text
large_string
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - `विमानातून दिसणारे आपले पिंपरी चिंचवड शहर, नाशिकफाटा उड्डाण पूल व मेट्रो स्टेशन कासारवाडी`, या आमदार महेश लांडगे यांच्या फेसबूक अकौंटवरील फोटोवर तब्बल १३४ नागरिकांनी टीकात्मक कमेंट्स केल्या आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांवर असंख्य नागरिकांनीच टीकेचा भडिमार केला आहे. `शेवटी अजितदादांनी केलेली कामेच भाजपा आमदारांना विमानातून दाखवावे लागत आहे..., तुम्ही (भाजपाने) पाच वर्षांत काय केले ते सांगा...,अजितदादांनी एखादी वस्ती, गाव किंवा तालुका नाही तर आख्खे महानगर उभे केलेय..तुमच्या फडणवीस यांना हे नेऊन दाखवा...अशा अत्यंत शेलक्या प्रतिक्रीया या पोस्टवर आल्याने ती पोस्ट आता चर्चेचा विषय ठरतीये.. आमदार महेश लांडगे यांच्या फेसबूक पोस्टवर विमानातून दिसणाऱ्या नाशिकफाटा उड्डाण पुलाचे तसेच मेट्रो स्टेशनचे विहंगम मनमोहक दृष्य या फोटोत दिसते. मेट्रो स्टेशन, नाशिकफाटा उड्डाण पूल, प्रशस्त मगामार्ग हे सर्व भाजपाचेच काम असल्यासारखे या फोटोतून ध्वनीत करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, नागरिकांनी या फोटोवरून भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा यथेच्छ समाचार घेतला आहे. कमेंट्स करणारे कोणीही एखाद्या राजकिय पक्षाचे डमी अकौंट होल्डर नाहीत, तर शहरातील सामान्य नागरिक आहेत. त्यातून भाजपा विरोधातील लोकभावना दिसून येत असल्याची चर्चा आहे. कमेंट्स करणाऱ्यांच्या काही शेलक्या कमेंट्स पुढीलप्रमाणे आहेत - फोटोत दिसणारे अजितदादांचे हे काम आहे..., दूरदृष्टी असलेला कृतिशील विचारांचा गतीशील नेता म्हणजे अजितदादा..., अजितदादांनी एक वस्ती, गाव, तालुका नाही तर आख्खे महानगर उभे केलेय...,पण हे सगळे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांचे आहे, तुमचे (भाजपा) काय ते सांगा की..., अजितदादांनी पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय... शेवटी अजित पवार यांनी केलेले कामच दाखवावे लागते ना...,अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडाल स्मार्ट सिटी कसे बनवले हे विमानातून दाखवताना भाजपाचे आमदार..., आज सगळ्या कमेंटस् बोलत आहेत, अजितदादा..., आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या फेसबूकवर भाजपाने केलेले काम सांगावे..., अजितदादा विकासाचा महामेरू, तुमच्या फडणवीसांना दाखवा की अजितदादांनी केलेले काम आहे..., आमदारसाहेब, एकदा कार्यकर्त्यांची विमानातून ट्रीप होऊन जाऊ द्या..., हवेत रहा महेश लांडगे..., विकासाचे शिल्पकार अजितदादा..., सर्व क्रेडीट अजितदादांचे... अहो पाच वर्षआंत भाजपाने केलेले काम दाखवा..., शेवटी अजितदादांनी केलेली कामे दाखवली...तुमचे नविन काम काय ते सांगा...,स्मार्ट सिटीचे जनक अजित पवार...,रोखठोक अजितदादा अशा प्रकारच्या कमेंट्स यावेळी दिसून आल्या ..
Share Market Today - जागतीक बाजारातून संमिश्र सकेत आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा आल्या. बाजार बंद होताना निर्देशांक कमी अधिक प्रमाणात कालच्या पातळीवर स्थिर राहीले. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 24 अंकांनी म्हणजे 0. 05 टक्क्यांनी कमी होऊन 49,492 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मात्र 1 अंकाने वाढून 14,564 अंकांवर बंद झाला. रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याचे म्हटले आहे. त्यातच जागतीक बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर काही गुतवणूकारांनी नफा काढून घेतला तर काही गुंतवणूकदारानी खरेदी केली. त्यामुळे निर्देशांक स्थिर राहीले. महिंद्रा, स्टेट बॅक, आयटीसी, एनटीपीसी, एअरटेल ओएनजीसी या कंपन्याच्या शेअरची खरेदी झाली. तर बजाज फायनान्स, टायटन, सनफार्मा या कंपन्याच्या शेअरची विक्री झाली. काल सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ किमतीवर आधारीत महागाई कमी झाली आहे. मात्र औद्योगीक उत्पादन वाढताना दिसत नाही. भारताची अर्थव्यवस्था मजबुत असल्याची लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना भारत आकर्षक वाटत आहे. त्यामुळे निर्देशांक आगेकूच करतील किंवा स्थिर राहण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते.
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) प्रथम सौ. रणदिवे.... पृ. शी. : किमान वेतन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक. L. C. BILL NO. VI OF 2010 क्रमांक 6 मांडतो. ( A BILL FURTHER TO AMEND THE MINIMUM WAGES ACT, 1948, IN ITS APPLICATION TO THE STATE OF MAHARASHTRA.) श्री. पद्माकर वळवी ( कामगार राज्यमंत्री ) : सभापती महोदय, सन 2010 चे विधानपरिषद विधेयक क्रमांक 6 किमान वेतन अधिनियम, 1948, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यासाठी मी सभागृहाची अनुमती मागतो. प्रश्न मतास टाकून संमत झाला. उपसभापती : अनुमती देण्यात आली आहे. श्री. पद्माकर वळवी : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2010 चाही साठ उपसभापती : विधेयक मांडण्यात आले आहे. असुधारित प्रत / प्र चे वि. प. वि.
अॅपरस, अवंत आणि डरिएरे, देवत या फ्रेंच पूर्वभाषा दरम्यान अर्थ आणि फरक काय आहेत आणि ते उपयोजक द्वारे त्यानंतर आहेत? फोटो घाला, आपल्या लहान पिशव्या, आणि देवत केमिली. मी नेहमीच ऐकत असलेले एक अपूर्ण आहे अपरेश क्वेंक + फ्रेंच लोकांमध्येही ही एक सामान्य चूक आहे, कारण प्रामाणिकपणे, तेथे ध्वनी भयानक आहेत. Avant que उपनियंत्रकांद्वारे अनुसरण केले जाते कारण कारवाई वास्तविकता बनली आहे किंवा नाही हे आम्हाला अद्याप माहित नाही अॅपेरस सह, आधीच कारवाई झाली आहेः यात काहीच शंका नाही, त्यामुळे उपयोजकांची आवश्यकता नाही. अॅप्रर्शस- अर्धवट शब्द एखाद्या फ्रेंच कानापर्यंत इतके खराब होतात की आपण नंतर क्रियापद ऐवजी संज्ञा वापरण्याचा प्रयत्न करू. आपण समान युक्ती "avant que" सह वापरु शकता आणि उपयोजक वापरून टाळा. आपण या आवृत्तीवर परत कधीही स्विच करू शकता. (किंवा अपर्स मुलगा डिपार्ट) या कामात सहभागी होण्याआधी (किंवा अवांत मुलगा डेपार्ट) तसे, जरी आपण फ्रेंचमध्ये "ले डर्रेरे" वापरत असलो तरीही (जरी हे इंग्रजी भाषेत "मागे" म्हणण्यासारखे अत्यंत विनयशील आहे), फ्रेंच लोक "विनाअॅरेरे" असे शब्द वापरत नाहीत. फक्त इंग्रजीमध्येच आपण "मागे" वापरतो त्याशिवाय शरीरशास्त्रातील त्या भागाचा विचार न करता.
कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक बड्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना आणि अनेक नेत्यांना ईडीमुळे जेलमध्ये जावे लागले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेलाच ईडी चौकशी लाऊ अशी धमक दिल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप होण्याची शक्यता वर्तवत ज्यांनी पैसे घेतले त्याच्याविरोधात ईडी चौकशी लागू शकते असा इशारा दिला आहे. (Chandrakant Patil said Congress is using digital payment mode to bribe voters) कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवर सध्या महाराष्ट्रातील तमामा जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. येथे काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले असून आरोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी झाडल्या जात असून या प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आज पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापूरच्या मतदारांना पैसे दिले जाणार असून त्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत आपण ईडीला पत्र पाठवले असून जो पैसे वाटणार आणि जो घेणार त्याची चौकशी करावी अशी विनंती केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मतदारामागे ईडीची चौकशी लागेल असा इशाराच पाटील यांनी दिला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून एका शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना घरोघरी फिरुन एक फॉर्म भरुन घेताना पाहत आहे. त्यात नावं, वय, फोन नंबर, बँक अकाऊंट नंबर याची माहिती घेतली जात आहे. अशी माहिती कोण कशासाठी गोळा करत आहे? त्यावर आयोगाने (Election Commission) चौकशी करुन कारवाई करायला हवी. पण आता माझ्याकडे याची पक्की माहिती आली असून ही माहिती पेटीएमच्या (Paytm) माध्यमातून मतदारांना (voters) पैसे पाठविण्यासाठी घेतली जात आहे. त्यामुळे मी नागरीकांना सावध करत आहे. आम्ही ईडीला पत्र पाठवले असून जो पैसे वाटणार आणि जो घेणार त्याची चौकशी करावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावर १००० रुपये किंवा प्रतिव्यक्ती १००० रुपये आले तर त्यांची उत्तर तुम्हाला ईडीला द्यावी लागतील. त्यामुळे १ हजार रुपयांच्या मोहापायी नागरिकांनीही ईडी (ED) चौकशीचा शुक्लकाष्ठ मागे लावून घेवू नये असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
मुंबई, दि. ७ (पीसीबी) : मराठी कला विश्वात सिनेमा आणि नाटक याप्रकारांमध्ये गेली ३९ वर्षे कार्यरत असणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांच्या १२५०० व्या नाट्य प्रयोगाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह विविध कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामले यांनी त्याच्या कारकिर्दीतील १२५०० वा प्रयोग मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात सादर केला. प्रशांत दामले यांना भारतीय सिनेमाचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांना खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन काय म्हणाले ? प्रशांत दामले यांचा १२५०० प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. ३९ वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी 'एका लग्नाची गोष्ट' या १००० व्या प्रयोगाला गेलो होतो. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!,असं अमिताभ बच्चन म्हणाले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांच्या १२५०० व्या नाट्य प्रयोगाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना जुनी आठवण सांगितली. तुमच्या एका लग्नाची गोष्ट या नाटकाच्या १००० व्या प्रयोगाला मी उपस्थित होतो, असं ते म्हणाले. आजच्या तुमच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला उपस्थित नसलो तर मी मनाने तिथेच तुमच्याबरोबरचं आहे, असं अमिताभ बच्चन म्हणाले.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार आहे. लाचलुचपत विभाग संबंधित चौकशी करणार आहे. या प्रकरणी, योजनतील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार योजनेवरून भाजप अडचणीत तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. भाजप सरकार असताना जलयुक्त शिवार योजने अंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी लहान-मोठी एकूण तेराशे 50 ठिकाणी कामे झाले असून या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा शासनाला संशय आहे. जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा अधिक ठिकाणी कामे झाली आहेत. सोलापूर सह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना अंतर्गत झाली आहेत कामे या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे. 2014 ते 19 पर्यंत राज्यातील जलयुक्त शिवार मोहिमे अंतर्गत झालेला तेराशे पन्नास कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत आहे. जलसंधारण विभाग कृषी विभाग आणि वन विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार योजनेवरून भाजप अडचणीत तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय.
Xiaomi Redmi Watch 2 And Redmi Buds Lite Launch: Xiaomi ने Redmi Note 11 सीरीजसह Redmi Watch 2 Smartwatch आणि Redmi Buds 3 Lite TWS Earbuds लाँच केले आहेत. शाओमीने काल चीनमध्ये आपली Redmi Note 11 सीरीज सादर केली. कंपनीचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट बघत होते. त्याचबारोबर कंपनीने एक नवीन Smartwatch आणि TWS Earbuds देखील सादर केले आहेत. कंपनीने Redmi Watch 2 आणि Redmi Buds 3 Lite लाँच केले आहेत. चला या दोन्ही डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि फीचर्सची माहिती जाणून घेऊया. Redmi Watch 2 चीनीमध्ये 399 युआन (सुमरे 4700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचचे Black, Blue आणि Ivory कलर व्हेरिएंट आणि Brown, Olive आणि Pink असे स्ट्रॅप्स उपलब्ध होतील. Redmi Buds 3 Lite ची किंमत 99 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत 1200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. लवकरच हे डिवाइस भारतात देखील दाखल होऊ शकतात. Redmi Watch 2 मध्ये 1. 6-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 100 वॉच फेस, ऑलवेज-ऑन डिस्प्ले, हार्ट रेट मॉनिटरिंग, Spo2 सेन्सर, स्लीप ट्रॅकिंग, GPS, GLONASS, Galileo आणि BeiDou असे स्पेक्स देण्यात आले आहेत. या डिवाइसमध्ये 117 फिटनेस मोड्स, NFC आणि XiaoAi AI Assistant सपोर्ट मिळतो. हा स्मार्टवॉच 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने या स्मार्टवॉचसह magnetic charger सपोर्ट दिला आहे. या वॉचमध्ये 5ATM वॉटर रेजिस्टन्स मिळतो. Redmi Buds 3 Lite ट्रू वायरलेस एयरबड्स इन-इयर डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. ब्लूटूथ 5. 2 सह येणारे हे बड्स टच कंट्रोल्ससह सादर करण्यात आले आहेत. चार्जिंग केसमध्ये एक USB टाईप -C पोर्ट आहे. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 18 तासांचा प्ले बॅक टाइम देऊ शकतात, यात चार्जिंग केसचा देखील समावेश असू शकतो.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांची निर्मिती असलेला '९९ साँग्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांची निर्मिती असलेला '९९ साँग्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अभिनेता इहान भट बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ए. आर. रेहमान यांनी आपल्या संगीताने रसिकांना भुरळ पाडल्यानंतर आता ते निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी '९९ साँग्स' चित्रपटासाठी जीओ स्टुडिओसोबत हातमिळवणी केली आहे. '९९ साँग्स' या चित्रपटात प्रेक्षकांना प्रेमकथा पहायला मिळणार आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, इहानने या चित्रपटात संगीतकाराची भूमिका साकारली असून त्याला या भूमिकेसाठी तयार करण्यासाठी ए. आर. रेहमान यांना खूप मेहनत घ्यावी लागली. शेकडो लोकांच्या ऑडिशनमधून इहानची निवड करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षांपासून इहान चेन्नईत रेहमान यांच्यासोबत राहून पियानो वाजवायला शिकला. मुंबईत वॉईस ट्रेनिंग घेतली. याशिवाय अमेरिकेत अभिनयाचे धडे गिरविले. इहान भट याबद्दल सांगतो की, अशाप्रकारच्या लाँचिंगबद्दल नवीन कलाकार फक्त विचार करू शकतात. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. कारण या सिनेमासाठी मला ए. आर. रेहमान सरांनी निवडले. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोईरालादेखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वेश कृष्णमूर्ती करत आहेत. ए. आर. रेहमान यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'या' उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवरच केला 'सवाल' ; ट्रेनिंगमध्ये शिकवतात 'चाटुगिरी', प्रचंड खळबळ - पोलीसनामा (Policenama) दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशच्या श्योपुरमधील पदस्थ तहसीलदार अमिता सिंह चांगल्याच चर्चेत आहेत. या महिला अधिकाऱ्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये तहसीलदारांना फक्त हुजरेगिरी करत भ्रष्टाचार करणारे म्हणून संबोधले आहे. असे त्यांनी लिहिले आहे अकॅडमीमध्ये कामाच्या प्रती कोणाला निष्ठा नाही तर इथे फक्त हुजरेगिरी आणि भ्रष्टाचाराची ट्रेनिंग दिली जात आहे. मध्यप्रदेशच्या तहसीलदार अमिता सिंह यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की हुजरेगिरी आणि आणि भ्रष्टाचाराने माखलेली हि शासकीय सेवा आहे. कार्यरत असलेल्या तहसीलदारांना भ्रष्ट सांगत त्यांनी अशा व्यवस्थेची किळस येत असल्याचे लिहिले आहे. आपल्या पोस्टमध्ये अमिता सिंह यांनी श्योपूरच्या कलेक्टरवरती सुद्धा ताशेरे ओढले आहेत. त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, आमच्यासारख्या अनुभवी तहसीलदारांना हटवून इतर नव्या तहसीलदारांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत आणि वरिष्ठ अधिकारी अशा तहसीलदारांना आपल्या गाडीमध्ये घेऊन फिरत आहेत. जिल्ह्यातील बाकी ठिकाणी अनुभवी तहसीलदारांना कामे सोपवली जात आहेत मात्र इथं उच्च अधिकारी नव्या तहसीलदारांना सर्व काही देत आहेत. सगळे नियम आणि कायदे टांगून यांनाच प्राथमिकता दिली जात आहे. कारण हे ट्रेनींगमध्ये वरिष्ठांना पटवण्याची आणि त्यांची हुजरेगिरी करण्याची कला शिकून आलेले आहेत. त्यांनी लिहिले आहे की ट्रेनिंगमध्ये काम करण्याची क्षमता वाढवण्यासंबंधी शिकलो होतो मात्र मागील एक दोन बॅचेसच्या तहसीलदारांन सोबत काम करून असे वाटते की आता अकॅडमीमध्ये काम, प्रतिष्ठा आणि शिस्तीची ट्रेनिंग दिली जात नाही तर हुजरेगिरी आणि भ्रष्टाचाराची शिकवण दिली जात आहे. २०११ साली अमिता सिंह यांनी कोण बनेगा करोडपातीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत हॉट सीट वर बसून ५० लाख रुपये जिकंले होते तेव्हापासून त्या मोठा चर्चेचा विषय बनल्या होत्या.
ग्रामीण भागातील उत्पन्न पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहिलेले नसल्यामुळे सध्या देशात पावसाने दडी मारली असूनही या भागाच्या अर्थकारणावर त्याचा विशेष परिणाम होणार नसल्याचे अनुमान इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने काढला आहे. ग्रामीण भागातील उत्पन्न पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहिलेले नसल्यामुळे सध्या देशात पावसाने दडी मारली असूनही या भागाच्या अर्थकारणावर त्याचा विशेष परिणाम होणार नसल्याचे अनुमान इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने काढला आहे. पाऊस कमी किंवा अनियमित झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडत असे. परंतु आता ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नाचे साधन केवळ शेती न राहिल्यामुळे यावर्षी अशी परिस्थती निर्माण होणार नाही असे इंडिया रेटिंग्जचे म्हणणे आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असे ताजे भाकित हवामान खात्याने केले आहे. विशेषतः जुलै व ऑगस्ट या महिन्यांत पाऊस कमी होणार आहे. तरीही ग्रामीण भागावर विशेष परिणाम दिसून येणार नाही असा इंडिया रेटिंग्जचा कयास आहे. याविषयी सुनील कुमार सिन्हा व देवेंद्र कुमार पंत यांनी एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये बिगरकृषी उत्पन्नाचा एकूण ग्रामीण उत्पन्नामध्ये वाटा वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. २००५मध्ये ग्रामीण उत्पन्नामध्ये बिगरकृषी उत्पन्नाचा वाटा ६१. १ टक्के होता. तो आता ७१. १ टक्के झाला आहे. यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने देशाच्या बहुतांश भागांत पेरण्या झाल्या आहेत. जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे या पेरण्या वाया जातील अशी भीती निर्माण झाली आहे. त्याचवेळी ग्रामीण भागात उद्योग जात असल्याने बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागात गुंतवणूक होताना दिसत आहे.
एल्विस प्रेस्लीच्या झंझावाताने 'रॉक अॅण्ड रोल' या नवसंगीताचे बारसे वगैरे झालेले असताना शेतकरी कुटुंबातल्या एका कृष्णवंशीय पोरीने संगीतवृंदाच्या प्रमुखाला, 'मला गायिका व्हायचंय' अशी टेचात गळ घातली. या पोरीसह तिच्या बहिणीला कोरसमध्ये गाण्याचे काम मिळाले. पण त्या कोरसमध्येही खणखणत्या आवाजाने तिने संगीतवृंदाच्या प्रमुखावर मोहिनी पाडली. टिना टर्नरचे 'क्वीन ऑफ रॉक अॅण्ड रोल' बनण्याच्या दिशेने पडलेले ते पहिले पाऊल. कलेचे घोडदौडीत रूपांतर होण्याआधी अडचणींचे अनंत-अडथळे सुरू होण्यापूर्वीचे. १९५८ साली आईक टर्नर या वाद्यवृंदप्रमुखाकडे झळकलेला आवाज १९६१ मध्ये टिना टर्नर या नावाने ओळखला गेला आणि पुढल्या काही वर्षांत आईक आणि टिना टर्नर या नवदाम्पत्याने 'रॉक अॅण्ड रोल' संगीतात डझनांहून अधिक हिट गाण्यांचा पाऊस पाडला. या काळात उदयाला आलेल्या बहुतांश सर्व रॉक अॅण्ड रोल संगीतकार-गायकांचा पुढल्या दोन दशकांत विविध कारणांनी अस्त झाला. पैसा, प्रसिद्धी, मानमरातब यांच्या गर्तेत ड्रग्ज-सेक्स आणि आत्महत्येने शेवट झालेल्या कितीतरी नावांचे दाखले येथे देता येतील. टिना टर्नरचे वैशिष्टय़ म्हणजे तिची खरी कारकीर्द फुलली ती आपले आरंभिक समकालीन रॉक-कलाकार सर्वार्थाने संपल्यानंतर. तेही दुःख आणि कफल्लकतेच्या परमोच्च अवस्थेत असताना. अॅना माये बुलक हे नाव घेऊन जन्मलेल्या या मुलीने आपले वडील नोकरीला असणाऱ्या शेतात कापूस काढणाऱ्या मजुरांसह कामही केले. कुटुंबाला वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकांच्या घरात बहिणींसह जगाचे विविधांगी अनुभव घेताना केवळ आपल्या आवाजावर विश्वास ठेवून तिने वाद्यवृदांत शिरकाव केला. पुढे आईक टर्नर या कलाकाराची गायिका पत्नी म्हणून लोकप्रिय होत असताना, त्याच्या मारझोड आणि जाचाला तिला सामोरे जावे लागले. १९७६ साली तिने आर्थिक तडजोड टाळून घटस्फोट घेतला. तेव्हा केवळ २६ सेंट्स पाकिटात असताना गाणेच आपल्याला तारून नेईल हा विश्वास तिला होता. १९८३ साली कॅपिटॉल रेकॉर्डसने तिला करारबद्ध केले आणि म्युझिक व्हिडीओ आणि एमटीव्हीच्या नव्या युगात टिना टर्नर हे नाव जगभर पोहोचण्यासाठी सज्ज झाले. वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी 'पॉपस्टार' बनण्याची किमया तिने करून दाखविली. १९८८ मध्ये १,८०,००० अशी विसाव्या शतकातली विश्वविक्रमी प्रेक्षकसंख्या असलेल्या मैफलीत तिने आपल्या खणखणीत आवाजाची पेशकश केली. मेल गिब्सनच्या 'मॅड मॅक्स : बियॉण्ड थंडरडोम' चित्रपटात ती झळकली. मायकेल जॅक्सनच्या झिंगाळवर्षांतही समांतररीत्या अल्बमविक्रीचे आणि स्टेज परफॉर्मन्सचे विक्रम रचत होती. एकूण ११ ग्रॅमी (त्यांतील आठ स्पर्धात्मक व इतर जीवनगौरवासम) पुरस्कार मिळविणाऱ्या आणि नव्वदोत्तरीत उगवलेल्या बहुतांश कलाकारांसह गायनाची हौस भागविणाऱ्या टर्नर यांचे उत्तरायुष्यातील वैवाहिक जीवन सुफळ आणि संपूर्ण गेले. विविध आजारांतही आवाज दुमदुमता राखणाऱ्या या गायिकेने नुकत्याच झालेल्या मृत्यूपूर्वी शेकडो कलावंतांना उभरण्याची प्रेरणा दिली.
संगणकाच्या मॉनिटरवरून टीव्ही कसा बनवायचा? हे करण्यासाठी, आपणास स्वतः मॉनिटर, टीव्ही ट्यूनर, प्लग, पॉवर कॉर्ड, एंटीना प्लग आणि ऍन्टीना वायरचा भाग आवश्यक आहे. उत्पादन टप्प्यातः - मॉनिटरकडून स्टॅन्ड आणि त्याच्या उर्वरित सपोर्ट काढून टाका. रिक्त आसन टीव्ही ट्यूनर ठेवण्यासाठी वापरले जाईल ट्युनरच्या वरच्या काठावर त्रिकोणी भाग ठेवावा, जो तारांचे अधिक सोयीस्कर पुरवठा आणि स्थापना प्रदान करेल तसेच ट्यूनरवरील IR रिसीव्हरची योग्य दिशा देखील देईल. - मॉनिटरचे मुख्य आरोहण काढा आणि उर्वरीत छिद्रे मध्ये screeds पास आणि ट्यूनर केस सुरक्षित. - जे लोक संगणकात मॉनिटर कसे करावेत याबद्दल स्वारस्य आहे, ते वायरचे माध्यमाने ट्यूनरचे वीज पुरवठा एकक आणि एक उष्णतायुक्त संकुचित नलिकाचे प्लग वाढवा. मॉनिटरचे पुरवठा वायर कट करा, आणि लीड वायर मिळविण्यासाठी पॉवर केबल आणि प्लग वापरा. - सोयिस्करपणे टेलिव्हिजन अॅन्टीना वायरला जोडण्यासाठी, आपण शेवटी एक प्लगसह ट्युनरपासून अॅन्टीना वायरचे एक छोटेसे विभाग काढू शकता आणि त्यास प्लास्टिकच्या क्लिपसह निराकरण करू शकता. - ट्यूनरची वीज पुरवठा दुहेरी बाजूंनी टेप किंवा गोंद सह निश्चित करणे आवश्यक आहे. - ट्यूनरच्या वीज पुरवठा युनिट, पुरवठा करणारा पॉवर केबल आणि मॉनिटरच्या वीज पुरवठा तारांमधील तारा कनेक्ट करा आणि त्यास प्लॅस्टीक क्लिपसह संरक्षित करा. - हे फक्त डोंगराच्या भिंतीच्या भागला टांगण्याकरिताच राहते, मॉनिटर लांबी व नेटवर्कमध्ये प्लग करते. आपण एक प्रणाली युनिट न एक टीव्ही मॉनिटर करू शकता आणखी कसे? नियमानुसार, बहुतांश LCD मॉनिटर्सकडे इनपुट-आऊटपुट असते जे LVDS म्हणतात. मॉनिटरवरील कव्हर काढून टाकून आणि आतल्या बाजूला उभ्या करुन, आपण पाहू शकता की कनेक्टर स्वतंत्र बोर्डवर आहेत हे इतर अंतर्गत घटकांशी जोडलेले एक लवचिक लूप पुरवते जे हार्ड ड्राइवसाठी IDE सारखे असते. मॉनिटरकडून टीव्ही बनवणे शक्य आहे का याविषयी शंका व्यक्त करणारे हे इंटरफेससाठी शंका दूर करण्याचा विस्तार बोर्ड विकत घेण्यासारखे आहे, ज्यामध्ये अंगभूत व्हिडिओ डीकोडर आहे. अशा उपकरणामुळे विविध उपसर्ग आणि संगणकाचा वापर न करता थेट analogue आणि डिजिटल टेलीव्हिजन दोन्ही पुनरुत्पादित करणे शक्य होईल. खरेदी केलेले बोर्ड वाहून नेणे आणि अशा उपकरणाच्या दुरूस्तीसाठी सेवा केंद्रावर देखरेख करणे आणि आधीपासून तयार केलेले टी. व्ही. घेऊन जाणे बाकी आहे. त्यास ऍन्टीना किंवा केबल केबलसह कनेक्ट करून, आपण त्याचा हेतू असलेल्या उद्देशासाठी वापरू शकता AV उपकरणाच्या कामात आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये धारण करणे, आपण स्वतः एक नवीन मंडळाला विकू शकता, जरी ही प्रक्रिया दमछाक करणारी आणि लांब आहे, परंतु पैसा वाचवण्यामध्ये प्रत्येक विशिष्ट मॉडेलसाठी पिनआउटची शोधणे आवश्यक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, आणि त्या नंतर केस आणखी विकसित केले जाईल, कारण उपकरणाचे परिमाण वाढेल. कोणत्याही परिस्थितीत, आपण एक तयार केलेला टीव्ही मिळवू शकता आणि तो विकत घेण्यासाठी पैसे खर्च करू शकत नाही.
मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ते चौघेही कारने परत येत होते. लॉ कॉलेज चौकातून जात असताना आरोपी कारचालक प्रेम चंदनानी याचे कारवरील नियंत्रण सुटले. नागपूर : भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात तरुणी ठार झाली तर चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. तिघांवरही न्यूरॉन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री लॉ कॉलेज चौकात झाला. बरखा हरिष खुराणा (२४) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्की हरिष खुराणा (२२) व त्याची बहिण बरखा तसेच नातेवाईक रिया जगन्नाथ खुराणा (२३) व प्रेम अशोक चंदनानी (२०) हे शुक्रवारी सायंकाळी अमरावती रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले होते. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ते चौघेही कारने परत येत होते. लॉ कॉलेज चौकातून जात असताना आरोपी कारचालक प्रेम चंदनानी याचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार दुभाजकावर आदळली. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाने अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी जखमींना खासगी रूग्णालयात हलविले. उपचारापूर्वीच बरखाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कारचालक प्रेम चंदनानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक'मासाठी श्री नितीन म्हसवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक'माच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या माननीय मु'याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी सर्वांना एकीचे बळ नेहमी श्रेष्ठच असते आणि म्हणूनच आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्यही 'एकी हेच बळ' असे आहे हे सांगून सर्वांनी एकोप्याने राहा असा संदेश दिला. शाळेतील शिक्षिका सौ. प्रिया इंदुलकर यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची व गुजरात मध्ये उभारण्यात येणार्या स्टॅच्यू ऑङ्ग युनिटी ची सविस्तर माहिती विद्यार्थ्याना सांगितली आजच्या राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून शाळेत चित्रकला, पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवणे, भेटकार्ड, घोषवाक्य, कविता व एकतेतून किल्ले उभारणी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शालासमिती अध्यक्ष डॉक्टर श्री. सुनील भंंडगे , ज्येष्ठ शिक्षक सौ. तनुजा तिकोने, श्री. धनंजय तळपे उपस्थित होते.
आंजर्ले खाडीतील काळकाई म्हणून असणाऱ्या ठिकाणच्या गेले दोन महिने या उभ्या असलेल्या नौका देखील उद्याच्या मुहूर्तावर मासेमारीला जाणार आहेत. बर्फ कारखान्यामध्ये बर्फ नेण्यासाठी आलेला मच्छीमार बांधव गडबड करत आहेत. अजूनही काही मच्छीमार नोकांच्या डागडुजीची कामं करत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरण मासेमारीला पोषक आहे. त्यामुळे हर्णै बंदरातून किमान ५० नौका मासेमारीसाठी जाणार आहेत. नागपंचमीनंतर दोन हजारांहून अधिक नौका मासेमारीसाठी समुद्रात जाण्यासाठी सज्ज होत आहेत. दापोली तालुक्यातील हर्णै सर्वांत मोठे बंदर आहे. येथे हंगामामध्ये आजूबाजूच्या गावांमधील मिळून ८०० ते ९००नौका मासेमारीसाठी येतात.
उच्च शिक्षण कायदा क्रमांक 2547 मधील संबंधित लेख आणि प्राध्यापक सदस्यत्वासाठी पदोन्नती आणि नियुक्ती या नियमांनुसार 68 प्राध्यापक सदस्यांची एज विद्यापीठाच्या खालील युनिट्समध्ये भरती केली जाईल. उमेदवारांनी नागरी सेवक कायदा क्रमांक 657 च्या कलम 48 मध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. प्राध्यापक कर्मचारी जे उमेदवार अर्ज करतील; त्यांनी ज्या युनिटसाठी, विभागासाठी आणि विभागासाठी अर्ज केला आहे, त्यांच्या रिझ्युमची छायाप्रत, त्यांच्या ओळखपत्राची छायाप्रत, लष्करी प्रमाणपत्र, शैक्षणिक दस्तऐवज (बॅचलर, मास्टर्स, डॉक्टरेट, असोसिएट प्रोफेसरशिप प्रमाणपत्र), प्रकाशन यादी, परदेशी भाषा प्रमाणपत्र, वैज्ञानिक अभ्यास आणि प्रकाशने. (सहा) संघ वैयक्तिकरित्या कार्मिक विभागाकडे फाइलसह अर्ज करतील. असोसिएट प्रोफेसर कर्मचारी जे उमेदवार अर्ज करतील; त्यांनी अर्ज केलेल्या युनिट, विभाग आणि विभाग, त्यांच्या सीव्हीची एक प्रत, ओळखपत्र, एक छायाचित्र, लष्करी सेवा प्रमाणपत्र, शैक्षणिक दस्तऐवज (अंडरग्रेजुएट, पदवीधर, डॉक्टरेट, सहयोगी प्राध्यापक प्रमाणपत्र), प्रकाशन यादी, परदेशी भाषा प्रमाणपत्र, वैज्ञानिक अभ्यास आणि प्रकाशने. (चार) संघ वैयक्तिकरित्या कार्मिक विभागाकडे फाइलसह अर्ज करतील. डॉक्टर शैक्षणिक सदस्य कर्मचारी जे उमेदवार अर्ज करतील; त्यांनी अर्ज केलेल्या युनिट, विभाग आणि विभाग, त्यांच्या सीव्हीची एक प्रत, ओळखपत्र, एक छायाचित्र, लष्करी सेवा प्रमाणपत्र, शैक्षणिक दस्तऐवज (अंडरग्रेजुएट, पदवीधर, डॉक्टरेट, सहयोगी प्राध्यापक प्रमाणपत्र), प्रकाशन यादी, परदेशी भाषा प्रमाणपत्र, वैज्ञानिक अभ्यास आणि प्रकाशने. (चार) संघ फाईलबाबत फॅकल्टी डीन कार्यालय/शाळा/संस्था संचालनालयाकडे वैयक्तिकरित्या अर्ज करतील. 1-परदेशातून प्राप्त केलेल्या डिप्लोमाच्या समतुल्यतेला आंतरविद्यापीठ मंडळाने मान्यता दिली पाहिजे. 2-अर्जाचा कालावधी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांचा आहे. (अंतिम तारीखः १७.१२.२०१९) 3-कोणत्याही सार्वजनिक संस्थेतील कर्मचार्यांनी (जरी त्यांनी आधी काम केले असेल आणि सोडले असेल) त्यांना ते काम करत असलेल्या संस्थेकडून मंजूर तपशीलवार सेवा दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. 4-Ege युनिव्हर्सिटी फॅकल्टी सदस्य अर्ज अटी https://personeldb.ege.edu.tr येथे उपलब्ध. 5-आमच्या जाहिरातीसाठी www.ege.edu.tr येथे उपलब्ध. 6- त्यांनी परदेशी भाषा शिकवण्याच्या नियमातील सामान्य अटी आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये परदेशी भाषा शिकवताना पाळल्या जाणार्या तत्त्वांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
हॅन्डबॅगची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स अवश्य वापरा! सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात. बऱ्याचदा इतर बॅग्जपेक्षा लेदरच्या बॅग्जना पसंती देण्यात येते. पण अनेकदा या बॅग्जची काळजी घेण्यामध्ये कुठेतरी चूक होते. त्यामुळे त्या फार काळ टिकत नाहीत. जर या बॅग्जची योग्य ती काळजी घेतली तर बॅग जास्त काळ टिकण्यास मदत होते. जसं बुटांना काही वेळाने पॉलिश करण्याची गरज भासते त्याचप्रामणे लेदरपासून तयार करण्यात आलेल्या हॅन्डबॅग्जनाही काही काळाने देखभाल करण्याती गरज भासते. बाजारामध्ये लेदर बॅग्जची काळजी घेण्यासाठी काही उत्पादन उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या हॅन्डबॅगची काळजी घेऊ शकता. तुम्ही तुमची हॅन्डबॅग एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवता का? हॅन्डबॅग जास्तीजास्त टिकावी म्हणून ती एखाद्या कोपऱ्यामध्ये न ठेवता. तुमच्या वॉर्डरोबमध्ये किंवा कपाटामध्ये सरळ उभी करून ठेवा. हॅन्डबॅग विकत घेताना तुम्हाला त्याच्यासोबत एक कव्हर मिळेल. त्याच कव्हरमध्ये ती ठेवणं फायदेशीर ठरेल. जर तुमच्या हॅन्डबॅगवर एखाद्या गोष्टीचा डाग लागला असेल तर ते लगेचचं स्वच्छ करा. त्यामुळे हॅन्डबॅगचा लूक तसाच टिकून राहण्यास मदत होईल. हॅन्डबॅगमध्ये कोणतीही वस्तू ठेवताना अथवा कॉस्मॅटिक्स ठेवताना त्या व्यवस्थित ठेवा. कारण त्यामुळे हॅन्डबॅगच्या आतल्या कापडाला डाग लागण्याची शक्यता असते.
मुंबईः मुंबईत क्षयरोग विषाणूच्या व्हेरिंएंटमुळे क्षयरोगाचा प्रसार वाढला आहे. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत क्षयरोग रुग्णांची संख्या १. ६७ लाखावर गेली आहे. त्यापैकी १. ४३ लाख रुग्णांवर पालिकेकडून उपचार झाले. त्यामध्ये, पुरुष रुग्णांची संख्या ६८ हजार, तर महिला रुग्णांची संख्या ७५ हजार एवढी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये, संपूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ८६ हजारांवर आहे. तसेच, २०२० ते २०२२ या कालावधीत मुंबईत क्षयरोगाने पीडित ७,५५१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सन २०२० मध्ये ३७,९४३ रुग्ण व २,२८३ रुग्णांचा मृत्यू, २०२१ मध्ये ४९,५६४ रुग्ण व २,७०५ रुग्णांचा मृत्यू तर २०२२ मध्ये ५६,११२ रुग्ण व २,५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच गेल्या तीन वर्षात १,४३,६१९ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यापैकी एकूण ७,५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे क्षयरोग रुग्णांमध्ये १५ - ४५ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तर १५ वर्षांपर्यंतच्या वयोगतील मुलांचे प्रमाण ९ टक्केपर्यंत असल्याचे पालिका आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. मुंबईकरांचे राहणीमान, प्रतिकार शक्तीचा अभाव, सार्वजनिक ठिकाणी कुठेही व कसेही थुंकणे, शिंकणे, खोकणे आदी कारणे रुग्ण वाढीसाठी कारणीभूत असल्याचे पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगल गोमारे यांनी सांगितले. जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मंगला गोमारे व डॉ. वर्षा पुरी यांनी क्षयरोग व उपाययोजना आदींबाबत शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली. क्षयरोग विषाणूच्या व्हेरिंएंटमुळे क्षयरोगाचा प्रसार वाढलेला आहे. त्यामुळे क्षयरोगाला रोखण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकारे जनजागृती करणे, रुग्ण शोधून काढणे, त्यांच्या चाचण्या करून त्याचे निदान करून त्यांना मोफत औषधोपचार देणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र क्षयरोग रूग्णांमध्ये नेमक्या कोणत्या व्हेरिंएंटची लागण झाली आहे याचा शोध घेण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येणार आहेत. क्षयरोग विषाणूच्या व्हेरिंएंटनुसार रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार करणे करणे शक्य होणार आहे. २०३० ऐवजी २०२५ पर्यन्त मुंबई क्षयरोग मुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे, असा दावा कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केला आहे.
गोंदवले, दि. 30 (वार्ताहर) - ढाकणी, ता. माण येथे मंगळवारी झालेल्या ग्रामसभेला बियरबार, परमिटरूम व लॉजिंगला युवकांनी विरोध दर्शविला. मात्र, गावात बाटली उभी करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेत 108 विरूध्द 78 ने ठराव मंजूर केला. यामुळे ग्रामसभेची तालुक्यात चर्चा आहे. ढाकणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी पार पडली. यावेळी बियर बार परमिट रूम व लॉजिंग हा महत्वाचा विषय घेण्यात आला होता. यावेळी 11 ग्रामथांनी बियर बारसाठी अर्ज केले होते. त्यास तरूणवर्गाने कडाडून विरोध केला होता. मात्र, उपस्थित महिलांनी या प्रस्तावास पाठिंबा दिला. तरुणवर्गाचा विरोध मोडून महिलांच्या पाठिंब्यामुळे प्रस्तावास सहमती मिळाली. त्यामुळे हा ठराव बहुमताने मान्य झाला. ग्रामसभेत सतीश सुर्यवंशी, अमोल नरबट, रवींद्र खाडे आदी गावातील तरुणांनी दारू विषयावर मनोगत वक्त करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. राज्यात आजपर्यंत अनेक ठिकाणी बाटली आडवी करण्यासाठी महिला पुढाकार घेताना दिसून येत होत्या. मात्र, ढाकणीत बाटली उभी करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत ठराव आपल्या बाजूने मंजूर केला असून याची चर्चा तालुकाभर रंगतदारपणे केली जात आहे.
खिडकीवर उपलब्ध तिकीट खरेदी करणे आणि रद्द करण्याचा नियमात सुसूत्रता नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. खिडकीसमोर रांगेत राहून तिकीट खरेदी करण्याचा त्रास ई-तिकीट सुविधेमुळे कमी झाला असून इंटरनेटवरून तिकीट घेण्यास पसंती वाढत आहे, परंतु असे तिकीट खरेदी करणे किंवा रद्द करण्यासाठी रेल्वेकडून प्रवाशांना नाहक भरुदड मात्र सहन करावा लागत आहे. ई-तिकीट आणि खिडकीवर उपलब्ध तिकीट खरेदी करणे आणि रद्द करण्याचा नियमात सुसूत्रता नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. ई-तिकीट असणाऱ्या प्रवाशांकडे 'कन्फर्म' तिकीट नसले तरी प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, त्या प्रवाशांना सामावून घेण्याची सोय रेल्वे करताना दिसत नसल्याने 'आरएसी' किंवा 'वेटिंग' तिकीट असलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वेच्या नियमानुसार एका ई-तिकिटावर ४ प्रवासी प्रवास करू शकतात. ४ पैकी एकाचेही 'बर्थ कन्फर्म' किंवा 'आरएसी' असल्यास चारही प्रवाशांना प्रवास करता येतो, पण उर्वरित तीन प्रवासी कुठे बसतील, हा प्रश्न अनुत्तरित ठेवण्यात आला आहे. आरक्षित तिकिटांसाठी ई-तिकीट घेणे सोयीचे आहे, त्यामुळे साहजिकच लांब पल्ल्याचा प्रवास करणारे ई तिकीट घेतात. हे माहिती असूनही ई-तिकिटांचे सुसूत्रीकरण करण्यात आलेले नाही, यामुळे रेल्वे प्रवासी आणि तिकीट तपासणीस यांच्यात वारंवार उडणारे खटके आणि वादावादी हे नित्याचेच झाले आहे. ई-तिकीट खरेदी आणि रद्द करण्याचे नियमही जणू प्रवाशांना लुटण्यासाठी बनवण्यात आले आहे का?, अशी शंका येते. एसी फर्स्ट क्लासचे कन्फर्म तिकीट ४८ तासांआधी रद्द केल्यास प्रत्येक प्रवाशामागे २४० रुपये शुल्क आकारण्यात येते. एसी टू टिअरचे कन्फर्म तिकीट रद्द केल्यास २०० रुपये कापण्यात येतात. एससी टिअरचे रद्द केल्यास १८० आणि स्लिपर क्लासचे तिकीट रद्द केल्यास १२० रुपये परस्पर कापण्यात येतात. नियोजित गाडी निघण्याच्या चार तासापूर्वी कन्फर्म तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कापण्यात येते. कन्फर्म तिकीट गाडी सुटण्याच्या चार तासापूर्वी रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज टाकण्यात न आल्यास एक दमडीही रेल्वे परत करत नाही. 'आरएसी' तिकिटासाठीही हाच नियम आहेत. एकीकडे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास करता येत नाही, असा नियम आहे, तर दुसरीकडे ई-तिकीट काढणाऱ्यांकडे एक बर्थ जरी आरएसी असेल, तर इतर प्रवाशांना प्रवास करता येतो, असा दुसरा नियम आहे. आरएसी किंवा प्रतीक्षा यादीतील ई-तिकीट रद्द करताना ६० रुपये लिपिक शुल्क आकारण्यात येते. याचाच अर्थ, ई-तिकीट काढले आणि प्रवास केला नाही तरी रेल्वे रक्कम कापूनच घेते. खिडकीवरून विकल्या जाणाऱ्या तिकिटांप्रमाणे ई-तिकीटही 'कन्फर्म' न झाल्यास आपोआप रद्द करण्याची सुविधा होणे आवश्यक आहे. तसेच तिकीट रद्द झाल्याबरोबर परतावा मिळायला हवा. सध्या तिकीट रद्द करण्याची विनंती करावी आणि एक महिन्यानंतर परतावा केला जातो, असे रेल्वेयात्री केंद्राचे वसंत शुक्ला यांनी सांगितले. रेल्वे ही सेवा आयआरसीटीसीच्या माध्यमातून देत आहे. रात्री १२.२० ते रात्री ११.४५ वाजेपर्यंत तिकीट खरेदी किंवा रद्द करता येते. आय-तिकीट सेवेसाठी आयआरसीटीसी स्लीपर क्लासकरिता ८० रुपये अधिक सेवाकर आकारते. उच्च श्रेणीतील तिकिटांसाठी १२० रुपये अधिक सेवाकर, ई-तिकीट सेवेकरिता स्लीपर क्लासमधील तिकिटांवर २० रुपये अधिक सेवाकर आणि उच्च श्रेणीतील तिकिटांवर ४० रुपये अधिक सेवाकर प्रवाशांकडून घेण्यात येतो.
या प्रेमाने समाज सांधला जाईल. प्रेमाच्या बंधनाने समाज बांधला जातो. प्रेमात सर्व भेदआपपरभाव नाहीसे होतात. प्रेमानें जीवन सुखी समृध्द होतें. असें हें दिव्य दैवी प्रेम प्रभुस्मरणानें मिळेल. संताचे सान्निध्यात मिळेल. प्रेमात दुःखाचे रूपांतर सुखांत होईल. मनुष्य जीवन संपूर्ण पालटून जाईल. उपदेश तो भलत्या हाती । झाला किती धरावा ॥ आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥ मोलाचे आयुष्य जाते हातोहात । विचारी पाहात लवलाही ॥ । गात जातो तुका । हाचि उपदेश लोका ।। तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥ आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिये ॥ कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्वि । तयाचा हरीख वाटे देवा ॥ गीता भागवत करीती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥ हित ते करावे देवाचे चिंतन । करोनियां मन शुध्द भावे ॥ तुका म्हणे फार । थोडा तरी उपकार ॥ संग न करावा दुर्जनांचा । करी संतांचा सायास ।। पतन उध्दार संतांचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे मिळालेली आहेत. औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे मिळालेली आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २४ लाख ४४ हजार मतदारांपैकी २३ लाख ८८ मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. जिल्ह्यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९९. ८५ टक्केमतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. तर पैठण मतदारसंघात सर्वात कमी ९६ टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत एकूण २४,४४,१९७ मतदार आहेत. यापैकी २३,८८,८१८ जणांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. निवडणूक आयोगातर्फे मागील महिनाभरात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नोंदणी मोहिमेंतर्गत ३० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. या सर्वांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली असून, त्यांनाही लवकरच घरपोच मतदार ओळखपत्रे वाटप केली जाणार आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघात २ लाख ७७ हजार मतदारांपैकी २ लाख ७२ हजार मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. फुलंब्री मतदारसंघातही ९८. ३३ टक्के मतदारांना ओळखपत्रे मिळाली आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २ लाख ७५ हजार मतदारांपैकी २ लाख ७४ हजार मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ९६. ६४ टक्के, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ९७. २४ टक्के तसेच पैठण मतदारसंघात ९७. ६० टक्के, गंगापूर मतदारसंघात ९६. ७० टक्के आणि वैजापूर मतदारसंघात ९६. ९५ टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी औरंगाबादच्या जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात मतदारांसाठी हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता भंगविषयक व निवडणूक खर्चविषयक तक्रार असल्यास नागरिकांना ती हेल्पलाईनवर नोंदविता येणार आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. हा टोल फ्री क्रमांक १८००२३३९२३४ असा असून, सदरचा कक्ष निवडणूक काळात २४ तास सुरू राहणार आहे. एम. ए. सय्यद हे या कक्षाचे नोडल आॅफिसर आहेत. तसेच एस. टी. पोफळे, एस. के. काशीद, राहुल राऊत, एम. टी. शेख, दीपक देशमुख इत्यादी कर्मचाऱ्यांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. विधानसभा निवडणूक चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजी घेतले जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतील मतदान प्रक्रियेसाठी तब्बल १६ हजार कर्मचारी लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात येत असून, त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजी, दुसरे ९ आॅक्टोबर आणि तिसरे १४ आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल. तसेच मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक ११ आणि १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. औरंगाबाद : महायुतीच्या नेत्यांबाबत व्हॉटस्अपवर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी एका आरोपीला अटक केली. व्हॉटस्अपच्या एका ग्रुपवर काल एका तरुणाने महायुतीच्या नेत्यांबाबत बदनामीकारक मजकूर टाकला. ही बाब लक्षात येताच राजेंद्र साबळे यांनी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविल्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी तो मजकूर टाकणाऱ्या तरुणाचा मोबाईल क्रमांकावरून शोध घेतला.
कदाचित, डोनट्ससारखे फार कमी लोक चवदार साखरेसह शिडकावलेले हलके, हलकं, हे स्वादिष्ट आहे ना? आता आम्ही तुम्हाला सांगेन की डोनट्सची गोठणी कशी करायची. खाली बरेच भिन्न पर्याय आहेत. नातेवाइकांसाठी एक उपाय तयार करण्यासाठी अधिक आकर्षित आणि त्वरेने आकर्षित करेल की एक निवडा. साहित्यः - दूध - 500 एमएल; - अंडी yolks - 2 तुकडे; - कोरड्या यीस्ट - 10 ग्रॅम; - साखर - 2 टेस्पून. चमच्याने; - melted बटर - 60 ग्रॅम; - पीठ - 700 ग्रॅम; 100 मि. ली. उबदार दूध मध्ये यीस्ट आणि साखर विसर्जित करा. आम्ही 10 मिनीटे उबदार ठिकाणी काढून टाका, जेणेकरून खमीरचे आंबट उर्वरित दूध मध्ये, sifted पिठ, मीठ, वितरित लोणी आणि यीस्ट वस्तुमान, सर्वकाही चांगले मिक्स आणि सुमारे 30 मिनिटे साठी dough काढा. त्यानंतर, आम्ही आमच्या हाताने मळून मळून मग ते चिकट नसल्याने सूर्यफूल तेल हाताने वंगण घालणे सोयीचे. यानंतर, पुन्हा एक उबदार ठिकाणी ठेवा. ते थकलेला नाही, तो एक मोठा हात रुमाल सह झाकून चांगले आहे. आम्ही पुढील गुणोत्तरांमधून बॉल आणि तळणे डोनट्स तयार करतो . साहित्यः - पीठ - 240 ग्रॅम; - तेल - 4 टेस्पून. चमच्याने; - साखर - 1 चमचे; - अंडी - 6 पीसी . ; - पाणी 225 मिलि; - बेकिंग पावडर - 1 चमचे; पाण्यात, भाज्या तेल, साखर आणि मीठ नीट ढवळून घ्यावे. परिणामी मिश्रण उकळणे द्या यानंतर, एक ढीग तयार होईपर्यंत, सतत ढवळत, पिठ मध्ये घाला. यानंतर, आगीपासून पॅन काढून टाका आणि कणकेचा तुकडा 3-4 मिनिटे थंड करा. मग अंडी गोळा करा आणि ते गुळगुळीत आणि एकसमान होईपर्यंत मिसळा. नंतर बेकिंग पावडर घालून पुन्हा मिक्स करावे. डोनट्ससाठी हे मळणी खोल तळण्यासाठी फारच उत्तम आहे. साहित्यः - पीठ - 550 ग्रॅम; - दूध - 310 ग्रॅम; - अंडी - 1 तुकडा; - साखर - 60 ग्रॅम; - लोणी - 30 ग्रॅम; - कोरडी यीस्ट - 1 टेस्पून चमचा; आम्ही ब्रेडमेकर च्या कंटेनर sifted पिठ मध्ये झोप झोपणे, यीस्ट आणि सर्व उर्वरित साहित्य घालावे. यात काहीच सक्ती नाही, मुख्य गोष्ट अशी आहे की दुधाला शेवटचा असावा. मोड निवडा "मूलभूत" आणि चाचणी प्रकार "यीस्ट". स्वयंपाक करण्याची वेळ 2 तास आणि 20 मिनिटे आहे. साहित्यः - पीठ - 3 कप; - केफिर - 250 ग्रॅम; - साखर - 5 टेस्पून. चमच्याने; - अंडी - 1 तुकडा; - भाजी तेल - 60 ग्रॅम; केफीर अंडी मिसळला जातो, साखर आणि मीठ घालतात, सर्वकाही पूर्णपणे मिसळले जाते. यानंतर, सोडा आणि तेल घाला, नंतर sifted ओट ओतणे आणि dough मालीश करणे. तो सहज बाहेर आला पाहिजे आणि आपल्या हातांना चिकटून राहू नका. एक 8-10 मिमी जाड थर मध्ये कणकेचे भुरभूर करा आणि काचाने भोक कापून घ्या. साहित्यः - पीठ - 0,5 किलो; - अंडी - 2 तुकडे; - लोणी - 100 ग्रॅम; - साखर - 2 टेस्पून. चमच्याने; - दूध - 400 एमएल; - यीस्ट - 25 ग्रॅम; यीस्ट उबदार दूध मध्ये प्रजनन आहे, sifted ओट ओतणे आणि dough मिक्स तो उगवतो तेव्हा, त्यावर अंडी, साखर, मीठ आणि मेल्टेड मटर घालावे. सर्व काळजीपूर्वक मिश्रण करा आणि दुसऱ्यांदा वाढण्याची चाचणी द्या. ते दोनदा वाढवते तेव्हा, आपण डोनट्स शिजवू शकता. साहित्यः - बाष्पीभवन दूध - 400 ग्रॅम; - पीठ - 0,5 किलो; - अंडी - 3 तुकडे; घनरूप दूध मध्ये, अंडी जोडा आणि मिक्स, नंतर बेकिंग पावडर मिसळून पीठ ओतणे. कणिक मिक्स करावे, तो खूप जास्त आणि लवचिक नाही मग आपण त्यातील गोळे बनवू शकता, आणि तुम्ही ते रोल करून तुकडे करू शकता. साहित्यः - कॉटेज चीज - 450 ग्राम; - साखर - 100 ग्रॅम; - आंबट मलई - 1 टेस्पून. चमचा; - साखर - 120 ग्रॅम; - वेनिला साखर - 1 पॅकेट; - पीठ - 800 ग्रॅम; - अंडी - 4 तुकडे; घडीव अंडी मध्ये साखर, आंबट मलई आणि या वनस्पतीसाठी केलेला अर्क साखर घालावे. कॉटेजची चीज एक चाळणीतून पुसली गेली आहे किंवा एक एकसंध वस्तुमान प्राप्त करण्यासाठी ब्लेंडरसह whisked आहे. हे साहित्य उरलेले मिश्रण घालून ठेवावे. शिजवलेले पिठ, सोडा, व्हिनेगर सह extinguished, आणि dough मालीश करणे. ते मऊ आणि लवचिक असावे. आम्ही 10 ते 15 मिनिटे साखरेसाठी खड्डा न घेता डोनट्सची दही चाचणी देतो आणि नंतर ती उत्पादने तयार करण्यासाठी वापरतो.
सेटन हिल युनिव्हर्सिटी प्रवेशाचे विहंगावलोकनः 2016 मध्ये, सेटन हिलने 61% अर्जदारांना मान्यता दिली, ज्यामुळे शाळा अधिक प्रमाणात उपलब्ध झाले. सरासरी ग्रेड आणि चाचणी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना (किंवा त्यापेक्षा चांगले) प्रवेश घेण्याची चांगली संधी असते. अर्ज करण्यासाठी, संभाव्य विद्यार्थ्यांना अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अधिकृत हायस्कूल लिप्यंतरण, एसएटी किंवा एक्ट स्कोर, एक लहान निबंध, आणि शिफारशीचा एक पत्र. संपूर्ण आवश्यकता आणि माहितीसाठी, शाळेच्या वेबसाइटला भेट द्या. आपण मध्ये मिळेल? प्रवेश डेटा (2016): सेटॉन हिल युनिव्हर्सिटी वर्णनः सेटॉन हिल युनिव्हर्सिटी, ग्रीन्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया मध्ये स्थित एक लहान, कॅथोलिक उदारमतवादी कला विद्यापीठ आहे. मूलतः एक महिला महाविद्यालय, विद्यापीठ 2002 मध्ये सहशिक्षण झाले. कॅम्पस पिट्सबर्ग बाहेर एक तास पेक्षा कमी, दक्षिण पश्चिम पेनसिल्वेनिया मध्ये Greensburg ऐतिहासिक जिल्ह्याच्या हृदय येथे 200 वृक्ष-अस्तर एकर वर वसलेले आहे. विद्यापीठ आपल्या अलीकडील तंत्रज्ञान लाभ कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो, जे पूर्णवेळ विद्यार्थ्यांना एक आयपॅड आणि मॅकबुकसह प्रदान करते. सेटन हिल 30 पेक्षा जास्त पदवीपूर्व पदवीधर आणि 12 ग्रॅज्युएट डिग्री, व्यवसाय, कला, मानसशास्त्र आणि संगीत तसेच आरोग्य विज्ञान, दृश्य आणि प्रदर्शन कला आणि व्यवसाय व उद्योजकता या विषयांच्या सहभागित कार्यक्रमांसहित प्रदान करते. हे प्रामुख्याने एक निवासी विश्वविद्यालये नसून, विद्यार्थी कॅम्पसच्या जीवनात सक्रीयपणे सहभागी आहेत, 40 पेक्षा जास्त क्लब आणि संघटनांमध्ये सहभागी आहेत, व्यापक अंतःक्रियात्मक ऍथलेटिक कार्यक्रम आणि कॅम्पस मंत्रालयाने सर्व विश्वास परंपरा पार पाडत आहेत. सेटन हिल ग्रिफन्स एनसीएए डिव्हिजन II वेस्ट व्हर्जिनिया इंटरकॉलेगेट ऍथलेटिक कॉन्फरन्समध्ये स्पर्धा करतात. नावनोंदणी (2016): - एकूण नोंदणीः 2,404 (2,055 पदवीधर) खर्च (2016-17): - पुस्तकेः $ 1,200 ( का इतका? ) सेटॉन हिल युनिव्हर्सिटी फायनांशियल एड (2015 - 16): हस्तांतरण, पदवी आणि धारणा दरः आंतरकॉलिजिएथ अॅथलेटिक प्रोग्रॅमः माहितीचा स्रोतः जर तू सेटन हिल युनिव्हर्सिटी आवडत असेल, तर तुम्हास हे शाळा देखील आवडतीलः
खिडकीः August 2018\n'हॉकीचा जादूगार' अशीच ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह यांची आज (२९ ऑगस्ट) जयंती. आणि आज आपला राष्ट्रीय क्रीडा दिनही. अफाट क्रीडाजगतातल्या एका जादूगाराचं कायमस्वरूपीचं स्मरण. अशा जादूगाराची आठवण की, ज्याच्यामुळे ऑलिंपिकमधलं आपलं एक सुवर्णपदक निश्चित असे. योगायोगाने सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा चालू आहे. त्यात आपली कामगिरी अत्युत्कृष्ट होत नसली, तरी भूतकाळाएवढी निराशाजनक नक्कीच नाही. अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत ऑलिंपिक आणि आशियाई स्पर्धा आटोपल्यानंतर आपल्याकडे सामूहिक रडगाण्याचा कार्यक्रम असे. गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत... 'एवढा आपला १०० कोटींचा देश आणि ऑलिंपिकमध्ये एक पदक नाही!' हेच सूत्र पकडून कट्ट्यांवरच्या गप्पांमध्ये तावातावानं मतं मांडली जात आणि संसदेतही 'अभ्यासपूर्ण' चर्चा होई. रडगाण्याचं आणि चर्चेचं निहित कर्तव्य संपल्यानंतर पुढच्या ऑलिंपिक किंवा आशियाई स्पर्धेपर्यंत क्रिकेटच आपला राष्ट्रीय खेळ असे! हे चित्र नव्या सहस्रकात थोडं बदललं. अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकानं 'येस्स! वी कॅन...' असा विश्वास आपल्या क्रीडाक्षेत्रात जागवला.\n'खेळायचं कशासाठी?' या सनातन प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण फारशा गांभीर्यानं केला नाही. आपल्या देशात क्रीडा-संस्कृती आहे का आणि असलीच तर ती कशा पद्धतीची आहे, ती बदलली पाहिजे का, तीत काय बदल करावे लागतील, याबद्दल विचार करायचं आपण टाळतो. आंतरराष्ट्रीय पदकविजेते एका रात्रीतून घडत नसतात, हे आपल्याला तत्त्व म्हणून मान्य आहे. पण त्यासाठी किती कठोर मेहनत घ्यावी लागते, पद्धतशीर नियोजन करावं लागतं, शिल्पासारखा खेळाडू घडवावा लागतो, याकडं आतापर्यंत आपलं बरंचसं दुर्लक्ष झालं. देश पातळीवर खेळाडू घडवण्याचं काम काही प्रमाणात भारतीय क्रीडा प्राधिकरण ('साई'-SAI) करीत आहे. पण या प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबद्दलही आजवर बरंच उलट-सुलट बोललं गेलं आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात राज्यात क्रीडापीठाची आणि त्याच्याशी संलग्न क्रीडा प्रबोधिनींची स्थापना झाली. पण दोन दशकांनंतरही 'प्रबोधिनी'चा ठसा ठळकपणे उमटला आहे, असं म्हणता येणार नाही. छोट्या-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये वर्षानुवर्षे क्रीडा मंडळं, क्लब चालू आहेत. त्यातले काही यथावकाश बंद पडतात, काही नव्याने सुरू होतात. नवे खेळाडू येतात, जुने सगळं पचवून मैदानापासून दूर जातात.\nविशिष्ट ध्येय समोर ठेवून आणि त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून (पदकविजेते) खेळाडू घडवणं, हे दीर्घ मुदतीचं काम आहे. तसं ते कालही होतं आणि आजच्या इन्स्टंटच्या जमान्यातही आहे. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या संस्था तुरळक का होईना आहेत आणि काही नव्यानं उभ्या राहत आहेत. नगरची 'मॅक्सिमस स्पोर्ट्स अॅकॅडमी' त्यापैकीच एक. नगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या फिरोदिया कुटुंबाचा आधार या प्रबोधिनीला आहे. शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशननं चार वर्षांपूर्वी, म्हणजे ऑक्टोबर २०१४मध्ये अॅकॅडमीची मुहूर्तमेढ रोवली. बॅडमिंटनपासून सुरुवात झालेल्या प्रबोधनीनं नंतरच्या काळात ज्यूदो आणि तिरंदाजी या दोन खेळांकडेही लक्ष वळवलं. कोणत्याही खेळात सर्वांत मूलभूत गोष्ट म्हणजे तंदुरुस्ती, खेळाडूची टिकून राहण्याची क्षमता (दमसास). त्याची काळजी घेणाराही स्वतंत्र विभाग 'मॅक्सिमस'मध्ये आहे.\n'ऑलिंपिकमध्ये सहभाग आणि पदक' हेच लक्ष्य ठेवून 'मॅक्सिमस'ची सुरुवात करण्यात आल्याचं प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जोशी यांनी सांगितलं. क्रीडा-संस्कृतीच्या माध्यमातून शहर बदलण्याच्या, शहरवासीयांची वृत्ती सकारात्मक बनविण्याच्या प्रयत्नांची ही सुरुवात असल्याचं सांगतानाच 'त्यात आम्हाला नक्की यश येईल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nबॅडमिंटन म्हणजे प्रबोधिनीचा पहिला आणि खास खेळ. प्रबोधिनीचे सर्वेसर्वा, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना त्यात विशेष रस. (कै.) शांतिकुमार फिरोदिया यांचाही ओढा बॅडमिंटनकडे होता. त्यातूनच साधारण २० वर्षांपूर्वी त्यांनी नगर क्लबवर खास प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. 'मॅक्सिमस'ची बीजं आहेत ती आधी सुरू झालेल्या बॅडमिंटन अॅकॅडमीमध्ये. तिचंच हे विस्तारित आणि व्यापक रूप. 'आपल्याला वेग, शेवटपर्यंत टिकून राहण्याची क्षमता आणि ताकद यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खेळाडूंना अगदी तरुण वयातच या गोष्टी शिकवल्या पाहिजेत,' असं मत असणारे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू जे. बी. एस. विद्याधर यांचं मार्गदर्शन नगरच्या खेळाडूंना मिळतं ते 'मॅक्सिमस'मुळंच. प्रकाश पडुकोण यांच्यानंतर 'ऑल इंग्लंड बॅडमिंटन' स्पर्धा जिंकलेले पुलेला गोपीचंद अॅकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. त्यांच्या 'गुरुकुल'च्या हातात 'मॅक्सिमस'नं हात मिळवला आहे. नगरच्या खेळाडूंना नवं आणि मूलभूत काही शिकायला मिळावं म्हणूनच ही युती आहे. इथं आपलं नाणं खणखणीत वाजविणाऱ्या खेळाडूंना पुढे विद्याधर, गोपीचंद यांच्या प्रबोधिनीत शिकण्याची संधी मिळणार आहे.\nबॅडमिंटन म्हणजे नगरमधली सध्याची 'इन थिंग' आहे. सर्व वयोगटांतली मंडळी रोज आवर्जून कोर्टवर दिसतात. त्यामुळंच की काय, प्रबोधिनीत सर्वाधिक संख्या आहे ती बॅडमिंटनच्या खेळाडूंची. सध्या १०० खेळाडू नियमित प्रशिक्षण घेतात. याशिवाय २० खेळाडू प्रतीक्षायादीवर आहेत. ही संख्या एकदम वाढलेली नाही. पहिल्या वर्षी ती ३०-४० होती; मग दुप्पट झाली आणि यंदा तिनं शतक गाठलं. खेळाडूला प्रवेश मिळाला की, लगेच बॅडमिंटनचे धडे शिकवायला सुरुवात होत नाही. आधीचे तीन महिने प्रत्येकाला 'फिजिकल फिटनेस' अजमावून पाहावा लागतो. त्यानंतर त्याला खेळाच्या अगदी मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. तिथं धडे गिरवल्यानंतर त्याची वरच्या तुकडीत रवानगी होते. सध्या वाडिया पार्क स्टेडियमच्या बॅडमिंटन क्रीडागारात रोज सायंकाळी ४ ते ५, ५ ते ६, ६ ते ७ आणि ७ ते ९ या चार तुकड्यांमध्ये बॅडमिंटनपटू शिकताना दिसतात. शेवटच्या तुकडीतले विद्यार्थी म्हणजे जणू हुश्शार मुलांची 'स्पेशल बॅच'. त्यांना स्पर्धात्मक पातळीचं प्रशिक्षण दिलं जातं. या तुकडीतल्या खेळाडूंना पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० या दोन तासांचं प्रशिक्षण सक्तीचं आहे. सर्वोत्तम १० खेळाडूंना विद्याधर यांच्या विजयवाडा येथील अॅकॅडमीत प्रशिक्षणाची संधी मिळेल. त्यासाठी त्यांना येणाऱ्या खर्चातील निम्मा वाटा 'मॅक्सिमस' उचलणार असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं. बॅडमिंटनची दर तीन महिन्यांनी स्पर्धा होते. त्यामुळे स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यातील प्रशिक्षणार्थींना होतो आणि त्यातून त्यांना स्वतःमधील उणिवा-क्षमतांची जाणीव होते.\n'मॅक्सिमस'च्या बुद्धिबळ शिबिरात चाल शिकवताना शार्दूल गागरे.\n'मॅक्सिमस स्पोर्ट्स अॅकॅडमी'चं काम तंत्रशुद्ध रीतीनं चालतं. एखाद्या खेळाडूला प्रवेश मिळाला की, लगेच दुसऱ्या दिवशी त्याला तो खेळ शिकवायला सुरुवात होते, असं मुळीच नाही. संबंधिताची शारीरिक क्षमता, आवड, कल हे सगळं तपासून खेळाची निवड केली जाते. याचं कारण साधं आहे. कोणत्या वयात खेळायला सुरुवात करावी, कोणता खेळ योग्य आहे, याचं तंत्रशुद्ध ज्ञान फारच कमी मुलांच्या पालकांना असतं. क्रिकेट आणि बॅडमिंटन सध्या गाजणारे खेळ आहेत, म्हणून बहुसंख्यांची ओढ तिकडेच असते. 'मॅक्सिमस'मध्ये दाखल झाल्यानंतर आधीचे तीन महिने 'फिजिकल फिटनेस' विभागात घालवावे लागतात. त्यातून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होते. ही मुले, त्यांचे पालक यांच्याशी संदीप जोशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधतात. या गप्पांमधून ते मुलांचं मानस जाणून घेतात. या चर्चेनंतर मुलासाठी कोणता खेळ योग्य हे निश्चित केलं जातं. शारीरिक तंदुरुस्तीबाबत 'अॅकॅडमी' एवढी आग्रही का आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना जोशी म्हणाले की, यातून मुलांची क्षमता किती नि काय आहे, हे समजून येतं. त्यानुसार मुलांसाठी योग्य असलेला खेळ निवडता येतो. दुसरं म्हणजे परीक्षेच्या किंवा सुटीच्या काळात मुलं खेळायला येत नाहीत. त्यामुळं वर्षभर शिकलेलं या गैरहजेरीत विसरायला होतं. तंदुरुस्तीचे व्यायाम घरीही करता येतात. त्यातून खेळाबद्दलची ओढ कायम राहते.\nसंकल्प थोरातला अत्याधुनिक सायकलची भेट.\nगुणी खेळाडूंना मदतीचा हात देण्यातही 'मॅक्सिमस' आघाडीवर आहे. हे खेळाडू ऑलिंपिक मान्यताप्राप्त खेळाचेच हवेत, असा त्यासाठी कटाक्ष आहे. असं पुरस्कृत करण्याआधी खेळाडूची पूर्ण माहिती मिळविली जाते. त्याची कामगिरी काय, त्याचं सातत्य कसं आहे, या खेळाला किती भवितव्य आहे, हे बारकाइनं पाहिलं जातं. त्या त्या खेळातल्या तज्ज्ञाचंही मत घेतलं जातं. वर्षभरात साधारण १०-१५ खेळाडूंना पुरस्कृत केलं जातं. शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे ही मदत दिली जाते. रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेले बॅडमिंटून खेळाडू मनू अत्री व सुमित रेड्डी, बुद्धिबळ खेळाडू शार्दूल व शाल्मली गागरे यांना आतापर्यंत अशी मदत मिळाली आहे.\n'खेलो इंडिया'त चमकलेली भाग्यश्री फंड.\nऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकावं, हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून अॅकॅडमीचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथलं कामकाजही त्याला अनुसरूनच चालतं. शिस्त आणि नियम यांच्या पालनावर भर आहे. खेळाचं प्रशिक्षण दिलं जातंच; पण आहाराबाबतही मार्गदर्शन केलं जातं. ज्यातून प्रेरणा मिळते अशा कार्यक्रमांचं आयोजन, क्रीडाविषयक चित्रपट-माहितीपट खेळाडूंना दाखविले जातात. खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या योजना असतात. अॅकॅडमी निःशुल्क नाही. कोणतीही गोष्ट मोफत मिळाली की, तिचं महत्त्व राहत नाही, हे जाणून नाममात्र शुल्क घेतलं जातं. तथापि त्यातून सगळा खर्च भागत नाही. मग तो वाटा नरेंद्र फिरोदिया उचलतात. गुणवान खेळाडूंसाठी वेगळा विचार सुरू आहे. बॅडमिंटनच्या तिमाही स्पर्धेत पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना शुल्क माफ केलं जातं.\nश्रेया गहिलेचा अचूक नेम करंडकावर!\nबॅडमिंटनप्रमाणंच सध्या तिरंदाजी व ज्यूदो यांचंही प्रशिक्षण इथं सुरू आहे. फुटबॉल आता लवकरच सुरू होईल. सध्या सुरेखा शिरसाट (ज्यूदो), जितेंद्रकुमार, रोहित शर्मा व तेजस पवार (बॅडमिंटन), पल्लवी सैंदाणे (फुटबॉल) असे मार्गदर्शक आहेत. येत्या काही काळातच 'मॅक्सिमस' रायफल शूटिंग, टेबल टेनिस, लॉन टेनिस या खेळांकडं वळणार आहे. 'मॅक्सिमस स्टेडियम'चं कामही लवकरच सुरू होईल. अॅकॅडमीचे धुरिण सध्या आणखी मोठी स्वप्नं पाहत आहेत. नेमबाजीची स्वतंत्र अॅकॅडमी येत्या दोन वर्षांत सुरू करण्याचं आणि 'साई'च्या धर्तीवर निवासी प्रबोधिनी स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे. अॅकॅडमीचा आजवरचा प्रवास नि त्याची गती पाहिली, तर ही स्वप्नं साकार होण्यात फार काही अडचण येईल, असं मुळीच वाटत नाही.\n'मॅक्सिमस'. हा शब्द आहे मूळचा लॅटिन. म्हणजे Greatest, Largest. मराठीत महत्तम. या शब्दाला जागणारी भव्यदिव्य स्वप्नं 'मॅक्सिमस अॅकॅडमी' पाहत आहे. या स्वप्नांना क्रीडा दिनी नवे पंख फुटावेत...\nया खेळाडूंना मिळाली मदत\n🏆 बॅडमिंटन - मनू अत्री - रिओ ऑलिंपिक, २०१६\n🏆 बॅडमिंटन - सुमित रेड्डी - रिओ ऑलिंपिक, २०१६\n🏆 बुद्धिबळ - ग्रँड मास्टर शार्दूल गागरे\n🏆 बुद्धिबळ - वूमेन्स इंटरनॅशनल मास्टर शाल्मली गागरे\n🏆 क्रिकेटपटू - प्रणव धनवडे - शालेय स्पर्धेत एका डावात १००९ धावा करण्याचा जागतिक विक्रम\n🏆 कुस्ती - भाग्यश्री फंड - 'खेलो इंडिया'मध्ये सुवर्णपदक आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदके.\n🏆 कुस्ती - सोनाली मंडलिक - राष्ट्रीय मानांकित खेळाडू\n🏆 सायकलिंग - संकल्प थोरात - गुवाहाटीतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक तिसरा क्रमांक.\n🏆 मुष्टियुद्ध - आरती भोसले - राष्ट्रीय खेळाडू\n🏆 तिरंदाजी - अभिजित रिंढे\n🏆 चालण्याची शर्यत - सुवर्णा कापसे - राष्ट्रीय खेळाडू\n🏆 चालण्याची शर्यत - पूजा कापसे - राष्ट्रीय खेळाडू\n(कृपया, लेखी परवानगीशिवाय हा लेख किंवा त्यातील भाग कोणत्याही माध्यमासाठी वापरू नये.)\n- August 28, 20183comments:
मुंबई, 14 फेब्रुवारी : उत्तराखंड (Uttarakhand) मधील चमोली (Chamoli) जिल्ह्यात आलेल्या जलप्रयाला आता एक आठवडा उलटला आहे. यामध्ये आजवर 40 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 165 जण अजूनही बेपत्ता आहेत. तपोवन टनेलमधून (Tapovan Tunnel) 120 मीटर खोदकाम केल्यानंतर रविवारी 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता या शोधकार्याचा वेग वाढवण्यात आला आहे. चमोलीच्या ऋषिगंगा प्रकल्पात आलेल्या जलप्रलयाचे साक्षीदार असलेले जण सुदैवी ठरले, कारण ते आज जिवंत आहेत. तपोवन मधील NTPC प्रोजेक्टमध्ये अवजड वाहन चालवणारे 27 वर्षांचे ड्रायव्हर विपूल कैरेनी देखील या सुदैवी व्यक्तींपैकी एक आहेत. मागच्या रविवारी त्यांची ड्यूटी होती. ऋषीगंगामध्ये जलप्रलय होण्याच्या पूर्वी त्यांना त्यांची आई मंगश्री देवी यांचा फोन आला होता. ( वाचा : Glacier Burst in Uttarakhand: सेनेचे जवान ठरत आहेत देवदूत ) त्या दिवशी नेमकं काय घडलं? "मला आईचा फोन आला होता. मी कामात असल्यानं सुरुवातीला त्या फोनकडं दुर्लक्ष केलं. पण आईनं हार मानली नाही. ती सतत फोन करत होती. अखेर मी तिचा फोन उचलला. तेव्हा धौलीगंगामध्ये पूर आला असून तू तुझ्या सर्व सहकाऱ्यांसह तातडीनं बाहेर पड, असं आईनं सांगितलं. आईच्या सुचनेप्रमाणे आम्ही सर्व जण वागलो. त्यामुळे आमचा जीव वाचला. " अशी त्या दिवसाची आठवण विपूल यांनी सांगितली आहे. "माझं गाव उंचावर आहे. जलप्रलय आला तेव्हा आई घराच्या बाहेर काम करत होती. तिनं पूर पाहिला आणि लगेच मला फोन केला. आईनं वेळीच फोन केला नसता, तर आज मी आणि माझे दोन डझन सहकारी जिवंत नसतो," असं विपूलनं सांगितले आहे. "आपल्याला रोजच्या कामासाठी 600 रुपये मिळतात. मात्र रविवारी काम केलं तर दुप्पट पैसे मिळतात. 7 फेब्रुवारी रोजी रविवारची सुट्टी असल्यानं मी कामावर गेलो होतो. तेव्हा सकाळी 10 वाजता आईचा फोन आला. त्यानंतर मी आणि माझे सहकारी एका शिडीच्या मदतीनं तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झालो. " असं विपूल यांनी म्हंटले आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Hijab Row : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब घालण्याचा वाद केवळ देशातील वाद राहिला नसून हा वाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. हिजाब प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. अनेकांनी हिजाब घालण्यास समर्थन दिले आहे तर अनेकांनी या नकार दिला आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश घालणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, शाळा कॉलेज हे शिक्षण घेण्याचे केंद्र आहे. इथे केवळ शिक्षणच दिले गेले पाहिजे. इतर धार्मिक किंवा राजकीय विषय मध्ये आणू नयेत. शाळेत विद्यार्थ्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. शाळेत हिजाब घालण्याच्या वादावर आदित्य ठाकरे म्हणाले, शाळेत जिथे जिथे गणवेश घालणे सक्तीचे तिथे गणवेश शिवाय इतर कोणत्याही गोष्टींना जागा मिळता कामा नये. विद्यार्थ्यांनी गणवेशाचे पालन करावे. शाळा कॉलेज शिक्षणाचे केंद्र आहे तिथे केवळ शिक्षणच मिळायला हवे. शाळेत विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार आणि चांगले शिक्षणच मिळायला हवे अशी शिवसेनेची भूमिका आहे. एका शाळेपासून सुरू झालेला हिजाबच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. बिकिनी असो, घूंगट असो, जीन्स किंवा हिजाब. महिलांनी काय घालायचे हा महिलांचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने त्यांना दिला आहे. महिलांचा अशा प्रकारे छळ बंद करा. लडकी हू लड सकती हू असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केले आहे. शाळेत आणि महाविद्यालयात विद्यार्थींनी हिजाब घालण्याच्या वादावरुन कर्नाटकात निदर्शने सुरू झाली आणि या वादाने आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. कर्नाटकात सुरू झालेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. महाराष्ट्रातील मालेगाव, बीड आणि मुंबईत काही अंशी पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी धार्मिक कटुता निर्माण होणार नाही असे कोणतेही व्यक्त किंवा कृती न करण्याचे आवाहन केले आहे.
कोकणातील गणेशोत्सव - कोंकण वृत्तांत\nkonkanvruttant Sep 3, 2019 09:28 0\nकोकणी माणूस चाकरमानी बनुन कामाच्या शोधात मुंबईत आला. मात्र त्याने त्याच्या परंपरा, सण, संस्कृती कायम जपली. कोकणी माणूस आपल्या सणांसाठी आपल्या परंपरांसाठी दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कोकणात जातो. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती म्हणजेच कोकणातला गणेशोत्सव होय! कोकणातील गणेशोत्सव सर्व कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणं, भजनं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणे असा हा उत्साहवर्धक सण आहे.\nकोकणात भाद्रपदातील गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. हा उत्सव मुख्यतः भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत चालतो. परंतु आपापल्या इच्छेनुसार, पद्धतीनुसार कुणी एक दिवस, दीड दिवस, तीन, पाच, सात, दहा दिवस गणेशोत्सव साजरा करतात. कोकणात काही ठिकाणी २१ दिवस गणपती आणण्याचीही प्रथा आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गजाननाचे घरोघरी आगमन होते. बालगणपतीपासून खूप मोठय़ा आकाराच्या गणेशमूर्ती आणल्या जातात.\nकोकणात सार्वजनिक वा घरगुती गणपतींचे आगमन हा एक जल्लोषच असतो. अनेक गावांतून, गावांतील ४०-५० कुटुंबीयांचे गणपती एकत्रित डोक्यावरून वाहून नेतात. गावांतील लोक, आबालवृद्ध महिला, उत्सवाचे कार्यकत्रे पारंपरिक वेशामध्ये लेझीम खेळत, नाचत-गात ढोल-ताशांच्या गजरांत, गुलाल उधळत, वाजत-गाजत गजाननाचे स्वागत करतात, हा देखावा अगदी नजरेत भरण्यासारखा असतो. यातून कोकणातील संघटित उत्सवाचे स्वरूप लक्षात येते.\nभाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा, नैवेद्य दाखविला जातो, आरती केली जाते. गणपतीला खास उकडीचे मोदक नैवेद्यासाठी असतात. आरतीची मजा ही आगळीवेगळी असते. नातेवाईक-शेजारी-पाजारी सगळे जमून प्रत्येक घरी वेळा ठरवून ताला-सुरांत वेगवेगळ्या चालींमध्ये आरत्या म्हटल्या जातात. दोन-दोन तास टाळ, झांजा, ढोलक-मृदंगाच्या साथीने भक्तीत एकरूप होणारे भक्तगण कोकणातच आढळतात. वर्षभर कधी-कुणाकडे जाणं होत नसले तरीही आरतीला, गणपती पाहायला एकमेकांकडे जाण्याची पद्धत इथे आहे. या भेटीमुळे नाते संबंधांनाही बळकटी येते.\nकोकणातील गणेशोत्सवाला धार्मिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत. गणपतीच्या कालावधीत दुपारनंतर भजन, प्रवचन तर रात्री कीर्तन, नमन, खेळे, दशावतार, अशा अनेकविध कार्यक्रमांचीही रेलचेल असते. सांस्कृतिक उपक्रमांवर भर देत अतिशय सद्भावनेने लोककला संवर्धनाचे व संस्कृती जपण्याचे उदात्त कार्य या उत्सवाद्वारे होते. गावकऱ्यांच्या सोबतीने आणि टाळ-मृदंगाच्या साथीने भजन भक्ती ही कोकणची खासियत आहे. गणेशोत्सवात भजनांना अधिकच रंग चढतो. भारतीय संस्कृती मूल्य जतन करण्याचे मोलाचे काम गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणवासीय करत असतात.\nकोकणांमध्ये गणपतीच्या शेजारी गौरीची स्थापना करतात. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणालाही एक वेगळं वलय आहे. भाद्रपद शुद्ध पक्षात, जेष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन करतात. आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या, दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जनासोबत त्यांचे विसर्जन करायचे अशी चाल आहे. गौरी विविध ठिकाणी विविध रूपात पूजतात. मुखवटय़ांच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरडय़ाच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खडय़ांच्या रूपात पूजल्या जातात. मुखवटय़ाच्या गौरी अत्यंत आकर्षक, सुंदर व अलंकृत असतात. या 'गौरी ओवसा' करण्याची पद्धत असल्याने या सणाला माहेरवाशिणी माहेरी येतात. एकूणच माहेरवाशिणी घरी आल्यामुळे कुटुंबात आनंदीआनंद नांदत असतो.\nकोकणातील गणेशोत्सव हा अर्थकारणांचाही मोठा स्रोत आहे. या कालावधीत शहरांतून मोठय़ा प्रमाणात भक्तवर्ग आपापल्या गावी येतो. त्यामुळे कोकण रेल्वेची सर्व तिकीटे चार-चार महिने आधीच बुक झालेली असतात. भक्तवर्गाला प्रवासासाठी शासनाकडून विशेष तरतूद व सोयीसुविधाही पुरवल्या जातात.\nकोकणात गणपती आरास, सजावट याला विशेष महत्त्व दिलं जातं. आर्थिक परिस्थिती उत्तम नसली तरी गणेशोत्सवासाठी काहीतरी करून उत्तम असं मकर गणेशोत्सवासाठी काहीतरी करून उत्तम असं सजावटीचं सामान घेणारे श्रद्धावान भक्त कोकणात आढळतात. त्यामुळे सजावटीचे रंगरंगोटीचे साहित्य, रंगबिरंगी फुले, फळे यांनी बाजारपेठ फुलून गेलेली असते. तसेच पेणच्या गणपती मूर्ती फक्त कोकणातच नाही तर महाराष्ट्रात, देशात सर्वत्र पाठविल्या जातात. त्यामुळे कोकणातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. पिढय़ापिढ्या एकाच विशिष्ट गणपती कारखान्यामधून आपल्याला हवी तशी मूर्ती घडवून घेण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. यातूनच मूर्तिकार व गणेशभक्त कुटुंबीय यांच्यातील ऋणानुबंध दृढ होतात.\nगणपती विसर्जन हा डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग असतो. गेली आठ ते दहा दिवस दिवस आपल्या सोबत आपल्या घरात राहिलेला हा बाप्पा विसर्जनासाठी पाण्यात सोडताना जणूकाही आपल्या घरातलाच कोणीतरी माणूस आपल्याला सोडून जातोय अशी भावना निर्माण होते. काहीजणांना तर अक्षरशः अश्रू आवरेनासे होतात. 'पुढच्या वर्षी लवकर या' हा संदेश गजाननाबरोबर नातेवाईकांनाही देत हा आनंद सोहळा संपतो आणि पुन्हा एकदा कोकणवासीयांना वेध लागतात ते पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे !\nलेखक : दिनेश मोरे (डोंबिवली)\nइमेल : dineshmore1983@gmail.com\nराष्ट्रवादीकडून कल्याण पूर्वेतून आप्पा शिंदे तर पश्चिमेत रमेश हनुमंते?
पिस्तुल हिसकावणाऱ्या काळेसह चौघांना अटक : डॉ. अभिनव देशमुख - Live Marathi\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : यादवनगर भागात बेकायदेशीर सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पथकावर हल्ला करुन पोलीस कर्माचाऱ्याकडून पिस्तुल हिसकावणाऱ्या निलेश काळेसह त्याच्यासोबत असलेल्या सुंदर दाभाडे, जावेद मुल्ला आणि सलमान मुल्ला यांना पकडण्यात पोलीसांना यश आले असून या प्रकऱणातील पिस्टल व त्यामधील पाच राऊंड पोलीसांनी हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.\nयादनगरात ८ एप्रिल रोजी प्रशिक्षणार्थी अतिरिक्त पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने सलीम मुल्ला व त्याचे भाऊ चालवत असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सलीम मु्ल्लाची पत्नी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवीका शमा मुल्ला यांच्यासह ४० मुल्ला समर्थकांनी पोलीसांवर हल्ला आणि गोंधळ घातला होता. तसेच पोलीस कर्मचारी निरंजन पाटील यांच्याकडील पिस्टल हिसकावून घेतले.\nयाप्रकऱणातील नगरसेविका शमा मुल्लासह २५ जणांना अटक केली असून इतर १० ते १५ जणांचा समावेश असल्याने त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी पिस्टल हिसकावणारा मुख्य आरोपी निलेश काळे तसेच राजू मुल्ला, सुंदर दाभाडे, जावेद मुल्ला हे घटने दिवशी पळून गेल्यानंतर आज सकाळी लक्षतिर्थ वसाहत येथे जमून कोल्हापूर शहर सोडून बाहेर जाण्याच्या तयारीत होते. याबाबत पोलीसांना माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडील पथकाने लक्षतिर्थ वसाहत येथे या चौघांचा शोध सुरु केला.\nत्यावेळी चारही आरोपी दोन मोटरसायकलवरुन जात असल्याचे दिसले. त्यांनी पोलीसांना पाहून मोटरसायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण हवालदार राजू आडुळकर यांनी मागे बसलेल्या निलेश काळे याला झेप घालून पकडले. इतर तिघे मोटरसायकलसह शिंगणापूरच्या दिशेने गेले. त्यांचा पाठलाग केला असता पुढे रस्ता संपल्याने मोटरसायकली तिथेच टाकून तिघेही उसाच्या शेतात लपण्यासाठी गेले. पोलीसांनी शेताला घेराव घालून राजू मुल्ला, सुंदर दाभाडे यांना पकडले. तत्पूर्वी राजारामपुरी पोलीसांनी सलमान मुल्ला याला अटक केली असून राजू मुल्ला मात्र मिळून आला नाही.\nया कारवाईत पोलीस उपनिरिक्षक सचिन पंडीत, राजेंद्र सानप, दादा पवार, राजू आडुळकर, राजू हंडे, रणजीत कांबळे, अजित वाडेकर, रमेश डोईफोडे, रोहित पवार, किरण शिंदे आदींनी भाग घेतला.
अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. बीड : 'अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, तसेच अजित पवार ज्या दिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,' असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी येथे आज दिला. अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक होत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी प्रतिक्रिया देताना खांडे बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाक रे यांनी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मंदिर निर्मितीसाठी अयोध्या दौऱ्याचे देखील आयोजन केले आहे, असे ते म्हणाले होते. याविषयी जालना येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलने केली. आज बीडमध्ये अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, गणेश वरेकर, जयसिंह चुंगडे, हनुमान पिंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंडलिक खांडे यांच्या ह्या वक्तव्याचा आणि अजित पवार यांच्या विषयीच्या लिखाणांचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे राष्टÑवादी काँग्रेसतर्फे दहन करण्यात आले.
'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला या चित्रपटाची आता भुरळ पडली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद, गाणी, सर्व कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांना खूप आवडले आहे. सोशल मीडियावर हा चित्रपट आवडल्याचे सांगत या चित्रपटाच्या टीमचे नेटकरी भरभरून कौतुक करीत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. तर या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवली. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेदेखील या गाण्यावर ताल धरीत रील बनवले आहे. शिल्पा शेट्टी हिने नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याची हूक स्टेप करीत थिरकताना दिसत आहे. अत्यंत आनंद घेत तिने या गाण्यावर नृत्य केले. हा व्हिडीओ पोस्ट करीत तिने लिहिले, "बहरला हा मधुमास नवा. " तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. तिने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तिने केलेला नाच सर्वांना आवडला आहे. तर तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत नेटकरी तिचे कौतुक करीत आहेत.
शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला. बिटरगाव : शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला. आता पैनगंगा तीरावरील गावांमध्ये ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी काठच्या लोकांना पावसाळ्यात कृत्रिम पूर तर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. इसापूर धरणाची निर्मिती १९६७ साली झाली. तेव्हापासून धरणातील पावसाळ्यात जास्तीचे झालेले पाणी नदीपात्रात सोडल्याने महापुराची परिस्थिती निर्माण होते. या पूर परिस्थितीचा फटका नदी किनाऱ्यावरील गावांना व शेतजमिनींना मोठ्या प्रमाणात बसतो. या नदी तीरावरील गावांमध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण होते. नागरिकांना व गुराढोरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यावर्षीचे चित्र तर अधिकच भयावह आहे. नदी किनाऱ्यावरील ४५ गावांची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतींनी पैनगंगा नदीवरून केली आहे. परंतु पाण्याअभावी ही योजना आॅक्टोबर महिन्यापासूनच बिनकामाची ठरत आहे. गावातील महिलांना आपली रोजमजुरी बुडवून दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. शिवाय शाळकरी मुलेसुद्धा शाळेत न जाता सायकलवरून दिवसभर पाणी आणतात. शेतकरी व शेतमजुरांनाही हेच काम दिवसभर करावे लागते. कुणी बैलबंडीने, कोणी सायकलने तर कोणी डोक्यावर पाणी आणताना दिसतात. या परिसरातील संपूर्ण ४५ गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. या भागातील नागरिकांनी इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासंबंधी ग्रामपंचायतीच्या ठरावासह निवेदनेसुद्धा सर्व संबंधितांना दिली आहे. सोबतच परिसरातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना देखील निवेदने देऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. इसापूर धरणामुळे पावसाळ्यात प्रचंड नुकसान नागरिकांना सहन करावे लागते. नुकसानग्रस्त नागरिकांचा धरणातील पाण्यावर पहिला अधिकार आहे. परंतु त्याची दखल कुणी घेत नाही. पाणीटंचाईमुळे दरवर्षी होरपळणाऱ्या हजारो नागरिकांचा वालीच कुणी उरला नाही. त्यामुळे इसापूर धरण या परिसरातील ४५ गावातील नागरिकांसाठी अभिशाप तर ठरत नाही ना, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
अहमदाबाद : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची चाचपणी काँग्रेसकडून सुरू झाली असून, त्यासाठी पक्षात आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करूनच विधानसभेची निवडणूक लढविण्याचे काँग्रेसने सूचित केले आहे. तेव्हापासून अनेक नेत्यांविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. पक्षनेत्यांच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेत विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांची नावे पुढे आहेत. अन्य नेत्यांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल; तसेच प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया व सिद्धार्थ पटेल स्पर्धेत आहेत. खरी स्पर्धा वाघेला व सोलंकी यांच्यातच आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय पातळीवर आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये यंदा भाजपचा पराभव करण्याची काँग्रेसला मोठी संधी असल्याचे सांगितले जाते. गुजरातमधील मोदी यांची उपस्थिती, आरक्षणासाठी पटेलांचे आंदोलन, दलितांमधील अस्वस्थता, सत्ताधाऱ्यांविरोधी रोष, भाजपमध्ये सक्षम नेत्याची उणीव आदी गोष्टी काँग्रेसला बळ देणाऱ्या आहेत. वाघेला, सोलंकी यांचे 'लॉबिंग' वाघेला यांच्या समर्थकांनी 'मुख्यमंत्री वाघेला' नावाचे फेसबुक पेज तयार केले असून, त्याद्वारे त्यांचा प्रचार सुरू केला आहे. 'गुजरातमध्ये भाजपचा पराभव करू शकणारे काँग्रेसचे एकमेव नेते,' असे त्यांचे वर्णन केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सोलंकी यांची पोस्टर अनेक ठिकाणी झळकली आहेत. अन्य राज्यांमधील नेत्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वाघेला व सोलंकी यांच्या दिल्ली वाऱ्याही वाढल्या आहेत.
आज, सनग्लासेस चमकदार सूर्यप्रकाशामुळे आपल्या डोळ्यांना अस्वस्थता किंवा हानी पोहोचवू शकत नाहीत. नक्कीच, ते फॅशन चा एक अविभाज्य भाग बनले आहेत. परंतु सनग्लासेस मूळतः 12 व्या शतकातील चीनमध्ये स्मोकी क्वार्ट्जपासून बनवले गेले होते, जेथे ते साक्षीदारांकडे विचारपूस करीत असतांना भावनांना लपवण्यासाठी घालण्यासाठी न्यायाधीशांचा वापर करत. आणि आज तेच सनग्लासेस युवा पिढी पासून ते वयस्क, सगळेच फॅशन अथवा डोळ्यांची सुरक्षा करणेसाठी वापरतात. आहे कि नाही नवल?
कोल्हापूर : जेव्हा मताचा आकडा वाढतो त्यावेळी याचा फायदा भाजपला होतो. याचे कारण की भाजपाचा खूप मोठा वर्ग असा आहे की तो मतदानाला जाण्यास कंटाळतो. मात्र या निवडणुकीत मताचा टक्का वाढल्याने भाजपचाच विजयी होणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मात्र मताधिक्क कमी होईल असेही ते म्हणाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या वादावादीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी ६ नंतर मतदान प्रक्रिया संपताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत या निवडणुकीत भाजपचा विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. यापत्रकार परिषदेस भाजपचे नेते, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या निवडणुकीत प्रशासनावर प्रचंड दबाब होता. सत्ता कशी वापरावी हे या सत्ताधाऱ्यांकडून शिकले पाहिजे. काल पैसे वाटले म्हणून किमान २०-२५ कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा या सत्ताधाऱ्याचा प्लॅन होता. मात्र कोणत्याही केसमध्ये काहीही निष्पण झालेले नाही.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर (Social Media) त्याचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हि़डिओमध्ये सुशांत 'सिनेमात काम मिळालं नाही, तर फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टीन सुरू करीन, नाहीतर स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करील,' असं सांगत आहे. सुशांतचा हा व्हिडिओ व्हायरल भयानी (Viral Bhayani) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. प्रत्येकापुढं वेगवेगळे प्रश्न आहेत, पण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. आज आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. याचं स्पष्ट कारण कळत नसलं तरी आपण अंदाज लावू शकतो. पण कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मांडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी सर्वत्र साजरी होत आहे. जिजाऊंनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्या शत्रूसोबत लढण्यासाठी बळ दिलं. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनदेखील त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता. धारावीत (Dharavi) आज 21 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोबाधित रुग्णांची संख्या 2089 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 77 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या एका चाहत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर या चाहत्याला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. हा चाहता बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील चंडी ठाणे क्षेत्रातील लोदीपुर गावातील रहिवाशी होता. मिडिया रिपोर्टनुसार, मृत चाहता 'सुशांतचा मृत्यू होऊ शकत नाही,' असं म्हणत होता. World Blood Donor Day 2020: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात 'जागतिक रक्तदाता दिन' साजरा होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे. 'राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे करोना वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाचा सामना करू शकलेले नाहीत,' अशी टिका रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले आज पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 87 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2622 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात 1087 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 1400 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार माजला आहे. आज दिवसभरात मुंबईत 69 जणांचा मृत्यू झाला असून 1383 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 56740 वर पोहचली आहे. आतापर्यंत मुंबईत 2111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Municipal Corporation Greater Mumbai) माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्यात आज 16 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा संख्या 200 पेक्षा जास्त झाली आहे. आज सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्यातील मणदुर, बुधगाव, पलूस, पणुब्रे, खेड, माळेवाडी, भाळवणी आणि भिकवडी येथील रुग्णांचा समावेश आहे. Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 3,427 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,568 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निकालासंदर्भात सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिवांनी केलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी (Former Pakistan Prime Minister Yousuf Raza Gilani) यांची कोरोना चाचणी (COVID19 Tests) पॉझिटिव्ह (Positive) आली आहे. यासंदर्भात पाकिस्तान मेडियाने वृत्त प्रकाशित केलं आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी (Shahid Khaqan Abbasi) यांनादेखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पेट्रोल-डिझेल वरील कर वाढ थांबवून सिगारेट आणि तंबाखू जन्य पदार्थांवर (Tobacco Cigarette) 'कोरोना सेस' (Corona Cess) आकारून महसुल तूट भरून काढा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) यांनी सरकारकडे केली आहे. सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमण (Milind Soman) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. मिलिंद सोशल मीडियावर आपले फिटनेस फोटो तसेच वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान, मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोमणने घरच्या घरी काही फळभाज्यांची शेती (Farming Video) केलेली पाहायला मिळत आहे. यात त्याने काकडी आणि दोडका हातात घेऊन फोटो शेअर केला आहे. केंद्र सरकारने मनाई केलेल्या एचटीबीटी (HTBT) बियाण्यांची लागवड करीत आज वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संघटने (Farmers Association) ने ठिकठिकाणी 'मी पण गुन्हेगार' या आंदोलनास सुरूवात केली. शेतकऱ्यांनी सरकारकडे एचटीबीटी व जीएम या जनुकीय तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांची लागवड करू देण्याची मागणी उचलून धरली आहे.
बदनापूर येथील डॉक्टराचा प्रताप; रुग्णाची पोलिसात धाव. चिखली(जि. बुलडाणा), दि. २३ः सततच्या पोटदुखीमुळे त्रस्त झालेल्या चिखली येथील रुग्णाची किडनी बदनापूर येथील डॉक्टराने शस्त्रक्रियेदरम्यान काढून घेतली असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसात तक्रार देताच डॉक्टरने या प्रकारची कबुलीही दिली आहे. चिखली तालुक्यातील मेरा बु. येथील ५२ वर्षीय अशोक लिंबाजी डोंगरदिवे यांना नेहमी पोटदुखीचा त्रास होत होता. वैद्यकीय निदानात मुतखडा असल्याचे स्पष्ट झाले होते. मुतखड्याचा आकार मोठा असल्याने त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे जालना जिल्हय़ातील बदनापूर येथे मोफत उपचार केले जात असल्याची माहिती मिळाल्याने डोंगरदिवे यांनी २ जुलै रोजी बदनापूर येथील नूर हॉस्पीटलमध्ये गेले. तेथील डॉ. एम. डी. गायकवाड यांनी शस्त्रक्रिया केली. मात्र, मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी त्यांची किडनीच काढून घेतली. ही बाब डोंगरदिवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुअण्णा पडघान व अन्य ग्रामस्थांना सोबत घेऊन डॉक्टरांना जाब विचारला. मात्र, डॉक्टरांनी अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक डोंगरदिवे यांनी बदनापूर पोलीसांत धाव घेत संबंधीत डॉक्टराविरूध्द रितसर तक्रार दाखल केली आहे. किडनी गायब असल्याची बाब समजल्यानंतर डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रूग्ण, ग्रामस्थ व नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यासह अरेरावी करणार्या डॉ. गायकवाड याने पोलिसांत तक्रार दाखल होताच चूक कबूल करून शस्त्रक्रियेदरम्यान दरम्यान किडनीला कात्री लागून रक्तस्त्राव झाला. त्यामुळे किडनी निकामी झाल्याने ती काढावी लागली, असे सांगून नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले आहे, अशी माहिती पिडीत रूग्ण डोंगरदिवे यांनी दिली आहे.
कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने "स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ - २०२२" स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका जनवाणी सहकारी संस्था कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी सेवा सह्योग फाउंडेशन, क्रिश डान्स अकॅडमी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रं. १२, डहाणूकर कॉलनी वा कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत लक्ष्मी नगर वसाहतीमध्ये शून्य कचरा प्रकल्पांतर्गत पर्यावरण पूरक किल्ले स्पर्धा व आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर किल्ले स्पर्धा ही दिवाळी सणाच्या प्रारंभीच्या कालखंडात घेतली जाते. पर्यावरण पूरक किल्ला स्पर्धा व आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना व नागरिकांना स्वच्छतेचा संदेश व कोणताही सण साजरा करत असताना पर्यावरण पूरक व निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर करण्याचा संदेश दिला जातो. तसेच मानवी जीवनामध्ये निसर्ग किती महत्त्वाची भूमिका बजावतो याविषयी जनजागृती केली जाते. आधुनिक कालखंडामध्ये दिवाळी हा सण साजरा करत असताना सर्रास नागरिक हे फायबर व प्लास्टर ऑफ पॅरिस चे किल्ले तसेच प्लास्टिक व थर्माकोल पासून तयार केलेले आकाश कंदील आणून आपल्या पाल्यांना देतात. त्या वस्तूंचा वापर झाला की कचऱ्या मध्ये टाकल्या जातात परत या वस्तू कचर्यात लवकर समाविष्ट होत नाही त्यामुळे पर्यावरणास व मानवाच्या आरोग्याला विघातक परिस्थिती निर्माण होते. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील व तत्पूर्वी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे ज्ञान व्हावे व ऐतिहासिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवावा शिवाय या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करावे. महाराष्ट्रात व भारतात अनेक किल्ले हे ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक म्हणून आपण जतन केलेले आहे त्या ठिकाणी नागरिक स्मारक पाहण्यासाठी जातात ते स्वच्छ व सुंदर राहिले पाहिजे हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. सदर कार्यक्रमाला लागणारे साहित्य कमिन्स इंडिया लिमिटेड जनवाणी व सेवा सह्योग फाउंडेशन या संस्थेने उपलब्ध करून दिले. या किल्ले स्पर्धेमध्ये क्रिश डान्स अकॅडमीचे प्रमुख कृष्णा शिंदे यांनी लक्ष्मी नगर मधील १५० सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच या मुलांनी सिंहगड, तोरणा गड, जंजिरा, शिवनेरी, प्रतापगड, विशाळ गड, रायगड व भुईकोट किल्ले तयार केले. या मुलांनी त्यांचा कल्पकतेतून किल्ले तयार केले शिवाय त्या किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा काय आहे व त्या किल्ल्यावर कोणाचे राज्य होते तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी कोणकोणत्या राजामध्ये युद्ध झाली व ती कशी ताब्यात घेतली याविषयी इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांनी कथन केल्या. तसेच विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे विभागीय अध्यक्ष कॉ. धनंजय आयवळे, कॉ. राम अडागळे व सुदिक्षा फाउंडेशनच्या उमा मॅडम सहभागी झाल्या. ४० विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील पळविण्याच्या कार्यशाळेमध्ये सक्रिय सहभाग घेतला व प्रत्येकाने पुठ्ठा रंगीत कागद गोठीव कागद, गम, लोकरी दोरा यापासून सुबक व सुंदर आकर्षक आकाश कंदील बनवले. सदर कार्यशाळा युवराज चाबुकस्वार, दिव्या जाधव यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. तसेच अनुष्का शेट्टी, राजश्री वारे, सचिन शेख, शितल घोडके, दिव्या साळुंखे, अल्लाउद्दीन शेख, सानिका शेटे यांनी उत्कृष्ट आकाश कंदील बनवले. सदर कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त माननीय सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार हनुमंत चाकणकर रूपाली शेडगे, यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड अण्णा ढावरे जनवाणीचे समीर अजगेकर, जयश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यकमाची सांगता !! फटाके मुक्त दिवाळीची शपथ !! मी एक जागरुक पुणेकर नागरिक म्हणून मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी व माझा परिवार, माझ्या बाजूचा परिवार, व माझ्या पुणे शहरातील परिवारास फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणेस कटीबद्ध राहिल व यासाठी दिवाळीतील प्रत्येक दिवस फटाकेमुक्तीसाठी देईल. मी स्वतः फटाके वाजवणार नाही व इतरानाही वाजवू देणार नाही. मी फटाके ऐवजी निरोगी शरिरयष्टी व ज्ञान योगासाठी मी खर्च करीन. निरोगी आरोग्यासाठी मी उचलले प्रत्येक पाऊल हे माझ्या पुणे शहरातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याला, पर्यायाने माझ्या भारत मातेच्या रक्षणाला व स्वच्छता ठेवण्याच्या कामी येईल. !! स्वच्छ पुणे !! !! निरोगी पुणे !! !!आपले पुणे!! !! फटाके मुक्त पुणे !! अशी शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजीनाथ गायकवाड यांनी केले. Previous articleसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक आता 'मेटा'
पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या पुण्यातील लोणावळ्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने हा 12 मेच्या रात्रीपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहे. तर जीवनावश्यक वस्तू केवळ घरपोच करण्याची मुभा देण्यात आलीये.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील 50 हजार एकर हेरे सरंजाम जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग 1 म्हणून नोंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले. त्यामुळे 18 वर्ष प्रलंबित असणारी अंमलबजावणी पुढील चार आठवड्यात पूर्ण होणार असून 47 गावातील 22 हजार हेक्टर क्षेत्राचा लाभ 60 हजार वहिवाटदारांना होणार आहे. मुंबई सरंजाम जहागीर एण्ड आदर इनाम्स ऑफ पॉलिटिकल नेचर रिझम्प्शन रूल्स 1952 नुसार जिल्ह्यातील हेरे सरंजाम खालसा करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील 47 गावातील 22 हजार 92 हेक्टर जमिनी (55 हजार 230 एकर) यामध्ये समाविष्ट आहेत. मूळ कब्जेदारांना 1 नोव्हेंबर 1952 पासून नियंत्रीत सत्ता प्रकाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर पूर्नप्रदान करण्यात आल्या आहेत. मूळ सरंजामदारांना व इतरांना पूर्नप्रदान करण्यात आलेल्या जमिनी वगळून उर्वरित जमिनी वहिवाटदारांना शेतजमीन कमालधारणा कायद्याच्या मर्यादेत नियंत्रीत सत्ता प्रकाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर देण्याची तरतूद आहे. त्यानुसार शिल्लक जमीन निर्गतीबाबत ज्या जमिनी नवीन व अविभाज्य शर्तीवर पूर्नप्रदान करण्यात आलेल्या आहेत, अशा जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी 1 नोव्हेंबर 1952 पासून आजपर्यंत जमीन प्रत्यक्षात कसणाऱ्या व्यक्ती, 1952 नंतर अतिक्रमण करून वहिवाटीत असणाऱ्या व्यक्तींकडून शेतसाऱ्याच्या 200 पट नजराना शासनाकडे भरून अशा सर्व जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी 18 डिसेंबर रोजी हेरे येथे ग्रामस्थांची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत आढावा घेतला असता कार्यवाही करण्यास अक्षम्य दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले. अशा बहुतांशी सर्व जमिनीवर अद्यापही 'सरकार ' हक्क नमूद आहे. यामुळे जमीनधारक व वहिवाटदारांना जमिनीची सुधारणा करणे, कर्ज काढणे, तारण गहाण देणे, वाटप करणे, हस्तांतरण व्यवहार नोंदणे आदी अडचणींना तोंड द्यावे लागत होते. - 7/12 वरील सरकार हक्क कमी होणार आहे. - भोगवटादार वर्ग 2 बंधन दूर होणार आहे. - वाटणी, पोटहिस्सा, कर्ज, तारणगहाण, हस्तांतरण यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. - पूर्नप्रदानानंतर शिल्लक क्षेत्र 'सरकार' हक्कात येणार. - खातेदारांना तहसिलदार, उपविभागीय कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. - कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. परिपूर्ण अर्ज तलाठ्याकडे द्यावा व पोहोच घ्यावी.
COM यूएसबी अडॅप्टर - विविध सीमा कनेक्ट करण्यासाठी पीसी परवानगी देते की एक साधन. दुर्दैवाने, प्रणाली अवरोध वर्तमान मॉडेल फार महत्वाचे फलित आहे कधी कधी नाही. त्यामुळे, वापरकर्ता त्याच्या क्षमता मर्यादित आहे. आम्ही अशा रिसीव्हरप्रमाणे एक साधन विचार असेल तर, तो केबल कनेक्ट करू शकत नाही. या प्रकरणात, वापरकर्ता फक्त अडॅप्टर (अडॅप्टर) मदत करण्यास सक्षम असेल. प्रकार कनेक्टर डेटा डिव्हाइस फरक. याच्या व्यतिरीक्त, हे घरी जोरदार वास्तववादी वातावरण आहे त्यांना करण्यासाठी की नोंद करावी. प्रथम, तथापि, हे महत्त्वाचे आहे त्यांच्या डिव्हाइसवर परिचित झाले आहे. वाहन USB कॉम अडॅप्टर पोर्ट, modulator पाठवणारा, आणि एक विद्युत्विरोधक समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये, आवाज किंवा संदेश मोठे करणारे उपकरण बोर्ड व्यतिरिक्त स्थीत करणे शक्य. बहुतेकदा निवडले या प्रकरणात एक वायर्ड मॉडेल आहे. Resistors या प्रकरणात फक्त ओपन टाईप वापरले. हे साधन मर्यादा वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे, सिग्नल प्रतिसाद वेळ सुमारे 20 msec असेल. इतर गोष्टींबरोबरच, साधन प्रसार रुंदी खात्यात घेणे आवश्यक आहे. हे घटक modulators अनेक तज्ञ फक्त दोन मार्ग वापर करण्याची शिफारस वाढ करणे. घरी जोरदार फक्त त्यांचे हात एक प्रकार एक USB कॉम अडॅप्टर करा. चिप या प्रकरणात तो प्रकार PP21 निवडा सल्ला दिला आहे. युनिट मध्ये प्रक्रिया स्थिर फक्त कनवर्टर मदत करेल. सामान्य ऑपरेशन साठी मॉडेल देखील उच्च दर्जाचे modulators आवश्यक आहे. म्हणाला, चीप तो फक्त कमी वारंवारता प्रकार निवडा करणे आवश्यक आहे. हे सर्व सुमारे 30 ms ठेवणे प्रतिसाद पर्याय सिग्नल होईल. तज्ञांचा चांगले चालू क्षारता कमी-शक्ती transistors वापर शिफारस करतो. या प्रकरणात, ते अनियमित पातळी 3B withstand मर्यादित करण्यासाठी भाग पाडतात. साधारणतया, या अडॅप्टर त्याचा सर्व प्रकारच्या आदर्श आहेत. शिवाय, ते रेडिओ कनेक्टर प्रकार SR101 कनेक्ट करता येते. या प्रकारच्या अडॅप्टर अनेक स्वरूप आधार करण्यास सक्षम आहेत. त्यांना न करता तो कन्व्हर्टर्स पाडणे अशक्य आहे. याव्यतिरिक्त एक चिप PP22 मालिका उचलण्याची गरज आहे. सर्व transistors तीन स्थीत पाहिजे. या प्रकरणात, त्यांना दोन पाठवणारा जवळ ठेवलेल्या पाहिजे. या प्रकरणात modulator तो नाडी प्रकार निवडा महत्वाचे आहे. सरासरी प्रतिसाद दर सिग्नल अंदाजे 30 ms आहे. स्थिर ऑपरेशन साठी गौण साधन पुरेसे आहे की. या प्रकरणात केबल, चिप परत निश्चित करणे आवश्यक आहे. हे सोल्डरींग प्रक्रियेदरम्यान modulator स्पर्श न करणे महत्वाचे आहे. Transistors देखील स्वच्छ ठेवले पाहिजे. एक छोटा धबधबा लाभ वारंवारता द्वारे प्रदान सर्किट इंटरफेसच्याग. सरासरी, हे घटक सुमारे 12 Hz आहे. काही तज्ञ चालू वहन वाढ amplifiers वापर सल्ला. गेल्या कनेक्ट साधन बंदर. USB-कॉम अडॅ ड्राइवर स्वतंत्रपणे निवडले आहे. करा एक प्रकार मायक्रो यूएसबी-कॉम त्यांच्या स्वतः च्या त्यांचे हात अडॅप्टर कठीण आहे. हे एक मानक-नसलेला पोर्ट उपस्थिती मुख्यत्वे आहे. तो प्रक्रिया करून ऐवजी उच्च खात्री करून घ्या. हे घटक आहे, तेव्हा किमान प्रतिसाद सिग्नल 20 ms होईल. स्वतंत्रपणे देखील कनवर्टर शोध लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या निवडलेले प्रमाणबद्ध प्रकार अनेक एक साधन घड्याळ वाढ. या प्रकरणात transistors एक स्टोअर उघडा सुधारणा निवडले जातात. सरासरी ते 3A येथे अनियमित withstand. वैकल्पिकरित्या, तुम्ही एकत्र उपप्रकार विचार करू शकता. या सर्व शेवटी सिग्नल प्रतिसाद गती वाढ होईल. कसे मानक अडॅप्टर प्रकार करण्यासाठी? हे अडॅप्टर केबल USB कॉम साधने ज्या कनेक्टर RSR21 टाइप आहे प्रस्तुत केले जाते. स्टोअर मध्ये पहिल्या ठिकाणी आपण एक modulator निवडणे आवश्यक आहे. या परिस्थितीत, आपण एक दिला नसणारे वर राहू शकता. तथापि, बँडविड्थ तो बऱ्यापैकी कमी आहे. तसेच, भविष्यात तेथे एकाच वेळी होणारे contours काही समस्या असू शकते. सादर समस्येचे निराकरण करण्यासाठी, आपण कंपनविषयक modulators वापरू शकता. ते जोरदार महाग बाजारात आहेत, परंतु साधन चाचणी फार चांगले आहेत, हे लक्षात येते. सर्व प्रथम ते तांबे संपर्क उपस्थिती भिन्न. त्यामुळे वर्तमान वहन त्यांच्या सर्वोच्च. इतर गोष्टींबरोबरच, चिप प्रकार PP20 तो खूपच चांगले काम करते. पोर्ट या प्रकरणात गेल्या प्रतिष्ठापीत करणे आवश्यक आहे. त्याच वेळी स्वतंत्रपणे केबल, ती निवडलेली आहे. RR220 प्रकार चिप वापरून अडॅप्टर कॉम USB आहे. या प्रकरणात, कनवर्टर रंगांचे विद्युत्विरोधक निवडलेल्या करणे आवश्यक आहे. याच्या व्यतिरीक्त, हे फक्त एक आरएफ modulator वापर करणे महत्त्वाचे आहे. सिग्नल प्रतिसाद गती वाढवण्यासाठी, अनेक तज्ञ खुले प्रकार transistors वापर शिफारस करतो. तथापि, बँडविड्थ साधन अत्यंत कमी आहे. यामुळे, ते साधन ड्राइव्हर प्रतिष्ठापन एक समस्या असू शकते. अतिरिक्त USB कॉम अडॅप्टर Triger आरोहित आहे. प्रणाली मध्ये घटक सर्किट इंटरफेसच्याग जबाबदार आहे. ही प्रक्रिया ग्रीड triode मध्ये स्थान घेते. वारंवारता विस्तार तो लक्षणीय वाढते. पोर्ट अडॅप्टर निवड न निवडलेले आहे. अडॅप्टर प्रकार प्रतिनिधित्व सोपे गोळा. तो प्रथम ते आज जोरदार लोकप्रिय आहेत की नोंद करावी. ते एक कनेक्टर प्रकार RSR 23 transducers चिप केवळ नाडी प्रकार जुळतात आहे की सर्व साधने योग्य आहेत. या प्रकरणात, transistors हे मानक वापर करणे चांगले आहे. तथापि, अनेक तज्ञ अजूनही ओपन-प्रकार भागांच्या त्यांच्या प्राधान्य द्या. दिलेल्या बाबतीत मापदंड बँडविड्थ वर्धक प्रकारावर अवलंबून असेल. आपण एक कमी वारंवारता बदल, साधन अपरिहार्य समस्या वापर करा. यामधून, रेखांशाचा बदल खूप चालू घटक patency वाढ. या प्रकरणात केबल उष्णता पसरवण्याची एक रीत उत्पादन चीप soldered आहे. कसे स्टोअर मध्ये एक मॉडेल निवडण्यासाठी? उच्च वारंवारता साधने RSR21 कनेक्टर प्रकार अडॅप्टर निवड करावी. लोड किमान 3 अ येथे ठेवली पाहिजे तांबे वाहक अपरिहार्यपणे ऑक्सिजन मुक्त करणे बंधनकारक केले आहे. या बाबतीत ते एक चांगला पट्टी उत्तीर्ण साधन अवलंबून करणे शक्य आहे. "डॉल्बी" आणि देखरेख करण्यासाठी डिजिटल स्वरूप अडॅप्टर आवश्यक आहे "सत्य. " यामधून, व्हिडिओ सिस्टम 720r कार्य करावे. साधने amplifiers सहसा संपर्करहित स्थापित. तथापि, काही मॉडेल स्वस्त analog सुधारणा आहेत. मॉडेल बाह्य शेल पीव्हीसी केले पाहिजे. घटक सिग्नल प्रतिसाद गती सरासरी सुमारे 30 ms आहे. सुमारे 2,500 रूबल्स खर्च उच्च दर्जाचे अडॅप्टर. अडॅप्टर USB-कॉम (अडॅप्टर) इतर साधने पासून ते एक modulator दुहेरी प्रकार आहे की मध्ये दर्शविले आहे. एक परिणाम म्हणून, क्षमता हे खूपच चांगले. ऑडिओ डिव्हाइस हे मॉडेल आदर्श आहे. या प्रकरणात दरम्यान सेट ट्रॅवर्स. सिग्नल स्थिरीकरण साधन उच्च वारंवारता शक्ती लागू. घटक प्रतिसाद गती नमुना सिग्नल 25 ms आहे. सुमारे 23 Hz येथे सरासरी वारंवारता सूचक साधन. अडॅप्टर चालू समायोजित करण्यासाठी एक लहान आरसा आहे. या प्रकारच्या अडॅप्टर मानला उच्च गती सिग्नल प्रतिसाद अभिमान सक्षम आहेत. या प्रकरणात कनवर्टर, कमी वारंवारता आहे. यामधून, modulator 23 Hz एक cutoff वारंवारता सेट आहे. हे सर्व तो जोरदार लवकर इनपुट अनियमित स्थिर करते. एक डिव्हाइस ड्राइव्हर प्रतिष्ठापन प्रदान प्रमुख स्वरूप करीता समर्थन पुरविते. या प्रकरणात आवाज किंवा संदेश मोठे करणारे उपकरण, एक नाडी प्रकार आहे. यामधून, उच्च प्रक्रिया करून पिढी घटक वाढत द्वारे शक्य झाले आहे. या अडॅप्टर तोटे कमी आच्छादन श्रेणी समाविष्ट करावा. उपकरणे कनेक्ट करताना या संघर्ष अनेकदा प्रणाली निर्माण झाले. याच्या व्यतिरीक्त, हे चिप मॉडेल मालिका संच RR19 आहे की नोंद करावी. या दरम्यानचे वारंवारता घटक पेक्षा 30 Hz नाही जास्त आहे. हा USB कॉम अडॅप्टर कनेक्टर प्रकार RSR30 स्थापित केला आहे अशा एक पीसी त्याचा कनेक्शन सुयोग्य आहे. या प्रकरणात एका प्रकारच्या शक्तीचे दुसर्या प्रकारच्या शक्तीत रुपांतर करणारे साधन, उच्च संवेदनशीलता वापरले जाते. या प्रकरणात, चिप दक्षिणेकडील सेट. Modulator 28 Hz एक काम वारंवारता तो सामील झाले. जास्त बँडविड्थ साधन गुणात्मक transistors प्रदान. हे देखील नोंद करावी कनवर्टर पासून विचलन प्रामाणिकपणाने दुर्मिळ आहे. तथापि, या अडॅप्टर तोटे अद्याप उपलब्ध आहे. सर्व प्रथम, ते लाट कुरूपता सह कनेक्ट केलेले आहेत. एक परिणाम म्हणून, डिव्हाइस समक्रमण दूर वापरकर्ता पासून खूप वेळ लागू शकतो. USB-कॉम RS232 अडॅप्टर कने प्रकार RSR21 साधने कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. या प्रकरणात, विशेष लक्ष उच्च दर्जाचे modulators दिले पाहिजे. ही चिप उपकरणे प्रकार PP21 मध्ये वापर केला जातो. Transistors हे मॉडेल analog स्वरूपात स्थापित. विशेष बँडविड्थ, ते भिन्न नाही. तथापि, प्रतिसाद गती घटक सिग्नल y 30 ms येथे अडॅप्टर प्रस्तुत केले जाते. हे मुख्यत्वे एक शक्तिशाली पाठवणारा स्थापना माध्यमातून साध्य होते. प्रणाली ऑपरेटिंग वारंवारता 23 Hz ते देखरेख करण्यास सक्षम आहे. या प्रकरणात, वापरले तांबे आम्हाला संपर्क साधा. सर्व प्रमुख स्वरूप प्रणाली द्वारे समर्थीत आहे. USB-कॉम अडॅ ड्राइव्हर निर्माता उपलब्ध आहे. डिव्हाइस बाह्य शेल संपूर्णपणे पीव्हीसी बनलेले आहे. पुढे मर्यादा वारंवारता घटक नक्की 30 Hz आहे की नोंद करावी. या संबंधात, बँडविड्थ साधन जोरदार उच्च आहे. या COM (पोर्ट USB) साधने कनेक्टर RSR26 मालिका आहे जे योग्य अडॅप्टर. विशेषतः, या मॉडेल मोठ्या प्रमाणावर पीसी स्वीकारणारा कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात. पुढील बदल नोटबुक मध्ये स्थापित केले जाऊ शकते. आकार अत्यंत संक्षिप्त आहे. चिप निर्माता आउटपुट एक coaxial प्रकार उपलब्ध आहे. संवेदनशीलता, हे मॉडेल इतर साधने वेगळे नाही. पुढे कार्य वारंवारता घटक काम केले 21 Hz आहे की नोंद करावी. या प्रकरणात, resistors च्या क्षारता खूप जास्त नाही. एक परिणाम म्हणून, सरासरी सिग्नल प्रतिसाद गती 20 ms आहे. दर्शक मॉडेल दरम्यानचे वारंवारता 33 Hz आहे. या अडॅप्टर Modulators thermo वापरले जाते. त्यांना लाट कुरूपता प्रामाणिकपणाने दुर्मिळ आहे. तो पुढे या अडॅप्टर अनेकदा एक सुंदर तापमान ग्रस्त की नोंद करावी. ते 40 अंश सेल्सिअस वापरले जाऊ शकते. या COM (पोर्ट USB) अडॅप्टर बहुतेकदा विविध त्याचा सेट आहे. ऑपरेटिंग वारंवारता दर नक्की 25 Hz आहे. तेव्हा हे संकेत 40 महेंद्रसिंग प्रतिसाद गती आहे. कनवर्टर या प्रकरणात निर्माता nehromaticheskogo प्रकार वापरले. त्याला जोरदार कमकुवत बँडविड्थ. तथापि, लोड तो withstand शकता 3 अ या प्रकारे, स्थिरता उच्च पातळीवर खात्री आहे, आणि डिव्हाइस मध्ये transistors क्वचितच होम करावा. उणीवा हेही घड्याळ गती मध्ये एक तीक्ष्ण वाढ नोंद करावी. कारण rassinhron modulator होते. USB-कॉम अडॅप्टर तारीख नियंत्रक कनेक्टर जोरदार लोकप्रिय असल्याचे मानले जाते. चिप्स त्याला विविध निवडले जाऊ शकते. एक नियम म्हणून, कमी वारंवारता transducers माऊंट केली जातात. हे मॉडेल सिग्नल प्रतिसाद गती चांगला आहे की खरं आहे. या प्रकारच्या अडॅपटरांकरीता Modulators केवळ दक्षिणेकडील लागू होतील. हे सर्व 30 Hz मर्यादा वारंवारता वाढ ठरतो. तथापि, साधन स्थिरता एक मॉडेल वर्धक वर प्रतिष्ठापीत असल्यास, नियंत्रित केला जाऊ शकतो. गौण साधन अंगभूत सह अडॅप्टर मागणी जास्त नाही. सर्व प्रथम ते पूर्णपणे नोटबुक योग्य नाही. याव्यतिरिक्त, चिप केवळ PP13 मालिका वापरले जाऊ शकते आहे. हे सर्व अखेरीस समस्या संख्या ठरतो. प्रामुख्याने 10 Hz कमी दरम्यानचे वारंवारता सेटिंग नोंद करावी. हा बोर्ड इनपुट विद्युत्विरोधक अभाव आहे. तसेच, या मॉडेल समस्या अनेकदा कारण अनियमित तीक्ष्ण ड्रॉप निर्माण होतात. कनवर्टर लोड, मात्र 3 अ मर्यादा ओलांडली वरील तोटे असूनही, तेव्हा अंगभूत अडॅप्टर अजूनही गौण साधन उपयुक्त आहेत तो उपकरणे RSR24 उत्पादन जोडलेले आहे बद्दल येतो तेव्हा हे येते.
PHOTOS: Uttarakhand glacier breaks off: See these selective photos of rescue operation bmh 90 । हाहाकार आणि जीव वाचवण्याची धडपड; पहा जलप्रलयानंतरची शहरा आणणारी दृश्य । Loksatta\nPublished on February 8, 2021 8:39 am\nदेवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये रविवारी निसर्गाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला. चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्यानं हाहाकार उडाला. या भयंकर दुर्घटनेत १२५ हून अधिक मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १० मृतदेह सापडले असून, इतरांचा शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Photo/ITBP)\nहिमकडा कोसळल्याने आलेल्या प्रलयात अलकनंदा नदीवरील जलविद्युत केंद्रे आणि ऋषीगंगा नदीवरील लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेले. (Photo/SDRF)\nनंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्यानंतर धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना रविवारी दुपारी महापूर आला. त्यामुळे नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला. त्याचबरोबर प्रलयामुळे 'नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन'चा (एनटीपीसी) धौलीगंगा नदीवरील तपोवन-विष्णूगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. (Photo/ITBP)\nऋषीगंगा नदीवरील एक लघू जलविद्युत प्रकल्पही वाहून गेल्याची माहिती इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली. ही घटना घडल्यानंतर तातडीनं मदत व बचाव कार्य हाती घेण्यात आलं. (Photo/SDRF)\nमहापूर आला तेव्हा या प्रकल्पांवर काम करणारे मजूर बोगद्यांमध्ये होते. त्यापैकी १२५जण अद्याप बेपत्ता आहेत. तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यामधून १६ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Photo/ITBP)\nआतापर्यंत १० मृतदेह सापडले असून १२५ मजूरांचा थांग लागत नसल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली. (Photo/SDRF)\nइंडो-तिबेट पोलीस दलाचे जवान, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कराच्या सहा तुकड्या बचावकार्य करीत आहेत. तर तीन हेलिकॉप्टरद्वारे दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून पूरग्रस्त भागांतील अनेक खेड्यांमध्ये मदतकार्य सुरू आहे. (Photo/ITBP)\nहिमकडा कोसळल्यानंतर सुरू झालेल्या प्रलयाची माहिती कळाल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली. स्थानिक यंत्रणांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. त्याचबरोबर एसडीआरएफच्या जवानांनाही पाचारण करण्यात आलं. (Photo/SDRF)\nनदीकाठावरील गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरल्यानं अनेकजण अडकून पडले. या नागरिकांना हवाई मदतीद्वारे सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. (Photo/IAF)\nहिमकडा तुटल्यानंतर आलेल्या जलप्रलयाबरोबर मातीचा भरावही सगळीकडे पसरला. त्यामुळे अनेक ठिकाणी मदत मोहीम राबवताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागत होता. (Photo/SDRF)\nबेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी श्वानांची मदत घेण्यात आली. (Photo/NDRF Director-General SN Pradhan)\nदुर्घटनेनंतर सुरू झालेलं मदत व बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. (Photo/NDRF Director-General SN Pradhan)\nया महाप्रलयात संपूर्ण एक छोटा जलविद्युत प्रकल्पच वाहून गेल्याचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले. 'एनटीपीसी' प्रकल्पाचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या भागातील घरेही वाहून गेली आहेत. त्याचबरोबर सीमा भागातील छावण्यांशी संपर्क तुटला आहे, असे इंडो-तिबेट पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. (Photo/SDRF)\nधौलीगंगा या गंगेच्या उपनदीला आलेल्या पुराचे पाणी दोन ते तीन मीटर उंचीवरून वाहत होते. पावरी, टिहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार, देहरादून या भागांना महापुराचा फटका बसला आहे. नदी काठावरील अनेक खेड्यांतील लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Photo/NDRF Director-General SN Pradhan)\nपौरी, टेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार आणि देहरादून या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे असून गंगेच्या काठावरील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) बचावकार्य करीत आहे. (Photo/IAF)\nलष्कराचे ४०० जवान घटनास्थळी मदतकार्य करत असून, दौन वैद्यकीय पथकेही पाठविण्यात आली आहेत. लष्कराचे अभियांत्रिकी कृती दलही घटनास्थळी तैनात करण्यात आलेले आहेत. (Photo/SDRF)
संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे. वर्धा : संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी खटेश्वर खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास पवार यांनी धर्मदायक आयुक्तांकडे कार्यकारिणीबाबत बदल अर्ज दाखल केला होता; पण तो फेटाळण्यात आला. यामुळे संत लोटांगण उपासक मंडळाचे अध्यक्ष कोण, हा प्रश्न निर्माण झाला होता. खटेश्वर खोडके यांनी ११ विश्वस्थांना मान्यता मिळावी, यासाठी ७ आॅगस्ट २०१५ ला सहायक धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. याबाबतचा निकाल जाहीर झाला आहे. आयुक्तांच्या निर्णयानंतर संस्थेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी सरपंच मारोती लोहवे, पोलीस पाटील अरविंद कांबळे उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष खटेश्वर खोडके यांचा उपस्थितांनी सत्कार केला. बैठकीत संस्थेचे सचिव मनोज बोदडे यांनी विचार व्यक्त केले. धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार मंडळाचा संपूर्ण व्यवहार आता नव्या कार्यकारिणीच्या ताब्यात आला आहे. सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यासाठी पूढील दिशा ठरविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
- ३ अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी हे परिवर्तन अतिशय लाभदायक ठरत आहे. - या वेळेस तुमच्या इन्कममध्ये चांगली वाढ होऊ शकते. - सोबतच उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनू शकतात. - कोणत्याही व्यावसायिक डीलमध्ये लाभ होऊ शकतात. - शुक्र यावेळेस तुमच्या संपत्ती आणि कुटुंबाचा दुसरा भाव आणि संगती आणि भागीदारीत सप्तम भावाचा स्वामी असेल. - त्यामुळे या काळात तुम्हाला जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. - सोबतच भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा मिळू शकतो. - व्यवसायिक प्रवासाचे योग संभवतात. हा प्रवास फायदेशीर ठरू शकतो. - यावेळेस तुम्हाला नव्या नोकरीचे प्रस्ताव येऊ शकतात. - सोबतच प्रमोशन आणि इन्क्रिमेंट होऊ शकते. - यावेळेस तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. - आर्थिक पक्षही मजबूत राहील. - जे लोक प्रॉपर्टी डीलर्स, रिअल इस्टेट एजंट्स, ट्रॅव्हल एजंट््स आणि ऑटोमोबाईल व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना विशेष लाभ होतील. - व्यापारात नवी डील फायनल होऊ शकते. - सोबतच यावेळेस भागीदारीच्या कामातही यश मिळू शकते. - यावेळेस तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. - सोबतच जर कुठे पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतात. - यावेळेस व्यापारात नवी गुंतवणूक करू शकता. - वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. - जे लोक वकी तसेच शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही वेळ चांगली आहे.
अमळनेर, जि. जळगाव : सध्या कॅन्सर ही खूप मोठी समस्या आहे. त्यावरील उपचार सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीला परवडत नाही. काही जण खर्चाच्या भीतीने त्यावर उपचार करणेही टाळतात. गरीबातील गरीब माणसाला परवडेल असे संशोधन भविष्यात करायचे आहे, त्यासाठी शासनाकडून नव्वद लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, असे प्रतिपादन आयआयटी गुवाहाटी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून निवड झालेले डॉ. विवेक बोरसे यांनी केले. येथील प्रताप महाविद्यालय अमळनेर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या ज्योती राणे यांनी डॉ. विवेक बोरसे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रताप महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन डॉ. बोरसे यांनी जे यश संपादन केले आहे ते आमच्यासाठी खूप आभिमानस्पद आहे. सामान्यज्ञान, विशेषज्ञान संशोधनविषयक ज्ञान व व्यावहारिक ज्ञान याचा उत्कृष्ट संगम असेल तर जीवनात उतुंग करिअर करता येते, असे मत उपप्राचार्य प्रा. एस. ओ. माळी यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ. बोरसे यांचे वडील भास्कर बोरसे, प्रा. वारुळे, प्रा. भुतडा, प्रा. गुलाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. बोरसे पुढे म्हणाले की, अभ्यासात सातत्य ठेवले की,, आत्मविश्वास निर्माण होत जातो आणि यश आपोआप मिळत जाते. आईवडील, शिक्षक, प्राध्यापक, मित्र, नातेवाईक यांच्यापासून खूप प्रेरणा मिळाली. बारावीनंतर आपले आवडीचे क्षेत्र निवडा, जे क्षेत्र निवडाल त्याच्यात जीव ओतून काम करा, मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. आयआयटी पवईमध्ये बेस्ट पीएचडी थिसिस अवॉर्ड मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला. शासनातर्फे इंस्पायर फॅकल्टी पुरस्कार मिळाला. यासाठी खूप मेहनत घेतली. त्याचे हे फळ आहे. प्रताप महाविद्यालयात शिकलो आणि याच महाविद्यालयात माझा सन्मान झाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. यातून प्रेरणा घेऊन भविष्यात अनेक आव्हानांवर मात करायची आहे, सर्वांचे आशीर्वाद आहेत, यश नक्की मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. शेकडो विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. उपप्राचार्य पी. आर. भावसार यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक पी. बी. अग्रवाल यांनी आभार मानले.
हेरिटेज परिसर म्हणून घोषित केलेल्या भागातील उपकरप्राप्त, धोकादायक किंवा आगीत भस्मसात झालेल्या इमारती जर 'ग्रेड-३'मध्ये असतील तर अशा इमारतींच्या पुनर्विकासाची परवानगी घेण्यासाठी हेरिटेज कमिटीकडे जाण्याची आवश्यकता नाही. हेरिटेज परिसर म्हणून घोषित केलेल्या भागातील उपकरप्राप्त, धोकादायक किंवा आगीत भस्मसात झालेल्या इमारती जर 'ग्रेड-३'मध्ये असतील तर अशा इमारतींच्या पुनर्विकासाची परवानगी घेण्यासाठी हेरिटेज कमिटीकडे जाण्याची आवश्यकता नाही. अशा इमारतींबाबत महापालिका आयुक्त निर्णय घेतील, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने सोमवारी दिला. मुंबईतील सुमारे ५८८ इमारती व आसपासच्या परिसराला हेरिटेज दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये शिवाजी पार्क परिसरातील किमान १८८ इमारतींचा समावेश आहे. या विरोधात डॉ. अरुण चितळे व महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याशिवाय दादर पूर्व, पारसी कॉलनी व माटुंगा पूर्व भागातील रहिवाशांनीही अॅड. संजय कदम यांच्यामार्फत हेरिटेजच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी हायकोर्टात सुरू असून सोमवारी न्या. मोहित शहा यांच्या खंडपीठाने वरील निर्वाळा दिला. मुंबई महापालिका आयुक्तांनी १४ ऑगस्ट २०१३ रोजी परिपत्रक काढून या भागातील इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्विकास करण्यापूर्वी हेरिटेज कमिटीची परवानगी घेण्याचे आदेश दिले आहे. पण, विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा कायदा असून, पालिका आयुक्तांचे हे परिपत्रक या कायद्याच्या विरोधात आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार शिवाजी पार्क भागातील जुन्या इमारतींचा विकास करण्यास कायद्याने परवानगी आहे, याकडे गेल्या सुनावणीत कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान, ग्रेड-१ व ग्रेड-२ मध्ये समाविष्ट असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासांबाबत आखलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतचा मसुदा सादर करा, असे आदेश कोर्टाने हेरिटेज कमिटीला दिले आहेत.
Big Boss14 च्या सेटवर आज 'राधे मां' एंट्री घेणार आहे. त्यावेळी नेमकी काय होईल याची झलक एकदा पाहा. मुंबई, 04 ऑक्टोबर : Big Boss 14 चा रविवारचा एपिसोड जबरदस्त होणार आहे. कारण 'बिग बॉस'च्या घरात चक्क 'राधे मां' (radhe ma) अवतरली आहे. घरातील सर्व कन्टेस्टंट आपल्या खेळात रमलेले असताना अचानक 'राधे मां' तिथे सगळ्याना आशीर्वाद द्यायला दाखल झाली. तिथं स्पर्धकांना आशीर्वाद तर दिलाच पण त्यांच्यासोबत मनसोक्त नाचण्याचा आनंदही तिनं घेतला. ज्यांच्यावर 'राधे मां' खूश असते, तो शिष्यही खूश राहतो. असा आशीर्वादही 'राधे मां'ने स्पर्धकांना दिला. सिद्धार्थ शुक्लासोबत इतर स्पर्धकांनीही 'राधे मां' चा आशीर्वाद घेतला. 'राधे मां' काही दिवसांसाठी बिग बॉसची स्पर्धक असेल अशी चर्चा रंगली होती. पण 'राधे मां' फक्त एका दिवसापूर्तीच सेटवर आली असल्याची शक्यता आहे. आता राधे मां परत येऊन खेळात सहभाग घेणार की एका दिवसाच्या पाहुणीसारखीच बिग बॉसच्या घरात दिसणार हे गुलदस्त्यातच आहे. 'राधे मां' घरी आल्यामुळे काही वेळासाठी घरातलं वातावरण थोडं बदललं, हे या प्रोमोवरून दिसून येतं. त्यामुळे तिनं जर खरोखरच शोमध्ये एंट्री घेतली तर घरात काय काय हंगामा होणार? हे लवकरच कळेल. बिग बॉस-14 (Bigg Boss-14) चं ग्रँड प्रीमियर शनिवारपासून सुरू झालं आहे. बिग बॉस-7 (Bigg Boss-7) ची विजेता गौहर खान (Gauhar Khan) या सीजनमध्ये सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि हिना खान (Hina Khan) सोबत नव्या भूमिकेत दिसणार आहे. बिग बॉस 13 सुपरहिट ठरला होता आणि त्याचा टीआरपीदेखील चांगला होता. अशात नवीन सीजनकडून अपेक्षा आहेत. शोचे सर्व उमेदवारांची नावेही समोर आली आहे. यंदाचे उमेदवारही चांगले असल्याने बिग बॉस हिट होण्याची अपेक्षा आहे.
एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आज बुधवारपासून मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उदघाटन आज संध्याकाळी 4 वाजता गणेश शिंदे यांच्या 'जीवन सुंदर आहे' या व्याख्यानाने होणार आहे. ही व्याख्यानमाला कांतीलाल शहा विद्यालयातील स्वर्गीय केशवराव वाडेकर सभागृहात दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांनी केलेल्या सामाजिक व सार्वजनिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच हा सामाजिक वसा व वारसा विद्यार्थी, पालक व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह व कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक रामदास काकडे यांनी दिली. व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष आहे. त्यानिमित्ताने विचारधन ऐकण्याची उत्तम संधी विद्यार्थी, पालकवर्ग, नागरिकांना मिळणार आहे. असे व्याख्यानमालेचे आयोजक, निमंत्रक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, विद्यालय विकास समिती सदस्य, कार्यक्रमाचे निमंत्रक आणि संयोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे व कार्यक्रमाचे निमंत्रक प्राचार्य डाॅ एस के मलघे यांनी सांगितले. व्याख्यानमालेचा लाभ मोठया संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
श� ��क्षकांना फिल्ड वर्क देऊ नका : महापौर नागपूर : अतिरिक्त ठरवून कर विभागात पाठविण्यात आलेल्या शिक्षकांच्या समस्यांबाबत मनपा शिक्षक संघाचे शिष्टमंडळ महापौरांना भेटले. याप्रसंगी महापौरांना विविध झोनमध्ये शिक्षकांना येणाऱ्या समस्यांबाबत अवगत करण्यात आले. कर आकारणी विभागाचे सभापती गिरीश देशमुख तसेच कर आकारणी विभागाचे प्रमुख हस्तक उपस्थित होते. यावेळेस महापौरांनी शिक्षकांना फिल्ड वर्क देऊ नका, असे आदेश दिले. त्यांना टेबल वर्क देण्यात यावे, तसेच सकाळी १०. १५ ते ५. ४५ ही वेळ ठरवावी, असा निर्णय घेतला. नियमानुसार सार्वजनिक सुट्ट्या आणि रविवारी कामावर बोलावू नये, असे ते म्हणाले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे, देवराव मांडवकर, संतोष विश्वकर्मा, मलविंदरसिंग कौर लांबा, कल्पना महल्ले, अख्तर खान, रामराव बावणे, मधुकर भोयर, अशोक बालपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. -------------दिगंबर जैन युवक मंडळ नागपूर : दिगंबर जैन युवक मंडळाचा २७ वा वर्धापनदिन उज्ज्वल गोरक्षण केंद्र येथे अशोकराव चवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नारायणराव पळसापुरे, सुनील भुसारी, संतोष सावळकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नारायणराव पळसापुरे, अशोक चवडे यांनी नरेंद्र भुसारी यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी अर्चना शहाकार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी महिला सक्षमीकरण विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. याप्रसंगी स्मिता श्रावणे, माया सावळकर, वीणा झवेरी, नमिता उदेपूरकर, अविनाश शहाकार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनय सावळकर, एड. विकास श्रावणे, किशोर महात्मे, प्रमोद भागवतकर, श्रीकांत धोपाडे, स्मिता महात्मे, प्रतिभा नखाते, जयश्री भुसारी, मनीषा रोहणे, मनीषा सावळकर, वैशाली मानेकर, वर्षा महात्मे आदींनी परिश्रम घेतले.
मुंबई, २८ सप्टेंबर । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल (MPSC Main Exam 2019 Result) जाहीर केला आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Maharashtra Public Service Commission has announced the final revised result of State Service Examination 2019 (MPSC Main Exam 2019 Result). MPSC has issued a circular in this regard : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. 10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीनं देण्यात आल्यानंतर आयोगानं निकालाविषयी भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी पत्र दिलं होतं. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या 413 पदांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या आता निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महत्वाचंः तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील 'फॉलो (Follow) ' बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. News Title: MPSC Main Exam 2019 Result is declared. - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?
काल माझ्या शासकीय बंगल्यामधील सर्व कर्मचारी व मंत्रालयातील सर्व कर्मचारी एकत्र आले व त्यांनी मला भावपूर्ण निरोप दिला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझ्याबरोबर त्यांचे अडीच वर्षातील वागणे यामध्ये कुठेही ते कर्मचारी आहेत आणि मी मंत्री आहे असे नव्हते. त्यांचे आणि माझे अत्यंत खेळीमेळीचे संबंध होते. रात्री उशिरापर्यंत जेव्हा मी काम करत बसायचो तेव्हा मला पाणी देणे, गरम-गरम जेवण देणे, अडीच वर्षांमध्ये कोणी माझ्या शासकीय बंगल्यावर आला असेल आणि तो जेवण न-करता गेला असेल असं मला नाही वाटत की महाराष्ट्रात कोणी असेल, असे ते म्हणाले. ए 3 म्हणजे जवळ-जवळ अन्नपूर्णाच झाली होती. माझे आचारी तसेच जेवण वाढणाऱ्यांनीही कधी त्याबाबत तक्रार केली नाही. काल सगळ्यांनी एकत्र येऊन मला भावपूर्ण निरोप दिला, असे ते म्हणाले. आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणच्या ऑफिसला जाऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या भेटी गाठी घेतल्या. जे 10 वर्षांत होऊ शकलं नाही ते मागच्या अडीच वर्षांत झालं. 10 वर्षांत जेवढे उत्पन्न होते ते मागच्या अडीच वर्षांत झाले. 10 वर्षांत जेवढी देकारपत्र दिली गेली तेवढी ह्या अडीच वर्षांत दिली गेली, असे आव्हाड म्हणाले.
पुण्याची सार्वजनिक वाहतुक PMPML च्या नावाने विविध तक्रारी येतात, त्यात काही नवीन नाही. ट्रॉफीक (Traffic), वेळापत्रक (Timetable), टिकीट दर (Ticket Price), सुरक्षा (Safety) यावर अनेक प्रश्न उपस्थित होतचं असताता. पण PMPML कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला हे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पुण्यात (Pune Rural) आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी (Education), नोकरीसाठी (Job) येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरी पीएमपीएल (PMPML) मधूल प्रवास करण हेचं सोयीचं किंवा परवडणार आहे. पीएमपीएलचा पास(PMPML Pass) काढत किंवा तिकीटवर अनेक प्रवाशी रोज पीएमपीएल मधून प्रवास करतात. पण उद्यापासून म्हणजेच २६ नोव्हेंबर (November) पासून पुण्यातील ग्रामीण भागातील तब्बल अकरा मार्गावर पीएमपीएल बसेस धावणार नाही असा निर्णय पीएमपीएल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तर हा निर्णय पुणे ग्रामिण भागातील नागरिकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. सासवड ते यवत (हे ही वाचाः- Water Taxi In Mumbai: 26 नोव्हेंबरपासून बेलापूर ते मांडवा दरम्यान नवीन वॉटर टॅक्सी होणार सुरू, जाणून घ्या वेळ आणि तिकीट) ग्रामीण भागातील पीएमपीएल (Pune Rural PMPML) बससेवा बंद केली असली तरी शहरी भागातील म्हणजेचं पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागातील बससेवा वाढवण्याचा निर्णय पीएमपीएलने (PMPML) घेतला आहे. शहरी भागातील प्रवाशांची वाढीव संख्या बघता पीएमपीएलने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. तरी तब्बल ११ ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्याच्या निर्णयाचा ग्रामिण भागातील नागरिकांवर काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
नागरिकांचे सर्व शासकीय कार्यालयातील प्रश्न व अडी अडचणी तात्काळ मार्गी लागाव्या यासाठी मतदार संघातील नागरिकांना जनता दरबाराचे खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून त्यांच्या हक्काच्या सेवकाला त्यांचे प्रश्न प्रत्यक्षपणे सांगण्याची संधी मिळावी व सबंधित अधिकाऱ्याकडून हे प्रश्न तातडीने सुटावे हा त्यामागचा उद्देश आहे. या जनता दरबारात नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरुपात सबंधित विभागाकडे दिल्या आहेत. पुढील जनता दरबारात यापैकी किती नागरिकांचे प्रश्न व अडचणी सुटल्या याचा खुलासा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे व त्याचा जाब त्या अधिकाऱ्याला पुढील जनता दरबारातच द्यावा लागणार आहे. त्यामुळे या जनता दरबारातील प्रश्न पुढच्या जनता दरबारात येता कामा नये अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे घेतलेल्या जनता दरबारात विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील असंख्य नागरिकांचे विविध शासकीय कार्यालयात अनेक प्रश्न रेंगाळत पडलेले होते. नागरिक चकरा घालून थकले होते मात्र प्रश्न काही सुटत नव्हते. नागरिक व अधिकारी एकाच व्यासपिठावर येवून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना आपल्या अडचणी व प्रश्न मांडण्यासाठी जनता दरबार सुरु केले. पहिल्याच जनता दरबारात नागरिकांच्या असंख्य अडचणींचा अक्षरशः पाऊस पडला होता मात्र सबंधित अधिकाऱ्यांना ना. आशुतोष काळे यांनी जागेवरच कानपिचक्या दिल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे दर दोन ते तीन महिन्यांनी जनता दरबार घेण्याचे ना. आशुतोष काळे यांनी ठरविले होते त्याप्रमाणे जनता दरबार सुरु होते परंतु दोन वर्षापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी निर्बंध घालण्यात आल्यामुळे जनता दरबार बंद होते. तरीदेखील प्रत्यक्ष भेटीतून ना. आशुतोष काळेंचे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरूच होते. या समस्या सोडविण्याला गती देण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा जनता दरबाराच्या माध्यमातून पुनःश्च हरिओम केला आहे. यावेळी नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरूपात घेवून सबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत तातडीने निर्णय घेवून कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या नागरिकांच्या अडचणी व प्रश्न जास्तीत जास्त स्वरूपात कसे मार्गी लागतील यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग, नगरपालिका, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, ग्रामीण रुग्णालय, रेल्वे विभाग, सहाय्यक निबंधक विभाग, दुय्यम निबंधक विभाग, वन विभाग, कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, सामाजिक वनीकरण, वखार महामंडळ आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जनता दरबार घेतला. या जनता दरबार प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रशांत वाकचौरे, डावा कालवा उपअभियंता थोरात, उजवा कालवा उपअभियंता महेश गायकवाड, प्र. तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगाव नगरपरिषदेचे ज्ञानेश्वर चाकणे, महावितरण अभियंता भूषण आचार्य, सहा. अभियंता अतुल खंदारे, यज्ञेश शेलार, डी. डी. पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक यशवंत ठोंबरे, चारी ड्रेनेज उपअभियंता शिंदे, वनविभाग श्रीम. प्रतिभा पाटील, सामाजिक वनीकरण उपअभियंता श्रीम. पूजा रक्ताटे, मेडिकल ऑफिसर डॉ. कृष्णा फुलसौंदर, आदी खात्याचे अधिकारी, सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, जिल्हापरिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके, फकीर कुरेशी, आकाश डागा, राजेंद्रे जोशी,चंद्रशेखर म्हस्के, प्रदीप कुऱ्हाडे, समाजसेवक संजय काळे, राजेंद्र खिलारी, सागर लकारे. किरण बागुल,नंदकिशोर औताडे,नारायण लांडगे, इम्रीयाज अत्तार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
सुया संबंधित Openwork गळपट्टा एकतर कार्यक्षम ऍक्सेसरीसाठी आणि एक सजावटीच्या घटक असू शकते. उत्पादन आकारावर अवलंबून, तो डोक्यावर किंवा खांद्यावर थकलेला जाऊ करण्यासाठी वापरले जाते. मात्र, फार मोठ्या openwork गळपट्टा, कनेक्ट आरे पूर्ण शाल होते. विणकाम पद्धत उत्पादन उत्पादन वापरले जाते काय आधारावर, gussets अनेक प्रकार आहेतः - संबंधित कोन. - एक गुळगुळीत कापड स्वरूपात केली. साधारणपणे, विणकाम सुया gussets (योजना आणि उत्पादने विशिष्ट प्रकारच्या वर्णन खाली तपशीलवार आहेत) एक त्रिकोणी आकार webs तयार आहे. विविध उत्पादने फरक कडा तयार करण्यासाठी अर्ज कोणत्या पद्धत तंतोतंत आहे. हरकत नाही विणकाम काय पद्धत कुशल कामगार निवडले, आपण अनेक अनिवार्य पावले करणे आवश्यक आहेः - उत्पादन आणि मापन नियंत्रण. - भविष्यात उत्पादन आकार, निवडलेले नमुना परिमाणे एक तुलना, आणि loops आणि पंक्ति गणना निर्धारित करत आहे. - उच्च अवघडपणा येतो तेव्हा, अशा हेतू एक वेब रेखाचित्र अप, आपण उत्पादन एक स्वरुपाचा प्रतिनिधीत्व आणि सर्व आयटम स्थान ओळखण्यासाठी पाहिजे. कोणत्याही कौशल्य आणि अनुभव knitters संबंधित शिफारसी वर्णन केले आहे. नवशिक्यांसाठी विणकाम, अर्थातच, नमुना आणि मॉडेल अधिक सोपे आहे, पण कापड व भुषण, तसेच काम अचूक अंमलबजावणी उजव्या संयोजन कोणत्याही उत्पादन महत्वाचे आहे. फेस-टू-फेस विणकाम? नियोजन उणीवा अनेकदा अनेक समस्या कारण आहे. आम्ही महिला ठळक सर्वात सामान्य त्रास उदाहरणे देऊः - सर्व नमुना ठेवण्यासाठी असमर्थता कॅनव्हास वर पुनरावृत्ती, "कट" तुकडे अलंकार. - उल्लंघन gussets प्रमाणात (खूप तीव्र, किंवा उलट, एक बोथट कोन). - अयशस्वी संयोजन कापड व नमुना, फार दाट किंवा openwork फॅब्रिक. ही पद्धत सर्वात सामान्यपणे सर्वात knitters वापरली जाते. त्याचे फायदे तो त्याच्या उत्पादन प्रक्रियेत headscarves आकार निरीक्षण आणि कोणत्याही टप्प्यावर काम करणे शक्य आहे की आहे. तसेच, आपण येथे काही घटक विणणे आणि त्यांना नंतर मुख्य करण्याची गरज नाही. अशा उत्पादन एक उत्कृष्ट उदाहरण फोटो हिरवा गळपट्टा म्हणून सर्व्ह करू शकता. तो एक विस्तृत प्रदेश hinges एक संच आणि त्यांच्या हळूहळू कमी सुरुवात होते. एक कोन विणणे गळपट्टा विकल्प म्हणून, आहे की, लूप जोडले करणे आवश्यक आहे. वाइड बाजूस लांबी आपण खांद्यावर उत्पादन बोलता करायचे असल्यास, विशेषतः 80-100 सें. मी. आहे, आणि 50-80 सें. मी. , गळपट्टा भूमिका असेल तेव्हा एक गळपट्टा. विणकाम सुरुवातीला एका मुलाला किंवा एक प्रौढ डोक्यावर स्कार्फ् चे अवरुप उत्पादनात खोटे शकते. या प्रकरणात, योग्य उपाय काढा आणि प्राप्त परिमाणे कार्य करण्यासाठी. विणकाम सुया (योजना आणि loops व्यतिरिक्त कोन लागत पद्धत दिले प्रक्रिया वर्णन) कॉर्नर gussets खालीलप्रमाणे आहेतः - तीन लूप वधारला. पहिल्या रांगेत Provyazyvayut. - आधी आणि केंद्रीय पळवाट नंतर दुसऱ्या रांगेत ऑपरेट अनुसूचित जाती (व्यतिरिक्त दोन लूप). - सर्वात knitters डिझाइन आणि इच्छा आधारीत, फेकून करू शकता nakida एक सुंदर भोक होते. खालील openwork विणकाम स्कार्फ् चे अवरुप विणकाम तर हे खरे आहे. आकृत्या आणि उत्पादने वर्णन सहज कोणत्याही विशेष जर्नल मध्ये आढळू शकते. इच्छित असल्यास वेब राहील न उत्पादित करता येते. हे एक पळवाट, विद्यमान दरम्यान अतिरिक्त broaches च्या provyazyvaya जोडले जाऊ नये. - तिसऱ्या (चुकीचे) संख्या provyazyvayut सर्व loops आणि nakida मध्ये समावेश आहे. - प्रत्येक ओळीत मध्यभागी समावेश समांतर एक नियमित तिरंगी फॉर्म gussets निर्मिती त्याच्या आरंभ आणि शेवट वजाबाकी केली पाहिजे. ही पद्धत एक इच्छित लांबी धार उत्पादने होईपर्यंत होईपर्यंत चालू आहे. पुढे, लूप फक्त व्यतिरिक्त करते. - त्याचप्रमाणे पुढील वेब वाढ करणे सुरू. - headscarf लांबी शिस्तबद्ध आकार समान असेल तेव्हा, काम बंद केले पाहिजे. ही पद्धत कोणत्याही उत्पादन रचना संबद्ध केले जाऊ शकतात, तो हळूहळू loops च्या व्यतिरिक्त द्वारे विणकाम प्रक्रियेत समाविष्ट पुनरावृत्ती होते. त्रिकोण करून अधिक सोपा आणि अंतर्ज्ञानी पद्धत प्रत्येक ओळीत एक हळूहळू कमी करणे किंवा, त्याउलट, सुरूवातीला पळवाट व्यतिरीक्त आणि शेवटी गुळगुळीत विणकाम फॅब्रिक निवडले नमुना आहे. पातळ अंगोरा किंवा अंगोरा जातीच्या मेंढीची लांब तलम लोकर वागण्याचा तेव्हा ही पद्धत लागू केले जाऊ शकते. खाली स्थित अतिशय प्रकाश openwork फॅब्रिक योग्य नमुने. तर्ाचे गळपट्टा अंगोरा जातीच्या मेंढीची लांब तलम लोकर आरे करण्यासाठी सोपे आहे आणि अतिशय आकर्षक दिसते. लांब ब्लॉकला झाल्यामुळे पूर्ण फॅब्रिक निराकरण विरघळलीः फक्त समस्या केसर स्वतः विशिष्टता असू शकते. कधी कधी हे कार्य अक्षरशः अशक्य आहे, त्यामुळे विणकाम प्रक्रियेत त्रुटी देखावा टाळण्यासाठी.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो कावळा व कावळी त्या सरोवराकडे गेली असता, त्यांना प्रत्यक्ष राणी व राजघराण्यातल्या इतर काही स्त्रिया गळ्यांतले रत्नहार व सोनसाखळ्या काठावर ठेवून सरोवरात जलविहार करीत असलेल्या दिसल्या. कावळीने झडप घालून त्यातली एक सोनसाखळी चोचीने उचलली व ती त्या कावळ्यासह त्या वडाच्या दिशेने मुद्दाम हळूहळू उडू लागली. त्याबरोबर त्या स्त्रियांसंगे आलेली सेवकमंडळी त्या दोघांच्या पाठोपाठ धावू लागली. शेवटी त्या कावळीने ती सोनसाखळी त्या वटवृक्षाच्या ढोलीत टाकली व पतीसह एका जवळच्या झाडावर जाऊन बसली. तेवढ्यात राणीच्या सेवकांनी त्या ढोलीत डोकावून पाहिले असता, त्यांच्या दृष्टीने तो काळा सर्प पडला. त्यांनी त्याला काठ्या व दगड यांचा वापर करून ठार केला. तो मारला गेल्यामुळे ते कावळ्याचे जोडपे सुखी झाले.' ही गोष्ट सांगून दमनक करटकाला म्हणाला, 'दादाबुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम् । ज्याला बुद्धी असते त्याचाच प्रभाव पडतो, ज्याला बुद्धी नाही त्याच्यात कुठून 'दम असणार?) 'असं जे म्हटलं जातं ते खरं आहे.' 'अरे दमनका, समजा, तुला पुरेपूर बुद्धी असली तरी तिच्या जोरावर तू पिंगलक महाराज व संजीवक या जीवश्चकंठश्च मित्रांमध्ये फूट कशी काय पाडू शकणार?' करटकाने हा प्रश्न केला असता दमनक आत्मविश्वासाने म्हणाला, 'दादा, अरे एक दुर्बळ ससा जर बुद्धीच्या सामर्थ्यावर एका सिंहाचा जीव घेऊ शकतो, तर तशाच बुद्धीच्या सामर्थ्यावर पिंगलकमहाराज व संजीवक यांच्यात मला फूट पाडता का येऊ नये?" 'ती गोष्ट काय आहे?" असे करटकाने विचारताच दमनक म्हणाला, 'ती गोष्ट अशी आहे.
बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली. वणी : बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली. सध्या सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याने बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. कृषी पणन नियमानुसार शेतकºयांना आपला माल बाजार समितीच्यामार्फतच विकावा लागतो. बाजार समितीला व शासनाला त्यामधून सेस प्राप्त होतो. मात्र मागील आठवड्यापासून शहरात विविध ठिकाणी बाजार समितीला डावलून काही व्यापारी अवैधपणे धान्य खरेदी करीत आहे. ही माहिती बाजार समितीला मिळाल्यावरून बाजार समितीच्या पथकाने शहरातील काही प्रतिष्ठानांवर धाड टाकली. त्यामध्ये अवैधपणे धान्य खरेदी करताना आढळल्याने बाजार समितीने नियमानुसार कारवाई केली. पहिली धाड लालगुडा परिसरातील रामदेव ट्रेडर्सवर टाकण्यात आली. तेथे अवैधपणे खरेदी केलेले ५० लाख रूपयांचे एक हजार ५०० क्विंटल सोयाबीन पथकाच्या हाती लागले. त्यानंतर आंबेडकर चौकामधील राजू निंबाळकर यांच्या दुकानातून ३० क्विंटल सोयाबीन व तीन क्विंटल तूर पथकाला मिळाली, तर नांदेपेरा मार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर असलेल्या प्रतिष्ठानात १७ क्विंटल सोयाबीन दुकानाच्या बाहेर ठेवलेले आढळून आले. दुकानदाराला धाडीची कुणकुण लागताच त्याने दुकानातील शटर बंद करून तेथून पोबारा केला. वृत्त लिहीपर्यंत धान्य जप्तीची कारवाई सुरूच होती. भरारी पथकांमध्ये सचिव अशोक झाडे, रमेश पुरी, अशोक घुगुल, कैलास कारगीरवार, सुनील निमजे, परशुराम अहीरकर, आरिफ खान, मनोज वैद्य यांचा समावेश होता. या तिनही व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या नोटीस देऊन सेस, बाजार फी व दंड भरण्यास सांगण्यात येणार आहे. तो न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असे सचिव अशोक झाडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अवैधपणे कोणत्याही व्यापाºयाला न विकता तो बाजार समितीतर्फेच विकावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकार यांनी शेतकºयांना केले आहे. पुढे शासनाने कोणत्याही दिलेल्या योजनेपासून शेतकरी वंचित राहू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
शहरात अप्पर डेपो परिसरात गुंडाच्या टोळ्याने १६ वाहनांची तोडफोड करण्याची घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. आपली दुश्मनी काढण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांना टोळक्याने लक्ष्य केले. अप्पर येथील दोन गटांमधील वादातून एका गटातील ७ ते ८ जणांचे टोळके पवननगर, न्यू पद्मावती या भागात आले. त्यांनी हातातील काढ्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. आवाजाने नागरिक गोळा होऊ लागले पण या टोळक्याने आपल्याकडील हत्याराने लोकांना धमकाविण्यास सुरुवात केल्याने कोणीही त्यांना अडविण्यास पुढे झाले नाही. टोळक्यांनी केलेल्या तोडफोडीत मारुती व्हॅन, छोटा टेम्पो, कार, दुचाकी अशा सुमारे १६ गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आपले वर्चस्व दाखविण्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी सध्या रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करण्याची नवी फॅशनच गुंडांमध्ये आली आहे. वारजे येथील रामनगर, स्वारगेट परिसरातील महर्षीनगर येथेही अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात अशा घटना घडत असून त्यात आपली दादा प्रतिमा निर्माण करण्यासाठी गुंडांकडून असा हैदोस घालण्यात येतो. अनेकदा त्यातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहे.
गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या लाभार्थ्याचे घर जीर्ण झाले असल्याने त्याला विनाअट घरम मंजूर करावे. गडचिरोली : मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या शेकडो नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात शुक्रवारी नगर परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांना सादर करण्यात आले. मूलभूत समस्या न सोडविल्यास भविष्यात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या लाभार्थ्याचे घर जीर्ण झाले असल्याने त्याला विनाअट घरम मंजूर करावे. घरटॅक्स १० टक्के वाढविला आहे तो कमी करावा. स्वच्छ, शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. भूमीगत गटार पाईपलाईनचे काम करताना एका वार्डातील काम झाल्याशिवाय दुसºया वार्डात सुरू करू नये. ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करावे. फुटपाथधारकांना दुकानगाळे उपलब्ध करून द्यावे. दर आठवड्याला नाल्या साफ कराव्या. कारगिल चौकाच्या जवळून विज्ञान महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण करावे. नगर परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय करावी. आदी मागण्यांसाठी चामोर्शी मार्गावरील पेपरमिल कार्यालय ते नगर परिषदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गोकुलनगर, विवेकानंदनगर, कैकाडी वस्तीमधील शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या. मुख्याधिकारी जोपर्यंत आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिल्याने मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी काही समस्या १५ दिवसात मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन न. प. च्या वतीने देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्णे, गजानन कुकुडकर, जी. के. बारसिंगे, माला भजगवळी, नरेश महाडोळे, योगेंद्र बांगरे, गुलाब मुघल, डाकराम वाघमारे, राजेंद्र बांबोळे, धर्मेंद्र गोवर्धन, डॉ. योगेश नंदेश्वर, सीमा दुर्गे, ज्योती जनबंधू, ज्योती दहिकर, गीता भोयर, डी. आर. जांभूळकर, अनिल राऊत, अनिल निकुरे यांनी केले.
वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात हट्टा ग्रामीण पोलीस स्टेशनं च्या पथकाने छापा टाकून हळदीच्या शेतातुन 76. 69 किलो गांजा जप्त केला आहे. मुंबई तक केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादाची एक ठिणगी पडलीय. त्याचं कारण आहे ते म्हणजे परदेशी प्रवाशांसाठीचे नियम. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आहे. गुरुवारी हैदराबादमध्ये उपचादारम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या सर्व गोष्टी स्पष्ट करण्याकरिता रॉबर्ट के. मेर्टनयांनी सर्वप्रथम विज्ञानाचे सामाजिक शास्त्रज्ञ यांनी अभ्यासलेल्या सर्व प्रकारच्या प्रोत्साहन देणार्या तसेच काही विरोध करनार्या नकारार्थी गोष्टींचा प्रभाव यावर चर्चा केलेली आहे. या कोण कोणत्या गोष्टी होत्या, तसेच त्यांचा सामाजिक रचनेवर ती कशा पद्धतीने परिणाम झाला, काही गोष्टींचा परिणाम समाजोपयोगी अशा गोष्टींमध्ये झाला तर काही गोष्टींचा परिणाम विध्वंसक स्वरूपाच्या वैज्ञानिक बदलांवर झाला. या सर्व गोष्टी व्यवस्थित पणे नमूद करण्याकरिता त्याने त्याच्या शोध प्रबंधाची पुढील प्रकारे रचना केली. यामध्ये सर्वप्रथम वैज्ञानिकाला मिळालेली स्वयंप्रेरणा. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मधून त्यावैज्ञानिकस स्वयंप्रेरणा लाभली तसेच या पाठीमागे काही वैयक्तिक कारण होते का? यामधील दुसरे कारण म्हणजे, या सर्व गोष्टी मागे कोणते सामाजिक किंवा आर्थिक घटक आहेत, यांची यामधील भूमिका काय आहे आणि ते कशा पद्धतीने विकास आणि आधुनिकीकरणाला कारणीभूत आहेत? ही प्रक्रिया एकंदर अत्यंत गुंतागुंतीची आणि अनेक घटक समाविष्ट असल्यामुळे यामधील विविध कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. तिसरे कारण म्हणजे सामाजिक गरज नसताना निव्वळ त्याच्या नावाखाली अनेक शोध लावले गेले, याची माहिती घेणे. समाज आणि त्याची गरज म्हणून काही वैज्ञानिकांनी काही शोध लावले आहेत, पण वास्तविक पाहता या गरजा निव्वळ निमित्त होत्या. तसेच त्याकाळी काही बदल झाले, त्यामुळे हे शोध लावण्यात मदत झाली असावी अशी अनेक कारणे सापडू शकतील. यावरती अनेक वाद विवाद आहेत, काही तज्ञांच्या मते, हे सामाजिक गरज नसताना निव्वळ वैयक्तिक एक फायदा पोटी, वैज्ञानिकाचा इंटरेस्ट, उत्सुकता, नवीन गोष्टी जानून घेण्याची त्याची इच्छा ही कारणे असू शकतात. यातील कोणते जास्त योग्य हे या व्याख्यानाच्या शेवटच्या भागात आपण पाहू. वरीलपैकी कोणतेही स्पष्टीकरण जास्त महत्त्वाचे आहे किंवा योग्य आहे? या चर्चेच्या शेवटी आपण ते पाहू. अशाप्रकारे वैज्ञानिक बदल किंवा तांत्रिक बदल आणि आणि समाज किंवा सामाजिक गरजा यामधील परस्पर संबंध वरील तीन मुख्य कारणांच्या मदतीने पुस्तक करण्यात आले आहे. वैज्ञानिक संशोधन आणि आणि समाजातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती या पाठीमागचे पहिले कारण वैज्ञानिकांना लाभलेली स्वयंप्रेरणा आहे. समाजातील अनेक समस्यांना वरती उपाय शोधण्याकरिता अनेक नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्यात आली हे या प्रगती पाठीमागचे दुसरे कारण आहे. तसेच काही समस्या अस्तित्वात नसताना देखील काही विशेष लोकांच्या वैयक्तिक फायदा करिता किंवा त्यांच्या इच्छेपोटी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून काही गोष्टी निर्माण करण्यात आल्या हे या पाठीमागचे तिसरे कारण आहे. आता आपण वैज्ञानिकांचा वैयक्तिक हेतू याबद्दल चर्चा करू. यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी येतात. पहिली म्हणजे स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणे आणि प्रसिद्धी मिळवणे होय. किंवा कोणत्याही प्रसिद्धीच्या किंवा फायद्याच्या मागे लागतात निव्वळ नवीन गोष्ट जाणून घेण्याच्या उद्देशाने संशोधन करण्यात आले. तुमच्या आवडी करिता असे संशोधन करण्यात आले. १७व्या शतकातील विज्ञान आणि त्यावेळच्या वैज्ञानिक गोष्टी हे सामाजिक, राजकीय गरजेपोटी करण्यात आले होते. उद्द. न्युटनचे खगोल शास्त्रीय निश्कर्श हे Greenwich वेधशाळेच्या मदतीने ब्रिटीश नेव्ही रॉयल नेव्ही यांच्या त्यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले. ब्रिटिश नेवीला मदत व्हावी म्हणून Greenwich observatory तयार करण्यात आली, आणि Greenwich observatory मुळे न्यूटन खगोल शास्त्रीय आकडेमोड करू शकला. न्यूटनच्या या कृतीमागे त्याची वैयक्तिक आवड आणि सूर्यमाला आणि त्यामधील नैसर्गिक जग याबाबतचे ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा हे कारण होते. त्याकामी त्याने ग्रीनवीच वेधशाळेची मदत घेतली आणि यामधून ब्रिटिश नेव्ही करिता पाठबळ मिळाले. अशा प्रकारे हे एकमेकांना सहाय्यक ठरले. Relation between science and social needs - two fold direct: some research is deliberately done for utilitarian purposes indirect: certain problems and materials for sc. research stems from practical exigencies(a state requiring urgent action) though scientists may not be aware 17th century science and technology were not devoid of each other as Sombart argued Many scientists turned their theoretical knowledge to practical problems Newton, Boyle. Hooke. Halley. Huyghens. Wren Military demands prompted increased speed in ship building and improvements in naval architecture For example, ship building was furthered by military interest in three ways. First, more and larger ship needed. second, they were required within a short period and third. need for warships Statistics suggests expansion in both mercantile and military marine since late 16th century Increase of commercial voyages to distant points, India, North America, Africa, Russia, stressed the need for accurate and expedient means of determining position at sea of finding latitude and longitude त्यामुळे हा एक वयक्तीक हेतू होता. त्याला सामाजिक गरजेची जोड मिळाली. याठिकाणी आणि प्राध्यापक रॉबर्ट विज्ञान आणि समाज यामधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध स्पष्ट करतात. प्रत्यक्ष संबंधांमध्ये काही संशोधन हे एखाद्या या समस्येच्या उपाय योजनेकरिता केले जाते. ज्यांचा वापर समाजातील अनेक प्रश्न सोडविण्याकरिता होऊ शकतो. उदा. आपल्याला जर मोठे जहाज बांधायचे असेल तर, जलविद्या मध्ये संशोधन करणे गरजेचे आहे, ही प्रत्यक्ष गोष्ट झाली. जंगलतोड कमी करूनही प्रगती करायची असेल तर, वनस्पतीशास्त्र मध्ये हे संशोधन वाढवले पाहिजे, ही हीदेखील एक प्रत्यक्ष पर्यावरणीय गरज आहे. समुद्र प्रवास किंवा सुरक्षितपणे समुद्रामार्गे दळणवळण करायचे असेल तर, समुद्र मार्गंचा आणि अक्षांश आणि रेखांश यांचा अभ्यास पाहिजे, त्याकरीता, त्या प्रदेशाच्या अक्षांश आणि रेखांश यावर संशोधन होणे गरजेचे आहे. ही सामाजिक, राजकीय तसेच वैज्ञानिक संशोधनाची देखील प्रत्यक्ष गरज आहे. आता प्रत्यक्ष गरज आणि वैज्ञानिक संशोधन याची उदाहरणे पाहू. बऱ्याच वेळेस अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या जातात ज्यांची की शिक्षक गरज असत नाही, परंतु इतर अनेक एक गरजेच्या गोष्टी वरती संशोधन करण्याकरिता अशा अशा गोष्टींची अप्रत्यक्षपणे गरज भासते. उदाहरणार्थ, न्यूटनने आकडेमोडीचा अभ्यास करत असताना ग्रीनवीच वेधशाळेचा उपयोग करून घेतला. याठिकाणी आपण असे म्हणू शकतो की, ग्रीनवीच वेधशाळेची निर्मिती ती ही रॉयल नेव्ही का मदतीकरिता झालेली. परंतु अजाणतेपणी, न्यूटनने देखील त्या वेधशाळेची मदत घेतल्याने ही वेधशाळा आणि आणि तिच्या मदतीतून सोडविण्यात आलेल्या काही खगोलशास्त्रीय समस्या यामध्ये हे अप्रत्यक्ष स्वरूपाचा संबंध दिसून येतो. याला प्रत्यक्ष गरज असे म्हणतात. Sombart या विद्वानांच्या मते, अगदी सतराव्या शतकापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच मूळ विज्ञान आणि आणि त्याचे विनियोग यामध्ये बरेच अंतर होते, किंवा कसलेच संबंध नव्हते. त्यामुळे विज्ञानाचा अनेक समस्यांवर ती उपाययोजना करण्याकरिता फार कमी वापर होत असे. Sombart याच्यामध्ये, मूळ विज्ञान, त्याचा विनियोग आणि आणि तांत्रिक प्रगती किंवा सामाजिक अडचण यांचा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही. परंतु प्राध्यापक रॉबर्ट यांच्यामध्ये, Sombart चा हा दावा चुकीचा आहे. थोडक्यात, १७व्या शतकातील विज्ञान आणि टेक्नॉलॉजी हे सामाजिक गरजेतून निर्माण झालेले नाही, तसेच विज्ञान व टेक्नॉलॉजी यामध्ये काही कनेक्शन नाही. अर्थात, रॉबर्ट के मेर्टन Sombart याच्या मताशी सहमत नाहीत. Newton, Boyle, Hooke, Halley, Huyghens, Wren अशा व इतर अनेक वैज्ञानिकांनी आपले संशोधकीय ज्ञान हे समाजातील उपलब्ध समस्या सोडवण्यासाठी वापरले. त्यांना मूळ वैज्ञानिक संकल्पनांचे ज्ञान होते, ते त्यांनी वापरात आणले. त्यांनी ते विद्यापीठा पुरते किंवा संशोधन केंद्रापुरते मर्यादित ठेवले नाही. Newton wren Hoone 17th century zEnglish Scientingdes Hallery Huyghens अशाप्रकारे सतराव्या शतकातील इंग्लंडमधील वैज्ञानिकांनी विज्ञानातील अनेक संकल्पनांचा आधार घेऊन समाजातील काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील असलेल्या ज्ञानाचा उपयोग हा केवळ शिकण्यापूरता न करता त्या ज्ञानाचा विनियोग समाजातील आणि रोजच्या जीवनातील वेगवेगळ्या समस्यांवरती उपाय शोधण्याकरिता करण्यात आला. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सशस्त्र सेना दल महत्वाचे होते, त्याच्या सक्षमीकरणाकरीता वेगवेगळ्या इमारती उभारणी ती आणि आणि नाविक तळावरती अनेक सोयी सुविधांची निर्मिती करण्यात आली. त्यांना अतिशय वेगवान जहाज आणि आणि नाविक तळावरती वेगवेगळ्या अत्याधुनिक सोयी सुविधा का अत्यावश्यक वाटल्या किंवा हव्या होत्या? कारण सतराव्या शतकामध्ये जलवाहतूक किंवा समुद्रामार्गे वाहतूक हा वाहतुकीचा एक प्रमुख प्रकार अस्तित्वात आला होता. तसेच या वाहतुकीचा वापर प्रवासी वाहतूक बरोबरच उद्योगधंदे व्यवसाय, आणि व्यापार यांच्या भरभराटीसाठी अत्यंत गरजेचा होता. इतर देशांची व्यापारी संबंध प्रस्थापित करणे, येथील कच्चामाल वापरून इंग्लंडमध्ये हे काम आल तयार करणे, त्याचा व्यापार करणे आणि राजकीय संबंध स्थापन करण्याकरिता अतिशय प्रभावी आणि वेगवान पद्धतीची वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते. याकरिता ब्रिटिशांना अत्याधुनिक स्वरूपाचे अतिशय वेगवान आणि मोठे जहाज आवश्यक होते. तसेच यामध्ये हे ब्रिटिशांचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध जोपासणे हादेखील एक उद्देश होता. त्याकरता त्यांना त्यांचे नाविक तळ अत्याधुनिक करून तेथील सोयी सुविधा सुधारणे गरजेचे होते. याकरिता त्यांनी त्यांच्याकडील वैज्ञानिकांना पाचारण केले. वैज्ञानिकांनी मोठ्या आकाराच्या जहाजांची बांधणी करण्याकरिता, इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आणि युद्ध नौका तयार करण्याकरिता प्रामुख्याने त्यांचे योगदान दिले. ब्रिटिश आकडेवारीनुसार सोळाव्या शतकामध्ये देशाची सशस्त्र सेना आणि आणि व्यापार वृद्धि करिता अत्याधुनिक नाविक दल यांचे सक्षमीकरण गरजेचे होते. याप्रमाणे ब्रिटिश नाविक दलामध्ये मोठमोठ्या जहाजांची बांधणी सुरू झाली. यामुळे व्यापाराकरिता ब्रिटिशांना खूप मोठ्या प्रमाणात कच्च्या आणि पक्क्या मालाची जी ने आण सुरू करता आली, भारत उत्तर अमेरिका आणि आफ्रिका या विविध प्रदेशापर्यंत पोहोचू शकले. तसेच यामध्ये हे समुद्रमार्गे प्रवास करत असताना अक्षांश आणि रेखांश यांच्या अचूक अभ्यास गरजेचा होता, त्यामुळे वैज्ञानिकांनी यावर्षीदेखील उपाययोजना करण्याकरिता प्रयत्न सुरू केले होते. Scientists were concerned with possible solution to this problem Mathematics and astronomy were advanced manifold through research in this direction For example. Napier's invention of logarithm expanded by Henry Briggs, Adrian Vlacq, Edmund Gunter and Henry Gellibrand was of help to astronomer and mariner Sprat, historiographer advancement of navigation was one of the chief aims of Royal Society The findings of longitude was one problem that engrossed the scientists and fostered profound developments in astronomy, mathematics, geography, mechanics and invention of clock and watch Social acclaim and social mobility and economic benefits of discovery and invention played crucial part in development of science and technology Another navigational problem was determining the time of the tides Many scientists: Newton, Boyle. Halley, John Wallis, Euler, Bernoulli, Leplaxee etc. made contribution to this A fine example of correlation of scientific interests and economic needs Depletion of forest resources (woods) - required in shipbuilding, in naval wars, as fuel, as housing material Scientists developed botanical knowledge to solve this problem समुद्रमार्ग, दिशा व अक्षांश आणि रेखांश याबाबत संशोधन करून गणित व खगोल शास्त्र यांचा अभ्यास करून पूर्ण विश्वभर कुठेही समुद्रामार्गे प्रवास करणे शक्य झाले. त्यामुळे व्यापारी द्रुष्ट्या प्रबळ होणे आणि इतर अनेक प्रदेशांवर राजकीय वर्चस्व गाजवणे ब्रिटिशांना शक्य झाले. या काम गणित आणि खगोल शास्त्र यामधील अत्याधुनिक विज्ञान आणि संशोधन कामी आली. तसेच अक्षांश आणि रेखांश याच्या व्यवस्थित अभ्यासामुळे समुद्रामधील दिशा आणि वेगवेगळी ठिकाणे शोधण्यात मदत नाही. उदाहरणार्थ, नेपियरने शोधलेले लॉगॅरिदम व त्यामध्ये Henry Briggs घातलेली भर यामुळे खगोलशास्त्रज्ञांना व मरिनर्सना (खलाशांना) हे शक्य झाले. नेपियरने शोधलेले लॉगॅरिदम (घातांक गणित) हे सैद्धांतिक होते, परंतु ते खगोलशास्त्रज्ञ आणि नाविक यांनी व्यवहार ज्ञानामध्ये वापरले, त्याच्या सहाय्याने अक्षांश आणि रेखांश यांचा व्यवस्थित अभ्यास करून समुद्रामधील वेगवेगळ्या दिशा आणि हाव ठिकाणे त्यांचा माग काढणे शक्य झाले. Sprat या समकालीन इतिहासकारांच्या मते, नौकानयनशास्त्रामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे हा इंग्लंडमधील रॉयल सोसायटीचा हेतू होता. त्यांना नौकानयन शास्त्रामध्ये का बरे अत्याधुनिक गोष्टी आणायचा होत्या? नौकानयन शास्त्र मधील आधुनिकता आणि त्याद्वारे संपूर्ण महासागरावर प्रभाव असणे आणि अत्यंत प्रभावी रित्या समुद्रामार्गे वाहतुकीची सोय असल्यामुळे लवकरच त्यांची एक प्रबळ अर्थव्यवस्था आणि राजकीय सामर्थ्य सिद्ध झाले. खगोलशास्त्र, गणित, भूगोल, यंत्रशास्त्र या सगळ्यांचा अभ्यास करून घड्याळाचा शोध लावण्यात आला. अक्षांश आणि रेखांशची समस्या सोडविण्याकरिताखगोल शास्त्रज्ञ, गणित तज्ञ, भूगोल तज्ञ आणि यंत्र यंत्रशास्त्र अभियंते यांनी एकत्रित येऊन त्यावर संशोधन केले. यामधूनच वेळ दर्शक घड्याळाची निर्मिती झाली. म्हणून आपण असे म्हणू शकतो की, सतराव्या शतकामध्ये इंग्लंडमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगती विविधांगांनी खाली कारण वैज्ञानिकांना असलेला सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा होय. ज्या शास्त्रज्ञांनी यांनी नवनवीन गोष्टी शोधून काढल्या, नव तंत्र तंत्रज्ञान शोधून पडले, अनेक नवीन उपकरणे तयार केली, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली, प्रसिद्धी मिळाली. तसेच समाजातील सर्वच स्तरांमध्ये त्यांचे संशोधन पोहोचले, सर्वज्ञात झाले. यामुळे त्यांना प्रचंड तसेच सामाजिक बळ देखील लाभले. यामुळे नवीन संशोधन आणि उपकरण निर्मिती ती या एकंदर वैज्ञानिक प्रक्रियेला देखील चांगले दिवस आले, यंत्रांचा वापर वाढू लागला, आणि सर्वच वैज्ञानिकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली. १७व्या शतकातील अनेक शोधांच्या पाठीमागे जी कारणे आहेत, जे वैज्ञानिक महत्वाचे शोध लावतील, अशांना सामाजिक द्रुष्ट्या खुप महत्व असायचे, त्यांना प्रतिष्ठा मिळायची. त्यामुळे सामाजिक गरज या बरोबरच मिळणारी प्रतिश्ठा, पैसा, पत यासारख्या अनेक गोष्टींमुळे वैज्ञानिक जास्त आवडीने काम करू लागले. अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असे नाविक दल आणि आरमार उभारण्यात पाठीमागे ब्रिटिशांचा विशेष हेतू होता. त्यामधील प्रमुख आहे साम्राज्यवाद विस्तार आणि व्यापार वृद्धिंगत करणे. त्याकरता त्यांनी मोठ्या जहाजांची ची बांधणी केली, अत्याधुनिक अशा पद्धतीची जहाजे ज्यामधून मोठ मोठ्या तोफांची वाहतूक करता येईल येईल अशा झाडांची निर्मिती केली, जेणेकरून युद्धजन्य परिस्थिती मध्ये या तोफा एका ठिकाणाहून दुसरीकडे कमीत कमी वेळेत वाहून नेता येतील. याव्यतिरिक्त त्यांनी, अक्षांश रेखांश याबाबतच्या समस्यादेखील सोडवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून समुद्र प्रवासादरम्यान दिशा दर्शक आणि वेळ याबाबतची माहिती कळू शकेल. समुद्र प्रवासादरम्यान निश्चित वेळ समजण्यासाठी आणि त्यानुसार पुढील नियोजनात करिता त्यांनी घड्याळाचा आणि वेळ दर्शकाचा शोध लावला. याद्वारे त्यांनी समुद्रा वरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. समुद्रावर ज्याचे नियंत्रण, त्याचे जगावर नियंत्रण असे समिकरण त्याकाळी रूढ झाले होते. त्यामुळे इंग्लंडने बरेच प्रयत्न करून हे सर्व शोध लाऊन समुद्रावर, पर्यायाने व्यापार, अनेक नावीक हालचाली, प्रवास अशा अनेक क्षेत्रात प्रगती केली. त्याकरीता बर्याच वैज्ञानिकांची, उदा. न्युटन, Boyle, Halley, John Wallis, Euler, Bernoulli, Leplaxce etcetera यांची मोठी मदत झाली. वैज्ञानिक गरज, वैज्ञानिकांचा वैयक्तिक इंटरेस्ट, आर्थिक गरज आणि सामाजिक गरज यामधून लेडीज कारणाकरिता लाकडाची गरज भासू लागली. लाकूड मिळविण्याकरिता प्रचंड प्रमाणात वृक्षतोड व्हायला सुरुवात झाली. जहाज बांधणी असेल, तसेच घरबांधणी करिता आणि आणि कोळशाची निर्मिती करण्याकरिता देखील प्रचंड प्रमाणात लाकडाचा वापर होत असे. यामुळे अति प्रमाणात जंगल तोड झाली. सतराव्या शतकामध्ये लाकुड हे प्रमुख इंधन व संसाधन म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जायचे. पण प्रचंड प्रमाणात व्रुक्ष तोड व्हायला लागल्यावर जंगले धोक्यात येतील अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वनस्पती शास्त्र विषयक ज्ञानाला महत्व प्राप्त झाले, त्याचा वापर करून लाकडाची समस्या मार्गी लावण्याकरिता वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू झाले. Sir Walter Raleigh listed six major qualities of a good ship: strong build, speed, stout scantling, ability to fight guns in all weather, ability lie easily in a gale, ability to stay well Many scientists tried to devise means to satisfy the requirements First had to solve problems in basic sciences to solve the practical needs For exm: to understand ship speed, scientists had to work in hydrodynamics Thereby establishing a link between a given technical task and the purely scientific investigation Wren: England must be masters of the sea, superior to all naval forces Need for better Inland transport led to more scientific investigation in this area Indicates attempts by scientists to provide technical solution to business enterprise- to facilitate extension of markets - one major requirement of development of capitalism NPTEL ONLINE CERTIFICATION COURSE Raleigh यांनी उत्क्रुष्ठ जहाजाचे सहा गुणधर्म सांगितले आहेत. ते कोणते आहेत? उत्क्रुष्ठ व मजबुत बांधणी, वेग, लहान पण मजबूत, कोणत्याही हवामानात लढण्याची क्षमता, वादळामध्ये टिकून राहण्याची क्षमता आणि त्याचा बॅलन्स... हे ते गुणधर्म आहेत. जहाजाच्या या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी आपले संशोधन या दिशेने सुरू केले. याकरता सर्वप्रथम वैज्ञानिकांनी यामधील सैद्धांतिक ज्ञान उपयोगात आणून त्याचा विनियोग या समस्या सोडविण्याकरिता आणि चांगल्या, उत्कृष्ट गुणधर्माचे जहाज बनविण्याकरिता वापरले. सर्वप्रथम त्यांनी मूळ विज्ञान विचारात घेतले, त्याद्वारे जल शास्त्रांमध्ये लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा परस्पर संबंध आणि विनियोग करून त्यामधून जहाज बांधणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. यामुळे त्यांना दिला गेलेल्या तांत्रिक काम आणि त्यांच्या जवळ असलेल्या या वैज्ञानिक ज्ञानाचा वापर लागला. आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे ब्रिटिशांना समुद्रा वरती अधिराज्य गाजवायचे होते. संपूर्ण युरोप खंडांमध्ये त्यांना त्यांचे आरमार अतिशय सामर्थ्यवान बनवायचे होते.
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी 23 जूनला प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये ( Voters List ) अनेक त्रुटी असल्याने प्रभाग हद्दीनुसार त्या नसल्याने त्यात मोठ्याप्रमाणात तफावत आढळत आहेत. याबाबत आक्षेप नोंदविण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवून मिळावी (Extension of deadline for filing objections)या आशयाचे निवेदन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांना दिले. यावेळी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि,प्रभागाच्या हद्दीनुसार मतदार याद्या होणे अपेक्षित होते. मात्र प्रभागाच्या चतुसिमा महापालिकेने ठरवून दिलेल्या हद्दीनुसार झाल्या असल्यातरी बरेचसे मतदार प्रभागाच्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. दुसऱ्या प्रभागतील नावे त्या प्रभागात समाविष्ट झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विधानसभेच्या याद्यांनुसारच मतदारांची नांवे येणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. महापालिकेने प्रभाग रचनेनुसार केलेले जनगणनेचे ब्लॉक आपल्याकडे उपलब्ध असतांनाही प्रभागनिहाय मतदारयाद्यांमध्ये मोठयप्रमाणात चुका झाल्याचे आश्चर्य वाटते. त्याच्या दुरुस्तीसाठी तसेच हरकती नोंदविण्यास दिलेला कालावधी खूपच कमी आहे. सर्व 44 प्रभागातून या सदोष प्रारूप मतदार याद्यांबाबत प्रचंड नाराजीचा सूर असल्याने त्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी ही मुदत आणखी 15 दिवसांची वाढवून मिळावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,माजी गटनेते विलास शिंदे,मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे,पश्चिम नाशिक विधानसभाप्रमुख सुभाष गायधनी,उप महानगरप्रमुख नाना पाटील,उप विभागप्रमुख संदीप लभडे आदी उपस्थित होते.
India-Malesia Make Film In Joint Venture । भारत-मलेशियाने एकत्रित चित्रपट काढावा, मलेशियाच्या राणी नूर सुजाना यांची अपेक्षा - Divya Marathi\nIndia Malesia Make Film In Joint Venture\nभारत-मलेशियाने एकत्रित चित्रपट काढावा, मलेशियाच्या राणी नूर सुजाना यांची अपेक्षा\nमुंबई - भारत आणि मलेशिया दोन वेगळे देश असले तरीही बॉलीवूडने दोन्ही देशांना जोडलेले आहे. त्यामुळे या दोन्ही देशांनी एकत्र येऊन चित्रपट निर्मिती करावी, अशी अपेक्षा मलेशियाच्या राणी तोहपान नूर सुजाना अब्दुल्ला यांनी खास 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली.\nभारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मलेशियाने एक योजना तयार केली असून त्यासाठी एक विशेष अल्बम 'तुम मिले' तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अल्बममध्ये नूर सुजाना यांनी हिंदी गाणी गायली आहेत. शुक्रवारी रात्री ताज हॉटेलमध्ये या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी नूर यांनी 'दिव्य मराठी'शी आपले गायन आणि बॉलीवूडच्या प्रेमाबाबत गप्पा मारल्या. नूर सुजाना या तोहपानबेंधारा केडाह राजघराण्याच्या असून पर्यटन वाढवण्याबाबत त्या विशेष प्रयत्न करीत आहेत. त्या म्हणाल्या की मला लहानपणापासूनच गाण्यांची, हिंदी चित्रपटांची आवड आहे. बॉबी, संगमसारखे उत्कृष्ट चित्रपट एक वेगळा आनंद देणारे आहेत. लता मंगेशकर, किशोरकुमार आणि मोहंमद रफी माझे आवडते गायक आहेत. राजघराण्यात आल्यानंतर माझ्या पतींनी मला गाण्याचा छंद पुढे नेण्यास मदत केली. मी काही अल्बम तयार केले असून ते चॅरिटीसाठी वापरण्यात आले आहेत. त्यामध्ये मी हिंदी गाणी मलेशियन संगीताच्या आधारे तयार करून गायलेली आहेत. उदित नारायण, अभिजित या गायकांबरोबर मी गाणी गायलेली आहेत. माझा हा नवा अल्बम 'तुम मिले'मध्ये चार गाणी असून ती मी कुमार सानूबरोबर गायली आहेत.\nफिल्मसिटी तयार करणार\nनूर म्हणाल्या की, हिंदी चित्रपट जगभरात लोकप्रिय आहेत. हे चित्रपट नाट्य, रोमान्स, अॅक्शन आणि अभिनय अशा चार प्रकारात असतात. हा प्रकार अन्य चित्रपटांमध्ये दिसत नाही. मलेशियात हिंदी चित्रपट लोकप्रिय असतात. त्यामुळे आम्ही मलेशियात एक फिल्मसिटी तयार करणार आहोत. भारतातला नायक मलेशियन मुलीच्या प्रेमात पडतो अशा प्रकारची कथा पडद्यावर मांडली तर ती नक्कीच चालेल.
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : केरळमधील कोची येथे आज (2 सप्टेंबर 22) देशातली पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण पंतप्रधान मोदी यांनी केलं. या ध्वजाचं डिझाईन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. भारतात पहिल्यांदा आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या मुद्रेचा हा गौरव आहे. भारतीय नौदलाच्या या ध्वजावरील नवीन बोधचिन्हाशी संबंधित काही नविन्यपूर्ण तथ्यंदेखील आहेत. `एनडी टीव्ही`ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजावरील बोधचिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत डिझाईन करण्यात आलं आहे. नौदलाच्या जुन्या बोधचिन्हावर लाल सेंट जॉर्जचा क्रॉस होता. हा भूतकाळातल्या ब्रिटिश वसाहतवादाशी जोडलेला होता. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याने आता ब्रिटिश वसातवादाच्या देशातील आणि आपल्या मनांतील गुलामीच्या खुणा पुसून टाकण्याचं आवाहन पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 22 च्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केलं होतं. त्याला अनुसरूनच नौदलाच्या ध्वजावरील चिन्हात बदल करण्यात आला आहे. 'आज 2 सप्टेंबर 2022 रोजी इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झुगारलं आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदल ध्वजावर गुलामगिरी दर्शवणारं रेड सेंट जॉर्जच्या क्रॉसचं चिन्हं होतं. नवं चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. आता नौदलाचा नवा ध्वज समुद्र आणि आकाशात दिमाखात फडकेल', असं या वेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले. नौदलाच्या नव्या ध्वजावरील बोधचिन्हाची खास अशी वैशिष्ट्य आहेत. बोधचिन्हाची खास वैशिष्टय सांगणारा एक व्हिडिओ नौदलानं शेअर केला आहे. 'या ध्वजाच्या वरच्या कॅन्टोनवर म्हणजे कोपऱ्यात राष्ट्रध्वज आहे. शेजारी असलेलं बोधचिन्हात निळा अष्टकोनी आकार असून, त्यात एका अँकरच्यावर राष्ट्रीय चिन्ह आहे. या दोन चिन्हांना सामावून घेणारा ढालीचा आकार भारतीय नौदलाच्या 'शं नो वरुणः' या बोधवाक्याच्या पायावर उभा आहे. अष्टकोनी आकाराला आतल्या बाजूने दोन सोनेरी किनारी आहेत. अष्टकोनी आकार भारतीय नौदलाची अष्टदिशात्मक पोहोच आणि बहुआयामी ऑपरेशनल क्षमतेचं प्रतीक असलेल्या आठ दिशांचं प्रतिनिधित्व करतो. हा अष्टकोनी आकार शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेतून घेण्यात आला आहे. यावरील नांगराचं अर्थात अँकरचे चिन्ह स्थिरता दर्शवतं,' असं नौदलानं सांगितलं. 'सतराव्या शतकात परकीयांच्या आक्रमणांपासून किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं होतं. हे भारतातलं पहिलं आरमार होतं. या आरमारात 60 लढाऊ जहाजं आणि अंदाजे 5000 मावळ्यांचा समावेश होता. दूरदृष्टीने देशाचं संरक्षण करणाऱ्या महान राजाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या राजमुद्रेचा अष्टकोनी आकार नव्या ध्वजावरील नौदलाच्या बोधचिन्हाला देण्यात आला आहे,' असं नौदलानं नवीन बोधचिन्हासंदर्भातील व्हिडिओत म्हटलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात संचलन करणारी तुकडी आणि बँड पथक पूर्णपणे महिलांचे असू शकते. नवी दिल्ली : पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात संचलन करणारी तुकडी आणि बँड पथक पूर्णपणे महिलांचे असू शकते. लष्करी अधिकारी या प्रस्तावावर काम करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. संरक्षण मंत्रालयाने मार्चमध्ये २०२४च्या संचलन योजनेवर तिन्ही सैन्यदले, विविध मंत्रालये आणि विभागांना एक कार्यालयीन निवेदन पाठवले असून, या निवेदनात अशा प्रकारच्या प्रस्तावावर विचार करण्याची सूचना केलेली आहे. फेब्रुवारीच्या प्रारंभी संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सखोल विचारविनिमय केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित संचलनात सहभागी सर्व तुकड्यांत (संचलन आणि बँड पथक) तसेच कवायती व इतर सादरीकरणात केवळ महिलांचाच सहभाग असेल. गेल्या काही वर्षांपासून कर्तव्य पथावर होणाऱ्या वार्षिक संचलनात महिला अधिकारीही सहभाग घेत आहेत. यात लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे.
मुंबई, 14 डिसेंबर : 2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूपचं त्रासदायक ठरलं आहे. या काळात मनोरंजनाच्या दृष्टीने मोजक्याचं गोष्टी आपल्या हातात होत्या, ज्यामुळं आपल्या चेहऱ्यावर हसू आलं. देशभरातील सर्व चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे अनेक चित्रपटप्रेमींनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला. त्यांनी ओटीटीवर वेब सीरिज पाहणं अधिक पसंद केलं आहे. सध्या नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असंख्य वेब सीरिज उपलब्ध आहेत. परंतु कोणता चित्रपट किंवा वेब सीरिज पाहण्यासाठी निवडावी हा प्रश्न दर्शकांना सतावतो. त्यामुळं आयएमडीबीनं एक यादी जाहीर केली आहे. आयएमडीबीने निवडलेल्या वेब मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद आणि खूप प्रेम दिलं आहे. आजही लोकं ही मालिका पून्हा पून्हा पाहतात. यातील काही वेब सीरिज कॉमेडी आहेत, तर काही थ्रिलर आहेत, तर काहींमध्ये मोठा संदेश दडलाय. त्यामुळं इथं 2020 सालच्या अव्वल क्रमांकाच्या 10 वेब मालिकांची सूची देण्यात आली आहे. स्कॅम 1992 ही हर्षद मेहताची कथा असून दर्शकांनी याला खूपचं पसंदी दिली आहे. या वेब मालिकेनं आयएमडीबीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. ही वेब मालिका तुम्ही SonyLiv या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. दुसऱ्या क्रमांकावर पंचायत ही वेब मालिका आहे. ही मालिका तुम्हाला गावातलं दर्शन घडवतं. या वेब मालिकेची कथा खूपच तगडी असून तुम्हाला खिळवून ठेवायला मदत करते. ही वेब मालिका तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. स्पेशल ओपीएस जेव्हा रिलीज झाली, तेव्हा जिकडं तिकडं याच वेब सीरीजचा बोलबाला होता. ही सिरीज 2002 साली संसदेवर झालेल्या हल्यासंदर्भात असून याच्या कथेला अनेक राजकीय संदर्भ चिकटलेले आहेत. संसदेवर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख दहशतवाद्याला पकडण्यासाठी भारतीय गुप्त एजंटने केलेल्या साहसी मिशनचं दर्शन तुम्हाला या वेब सीरीज मध्ये पाहायला मिळेल. ही वेब मालिका हॉटस्टारवर पाहायला मिळेल. या वेब मालिकेनं आयएमडीबीच्या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. ही मालिकेला दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बंदिश बँडीट्सची कथा दोन गायकांची असून दर्शकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात या मालिकेला यश आलं आहे. ही मालिका प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. मिर्जापूर वेब सीरीजचे फॅन्स गेल्या एक वर्षभरापासून या सीरीजची वाट पाहत होते. यातील प्रत्येक डायलॉग उच्च कोटीचा आणि दर्शकांच्या जीभेवर रेंगाळणारे आहेत. याची कथा थ्रिलर असून शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला आहे. ही वेब मालिका तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. असुर ही वेब मालिका सत्य घटनेवर अधारीत असून क्राइम आणि थ्रिलरने ओतप्रेत भरलेली आहे. अर्शद वारसीने यामध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. ही वेब सीरीज तुम्हाला वूट (Voot) वर पाहता येईल. पाताळ लोक ही कथा एका घटनेच्या पोलीस तपाससंदर्भातला आहे. सुरूवातीला साधी केस असेल अशी वाटणारी कथा क्राइमच्या दुनियेतील अनेक धागेदोरे उलगडते. ही वेब मालिका तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ही वेब मालिका तुम्हाला नशेच्या दुनियेची सैर करवून आणते. नशेच्या बाजारात होणाऱ्या घडामोडी, खून, राजकारण, जीवघेणी स्पर्धा असं एकंदरीत सर्व घटकांना स्पर्श करणारी ही मालिका आहे. तुम्ही ही वेब मालिका एमएक्स व्हिडिओवर पाहू शकता. सुष्मिता सेन यांनी या मालिकेत दमदार अभिनय साकारला असून त्यांची ही पहिलीच वेब मालिका आहे. ही मालिकेची पटकथा पेनोझा या डच नाटकावर अधारित आहे. ही वेब सीरीज तुम्हाला हॉटस्टारवर पाहता येईल. अभय ही वेब मालिका क्राइम, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहे. ही कथा एका क्राइम कादंबरीवर अधारित आहे. ही मालिका ZEE5 वर पाहू शकता. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अमरावती : जो सदैव महाराष्ट्राचे हित चिंततो, त्याला काहीही होणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी दिली आहे. निलंग्यात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह त्या मुलाखतीत बोलत होत्या. दोन दिवसांपूर्वी निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखरुप बचावले. सुदैवानं मोठा अनर्थ होता-होता टळला. या अपघातानंतर राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांना काय वाटतं हेच आम्ही जाणून घेतलं. प्रश्न : मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याची माहीती तुम्हाला सर्वात आधी कोणाकडून मिळाली, आणि त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती, त्यांनीच स्वतः दिली. यानंतर त्यांनीच स्वतः आपण सर्व सुखरुप असल्याबद्दलही सांगितलं. पण फक्त तुम्ही कुणी टीव्ही पाहू नका, अशी सूचना केली. कारण त्यासंबंधी बातम्या रंजकतेतनं दाखवल्या जातील अशं त्यांचं म्हणणं होतं. पण यावर मी त्याला विचारलं की ते ठिक आहे. तुम्ही खरंच ठिक आहात ना? त्यावर त्यांनीच सांगितलं की, हो मी ठिक आहे. आम्हाला कसलीही इजा झाली नाही. मी 4 ते 4. 30 पर्यंत येतो. त्यानंतर तू स्वतः पाहा. प्रश्न : या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची भीती वाटते का? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : मुळीच नाही. . ! कारण दौरे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याची भीती अजिबात वाटत नाही. अन् ज्या माणसाला दिवसाचे 24 तास पूरत नाहीत. त्याला अशा दौऱ्यांसाठी रस्ते मार्गे प्रवास करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना अशी अडवणूक करता येणार नाही. पण मी एक सांगते 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्याचाच सदैव विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही. याची अम्हाला सदैन खात्री आहे. प्रश्न : पण या घटनेनंतर तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : नाही. . मुख्यमंत्र्यांना मी असा काही सल्ला दिला नाही. पण एक आई म्हणून माझ्या समाधाना करता त्यांना काही गोष्टी सांगत असते, आणि तेही त्यावर सकारात्मक उत्तरं देतात. प्रश्न : मुख्यमंत्री निलंग्यावरुन घरी परत आल्यावर त्यांनी काय सांगितलं? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : ते म्हणाले की, बघं मी सुखरुप परत आलो आहे. पण त्यावर मी विचारलं इतर सर्वही सुखरुप आहेत का त्यावर ते ही म्हणाले की, हो. . इतरही सर्व सुखरुप आहेत केवळ, केतन पाठक यांना थोडसं लागलं आहे. बाकी अम्हाला काही कुणाला लागलं नाही. आम्ही सगळी ठिक आहोत. प्रश्न : गडचिरोली मध्येही असाच प्रकार घडला होता त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया होती? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हो. . तेव्हाचं मला काही नीटसं समजलं नव्हतं. पण त्यानंतर त्यांनी अनेक दौरे केले. पण त्यादरम्यान काही भीती वाटली नाही. किंवा त्रासही झाला नाही. पण एकाच गोष्टीची खंत वाटते की, जो व्यक्ती लोकांसाठी एवढा झिजतो आहे, स्वतः च्या जीवाला त्रास करुन घेत आहे. 45 अंश सेल्सिअस तापमानात स्वतः फिरतो आहे, पण इतकं चांगलं काम करत असताना ही आपल्या मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, हे पाहून मला त्रास होतो.
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोतर्फे २८ मार्च २०२३ पासून बंगळुरू-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) दरम्यान थेट सेवा सुरू केल्याची घोषणा केली. या मार्गावर विमानसेवा सुरू झाल्याने बंगळुरू-छत्रपती संभाजीनगर मार्गावर थेट वाहतूक सेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ आता फक्त दीड तासावर आला आहे. इंडिगोच्या जागतिक सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितले, की ही दोन शहरे रेशीम आणि कापसाचा उत्पादक प्रदेश आहे. त्यामुळे थेट जोडणीसह वस्त्रांची बाजारपेठ आणि दळणवळणाला चालना मिळू शकणार आहे. या थेट सेवेमुळे आता मोठ्या प्रमाणावर प्रवासातील वेळेत बचत होणार आहे. बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगर विमानसेवेमुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर सहा नेटवर्कने जोडले जात आहोत. छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपैकी एक असून हे शहर विविध ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. दोन वारसास्थळे असलेला हा एकमेव जिल्हा आहे. प्रवासी हे www. goIndiGo. in या वेबसाइटवरूनही थेट बुकिंग करू शकतात. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विनय मल्होत्रा यांनी केले.
२०१४ चे हॉटेलचे बिल दिले नाही असं म्हणत हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांचा तापा अडवला. आता यावरून सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यावर प्रत्यारोप केला आहे. आपल्याविरोधात कुणीतरी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोलापूर : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सांगोला येथे पंचायत समितीच्या दौऱ्यावर असताना एक व्यक्ती सदाभाऊ ह्यांना अडवून थकीत बिलासंदर्भांत विचारू लागली. ह्यावेळी त्या व्यक्तीने सदाभाऊ यांचा ताफा अडवला. त्या व्यक्तीला सदाभाऊ खोत ह्यांनी विचारलं. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान आपले कार्यकर्ते माझ्या हॉटेलात जेवून गेले. मात्र अद्याप बिलाची रक्कम चुकती केलेली नाही, असा दावा त्या व्यक्तीने केला. अस्पष्ट आणि अपुरी माहिती पुरवली. खोलवर विचारणा केली असता सदर व्यक्तीने आपलं नाव अशोक शिनगारे असल्याचं सांगितलं. मात्र ह्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही, असा दावा सदाभाऊ खोत यांच्याकडून करण्यात आला. सदाभाऊ खोत ह्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून या घटनेसंबंधी आरोप फेटाळून लावले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा कोणताही कार्यकर्ता अथवा प्रचारक साधा हॉटेलात चहा सुद्धा पित नव्हता. कारण आमच्याकडे पैसे नव्हते. मग हजारो रुपयांचं हॉटेलचं बिल होणं अशक्य आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले. असं काहीतरी कुभांड रचायचं आणि त्यानंतर हल्ला करायचा, असा त्यांचा एकंदरीत प्लॅन होता. परंतु त्यांचं टायमिंग चुकलं आणि आम्ही लवकर आलो. तो बराच वेळ नुसताच कुभांड रचून एकच गोष्ट दहा वेळा सांगत होता. हल्ला करायला लोक येणार होते, ते लवकर येत नव्हते. त्यामुळे त्याला जी स्क्रिप्ट दिली होती, ती तो पुन्हा पुन्हा सांगत होता. हा हल्ला का झाला? तर भाऊंनी पैसे दिले नाहीत म्हणून, या कार्यकर्त्यांनी सदाभाऊवर हल्ला केला असं चित्र त्यांना महाराष्ट्रभर पसरवायचं होतं, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. ह्या घटनेमागची सत्यता पडताळता डोळ्यासमोर जे आलं ते मात्र अवस्थ राजकीय वातावरणातून कुणीतरी केलेलं षडयंत्र असल्याचं उघड झालं. ह्या प्रकरणात सदाभाऊ खोत ह्यांनी राष्ट्रवादीच्या टोमॅटो सारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून हा हॉटेल मालक बनाव करत असल्याचं सांगत त्या व्यक्तीच्या गुन्ह्याचा पाढाच सदाभाऊ खोत यांनी मीडिया समोर वाचला. ३/४/२०२१ रोजी लिमिटेशन ऍक्ट खाली आणखी एक गुन्हा दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे महाकाळचा कलम १३८ खाली गुन्हा दाखल आहे. जयहिंद पतसंस्थेचा कलम १३८ खाली गुन्हा दाखल आहे. असे तब्बल सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो वाळूमाफिया आहे. तो दारूविक्रेता आहे, ही सगळी माहिती समोर आली. हा राष्ट्रवादीचा भामट्या एवढ्यावरच थांबला नाही. सिद्धू शिंदे (रा. काळेवाडी, ता आटपाडी, जि. सांगली) यांच्या बंगळूर येथील सोन्याच्या दुकानातून १४ किलो सोने चोरल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे, असा दावा सदाभाऊंनी केला. ह्या व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. पण पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आले. त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे, हे लक्षात आले, असं सदाभाऊ खोत म्हणाले. राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीयांकडून मला धोका आहे, असा आरोपही त्यांनी केला. तुम्ही असे हल्ले करून आणि कुभांड रचून आम्हाला जीवनातून उठवू शकत नाही. हा संघर्ष आता तीव्र होईल आणि गावगाड्यातील माणसांना एकत्र घेऊन ह्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात आरे ला कारे म्हणूनच उत्तर दिले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला.
ज्यादा दराने किराणा मालाची विक्री -तिरुपती मार्केटच्या,विक्रम खंडेलवालला पोलिसांनी पकडले . । My Marathi\nHome Local Pune ज्यादा दराने किराणा मालाची विक्री -तिरुपती मार्केटच्या,विक्रम खंडेलवालला पोलिसांनी पकडले .\nअन्न व पुरवठा निरीक्षक प्राजक्ता माळी यांची धडक कारवाई सुरु\nपुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लॉक डाऊन जाहीर केले आहे. या संधीचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने किराणा मालाची विक्री करणार्या दुकानदारावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nगुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे पथक सदाशिव पेठेत एका दुकानदार जादा दराने मालाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध अन्न व पुरवठा निरीक्षक प्राजक्ता माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम ३, ७ व भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलॉक डाऊनच्या काळात गैरफायदा घेऊन सिगारेटची विक्री जास्त दराने करण्याचा ठपका ठेवून नफेखोरी करणाऱ्या विक्रम खंडेलवाल या दुकानदारावर १८८ नुसार समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलीस उपनिरीक्षक महाडिक, कर्मचारी मोकाशी हे समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तिरुपती मिनी मार्केट या किराणा माल दुकानात खंडेलवाल हा सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना मिळून आला. यावेळी त्याच्या ताब्यातून २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जागतिकीकरणाचा फोलपणा अण्णांच्या घटनेतून सामोरा येतो. जागतिकीकरणामुळे भांडवलदारांचे चारित्र्य बदलले. त्याने भ्रष्टाचाराला स्कोप दिला. केतकर म्हणाल्याप्रमाणे अण्णांच्या या आंदोलनामुळे लोकशाही धोक्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाने भ्रष्टाचाराचा मुद्दा निकालातही निघणार नाही. भ्रष्टाचार हे भांडवलशाहीचे अभिन्न अंग आहे. त्याशिवाय धनसंचय होऊ शकणार नाही. भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रथमच निर्माण झालेला नाही. व्ही. पी. सिंग वगैरे मंडळींनी हा मुद्दा समोर आणलाच होता. टूजी स्कॅम असोत, वा हर्षद मेहता प्रकरण, या सर्व प्रकरणांतूनही हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारे कोसळली, मात्र त्यावेळी कुणी संविधानाला हात घातलेला नव्हता. कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांनी क्रूर जागतिकीकरणाच्या बाजूने ज्या भूमिका घेतल्या, त्या मला नेहमीच खटकत राहिल्या. मी आणि केतकर यांनी एकत्रितपणे गिरण्यांच्या गेटवर गिरणी कामगारांच्या सभा घेतलेल्या आहेत. अचानक, त्यांनी हे सगळे सोडून जागतिकीकरणाच्या बाजूची भूमिका घेणे मला बोचणारे ठरले. जागतिकीकरणाचा फोलपणा अण्णांच्या घटनेतून सामोरा येतो. जागतिकीकरणामुळे भांडवलदारांचे चारित्र्य बदलले. त्याने भ्रष्टाचाराला स्कोप दिला. केतकर म्हणाल्याप्रमाणे अण्णांच्या या आंदोलनामुळे लोकशाही धोक्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाने भ्रष्टाचाराचा मुद्दा निकालातही निघणार नाही. भ्रष्टाचार हे भांडवलशाहीचे अभिन्न अंग आहे. त्याशिवाय धनसंचय होऊ शकणार नाही. तसेच, भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रथमच निर्माण झालेला नाही. व्ही. पी. सिंग वगैरे मंडळींनी हा मुद्दा समोर आणलाच होता. त्यातच नुकतेच झालेले टूजी स्कॅम असोत, वा हर्षद मेहता प्रकरण, या सर्व प्रकरणांतूनही हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारे कोसळली, मात्र त्यावेळी कुणी संविधानाला हात घातलेला नव्हता. शेवटी, हा भ्रष्टाचार कुठे जाऊन थांबणार? भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसे खाणे नव्हे. माणसाला माणसाच्या बरोबरीने जगण्याचे अधिकार नाकारणे हा सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे धनाची आसक्ती हा मोठा भ्रष्टाचार आहे. देशातील कष्टकरी, कामगार, स्त्रिया, दलित या सर्वांवर होणारे अन्याय अण्णांना दिसत नाहीत का? या निकषावर अण्णांसोबत जी माणसे आहेत त्यांच्या भूमिका काय आहेत? मी प्रचंड अस्वस्थ आहे, कारण वरवर गोंडस दिसणारा भ्रष्टाचार निर्मूलनाचा हा मुद्दा देशातील तळागाळातील वर्गांच्या विरोधात जाणार आहे. कारण या वर्गाच्या हाती केवळ एक हत्यार उरले आहे आणि ते म्हणजे संविधान आणि अण्णांचा हल्ला संविधानावरच आहे! या संविधानाने न्यायव्यवस्था आणि संसदेत समतोल राखला आहे. अण्णांच्या आंदोलनाचा रोख समतोलाला बायपास करून नवीन असंविधानिक व्यवस्था निर्माण करण्याकडे दिसतो. केतकर, गांगलांसारख्या आमच्या मित्रांनी या परिस्थितीला त्यांच्या जागतिकीकरणाच्या बाजूने घेतलेल्या भूमिका जबाबदार होत्या, हे प्रांजळपणाने कबूल करावे. दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म. टा. 'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने 'ग्रंथाली'ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये 'एस. टी. समाचार'चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्थापक सदस्य आहेत. साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची 'माया माध्यमांची', 'कॅन्सर डायरी' (लेखन-संपादन), 'शोध मराठीपणाचा' (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्क्रीन इज द वर्ल्ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा 'सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्कार, 'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठा साहित्य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्हाण' पुरस्कार लाभले आहेत.
अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्यासह फर्स्ट लेडी जिल बिडेन, मस्जिदचे इमाम मोहम्मद डॉ. तालिब एम. शरीफ आणि पाकिस्तानी गायक आणि संगीतकार अरुज आफताब यांचीही उपस्थिती होती. यावेळी जो बायडेन यांनी जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरताहेत असं वक्तव्य केले आहे. (Muslims around the world are victims of violence ) "इस्लामोफोबियामुळे मुस्लिमांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अडचणींचा सामना करूनही मुस्लिम समाजातील लोक अमेरिकेला मजबूत बनवण्याचे काम करत आहेत", असंही त्य व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात जो बायडेन म्हणाले. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीला सर्वसाधारण सभेत बाजू मांडू देण्यास काही हरकत नाही, असा सल्ला विधी सल्लागारांनी महापौरांना दिला आहे. त्यामुळे कोणत्या सर्वसाधारण सभेत कंपनीला बाजू मांडू द्यायची की नाही, याचा निर्णय आता महापौरांना घ्यावा लागणार आहे. महापालिकेने समांतर जलवाहिनीचा पीपीपीतत्वावरचा करार एक ऑक्टोबर २०१६ रोजी रद्द केला. करार रद्द झाल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था पुन्हा महापालिकेच्या ताब्यात आली. सध्या संपूर्ण शहराला महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. करार रद्द झाल्यावर कंपनीने कोर्टात आणि लवादाकडे धाव घेतली. या दोन्ही ठिकाणी कंपनीविरुद्ध महापालिका असे प्रकरण सुरू आहे. समांतर जलवाहिनीचे काम 'त्याच' कंपनीकडून करून घेण्याबद्दल सध्या हालचाली सुरू झाल्या आहेत. न्यायालयाच्या बाहेर तडजोड करून समांतर जलवाहिनीचे काम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या माध्यमातून करून घेण्यासाठी राजकीय नेत्यांचा एक गट देखील सक्रिय झाला आहे. कंपनीतर्फेही हालचाली केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करार रद्द झाल्याच्या १३ महिन्यानंतर, म्हणजे १४ नोव्हेंबर २०१७ रोजी कंपनीने महापालिका आयुक्तांना पत्र देऊन, 'सर्वसाधारण सभेच्या समोर बाजू मांडण्याची संधी द्यावी,' अशी विनंती केली आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे ब्रिजेश सिंग यांनी हे पत्र कंपनीच्या लेटहेडवर नव्हते, त्यामुळे या पत्राच्या वैधतेबद्दल आक्षेप घेण्यात आला. या आक्षेपानंतर कंपनीने लेटरहेडवर आयुक्तांच्या नावे पत्र पाठवले. सर्वसाधारण सभेत कोणते विषय घ्यायचे, याचे अधिकार महापौरांचे आहेत. त्यामुळे आयुक्तांनी कंपनीचे पत्र पुढील निर्णयासाठी महापौरांकडे पाठवले. कंपनी आणि महापालिका यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे कंपनीच्या पत्रावर एकतर्फी निर्णय घेणे शक्य नाही, असे म्हणत महापौर नंदकुमार घोडेले यांनी कंपनीचे पत्र अभिप्रायासाठी विधी सल्लागारांकडे पाठवले. स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घेणे शक्य वाटत नसल्यामुळे विधी सल्लागारांनी कंपनीचे पत्र सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत असलेल्या वकिलांकडे पाठवले व त्यांचा अभिप्राय मागवला. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा वकिलांच्या अभिप्रायाकडे डोळे लावून बसली होती. दोन दिवसांपूर्वी वकिलांचा अभिप्राय महापालिकेच्या विधी सल्लागार विभागाला प्राप्त झाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कंपनीला बाजू मांडू देण्याची संधी देण्यास हरकत नाही, त्यांना बाजू मांडू द्यावी, असा अभिप्राय वकिलांनी दिला आहे. वकिलांनी नोंदवलेला अभिप्राय विधी सल्लागारांनी महापौरांपर्यंत पोचवला आहे. या अभिप्रायानुसार महापौर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीला सर्वसाधारण सभेत बाजू मांडण्याची परवानगी देण्यास काही हरकत नाही, असा अभिप्राय विधी सल्लागारांनी दिलेला असला तरी आवश्यक त्या तरतुदींचा अभ्यास करून कंपनीला सर्वसाधारण सभेत बाजू मांडू देण्याबद्दल निर्णय घेतला जाईल. निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
पालिकेच्या मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱया प्रकल्पग्रस्तांसाठी पर्यायी घराऐवजी आर्थिक मोबदला देण्यात येणार असून अधिपृत बांधकामांना 30 लाखांऐवजी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतच्या निर्णयाला आज स्थायी समितीत बहुमताने मंजुरी मिळाली. या निर्णयाचा 1964 पर्यंतची हजारो अधिपृत बांधकामे, प्रकल्पग्रस्तांना फायदा होणार असून पालिकेचे अनेक विकास प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घरांऐवजी आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका नवे धोरण आणत आहे. यामध्ये रेडिरेकनर रेटनुसार मोबदला दिला जाणार आहे. या धोरणानुसार झोपडीधारकांना किमान 17 लाख तर जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंत तर 1964 पूर्वीच्या बांधकामांना 34 लाख ते 1 कोटींपर्यंत आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये झोपडीधारकांना जास्तीत जास्त 30 लाखांचा मोबदला पुरेसा ठरत नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते. शिवाय मोक्याच्या ठिकाणची जागा गेल्यावर 30 लाखांत घर घेणे शक्य नव्हते. त्यामुळे झोपडीवासीयांसाठी मोबदल्याची रक्कम 50 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी करीत शिवसेनेच्या वतीने सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडली. याला विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. त्यामुळे उपसूचनेसह प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. पालिकेच्या माध्यमातून विकास आराखडा, सर्वसमावेशक वाहतूक योजना, पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांसाठी अनेक वेळा सदर जमीन भारमुक्त करताना प्रकल्पबाधितांना पर्यायी घरे द्यावी लागतात. यामध्ये निवासी जागेसाठी मालमत्ता खात्याकडून, तर अनिवासी बांधकामांना बाजार खात्याकडून पर्यायी जागा देण्यात येतात. n सद्यस्थितीत पालिकेने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांत सुमारे 40 हजार घरांची गरज आहे. मात्र सद्यस्थितीत पालिकेकडे उपलब्ध जागा अत्यंत कमी आहेत. त्यामुळेच प्रकल्पबाधितांना घरांच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याचे धोरण प्रस्तावित करण्यात आले आहे. माहुल येथील प्रदूषणामुळे या पर्यायी जागेत जाण्यास प्रकल्पग्रस्त तयार नसतात. त्यामुळे हे प्रकरणही न्यायालयात आहे. मात्र नव्या धोरणामुळे प्रकल्पबाधित आर्थिक मोबदला घेऊन आपल्याला हव्या त्या ठिकाणी घर घेऊ शकतील. परिणामी रहिवाशांच्या विरोधामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. पालिकेने आतापर्यंत विविध विकासकामांतील प्रकल्पाबाधितांना 244986 सदनिकांचे वाटप केले आहे. तर एम/पूर्व येथे दुरुस्तीनंतर उपलब्ध झालेल्या 819 व इतर केवळ 131 सदनिका उपलब्ध आहेत. तर न्यायालयाच्या निर्णयामुळे 3828 सदनिका वाटप करता येत नाहीत. असे असताना सद्यस्थितीत विविध विकासकामांतील प्रकल्पबाधितांची संख्या 36,221 झाली असून नजीकच्या काळात ही संख्या 40 हजारांवर जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घरे देण्यासाठी सदनिकांचा तुटवडा होणार आहे. त्यामुळे हे धोरण उपयुक्त ठरणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
150cc-200cc सेगमेंटमध्ये दमदार बाइक खरेदी करायचा विचार असेल तर आज तुम्हाला 150cc-200cc सेगमेंटमध्ये भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टॉप १० बाइक्सबाबत सांगणार आहोत. हायलाइट्सः नवी दिल्ली : भारताच्या बाजारात बजेट सेगमेंटमधील पॉवरफुल स्पोर्ट्स बाइकची डिमांड वाढतेय, शिवाय तरुणांना आकर्षित करण्यासाठी TVS, Bajaj, Yamaha, Hero, Suzuki, Honda अशा प्रमुख कंपन्या 150cc ते 200cc सेगमेंटमध्ये एकाहून एक शानदार बाइक्स लाँच करत आहेत. TVS Apache आणि Bajaj Pulsar यांसारख्या बाइक्स ग्राहकांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय आहेत. परवडणाऱ्या स्पोर्ट्स बाइक आपल्या शानदार लूक आणि पॉवरफुल फीचर्ससोबत चांगल्या स्पीडसाठी ओळखल्या जातात. आज तुम्हाला 150cc-200cc सेगमेंटमध्ये भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टॉप १० बाइक्सबाबत सांगणार आहोत. या सर्व बाइक्सच्या जुलै २०२१ मधील एकूण सेल्स रिपोर्टवरही नजर मारुयात. 150cc-200cc सेगमेंटच्या दमदार बाइक्स - भारतात 150cc-200cc सेगमेंटच्या टॉप 10 बाइक्समध्ये TVS Apache, Bajaj Pulsar, Honda Unicorn 160, Yamaha FZ, Yamaha R15, Yamaha MT15, Suzuki Gixxer, Hero Xstream 160R, KTM 200 आणि Bajaj Avenger अशा बाइक्सचा समावेश होतो. टॉप १० च्या यादीमध्ये यामहाच्या सर्वाधिक ३ बाइक्स आहेत, तर सर्वात जास्त टू-व्हीलर विकणाऱ्या Hero Motocorp कंपनीची कामगिरी मात्र बजेट स्पोर्ट्स बाइक सेगमेंटमध्ये निराशाजनक राहिलीये. या सेगमेंटमच्या टॉप १० लिस्टमध्ये कंपनीच्या फक्त एकाच बाइकचा समावेश झालाय. टॉप 10 बाइक्सचा सेल्स रिपोर्ट - जुलै २०२१ मध्ये 150cc-200cc बाइक सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विक्री टीव्हीएसच्या TVS Apache या बाइकची झाली. जुलै २०२१ मध्ये कंपनीने एकूण २७,२८८ टीव्हीएस अपाचे विकल्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Bajaj Pulsar आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण २६,९४३ पल्सर विकल्यात. पण दोन्ही बाइकच्या विक्रीमध्ये जून २०२१ महिन्याच्या तुलनेत घट झाली आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर Honda Unicorn 160 ही दमदार बाइक आहे. एकूण २१,७३५ युनिकॉर्नची विक्री झाली. चौथ्या क्रमांकावर Yamaha FZ आहे, कंपनीने या बाइकच्या एकूण १८,०६६ यूनिट्सची विक्री केली. नंतर Yamaha R15 पाचव्या क्रमांकावर आहे, एकूण ७,२८० R15 बाइक्सची विक्री झाली. सहाव्या क्रमांकावरही यामहा मोटर्सची Yamaha MT15 बाइक असून जुलैमध्ये कंपनीने एकूण ५,३१६ MT15 बाइक्स विकल्यात. 150cc-200cc बाइक सेगमेंटमध्ये सुझुकीची दमदार बाइक Suzuki Gixxer विक्रीच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर आहे. जुलैमध्ये एकूण २,९३७ यूनिटची विक्री झाली. यानंतर ८ व्या क्रमांकावर KTM 200 बाइक आहे, जुलैमध्ये एकूण २,०१९ KTM 200 बाइकची विक्री झाली. टॉप १० च्या यादीमध्ये १० व्या क्रमांकावर Bajaj Avenger आहे. जुलैमध्ये कंपनीने एकूण १,८६६ Bajaj Avenger विकल्या. तर, 'मंथली ग्रोथ'च्या बाबतीत सुझुकी जिक्सर, हीरो एक्स्स्ट्रीम 160आर आणि यामहा एफजेडची कामगिरी सर्वात चांगली राहिली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आरखड्यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. आज राज्यात 1 हजार 444 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात एकूण 2 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आठ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. (New corona patients in maharashtra and 8 patients dead) राज्यातील मृत्यूदर हा 1. 83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79 लाख 39 हजार 594 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98. 03 टक्के इतके झाले आहे. राज्यात एकूण 10 हजार 902 सक्रिय रुग्ण संख्या आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4 हजार 412 इतके रुग्ण आहेत. मुंबईनंतर ठाण्यामध्ये 2 हजार 478 सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 22 हजार 31 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 38 लाख 25 हजार 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2 हजार 152 रुग्णांची घट झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 7 हजार 591 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. देशातील कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. यामधील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणं असणारे आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण जालीम उपाय मानला जातो. त्यामुळे राज्यभरात लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. तसेच, सध्या ज्या नागरिकांच्या लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत. त्यांना बुस्टर डोस दिला जात आहे. दरम्यान, एकिकडे कोरोनाचे संकट असून, दुसरीकडे साथीच्या आजरांनी डोकं वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
नागरिकत्व कायदा तयार झाल्यानंतर देशातील ईशान्य भारतात हिंसाचार उसळला आहे. या कायद्याविरोधात विरीधात जनता रस्त्यावर उतरली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, वकील निजाम पाशा म्हणाले की, एमआयएमने नागरिकत्व दुरुसती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इंडियन यूनियन मुस्लिम लीगनेही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ओवेसी यांनी कायद्याला विरोध करत विधेयकाची प्रत लोकसभेत फाडली होती.
नवी दिल्ली : Earn Money । देश-विदेशाची अशी अनेक नाणी आहेत जी खुप वर्षापूर्वीच बंद झालेली आहे आणि ती फार क्वचित पहायला मिळतात. अशा दुर्मिळ नाण्यांसाठी काही लोक लाखो रूपये देण्यास तयार असतात. सध्या आम्ही येथे 2 रुपयांच्या ज्या नाण्याबाबत सांगणार आहोत ते नाणे तुम्हाला 5 लाख रुपये मिळवून (Earn Money) देऊ शकते. कसे असावे 2 रुपयांचे नाणे? ई कॉमर्स वेबसाइट क्विकरवर एक दुर्मिळ 2000 सालातील नाणे आहे. या नाण्याच्या पाठीमागे भारताचा नकाशा आणि त्या नकाशात राष्ट्रीय झेंडा आहे. शेजारी हिंदीत राष्ट्रीय एकता आणि इंग्रजीत National Integration लिहिलेले आहे. क्विकर डॉट कॉमवर या नाण्याची किंमत 5 लाख रुपये सांगितली आहे. याच वेबसाईटवर इतरही नाण्यांना मागणी आहे. जसे की 2 रुपयांच्याच एका 1994 च्या नाण्याची किंमत 5 लाख सांगण्यात आली आहे. अशी दोन नाणी विकली तर 10 लाख मिळू शकतात. आता जाणून घ्या यासाठी काय करावे लागेल? तुमच्याकडे असे 2 रूपयाचे नाणे असेल तर साईटवर ऑनलाइन विक्रेता म्हणून नोंदणी करा. याची पूर्ण माहिती https://www. quikr. com/home-lifestyle/2-rupee-coin-for-sale-quantity-2-jalandhar/p/355893515 येथे मिळेल. रजिस्टर केल्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. या वेबसाइटवर 2 ऑपशन नाणी खरेदी करण्यासाठी Buy Now आणि विकण्यासाठी Make an Offer आहे. येथे जाऊन नाण्याचा फोटो अपलोड करा. त्यानंतर लोक थेट तुमच्याशी संपर्क करतील. मनासारखी किंमत आल्यानंतर तुम्ही नाणे विकू शकता. - Money Heist 5 । मुंबई पोलिस लयभारी ! Bella Ciao गाण्यावर केलं जबरदस्त परफॉर्म, म्हणाले - 'खाकी सर्वकाही आणखी चांगलं बनवते' (व्हिडीओ)
नाशिकः मद्याच्या नशेत अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलेल्या युवकाचा १०० टक्के भाजून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी फुलेनगर झोपडपट्टी येथे घडली. लक्ष्मण साकरून दोंदे (३८, रा. भराडवाडी, फुलेनगर) असे पेटवून घेणार्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोंदे याने मद्याच्या नशेत फुलेनगरच्या तीन पुतळा परिसरात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत स्वतला पेटवून घेतले. यामध्ये तो १०० टक्के भाजला. पोलीसांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ....
नाशिक : एकीकडे करोनाच्या विळख्यात महाराष्ट्र राज्य सापडले असताना, दुसरीकडे राज्यातील नाशिक शहरामधील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन वायूची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेबाबत देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे! " अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही, ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे, तसेच या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी, यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असून, नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
'केळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!\nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!\nJune 20, 2017 July 29, 2020 इनमराठी टीम10341 Views0Comments Banana Peel, Benefits\nलेखाचं शीर्षक वाचून तुम्ही नकीच बुचकळ्यात पडला असाल. तुम्हाला वाटत असेल की त्या सध्या केळीच्या सालीने एवढे काय मोठे तीर आपण मारू शकतो.\nतुमच्या दृष्टीने जरीही ती निरुपयोगी असली तरी आता आम्ही जे फायदे सांगणार आहोत ते वाचल्यावर तुम्ही देखील थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया केळाच्या सालीचे हे १० उपयोग जे आजवर तुम्हाला कोणीही कधीही सांगितले नसतील!\nही गोष्ट ऐकायला विचित्र वाटते पण हे १०० टक्के खरं आहे की केळीच्या सालीचा उपयोग शूज आणि चांदीचे दागिने पोलिश करण्यात केला जाऊ शकतो.\nकेळी या फळाचे मुळातच असंख्य फायदे आहेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा फायदा होय. तर जेव्हा कधी अर्जंट मध्ये बूट पोलिश करायची गरज भासेल किंवा चांदीचे दागिने पोलिश करायला काही साधन उपलब्ध नसेल तेव्हा बिनधास्त केळीची साल वापरा आणि चकाचक पोलिश करा.\nकेळीच्या सालीचा दैनंदिन आयुष्यात होणारा हा अजून एक महत्त्वाचा फायदा.\nजर तुमची टूथपेस्ट संपली असेल किंवा दात खूपच पिवळे पडले असतील तर केळीची साल दातांवर घासा, तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.\nकेळ्याच्या सालीचा हा उपयोग सर्वांच्याच दृष्टीने अतिमहत्त्वाचा आहे. कधी हातापायावर वगैरे छोटीशी जखम झाली तर त्यावर टेपने केळ्याची साल लावून ठेवा.\nसालीमधील गुण जखम बर करण्यात आणि व्रण नाहीसा करण्यात मदत करेल.\nताण कमी करण्यासाठी\nएका संशोधनातून सिद्ध झालंय की केळ्याच्या सालीचा antidepressant म्हणून वापर करता येऊ शकतो. Antidepressant असे मेडिसिन असते जे ताण-तणाव कमी करण्यासाठी मदत करते आणि मन शांत ठेवते.\nजर तुम्ही केळीची साल पाण्यात उकळून ते पाणी प्यालात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant असतो.\nज्या प्रमाणे विविध वस्तू पोलिश करण्यासाठी केळीच्या सालीचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमच्या बागेतील झाडांच्या पानावर जर डाग वगैरे पडले असतील किंवा ती पाने खराब झाली असतील, तर केळीच्या सालीच्या सहाय्याने ती साफ करता येतात.\nयाचा फायदा असा की तुमच्या झाडांची पाने पुन्हा एकदा टवटवीत दिसतील.\nकेळ्याची साल खाण्याची कल्पना जरा विचित्र वाटते नाही का? पण विश्वास ठेवा ही विचित्र कल्पना तुमच्या शरीरासाठी मात्र फार उपयुक्त ठरू शकते तुम्ही ही साल कच्ची खा किंवा शिजवून खा, त्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळणार हे नक्की!\nआजकाल तर बऱ्याच नवनवीन रेसिपीज अध्ये केळ्याच्या सालीचा उपयोग केला जातो.\nही युक्ती वापरलीत तर केवळ २ तासांत तुम्ही २४० पानांचं पुस्तक वाचू शकता! करताय ना ट्राय?\nझेड, वाय, झेड प्लस... VIP लोकांना दिल्या जाणाऱ्या सिक्युरिटींचे प्रकार जाणून घ्या!
भंडारा : हिंदुत्ववादी संघटना असलेली बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख पदाधिकारी असलेल्या प्रवीण उदापुरे व पंकज उदापुरे यांच्यावर भंडारा पोलिसांनी षडयंत्र रचून गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे खोटे असून माझ्या मुलांना पोलिसांनी नाहक फसविल्याचा आरोप मनोहर उदापुरे यांनी पत्रपरिषदेतून केला आहे. यावेळी त्यांनी पुढे सांगताना, बजरंग दलाचे कार्य करीत असताना माझा मुलगा प्रविण हा सामाजिक व धार्मिक भावनेतून काम करीत आहे. दरम्यान त्याने अनेकदा धार्मिक स्वरूपाच्या बाबींसाठी आंदोलने केले. यामुळे त्याच्यावर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे. दरम्यान घरी पाहुणे बसले असताना भंडारा पोलीस ठाण्याचा एक पोलीस कर्मचारी घरी येवून त्याने प्रविण उदापुरेला ठाण्यात बोलविल्याचे सांगितले. याबाबत मी स्वतः पोलीस स्टेशनला मुलावरील आरोपांच्या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेण्याकरीता गेलो असता पोलिसांनी माझ्याशी असभ्यपणाची वर्तणूक दिली. व प्रविणवर तडीपारीची कारवाई करावयाची असल्याचे सांगत त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणले. यानंतर कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता पोलिसांनी मोठ्या ताफ्यासह माझ्या घरी येऊन लहान मुलगा पंकजला भंडारा पोलीस ठाण्यात नेले. यानंतर त्याला लॉकअपमध्ये आरोपीसारखी वागणूक दिली. प्रविणला पकडण्याकरीता पोलिसांनी अनेक टीम बनविली. वेळोवेळी घरी येऊन आमचे मानसिक शोषण केले. माझे दोन्ही मुले निर्दोष असून पोलिसांनी त्यांना षडयंत्रात फसवून त्यांच्यावर कारवाई केली असून यात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मनोहर उदापुरे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
Nagpur News नागपूरमध्ये देशाची 'लॉजिस्टिक' राजधानी बनण्याची क्षमता असून वर्धा येथील सिंदीच्या (रेल्वे) ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपूर : नागपूर शहर देशाच्या हृदयस्थानी असून येथील दळणवळणाच्या सुविधा लक्षात घेता भविष्यात मोठ्या संधी आहेत. नागपूरमध्ये देशाची 'लॉजिस्टिक' राजधानी बनण्याची क्षमता असून वर्धा येथील सिंदीच्या (रेल्वे) ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यादरम्यान शुक्रवारी सिंधी (रेल्वे) येथील ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. (Nagpur has the potential to become the country's 'logistics' capital, Nitin Gadkari) यावेळी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, 'जेनपीटी'चे अध्यक्ष संजय सेठी, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे संचालक के. सतिनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग, सीईओ प्रकाश गौर, महापौर दयाशंकर तिवासी, वर्धा जि. प. अध्यक्षा सरिता गाखरे प्रामुख्याने उपस्थित होते. या मल्टी मॉडेल पार्कच्या माध्यमातून जगभरात निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या देशात निर्यातीसाठीचा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सहायक ठरतील. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कला रेल्वेसोबतच समृद्धी महामार्गदेखील जोडला जाणार असल्याने याचा थेट फायदा शेतकरी आणि व्यापारीवर्गाला मिळेल. या निर्यात सुविधेचा फायदा घेण्यासाठी विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघुउद्योग भारती, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. तसेच या पार्कमुळे पाच वर्षांत ५० हजार रोजगार संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. सुनील केदार यांनी भाषणादरम्यान गडकरींच्या कार्यशैलीची प्रशंसाच केली. गडकरी हे इतर राजकारण्यांहून वेगळे आहे. त्यांनी केवळ वर्ध्याच्या विकासाचे स्वप्नच पाहिले नाही, तर ते पूर्णदेखील करून दाखविले. आपल्या कामाने गडकरींनी सर्वच राजकारण्यांना शिकवण दिली आहे. विकासाच्या बाबतीत ते स्वतःही स्वस्थ बसत नाहीत व इतरांनादेखील बरोबर कामाला लावतात. लॉजिस्टिक पार्कसाठी राज्य शासनाकडून पूर्ण मदत मिळवून देऊ, असे आश्वासन केदार यांनी दिले. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज निर्माण झाली आहे. इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या पर्यायांचा स्वीकार करावाच लागणार असून सरकार त्या दिशेने काम करत आहे. पेट्रोल, डिझेलची ८० टक्क्यांची आयात संपवून ती शून्य टक्क्यांवर आणली जावी. देशात पर्यायी इंधन उपलब्ध होऊन पेट्रोलपंप बंद झाले पाहिजेत, अशी माझी इच्छा असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले. आगामी काही महिन्यांत नागपूर-हैदराबाद एक्स्प्रेस हायवे बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. किसान रेल्वेच्या माध्यमातून बांगलादेशला संत्र्यांची निर्यात होत असे. संत्र्यांच्या निर्यातीवर कर कमी करण्याबाबत बांगलादेशच्या गृहमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तेव्हापासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तत्कालीन निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान दिलं. नंतर ऋषभ पंतची खराब कामगिरी नंतर देखील भारतीय संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलकडे यष्टीरक्षण दिलं. अशात धोनीबद्दल चाहत्यांना उत्सुकता असली तरी धोनीच्या मनात अजून तरी निवृत्तीचा विचार आलेला नाही, असे धोनीच्या एका जवळच्या मित्राने एका खाजगी चॅनलशी बोलताना सांगितले. त्याने म्हटलं की धोनीला रिटारमेंटबद्दल विचारलं की राग येतो कारण त्याच्यामते तो अजुनही सर्वात तंदुरुस्त विकेटकीपर आहे. सध्या तो स्वतःच्या फीटनेसवर खूप लक्ष देत आहे. वय त्याच्या हातात नसलं तरी तो फिट राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 टी-20 आणि 2011 वन-डे असे दोन विश्वचषक जिंकले आहेत. मात्र मागील वर्षापासून माही फॉर्ममध्ये नाही म्हणतं अनेक माजी खेळाडू तसेच सोशल मीडियावर देखील त्याने निवृत्ती स्विकारावी असा दबाव वाढत चालला होता.
निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले नगरसेवक चेतन तुपे, मंगेश तुपे, विजय मोरे, प्रवीण तुपे, निलेश मगर, सुनील बनकर, दत्ता तुपे, प्रशांत पवार, अतुल तरवडे, हनुमंत तुपे, प्रतिमा तुपे, मयूर तुपे, विक्रम जाधव, विजय तुपे, भानुदास शिंदे, योगेश जगताप आदी उपस्थित होते. हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे, हडपसर विभाग कोषाध्यक्ष योगेश ससाणे, मनसे हडपसर उपाध्यक्ष सविता मोरे, उपाध्यक्ष अमोल मारणे, सचिन मोरे, राजेश पवार, उबेद खान, इम्रान खान, वसंतराव फाऊंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, रिजवान शेख, प्रताप उबाळे, संकेत खेडेकर, सोमनाथ मोरे, राजेश देव, यांच्यासह राजू हिंगणे व असंख्य कार्यकर्त्यांनी नगरसेवक चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. दरम्यान, राज्यात होणाऱ्या महापालिकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांच्या रणधुमाळीला सर्वत्र सुरवात झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योगेश ससाणे व सविता मोरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजप आणि मनसेला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : Pan Card आणि Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्वीट आयकर विभागाने केलं आहे. आता 30 एप्रिल 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाच्या साईटवर अनेकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली.
नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजनाबाबत सांगणार आहोत. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी. यामध्ये, 18 व्या वर्षी दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकेल. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तससह व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासाठी तुम्हांला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल. रजिस्ट्रेशनसाठी, तुम्हांला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. याशिवाय संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.
मॉन्टरर ( " प्रदर्शित करणे, प्रदर्शित करणे, निर्मिती, प्रदर्शन करणे") एक नियमित फ्रेंच - क्रियापद आहे , ज्याचा अर्थ फ्रेंच भाषेतील क्रियापदाचा सर्वात मोठा गट आहे. ते सर्व भाषण आणि मूड मध्ये संयुग्मन नमुन्यांची शेअर. Ud tudier वापरण्यासाठी , अपूर्णांकांपासून -चे शेवट समाप्त करून सुरु करा या क्रियापदाचे व्याप्ती दर्शविते नंतर क्रियापद संयोग करण्यासाठी , शेवट जोडणे (खालील तक्ता मध्ये दर्शविले) स्टेम करण्यासाठी. हे लक्षात ठेवा की टेबल केवळ साध्या conjugations ची सूची दाखवते. कंपाउंड संयुग्मणे , ज्यात क्रियाशील क्रियापद अवतार आणि मागील कृती मोन्ट्रे यांचा समावेश असतो , ते समाविष्ट नाहीत. सामान्यत :, फ्रेंच भाषेत पाच सर्वात मोठ्या क्रियापद आहेतः नियमित -र, -आणि -रे ; स्टेम-बदलणारे; आणि अनियमित एकदा आपण प्रत्येक प्रकारचे नियमित क्रियापदासाठी संयोगाच्या नियमांबद्दल जाणून घेतले की आपल्यास प्रत्यक्षात जुळवून घेण्यासंबंधी कोणतीही समस्या नसावी. फ्रान्सीसी क्रियापदाचे सर्वात मोठे वर्ग आतापर्यंतचे नियमित -तरी क्रियापद आहे. - मॉन्ट्रेझ-मोई मतदान केंद्र > मला तुमचे तिकीट दाखवा. - पिकासो माँट्रेप बेटे शेफ डी'ओव्हरेए पॅरिस > पिकासोने पॅरिसमध्ये त्याच्या उत्कृष्ट नमुना प्रदर्शित केल्या. - इल मंट्रे ला रिचर्स एक्स्टर्दिरीअर डे फवेल > त्यांनी आपल्या कुटुंबाची विलक्षण संपत्ती उधळली. - से montrer [pronominal]> दिसण्यासाठी (सार्वजनिक) - मी माझ्या वडिलांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. > मी लोकांना यासारखे मला पाहू देऊ शकत नाही. - डिस्पेंसर > खर्च करण्यासाठी (पैसा) - passer > पास, खर्च (वेळ) - भेट देणारे > भेटण्यासाठी (एक जागा)
मुंबई । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोर्टाने आज(९ सप्टेंबर) महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष सुटका केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर आज (९ सप्टेंबर) न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात कोर्टात धाव घेलती आहे. "छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केसमधून निर्दोष मुक्तता झाली. या निर्णयाविरोधात मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे" असे ट्विट अंजली दमानिया यांनी केली आहे. काय आहे प्रकरण? छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर १५ जून २०१५ रोजी सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते. दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. २० हजार पानांच्या या आरोपपत्रात ६० साक्षीदार होते. या आरोपपत्राचा आधार घेऊन सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली होती. भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनचे बांधकाम मे. के. एस चमणकर या कंपनीला मिळवून दिले. यासाठी भुजबळांनी कंपनीच्या अनुकूल शासकीय निर्णय घेतले. प्रादेशिक परिवहन विभागाने मे. चमणकर यांना निविदा देण्यास नकार दिला. तरीही भुजबळांनी परिवहन विभागाकडून मे. चमणकर यांनाच काम मिळेल, अशी व्यवस्था केली. याद्वारे भुजबळांनी विकासकाला २० टक्क्यांऐवजी ८० टक्के नफा देखील मिळवून दिल्याचा आरोप भुजबळांवर होता. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
नोटीस बजावूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्त करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. घरगुती ग्राहकांसह आता वाणिज्यिक ग्राहकांवरही महावितरणने कारवाई बडगा उगारला आहे. औरंगाबाद : मराठवाड्यात औद्योगिक व वाणिज्यिक ३१ हजार ८५७ वीज ग्राहकांकडे ४३. ८० कोटी रूपयांची थकबाकी आहे. नोटीस बजावूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्त करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. घरगुती ग्राहकांसह आता वाणिज्यिक ग्राहकांवरही महावितरणने कारवाई बडगा उगारला आहे. वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंप, पथदिवे अशा सर्व वर्गातील ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 'हर घर दस्तक' मोहिमेद्वारे वीजबिल वसुलीला वेग देण्यात आला आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या कृषिपंप ग्राहकांसाठी सवलत देण्यात आली असून निम्मे बिल माफ करण्यात आले आहे. थकबाकीमुळे महावितरणचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. कोळसा खरेदी करण्यासाठी खासगी कंपन्यांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे कुणालाही वीजबिल माफ होणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर महावितरणने नोटीसा बजावूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मराठवाड्यात ६२०५ औद्योगिक वीज ग्राहकांकडे ११. ७१ कोटी रूपये थकबाकी आहे. वाणिज्यिक २५,६५२ ग्राहकांकडे ३२. ०८ कोटी रूपये थकबाकी आहे. दरम्यान, वीजबिल वसुलीसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. ग्राहकांना वारंवार सूचना करण्यात येत आहेत. मराठवाड्यात जवळपास १५ हजार कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. महावितरणची पूर्ण यंत्रणा कार्यरत झाली आहे. पण, अद्याप एकूण थकबाकीच्या तुलनेत जेमतेम वीजबिलांचा भरणा झाला आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नवी दिल्लीः भारतात 3 ते 6 वयोगटातील 7. 40 कोटी मुलांपैकी तब्बल 2 कोटी मुलं प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत, असं युनायटेड नेशनची संस्था युनिसेफने एका अहवालात म्हटलं आहे. शाळेत न जाणाऱ्या मुलांपैकी 34 टक्के मुस्लिम, 25. 9 टक्के हिंदू आणि 25. 6 टक्के ख्रिश्चन धर्मातील मुलं आहेत. 'स्टेट ऑफ दी वर्ल्ड चिल्ड्रेन रिपोर्ट 2016' या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण न झाल्यास मुलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. प्राथमिक शाळेत न जाता थेट माध्यमिक शाळेत प्रवेश दिल्यास विद्यार्थी लवकरच शाळा सोडण्याची शक्यता असते, असंही युनिसेफने म्हटलं आहे. सरकारने 2014 साली शाळेत न जाणाऱ्या मुलांचं सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये युनिसेफच्या सर्वेक्षणाच्या विरुद्ध माहिती असल्याचं दिसत आहे. भारतातील जवळपास 60 टक्के मुलं माध्यमिक शिक्षणाला प्रवेश घेण्यापूर्वीच शाळा सोडतात. राईट टू एज्युकेशन या कायद्याचाही भारताच्या शिक्षणव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नसल्याचं भारताच्या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. भारतात 2014 साली 6 ते 13 वयोगटात शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 60 लाख होती, तर 2009 साली हा आकडा 80 लाख होता. Published at : 29 Jun 2016 01:00 PM (IST)
राजधानीकडे परतला. २ यानंतरच्या डिसेंबर महिन्यात त्याला पुन्हा एकदा आग्रा सोडावे लागले. या मोहिमेचा उद्देश दक्षिणेत पळून जाऊन बंडखोरी करणाऱ्या खानजहान लोधी याला जरब बसविण्याचा होता. शहाजहान याने रनथंबोर, चांदा आणि माळवा यामार्गे प्रयाण केले आणि तो १ मार्च १६३० रोजी बुरहा येथे पोहोचला.३ येथे तो नंतरची जवळजवळ दोन वर्षे मुक्काम करुन राहिला. हुस्नआरा हिचा जन्म बुरहाणपूर येथे १३ एप्रिल रोजी बादशहाच्या एका मुलीचा जन्म झाला; तिचे नाव हुस्नआरा बेगम असे ठेवण्यात आले. शहाजहानच्या जीवनातील हा काळखंड फार मोठ्या सुखाचा होता. निजामशाहीमधील किल्ले एकापाठोपाठ पाडाव होत होते आणि खानजहान याचा एकाठिकाणाहन दुसऱ्या ठिकाणाकडे अव्याहतपणे पाठलाग चाललेला होता. अखेर त्याला सिंधजवळ गाठण्यात बादशाही फौजांना यश आले आणि खानजहान याला मृत्यूची शिक्षा देण्यात आली. बादशहाला हे जे यश मिळाले त्याच्या प्रित्यर्थ दरबारामध्ये समारंभ आणि उत्सव करण्यात आले; त्याचप्रमाणे मेजवान्या देण्यात आल्या आणि अधिकाऱ्याची बढती करण्यास आली परंतू अचानक एकाएकी मोठी आपत्ती कोसळली आणि बादशदाच्या आनंदावर विरजण पडले. या आपत्तीमुळे शहाजहानच्या पुढील संपूर्ण आयुष्याला औदासिन्य आणि विषाद यांनी जवळजवळ घेरले. बुधवार तारीख ७ जून १६३९ या दिवशी रात्री शहाजहानची सम्राज्ञी मुमताज महल हिने एका मुलीला जन्म दिला. बाळंतपणामुळे झालेला त्रास तिला सहन झाला नाही आणि तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. मुमताजचा मृत्यु तिने जहानआरा बेगम हिला आपल्याजवळ येण्यासाठी बादशहाला बोलावू पाठविण्यास सांगितले. बादशहा त्यावेळी अगदी नजिकच्याच एका दिवाण खान्यात आपली पत्नी ज्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेली होती तिथे शहाजहान याने चपळाईने प्रयाण केले. मुमताजमहल हिने आपले डोळे किंचित उघडले आणि आपल्या मुलांची काळजी आणि देखभाल करण्याची शहाजहान याला विनंती केली आणि त्याचा अखेरचा निरोप घेतला. या सर्व गोष्टी इतक्या काही जलदगतीने घडून आल्या की शहाजहान हा अनिवार अशा दुःखाच्या लाटेत बुडून गेला आणि ओक्साबोक्सी त्याने अश्रुंना वाट करुन दिली. ५ या घटनेनंतर संपूर्ण दरबारात सूतक पाळण्यात आले आणि दुःखाचे निदर्शक म्हणून अधिकारी वर्गांने सफेद वस्त्रे परिधान केली. जवळजवळ एक आठवडा शहाजहानने झरोखा या जागेत येण्याचे टाकले त्याच्या जीवनातील सारे स्वारस्यच लुप्त झाल्याचा आभास निर्माण झाला. शहाजहानला जो विलक्षण शोक झाला होता त्याच्या तीव्रतेने त्याचे केस पांढरे झाले. त्यानंतरची दोन वर्षे तो गाणी बजावणी आणि करमणुकीचे इतर प्रकार यापासून पूर्णपणे अलिप्त राहिला इतकेच नव्हे तर त्याने भपकेबाज पोषाख करण्याचेही सोडून दिले. शहाजहानचे दुःख ईद आणि अशाच प्रकारच्या इतर समारंभाचे प्रसंगी तो घळघळा रडत असे आणि आपल्या बायकांपैकी त्याचे जिच्यावर अतिशय प्रेम होते अशी मुमताज त्याला सोडून गेल्याबद्दल शोक करी. असे म्हणतात की त्यावेळी शहाजहान असे वारंवार म्हणत असे; लोकांचे भले व्हावे यांसाठी झगडण्याचा परमेश्वराने जर त्याला दैवी संदेश पालन करण्याची आज्ञा केली नसती तर त्याने आपले साम्राज्य आपल्या मुलांमध्ये विभागून निवृत्तीचे जिणे आपण जगलो असतो.६ मुमताज महलचे मृत शरीर तात्पुरते तापी नदीच्या पलीकडच्या तीराकडील जैनाबाद या बागेत दफन करण्यात आले. १६३१ च्या डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला मुमताजचा मृतदेह राजपुत्र झुंजा वजीरखान आणि मृत मुमताजची मुख्य दासी सती - उन - निसा यांच्याबरोबर लवाजम्यासहित आग्रा येथे पाठविण्यात आला. मुमताजच्या मृतदेहाची आग्रा येथे रवानगी आग्रा येथे यमुना नदीच्या काठावर एका रिकाम्या जागी मुमताजच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. ही जागा राजा मानसिंग याच्या मालकीची होती ती या प्रसंगी शहाजहान याने त्याचा नातू जयसिंग याच्या कडून अगदी मामुली किमतीत आपल्या ताब्यात घेतली. पुढील १७ वर्षाच्या काळात या जागेवर शहाजहान याने एका अतिशय भव्य अशा कबरीची बांधणी केली. ही कबर (ताजमहल) पत्नीवर विलक्षण प्रेम करणाऱ्या पतीने या प्रेमाची तितक्याच उत्कटतेने परतफेड करणाऱ्या पत्नीप्रित्यर्थ केलेले एक स्मारक म्हणून यावच्चंद्र दिवाकरो या भूतलावर प्रसिद्ध झाली. ६ मार्च १६३२ रोजी बुरहाणपूर येथील दरबार बरखास्त झाला. आणि पुढील वर्षाच्या जून महिन्यात - शाही दरबाराचे आग्रा येथे आगमन झाले. शहाजहानचे आग्रा येथे पुनरागमन यानंतर पुढील दोन वर्षे शहाजहानचे राजधानीमध्ये वास्तव्य होते. आग्रा येथे परतल्यानंतर एका पंधरवड्याने शहाजहान याने मकतब म्हणजे त्यांचा सर्वात धाकटा मुलगा राजपुत्र मुराद याच्या शालाप्रवेशाचा समारंभ औपचारीक पणे साजरा केला.९ मुल्ला मिरख याची राजपुत्र मुरादचा शिक्षक म्हणून नेमणक करण्यात आली आणि एक हजार रुपयांची बक्षिसी देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगाच्या निमित्ताने कोठच्याही प्रकारची मेजवानी अथवा इतर थाट करण्यात आला नाही आणि याचे कारण म्हणजे बादशहाला झालेल्या दुःखाची आठवण अजून ताजी होती. शहाजहानला ४१ वर्षे पूर्ण झाल्यावर करण्यात आलेल्या तुला समारंभाची सांगता झाल्यानंतर शहाजहान याने त्याचा मोठा मुलगा दारा शिकोह याच्या विवाहाची तयारी ताबडतोब करण्यासंबंधी हूकूम दिले. १० दाराचा विवाह दाराचा वाङ्गनिश्चय मुमताज महल जिवंत असताना आणि बादशहाचा मुक्काम दक्षिणेत असताना राजपुत्र परवीज याच्या मुलीबरोबर झाला होता. त्यावेळीच अशी आज्ञा काढलेली होती की गुजराथ, बनारस, सातगाव, मलडाह, सोनारगाव आणि पाटण येथून दुर्मिळ आणि मौल्यवान चीजा आणून ध्याव्यात. त्याचप्रमाणे आग्रा आणि लाहोर येथील शाही गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी हिरे आणि माणके, चांदी आणि सोने यांची भांडी आणि विवाहाच्या वेळी लागणाऱ्या अशाच प्रकारच्या इतर वस्तूंची तरतूद करावी असेही हुकूम देण्यात आलेले होते. परंतु मुमताज महल हिचा अचानक मृत्यू झाल्याने ती तयारी पुढे ढकलण्यात आली. जानेवारी १६३३ मध्ये पुन्हा एकदा ही जमवाजमव करण्यास सुरवात झाली. जानेवारी महिन्याच्या २५ तारखेला जहानआरा बेगम आणि सती-उन्-नीसा खानुन ह्या दोघींच्या देखरेखीखाली बादशहा लोकांची गाऱ्हाणी ज्या ठिकाणी ऐकत असे त्या दिवाणखान्यात विवाहानिमित्त आलेल्या नजराण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्या दिवशी दुपारी बादशहा आणि जनानखान्यातील स्त्रिया यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि संध्याकाळी शाही अधिकाऱ्यांना तिथे जाण्याची परवानगी देण्यात आली. वधूच्या आईने तिला ज्या भेटी देण्यात आलेल्या होत्या त्यांचे प्रदर्शन त्याच दिवाणखान्यात आयोजित केले आणि शहाजहान हे ही प्रदर्शन पहाण्यास गेला. १ फेब्रुवारी रोजी विवाहाच्या अगोदरचा हीनाबंदी नावाचा विधी पार पाडण्यात आला आणि इतक्या काळ पर्यत मुकेपणाने असलेल्या शाही वाद्यदवांने वाद्यांचे मधुर असे सूर आणि आनंदाच्या लहरी यांचा एकच जल्लोष उडवून जणूकाही मुमताजच्या मृत्यूमुळे पाळण्यात येत असलेले सूतक संपल्याचे जाहिर केले. विड्याची पाने, वेलची आणि सुकामेवा ही दरबारी मंडळींमध्ये वाटण्यात आली आणि संध्याकाळच्या वेळी लोकांच्या आनंदाच्या आरोळ्यांत यमुनानदीच्या तीरावर दारुकामाची भपकेदार आतषबाजी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी राजपुत्र शुजा, औरंगजेब आणि मुराद हे तिघेजण आसफखान आणि इतर प्रतिष्ठीत उमराव याच्यांसह दाराचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्याला विवाहादाखल भेटी देण्यासाठी म्हणून त्याच्याघरी गेले. त्यानंतर एक अतिशय भव्य अशी मिरवणूक सजविण्यात आलीः दारा हा हत्तीवरील अंबारीत बसला होता आणि त्याच्या पाठोपाठ दरबारी मंडळी कुणी घोड्यांवर तर कोणी पायी अशी मोठ्या दिमाखात चालली होती. विवाहानिमित्त आलेल्या भेटींचे प्रदर्शन ज्या ठिकाणी भरले होते त्या दिवाणखान्यात वराला नेण्यात आले. या ठिकाणी शहाजहानने त्याला भेटी दिल्या आणि हिदुस्थानातील रुढीनुसार त्याच्या मस्तकावर मोती पाचू आणि माणके यांची तयार केलेली एक माला (सिंहरा) बांधली. शहांजहान याच्या लग्नाच्या प्रसंगी हिच माला जहांगीरने त्याच्या मस्तकावर बांधली होती. संध्याकाळी यमुना नदीच्या तीरावर दिव्यांचा लखलखाट आणि रोषणाई करण्यात आली होती आणि त्याचवेळी जे प्रचंड दारुकाम झाले त्यामुळे लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. संगीत, नाच आणि करमणुकीचे इतर प्रकार रात्रीची दोन पळे आणि दोन घडी होईपर्यत चालले होते कारण ही वेळ विवाहाचा विधीपार पाडण्यासाठी म्हणून अतिशय शुभदायी होती. विवाहाच्या ठरलेल्या वेळी शहाजहान याने काजी महमद अस्लाम याला शहाबुर्ज इकडे पाठविले. याठिकाणी बादशहाच्या समक्ष काजी अस्लाम याने विवाह विधीच्या सोहळ्याचे वाचन केले. बादशहाने लग्नाप्रित्यर्थ भेट म्हणून (मीह) पाच लक्ष रुपये नियुक्त करुन दिले. सोने आणि चांदी यांच्या मोहरांचा विवाहीत जोडप्यावर वर्षाव करण्यात आला. ही नाणी घेण्याच्या गडबडीत तेथे जमलेल्या चाकरांनी परस्परांना धक्काबुक्की केली आणि काहीजण सपशेल तोंडघशी पडले. दारा आणि त्याची पत्नी यांना सुख मिळावे म्हणून ज्या प्रार्थना म्हणण्यात आल्या त्यांनी सारे वातावरण दुमदुमून गेले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या कवीजनांनी याप्रसंगाची स्मृती कायम रहावी म्हणून काव्यपंक्तीची रचना केली. बादशहाने दाराच्या राजवाड्याला भेट दिल्यानंतर यासर्व उत्सवांची सांगता झाली. दाराच्या विवाहानिमित्त जो पैसा खर्च करण्यात आला ती एकंदर रक्कम ३२ लाख रुपये इतकी भरली. यापैकी ६ लक्ष रुपये बादशाही खजिन्यातून खर्च करण्यात आले, १६ लक्ष रुपये जहानआरा बेगम हिने दिले आणि उर्वरित खर्च वधूच्या आईने केला.
कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) - जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणाऱ्या दोघांकडून साहित्य आणि ६९ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले . हातकणगले येथील माले मुडशिंगी गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई करत दोघांना अटक केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटाप्रकरणी या दोघांकडे चौकशी करण्यात येत आहे. विलास राजाराम जाधव आणि आनंदा राजाराम जाधव (रा. माले मुडशिंगी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री अज्ञाताने रस्त्यावर ठेवलेल्या वस्तूचा स्फोट होऊन ट्रक चालक दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने व हरिष पाटील यांना माले मुडशिंगी गावात गावठी बॉम्ब माहिती मिळाली होती. विलास जाधव, आनंदा जाधव जंगली जनावरांच्या शिकारीसाठी राहत्या घरी गावठी बॉम्ब बनवून त्याची विक्री करत होते. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता घरात गावठी बाँम्ब बनवण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ जिवंत गावठी बाँम्ब असा एकूण सुमारे ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
काल चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर गद्दारी केल्याचा आरोप केला. . ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्रच्या विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला १०५ जागा, शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४जागा, कॉंग्रेसला ४४ जागा आणि इतरांना काही जागा मिळाल्या. भाजप - शिवसेना युती करून निवडणूक लढले होते. त्या मुळे भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना खात्री होती की आपला म्हणजे मीच मुख्यमंत्री होईल आणि गेल्या५ वर्षाप्रमाणे शिवसेनेला फारसं महत्व न देता आपण सरकार चालवू. शिवसेना आपल्याशिवाय कुठेच जावू शकत नाही. शिवसेना तयार झाली नाही तर राष्ट्रवादी आहेच, गेल्या वेळेप्रमाणे बाहेरून पाठिंबा द्यायला. परंतु उद्धव ठाकरेंनी निकालाच्या दुसर्या दिवशी जाहीर केलं की युती सरकारमध्ये आम्हाला सत्तेत समान वाटा पाहिजे, आमचं अमित शहा यांच्या बरोबर ठरले आहे, आम्हाला सुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री पाहिजे. अन्यथा आमच्याकडे दूसरा पर्याय आहे. भाजपला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की असे काही होईल. काही अपक्षांच्या मदतीने 116 पर्यन्त आकडा भाजपचा होत होता. त्या पुढे काही त्यांची गाडी सरकायला तयार नव्हती. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर बोलणी सुरू केली. यात प्रामुख्याने संजय राऊत आणि जेष्ठ नेते शरद पवारांनी पुढाकार घेतला. मग भाजपला कळून चुकलं की आता आपलं सरकार काही येत नाही. तरी सुद्धा त्यांनी राज्यपाल कोशारींच्या मदतीने शेवट पर्यन्त प्रयत्न केले. परंतु ते सर्व निष्फळ ठरले. किंवा असे म्हणता येईल की पवारांसारख्या जेष्ठ आणि मुत्सदी नेत्याने मोदी - शहा - फडणवीस - कोशारी यांच्यावर मात केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे सरकार स्थापन झाले. सवयी प्रमाणे भाजप नेते शिवसेनेने गद्दारी केली , आम्हालाच जनाधार मिळाला आहे असे सांगायला सुरवात केली. फडणवीस तर मीच कायमचा मुख्यमंत्री असे स्वतःच्या फेसबुकवर लिहू लागले. हे असे का झाले.... . ? 30 वर्षाची युती अशी कशी तुटली...? कॉंग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाबरोबर वैचारिक मतभेद असूनही त्यांच्या बरोबर शिवसेना का गेली...? भाजपला खरच धोका दिला का ...? लक्षात घ्या. शिवसेनेने गद्दारी केली नाही... उलट भाजपनेच त्यांच्याशी गद्दारी केली. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवून स्वबळावर सरकार आणायचे आहे. शिवसेना हाच त्यांचा प्रमुख शत्रू आहे. दूसरा हिंदुत्ववादी पक्ष त्यांना नकोय. त्या साठी ते वाट्टेल ते करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. नुकत्याच बिहारच्या निवडणुकीत संघातील अनेकांना स्व. रामविलास पासवाण यांच्या पक्षातून नितीश कुमारांच्या पक्षा विरुद्ध उभे केले. नितीश कुमारांच्या जागा कमी होतील याची काळजी घेतली. त्यांच्या बरोबर युती करून सुद्धा त्यांना धोका दिला. हे सर्व देशाने बघितलंय. . . असो. . आता शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमागील कारणे बघू. २०१४ला भाजपने शिवसेनेबरोबर शेवटच्या क्षणी युती तोडली. १६ अॉक्टोबरला मतदान होते आणि २५ सप्टेंबरला अगदी शेवटच्या क्षणी शिवसेनेला गाफिल ठेवून भाजपने त्यांच्या बरोबर असलेली ३० वर्षाची युती तोडली. मग गद्दारी कुणी केली. . ? १९ ऑक्टोबर २०१४ला निकाल लागला आणि दुसर्या दिवशी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले. भाजपने प्रत्यक्षपणे पाठिंबा घेतला नाही आणि नाकारला ही नाही. १२२ आमदारांच्या भाजपने सरकार बनविले. राष्ट्रवादीच्या मदतीने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केलेल भाजपने. शिवसेनेला सहा महीने सरकार बाहेर ठेवले. ६ महीने अप्रत्यक्षपणे भाजपने राष्ट्रवादीचा पाठींबा घेतला. भाजपने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीच विश्वासात घेतले नाही. शेतकरी कर्ज माफी असो किंवा मराठा आरक्षण नाहीतर जलयुक्त शिवार सारखी योजना. शिवसेनेच्या मंत्र्यांना सतत दुय्यम वागणूक दिली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात जे काही केले ते सर्व भाजपने केले, त्यातही फडणवीसांनी केले अशी सारखी जाहिरात केली. युती सरकार ऐवजी फडणवीस सरकार असाच उल्लेख सतत केला. शिवसेनेचे सरकारमध्ये अस्तित्व आहे की नाही अशी शंका जनतेला येईल इथपर्यंत स्वतःची जाहिरात केली. गेली ६ वर्षे उद्धव ठाकरेंचा सतत अपमान केला. अनेक महत्वाच्या कार्यक्रमाला / उद्घाटनाला त्यांना बोलावले नाही. मोदींच्या हस्ते मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमीपूजन व ठाणे - भिवंडी - कल्याण , दहिसर - मीरा भाईंदर या दोन मेट्रो रेल्वे मार्गाच्या उदघाटनाप्रसंगी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिले नाही. कारण शिवसेनेला खाली दाखवायचे होते आणि आपणच सगळे करतो असे भाजपला भासवायचे होते. ३५ वर्षे यांचे प्रमुख नेते मातोश्रीवर जात होते त्यांचाच असा अपमान करण्यात मोदी फडणवीसांना आनंद वाटत होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किरीट सोमय्या व शेलार यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेवर खालच्या पद्धतीने टीका केली. विशेष म्हणजे राज्यात आणि मुंबईत शिवसेनेबरोबर सत्तेत असूनही अशी टीका केली. मुंबई मनपा मध्ये माफिया राज चालू आहे आणि त्याचे सुत्रधार बांद्राला असतात अश्या आशयाची टीका केली. मुंबई महापालिकेतल्या रस्ते, नालेसफाई, टॅबलेट घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून भाजपने शिवसेनेवर आरोप सुरू केलेले असतानाच, या घोटाळ्यांचे सूत्रधार हे वांद्र्याचे साहेब, त्यांचे मेहुणे आणि त्यांचा खासगी सचिव आहे, असा आरोप करून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली. सोमय्या आणि त्यांचे सहकारी हे विसरले की हे सुद्धा गेली २० वर्षे ते सुद्धा मनपमध्ये सत्तेत होते. माफियाराज आणि भ्रष्टाचार झाला तरी २० वर्षात भाजपने एकदाही त्यावर तोंड उघडले नाही. भाजपने महानगरपालिका, ग्राम पंचायत व जिल्हापरिषद निवडणुकीत सेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. या निवडणुका भाजपाने स्वतःच्या बळावर लढवल्या. पूर्वी ते शिवसेनेला बरोबर घेवून लढवायचे. त्यांनी ह्या निवडणुका पक्षाच्या बळावर लढवल्या जाव्यात किंवा एक हाती फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी ४वॉर्डचा एक प्रभाग करून घेतल्या. त्या मुळे बर्याच भागात शिवसेना ४ क्रमांकावर आली. भाजपने शिवसेनेला २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत ५० टक्के जागा देतो सांगून कमी जागा दिल्या. इतर सहयोगी पक्षांच्या जागा सुद्धा सहयोगी पक्षांना फसवून भाजपने घेतल्या. २८८ मतदारसंघात मित्रपक्षांसह भाजपच्या कमळावर तब्बल 164 अधिकृत उमेदवारांनी भाजपच्या बी फॉर्म वर उमेदवारी अर्ज भरला आहे. मित्रपक्षांना जागा सोडल्या असल्या तरी त्यापैकीही बहुतांश ठिकाणी उमेदवार भाजपनेच ठरवला आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजपने युती असूनही सेनेच्या उमेदवारच्या विरुद्ध प्रचार केला. बंडखोर निवडून आणले. बार्शीचे दिलीप सोपल शिवसेनेतून उभे होते. त्यांच्या विरुद्ध भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत हे विजयी झाले. उरण मतदारसंघात भाजप बंडखोर महेश बालदी यांना शिवसेना उमेदवार मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपने निवडून आणले. कागल मतदार संघात मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे असलेले समरजित घाटगे यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. संजय घाडगे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असूनही समरजित घाडगे उभे राहिले. आता प्रश्न असा पडतो की शिवसेनेने गद्दारी केली की भाजपने. . ? भाजपने नुसती गद्दारी केली नाही तर साम दाम दंड भेद याचा वापर करून सेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने युती तोडली नसती तर पुढच्या निवडणुकीपर्यंत भाजपने त्यांना 10 ते 20 आमदारांवर आणले असते. मुंबई - ठाणे येथील मनपामध्ये त्यांना विरोधी बाकावर बसायला लावले असते. इडी मागे लावून किंवा पैसे देवून सेनेच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात ओढले असते. काहीही खोटे नाटे आरोप करून सेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला असता. भाजप सोबत न जाता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर सत्ता स्थापन करण्याची शिवसेनेने अतिशय योग्य भूमिका घेतली. ही सत्तेची नाही तर अस्तित्वाची लढाई ठरली आणि त्यात उद्धव ठाकरेंच्या चाणाक्ष नेतृत्वाने भाजपवर मात केली. धन्यवाद . . ! ✍️ - हेमंत पाटील, राजकीय विश्लेषक , पुणे ! !
राष्ट्रीय बातमीपत्र दु एक तीस वाजता चार जानेवारी दोन हजार एकोणीस शुक्रवार ठळक बातम्या एक मणिपूर आणि आसाममधल्या विविध विकास प्रकल्पाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन दोन रामजन्मभूमीबाबरी मशिद विवादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात दहा जानेवारीपर्यंत पुढं ढकलली तीन राज्यसभेत महिला सदस्यांकडून संसद आणि विधीमंडळात महिलांना तेहेतीस टक्के आरक्षण देण्याची मागणी चार लोकपालबाबत शोध समिती स्थापन करण्यासंदर्भात उचललेल्या पावलांबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश पाच चेतेश्वर पुजाराऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सिडनी कसोटीत भारताचा सात बाद सहा शे बावीस धावांचा डोंगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मणिपूर आणि आसामच्या दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काही प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे तर काही प्रकल्पांचं उदघाटनही प्रधानमंत्री करतील मणिपूरमध्ये मोरेहा इथल्या एकात्मिक तपास चौकी सह दोलाईथाबी बॅरेज प्रकल्प सावोबंग इथं उभारण्यात आलेलं अन्नधान्य गोदाम थंगलमधल्या पर्यावरण पर्यटन परिसरासह अनेक पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश आहे चार शे किलोवॅट क्षमतेच्या सिल्चर इंफाळ प्रकल्पाचं लोकार्पण ही प्रधानमंत्री आज करणार आहेत तसंच इंफाळ मध्ये असलेल्या धनमंजुरी विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी दहा जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन मालकी हक्काच्या वादासंदर्भात विविध याचिकांची आज सुनावणी होणार होती गेल्या वर्षी एकोणतीस ऑक्टोबरला ही सुनावणी आज करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं होतं मात्र सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठानं ही सुनावणी पुढे ढकलली संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना तेहेतीस टक्के आरक्षण द्यावं ही मागणी आज राज्यसभेत काही महिला सदस्यांनी लावून धरली शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित झाला होता यासंदर्भात सभागृहात चर्चेला अनुमती द्यावी यासाठी काही महिला सदस्यांनी आपली भेट घेतल्याचं राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वी सांगितलं संसदेतल्या अण्णाद्रमुक आणि तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांचं निलंबन रद्द करायची आपली तयारी आहे मात्र सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी सहमती दर्शवली पाहिजे असं लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज सांगितलं या सदस्यांना वारंवार सूचना देऊनही गेले कित्येक दिवस ते हौद्यात उतरुन सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत होते त्यामुळे नाईलाजाने निलंबनाचा निर्णय घ्यावा लागल्या असं त्या म्हणाल्या तत्पूर्वी अण्णाद्रमुकचे खासदार आणि लोकसभेचे उपसभापती एम थंबीदुराई यांनी शून्य प्रहरात निलंबनाचा मुद्दा सभागृहात मांडला दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईबाबत केंद्रसरकारनं अलीकडे कोणताही निर्णय घेतलेला नाही असं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे नोटांची छपाई ही नेहमीच आवश्यकतेनुसार केली जाते असं स्पष्टीकरण आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी ट्विटवर दिलं आहे देशात सध्या दोन हजार रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध असून त्यापैकी पस्तीस टक्के नोटा चलनात आहेत असं गर्ग यांनी सांगितलं केंद्रसरकारनं दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचं प्रसारमाध्यामांच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर गर्ग यांनी ही माहिती दिली आहे बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात बर्ड फ्लू चा प्रकोप असल्याच्या पार्श्व मीवर या रोगालाआळा घालण्यासाठी पंधरा हजार कोंबडयांना मारण्याचे आदेश बिहार सरकारनं दिले आहेत जमालपुर क्षेत्रातल्या संपतचक गावाच्या एक किलोमीटर कक्षेत सर्व आजारी कोंबड्याना मारण्यात यावं असं राज्याच्या पशुपालन विभागांनं सांगितलं आहे बर्ड फ्लू च्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात दुसऱ्यांदा कोंबड्याना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं जिल्हा दंडाधिकारी आनंद शर्मा यांनी सांगितलं 1984च्या शीख विरोधी दंगलीतल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई लढणारे आम आदमी पक्षाचे नेते एच एस फुल्का यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती फुल्का यांनी ट्वीट करून दिली आहे भारताच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती झपाट्यानं वाढून केवळ शंभर दिवसात सुमारे सात लाख लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी समाधान व्यक्त केलं आहे सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिण्याच्या दिशेनं उचललेल्या पावलांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली आहे अंटार्क्टिकामधलं माउंट विन्सन हे सर्वोच्च शिखर सर केल्याबद्दल दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा हिचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे हे शिखर सर करणारी ती जगातली पहिली दिव्यांग महिला ठरली आहे अरुणिमानं यशाचं नवं शिखर सर केलं आहे आणि आपले कष्ट आणि चिकाटीच्या यांच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारी अरुणिमा भारताचा अभिमान आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे पाबुक हे चक्रीवादळ उद्या दुपारपूर्वी अंदमानच्या समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे त्यानंतर ते रविवारी संध्याकाळच्या सुमाराला ते अंदमान बेटं ओलांडण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे या वादळाच्या प्रभावामुळे उद्या संध्याकाळी अंदमान बेटांवर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच अंदमानच्या समुद्रात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहतील आणि त्यांचा वेग ताशी साठ किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या तिसया राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कराचं वितरण आज नवी दिल्लीत होणार आहे पहिल्या युवा आणि उत्कृष्ट कामगिरी असणारे उद्योजक तसंच उद्योजकतेला पुरक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्यनशील व्यक्तींना या पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे लोकपाल संदर्भात शोध समिती स्थापन करण्याबात गेल्या सप्टेंबर महिन्यापासून कोणती पावलं उचलली यासंदर्भात केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले येत्या सतरा जानेवारीपर्यंत हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश महान्यायकर्ता के के वेणुगोपाल यांना न्यायालयानं दिले आहेत सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पिठानं हे निर्देश दिले ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं सात बाद सहा शे बावीस धावांचा डोंगर उभारला शंभर त्र्याण्णव धावा करणारा चेतेश्वर पुजारा नाबाद दीडशतकी खेळी करणारा ऋषभ पंत वेगवान एक्क्याऐंशी धावा करणारा रवींद्र जडेजा यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना निष्प्रभ केलं दिवसाच्या सुरुवातीला पुजारा आणि हनुमा विहारी यांनी पाचव्या गड्यासाठी शंभर एक धावांची भागीदारी रचली त्यानंतर पुजारा आणि ऋषभ पंत आणि आजच्या दिवसाच्या उत्तरार्धात ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी केलेल्या भागीदाऱ्यांच्या जोरावर भारतानं सहा शे बावीस धावा फटकावल्या पंत आणि जाडेजा यांनी सातव्या गड्यासाठी मालिकेतली सर्वात मोठी दोन शे चार धावांची भागीदारी रचली कर्णधार विराट कोहलीनं डाव घोषित केल्यावर दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं बिनबाद चोवीस धावा केल्या राफेल लढाऊविमानांच्या खरेदीप्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विचार विनिमय किंवा चर्चा न करता मूळ किंमत वाढवली असा आरोप काँग्रेसनं केला आहे प्रधानमंत्र्यांच्या या एकतर्फी निर्णयामुळे सरकारी तिजोरीचं प्रचंड नुकसान झालं आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे ते आज संसदभवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते राष्ट्राचं हित लक्षात न घेता प्रधानमंत्र्यांनी बँक हमीपत्रासारखे अटी आणि नियम विनाकारण शिथिल केले अशी टीका त्यांनी केली प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातल्या पूर्व सियांग जिल्ह्यात शंभर टक्के विद्युतीकरण झालं आहे राज्याच्या ऊर्जा विभागांनं ही माहिती दिली पासीघाट ऊर्जा विभागानं गेल्यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत दोन हजार सहा शे बासष्ठ घरांपर्यंत वीज पोहोचवली उत्तर अफगाणिस्तानातल्या सुरक्षा तपासणी चौक्यांवर झालेल्या निर्दयी आणि भ्याड हल्ल्यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं तीव्र निषेध केला आहे या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्यांना आणि त्यांना पाठबळ पुरवणाऱ्यांन कठोर शिक्षा झाली पाहिजे असं संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे सोमवारी झालेल्या या हल्ल्यात सत्तावीस जणांचा बळी गेला होता तर अनेकजण जखमी झाले होते नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात काल भाजपा संसदीय मंडळाची बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते खाद्यपदार्थ उद्योजकांना पॅकेजिंग च्या नव्या नियमांचं पालन करावं लागेल असं खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हटलं आहे नव्या नियमांनुसार प्लास्टिक आणि वर्तमानपत्रांच्या कागदपत्रांमध्ये खाद्यपदार्थ पॅकिंग करायला प्रतिबंध घालण्यात आला आहे हे प्रतिबंध येत्या एक जुलै पासून लागू केले जातील पॅकेजिंगसाठी करण्यात अलेलले नवे नियम भारताच्या खाद्य सुरक्षा मानकांना नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी व्यक्त केला देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी वीज प्रकल्पांच्या कोळसा साठ्यात आणि कोळसा पुरवठ्यात सरकारनं वाढ केली आहे गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ पंचवीस टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं काल जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे देशांतर्गत कोळसा पुरवठा वाढवण्याच्याच दृष्टीनं गेल्या एकतीस डिसेंबर पर्यंत वीज प्रकल्पांमध्ये एक कोटी साठ लाख टनांहून अधिक कोळसा साठा होता तर डिसेंबर दोन हजार सतरा मध्ये हा साठा एक कोटी तीस लाख टन होता
स्थैर्य, फलटण, दि. २५ : शहराच्या मध्यवर्ती भागात, माळजाई उद्याना समोरील प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाच्या पाठीमागील जागेत सभागृह/मंगल कार्यालय व दुकान गाळ्यांसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये १०० बेडचे सर्व सोयी सुविधांनी युक्त कोविड रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. फलटण नगर परिषद सर्वसाधारण सभेत शहरात कोविड रुग्णालय उभारणी कामी इमारत उपलब्धतेबाबत ठराव मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्षा सौ. निताताई मिलींद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, सर्व नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने कार्यवाही करुन रुग्णालयासाठी आवश्यक इमारत, पुरेशी स्वच्छता गृह, वीज जोडणी व फिटिंग, पाण्याची व्यवस्था, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, गरज पडल्यास बाहेर गावच्या रुग्णांचे नातेवाइकांसाठी लगत दोन स्वतंत्र खोल्या आदी कामे अंतीम टप्प्यात सुरु असून आगामी सप्ताहात सदर इमारत पूर्ण होईल याची ग्वाही यावेळी नगर परिषद प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे. फलटण शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालये पुरेशी होत नसल्याने ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नगर परिषदेस या सभागृहात १०० बेडचे सर्व साधने सुविधांनी युक्त कोविड रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने इमारत तातडीने तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार नगर परिषद सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन सदर इमारतीचे सुरु असलेले अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने अवघ्या सप्ताहात अपूर्ण कामाची पूर्तता करण्यात आल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची या इमारती मध्ये १०० बेडचे कोरोना उपचार केंद्र (हॉस्पिटल) उभारणी बाबत चर्चा झाली असून लवकरच जिल्हाधिकारी सदर इमारतीची पाहणी करुन पुढील कार्यवाही करणार असल्याचे समजते. १०० बेड पैकी ८० बेड ऑक्सिजन सुविधा व २० बेडचे आयसीयू उभारण्याचे नियोजन असून उप जिल्हा रुग्णालयातील ४० आणि हे १०० असे १४० बेडची दोन्ही हॉस्पिटल्स फलटणकरांसाठी खाजगी हॉस्पिटल्सच्या जोडीला उपलब्ध होणार आहेत. नगर परिषदेने इमारत, पाणी, वीज, स्वच्छता गृह आणि या इमारती शेजारी रुग्णांच्या नातेवाइकांसाठी दोन खोल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. नगर परिषदेने फलटण-शिंगणापूर रोडवरील नगर परिषद मालकीच्या जुन्या सध्या वापरात नसलेल्या विद्यार्थीनी वसतीगृहाच्या जागेत यापूर्वीच कोविड रुग्णालयाची उभारणी नगर परिषद व शहरातील काही डॉक्टर्स आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने केली आहे. सुमारे ४० बेडच्या या रुग्णालयात ऑक्सीजन व गरज पडल्यास व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी निदर्शनास आणून दिले.
Isolda Dychauk - 24 वर्षे सुमारे 30 चित्रपट आणि दूरदर्शन मालिका मागे व्यवस्थापित आहे जर्मन सिनेमा, वाढत्या स्टार. एक तरुण अभिनेत्री त्याच्या सर्वात प्रसिद्ध भूमिका टीव्ही शो "बोर्जिया" मध्ये तारांकित. ती प्रसिद्ध Lucrezia, पोप मुलगी भूमिका केलेल्या. रशियन दर्शक Isolde चित्रपट "Faust" Aleksandra Sokurova प्रसिध्द आहे. आम्ही या आकर्षक मुलगी, ज्या मुख्य अद्याप यश येणे काय सांगू शकता? परफॉर्मर कपटी आणि मोहक Lucrezia बोर्जिया भविष्यात भूमिका सुरगुत मध्ये जन्म झाला, फेब्रुवारी 1993 मध्ये एक सुखी कार्यक्रम होता. मुलगी एक कलात्मक कुटुंबात त्यांचा जन्म झाला, तिच्या आई संगीत शाळेत शिकवले. चार वर्षे, Isolde नृत्यनाट्य सराव सुरुवात केली. ती एक प्रसिद्ध बॅले होत स्वप्न पडले, पण नशीब अन्यथा आदेश दिला. नऊ वर्षे वयाच्या आपल्या कुटुंबाला Isolda Dychauk बर्लिन हलविले. सक्षम मुलगी लवकर अस्खलितपणे जर्मन मध्ये, मी उच्चारण मुक्त झालो बोलू लागला, मित्र घेतले. Isolde ती म्हणाली, "नवीन पिढी" बर्लिन नाटक शाळेत त्याच्या आईचे सल्ला प्रवेश केला तेव्हा दहा वर्षांचा होता. लवकरच, भविष्यात स्टार एक बॅले होण्यासाठी, तरी त्याची इच्छा बद्दल विसरला, आणि नृत्य चालू होती. ती लक्षात आले की, चित्रपट होऊ इच्छित आहे. संच Isolda Dychauk प्रथम 2004 मध्ये आला, ती 11 वर्षांची असताना. त्यांनी भूमिका केलेला पहिला, तरुण अभिनेत्री, एक शॉर्ट फिल्म मध्ये सादर आहे "मला आपल्या शूज द्या. " त्याच्या सहभाग भाग Isolde स्टार केले, पण ती मौल्यवान अनुभव दिला. गेला पुढील भूमिका 2007 मध्ये Dyushauk. एक दुः खी परित्यक्ता, पण प्रेक्षक पासून मान्यता बोलावणे शकत नाही, जे दुर्दैवी प्राक्तन - कुटुंब नाटक "माझी बहीण 'परदेशातून रहस्य लिसा प्रतिमा केलेल्या. लगेच त्या नंतर मी प्रकाश चित्रकला त्याच्या सहभाग "काहीही नाही विसरला आहे" पाहिले. या Isolde नाटक मध्ये पॉला नावाचा एक किशोरवयीन मुलगी नाही. "काहीही विसरला आहे" नाटक प्रकाशन नंतर सक्रियपणे पैसे काढता येतात Isolda Dychauk सुरु आहे, चित्रपट आणि तिच्या सहभाग टीव्ही मालिका दुसर्या नंतर एक बाहेर आला. प्रथम, तरुण अभिनेत्री दूरदर्शन चित्रपट मध्ये एलिझाबेथ Wynter भूमिका होती "आयर्लंड आमच्या फार्म. " मग तो म्हणाला, टीव्ही मालिका "Tatort" च्या चित्रीकरणादरम्यान मध्ये भाग घेतला "पोलिस फोन - 110,". "म्हातारा" 2008 मध्ये Isolda Dychauk "फेरो पासून माझा मित्र" तरुण नाटक माध्यमातून प्रेक्षक लक्ष आकर्षित. चित्रपट एक मॅन असल्याची बतावणी आवडी जो मुलगी कथा सांगते. तिच्या गुप्त प्रकट करण्यास सक्षम आहे अशी व्यक्ती आहे होईपर्यंत तिला, इतर सहज फसवू सांभाळते. या चित्रात Isolde अगदी लहान होती, पण स्पष्ट भूमिका Bianchi. तरुण अभिनेत्री यशस्वी 2010 मध्ये दिसू लागले. त्याचे अस्तित्व रशियन दर्शक शिकलो त्यामुळे ती, काल्पनिक नाटक "Faust" Aleksandra Sokurova मध्ये एक कळ भूमिका केली. प्लॉट ग्यॉटे प्रसिद्ध कार्य मिलाप आहे. प्रेक्षक लक्ष Faust आणि डेझीच्या जातीचे फुलझाड क्लिष्ट संबंध आहेत. हे मार्गारिटा आणि Dyushauk प्रतिमा या नाटक मध्ये दिलेली आहे. मालिका "बोर्जिया" "बोर्जिया" - अद्याप सर्वात प्रसिद्ध टीव्ही प्रकल्प, मोहक Isolda Dychauk तारांकित आहे. चित्रपटांची सूची मुलगी, 2011 मध्ये या ऐतिहासिक नाटक यावेत फक्त तीन ऋतू आला. 15 व्या शतकात सर्वात भयंकर आणि भ्रष्ट कुटुंबांना एक प्रतिनिधी - मालिका फ्रेंच-जर्मन उत्पादन मुख्य वर्ण. रॉड्रिगो Bordzhia क्रमाक्रमाने तो व त्याचे असंख्य अनौरस संतती संतती करण्याचा अधिकार शोधत, आणि नंतर पूर्णपणे पोप होतात. त्याचा मार्ग वर, तो दूर दुसर्या नंतर एक अडथळा, निर्दयपणे शत्रूंना खाली क्रॅक नाश करीन. अर्थात, मुले त्यांचे वडील स्वतः च्या फायद्यासाठी भयंकर गुन्हा तयार मागे नाही. टीव्ही शो "बोर्जिया" अभिनेत्री मध्ये Isolde प्रखरतेने त्यांच्या स्वतः च्या हेतूने लोक हाताळू सोपे, एका तरुण intriguer Lucretia, प्रतिमा केलेल्या. त्याची नायिका - रॉड्रिगो बोर्जिया कोण, intrigues आणि खून धन्यवाद सहाव्या पोप अलेक्झांडर झाले, एक मुलगी. अभिनेत्री Dyushauk, चाहते खूप आनंद देणे, चित्रपट आणि मालिका काम आहे. तिच्या सहभाग तुलनेने अलीकडील प्रकल्प शॉर्ट फिल्म "हॅलो", "कुपी", "Cordelia" मिनी मालिका "केप," नाटक सांगता येईल "बीट्राइस न बोरिस. " तसेच, ती टीव्ही चित्रपट चित्रीकरणाच्या भाग घेतला "एक वर्ष नंतर, उद्या. " आपण अभिनेत्री वैयक्तिक जीवनाविषयी काय सांगू शकता, लग्न किंवा नाही हे Isolda Dychauk? परफॉर्मर चरित्र Lucrezia बोर्जिया भूमिका ती कधीच remarried, आहे की नाही मुले सूचित करते. तथापि, ती त्याचे नाव Isolde आहे पत्रकारांशी कॉल नकार तरुण आहे. Isolde घरात मांजरे प्राणी अनेक एक जागा होती प्रेम करतो. तरुण अभिनेत्री ती पियानो, नृत्य खेळत आणि वाचन आनंद एक ना अनेक छंद आहे. Keyt Uinslet आणि Meril पट्टी - अभिनेत्री, ज्या प्रतिभा ती प्रशंसा. Dyushauk उंची 162 सेमी आहे आणि वजन सतत बदलत आहे.
पुणे विभागाचा मुख्यमंत्री सचिवालय क्षेत्रीय कक्ष सर्व सुविधांनी सज्ज असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी म्हटलं आहे विभागीय पातळीवरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाविषयी माहिती देताना ते बोलत होते मुख्यमंत्री कार्यालयाशी निगडित सर्व प्रकारचे अर्ज विभागीय कक्षात स्वीकारले जाणार असून विभाग पातळीवरील अर्ज पुढील कार्यवाहीसाठी योग्य तो शेरा मारून संबंधित खात्यांकडे सोपवले जातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष विभागीय पातळीवर सुरु झाल्यानं आता सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही असा विश्वास पुणे विभागीय कक्षाचे प्रमुख महसूल उपायुक्त प्रताप जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला पुणे महसूल विभागातील पाचही जिल्ह्य प्रशासनाशी संबंधित नागरिकांचे प्रश्न विभागीय पातळीवरच समन्वयाने सोडवण्याची या कक्षाची भूमिका राहणार असल्याचंही ते म्हणाले महा मेट्रो महा मेट्रोच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज मुठा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात् आल यामध्ये मेट्रो चे सुमारे शंभर पन्नास कर्मचारी सहभागी झाले होते तसंच हेल्मेट वापराचं महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आलं वर्धापन दिनानिमित्त मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं बॉम्बे सपर्स भारतीय सैन्य दलाचा बॉम्बे सपर्स अर्थात् बॉम्बे इंजीनियरींग ग्रुप यंदा दोन शे वर्ष पूर्ण करत आहे यानिमित्त एकोणतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान संचलन हवाई प्रात्यक्षिकांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यावेळी उपस्थित राहणार आहेत दोन शे वर्षा च्या करकीर्दित बॉम्बे इंजीनियरींग ग्रुप ने अशोक चक्र परमवीर चक्र हे सर्वोच्च सन्मान प्राप्त केले आहेत तसच सदतीस शौर्य पदक प्राप्त केली आहेत क्रिएटिव फाउंडेशन महापालिकेनं जुना रस्ता खोदून नंतर डांबरीकरण करावं अशी मागणी क्रिएटिव फाउंडेशनच्या वतीनं आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे रस्ता न खोदता डांबरीकरण केल्यास रस्त्याची उंची वाढते यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरतं त्यामुळे रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक करतानाच रस्ता खोदून डांबरीकरणाची तरतूद करावी असं फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे प्रशिक्षण वैकुंठ मेहता सहकार प्रबंध संस्थान मध्ये वीस ते बावीस जानेवारी दरम्यान जेंडर बजेटींग ऍन्ड इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ या विषयावर प्रादेशिक स्तरावरील प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात पाच राज्यातील मिळून सदुसष्ठ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते सातारा जिल्ह्यातील माणदेशी फाऊंडेशनला देखील प्रशिक्षणार्थीनी यानिमित्ताने भेट दिली पुणे कॅन्टोन्मेंट पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयातल्या विविध उपचारांचे दर वाढवल्यामुळे रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या घटत असल्याचा दावा बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनी केला आहे त्यामुळे बोर्डाने रूग्णालयाच्या वाढीव दरात कपात करावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे रूग्णालयातल्या शस्त्रक्रिया विभागाचं शुल्क दुपटीने वाढविण्यात आलं असून रक्ततपासणी डायलिसिस यासारख्या चाचण्यांचं शुल्कही वाढवण्यात आलं आहे याची दखल घेत बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर कुलजित सिंह यांनी बोर्डाच्या आरोग्य समितीद्वारे या मुद्द्याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं पुण्याचे महापौर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सोशलमीडियावर लोकप्रिय असलेल्या फेसबुक वरून आता थेट पुणेकरांची संवाद साधणार आहेत दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी सात वाजता हा संवाद होणार असून या संवादाचा पहिला भाग येत्या शनिवारी मोहोळ यांच्या फेसबुक पेजवरून प्रसारित होणार आहे नागरिकांनी थेट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचं महापौरांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जयंती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत आज कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला प्रप्र कुलगुरू डॉ एन एस उमराणी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार विविध विभागांचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते हवामान पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान एकतीस आणि किमान तापमान चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून कमाल तापमान तीस तर किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत राज्यातल्या आणि देशातल्या इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ऐका प्रादेशिक बातम्या पुणे अ केंद्रावर आणि त्यानंतर उद्या रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पुन्हा भेटू या विविध भारतीवर ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना(Shiv Sena)-भाजप (BJP) युती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र येत्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जेपी नड्डा (HP Nadda) यांच्यात युती जागावाटपाची चर्चा होणार आहे. त्यामुळे कोणत्या आणि किती जागांवर युतीमधील कोणाचा उमेदवार लढणार हा मुद्दा प्रथम मांडला गेला. परंतु जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत आता अधिक चर्चा केली जाणार आहे. याबाबत शिवसेना-भाजप पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमध्ये होणार आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची बैठक पार पडणार आहे. (महायुतीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये खलबते सुरु; जागावाटपाबद्दलची पहिली बैठक फिसकटली, जाणून घ्या काय असेल फॉर्म्युला) तसेच आगामी विधानसभेसाठी मजहाराष्ट्रातून 288 जागांपैकी भाजप-शिवसेना मध्ये 270 जागा आणि घटक पक्षासाठी 18 जागा लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपला 160, शिवसेना 110 आणि घटक पक्ष 18 जागांवर लढतील असा अंदाज पार पडलेल्या चर्चेतून समोर आला आहे. खा. संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या भेटीदरम्यानच्या एका घटनेची आठवण करून देत, युतीमध्ये दोन्ही पक्ष समान जागा लढवतील असे ठरले असल्याचे सांगितले आहे. असो आता पुन्हा एकद दोन्ही पक्षांमध्ये बैठका होऊन युतीचा नवा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने टेलिफोनवर वंदे मातरम बोलण्याच्या संदर्भात शनिवारी जारी केलेल्या जीआरनंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष हा मोठा उपक्रम म्हणत आहेत. तर दुसरीकडे विरोधक याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबईत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी म्हणाले की, मी आमच्या बाजूने नक्कीच बोलेन, पण वंदे मातरम कधीच बोलणार नाही. आम्ही फक्त अल्लाहची इबादत करतो आणि त्याचीच इबादत करू. अबू आझमी म्हणाले की, मी ज्या वेळी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडून जय महाराष्ट्र ऐकला. यासंदर्भात खुद्द महाराष्ट्र सरकारनेही जीआर काढला होता. शेवटी शिंदे सरकार जय महाराष्ट्र ऐवजी वंदे मातरम म्हणायला का लावले जात आहे? एकनाथ शिंदे यांच्या या आदेशावरून तेही आता भाजप आणि आरएसएसची भाषा बोलू लागले आहेत की त्यांच्या दबावाखाली काम करत आहेत, हे समजण्या पलिकडचे आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आजही काही मुस्लिम नेते याला विरोध करत आहेत. सोमय्या यांनी विचारले की हे लोक आझाद काश्मीरच्या बाजूने, बुरखा न घातल्यामुळे हिंदू पत्नीच्या हत्येविरुद्ध आवाज उठवत नाहीत. त्यांनी वंदे मातरम बोललेच पाहिजे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आणि सरकार अशी जबरदस्ती करू शकत नाही, असे म्हटले आहे. लोकांना त्यांच्या स्वेच्छेने बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकार हुकूमशाही वृत्ती स्वीकारू शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन कॉल्सला उत्तर देताना वंदे मातरम म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे रोजगार मिळेल का? वंदे मातरमच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचे नेते चरणसिंग सप्रा यांनी सरकारवर ताशेरे ओढले. आम्ही वंदे मातरम्च्या विरोधात अजिबात नाही, असे ते म्हणाले. मात्र, जय महाराष्ट्र म्हणत आदेशाचे काय होणार असा माझा शिंदे सरकारला सवाल आहे. शेवटी शिंदे सरकारला जय महाराष्ट्र करायला काय हरकत आहे? शेवटी त्यांना जय महाराष्ट्र म्हणायला काय हरकत आहे? शिंदे सेना आरएसएसच्या इशाऱ्यावर चालत आहे का? की महत्त्वाच्या मुद्द्यांवरून राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे मोठे षडयंत्र आहे. आज महागाई, बेरोजगारी असे प्रश्न जनतेसमोर उभे आहेत. वंदे मातरमचा जप केल्याने या समस्या संपतील का? तसे असेल तर मी वंदे मातरम हजार वेळा बोलायला तयार आहे. माझ्या मते हा केवळ जनतेचे लक्ष वळवण्याचा एक मार्ग आहे. एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनीही वंदे मातरमच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजप नेत्यांसमोर कोणताही मुद्दा सोडलेला नाही. फोनवर वंदे मातरम म्हटले तर देशातील बेरोजगारी संपेल का? राज्यात मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? भाजप जनतेला मूर्ख बनवत आहे. हे लोकही गांधी जयंतीपासून वंदे मातरम बोलू लागले आहेत. नथुराम गोडसे ज्याने गांधीजींची हत्या केली. आरएसएसचे लोक त्या व्यक्तीची पूजा करतात.