text
large_string
प्रकरण नववें. एक दोन थेंब पाण्यांतून देण्यास हरकत नाहीं. या औषधांत विषारी पदार्थ फार मिसळले असल्याने याचा उपयोग फार काळजीपूर्वक करावा. लहान मुलास एकपासून पांच थेंबांपेक्षा जास्त देऊ नये. ३ अमोनिया कार्बानसः - या औषधाच्या अंगीं उत्तेजक, कफन व वांतिकारक धर्म आहेत. या औषधास एका प्रकारचा उग्र दर्प असतो. तो नाकास फार झोंबतो. हें औषध फार जोरानें हुंगल्यास डोळ्यानाकांतून पाण्याच्या धारा लागतात व कित्येक वेळां घेरी येते. घेरी येऊन बेशुद्ध पडलेल्या माणसास सावध करण्यासाठी याचा उपयोग करितात. कांद्याच्या अंगच्या दर्पाचा जो गुण आहे, त्या प्रकारचाच गुण या औषधाच्या दर्पंत आहे. मुलांचा कफ फार दाट होऊन लवकर सुटत नसल्यास या औषधाचें चाटण देतात. कित्येक प्रसंगी ज्वर फार आल्याकारणानें आजान्यास ग्लानि येते व फार अशक्तपणा भासतो अशा वेळीं या औषधापासून फार उपयोग होतो. ४ स्पिरिट इथेरीस नायट्रोसीः या औषधाचे अंगीं स्वेदोत्पादक, मूलल व उत्तेजक धर्म आहेत. लहान मुलास ताप भरला असतां या औषधापासून फार लौकर घाम येऊन ज्वर कमी होतो. हें ५ पासून १०/१५ थेंबपर्यंत द्यावें. ५ स्पिरिट अमोनिया अॅरोमॅटिकः - ह्यास "सालव्हॉलोटाईल" ह्या औषधाच्या अंगीं दीपकधर्म आहे, वायूच्या असेंही ह्मणतात. अवरोधामुळे लहान मुलाच्या पोटांत दुखत असल्यास या औषधाचे २१४ थेंब पाण्यांतून दिल्यास फार जलद गुण येतो. याचे व अमोनिया कार्बोनसचे गुणधर्म जवळ जवळ सारखेच आहेत. ६ इपिकॅक्युअना वाईनः - या औषधाचे अंर्गी; कक मोकळा करण्याचा धर्म असून स्वेदोत्पादकधर्मही आहे. खोकल्यामध्ये लहान मुलास एक धाकटा चमचाभर पाण्यांतून ५ पासून १० थेंब दिल्यास खोकला कमी होतो. मुलास कफ दाटून श्वास बरोबर घेतां येत नसल्यास, व पोट एकसारखें उडत असल्यास या औषधाचे १० थेंब लहान चमचाभर पाण्यांतून प्रत्येक दहा दहा मिनिटांनी उलटी होईपर्यंत द्यावे. पहिली उलटी झाल्याबरोबर औषध देण्याचें बंद करावें. ७ लायकर अमोनिया असिटेटीसः- या औषधाच्या अंर्गी स्वेदोत्पादक धर्म फार असून साधारण उत्तेजकधर्मही आहे. थोडा ज्वर व सर्दी झाली असल्यास अंगांतून घाम काढण्यास यासारखें दुसरें उत्तम औषधच नाहीं. याबरोबर कापराचें पाणी व स्पिरिट इथेरीस नायट्रोसी हीं मिश्रण केली असतां घाम जलद येऊन ज्वर फार लौकर कमी होतो. १५ पासून ६० थेंबपर्यंत लहान मुलास द्यावे. ८ सुंठीचा अर्क ( टिंकूचर झिंजिवरीस ): - या औषधाचे अंर्गी वायुहारक धर्म चांगला आहे. यामुळे लहान बालकाचे पोटांत वायु घरला असल्यास २ पासून ४ थेंब थोड्याशा पाण्यांतून द्यावें. याऐवज साधी सुंठ मधांतून उगाळून दिली असतां चालेल. सुंठ चवीस तिखट असल्याकारणानें मुळे घेण्यास कां करितात. ९ पोटॅशिअम ब्रोमाइडः - या औषधाच्या अंगीं निद्रा आणण्याचा व शामक धर्म आहे. यामुळे या औषधाचा उपयोग विशेषकरून निद्रा आणण्याचे व ज्ञानतंतूंची चेतना कमी करण्याचे काम करितात. प्रमाण अर्धा ग्रेन पासून ४ ग्रेन. १० टिंक्चर आयोडीनः - हें औषध लहान मुलांस फारसें पोटांत देत नाहीत, पण एखाद्या भागावर सूज आल्यास काहा लागून एखादा शरीराचा भाग दुखत असल्यास याचा लेप करितात. ११ मॅग्नीशियाः--हा एक प्रकारचा क्षार आहे. तो दिसण्यांत साखरेसारखा दिसतो व चवीस कडवट असतो. तो चांगल्या घट्ट बुचाच्या बाटलीत भरून ठेवावा; उवडा टाकू नये. कोणास आम्लप्रकरण नववें. पित्त व अवरोध झाला असल्यास त्यावर हा फार हितावह आहे. प्रमाण मुलास ५ - २० ग्रेन. १२ पेपरमिटाचा अर्कः --- लहान मुलाच्या पोटांत वायु धरून पोट दुखतें त्यावर व अजीर्णोश होतो त्यावर १-३ थेंब पाण्यांतून द्यावेत. १३ अफूचा अर्कः-- (टिंक्चर ओपिअम्) या औषवाचा उपयोग फार काळजीनें केला पाहिजे. पोटांत दुखत असल्यास अथवा मुलास एकसारखे जुलाब होत असल्यास याचे १-२ थेंब पाण्यांतून द्यावेत. याचा उपयोग डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय फारसा करूं नये. १४ कोयनेलः - हें औषध सिंकोना नांवाच्या वनस्पतीपासून तयार केलेले असतें. हें हिंवज्वरावर रामबाण औषध आहे. हें वनस्पतीपासून तयार केले असल्यानें कोणच्याही धर्माच्या मनुष्यास घेण्यास हरकत नाहीं. आजान्याच्या अंगांत ताप असतांना हे औषध दिल्यापासून फारसा उपयोग होत नाहीं. पण हिंवाची पाळी येण्यापूर्वी दोन तास अगोदर अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरानें वयांच्या मानानें दिले असतां हिंवाचा जोर कमी होतो. या औषधाचा उपयोग कॉलन्यांतही चांगला झाल्याचें अनेकवेळां अनुभवास आले आहे, प्रमाणः - १ वर्षाचे मुलांस एक ग्रेन लिंबाचा व आल्याचा रस समभाग घेऊन त्यांत खडीसाखरेची पूड मिसळून त्याबरोबर कोयनेल कॉलन्याच्या घेतलें असतां, त्याचा कडूपणा बराच कमी होतो. विकारांत मुलास २ ग्रेनप्रमाणे मलांत पित्त दिसू लागेपर्यंत हाणजे मलाचा रंग पिंवळा होईपर्यंत अर्ध्या अर्ध्या तासानें द्यावें. १५ सँटोनाईनः-- हें जंतावर रामबाण औषध आहे. हे बाजारांत जंताची पूड या नांवानें सर्वत्र विकले जाते. हे औषध रात्रीं निजते वेळी साखरेबरोबर अगर गुळाबरोबर द्यावें व दुसरे दिवशीं एरंडेल
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मैत्रिणीसोबत कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे गावात आज (सोमवार) सकाळी दहाच्या सुमारास अभिनव कॉलेज रोडजवळ झाला. साक्षी आप्पा बाटे (वय-19 रा. बी. समर्थनगर, गणेशनगर, धायरी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साक्षी आणि तिची मैत्रिण रागिणी बालाजी कंकुले या दोघी दुचाकीवरून नऱ्हे येथील नर्सिंग कॉलेजला जात होत्या. त्यावेळी रागिणी कंकुले ही दुचाकी चालवत होती. अभिनव कॉलेज रस्त्याने जात असताना पाण्याचा टँकर (एमएच 12 एचडी 4091) हा दुचाकीच्या पुढे चालला होता. टँकर चालकाने अचानक टँकर थांबवला. टँकर चालकाने टँकर थाबवल्याने या दोघींच्या दुचाकीला ब्रेक लागला. यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेली साक्षी ही पाण्याच्या टँकरच्या मागे पडली. त्याचवेळी टँकर पाठीमागे आला. टँकरचे चाक साक्षीच्या पोटावरून गेले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या साक्षीचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.
नवी दिल्ली : नोटांबदीनंतर पोस्ट खात्यात तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बाद झाल्यानंतर नागरिकांनी नोटा बँकात, पोस्ट खात्यात जमा केल्या. देशभरात पोस्ट खात्याचे अनेक कार्यालये आहेत. पोस्ट खात्याचे सचिव बी. व्ही. सुधाकर यांनी सांगितले की, २४ नोव्हेंबरपर्यंतच पोस्टाने ५७८ लाख नोटा बदलून दिल्या आहेत. याची किंमत ३६८० कोटी रुपये आहे. पाचशे आणि हजारच्या एकूण ३२ हजार ६३१ कोटी रुपयांच्या नोटा बदलून दिल्या आहेत. याच काळात पोस्ट आॅफिसमधून ३. ५ हजार कोटी नागरिकांनी काढले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात अनेक बँकां आणि पोस्ट आॅफिसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. पोस्ट खात्याच्या ग्रामीण भागातही अनेक शाखा आहेत. देशात मोठे जाळे असल्यामुळे नागरिकांकडून जमा झालेल्या नोटांनी तूर्तास पोस्टाची तिजोरी मात्र मालामाल झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) नोटांबदीनंतर पोस्ट खात्यात तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. नोटांबदीनंतर पोस्ट खात्यात तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.
नागपूर- भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादव यांच्या नागपूरमधील घरात चोरी झाली. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. उमेश यादव हा नागपूरमध्येच होता. तो आपल्या कुटुंबासोबत एका पार्टीसाठी बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नागपुरातील उच्चभ्रू शंकरनगर परिसरातील राहत्या घरातून ४५ हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल चोरीला गेल्याचे समजते. उमेश यादवने पोलिसात तक्रार दाखल केली असून अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही. मात्र उच्चभ्रू वस्तीत आणि खेळाडूच्या घरी चोरी झाल्याने पोलीस कसून तपास करत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा विस्तार करताना एक नवीन प्लॅन आणला आहे. 1,999 रुपये किमतीचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या JioFiber नंतर लगेच बाजारात उतरवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 33 जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. हा नवीन प्लॅन 849 रुपये/ 1,277 रुपये/ 2,499 रुपये/ 4,499 रुपये/ 5,999 रुपये/ 9,999 रुपये आणि 16,999 वाल्या या सर्व प्लॅन्सबरोबर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनचा सामना हा एयरटेल V-Fiber च्या 1,999 तसेच JioFiber च्या 2,499 वाल्या प्लॅनबरोबर राहणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रतिदिन 100 Mbps च्या वेगाने ३३ जीबी डेटा मिळणार आहे. त्यानंतर याचा स्पीड हा 4 Mbps इतका होणार आहे. यामध्ये तुम्हाला अधिक वेग मिळणार असून रिलायन्सच्या JioFiber मध्ये देखील तुम्हाला 3 Mbps मात्र बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 4 Mbps स्पीड मिळणार आहे. डेटा बरोबरच तुम्ही या प्लॅनमध्ये देशभरात कुठेही फोन लावू शकता. कंपनीच्या लॅण्डलाइनवरून तुम्ही देशभरात कुठेही फोन करू शकता. दरम्यान, या प्लॅनबरोबरच बीएसएनएलचा 1,277 रुपये आणि 2,499 रुपये किमतीचा देखील ब्रॉडबँड प्लॅन उपलब्ध आहे. मात्र जिओने नुकत्याच लाँच केलेल्या 2,499 रुपयांच्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन स्वस्त आणि सर्वात उत्तम असून यामध्ये तुम्हाला त्याच प्रकारची सेवा मिळणार आहे.
केएमटी प्रशासनाचा गलथानपणा आणि काही अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रविवारी केएमटी बसचा अपघात घडला. केएमटी प्रशासनाचा गलथानपणा आणि काही अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रविवारी केएमटी बसचा अपघात घडला. अपघातास जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत करून न्याय द्या. अन्यथा हिशोब मोजावा लागेल असा इशारा राजारामपुरीतील शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित चौधरी यांना दिला. आयुक्त चौधरी यांनी, अपघातग्रस्तांना येत्या आठ दिवसात आर्थिक मदत आणि तानाजी साठे यांच्या वारसाना सात दिवसांत महापालिका सेवेत सामावून घेतले जाईल अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. 'स्क्रॅपमधील बस रस्त्यावर धावत असून प्रवाशांचा जीव टांगणीला अशी स्थिती आहे. स्क्रॅप बस म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. प्रशासन, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की आणखी लोकांचा बळी घेणार? नागरिकांच्या संयमांचा अंत पाहू नका. काही ड्रायव्हर गॉगल घालून बेदरकारपणे बस चालवितात. त्यांना प्रशासनाने शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे' असे त्यांनी सांगितले. नगरसेवक संदीप कवाळे यांनी, अपघातानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांची मदत झाली. मात्र प्रशासनाने, नागरिकांचा संयम सुटण्याअगोदर मदतीचा हात द्यावा. अपघातातील मृत नागरिकांच्या वारसांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. शिष्टमंडळात एन. बी. कवाळे, वसंत घाटगे, अॅड. दत्ता कवाळे, सचिन कवाळे, रणजित कवाळे, कुमार दाभाडे, प्रमोद घाटगे, संतोष भंडारे, सुरेश अवघडे, विजय हेगडे आदींचा समावेश होता. 'अपघाताची घटना दुर्दैवी आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घटनेदिवशी रात्रीच घेतला. यासंदर्भात माझी महापौरांशी चर्चा झाली आहे. महापालिकेने मदतीचा शब्द दिला आहे. खास बाब म्हणून हा निर्णय झाला आहे. संबंधितांना मदत निश्चितच करू. येत्या आठ-दहा दिवसांत मदतीचा धनादेश दिला जाईल' असे आयुक्त चौधरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 'अपघातातील मृत हलगीवादक तानाजी साठे हे महापालिकेत आरोग्य विभागात नोकरी करत होते. त्यांच्या वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. सात दिवसांत त्यांच्या वारसाला नोकरी दिली जाईल' अशी ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली.
मुंबई - माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अटलजींचे मुंबईशीही अतूट नाते होते. त्यांचे स्मारक मुंबईकरांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी मुंबईत आणण्यात आला. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांना हस्तांतरित केला. तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अटलजींचा अस्थिकलश हस्तांतरित केला. दानवे व शेलार नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई येथे अटलजींचा अस्थिकलश घेऊन आले. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशांना वंदन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष खा. अमर साबळे व आ. प्रसाद लाड उपस्थित होते. सायंकाळी एनसीपीए येथे श्रद्धांजली सभा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अटलजी यांचे नेतृत्व सर्वसमावेश होते. पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी केलेले काम मोठे होते. मुंबईशी त्यांचा असलेला स्नेहबंध लक्षात घेऊन त्यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यात येईल. हे स्मारक कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत राहील, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महिन्यांपासून काँग्रेसमधील कलह समोर आले आहेत. नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या काँग्रेसमधील कलहाला आज महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली. काँग्रेसमधील असंतुष्टाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी भेट घेतली. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व करण्यास असंतुष्ट नेत्याचा विरोध नसून राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या वाढत्या प्रभावाला विरोध असल्याचे आज स्पष्ट झाले. याच मुद्यावर असंतुष्ट गटाची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर मांडली. महिन्यांपासून काँग्रेसमधील कलह समोर आले आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोडल्यानंतर अद्यापही काँग्रेसला पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष मिळालेला नाही. यामुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचा दावा काँग्रेसमधील असंतुष्ट नेते करीत आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर राहुल व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाच्या क्षमता पुन्हा अधोरेखित झाल्या. या मुद्यावरून गुलाम नबी आझाद यांनी आझाद यांनी या भेटीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कुणाचाही अविश्वास स्पष्ट नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे समजते. असंतुष्टांचा विरोध राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाला तसेच त्यांच्या भोवती असलेल्या नेत्यांना आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची निवड तसेच उत्तरप्रदेशात महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय कार्यकारिणीमध्ये चर्चा न करताच घेतल्याचे यावेळी सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हे दोन्ही निर्णय काँग्रेसला महागात पडल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाने ब्लॉक स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका घ्यावा, असा मुद्याही या चर्चेत आल्याचे सांगण्यात आले.
सोनई (नगर) - शनिशिंगणापूर येथे ३० एप्रिल या दिवशी अमावास्या यात्रेत मंदिर परिसरात यंत्रांचा सडा पडला होता. ती पायदळी तुडवली जात असल्याने त्यांचे पावित्र्य नष्ट होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यानंतर विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन पूजेच्या ताटातील नवग्रह, शनियंत्र, शिक्का आणि कलश यंत्र मंदिरात नेण्यास बंदी घातली आहे. यंत्रांवर बंदी आणली असली, तरी नाल विक्री आणि काळ्या तिळाचे तेल यांविषयीही मोठी फसवणूक होत आहे. नाल सिद्ध केलेली आहे, असे सांगून ५०० ते १ सहस्र रुपये घेतले जातात. हा निर्णय कायमस्वरूपी रहावा, असे भाविकांचे म्हणणे आहे. शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले की, बंदी घातलेल्या वस्तूंसह पूजेचे ताट ५०० ते २ सहस्र रुपयांना विकले जात होते. देवस्थानच्या या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. या वस्तू मंदिरात जाणार नाहीत, यासाठी सुरक्षा विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.
High Explosive Factory । टीम महाराष्ट्र देशाः उच्च विस्फोटक निर्मिणी (High Explosive Factory) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Recruiting) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. उच्च विस्फोटक निर्मिणी (High Explosive Factory) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा) - 10 पदे आणि सामान्य प्रवाह (पदवीधर) - 40 पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतील (High Explosive Factory) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (High Explosive Factory) दिनांक 15 मे 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे - 411003. जाहिरात पाहा (View ad) अधिकृत वेबसाईट (Official website)
घालमोडे दादा आणि संमेलनं! कोरोनाच्या ऐन भरातही 'होणार, होणार' म्हणून गेलं वर्ष-सहा महिने गाजत असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता चार दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि गेली तीन-चार दशकं पडून गेलेल्या रिवाजानुसार वेगवेगळ्या वादांनाही उधाण आलं आहे. मराठी साहित्य संमेलनात खऱ्या अर्थानं वादळ उठलं ते १९८१ मध्ये अकोला इथं झालेल्या संमेलनात. त्या वादाला पार्श्वभूमी होती ती ए. आर. अंतुले यांच्या सरकारनं साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांत हस्तक्षेप केल्याची. त्या वादाला आणखी एक झालर होती ती इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये जारी केलेल्या आणीबाणीची आणि त्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आलेल्या गदेची. राज्य सरकारतर्फे साहित्यिकांना नियमित पुरस्कार दिले जातात. त्यासाठी साहित्यक्षेत्रातीलच जुन्या-जाणत्यांची एक समिती असते आणि या समितीनं सुचवलेल्या पुरस्कारयादीत सरकार सहसा हस्तक्षेप करत नसे. मात्र, त्या वर्षी समितीनं सुचवलेल्या 'सिंहासन', 'जनांचा प्रवाहो चालला' तसंच 'लोकनायक जयप्रकाश' या अनुक्रमे अरुण साधू, विनय हर्डीकर आणि बा. न. राजहंस यांच्या पुस्तकांना पुरस्कार न देण्याचा निर्णय अंतुले यांनी घेतला आणि वादळ उठलं. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री वसंत साठे यांनी संमेलनाचं यजमानपद भूषवताना विषय नियामक समितीच्या बैठकीत कमालीचा धुडगूस घातला आणि शेवटी पुढं वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं 'इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान' स्थापन केल्याबद्दल अंतुले यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करून घेतला! त्यामुळे सत्ताधारी राजकारणी आणि साहित्यिक यांच्यातील संबंध कमालीचे विकोपाला गेले आणि त्याच वर्षी रायपूर इथं होऊ घातलेल्या संमेलनावर साहित्यिकांनी बहिष्कार टाकला. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, या संमेलनास अंतुले यांच्याबरोबरच मध्य प्रदेशाचे (तेव्हा छत्तीसगड या राज्याची निर्मिती व्हायची होती आणि रायपूर हे मध्य प्रदेशातच होतं) तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह उपस्थित राहणार होते. मात्र, काही साहित्यिकांनी या संमेलनावर बहिष्कार घालून सरकारी मदतीविना मुंबईतच मालतीबाई बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं संमेलन भरवलं आणि ते यशस्वीही करून दाखवलं तरी त्याचा रायपूरच्या संमेलनावर काहीच परिणाम झाला नाही. रायपूरला अध्यक्ष म्हणून प्रख्यात कथाकार गंगाधर गाडगीळ यांची निवड झाली होती. मात्र, अनेक लोकप्रिय साहित्यिक या संमेलनाकडे फिरकले नाहीत आणि त्याची खंत रायपूरकरांच्या मनात कायमच राहिली. मात्र, या वादाचा एक परिणाम असा झाला की, आपल्या उपस्थितीमुळे संमेलनात वादंग माजू शकतं हे लक्षात घेऊन अंतुले यांनी संमेलनाला जाणं टाळलं. मग सरकारी मदतीचा एक लाखाचा चेक घेऊन त्यांनी जयंतराव टिळक यांना तिथं धाडलं. जयंतराव तेव्हा विधान परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनीही कमालीची चलाखी दाखवली आणि व्यासपीठावर बसण्याऐवजी, आपण पत्रकार आहोत, असं सांगत त्यांनी थेट पत्रकारांमध्ये बैठक मारली! या दोन्ही संमेलनांना उपस्थित राहिल्यावर लक्षात आलं ते एवढंच की, राजकारणी तसंच साहित्यिक या वादात साहित्यिकांमध्येच दोन तट पडले आहेत. मुंबईचं समांतर संमेलन दणक्यात पार पडलं होतं खर; पण त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. या संमेलनात अभिव्यक्तिस्वातंत्र्यासंबंधात ज्येष्ठ विचारवंत प्रभाकर पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली एक परिसंवादही झाला. शिवाय, आणीबाणीत इचलकरंजी येथील संमेलन अध्यक्षपदावरून गाजवणाऱ्या दुर्गाबाई भागवत यांचंही दणदणीत भाषण झालं. बाकी, पुढं संमेलनं 'मागील पानावरून पुढे' याच रिवाजानुसार सुरू राहिली आणि त्यांची व्याप्तीही दणक्यात वाढत राहिली. . . आणि अखेरीस संमेलनांना भराडीदेवीच्या जत्रेचंच स्वरूप प्राप्त होऊन गेलं. आणीबाणीपूर्व काळात म्हणजे १९७० चं दशक उजाडण्यापूर्वी, हे वाद साहित्यिकांमध्येच झडत आणि त्यातून साहित्य-संस्कृती, तसंच कला आदी क्षेत्रांत काही नवं घडतही असे. राजकारण्यांनाही तेव्हा साहित्यिकांचा काहीसा धाक असे. मराठीभाषकांचं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची पहिलीवहिली जाहीर हाक तर १९४६ मध्ये, म्हणजे देश स्वतंत्र होण्याआधीच, बेळगाव इथं झालेल्या संमेलनात अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनीच दिली होती. ते प्रख्यात कादंबरीकार तर होतेच; शिवाय पत्रकार-संपादक म्हणूनही त्यांचा मोठा दबदबा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली ती त्यानंतरच. मात्र, आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर राजकारणी आणि साहित्यिक यांच्या नातेसंबंधांचा मुद्दा वेगळ्याच अंगानं ऐरणीवर आल्यानंतर मग धूर्त राजकारण्यांनी या संमेलनांचं यजमानपदच साहित्यसंस्थांकडून हिसकावून घेतलं! मग हीच मंडळी संमेलनं दणदणीत पद्धतीनं आयोजित करू लागली. मात्र, त्यानंतरही सरकारी मदत आणि शिवाय स्थानिक राजकारण्यांचा उदंड पैसा यांच्या जोरावरच ही संमेलनं होत राहिली. नाशकातल्या यंदाच्या संमेलनातही यापेक्षा काही वेगळं घडतंय असं बिलकूलच नाही. यानिमित्तानं महात्मा जोतिबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना दिलेल्या खणखणीत जबाबाची आठवण होणं अगदीच स्वाभाविक आहे. तेव्हा संमेलनं ही 'ग्रंथकार सभे'तर्फे भरवली जात आणि त्या संस्थेचं धुरीणत्व तेव्हा रानडे यांच्याकडे होतं. त्यांनी या संमेलनास आमंत्रित केल्यावर फुले यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रात संमेलनाची संभावना 'घालमोडे दादांचं संमेलन' अशा तिखट शब्दांत केली होती. 'ग्रंथकार सभे'ला पत्र पाठवून 'तुमची ग्रंथकार सभा उंटावरून शेळ्या वळणारी आहे. एकतेची बीजं तुमच्या साहित्यात नाहीत, तुम्ही घालमोडे दादा आहात. . . ' हे स्पष्ट शब्दांत फुले यांनी रानडे यांना कळवलं होतं. नाशकातल्या यंदाच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ हे स्वतःला महात्मा फुले यांचे पाईक म्हणवून घेतात, त्या पार्श्वभूमीवर, 'एकतेची बीजं' या संमेलनातून तरी फुलतील अशी आशा करावी काय? दुही माजवल्या जाण्याच्या सध्याच्या या काळात या बीजांची समाजाला कधी नव्हे एवढी अपेक्षा आहे.
गोंदिया : गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी ३१ ऑगस्टच्या रात्री ११ वाजता ते १ सप्टेंबरच्या सकाळी ५ वाजता या सहा तासाच्या काळात राबविलेल्या 'ऑपरेशन ऑल आऊट' या उपक्रमात घातकशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या कारवाईत आवेश कन्हैयालाल चतरे (२१) रा. शीतला माता चौक बाजपाई वॉर्ड गोंदिया याचा समावेश आहे. आवेश याला १ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजता सिंगलटोली परिसरातून घातक हत्यारासह अटक करण्यात आली. तर रोहित कैलाश सोनवाने (२०) रा. पिंडकेपार रोज बजाज वॉर्ड गोंदिया याला पहाटे २. ३० वाजता भीमनगरच्या बौध्द विहारामागील परिसरात अटक करण्यात आली. त्या दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अन्वये गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदिया शहर पोलिसांनी ३१ ऑगस्टच्या रात्री ऑपरेशन ऑल आऊट राबविले. या ऑपरेशनमध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ३४ सराईत गुन्हेगार तपासण्यात आले. गोंदिया शहर ठाण्यातील सर्व हॉटेल, लॉज, बँकांचे एटीएम, मंदिर, पुतळे तपासून समन्स व वारंट तामील केले. गोंदियाच्या जयस्तंभ चौकात आणि भवानी चौकात नाकाबंदी करून वाहन तपासण्यात आली. काही वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या ऑपरेशन मुस्कान दरम्यान एका दारू विक्रेत्याला पकडण्यात आले. तर संशयित हालचाली करणाऱ्या एकाला पकडण्यात आले. 'ऑपरेशन ऑल आऊट' हे उपक्रम पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, रामभाऊ व्होंडे, महादेव सीद, महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार, सहाय्यक फौजदार घनश्याम थेर व गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील ४५ कर्मचाऱ्यांनी पार पाडले.
हैद्राबाद : हैद्राबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत तक्रार दाखल केली होती. सीबीआयने आयव्हीआरसीएल कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई.सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर.बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयव्हीआरसीएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी असून गेल्या २५ वर्षांपासून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आरोपींनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बँकांकडून क्रेडिट लिमिटचा लाभ घेतला आणि कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली,असा आरोप स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या तक्रारीत केला आह. आरोपींबरोबर काही अज्ञात सरकारी कर्मचारीही या फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याचेही स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. फसवणूक केलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. सर्व बँकांना मिळून ४,८३७ कोटींची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर.जी.कौर यांनी दिली आहे. कंपनीने लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून संबंधित लोकांना पैसे दिले. यावेळी खरेदी व्यवहारांची नोंद न करता कंपनीच्या खात्यात हा निधी जमा केला आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला,असे तक्रारीत म्हटले आहे.सीबीआयकडून बुधवारी यासंबंधी आरोपींच्या कार्यालय आणि घरांवर छापे टाकून काही कागदपत्रेही जप्त केली आहेत.
बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोडणी कामगार महिलांना गर्भाशये का नाहीत? अशा मथळ्याखाली चेन्नईच्या 'The Hindu' या वृत्तपत्रात एक वृत्तांत प्रसिद्ध झाला. त्याचा सारांश असाः मराठवाड्यातील दुष्काळी भागात दुष्काळ ज्या प्रमाणात असेल तेवढ्या कमीअधिक प्रमाणात कुटुंबे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. मुळात ठिकठिकाणच्या ऊसशेतीमधील ऊस तोडून तो कारखान्यात गाळण्यासाठी व साखर बनवण्यासाठी नेऊन दिला जातो तो कारखान्याच्या ठेकेदारांमार्फत. हे ठेकेदार गावागावत जाऊन ऊसतोड कामगार गोळा करतात व त्यांना उचल देऊन पुऱ्या हंगामात काम करून घेण्यासाठी बांधून ठेवतात. हंगाम साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. नवरा- बायकोचे मिळून कामगार म्हणून एक युनिट ठरवले जाते. एका जोडप्याला एक टन ऊस तोडण्याचे अडीचशे रुपये मिळतात. दोघांकडून चार-पाच महिन्यांत साधारणपणे तीनशे टन ऊस तोडला जातो. दोघांपैकी एकाने जरी एक दिवसाची सुट्टी घेतली तर मुकादम पाचशे रुपये दंड आकारतो. त्या जोडप्याची वार्षिक कमाई आणि उत्पन्न ऊसतोडणीच्या हंगामात जी काही असेल तीच असते. त्यामुळे त्यांना सुट्टी घेणे परवडत नाही. स्त्रीची मासिक पाळी महिन्यातून साधारणपणे एक वेळा किंवा कधी दोन वेळा येत असल्याने तशा महिला महिन्यातून साधारण दोन ते तीन दिवस तरी काम करू शकत नाहीत. मासिक पाळीमध्ये महिलांची गैरसोय अतिशय होते. ती कुटुंबे ऊसतोडणीच्या ठिकाणी पाले ठोकून राहत असतात. त्यांना संडास-बाथरूमची सोय नसते. शिवाय रोजगार तर बुडतो आणि वरून दंडही भरावा लागतो. त्यामुळे अनेक महिला त्यांची ऑपरेशन करून घेऊन गर्भाशये काढून टाकतात. वंजारवाडी गावात पन्नास टक्के महिलांनी गर्भाशये काढल्याचे आढळून आले आहे. अकाली गर्भाशय काढून टाकले तर त्याची भयानक किंमत त्या गरीब महिलांना चुकवावी लागते! हार्मोनल असंतुलन, मानसिक त्रास, डिप्रेशन, हातापायांची आग होणे, वजनात वाढ/घट, लठ्ठपणा असे अनेक त्रास उद्भवतात. महिला सांगतात, की "त्याव्यतिरिक्त महिलांचे लैंगिक शोषणसुद्धा होते". एखाद्या वस्तीवर जर लग्न असेल तर ऊसतोड कामगार जोडपे हातातील ऊसतोडणीचे काम सोडून त्या लग्नाला अक्षरशः पळत जातात. कारण त्यांना तेथे गोडधोड खाण्यास मिळते. त्यांना रोजचे हजार-दोन हजार रुपये मिळतात, तरी त्यांना ते खर्च करता येत नाहीत. कारण त्यांना त्या गंगाजळीवर पुढील वर्ष काढायचे असते. मी हा वृत्तांत समाजमाध्यमात मराठीत मांडल्यावर अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यावर भाष्य केले. त्यांनी ऊसतोड मजुरांच्या बायकांची स्थिती सांगितली. "ऊसाची शेती करून आणि ऊसाचे कारखाने काढून ज्यांनी अमाप कमावले अशा लोकांना मजुरांशी देणेघेणे काही नाही. बीडमध्ये तर 'महिलाराज' चालते! म्हणजे बीडमधील राजकीय सत्ता आणि सूत्रे महिलांच्या (मुंडे भगिनी) हाती आहेत. तरीही त्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. त्या विषयाला समाजातही गंभीर अशी वाचा फुटलेली नाही. नगर जिल्ह्यातील राजकारण ऊसावर कसे तापवले जाते ते तर सर्वश्रुत आहे! पण ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तेथील विद्यमान नेत्यांनी विचार केलेला नाही". ते पुढे असेही म्हणाले, की निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर-अकोले, राहाता, श्रीरामपुर या तालुक्यांतील दुष्काळी भागांसाठी आहे. ते जर तालुक्यातील दुष्काळी खेडी आणि पारनेर-बीड-पाथर्डी या कोरड्या रखरखीत तालुक्यांत फिरवले तर तो सारा भाग सुजलाम सुफलाम होऊन जाईल, पण प्रवरानगर व परिसरातील इतर साखरकारखाने तसे होऊ देणार नाहीत, कारण मग त्यांच्या संपन्नतेत भाग तयार होतील आणि त्यांचे महात्म्य संपून जाईल. त्यांचा सवाल आहे, सुप्रीम कोर्टात मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून याचिका दाखल करू पाहणारे लोक ऊसतोड कामगारांच्या गरीब बायकांच्या हलाखीवर का कधी बोलत नाहीत? देवळादेवळांत जाऊन ठाण मांडून बायकांसाठी तथाकथित न्याय मागणारी तृप्ती देसाई का कधी अशा गरीब बायकांच्या प्रश्नावर लढताना दिसत नाही? त्याचा अर्थ देवळे फक्त त्यांची Soft Political Target प्राप्त करण्यासाठी लागतात! बायकांच्या हक्कांविषयी त्यांना घेणेदेणे नाही. बायकांच्या पाळीचा प्रश्न हा काय मंदिर प्रवेशापुरता मर्यादित आहे का? त्या मंदिरामध्ये गेल्या- नाही गेल्या तर मासिक पाळीच्या वेदनेत फरक पडणार आहे का? बायकांना ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड्स मिळत नाहीत, पाळीच्या त्रासासाठी संतती नियमनाच्या गोळ्या सर्रास दिल्या जातात. पाळीच्या दुखण्यावर उपाययोजना नसते, त्यावर कधी कोणाला भूमिका घेताना पाहिले आहे? जर पोटासाठी बाईला तिचे गर्भाशय काढण्याची वेळ येत असेल, तर सुप्रीम कोर्टात एक काय हज्जारो याचिका दाखल केल्या तरी संविधानातील सामाजिक न्याय अस्तित्वात येऊ शकत नाही. तो फक्त ऊसतोडणी मजुरांचा प्रश्न नाही. तो समाजातील हर एका घटकाचा प्रश्न आहे.
...अन् नेटकरांनी रेणुका शहाणेला विचारलं तुझा नवरा किती शिकलाय? अभिनेत्री रेणुका शहाणे ट्विटरवर फार सक्रीय असतात. चालू घडामोडींवर त्या सोशल मीडियामार्फत व्यक्त होत असतात. मुंबई, 6 मे- सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. एकीकडे प्रत्येक पक्ष आपणच किती चांगले आहोत हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत तर दुसरीकडे कलाकार मंडळीही ठराविक एका पक्षाचं खुलेपणाने समर्थन देताना दिसत आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा दिसते. प्रत्येकजण आपली मतं आणि विचार ट्विटर, फेसबुकवर शेअर करत निवडणुकांच्या रणधुमाळीत सहभागी होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे ट्विटरवर फार सक्रीय असतात. चालू घडामोडींवर त्या सोशल मीडियामार्फत व्यक्त होत असतात. आताही काहीसे असेच झाले. अभिनेता अनुप सोनी यांनी ट्विटरवर आपलं मत शेअर करत म्हटलं की, 'मला खरंच असं वाटतं की निवडणुकांसाठी उभं राहणाऱ्या उमेदवाराचं किमान शिक्षण असणं आवश्यक असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटत?' अनुप यांच्या या प्रश्नावर अनेक नेटकऱ्यांनी आपआपली मतं दिली. यात रेणुका यांनीही आपलं मत देताना म्हटलं की, 'मला हा मुद्दा फारसा पटला नाही. शिक्षणाने अक्कल, चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा येतोच असं नाही. मी अशा अनेक लोकांना ओळखते जे उच्च शिक्षित आहेत. पण ते दुराचारी, जातीयवादी आणि मतभेद करणारे आहेत.' रेणुका यांचं हे उत्तर काहींना पटलं तर काहींनी तिला उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर मी भगवी साडी नेसले तर मी 'साध्वी स्वरा भास्कर' होईन का? द सेक्युलर या नावाच्या ट्विटर अकाउंटवर रेणुका यांना तुमचा नवरा किती शिकलाय असा प्रश्न विचारण्यात आला. रेणुका या नेटकरांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी ओळखल्या जातात. या प्रश्नाचं जसंच्या तसं उत्तर देत त्यांनी अभिनेते आशुतोष राणा आणि त्यांचं स्वतःचं संपूर्ण शिक्षण ट्विटरवरच सांगितलं. रेणुका म्हणाल्या की, 'माझ्या नवऱ्याने मध्यप्रदेशच्या सागर विद्यापिठातून बीए केलं असून दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून एमए केलं आहे. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून मी सायकॉलॉजीमध्ये पदवी घेतली असून मुंबई विद्यापिठातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एमए केलं आहे.' सध्या रेणुका शहाणे यांचं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत असून यापुढए रेणुका यांना उलट प्रश्न विचारताना नेटकरांना १० वेळा विचार करावा लागेल हे मात्र नक्की.
मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवताना बलाढ्य रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेटनी लोळवले. मुंबईने एकूण ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. कर्णधार रोहित शर्माच्या चमकदार अर्धशतकानंतर जोस बटलर आणि विध्वंसक किरॉन पोलार्ड यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवताना बलाढ्य रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेटनी लोळवले. मुंबईने एकूण ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या शानदार सामन्यात बँगलोरने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने १८ षटकांतच ४ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. रोहितने ४४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावा फटकावल्या. अंबाती रायुडूनेही ३१ धावांची खेळी केली. रोहित-रायुडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला. इक्बाल अब्दुल्लाने रायुडूला बाद करून ही जोडी फोडली. मात्र, यानंतर बटलर आणि पोलार्ड यांनी चौफेर फटकेबाजी करताना बँगलोरच्या आव्हानातली हवा काढली. बटलरने १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. तर, पोलार्डने केवळ १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ३९ धावांचा विजयी तडाखा दिला. अब्दुल्लाने (३/४०) मुंबईला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहली व धडाकेबाज एबी डिव्हिलीयर्स यांच्या जोरावर बँगलोरने आक्रमक सुरुवात केली. मात्र, कृणाल पंड्याने एकाच षटकात या दोघांना बाद करून बँगलोरला कोंडीत पकडले. मात्र, अखेरच्या क्षणी ट्राविस हेड व सर्फराझ खान यांनी केलेल्या वेगवान ६३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर जोरावर बँगलोरने मुंबईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान उभे केले. हेडने २४ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या, तर सर्फराझने १८ चेंडूंत २८ धावांचा तडाखा दिला. मुंबईकडून बुमराह (३/३१) व कृणाल (२/२७) यांनी चांगला मारा केला. > धावफलक : रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली झे. साउदी गो. कृणाल पंड्या ३३, लोकेश राहुल झे. हरभजनसिंग गो. मॅक्लेनघन २३, एबी डिव्हिलीयर्स यष्टीचीत (पटेल) गो. हार्दिक पंड्या २९, शेन वॉटसन झे. पटेल गो. बुमराह ५, ट्रॅव्हिस हेड धावबाद (हरभजन/पटेल) ३७, सर्फराझ खान झे. कृणाल पंड्या गो. बुमराह २८, स्टुअर्ट बिन्नी घे. हार्दिक पंड्या गो. बुमराह १, हर्षल पटेल नाबाद ०, केन रिचर्डसन नाबाद १; अवांतर : १३; एकूण : २० षटकांत ७ बाद १७०; गडी बाद होण्याचा क्रम : १/३२, २/९१, ३/९३, ४/९९, ५/१६२, ६/१६९, ७/१६९; गोलंदाजी : टीम साउदी ४-०-२५-०, मिशेल मॅक्लेनघन ४-०-४६-१, जसप्रीत बुमराह ४-०-३१-३, हरभजनसिंग २-०-२०-०, कृणाल पंड्या ४-०-२७-२, हार्दिक पंड्या २-०-१८-०. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. डिव्हिलीयर्स गो. इक्बाल अब्दुल्ला ६२, पार्थिव पटेल झे. डिव्हिलीयर्स ५, अंबाती रायुडू झे. रिचर्डसन ूगो. इक्बाल अब्दुल्ला ३१, जोस बटलर झे. वॉटसन गो. इक्बाल अब्दुल्ला २८, किरॉन पोलार्ड नाबाद ३९, हार्दिक पंड्या नाबाद २; अवांतर : ०३; एकूण : १८ षटकात ४ बाद १७१; गडी बाद होण्याचा क्रम : १/६, २/८२, ३/१०९, ४/१४०; गोलंदाजी : वरुण अॅरॉन ४-०-३७-०, केन रिचर्डसन ३-०-२६-१, शेन वॉटसन ४-०-४०-०, हर्षल पटेल २-०-२०-०, इक्बाल अब्दुल्ला ४-०-४०-३, स्टुअर्ट बिन्नी १-०-८-०.
निम्म्याहून जास्त एक शतक संबंधित विश्वास बसणार नाही इतका मोहक एक छोटी परी राहते. आकर्षक स्त्री धाटणी तसेच शक्य एक स्त्री चेहरा सुंदर ओव्हल, तो मोहक मोहिनी तेही प्रतिमा देते भर. Mowing मिळालेल्या एक उशिर विचित्र नाव अपघात आहे. ब्रिटिश पौराणिक, त्यामुळे fairies आणि पर्या सारखा असणे की लहान प्राणी म्हणतात. या आकर्षक वर्ण जसे एक छोटी परी धाटणी, खूप सुंदर आणि उद्धट दिसते. Hairdressers आणि एक छोटी परी टीप निवडा जो या अनेक फायदे महिला लहान hairstyle. - आर्थिक अडचणीत आलेल्या व्यवसायातील फार पटकन केले जाते. तो पुरेशी परंपरागत शैली एजंट आहे. - कारण लहान केस काळजी करणे सोपे आहे. - एक छोटी परी धाटणी उन्हाळ्यात साठी विशेषतः चांगला आहे. - सर्व केस प्रकार योग्य, हेअरस्टाईल. - pixies सह सतत नवीन प्रतिमा अप येऊ शकता. - लहान केस एक स्त्री अधिक तरतरीत आणि स्वतः ची विश्वास करते. - Hairstyle त्यांच्या पेक्षा जास्त वर्षे लहान दिसत मदत करते. तसेच एक सुंदर, हेअरस्टाईल काही शुद्धीत आहे. ही वैशिष्ट्ये ब्युटी सलून जाण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. - लहान एक छोटी परी पूर्णपणे चेहरा उघडते. हे आपल्या मेकअप नेहमी परिपूर्ण असावे याचा अर्थ असा की. - केस एक केशरचनेचा एक गोळा जाऊ शकत नाही. - एक छोटी परी धाटणी लहान केस व्यवस्थित आणि फक्त घडवली निरोगी केस फॅशनेबल दिसते. प्रत्येक दिवस आपले केस धुवा लागेल तयार व्हा. - एक छोटी परी सतत अद्ययावताची आवश्यकता आहे. केशभूषा भेट द्या नियमितपणे करणे आवश्यक आहे. - लहान केस एक छोटी परी योजना मोहॉक सह (फोटो आपण पुनरावलोकनासाठी मध्ये पाहू शकता, जे) किंवा मुंडण मंदिरे उत्तम प्रकारे बदल घाबरत नाही कोण आहेत मुली प्रतिमा पूरक आहेत. एक छोटी परी या प्रकारची पुरुष शैली मध्ये पोषाख खूप सुंदर लिंग, आणि रोमँटिक स्वरूप भागविण्यासाठी. - कठोर व्यवसाय महिला अनेकदा एक लहान सीमा एक, हेअरस्टाईल निवडा. Hairstyle, जास्तीत जास्त उघडण्याच्या कपाळ, उत्तम प्रकारे चष्मा सुती मिश्रित. - लांब bangs सह एक छोटी परी - हा सर्वात लोकप्रिय पर्याय धाटणी आहे. ती थोडा खर्चिक दिसते, पण तो अगदी 35 वर्षे जुने महिला योग्य आहे. hairdressers म्हणू म्हणून एक छोटी परी धाटणी मनाने समान आहे. त्याचे मुख्य फरक दुर्घटना एक हलकीफुलकी आणि जास्त स्पष्टता आणि मृत्यूनंतर नसतानाही दिसून येते आहे. मंदिरे येथे सी, अतिरिक्त लांब केले जातात बाजू लहान बाहेर क्लिप. योजना त्यानुसार समान कान, खुल्या राहते. तज्ज्ञांच्या मते, गुप्त नाही त्याच्या योग्य प्रतिष्ठापन खूप छोटी परी परिपूर्ण mowing आहे. निरोगी तसेच groomed केस, ती अत्युत्कृष्ट दिसते. त्यामुळे, आपण लहान स्वारस्य एक छोटी परी धाटणी आहेत केस? कापून कसे? च्या चौकशी द्या. एक शॉर्ट कट एक छोटी परी तयार करण्यासाठी, hairdressers एक मल्टि-थर तंत्र वापरा. पावले विचार कराः - सर्व केस सुबकपणे परत combed. - कान शीर्षस्थानी डोके मध्यवर्ती बिंदू पासून radial, दुरावा करू. - पुढे, केस तिरपे वियोग विभागली पाहिजे. आम्ही त्यांना वेगळे करण्याचा हा डाव, त्याच्या मंदिरात radial, दुरावा पुढे करणे आवश्यक आहे. - व्यक्ती कान मागे हलक्या दुरूस्ती धरा. - योग्य कोन येथे केस विंचर. - केस लांबी परत कमी जेणेकरून एक छोटी परी कट वस्तरा असावा. - नियंत्रण लॉक अनुसरण, चेहरा आणि दुरूस्ती केस लहान पॅच संकलन, कट करणे सुरू करणे आवश्यक आहे. - डोके वक्रता क्षेत्रात आणखी एक radial विभाग एक वेगळे आणि काटकोन येथे कट करणे सुरू करणे आवश्यक आहे. - प्रत्येक नवीन विभाग त्याच्या डोक्यावर मागे इच्छित वॉल्यूम निर्माण, मागील एक अग्रेषित करणे आवश्यक आहे. - विरुद्ध बाजूस समान गोष्ट पुन्हा. - शिल्लक तपासून पहा, तो एक radial विभाग करण्यासाठी डोके परत मध्यभागी विरुद्ध बाजूला असणे आवश्यक आहे. - आपण आता केंद्रीय वियोग परत येऊ शकता. - , एक मोठा आवाज मिळवत त्याच्या त्रिकोण पेटला. - हेअर त्यांच्या नैसर्गिक वाढ दिशेने combed पाहिजे. - बिंदू कट कट पाहिजे. केंद्र, बोट आणण्यासाठी कोनातून प्रारंभ होत आहे. - एक गोलाकार मोठा आवाज करा. - फ्लॅट कंगवा वापर करून शॉवर कोरड्या. - मोठा आवाज softer ओळ करण्यासाठी, ते सरकता कट उपचार करणे आवश्यक आहे. - एक बिंदू तपशील खर्च कट. - सर्किट डोक्याचा किंवा कवटीचा मागील भाग साफ. लहान केस अतिशय सुंदर एक छोटी परी धाटणी तो देखील तोटे आहेत. आपण प्रतिमा बदलू ठरविले करण्यापूर्वी, तो केस सतत अद्यतन करणे आवश्यक आहे असे समजले पाहिजे. एक धाटणी न्हावी मालक मासिक आधारावर लागेल उपस्थित राहा. तसेच लहरी, हेअरस्टाईल झाले अभाव सहन करणार नाही. योग्य प्रतिष्ठापन केस पोताच्या सी वाटप आहे. आपले केस shampooing नंतर फळे एक लहान रक्कम लागू करण्यासाठी आवश्यक आहे. हे केस इच्छित खंड होईल. ड्राय केस असावी, सेवकाने नमन. वैयक्तिक सी, पिसे सहज अशा रागाचा झटका किंवा जेल म्हणून झाले उत्पादने वापरून केले जाऊ शकते. जटिल रचना एक स्त्री त्याचे फायदे महत्व देणे, आपला चेहरा प्रमाणात सह "प्ले" करण्याची परवानगी देते. दुर्घटना tousled, लांब, गुळगुळीतः बॉक्स अत्यंत विविधतापूर्ण आहेत slanting धावा. लहान केस साठी एक छोटी परी धाटणी, एका बाजूला ठेवले, फॅशनेबल आणि तरतरीत दिसते. एक, हेअरस्टाईल तयार करा खूप सोपे आहे. आपले केस धुतल्यानंतर एक हेअर ड्रायर वापर करणे आवश्यक आहे. कोरडे दरम्यान, केस एका बाजूला combed पाहिजे. केस हळूहळू अप वाळवा आणि परिणाम इच्छित स्थानावर असेल. शेवटी, तो केस लेप शिडकावा शिफारस केली आहे. एक छोटी परी धाटणी मुली नियमितपणे केस हालचाल करेल. हे करण्यासाठी, विविध शैली वापरा, केस केस पिंजारलेले देखावा देणे भयभीत होऊ नका. धाटणी मुख्य फायदे एक - त्याच्या परिपूर्ण संशयाव आहे. हा सहसा पातळ केस असलेल्या महिला निवडा. उत्तम प्रकारे शैली अशा केस लहान haircuts एक छोटी परी. सर्व दिवस केस ठेवणे आकार देते. आक्रमक स्वरूपाचा सर्व वयोगटातील महिला सुंदर दिसते. वर्षे धन्यवाद एक छोटी परी मध्ये स्त्रिया अधिक ताजा दिसत. अशा केस खूप तरुण beauties फक्त आकर्षक आहेत. फार मोठी चेहरा मालक विशेषतः चांगला pixies मोठे डोळे आणि गोंडस ओठांनी, आणि सुव्यवस्थित cheekbones स्पष्ट ओळ. तसेच एक छोटी परी धाटणी लहान केस साठी, जे एक फोटो सर्वेक्षण सादर केले आहेत, तो ओव्हल चेहऱ्यावर चांगले दिसते. या प्रकरणात आपण एक लहान व्यवस्थित bangs एक छोटी परी निवडू नये. एक व्यक्ती एक चौरस असल्यास, केशभूषा एक वाढवलेला bangs, कपाळ ओळ पांघरूण, चेहरा हळूहळू बसणे करेल करण्यासाठी सल्ला होईल. या चेहर्याचा वैशिष्ट्ये कमी होईल. सी ग 'ची बाधा की एक गोल चेहरा महिला एक छोटी परी स्टॅक शिफारस केली आहे. अंध गोलाई मदत bangs, त्याच्या बाजूला ठेवले लपवून ठेवून. bangs सह एक छोटी परी धाटणी - या विविध केस रचना सारखेच सुंदर दिसते आहेत त्या अष्टपैलू hairstyles एक आहे. तो दाट जाड आणि कठीण, आणि दुर्मिळ, पातळ केस म्हणून चांगले आहे. तंत्रज्ञान स्टॅकिंग फक्त भिन्न आहे. या hairstyle नागमोडी केस अगदी महिला निवडले आहे. लहरी कुरळे केस आश्चर्यकारक दिसते. थोडक्यात, एक छोटी परी धाटणी कुरळे केस आणि राखाडी वस्तुमान बाहेर उभे अजिबात संकोच करू नका कोण चंचल स्वभावाचा शूर महिला उत्तम गुळगुळीत. अशा प्रकारच्या पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यास घाबरत नाही आहे. फायदेशीर तसेच अंमलात धाटणी, चांगला वैशिष्ट्ये महत्व लहान flaws लपविण्यासाठी. एक छोटी परी आपल्या प्रतिमा नीरस होऊ शकत नाही. या hairstyle त्यांची ओळख उघड कोणत्याही स्त्री मदत होईल. महिला लहान केस साठी एक छोटी परी धाटणी मंदिरे येथे लॉक प्रयोग करीता परवानगी देतो. त्यांना इच्छित लांबी करून देणे, तो कान आणि cheekbones लपवू करणे शक्य आहे. अमर्याद तज्ञ प्रेमी साठी मंदिरे किंवा डोके नमुना मागे मार्गदर्शन. हा पर्याय जोरदार असामान्य, तसेच एक मुंडण व्हिस्की सह अभाव दिसते. मूळ लहान केस एक छोटी परी लहान केस दररोज पोशाख नाही फक्त चांगला आहे. योग्य प्रतिष्ठापन हे उत्सव एक अद्वितीय प्रतिमा भाग होईल. ग्लॅमर आणि डोळ्यात भरणारा एक छोटी परी आश्चर्यकारक असेल त्याच्या पूरक तरतरीत सुटे द्या. अधिक आकर्षक प्रतिमा चष्मा, रेशीम स्कार्फ् चे अवरुप किंवा लहान कॅप करेल. एक छोटी परी अधिक नेत्रदीपक करण्यासाठी, तज्ञ किंवा हायलाइट्स रंगाची पूड रिसॉर्ट शिफारस करतो. मनोरंजक छटा दाखवा देखावा आपल्या ब्राइटनेस चढ देणे आणि इतर दृष्टीक्षेपात कौतुकाच्या नजरा आकर्षित करता येईल. आम्ही एक छोटी परी करण्यात सक्षम आहेत म्हणून - या त्या haircuts, स्त्रीत्व सह केस एकूण एकत्र व्यवस्थापित एक आहे. या hairstyle प्रतिष्ठापन करणे सोपे आहे. आपण कोणत्याही प्रतिमा अश्या, शास्त्रीय आणि आघाडीचे गार्डे मदत करते.
(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही) प्रथम श्री. सोनावणे अॅड. अनिल परब : सभापती महोदया, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्यानुसार या सभागृहाचे वेगळे स्थान आहे. या सभागृहात भाषण करताना भाषा कशी असावी याचे नियम आहेत. संकेत आहेत. भाषण करताना भाषा आक्रमक असण्यास काहीच हरकत नाही, परंतु नेमकी भाषा कशी असावी याचा आपल्याकडे अलिखित ढाचा आहे. त्या ढाच्याच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधी बाजूच्या लोकांना जाता येत नाही. जर सभागृहात चुकीची भाषा वापरली असेल तर सन्माननीय सदस्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास काही हरकत नाही. आमच्याकडून चूक झाल्यानंतर आम्ही सुद्धा अनेक वेळा दिलगिरी व्यक्त केलेली आहे. सन्माननीय सदस्य श्री.गोपिचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यास हा विषय संपून जाईल. मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी भाषण करताना आपल्या भाषेवर संयम ठेवावा. सन्माननीय सदस्य श्री.गोपिचंद पडळकर यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्याप्रकरणी एका शब्दात दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपून टाकावा. श्री.गोपिचंद पडळकर : सभापती महोदया, माझ्या बोलण्यातून अनवधानाने या सभागृहात काही चुकीचे वक्तव्य उच्चारले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु माझ्या तशा कोणत्याही भावना नव्हत्या. या संपूर्ण विषयात गुन्हेगार ठरविण्याचे अधिकार हे न्यायालयाला आहेत एवढेच मी बोललो होतो. तरी सुद्धा जर माझ्याकडून काही चुकीचे भावना पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. सभापती महोदया, नियम २६० च्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो
बोईसर, लग्नसराईसाठी मोठ्या विश्वासाने दागिने बनविण्यास दिलेल्या सराफाने अनेक ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार बोईसरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणार्या सराफाविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील लग्न ऐन तोंडावर आले असताना सोन्याचे दागिने बनविण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालणार्यांच्या पोटात या फसवणुकीमुळे मात्र अक्षरक्षः गोळा आला आहे. बोईसर शहरातील एसटीबस स्टँडजवळील पिंकल ज्वेलर्सचा मालक ललित सोनी हा आपले दुकान बंद करून ८ मार्च रोजी कुटुंबासहीत अचानक गायब झाला होता. दुकान आणि घराला दोन-तीन दिवस टाळे लावून ज्वेलर्स अचानक गायब झाल्याने लग्नसराईत दागिने बनविण्यासाठी आगाऊ पैसे जमा केलेले अनेक ग्राहक यामुळे हवालदिल झाले होते. या प्रकरणी वर्षा वसंत पाटील,सुभाष वामन गवळी,कल्पेश विलास गवळी,वनश्री विकास घरत आणि संगम सेवक सासे या फसवणूक झालेल्या ग्राहकांनी बोईसर पोnrस स्टेशन येथे धाव घेऊन ललित सोनी या ज्वेलर्सविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीच्या आधारे बोईसर पोलिसांनी ज्वेलर्सशी संपर्क साधून पोलीस स्टेशनला बोलावून त्याचा जबाब नोंदवला होता. यामध्ये ग्राहकांकडून घेतलेले सोन्याचे दागिने आणि आगाऊ पैसे घेऊन फसवणूक केल्याचे मान्य करीत ज्वेलर्सने लवकरात लवकर सर्व दागिने किंवा पैसे परत करण्याचे कबूल केले होते. मात्र याला दोन महिने होऊन सुद्धा तसेच वारंवार आश्वासन देऊन ही पिंकल ज्वेलर्सचा मालक ललित सोनी याने दागिने किंवा पैसे परत करण्यास असमर्थता दाखविल्याने अखेर त्याच्याविरोधात बोईसर पोलीस स्टेशन येथे कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । रायगडच्या वादग्रस्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडातील दरड दुर्घटना दरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जबाबदारपणे परिस्थिती हाताळली नसल्याचा आरोप करीत राज्य शासनाने कारवाई करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शासनाकडे केली होती. तसेच त्यांच्या कारभारावर कृषीवलने मोठया प्रमाणावर टिका केली होती. त्यामुळे कार्यकाळ पुर्ण होण्यापूर्वीच निधी चौधरी यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. निधी चौधरी यांची नियुक्ती मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे.
धुळे : नवरात्रोत्सवातील महत्त्वाचे पर्व समजल्या जाणाऱ्या महाअष्टमीदिनी रविवारी खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरात नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. आठ जोडप्यांच्या हस्ते आहुती देण्यात आली. अष्टमीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दिवसभरात खान्देशसह राज्यातील व परराज्यातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. एकवीरादेवी मंदिरात अष्टमीला सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत होमहवन, नवचंडी यज्ञ, पूर्णाहूती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य भाविकांनी मंदिराच्या आवारात चक्रपूजा केली. त्यासाठी सर्व आबालवृद्ध भाऊबंद एकत्र आले होते. पौराहित्य प्रदीप अंबादास जोशी, धनंजय भंडारी यांच्यासह ११ ब्रह्मवृंदानी केले. यावेळी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, कार्यकारी अध्यक्ष मधुकर गुरव, यांच्यासह मनोहर गुरव, चंद्रशेखर गुरव, भरत देवळे, दत्ता शिंदे निलेश गुरव, नंदलाल गुरव आदी उपस्थित होते. या दिवशी दर्शनाचेही महत्त्व असल्याने भाविकांची गर्दी झाली होती. चोख बंदोबस्तामुळे गर्दी असतांनाही सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला . दरम्यान शहरातील संतोषी माता मंदिर, कालिका माता मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली होती. सोमवारी महानवमीनिमित्त मंदिरात सकाळी १० वाजता सुवासिनी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच विजयादशमी उत्सव देखील साजरा करण्यात येणार आहे.
दिनचर्या श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन भेट घेणार सबब बडेसाहेब काझी यास त्याणीं बोलावून नेऊन त्यांस विनंती करण्याविसई सांगितले आपण मान्य थोर आपलेकडे प्रथम खाशापैकी कोणी यावे म्हणोन सांगितले त्याप्रो काझीनी विनंती केली सबब बाळकृष्णराव x x x लागू यास आज प्रातःकाळी पाठविले होते त्याप्रमाणे अस्तमानी पिरजादे येऊन आपासाोस भेट्न दुधा केला. छ. २४ रबीलावल फाल्गुन व ॥ १० भृगुवासर मु. सिरटी प्रातःकाळी नारायणाचार्य व रामचंद्र ज्योतिषी रमल जाणणारे गंगातीरकर असे आले होते. त्याणी एक दोन शकून पाहिले दोन तीन घटका बसले होते व गोविंद हरी बिनीवाले याचे हात कागदावर छापून घेऊन गेले उदईक लक्षणे बघून सांगतो म्हणोन बोलले दुपारी परचुरे याचे घरी स्वारी भोजनास गेली होती स्वारीतील सर्व लोक बारगीर शिलेदार यास जेवणाचा बेत किल्ल्यातील पागेत केला होता जेवणें होऊन. विडे नाच होऊन आपासो यांस मुजरा करून ठिकाणास गेले नंतर कुसलापूर येथील लोखंड करणार आणविले होते त्याजकडून भट्टी लावून अस्तमानी भट्टी दोन घटका रात्रीस उतरून लोखंड जाहलेले सर्वत्रांनीं पाहिले सिरटीलगत तीन कोसावर गोजनूर गांव आहे त्या गांवालगत डोंगर आहे त्या डोंगरात वाघ आला होता त्यास गांवकऱ्यानी मारून त्याचे कातड्याचे भोत करून बिदरहल्लीस आणिला होता तसा आणखी वाघ येऊन कांहीं माणसे मोडली म्हणोन वर्तमान आले त्यावरून उद्या दोन घटका दिवसास शिकारीस जाण्याचा बेत तात्यासाोचा केला आहे स्वारीबरोबर बरकंदाज व करोल वगैरे शेदोनास ताकीद केली आहे. छ. २५ रबिलावल फाल्गुन व ॥ ११ मंदवार मु. सिरटी. तात्यासाहेब व भाऊसो शिकारीकरिता गोजनूरास गेले मागून चार घटकांनी आपासाो स्वारी गेली सारा डोंगर पिटला व बार काढले परंतु वाघाची चाहुल कोठे लागली नाहीं एक दोन ससे उठले त्यास मारून आणले तात्यासाहेब यास वाघ मारावयाची हौस मोठी. छ. ६ रबीलाखर बुधवार मु. सिरटी देसाई यांस वस्त्रे दिऊन निरोप दिला नंतर नरगुंदकर दोन घटका बसले होते त्यास निरोप दिला ते किल्ल्यातील बागेत बंगल्यात राहिले त्याजकडे शिधापाणी पाठवून दिले रात्री नरगुंदकरास भोजनास बोलावले होते. महाराष्ट्र प्रभोजक संस्था पेठ, बजे बा कृप्या पृथ्वीर चौक, दुवे-४११०३०
अजित पवार यांनी या वेळी सांगितले की, सारथी बंद होणार अशा बातम्या आल्या. परंतू सारथी संस्था बंद केली जाणार नाही. कोरोना व्हायरस संकट काळात राज्य अडचणीत आहे. तरीही ही संस्था बंद केली जाणार नाही.
न्यूयॉर्क - कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे अजूनही नर्व्हस, कोणताही ठोस गुण नसलेले विद्यार्थीच आहेत, अशा शब्दात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांचे वर्णन केले आहे. ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांवर प्रभाव टाकायचा असतो. मात्र त्यामध्ये टाकण्याची गुणवत्ता आणि कोणत्याही विषयातील तज्ञ होण्याची तीव्र इच्छा नसते, तसेच राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्व असल्याचे ओबामा यांनी "अ प्रोमिस्ड लॅन्ड' या आपल्या पुस्तकात म्हटले असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या पुस्तक परिचयामध्ये म्हटले आहे. या पुस्तकात ओबामा यांनी भारतीय राजकीय नेत्यांबरोबरच जागतिक पातळीवरील अन्य नेत्यांबाबतही खुलेपणाने आपले मत मांडले आहे. राहुल गांधी यांच्या मातोश्री आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख ओबामा यांच्या पुस्तकात आहे. आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि राहम एमॅन्युएल यासारख्या देखण्या व्यक्तींबाबत सांगितले जात असे. मात्र एखाद दुसरे उदाहरण सोडले तर महिलांबाबत सांगितले जात नसे. अशा अपवादातील महिलांमध्ये सोनिया गांधी यांचा समावेश होतो. अनेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोघेही शांत, प्रामाणिकपणाबाबत सारखेच आहेत. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे कठोर वृत्तीचे, सहकाऱ्यांचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आणि अतुलनीय शारीरिक क्षमता असलेले आहेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे. ओबामा यांचे हे पुस्तक 17 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये ओबामा यांचे बालपण आणि राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळाचाही आढावा असेल. विशेषतः 2008 साली अध्यक्षपदाच्या प्रचाराच्या काळापर्यंतच्या कालखंडाचा या पुस्तकात आलेख असेल. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन वंशाचे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्ष असताना 2010 आणि 2015 साली भारताला भेट दिली होती.
Max Maharashtra Impact मॅक्स महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश ऊसतोड महिलांना मिळाले ओळखपत्र ! बीड (Beed)जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोड मजुरांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी मॅक्स महाराष्ट्रने बातमीतून केली होती या मागणीला यश आले असून ऊसतोड मजुरांना ओळखपत्र देण्यास सुरवात झाली आहे. बीड (Beed)जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोड मजुरांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी मॅक्स महाराष्ट्रने बातमीतून केली होती या मागणीला यश आले असून ऊसतोड मजुरांना ओळखपत्र देण्यास सुरवात झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या समस्यांविषयी मॅक्स महाराष्ट्रने सप्टेंबर 2022 मध्ये बातमी केली होती. त्या बातमीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी एक एप (sugarcane cutter rajister app)तयार केले होते. त्या एपमध्ये ऊसतोड कामगारांच्या नोंदणीला सुरुवात झाली. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्र ने ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहाच्या मागणीसाठी अनेक वेळा बातमी केली. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना मॅक्स महाराष्ट्र ने एका कार्यक्रमादरम्यान ऊसतोड कामगारांच्या ओळखपत्राविषयी प्रश्न विचारला होता. दखल घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगार महिला व पुरुषांना ओळखपत्राचे वाटप केले. या ओळखपत्रांमध्ये त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती असून त्या आधारे त्याला विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांच्या नोंदणीची का आहे गरज. . . ? जिल्ह्यातील ज्या महिलांची ऊसतोड (Ustod majur)कामगार महिला म्हणून नोंदणी झालेली नसेल या महिलांची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने बैठक बोलावली होती. नोंदणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये विविध कॅटेगिरी करता येईल. त्यांना कोणत्या योजना देता येतील याच्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना दिली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कामगारांच्या कुटुंबाला विमा लागू केला जाणार आहे.
प्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता रूसोने शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या अंतर्गत शक्तीचा विकास होय, असे म्हटले. याचा अर्थ 'जे रुजतं, अंकुरतं, फुलतं आणि बहरतं ते शिक्षण' असे म्हणता येईल. 'शिक्षणाशिवाय माणूस खटाऱ्याचा बैल होईल' असे लोकसंत गाडगेबाबांनी उगाच म्हटले नाही. आपल्या मुलांच्या आणि पर्यायाने समाजजीवनाला दिशा, गती आणि आकार द्यायचा असेल तर योग्य दिशादर्शक शिक्षणाशिवाय पर्याय नाही, यावर सर्वच विचारवंत आणि समाजसुधारकांचे एकमत आहे. १९७२ नंतर महाराष्ट्र राज्यात एक आकृतीबंध, एकच अभ्यासक्रम, एकच नियमव्यवस्था स्वीकारण्यात आली. इ. स. १८१८ साली इंग्रजांचा अमल सुरू झाल्यावर इंग्रजांनी देशातील इतर भागांप्रमाणे तत्कालीन महाराष्ट्रातही शिक्षण प्रसारासाठी प्रयत्न सुरू केले होते. १८१५ साली प्रामुख्याने, ख्रिश्चन आणि युरोपीय मुलांच्या शिक्षणासाठी बॉम्बे एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना करण्यात आली. परंतु भारतीयांच्या मनात इंग्रजांच्या शिक्षणविषयक धोरणाविषयी शंका निर्माण होऊ लागल्याने १८२२ साली 'बॉम्बे नेटीव्ह स्कूल सोसायटी'ची स्थापना करण्यात आली. पुढे १८२७साली या संस्थेचा 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' असा नामविस्तार करण्यात आला. भारतीय भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, इंग्रजीतून शिक्षण देणाऱ्या शाळा स्थापन करण्याचे कार्य करण्यात आले. १८२१ साली पुण्यात संस्कृत कॉलेज, १८२४ साली मुंबईला इंजिनीअरिंग कॉलेज, तर १८२७ साली गव्हर्नर एलफिन्स्टनच्या नावाने मुंबई येथे एलफिन्स्टन इन्स्टिट्युटची स्थापना करण्यात आली. याच संस्थेला पुढे एलफिन्स्टन कॉलेज असे म्हटले जाऊ लागले. इ. स. १८३४ मध्ये मुंबई येथे विल्सन मिशनरी कॉलेज व पुणे, अहमदनगर, सुरत, राजकोट येथे मिशनरी शाळांची स्थापना करण्यात आली. १८४५ साली ग्रँट मेडिकल कॉलेज, आणि १८५४ साली पुण्यात सायन्स कॉलेजची स्थापना करण्यात आली. याशिवाय स्त्रीशिक्षणाच्या प्रचारार्थ १८३१ साली अहमदनगर येथे शाळा स्थापन करण्यात आली. या सर्व शैक्षणिक संस्थावर देखरेखीसाठी १८४० साली मुंबईला शिक्षण मंडळाची स्थापना इंग्रज सरकारने केली. इंग्रज सरकारने केलेल्या तत्कालीन शिक्षणाच्या सोयींचा फायदा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांनाच होत असल्याने महात्मा जोतीराव फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची शाळा, तर १८५१ साली अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. सामाजिक विषमता व जातीभेदाचे निवारण करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय असल्याचे विचारात घेऊन मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी जोतीराव फुले यांनी केली. याच काळात १८५७ साली मुंबई येथे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस ही विख्यात संस्था स्थापन करण्यात आली. इंग्रज सरकारने सुरू केलेल्या या शिक्षणव्यवस्थेला पुढे विरोधाचा सामना करावा लागला. सरकारी शिक्षणसंस्था व सरकारी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळा- महाविद्यालयावर बहिष्कार घालून नव्या'राष्ट्रीय शिक्षणा'चा आग्रह सुरू झाला. १९०५ व१९०६ च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये राष्ट्रीय शिक्षणासाठी आग्रह धरण्यात आला. त्यातूनच सरकारी अनुदानाचा धिक्कार करून २९ नोव्हेंबर १९२० मध्ये गुजराती नॅशनल शाळा निर्माण झाली. सामाजिक विषमता व जातीभेदाचे निवारण करण्यासाठी येथे १९२३ मध्ये लोकवर्गणीतून नॅशनल मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले. पुणे येथे टिळक महाराष्ट्र महाविद्यालय स्थापन झाले. १८९९ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतंत्र संस्था स्थापन केली तर पुढे १९१६ मध्ये महिला विद्यापीठ स्थापन केले. श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठ असे आज उभे असणारे हे एकमेव विद्यापीठ होय. १९१९ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'रयत शिक्षण संस्था' स्थापन केली. आज ६८० पेक्षा जास्त शाळा-महाविद्यालयांचे जाळे 'रयत' ने निर्माण केले आहे. विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेबांनी १९३२ साली शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून विदर्भाच्या खेड्यापाड्यात शिक्षणगंगा पोहोचविली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४५ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून महाविद्यालय सुरू करण्याचीची मोहीम उघडली, त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण-बहुजन समाजाचे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आलेत. महाराष्ट्रात १९५९ मध्ये महात्मा गांधींची मूलोद्योग शिक्षणपद्धती राबविण्यात आली. सर्व प्रशिक्षण संस्थांचे मुलोद्योग प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतर करण्यात आले होते. मूलोद्योग शिक्षणाबरोबर हस्तव्यवसाय शिकविणे आणि मूलोद्योग शाळांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, १९६४ मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याचे धोरण आखण्यात आल्यानंतर मूलोद्योग शिक्षणपद्धती बंद पडली. महाराष्ट्रात १९६० नंतर शैक्षणिक संस्था, ग्रंथ प्रकाशन, संशोधन यामाध्यमातून शिक्षणक्षेत्र विस्तारत गेले. सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांना फीमाफी आणि इतर सवलती दिल्यामुळे शिक्षण सामान्यांपर्यंत पोहचण्याची प्रक्रिया सुरू झाली. १९६०-६७ ते १९८४-८५ या काळात प्राथमिक शाळा दीडपटीने, तर माध्यमिक विद्यालये तीनपटीने वाढली. १९६२ साली जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यावर शिफारसीवरून श्वेतपत्रिका तयार करून सामाजिक शिक्षणाची शासनाने १९६८ मध्ये सोय केली. त्यामध्ये शिक्षणाची समानसंधी, व आर्थिकदृष्ट्या अविकसित घटक याच्यावर विशेष लक्ष, प्रादेशिक असमतोल, गुणवत्तावाढ व नवे शैक्षणिक प्रयोग ही मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यात आली. १९८३-८४ मध्ये सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली. याशिवाय ७५ प्रकारच्या फी सवलत व शिष्यवृत्त्या सुरू करण्यात आल्या. याचा मोठा फायदा मुलींच्या शिक्षणासाठी झाला. १९४६- ६६ मध्ये डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखालील कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार १९६८ साली देशाचे पहिले शिक्षणविषयक धोरण जाहीर करण्यात आले. डॉ. त्रिगुणा सेन यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने ऑगस्ट १९८५ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविण्याच्या दृष्टीने शैक्षणिक आव्हान - एक यथार्थ दर्शन' नावाचा प्रलेख प्रसिद्ध केला व मे १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार संपूर्ण देशात ५+३+२+२+३ हा आकृतीबंध स्वीकारण्यात आला. त्याची अंमलबजावणी १९८९ पासून सुरू झाली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राने जून १९७२ पासून माध्यमिकस्तरावर सुधारित अभ्यासक्रम सुरू केला. त्यानुसार, मार्च १९७५ मध्ये पहिली माध्यमिक शालान्त प्रमाण पत्र परीक्षा घेण्यात आली. इ. स. १९८३ पासून व्यावसायिक अभियांत्रिकी, वैद्यकीय, शारीरिक शिक्षण, वाढ अध्यापन व तंत्रनिकेतन संस्थामध्ये करण्यात आली. परंतु यापैकी बहुतेक संस्था विनाअनुदान तत्त्वावर असल्याने विद्यार्थ्यांना फी भरण्याशिवाय पर्याय नव्हता. तत्त्वावरील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विनाअनुदान संस्थांचे संचालक बहुतांशी सत्ताधारी राजकीय नेते होते. हे राजकीय सत्ताधारी आता शिक्षणसम्राटांच्या भूमिकेत शिरले होते. खुद्द राज्यकर्तावर्गच शिक्षण ताब्यात घेऊन, त्यांचे मालक होऊन शिक्षकांचा व लोकशाही संस्थांचा शक्तिपात करण्यात आघाडीवर आहे. २४ नोव्हेंबर २००१ रोजी राज्यात कायम विनाअनुदान तत्त्वावर प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २००१ ते २००७-०८ या कालावधीत मराठी माध्यमाच्या १७०० प्राथमिक व २२०० एवढ्या माध्यमिक शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. याचा परिणाम महाराष्ट्रातील अनुदानित सरकारी शाळांच्या विपन्नावस्थेत झाला. पुढे २९ एप्रिल २००८ रोजी कायम विनाअनुदानित धोरण राज्यात रद्द केल्याने विनाअनुदान तत्त्वावर मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याकरिता खाजगी संस्थांकडून मिळालेले एकूण ११ हजार ६५४ प्रस्ताव रद्द करण्यात आले. परंतु इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळांना मान्यता देण्याचे धोरण राबविण्यात आले, याचा परिणाम म्हणून सर्वत्र कॉन्व्हेंट शाळा सुरू होऊन मराठी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाले. यातूनच द्विवर्ण शिक्षण व्यवस्था फोफावली. आज महाराष्ट्रात २३ राज्य विद्यापीठे आहेत. त्यामध्ये १० सामान्य, १ महिलांसाठी, ४ कृषी, ३ विधी, १ वैद्यकीय, १ तंत्रज्ञान, १ पशु व मत्स्यविज्ञान, ९ मुक्त व १ संस्कृत विद्यापीठ आहे. याशिवाय अभिमत विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे व संशोधन संस्था आहेत. ७२ कृषी महाविद्यालये, २२०० महाविद्यालये, १६ हजार माध्यमिक शाळा, ६२ हजारांपेक्षा जास्त प्राथमिक शाळा, ३७४ शासकीय वसतिगृहे, २३८८ अनुदानित वसतिगृहे, ७९ निवासी शाळा, ५१ समाजकार्य, महाविद्यालये, १९ अनु. जाती आश्रमशाळा याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, साखर शाळा, अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामधून लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या सोयी घेत आहेत. परंतु विद्यार्थी गळती आणि शैक्षणिक गुणवत्तेचे आव्हानही फार मोठे आहे. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची आठवीपर्यंत परीक्षा न घेणे परंतु कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, राज्य परीक्षा मंडळ व सीबीएसईसारख्या मंडळाच्या अभ्यासक्रमात तफावत असणे, मराठी शाळांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन पालकांची रांग असणे, खाजगी संस्थांबाबतचे लवचिक धोरण, शिक्षण सेवक, कंत्राटी, तासिका तत्त्वावर नियुक्ती होणे याशिवाय शिक्षकांमागे असणारा माहितीचा ससेमिरा आणि शाळाबाह्य, शिक्षणेतर कामे यामुळे शिक्षण क्षेत्रावर दुरगामी परिणाम झाला आहे. २०११ मध्ये राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने बजेटमध्ये उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणासाठी १३०० कोटी व इतरांसाठी ७५० कोटी अशी एकूण २ हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली, परंतु या रकमेतून पुन्हा एकदा खाजगी शिक्षणसंस्थांचा फायदा होण्याचीच शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात तर उच्चशिक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस चालना देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात संस्थांच्या बरोबरीने परकीय कंपन्या दाखल होणार आहेत. त्यामुळे ज्याच्याजवळ पैसा आहे त्याने कौशल्याधारित शिक्षण घ्यावे आणि ज्याच्याकडे पैसा नाही, त्याने इतर शिक्षणाकडे वळावे, अशी द्विवर्ण व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. शिक्षणातून ज्ञान, कौशल्ये, गुणवत्ता असणारा विद्यार्थी निर्माण होण्याची अपेक्षा असताना शिक्षणावर खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी प्रयत्न करणारा विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडेल. इथेच आपली शिक्षण धोरणे नापास झालेली असतील. त्यामुळे सामाजिक व आर्थिक विषमतेने भरलेल्या आपल्या समाजात शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत, पोहचवायची असेल तर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच शिक्षणाच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी सामान्य जनतेने लावून धरली पाहिजे.
सुरेश जाधव (बीड), 22 डिसेंबर : बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर एक आमंत्रण पत्रिका वायरल होत आहे. या पत्रिकेमध्ये 25 महिन्यापासून शेतात उभा असलेल्या उसाची होळी करणार असल्याचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये चक्क शुभ हस्ते म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रमुख उपस्थिती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची नावे आहेत. या उसाच्या होळीच्या कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची ही पत्रिका चर्चेचा भाग ठरते आहे. बीड जिल्ह्यातील तालुका माजलगाव या ठिकाणी 26 डिसेंबर 2022 रोजी दुपारी एक वाजता 25 महिन्यापासून शेतात उभा असलेल्या उसाची होळी पेटवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा ऊस पेटवला जाणार असल्याची पत्रिका सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. ही पत्रिका अन्यायग्रस्त शेतकरी गंगाधर थावरे आणि संग्राम गंगाधर थावरे या दोघांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. Maharashtra Politics : आज पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद; मोठा निर्णय घेणार? Health Tips: बॉडी बनवण्याचा विचार करताय? हा शॅार्टकट तुमचा जीव घेऊ शकतो! PSI Success Story: बापाने आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात तोडला ऊस, पोरगं आता अंगात घालणार खाकी वर्दी! Agriculture News: मोसंबीची शेती खरंच नफा देते का? कसं करायचं नियोजन? मागील पंचवीस महिन्यापासून शेतात ऊस उभा असल्याने आणि जय महेश शुगर इंडस्ट्री पवारवाडी यांच्या राजकीय अट्टाहासापाई जवळपास पंधरा शेतकऱ्यांचा ऊस जाणीवपूर्वक त्या कारखान्याने नेला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आता हे नुकसान सहन करण्यासाठी आम्ही तयार असून हा ऊस 25 महिन्यापासून शेतात उभा असल्याने उसाची होळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही राबवला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी नेते गंगा थावरे आणि अन्यायग्रस्त शेतकरी म्हणून गंगा विषम थावरे यांनी हे आव्हान केले आहे. या सगळ्या बातमीमुळे सध्या जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर राहणार का? यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? हे पाहणं गरजेचं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
लॉकडाऊन मुळे गेले 4 महिने बंद चित्रपट, मालिकांचे शूटिंग आता हळूहळू सुरु होत आहे. अनलॉक 2 च्या टप्प्यात सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारावर हे चित्रिकरण सुरु झाले आहे. यामुळे उद्यापासून झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) मालिका पुन्हा सुरु होत आहे. यात गेली अनेक वर्षे सुरु असलेली 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) ही मालिका आता वेगळ्या अंदाजात आपल्या समोर येत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात प्रेक्षकांची लाडकी जुनी शनाया (Shanaya) म्हणजेच रसिका सुनील (Rasika Sunil) पुन्हा एकदा या सिरियलमध्ये एन्ट्री करतेय. तिच्या येण्याच्या बातमीने तिचे चाहते आनंदून गेले आहेत. त्यातच रसिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन या मालिकेचे वेगळेपणाची एक छोटीशी हिंट चाहत्यांना दिली आहे. हे नवीन पोस्टर पाहून असं दिसतय की शनाया आणि राधिका गुरुनाथला चांगलाच धडा शिकवणार आहे. दरम्यान मालिका सोडल्यावरही रसिका सुनील चांगलीच चर्चेत होती. जीम मधले फोटो पोस्ट करुन कधी फिटनेस गोल दाखवत तर कधी स्वीमिंग पूल मध्ये बिकिनी घालुन, बोल्ड फोटोशुटची झलक शेअर करुन रसिका ऑनलाईन बरीच अॅक्टिव्ह झाली होती.
कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटव्ह आली आहे. शुक्रवारी रात्री त्यांना ताप आणि खोकला आला होता. यानंतर त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली. यानंतर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉजिटीव्ह आली. दरम्यानच्या काळात पाटील यांनी काल जलव्यवस्थापन समिती बैठकीस हजेरी लावली. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि अध्यक्ष कार्यालयाचे कर्मचारी यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. लॉकडाऊनमध्ये कोणीही पदाधिकारी जिल्हा परिषदेत येणार नाही अशी घोषणा अध्यक्ष पाटील यांनी केली होती. मात्र ते दररोज न चुकता कार्यालयात येत होते. महत्वाचे म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
मुलगी नको, हा नारा आजही अनेक ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी तो थेट असतो, तर काही ठिकाणी छुपा. लगतच्या काळात अशा काही घटना समोर आल्या आणि आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद मनात आहेच, हे सिद्ध झाले. चौथीही मुलगी झाली म्हणून उंबऱ्याच्या आतही न घेता आई - वडिलांनीच तिला हॉस्पिटलमधून तिला थेट अनाथालयाचा रस्ता दाखविला. पुण्यात नुकताच हा धक्कादायक प्रकार घडला. सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडलेला हा प्रकार आजही मुली नकोशाच आहेत, याची दाहकता स्पष्ट करतो. अशा हजारो घटना राज्यात, देशभरात होताना दिसत आहेत. मुलगी झाली म्हणून थेट पत्नीला मारझोड करून तिला घर सोडण्यास प्रवृत्त करण्याची मजल मुंबई पोलिस दलातील एका पोलिसाने मारली. पैसा आणि कायदा आपल्या हातात असल्याची दर्पोक्तीही या पोलिस कर्मचाऱ्याने केल्याने, साहाय्यक विक्रीकर निरीक्षक असलेल्या पत्नीला नाइलाजाने माहेरी येऊन पोलिसांत फिर्याद देण्याची दुर्दैवी वेळ आली होती. बेंगळुरूमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा गर्भपात घडविण्यासाठी तिच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. या तरुणाला एका भोंदूबाबाने त्याच्या प्रेयसीच्या पोटात वाढणारे बाळ ही मुलगी असून, तिचा जन्म झाल्यास त्याचे दुर्दैव सुरू होईल, असे सांगितले होते. त्यामुळे त्याने प्रेयसीला गर्भपात करायला सांगितला. तिने त्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. नकोच ती मुलगी, या मानसिकतेमुळे आजही अशा अंगावर काटा आणणाऱ्या घटना आजूबाजूला घडताना पाहून समाजमन सुन्न होते. काही काळ हळहळ व्यक्त करते. एकविसाव्या शतकात येऊन स्थिरावल्यानंतरही ही मानसिकता बदलायला मात्र ते तयार नाही. मुलगी नको याला मानसिकतेला कोणीही अपवाद नाही. शहर, गाव, शिकलेला, न शिकलेला, श्रीमंत, गरीब, जात - पात, धर्म सगळीकडे मुलींना नाकारले जात असल्याचे दिसते. आई, पत्नी, प्रेयसी, बहीण, सून हवी; पण मुलगी नको, या अट्टहासामुळे नकोशा असलेल्या मुलींचा त्या जन्माला येण्याआधीच गळा घोटला जातो. मुलगा होईपर्यंत मुलींना जन्माला घालून, त्यांना जन्मभर नकोशा असल्याची जाणीव करून देत त्यांचे जगणे, उमलणेच कोमेजून टाकले जाते. मुलगा जन्माला आल्याखेरीज पालकांना जन्म सार्थकी लागल्याचे वाटत नाही. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन, हे वर्षानुवर्षे रुढी, परंपरांच्या माध्यमातून प्रत्येक पिढीत झिरपत राहिले आहे. किंबहुना तशी सोयच करून ठेवण्यात आली आहे. मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढविणारा. 'मुलगा व्हावा ऐसा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा,' असे म्हणत मुलाचे स्वागत थाटात केले जाते. 'काय मग पेढे कधी देणार,' अशी विचारपूस करताना कुटुंब वाढविण्याच्या तयारीत असणाऱ्यांना 'मुलगा हवा' अशाच अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या जातात. मुलगी झाली म्हणून पेढे वाटणाऱ्यांना वेड्यात काढले जाते. मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करणे आणि त्यांचे आनंदून स्वागत करणे, हे कमी मुलींच्या वाट्याला येते. मुलगी नको, हा अट्टाहास आजही गर्भात उमलणाऱ्या कळ्यांना खुडून टाकण्यास भाग पाडतो. प्रसंगी संबंधित महिलेवर शारीरिक, मानसिक अत्याचार केले जातात. कधी मुलीच होतात म्हणून दुसरे लग्न करुन पुत्रप्राप्तीची धडपड सुरूच ठेवली जातो. आज आपण वेगाने प्रगती करत आहोत. नवनवे संशोधन, अंतराळातील वेध घेणारे उपग्रह, थक्क करणाऱ्या गोष्टींची उभारणी, असे स्वप्नवत जगणे एकविसाव्या शतकात जगत असताना मुलींच्या स्वागताबाबत पिछाडीवरच आहोत. सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याऐवजी गर्भलिंगनिदान करून गर्भपात घडवून करण्यासाठीच मोठ्या प्रमाणावर केला जातो. राज्यात गर्भलिंगनिदान चाचणी कायदा कडक करूनही चोरीछुपे, तर कधी राज्याच्या बाहेर जाऊन नकोशा मुलींपासून सुटका करून घेण्यात येते आहे. यामुळे बोगस डॉक्टरांचे, डॉक्टरकीला काळीमा फासणाऱ्यांचे चांगलेच फावते. नकोशा मुलींमुळे लाखो रुपये कमविले गेले. काहींचे गैरव्यहार उजेडात आले. काहींना चाप बसला, तरीही आजही रोजरोसपणे मुलींना नाकारलेच जाते आहे. म्हैसाळ येथील गर्भलिंग हत्या प्रकरणातील डॉ. खिद्रापुरे खटल्याचे काम पाहणारे विशेष सरकारी वकिल अॅड. हर्षद निंबाळकर सांगतात, 'आजही मुलगी नको, ही समाजाची मानसिकता आहे. याच मानसिकतेचा बोगस डॉक्टर फायदा घेतात. समाजात असा विचार करणारे असल्यामुळेच अशा डॉक्टरांचे फावते. मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करायचा, असा धंदा करणारे लोक आहेत, त्यांचे एजंट्स आहेत. हे एजंट असे लोक शोधून त्यांना ही मदत करतात. दुर्दैव म्हणजे कायदा कडक असूनही त्याची भीती वाटत नाही. आता ही परिस्थिती काही प्रमाणात बदलते आहे. ' आजही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. आज कोणत्याही क्षेत्रात मुली मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात नाव कमविले आहे. आपल्याकडील विवाहसंस्थेच्या प्रश्नांमुळे पालकांना अनेक अडचणी येतात. मुलीचे लग्न, हुंडा, समाजाला दाखविण्यासाठी थाटामाटातील लग्न अशी अनेक कारणे मुलगी नको या गोष्टींशी निगडीत आहेत, असे अॅड. निंबाळकर नमूद करतात. अॅड. माधवी परदेशी सांगतात, 'पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे आजही मुलगी नको ही मानसिकता आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे लोकाचे धन, असे समजले जाते. मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा त्यांच्या लग्नासाठी पैसे साठविले पाहिजेत, याकडेच लक्ष दिले जाते. मुलीला शिकविले, तरी ती लोकाच्या घरी जाणार, तिला मिळणारा पैसा आपल्या घरात येणार नाही, या विचारातून त्यांना पुरेसे शिक्षणही दिले जात नाही. सध्याच्या काळात मुलींच्या प्रगतीचा आलेख पाहिल्यास त्या कशातही मागे नाहीत हे लक्षात येईल. दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा, विविध क्षेत्रांमध्ये मुली आघाडीवर आहेत. हे चित्र कितीही आशादायक वाटत असले, तरीही मुली आजही नकोशा आहेत. मुलींचे स्वागत व्हायला हवे. त्यांना चांगले शिक्षण, संरक्षण, नोकरीच्या संधी मिळाव्यात, यासाठी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविले पाहिजे. ' निसर्गाने स्त्री-पुरुष म्हणून जन्माला घातले असले, तरी त्यात भेद, उच्च-नीचता समाजाने आणली आहे. स्त्री, पुरुष म्हणून अंगभूत असलेले गुण नक्कीच वेगळे असतील. स्त्रिया पुरुषांपेक्षा नक्कीच कमी नाहीत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात किंबहुना त्या करत आहेत. स्त्रियांचे कर्तृत्व पुरुषांशी बरोबरी करून मोजले जाते. तिच्यावर होणारा खर्च, तिचे शिक्षण, ती परक्याच्या घरी जाणार, तिच्या लग्नाचा खर्च, हुंड्याच्या मोठ्या रकमा, मुलगी म्हणून सांभाळताना गैरप्रकार झाले तर घराण्याची इज्जत कमी होणार, त्यापेक्षा मुलगा कसा बरा, हीच मानसिकता मुलींना नकोशी बनवत आहे. हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. अजून खूप पल्ला बाकी आहे. काही वर्षापूर्वी दूरदर्शन येणारी जाहिरात आठवते, उघडा तिचे डोळे, तिचे हात, पाय, बघू तिला जगाकडे. ' आजही ती लागू होते आहे.
भारतीय संघाची १९ वर्षांखालील आयसीसी वनडे वर्ल्डकप (युवा वर्ल्डकप) स्पर्धेतील सलामीची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. पुढील वर्षी न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. भारतीय संघाची १९ वर्षांखालील आयसीसी वनडे वर्ल्डकप (युवा वर्ल्डकप) स्पर्धेतील सलामीची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. पुढील वर्षी न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया या प्रत्येकी तीन वेळा विजेते राहिलेल्या संघांचा 'ब' गटात समावेश करण्यात आला आहे. या दोघांव्यतिरिक्त या गटात झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) समावेश आहे. भारताने २०००, २००८ आणि २०१२मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. दोन वेळा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या स्पर्धेत वेस्ट इंडिजने भारतावर ५ विकेटनी मात करून विजेतेपद पटकावले होते. सध्या युवा संघाची जबाबदारी माजी कर्णधार राहुल द्रविडवर आहे. या वर्ल्डकपच्या तयारीसाठी भारताकडे पुरेसा अवधी आहे. हा बारावा युवा वर्ल्ड कप असून, न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा होत आहे. वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. यातील पहिला सराव सामना ९ जानेवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर दुसरा सराव सामना १० जानेवारीला केनियाविरुद्ध खेळला जाईल. -स्पर्धेत १६ संघांचा सहभाग असून, सात ठिकाणी स्पर्धेचे सामने होतील. -गतविजेता वेस्ट इंडिज आणि यजमान न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील सलामीची लढत होईल. -कसोटी दर्जा प्राप्त दहा संघांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला असून, इतरांनी पात्रता फेरीतून प्रवेश मिळवला. -प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीगमध्ये (उपांत्यपूर्व फेरी) खेळतील. -उर्वरित आठ संघ प्लेट चॅम्पियनशिपमध्ये खेळतील. -स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चार लढती होणार आहेत.
मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला नवा बॉस मिळाल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील आता ट्विटरवर परततील, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती, ट्रम्प यांच्यावर गेल्या वर्षी कायमची बंदी घालण्यात आली होती. या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी कधीही ट्विटरवर परतणार नाही. ते म्हणाले, मी माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर राहीन. ट्विटरच्या नवीन बॉस मस्कबद्दल बोलताना ते म्हणाले, "मस्क एक चांगले व्यक्तीमत्व आहे, मला आशा आहे की ते ट्विटरमध्ये सुधारणा करतील. मात्र, मी Truth Social वर राहीन. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, जे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, त्यांनी ट्विटरचे शेअर्स विकत घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. अखेर आता ते ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरला प्रति शेअर $54. 20 या दराने विकत घेण्याची ऑफर दिली होती, जी सोमवारी संध्याकाळी उशिरा ट्विटरच्या बोर्डाने स्वीकारली आहे. सध्या, ट्विटरवरून माहिती देताना, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतल्याचे सांगितले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी US $ 44 अब्ज दिले आहेत. दरम्यान, टेस्लाचे मालक एलोन मस्क यांचे हा ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मुंबई महापालिका भाजपच्याच ताब्यात येणार असल्याचा दावा केला आहे. तर गेल्या वेळेसही आपलाच महापौर बसला असता असे सांगतानाच त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही ८२ जागा जिंकलो त्यावेळी आमचाच महापौर बसला असता. परंतु अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी सोडा आपल्याला राज्य चालवायचे आहे, असे सांगितले होते. शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यासंदर्भात कधीच शब्द दिला नव्हता, असा दावा भाजपडून करण्यात आला होता. तर आता मुंबई महापालिकाही आम्ही त्यांच्यासाठीच सोडली असे, चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान,गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवून आपला भगवा फडकवण्याची तयारी भाजप करत आहे. त्यासाठी भाजपडून मिशन मुंबई ची रणनिती देखील आखली जात असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपने कितीही तयारी केली तरी महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता कायम राहील, असे महाविकास आघाडीतील नेत्यांनी ठणकावून सांगितले आहे.
उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सोल - उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्योंगयोंगवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने युद्धसरावास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज या कवायतींमध्ये अमेरिकेची लढाऊ बी-१बी विमाने सहभागी झाली होती. दरम्यान अमेरिकेने उचललेल्या या पावलानंतर उत्तर कोरिया बिथरला असून, याचे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्यांनी दिली आहे. उत्तर कोरियाने या युद्धसरावाविरोधाक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा युद्धसराव कोरियव द्विपकल्पाला युद्धाच्या दिशेने घेऊन जाईल, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. अमेरिकेच्या विमानांनी गुआम येईल हवाईहद्दीतून उड्डाण केले होते. या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेची एफ-२२ आणि एफ-३५ स्टील्थ फायटर विमाने सहभागी झाली आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर हा युद्धसराव करण्यात येत आहे. उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर हल्ला करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचा दावाही केला होता. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाच्या वर्तमानपत्रात हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. फोटो प्रसिद्ध होताच अमेरिकेसह उत्तर कोरियाच्या विरोधात असणा-या देशांच्या शास्त्रज्ञांनी हे क्षेपणास्त्र किती घातक ठरु शकते त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. तज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉसाँग-15 हे यापूर्वीच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत आकाराने मोठे आणि टेक्नोलॉजीमध्ये अधिक सरस आहे. उत्तर कोरियाने ही चाचणी करताना आपल्याच देशात बनवलेल्या मोबाइल लाँचरचा उपयोग केला. शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या रेंजबद्दल मात्र शंका उपस्थित केली आहे. दरम्यान. वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर उत्तर कोरियामध्ये कौतुक सोहळा सुरु होता. उत्तर कोरियाच्या किम संग चौकात शुक्रवारी वॉसाँग-15 क्षेपणास्त्र चाचणीच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोडाँग सिनमन या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर या सेलिब्रेशनचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. उत्तर कोरियाच्या दिवंगत नेत्यांचे फोटो लावून या संपूर्ण चौकाची सजावट करण्यात आली होती. किम संग चौकात जमलेल्या नागरीकांची नाचगाणी एकूणच आंनदोत्सव सुरु होता.
Lok Sabha Elections 2019: 'माफ करा, खरं म्हणजे आजच्या जाहीर सभेसाठी तुम्ही इथे मोठ्या संख्येने आला आहात. पण, मी आज येथे भाषण करण्यासाठी आलो नाही. मला काही वेळापीर्वीच कळले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाचा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडे (Vaijnath Dahatonde) यांचे काहीच तासांपूर्वी दुःखद निधन झाले. त्याच्या घरावर दुःखाचा डोंगर असताा सभा घेणे योग्य वाटत नाही', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आयोजित करण्यात आलेलेली जाहीर सभा रद्द केली. त्यांच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड नक्कीच झाला. मात्र, औचित्य पाहून साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये बराच काळ रगंली होती. बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) असलेल्या परळी (Parli) शहरातील गणेशपार (Ganesh Par) येथे गुरुवारी सांयंकाळी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. परळी येथील गणेशपार भागाला राजकीयदृष्ट्या मोठे वलय आहे. गेली अनेक वर्षे परळीच्या राजकारणात असे मानले जाते की, गणेशपार भागात सभा जिंकली की, विजयाचा मार्ग सुखकर होतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीने आयोजित केलेल्या या सभेसाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. त्यासाठी उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून तयारीही अगदी जोमात करण्यात आली होती. आता प्रतिक्षा होती केवळ सभेच्या मंचावरुन धनंजय मुंडे काय बोलणार याकडे. गोपीनाथ मुंडे हायात असतानाच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून परळी आणि पर्यायाने बीडच्या राजकारणात मुंडे विरुद्ध मुंडे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर हा संघर्ष आता पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राहिला आहे. राज्याच्या राजकारणात या वादाकडे नेहमीच उत्सुकतेने पाहिले जाते. कारण, पंकजा आणि धनंजय या बहिण भावात नेहमीच जाहीर सभांतून आरोपप्रत्यारोप होत असता. गणेशपार येथील सभेतून मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांना काय उत्तर मिळते आणि धनंजय मुंडे आता कोणता मोठा आरोप करतात याकडे परळीकरांचे लक्ष लागले असतानाच ही सभाच रद्द करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला. (हेही वाचा, राज ठाकरे विरोधात अर्वाच्च्य भाषेत लिखाण करणार्या विजय वारे यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप) दरम्यान, वैजनाथ दहातोंडे हा माझा चांगला मित्र होता. आमचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी, तो अत्यंत तळमळीने काम करणारा कार्यकर्ता होता. सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता अशी त्याची ओळख कायमच राहिल. त्याच्या जाण्यमुळे त्याचे कुटुंबीय अत्यंत दुःखात असताना सभा घेणे मला योग्य वाटत नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी दहातोंडे यांना श्रद्धांजील अर्पण केली.
देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. ४३ वर्षांमध्ये दहा जणांना हे पद भूषविण्याची संधी मिळाली असून, मराठवाड्याला दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने घातलेली बंदी उठणार असून, रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. मुंबईमधील कृषी व्यापार स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. शासनाने जानेवारी, १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना करून सर्व कृषी व्यापार एका छत्राखाली आणला. पा. शी देशमुख यांची पहिले सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक महिन्यानंतर कि़ बा. म्हस्के यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. बाजारसमितीचे काम चांगले सुरू झाले असतानाच, मुंबईमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाजारसमिती नवी मुंबईत स्थलांतरिच करण्याचा निर्णय घेण्यात आला व टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्थलांतरित केल्या आहेत. ४३ वर्षांमध्ये तब्बल दहा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. बाजारसमितीचे संचालक होण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांमध्ये चढाओढ असते. नाशिकचे देवीदास पिंगळे खासदार असताना मुंबई बाजारसमितीवर संचालक होते. पुणे जिल्ह्यातील आमदार कुमार गोसावी यांनीही सभापतीपद भूषविले आहे. जिंतूरचे यापूर्वीचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभापतीपद भूषविले असून, अनेक वर्षे ते बाजारसमितीवर संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही बाजारसमितीवर अनेक वर्षांपासून संचालक आहेत. डिसेंबर, २०१४ मध्ये शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकीय मंडळांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास निर्बंध घातले होते. शासनाने वेळेत निवडणूक घेतली नसल्याने तब्बल सहा वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. या काळात कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी व इतर सर्व धोरणात्मक प्रकल्पांचे काम ठप्प झाले होते. बाजारसमितीच्या विकासाला गती मिळत नव्हती. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळ कसे काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे असते संचालक मंडळ : मुंबई बाजारसमितीवर १८ लोकनियुक्त संचालक असतात. त्यांच्यामध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी दोन असे १२ शेतकरी प्रतिनिधी. पाच व्यापारी प्रतिनिधी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो. सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर शासन पाच सदस्यांची नियुक्ती करते. मुंबई व नवी मुंबई महापालिकेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, पणन संचालक व बाजारसमिती सचिव असे एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते. विद्यमान संचालक पुढीलप्रमाणे : मुंबई बाजारसमितीवर सद्यस्थितीमध्ये अशोक डक(सभापती), धनंजय वाडकर (उपसभापती), बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, अद्वय हिरे, जयदत्त होळकर, वैजनाथ शिंदे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, नीलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.
लाईव्ह न्यूज : संजू सॅमसन ( ९) अपयशी ठरला अन् यानिक कारियाच्या अप्रतिम फिरकी चेंडूवर त्याला झेल देण्यास भाग पाडले आणि ११३ धावांत निम्मा संघ माघारी परतला. हार्दिक पांड्या व संजू सॅमसन सावध खेळत होते, परंतु जेडन सील्स गोलंदाजीवर परतला अन् त्याने हार्दिकची ( ७) विकेट मिळवून दिली. भारताला ११३ धावांवर चौथा धक्का बसला. चौथ्या क्रमांकावर अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अन् शेफर्डच्या बाऊन्सरवर अक्षर ( १) झेलबाद झाला. आतातरी सूर्यकुमार यादव फलंदाजीला येईल, अशी आशाही फोल ठरली. ३४ धावा करणारा शुबमन गिल अल्झारी जोसेफच्या हाती झेल देऊन माघारी परतला अन् भारताला ९० धावांववर पहिला धक्का बसला. इशान किशनने ५१ चेंडूंत वन डे क्रिकेटमधील पाचवे अर्धशतक झळकावले. गोंदिया : नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथे शनिवारी (दि. २९) दुपारच्या सुमारास घडली. मुंबई : श्रीकांत शिंदे अडचणीत! , नियम उल्लंघनानंतरही गुन्हा का नोंद नाही? मुंबई : मुंबई : मुंबई : मुंबई : मुंबई : सावधान, लेप्टो पसरतोय. . ! मुंबई : मुंबई : मुंबई : कायद्याच्या कचाट्यात मेट्रोचे जाळे अडकायला नको! मुंबई :
श्री.जयप्रकाश छाजेड : सभापती महोदय, मुंबईसारख्या शहरामध्ये आणि औद्योगिकीकरण होणाऱ्या भागामध्ये सुरक्षा रक्षक अतिशय महत्वाचा घटक बनलेला आहे. सुरक्षा रक्षक कायदा करण्यात आला त्या कायद्यामध्ये सरकारने सुरक्षा रक्षकांच्या सेवा व शर्ती यांचे नियमन करण्याचा निर्णय घेतला. राज्यामध्ये 28 वर्षापूर्वी सुरक्षा रक्षक महामंडळ निर्माण झाल्यापासून अनेक सुरक्षा रक्षकांची अद्याप नोंदणी देखील झालेली नाही. असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही
बाबू राजेंद्रप्रसाद. १९२२-२८- विधायक राजकारण -खादीचा प्रचार. राष्ट्रीय शिक्षणाचे कार्य इ. १९२८ - शेतकन्यांची सेवा करण्यासाठी ब्रह्मदेशांत प्रयाण. मार्च १९२८-खटल्याच्या कामासाठी विलायत यात्रा. ५ जुलै १९३० -- सत्याग्रहाच्या चळवळीत ६ महिन्यांची कैद. ४ जानेवारी १९३२ - दुसऱ्या चळवळीत सहा महिन्यांची शिक्षा, ६ जानेवारी १९३३- १५ महिने तुरुंगवासाची सजा. १७ जानेवारी १९३४-आजारीपणामुळे तुरुगातून सुटका. २० जानेवारी १९३४ - बिहार भूकंपनिवारणाचे कार्य. ३० सप्टेंबर १९३४- मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष. २१ ऑक्टोबर १९३४ कल्याणहून खास गाडीतून मुंबईस प्रयाण. मान-सन्मान १९२० - विहार प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष मुंगेर, १९२०- बिहार राजकीय परीषदेचे अध्यक्ष- भागलपुर १९२१ ते १९३४ - कॉमेस वर्किंग कमिटीचे सभासद. १९२२ - काँग्रेसचे मुख्य चिटणीस. १९२२ - हिंदुमहासभेचे स्वागताध्यक्ष-गया. १९२३ - हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - कोकोनाडा. १९३३ - बिहारप्रांतीय साहित्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष - पाटणा १९२४- शहर म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष-पाटणा. १९२४- अखिल भारतीय कायस्थ परिषदेचे अध्यक्ष - जोनपुर, १९२६ - विहारप्रांतीय हिन्दी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष-दरभंगा १९२७ - संयुक्त प्रांतीय साहित्य संमेलनाध्यक्ष - गुरुकुल कांगडी. १९३० - जगन्नाथपुरी कॉो नियोजित अध्यक्ष. १९३०-१९३१ -काँग्रेसचे हंगासी अभ्यर्क. १९३४-४८ व्या काँग्रेसचे अध्यक्ष मं
किरकोळ बाजारात ४० रुपये किलोवर गेलेला कांदा स्वस्त (Onion Rate)करण्यासाठी आता केंद्र सरकार पाऊल उचलले आहे. केंद्र सरकार बफर स्टॉकमधला (buffer stock)१. ११ लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर (Onion Rate) ५ ते १२ रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार बफर स्टॉकमधील कांदा महाराष्ट्र (Maharashtra) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि गुजरातमधील (Gujarat) मधील स्थानिक बाजारपेठेत आणण्यात आला. तसेच बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला. २ नोव्हेंबरपर्यंत बफर स्टॉकमधून एकूण १. ११ टन कांदा प्रमुख बाजारपेठेत आणण्यात आला होता. मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत किरकोळ किमती ५-१२ रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत.
कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थती अत्यंत बिकट असताना तसेच घरफाळा, नगररचना, पाणीपट्टी, केएमटी यासारख्या आर्थिक उत्पन्नाच्या संस्थांकडून ठोस उत्पन्न मिळत नसताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे योग्य नाही. त्यामुळे झालेला निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील नागरिकांनी तसेच ई वॉर्ड समितीने बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक मंदी आहे. सर्व उद्योगधंदे नुकसानीत आहेत. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार पन्नास टक्के कमी केले आहेत. सामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे. अशा प्रचंड आर्थिक अडचणीच्या काळात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून त्याचा संपूर्ण आर्थिक बोजा मेटाकुटीने जगणाऱ्या शहरातील नागरिकांवर लादणे योग्य नाही, असे निवेदनात म्हटले आहे. महापालिकेचा जन्म व मृत्यू दाखला मिळविण्यासाठी घरफाळा भरल्याच्या पावतीची सक्ती केली आहे, ती पूर्णतः चुकीची आहे. व्यक्तीचा नैसर्गिक जन्म व मृत्यू येतो. त्याची नोंद ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असताना कोणत्याही प्रकारची सक्ती केल्यास कोल्हापुरात आंदोलन होईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
अहमदनगर (प्रतिनिधी)- थकबाकीच्या कारणावरून महावितरण कंपनी जिल्हा परिषदेला नेहमीच वीजजोड तोडण्याची धमकी देत असते. मात्र, याच महावितरण कंपनीशी संलग्न असणार्या महापारेषण कंपनीने राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मल ग्रामपंचायतीचा दीड कोटी रुपयांचा कर 2014 पासून थकविला आहे. ग्रामपंचायत ही जिल्हा परिषदेची उपसंस्था आहे. या संस्थेवर जिल्ह परिषदेचे प्रत्यक्षात नियंत्रण आहे. याच जिल्हा परिषदेला आतापर्यंत अनेक वेळा प्रादेशिक पाणी योजनांचे वीज बिल थकल्या प्रकरणी महावितरण कंपनीने वीजजोड तोडण्याची धमक्या दिल्या आहेत. मात्र, महापारेषण कंपनीने राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मल ग्रामपंचायतीचा दीड कोटी रुपयांचा कर 2014 पासून थकविला आहे. पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत महापारेषण कंपनीचे 400 केव्हीचे केंद्र असून त्या केंद्राचा कर 2014 पासून थकीत आहे. या थकीत करासाठी पिंपरी निर्मळ ग्रामपंचातीने महा पारेषणच्या बाभळेश्वर कार्यालयाकडे वारंवार पाठपुरवा करून ग्रामपंचायतीचा दीड कोटीचा थकीत कर वसूल झालेला नाही. ही बाब राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन थकबाकी वसूलीसाठी ग्राहक न्यायालयात जाण्याच्या तयार आहे. याबाबतच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला दिल्या आहेत.
पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट 'क' मधील विविध १८ संवर्गातील रिक्त पदांच्या महाभरतीची प्रक्रिया रद्द झाल्याने, या परीक्षेला अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार आहे. यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात एकूण शुल्कापैकी ६५ टक्के रक्कम ही सर्व जिल्हा परिषदांकडे वर्ग केली आहे. यापुढील शुल्क परत करण्याची प्रक्रिया आपापल्या जिल्हा परिषदांमार्फत केली जाणार आहे. राज्य सरकारने जिल्हा परिषदांमधील विविध १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये महाभरती प्रक्रिया सुरु केली होती. या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु पुढे ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द करण्यात आली होती. भरती प्रक्रिया रद्द झाल्याने, यासाठी भरण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 'सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. 'सकाळ'च्या पाठपुराव्यानंतर या परीक्षाचे शुल्क परत करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने २१ आक्टोबर २०२२ रोजी घेतला होता. परंतु शुल्क परताव्याचा निर्णय होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा शुल्क परत मिळाले नव्हते. नेमके हे पैसे कुठे आहेत, याबाबत जिल्हा परिषदांकडे माहिती उपलब्ध नव्हती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ६५ टक्के परीक्षा शुल्क हे जिल्हा परिषदांच्या माध्यमातून परत करण्याचा आणि यासाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, या निर्णयानुसार संबंधित जिल्हा परिषदांकडे हा निधी वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेला १ कोटी १९ लाख ५३ हजार ३३८ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, या दोन्ही जाहिरातीनुसार परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ६५ टक्के परीक्षा शुल्क उमेदवारांना परत केले जाणार आहे. परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी ज्या जिल्हा परिषदेतील भरतीसाठी अर्ज दाखल केला होता, त्याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदांना शुल्क परताव्याबाबतच्या याद्या पाठविल्या आहेत. या याद्यांमध्ये उमेदवाराचे नाव आणि त्याला परत मिळणाऱ्या शुल्काची रक्कम नमूद करण्यात आलेली आहे. शुल्क परतावा दृष्टीक्षेपात. . . !
IPL 2022: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वाची सर्व तयारी झाली आहे. ८ संघांना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. लखनौ व अहमदाबाद या नव्या फ्रँचायझी दाखल झाल्या आहेत आणि त्यामुळे आयपीएल २०२२चा फॉरमॅटही बदलणार आहे. अहमदाबाद फ्रँचायझी पांड्या बंधु, श्रेयस अय्यर, शिखर धवन या खेळाडूंसह टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. पण, या फ्रँचायझीचं भवितव्य संकटात सापडले आहे. Irelia Company Pte Ltd (CVC Capital Partners) या कंपनीनं अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क मिळवले आहेत. मात्र, बीसीसीआयनं अजूनही या फ्रँचायझीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आयपीएल २०२२त १० नाही तर ९ संघ खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत. InsideSportशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की,"याबाबत मला विचारू नका, सचिवांना विचारा. अहमदाबाद आयपीएल टीमबाबात आम्ही अनभिद्न आहोत. " CVC Capital ने २५ ऑक्टोबरला ५६२५ कोटींत खरेदी केलं होतं. पण, या कंपनीची बेटींग ( सट्टा लावणारी) कंपनीत गुंतवणूक असल्यानं नवा वाद सुरू झाला होता. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित करताना बीसीसीआयवर टीका केली होती. अद्याप बीसीसीआयकडून या मुद्यावर कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, ही फ्रँचायझी रद्द केल्यास पुढील पर्वात केवळ ९ संघ खेळताना दिसतील किंवा नव्या फ्रँचायझीला हक्क दिले जाऊ शकतात. २५ ऑक्टोबरला काय झालं? संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. Indian Premier League मध्ये ( IPL 2022) आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ, तर CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. दोन नव्या फ्रँचायझींसाठी १० स्पर्धेत शर्यतीत होते. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे. लखनौ, अहमदाबाद फ्रँचायझींची रिकॉर्डतोड बोली; अन्य आठ फ्रँचायझींची किंमत ठरली तुटपूंजी! ८ फ्रँचायझींना ४ खेळाडूंसाठी दिलंय ४२ कोटींचं बजेट; रोहित शर्मा, विराट कोहली, MS Dhoni यांना फटका? Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
घरेलू कामगारांना कोव्हिड अनुदानाचे १५०० रूपये मिळावेत या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवार ता. २७ रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. सीआयटीयुच्यावतीने महाराष्ट्रातील घरेलू कामगारांना कोव्हिड अनुदान म्हणून प्रत्येकी ५ हजार मिळावेत, अशी मागणी राज्य शासनाकडून केली होती. मात्र, नोंदीत घरेलू कामगारांना २०११ ते २०२१ या काळात ज्या महिला नोंदीत आहेत, त्यांना कोव्हिड अनुदान म्हणून १५०० रूपये देण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती. सन २०११ ते २१ मधील काही घरेलू कामगारांच्या खात्यावर १५०० रूपये जमा झाले. तर अद्यापही अनेक कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून निवेदन देऊनही कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे संघटनेच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. बैठकीला कॉ. दत्ता माने, शाहजाद मुजावर, पार्वती जाधव, जहीरा शेख, सुलोचना निळकंठ आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक : राज्य सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीच्या धोरणात बदल करत नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांबरोबरच माजी आमदारांनाही विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले असून, उर्वरित पदांच्या नियुक्त्यांचे अधिकार पालकमंत्र्यांकडे कायम ठेवले आहेत. आहे. या शिवाय दलित मित्र, आदर्श कामगार पुरस्कार विजेत्यांनाही जिल्हाधिकारी आपल्या अधिकारात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमू शकतील. या अधिकाऱ्यांना फक्त कागदपत्रे साक्षांकनाचेच अधिकार प्रदान करण्यात आले असून, ते करताना मूळ कागदपत्रांची खातरजमा केली जावी असा दंडक घालून देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष कार्यकारीपदी नियुक्ती देताना माजी आमदारांना मात्र त्यांच्या इच्छेप्रमाणे नियुक्ती केली जावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदत संपलेल्या अधिकाऱ्यांनी पदाचा वापर केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या पदावरील व्यक्तीला कोणतेही मानधन शासनाकडून दिले जाणार नाही, असेही धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पक्षांच्या अपक्षांची बंडखोरी की माघारी? पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (दि. १३) अखेरचा दिवस आहे. उमेदवारी न मिळाल्याने जवळपास सर्वच तालुक्यांत अनेक दिग्गजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. काहींनी तर उघड बंड केले आहे. त्यामुळे त्यांच्या माघारीसाठी आज दिवसभर शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी ५२९ तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी ९०५ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात अपक्षांची संख्याही खूप मोठी आहे. हे सर्व अपक्ष उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन रिंगणात उतरले आहेत. यावेळी सर्वच पक्षांनी पक्षातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर केले नाहीत. तसेच एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती दिले. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने थेट बंड करीत दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळविण्याची संधी अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे पक्षाने तिकीट न दिल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. हे अपक्ष पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांची उमेदवारी मागे घेणे हे मोठे आव्हान सर्वच पक्षासंमोर आहे. त्यात राष्ट्रवादीसमोर अनेक ठिकाणी मोठा पेच आहे. (प्रतिनिधी)
अभिनेता मनीष पॉलने 'ब्लॅक ब्रिफकेस' या लघुपटामध्ये पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे. या लघुपटासाठी अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता मनिष पॉलने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता मनीष एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे. 'ब्लॅक ब्रिफकेस' लघुपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. हा लघुपट त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईज ठरणार आहे. मनीषच्या लघुपटाचा ट्रेलर पाहून अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. 'ब्लॅक ब्रिफकेस' लघुपटात मनीष आपल्या स्वभावाच्या विरुद्ध दिसतो आहे. नकारात्मक भूमिका साकारलेल्या मनीषच्या लघुपटाचा ट्रेलर पाहून अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, 'या प्रतिभावंत कलाकाराकडून अनपेक्षित नजराणा. माझ्या खूप शुभेच्छा. ' मनीष पॉलने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली असून तो म्हणाला की, 'प्रत्येक अभिनेत्याला प्रत्येक भूमिका साकारत आली पाहिजे. एखाद्या पठडीत बांधलेल्या कलाकाराला हा बंध तोडणे कठीण असते. हा लघुपट केवळ १५ मिनिटांचा आहे. दरम्यान या चित्रपटातील काम करण्याचा अनुभव आव्हानात्मक आणि वेगळा होता. एक अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणे आपल्याला आवडत असून लोकांना फक्त मी शोचे निवेदन करतो आणि कॉमेडी करतो इतकंच माहीत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता माझ्यातला वेगळा मी दिसावा, इतकीच माझी अपेक्षा आहे. ' मनीषचा 'ब्लॅक ब्रिफकेस' लघुपट त्याच्या चाहत्यांना भावतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबई : बर्फाचा एक विशाल पर्वत अंटार्क्टिकापासून विभक्त झाला आहे. आतापर्यंत तुटलेला जगातील सर्वात मोठा हिमनग म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. हा हिमखंड 170 किलोमीटर लांबीचा आणि सुमारे 25 किलोमीटर रुंद आहे. युरोपियन अंतराळ एजन्सीच्या उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून आले आहे की अंटार्क्टिकाच्या पश्चिमेस स्थित रोन्ने आईस सेल्फमधील हा विशाल बर्फाचा तुकडा फुटल्यामुळे जगात दहशतीचे वातावरण आहे. हिमखंड तुटून आता मुक्तपणे समुद्रात पोहत आहेत. या विशाल आइसबर्गचा संपूर्ण आकार 4320 किलोमीटर आहे. आता हा जगातील सर्वात मोठा हिमनग बनला आहे. संशोधकांनी त्याचे नाव ए-76 असे ठेवले आहे. हा हिमनग तुटल्याचे छायाचित्र युरोपियन युनियनचा उपग्रह कोपरनिकस सेंटिनेल याने काढले आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशाचे परीक्षण करतो. अंटार्क्टिक सर्व्हे ग्रुप ऑफ ब्रिटेनने प्रथम बर्फाळ पर्वत ब्रेक-अप झाल्याची माहिती दिली आहे. ब्रिटनच्या नॅशनल स्नो आणि स्नो डेटा सेंटरच्या म्हणण्यानुसार, हा हिमनग तुटण्यामुळे समुद्र पातळी थेट वाढणार नाही तर अप्रत्यक्षपणे पाण्याची पातळी अनेक ठिकाणी वाढेल. एवढेच नव्हे तर यामुळे हिमनगांचा वेग आणि बर्फाचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्यांनी असा इशारा दिला की अंटार्क्टिका हा भाग पृथ्वीच्या इतर भागाच्या तुलनेत वेगाने गरम होत आहे. अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या स्वरूपात इतके पाणी आहे की जे वितळले तर समुद्राची पातळी जगभरात 200 फूटांपर्यंत वाढू शकते. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की ए-76 हा बर्फाळ पर्वत हवामान बदलामुळे नव्हे तर इतर कारणांमुळे तुटला आहे. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे टीमचे वैज्ञानिक लॉरा गेरीश यांनी ट्वीट केले की, कालावधी पूर्ण झाल्यानंतर ए-76 आणि ए-74 हे दोन्ही हिमनग नैसर्गिक कारणांमुळे वेगळे झाले आहेत. मात्र, तरीही त्यांच्यावर आणि त्यांच्या वेगावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. नेचर मासिकाच्या म्हणण्यानुसार, सन 1880 नंतर समुद्राची सरासरी पातळी 9 इंचने वाढली आहे. यातील एक तृतीयांश पाणी ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामध्ये बर्फ वितळण्यामुळे येते.
बाजारात अनेक प्रकाराचे डोअरमॅट्स अनेक डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. पण जर एकही पैसा खर्च न करता जर आपल्याला मॅट्स मिळत असतील तर? होय हे शक्य आहे. जुन्या चादरी वापरुन आपण डोअरमॅट्स तयार करू शकता. आपण वेगवेगळ्या शीट्स जोडून जाड डोअरमॅट्सही बनवू शकता. तुम्हाला मेटला चांगला लूक द्यायचा असेल तर त्याभोवती अतिरिक्त कापड लावून वेगळा लूक तयार करता येऊ शकतो. स्वयंपाकघरातील कपाटात कापड किंवा पेपर ठेवले जातात. अशा परिस्थितीत आपण मसाल्यांच्या बॉक्सखाली जुनी चादर देखील घालू शकता. याशिवाय स्वयंपाकघरातील साफसफाईसाठी वापरण्यासाठी लागणारे कपडे जुन्या चादरींचे तयार केले जाऊ शकतात. चादरी चांगल्या स्थितीत असतील तर त्याच्या पिशव्या तयार करतात येतील. तुम्ही इतर कापड वापरुन त्याला आकर्षक लूक देऊ शकतात. तुम्ही जुन्या शीटमधून खिडक्यांसाठी पडदे देखील बनवू शकता. तुम्हाला फक्त खिडकीच्या आकाराची शीट कापून त्याचा शिवण मारायची आहे. यानंतर एका बाजूने शीटमध्ये तार टाकून पडदा वापरता येऊ शकतो.
वार्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान' असं गोविंदाग्रज कुठल्याश्या प्रतिभेने भारलेल्या अलौकिक क्षणी लिहून गेले असतील कोणास ठाऊक! जगण्याचा अर्थ गवसलेले असे सुवर्ण अश्वत्थासारखे लोक प्रत्येक पिढीत असतात, आणि तरी कालसामर्थ्यापुढे नाजूक पानांसारखंच त्यांना कधीतरी जावं लागतं. स्वतंत्र भारतामधल्या गणितज्ञांच्या पहिल्या पिढीतली दोन सोनेरी पिंपळपाने गेल्या वर्षभराच्या कालावधीत अशीच अज्ञाताच्या चरणी अर्पण झाली. ते दोघे म्हणजे एकमेकांचे परममित्र असलेले 'कोंजीवरम श्रीरंगाचारी शेषाद्री' आणि 'मुदुंबई शेषाचलु नरसिम्हन'. विषयः शब्दखुणाः
नागपूर : शारजाहहून बांगलादेशच्या चटगांव येथे जाणारे एअर अरेबियाचे विमान तांत्रिक कारणाने आपातस्थितीत रविवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानात १२९ प्रवासी होते. एअर अरेबियाचे विमान नियमित उड्डाणांतर्गत शारजाहहून चटगांवला जात होते. विमान आकाशातून जात असताना वैमानिकाला विमानाच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याचे कळले. वैमानिकाने नागपूर विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर विमानाला सायंकाळी ५. १५ वाजता डायव्हर्ट करून आपातस्थितीत उतरविण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत थांबविण्यात आले. दुरुस्तीसाठी कंपनीच्या तंत्रज्ञाला बोलविण्यात आले आहे. या दरम्यान विमान कंपनीतर्फे प्रवाशांसाठी नाश्ताची व्यवस्था करण्यात आली. विमानाच्या दुरुस्तीला वेळ लागल्यास प्रवाशांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भक्ती बरोबर शक्ती हि मिळते,तर हि शक्ती म्हणजे त्या दिव्यामधुन येणारा सुगंध. आपणांस माहित असेलही कि त्या सुगंधाने आपल्याला निरोगी सुध्दा राहता येऊ शकते. दिवा कशाचा लावला तर त्याने वातावरण शुध्द होते व आरोग्य कसे चांगले होते किंवा आजारपणात ते कसे फलदायी ठरतात हे पाहुया. दिवा छोटा व मातीचा असणे आवश्यक. शुध्द तुपाच्या दिव्यात एक कापुर वडी व एक लवंग टाकल्यास, सतत होणारी सर्दि व डोके दुखी बरी होण्यास मदत होते. दिवसातून केवळ एक वेळेस. शुध्द तुपाच्या दिव्यात एक कापुर व एक काळेमिरी टाकल्यास, मानसिक आजार, हातापायात येणारी सुज कमी होण्यास मदत होते. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात हिंग व लवंग टाकल्यास, अंगात होणारी जळजळ, एसिडीटी, मळमळ, डोक जड होण, जुलाब होणे हे विकार थांबण्यास मदत होते. मोगर्याचे तेल ( चमेली तेल ) मध्ये दोन थेंब दुधाचे टाकल्यास, सतत होणारी बेचैनी, अंगदुखी, मणक्याचा त्रास, मान अवघडणे हे त्रास बरे होण्यास मदत होते. सुर्यफुलाच्या तेलाच्या दिव्यात एक कडुलिंबाचे एकपान टाकल्यास कोणत्याही आजारातुन लवकर बरे होण्यास मदत होते. शुध्द तुपाच्या दिव्यात भिमसेन कापुर व ओवा टाकल्यास हवेतील बारिक किटक जे दिसत नाहीत ते राहत नाही व एाक्सीजन चे प्रमाण सामान्यतः वाढण्यास मदत होते. शुध्द तुपाच्या दिव्यात खाण्याच्या पानाचे एक देठ, हिंग, एक इलायची, एक लवंग टाकल्यास घरातील मतभेद दुर होतात, शांतता व लहान मुलांचे बुध्दी चातुर्य वाढते. आपण सर्वजण घरामधील मंदिरात, तुळशीजवळ दिवा लावतो, कारण दिवा लावल्याने तन व मन प्रसन्न होते, भक्ती बरोबर शक्ती हि मिळते, तर हि शक्ती म्हणजे त्या दिव्यामधुन येणारा सुगंध. आपणांस माहित असेलही कि त्या सुगंधाने आपल्याला निरोगी सुध्दा राहता येऊ शकते. दिवा कशाचा लावला तर त्याने वातावरण शुध्द होते व आरोग्य कसे चांगले होते किंवा आजारपणात ते कसे फलदायी ठरतात हे पाहुया. दिवा छोटा व मातीचा असणे आवश्यक.
विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर भाजपाकडून महिलांना पुरेशा प्रमाणात उमेदवा-या दिल्या जात आहेत, असा दावा पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी केले. पणजी : विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर भाजपाकडून महिलांना पुरेशा प्रमाणात उमेदवा-या दिल्या जात आहेत, असा दावा पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागा भाजपा जिंकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रीमती रहाटकर यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीलाही उपस्थिती लावली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांचे गोव्यात महिलांना उमेदवारीच्या बाबतीत डावलले जाते याकडे लक्ष वेधले असता भाजपा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. गोव्यातील स्थिती मला माहीत नाही, परंतु राष्ट्रीय स्तरावर याआधी पुरेशा प्रमाणात महिलांना तिकिटे दिली गेलेली आहेत, असे त्या म्हणाल्या. महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक भाजपानेच आणले. महिलांना उमेदवा-या मिळाव्यात यासाठी महिला मोर्चाचे प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपा जिंकणार, असा दावा करताना पक्षाच्या कल्याणकारी योजना घराघरात पोचविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. १६५0 पैकी १४00 बूथवर काम झालेले आहे. ३१ जुलैपर्यंत उर्वरित २५0 बूथवरही आम्ही पोहचू. प्रत्येक बूथवर १0 महिला काम करतील, असे त्या म्हणाल्या. जेव्हा जेव्हा गोव्यातील दोन्ही जागा भाजपाने जिंकलेल्या तेव्हा तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झालेले आहे, अशी पुष्टीही जोडताना गोवा याबाबतीत पक्षाला लकी ठरल्याचे सुतोवाच केले. केंद्र सरकारबरोबरच गोव्यातील भाजपा सरकारनेही महिलांना लाडली लक्ष्मी, गृहआधार यासारख्या कल्याणकारी योजना दिल्या. त्याचा लाभ हजारो महिला घेत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महिलांसाठी येथे चांगले काम केले आहे, असे कौतुकाचे उद्गारही त्यांनी काढले. रहाटकर म्हणाल्या की, भाजपाने नेहमीच विकासाचे राजकारण केले. केंद्र सरकारने 'मातृत्त्व सुरक्षा योजना' यासारखी महत्त्वाची योजना दिली. तिहेरी तलाक कोर्टाने अवैध ठरवावा, यासाठी केंद्राने समर्थन दिले. मुस्लिम समाजात हलालची कुप्रथा आहे त्यालाही केंद्र सरकार कोर्टात विरोध करणार आहे. दरम्यान, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक बाबतीत चर्चा झाल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. परंतु याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. पत्रकार परिषदेस भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सुलक्षणा सावंत, राज्य कार्यकारिणी उपाध्यक्षा कुंदा चोडणकर, महिला प्रभारी श्रीमती कौशल्या ब्रार, पूनम सामंत, सपना मापारी, शीतल नाईक व इतर उपस्थित होत्या.
औरंगाबाद, 26 ऑक्टोबरः मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मराठा आरक्षण रद्द झालेलं नाही, सुप्रीम कोर्टानं त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित असल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तसेच सुप्रीम कोर्टात मी युक्तिवाद केलेला नाही, त्यामुळे माझ्यावर आरोप करणे चुकीचं आहे, असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक चव्हाण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. चव्हाण म्हणाले, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. संवैधानिक कोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी न्यावं. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे या खंडपीठाचा अंतरिम आदेश निरस्त करण्याच्या अर्जावरील सुनावणी घटनापीठापुढेच झाली पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान, मराठा आरक्षण स्थगित करण्याचा खंडपीठाचा अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी अर्ज करतानाही राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात तशी विनंती केली होती. उद्याच्या सुनावणीत आम्ही ही विनंती पुन्हा करणार आहोत, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारनं आणखी जोर लावायला पाहिजे म्हणजे काय करायचं? , असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला पाहिजे, ही फक्त सरकाची नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे. मराठा आरक्षणावरुन आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात मंजुरी मिळावी, ही आमची ठाम भूमिका आहे, असं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळाल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठण्यासाठी राज्य सरकारनं कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूव भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली. जालना येथे राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेत छत्रपती संभाजी राजे बोलत होतं. यावेळी आमदार नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजही माझाच आहे. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचं मात्र पानीपत होऊ द्यायचा नाही, असा सल्ला देखील संभाजी राजे यांनी मराठा कार्यकर्त्यांना दिला. आपला राज्य सरकारच्या समितीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, दगाफटका केल्यास सोडणार नाही, असा सज्जड इशारा देखील संभाजी राजे यांनी सरकारला दिला. खासदार संभाजी राजे छत्रपती म्हणाले, आरक्षण मला नको तर 85 टक्के गरीब मराठ्यांना हवं आहे. शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. 200 वर्षांनंतर छत्रपती शाहू महाराजांनी देखील वंचितांना आरक्षण दिलं. मग आता मराठा समाज बहुजनातून बाहेर का? वंचितांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाज मागासलेला सिद्ध होऊन देखील त्यांच्या आरक्षणाला विरोध का? आता फक्त एकच लक्ष्य ठेवायचा तो म्हणजे हक्काचा SEBC आरक्षण टिकविणे, असं संभाजी राजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय जोर लावायचा तो लावा आणि हे आरक्षण टिकवा, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना माझी विनंती आहे, असंही संभाजी राजे यावेळी म्हणाले. मला नको तर माझ्यापेक्षा हुशार लोक मराठा समाजात आहे. त्यांना सारथीवर घ्या, सारथीला भरघोस निधी द्या, अशी मागणी संभाजी राजे यांनी यावेळी केली. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सध्या चौथा आठवडा सुरु आहे. काल या आठवड्यातील नॉमिनेशन पार पडले. यामध्ये उत्कर्ष, मीरा, गायत्री, जय आणि अविष्कार सुरक्षित झाले आहेत. आता आज बिग बॉसच्या घरात बीबी कॉलेज (BB College) भरणार आहे. यामध्ये काय काय धमाल उडणार हे आजच्या भागामध्ये पहला मिळणार आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्य कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भूमिका साकारणार आहेत. बिग बॉसच्या घरात #BBCollege भरणार, पाहा काय, काय धमाल उडणार? ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही. )
Gawli gang connection in Sidhu Musewala's murder case\nसिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणात गवळी गॅंगच कनेक्शन\n08 Jun, 2022, 1:01 am\nपंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी उलगडा केलेल्या या प्रकरणात आठ शार्पशूटर्सनी मिळून मुसेवालाची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी पुराव्यानुसार बांधला आहे. यापैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर आली असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. २९ मे रोजी मुसेवालाच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता.\nसंतोष जाधव याला खास मुंबईहून पंजाबला बोलावण्यात आले होते. त्याच्यासोबत महाराष्ट्राचा सौरभ महाकाळही होता. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी माहितीचे आदानप्रदान केले असून, मुंबई पोलिसांकडून सहकार्यही मागितले आहे. सिद्धू मुसेवाला यांची रविवारी, २९ मे रोजी सायंकाळी मानसातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली. मुसेवालावर सुमारे ४० राउंड गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्या शरीरावर १९ जखमा आढळल्या. त्यापैकी सात गोळ्या थेट मुसेवाला यांना लागल्या होत्या.\nसिद्धू मुसेवाला खून प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स टोळीचे नाव समोर येत होते. लॉरेन्स गँगचा कॅनडाचा गँगस्टर गोल्डी बार याने स्वतः याची जबाबदारी घेतली. त्यानंतर याच टोळीतील सचिन थापन बिश्नोई याने टीव्ही चॅनलवर फोन करून हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यात आता गवळी टोळीचे नाव समोर आल्याने लॉरेन्स टोळीसह गवळी टोळीचाही खून प्रकरणात हात आहे की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
"हे मन बावरे'मध्ये दुर्गाबाईंना सिद्धार्थच्या आयुष्यातून अनुश्री दीक्षितला कायमचे दूर करायचे आहे. त्यासाठी त्यांनी सिद्धार्थला मनवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांचे न ऐकता तो घर सोडून निघून गेला. आता दुर्गाबाईंनी सिद्धार्थला पाठिंबा देण्याचे नाटक सुरू केले आहे. अनुश्रीसमोर त्या विचित्र अट घालणार आहेत. ही अट अनुश्री कधीच मान्य करणार नाही, हे त्यांनाही माहिती आहे. पण अनुश्रीला फेरविचार करण्याची संधी मिळाली आहे. आता यातून अनुश्री कसा मार्ग काढते आणि सिद्धार्थला या सर्व घडामोडींची माहिती मिळते का, हे लवकरच समजेल.
चांगले आहे. कारण, ह्यांत मराठी भाषेतील त्या त्या शब्दांची व्युत्पत्ति चांगली दिली असून तदनुसार नियम बांधले आहेत, व व्याकरणसंबंधी सर्व विषयही यांत आहेत. दुर्बोधत्वाचा आरोप ह्या व्याकरणावर कोणी आणितात; परंतु ज्याप्रमाणे नावें तून पैलतीरास जावयाचे आहे त्यास तिचे हिसके सोसावे लागतात त्याप्रमाणेच व्याकरणाब्धिपारंगत होण्यास त्याच्या दुर्बोधत्वाचे हिमके सोसले पाहिजेत. तिसरं उपकरण कोश. प्रस्तुत पुस्तक कोशाचं असल्याकारणानं त्यासंबंधे थोडे तपशील - वार लिहिणे इष्ट दिसतं. कोशाची पद्धति अगदी प्रथम भाषांमध्ये श्रेष्ठत्व पावलेल्या संस्कृत भाषेत सुरू झाली. हे कशावरून हा आक्षेप पुढे येणारच; त्याम हल्ली चाल अमलेल्या कोशपद्धतीच्या इतिहासाचं आविष्करण हेच उत्तर होय. हे आविष्करण योग्य स्थळी होईलच. संस्कृत भाषेत ५६ कोश आहेत असे हाणण्याची रूढी पूर्वापार आहे. परंतु ह्या संख्येपेक्षा कोशांची सं ग्या जास्त असावी असे आमचे अनुमान आहे. ह्या कोशांची व्यवस्था हल्लींच्या कोशांतील व्यवस्थेप्रमाणं वर्णानुक्रमानं केलेली नाही. वेगळाल्या विषयांच्या संबंधाने शब्दांचे वर्गीकरण त्यांत केले आहे व त्यांस स्वर्गवर्ग, मनुष्यवर्ग, वनौषधिवर्ग, वैश्यवर्ग इत्यादि नांवें दिलेली आहेत. ह्यांत तत्तद्वगीय शब्दांचा संग्रह असतो. क्वचित् आद्यंत वर्णांवरूनही श ब्दांचे परिगणन असतं. असल्या कोशांच्या रचनेचा काल भारतवर्षीय राजांच्या व विद्यांच्या व्हासाबरोबरच झाला. त्याचे पुनरुज्जीवन बन्याच वर्षांत झाले नाही. पुढे बराच काळ लोटल्यानंतर मराठी राज्याचे संस्थापक श्रीशिवाजी महाराज ह्यांनी स्वराज्य स्थापिल्यावर तो काळ पुनः डोकावू लागला. तेव्हांपासून पेशव्यांच्या राज्याच्या अखेरीपर्यंत कांहीं विद्वद्वत्लें भरतभूमीच्या पोटी निपजली. त्यांनी संस्कृत व प्राकृत ग्रंथरचना बरीच केली. त्यांत अशा तऱ्हेचा एकच ग्रंथ झालेला पहाण्यांत येत आहे; तो पंडित रघुनाथरायकृत राजव्यवहारकांश होय. हा कोश हल्ली छापला असल्यामुळे पुष्कळांस माहित असेलच. पेशव्यांचे राज्याचा वारसा दुसऱ्या बाजीरावानं सोडून दिल्यापासून दक्षणेत इंग्रजांचा अम्मल झाला. राजकीय अमलावरोवर इंग्रजी विद्याकलांनीही आपला अंमल सुरू केला. जसजसा हा अंमल जारी झाला तसतसे पाश्चात्य विद्याकळादिकांच्या इतिहासाचें ज्ञान वाढत गेले. त्या इतिहासावरून असे स्पष्ट दिसत की हल्ली भूगोलाच्या बऱ्याच अंशावर बोलली व लिहिली जाणारी व त्यामुळेच भूगोळांतल्या सर्व भाषांपेक्षा श्रेष्ठत्व पावलेली अशी जी इंग्रजी भाषा त्या भापतला पहिला कोश डा० जानसन नांवाच्या महापंडिताने तयार केला; व डा. जानसनचा इंग्रजी भाषेचा कोश पाहूनच युरोपांतील इतर राष्ट्रांनीही आपआपल्या भाषांचे कोश तयार करविले. ह्यावरून संस्कृत भाषेंतत्र प्रथम कोश झाले होते हैं आ मर्चे सदरचें ह्मणणें सिद्ध होतं. डा० जानसनच्या कोशाप्रमाणे संस्कृत भाषेचे कोश वर्णानुक्रमबद्ध - व ह्मणूनच पहाण्यास अति सुलभ - नव्हते, हे खरे; परंतु संस्कृत शब्दसंग्रह शिकण्याची पद्धति इंग्रजी तऱ्हेची न
संसदेत कृषी विधेयकावरून सुरु असलेले आंदोलन आणि करोना संकटाची तीव्रता आणखी वाढल्याने गुंतवणूकदार धास्तावलो आहेत. त्यांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात चौफेर विक्री केली असून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई : शेअर बाजारात सध्या मोठी पडझड झाली आहे. चौफेर विक्रीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७५० अंकांनी गडगडला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४३ अंकांनी घसरला आहे. या पडझडीत गुंतवणूकदारांचे सुमारे दोन लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. आज सकाळपासून बाजारावर नकारात्मक वातावरणचा प्रभाव होता. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. अमेरिकेतील निवडणूक, करोनाचे नुकसान आणि अर्थव्यवस्थेला होणारी मदत याचे पडसाद भांडवली बाजारावर उमटले. सिंगापूरसह प्रमुख शेअर बाजारांत आज घसरण झाली. तो पाहून भारतीय बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु केला. सध्या सेन्सेक्स ७४३ अंकांनी कोसळला असून तो ३८१०२ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी २४३ अंकांनी घसरला असून तो ११२६१ अंकावर आहे. केंद्राचा दणका; शेतकऱ्यांनंतर कोट्यावधी दुकानदार 'या' कायद्यामुळे संकटात सेन्सेक्स आणि निफ्टीने घसरणीची वाट धरली. संसदेत कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका होत आहे. एकीकडे करोनाशी लढाई सुरु असताना कृषी विषेयकावरून सुरु असलेल्या गोंधळाने बाजारात अस्थिरता निर्माण झाली. गुंतवणूकदारांनी या परिस्थितीत पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिले. आजच्या सत्रात टेलिकॉम, बँका, वित्त संस्था, वाहन उद्योग या क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला. आयटी आणि हॉटेल कंपन्यांच्या शेअरला मात्र खरेदीदर होते. Gold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २७ शेअर घसरणीसह बंद झाले. तर इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि टीसीएस या शेअरमध्ये वाढ झाली. वित्त सेवा क्षेत्रात एडलवाइज फायनान्शिअल, इंडियाबुल्स हौसिंग, मुथूट फायनान्स, श्रीराम सिटी युनियन, आदित्य बिर्ला कॅपिटल, हुडको आदी महत्वाचे शेअर घसरले आहेत. त्याशिवाय आजच्या पडझडीत स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांना देखील जबर फटका बसला आहे. डिझेल स्वस्त; सलग पाचव्या दिवशी दर कपात रिझर्व्ह बँकेच्या अहवालात बँकांमधील आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्यानंतर आज बँकांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. ज्यात एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आदी शेअर घसरले. चलन बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी वधारून ७३. ३८ वर बंद झाला. शुक्रवारीसुद्धा तो ७ पैशांनी वधारला होता.
हिरानंदानी समूहातील एच-एनर्जी गेटवे या कंपनीतर्फे रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे उभारण्यात आलेल्या नैसर्गिक वायू प्रकल्पामुळे दाभोळच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला नैसर्गिक वायूचा नियमित पुरवठा होऊन तेथे बारमाही वीजनिर्मिती होईल, असा विश्वास मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला. देशातील या पहिल्याच तरंगत्या नैसर्गिक वायू पुनर्भरण प्रकल्पामध्ये परदेशातून अन्य जहाजांद्वारे येणारा नैसर्गिक वायू जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या बंदर परिसरात एच-एनर्जीने भाडे करारावर घेतलेल्या जहाजावरील साठवण टाक्यांमध्ये उतरवून घेतला जाणार आहे. अशा प्रकारे सुमारे साडेचार हजार टन वायू साठवण्याची या टाक्यांची क्षमता असून तेथे प्रक्रिया करून कंपनीतर्फे टाकल्या जात असलेल्या नलिकेवाटे देशाच्या अन्य भागांमध्ये पाठवण्यात येणार आहे. जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या बंदरातील जेटी आणि अन्य सेवांचा त्यासाठी भाडेतत्त्वावर वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवरमध्ये वीजनिर्मितीचे काम पावसाळ्यात नैसर्गिक वायूच्या पुरवठय़ाअभावी बंद राहते. कारण त्या काळात तेथील जेटीवर जहाजे येऊ शकत नाहीत, पण जयगडचे बंदर बारमाही असून एच-एनर्जीतर्फे येथे उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेला नैसर्गिक वायू दाभोळसह राज्याच्या विविध भागांमध्ये बंद नलिकेवाटे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे दाभोळ प्रकल्पासाठी नैसर्गिक वायूचा नियमितपणे पुरवठा होऊन तेथे अखंडितपणे वीजनिर्मिती होऊ शकेल. अवघ्या १७ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प उभा करणाऱ्या एच-एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक दर्शन हिरानंदानी यांचे विशेष कौतुक करून फडणवीस म्हणाले की, येथे उपलब्ध होणारा नैसर्गिक वायू उद्योग, वाणिज्य आणि घरगुती वापर या तिन्हीसाठी वापरला जाणार आहे. प्रदूषणरहित ऊर्जा, ही देशाची गरज भागवण्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्वाचे योगदान राहील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, प्रसाद लाड, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, जिंदाल उद्योगसमूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, या औपचारिक कार्यक्रमापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत निरंजन हिरानंदानी म्हणाले की, पर्यावरणस्नेही ऊर्जेच्या प्रसारासाठी एच-एनर्जी प्रयत्नशील असून हा प्रकल्प त्याचाच भाग आहे. सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा कमीत कमी किमतीत उपयोग येथे करण्यात आला आहे. वाहने किंवा औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच घरगुती वापरासाठी बंद नलिकेद्वारे गॅसपुरवठा करण्याची आमची योजना आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात सीएनजीचे जाळे उभारत असलेल्या युनिसेल कंपनीला या वायूचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जाणार आहे.
लोकसभेनंतर आज राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. आता यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी होताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. दरम्यान हे विधेयक राज्यसभेत मंजूर होताच पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया देत विधेयकास पाठिंबा दिलेल्या राज्यसभेतील सर्व खासदारांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी म्हटले की, त्यांचे हे पाऊल भारताच्या इतिहासात सदैव स्मरणात ठेवले जाईल. शिवाय, आजचा दिवस ऐतिहासीक असल्याचेही ते म्हणाले. मोदींनी म्हटले आहे की, आज एक ऐतिहासीक दिवस आहे. आज कोट्यवधी मुस्लीम माता-भगिनींचा विजय झाला आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. या ऐतिहासीक क्षणी मी सर्व खासदारांचे आभार व्यक्त करतो. तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणे हे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तुष्टिकरणाच्या नावाखाली देशातील कोट्यावधी मात-भगिनींना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप केले गेले आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मुस्लीम महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा मान आमच्या सरकारला मिळाला. राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक विधेयक ९९ विरूद्ध ८४ च्या फरकाने मंजूर झाले. तिहारी तलाक विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, तीन संचालकांसह सचिवावर सरकारी वाहनाचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि संचालकांनी मंगळवारी (दि. ५) बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज आटोपून पिंपळगाव येथील १०० एकर जागेत असलेल्या बाजार समितीला भेट पाहणी दौरा करण्याचे नियोजन केले. यामध्ये सभापती शिवाजी चुंभळे हे आपल्या खासगी वाहनाने काही संचालकांना घेऊन तर उपसभापती संजय तुंगार यांनी संचालक दिलीप थेटे, रवींद्र भोये, युवराज कोठुळे तसेच बाजार समिती सचिव अरुण काळे यांना आपल्यासोबत घेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे वाहनामध्ये (एमएच १५-ईएक्स ३७९५) बसून पिंपळगावकडे प्रस्थान केले. पिंपळगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन बाहेर फोटोसेशन करून पुन्हा त्याच वाहनात बसून बाजार समितीच्या १०० एकर जागेत बांधलेल्या विविध कामकाजांची पाहणी केली. दीड-दोन तासांच्या पाहणी दौऱ्यानंतर पुन्हा सभापती, उपसभापती, संचालक मंडळाने वाहनात बसून नाशिककडे प्रस्थान केले होते. सध्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी सरकारी वाहनांचा वापर न करता ही वाहने कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. असे असताना बाजार समितीच्या उपसभापती व अन्य संचालकांनी बाजार समितीच्या वाहनाचा सर्रासपणे वापर करून आचारसंहितेचा भंग केला. याची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी माने यांनी गुरुवारी (दि. १४) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना कारवाईचे आदेश दिले होते.
प्रो-टेम सभापती नियुक्तीच्या हालचाली : गिरीश चोडणकर । पुढारी\tTop\nFri, May 29, 2020 21:49\nहोमपेज › Goa › प्रो-टेम सभापती नियुक्तीच्या हालचाली : गिरीश चोडणकर\nप्रो-टेम सभापती नियुक्तीच्या हालचाली : गिरीश चोडणकर\nविधानसभेचे उपसभापती असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रो-टेम सभापती नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या जवळच्या आमदाराला प्रो-टेम सभापती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपसभापती असताना प्रो-टेम सभापतींची निवड ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रो-टेम सभापतींची निवड करू नये. तसेच यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, प्रो-टेम सभापती निवडीसाठी प्रयत्न सुरू नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.\nचोडणकर म्हणाले, मंत्री विश्वजित राणे यांच्यावर अपात्रता याचिका दाखल केली आहे. ते अपात्र व्हावेत म्हणूनच प्रो-टेम सभापती नियुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राणे व सावंत एकाच पक्षातील असले तरी एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. सावंत यांना राणे आपले प्रतिस्पर्धी वाटतात. राणे आपले मुख्यमंत्री पद हिरावून घेतील, अशी भीती सावंत यांना आहे. पद राखण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत.\nसभापती तसेच उपसभापतींनी राजीनामा दिल्यास प्रो-टेम सभापती नेमण्याची मुभा आहे. प्रो-टेम सभापती हे एक संविधानिक पद आहे. त्यामुळे सभापती किंवा उपसभापती असताना प्रो-टेम सभापती नेमण्याची कसलीच तरतूद संविधानात नाही. सभापती किंवा उपसभापतींचा मृत्यू झाल्यास हे पद रिक्त ठेवता येत नाही, अशा वेळी प्रो-टेम सभापती नेमला जातो. सभापतीचे सर्व अधिकारही प्रो-टेम सभापतीला मिळत नाहीत. प्रो-टेम सभापतींना मर्यादित अधिकार आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले.\nभाजपने वेळोवेळी लोकांचा घात केला आहे. मगोपने भाजपला पाठिंबा दिला. परंतु भाजपने रातोरात त्यांचेच आमदार पळविले. चौकीदार रात्रीचे आमदार चोरुन नेतात. सरकारला पाठिंबा दिलेले विजय सरदेसाई आपल्या तिन्ही आमदारांना एकटे सोडत नसून विदेश दौर्यांवरही आमदारांना सोबत घेऊन फिरतात, असे चोडणकर म्हणाले.
जोरात वारे वाहून वादळ निर्माण होत वीजांचा कडकडाटात शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधा उडाली. पुणे : सकाळपासूनच कडक ऊन . . . सर्वत्र उकाडा. . आणि दुपारी दीडच्या सुमारास अचानक जोरात वारे वाहून वादळ निर्माण होत वीजांचा कडकडाटात शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधा उडाली. कारण सकाळी सर्वत्रच ऊन आणि उकाडा जाणवत होता. दुचाकीस्वारांनी झाडांचा आश्रय घेतल्याचे दिसत होते. या एका दिवसात नागरिकांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंचे दर्शन होऊन वेगळा अनुभव मिळत आहे. या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार झाले असून आधीच उकाडा त्यात वीज नसल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्कः दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्याच बरोबर वेगवान गोलंदाज उमरान मलिक प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. दुसऱ्या वनडेत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. उमरान मलिक भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. उमरानला न्यूझीलंड दौऱ्यावर वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याचवेळी, कुलदीप सेन आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. पहिल्या वनडेत बांग्लादेशने 1 विकेटने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे भारताला मालिका वाचवण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. त्याचबरोबर बांग्लादेश दुसऱ्या वनडेतही बाजी मारून मालिका जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
राज्यात कोरोनाचा विस्फोट होत असताना तसेच रुग्णसंख्या एकीकडे झपाटय़ाने वाढत असताना, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहे. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळले नसते. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके हे पक्षसंघटना बाजूला ठेवून शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवत होते. प्रसंगी आम्हाला मदत केली. म्हणून आम्ही त्यांच्या रिक्त जागेवर होत असलेल्या निवडणुकीसाठी त्यांच्या पुत्राला मदत करण्यासाठी प्रचारासाठी आलो आहोत. राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी प्रशासकही नेमले आहेत. या मतदारसंघाची पोटनिवडणूक तीन महिन्यांनी लागली असती तरी चालले असते. मात्र, केंद्राने ही निवडणूक लादली. अस्तित्व दाखवण्यासाठी प्रचार करणे भाग आहे, असेही ते म्हणाले.
Gram Panchayat Elections राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. अहमदनगरः विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. ( Maharashtra Gram Panchayat Elections Latest News ) करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. त्यावरूनही राजकारण पेटले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. १० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असताना ग्रामीण भागात निवडणुकांची जोरदार धामधूम पाहायला मिळणार आहे. करोना संबंधीच्या नियमांचे पालन करून निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब या निवडणुकांमध्येही पहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवविण्याची घोषणा अलीकडेच केली आहे. भाजपने स्वबळाचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. दोन्ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर व्हायची आहे. येत्या काळात या राजकीय जुळवाजुळवीला वेग येणार आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रथमच होत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसली तशीच चुरस यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. प्रशासक नियुक्त्यांच्यावेळी झालेल्या राजकारणातून याची झलक पहायला मिळाली आहे. ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत बाजी मारणाऱ्या महाविकास आघाडीसाठी ही राजकीय आखाड्यातील दुसरी परीक्षा ठरणार आहे.
यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किराना घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किराना घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राज्य सरकारतर्फे या पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठी निवड करण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयातील सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सर्वानुमते डॉ. प्रभा अत्रे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली. त्यानंतर विनोद तावडे यांनी डॉ. प्रभा अत्रे यांचे फोनवरून अभिनंदन केले. ३ आणि ४ डिसेंबरला नाशिकमध्ये पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव होणार आहे. यावेळी डॉ. प्रभा अत्रे यांना हा पुरस्कार देण्यात येईल. पाच लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी किशोरी आमोणकर आणि पंडित जसराज यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
वॉशिंग्टन, 11 डिसेंबर : अमेरिकन राष्ट्रपती (US Election 2020) निवडणुकीत जो बायडन(Joe Biden) यांनी विजय मिळवला असून पुढील महिन्यात ते राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. परंतू त्याआधी त्यांच्या मुलावर नवीन संकट आले असून टॅक्स बुडवल्याच्या आरोप त्याच्यावर झाला असून, या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी देखील राष्ट्रपती निवडणुकीत हंटर बायडन यांनी (Hunter Biden ) चीन आणि युक्रेनमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप जो बायडन (Joe Biden) यांच्यावर केला होता. त्यामुळे आता त्याच्या संकटात वाढ होऊ शकते. बीबीसीने या संदर्भात न्यूयॉर्क टाइम्सच्या(New York Times) हवाल्याने वृत्त दिलं असून यामध्ये त्यांनी एका संदिग्ध ई-मेलचा देखील उल्लेख केला आहे. या मेलमधे युक्रेनमधील ऊर्जा कंपनी बरिश्मा (Burisma) च्या एका अधिकाऱ्याने जो बायडन यांची भेट घालून दिल्याबद्दल हंटर याचे आभार मानले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी त्याला भली मोठी रक्कम मिळाल्याचा देखील दावा करण्यात येत आहे. डेलवर या राज्यामध्ये हंटरवर युक्रेनमध्ये पैशांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, या युक्रेनमधील कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर हंटर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर हे आरोप केल्यानंतर त्यांनी आपलं ऑफिशियल शेड्युल तपासण्याची विनंती केली. आपल्या शेड्युलमध्ये कुठेही ही भेट झाली नसल्याचे देखील यावेळी बायडन यांनी स्पष्ट केले. युक्रेनच्या कंपनीच्या आणि जो बायडनमध्ये भेट झाली असल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये आले होते. परंतु बायडन यांना शेड्युलमध्ये याची नोंद करण्यात आलेली नाही. याच कंपनीबद्दल बोलायचे झाले तर युक्रेनमधील या कंपनीवर हंटर हा 2014 ते 2019 पर्यंत बोर्डावर होता. परंतु युक्रेन हा आधी सोव्हिएत रशियामध्ये होता त्यामुळे एकप्रकारे शत्रूराष्ट्र रशियाचा भाग मानला जातो. त्यामुळे या देशातील कंपनीवर हंटर असणं देशाच्या सुरक्षेला आव्हान दिल्यासारखं असल्याचं म्हटले जातं. हंटरने 2019 मध्ये या कंपनीच्या बोर्डावरून राजीनामा दिला. 2019 च्या मध्यात अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया होत होती. आपल्या वडिलांना यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे देखील त्यावेळी बोललं गेलं होतं. हंटर याचा चीनमध्ये मोठा व्यवसाय असून त्यासंदर्भात समोर आलेले हे आरोप फारसे धक्कादायक नाहीत. पॉलिटिफॅक्ट वेबसाईटच्या माहितीनुसार हंटर याने 2008 मध्ये चीनमध्ये आपला व्यवसाय सुरु केला होता. याआधी देखील त्याने चीनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच्या या आरोपांवर कंझव्हेटिव्ह लेखक पीटर स्वेजर यांनी एक पुस्तक देखील लिहिलं आहे. 'Secret Empires: How the American Political Class Hides Corruption and Enriches Family and Friends' नावाच्या या पुस्तकात हंटरविषयी अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर करून त्याने कशा पद्धतीने चीनमध्ये आपला व्यवसाय विस्तारला होता याची माहिती देण्यात आली आहे. चीनमधील एका डिलसाठी स्वतः जो बायडन आपला मुलगा हंटर याच्यासोबत चीनमध्ये गेले होते. त्यावेळी बैठकीनंतर 10 दिवसांमध्ये चीनच्या बँक ऑफ चायनाकडून त्याला 1. 5 बिलियन डॉलरची डील मिळाली होती असा आरोप ट्रम्प यांनी वारंवार केला होता. या मेलमध्ये अनेक धक्कादायक गोष्टीसमोर येत असून चीनच्या एका उद्योगपतीकडून हंटर याला वर्षाला 10 मिलियन डॉलर मिळत असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. चीनच्या एका ऊर्जा कंपनीबरोबर हंटर याचा संबंध असल्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. हे पैसे त्याला केवळ भेट घडवून आणण्यासाठी दिले जात असल्याचंही मेलमध्ये लिहिलंय. परंतु या भेटी तो कुणाबरोबर घडवून आणत असे या संदर्भात कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. हंटर याच्यावर हे आरोप झाल्यानंतर जो बायडन यांनी याचा इन्कार केला असून आपल्या मुलाच्या व्यवसायाशी आपलं काही देणं-घेणं नसल्याचं बायडन यांनी म्हटल्यांचं फॉक्स न्यूजने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात जो बायडन उपराष्ट्रपती असताना हंटर बायडन याची सैन्यातून हकालपट्टी करण्यात आली होती. नशा केल्याचा आरोप त्यावेळी त्याच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच व्हाईट हाऊसमधील अतिशय गुप्त अशी माहिती असणारा लॅपटॉप एकदा त्याच्याकडून जप्त करण्यात आला होता. विशिष्ट कालावधीत हंटरने टॅक्स घोटाळा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवून सध्या त्याची या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
जागाखरेदीसाठी वाकड 'मोस्ट सर्चड्'! पुण्यात जागा विकत घेण्यासाठी सर्वाधिक लोक वाकडचाच विचार करीत असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. '९९ एकर्स' या संकेतस्थळाने केलेल्या पाहणीत २०१२ साली वाकड हा पुण्यात जागा खरेदीसाठी संकेतस्थळावर सर्वात जास्त शोधला गेलेला भाग ठरला आहे. तर कोथरूडचा जागा भाडय़ाने घेण्यासाठी सर्वाधिक शोध केला गेल्याचे समोर आले आहे. संकेतस्थळातर्फे पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये अशा प्रकारची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनुसार संकेतस्थळाने पुण्यातील जागाखरेदीसाठी तसेच जागा भाडय़ाने घेण्यासाठी शोधल्या गेलेल्या पहिल्या वीस ठिकाणांची यादीच प्रसिद्ध केली आहे. जागाखरेदीच्या बाबतीत वाकडच्या खालोखाल बाणेरचा आणि त्यानंतर कोथरूडचा क्रमांक लागला आहे. तर बालेवाडी आणि कोंढवा जागाखरेदीसाठी सर्वात कमी लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. जागा भाडय़ाने घेण्यासाठी कोथरूडनंतर औंधने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर बाणेर जागा भाडय़ाने घेण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर आहे. बावधन या यादीत सर्वात शेवटच्या म्हणजे विसाव्या क्रमांकावर आहे. 'तरुण आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण नागरिक मोठय़ा आकाराच्या घरांच्या शोधात असल्याचे चित्र असून अशा प्रकारच्या घरांमधील गुंतवणुकीसाठी वाकड लोकप्रिय होत आहे. या भागांतील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांचा विकास या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे', असे संकेतस्थळाने म्हटले आहे.
देहरादून, 15 मे : फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअॅपवर मैत्री आणि प्रेम झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशीच एक घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी भागात घडली आहे. येथे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला आलेल्या दोन तरुणांमध्ये मारमारी झाली. त्यानंतर कळालं की, दोन्ही तरुणांसोबत एकच तरुणी प्रेमाचा खेळ खेळत होती. तब्बल दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन गेम खेळत असताना तिची मैत्री राजस्थानमधील तरुणासोबत झाली होती. त्यानंतर दोघेही एकत्रच पबजी गेम खेळत होती. यादरम्यान दोघांनी आपला मोबाइल नंबर शेअर केला आणि फोनवर बोलू लागले. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले, आणि भेटण्याचा प्लान केला. एक महिन्यापूर्वी ऑनलाइन खेळादरम्यान तरुणीचा मैत्री मुरादाबाद येथील एका तरुणासोबत झाली. या तरुणासोबतही ती प्रेमात पडली. तरुणीने मुरादाबादमधील तरुणाला भेटण्यासाठी हल्द्वानी येथे बोलावलं. शुक्रवारी दोघांना भेटायला तरुणी मल्ला गोरखपूर हल्द्वानी येथे पोहोचली. येथे पोहोचताच दोघेही तरुणीला आपली प्रेयसी असल्याचं सांगून भांडू लागले. गोंधळ झाल्यानंतर कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस दोघांनाही ठाण्यात घेऊन गेले. येथे चौकशीदरम्यान सत्य समोर आलं. तरुणीने दोन्ही तरुणांना एकत्र का बोलावलं, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ज्यावेळी दोन्ही तरुण भांडण करीत होते, त्यावेळी तरुणीही तेथे होती. यावेळी तिने राजस्थानमधील तरुणाला कानशिलात लगावली. पबजी गेम खेळण्यात दोन्ही तरुण प्रोफेशनल लेव्हलचे खेळाडू आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
भारतात सातत्याने प्रदूषण वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 15 शहरे भारतातील आहेत. तथापि, गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2022 च्या तुलनेत, खराब हवेची गुणवत्ता असलेल्या देशांच्या यादीत (World's Most Polluted Cities) भारताने तीन स्थानांवर सुधारणा केली आहे. या अहवालानुसार चाड, इराक, पाकिस्तान, बहरीन आणि बांगलादेश हे जगातील सर्वाधिक प्रदूषित देश आहेत. या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे. नियामधील सर्वात प्रदूषित शहर पाकिस्तानातील लाहोर आहे. यानंतर चीनचे होटन दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारताचे भिवंडी शहर तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली हे चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे. सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर नदजामेना (चाड) आहे. (हे देखील वाचाः Housing Sales in India: आर्थिक वर्षे 2023 मध्ये देशात तब्बल 3. 47 ट्रिलियन रुपयांच्या घरांची विक्री; मुंबई आणि पुणे आघाडीवर- Anarock) गेल्या काही वर्षांत आपल्या वातावरणात ज्या प्रकारे प्रदूषण वाढत आहे, ते केवळ वर्तमानासाठीच नव्हे तर भविष्यासाठीही अनेक प्रकारे आव्हानात्मक ठरू शकते. भारताची राजधानी दिल्ली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण इतके वाढते की लोकांना मोकळ्या हवेत श्वास घेणेही कठीण होते. जलप्रदूषण ही देखील आपल्यासाठी गंभीर समस्या आहे. दिल्लीतील यमुनेची स्थिती सर्वांनाच माहिती आहे. येणाऱ्या काळात शुद्ध पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागेल याची साक्ष यमुनेचा फेस देतो. प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने महत्त्वाचे धोरण आखले पाहिजे. यासोबतच प्रत्येक व्यक्तीने जबाबदार नागरिक बनून योगदान दिले पाहिजे, तरच प्रदूषणाच्या लढाईत विजय शक्य आहे.
पण शेतमालाचे भाव वाढले तर सारे गळे काढू लागतात. पण असं का होतं, यावर कोणी विचार करत नाही. पेट्रोलचे भाव वाढले तर ते पुन्हा कमी होण्याची क्वचित शक्यता आहे हे माहीत असतं.पण दोनचार दिवस आदळआपट करत पुन्हा पंपावरच्या रांगा आणि वाहनखरेदी थांबत नाही. शेतमालाच्या भावात चढ-उतार का होतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला कितपत होतो, याचा विचार करण्याची शक्ती मध्यम आणि उच्चवर्ग हरवून बसला आहे. शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच येत चालला आहे. यामुळंच शेतीकडं आजची सुशिक्षित पिढी आकर्षित होत नाही. एक कप चहाला आम्ही १५-२० रुपये मोजायला तयार असतो, पण एक कोथिंबिरीची जुडी १० रुपयाला झाली तर कासावीस होतो.सरकारला शिव्या घालतो.हा आमचा दांभिकपणा नव्हे का? जर उद्या शेतीच थांबली तर... आणि तशी सुरुवातही झालेली आहे... तरुण शहरांकडे पळत आहेत. शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुलीही मिळणं अशक्य होऊ लागलं आहे. याचे परिणाम काय होणार आहेत हे आजच समजावून घेतले पाहिजेत.त्यातच भांडवलदारांनी जमिनी खरेदीचा सपाटा लावल्यानं शेतीयोग्य जमीनही कमी होत आहे. (अर्थात, हे फक्त पश्चिम महाराष्ट्रात घडतंय.) हे भांडवलदार (खरं तर राजकारणीच यात जास्त आहेत.) काही शेती करण्यासाठी जमिनी विकत घेत नाहीत हे उघड वास्तव आहे. जमिनी विकून मिळालेले पैसे कोठे गुंतवावेत याचं मार्गदर्शन नसल्यानं, अन्य व्यवसायाचा कसलाही अनुभव नसल्यानं हे गुंठासम्राट दारू, बाया आणि राजकारण यावर पैसे उडवतात. पण याबद्दल कोणीही चकार शब्द काढायला तयार नाही. त्यांचं प्रबोधन व्हावं असं कोणाला वाटत नाही. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. १. शेतकऱ्यांची अनुकरणाची प्रवृत्ती - कांद्याचा भाव वाढतो आहे असं दिसलं रे दिसलं की जो तो भसाभसा कांदेच लावणार. मग एवढं उत्पादन होतं की, मागणीपेक्षा पुरवठाच वाढतो आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. जो कांदा काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या भावानं विकला जात होता, तोच कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागतो. हे एक उदाहरण झालं. असंच अन्य पिकांबाबतही होतं. हे आपण नेहमी पाहतच असतो. हे असं होतं कारण एकूणातील गरज लक्षात घेऊन जेवढ्या प्रमाणात लागवड व्हायला हवी तशी होत नाही आणि तसं नियंत्रणही आस्तित्वात नाही. नैसर्गिक धोके लक्षात घेऊन गरजेच्या १५ ते २० टक्के एवढीच अधिक लागवड झाली तर बाजारभावाचा प्रश्न बऱ्यापैकी मिटू शकतो. यासाठी आवश्यक ती आकडेवारी उपलब्ध असते का? असली तरी ती पुरेशी असते का? आणि समजा असली तरी मुळात सर्व उत्पादक एकूण किती लागवड करत आहेत, हे कोणाला माहीत असतं का?याचं उत्तर नाही असंच आहे. खरं तर बियाण्यांच्या एकूण खपावरच नियंत्रण असलं तर? म्हणजे काही केल्या त्या-त्या विशिष्ट क्षेत्रांत विशिष्ट प्रमाणातच बियाणी उपलब्ध करायला हवीत. म्हणजे अतिरिक्ततेचं आर्थिक ओझं कोणावरच पडणार नाही. शेतकऱ्याला माल फेकून द्यावा लागणार नाही, उलट योग्य तो भाव मिळेल. किमान आज होते तशी परवड तरी होणार नाही. मान्सून चांगला गेला म्हणून उत्पादन वाढलं आणि म्हणून भाव कोसळतात हा इथं अतिरेकी सिद्धांत होतो. मुळात काय उत्पादित करायचं, किती प्रमाणात करायचं याचं नियोजन नसल्यानं भाव कोसळतात. सर्वच शेतमालाचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कोसळत नाहीत हे आपण लक्षात घेत नाही. मग मान्सून चांगला असो की वाईट. कारण मान्सून समजा वाईट गेला तर भाव चढे राहिल्यानं एकूणातील गोळाबेरीज कायम राहते. चांगल्या मान्सूनमुळे समजा उत्पादन वाढलं आणि भाव जरी कमी मिळाले तरी उत्पादनच वाढलं असल्यानं पुन्हा तेवढेच पैसे हाती येऊ शकतात.
ENG vs AUS, Ashton Agar fielding Video: क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीला महत्त्व असा अनेकांचा समज आहे. पण फिल्डिंग हा एक असा विभाग आहे की, जर त्या क्षेत्रात संघाने चांगली कामगिरी केली तरीही संघाची जिंकण्याची शक्यता वाढते. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे दृश्य पाहायला मिळते. ते पाहून चाहत्यांचे डोळ्याचे पारणे फिटते. असेच काहीसे गुरुवारी एडिलेड ओव्हल मैदानावर पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू एश्टन अगरने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवून दिला. याआधी एश्टन एगरने लियाम डॉसनला धावबाद केले होते. एश्टन अगरने एका हाताने चेंडू पकडला आणि तो लगेच फेकला आणि डॉसनने एक धाव चोरण्यासाठी त्याची विकेट गमावली. अगरने 10 षटकात 62 धावा दिल्या, पण गोलंदाजीत त्याला विकेट मिळवता आली नाही. असे असले तरी फिल्डिंगमध्ये त्याने दमदार कामगिरी दिली. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर.... मोरया माझा - ५ : श्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का? तर वरपांगी हा प्रश्न बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी उंदीरावर बसता येत नाही हे जर आपल्याला समजते, तर शास्त्रकारांना कळत नव्हते का? तरीही सांगितले तर त्यात काहीतरी वेगळा अर्थ नक्कीच असेल ना? तो समजून घेण्याची जबाबदारी कोणाची? येथे उंदीर हा प्राणी एवढा मर्यादित अर्थ नाही. त्या उंदराला प्रतीक रूपात घेतले आहे. पाहायचे आहेत ते त्याचे गुण. उंदीर कार्य कसे करतो? तर तो निशाचर अर्थात रात्री काम करतो. म्हणजे आपल्या नकळत कार्य करतो. दुसरी गोष्ट आत लपून काम करतो. तिसरी गोष्ट म्हणजे सर्व पदार्थ कुरतडतो. नकळत कार्य करणे, आत राहून कार्य करणे आणि सर्व गोष्टी कुरतडणे. अगदी असेच कार्य करणारी आणखी ही गोष्ट आहे. कोणती? तर काळ. तोही आपल्याला नकळत कुरतडत आहे. आपले हे शरीर आतल्याआत कुरतडल्या जात आहे. काळ सर्वच गोष्टींना कुरतडत असतो. अशा या काळाचे प्रतीक आहे उंदीर. त्यावर जे बसतात अर्थात काळावर ज्यांची सत्ता चालते त्या "कालत्रयातीत" परमात्म्याला मूषकवाहन म्हणतात.
ऋतू कोणताही असो त्वचेसंबंधीच्या समस्या प्रत्येक ऋतुत असतातच. ऋतुप्रमाणे या समस्यांचं स्वरुप तेवढं बदलतं. पावसाळ्यात तर त्वचेची काळजी घेण्याची खूप गरज असते. आणि नेमकं इथेच दुर्लक्ष होतं. पावसाळ्यातलं दमट कुंद वातावरण, पावसाळ्यात कधी पडणारं कडक ऊन या गोष्टी त्वचेसाठी घातक असतात. या घटकांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय शोधण्याची गरज असते. पावसाळ्यातल्या त्वचेसंबंधीच्या सर्व धोकादायक घटकांचा विचार करुन दही हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. दह्यात कॅल्शियम , प्रथिनं आणि अनेक जीवनसत्त्वं असतात. त्याचप्रमाणे त्वचेसाठी उपयुक्त ड जीवनसत्त्वंही दह्यात असतं. दह्यात असलेलं लॅक्टिक अँसिड त्वचेवरच्या सुरकुत्यांविरुध्द काम करतं. त्याचप्रमाणे त्वचा कोमलही करतं. दह्याचा वापर चेहेर्यावर केल्यास चेहेर्यावरची चमक वाढते. शिवाय मुरुम पुटकुळ्या त्यामुळे होणारी लालसर त्वचा या त्वचेशी निगडित समस्याही सहज सुटतात. 1. दही आणि बेसन यांचा एकत्रित उपयोग आपली त्वचा एक्सफोलिएट करतो. शिवाय त्वचेतील सर्व अशुध्द घटक स्वच्छ करण्याचं काम दही आणि बेसनाचा लेप करतो. तेलकट त्वचा असेल तर या लेपाचा उपयोग फेस स्क्रबसारखा करता येतो. एका वाटीत दोन चमचे दही घ्यावं आणि त्यात एक चमचा बेसन घालावं. ते चांगलं घोळून घ्यावं. ही पेस्ट चेहेर्यावर लावावी. दहा मिनिटं हा लेप तसाच राहू द्यावा. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा. या लेपामुळे चेहेर्याचा रंग खुलतो. 2. दह्याचा उपयोग घरच्याघरी फेशिअल करण्यासाठी होतो. यासाठी दही आणि लिंबू वापरावं. दही आणि लिंबात क जीवनसत्त्व भरपूर असतं. तसेच यात असलेल्या लॅक्टिक अँसिडमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहेर्याच रंग उजळतो. त्यासाठी एका भांड्यात दही घेऊन त्यात एक छोटया लिंबाचा रस पिळावा. दही आणि लिंबाचा रस चांगला एकजीव करावा. हा लेप चेहेर्यावर लावावा. हा लेप लावताना कमीतकमी 20 मिनिटं हलक्या हातानं मसाज करावा. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा. या लेपामुळे चेहेरा ताजा तवाना होतो.
भारताच्या उदयवीरसिंगने जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या गटात २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. याच प्रकारात भारताने सांघिकमध्ये सुवर्णयश मिळवले. या दोन सुवर्णपदकांसह भारताचे एकूण २४ पदके झाली आहेत. यात नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि सात ब्राँझपदकांचा समावेश आहे. ज्युनियर मुलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये उदयवीरने एकूण ५८७ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. त्याने प्रिसिजनमध्ये २९१ आणि रॅपिडमध्ये २९६ गुण मिळवले. अमेरिकेचा हेन्री टर्नर लेव्हेरेटने ५८४ गुणांसह रौप्यपदक, तर कोरियाच्या जीक्यून ली याने ५८२ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. भारताच्या विजयवीरला (५८१) चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताचा तिसरा नेमबाज राजकंवरसिंग संधू (६५८) २०व्या स्थानावर राहिला. उदयवीर, विजयवीर आणि राजकंवरसिंग यांनी एकत्रित मिळून १७३६ गुण मिळवून सुवर्णयश मिळवले. चीनच्या संघाने (१७३०) रौप्यपदकाची कमाई केली, तर कोरियाच्या संघाने (१७२१) ब्राँझपदक पटकावले. वरिष्ठ गटात शीराझ शेख स्कीटमध्ये पात्रता फेरीत आठव्या स्थानी राहिला, त्याने ४९ गुण मिळवले. अंगद वीरसिंग ४७ गुणांसह ६९व्या तर मिराज अहमद ४१ गुणांसह ७९व्या स्थानावर राहिला. या प्रकारात एकूण क्रमवारीत भारतीय संघ (१३७) १६व्या स्थानावर राहिला. स्पर्धेतील २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात भारताला पदक मिळवण्यात यश आले नाही. भारताचा गुरप्रीतसिंग ५८१ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. विजयकुमार (५७६) आणि अनिश भानवाला (५७६) अनुक्रमे २४व्या आणि २५व्या स्थानावर राहिले. विजयकुमारने लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक, तर अनिशने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. या प्रकारात भारतीय संघ १७३३ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेतून भारताला आतापर्यंत दोनच ऑलिंपिक कोटा मिळवता आले आहेत. अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय हॉकीतून सरदार सिंहची निवृत्ती! अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
मुंबईः बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना ही एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती आहे. मात्र कोरोनाच्या संकटाला केंद्र सरकार गांभीर्याने घेत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नावर एका राष्ट्रीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ही समिती केंद्र व राज्यांमध्ये समन्वय राखून काम करेल. तसे झाल्यास ऑक्सिजन, रेमडेसिविर, लसीकरण व अन्य वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही असेही ते म्हणाले. महाराष्ट्र दिनानिमित्त राऊत यांनी जनतेला शुभेच्छा देताना, करोनाच्या संकटातून राज्य बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. खासदार राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. लस वितरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. लशीच्या दरात समानता राखण्यासाठी केंद्र सरकार 100 टक्के टक्के लस खरेदी करून राज्यांना का वितरित करत नाही, असा सवाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय सक्रिय झाले असून ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे. मात्र, लसींचा पुरवठा होत नाही. अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत. कोरोनाची परिस्थिती इतकी भयंकर आहे की राजकारणविरहित काम केलं तरच हा देश वाचेल. नाहीतर इथे फक्त मुडद्याचे राज्य राहील, असेही राऊत म्हणाले.
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी आता पुन्हा त्याच जुन्या 'इमोशनल पॅटर्न'ला सुरूवात झाला आहे. शहरातील नागरिकांचे बनावट फेसबुक खाते तयार केले जात आहे. पुणे - "मी मोठ्या संकटात सापडलो आहे. मी आजारी असून, पैशांची गरज आहे. तुम्हाला जेवढे शक्य असतील, तेवढे पैसे माझ्या बॅंक खात्यावर तत्काळ पाठवून द्या. . " खासगी बॅंकेमध्ये काम करणाऱ्या अक्षय पवार या तरुणाच्या नावाने तयार केलेल्या बनावट फेसबुकवरील मेसेजद्वारे त्याच्या मित्रांना पैशांची मागणी करणारा संदेश गेला. एका मित्राने मेसेजला प्रतिसाद देत एक हजार रुपये पाठविले; मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते गेले नाहीत. तोपर्यंत अक्षयच्या अन्य मित्रांनी त्याच्यापर्यंत हा प्रकार पोचविला. अशा पद्धतीने नागरिकांच्या फेसबुक खात्याशी मिळते-जुळते बनावट फेसबुक खाते बनवून फसवणूक करण्याचा सायबर गुन्हेगारांचा 'इमोशनल पॅटर्न' पुन्हा सुरू झाला आहे. 'मी आजारी आहे', 'मी संकटात सापडलो आहे' किंवा 'आम्ही सहकुटुंब बाहेर फिरण्यासाठी आलो असताना आम्ही एके ठिकाणी अडकलो आहोत' अशी बतावणी करून त्यापुढे 'मला आर्थिक मदतीची गरज आहे. कृपया मला मी दिलेल्या बॅंक खात्यावर त्वरित पैसे पाठवून द्या" अशी भावनिक साद मेसेंजरद्वारे घातली जात असे. त्यामुळे नागरिकही काही वेळातच संबंधित नागरिकाच्या बॅंक खात्यावर पैसे पाठवीत. मात्र समोरील व्यक्तीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसे. त्यामुळे पैसे पाठविणारी व्यक्ती आपल्या ओळखीच्या व्यक्तीला फोन करून त्याच्याकडे विचारणा करीत असे. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत. सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी आता पुन्हा त्याच जुन्या 'इमोशनल पॅटर्न'ला सुरूवात झाला आहे. शहरातील नागरिकांचे बनावट फेसबुक खाते तयार केले जात आहे. त्यानंतर पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. सायबर पोलिसांकडे याप्रकरणी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. बनावट फेसबुक खाते तयार झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करा. फेसबुकवरील मेसेज पाहून पैसे पाठवू नका. मेसेंजरद्वारे पैशांची मागणी करणाऱ्याची पडताळणी करा. ज्यांच्या नावाने पैसे मागण्यात आले आहेत, त्यांच्याशी थेट बोलून पुढील कार्यवाही करा. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. माझ्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करून मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानंतर त्यातील मेसेंजरद्वारे मित्रांकडे आर्थिक मदत मागणारे मेसेज पाठविले. एका मित्राने पैसे पाठविण्याचा प्रयत्नही केला. परंतु, ते गेले नाहीत. त्यानंतर मी पोलिसांकडे तक्रार केली. बनावट फेसबुक खाते तयार करून फसवणुकीच्या काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणांचा तपास केला जात आहे. नागरिकांनीही सजग राहून कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी आर्थिक देवाण-घेवाण करू नये.
औरंगाबाद : जिल्ह्यातील एखाद्या खेड्यात एखाद्यास कोरोनाचे निदान झाले आणि त्याला ऑक्सिजनची गरज भासली, तर अनेक कि. मी. अंतर प्रवास करून शहर गाठावे लागत आहे. अशावेळी अनेक रुग्णांची ऑक्सिजनची पातळी ९० वरून ६० वर येते. अनेक रुग्ण रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेत असतात आणि त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मग रुग्ण वाचणार कसा? त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनावरील उपचाराची सुविधा वाढविण्याची गरज असल्याची अपेक्षा फिजिशियन असोसिएशनने व्यक्त केली. जिल्ह्यात शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात बुधवारी उच्चांकी ९४७ रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या १५ हजार ८०२ रुग्णांपैकी तब्बल ४५ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना सरळ शहरात रेफर केले जात असल्याची परिस्थिती आहे. रेफर करताना शहरात बेड उपलब्ध होईल की नाही, याचा कोणताही विचार केला जात नाही. ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णाची प्रकृती शहर गाठेपर्यंत आणखी खालावते. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले तरी फारसा उपयोग होत नाही. केंद्रीय पथकानेही ग्रामीण भागातून रेफर होणाऱ्या रुग्णांच्या परिस्थितीवर बोट ठेवले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळेल, अशी व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. ऑक्सिजनची पातळी ९० असताना खेड्यातील रुग्ण शहरात येतात. इथे येईपर्यंत ऑक्सिजनची पातळी ६० वर येते. मग रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवूनही उपयोग होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळायला पाहिजेत. जम्बो सेंटर उभे करून त्यांना उपचाराची सुविधा दिली पाहिजे.
yawal bamnod Youth commits suicide by strangulation\nPublished on : 28 Jul, 2020 , 5:13 pm\nबामणोद - यावल - Jalgaon - Yawal - वार्ताहर :\nयेथील कोळी वाड्यातील रहिवासी राहुल प्रमोद सोनवणे (वय २१) या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, येथील कोळीवाड्यातील रहिवासी आणि भालोद महाविद्यालयाचा प्रथम वर्ष कलाचा राहुल प्रमोद सोनवणे या तरुणाने दुपारी १२ वाजेच्या सुमारास भालोद-हिंगोणा रस्त्याने असलेल्या विष्णु वाघुळदे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.\nराहुल याच्या आत्महत्येची माहिती गावात वार्यासारखी पसरली आणि त्याचा मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपसरपंच दिलीप भालेराव, हे.कॉं. किरण चाटे, हे.कॉं. उमेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालय हलवला.\nस्वभावाने शांत आणि आज्ञाधारक असलेल्या राहुल याच्या आत्महत्येने संपूर्ण बामणोद गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याबाबत फैजपुर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉं. किरण चाटे व हे.कॉ उमेश सानप करीत आहेत.
पुणेः पुण्यात भाजपच्या (BJP) एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रीया येत आहेत. आता या मारहाणीचा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निषेध व्यक्त केला आहे. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. सर्वच पक्ष आंदोलन करतात. आमच्या विरोधात देखिल भाजप कार्यकर्ते आंदोलन करतात. केंद्रीय मंत्र्यांविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात. आंदोलन हा राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. ते सगळे पक्ष करतात. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलनात कायदा हातात कोणी घेऊ नये. केंद्रीय मंत्र्यांना संरक्षण देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. ते काम पोलीस करत आहेत, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. महिलेला अशा पध्तीने मारहाण करणं चुकीचे आहे. आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे, अशी प्रतिक्रीया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. ज्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. ज्याने मारहाण केली तो गिरीष बापट यांचा कार्यकर्ता आहे. तुम्हाला भाजपची वृत्ती आता कळाली असेल. भाजपचा मुखवटा आम्ही फाडला आहे. भाजप सुसंस्कृत नाही. केंद्राची सत्ता आहे म्हणून त्यांना मस्ती आली आहे, असंही रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रसेने (NCP) आंदोलन केलं. बालगंधर्व येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इराणी आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या सभागृहात अचानक गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजपच्या (BJP) कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
भारतात सर्वत्र चिमण्या आणि मोरांची संख्या वाढत असतानाच गिधाडे आणि गरुडासह इतर ५० टक्के पक्षी प्रजातींची संख्या घटली आहे. भारतीय पक्षी सद्यःस्थिती अहवालातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भारतात सर्वत्र चिमण्या आणि मोरांची संख्या वाढत असतानाच गिधाडे आणि गरुडासह इतर ५० टक्के पक्षी प्रजातींची संख्या घटली आहे. भारतीय पक्षी सद्यःस्थिती अहवालातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सदर अहवाल १५ हजार ५०० पक्षी निरीक्षकांच्या एक कोटींहून अधिक नोंदी वापरून बनविला आहे. भारतात प्रथमच 'सिटीझन सायन्स' या संकल्पनेचा वापर करून पक्ष्यांच्या सद्यःस्थितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात सुमारे ८६७ भारतीय पक्ष्यांच्या सद्यःस्थितीचा मागोवा घेण्यात आला. पक्षी निरीक्षकांनी केलेल्या अभूतपूर्व नोंदीच्या आधारे हे सर्व शक्य झाल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने स्पष्ट केले आहे. या कामामध्ये भारतातील दोन सरकारी आणि आठ स्वयंसेवी संस्था सहभागी होत्या. त्यामध्ये अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एनव्हायरनमेंट (एटीआईई), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी (एफइसी), नॅशनल बायोडायव्हरर्सिटी ऑथॉरिटी (एनबीए), नॅशनल सेंटर फॉर बायोलोजीकल सायन्स (एनसीबीएस), नेचर कन्झरवेशन फाउंडेशन (एनसीएफ) सलीम अली सेंटर फॉर ओर्निथोलोजी अँड नॅचरल हिस्ट्री, वेटलँडस इंटरनॅशनल साउथ एशिया, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर इंडिया यांचा सहभाग होता. पक्षी निरीक्षकांनी ई- बर्डच्या माध्यमातून संकलित केलेल्या माहितीवरून, पक्ष्यांच्या कोणत्या जातींचे संवर्धन होणे गरजेचे आहे आणि कोणत्या जाती सुरक्षित आहेत हे आता अधिकृतरित्या सिद्ध झाले आहे. या माहितीच्या विश्लेषणानंतर गेल्या २५ वर्षांत पक्ष्यांच्या ४८ टक्के जाती सुरक्षित, स्थिर आणि वाढल्या आहेत. तर गेल्या पाच वर्षांत सुमारे ७९ टक्के पक्ष्यांच्या जाती घटल्याचे निदर्शनास आले आहे. यात नोंद करण्यासारखी बाब म्हणजे, भारतात सर्वत्र चिमण्यांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या स्थिर किंवा वाढत आहे. पण शहरी भागात त्यांची संख्या कमी होत चालली आहे. या अहवालानुसार भारतातील १०१ पक्ष्यांच्या जातींना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. सामान्य पक्ष्यांची संख्या कमालीची घटत असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत सलीम अली सेंटर फॉर ओर्निथोलोजी अँड नॅच्युरल हिस्ट्री संस्थेचे डॉ. राजा जयपाल यांनी व्यक्त केले. 'पक्षी निरीक्षकांच्या भरीव सहभागामुळेच भारतासारख्या देशातून अशा प्रकारची उत्तम माहिती संकलित होऊ शकली, असे बीएनएचएसचे डॉ. गिरीश जठार यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
लोकमत विधिमंडळ पुरस्कार २०१८ उत्कृष्ट संसदपटू म्हणून आमदार ऍड यशोमतीताई ठाकूर यांना जाहीर झाला. परंतु पिताश्री माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांचे निधन झाल्याने, यशोमतीताई ठाकूर उपस्थित राहू शकल्या नाही. यावेळी हा बहुमोल व नागरिकांचे मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्यासाठी नेहमी आक्रमक राहणाऱ्या यशोमती ताई यांचा हा बहुमान, त्यांच्या प्रतिनिधी म्हणून स्वीकारला तो त्यांच्या कन्या कु. आकांक्षा यांनी. यावेळी अतिशय भावनूूक असा क्षण आज नागपूर येथील सोहळ्यात होता. राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी विरोधीपक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील, वित्त व नियोजन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व आमदार श्री जयंत पाटील, विधानपरिषद अद्यक्ष श्री रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अद्यक्ष श्री हरिभाऊ बागडे, परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते, जेष्ठ सरकारी वकील ऍड उज्वल निकम, माजी राज्यसभा सदस्य व लोकमत एडिटोरीयल बोर्डाचे अद्यक्ष श्री विजयबाबू दर्डा, माजी शिक्षणमंत्री राजेंद्रजी दर्डा उपस्थित होते. त्यामुळे हा सन्मान खऱ्या अर्थाने स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांना श्रद्धांजली असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Education board HSC, SSC examination updates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेपूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान 10 मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) या संदर्भात एक नोटिफिकेशन काढलं आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याने पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु, प्रश्नपत्रिका मोबाइलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा आणि काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून आणि पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करुन सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहेत. फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळच्या सत्रात सकाळी 11 वाजता तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. तसेच लेखनास प्रारंभ होईल. सकाळच्या सत्रात सकाळी 10. 30 वाजता तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 2. 30 वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.
गेवराई : गरिबांसाठी रेशन दुकानावर आलेले रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनाचे इंधन म्हणून होत आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे. पुरवठा खात्याचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रेशनकार्डधारकांना रॉकेल मिळेनासे झाले असल्याचे चित्र आहे. गेवराई : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी इमारती धूळ खात असून, महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. सज्जावर तलाठी राहत नसल्याने कामे होईनासे झाले आहेत. पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पान टपरी, तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे. सिरसाळा : सिरसाळा व परिसरातील नागरिकांचा रोज परळीशी संपर्क असतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन आवश्यकता नसेल तर परळीला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीदेखील नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहेत. माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघात झाल्याचे देखील उदाहरणे आहेत. ही जनावरे रस्त्यावरून हटवावीत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने जनावरांचा धोका वाढत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा निर्धास्तपणे सुरूच आहे. बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मुंबई, 27 सप्टेंबर : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर तपासात हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार हे अमली पदार्थ सेवन करत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने हिंदी चित्रपट सृष्टीतील काही जणांना अंमली पदार्थ पुरवत असलेल्या दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 139 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एम डी जप्त केले आहे. याच बाजारमूल्य साडेपाच लाख रुपये आहे. उस्मान अन्वर अली शेख (वय 40) असं आरोपीचं नाव असून तो जोगेश्वरी पश्चिम येथे राहतो. अंमली पदार्थ विकण्याचा याचा धंदा आहे. चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार अंमली पदार्थ सेवन करत असल्यावरून देशभरात चर्चा सुरू आहे आणि त्यांची चौकशी होत आहे. त्यांनाही हा उस्मान शेख अंमली पदार्थ पुरवत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आल्याची माहिती गुन्हे शाखा विभागाचे पोलीस आयुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे. उस्मान हा झोमॅटो ही हॉटेल मधील खाद्यपदार्थ घरपोच पुरवणाऱ्या कंपनीत काम करतो आणि त्याच्या आडून ग्राहकांना अमली पदार्थ पुरवत होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांना आपल्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीच्या ओशिवरा या ठिकाणी असलेल्या एका मॉल जवळ उस्मान हा मेफेड्रोन म्हणजेच एम डी हा अमली पदार्थ विकण्यासाठी मोटारसायकल घेऊन येत असल्याची माहिती मिळाली त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी उस्मान अन्वर अली शेख याला रंगेहात पकडले. त्याच्याकडे 139 ग्राम इतक्या वजनाचे एमडी आढळले. ज्याची बाजारातील किमंत साडे पाच लाख रुपये आहे. उस्मानला आपल्या कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याला आबु सुफुया खान हा एम डी पुरवत असल्याचं सांगितलं. तसंच तो चित्रपट सृष्टीतील काही व्यक्तींनाही अमली पदार्थ पुरवत असल्याचे चौकशीत सांगितले. त्यामुळे या दोघांची याबाबत त्या दिशेने चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे. उस्मान आणि अबू सुफियान यांची कसून चौकशी पोलिसांनी केली तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारेल आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील बडे कलाकार गळाला लागतील हे निश्चित.
आपल्या राज्य उभारणीत सिंहाचा वाटा उचलला तो राज्य पुनर्रचना या घटनेने. या घटनेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. एक मैलाचा दगड म्हणून या घटिताचा आढावा घेणे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आहे. ब्रिटिशकालीन भारतातील प्रांतांची भाषिक पुनर्रचना करा, असा आग्रह अगदी होमरूल चळवळीने धरला होता. ब्रिटिश जसजसे भारतातील प्रांत जिंकत गेले, तसे त्या काळातील प्रांत साकारले. त्यात एकसंधपणा नव्हता. बहुभाषिक स्वरूपाने प्रशासन करणे अडचणीचे होते. (उदा. मुंबई प्रांतात आजच्या कर्नाटकाचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, सिंध व पश्चिम आशियातील एडन यांचा समावेश होता. ) पण 'फोडा आणि राज्य करा' असे धोरण असलेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना प्रांतांची अशी चिंध्याचिंध्याची रचना सोयिस्करच होती. काँग्रेसच्या १९२०च्या नागपूर येथील अधिवेशनात भाषिक पुनर्रचनेची मागणी एक कार्यक्रम म्हणून स्वीकारली. आधी लोकमान्य टिळकांनी आणि नंतर महात्मा गांधींनी भाषिक राज्ये भारताला बळकटी आणतील असेच मानले. गांधी तर म्हणाले की, 'मी अस्सल गुजराती आहे म्हणून मी भारतीय आहे. जर मी चांगला गुजराती नसेन तर मी खऱ्या अर्थाने भारतीयही बनू शकत नाही. ' अशाप्रकारे भाषिक उपराष्ट्रवादाला उपरे न मानता भारतीय राष्ट्रीयतेचा अविभाज्य भाग मानले गेले. १९३६मध्ये मधुसूदन दास यांच्या प्रयत्नांनी ओरिसा हे पहिले भाषिक राज्य अस्तित्वात आले. स्वातंत्र्य आले व भारताचा राजकीय नकाशा झपाट्याने बदलू लागला. फाळणीमुळे काही भाग वेगळा झाला. त्यामुळे उर्वरित भागात एक प्रकारचे भावनिक ऐक्य निर्माण झाले. सरदार पटेलांच्या प्रयत्नाने संस्थाने नष्ट होऊन ती आता भारताचा राजकीय भाग बनली. फाळणीमुळे भारताचा मोठा भाग बाहेर गेला, तरी संस्थानांच्या प्रवेशामुळे प्रत्यक्षात त्याहून मोठा भाग भारतात दाखल झाला. अशावेळी या सर्व भागांचे राजकीय ऐक्य घडवून आणून त्यांना स्थिर करण्याचे आव्हान उभे राहिले. भाषिक ऐक्य साकारून प्रांतांची पुनर्रचना होईल, अशी लोकांची अपेक्षा होती. पण फाळणीमुळे विद्ध झालेले नेते आता भाषिक पुनर्रचनेच्या मागणीकडे फाळणीच्या चष्म्यातून बघायला लागले. त्यांना वाटू लागले, की भाषिक उपराष्ट्रवाद कधीही राष्ट्रवादाचे रूप धारण करेल व त्यातून भारताच्या एकता व अखंडतेला धोका निर्माण होईल. तेव्हा आहे तसे चालू दे. लोकांचे समाधान करण्यासाठी सुरुवातीला दार आयोग व नंतर जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या यांची एक समिती नेमली. (जेव्हीपी) पण या समित्यांनी तांत्रिक कारणे देत भाषिक पुनर्रचना नाकारली. 'विविधतेत एकता' असल्याची ग्वाही देणाऱ्या नेत्यांनाच आता विविधतेची भीती वाटायला लागली होती. त्यामुळे भाषिक चळवळींना त्यांनी प्रांतिक अस्मितावाद म्हणून निकालात काढले. पंतप्रधान नेहरूंनी असा विचार केला की लोक काही काळ मागणी करतील व नंतर गप्प बसतील. इतकी वर्षे ही व्यवस्था चाललीच की, या पुढेही चालवू. लोकांसाठी हा अपेक्षाभंग होता. सरकार काहीच हालचाल करीत नाही, हे लक्षात आल्यावर लोकांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही याची खात्री पटली. त्यातून संघर्षपर्वाला सुरुवात झाली. आंध्र व तेलंगण भागातील लोकांनी मद्रास प्रांतातून वेगळे होण्याची मागणी लावून धरली. गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामलू यांनी त्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. या लढ्यातूनच पुढे भाषिक पुनर्रचनेला कशी गती मिळाली ते आपण पुढच्या लेखात बघू. लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.
तरूण हा आपल्या देशाचा कणा आहे. त्या तरूणाने कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता जीवन जगायला शिकले पाहिजे. त्यासाठी त्याने अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा. अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, गैरसमज यांना तिलांजली दिली तर माणसाचा मेंदू खर्या अर्थाने स्वतंत्र होईल. ज्यामुळे माणूस स्वतःची सर्वांगीण प्रगती करू शकतो,असे विचार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिगंबर कट्यारे यांनी मांडले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील युवती सभा यांच्या अंतर्गत आयोजित विद्यार्थिनी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत ते 'वैज्ञानिक दृष्टिकोन व युवक' या विषयावर बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विजयराव देशपांडे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, डॉ. पर्णिका एडाखे, प्रा. पी. एस. पाडवी यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन युवती सभाप्रमुख डाॅ. चित्रा पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या विविध सत्रांमध्ये चाळीसगाव येथील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रा. डाॅ. यु. आर. मगर यांनी 'युवतींसाठी स्वयंरोजगार' या विषयावर, आरोग्य अधिकारी डॉ. पर्णिका एडाखे यांनी 'महिलांचे आरोग्य' या विषयावर, माजी जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक अण्णासाहेब र. भा. गरूड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अमर जावळे यांनी 'व्यक्तिमत्व विकास' या विषयावर तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिगंबर कट्यारे यांनी 'वैज्ञानिक दृष्टिकोन आणि युवक' या विषयावर मार्गदर्शन केले. विविध सत्रांचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु. वैष्णवी देसले, कु. अश्विनी इंगळे, कु. आरती राठोड, कु. पूनम राठोड, कु. मोहिनी सैंदाणे, कु. गायत्री सपके, कु. योगिता पाटील या विद्यार्थिनींनी केले.
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या : हुंड्यासाठी छळ होत असल्याचे रामेश्वर कॉलनीत एका विवाहितेने (वय २३) आत्महत्या केली. विवाहितेस हुंड्यातील उर्वरित ३ लाख रूपये आणावे अशी मागणी पोलीस पतीकडून वारंवार होत असल्याच्या त्रासाला कंटाळून गुरूवारी (दि. ९ सप्टेंबर) रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीराने गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविण श्यामराव पाटील (रा. श्रीराम मंदिर चौक, मेहरूण) यांची लहान मुलगी कोमल हिचा विवाह १३ फेब्रुवारी २०१६ रोजी रामेश्वर कॉलनीतील चेतन अरविंद ढाकणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. चेतन ढाकणे हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑक्टोबर २०२१) लग्नाच्यावेळी हुंडा म्हणून २० लाख रूपये देण्याचे ठरले होते. परंतु, लग्न थाटामाटात झाल्याने प्रविण पाटील यांनी ७ लाख रूपये दिले होते. उर्वरित १३ लाख रूपयांपैकी १० लाख रूपये चार महिन्यांपूर्वी घर घेण्यासाठी दिले होते. हुंड्यातील ३ लाख रूपये देणे बाकी होते. दरम्यान, उर्वरित हुंड्यातील ३ लाख रूपये आणावे यासाठी पती चेतन ढाकणे याने विवाहितेला मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ करत होता. यानंतर त्याने हुंड्याची रक्कम तातडीने आणावी यासाठी मंदाबाई अरविंद ढाकणे (सासू), प्रतिभा ज्ञानेश्वर घुगे (नणंद) आणि ज्ञानेश्वर विठ्ठल घुगे (जवाई) यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली होती. पाचवी कसोटी थेट रद्दच होणार? दिनेश कार्तिक बोलता बोलता काय म्हणाला.. यानंतर कोमलने हुंड्यासाठी छळ होत असल्याने ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यानंतर चेतन याने कोमलला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आणि तिच्या कुटूबियांना ही माहिती सांगितली. मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच विवाहिता कोमलचे आई -वडिलांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यात सासरच्या जांचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप कोमलचे वडील प्रविण पाटील यांनी केला. Saudi Arabia : अखेर सौदी अरेबियाचं तालिबानी प्रेम जागं झालंच !!! वडिल प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील संशयित आरोपी पती चेतन ढाकणे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
दीपक केसरकर यांना आयकर विभागाची नोटीस आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. सावंतवाडी : शिवसेनेचे आमदार शिंदे गटाबरोबर गेल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली असली तरी यामागे केंद्रीय यंत्रणा काम करत असून शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार हे या यंत्रणाच्या फेऱ्यात अडकले आहेत. यातून आमदार दीपक केसरकर हे ही सुटले नसून त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा आहे. दरम्यान, याला दीपक केसरकर यांनी दुजोरा दिला आहे. परंतु आम्ही केलेल्या बंडाशी कोणताही संबध नसल्याचा खुलासा ही त्यांनी केला आहे. शिवसेनेचे काही आमदार बंडखोरी करून आसाममधील गुवाहाटी येथे गेले आहेत. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यातील काही आमदार केंद्रीय यंत्रणांच्या भीतीनं गेले असल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. परंतु, आता सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी आपल्या निवासस्थानावर ही नोटीस आली असून त्या नोटीसीचे उत्तर मी दिले आहे. नियमानुसार आयकर हा भरला जातो ती प्रकिया आहे. मात्र ही नोटीस आली असल्याची कबुली केसरकर यांनी दिली आहे.
बिजबाची तसबीर ! प्रकरण ४२ वें. विजयाची तसबीर ! मीजींचे मन आज कित्येक दिवसांपासून फार अस्वस्थ झालें आहे, हे आश्रमांतील सर्व शिष्यिशिष्यणींना कळून चुकलें होतें. ते कसल्या तरी मोठ्या चिंतेंत मन असून रात्रंदिवस डोळे झांकून बसत. देवघरांतही त्यांच्या येरझारा चालू असत. पहिल्यासारखें मधुर हास्यही आतां त्यांच्या मुखावर विलसत नव्हतें. शिष्यमंडळीला उपदेशामृताचे घुटकेही त्यांच्याकडून आतां फारसे मिळत नव्हते. नेहमीप्रमाणें शिष्यशिष्यणींचा मेळा सकाळ सध्याकाळ त्यांच्याभोवताली गोळा होई. पण त्यामुळे त्यांचे मन उलट व्यग्र झालेले दिसे. कोणी कांही प्रश्न विचा रले तर त्यांची त्यांजकडून कशींतरी उत्तरे मिळत. पण हीं उत्तरें देतां देतांच ते मध्यंतरी थांबत आणि अन्यमनस्क होत, किंवा चंचल मन बनून दुसरीकडे कोठें निघून जात. या कारणामुळे शिष्य आणि शिष्यिणी आतां त्यांच्याजवळ फारशीं जात नसत, भयानें दूरदूरच राहात. पण दोन चार दिवसांनंतर त्यांनीं पुन्हा शास्त्रवाचनाचा क्रम सुरू केला आणि तो नियमितपणे पुढे चालू लागला. पण कुसुमला मात्र आतां ते शास्त्र ऐकावयाला बोलवीत नव्हते. कुसुमलाही तें ऐकण्याची जरूर वाटली नाहीं. गुरुजींचें शास्त्र ऐकण्यासाठी कुसुम त्यांच्या जवळ येत असेल अशा आशेनें विजय त्यांच्याकडे नियमानें शास्त्राच्यावेळी येत असे. कारण तिच्या भेटीसाठी त्याचें मन अगर्दी उतावीळ झालें होतें. पण त्याची या बाबतींत दररोज निराशच होत होती. आज माघ शु॥ १५ होती. आज तपश्चर्येसाठी एकांत गुहेत जाऊन राहण्याचा विजयाचा निश्चय झाला होता. यामुळे जाते बेळी तरी तिची वनव्यांतले फूल. भेट होईल तर बरें, या आशेनें त्याचे मन अगदीं वेडावून गेलें होतें. आणि त्यासाठीं तो सारखा इकडून तिकडे फेल्या घालीत होता. कुसुमच्या दुःखाला आज सीमा राहिली नव्हती. ज्या विजयाच्या जीवावरती घरदार आणि गणगोत सोडून ती बाहेर बाहेर पडली होती तो तिची बिलकूल फिकीर न करतां तपश्चर्येला जाणार होता. तो इतका यि असेल ह्याची या घटकेपर्यंत तिला कल्पना नव्हती. तिने आपल्या खोलीचे दार लावून घेतले आणि आपल्या पेटींतील विजयाची तसबीर काढून ती त्याचे निरक्षण करू लागली. तिने तसबीर त्याच्या घरांतून चोरून आणली होती. ती तसबीर पाहतां पाहतां तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ती त्या तसबिरीला उद्देशून म्हणाली, प्रियकरा, आपण मजवर इतके कसे बरे निष्ठुर झालां ! माझी तुम्हांला लवमातही कशी कीव आली नाही ? " कुसुम आपल्या दुःखमय विचारात इतकी गढून गेली होती कीं, आपल्या खोलीचे दार पश्चिमेकडील वाऱ्याच्या योगाने उघडले आहे याची तिला बिलकुल जाणीव झाली नाही. बरोबर याच वेळेला स्वामीजी त्याच मार्गाने चालले होते. त्यांनी सहज आंत नजर फेकली, तो कुसुम कसले तरी चित्र मांडीवर घेऊन अश्रू गाळीत असल्याची त्यांना दिसली. ते एकदम थांबले. आंत जावे की नाहीं यासबधाने त्यांनी थोडा वेळ आपल्या मनाशी विचार केला. नंतर ते एकदम आत घुसले आणि तिच्या मांडीवरची तसबीर आपल्या हातांत घेऊन ते तिला म्हणाले, " राधिके, ही तसबीर फार छान आहेग. " पण त्यांच्या या कृत्यानें ती इतकी चिडली की, एखाद्या वाघिणी प्रमाणे त्यांच्या अंगावर चवताळून त्यांना म्हणाली, चल, दूर हो, चोरा ! " कुसुमची ती त्या वेळची भयंकर मूर्ति पाहून स्वामीजींच्या तोडचें पाणी पळाले आणि त्यांनी त्याच क्षणीं खोलीच्या बाहेर उडी घेतली. पण
डिव्हाइसचे फर्मवेयर अद्ययावत करण्यासाठी, प्रथम आपण तो एका वैयक्तिक कॉम्प्यूटरवर डाउनलोड करणे आवश्यक आहे, आणि नंतर प्राप्तकर्त्याचा पीसीशी कनेक्ट करा आणि प्रोग्राम रीस्टार्ट करा. एक नल-मोडेम केबलचा उपयोग संगणकाला उपग्रह प्राप्तकर्त्याशी जोडण्यासाठी केला जातो. आपल्याकडे असे इंटरफेस नसल्यास, आपण ते संगणकाच्या स्टोअरमध्ये खरेदी करू शकता, तथापि हे उत्पादन नेहमीच नसते. कोणत्याही परिस्थितीत, आपल्याकडे पर्याय आहेः तयार समाधान शोधणे किंवा स्वतः चे शून्य-मोडेम केबल तयार करणे. नंतरचे पर्याय खूप स्वस्त असतील. नल-मोडेम आरएस -232 केबल कसा बनवायचा ? ही हस्तपुस्तिका अनिवार्य नाही, परंतु सरावाने त्याची तपासणी केली जातेः 1. कनेक्टरवर जादा लीड्स कापून देण्याची शिफारस केलेली नाही. 2. कनेक्टरला जोडणे, तणाव दूर करण्यासाठी आवश्यक आहे कारण घरफोडी उपकरणांना स्पर्श करते. अन्यथा, कॉम्प्यूटरवर किंवा प्राप्तकर्त्यावर कॉम इंटरफेस बर्न करण्याचा धोका आहे. सर्व उपकरणांवर आधारित असेल तर हे कनेक्शन आवश्यक नाही. 3. ते चांगले कार्य करते म्हणून , एक shielded केबल वापर करणे श्रेयस्कर आहे. 4. उपग्रह सिग्नलच्या सर्व ट्यूनरमध्ये फक्त तीन संपर्क वापरले जातात. 5. काही प्राप्त साधनांमध्ये MAX232 चीप नाही (असे गृहित धरले जाते की हे बाह्य अडॉप्टरमध्ये असेल). अशा डिव्हाइसेसमध्ये, प्राप्तकर्त्याच्या कॉम पोर्टवर चार आउटपुट असतात, पण अॅडॉप्टरच्या आउटपुटमध्ये तीनच संपर्क असतात म्हणूनच, आपण नल मोडेम केबल जोडण्याआधी, आपल्याला आपल्या डिव्हाइससाठी दस्तऐवजीकरण तपशीलवार अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, आपण प्रथम अॅडॉप्टर संलग्न करणे आवश्यक आहे. 6. काही ट्यूनरमध्ये, कनेक्टरवरील पिन 2 आणि 3 एकमेकांशी संवाद साधतात. या प्रकरणात, आपल्याला क्रॉस केबल नाही, एका सरळ केबलची आवश्यकता आहे. आपल्या प्राप्तकर्त्यावर कोणत्या प्रकारची कनेक्टर आहे हे निर्धारीत करण्यासाठी, आपण त्यासाठी दस्तऐवजीकरण अभ्यास करावा. 7. केबलला फंक्शनल वापरायला सूचवले जाते कारण ही यांत्रिक प्रभावांपेक्षा जास्त प्रतिरोधक आहे. शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी बांधलेल्या संपर्कांना सिलिकॉनने भरावे. COM इंटरफेसमध्ये, फक्त तीन संपर्क आणि कनेक्टर बॉडी विकली पाहिजेत. या केबल मध्ये, आपण 2, 3 आणि 5 पिनचा वापर करणे आवश्यक आहे. शून्य-मॉडेम केबलच्या फॉरवर्ड वर्जन मध्ये, हे संपर्क दोन्ही कनेक्टरमध्ये समान विकले गेले आहेत आणि क्रॉस-कनेक्ट 2 आणि 3 मध्ये ते एकमेकांशी संवाद साधतात.
'भारतीय संगीत' ही ईश्वराने मानवाला दिलेली एक 'दैवी देणगी' आहे. कलेचा मूळ उद्देश 'ईश्वरप्राप्ती' हा आहे. स्वतःचा अहंकार त्यागून ईश्वराच्या अखंड अनुसंधानात राहून कलेतून ईश्वराची अखंड अनुभूती घेता येणे, म्हणजेच 'कलेतून ईश्वरप्राप्ती साधणे', असे म्हणता येईल. सध्याच्या गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या स्थितीचा अभ्यास केल्यास आताच्या नवोदित कलाकारांची कलेतून भौतिक सुख मिळवणे, विविध स्पर्धांत सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवणे, स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व निर्माण करणे अन् इतरांच्या समवेत स्पर्धा करणे, अशीच मानसिकता दिसते. याला एक कारण म्हणजे विविध कार्यक्रमांची (रिएलिटी शोज्ची) आलेली लाट होय. सध्या होणारे काही कार्यक्रम माझ्या पहाण्यात आले. यातील काही परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलेला दिलेला विक्षिप्त प्रतिसाद, स्पर्धकांचे केलेले अवास्तव कौतुक, परीक्षक आणि पालक यांची स्पर्धात्मक मानसिकता हे पाहून माझे मन उदास झाले. कला स्पर्धामय करून तिच्या मूळ 'ईश्वरप्राप्ती' या उद्देशापासून आपण कित्येक कोस दूर जात असल्याचे जाणवले. या कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या होणार्या विक्षिप्त कृतींची काही उदाहरणे, त्यातून परीक्षकांची दिसणारी विदारक स्थिती, त्यांच्या अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारी चुकीची दिशा यातील काही भाग ७ एप्रिल या दिवशी पाहिला. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया. ३ अ. बालवयात मुलांना अश्लील गाण्यांवर नाचवल्याने लहान वयात नको त्या भावना निर्माण होत असूनही त्याचे परीक्षक आणि पालक यांना अयोग्य न वाटणे : ६ - ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांना मोठ्यांप्रमाणे गाण्यास अथवा नृत्य करण्यास प्रेरित केले जाते, उदा. मुन्नी बदनाम हुई... (एका चित्रपटातील आयटम गाणे - अश्लील हावभाव करत तंग कपडे घालून केलेले नृत्य) एवढ्या लहान वयात त्यांना अशा गाण्यांवर नृत्य करायला शिक्षकांसह अगदी पालकही प्रोत्साहित करतात. तसेच दर्शक आणि परीक्षक यांना त्यांचे कौतुक वाटते. ('ज्या वयात मुले चांगले विचार ग्रहण करून घडतात, त्यांच्यावर अशा नाच-गाण्यांमुळे विपरीत परिणाम होईल. भावी पिढीवर चांगले संस्कार घडल्यासच राष्ट्राचे भवितव्य घडणार आहे. याचा परीक्षक, तसेच पालक यांनी विचार केल्यास भावी पिढीही चांगली सुसंस्कारीत होईल. ' - संकलक) ३ आ. स्पर्धकाचे अनावश्यक कौतुक करणे : 'एखाद्याने चांगले नृत्य सादर केले असेल, तर परीक्षक त्या स्पर्धकाचे अनावश्यक कौतुक करतात. एका कार्यक्रमात परीक्षक पुढील प्रकारे अनावश्यक आणि अवास्तव कौतुक करतांना दिसले आहेत. 'आजपर्यंत अशा प्रकारचे सादरीकरण कुणीच केले नाही. यापेक्षा याची दुसरी चांगली पद्धत (Version) असूच शकत नाही किंवा तुम्ही अमुक एका मोठ्या कलाकारालाही हरवले असते' इत्यादी. असे अनेक कार्यक्रमांत निदर्शनास आले आहे. ('अशा प्रकारच्या अवास्तव कौतुकाने स्पर्धकाचा अहं वाढून त्याची पुढील कला शिकण्याची जिज्ञासा संपुष्टात येऊन त्याच्या कलासाधनेची हानी होऊ शकते. ' - संकलक) आजकाल मूळ भारतीय शास्त्रीय नृत्य सादरीकरण करणारे अत्यल्प आढळतात. सर्व युवा पिढी पाश्चात्त्य नृत्याकडे (उदा. हिप-हॉप (Hip-Hop), काँटेम्पररी (Contemporary), ब्रेक डान्स (Break Dance), रोबोटिक डान्स (Robotic), लिरीकल डान्स (Lyrical Dance कडे) वळलेली आढळते. कार्यक्रमात शुद्ध भारतीय शास्त्रीय नृत्य न करता 'फ्यूझन' म्हणजे भारतीय आणि पाश्चात्त्य प्रकारांचे एकत्रीकरण केलेले आढळते, उदा. शास्त्रीय नृत्यात एखादा पाश्चात्त्य तालावर (बीटवर) म्हणजे 'रॅप' (पाश्चात्त्य गायन प्रकार) टाकतात, भरतनाट्यम् करतांना सर्व मुद्रा आणि हालचाली 'ब्रेकडान्स'प्रमाणे करतात इत्यादी. ' (क्रमशः) - कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८. ५. २०२१)
नवी दिल्ली - लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चीन बलाढ्य देश होईल, मात्र भारतदेखील दुबळं राष्ट्र नाही आणि भारतात कोणालाही घुसखोरी करण्याची परवानगी मिळणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे. भारताने आपल्या उत्तरेकडील सीमारेषेवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे असंही ते बोलले आहेत. चीनच्या आक्रमकतेचा सामना करण्याठी भारत पुर्णपणे सक्षम असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन रावत यांनी सांगितलं की, 'चीन एक शक्तिशाली देश आहे, पण आपणही दुबळे नाही आहोत'. चीनी घुसखोरीच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी आम्ही कोणालाही आमच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याची परवानगी देणार नसल्याचं सांगितलं. 'चीन सीमारेषेवर दबाव वाढवत आहे हे खरं आहे, पण आम्ही त्याचा सामना करत आहोत', असंही ते बोलले आहेत. 'चीनसोबत तणाव वाढू नये यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आम्ही लोक आपल्या जमिनीवर घुसखोरी होऊ देणार नाही. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढील कारवाईसाठी लष्कराला योग्य ते आदेश देण्यात आले आहेत', असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं. यावेळी बिपीन रावत यांनी दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात आलेल्या चेतावणीवर बोलताना भारताला याचे काय परिणाम होतायच याची वाट पहावी लागेल असं म्हटलं आहे. ते बोलले की, 'पाकिस्तानमध्ये दहशतवादी वापरुन फेकून देण्याची गोष्ट आहे. पाकिस्तानला आपल्या चूक लक्षात येऊन वेदना झाल्या पाहिजेत याची खात्री भारतीय लष्कर करत आहे'. 'अमेरिकेकडून पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्यात आल्याने आता जेव्हा कधी दहशतवादाचा मुद्दा येईल तेव्हा भारताचं काम अमेरिका करुन टाकेल हे भारताने समजून घ्यायला हवं', असं त्यांना यावेळी सांगितलं. पुढे त्यांनी सांगितलं की, 'सर्व काही गोष्टी व्यवस्थित सुरु आहेत असं म्हणणं थोडं घाईचं होईल. आता अमेरिका आपलं काम करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही'. तिथे पाकिस्तानात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पाकिस्तानला अमेरिकेपुढे न झुकण्याचं तसंच त्यांच्या मागण्या न स्विकारण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या जमिनीवरुन कार्यरत असणा-या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून मसूद अजहर बोलला आहे की, 'पाकिस्तानी मीडिया आणि बुद्धीजीवी लोक डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी पुर्ण करण्याचा सल्ला देत पाकिस्तानमधील लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत'. मसूद अजहर याचं वक्तव्य अशावेळी आलं आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि धोका दिल्याचा आरोप केला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला सुरक्षेसाठी देण्यात येणारी आर्थित मदत थांबवली आहे. Indian Army chief General Bipin Rawat on Friday said "China is a powerful country but we are not a weak nation". He also claimed that the Indian army is capable of handling Beijing's assertiveness and Chinese incursions into India.
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, आपली भावनेच्या भरात चूक झाली, तुझा आयुष्यभर पत्नी म्हणून सांभाळ करेल, पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नको. गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल, अशी धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रामदास दत्तोबा थोरात (रा. आयुधिक कार्यशाळा शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या पोलीस खात्याच्या संबंधित नोकरी करतात. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी थोरात याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तर शारीरिक संबंध निर्माण केल्यानंतर माझी भावनेच्या भरात माझी चूक झाली. या चुकीबददल तुला घर किंवा जागा घेऊन देतो. तसेच दर महिन्याला 10 हजार रूपये आणि निवृत्त झाल्यावर 5 हजार रूपये व निवृत्तीच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम देतो. नोटरी करून देऊन पत्नी म्हणून सांभाळ करतो. पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस, असे सांगत होता. मात्र जर गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक झडते या करीत आहेत.
कोलाज Instagram कथा, आता शोधा! Ers ➡️ अनुयायी ▷ ➡️\nजानेवारी 10, 20190टिप्पण्या 1447\nइंस्टाग्राम कथा एक उपयुक्त अनुप्रयोग साधन आहे. हे, वापरकर्त्याच्या रोजच्या इव्हेंटचे फोटो आणि व्हिडिओ सामायिक करण्याची परवानगी देतात; 24 तासांनंतर अदृश्य होण्याच्या वैशिष्ट्यासह. प्लॅटफॉर्मच्या या प्रभावी क्षेत्रामुळे वापरकर्ता दिवसा केलेल्या सर्व गोष्टी पोस्ट करू शकतो, जास्त लोड न करता आपले प्रोफाइल याव्यतिरिक्त, प्रसिद्ध सामाजिक नेटवर्क आपल्याला प्रभाव, रेखाचित्र, स्टिकर आणि इतर साधनांच्या इतर श्रेणीसह प्रकाशने सानुकूलित करण्याची परवानगी देतो. म्हणूनच वापरण्यासाठी उच्च मागणी वापरकर्ते, हे प्रोग्रामरसाठी प्रोत्साहन देणारी आहे. म्हणून, एक श्रेणी अनुप्रयोग आणि विस्तार जे प्रकाशन शैलीकृत करण्याची आणि इन्स्टाग्राम स्टोरीज कोलाज मिळविण्याची परवानगी देते.\nइन्स्टाग्राम स्टोरीज कोलाज कसा बनवायचा?\nइंस्टाग्राम स्टोरीज कोलाज बनवण्यासाठी वापरकर्त्याने ते डाउनलोड आणि स्थापित करणे आवश्यक आहे शिफारस केलेले अनुप्रयोग. अशा प्रकारे वापरकर्त्यास इच्छित उद्दीष्टे साध्य करण्यात सक्षम होतील. यासाठी, प्रकाशित करा सर्जनशील आणि प्रथम हाताने सामग्री. अतिरिक्त अनुप्रयोगाचा वापर अपरिहार्य आहे, परंतु अशा प्रकारे यशाची शक्यता वाढविली जाते.\nअॅप मांडणी हे इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मद्वारे उत्पन्न केले गेले आहे, जे स्वतंत्र आहे आणि सर्जनशीलता पूर्णपणे विकसित करण्यास अनुमती देते. यासह जोडले, ते इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज तयार करण्याच्या चरणांचे सुलभ करते. हे आकार आणि पूर्ण देखील येईल पूर्वनिर्धारित टेम्पलेटs जेथे फक्त इच्छित प्रतिमा ठेवावी. याव्यतिरिक्त, आवश्यक छायाचित्रे निवडताना ते द्रुतगतीने कार्य करते, जेणेकरून ते यावर अवलंबून संभाव्य रचना दर्शवेल प्रतिमांची संख्या. हे सर्व ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे आणि मोबाइल डिव्हाइसच्या स्टोअरमध्ये आढळू शकते.\nलेआउट डाउनलोड करा\nप्लॅटफॉर्म उघडताना आणि Instagram आणि ओळखा, वापरकर्त्याने कॅमेर्याकडे जाणे आवश्यक आहे. एकदा आपण त्यात आल्यावर आपण फोटोग्राफिक रोल किंवा लायब्ररी निवडाल जेणेकरून ते वापरकर्त्यासमोर येईल सर्वात अलीकडील फोटो आणि एका टोकाला लेआउट चिन्ह. त्यावर क्लिक करून, वापरकर्त्यास त्यांना ते डाउनलोड करायचे असल्यास विचारले जाईल. एकदा आपण याची पुष्टी केली डाउनलोड करू इच्छिता आपल्या ऑपरेटिंग सिस्टमशी संबंधित अनुप्रयोग स्टोअरमध्ये पुनर्निर्देशित केला जाईल. आधीपासूनच स्टोअरमध्ये, अनुप्रयोगाचे कार्य, कार्य, वजन आणि इतरांचे वर्णन प्रदर्शित केले जाईल. त्यांना वाचल्यानंतर वापरकर्त्याने डाउनलोड करणे आवश्यक आहे. सक्षम असणे स्वयंचलितपणे स्थापित करा डिव्हाइसवरील अॅप.\nअनुप्रयोग डाउनलोड केल्यानंतर, आपण ते उघडणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे, वापरकर्त्यास एक संक्षिप्त सादरीकरण सादर केले जाईल स्पष्टीकरणात्मक ट्यूटोरियल लेआउट कसे वापरावे आणि परिणाम काय असू शकतात. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वापरकर्त्याने समाप्त होईपर्यंत उजवीकडून डावीकडे स्क्रोल करणे आवश्यक आहे. एकदा स्पष्टीकरण संपल्यानंतर, व्यक्ती त्याच्या कोलाजच्या इंस्टाग्राम स्टोरीजच्या ध्येयसह पुढे जाऊ शकते. हे करण्यासाठी, आपल्याला गॅलरी किंवा लायब्ररीमध्ये प्रवेश करण्याची अनुमती देखील आवश्यक आहे, जेणेकरून छायाचित्रे काढा वापरण्यासाठी\nइन्स्टाग्राम स्टोरीज कोलाज बनवा\nयासाठी, वापरकर्त्याने अनुप्रयोग प्लॅटफॉर्मवरुन संबंधित छायाचित्रे निवडणे आवश्यक आहे. आपण छायाचित्रे निवडताच, लेआउट प्रतिमांच्या संख्येसाठी संभाव्य डिझाइन प्रदर्शित करेल. एकदा आपण फोटो निवडल्यानंतर, अॅप यासाठी साधने ऑफर करतो प्रतिमा सुधारित करा दोन्ही आकार, स्थिती आणि इतर.\nएकदा वापरकर्त्याने आधीपासूनच सर्व फोटोंचा वापर करण्यासाठी टेम्पलेट निवडले आहे आणि तो डिझाइन सुधारण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार साधने वापरत आहे. ते आवश्यक असेल, प्रतिमा जतन करा आपल्या लायब्ररीमध्ये आणि त्यास Instagram अनुप्रयोगामध्ये निर्यात करण्यात सक्षम व्हा; जे नंतर इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज म्हणून सामायिक केले जाईल.\nप्रतिमा जतन केल्यानंतर, आपण इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म प्रविष्ट करणे आवश्यक आहे. नंतर, स्टोरी बारवर जा आणि आपल्या वापरकर्त्याच्या (बल + चिन्ह असलेले) बलून वर क्लिक करा. अन्यथा, आपण उजवीकडे आणि वर स्वाइप करू शकता नवीन इतिहासआपण तेथे असल्याने आपण वर स्क्रोल केले पाहिजे. जेणेकरून अशा प्रकारे, सर्व अलीकडील प्रतिमा आणि छायाचित्रे दिसू शकतील जेणेकरून आपण तयार केलेला इन्स्ट्राग्राम स्टोरीज कोलाज निवडू शकता. यानंतर, आपण दाबा आवश्यक आहे पोस्ट आणि पुष्टी करा पोस्ट त्याच्या इतिहासाकडे निर्देशित. अशा प्रकारे आपण इच्छित इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज अपलोड करणे समाप्त केले.\nकसे ते पहा इन्स्टाग्रामवर आपले अनुयायी वाढवा.\nवैकल्पिक साधन आणि अनुप्रयोग\nव्यासपीठाच्या वापरकर्त्यांनी परत जाण्यात उच्च रस दर्शविला आहे अधिक सर्जनशील आपल्या कथा इतकेच की, त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज, टाइपफेस, मायक्रो आणि इतर सारख्या प्रकाशनांना उच्च स्तरावर कल्पनाशक्तीवर नेले आहे. कथा सानुकूलित करण्यासाठी आणि एक अद्वितीय आणि अविस्मरणीय प्रकाशन करण्यासाठी, काही अनुप्रयोगांची शिफारस केली जाते. हे त्या व्यक्तीस इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज तयार करु देईल, तसेच परत येण्याचे आणखी एक मार्ग आहे अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण आपले पोस्ट लेआउटसाठी काही वैकल्पिक अनुप्रयोग असू शकतातः\nया प्लॅटफॉर्मसह, वापरकर्ता मूळ इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज डिझाइन करण्यासाठी संगणक किंवा मोबाइल वेबसाइट वापरू शकतो. आणि तेच केवळ पृष्ठ आपल्याला कथा कॉन्फिगर करण्याची परवानगीच देत नाही, तर आणते देखील अंतहीन शक्यता. साध्या आणि किमानचौकट पोस्ट पासून, अद्वितीय आणि अत्युत्तम प्रकाशने वापरकर्त्याने केवळ कॅनव्हाची अधिकृत वेबसाइट असणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारे सर्जनशीलतेच्या विश्वात प्रवेश करणे आवश्यक आहे.\nत्याच व्यासपीठासाठी एक एपीके आहे मोबाईल डिव्हाइसेस. अशा प्रकारे वापरा दरम्यानचा अनुभव सुधारणे आणि इंस्टाग्राम स्टोरीज कोलाजची रचना आणि निर्मिती सुलभ करणे. हा अनुप्रयोग आयओएस, Android आणि इतरांसाठी उपलब्ध आहे. म्हणून त्याची स्वीकृती विस्तृत आणि अत्यंत शिफारसीय आहे. याव्यतिरिक्त, व्यवसाय स्तरावर, हे साधन आपल्याला एक करण्याची परवानगी देईल चांगले विकास ते ज्या जाहिराती आणि डिझाइन हाताळतात त्याविषयी, जसे इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज.\nअनुप्रयोग नेत्रदीपक इन्स्टाग्राम स्टोरीज कोलाज बनविण्यासाठी उपयुक्त आहे. हे आपल्यासह विविध पर्याय आणते, आणि iOS ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे. हे अॅप आहे पूर्णपणे विनामूल्य आणि वापरण्यास अगदी सोपे आहे. यात विविध स्वरूपने आहेत जी संपादित केली जाऊ शकतात आणि आदर्श इंस्टाग्राम स्टोरीज कोलाजच्या आकारात रुपांतर करू शकतात. वापरकर्त्यास अनुप्रयोग प्राप्त करण्याची इच्छा असल्यास ते त्यांच्या मोबाइल डिव्हाइससाठी अॅपस्टोअर शोधू शकतात.\nसुपर संपादन अनुप्रयोग सोपे आणि आरामदायक. हा अनुप्रयोग आपल्याकडे कलर पॅलेट आणि सूचना, फोटो आकार संपादन आणि इंस्टाग्राम स्टोरीज कोलाज बनविण्यासाठी इच्छित इच्छित पर्याय आणेल. हे विनामूल्य अॅप वापरकर्त्याला मार्ग माहित नसतानाही व्यावसायिक म्हणून प्रकाशने पोस्ट करण्याचे आश्वासन देतो. त्याची रचना असल्याने आणि साधेपणाचे कॉन्फिगरेशन, हे नंतरच्या वापरासाठी समजून घेणे खूप सोपे करते.\n1 इन्स्टाग्राम स्टोरीज कोलाज कसा बनवायचा?\n1.1 लेआउट डाउनलोड करा\n1.2 अॅप उघडा\n1.3 इन्स्टाग्राम स्टोरीज कोलाज बनवा\n1.4 जतन करा\n1.5 आणि Instagram\n2 वैकल्पिक साधन आणि अनुप्रयोग\n2.2 उघडकीस आणणे\n2.3 अॅडोब स्पार्क\nसंकेतशब्द बदला इंस्टाग्राम सुपर इझी!
जेआयटी डीबगिंग म्हणजे काय? - सामान्य प्रश्न\nमुख्य > सामान्य प्रश्न > जीट डीबगिंग सक्षम करणे - समस्यांचे निराकरण\nजीट डीबगिंग सक्षम करणे - समस्यांचे निराकरण\nजेआयटी डीबगिंग म्हणजे काय?\nजस्ट इन-टाइमडीबगिंगव्हिज्युअल स्टुडिओ लॉन्च करणारे वैशिष्ट्य आहेडीबगरजेव्हा व्हिज्युअल स्टुडिओच्या बाहेर चालू असलेला एखादा प्रोग्राम एखादा गंभीर त्रुटी आढळतो. जस्ट इन-टाइमडीबगिंगऑपरेटिंग सिस्टमद्वारे अनुप्रयोग समाप्त होण्यापूर्वी आपल्याला त्रुटीचे परीक्षण करण्याची परवानगी देते.\nमागील लेखात, आम्ही जावास्क्रिप्टकोर, वेबकिटचे जावास्क्रिप्ट इंजिन, ऑब्जेक्ट्स आणि व्हॅल्यूज मेमरीमध्ये कसे संचयित करतो ते तपासले.\nया लेखात मी फक्त-इन-टाइम कंपाईलर जेआयटीबद्दल थोडे अधिक जाणून घेऊ इच्छित आहे. ही ब्राउझर शोषण मालिका एसएसडी सुरक्षित प्रकटीकरण द्वारे समर्थित आहे. अधिक माहितीसाठी, सोप्या भाषेत वर्णन पहा, फक्त-इन-टाइम कंपाईलर जावास्क्रिप्ट बायटाकोड जावास्क्रिप्ट व्हर्च्युअल मशीनद्वारे नेटिव्ह मशीन कोडमध्ये बनवते.\nकोड संकलित करेल. पण जावास्क्रिप्टकोरमधील जेआयटी ही थोडी अधिक निफ्टी आहे. तर मग आपण त्याबद्दल कसे शिकू शकतो? वेबकिट ब्लॉगवर या लेखासारखी काही अधिकृत वेबकिट संसाधने तपासण्यासाठी लिनस कडून चांगली टिप मिळाली.\nजावास्क्रिप्ट कोअर सीएसआयः क्रॅश साइट इन्व्हेस्टिगेशन स्टोरी. आज मी यातील काही साधनांचे वर्णन करणार आहे जे वेबकिट अभियंता जेएससी व्हर्च्युअल मशीन (व्हीएम) मधील वास्तविक बग कसे निदान करतात याची कथा सांगून वापरतात. वेबकिटमध्ये हातभार लावण्यास इच्छुक लोकांसाठी हा ब्लॉग आहे आणि कारण शोधण्यासाठी क्रॅश डीबग कसे करावे याबद्दल लेखक खूप मौल्यवान अंतर्दृष्टी सामायिक करतात.\nआणि आम्हाला सुरक्षा संशोधक म्हणून हेच जाणून घ्यायचे आहे. उदाहरणार्थ, हेप ओव्हरफ्लो किंवा वापर-नंतरच्या समस्यांसारख्या संभाव्य त्रुटी शोधण्यासाठी वेबकिटचा पत्ता सॅनिटायझर बिल्ड कसा तयार करावा याचे वर्णन करते, जे सामान्य प्रोग्रामसह त्वरित क्रॅश होत नाही. पण आम्हाला सध्या JIT च्या गोष्टींमध्ये रस आहे.\nआणि पुढील लेखात आम्हाला पुढील सापडते. जेएससी अनेक अंमलबजावणी इंजिनसह येते. आपण याबद्दल वाचला असेल, हा एफटीएल जेआयटी सादर करणारा एक लेख आहे.\n4 स्तर आहेतः स्तर 1: एलआयएलएन्ट इंटरप्रिटर टायर 2: बेसलाइन जेआयटी कंपाईलर टायर 3: डीएफजी जेआयटी आणि टायर 4: एफटीएल जेआयटीएस सो टायर 1 नियमित इंटरप्रिटर आहे. हे मूलभूत जावास्क्रिप्ट व्हर्च्युअल मशीन आहे. आपण लोअरवेईलइन्टरप्रेटर सीपीपी स्त्रोत फाइलवर एक द्रुत नजर टाकू शकतो, ज्यामध्ये इंटरप्रिटर लूप आहे.\nतर हे फक्त जावास्क्रिप्ट बायकोडमधून जाते आणि नंतर प्रत्येक विधान कार्यान्वित करते. तर ... जर एखादे फंक्शन आता बर्याचदा कॉल केले तर ते 'हॉट' होऊ शकते.\nही एक संज्ञा आहे जी बर्याच गोष्टी चालू असल्याचे वर्णन करते. आणि मग जावास्क्रिप्ट कोअर पहिल्या टप्प्यात फंक्शन JIT घेण्याचा निर्णय घेऊ शकेल. बेसिक जेआयटी\nआणि संबंधित JIT.cpp फाईलमध्ये आम्हाला पुन्हा काही अतिरिक्त माहिती मिळू शकेल. जर एलआयएलएन्टला हे कळले की लूपमध्ये बेसलाइन जेआयटीमध्ये ओएसआर एंट्री आहे तर हे आमचे संकलन सुरू केल्यावर कार्यान्वित झालेल्या बायकोड ऑफसेटमधून पास केले जाते.\nआम्हाला त्या बायकोड ऑफसेटद्वारे पोहोचण्यायोग्य प्रत्येक गोष्टीसाठी कोड कंपाईल करणे आवश्यक आहे. ओएसआर, ऑन स्टॅक रिप्लेसमेंट, मुळात जेआयटीचा एक प्रकार आहे जो आपल्याला फ्लायवर कंपाईल कोडवर स्विच करण्याची परवानगी देतो. हे अद्याप बायकोडशी अगदी सुसंगत आहे, म्हणून बोलणे, कारण अजून कोणतीही ऑप्टिमायझेशन झालेली नाही.\n"वेबकिट एफटीएल जेआयटी सादर करीत आहोत" वरून आपण हे देखील वाचतोः फंक्शनची पहिली अंमलबजावणी नेहमीच इंटरप्रीटर लेयरमध्ये सुरू होते. एकदा फंक्शनमधील स्टेटमेंट 100 पेक्षा जास्त वेळा कार्यान्वित झाल्यावर किंवा फंक्शनला6वेळापेक्षा जास्त म्हणतात (जे आधी येते) नंतर अंमलबजावणी जेआयटी बेसलाइनद्वारे संकलित केलेल्या कोडवर पुनर्निर्देशित केली जाते ज्यामुळे इंटरप्रिटरच्या काही ओव्हरहेड काढून टाकल्या जातात. गंभीर कंपाईलर ऑप्टिमायझेशनची कमतरता. बेसलाइन कोडमध्ये 1000 पेक्षा जास्त वेळा एखाद्या सूचना लागू केल्यावर किंवा बेसलाइन फंक्शनला 66 वेळापेक्षा जास्त वेळा कॉल केल्यावर आम्ही अंमलबजावणी परत डीएफजीकडे पाठवितो. JIT.DFG म्हणजे डेटा फ्लो ग्राफ, म्हणजे त्याबद्दल थोडासा ही पद्धत काय आहे\nलेखात डीफजी पाइपलाइनचे वर्णन करणारे एक छान चित्र देखील आहे. डीएफजी बायकोडला डीएफजी-सीपीएस स्वरूपात रूपांतरित करण्यास सुरवात करते. सीपीएस म्हणजे कॉन्टिनेशन-पासिंग स्टाईल, म्हणजे आपला कोड रिटर्न्स वापरत नाही, परंतु त्याऐवजी पुढे चालू ठेवतो आणि पुढच्या फंक्शनकडे जाईल.\nआपण कधीही नोडजेएस एक्सप्रेस विकास केला असल्यास आपण त्यासंबंधी पुढील () फंक्शन फ्लो व्हेरिएबल्स आणि तात्पुरते दरम्यानच्या संबंधांसारखे विचार करू शकता. प्रोफाइलिंग माहिती नंतर प्रकारच्या अंदाजासाठी अनुमान काढली जाते आणि त्या अनुमानांचा वापर कमीतकमी चाचण्यांच्या संचासाठी केला जातो. पारंपारिक कंपाईलर ऑप्टिमायझेशन अनुसरण करतात.\nकंपाइलर थेट डेटा फ्लो ग्राफमधून मशीन कोड व्युत्पन्न करते, म्हणूनच येथे गोष्टी मनोरंजक बनतात. जेआयटी संकलक प्रकारांचा अंदाज लावतो आणि जेआयटीचा विश्वास आहे की प्रकार बदलत नाहीत, जेआयटी काही धनादेश काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकते. अर्थातच एखादे फंक्शन म्हटले गेले तर त्या कोडमध्ये तीव्रतेने वेग वाढवू शकतो परंतु हे सर्व काही नाही.\nडीएफजी जेआयटीनंतर अजूनही एक जेआयटी आहे. एफटीएल - प्रकाशापेक्षा वेगवान. जेव्हा हा प्राणी सादर केला गेला, तेव्हा त्याने जावास्क्रिप्टमध्ये आक्रमक सी-सारखी ऑप्टिमायझेशन आणण्यासाठी एफटीएल जेआयटी विकसित केली गेली आणि अधिक नमुनेदार कंपाईलर ऑप्टिमायझेशन लागू करण्यासाठी सुप्रसिद्ध कंपाईलर बॅकएंड एलएलव्हीएम वापरला.\nकाही क्षणी, एल3व्हीची जागा बी3ने बदलली, परंतु कल्पना समान आहे. आणि हे जेआयटी कंपाईलर कोडबद्दल आणखीन गृहित धरू शकते. पण त्यास जरा पाहूया, क्रॅश तपासणीवरील लेख उत्कृष्ट आहे.\nहे अनेक पर्यावरणीय चलांचा परिचय देते जे जेआयटीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि डीबगिंग आउटपुट सक्षम करण्यासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, आम्ही JIT पूर्णपणे अक्षम करण्यासाठी JSC_useJIT वापरू शकतो किंवा अंतिम टप्पा फक्त FTL अक्षम करण्यासाठी JSC_useFTLJITJ वापरू शकतो. किंवा आम्ही समांतर JIT करणारे धागे अक्षम करू शकतो.\nकिंवा आम्ही जेआयटी ऑप्टिमायझेशन करतो तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही अहवाल देऊ आणि मुद्रित करू शकतो. म्हणून एलएलडीबी मध्ये मी सर्वकाही चालू करण्यासाठी आणि नंतर जेएससी रीस्टार्ट करण्यासाठी वातावरणीय चल सेट केले, ज्याचा परिणाम आधीपासूनच जेआयटी ऑप्टिमायझेशन डीबग प्रिंट्समध्ये होतो. जर आपण फंक्शनची नावे जीट केलेली आहेत तर ती दिसते की आधीपासूनच CharAt, Abs, यासारख्या गोष्टी ट्वीक केल्या गेल्या आहेत.\nपरंतु आता आम्हाला आमचे स्वतःचे जेआयटी फंक्शन बनवायचे आहे, पॅरामीटर म्हणून एक सोपी संख्या घेणारा इव्हरोफ्लो फंक्शन, नंतर रिझल्ट व्हेरिएबल तयार करतो आणि आय = ० ते एन पर्यंत लूप बनवितो आणि त्याचा निकाल लागतो. गरम ". हे फंक्शन कॉल करण्याच्या एका साध्या लूपने आपण हे करू शकतो.\nचला फक्त चार आवृत्त्यांसह प्रारंभ करूया. हे काही आऊटपुट दाखवते, परंतु आपल्याला पाहिजे ते नाही. लूपमध्ये 10 वेळा कार्यान्वित करणे देखील काहीही करत नाही.\nपरंतु 100 वेळा फंक्शन कार्यान्वित केल्यास जेआयटी या बेसलाईनला चालना मिळेल. येथे जावास्क्रिप्ट फंक्शनच्या समकक्ष असेंब्ली कोड कोड आहे. आणखी आक्रमक जेआयटी सुरू करण्याचा प्रयत्न करूया. पळवाट वाढवूया.\nआणि बूम डीएफजी जित ...\nआणि आता पूर्णपणे वेडे होऊ, लूप समायोजित करू. एफटीएल जित. भरभराट, तेथे बरेच अधिक उत्पादन आहे, परंतु खरे सांगायचे तर याचा अर्थ काय आहे याची कल्पना नाही.\nपरंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण खोल खोदण्यासाठी विविध डीबगिंग पद्धती आणि युक्त्या शिकलो. आता तुम्हाला जेआयटी कंपाईलरबद्दल थोडे अधिक माहिती आहे. शेवटच्या लेखामधून आपल्याला हे देखील माहित आहे की जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट्स, अॅरे आणि व्हॅल्यूज मेमरीमध्ये कशा दर्शविल्या जातात.\nआता पुढील कल्पना विचारात घ्या. जेआयटी कंपाईलर कोडमधील प्रकारांचा अंदाज घेत असेल आणि गृहीत धरत असेल आणि धनादेश काढून टाकतील आणि उदाहरणार्थ त्यांना एका विशिष्ट मेमरीमधून सहज हलवेल तर, गैरवर्तन होऊ शकेल काय? फक्त गृहीतके म्हणा, जेआयटी कोड जावास्क्रिप्टच्या दुप्पट अॅरेची अपेक्षा करतो आणि त्यांच्यावर थेट मूल्यांची प्रतिक्रिया देतो. त्यानंतर जेआयटी कंपाईलर सर्व तपासणीस ऑप्टिमाइझ करते, परंतु त्यानंतर आपल्याला अॅरेच्या सहाय्याने ऑब्जेक्टसह एंट्री पुनर्स्थित करण्याचा एक मार्ग सापडेल.\nपॉईंटर म्हणून या अॅरे मध्ये ऑब्जेक्ट ठेवला जाईल. तर जर जिड कोडमध्ये कोणतेही धनादेश नसले आणि या अॅरेची प्रथम नोंद दिली तर ती त्या पॉईंटरला दुहेरी परत करेल, बरोबर? ते खूपच वाईट असेल आणि 'ब्राउझरच्या असुरक्षिततेच्या नमुन्यांपैकी हा एक नमुना आहे आणि आम्ही लवकरच कार्यवाहीत पाहू. पण अशा गोष्टी रोखण्यासाठी जेआयटी प्रयत्न कसा करते? बरं, हे सिद्ध झालं की विकसकांच्या समजांवर परिणाम करणारे प्रत्येक कार्य मॉडेल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेआयटी संकलक आहे.\nतर या अॅरेचा लेआउट बदलणारी एखादी वस्तू असल्यास, उदाहरणार्थ एखादी वस्तू डबल अॅरेमध्ये ठेवली असेल तर अशा फंक्शनला धोकादायक म्हणून चिन्हांकित केले पाहिजे. त्याबद्दलच्या या झेडडीआय लेखातील एक संक्षिप्त उतारा मी तुम्हाला सांगतो. 'तुमची सोय गुंतवणेः जीआयटी सोबतीसाठी मार्गदर्शक' वाचा.\nयेथे ते लिहितातः भविष्यातील ऑप्टिमायझेशन टाळण्यासाठी ऑपरेशन संभाव्यतः धोकादायक आहे असे म्हणण्याचा मार्ग म्हणजे क्लोबरवर्ल्ड नावाच्या फंक्शनला कॉल करणे जे इतर गोष्टींबरोबरच आलेखातील सर्व अॅरेच्या प्रकारांबद्दलचे सर्व गृहित धरू शकते. म्हणून जावास्क्रिप्ट इंजिन क्लोबरवर्ल्डला कॉल करून संभाव्य दुष्परिणाम होऊ शकेल असे काहीही चिन्हांकित करण्याचा प्रयत्न करतो. दुष्परिणाम अशा गोष्टी असू शकतात ज्या आपण फक्त किंमतीचे प्रकार बदलण्यासारखे विचार करीत होते आणि त्या बदल्याची अपेक्षा नसून दुसरे काहीतरी असू शकते.\nतर येथे क्लोबर वर्ल्ड फंक्शन आहे जे डीएफजी-जेआयटी भागातील अंमलात आणले जाते. याला क्लोबरस्ट्रक्चर्स म्हणतात, जे स्ट्रक्चर एअरक्लॉबर्ड सेटवर स्ट्रक्चरक्लॉबरस्टेट सेट करतात हे स्पष्टपणे अशा गोष्टी आहेत जिथे उदाहरणार्थ ऑब्जेक्टची रचना बदलते. समजू की जेआयटी एखाद्या वस्तूवरील .x मालमत्तेत प्रवेश अनुकूलित करते आणि अचानक आपण ते हटवल्यास, रचना बदलली आहे हे चिन्हांकित करणे आवश्यक आहे जेआयटी कोड टाकता येईल, अन्यथा जेव्हा आपण हा जिटर पुन्हा वापरता तेव्हा आपल्याला मेमरी भ्रष्टाचार होईल. कार्य.\nvba पुनरावृत्ती वर्ण\nपण आता तेवढे पुरे झाले. पुढील लेखात आपण लिनसच्या शोषणाकडे जाऊ, जे अशा प्रकरणात गैरवर्तन करते.\nजेआयटी डीबगिंग सक्षम केल्यावर कोणताही न हाताळलेला अपवाद जेआयटीला पाठविला जाईल?\nकरण्यासाठीसक्षम कराफक्त वेळेत (जेआयटी)डीबगिंग, द. या अनुप्रयोगासाठी कॉन्फिगरेशन फाइल किंवा संगणकासाठी (मशीन. कॉन्फिगरेशन) असणे आवश्यक आहेjitDebuggingसिस्टममध्ये मूल्य सेट करते.जेव्हा जेआयटी डीबगिंग सक्षम केले जाते,कोणताही न हाताळलेला अपवाद जेआयटी डीबगरला पाठविला जाईलहा संवाद बॉक्स हाताळण्याऐवजी संगणकावर नोंदणीकृत. '\nमी JIT डीबगिंग कसे अक्षम करू?\nविंडोज कंट्रोल पॅनेल> नेटवर्क आणि इंटरनेट> इंटरनेट पर्याय मध्ये, निवडाअक्षम करास्क्रिप्टडीबगिंग(इंटरनेट एक्सप्लोरर) आणिअक्षम करास्क्रिप्टडीबगिंग(इतर)23 मे 2018\nमी कसे निश्चित करावे नाही नोंदणीकृत जेआयटी डीबगर निर्दिष्ट केलेले नाही?\nनोंदणीकृत जेआयटी डीबगर निर्दिष्ट केलेले नाही. अ वर संलग्न करताना प्रक्रिया प्रतीक्षा करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा वर क्लिक कराडीबगरस्वतः. रद्द करण्यासाठी क्लिक कराजेआयटीडीबग विनंती.10 मे 2018\nमायक्रोसॉफ्ट.नेटसाठी J 'जेआयटी डीबगिंग ' सक्षम कसे करावे?\n'तुमच्या अॅप्लिकेशनमध्ये न हाताळलेला अपवाद आढळला आहे ..... सिस्टमला निर्दिष्ट केलेली फाइल सापडली नाही ... जस्ट इन टाइम (जेआयटी) डीबगिंग सक्षम करण्यासाठी, या अनुप्रयोगासाठी .कंफिग फाइल किंवा संगणकासाठी (मशीन कॉन्फिग) असणे आवश्यक आहे jitDebugging मूल्य system.windows.forms विभागात सेट केले. अनुप्रयोग डीबगिंग सक्षमसह देखील संकलित केलेला असणे आवश्यक आहे.\nएखादा जस्ट टाइम (जेआयटी) डीबगिंग डायलॉग बॉक्स आहे का?\nया डायलॉग बॉक्स ऐवजी फक्त-इन-टाइम (जेआयटी) डीबगिंग. सिस्टम.अनुधिकृतअॅक्सेप्ट एक्सेप्शनः 'सीः प्रोग्राम फायली (x86) ot बॉटबॉय प्रीफ्स.एक्सएमएल' या मार्गावर प्रवेश नाकारला आहे. jitDebugging मूल्य system.windows.forms विभागात सेट केले. सक्षम. या डायलॉग बॉक्सद्वारे हाताळण्याऐवजी. हा धागा लॉक केलेला आहे.\nफक्त डीबगिंगमध्ये सक्षम किंवा अक्षम कसे करावे?\nकेवळ-इन-टाइम डीबगिंग सक्षम किंवा अक्षम करण्यासाठीः 1 साधने किंवा डीबग मेनूवर, पर्याय निवडा & gt; डीबगिंग & जीटी; जस्ट इन-टाइम2या प्रकारच्या कोड बॉक्ससाठी जस्ट-इन-टाइम डीबगिंग सक्षम करा मध्ये, आपल्याला जस्ट-इन-टाइम डीबगिंग डीबग करण्यासाठी इच्छित कोडचे प्रकार निवडाः व्यवस्थापित, मूळ आणि / किंवा स्क्रिप्ट.3ओके िनवडा. अजून पहा...\nमी JIT मध्ये ही समस्या कशी दूर करू?\nमी या समस्येचे निराकरण कसे करू? या डायलॉग बॉक्स ऐवजी फक्त-इन-टाइम (जेआयटी) डीबगिंग. सिस्टम.अनुधिकृतअॅक्सेप्ट एक्सेप्शनः 'सीः प्रोग्राम फायली (x86) ot बॉटबॉय प्रीफेस.एक्सएमएल' या मार्गावर प्रवेश नाकारला आहे. jitDebugging मूल्य system.windows.forms विभागात सेट केले. सक्षम. या डायलॉग बॉक्सद्वारे हाताळण्याऐवजी. हा धागा लॉक केलेला आहे.
Sanjay Raut । नाशिकः काल (14 जुलै) अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेत्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. सध्या शिंदे गटातील लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहे. मात्र, त्यांना अजित पवारांची धुणीभांडी करावी लागणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीला गेले होते. मात्र, दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंचं काहीच ऐकून घेण्यात आलेलं नाही. पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, "एकनाथ शिंदे सक्षम नेतृत्व आहे की नाही? हा प्रश्नच नाहीये. कारण त्यांच्याकडं आता दुसरा उपाय नाहीये. शिंदे गटाला आता अजितदादांची धुणीभांडी करावी लागणार आहे. "अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आम्हाला अजिबात पटलेला नाही. त्याचबरोबर तो निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा नाही. शिवसेना फोडण्यापुरत शिंदे गटाच्या नेत्यांचं महत्त्व आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचं महत्त्व संपलं आहे", असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.