text
large_string
Coronavirus, cpr, hospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ४९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. याच वेळी तीन अत्यवस्थ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ४९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. याच वेळी तीन अत्यवस्थ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा, करवीर व पन्हाळा तालुक्यांत एकाही नवीन रुग्णांची नोंद झाली नाही. तर आजरा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी एक, कागल, शाहूवाडी तालुक्यांत प्रत्येकी दोन, शिरोळ तालुक्यात चार, तर कोल्हापूर शहरात २० नवीन रुग्णांची नोंद झाली. ५३६ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये ४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता, पण मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील ५० वर्षीय पुरुष, शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील ७५ वर्षीय महिला, तर करवीर तालुक्यातील कळंबा येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या ४८ हजार २७२ झाली असून, त्यापैकी ४५ हजार ७०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९२५ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आजरा - ८४६, भुदरगड - १२०८, चंदगड - ११७७, गडहिंग्लज - १४०८, गगनबावडा - १४३, हातकणंगले - ५२३९, कागल - १६४२, करवीर - ५५५०, पन्हाळा - १८३७, राधानगरी - १२१४, शाहूवाडी - १३२५, शिरोळ - २४६४, नगरपालिका हद्द - ७३५४, कोल्हापूर शहर १४ हजार ६३७, इतर जिल्हा - २२२८.
महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच नव्हे तर सहा नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच नव्हे तर सहा नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्रत्यक्षात काँग्रेसचे ४१ नगरसेवक आहेत. एका जागेसाठी ७ चा कोटा यानुसार ३५ नगरसेवकांध्येच पाच जागा निवडून येतात. शेवटी सहा नगरसेवक उरतात. एक नगरसेवक कमी असतानाही काँग्रेसने सहावा अर्ज दाखल केला असल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. मेट्रोरिजनच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. २४ रोजी छाणनी आटोपली. १७ मे रोजी निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेत रणणिती आखली होती. तर काँग्रेसमध्येही सर्व नेत्यांनी आपसात समन्वय साधत उमेदवार निश्चित केले. शहरी मतदारसंघात एक उमेदवार निवडून येण्यासाठी ७ चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पाच सदस्य निवडून आल्यावरी काँग्रेसचे पाच नगरसेवक उरतात. यात एका मताची जुळवाजळव केली तर आणखी एक नगरसेवक निवडून येऊ शकतो. काँग्रेसने ही रिस्क घेतली असून एक उमेदवार रिंगणात उतरविला आहे. शहरी भागातील मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय महाकाळकर, दीपक कापसे, अरुण डवरे, प्रशांत धवड, रेखा बारहाते आणि सुरेश जग्यासी या सहा नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)
एकाकी आजी-आजोबांची काळजी हेच करिअर होऊ शकतं! - खरं नाही वाटत? वृद्धांची काळजी आणि देखभाल ही आता नवीन रोजगार संधीच नाही, तर स्वतंत्र व्यवसाय संधी होऊ शकते! तरुणांची संख्या कमी आणि ज्येष्ठांची जास्त अशी समस्या घेऊन जगणार्या काळात ही समस्या तरुण हातांना रोजगार देऊ शकते. अनेक देशांमध्ये आता वृद्ध लोकांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कशा हाताळायच्या, हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे. काहीअंशी भारतामध्येही हे चित्र आढळत आहेच; पण जर्मनी किंवा जपान यासारख्या देशांमध्ये तर या प्रश्नानं जवळपास गंभीर स्वरूप धारण केलं आहे. यामधला महत्त्वाचा भाग म्हणजे या देशांमधला प्रश्न आर्थिक कारणांमुळे निर्माण झालेला नाही. तिथं आर्थिक पातळीवर बर्यापैकी समृद्धी आहे. आपलं निवृत्तीपश्चात आयुष्य जगण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही. मात्र मुळात लोकसंख्यावाढीचा वेग कमी असल्यामुळे तिथल्या वृद्ध लोकांचं प्रमाण वाढलं आहे. त्या तुलनेनं तिथं तरुणांचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे. यामुळे वृद्ध लोक एकाकी झाले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी मनुष्यबळ नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ तर अजिबातच नाही. त्यामुळे वृद्धांचे आरोग्याचे आणि एकटेपणाचे, देखभालीचे प्रश्न वाढत चालले आहेत. हे सगळं परदेशातच घडतंय असं काही नाही. भारतामध्येही अनेक मोठय़ा शहरांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती येऊ घातली आहे. तरु णाईची गरज मोठय़ा प्रमाणावर भासणार आहे. पुण्या-मुंबईसारख्या गावांमध्ये आत्ताच त्याची काही उदाहरणं सहजपणे सापडतात. मुलं-मुली परदेशी किंवा दुसर्या गावात राहात असल्यामुळे किंवा काहीवेळा तर त्याच गावात राहात असूनसुद्धा वृद्ध लोकांवर एकटं राहायची वेळ येते. असे लोक गृहसंकुलामध्ये राहात असल्यामुळे मूलभूत सुविधा, सुरक्षा असे प्रश्न अगदी ठळकपणे समोर येत नसले तरी या वृद्धांची 8 ते 24 तास काळजी घेण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासते. त्यात त्यांना खायला घालण्यापासून त्यांच्या दैनंदिन समस्यांर्पयत सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. त्यातच वृद्ध लोकांना अनेक प्रकारच्या वैद्यकीय समस्या भेडसावत असल्यामुळे त्या संदर्भातल्या प्रश्नांचाही सामना करणं गरजेचं असतं. अशावेळी भरवशाच्या लोकांची गरज प्रकर्षानं भासते. त्यात डॉक्टरांकडे नेऊन आणण्यापासून वेळच्या वेळी गोळ्या-औषधं देण्यार्पयत अनेक गोष्टींचा समावेश होतो. संधी कुणाला? वृद्धांची सर्वार्थानं काळजी घेऊ शकणार्या तरु ण-तरु णींची गरज यामुळे मोठय़ा प्रमाणावर भारताबाहेर आणि भारतातही भासणार हे म्हणूनच अगदी नक्की आहे. यासाठी अजून कुठला 'अभ्यासक्र म' नसला तरी असा अभ्यासक्र म स्वतर्च आखून त्यानुसार आवश्यक असलेल्या गोष्टी शिकणं सहज शक्य आहे. त्यात मुळात आपण कुणाशीही नीटपणे कसं बोलावं, इतरांच्या घरी कसं वागावं, आपली वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी या गोष्टी तर येतातच. याखेरीज रु ग्णांची काळजी घेण्यासाठीच्या गोष्टींचाही समावेश होतो. वृद्ध लोक चिडचिडे असणार, वारंवार आजारी पडणार, असंख्य गोष्टींविषयी तक्र ारी करणार, नाजूक मनाचे असणार असं सगळं निसर्गसारख्या अभ्यासक्र मांमध्ये शिकवलं जात असल्यामुळे त्या संदर्भातलं प्रशिक्षण घेणं उपयुक्त ठरू शकतं. तसंच शारीरिक काळजी घेणं म्हणजेच सर्वसामान्यपणे किळस येईल अशा प्रसंगांनाही सामोरं जाण्याची तयारी ठेवणं हे ओघानं आलंच. एकूणच हे काम आव्हानात्मक असणार हे नक्की. याच्या जोडीला वृद्ध लोकांची करमणूक करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना धीर देणं, त्यांच्याशी आत्मियतेनं वागणं, त्यांच्या वेगानं त्यांना जगू देणं हे सगळंही आपल्याला सर्वसामान्यपणे कटकटीचं वाटू शकतं. आपलं तेच काम झाल्यावर मात्न आपल्याला त्याच्याशी जळवून घेणं भागच पडतं याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच या कामात फक्त शारीरिक कष्ट करून पुरेसं नसतं, तर मानसिकरीत्याही खूप संयम बाळगणं गरजेचं ठरतं. 'हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट'सारख्या अभ्यासक्र मांमध्ये हे शिकवलं जातं. स्कोप का आणि किती? ज्या तरुण-तरुणींना अशा कामात रस वाटतो त्यांनी या पर्यायाचा जरूर विचार करावा. कदाचित जर्मन किंवा जपानी भाषा शिकण्याचा फायदाही मिळू शकतो. तसंच अशा प्रकारचे तरु ण-तरु णी गोळा करून त्यांना गरजेनुसार ठिकिठिकाणी उपलब्ध करून देणारी संस्था काढू शकण्याचा पर्याय छोटा उद्योजक बनू पाहणार्यांकडे आहे.
धुळे : शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपच्या (BJP) खासदार हेमा मालिनी यांच्याविषयी केलेले वक्तव्य भोवण्याची शक्यता होती. मात्र सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी कारवाईचा इशारा देताच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही राष्ट्रवादी आता महाराष्ट्र सरकारमध्ये सर्वांचं बाबतीत सर्वात पुढे असल्याचे आता सिद्ध होतांना हळू हळुवा दिसत आहे. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालाशी करणाऱ्या शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने आणि नवनियुक्त महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी इशारा देताच पाटील यांनी लगेच माफी मागितली. पाटील दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले की, माझ्या भाषणामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो', असे पाटील यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये बोलताना आपल्या विधानावर त्यांनी माफी मागितली.
देशभरातील खासगी रुग्णालयांचा शुक्रवारी बंद; सांगली : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास शासनाने परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आयएमएशी संलग्नित सर्व खासगी रुग्णालये यादिवशी बंद राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी ही माहिती दिली. शस्त्रक्रियेला परवानगीच्या निमित्ताने आयएमए आणि जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन या संघटना आमने-सामने आल्या आहेत. आयएमएने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आंदोलनाचे विविध टप्पे म्हणून ८ डिसेंबरला राज्यातील प्रमुख शहरांत डॉक्टर्स शांततेने निदर्शने करतील. मास्क, पांढरा कोट आणि स्टेथेस्कोपसह वीस-वीस डाॅक्टरांचे गट आंदोलनात सहभागी होतील. दुसरा टप्पा म्हणून देशभरातील सर्व खासगी वैद्यकीय सेवा शुक्रवारी बंद राहील. कोरोनासह अतिदक्षता विभाग मात्र सुरु राहतील. संपाला मार्ड संघटनेने पाठिंबा दिल्याचे डॉ. दोरकर म्हणाले. संपाची दखल घेतली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आयएमएने दिला आहे. जिल्हास्तरावरही याचिका दाखल केल्या जातील. आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या शासनाच्या निर्णयाला आयएमएने आक्षेप घेतला आहे. परवानगी दिलेल्या ५८ शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतल्याविना त्या करता येणार नाहीत, असा दावा केला आहे. अपुऱ्या ज्ञानावर केलेल्या शस्त्रक्रिया रुग्णांसाठी प्राणघातक ठरतील. मेडिकल कमिशनच्या परवानगीविना शासनाने जारी केलेल्या निर्णयाला कोणताही कायदेशीर आधार नाही, असेही आयएमएने म्हटले आहे.
करोना झालेल्या प्रत्येकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज नाही. संसर्ग झाल्याची नोंद केल्यानंतर वैद्यकीय निगराणीमध्ये योग्य त्या निकषांचे पालन करून घरामध्ये विलगीकरण करता येते. करोना झालेल्या प्रत्येकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज नाही. संसर्ग झाल्याची नोंद केल्यानंतर वैद्यकीय निगराणीमध्ये योग्य त्या निकषांचे पालन करून घरामध्ये विलगीकरण करता येते. मुंबईमध्ये आजवर पाच लाख व्यक्ती या घरामध्ये विलगीकरणात आहेत. आत्तापर्यंत तीस लाख ९४ हजार ९७६ व्यक्तींनी विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. २२ ऑक्टोबर रोजी नोंद झालेल्या ८८६ व्यक्ती या विविध प्रकारच्या विलगीकरण केंद्रांमध्ये वैद्यकीय उपचार घेत असून १ लाख ५७ हजार ६६९ जणांनी आतापर्यंत या सुविधेचा लाभ घेतला आहे. निकटच्या संपर्कातील १२ हजार ९४० व्यक्तींना शोधून करण्यात आले असून १० हजार ४११ व्यक्तीमध्ये संसर्गाची सौम्य प्रकारची लक्षणे दिसून आली आहे. मार्च ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये पालिकेने तपासण्या, चाचण्या, रुग्णशोध ही त्रिसूत्री कायम ठेवली आहे. डॉ. सुरेश म्हात्रे यांनी विलगीकरणाच्या संदर्भात दिलेले निकष हे अतिशय सुस्पष्ट असल्याचे सांगितले. आता चाचण्यांची उपलब्धताही वाढवण्यात आली आहे, त्यामुळे पूर्वी चाचण्या करण्यासाठी सामान्यांची धावपळ व्हायची, आता मात्र या परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. चाचण्यांची उपलब्धता वाढली आहे. संसर्ग झाल्याची माहिती व वैद्यकीय मार्गदर्शनानंतर वॉररुमच्या माध्यमातून सातत्याने संबधित व्यक्तीशी संपर्क ठेवला जातो, त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे का, लक्षणांची तीव्रता वाढली आहे का, याची माहिती घेतली जाते. त्यामुळे घरामध्ये विलगीकरणामध्ये असलेले मुंबईकर योग्य वैद्यकीय मदतीनंतर करोनामुक्त झालेले आहेत. लक्षणांची तीव्रता वाढल्यास दुर्लक्ष होता कामा नये याकडे पालिका प्रशासनाने सातत्याने लक्ष वेधले आहे. बैठी घरे, चाळी तसेच झोपडपट्ट्यांमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नाही. सार्वजनिक शौचालयांचा वापर, सुरक्षित अंतराचा अभाव यामुळे या व्यक्तींना विलगीकरण केंद्रामध्ये दाखल होण्यास सांगितले जाते. अनेकजण त्या भीतीने माहिती देत नाहीत, असाही अनुभव येतो. मात्र आजार लपवण्यामुळे गुंतागुंत कमी होण्यापेक्षा ती वाढते, त्यामुळे चाचण्या करून घेणे, सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना योग्य माहिती देणे गरजेचे असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कांकाणी यांनी सांगितले. मुंबईमध्ये ६२० सक्रिय प्रतिबंध क्षेत्रे जाहीर करण्यात आली असून त्यात ६. ७ लाख घरांचा समावेश आहे. यातील २८. ४ लाख लोकसंख्येचा समावेश आहे. आतापर्यंत १, ३८९ प्रतिबंध क्षेत्र मुक्त करण्यात आली आहेत, मुंबईमध्ये ८, ५१८ इमारती सील करण्यात आल्या आहे, यात २. ४ लाख घरांचा समावेश असून नऊ लाख लोकसंख्या येथे राहते. मुंबईतील ४१ हजार ०५० इमारती प्रतिबंध क्षेत्रातून मुक्त करण्यात आल्या आहेत. आरसी या प्रभागामध्ये सर्वाधिक म्हणजे ११३७ सील इमारतींची संख्या दिसून आली आहे तर त्या खालोखाल आरएस प्रभागात ७६५ इमारती, के पश्चिममध्ये ७१२, पी उत्तर मध्ये ६६६, के पूर्वमध्ये ५७४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील त्राल (Tral) येथे दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या भागात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली आहे. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी संपूर्ण परिसर घेरला आणि सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. त्याचदरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षारक्षकांवर जोरदार गोळीबाराला सुरुवात झाली. या गोळीबाराला सुरक्षारक्षकांनी देखील सडेतोड उत्तर दिले. हाती आलेल्या वृत्तानुसार, जंगलात दोन-तीन दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी रविवारी सुरक्षारक्षकांनी शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अंसार गजवात-उल-हिंद च्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यात अहमद मीर, रफी हसन मीर, सुहेल अहमद भट आणि अब्दुल अजाद अहमद यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यानंतर या महिन्यात एजीएच दहशतवाद्यांसोबत दुसरी चकमक झाली. गेल्या महिन्यात पुलवामा येथे झालेल्या चकमकीत नव्या दहशतवादी संघटनेचे कमांडर जाकिर मूसा याचा खात्मा करण्यात आला होता. ANI ट्विटः यापूर्वी शनिवारी बारामूला जिल्ह्यात सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद च्या पाकिस्तानी दशहतावाद्याचा खात्मा करण्यात आला.
होय मी ज्योतिष आहे असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सांगली महापालिकेत भाजपाचा महापौर होणार असं भाकीतही चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलंय. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपात येण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर केले. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीचे भाजपाकडून रणशिंग फुंकण्यात आलं त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपचाच विजय होणार असा विश्वास, व्यक्त केलाय.
"अहो, काय करायचे मग ? पाठवायचे आहे का राजसला ?" आमच्या हिने चौथ्यांदा हा प्रश्न विचारला तेंव्हा मात्र मला जाम हसायला आले. "अग म्हणजे काय ? तो काय कुठे परदेशात निघालाय का ? शहरापासुन फक्त ३० कि.मी. वर नविन लेणी सापडलियेत तिकडे जाणार आहे त्यांच्या शाळेची सहल." "अहो पण त्या जागेविषयी किती उलट सुलट कानावर येतय ते ऐकलय ना तुम्ही ? शापीत आहे म्हणे ती जागा. उगाच विषाची परिक्षा कशाला बघा ? आणी शाळेला बरी मेली असलिच ठिकाणे सापडतात लाहन्ग्यांना घेउन जायला." हिचे गुरगुरणे आणी नाराजी व्यक्त करणे. "अग, चंद्रावर गेलाय आपला भारत आणी तु काय हे खुळ्यासारखे बोलत आहेस ? अब्दुल कलामांवर पेपरात लेख लिहिला होतास तु, हे सांगुन तरी खरे वाटेल का कोणाला ?" ह्या वाक्यावर मात्र जरा चेहरा खुलला. "तसे नाहि हो, आपल्या काळजाचा तुकडा जाणार म्हणुन थोडी जास्तच काळजी वाटतिये इतकेच." "अग सकाळी ८ ला जाणार ते संध्याकाळी ५ पर्यंत परत सुध्दा येणार सगळे. उगाच काळजी करु नकोस." ह्या सागळ्या चिंता वाद काळज्यांपासुन मुक्त असलेला आमचा राजस मात्र अगदी उत्साहाने बरोबर काय काय न्यायचे, कोणाच्या शेजारच्या सिट वर बसायचे हे ठरवण्यात अगदी मश्गुल झाला होता. आत्ता आत्ता सिनिअर के. जी. मध्ये गेलेले आमचे बाळ अगदी सहलमय झाले होते. शेवटी एकदाचा सहलिचा दिवस उजाडला. का कोणास ठाउक आज हवामान थोडेसे कुंद होते, स्वच्छ असा सुर्यप्रकाश सकाळपासुन पडलाच न्हवता. ऑफिसच्या गडबडी मध्ये मी ८ वाजताच राजसला त्याच्या शाळेच्या बसमध्ये बसवुन आलो होतो. त्याच्यकडे निट लक्ष ठेवा वगैरे वगैरे पालक ह्या नात्यानी द्यायच्या सुचना हिनी दिल्याच त्याच्या मॅडमना. राजसची स्वारी अगदी खुशीत होती आणी घरुन फक्त पाणीच घेउन यायला सांगीतले असल्याने राजसच्या मातोश्रीही खुशीत होत्या. राजसची बस सुटली आणी आम्ही घरी परत आलो. सगळे आवरुन ९ च्या ठोक्याला मी घराबाहेर पडलो. ऑफीस मध्ये पोचताच स्वतःला कामच्या गराड्यात गुरफटुन टाकले. "सर आज प्लिज मला घरापर्यंत लिफ्ट द्याल ?" अनघाच्या माझ्या सेक्रेटरीच्या प्रश्नाने मी भानावर आलो. "का ग ? आज काय बघायला वगैरे येणार आहेत का काय ?" मी नेहमीसारखी तिची फिरकी घेतली. "अय्या अहो असे काय हो सर. बाहेर बघाना काय मोठ्ठा पाऊस पडतोय." माझ्या वातानुकुलित आणी आवाजविरोधक कक्षाचा पडदा बाजुला करुन बघितले आणी मी हैराणच झालो. परमेश्वरा, अक्षरशः हत्तीच्या सोंडेतुन पाणी उडावे तसा धबधबा पाऊस कोसळत होता. मला सगळ्यात पहीली आठवण आली ती राजसची. मी घाईघाईने घरी फोन करायला वळलो आणी तेव्हड्यात खिशातला मोबाईल वाजायला लागला. मला तर बाई राजसला पाठवु नये असे मनापसुन वाटत होते. पण ह्यांनी आणी राजसनी हट्टच धरल्यावर मग काय. ह्यांनी तर टिंगलच करायचा प्रयत्न केला माझ्या विचारांची. मान्य आहे मी एक आधुनिक स्त्री आहे, चांगली ग्रॅज्युएट आहे. पण ज्या जागेविषयी रोज उलट सुलट छापुन येतय, ज्या जागेवर गवत खायला म्हणुन सुद्धा जनावरे फ़िरकत नाहीत अशा ठीकाणी मुलांना घेउन जायची गरजच काय म्हणते मी ? ह्या वयात काय कळतय पोरांना सांस्कृतीक वारसा वगैरे ? आणी बाकीचे पालक हो कसे म्हणाले ? राजस तिकडे सहलीला गेलाय कळल्यावर गायतोंडे काकुंचा चेहरातर पाहण्यालायक झाला होत. "अग तुला माहितिये का ? काही दुष्ट शक्तींना कोंडुन घातले होते म्हणे आपल्या पुर्वजांनी तिथे. कसे ग आई वडील तुम्ही ? मॉडर्न मॉडर्न म्हणुन मुलाच्या जिवाशी खेळायचे का ? हे सुद्धा वर ऐकवुन गेल्या. त्यात मेले हे आजचे वातावरण. पाऊस अजुन वाढु नये म्हणजे नशीब. मगाच पासुन त्या राजसच्या सहली बरोबर गेलेल्या अनुप्रिता मॅडमचा फोन सुद्धा लागत नाहीये, काय करावे ? मन नुसते चिंतानी भरुन गेलय. ह्यांना फोन करावा का ? "हॅलो मि. अभिमन्यु राजाध्यक्ष का?" मी काहि बोलयच्या आतच पलिकडुन घाईघाईत प्रश्न विचारला गेला. "बोलतोय" मी. "हे बघा मी प्रिन्सीपल डायस बोलतोय, राजसच्या शाळेतुन. सहल ज्या लेण्यांमध्ये गेली होती तिकडे दरड कोसळल्याने मोठा अपघात झालाय. सर्व मुले सुखरुप आहेत, त्यांची काळजी करु नका. मात्र जोवर रस्ता मोकळा होत नाही तोवर त्यांना तिथुन हालता येणार नाही. तुम्ही काळजी करु नये म्हणुन हा फोन केलाय. आम्ही सतत तुमच्या संपर्कात राहुच. मी २ फोन नं. देतो तेव्हडे तुमच्याकडे लिहुन ठेवा. "अहो खरेच सगळे सुखरुप आहे ना हो ?" माझा धीर आता थोडा थोड सुटायला लागला होता. "डोंट वरी मिस्टर राजाध्यक्ष, ऑल इज फाईन. वुई आर ट्रायींग अवर बेस्ट. लवकरात लवकर आम्ही तुमची मुले तुमच्या ताब्यात सुखरुप देउ." का कोणास ठाउक मला ते बोलणे पटत न्हवते. राहुन राहुन काहितरी चुकतय, काहितरी विचित्र घडलय असे आत कुठेतरी टोचत होते. नशीब मलाच फोन केला होता, घरी फोन केला असता तर नुसता हल्लकल्लोळच उडाला असता. आता लवकरात लवकर घर गाठुन अभ्राला जमेल तेव्हड्या नाजुकपणे परिस्थीती सांगीतली पाहिजे. "क्या यार ! ये सब आजही होना था ? बारीश तो ऐसे गीर रहि है जैसे सारी दुनिया को डुबा देगी. त्यात दरड कोसळल्याने रस्ता जाम झालाय. किती वेळ अजुन ह्या भुतिया ठिकाणी कोंडुन पडावे लागणार आहे देवाला माहित. किती उत्साहानी आपण आणी अमननी आज रात्रिच्या जेवणाचा प्लॅन बनवला होता, आता तो रागावुन बसणार ते वेगळेच. परमेश्वरा, हा पाऊस तरी थांबु दे रे. ह्या कुबट वासात नकोसे झालय. त्यात हि कार्टी, माकड बरी पण हि नको असे झालय. आणी त्यात तो राजस मगासपासुन जो टक लावुन माझ्याकडे पाहात बसलाय तो एक क्षण माझ्यावरुन नजर हलवायला तयार नाहिये. आणी त्याची ती नजर.. श्शी एखाद्या निरागस लहान मुलाची नजर अशी असु शकते ? कपडे फाडुन ति नजर आत आत घुसतीये असे वाटतय मला. "मॅडम, चलो रास्ता एक साईडसे चालु हो गया है." चंदुचा आवाज ऐकला आणी जिव भांड्यात पडला. लगेच मुलामुलिंची रांग करायला घेतली. एक एक करुन सगळ्यांना बस मध्ये चढवले. आणी डोकी मोजायला सुरुवात केली. अरे समवन इस मिसिंग, एक डोके कमी आहे. "दिदी राजस नहि आया." गिरिष्मा म्हणाली. मागे जाउन बघितले तर तिच्या शेजारची सिट रिकामी. खाली उतरले तर चंदु ड्रायव्हरला गाडित अडकलेला कचरा साफ करायला मदत करत होता, तर रेहाना आणी श्रीधर मुलांना बरोबर आणलेले स्वेटर, जर्किन घालायला मदत करत होते. चला, म्हणजे प्रिता बाई आता तुम्हालाच जाउन त्याला आणले पाहिजे. मी घाबरत घाबरतच मगाशी आडोसा घेतलेल्या गुहेत शिरले. दुपारी गाईड बरोबर मनमोहक वाटणार्या त्या मुर्ती आता मात्र एखाद्या अक्राळ विक्राळ पशु प्रमाणे भासत होत्या. "राजस , ए राजस" माझ्या आवाजाच्या प्रतिध्वनीमुळे मीच दचकले. मगाशी लावलेल्या मशालिंच्या उजेडात एका कोपर्यात बसलेला राजस मला दिसला. परमेश्वरा, त्या अंधारात त्याचे डोळे एखाद्या जंगली जनावराप्रमणे चमकत होते. "राजस चला, घरी मॉम, डॅड वाट बघत असतील ना बाळा ? चला चला ग्रिष्मा पण तिकडे वाट बघतिये, चला पटकन." मी थोडे अंतर राखुनच बोलत होते. राजसची ती जहरी नजर पुन्हा एकदा माझ्याकडे वळली आणी प्रत्युत्तरा दाखल त्याच्या तोंडातुन एक विचित्र प्रकारचा गुरगुराट बाहेर पडला. इतक्यावेळ शांत बसलेल्या राजसनी आता मात्र त्याची जागा सोडली आणी एखाद्या श्वापदाप्रमाणे तो गुढघे आणी तळहातवर उभा राहीला. आता मात्र माझ्या काळजानी ठाव सोडला, हे निश्चीत काहितरी अनैसर्गिक होते, काहितरी अमानवीय होते. मी भितीनी चार पावले मागे हटले आणी त्याच वेळी राजसनी एखाद्या लांडग्यासारखी माझ्यावर झेप घेतली. क्रमश : (संध्याकाळ पर्यंत अंतीम भाग टाकायचा प्रयत्न करतो. कामामुळे थांबावे लागतय. क्षमस्व.)
आमच्याकडे वायरलेस हेडफोन्समध्ये ख-या भरभराटीचा सामना करावा लागत आहे, जरी हे खरे आहे की हे थोड्या काळासाठी आहे, परंतु आता असे आढळले आहे की बरेच वापरकर्ते त्यांच्या वायरलेस हेडफोन्सचा बर्याचदा आनंद घेत आहेत. यावेळी आम्ही चाचणी करण्यास सक्षम आहोत नून्टेक मधील नवीन झोरो II हेडफोन, आणि आम्ही आपल्याला हेडफोन्सच्या सर्वात मनोरंजक तपशीलांसह वापरण्याचा आमचा अनुभव सांगत आहोत की दोष न घालता दोषांशिवाय बरेच गुण आहेत. आपण वायरलेस कार्य करणारे हेडसेट खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, झोरो II वायरलेसचे हे पुनरावलोकन गमावू नका. सर्वप्रथम आम्ही स्वतः ब्रँडच्या छोट्या पुनरावलोकनासह सुरुवात करणार आहोत आणि चीनमध्ये बनविलेल्या, ऑडिओ उत्पादनांचा वापर करणार्यांना ऑफर देत असलेल्या आणि १ 15 वर्षांपेक्षा कमी काळापासून बाजारात असणार्या या ऑस्ट्रेलियन कंपनीचे काही तपशील जाणून घेणार आहोत. इटालियन डिझाइनसह. ते आम्हाला खरोखर सुबक, नवीन डिझाइनसह उत्पादनांची ऑफर देतात आणि स्वतः च्या हॉलमार्कसह आम्ही या झोरो II आणि कंपनीच्या उर्वरित उत्पादनांमध्ये पाहू शकतो, ते त्यांच्या संपूर्ण श्रेणीसाठी हेडफोनसाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान देखील वापरतात. या निमित्ताने, 2010 मध्ये आणि हेडफोनची झोरो श्रेणी बाजारात आली डिझाइनसह ध्वनी गुणवत्तेबद्दल धन्यवाद ऑफर लवकरच वापरकर्त्यांसाठी लोकप्रिय झाले. जसे आपण हेडफोन्सबद्दल बोलत आहोत, आम्ही केवळ त्यापैकी ऑडिओ गुणवत्तेसह प्रारंभ करू शकतो. आमच्याकडे हेडबँड असलेले हेडफोन्स आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की बाह्य आवाज खरोखरच चांगलापणे वेगळा झाला आहे आणि जर आम्ही त्यात जोडला तर या झोरो II ची सामर्थ्य खरोखर जास्त आहे बरं, आम्हाला या संदर्भात कोणतीही समस्या दिसत नाही. आम्हाला बाजारात सापडलेल्या काही हेडबँड हेडफोन्समध्ये आम्हाला शक्तीचा अभाव लक्षात येऊ शकतो परंतु हे असे नाही आणि ऑडिओ गुणवत्ता खरोखर चांगली तसेच शक्तिशाली आहे. मी म्हणू शकतो की जास्तीत जास्त व्हॉल्यूमवर त्यांच्याकडे असलेली थोडी शक्ती विकृत करते आणि आम्ही ज्या संगीत वाजवितो त्यावर अवलंबून हे अधिक सहज लक्षात येईल, म्हणून या अर्थाने आम्हाला फक्त त्याच्या ऑडिओ उर्जेचा आनंद घ्यावा लागेल. आमच्याकडे हेडफोन आहेत ज्याचे अंदाजे 4.1 मीटर किंवा त्यावरील श्रेणीसह ब्लूटूथ 10 कनेक्शन आहे एनएफसी कनेक्शन, ptप्ट-एक्स लॉशलेस ट्रान्समिशन तंत्रज्ञान आणि एक्सक्लुझिव्ह एससीसीबी (सराउंड क्लोज्ड कॅव्हिटी बॉडी) ध्वनिक तंत्रज्ञान जोडा. या झोरो II हेल्मेट्समध्ये एकाच वेळी दोन उपकरणांपर्यंत उत्तरे मिळण्याची शक्यता देखील आहे. मायक्रोफोन जोडून (mm.mm मीमी जॅक केबलवर) ते आपल्यास थेट कॉल करू देते आणि त्याचा मायक्रोफोन घरामध्ये चांगला कार्य करतो, आम्ही त्याची घराबाहेर चाचणी केली नाही. या हेडफोन्सचे मोजमाप 3,5 x 17,9 x 17,1 सेमी आहे आणि a आहे 499g वजन. डिव्हाइससह ऑपरेशन आणि सिंक्रोनाइझेशन सोपे आहे. आम्ही डाव्या बाजूला सापडलेल्या बटणाद्वारे आम्ही हेडफोन्स सक्रिय करतो आणि आम्हाला एक «पॉवर ऑन will ऐकू येईल. आम्ही आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन झोरो II वायरलेससाठी ब्लूटूथमध्ये शोधतो. एकदा दुवा साधल्यास आम्ही ऐकू येईल «आपला हेडफोन कनेक्ट केलेला आहे» आता आमच्याकडे हेडफोन कनेक्ट झाले आहेत आणि आम्ही आमच्या संगीताचा आनंद घेऊ शकतो. आपल्याकडे संगीताची आवाज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी किंवा त्याच पॉवर बटणासह प्ले / विराम देण्यासाठी उजवीकडील बटणे आहेत. निर्माता म्हणतात की स्वायत्तता 35 तास आहे आणि या अर्थाने ते चांगल्या प्रकारे पालन करतात. बांधकाम साहित्यावर आम्ही उभे राहतो गलिच्छ होण्याचा धोकादायक प्लास्टिकचा स्पर्श उत्कृष्ट परिष्करणापेक्षा अधिक, परंतु प्रत्यक्षात अॅल्युमिनियमचे स्पर्श आणि या मॅट ब्लॅक कलरने परिधान करणार्यासाठी नेत्रदीपक आकर्षक भेट दिली. या झोरो II मध्ये समाविष्ट असलेल्या सामग्रीबद्दल आम्हाला थोडीशी तक्रार नाही. आम्हाला वाहतुकीसाठी कार्बन फायबर फिनिश (केबल्ससाठी एका लहान विभागात आत), 3,5 के सोन्याचे-प्लेटेड फ्लॅट 24 मिमी जॅक कनेक्टर असलेली एक केबल आहे ज्यामध्ये कॉल करण्यासाठी मायक्रोफोन आणि मायक्रो यूएसबी चार्जिंग केबलसाठी यूएसबी जोडला जातो. आपल्याला या उत्पादनाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास किंवा त्यांच्याकडे असलेली उर्वरित कॅटलॉग जाणून घेऊ इच्छित असल्यास आपण थेट प्रवेश करू शकता नून्टेकची अधिकृत वेबसाइट जिथे आम्हाला ब्रँडची सर्व उत्पादने आणि त्यांच्याबद्दल अधिक तपशील आढळतात झोरो II वायरलेस. आपल्याला खरेदीमध्ये स्वारस्य असल्यास आपण थेट झोरोआयआय येथे प्रवेश करू शकता ऍमेझॉन, आता त्यांच्या नेहमीच्या किंमतीवर देखील 30% सूट आहे याचा फायदा घेऊन.
मासिकपाळी... प्रत्येक स्त्रीच्या आपुलकीचा विषय. काही हेल्थ डिसआॅर्डरस् किंवा प्रेग्नसी असेल तरच गायब होणारी किंवा अनियमित होणारी ही आपली सखी. एरवी मात्र अगदी महिन्याच्या महिन्याला न चुकता हजेरी लावणारी. आपल्या आज्जीबाई 'त्या' दिवसात कापडाचा वापर करायच्या. ती कापडे धुणे, वाळवणे अशा कटकटी पाळीच्या त्या वेदनांत, रक्तस्त्रावात आणखीनच भर टाकायच्या. आपल्या आईने तसे दोन्हीही अनुभवलय असं मला वाटतं. कपड्याची कटकट आणि सॅनिटरी पॅडसचा यूज एड थ्रो हा सुटसुटीतपणाही. आपल्या जनरेशन मध्ये "सुखवस्तू" घरातल्या जवळपास सर्वच मुली पॅडस् वापरत असाव्यात. इथे सुखवस्तू हा शब्द ठळक होऊन नजरेला झोंबतो. अर्थातच सॅनिटरी पॅडसच्या प्रचंड किंमतींमुळे. आपल्याला ती किंमत प्रचंड वाटत नसावीही कदाचित, पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील स्त्रीयांचे काय? तुटपुंजी मिळकत आणि कुटुंबनियोजन वगैरे गोष्टींची माहिती शून्य असल्याने खाणारी तोंडे भरपूर. अशा परिस्थितीत ती स्त्री काय स्वतःच्या मासिक पाळीवर खर्च करणार? तसंही स्त्री, स्त्रीचे आरोग्य आपल्या इथे 'नॉट सो इंम्पॉरटंट थिंग्स' आहेत. नाही का..!! हे दुर्लक्ष, स्वतःची हेळसांड यातून पाळीच्या दिवसात आवश्यक ती काळजी, स्वच्छता पाळली जात नाही. अत्यंत घाण कपड्याचा वापर संसर्गाला जन्म देतो. काही ठिकाणी तर स्त्रीया राख, झाडाची पाने वापरतात. या सगळ्यांतून गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर तसंच अनेक संसर्ग होण्याची शक्यता बळावते. ही शक्यता प्रचंड प्रमाणात सत्यातही उतरलीये. पण हे एवढ्यावरच संपत नाही. पॅडसच्या अवाजवी किंमतींमुळे काही स्त्रीया एकच पॅड बऱ्याच कालावधीसाठी वापरतात. यातूनही गर्भाशयाच्या पिशवीचे वेगवेगळे विकार, संसर्ग उद्भवू शकतात. जनरली पाच तासांच्या वर एक पॅड वापरूच नये. आधीच अपुरी माहिती, त्यात सॅनिटरी पॅडसच्या अवाजवी किंमती यांमुळे स्त्रीयांना ह्या प्रश्नांना तोंड द्यावे लागतेय. सॅनिटरी पॅडस ही अत्यंत महत्वाची, अत्यावश्यक गोष्ट आहे. ती अत्यल्प किंमतीत उपलब्ध होणे, तसेच बाकीच्या रेशनिंग गोष्टींबरोबर पुरवली जाणे गरजेचे आहे. स्त्रीच्या पोटात देशाचे भविष्य उमलत असत. तीच स्त्री निरोगी नसेल तर कसं चालेल? स्त्रीयांनो स्वतःचे, स्वतःच्या आरोग्याचे महत्व ओळखा. काळजी घ्या स्वतःची.
काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेवार यांनी आपल्या भाषणातून औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीचे आकडे जाहीर करुन सगळी पोलखोल केली. तर जिल्ह्यात चार महिन्यात फक्त १९८३ नवीन सदस्यांची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबादः शहरातील चिखलठाणा परिसरात मंगळवारी झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्ते मेळाव्यात डिजिटल सदस्य नोंदणीवर भर देण्याचं आवाहन पक्षातील जेष्ठ नेत्यांनी केली. मात्र याचवेळी सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेवार यांनी आपल्या भाषणातून औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीचे आकडे जाहीर करुन सगळी पोलखोल केली. तर जिल्ह्यात चार महिन्यात फक्त १९८३ नवीन सदस्यांची नोंद झाली असल्याचं सुद्धा मुत्तेवार म्हणाले. गेल्या चार महिन्यांत औरंगाबाद पूर्वमध्ये २९८, पश्चिममध्ये ६७, सिल्लोड १०, गंगापूर ४४२, फुलंब्री ६८०, पैठण २१६, कन्नड २३१ अशी नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक एक कोटींची नोंदणी करण्याच्या सूचना आहेत. पण एक लाखाचाही आकडा गाठलेला नाही. उलट तेलंगणात ३० लाख नोंदले गेले, असं म्हणत मुत्तेवार यांनी सदस्य नोंदणीची पोलखोल केली. यावेळी माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री तथा अमित देशमुख म्हणाले की, आगामी स्थानिक निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. पण एकीकडे एक कोटींचे उद्दिष्ट असताना फक्त १ लाख सदस्य नोंदणी झाली असताना देशमुख यांच्या स्वबळाच्या नाऱ्याची मोठी चर्चा पाहायला मिळाली. . . . . तरच काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार! यापुढे काँग्रेस पक्षातून उमेदवारी हवी असेल तर 'डिजीटल सदस्य नोंदणी' अनिवार्य असणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते तथा माहिती वैद्यकीय शिक्षण आणि वैदयकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागीय पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ३१ मार्चपर्यंत काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणी सुरु आहे. डिजीटल सदस्य नोंदणी केल्यानंतर कार्यकर्त्यांनाही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधता येणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील प्रत्येकाने डिजीटल नोंदणी करावी. तसेच यापुढे उमेदवारी देतांना सुद्धा डिजिटल नोंदणीचा विचार केला जाणार असून, ज्यांनी डिजीटल सदस्य नोंदणी केली नाही, त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असंही देशमुख म्हणाले.
सॅमसंग कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. सॅमसंगचे प्रोडक्ट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास इंडिपेंडेंस डे ऑफर आणली आहे. या अंतर्गत टीव्ही आणि फ्रिज खरेदी करणाऱ्याला एक महागडा स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळणार आहे. नवी दिल्लीः सॅमसंगचे प्रोडक्ट खरेदी करण्याची ही जबरदस्त संधी आहे. कंपनीने युजर्संसाठी एक खास इंडिपेंडेंस डे ऑफर आणली आहे. यात टेलिव्हिजनसोबत रेफ्रिजरेटर, स्मार्ट अवन, वॉशिंग मशीन आणि एयर कंडिशनर्सला जबरदस्त डिलमध्ये खरेदी करता येवू शकते. या ऑफर मध्ये सॅमसंगचाय QLED टीव्ही खरेदी केल्यानंतर ७७ हजार ९९९ रुपयांचा Galaxy S20+ स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळणार आहे. हा सेल १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे. जबरदस्त स्कीमचा उठवा फायदा ३१ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये १५ टक्के कॅशबॅकची जबरदस्त ऑफर आहे. या सेलमध्ये ९९० रुपयांच्या ईएमआय खरेदीवर अनेक प्रोडक्ट खरेदी करता येवू शकतात. ऑफरमध्ये सॅमसंग QLED TV, 4K UHD TV, Smart TV, SpaceMax Family Hub रेफ्रिजरेटर, Sie-By-Side आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, फ्लेक्सवॉश वॉशिंग मशीन, ऐडवॉश वॉशिंग मशीन सह अन्य प्रोडक्ट निश्चित बेनिफिटवर ऑफर केले जात आहेत. QLED 8K TV वर महागडा फोन फ्री या ऑफरमध्ये कंपनी आपल्या QLED 8K TV खरेदीवर ७७ हजार ९९९ रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी एस२० प्लस स्मार्टफोन फ्री ऑफर करीत आहे. तसेच या सेलमध्ये खरेदी केलेल्या टीव्हीवर १० वर्षाची नो स्क्रीन बर्न - इन वॉरंट शिवाय QLED TV च्या पॅनल्सवर ३ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. स्मार्ट टीव्हीवर ९ हजारांचा कॅशबॅक सॅमसंगच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर युजर्संना ९ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. तसेच ४३ इंचाचा आणि त्यापेक्षा जास्त स्क्रीन साईज असलेल्या मॉडल्सला ९९० रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. फ्रीज खरेदीवर ३८ हजारांचा फोन फ्री सॅमसंगचा फ्रीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जबरदस्त ऑफर मिळत आहे. कंपनीने स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदीवर युजर्संना ३७ हजार ९९९ रुपये किंमत असलेला सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाइट स्मार्टफोन मिळत आहे. ३०० लीटरपेक्षा जास्त फ्रीज आणि वॉशिंग मशीन खरेदीवर १५ टक्के कॅशबॅक कंपनी देत आहे. या वस्तूंला सुद्धा ९९० रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. सॅमसंगची खास ईएमआय स्कीम युजर्संना महागडे प्रोडक्ट खरेदी करणे सोपे जावे यासाठी कंपनीने My Samsung My EMI ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत आपली पसंतीची प्रोडक्ट कमीत कमी डाऊन पेमेंट आणि ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. या ईएमआयची जास्तीत जास्त मर्यादा ३६ महिन्यांची आहे.
मुंबई - २०१९ लोकसभेत काँग्रेसचा जोरदार प्रभाव झाल्यामुळे संपूर्ण पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्ज नेत्यांचा पराभव झाला आहे. निकाल नंतर आज प्रथमच अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी राज्यातील अन्य प्रदेशाध्यक्षांनी देखील हीच भूमिका घ्यावी असे सांगितले. जेणेकरून आगामी निवडणुकीत तरुण नेत्यांना संधी देता येईल. या निवडणुकीत अशोक चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून पराभूत झाले असून, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी प्रभाव केला आहे.
पाच डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ : सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीसाठी निविदा दाखल करण्यास दोनवेळा मुदतवाढ देऊनही, नव्याने एकही निविदा दाखल झालेली नाही. आतापर्यंत १०३ प्लॉटस्पैकी केवळ तीन प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीने निविदा प्रक्रियेला दि. ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, ही मुदतवाढ अंतिम आहे. यावेळीही प्रतिसाद न मिळाल्यास, लिलावास प्रतिसाद नसल्याचा अहवाल शासनाकडे देणार असल्याचे, जागा विक्रीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सांगितले. वसंतदादा साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची २१ कोटींची देणी अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. शेतकरी, जिल्हा बँक आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची थकबाकीसह जवळपास शंभर कोटींची थकबाकी कारखान्याकडे आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्कही काढण्यात आला होता. कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीला शासनानेही परवानगी दिली. जागा विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चारजणांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सह. संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे असून, समितीत पुणे साखर आयुक्त (प्रशासन) संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व कोल्हापूर प्रादेशिक सह. संस्था साखर योगीराज सुर्वे यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने जागा विक्री निविदेस पुन्हा ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, या कालावधित निविदा दाखल न झाल्यास राज्य शासनास तसा अहवाल देणार आहे. यावर शासनच योग्य तो निर्णय घेईल, असे मत शैलेश कोतमिरे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी) कारखान्याने २१ एकर जागेत १०३ प्लॉट पाडले. त्याच्या रेखांकनाला महापालिकेची मान्यताही घेण्यात आली आहे. त्यानंतर समितीने जागा विक्रीची निविदा प्रसिद्ध करीत १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधित केवळ तीन प्लॉटसाठी तीन निविदा दाखल झाल्या. निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने समितीने प्रक्रियेला ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतीत नव्याने एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे समितीने पुन्हा एकदा २० नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. दुसऱ्या मुदतीत एकही निविदा दाखल झाली नसल्यामुळे जागा विक्री समितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत.
Hemant Dhome: गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर ला 'झिम्मा'ने लोकांना वेड लावले होते तर या वर्षी पुन्हा त्याच शुक्रवारी 'सनी' लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'झिम्मा' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर हेमंत ढोमे (Hemant Dhome)यांचा 'सनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झिम्मा' नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावल्या आहेत. प्रेक्षकांच्या हयाच अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी बरोबर एक वर्षांनी 'सनी'(Sunny) हा सिनेमा १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Jhimma Director Hemant Dhome Big Announcement, Post viral About his new 'Sunny' Movie) क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर यात 'सनी'ची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ह्या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते असून सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केलेले आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे सिनेमाबद्दल म्हणतात, " 'झिम्मा' ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने 'सनी' हा सिनेमा घेऊन आलोय. आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे 'झिम्मा'ला प्रेम दिले तसेच ते 'सनी'ला हि मिळेल अशी खात्री आहे. "
छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे 'बिग बॉस 16'मधून अर्चना गाैतम हिला खूप लाेकप्रियता मिळाली. सध्या अर्चना साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अशातच तिने आपले लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फाेटाेंमध्ये अर्चना हिने अनारकलीचा लूक केला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहते तिच्या या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
धुळे : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने काल रात्रीपासून शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही निकटवर्तीय देखील आहेत. यात धुळे जिल्ह्यातील साक्री (Sakri) मतदार संघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांचा फोन देखील नॉटरिचेबल आहेत. यामुळे आमदार गावित देखील शिंदेसोबत आहे का? याबाबत चर्चा सुरू आहे. (dhule news sakri matdar sangh MLA Manjula Gavit is also notreachable) शिवसेनेचे (Shiv Sena) ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती आहे. सोमवारी (२० जून) विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील (Gujarat) सुरतला गेले होते. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची देखील सध्या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे एकटे नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय देखील असल्याचे सांगितले जात आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री मतदार संघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा फोन देखील नॉटरिचेबल आहेत. अपक्ष आमदार मंजुळा गावित यांची सुरुवातीपासून शिवसेनेशी जवळीक असून सत्ता स्थापन करताना त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. आता शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या गटात अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा देखील समावेश आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
चपळ काजू, केचअप बाटल्यांप्रमाणे, नेहमी खूप घट्ट किंवा खूप हरवू असे वाटते. चाकांच्या काजू येतो तेव्हा ते खूपच ढीग होतात आणि आपण गोंधळ किंवा चाक गमावू शकता. खूप घट्ट, आणि आपण पिलारा वेळ grilling येतात गरज शकते किंवा आपण काहीतरी खंडित शकते दुर्दैवाने, बहुतांश DIYers "कणखर चांगले आहेत" च्या बाजूला चुकीचे वाटू लागते असे दिसते, ज्यामुळे निराशा, तुटलेली तुकडी आणि थ्रेड्सदेखील नुकसान होतात. सोयीसाठी, पुनरावृत्ती, सुसंगतता आणि सुरक्षिततेसाठी, इंजिनिअर्स प्रत्येक कॅपिटलसाठी किती फास्टरर कॉम्प्रेशन आवश्यक आहेत हे निर्दिष्ट करतात- होय, तेथे केचअप बोतल कॅप टॉर्क विनिर्देश आहे- स्क्रू, बोल्ट, अल्ट, सेन्सर आणि स्पार्क प्लग. प्रत्येक DIYer टॉर्क पानाचा वापर कसा करावा हे जाणून घेण्यासाठी टूलबॉक्समध्ये किमान एक किंवा दोन असणे आवश्यक आहे. एक टोक़ रंच काय आहे? तो उघड्या केचअपच्या बाटल्यांसोबत आणि शिरांचे काजू घेताना येतो तेव्हा टोक़ समजून घेणे हे एक महत्त्वाचे उपाय आहे. टोरक बोतल कॅप किंवा चाक अक्रोड कितपत बाटली किंवा हब, चाक, आणि ब्रेक रोटर वर जबरदस्ती आहे किती अप्रत्यक्ष मोजमाप. आम्ही "अप्रत्यक्ष" म्हणतो कारण कम्प्रेशन मोजण्याचे कोणतेही व्यावहारिक मार्ग नाही किंवा बोलतो किती आहे, परंतु "टोक़" काय आहे? टॉर्क ही एक मध्यम आकाराचे बल आहे , विशेषतः एलबी · फीट, एलबी · इन किंवा एनएम (पाउंड-पाय, पाउंड = इंची, न्यूटन) मध्ये व्यक्त केले जाते, जे बल काळ अंतर असते. हे चित्रित करण्यासाठी, 2-फूट ब्रेकर बारसह व्हील काजू काढा. ब्रेकर पट्टीच्या शेवटी 50 पौंड शक्तीचा वापर करून चाक बोनलवर सॉकेट निश्चित केले जाते. व्हील अर्टवर 100 एलबी · टॉर्कमध्ये फलोत्पादन म्हणजेच 50 पौंड गियर 2 फूट लीव्हरने वाढवले आहे. एक 3-फूट ब्रेकर बार सह, आपल्याला फक्त 100 एलबी · टॉर्कचे टोक लावण्यासाठी 33. 3 पौंड शक्तीची गरज आहे, तर 1-फूट रत्चाटसाठी 100 पौंड शक्ती आवश्यक असते. मनुष्यांनी कॅलिब्रेटेड बल मीटर्स त्यांच्या हातात बनवल्याशिवाय, रेंचवर किती शक्ती ठेवल्या आणि किती कोळशाचे गोळे केले या बोल्टमध्ये ठेवले याबद्दल सातत्याने मोजण्याचा कोणताही मार्ग नाही. एक कॅलिब्रेटेड चक्राकार रींच म्हणजे ऑक्सिजन सेंसर आणि स्पार्क प्लग्सपासून वाल्व्ह कव्हर गॅस्केट बोल्ट, व्हील नट्स आणि सिलेंडर हेड बोल्ट्ससाठी प्रत्येक गोष्टीची योग्य कडकपणा निश्चित करणे आवश्यक आहे. अर्जावर अवलंबून, उपलब्ध अनेक टोक़ रेंच प्रकार आहेत, परंतु त्यापैकी तीन ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सर्वात सामान्य आहेत, बीम, क्लिक आणि इलेक्ट्रॉनिक टॉर्क वेंचन्ससहित. प्रत्येक प्रकार थोडासा वेगळा कार्य करते ज्यायोगे एखाद्या दिलेल्या फास्टरनरवर किती दाब लावता येते हे मोजता येते. - बीमः सुमारे शंभर वर्षांपूर्वी शोधण्यात आलेला बीम-प्रकारचा टॉर्क विरेंचा वापर करणे सर्वात सोपा आणि सर्वात सोपा आहे. मुख्य बीम वर हँडल आहे, जे आपण सॉकेटमध्ये बर्न लागू करण्यासाठी वापरता. निर्देशक बीम सॉकेट हेडवर निश्चित करण्यात आलेला आहे आणि फास्टनर कडक करताना हलवित नाही. मुख्य तुळई वर गेज तो deflected आहे की अंतर उपाय, आपण एक टॉर्क वाचन देत. - इलेक्ट्रॉनिक : पिझो-इलेक्ट्रिक सेंसर वापरणे, जे प्रतिकारशक्ती बदलते ते किती अवघड करते यावर अवलंबून असते, इलेक्ट्रॉनिक टॉर्क वेटर्सकडे कोणतेही हलणारे भाग नाहीत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, त्यांना असे वाटते की एका डिजिटल डिस्प्लेवर वाचन देते, सॉकेटमध्ये किती वळण शक्ती लागू केली जाते. एक निर्दिष्ट टॉर्क सेट करण्यासाठी, डिस्प्ले सहसा ब्लिंक, व्हाइब्रेट किंवा बीपवर सेट केल्यावर सेट केले जाऊ शकते. इलेक्ट्रॉनिक प्रकारांमध्ये टॉर्क-अँगल फंक्शन देखील समाविष्ट होऊ शकते. - 10 ते 250 इंच फूट असलेल्या लहान टॉर्क वाईनचे, वाल्व्ह कव्हर, थ्रॉटल बॉडीज, ट्रांसमिशन वाल्व्ह बॉडीज, काही इनटेक मॅनिफॉल्ड्स आणि आंतरीक फास्टनर्ससाठी उपयुक्त आहेत. - 5 ते 100 एलबीचे फूट असलेल्या मध्यम टॉर्क वेटचे इंजिन उपकरणे, निलंबन घटक, ब्रेक घटक, आतील भाग आणि काही काजूच्या काजूसाठी उपयुक्त आहेत. - 20 ते 250 lb · फूट असलेल्या मोठ्या टॉर्क वेटर्स, सिलेंडरच्या डोळ्यांच्या कपाटासाठी उपयोगी आहेत, मोठे घटक, व्हीलचेअर आणि व्हील बेअरिंग हब. कोणतीही टोक़ पाना एक फर्म आणि स्थिर हात आवश्यक. एक चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती (प्रेरणा) क्रम असल्यास, जसे की काचेचे काजू, सिलेंडर डोकेचे बोल्ट, आणि काही अंतर्गत इंजिन व प्रेषण भाग मजबूत करणे, नुकसान टाळण्यासाठी आणि योग्य ऑपरेशन निश्चित करण्यासाठी चरणांचे अनुसरण करा. काही फास्टनर्स, जसे टॉर्क-टू-प्रॉडक्शन सिलेंडर हेड् बोल्ट्स , अतिरिक्त वळण आवश्यक आहे, ओलांडता शक्तीच्या बाहेर बोल्टला एका विशिष्ट टॉर्कमध्ये सेट केल्यानंतर, अतिरिक्त कोन स्पष्टपणे निर्देशित केले जाईल, टॉर्चचा विचार न करता पुढे बोलणे आपण काहीवेळा पेंट चिन्ह वापरू शकता परंतु टॉर्क-एंगल गॉग्ज आणि इलेक्ट्रॉनिक गेज अधिक अचूक आहेत. बीम टोक़ रेंच वापरण्यासाठी, तोपर्यंत आवश्यक टोक़पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत काळजीपूर्वक गेज पहा, नंतर हाताळण्यासाठी बळ लागू करणे थांबवा. क्लिक प्रकार टाके पाना वापरण्यासाठी, तो एक स्प्रिंग किंवा स्प्लिट-बीम असो, डायल समायोजित करा आणि आवश्यक टॉर्क स्पेशिफिकेशनमध्ये लॉक करा, नंतर हळूहळू फास्टनर घट्ट करा टोक़ची मर्यादा गाठल्यावर, आपण हँडलमध्ये " क्लिक " अनुभवता आणि ऐकू शकाल, ज्यावेळी तुम्ही बल लागू करणे थांबवाल इलेक्ट्रॉनिक टॉर्क वेन्नेस्चा वापर समान प्रकारात वापरण्यात येतो जसे की क्लिक-प्रकारच्या, समायोजन आणि सूचना इलेक्ट्रॉनिक वगळता टॉर्क पोहोचल्यावर, बीप, कंपन किंवा फ्लॅशिंग लाइटद्वारे सूचित केले जाते, तेव्हा फास्टरला अधिक कडक टाळणे टाळण्यासाठी बल लागू करणे थांबवा. स्प्लिट बीम आणि बीम टॉर्क वॅन्चेस्ला स्टोरेजवर कोणत्याही खास काळजीची आवश्यकता नाही, परंतु मायक्रोमीटर-समायोज्य क्लिक-प्रकार टॉर्क वॅन्चेसचे निर्धारण करणे आवश्यक आहे. हे "सेटिंग" पासून स्प्रिंग रोखेल आणि भावी टॉर्क रीडिंग्सवर स्काइप करेल. टॉर्क वेटर्स त्यांच्या संरक्षणीय प्रकरणांमध्ये साठवून ठेवल्या पाहिजेत आणि कधीही सोडले नाहीत. वर्षातून साधारण एकदा, आपण आपल्या टोक़ पानास सोयीसाठी आत ठेवण्यासाठी कॅलिब्रेट केलेले असावे.
कतारमध्ये आजपासून फिफा विश्वचषकाला सुरुवात होत आहे. पण, प्रेक्षकांच्या मते, जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत खेळाडूंच्या दुखापतीची प्रक्रिया सुरूच असते. आता विश्वविजेता फ्रान्सचा स्ट्रायकर करीम बेंजेमा याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. फ्रेंच फुटबॉल फेडरेशनने शनिवारी ही माहिती दिली. बेंजेमा डाव्या मांडीला दुखापत झाल्याने बाहेर आहे. त्याला बरे होण्यासाठी जवळपास तीन-चार आठवडे लागतील. संघाचे प्रशिक्षक डिडिएर डेस चॅम्प्स म्हणाले- 'मी त्याच्यासाठी खूप दुःखी आहे. त्याने विश्वचषक हे आपले लक्ष्य मानले होते. या दुखापतीनंतरही माझा संघावर पूर्ण विश्वास आहे. आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. बेंजेमाला एक महिन्यापूर्वी फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेचा बॅलोन डी'ओर पुरस्कार मिळाला होता. विश्वचषकापूर्वी दुखापत झालेला तो फ्रान्सचा 5वा खेळाडू आहे. त्याच्या आधी, मिडफिल्डर एन'गोलो कांते आणि पॉल पोग्बा, एनकुकू आणि बचावपटू किम्पेम्बे यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. अनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पण, अशी 5 नावे आहेत जी स्पर्धेपूर्वी दुखापतीमुळे वगळण्यात आली आहेत. निकोलस गोन्झालेझ, अर्जेंटिना हा खेळाडू गुरुवारी जखमी झाला. आतापर्यंत अर्जेंटिनाचे 3 खेळाडू जखमी झाले आहेत. जोक्विन कोरिया, अर्जेंटीना गोन्झालेझसह जोआक्विन कोरियाने दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार घेतल्याचे वृत्त आहे. जोस लुईस गया, स्पेन त्याची जागा अलेजांद्रो ब्लेड्स, जो बार्सिलोनाकडून क्लब फुटबॉलमध्ये खेळतो, त्याने घेतली. सादिओ माने, सेनेगल माने दुखापतग्रस्त असूनही यांची संघात निवड झाली. पण, त्यांना वेळेत सावरता आले नाही. शुक्रवारी, सेनेगलचा कर्णधार आणि स्टार फॉरवर्ड सादिओ माने दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. तो दुखापतीतून सावरत होता. मानेने सेनेगलसाठी 92 सामन्यांमध्ये 33 गोल केले आहेत. तो यापूर्वी इंग्लिश प्रीमियर लीग क्लब लिव्हरपूलकडून खेळला होता. तो आता बायर्न म्युनिकचे प्रतिनिधित्व करतो. रिअल माद्रिदच्या या खेळाडूने यावेळीही विश्वचषकात भाग घेतला होता. वादांमुळे बेंजेमा मागील आवृत्तीही खेळू शकला नव्हता आणि 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक खेळण्याच्या त्याच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. 2014 मध्ये तो शेवटचा विश्वचषक खेळला होता, ज्यामध्ये जर्मनीचा संघ चॅम्पियन बनला होता. बेंजेमाने गेल्या मोसमात रिअल माद्रिदसाठी 46 सामन्यांत 44 गोल केले होते. यामध्ये ला लीगामधील 27 गोलांचा समावेश आहे. बेंजेमाने चॅम्पियन्स लीगमधील 12 सामन्यांमध्ये 15 गोल केले आहेत.
बारामती शहरातील कोरोना रुग्णांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या तीन हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीन्स आज रुई येथे कार्यान्वित करण्यात आल्या. बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोना रुग्णांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या तीन हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीन्स आज रुई येथे कार्यान्वित करण्यात आल्या. बारामतीतील रुई रुग्णालयाच कोविड हेल्थ सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ज्या रुग्णांना दाखल करण्यात येते, त्यापैकी काहींना जर ऑक्सिजनची गरज भासली, तर या हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीनचा वापर केला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा लाख रुपये या तीन मशीन्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत. ज्या रुग्णांना मास्कच्या ऑक्सिजन यंत्रणेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हाय फ्लो नेझल मशीन उपयुक्त ठरणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान, एमआयडीसीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या तीन इमारती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अधिग्रहीत केल्या आहेत. या एका वसतिगृहात 54 व्यक्ती राहू शकतात. तीन इमारती मिळून या ठिकाणी 162 रुग्ण राहू शकतील. या पध्दतीने ज्यांना लक्षणे नाहीत, मात्र जे पॉझिटिव्ह आहेत असे, त्याच प्रमाणे ज्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेतले जातील, त्यांनाही रिपोर्ट येईपर्यंत याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता बारामतीकरांचीही उत्तम सोय येथे होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज बारामतीत घेतलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हे आवाहन केले. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकार डरपोक! पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६६ हजार अवैध बांधकामे पाडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी सरकारला अर्ज करता आला असता. पण राज्य सरकारमध्ये तसे धाडस नाही म्हणून सरकारने महापालिकेला पुढे करून त्यांच्यामार्फत तसा अर्ज केला, असे खडे बोल सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने ही अवैध बांधकामे वाचविणे आता शक्य नसल्याचे स्पष्ट केले. या महापालिका हद्दीतील अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने आॅक्टोबर २०१३मध्ये दिले. त्यानंतर महापालिकेने कारवाईचा कार्यक्रमही ठरविला. परंतु काही अवैध बांधकामवाले सर्वोच्च न्यायालयात गेले व तेथे तात्पुरती स्थगिती दिली गेल्याने ही प्रस्तावित कारवाई थांबविली गेली. आता ती स्थगिती उठली असल्याने कारवाई करण्यात काहीच अडचण नाही. आधीच्या आदेशानुसार कारवाई केली जावी यासाठी जयश्री डांगे यांनी केलेली ताजी जनहित याचिकाही न्यायालयापुढे आहे. परंतु राज्यभरातील महापालिका हद्दींमधील अवैध बांधकामांचे काय करावे याविषयी नेमलेल्या सिताराम कुंटे समितीने सरकारला अहवाल दिला. ही बांधकामे नियमाधीन करण्याची समितीची शिफारस तत्त्वतः स्वीकारण्याचे सरकारने ठरविले. या पार्श्वभूमवर सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेस असे पत्र लिहिले की, कुंटे समितीविषयी सरकारचा निर्णय होईपर्यंत निदान महिनाभर तरी महापालिकेने कारवाई करायचे थांबावे व तशी मुदत घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करावा. त्यानुसार ज्या मूळ याचिकेत अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश झाले होते त्यात एक सिव्हिल अॅप्लिकेशन करून महापालिकेने न्यायालयास स्थगितीची विनंती केली. महापालिकेने आपल्या अर्जासोबत सरकारने पाठविलेले पत्रही जोडले. ते पाहिल्यावर न्या. अभय ओक व न्या. अशोक भंगाळे यांचे खंडपीठ संतापले व न्यायमूर्तींनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. तुम्हाला धोरणात्मक निर्णय घ्यायला वेळ मिळावा यासाठी महापालिकेस अर्ज करण्यास सांगण्याची गरज काय? न्यायालयास अशी विनंती करण्याचे धाडस सरकारने दाखवायला हवे होते. खास करून मूळ याचिकेत सरकारही प्रतिवादी असल्याने सरकारला अर्ज करण्यात काहीच अडचण नव्हती. पण सरकारने तसे न करता महापालिकेस पुढे केले, असे न्यायमूर्तींनी सरकारी वकिलास ऐकविले. शिवाय कोणत्या कायद्यानुसार सरकारने असे पत्र पालिकेला लिहिले आहे, असा सवालही न्यायालयाने यावेळी केला.
मुंबई : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे आता पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी काल शनिवारी जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पिकं धोक्यात येण्याची शक्याता आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल शनिवारी जळगावसह बुलढाण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरण थंड झाले होते. मात्र याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात सर्वत्र रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये अनेकांनी पिकांवर औषध फवारणीला सुरूवात केली आहे. ५ ते ७ मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पश्चिम चक्रवाताचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहू लागलेत. त्यामुळे गारपीट तसेच पावसाच्या सरी कोसळणार असं हवामान विभाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, विदर्भ तसेच पालघर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. ७ मार्च रोजी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळेल तर ८ मार्च रोजी गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा तसेच चंद्रपूर येथे हलक्या सरी कोसळतील. ६ मार्चपर्यंत येथे ढगाळ वातावरण कायम राहणार असून तुरळक पाऊस पडणार आहे. शेतात सध्या द्राक्ष काढणीला आलेत. मात्र पाऊस आल्यामुळे द्राक्षांवर किड पडण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी ८ मार्चपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. आज रविवार असल्याने मुंबईकर फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे असे हवामान खात्याने सांगितले आहे.
नवी दिल्ली, 07 मे : रशिया- युक्रेन युद्धामुळे (russia-ukraine war) युरोप आणि आफ्रिकेत होणारी गहू (wheat) आणि अन्यधान्य निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे पर्याय म्हणून भारतातील गहू खरेदीसाठी मागणी वाढली आहे. अलीकडील काही दिवसांत भारतातून सुमारे ५ लाख टन गहू निर्यातीसाठी (wheat export) व्यापाऱ्यांनी करार केले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गहू (international market) , खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे जगात धान्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताकडे आता गहू खरेदीदार आकर्षित झाल्याचे वृत्त Reuters दिलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी तीन दिवसांचा युरोप दौरा केला यानंतर भारतात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच (५ मे) गहू पुरवठा, साठवणूक, निर्यातीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. गहू उत्पादन, सरकारी खरेदीबाबत केंद्र सरकारकडून सुधारित अंदाज जारी करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून गव्हाचा पुरवठा, साठवणूक आणि निर्यातीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींना अधिकाऱ्यांना काही सुचना केल्या ते म्हणाले कि, भारत अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादनांचा विश्वासार्ह स्रोत बनायला हवा. यासाठी मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेचे निकष, स्टँडर्ड राखण्याच्या सूचना केल्या आहेत. पंतप्रधानांचे मुख्य सचिव, सल्लागार, कॅबिनेट सचिव, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव, अन्न व नागरी पुरवठा सचिव या बैठकीस हजर होते. मार्च ते एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादन घटल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. सरकारी खरेदी केंद्रावरील परिस्थिती, गहू निर्यातीबद्दल त्यांना अवगत करून देण्यात आले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. गव्हाची सरकारी खरेदी १ कोटी ९५ लाख टन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने ४ मे २०२२ रोजी वर्तवला आहे. निर्धारित ७५ लाख टन गहू साठ्याच्या तुलनेत भारताकडे ८० लाख टन गव्हाचा उपलब्ध असणार आहे. केंद्र सरकारने गहू उत्पादनाचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. सरकारने सुधारित अंदाजात गहू उत्पादन ११ कोटी १५ लाख टनांऐवजी १० कोटी ५० लाख टन होणार असल्याचे नमूद केले आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी धान्य पुरवठ्याची वाहतूक थांबली आहे. रशिया आणि युक्रेनमधून जगातील एकूण निर्यातीपैकी ३० टक्के गहू निर्यात होतो. पण युद्धामुळे या देशांतून होणारी गव्हाची निर्यात थांबली आहे. दरम्यान, भारतात सलग वर्षे गव्हाचे बंपर उत्पादन झाले आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा शिल्लक आहे. यामुळे व्यापारी आता निर्यातीच्या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
BSNL चं ग्राहकांना गिफ्ट; Free मध्ये मिळतंय 4G SIM; पाहा काय आहे ऑफर - Marathi News । BSNL users can get free 4G SIM till 31st December 2021 here is how । Latest business News at Lokmat.com\nBSNL users can get free 4G SIM till 31st December 2021 here is how\nBSNL चं ग्राहकांना गिफ्ट; Free मध्ये मिळतंय 4G SIM; पाहा काय आहे ऑफर\nBy ऑनलाइन लोकमत । Published: October 6, 2021 01:09 PM2021-10-06T13:09:39+5:302021-10-06T13:19:28+5:30\nBSNL 4G Free Sim : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना 4G सिम कार्ड मोफत देण्याची घोषणा केली आहे.\nसरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना 4G सिम कार्ड मोफत (free sim card) देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरची वैधता 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.\nनुकताच कंपनीनं यासंदर्भातील प्रस्ताव आणला होता. आता याचा लाभ त्यांना मिळेल जे 100 रूपये किंना त्यापेक्षा अधिकचं रिचार्ज कूपनचा वापर करतील. आतापर्यंत बीएसएनएल (BSNL) आपल्या केरळ सर्कलमध्ये मोफत सिम कार्ड ऑफर करत आहे.\nपरंतु ही ऑफर लवकरच इतर परिमंडळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. BSNL च्या माहितीनुसार युझर्स 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचं रिचार्ज करून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय BSNL वर स्विच करू शकतात.\nBSNL नवीन ग्राहकांना आणि इतर ऑपरेटरकडून नेटवर्कवर पोर्ट करणाऱ्यांना डिसेंबरपर्यंत मोफत 4G सिम कार्ड ऑफर करत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ही ऑफर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत ही ऑफर तीन तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आता ही ऑफर डिसेंबरपर्यंत मिळणार आहे.\nBSNL च्या नव्या 4G सिमकार्डची किंमत 20 रूपये इतरी आहे. जर तुम्ही नवं सिमकार्ड घेतलं किंवा तुम्ही पोर्ट केलं तर तुमच्याकडून हे शुल्क आकारलं जाणार नाही. याचा लाभ बीएसएनएलच्या सेवा केंद्रांमधून, सीएससी आणि रिटेल आऊटलेटमधून घेतला जाऊ शकतो.\nमोफत 4G सिम ऑफर व्यतिरिक्त, BSNL ने आपल्या 699 रुपयांच्या प्रमोशनल प्लानची वैधता 90 दिवसांनी वाढवली आहे. कंपनी या प्रमोशनल प्रीपेड प्लानसह 180 दिवसांची वैधताही देते. कंपनीची ही ऑफर 28 सप्टेंबर रोजी संपणार होती, परंतु ती आणखी 90 दिवसांसाठी वाढवली आहे.\n699 रुपयांच्या प्रमोशनल प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये दररोज 0.5 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देण्यात येतात. या ऑफरलाही तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रोमो प्लॅन जानेवारी 2022 पर्यंत वैध असेल. हा प्रोमो प्रीपेड प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना रिटेल स्टोअर्सला भेट द्यावी लागेल.
कोरोनाच्या लढाईत सर्वसामान्यांना मदतीसाठी नामवंत खेळाडू दिलदारपणे पुढे सरसावले आहेत. फूटबॉल स्टार सादियो माने, झाल्टन इब्राहीमोवीच, पॉल पोग्बा यांच्यासह रसेल विल्सन व जे.जे. वॕट यांनी सुरुवात केल्यावर आता लियोनेल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो, रॉजर फेडरर आणि सौरव गांगुली हेसुध्दा पुढे आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरीब व गरजूंसाठी 50 लाख रुपये किमतीचा तांदूळ देण्याचे जाहीर केले आहे. 21 दिवसांचा लॉकडाउन असताना रोजंदारी गरिबांसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी गांगुली यांच्या जोडीला लाल बाबा राईस ही कंपनी आली असून त्यांनी सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांना ही मदतीची घोषणा केली आहे. सर्वात सफल टेनिसपटू स्वीत्झर्लंडचा राॕजर फेडरर आणि त्याची पत्नी मिर्का यांनी 10 लाख 20 हजार डॉलरची मदत जाहीर केली आहे. स्वीत्झर्लंडमध्ये कोविड-19 मुळे प्रभावीत कुटुंबांना या निधीतून मदत करण्यात येणार आहे. ही प्रत्येकासाठी परीक्षेची घडी आहे आणि कुणाचेही हाल होऊ नयेत असे फेडररने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कोरोनाने प्रभावित रुग्णांच्या संख्येबाबत स्वीत्झर्लंड जगात नवव्या स्थानी आहे. तेथे 8800 च्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडमध्येही लाॕकडाऊन करण्यात आले आहे. फेडरर सध्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेतून सावरत आहे. अमेरिकेने कोरोनाच्या मुकाबल्यासाठी दोन सहस्राब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीच्या माध्यमातून कोरोनामुळे होणारी आर्थिक हानी भरून काढण्याची त्यांची योजना आहे. युरोप हे आता कोरोनाचे केंद्र बनले असून इटलीनंतर आता स्पेनमधील मृतांची संख्या चीनपेक्षाही जास्त झाली आहे. ब्रिटनचे राजपूत्र प्रिन्स चार्लस् यांनासुध्दा कोरोनाची बाधा झाली आहे. फूटबॉल सुपरस्टार क्रिस्तियानो रोनाल्डो याने पोर्तुगालमधील दवाखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला आहे. रोनाल्डो आणि त्याचे सहकारी जाॕर्ज मेंडेस यांनी नाॕर्थ लिस्बन युनिव्हार्सिटी हाॕस्पिटल सेंटरला दोन अतिदक्षता कक्ष आणि पोर्तो युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सेंटरलासुध्दा अतिदक्षता कक्षासाठी निधी देण्याची घोषणा केली आहे. प्रत्येकी 10 खाटांचे हे कक्ष असणार आहेत. त्यात व्हेंटीलेटर, हर्ट माॕनिटर, पम्प आणि इन्फ्युजन सिरिंजेस आणि अत्यावश्यक उपकरणे राहणार आहेत. पोर्तुगालमध्ये दोन हजारावरा लोकांना कोरोना बाधा झाली असून 23 मृत्यु झाले आहेत. रोनाल्डोच्या युवैंटस संघातील सहकारी पौलो दायबाला, ब्लेज मॕटिडी व डॕनियेले रुगानी हे कोरोना पॉझिटीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रोनाल्डोसारखाच फुटबाॕलचा दुसरा सुपरस्टार लियोनेल मेस्सी हासुध्दा मागे नाही. त्याने 10 लाख 80 हजार डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. इटालीयन रग्बी खेळाडू मॕक्झिम एम्बांदा हा आपली मैत्रिण व तिच्या वडिलांच्या मदतीने मिलान येथे रुग्णसेवा करत आहे. त्याच्या मैत्रिणीचे वडिल हे डॉक्टर आहेत. भारतीय क्रिकेटपटू इरफान व युसुफ या पठाण बंधूंनी बडोद्यात करोनाच्या मुकाबल्यासाठी चार हजार मास्क वाटले आहेत. सध्या देशात मास्क व सॕनिटायजर्सचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी पठाण भावांडांनी हे चार हजार मास्क स्थानिक प्रशासनाकडे सोपवले आहेत. दिल्ली आणि आसामचा माजी फिरकी गोलंदाज सुखविंदरसींग याने वेगळ्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात मदत केली आहे. या माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूने इटलीतून जे भारतियांचे सुटका अभियान राबविण्यात आले त्यात योगदान दिले आहे.एअर इंडियाने 22 मार्च रोजी इटालीतून 263 भारातियांना एअरलिफ्ट केले. या अभियानाच्या चमूत सुखविंदरसिंगसुध्दा होता. तो एअर इंडियाच्या सेवेत कार्यरत आहे. सुखविंदरने 1986 ते 2004 दरम्यान 47 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चार शतकांसह 2076 धावा केल्या असून 148 बळी मिळवले आहेत.
Noise ColorFit Icon 2: भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टवॉच लाँच करण्यात आली आहे. नॉईज कलरफिट आयकॉन 2 असे त्या घड्याळाचे नाव आहे. त्याची किंमत 2499 रुपये आहे. यामध्ये फिटनेसशी संबंधित अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. घड्याळाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, मोठा डिस्प्ले, मजबूत बॅटरी बॅकअप, 60 पेक्षा जास्त मोड आणि वॉटर प्रोटेक्शन यासाठी IP67 प्रमाणित रेटिंग देण्यात आली आहे. यात हार्ट रेट मॉनिटर्स देखील आहेत. जी फायरबोल्ट सारख्या स्मार्टवॉचला स्पर्धा देत आहे. Noise ColorFit Icon 2 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 1. 8-इंचाचा वक्र डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 240 x 280 पिक्सेल आहे. हे 500 nits च्या शिखर ब्राइटनेससह येते. तसेच यामध्ये कस्टमाइज वॉच फेस देण्यात आले आहेत. कंपनीने यामध्ये स्क्वेअर डायल वापरला आहे, ज्यामध्ये एक गोलाकार बटण देखील दिले आहे आणि ते उजव्या बाजूला आहे. नॉईज कलरफिट आयकॉन 2 मध्ये हार्ट बिट सेंसर, एसपीओ 2 सेन्सर, स्लीप ट्रॅकिंग वैशिष्ट्ये आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या वेअरेबल डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करण्यात आला आहे, जो ड्रायव्हिंग आणि इतर ठिकाणी खूप उपयुक्त ठरतो. यासोबतच क्विक डायल, कॉल हिस्ट्री आणि फेव्हरेट कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह करण्याचा पर्याय आहे. या स्मार्टवॉचमध्ये AI व्हॉईस असिस्टंटची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच, यात कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल फीचर्स आहेत. यात नोटिफिकेशन डिस्प्ले आणि इनबिल्ट गेम्सचा पर्यायही आहे. यात 260 mAh ची बॅटरी आहे. ज्यात 4 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल. नॉइज कलरफिट आयकॉन 2 च्या कलर वेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, यात जेट ब्लॅक, सिल्व्हर ग्रे, रोज पिंक आणि डीप वाईन कलर उपलब्ध आहेत. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या विभागात अनेक स्मार्ट घड्याळे आहेत. फायरबोल्ट व्यतिरिक्त यामध्ये अनेक चांगले पर्याय आहेत. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
या परिसरात, दीड दशकांपूर्वी, शांतताकाळातील जगातील सर्वात मोठा विध्वंस घडला होता यावर विश्वास बसणार नाही इतपत हा परिसर बदललेला आहे. टाइम्स स्क्वेअर (मूळ नकाशा जालावरून साभार) या भागाला लाडाने "विश्वाचा केंद्रबिंदू (Center of the Universe)", "जगाचे हृदय (Heart of the World)" आणि "The Great White Way" असेही संबोधले जाते. न्यू यॉर्क टाईम्सने, १ टाईम्स स्क्वेअर या पत्त्यावरच्या, आपल्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन १९०४ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता (New Year's Eve) फटाक्यांची रोषणाई करून केले. १९०६ नंतर सुरक्षेच्या कारणासाठी फटाक्यांची रोषणाई बंद केली गेली. त्याऐवजी १९०७ साली त्या इमारतीवर असलेल्या स्तंभावरील स्फटिकगोल खाली उतरवून नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. हा सर्व सोहळा पाहण्यासाठी जगभरचे जवळ जवळ १० लाख पर्यटक तेथे दरवर्षी ३१ डिसेंबरला गर्दी करतात. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता खाली उतरवला जातो व वर्षभर तेथेच राहतो. त्याच्यामागे वेळ दाखविणारा इलेक्ट्रॉनिक फलक दिसत आहे. १ टाईम्स स्क्वेअरवरचा नववर्षस्वागत सोहळा (जालावरून साभार) उण्यापुर्या दहा वर्षांच्या वापरानंतर टाईम्सने त्याचे मुख्यालय या इमारतीतून "२२९ वेस्ट ४३वा स्ट्रीट" या पत्त्यावर हलविले. असे असले तरी वर्षारंभाच्या स्फटिकगोल उतरवण्याच्या प्रथेमुळे व तिच्या दर्शनी भागावर असलेल्या महाकाय जाहिरातींमुळे या इमारतीचे व तिच्यासमोरच्या चौकाचे महत्त्व कायम राहिले आहे. खालच्या काही मजल्यांवर असलेले औषधाचे दुकान सोडले तर इतर सर्व इमारत हल्ली रिकामी असते. मात्र, जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न ती आर्थिक कमी भरून काढत असल्याने ती इमारत तोडून नवीन काही बांधण्याचा विचार केला गेलेला नाही. पहिल्या महायुद्धाच्या (१९१४ ते १९१८) सुरुवातीपर्यंत टाईम्स स्क्वेअरच्या आजूबाजूला ब्रॉडवेवर नाटकांच्या थिएटर्सची गर्दी झाली आणि तेथे पर्यटकांची वर्दळ वाढू लागली. १९३० च्या दशकातल्या आर्थिक मंदीमुळे त्यातली अनेक रंगमंदिरे बंद पडली आणि अनेकांचा उपयोग स्ट्रीपटीज, पीप शो इत्यादी सवंग गोष्टींसाठी केला जाऊ लागला. दुसर्या महायुद्धानंतर सुधारलेल्या आर्थिक स्थितीने रंगमंदिरांना काही कालासाठी परत ऊर्जितावस्था आली होती. मात्र १९६०च्या दशकाच्या शेवटाला परिस्थिती परत बिघडली आणि हा विभाग अंमली पदार्थ आणि गुन्हेगारीचे माहेरघर बनला. १९८०च्या दशकात या विभागाच्या पुनर्विकासाचे अनेक मसुदे तयार केले गेले पण जमिनीवरची परिस्थिती तीच राहिली. मात्र त्याच सुमारास वॉल्ट डिस्ने कंपनीने येथे "डिस्ने स्टोअर" सुरू करून पर्यटकांना आकर्षित करणे सुरू केले. त्यामुळे तयार झालेल्या सकारात्मक परिस्थितीमुळे सर्व कुटुंबासह भेट देता येईल असे इतर अनेक व्यवसाय येथे परतले आणि या विभागाचा कायापालट सुरू झाला. या सर्व प्रक्रियेला "डिस्निफिकेशन" असे संबोधले जाते. आता येथे जागतिक कीर्तीची १०० पेक्षा जास्त दुकाने व MTV व ABC यासारख्या मान्यवर माध्यमांची कार्यालये आहेत. १९९०च्या दशकाच्या शेवटापासून हा विभाग पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित आणि आकर्षक झाला आहे. गेली अनेक वर्षे तो केवळ न्यू यॉर्क शहर पर्यटनाच्या केंद्रस्थानीच नाही तर भेट देणार्या पर्यटकसंखेप्रमाणे बनवलेल्या बर्याच जागतीक याद्यांत शीर्षस्थानी आहे. येथे प्रत्येकी ५०० पेक्षा जास्त आसने असलेली ४० पेक्षा जास्त रंगमंदिरे आहेत. दर रंगमंदिरात एकाच नाटकाचे दर आठवड्याला आठ प्रयोग चालू असतात. त्यातली ५०% तरी नातके पाच-सात वर्षे तर काही १०-१२ वर्षे सतत प्रयोग करणारी आहेत. येथील १९३० च्या दशकातील जुन्या क्लासिकल नाटकांपासून आजच्या जमान्यातील हायटेक नाटकांपर्यंतचे असंख्य प्रकार पहायला जगभरचे पर्यटक आणि दर्दी रसिक वर्षभर गर्दी करतात. या नाटकांच्या जाहिरातींनी सतत झगमगणार्या या विभागाला The Great White Way असेही म्हणतात. या नाटकांची तिकिटे मात्र खिशाला भारी असतात. नावाजलेल्या नाटकाच्या पुढच्या रांगेतील तिकिटाला $२२५ किंवा अधिक मोजावे लागतात. मागच्या खुर्च्यांवर बसण्याची तयारी असली तर जालावरून बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण, तरीही या नाटकांच्या मक्केत काही जगप्रसिद्ध नाटके पुढच्या खुर्चीवरून बघण्याचा आनंद निर्विवादपणे पैसे वसूल करून देणारा अनुभव असतो. नाटक बघण्यासाठी होणार्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी तेथे मोठ्या मोठ्या आकाराच्या जाहिराती (बिलबोर्ड) लावल्या जातात. येथे १९१७ मध्ये पहिली विजेच्या वापराने झगमगणारी जाहिरात लावली गेली. धावत्या अक्षरांच्या विद्युत जाहिरातीची सुरुवात १९२८ साली नवनिर्वाचित अमेरिकन अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांच्या विजयाच्या बातमीने झाली. त्यात चलतचित्रे असलेल्या अनेक मजली उंचीच्या महाकाय जाहिरातींची भर पडली आहे. या जाहिराती इतके मोठे पर्यटक आकर्षण ठरल्या आहेत की शहराच्या झोनिंग नियमांप्रमाणे या विभागातल्या इमारतींच्या दर्शनी भागावर जाहिराती लावणे कायद्याने आवश्यक केले गेले आहे ! महाकाय बिलबोर्ड ०४ (जालावरून साभार) वाहनांची गर्दी कमी करून तो पायी चालणार्या पर्यटकांसाठी अनुकूल व्हावा यासाठी या भागात २००९ पासून अनेक पुनर्विकास कामे केली गेली आहेत आणि ती अजूनही चालू आहेत. या योजनेअंतर्गत येथे अनेक मोठमोठे वाहनमुक्त प्लाझा (car-free plazas) बनवले आहेत. या प्लाझांमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी सरकारी खर्चाने खुर्च्या बसवल्या आहेत. बरेचसे रेस्तराँ त्यांच्या दर्शनी भागासमोर खुर्च्या व टेबले मांडतात. तेथे बसून पर्यटक खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतात किंवा नुसते आजूबाजूचा नजारा न्याहाळू शकतात. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालवलेला हा प्रकल्प आता कायमस्वरूपी झाला आहे आणि त्यात अजून नवनवे रस्ते सामील केले जात आहेत. यामुळे पर्यटकांच्या सोयीबरोबरच, अपघातांचे प्रमाण कमी होणे, प्रदूषण कमी होणे इत्यादी अनेक फायदे होत आहेत. या प्लाझांवर काही कलाकार त्यांचे कसब दाखवून पर्यटकांचे मनोरंजन करताना दिसतात. वरच्या गोष्टींशिवाय येथे अनेक आकर्षणे आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची खालीलप्रमाणे आहेत : १. मादाम तुस्सॉज (Madame Tussauds) या जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाची शाखा. २. Ripley's Believe It or Not! हे आश्चर्यकारक गोष्टींचे संग्रहालय. ३. अनेक चलत्चित्र पडदे (स्क्रीन) असलेली चित्रपटगृह संकुले. AMC एंपायर२५ नावाच्या अनेक मजली संकुलात २५ पडदे आहेत. ४. The Ride ही नाटकीय प्रयोग आणि हायटेक सादरीकरण करणार्या कलाकारचमूसह न्यू यॉर्कमध्ये फिरवून आणणारी बसची सफर. ५. न्यू यॉर्क शहर व परिसराचे दर्शन करवणार्या बसच्या बहुतांश सहली टाईम्स स्क्वेअर परिसरातून सुरु होतात. ६. बिटल्स, लेड झेपेलिन, मॅडोना, इत्यादी अनेक प्रसिद्ध मान्यवर तारे-तारकांच्या भेटींचे फोटो व चिन्हे (मेमरोबिलिया) असलेल्या हार्ड रॉक कॅफेसारखी उपाहारगृहे येथे आहेत. ७. असंख्य लहानमोठी रेस्तराँ आणि दुकानांनी हा भाग खच्चून भरलेला आहे. इथली काही रंगमंदिरे व इतर महत्त्वाच्या आकर्षणांना आपण लेखमालेच्या पुढच्या काही भागांत स्वतंत्रपणे भेट देऊच. पर्यटकभेटींच्या संख्येप्रमाणे बनवलेल्या यादीत टाईम्स स्क्वेअर अनेक वर्षे सतत वरच्या स्थानावर आहे. दरदिवशी या जागेला साधारणपणे ३,६०,००० पादचारी भेट देतात. मार्च २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या एका वर्षाच्या कालावधीत टाईम्स स्क्वेअरला १२,८७,९४,००० लोकांनी भेट दिली. ही संख्या त्याच कालावधीत जगभरच्या सर्व डिस्ने थीम पार्क्सना भेट दिलेल्या पर्यटकांपेक्षा मोठी होती. फक्त लास वेगास हेच एक पर्यटक आकर्षण याबाबतीत टाईम्स स्क्वेअरच्या पुढे आहे. न्यू यॉर्क शहराच्या पर्यटन उत्पन्नापैकी २२% या एकाच जागेवर मिळते. फिरत्या गाडीवरचा हॉट डॉग, सँडविच इत्यादी खात खात इथली मजा पाहत फिरणे, दुकानांत शिरून काही खरेदी करणे किंवा फक्त त्यांच्या अनेकमजली काचांच्या भिंतीपलीकडचे वस्तूंच्या सादरीकरणाचे देखावे पाहणे, प्रचंड आकाराच्या बिलबोर्डांवरच्या व्हिडिओ जाहिराती पाहणे, रस्त्यावरच्या कलाकारांच्या करामती पाहणे, चालायचा कंटाळा आला तर मोक्याची खुर्ची पकडून इकडून तिकडे लगबगीने जाणार्या लोकांना न्याहाळणे, असे अनेक प्रकार करत टाईम्स स्क्वेअरवर तासनतास खर्च केले तरी कंटाळा येत नाही. (क्रमश :)
बारदाना नसल्याचे क्षुल्लक कारण दर्शवून नाफेड व एफसीआय जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी बंद करीत आहे. अमरावती : बारदाना नसल्याचे क्षुल्लक कारण दर्शवून नाफेड व एफसीआय जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी बंद करीत आहे. त्यामुळे या यंत्रणांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनीच तूर खरेदी करावी, यासाठी जि. प. सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तुरीचा ट्रॅक्टर घुसवून प्रतिकात्मक तूर खरेदी आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी के. पी. परदेशी यांना सोपविण्यात आले. अखेरच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांची तूर खरेदी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र जिल्ह्यासह राज्यातील नाफेड व तुरीचे केंद्र बारदाना नसल्याचे कारण दर्शवून बंद करण्यात येत आहेत. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अमरावती : ८० हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत बाजार समितीत पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. पीककर्ज, त्यावरील व्याज भरणे बाकी आहे. मुला-मुलींचे विवाह अडले आहेत. त्यामुळे या यंत्रणांवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच तूर खरेदी करावी, अशी मागणी प्रकाश साबळे यांनी केली व जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅक्टर आणून तुरीची मोजणी करून प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी हरिभाऊ मोहोड, अताउल्लाखान, पंकज देशमुख, समीर जवंजाळ, अनिकेत ढेंगळे, अनिल इंगळे, शशीकांत बोंडे, नितीन पवित्रकार, नरेंद्र बारबुद्धे आदी शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत ट्रॅक्टर नेऊन घोषणाबाजी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. प्रकाश साबळे, हरिभाऊ मोहोड, प्रवीण मेटकर, अनुल्ला खान व मिलिंद जाधव अशी आरोपींची नावे आहेत. निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करणे, परवानगीशिवाय आंदोलन करणे, पोलीस उपायुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली. बारदान्याअभावी एफसीआय अमरावती बाजार समितीमधील तूर खरेदी बंद करीत असेल तर त्यासाठी उपोषण करण्याऐवजी बारदाना उपलब्ध व्हावा म्हणून संचालकांनी प्रयत्न करायला हवे. उपोषणाचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा बाजार संचालकांनी नाही असे, माजी सभापती सुनील वऱ्हाडे यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात दिल्ली व हरियाणा येथील एफसीआयच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून तासाभरात १० हजार बारदाना उपलब्ध केल्याची आठवण वऱ्हाडे यांनी करून दिली. शासनाचे धोरण हे शेतकऱ्यांसाठी मरण ठरत आहे. शासकीय खरेदी केंद्र बंद होत आहेत. याकेंद्रांवर तूर चोरी होते, वजन घटते, भाव मात्र तोच मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ईच्छामरणाची परवानगी द्या. आम्ही हाती मशाल घेऊन या मस्तवाल यंत्रणेचा व शासनाचा अंत करतो, असे साबळे म्हणाले. आम्ही यासंदर्भात पाठपुरावा करीत आहोत. बारदान्याअभावी केंद्र बंद पडू नये, यासाठी एक लाख बारदाना भंडारा येथून मागविला आहे. एफसीआय येथील बारदाना घेण्यास तयार नाही. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना बारदाना खरेदीचे अधिकार दिले आहेत. मात्र, आदेश अप्राप्त असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी के. पी. परदेशी यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८५ हजार पोत्यांची मोजणी व्हायची आहे. लवकरच सर्व ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येतील. एक लाख बारदाना लवकरच पोहोचत आहे. यातील ३० हजार पोते व्हीसीएमएसद्वारा एफसीआयला भाडेतत्वावर देण्यात येतील, असे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगताच शनिवार, रविवारसह सुटीच्या दिवशी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. बारदानाअभावी बंद करण्यात आलेली तूर खरेदी एफसीआयने त्वरीत सुरू करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरावती बाजार समिती उपसभापतीसह संचालकांनी मंगळवारी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीमधील बंद एफसीआयचे तूर खरेदी केंद्र चार दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही ते सुरू झाले नाही. त्यामुळे बाजार समिती उपसभापती किशोर चांगोले, संचालक प्रफुल्ल राऊत, विकास इंगोले, अशोक दहीकर, नाना नागमोते, उमेश घुरडे, विनोद गुहे, वीरेंद्र जाधव, प्रितम भटकर आदी उपोषणावर आहेत.
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर आणि बार्सिलोना क्लबचा आधारस्तंभ लियोनेल मेस्सी क्लबने आयोजित केलेल्या निरोप समारंभात एकदम भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. बार्सिलोन क्लब बरोबरची १७ वर्षांची सक्रीय साथ आणि त्यापूर्वी ४ वर्षाचे प्रशिक्षण असे २१ वर्षाचे नाते संपुष्टात आल्याने मेस्सी गहिवरून गेला. निरोप समारंभात बोलताना त्याला अश्रू आवरेनात. इतक्या वर्षांची साथ सुटल्याचे वेदना त्याच्या डोळ्यावाटे पाझरत होती. मेस्सी म्हणाला, जवळजवळ आयुष्यातला आत्तापर्यंतचा काळ येथेच गेला. टिम सोडणे मला फार अवघड होते. मी तयार नव्हतो. क्लब बरोबर आपण कायम राहू असा विश्वास वाटत होता. हे माझे घरच आहे. क्लब सोडावा लागल्याने फार निराश झालो आहे. स्पॅॅनिश लीगच्या आर्थिक नियमांमुळे क्लब बरोबर पुन्हा करार करणे असंभव झाले आहे. बार्सिलोना क्लब बरोबर मेस्सीने यशाची अनेक शिखरे आणि अनेक स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय खिताब मिळविले. २००४ पासून मेस्सी या क्लब बरोबर खेळत आहे. ७७८ सामने या क्लबतर्फे खेळून त्याने रेकॉर्ड नोंदविले आहे आणि ६७२ गोल केले आहेत. बार्सिलोनाचा तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.
दहिगाव, ता. यावल : येथील ग्रामपंचायतकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी ,अगणवाडी सेविका , मदतनीस, आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन पर भत्ता म्हणून प्रत्येकी १०००रू प्रमाणे शासनाच्या परीपत्रकानुसार वितरीत करण्यात आला. वितरीत करतांना सरपंच साजिया सत्तार तडवी व उपसरपंच देवीदास धांगो पाटील यांनी त्यांना ही रक्कम चेक द्वारे दिली. ही रक्कम त्यांना ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग योजनेतुन देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. ग्रामीण पातळीवर या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबवणे, आरोग्याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण करणे इत्यादी कामे जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन करत आहेत. हे कर्मचारी जोखीम पत्करुन ही कामं करत असल्याने, त्यांना येथील ग्रामपंचायत कडून एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली.
मालेगाव : तालुक्यातील टाकळी रोडवर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने वाके फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. या प्रकरणी दिलीप दगा शेवाळे (रा. टाकळी) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भारत नानाजी अहिरे (२४) यांनी काल दुपारी फिर्याद दिली. गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दिलीप शेवाळे आपल्या दुचाकीवरून टाकळी गावाकडून वाके फाट्याकडे लोखंडी बफर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या नितीन भगवान खैरनार याच्या दुचाकीला जबर धडक दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार मोरे करत आहेत. (प्रतिनिधी)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी नुकतचं एका परीचं स्वागत केलय. त्याच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र आलिया रणबीरचं नव्हे तर बॉलीवूडचं आणखी एक जोडपं आहे जे लवकरच आई बाबा होणार आहेत. ते जोडपं आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर. हे दोघेही त्यांच्या या प्रवासाचा आनंद घेत आहेत. इतकच नाही तर ते वेळोवेळी सोशल मीडियावर येणाऱ्या बाळासंदर्भात प्रत्येक अपडेट त्यांच्या चाहत्यांशी शेअर करताय. त्याच्या हॉस्पिटमध्ये तपासणीसाठी गेल्यापासून तर नर्सरीच्या तयारीपर्यंत, बिपाशा तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सगळेच फोटो शेअर करत असते. तिन नूकतचं केलेलं बोल्ड फोटोशूट चांगलच ट्रोल झालेलं असतांनाच तिने आज 'बेबी ऑन द वे' अशी घोषणा करत करणसोबत तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला. हेही वाचाः का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान ! बिपाशा बसूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तिने एका काळ्या रंगाचा शर्ट ड्रेस घातलेला आहे. तिने केस मोकळे केस सोडत आणि लाइट मेकअप केलाय. ती एका इग्लिश गाण्यावर ताल धरत नाचत आहे. ती तिच्या बेबी बंपवर हात ठेवुन काळजीपूर्वक नाचत आहे. प्रेगन्सी ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत करणही नाचतांना दिसतोय. व्हिडिओवर तिने 'बेबी ऑन वे' असं लिहिलंय. मात्र, काहींना बिपाशाचं असं नाचणं मुळीच आवडलेलं दिसत नाहिये. यूजर्सने तिला या अशा स्थितीत डान्स करण्यास न करण्याचा सल्ला दिलाय. एका यूजरने तर लिहिलंय की, 'वेडी झालीस आहेस का, या अवस्थेत नाचतेय, स्वतःची नाही तर त्या बाळाची तर काळजी घे. '
भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) सध्या टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या शोधात आहे. विश्वचषकनंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक आणि अन्य प्रमुख पदांसाठी अर्ज मागवले होते. 30 जुलै, मंगळवारी या पदांसाठीची अर्ज करण्याची मुदत संपली असून रवि शास्त्री (Ravi Shastri) यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी पाच जणांचे अर्ज आले आहेत. पण बंगळुरू मिरर, या वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास 2000 अर्जदार समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री यांच्या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी (Tom Moody), न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson), भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंह (Robin Singh) आणि भारताचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) या पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण पूर्वी या भूमिकेसाठी आपली आवड दाखवलेल्या श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने यांनी अद्याप अर्ज पाठविला नाही. (टीम इंडियासाठी प्रशिक्षक निवडताना विराट कोहली याच्या मताचा विचार करणे बंधनकारक नाहीः CAC सदस्य अंशुमन गायकवाड) यंदा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडे आहे. आणि या प्रक्रियेत विराट कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मिररने असेही म्हटले आहे की अनेक आंतरराष्ट्रीय इच्छुकांनी त्यांच्या एजंट्सद्वारे अर्ज पाठवले आहे आणि सर्व नावाचे मूल्यांकन करण्यासाठी बीसीसीआय अधिक वेळ घेऊ शकते. दरम्यान, भारतीय संघाच्या मुख्य पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली आहे. आणि आता लवकरच या अर्जदारांची मुलाखत घेतली जाणार आहे. यांच्याशिवाय भारताचे माजी टेस्ट क्रिकेटपटू प्रविण आम्रे (Pravin Amre) यांनी फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने (Jonty Rhodes) यांनी क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.
रायपूर, 04 नोव्हेंबर : पांढरे केस (White hair) लपवण्यासाठी केसांना डाय (hair dye) किंवा मेहंदी (mehandi) लावली जाते. हल्ली फॅशन म्हणून केसांना वेगवेगळे रंग (hair colour) दिले जातात. हेअर कलर करण्याची क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळते. मात्र तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल एक असं गाव आहे, जिथं सर्वांनीच आपले केस कलर केले आहेत. या गावात सर्वांचेच केस लाल दिसतील. पांढरे केस लपवणं किंवा फॅशन हा यामागील उद्देश नाही. तर या गावाने एका गोष्टीचा धसका घेतला आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांनी आपले केस लाल केले आहेत. छत्तीसगढच्या (chhattisgarh) दुर्ग जिल्ह्यातील धमधा ब्लॉक. या गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येकाचे केस लाल दिसतील. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक महिला-पुरुष सर्वांचेच केस लाल दिसतील. असे केस रंगवल्याने आपल्याला कोरोना होणार नाही, असं या ग्रामस्थांना वाटतं हे केस नैसर्गिकरित्या लाल नाहीत तर त्यांना त्यांना कृत्रिम रंग देऊन लाल करण्यात आले आहेत. बरं हे केस लाल करण्यामागे कोणती प्रथा, परंपरा नाही तर आहे तो अंधविश्वास. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी या लोकांनी आपल्या केसांना लाल रंग दिला आहे. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला. कोरोना महासाथीपासून वाचवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छता यावर भर दिला जातो आहे. दुसरीकडे कोरोनाविरोधात प्रभावी औषध आणि लस तयार केली जाते आहे. मात्र याचदरम्यान धमधा ब्लॉकमधील ग्रामस्था मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी केस लाल करत आहेत. आता बचावाचा हा मार्ग त्यांना कुणी सांगितला. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार 15 दिवसांपूर्वी एका महिलेच्या स्वप्नात त्यांचं आराध्य दैवत बूढादेव आले आणि त्यांनी संपूर्ण समजाताली लोकांना आपले केस डाय करा म्हणजे कुणालाच कोरोना होणार नाही, असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी लगेचच महिलेनं आपल्या स्वप्नानबाबत सर्व ग्रामस्थांना सांगितलं आणि मग गावातल्या सर्व लोकांनी आपले केस रंगवायला घेतले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पिंपरी, (महाईन्यूज) - जागतिक योग दिन देशभरात साजरा होत असताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आगळा-वेगळा उपक्रम राबविला. सुमारे एक हजार दिव्यांगांना मुंबई दर्शन घडवत त्यांच्यासोबत जागतिक योग दिन साजरा केला. आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् क्लब, दिव्याज फाउंडेशन आणि शिवांजली महिला प्रतिष्ठान यांनी एकत्रित येत या कार्यक्रमाची आखणी केली. दोन दिवसीय उपक्रमात गुरूवारी (दि. 20) एक हजार दिव्यांग बांधवांना मुंबईचे दर्शन घडविले. त्यानंतर शुक्रवारी (दि. 21) योगदिनी मुंबई येथे विशेष सोहळा आयोजित केला होता. यामध्ये योगाचे सादरीकरण, मार्गदर्शन तसेच उल्लेखनीय कामगिरी करणा-या दिव्यांगांचा गौरव सोहळा झाला. दिव्यांगांना 'मोटिवेशनल' प्रशिक्षण देण्यात आले. अभिनेते सुनील शेट्टी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पूजा लांडगे, मंगलप्रकाश लोढा, दीपा मल्लिक आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडमधून 20 बसमधून दिव्यांगांना मुंबई दर्शन घडविण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे दिव्यांग भारावले होते. अभिनेते सुनील शेट्टी म्हणाले की, दिव्यांग मुलांची काहीतरी करण्याची धडपड ही आपल्यासारख्या सामान्य लोकांना सकारात्मक ऊर्जा देत असते. एक कुस्तीपटू असणारे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या शहरातील एक हजार दिव्यांग मुलांना मुंबई दर्शन घडविले. तसेच मुंबईत अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या सोहळ्याचा एक भाग मला बनता आले, याचे खूप समाधान वाटते. भविष्यात या उपक्रमाला सहकार्य करायला मला नक्की आवडेल, असा शब्दही त्यांनी दिला. अमृता फडणवीस म्हणाल्या की, आमदार महेशदादा हे नेहमीच अभिनव उपक्रम राबवितात. दिव्यांग मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरण्याचे काम त्यांनी यानिमित्ताने केले आहे. हा सोहळा कायमच स्मरणात राहील. दिव्यांगांना आयुष्यात उभे राहण्यासाठी मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग, निराधार मुलांसाठी काम करता येत असल्याचे समाधान वाटते, असेही त्या म्हणाल्या. महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग मुलांना मुंबई दर्शन घडवायचे, हे खूप दिवसांपासून मनात होते. त्यासाठी आम्ही मुलांना घेऊन मुंबईत आलो. दुसर्याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन असल्यामुळे अमृताताई फडणवीस यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी होऊन आम्हाला मुंबईत योग दिन साजरा करता आला. दीपा मलिक यांनी मुलांना जे मौलिक मार्गदर्शन केले, ते त्यांच्या भावी आयुष्यात नक्की उपयोगी पडेल.
नाटकाचा उपयोग मुलांना-मोठ्यांना रोजच्या आयुष्यातही होतो. नाटक एक 'थेरपी' म्हणून वापरता येते आणि हाच उद्देश घेऊन १२ वर्षांपूर्वी नाट्यशास्त्रात मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या संकेत ओक यांनी सहकलाकारांच्या साहाय्याने 'वेध अॅक्टिंग अकॅडमी'ची सुरुवात केली. वयवर्ष पाचपासून ५० पर्यंतच्या शिकण्याची आवड असणार्यांना नाटकाच्या तालमीत तयार केले जाते. मुलांना अभिनयाचे धडे देणार्या 'वेध अॅक्टिंग अकॅडमी'ने यंदा १२ वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केले आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा. 'वेध अॅक्टिंग अकॅडमी'ची फक्त दहा-बारा दिवसांची अभिनय कार्यशाळा जेव्हा पूर्ण वर्षभराची हसती खेळती शाळा बनली आणि या छोट्या दोस्तांचं आयुष्यच बदलायला लागली. अर्थातच ही हसती खेळती, तंत्रशुद्ध शिक्षणासोबतच मज्जा, मस्ती, दंगा करण्याचे हक्काचे ठिकाण मानणारी, मुलांना आपलीशी झालेली शाळा म्हणजेच अभिनयासोबतच व्यक्तिमत्व विकास साधणारी लहान मुलांची 'वेध अॅक्टिंग अकॅडमी. ' यावर्षी 'वेध' संस्थेला एक तप म्हणजेच १२ वर्षे पूर्ण झाली. 'मास्टर्स ऑफ थिएटर आर्ट्स' केलेल्या संकेत ओक यांनी दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाने १० जुलै २०१० रोजी 'वेध अकॅडमी'ची सुरुवात केली. 'वेध'चे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते झाले. लहान मुलांची ही अभिनय कार्यशाळा फक्त १०-१२ दिवसांपर्यंत मर्यादित न ठेवता. त्यामध्ये असणारे सगळे पैलू एका प्रोफेशनल कोर्समार्फत पुढे आणावे शिवाय अभिनयाच्या तंत्रशुद्ध शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे काम 'वेध अकॅडमी' करतेय. या प्रयत्नांना खर्या अर्थाने आणि वेगवेगळ्या रुपात यश मिळत ही डोंबिवली, कल्याण आणि ठाणे येथे वर्षभराची लहान मुलांची आणि मोठ्या वयोगटाची 'अॅक्टिंग अकॅडमी' गेली बारा वर्ष उत्तमरित्या कार्यरत आहे. यामध्ये संकेत ओक यांंच्यासोबतच त्यांची पत्नी मधुरा ओक याशिवाय अद्वैत ओक, सौरभ सोहोनी, निलय घैसास, अदिती हरदास, वृंदा दाभोलकर, श्वेता परेतकर ,चैताली धोपटकर, आदित्य बिवलकर आणि संंपूर्ण टीम 'वेध', 'वेध'चे आजी माजी विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे. 'वेध अॅक्टिंग अकॅडमी' एक विशिष्ट अभ्यासक्रम तसेच इतक्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन मिळवून देणारी फक्त ठाणे, डोंबिवलीतलीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातली एक सर्वोत्कृष्ट अकॅडमी ठरतेय. ज्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा समावेश आहे. 'नाटकातून व्यक्तिमत्त्व विकास' हा मूळ हेतू ठेवून 'वेध' अभिनयाबरोबरच बाकी विषयातीलही प्रशिक्षण देत आहे. 'व्हॉईस कल्चर', 'फोटोग्राफी', 'मेकअप', 'डबिंग', निवेदन, बॉडी मुव्हमेंटस, डान्स या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचं तंत्रशुद्ध शिक्षण दिले जाते. यासाठी प्रत्येक विषयातली तज्ज्ञ व्यक्ती बोलवली जाते. आजपर्यंत अनेक मान्यवर दिग्गज अभिनेते मंडळींची 'वेध'ला भेट दिली आहे. 'वेध'मध्ये विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, चिन्मय मांडलेकर, पुरुषोत्तम बेर्डे, वामन केंद्रे, शरद पोंक्षे, सुमित राघवन, डॉ. सलील कुलकर्णी, इला भाटे, सतीश राजवाडे, डॉ. गिरीश ओक, ललित प्रभाकर, शशांक केतकर, श्रीरंग गोडबोले, लीना भागवत, कुशल बद्रिके महेश लिमये , उदय सबनीस , स्मिता तळवलकर, सारंग साठ्ये यांसारखी उत्तम कलाकार मंडळी मार्गदर्शन करण्यासाठी आली आहे. या मार्गदर्शनासोबतच त्यांच्या प्रशिक्षणाचा 'वेध'मधल्या कलाकारांंना प्रत्यक्ष काम करताना उपयोग व्हावा, यासाठी लघुचित्रपट, बालरंगोत्सव, अॅडव्हान्स कमिशयल शूट, एकपात्री स्पर्धा याही गोष्टींचा विशेष समावेश असतो. 'बालरंगोत्सव' हे मुलांचे प्रशिक्षण झाल्यावर थेट नाट्यगृहात सादरीकरण असते. यामध्ये निवेदनापासून सगळी जबाबदारी ही मुलेच उचलतात. शिवाय 'वेध'ने सामाजिक विषय घेऊन काही लघुचित्रपटसुद्धा केले आहेत. या सगळ्या सर्वांगीण विकासामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात चांगले बदल होताना या 'वेध'ने पाहिले आहेत. यामुळे या छोट्या दोस्तांची एकूणच प्रगती होत जाते. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो. धीटपणे ते चारचौघात बोलू शकतात. याविषयी बोलताना 'वेध'चे संचालक संकेत ओक म्हणाले की, या सगळ्यात आजपर्यंत अनेकप्रकारे मुलांची प्रगती पाहिली. पण जेव्हा मूकबधीर मुलांमध्येसुद्धा माईक घेऊन बोलण्याचा आग्रह, जिद्द, आत्मविश्वास दिसला तेव्हा खर्या अर्थाने समाधान वाटले. यासोबतच जेव्हा मानसिकदृष्ट्या कमजोर मुलांना व त्यांच्या पालकांना त्या मुलांच्या सुधारणेसाठी मानसोपचारतज्ज्ञ 'वेध'चे नाव सुचवतात तेव्हा खर्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास याचे योग्य प्रशिक्षण दिले जाते, याचे समाधान वाटते. असाच एक 'ऑटिस्टिक' मुलांमधला फरक लक्षात राहण्यासारखा होता. ज्या मुलांना काही बोलता येणे शक्य नव्हते, त्याने प्रशिक्षण घेत असताना अख्खा एक 'डायलॉग' अभिनयासहित बोलून दाखवला. असे अनेक प्रसंग 'वेध'ला वाढवत गेले. त्यामुळे दरवर्षी अशा दोन विद्यार्थ्यांना 'वेध'मध्ये मोफत प्रवेश दिला जातो. 'वेध'ने आत्तापर्यंत बेळगाव, सोलापूर, ठाणे या बालनाट्य आणि नाट्य संमेलनात सहभाग घेतला आहे तसेच राष्ट्रीय महोत्सवात अनेक पारितोषिक मिळवली आहेत. 'वेध'च्या बालकलाकारांनी कामे केलेल्या चित्रपटांना सलग दोन वर्षे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तसेच 'वेध'च्या कलाकारांना 'फिल्म फेअर', 'झी', 'मटा' असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत तसेच अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारदेखील मिळाले आहेत. यावर्षी तपपूर्ती झाल्याच्या निमित्ताने 'वेध'ने ५० बालकलाकारांना घेऊन 'सुंदर ती दुसरी दुनिया' या एका आगळ्यावेगळ्या दोन अंकी बालनाट्याचा शुभारंभ सावित्रीबाई फुले रंगमंदिर, डोंबिवली तसेच गडकरी रंगायतन, ठाणे येथे केला आणि सुरूवातीचे दोन्ही प्रयोग बुधवार, शुक्रवार रात्र असूनही प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडले. प्रेक्षकांची उभं राहून मानवंदनाही मिळाली. या नाटकाच्या माध्यमातून बालरंगभूमी साठी योगदान दिलेल्या अनेक दिग्गज लेखक - दिग्दर्शक यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न 'वेध'च्यावतीने करण्यात आलेला आहे. लहान मुलांना या व्यक्तिमत्त्वांची ओळख होणं आणि त्यांच्या पालकांना त्यांनी त्यांच्या लहानपणी अनुभवलेल्या नाटकांच्या त्या सुंदर दुनियेची एक सफर या निमित्ताने करता येते. डॉ. समीर मोने यांनी या नाटकाचं लेखन केलं असून त्यांनी योग्य पद्धतीने जुन्या-नव्या नाटकांची गुंफण या कलाकृतीत केलेली आढळते. या नाटकाचं दिग्दर्शन 'वेध'च्या मधुरा ओक, निलय घैसास, वृंदा दाभोळलर, अदिती हरिदास, सौरभ सोहोनी ह्यांनी अत्यंत देखणे केले आहे. या नाटकाची संकल्पना 'वेध'चे संकेत ओक यांची आहे. ठाणे, डोंबिवली येथील प्रयोगाला शुक्रवार आणि बुधवार रात्र असूनसुद्धा लाभलेला प्रेक्षकवर्ग आणि नाटक संपल्यावर या बालकलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी उभं राहून दिलेली दाद हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता. या नाटकातील केलेली जुन्या नाटकांची निवड तसेच पात्र निवड ही अचूक असल्याचे मत प्रेक्षकांनी नोंदवले. तसेच मुले ज्या आत्मविश्वासाने सादरीकरण करत होती त्यामागे मुलांनी केलेल्या तालमींची मेहनत व त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणारे यांची मेहनत ही कळून येत होती. नाटकात वापर केला जाणारा दृक्श्राव्य माध्यमाचा वापर आणि या नाटकाचे अतिशय समर्पक असे संगीत ही या नाटकाची जमेची बाजू. यासाठी आदित्य बिवलकर आणि सुखदा भावे-दाबके यांनी खूप मेहनत घेतलेली दिसून आली,तसेच विजय गोळे यांनी अप्रतिम प्रकाशयोजना साकारली. उलेश खंदारे यांची रंगभूषा आणि इशिता गोखले हिने केलेली वेशभूषा अप्रतिम होती. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या बालकलाकारांना घेऊन सर्वांनाच समान भूमिका मिळेल, अशा पद्धतीचे बालनाट्य सादर होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. या नाटकाचे असे अनेक प्रयोग व्हावेत आणि संपूर्ण जगापर्यंत मराठी बालरंगभूमीचे कार्य पोहोचावे, अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे,ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, महेश राजदेरकर, 'अपूर्वा प्रॉडक्शन्स' चे सुमुख वर्तक, 'जाई काजळ'चे राजेश गाडगीळ, श्री लक्ष्मी नारायण संस्थेचे माधव जोशी, आनंद म्हसवेकर, मनोज मेहेता, श्रीपाद कुलकर्णी, 'विद्यानिकेतन'चे विवेक पंडित , लीना मॅथ्यु, दीपाली काळे, स्नेहल दीक्षित, श्रीकांत पावगी, संपदा जोगळेकर-कुलकर्णी, अरविंद जगताप, असिस्टंट कमिशनर धुमाळ , स्निग्धा सबनीस, विद्याधर ठाणेकर, प्रसाद कांबळी असे अनेक मान्यवर या प्रयोगाला उपस्थित होते. या नाटकाचे यापुढेदेखील विविध शहरांमध्ये अनेक प्रयोग व्हावेत आणि पुढील पिढीला बालरंगभूमी आणि बालनाट्यांशी निगडित व्यक्तिमत्त्वांची ओळख व्हावी, अशी इच्छा 'वेध'च्या मधुरा ओक यांनी व्यक्त केली. येत्या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हे नाटक अजून लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 'वेध'च्या तपपूर्ती निमित्त 'वेध'ने १२ वेगवेगळे कार्यक्रम केल. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला, येत्या वर्षांमध्ये शॉर्टफिल्म आणि फिल्म फेस्टिवल साठी चित्रपट बनवायचा 'वेध'चा मानस आहे.
ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलींच्या आधारे (एमसीक्यू) होत आहे. ५ मे ते ६ जून दरम्यान परीक्षा होणार असून, ६०० अभ्यासक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे गुण दिले जातील. ८० गुणांच्या विषयासाठी प्रश्नपत्रिकेतील ४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. विषयांचे गुण, प्रश्नपत्रिकेतील गुण आणि परीक्षार्थींनी सोडविलेल्या प्रश्नानुसार गुणांकन होणार आहे. अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० ऑनलाईन परीक्षा ५ मेपासून प्रारंभ होत आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉपद्वारे ऑनलाइन परीक्षा देता येईल. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन परीक्षांच्या अनुषंगाने सुविधा नाही, अशांना महाविद्यालयांनी व्यवस्था करून द्यावी लागणार आहे. ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलींच्या आधारे (एमसीक्यू) होत आहे. ५ मे ते ६ जून दरम्यान परीक्षा होणार असून, ६०० अभ्यासक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे गुण दिले जातील. ८० गुणांच्या विषयासाठी प्रश्नपत्रिकेतील ४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. विषयांचे गुण, प्रश्नपत्रिकेतील गुण आणि परीक्षार्थींनी सोडविलेल्या प्रश्नानुसार गुणांकन होणार आहे. परीक्षा महाविद्यालयात तर गुण विद्यापीठ देणार, असे या परीक्षांचे वैशिष्ट्य असणार आहे. विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांसाठी बाह्य यंत्रणा नियुक्त केली नाही. मू्ल्यांकन स्वयंचलित ठेवण्यात आले आहे. अचूक प्रश्न सोडविले, तरच गुण मिळतील. महाविद्यालयांना प्रतिविद्यार्थी १० रुपये दिले जातील. विद्यापीठ अंतर्गत सर्वच महाविद्यालयांत एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा सुरू होेतील, अशी तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयाला स्वतंत्र पासवर्ड देण्यात आला आहे. ६०० अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अचूक नियोजन करण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका महाविद्यालयात पाठविण्यात आल्या आहेत. ऑनलाईन परीक्षांची व्यवस्था करताना विद्यापीठाने स्वयंचलित मूल्यांकन होईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्नांची उत्तरे ओके केली की, ते उत्तर डेटा बेसच्या ऑप्शनमध्ये असल्यास स्वयंचलित गुण देण्याची प्रणाली विकसित केली. त्यामुळे नव्याने मूल्यांकन करण्याची गरज असणार नाही, अशी अद्ययावत व्यवस्था विद्यापीठाने तयार केली. ऑनलाइन परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थी, महाविद्यालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षा असलेल्या वेळेतच लिंक ओपन होईल, अन्यथा दुसऱ्या वेळेत लिंक उघडणार नाही, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. हिवाळी २०२० नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरदिवशी तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
मुंबई, 8 मार्च : भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारा आणि ट्रोल करणाराही मोठा वर्ग आहे. याबाबतच बोलतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'अमृता फडणवीस यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा जसा अधिकार आहे तसाच, फॉलोअर्सना त्यांना ट्रोल करणाचाही अधिकार आहे,' असं अजब वक्तव्य केल्यामुळे क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी अदिती आज पिंपरी चिंचवड मध्ये आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, 50 टक्के आरक्षण नसताना ज्या दिवशी महिलांना संधी दिली जाईल, तोच दिवस खऱ्या अर्थाने माझ्यासाठी महिला दिवस असेल असं म्हणत अदिती यांनी राजकारणातील महिलांची स्थिती दर्शविणारं विधानही केलं. तर राज्यात दिशा कायदा लागू करण्याआधी तो एवढा कठोर करा की आपल्याला इतर राज्यात अभ्यासासाठी जाण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी केल्याचंही आदती यांनी सांगितलं आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करू लागल्या आहेत. विविध मुद्द्यांवरील आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते ट्विटर, फेसबुक अशा माध्यमांचा वापर करतात. पण गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (@fadnavis_amruta) या देखील ट्विटरवर प्रचंड सक्रिय झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत दरी निर्माण झाली. साहजिक याचा परिणाम देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांवरही झाला. हे दोनही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच वादात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेत थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनाही सोशल मीडियावर टार्गेट करण्यात आलं होतं. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
'शांतता क्षेत्रां'चा संकोच! केंद्राने ध्वनिप्रदूषणासंबंधीचे नियम लागू केले तेव्हा त्यात शांतता क्षेत्राचाही उल्लेख होता. मुंबईतील दीड हजारांहून अधिक शांतता क्षेत्र एका रात्रीत मोडीत काढल्यावर राज्य सरकारने सात महिन्यांनंतर नव्याने तयार केलेल्या यादीत केवळ ११० शांतता क्षेत्रांचीच नोंद केली आहे. शिवाजी पार्कसह शीव रुग्णालय, सेंट झेवियर्स महाविद्यालय अशी अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा या यादीत समावेश नाही. त्यामुळे अनेक रुग्णालये, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात आताच्या घडीला ध्वनिक्षेपकाच्या वापरावर बंदी नाही. केंद्राने ध्वनिप्रदूषणासंबंधीचे नियम लागू केले तेव्हा त्यात शांतता क्षेत्राचाही उल्लेख होता. शाळा-महाविद्यालय, न्यायालय, रुग्णालय तसेच धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिसराला शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. ध्वनिप्रदूषणविरोधी कार्यकर्त्यांचा दबाव व न्यायालयाचे आदेश यामुळे २००९ मध्ये महानगरपालिकेने शहरातील १५३७ शांतता क्षेत्रांची यादी जाहीर केली. शांतता क्षेत्राकरिता हीच यादी आतापर्यंत ग्राह्य़ धरली जात होती. मात्र गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजी ध्वनिप्रदूषण नियमांमध्ये बदल करून केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय शहरात शांतता क्षेत्र घोषित करता येणार नसल्याचा नियम केला. त्यामुळे पालिकेची आधीची यादी मोडीत निघाली. आता शहरात नव्याने शांतता क्षेत्र ठरवून देण्याचे काम राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. महापालिकेने नोव्हेंबरमध्ये ११० शांतता क्षेत्रांची यादी राज्य सरकारला पाठवली. यात शहरातील मोठी रुग्णालये, न्यायालये यांचा समावेश असला तरी आधीच्या यादीतील तब्बल १४२७ क्षेत्रांचा समावेश नाही. शांतता क्षेत्रांचा निकष बदलला नसला तरी जुन्या यादीनुसारची ठिकाणे संबंधित जागी आहेत का त्याची पाहणी करावी लागेल. त्यामुळे आम्ही प्रमुख स्थळांची नावे आधी कळवली. त्यासंबंधी वॉर्ड पातळीवरून पाहणी झाल्यावर राज्य सरकारला नोव्हेंबरमध्ये यादी कळवली गेली. दुसरी यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ही नावे राज्य सरकारकडे पाठवण्यात येतील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आताच्या घडीला मुंबईत केवळ ११० ठिकाणीच शांतता क्षेत्र निश्चित आहे. नियमानुसार शांतता क्षेत्रांमध्ये आवाजाची पातळी दिवसा ५० डेसिबल तर रात्री ४० डेसिबलपर्यंतच ठेवता येते. त्यामुळे या परिसरात कोणत्याही वेळी ध्वनिक्षेपक लावण्यास, सभा, मिरवणुका काढण्यास बंदी घातली जाते. मात्र ही शांतता क्षेत्र गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव, मैदानांवरील राजकीय सभा, मिरवणुका यांसाठी अडचणीची ठरू लागली. शांतता क्षेत्रांमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याने काही कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. दरम्यान, १० ऑगस्ट २०१७ रोजी ध्वनिप्रदूषण नियमांमध्येच बदल करण्यात आला. राज्य सरकारने मान्यता दिल्याशिवाय शांतता क्षेत्र घोषित होणार नसल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. मात्र उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मुद्दा अयोग्य ठरवला. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार नागरिकांकडून सूचना व हरकती न मागवता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महानगरपालिका आणि राज्य सरकार जनतेची फसवणूक करीत आहेत. २००९ मध्ये १५०३ शांतता क्षेत्र जाहीर झाली होती. ही यादी आता फक्त ११० वर आणली गेली. कोणताही निकष बदलला नसताना ही संख्या कमी का झाली याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. शिवसेनेच्या काही नेत्यांनी तर पंकजा यांचे पक्षात स्वागत करू अशीही हाक दिली होती. पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबत स्वतः त्यांनी खुलासा केला आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. यांनतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांबाबत भाष्य केले. 'माझ्या मनात कोणतीही खदखद नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरु असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लावला. ठाकरे गटाच्या ऑफरबाबत काय वाटत ? असा सवाल मध्यमकर्मीनी विचारला असता पंकजा म्हणाल्या,"प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी ओव्हरटेक करत नाही,माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उतत दिल हीच मोठी गोष्टी आहे" असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. पंकजा मुंडे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करुक्रमांसाठी उपस्थित का राहत नाहीत ? असा सवाल विचारला असता, 'मीही ती चर्चा ऐकली आहे,त्यावर वेगळी पत्रकार परिषद घेता येईल' असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिल. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली कार्यकर्ता आहे. मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते,कोणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाबाहेरील कार्यक्रमांना जाण मला कंपलसरी नाही असंही मुंडे यावेळी म्हणाल्या. "विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल अफवा पसरवू नये त्या एक प्रगल्भ नेत्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जणता पार्टी आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, या सर्व केवळ चर्चा आहेत. त्या राष्ट्रीय राजकारण असून त्यांना कोणीही फूस लावू शकत नाही" असा विश्वास देखील यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.
व्हॅलेंटाइन डे आणि कॉलेजमध्ये साज-या होणा-या विविध डेजच्यानिमित्ताने मित्र - मैत्रिणी आणि आवडत्या व्यक्तीला ग्रिटींग कार्ड देऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत आता खूप जुनी झाली आहे. व्हॅलेंटाइन डे आणि कॉलेजमध्ये साज-या होणा-या विविध डेजच्यानिमित्ताने मित्र - मैत्रिणी आणि आवडत्या व्यक्तीला ग्रिटींग कार्ड देऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत आता खूप जुनी झाली आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमुळे तरूणाईसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अॅप्समुळे विविध प्रकारचे ग्रीटिंग्ज आणि मेसेज प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचविता येत आहेत. सध्या अशाच सर्व सोशल नेटवर्र्किं ग साईटवर वेगवेगळ्या डेज्च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. सध्याचा तरुणवर्ग हा टेक्नोलॉजीशी जोडला गेला असल्याने एका क्लिकवर जगभरातील माहिती गोळा करू शकतो. अशाच सोशल नेटवर्किंग साईटवर सध्या व्हॅलेंटाईनबरोबर विविध डेजच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. स्मार्ट फोनमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील मित्र-मैत्रिणींशी जोडणे शक्य झाले आहे. एकमेकांपासून दूर असलेल्या प्रिय व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हे एक चांगले माध्यम ठरले आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात विविध डेज्नुसार दररोज एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे शक्य होत नाही. अशा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया या पर्यायाची निवड सहजशक्य होत आहे. व्हॉट्सअपच्या सहाय्याने आपल्या प्रिय व्यक्ती किंवा मित्र- मैत्रिणींना एसएमएस किंवा प्रेमाचे प्रतीक असलेले विविध फोटो पोस्ट केले जात आहेत. वर्षभरात प्रियजनांसोबत साजरे केलेले काही खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून एकमेकांना शेअर केले जात आहेत. मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या गिफ्ट्ससोबत सेल्फी काढून स्वतःच्या आवडीचे किंवा गायलेले गाणे त्या प्रियजनांना ऐकविले जाते. फेसबुक या सोशल साइटवर एकाच वेळी हजारो मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येत असल्याने सध्या व्हॅलेंटाइन डेजचे प्लॅनिंग जोरदार सुरू आहे. विविध डेज्ची माहिती स्टेटस्च्या माध्यमातून दिली जात आहे. त्याचबरोबर व्हॅलेन्टाइन डे निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती इव्हेंट या पर्यायाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. याद्वारे फेसबुक मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केले जात आहे. डेज्नुसार प्रत्येक जण दररोज स्टेटस् चेंजबरोबर डेजचे फोटो शेअर करत आहेत, त्याचबरोबर ्ट्विटर आणि ई-मेलच्या माध्यमातूनही डेज्नुसार एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
The Vaccine War: 11 भाषा, 15 ऑगस्ट, येतोय विवेक अग्निहोत्रींचा 'द वॅक्सिन वाॅर' गअलीकडेच, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे संकेत देऊन सर्वांचे लक्ष वेधले होते, ज्यानंतर नेटिझन्स त्यांच्या आगामी चित्रपटाच्या नावाचा अंदाज लावू लागले. दर्शकांची उत्सुकता शिगेला असतानाच, आता चित्रपट निर्मात्याने अखेर त्यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक 'द व्हॅक्सिन वॉर' जाहीर केले आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा ११ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (The Vaccine War: Vivek Agnihotri announces 'incredible true story' that will be released in 11 languages release date independence day 2023) हेही वाचाः Bigg Boss Marathi 4: मनातलं प्रेम अखेर ओठावर! प्रसादनं केलं अमृताला प्रपोज.. या चित्रपटाचे पोस्टरचे देखील आज जाहीर करण्यात आले. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेचाही उल्लेख आहे. हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित असून, या महिन्यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. हेही वाचाः India Lockdown: 'इंडिया लॉकडाउन'ची का होतेय एवढी चर्चा! ते भयाण वास्तव पुन्हा समोर.. याबाबत बोलताना विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले, "लॉकडाऊन दरम्यान जेव्हा 'काश्मीर फाइल्स' पुढे ढकलण्यात आला, तेव्हा मी यावर अभ्यास सुरू केला. मग आम्ही ICMR आणि NIV च्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरू केले ज्यांनी आपली स्वदेशी लस तयार केली. त्यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची कहाणी जबरदस्त होती आणि संशोधन करताना आम्हाला समजले की हे शास्त्रज्ञ भारतासाठी केवळ परदेशी एजन्सीच नव्हे तर आपल्याच लोकांशी कसे लढले. 'तरीही, आपण सर्वात वेगवान, स्वस्त आणि सुरक्षित लस तयार करून महासत्ता देशांवरही विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगावीशी वाटली. एका बायो-वॉरबद्दल भारतातील हा पहिला विज्ञान चित्रपट असेल,' असेही ते म्हणाले. Presenting 'THE VACCINE WAR' - an incredible true story of a war that you didn't know India fought. And won with its science, courage & great Indian values. It will release on Independence Day, 2023. In 11 languages. 'द कश्मीर फाइल्स' नंतर विवेक रंजन अग्निहोत्रीच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी बातमी आहे. शिवाय, या घोषणेसह, चित्रपट निर्मात्याने देशासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय कसा हाताळला जाईल असा प्रश्नात सर्वांना पाडले आहे. पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची घोषणा केलेली नाही. लस युद्धाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी आणि आमच्या शास्त्रज्ञांनी केलेले प्रयत्न मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी कोण योग्य ठरेल हे पाहणे मनोरंजक असेल. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. औरंगाबाद : औरंगाबाद व जालना या दोन दुष्काळी जिल्ह्यांतील कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अगोदर या योजनेतून वीज जोडणी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा (१५ आॅगस्ट) मुहूर्त शोधला होता. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातूनच या योजनेचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात मात्र, अजूनही ११ केव्ही ही उच्चदाब वाहिनीच वावरापर्यंत पोहोचलेली नाही. यासंबंधीची कामे करण्यासाठी कंत्राटदार निश्चित झालेले नाहीत. ही योजना राबविण्यासाठी महावितरणला सलग तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली. निविदांमधील दरसूची ही परवडणारी नसल्यामुळे कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळत नाही. त्यामुळे आता महावितरणने या योजनेसाठी प्रजासत्ताक दिनाचा (२६ जानेवारी) मुहूर्त तरी साधावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, हे विशेष! ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या जिल्ह्यातील ९ हजार २१४ तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीज जोडणी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मागील ७ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत. या योजनेंतर्गत एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन किंवा तीन कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. वीज चोरीपासून सुटका होणार आहे. या योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात १६८ कोटी ८ लाख रुपये, तर जालना जिल्ह्यात १८३ कोटी ८८ लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत. मात्र, या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरच कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे जुलैपासून तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. निविदांमधील विद्युत साहित्यांचा दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी या योजनेच्या कामांवर राज्यभर बहिष्कार टाकलेला आहे. सध्या ६५ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. सध्या सर्रासपणे आकडे टाकून कृषिपंपांना विजेचा वापर केला जातो. आता यापुढे उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून कृषिपंपांना वीज चोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीत एका रोहित्रावरून दोन किंवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होईल. उच्चदाब प्रणालीमुळे वीज हानीसुद्धा कमी होणार आहे.
Control High Blood Pressure : लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हृदया संबधित आजार खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. हाय ब्लड प्रेशर मुळे बराच वेळा हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता असते त्यामुळे तुमचे हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर कसा कराल ते पाहूयात. मेथी आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवायचे असेल तर मेथी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे सकाळी एक चमचा मेथी पावडर आणि रात्री १ चमचा मेथी पावडर घेतल्याने तुमचे रक्तदाब नियंत्रित राहील. मेथी मधुमेहासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. तुम्ही जर याचे पंधरा दिवस सेवन केले तर तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल. फायब्रिनोलाइटिकचे प्रमाण कांद्यामध्ये असते जे रक्त (Blood) गोठण्यापासून संरक्षण करतो. जर तुम्ही मधात कांद्याचा रस समान प्रमाणात मिक्स करून घेतल्याने तुमची उच्च रक्तदाबाची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत होईल. तुळशीमध्ये खूप गुणधर्म असतात जे औषधासारखे काम करतात. तुमचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम सुद्धा तुळशी करू शकते. त्यासाठी तुम्हाला तुळस आणि कडुलिंबाचे पाने समप्रमाणात बारीक करून घ्या आणि कोमट पाण्यासोबत सेवन करा. असे आठवड्यातून एकदा सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने तुमचे रक्तदाब नियंत्रित राहील. एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून घेऊ शकता. जर तुम्हाला मधुमेहाच्या समस्या असतील तर हा उपाय करण्याअगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वयंपाकघरात आपण दालचिनीचा वापर करतो त्यामुळे सहज उपलब्ध होते दालचिनी मध्ये अनेक गुणधर्म असतात जे दात दुखी,कर्करोग,ताप कमी करण्यासाठी मदत करते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दालचीनीचा उपयोग केला जातो. हरभरा, गहू दोन्ही समप्रमाणात बारीक पीठ करून त्या पिठाची भाकर सकाळी न्याहारीत रोज खावी. यामुळे तुमचे हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होते सोबतच तुम्हाला मधुमेहापासूनआराम मिळेल. जेवणानंतर रोज पाच ते दहा ग्रॅम टरबुजाच्या बिया खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. टरबुजाच्या बिया मध्ये लायकोपिन कोलेस्ट्रॉल असते कमी करण्यास मदत करते. डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
तलवाडा : पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार वनराई आणि त्यात स्वच्छंदपणे वाहणारा पलूचा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. मुंबईपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पिकनिक पॉइंटवर सध्या पर्यटकांची तुडुंब गर्दी दिसत आहे. आदिवासीबहुल या भागात यामुळे रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. जून ते आॅक्टोबर या काळात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. दगड व चिखलवाट तुडवतच येथे यावे लागते. येथील हिरवाईच्या सौंदर्यात विक्रमगडचा पलूचा आणि जव्हारचा दाभोसा धबधबा अधिक भर टाकतो. या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्याशिवाय येथील निसर्गदर्शन पूर्णच होत नाही. पावसाळा सुरू झाला की, येथील नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुभ्र धबधबे. विविध प्रजातींचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्याने पक्षी निरीक्षकसुद्धा या काळात येथे येत असतात. विक्रमगडमधील शाळा, कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी येथे आवर्जून भेट देत असतात. (वार्ताहर)
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राच्या महिलांच्या स्थितीबाबतच्या आयोगातून आज इराणला बाहेर काढण्यात आले. माहसा आमिनीच्या मृत्यूनंतर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इराणला या आयोगाच्या सदस्यत्वावरून बाहेर काढण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महिलांच्या स्थितीबाबत झालेल्या मतदानानुसार 29 विरुद्ध 8 मतांनी इराणला बाहेर काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तर 16 देश या ठरावावरील मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले. निकाराग्वा, नायजेरिया, ओमान, बोलिव्हिया, चीन, कझाकिस्तान, रशिया आणि झिम्बाब्वे या देशांनी इराणविरोधातील या ठरावाच्या वेळी इराणच्या बाजूने मतदान केले. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या 54 सदस्यांसमोर हा ठराव मांडण्यात आला होता. या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या या ठरावानुसार महिलांच्या स्थितीबाबतच्या आयोगावरून इराणला तत्काळ हटवण्यात आले. इराणच्या सदस्यत्वाची मुदत 2022 ते 2026 पर्यंत होती. उर्वरित सर्व कालावधीसाठी इराणला या आयोगाच्या सदस्यत्वावरून हटवण्यात आले आहे. माहसा आमिनीचा मृत्यू देशाच्या नैतिक सुरक्षा रक्षकांच्या कोठडीत सप्टेंबर महिन्यात झाला होता. तेव्हापासून सुरू झालेले आंदोलन गेल्या 12 आठवड्यांपासून तेथे सुरू आहे. माहसा आमिनीच्या मृत्यूमुळे इराणमधील महिलांची स्थिती किती वाईट आहे, हे अधोरेखित झाले आहे. आता ही दडपशाही आणि हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश इराणमधील जनतेने आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे, असे ब्रिटन, अमेरिका, चेक प्रजासत्ताक आणि युरोपीय संघाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
नाशिक - राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बनावट नियुक्तीपत्र तयार करुन गंडा घालणा-या विरुध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक करण्याचा हा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी बाबासाहेब निवृत्ती भूतकर (वय ५१, अक्षय बेहळे, तपोवन रोड) यांनी तक्रार केली आहे. औरंगाबादचे रविंद्र जाधव असे संशयिताचे नाव आहे. जाधव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात बनावट नियुक्तीपत्र तयार करुन उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
LOC Firing: सुरुवातीला या घटनेला अपघाती फायरिंग म्हटले जात आहे. संरक्षण दलातील सुत्रांनुसार ही घटना गुरुवारी दुपारी राजौरी सेक्टरच्या हनजनवली भागात झाली आहे. जम्मू : जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये गुरुवारी नियंत्रण रेषेवर गोळीबाराच्या घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून सैन्याच्या अधिकाऱ्यांनी त्या दिशेने तातडीने धाव घेतली, परंतू तिथे दोन जवान विव्हळत जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. काही वेळाने या जवानांचा मृत्यू झाला. या रहस्यमयी गोळीबार प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या घटनेत सैन्याच्या पंजाब युनिट १४ च्या दोन जवानांचा मृत्यू झाला. दोघेही पंजाबचेच होते. सुरुवातीला या घटनेला अपघाती फायरिंग म्हटले जात आहे. संरक्षण दलातील सुत्रांनुसार ही घटना गुरुवारी दुपारी राजौरी सेक्टरच्या हनजनवली भागात झाली आहे. घटनेत जखमी झालेल्या दोन जवानांचा काही वेळात मृत्यू झाला. सूचना मिळताच पोलिसांची टीमदेखील घटनास्थळी पोहोचली. आकस्मिक गोळीबार झाल्याचे संकेत मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच सैन्याचे जवान आणि अधिकाऱ्यांनी लगेचच तिकडे धाव घेतली. यावेळी सरबजीत सिंग आणि नवराज सिंग हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दोघांनाही त्या अवस्थेत नजीकच्या सैन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती आलेली नाही. दोन्ही जवानांनी वादातून एकमेकांवर गोळी चालविली असेल असे बोलले जात आहे. त्यांच्या बंदुका जप्त करण्यात आल्या असून तपास केला जात आहे.
भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे. मानापूर/देलनवाडी : भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे. म्हणूनच बुद्धाचा धम्म हाच खरा मानवतावादी जीवनमार्ग आहे, असे प्रतिपादन वर्धा येथील प्राचार्य डॉ. बी. एम. कºहाडे यांनी केले. त्रिशरण नवयुवक मंडळ तथा बौद्ध समाज आणि यशोधरा महिला मंडळ मानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पीतांबर कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. के. मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पीतांबर कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पीतांबर कोडापे मार्गदर्शन करताना म्हणाले, बुद्ध धम्म आदर्श समाजच नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्त्व निर्मितीचीही दिशा निर्देश देतो. बुद्धाच्या शिकवणुकीत अष्ठांग मार्ग आहेत. हे आपल्याला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवितात. त्यामुळे बुद्धाच्या धम्माची गरज आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला नामदेव मोरघडे, पेंदोर, डी. पी. मोरघडे, तुकाराम वैरकर, भाऊराव घोडमारे, भाष्करराव देऊळकर, अशोक चौधरी, रेखचंद भैसारे, संदीप टेंभुर्णे, भाष्कर उंदीरवाडे, शुभम सहारे, हेमंत सहारे, शिल्पा ढोरे, मृणाली ढवळे उपस्थित होते. संचालन प्रा. धनपाल टेंभुर्णे, प्रास्ताविक रेखचंद भैसारे तर आभार संदीप टेंभुर्णे यांनी मानले.
विनायक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत म्हसळा शहरासाठी रु. १,७२,२३,२५३/- (रुपये एक कोटी बाहत्तर लाख तेवीस हजार दोनशे त्रेपन्न) रकमेची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. अशी माहिती नगराध्यक्षा श्रीमती कविता शितल बोरकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष श्री. नाझिम हसवारे यांनी दि. १४ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष नाझिम हसवारे, नगराध्यक्षा कविता शितल बोरकर, उपनगराध्यक्ष नासिर दळवी, बांधकाम सभापती संतोष काते, नगरसेवक करण गायकवाड, नगरसेविका सेजल खताते, नगरसेविका जयश्री कापरे, भाई बोरकर आदि नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. उन्हाळ्यात, पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणा-या म्हसळे शहरातील जनतेला या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे. पहिल्या प्रथम म्हसळे शहरासाठी कोटी रुपयाच्या मोठ्या रकमेची नळ पाणी पुरवठा योजना राबवणार असल्याने येथील जनतेची तहान भागणार यात तिळमात्र शंका नाही.
लग्न ठरविणे ही गोष्ट अवघड होत चालली आहे, असं हल्ली सर्रासपणे बोलले जाते. बरेच दिवस, महिने, वर्षे, स्थळे बघणे सुरूच आहे...पाहतोय पण अजून काही निर्णय झाला नाही...असे संवाद हमखास ऐकायला मिळतात. दिवस पुढे सरकतात.. वय वाढत जाते. पालकांची काळजी वाढते. पण निर्णय काही होत नाही. असे का होत असावे? याचा खोलवर विचार केला तर अनेक गोष्टी समोर येतात. त्याचा विचार विवाहेच्छू मुले, मुली व त्यांच्या पालकांनी करणे गरजेचे आहे. सर्वांत पहिला मुद्दा : आपली पूर्वापार चालत आलेली विचारपद्धती होती की, संसार दोघांचा असतो. दोघांनी स्वप्न पाहायचे आणि मग कष्ट करून एकमेकांच्या साथीने पूर्णत्वास आणायचे. पण सध्या मुलींचा बायोडेटा पाहिला तर केवळ अपेक्षाच पाहायला मिळतात. मुलगा वेल सेटल्ड असावा, पाच आकडी पगार असावा, स्वतःचा फ्लॅट असावा वगैरे वगैरे. थोडक्यात सर्व सुखसोई रेडिमेड असाव्यात. पण, बारकाईने विचार केल्यास मुलगा २२-२३ व्या वर्षी पदवीधर होणार. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर २५-२६ वर्षे. दोन तीन वर्षांतच तो मोठा पगार कसा मिळविणार? आयटी क्षेत्रात मोठा पगार आहे. पण, तिथली जीवनशैली वेगळी आहे. मोठ्या पगारांसोबत त्याचे 'साइडइफेक्टही' आहेत. पैसा आहे पण स्थैर्य नाही. सतत बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावे लागते. स्वैराचार, व्यसने याचे प्रमाण जास्त आहे. आपल्या जोडीदाराप्रती आयुष्यभर एकनिष्ठ राहण्याची किंवा एकमेकांना समजून घेऊन शेवटपर्यंत निभावून नेण्याची वृत्ती कमी आहे. आयटीव्यतिरिक्त इतर क्षेत्रात फारसे तेजीचे वातावरण नाही. त्यामुळे मुलांना नोकरी मिळते. पण, मिळणारा पगार कमी आहे. पण, थोड्या कालावधीनंतर ग्रोथ, स्टॅबिलिटी नक्की आहे, याचा विचार मुलींनी केला पाहिजे. आज अनेक मुलींचा पुण्या-मुंबईकडीलच स्थळाकडे कल असतो. पण, जर मुलगा उच्चशिक्षित, कर्तृत्ववान असेल तर मुलींनी इतरत्र स्थळे स्वीकारायला हरकत नाही. आधी मुलाच्या शिक्षणाला, कर्तृत्वाला महत्त्व द्यायला हवे. मोठ्या शहरात येणारा पगार जरी जास्त असला तरी, खर्चाचा आकडाही मोठाच असतो. याचाही विचार व्हायला हवा. दुसऱ्या बाजूने मुलांच्या अपेक्षा पाहता त्यांनाही 'आखुडशिंगी, बहुगुणी, दुभती' अशी उपमा वापरता येईल अशी मुलगी हवी असते. अर्थात, मुलीने घर, करिअर, मुले-बाळे, पै-पाहुणे सर्व काही एकहाती सांभाळले पाहिजे, अशी अपेक्षा असते. 'अष्टभुजा नारायणी' बनून सर्व आघाड्यांवर लढणे अपेक्षित असते. पण, सखोल विचार केल्यावर लक्षात येते, पूर्वी एकत्र कुटुंबात जबाबदाऱ्या वाटल्या जात होत्या. त्यामुळे एका स्त्रीवर भार पडत नव्हता. तिला इतर जणांची साथ मिळायची. मानसिक, शारीरिक ताण कमी होता. मुलांचे संगोपन करणे सोपे होते. पण, आजच्या काळात मुलांनी पण सांसारिक जबाबदारीमध्ये मदत करण्याची गरज आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात मुले टिकून राहावीत म्हणून त्यांच्या जडणघडणीत मदत करणे गरजेचे आहे. तरंच तिची तारेवरची कसरत कमी होईल. शिवाय मुलगी उच्चशिक्षित असेल, मोठ्या पदावर नोकरी करणारी असेल तर, त्यासोबत तिची स्वतःची काही मते असणारच हे समजून घ्यायला हवे. पालकांनी मुला-मुलींना वाढविताना तडजोड, नाती सांभाळण्याची समज याचेही शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचे आहेच. पण, मुलींना आधीपासून घरातील कामांची, जबाबदारी घेण्याची सवय हवी. हाच पूर्वानुभव तिला लग्नानंतर आत्मविश्वासाने घर सांभाळताना उपयोगी ठरेल. वेळेचे व्यवस्थापन करता येईल, कामाचा ताण कमी जाणवेल. हल्ली आपल्या समाजाची स्थिती पाहता, मुलींचे उच्चशिक्षित होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच त्यांना त्याच तोडीचा जोडीदार हवा असतो. त्यासाठी मुलांनी मानसिकता बदलून शिक्षणाचा पाया भक्कम केला पाहिजे. स्थळे निवडताना जर सर्वच मुला-मुलींच्या अपेक्षा एका ठराविक साच्यातील स्थळाकडे केंद्रित झाल्या तर आपल्यालाच असे स्थळ मिळावे, यादृष्टीने हुंडा पद्धती, खर्चिक लग्नसोहळे याला प्रोत्साहन मिळेल. वरील उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यास एक सांगावे वाटते, की दोन्हीकडील पक्षांनी अपेक्षा ठेवताना आपण कोणत्या गोष्टींबद्दल ठाम (Rigid) आहेत व कोणत्या मुद्द्यामध्ये लवचिक (Flexible) राहू शकतो याचा विचार करून स्थळ निवडावे. म्हणजे निर्णयाप्रत पोचणे सोपे जाईल. कारण, जगातील कोणतीच व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसते. वडीलधाऱ्यांनी मुलगा, मुलगी दोघांनाही समुपदेशन केले पाहिजे की, सर्व गोष्टी रेडिमेड (Readymade) मिळणार नाहीत. दोघांनी मिळून संसारातले एक एक टप्पे गाठायचे असतात.संयम, समजूतदारपणा, नैतिकता या गुणांची संसाराला पैशापेक्षा जास्त गरज आहे याची समज द्यायला हवी.
मुंबई :- शहरात अवैधरीत्या सुरु असलेल्या डान्स बारवरील पोलीस कारवाईसोबत संबंधीत स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्यांवर करण्यात येणार्या कठोर कारवाईने सध्या शहर पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंधेरी-कुर्ला रोडवरील नाईट लवर्स बारवरील कारवाईनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांची फक्त मुख्य नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या आदेशावरुन शहरात अवैध कारवायांवर कारवाईचा धडाका सुरु झाल्याने अवैधरीत्या सुरु असलेल्या डान्सबार मालकांचे धाबे दणाणले आहेत. अशातच स्थानिक पोलीस ठाण्यांवर अशा अवैध कारवायांवर करडी नजर ठेऊन कठोर कारवाईचीही जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा अवैध कारवाया आढळल्यास संबंधीत पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकारी आणि अंमलदांवर याचा ठपका ठेवत थेट निलंबनापर्यंत कारवाई केली जात आहे. यामूळे पोलीस दल धास्तावले आहे. ताडदेवमधील इंडियाना बारवरील छाप्यानंतर ताडदेव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विश्वनाथ सासवे यांना निलंबीत करण्यात आले. त्यापाठोपाठ मे महिन्यात गॅ्रण्ट रोड येथील गोल्डन गुंज डान्सबारवर केलेल्या कारवाईनंतर गावदेवी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांचे निलंबन झाले. तर 15 जुलैला बोरीवली पूर्वेकडील सूर संगीत या बारवरील कारवाईनंतर कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांच्यासह दोन अधिकारी आणि एका अंमलदारावर निलंबनाची तडकाफडकी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता 20 जुलैच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रमुख पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अंधेरी-कुर्ला रोडवरील नाइट लवर्स बारवर छापा टाकून केलेल्या कारवाईनंतर मात्र एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अलकनुरे यांची मुख्य नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
विधानभवनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागपूर महापालिका आणि आरोग्य खात्याच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक आमदारांना सर्दी, खोकला झाल्याचे आरोग्य तपासणीत पुढे आले आहे. मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरच्या विधान भवनात (Nagpur Vidhan Bhavan) कोरोनाच्या टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानभवनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजंट (Antigen Test) आणि आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) व्यवस्था करण्यात आली आहे. जा लोकांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करावी असे आवाहन विधानभवनाच्या व्यवस्थापनाने केली आहे. विधानभवनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागपूर महापालिका (Nagpur Municipal Corporation) आणि आरोग्य खात्याच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक आमदारांना सर्दी, खोकला झाल्याचे आरोग्य तपासणीत पुढे आले आहे. नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. त्यातच नागपूरसह विदर्भात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अधिवेशनात सर्व आमदार मंत्री थंडीपासून बचाव करणारे कपडे घातलेले दिसतात. अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून गेल्या तीन दिवसांत निम्म्या आमदारांना सर्दी आणि खोकला झाला आहे. सर्दी, खोकल्यासह काही आमदारांना ताप आला असून काहींना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचीही समस्या सतावत आहे. विधानभवन परिसरात एकूण ६११ जणांची तपासणी आतापर्यंत झाली आहे. नागपुरात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहात आहे. मुंबईकरांना या थंडीची सवय नसल्यामुळे नागपूर अधिवेशनात काम करताना त्यांना त्रास होत आहे.
नागपूरः कर्णधार मिताली राजसह स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी झळकावलेल्या अर्धशतकांमुळे भारतीय महिला संघाने वनडे मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात इंग्लंडवर ८ विकेटनी सहज मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली. त्याचबरोबर मितालीने वन-डे कारकिर्दीतील पन्नास अर्धशतके पूर्ण करण्याचा विक्रमही प्रस्थापित केला. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तथापि, अॅमी जोन्स आणि कॅप्टन हिदर नाइट वगळता इंग्लंडच्या अन्य फलंदाज अपयशी ठरल्या. त्यामुळे इंग्लंडला ९ बाद २०१ धावांपर्यंतच मजल मारता आली. जोन्सने ११९ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ९४ धावांची खेळी केली. तिचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. इंग्लंडचे आव्हान भारतीय संघाने ४५. २ षटकांत २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. स्मृती मानधना ६७ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ५३ धावा करून जखमी निवृत्त झाल्यानंतर मिताली आणि दीप्तीने नाबाद १०३ धावांची भागीदारी रचून भारताचा विजय साकारला. मितालीने १२४ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह नाबाद ७४, तर दीप्तीने ६१ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ५४ धावा फटकावल्या. स्कोअरबोर्ड : इंग्लंड ५० षटकांत ९ बाद २०१ (अॅमी जोन्स ९४, झुलन गोस्वामी २-३९, राजेश्वरी गायकवाड २-३२) पराभूत विरुद्ध भारत ४५. २ षटकांत २ बाद २०२ (स्मृती मानधना ५३, मिताली राज नाबाद ७४, दीप्ती शर्मा नाबाद ५४, अॅना श्रबसोल २-३७). ५० - मिताली राजने या सामन्यात झळकावलेले अर्धशतक हे तिचे वन-डे कारकिर्दीतील पन्नासावे अर्धशतक ठरले. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली.
मुंबई - राज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आदी प्रवर्गातील सावित्रीच्या लेकींना मागील ३० वर्षांपासून नियमित शाळेत येण्यासाठी दिले जाणारे दैनंदिन १ रुपया प्रोत्साहनपर अनुदान वाढवून प्रतिदिन किमान २० रुपये करावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली असून आजच्या या महागाईच्या जमान्यात एक रुपयात साधी पेन्सिल तरी मिळते का? असा प्रश्न उपस्थित करत, सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून अनुदान प्रतिदिन किमान २० रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात, सन १९९२ साली तत्कालीन राज्य सरकारने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व त्यांनी दाखवलेला स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन आदिवासी क्षेत्राबाहेरील आर्थिक दुर्बल घटकातील तसेच अनुसूचित जाती- जमाती व भटक्या जमातींमधील पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढावी तसेच गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पहिली ते चौथीत शिकणाऱ्या मुलींना प्रोत्साहन पर उपस्थिती भत्ता देण्यासाठी 'दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता' देण्याचा शासन निर्णय घेतला होता. याअंतर्गत प्रति विद्यार्थिनी, प्रतिदिन १ रुपयाप्रमाणे भत्ता निश्चित करण्यात आलेला असून, वर्षातील एकूण उपस्थितीचे २२० दिवस ग्राह्य धरून याप्रमाणे भत्ता दिला जातो. सदर योजनेतील भत्ता वितरीत करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये अद्याप निधीही उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. मागील सुमारे तीस वर्षांपासून या योजनेत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. देशाचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत असताना दुसरीकडे महागाई आकाशाला गवसणी घालत आहे. अशा परिस्थितीत सावित्रीमाईंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या भत्त्याची एक रुपया रक्कम ही शालेय मुलींची चेष्टा करणारी असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. आजच्या बाजार भावानुसार एक रुपयात एक पेन्सिल मिळणे सुद्धा दुरापास्त आहे असे असताना शालेय मुलींना उपस्थिती प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा तुटपुंजा भत्ता देखील वाढविण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती,भटक्या जमाती आदी प्रवर्गातील सावित्रीच्या लेकींना मागील वर्षांपासून दिले जाणारे दैनंदिन 1 रुपया अनुदान वाढवून प्रतिदिन किमान 20 रुपये करावे,अशी मागणी केली आहे. आज सावित्रीमाईंची जयंती आपण उत्साहात साजरी करत आहोत, सावित्रीमाईंनी सामाजिक विरोध झुगारून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना ज्ञानदानाचे पवित्र काम करून स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. याच पार्श्वभूमीवर बालिका दिनाचे निमित्त साधून शासनाने वरील योजना सुरू केलेली आहे. सध्याच्या आधुनिक युगात देश डिजिटायझेशनकडे वाटचाल करत असताना शिक्षण व त्याला पूरक साधनांमध्ये देखील आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांना अनुसरून व आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करून प्राथमिक शिक्षण प्राप्त करण्यासाठी उपरोक्त योजनेचे पुनरावलोकन करून त्यात बदल करणे गरजेचे आहे. तसेच याअंतर्गत मुलींना दिला जाणारा दैनंदिन भत्ता १ रुपयावरून वरून प्रतिदिन किमान २० रुपये करणे देखील गरजेचे आहे; असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून दैनंदिन भत्ता वाढ करण्यासाठी राज्यशासन स्तरावरून एका बैठकीचे तातडीने आयोजन करून निर्णय घ्यावा, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
नागपूर : अन्य राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या धोरणाचा अभ्यास करुन राज्याचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या सूचनेच्या उत्तरात दिली. सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर बोलताना श्री.बडोले म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक धोरण 30 सप्टेंबर 2013 रोजी करण्यात आले. या धोरणाच्या माध्यमातून गंभीर आजाराबाबत धर्मदाय संस्था व राज्य शासनाकडून मदत करण्यात येते. तसेच शासकीय रुग्णालय व बस प्रवासाकरिता सवलत देण्यात येते. अन्य राज्यातील धोरणाचा अभ्यास करुन राज्याचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याकरिता या धोरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी व इतर संबंधीत घटकांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देण्यात याव्यात तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वरुन 60 करण्यात यावे याबाबत शासन सकारात्मक असल्याचे श्री.बडोले यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत कार्यवाही चालू असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विधवा व दिव्यांग महिला यांचा मुलगा 25 वर्षाचा झाला असेल तर त्याची पेन्शन बंद केली जाईल. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वर्षभर मानधन थकीत असेल तर संबंधित तहसिलदारावर कार्यवाही केली जाईल. संलग्न खाते असलेल्या लाभार्थ्यांना 1200 रुपये दिले जाणार आहेत. या चर्चेत सदस्य सर्वश्री चंद्रदीप नरके, विजय काळे, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार, समीर कुणावार, विजय वडेट्टिवार, जयंत पाटील, अतुल भातखळकर, श्रीमती मनिषा चौधरी, भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला होता.
आगामी काळामध्ये महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, ईस्टर संडे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया, रमजान ईद आदी सण येऊ ठेपले असून हे सण उत्साहात साजरे करताना ग्रामस्थांनी परिसरात वावरताना जागरूक राहावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी त्यांच्या हद्दीतील सरपंचासह इतर ग्रामस्थांना व पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक जगदीश शेजकर, गोपनीय विभागाचे अधिकारी राजेंद्र कुवर, पंकज शिंदे आदींसह पनवेल तालुका हद्दीतील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामस्थ व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल पाटील यांनी सांगितले की, आताच्या काळामध्ये गावातील मुख्य रस्त्यावर, चौकात, बाजारपेठेत, प्रवेशद्वार या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येतात. तसेच गावात अनोळखी व्यक्ती किंवा वाहने आल्यास त्याची माहिती सुद्दा पोलिसांना मिळते. यातूनच गुन्हा घडल्यास तो उघडकीस सुद्दा येतो. गावामध्ये बेकायदेशीररित्या देशी-विदेशी मद्यसाठा किंवा विक्री करण्यात येत असेल तर त्याची माहिती मला प्रत्यक्ष फोनवर कळवावी यासाठी कोणतीही भीती बाळगू नये, महिला वर्गांसाठी पोलीस ठाण्यामध्ये वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. तेथील अधिकारी सुद्धा महिला असल्याने महिलांनी आपल्या तक्रारी न घाबरता द्यावा तेथे आपल्या तक्रारींचे निराकरण करता येईल. तसेच आपल्या हद्दीमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी सर्वांनी घ्यावी. त्यांच्यासाठी व सर्वांसाठी पोलिसांमार्फत 112 क्रमांक हा चोवीस तास उपलब्ध असतो. कुठलीही दुर्घटना किंवा मदत भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा. आगामी सणामध्ये मिरवणुकीला डीजेचा वापर करू नये, शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्थीप्रमाणे सण साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. गावागावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे उभारण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी उपस्थित सरपंच व इतर पदाधिकार्यांना आवाहन केले. यावेळी उपस्थित सरपंचांनी गटविकास अधिकार्यांनी याकडे लक्ष घातल्यास व तसे आदेश ग्रामसेवकांना दिल्यास काही महिन्यातच संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही शासनामार्फत उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिल्यावर अनिल पाटील यांनी सर्वांसमोर पनवेलचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
educational materials issue in solapur । ठरावीक दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पालकांना शाळा लावतात तगादा - Divya Marathi\nEducational Materials Issue In Solapur\nठरावीक दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पालकांना शाळा लावतात तगादा\nसोलापूर - शाळा,महाविद्यालये आठवड्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. परंतु ठरावीक दुकानांतूनच शालेय साहित्याच्या खरेदीचा निर्बंध शाळांना घातल्याने पालकांची गोची झाली आहे. बहुतेक इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळाचालकांकडून तसा तगादा लावला जातो. शिक्षण हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन करून शिक्षण संस्था आणि दुकानदारांच्या मिलिभगतमधून हा प्रकार सुरू आहे. या प्रकारामुळे पालकांची कशी अर्थिक लूट होते यावर 'डीबी स्टार'ने टाकलेला हा प्रकाश...\nशहर जिल्ह्यात २२५ हून अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळेचे शिक्षण संस्थाचालक दुकानदार यांच्यात मिलिभगत असल्याचा संशय आहे. त्यामुळे शाळांकडून ठरावीक दुकानातूनच ड्रेस आणि शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती केली जाते. पालकांना नाइलाजाने या दुकानात जावे लागते. हे दुकानदार आपल्याशिवाय ग्राहक कुठे जाणार नाही म्हणून इतर दुकानांपेक्षा साधारण १० ते १५ टक्के रक्कम जास्त दर लावून वस्तूची विक्री करतात, तर काही शाळा स्वतः अशा साहित्याची विक्री करतात. या प्रकारामुळे पालकांची अर्थिक पिळवणूक होताना दिसत आहे.\nशहरातील बहुतांश दुकानांनी शाळांबरोबर टायप केला आहे. त्यामुळे पालकही शाळांनी सांगितलेल्या दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदी करतात. कारण संबंधित शाळांना दुकानाकडून कमिशनचे पैसे मिळतात. आम्ही कोणत्याचा शाळा अथवा शिक्षकाबरोबर टायप केले नाही.\nशाळांना समज देणार\nपालकांना ठरवून दिलेल्या दुकानातून साहित्या घेण्यास लावणे चुकीचे आहे. याबाबत पालकांनी तक्रार केल्यास संबंधित शाळांना समज देण्यात येईल. मुळात असे बंधन कुठल्याच शाळांना करता येणार नाही. पालकांनी लगेच माध्यमिक शिक्षण विभागाशी संपर्क करावा.\nजादादराने केली जाते विक्री\nशाळामध्ये पुस्तके घ्या अथवा ठरवून दिलेल्या दुकानातून साहित्य घेण्यास सांगतात, त्यामुळे पालकांचा वेळ पैसा वाया जातो. शिवाय पालकांना सूट दिली जात नाही. इतर दुकानात त्याच वस्तू कमी दरात मिळतात.\n^आयएमएसशाळेमधूनसीबीएसई स्टेट बोर्डनुसार शाळेतूनच पुस्तके देण्यात येतात. कारण सीबीएसईची पुस्तके सहजा सहजी दुकानात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शाळा पालकांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविते. इतर शैक्षणिक साहित्य ठरावीक दुकानातूनच आणण्याचा आग्रह केला जात नाही.\nस्वस्तात साहित्य द्या\nतानाजीमाने, अध्यक्षमुख्याध्यापक संघटना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जास्तीचे साहित्य खरेदी करतात. त्यामुळे पालकांच्या हातात स्वस्तात देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तसेच, विशिष्ट दुकानातूनच साहित्य घ्या असा अग्रह धरला तर बाजारपेठेतील किमतीप्रमाणे साहित्यांची विक्री झाली पाहिजे. त्यातून पालकांची अर्थिक लूट होणार नाही. आरटीईचे कायद्याचे उल्लंघन आहे.\n^ठरवूनदिलेल्यादुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास लावणे हे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. शाळा नियमबाह्या पध्दतीने हा प्रकार सुरू आहे. शाळेतून िकंवा ठरवून दिलेल्या दुकानातील शैक्षणिक साहित्यांची गुणवत्ता कमी दर्जाची असते. दुकानवाले पालकांनी खरेदी केलेल्या साहित्यातून कमिशन देतात.\nयामुळे शाळांकडून होते सक्ती\nसाधारणदहा वर्षांपासून शासनाकडून अनुदानित शाळा, संस्थांना शिक्षणेतर अनुदान बंद करण्यात आले आहे. अशा स्वरूपाचे अनुदान बंद केल्याने शाळांना क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांसाठी निधीची गरज म्हणून प्रायोजक शोधावे लागत आहेत. शैक्षणिक साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या संबंधातून असे प्रायोजक मिळविण्यासाठी काही शाळा पालकांना ठरावीक दुकानांतून साहित्य करण्याची सक्ती करत असल्याचे निदर्शनास येत आहे.\nपुस्तकांबरोबरच वह्यांची सक्ती\nशाळांनीठरवून दिलेल्या दुकानातूनच पुस्तके घेण्यासाठी सांगितले जाते. दुकानात गेल्यानंतर पुस्तकांबरोबरच वह्याही घ्याव्या लागतात, असे सांगितले जाते. उदाहरणार्थ वीच्या वर्गाची पुस्तके घेण्यासाठी गेल्यानंतर वह्याही त्याच दुकानातून आग्रह धरला जातो. यामुळे पालकांचे जास्तीचे पैसे जात आहेत. ठरवून दिलेल्या दुकानात फक्त वह्यांवर १० टक्के सूट दिली जात आहे. इतर वस्तूवर काहीच सूट नाही.\nठरावीक दुकानातूनच आग्रह का?\nसाधारणएका विद्यार्थ्याला संपूर्ण शैक्षणिक वर्षात गणवेश, बॅग, शूज, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, कंपास, पाटी, वॉटर बॅग, कॅमलीन रंग, चित्रकला वही आदी साहित्य लागते. सर्वच शैक्षणिक दुकानातून शालेय साहित्यांची विक्री केली जाते. परंतु शाळांकडून ठरावीक दुकानातून ड्रेस घ्या, शैक्षणिक साहित्य आणा असे सांगितले जाते. अधिकची कटकट नको म्हणून पालक महाग असूनही आर्थिक झळ सोसून शाळांनी सांगितलेल्या दुकानातून साहित्य घेताना दिसतात.
नाशिक : पुणे महापालिकेचे अनुकरण करून नाशिक महापालिकेने मॉल्समध्ये पार्किंग मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र मॉल्स चालकांनी महानगरपालिकेला पुणेरी हिसका दाखवत, कोणत्या कायद्याच्या आधारावर नोटीस पाठवली, असा जाब विचारला आहे. नाशिक शहरात सध्या मॉल्समधील पार्किंगचा विषय चांगलाच चिघळत चालला आहे. पुणे महापालिकेने मॉल्समधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेतही मोफत पार्किंग करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली. त्यानंतर महासभेत नाशिकच्या महापौरांनी मॉल्समधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय घेतला. तसेच या नियमाचं पालन न करणाऱ्या मॉल्स चालकांना नोटीस पाठवण्यासही सुरुवात केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवस मॉल बाहेर उभे राहून नागरिकांना पार्किंगचे पैसे भरू नका, असं आवाहनही केलं. शिवसेनेच्या या कृतीचं नागरिकांनी स्वागतही केलं. महापौरांच्या निर्णयांनतर नाशिककर समाधान व्यक्त करत होते. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. महापौरांनी घाईघाईत घेतलेल्या निर्णयाला सिटी सेंटर मॉल व्यवस्थापनाने आव्हान दिलं आहे. मनपाच्या नोटीसला उत्तर देताना कोणत्या कायद्याच्या आधारावर नोटीस पाठविली, असा जाबच प्रशासनाला त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता नाशिक मनपा प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. एकीकडे मनपा प्रशासन आणि मॉल्स चालक यांच्यात कायदेशीर लढाई सुरु झाली असताना शिवसेनेनंही यात उडी घेतली आहे. मोफत पार्किंगची तत्काळ अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनासमोर पेच प्रसंग निर्माण झाला आहे.
Diabetes Care Tips : मधुमेहाच्या रुग्णांना प्रत्येक ऋतूमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्यात शारीरिक निष्क्रियतेमुळे साखरेची पातळी वाढू लागते, तर उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे साखरेची पातळी वाढू लागते. म्हणूनच उन्हाळ्यात आहारात काही बदल करणे खूप गरजेचे आहे. उष्णतेचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा शारीरिक हालचाली वाढवा. दिवसाच्या सर्वात गरम वेळेत, विशेषतः सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत बाहेर पडणे टाळा. सक्रिय राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ३० मिनिटे चालणे, एकतर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान थंड असताना सक्रिय राहा. 2. फायबर-समृद्ध अन्न खाः भरपूर धान्याचा आहारात समावेश करा, कारण ते पचन कमी करण्यास मदत करतात, रक्तातील साखर अचानक वाढण्यास प्रतिबंध करतात. उच्च फायबरचा आहार वजन कमी करण्यास प्रोत्साहन देतो, ज्यामुळे मधुमेहाचे (Diabetes) चांगले व्यवस्थापन होऊ शकते आणि हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि काही प्रकारचे कर्करोग (Cancer) होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो. म्हणून, उन्हाळ्यात ओट्स, ब्राऊन राइस, संपूर्ण धान्य ब्रेड आणि तृणधान्ये तसेच फळे, नट, बिया आणि गाजर, टोमॅटो आणि इतर तंतुमय भाज्या आणि फळे खा. उन्हाळ्यात ताजेतवाने होण्यासाठी अनेकांनाज्यूस आणि स्मूदी पिणे आवडते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या पेयांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते आणि फायबरचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. तुम्हाला मधुमेह असल्यास, गोड रस पिणे टाळा किंवा ते कमी प्रमाणात पिणे चांगले. त्याऐवजी फळांचे सेवन करा. 4. हायड्रेटेड राहाः उच्च रक्तातील साखरेची पातळी असलेल्या लोकांमध्ये उन्हाळ्यात लघवी जास्त होते आणि घामही येतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये पाण्याची कमतरता जास्त दिसून येते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे साखर वाढते. मग शरीरातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड अधिक मेहनत करू शकतात. अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. भरपूर लिंबू पाणी प्या, याशिवाय तुम्ही ग्रीन टी, भाज्यांचा बनलेला ग्रीन ज्यूस प्या. दर दोन तासांनी साधे पाणी प्यावे. डिस्क्लेमरः सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
मुंबई - राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले यांनी सुद्धा तिखट प्रतिक्रिया दिली आहे,राज्यपालांनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता.
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून मागील सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. तसेच तत्कालीन सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचे सत्रच ठाकरे सरकारने सुरु केले आहे. यातच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केलेल्या समित्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विधानभवनात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीदरम्यान उदय सामंत म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या समित्यांवर सदस्य म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्ती ही केली जात असते. तर अशा समित्या या रद्द करण्यात याव्यात आणि नवीन अशासकीय सदस्य नियुक्त समित्या गठित करण्याचा प्रस्ताव तयार करावा असा आदेश उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच राज्यातील ग्रंथालयाची पडताळणी करुन नवीन अत्याधुनिक सुविधासह ग्रंथालये असावेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालय, विद्यापीठे यांच्या मैदानात विविध अतिक्रमणे केली जात आहेत. हे तातडीने थांबवण्यात यावे. तसेच ज्या महाविद्यालयांना, वसतिगृहांना ३० वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यांचे संरचनात्मक लेखा परिक्षण करण्यात यावे आणि विद्यापीठाने रिक्त पदांचा अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, अशा विविध सूचना देखील मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाचे कुलगुरू हे संघाच्या विचारांचे असल्याने अशा घडल्या. या घटना टाळायच्या असतील तर कुलगुरु आणि प्र कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. 'जेएनयूमध्ये जो प्रकार घडला त्यावेळी एबीव्हीपी आणि भाजपच्या गुंडांना नक्कीच तेथील विद्यापीठ प्रशासनाची मदत मिळाली असणार आहे. जेएनयूचे कुलकुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत. ' असा आरोप देशमुखांनी केला आहे. - दाढी करण्यासाठी 'रेझर' वापरताय? 'या' 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका ! - मुलांना कोणतं खेळणं देताय ? होऊ शकतात 'हे' 6 गंभीर धोके !
शासनाच्या सुस्त कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, केंद्रीय दक्षता आयोग आणि अन्य तपास यंत्रणांना सहसचिव पदावरील अधिकाऱ्यांचा चौकशी करण्याचे अधिकार देण्याबाबत काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशातील चूक तब्बल २० महिन्यांनंतर सुधारण्यात आली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास कण्यासाठी प्रणब मुखर्जी केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली एका मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती. या मंत्रिगटाने आपला अहवाल सरकारला सादर करताना, भ्रष्टाचाराची प्रकरणे निकाली काढताना सहसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांचा तपास करायचा झाल्यास त्यासाठी पंतप्रधानांची अनुमती घेण्यात यावी, असे नमूद केले होते. या सूचनेच्या आधीन राहत, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सप्टेंबर २०११ मध्ये जारी केलेल्या आदेशात मात्र 'सहसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची' असा उल्लेख करण्याऐवजी 'सहसचिव पदाहून वरिष्ठ असलेल्या पदांवरील अधिकाऱ्यांची' असा उल्लेख केला. त्यामुळे सहसचिव पदावरील अधिकाऱ्यांबाबत मंत्रिगटाने दिलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे पालन होऊ शकले नाही. सरकारी अध्यादेश काढताना झालेल्या या गोंधळामुळे, तपास करणाऱ्या सरकारी विभागांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागे. मात्र आता नव्या आदेशानुसार ही परवानगी देण्याचे सर्वाधिकार केवळ पंतप्रधान कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत, यामुळे अनेक प्रकरणांचा तपास करताना निश्चितच सुसूत्रता येईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला तपास प्रक्रियेत 'बाह्य़ प्रभावापासून मुक्त' ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे पी. चिदम्बरम यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने कोणते उपाय योजता येतील यावर बैठक घेतली होती. त्या वेळी ही बाब नजरेसमोर आली. मात्र सहसचिव पदावर असलेल्या व्यक्तीस तपासाच्या कक्षेत आणण्यास त्या वेळीसुद्धा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने विरोध दर्शविला होता.
मुंबई : मुंबईतून इंडोनेशियातील बालीमध्ये जाण्यासाठी थेट विमानसेवा शोधण्याची झटापट जवळपास दीड लाख लोकांनी केली. . . तर अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस या शहरांकरिताही मुंबईतून थेट विमानसेवा हवी, यासाठी सुमारे लाखभर प्रवाशांची शोधाशोध सुरू होती. . . इतकी मागणी असूनही या स्थळांना मुंबईतून थेट उड्डाणेच उपलब्ध नव्हती. जगभरातील अनेक स्थळांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात थेट उड्डाणाची मागणी असतानाही मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांतून हे रुट्स वंचितच राहिले आहेत, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्कायस्कॅनर या सर्च इंजिनतर्फे अलिकडेच ५ कोटी प्रवाशांच्या डेटाबेसमधून एक सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात बुकिंग करणारे प्रवासी कोणत्या रुटसाठी थेट विमानसेवेची विचारणा करतात, हे पाहिले गेले. त्यात बाली, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिसची मुंबईतून शोधाशोध सुरू होती. त्याचप्रमाणे दिल्लीहून न्यूझीलंडच्या ऑकलंडसाठी थेट विमानसेवा शोधणारे १. २० लाखांहून अधिक लोक आढळले. याच संस्थेने नाताळातील सहलीसाठी लोकप्रिय ठिकाणांविषयी सर्वेक्षण केले होते. त्यातही दिल्लीकरांमध्ये ऑकलंड हे वरच्या स्थानावर आढळले होते. मुंबईकरांमध्ये अमेरिकेच्या वेस्टकोस्टला थेट विमानसेवेने जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती. युरोपातील अनेक स्थळे आता भारताशी चांगल्या प्रकारे जोडली गेली असली, तरीही दिल्लीतून अॅथेन्स आणि बार्सिलोनाला जाण्यासाठी थेट उड्डाण उपलब्ध नव्हते. त्यासाठी ५० हजार जणांनी शोध घेतला होता. मुंबईतून जोहान्सबर्ग (८३ हजार), सिडनी (८२ हजार), मेलबर्न (८१ हजार), माले (७९ हजार) व दार-ए-सलाम (७८ हजार) या शहरांसाठीही थेट उड्डाणसेवेची शोधाशोध प्रवाशांनी केली होती. टूर व्यावसायिक राजेश रातेरिया यांनी सांगितले की, इंडोनेशियातील बाली हे ठिकाण परिषदा, मेडिकल-कॉन्फरन्स, पर्यटन, लग्नसमारंभ अशा विविध कारणांसाठी सध्या लोकप्रिय आहे. तेव्हा तेथे मागणी मोठी असते. एअर इंडिया, जेट यांनीही काही थेट उड्डाणे मुंबईऐवजी दिल्लीहून केली आहेत. इतकी मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले असेल, तर एअर इंडिया, जेट अशा कंपन्यांना लांब पल्ल्याची थेट उड्डाणे सुरू करण्यासाठी सरकारनेही पाठबळ द्यायला हवे. विमान कंपन्यांनीही अशा सर्वेक्षणावरून व्यवहार्यता तपासणी करायला हवी. हवाई वाहतूकतज्ज्ञ विंगकमांडर (निवृत्त) शशिकांत कोप्पीकर यांनी सांगितले की, थेट उड्डाणांना इंधनटाकी पूर्ण भरायची असल्याने सर्वच्या सर्व प्रवासी नेता येत नाहीत. शिवाय ७७७ सारखी लांब पल्ल्यासाठी वापरली जाणारी मोठी विमाने दोन शहरांमध्ये कमी अंतरासाठी फिरविणे इंधन तसेच तांत्रिक व्यवहार्यतेच्या दृष्टीने अयोग्य ठरते. त्यामुळेच नटक्रॅकर म्हणजे अडकित्त्यासारखे रुटप्लॅनिंग सयुक्तिक ठरते. जसे जाताना विमान मुंबईहून सॅनफ्रान्सिस्कोला जाईल व येताना ते दिल्लीत येईल. असे केल्यास थेट उड्डाणे व्यवहार्य ठरतील. बालीसारख्या ठिकाणाचा एअर इंडियाने नक्कीच विचार करावा. आसनसंख्या, इंधन व सामग्रीचा वापर या सर्वांचा अभ्यास निश्चितच करावा लागतो.
Daily Panchang : मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३, भारतीय सौर १८ माघ शके १९४४, माघ कृष्ण द्वितीया उत्तररात्री ४-२८ पर्यंत, चंद्रनक्षत्रः मघा सायं. ५-४४ पर्यंत, चंद्रराशीः सिंह, सूर्यनक्षत्रः धनिष्ठा, राष्ट्रीय मिती माघ १८, शक संवत १९४४, माघ कृष्ण, द्वितीया, मंगळवार, विक्रम संवत् २०७९, सौर माघ मास प्रविष्टे २५, रज्जब-१५, हिजरी १४४४(मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ७ फेब्रुवारी २०२३, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु. राहूकाळ दुपारी ३ वाजून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. द्वितीया तिथी दुसऱ्या दिवशी ४ वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. मघा नक्षत्र सायं ५ वाजून ४५ मिनिटे त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ. शोभन योग सायं ४ वाजून २ मिनिटे त्यानंतर अतिगण्ड योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी ३ वाजून २४ मिनिटे त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल. सूर्योदयः सकाळी ७-१२, सूर्यास्तः सायं. ६-३४, चंद्रोदय : रात्री ८-००, चंद्रास्तः सकाळी ८-१६, पूर्ण भरतीः दुपारी १२-५९ पाण्याची उंची ३. ८९ मीटर, उत्तररात्री १-३७ पाण्याची उंची ४. ४६ मीटर, पूर्ण ओहोटीः सकाळी ७-१० पाण्याची उंची १. ४८ मीटर, सायं. ६-४८ पाण्याची उंची ०. ८२ मीटर. (दामोदर सोमन) आजचा शुभ मुहूर्त : अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २५ मिनिटे ते ३ वाजून ९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून २ मिनिटे ते ६ वाजून २८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ५२ मिनिटापर्यंत. आजचा अशुभ मुहूर्त : राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १८ मिनिटे ते १० वाजून २ मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर मध्यरात्री ११ वाजून १७ मिनिटे ते १२ वाजून ९ मिनिटापर्यंत.
घरात एकटय़ाच राहणाःया अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून मानखुर्द पोलिसांनी गगनकुमार तिवारी (38) याला अटक केली आहे. मुंबईः घरात एकटय़ाच राहणाःया अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून मानखुर्द पोलिसांनी गगनकुमार तिवारी (38) याला अटक केली आहे. मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरात ही 16वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. मात्र वर्षभरापूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाल्याने घरात ही मुलगी आणि तिची चुलत बहीण राहत होती. याच दरम्यान तिचा मानलेला मामा त्यांच्याकडे दररोज येत असे. काकांची मुलगी घरात नसताना आरोपीने अनेकदा या मुलीला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. भीतीपोटी मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र काही दिवसांनंतर आरोपीने मुलगी राहत असलेले घरही त्याच्या नावावर करून घेतले. त्यानंतर पीडित मुलीसोबत राहणाःया तिच्या चुलत बहिणीलाही घराबाहेर काढले. त्यानंतर तोच या घरामध्ये राहू लागला. पीडित मुलीवर आरोपीकडून रोजच अत्याचार होत होते. त्याला विरोध केल्यास मुलीला मारहाण होत असे. अखेर या मुलीने काही महिलांना ही बाब सांगितली. त्यांनी मानखुर्द पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)
उत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल. ही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील. एखाद्या नवीन क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करायचे ठरवले तरी त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे कारण खर्च वाढेल आणि त्या खर्चाचे रूपांतर नंतर उत्पन्नात होण्याची शक्यता नाही. शत्रू समस्या निर्माण करतील आणि कायदेशीर संकटात सापडू शकाल. तुम्ही तुमच्या कामातच व्यस्त राहाल, तुमच्या बाह्यरूपातही स्थैर्य असाल. लघु मुदतीसाठी आर्थिक लाभ होऊ शकेल. मध्यम आणि दीर्घकालीन प्रकल्प सुरू करावेत. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबतची मैत्री फार सलोख्याची नसेल. झटपट पैसा कमविण्याच्या मार्गांची शहानिशा करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रियकर अथवी प्रेयसीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
नागपूर - चोऱ्या-लुटमाऱ्या करून गब्बर झालेला आणि नंतर अनेकांच्या मालमत्ता बळकावत सुटलेला कुख्यात गुन्हेगार राकेश डेकाटे तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध पुन्हा एका पीडिताने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. सिकंदरसिंग चंदनसिंग संधू (वय ४०) असे तक्रारदाराचे नाव असून ते शास्त्री ले-आऊटमध्ये राहतात. संधू यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी आरोपी राकेश डेकाटेकडून २ जानेवारी २०१० ला १० लाख रुपये व्याजाने घेतले होते. ठरलेल्या मुदतीत संधू यांनी डेकाटेला १४ लाख ९१ हजार रुपये परत केले. मात्र, अनाकलनीय पद्धतीने व्याज लावून राकेश, त्याचा भाऊ मुकेश डेकाटे आणि अन्य दोन साथीदारांनी त्यांना छत्रपती चाैकाजवळच्या पेट्रोल पंपावर बोलविले. संधू तेथे त्यांच्या कारने येताच आरोपी जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसले. त्यांना निर्जन ठिकाणी नेले आणि तेथे पुन्हा दोन साथीदारांना बोलावून संधू यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. व्याजाच्या पैशाची मागणी करून आरोपींनी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपवर तसेच टीटीओ फाॅर्मवर सह्या तसेच अंगठे घेतले. त्याआधारे संधू यांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेचे बनावट विक्रीपत्र तयार करून ते कोर्टात सादर केले. अशाप्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे आपली बाजू भक्कम झाल्याचा गैरसमज करून घेत आरोपी राकेश डेकाटे संधू यांच्या घरासमोर यायचा. त्यांना ५० लाख रुपयाची मागणी करायचा आणि ते दिले नाही तर तुझ्यासोबत तुझ्या परिवारालाही जीवे ठार मारू, अशी धमकी द्यायचा. राकेश डेकाटे आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे संधू यांनी तब्बल १० वर्षे आर्थिक नुकसान तसेच शारीरिक आणि मानसिक छळ सहन केला. आता मात्र गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्यामुळे संधू यांना हिंमत आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रतापनगर ठाण्यात आरोपी राकेश, मुकेश डेकाटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला. अत्यंत धूर्त आणि चालबाज असलेला राकेश डेकाटे हा गुन्हेगार कोणत्याही थराला जातो. दाणीच्या प्रकरणात पोलिसांनी आक्रमकता दाखविल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांच्या माध्यमातून कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. अशाप्रकारे पोलिसांवर दडपण आणून आपल्या पापाला झाकण्याचा डेकाटेचा डाव होता. मात्र, पोलिसांनी तो धुडकावून लावत त्याच्या पापाचा घडा फोडला.
ठाण्यातील ११० गुंतवणुकदारांनी दरमहा दोन टक्के व्याज मिळणार या हेतूने ठक्कर लक्ष्मीदास हरजीवनदास यांच्या योजनेमध्ये आयुष्यभराची कमाई गुंतविली होती. ठाणे : ठाण्यातील ११० गुंतवणुकदारांनी दरमहा दोन टक्के व्याज मिळणार या हेतूने ठक्कर लक्ष्मीदास हरजीवनदास यांच्या योजनेमध्ये आयुष्यभराची कमाई गुंतविली होती. परंतु या नागरीकांची घोर निराशा झाली. अखेर आता तब्बल १२ वर्षांनतर या नागरीकांना आपली गुंतविलेली रक्कम परत मिळणार आहे. त्यामुळे आता जेष्ठांचे दिवस सुखात जाणार असल्याचे चित्र आहे. बाजारपेठ रस्त्यावरील ठक्कर लक्ष्मीदास हरजीवनदास या किराणा मालाच्या दुकानाचे ठाण्यात बरेच नाव आहे. या दुकानाच्या मालकाने याच नावाचा फायदा उठवत एक योजना जाहीर केली. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर दरमहा २ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आपण आफ्रिकेला औषध निर्यात करत असून त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. जर या योजनेत पैसे गुंतवले तर त्यातून चांगले उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवत त्याने ज्येष्ठ नागरिकांना भुलवले. जे नागरिक निवृत्त होत आहेत किंवा निवृत्तीच्या वाटेवर आहेत अशांना त्यांनी आपल्या जाळ्यात ओढले. सुरूवातीला या गुंतवणूकीवर ज्येष्ठ नागरिकांना चांगले व्याज मिळाले. काहीवेळा तर ते अगदी घरपोच मिळाले. यातूनच या योजनेची हवा निर्माण झाली आणि निवृत्त झालेल्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेत आपले पैसे गुंतवले. कालांतराने या गुंतवणुकीतून मिळणारे व्याजही बंद झाले. शिवाय गुंतवलेली रक्कमही परत मिळेनाशी झाली. आपल्याला व्याजही मिळत नाही आणि गुंतवलेली रक्कमही परत मिळत नाही हे पाहून या गुंतवणुकदारांनी पोलीस आणि न्यायालयाची पायरी चढली. न्यायालयाने गुंतवणुकदाराचे पैसे परत देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने संबंधित संस्थेच्या मालमत्तेचा लिलाव करावा आणि त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे असे आदेश दिले. या आदेशानंतर मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्यातून साडेसात कोटी रूपये जमा झाले. (प्रतिनिधी)
केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना प्रस्थापितांच्या जाचातुन मुक्त करण्याचे काम केले आहे परंतु शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवणाऱ्या महाभकास आघाडी सरकारने अकारण अपप्रचार करत या विधेयकाला महाराष्ट्र राज्यात स्थगिती दिली आहे ही स्थगिती सरकारने उठवावी व कृषी विधेयक राज्यात लागू करावे यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, जिल्हा सचिव भाऊ नगरे, संघटन सरचिटणीस आप्पा गायकवाड, शहर उपाध्यक्ष राजेश कडु, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर टेकाळे, सहकोषाध्यक्ष संजय गवळी,मा. तालुकाध्यक्ष माऊली पेचे, गटनेते सचिनभाऊ नागपुरे, मा. सरपंच सतिषजी गायके, संदिपभाऊ आलवणे, प्रतापभाऊ चिंधे, अंबादास उंदरे, विशाल धनगर, दादा वाघ, आदिनाथ पटारे, प्रशांत बहिरट आदी उपस्थित होते.
भारतीय कसोटी संघाची (India Test Team) मधली फळी बर्याच काळापासून चर्चेत राहिली आहे. विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या बॅटच्या मौनाबद्दल लोक सतत बोलत असतात. तथापि, आणखी एक फलंदाज आहे ज्याने बऱ्याच काळापासून मोठी खेळी खेळली नाही आणि तो अत्यंत खराब फॉर्मशी झुंजत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या (South Africa Tour) चारही डावात युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) फ्लॉप ठरला पण त्याने ज्या प्रकारचे बेजबाबदार शॉट्स खेळले त्यामुळे तो अनेक क्रिकेट जाणकारांच्या निशाण्यावर आला आहे. इतकंच नाही तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही त्याच्यावर निराश दिले आणि आता केप टाउन कसोटीपूर्वी (Cape Town Test) पंतवर आपली प्रतिक्रिया देताना विराट कोहलीला माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) दिलेला एक सल्ला आठवला. (IND vs SA 3rd Test 2022: निर्णायक केप टाउन कसोटीतून मोहम्मद सिराजची एक्झिट, विराट कोहलीने डाया त्याचा फिटनेस अपडेट) विराट कोहलीने केप टाउन येथील तिसर्या कसोटीपूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांना संबोधिताना धोनीने त्याला दिलेला सल्ला आठवला जो त्याने भारताचा यष्टिरक्षक पंतलाही दिला. दुसऱ्या कसोटीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर बेजबाबदार शॉट खेळल्याबद्दल गेल्या आठवड्यात चर्चेत आला होता. "सरावात रिषभशी संवाद साधला. त्याने जबाबदारी घ्यायला हवी. आपल्या करिअरमध्ये आपण सर्वांनी चुका केल्या आहेत. एखाद्याला स्वतःची चूक समजली पाहिजे आणि सुधारणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची पुनरावृत्ती होणार नाही," विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले. "मला आठवते की एमएस धोनीने मला एकदा सांगितले होते की दोन चुकांमध्ये 6-7 महिन्यांचे अंतर असावे. अशा प्रकारे तुमची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रगती होईल. तो माझ्या व्यवस्थेचा एक भाग बनला. त्यामुळे तुमच्या चुकांवर चिंतन करणे महत्त्वाचे आहे आणि मला माहित आहे की रिषभ असे करतो आणि तो त्याच्या चुकांमधून शिकेल," कोहलीने शेवटच्या सामन्यात पंतच्या शॉट निवडीबद्दल बोलताना पुढे म्हटले.
पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत नाशिक महापालिकेने सिंहस्थनगरी प्रवेशद्वार आकर्षक दिसावे, यासाठी जनार्दन स्वामी आश्रमाकडून तपोवनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दगडी कमान उभारून कमानीवर २५ पितळी घंटा बसवून रामानंदाचार्य प्रवेशद्वार असे नामकरण केले होते. पण पालिकेने बसविलेल्या पितळी घंटांवर भुरट्या चोरट्यांची नजर पडली आणि चोरट्यांनी दोन पितळी घंटा चोरल्या होत्या. सव्वादोन वर्षांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वार कमानीवर बसविलेल्या दोन पितळी घंटांवर डल्ला मारल्याचे लक्षात येताच, ही बाब काही नागरिकांनी मनपाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन नवीन घंटा बसविण्याची मागणी करून निवेदन दिले होते. या प्रवेशद्वारावर पुन्हा नव्याने पितळी घंटा बसविण्यासाठी मोठा खर्च नसला तरी, पालिका प्रशासन नव्याने पितळी घंटा बसविण्यास उदासीनता दाखवत असल्याने तसेच सत्ताधारी लोकप्रतिनिधीदेखील या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने रामानंदाचार्य प्रवेशद्वारावर पितळी घंटा बसविण्यात याव्यात, यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. (फोटो ०३ घंटा)
जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. नाशिक - जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. पण, भारतीय जनता पक्षात कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, असे उदाहरणही महाजन यांनी यावेळी दिले. नाशिक येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी खडसेंना लक्ष्य केले. भाजपमधील ज्येष्ठ नेते आणी माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या अडगळीत पडल्याचे दिसून येते. तसेच पक्षाकडून सातत्त्याने त्यांना डावलण्यात येत असल्याचे दिसते. त्यातच, आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर तोफ डागली आहे. खडसेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना महाजन यांनी खडसेंना चांगलाचा टोला लगावला. जळगावमधील एका कार्यक्रमात खडसे यांनी ज्येष्ठतेनुसार आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे विधान केले होते. त्याविषयी महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी राजकारणात सर्वानाच मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हावेसे वाटते, असे सांगितले. भाजपमध्ये कोणत्याही पदनियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात आणि मंत्रिमंडळाबाहेर अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी खडसेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. दरम्यान, जळगाव महापालिका निकालातही एकनाथ खडसेंऐवजी गिरीश महाजन यांनाच किंगमेकर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये खडसेंची कोंडी होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.
फेंगशुई या शास्त्राला सर्व जगात मान्यता प्राप्त झाली आहे. फेंगशुईचा सरळ सोपा अर्थ आहे हवा व पाणी. हे शास्त्र लहरींवर, दिशांवर आणि 'जिनटी ऑफ लक' अर्थातच आपले जन्मजात लक, आपल्या कर्मातून प्राप्त होत असलेले लक यावर आधारित आहे. आयुष्यात खूप नकारात्मकता असेल तर ती लवकरात लवकर नाहीशी करण्याच्या प्रयत्नात कोणतेही चुकीचे पाउल उचलू नका. नकारात्मकता घालवण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, फेंगशुईचे हे उपाय करू शकता. ते खूप सोपे आहेत आणि हे उपाय केल्याने सर्व प्रकारची नकारात्मकता क्षणात नष्ट होते असे मानले जाते. फेंगशुईच्या मते, आयुष्यात नकारात्मकता असेल किंवा सतत एखाद्या गोष्टीबद्दल सदासर्वकाळ ताण-तणाव असेल तर झुंबर ( विंड चाईम)घरी घेऊन या. फक्त हवा खेळती राहील अशा ठिकाणी विंड चाईम लावले जाईल याची काळजी घ्या. असे म्हटले जाते की, जेव्हा हवा या विंड चाईमवर आदळते तेव्हा त्यातून निघणाऱ्या मधुर आवाजाने घरातील नकारात्मकता व ताण हळूहळू कमी होण्यास मदत होते. फेंगशुईच्या मते, घरात किंवा ऑफिसमधील वाळलेल्या वनस्पती काढून टाका. विशेषतः फ्लॉवरपॉट मध्ये असलेली अशी झाडे त्वरित काढा. त्याने नकारात्मक उर्जेत वाढ होते. जीवनात सकारात्मकता आणि आनंद वाढविण्यासाठी ताजी हिरवी वनस्पती, रोपं असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त घरात तीन मातीच्या भांड्यांमध्ये हिरव्या रोपांची लागवड करून ती भांडी पूर्वेकडील दिशेला ठेवा. असे केल्याने घरात सुख,समृद्धी,आनंद नांदेल. फेंगशुईच्या मान्यतेनुसार, जर जीवनात नकारात्मकता सतत वाढत असेल तर प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडेसे मीठ ठेवा. यानंतर दर दोन दिवसांनी मीठ बदला आणि बाहेर फेकून द्या. असे मानले जाते की, यामुळे नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. याशिवाय सिंगिंग बाउल, फू डॉग्स किंवा क्रिस्टल सिंगिंग बाऊल देखील ठेऊ शकता. यांचादेखील नकारात्मकता संपविण्यात उपयोग होतो.
भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंग दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच गीता बसराचा बेबी शॉवरचा कार्यक्रम साजरा केला गेला. हिनायासोबत गीता आणि हरभजन सिंग त्यांच्या बिल्डिंगच्या खाली दिसले. यादरम्यान, गीताने ग्रे रंगाच्या वन-पीस परिधान केला होता, तर हरभजन सिंगने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. बरीच वर्षे डेटिंग केल्यावर हरभजन आणि गीताने 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केलं.
मागील १५ वर्ष मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदकडून गोल्सचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सोमवारी आपल्या नवीन क्लबकडून पहिला गोल नोंदवला. मुंबई- मागील १५ वर्ष मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदकडून गोल्सचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सोमवारी आपल्या नवीन क्लबकडून पहिला गोल नोंदवला. युव्हेंटसच्या जर्सीत प्रथमच मैदानावर उतरलेल्या रोनाल्डोने तुरीन येथील ओल्ड लेडी मैदानावर व्हिल्लर पेरोसा 'ब' क्लबविरुद्ध सुरेख गोल केला. नव्या सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याचा सराव व्हाव म्हणून रोनाल्डो मैदानात उतरला होता. पदार्पणाच्या लढतीत रोनाल्डोला गोल करण्यासाठी केवळ आठ मिनिटाचा खेळ पुरेसा ठरला. मागील महिन्यात सीरि ए लीगच्यी विजेत्या युव्हेंटसने त्याला ८०० कोटी रुपयांत करारबद्ध केले. रेयालसोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून रोनाल्डो युव्हेंटसमध्ये दाखल झाला. रेयालच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. युव्हेंटसकडून रोनाल्डोने केलेला पहिला गोल पाहा. . 'सर्वकाही चांगले सुरू आहे. गोल केल्याचा आनंद आहेच. येथील चाहत्यांचा पाठिंबा पाहून मी थक्क झालो. मी लहान असल्यापासून या क्लबला फॉलो करतोय. तेव्हा या क्लबकडून खेळण्याचे पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे. जगातील मोठ्या क्लबकडून खेळण्याचा आनंदच निराळा आहे,'अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने दिली.
पोळी ही मुलींच्या शरीरावर सर्वात जास्त समस्या क्षेत्रांपैकी एक आहे, त्यामुळे घरी प्रेस कसे पंप करावे याचे विषय लोकप्रिय आहे. प्रशिक्षण प्रभावी होण्यासाठी, सर्व नियम हाताळणे आवश्यक आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्यायाम करण्याचा तंत्र जाणून घेणे. लक्षात ठेवा हे केवळ प्रेस करण्यासाठीच नव्हे तर योग्यरित्या खाण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, कारण हे न करता त्याचे परिणाम साध्य करणे शक्य होणार नाही. एखाद्या मुलीला घरात एक प्रेस पंप कसे करावे? सर्व विद्यमान नियमांनुसार खात्यात गृह मंत्रालयाचा विकास व्हायला हवा. - प्रशिक्षण सुरु केल्यानंतर फक्त एक तास खाल्यानंतर. हे महत्त्वाचे आहे की पोट रिकामी आहे कारण प्रेसवर व्यायाम करताना शरीराचा भाग ओढला जातो आणि मळमळ, छातीत जळजळ किंवा पोटदुखी होऊ शकते. अस्वस्थता झाल्यास, प्रशिक्षण थांबविले पाहिजे. सत्र दोन तास खाण्याची शिफारस केलेली नाही. - ही सराव सुरू होते, ज्यामुळे जखम होणे टाळले जाते आणि हे प्रशिक्षण प्रभावी देखील करते. हृदयाचे प्राधान्य देणे हे उत्तम आहे. प्रशिक्षण एक डाइंड सह समाप्त पाहिजे. - प्रत्येक व्यायाम 15-20 वेळा करा, 3 दृष्टिकोण करा जे दरम्यान एक लहान विश्रांतीची अनुमती आहे. - परिणाम प्राप्त करण्यासाठी, श्वसनकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. श्वास घेताना जास्तीतजास्त लोड करावा आणि विश्रांतीबद्दल श्वास घेण्यास सांगितले पाहिजे. आता आपण व्यायाम करू शकता, जे आज बरेच आहेत, म्हणून आपण त्यांचे सर्वात प्रभावी लक्ष केंद्रित करूया. घरी प्रेससाठी उत्तम व्यायामः - पाय वाढवण्याने वाकणे निम्न दाबाच्या स्नायूंवर भार टाकते. स्वतःला आपल्या मागे ठेवा आणि आपले हात पकडा, उदाहरणार्थ, टेबल किंवा सोफाच्या पाय वर आपले पाय थोड्याशी गुडघे टेकून उभे करा आणि जेव्हा ते उजव्या कोनातून मजल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आपण आपले पाय दिपवून, ओटीपोट वाढविण्याची गरज आहे. - लोअर आणि ऊपरी प्रेस दोन्ही लोड करण्यासाठी, खालील व्यायाम कराः आपल्या मागे बसून आपले पाय सरळ करा म्हणजे ते जमिनीवर लंब आहेत. हात देखील वाढविले पाहिजे जेणेकरून ते पाय समांतर असतील. लोड वाढवण्यासाठी आपण एक डंबेल वापरू शकता. व्यायामाचे कार्य शरीराच्या वरच्या भागाची वाढ करून पाय पर्यंत पोहोचणे आहे. - तिरकस स्नायू बाहेर काम न करता एक मुलगी घरी दाबा पटकन कार्य करणार नाही, अशा व्यायाम आपण कुरुप फाशी बाजूंना काढण्यासाठी परवानगी कारण. चांगले परिणाम व्यायाम "रशियन मोहीम" दिले जाते. गुडघे टेकून जमिनीवर बसून शरीराच्या वरच्या भागाला वळसा देणे आवश्यक आहे जेणेकरून तो मांडीच्या आकारात एक पत्र तयार करेल. स्थिर स्थान शोधणे महत्त्वाचे आहे. हातांनी तळवेस हाताने पुढे ढकलून घ्या किंवा पट्टीतून एक डंबेल किंवा पॅनकेक घ्या. हातावर समांतर असा हातात धरताना एका शरीरात एका दिशेत श्वास चालू. स्थान निश्चित केल्यानंतर, दुसऱ्या दिशेने फिरवा. - तसेच लोड प्रेस व्यायाम बार हाताने खोटे बोलणे घ्या, तर हात भिंतींवर कोळंबीने घट्ट व्हायला पाहिजेत आणि कडा घट्ट बसले पाहिजे. शरीराने सरळ रेष बनवा. प्रेस सतत सतत रहस्य ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे कमीतकमी अर्धा मिनिटासाठी स्थिर स्थान धरा. भार वाढविण्यासाठी एक पाय वाढवा.
कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) उद्या (बुधवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चकमदार कामगिरीची अपेक्षा आहे. कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) उद्या (बुधवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चकमदार कामगिरीची अपेक्षा आहे. नेतृत्वामध्ये बदल झाल्यामुळे कामगिरी सुधारली असल्याचे संकेत प्रतिस्पर्धी किंग्ज इलेव्हन संघाने दिले आहेत. त्यामुळे उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. जवळजवळ तीन आठवडे गृहमैदानापासून दूर असलेल्या, दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाने प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर आपल्या सातपैकी जवळजवळ सहा सामने खेळले असून, त्यांपैकी चार जिंकले आहेत. सोमवारी युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर केकेआर संघ ईडन गार्डन्सवर परतत आहे. कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज, जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव. किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, निखिल नाईक, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, अरमान जफर, प्रदीप साहू, निखिल नाईक, मनन वोरा व स्वप्निल सिंग.
श्रीनगर : अतिरेक्यांचे मृतदेह कुटुंबीयांना न सोपवण्याचा मोठा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यविधीसाठी सोपवले जात होते. अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी होते, प्रक्षोभक भाषणं होतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी पुरण्यात येणार आहेत. दहशतवाद्यांच्या भरती मोहिमेला आळा घालण्यासाठी लष्कराने हा निर्णय घेतला आहे. स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात. युवकांना अशा अंत्ययात्रेत जाण्यापासून रोखणे शक्य नसल्याने गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर लष्कराने हा निर्णय घेतला आहे. अंत्ययात्रेत सहभागी झालेले इतर दहशतवादी या अंत्ययात्रेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. सोशल मीडियावर अशा व्हीडीओंद्वारे तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आकर्षित केलं जातं. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र यासारख्या दहशतवादी संघटना दहशतवाद्यांच्या अत्ययांत्रेचा फायदा तरुणांना आकर्षित करण्यासाठी करतात. सोशल मीडियावर अंत्ययात्रांचे व्हीडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज व्हायरल केले जातात आणि यातून नवीन दहशतवादी तयार होतात.
मुंबई, 13 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आपली दोन मुले तैमूर अली खान आणि जेह (Taimur & Jeh) यांच्यासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. काही दिवसांपासून हे सर्वजण इंग्लंडमध्ये धम्माल करताना दिसून येत आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरून सतत तिच्या व्हेकेशनचे अपडेट्स फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर करत असते. दरम्यान अभिनेत्रीची नवी सोशल मीडिया पोस्ट प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये ती आपला मोठा मुलगा, तैमूरसोबत केनिंग्टन ओव्हल येथे भारत व्हर्सेस इंग्लंडचा सामना एन्जॉय करताना दिसत आहे. करिना कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. चाहते नेहमीच या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देताना दिसून येतात. दरम्यान बेबोने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती मोठा मुलगा तैमूरसोबत क्रिकेट स्टेडियमवर दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलंय, "माझा पहिला सामना. . . 'भारत विरुद्ध इंग्लंड'. " तत्पूर्वी करिनाने आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये करिना आणि सैफ आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत जेवणाचा आस्वाद घेताना दिसले होते. या दोघांनी लंडनमधील डॅफनेज रेस्टोरंटमधून हा फोटो शेअर केला होता. ( हे वाचाःसारा अली खानच्या 'डेटिंग प्रपोजल'वर साऊथ स्टार विजय देवरकोंडाने दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाला अभिनेता? ) यापूर्वी सारा अली खाननेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. यामध्ये सारा आणि इब्राहिम वडील सैफ आणि भाऊ जेहसोबत दिसून आले होते. ते दोघेही लंडनमध्येच होते. वास्तविक सारा आणि इब्राहिम सैफ आणि अमृताची मुले आहेत. तर तैमूर आणि जेह करिना आणि सैफची मुले आहेत. मात्र सावत्र भावंडे असूनदेखील त्यांच्यामध्ये प्रचंड प्रेम पाहायला मिळतं. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटलेले असेल, असे हवामान विभागाने सांगितले. हिंगोली : प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, २४ जून रोजी मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. दरम्यान, विजांचा कडकडाटही होईल, असा अंदाज परभणीच्या 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. २४ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटलेले असेल, असे हवामान विभागाने सांगितले. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २४ जून रोजी काही जिल्ह्यांत तर २५, २६, २७ जून रोजी बहुतांश जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात २३ ते २९ जूनदरम्यान पाऊस सरासरीएवढा व ३० जून ते ६ जुलैदरम्यान औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतही सरासरीएवढा तसेच इतर जिल्ह्यांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
एम्सच्या डॉक्टरांचा दावा; देशातील बहुतांश लोकांना भासणार नाही कोरोना लसीची गरज - Majha Paper\nएम्सच्या डॉक्टरांचा दावा; देशातील बहुतांश लोकांना भासणार नाही कोरोना लसीची गरज\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / एम्स, कोरोना प्रतिबंधक लस, डॉ. रणदिप गुलेरिया / November 15, 2020 November 15, 2020\nनवी दिल्ली - मागील आठ ते नऊ महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. त्यातच आता संपूर्ण जगभरातील लोकांचे कोरोना व्हायरसची लस कधी तयार होणार याकडे लक्ष आहे. संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या संक्रमणाबाबत तसेच लसीकरणाबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या पाहून देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल, असा दावा केला आहे.\nभारतातील इतर राज्यात दिल्लीप्रमाणेच वाढत जाणारे प्रदूषण, दिवाळीची एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांचा आकडा थंडीमुळे वेगाने वाढू शकतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी केलेला दावा हा दिलासादायक ठरत आहे.\nएम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाबाबत माहिती देताना सांगितले की, ज्या प्रकारचा ट्रेंड आपण पाहत आहोत. ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कदाचित कोरोनाचे स्वरुप बदलणार नाही.\nपुढे त्यांनी सांगितले की, आपण येत्या काळात अशा टप्प्यावर पोहोचू शकतो, जेथे देशातील नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती एवढी वाढू शकते की लसीची त्यांना गरज देखील भासेल की नाही याबाबत शंका आहे.\nकोरोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी घट ही दिलासादायक बाब आहे. पण येत्या काळात थंडीचा कडाका वाढला आणि प्रदूषण जास्त असेल तर कोरोनाचे विषाणू हवेत अधिक काळ जिवंत राहू शकतात आणि वेगाने पसरण्याचा धोका देखील आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही याचे भान नागरिकांनी ठेवायला हवे . सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर या गोष्टींचा वापर केला पाहिजे, असे मत यावेळी डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केले.
again the corona cases raised in Mumbai and adjoin area and todays Maharashtra tally goes on more than 8 thousand. नववर्षाचा अवधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून कालच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजाराने वाढ झाली आहे. तर मुंबईतील रूग्ण संख्येत जवळपास एक हजाराने वाढ होत ५५४३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात मुंबईसह राज्यात एकूण ८,०६७ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईसह एमएमआरमध्ये ६८६८ इतकी सर्वाधिक संख्या आढळून आली आहे. मुंबई उपनगरातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, पालघर, पनवेल, नवी मुंबई आणि ठाणेमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे. सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, आज राज्यात ४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत. वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी १ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळला आहे.
शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर मराठी सुपर हिट सैराट चित्रपटाच्या रिमेक 'धडक' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे जान्हवी आणि इशानने शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे फोटो प्रसिद्ध झाले असून व्ह्याराल होते आहेत. सकाळी चित्रपटाचा पहिला शॉट चित्रीत करण्यात आला आहे. पहिल्या फोटोमध्ये इशान आणि जान्हवी समुद्रकिनारी बसलेले दिसत असून त्यांच्या हातात 'धडक'चा बोर्डही आहे. सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत असून करण जोहर 'धडक'चा निर्माता आहे. नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक धडक सिनेमा असणार आहे. जान्हवी कपूर आर्ची तर इशान खट्टर परशाची भूमिका साकारट आहेत. 'सैराट' चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र 'धडक'ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे. आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची आई म्हणजेच श्रीदेवी साकारणार आहे. चित्रपट पूर्ण होवून हा चित्रपट 6 जुलै, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.
४४. अमर महात्मा तूं सत्य-अहिंसा-रत प्रतिगौतमबुद्ध तूं तनुवाङ्मनसा उदारचरित विशुद्ध तूं देव मानवांतला दुवा तुटलेला तूं भूतदयेचा झरा जिता फुटलेला ! तव जीवन म्हणजे सविनय सत्यप्रयोग नवमानवता मंगलतेस्तव तव 'योग' रे ! फोडलीस तूं तिच्यांतली तटबंदी ती तरीच वंदी तुला होउनी बंदी ! जग अवघें असतां युद्धाने उद्भ्रांत रक्ताचे ताज्या वाहत असतां पाट निःशस्त्र तूं परी अध्यात्मबलावरती - आणलीस घडवुन शांतिमयी उत्क्रांती ! नव हिंदराष्ट्र हें, याचा तूं निर्माता तूं सगासोयरा तूंच पिता तूं माता पाऊल टाकि हें तुझ्या पाउलावरती ने मागे मागे - यास धरी तूं हातीं ! बंदी - भाट ४५. तूं हास तूं हास तूं हास आणि जग हसेल सारें संगी रड, एकलाच बस रडत आपुल्या जागी जग जुनें तयाचें दुःख तेंच तें रोज म्हणुनीच सुखाचा तें घे अक्षय खोज. गा गाणें-होतिल प्रतिध्वनित गिरिगुंफा त्यज ऊन उसासे - हवेंत विरतिल वाफा जयघोषीं उठती सुसंबद्ध पडसाद पण चित्कारी ते पडती होउन रुद्ध. कर उत्सव - येइल जनता मागे मागें कर शोक आणि ती जाइल परती वेगें ती उत्सुक व्हाया आनंदीं सहभागी पण नको खेद तिज, ती नच मंद अभागी. अस प्रसन्न - जुळतिल भ॑वते मित्र असंख्य हो खिन्न - तोडतिल एक एक ते सख्य कुणि अव्हेरिल नच तुझा चहाचा प्याला पण तूंच उकळुनी पी काढ्याचा पाला. दे मेजवानि तू -- भरेल मंडप गच्च कर उपास तेथे शिरेल एकादाच यश मिळव स्वयें, दे इतरांना, जगशिल तुं पण सहाय कुणिहि न, कवळशील जर मृत्यू • खोज - शोध. ४६. दूरस्थ अपत्यांना बाळांनो ! तुमच्याशिवाय मजला वाटे इथे एकलें भासे कीं घर सर्व चोहिकडुनी खाया उठे आपुलें हे आहेत समोर ग्रंथ पडले - वाटे नको वाचन, ही सामग्रि समग्र सिद्ध असुनी - होई नको लेखन. आहे गाउनि बोलुनी रिझवितो हा सारखा रेडिओ कानांना अवधान या पण कुठे? कीं त्यास देतील 'ओ' व्हावें कार्यनिमग्न वेळ म्हणजे जाईल, ही भावना, पाणी सिंचित हिंडतों उपवनीं; छे ! जीव लागेचना ! तारे मोजित शून्यदृष्टि पडतों रात्रीं पलंगावरी केव्हा पापणि पापणीस मिळते, तेंही कळेना परी, नाहीं नीज निवांत, देह थकला राहे पडोनी, पण - नाहीं स्वस्थपणा, तुम्हांस बघतें स्वप्नांत वेडें मन. नाहीं भेटत जोंवरी मज तुम्ही प्रत्यक्ष सारेजण मी राहीन कसाबसा, पलिकडे लोटीन आला दिन. दूरस्थ अपत्यांना ४७. स्वतंत्र भारत [ आरंभी चंद्रकांत राजाची. शेवटीं अनुष्टुप ] स्वतंत्र भारत स्वतंत्र भारत स्वतंत्र भारत हा अनादि काळापासुन आहे जनसेवारत हा. धर्मजातिमतपंथ कुणाचा असो कोणताही उदारधी हा त्या सर्वांना समदृष्टी पाही. याजपाशिं नच विध्वंसक वा संहारक शस्त्रें मनास करतिल पथप्रदर्शन अशीं परी शास्त्रे. पूज्य आमुचा पितृदेश हा स्वर्गाहुन श्रेष्ठ इथे नांदले पुरा आमुचे ऋषी मुनी ज्येष्ठ भिनलें होतें रुधिरीं त्यांच्या पूर्ण सहिष्णुत्व मानवतेचे उपकर्ते ते ! हें त्यांचें तत्त्व;सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तुनिरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् काले वर्षतुं पर्जन्यः पृथिवी शस्यशालिनी विश्वोऽयं क्षोभरहितो मानवाः सन्तुनिर्भयाः ४८. ताजमहाल कोठे ती मुमताज आज अथवा कोठे शहाजाँह तो ? त्यांच्या नष्ट कलेवरावर स्मृतिप्रासाद हा शोभतो ! त्यांच्या पार्थिव जीवनास विरती येथे मिळाली खरी मागे त्यांतिल ही अपार्थिव कला आहे तगोनी परी ! छे ! - हा ताजमहाल ना ! विरह हा प्रत्यक्ष आहे उभा ! अनी निज सिंचिला नृपतिने याचा सदा पायवा ! काळा ! उज्ज्वल अश्रु हा जणु तुझ्या काळ्या कपोलावर ! किंवा उत्कट पावला प्रणय हा शिल्पांत रूपांतर ! शाहाच्या हृदयामधील अथवा ही चित्रशाळा दिसे ? श्रृंगारप्रियता तदीय अथवा आकारुनी ही बसे ? किंवा सुंदरता समोर उतरे ही काय मूर्तीमती ? दावी हातिं धरून स्वप्न उडतें वा मानवाची मती ? वा जी बीजच जीवसृष्टिस ! करी जी तन्विकासोन्नती ! - ती ही स्त्रीपुरुषांतली प्रकटली साक्षात् मनोज्ञा रती ? विरती - अखेर, अंत ४९. उमरखय्यामास तुज वेड लागले नव्हतें ना खय्यामा ? गणिलेंस कसे तूं कुंभाराला ब्रह्मा ? तो नदीकांठची घेउन ओली माती तिंबतो, लिंपतो, थापत बसतो हातीं घडवितो तिचे मग घट तो चाकावरतीं. ब्रह्मयाची म्हणुनी पावे का तो महती ? येती का त्याला त्यांत ओतितां प्राण ? कुंभार शेवटीं कुंभारच - ब्रह्मा न ! पण सृष्टीच्या या अखंड चक्रावरतीं निर्मितो क्षणोक्षणिं ब्रह्मा मानवमूर्ती त्या मूर्ती म्हणजे नसते केवळ माती त्यांच्यांत चिरंतन तो पाजळतो ज्योती पण कुंभाराचे घट मातीचे असती मातीत मिळति ते होते त्यांची माती ! तत्त्वज्ञ महाकवि ' म्हणति तुजला कोणी पण तत्त्व खरें नच येई त्यांच्या ध्यानीं त्वत्तत्त्व 'निराशा ' आधीं, अंतीं, मध्यीं तें सवंग, पोकळ पावे म्हणुन प्रसिद्धी !
भारतात Coronavirus च्या रुग्णांची संख्या दररोज नवा उच्चांक गाठतेय आणि महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरच्या तमीळनाडू राज्यापेक्षा महाराष्ट्रात जवळपास तिप्पट रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे पुणे जिल्ह्यात. पुण्यात उपचार सुरूदुसऱ्या क्रमांकावरच्या तमीळनाडू राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिपटीहून अधिक रुग्ण आहेत. 23 जुलैच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात 41357 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या(1,40,092) एक तृतीयांश रुग्ण पुण्यात आहेत. 23 जुलैच्या सरकारी आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत. राज्यातला पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडला होता. आता पुन्हा एकदा पुणे शहर आणि जिल्हा राज्यातच नाही तर देशभरातला चिंताजनक हॉटस्पॉट ठरला आहे. पुण्यात सात ते आठ दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाच्या कुटुंबाने अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं होतं. त्या रुग्णांचा काल दुर्दैवाने मृत्यू झाला. 23 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 44065 झाली आहे. 24 तासांतच 1599 रुग्णांची वाढ झाली आहे. 23 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात 24 तासांत 41 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. 589 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 82 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर पुण्यात उद्या दैनंदिन व्यवहार खुले होत आहेत. काही निर्बंध सुरूच असतील. 10 दिवस कडक लॉकडाऊन असूनही सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यापैकी शहरात एक्टिव्ह रुग्ण संख्या 17053 आहे. 23 जुलैच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असून त्यांची संख्या 41357 आहे. मुंबईत घरोघरी जाऊन केलेल्या स्क्रीनिंगमुळे आणि क्वारंटाईन केल्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूदरही आटोक्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने २२ जागीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे त्या सर्व जागांची मागणी केली आहे. नांदेड,बारामती, माढा या प्रमुख जागांची मागणी देखील वंचित आघडीने केली आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांची बारामतीची जागा शरद पवारांची माढ्याची जागा आणि अशोक चव्हाण यांची नांदेड येथील जागा वंचित बहुजन आघाडीने मागितली असल्याने त्यांच्या मागणीची पूर्तता काँग्रेस आघाडी करणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात चर्चा झाली असून काँग्रेस आघाडी कडून अशोक चव्हाण, विखे पाटील, जितेंद्र आव्हाड तर वंचित बहुजन आघाडीकडून लक्ष्मण माने हे चर्चेत सहभागी झाले होते. वंचितच्या या मागणी वरून काँग्रेस आघाडी सोबत वंचित आघाडी जाण्याच्या तयारीत नाही असेच चित्र सध्या दिसते आहे.
नाशिक : कॉलेजरोडवरील खुल्या जागेत पाळीव श्वानांसाठी उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी मांडण्यात आला परंतु ज्यांनी पेटपार्कसाठी शिफारस केली त्या स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर माघार घेतल्याने प्रस्ताव चर्चेपूर्वीच रद्द करण्यात आला. अॅड होक पार्क कमिटीचे डॉ. दिग्विजय पाटील आणि नेहा गुप्ता यांनी कॉलेजरोडवरील नंदन स्वीट्समोर असलेल्या खुल्या जागेत पाळीव श्वानांसाठी पेटपार्क विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांबद्दल जागृती व प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जाणार होता. सदर पेटपार्क कॉलेजरोडवरील उद्यानाच्या जागेत होण्याकरिता स्थानिक नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि छाया ठाकरे यांनी प्रशासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या महासभेत सदरचा प्रस्ताव मांडण्यात आला असता शिवाजी गांगुर्डे यांनी सभागृहात निवेदन करत सदर पेटपार्कला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने प्रस्ताव रद्द करण्याची विनंती केली. तसेच सदर पेटपार्कसाठी शहराच्या बाहेर कुठेतरी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची सूचनाही केली. शिवाजी गांगुर्डे यांनी घेतलेल्या या भूमिकेने सभागृहही अवाक झाले आणि शिफारस करणाऱ्यांनीच माघारीचा प्रस्ताव दिल्याने हास्याचे फवारे उडाले. पाळीव श्वानांसाठी स्वतंत्र उद्यानाचा प्रस्ताव पहिल्यांदाच नाशिक महापालिकेसमोर आला होता. सदर पेटपार्क कॉलेजरोडवर विकसित केला जाणार असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला. या पेटपार्कमुळे सार्वजनिक स्वच्छतेला व नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त करत स्थानिक नगरसेवकांना जाब विचारला. नागरिकांच्या तक्रारीनंतर गांगुर्डे आणि ठाकरे यांच्यावर सदरचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढवली.
अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय आंतरराष्ट्रीय क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट [The International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics, Hyderabad] हैदराबाद येथे संप्रेषण अधिकारी पदांची ०१ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान संप्रेषण मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम. ०२) विकास, संप्रेषण आणि माध्यमांमध्ये किमान ०५ वर्षांचा अनुभव. ०३) विज्ञान-आधारित कथा लिहिणे आणि वैज्ञानिक लेख, अहवाल आणि प्रकाशने संपादित करणे. ०४) संशोधन / ना-नफा संस्थेत पूर्वीचा अनुभव प्राधान्य : ०१) शेती आणि जैविक विज्ञानातील पार्श्वभूमी अत्यंत प्राधान्य. ०२) बहुसांस्कृतिक संघात काम करण्याचा अनुभव प्राधान्य दिले जाईल ०३) बहुभाषिक क्षमता, विशेषत : फ्रेंचमध्ये. नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगाना) वर्तमान भरती (येथे क्लिक करा) NMK (येथे क्लिक करा) © Maha NMK™ । Copyright 2015 - 2023 All Rights Reserved. Made with ❤ in India.
नागपूर - राज्यात आतापर्यंत कोरोनाचे नवीन २५४ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या आजारात बरे झालेले रुग्ण ९८ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. ते म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांत वाढ झालेली नाही. लसीकरण चांगले झाले आहे. सध्या सक्रीय रुग्ण १ सहस्र ९५० आहेत. सध्या सर्वत्र गर्दी होत आहे. राजकीय मेळावे होत आहेत. तरीही कोरोनाचे रुग्ण अपेक्षित वाढत नाहीत. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. चौथ्या लाटेची सुतराम शक्यता वाटत नाही; मात्र असे असले, तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
Crime News ( Image Source : Getty Images ) Crime News: आई होणं म्हणजे, बाईला मिळालेलं वरदान. पण एका आईनं केलेलं कृत्य अत्यंत धक्कादायक आहे. एका महिलेनं आपल्या घराच्या शौचालयात बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर पोटच्या बाळाचाच जीव घेतला आहे. ही घटना 22 एप्रिलची आहे. महिलेनं बाळाला जन्म दिला खरा, पण त्यानंतर बाळ रडू लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजानं महिला खूप घाबरली आणि महिलेनं कोणताही मागचा पुढचा विचार न करता बाळाला थेट शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिलं. घटना कोलकात्यातील (Kolkata Crime News) आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. आरोपी महिलेचं म्हणणं आहे की, तिला तिच्या गरोदरपणाची माहिती नव्हती. तिला नेहमीप्रमाणे मासिक पाळी येत होती. अशा परिस्थितीत जेव्हा ती शौचालयात गेली आणि तिनं अचानक बाळाला जन्म दिला, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. बाळ रडू लागलं, तिला काही सुचेनासं झालं. बाळाला पाहुन ती घाबरली आणि तिनं खिडकीची काच फोडली आणि नवजात बाळाला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडल्याचा आवाज आला. त्यावेळी शंका आल्यानं शेजाऱ्यांनी धाव घेतली. ज्यावेळी ते घटनास्थळी पोहोचले त्यावेळी जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत नवजात बाळ पडलेलं होतं. ते पाहून शेजाऱ्यांनी तात्काळा पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. तर दुसरीकडे महिलेला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. महिला आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, बाळाचा मृत्यू झाला होता. महिला मानसिक आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तसेच, तिच्या गरोदरपणाबद्दल कुटुंबातील कोणालाही माहिती नव्हती, अशी माहितीही पोलीस चौकशीतून समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिला जून 2022 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि नोव्हेंबरमध्ये तिचं लग्न झालं होतं. महिलेचा पतीही मद्यपी आहे. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून महिलेविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाच्या इतर बातम्या :
#DhirubhaiAmbani : यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा धीरुभाई अंबानींची ही ५ वचनं By ऑनलाइन लोकमत । Published: December 28, 2017 03:59 PM2017-12-28T15:59:05+5:302017-12-28T16:33:47+5:30 रिलायन्स इंडस्ट्रीचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी मोध यांच्या कूटुंबात झाला. त्यांचे खरे नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे होते. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त जाणून घेऊया या महान व्यक्तीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. आपल्या कामगिरीतून धीरुभाई अंबानींनी भारतीय उद्योगविश्वाचा चेहरा-मोहरा बदलला. पण सुरुवातीला ते गिरनार येथील पिलग्रीमजवळ भजी विकत असत आणि हीच त्यांची एक व्यावसायीक म्हणून विश्वात झालेली एंट्री होती. धीरुभाई अंबानी हे व्यक्तिमत्त्व सुशिक्षित नव्हतं तरीही त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचं विश्व निर्माण केलं. ते फक्त दहावी शिकले आणि मग येमेनला गेले. त्यांनी गॅस स्टेशन अटेंडंट म्हणूनही काम पाहिलंय आणि तेव्हा त्यांना ३०० रुपये पगार होता. त्यानंतर त्यांचा कोट्याधीश होण्याचा प्रवास सुरु झाला. १९५८ ला येमेनहून परतल्यावर त्यांनी चंपकलाल दमानी या आपल्या चुलत भावासोबत टेक्टाईल ट्रेडींग कंपनी सुरु केली. १९६० ला त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना केली आणि उद्योगविश्वात आपली सुरुवात केली. टॅग्स :आंतरराष्ट्रीयरिलायन्स कम्युनिकेशनरिलायन्स जिओInternationalReliance CommunicationsReliance Jioशेअर :
सकाळी 5. 30च्या दरम्यान दहशतवादी सैन्य दलाच्या मुख्यालयात घुसले. हेलिपॅड परिसरातून दहशतवादी मुख्यलयाच्या परिसरात दाखल झाले. श्रीनगरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या उरीमध्ये पुन्हा एकाद दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. हा हल्ला भारतीय सैन्य दलाच्या 12 ब्रिगेटच्या मुख्यालयावर झाला. हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांनी रशिया आणि अमेरिका दौरा रद्द केला. बुरहान वानी प्रकरणानंतर येथील परिस्थिती शांत होत नाही आहे. लष्कराने जी बंधनं घातलेली ती शिथिल करण्यास सुरुवात केली होती, मात्र या हल्ल्यानंतर पुन्हा बंधन येऊ शकतील.
म्हणतात ना, माणसांत पण देव असतो. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने अवघ्या जगाला हे दाखवून दिलं आहे. रिअल हिरोची उपाधी तो सार्थ ठरवतोय. लॉकडाऊनच्या काळात हजारो प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदचं मदत कार्य विविधप्रकारे सुरुच आहे. त्यामुळे तो आपसूकच चर्चेत येतो. त्याला प्रसिध्दीचा कुठलाही हव्यास नाही. तो मनापासून गरजूंची मदत करतो, हेच वेळोवेळी पाहायला मिळतं. अनेकांना रोजगार मिळवून देणं. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं ,अशा त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होते. . सोनूच्या कार्याचा गौरव अनेकप्रकारे झालेला पाहायला मिळाला. कुठे कोणी त्याचा पुतळा उभा केला तर कोणी वाळू शिल्प साकारत या रिअल हिरोला वंदन केलं. तर कोणी सोनूच्या नावावर दुकानाचं उद्घाटन केलं . आत्तासुध्दा सोनू सूदला एका एअरलाईन्स कंपनीकडून हटके अंदाजात सन्मानित करण्यात आलं आहे. स्पाईस जेट कंपनीने सोनू सूदच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्पाइजेट बोइंग 73वर सोनू सूदच्या चेहरा साकारला आहे. 'ए सैल्यूट टू द सेविअर सोनू सूद' असंही त्यावर लिहलं आहे.
Hardik Pandya - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने मंगळवारी सिडनी येथे झालेल्या सराव सत्रात भाग घेतला नाही. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते, असे मानले जात होते. सिडनीः भारतीय क्रिकेट संघ आता टी-२० विश्वचषकातील दुसरा गट सामना गुरुवारी नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे आणि हा सामना सिडनी येथे होणार आहे. या सामन्यासाठी संघ सिडनीमध्ये दाखल झाला आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मंगळवारी सिडनी क्रिकेट मैदानावर सराव सत्र निश्चित केले होते. टीम इंडियाचे अनेक खेळाडू या सराव सत्रात सहभागी झाले नाहीत. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे असे मानले जात होते की कदाचित त्याला नेदरलँड्सविरुद्धच्या अंतिम अकराच्या संघामध्ये संधी दिली जाणार नाही आणि तो विश्रांती घेईल. याबाबतची अपडेट आता समोर आली आहे. हार्दिक पंड्या नेदरलँड्सविरुद्ध खेळणार ? भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महाम्ब्रे यांनी हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त असून नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच या सामन्यात हार्दिक पांड्या खेळताना दिसणार आहे, ज्याने पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघासाठी जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या स्नायूंवर ताण पडत होता. सिडनीच्या मिक्स झोनमध्ये त्याला स्नायूंचा तीव्र ताण अजून जाणवत आहे का? असे विचारले असता तो म्हणाला, 'नाही, आता मला असे वाटत नाहीये. कारण मी याआधी टी-२० मध्ये धावून इतक्या धावा केल्या नाहीत. ' हार्दिक पांड्यानंतर आता गोलंदाजी प्रशिक्षकांनी तो पूर्णपणे तंदुरुस्त असून अंतिम अकराचा भाग असेल याची पुष्टी केली आहे. टीम इंडियाबद्दल बोलायचे तर या संघाने पाकिस्तानविरुद्धचा पहिला गट सामना ४ विकेटने जिंकला आणि संघ दोन गुण मिळवत पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ आता पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार असून या सामन्यात टीम इंडिया विजयाचा दावेदार मानला जात आहे. विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, पण रोहित शर्मा आणि केएल राहुलचा फॉर्म संघासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांनी गौरी लंकेश, डॉ दाभोलकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं. या हत्या प्रकरणात रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अशा विचारवंतांच्या हत्या म्हणजे सेक्युलरिझमवर हल्ला असल्याची टीका पवार यांनी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असं भाकीतही केलं. मात्र २०१९ मध्ये कोण पंतप्रधान होईल, या प्रश्नावर मात्र पवार यांनी ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील, त्यांचाच पंतप्रधान होईल अशा शब्दांत उत्तर दिलं. तसंच जनता सुज्ञ आहे. जनताच ठरवेल कोणी पंतप्रधान व्हावं असंही उत्तर पवार यांनी यावेळी दिलं.
राष्ट्रीय बातमीपत्र नऊ पंधरा दिनांक तीस नऊ दोन हजार वीस वार बुधवार एक अयोध्येतील वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त केल्याप्रकरणी सर्व बत्तीस आरोपी निर्दोष दोन सीमेलगतच्या वादग्रस्त भागातील सैन्य मागे घेण्याबाबत भारतचीन दरम्यान सहमती तीन ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओडिशामधील बालासोर इथं यशस्वी चाचणी चार प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवली आणि पाच हाथरस अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची विशेष समिती स्थापन बाबरी मशिद निकाल उत्तर प्रदेशातील बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज सर्व बत्तीस आरोपींना निर्दोष ठरवलं ही घटना पूर्वनियोजित नव्हती असं मत न्यायालयानं निकाल देताना व्यक्त केलं आरोपींविरुद्ध कोणताही निर्णायक पुरावा आढळला नाही असंही निकालात नमूद केलं आहे या प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती आणि कल्याण सिंग हे प्रमुख आरोपी होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या कारणामुळे हे सर्व नेते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत सहा डिसेंबर एक हजार नऊ शे ब्याण्णव रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी न्यायालयात सुरुवातीला एकोणपन्नास जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यातील सतरा जणांचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाल्यामुळे बत्तीस जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता बैठक भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती शांततापूर्ण ठेवण्याच्या दृष्टीनं सीमेलगतच्या वादग्रस्त भागातील सैन्य मागे घेण्याबाबत या दोन्ही देशांमध्ये आज सहमती झाली भारत आणि चीन सीमारेषेवरील तणाव निवळण्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून उभय देशांदरम्यान आज एकोणीस वी बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला भारतातर्फे पूर्व आशियाई विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव यामध्ये सहभागी झाले होते मॉस्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यान उभय देशांच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची बैठक झाली होती या बैठकीत मतैक्य झालेल्या परस्पर सामंजस्याच्या पाच मुद्द्यांवरील पुढील चर्चेच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची होती दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत आज सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थितीचं मूल्यांकन करून आढावा घेण्यात आला या महिन्याच्या एकवीस तारखेला पार पडलेल्या वरिष्ठ कमांडर पातळीवरील सहाव्या बैठकीत निश्चित केल्याप्रमाणे उभय देशांदरम्यान कोणतेही गैरसमज राहू नयेत आणि स्थैर्य कायम राहावे म्हणून प्रयत्न करण्यास आणि कमांडर पातळीवरील संवाद कायम राखण्यास उभय देशांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली असं आकाशवाणीच्या बीजिंगमधील प्रतिनिधीनं कळवलं आहे भारत बांग्लादेश भारत आणि बांग्लादेशनं उभय देशांदरम्यान सीमेवरील प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेण्यासाठी एक उच्च स्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे उभय देशांच्या संयुक्त सल्लागार आयोगाच्या काल दूरदृश्य पद्धतीने झालेल्या सहा व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला गुंतवणुकींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यावर विलंब होत असेल तर ते त्वरेनं मार्गी लावण्याचं आश्वासन भारतानं बांग्लादेशला दिलं आहे जपान जपानच्या संरक्षण मंत्रालय आत्तापर्यंतचा विक्रमी म्हणजे साडेपाच ट्रिलीयन येन अर्थात पंचावन्न बिलियन अमेरिकन डॉलर्स रकमेचा अर्थसंकल्प यंदा सादर करण्याच्या प्रयत्नात आहे आगामी काळातील सायबर आणि इतर बहिर्गत क्षेत्रातील हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या प्रतीकारासाठी अमेरिकन बनावटीची महागडी रडारपासूनही संरक्षण करणारी लढाऊ विमानं खरेदी करणं हा या मागचा मुख्य हेतू आहे जपानचे नवे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांच्या नेतृत्वाखाली सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून आज त्याचा प्रस्ताव जनतेसाठी खुला करण्यात आला दोन भूतपूर्व पंतप्रधान शिंझो अँबे यांची संरक्षणविषयक धोरणं अनुसरत तीच पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं जपान सरकारनं म्हटलं आहे राजनाथब्राम्होस जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्राची आज सकाळी ओडिशामधील बालासोर इथं यशस्वी चाचणी करण्यात आली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं हे क्षेपणास्त्र विकसित केलं असून यात स्वदेशी बुस्टर आणि एअरफ्रेम सेक्शन यासह स्वदेशी बनावटीच्या अनेक यंत्रणाचा समावेश आहे केंद्रीय संरक्षण मंत्रीराजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओच्या कर्मचाऱ्यांचं आणि ब्राम्होस तुकडीचं अभिनंदन केलं आजच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आत्मनिर्भर भारताचा संकल्प साकार करत शक्तिशाली ब्रह्मोस शस्त्रास्त्र प्रणालीसाठी स्वदेशी बूस्टर आणि इतर स्वदेशी घटकांच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं राजनाथ सिंह या वेळी म्हणाले मुदत केंद्र सरकारनं दोन लाख एक हजार नऊ शे वीस आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यासाठीची मुदत यंदाच्या तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे एरवी एकतीस मार्च असणारी ही मुदत कोविड19 मुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन तीस सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती मात्र अद्यापही कोविड19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नसून करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे हे लक्षात घेऊन ही मुदत पुन्हा वाढविण्यात आली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे परतावा दरम्यान गेल्या एक एप्रिलपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षातील आत्तापर्यंतच्या सहा महिन्यात प्राप्तीकर विभागानं तेहेतीस लाख चोपन्न हजार करदात्यांना एक लाख अठरा हजार तीनशे चोवीस कोटी रुपये परतावा म्हणून दिले आहेत परताव्याच्या एकूण रकमेपैकी शहाऐंशी हजार चौऱ्याण्णव कोटी रुपये इतकी रक्कम एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार व्यावसायिक करदात्यांना परत करण्यात आली असून उर्वरित बत्तीस हजार दोन शे तीस कोटी रुपये रक्कम एकतीस लाख पंच्याहत्तर हजार वैयक्तिक करदात्यांना परत करण्यात आली आहे खरीप आहे आत्तापर्यंत देशभरात खरीप महाराष्ट्रासह धान्यांची तमिळनाडूकिमान कर्नाटकआधारभूत तेलंगण किमतीला आणि खरेदी हरियाना करण्यास या केंद्र राज्यांमध्ये सरकारनं चौदा लाख वेगानं टनांहून प्रारंभ केला अधिक डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला हिरवा कंदील मिळाला असून खरेदीला सुरुवात झाली आहे खरीप हंगामातील तांदळाच्या खरेदीला पंजाब आणि हरियाना इथं गेल्या शनिवारपासून सुरुवात झाली असून हरियाणामध्ये तीन हजार पाचशे सहा टन तर पंजाबमध्ये सुमारे एक्केचाळीस हजार तीनशे टनपेक्षा अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे किमान आधारभूत किंमतीनुसार या तांदळाचं मूल्य चौऱ्याऐंशी कोटी साठ लाख रुपये आहे देशात कापसाच्या खरेदीला भारतीय कापूस महासंघाच्या माध्यमातून उद्यापासून प्रारंभ होईल असं केंद्रीय कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे सरकारनं आपल्या नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये तेहेतीस लाख रुपये किंमतीच्या सेहेचाळीस टन मुगाची खरेदीही नुकतीच केली आहे बिहारनिवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वातील पथकानं आज बिहारमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली पाटणा इथं झालेल्या बैठकीत सारण सिवान गोपालगंज आणि मुझफ्फरपुरसह सव्वीस जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याशी ही त्यांनी चर्चा केली संयुक्त जनता दलानं मतदारांना मतदान पत्रिका वितरीत करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगानं घ्यावी अशी मागणी केली काँग्रेसनं प्रत्येक दहा मतदान केंद्रांमाग एक वैदयकीय तपासणी दल तैनात करण्याची मागणी केली तर लोक जनशक्ती पक्षानं पंचायत निवडणुकांप्रमाणे मतदान केंद्र बनविण्याची मागणी केली उद्या गया इथं हे पथक बारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पोलीस तीन अधीक्षक यांच्याशी चर्चा करणार असून दिल्लीला परतण्यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव गृह विभागाचे सचिव आणि पोलीस महासंचालकासमवेत चर्चा करणार आहे फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा यांनी आज हा निर्णय जाहीर केला बिहारमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर तीन नोव्हेंबर आणि सात नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत टाळेबंदी शिथिल प्रतिबंधीत क्षेत्रे वगळता इतर भागातील आणखी काही दैनंदिन व्यवहार उद्यापासून सुरूकरण्याबाबत गृहमंत्रालयानं आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत अनलॉकपाच अंतर्गतदेण्यात आलेल्या या सुचना उद्यापासून लागू होणार असून यामध्ये शाळा प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पंधरा ऑक्टोबर नंतर यांचा आढावा टप्प्याटप्प्यानं घेऊन निर्णय याबाबत घेण्याची निर्णय मुभा घेण्याच्या देण्यात सुचना आली देण्यात आहे शाळाआल्या आहेतसंस्थामध्ये पालकांनी केली जाणारी लेखी परवानगी व्यवस्था दिल्यानंतरच परीस्थिती विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार आहे ऑनलाईन दूरशिक्षण या सुरूचराहणार आहे यामध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळून अन्य भागातील चित्रपटगृहे मल्टीप्लेक्स पंधरा ऑक्टोबरपासून पन्नास टक्के क्षमतेनं सुरू करता येणार आहेत याबाबत आणखी सविस्तर सुचनामाहिती आणि प्रसारण मंत्रालय जारी करणार आहे खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी जलतरण तलाव खुले करण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतीतल्या सुचना क्रीडामंत्रालय जारी करेल असं गृहमंत्रालयान म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्रात एकतीस ऑक्टोबरपर्यंत टाळेबंदी लागूच राहणार असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे गोयल मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेसेवा अधिक गतीनं सुरू करण्याच्या दृष्टीनं उद्यापासून मध्यरेल्वेच्या वतीनं आणखी आठ लोकल रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार आहेत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज ट्वीटद्वारे ही माहिती दिली यातील दोन गाड्या फक्त महिलांसाठी असून याद्वारे वाहतूक यंत्रणेवर ताण येणार नाही आणि सर्व पर्यटकांना कोविड19 मध्यरेल्वेतर्फे प्रतीबंधासाठीच्या सध्या चार शे तेवीस सुरक्षित रेल्वे अंतरासारख्या गाड्या चालविण्यात मार्गदर्शक येत सूचनांचं असून या पालन नव्या करणं आठ शक्य गाड्यांमुळे होईल ही असं संख्या गोयल चार शे एकतीस यांनी वर जाणार म्हटलं आहेआहे कोविड देशातकोविड एकोणीस च्या बाधित रुग्णांची संख्या बरेहोणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कमी होत असून सध्याएकूण कोरोनाबाधीतांच्या संख्येच्या पंधरा टक्के रुग्ण उपचार घेत आहेत हा आकडा नऊ लाख चाळीस हजार चार शे एक्केचाळीस आहे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येची टक्केवारी एक ऑगस्ट रोजी तेहेतीस पूर्णांक बत्तीस शतांश टक्के होती ती तीस सप्टेंबर अखेर पंधरा पूर्नाक अकरा शतांश टक्क्यांवर आली आहे गेल्या दोन महिन्यात हे प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक कमी झालं आहे देशातील कोविड19 चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता त्र्याऐंशी पूर्णांक तेहेतीस शतांश टक्के झाला आहे आतापर्यंत एक्कावन्न लाख सत्त्याऐंशी हजार आठ शे पंचवीस रुग्ण बरे झाले आहेत बरे झालेले रुग्ण आणि उपचार घेणारे रुग्ण यांच्या संख्येतील फरक दिवसेंदिवस वाढतअसून सध्या हा फरक बेचाळीस लाखांचा आहे काल ऐंशी हजार चार शे बाहत्तर नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली त्यामुळे कोरोना बाधितांची एकंदर संख्या बासष्ठ लाख पंचवीस हजार सात शे त्रेसष्ठ झाली आहे तर कालच्या दिवसात एक हजार शंभर एकोण ऐंशी रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या सत्त्याण्णव हजार चार शे सत्त्याण्णव झाली आहे दरम्यान कोविड एकोणीस च्या एकूणरुग्णसंख्येपैकी शहात्तर टक्के रुग्ण महाराष्ट्र कर्नाटक केरळ आंध्रप्रदेश उत्तरप्रदेश60 हजार तामिळनाडूरुग्ण उपचार ओडिशा घेतआहेतआसाम छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यामध्ये आहेत महाराष्ट्रात तब्बल दोन लाख चार कोविड आकडेवारी आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोविड एकोणीस आजारातून बरे झालेल्या रुग्णांची देशातली एकंदर संख्या आता एक्कावन्न लाख सत्त्याऐंशी हजार आठ शे पंचवीस झाली आहे त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दरही त्र्याऐंशी पूर्णांक तेहेतीस शतांश टक्के झाला आहे काल ऐंशी हजार चार शे बाहत्तर नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यामुळे कोरोनाबाधितांची एकंदर संख्या बासष्ठ लाख पंचवीस हजार सात शे त्रेसष्ठ झाली आहे तर कालच्या दिवसात एक हजार शंभर एकोण ऐंशी रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या सत्त्याण्णव हजार चार शे सत्त्याण्णव झाली आहे देशात सध्या नऊ लाख चाळीस हजार चार शे एक्केचाळीस कोविड एकोणीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत एम्सकोरोना कोविड एकोणीस ची पुन्हा लागण झालेल्या रुग्णामुळेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असं एम्सरुग्णालयाच्या संधीवात विभागाच्या प्रमुख डॉ उमा कुमार यांनी म्हटलं आहे काहीराज्यातून असे अहवाल प्राप्त झाले आहेत पण याचे प्रमाण अत्यल्प आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी शारीरिक अंतर राखणं तीन हातांची स्वच्छता करणं अत्यावश्यक आहे असंही त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं हाथरस उत्तरप्रदेशमधील हाथरस अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यशासनानं तीन सदस्यांची एक विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे या विशेष समितीचे नेतृत्त्व राज्याचे गृह सचिव भगवान स्वरूप करणार असून उपमहानिरीक्षक चंद्रप्रकाश आणि पीएसी सेनाप्रमुख पूनम हे सदस्य आहेत येत्या आठवड्यात या समितीला अहवाल सादर करायचा आहे या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून जलदगती न्यायालयात हाखटला चालणार आहे घेतली तिच्या दरम्यान वडीलांनी उत्तरप्रदेशचे दोषींना मुख्यमंत्री कठोरातकठोर योगी शिक्षा आदित्यनाथ व्हावी यांनी अशी मागणी याप्रकरणातील केली आहेपिडीत यावर मुलीच्या मुख्यमंत्र्यांनी वडीलांची दोषींवर भेट कठोरातकठोर कारवाई करण्याचं तसंच पीडीतेच्या कुटुंबाला सर्व ती मदत करण्याची ग्वाहीदिली पीडीतेच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा सरकारनं केली असून दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीसुचना दिली उत्तरप्रदेश पोलसांनी पीडीतेच्या पार्थिव देहावर कुटुंबीयांना कल्पनान देता अंत्यसंस्कार केल्याचा आरोप फेटाळला आहे चौदा सप्टेंबर रोजी या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता उपचारादरम्यान तिचा मंगळवारी मृत्यू झाला
महाराष्ट्रात कांदा खरेदी आणि त्याच्या दरावरून सध्या मोठे वादळ सुरू आहे. विधानसभेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधकांनी सत्ताधारांना चांगलेच धारेवर धरत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. तत्पुर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, राज्यात विविध ठिकाणी शेतकरी मोफत कांदा वाटप किंवा कांद्याचे पिक जाळून अथवा ट्रॅक्टरने नांगरून टाकत आहेत. कांद्याचे भाव घसरल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाद्वारे 'कांदे' पाठवले आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने हे 'कांदे' पाठवले आहेत. सरकारला कांद्याला भाव देता येत नसेल तर शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले. दरम्यान, नाशिकच्या येवला तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने उद्विग्न होऊन आपल्या शेतात कांद्याची होळी केली. तसेच, अहमदनगरच्या बाजारपेठेत एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोन रुपये किलोचा भाव मिळाला. 17 गोण्या कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती केवळ एक रुपया पडला. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी या प्रश्नावरून रान उठवले आहे. शेतकरी संकटात असताना सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले. यावर, सरकारने कांदा खरेदीला सुरूवात केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
घरि नसणे बसणे पार्थ रथी चाकरसे कामाला ।। २ ।। यवन कबीर नामें महा साधू विणिला त्याचा शेला ॥ ३ ॥ दीनवत्सल नामास्तव जातो काय वदावें तुला ॥ 8 ॥ राजाराम लीन प्रासादिक मनिचा संशय गेला ।। बोला हो० ॥ ५ ॥ सुजनता घरी सुजनता घरी रे कांहीं तरी सुजनता घरी धरों ।। ध्रु० ॥ ह्मणती तुजला या गोकुळंचा निजजनिता चौधरी ॥ १ ॥ ह्मणती गोपी सोडुनि शिशुपण दास जना उद्धरी ॥ २ ॥ राजाराम लीन प्रासादिक उतरी भवसागरीं ॥ ३ ॥ उत्तररागिणी नादरदरदीं तथ तथ ना या चालीवर. नमितसें रमेऽब्धि-कन्ये वैष्णवि होसिल काय मूकसम घड घड घड घड घड घड घड घड बोलुनी सुखी कर ॥ ध्रु०॥ कर घर हर शिव की मत्कर अघ जो वरी नसे यमप्रदर्शन जाहल्यावर नर सुर जनजननी कराल काय घराल काय हराल काय ॥१॥ करघृत खेटक मातुलिंग सत्पानपात्र पारदे भवाचल गड गड गड गड गड गड गड गड कोसळे समुद्धर ।। २ ।। राजारामी रत प्रासादिक देह हा नसेचि यास्तव अंतक कड कड कड कड कड कड कड कड खात दांत मजवर ।। नमितासे ३ काय मनाला सं• या चालीवर. अहा हरि हा काय घरिसि कर गौळणी बहुजणि असतां रे ॥ भु० ॥ कुंजवनीं गोपिकां सहित मी चुकवाने तुजला फिरतें रे । कोठुाने येथे कसा अलासी अपराध हि तिळ नसतां रे ॥ १ ॥ बोल तरि शिण होतो सखया नख या दृष्टि न पडतें रे । दडते जरिपरि घडतें पाप अणिक तुम्ही हसतां रे ॥ २ ॥ सदय विभू कळवळला तेव्हां कर जोडुनि वंदितसे ती रे । राजाराम लीन प्रासादिक हर्ष मनीं पद ठसतां रे ॥ ३ ॥ पद १५. प्रीति धरी हरि या चालीवरें. हा भवसिंधु तरावा । मानवा राम मुखी गावा ॥ ध्रु० ।। गणिका-गेही लंपट होसी । किति तरी फजित करावा ॥ १ ॥