text
large_string
मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळच्या सेंच्युरी बिल्डिंगचा भाग या दुर्घटनेत कोसळला. मुंबई - लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या लिक्विड नायट्रोजन टँकचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत इमारतीचा काही भाग कोसळला असून, या दुर्घटनेमध्ये एक महिला जखमी झाली आहे. मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळच्या सेंच्युरी बिल्डिंगचा भाग या दुर्घटनेत कोसळला. दरम्यान, या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुचित रश्मी कौर असे या जखमी महिलेचे नाव आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता हा अपघात घडला. साखरपा : दाट धुके आणि काळोखामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार झाला. अजय नीळकंठ शिंदे (वय-२५, रा. मठ धामापूर, ता. संगमेश्वर) असे या मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता घडला. याबाबत माहिती अशी की, अपघातग्रस्त ट्रक (एमएच ०४, केएफ ९८४१) रत्नागिरीहून बुधवारी (दि. २२) रात्री कोल्हापूरकडे सिमेंट घेऊन चालला होता. हा ट्रक संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - वाणीवाडी दरम्यान आला असता दाट धुके आणि काळोखामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. यामध्ये अजय शिंदे हा चालक ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक उलटताच मोठ्याने आवाज आल्याने ग्रामस्थ खडबडून जागे झाले. आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. मात्र, काळोखामुळे ग्रामस्थांना मदत कार्यात अडचण येत होती. सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ट्रक खाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याची ओळख पटली.
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : देशातली सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपले व्याजदर (Interest Rate) कमी करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर आज, 15 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. स्टेट बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. कर्जाचे व्याजदरही (Loan Interest rates) कमी झाल्याने गृह कर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Vehicle Loan), वैयक्तिक कर्जासह (Personal Loan) अनेक प्रकारच्या कर्जांचा मासिक हप्ता (EMI)कमी होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्टेट बँकेने बेस रेटमध्ये एक बेसिस पॉइंट (Basis Point) म्हणजेच 0. 05 टक्के कपात केली आहे. त्यामुळे या कपातीनंतर नवीन व्याजदर 7. 45 टक्के झाला आहे. याशिवाय बँकेने प्राइम लेंडिंग रेटमध्ये (PLR) 0. 05 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएलआर 12. 20 टक्के झाला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये स्टेट बँकेने गृहकर्जाचा दर 6. 70 टक्के केला होता. यासोबतच महिला ग्राहकांना 0. 05 टक्के अतिरिक्त सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गृहकर्जदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यामुळे मासिक कर्जाच्या हप्त्यात काहीशी घट होणार आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या अनेक ग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने अनेक जण घर घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं विचार करू लागले आहेत. त्यामुळे नवीन गृह कर्जदारांनाही घटत्या व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्रालाही होणार आहे. कोरोना संकटाचा फटका बसलेल्या या क्षेत्राला यामुळे चालना मिळेल. अर्थात ठेवींचे व्याजदरही यामुळे कमी होणार आहेत. त्यामुळे नवीन ठेवीदारांना ठेवींवर कमी व्याजदराने व्याजाचा लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेने निश्चित केलेला व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) निश्चित केलेल्या बेस रेटवर आधारित आहे. बेस रेट हा किमान व्याज दर असतो. याच्यापेक्षा कमी व्याजदराने कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेला सध्याचा आधार दर अर्थात बेस रेट 7. 30 ते 8. 80 टक्के आहे. जुलै 2010 नंतर घेतलेली सर्व गृहकर्जं आधार दराशी जोडलेली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेला सध्याचा एमसीएलआर (MCLR) दर 6. 55-7. 00 टक्के आहे. यावरूनच व्याजाचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे सर्व बॅंकांच्या व्याजदरात फार मोठा फरक नसतो. याचा लाभ कर्जदारांना होतो. सध्याच्या काळात तर कर्जदारांसाठी ही दिलासादायकच बातमी आहे. आता इतर बँकाही व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पुनः उघडले व " वादग्रस्त विषय आहे तो. जाऊं द्या तो. आणि तुमच्या या शारीरिक सुस्थितीची सांगा आह्याला गुरुकिल्ली. हो निदान बाह्यतः तरी तुह्मी जे असे तरुण दिसतां आहां, तें कशामुळं ?" अशी त्यांनीं पृच्छा केली. " बाह्यतः तरी ! " सुधाकर उद्गारले व मोठ्यानें हंसू लागले. " ह्मणजे वस्तुतः कांहीं मी तरुण नाहीं आप्पासाहेब, असंच ना ? पण आपल्याप्रमाणं ज्यांनां माझ्या पूर्वचरित्राची माहिती नाहीं त्यांनां मी खुराखरा तरुण वाटतो आहे त्याची वाट ? ज्यांनां माझं खरं वय ठाऊक नाहीं, त्यांना मी खरोखर विशी पंचविशीचा वाटतो हें खरं नाहीं का ? आपल्याला सुद्धां माझ्याप्रमाणं आजवर तरुण राहतां आलं असतं, आप्पासाहेब. पण- " " पण काय ? " श्रीमंतांनीं सोत्सुक प्रश्न केला. " पण त्याला आपणा स्वतःसंबंधी ज्ञान आणि सृष्टिज्ञान यांची जोड व्हायला हवी. पण आपण का यातायातींत पडतां ? मरणाकरितांच जगायचं, असाच जिथं आपला समज, तिथं तारुण्य रक्षण करून तरी काय करायचं ? आज नाहीं उद्यां मृत्युमुखी पडायचंच, मग तें आजच पडलं तर काय बिघडलं ! मग कुणी सांगितली आहे आपल्याला ही तारुण्यसंरक्षणाची खटाटोप असंच ना आप्पासाहेब ? " नाहीं, अशी नाहीं माझी समजूत." श्रीमंत शांतपणे ह्मणाले. " जगण्यांत हशील नाहीं, असं नाहीं मी समजत. जगायला मिळेल तितकं हवंच, नकोसं कसं वाटेल ? - " " असं खरं ना ?" सुधाकरांनी श्रीमंतांचें भाषण संपण्यापूर्वीच विचारिलें. "जगायला मिळेल तितकं हवंच, नाहींका ? आपण आजवर सुखाबरोबर दुःखहि चाखलींत, तीं कशाकरितां ? सिंहासनस्थ राजापासून पर्णकुटींतल्या रंकापर्यंत सर्व प्रकारच्या अवस्थेतलीं माणसं जन्मभर जीं खटाटोप करतात, तीं मृत्यु हेंच जीवनाचं अंतिम असतं तर करतीं का सर्वस्व विनाश हीच जर जीवनाची शेवटची पायरी असती, तर महत्त्वाकांक्षा कोण धरतं ? अर्थसंचयाकरितां कोण धडपडतं? कीर्तिकरितां कोण प्राण देतं प्रेमा करितां कोण सर्वस्वाचा यज्ञ करतं? करतं का ? जीवन हें मृत्यूकरितां असं असतं, तर अनंत ब्रह्मांडमालांची उत्पत्ति हें केवढं महत्पातक ठरतं. " कोणीहि कांहीं बोललं नाहीं. सुधाकरांची दृष्टि विजेप्रमाणे सर्वांवरून फिरली. यावर उत्तरच येणें शक्य नाहीं. आणि माझ्या तारुण्याचं रहस्य तें यांतच आहे. मृत्यु असा कुठंच नाहीं. जें कांहीं विश्वांत दिसतं तें स्थित्यंतर. या गोष्टीचीं चिरंतन जाणीव हीच तारुण्यसंरक्षणाची गुरुकिल्ली. ज्या अणूपरमाणूंनी आपला देह घडलेला आहे, त्याचं स्थित्यंतर अखंड चाललेलंच असतं. त्या स्थित्यंतराचं जनन आपल्या जन्माबरोबर किंवा आपल्या जन्मापूर्वीच. आतां तारुण्यरक्षण हें ज्याचं इष्ट, त्यानं करायचं काय? तर आपल्या मनाच्या आणि इच्छाशक्तीच्या साहाय्यानेंहि स्थित्यंतरक्रिया अशा रीतीनं चालवायची की ती आपल्याला हितकर होईल म्हणजे आपलं इष्ट पुरवील. माझंच उदाहरण घेऊं. मी हे जाणून आहे की प्रत्येक क्षणीं माझ्यामध्ये कांहीं विशिष्ट कार्याकरितां स्थित्यंतर होतं आहे. तेव्हां मी करायचं इतकंच, कीं तें स्थित्यंतर माझ्या शारीरिक आरोग्याला वर्धक असं होईल, तें पहायचं. त्या आरोग्याला विघातक, असं तें न होईसं करायचं. तें स्थित्यंतर माझ्या तारुण्याला वर्धक असं कसं होईल तें पहायचं. वार्धक्याला पोषक असं तें न होईलसं करायचं ह्मणजे त्याचा अर्थ काय तर माझी शारीरिक उन्नति वा अवनति ही माझ्याच हातीं आहे. मी आजारी पडलों, तर त्याबद्दल माझा मीच जबाबदार. मी वृद्ध झालों तर माझा मीच जबाबदार ह्मणजे माझी इच्छा, तसा मी. मीच स्वतःला हवं तसं बनवितों. आणि ज्या सृष्टिनियमांनीं मी अस्तित्वांत आलों, तेच नियम मला या कामीं साहाय्यक होत असतात. " " आपली जशी इच्छा, तसे आपण होऊं असं जर असेल तर आपल्यापैकी कोण सहस्रायु होऊं पहाणार नाहीं ?" डॉ. भास्कररावनीं विचारिलें. " खात्री आहे आपली अशी ?" सुधाकरांनीं प्रश्न केला. " प्रत्येक जण सहस्रायु होईलसं खरंच वाटतं आपल्याला ? कोण काय होऊं पाहील, तें त्याच्या परिस्थितीवर स्वतःच्या निवडीवरच अवलंबून राहील. तुमचीच गोष्ट घ्या. तुझाला सहस्रायुच होऊन रहावंसं नाहीं वाटत, खचित त्याहून दुसरंच कांहीं व्हावंसं वाटतं आहे डॉक्टर तुझाला, नाहीं ?" दुसऱ्याच्या मनांतले विचारहि कळतात वाटतं सुधाकर तुझांला ?" श्रीमंतांनीं अकल्पित प्रश्न केला. सुधाकर सस्मित त्यांच्याकडे पाहू लागले. " बरीच मंडळी अलीकडे त्या विद्येच्या नादीं लागली आहे." सिगारेट पेटवीत डॉक्टरनी उद्गार काढले. "त्या विद्येत कठीण असं कांहीं नाहीं ह्मणा." कठीण कठीण तें काय आहे कशांत ?" सुधाकर ह्मणाले. " तर मग तेवढी ती आंगठी काढा बरं डॉक्टर तुमच्या खिशांतली. तुझी ती मुद्दाम मला दाखविण्याकरितां आणली आहे, बरोबर नाहीं? किती किंमतीची होईल तें विचारावयाचं आहे आपल्याला मला, नाहीं का ?" डॉक्टरांच्या तोंडची सिगारेट खालीं पडली व ते टकमक पहात राहिले. 'आश्चर्या तिरेक ' ज्याला ह्मणतात, तो मला त्यांच्या ठिकाणीं चांगला पहायला मिळाला. श्रीमंतहि आरामखुर्चीवर उठून बसले व सुधाकरांकडे टकमक पाहू लागले. पण - पण आपल्याला कळलं कसं मी खिशांत आणली आहे ह्मणून ?" डॉक्टरानीं संकप स्वरांनी विचारिलें. सुधाकर हंसू लागले. " विचारवाचनविद्येनं तिच्यांत कठीण असं कांहीं नाहीं. तुम्हीच आतां ह्मणालांत डॉक्टर. मग त्यांत विशेष तें काय बरं काढा ती आंगठी बाहेर आतां." सुधाकरांनी असं ह्मणतांच डॉक्टर अगदीं गोंधळून आंगठी आणली आहे खरी मी बरोबर. डॉक्टरांनी स्थिर होऊन सिगारेट उचलून घेत उत्तर दिलें. " ह्मटलं, ती आपल्याला दाखवून तिची आदमासिक किंमत विचारावी; तसंच ती किती वर्षांची जुनी आहे तेंहि आपल्याला सांगतां आल्यास विचारून घ्यावं." असे ह्मणून धूर सोडीत त्यांनी आपल्या जॅकिटाच्या खिशांतून एक चांदीची डबी बाहेर काढली व ती उघडून तिच्यांतील आंगठी सुधाकरांच्या हातीं दिली. आंगठीचा हिरा लखकन लकाकला. त्या सरशीं सुधाकरांनी ब्रह्मारण्यांत दाखविलेल्या दृश्यांपैकी एकाची आठवण झाली. चितारी शिवकरण याचा वध ज्या हातानें केला, त्या हाती अशीच देदीप्यमान हिन्याची आंगठी लकाकल्याचें मला एकदम आठवलें. सुधाकर त्या आंगठीचें निरीक्षण करीत असतां मी तिकडे एकाग्रतेनें पहात राहिलें. फार जुनी आंगठी आहे ही " सुधाकरांनीं तिज कडे पहात उद्गार काढिले, व आपली दृष्टि डॉक्टरांकडे वळवून ते ह्मणाले "निदान चारशे वर्षांची जुनी आहे. रजपूत घडण आहे ही. रजपूत राजाची असावी ही मूळची. हा हिरा जर बोलूं शकेल, तर काय अद्भुत गोष्ट सांगेल हा. अमंगल रत्न आहे हें." "अमंगल तें कसं !" उषा जी इतका वेळ मुकट ऐकत होती, तिनें विचारलें. "अमंगल ह्मणजे, याचा दुरुपयोग झालेला आहे, जं अमंगळ कामीं लागलेलं आहे असं. अशा रत्नांपैकी आहे हा हिरा मौल्यवान् रत्नांत एक प्रकारचं चैतन्य असतं. त्या चैतन्याच्या योगानं त्यांच्यांत परिस्थितीचीं चित्रे ग्रहण करण्याची शक्ति असते. त्या हिन्यांत कित्येक अमंगल प्रकारची चित्रे उमटलेली दिसताहेत. फार दुःखाचे प्रकार दिसतात ते." सुधाकरांचे हे उद्गार डॉ. भास्करराव निमूट ऐकत होते. ते थांबल्यावर सिगारेट फेकून डॉक्टर घुटमळत बोलू लागलेया आंगठीचा पूर्वेतिहास कांहीं मला माहीत नाही. आमचे वडील उत्तर हिंदुस्थानांत संस्थानचे कारभारी असतां तेथल्या महाराजांकडून त्यांनां ती देणगी ह्मणून मिळाली. त्यांच्या पश्चात् ती मजजवळ आहे. मी इंग्लंडांत असतां एका रत्नपारख्याला ती दाखविली होती. त्यांनी मला ती विकून टाकायला सांगितली. पण ती कल्पनामुद्धां मला सहन होत नाहीं. इतकी ती मला आवडते. " स्वाभाविकच." असं म्हणून सुधाकरांनी ती उषेकडे केली. उषेनं ती हातीं घेतांच तिची मुद्रा भीतिप्रस्तशी मला दिसली. तिनं ती लागलीच श्रीमंतांच्या हाती दिली. श्रीमंतांनी ती क्षणभर पाहून मजजवळ दिली. मी ती घेऊन रामभाऊंकडे करतांच डॉक्टरांनी त्यांच्या जवळून घेतली व डबींत घातली. पण अशा तऱ्हेच्या अमंगळ रत्नांचा ती ज्याजवळ असतील त्याच्यावर कांही अनिष्ट असा परिणाम होतो का ?" श्रीमंतांनी विचारिलें. अर्थात् झालाच पाहिजे. त्याच्या उलट चांगले संस्कार झालेल्या म्हणजे मंगळ रत्नाचा अत्यंत हितकर परिणाम होत असतो. " असे म्हणून सुधाकरांनी आपल्या बोटांतील आंगठी काढली. हरणार्थ, ही आंगठी पहा, हिजवर कसलेहि अमंगळ संस्कार झालेले नाहींत. अगदर्दी शुद्ध आहे हिचा हिरा. त्यामुळं याचं तेज पहा कसं चंद्रप्रभेप्रमाणें आहे आनंददायक आणि ही जुनीहि फार आहे. हजार वर्षाची जुनी आहे ही. " आह्मी सगळ्यांनी ती हातांत घेऊन पाहिली चंद्रप्रभेप्रमाणे त्या हिन्याचें तेज खरोखरच आनंद दायक आहे असे मला वाटलें. " रत्नं मंगल करण्याचं काम स्त्रियांचं." मजकडे सस्मित पहात सुधाकर ह्मणाले; "तें त्यांनीं केलं, ह्मणजे त्यांच्या प्रमाणं रत्नंहि सर्वानां आनंद व सुख देऊन मंगलदायक होतात. " " सोपंच काम आहे स्त्रीवर्गाकडे सुधाकरांच्या ह्मणण्याप्रमाणं." श्रीमंतांनी विनोद केला. " स्त्रियांनां ते खरोखरच सोपं आहे." सुधाकर ह्मणाले; " आपली पुरुषांची मात्र गोष्ट निराळी. आपल्याला त्या कामाइतकं कठीण दुसरं कामच नाहीं. आपल्याला ह्मणजे सामान्य पुरुषांनां अपवादरूप पुरुषांची गोष्ट नाहीं बोलत मीः पण आपण जांभया यायला लागलां आप्पासाहेब आपली वामकुक्षि मी पळवितों आहे, नाहीं? गादी टाकून द्यायला सांगूं का गड्याला ?" " नको नको, " श्रीमंत जांभई देत ह्मणाले. "घरींच घेईन ती अंमळशानं इथं पळवितों तिला जराशी, चला हिंडू थोडा वेळ इकडे तिकडे." असें ह्मणून ते उठले, त्याबरोबर सुधाकरहि उठले व ते दोघे बोलत बोलत तेथून निघून गेले. डॉक्टर व रामभाऊ हेहि त्यांच्या पाठोपाठ निघून गेले; तेव्हां मी आणि उषा दोघीच तेथं राहिलों. ह्रीं मतं तुला पसंत असणारच गीते. नाहीं ?" उषेनं विचारिलें. कोणतीं मतं ? " मी उलट विचारिलें. हीं - मृत्यु असा नाहींच; तसंच आपलीं फक्त स्थित्यंतरं होत असतात. आतां सुधाकरांनी सांगितलेल्या गोष्टींवर तुझी श्रद्धा असणारच ह्मणा. ह्या गोष्टी जर खन्या असतील, तर काय ग तरी भयंकर. मग मृत्यूच्या सुखाला आपण आंचवलोंच, नाहीं? निदान माझ्यासारख्या जीवाला कंटाळलेल्या स्त्रियांनां तरी मृत्यु हें सुख नाहीं का ग?" "खरंच ह्मणतेस उषे." मी संकप स्वराने तिला ह्मटलें. " आपणासारख्या स्त्रियांनां मृत्यु हा पुष्कळ वेळां खरोखरच सुखाचा होतो. आपणावर ममता करणारं कोणी नसलं, जग शून्यसं वाटायला लागलं. ज्यांनां आपण आपलंसं ह्मटलं, तींच आपल्याला परक्यासारखीं लेखूं लागलीं, ह्मणजे मरण हें सुखाचं कां नाहीं वाटणार ? प्रेमावांचून जिणं, अनंतकाळचं जिणं कोणाला हवंसं वाटेल? अशा स्थितींत खरा मृत्यु - खरा विनाश - किती सुखाचा ?" मला पुढे बोलवेना; डोळे पाण्याने भरून आले. उषेनें तें पाहिले व ह्मटलें, "गीते, तुला वाईट वाटायला काय झालं ग तूं सदाची आनंदी, तुला ? दुःख कसलं ! आलेला गहिंवर दावून मी ह्मणाल्यें, "नाहींग, मला आपलं वाईट वाटलं कीं माझं आजपर्यंतचं जिणं कसं वेड्यासारखं झालं, इतकंच. दुसरं कांहीं नाहीं उषे. " उषेला माझ्या बोलण्याचा अर्थ कसा कळणार ? ती मुकट मजकडे पहात राहिली. तिच्या तो लक्षांत येऊं नये, ह्मणून मी विषयच पालटला. पण हो," मी ह्मटलें, "मी जाईन ह्मणत्य एक दोन दिवसांत इथून पुष्कळच राहिल्यें मी तुझ्याकडे जावंच आतां हो तुलाहि माझ्या सहवासापासून मोठंसं सुख वाटतं आहे असं नाहीं. नि मलाहि - " उषा गांभिर्याने माझ्याकडे पाहू लागली. "गीते, मलाहि असंच वाटायला लागलं आहे कालपासून तुलाहि असंच वाटावं यांत नवल नाहीं ?" नवल नाहीं उषे." मी उत्तर केलें. "दोघींनां एकमेकींकडे ओढणारं असं कांही तरी दोघींत आहे, त्याचप्रमाणं दोघींनां एकमेकींपासून ओढणारं असंहि कांहींतरी दोघींत आहे, त्याचा हा परिणाम. तें काय आहे, तें तुलाहि सांगतां यायचं नाहीं, मलाहि सांगतां यायचं नाहीं. पण तसं कांहीं तरी आहे खास. असे प्रकार पुष्कळांमध्ये झालेले मी पाहिले आहेत; पण असं कां व्हावं तें कोण सांगणार ? तें गूढच नाहीं का ?" " पण - " उषेनं ह्मटलें. " पण हे तुझे सुधाकर इथं येईपर्यंत असं नव्हतं ग कधीं वाटलं मला नि तुलाहि खास " ती पुढे कांहीं बोलणार, तों सुधाकर आणि श्रीमंत घाईघाईनें आंत आले. " ब्रह्मारण्याकडे जायचं ह्मणताहेत आप्पासाहेब, रोजची वामकुक्षि टाकून तुझी दोघीहि येतांना ? सुधाकरांनी प्रश्न केला. मला नकळत मी 'होय' ह्मटलं. उषा घुटमळली. " आतां चहा घेऊं, नी जाऊं. मग तुझी काय हरकत आहे ?" श्रीमंतांनीं उषेला विचारलें. "पण तुम्ही येणार आतां !" उषा साश्चर्य उद्गारली. "होय ग, सुधाकरांनी सुचवलं, ब्रह्मारण्याकडे जाऊं ह्मणून ह्मटलं जाऊं ते ह्मणताहेत तर, ही गीता येते आहे. मग तुलाच मागं राहून काय करायचं ?" उषेचा निरुपाय झाला. " चला तर " करून ती तों चहा, बिस्किटें, फळें टेबलावर येऊन थडकलीं. "सारा बेत कसा घड्याळासारखा सुधाकर तुमचा, " श्रीमंत उद्गारले. " तसा तो व्हावा असा प्रयत्न करतों झालं. प्रत्येक बाबतींत आणि प्रत्येक खेपेला तो तसा जमतोच, असं थोडंच आहे ? बरं मग उशीर का ? उचलायचा चहा." असें ह्मणून सुधाकरांनी आपला दुधाचा कप उचलला. ' जलतरंग' थांबले पण त्यानें माझ्या हृदयांत उत्पन्न केलेले तरंग कांहीं थांबले नाहींत. मला जखडून टाकणारी शृंखला खरोखरच का अभेद्य आहे ? या विचारानें माझें हृदय धडधडूं लागलें; डोळे भरून आले. ज्या विकार - विचारांबरोबर माझें मन वहात होतें, ते मला बोलूं देईनात. अशा स्थितींत - माझ्या या निःशब्द स्थितींत, मोटार एकदम थांबली. तेव्हां कोठें मी भानावर आल्यें व पहात्यें, तर ब्रह्मारण्याच्या कांठावरील कालचेंच मोटार थांबण्याचें ठिकाण. " उतरायचं आप्पासाहेब" म्हणून सुधाकर उत रले. त्याबरोबर श्रीमंत, उषा, मी, डॉक्टर आदि आम्ही सर्व उतरून अरण्यांत प्रवेश केला. सुधाकरांचा नोकर मोटारीजवळ राहिला, हे सांगावयास नकोच. " हें पहा आप्पासाहेब, " सुधाकरांनी डोकीवरील वृक्षशाखांकडे हात करून झटले; " हे वृक्ष पहा. यांतील बहुतेक, फांद्यांत फांद्या अडकवून, लवून वांकून परस्परांच्या उन्नतीला अवरोध करीत आहेत. एखादाच तसं न करितां सडक वर जाऊन नभोदर्शन घेतो आहे. बहुजन समूहहि त्या वृक्षाप्रमाणें गतानुगतिक होऊन, परंपरेस बिलगून खऱ्या उन्नतीस अवरोध करीत असतो. त्यांतला एखादाच तसं न करितां गतानुगतिक न होतां-सडक वर जातो व सत्यदर्शन घेतो, नाहीं ?" सर्वांनी चहाला आरंभ केला. डॉक्टर भास्करराव विशेष गंभीर दिसले. बरोबर येण्याचें त्यांच्या मनांत नसतां 'सेवाधर्म' ह्मणून त्यांनां येणे भाग पडलें असा ह्या गांभीर्याचा मी अर्थ केला. चहा आटोपतांच मंडळी जायला सज्ज झाली. " चलायचं. " असें सुधाकर म्हणतांच केवळ कर्णमनोहर असे संगीत स्वर ऐकू येऊं लागले. सुधाकरांच्या यांत्रिक जलतरंगाच्या लहरी होत हैं सांगावयास नकोच. सुधाकर, श्रीमंत, उषा, मी, डॉक्टर व रामभाऊ हीं सर्व मोटारींत चढतांच ते स्वर थांबले व सुधाकरांचा 'साइस' मागें उडी मारून चढतांच टार सुरू झाली. प्रकरण अकरावें 'प्रेमपथ ' " खरं आहे सुधाकर, " श्रीमंतांनी उत्तर केलें. समाजबंधनं वाढलीं, व्यक्तिस्वातंत्र्याला वाव नाहींसा झाला, म्हणजे व्यक्तिवाद - व्यक्तिस्वातंत्र्यहि प्रचारांत आणण्याकरितां समाजाला धाब्यावर बसवावं लागतं. पण तें धैर्य फार थोडक्यांतच सांपडतं. म्हणूनच अशांनां महात्मे समजतात व त्यांचे गोडवे गातात." पण -पण - " डॉक्टर अडखळत बोलू लागले. पण - पाश्चात्य देशांत तर आज व्यक्तिवाद ढांसळून पडतो आहे व त्याच्या जागीं समाजशास्त्राची ध्वजा उभारली जात आहे. मग त्या व्यक्तिवादाची आपल्याकडे प्रस्थापना करून कसं चालेल ?" " कां बरं ?" सुधाकरांनी उत्तर केलें, "कां नाहीं चालणार ? पाश्चात्य देशांत व्यक्तिवादाचा कळस झाला; व्यक्ति कोणतीहि सामाजिक बंधनं ओळखीनाशी झाली व त्यामुळं समाजाला 'समाजपण' उरतं कीं नाहीं, अशी वेळ आली; म्हणून आज तिकडे व्यक्तिस्वातंत्र्याच्या जागीं समाजवादाची, सामाजिक कर्तव्याची स्थापना होत आहे. पण आपल्या इकडे तसं आहे का ? आपल्या इकडे त्याच्या उलट प्रकार नाहीं का ? आपल्या इकडे समाजानं व्यक्तित्व खाऊन टाकलं आहे; व्यक्तीला अस्तित्वच उरलेलं नाहींसं झालं आहे, व त्यामुळं समाज ज्या अनिष्ट परंपरेस बिलगून राहिला आहे, ती प्रकरण अकरावें मोडणं अशक्यसं झालेलं आहे. म्हणूनच इकडे आजकाल कशाची गरज असेल, तर व्यक्तिवादाची. समाजवाद आपल्याला आज नको आहे. समाजाकरितां व्यक्तीनं आत्मयज्ञ करण्यापेक्षां व्यक्तीकरितां समाजानें आज आत्मयज्ञ केला पाहिजे. व्यक्तीच्या वाढीकरितां समाजानं आपलीं बंधनं आज ढिलीं केली पाहिजेत, तरच तरणोपाय आहे. समाज आपण होऊन तीं बंधनं ढिलीं करणार नाहीं, तर व्यक्तीनं तीं ढिलीं केली पाहिजेत. धार्मिक, सामाजिक व औद्योगिक सर्वच बाबतींत व्यक्तिस्वातंत्र्याचा परिपोष व्हायला हवा. तरच आपला समाज या बाबतींत पूर्वीचं उच्चपद मिळवील असं नाहीं वाटत आपल्याला श्रीमंत ?" श्रीमंत घुटमळले. एक सामजिक सुधारणेची बाब कायती त्यांनां ठाऊक. इतर बाबींविषयीं ते काय बोलणार ? " आहे - आहे - बरोबर आहे तुमचं ह्मणणं," ते शेवटीं ह्मणाले. तितक्यांत उषेने त्यांना काय विचा रिलें; तेव्हां तिच्याशीं ते बोलू लागले. एव्हांना आह्मी ब्रह्मारण्याच्या मध्यावर आलो. श्रीमंत व उषा, डॉक्टर व रामभाऊ, आणि सुधाकर व मी अशा इतउत्तर जोड्या होऊन आह्मीं बोलत बोलत जाऊं लागलों. पहिल्या दोन जोड्या पुढे असून आमची जोडी सर्वांच्या मागें होती. "तुला मजजवळ बोलायचं आहे एकट्याशीं नाहीं ? " सुधाकरांनी मला विचारलें तूं काय बोलणार आहेस तें मला ठाऊक आहेच ह्मणा. " " मग मी बोलायला नकोच तें." मी उत्तर केलें. "नकोच, खरंच नको. पण "तूं तें बोलून टाकल्यानं समाधान वाटेल तुला आणि मला दोघांनांहि पण तुला संकोच तरी कां वाटावा आतां माझ्याशीं बोलायला ?" संकोच," मला कसेंसेच वाटून मी उद्गारल्यें. " संकोच कां वाटेल ?" नाहींना. पण खरंच का है ?" मी दृष्टी वर करून त्यांच्याकडे पाहिलें; ते सस्मित दिसले. माझ्या हृदयांतील धडधड क्षणांत बंद झाली. " मला काय होतं आहे नि काय नाहीं, सांगायला का हवं मी ? " मी हलकेंच झटलें. " हा सगळा प्रकार किती अकल्पित घडून आला आहे बरं ? नि ही ही मंडळी अशा प्रकारची. तेव्हां कांहींसा संकोच कां नाहीं वाटणार ? एरव्हीं बोलत्यें, तितकं मोकळेपणानं कसं बोलवेल अशा स्थितींत ? आपली गोष्ट निराळी. पुरुषांची गोष्टच निराळी नि शिवाय आपल्याला का ह्या असल्या माणसांचा संकोच वाढणार ? पण माझी गोष्ट निराळी. लवकरच आतां मी इथून गेल्यावर कदाचित् मला या सगळ्या प्रकाराचा शांतपणानं विचार करतां येईल; नि मग थोडा फार धीर येईल बोलायला." काय. तूं जाणार लवकरच ? " सुधाकरांनीं शांतपर्णे विचारिलें. " ह्मणयें तसं. वरं नाहीं का आतां जाणं ? " सुधाकर कांहींच बोलले नाहींत. मी पुढें ह्मटलें अशा स्थितीत काय करावं, तेंच मला कळत नाहीं. आपणच साहाय्य करायला हवं मला अशा प्रसंगीं.' "मी ? मी साहाय्य करूं ? " सुधाकरांनीं विचारिलें. "पण तूं इथून गेल्यावर मी साहाय्य तें कसं करणार ?" सुधाकरांचे हे सखेद स्वर ऐकून आतां काय करावें, तेंच मला कळेना. " मी जायें आहे, ती इकडच्या सहवासाला मी पात्र आहे असं मला वाटतं, तर जायें का मी ? मला पुढे बोलवेना असे पाहून त्यांनी माझा एक हात आपल्या हातीं घेतला; " मी ही अशी विक्षिप्त, दुराग्रही, आपल्या सहवासाला सर्वथैव अपात्र. नाहीं का ? कित्ती बोलायचं आहे मला पण-पण. या मंडळीला काय वाटेल ?" कांहीं नाहीं वाटत त्यांनां, " माझा हात आपल्या हात ठेवून सुधाकर ह्मणालेः " त्यांनां आपलं संभाषण ऐकूंच जाणार नाहीं, किंवा आपलं कांहीं संभाषण चाललं आहे, हेंहि त्यांच्या लक्षांत येणार नाहीं, इतके त्या सगळ्यांनां मी दूर त्यांनां नकळत दूर ठेवतों. ह्मणजे तर झालं ?- बघ. ते बघ. सगळेच जलद चालूं लागले. हं. आतां बोल, तुला काय बोलायचं आहे तें ?" मी दृष्टि वर केली. त्यांची दृष्टि मजवर प्रेमाचा वर्षाव करीत आहेशी मला वाटली. आपल्या पूर्वसंबंधाविषयीं, आपल्या पूर्व ऋणानुबंधाविषयीं तुला कांहीं कळायचं राहिलं आहे का ?" त्यांनीं सौम्यपणें विचारलें. " आपल्याला त्याचं ज्ञान जितकं आहे, तितकं मला आहे का ? मी फार तर काळोखांत चांचपडतें आहे, आपल्या हाताच्या आश्रयानं चांचपडत चालतें
Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. या स्पर्धेत शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स त्यांचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. पण याचदरम्यान केकेआरला धक्का देणारी एक बातमी आली आहे. त्यांच्या संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू पुढील काही सामन्यांना मुकणार आहेत. हे दोन खेळाडू म्हणजे शाकिब अल हसन आणि लिटन दास. सध्या हे दोन्ही खेळाडू बांगलादेशमध्येच आहेत. सध्या आयर्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात या दोन्ही संघात वनडे आणि टी२० मालिका झाली आहे. आता एकमेव कसोटी सामना बाकी आहे. या कसोटी सामन्यासाठी शाकिब आणि लिटन या दोघांचाही बांगलादेश संघात समावेश आहे. त्याचमुळे राष्ट्रीय संघाच्या वचनबद्धतेमुळे या दोघांनाही किमान ८ एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही. बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ४ ते ८ एप्रिल दरम्यान होणार आहे. या सामन्यात शाकिब आणि लिटन खेळताना दिसू शकतात. त्याचमुळे हा सामना संपल्यानंतरच ते केकेआरसाठी उपलब्ध राहणार आहेत. याआधी या दोन्ही क्रिकेटपटूंना बांगलादेशकडून आयपीएलमध्ये सुरुवातीपासून सामील होण्याची परवानगी मिळेल अशी चर्चा होत होती. पण आता त्यांची कसोटी सामन्यासाठी बांगलादेश संघात निवड झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता केकेआरकडून सुरुवातीचे काही सामन्यांना त्यांना मुकावे लागेल. हे दोघेही नुकतेच आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेत खेळले होते. या दोघांनीही या मालिकेत दमदार कामगिरीही केली होती. लिटनने सर्वात जलद टी२० अर्धशतक करण्याचा विक्रमही केला होता. तसेच शाकिब फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावतो. याच कारणामुळे सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या या दोन्ही खेळाडूंची केकेआरला प्रतिक्षा आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे केकेआरला ८ एप्रिलपर्यंत पंजाब किंग्सनंतर आता फक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध एकच सामना खेळायचा आहे. त्यामुळे त्यानंतरच्या सामन्यांसाठी शाकिब आणि लिटन केकेआरसाठी उपलब्ध होऊ शकतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केकेआरचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे अनुपलब्ध आहे. त्याच्याऐवजी नितीश राणा केकेआरचे नेतृत्व करत आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
तारापूर (पालघर) : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाली. यामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामगारांना विषारी वायूची लागण झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना विषारी वायूची लागण झाली. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाली. यामुळे तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर या कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात आणल्यानंतर संबंधीत रासायनिक वायुचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करत असताना डॉक्टरांना चक्कर आल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
खाल्लेलं अन्न नीट पचत नाही, सकाळी उठल्यावर पोट साफच होत नाही. सतत अॅसि़डीटी-गॅसेस अशा पचनाशी निगडीत समस्या उद्भवतात. असं तुम्हालाही होत असेल तर पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी तुम्हाला काही उपाय करणे गरजेचे असते. व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन आणि बैठी जीवनशैली यांमुळे पचनाशी निगडीत समस्या उद्भवतात. पण पोट नीट साफ झाले तरच आपल्याला फ्रेश वाटते आणि दिवस चांगला जातो. अन्यथा आपल्याला अस्वस्थ वाटत राहते. नैसर्गिकरित्या पोटातील अनावश्यक घाण बाहेर येणे म्हणजेच पोट साफ होणे आवश्यक असते. पण असे होत नसेल तर रात्री झोपताना काही सोपे उपाय करता येतात. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी यासाठी काय करायचे ते सांगतात. नियमितपणे जेवल्यावर ५ ते १० मिनीटे या २ गोष्टी केल्यास आपली पचनक्रिया नक्कीच सुधारण्यास मदत होते (2 Easy Home Remedy For Digestion Problem). जेवण झाल्यावर वज्रासनात बसणे हा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. पाय गुडघ्यात दुमडून पायांवर बसणे म्हणजे वज्रासन. दिसायला हे आसन सोपे दिसत असले तरी ३ ते ५ मिनीटे या आसनात बसणे काहींसाठी अवघड असू शकते, मात्र सरावाने ते जमते. खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारख्या समस्या दूर होतात. तसेच पेल्विक स्नायू मजबूत करण्यासाठीही हे आसन उपयुक्त असते. जेवण जास्त झाले असेल आणि पोट जड झाले असेल तर वज्रासनातच बसून केले जाणारी ही पुषण मुद्रा अवश्य करायला हवी. यासाठी उजव्या हाताची पहिली २ बोटं अंगठ्याला जोडावीत आणि डाव्या हाताची मधली २ बोटं अंगठ्याला जोडावीत. आणि हात गुडघ्यावर ठेवून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. सुरुवातीला ३ ते ५ मिनीटे करुन हळूहळू याची वेळ वाढवत न्यावी. एकदा जमायला लागल्यावर तुम्ही १५ मिनीटांपर्यंत ही मुद्रा करु शकता.
त्रुटी अनुप्रयोग "Google Play सेवा" आली - निराकरण कसे? कदाचित आम्ही Android-साधने मालक, अशा सेवा सह चेहर्याचा की Google Play सारखे म्हणू नये. दुर्दैवाने, आपण प्रणाली वापरता तेव्हा बरेचदा अनुप्रयोग "सेवा Google Play" त्रुटी असा संदेश, थोडक्यात वर्णन आणि दोष कोड त्यानंतर दाखवतो. च्या, पाहू कारण आहे आणि ते कसे लढा आहे काय करू या. Google काय आहे प्ले? एक थोडे अंतर सुरू आणि Google Play सेवा, अद्याप Play बाजार किंवा Android Market म्हणून ओळखले आहे काय पाहू. या दूरस्थ फाइल संचयन, Android ऑपरेटिंग सिस्टम वापरली सॉफ्टवेअर आणि मल्टिमिडीया सामग्री प्रस्तुत जे खरं तर. हे अक्षरशः AppStore सेवा, "सफरचंद" साधने ऍपल डिझाइन म्हणून समान आहे. आपण सर्व सामग्री स्पष्टपणे सामग्री प्रकारानुसार रचना आहे जेथे, उदाहरणार्थ, कार्यक्रम, खेळ, संगीत, चित्रपट, पुस्तके, आणि त्यामुळे वर. डी सेवा स्वतः पाहतो तर मुळात आपण सादर दिले आणि मुक्त सामग्री आहे काय लक्ष देणे आवश्यक आहे . सर्वात सामान्य - अगदी Google Play सर्व्हर त्रुटी सेवा काही कार्यक्रम किंवा खेळ खरेदी तरी. कोण अशा अपयश बहुधा कारणे, तसेच समस्या निवारण सूचवलेले पद्धत विचार केला जाईल. का Google Play सेवा त्रुटी येतात का? क्रॅश आणि त्रुटी संदेश सर्वात सामान्य कारण सेवा कॅशे उतू मानले जाते. कधी कधी त्रुटी Google Play डेटा अनधिकृत फर्मवेअर प्रतिष्ठापन संबद्ध केले जाऊ शकतात किंवा अगदी सेवा स्वतः सुधारणा होत आहे. काही प्रकरणांमध्ये, कदाचित, अयोग्य वापरकर्ता ओळख (विद्यमान खाते अंतर्गत सेवा सुरू करण्यास असमर्थता) आहे. शेवटी, मूळ तर सॉफ्टवेअर प्रतिष्ठापन काढण्यायोग्य मेमरी कार्ड वर केला आहे, साहजिकच तो फक्त सदोष आहे किंवा तिच्या पुरेशी जागा नाही आहे असे गृहीत धरते आहे. प्रथम पण पहिल्या गोष्टी. त्रुटी प्रकार म्हणून, जवळजवळ सर्व अनुप्रयोग, कार्यक्रम, खेळ, किंवा सुधारणा आधीपासूनच स्थापित ची स्थापना करताना सामग्री लोड संबंधित. सर्वात वारंवार त्रुटी कोड 413, 491, 492, 498, 905, 919, 921, 923, 927, आणि त्यामुळे वर. ई फक्त नाव. अनेक अस्पष्ट, तथापि, का सेवा विविध कोड सह अपयश च्या वाणांचे एक प्रचंड संख्या, ते सर्व समान मूळ कारण आहे जरी उपलब्ध आहे. त्रुटी आली अनुप्रयोग "Google Play सेवा", काय हे बहुतांश घटनांमध्ये अर्थ आहे? सेवा विस्कळीत, सामान्य स्पष्ट काहीतरी होते. कधी कधी, उदाहरणार्थ, आपण त्रुटी 921 Google Play, जे, ती म्हणते म्हणून प्रणाली, अज्ञात आहे नंतर पुन्हा, हे केवळ काही सामग्री डाउनलोड नाही किंवा सुधारित करू शकता सूचित करते की मिळेल म्हणायचे ते पुरे. तथापि, एकदा सर्व बग समान प्रकारचा आहे, आणि जवळजवळ सर्व प्रकरणात त्यांच्या उपाय पद्धती समान आहे आणि फक्त तीन गोष्टी रक्कमः कॅशे आणि डेटा अनुप्रयोग, सेवा दुर्गम अद्यतने आणि योग्य नोंद खाते साफ करा. Google Play वर बाजार त्रुटी दृष्टीदोष काम क्षमता काढता येण्याजोगे माध्यम संबंधित केले जाऊ शकते असे सांगणारे न जातो, पण या नंतर चर्चा करता येईल. दरम्यान, सर्वात सोपी उपाय लक्ष केंद्रित करा. त्यामुळे आम्ही डेटा डाउनलोड प्रक्रिया किंवा अनुप्रयोग सुधारणा येते की अज्ञात Google Play त्रुटी गृहित धरू. काही कारणास्तव, प्रणाली आणि सेवा स्वतःच अज्ञात कारण मूळ सूचित अशा अपयश ओळखले जाते, नाही. सहसा ती एक चूक आहे 921 Google Play. सेटिंग्ज वर जा आणि मोबाइल डिव्हाइस निवडा जेथे अनुप्रयोग मेनू, आणि नंतर Google Play साठी पाहूः पूर्ववर्ती दृश्य, हे खालील गोष्टी करणे आवश्यक आहे. क्लिअरिंग कॅशे आणि डेटाः इच्छित विभागात मुख्य मेनू प्रवेश तुम्ही दोन बटण वापरू शकता. लक्षात ठेवा की त्रुटी कोड 905 असू शकत नाही, तर अद्यतने शकते स्पर्श करू. Google कडून अज्ञात त्रुटी कोड 921 फक्त या पद्धतीने पूर्णपणे काढली खेळा. त्रुटी कोड 905 एक अपयश या अप्रिय परिस्थिती संबंधित, स्थापित सुधारणा सेवा सर्व काढण्यासाठी तेथे आहे. पूर्णपणे आपण काही प्रकरणांमध्ये सुधारणा हटविण्याची आवश्यकता असू शकते Google च्या सर्व सेवांवर. वरील उदाहरणात, तो सेवा व्यवस्थापन मेनू मध्ये अद्यतनित करा बटण काढण्याची पुरवते असे म्हटले होते. तेथे, भयंकर काहीही होणार नाही आपण हे केल्यास, आणि नंतर डिव्हाइस रीस्टार्ट करा. आपण आपोआप सेवा अद्यतन करेल इंटरनेट पुन्हा कनेक्ट करता तेव्हा नवीन प्रकाशन, गेल्या "गचाळ" पॅक स्थापना bypasses जे आधीच दुरुस्ती. तत्त्व, आम्ही लागू केल्यास आणि कॅशे स्वच्छता आणि हटवू डेटा, अद्यतने विस्थापित, बहुतांश घटनांमध्ये, कोणत्याही समस्या एकदा आणि सर्व निराकरण केले जाऊ शकते. तथापि, सामग्री अपलोड समस्या समाधान बाह्यात्कारी साधेपणा असूनही (लक्षात घ्या की हे प्रतिष्ठापन मूलतः डिव्हाइसवर तात्पुरत्या प्रतिष्ठापन फाइल्स् केले जातात म्हणून पेक्षा, डाउनलोड आहे की), काही प्रकरणांमध्ये, समस्या संपुष्टात सेवा फक्त नोंदणीकृत वापरकर्ता ओळखत नाही की असू शकते. अर्थात, हा सर्वात सोपा उपाय (आपले लॉगिन आणि पासवर्ड म्हणून तुम्ही Gmail पत्ता) नोंदणी येथे निर्दिष्ट योग्य डेटा प्रविष्ट करणे आहे. तथापि, सराव शो (आणि हे एक वेगळी केस नाही) म्हणून, तो नेहमी चालना दिली नाही. खूप वेळा एक संदेश प्रणाली अपयश कोड 905 आणि 492. या सर्वात सामान्य परिस्थितीत देण्यात, तर अनुप्रयोग आपण "सेवा Google Play की» त्रुटी आली सांगणे. कसे या प्रकारच्या Google Play त्रुटीचे निराकरण करण्यासाठी? काहीही सोपे असू शकते. आपण फक्त काढून त्यांच्या "uchetku", आणि नंतर तो पुन्हा प्रविष्ट करण्यासाठी प्रणाली रिबूट करा आवश्यक आहे. पार हे ऑपरेशन, सेटिंग्ज मेनू विभाग खाती निवडला, जेथे विशेषतः, आम्ही Google रस आहेत शक्य आहे. एकदा आपण फक्त मेन्यू पासून हटवा बटणावर नोंदणी किंवा संबंधित ओळ वापर करणे आवश्यक आहे कंट्रोल बॉक्स मध्ये लॉग इन (हे सर्व Android प्रणाली बदल अवलंबून). अर्थात, नोंदणी डेटा काढून टाकण्याच्या प्रक्रियेत - एक कृतघ्न काम, आपण अचूक पत्ता पत्ता आणि पासवर्ड आठवत नाही, विशेषतः जेव्हा. दुसरीकडे, सर्व आवश्यक माहिती उपलब्ध असेल तर, रीस्टार्ट झाल्यानंतर, विद्यमान खाते इनपुट सूचित किंवा एका नवीन आपोआप कनेक्ट होईल तयार, आपण सर्व आवश्यक प्रविष्ट करू शकता, आणि नंतर. इनपुट एक समस्या आहे अचानक असल्यास, आपण एकतर (पत्ता नक्की Gmail ओळखले जाते तर) आपण आपला संकेतशब्द पुनर्प्राप्त करण्यासाठी, किंवा नवीन खाते तयार करणे सहमत आहे आणि तिच्या मदतीने सेवा प्रवेश करण्याचा प्रयत्न प्रयत्न करू शकता. योगायोग असा की, नोंदणी नेहमी, बदलले जाऊ शकते आपण अचानक वैयक्तिक डेटा लक्षात तर. हे Google सेवा योजना त्याच विभागात खाती केले जाते. सर्वात गंभीर समस्या अनुप्रयोग मध्ये "सेवा Google Play» त्रुटी की एक इशारा आली तेव्हा काढता येण्याजोगे माध्यम (SD कार्ड) सॉफ्टवेअर अपयश किंवा शारीरिक नुकसान व्यत्यय आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जोरदार कठीण आहे, पण तरीही येथे एक समाधान आहे. सर्वात महत्वाची गोष्ट कार्ड, विशेष उपयुक्तता वापरून, मीडिया हा प्रकार फक्त संबंधित पूर्णपणे स्वरूप लागेल आहे. आपण प्रथम कंट्रोलर कोड काही योग्य सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी उपकरण निर्माता च्या वेबसाइटवर नंतर जाणून लागेल. लक्षात ठेवा प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक बाबतीत हे कार्य करेल. अनेकदा, एक अडॅप्टर किंवा कार्ड रीडर द्वारे संगणकात कार्ड घालताना अगदी काढता ड्राइव्ह म्हणून निर्धारित करणे शक्य नाही. हे असू शकते की सर्वात वाईट गोष्ट आहे. तथापि, स्वरूपण बनवण्यासाठी, आपण इच्छित परिणाम साध्य करू शकतो, पण तो नाही काढता येण्याजोगे माध्यम वर, परंतु हा Android-साधने अंतर्गत मेमरी वर डीफॉल्ट सेटिंग्ज, आणि डाउनलोड अनुप्रयोग बदलू शकणार नाही सर्वोत्तम आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणून आपण अनेक समस्या लावतात करू शकता. साधारणतया, वापरकर्ता अनुप्रयोग "सेवा Google Play की» त्रुटी आली असा संदेश पाहतो तर, चिंता साठी विशिष्ट कारणे असू नये. वरील समस्या कोणत्याही फक्त काढली आहे. तथापि, या अभ्यास करण्यात आला व्हायरस थीम नाही. सराव शो, प्रामुख्याने स्पायवेअर, आणि कोड किंवा साधा स्पॅम, जे, प्रसंगोपात, खालीलप्रमाणे कार्यः प्रथम ब्राउझर द्वारे इंटरनेट वर काही पृष्ठ उघडण्याचा प्रयत्न (सहसा साधन व्हायरसचा संसर्ग झाला आहे, किंवा कार्य करू शकत नाहीत सूचित जलद), Google Play वर एक पुनर्निर्देशन त्यानंतर. तेथे नक्कीच अनिच्छेने परावर्तित, ऐवजी सेवा स्वतः डाउनलोड त्याच्या अनुप्रयोग काही विकासक, स्थापित मालवेअर लोकप्रियता आणि त्याच्या अनुप्रयोग किंवा सॉफ्टवेअर पुनर्विक्री काही डाउनलोड संख्या वाढत प्ले बाजार वापरकर्ता पुनर्निर्देशने की नाही हे आहे का? नंतर याचा विचार करा, आणि "बाजार" संबंधित कोणत्याही चुका त्या अपयश, त्यामुळे नीट सेवा माहिती जे आहे. तथापि, समस्या उद्भवू आणि, तर बहुतांश घटनांमध्ये, मानक उपाय कॅशे सामग्री नेहमीच्या काढणे आहे. नाही, अर्थातच, एक मुख्य दृष्टिकोन लागू केले जाऊ शकते, उदाहरणार्थ, कारखाना सेटिंग्ज, किंवा अगदी तथाकथित हार्ड रीसेट करत रीसेट, पण मी सर्वात प्रकरणांमध्ये अशा कार्यपद्धती आवश्यक नाही असे मला वाटते. शिवाय, या चरणांचे नंतर, आपण सहजपणे आधीच आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबलेट वर प्रतिष्ठापित केलेल्या एखाद्या सॉफ्टवेअर गमावू शकत नाही, म्हणून तो ध्वनी दुः खी म्हणून कारण, सर्वकाही गमावू शकता अशा चरणांचे आधी वाचतो विचार करण्यासाठी एक शंभर वेळा आहे की आपल्याकडे आहेत.
Jio Recharge Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे २,९९९ रुपये आणि २,८७९ रुपये किंमतीचे वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंगसह अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. हायलाइट्सः जिओकडे आहे वर्षभराच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स. नवी दिल्लीःJio Recharge Plans: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडे ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक प्रीपेड प्लान्स आहेत. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये अगदी १५ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहे. सध्या ग्राहक वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला पसंती देत आहेत. यामुळे दरमहिन्याला रिचार्ज करण्याची गरजच नसते. Jio कडे वर्षभराच्या वैधतेसह येणारे असेच दोन प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएसह अनेक सुविधा मिळते. या प्रीपेड प्लानची किंमत २,९९९ रुपये आणि २,८७९ रुपये आहे. Jio च्या या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे २,९९९ रुपये किंमतीचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज २. ५ जीबी डेटा दिला जातो. अशाप्रकारे, प्लानमध्ये एकूण ९१२. ५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये ओटीटी बेनिफिट्स देखील दिले जात आहे. यात तुम्हाला डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळते. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. Jio कडे २,८७९ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता मिळते. यात दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ७३० जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, या प्रीपेड प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात आहे. तुम्ही जर जास्त दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर हा रिचार्ज फायद्याचा ठरेल. तसेच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन हवे असल्यास २,९९९ रुपयाचा रिचार्ज तुम्हाला उपयोगी येईल.
मुसर्रत मास्टर्स यांच्या रंगलेखनात असलेला फोर्स या कलाकृतींचे वैशिष्ट्य असून, त्यासाठी त्यांनी घोड्यांचा प्रतीकात्मक वापर उत्तमरीत्या केला आहे. घोडा आणि काही कलाकृतीत स्त्री व्यक्तिरेखा दिसतात आणि त्या गतिमानतेशी नाते विणतात. घोड्यांचे धावणे असो की स्त्रियांचे जगणे असो, यात वेगवेगळे अडथडे हे असतातच. ते अडथडे पार करण्यासाठी रंगलेखिकेने कॅनव्हासवर रेखाटलेला फोर्स परिणामकारकता दर्शविणारा आहे. ही चित्रे बघताना त्या कलाकृतीतील अडथडे कलारसिकांनाही गुंतवणारे आहे, हेच या चित्राचे खरे बलस्थान आहे. या चित्रामंध्ये वेगवेगळ्या भावभावनांचे दर्शन होते. सांस्कृतिक समृद्धता अधोरेखित होते. ऊर्जा, सौंदर्य आणि तोल याचा विलक्षण समन्वय या कलाकृतीत दिसतो. मुसर्रत यांच्या या कलाकृतीतील शक्तिशाली स्ट्रोक मोहक आणि तेवढेच अर्थपूर्ण आहेत. मुसर्रत यांच्या चित्रांचे आजवर पुणे, मुंबई, बंगलोरसह दुबई, लंडनमध्ये अनेक प्रदर्शने भरली असून, जगभरातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने व खासगी दालनात त्यांच्या कलाकृती संग्रहित ठेवण्यात आल्या आहेत. पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सडेतोड स्वभाव सर्वांनाच परिचीत आहे. त्याची पुन्हा एकदा प्रचिती पिंपरी चिंचवडमध्ये आली. सोशल डिस्टन्सिंगवरून अजित पवार चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांनी पिंपरीत मनसे नगरसेवक सचिन चिखले यांना सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने चांगलेच सुनावले. अजित पवार काल पिंपरी चिंचवडमध्ये 'जम्बो कोव्हिड सेंटर'ची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी मनसे नगरसेवक सचिन चिखले हे काही मुद्दे घेऊन अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते जवळ जाऊन संवाद साधत असताना, सोशल डिस्टन्सिंग पाळत न पाळल्याने अजित पवार भडकले. "मग लांबून बोल ना, फिजिकल डिस्टन्सिंगचे बाकीचे बघतायत, त्यांचे काय बाकीचे नाही, तुझे सांग पटकन", असे म्हणत अजित पवारांनी नगरसेवकाला चांगलेच झापले. याशिवाय फिजिकल डिस्टन्स ठेव की, आमचे चार ते पाच मंत्री बाधित झालेत, असेही अजित पवारांनी सुनावले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील नेहरुनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडिअमवर ऑक्सिजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या एक हजार बेडचे 'जम्बो कोव्हिड रुग्णालय' उभारण्यात येत आहे. पाहणी करण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी "जंबो कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी कामगार कुठून मागवले?" असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. "आपल्याकडे दोन टीम आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्राचे आहेत" असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. "महाराष्ट्राच्या कोणत्या भागातील आहेत?" असे पुढे दादांनी विचारले. यावर "कामगार कोकण आणि मुंबईत राहणारे परप्रांतीय आहेत" असे उत्तर त्यांना मिळाले.
शुक्रवारचा दिवस उजाडल्यानंतर निरभ्र आकाशाचे दर्शन झाल्यामुळे पाऊस पडणार नसल्याचा अंदाज बांधून घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांना अखेर पावसाने गाठलेच. . . दुपारी एक ते पाच दरम्यान शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस बरसला. अवघ्या चार तासांत शहरात तब्बल १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहराच्या कानाकोपऱ्यात बरसलेल्या पावसामुळे बहुतांश रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
राजकीय साठमारीत मग्न असणा-या सर्वच राजकीय नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले जाईल, असा कौल मतदारांनी दिला आहे. पुन्हा महायुतीचीच सत्ता महाराष्ट्र राज्यात असणार हे जरी विधानसभा निवडणूक निकालाने स्पष्ट झाले असले तरी २०१४ च्या तुलनेत युतीवरचा मतदारांचा भरवसा कमी झाल्याचेही अधोरेखित झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी येत्या पाच वर्षात आक्रमक विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा विश्वास वाढवणारी ही निवडणूक होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्षपणे आपला वरचष्मा राखला आहे. २०१४ पासून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे विनोद तावडे, एकनाथ खडसे यांना तिकीट वाटपातच डावलले गेले. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यातून लढत देताना नाकीनऊ आणले, तर 'मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री' अशी शेखी मिरविणा-या पंकजा मुंडे यांना परळीच्या मतदारांनी मनातून उतरवले आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही मतदारांनी नाकारले आहे. निवडणुकीआधी खडसेंनी राष्ट्रवादीकडे एबी फॉर्म मागितला होता, हा भाजपकडे बार्गेनिंग करण्याचा फंडा होता, मात्र भाजपने खडसेंच्या मुलीला उमेदवारी देत खडसेंचा न बोलून पत्ता कट केला, असे आता स्पष्ट झाले आहे. एकंदरच अंतर्गत विरोधकांना नामोहरम केल्याने आता फडणवीसांसमोर मुख्यमंत्रीपदाचा कुणी दावेदार राहिलेला नाही. सुरुवातीपासूनच युती करण्यासाठी फडणवीस आग्रही होते. सेनेच्या राजकीय इच्छाशक्तीचा पुरता अंदाज आल्यानेच फडणवीस यांनी कोणताही धोका, उणिवा राहायला नको म्हणून सेनेसोबत सोयरिक केली होती. महायुतीत एकमत झाले आणि कोणताही वाद न होता सत्ता स्थापन झाली आणि फडणवीसांनाच पुन्हा संधी मिळाली, तर ते भाजपचे सलग दोन टर्म मुख्यमंत्री असणारे पहिले मुख्यमंत्री असतील यात शंका नाही. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. लोकसभेनंतर इतर पक्षांतून भाजपात येणा-यांची रांग लागली होती. मात्र या आयारामांपैकी ज्यांचे खरेच काम होते, अशाच नेत्यांना मतदारांनी स्वीकारले आहे आणि जे केवळ सत्तेसाठी भाजपात दाखल झाले त्यांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. विरोधी मताधिक्य घटले असले तरी आम्ही सत्तेवर आहोत आणि हेच अंतिम सत्य आहे, असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेणा-या सत्ताधा-यांनी मिळालेल्या या विजयी संधीचा उपयोग जनहितासाठी केला नाही आणि गत पाच वर्षाचीच पुनरावृत्ती केली, तर २०२३ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सक्षम विरोधी पक्ष नव्हे तर ही आघाडी स्वबळावर निवडून येऊ शकते, याची दखल घ्यायला लावणारा हा निकाल सर्वानाच अंतर्मुख करायला लावणारा आहे. 'अब की बार २२० पार' असे म्हणत विधानसभा निवडणुकीत मतदारांना सामोरे जाणा-या भाजप-शिवसेना युतीची यावेळी १५० चा आकडा गाठताना दमछाक झाली. महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या आणि सत्तेचे ते दावेदार ठरत असले तरीही महाराष्ट्रातीलच नाही, तर हरयाणामधील जनतेनेही सत्ताधा-यांच्या विरोधातील नाराजी मतदानातून दाखवून दिली आहे. युती केल्याने अर्थातच शिवसेनेला फायदा झालेला आहे, तर भाजपचे संख्याबळ कमी झाले आहे. जनतेच्या मनातले प्रश्न घेत निवडणुकीत उतरण्याऐवजी राष्ट्रवाद, कलम ३७० चा मुद्दा अधिक प्रभावी केल्याचा फटका भाजपला बसला आहे. ग्रामीण भागात आजही काँग्रेस-राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. २०१४ मध्ये तो मोदी लाटेमुळे भाजपकडे खेचला गेला होता. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांनी भाजप, सेनेत प्रवेश करूनही जनतेने त्यांना नाकारले आहे. कोल्हापुरात भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही, तर खुद्द चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातील बदलत्या हवेचा अंदाज आल्याने पुण्यातून उमेदवारी करावी लागली. अर्थातच कोथरूडमधला त्यांचा विजय सहजसाध्य नव्हता, हे खुद्द पाटील यांनाही मान्य करावेच लागेल. भाजपला सर्वात मोठा धक्का देणारा पराभव पंकजा मुंडे यांचा ठरला. परळी मतदारसंघ २०१४ पासूनच चर्चेत आला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघातातील निधनानंतर लगेचच निवडणुकीला सामोरे जाणा-या पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या कर्तबगारीवर पाच वर्षे राज्य केले, मात्र हे करीत असताना वडिलांनी सर्वसामान्यांसोबत नाळ जोडत केलेले समाजकारण आणि नैतिकतेच्या राजकारणाचा काही प्रमाणात त्यांना विसर पडलेला दिसला. सत्तेवर येताच उघडकीस आलेला चिक्की घोटाळा, या संदर्भातील बातम्या दाबताना माध्यमांनाही याविषयी केलेला संपर्क असो वा बाल व महिला कल्याणमधील त्यांची सुमार कामगिरी, भगवानगडाचा वाद, दसरा मेळाव्यासाठी वेळोवेळी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, यासोबतच वेळोवेळी दहशत निर्माण करणा-या त्यांच्या व्हायरल झालेल्या क्लीप अशा अनेक कारणांनी त्यांची उणी पाच वर्षाची सत्तेतील कारकीर्द वादग्रस्तच राहिली. जे परळीचे झाले तेच सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचे झाले. विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तरच मला मताधिक्य मिळेल, हा उदयनराजेंचा आत्मविश्वास मतदारांनी पार धुऊन काढला. आजवर शरद पवारांनी उदयनराजेंचे शंभर अपराध माफ केले होते, ही वस्तुस्थिती असतानाही राजेंना आपला विजय राखता आला नाही. दोन लाखांच्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोदी लाटेतही खासदारकी मिळवलेल्या राजेंना अवदसा आठवली आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर तीन महिन्यांतच राष्ट्रवादीत घुसमट होते म्हणत स्टंटबाजी केली. मात्र, यावेळी त्यांचे कॉलर उडवणे काही नवमतदारांना पटलेले दिसत नाही. उदयनराजेंचा पराभव म्हणजे सत्तेच्या हव्यासापायी सत्ताधा-यांकडून घेतलेल्या चुकीच्या निर्णयापैकी हा एक निर्णय होता. ज्याचा फटका भाजपला बसला. कोकणातील कणकवलीचा गड राखण्यात नितेश राणे यशस्वी झाले. नितेश राणे यांच्या नेतृत्वावर कणकवलीकरांनी शिक्कामोर्तब केले आहे. वास्तविक ही निवडणूक पहिल्या दिवसांपासूनच एकतर्फी होती. मात्र, शिवसेनेने व्यक्तिद्वेषापोटी युतीला तिलांजली देत या मतदारसंघात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दिला. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर ठाकरेंनी सभाही घेतली. या सभेत राणेंना विरोध हा एकमेव अजेंडा राबविला गेला. उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पी कावा मतदारांनी जाणला. मुख्यमंत्र्यांनी कोकणात आणखी लक्ष घातले असते, तर कदाचित कोकणात भाजपच्या पारडय़ात आणखी दोन जागा पडल्या असत्या. मात्र, नारायण राणे यांनी कोकणात आजवर केलेल्या कामांची पोचपावतीच नितेश राणेंच्या विजयामुळे मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत पैलवान कोण, असा वाद रंगला होता. यावर आता पडदा पडला असला तरी वयाच्या ८०व्या वर्षी राजकारणातले आपले वर्चस्व राखताना राज्यात राष्ट्रवादी सत्ता पालटू शकते, हा वचक कायम ठेवण्यात राज्याच्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, बारामतीचा पैलवान यशस्वी ठरला आहे. लोकसभेत ज्या 'वंचित'ने आघाडीच्या यशात खोडा घातला होता, त्या 'वंचित'लाच राजकारणातून वंचित होण्याची वेळ मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आपल्या उमेदवारांसाठी आक्रमकरीत्या आणि निवडून येण्यासाठीच प्रचार यंत्रणा राबवली गेली. तुलनेत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमध्ये जोर कमी दिसला, मात्र युवा काँग्रेसने आपली कुमक कामाला लावली होती, त्याचेच यश काँग्रेसने राखलेल्या अनेक जागांवरून दिसते. राहुल गांधी यांनी राज्यात केवळ पाच सभा घेतल्या, तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात सभा न घेता थेट युवा संवाद साधला. काँग्रेसमधील बहुतेक ज्येष्ठ नेत्यांनी आपले गड राखले आहेत. मात्र राज्यात एकसंध विजयासाठी काँग्रेस परिणामकारकरीत्या लढू शकली नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मला विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असे म्हणत राज्यात सभा घेणा-या मनसेच्या राज ठाकरे यांच्या पक्षाचे कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांच्या रूपाने इंजिन विधानसभेपर्यंत धावले आहे. मतदारांना आता व्यक्तिगत टीका-टिप्पणीच्या राजकारणात रस राहिला नसून त्यांना त्यांच्यासमोरील समस्यांवर किमान भाष्य अपेक्षित आहे. रोजगार निर्मिती, कर्ज उपलब्धी, महागाईवर नियंत्रण, पूरग्रस्तांचा पुनर्विकास आणि दुष्काळी जनतेला वर्षभर तग धरण्याची आस आहे. एकंदरच सामान्यांचे आयुष्य सुसह्य, समाधानी व्हावे या अपेक्षेने सत्ताधा-यांकडे बघणा-या सामान्य जनतेच्या समस्या सध्यातरी राजकीय साठमारीत नगण्यच ठरत आहेत. सत्ताधा-यांकडून किमान आश्वासक निर्णय, नव्या योजना, रोजगाराची खात्री, जगण्याविषयीची सुरक्षा, जातीधर्मविरहीत समाजरजना, महिला सुरक्षा आदी प्रश्नांवर काही ठोस निर्णय, विधायक, वैचारिक कृती अपेक्षित होती. पण तसे घडताना निवडणूक प्रचारात दिसले नाही. देशाची अर्थव्यवस्था पाच मिलियन डॉलपर्यंत पोहोचवण्याची महत्वाकांक्षा बाळगणा-या भाजप सरकारच्या काळात आजवरची सर्वात मोठी बेरोजगारांची फौज उभी ठाकली आहे. देशभरातल्या कानाकोप-यांतून भल्या भल्या उद्योजकांनी आपले एक एक विभाग बंद केले आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नोटा बंदी आणि जीएसटीमुळे कोलमडलेले लघु उद्योग, बँकांमधील आर्थिक घोटाळे, परंपरागत व्यवसाय, शेतीवर आधारित उद्योग, साखर कारखानदारी, अजूनही उभारी घेऊ शकत नाही. सरकारने मुद्रा कर्ज योजना, पीककर्ज, पीक विमा कार्यान्वित केली, पण ठरावीक वर्गापर्यंतच ती मर्यादित राहिली. स्टार्ट अप महाराष्ट्र योजनाही दखलपात्र ठरली नाही. संपूर्ण देशभरात बेरोजगारी, महागाई, शेतकरी समस्या, शिक्षण, उद्योग, महिला सुरक्षा आदी प्रश्नांसोबतच देशाची आर्थिक घडीही विस्कटली आहे. सामान्य जनतेसमोर आला दिवस कसा काढायचा हा प्रश्न आ वासून उभा आहे. आज सुरू असणारी नोकरी उद्या असेलच याची खात्री नाही. डझनभर कॉर्पोरेट कंपन्यांनी आपले काही विभाग बंद करताना हजारो कर्मचा-यांना एका रात्रीत कामावरून काढून टाकले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर लाखोंच्या संख्येने रोजगार बुडाले. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. रोजी रोटी आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीने हजारो नागरिक रोज स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे मोठय़ा शहरांवरील ताण वाढतो आहे. रोजगार निर्मिती पूर्णता ठप्प झाली आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, सायबर क्राईमचा आलेख चढता आहे. विदर्भ मराठवाडय़ातला दुष्काळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती यामुळे तेथील सामान्य जनता आस्मानी तडाख्याने भरडली गेली आहे. कोल्हापूर, सांगलीच्या पूरपरिस्थितीवेळी तीन दिवसांनी सत्ताधा-यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला, तोपर्यंत बोट उलटून दुर्घटना घडली होती. पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळण्यासही अनंत अडचणी, नियमांचा सामना करावा लागला. या सर्वाचा फटका भाजपच्या घसरलेल्या आकडेवारीतून दिसून येतो. लोकसभेत संपूर्ण महाराष्ट्रात विजयी पताका बहुमताने झळकवणा-या महायुतीची विधानसभेनंतर घसरणच झालेली दिसून येते. सत्तेचा उन्माद केव्हाही घातकच असतो, सत्तेत असूनही केवळ आपल्या स्वार्थासाठी विरोध करीत दिवस काढणे हेही घातकच. या दोन्ही प्रवृत्तीला वेसण घालण्याचे काम मतदारांनी केले आहे. यातून गर्भित इशारा भाजप आणि शिवसेना दोघेही घेतील आणि येत्या पाच वर्षात जनतेला अपेक्षित असणारा, जनकल्याणाचा कारभार करतील, राज्यातील प्रत्येक हाताला काम, कामाला दाम, महिला सुरक्षा, उद्योग शेतीमध्ये आश्वासकता आदी निर्माण करतील हीच अपेक्षा राज्यातील प्रत्येक मतदार करीत असणार यात दुमत नाही.
नवी दिल्लीः देशातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये अखंडितरित्या कोळसा पुरवठा करण्यासाठी ( coal crisis ) रेल्वे विभागाकडे व्हॅगन आणि रॅकची कमतरता नाही. सध्यस्थितीत रेल्वेकडे ८५० रॅक आहेत. कोळसा आणि उर्जा मंत्रालयाकडून कोळसा वाहतूक करण्यासाठी जेवढ्याही रॅकची मागणी केली जात आहे तेवढे पुरवले जात आहेत, अशी माहिती रेल्वे विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. रेल्वेकडून दररोज ४३५ रॅकच्या सहाय्याने ४ हजार टन कोळश्याची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी मालगाडीचा असलेला सरासरी वेग २४ वरून ४६ किलोमीटर ताशी पर्यंत पोहचला आहे. दरम्यान, रेल्वेने लोड होणाऱ्या रॅकची संख्या सोमवारी ४३० वरून ४४० ते ४५० पर्यंत केली आहे. सोमवारी दिवसभरात १.७७ दशलक्ष टन कोळश्याची वाहतूक करण्यात आली. ( coal crisis ) दैनंदिन कोळश्याची मागणी ५०० रॅक पर्यंत वाढली, तरी रेल्वे हे आव्हान पेलण्यास समर्थ असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. देशातील पूर्व भागात कोळसा क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कोळसा येत आहे. अशात पूर्व मध्य रेल्वेकडून सेवा दिली जात आहे, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. देशातील वीज निर्मिती केंद्र सध्या कोळसाच्या तुटवड्याचा सामना करीत आहेत. अशात या केंद्रांमध्ये कोळसा पोहोचवण्याची जबाबदारी रेल्वे विभागाने उचलली आहे. कोळसाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. कोळसा घेवून जाणाऱ्या मालगाडीच्या मार्गात कुठलाही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत. लवकरात लवकर वीज निर्मिती केंद्रापर्यंत कोळसा पोहचवण्यासाठी या ट्रेनवर विशेष लक्ष दिले जात आहे. प्रत्येक तासाची माहिती एकत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच दररोज लोड होणाऱ्या कोळशाचे प्रमाण देखील वाढवण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. उर्जा तसेच कोळसा मंत्रालयाच्या चर्चे दरम्यान कोळसा परिवहन क्षमतेत कुठलाही अडथळा होणार नाही, असे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले आहे. वीज निर्मिती केंद्राच्या आवश्यकतेनूसार परिवहन करण्याची विभागाची तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोळशाच्या तुटवड्याच्या संकटाला रेल्वेने अंतर्गत आपात्काल मानला आहे.यामुळे पावर प्लांटला कोळसा पुरवण्यासाठी २४ तास कोळशाची परिवहन करणाऱ्या मालगाड्या संचालित केल्या जात आहे. राष्ट्रीय ट्रान्सपोर्टसने देखील कोळशाच्या तुटवड्याला आपत्काल घोषित केले आहे. सर्व विभागीय रेल्वे प्रमुखांना एक नियंत्रण कक्ष तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबत जनरल मॅनेजर्स तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दर एका तासांचे बुलेटिन बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांच्या पुढाकाराने राईस मिल क्लस्टरच्या उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. गडचिरोली : जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांच्या पुढाकाराने राईस मिल क्लस्टरच्या उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे राईस मिलचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. काही उद्योजक हा व्यवसाय मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत. काही व्यापारी स्वतःच धान खरेदी करून त्याची मिलिंग केल्यानंतर विक्री करतात तर काही राईस मिलमालक घरगुती धान पिसाई करून देतात. चामोर्शी येथील उद्योजकांनी राज्यातील पहिले राईस मिल क्लस्टर निर्माण केले आहे. या क्लस्टरमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेला ५० उद्योजक उपस्थित होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. के. सिल्लारे, नाबार्डचे अधिकारी क्रिष्णा कोल्हे, केंद्राच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाचे सहाय्यक संचालक कंदारे, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कराडे, एस. पी. कोलते आदी उपस्थित होते. या सर्वच मान्यवरांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जात असल्याने राईस मिल उद्योगाला चांगली संधी असल्याने हा अत्यंत चांगला उद्योग असल्याचे मार्गदर्शन केले. उद्योग स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेकडून कर्ज उपलब्ध होईल, तांदळाची असलेली बाजारपेठ व उद्योगाबद्दलची माहिती पॉवर पार्इंट प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितली. राईस मिल ट्रस्टचे उद्योजक रवींद्र ओल्लालवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे राईसमिलचा उद्योग वाढण्यास फार मोठी मदत होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
प्रत्येक स्त्रीला तिच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिला निर्णय स्वातंत्र्य असून स्त्रीचा समाजाने आदर केला पाहिजे. नवी दिल्ली - प्रत्येक स्त्रीला तिच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिला निर्णय स्वातंत्र्य असून स्त्रीचा समाजाने आदर केला पाहिजे. तुम्हाला प्रेमासाठी तिच्यावर जबरदस्ती करता येणार नाही. तिला एखाद्याच्या प्रेमाला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. छेडछाडीच्या प्रकरणात सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या एका आरोपीच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वरील मत नोंदवले. भारतीय संविधानाने महिलेला अधिकार बहाल केले आहेत. सुसंस्कृत समाजात पुरुषी अहंकाराला अजिबात थारा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. छेडछाड आणि तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने या आरोपीला सात वर्षाची सजा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढणे हा छळवणुकीचाच प्रकार आहे. या प्रकारांमधून आजही महिलांचा आदर करण्याची मानसिकता समाजात नसल्याचे दिसत आहे. घटनेतील कलम १४ अनुसार महिलांनाही पुरुषांप्रमाणे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे, असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त करत समाजातील दांभिकतेवर बोट ठेवले.
स्वमदत गटांचे महत्त्व विषद करणारे लेख वा अनेक आजारांविषयी शास्त्रोक्त माहिती देणारे लेख, त्यांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. स्वमदत गटांचे महत्त्व विषद करणारे लेख वा अनेक आजारांविषयी शास्त्रोक्त माहिती देणारे लेख, त्यांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. सामान्यांमध्ये जनजागृती करत, खबरदारीचे उपाय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून लेखमालेने मोलाची भूमिका पार पाडली. दी ड-दोन वर्षांपूर्वी 'स्वमदत गटांचे प्रयोजन आणि महत्त्व' या विषयावर लिहिण्याचा प्रस्ताव आला. पण मी थोडी विचारात पडले! 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदाची माझी कारकीर्द महत्त्वाच्या टप्प्यावर होती. रोज डॉक्टरांना भेडसावणाऱ्या नवीन समस्या, त्यांवर संभाव्य उपाययोजना अशा अनेक अंगांनी, अनेक पातळ्यांवर काम सुरू होते. लेखन करण्याइतकी शांती, मेंदू आणि मन दोन्हीला नव्हती. तरीही हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. लेख कसा असावा याचा एक कच्चा आराखडा तयार झाला. लेखमाला सुरू करायची म्हटल्यावर विषय डोक्यात येत गेले, कुणाला लिहिते करायचे याची संभाव्य यादी कागदावर उतरू लागली आणि लेखांना मूर्त स्वरूप येत गेले. पहिले काही लेख 'मैत्री आजारांशी' या मथळ्याखाली विविध स्वमदत गटांची माहिती देणारे होते. कोणतेही आजारपण निभावणे अवघडच असते. चिवट, दुर्धर उतारवयात होणारे आजार, मानसिक आजार यात रुग्णाबरोबर घरातील मंडळींनादेखील तेवढेच दुःख सोसावे लागते. ही जबाबदारी कशी पेलायची याची फारशी माहिती कुठे उपलब्ध नसते. अशा कसोटीच्या प्रसंगी स्वमदत गटांची 'शेअरिंग आणि केअरिंग' ही पॉलिसी प्रचंड उपयोगी ठरते. वानगीदाखल प्रत्येक गटांनी घटना/उदाहरणे द्यावीत म्हणजे सर्वसामान्यांना ते जास्त रोचक वाटेल असा आग्रह धरला. मालिकेतील या विषयाची पूर्वपीठिका सांगणारा माझा पहिला लेख १८ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. वाचकांना ही संकल्पना आवडल्याचे अनेक फोन आले आणि आमचा हुरूप वाढला. अनेकांनी लेखांची कात्रणे संग्रही ठेवल्याचे आवर्जून सांगितले. खऱ्या अर्थाने लेखनाचा प्रवास सुरू झाला. पुण्यात १०-१२ स्वमदत गटांचा 'सेतू' हा एक मंच आहे. सेवाभावी संस्था आणि स्वमदत गटांना कार्यकर्ते आणि मदतनीस यांची कायम चणचण भासते. अशा प्रसंगी सर्व गट एकमेकांना एकदिलाने मदत करतात. एकमेकांच्या कार्यक्रमांना उत्साहाने हजेरी लावतात. अशा गटांच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी लिहिलेले जिवंत अनुभव या सदरात प्रसिद्ध व्हावेत अशी इच्छा होती. त्या अनुषंगाने 'किडनी फेल्युअर' हा अनुराधा देशपांडे लिखित, 'बाल मधुमेही' हा विद्या गोखले यांचा, मानसिक स्वास्थ्यासाठी प्राजित गटाच्या अभिजात कुलकर्णीचा लेख प्रसिद्ध झाला. लेखातील स्वानुभव व प्रामाणिक आवाज ऐकून 'प्राजित'च्या पुढील गुरुवारच्या सभेला अनेकांनी हजेरी लावली. यासह 'दारू पिण्याचा आजार' हा मुक्तांगण संस्थेच्या आनंद पटवर्धन यांचा आणि 'व्यसनाधीनांच्या पत्नीसाठी' हा मुक्ता पुणतांबेकर यांचा लेख प्रसिद्ध झाला. या लेखांनी जादू केली, अनेक लोक संस्थेच्या कामाची विचारपूस करत आले, नवे कार्यकर्ते तयार झाले व नवा हुरूप संचारला. मात्र अन्य स्वमदत गटांना लेख लिहून देणे जमले नसल्याने यापुढील मालिका 'सामना आजारांशी' या शीर्षकाखाली सुरू ठेवण्यात आली. सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या रोजच्या जीवनातील आजारांविषयी शास्त्रीय माहिती, रुग्णांनी व घरातील इतर व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, विशेष आहार उपचारपद्धतींबद्दल सोप्या शब्दांत सांगितलेली माहिती, काही संभाव्य धोके याबाबत त्या त्या विषयावरील तज्ज्ञांनी माहिती द्यावी अशी रूपरेषा आखली गेली. सामान्यांना भावतील असे आणि काही इबोलासारख्या नव्याने आलेल्या आजारांविषयी माहिती देण्याचे ठरविले. यानंतर मराठीत सविस्तर लिहू शकणाऱ्या तज्ज्ञांनी शोधमोहीम सुरू झाली. सर्वच लेखकांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. आजाराविषयी वाचकांना घाबरून न सोडता आवश्यक ती सर्व माहिती योग्य शब्दात चपखलपणे पोचविण्याचे आमचे उद्दिष्ट होते. Known devil is better than unknown angel'.. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, दमा, अपेंडिसायटिस, टॉन्सिल्स, मूळव्याध हे नेहमी कानावर पडणारे शब्द! परंतु त्यातील काही फारसे माहीत नसलेले 'अँजेल' हाताळण्याचे आम्ही ठरविले. उदा. गर्भारपणातला मधुमेह, लहान मुलांमधील लठ्ठपणा, दम्याची कारणमीमांसा आणि नवीन औषधोपचार व अॅटॅक येऊ नये म्हणून घ्यायची खबरदारी, मूळव्याधीवरील जीवनशैलीचा प्रभाव आणि बदलाची आवश्यकता आदी वाचकांना सोप्या भाषेत, उपदेश न करता लिहिलेले सर्वच लेख अतिशय भावले. डॉक्टर लेखकांवर फोन आणि ई-मेल यांचा भडिमार झाला. शास्त्रीय माहिती वाचकांपर्यंत योग्य रीतीने पोचल्याचा आणि त्याचा योग्य तो प्रतिसाद मिळाल्याचे लेखकांनाही समाधान झाले. 'इबोला'सारख्या वेगाने पसरणाऱ्या जवळजवळ १०० टक्के प्राणघातक असणाऱ्या आणि डॉक्टर आणि समाज या दोघांनाही नवीन असणारा विषय किंवा 'डेंग्यू'सारखा पावसाळ्यात धुमाकूळ घालणारा आजार फारसा महीत नसलेला 'हिपॅटायटीस सी' आणि 'हिपॅटायटीस बी'सारखा आजार यावरील माहितीपूर्ण लेख महत्त्वपूर्ण ठरले. 'कुष्ठरोगा'सारखा अजूनही पूर्णपणे उच्चाटन न झालेला संसर्गजन्य आजार किंवा 'सोरिअॅसिस' सारखा चिकट आणि चिवट त्वचारोग,'अल्झायर'सारखा बौद्धिक विकलांगता आणणारा आणि रुग्ण व नातेवाईक यांचे जीवन कष्टप्रद करणारा आजार किंवा संधिवात, सांधेदुखीसारखा भरपूर प्रमाणात आढळणारा आजार , टॉन्सिलवरील साधेसोपे उपाय, या विषयांवरील सर्वच माहिती उपयुक्त होती. भारत पोलिओमुक्त कसा झाला आणि तो तसाच राहण्याकरिता काय खबरदारी घ्यावी लागली याचे विवेचन करणारा लेखही माहितीपूर्ण होता. एकूणच नाक, कान, घसा, डोळे, त्वचा, हृदयरोग, मधुमेह, सांधे, दमा, टॉन्सिल्स, अपेंडिक्स, मूळव्याध, हर्निया अशा विविध अवयवांची आणि आजारांची माहिती देण्याचा हा प्रयत्न होता. म्हणूनच गेले वर्षभर 'चतुरंग'मध्ये चालविलेल्या या सदराने खूप काही दिले. सर्व लेखकांनी लिखाणासाठी घेतलेल्या परिश्रमासाठी त्यांची मी ऋणी आहे. लेखनसाहाय्य आणि कार्यालयीन कामकाजासाठी अश्विनी देशपांडे आणि संगीत कोन्हाळे यांची अनमोल मदत झाली. अजूनही ही मालिका चालू ठेवण्याबद्दलची विनंतीवजा पत्रे येत आहेत. तुर्तास इतकेच! पुन्हा कधी तरी भेटीची संधी मिळेल अशी आशा आहे. सरत्या वर्षांत सामोऱ्या आलेल्या 'डेंग्यू, इबोला'सारख्या शत्रूंशी सामना उगवत्या वर्षांत करावयाची वेळ येऊ नये. तसेच नूतन वर्ष आपणा सर्वाना आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा! धन्यवाद! (सदर समाप्त) (वर्षभर दर पंधरवडय़ाने चाललेल्या या सदरासाठी पडद्याआडून तर कधी प्रत्यक्षपणे डॉ. माया तुळपुळे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्याचे 'चतुरंग' तर्फे खास आभार)
कोल्हापूर : कॉँग्रेसने पूर्वीपासूनच 'मुस्लिम खतरे में है' अशी दिशाभूल करत हिंदू-मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, असा आरोप भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी सोमवारी येथे केला. 'अच्छे दिन' कुठे आहेत? अशी विचारणा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्ला चढवत भ्रष्टाचारामध्ये त्यांची पिल्ली जेलमध्ये जात आहेत. हे 'अच्छे दिन' नाहीत का? अशी विचारणाही त्यांनी केली. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे भाजप अल्पसंख्याक आघाडीतर्फेे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती आघाडीचे प्रदेश महामंत्री इम्रान मुजावर, एजाज देशमुख, सिकंदर शेख, सचिव अॅड. तबस्सूम बैरागदार, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अल्पसंख्याक आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष नझीर देसाई, ग्रामीण जिल्हाध्यक्ष झाकीर जमादार यांची होती. जमाल सिद्दिकी म्हणाले, 'अच्छे दिन' कुठे आहेत? अशी विचारणा करणाऱ्या शरद पवारांना भ्रष्टाचारप्रकरणी त्यांची पिल्ली जेलमध्ये जात आहेत. हे 'अच्छे दिन' दिसत नाहीत का? सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरू असलेली 'सीआडी' चौकशी व कॉँग्रेस आघाडीच्या काळात बेकायदेशीररीत्या बांधलेली आदर्श इमारत पाडण्याचे दिलेले आदेश हे 'अच्छे दिनच' आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची दिशाभूल थांबवावी. एजाज देशमुख म्हणाले, मुस्लिमांनी ६० वर्षे कॉँग्रेसला मते दिली; परंतु त्यांनी त्या बदल्यात समाजाला गरिबी, भूखमरी, बेरोजगारीच दिली. सिकंदर शेख म्हणाले, अल्पसंख्याक समाज भाजपशी जोडला जावा, यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. इम्रान मुजावर म्हणाले, भाजपमध्ये जाती-धर्मावरून दुजाभाव केला जात नाही. हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. संदीप देसाई म्हणाले, गेल्या ६0 वर्र्षात कॉँग्रेसने मुस्लिमांना शिक्षणापासून वंचित ठेवले. महेश जाधव म्हणाले, भाजप हा जातीयवादी पक्ष असल्याची कॉँग्रेसने घातलेली भीती नाहक आहे. अॅड. तबस्सुम बैरागदार यांनी विविध योजनांची माहिती दिली. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन, तौफिक बागवान यांनी आभार मानले. अशोक देसाई, विजय जाधव, मुश्ताक पठाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सुरांच्या विश्वात रमताना. . . संगीताच्या सागरी लाटांमध्ये चिंब भिजताना. . . त्याच्यातील अथांगतेचा शोध घेत शिष्यत्व भाळी सजवित अखंडीपणे संगीत सेवाव्रती म्हणून कार्यरत राहणाऱ्या मंजुषा पाटील यांनी संगीताची मोठी परंपरा असलेल्या सांगलीचा झेंडा सातत्याने संगीतविश्वात फडकवित ठेवला. - अविनाश कोळी, सांगली. सुरांच्या विश्वात रमताना. . . संगीताच्या सागरी लाटांमध्ये चिंब भिजताना. . . त्याच्यातील अथांगतेचा शोध घेत शिष्यत्व भाळी सजवित अखंडीपणे संगीत सेवाव्रती म्हणून कार्यरत राहणाऱ्या मंजुषा पाटील यांनी संगीताची मोठी परंपरा असलेल्या सांगलीचा झेंडा सातत्याने संगीतविश्वात फडकवित ठेवला. गुरुच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या संगीतकला फुलविताना गायक, कानसेन घडविण्याचे काम करणाºया मंजुषा पोटील या खºया अर्थाने 'गुरुकुल'च्या गुरुमाऊलीच आहेत. विद्यार्थ्यांना संगीताचे पैलू पाडून संगीताच्या विशाल पटलावर गायकरुपी रत्नांना चमविण्याचे काम त्यांनी अखंडितपणे सुरू ठेवले आहे. गायक, कानसेन घडविताना स्वतः नेहमीच विद्यार्थी दशेत राहणे त्यांनी पसंत केले. संगीत मैफली, संगीत स्पर्धा गाजविताना संगीतक्षेत्रातील नामांकित पदव्या प्राप्त करताना तसेच एका मोठ्या संस्थेच्या उभारणीनंतरही त्यांनी आपले शिष्यत्व अबाधित ठेवत गुरुचरणी रमण्याचे काम आवडीने केले. मंजुषा पाटील यांचा जन्म सांगलीचा. पं. चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सुरुवातीचे संगीताचे धडे त्यांनी गिरवले. त्यानंतर मिरजेच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी संगीत विशारदपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदकासह संगीतातील मास्टर डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांचा संगीतक्षेत्रातील प्रवास थक्क करणारा राहिला. नामांकित संगीत स्पर्धां त्यांनी त्यांच्या अस्सल गायकीवर गाजविल्या. यातीलच एक स्पर्धा म्हणजे इचलकरंजीतील संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा संगीत स्पर्धा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरली. येथे त्यांना काणेबुवांसारखे विख्यात गुरु भेटले. मंजुषा पाटील यांच्या गायकीतील शुद्धता, क्षमता आणि अफलातून उर्जा ओळखून काणेबुवांनी त्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले. त्यानंतर डॉ. विकास कशाळकर आणि सध्या पं. उल्हास कशाळकर यांच्याकडे त्या शिकत आहेत. या गुरुंनी शास्त्रीय संगीताला घराण्याच्या चौकटीत बांधून न ठेवता, सर्व घराण्यांच्या चांगल्या शैली आत्मसात करण्याची दृष्टी त्यांना दिलीच शिवाय सर्व चांगले संगीत मग ते कुठल्याही प्रकारचे असो, त्याकडे डोळसपणे बघायला शिकवले. नवीन पिढीने याच डोळस वृत्तीने शास्त्रीय संगीत गुरुमुखातून शिकले पाहिजे म्हणून मंजुषा पाटील यांनी गुरुकुल संगीत विद्यालयाची स्थापना केली. गेल्या चार वर्षापासून या संस्थेकडून संगीत ज्ञानदानाचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. ज्ञानदानाबरोबरच देशातील नामांकित गायक, वादक व कलाकारांचे सानिध्य येथील विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले आहे. वर्षातून एकदा विद्यालयामार्फत संगीत महोत्सव घेतला जातो. त्यामुळे गेल्या चार वर्षात संगीत क्षेत्रात सांगलीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सूरातील माधुर्य, त्यावरील पकड, त्याचे अवगत केलेले सौंदर्य शास्त्र, गायनातील संशोधनवृत्ती, निर्मिती कला, गाण्याला तालबद्ध पैलू पाडण्याची कला, संगीतप्रेमींला मंत्रमुग्ध करणाºया तानांची लकब अशा अनेक गोष्टींनी त्यांची कला सजली आहे. संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य करताना त्यांनी आपल्यातील साधेपणा जपला. त्यामुळेच दिग्गज कलाकार त्यांच्या गुरुकुलकडे व महोत्सवांकडे आकर्षित होत असतात. कित्येक वर्षापासून त्यांची संगीत तपश्चर्या सुरू आहे. श्वास, हृदयाची स्पंदने, धमण्यांमधील प्रवाह अशा साºया गोष्टींना संगीताने व्यापून टाकत त्यांनी स्वतःला घडविले. या घडण्याला त्यांचे गुरू जितके कारणीभूत आहेत, तितकीच त्यांची संगीताप्रती आस्था, प्रेम आणि त्यातून केलेली तपश्चर्यासुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळेच संगीत नाट्य अॅकॅडमीचा पुरस्कार, पं. कुमार गंधर्व राष्टÑीय पुरस्कार, पं. बसवराज राजगुरु युवा पुरस्कार आदी अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. राष्टÑीय, आंतरराष्टÑीय संगीत मैफलींचा आनंद लुटतानाच रसिकांवर मोहिनी टाकत त्यांच्या हृदयावर राज्य करण्याचे काम गुरुकुलच्या या गुरुमाऊलीने अखंडितपणे सुरू ठेवले आहे. कायम असायला हवी. यासाठी गुरुंवर श्रद्धा आणि संगीतावर मनसोक्त प्रेम हवे, अशी भावना त्या नेहमी व्यक्त करीत असतात.
अमेरिकेतील मराठमोळे उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांनी मिशिगन येथे पुन्हा एकदा विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. २००९मध्ये सॅन होजेमध्ये झालेल्या विश्व संमेलनाच्या आयोजनातही त्यांचा सहभाग होता. अमेरिकेतील मराठमोळे उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांनी मिशिगन येथे पुन्हा एकदा विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. २००९मध्ये सॅन होजेमध्ये झालेल्या विश्व संमेलनाच्या आयोजनातही त्यांचा सहभाग होता. ग्रंथ महोत्सव समिती व जागतिक मराठी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातारा येथील ग्रंथ महोत्सवासाठी ठाणेकर आले होते. त्या वेळी पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २००९मध्ये त्यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून सॅन होजेमध्ये संमेलन भरवले होते; मात्र आता ते बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे आता मराठीयुएसए डॉट कॉम या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून संमेलन आयोजित करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. तसे त्यांनी महामंडळाचे पदाधिकारी डॉ. माधवी वैद्य व प्रकाश पायगुडे यांनाही सांगितले आहे. 'अमेरिकेत मराठी साहित्य, नाटक, चित्रपटांविषयी प्रेम आहे. आम्हाला तिथे या सगळ्याची उणीव जाणवते. त्यामुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात, तेव्हा ती आमच्यासाठी पर्वणी ठरते. साहित्य संमेलनात साहित्यिकांशी संवाद साधण्याची संधी आम्हाला सॅन होजेच्या संमेलनात मिळाली होती. तसा आनंद आम्हाला पुन्हा घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही विश्व संमेलन घेण्यासाठी तयार आहोत,' असे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्रॉइट या शहरात ठाणेदार वास्तव्याला आहे. त्यामुळे डेट्रॉइट येथेच संमेलन घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. 'मिशिगन हे अमेरिकेच्या पूर्व भागातील राज्य आहे. या भागात बरेच मराठी बांधव राहतात. त्यामुळे या संमेलनालाही उत्तम प्रतिसाद मिळेल. मराठी साहित्यिकांना जागतिक स्तरावर 'एक्स्पोजर' मिळत नाही. अशा संमेलनातून त्यांना जागतिक अनुभव घेण्याची संधी मिळते. तो अनुभव लेखक म्हणून ते अधिक संपन्न पद्धतीने वाचकांना देऊ शकतात,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 'यशस्वी उद्योजक असलेल्या ठाणेदार यांचे 'ही 'श्री'ची इच्छा' हे आत्मपर पुस्तक बरेच गाजले होते. या पुस्तकाच्या बेचाळीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या. आता लवकरच या पुस्तकाचा पुढील भागही प्रकाशित होणार आहे. 'माझ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती २००४मध्ये प्रकाशित झाली होती. त्यानंतरही माझ्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले. त्याविषयी नव्या पुस्तकात लिहिले जाणार आहे,' असेही ठाणेकर यांनी सांगितले.
Vivo Smartphone : Vivo पुढील आठवड्यात भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च (Launch) करणार आहे. कंपनीने Vivo T1X च्या भारतात लॉन्च तारखेची माहिती दिली आहे. Vivo 20 जुलै रोजी आपला नवीन Series-T स्मार्टफोन लॉन्च करेल. Vivo ने पुष्टी केली आहे की फोन भारतात Flipkart द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, एका नवीन अहवालात या Vivo स्मार्टफोनची प्रमुख वैशिष्ट्ये (Features) समोर आली आहेत. टिपस्टर योगेश ब्रारचा हवाला देत अहवालात दावा केला आहे की Vivo T1X चे भारतीय प्रकार मलेशियामध्ये लॉन्च केलेल्या प्रकारापेक्षा वेगळे असेल. Vivo T1X च्या भारतीय व्हेरियंटची वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. Vivo भारतात आपला नवीन 4G स्मार्टफोन T1X लाँच करेल. कंपनी सीरीज-टी इंडिया लाइनअपमधील दुसरी 4G ऑफर असेल. रिपोर्टनुसार, फोनमध्ये 6. 58-इंचाचा IPS LCD असेल. हे फुल एचडी + रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. T1X 4G 44W स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित असेल, जो या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च झाला होता. हे 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह जोडले जाईल. अहवालात दावा केला आहे की Vivo T1X इंडिया व्हेरिएंट 5000mAh बॅटरी पॅक करेल परंतु बॉक्समधून फक्त 18W जलद चार्जिंग ऑफर करेल. फोन 44W फास्ट चार्जिंग प्रदान करेल. तसेच T1X 4G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यात 50MP मुख्य कॅमेरा (Camera) सेन्सर असेल. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की डिव्हाइस अल्ट्रावाइड कॅमेरासह येणार नाही आणि त्याऐवजी, Vivo 2MP सेन्सर ऑफर करेल. हा 2MP सेन्सर डेप्थ सेन्सिंग किंवा मॅक्रो फोटोग्राफीसाठी वापरला जाऊ शकतो. दरम्यान, Redmi Note 11, Poco M4 Pro, Realme 9, Moto G52 आणि या सेगमेंटच्या इतर बजेट स्मार्टफोन्सशी स्पर्धा करण्यासाठी या स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.
'केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा'\n'केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा'\nमुंबई : आजचा दिवस म्हणजेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Constitution Day) म्हणून देशभरात साजरा केला जातो. केंद्र सरकारडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे. मात्र काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. भारतीय संविधान दिनानिमित्ताने मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाने प्रदेश कार्यालयात संविधान गौरव दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी भाजपला कडाडून विरोध करण्याचे आवाहन केले आहे.\nसंविधान हे जात नाही किंवा धर्म नाही किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण आता केंद्रातले सत्ताधारी हे संविधान बदलू पहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आज आपली जी काही ओळख आहे ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध आपल्याला करायला हवा, असं सांगतानाच संविधान वाचलं तरच देश वाचेल. त्यामुळे आपण संपूर्ण राज्यभर संविधानाच्या संरक्षणासाठी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.\nअगदी मोठं आंदोलन जरी प्रत्येकाला शक्य झालं नाही, तरी आपल्या पातळीवर आपण छोट्या छोट्या गोष्टी करून संविधानाबद्दलच्या जाणिवांबाबत जागर करू शकतो. संविधानाने मला काय दिलं यावर एक निबंध स्पर्धा आपण घेऊ शकतो. आपण व्हॉट्सअप वापरतो. त्यात दर आठवड्याला आपण संविधानाचा एखादा सुविचार फॉरवर्ड करू शकतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.\nराष्ट्रवादी मासिकात दर महिन्याला आपण संविधानवर एक पान देण्याचा प्रयत्न करू. अकॅडेमिकली महाराष्ट्र सरकार संविधानासाठी काय करू शकेल यावर कार्यक्रम असायला हवा. पुढील पिढ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व वाढत राहील याची काळजी आपणच घ्यायला हवी. संविधानाच्या बळकटीसाठीच आपण आपली संघटना वाढवत राहूया, आणि त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपत राहूया, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.\nऔरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून 'अल्टिमेटम'!
देशाच्या सीमांचे रक्षण करताना अनेक सैनिक शहीद झाले. मात्र शहीद होण्यापूर्वी या सैनिकांनी मोठी कामगिरी करीत शत्रूला यमसदनी धाडलेले असते. त्यामुळे त्यांच्या कथा रुपेरी पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या जातात आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेची रक्षा हे सैनिक करतात त्याचप्रमाणे देशातील नक्षलींना रोखण्याचे काम सीआरपीएफचे जवान करीत असतात. आपल्याच देशातील बांधवांशी त्यांना लढाई करावी लागते. नक्षली छुपे युद्ध करीत असल्याने या सैनिकांना जीव तळहातावर ठेवूनच काम करावे लागते. नक्षली हल्ल्यात आजवर सीआरपीएफचे शेकडो जवान शहीद झालेले आहेत. या जवानांच्या कथा मात्र प्रेक्षकांसमोर आलेल्या नाहीत. मात्र आता शहीद झालेल्या सीआरएफच्या जवानांच्या कथा वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. देशात आतापर्यंत सीआरपीएफचे (CRPF) २,२२४ जवान विविध मोहिमांमध्ये शहीद झालेले आहेत. यातील निम्मे जवान तर छत्तीसगडमधील नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले आहेत. गेल्या २० वर्षांत छत्तीसगडमध्ये १२०० जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातही गडचिरोली, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड येथे नक्षल्यांच्या हल्ल्यात सीआरएफचे जवान शहीद झालेले आहेत. या शहीद सीआरपीएफ जवानांची गाथा पडद्यावर आणण्यासाठी सीआरएफने स्लो कंटेंट प्रा. लिमिटेडसोबत एक एमओयू केला आहे. सीआरपीएफच्या सेंट्रल झोनचे स्पेशल डीजी कुलदीप सिंह यांनी सांगितले, सीआरपीएफच्या जवानांच्या शौर्याची गाथा फक्त त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांपुरतीच मर्यादित राहाते. त्यांची गाथा-कथा आम्ही प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न या वेब सीरीजद्वारे करणार आहोत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमामुळे सीआरपीएफच्या जवानांचे मनोधैर्य तर वाढेलच, तरुणांनाही सीआरपीएफ जॉईन करण्याची इच्छा जागृत होईल हा या वेबसीरीज बनवण्यामागे आमचा मुख्य उद्देश आहे, असेही सिंह यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील २० शहीदजवानांची कथा प्रेक्षकांसमोर आणली जाणार आहे. यात सीआरपीएफचे जवान काम करताना दिसणार आहेत. तसेच नीलेश मिसराच्या आवाजात या कथांची ऑडिओ सीरीजही तयार केली जाणार आहे.
लाईव्ह न्यूज : नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन! अकोला : १६ लाखांच्या दरोड्याचे बिंग आलिशान जिप्सीमुळे फुटले! अकोला : अकोला : अकोला : अकोला : कर्जमाफीच्या कामात हलगर्जी करू नका! अकोला : 'त्या' १३३ शिक्षकांच्या कागदपत्रांची झाडाझडती! अकोला : अकोला : अकोला : मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत तीन हजार मतदारांचे अर्ज! अकोला : वातावरणातील बदल ठरताहेत घातक!
औरंगाबाद : जिल्ह्यात १०० कोरोनाबाधितांची भर पडली, तर ५ बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात २५२ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील १९, तर ग्रामीण भागातील २३३ जण घरी परतले असून १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ००८ झाली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३६६ जण कोरोनामुक्त झाले आहे, तर उपचारादरम्यान आतापर्यंत ३३६१ जणांचा मृत्यू झाल्याने १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले. नाईक नगर बीड बायपास २, जुना बाजार १, नारेगाव १, मयुर पार्क १, अशोक नगर १, विशाल नगर १, मथुरा नगर १, स्नेह नगर १, नेहरू नगर १, एकता नगर १, कांचनवाडी १, अन्य ८. तालुकानिहाय औरंगाबाद ६, फुलंब्री ७, गंगापूर २४, कन्नड १२, सिल्लोड २, वैजापूर २१, पैठण ७, सोयगाव येथे १ रुग्ण आढळून आला. घाटीत उपचारादरम्यान पडेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७२ वर्षीय महिला, जायकवाडी उत्तर पैठण येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात शिवाजी हायस्कूल परिसरातील ४६ वर्षीय पुरुष, हाऊसिंग सोसायटी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तालुक्यातील टाकळी प्र. दे. येथे शुक्रवारी रात्री कुत्र्याने घातलेल्या हैदोसात ३०-४० ग्रामस्थ जखमी झाले आहेत. झोपलेल्या ग्रामस्थांना कुत्र्याने लक्ष करत लचके तोडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील टाकळी प्र. दे. येथे शुक्रवारी रात्री कुत्र्याने घातलेल्या हैदोसात ३०-४० ग्रामस्थ जखमी झाले आहेत. झोपलेल्या ग्रामस्थांना कुत्र्याने लक्ष करत लचके तोडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टाकळी प्र. दे. गावातील सरला सुनील पगारे (३२), अनुष्का सोमनाथ मुसळे (४२), गोरख नाना सूर्यवंशी (४५), रत्नाबाई प्रकाश पाटील (५०), सकवारबाई पंडित मगर (७०), हिराबाई यशवंत वाघ (४५), वैभव वैजुनाथ पाटील (१३), सुधीर रामदास आहिरे (५६) (सर्व रा. टाकळी प्र. दे) रात्री घराबाहेर झोपलेले असताना कुत्र्याने त्यांना चावा घेतला. जखमींमध्ये कुत्र्याने गोरख सूर्यवंशी, रत्नाबाई पाटील, सकवारबाई मगर यांना चेहऱ्यावर व मानेला चावा घेवून गंभीर दुखापत केली. जखमींना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरीत जखमींमध्ये अनेकांच्या हाता पायाचे व अंगाचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले आहेत. या घटनेतील गंभीर जखमींना धुळे जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
Cuban Revolutionary Fidel Castro । क्युबाचा क्रांतिसूर्य । Loksatta\nघरदार सोडून, केस वाढवून हिप्पींचे थवे समाधानाच्या शोधात उन्मुक्त वणवण करू लागले.\nलोकसत्ता टीम । November 27, 2016 02:25 am\nविसाव्या शतकातलं साठचं दशक अनेकार्थानी महत्त्वाचं आहे. अठराव्या शतकातली औद्योगिक क्रांती, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली साम्यवादी क्रांती आणि दोन जागतिक महायुद्धं आणि त्यानंतर सुरू झालेलं शीतयुद्ध यांच्या बेरजेतून अवतरलेल्या जगाने कूस पालटली ती या दशकात. तो काळ मोठा विचित्र होता. परंपरांची पडझड झाली होती. नवी मूल्यव्यवस्था उदयास येऊ लागली होती. पिढय़ान् पिढय़ा चालत आलेल्या सामाजिक-राजकीय-कौटुंबिक संस्था उद्ध्वस्त धर्मशाळा बनल्या होत्या. अस्वस्थतेचा गारठा जणू अवघ्या आसमंतात भरलेला होता. हे टिपेला पोचलं अन् साठचं दशक उगवलं.\nअमेरिकेत 'काळ्या' संगीतातून बंडखोरीची रागदारी आळविली जाऊ लागली. घरदार सोडून, केस वाढवून हिप्पींचे थवे समाधानाच्या शोधात उन्मुक्त वणवण करू लागले. तरुणांच्या ओठीची प्रीतीगीतं जाऊन तिथं क्रांतीचे रोमँटिक पोवाडे रुळू लागले. 'युग की जडता'च्या विरोधात 'इन्कलाब'चे नारे घुमू लागले. अशा भारलेल्या वातावरणात, क्युबातली हुकूमशाही सत्ता उलथवून लावणारा फिडेल कॅस्ट्रो नावाचा अवघ्या विश्वातला बंडखोर तरुणाईचा नायक बनला नसता तर नवलच होतं.\nक्युबा अमेरिकेच्या परसदारातला, लॅटिन अमेरिकेतला एक एवढासा देश. आपल्या कोकणासारखा. ऊस, तंबाखू, कॉफी पिकवणारा. मँगनीझ, कॉपर, निकेल, अशा विपुल खनिजसंपत्तीने संपन्न असा. पण महासत्तेच्या पर्जन्यछायेत असणाऱ्या देशाला महासत्तेचं अंकित बनून राहण्याखेरीज गत्यंतर नसतं. क्युबाची साधनसंपत्ती अमेरिकी भांडवलशाहीचे खिसे भरीत होती. आणि त्या हितसंबंधांना बाधा येत नव्हती तोवर तिथं काय चाललंय, हे पाहण्यात अमेरिकेला रस नव्हता. उलट तिथल्या क्रूर, जुलमी हुकूमशाही राजवटीकडं कानाडोळा करणं हेच अमेरिकेच्या सोयीचं अन् हिताचं होतं. परिणामी क्युबाचा हुकूमशहा बाटिस्टा लोकांची सुखेनैव पिळवणूक करीत होता. एकीकडं हुकूमशाही राजवट आणि दुसरीकडं व्यापारी, खाणमालक आणि ऊस मळेवाले यांचं शोषण या चरकात सर्वसामान्य शेतकरी, कामकरी पिळून निघत होते. फिडेल यांचा लढा जुलूमशाहीविरोधात होता. विद्यापीठात शिकणारा हा बुद्धिमान तरुण. सुरुवातीला सदनशीर मार्गानेच त्याने आपली लढाई सुरू केली. पण संगिनीचा मुकाबला अर्ज-विनंत्यांनी करता येत नसतो, हे लक्षात आल्यावर त्यानेही हाती बंदूक घेतली. ज्या व्यवस्थेतून मूठभर प्रस्थापितांची बेशरम श्रीमंती आणि बाकीच्यांची कंगाली ही विषमता येते ती व्यवस्था बदलणं हे त्याचं ध्येय होतं. समता प्रस्थापित करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणजे तो साम्यवादी होता का? तर तसं काही नव्हतं. हे सगळं ज्या इझममध्ये बसतं तोच त्याचा इझम होता. त्याला साम्यवाद म्हणायचं की समाजवाद हे त्याने जगावर सोडून दिलं होतं. वस्तुतः पोथीबंद साम्यवाद आणि साम्यवादी पक्ष याबद्दल त्याला फारस ममत्व नव्हतं. लेबलच लावायचं, तर त्याला 'मुक्त साम्यवादी' म्हणता येईल. बंडखोर क्रांतिकारक चे गव्हेराच्या साथीने फिडेलने उभारलेल्या लढय़ाला जानेवारी १९५९ मध्ये यश आलं. मूठभर साथीदाराच्या साह्य़ाने गनिमी काव्याने लढत त्याने अमेरिकाधार्जिण्या बटिस्टाची जुलमी राजवट उलथवून क्युबाची सत्ता हस्तगत केली. हा अमेरिकेला मोठाच धक्का होता.\nशीतयुद्ध ऐन भरात असलेला तो काळ. तिकडं व्हिएतनाम पेटलेलं. चिलीमध्ये जनरल पिनोशेच्या राजवटीविरोधात वणवे भडकलेले. तशात क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रोनेही क्रांती घडविली. या घटनेने अमेरिकन राज्यकर्ते किती चिडले होते याचं प्रत्यंतर लगेच आलं. १९६१ मध्ये जॉन एफ केनेडींनी क्युबावर छुपं आक्रमण केलं. पण त्या प्रकरणात अमेरिकेची मोठी नाचक्की झाली. यावर अमेरिकेने क्युबाविरोधात आर्थिक र्निबधांचं हत्यार परजलं. त्याला उत्तर म्हणून फिडेल यांनी आपण साम्यवादी असल्याचं घोषित करून सोव्हिएत युनियनशी जवळीक साधली. एकीकडे रशियाकडून मिळणारी मदत आणि दुसरीकडे जमीनसुधारणा कायद्यांच्या माध्यमातून जमिनीचे फेरवाटप अशा मार्गानी आता फिडेल यांचा दारिद्रय़ाविरोधातला लढा सुरू झाला. देशाची उभारणी करायची तर त्यासाठी स्वस्थता हवी. पण शेजारीच अमेरिका क्युबातला प्रतिक्रांतीवादी शक्तींना गोंजारीत बसलेली असताना ते मिळेल याची खात्री नव्हती. रशियाला क्षेपणास्त्र तळासाठी क्युबाची भूमी देण्याचा निर्णय या परिस्थितीतून आला होता. १९६२ च्या या 'क्युबन मिसाईल क्राइसिस'नंतर बलाढय़ अमेरिकेसमोर छाती काढून ठाम उभा राहणारा नेता म्हणून फिडेल यांची प्रतिमा अधिक उजळली. व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात अमेरिकेतील तरुण पिढीने जेव्हा बंड पुकारलं तेव्हा त्यांच्यासमोर आदर्श चे आणि फिडेल यांचेच होते.\nगेली सलग पाच दशके कॅस्ट्रो या नावाची जादू, त्याचा करिष्मा अभंग आहे. हे कशामुळे झालं? बलाढय़ महासत्तेला आयुष्यभर टक्कर दिली म्हणून? सीआयएने अनेकवार खुनाचे प्रयत्न करूनही त्यातून सहीसलामत सुटले म्हणून? जगभरातील क्रांतिकारांना, पॅलेस्टिनसारख्या मुक्तिलढय़ांना सक्रिय पाठिंबा दिला म्हणून की सहकारी शेती, जमिनीचं फेरवाटप यांसारख्या उपायांनी, समाजवादी विचारसरणीने राष्ट्रउभारणीचे प्रयत्न केले म्हणून? खरं तर हे सगळं मिळून जे रसायन तयार होतं तोच कॅस्ट्रोंचा करिष्मा होता.\nमला दोषी ठरवा. त्याला काहीही महत्त्व नाही. कारण इतिहासच मला दोषमुक्त ठरवील. (सांतियागो डे क्युबा येथील लष्करी बराकीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली सुरू असलेल्या खटल्याच्या वेळी युक्तिवाद करताना. १९५३)\nक्रांती म्हणजे गुलाबांची शय्या नाही. क्रांती म्हणजे भविष्य आणि वर्तमान यांतील संघर्ष आहे.\nक्रांती म्हणजे शोषकांची शोषितांविरोधातील हुकूमशाही.\nमी ८२ जणांसह क्रांतीस प्रारंभ केला. आता मला पुन्हा क्रांती करावी लागली, तर मी ती १०-१५ जणांसह आणि संपूर्ण विश्वासाने करीन. तुमच्याकडे विश्वास असेल आणि कृतीची योजना असेल, तर तुम्ही किती लहान आहात याने काहीही फरक पडत नाही.\nमी मार्क्सवादी-लेनिनवादी आहे आणि आयुष्याच्या अंतिम दिवसापर्यंत तसाच असेन.\nमाझं ज्यांवर पोषण झालं त्या कल्पना आणि त्या प्रतीकाची.. येशू ख्रिस्त नावाच्या त्या असामान्य व्यक्तीची कल्पना यांच्यात मला कधीही विसंगती दिसली नाही.\nते समाजवादाच्या अपयशाबद्दल बोलत असतात. पण आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत तरी कुठं भांडवलशाहीचं यश दिसतंय?\nमला भांडवलशाहीची घृणा वाटते. ती घाणेरडी आहे, अश्लील आहे, अलगतावादी आहे.. कारण तिच्यातून युद्ध, ढोंग आणि स्पर्धा जन्माला येते.\nकधी तरी अमेरिकेतील भांडवलशाही व्यवस्था नाहीशी होईल. कारण कोणतीही सामाजिक वर्गव्यवस्था अमर नसते. एके दिवशी वर्गीय समाज नाहीसा होईल.\nमी महापौरांना मत देणार नाही.. ते त्यांनी मला रात्रभोजनाला बोलावलं नाही म्हणून नाही; तर विमानतळावरून इथं शहरात येताना रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत म्हणून!\nमनुष्य आपल्या नियतीला आकार देत नसतो. त्या-त्या काळासाठी नियती मनुष्याला जन्माला घालत असते.\nअमेरिकेची नाचक्की झाली, ते प्रकरण..\nक्युबातील कॅस्ट्रो यांची साम्यवादी राजवट म्हणजे अमेरिकेसाठी कायमच डोकेदुखी होती. आजवर अटलांटिक महासागरपार दूर पूर्व युरोपमध्ये क्षितिजावर जाणवणारा साम्यवादाचा धोका आता थेट अमेरिकेच्या उंबरठय़ावर येऊन दारावर टकटक करत होता. त्यामुळेच कॅस्ट्रो यांची राजवट उलथवून टाकण्याचे अनेक प्रयत्न अमेरिकेने केले. त्यापैकी सर्वात गाजलेली कारवाई म्हणजे 'बे ऑफ पिग्ज.'\nकॅस्ट्रो यांना हटवण्याच्या मोहिमेसाठी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी सीआयए या गुप्तचर संस्थेला मार्च १९६० मध्ये १३.१ दशलक्ष डॉलचा निधी मंजूर केला. कॅस्ट्रो यांच्या क्रांतीनंतर अनेक क्युबातील अनेकांनी अमेरिकेतील मायामी आणि आसपासच्या प्रदेशात स्थलांतर केले होते. त्यांना हाताशी धरून सीआयएने योजना आखली. या निर्वासितांना शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्यात आले आणि शेजारच्या ग्वाटेमाला या देशात ब्रिगेड २५०६ नावाने गनिमी सैन्य सज्ज करण्यात आले. आयसेनहॉवर यांच्यानंतर अध्यक्ष झालेले जॉन एफ. केनेडी यांनी ४ एप्रिल १९६१ रोजी या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला.\nत्यानुसार क्युबाच्या दक्षिण किनाऱ्यावरील 'बे ऑफ पिग्ज' या ठिकाणी सीआयएच्या मदतीने १४०० गनिमांना उतरवण्याचे ठरले. १३ एप्रिल १९६१ रोजी हे सर्व गनीम ग्वाटेमालात एकत्र जमले. १६ एप्रिलला ते बोटीने बे ऑफ पिग्ज येथे उतरले. तत्पूर्वी सीआयएने पुरवलेल्या बी-२६ विमानांनी क्युबात दोन दिवस बॉम्बफेक केली होती. कॅस्ट्रो यांच्या सैन्याने या हल्लेखोरांचा जोरदार प्रतिकार केला. या मोहिमेत अमेरिकेचा हात असल्याचे जगाच्या नजरेसमोर येऊ लागताच अमेरिकेने हवाई हल्ले थांबवले आणि गनीम एकाकी पडले. अखेर २० एप्रिलला हे गनीम क्युबाच्या सैन्यासमोर शरण आले. अमेरिकेच्या मदतीने लढणारे शेकडो गनीम मारले गेले तर कित्येक बंदी झाले. क्युबातील कॅस्ट्रो यांची राजवट उलथवून टाकण्यास हा हल्ला अयशस्वी ठरला. उलट त्याने अमेरिकेची जगभर नाचक्की तर झालीच आणि कॅस्ट्रो यांची सत्तेवरील मांड अधिक पक्की झाली.\nशीतयुद्धाच्या काळात क्युबातील क्षेपणास्त्र पेच विशेष गाजला होता. ऑक्टोबर १९६२ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना अशी माहिती मिळाली की, क्युबात रशियन बनावटीची क्षेपणास्त्रे लावण्यात आली आहेत. अमेरिकेच्या यू २ या हेरगिरी विमानांनी घेतलेल्या छायाचित्रात क्युबात रशियाने क्षेपणास्त्रे लावल्याचे स्पष्ट झाले होते. अध्यक्ष केनेडी यांनी लगेच त्यावर कठोर भूमिका घेतली. रशियाचे पंतप्रधान निकिता क्रुश्चेव यांच्याशी त्यांचा नजरेला नजर भिडवून संघर्ष सुरू होता. एकमेकांचा विनाश करण्याची भाषा यात बोलली गेली. त्यावेळी युद्ध झाले असते तर लाखो लोक मारले गेले असते. २९ ऑक्टोबर १९६२ रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाची बैठक झाली.\nअखेर केनेडी व त्यांच्या सल्लागारांनी एकत्र बसून अनेक पर्याय शोधले. आठवडाभर गुप्त चर्चेनंतर अमेरिकेने क्युबात येणाऱ्या शस्त्रपुरवठय़ाची नौदलामार्फत कोंडी करण्याचे ठरवले. दोन आठवडे तणावाखाली गेले, कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते. क्युबावर हल्ला करण्याचा एक पर्याय त्यावेळी होता पण अमेरिकेने असे ठरवले की, रशियाने क्षेपणास्त्रे मागे घेतली तर हल्ला करायचा नाही. हा पर्याय फेटाळला गेल्यास २४ तासांत क्युबावर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेने दिली होती. अमेरिकेने क्युबावर हल्ला करू नये व तुर्कस्थानातील क्षेपणास्त्रे सहा महिन्यांत माघारी घ्यावीत तर आम्ही क्युबातील क्षेपणास्त्रे मागे घेऊ असे पत्र क्रुश्चेव यांनी पाठवले व तो प्रस्ताव मंजूर झाल्याने पुढचा अनर्थ टळला. रशियाची क्षेपणास्त्रे अमेरिकेतील फ्लोरिडापासून ९० मैल अंतरावर होती. त्यावेळी केनेडी यांनी हा धोका २२ ऑक्टोबर १९६२ रोजी टीव्हीवरील भाषणात जाहीरपणे मांडला होता व लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी दर्शवली होती. या पेचप्रसंगात दोन्ही महासत्ता युद्धाच्या टोकावर होत्या. रशियाने पाठवलेली क्षेपणास्त्रे अण्वस्त्र सज्ज होती. रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांनी आण्विक धाक निर्माण करण्यासाठी क्युबात क्षेपणास्त्रे तैनात केली होती कारण त्याच वेळी तुर्कस्थान व पश्चिम युरोपातील क्षेपणास्त्रे रशियाच्या दिशेने रोखलेली होती.\nभारत-क्युबा मैत्रीचे गाढ नाते\nभारताचे आणि क्युबाचे संबंध कायमच मित्रत्वाचे आणि सौहार्दपूर्ण राहिले आहेत. फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांचे सहकारी चे गव्हेरा यांच्या नेतृत्वाखाली १९५९ साली क्युबाचे तत्कालीन अध्यक्ष फुल्गेशियो बॅटिस्टा यांची जुलमी राजवट उलथवून जी साम्यवादी राजवट प्रस्थापित झाली तिला सर्वप्रथम पाठिंबा देणाऱ्या मोजक्या देशांपैकी भारत एक होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळण्यासाठी क्युबाने भारताला कायम पाठिंबा दिला आहे आणि क्युबावरील अमेरिकी र्निबध उठवले जावेत यासाठी भारताने सतत प्रयत्न केले आहेत.\nशीतयुद्धाच्या काळात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या अलिप्ततावादी चळवळीने दोन्ही देशांना आणखी जवळ आणले. भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ऑक्टोबर २०१३ साली क्युबाची राजधानी हवानाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी कॅस्ट्रो यांचा उल्लेख 'अलिप्ततावादी चळवळीचा झळाळता तारा' असा केला होता. कॅस्ट्रो सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी अनेक वेळा एकमेकांना भेटी दिल्या होत्या. क्युबातील क्रांतीनंतर लगेचच १९५९ साली चे गव्हेरा यांनी दिल्लीला भेट दिली होती. त्यानंतर १९६० साली नेहरू आणि कॅस्ट्रो यांची न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अलिप्ततावादी चळवळीच्या परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती.\nभारताच्या मैत्रीबद्दल कॅस्ट्रो नेहमीच कृतज्ञतेने बोलत. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते, 'मला भेटायला आलेली पहिली व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नेहरू. ते मी कधीच विसरू शकत नाही. मी ३४ वर्षांचा होतो आणि मला कोणी फारसे ओळखतही नव्हते. मी थोडा तणावाखाली होतो. मात्र नेहरूंनी मला धीर दिला आणि माझा तणाव कुठल्या कुठे पळून गेला.'\nत्यानंतर १९८५ साली राजीव गांधी आणि २००६ साली मनमोहन सिंग यांनीही क्युबाला भेट दिली होती. कॅस्ट्रो यांनी १९७३ आणि १९८३ साली भारताला भेट दिली होती. दोन्ही वेळा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. कॅस्ट्रो यांनी इंदिरा गांधी यांना दिलेले आलिंगन आणि त्याचे छायाचित्र 'कॅस्ट्रो हग' म्हणून बरेच गाजले आणि भारत-क्युबा संबंधांचे प्रतीक बनले.\nशीतयुद्धाच्या काळात क्युबाला सोव्हिएत युनियनचा मोठा आधार होता. १९९१ ते १९९३ या काळात सोव्हिएत संघ विसर्जित झाल्यानंतर तो आधार नाहीसा झाला, पण भारताने क्युबाची साथ सोडली नाही. अमेरिकेने लादलेल्या र्निबधांमुळे क्युबात अन्नधान्य आणि अन्य अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा जाणवत होता. त्या वेळी भारताने क्युबाला दहा हजार टन तांदूळ आणि दहा हजार टन गहू पाठवला. कॅस्ट्रो यांनी कृतज्ञतेने या मदतीचा उल्लेख 'ब्रेड ऑफ इंडिया' असा केला आणि तो बराच गाजला. कारण भारताने पाठवलेल्या गव्हापासून तयार झालेल्या पावाची किमान एक तरी लादी क्युबाच्या त्या वेळच्या ११ दशलक्ष लोकसंख्येपैकी प्रत्येक नागरिकाच्या वाटय़ाला आली असती. त्यानंतर क्युबातील भूकंपावेळी भारताने २ दशलक्ष डॉलर इतकी मदत केली होती.\n१३ ऑगस्ट १९२६ : पूर्व क्युबातील बायरन येथे कॅस्ट्रो यांचा जन्म. वडील स्पॅनिश स्थलांतरित जमीनदार. विद्यार्थी म्हणून उत्तम प्रगती. शेती सोडून शिक्षणावर भर.\n२६ जुलै १९५३ : सांतियागो डे येथे क्युबाच्या लष्करी बराकीवर हल्ल्याचे नेतृत्व, कॅस्ट्रो यांना अटक.\n२ डिसेंबर १९५६ : मेक्सिकोतून ग्रॅनमा जहाजाने ८१ साथीदारांसह क्युबात येऊन सिएरा माएस्ट्रा येथे २५ महिने लष्करी मोहीम.\n१ जानेवारी १९५९ : हुकूमशहा फुलगेनशियो बॅटिस्टा देशाबाहेर पसार. कॅस्ट्रो यांचे हवानात विजयी आगमन.\n१५ ते २७ एप्रिल १९५९ : अमेरिकेचे उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याशी भेट.\n१९६० : रशियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित.\n१९६१ : अमेरिकेशी राजनैतिक संबंध तोडले.\n१७ ते १९ एप्रिल १९६१ : कॅस्ट्रोविरोधी १४०० जणांचा 'बे ऑफ पिग्ज'मधील आक्रमणात पराभव.\n१३ फेब्रुवारी १९६२ : अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे क्युबावर र्निबध\nऑक्टोबर १९६२ : रशियाने क्युबात क्षेपणास्त्रे पाठवली, पण अमेरिकेचे क्युबावरील संभाव्य आक्रमण टळले.\nएप्रिल १९६३ : रशियाला पहिली भेट.\n१९६५ : क्युबात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना.\n१९७५ : अंगोलाच्या स्वातंत्र्यासाठी सैन्य पाठवले.\n१९८० : १२५००० शरणार्थीना बाहेर जाण्यास परवानगी.\n१९९० : सोविएत रशियाच्या विघटनानंतर क्युबाची आर्थिक कोंडी.\n१९९५ : चीनला भेट\n१९९८ : पोप जॉन पॉल द्वितीय यांचे क्युबा भेटीत स्वागत\nमार्च २००३ : ७५ विरोधी नेत्यांच्या अटकेचे आदेश.\n३१ जुलै २००६ : आतडय़ाच्या शस्त्रक्रियेनंतर सत्ता बंधू राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे हस्तांतरित.\nफेब्रुवारी २००८ : राऊल कॅस्ट्रो अध्यक्षपदी.\n२२ मार्च २०११ : फिडेल कॅस्ट्रो यांनी अधिकारपद सोडल्याचे जाहीर केले.\n१७ डिसेंबर २०१४ : राऊल कॅस्ट्रो यांच्याकडून अमेरिकेच्या मैत्रीप्रस्तावास प्रतिसाद .\n२० जुलै २०१५ : अमेरिका व क्युबा यांचे एकमेकांच्या देशात दूतावास सुरू.\n२५ नोव्हेंबर २०१६ : फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन.\nFirst Published on November 27, 2016 2:25 am\nWeb Title: cuban revolutionary fidel castro\n1 स्वरभाषेचा सांगाती..\n2 बहुआयामी, व्यासंगी आणि अजातशत्रू\n3 आठवडय़ाची शाळा : ठेंगण्या शाळेला उंच ताठ कणा मिळतो तेव्हा..
यूपीच्या जनतेनं रामराज्याची निवड केली, असंही रवि किशन म्हणाले. Uttar Pradesh Assembly elections Result 2022: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने (BJP) धडाकेबाज विजयाच्या दिशेने आगेकूच केली. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या चार तासांतच चित्र जवळपास स्पष्ट झालं. भाजपाने ४०३ पैकी २५०+ जागांवर आघाडी मिळवली. भाजपाच्या विजयाचं चित्र स्पष्ट होताच नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. यूपीच्या जनतेने रामराज्याची निवड केली असं मत खासदार रवि किशन (Ravi Kishan) यांनी व्यक्त केलं. "उत्तर प्रदेशच्या जनतेने मनात पक्क केलं होतं की यूपीमध्ये रामराज्य आणायचं. रामराज्य साकारण्याची सुरूवात यूपीच्या जनतेने केली आहे. नवं उत्तर प्रदेश आणि नवीन भारताच्या दिशेने आगेकूच करण्याच्या उद्देशाने यूपीच्या जनतेने त्यांचं भविष्य निवडलं आहे. आता अखिलेश यादव आणि त्यांचे मित्रपक्षांना कोणत्या गोष्टीचा घमंड असेल? कारण त्यांचा मोठा पराभव झालाय. विरोधकांना मी सांगू इच्छितो की ना सायकल, ना हत्ती, ना हात. . . उत्तर प्रदेशच्या जनतेची योगींनाच साथ", अशा शब्दात गोरखपूर मतदारसंघातील भाजपाचे खासदार रवि किशन यांनी आनंद व्यक्त केला. (Uttar Pradesh Assembly Election 2022) उत्तर प्रदेशात सर्व ४०३ जागांचे कल हाती आले. भाजपने २६९ जागांवर मोठी आघाडी घेतली. तर सपा १२३ जागा, बसपा ०५, काँग्रेस ०३ आणि अन्य ३ वर आघाडीवर असल्याचं दिसलं. दुपारी १ वाजेपर्यंत गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या रायबरेली येथे काँग्रेस उमेदवाराला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर राहिले. दुपारी १ वाजेपर्यंत योगी आदित्यनाथ १६ हजार ५६९, समाजवादी पक्षाच्या सुभाती शुक्लांना ४ हजार २९०, काँग्रेसच्या चेतना पांडे २२६ मते, बसपचे ख्वाजा शमसुद्दीन यांना १०४२ मते मिळाली होती.
Car prices will increase : जर तुम्ही कार घेण्याची तयारी करत असाल तर घाई करा. कारण पुढील महिन्यात म्हणजेच 1 जानेवारीपासून तुम्हाला चारसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. दरम्यान, तुम्ही या महिन्यात Citroen कार घेण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. कारण 1 जानेवारी 2023 पासून ते आपल्या कारच्या किंमती 1. 5% ते 2% ने वाढवतील. कंपनी C3 आणि C5 Aircross हे दोन मॉडेल भारतीय बाजारात विकत आहे. अशा प्रकारे, नवीन दरवाढीनंतर, Citroën C3 खरेदी करण्यासाठी रु. 8,800 पर्यंत आणि C5 Aircross ची किंमत रु. 16,300 पर्यंत असेल. जुन्या किमती जुन्या स्टॉकवरच लागू होतील. आता खरेदी केल्यावर, ग्राहकांना डीलर्सकडून इअर-एंड डिस्काउंट देखील मिळेल. Citroën C3 ची किंमत Maruti Swift, Tata Punch आणि Hyundai Venue पेक्षा कमी आहे. कंपनी या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 10,000 रुपयांचे दोन वर्षांचे मेन्टेनन्स पॅकेज देत आहे. अशा प्रकारे ती 30 हजार रुपयांची ऑफर बनते. या ऑफरनंतर त्याची किंमत 5. 88 लाख रुपयांवरून 5. 58 लाख रुपयांपर्यंत खाली येईल. म्हणजेच ही कार तुम्ही चेन्नई (तामिळनाडू), बेंगळुरू (कर्नाटक), कोईम्बतूर (तामिळनाडू), हैदराबाद (तेलंगणा), कालिकत (केरळ), कोची (केरळ), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), पुणे (महाराष्ट्र) येथे खरेदी करू शकता. तसेच मुंबई (महाराष्ट्र) ), सूरत (गुजरात), कोलकाता (पश्चिम बंगाल), अहमदाबाद (गुजरात), लखनौ (उत्तर प्रदेश), जयपूर (राजस्थान), गुरुग्राम (हरियाणा), नवी दिल्ली आणि चंदीगड या ठिकाणीही खरेदी करू शकता. Citroën C3 दोन इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हे हाय-स्पेक 1. 2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि लोअर-स्पेक नॅचरली एस्पिरेटेड 1. 2-लीटर पेट्रोल इंजिनसह ऑफर केले जाईल. हाय स्पेक इंजिन मॉडेल 110hp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. लो-स्पेक मॉडेल 82hp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध असेल. हे 5-स्पीड आणि 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. Citroën C3 ब्लॅकच्या सीट फॅब्रिकसाठी, फ्रेंच ऑटोमेकर 4 मोनोटोन रंग, 6 ड्युअल-टोन रंगांसह येतो. डॅशबोर्डमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसाठी समर्थन असलेली 10-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, चार-स्पीकर साउंड सिस्टम, फ्रंट आणि रिअर यूएसबी चार्जिंग पोर्ट समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी, यात ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर आणि सीटबेल्ट रिमाइंडर मिळतात. या एसयूव्हीची लांबी 3,981 मिमी, रुंदी 1,733 मिमी आणि उंची 1,586 मिमी आहे. यात ड्युअल-टोन अॅलॉय व्हील, चार मोनो-टोन आणि दोन ड्युअल-टोन शेड्स असलेले हेक्सागोनल एअर डॅम, एक्स-आकाराच्या फॉक्स स्कफ प्लेट्स आणि अष्टपैलू ब्लॅक क्लेडिंग मिळतात. त्याच्या चाकांमध्ये 15-इंच स्टीलची चाके जोडण्यात आली आहेत. एक पर्याय म्हणून, तुम्हाला 15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील मिळतात. कारच्या मागील बाजूस रॅपराउंड टेल-लाइट्स लावण्यात आले आहेत. सिट्रोएनने या वर्षी सप्टेंबरमध्ये आपली दुसरी कार, C5 एअरक्रॉस फेसलिफ्ट लॉन्च केली. त्यावेळी त्याची एक्स-शोरूम किंमत 36. 67 लाख रुपये होती. यात 2. 0-लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन मिळते, जे 175bhp पॉवर आणि 400Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर, त्याचे मायलेज 17. 5 kmpl आहे. ट्रान्समिशनसाठी, फेसलिफ्ट फक्त 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह आणण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पुढील महिन्यापासून ही आलिशान कार खरेदी करणे आणखी महाग होणार आहे.
जाहिरात टाकण्यास काही तांत्रिक अडचण येत असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क केल्यास आम्ही जाहिरात टाकण्यास मदत करू. आजचे जग हे मार्केटिंग चे जग म्हणून ओळखले जाते.मार्केटिंग ची व्याख्या म्हणजे तुमचे प्रॉडक्ट, सेवा, मत, विचार जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवणे, त्यांना ते समजावणे आणि ते जास्तीत जास्त जनतेला वापरायला लावणे म्हणजे मार्केटिंग होय. जगभर अनेक गोष्टींची मार्केटिंग केली जाते. वेगवेगळ्या नवीन जुन्या गोष्टी जणते पर्यंत पोहचवल्या जातात चतुराईने आपल्याला त्या वापरण्यास भाग पाडले जाते. मग या युगात शेतकरी मार्केटिंग पासून लांब का? त्यांना देखील त्यांच्या पिकांची मार्केटिंग करता यायला हवी. त्यांना देखील त्यांच्या मालाला नावलौकिक मिळू चांगले मूल्य भेटले पाहिजे. या शेतीच्या आधुनिक कल्पनेला साकार करण्यासाठी काम करणारे डिजिटल व्यासपीठ म्हणजे कृषी क्रांती. या नावीन्य पूर्ण संकलपनेचा भाग बना. तोंडाला काळं कापड लावलेला हा जो इसम दिसतोय त्याचं नाव आहे, विलास जावळे. तो एकेकाळी पोलिस होता. एकेकाळी तोही आरोपींना असाच पकडायचा. पण, नैतिकता सोडली आणि हातात बेड्या पडल्या. त्याचं झालंय असं की, हा पठ्ठ्या लोकांना रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवून बोलवायचा. आणि सावज टप्प्यात आलं की त्याचे मोबाईल आणि गाडी हातोहात गायब करायचा. अनेक तरुणांचे मोबाईल, गाड्या चोरल्याच्या तक्रारी आल्यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच. आणि त्याच्याकडून तब्बल 8 गाड्यांसह 11 स्मार्टफोन जप्त केलेयत.
आलाय. प्रेक्षकांची पसंती आशयघन सिनेमांना जास्त मिळते. सिनेमातून दिल्या जाणा-या संदेशावर लोकांचं लक्ष आहे. यावर्षांची सुरुवातच अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर असे दोन तगडे स्टार असलेल्या 'वझीर' ने झाली खरी पण हा चित्रपट चालला नाही. अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट' नं आशयाच्या जोरावर 128 कोटीचा बिझनेस केला. त्याच्यानंतर मात्र शाहरूखचा 'फॅन' प्रियांका चोप्राचा 'जय गंगाजल' सोनम कपूरचा 'नीरजा' हे चित्रपट पोटापुरता गल्ला जमवत एक्झिट घेतली.पण अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल्ल 3' या मल्टीस्टारर चित्रपटानं 106 कोटींचा आकडा पार केला.
संक्रांतीला दिवसही कणाकणानी मोठा व्हाला सुरूवात होते. सकाळी सकाळी वाजणारी बोचरी थंडी मध्यान्हीच्या उन्हात बोथट व्हायला लागली आणि पतंगांच्या मोसमाला सुरवात झाली. निरभ्र आकाशात रंगीबेरंगी पतंगाच्या आकृत्या उमटायला लागल्या. सारेच सरसावून गच्चीवर, मैदानात जमायला लागले. नवीन काचेरी मांजा, नवीन चकर्या आणि नवनवीन आकाराचे पतंग बाजारात दिसू लागले. बघावे तिकडे पतंगाची फर...फर, पतंग उडवणार्यांचा जल्लोष नि कल्लोळ. समोरसमोरच गच्चीतून दोन पतंगाची अगदी चढाओढ लागली. एक पतंग कटला आणि त्यातला दुसरा शांतपणे आकाशात उडत राहिला. कटलेला पतंग आनंदात बेहोशीत दुसर्या पतंगाला म्हणाला, 'बघ! आज मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे. मी आज मनसोक्त वाटेल तसा आकाशात उडू शकतो. ना मला दोर्याचे बंधन ना चक्रीशी बांधिलकी. मी आज मुक्त आहे! मुक्त आहे!' असे गातच तो बेहोशीत बेधूंद होऊन जणू वार्याशीस स्पर्धा करत गिरक्या घेत उडत राहिला. शांतपणे उडणारा पतंग तला म्हणाला, 'अरे! सावर स्वतःला. स्वातंत्र्य मिळालं म्हणून असा स्वैर उडू नकोस. शांतपणे स्वतःला सावरून उडत राहिलास तर कुणाच तरी गच्चीत, किंवा अंगणात सुखरूपपणे पोहचशील.' आपल्याच नादात उडणार्या त्या पतंगाला त्याचे हे उपदेशाचे डोस नको होते. स्वातंत्रचा आनंद लुटता लुटताच तो गिरक्या घेत घेत बेछूटपणे उडत राहिला. क्षणार्धात वार्याचा एक झोत आला नि कटलेला पतंग लांब लांब दूरवरफेकला गेला. गिरक्या घेतच भेलांडत भेलांडत बाभळीच्या झाडात अडकून बसला. असंख्य काटय़ांनी त्याचे अंग विदीर्ण विदीर्ण होऊन गेले. कटलेला पतंग पकडण्यासाठी अनेकजण झेलगुंडा टाकत राहिले, दगड मारत राहिले. विदीर्ण झालेला पतंग आणखीनच विदीर्ण होऊन चिंध्या होऊन झाडाला लोंबकळत राहिला.
ह्मणून केवळ राजकुमारांना त्यांच्या संस्थानाबाहेर, युरोपियन पालकांच्या देखरेखेखालीं त्यांची काळजी घेण्यासाठी एकादा स्थानिक मनुष्य असल्याशिवाय कधींहि ठेवण्यांत येऊं नये. " स्वतःच्या बाबतींत स्थानिक मनुष्यांच्या उणीवेबद्दल महाराजांना कुरकुर करण्यास मुळींच जागा नव्हती. मात्र आपण अल्पवयस्क असलेवेळी आपल्या संस्थानापासून लांब अंतरावर राहणे, महाराजांना बिलकुल पसंत नव्हते, अर्से वरील अभिप्रायावरून उघड होतें. राजकोटडून धारवाडला स्थलांतर झाल्याचे पाहून महाराजांना अतिशय आनंद झाला असला पाहिजे, अर्से अनुमान केलें तर ते चुकीचें होण्याचा संभव नाहीं. धारवाडला जवळ जवळ चार वर्षे राहून मि. फ्रेजर यांच्या देखरेखीखालीं महाराजांचा अभ्यासक्रम पुरा झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये महाराजांना जे उच्चासन मंडित करावयाचें होते त्यासंबंधी आपलीं कर्तव्ये करण्यास ते योग्य झाले. प्रत्येक नियतकालाच्या शेवटीं महाराजांच्या व त्यांच्या सहाध्यायांच्या प्रगतीविषयीं जे अहवाल शिक्षकांकडून सादर करण्यांत येत त्यांवरून महाराजांना जे उत्कृष्ट शिक्षण दिले जात होतें, त्याची चांगलीच कल्पना येते. पूर्वीप्रमाणेच या छात्रवर्गात हे बंधुद्रय ( महाराज व बापूसाहेब ), कागलचे ( लहान पाती ) बाळासाहेब ऊर्फ काकासाहेब व दत्ताजीराव इंगळे यांचा समावेश झाला होता. भावनगरचे राजकुमार जरी या छात्रगणापैकीं नव्हते, तरी तेहि मि. फ्रेजर यांच्या सहवासांतच रहात असून त्यांची व कोल्हापूरराजकुमारांची धारवाड येथें चांगलीच मैत्री जडली. या कुटुंबाने ( मि. फ्रेजर हे या छात्रवर्गाला या नांवानें संबोधित असत ) धारवाड येथील बहुतेक काळ अध्ययन करण्यांत किंवा हिंदुस्थानाच्या सर्व भागांत आल्हाददायक पर्यटणे करण्यांत एकत्र घालविला. १८८९ सालच्या आक्टोबर महिन्याच्या त्यांच्या प्रगतीच्या पहिल्या अहवालांत पुढील मजकूर आहे. " दत्ताजीराव इंगळयाने पहिला नंबर सहज पटकाविला आहे. त्याच्या प्रगतीचे मासिक पत्रक ठेवण्यांत न आल्यामुळे त्याच्याविषयीं दोन शब्द विशेष लिहावे असे मला वाटते. हा मुलगा हुशार, चाणाक्ष असून तो इतरांना सर्व विषयांत सहज मागे टाकतो. " बाकीचे तिघेजण - महाराज, बापूसाहेब व बाळासाहेब यांची प्रगति जवळ जवळ सारखीच आहे. परंतु बाळासाहेब हा विचारपूर्वक काम करणारा असून धारवाडचा निवास. विशेष परिश्रम घेतो. याचा दुसरा नंबर लावण्यास हरकत नाहीं. बापूसाहेबानें महाराजांना मार्गे टाकिलें आहे. बापूसाहेबानें या टर्मच्या प्रारंभींच विशेष प्रगति केली. परंतु गेल्या पांच आठवड्यांत महाराजांनीं बापूसाहेबाला मार्गे टाकिले असून इतरांच्या मानानें बापूसाहेबाची प्रगति मंदगतीने होत आहे. बापूसाहेब दिवसानुदिवस शिळा होत चालला आहे, असा अभिप्राय रजिष्टरांत दाखल करणे मला भाग पडले आहे. " १८९० सालच्या एप्रिल महिन्याच्या ११ व्या तारखेचा अहवाल बराच व्यापक व मनोरंजक असा आहे. यांतील पुढील कांहीं उताऱ्यांवरून महाराजांच्या प्रगतीविषयीं चांगलीच कल्पना होईलः-- " १८८९ सालच्या मे महिन्याच्या २२ व्या तारखेस मी कोल्हापूर येथे कामावर रुजू झालों, या वेळीं महाराज व त्यांचे संवगडी कोल्हापुरासच होते. धारवाड येथें ता. ११ जून रोजीं अभ्यासास प्रारंभ झाला. तेथे राहण्यासंबंधीं जरूर ती व्यवस्था करण्यासाठीं मी एकटाच कांहीं दिवस अगोदर गेलों होतों. धारवाडला बंगल्यांचा तुटवडा असल्यामुळे पावसाळा इतका समीप आला असतांना सोईस्कर अशी व्यवस्था करून घेणे अशक्य होतें; ह्मणून आझांस किल्लयांतील साधारण प्रतीच्या घरांतच राहणे भाग पडले. किल्ला हा धारवाड येथील ठाण्यापैकी अगदींच कुचकामाचा भाग आहे. तेथें कोल्हापूरचे कुमार एका बंगल्यांत राहिले व भाऊसिंगजी व त्यांचे संवगडी दुसऱ्या बंगल्यांत राहिले. दुसऱ्या टर्मला अधिक हवेशीर भागांतील आणखीं घरे घेण्यांत आलीं. हीं बऱ्याच लांब अंतरावर असल्यामुळे जरी सोईस्कर नव्हतीं, तरी तीं कशीबशी चालण्यासारखीं होतीं. पुढील वर्षाच्या जून महिन्यापासून कोल्हापूरचे व भावनगरचे कुमार माझ्या बंगल्याशेजारी एकमेकांपासून जवळ अंतरावर असलेल्या नवीन बंगल्यांत राहतील. तेथेंच आझीं आमची धारवाड येथे राहण्याची मुदत संपेतोंपर्यंत राहूं. बहुतेक घोड्यांची व नोकरलोकांची राहण्याची सोय शहरांतील भाड्याच्या "उतारा" मध्ये केली आहे. " हिवाळ्यांतील सुटीचे दिवस महाराजांनी कोल्हापुरांत घालविले. तेथें भाऊसिंगजीनेंहि त्यांचा पाहुणा ह्मणून तीन आठवडे काढिले. नेक नामदार प्रिन्स आलबर्ट व्हिक्टर यांचें, पुणे येथे कुमारांना दर्शन घेतां यावें झणून सुटीची मुदत एका पंधरवड्यानें वाढविण्यांत आली. प्रिन्सच्या सन्मानार्थ जे उत्सव झाले त्या सर्वांना आपणांस हजर राहतां आलें ह्मणून कुमारांना अत्यंत आनंद झाला. दरबारांत महाराजांचे रीतसर स्वागत होऊन त्यांचा गौरव करण्यांत आला. अशा प्रकारचा बहुमान फक्त याच संस्थानिकांचा झाला. दुसऱ्या टर्ममध्ये एक आठवडा (५ ते ११ फेब्रुवारी ) सर्वांनीं, कोल्हापूर व दक्षिण महाराष्ट्रांतील जनावरांच्या व घोड्यांच्या वार्षिक संमेलनाच्या वेळीं चिंचली येथें घालविला. हे प्रसंग खेरीज करून बाकीची टर्म, उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त भाऊसिंगजी भावनगरला व कोल्हापूरचे कुमार कोल्हापुराला निघून जाईपर्यंत धारवाडांतच घालविण्यांत आली. राजकुमार-कॉलेजांत असते वेळींच सर्व मुलांच्या एकमेकाश ओळखी झाल्या होत्या ही सुदैवाची गोष्ट होय. ( हे कॉलेज त्यांनी १८८९ सालच्या एप्रिल अखेर सोडलें ) तेथे ते समरुचित्वामुळे एकमेकांचे जिवलग स्नेही झाले. झणून घोड्यावर बसणे, शर्यत खेळणें व वहानांत बसून हिंडणे फिरणे इत्यादि दैनिक करमणूकीचे खेळ ते मिळूनच खेळतात. कुमारांना विशेषतः घोड्यावर बसण्याचा फार शोक आहे. घोड्यावर बसून रपेट करण्याच्या कामीं धारवाडच्या आसपासचा प्रदेश बराच सोयीचा आहे. " धारवाड येथील दिनक्रम पुढीलप्रमाणे आहेःकुमार सकाळीं ६-३० ला उठून बुवासाहेब इंगळे यांच्याबरोबर ( व मीहि बहुतकरून त्यांच्या बरोबर जातो. ) घोड्यावर बसून रपेट करण्याकरितां, सहल करण्याकरितां किंवा नेम मारण्याकरितां जातात. शाळा सकाळी दहा ते दोन प्रहरीं एक वाजेपर्यंत चालून पुनः दोन प्रहरीं दोन ते संध्याकाळीं पांच वाजेपर्यंत भरते. यानंतर एक अर्धा तास त्यांना कवाईत शिकविण्यांत येते. नंतर ते टेनिस खेळणे, वाहनारूढ होणे किंवा सहल करणे यांपैकी कोणतें तरी करितात. संध्याकाळी एका तशाच्या देखरेखेखालीं ते दांडपट्टा व तालीम करितात. संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवसाचे धडे तयार करतात. सुटीच्या वेळेकरितां कांहीं ठराविक कार्यक्रम आखलेला नसतो. मात्र सकाळपासून रात्र होईतोपर्यंत त्यांचा प्रत्येक तास कामांत किंवा कोणत्या तरी प्रकारचे खेळ खेळण्यात जातो. अशा प्रकारे त्यांचा प्रत्येक तास बांधला गेला असल्यामुळे, रिकाम्या वेळेत चावटपणा करण्याकडे मलांची जी साहजिक प्रवत्ति असते तिला महाराजांची प्रगति. बिलकूल अवकाश मिळत नाहीं. रविवारचे व इतर सुटीचे दिवस ते बहुधा लांब अंतरावरच्या शिकारी करण्यांत घालवितात. अशा प्रसंगी मी यांना निःशंकपणे बुवासाहेब इंगळ्यांच्या हवालीं करितों. बुवासाहेब इंगळे हे पहिल्या प्रतीचे शिकारी असून साधेपणाचे ते एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. " महाराज जरी अभ्यासांत अजून मार्गेच पडले आहेत, तरी त्यांचे एका वर्षाचे काम समाधानकारक असे झाले असून त्यांची प्रगति एकसारखी व जलद होत आहे. ते कुशाग्रबुद्धीचे नाहींत; परंतु त्यांना व्यवहारज्ञान फार चांगले आहे व त्यांची स्मरणशक्तिहि फार चांगली आहे. शिवाय शिक्षणसंपादण्याची त्यांना मनापासून काळजी असून ते लक्षपूर्वक परिश्रम घेतात. आतां सर्वजण नुक्तेच शिकत असलेल्या प्राथमिक अर्थशास्त्रांत महाराजांचें व्यवहारज्ञान विशेषकरून प्रत्ययास येतें. या विषयांत ते इतरापेक्षां हुशार आहेत. त्यांची इंग्रजी भाषेत संभाषण करण्याची शैली बरीच सुधारली असून ते आतां सहज व अचूक संभाषण करूं शकतात. जसजसा त्यांचा भिडस्तपणा मोडत जाईल तसतशी त्यांची या बाबतींत एक सारखी प्रगतिच होत जाईल. परक्या लोकांसमोर या भिडस्तपणामुळे, त्यांना आपल्या अंगची हुशारी दाखवितां येत नाहीं. त्यांच्या कामांतील मुख्य दोष झटले झणजे निष्काळजीपणा व टापटिपीचा अभाव हे होत. हे दोष विशेषेकरून त्यांच्या शुद्धलेखनांत, हस्ताक्षरांत व वाक्यरचनेंत दिसून येतात. स्वभावाच्या बाबतींत पाहिले तर आकृतीच्या मानाने ते अगदींच अल्पवयाचे असून निरोगी मनाचे, उघडया दिलाचे, उदार व सच्छील असे आहेत. त्यांना अहंपणाचा वारा देखील नाहीं. त्यांच्या विचारीपणाचीं व निःस्वार्थीपणाचीं पुष्कळ उदाहरणे मीं पाहिलीं आहेत; त्यावरून महाराज दिसतात त्याप्रमाणेच खरोखर सुस्वभावी आहेत हे उघड आहे. महाराज बरेच धिप्पाड आहेत. त्यांची उंची पांच फूट नऊ इंच असून त्यांचे वजन चौदा स्टोन एक पौंड आहे. त्यांची आकृति भव्य असून त्यांच्या शरीराची ठेवण चांगली आहे. परंतु त्यांच्या परंपरागत वातप्रवृत्तीमुळे एक नवीन काळजीचे कारण उत्पन्न झाले आहे. मिताहार व भरपूर व्यायाम करून व त्याचप्रमाणे आपल्या वजनावर एक सारखी नजर ठेवून महाराजांनीं आपले वजन गेल्या आक्टोबरपासून वाढू दिले नाहीं, ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे. राजकोट येथें असतें वेळीं महाराजांचे वजन केव्हां केव्हां एकाएकी वाढत असे, असे मला सांगण्यांत येतें. परंतु हे प्रकार येथे उद्भवले नाहींत. फाजील धष्टपुष्टपणा हेच त्यांचे निःसंशय कारण असावें. त्यांच्या वागणुकींत पाणीदारपणाचा अभाव हा दोष अद्याप दिसून येतो. या दोषाच्या जोडीला युरोपीयन लोकाशीं वागण्यांत दिसून येणारा त्यांचा भिडस्तपणा हा दुसरा दोष आहे. त्यांना त्यांच्या पुष्कळशा मित्रांची सोबत असल्यामुळे युरोपियन लोकांशीं दळणवळण ठेवण्याची त्यांच्या मनाची विशेष प्रवृत्ति नसावी अर्से मला वाटते. हा या व्यवस्थेत अपरिहार्य असा दोष आहे. आरोग्यदृष्ट्या गेल्या वर्षात त्यांची बरीच प्रगति झाली आहे. आतां ते घोडयावर बसण्यांत पटाईत झाले असून, चिंचली येथें त्यांना कित्येक युरोपीयन प्रतिस्पर्धी असतांनाहि त्यांनीं भाला मारण्यांतले पहिले बक्षिस पटकावले हे येथें नमूद करण्यासारखे आहे. टेनिस खेळण्यांत ते अतिशय गबाळे आहेत; परंतु ते चांगल्याप्रकारें नेम मारणारे असून, चार घोड्यांचा रथ हांकण्यास व एकामागून एक असे चार घोडे लावून ते चालविण्यास, पोहण्यास व थोडेंबहूत वल्हविण्यासहि शिकले आहेत. " १८९० सालच्या आक्टोबर महिन्याच्या अहवालावरून आमचे महाराज आपल्या बहुतेक संवगड्यांच्या अद्याप मागेंच पडले आहेत असे दिसून येतें. त्यांच्या सहाध्यायांमध्ये महाराजांचा सर्वात खालचा नंबर लागल्याविषयीं अहवालांत पुढीलप्रमाणे लिहिले आहे. महाराज घोड्यावरून पडून त्यांना लिहितां न आल्यामुळे महाराजांचे कांहीं मार्क कमी झाले; याविषयीं मीं त्याच वेळीं लिहिलें आहे. त्यांचा हात शाबूत असतांना देखील त्यांनीं बापूसाहेबाला क्वचितच् मागें टाकले होतें. बापूसाहेबाचा नंबर यथायोग्यच आहे. बापूसाहेबानें एकसारखी व चांगली मेहेनत केली. महाराज आपल्या धाकट्या बंधूला कायमचे मार्गे टाकतील अशी जी गेल्या टर्मला आशा वाटत होती, ती नाहींशीं होऊन माझी नाउमेद झाली हें कबूल करणे मला भाग आहे. महाराज आळशी नाहींत; परंतु त्यांच्या सर्व कामांतील दोष गबाळेपणा हा तसाच चालूं आहे. हा दोष अंकगणितांत अगदर्दीच अक्षम्य होतो. "महाराज घोड्यावरून पडून त्यांचा उजवा खांदा दुखावल्यामुळे त्यांना सहा आठवडे आपल्या हाताचा उपयोग करितां आला नाहीं. हा प्रसंग खेरीज करून, या छात्रगणाचें प्रकृतिमान उत्कृष्ट राहिलें. नेहमींचे खेळ खेळून, ते ठाण्यां४ थें. ] क्षेत्रांतील अनुभव. तील शिकारी कुत्रे बरोबर घेऊन नियमितपणे शिकार करीत असत. बिलिअर्ड टेबल त्यांना फारच आवडले. " "१८९० सालची हिंवाळ्यांतील टर्म ता. १५ मार्चला पुरी झाल्यावर कोल्हापूरला एक महिनाभर राहून, महाराज, त्यांचे बंधु व त्यांचे इतर सोचती, राहिलेली मुटी घालविण्यासाठीं महाबळेश्वरला गेले. पूर्वीप्रमाणे ते तेथील " क्रेग " बंगल्यांत जाऊन राहिले. हा बंगला कागल संस्थानचा आहे. यांना भावनगरहून भाऊसिंगजी व काळुबा हे तेथे येऊन ता० १ मेला मिळाल्यानंतर टर्मला मुरवात झाली. नेहमींप्रमाणे या महिन्याअखेरपर्यंत काम चालून नंतर आझी परत धारवाडला आलों. आक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेला हिंवाळ्यांतील सुटीला प्रारंभ होऊन, महाराज टेंबलाईच्या यात्रेकरितां व दसरा-दिवाळीच्या सणानिमित्त, कोल्हापूरला गेले; अशा प्रसंगी महाराजांनी हजर राहणे हे राज्ञ्यांच्या व प्रजाजनांच्या दृष्टीने महत्त्वाचें समजले जाते. ' या अहवालानंतर हिंवाळ्याच्या सुटीचे दिवस आले; ते देशपर्यटनांत घालविण्यांत आले. अशा प्रकारचीं जीं पर्यटनें झालीं त्यांच्यायोगानें महाराजांच्या शिक्षणांत चांगलीच भर पडली असली पाहिजे. महाराजांचीं तीन पर्यटन - दोन उत्तर हिंदुस्थानांत व एक दक्षिण हिंदुस्थानांत-झालीं. त्यांचें सविस्तर वर्णन मि० फ्रेजरसाहेबांनीं "Three tours in India and Ceylon ( हिंदुस्थान व सीलोनमधील तीन पर्यटनें ) या नांवच्या आपल्या एका सुंदर लहानशा ग्रंथांत केले आहे. खासगी रीतीने या ग्रंथाचा प्रसार करण्यासाठींच हा ग्रंथ छापलेला होता. ता० १६ नोव्हेंबर रोजी या पर्यटनाला सुरवात होऊन महाराज कोल्हापूरहून निघून दुसऱ्या दिवशीं कल्याणला आपले मित्र भाऊसिंगजी यांना मिळाले. या सर्वांनी आपला पहिला मुक्काम नाशीक क्षेत्रांत केला. येथें महाराजांना आपल्या दर्जाच्या मनुष्याला एकाद्या पवित्र क्षेत्रांत कसा त्रास होतो, याचा पहिला अनुभव आला. त्यांच्या बंगल्याच्या आवारांत बुभुक्षित भिक्षुकांचा जणूं गराडाच पडला होता. भटजींच्या सुळसुळाटाबद्दल नाशीकची प्रसिद्धीच आहे. ओट्यावर त्यांना चढू न देण्याबद्दल कडक उपाय योजावे लागले. महाराजांच्या तेथील कुलोपाध्यायानें महाराजांच्या कँपांतील रावापासून रंकापर्यंतचे लोक शोधून काढून त्यांची नावे आपल्या वहींत सामील केलीं. महाराजांच्या सहीचा आपणांस बहुमान ( व फायदा ) मिळावा अणून दोन प्रतिस्पर्ध्यामध्ये एकदां तंटा लागला. दोघांचीहि आझांस जरूरी नाहीं असे सांगून हा तंटा मिटवावा लागला. ता २० रोजीं जबलपूर गांठल्यानंतर तेथें नर्मदेच्या कांठच्या प्रदेशांत चांदण्या रात्रीं सहल करण्यांत आली. यानंतर अलाहाबाद आले. तेथेंहि भटांनी महाराजांवर स्टेशनवरच झडप घालून ते आपल्या " रेवाकोठी " बंगल्याला पोंचतात न पोचतात तोच त्यांना संगमाला नेले. किल्ला पहाण्याकरितां "आह्मी गेलों असतांना एका भुयारांतून अक्षय्य वृक्षाला जाऊन पोंचलों. हा अक्षय्य वृक्ष झटला ह्मणजे अंजिराच्या झाडाच्या फांद्या व मुळे नसलेला असा एक बुंधा असून तो दगडांत रोंवलेला आहे. या वृक्षाला पार्ने येत असून तो चिरकाल टिकणारा आहे, असा लोकभ्रम आहे. परंतु जेव्हां आझीं हा वृक्ष, पाहिला तेव्हां त्याच्यावर एक पान देखील नसून तो वृक्ष दिसत होता त्याप्रमाणेच मृतप्राय असावा. " ता० २३ रोजीं हे कुमार सुप्रसिद्ध काशी क्षेत्रास जाऊन पोंचले. काशींतील विविध क्षेत्रांचे दर्शन घेत असतां महाराजांना त्यांच्या उपाध्यायाच्या हुकमतीखालीं गंगेंत अनेकदां स्नान करावे लागले. परंतु हाच प्रकार " सर्वात अतिशय घाणेरडे व सर्वात अतिशय पवित्र " अशा मणिकर्ण - कुंडांत करण्यास जेव्हां महाराजांना विनंति करण्यात आली, तेव्हां त्यांनीं तसे करण्याचे साफ नाकारिलें. " या कृत्यामुळे महाराजांचा धार्मिक वाटाड्या जो उपाध्याय त्याच्या मनास जबरदस्त धक्का बसला असावा अर्से मला वाटतें. " ता. २७ रोजीं राजकुमार कलकत्त्याला जाऊन पोंचले. कलकत्त्याला कुमार पोंचतात न पोंचतात तोंच ते, तेथील परिस्थितीची मुंबईशीं तुलना करूं लागले. त्यांच्या मर्ते कलकत्त्याला अनुकूल अशी पहिली गोष्ट झटली झणजे तेथील हवा ही होय. आह्मी कलकत्त्याला असते वेळीं तेथील हवा अतिशय आल्हादकारक अशी होती. तेथील प्राणीसंग्रहालय, इतर बागबगीचे व सुंदर आणि विस्तीर्ण मैदान यांची तुलना मुंबई येथील शुष्क एस्प्लेनेडशीं केली असतां ती कलकत्त्याला अनुकूल अशीच ठरली. परंतु आमच्या भागांतील सार्वजनिक इमारती एक एकट्या घेतल्या तर त्या या ' प्रासाद - नगराच्या' झणजे कलकत्त्याच्या इमारतींहून अधिक सुंदर आहेत अर्से सर्वोचें एकमत पडले. रस्त्यांतील घोडे जरी बहुधा चांगले असत तरी ट्रॅमगाड्या व ट्रॅमचे घोडे मात्र मुंबईपेक्षां खराब होते हे महाराजा॑ांच्या तत्काल लक्षांत आले. लहान सहान पुष्कळ गोष्टींकडे कुमार तुलनात्मक फत्तेपूर शिक्री. व टीकात्मक दृष्टीने पहात होते हे पाहून मला आनंद झाला. कलकत्त्याला असते वेळीं कुमारांनीं मध्येच दार्जिलिंगला जाऊन, कांचनगंगेचा अत्यंत उंचीचा व बर्फाच्छादित भाग पाहिला. दार्जिलिंगला जात असतां, चहाची लागवड करणाऱ्या एका वृद्ध गृहस्थानें ' बोटींत एक राजा आहे' असें मि० फ्रेजर यांच्या कामांत सांगितले व राजा झणून, आपल्या अंगाभोंवतीं डोक्यापर्यंत शाली गुंडाळून घेऊन बसलेल्या एका गृहस्थाकडे बोट केलें. हा गृहस्थ दुसरा कोणी नसून, दम्याच्या विकारामुळे खोकत बसलेले मि० गोखले हे होत ! दुसऱ्या एका प्रसंगीं अशाच एका अनोळखी गृहस्थानें महाराज कोण है फ्रेजरसाहेबांना दाखविलें. दाखविलेले गृहस्थ महाराजच होते. मात्र बाकीची त्यांच्या बरोबरची मित्रमंडळी ह्मणजे महाराजांचीं मुलेच होत, असे त्यानें सांगितलें व हंसतां हंसता फ्रेजरसाहेबांचीं मुरकुंडी वळविली ! लखनौ येथें दोन दिवस घालवून ते ता. १२ रोजी आग्र्याला आले. ह्रीं मुले सोळा वर्षांची असल्यामुळे तीं बांधकामाचीं विशेष चहातीं असण्याचा संभव नसूनहि - निदान महाराज तरी अशा बाबतींत विशेष लक्ष कधींच घालीत नसत - महाराज व इतर कुमार ताजमहाल पहाण्यांत बरेच गुंग झाले होते. दुसऱ्या दिवशीं सकाळीं महात्मा अकबरचें प्राचीन निवासस्थान - फत्तेपूर शिक्रीहे पहाण्यासाठी सर्वजण गाडींतून गेले. " थंडी जबर पडल्यामुळे, सबंध दिवसभर आमचे ओव्हरकोट आझांला आरामदायकच केवळ नव्हे तर अत्यंत आवश्यक असे वाटले. या लांबच्या प्रवासाचा आझांस योग्य मोबदला मिळाला. अकबरच्या अत्यंत काळजीपूर्वक राखून ठेवलेल्या राजवाड्याला जे एकप्रकारचे विशिष्ट मनोहरत्व आहे ते आह्नीं पाहिलेल्या इतर राजवाड्यांत नव्हतें. हा राजवाडा ह्मणजे अनेक इमारतींचा एक संग्रहच आहे. " राजवाड्याची " आपली अशी कल्पना नसते असे खुद्द महाराज व भाऊसिंगजी ह्मणाले. निरनिराळ्या खोल्या एकाच इमारतींत नसून, प्राचीन काळच्या अनेक तंबूंच्या छावणीप्रमाणे त्या एकमेकापासून अलगं आहेत. हे स्थळ फिरून पाहिले असतां, अनेक ठिकाणीं झटल्याप्रमाणे, या थोर बादशहाच्या दैनिक कार्यक्रमाचे चांगलेच चित्र डोळ्यासमोर उभे राहतें. कल्पनाशकीच्या जोरावर एकाद्याला बादशहाच्या मागून सहज जातां येईल. पहा, बादशहा आपल्या लहान परंतु साध्या अशा खोलींतून उठून सकाळींच भव्य दर्ग्याचें व फकीर शेख शेलीम खिस्ती या आपल्या जुन्या मित्राचें दर्शन घेण्याकरिता निघाला आहे. नंतर तो " हरण-मिनार " वरून क्रीडा करण्याच्या ठिकाणीं जात आहे. हरणमिनार हा सत्तर फूट उंचीचा मनोरा असून त्याच्यावर खुंट्याप्रमाणें हत्तींचे सुळे बसविलेले आहेत. या मनोन्याजवळून त्याच्याकडे हरणे हांकलली जात आहेत. नंतर लोकांचे अर्ज घेण्याकरितां व 'दिवाणी - ई-आम' मधून लोकांना दर्शन देण्यासाठीं तो ' हत्तीपाळ' येथे जात आहे. हत्तीपाळ येथील दगडी हत्ती, जीवंत हत्तीच्या आकारा इतके मोठे आहेत. खास बैठकीच्या दिवशीं, बादशाह आपल्या दिवाणासह एकांत - दिवाण - ईखासमध्ये बसत असे. या दिवाण - ई - खासच्या अपूर्व रचनेची कल्पना त्याची स्वतःचीच असली पाहिजे. बादशहाच्या खासगी चारित्र्याची कल्पना पचिशी तक्तपोशी व रासक्रीडागृहावरून होते. येथें तो आपल्या झनान्यांतील स्त्रियांशीं क्रीडा करीत असे. पांचमजली पंचमहाल हा मुलांना खेळण्यासाठीं बांधला होता असें ह्मणतात. उत्पादकाच्या चारित्र्याची कल्पना देणारा यासारखा दुसरा राजवाडा कोठेंहि नसेल, अशी माझी समजूत आहे. अकबरच्या धर्मसहिष्णुतेचें फत्तेपूरशिक्री इतकें स्पष्ट उदाहरण दुसरें सांपडावयाचें नाहीं. येथे जुन्या पद्धतीवर बांधलेल्या मशीदीशेजारींच महाराज्ञी जोधबाईकरितां हिंदु देवतेचें भंदीर, पोर्चुगीज राणीचा महाल, बिरबलचा रत्नमहाल व त्याच्या दुसऱ्या एका गुरूचे धवल जैनमंदीर इत्यादि इमारती बांधल्या आहेत. दगडी हत्ती व खोदीव कामांतील आकृती ज्या छिन्नविछिन्न झालेल्या आहेत त्यावरून अवरंगजेबाच्या धर्मवेडाचीहि याच ठिकाणीं ताजी आठवण होते. या त्याच्या धर्मवेडाला हिंदूंचीं देवालये व त्याच्या पूर्वजांनीं बांधिलेल्या पुराणपद्धतीविरुद्ध असलेल्या सुंदर इमारती याही सारख्याच बळी पडल्या. हे स्थळ पहातांच, ज्यांच्याविषयीं यांनीं थोडेबहुत वाचले आहे अशा या दोन बादशाहांमधील महदंतर कुमारांच्या लक्षांत आल्याशिवाय राहिले नसेल. कुमारांच्या मतें या अतिशय बोधप्रद गणलेल्या इमारतींचा जो चोहोंकडे एकजातपणा दिसून येत होता, तो महादरवाजावरून कित्येक खेडगळ लोक ८० फुटांखालील खंदकांत उड्या टाकीत असलेले पाहून, थोडासा कमी झाला. या खंदकांतील पाण्याच्या घाणेरडेपणामुळेच उडया मारणान्यांच्या करामतीची किंमत दर माणसीं चार आण्याइतकी स्वस्त झाली की काय असे आझांस इंदुरावाचा वाडा. वाटले. मशीदीच्या आवारांतील शेक शेलीम खिस्तीच्या थडग्याचा येथें उल्लेख करणे भाग आहे. या थडग्याचे संगमरवरी दगडाचे जाळीदार पडदे नाजूकपणाच्या बाबतींत आग्रा व शिकंदरा येथील जाळीदार कामांपेक्षांहि उच्च प्रतीचे आहेत. ज्या वृद्ध मुल्लयानें आह्मांस हे ठिकाण फिरून दाखविलें, तो मुल्ला अकबराच्या या प्राचीन फकीराचा खास वंशज आहे. त्याच्या पूर्वजांनीं है शहर बांधण्यासाठी अकबरचें मन वळविले, अशी जी आख्यायिका आहे ती लक्षांत घेतां, प्रस्तुतचा मुल्ला या शहराचा माहितगार ह्मणून येथे असणे, हे यथायोग्यच आहे. " ता. १८ रोजों दोन प्रहरीं राजकुमार दिल्लीला दाखल झाले. फेरोजशा कोट व तेथील अशोक स्तंभ पाहिल्यानंतर ते पुराणा किल्लयाला गेले. महाभारतकालीन युधिष्ठिर राजानें हा बांधला अशी आख्यायिका आहे. आहे. महाराजांचा थोर पूर्वज श्रीशिवाजी हा, अवरंगजेबनें त्याला विश्वासघातानें बंदिवासांत टाकल्यानंतर, या किल्लयांतूनच निसटला, हीच प्रचलित गोष्ट महाराजांना येथें विशेष महत्वाची वाटली असेल. दुसऱ्या दिवशीं फलाहारानंतर आह्मी ५७ च्या बंडामुळे प्रसिद्धीस आलेलीं स्थळे पहाण्यास गेलों. प्रथम आह्मी काश्मीरगेटकडे गेलों. तेथून हालण्यापूर्वी कोणत्याहि काळच्या अंगावर अत्यंत शहारे आणणाऱ्या अशा रक्तपाताच्या प्रसंगासमोर आपण प्रत्यक्ष उभे आहोत, असे कुमारांना वाटले असेल. या तटाभोंवतीं आह्मी फिरत असतां, आह्मीं नुक्तेच पाहून आलेल्या लखनौ येथील व दृष्टीसमोर असलेल्या दिल्ली येथील त्या काळच्या लढाऊ पक्षांच्या बलाबलाची तुलना केल्याशिवाय राहवत नसे. असहाय स्थितींत असलेल्या छावणीसभोंवतीं लाखों लोकांचा गराडा पडला असतांना किंवा मूठभर इंग्रजलोक एकादे तटबंदीचें शहर घेत असतांना, इंग्रजांला जें हटकून यश येई ते पाहून इंग्रजांच्या शिपाई व इंग्रजाचें नेतृत्व नसलेला शिपाई या दोहोंमधील महदंतर कोणत्याहि हिंदी मनुष्याच्या मनावर ठसल्याखेरीज राहणार नाहीं. नंतर आझीं " रिज " ( टेकडी ), विजयस्तंभ, इंदुरावाचा वाडा आणि स्मारक ह्रीं स्थलें पाहण्यास गेलों. इंदुराव हा आपल्या हयातींत कागलचा चीफ असून बापूसाहेबांचा आजा असल्यामुळे, इंदुरावाचा वाडा पाहून कुमारांना विशेष आनंद झाला. इंदुरावाचें खरें नांव जयसिंगराव घाटगे अर्से होतें, दौलत1 राव शिंद्याची राणी बायजाबाई ही इंदुरावाची बहीण असल्यामुळे ग्वाल्हेरच्या दरबारीं त्याची पुष्कळ सत्ता होती. परंतु तो तिच्याशीं भांडून दिल्ली येथे स्वतः बांधलेल्या आपल्या या वाड्यांत येऊन राहिला. पर्यंत आपल्या आयुष्याचा राहिलेला काळ दिल्ली येथे मुख्यत्वेंकरून शिकार करण्यांत त्याने घालविला. मालेसनने बेअर्ड स्मिथच्या आठवणींतून घेतलेल्या उतान्यामध्ये त्याचा पुढीलप्रमाणे उल्लेख केलेला आहे :-" हा वृद्ध गृहस्थ स्थानिक समाजामध्ये नामांकित होता. हा उदार, मनमिळाऊ, निष्कपटी परंतु आडदांड स्वभावाचा असून प्रेमळ अंतःकरणाचा होता. हे वर्णन कै० आबासाहेबांना तंतोतंत लागूं पडण्यासारखे होतें. आबासाहेब हे इंदुरावाचे पणतु असून त्यांचेंहि नांव जयसिंगराव असें होतें. पुढचा मुक्काम जयपूरला झाला. राजकोट-कॉलेजाविषयीं त्यांच्या ज्या आठवणी होत्या, त्यांच्या सहाय्यानें त्यांना अजमीर येथील मेयो कॉलेजकडे टीकात्मक दृष्टीने पहातां आलें. त्यांना तेथील इमारती बांधण्याची पद्धत पसंत पडली; परंतु मुळे व प्रिन्सिपाल एकाच इमारतींत जवळ जवळ राहण्याची राजकोटची पद्धत त्यांना अधिक पसंत वाटली. मि. फ्रेजर पुढे ह्मणतात-" या दिवशीं संध्याकाळीं बडोदा येथील गव्हर्नरजनरलच्या एजंटाकडून मला अशी तार आली की महाराजांची प्रकृति नादुरुस्त झाल्यामुळे गाइकवाडमहाराजांच्या भेटीचा बेत रहित करण्यांत यावा. महाराजांना व कुमार श्रीभाऊसिंगजी यांना खास निमंत्रणें देऊन हा भेटीचा योग फार दिवसांपासून जुळवून आणला असल्यामुळे सर्वांची यामुळे फारच निराशा झाली. बडोदा पाहून आपले नातलग गाइकवाडमहाराज यांची प्रत्यक्ष ओळख करून घेण्यास महाराज फार आतुर झाले होते. महाराजांची दिलगिरी प्रदर्शित करण्यासाठीं ता. २५ रोजीं मी बडोदा येथें उतरलों. तेथेंहि इतकीच तीव्र निराशा झाल्याचे दिसून आले. महाराजांच्या स्वागताप्रीत्यर्थ स्टेशनपासून महाराज उतरावयाच्या बंगल्यापर्यंत रस्ते शृंगारिलेले होते. " ता. २५ रोजीं कुमार अजमीरहून मुंबईला निघाले. नंतर शास्त्रीय प्रदर्शनाला हजर राहण्यासाठीं चार दिवस कोल्हापूरला जाऊन ते ता. ३० रोजी धारवाडला पोचले व नवीन वर्षाच्या प्रारंभाबरोबरच त्यांनी आपल्या अभ्यासालाहि प्रारंभ केला. " अशाप्रकारे यशस्वी रीतोनें हे देशपर्यटण शेवटास जाऊन महाराजांचा विवाह. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यापासून कुमारांना आनंद व फायदा झाला. नसूनहि त्यांनीं ४,८९९ मैलांपेक्षांहि अधिक प्रवास केला. व हिंदी साम्राज्याच्या आकाराची व त्यांत समाविष्ट झालेल्या नानाविध लोकांची व प्रदेशाची त्यांना थोडीबहुत कल्पना झाली. महाराजांनी एकदां हाटल्याप्रमाणे, जेथे कोल्हारचं नांव देखील ऐकू येत नसें अशा ठिकाणीं ते गेले होते. त्यांनीं प्रत्यक्ष पाहिलेल्या नैसर्गिक देखाव्यांचीं व इमारतींचीं प्रतिबिंबे आणि ऐतिहासिक गोष्टी, केवळ वाचनानें कधींहि शक्य होणार नाहीं अशा उत्कृष्ट रीतीनें, त्यांच्या मनावर या प्रवासांत ठसल्या गेल्या. देशपर्यटनानें जे नवीन विचार प्राप्त झाले त्यांचे दृश्य फळ ह्मणजे सर्वसाधारणपणे त्यांचीं संभाषणे उठावदार होत गेलीं. " ता० १ एप्रील सन १८९१ सालीं महाराजांचा विवाह बडोद्याचे मेहरजीरा खानवीलकर यांची कन्या व गणपतराव गाइकवाडमहाराज लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी झाला. १८८० सालच्या नूतन वर्षाच्या प्रारंभा दिवशीं यांचा जन्म झाला होता. झणजे आतां महाराज्ञीपदारूढ झालेल्या श्री लक्ष्मीबाईसाहेब यांचे वय विवाहाच्या वेळीं अवघें ११ वर्षांचे होतें. पूर्वी खानवीलकर हे रत्नागिरी तालुक्यांतील पांच गांवच्या खोतीचे मालक असून सुपे हे त्यांचें केंद्रस्थान होतें. पेशव्यांच्या अंमलाखालीं वसईचा किल्ला असते वेळीं हे खानवीलकर कांहीं दिवस या किल्लयाचे मुख्य अधिकारी होते. हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यांत गेल्यानंतर खानवीलकर हे माताऱ्याला आले. तेथें आल्यावर त्यांचा छत्रपतिघराण्याशीं विवाह-संबंध झाला. तेथून त्यांनीं पुनः बडोद्याला स्थलांतर केलें. तेथें महाराणी लक्ष्मीबईसाहेबांच्या आजांचा विवाह श्रीमन्महाराज मयाजीराव ( वडील ) गाइकवाड यांच्या कन्येशीं झाला. अशाप्रकारें कोल्हापूरच्या महाराणीसाहेब या मराठाबातीच्या एका अत्युच्च घराण्यांतील वंशज असून त्या आपल्या अत्युच्च कुलानें, त्याचप्रमाणे आपल्या अंगच्या गुणांनीं आपल्या नवप्राप्त उच्च पदाला योग्य अशाच आहेत. हा समारंभ झाल्यानंतर महाराज आपल्या संस्थानच्या पहाडी मुलुखांत शिकार करण्याकरितां गेले. तेथें एक आठवडा घालवून त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांचे स्वागत करण्याकरितां कोल्हापूरला आले. संस्थानच्या रेल्वेचा व औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटण समारंभ करण्याकरितां हे कोल्हापुरास याववा. च. ४ याचे होते. मे महिन्यांत धारवाडला जाणे जरी प्राप्त होतें, तरी महाराजांना आपले बंधु बापूसाहेब व चुलते बाळासाहेब यांच्या विवाहसमारंभाला हजर राहण्यासाठीं कोल्हापूरला आणखी दोन आठवडे राहावें लागले. हे विवाह - समारंभ मे महिन्याच्या अकराव्या तारखेला झाले. ता. २ आक्टोबर रोजीं पुज्या झालेल्या पावसाळ्याच्या टर्ममध्ये झालेल्या कामासंबंधानें मि० फ्रेजर साहेब लिहितातः-- www MANNV " महाराज हे २३४ मार्कांनी आपल्या बंधूच्या मागें आहेत. परंतु ते पूर्वीपेक्षां त्यांच्याजवळ आले आहेत. दोघां मुलांनींहि एकसारखी मेहनत केली. परंतु ज्या चुका त्यांना स्वतः दुरुस्त करण्यासारख्या आहेत, त्या न होऊं देण्याबद्दल जर ते दक्षता घेतील, तर शेंकडा २५ प्रमाणांत त्यांच्या मार्काची वाढ होत जाईल. " या पांच महिन्यांत सर्व कुमारांची प्रकृति चांगलीच राहिली हे सांगण्यास मला समाधान वाटते. महाराजांचे वजन विशेष वाढलें नाहीं. परंतु बापूसाहेब बराच धष्टपुष्ट झालेला आहे. " महाराजांच्या प्रगतीसंबंधाने त्यांचे शिक्षक ह्मणतातःमहाराज मेहनत करून आपल्या शिक्षणांत बरेंच लक्ष घालीत आहेत. परंतु त्यांच्या बंधूनें त्यांना मार्गे टाकल्याचे पाहून माझी निराशा झाली. एकाद्या विषयाची रूपरेखा त्यांच्या लक्षांत लवकर येऊन ते त्यासंबंधी माहिती देऊं शकतात. महाराज हुशार आहेत; परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे लेखन समाधानकारक नसते. या वर्षांत त्यांनी सर्वसाधारण प्रगति केल्याचे दिसून येतें. कायदा व भौतिक शास्त्रांची मूलतत्त्रे या विषयांत त्यांनीं बरेंच लक्ष घातले असून ते स्वतःच विचार करण्यास शिकले आहेत, असे अनेक अनपेक्षित मार्गांनीं आमच्या निदर्शनास आले. संभाषण करगें आतां त्यांना बरेंच सोपे जाते. परंतु अद्याप त्यांचा स्वभाव भिडस्त असल्यामुळे त्यांना आपल्या अंगची हुशारी परक्या लोकांसमोर दाखवितां येत नाहीं. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव पूर्वीप्रमाणेच आहे. पुस्तकाकडे व खेळाकडे महाराजांचा विशेष ओढा असल्याचे दिसून येत नाहीं. परंतु घोडा, कुत्रीं ब बंदुका या त्यांना पूर्वीप्रमाणेच परम प्रिय आहेत. त्यांच्या वडिलांचें चाबूक चालविण्याचे कौशल्यहि त्यांच्यांत उतरलेले आहे. गेल्या टर्ममध्ये धारवाड येथे महाराजांचें मनोधैर्य. स्वतःच सहा घोड्यांची एक जोडी तयार करून ती पूर्णपणे आपल्या ताब्यांत ठेवून हांकीत असत. " त्यांचें प्रकृतिमान अत्यंत चांगले आहे. त्यांचें वजन बहुतेक गेल्या वर्षा इतकेंच ह्मणजे चौदा स्टोन २१ पौंड भरते, मात्र आतां त्यांची उंची ५ फूट, १०८ इंच भरते. " आपल्या उत्तर वयाच्या विविध व्यवसायांत महाराजांनीं जी असामान्य बुद्धिमत्ता प्रगट केली, ती ज्यांना ह्मणून माहित आहे, त्यांना टापटिपपणाचा अभाव, निष्काळजी वर्तन व युरोपीयन लोकांच्या सहवासांत भिडस्तपणा हे वरील दोषारोप त्यांच्या खन्या स्वभावाश कांहींसे विसंगत दिसण्याचा संभव आह. परंतु त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षगापर्यंत हे दोष बाह्यतः तरी त्यांना बिलगूनच होते. महाराजांना अत्यंत प्रिय असलेल्या शेतकरी पेशाच्या साधेपणाचा हा साहजिक परिणाम असावा, असे मला वाटतें. युरोपीयनसमाजांच्या चालीरीती यांचा त्यांना बराच कंटाळा असे. ह्मणून ते एकाद्या मेजवानीला हजर राहण्याचे किंवा आपल्या युरोपीयन मित्रांच्या सहवासांत जास्त वेळ घालविण्याचे बहुधां ढाळीत असत. गरीब लोकांशीं ते मन मोकळे करून वागत व त्यांच्याच सहवासांत राहणें त्यांना आवडे. महाराजांच्या स्वाभाविक निर्बंधरहित वर्तनांत एकाद्या युरोपीयन किंवा हिंदी सुव्यवस्थित गृहस्थाला टापटिपीचा अभाव दिसून आल्याखेरीज राहत नसे. परंतु महाराजांना अशाच प्रकारची राहणी मनापासून आवडत असे. महाराज लहान असतां त्यांच्या बाह्यतः दिसणाऱ्या गबाळेपणाबद्दल त्यांना बोलून घ्यावे लागत असे. या बाबतींत महाराजांच्या परिवारांतील नोकरलोकांवरहि थोडीबहुत जबाबदारी असल्यामुळे, त्यांनाही याबद्दल बोलून घेणे भाग पडे. परंतु निःस्वार्थीपणाला साजेशा खऱ्या धैर्यानें व सुविचारीपणाने ते सर्व दोष आपल्या माथीं घेऊन आपल्या नोकरलोकांना याबद्दलच्या सर्व जबाबदारीतून ते मुक्त करीत असत. कर्नल रीव्ह्ज हे एकदां अल्पवयस्क महाराजांचीं नखे न काढल्याबद्दल एका हजामाला रार्गे भरले. परंतु महाराज एकदम उठून त्यांना ह्मणाले, " हा दोष हजामाचा नसून मींच त्याला माझीं नखे काहूं दिलीं नाहींत. " . साधेपणाची मर्यादा संपून गबाळेपणाला कोठे सुरवात होते, हे ठरविणे झरोखर कठीण आहे. या दोन [ प्र० ४ थें. गुणावगुणांची इयत्ता ठरविण्याच्या भरीस महाराज केव्हांहि पडले नाहींत. कडक शिष्टाचाराचा अंगीकार करण्यापेक्षां निर्भेळ साधेपणाच पतकरणे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटत असे. अशाप्रकारें महाराजांच्या शिक्षणाची काळजी घेतली जात असतां, महाराशींच्या शिक्षणाचीहि योग्यप्रकारें व्यवस्था ठेवण्यांत येत होती. महाराणी या सकवारबाई राणीसाहेब यांच्या देखरेखीखालीं होत्या. महाराज्ञींच्या शिक्षणाची काळजी घेण्यासाठीं मिसेस कॉक्स या युरोपीयन बाईची नेमणूक होऊन, या बाईनें महाराणीच्या सहवासांत रोज चार तासाप्रमाणे चार वर्षे काढलीं. यामुळे राज्ञीपदास योग्य असें शिक्षण त्यांना सहजच प्राप्त झाले. प्रकरण ५ वें. शिक्षणाची समाप्ति. हाराज धारवाडला राहून वर्ष होते न होते तोंच शिक्षण परिपूर्ण करण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठविण्याचा प्रश्न पुनः उपस्थित झाला. महाराजांच्या कल्याणाविषय विशेष कळकळ बाळगीत असलेले मि० लीवॉर्नर यांनीं " शीक्स वर्थ पार्क " हे महाराजांचें इंग्लंडमधील निवासस्थान ठरवून, ही व्यवस्था मान्य आहे किंवा कसें हैं विचारण्यासाठी त्यांनी कोल्हापूर दरबारला लिहिलें. सहा महिन्यांनंतर या बाबतींतील श्रीमंत आबासाहेबांची इच्छा पार पाडण्याच्या अव श्यकतेचें महत्व, कर्नल रीव्हूज, हे महाराजांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून येतें. दुसरे एक माजी पोलिटिकल एजंट कर्नल सी. वूडहॉऊस हेहि १८९१ सालच्या प्रारंभी हीच विनंति थोड्याशा व्यापक स्वरूपांत करितात. संस्थानांतील कोणत्याहि राजकीय अधिकाऱ्यापेक्षा ज्यांचा संबंध कोल्हापूर संस्थानला विशेष दिवस घडला असे जे अलीकडचे रेसिडेंट कर्नल वुडहॉऊस त्यांचे, कर्नल सी. वुडहॉऊस हे वडील होत. या वर्षाच्या मध्याच्या सुमारास या प्रश्नाला व्यवस्थित स्वरूप येऊन सन १८९९ सालीं मुंबईसरकारकडून आपल्या एका ठरावांत पुढील उल्लेख करण्यांत आलाः" महाराजांचें इंग्लिश भाषेचे वाढते ज्ञान व नुकत्याच झालेल्या देशपर्यटनामुळे त्यांना झालेलें सौख्य या गोष्टीं लक्षांत घेतां कै० रीजंटच्या उत्कट इच्छेनुरूप जेव्हा त्यांना इंग्लंडला पाठविण्यांत येईल तेव्हां महाराजांच्या वडि लांच्या अंदाजाप्रमाणे महाराजांना त्यापासून सौख्य व फायदा होईल अशी आशा बाळगण्यास जागा आहे. " अशाप्रकारें इंग्लंडला जाण्यासाठी चोहींकडून आग्रह होत असतांना अवघ्या अठरा वर्षांच्या वयाच्या महाराजांनी आपल्या या वजनदार पालकांचा व आपल्या हितचिंतकांचा उपदेश जर मान्य केला असता, तर ते अगदी स्वाभाविक झाले असतें. परंतु याच्या उलट महाराजांचा बेत ठरला असल्यामुळे, त्यांच्या मनावर जो चोहोंकडून दाब पाडला जात होता, त्याचा प्रतिकार करण्याचा त्यांनीं ठाम निश्चय केला. महाराजांचा अशा प्रकारचा निश्चय होण्यास झालेलीं कारणे पुढे लौकरच त्यांच्याच शब्दांत देण्यांत येतील. येथे सांगावयाची मुख्य गोष्ट झटली ह्मणजे, या बाबतींतील महाराजांच्या विचारसरणीचा भारदस्तपणा किंवा फोलपणाहि नसून, प्रतिपक्ष अत्यंत जोरदार असतांनाहि महाराजांनीं जे अनेक यशस्वी सामने केले त्यांपैकीं हा पहिला सामना होता हीच होय. विरोधाच्या प्रसंगीं कधींहि न डगमगणारे अंतःकरण, प्रतिकूल परिस्थितींतहि स्वतःच्याच मार्गानें जाण्याची हिय्या व या सर्वांहूनहि कोणत्याहि प्रश्नाची चर्चा करण्याच्या प्रसंगीं किंवा एकादा गुंतागुंतीचा प्रश्न उपस्थित झाला असतां त्यांच्या अंगीं जी एक प्रकारची असामान्य कार्यक्षमता दिसून येत होती, त्यामुळे शिक्षकांनीं वारंवार उल्लेख केलेल्या महाराजांच्या निष्काळजी वर्तनावरून, ज्यांनी महाराजांच्या बुद्धिमतेची व स्वभावाची कल्पना बांधलेली होती, ते आश्चर्यविमूढ झाले असले तर नवल नाहीं. ज्यावरून महाराज लाजाळु स्वभावाचे आहेत अशी यूरोपीयन लोकांची चुकीची समजूत झाली, तो भिडस्तपणा धिटाई दाखविण्याचा प्रसंग येतांच नाहींसा आपण काय करावयाचें ते आपल्या मनांत पर्के ठरवून, आपल्या कै. पित्यांच्या इच्छेमुळे महत्व पावलेला आपल्या पालकांचा सल्ला त्यांनीं झुगारून दिला. आपल्या अंगीं प्रामुख्यानें वसत असलेल्या चाणाक्षपणाच्या सहाय्यानें आपल्या मताविरुद्ध बहुतेक एकूण एक लोक असतांना देखील त्यांच्या मताऐवजीं आपलेंच मत लॉर्ड हॅरिस साहेबांनीं मान्य करावें ह्मणून त्यांचे मन वळविण्यासाठीं महाराज महाबळेश्वराला तांतडीनें निघाले; व ते आपल्या आयुष्यांतील मुत्सद्दिगिरीच्या या पहिल्या परीक्षेत विजयीहि झाले. महाराजांनीं लॉर्ड हॅरिस यांच्यासमोर आपलें जें ह्मणणे मांडलें, तें त्यांनींच मागाहून लिहून काढिलें होतें. त्यांत ते ह्मणतातः-- " येत्या वर्षी मी या प्रवासापासून उद्भवणारे फायदे घेण्यास समर्थ होईन, असा जो पहिला मुद्दा आहे, त्यासंबंधाने मला एवढेच सांगावयाचे आहे कीं, कांहीं अंशाने ही गोष्ट मी कबूल करितों; परंतु मी आणखी कांहीं दिवस वाट पाहिली तर याहिपेक्षां माझा अधिक फायदा होईल असे मला वाटतें. कारण, अनुभवाने माझें ज्ञान वाढतच जाईल. माझे इंग्लिश भाषेचें ज्ञान तसेंच जागृत यशस्वी युक्तिवाद. मला शिकारीचा मोठा नाद आहे तरी मी माझे इंग्रजी वाचन कायमच ठेवीन. वाचन अगदींच सोडून देण्याची माझी मुळींच इच्छा नाहीं. मि. फ्रेजर यांनी मला जें ज्ञान दिले आहे, ते वृद्धिंगत करण्याची माझी इच्छा आहे. शिवाय हाच पैसा जर मी मागाहून खर्च केला तर माझा अधिकच फायदा होईल. झणून मीं घाई कां करावी ? ५ वें. वें. ] NINY ANIMA पुढे माझे कुटुंब सोडून जाणें मला अवघड जाईल, असा जो दुसरा मुद्दा आहे, त्यासंबंधानें मला इतकेच सांगावयाचें आहे कीं, इंग्लंडच्या संस्कृतीविषयीं माझ्या ठायीं मोठा आदर आहे. आणि हा आदर दिवसानुदिवस वाढतच जाईल. मी थोडेंसें संसारसुख अनुभवल्यानंतर, या पर्यटनापासून होणारे फायदे माझ्या दृष्टीनें कमी किंमतीचे ठरतील, अर्से मला वाटत नाहीं. शिवाय माझ्या पत्नीलाहि इंग्लंडला जाण्याचे आवडून आझी दोघे मिळून जाऊं; असाहि संभव आहे. असे झाले तर माझे कुटुंब माझ्या मार्गातील एक विघ्न न होतां उलट ते माझे मन वळविण्याचे एक नवें साधनच होईल. कांहीं वर्षांनंतर माझ्या प्रजाजनांना माझी जरूरी राहील, व माझे नातळग देखील माझ्या मार्गात आडवे येतील, हा जो तिसरा मुद्दा आहे त्यासंबंधानें ह्मणाल, तर मी कांहीं काळपर्यंत निघून गेलों तर माझे प्रजाजन नाराज होणार नाहीत, अशी माझी खात्री आहे; कारण त्या वेळेपर्यंत मला कांहीं मुले होतील व त्यामुळे माझी आठवण त्यांना तितकी होणार नाहीं. ज्याच्याकरितां ते पुष्कळ दिवस वाट पहात बसले आहेत ते त्यांच्या छत्रपतींचे राज्य त्यांना अनुभवावयास सांपडेल. कोल्हापूरच्या गेल्या तीन पिढ्यांचा इतिहास अशुभ असा असल्यामुळे लोकांचीं मर्ने साशंक झालेलीं आहेत; परंतु कांहीं दिवस मीं राज्य केल्यानंतर त्यांची भीति दूर होऊन ते माझ्या प्रयाणाविषयीं शंका घेत बसणार नाहींत. त्या वेळीं राज्यसूत्रे कार्यक्षम माणसांच्या हातीं मी हवालीं करीन. सरकार त्यांच्यावर देखरेख ठेवील, अशी मला आशा आहे. कांहीं वर्षांनंतर माझ्या वडील माणसांची परवानगी मिळण्याविषयींसुद्धां संशय राहणार नाहीं. कारण ते मला पुढे विलायवेस जाऊं देऊं अर्से झणतात व माझ्या गैरहजेरीत ते माझ्या मुलांचे संगोपन करण्यांत आपली वेळ घालवितील अशी त्यांना आशा आहे. आतांच जर मी गेलों तर माझें शील अजून दृढ झाले नसल्यामुळे ते विषडून जाईल व युरोपसारख्या खंडांत मोह पडण्याचे पुष्कळ प्रसंग असतात अर्से त्यांचें झणणे आहे. " मि० फ्रेजर साहेबांना कांहीं वर्षांनंतर माझ्याबरोबर विलायतेस येतां येणार नाहीं, असा चौथा मुद्दा आहे. यासंबंधान मला इतकेंच सांगावयाचे आहे कीं, मि. फ्रेजरसारखे कनवाळु गृहस्थ माझ्याबरोबर येतील तर त्यापासून मला अधिकच आनंद होईल. मी पुढे मागें इंग्लंडला गेल्यावर मि. फ्रेजर यांना कांहीं काळपर्यंत माझ्याबरोबर देण्यासाठी सरकारला विनंति केली असतां सरकार नाहीं झणणार नाहीं, अशी माझी खात्री आहे. परंतु सरकार त्या वेळीं नाकबूलच झाले तर मी दुसरा मनुष्य माझ्याबरोबर घेईन. माझे वडील जेव्हां विलायतेला गेले तेव्हां कर्नल गॉर्डनची माझ्याकडे योजना झालेली होती. पुढील वर्षी इंग्लंडला न जाण्याचीं माझीं कारणे आपल्यासमोर मांडण्याची जी आपण संधि दिली तीबद्दल मी आपला फार आभारी आहे. माझ्या प्रकृतीसंबंधींचा मि. कॅनॉथी यांचा अभिप्राय मि. फ्रेजर यांनीं मला दाखविला. यासंबंधी दोन शब्द सांगणे मला इष्ट वाटतें. .मीं जलपर्यटन करावें असे त्यांचे मत आहे. यासंबंधाने आतांच निश्चय करण्याचे कारण दिसत नाहीं. " याला ता. २० जुलै सन १८९२ रोजी लॉर्ड हॅरिस साहेबांचे पुढीलप्रमाणे उत्तर आलेंः. " महाबळेश्वर येथील आमच्या भेटीच्या वेळीं इंग्लंडला जाण्याच्या अवश्यकतेसंबंधीं जे मुद्दे मीं आपल्यासमोर विचार करण्याकरितां मांडले होते, त्यासंबंधींचे आपले ता. २० जुलै सन १८९२ चे पत्र पोंचलें. आपली राज्यसूत्रे आपल्या हातीं येण्यापूर्वी इंग्लंडला जावयाचे नाहीं, असा आपला निश्चय झालेला आहे. असा निश्चय झाल्याचे पाहून माझी नाउमेद झाली, हे मी आपल्यापासून लपवून ठेवीत नाहीं. तथापि असा निश्चय आपल्या घराण्यांतील राज्यांच्या सल्ल्याने झाल्याचे पाहून मला त्याबद्दल आश्चर्यहि वाटत नाहीं. जसजसा काळ लोटत जाईल व जसजसे आपले कौटुंबिक व व्यावहारिक व्यवसाय एकसारखे वाढत जातील तसतसे आपण लांबचा प्रवास करण्यास तयार व्हाल किंवा नाहीं याविषयीं माझें मन साशंक आहे. शिवाय आपणास फायदेशीर अशी जी व्यवस्था आतां करणे शक्य होईल ती पुढच्या काळाच्या परिथित्यनुरूप करितां येणे अशक्य शेंईल. आपल्या हल्लींच्या वयाच्या वेळीं युरोपला गेल्यापासन जसा फायदा होईल तसाच फायदा आणखी कांहीं वर्षानंतर गेल्यानेंहि होईल, ही गोष्ट मला नाकबूल करितां येत नाहीं. आपण ज्या भावनांनीं प्रेरित होऊन हा निश्चय केलेला आहे. त्या भावना मला पूर्णपणे समजून आल्या आहेत, असे मला वाटतें मीं आतांपर्यंत आपणास जितका आग्रह केला, त्यापेक्षां मीं अधिक कांहीं करावें, अशी माझी इच्छा नाहीं. " भारदस्त विचारसरणी. ' महाराजांच्या विचारसरणीचा विजय या ठिकाणीं अपुराच झाला आहे, हे उघड आहे. पुढे कांहीं काळानंतर - ह्मणजे लॉर्ड हॅरिस यांच्या या निराशेची तीव्रता कमी झाल्यावर, चिंचली येथील यात्रेच्या वेळीं लॉर्ड हॅरिस यांनी आपल्या भाषणांत महाराजांच्या विचारसरणीचा विशेष गौरव केला. महाराजांना उपदेशादाखल केलेल्या भाषणांत ते ह्मणाले :" आणखी एक दोन वर्षे ( विलायतेचा प्रवास ) पुढे लोटणे आपणांस पसंत आहे, असे आपण पूर्ण विचारांतीं ह्मणालात. आपली भारदस्त विचारसरणी ऐकून घेतली; व जसजसे वय होत जाते, तसतशी मनुष्याची प्रवास करब्याची प्रवृत्ति कमीकमी होत जाते व जसजसे आपण राज्यकारभारात पडत जातों, त्यामानानें आपले व्यवसाय फार दिवसपर्यंत सोडून राहण्याचे प्रसंग टाळण्याची इच्छा वाढतच जाते. परंतु जसजसे आपण मोठे होत जाल, त्या मानानें आपल्या पाश्चात्य देशाच्या सफरीपासून उद्भवणारे फायदे ग्रहण करण्यास आपण अधिक समर्थ व्हाल, या आपल्या अभिप्रायास विरोध करणे मला योग्य वाटले नाहीं. ही आपली भारदस्त विचारसरणी लक्षांत घेण्यासारखीच होती. कांहों संस्थानिक सिंहासनारूढ होण्यापूर्वी विलायतेला गेले होते ह्मणून, आपणहि राज्यसूत्रे हातीं घेण्यापूर्वी अशा प्रकारची सफर केलीच पाहिजे असे सिद्ध होत नाहीं. शिवाय हिंदुस्थानचा बराच भाग प्रत्यक्ष जाऊन पाहण्याच्या संधीचा आपण उपयोग केलाच आहे. आपण सीलोनपासून मद्रास ते पेशावरपर्यंत प्रवास केला असून हिंदुस्थानचे बहुतेक प्रांत आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले आहेत. अशा प्रकारचे कित्येक वर्षांचें पर्यटन, ब्रिटिशराज्याच्या ध्येयाची, उद्देशाची व सामर्थ्याची यथार्थ कल्पना आपणांस करून देण्यास जर पुरेसे होत नसेल, तर इंग्लंडच्या सफरीपासून, या वयांत आपल्या उपयोगी पडेल की नाहीं, याबद्दल मला शंका वाटते. आलं इंग्लंडच्या सफरीपासून जे फायदे होण्याचा संभव आहे, तेच फायदे ग्रहण करण्यास आणखी थोड्या वर्षांनीं आपण अधिक समर्थ व्हाल, हे आपले ह्मणणे मला या परिस्थितींत सयुक्तिक वाटले; आणि आपली इच्छा ही आपल्या घराण्यांतील माणसांच्या व आपल्या बहुतेक प्रजाजनांच्या इच्छेचा प्रतिध्वनि आहे असे मानून आपणांस अनुकूल असे धोरण स्वीकारण्यास मी तयार झालो. " अशा प्रकारें महाराजांच्या इंग्लंडच्या सफरीची वासलांत लावण्यांत येईतोंपर्यंत, दक्षिण हिंदुस्थान व सीलोनमधील महाराजांची दुसरी सफर पुरी झाली होती. १८९१ सालच्या ता. ५ नोव्हेंबरला कोल्हापुराहून निघून, विजापूर, हैद्राबाद, मद्रास, पांदिचरी, तंजावर, तुतीकोरीन, कोलंबो, कांडी व नेवारा-एलिआ इत्यादि स्थळें कुमारांनी या प्रवासांत पाहिली. परत येते वेळीं हौसूर संस्थानची बंगळूर व हौसूर हीं दोन प्रमुख शहरे पाहून कुमार ता. २४ डिसेंबरला परत आपल्या धारवाड येथील छावणीला आले. मि. फ्रेजर साहेबांच्या या हकीगतींतून घेतलेल्या उताऱ्यावरून कुमारांना हा प्रवास किती आल्हाददायक झाला, याची कल्पना होईल : - "दहा वाजण्याच्या पूर्वीच आह्मी विजापुराला पोहोंचलों. महाराज व त्यांचा इतर परिवार वाहनांतून आनंद-महालामध्ये गेला. तेथें त्यांच्या राहण्याची चांगली सोय लागली; संध्याकाळी आह्मी टांग्यांत बसून निघालों, कोणतेंहि वाहन हांकण्यास महाराज नेहमींच आतुर असल्यामुळेच ते आज रडक्या खेचरांची एक जोडी हांकीत होते. आझी प्रथम ताजबावडीला गेलों. ताजबावडी हे एक बांधीव तळे असून यांत, शहरापासून तीन मैलांवर तोर्वी नांवाच्या पाण्याच्या मुख्य सांठ्यांतून नळानें पाणी आणून सोडले आहे. विजापुरासारखें स्थळ राजधानीकरितां पसंत करण्यांत आले होतें, है पाहून सकृद्दर्शनीं आश्चर्य वाटलें. कारण, तटबंदी करण्याकरितां अनुकूल अशी नैसर्गिक परिस्थिति येथें नसून चालू वर्षासारख्या अवर्षणाच्या काळांत मोठ्या लोकसंख्येला पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्याची साधनेंहि उपलब्ध नाहींत. परंतु विजापूरच्या प्राचीन इंजिनीअर व कारागीर लोकांनी आपले कौशल्यसर्वस्व भव्य तटबंदी, घुमट व राजवाडे बांधण्यांतच खर्च केलें नसून, शहराच्या आसपासच्या तलावांना व शहरांतील पाण्याच्या सांठयाला जोडणाऱ्या कालव्यांचें व नळांचें एक जाळेच निर्माण करून उपयुक्त अशा कामींहि त्यांनी आपले कौशल्य दाखविले आहे. हिंदुस्थानच्या प्रमुख मद्रास दृष्टीस पडतांच स्वाभाविकपणेच महाराजांना प्रांतांच्या मुख्य शहरांची तुलना करण्याची प्रवृत्ति झाली :-- आतांपर्यंत महाराजांनीं तीन प्रांतिक शहरे पाहिलीं असून मुंबई व कलकत्ता या शहरांशीं तुलना करण्यासारखी महाराजांना मद्रासमध्यें भरपूर सामुग्री सांपडली. येथे जागेला महत्व नाहीं, असे दिसतें. इमारती जागजागीं पसरल्या आहेत. शहर किल्ल्यापासून लांब आहे व किल्ला घाटापासून लांब आहे. आसपासचा प्रदेश कित्येक मैलपर्यंत पसरला आहे. मद्रास येथील विस्तीर्ण आवारें पाहून कलकत्ता व मुंबई येथे राहणाऱ्यांना हेवा उत्पन्न होण्यासारखा आहे. परंतु याहीपेक्षां विशेष आश्चर्य करण्यासारखी गोष्ट ही कीं, बरींचशीं दुकानें व माऊंट रोडसुद्धां आपापल्या स्वतंत्र आवारांत आहेत. ह्मणून मद्रास शहरांत रस्ते नसून सडका आहेत, असे उद्गार काढण्याची एकाद्याच्या मनाची सहज प्रवृत्ति होते. येथे विशेष गडबड दिसून येत नाहीं. येथील लोक हातगाड्यांत बसण्यांतच समाधान मानतात. हे कदाचित् येथील लोकरिवाजास अनुसरून असेल. आपल्याकडे व कलकत्ता येथे ज्याप्रमाणे व्हिक्टोरिआ व टांगे आहेत, तसे येथें सहसा आढळत नाहींत. कूमनदीच्या शाखा व कालव्यांप्रमाणे दिसणारे तिचे लहान लहान पाट यांच्यावरून लोक एकसारखे जात येत असतात. ताडांच्या व इतर वृक्षांच्या समृद्धीमुळे या शहराच्या बऱ्याचशा भागाला खेडवळ स्वरूप प्राप्त झाले आहे. स्त्रियांचा पोषाख, दुडदुड चालणारे लहान लहान बैल व इंग्लिश भाषेचा प्रसार इत्यादि विविध प्रकार कुमारांच्या दृष्टींत येथे विशेष भरले. रस्त्यांतील भिकारी व कुली लोकसुद्धां इंग्लिश भाषा बोलत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटे. मद्रास शहरांतीलच केवळ नव्हे, तर त्या प्रांतांतील खेडेगांवांतीलहि प्राथमिक शाळांत इंग्रजी भाषा शिकविली जाते, असे मला सांगण्यांत आलें. जसजसे आपण दक्षिणेकडे जातो, तसतसा इंग्रजी भाषेचा अधिकाधिकच प्रसार आढळून येतो. येथे व सीलोनमध्यें नेटिव्ह लोकांशीं संभाषण करतांना कुमारांना इंग्रजी भाषेचें अवलंबन करावे लागलें; हा अनुभव त्यांना उपयुक्त असाच झाला. फ्रेंच हिंदुस्थानच्या राजधानीविषयीं व लोकसत्तात्मक फ्रेंच राष्ट्र आपल्या हिंदी प्रजाजनांना कशाप्रकारे वागविते, यासंबंधीं कुमारांना पुढीलप्रमाणे अनुभव आलाः६० " संध्याकाळी आझी डुप्लेच्या उत्कृष्ट पुतळ्यानजिक असलेल्या प्रासा- दांतून गाडींत बसून गेलों, व तसेंच वाळवंटावरून सार्वजनिक बगीच्यांत गेलों. या बगीच्यांत, पोखरलेल्या विहिरी, कांहीं असामान्य लतावेली व समुद्रकिनाज्यावर दुसरीकडे न आढळणारी अशीं भाकरीचीं झार्डे इत्यादि पाहण्यासारखे आहे; हे पाहिल्यानंतर पांदिचरी येथील बहुतेक स्थळे पाहून झालीं. आमची जी येथें छोटेखानी सफर झाली, तिचा योग्य मोबदला आह्मांस मिळाला. कोणत्याहि अँग्लोइंडिअन पद्धतीच्या स्थळापेक्षा हे थोडेसे तऱ्हेवाईक लहानसे शहर आहे. जेथे जेथे इंग्रजी गृहस्थ जातो, तेथे तेथें तो आपल्याबरोबर आपले रीतरिवाज नेतो, अर्से जें ह्मणतात, ते जर खरे असेल, तर आह्मांपेक्षांहि फ्रेंचलोकांनी आपल्या घरची परिस्थिति अधिक चांगल्या प्रकारें येथें उतरविली आहे. बागबगीचे व आवार असलेले बंगले येथें नाहींत; परंतु येथील घरे नॉमँडी येथील कोणत्याहि लहान शहरांतील घरांप्रमाणे एकमेकाला चिकटून आहेत. " हे स्थळ अगदीं स्वच्छ आहे. फ्रेंचलोक जरी आपणांस स्वातंत्र्याचं, समतेचे व बंधुप्रेमाचे चहाते समजतात, तरी त्यांनीं यूरोपीयन लोकांची छावणी व काळ्या लोकांचें शहर हीं दोन्हीं एकमेकांपासून अगदीं अलग ठेविलीं आहेत. या दोहांमध्ये एक कालवा आहे. " तंजावर हे स्थळ मराठाकुमारांना विशेष चित्ताकर्षक वाटले, तंजावर येथील इमारती व त्यांचा तेथील ऐतिहासिक गोष्टींशीं संबंध या कारणद्वयामुळे तंजावर हे दक्षिण दिल्ली होय, या ह्मणण्याची सार्थता मनास बरोबर पटते. आतांपर्यंत ज्यांचीं आह्मांस नांवें देखील माहीत नव्हतीं असे भव्य देवालये बांधणारे चौल राजे, विजयानगरचे विजयी नायक इत्यादि जुन्या घराण्यांची आठवण आह्मांस येथें प्रथमच झाली. या सर्वांहूनहि कुमारांना अत्यंत मनोवेधक गोष्ट झटली झणजे विख्यात शिवाजीमहाराजांचे सुप्रसिद्ध वडील शहाजी राजे यांच्या नेतृत्वाखालीं मराठ्यांनी येथे १६६० सालीं मराठाराज्याचा पाया घातला ही होय. कोल्हापूरचे राजे, शिवाजीमहाराजांचे खास वंशज आहेत. आपल्या जातीचा अभिमान असलेल्या तंजावरच्या मराठ्यांनी महाराजांचें प्रेमानें स्वागत करून आपणांस आपल्या आसपणाची आठवण आहे, असे निदर्शनास आणिलें." सीलोनला गेल्यावर कुमारांना आनंद झाला. शिकारीहि तेथे झाल्या. -- सीलोन व शिकार. तेथील डोंगराळ प्रदेशाची नैसर्गिक शोभा पाहून महाराजांना नेहमीं प्रिय असलेल्या अशा कांहीं सुदैवानें नजरेस पडलेल्या सांबरांची शिकार करून कुमारांना अतिशय आनंद झाला. सर सॅम्युअल बेकर यांनीं प्रथम सुरू केलेली ही सांबरांची शिकार अद्याप या भागांत चालू आहे. शिकारी कुत्र्यांचे मालक सी. डब्ल्यू व जॅक्सन हे दुय्यम सरकारी मुनीम मि. फाउलर यांच्या सुचनेवरून, नेवारा इलिआपर्यंत आले होते. येथील रानांत सांबरें पुष्कळ असून तीं नेहमींच सांपडतात. रान सोडून अगदी जवळच्या ओढ्याचा आश्रय घेऊन सांबर फिरून उर्भे राहीतोपर्यंत सहासात कुत्रीं सर्व जंगलभर त्याचा एकसारखा पाठलाग करितात. सांबर कोठून निसटून जाईल ती जागा त्यांना अचूक माहित असते. तेथें तोंडावर दोन तीन कुत्र्यांच्या जोड्या बसविलेल्या असतात. हे कुत्रे मोठे असून मजबूत असतात. यांची पैदास बहुतकरून स्कॉच व कांगारू जातीच्या कुत्र्यांच्या मिश्रसंबंधापासून झालेली असते. सांबर बाहेर पडतांच ते त्याच्या तोंडावरच हल्ला करितात, किवा सांबर अशक्त असले तर त्याच्याशीं पाण्यांत बराच वेळपर्यंत झगडून त्याला लोळवितात. आह्मी तेथे असेतोपर्यंत आमच्या तीन सहलीं झाल्या. दोन दिवस मात्र आह्मांला चांगलीच शिकार साधली. पहिली शिकार सितालियानजिक झाली. लौकरच एक सांबर उठलें व तें आतां निसटून जाणार इतक्यांत त्याला परतवून मागे लावण्यांत आले व बगीच्याकडे तें धांवत सुटलें. तिकडे आह्मी कुत्र्यांसहित धांवत गेलों. जंगलाच्या दुसऱ्या बाजूला आझी पोंचतों न पोंचतों तोंच सांबर माळावर उडया मारीत जात असलेले दृष्टीस पडलें. तें कुत्र्यांपासून बऱ्याच अंतरावर होते. त्याच्यावर दोन कुत्रीं सोडून देण्यांत आलीं. एका क्षणार्धात सांबर व कुत्रीं अगदीं उभ्या दरींत खरखडत जाऊन अखेर खालच्या ओढयांत कुत्र्यांनी सांबराला खालीं पाडलें. बऱ्याच खांचा खळग्यांतून त्यांच्या पाठीमागून आह्मांस जावे लागलें." दुसरी शिकार चंद्रकांत मैदानांत झाली. सांबर बाहेर पडेतोंपर्यंत दाट जंगलांत कुत्र्यांना दोन तासपर्यंत एकसारखा त्याचा पाठलाग करावा लागला. शेवटीं एका आवाजासरशीं सावजाने रस्त्यावर उडी घेतली. बाणासारखें एका ओढ्यांतून निघून त्यानें मोठ्या त्वरेनें त्याचा दुसरा, तीर गांठला. आतां ते दुसऱ्या
Last Modified गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (14:02 IST) भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. अंकिताच्या या निवड प्रक्रियेबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर सांगतात, " 'बॉईज 2' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मी आणि माझ्या टीमने मुलीच्या भन्नाट जीवनावर चित्रपट करायचे ठरवले. यावेळी अंकिता आमच्या सोबतच होती. चित्रपटाची पटकथा पूर्ण झाल्यानंतर 'गर्ल्स' या सिनेमासाठी कलाकारांचा शोध सुरू झाला. नवीन कलाकारांना संधी द्यायची या विचाराने नवीन मुलींसाठी आम्ही ऑडिशन्स सुरू केल्या. अनेक ऑडिशन्स झाल्या मात्र मला आणि माझ्या टीमला मनासारखी 'मती' मिळत नव्हती. सर्वात शेवटी अंकिताने ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची 'मती' मिळाली." या भन्नाट चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. कायरा कुमार क्रिएशनस प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अ कायरा कुमार क्रिएशन प्रॉडक्शनच्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांची असून, अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामुळे बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन न होता काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने मिळून सरकार बनवले. भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवल्यामुळे शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं अशी कुजबूज भाजप नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. राज्यात सत्ता स्थापनेत अपयश आल्यानंतर पक्षातंर्गत मतभेद आता समोर येऊ लागले आहेत. भाजपमधील या कुजबुजीने भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. निवडणुकीत उमेदवारी नाकारणे, पक्षातील महत्त्वाच्या उमेदवारांचा झालेला धक्कादायक पराभव आणि निवडणुकीनंतर सत्तास्थापन करण्यात आलेले अपयश यामुळे पक्षात नाराजी आहे. सत्ता गेल्यामुळे जनसंपर्क कमी होण्याची भीती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. त्यातूनच शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद दिल्यास काय बिघडले असतं, अशी चर्चा नेते करत आहेत. महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. जनतेने तसा कौल दिला होता. आम्ही दोन पावले मागे गेलो असतो, नक्कीच मार्ग निघाला असता असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराजांना एकत्र आणून फडणवीसांच्या नेतृत्वाविरोधातआवाज उठवायला सुरुवात केली आहे. भाजपच्या आजच्या स्थितीला नेतृत्वच जबाबदार असून त्यांनी निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली.
In The Ransom Case, Bookmaker Gets 5 Others; The Betting Market Is Directly To Daud? खंडणी प्रकरणात सट्टेबाज सोनूसह 5 जणांवर मोक्का; सट्टेबाजाराचे धागेदोरे थेट दाऊदपर्यंत? पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असतानाही सेलिब्रिटी का खेळतात सट्टा? मुंबई - आयपीएल बेटिंगप्रकरणी अटकेतील सट्टेबाज सोनू जालान, त्याच्या ४ साथीदारांसह गँगस्टर रवी पुजारी याला मोक्का लावण्यात आला आहे. ठाण्यातील रितेश शहा या मसाले व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपी जालान, मुनीर खान, सुरेंद्र बागरी ऊर्फ ज्युनियर कोलकाता, किरण माला, केतन तन्ना ऊर्फ राजा यांनी रवी पुजारीचे नाव सांगत २२ जानेवारीला शहा यांना जबरदस्तीने ठाणे येथून गोरेगावला नेले. शहा यांच्या मालकीच्या एका फ्लॅटच्या तारणपत्रावर बंदुकीचा धाक दाखवून सह्या करण्यास सांगितले. तसेच ३ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणीही केली. प्रकरणी जालानसह ४ बुकी व रवी पुजारी अशा ६ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. खंडणीखोरीचे हे प्रकरण जरी सट्टेबाजीशी संबंधित नसले तरीही या प्रकरणाद्वारे सोनू जालान आणि इतर बुकींचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध समोर आले असून या मुद्द्याचा उपयोग पोलिसांना खटल्यादरम्यान होणार आहे. बुकींचे दाऊदशी संबंध बुकी साेनू जालानच्या आतापर्यंत चौकशीतून या सट्टेबाजीत अडकलेल्या अनेक बड्या लोकांची नावे समोर आली आहेत. सिनेअभिनेता अरबाज खान, निर्माता पराग संघवी, एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा भाऊ समीर बुधा अशा काहींची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. अरबाज खानने आपण सोनूकडे सट्टा खेळण्याची कबुली दिली असून यात आपण दोन कोटी ८० लाखांची रक्कम गमावल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. निर्माता पराग संघवी हा आपला या धंद्यातील भागीदार असल्याचा दावा सोनूने केला आहे. समीर बुधा हादेखील आपला साथीदार असल्याचा दावा सोनूने केला असून त्याच्याच नावे असलेल्या कारमधून सोनूला अटक करण्यात आली होती. निर्माता पराग संघवीने सोनू जालानशी असलेले सगळे संबंध नाकारले आहेत. आपण निर्माता असल्याचे कळल्याने सोनूने संबंध वाढवले होते, पण सोनू बुकी असल्याचे समजताच त्याच्याशी संबंध तोडल्याचे परागने चौकशीदरम्यान सांगितले. सोनू जालान हा देशातील एक मोठा बुकी आहे. या धंद्यामार्फत अवघ्या सोळा वर्षांत सोनू जालानने हजारो कोटी रुपयांची माया जमवली आहे. दहावी नापास असलेला सोनू जालान अगोदर मुंबई आणि राज्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा खबरी होता. या ओळखीच्या बळावर तो सिनेसृष्टीतील बडे तारे-तारका, क्रिकेटपटू आणि उद्योगपतींच्या वर्तुळात पोहोचला. छानछोकीची आवड असलेल्या सोनूने मुंबईत ३ आलिशान फ्लॅट भाड्याने घेतले असून यापैकी एका फ्लॅटचे भाडे जवळपास दीड लाखाच्या आसपास असल्याचे समजते. तसेच महागड्या मोटारींचा ताफाही तो बाळगून आहे. बेटिंगमधून मिळालेला पैसा त्याने बेनामी संपत्तीत गुंतवला आहे. ठाणे पोलिसांना सोनूच्या घरातून मिळालेल्या डायरीतील नोंदीनुसार यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने जवळपास ५०० कोटींची उलाढाल केली आहे. अंतिम सामन्यावरील सट्ट्यात तर त्याने दहा कोटींचा निव्वळ नफा कमावल्याची माहिती आहे. आपले एक ऑटो पार्ट््सचे दुकान असल्याचे तो लोकांना भासवायचा. मानसाेपचारतज्ञांच्या मते, 'प्रत्येक मनात जुगाराची सुप्त इच्छा' अभिनेता अरबाज खानसारखे सेलिब्रिटी पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असतानाही सट्टेबाजीकडे का वळतात, अधिक पैशाची त्यांना हाव का असते, याबाबत मुंबईतील एक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवींद्र अभ्यंकर यांचे मत जाणून घेतले. त्यांच्या मते, 'कोणताही मनुष्य मग तो सुशिक्षित असो, अशिक्षित असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाच्या मनात जुगार खेळण्याबाबत एक सुप्त इच्छा असते. किमान एकदा आपण नशीब आजमावून पाहिले पाहिजे असे वाटणे ही एक सहज मानवी प्रवृत्ती आहे. ते एक प्रकारचे थ्रील आहे. मी नक्कीच जिंकेन असा एक सुप्त आत्मविश्वास प्रत्येकाला असतो. अगदी महाभारतातही जुगाराचे दाखले सापडतात. पण म्हणून प्रत्येक माणूस जुगार खेळत नाही. त्यासाठी प्रत्येकाचे एक कारण असते. पण माणसाची हाव सुटत नाही. सिनेसृष्टीतील व्यक्तींना तर पैसा, प्रसिद्धी, वलय, चाहत्यांचे प्रेम अशा सर्व बाबी मिळालेल्या असतात तरीही त्यांना जुगार खेळावासा वाटण्यामागे हीच हाव असते. जे आपल्याकडे आहे ते पुरेसे आहे, असे कधीच कोणी म्हणत नाही. प्रत्येकाला अजून काहीतरी हवे असतेच. त्यातून मग असे प्रकार घडतात, असे डॉ. अभ्यंकर म्हणाले. पूर्वीच्या व मॅच फिक्सिंगच्या तंत्रात बराच बदल झाला आहे. पूर्वी संपूर्ण सामना फिक्स करून निकाल बदलला जायचा. अाता स्पॉट फिक्सिंग हा नवा प्रकार समोर आला आहे. २०१३ च्या आयपीएलमध्ये याच पद्धतीने फिक्सिंग झाली. त्यात एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलावर बीसीसीआयने कारवाई केली होती. स्पॉट फिक्सिंग म्हणजे सामन्याचा विशिष्ट भागच फिक्स करायचा. म्हणजे एखाद्या विशिष्ट षटकात सट्टेबाजांना सामील गोलंदाजाने अतिरिक्त धावा द्यायच्या. नेमक्या कोणत्या षटकात तो या धावा देणार आहे ते षटक सुरू करण्यापूर्वी गोलंदाजाने संकेत बुकींना द्यायचा. म्हणजे टॉवेल कंबरेला खोचणे किंवा क्षेत्ररक्षण लावण्यासाठी बराच वेळ घेणे अशा विशिष्ट हालचालीतून खेळाडू संकेत देत असे. हे संकेत जाणून घेत बुकी सट्ट्याच्या दरात चढ-उतार करत मोठा नफा कमावतो. या प्रकारात संपूर्ण संघ फिक्स करण्याऐवजी एक किंवा दोन खेळाडूंना फिक्स केले जातात. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता सट्टेबाजीही अधिक व्यापक झाल्याचे दिसते. पोलिसांनी सोनू जालानच्या घरावर घातलेल्या धाडीदरम्यान एक विशेष यंत्र जप्त केले, ज्या यंत्राच्या माध्यमातून सोनू जालान दर षटकानंतर एकाच वेळी देशभरातील ५० बुकींच्या संपर्कात असे. एका मोठ्या चार्जरला २१ मोबाइल फोन आणि हेडफोन्स, आवाज कमीअधिक करण्यासाठीच्या बटणांसह स्पीकर्सची सोय या यंत्रात आहे. या संभाषणादरम्यान वापरण्यासाठी विशिष्ट शब्दांना प्रतिशब्द म्हणून सांकेतिक शब्दांची नोंद असलेली एक डायरीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. पूर्वी एखाद्या टेलिफोनच्या साहाय्याने केली जाणारी निरोपांची देवाणघेवाण आता तंत्रज्ञानामुळे बहुस्तरीय झाली आहे. मुंबईतील मालाड येथे वास्तव्यास असलेल्या या सोनू जालानचे थेट संबंध दाऊदशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनू हा रईस सिद्दिकी आणि अनिल टुंडा या दाऊदच्या दोन विश्वासू साथीदारांच्या नियमित संपर्कात असून हे दोघे भारत, पाकिस्तान, दुबई आणि आखाती देशातील सट्टेबाजारावर नियंत्रण ठेवून असतात. या दोघांची सोनूने दुबईत बऱ्याचदा भेट घेतल्याची बाब समोर आली आहे. या सर्व सट्टेबाजारातील उलाढालीचा पैसा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम आणि छोटा शकीलमार्फत जमा केला जातो.
13th AUGUST TODAY IN HISTORY - DINVISHESH GHADAMODI - History Today\n13th AUGUST TODAY IN HISTORY - DINVISHESH GHADAMODI\nPosted on August 14, 2015 August 14, 2015 by guy8461\nस्वगृह » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » ऑगस्ट » १३ ऑगस्ट दिनविशेष\n१३ ऑगस्ट दिनविशेष\nद्वारे स्वाती खंदारे । प्रकाशक संपादक मंडळ । १३ ऑगस्ट २०१३\n१३ ऑगस्ट दिनविशेष(August 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.\nविक्रम साराभाई - विक्रम अंबालाल साराभाई (गुजरातीः વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१३ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.\n१७९२ - फ्रांसच्या राजघराण्यातील व्यक्तींना क्रांतीकारकांनी पकडून तुरुंगात टाकले.\n१९४० - जर्मनांनी या दिवसाला 'गरुडदिन' असे नाव दिले होते. कारण या दिवशी ब्रिटनच्या हवाईदलात एकही विमान शिल्लक असणार नाही, असे गोलरिंगने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. बरीच जर्मन विमाने पाडण्यात ब्रिटिश हवाई दलाला यश आले.\n१९४२ - न्युर्यॉकमध्ये बांबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन. वॉल्ट डिस्नेच्या या अजरामर निर्मितीचा पहिला खेळ रेडियो सिटी म्युझिक हॉलमध्ये झाला.\n१९४३ - रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती.\n१९४५ - जपान शरण येत नाही, असे दिसताच अमेरिकी विमानांनी टोकियोवर प्रचारपत्रकांचा वर्षाव केला.\n१९६१ - ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या . बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.\n१९९१ - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.\n२००० - पाकिस्तानातील पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन.\n२००२ - के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.\n२००३ - ज्येष्ठ कलादिग्दर्शक केशव दत्तात्रय तथा दादा महाजनी यांचे निधन . मराठी चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.\n२००४ - नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले.\n२००४ - जगातील एक सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑल्ंिापिकला जल्लोषात प्रारंभ झाला. ग्रीक संस्कृती, देव -देवता याबरोबरच ऑल्ंिापिकची जन्मगाथा यांच्या जोडीला पॉपचाही समावेश असलेल्या संगीत व नृत्य कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांबरोबरच जगभरातील सुमारे तीनशे दूरचीत्रवाणी वाहिन्यांवर अंदाजे चार अब्ज क्रीडाप्रेमींना या सोहळयाने मोहित केले.\n१८७२ - रिर्चड क्लिस्टॅटर, क्लोरोफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण करून १९१५ चे नोबेल पारितोषिक मिळविणारा जीवशास्त्रज्ञ.\n१८८० - जॉन लोगी बेअर्ड, दूरचित्रवाणीसंचशोधक.\n१८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी.\n१८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक.\n१८९९ - अल्फ्रेड हिचकॉक, इंग्लिश चित्रपटदिग्दर्शक.\n१८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक.\n१९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार.\n१९२७ - फिडेल कॅस्ट्रो, क्युबाचा हुकुमशहा.\n१७९५ - अहल्याबाई होळकर.\n१९१० - क्रिमियन युद्धात सैनिकांनी देवदूत मानलेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेलचे निधन.\n१९४६ - एच. जी. वेल्स या साहित्यिकाचे निधन.\n१९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही त्यांची नाटके गाजली.\n१९८८ - व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते.\nस आद्याक्षरावरून मुलांची नावे\n2 Reasons Why Bank Fixed Deposits Alone Won't Make You RichScripbox\n4 Easy Science Experiments That Will Transform Your ChildFlintobox\nSimple Toys to Make Your Kids Smart and CreativeMagic Crate\nAn Underwater Tennis Court In Dubai To Host Grand Slam TournamentsPursuitist\n14th AUGUST 2015 DARSH/ MAUNI/HARIYALI AMAVASYA-SHRAVAN MAAS ARAMBH ( START )
मागील मिटींग मध्ये ठरल्याप्रमाणे आज दिनांक ०८/०१/२०२१ रोजी, कर्मचारी संघटना व मुंबई रिजनचे सर्व असेट हेड, चीफ ऑफशोर फायनान्स तसेच इंचार्ज आय आर यांची कोवीड परिस्थितीतील ऑफशोर ओटी संदर्भात वसुधारा भवन येथे मिटींग घेण्यात आली. सदर मिटींग मध्ये ईडी सीडीएस श्री. जयस्वाल साहेब, ईडी (एमएच) असेट श्री. पांडेसाहेब, ईडी (बीअँडएस) श्री. माथवन साहेब, ईडी (एचडीएस) श्री. आहुजा साहेब, ईडी (डीप वॉटर) श्री. ढोबल साहेब, जीजीएम एचआरओ श्री. सुनील सिंग साहेब, चीफ ऑफशोर फायनान्स श्री. टोणगावकर साहेब, सीजीएम इंचार्ज (एचआर) श्री. तोमर साहेब, जीएम इंचार्ज (आय आर) श्री. गणेशन साहेब व अन्य दोन ऑफिसर तसेच कर्मचारी संघटनेतर्फे सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष श्री. पराग कदम, ऑफशोर सेक्रेटरी श्री. प्रदीप म्हाडगुत, सेक्रेटरी श्री. पंकज कोळी तसेच श्री. श्रेयस जोरापूरकर उपस्थित होते.
१९ जानेवारी १९२२ रोजी आर्थर रॉबर्ट मॉरिस या ऑस्ट्रेलियाई कसोटीपटूचा जन्म झाला. डावखुरा मॉरिस सर्वाधिक विख्यात आहे तो १९५४८ च्या इंग्लंड दौर्यावर गेलेल्या डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील बिनीचा खेळाडू म्हणून. वडलांच्या प्रोत्साहनामुळे क्रिकेट, रग्बी आणि टेनिससारख्या कंदुकक्रीडांमध्ये आर्थरला रुची वाटू लागली आणि वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच आर्थर मैदाने गाजवू लागला. आपली शालेय कारकीर्द आर्थरने गोलंदाज म्हणून गाजविलेली होती. बिल ओरेली हा कर्णधार म्हणून लाभल्यावर मात्र ओरेलीने त्याचे फलंदाजीतील कौशल्य हेरले आणि क्लब सामन्यांमध्ये त्याने आर्थरला फलंदाजीत बढती दिली. अपेक्षेप्रमाणे तिथे आर्थरने अतिशय चांगली कामगिरी केली. वयाच्या सतराव्या वर्षी माध्यमिक शिक्षण संपल्यावर एके ठिकाणी आर्थर कारकून म्हणून काम करू लागला. पुढच्याच वर्षी त्याचे प्रथमश्रेणीतील पदार्पण साजरे झाले. क्ल्वीन्सलँडविरुद्ध न्यू साऊथ वेल्ससाठी खेळताना दोन्ही डावांमध्ये आर्थरने शतके काढली. प्रथमश्रेणी पदार्पणाच्या दोन्ही डावांमध्ये शतके काढणारा आर्थर मॉरिस हा पहिला खेळाडू ठरला. दुसर्या महायुद्धामुळे मॉरिससारख्या अनेक खेळाडूंना प्रथमश्रेणी सामन्यांना मुकावे लागले. स्थानिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. १९४६-४७ च्या हंगामात क्रिकेट पूर्ववत सुरू झाले. क्वीन्सलँडविरुद्ध खेळताना त्याने २७ आणि ९८ धावा काढल्या. याच हंगामात वॉली हॅमंडच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ कांगारुंच्या देशात आला होता. या संघाविरुद्धच्या दौर्यावरच्या सामन्यासाठी मॉरिसची निवड झाली. नेहमीचा सलामीवीर बिल ब्राऊन जायबंदी असल्याने मॉरिसला संधी मिळाली होती आणि ११५ धावा काढून आणि ब्रॅडमनसोबत १९६ धावांची भागीदारी करून मॉरिसने संधीचे 'कांदे' केले. प्रवासी संघ न्यू साऊथ वेल्स विरुद्ध खेळला त्या सामन्यात मॉरिसने ८१ धावा काढल्या आणि कसोटीचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. मात्र त्याला नैसर्गिक खेळ कायम ठेवण्याचाच सल्ला दिला. तिसर्या कसोटीच्या दुसर्या डावात त्याने १५५ धावा काढल्या आणि पुढच्या दोन डावांमध्ये १२२ आणि नाबाद १२४. १९४८ च्या इंग्लंड दौर्यात कसोटी मालिकेत तीन शतके काढणारा आर्थर मॉरिस फलंदाजांमध्ये अग्रस्थानी राहिला. ८७ धावांच्या पारंपरिक सरासरीने त्याने एकूण ६९६ धावा त्याने कसोट्यांमध्ये काढल्या : ३१, ९, १०५, ६२, ५१, नाबाद ५४, ६, १८२ आणि धावबाद १९६ ! कसोटी कारकीर्द : ४६ सामने, ३५३३ धावा, सरासरी ४६. ४८, प्रत्येकी १२ शतके आणि निमशतके, २०६ सर्वोच्च.
नवनवीन गोष्टी शिकण्याची मानवी मेंदूची क्षमता खूपच मोठी आहे. ती मेंदूतील चेतापेशींच्या व चेतातंतुंच्या लवचीकतेमुळे असते. आपण ही लवचीकता जेवढी जपू, तेवढी ती वाढत जाते. आणि मेंदू नवनवीन गोष्टी शिकणे व त्या लक्षात ठेवणे हे काम सहजतेने करू शकतो. त्यासाठी आपल्याला श्रम मात्र नक्कीच करावे लागतात. आपल्या मेंदूतील मन हे भाग कसे काम करत असतो ते आपण पहिले. लिम्बिक कॉर्टेक्स वगैरे भाग मन म्हणून कसे काम करतात ते पहिले. ते मन सशक्त करण्यासाठी त्याला कसे 'ट्रेन' करायचे, ते आपण पहिले. त्याविषयी टिप्स आतापर्यंत दिल्या. आता मनाशीच संबंधित मेंदूच्या वेगळ्या कार्याकडे थोडे वळू या. ते कार्य म्हणजे स्मरणशक्ती. एखादी गोष्ट (ऐकलेली, पाहिलेली) मेंदूमध्ये साठवली जाणे व योग्य वेळी ती परत सांगता/लिहिता येणे, याला आठवण्याची शक्ती किंवा स्मरणशक्ती असे म्हणतात. आपण पाहिलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टी आपल्या मेंदूत ठराविक ठिकाणी उमटतात (registrar होतात). उदा. ऑक्सिपिटल कॉर्टेक्समध्ये वाचलेल्या किंवा पाहिलेल्या गोष्टी, तर टेम्पोरल कॉर्टेक्समध्ये ऐकलेल्या गोष्टी रजिस्टर होतात. अर्थात त्यासाठी मेंदू पूर्ण एकाग्र असणे आवश्यक असते. त्यासाठी मेंदूतील रेटीक्युलर अॅक्टिवेटिंग सिस्टिमचे काम महत्त्वाचे असते. ही संस्था जर व्यवस्थित कार्य करत असेल तर एकाग्रता वाढते व रजिस्ट्रेशन चांगल्या प्रकारे होते. या कामात हायपोथॅलॅमस वगैरे भागांचीही मदत होते. रजिस्टर झालेला हा भाग त्यानंतर लघुकालीन स्मरणकेंद्रात (short term memory मध्ये) जातो. त्यानंतर परत परत प्रक्टिस केल्यावर, चिंतन केल्यावर त्यातील भाग दीर्घकालीन स्मरणात जातो. परवाच एक आई तिच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली होती. "माझ्या मुलाला परीक्षेत काही लिहीताच येत नाही. घरी तीच उत्तरे बरोबर सांगतो किंवा लिहितोसुद्धा, पण परीक्षेत आठवत नाही." अनेक मुलांना ही भीती असते की, परीक्षेत पेपर लिहिताना मला एवढा सगळा अभ्यास आठवेल की नाही ? मग हिच भीती वाढत जाऊन काही वेळा खरी ठरते. म्हणजेच, आपली स्मरणशक्ती चांगली असेल तर ही समस्या येणार नाही. आपला मेंदू म्हणजे काही संगणक / कॉम्प्यूटर नाही की एखादी चिप / सॉफ्टवेअर घालून ती वाढवता येईल. आपल्या मेंदूने संगणकाचा शोध लावला आहे, तर मेंदू हा संगणकापेक्षा जास्त वरच्या स्तरावरचा आहे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवणे हे सॉफ्टवेअर घालण्याएवढे सोपे काम नाही. किंवा संगणकात नुसते 'save'चे बटण दाबून एखादी माहिती 'Memory'त घालता येते, तसा सोपा हा प्रकार नाही. आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी जसे आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात, तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. चांगली स्मरणशक्ती ही तुमच्या सुदृढ मनावर व मेंदूच्या एकाग्रतेवर, तरलतेवर अवलंबून असते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक गोष्टींवर परिश्रम घ्यावे लागतात. इंग्रजीत एक म्हण आहे, You can't teach old dog new tricks. पण आमच्या मेंदूच्या बाबतीत ही म्हण अजिबात लागू नाही. वेगवेगळ्या गोष्टी समायोजित करण्याची आपल्या मेंदूची शक्ती अफाट आहे. अगदी वृद्ध वयातदेखील लोक मोबाईल, संगणक शिकू शकतात ते याचमुळे. त्याला 'न्यूरोप्लास्टिसिटी' किंवा 'मेंदूची लवचिकता' असे म्हणता येईल. योग्य अशा उत्तेजनामुळे चेतापेशीच्या व चेतातंतुच्या पातळीवर मेंदूत नवीन जोडण्या होऊ शकतात आणि म्हणून शिकून शिकून, प्रयत्न करून तुम्ही स्मरणशक्ती वाढवू शकता. त्यासाठी आपण खालील मुद्दे विचारात घेणार आहोत, जे पुढच्या लेखात विस्ताराने येतील. झोप व व्यायाम न टाळणे. वेळेचे योग्य नियोजन करणे ; जेणेकरून मित्र, मजा, मनोरंजन यासाठी वेळ राहील. मनाला, मेंदूला ताणमुक्त ठेवणे. मेंदूची लवचिकता वाढवणाऱ्या आहारावर भर देणे. मेंदूला स्मरणाचे काही व्यायाम देणे. स्मरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आत्मसात करणे. आपली अध्ययन क्षमता वाढवणे. आपण पहिले की मेंदूला आपण नवीन पद्धती शिकवू शकतो. किंबहुना, नवनवीन गोष्टी शिकण्याची मानवी मेंदूची क्षमता खूपच मोठी आहे. ती मेंदूतील चेतापेशींच्या व चेतातंतुंच्या लवचीकतेमुळे असते. ही लवचीकता जेवढी जपू, तेवढी ती वाढत जाते. आणि मेंदू नवनवीन गोष्टी शिकणे व त्या लक्षात ठेवणे हे काम सहजतेने करू शकतो. त्यासाठी आपल्याला श्रम मात्र नक्कीच करावे लागतात. पुढे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे, त्या पण आत्मसात केल्या व आचरणात आणल्या तर स्मरणशक्ती नक्की वाढू शकते. त्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप व व्यायाम या दोन्ही गोष्टी टाळू नका. झोपही टाळू नका आणि व्यायामही टाळू नका. या दोन टोकाच्या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य गाठता आला पाहिजे. शारीरिक व्यायामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजन पुरवठा तर वाढतोच, शिवाय मेंदूतील रेटिक्युलर अॅक्टिव्हेटिंग सिस्टीम उद्वीपित होते. त्याचबरोबर मेंदूत एन्डॉर्फीन नावाची संप्रेरके स्त्रवतात, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तुमची झोप अपूर्ण झाली तर तुमची कल्पनाशक्ती, कार्यक्षमता, विवेकपूर्ण विचार करण्याची क्षमता कमी होते. दिवसभरात सहा ते सात तासांची झोप घेतल्यास मेंदू अधिक ताजातवाना राहतो व कार्यक्षम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप आवश्यक आहे. म्हणून म्हणतात, Improve your Memory by sleeping on it. मौजमजा, मनोरंजन, मित्रांबरोबर 'टाईमपास' या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळे खेळ खेळणे, मित्रांबरोबर फिरणे, गप्पा मारणे, हसणे, खिदळणे किंवा एखादा सुंदर सिनेमा-नाटक पाहणे या मनोरंजनालासुद्धा महत्त्व आहे. या 'रिलॅक्सेशन'मुळे मेंदू ताजातवाना राहतो व कार्यक्षमता वाढते. पर्यायाने स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. उत्कृष्ट नातेसंबंधही अध्ययनाची एकूण क्षमता वाढवण्यास महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे मेंदूला एक प्रकारचे उद्वीपन मिळत असते. अर्थपूर्ण नातेसंबंध, दृढ नातेसंबंध सुदृढ मदतीचे हात देण्यास उपयोगी ठरतात. त्यामुळे केवळ भावनिक आरोग्याच नव्हे, तर मेंदूचे एकूण आरोग्य चांगले राहते. हार्वर्ड स्कूलच्या एका संशोधनाने सिद्ध केले आहे कि माणूस जेवढा सामाजिकदृष्ट्या कार्यशील, तेवढी त्याची स्मरणशक्ती जास्त चांगली राहते. इतर भावनिक प्रतीसादांपेक्षा हास्याचा प्रतिसाद संपूर्ण मेंदुभर पसरतो. विनोद ऐकणे, विनोदी चिलाईन्स टाकणे/विचार करणे हे मेंदूच्या अध्ययनक्षमतेसाठी, कल्पनाशक्तीसाठी आवश्यक असते. त्यासाठी खालील गोष्टी कराव्या : स्वतःला हसावे : स्वतःचे विनोदी, हास्यास्पद किस्से इतरांना सांगावे किंवा कधी जेव्हा आपण स्वतःला नको इतक्या गंभीरपणे घेतले आहे असे किस्से ऐकवावे. हास्याचा मागोवा घेऊन त्यात सामील होणे : आपल्याला आजूबाजूला कोणी हस्ते आहे, असे दिसले तर त्यांच्यात सामील व्हावे. त्यांच्या विनोदात सहभागी व्हावे. विनोद हा संसर्गजन्य आहे. त्यामुळे विनोद करणाऱ्या, जमणाऱ्या अशा व्यक्तींचा सहवास सहसा चुकवू नये. स्वःचे हस्तानाचे, घरातल्यांचे मजा करतानाचे फोटो पाहावेत. त्या आठवणीत रममाण व्हावे. विनोदी आठवणी काढून खिदळावे. अशा अनेक आठवणी आपल्याला हास्यात बुडवतात. छोट्या मुलांबरोबर खेळावे. या सर्वांतून सत्वपूर्ण हास्याचा रस स्त्रवला जातो, जो संपूर्ण मेंदूला उद्विपित करतो व त्यामुळे कार्यक्षमता वाढवतो, पर्यायाने स्मरणशक्ती ! स्मरणशक्ती वाढवण्यासाठी झोप, व्यायाम, मनोरंजन यासाठी (योग्य तेवढा) वेळ देणे हे किती व कसे आवश्यक आहे ते आपण पहिले. 'हास्यरस' हे स्मरणशक्ती वाढवण्याचे उत्तम टॉनिक आहे, हेसुद्धा आपण मागील भागात पहिले. आता इतर काही महत्त्वाच्या पायऱ्यांची/ आवश्यक गोष्टींची माहीती आपण करून घेऊ. 'तणाव नियोजन' किंवा 'टेन्शन मॅनेजमेंट' हीसुद्धा स्मरणशक्ती वाढवण्याच्या उपयातील एक महत्त्वाची पायरी आहे. कारण टेन्शन म्हणजे जे मनात असते, शरीरावर दिसते, नात्यातून बोलते, कामातून कळते. म्हणजेच मनावर/मेंदूवर टेन्शन असेल तर अभ्यास करण्याच्या इच्छेवर, एकाग्रतेवर पर्यायाने स्मरणशक्तीवर परिणाम होत असतो. त्यासाठी टेन्शन कमी करण्यासाठी 'विवेकी' किंवा 'सकारात्मक' दृष्टीकोन कसा ठेवायचा, हे आणि मागे काही लेखांमधून पाहिलेच आहे. तेव्हा आपण हेदेखील बघितले कि योगाभ्यास/योगमार्गाचा अवलंब केल्यास ताणाचे नियोजन करण्यास त्याचा उपयोग होतो. कारण भगवान श्रीकृष्णांनी 'कर्मसंन्यास योगात' म्हटले आहे कि आपल्या प्राकृत भावनांचे उद्वीपन नियंत्रित केल्यास जो शिकतो तो खरा योगी, खरा सुखी मनुष्य ! म्हणजेच योगमार्ग हा आपल्याला आपल्या नकारात्मक भावना, विचार नियंत्रित करण्यास मदत करतो. योगामुळे किंवा कुठल्याही Meditation मुळे मेंदूतील Prefrontal Cortex (प्रीफ्रंटल कॉर्टेक्स) ची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते, जिथे स्मरणशक्तीचे केंद्र असते. तसेच योगामुळे मेंदूतील पेशींची एकमेकांशी जोडणी अधिक कार्यक्षम होते. एकाग्रता वाढण्यात व स्मरणशक्ती वाढण्यात या सर्वांचा परिणाम होत असतो. मेंदूची कार्यक्षमता वाढवणारा आहार हीसुद्धा एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. मेंदूचे आरोग्य वाढवण्यासाठी फळे, सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, 'आरोग्यदायी' स्निग्ध पदार्थ हे उपयोगी ठरतात. यात प्रामुख्याने ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ हे मेंदूसाठी फारच उपयुक्त ठरतात. मासे हा या पदार्थांचा सर्वात मोठा साठा आहे. माशांमधून ही फॅटी अॅसिड्स जास्त प्रमाणात शरीरात जातात, जी मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असतात. कॉडलीव्हर ऑईल किंवा शार्कलिव्हर ऑईल या Fish oil supplements मधून शाकाहारी लोक हा पदार्थ घेऊ शकतात. त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया, सोयाबीन, बदाम, फ्लॅक्सिड ऑईल यामधूनही Omega-३ मिळू शकते. त्याचबरोबर सॅच्युरेटेड फॅट्स (Saturated fats) चे जेवणातील प्रमाण कमी करणे अत्यावश्यक आहे. रेड मी, दूध, लोणी, चीज, आईसक्रिम यांचे सेवन कमी केले तर मेंदूची कार्यक्षमता वाढते. फळे, हिरव्या पालेभाज्या यामध्ये सर्वात जास्त अॅन्टिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पालक, मेथी, ब्रोकोली, लेट्युस, फळांमध्ये आंबा, द्राक्षे, बेदाणे,काळ्या मनुका, कलिंगड यांचे सेवन महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर गहू, गव्हाची पोळी, ब्रेड (गव्हाचा), ओट्स, कडधान्ये यांमुळे मेंदूची कार्यक्षमता खूपच वाढायला मदत होते. आता सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे मेंदूचे व्यायाम, स्मरणशक्तीच्या वेगळ्या क्लृप्त्या शिकणे. वेगळी भाषा शिकणे, वेगळे वाद्य वाजवायला, गाणे म्हणायला शिकणे, एखादा खेळ शिकणे, कोडी, सुडोकू सोडवणे हे सगळे मेंदूचे व्यायाम आहेत. ७-८ वर्षांपर्यंत मेंदू पूर्ण विकसित झालेला असतो. नवी माहिती आत्मसात करण्याची त्याची क्षमता वाढलेली असते. त्यामुळे असे 'बौद्धिक व्यायाम' केल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. Memory Devices किंवा स्मरणाच्या वेगळ्या क्लृप्त्या/युक्त्या असे त्यास म्हणता येईल. प्रतिमा डोळ्यासमोर उभी करणे - एखाद्या व्यक्तीविषयी लक्षात ठेवताना, जागेविषयी लक्षात ठेवताना तिची त्रिमित प्रतिमा (३-D image) लक्षात ठेवली तर बाकी आठवणे सोपे जाते. उदा. साबरमती आश्रम लक्षात ठेवताना त्यात महात्मा गांधी, चरखा, शेळ्या, बाजूची नदी अशी सगळी प्रतिमा लक्षात ठेवली तर सर्व इतिहास लक्षात राहू शकतो. अर्थपूर्ण वाक्य तयार करणे - एखाद्या उत्तराचे मुद्दे लक्षात ठेवताना त्यातले पहिले अक्षर घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार करून ते लक्षात ठेवले तर उत्तर लक्षात रहाते. उदा. एखाद्या उत्तराचे मुद्दे E,G,B,D,F अशा अक्षरांपासून असतील तर वाक्य Every Good Boy Does Fine. पहिली अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवणे व लक्षात ठेवणे- मोठी सरोवरे लक्षात ठेवण्यासाठी HOMES म्हणजे Huron, Ontario, Michigan, Erie, Superior. चालीत/गेयतेत लक्षात ठेवणे - ३० दिवस असणारे महिने लक्षात ठेवण्यासाठी Thirty days has September, April, June and November असे चालीत लक्षात ठेवू शकतो. Chunking - मोठी माहिती छोट्या छोट्या भागात विभागून लक्षात ठेवणे. ९९५०४५१९१६ हा क्रमांक ९९-५०४-५१९-१६ असा Chunks मधून लक्षात ठेवू शकतो. स्मरणशक्ती वाढवण्यास असे विविध उपाय उपयुक्त ठरतात. म्हणून एकाग्रतेने ऐका, वाचा, मनन करा, चिंतन करा म्हणजे लक्षात राहील.
एक संस्कृत वचनाप्रमाणे आपल्या बाळाला पाच वर्षापर्यन्त मनसोक्त खेळू द्यावे, पुढे दहा वर्ष म्हणजे वयाच्या पंधरा वर्षापर्यन्त चांगले संस्कार द्यावेत. अपत्याचे वयवर्षं पंधरानंतर त्याला मित्रत्वाने वागवावे. पण आधुनिक संत विनोबा भावे म्हणतात मित्र असला म्हणजे आपण त्याला आपल्या घरी कायम ठेवून घेत नाही. फारतर त्याची गैरसोय होवू नये म्हणून तात्पुरती आठचार दिवस आपण त्याला आपल्याकडे वास्तव्याची मुभा देतो. हल्ली ऊच्च शिक्षणामुळे मात्र उत्पन्न मिळवण्याचा वेटिंग पीरियड वाढला. माध्यमिक शिक्षणानंतरच पालकांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक खर्चदेखील करावा लागतो. अशा विवंचनेत कर कायदे काय मदत करतात ते पाहू. व्यवसाय कर हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. महाराष्ट्रात कमालदर वार्षिक अडीच हजार रुपये आहे. दिव्यांग पाल्याच्या पालकाला व्यवसायकर पूर्णपने माफ आहे. व्यवसयायकर विभागात रिफंड मिळण्याची तरतूद नाही म्हणून कर्मचाऱ्याने पहिल्या वर्षीच योग्य वैद्यकीय पुरावे व्यवसायकर अधिकार्याला दाखवून कायमचा फायदा करून घ्यावा. केंद्र सरकारच्या प्राप्तीकर कायद्यातदेखील दिव्यांग पाल्यांच्या पालकांना काही सूट दिली ते पुढे पाहू. क्लबिंगच्या तरतुदी १० (३२) अल्पवयिन मुलांच्या नावाने मुदत ठेवी पासून किंवा इतर उत्पन्न मिळाल्यास ते करमाफ नाही. पालकांना असे उत्पन्न त्यांच्या विवरणपत्रात नमूद करावे लागते. अज्ञान मुलांच्या आई किंवा वडील दोघांपैकी ज्याचे जास्त उत्पन्न असेल त्याच्या उत्पन्नात ते मिळवावे लागते. म्हणजे वाढीव दराने प्राप्तीकर द्यावा लागतो. अर्थात प्रत्येक एक मुलामागे १,५०० रुपयांची सूट मिळते. अपत्य जर दिव्यांग असेल त्याच्या नावाचे सर्व उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात दाखवायची गरज नसते. असे उत्पन्न पाल्याचेच समजून कलम ८० यू नुसार पुन्हा त्याला वजावट मिळते. घटस्फोटीत आईवडीलांच्या बाबतीत मुलाचे संगोपन करणार्या पालकाच्या उत्पन्नात मुलाला मिळणारे व्याजाचे उत्पन्न दाखवावे. सावत्र मुलांच्या उत्पन्नालादेखील ह्या तरतुदी लागू आहेत. अपत्यांचे पीपीएफ किंवा समृद्धी सुकन्या खाते असेल मिळणारे व्याज पालकांच्या विवरणपत्रात पूर्वपणे करमाफ राहील. दुर्दैवाने एखाद्या मुलाचे आईवडील हयात नसतील; तर अज्ञान मुलांच्या नावाने मिळणारे उत्पन्न त्यांना सांभाळणार्या पालकाच्या उत्पन्नात दाखवण्याची गरज नसते. कायदेशीर पालकाला अज्ञान मुलाच्या पॅनवर अधिकृत प्रतीनिधी म्हणून आयकर विवरणपत्र दाखल करावे लागेल. कलम ६४ (१-ए) नुसार चित्रपटातील कलाकारांना मिळणारे उत्पन्न अल्पवयीन मुलांनांचेच उत्पन्न मानले गेले. काही अल्पवयीन मुलांकडे वेगळे कसब, प्रावीण्य, कौशल्ल्य किंवा कला असू शकते. मुलांना मिळणार्या अशा अंगमेहनतीच्या कामामुळे जो मोबदला मिळतो तो पालकांच्या उत्पन्नात दाखवायची गरज नाही. शैक्षणिक भत्ता १० (१४) कर्मचार्याला मिळणार्या वेतनाच्या पे स्लिप आणि फॉर्म क्रमांक १६ ही रक्कम वेगळी दर्शवली पाहिजे. नियोक्त्याकडून शैक्षणिक भत्ता मिळत नसेल तर वजावट मिळणार नाही. दोन मुलांपर्यंतचा शैक्षणिक भत्ता पगारातून वजा करता येतो. शैक्षणिक भत्ता रुपये १०० प्रती महिन्याला आणि वसतिगृह भत्ता रुपये तीनशे दर महिन्याला आयकराची गणना करताना वजावट मिळते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कर्मचार्यांना मिळालेला शैक्षणिक भत्ता पूर्णपणे करमाफ असतो. व्यवसाय कर आणि प्रमाणित वजावट केल्यानंतर येणार्या रक्कमेलाच 'वेतनापासूनचे उत्पन्न' असे म्हणतात. ट्युशन म्हणजे प्रायव्हेट क्लासला बक्कळ फीज मोजतो ती नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त कोर्सला अॅडमिशन घेतले असेल तर एकूण खर्चाच्या पावतीवर ट्युशन फी वेगळी दाखवायला हवी. कलम ८०-सी च्या अंतर्गत हे पेमेंट दाखवता येते. अर्थात कलम ८०-सी मधील सर्व गुंतवणुका दीड लाख रुपये पर्यंतच पात्र आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च जास्त येत असेल तर उत्पन्नाचा पक्का पुरावा सांभाळून ठेवला पाहिजे. कारण ट्यूशन फीसोबत इतर खर्चदेखील रेकॉर्ड होतात. भाचरे, पुतण्ये, भावंडे आणि जीवनसाथीच्या ट्यूशनफीचे पुण्य मिळत असेल पण कलम ८० सी ची वजावट मिळणार नाही. याउलट तेव्हढ्या रक्कमेने आपले भांडवल मात्र कमी होते. म्हणून असेल तर हिंदू कुटुंबाच्या बँक खात्यातून पेमेंट करावे. ज्यूनियर केजीची ट्यूशन फी देखील एकूण उत्पन्नातून वजा मिळते. एका करदात्याला फक्त दोन मुलांच्या ट्युशन फीजची वजावट मिळते. पण आई आणि वडील दोघांचे उत्पन्न करपात्र असेल आणि तीन किंवा चार मुले असतील तर वेगवेगळ्या खात्यातून पेमेंट करून कलम ८० सी चा लाभ घेता येतो. कलम ८० मध्ये सर्व गुंतवणुका मिळवून वार्षिक दीड लाख रुपयांपेक्षा जास्त फायदा मिळत नाही; म्हणून उर्वरीत रक्कम जीवनसाथीच्या बँकेतून द्यावी. उच्चशिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा फायदा या कलमाने घेता येतो. यासाठी व्याजाच्या रकमेची काही मर्यादा नाही. कर्जाचा हफ्ता सुरू झाल्यापासून आठ वर्षांपर्यन्तच्या व्यजाची रक्कम एकूण उत्पन्नातून वजा मागता येते. कर्जाच्या मूळरक्कम परतफेडीचा फायदा मात्र मिळत नाही. संयुक्त हिंदू कुटुंबाला या कलमाचा फायदा घेता येतो. पूर्वी हा फायदा फक्त विद्यार्थ्याला मिळवायचा. सुरुवातीचे काही वर्ष कर्जाचे हफ्ते वडील भरतात. पाल्याला उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे कलम ८०-ई ची सूट वाया जात होती. म्हणून आयकर विभागाने व्यवहार्य पर्याय दिला. अर्थात कर्जफेड करणारे वडील आणि विद्यार्थी दोघांना एकाच वेळी फायदा मिळणार नाही. मुलगा/मुलगी कमवते झाल्यावर पालकांऐवजी कलम ८०-ई ची सवलत घेवू शकतात. बारावी नंतरचे कोणतेही शिक्षण हे उच्चशिक्षण मानले जाते. परदेशी विद्यापीठात. आयटीआय, डिप्लोमा, किंवा कोणत्याही विद्याशाखेला प्रवेश असेल तरी कर्जावरच्या व्याजाची सर्व सूट एकूण उत्पन्नातून घेता येते. शिक्षणासाठी कर्ज जर नातेवायिकांकढून, पतसंस्थेकडून किंवा सोनेतारण कर्ज असेल व्याजाचा फायदा मिळणार नाही. जीवनसाथीच्या (पती किंवा पत्नी) शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचादेखील फायदा घेता येईल. ज्या व्यक्ती कायदेशीर वारस व्होवू शकतात त्यांच्या शिक्षणाच्या कर्जावरील व्याजचा लाभ मिळेल. दत्तक मुलगा किवा मुलीसाठी देखील बँक कर्ज देत असते. भावंडे, पुतण्या, मेहुणा यांचे शैक्षणिक कर्ज पेड करत असेल तर करदात्याला ८०-ई चा मिळणार नाही. काळजीवाहू पालक (कलम ८० डीडी) गंभीर अपंगांच्या पुर्वसनासाठी हे सेक्शन आहे. निवासी करदाता किंवा सयुक्त हिंदू कुटुंबाला किंवा कुटुंबातील सदस्याला या तरतुदीचा लाभ घेता येतो. १९९५ ला समान संधी आणि अधिकारांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग कायदा संसदेने पास केला. त्यानुसार अक्षमता सिद्ध करण्यासाठी सिव्हील सर्जन किंवा बालरुग्ण न्यूरोलॉजिस्टचा 'फॉर्म १० आयए' मिळवून ठेवावा. अपंगत्वाची टक्केवारी ४० ते ८० टक्के असेल करदात्याला त्याच्या एकूण उत्पन्नातून ७५ हजाराची सवलत मिळेल. 80 टक्क्यांहून जास्त गंभीर अपंगत्व असेल एकूण उत्पन्नातून सव्वा लाख रुपये वजा मिळतात. अपंग आश्रित व्यक्ती ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी किंवा एकाधिक अपंगांनी ग्रस्त असल्यास विमा कंपन्या वेगळे पॉलिसी प्रॉडक्ट तयार करतात. अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कलम ८० सी व्यतिरिक्त सूट घेता येते. प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रमांतर्गत विद्यावेतन आणि आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी एनएसडीएलने विकसित केलेले हे पोर्टल आहे. १५ ऑगस्ट २०१५ रोजी तयार केलेले हे पोर्टल डिजिटल इंडियाचा एक भाग आहे. या पोर्टलला प्रत्येक तरुणाने नोंदणी करावी अशी सरकारची अपेक्षा आहे. हे पोर्टल तातडीने पारदर्शकतेसाठी बँका, संशोधक, कंपन्या, मालक आणि कर्मचारी यांचा दुवा आहे. भारत सरकारच्या केंद्रीय क्षेत्र आणि व्याज अनुदान २००९ या योजनेनुसार शैक्षणिक कर्जाची ही एक मॉडेल योजना आहे. भौगोलिक असंतुलन कमी करण्यासाठी ही योजना काम करते. वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांपेक्षा जास्त असेल तर या योजनेचा फायदा घेता येत नाही. कर्ज मिळवण्यासाठी तारण किंवा गॅरंटर (हमीदाराची) गरज नाही. व्याजावर अंशदान म्हणजे सबसीडी देण्याची तरतूद या योजनेत आहे. रिजर्व बँकेने त्यासाठी नोडल बँक म्हणून कॅनारा बँकेची नियुक्ती केली आहे. कोणत्याही बँकेतून शैक्षणिक कर्ज घेतल्यास कॅनरा बँकेच्या बेंगलुरू शाखेत सबसीडीचा प्रस्ताव पाठवला पाहिजे. भारत सरककारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते. देशातील नामांकीत तीस टक्के कंपन्या या योजनेत सहभागी आहेत. अपरेंटिस अधिनियम १९६१ अन्वये काही कंपन्यांना एकूण कर्मचार्यांच्या दहा टक्के नवीन आणि शिकाऊ उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे. कमवा आणि शिका या योजनेप्रमाणे उमेदवाराला आर्थिक पाठबळासोबत भविष्यातील उद्योजक घडवण्याचा सरकारचा उद्देश असतो. शिष्यवृत्ती किंवा फेलोशिप १० (१६) भारतीय निवासी करदात्याला शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी मिळणारी स्कॉलरशिप करमाफ आहे. ज्यूनिअर्स डॉक्टअअर्स आणि हॉस्पिटल यांच्या लेखी करारात 'मालक आणि नोकर' संबंध नसतील अशा मिळालेल्या छात्रवृत्तीवर टीडीएस करावयाची गरज नाही. स्टायपेंड करमाफ असले तर आयकर विवरणपत्रात ते दाखवावे त्यामुळे आर्थिक प्रोफाइल चांगली दिसते. तरच स्वतःच्या स्टार्टअपला बँक लवकर कर्ज देते आणि मग नवीन व्यवसायिकाला दुसर्याला नोकरीवर ठेवणे शक्य होते.
बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव! - Chandradhun\nHome/Article/बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव!\nबासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव!\nDainik Chandradhun May 27, 2021\tArticle, चंद्रपूर, विदर्भ Leaveacomment 137 Views\nदेशात सध्या सर्व पातळ्यांवर विविध घडामोडी घडत आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास उभारलेल्या फौजेचे अस्तित्व सध्याच्या काळात धूसर होत चालल्याचे प्रकर्षाने जाणवते. आज बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या समाजातील तरुण वर्ग आहे तरी कुठे?. हा वर्ग सध्या काय करत आहे? त्यांचे प्रेरणास्थान कोण आहेत? त्यांची जीवनातील ध्येय काय आहेत? आपल्या सभोवताली घडत असलेल्या एकंदर घटनांबद्दल आणि घटकांबद्दल त्यांचे काय मत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आज नितांत गरज आहे असे जाणविते. खरं तर आज या संपूर्ण तरुण वर्गास आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तसे पाहता आत्मपरीक्षण ही क्रिया निरंतर सुरु राहायला हवी अन्यथा आपली वाढ खुंटते व आपण आपल्या निश्चित मार्गापासून भटकले जातो. दुःखद अंतःकरणाने असे मांडावे लागत आहे कि आजचा आपला तरुण वर्ग हा बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गापासून भटकला आहे. याच गोष्टीचा फायदा इतरांनी वेळोवेळी उचलला आहे आणि उचलत आहेत.\nमला या घडीला वाचकांसाठी एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो, "हे लोक जय भीम वाले आहेत" हे एक साध वाक्य आहे. पण प्रश्न हा आहे कि बौद्धेतर समाज, मग त्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय समाज आणि स्वतःला उच्चवर्णीय समजणार समाज जेव्हा वरील नमूद वाक्य उदगारतो तेव्हा या वाक्यात कोणता भाव असतो??? आदर असतो? प्रेम/सद्भावना असते? द्वेष असतो कि मत्सर असतो? हा प्रश्न आपणास कधी पडला आहे का? आणि जर पडला असेल तर याचे उत्तर काय आहे?.\nमला असे वाटते कि बहुतेक लोकांना या प्रश्नाचे उत्तर ठाऊक आहे. आणि हे उत्तर येणास जबाबदार इतर समाजातील लोक नसून सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. हे एक कटू सत्य आहे. ज्याकडे तुम्ही आणि आम्ही पाठ फिरवू शकत नाही. किंबहुना त्याचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. एक प्रकारे जबाबदारीच म्हणा हवे तर. येथे बऱ्याच जणांना माझी मते पटणार नाहीत, आक्षेपार्ह वाटतील,पण मी येथे समाजातील १०% लोकांबद्दल नाही तर ९०% लोकांबद्दल आपले प्रामाणिक मत मांडत आहे.\nआपल्या समाजातील बरेच तरुण-तरुणी शिकले, उच्च शिक्षित झाले, मोठे साहेब झाले, नेते झाले, व्यावसायिक सुद्धा झाले, परदेशात स्थायिक झाले, तसे पहिले तर आपण बरीच प्रगति देखील केली. तरीसुद्धा "हे लोक जय भीम वाले आहेत" या वाक्यातील इतरांच्या मनातील भावना बदलल्या आहेत का? आपल्या स्वतःच्या तरी मनातील भावना बदलल्या आहेत का? प्रामाणिक उत्तराची अपेक्षा आहे. आपण कुठे कमी पडतोय हे शोधण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आरक्षणाचा उपयोग करून पुढे गेलेल्या किती टक्के तरुणांनी आपण समाजासाठी काही देणे लागतो या विचाराने विधायक कार्ये केली आहेत?\nआज आपला तरुण वर्ग १४ एप्रिल ला भव्य दिव्य मिरवणूक काढणे,वर्गणी गोळा करणे, आंबेडकरी गाण्यांवर डीजे च्या तालावर नाचणे आणि ६ डिसेंबर ला शुभ्र वस्त्र परिधान करून चैत्यभूमी, दीक्षाभूमी अथवा सार्वजनिक चौकातील बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प-हार वाहून आदरांजली देणे हेच आपले बाबासाहेबांप्रती काय ते कर्तव्य आहे. या पोकळ विचारधारेचा भाग बनला आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत, सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे चुकीचे आहे परंतु वर नमूद केल्याप्रमाणे येथे जनमानसा बाबत मत व्यक्त केले आहे.\nबाबासाहेबांइतका ज्ञानासूर्य/ ज्ञानाचा महासागर या पृथ्वीतलावर दुसरा जन्मला नाही, भारतीय राज्यघटना हि आमच्या बाबांची देण आहे, नोकरदार वर्गासाठी ८ तासांचा दिवस, बोनस, महिलांसाठी आरक्षण अशा एक ना अनेक गोष्टींचा अभिमान आजचा तरुण वर्ग बाळगून आहे आणि तो हवा सुद्धा. पण यामधील किती जण बाबासाहेबांच्या शैक्षणिक कारकिर्दीची अचूक माहिती सांगू शकतात? पूर्ण तपशील सोडाच पण बाबासाहेबांनी मिळविलेल्या पदव्यांची आणि विषयांची तरी माहिती सांगू शकतात का? बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके, शोधनिबंधे, प्रबंध, पत्रं आजच्या तरुण वर्गाने वाचली आहेत का? जर याचे उत्तर होकारार्थी असले असते तर कदाचित "हे लोक जय भीम वाले आहेत" या वाक्यास एक वेगळेच तेजोवलय निर्माण झाले असते.\nसामाजिक दबावाच्या नावाखाली आजही आपले लोक इतर देवतांच्या धर्मान्ध चालीरीती, रूढी परंपरा पकडून बसला आहे. देव देवस्की, घरचा देव, गावाचा देव करीत अजूनही बरीचशी सुशिक्षित आणि समाजात विशिष्ट स्थान प्राप्त केलेली मंडळी आपल्याला आढळून येते व हे सर्व सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जाण्याच्या मनःस्थितीत सध्या तरी ते दिसत नाहीत. आपल्या समाजात असे किती परिवार आहेत जे आपल्या मुलींना- सुनांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेले समान स्थान देऊन त्यांचे मत परिवाराच्या प्रत्येक निर्णयात गृहीत धरतात व त्यांना योग्य ते स्वातंत्र्य देतात? खरं तर अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या नमूद करता येऊ शकतील परंतु हि वेळ त्याच त्याच मुद्द्यांना धरून चघळत बसण्याची नसून यावर मार्ग काढण्याची आहे.\nमग कदाचित एक प्रश्न मनात येईल कि यावर काही तोडगा निघू शकतो का? माझे वैयक्तिक मत आहे कि "होय". जर का हजारो वर्षे चालत आलेल्या रूढी परंपरांना फुले- आंबेडकरांसारखी व्यक्तिमत्त्वे आवाहन देऊन त्यावर चळवळ उभारून शुद्राती शूद्र संबोधलेल्या समाजास माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देऊ शकतात तर आपण सर्व एकत्र येऊन त्यांनी केलेल्या परिश्रमाच्या २०% जरी कार्य केले तरी बदल अटळ आहे.\nबाबासाहेबांनी आपणास राज्यकर्ते व्हा असा सल्ला दिला. काहींनी त्या मार्गावर जाऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली सुद्धा, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित कार्य काही कारणास्तव झालेले दिसून येत नाही. आणि जर का तसे झाले असते तर आज मी हा लेख मुळात लिहिलाच नसता. अशा नेत्यांची इतर समाजातील नेत्यांनी जाणीवपूर्वक रित्या पंख छाटले, अर्थात आपले पंख छाटले जात आहेत हि बाब त्यांच्या लक्षात न येणे हेच त्यांचे अपयश किंबहुना एकंदरीत चळवळीचे अपयश होय. असो, मूळ मुद्द्याकडे वळायचे झाल्यास आज आपल्या समाजातील तरुण वर्गाने काय केले पाहिजे यावर विचारविनिमय काण्याची नितांत गरज आहे. आजच्या काळात आपणास राज्यकर्ते व्हायचे असेल तर आपणास काय करावे लागेल? राजकीय चळवळीत सक्रिय भाग घ्यावा लागेल कि इतर मार्ग शोधावे लागतील?\nराजकारणांत सर्वच जण नेते बानू शकत नाहीत, ती कुवत आणि त्यासाठी लागणारे कौशल्य सगळ्यात असतेच असे नाही. मग यावर पर्याय आहे प्रशासकीय सेवेचा. आपल्या समाजातील सर्व तरुण- तरुणींनी आपला मोर्चा शासकीय सेवेच्या दिशेने वाळवायला हवा. IAS, IPS, IRS, IFS, कायदेतज्ज्ञ, अश्या सर्वात महत्वाच्या पदांवर जास्तीत जास्त तरुण तरुणी पोहोचली पाहिजेत. शासनातील क्लास १ ते ४ मधील सर्व पदांवर आपल्या तरुणांनी मेरिट च्या बळावर, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवून निवडून गेले पाहिजे.\nआज जर का आपणास कोणी विचारले कि भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी कुठे शिक्षण घेतात तर त्याचे उत्तर असते IIT, IIM, IISC, JNU. या शैक्षणिक संस्थांमधून निघालेले विद्यार्थी हे जागतिक व्यापारी वर्गाची पहिली पसंत असतात, त्यांना उत्तम पगार मिळतो. आपल्या तरुण वर्गाने अशा नामांकित शिक्षण संस्थांमध्ये निवड कशी होईल या दिशेने स्वतःला झोकून दिले पाहिजे. आपली मुलं डॉक्टर झाली पाहिजेत सध्याची जागतिक महामारीमध्ये होत असलेला बाजार, लोकांची फसवणूक आपण पाहिली अथवा अनुभवलीही असेल मग जर का आपल्या घरातील मुलं डॉक्टर असली तर हि फसवा फसवी शक्य होईल का? काही जण म्हणतील कि हाताची सर्वच बोटे सामान नसतात, सर्वांना उच्च शिक्षण घेणे शक्य नाही, नसुदे, मग काही मुलं व्यापारात आपले नाव प्रस्थापित करू शकतील, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून विक्रमी उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करू शकतील. जर अशा प्रकारे आपल्या तरुण वर्गाने वाटचाल करायचे निश्चित केले तर आपल्याला राज्यकर्ते होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. बाबासाहेबांनी फार प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले, ते पण काही तुमच्या आमच्यासारखेच सोन्या चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नव्हते, त्यांनी ज्या हाल- अपेष्टांना सामोरे जाऊन आपले व्यक्तिमत्त्व उभे केले त्याची तर आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. आज आपल्याकडे त्यांच्या काळात उपलब्ध नसलेले बरीच साधनं उपलब्ध आहेत ज्यांचा पुरेपूर वापर करणे अपेक्षित आहे.\nपरंतु या क्षणाला मला असे वाटते कि आपणास आधी हे शोधावे लागेल कि खरंच आपल्या समाजातील तरुण वर्गाची ध्येय काय आहेत आणि त्यांचे प्रेरणास्थान कोण आहेत? आणि मुळात त्यांना या लेखात मांडलेल्या विचारांमध्ये तथ्य आढळते का? जर यांची उत्तरे सकारात्मक असली तरच हे विचार पुढे नेण्यात शहाणपण आहे अथवा असे लिखाण करणारे आणि भाषणे देणारे अनेक विद्वान आपल्याला चौका चौकात सापडतील.\nआपला अभिप्राय कळावा. जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तसा उद्देश मुळीच नाही हे लक्षात घ्यावे व क्षमा करावी.\nप्रतिक प्रिया प्रकाश तांबे (M.Sc.,M.Phil.),Mob- 9579764604,\nPrevious साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का नाही ? ("उर्जामंत्र्यांना" संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.)\nNext शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?.
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यासाठी व नोकरीत सवलत देण्यासाठी 5 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) अंबड तालुक्यातील गलाटी मध्यम प्रकल्प (Galati Medium Project) शाखा शाहपुर सहाय्यक अभियंत्याला (Assistant Engineer) औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. बुद्धभुषण सुखदेव दाभाडे Buddhabhushan Sukhdev Dabhade (वय-31) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि. 13) केली. तक्रारदार हे दाभाडे यांच्या कार्य़ालयात कर्मचारी आहेत. दाभाडे यांनी तक्रारदार यांना गैरवर्तन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस दिली होती. ही नोटीस रद्द करण्यासाठी तसेच नोकरीत सवलत देण्यासाठी दाभाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पडताळणी केली असता दभाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना बुद्धभुषण दाभाडे यांना रंगेहात पकडण्यात आले. (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप राजपुत (Police Inspector Sandeep Rajput) करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), (DySP Maruti Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपुत, पोलीस अंमलदार बाळु थोरात, दत्तात्रय होरकटे, केवलसिंग घुसींगे यांच्या पथकाने केली.
लग्न समारंभात आकर्षक सजावटी व शोभेसाठी आजअखेर पानाफुलांचा वापर होत होता. परंतु आता चक्क कबुतराचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. वेगळेपण दाखवण्याच्या हेतूने व प्रतिष्ठेसाठी धनिकांकडून आता पक्ष्यांचा वापर होवू लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. लग्नाच्या धामधुमीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते, लग्न समारंभात मंडपाची जागा आता प्रशस्त हॉलने घेतली आहे. या हॉलमधील सजावट थोडक्या स्वरूपात असल्याने लग्नाला आकर्षक स्वरूप येण्यासाठी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाना-फुलांची, रंगीत पडद्याची, आकर्षक रंगीत लाईटची रोषणाई करून लग्न समारंभ उठून दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आजअखेर कोणीही सजावटीसाठी शोभेसाठी केला नव्हता. परंतु आजच्या युगात चक्क जिवंत कबुतरांचा वापर लग्न समारंभात शोभेसाठी केला जात असल्याचे दिसून येऊ लागले आहे. या कबुतरांना सजवलेल्या पाना-फुलांच्या स्टँडवर ठेवले जाते. त्यांनी उडून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायांना दोरीने बांधले जाते. लग्न समारंभाच्या दिवसभराच्या धावपळीत लहानग्यांचा एकप्रकारे खेळच होत असतो. तर या कबुतरांना मात्र त्यांचा त्यांना जीव नकोसा होत असतो. एकीकडे घरात पिंजरामध्ये पोपट ठेवायचा म्हटले तरी आता अवघड होवून बसले आहे. पोपटाला बंदिस्त करताच वनविभाग कारवाईचा बडगा उगारते मग लग्न समारंभात कबुतराचा वापर करणे योग्य ठरते का? लग्न समारंभासह इतर कार्यक्रमात अशा प्रकारच्या कबुतरांसह इतर पक्ष्यांचा वापर होवू लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे.
Old Notes Gives Money : तुमच्याकडे 'ह्या' सिरीजची नोट आहे का? काही मिनिटांत मिळतील3लाख रुपये । Mhlive24.com\nHome/ब्रेकिंग/Old notes gives money : तुमच्याकडे 'ह्या' सिरीजची नोट आहे का? काही मिनिटांत मिळतील3लाख रुपये\nOld notes gives money : तुमच्याकडे 'ह्या' सिरीजची नोट आहे का? काही मिनिटांत मिळतील3लाख रुपये\nMHLive24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- जर तुम्हालाही नोकरी करताकरता किंवा घरबसल्या कष्ट न करता पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक मार्ग घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही कोणतीही मेहनत न करता काही मिनिटांत लखपती होऊ शकता.(Old notes gives money )\nजर तुमच्याकडेही 1, 5, 10, 20, 50 किंवा 100 किंवा 2000 रुपयांच्या 786 क्रमांकाच्या नोटा असतील तर तुम्ही घरी बसून रातोरात लखपती होऊ शकता. या नोटांच्या संग्रहातून तुम्ही प्रचंड कमाई कशी करू शकता ते जाणून घ्या.\nअनेकजण जुन्या नोटांचे कलेक्शन करतात\nआजकाल लोकांना जुनी आणि अनोखी नाणी जमा करण्याची खूप आवड आहे. जुनी नाणी जमा करणे, जतन करणे हे आजकाल ट्रेंडमध्ये आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो, तोही कोणत्याही मेहनतीशिवाय.\nआज आम्ही तुम्हाला काही खास नोट्सबद्दल सांगत आहोत, ज्यातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. जर तुमच्याकडे 786 सिरीज ची नोट असेल तर तुम्ही ती ई-बे वर विकू शकता. ही वेबसाइट जुन्या नोटा किंवा नाणी विकण्यासाठी आहे.\n786 क्रमांकामध्ये काय विशेष आहे?\nधर्म आणि नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची देशात कमी नाही. अनेक लोक आहेत जे पुरातन वस्तू जतन करतात. इस्लाममध्ये 786 या संख्येला खूप महत्त्व आहे आणि मुस्लिम लोक याला अतिशय पवित्र मानतात. तथापि, 786 बद्दल वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते भिन्न आहेत. 786 हा आकडा केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व जाती-समुदायातील लोक भाग्यवान मानतात.\nया नोटा कुठे आणि कशा विकायच्या?\nया नोट विकण्यासाठी तुम्ही प्रथम www.ebay.com वर जा.\nहोम पेज वर रजिस्टर करा.\nयेथे तुम्ही 'विक्रेता' म्हणून स्वतःची नोंदणी करा.\nपुढे, तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा.\nत्यानंतर, जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याचा शौकीन असलेल्या आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या लोकांना Ebay तुमची जाहिरात दाखवेल.\nआता ज्यांना ही चीन नोट खरेदी करण्यात रस आहे ते लोक तुमच्याशी संपर्क साधतील.\nयेथे तुम्ही या लोकांशी संपर्क करून तुमच्या नोटसाठी वाटाघाटी करू शकता.\nयानंतर, योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही तुमची नोट विकू शकता.\nआपण किती कमवाल ?\nया पुरातन नोटांची कमाई करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. इबे वेबसाइटवर अशा निवडक नोटांचा लिलाव होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बोलीमध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची विशेष सीरीज 786 ची नोटही चांगल्या किमतीत विकू शकता. आतापर्यंतच्या किंमतीवर नजर टाकली तर अशा नोटेसाठी3लाख रुपयांपर्यंत बोली लागली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील काही भागात आज सांयकाळी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे द्राक्षासह पिकांचे मोठे नुकसान झाले. आहे निळवंडी , हातनोरे मडकेजांब कोराटे,पालखेड, मोहाडी, वणी,आदि परिसरात आज पावसाने हजेरी लावली त्यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आज झालेल्या पावसामुळे जे द्राक्ष पिक हे फुलोर्याच्या अवस्ततेत आहे त्याची कुज होऊ शकते तसेच डावणी ,भुरी , करपा आदि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकर्यांच्या द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहे, तर सोंगनीला आलेल्या सोयाबीन मका पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे,त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. येवला : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावात आज बेमोसमी पाऊसाने हजेरी लावली. गेल्या एक मिहन्यापासून पावसाने उघडीप दिलेली होती या पावसाने रब्बी पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. या पावसाने शेतकरी वर्गाचे कोणतेही नुकसान झाले नाही. उलट यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीपाचे पिक अगोदरच वाया गेलेले आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकर्यांना हवासा वाटत आहे. येवला शहरात सायंकाळी 6 ते 6. 30 दरम्यान पावसाने हजेरी लावली तत्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच हिवाळा सुरु होऊनही अपेक्षति थंडी पडलेली नाही. या पावसामुळे थंडी निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वणी : परिसरात दुपारच्या सुमारास बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागावर भुरी व टमाट्यावर करपा रोगाची शक्यता बळावली. दुपारी पाच वाजेच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला हलक्याशा मध्यम पावसामुळे द्राक्ष बागावर भुरी व टमाट्यावर करपा रोगाची भीती व्यक्त केली जात आहे. तर गहू, हरभरा, मसुर, ज्वारी या रब्बी पिकांना हा पाऊस पोषक मानण्यात येतो आहे. दरम्यान काही भागात पावसामुळे उघड्यावर असलेला भुईमूग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धादल उडाली तर टमाटा उपबाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला दरम्यान बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण असून, विजेचा लंपडाव सुरू होता. कसबे सुकेणे : रात्री आठ वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना वादळी पावसाने सूमारे दिड तास झोडपले. ठिकठिकाणी द्राक्षबांगाचे नुकसान झाले असून रात्री उशीरापर्यंत काही ठिकाणी तुरळक सरी कोसळत होत्या. गोदाकाठच्या चांदोरी, सायखेडा, चाटोरी, भेंडाळी, शिंगवे,शिंपी टाकळी, या भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. बाणगंगा काठच्या सुकेणे, ओणे, दात्याणे जिव्हाळे, पिंपळस या भागातही हलक्या स्वरूपाच पाऊस झाला. (लोकमत चमू)देवपूर येथे वीजपडून महिला ठारवणी : दिंडोरी तालुक्यातील देवपूर येथे महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मिराबाई पुरुषोत्तम महाले (२८) ही महिला गवताचा भारा घरी घेऊन जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या जागीच ठार झाल्या. या परिसरात सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा व जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अशा स्थितीत दिलीप रामचंद्र महाले यांच्या शेतजमिनतून रस्त्यावर जात असताना हा प्रकार घडला. पोलीस निरीक्षक मिलिंद खोडपे, के. टी. खैरनार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
!! कावळे !! । sahitya-setu\n!! कावळे !!\nकुठे तरी ऐकण्यात आलेली एक छोटीशी गोष्ट\nगोष्टीचं नाव जरी ' कावळे ' असलं तरी गोष्ट आहे कावळे आणि चिमणीची. नाही नाही " चिमणे चिमणे दार उघड. थांब माझ्या बाळाला वगैरे " ती छोट्या बालकांची आजीबात नाही. तर ही लहानांनी, मोठ्यांनी, सगळ्यांनीच एकमेकांना सांगावी आणि ऐकावी अशी गोष्ट आहे. तर गोष्टीचं नाव आहे ' कावळे '\nएक कावळा कुठून तरी एक जळती सुतळी आपल्या चोचीतून आणतो आणि एका घरात टाकतो. सुतळीचे आगीने झालेले लालभडक टोक व त्यातून निघणारा धूर पाहून त्याला मजा वाटते. आणि आपल्या चोचीने फुंकर घालून तो ती आग फुलवू लागतो. जसजशी आग फुलून ठिणग्या उडू लागतात, तसतसा त्यचा आनंद वाढू लागतो. इतर कावळेही भोवती जमतात. त्यांनाही तो प्रकार पाहून मजा वाटते. फुलती आग बघून त्यांचाही आनंद फुलू लागतो. तेही त्या आगीला फुंकर घालू लागतात. बघता बघता तिथं शेकडो कावळे जमा होतात आणि फुंकर घालून ती आग चेतवू लागतात. आग जसजशी भडकत जाते तसतसे ते आनंदाने टाळ्या वाजवून गावू-नाचू लागतात. आनंदाने " काव काव " असे किंचाळू लागतात.\nएक चिमणी हे दृश्य बघते. ते जळते घर पाहून तिचे मन जळू लागते. गेली अनेक वर्षे ती हे घर आनंदाने, सुखाने हसताना, खेळताना, बागडताना पहात आली आहे. " अरे, ते घर जाळू नका. तिथे खूप चांगली माणसे रहातात. ती सुसंस्कृत, दयाळू आणि फार चांगली माणसे आहेत. माणसांवरच नव्हे तर प्राणी मात्रांवर सुद्धा प्रेम करणारी माणसे आहेत. सज्जन आहेत. गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहेत. ती आग विझवा. त्यांना वाचवा " असा आक्रोश करू लागली. पण कावळ्यांच्या त्या ' काव काव ' कलकलाटात त्या बिचारीचा आवाज कुणाला ऐकूच येत नव्हता. आग अधिकच भडकवून अधिकाधिक आनंद मिळविण्यात कावळे दंग होते. बिचा-या चिमणीला हे बघवेना. काय करावे सुचेना. आणि अचानक तिला एके ठिकाणी पाणी दिसले आणि एक कल्पना सुचली. ती आपल्या चोचीतून थोडे थोडे पाणी आणून त्या आगीवर शिंपडू लागली.\nसगळे कावळे तिला हसायला लागले.आणि तिची खिल्ली उडवीत म्हणाले " वेडी रे वेडी, अग चिमणे, तुझ्या चोचभर पाण्याने ती आग विझणार आहेका? आयुष्यभर अशी चोचीने पाणी घालत राहिलीस तरी ती आग तर विझणार नाहीच पण तू मात्र फुकट मरशील. ते घर आता जळून खाक होणार हे नक्की ".\nयावर चिमणीने दिलेले उत्तर मार्मिक, सुंदर आणी विचार करायला लावणारे आहे. ती म्हणाली " न विझुदे ही आग माझ्या चोचभर पाण्याने. पण जेव्हा या खाक झालेल्या घराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझा उल्लेख, ' आग लावणारी चिमणी ' म्हणून नाही तर ' आग विझावणारी चिमणी म्हणून केला जाईल ".\nकाळाची पाऊले वेगळ्या दिशेने पडत असल्याचे जाणवते आहे.मोठमोठे बंगले,गाड्या,उंच उंच इमारती, टावर्स, आलीशान, फ़्लाट मॉलस, मल्टीप्लेक्स थियेटर्स, अशी चकाकती समृद्धी आली. पण समृद्धीचे हे सोने असली आहे की नकली, हे भविष्य काळच ठरवेल. समृद्धी आली पण मनातली आणि जनातली शांती भंग पावल्याचे स्पष्ट दिसत आहे. दंगे, बाँबस्फोट, खून, बलात्कार, भ्रष्टाचार हे राक्षस बलवान होत आहेत. पेटलेल्या सुतळ्या चोचीत धरून कावळे फिरत आहेत. फुंकर घालून ती आग भडकवायला इतर कावळे टपलेच आहेत. गरज आहे ती चोचीत पाणी आणणा-या चिमण्यांनी एकत्र येवून ही आग विझवण्याची. तथास्तु !
नाशिक : नाशिक द्राक्ष,कांद्यांचा जिल्हा म्हणून देशभर परिचित आहे पण आता नाशिक जिल्हा मक्याचे सर्वाधिक पीक घेणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. यंदाच्या खरिपातील पाच लाख ६९ हजार हेक्टरवरील पेरणीपैकी तब्बल सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्र मक्यांच्या पिकाखाली गुंतविले आहे. कमी भांडवल, मर्यादित श्रम अन् अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून या पिवळ्या सोन्याला जिल्ह्यातील दहा तालुक्यांत सर्वाधिक पसंती मिळत आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या दोन-तीन वर्षापासून बदलत आहे. यामध्ये मोटा बदल म्हणजे बाजरी,डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्म्याने घटले याची जागा मक्यासह कांदा व भाजीपाला पिकाने घेतली आहे. विशेषतः सर्वाधिक क्षेत्र मक्याखाली गुंतविले जात असून अत्यल्प खर्चात हे पीक निघत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम पर्याय मिळाला आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या पोल्ट्री व स्टार्च उद्योगामुळे मक्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. या दोन्ही उद्योगांसाठी सांगली,सातारा, शिरपूर, दोंडाईचा येथे मागणी आहेच. पण गुजरात,तामीळनाडू,हरियाना, पंजाब आदी राज्यात व युक्रेन,मलेशिया,व्हिएतनाम येथेही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो. वाढलेल्या मागणीमुळे गेल्यावर्षी तर खासगी बाजारात दोन हजारांच्या आसपास दर पोचले होते, याशिवाय केंद्र शासनानेदेखील एक हजार ७६० रूपयांचा हमीभाव निश्चित केल्याने,मका पीक,परवडण रे म्हणून शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. खरिपाच्या सुरवातीला मका पीक घेऊन रब्बीतील गव्हासह उन्हाळ कांद्याचेही पीक घेता येते, बियाण्याच्या किंमती मर्यादित, फक्त दोन-तीन फवारण्या,मर्यादित खते,आंतरमशागतीसह यंत्रामुळे काढणीचा खर्चही अल्प,जनावरांना चारा,तसेच काढणी करतांना पूस असला तरी,बिट्या झाकून ठेवत केव्हाही मका तयार करून विक्री करता येते. शिवाय शासकीय हमीभावात विक्री केल्यास एक हजार ७६० रूपये दर निश्चितच असतो. यामुळेच मक्याला पसंती मिळत आहे. मक्याची सर्वाधिक लागवड येवला तालुक्यात झाली असून त्याखालोखाल मालेगाव,बागलाम व नांदगावमध्ये मक्याखाली क्षेत्र गुंतले आहे, तर नाशिक,दिंडोरी, निफाडमध्ये अपेक्षेपेक्षा लागवड घटल्याचा आकडे सांगतात. मक्याचे पीक १२० दिवसात येते, जिल्ह्यातील जमिनीचा पोत बघता एकरी ३० ते ४० सरासरी ३३ क्विंटल उत्पन्न मक्याचे निघते, सासकीय हमीभाव एक हजार ७६० रूपये गृहीत धरल्यास सरासरी ५० ते ६० हजारांचे उत्पन्न एका एकरातून मिळते. यातील सुमारे २० ते २५ हजारांचा खर्च जातो,तर अंदाजे ३० ते ४० हजार रूपये शेतकऱ्यांच्या हातात राहतात.
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. सिडको : नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. अद्यापही घरातून चिखल काढण्याचे काम सुरू आहे. उंटवाडी व आयटीआय पुलावरून बंद करण्यात आलेल्या वाहतुकीमुळे सिडकोचा शहराशी संपर्क तुटला होता. काहीशा थंडावलेल्या पावसाने रात्रीपासून पुन्हा एकदा जोर धरल्याने अद्याप सिडकोतील जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबडसह परिसरात संततधार झालेल्या पावसामुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. जुने सिडको बडदेनगर ते खोडेमळा येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे. याबरोबरच दत्ताचौक, विजयनगर, लेखानगर, तोरणानगर, खांडेमळा संभाजी चौक, खुटवडनगर यांसह सिडको भागातील तसेच अंबड भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, मनपाने त्वरित डागडुजी करण्याची मागणी केली आहे. रविवारी नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे नदी पात्रालगतच्या ४० घरांमध्ये पुराचे पाणी शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. रहिवासी सकाळी झोपेत असतानाच आलेल्या वेगवान पाण्यामुळे येथील रहिवाशांना जीव वाचविण्यासाठी संसार सोडून बाहेर पळ काढावा लागला. उंटवाडीच्या दोंदे पुलावरून पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. नदीचे पाणी खेतवानी लॉन्सपर्यंत आल्याने तीन वर्षांपूर्वीसारखी पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पोलीस व मनपा प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी परिसरातील रहिवाशांना तसेच उंटवाडी ग्रामस्थांना स्थलांतराची सूचना दिली. पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू झाली आहे.
अमळनेर, जि. जळगाव : चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला वाळूच्या ट्रॅक्टरने धडक देऊन उडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना ९ रोजी पहाटे तालुक्यातील खरदे ते वासरे रस्त्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव यांना घेऊन तहसीलदारांचे वाहन क्रमांक एमएच १९. सीव्ही ४१८ घेऊन अवैध गौण खनिज चोरीला आळा बसवण्यासाठी गलवाडे जैतपिर परिसरात ८ रोजी रात्रीपासून गस्त घालत असताना ९ रोजी पहाटे खरदे ते वासरे रस्त्यावर त्यांना समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९, ८०७ वरील चालक भीमराव कैलास वानखेडे रा. चौबारी याने सरळ तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या गाडीचे १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून भीमराव वानखेडे विरुद्ध शासकीय कामात अडथळा, मालमतेचे नुकसान, चोरी व अपघाताचा गुन्हा दाखल केला असून आरोपी वानखेडे याला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील २ लाख ७० हजार रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली वाळूसह जप्त करण्यात आले आहे. तपास सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला करीत आहेत.
आणि बहुतेक ठिकाणी रसाचा अथवा भाषाचा अभिनय अनुभावांच्या द्वारा करावा, असे म्हटले आहे (अनुभावैः अभिनयेत्). म्हणजे नाट्यप्रयोगात अभिनयाने अभिव्यक्त झालेले अनुभाव म्हणजेच रसाचा अथवा भावाचा अभिनय अथवा त्याच्या आविष्काराचे साधन. पहा : भाव; रस अनुमितिवाद : नाट्यप्रयोगात दृष्टीस पडणाऱ्या विभाव, अनुभाव आणि व्यभिचारिभाव ह्या हेतूमुळे नटाच्या ठिकाणी रस विद्यमान असल्याचे अनुमान प्रेक्षक करतात, असा श्रीशंकुकाचा सिद्धान्त. पहा : रस. अनुवाद : अनुवाद म्हणजे मौखिक किंवा लिखित भाषेच्या माध्यमातून एकदा व्यक्त झालेल्या आशयाची, त्याच भाषेच्या किंवा दुसऱ्या एखाद्या भाषेच्या माध्यमातून पुन्हा केलेली मौखिक किंवा लिखित अभिव्यक्ती. याचा अर्थ असा, की मूळ अभिव्यक्ता आणि पुनराभिव्यक्ती मौखिक आहे की लिखित, या आधारावर अनुवादाचे चार प्रकार संभवतात : (१) मौखिक → मौखिक (२) मौखिक → लिखित (३) लिखित → मौखिक (४) लिखित → लिखित या चार प्रकारांपैकी चौथा प्रकार सर्वात अधिक प्रमाणात आढळतो आणि दुसरा प्रकार व्यवहारात सहसा आढळत नाही. पहिल्या प्रकारासाठी 'अर्थविवरण' ही संज्ञा वापरता येईल. (आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन, पृ. ११९ - मिलिंद मालशे). या प्रकाराचे 'क्रमवार' व 'तात्काळ' असे दोन उपप्रकारही आहेत. मूळ अभिव्यक्ती व पुनराभिव्यक्ती एकच भाषा वापरतात, की भिन्न भाषा वापरतात, या आधारावरही अनुवादाचे दोन प्रकार होतात. अनुवाद - १ म्हणजे मूळ अभिव्यक्ती व पुनराभिव्यक्ती यांमध्ये एकच भाषा असलेला अनुवाद आणि अनुवाद-२ म्हणजे पुनराभिव्यक्तीमध्ये मूळ अभिव्यक्तीपेक्षा भिन्न भाषा वापरणारा अनुवाद. यांपैकी अनुवाद - १ साठी 'अनुवाद' ही संज्ञा वापरावी आणि अनुवाद - २ साठी (म्हणजे भिन्न भाषिक अनुवादासाठी) 'भाषांतर' ही संज्ञा वापरावी, असे अशोक रा. केळकरांनी सुचविले आहे ('भाषांतर', मराठी विश्वकोश : खंड १२, पृ. ४७९ ते ४८१). अर्थाच्या दृष्टीने अनुवाद-१ च्या जवळपास येणाऱ्या संज्ञा म्हणजे 'भावार्थ', 'गोषवारा' व 'सारांश'. या संज्ञा व अनुवाद- १ यांमध्ये लांबीच्या आधारावर फरक करता येतो. सर्वसाधारणपणे मूळ अभिव्यक्तीतील क्लिष्टता, कालबाह्यता काढून टाकण्यासाठीही अनुवाद - १ चा उपयोग होतो. उदा., लीळाचरित्र किंवा मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्रावरील लेखन यांचा मराठी अनुवाद. मूळ अभिव्यक्तीतील कालबाह्य भाषिक घटक बदलून त्यांच्या जागी समकालीन भाषिक घटक वापरण्याच्या प्रक्रियेला 'अर्वाचीनीकरण' अशी संज्ञा आहे. काही वेळा पद्य अभिव्यक्तीचा गद्य अनुवाद केला जातो.
सरोगसी या विषयाकडे आपल्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. मूल होत नाही, म्हणून सरोगसी करायची, असे एखाद्या जोडप्याने म्हटल्यास घरातील वडीलधारी मंडळींचा कायमच विरोध असतो. सरोगसीबद्दल असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी 'करार' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात आपल्याला क्रांती रेडकर, सुबोध भावे आणि उर्मिला कोठारे पाहायला मिळणार आहेत. क्रांती आणि सुबोधची जोडी या आधी आपल्याला 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील भूमिकेबद्दल क्रांतीने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, "करार' या चित्रपटात मी अत्यंत वेगळ्या भूमिकेमध्ये आहे. सरोगसी या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सरोगसीबद्दल आपल्याकडे फारच गैरसमज असतात. अनेक वेळा कुटुंब, समाज या गोष्टीला स्वीकारत नाही. त्यामुळे सरोगसी म्हणजे नेमके काय? सरोगसीचे फायदे आणि तोटे काय असतात, या सर्वच गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. ' सुबोध-क्रांती आणि उर्मिला हे तिघे पहिल्यांदाच आपल्याला या चित्रपटाद्वारे एकत्र पाहायला मिळणार आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता आली आहे. याचा जल्लोष ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात साजरा केला गेला. या जल्लोष दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांकडून फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील राणे समर्थक विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला.
नवरा आणि नारळ ! ! नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची . बरं , घेताना फोडूनही बघता येत नाही. दोन्हीही कसेही निघाले तरी " पदरी पडले, पवित्र झाले ". दोघांनाही देवघरात स्थान, दोघेही पुज्य. पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. हल्ली ऑन लाईन साईट वर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात. नारळ म्हटलं कि मला धडधडतं. चांगला ओळखायचा कसा ? मी उगाचच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे. अण्णाला कळायचं हे गि-हाईक नवीन आहे. तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा. ये, लो ! म्हणायचा. मी विचारायचो "खवट" निकलेगा तो ? तो म्हणायचा "तुम्हारा नसीब ! ! " आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी व खोब-याच्या वड्या आणि काय काय ! खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं. कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं, उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी. . . . किती बहुगुणी ! ! थोडक्यात काय, नवरा काय ? नारळ काय ? गोड निघाला तर नशीब, खवट निघाला तर उपयोगी, हे कोकणी तत्त्वज्ञान. ह्याला जीवन ऐसे नांव ! !
आयुर्वेदामध्ये शिकेकाईला (benefits of shikakai) भरपूर महत्त्व आहे. केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी शिकेकाईचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आपल्या देशामध्ये बहुतांश लोकांच्या घरामध्ये ही औषधी वनस्पती आढळतेच. आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये योग्य पद्धतीनं याचा समावेश केल्यास तुमचे केस लांबसडक, घनदाट आणि मऊ होतील. शिकेकाईमध्ये ल्युपॉल, स्पिनॅस्टरॉल, लॅक्टॉन यासारखे घटक आहेत. हे घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत. यामुळे केसांचे दुभंगणे देखील कमी होते. शिवाय केस चमकदार होतात. पण तुम्हाला माहिती आहे का केसांप्रमाणेच त्वचेसाठीही शिकेकाई लाभदायक आहे. खाज सुटणे, त्वचा लाल होणे, कोरडी होणे इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त आहे. (Skin Care पिकलेल्या केळ्यापासून घरामध्येच करा फेशिअल, ५ मिनिटांत उजळेल चेहरा) खरुज सारख्या त्वचा विकारांवर शिकेकाई रामबाण उपाय आहे. गरम पाणी आणि हळद एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. यानंतर शिकेकाईची पावडरही त्यात मिक्स करा. हळद, शिकेकाई नीट एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये दूध मिक्स करा. आता या मिश्रणाचा अँटी सेप्टिक बॉडी वॉशच्या स्वरुपात उपयोग करा. यामुळे खरुजची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. (झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा बदाम तेलाचे २ थेंब, सकाळी दिसेल त्वचेवर नॅचरल ग्लो ) चेहऱ्यावर मुरुमांचे डाग राहतात. भरपूर उपाय केल्यानंतरही बऱ्याचदा मुरुमांचे डाग कमी होत नाही. पण यासाठी तुम्ही एकदा शिकेकाईचा वापर करून पाहा. दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा दूध, बदाम पावडर, हळद आणि दोन चमचे मध मिक्स करा. आता हे मिश्रण बॉडी स्क्रब प्रमाणे वापरा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होईल. ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येईल. शिकेकाईमध्ये अँटी बॅक्टेरिअलचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. एका वाटीमध्ये एक चमचा शिकेकाई पावडर, एक चमचा हळद, मध एकत्र घ्या आणि याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. नियमित या पेस्टनं आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करा. या स्क्रबचा वापर केल्यास तुम्हाला महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याची आवश्यकता भासणार नाही. शिकेकाईचे केसांसाठीचे फायदे जाणून घेऊया. वाढत्या वयानुसार आपल्या केसांमध्येही बदल होऊ लागतात. पण तुम्ही योग्य देखभाल केली तर केस काळेशार आणि मजबूत राहू शकतात. केसांसाठी हर्बल प्रोडक्टचा वापर करावा. केसांसाठी शिकेकाई हा रामबाण उपाय आहे. शिकेकाईची पावडर पाण्यात भिजत ठेवा आणि या पाण्याने आपले केस धुऊन घ्या. शिकेकाईमधील अँटी सेप्टिक गुणधर्मामुळे टाळूला आलेली सूज कमी होते. केसातील कोंडा कमी होतो. केसांना नैसर्गिक काळा रंग हवा असल्यास आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर एकत्र घ्या आणि त्याचा लेप केसांवर लावा. हे मिश्रण एक तास केसांमध्ये राहू द्यावे. यानंतर कोमट पाणी आणि शॅम्पूच्या मदतीनं केस स्वच्छ धुऊन घ्या. महिनाभर हा उपाय करा. तुमचे केस लांब आणि जाड होती. शिवाय केसांचे तुटणे, केस गळतीचीही समस्या कमी होईल. एक चमचा शिकेकाई पावडर (Shikakai Benefits For Hair) आणि दोन चमचे दही एकत्र घ्या. हा लेप मुळांसह केसांना लावा. एक तास लेप केसांना (Hair Care Tips) लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. सकारात्मक परिणामांसाठी एक महिनाभर हा उपाय करावा. दह्यामुळे कोरड्या केसांची समस्या कमी होती.(copy content) Note कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
12 डिसेंबर : औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसीमध्ये बेंकी इंटरनॅशनल या केमिकल कंपनीला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केलं होतं. या आगीत कंपनी जळून खाक झालीय. घटनास्थळापासून काही किलोमीटरपर्यंत आगीचा धुराळं दिसून येत होते. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात त्यांना यश आलंय. मात्र ही आग कशामुळे लागली हे अजूनही कळू शकले नाही. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
मेट्रो कारशेडचे काम सुरू असताना पन्नास फूट उंचीवरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वनाज येथे घडली. मेट्रो कारशेडचे काम सुरू असताना पन्नास फूट उंचीवरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वनाज येथे घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मूळचंद्र तीन महिन्यांपासून कामासाठी पुण्यात राहत होता. मेट्रो प्रशासनाने त्याचा मृतदेह मूळ गावी कुटुंबीयांकडे पाठवला आहे. कोथरूड पोलिस तपास करीत आहेत. कामगाराचा मृत्यू ही वाईट घटना असून, या घटनेची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. कामगाराच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येणार आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे.
गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते. घाटलेः कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा. हे घाटले तयार झाले.यातील दूध लवकर आळते आणि मिश्रण घट्ट होते ,त्यामुळे वाढायच्या आधी १/२ ते १ कप दूध घाला व खिरीसारखे सरसरीत मिश्रण करा.दूध घातल्याने अगोड वाटल्यास थोडी साखर/गूळ घाला.(परंतु गूळ चटकन विरघळत नाही.) घावनेः तांदळाची पिठी पाणी व चवीपुरते मीठ घालून घावनाला/धिरड्यांना भिजवतो तसे भिजवा,१०/१५ मिनिटे ठेवा.तवा चांगला तापवून घावने घाला.घाटल्याबरोबर खा.
बॉलिवूडची ही अभिनेत्री बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया बऱ्याच कालावधीपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. आयशा टाकिया सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी ती एका स्पेशल पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आयशा टाकियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आयशाने लिहिले की, जेव्हा मी छोटी मुलगी होती. तिच्या या बालपणीच्या फोटोला खूप लाइक्स मिळत आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चूनर उड उड जाऐ' या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली होती. आयशा टाकियाने बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या चित्रपटात काम केले आहे. तिने करियरची सुरूवात २००४ साली टारझन द वंडर कार चित्रपटातून केली. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात झळकली. २००९ साली ती सलमान खानसोबत वॉण्टेंड चित्रपटात पहायला मिळाली. २००९ मध्ये फरहान आजमीसह लग्नबंधनात अडकत तिच्या आयुष्यात बिझी झाली. आयशाचा शेवटचा चित्रपट मोड होता. हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत रणविजय सिंग मुख्य भूमिकेत होता. आयशा टाकियाची गिनती बॉलिवूडमधील अयशस्वी अभिनेत्रींमध्ये होते.
सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या चार माजी नगरसेवकांना अटक झाली होती. मुंबई- भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. मात्र काही मिनिटातंच लगेचच त्यांची सुटका करण्यात आली. चौघांवरही जामीनपात्र गुन्हे असल्यानं पोलिसांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या चार माजी नगरसेवकांना अटक झाली होती. दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी अलीम यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांच्याविरोधात जामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांची लगेच सुटका झाली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले आहेत. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली. या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली आहे. महाडेश्वर यांच्यावर फुटकळ कारवाई करून भागणार नाही, या संपूर्ण प्रकरणाची क्राईम ब्रांचच्यावतीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच हा हल्लाच नाही, असे म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही माफी मागितली पाहिजे, असं अतुल भातखळकर ट्विटरद्वारे म्हणाले.
सातारा : सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवारी (दि. २६) होणार असून, सभेपूर्वीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अंदाजपत्रकाच्या आराखड्यातील गोषवारा पत्रकच गायब असल्याने नक्की किती कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली जाणार, याबाबत नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आता विरोधक काय भूमीका घेतायत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सातारा ही जिल्ह्यातील एकमेव 'अ' वर्ग नगरपालिका असून, पालिकेचा अंदाजपत्रक इतर पालिकांच्या तुलनेत सर्वात मोठे आहे. गतवर्षी पालिकेने २१२ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. लेखा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हद्दवाढीमुळे यंदाचे अंदाजपत्रक २९८ कोटीवर पोहोचले आहे. या अंदाजपत्रकाला मान्यता देणारी विशेष सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे अंदाजपत्रक ऑनलाइन सादर करणार आहेत. दरम्यान, अंदाजपत्रकाच्या मांडणीत भांडवली जमा व खर्च, प्राप्त परिस्थितीत असणारी अखेरची शिल्लक यांचा ताळेबंद दर्शविणारे गोषवारा पत्रक नसल्याचे काही नगरसेवकांच्या लक्षात आले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोषवारा पत्रक नसल्याने सभा नक्की किती कोटीच्या अंदाजपत्रकीय आराखड्याला मंजुरी देणार, याबाबत नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही तांत्रिक चूक आहे की अन्य काय? याबाबत विरोधक काय? भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विकासकामांसाठी प्रशासनाने निधीची किती तरतूद केली आहे, सातारकांवर यंदा कराचा बोजा पडला आहे की नाही, याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
शहादा : रस्त्याच्या मधोमध वाहने व लाँरी उभी करून व्यवसाय करणारे फेरीवाले विरोधात तसेच तात्पुरते अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण सोमवारी पालिका व पोलीस दलाच्या संयुक्त मोहिमेत काढण्यात आले. दिवसभरात दोन टप्प्यात झालेल्या कारवाईत सुमारे १०० पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली. दरम्यान, शहरात मंगळवारी बाजार भरत असल्याने मोहीम तात्पुरती एक दिवस बंद राहील. परंतु बुधवारपासून पुन्हा अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी सांगितले. परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक एम. रमेश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात फेरफटका मारून शहराची परिस्थिती जाणून घेतली. यात प्रामुख्याने वाहतुकीच्या कोंडीसाठी फेरीवाले व अतिक्रमणधारक जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी चर्चा करून पोलीस व पालिका प्रशासनाद्वारे संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण काढण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे फेरीवाल्यांना व्यवसायासाठी प्रेस मारुती मैदानावर जागा देण्याचा निर्णय घेतला आला आहे. सोमवारी सकाळी १० वाजता परीविक्षाधीन पोलीस अधिक्षक एम. रमेश, पािलका मुख्याधिकारी राहुल वाघ व पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस तथा दंगा नियंत्रण पथक व पोलीस कर्मचारी यांनी नगरपालिका कार्यालयापासून मोहिमेला सुरुवात केली. मुख्य रस्ता, भाजी मंडई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बसस्थानक परिसर, दोंडाईचा रोड, विश्रामगृह परिसर, पंचायत समिती कार्यालय परिसर आदी महत्त्वाच्या ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन रिक्षाद्वारे शहरात सकाळपासून केले जात होते. जे अतिक्रमणधारक स्वतःहून काढतील त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र ज्यांनी अतिक्रमण काढले नाही अशांच्या विरोधात पालिकेने जेसीबीचा वापर करून अतिक्रमण काढले. दिवसभरात दोन टप्प्यात चाललेल्या या कारवाईत १०० पेक्षा अधिक तात्पुरती अतिक्रमणे काढण्यात आली. यात रस्त्याच्या मधोमध असलेल्या टपऱ्या, फेरीवाले यांचा समावेश आहे तर ज्यांनी पत्र्याचे शेड व पायऱ्या बांधून अतिक्रमण केले त्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले व साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहरात २०० पेक्षा अधिक फेरीवाले व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांची कुठेही अधिकृत नोंद नाही. मात्र सर्रासपणे वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध लॉरी लावून व्यवसाय करतात व वाहतुकीची कोंडी करतात. अशांंवर सोमवारी कारवाई करण्यात आली. फेरीवाल्यांना व्यवसायासाठी प्रेस मारूती मैदानावर पालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली असून त्यांनी तेथेच व्यवसाय करावा. मंगळवारपासून ते पुन्हा रस्त्यावर आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनधारक मनात येईल त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने लावून वाहतूक अडवतात. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाने मुख्य रस्ता व दोंडाईचा रस्त्यावर दोन्ही बाजूला मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. मात्र वाहन चालकांकडून बेजबाबदारपणे वाहनांची पार्किंग करण्यात येते. अशा वाहनचालकांवर पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. आजच्या मोहिमेत पोलिसांच्या वाहतूक शाखेने रस्त्यांच्या मधोमध वाहने पार्किंग करणाऱ्यांविरोधात ही कारवाई केली. दररोज वाहतूक शाखेमार्फत ही कारवाई करण्यात यावी. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे मुख्य बाजारपेठेत दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्रपणे पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Budget expectations : The government should eliminate the cash crisis in real estate । रिअल इस्टेटमधील राेकड संकट सरकारने दूर करावे, गृह कर्जावरील व्याज ७ % हवे - Divya Marathi\nBudget Expectations : The Government Should Eliminate The Cash Crisis In Real Estate\nरिअल इस्टेटमधील राेकड संकट सरकारने दूर करावे, गृह कर्जावरील व्याज ७ % हवे\nशेतीनंतर सर्वात जास्त रोजगाराची संधी देणारे आहे हे क्षेत्र, जीडीपीमध्ये याचे ८ टक्के योगदान\nपरवडणाऱ्या घरांसाठी घरांच्या आकाराला प्राधान्य द्यावे, याची मानके एकसारखी हवीत\nराेकड संकट दूर करण्याचे प्रयत्न व्हावेत, १०% वाढ शक्य\nनवी दिल्ली - २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. देशाला आर्थिक मरगळीतून बाहेर काढण्यासाठी सरकार अर्थसंकल्पामध्ये काय उपाययाेजना करते याकडे प्रमुख क्षेत्रांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून अडचणींचा सामना करत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला सरकार समाधानकारक उपाय याेजना करेल अशा अपेक्षा वाटत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेट क्षेत्राला विशेष महत्व आहे. देशाच्या जीडीपीमध्ये त्याचा ८ टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रानंतर राेजगाराच्या सर्वाधिक संधी देणारेही हे क्षेत्र आहे.\n1600 गृह प्रकल्पात केंद्र सरकार ४.५८ लाख रखडलेल्या घरांना २५ हजार कोटी रुपयांची मदत देत आहे.\n13 लाख न विकलेली घरे देशात आहेत. यापैकी केवळ ८ मोठ्या शहरांत ४ लाख घरे ग्राहकाशिवाय पडून आहेत.\n8.3 लाख कोटी रुपयांचे रिअल इस्टेट. देशभरात ६ कोटींपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करते.\nप्रथम घर खरेदी करणाऱ्यांना १०० % करसवलत हवी\nरिअल इस्टेट विकासकांची राष्ट्रीय संघटना क्रेडाईने देखील सरकारला अर्थसंकल्पासाठी काही प्रस्ताव दिले आहेत. क्रेडाईचे प्रमुख सतीश मगर म्हणाले, गेल्या वर्षात रिअल इस्टेटला\nरेरा, जीएसटी, आयबीसी सारख्या बदलांचा सामना करावा लागत आहे. जीडीपीच्या वाढीचा दर ८ % वरून कमी हाेऊन ५ %वर आल्याने घर, दुकाने आणि कार्यालय जागांची मागण कमी झाली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला गती देण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. गृह कर्जावर कर सवलत मिळते. पण ही सूट केवळ १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत मंजूर झालेल्या कर्जांनाच मिळते. ही मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवता येऊ शकते. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना व्याजात १००%सूट मिळाली पाहीजे.\nप्राप्तिकर कायद्याचा कलम ४३ सीए बाधा ठरत आहे. ताे हटवला किंवा त्यात सुधारणा केली तर सर्किल रेटच्या तुलनेत ३० %कमी किमतीत विक्री हाेऊ शकते.\nप्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० आयबीए अंतर्गत मिळणारे लाभ सर्व परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांपर्यंत पाेहोचले पाहिजे. ते घराच्या आकारावर अवलंबून असेल. जर प्रकल्प चेन्नई, दिल्ली, काेलकाता वा मुंबईत असेल तर त्यासाठी कार्पेट एरिया ३० चाैरस मीटर असावा देशाच्या अन्य भागात असेल तर कार्पेच एरिया ६० चाैरस मीटर असावा.\nजीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा एकदा बहाल करावा.\nरिअल इस्टेट प्रकल्पासाठी वन टाइम रिस्ट्रक्चरिंग स्कीम आणली जावी.िलक्विडिटी रिअल इस्टेट साठी माेठी समस्या आहे.मूळधन आणि व्याजावर दाेन वर्षांची सवलतीसह वन टाइम रिस्ट्रक्चरिंग स्कीमची खूप मदत मिळू शकेल.\n१ काेटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला प्राधान्य म्हणून बघावे,व्याजदर ७% पेक्षा कमी असावे.\nस्वस्त घरांसाठी ४५ लाख रुपयांच्या मूल्याची सीमा संपवून ६० किंवा ९० चाैरस मीटरच्या घरांनाच हा लाभ देण्याची शिफारस करण्यात आली आहे.\nरिअल इस्टेट क्षेत्राला रुळावर आणण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काैन्सिलने (नारडेकाे) सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये राेकड संकट दूर करण्यापासून ते गृहकर्जात सवलत आणि प्राप्तिकर करात सवलत सारख्या मागण्या आहेत. नारडेकाेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. निरंजन हिरानंदानी म्हणाले रिअल इस्टेट क्षेत्राला सध्या राेखीच्या संकटाला ताेंड द्यावे लागत आहे. राेकड अभावामुळे रखडलेले गृह निर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारने कंपन्यांच्या कर्जाचे पुनर्गठठन केले पाहिजे किंवा किंवा अशा कर्जाच्या बाबतीत त्यांनी बँकांना एक-वेळ सवलत देण्याचा पर्याय द्यावा. याद्वारे, कर्जदार कंपनीचे खाते एक मानक खाते राहील आणि संबंधित रक्कम एनपीए होणार नाही. जर सरकारने प्रयत्न केले तर या क्षेत्रात दुप्पट आकडी वाढ साधणे कठीण नाही.\nमुद्रांक शुल्कात ५०% कपात , िकरायादारीस प्रोत्साहनासाठी सवलत हवी : हिरानंदानी\n३१ मार्च २०२० रोजी किंवा त्यापूर्वी घडणाऱ्या सर्व प्रकारच्या रिअल इस्टेट व्यवहारावर मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्क्यांची कपात केली जावी. यानंतर याचा परिणाम असा होईल की आतापर्यत प्रतिक्षा करणारे ग्राहक घर खरेदी करण्यास सुरुवात करतील आणि त्यांचे स्वप्नही पूर्ण होईल.\nहिरानंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार,सन २०२२ पर्यंत देशातील सर्वांना घरं उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी देशातील भाडेकरू घरांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.यासाठी विकसकांना कर सवलत देण्यात यावी.\nगृह कर्जावरील व्याज दर कमी करून सात टक्क्यांपर्यंत आणावा, व्याज दर कपातीचा फायदा अंतिम व्यक्तीपर्यंत पाेहचवावा.\nवस्त आणि सेवा कर आणि प्राप्तिकर कायद्यात आता परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत सुधारणा केली आहे. परवडणाऱ्या घरांसाठी ४५ लाख रुपये मूल्याची मर्यादा संपवून ६० किंवा ९० चौमीटर क्षेत्राच्या घरांना हा लाभ देण्याची शिफारस केली आहे.\nगृह कर्जावरील व्याजदर कमी करून सात टक्क्यांपर्यंत खाली आणले पाहिजेत. व्याज दरातील कपातीचा फायदा शेवटच्या उपयोगकर्त्यापर्यंत पोहोचला पाहिजे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ला वडाळा ते CSMT मेट्रो लाईन 11 च्या प्रस्तावित भूमिगत प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो लाईन 11 चे काम करायचे होते. तथापि, अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने हा प्रकल्प एमएमआरडीएकडून एमएमआरसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे कारण महामंडळ आधीच कुलाबा ते अंधेरी मार्गे SEEPZ पर्यंत भूमिगत मुंबई मेट्रो लाइन 3 बांधत आहे. मेट्रो लाइन 11 मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीतून जाणार आहे. जमिनीच्या किमतीचे महत्त्व लक्षात घेऊन प्रस्तावित रेषा भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएची मुंबई पोर्ट ट्रस्टशी जमीन हस्तांतरित करण्यासाठी चर्चा सुरू होती, ज्यातून भुयारी मार्ग जाणार आहे. एमएमआरडीएने भूमिगत मेट्रो बांधली असती आणि वरील जमिनीची कमाई केली असती आणि त्यातून मिळणारा पैसा इतर विकासकामांसाठी वापरला गेला असता. MMRDA MBPT सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेत होते. सध्या, स्थानकाचे बांधकाम, सिस्टम इंस्टॉलेशन आणि इतर विविध कामे जसे की ट्रॅक टाकणे इ. प्रगतीपथावर आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये मेट्रो मार्गाचा टप्पा 1 (BKC ते SEEPZ) सुरू करण्याचे MMRC चे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीएने डीपीआरमध्ये 8,739 कोटी रुपये खर्चून 12. 70 किमी लांबीची मेट्रो लाईन 11 (वडाळा ते सीएसएमटी) बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. JICA (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) प्रकल्पाच्या खर्चाच्या 2,022 कोटी रुपयांचा निधी देणार होती. महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये लाईन 11 ला मंजूरी दिली आणि MMRDA नुसार ही लाईन पूर्ण करण्याची अंतिम मुदत ऑक्टोबर 2026 आहे. मेट्रो लाइन 11 हा मेट्रो लाइन 4 (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) चा विस्तार आहे. मेट्रो लाईन 4 चे काम ऑक्टोबर 2018 मध्ये सुरु झाले. 32 स्टेशन्स असलेला 32. 32 किमी लांबीचा पूर्ण एलिव्हेटेड मेट्रो लाईन 4 कॉरिडॉर पूर्ण होण्याच्या वेळापत्रकापेक्षा मागे आहे.
एमपीसी न्यूज - 'हिंगणघाट'च्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी टिळक चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच मृत झालेल्या युवतीला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, स्वरदा बापट, शहराचे सरचिटणीस गणेश घोष, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शशीकला मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी कठोर शिक्षा मारेकर्याला घडवावी, असे मत उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी व्यक्त केले. ही अत्यंत दुःखद, धक्कादायक आणि मन सून्न करणारी घटना आहे. राज्य शासनाने विश्वासार्हता गमावली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा करावी, असे आवाहन सभागृहनेते धीरज घाटे यांनी केले. गेल्या चार महिन्यांत राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. कायदा आणि सुविधा परिस्थितीवर शासनाचे नियंत्रण नाही. दोषींना जरब बसेल अशी शिक्षा करावी. अन्यथा, भाजपला वारंवार या विषयात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिला.
देवरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार व प्रसार पंधरवाडाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी उत्पन्न वाढीच्या सूत्राचा वापर करून आपल्या शेतीच्या उत्पन्नात वाढ करावी, असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मेश्राम यांनी केले. लगतच्या चिचेवाडा येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात उन्नत शेती समृध्द शेतकरी या उपक्रमाची माहिती देताना ते बोलत होते. देवरी मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात या सभेचे आयोजन करण्यात आले. देवरी मंडळ क्षेत्रातील चिचेवाडा, आमगाव, सरेपार, जमनापुर, पुराडा, मुरपार येथील सभेत उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे सूत्र, कृषी विभागांतर्गत शेती विकासाच्या तसेच शेतकरी व्यवसायाच्या विविध योजना, शासनाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानाचे महत्व आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत तालुक्यातील या अभियानाच्या सभेत माती परीक्षण, बीज प्रक्रिया, श्री पध्दत, चारसूत्री पध्दत, कृषी अभियांत्रिकीकरण, फळबाग लागवड, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. देवरी मंडळांतर्गत सुरू असणाऱ्या या अभियानामध्ये कृषी सहायक लेमन गोमासे, प्रशांत सावलकर, रजनीश पंचभाई, भारत डोंगरवार, संजय कापगते, गणेश तिडके, मनोहर कोल्हे, देवेंद्र हरदुले, ईश्वर पाथोडे, ललीता धानगाये आदी सहकार्य करीत आहेत. सभांना उपस्थित राहण्याचे आवाहन आहे.
सकाळी ८ पर्यंत ६४ मि. मी. पावसाची नोंद झाली. बीड : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने भीम नाईक तांडा येथील ६५ मतदार पुरात अडकले. त्यांना वडवणी तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने होडीच्या सहाय्याने मतदान केंद्रावर आणत मतदानाचा हक्क बजावण्यात मदत केली. तत्काळ कार्यवाही करत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यात मदत केल्याने तहसीलदार सुरेखा स्वामी व यांच्या पथकाचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय पांडे यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी मतदानाच्या दिवशीसुद्धा काही मतदार संघात सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. माजलगाव विधानसभा मतदारसंघातील खळवट निमगाव येथे सकाळी ८ पर्यंत ६४ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे देव नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. भीम नाईक तांडा येथील जवळपास ६५ मतदारांना पूर वाढल्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास अडथळा येत होता. येथील केवळ १४ मतदारांनी पूर येण्याच्या आधी मतदान केले होते. अनेक मतदार पुरात अडकल्याची माहिती वडवणीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. देवगाव येथील भोई समाजाच्या काही नागरिकांकडून थर्माकोलची होडी (चप्पू) घेतली व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले. यानंतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी तहसीलदार स्वामी आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी अभिनंदन केले आहे.
Jio Glass Features : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 5G Launch केली आहे. एअरटेलकडून काही शहरात ५जी सर्विस लाँच करण्यात आली आहे. भारतातील टेक्नोलॉजी आता वेगाने पुढे जाणार आहे. या निमित्त जिओ ग्लासची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जाणून घ्या डिटेल्स. नवी दिल्लीः देशाला हाय स्पीड मोबाइल इंटरनेट 5G ची भेट देणारे आणि इंडिया मोबाइल काँग्रेस २०२२ चे उद्धाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेमो झोनमध्ये ५जी डिव्हाइसचा अनुभव घेतला आहे. या दरम्यान पीएम मोदी यांनी जिओच्या पॅव्हेलियनमध्ये जावून जिओ ग्लासचा एक्सपीरियन्स घेतला. जिओ ग्लास एक स्मार्ट डिव्हाइस आहे. ज्यात गेमिंग आणि इंटरटेनमेंट सोबत एज्युकेशनसाठी वापर केला जावू शकतो. जाणून घ्या डिटेल्स. जिओ ग्लास बाहेरुन दिसायला एकदम सामान्या चश्मा सारखा दिसतो. परंतु, हे आगामी दिवसात संपूर्ण एक्सपीरियन्स बदलून टाकू शकतो. या चश्म्याला स्मार्ट डिव्हाइस सारखे जसे स्मार्टफोन आणि टॅबलेटला सहज कनेक्ट केला जावू शकतो. यानंतर तुम्ही याच्या मदतीने व्हिडिओ स्ट्रिमिंग सुद्धा करू शकता. हा चश्मा 2D सोबत 3D व्हिज्युअल्सला सुद्धा सपोर्ट करतो. यात (1920X 1080 पिक्सल) रिजॉल्यूशन पर्यंत व्हिडिओला प्ले केले जावू शकते. चश्मा सोबत ऑडियोसाठी इन बिल्ट स्पीकर सुद्धा मिळते. जिओ ग्लासच्या अन्य फीचर्स मध्ये याच्या मदतीने ५० डिग्रीचे फिल्ड ऑफ व्यू मध्ये कंटेटला पाहू शकता. चश्मा सोबत जिओ ग्लास कंट्रोलचा सपोर्ट सुद्धा मिळतो. याच्या मदतीने याचा ब्राइटनेसला सुद्धा कंट्रोल केले जावू शकते. जिओ ग्लास, होलोग्राफिक कंटेट आणि सामान्य व्हिडिओ काँफ्रेंसिंगचा एक्सपीरियन्स आणखी खास बनवू शकतो. कंपनीच्या दाव्यानुसार, या चश्माच्या मदतीने एज्युकेशनला आणखी चांगले करता येवू शकते. विद्यार्थी या ग्लासला घालून 2D आणि 3D व्हिज्युअल्सने टॉपिकला चांगले समजू शकतात. परंतु, कंपनीने आतापर्यंत याच्या मार्केटमधील उपलब्धेसंबंधी कोणतीही माहिती दिली नाही. कंपनी लवकरच याला मार्केटमध्ये उपलब्ध करू शकते, असे बोलले जात आहे.
XIKOO नवीन ईएनर्जी सेव्हिंग इंडस्ट्रियल एअर कंडिशनर ऊर्जेची बचत करू शकते जास्त COP आहे, पारंपारिक एअर कंडिशनरपेक्षा 40-60% ऊर्जा वाचवू शकते, तापमान सर्वात कमी 5 अंश आहे. बाष्पीभवन संक्षेपण तंत्रज्ञान सध्या सर्वात कार्यक्षम संक्षेपण पद्धत म्हणून ओळखले जाते.हे थंड करण्याचे माध्यम म्हणून पाणी आणि हवा वापरते आणि जलद थंड होण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी उष्णता काढून टाकण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन वापरते.एक लिटर पाण्याच्या बाष्पीभवनाने शोषली जाणारी उष्णता 2270KJ आहे, जी 2300 BTU शीतकरण क्षमतेइतकी आहे. बाष्पीभवन औद्योगिक ऊर्जा-बचत एअर कंडिशनरचा मुख्य घटक म्हणजे थेट बाष्पीभवन उष्णता एक्सचेंजर प्रकार 5090 कूलिंग पॅड "मल्टी-लेयर कोरुगेटेड फायबर लॅमिनेट", जे स्वीडनमधून सादर केलेले पेटंट उत्पादन आहे, चांगले पाणी शोषण आणि वायुवीजन कार्यक्षमतेसह.थर्मल क्षेत्र पृष्ठभागाच्या 100 पट जास्त, पाणी विसर्जन आणि गंज प्रतिकारापर्यंत पोहोचू शकते आणि सामान्य सेवा आयुष्य 8 वर्षांपेक्षा जास्त आहे.कंडेन्सिंग तापमान कमी केल्याने रेफ्रिजरेशन सिस्टमचा कंडेन्सेशन प्रेशर आणि कंप्रेसरचा डिस्चार्ज प्रेशर कमी होऊ शकतो आणि कंप्रेसरची इनपुट पॉवर कमी करून उच्च ऊर्जा कार्यक्षमता गुणोत्तर प्राप्त करण्यासाठी कंप्रेसरचा वापर केला जाऊ शकतो.जेणेकरून समान कूलिंग क्षमतेसह पारंपारिक एअर कंडिशनर्सपेक्षा अधिक ऊर्जा बचत साध्य करता येईल. चे फायदेबाष्पीभवन पाणी थंड औद्योगिक ऊर्जा बचत एअर कंडिशनरः 1. ऊर्जा-बचत आणि वीज-बचत, जे पारंपारिक एअर कंडिशनरच्या तुलनेत 30-50% विजेची बचत करते. 2. प्रतिष्ठापन जागा लहान आहे.बाष्पीभवन कंडेन्सेशन इंडस्ट्रियल एनर्जी सेव्हिंग एअर कंडिशनिंग युनिटला कूलिंग टॉवर, सर्कुलटिंग वॉटर पंप आणि कॉपर पाइपिंग सिस्टीम यासारख्या अनेक उपकरणांची आवश्यकता असते.सिस्टमची रचना सोपी आहे आणि स्थापनेची जागा एक लहान क्षेत्र व्यापते, जी देखभालीसाठी सोयीस्कर आहे आणि ऊर्जा वाचवते. 3. कूलिंग आणि रेफ्रिजरेशन वातावरणात सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऍप्लिकेशन्स, बाष्पीभवन कंडेन्सेशन औद्योगिक ऊर्जा-बचत वातानुकूलित उत्पादने उच्च तापमान आणि उदास वातावरणात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात जसे की उद्योग, शेती आणि वाणिज्य.
अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयांना अनुसरून शुक्रवार, २१ मे राेजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी समितीचे पदाधिकारी व निवडक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमरावती : जिल्ह्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आता परिस्थितीत काहीशी सुधारणा होत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधेसाठी प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हाॅटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वीज पुरवठा बंद असल्याने गुरुवारी या विभागातील प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाविनाच बसावे लागले. अमरावती : सध्या उन्हाळी कांदा निघाला असून कांदा खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत. अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अनेक नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र, पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी वेटिंगवर आहेत.
आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. ही आजची परिस्थिती असली तरी पुर्वी असे नव्हते. महिलांना पाहिजे तेवढे स्थान, मान सन्मान मिळत नव्हता. पण तेव्हाही अश्या महिला होत्या की ज्यांनी नाव कमवलं. त्यांची ओळख केवळ वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी 'पहिली महिला' एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती तर त्यांनी महिलांच्या मुक्ती आणि सक्षमीकरणासाठीही प्रयत्न केले. शिक्षणाला त्या काळी महत्तव नसताना ही अनेक महिला शिकल्या. त्यातीलच एक म्हणजे भारतातील पहिल्या महिला आमदार आणि पहिल्या महिला शल्यचिकित्सक हा बहुमान मिळवणाऱ्या डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी. तामिळनाडूमध्ये मुथुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त 'हॉस्पिटल डे' साजरा केला जातो. डॉ. रेड्डी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व लोकांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी खर्ची घातलं. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली होती आणि त्या पहिल्या 'हाऊस सर्जन' होत्या. १९५६ साली त्यांना वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १९८६ साली मुथुलक्ष्मी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त तामिळनाडू सरकारनं खास तिकिट प्रसिद्ध केलं होतं. तसेच कायदेमंडळाच्या पहिल्या महिल्या सदस्यही होत्या. तेव्हा शिक्षणाला एवढं महत्त्व नव्हते तरी, मुथुलक्ष्मी यांच्या वडिलांनी मॅट्रिकपर्यंत त्यांना स्वतःच घरी शिकवलं. काही शिक्षकही त्यांना घरी शिकवायला यायचे. मॅट्रिकच्या परीक्षेत त्या प्रथम आल्या. मात्र तरीही मुलगी असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश नाकारला गेला. त्यांच्या प्रवेशावरून त्याकाळी त्यांनी विरोध झाला. पण मुथुलक्ष्मी यांची अभ्यासातली रुची पाहून पुदुकोट्टाईचे राजे मार्तंड भैरव थोंडामन यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेशही मिळवून दिला. त्याकाळी शाळेत जाणारी ती एकमेव मुलगी होती. त्या मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. तसंच, डॉ. रेड्डी सरकारी रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. काही वर्षांनतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला. देवदासी प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा संमत करून घेण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. हिंदू देवळांमध्ये तरुण मुलींना देवाला अर्पण करण्याची प्रथा म्हणजे देवदासी. यावेळीही मुथुलक्ष्मी यांना विरोध सहन करावा लागला. अर्थात, हे विधेयक मद्रास कायदे मंडळात एकमतानं मंजूर झालं आणि केंद्र सरकारकडेही पाठविण्यात आलं. १९४७ मध्ये या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. मद्रास विधानसभेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम लग्नासाठी मुलींचे वय वाढवण्यात यावं. तसा कायदा बनावा यासाठी पाठपुरावा केला. तसंच, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. एवढचं नाही तर त्यांनी लग्नाआधी आपल्या पतीला एकच अट घातली की त्यांनी मुथुलक्ष्मी यांच्या सामाजिक तसंच गरजूंना वैद्यकीय मदत देण्याच्या कामात कोणताही हस्तक्षेप करू नये. मुलींचं विवाहाचं वय १४ वर्षं करणाऱ्या कायद्यावरील चर्चेदरम्यान त्यांनी म्हटलं होतं, "सती प्रथेमध्ये एखाद्या स्त्रीला होणारा त्रास हा काही मिनिटांचाच असतो. पण बालविवाहामुळे मुलीला तिच्या जन्मापासून हा त्रास सुरू होतो. लहान वयातलं बायकोपण, आईपण कधीकधी वैधव्य सोसताना मुलीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. देवदासी यांच्यासाठी त्यांनी अडयारमधल्या आपल्या घरातच 'अव्वई घर' सुरू केलं होतं. कॅन्सरमुळे धाकट्या बहिणीचं निधन झाल्यानंतर मुथुलक्ष्मी यांना धक्का बसला. त्यानंतर १९५४ साली अडयार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. आजही या संस्थेमार्फत देशभरात कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात.
राजापूर : तालुक्यातील नाटे येथे बुधवारी रात्री ८. ३० च्या सुमारास नाटे पोलीस स्थानकालगत झालेल्या दुचाकी अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी महिलेला संदेश पाथरे यांच्या रुग्णवाहिकेतून धारतळे प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. खड्डे खोदण्याचे काम करणारे ठेकेदार बाजीराव हे दुचाकीवरून जात असताना नाटे येथे दुचाकीवर मागे बसलेली महिला अचानक रस्त्यावर पडली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. महिला पडल्यामुळे चालकाचा तोल जाऊन दुचाकीही थोडी पुढे जाऊन पडली. सुदैवाने पाथरे कार वॉशचे मालक संदेश पाथरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ मदत केली. स्वतःच्या रुग्णवाहिकेमधून त्यांचे चिरंजीव दादू पाथरे यांनी जखमी महिलेला उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविले. धारतळे ते नाटे या मुख्य रस्त्यावर अर्धवट काम झालेले असताना मधला काही भाग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जावेद जाफरीचे लग्न झाले होते. पण हे लग्न काहीच महिने टिकले. जावेद जाफरीने बॉलिवूडमध्ये एक अभिनेता म्हणून त्याचे नाव कमावले. पण त्याने त्याच्या खाजगी आयुष्याविषयी कधीही बोलणे टाळले. तुम्हाला माहीत आहे का, एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जावेद जाफरीचे लग्न झाले होते. पण हे लग्न काहीच महिने टिकले. जावेद जाफरीचे लग्न हबिबा जाफरीसोबत झालेले असून त्यांना मीजान, अब्बास आणि अल्विरा अशी तीन मुले आहेत. जावेद जाफरीचे हबिबाच्या आधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न झाले होते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून हिना या प्रसिद्ध चित्रपटात झळकलेली जेबा बख्तियार आहे. हिना या चित्रपटात जेबाने 'हिना' नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. 'मैं हू खुशरंग हिना' हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. जेबा आणि जावेद यांनी लपूनछपून लग्न केले होते. पण काहीच महिन्यांमध्ये ते दोघे वेगळे झाले. जेबा आणि जावेदचे लग्न झाले असले तरी तिने मीडियात या गोष्टीला नकार दिला होता. पण जावेदने 'निकाहनामा' दाखवल्यावर सत्य जगासमोर आले होते. जेबाचे लग्न प्रसिद्ध गायक अदनान सामीसोबत देखील झाले होते. अदनान आणि जेबा यांना एक मुलगा झाला. त्यांचे लग्न केवळ दोन वर्षे टिकले. १९९७ मध्ये ते दोघे विभक्त झाले. तिचे पहिले लग्न सलमान वालियानीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगीही झाली. पण हे देखील लग्न फार काळ टिकले नाही. बॉलिवूडमध्ये करियर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली. तिथे तिने सोहेल खान लेगारीसोबत लग्न केले. जेबाने एक नाही, दोन नाही तर तब्बल चार लग्नं केलीत.
जळगाव : निम्म्याहून अधिक डिसेंबर महिना संपला तरी गायब असलेली थंंडी गेल्या आठवड्यापासून चांगलीच वाढीस लागल्याने सुक्यामेव्याला चांगलीच मागणी वाढली असून डिंक, मेथीच्या लाडूसाठी बाजारात खरेदीसाठी रेलचेल आहे. त्यात यंदा सुकामेव्याचे भाव कमी झाल्याने त्यांना मागणीदेखील चांगली वाढली आहे. विशेष म्हणजे, विविध कंपन्या रेडिमेड लाडू तयार करीत असल्या तरी घरगुती लाडूलाच पसंती कायम आहे. थंडीची चाहूल लागताच गृहिणींची लगबग सुरू होते ती डिंकाचे लाडू करण्यासाठी. हिवाळ्यात उत्तम प्रकृतीसाठी हिरव्या पालेभाज्यांसह आरोग्यवर्धक इतरही पोषक पदार्थ खाण्याकडे कल असतो. त्यामुळे एरव्ही उन्हाळ्याच वर्ज्य असलेल्या गरम पडणाऱ्या व शरीरास ऊब देणाऱ्या वस्तू हिवाळ्यात आवर्जून सेवन केल्या जातात. सध्या बाजारात डिंक, मेथी व सुकामेव्याचा लाडूच्या साहित्याचा बाजार गरम आहे. सध्याचे धकाधकीचे जीवन पाहता लोणचे व इतर पदार्थांसह तयार (रेडिमेड) लाडूही कंपन्या बनवित आहे. मात्र घरगुती लाडूंसाठी घटक पदार्थांची खरेदी केली जात आहे. थंडी वाढू लागली तेव्हापासून डिंक, मेथीच्या लाडूसाठी घटक पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यात यंदा सुकामेव्याचे भाव कमी झाल्याने त्याला अधिक मागणी वाढली आहे. - सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेता.
प्रशांत भूषण यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील पात्र रोमियो आणि भगवान श्रीकृष्णाची तुलना केली आहे. नवी दिल्ली, दि. 2 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टवाळखोरांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेलं एंटी रोमियो स्क्वॉड हे पथक सध्या चर्चेत आहे. यावरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी एंटी रोमियो स्क्वॉडवर टीका केली आहे. प्रशांत भूषण यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील पात्र रोमियो आणि भगवान श्रीकृष्णाची तुलना केली आहे. रोमियोने केवळ एका महिलेवर प्रेम केलं होतं तर कृष्ण छेडछाड करण्यासाठी प्रसीद्ध होता. आदित्यनाथ यांच्यात एंटी रोमियो स्क्वॉडचं नाव बदलून एंटी कृष्ण स्क्वॉड करण्याची हिम्मत आहे का असं ट्विट भूषण यांनी केलं आहे. प्रशांत भूषण यांच्या या ट्विटनंतर मोठा वाद सुरू होऊ शकतो. कारण, कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाची तुलना त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील रोमियोसोबत केली आहे. उत्तरप्रदेशात सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी महिलांची होणारी छेडछाड रोखण्यासाठी एंटी रोमियो स्क्वॉडची स्थापना केली. पण स्थापना झाल्यापासून या पथकाच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक सवाल उपस्थित झाले. सहमतीने केवळ चर्चा करणा-या अनेक महिला-पुरूषांना या पथकाने नाहक त्रास दिला तर भावा-बहिणीला उचलून पोलीस स्थानकात घेऊन गेले अशा अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या.
HBD Dhoni : जाणून घ्या 'हेलिकॉप्टर' शॉटविषयी खास गोष्टी - Majha Paper\nHBD Dhoni : जाणून घ्या 'हेलिकॉप्टर' शॉटविषयी खास गोष्टी\nक्रीडा, मुख्य / By Majha Paper / महेंद्रसिंग धोनी, वाढदिवस, हेलिकॉप्टर शॉट / July 7, 2020 July 7, 2020\nमहेंद्रसिंग धोनीच्या नावावर क्रिकेटमधील अनेक कीर्तिमान आणि विक्रमांची नोंद आहे. मात्र मैदानावर त्याच्याद्वारे खेळला जाणार एक शॉट संपुर्ण जगात प्रसिद्ध आणि चर्चित आहे. याचे नाव आहे हेलिकॉप्टर शॉट. एक असा शॉट ज्याचा शोध स्वतः धोनीने लावला. आजही त्याच्या बॅटमधून निघणारा हा शॉट चाहत्यांना तेवढाच आवडतो.\nImage Credited - cricketaddictor\nहेलिकॉप्टर शॉटचा इतिहास -\nअसे सांगितले जाते की धोनीने हा शॉट आपला लहानपणीचा मित्र आणि झारखंडचा माजी खेळाडू संतोष लालकडून शिकला होता. धोनीने सुरुवातीला मित्राकडून हा शॉट शिकला व नंतर मोठ्या स्तरावर याचा वापर करण्यास सुरूवात केली. धोनीच्या या मित्राचे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला.\nधोनीच्या आधी सचिनने खेळला होता हा शॉट -\nभलेही हेलिकॉप्टर शॉट धोनीमुळे लोकप्रिय झाला असला तर धोनीच्या सचिन तेंडुलकरने देखील एका सामन्यात हा शॉट मारला होता. सचिनने 2002 मध्ये इग्लंड विरुद्धच्या सामन्यात हा शॉट खेळला होता.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर -\nधोनीचा हा शॉट सर्वात प्रथम 2006 साली गोव्यात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पाहण्यास मिळाला होता. यावेळी इयान बॉथमने देखील धोनीच्या शॉटचे कौतुक केले होते.\nहेलिकॉप्टर नाव कसे मिळाले ?\n2011 मध्ये आलेल्या पेप्सीच्या एका जाहिरातीमध्ये धोनी एका व्यक्तीला चारा कापणारी मशीन चालवताना शिकवत आहे. यानंतर ती व्यक्ती धोनीला म्हणते की, खूपच भारी, आता तेथेही जाऊन असेच कर.\nताकद आणि तंत्राचा समन्वय -\nया शॉटसाठी प्रामुख्याने ताकद आणि संतुलनाचा गरज आहे. धोनी हा शॉट खेळण्यासाठी संपुर्ण ताकद लावताना दिसून येतो. यावेळी त्याची बॅट मागच्या बाजूला फिरते व बॉल खालील बाजूला धडकतो. धोनी पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक शॉटमध्ये ताकद वापरलेली असते. हा शॉट खेळताना मात्र ताकदसोबत एकाग्रता आणि तंत्रज्ञानाची अधिक गरज असते.
थंडीच्या दिवसांत पडणारा पाऊस, एकाएकी मोठय़ा प्रमाणात वाढणारे तापमान आणि मॉन्सून आगमनाच्या दिवसांत होणारे बदल यांचा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्याचा हा आढावा. . पृथ्वीवरील जीवनासाठी हवामान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या हवामानामुळेच आज पृथ्वीवर सजीवसृष्टी टिकून राहिलेली असून, त्याच्या मदतीनेच सामाजिक -आर्थिक अभिसरण होताना दिसून येत आहे. मात्र, जागतिक तपामानवाढ आणि हवामानबदलामुळे पूर्ण जग ढवळून निघत असतानाच त्याच्या झळा भारतालाही वेगाने बसू लागल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १९0१ ते २0१३ या ११२ वर्षांतील आकडेवारीच्या केलेल्या सखोल अभ्यासामधून दिसून येत आहे. यामध्ये प्रत्येक राज्यात नेमके काय बदल होत आहेत, याचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. यात अनेक राज्यांच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मॉन्सूनच्या पावसाच्या वितरणात आणि तीव्रतेतही वेगाने बदल होत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने घोडदौड करणार्या भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी स्थानिक पातळीपासून केंद्र पातळीपर्यंत उपाययोजना निर्माण करून त्या प्रभावी पद्धतीने राबविण्याची आवश्यकता आहे. सन १९0१ ते २0१३ या ११२ वर्षांत पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. ती 0. ८९ अंश सेल्सिअस इतकी आहे. पृथ्वीच्या काही भागांचे तापमान तर आणखी वाढून १. 0८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. एवढय़ा प्रमाणात होणारी वाढ पहिल्यांदाच नोंदविली गेली असून, ती धोक्याची घंटा आहे. या तापमानवाढीचा आणि हवामानबदलाचा परिणाम समुद्रावरही दिसून येऊ लागला आहे. हिमनग वेगाने वितळू लागल्याने समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. या ११२ वर्षांत समुद्राच्या पाण्याची पातळी 0. ३३ ते 0. ६२ मीटरने वाढल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. विविध शास्त्रज्ञांनी केलेल्या भाकितांपेक्षा ही तापमानवाढ जास्त आहे. याचा थेट परिणाम उष्ण कटिबंधातील भागांवर दिसून येऊ लागला आहे आणि विकसनशील देशांना त्याच्या झळा बसण्याची शक्यता वाढली आहे. या जागतिक बदलामुळे केवळ तापमानातच वाढ झालेली नाही, तर पावसाची तीव्रताही कमीअधिक झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. भारत वेगाने विकसित होणारा देश आहे. नुकत्याच एका जागतिक सर्वेक्षणात भारताची अर्थव्यवस्था गरुडझेप घेत जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर पोहोचली आहे. ही घोडदौड आणखी वाढण्याची अपेक्षा जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. अशा काळात जागतिक हवामानबदलाचा विपरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याखेरीज राहणार नाही, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हे रोखण्यासाठी स्थानिक पातळीपासून देश पातळी आणि जागतिक पातळीवर सक्रिय उपाययोजना करणे गरजेचे आहे. जागतिक तापमानवाढ, हवामानबदल, वेगाने वाढणारी लोकसंख्या व हव्यासापोटी ओरबडली जाणारी नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा थेट परिणाम सजीवसृष्टीवर होणार असून, त्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा, शुद्ध पाणी, आरोग्य आणि ऊर्जा यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतील. भारतातील हवामानशास्त्राचा अभ्यास आणि अंदाज वर्तविणारी एक अग्रगण्य शासकीय संस्था म्हणून आयएमडीचा नावलौकिक आहे. आयएमडीचे देशाच्या कानाकोपर्यात विस्तृत जाळे असून, त्यामध्ये ५00 सरफेस मेट्रॉलॉजिक स्टेशन आणि अडीच हजारांहून अधिक रेनफॉल स्टेशन यांचा समावेश आहे. यांपैकी २८२ सरफेस मेट्रॉलॉजिक स्टेशन आणि १ हजार ४५१ रेनफॉल स्टेशनमध्ये जमा होणार्या आकडेवारीचा वापर राज्यांमध्ये होणार्या हवामानबदलाच्या अभ्यासासाठी केला गेला. हवामानबदलाची स्थिती देशामध्ये वेगाने बिघडत आहे. प्रत्येक राज्याची स्थिती वेगळी असून, बहुतांशी राज्यांच्या वार्षिक तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. केवळ इंडो-गंगेटीक प्लेटमध्ये येणार्या राज्यांमध्येच तापमानवाढ दिसून आलेली नाही. काही राज्यांचे तापमान वाढणे आणि घटणे यांमध्ये लहरीपणा दिसून आला आहे. याचबरोबर, मॉन्सूनच्या पावसातही सातत्याने घट दिसून आली, ही चिंतेची बाब आहे. बहुतांशी राज्यांच्या तापमानामध्ये १९५१ ते २0१0 या वर्षांमध्ये सातत्याने वाढ दिसून आली आहे. यामध्ये बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, जम्मू-काश्मीर, मेघालय, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप बेटे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू व उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. देशात सर्वाधिक तापमानवाढ हिमाचल प्रदेशामध्ये दिसून आली आहे. या राज्याचे तापमान दर वर्षी 0. 0६ अंशांनी वाढत आहे. दिसायला हा आकडा छोटा असला, तरी दर वर्षी एवढे तापमान वाढल्याने तेथील हवामानात वेगाने बदल होऊ लागले असून, जैववैविध्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यापाठोपाठ गोव्याचे तापमान दर वर्षी 0. 0४ अंशाने वाढत आहे. मिझोराम, मणिपूर व तमिळनाडूचे तापमान दर वर्षी 0. 0३ अंशाने वाढत आहे. ही धोक्याची घंटा आहे. एकीकडे, तापमानात वेगाने वाढ होत असतानाच काही राज्यांच्या तापमानात या काळात सातत्याने घट दिसून आली आहे. यामध्ये पंजाब, हरियाना यांचा समावेश आहे. पंजाबचे तापमान दर वर्षी 0. 0१ अंशाने, तर हरियानाचे तापमान दर वर्षी 0. 0२ अंशाने घटत आहे. भारताची अर्थव्यस्था ही कृषिप्रधान असून, देशातील बहुतांशी शेती ही नैऋत्य मोसमी पावसावर (मॉन्सून) अवलंबून आहे. मात्र, या मॉन्सूनचा लहरीपणा वाढला असून, त्याचा विपरीत परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ लागला आहे. पावसाचे दिवस वाढत नसतानाही अनेक राज्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. यावरून राज्यांमध्ये महापूर, ओला दुष्काळ पडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत असून, पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. सन १९५१ ते २0१0 या काळात बिहार, गुजरात, झारखंड, कर्नाटक, लक्षद्वीप, पश्चिम बंगाल, मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये मॉन्सूनच्या पावसाची तीव्रता वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. तर, अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील मॉन्सूनच्या पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट दिसून आली आहे. मॉन्सूनचा पाऊस ४ महिने पडत असला, तरी दक्षिण मोसमी पाऊस व वर्षात इतर वेळी पडणारा पाऊसही राज्यांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, या वार्षिक पावसावरही जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलाचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. अनेक राज्यांमध्ये वार्षिक पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, हरियाना, जम्मू-काश्मीर, झारखंड, लक्षद्वीप बेटे, मणिूपर, मेघालय, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, त्रिपुरा व पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. मेघालय राज्याच्या वार्षिक पावसामध्ये या काळात सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे. तेथे दर वर्षी सरासरीपेक्षा १४. ६८ मिमी पाऊस जास्त पडत आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये दर वर्षी वार्षिक पावसापेक्षा ३. ६३ मिमी पाऊस वाढत आहे. मात्र, या भागांमध्ये पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये वाढ झालेली नाही. त्यावरून हे स्पष्ट होत आहे, की मुसळधार पाऊस, ढगफुटीसारख्या पावसाची तीव्रता या भागांमध्ये वाढू लागली आहे. यामुळे महापूर, ओला दुष्काळ यासारख्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून, त्याचा विपरीत परिणाम सजीवांवर होत असून दर वर्षी मोठय़ा वित्तहानीलाही देशाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण वाढत असतानाच, दुसरीकडे काही राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण घटत असल्याचेही दिसून आले आहे. यांमध्ये अंदमान-निकोबार बेटे, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. अंदमान-निकोबार बेटांवरून दर वर्षी ७. ७७ मिमी आणि उत्तर प्रदेशामधून दर वर्षी ४. ५२ मिमी पाऊस कमी होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. हवामानबदल आणि तापमानवाढीचा फटका भारताला बसू लागला असून, भविष्यात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आतापर्यंत केला जाणारा काणाडोळा आता परवडणारा नाही. हे रोखण्यासाठी केवळ शासकीय स्तरावर प्रयत्न करून भागणार नाही, तर प्रत्येकाने वैयक्तिक पातळीपासून प्रयत्न करायला हवेत. बातमीदार आहेत. )
आपल्या स्वतः चे साखर क्रिस्टल्स वाढवणे सोपे आहे! साखर क्रिस्टल्सला रॉक कॅन्डी म्हणूनही ओळखले जाते कारण क्रिस्टलायझ्ड सुक्रोज (टेबल साखर) रॉक क्रिस्टल्स सारखी दिसतो आणि आपण आपले तयार केलेले उत्पादन खाऊ शकतो. आपण साखर आणि पाण्याने सुंदर साखर क्रिस्टल्स वाढू शकता किंवा रंगीत क्रिस्टल्स मिळवण्यासाठी आपण अन्न रंगाचा जोडू शकता. हे सोपे, सुरक्षित आणि मजेदार आहे साखर विरघळण्यासाठी उकळत्या पाण्याचे आवश्यक आहे, म्हणून या प्रकल्पासाठी प्रौढ पर्यवेक्षणची शिफारस केली जाते. - 3 कप टेबल साखर (सुक्रोज) रॉक कँडी वाढवा द्या! - आपल्या सामग्री गोळा. - एक पेन्सिल किंवा बटर चाकूला स्ट्रिंग टाईप करा आपण एक बीज क्रिस्टल तयार केल्यास, स्ट्रिंगच्या तळाशी बांधला जाणे. काचेच्या किलकिलेच्या शीर्षावर पेन्सिल किंवा चाकू सेट करा आणि हे सुनिश्चित करा की स्ट्रिंग त्याच्या बाजू किंवा तळाशी स्पर्श न करता जार मध्ये थांबेल. तथापि, आपल्याला स्ट्रिंग जवळजवळ तळाशी हँग होणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास, स्ट्रिंगची लांबी समायोजित करा. - पाणी उकळणे. जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये आपले पाणी उकळवून घेतले तर फारच सावध राहा! - एका वेळी साखर, एक चमचे हलवून ढवळा. ते कंटेनरच्या तळाशी एकत्र होणे सुरू होईपर्यंत साखर घालणे आणि अधिक ढीग होईपर्यंत विरघळत नाही. याचा अर्थ आपल्या साखरचे समाधान संतृप्त आहे. जर तुम्ही भरत असलेल्या द्रावणाचा उपयोग केला नाही, तर तुमचे स्फटिका लवकर वाढणार नाही. दुसरीकडे, आपण जर जास्त साखर घालता, तर नवीन क्रिस्टल्स अंडरसॉसड साखर वर वाढतात आणि आपल्या स्ट्रिंगवर नाहीत. - आपण रंगीबेरंगी क्रिस्टल्स हवे असल्यास, अन्न रंगाच्या काही थेंबमध्ये नीट ढवळून घ्या. - आपल्या द्राक्षाची स्वच्छ काचेच्या किलकिलेमध्ये घाला. आपण आपल्या कंटेनरच्या तळाशी undissolved साखर असल्यास, जार मध्ये ते मिळत टाळण्यासाठी. - किलकिले वर पेन्सिल ठेवा आणि स्ट्रिंग द्रवरूप मध्ये लटकण्याची अनुमती द्या. - कुठेतरी अस्वस्थ राहू शकाल जेथे किल कुठेतरी सेट करा. आपण इच्छित असल्यास, आपण किलकिलेमध्ये घसरण होण्यापासून धूळस टाळण्यासाठी किलकिलेवर कॉफी फिल्टर किंवा पेपर टॉवेल सेट करु शकता. - एक दिवसा नंतर आपल्या क्रिस्टल्सवर तपासा. आपण स्ट्रिंग किंवा बीड क्रिस्टलवर क्रिस्टल ग्रोथची सुरवात पहाण्यास सक्षम असावे. - क्रिस्टल्स वाढतात, जोपर्यंत ते इच्छित आकारात पोहचत नाहीत किंवा वाढू न देता थांबतात. या टप्प्यावर, आपण स्ट्रिंग काढू शकता आणि क्रिस्टल कोरड्या करण्याची अनुमती देऊ शकता. आपण त्यांना खाणे किंवा त्यांना ठेवू शकता. मजा करा! - आपल्याला साखरेच्या क्रिस्टल्स वाढवण्यात समस्या येत असेल तर आपण काही खास तंत्रांचा वापर करू शकता. रॉक कँडी कसा बनवावा हे व्हिडिओ ट्यूटोरियल देखील उपलब्ध आहे. टिपाः - क्रिस्टल कापूस किंवा ऊन स्ट्रिंग किंवा यार्न वर तयार करतील, परंतु नायलॉन ओळीवर नसतील. आपण नायलॉन ओळी वापरत असल्यास क्रिस्टल ग्रोथ ला उत्तेजन देण्यासाठी त्यावर बीज क्रिस्टल बांधून घ्या. - आपण खाण्यासाठी क्रिस्टल्स तयार करत असल्यास, कृपया आपली स्ट्रिंग खाली ठेवण्यासाठी मासेमारीचा वापर करू नका. वजन पासून आघाडी पाणी मध्ये समाप्त होईल - ते विषारी आहे पेपर क्लीप्स हा एक चांगला पर्याय आहे, परंतु तरीही उत्तम नाही.
बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई, महाराष्ट्रातून भाजपच्या फौजा पाठवल्या आहेत, तिथे ठाण मांडून बसले आहेत. यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसा गेला आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला शिवसेना परंपरेने जात असते. बेळगावसह कारवार, निपाणी, भालकी हा भाग महाराष्ट्रात यायलाच हवा असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तिथल्या मराठी जनतेच्या पाठिशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बेळगावात जाऊन सीमाबांधवांचा प्रचार करावा. मुख्यमंत्री मी बेळगावच्या लढ्यात होतो, तुरुंगवास भोगला म्हणतात. जर खरंच तुरुंगवास भोगला असेल, बेळगावच्या लढ्याची जाणीव असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्व बंधने झुगारून बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, आम्ही प्रचारासाठी निघालो आहोत, आमची निष्ठा, कमिटमेंट आहे. सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने 70 हुतात्मे दिले, बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगला. त्यामुळे आम्ही मराठी बांधवांशी बेईमानी करणार नाही. माझ्यावर बेळगाव पोलिसांचे वॉरंट आहे. त्यामुळे बेळगावात उतरल्यानंतर सर्वात आधी मला कोर्टात हजर रहावे लागेल आणि मग तिथून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या कार्यक्रमांना जावे लागेल. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे बसून सुस्कारे सोडू नये. बेळगावच्या लोकांविषयी किंवा राज्यपालांनी भाषणात सीमाभाग आमचाच हे बोलून उपयोगाचे नाही. सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठिशी संकटकाळी उभे राहण्याची हिंमत तुम्ही दाखवणार नसाल तर सर्व व्यर्थ आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. मुख्यमंत्री बेळगाव किंवा कर्नाटकात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांनी कर्नाटकात जाऊन माती खावी किंवा अन्य काही खावे. त्यांनी कोणाचाही प्रचार करावा. आमची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करावा ही आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी ते 70 वर्षापासून संघर्ष करत आहेत. लढा देताहेत, तुरुंगवास भोगताहेत, गोळ्या खाताहेत. तुम्ही जर स्वतःची शिवसेना खरी म्हणत असेल तर बेळगावच्या मराठी जनतेशी गद्दारी करू नका. तुमच्या रक्तात गद्दारीचे रक्त भिनले असेल तर मात्र तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार कराल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
मुंबईतील पत्रकार परिषदेतील मान्यवरांचे विचार ! करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जीतेंद्र आव्हाड यांना फटकारले असून या प्रकरणाचे पुन्हा अन्वेषण करण्याची करमुसे यांची मागणी मान्य केली आहे. पाकमधील १८ श्रीमंतांची सूची माझ्याकडे आहे. त्यांच्या बँक खात्यांमध्ये ४ सहस्र कोटी रुपये आहेत. या १८ जणांमध्ये राजकीय नेते, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सैन्याधिकारी आहेत. या सर्वांनी देशासाठी त्यांच्या पैशांचा त्याग केला पाहिजे. हिंदु मुली अन् माताभगिनी, तसेच संस्कृतीचा सर्वनाश करू पहाणार्या लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा करावा. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करावे, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता 'हिंदु गर्जना मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. 'लव्ह जिहाद', 'धर्मांतर' आणि 'गोहत्या बंदी कायदा' राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून शहरांमध्ये चालू असणारी 'भुयारी गटार योजना' म्हणजे भविष्यात पांढरा हत्ती पोसण्याचा उद्योग ठरणार आहे. ही भुयारी गटार योजना पुढे चालवणे अवघड असून या योजनेत अनेक त्रुटी आहेत. सनातन धर्म हा सर्वसमावेशक आहे आणि यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भारतियांच्या 'डी. एन्. ए. 'मध्ये (गुणसूत्रांमध्ये) रोग नव्हे, तर योग आहे. योगऋषी रामदेवबाबा यांचे सनातन जीवन शैली अंगीकारण्याचे आवाहन ! भारताला इस्लामी देश बनवणार्यांनी काश्मीरमध्ये काय केले ? याविषयी ओवैसी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! सहस्रो हिंदु युवतींना उद्ध्वस्त करणारा 'लव्ह जिहाद', भारतीय अर्थव्यवस्थेवरील मोठे संकट 'हलाल जिहाद', वक्फ बोर्ड कायद्यामुळे वाढत असलेला 'लँड जिहाद' आणि हिंदूंवर होणार्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी या हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन ! २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेवाकांठा - मुंबईसरकाच्या ताब्यांतील (६१ संस्थानांची) एक एजन्सी. क्षेत्रफळ ४९५६ चौरस मैल. उत्तरेस डोंगरपूर व बांसवाडा संस्थाने; पूर्वेस दोहद तहशील, भोपावर एजन्सींतील संस्थाने व खानदेश; दक्षिणेस बडोदे व सुरत जिल्हा; पश्चिमेस भडोच, बडोदें पंचमहाल, खेडा व अहमदाबाद जिल्हे. ६१ संस्थानांपैकी ६ मोठी व ५५ लहान आहेत. मोठया संस्थानांत राजपिप्पला संस्थान पहिल्या प्रतीचें आहे. लोकसंख्या (१९२१) ६६५०९९. महिनदी, पश्चिमभाग व दक्षिणभाग ह्मा अॅगेटच्या सौदर्याबद्दल विशेष ख्याति आहे. या प्रदेशांत जंगलहि पुष्कळ असून मोह व साग ही झाडें मुख्य आहेत. या देशांत थंडी व उन्हाळा दोन्ही तीव्र असतात. पावसाचें मान ३८ ते ४८ इंच असतें.\nइतिहास. -७४६-९६१ पावेतों चंपानेरशिवाय बाकी सर्व प्रदेश अनहिलवाडा वंशाच्या अमलाखाली होता. नंतर ११, १२, १३ या शतकांत रजपुतांनी आपली सत्त येथें स्थापिली. १६ व्या शतकांत अमदाबादच्या सुलतानांनी आपला अमल यावर बसविला, व १७ व्या शतकांत मराठयांनी या प्रदेशांतून खंडणी वसूल केली. परंतु गायकवाडाच्या हातून येथील बंदोबस्त चांगला होईना. तेव्हां इंग्रजांनी त्याच्याशी १८२२ सालीं तह करून स. १८२६त रेवाकांठाएजन्सी स्थापिली. लोकसंख्या (१९२१) ४७९०६५ असून हींत हिंदु शेंकडा ९० व मुसुलमान शेंकडा ५, जैन, ख्रिस्ती वगैरे मिळून बाकींचे आहेत. या एजन्सींत ६ शहरें व २८१७ खेडीं आहेत. मुख्य शहरें नांदोद, लोणावाडा, व बालसिनोर.\nशेतकी.- रेवाकांठांत पुष्कळ प्रकारची जमीन आहे. मही व नर्मदा नद्यांजवळील भाग फार सुपीक आहे. राजपिप्पला भाग सर्वांत सुपीक आहे. मुख्य पिकें तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, मठ, तीळ, गहूं. याशिवाय कलिगडें, पेरू, केळी वगैरे फळेंहि होतात.\nरेवाकांठाचा बराच भाग जंगलयुक्त आहे. सरकारी जंगल व इतर जंगल असे दोन जंगलाचे भाग आहेत. मँगेनीज व अभ्रक छोटा उदेपूर व जंबूघोडा या भागांत सांपडतें; राजपिप्पल्यांत अधिक सांपडतें. येथील व्यापार महत्त्वाचा नाही. साबू, खादीचा कपडा, नवार वगैरे जिन्नस तयार होतात. न्यायाच्या कामाकरितां ३२ दिवाणी कोटें आहेत; त्यांपैकी १७ इंग्रजी अमलाखाली व १५ संस्थानिकांच्या ताब्यांत आहेत. दुय्यम प्रकारच्या संस्थानिकांस आपापल्या संस्थानपुरता पूर्ण अधिकार आहे.
नाशिक : हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरावर लावण्याकरिता तिरंगा विकत घ्यावा, अशी सक्ती रेशनदुकानदार करत असल्याने ही सक्ती मागे घ्यावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून, हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने नाशिककर आपल्या घरावर तसेच वाहनांवर तिरंगा लावताना दिसत आहे. परंतु गोर-गरिबांसाठी धान्य मिळणार्या रेशनदुकानांवर दुकानदार त्यांच्याकडून तिरंगा विकत घेण्याची सक्ती करत असल्याने नागरिक विरोध करत आहे. दारिद्र रेषेखालील जनतेला रास्त भावात धान्य मिळावे याकरिता रेशन दुकानात धान्य वितरण होत असते. सदरचे धान्य विकत घेण्यासाठी गोर-गरीब काबाड कष्ट करून आपल्या झोपडीत राहतात. त्यांच्याकडे स्वतःचे घर नसल्याने त्यांना तिरंगा विकत घेवून लावावा तरी कुठे असा प्रश्न त्यांना उद्भवत आहे. रेशन दुकानदार करत असलेली सक्ती तातडीने थांबविण्याचे संबधितांना आदेशान्वित करावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
नागपूर : आरटीओ कार्यालयांमधील कामकाजात गती यावी, अर्जदारांचा वेळ वाचवा व पारदर्शकपणा आणण्यासाठी 'सारथी ४. ०' व 'वाहन ४. ०' या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात झाली. परंतु पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातील या संथ गतीच्या सर्व्हरमुळे गेल्या व काही दिवसांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने १० मिनिटांच्या कामाला दोन तासाचा वेळ लागत आहे. याचा फटका कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून ते विविध कामांसाठी येणाऱ्यांना बसत आहे. राज्यातील आरटीओ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये 'सारथी ४. ०' व 'वाहन ४. ०' या नव्या 'वेब बेस' प्रणालीद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. या प्रणालीमध्ये शिकाऊ वाहन परवाना व पक्क्या वाहन परवान्यासाठी लागणाऱ्या 'आॅनलाईन अपॉर्इंटमेंट'सह इतरही अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु जेव्हापासून ही प्रणाली सुरू झाली आहे तेव्हापासून आरटीओ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी व अर्जदाराला विविध समस्यांमधून जावे लागत आहे. पूर्व नागपूरच्या आरटीओ कार्यालयामधील हे दोन्ही सर्व्हर नेहमीच संथ गतीने चालत असल्याची तक्रार आहे. यातच वारंवार बंद पडणारे इंटरनेट व गेल्या काही दिवसांपासून विजेच्या वाढलेल्या लपंडावामुळे अर्जदाराच्या दहा मिनिटांच्या कामाला दोन तासावर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
भारतीय संघ २०२०-२०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. विराटची पत्नी अनुष्का ही आपल्या पहिल्या अपत्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जन्म देऊ शकते. त्यामुळे, तिच्यासोबत राहण्यासाठी विराट भारतात दाखल होईल. विराटच्या या निर्णयाचे माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी स्वागत केले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. कपिल देव नुकतेच हिंदुस्तान टाइम्सने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी झाले होते. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. दौऱ्यावर सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी येथे खेळले जातील. त्यानंतर, तिसरा वनडे आणि पहिला टी२० सामना कॅनबेरा येथे खेळवला जाईल. अखेरच्या दोन टी२० सामन्यांसाठी दोन्ही संघ पुन्हा सिडनी येथे दाखल होतील. अखेरीस, १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
शाहरुखचा 'पठाण' दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. भारतात या सिनेमाने आता 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. रिलीजच्या 28 दिवसांत शाहरुखचा 'पठाण' 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. भारतातसह जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला आहे. बादशाहच्या 'पठाण'ने जगभरात 1003 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'पठाण' पाचव्या क्रमांकावर आहे. 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'पठाण'चा दुसरा भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पठाण' हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद अखेर शमल्याचं चित्र आहे. डिजिटल नियम २०२१ चे पालन करण्यासंबंधी सोशल मीडिया कंपनी ट्विटर आता नरम होताना दिसत आहे. डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जात आहेत, असे ट्विटरने सरकारला सांगितले. तसेच याबाबत एका आठवड्यात नवीन डिजिटल नियमांचे पालन करण्याबाबत झालेल्या प्रगतीचा तपशील सरकारला सादर करू, असे ट्विटरने स्पष्ट केले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता. फेसबूक, गुगल यांसह अनेक कंपन्यांनी डिजिटल नियमांनुसार तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासारखी अनेक पावले उचलली आहेत. परंतु ट्विटर आणि सरकारमधील संघर्ष कमी होताना दिसत नव्हता. अखेर ट्विटरने नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केल्यानंतर मंगळवारी राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नांदेडात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. परंतु आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा या ठिकाणी आणून जाळला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलनात सरचिटणीस विजय गंभीरे, व्यंकटराव मोकले, अशोक पाटील धनेगावकर, महेश बाळू खोमणे, दीपकसिंह रावत, अभिषेक सौदे, शीतल खांडिल, अनिलसिंह हजारी, शीतल भालके, संजय अंभोरे, व्यंकटेश जिंदम, साहेबराव गायकवाड, भटक्या विमुक्त आघाडीचे नरेंद्र बैस, चिटणीस विपुल मोळके, सुनील राणे, मारोती वाघ, शततारका पांढरे यांची यावेळी उपस्थिती होती.
बिहार भूकंप. होतें. राजेंद्रबाबू कलकत्याहून पाटण्याला जेव्हां वकिली करावयास आले तेव्हांही एकदां त्यांनीं बालिया जिल्ह्यांतील जलप्रलयग्रस्तांची सेवा केली होती. बंगालप्रमाणे बिहार प्रांतांतही नेहमी जलप्रलय होत असल्यामुळे बहुतेक दरवर्षी एकाद्या जिल्ह्याला हानी पोंचली नाहीं असें सहसा होत नाही. त्यामुळे सेवाव्रतधारी राजेंद्रबाबूंना छपरा, आरा, दरभंगा इत्यादि अनेक ठिकाणी आपद्ग्रस्तांचा समाचार घ्यावा लागला. त्याचप्रमाणें १९२३ सालीं गंगानदीला महापूर आला. तो इतका प्रचंड होता कीं, शहाबाद, पाटणा, सारण, मुंगेर इत्यादि जिल्ह्यांतल्या लोकांवर भयंकर संकट ओढवलें. शेंकडोंशें लोकांची घरेदारे वाहून गेलीं. कोणाला रहावयाला जागा उरली नाहीं कीं खायला मूठभर धान्य राहिलें नाहीं. शेतकन्यांची तर सर्वांत कठीण अवस्था झाली. शेतकन्याजवळ बींबियाणेंही उरले नाहीं. ह्या आपत्तीत राजेंद्रबाबू धांवन आले व त्यांनी मुंबई, गुजराथ संयुक्त प्रांत इत्यादि ठिकाणांहून पुरेसें द्रव्यसहाय्य मिळविलें व अनाथांना मदत पोहोचविली. १९३१ साली चंपारण्यांत दुष्काळ पडला. आपत्ति दिसली कीं राजेंद्रबाबू तेथें धांवत यावयाचे, हे ठरल्यासारखें असल्यामुळे ते ताबडतोब चम्पारण्यांत येऊन दाखल झाले. व त्यांनी बाहेरून मदत जमवून त्यांच्या संकटाचा अंशतः परिहार केला. बिहार भूकंप राजेंद्रबाबूंच्या सेवाव्रताची खरी कसोटी परवांच्या भूकंपाच्या वेळी दिसून आली. १५ जानेवारी १९३४ रोजीं बिहारमध्ये फक्त दीड मिनिट भूकंपाचा जो हादरा बसला, त्यानें जिकडेतिकडे भयंकर, हाहाःकार उडाला. बिहारवर आलेल्या आजपर्यंतच्या संकटांत इतकें भीषण संकट आले नव्हते. या भूकंपानें जो प्रळय केला व जो अनर्थ मांडला त्याचे निवारण सहजी होणें शक्य नव्हते. त्यासाठी संबंध देशांतून मदत मिळविणें अवश्य होतें. जागजागी सहाय्यक समित्या स्थापन करून स्वयंसेवकांची सेना आपद्ग्रस्तांच्या सहाय्यासाठी पाठविणें जरूर होतें. त्या दीड मिनिट धरणीकंपानें बिहारची जी दुर्दशा झाली ती कल्पनेलाही अगम्य होती. पण अशा भयंकर आपत्तीच्या वेळीं सेवाव्रतधारी दीनबंधु राजेंद्र प्रसाद हजारीबाग तुरुंगांत रुग्णशय्येवर खितपत पडले होते. सुमारें पांच महिने ते हॉस्पिटलमध्ये होते व सरकारी डॉक्टरांकडून त्यांच्या औषधोपचारांची तजवीज होत होती तरी त्यांची प्रकृति दिवसेंदिवस अधिकाधिकच बिघडत चालली होती. अखेर सरकारने त्यांची मुक्तता करण्याचे ठरविलें व भृकंपाच्या तिसन्या दिवशीं ता. १७ जानेवारी रोजी त्यांना तुरुंगांतून सोडण्यांत आलें. तुरुंगांतून बाहेर येतांक्षणींच ह्या दीनवत्सलानें आपला मोर्चा भूकंपग्रस्तांकडे वळविला व त्यांच्या क्षेमसमाचाराची चौकशी करण्यास प्रारंभ केला. प्रकृति विघडल्यामुळे ते तुरुंगांतून बाहेर आले होते व कांहीं दिवस तरी त्यांनीं हॉस्पिटलमध्यें पडून चांगली विश्रांति घ्यावयास हवी होती. पण त्यांनी पुरता एक दिवसही जाऊं दिला नाहीं. लगेंच ते कार्याला लागले. त्यांनीं भूकंपाची एकंदर कल्पना करून घेऊन ता. २० रोजीं भूकंपनिवारक समिती स्थापन केली. त्यांनी आपल्या शरीरप्रकृती - कडे न पहातां अविश्रांत कार्य करावयास सुरवात केली. पहांटे चार वाजल्यापासून तो जवळजवळ मध्यरात्र होईपर्यंत ते एकसारखे कामांत व्यग्र असत. त्यांनी ठिकठिकाणी फिरून भूकंपाची एकदां संपूर्ण पहाणी केली, व भूकंपाची करुण कहाणी देशाला अधिकृत स्वरूपांत निवेदन केली. त्याबरोबर देशांत सर्वत्र खळबळ उडाली व बिहारच्या मदतीसाठी द्रव्याचा वर्षाव होऊं लागला. बाबू राजेंद्र - प्रसाद यांनीं भूकंपासंबंधी जे पहिले पत्रक काढलें, तें पुढीलप्रमाणें आहेः जाहीर पत्रक. जाहीर पत्रक "ता. १५ जानेवारी रोजी दुपारी या प्रांतावर जो अनर्थ कोसळला त्यामुळे भयंकर वित्तहानि व प्राणहानि झाली आहे. संपूर्ण आणि खरी माहिती अद्यापि मिळालेली नाही. परंतु जी कांहीं मिळाली आहे तिच्यावरून झालेल्या अनर्थाची कल्पना येते. हजारों लोक नाश पावले आहेत आणि शेंकडों लोक निराश्रित झाले आहेत, असें म्हटलें असतां अतिशयोक्ति होणार नाहीं. हे निराश्रित लोक उघड्या मैदानावर थंडीनें कुडकुडत कसा तरी काल कंठीत आहेत. पाटणा, गया आणि सारण या शहरांनीं या आपत्तीचें उग्र स्वरूप पाहिले आहेच, तथापि मुझफरपुर, दरभंगा, चम्पारण्य इत्यादि ठिकाणीं तर या आपतचे उग्रतर स्वरूप दृश्यमान होत आहे. अर्थात् अशा आपद्ग्रस्तांना सहाय्याची आवश्यकता आहे, हें सांगणें नकोच. या लोकांचें दुःख कमी करण्यासाठीं कांहीं संस्था आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. आपग्रस्तांना सुखसोयी पुरविण्यासाठी एक सभा भरून बिहार सेंट्रल रिलीफ कमिटीची स्थापना झाली आहे. तथापि द्रव्यसहाय्य, मनुष्यसहाय्य आणि सामुग्री यांशिवाय कमिटीला आपले काम करता येणार नाहीं. ताबडतोबीच्या गरजा म्हणजे अशा कीं मातीच्या ढिगाण्यांतून प्रेतें उकरून काढणें, निराश्रितांसाठी झोंपड्या उभारणें, अन्न, कपडे आणि घोंगड्या पुरविणें, आणि औषधपाण्याची तजवीज करणें या कामांसाठींच प्रथमतः आम्हांस द्रव्यसहाय्याबरोबर अन्न सामुग्रीची व औषधादिकांची जरूरी आहे. " कमिटीतर्फे मी विनंतीपत्रक काढून जी मागणी केली आहे, देशाच्या सर्व भागांकडून पुरविली जाईल, अशी मला आशा आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब घातुक आहे. सहाय्य देण्यास विलंब करणे म्हणजे सहाय्य न देण्यासारखेंच आहे. "आतांपर्यंत जी मदत झाली आहे आणि जी सहानुभूति दर्शविली गेली आहे, त्याबद्दल माझ्या देशबांधवांचे मी आभार मानतों. " सर्व प्रकारचें सहाय्य किंवा देणग्या श्रीयुत आर. एस्. पंडित कमिटीचे ट्रेझरर, बँक ऑफ बिहार लिमिटेड, पाटणा, या पत्यावर पाठविणें. देणग्यांची पोंच ताबडतोब देण्यांत येईल. भूकंपनिवारक कमिटी निराश्रितांना जनतेतर्फे सहाय्य करणारी बिहार सेंट्रल रिलीफ कमिटी ही प्रमुख सहाय्यक संस्था भूकंपानंतर ताबडतोब निर्माण झाली. भूकंप झाल्यावर पांच दिवसांनी म्हणजे ता. २० जानेवारी रोजी बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखालीं एक सभा भरून तिच्यांत ह्या कमिटीची स्थापना झाली. त्या वेळीं बिहार प्रांताच्या बाहेरचे पुढारी तिच्यांत नव्हते. पण आपत्तीचें रौद्र स्वरूप जों जों दृग्गोचर होऊं लागलें, तों तो ह्या कमिटींत सर्व प्रांतांचे प्रतिनिधी असण्याची व ती अधिक प्रातिनिधिक करण्याची आवश्यकता भासूं लागली. फेब्रुवारीच्या आरंभी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सूचनेवरून ५००० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या संस्थांचा एकेक प्रतिनिधी घेण्याचा कमिटीने ठराव केला. या ठरावाप्रमाणें निरनिराळ्या प्रांतांतील २७ नवे सभासद कमिटीवर घेण्यांत आले. याखेरीज देशांतील सर्व पक्षांतील आणखी वजनदार पुढारी कमिटीवर नेमण्यांत आले. अखेरीस कार्यकारी मंडळांत १२७ सभासदांची भरती झाली. २८ मार्च रोजी पाटणा येथें महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखालीं या कमिटीची सभा भरून महत्वाचे निर्णय करण्यांत आले ही कमिटी सरकारांत नोंदण्याचें ठरून तिचे उद्देश निश्चित करण्यांत आले व पंधरा मंडळींचें एक सुटसुटीत कार्यकारी मंडळ निवडण्यांत आलें. बाबू राजेंद्रप्रसाद यांची अर्थात्च अध्यक्ष म्हणून निवड झाली व बाबू अनुग्रह नारायणसिंह, मौ. हफीझ व बाबू बलदेवसहाय यांना सेक्रेटरी नेमण्यांत आले. सभासदांत जमनालाल बजाज, जे. सी. कुमाराप्पा, आचार्य कृपलानी, बाबू व्रजकिशोरप्रसाद, डॉ. सय्यद महमूद इत्यादिकांची नांवें मुक्रर करण्यांत आली. या सभेत सर्वोत महत्त्वाचा ठराव कमिटीच्या धोरणासंबंधानें झाला. तो म्हणजे सरकारशी आदरपूर्वक सहकार्य करण्याचा हा ठराव खुद्द महात्मा गांधींनी मांडला व तो एकमताने मंजूर झाला. एक मुलाखत बिहारच्या भूकंपाचें स्वरूप किती रौद्र व भयानक होतें याची कल्पना तेथें प्रत्यक्ष गेल्याशिवाय होणे शक्य नसल्यामुळे निरनिराळ्या वर्तमानपत्रांनी आपापले खास प्रतिनिधि पाठवून तेथील चक्षुर्वै सत्यं ' माहिती आणविली. मुंबईच्या 'लोकमान्य ' पत्रानेही आपला खास प्रतिनिधि धाडला होता. त्यानें बिहारच्या परिस्थितीचें नुसतें निरीक्षण केलें नाहीं, तर बिहारचे प्राण बाबू राजेंद्रप्रसादजी यांची ता. १-२-३४ रोजी मुलाखतही घेतली. ही मुलाखत लोकमान्याच्या खास बिहार धरणीकंप अंकांत प्रसिद्ध झाली आहे. ती पुढीलप्रमाणे आहेःबाबू राजेंद्र प्रसाद हें बिहारचें परम दैवत आहे. त्यांच्याइतका सर्वमान्य पुढारी त्या प्रांतांत आज दुसरा नाहीं. जगन्नाथपुरी येथें भरणाज्या काँग्रेसच्या अधिवेशनासाठी त्यांचीच निवड करून राष्ट्रानें त्यांचेवरील आपला विश्वास प्रकट केला आहे. कायदेभंगाच्या चळवळीमुळें हें अधिवेशन होऊं शकले नाहीं ही गोष्ट निराळी. असो. "धरणीकंपाच्या कहरानें एकंदर नुकसान झालें तरी किती यासंबंधी माहिती सरकार आपल्या अधिकान्यांमार्फत प्रसिद्ध करतें. व्हाईसबरॉयांना प्रांतिक गव्हर्नरकडून जाणान्या रिपोटाला जितकी किंमत तितकीच, किंबहुना थोडी अधिक, बहुजनसमाज लोकपक्षीय पुढाव्यांच्या रिपोर्टाला देणार. बिहारमधील हलाखीचें अधिकृत वर्णन बाबू राजेंद्र प्रसाद याखेरीज कोण करूं शकेल ? तेव्हां मी त्यांना भेटून कांहीं प्रश्न विचारले. त्यांचा सारांश येथें मुद्दामच देत आहे. बिहार प्रांताचें नुकसान किती झालें, मदत कशी, केव्हां व कुठें पाठवावी वगैरे खुलासा मुद्दामच करून घेतला आहे. बाबूजींचा रोजचा प्रघात असा दिसतो कीं, छावणीत सकाळी येतांच प्रथम नवीन पाहुणे मंडळींची भेट घ्यावयाची, त्यांना कुशल प्रश्न विचारावयाचे, त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था झाली आहे किंवा नाहीं याची चौकशी करावयाची, आणि येथें येण्याचा त्यांचा उद्देश विचारावयाचा. माझी व बाबूजींची प्रथम दृष्टभेट अशाच प्रकारानें झाली. सहा फूट उंचीची, काळीसांवळी कृश मूर्ति, अंगांत लांब काळा गरम कोट, डोक्याला काळी टोपी व गळ्याभोंवतीं एक साधा गळपट्टा आणि पायांत पायमोजे व बूट अशी ही बिहारी राजेंद्राची मूर्ति पाहून ही कोणी अत्यंत थोर व्यक्ति आहे, असें परिचिताशिवाय फारच थोड्यांना सांगतां येईल. बाबू राजेंद्रप्रसाद म्हणजे सगळ्या बिहार प्रांताचें परमदैवत आहे. त्यांच्या रूपानें बिहार प्रांताची पुण्याई, बिहार प्रांताचें भाग्य उदयाला आलें असें सर्व जनतेला वाटत असतें, बिहारवर दुःखाचा डोंगर कोसळायला आणि बिहारच्या अधिदैवताची तुरुंगांतून मुक्तता होण्याला एकच गांठ पडली, हैं बिहारी जनतेचें मोठें भाग्य होय. कांहीं लोक असेही म्हणतात कीं, सरकारला देखील बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या मदतीची आवश्यकता भासल्यामुळे मुदत भरण्यापूर्वीच त्यांची अकस्मात् मुक्तता करण्यांत आली. सर्व बिहार प्रांतावर वजन अस णारा आणि बाहेरच्या प्रांतांतही आदर असणारा बाबू राजेंद्रप्रसाद यांच्यासारखा दुसरा पुढारी या प्रांतांत नाहीं. सर्व प्रांतांप्रमाणे बिहार प्रांतांतही पक्षभेद आहेत. पण वावू राजेंद्रप्रसाद ही अशी एकच व्यक्ति आहे कीं, जिच्याबद्दल प्रत्येक पक्षांतील माणसाला आदर वाटतो. त्यांच्या हाताखाली काम करावयाला कोणालाही कमीपणा वाटत नाहीं. उलट मोठेपणाच वाटतो. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे बाबूजींची तुरुंगांतून मुक्तता झाली खरी, पण बाहेर आल्यावर विश्रांतीचा एक क्षणही त्यांना लाभला नाहीं. तुरुंगाच्या बाहेर पाऊल टाकतांच त्यांचे कानांवर चोहोकडून आक्रोश येऊं लागला. मग बाबूजींना विश्रांति कोठली, झोंप कोठली, अन्न कोठलें, आणि औषधपाणी तरी कोठलें ? पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बाबूजी रिलीफ कमिटीच्या कामामध्ये गुंतलेले असतात. कमिटीच्या कामांत असे दंग असतां बाबूजी एकदम माझ्याशीं बोलतील अशी माझी अपेक्षा नव्हती. तरी खुशालीचे प्रश्न विचारून त्यांच्यावर पडलेल्या बोजाचा मी निर्देश केला. प्रकृति बरी नाहीं या सबबीवर मुदत भरण्यापूर्वी त्यांची सुटका झाली, पण तुरुंगांतून बाहेर पडल्यापासून एक क्षणाचीही फुरसत त्यांना मिळाली नाहीं ! पहाटेपासून रात्रीपर्यंत ते सारखे याच कामांत गढलेले पाहून मी त्यांना ' या परिश्रमाचा ताण पडत नाहीं काय ' म्हणून विचारलें. तेव्हां बाबूजी म्हणाले - ' है, ताण कसला ? कामापुढे मी आजारी आहे याची जाणीवच होत नाहीं. माझी प्रकृति चांगली सुधारत आहे !" " मी - आपद्ग्रस्त बिहारला मदत करण्यासाठी आपण जनतेला विनंती केली, तिला मनाप्रमाणें मान मिळाला काय ? बाबूजी-बिहार संकटांत सांपडला असतां सगळा देश त्याच्या मदतीला धावून आला, हे सांगण्यास मला आनंद वाटतो. चहूंकडून आमचेवर मदतीचा वर्षाव होत आहे. पण आमची आपत्ती इतकी प्रचंड आहे कीं एवढी मनःपूर्वक आलेली भरपूर मदत देखील आम्हांला अपुरी वाटते ! आणखी मिळेल तेवढी मदत पाहिजे आहे. मी - आपल्याला रोख पैशांची मदत पाहिजे कीं वस्तुरूपानें ? मुंबईतल्या एका कमिटीकडून आपलेकडे यापूर्वीच एक हजार रुपये आलेले आहेत. बाकी रक्कम वस्तूंच्या रूपानें पाठवावी असें कांहींचें म्हणणें आहे. तथापि आपण सूचना कराल त्याप्रमाणें कमिटी बागणार आहे. बाबूजी - आम्हांला वस्तूपेक्षां पैशाच्या रूपानें मदत मिळेल तितकी चांगली. पैशांचा जरूरीप्रमाणें वाटेल तेव्हां वाटेल तसा उपयोग करतां येतो. इकडेतिकडे मदत पाठविणेंही सुलभ जाते. वस्तूंच्या रूपानें मदत मागवितांना रेल्वेचा खर्च निष्कारण होतो. दुसरें असें कीं आमचेकडे असलेल्या एका केंद्रांतून दुसन्या केंद्राकडे सामान पाठवितांना त्रास पडतो, व पुनः खर्चही येतो. तथापि कांहीं दात्यांची वस्तुरूपानें मदत करण्याकडेच प्रवृत्ति असते. अर्थात् त्यांनी कांहीं मदत केली तरी ती आम्ही स्वीकारतों. अशा त्यांना माझी अशी विनंति की, त्यांनी आम्हांला शक्य तो पन्हाळी पत्रे पुरवावे. आसप्याकरितां त्यांची आम्हांला अत्यंत आवश्यकता आहे. इकडे ते फार महाग पडता. मी - आपदग्रस्तांना सहाय्य करणाऱ्या संस्था पुष्कळ निघाल्या आहेत. या संस्थांत परस्परसहकार्य किंवा एकसूत्रीपणा नसल्यामुळे शक्तीचा आणि द्रव्याचा अपव्यय होण्याचा संभव असतो. कित्येकांना अनेक संस्थांकडून अनेक वेळां मदत मिळते, तर कित्येकांना कोणाकडून कांहींच मदत मिळत नाहीं, अशी शक्यता आहे ना ? बाबूजी - तुम्ही म्हणतां ती गोष्ट अगदर्दी खरी आहे. असें होऊं नये म्हणून आमचा शक्य तेवढा प्रयत्न चालू आहे. पण त्यांत पूर्णत्वानें यश येईलच असें नाहीं. कारण अनेक संघटना निरनिराळ्या दिशेनें काम करीत आहेत. कांहींचें सहकार्य होऊं शकतें, "पण सर्वांचेंच होईल असे नाहीं.
ठाणे । सफेद कांद्याला लॉकडाऊनचा फटका, शेकऱ्यांना भेडसावतोय कांदा साठवणुकीचा प्रश्न । Navarashtra (नवराष्ट्र) नीता चौरे, पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या म्हसरोली या गावात, पाच ते सहा वर्षापासून खरीपातल्या भातपीकाच्या कापनीनंतर डिसेंबर महिन्यात सफेद कांद्याची लागवड केली जाते. या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्यानं गेल्या काही वर्षांत या गावातल्या शेतकऱ्यांकडून सफेद कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाऊ लागली आहे. ह्या वर्षी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या पासुन जवळ असलेल्या मुंबई,वसई विरार, पालघर, नालासोपारा, भाईंदर अशा शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेत म्हसरोली गावातल्या शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात सफेद कांद्याची लागवड यंदा केली आहे. मात्र कोव्हीड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पिकविलेला शेतमालाची विक्री होत नसल्यानं शेतकरी संकटात आला आहे. म्हसरोली, कुरंझे परीसरातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात पिकविल्या जाणाऱ्या पांढऱ्या कांद्याला ही लॉकडाऊनचा फटका बसला असून बाजारपेठ बंद असल्यानं विक्रीसाठी तयार असणारा पांढरा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या म्हसरोली गावात १०० ते ११० शेतकऱ्यां कडून यंदा १८० ते २०० एकरा वर सफेद कांदाची लागवड करण्यात आली आहे. यातून यंदा कांद्याचं चांगलं उत्पादन या एका गावातून येण्याची शक्यता गावातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र कोव्हीड २९ संसर्गजन्य आजारामुळे शेतकरी विक्रीस घेऊन जाणारी मुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भाईंदर सारखी शहरं लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे कांदा विक्रीस नेता येत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. गेल्या वर्षी सुरवातीला चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यानं त्याला प्रतिमाळ ६० ते ७० रुपये इतका चांगला दर शेतकऱ्यांना मिळू शकला होता. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यानं प्रतिमाळ ४० ते ५० रुपये भाव मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. दरम्यान पांढऱ्या कांद्याच्या दोन किलोची एक याप्रमाणं झेले बांधण्यात येत असून ते जमिनीवर न ठेवता टांगून ठेवावे लागतात. अन्यथा ते टिकत नसल्याचं ही शेतकऱ्यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात पिकविलेल्या कांद्याची विक्री होत नसल्यानं हा कांदा कुठे साठवून ठेवायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. ऐन विक्री हंगामात लॉकडाऊन लागू असल्यानं पांढरा कांद्याच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला असून पांढरा कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सफेद कांद्याचे औषधी गुणधर्म : सफेद कांदयाला औषधी गुणधर्म आहेत. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ आणि मधात टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्यानं इन्शुलिन निर्माण होते. हे मधुमेह सारख्या आजारावर परिणाम करते. कच्च्या कांदयानं रक्तदाब ही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अॅसिड असते. हे कोलेस्टेरॉल ही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासून ही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्यानं रक्ताची कमतरता ही दूर होते. यामुळे अॅनिमियाही दूर होतो असे जाणकार शेतकरी सांगतात. गेल्या पाच-सहा वर्षात सफेद कांदा हा अल्प प्रमाणात उत्पादित होत असे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षात आमच्या गावात सर्वच शेतकरी सफेद कांदा लागवड करत आहेत. सफेद कांदाला जादा भावामुळे सफेद कांदा लावण्यासाठी गावातील सर्वच शेतकरी पुढे आले आहेत. आता कांदा तयार झाला असून. या वर्षी अचानक आलेल्या कोरोनामुले आम्ही विक्री घेऊन जाणारी शहरे व बस सेवा बंद असल्याने तसेच व्यापारी ही येत नसल्याने कांदा घरी पडून आहे. त्यामुळे सफेद कांदा लागवड शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. - अनिल गोपाळ जाधव, सफेद कांदा उत्पादक,शेतकरी, (म्हसरोली गाव)
नवी दिल्लीःटाटा मोटर्स (Tata Motors) फेस्टिव सीजन २०२३ च्या जवळपास आपली पॉवरफुल Tata Harrier Facelift ला लाँच करणार आहे. या एसयूव्हीमध्ये खूप सारे कॉस्मेटिक आणि मॅकेनिकल बदल पाहायला मिळू शकतात. नुकतेच याला टेस्ट म्यूलला पाहिले गेले आहे. परंतु, प्रोटोटाइप पूर्णपणे लपलेले दिसले. यामुळे आगामी फेसलिफ्ट मॉडल संबंधी माहिती मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी 2023 Tata Harrier Facelift संबंधी काही खास गोष्टी सांगणार आहोत. जाणून घ्या. 2023 Tata Harrier Facelift ची किंमत सध्या 2023 Tata Harrier Facelift ची टेस्टिंग सुरू आहे. टाटा मोटर्स ऑक्टोबर २०२३ च्या जवळपास या कारला लाँच करू शकते. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, प्रोडक्शन सप्टेंबर महिन्यात सुरू होऊ शकते. किंमतीत ही सध्याच्या मॉडलच्या तुलनेत जास्त असू शकते. 2023 Tata Harrier Facelift चे एक्सटीरियर फेसलिफ्ट मॉडलमध्ये काही कॉस्मेटिक बदल दिसतील. नवीन हेडलँम्प डिझाइन, डीआरएल सोबत एक नवीन फ्रंट बंपर सारखा मोठा बदल पाहायला मिळेल. हा बदल Auto Expo 2023 मध्ये शोकेस हॅरियर ईव्हीच्या डिझाइन सारखे असेल. साइड प्रोफाइल जवळपास सारखीच आहे. रियर मध्ये एलईडी टेल लँम्प्स दिली आहे. 2023 Tata Harrier Facelift चे इंटीरियर Harrier Facelift मध्ये एक नवीन १०. २५ इंचाचा इंफोटेनमेंट डिस्प्ले सोबत एक नवीन सेंटर कन्सोल हाउसिंग, नवीन गियर शिफ्टर आणि ड्राइव्ह मोड रोटरी डायल मिळेल. तर केबिन लेआउट, स्टियरिंग व्हील आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टर आधीसारखी राहण्याची शक्यता आहे. 2023 Tata Harrier Facelift नवीन फीचर्स आजच्या मार्केटकडे पाहिल्यास काही फीचर्स सामान्य झाले आहेत. यासोबत भारतीय कार निर्माता अपडेटेड मॉडलला काही नवीन फीचर्स जसे, एंबिएंट लाइटिंग, लेवल 2 ADAS टेक, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सोबत लेटेस्ट इंफोटेनमेंट UI आणि एक इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सोबत येईल. 2023 Tata Harrier Facelift चे इंजिन आणि पॉवर नवीन Tata Harrier Facelift मध्ये २. ० लीटर क्रॉयोटेक डिझेल इंजिन दिले जाणार आहे. जे १७० बीएचपीचे पॉवर आणि ३५० एनएमचे टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशन मध्ये यात ६ स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक आणि ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शन मिळेल. Tata Harrier Facelift मध्ये १. ५ लीटर tGDi पेट्रोल इंजिन सुद्धा मिळू शकते.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या स्वतंत्र चौकशीची मागणी फेटाळून लावली आहे . सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री 'श्रीदेवी' यांचे २४ फेब्रुवारी रोजी बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्या ५४ वर्षांच्या होत्या. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. दिग्दर्शक सुनिल सिंग यांनी यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याआधी सिंग यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. अभिनेत्री श्रीदेवी यांचा 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता. एका लग्न समारंभासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचा अचानक मृत्यू झाल्याने काही काळ संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. पण चौकशीनंतर दुबई पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. याचिकाकर्ते सिंग यांचे वकील विकास सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार श्रीदेवी यांची 240 कोटी रुपयांचा विमा होता. जर त्यांचा मृत्यू युएईमध्ये झाला तरच या विम्याची रक्कम तेव्हा मिळू शकणार होती. मात्र न्यायालयाने याच मुद्दयावर दाखल झालेल्या दोन याचिका याआधी फेटाळून लावल्याचे सांगित सिंग यांची याचिका फेटाळली.
नवी दिल्लीः कोरोना महासाथीची दुसरी लाट येत असल्याचा इशारा मिळूनही आपण सर्वांनी बेपर्वाई, निष्काळजीपणा दाखवला त्यामुळे देशाला आज मोठ्या आरोग्य संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. देशात फैलावलेल्या दुसर्या कोरोना लाटेवरची भागवत यांची ही पहिली प्रतिक्रिया असून त्यांनी या लाटेमुळे आलेल्या संकटाला देशातील समस्त जनता, सरकार, प्रशासन अशा सर्वांना जबाबदार धरले आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा डॉक्टरांनी पूर्वीच दिला होता तरीही त्याकडे आपण सर्वांनी दुर्लक्ष केले. बेजाबदारपणा दाखवला. आता कोरोनाची तिसरी लाट येईल असा इशारा दिला जात आहे. या लाटेला आपण घाबरणार आहोत का? असा सवाल करत भागवत यांनी ही लढाई लढण्याची व जिंकण्याची आपली पद्धत योग्य आहे का, असे प्रश्न उपस्थित केले. संघपुरस्कृत 'पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड' या श्रृंखलेत भागवत बोलत होते. सध्याच्या काळात लोकांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मकता आणण्याचे प्रयत्न अत्यावश्यक असल्याने वर्तमानातल्या अनुभवातून आपण शिकलो तर देशाच्या भविष्याकडे आपले लक्ष केंद्रीत होऊ शकते असे भागवत म्हणाले. आपण आपल्या चुकातून शिकलो तर तिसर्या लाटेचा यशस्वी मुकाबला करू असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला. भाषणात भागवत यांनी, जीवन व मृत्यूचे चक्र असेच चालत राहील... आपण कोणीच या क्षणी भयभीत नाही. ही परिस्थिती आपल्याला भविष्यासाठी अनेक बाबी शिकवून जाईल, असे विधान केले.
मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजार बुधवारी पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत. बाजारातील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा, मसाला, धान्य बाजारामधील सर्व व्यवहार बंद असणार आहेत. तर मागच्या वेळची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबईमधील महानगरपालिका आणि खासगी शाळाही बंद ठेवल्या जाणार आहेत.
नवी दिल्ली 11 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) कधीकधी असे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं, जे पाहून आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मात्र, जगात अनेक असे लोक असतात, जे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात टाकायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की एक महिला जंगलात 6 सिंहिणींसोबत आरामात फिरत आहे (Woman Walking With 6 Lioness), जणू ते तिचे पाळीव श्वान आहेत. हा व्हिडिओ खरोखरच हैराण (Shocking Video Viral) करणारा आहे. हा व्हिडिओ पाहून कोणच्या काळजाचे ठोके वाढतील. हा व्हिडिओ काही सेकंदांचाच आहे. मात्र, तो पाहून नक्कीच तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ जंगलात शूट केला गेला आहे. यात एक महिला सहा सिंहिणींसोबत अगदी आरामात फिरताना दिसते. हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान एकही सिंहिण महिलेवर हल्ला करत नाही. महिलेच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून असं वाटतं की तिला या सिंहिणींची जराही भीती नाही. हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर safarigallery नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, आयुष्यात कधी ना कधी, ते काम नक्की करा, ज्याची तुम्हाला भीती वाटते. तर तुम्हाला हे करून पाहायला आवडेल? एका दिवसाआधी अपलोड झालेला हा व्हिडिओ पाहून सगळे हैराण आहेत, की अखेर या सिंहिणी महिलेवर हल्ला का करत नसाव्या. तर काही यूजर्सचं असं म्हणणं आहे, की जर या सिंहिणी हल्ला करत नसतील, तर आम्हालाही त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवायला आवडेल. सफारी गॅलरीने पुढे माहिती देत सांगितलं, की सिंह आधी संपूर्ण आफ्रिका, आशिया आणि यूरोपात आढळत असे. मात्र आता केवळ अपवादात्मक स्थितीतंच आफ्रिकेत आढळतात. बाकी आशियाई सिंह भारतात सासन-गिर नॅशनल पार्कमध्ये दिसतात. यासोबतच हेदेखील सांगण्यात आलं, की सिंहाची डरकाळी 5 मील दूरवरुनही ऐकू येते. एक सिंह 50 मील प्रति तास वेगाने पळू शकतो आणि 36 फूटापर्यंत उडी घेऊ शकतो. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथी होत आहेत. पाठोपाठ तेथे सार्वत्रिक निवडणुकाही होत आहेत आणि आगामी काळात अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतर 'रिकामटेकड्या' होणाऱ्या तालिबानला भारतविरोधी कारवायांमध्ये व्यग्र ठेवण्यावर पाकचा भर राहण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास अस्थिरतेच्या वाळवंटात शांततेचे मृगजळही राहणार नाही. 'एकविसाव्या शतकातील सर्व प्रकारच्या डोकेदुखी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याचे नाव आहे, पाकिस्तान!' हे उद्गार आहेत अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री मॅडलिन आलब्राईट यांचे. अस्थिरतेच्या पहाटेने पाकिस्तानच्या नववर्षाची सुरुवात झाली आहे. पाकच्या सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान रजा परवेज अश्रफ यांना अटक करण्याचा आदेश काढला आहे. याच सुमारास धर्मगुरू ताहिसल कादरी यांनी पाक राजवटीविरुद्ध इस्लामाबादमध्ये अभूतपूर्व मोर्चाचे आयोजन केले. दोन्ही घटना अनपेक्षित दिसल्या, तरी यामागे पाक लष्कराचाच हात आहे असा संशय पाकमधील राजकीय पंडित व्यक्त करीत आहेत. १९९९च्या लष्करी उठावास पाठिंबा देणारे हेच कादरी होते, हेही त्यामागचे कारण आहे. पाठोपाठ आशिया खंडातील शांततेवर परिणाम करणाऱ्या दोन प्रमुख घडामोडी येत्या काही महिन्यांत होणार आहेत. एक म्हणजे पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका व दुसरी म्हणजे अफगाणिस्तानातून होणारी अमेरिकी सैन्याची माघार. पूंछ सीमेवरील दोन भारतीय जवानांची क्रूर हत्या हा पाक लष्कराचा खोडसाळपणा नसून भविष्यातील डावपेचांचा एक भाग आणि भारताच्या सहनशीलतेच्या मर्यादा तपासण्याचा अप्रत्यक्ष अघोरी प्रयत्न आहे. दुर्दैवाने भारताची प्रतिक्रिया ही टीव्ही चॅनेलच्या टॉक शोवरील तथाकथित बुद्धिवंतांपुरतीच मर्यादित राहिली. याउलट पाश्चिमात्य देशांनी, विशेषतः अमेरिकेने, 'नजीकच्या भविष्यातील पाकिस्तान' या विषयावर सखोल रणनीती तयारही केली आहे. अतिरेकी मूलगामी शक्ती पाकिस्तानच्या सरंजामी जहागिरी व्यवस्थेला व लष्कराला सध्या तरी आव्हान देऊ शकणार नाहीत. परंतु भविष्यात हे असंभव नाही. हा धागा पकडून पाकिस्तानमधील सरकार व व्यवस्था जर कधी काळी अतिरेकी शक्तींच्या ताब्यात गेली तर काय, यावर भयानक निष्कर्ष अमेरिकेतील परराष्ट्र धोरणाशी संबंधित अभ्यासकांनी काढले आहेत. निवडणुकीपूर्वी सरकार कोसळले अथवा लष्कराने उठाव केला तर पाकिस्तान लष्कर-ए-तोयबा, तालिबान यांच्या ताब्यात तरी जाईल किंवा तेथील व्यवस्थेमध्ये दहशतवादी संघटनांचा सहभाग वाढेल. अमेरिकेचे परराष्ट्रनीती तज्ज्ञ जॉन स्मिड यांच्या प्रबंधाप्रमाणे पाकिस्तान हे जगातील दहशतवाद्यांचे मुख्य आकर्षण आणि मुख्य केंद्र बनेल. पाश्चिमात्य देशांच्या गुप्त अंदाजानुसार पाककडे शंभरहून अधिक आण्विक शस्त्रे आहेत. यातील अनेक शस्त्रे एफ-१६ या विमानाद्वारे मारा करू शकतील अशी डिझाइन केली आहेत. यातील काही तर १५०० मैलांचा पल्ला गाठू शकतात. थोडक्यात, भारतातील सर्व प्रमुख शहरांना पाकिस्तान सहज लक्ष्य करू शकेल. अमेरिकेच्या 'नॅशनल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल'च्या गणितानुसार भारतावर अणुहल्ला झाल्यास किमान १० ते १५ लाख लोक मृत्युमुखी पडतील. २० लाखांहून अधिक लोक जखमी वा घायाळ होतील. किरणोत्सर्गाच्या दुष्परिणामाने एक कोटींहून अधिक लोक मृत्युमुखी तरी पडतील किंवा विकलांग होतील. अनेक शहरे, उद्योगधंदे इत्यादी नष्ट होतील. हा एकत्रित विनाश जवळपास हिरोशिमाइतका असेल, असाही या कौन्सिलचा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे बटन दाबले की, एकदम १०० अणुशस्त्रे भारताच्या दिशेने झेपावतील हे कदापि असंभव आहे. कारण अण्वस्त्रे व ती आकाशात सोडणारी यंत्रणा याचे गणित जुळवून आणल्यानंतरच मारा करणे शक्य आहे. सध्या आपल्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे ही यंत्रणा, त्याचे गणित, पासवर्ड इत्यादी पाक लष्करातील अतिशय मर्यादित तज्ज्ञांच्या हातात आहे. परंतु दुर्दैवाने पाकमध्ये उठाव/क्रांती होऊन तालिबानसारख्यांच्या हातात अण्वस्त्रे आली तर काय, या काळजीने पाश्चिमात्य अभ्यासक ग्रासलेले आहेत. इराणमधल्या क्रांतीत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनीच दहशतवाद्यांपुढे शरणागती पत्करली तसे झाले तर मात्र अणुयुद्ध संभव आहे. आणखी एक वेगळा धोका म्हणजे पाकमधील दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील त्यांच्या गटाचे प्राबल्य असलेल्या प्रांतातून चोरट्या मार्गाने ही अण्वस्त्रे पाकिस्तानबाहेर हलवली तर अमेरिका, पाश्चिमात्य देश, इस्रायल व भारत यातील कोणताही देश लक्ष्य ठरू शकेल. सारे धोके विचारात घेऊन अमेरिकेने अवकाशात अणुहल्ला विरोधी कवच तयार केले आहे अशी वदंता आहे. पाश्चिमात्य अभ्यासकांच्या दुसऱ्या एका सिद्धांताप्रमाणे पाक लष्करपुरस्कृत दहशतवादी संघटना भारतावर सरसकट अणुहल्ला करणार नाहीत. याउलट छोट्या छोट्या दहशतवादी हल्ल्यांवर त्यांचा भर राहील. जॉन स्मिड यांच्या मते भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या हेही त्यामागचे एक कारण आहे. एक गोष्ट नक्की, पाक लष्कर एकवेळ अतिरेक्यांना पाठबळ देईल; पण त्यांनाच शरण जाणार नाहीत. पाकमध्ये कितीही उलथापालथ झाली तरी पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तालिबान, तोयबाच्या प्रमुखांचे नेतृत्व कदापि स्वीकारणार नाहीत अशी अप्रत्यक्ष कबुलीच पाकच्या काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी एका अमेरिकी राजदूताला काही महिन्यांपूर्वी दिली. अर्थात उद्या पाक लष्करच जर दहशतवाद्यांपुढे कोलमडले, तर मात्र यातील अनेक बाबी संभव आहेत. पाकमध्ये नव्याने आकार घेणाऱ्या समीकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जमात-ए-इस्लाम. आयएसआयचे निवृत्त प्रमुख हमीद गुल यांच्यापासून अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर जमातच्या कार्याला वाहून घेण्यास सुरुवात केली आहे. पाकमधील अंतर्गत दहशतवाद्यांना लक्ष्य करण्या-ऐवजी काश्मीरप्रश्नावर रान उठवून भारताला लक्ष्य करा ही त्यांची प्रमुख भूमिका दुर्लक्षित करून चालणार नाही. पाकिस्तान कोलमडल्यास अण्वस्त्रांपर्यंत पोहोचण्यापासून अल् कायदा, लष्कर-ए-तोयबा, तालिबान यांना रोखण्याची योजनाही अमेरिकेने आखली आहे, असे म्हणतात. यासाठी अमेरिकेत एक विशेष दलही स्थापन केले असून त्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यासही सुरुवात झाली आहे. हे सारे पडद्यामागे घडत असल्यामुळे कुठेही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अफगाणिस्तानच्या आदिवासी भागात व पाकमधील बलुचिस्तानमध्ये अमेरिकी दबाव झुगारून पाकने या संघटनांना छुपा आश्रय दिल्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे. भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तान हा शत्रू बनणे व त्या अनुषंगाने तो चीनच्या अधिपत्याखाली जाणे अमेरिकेला महागात पडेल. चीनच्या वाढत्या आर्थिक, राजकीय आक्रमणाला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. खरं तर भारताला त्यासाठी वापरून घेण्याची अमेरिकेची राजनीती आहे. याशिवाय अफगाणिस्तानात कायम वास्तव्य केल्यास आर्थिक बोज्यापेक्षा जगातील मुस्लिम राष्ट्रांचा रोष वाढण्याची शक्यता अमेरिकेला भेडसावत आहे. अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतर 'रिकामटेकड्या' होणाऱ्या तालिबानला भारतविरोधी कारवायांमध्ये व्यस्त ठेवण्यावर पाकचा भर राहील. फांदीसोबत पाने वळावीत तशी तालिबानसोबत अण्वस्रे वळल्यास अस्थिरतेच्या वाळवंटात शांततेचे मृगजळही राहणार नाही.
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असणा-या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही उघड झाले आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने ड्रग्सबाबत उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या ४ स्टार्सची नावे घेतली होती. यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असे म्हटले होते. यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केवळ रणवीर अथवा रणबीर कशाला तर आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची चाचणी करावी, कारण बॉलिवूडच्या सर्कलमध्ये आदित्य ठाकरेंचा वावर असतो असं निलेश राणे म्हणाले आहेत. कोणत्याही फिल्मी कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची रक्तचाचणी बंधनकारक करा, अशी मागणी यापूर्वी कंगनाने केली होती. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज घेतले जाते. पाण्यासारखे ड्रग्ज वाहते, असे कंगना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. काही माझ्या वयाचे युवा वैयक्तिकरित्या ड्रग्ज घेतात आणि शो करतात. या कलाकारांबद्दल ब्लाइंड आयटमदेखील लिहिले गेले होते. सर्व काही एक प्रकारे हाताळले जाते. त्यांच्या पत्नीदेखील अशा पार्टी आयोजित करतात़ तिथे पूर्णपणे वेगळे वातावरण असते. तिथे असे लोक भेटतात जे फक्त ड्रग्स घेतात आणि दुस-यांसोबत दुर्व्यवहार करतात. काही सरकारांनी या बॉलिवूडच्या ड्रग्ज माफियांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले. बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांमध्ये रिलेशन आहे. ते एकमेकांना ओळखतात. बॉलिवूडचे अनेक कलाकार बालपणापासून ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. अशाच एका अभिनेत्याला मी डेटही केले आहे, असेही ती म्हणाली होती.
लिक्विड नखेः वैशिष्ट्य. सरस कसे वापरावे "द्रव नखे"? लिक्विड नखे, आपण या सरस खरेदी करण्यापूर्वी माहित पाहिजे जे वैशिष्ट्य दुरुस्ती आणि बांधकाम दरम्यान आज वापरले जातात. परंपरागत रचना निष्ठा वर्णन तुलनेत तेव्हा, प्रथम लहान अपूर्णांक काढण्यासाठी समाविष्टीत आहे, ते आम्हाला ऑपरेशन दरम्यान लक्षणीय लोड विषय असेल सूचविले घट्ट बॉण्ड भाग साध्य करण्यासाठी परवानगी देते. मिश्रण आधार म्हणून वापरले जाते , कृत्रिम रबर आलेला जोडले जातात जे. निष्ठा विशिष्ट प्रकारच्या क्लासिक आवृत्ती काढण्यासाठी भूमिका माती वापरले, एक प्रचंड वाढ झाली तंतुभवनयोग्यता आहे. खडू उत्पादक, पूर्ण रचना एक पांढरा रंग वापर माध्यमातून. साधारणपणे, रंग वापरले संबंधित साध्य करण्यासाठी टायटॅनियम डायऑक्साइड. लिक्विड नखे, हा लेख सादर करण्यात येईल, जे तांत्रिक आतील अनुप्रयोग करीता वापरले जातात. ते लवचिक आहेत, जे फार खरेदीदार आहे. घरगुती मास्टर्स रचना 9. 5 मिमी पर्यंत जाडी, seams उपस्थिती वापरले जाऊ शकते हे लक्षात ठेवा. विशेषज्ञ सक्रिय निष्ठा संपादीत आणि आणखी 10 संच पर्यंत मिनिटे बाँडिंग पृष्ठभाग स्थिती निराकरण करण्यासाठी परवानगी देतो कारण, ती निवडलेली. लिक्विड नखे, तांत्रिक वैशिष्ट्ये बाहय वापर शिफारसीय उत्पादन, खरेदी करण्यापूर्वी, तसेच कृत्रिम ग्रॅनाइट आणि मार्बल बाँडिंग साठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे. विशेषज्ञ सरी आणि बाथरुम मध्ये मजले सजवण्याच्या द्रव नखे विकत शिफारस नाही. वर्णन रचना अर्ज करण्यापूर्वी पृष्ठभाग स्वच्छ, गुळगुळीत आणि कोरडा आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. विकत घेतले काडतूस स्थापित करणे आवश्यक आहे तोफा sealant फक्त कापून 45 अंश कोनात टीप नंतर. तो चिकट थर स्थापना इच्छित जाडी नुसार पूर्ण करणे आवश्यक आहे. ते टीप समाविष्ट आहे लेबलिंग मदत करेल. वापर करण्यापूर्वी, संरक्षक पडदा काडतूस आरपार. 6. 5 मिमी थर जाडी स्थापना करण्यात आली जेणेकरून या, एक नागमोडी पद्धतीने केले पाहिजे एक रचना नंतर लागू केले जाऊ शकते. अनुप्रयोग काही सेकंद एकमेकांना विरुद्ध जे प्रेस नंतर, नंतर ते काही काळ ठेवण्यासाठी सक्षम दोन्ही पृष्ठभाग वर चालते पाहिजे. फक्त भाग जोरदार कुरूप आहेत की कार्यक्रम, तो अतिरिक्त स्थिरता असणे आवश्यक आहे. लिक्विड खिळे, सूचविले घट्ट बाँडिंग प्रदान करण्याची परवानगी कोणत्या वैशिष्ट्ये प्रथम प्रेस पृष्ठभाग पाहिजे एकमेकांना घट्ट जलद बाँडिंग साध्य करण्यासाठी 30 सें. मी. zigzags दरम्यान अंतराने एक सह चिकट अर्ज दृश्य वापरले पाहिजे. धार पासून 3. 5 सेमी माघार करणे आवश्यक आहे. करण्यासाठी, नंतर 5 मिनिटे त्यांना वेगळे आणि नंतर पुन्हा दाबली. हे काय त्यांच्या खप शोधण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी महत्वाचे आहे. स्थापना थर व्यास 6. 5 मिलिमीटर समान आहे, तर एक काडतूस 10 रेषेचा मीटर पुरेशी होईल. आवश्यक असल्यास, द्रव नखे पृष्ठभाग स्वच्छ खनिज तेल आधारित solvents वापर करणे आवश्यक आहे. नखे खरेदी करून, आपण मिश्रण 310 मिली ज्यात काडतूस करा. एक बॉक्स मध्ये 24 काडतूस आहे. आपण एकत्र चिकटविणे सुरुवात करण्यापूर्वी, आपल्याला द्रव नखे कसे वापरावे याबद्दल माहिती हवी आहे. अनुप्रयोग तापमान -7 +30 अंश श्रेण्या. कार्यकारी तापमान सूचविले विस्तृत आहे आणि -30 +90 अंश असते. 24 तासांनंतर, flexural शक्ती 250 उपनिरीक्षक आत साजरा केला जातो. 48 तास आकृती आधीच आहे 350 उपनिरीक्षक होते, आकृती, तर 7 दिवस एक मर्यादा पोहोचते - 400 उपनिरीक्षक. निर्माता, उत्कृष्ट टिकाऊपणा हमी अशा प्रकारे निष्ठा रचना 20 वर्षे त्याची गुणवत्ता वैशिष्ट्ये टिकून राहतील. लिक्विड नखे, अनेकदा पुरेशी फक्त सकारात्मक आढावा, 30 000 ° से 'PS श्रेणी viscosity आहे. त्यांनी उत्कृष्ट पाणी प्रतिकार आहे, आणि कमी तापमान गोठवू शकत नाही. घाम येणे, खूप, साजरा नाही. थोडा गंध लागू करताना, प्रकाशीत केले जाईल जे दिवाळखोर नसलेला मालकीची असावी. चिकट रचना केल्यानंतर पायही जाऊ शकते. बरेचदा, मास्टर्स आणि व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक पृष्ठभाग वर स्थळांच्या निर्मिती शक्यता रूची आहे. काय संभाव्यता फक्त संगमरवरी बाबतीत अस्तित्वात आहे. पूर्णपणे कोरडा रचना 2 आठवडे येते. हे मिश्रण ज्वालाग्रही आहे की, ते उच्च तापमानात उघड तेव्हा पेटणे शकते लक्षात करणे आवश्यक आहे. रचना पाऊल कोरडे मध्ये नॉन-ज्वालाग्रही आहे. आपण द्रव नखे सरस करण्यापूर्वी, आपण श्रेणी बांधकाम साहित्य बाजारात उपलब्ध पाहू करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, येथे व्यावसायिक रूपात उपलब्ध पाणी विद्रव्य मिश्रणावर अंमलात, आढळू शकते ऍक्रेलिक आधारित. मुख्य घटक पूर्णपणे आरोग्यासाठी धोकादायक नाही, हे पर्यावरणास अनुकूल साहित्य आहे. अशा नखे सच्छिद्र साहित्य बाँडिंग साठी वापरले जाऊ शकते. एक रचना उच्च आर्द्रता झेप contraindicated आहे. अशा मिश्रणावर फक्त शून्य वरील तापमान चालवता येते. प्रश्न द्रव नखे कसे वापरावे आपण समोर आहे, तर तो आपण बाजारात अत्यंत विशेष आणि सामान्य सूत्र शोधू शकता हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. इतर जवळजवळ प्रत्येक गोष्ट glued जाऊ शकते, तर त्यांना काही, फक्त बाँडिंग प्लास्टिक असतात. तो भार, रचना पडत असेल जे खरेदी करण्यापूर्वी विचारात घेणे महत्वाचे आहे. आपण सरस विकत घेण्यासाठी "द्रव नखे" ठरविले तर, तांत्रिक विनिर्देश हा लेख वाचले जाऊ शकते. हे आपण योग्य प्रभावी गुणवत्ता वैशिष्ट्ये योग्य निवड आणि उच्च खर्च आहे त्या संयुगे साठी overpaying नाही करण्यास परवानगी देते.
स्मार्टफोन ब्रँड OnePlus लवकरच आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 3 लाँच करू शकतो. OnePlus Nord सिरीज ही कंपनीकडून येणारी बजेट सिरीज आहे. या सीरीज अंतर्गत, वनप्लसने आतापर्यंत वनप्लस नॉर्ड आणि वनप्लस नॉर्ड 2 फोन सादर केले होते. ही सीरीज वनप्लसची सर्वात लोकप्रिय सिरीज देखील मानली जाते. हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो, असा दावा OnePlus Nord 3 बद्दल केला जात आहे. टिपस्टर मुकुल शर्मा यांनी एका ट्विटद्वारे दावा केला आहे की, वनप्लस हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. टिपस्टरच्या मते, या फोनसह कंपनी Nord Watch, Nord Band, New Nord Buds आणि Nord स्मार्ट मेजरिंग स्केलसह इतर स्मार्ट डिवाइस सादर करण्याची शक्यता आहे. कंपनीने अलीकडेच OnePlus Nord Buds CE TWS इयरबड्स भारतात 2,299 रुपयांच्या किमतीसह लाँच केले आहेत. हा फोन 6.7-इंच लांबीच्या फुल HD + AMOLED डिस्प्लेसह लाँच केले जाऊ शकते, ज्याला 120Hz आणि 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनचा रिफ्रेश रेट मिळेल. तसेच, फोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि 50-megapixel ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असेल, असे सांगितले जात आहे. यामध्ये 4,500mAh बॅटरीसह 150W सुपर फ्लॅश चार्जिंगसाठी देखील सपोर्ट मिळणार आहे. तसेच, यामध्ये 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलमध्ये डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर्स देखील मिळू शकतात. फोनमध्ये व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. तसेच, फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह ऑफर केला जाऊ शकतो.
VIDEO : "मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो! " भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश पॉवरफुल. . . ; पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पण, या संकटातही भारतातील अर्थव्यवस्था डगमगलेली नाही. आयएमएफनेही याचे संकेत दिले आहे. पण, भारता शेजारील देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे, यात श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशांची अवस्था बिकट झाली आहे. जगभरात मंदी सावट आहे. पण, भारत प्रगतीत पुढे आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिक भारताचे कौतुक करत आहेत, आणि भारताला आपला मोठा भाऊ मानत आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानी जनतेनेही पाकिस्तानी राज्यकर्त्यांवर टीका केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किंबहुना भारताची प्रगती आणि पाकिस्तानची गरिबी पाहून पाकिस्तानी नागरीकांनाही पश्चाताप होत आहे. पाकिस्तानी लोकांची वाईट अवस्था पाहून पाकिस्तानी जनतेने बडा भाई, बडा भाई होता है असे उघडपणे म्हटले आहे. पाकिस्तान आपल्या अहंकारामुळे भारताकडून मदत घेत नाही. पाकिस्तानची भारताशी स्पर्धा नाही, कारण भारत खूप पुढे गेला आहे, असंही पाकिस्तानी बोलत आहेत. पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध चांगले राहिले असते तर आज पाकिस्तानची अशी अवस्था झाली नसती, असंही पाकिस्तानी जनतेवने म्हटले आहे. सना अमजद नावाच्या यूट्यूब चॅनलवर भारताबाबत पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. यात त्यांनी भारताचे जोरदार कौतुक केले. आबिद अली नावाच्या पाकिस्तानी नागरिकांने सांगितले की, भारताचे शक्तिशाली देशांशी संबंध आहेत. त्यांची अर्थव्यवस्था सतत वाढत आहे. भारतासोबत आमचे संबंध चांगले असते तर भारत आम्हाला कर्ज देईल, ज्या प्रकारे चीन आणि सौदी आम्हाला मदत करतात. पण आपल्या खोट्या अहंकारामुळे वैर आहे. भारत खूप शक्तिशाली आहे, तो आपल्यापेक्षा खूप पुढे आहे, असंही त्याने म्हटले आहे. 'भारत आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. ते लोक कष्ट करत आहेत, आम्ही धर्मातून बाहेर पडू शकलो नाही, भारत आणि पाकिस्तान का वेगळे झाले याचा विचार करत आहोत. तिकडे चिकन दीडशे रुपये किलो आहे, मग आमचा काय दोष सांगा. आपण आपला अहंकार वेगळा केला पाहिजे. मोठा भाऊ मोठा असतो. भारत आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, हे सत्य स्वीकारा. आताही निर्णय घेतला नाही तर कधी घेणार, असंही यात म्हटले आहे. 'सर्व कंपन्यांची प्रॉडक्शन हाऊस भारतात आहेत. जगाला वाटतं की भारतात एवढी मोठी बाजारपेठ आहे, पाकिस्तानात कंपन्या येत नाहीत. कारण सगळेच तोंड उघडून बसलेत की आम्हाला एवढे द्या. बांगलादेश आपल्यापेक्षा पुढे गेला आहे. आमची शर्यत आता अफगाणिस्तान आणि बांगलादेशची आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही, असंही तो नागरिक म्हणाला.
नागपूरः महाविकास आघाडी सत्तेत येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णतः क्लीन चीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात 'क्लीन चिट' देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जबाबदारी ठरविण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अॅन्ड इन्स्ट्रक्शनचा आधार घेतला आहे. (Former Deputy Chief Minister Ajit Pawar gets Clean Chit from ACB in Irrigation Scam) महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अॅन्ड इन्स्ट्रक्शनमधील नियम १४ अनुसार (Maharashtra Government Rules of Business And Instruction Law) विभागाच्या सचिवाने टेंडरसंबंधित बाबी तपासून माहिती संबंधित मंत्री व मुख्य सचिवांना दिली पाहिजे. जल संसाधन विभागाचे सचिव व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचा दर्जा, कर्तव्ये व जबाबदाऱ्या समान आहेत. त्यामुळे सिंचन प्रकल्पांचे टेंडर व खर्च मंजुरीमध्ये काही अवैधता आहे वा नाही, हे तपासण्याची जबाबदारी या दोन अधिकाऱ्यांची होती. त्यांनी याची माहिती पवार यांना द्यायला हवी होती. त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे पवार यांच्यावर घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करता येणार नाही, असे आताच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. १९९९ ते २००९ या कालखंडात राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची अनियमितता असल्याची बाब समोर आली. फेब्रुवारी २०१२ मध्ये तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करून सिंचन विभागात गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले होते. त्यानंतर २०१२ मध्ये जनमंच या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करून राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली. उच्च न्यायालयात याचिकांवर सुनावणी सुरू होती. सर्वाधिक खळबळजनक म्हणजे मुख्य अभियंता पांढरे (Chief Engineer Pandhare) यांच्या गौप्यस्फोटाने तर जलसिंचन प्रकल्पांमध्ये ३५ हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या दहा वर्षात उभारण्यात आलेले प्रकल्प अतिशय निकृष्ट दर्जाच्या साधनसामुग्रीचे आहेत. सरकारने राज्यातील अशा सर्व प्रकल्पांवर तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. सिंचन मात्र फक्त एकच टक्का झालं आहे. याप्रकरणी अजित पवार यांना चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चौकशीसाठी ऑक्टोबर २०१५ मध्ये ३ वेळा समन्स बजावला होता. यानंतर त्यांची एसीबीच्या मुख्यालयात सहा तास चौकशी झाली होती. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांना क्लीन चिट दिली होती. वॉटर कप; राज ठाकरेंनी मांडलेलं सिंचन क्षेत्रातील वास्तव उपस्थितांना रुचलं, पण अजित पवारांना का झोंबल? - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशाचा आवाज, भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी ८.१२ वाजता निधन झाले. दरम्यान त्या ९३ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर आता लता दीदींचे पार्थिव ब्रीच कॅंडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे नेण्यात आले आहे. येथे दुपारी ३ वाजेपर्यंत अंत्य दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. याठिकाणी अनेक दिग्गज कलाकार मंडळी आणि नेते मंडळी उपस्थित आहेत. दरम्यान त्यांना मुंबई पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात येत आहेत. लता दीदींचे निधन हे मंगेशकर कुटुंबियांसोबत संपूर्ण चाहता वर्ग आणि गायन क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी आहे. लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे चाहते आणि अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत. हुंदके देणारे, टाहो फोनारे आवाज संपूर्ण वातावरण शोकमय झाल्याचे दर्शवित आहे. लता दीदी या भारतरत्न असून देशाचा आवाज आहेत. त्यांना मुंबई पोलीस पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. गायन क्षेत्रातील नामांकित गायिका आणि स्वरसम्राज्ञी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे ज्यामध्ये वयाची मर्यादा नाही. लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे सचिन तेंडुलकर, जावेद अख्तर, अनुपम खेर, सुभाष देसाई, बाळा नांदगावकर, आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसारखे दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. लता दीदी यांची काळजी घेणारे त्यांचे सहाय्यक अश्या प्रत्येकाच्या भरलेल्या उरातून केवळ लता दीदींच्या नसण्याचे दुःख ओझरतं आहे. लता दीदींचे निधन हि बाब अक्षरशः हृदयद्रावक आहे. लता दीदीं यांचे पार्थिव ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे नेण्यात येईल. यानंतर त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ४.३० वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. लता दीदींचे निधन हे देशाचे आणि संपूर्ण संगीत सृष्टीचे नुकसान आहे आणि लता दीदींचे स्वर अमर आहेत. यामुळे लता दीदी नेहमीच स्मरणात राहतील अश्या शोकसंवेदना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत.