text
large_string
पुरांमुळे गोव्यातील रस्ते, जलवाहिनी तसेच इतर पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने या नुकसानीचा आकडा १६५ कोटी रुपयांच्या घरात जातो. म्हापसाः पुरांमुळे गोव्यातील रस्ते, जलवाहिनी तसेच इतर पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने या नुकसानीचा आकडा १६५ कोटी रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे केंद्राकडून नुकसान भरपाई मागून घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोणीही शेती करणं सोडून देवू नका, सध्या भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरामागील जागेत आपल्यापुरता भाजीची लागवड करावी. सद्यस्थितील गोव्याला भाजीसाठी कर्नाटकवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे यापुढे स्वावलंबी न होता, स्वयंभू व्हावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. विविध राज्यांतील पूरग्रस्त भागांची पाहणी करून अहवाल देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे पथक पुराचा फटक बसलेल्या राज्यांना भेट देणार आहे. या यादीत गोव्याचे नाव नाही, अशी बातमी आली होती. त्यानुसार केंद्रीय गृह खात्याला गोवा सरकारने पत्र पाठवून ही बाब नजरेस आणून दिली आहे. कारण गोव्यातील नुकसानीचा आकडा हा सामान्य नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पोलीसनामा ऑनलाइन टीम - अलाहाबाद हायकोर्टाने कानपूर नगरातील अजय प्रकाश वर्मा यांना पत्नी आणि मुलासाठी कुटुंब न्यायालयात प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला 10 हजार रुपये राहण्याचा हप्ता आणि थकबाकी 15 मे पर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अर्जाच्या तारखेपासून पत्नीला 3 हजार आणि मुलांना 2 हजार (एकूण 5 हजार) आणि आदेश दिलेल्या तारखेपासून पत्नीला 5 हजार आणि मुलांना 10 हजार प्रति महिना एकूण 15 हजार रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायालयाने म्हंटले आहे की ठेव रक्कम पत्नीला दिली जावी. न्यायालयाने पत्नीला नोटीस बजावली आहे. हा आदेश न्यायमूर्ती जे. जे. मुनीर यांनी अजय प्रकाश वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या दर्जापेक्षा अधिक पोटगी द्यावी असे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ता आणि वंदना वर्मा यांचे लग्न आर्य समाजाच्या मंदिरात कानपुर नगरमध्ये २००६ मध्ये झाले. २०१५ मध्ये पत्नी स्वतंत्र राहू लागली. त्यांनी छळाचा आरोप करून पोटगी न्यायालयात कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्याच्या आधारे सुधारित याचिका दाखल झालेल्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आली आहे.
भीलवाडामध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचला कसा? किती खरं किती खोटं? सध्या देशात कोरोना व्हायरसचा दुसरा टप्पा सुरू आहे. जे परदेशातून आले आहेत आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, अशा सर्वांना सरकार आयसोलेशनमध्ये ठेवत आहे. Coronavirus : नवी दिल्ली : कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी सरकारने संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. तरीदेखील लोक घराबाहेर पडत असून रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो राजस्थानच्या भीलवाडा भागातील असल्याचे म्हटले जात आहे. सध्या भीलवाडामध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना लोकांवर लाठीचार्ज करावा लागत आहे. हे वृत्त किती खरे किती खोटे आहे याबाबत जाणून घेऊयात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस लोकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं, आणि तिथून निघताना पोलिस त्याच्यावर लाठीचार्ज करताना दिसून आले. तिथेच उभा असलेला एकजण होत जोडून पोलिसांना विनंती करताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यात कोरोना पोहोचल्याने कर्फ्यू लागू करण्यात आला. असे असतानाही लोक निर्लज्जासारखे घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लाठीचार्जशिवाय पोलिसांपुढे दुसरा कोणता पर्याय नाही. राजस्थानच्या भीलवाडा आणि केरळमधील ज्या क्षेत्रात कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे, त्या सर्वांना कोरोनाची लागण नेमकी कुठे आणि कशी झाली. याचा अजूनही शोध लागला नाही. त्या सर्व कोरोनाग्रस्तांपैकी कुणीही परदेशी गेले नव्हते, हे विशेष. अख्ख्या देश कोरोनाच्या खाईत लोटू नये, यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार कठोर कायद्यांची अंमलबजावणी करत आहे. सध्या देशात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. परदेशातून जे लोक येत आहेत, त्या सर्वांना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला तर नक्की कुणामुळे त्याचे संक्रमण होत आहे, हे ओळखणे अवघड होणार आहे. हे सगळं ठीक. मात्र, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं गाव हे भीलवाडा आहे? आणि खरंच तिथे कोरोनाची तिसरी स्टेज सुरू आहे? हा प्रश्न मागे राहतोच. कोरोनाची तिसरी स्टेज सुरू झाल्याने भीलवाडामधील २४ लाख लोकांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे, अशा प्रकारचे वृत्त एका वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले होते. रविवारपासून (ता. २२) देशात संचारबंदी लागू करण्यास सुरवात झाली. मात्र, त्या अगोदर एक दिवस शनिवारी (ता.२१) भीलवाडामध्ये ११ कोरोना पॉझिटिव्ह नागरिक आढळून आल्याने सन्नाटा पसरला होता. कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरवात झाली. भीलवाडा हा कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याकडे चालला आहे. जिल्ह्यातील २८ लोक आयसोलेशनमध्ये असून त्यापैकी ६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तर ११ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. अनेक रुग्णांवर उपचार केल्यामुळे तीन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असल्याची माहिती भीलवाडा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, खाजगी दवाखान्यातील ३ डॉक्टर आणि ९ परिचारिकासहित एकूण १३ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. या १३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली याचा सुगावा अजूनपर्यंत लागला नाही. देशात सामुदायिकरित्या कोरोनाचा प्रसार होत नसल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डॉ. रमन यांनी म्हटले आहे. मात्र, भीलवाडा येथील परिस्थिती पाहता कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याची सुरवात झाल्याचे म्हणावे लागले.
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं. नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा? . त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच. . त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं. - अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे. कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा. . बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा. . या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच. लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं. जाब विचारू शकतो आपण? प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं. जेवायला वाढलंय. . हे ही चारदा सांगावं लागतं. प्रवासाची आवड कसली? उत्तर म्हणून फक्त जांभया देतो. मनापासून सांगतो, त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं. तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली. अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी. सांगितलंच जात नाहीये; नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त. आणि मग करा काय? ? आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे. धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ? . . देऊन मगच संसार मांडायला हवा. ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात. . आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही. . हेच संसाराचं खरं मर्म आहे. आपोआप होत नाहीत. होत जातात. कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं.
हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे. Optical Illusion : हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे. काही लोक म्हणतात की हत्ती तो ४ पायांवर चालतो म्हणून याला चार पाय आहेत. तर अनेकांनी सांगितलं की चित्रात असलेल्या हत्तीला ५ पाय आहेत. चित्रात तुम्हाला हत्तीचे किती पाय दिसतायत? काही लोकांना या प्रश्नाचं उत्तर अशक्य वाटतं. तुम्हीही या चित्राकडे नीट पाहा आणि सांगा की या हत्तीला नेमके किती पाय आहेत. खरं तर, या चित्राशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हीही थोडं गोंधळून गेला असाल. कारण कलाकाराने हत्तीचं हे चित्र अतिशय चतुराईने बनवलं आहे. या चित्रामध्ये फक्त हत्तीचा मागील डाव्या बाजूचा पाय योग्यरित्या रेखाटण्यात आला आहे. तो पाय योग्य रित्या दिसत आहे. परंतु अन्य पाय त्यात नीट समजत नाहीत. जर तुम्ही हे चित्र निरखून पाहिलं तर यात असलेल्या हत्तीचे अन्य पाय पूर्णपणे रेखाटलेच नसल्याचं दिसेल. कलाकारानं हत्तीच्या पायांऐवजी त्याच्या पायाची प्रतिमा पायांदरम्यान ठेवली आहे. त्यामुळे लोकांना गोंधळवण्यासाठी कलाकारानं हे चित्र किती हुशारीनं काढलंय हे पाहिलंच असेल. या चित्रातील हत्तीला ४ पाय आहेत की पाच हे सांगणं मात्र अवघड आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ५१ लघुप्रकल्प, ८४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. केवळ दहा बंधाऱ्यांमध्ये पाणी असून, त्यांनीही तळ गाठला आहे. ५१ पैकी केवळ २ प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. तो कडक उन्हामुळे काही दिवसात संपणार आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी अधिक पायपीट करावी लागत आहे.
मुंबई : लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. हळूहळू मेट्रो, रेल्वे, बस, कार्यालयं सुरू होत असताना याला सिनेमागृहंही अपवाद ठरलेली नाहीत. आता चित्रपटगृहंही खुली झाली असून 50 टक्के प्रेक्षकसंख्येसह त्यांना परवानगी देण्यात आली आहे. आता लोकांनाही थिएटरमध्ये येण्याची सवय व्हावी आणि त्यांच्यात सुरक्षेबाबतचा विश्वास वाढावा यासाठी अनेकांनी नवे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यापेक्षा जुने गाजलेले चित्रपट नव्याने रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास नऊ महिन्यांनंतर पुन्हा एकदा थिएटर्स खुली झाली असून लोकांना सिनेमात खेचण्यासाठी पुन्हा एकदा काही मराठी चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. यात प्रवीण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न', प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी', दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' हे चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना फत्तेशिकस्त चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, 'लोकांमध्ये सुरक्षेबाबत एक विश्वास येणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही फत्तेशिकस्त पु्न्हा थिएटरमध्ये लावण्याचा निर्णय घेतला. सध्या सरसकट हा चित्रपट सर्वत्र रिलीज झालेला नाही. पण जिथे शक्य आहे तिथे आम्ही चित्रपट लावलेला आहे. यात पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी भागांचा समावेश होतोय. याला प्रतिसादही चांगला असल्याचं दिसतं. बुक माय शोवर तरी माझ्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याचं दिसतं. ' मुळशी पॅटर्न हा चित्रपटही पुन्हा थिएटरमध्ये आला आहे. अनेक थिएटर्सनी आपलं थिएटर नव्यानं नेटकं करण्यावर भर दिला आहे. त्याचा एक भाग म्हणून आता यात जुने गाजलेले चित्रपट पुन्हा दाखवण्यावर भर आहे. मुळशी पॅटर्न हा चित्रपट खूपच गाजला होता. असं असलं तरी अनेकांनी तो पाहिला नाहीय. काहींनी टीव्हीवर तो पाहिला असला तरी थिएटरमध्ये हा चित्रपट पुन्हा पाहाणं हा एक वेगळा आनंद ठरतो. म्हणून या चित्रपटाला प्रतिसाद चांगला मिळेल अशी आशा चित्रपट निर्मात्यांना वाटते. अनेक ठिकाणी थिएटरवाल्यांना चित्रपटगृहं सुरू करायची आहेत. पण नव्याने सिनेमे येण्याआधी जुने गाजलेले चित्रपट लावून ही मंडीही चाचपणी करताहेत. अशावेळी मराठी सिनेसृष्टीत गाजलेले चित्रपट लावले जातायत. महाराष्ट्रात हे चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी ते चित्रपट सर्वत्र पाहायला मिळत नाहीयेत. पण काही शहरात एखाद दोन थिएटरमध्ये हे चित्रपट लागलेले दिसतात.
बेल्जियम एक लहान पण अतिशय आकर्षक आणि उबदार युरोपियन राज्य आहे. येथे, एक नियम म्हणून, आरामदायी आणि आरामदायी राहण्यासाठीचे चाहते बेल्जियनांच्या जीवनाचा तालबद्ध ताल, समुद्र आणि माउंटन लँडस्केपची विलक्षण सुंदरता, प्राचीन महल आणि भव्य बेल्जियन waffles असलेल्या उबदार कॅफेसह शेजारच्या सुरेख सुती घरे, जगभरातून पर्यटक आकर्षित करतात. बेल्जियमला जायला जाण्याआधी , आपण निवासस्थानासह आगाऊ ठरवले पाहिजे हा देश युरोपच्या एका छोट्या भागात स्थित आहे या वस्तुस्थिती असूनही, त्याच्या प्रांतामध्ये अनेक हॉटेल्सचे विविध स्तर आहेत. बेल्जियममध्ये लोकप्रिय आणि तारकाशिवाय हॉटेलचा आनंद घ्या दर एक विस्तृत दर पर्यटकांना प्रत्येक चव आणि बक्षीस साठी प्रदान गृहनिर्माण आणि सेवा पर्याय निवडण्याची परवानगी देईल आणि आमच्या लेखामुळे आपल्याला बेल्जियममध्ये हॉटेल निवडण्यास मदत होईल. - हॉटेल्सची सर्वात मोठी निवड बेल्जियमची राजधानी येथे सादर केली आहे - ब्रसेल्स . लक्झ एव्हेन्यूवर अनेक दुकानांद्वारे वेढलेले स्टीगेंबर्गर विल्चर चे विलासी हॉटेल आहे. हॉटेलच्या ट्रामवर आपण जगात पोहोचू शकता - काही मिनिटांत प्रसिद्ध ग्रँड प्लेस . उबदार खोल्या चिरडल्या जातात, टीव्ही बसवले जातात, अभ्यागत इंटरनेट देखील वापरू शकतात सकाळी, अतिथींना "बुफे" मध्ये आमंत्रित केले आहे हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर आधुनिक फिटनेस रूम आहे ज्यामध्ये आपण आपली फिटनेस सुधारू शकतो आणि आपले आरोग्य सुधारू शकता. - अन्य आरामदायक हॉटेल वॉरविक ब्रसेल्स ब्रुसेल्सच्या मध्यभागी स्थित आहे. जवळपास हा स्क्वेअर व्यवसाय केंद्र आणि गारे सेंट्रल मेट्रो स्टेशन आहे. हे प्रशस्त खोल्या अत्यावश्यक वातानुकुलित आहेत, तसेच आरामदायी मुक्कामसाठी आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आहे. वॉरविक ब्रुसेल्स गैर धूम्रपान करणाऱ्यांसाठी खाजगी खोल्या, फिटनेस क्लब आणि सौनाचा विनामूल्य उपयोग. चटनीच्या कॅफे अँड बारमध्ये बेल्जियमचे खाद्यपदार्थ आणि पेयाचे विविध प्रकार आहेत. ब्रुसेल्स विमानतळांसाठी शटल सेवा अतिरिक्त खर्चावर उपलब्ध आहे. - एव्हरसेन मधील मोहक पिवळा पनडुरीत बी आणि बी ग्रोटे मार्केटपासून 300 मीटर अंतरावर आहे. हॉटेलमधून चालण्याच्या अंतरावर एमएएस फॅशन म्युझियम आणि संग्रहालय आहे . किमानचौकटप्रबंधक खोल्या केबल चॅनेल, एक लहान बार आणि एक कॉफी मशीन एक टीव्ही सुसज्ज आहेत. सकाळच्या वेळी, तृणधान्ये, फळे आणि ताजी कॉफी देऊन संपूर्ण नाश्ता दिला जातो. पिवळा पनडयाच्या पहिल्या मजल्यावर आपण कॅफेबारमध्ये बसून ताजे वर्तमानपत्र वाचू शकता आणि विविध गोड पदार्थ वापरून पहा. अतिथींच्या सोयीसाठी विनामूल्य खाजगी पार्किंग उपलब्ध आहे. - मॅनकेन पिसच्या पुतळ्याच्या जवळ आणि रेने मॅग्र्रिटच्या संग्रहालयाजवळ असलेले ब्रसेल्स हॉटेल सब्लन , दिवसाच्या कोणत्याही वेळी पाहुण्यांचे स्वागत करतो. मूळ खोल्यांमध्ये एक मिनी फ्रिज, केबल टीव्ही, वातानुकूलन आणि विनामूल्य Wi-Fi आहे. बाथरूममध्ये एक इलेक्ट्रिक ड्रायर आहे. प्रत्येक सकाळी अभ्यागतांना अनेक खाद्यपदार्थांसह "बुफे" मध्ये आमंत्रित केले जाते. आपण कल्याण परिसरात आराम करु शकता, जिथे हायडॅमॅसेज स्नान आणि फिनिश सौना आहे. - हॉटेल डे कीझर हे रेल्वे स्थानक आणि एंटवर्पमधील शहर चिन्न जवळ आहे. रिसेप्शन दररोज 24 तास उघडे आहे आणि प्रत्येक खोलीत विनामूल्य Wi-Fi, एक सुरक्षित, मिनीबार आणि एक टीव्ही आहे. याव्यतिरिक्त, स्नानगृहमध्ये स्नानवस्त्र आणि केस वाळवण्याचे साधन आहे. हॉटेलच्या टेरिटोरीवरील बारमध्ये आपण वेगवेगळ्या बेल्जियन बिअर आणि अल्कोहोल पेये मिळवू शकता. - ओस्टेंड मधील वालुकामय किनार्याच्या किनार्यावर एक उत्कृष्ट युरोपियन हॉटेल Mercure Oostende आहे . हॉटेलचे खोल्या घोषित वर्गांशी जुळतात, त्याखेरीज त्यांच्यामध्ये कॉफी टेबल, फ्री वाय-फाय, एक टीव्ही, एक कॉफी मेकर आणि चाय अॅट्रिब्यूट्स असतात. Mercure Oostende च्या पाहुण्या हॉटेलच्या बाहेर ओस्टेंडे कॅसिनो आणि फिटनेस क्लबमध्ये विनामूल्य प्रवेश मिळण्यास पात्र आहेत. सकाळी, आघात भरला जातो आणि लंच आणि डिनरसाठी, आंतरराष्ट्रीय पाककृती आणि स्थानिक कॅफे प्रीमटाइन कॅफे वापरुन पहा. - बेडफोर्ड हॉटेल ब्रुसेल्सच्या ऐतिहासिक काळातील एक बुटीक हॉटेल आहे, जे थकबाकी ग्रँड प्लेस आणि अॅननेन्स मेट्रो स्टेशन जवळ आहे. हॉटेलच्या प्रत्येक खोलीत तरतरीत आणि आरामदायक आहे. खोल्यांमध्ये प्लाझ्मा टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि एक अपरिवार्य वातानुकूलन उपलब्ध आहे. हायलाइट हा मजला वर आधुनिक लाकडी कोटिंग आहे. Bedford Hotel च्या बाजूला असलेल्या अनेक रेस्टॉरंट्स किंवा पबमध्ये जाऊ शकता. - बेल्जियम बोट डे बरगेचे आश्चर्यकारक हॉटेल, ब्रुग शहरात बांधलेले आहे, अपवाद न करता प्रत्येकासारखे. हॉटेल बाजार चौरस आणि Baffrua वॉचटावर जवळ आहे. मूळ केबिन निळ्या टोन आणि जहाज-विशिष्ट डिझाइन तपशील प्राधान्य असलेल्या सागरी शैली मध्ये केले जातात. या केबिनमध्ये धूम्रपान करणे प्रतिबंधित आहे, याकरिता एक विशेष लाउंज आहे. बोर्डवर हॉटेल एक परिष्कृत रेस्टॉरंट कॅप्टन टेबल आहे, जे फ्लेमिश गोमांस आणि लॉबस्टरसह बेल्जियन पाककृतीस प्रदान करते.
संघाचा पराभव समोर दिसू लागला किंवा खराब कामगिरी झाली की, आपल्यातली वैगुण्य, त्रुटी लपवून खेळपट्टीवर आणि ती तयार करणाऱ्यावर खापर फोडण्याची पद्धत तशी जुनीच आहे. संघाचा पराभव समोर दिसू लागला किंवा खराब कामगिरी झाली की, आपल्यातली वैगुण्य, त्रुटी लपवून खेळपट्टीवर आणि ती तयार करणाऱ्यावर खापर फोडण्याची पद्धत तशी जुनीच आहे. त्यामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात केलेल्या ४३८ धावांच्या विक्रमी धावसंख्येमुळे टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री बिथरणे स्वाभाविक होते. पण संयमी टीका करण्याऐवजी ते वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर आणि माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांच्यावर घसरले. भर मैदानात नाईक यांच्यावर शास्त्री यांनी शेरेबाजी केल्याचे स्पष्ट झाले. त्यात काही अपशब्द होते, असे म्हणतात. भारतीय संघाच्या संचालकाकडून अशी शेरेबाजी शोभनीय नाही. विशेष म्हणजे, रवी शास्त्री आणि सुधीर नाईक हे दोघेही मुंबईचे खेळाडू. नाईक हे वयाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ. अशा परिस्थितीत वैयक्तिक टीका समर्थनीय नव्हती. शास्त्री यांना खेळपट्टीबाबत काही नाराजी होती तर त्यांनी ती नाईक यांना सामन्यानंतर भेटून खासगीत नोंदवायला हवी होती किंवा संघाच्या कामगिरीबद्दलच्या अहवालात त्यांनी या गोष्टीचा उल्लेख करणेही त्यांना शक्य होते. मात्र, तसे न करता त्यांचा तोल सुटला आणि त्यातून शास्त्री यांच्याच प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. कुशल समालोचक म्हणून शास्त्री यांचा लौकिक आहे. समालोचकाला शब्द तोलूनमापून वापरावे लागतात. कुणी दुखावणार नाही याचे भान बाळगावे लागते. शास्त्री यांचे हे भान सुटले. त्यांची चूक झाली. संजय मांजरेकरसारख्या खेळाडूने टीका केली ती उगाच नव्हे. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जातो. पण तो तसा नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न काहीवेळा होत असतो. त्यातून खेळाची नाचक्की होते. मध्यंतरी दिल्लीचा गौतम गंभीर आणि बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्यात मैदानातच शाब्दिक चकमक झाली. अशा घटनांमधून उदयोन्मुख खेळाडूंपुढे कोणता आदर्श जातो? आपले कोण काय करणार, अशी बेफिकीर वृत्तीही आजकाल खेळाडूंमध्ये फोफावते आहे. म्हणून अशा घटनांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. शास्त्री बीसीसीआयच्या मर्जीतले असल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल. ती होण्याआधीच, नाईक यांची माफी मागण्याचा सुसंस्कृतपणा शास्त्री दाखवतात का, हेही कळेलच!
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहर स्मार्ट करण्याचा विडा उचलला असताना त्याचाच एक भाग म्हणून हाऊसिंग फॉर आॅल योजनेच्या माध्यमातून शहरातील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील झोपड्यांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत तो पूर्ण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. पुनर्विकासाच्या पायलट प्रोजेक्टसाठी एका झोपडपट्टीची निवड केली जाईल. ती झोपडपट्टी कोणती असेल, कोणत्या प्रभागातील असेल, याबाबत आतापासूनच उत्सुकता वाढली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे - हाऊसिंग फॉल आॅल या योजनेंतर्गत अॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी, त्याअंतर्गत खाजगी-लोकसहभागातून गृहनिर्माण प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. हा प्लॅन तयार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य सरकारकडून ३५ लाखांचे अनुदान पालिकेला मिळणार आहे. त्यानुसार, सल्लागाराच्या माध्यमातून संपूर्ण शहरासाठीचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यात संपूर्ण शहरात किती झोपड्या आहेत, त्यात किती कुटुंबे राहतात, याची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर, संपूर्ण शहराचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. यात शहरातील झोपड्यांचा कशा पद्धतीने विकास केला जाऊ शकतो, कोणत्या माध्यमातून केला जाऊ शकतो, कोणत्या नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास केल्यास योग्य ठरेल, किती घरांची आवश्यकता भासेल, पुनर्विकासासाठी किती घरांची बांधणी करावी लागेल. त्या ठिकाणी असलेली लोकसंख्या, घरांच्या बांधणीसाठी येणारा एकूण खर्च, त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सध्या हे क्षेत्र कसे आहे, याचा समावेश त्यात असेल.
जीवितप्रवास सध्यांच्या या अनुकंपनीय दशपर्यंत दशपर्यंत कसा येऊन चला होता तें मनांत येऊन तिच्या डोळ्यांतून आसवं ओवर HRADA सहा सातच वर्षांपूर्वी उमा ही कॉलेजांत शिकणारी आनंदी, स्वच्छंदी, हुषार मुलगी होती हें आज कुणाला सांगून तरी खरं वाटण्यासारखं होतं कां ? त्या वेळेस तिचे आण्णा श्रीमंत नसले तरी सधन होते, आणि ती स्वतः आपल्या महत्त्वाकांक्षेचे आणि मनोरथांचे पतंग आकाशांत किती तरी उंच उंच उडविण्यांत गर्क झालेली होती ! पण अण्णांना त्याच वेळीं एक चांगलं स्थळ कुणीतरी सांगितलं. तिथं उमा जन्माची सुखी होईल असं त्यांना वाटलं. पदवीचा अभ्यास पूर्ण करण्याची लेकीची कल्पना त्यांनी ऐकली नाही. हुंड्याची अडचण होती ती आपली लहानशी जमीन विकून अन् सांठवलेला सारा पैसा एकत्र करून त्यांनी भागवली. त्यांनी तिचं लग्न करून टाकलं. उमाला कुठं आपल्या आयुष्यावर अधिकार चालवितां आला ?................. पुढं दोन वर्षानी उमाच्या पोटीं आनंद आला, पण त्याच्या आधीच तिच्या संसारांतला आनंद नष्ट होऊं लागला होता. व्यसनी पतीशीं संसार करणं तिला अधिकाधिक क्लेशदायक व्हायला लागलं. तिच्या नवऱ्यानं स्वतःची सगळी इस्टेट उधळून टाकली. एक दोन फौजदारी गुन्ह्यांतही तो सांपडला. तरीही त्याच्यापासून ती दूर झाली नसती. त्याची सेवा करणं हें आपलं पहिलं कर्तव्य आहे असं ती आपल्या मनाला शिकवून राहिली असती. पण अखेर तिचा नवरा जेव्हां निर्दय पशूसारखी मारहाण करूं लागला, आणि आपल्या मुलाच्या शारीरिक सुरक्षितेबद्दलसुद्धां जेव्हां तिला चिंता वाटू लागली, तेव्हा एके दिवशी पतिगृह सोडून ती आपल्या अण्णांच्या घरीं रहावयास आली ! या प्रसंगी तरी तिला आपल्या आयुष्यावर अधिकार चालवितां आला होतां काय ?...... मग अशी ही उमा राजाभाऊवर कसला अधिकार चालविणार ?... ... अधिकार !...... तिनं पदरानं डोळे टिपले आणि मान वर करून समोर पाहिलं. तिच्या दारांतून राजाभाऊच्या खोलीची एक खिडकी दिसत होती. कितीदां तरी त्या खिडकीकडे ती टक लावून पहात बसत असे. राजाभाऊची हालचाल तिला त्या खिडकींतून दिसत असे; किंवा निदान खुंटीवरचे त्याचे कपडे, हातांत धरायची त्याची काठी अन् त्याच्या पुस्तकांच्या कपाटाचा एक कोपरा तिला दिसत असे त्या वस्तु पहातांना तिच्या मनांत अनेक वेळां येई, की त्यांकडे ज्याप्रमाणं आपण दुरून पहात आहोत त्याप्रमाणेच राजाभाऊकडेही आपण फक्त दुरूनच पाह्यला पाहिजे, आपलं त्याच्यावर जडलेलं प्रेम कधीं सुफलित होणं शक्य नाहीं; इतकंच नव्हे, तर आपल्या प्रेमाची त्याला ओळख देणं म्हणजे सुद्धां त्याच्या सुंदर आयुष्याचा एक प्रकारें घात करण्यासारखं ठरेल ! आपण येवढीच तीव्र इच्छा मनाशीं धरावी, कीं दुरून का होईना राजाभाऊ सदैव आपल्या दृष्टीस पडावा ! आत्तां हेच विचार उमाच्या मनांत आले, व समोरच्या त्या खिडकीकडे ती तशीच किती वेळ तरी पहात राहिली ! याच वेळीं- म्हणजे सुमारे दीड वाजतां x x x कॉलेजचे प्रिन्सिपल आणि ज्या विषयाचं अध्यापन राजाभाऊ करीत असे त्या विषयाचे वृद्ध वरिष्ठ अध्यापक या दोघात प्रिन्सिपलसाहेबांच्या कचेरीत राजाभाऊबद्दलचंच बोलणं चाललं होतं. प्रिन्सिपल म्हणत होते, राजाभाऊच्या हुषारीबद्दल प्रश्नच नाहीं हो ! तुमचा तो अतिशय आवडता का आहे हे मला समजतं अन् माझंही त्याच्यावर प्रेम नाहीं अशी समजूत तुम्ही करून घेऊं नका. पण त्याच्या बाबतीत मी कसा पेंचांत पडलों आहे तें तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तुमचं आता वय झालं, अन् अध्यापनाच्या कामातनं पुढच्या जून महिन्यापासून निवृत्त होण्याची तुमची इच्छा आहे. पहिल्यापासून आपली सर्वांची कल्पना अशी कीं तुमच्या जागीं राजाभाऊची नेमणूक करतां येईल, अन् ती केली कीं सगळं कांहीं ठीक होईल. या वर्षी राजाभाऊला अध्यापनाचं थोडंसं काम आपण दिलं तें याच कल्पनेनं. त्यानं ते उत्तम बजावलं यांतही शंका नाहीं. विद्यार्थ्यांत तो अतिशय
मुंबई- क्रिकेट विश्वात विराट कोहली आणि एबी डि'व्हीलियर्सचं नाव दुनियेतील सर्वात घातक फलंदाजांच्या यादीत येतं. हे दोन्ही खेळाडू आज दुनियेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये सहभागी आहेत. विराट व डि'व्हीलियर्स दोघंही आयपीएलसाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुकडून खेळतात. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डि'व्हीलियर्स आणि विराट कोहली चांगले मित्र आहेत. आरसीबी संघाचे हे दोघे मजबूत स्तंभ मानले जातात. विराट कोहली आणि एबी डि'व्हीलियर्स या दोघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? या मुद्द्यावरून नेहमीच क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. विराट व डि'व्हीलियर्स दोघंही रनमशिन आहेत. त्यामुळे त्या दोघांपैकी एकाला सर्वश्रेष्ठ ठरवणं चाहत्यांनाही कठीण जातं. पण आता विराट कोहलीने स्वतः दोघांपैकी सर्वश्रेष्ठ कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मला डि'व्हीलियर्स सारखं खेळता येत नाही, असं खुद्द विराट कोहली म्हणाला. आमच्या दोघांमध्ये होणारी तुलना व चर्चा माझ्या नेहमी कानावर येतात. मी सर्व फॉर्ममध्ये खेळू शकतो. पण डि'व्हीलियर्स जसे शॉट्स मैदानावर खेळतो तसं मी खेळू शकत नाही. त्याच्याप्रमाणे नवीन-नवीन शॉट्स खेळता येत नाही. डि'व्हीलियर्समुळे असलेल्या योग्यतेमुळे व अद्भुत शॉट्स खेळण्याच्या क्षमतेमुळे त्याला जास्त पसंत केलं जातं, असं म्हणत विराटने डि'व्हीलियर्सचं कौतुक केलं आहे. डि'व्हीलियर्स फास्ट बॉलरलाही रिवर स्वीपकरून छक्का मारू शकतो. जे मी आयुष्यात कधी पाहिलं नाही, असंही विराटने म्हटलं. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
नवी दिल्ली - वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विक्रम मिस्त्री यांची भारताचे चीनमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ते गौतम बंबवाले यांची जागा घेतील. मिस्त्री सध्या भारताचे म्यानमारमधील राजदूत म्हणून कार्य करत आहेत. मागील वर्षीचा डोकलाम पेच विसरून भारत आणि चीन द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी मिस्त्री यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) 1989 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी याआधी पंतप्रधान कार्यालयात आणि परराष्ट्र मंत्रालयात विविध प्रकारची जबाबदारी सांभाळली. याशिवाय, युरोप, आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील भारतीय दूूतावासांमध्ये कार्य करण्याचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.
इंडोनेशियामधील नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. जाकार्ता - इंडोनेशियामधील नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. इंडोनेशियातील उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, त्यामुळे स्थानिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आठवडाभरामध्ये त्सुनामी आणि भूकंपामुळे इंडोनेशियात हजारो लोक मारले गेले आहेत. त्या आपत्तीमधून इंडोनेशिया अद्याप सावरला नसतानाच उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन ज्वालामुखी जागृत झाला आहे. या ज्वालामुखीमध्ये होत असलेल्या स्फोटामुळे त्सुनामी आणि भूकंप पीडितांसाठी चालवण्यात येत असलेल्या मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. बुधवारी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला, अशी माहिती इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या छायाचित्रामधून ज्वालामुखीतील राखेचे लोट 4 हजार मीटर उंचीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. इंडोनेशियातील माऊंट सोपुतनच्या उत्तर पश्चिम भागात ज्वालामुखीमधून उठलेली राख दूरच्या प्रदेशातही पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्यातरी ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेमुळे देश आणि परदेशातील विमानसेवेवर परिणाम होण्याची शक्यता नाही, अशी माहिती बीएनपीडी या संस्थेने दिली आहे.
औरंगाबाद, 04 नोव्हेंबरः नाग आणि मूंगसाचं वैर हे सगळेच जण जाणतात. एकमेकांसमोर आल्यानंतर कोणीतरी एक ठार झाल्याशिवाय लढाई थांबत नाही. अर्ध्या तासाच्या थरारक लढाईनंतर मूंगसानं सापाची शिकार केली. हर्सूल गावातील तलावाजवळचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा बीटात पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. मंगळवारी सकाळी जंगल सफारी करणाऱ्या काही पर्यटकांना कम्पार्टमेंट क्र. ६६९ मध्ये रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत तो आढळून आला. माहिती सूत्रानुसार दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या पर्यटकांनी लगेच वन विभागाच्या गेटवरील वन कर्मचाऱ्यांना वाघाची माहिती दिली. त्यावर वन कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातील वरिष्ठांना कळविले. त्यानुसार दुपारी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक ऋषिकेश रंजन यांच्यासह डॉ. कडू, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी प्रफुल्ल भांबूरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाचे प्रतिनिधी कुंदन हाते व अन्य वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान वरिष्ठांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्या वाघाच्या बाजूलाच रक्त सांडलेले दिसून आले. तसेच मृत्यू झालेल्या वाघाच्या मानेवर गंभीर जखमाही दिसून आल्या. त्यावरून सोमवारी रात्री दोन वाघांच्या झुंजीत हा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, मागील महिनाभरात पेंचमधील ही दुसरी घटना आहे. गत जानेवारी महिन्यात सुद्धा येथील टुयापार बीटात एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आता ही दुसरी घटना पुढे आली आहे. याशिवाय नागपूर वन विभागातील घटनांचा विचार करता मागील दोन महिन्यात चार वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक खापा, एक पवनी व दोन पेंचमधील वाघांचा समावेश आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वाघांच्या या मृत्यू सत्रावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
शिरूर कासार : तालुक्यात ७३२ दुकानदारांनी मुदतीत कोरोना चाचणी करून घेतली, तर तपासणी रिपोर्ट पाहून लावलेले सील काढून घेत दुकान सुरू झाले असल्याची माहिती नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिली . 'कोरोना' प्रतिबंधासाठी सर्व व्यापारी यांना तपासणी करून घेण्याचे सुचविले होते आणि सुजाण व्यापाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत, सुमारे ७३२ व्यापाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत टेस्ट करून घेतली. या सर्वांचे रिपोर्ट पाहून खात्री करत असताना, अवघ्या दोन दुकानदारांनी टेस्टिंग करून घेतली नसल्याचे निष्पन्न झाले होते. लागलीच कारवाई आणि नंतर तपासणी केल्याने दुकान सुरू करता आली. बंद केलेले कोरोना केअर सेंटर रुग्णवाढ होत असल्याने सुरू करावे लागले. महसूल, पोलीस, आरोग्य, तसेच नगरपंचायत प्रशासन पुन्हा या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तहसीलदार श्रीराम बेंडे हेही रस्त्यावर फेरफटका मारून नागरिकांना वारंवार आवाहन करत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शास आल्यास कुणालाही पाठिशी न घालता कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.
रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तसेच गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरील डांबर उखडले असून, अनेक ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहेत. त्यावरून वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत केल्यासारखे आहे. विशेषतः रुग्णांना वेळेवर उपचार करण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी तसेच गावातील नागरिकांनी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले. मात्र, अद्यापही कामाला वेग न आल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. मार्डी-खिरकुंड रस्त्यावरचा पूल खचला! अकोट : अकोट मार्डी, खिरकुंड, डांगरखेड, वस्तापूर या आदिवासीबहुल भागाला जोडणारा एकमेव पुलाखालील मलबा खचला आहे. पुरामुळे मोठा खड्डा पडल्याने पाच गावांतील संपर्क तुटला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर गौण खनिज उत्खनन करून वाहन जात असून, हाकेच्या अंतरावर खिरकुंड धरण असल्याने तसेच आदिवासी गाव असल्याने प्रशासनाने त्वरित हा पूल दुरुस्त करून देण्याची ग्रामस्थांची मागणी जोर धरत आहे.
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर औरंगाबादेतील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जात असताना शनिवारी मात्र निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवले. परिणामी, राज्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर दोन्ही गटाकडून तीव्र प्रतिक्रिया सुरू झाल्या. रविवारी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शिंदे यांच्यावर जहाल टिका केली. 'दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं'; खैरेंनी असे विधान केल्याचा आरोप करत यामुळे मुख्यमंत्र्यांचे चरित्र हनन झाले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी भूमिका शिंदे गटाच्या राजेंद्र जंजाळ घेतली आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारीच पोलिस आयुक्तालय गाठत ठिय्या मांडला. खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिले, या मागणीवर ते अडून राहिले. त्यानंतर वरीष्ठ पातळीवर खलबतं सुरू झाली, त्यानंतर खैरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. जंजाळ यांची खैरें विरोधात फिर्याद घेण्यात आली. यात भारतीय दंड विधान 153 ए (1) (बी), 189, 505 (1) (ब) या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
रांची : काँग्रेसने आपल्या संपूर्ण ६० वर्षांच्या सत्ताकाळात आदिवासी आणि गरिबांना दुर्लक्षित ठेवले असून केवळ त्यांच्या मतांसाठी त्यांचा वापर करीत 'गरिबी हटाव'चा फक्त नाराच दिला आहे. मात्र, गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी आजवर काहीही केलेले नाही. त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी आणि गरिबांचे जीवनमान बदलविण्याकरिता ठोस पुढाकार घेत अनेक मोठ्या योजना राबविल्या आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी केले. काँग्रेसकडून 'गरिबी हटवा' हा नारा केवळ मतांसाठी प्रत्येक निवडणुकीत देण्यात आला. मोदी सरकारने मात्र आदिवासी आणि गरीब या वर्गांच्या विकासावर भर देऊन अवघ्या चार वर्षात त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, असे अमित शाह यांनी जनजातीय समाजातील बुद्धीजीवींच्या कार्यक्रमात सांगितले. काँग्रेसने फक्त नारेबाजी केली, मात्र मोदी सरकारने आपल्या कृतीतून आदिवासी आणि गरिबांचे जीवनमान उंचावले. सत्येच्या पहिल्या दिवसापासूनच मोदी यांनी आपले सरकार गरिबांना समर्पित केले होते. विजेशिवाय आयुष्य कसे असते, गरिबांच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास इतर सदस्यांवर कोणती परिस्थिती उद्भवते, याची जाणीव असल्यानेच मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास' या सिद्धांतानुसार सरकारचे कार्यक्रम व धोरण निश्चित केले, असे अमित शाह या कार्यक्रमात म्हणाले. गेल्या ६० वर्षात जे काँग्रेसला शक्य झाले नाही, ते मोदी सरकारने चार वर्षातच करून दाखवले, असा दावा देखील अमित शाह यांनी यावेळी केला.
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज आरक्षणासाठी (Dhangar Samaj Reservation) आंदोलन करत आहे. परंतु राज्य सरकार धनगर आरक्षणाविषयी सकारात्मक असले तरी ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी केला आहे. यादरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर आज धनगर आरक्षणासंदर्भातील बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत धनगर समाजाला 'एसटी'चा दर्जा देण्याबाबत चर्चा झाली. आजच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. धनगर आरक्षणाबाबत सरकारने दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली. गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावेळी धनगर आरक्षणाबाबत सरकारने धनगर समाजाच्या नेत्याशी चर्चा केली. धनगर आणि धनगड याविषयीचा अभ्यास करण्यासाठी दोन समिती स्थापन होणार आहे. राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. याकाळात सरकारकडून स्थापन करण्यात येणाऱ्या समितीत महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आणि धनगरज समाजचे तज्ञ मध्यप्रदेश, बिहार आणि तेलंगणामध्ये जाऊन आरक्षणासंबंधी अभ्यास करतील आणि अहवाल दिल्ली पाठवतील. यासाठी पुढील दोन दिवसांत समिती स्थापन होणार असल्याची गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सरकारने तातडीची बैठक 'सह्याद्री अथितीगृहा'वर बोलावली. राज्य सरकारने आपल्या अधिकाराअंतर्गत जीआर काढावा. त्या जीआरमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात की, धनगर समाजाला एसटीचा दाखला जारी करावा. यावर विषयावर सविस्तर चर्चा झाली. धनगर समाजाच्या सर्व प्रतिनिधींनी यावर मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही यावर मत व्यक्त केलं. धनगर आरक्षणाबाबत सरकारने दोन महिन्यांचा कालावधी मागितला, अशी माहिती पडळकर यांनी दिली.
राष्ट्रीय मिती आषाढ १८, शक संवत् १९४३ ज्येष्ठ कृष्ण अमावस्या, शुक्रवार विक्रम संवत २०७८. सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २५, जिल्काद २८, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ जुलै २०२१ ई. राष्ट्रीय मिती आषाढ १८, शक संवत् १९४३ ज्येष्ठ कृष्ण अमावस्या, शुक्रवार विक्रम संवत २०७८. सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २५, जिल्काद २८, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ जुलै २०२१ ई. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षाऋतू. राहूकाळ पुर्वान्ह १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर प्रतिपदा तिथीची सुरुवात. आर्द्रा नक्षत्र रात्री ११ वाजून १४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्राची सुरुवात. ध्रुव योग संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योगाची सुरुवात. चतुष्पद करण संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर नाग करणाची सुरुवात. चंद्र दिवस-रात्र मिथुन राशीत संचार करेल. अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ५८ मिनिट ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असेल. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिट ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिट ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजून ९ मिनिट ते ७ वाजून ३३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ दुपारी ११ वाजून १८ मिनिट ते २ वाजून ३ मिनिटांपर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग रात्री ११ वाजून १४ मिनिट ते सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. ब्रह्म मुहूर्त दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून ९ मिनिट ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत. राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिट ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ७ वाजून ३० मिनिट ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ असेल. दुमुहुर्त काळ सकाळी ८ वाजून १७ मिनिट ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५४ मिनिट ते १ वाजून ५० मिनिटांपर्यंत. आजचा उपाय : आज शुक्रवारचा दिवस आहे. लक्ष्मी देवीला केशराच्या खिरीचा प्रसाद दाखवून कुटुंबाने त्याचे सेवन करावे.
या पार्टीला हिंगणा पोलिसांचा आश्रय मिळाल्याच्या माहितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. नागपूर : हिंगणा येथील डोंगरगाव येथे फार्म हाऊसवर अमली पदार्थांच्या सेवनासह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी छापा मारला. पोलीस आल्याने आयोजकांनी पार्टीतून ड्रग्ज आणि आक्षेपार्ह वस्तू अगोदरच बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर यालाही पकडले आहे. या पार्टीला हिंगणा पोलिसांचा आश्रय मिळाल्याच्या माहितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. हिंगणा येथील डोंगरगाव येथे गिरनार फार्म हाऊस आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका ग्रुपने या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत नफीस, शिवा व एक तरुणी हे प्रमुख होते आणि त्यांनी सिंगल तसेच ग्रुप एन्ट्री ठेवली होती. सिंगल एंट्रीसाठी अकराशे आणि ग्रुप एंट्रीसाठी ३० ते ५० हजार रुपये ठेवण्यात आले होते. या पार्टीत तरुण-तरुणींशिवाय संशयित आणि व्यावसायिक गुन्हेगारही मोठ्या संख्येने आले होते. पार्टीच्या आयोजनासाठी हिंगणा पोलिसांना आधीच विश्वासात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पार्टी आयोजित करण्यासाठी आणि मद्यासाठी पोलिसांची परवानगीही घेण्यात आली होती. सायंकाळपासून पार्टीला सुरुवात झाली होती, त्यात दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली होती. पार्टीत दारूसोबत अमली पदार्थांचे सेवनदेखील सुरू होते असे सांगण्यात येत आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास नाईट राऊंड करत असलेले पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना पार्टी आणि सुमित ठाकूरच्या उपस्थितीची माहिती मिळाली. राजमाने यांनी तातडीने त्यांच्या पथकासह गिरनार फार्म हाऊसवर छापा टाकला. पोलिस छापा टाकणार असल्याने हिंगणा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ आयोजकांना सावध केले. त्यानंतर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आयोजकांचे साथीदार मागच्या दाराने पळून गेले. राजमाने आणि त्यांचे पथक फार्म हाऊसमध्ये दाखल होताच पार्टीत गोंधळ उडाला. दरम्यान, हिंगणा पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पार्टी आणि कारमध्ये दारू सापडली. आयोजकांनी दारू पिण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे सांगितले. त्यानंतर परवानगी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आयोजकांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली. या प्रकरणात सुमित ठाकूरवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. चौकशी केल्यानंतर सुमितला पोलीस ठाण्यातून सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टी आयोजक नफीसचे शहरातील अनेक वादग्रस्त लोकांशी संबंध आहेत. हिंगणा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. परदेशी यांची तत्काळ प्रभावाने बदली केली आहे. परदेशी हे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे विशाल माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार दिवसांत हलगर्जीपणामुळे ठाणेदाराची बदली झाल्याची ही दुसरी घटना आहे. २९ जून रोजी विवेकानंद नगर गोळीबार प्रकरणी धंतोलीचे ठाणेदार महेश चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.
अडखळती सुरुवात आणि डावाच्या मध्यावर ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी केलेल्या तुफानी शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. कोलताना नाईटरायडर्सने २० षटकांमध्ये ७ बाद २०४ धावा फटकावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले आहे. चार वर्षांनंतर घरच्या मैदानात पहिला सामना खेळत असलेल्या कोलकाता नाईटरायडर्सला बंगळुरूविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नव्हती. बंगळुरूने नाणेफेक जिंकत कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यावर चौथ्याच षटकात डेव्हिड विलीने केकेआरला जबर धक्के दिले. विलीने डावातील चौथ्या षटकात व्यंकटेश अय्यर (३) आणि मनदीप सिंग (०) यांची पाठोपाठच्या चेंडूवर दांडी गुल करत इडन गार्डनवर खळबळ उडवली. त्यानंतर कर्णधार नितीश राणाही स्वस्तात माघारी परतला. ५० धावा पूर्ण होण्याआधीच त्यांचे ३ खंदे फलंदाज माघारी परतले आहेत. एकीकडे बंगळुरूच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांना टिकून खेळणेही कठीण झालेले असताना रहमतुल्ला गुरबाझ एकट्यानेच खिंड लढवताना दिसला. इतर फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडत असताना गुरबाझने, चौकार षटकारांची आतशबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकवीर रहमतुल्लाह गुरबाझ आणि आंद्रे रसेल पाठोपाठ बाद झाल्याने कोलकाताची अवस्था ५ बाद ८९ अशी अवस्था झाली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने तुफानी प्रतिहल्ला चढवत केकेआरला सामन्यात कमबॅक करून दिले. दरम्यान, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत शार्दुलने आपले अर्धशतक अवघ्या २० चेंडूत पूर्ण केले. शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह (४६ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करत कोलकात्याला १९० धावांच्या पार मजल मारून दिली. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
Rishabh Shetty Announced Kantara Prequel : 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत. आता सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. 'कांतारा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण झाले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून 'कांतारा'चा दुसरा भाग (Kantara 2) येणार असल्याची चर्चा होत होती. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वलची प्रतीक्षा करत होते. अखेर या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा न करता प्रीक्वलची घोषणा करण्यात आली आहे. 'कांतारा' या बहुचर्चित सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. तसेच या सिनेमात त्याच्या अभिनयाची जादूदेखील पाहायला मिळाली आहे. आता या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा करत ऋषभ शेट्टी म्हणाला,"कांतारा' या सिनेमावर प्रेम केल्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही सिनेमाला पसंती दर्शवल्यामुळे या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवसांचा टप्पा पार केला आहे". A post shared by Taran Adarsh (@taranadarsh) ऋषभ शेट्टी पुढे म्हणाला,"कांतारा' सिनेमात जे होतं तो कथानकाचा दुसरा भाग आहे. पुढील वर्षात या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कांतारा'च्या शूटिंगदरम्यानच या सिनेमाच्या प्रीक्वलबद्दल मी विचार करत होतो. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. लवकरच सिनेमासंदर्भात अधिक माहिती देईल". कांताराचे निर्माते विजय किरागंदुर म्हणाले,"कांतारा' या सिनेमाचा जॉनर थोडा वेगळा असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाच्या कथानकापासून शूटिंगपर्यंत सर्व गोष्टींवर या सिनेमाच्या टीमने मेहनत घेतली आहे. त्यामुळेच हा सिनेमा यशस्वी झाला. आता या सिनेमाच्या प्रीक्वलच्या तयारीला सुरुवात करत असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होईल". प्रेक्षक अजूनही 'कांतारा'बद्दल उत्साही असतानाच या सिनेमाच्या सिक्वेलच्या अफवांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. सिनेमाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर सिनेमाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.
विराटची पत्नी अनुष्का बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून येणार आहे. रोहितसाठी देश महत्त्वाचा की IPL? बीसीसीआय यावर कारवाई करणार आहे का? धोनी घेणार IPL मधून संन्यास ? आता धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे : पुणे महापालिकेत राज्यशासनाकडून प्रतिनियुक्तीने अधिकारी पाठविणे सुरूच असून भोर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वारूळे यांची महापालिकेत नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, वारूळे यांच्याकडे वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे. हा पदभार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांच्याकडे होता. मात्र, सोनूने यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनास, क्षेत्रीय कार्यालय आणि वृक्षप्राधिकरण समितीचा पदभार असल्याने त्यांचे आपत्ती व्यवस्थापनाकडे दूर्लक्ष होत असल्याची टिका नगरसेवकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे वारूळे यांची नियुक्ती होताच सोनूने यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. वारूळे हे भोर नगर परिषदेत मुख्याधिकारी होते. त्यांच्या बदलीचे आदेश राज्यशासनाकडून 24 जुलै रोजी काढण्यात आले होते. त्यानंतर लगेच वारूळे हे 25 जुलै रोजी महापालिकेत रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनूने यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त पदभारामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात लक्ष देता येत नसल्याची टिका नगरसेवकांकडून करण्यात येत होती. सोनूने यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनास, क्षेत्रीय कार्यालय आणि वृक्षप्राधिकरण समितीचा पदभार असल्याने, त्यांनीही काही पदभार कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून त्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता वारूळे यांची शासनाकडूनच नियुक्ती करण्यात आल्याने सोनूने यांच्याकडील पदभार कमी करण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.
बीड : किल्ले धारूरच्या माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांच्या पतीची हत्या केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. नामदेव शिनगारे असे मृताचे नाव आहे. धारूर-केज रस्त्याच्या कडेला धारूर शहरापासून दीड किलो मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. तर त्यांची मोटरसायकल घटनास्थळापासून दूर आढळली आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या बाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Home Ahmednagar North Shrirampur ...तर 'मुळा-प्रवरा' विरोधात उच्च न्यायालयात जाऊ - विखे. ...तर 'मुळा-प्रवरा' विरोधात उच्च न्यायालयात जाऊ - विखे. अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दुष्काळग्रस्त अनुदानापोटी शासनाकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला मिळालेले सुमारे ५२ कोटी रुपयांपैकी १७ कोटी रुपये अद्यापही त्यांना देण्यात आलेले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, त्यावर कारवाई न झाल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अर्ज केला असून त्यांनीही कारवाई केली नाहीतर उच्च न्यायालयात जाणार असल्याचे अशोक विखे यांनी सांगितले. अशोक बॅँकेच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटेही उपस्थित होते. सुरवातीला अशोक विखे यांनी मुळा-प्रवरा संस्थेकडील १७ कोटी रुपयांच्या अनुदानाच्या रकमेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर माजी आमदार मुरकुटे समर्थकांनीही शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच मुरकुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन लेखा परिक्षकांनी त्यांच्या अहवालात ५२ कोटी रुपयांपैकी ३४ कोटी रुपये सभासदांना दिले असून उर्वरित १७ कोटी रुपये सभासदांना दिले नसल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन दुष्काळ अनुदानात कोणतीही अफरातफर झाली नसल्याचा खुलासा करत कौटुंबिक वादातून हा आरोप अशोख विखे करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा अशोक विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन कौटुंबिक वादातून आरोप करत असल्याचा मुद्दा खोडून काढला. सव्वा लाख सभासदासाठी हा विषय हाती घेतला असून वडिल बाळासाहेब विखे यांच्यानंतर थोराला पुत्र म्हणून सभासद, शेतकऱ्यांची बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. संस्थेची वार्षिक सभा असताना त्याचा अहवालही आपल्याला पाठविण्यात आला नव्हता. मुरकुटे यांच्यामुळे अहवाल मिळाला, त्याचा अभ्यास केल्यानंतर दुष्काळग्रस्त अनुदानाचे सभासद शेतकऱ्यांना देय असलेले ५२ पैकी १७ कोटी रूपये अद्याप दिले नसल्याचे लक्षात आले. तसेच शेती वीज ग्राहकांना शासनाने मंजूर केलेली इंधन व इतर समायोजन आकारातील सवलतीची ९१ लाख ७० हजार ५१४ रूपये ही रक्कमही सभासदांची बँकेत खाती नसल्याची बतावणी करून वाटप केलेली नसल्याचे डॉ. विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगून मुळाप्रवरात हा आणखी एक घोटाळा असल्याचे सांगितले.
गॅलरीतून डोकावताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून ८ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरात शनिवारी दुपारी घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरातील अब्दुल रफिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सईद अहमद मोमीन आपल्या परिवारासह राहत असून इमारतीच्या गॅलरीत लोखंडी जाळी बसवण्यात आली होती. बाहेरुन किराणा घेण्यासाठी या लोखंडी जाळीला थोडा गॅप ठेवण्यात आला होता. सईद अहमद मोमीन यांची मुलगी तकदीस सईद अहमद मोमिन (वय ८) ही शनिवारी दुपारच्या सुमारास गॅलरीमध्ये स्टूल लावून लोखंडी जाळीतून बाहेर डोकावत होती. तेवढ्यात तिचा तोल जाऊन एकदम इमारतीच्या तिसºया मजल्यावरून खाली पडली. त्यानंतर स्थानिकांनी तिला प्राथमिक उपचाराकरता भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तकदीसची परिस्थिती गंभीर असल्याने तिला ठाण्यातील टायटन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. दरम्यान, या घटनेची अकस्मात मृत्यु अशी नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून निजामपुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी कामगारांनी रक्त सांडलेले असून, राज्याच्या प्रगतीतही त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. परंतु, अशा कामगारांची जाण नसलेल्या शासकीय यंत्रणेने मात्र आजही त्यांना किमान वेतनापासून वंचितच ठेवल्याची स्थिती आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी कामगारांनी रक्त सांडलेले असून, राज्याच्या प्रगतीतही त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. परंतु, अशा कामगारांची जाण नसलेल्या शासकीय यंत्रणेने मात्र आजही त्यांना किमान वेतनापासून वंचितच ठेवल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे शासकीय व निमशासकीय कार्यालयांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांसह खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची अशी पिळवणूक होताना दिसते. असंघटित कामगारांसाठी तर किमान वेतनाची तरतूदच शासनाने केली नसल्याने आजही असे कामगार वाऱ्यावर आहेत. आज, सोमवारी (दि. १ मे) जागतिक कामगार दिन साजरा होत असताना अशा कामगारांना न्याय मिळणार तरी केव्हा, असा सवाल आपसूक उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांत कामगार संघटना व कामगारांच्या गळचेपीचेच धोरण राबविले जात असल्याने कामगार देशोधडीला लागण्याच्या मार्गावर असल्याची स्थिती आहे. जगात सर्वांत मोठी शक्ती म्हणून कामगारवर्गाकडे पाहिले जाते. परंतु, त्याच शक्तीला आजही किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरत आंदोलने करावी लागत आहेत. विशेष म्हणजे देशात असंघटित कामगारांची संख्या तब्बल ९३ टक्के आहे. यात केवळ ७ टक्केच कामगारांना कायद्याचे संरक्षण असल्याने कामगारांची होरपळ कधी थांबणार, असा प्रश्न या घटकांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्रात व राज्यात मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्रचा नारा दिल्यावरही कामगारांची होरपळच सुरू असल्याचे चित्र आहे. यापूर्वी एखाद्या आस्थापनेत किमान २० पेक्षा अधिक कामगार असतील, तर कायदा लागू होत असे. परंतु, नवीन कायद्यानुसार ४९ कामगार आस्थापनेत असतील, तर त्यांना कामगार कायद्याचे नियमच लागू होत नाहीत. नवीन नियमानुसार कारखाना मालकाला २९९ कामगार असलेल्या कारखान्यात काही अडचण भासल्यास कधीही कारखाना बंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. मोजक्याच कारखान्यांत तीनशेहून अधिक कामगारांची संख्या असते. परिणामी कामगारांचेच नुकसान होत आहे. त्यामुळे उद्योजकांसाठी पोषक वातावरण तयार करून कामगारवर्गाला त्रास देण्याचे धोरण स्वीकारले जात असल्याचा आरोप होत आहे. नोकरभरतीअभावी शासकीय व निमशासकीय कार्यालयांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कायम कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा मिळतात, परंतु त्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना मात्र सुविधांपासून वंचितच राहावे लागत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करूनदेखील कंत्राटी कामगारांना किमान वेतनही दिले जात नसल्याची स्थिती आहे. ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या असंख्य शिक्षकांसह शिक्षकेतर कामगारांनाही किमान वेतनापासून वंचितच राहावे लागत आहे. खासगी शिक्षण संस्थेत ज्ञानदानाचे काम करणाऱ्यांसह इतरानी साधा आवाज उठविणेही गुन्हा ठरताना दिसतो. आठ तासांहून अधिक काम करूनदेखील किमान वेतनही मिळत नसल्याने खासगी संस्थांवर अंकुश ठेवणारे शासकीय विभाग नेमके करतात तरी काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. असंघटितांना वाली कोण? देशातील सर्वांत मोठी कामगारांची संख्या असंघटित क्षेत्रात आहे. मिळेल ते काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र मंडळाची स्थापनादेखील केली होती. परंतु, मंडळाकडे असंघटित कामगारांची माहिती घेण्यासाठी कर्मचारीच नसल्याने असंघटित कामगारांना वाली कोण, असा सवाल उपस्थित होतो. कारवाईमुळे कामगार संघटनांची धारही बोथट होत आहे. भविष्यात कामगार चळवळ टिकविण्यासाठी कामगारांवर मोठा लढा उभा करण्याची वेळ येणार हेच यातून अधोरेखित होत आहे.
बाबतीत, वरच्या दृश्यापासून दुमडल्यानंतर समोरचे दृश्य तळाशी येते आणि जर आपण डाव्या बाजूने पाहिले तर, ते दृश्य डाव्या बाजूकडे ओहो उजवीकडे या अपारदर्शक प्रतलावर येते. आणि जर आपण उजव्या बाजूने पहात आहोत तर, अपारदर्शक प्रतलावरील प्रक्षेपण डाव्या बाजूला येईल. अशाप्रकारे आपण पुढे जाऊ आणि बहुतेक सर्व प्रकरणे कमीतकमी भारतीय मानकांकरिता आणि आपल्या अभियांत्रिकी रेखांकनाच्या अभ्यासक्रमासाठी, आपण या प्रथम क्वाड्रन्ट प्रणालीचे विस्तृतपणे पालन (Refer Slide Time: 02:46) तर,आपण या प्रथम क्वाड्रन्ट प्रणालीबद्दल अधिक जाणून घेऊ. आपण आपल्या प्रथम क्वाड्रन्ट प्रकारच्या प्रणालीसारख्या पहिल्या कोनात या चित्राकडे पाहू या. असे परिमाण असलेले एक टेपर्ड (Tapered) सिलेंडर (Cylinder) आहे. जर आपण या दिशेने पहात आहोत कारण हे एक पारदर्शक प्रतल आहे ज्याद्वारे आपण जे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि हे देखील एक दुसरे पारदर्शी प्रतल आहे. सहसा, आपण पहाण्याचा प्रयत्न करतो त्या दिशेने जास्तीत जास्त परिमाण उपलब्ध असतात. तर, जर तसे असेल तर, जर आपण या दिशेने पाहत असाल तर, या टेपर सिलेंडरचे प्रक्षेपण दुसऱ्या प्रतलात ट्रॅपेझियम (Trapezium) म्हणून येतो. कारण हे प्रथम आहे, ज्याचे आपण निरीक्षण करणार आहोत. तर त्यास समोरचे दृश्य म्हणूया. जर आपण वरुन पहात आहोत तर हे पुन्हा ट्रॅपेझियमसारखे दिसते; समान सममीत वस्तू या दृश्यातून आणि वरच्या दृश्यातून येते. जर आपण या दृश्याकडून पहात असाल तर ते वर्तुळाच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या मोठ्या वर्तुळासारखे दिसते. तर, प्रतलात, ते वर्तुळाच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या मोठ्या वर्तुळासारखे दिसते कारण आपण कलत्या दिशेने पाहत आहोत, ते कदाचित लंबवर्तुळासारखे दिसेल. पण आपल्याला हे पान उलटावे लागेल किंवा दुमडावे लागेल. एकदा आपण ते दुमडले की ते प्रतलात एक संपूर्ण वर्तुळ बनवते. (Refer Slide Time: 04:54) (Refer Slide Time: 06:21) तर, जर आपण या संपूर्ण वस्तूसाठी हे रेखांकन करत असाल तर, पुढील दृश्य त्या दिशेने असेल आणि मग डावी बाजू उजवीकडे असेल जेंव्हा आपण या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर या रेषांच्या अनुषंगाने दृश्य दिसेल, नंतर त्या दरम्यान आपल्याला एक मोठे वर्तुळ मिळेल जे दृश्यमान होईल. त्याचप्रमाणे, आपण या दिशेने पहात आहोत, म्हणून या रेषांच्या आधारे आपल्याला आणखी एक वर्तुळ मिळेल जे त्याच्याशी समकेंद्री असेल. दोघेही दिसत आहेत. आता, वरचे दृश्य, जर आपण त्या दिशेने पहात असाल तर; तर, हे या तळातील प्रतलात प्रक्षेपित करते आणि आपण ते उघडण्यासाठी त्यास दुमडत आहोत, मग ही रेषा व तळाशी असलेली रेषा एकरूप होते. तर, तशाच प्रकारे ही तळातील रेषा एकरुप आहे आणि आपण त्या दिशेने पहात आहोत, पुन्हा आपल्याला त्याच आकाराचे ट्रॅपेझियम दिसेल. तर, हे एक समोरचे दृश्य आहे, वरचे दृश्य आहे, डावीकडचे उजवीकडे असलेले-डाव्या बाजुचे दृश्य आहे. हा मार्ग आहे, ज्यामध्ये आपण एक चित्र तयार करतो. तर, हे तयार करताना, वस्तूचे समोरचे दृश्य, हे वस्तूचे समोरचे दृश्य आहे, ट्रॅपेझियम ; हे त्या वस्तूचे डाव्या बाजुचे दृश्य आहे आणि आपली रेखांकन परिभाषा अशा प्रकारे जाते कारण ही एक दंडगोलाकार वस्तू आहे. आपण सामान्यतः त्या बिंदूतून जात असलेल्या अक्षाचे हे केंद्र दर्शवितो. जर हे संपूर्ण वर्तुळ असेल तर ही रेषा त्यामधून जाईल. (Refer Slide Time: 07:15 ) तर तीच रेषा आपण ती येथे दर्शवित आहोत. दुसरे कारण हे डाव्या बाजूच्या दृश्यावरील एक वर्तुळ आहे, एक वर्तुळ आहे आणि दुसरे वर्तुळ आहे कारण ही वर्तुळे असणारी दंडगोलाकार वस्तू आहे. तर पुन्हा डॅश- डॉट (dash-dot) ओळी दर्शवित आहेत की ही एक दंडगोलाकार वस्तू आहे. (Refer Slide Time: 07:47) 3rd angle system Project जर आपण ती वस्तू तृतीय कोन प्रक्षेपण प्रणालीमध्ये पहात आहोत, तर त्याच दंडगोलाकार वस्तूला आपण तृतीय क्वाड्रंट मध्ये ठेवत आहोत. तर, ज्या प्रतलावर ते प्रक्षेपित केले आहे ते हे आहे. ज्या प्रतलावर हे प्रक्षेपित केले जाईल ते येथे प्रक्षेपित केले जातील, ते तेथे प्रक्षेपित केले जातील. 3rd angle system तर, जर आपण ते संपूर्ण प्रतल उलट करत असाल तर हे या प्रतलात येते. या प्रतलात प्रक्षेपित करण्यासाठी प्रक्षेपण केल्यानंतर त्यास दुमडून, नंतर त्याला या दिशेने दुमडून फिरवा, जेणेकरुन आपल्याला जे दृश्य मिळेल ते एक वर्तुळ असेल. अगदी याचप्रमाणे आपण तृतीय कोन प्रक्षेपण प्रणालीमध्ये पाहिले आहे. तर, हे प्रक्षेपित केलेले असतील. तर अश्या पद्धतीने आपल्याला आवश्यक दृश्ये मिळतील. (Refer Slide Time: 08:48) तृतीय कोन प्रक्षेपण प्रणालीमध्ये या चिन्हांद्वारे वस्तूच्या पुढे हे परिमाण दर्शविणे सामान्य आहे. कारण ते प्रक्षेपित केलेले आहे. तर, काही व्यास, दुसरा व्यास कदाचित वस्तूची लांबी 2.2 डी (d) आणि सामान्यतः , आपण समोरच्या दृश्यासाठी दर्शवितो. आपण जास्तीत जास्त परिमाण, ते समोरच्या दृश्यावर दर्शविणार आहोत आणि उर्वरित परिमाण वरच्या दृश्यावर वितरित केले जातील, त्यानंतर बाजूच्या दृश्यानंतर. (Refer Slide Time: 09:41) Glass box method The observer moves around the object Prof. Akhilesh Kumar Maurya for his excellent materials आता आपण या प्रक्षेपणांमध्ये सामील असलेल्या पद्धती पाहू. कोणतेही प्रक्षेपण, आपण दोन पद्धतींमध्ये विभागतो; एक नैसर्गिक पद्धतीने आहे, दुसरे म्हणजे काचपेटी पद्धत. नैसर्गिक पद्धतीच्या बाबतीत आपण काय करतो ते म्हणजे आपण वस्तूला ठेवतो, निरीक्षक म्हणून ती वस्तू कशी दिसते ते बघण्यासाठी आपण त्या वस्तूभोवती फिरत असतो. दुसरा मार्ग म्हणजे आपण वस्तू ठेवतो हळू हळू त्यास 90 अंशांनी घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवतो, किंवा कदाचित वरपासून खालपर्यंत 90 अंश किंवा तळापासून वर पर्यंत 90 अंशांनी फिरवतो. अशाप्रकारे आपण वस्तू फिरवू शकतो आणि दृश्य पाहू शकतो. जर आपण ते करत असाल तर प्रथम वस्तू ठेवा, निरीक्षकाला निश्चित करा, वस्तू फिरवा, आपल्याला जे काही दृश्य मिळेल, त्यालाच आपण नैसर्गिक पद्धत असे म्हणतो. काचपेटी पद्धतीमध्ये आपण या वस्तू भोवती काल्पनिक पेटी बनवतो; त्यापैकी काही प्रतले पारदर्शक आहेत, त्यातील काही अपारदर्शक प्रतले आहेत. त्या पारदर्शक प्रतलांभोवती फिरा जेणेकरून आपल्याला जे काही दृश्य मिळेल त्यालाच आपण काचपेटी पद्धत असे म्हणतो. (Refer Slide Time: 11:18) Front view Right Side-view।। । L-Shale चला, तर आपण एखाद्या वस्तूकडे पाहू. येथे काहीतरी वस्तू एल (L) आकारात आहे. एल आकाराचा एक ठोकळा आहे आणि आपण याला समोरचे दृश्य असे म्हणू इच्छितो. तर, आपण ती व्यक्ती आहात जी मॉनिटरकडे (Monitor) पहात आहे आणि वस्तू आपल्याकडे किंचित झुकलेली आहे. या वस्तूला त्या दिशेने एका विशिष्ट कोनातून फिरविणे सोपे आहे जेणेकरून ते त्या दिशेने प्रतलाच्या दिशेने, आपल्या दिशेने लंब असेल. तर, जर आपण त्या वस्तूला त्या विशिष्ट कोनातून फिरवत आहोत; हे, आपण पाहण्याच्या स्थितीत असू; ते एक, आपण पाहण्याच्या स्थितीत असू. (Refer Slide Time: 12:16) Front view Right Side view तर, त्या वस्तूला फिरवा जेणेकरून ती नैसर्गिक पद्धतीने त्या आकारात येईल. यालाच आपण त्या वस्तूचे समोरचे दृश्य म्हणतो. त्याचप्रमाणे, माथ्याच्या दृश्यासाठी आपल्याला जे करायचे आहे ते हे की आपण ज्याला वस्तू म्हणायचा प्रयत्न करीत आहोत आणि आपल्याला जे करायचे आहे तेच हे एक समोरचे दृश्य आहे. (Refer Slide Time: 12:44) Front view Right Side view तर, त्या दिशेने फिरवा. तर असे केल्याने आपण पुन्हा त्या लंब दिशेने किंवा कदाचित त्या कागदाच्या प्रतलात जाऊ. मग ज्या काही गोष्टी आपण निरिक्षण करणार आहोत त्यास आपण वरचे दृश्य म्हणतो. उदाहरणार्थ, जर आपण या वस्तूला त्या मार्गाने फिरवत आहोत, तर येथे वरच्या दृश्यासाठी हे एक परिमाण म्हणून आपल्याला मिळणार आहे. हे, कारण की आपण लंब बनवत आहोत ही संपूर्ण वस्तू आपल्या दिशेने त्या पातळीवर येते. त्याचप्रमाणे, त्या लंब दिशेने प्रतलाला फिरवून आपल्याला उजव्या बाजूचे दृश्य दिसेल. यालाच आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो. निरीक्षक नेहमीच स्थिर असतो, वस्तू अशा प्रकारे फिरविली जाईल की ती निरीक्षकाच्या दृष्टीक्षेपात असेल आणि जे काही दृश्य आपल्याला प्राप्त होईल त्यालाच आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो. (Refer Slide Time: 13:56)
घारगावः अकोले मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनला अचानक भेट दिली. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कामात सुधारणा होत नसेल तर बदली करून जा अशा शब्दात लहामटे यांनी सुनावले. आमदार लहामटे रविवारी मतदार संघातील बोटा येथे एका दशक्रियाविधीसाठी आले होते. दशक्रिया विधी संपल्यावर परिसरात होत असलेल्या चोऱ्यांचे संदर्भात नागरिकांनी त्यांच्यापुढे तक्रारीचा पाढा मांडला. आमदार लहामटे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लगेच घारगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्याकडून परिसरात होत असलेल्या चोर्यांच्या तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी पोलिसांनी आम्ही चोर्यांचा तपास करीत आहोत. काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते मात्र बाल न्याय मंडळाने त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक भुसारे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधात परिसरातील चोर्यांचा संपर्क लागत नाही अशा तक्रारी आल्याचे सांगून त्यावर मला उत्तर द्या जर कामात सुधारणा होत नसेल तर बदली करून घ्या. मी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलतो. अशा शब्दात सुनावले. लोकाच्या तक्रारी येणार नाहीत असे काम करा. त्याचबरोबर तुमच्या भागातील वाळू माफियांवर अंकुश ठेवण्याच्या सूचना दिल्या. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घारगाव येथे जनता दरबार घेणार आहोत असेही आ. लहामटे यांनी सांगितले.
1. गेल्या महिन्यात, कोन्या रेल सिस्टीम मेट्रो लाइन आणि मेट्रो व्हेईकलची निविदा चीनी CRRC कंपनीला 1.2 दशलक्ष युरो (7 अब्ज 900 दशलक्ष TL) साठी देण्यात आली. गेल्या वर्षी इस्तंबूलमध्ये आयोजित 272 रेल्वे सिस्टीम मेट्रो वाहनांसाठीची निविदा 2 अब्ज 448 दशलक्ष TL च्या किमतीसाठी चीनी CRRC कंपनीला देण्यात आली होती. 11 व्या विकास आराखड्यात आम्ही 2023 पर्यंत रेल्वे प्रणाली 80% देशांतर्गत योगदान आणि राष्ट्रीय ब्रँड असेल असे नियोजन केले नव्हते का? आमच्या विकास आराखड्यानुसार, या प्रकल्पांनी स्वतःला सिद्ध केले आहे, आपल्या देशात गुंतवणूक करून उत्पादन केले आहे आणि परदेशात निर्यात केले आहे. DURMAZLAR, BOZANKAYA, TÜLOMSAŞ, TÜVASAŞ, ASELSAN, BMC, ASAŞ, TÜDEMSAŞ, इ., जर ते आमच्या देशात गुंतवणूक आणि उत्पादन करणार्या आमच्या कंपन्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय संघाला दिले गेले असते, जर आमचा देश, आमचा राष्ट्रीय उद्योग जिंकला असता, आमच्या 15.000 मुळे अभियंते, तंत्रज्ञ आणि कामगार जे इथे डिझाईन करून उत्पादन करतात, परदेशात जाण्यासाठी आपले परकीय चलन आपल्या देशातच राहिले तर बरे होणार नाही का? भूतकाळात, अंकारा नगरपालिकेने एकूण 2 अब्ज TL खर्च केले आहेत, ज्यात अंकापार्कसाठी अंदाजे 3 अब्ज TL, Şentepe केबल कारसाठी 51 दशलक्ष TL, विविध पुतळे, प्रवेशद्वार, घड्याळाचे टॉवर, मांजरी आणि डायनासोरसाठी 439 दशलक्ष TL. उदाहरणार्थ, जर वाहतूक समस्या, ज्या राजधानी अंकाराच्या सर्वात महत्वाच्या समस्या आहेत, त्याऐवजी खर्च केलेल्या या पैशाने सोडवल्या गेल्या. जर Kızılay-Airport मेट्रो लाईन, Kızılay-Etlik City Hospital मेट्रो लाईन बांधली गेली असेल, किंवा ज्या कालावधीत हे पैसे खरेदी केले गेले त्या कालावधीनुसार, 1800 इलेक्ट्रिक बसेस किंवा 1000 मेट्रो रेल्वे सिस्टम वाहने खरेदी करता येतील. बस खरेदी आणि मेट्रो मार्ग आणि मेट्रो वाहने या दोन्ही गोष्टी अंकाराच्या गरजेनुसार नियोजित आणि बांधल्या गेल्या आणि आपल्या राजधानीची वाहतूक समस्या सुटली तर बरे होणार नाही का? शिवाय, अंकारामध्ये आमची स्थानिक आणि राष्ट्रीय कंपनी आहे जी स्थानिक आणि राष्ट्रीय सुविधांसह ट्राम आणि मेट्रो वाहने बनवते. 3. परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी अनिवार्य असलेला फी स्टॅम्प खरेदी केलेल्या विमानाच्या तिकिटात जोडला गेला, तर लोकांनी विमानतळ आणि बँकांमध्ये फी स्टॅम्प खरेदी करण्याची तसदी घेतली नाही तर बरे होणार नाही का? त्यांनी त्यांचा वेळ वाया घालवला नाही? ४. घड्याळं जरी १ तास मागे गेली तरी शाळेत जाणारी आमची मुलं आणि कामावर जाणारे कर्मचारी अंधारात न जाता उजेडात निघाले तर बरे होणार नाही का? 5. तुर्कस्तानची राजधानी अंकारा, ज्यात विमानतळापर्यंत मेट्रो नाही, एकूण 56 किमी मेट्रो मार्ग आहेत. तेथे फक्त M4 Keçiören - Kızılay - विमानतळ लाइन आहे, जी निर्माणाधीन आणि नियोजित आहे आणि 35 किमी लांबीची लाईन आहे. आज, अंकारा येथील एट्लिक शहरातील रुग्णालय पूर्ण होणार आहे. मात्र अद्यापही मेट्रो मार्ग सुरू झालेला नाही. विद्यापीठे, औद्योगिक क्षेत्रे, व्यापार केंद्रे आणि नवीन विकसनशील क्षेत्रे यांसारख्या लोकसंख्येची घनता जास्त आणि झपाट्याने वाढत असलेल्या भागात जास्त वेळ न घालवता रेल्वे प्रणाली (मेट्रो, ट्राम) आणि मास ट्रान्झिट सिस्टीम या प्रणालींमध्ये तातडीने एकत्रित केल्या जातील. विमानतळ, नवीन एट्लिक शहर रुग्णालये उघडली जातील. वाहतूक लाईन नियोजित आणि बांधल्या गेल्या तर बरे होणार नाही का?
कलाशाखेचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांमध्ये आपलं उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आवश्यक अशी कौशल्य विकसित होत जातात. कलाशाखेचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांमध्ये आपलं उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आवश्यक अशी कौशल्य विकसित होत जातात. विश्लेषण आणि कल्पकता : एखाद्या परिस्थितीचं किंवा समस्येचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निरीक्षण/विचार करणं, त्या परिस्थितीशी किंवा समस्येशी संबंधित बऱ्यावाईट घटनांचा आढावा घेणं, त्याची तुलना करणं, माहिती मिळवणं आणि सत्य परिस्थिती शोधून काढणं, मतं आणि कल्पना मांडणं, संशोधनातून मिळवलेल्या माहितीच्या आधारे उत्तर तयार करणं किंवा प्रतिवाद करणं या सगळ्या गोष्टी कला शाखेतील विद्यार्थ्यांना हळूहळू जमू लागतात. तर्कशक्तीचा वापर करून प्रश्न विचारून उत्तरं मिळवणं आणि त्याचं विश्लेषण करणंही जमू लागतं. माहिती आणि सत्य गोळा करून ते तर्कशुद्ध रूपात सादर करणं, प्रभावी संदेश आणि कागदपत्रं तयार करणं, वाचनीय लेखन करणं, प्रेक्षकांना योग्य ती माहिती देणं आदी गोष्टी जमू लागतात. या शाखेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृती समजून घेणं शक्य होतं. त्याचं आपल्या दैनंदिन आयुष्यातलं महत्त्व, जातपात, लिंग, धर्म या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक पिढीशी वागण्याची पद्धत, उपक्रम राबवण्याची गती आणि इतर पद्धती ज्यामुळे आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो. कोणत्या परिस्थितीत कसं वागावं, कोणते निर्णय घ्यावेत? आदी नेतृत्त्वगुण कलाशाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होता. माहिती ओळखणं, ती मिळवणं, तिची वर्गवारी करणं, कागदपत्रं, नकाशे यांचं जतन करणं हेही या शाखेत शिकायला मिळतं. भविष्यातील कामाचं/उपक्रमाचं योग्य नियोजन आणि आयोजन करणं, जोखीम घेऊन या सगळ्यांच आयोजन करणं, त्यावर देखरेख करणं, कामातील प्रगतीचा आढावा घेणं. व्यवसायविषयक नवनवीन कल्पना तयार करणं, स्पर्धेचा आढावा घेणं, धोरण आखणं, नियम, अटी आणि कायदे समजून घेणं, ग्राहकांचा अभ्यास करणं (मार्केटिंग रिसर्च), समस्येचं कारण शोधणं, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आदी गोष्टी या शाखेतील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने जमतात. परिस्थिती किंवा समस्येचं कारण शोधणं, तुकड्यातुकड्यांमधील परिस्थितीचा संबंध समजून आढावा घेणं, ती परिस्थिती किंवा घटना बदलल्यास त्याचे काय परिणाम होतील याचा अंदाज वर्तवणं आदी.
सुकैनानं जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं लिहिलं आहे, 'आईला सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म आवडायचा. ती नेहमीच फेसबुक, इन्स्टाग्राम याद्वारे फॅन्सशी संपर्क ठेवायची. कधी कधी मला पोस्ट शेअर करायला सांगायची. मला आजही आठवतंय तिची शेवटची पोस्ट सुशांतसिंहबद्दलच होती. ' त्या वेळी सरोज खाननं इन्स्टाग्रामवर सुशांतचा (Sushant Singh Rajput) एक फोटो अपलोड करून लिहिलं होतं, ' सुशांत बाळा मी तुझ्याबरोबर कधी काम केलं नाही. पण आपण खूप वेळा भेटलो आहोत. काय झालं असं? तुला मोठ्यांशी बोलायला हवं होतं. त्यांनी तुला आनंदी राहायला मदत केली असती. या क्षणी तुझ्या जवळच्यांवर काय दुःख ओढवलंय, हे मी सांगू शकणार नाही. देव त्यांना या दुःखातून बाहेर यायला मदत करो. ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो. मला तुझे सगळे सिनेमे आवडतात. आम्ही तुझ्यावर प्रेम करत राहू. RIP' लोकप्रिय कोरिओग्राफर सरोज खानची सोशल मीडियावरची ही शेवटची पोस्ट होती. त्यांनी सुशांतच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केलं होतं. त्या म्हणायच्या, या मुलात वेगळी चमक आहे. मला हे लोकांना सांगायचं आहे. ३ जुलै २०२० रोजी सरोज खान हे जग सोडून निघून गेल्या. त्याआधी त्याच वर्षी २० जूनला सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केली होती. त्यावेळी बाॅलिवूडसाठी मोठा धक्का होता. आजही सुशांतचा मोठा चाहता वर्ग आहे.
मुंबई, 03 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान मांडलेल्या मुद्द्यांवर विविध प्रकारे चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती जनतेसमोर मांडतानाच अनेक नेत्यांची वक्तव्ये आणि कृत्ये यावर अप्रत्यक्षपणे टीकाही केली होती. मास्क न घालणाऱ्या नेत्यांबाबतही उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य राज ठाकरे किंवा मनसेच्या नेत्यांसाठी होतं अशी चर्चा आहे. त्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी अनेक नेत्यांचा समाचार घेतला. काही नेते लॉकडाऊनला विरोध करत आहेत तर काही नियम पाळायला तयार नाहीत, असं सांगताना मास्क न वापरणाऱ्यांबाबतही उद्धव यांनी वक्तव्य केलं होतं. काही नेते मी मास्क वापरत नाही असं सांगतात. पण मास्क न वापरणं यात काही शूरपणा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीररित्या आपण मास्क वापरत नसल्याचं सांगितलं होतं. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी हे देखिल मास्क वापरत नाहीत. त्यामुळं राज ठाकरे आणि मनसेकडे उद्धव यांचा निशाणा होता अशी चर्चा आहे. त्यामुळं यावरूनदेखील विविध चर्चा रंगायला सुरुवात झाल्या आहेत. SPECIAL REPORT : अंतराळाची सफर ते VR राईड, महाराष्ट्रात होणार सायन्स सिटी! मंत्रालयातील ती शापित खोली; 'केबिन नंबर 602', अजित पवारांनीही दिला इथे बसण्यास नकार, पण का? Mumbai News : मुंबईकरांमध्ये धडकी भरवणारा लेप्टोरियस कसा होतो? तो टाळण्यासाठी काय घ्याल खबरदारी? Maharashtra Politics : अधिवेशनात कोणता आमदार दमदार? काँग्रेस पहिल्या स्थानी तर ठाकरे गटाने पटकावले दुसरे स्थान! Maharashtra Politics : अजितदादा अजूनही वेटिंगवर; मुश्रीफ आणि भुजबळांसह 8 जणांना मंत्रालयात मिळाले दालन! उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे किंवा मनसे काय प्रतिक्रिया देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पण राज ठाकरेंची प्रतिक्रिया येण्याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 शी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. मास्क वापरला तरी कोरोना होत नाही याची खात्री काय. ज्यांनी मास्क वापरला त्यांनाही, कोरोना झालाच ना, त्यामुळं काहीही बोलण्यात अर्थ नसल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या वक्त्यांनंतर विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन लागण्याबाबतही विविध चर्चा होत आहेत. मात्र नेत्यांविषयी आणि खासकरून मास्क विषयीच्या त्यांच्या या वक्तव्यानंतर आता या मुद्द्यांवर कलगीतुरा रंगणार असं दिसत आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
केले. पण माझ्या घरची खाजगी व आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याकारणाने नाईलाजाने मला सरकारी नोकरी धरावी लागली होती. तेव्हा पू. स्वामीजींच्या अपेक्षेप्रमाणे मी पुढील शिक्षण घेऊन पदवीधर होऊ शकलो नाही हे माझे दुर्भाग्य आहे. पण ज्याअर्थी, पू. स्वामीजींनी मला प्रत्यक्ष बोलावून घेऊन स्वतः लिहिलेले आत्मचरित्र व इतर लिखाण अत्यंत आत्मियतेने माझ्या स्वाधीन केले. त्याअर्थी, त्यांचा प्रसाद म्हणून मी ते स्वीकारले, एवढेच नव्हे तर तो सर्व हस्तलिखित मजकूर छापून प्रकाशित करणे हे माझे कर्तव्यच आहे असे समजून ते छापून काढण्याचा निर्धार मी केला. पण माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने बरीच वर्षे ते मी प्रकाशित करू शकलो नाही. पण ते सर्व लिखाण कित्येक वर्षांपासून अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी जपून ठेवले ते सर्व प्रकाशित करण्याचा मार्ग शोधीत असता "प्रयत्नांती परमेश्वर" या म्हणीप्रमाणे एक योग जुळून आला. महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री सन्माननीय श्री. सुधाकरराव नाईक एका कार्यक्रमासाठी हैदराबादला आले होते. त्यांना मी भेटलो. पू. स्वामीजींचे आत्मचरित्र व इतर हस्तलिखित मजकूर त्यांना दाखविला व ते सर्व प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याची विनंती केली. त्यांनी पू. स्वामीजींविषयी खूप आदर दाखविला व ते सारे प्रकाशित करण्यासाठी लागणारा एक लाख रुपयांचा निधी देण्याचे मला त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर थोड्याच दिवसानंतर पू. स्वामीजींची दैनंदिनी व इतर लिखाण प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सोपविले. त्याप्रमाणे कळविलेही. अशा रीतीने माननीय श्री. सुधाकरराव नाईकांनी पू. स्वामीजींच्या हस्तलिखितांबद्दल आस्था दाखविल्यामुळे प्रकाशनाच्या कार्यास प्रोत्साहन मिळाले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. य. दि. फडके यांनी ते लिखाण प्रसिद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली. याबद्दल माजी मुख्य मंत्री श्री. सुधाकरराव नाईक व डॉ. य. दि. फडके यांचा मी अतिशय ऋणी आहे. त्यांनी हाती घेतलेले काम मंडळाचे नंतरचे अध्यक्ष श्री. द. मा. मिरासदार यांनी अतिशय चिकाटीने पूर्ण केले याबद्दल मी श्री. मिरासदार यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सध्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश द्वादशीवार यांनी या कामी खूपच लक्ष घातले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच प्रा. वि. पां. देऊळगावकर यांनी त्या दैनंदिनीचे व अन्य हस्तलिखिताचे संपादकीय कार्य अत्यंत परिश्रमाने व यशस्वी रीतीने पार पाडले याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच प्रा. वि. पां. देऊळगावकरांनी सर्व हस्तलिखितांचे संपादकीय कार्य मोठ्या परिश्रमाने पार पाडले. एवढेच नव्हे तर पू. स्वामीजींचे निकटवर्ती सहकारी व भारताचे माजी पंतप्रधान माननीय श्री. पी. व्ही. नरसिंहराव यांचा शुभसंदेशही प्राप्त करून घेतला. याबद्दल मी मान्यवर श्री. पी. व्ही. नरसिंहराव यांचा अत्यंत ऋणी आहे. कारण तो संदेश मिळवावा अशी माझी फार दिवसांपासूनची तीव्र इच्छा होती. ती इच्छाही श्री. देऊळगावकरांनी पूर्ण केली. याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. अशा प्रकारे माझ्याजवळ जपून ठेवलेले पू. स्वामीजींचे लिखाण प्रकाशित करण्याचे माझे स्वप्न साकार होऊन माझे जीवन सार्थक झाले या भावनेने मोठ्या आनंदाने माझे कृतज्ञतेचे बोल पू. स्वामीजींच्या चरणी अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस अत्यंत नम्रतापूर्वक वंदन करतो. अमृतराव देशमुख
येवला/जळगाव नेऊर : येवला तालुक्यात टोमॅटोची लागवडीची लगबग सुरू झाली असून, सरी पाडणे, ठिबक पसरविणे, मल्चिंग पेपर अंथरणे, रासायनिक खते, शेणखत मिक्स करणे ही कामे सुरू झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी येतील का, बाजारसमित्या चालू राहतील का? मजूर मिळतील का, हे भविष्य अंधारमय असताना, शेतकरी मात्र टोमॅटो लागवडीतून आपला जुगार खेळू पाहात आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्ग साथीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरविली. पर्यायाने कोरोनाला न घाबरता, ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडले. त्यामुळे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटो लागवडीच्या जोरदार तयारीला लागला असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो रोपांचे बुकिंग केले आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना टॉमेटोतून बऱ्यापैकी पैसे झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो बुकिंग केल्याने, यावर्षी टोमॅटो क्षेत्र लागवड वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पंधरा दिवस अगोदर टोमॅटो लागवड होत असून, लागवडीसाठी वातावरण पोषक तयार होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी टोमॅटो लागवडीचा खर्च वाढला असून, मल्चिंग पेपर, तार, बांबू, मशागत या खर्चात वाढ झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना टोमॅटो पीक उभं करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याने, शेतकरी आपला शेतीमाल विकून टोमॅटोचे पीक उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या एक-दीड महिन्यांपासून कोरोना संसर्ग साथीच्या रोगामुळे मजूर वर्ग कामावर येण्यासाठी घाबरत असून, बऱ्याच प्रमाणात शेतकरी घरीच कामे करत आहेत. त्यामुळे पुढे येणाऱ्या टोमॅटोच्या हंगामासाठी मजुरांची टंचाई भासणार आहे. टोमॅटो लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा देऊन टोमॅटो लागवडीसाठी विहीर, शेततळ्यात पाणी साठवून ठेवलेले आहे. लाॅकडाऊन असल्यामुळे मल्चिंग पेपरचे दर दरवर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे. रोपे, खतांच्या बाबतीत तोच प्रश्न आहे. डिझेल महाग झाल्याने शेतीसाठी मशागतीचा खर्च वाढला आहे, भाजीपाला पिकाला भाव सापडेल की नाही, याची खात्री नाही, अशाही परिस्थितीत बळीराजा आपले नशीब आजमाविण्यासाठी तयारीला लागला आहे. टोमॅटो लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने मल्चिंग पेपर अंथरताना शेतकरी. (२५ जळगाव नेऊर)
भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीमधील लाेकप्रिय अभिनेता खेसारी लाल यादव याचे गाणे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांचे कोणतेही गाणे आले की, ते काहीवेळातच व्हायरल हाेतात. त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. त्याची गाणे रिलीज हाेताच ट्रेंडिंग लिस्टमध्ये येतात. म्हणूनच त्याला ट्रेंडिंग स्टार देखील म्हणतात. अशातच आता अभिनेत्याचे नवीन हिंदी सॅड सॉन्ग 'मेहफिल' रिलीज झाले आहे, जे रिलीज होताच यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. खेसारी लाल यादव (Khesari Lal yadav) याच 'मेहफिल' या म्युझिक व्हिडिओ सलीम मर्चंटच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे. खेसारीचे हे गाणे यूट्यूबच्या म्युझिक लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. व्हिडिओला सुमारे 7 लाख व्ह्यूज आणि एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यामध्ये अभिनेत्यासाेबत अभिनेत्री ख्वाहिश गल देखील दिसत आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री खेसरिच्या प्रेमात पडते. मात्र, काही गुंडे तिला जीवानी मारुन टाकतात, त्यानंतर अभिनेत्याला फार दुःख हाेते आणि ताे बारमध्ये जाताे. सतत दारुच्या नशेत असताे. हे एक अतिशय दुःखद गाणे आहे, जे प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये खेसारी आणि ख्वाहिश गल यांची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जात आहे. गाण्याला संगीत खेसारी लाल यादव यांनी दिले असून त्यांनी या गाण्याला आवाजही दिला आहे. गाण्याचे बोल श्रद्धा पंडित यांनी लिहिले आहेत तर अंशुमन शर्मा यांनी संगीत तयार केले आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन बिभांशु तिवारी यांनी केले असून अस्लम खान यांनी कोरिओग्राफ केले आहे. निर्मिती निशांत सिंग यांची आहे. खेसारी लाल यादव यांची अनेक गाणी ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहेत. यामध्ये त्याचे बंगाली गाणे 'बंधू तीन दिन 2. 0' आहे. हे गाणे त्यांनी शिल्पी राजसोबत गायले आहे. त्याचवेळी त्याचे आणखी एक हिंदी गाणे 'बारिश' देखील ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे.
महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत. उल्हासनगर : महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत. पालिका आयुक्तांनी डब्बे खरेदीचे निविदा रद्द केली नाहीतर, न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. उल्हासनगर महापालिकेने शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी, तसेच ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी 6 कोटीच्या निधीतून कचऱ्याचे 3 लाख 44 हजार डब्बे खरेदी करण्यासाठी निविदा काढली. मात्र पालिकेत एकूण 1 लाख 72 हजार मालमत्ताधारक असून त्यापैकी 25 ते 30 टक्के मालमत्तेचा थांगपत्ता नाही. तसेच 40 हजार मालमत्ता वाणिज्य वापराच्या आहेत. मग 1 लाख 72 मालमत्ता गृहीत धरून कचऱ्याचे दोन डब्बे देणार का? ,असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच एक डब्याची 175 तर दोन डब्याची किंमत 350 रुपये दाखविली आहे. त्याच डब्याची किंमत बाजारात 70 ते 90 रुपये असल्याचे बिल मालवणकर यांनी सोशल मीडियावर टाकले . एकूणच कचऱ्याचे डब्बे खरेदीत मोठा घोळ असल्याचा आरोप करून निविदा रद्द करण्याची मागणी केली. त्या 6 कोटीच्या निधीतून भूखंड विकत घेउन कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्याचा सल्ला दिला. महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर काहीएक निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ मालवणकर यांनी उपोषनाचा इशारा दिला होता. त्यांनी अचानक कॅम्प नं 4 येथील स्मशानभूमीत सोमवारी उपोषण करणार असल्याचे, रात्री उशिरा जाहीर केले. या प्रकाराने सर्वांना धक्का बसला असून मनसे, पीआरपी यांच्यासह विविध सामाजिक संस्थेने उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
तालुक्यातील बाबरे गावाजवळच्या नदीत रविवारी बुडालेल्या दोन तरुणांचा मृतदेह सोमवारी सकाळी स्थानिक आदिवासी ग्रामस्थांच्या मदतीने काढण्यात आला. शहापूर ः तालुक्यातील बाबरे गावाजवळच्या नदीत रविवारी बुडालेल्या दोन तरुणांचा मृतदेह सोमवारी सकाळी स्थानिक आदिवासी ग्रामस्थांच्या मदतीने काढण्यात आला. हे तरुण नागपाडा येथील आहेत. रविवारी दुपारी सहा तरुण या नदीत आंघोळ करण्यासाठी गेले असता नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अक्रम महम्मद अस्लम अन्सारी (२२) व जैद महम्मद शमशुद्दीन अन्सारी (२६) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या दोघांसह अदनान नौशाद खान, रफिक अंसारी, सिकंदर शेख व सैय्यद माजिद असे सहा तरुण नौशाद खान यांच्या फार्महाऊसवर आले होते. उंभरी नदीत ते आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करत असताना पाण्यात वाढ झाली. यातील पाच जणांना पोहता येत नसल्याने ते बुडाले. त्यापैकी सैय्यदला पोहता येत असल्याने त्याने अदनान, रफिक व सिकंदर यांना नदीकाठावर आणले. अक्रम व जैद यांचा ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू होता. सोमवारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
"मिळकतकर अभय योजना पुन्हा राबवा' पुणे - शहरातील मिळकतधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. त्यामुळे त्याच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा मिळकतकर अभय योजना राबवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी स्थायी समितीत दिला आहे. दरम्यान, महापालिकेकडील मिळकतकर थकबाकीचा आकडा तब्बल 2400 कोटींवर गेला असून त्यात दरवर्षी 24 टक्के वाढ होत आहे. शहरातील अनेक मिळकतकरधारकांना पालिकेच्या चुकीने अथवा त्यांच्या चुकीने मिळकतकर भरलेला नाही. अशा मिळकतकरावर तीन पट दंड आकारला जात असून एकूण दंडावर व्याजाची रक्कम वर्षाला जवळपास 24 टक्के होते. त्यामुळे हा थकबाकीचा आकडा फुगतच आहे. मात्र, अनेक नागरिकांना हा कर भरायचा असल्याने त्यांच्याकडून पालिकेकडे विचारणाही केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच अनावश्यक थकबाकी कमी व्हावी यासाठी प्रशासनाने मिळकतकर अभय योजना पुन्हा राबवावी अशी मागणी ऍड. जाधव यांनी केली आहे.
पुणे (प्रतिनिधी) : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ हे धान्य मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता दिले जाणार आहे. गहू आठ रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ असे अन्नधान्य मिळणार आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. या निर्णयाचा फायदा पुणे जिल्ह्यातील 7 लाख 62 हजार केशरी शिधापत्रिकेमधील 32 लाख 86 हजार नागरिकांना होणार आहे. केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतील अन्नधान्याचा लाभ मिळत नाही. अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्यांचे धान्य मिळणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केंद्रीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून धान्याची उचल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरविलेल्या दराने व त्या परिंआणात अन्नधान्य देण्यात यावे. अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदरामे शिधापत्रिकेचा क्रमांक , त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील या बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी. त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ग्राहकास रितसर पावती देण्याच्या सूचना शासनाने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. अन्नधान्य वाटपामध्ये गैरव्यवहार होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
वगळलेल्या गावांसहित कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक व्हावी, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेली १३ वर्षे या गावांच्या नशिबी वनवास येतो आहे. वगळलेल्या गावांसहित कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक व्हावी, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेली १३ वर्षे या गावांच्या नशिबी वनवास येतो आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकारने ही गावे वगळणे आणि त्यांची स्वतंत्र महापालिका होईल, असे जाहीर करणे हे या गावांना राजकारणासाठी वापरण्याचे नवे पाऊल होते. ते निवडणूक आयोगाने निरर्थक ठरविले. आयोगाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. पालिकेचा कर परवडत नाही, शहरातली बहुतांश आरक्षणे आमच्या गावात टाकली आहेत असे आक्षेप कल्याण-डोंबिवली महापालिकेतल्या २७ गावांनी नोंदविल्यानंतर २००२ साली ही गावे सर्वप्रथम पालिका हद्दीतून वगळली. गेल्या १३ वर्षांत इथे राज्य करणाऱ्या ग्रामपंचायतींनी विकासाचा बट्याबोळ केला. बेकायदा बांधकामांची बजबजपुरी माजली. ना धड रस्ते, ना प्यायला पाणी. कचऱ्याच्या डंपिंगपासून ते एमआयडीसीच्या जीवघेण्या प्रदूषणापर्यंत असंख्य समस्यांचा विळखा या भागाला पडला आहे. महापालिकेत समावेश झाला तर संकटे दूर होतील, अशी रहिवाशांना आशा होती. त्याच उद्देशाने २७ गावे पुन्हा महापालिका हद्दीत टाकण्याचा निर्णय जूनमध्येच झाला होता. अधिसूचना, हरकती, सुनावणी आणि निर्णय ही प्रक्रियाही झाली. आता दोन महिन्यांत सरकारने कोलांटीउडी मारून पुन्हा २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र महापालिका करण्याच्या निर्णय घेतला. यात निवडणुकीतल्या वर्चस्वाचे आणि बांधकाम व्यवसायातल्या आर्थिक उलाढालींचे गणित असेल तर लोकहिताचे काय, असा प्रश्न सरकारला विचारावा लागेल. येत्या दोन महिन्यांत निवडणूक होईल. ती स्वबळावर जिंकून शिवसेनेला गारद करण्याची भाजपनीती आहे. या २७ गावांमध्ये २१ प्रभाग आहेत. तिथे शिवसेनेचे वर्चस्व असून भाजपच्या पदरात जेमतेत तीन ते पाच जागा पडतील असे एका पाहणीतील भाकीत आहे. याच पार्श्वभूमीवर, ही गावे वगळली गेली आहेत. या गावांमधली प्रचंड जमीन काही राजकीय नेत्यांनी बळकावली आहे. याशिवाय, भूमाफिया व बिल्डरांनी आधीच मोर्चेबांधणी केली आहे. भूमिपुत्र आणि ग्रामपंचायतींना 'गुंडाळून' जमिनी आणि बांधकामांचे व्यवहार बेमालूम उरकण्याची रीत या भागात विकसित झाली आहे. गावे महापालिकेत गेल्यास हे व्यवहार अडचणीत येऊ शकतात. मात्र, आता ही गावेच वगळली गेली आहेत. यातली सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे राजकीय स्वार्थापोटी चाललेल्या दबाबवतंत्राला मुख्यमंत्रीही बळी पडलेले दिसतात. परंतु, आता निवडणुकीची पूर्वतयारी झाली आहे. मतदारयाद्या, प्रभाग रचना, आरक्षणे जाहीर झाली आहेत. त्यामुळे, २७ गावांचा समावेश असलेल्या माहापालिकेसाठी निर्धारित वेळेत निवडणूक होईल, असा आदेश देऊन निवडणूक आयोगाने सरकारचा मुखभंग केला आहे. त्यावरून निर्माण होणाऱ्या होणाऱ्या वादाचे पडसाद यापुढे उमटणार आहेत. परंतु, या गावांचा विकास खरोखर होणार आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. जो भाग सध्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे, तेथेही नागरी सुविधांची दैना लाखो नागरिक रोज अनुभवत आहेत. जोपर्यंत राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांचा भ्रष्ट कारभार बंद होत नाही तोवर कोणताही विकास शक्य नाही. महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरांमध्ये ही साखळी आज धुमाकूळ घालते आहे. ही साखळी सांभाळून राजकीय स्वार्थासाठी वाटेल तशा कोलांटउड्या मारल्या जाणार असतील तर महाराष्ट्रातील महानगरांमध्ये अच्छे दिन येणार तरी कसे?
कुर्डीकर, मोगूबाई : ( १५ जुलै १९०४- १० फेब्रुवारी २००१ ). हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका. त्यांचा जन्म कुर्डी (गोवा) येथे झाला. त्यांचे पाळण्यातले नाव मोगा. त्यांच्या मातोश्री व गायिका जयश्रीबाई यांचा आवाज गोड असला, तरी व्यासंग करण्याजोगी त्यांच्या घरची परिस्थिती नव्हती; मात्र आपल्या मुलीने अभिजात संगीत क्षेत्रात मोठे नाव कमवावे, या तळमळीने त्यांनी खूप धडपड केली. गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात आणि सोमेश्वर-रवळनाथाच्या देवळात चालणाऱ्या भजनांच्या वातावरणात वाढल्याने मोगूबाईंवर लहान वयातच सुरांचा संस्कार झाला. मोगूबाई नऊ वर्षे वयाच्या असताना जयश्रीबाईंनी त्यांच्यासह गोव्याच्याच 'चंद्रेश्वर भूतनाथ संगीत नाटक मंडळीत' प्रवेश केला. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद इ. नाटकांमधील मोगूबाईंची कामे व गाणी त्याकाळी गाजली. तिथेच प्रख्यात तबलावादक लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी मोगूबाईंना शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे धडे दिले. परिणामी मोगूबाईंच्या अंगभूत लय-ताल गुणांना प्रोत्साहन मिळून त्यांत त्यांनी पुढे असामान्य प्रावीण्य मिळविले. मोगूबाईंची घरची स्थिती हलाखीची होती. त्यातच वयाच्या दहाव्या वर्षी आईचे छत्रही नाहीसे झाले. १९१७ ते १९१९ या काळात मोगूबाई 'सातारकर स्त्री नाटक मंडळी'त होत्या. तिथे 'शारदा', 'सुभद्रा', 'किंकिणी' अशा यशस्वी भूमिका त्यांनी केल्या. १९१९ मध्ये मोगूबाई सांगलीत आल्या. मोगूबाईंची त्या वयातील गाण्याची तयारी व समज पाहून जयपूर घराण्याचे ख्यातनाम गायक अल्लादियाखाँ यांनी त्यांना तालीम सुरू केली. १९२१ मध्ये खाँसाहेब मुंबईस आले. मोगूबाईही तालमीसाठी मुंबईस आल्या. दोन वर्षांची ही तालीम नंतर खंडित झाल्याने आग्रा घराण्याचे बशीरखाँ व विलायत हुसेनखाँ यांची त्यांनी तालीम घेतली. १९२७ ते १९३२ या काळात अल्लादियाखाँसाहेबांनी आपले बंधू हैदरखाँ यांची तालीम मोगूबाईंना देवविली. अल्लादियाखाँसाहेबांनी १९३४ मध्ये गंडाबंधन करून मोगबाईंना तालीम सुरू केली, ती खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत (१९४६), अधूनमधून व्यत्यय येत गेल्याने ही तालीम खंडित स्वरूपात दिली गेली. लयप्राधान्य हे मोगूबाईंच्या गाण्याचे खास वैशिष्ट्य असून, लयीचे अवघड प्रकारही त्या सहजतेने करून जात असत. कमीतकमी स्वरयोजनेच्या अर्थवाही उपजा, कणस्वरांची प्रभावी योजना, आवाजाचा अकृत्रिम, अनुनासिकविरहित लगाव, खणखणीत असूनही हळुवार असा स्वर, सुरेल स्वरांचा डौल व लयीचा तोल एकाच वेळी सांभाळण्याचे कसब, लयीशी लडिवाळपणे खेळत केलेले बाल-आलाप व लयीत गुंफलेल्या बोल-ताना, प्रचंड दमसासाच्या ताना, बंदिशीची व ख्यालाची प्रमाणबद्ध मांडणी ही त्यांच्या ख्यालगायनाची ठळक वैशिष्ट्ये होती. अस्ताई-अंतऱ्यातील शब्दांचा भावार्थ व स्वरार्थ लक्षात घेऊन लयीच्या विविध अंगांनी चीजेचे बोल फिरवून अलगद समेवर येणे, तानफिक्र्यांमध्ये प्रत्येक फिक्र्यातील अंतर्गत लडींची सतत बदलती ठेवण ठेवणे, ही त्यांची खासियत होती. मोगूबाईंनी सावनी नट, जयतकल्याण, शुद्ध नट, बसंत बहार, भूप नट, संपूर्ण मालकंस अशा अनेक अनवट रागांतून द्रुत चिजा बांधल्या. त्या त्यांच्या सर्जनशीलतेच्या निदर्शक आहेत. स्वतः आयुष्य भर केवळ ख्यालगायकीचा पाठपुरावा करत असतानाही त्यांनी ठुमरी, भजन आदी उपशास्त्रीय प्रकारांकडेही रसिक व मर्मग्राही दृष्टीने लक्ष पुरवले. मोगूबाईंना रसिकांकडून 'गानतपस्विनी' ही सन्मान्य उपाधी मिळाली. जयपूर घराण्याची गानपरंपरा सातत्याने टिकावी, यासाठी त्यांनी मुक्तहस्ताने गानविद्या दिली. ख्यातनाम गायिका किशोरी आमोणकर ह्या त्यांच्या कन्या व शिष्या होत. मोगूबाईंच्या अन्य शिष्यवर्गात कौसल्या मंजेश्वर, वामनराव देशपांडे, सुशीलाराणी पटेल, कमल तांबे, सुहासिनी मुळगावकर, पद्मा तळवलकर, सुलभा पिशवीकर इ. गायक गायिकांचा अंतर्भाव होतो. मोगूबाईंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांमध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९६८), भारत सरकारकडून पद्मभूषण (१९७४) हा सन्मान, गोव्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात संगीत रिसर्च अकादमीचे पारितोषिक (१९८०) इत्यादींचा समावेश होतो. मोगूबाईंचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. संदर्भ : इनामदार, कल्याणी, गानतपस्विनी, पुणे, १९८६.
मुंबई - शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अशातच भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,'गर्व कुणालाही सोडत नाही. दुसऱ्यांचं घर तोडायला जे निघाले होते त्यांचं स्वःताचं घर कधी बर्बाद झालं ते त्यांनाही कळलं नाही. ईश्वराच्या लाठीत आवाज नसतो. कोण म्हणतं अहंकार फक्त रावणाला मारतो. अहंकार धनुष्यबाणालाही मारतो असं म्हणत त्यांनी मर्सिडिसचा लोगो आणि पेग्विंग शेअर करत चॉईस इज यूअर असं कॅप्शन देत कंबोज यांनी खोचक सल्ला दिला आहे. घमंड किसी का भी नहीं रहता , दूसरों का घर तोड़ने चले थे ख़ुद का घर कब बर्बाद हो गया पता ही नहीं लगा ! ईश्वर की लाठी में आवाज़ नहीं होती ! कौन कहता है अहंकार सिर्फ रावण को मारता है। अहंकार धनुष-बाण को भी मार देता हैं । हर हर महादेव !
पिंपरी : भय व भ्रष्टाचारापासून सर्वसामान्य जनतेची सुटका करून स्वच्छ, पारदर्शक कारभाराची हमी देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाचाही लाचप्रकरणात हात असल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील आयुक्त दिनेश वाघमारे हेच लाचप्रकरणातील खरे सूत्रधार आहेत. पोलिसांनी त्यांचा स्वीय सहायक शिर्के १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या मंगला कदम यांनी केला. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक व लघुलेखक शिर्के एका बांधकाम व्यावसायिकाकडून १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कदम यांनी केली. त्या म्हणाल्या, "शहरात राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटणाऱ्या भाजपाने महापालिका निवडणुकांपासूनच अत्यंत नियोजनबद्धरीतीने स्वतःची कार्यपद्धती राबवयाला सुरुवात केली होती. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी भाजपाला विजयी करण्यासाठी आपली सारी शक्ती, प्रतिष्ठा पणाला लावली होती. सर्वसामान्य जनतेला आपले गोंडस रूप दाखवून भुलवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. शिर्के यांच्या रूपाने भाजपाचा भ्रष्ट कारभारच चव्हाट्यावर आला आहे. " (प्रतिनिधी)
बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranavat) तिच्या चित्रपटांच्या व्यतरिक्त इतर वादग्रस्त मुद्यांसाठी कायम चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती कायदेविषयक बाबींमुळे चर्चेत येत आहे. कंगनाच्या अडचणीत आणख वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगणाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान अंधेरीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये हजर राहण्याविषयी अल्टिमेटम दिला आहे. पुढे होणाऱ्या सुनावणीसाठी कंगणा हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जाहीर केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान कंगना रणावतच्या वकिलाने न्यायालयामध्ये सांगितले आहे की, कंगना सध्या देशात नसल्यामुळे सुनावणी दरम्यान ती हजर राहू शकणार नाही. मात्र गीतकार जावेद अख्तर यांचे वकिल जय भरद्वाज यांनी यास विरोध दर्शवला आहे. कंगना कोणत्याही तारखेला हजर न झाल्यास जामीनपत्र वॉरंट देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. दरम्यान न्यायालयाने कंगनाला इशारा दिला आहे. कंगना रणावतच्या विरोधात जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. परंतु कंगनाच्या न्यायालयात हजर झाल्याच्या संदर्भात अनेकदा गहाळपणा दिसून येत आहे. याआगोदरही त्यांच्याविरोधात वॉरंट देण्यात आले आहेत. न्यायालयाने वारंवार बोलविण्यात आले तरी ती न आल्यामुळे वॉरंट बजावण्यात आले होते. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
श्रीरामपूर : शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी अटक केलेले दोन तरूण हे मराठवाड्यातील असून, ते येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी शुभम श्रीराम जाधव (रा. आंबेजोगाई, जि. बीड) व प्रवीण प्रदीप खुणे (रा. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक केली आहे. ते श्रीरामपूर तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडून एक दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी या दोघांना मंगळवारी दोन रेमडेसिविर इंजेक्शन्ससह पकडले होते. ते ४० हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री एका गरजू रुग्णाला करणार होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. यातील खुणे हा शहरातील एका डॉक्टरांकडे वार्डबॉय म्हणून काम करत होता. याच डॉक्टरांनी आपल्याला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे शहर पोलिसांनी या डॉक्टरचीही कसून चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे. रेमडेसिविरची विक्री करताना तरुणांवर सहजासहजी संशय येत नाही. सोशल मीडियाद्वारे त्यांना गरजू रुग्णांबाबत सहज माहिती उपलब्ध होते. त्यामुळे त्यांना या काळा बाजारात ओढले जात असावे, अशी शक्यता आहे. दुपारी १२ वाजता भाजप कार्यकर्त्यांनी या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अन्न व औषध प्रशासनाची त्यात फिर्याद घेण्यात आली नाही, तर एका कार्यकर्त्यालाच फिर्यादी करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी 'नॉट रिचेबल' होते, असे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी 'लोकमत'ला सांगितले.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी मध्य प्रदेशातील रतलाम येथे सोमवारी एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी प्रियंका गांधींचा एक वेगळं रुप पहायला मिळालं. प्रियंका गांधी लोकांना संबोधित करत असताना त्यांची नजर बॅरिकेट्सजवळ उभ्या लोकांवर पडली. सभा संपल्यानंतर मंचावरुन खाली उतरत असताना त्या गर्दीतील एका महिलेने प्रियंका गांधींना आवाज दिला. आवाज ऐकताच प्रियंका गांधी त्यांच्या दिशेने गेल्या आणि तीन फूट उंच बॅरिकेट्स ओलांडून उडी मारली आणि लोकांमध्ये पोहोचल्या. प्रियंका गांधींना बॅरिकेट्सवरुन उडी मारताना पाहून त्यांचे सुरक्षारक्षकही काही काळ आश्चर्यचकित झाले. प्रियंका गांधींना लोकांशी गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लोकांनी सेल्फीसाठी विनंती केली असता प्रियंका गांधींनी त्यांची इच्छाही पूर्ण केली. After adressing a rally at Ratlam in support of INC candidate Sh. Kantilal Bhuria, when @priyankagandhi was leaving, the ground echoed with "Priyanka didi" by an eager crowd wanting to meet her. याआधी प्रचारसभेत बोलताना प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदी सरकार अहंकारी असून, हा अहंकारच त्यांचा पराभव करेल असं त्यांनी म्हटलं. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सोमवारी इंदौर आणि उज्जैन येथे रोड शो केला आणि रतलाममध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर आरोप केला. नरेंद्र मोदी उद्योगपतींना मदत करत असल्याचं त्यांनी म्हटलं. लोकशाहीत जनता सर्वात जास्त शक्तिशाली जनता आहे, पण मोदी जनतेचं बोलणं ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला. प्रियंका गांधी यांनी राफेलवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींना वाटलं की, आकाशात ढगाळ वातावरण आहेत आता तर रडारच्या तावडीत सापडणार नाही. पण त्यांनी काहाही करो, पकडले तर गेले आहेत. त्यांनी एका अशा उद्योगपतीला काम दिलं ज्याला विमान तयार करण्याचा काहीच अनुभव नाही अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
पुणे देशातील मेट्रो सिटींपैकी एक आहे. शहरात आता प्रत्येकाकडेच एटीएम, डेबिट, क्रेडीट कार्ड आहे. पुणेकरच नव्हे तर देशभरातील नागरिकांना एटीएम, डेबिट, क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत आहेत. स्मार्टफोनमुळे सर्व व्यवहार सुकर झाले आहेत. मात्र खातेदाराला फोन येतो. समोरील व्यक्ती बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगूून कार्ड ब्लॉक होण्याची भिती दाखवतो अन कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतो. अन क्षणार्धात खात्यातील पैसे गायब होतात. तसेच कार्डची क्लोनिंग करून बनावट कार्ड तयार करूनही रोकड गायब केली जाते. फोन करून कमी व्याजदराने कर्ज देण्याचे किंवा नोकरी लावण्याचे अमिष दाखवले जाते. मात्र फोन करणारा भामटा कर्ज मंजूर करण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी करतो. गरजू व्यक्ती कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाईन रक्कम पाठवतो. त्यानंतर कर्जही मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही. बेरोजगार तरुण लवकर नोकरी मिण्याच्या किंवा व्यवसायासाठी कर्ज मिळण्याच्या आशेने बळी पडतात. तर विमा किंवा त्याची रक्कम देण्याच्या अमिषानेही पुणेकरांना जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केली जाते. तर त्यासोबतच व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा भागीदार करून देण्याचे अमिष दाखवले जाते. त्यासाठी व्यक्तीकडून ऑनलाईन पैसे घेऊन व्यवसाय सुरु न करता फसवणूक केली जाते. मोबाईलवर लॉटरी लागल्याचा मेसेज पाठवून ते पैसे सोडवून घेण्यासाठी काही रकमेची मागणी करून फसवणूक केली जाते. मागील काही दिवसांपुर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला अशा प्रकारे लाखो रुपयांना फसविण्यात आले. तर वेगवेगळ्या मॅट्रीमोनियल साईट्सवरून मैत्री करून लग्नाच्या अमिषाने भावनिकदृष्ट्या गुंतवले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळले जातात. - कोणतीही बँक एटीएम, डेबिट, क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती विचारत नाही. त्यामुळे कोणालाही कार्डचा सोळा अंकी क्रमांक, सीसीव्ही क्रमांक किंवा पीन सांगू नका. - सुरक्षा रक्षक नसलेल्या किंवा गर्दी नसलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढताना काळजी घ्या. मशीनला छुपा कॅमेरा, स्कीमर लावलेला नाही ना याची खात्री करा. - नोकरीचे अमिष दाखवले गेल्यास लगेचच पैसे न भरता खात्री करूनच पुढील प्रक्रीया करा. व्यवसायाबाबतही खात्री करूनच पैसे द्या.
पुणे - करारनाम्याचे उल्लंघन करून, तसेच मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टर्स'च्या दोन संचालकांच्या विरोधात चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला कह्यात घेतले आहे. तळमजला आणि दोन मजल्याच्या बांधकामाला अनुमती असतांना ७ मजल्यांचा बनावट बांधकाम नकाशा सिद्ध करून, तो महापालिकेने संमत केल्याचे भासवून त्यावर २४ कोटींचे कर्ज घेतले आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून अशोक थेपडे आणि अमित थेपडे यांच्या विरोधात बनावट कागदपत्र सिद्ध करणे, करारनामाचे उल्लंघन करून फसवणूक करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. तर अमित थेपडे यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा प्रकार वर्ष २००६ ते २०२३ या कालावधीत घडला. अगरवाल यांच्या वाट्यातील ४ कोटी रुपये किमतीचे दुकान आणि साडेदहा कोटी रुपये मूल्य असलेले कार्यालय थेपडे यांनी परस्पर विकले. त्यामुळे अगरवाल यांनी १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीष तुले पुढील अन्वेषण करत आहेत.
नंदूरबारः धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला. जळगावहून सूरतकडे जाणारी खासगी बस कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळील पुलावरून ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींवर विसरवडी, नवापूर व नंदुरबारमधल्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मध्यरात्री २ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. हा अपघात कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते.
A chaiwalla lost life on Samruddhi Expressway : पोटासाठी समृद्धी महामार्गावर चहा विकण्यासाठी गेलेल्या एका चहावाल्याला मागून येणाऱ्या भरघाव टँकरने उडवले. यात चहावाल्याने आपला जीव गमावला. वाशिम : समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासूननच वेग वेगळ्या कारणाने मोठे अपघात होत आहेत. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असाच एक मोठा अपघात आज सकाळी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इंटरचेंजच्या जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने यात एकजण जागीच गतप्राण झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार मृत्युमुखी पडलेले माधव बालाजी वानखेडे (वय ४५ वर्ष रा. ईरळा ता. मालेगाव जि. वाशिम) हे इंटरचेंज जवळ चहा विकत होते. तिथे चहा पिण्यासाठी टँकरचालक थांबला होता. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली व हा अपघात घडला, ज्यात चहा विक्रीसाठी उभे असलेले वानखेडे यांचा मृत्यू झाला, टँकर पलटी झाल्याने व कंटेनरचा समोरील भाग पूर्णपने चुरा झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्याठिकाणी आजचा अपघात झाला तिथून टोल नाका व इंटरचेंज जवळच आहे. इथे समृद्धी महामार्गावरील कर्मचारी नेहमी असतात मात्र चहा विक्रीची ही बाब त्यांच्या निदर्शनास कशी आली नाही हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
प्रवेश पहिला ( गावदेवीवरील एका ब्लॉकमधील खोली. दारांना व खिडक्यांना पडदे लावलेले आहेत. बाजूला एक शेल्फ असून त्यावर कांही पुस्तकें अस्ताव्यस्त पडलेली आहेत. बाजूच्या एका भिंतीला टेकून एक टेबल आहे. त्यावर एक लिहिण्याचें पॅड, पुस्तकें व वह्या पडलेल्या आहेत. दुसऱ्या भिंतीला एक ड्रेसिंग टेबल आहे. त्यासमोर गाणें गुणगुणत, केस सारखे करीत नाला निमकर उभी आहे. ती एक डिझाइनचें सहा वारी पातळ नेसलेली असून तिच्या बिनबाह्यांच्या जंपरवर एक लांब वेणी रुळत आहे. ) नीला - ( दारावरील 'टक् टक्' आवाजाने चमकून मागे पहात ) कोण ? अविनाश ? कधी आलांत ? ( त्याला पाहून झालेला आनंद तिच्या डोळ्यांत प्रतिबिंबित झाल्याशिवाय रहात नाही.) अवि० - ( त्याचे केस चापून चोपून बसविलेले असले तरी कुरळे दिसत आहेत. डोळे पिंगट, तपकिरी रंगाचे असून चेहऱ्यावर हास्य चमकत आहे. आंत येऊं का ? नीला - हो, या ना ! अवि० - (आंत येऊन तिच्या लांब वेणीकडे पहात ) तुमच्या कार्मात व्यत्यय नाही ना आणला मी ?
आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची आवश्यकता दिसत नाहींत. या प्रश्नाला इतकें महत्त्व देण्यांत आलेले दिसतें कीं, त्यामुळे भौतिक शास्त्रवाढीमुळे निष्पन्न होऊं शकणारी सुखसमृद्धि ही सामान्य जनतेच्या आटोक्यांत येणें दूरापास्तच होऊन बसले आहे. शास्त्रीय ज्ञानवाढीच्या द्वारें जनतेस म्हणजेच बहुजनसमाजास किमान अमुक इतक्या तरी सुखसोयी उपलब्ध करून देणें आपले कर्त्यव्य होय, हैं सर्वच राष्ट्रांतील सरकारांना पूर्णत्वानें मान्य असले, तरी तत्पूर्वी आक्रमक परकीयांपासून देश स्वतंत्र व सुरक्षित ठेवण्याची तजवीज करणें हें अधिक महत्त्वाचें कर्तव्य होय, या तत्त्वावर त्यांचे सर्व व्यवहार चालूं असल्यानें संरक्षणात्मक व संहारात्मक शस्त्रांच्या निर्मितीवर सालोसाल कोट्यवधींनीं खर्च होत असतांहि निकृष्ट स्थितींत कसेंबसें दिवस कंठणाऱ्या सामान्य जनतेची स्थिति सुधारणेचें कार्य आर्थिक टंचाईच्या सबबीवर नेहमींच मागें पडतें. हा अनुभव सर्वच राष्ट्रांच्या बाबतींत अधिकउण्या प्रमाणांत आढळून येतो. या शस्त्रास्त्रवाढीचा स्वाभाविक परिणाम म्हणजे एकदां युद्ध पेटलें कीं त्याच्या सर्वभक्षी ज्वालांमध्यें घरेंदारें, कारखाने लोहमार्ग, नौकानयन, मुर्लेमाणसें इत्यादींचा विध्वंस होणें क्रमप्राप्तच होतें. अण्वस्त्रानें मोठमोठीं शहरें, त्यांतील माणसें संपत्तीसह, क्षणार्धात बेचिराख होतात हें गेल्या महायुद्धांत सर्वानीं पाहिलें आहेच. आतां तर विध्वंसनाच्या बाबतींत त्यालाहि बरें म्हणवितील अशी अस्त्रे निर्माण केल्याच्या बढाया सुरूं झालेल्या आहेत. हायड्रोजन बाँब तर इतका विध्वंसक आहे कीं त्याच्या निर्जन प्रदेशांतील नुसत्या चांचणी स्फोटानेंहि सर्व पृथ्वीवरील मानवजातीवर संकट कोसळू पहात आहे; मग त्याचा उपयोग युद्धकालीं करण्यांत आल्यास काय होईल याची कल्पनाच करावी. या अस्त्रांवर व त्यांच्या चांचणीवर बंदी घालण्याच्या वाटाघाटी चालूं असल्याच्या वार्ता मधूनमधून कानांवर येत असल्या तरी युद्ध हा प्रत्येक राष्ट्राच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्यानें, यदाकदाचित् अशी बंदी घातली गेलीच तरी ती प्रत्यक्ष युद्धांत किती काल अमलांत राहूं शकेल याची शंकाच आहे. बहुधा ती मोडली जाईल व या महाभयंकर अस्त्राचा वापर सर्रास केला जाईल असेंच मानण्याकडे मनाची प्रवृत्ति होते. तसे झाल्यास मनुष्य व इतर प्राण्यांचें भवितव्य काय होईल याची कल्पनासुद्धां करवत नाहीं. भावी परिस्थितीचें हें सर्व चित्र डोळ्यासमोर उभें केल्यावर कोणासहि असे प्रश्न सहजच सुचतील कीं हैं सत्र थांबणार केव्हां, मनुष्यजातीला चिरकाल स्वरूपाची सुरक्षितता लाभणार केव्हां व भौतिकशास्त्राच्या प्रगतीचा खराखुरा लाभ तिच्या पदरांत पडणार केव्हां ? कां हें सर्व होण्यापूर्वीच मानवजात नष्ट होणार ? ज्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या सुरक्षिततेच्या नांवावर ही अमानुपता चालली आहे तें स्वातंत्र्य खरोखरच इतक्या मोलाचें आहे काय कीं त्या प्रीत्यर्थ मानवजातीची आहुती देण्यासहि दिक्कत वाटूं नये ? पिकांना धोका उत्पन्न झाला तरी बेहेत्तर पण कुंपण पक्कें झाले पाहिजे अशा पद्धतीची घोडचूक तर यांत होत नाहीं ना ? या व असल्या प्रश्नांच्या उत्तरांचेंच अंतिम पर्यवसान म्हणजे ज्या चक्रनेमिक्रमानें पुन्हां पुन्हां उद्भवणाऱ्या युद्धांत विजय मिळविण्याच्या आशेनें ही अति उत्पातकारी शस्त्रास्त्रे उत्पन्न करण्याचा मोह राष्ट्रांना पडतो त्या युद्धांसच आळा घालणारी एक सार्वराष्ट्रीय योजना आंखून तिची निग्रहानें अंमलबजावणी होईल असा बंदोबस्त करणें हैं होय. जोपर्यंत अशी योजना होत नाहीं तोपर्यंत शस्त्रास्त्रांमार्गे लागल्याबद्दल राष्ट्रांना, विशेषतः संरक्षणेच्छु राष्ट्रांना, दोष देणें उचित होणार नाहीं, स्वराष्ट्र व स्वजनांच्या हितसंबंधाचें रक्षण करणारी दुसरी यंत्रणा नसेल तर तें कार्य स्वतःच पार पाडणें हैं राष्ट्राचें कर्तव्यच होय. मग त्यांत यश येवो अगर कुएए ऐसीओ औऊंअः कखगघुङ चषजत्र ठंडटण तयधन पफबभ्रम यरलवशु पसह कक्षज्ञ मराठीचा विकास महाराष्ट्राचा विकास राज्य मराठी विकास संस्थद्वारे संगणकीकृत 'नवभारत ७५ अमृतमहोत्सवी द्वारा प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई
सम्राट गायकवाड/साताराः एकेकाळी प्रत्येक राजकीय पक्षाची विचारधारा असायची. मात्र, 2014 पासून देशातील सर्वच पक्षाची आणि नेत्यांची विचारधारा बदलण्यास सुरूवात झाली. त्यामध्ये सातारा जिल्ह्याने अलिप्त राहत कॉंग्रेसी विचारधारेची नाळ कायम ठेवली. 2019 मध्ये मात्र, महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यानेदेखील कुस बदलण्यास सुरूवात केली. जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधून कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा विजय झाला. तर सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे मताधिक्य तब्बल अडीच लाखांनी घटविले. तेव्हापासून जिल्ह्यात भाजप-शिवसेनेने पाय रोवण्यास सुरूवात केली. परिणामी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांचा आणि करून घेणाऱ्यांमध्ये विचारधारेचा कोणताही अडसर जाणवला नाही. केवळ मतदारसंघाचा विकास याच मुद्द्यावर प्रवेश करण्यात आला असल्याचे जुजबी उत्तर दोन्ही आमदारांनी दिले. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर पक्षांतर करणारे व येत्या काळात करणाऱ्या नेत्यांचा प्रोफेशनल पॉलिटिक्सचा फॉम्युला सातारा जिल्ह्यातील मतदार स्वीकारतील का? हा खरा प्रश्न आहे. "प्रोफेशनल पॉलिटिक्स'चा फॉर्म्युला सातारा जिल्हा स्वीकारणार? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन आमदारांनी पक्ष शिस्त पाळत सुरूवातीला पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरच भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच त्यानंतर राजीनामा दिलेले शिवेंद्रसिंहराजे व जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना निर्माण झाला. कारण, दोन्ही आमदारांना पुर्वाश्रमीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भरभरून दिल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर खा. शरद पवार व विशेषतः आ. अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंना खंबीर साथ दिल्याचे देखील जनतेने पाहिले. तर जयकुमार गोरे यांना जिल्हा परिषद सदस्य ते आमदार करण्यामध्ये स्व. पंतगराव कदम, स्व. विलासराव देशमुख यांचा मोलाचा वाटा राहिला. पुढे पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून गोरेंना लागेल ती ताकद दिली. उरमोडीचा प्रश्न निकालात काढून आ. गोरेंच्या राजकीय वाटचालीला खऱ्या अर्थाने मोकळी वाट करून दिली. सद्यस्थितीत दोन्ही आमदारांचे मतदार संघात केडर मजबूत आहे. भाजपचा कोणताही उमेदवार त्यांचा पराभव करू शकत नव्हता, असा ग्राऊंड रिऍलिटी रिपोर्ट आहे. तरी देखील त्यांनी मतदारसंघाचा विकास याच मुद्द्यावर अनेक वर्षापासूनची पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच त्यामुळे प्रवेश करणाऱ्या कॉंग्रस-राष्ट्रवादी आमदार आणि प्रवेश करून घेणाऱ्या भाजपमध्ये पक्षीय विचारधारेचा कोणताही अडसर नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु हा राजकीय व्यवहार दोन नेत्यांमध्ये झाला आहे. तो दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना व जनतेला ही मान्य आहे का? याची साधी चाचपणी कोणीही करताना दिसून येत नाही. कारण, प्रत्येकाने कार्यकर्त्यांना व जनतेला गृहीत धरले आहे. मतदारसंघाचा विकास या मुद्द्यावर मतदारराजा आपल्यामागे मेंढराप्रमाणे मागे येईलच, अशी अपेक्षा त्यांना आहे. खरे तर ज्या प्रमाणे यापुर्वी दोन्ही आमदारांच्या अनुक्रमे प्रत्येकी 15 आणि 10 वर्ष मतदारांनी विकासाच्या मुद्यावरच आमदारांना निवडून दिले होते. तेव्हा इतक्या वर्षानंतर देखील अद्याप मतदारसंघाचा विकास आणि प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पक्षांतर होत असेल तर साहजिकच पुर्वाश्रमीच्या पक्षाने त्यांच्यावर घोर अन्याय केला असे म्हणावे लागेल किंवा त्यांनी अन्याय निमूटपणे सहन केला, असे ही म्हणावे लागेल. अशावेळी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो, या वाक्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मात्र, आता ज्या पक्षात कोणताच अन्याय होणार नाही. सन्मानाची वागणूक मिळेल. मतदारसंघाचा विकास ही होईल, अशा पक्षात दोन आमदार गेले आहेत. मात्र, यापूर्वी राज्यात भाजपचे 122 आमदार निवडून आले होते. त्यापैकी सर्वच मतदारसंघात भरीव विकास झाला का? प्रश्नाचे जाणून घेण्यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात मतदारांना सोबत घेवून एखादा पाहणी दौरा आयोजित करणे आवश्यक होते. मात्र, तसा कोणताही प्रयोग करण्यात आला नाही. जरी केला नाही तरी सद्यस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून संपुर्ण जग पाहण्याची सुविधा इंटरनेटने करून ठेवली आहे. भाजपने देशात, राज्यात आणि सातारा जिल्ह्यातही मागील 5 वर्षात किती विकास केला आणि आर्थिक मंदीनंतर करित आहे, हे सर्वजण पहात आहोत. त्यामुळे केवळ मतदारसंघाचा विकास हा प्रोफेशनल पॉलिटिक्सचा मुद्दा पुढे जे पक्षांतर होत आणि होणार आहे, ते जिल्ह्यातील मतदारांना कितपत रूचते कि खुपते, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द वगळता पुढे जिल्ह्यात एकही राज्याला दिशादर्शक प्रकल्प उभारला गेला नाही. काही प्रमाणात धरणांची निर्मिती रडत-खडत करण्यात आली. मात्र, धरणग्रस्तांचे प्रश्न आणि त्याचबरोबर धरणे होवून देखील लाभक्षेत्राला पाणी कॉंग्रेस आणि भाजपच्या राजवटीत मिळू शकले नाही. म्हणूनच आज ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघतात. त्याचबरोबर मागील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणात अडगळीत पडलेले मेडीकल कॉलेजचा प्रश्न भाजप सरकार पुर्णतः सोडवू शकले नाही. त्याचप्रमाणे जिहे-कठापूर योजनेसाठी आता निवडणुकीच्या तोंडावर निधीची तरतूद केली आहे. टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडविणे ही भाजपची खासयित आहे. तेव्हा केवळ पक्ष बदलून मतदारसंघातील प्रश्न सुटतील अथवा विकास होईल, असे नाही. हे सर्व चित्र बदलण्यासाठी राजकीय वजन आणि चिकाटी निर्माण केली तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सो कॉल्ड विकास होवू शकेल. त्या कार्यकर्त्यांचे काय होणार ? दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षामधून विरोध होण्यास सुरूवात झाली आहे. विशेषतः साताऱ्यातील प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक पवार तर माण-खटावमधून माजी आमदार दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी विरोध केला आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या विरोधाची कोणतीही दखल घेतलेली नाही. ही एक बाजू असली तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने भाजपमधील मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे. कारण, दोन्ही आमदारांचे कार्यकर्त्यांचे केडर आहे. हे केडर मूळ भाजप कार्यकर्त्यांना कितपत सन्मान देतील, हा देखील प्रश्न उपस्थित होण्यास सुरूवात झाली आहे.
मुंबई डिव्हिजनच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) मध्ये लोकल ट्रेन मध्ये आता महिला प्रवाशांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकूण आसन व्यवस्थेच्या 23. 33% वरून आता ती 25. 47% करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. गर्दीच्या वेळेस लोकल मध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. हे देखील नक्की पहाः Mumbai: ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी, पहा व्हिडिओ . 12 डब्ब्याच्या लोकल मध्ये 1170 जागांपैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतात. आता पश्चिम रेल्वे कडून जनरल कम्पार्टमेंट मध्ये बदल करून 25 अधिकच्या जागा महिलांना दिल्या जातील असे सांगितलं आहे. यामुळे एकूण आसन व्यवस्था 298 झाली आहे. काही दिवसांपूर्वी लोकल ट्रेन मध्ये बसण्याच्या जागेवरून महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत.
आरमोरी : तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीत समायोजन करण्यात आले नाही. समायोजन तत्काळ करावे, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आरमोरी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत केले. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी शासनाने यादी मागितली होती. त्यानुसार शासनाला माहिती पुरविण्यात आली. ५ जुलै २०१६ रोजी नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. यास आता एक वर्षाचा कालावधी झाला असतानाही पदभरती झाली नाही. त्यामुळे आकृतीबंध तयार होऊन एक वर्षांचा कालावधी उलटून नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले आहे. त्यांच्या समायोजनाची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यांना वेतनश्रेणीसुद्धा लागू झाली नाही. या कर्मचाऱ्यांना नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, अशी मागणी नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. असुरक्षिततेची भावना असल्याने याचा विपरित परिणाम कामावर पडत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पदभरती करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे नगर विकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापूर्वी नगर पंचायत कार्यालयात पदभरती होणे गरजेचे आहे.
महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. (व्यवस्थापकीय विश्वस्त, बॉम्बे सर्वोदय मंडळ) महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. मी १० वर्षांचा असताना गांधीविचारांनी माझ्या मनावर गारुड केले. त्यामुळे मी गांधीजींच्या विचाराप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करु लागलो. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचा व त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही वेळा मला खोटे बोलावे लागते, त्याची खंत आहे. माझे खोटे बोलणे माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांसाठीच असते. मात्र माझ्यातील हा दुर्गुणदेखील कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. गांधी जयंती एक दिवस, एक सप्ताह साजरी करण्याऐवजी त्यांचे विचार दररोज आचरणात आणण्याची गरज आहे. माझे वय ८२ वर्षे आहे. मात्र तरुणाई, नवीन पिढी गांधी विचार पुढे नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुढे येण्यास इच्छुक नाही, हे चित्र मनाला अतिशय वेदना देणारे आहे. नव्या पिढीत गांधी विचार रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ मात्र हव्या त्या प्रमाणात तरुणाई याकडे वळण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून गांधी विचार प्रसार, प्रचार करण्याचे काम करण्यासाठी कोणी इच्छुक स्वतःहून पुढे येत नाही. निःस्वार्थ भावनेने हे काम करण्याची गरज आहे. कॉर्पोरेट संस्कृतीप्रमाणे दर महिन्याला गलेलठ्ठ पगार घेऊन हे काम यशस्वी होणार नाही. मात्र सामाजिक कार्याच्या हेतूने निःस्वार्थ भावनेने गांधी विचार पुढे नेण्यासाठी कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव आहे. एकीकडे मंडळाच्या खर्चात महागाईमुळे सातत्याने वाढ होत असून दुसरीकडे या कार्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठी घट होताना दिसत आहे. ही परिस्थिती चिंताजनक अशीच आहे. देणगीदारांमध्ये मोठी घट झाली आहे. तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये मतपरिवर्तन व्हावे यासाठी आम्ही कैद्यांपर्यत गांधी विचार पोहोचवून त्यांच्या परीक्षा घेतो. एकाही कैद्याचे खºया अर्थाने मतपरिवर्तन झाले तर ते आमच्यासाठी मोठे यश असते. जास्तीत जास्त जणांपर्यंत गांधी विचार पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. वेबसाईटच्या माध्यमातून तरुणाईला याबाबत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेबसाईटला २०१९ मध्ये सुमारे १५ लाख जणांनी भेट देऊन गांधी विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, पाकिस्तान व जगातील १९५ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे. धर्माऐवजी माणूस म्हणून जगण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. सर्वोदय मंडळात गांधी जाणून घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात. गांधी विचारांवर आचरण करणारी माणसे कमी कमी होत चालली असली तरी आमचा लोकांच्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास असून महात्मा गांधीची हत्या करणाºया नथुराम गोडसे प्रवृत्तींना समाज जवळ करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. सध्या गावागावांत द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी विचार किती महत्त्वाचे आहेत याची प्रचीती लोकांना येईल, गांधी विचारांचे महत्त्व लोकांना पुन्हा नक्कीच कळेल. कारण महात्मा गांधींची हत्या झाली असली तरी गांधी विचार कधीच मरणार नाहीत.
पण होतं काय की आपल्याला कोणते उपाय वापरायचे, कोणते नाही वापरायचे याचे योग्य ज्ञान आणि माहिती नसते त्यामुळे अनेकदा नको त्या उपायांवर आपला वेळ खर्च होऊन बसतो. तुम्हाला सुद्धा अस अनुभव आला असेलच की तुम्ही अनेक उपाय करून पहिले पण त्याचा तुमच्या केसांवर परिणामच झाला नाही. पण आता काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आज काही खास उपाय सांगणार आहोत जे तुमचे केस घनदाट आणि लांब करायला मदत करतील. अजून एकदा ट्राय करून पहा आणि हे उपाय नक्की वापरा, तुम्हाला फरक दिसणारच! (फोटो साभार : freepik) सध्या इसेंशीयल ऑईलचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यांची खूप जास्त चलती सुद्धा आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की याचा वापर केवळ केसांसाठीच नाही तर स्किनसाठी सुद्धा केला जातो. खास गोष्ट ही आहे की यामुळे केसांचे लयाला गेलेले सौंदर्य सुद्धा परत मिळते. रोजमेरी आणि लेव्हेंडर हेअर ग्रोथ साठी परफेक्ट समजले जातात. पण तुम्ही तुमच्या पसंतीने कोणतेही इसेंशीयल ऑईल वापरू शकता. ऑईलिंग किंवा हेअर पॅकमध्ये या इसेंशीयल ऑईलचे 4 ते 5 थेंब मिक्स करा आणि अप्लाय करा तुम्हाला स्वतःलाच फरक दिसून येईल. (फोटो साभारः pexels) (वाचा :- Mira Rajput hair fall : केस गळतीने वैतागलेल्या मीरा राजपूतने कापले पौर्णिमेच्या दिवशी केस, सांगितले किती कामी आला 'हा' उपाय. . ! ) केसांसाठी ऐलोवेरा खूप फायदेशीर समजले जाते. याचा गर किंवा जेल देखील तितकाच प्रभावी असते. यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज होते आणि केसांची खुंटलेली वाढ पुन्हा वेगाने सुरु होते. तुम्ही हे जेल स्कॅल्पवर लावून केवळ 30 मिनिटे ठेवायचं आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये तिळाचे तेल सुद्धा मिक्स करू शकता आणि केसांना लावू शकता. महिनाभर सतत अप्लाय केले तर तुम्हाला याचा जबरदस्त प्रभाव पाहायला मिळेल. पण प्रिझर्व्ह केलेल्या ऐलोवेरा जेलचा सहसा वापर करू नका. घरच्या ताज्या व नैसर्गिक कोरफडीच्या पानांतून काढलेला गर वापरणं किंवा घरच्या घरीच ऐलोवेरा जेल बनवून त्याचा वापर करणे उत्तम! (फोटो साभारः pixabay&istock) (वाचा :- Amla Uses For Skin : 50 शीत दिसायचं आहे 20 शी सारखं तरूण? मग फक्त 10 रूपयांच्या 'या' गोष्टीचा असा करा वापरा. . ! ) कांद्याचा ताजा रस केसांसाठी खूप फायदेशीर असतो आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा ठावूक असेलच. कांद्याचा रस हा केसांवर एखाद्या जादूसारखा काम करतो. म्हणून अनेक लोकं आपल्या हेअर रुटीन मध्ये याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर करतात. तुम्हाला जर मोठे केस हवे असतील तर कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या हेअर मास्क मध्ये किंवा हेअर ऑईल मध्ये सुद्धा मिक्स करून अप्लाय करू शकता. बदाम तेल, कांद्याची पेस्ट, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून हेअर पॅक बनवा आणि मग केसांवर लावा आणि 45 मिनिटांनी केस धुवून घ्या. (फोटो साभारः pexels) (वाचा :- Betel Leaf for skin care : एका रात्रीत पिंपल्स बरे करू शकतं 'हे' एक पान, चेहरा ग्लोइंग बनवण्यासोबतच अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर आहे रामबाण. . ! ) राईस वॉटरचा वापर तुमच्यापैकी अनेकांनी या आधी सुद्धा केला असेल आणि हेअर ग्रोथ साठी राईस वॉटर हे खरंच उपयुक्त आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा अप्लाय करूनच तुम्हाला महिन्याभरात खूप जास्त फरक दिसून येतो. राईस वॉटर बनवण्यासाठी आधी तांदूळ शिजवून घ्या. पाणी यात जरा जास्तच ठेवा कारण तेच तुम्हाला हवे आहे. आता कपड्याच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या. नंतर स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवा. थंड झाल्यावर स्प्रे बॉटलच्या मदतीने स्कॅल्पवर लावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी अप्लाय करा. 45 मिनिटे असेच ठेवल्यावर शॅम्पूने हेअर वॉश करा. (फोटो साभारः freepik) (वाचा :- Food For Hair Fall : वयाच्या 60ठी नंतरही केस राहतील घनदाट व लांबसडक, हेअरफॉलही होईल बंद, करा हेअर एक्सपर्ट्सचे हे उपाय! ) तुळशीच्या पानांचे पाणी सुद्धा केसांसाठी चांगले असते. काही लोकांसाठी तर हे एका जादूसारखे काम करते. जर तुमच्याकडे हेअर पॅक लावण्याचा वेळ नसेल तर तुळशीच्या पानांचा वापर करा. यासाठी एक भांड्यात 3 ग्लास पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवून द्या. आता यात तुळशीचे 20 ते 25 पाने मिक्स करा. उकळवून घ्या, जेणेकरून त्यातील रस पाण्यात मिक्स होईल. आता जेव्हा हे उकळेल तेव्हा थंड होण्यासाठी सोडून द्या. आता शॅम्पू केल्यावर या पाण्याने आपल्या केसांना क्लीन करा. या वेळी बोटांनी स्कॅल्पला मसाज देखील करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा दिसून येईल. (वाचा :- सुरकुत्या सोडाच सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या चेह-यावर नाही एकही डाग, वयाच्या 61ठी मध्ये लांबसडक व घनदाट केसांसाठी करते 'हा' 1 उपाय! ) टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
बीडः ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरणार आहे. रासप नेते महादेव जानकर यांनी उद्या रविवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जानकर यांच्या उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महादेव जानकर यांनी रविवारी होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करतील. ओबीसींना लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाद्वारे या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं जानकर यांनी सांगितलं. उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात स्वतः जानकरही सहभागी होणार आहेत. ते मुंबईतील मानखुर्द येथे शेकडो कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन करणार आहेत.
भारतानं आजवर लढलेल्या युद्धापैकी कारगील हे फारकाळ चालेलं युद्ध नव्हतं, तरी या युद्धाच महत्त्व प्रचंड आहे. भारतीय सैन्यानं धैर्य आणि पराक्रमाच्या बळावर हे युद्ध जिंकलं होतं. यावेळी भारतीय सैन्याच्या युद्धकौशल्याची जगभरात चर्चा झाली होती. विक्रम बात्रा (Vikram Batra) यांनी दाखवलेल्या अचाट साहसाच्या जोरावर भारताला हे युद्ध जिंकणं शक्य झालं. त्यांना मरणोत्तर 'परमवीर चक्र' देऊन सन्मानिक करण्यात आलं. १३ जम्मू-काश्मिर रायफलचे कॅप्टन विक्रम बात्रा ७ जुलै १९९९ ला शहिद झाले होते. त्यांच्या आयुष्यावर आलेल्या 'शेरशहा' या सिनेमामुळं त्यांच्या पराक्रमाला परत एकदा याद केलं जातं आहे. (Vikram Batra who won Kargil at the age of 25 by betting on his prowess) कॅप्टन विक्रम बात्रा यांनी वयाच्या २४ व्या वर्षी ती उंची गाठली जिथं पोहचणं प्रत्येक भारतीय सैनिकाचं स्वप्न असतं. कारगिल युद्धात पॉइंट ४८७५ वर कब्जा करण्यात त्यांनी महत्त्वपुर्ण भूमिका निभावली. हिमाचल प्रदेशच्या पालमपुर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. वडील गिरीधारी बात्रा हे शाळेत मुख्याध्यापक होते तर आई शिक्षिका होत्या. पालमपूरमधून शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी चंदगडमध्ये पदवीच शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथं त्यांनी एनसीसीच प्रमाणपत्र मिळवलं. दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांनी सहभाग घेतला. यानंतर त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. पदवीच्या शिक्षणा दरम्यान बात्रा यांची मर्चंड नेव्हीसाठी हॉंगकॉंगमधल्या कंपनीत निवड झाली होती. परंतू त्यांनी देशसेवा करण्याला प्राधान्य दिलं. ही बातमी पण वाचा : या चुकांमुळं अफगाणिस्तानात झाला अमेरिकेचा पराभव ! ४८७५ च्या त्या खास टेकडीला ताब्यात घेण्याची जबाबदारी देखील बात्रा यांच्या मजबूत खांद्यावर सोपवण्यात आली. या टेकडीवर पाकिस्तानी सैन्याची मजबूत नाकाबंदी होती. ही टेकडी जिंकण जवळपास अशक्य होतं. कॅप्टन विक्रम बात्रा यांनी मागचीच रणनिती वापरायचं ठरवलं होतं. तात्काळ त्यांनी यावर कारवाई करायला सुरुवात केली. या दरम्यान ते टेकडीचा कब्जा मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना प्राण गमवावे लागले. भारतातल्या कोट्यावधी लोकांची भावना त्यावेळी गड आला पण सिंह गेला अशीच झाली होती. पाकिस्तानी सैन्याचा दारु पराभव झाला. भारतानं कारगील जिंकलं. यानंतर कॅप्टन विक्रम बात्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. शिवाय ४८७५ टेकडीला कॅप्टन विक्रम बात्रा यांचं नाव देण्यात आलं. ते पालमूरचे दुसरे सैनिक आहेत ज्यांना परमवीर चक्र मिळालं. त्यांच्या आधी मेजर सोमनाथ शर्मा यांना भारतातलं पहिलं परमवीर चक्रान सन्मानित करण्यात आलं होतं. Disclaimer : सदरील माहिती पुस्तकं, वर्तमानपत्रं, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे. यात आम्ही सत्यतेचा दावा करत नाही.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केंद्र सरकारने २६ मार्च २०२० रोजी २१ दिवसांचा लॉक डाउन लक्षात घेऊन देशातील गरीब जनतेला कोणती समस्या येऊ नये यासाठी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी १. ७० कोटींचा निधी पुरवला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा का लाभ देशातील ८० कोटी लाभार्थींना दिला जाईल.
थिरुवनंतपूरम् (केरळ) - केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळात झालेल्या हिंसाचाराची केरळ उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेत 'सार्वजनिक मालमत्तेची हानी सहन केले जाऊ शकत नाही', असे म्हटले आहे. 'अशा प्रकारे कुणीही बंद पुकारू शकत नाही. हा बंद अवैध आहे', असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. Kerala High Court initiates suo motu case against the leaders of Popular Front of India (PFI) for calling a one-day statewide bandh in Kerala. As per a Kerala HC order, nobody can call for a bandh in the state without permission. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेशही न्यायालयाने राज्य प्रशासनाला दिला आहे. 'कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात', असे न्यायालयाने सरकारला सांगितले.
An गळू डोळ्यावर परिणाम होतो मेदयुक्त मध्ये एक encapsulated पोकळी, जे भरले आहे पू. चा विकास पू सह संसर्गाचे लक्षण आहे जीवाणू, अनेकदा तथाकथित झाल्याने स्टेफिलोकोसी. संरक्षण प्रणाली विशेष रोगप्रतिकारक पेशी पाठवून या संसर्गावर प्रतिक्रिया देते, एक प्रकारचा पांढरा रक्त पेशी (ल्युकोसाइट्स), संक्रमणाच्या ठिकाणी. हे तथाकथित न्यूट्रोफिल ग्रॅन्युलोसाइट्स आक्रमणकर्त्याशी लढण्यासाठी जबाबदार आहेत जीवाणू. तर पू नंतर तयार होते, त्यात न्युट्रोफिल ग्रॅन्युलोसाइट्स, जिवाणू घटक आणि संसर्गाच्या क्षेत्रातून मृत ऊतक पेशींचे तुकडे यांचे मिश्रण असते. तत्वतः, ही प्रक्रिया उपयुक्त आहे आणि कार्यक्षम प्रतिरक्षा प्रतिसादाचे लक्षण आहे. तथापि, जर पू बाहेरून बाहेर पडू शकत नाही, तर संक्रमित ऊतीमध्ये एक लहान पोकळी तयार होऊ शकते ज्यामध्ये ती रिकामी होते. नंतर, या पूने भरलेल्या पोकळीभोवती एक पडदा तयार होतोः अ गळू मेदयुक्त मध्ये तयार आणि स्थायिक आहे. तत्वतः, अशी प्रतिक्रिया शरीरात कुठेही होऊ शकते जिथे जिवाणू संसर्ग होतो. हे शरीराच्या आत किंवा शरीराबाहेर होऊ शकते. बर्याचदा त्वचा आणि अंतर्निहित ऊती प्रभावित होतात, कारण रोगजनक त्वचेच्या मोठ्या पृष्ठभागाद्वारे बाहेरून त्वरीत आत प्रवेश करू शकतात. सौंदर्यदृष्ट्या आणि त्याच्या लक्षणांमुळे विशेषतः त्रासदायक आणि धोकादायक देखील असू शकते गळू चेहऱ्याच्या क्षेत्रामध्ये. उदाहरणार्थ, डोळ्यावर गळू दिसल्यास, डोळे मिचकावणे आणि झोपणे या लक्षणांमुळे अधिक कठीण होऊ शकते. तर जीवाणू प्रविष्ट करा लसीका प्रणाली किंवा रक्त, एक दाह लसीका प्रणाली (लिम्फॅन्जायटीस) किंवा रक्त विषबाधा (सेप्सिस) चे गंभीर परिणाम होऊ शकतात. डोळ्यावर गळू असल्यास, ते विशेषतः धोकादायक आहे कारण यामुळे त्वरीत गंभीर आणि जीवघेणा गुंतागुंत होऊ शकते. त्वचेच्या क्षेत्रामध्ये डोळ्यावर गळू दिसल्यास, ते बर्याचदा दुखापतीमुळे होते. बाधित व्यक्तीला अशी दुखापत आठवतही नाही. अगदी लहान जखमा, उदाहरणार्थ खोल ओरखडे, किंवा मुरुम पिळणे, सर्वात वाईट परिस्थितीत जीवाणू त्वचेतून आत जाण्यासाठी पुरेसे असू शकतात. An कीटक चावणे जीवाणूंसाठी प्रवेश बिंदू म्हणून देखील काम करू शकते. तथापि, मोठ्या जखमा, जसे की सर्जिकल जखमा, अर्थातच संसर्ग आणि गळूच्या विकासासाठी देखील जबाबदार असू शकतात. याव्यतिरिक्त, परदेशी शरीरे, उदाहरणार्थ, लाकूड स्प्लिंटर्स, दाहक प्रतिक्रिया, पू तयार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यावर फोड येऊ शकतात. अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना एक गळू च्या कारणे डोळ्यात देखील समान असू शकते. जेव्हा वरवरचा संसर्ग खोलवर पसरतो तेव्हा ही परिस्थिती असते. याला नंतर बॅक्टेरियल ऑर्बिटल ऑब्स्ट्रक्शन किंवा ऑर्बिटल सेल्युलायटिस म्हणतात. याचे इतर महत्त्वाचे कारण म्हणजे जळजळ अलौकिक सायनस (सायनुसायटिस), लॅक्रिमल सॅक (डॅक्रोसिस्टिटिस), द मध्यम कान (ओटिटिस मीडिया) आणि दात. तथापि, दूरच्या भागात संक्रमण, जसे की श्वसन मार्ग, द्वारे रोगजनकांचा प्रसार देखील होऊ शकतो रक्त डोळ्याच्या क्षेत्रापर्यंत आणि गळू तयार होणे.
Used Bike-Scooter buyer's guide : तुम्ही जर सेकेंड हँड बाइक किंवा स्कूटर खरेदी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला सेकेंड हँड वाहन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबतची माहिती मिळेल. Second Hand Two Wheeler : भारतात दरवर्षी १ कोटींपेक्षा जास्त नवीन दुचाकी विकल्या जातात. जगभरात चीननंतरची भारत ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतात जशा नवीन दुचाकी विकल्या जातात, त्याचप्रमाणे लाखो दुचाकींची सेकेंड हँड वाहनांच्या बाजारात देखील खरेदी-विक्री होत असते. ज्यांच्याकडे नवीन दुचाकी खरेदी करण्याइतके पैसे नाहीत असे लोक सेकेंड हँड वाहन बाजारातून दुचाकी खरेदी करतात. तसेच जगाने गेल्या दोन वर्षात कोरोना या साथरोगाची बिकट परिस्थिती निभावून नेली आहे. या काळात स्वतःचं खासगी वाहन असणं किती गरजेचं आहे ही बाब अधोरेखित झाली आहे. तसेच या काळात लोकांच्या बजेटवर लक्षणीय परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांचा ओढा सेकेंड हँड वाहनांच्या बाजाराकडे आहे. तुम्ही देखील एखादी सेकंड हँड बाइक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ४ महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्या कामी येतील. सेकेंड हँड वाहन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमची गरज लक्षात घेतली पाहिजे. आपल्या देशात अनेक प्रकारच्या, वेगवेगळ्या इंजिन क्षमतेच्या, कमी-जास्त मायलेज देणाऱ्या बाइक-स्कूटर उपलब्ध आहेत.तुम्ही रोजच्या प्रवासासाठी बाइक-स्कूटर शोधत असाल, तर तुम्ही जास्त मायलेज देणारं मॉडेल खरेदी करायला हवं. स्कूटरपेक्षा बाइक चांगलं मायलेज देतात. मात्र तुमच्या घरात कोणी महिला असेल तर तुम्ही दोघेही वापरू शकाल अशी स्कूटर खरेदी करणं चांगला पर्याय असेल. जे वाहन तुम्ही खरेदी करताय तेच मॉडेल जर शोरूममधून खरेदी करायचं असेल तर किती रुपये द्यावे लागतात. या किंमतीतला फरक विचारात घेऊनच वाहन खरेदी करा. कोणतंही वाहन जर तुम्ही सेकेंड हँड वाहनांच्या बाजारातून खरेदी करत असाल तर तर सर्वात आधी टेस्ट राईड घ्या. वाहन किती चांगलं आहे, त्यात काही दोष आहेत का याबाबतची माहिती तुम्हाला टेस्ट राईडदरम्यान मिळेल. इंजिनच्या आजूबाजूला कुठे तेल गळती होतेय का ते तापासा. फ्रेममध्ये गंज, इंजिनमधून धूर निघणे, इंजिन वगळता कोणताही वेगळा आवाज, क्लच नीट आहे का या गोष्टींकडे लक्ष द्या. तसेच गाडीचे टायर्स देखील तपासा. गाडीचे टायर्स देखील खूप महत्त्वाचा भाग असतात. वाहन किती चांगलं आहे हे देखील टेस्ट राईडदरम्यान कळेल. वाहन खरेदी करण्यापूर्वी त्या वाहनाची सर्व कागदपत्रं तपासा. योग्य कागदपत्रांशिवाय गाडी खरेदी केल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (नोंदणी प्रमाणपत्र), पोल्यूशन सर्टिफिकेट (प्रदूषण प्रमाणपत्र) आणि चालानसह इंजिन आणि चेसिस क्रमांकाशी जुळणारी कागदपत्रे तपासणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. याशिवाय NOC सोबत RTO ने जारी केलेला फॉर्म २८, २९ आणि ३० देखील तपासा. तसेच सर्व्हिसिंगशी संबंधित कागदपत्रे तपासा. याशिवाय वाहन खरेदीनंतर इन्शूरन्स (विमा) तुमच्या नावावर हस्तांतरित झाला आहे का ते देखील तपासा. जर तुम्हाला वाहन आवडलं असेल आणि विक्रेता जास्त किंमत मागत असेल, तर तुम्ही त्याच्याशी बार्गेनिंग केलं पाहिजे. कारण प्रत्येक वाहन विक्रेत्याला जुन्या वाहनाची जास्तीत जास्त किंमत हवी असते. याशिवाय, तुम्ही वाहनाची सध्याची बाजारपेठेतील किंमत तपासली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्या मूळ किंमतीची कल्पना येईल. जे वाहन तुम्ही खरेदी करताय ते किती जुनं आहे आणि त्या वाहनाचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यावरून तुम्ही त्या वाहनाची किंमत ठरवायला हवी. वाहन तपासायला आणि त्याची किंमती ठरवण्यात मदतीसाठी सोबत एखाद्या मेकॅनिकला घ्या. त्यामुळे तुमची मदत होईल. महत्वाचे लेख2022 Maruti Brezza च्या लाँचिंगआधीच फीचर्स लीक, सनरूफसह सेफ्टी फीचर्सचा भरणा, नवीन कारमध्ये काय असेल खास?
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणासह (म्हाडा) लाभार्थ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने बांधकाम व्यावसायिकाला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज प्रकाश येवला (वय ३५, रा. रहाटणी, पिंपरी-चिंचवड) असे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शासन नियमानुसार विकसकाने एकूण क्षेत्रफळाच्या २० टक्के जागेवर अल्प उत्पन्न गटाअंतर्गत म्हाडाला सदनिका उपलब्ध करुन बंधनकारक आहे. मे २०१९ मध्ये म्हाडाने काढलेल्या लॉटरीत भूमी कन्स्ट्रक्शनतर्फे पंकज येवला यांनी सादर केलेल्या भूमी ब्लेसिंग या गृहप्रकल्पाचा समावेश होता. त्याअनुषंगाने म्हाडाने काढलेल्या लॉटरीत जून २०१९ मध्ये लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार लाभार्थ्यांना देकार पत्र देण्यात आले होते. लाभार्थी आणि विकसक यांच्यात करारनामा झाल्यानंतर सदनिकेच्या मोबदल्यापोटी ७० टक्के रक्कम मिळाली होती. पंकज येवला यांनी करारानुसार लाभार्थ्यांना २० सप्टेंबर २०२० पर्यंत गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करुन ताबा देणे बंधनकारक होते. मात्र, येवला यांनी ताबा दिला नाही. ताबा मिळण्यास विलंब झाल्याने लाभार्थ्यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी तक्रार केली होती. येवला यांच्याशी म्हाडाच्या पुणे कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. त्यांची बैठकही झाली होती. त्या वेळी ३१ मार्च २०२२ पूर्वी लाभार्थ्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर येवला यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी उपोषण करण्याचा इशारा नोटीशीद्वारे दिला होता. त्यानंतर म्हाडाने या प्रकरणात पोलिसांकडे फिर्याद दिली होती. म्हाडाकडून विधी सल्लागार एड. श्रीकांत ठाकूर आणि मालेगावकर अँड असोसिएटसकडून एड. सिद्धांत मालेगावकर यांनी बाजू मांडली. म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
सोलापुर / पंढरपूर (प्रतिनिधी) - पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार पंढरपूरच्या पत्रकार बांधवांना आज जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तुर दाळ, हरभरा दाळ, पोहे, मेडीमिक्स साबण, गोडे तेल, मीठ, खोबरेल तेल, चहा पावडर, शेंगदाणा, रवा व सॅनेटायझर, मसुर दाळ, गहु, तांदुळ असा किराणा माल व अत्यावश्यक वस्तु देण्यात आल्या. यासाठी व्हीएनएस ग्रुपचे संतोष वायचळ, चंद्रभागा साखर कारखान्याचे संचालक नागेशदादा फाटे यांनी यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत केली तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचे वतीने 75 किलो गहु व 75 किलो तांदुळ देण्यात आले. मनसेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक दिलीपराव धोत्रे यांचेकडून गहु, तांदुळ, साखर, चहा पावडर असे स्वतंत्र कीट देण्यात आले. आज व्हीएनएस ग्रुपचे व्यवस्थापक राजुभाई मुलाणी, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख समाजसेवक ओंकार बसवंती, शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ.आरती बसवंती यांच्या हस्ते शिवयोगी मंगल कार्यालय लिंक रोड, पंढरपूर येथे सोशल डिस्टन्स राखुन हे वितरण करण्यात आले. पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पंढरपूर कार्याध्यक्ष झाकीर नदाफ, अध्यक्ष श्रीकांत कसबे, उपाध्यक्ष तानाजी जाधव, खजिनदार अशोक पवार, प्रसिध्दीप्रमुख संजय हेगडे यांच्या प्रयत्नातुन हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी पत्रकार विरेंद्रसिंह उत्पात, जैनुद्दीन मुलाणी, संतोष कांबळे, शंकर पवार, शंकर कदम, लक्ष्मण जाधव, धीरज साळुंखे, उमेश टोमके, गौतम जाधव, नंदकुमार देशपांडे, अशोक पवार, लखन साळुंखे, तानाजी सुतकर, डॉ.शिवाजी पाटोळे, आदी उपस्थित होते.
राज्यातील सुप्रसिद्ध कार्ला, लोणावळा येथील श्री एकवीरा देवीच्या गडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता यात्रा आणि पालखी सोहळा रंगणार आहे. २५ मार्च रोजी पहाटे ४ वाजता तेलवण आणि मानाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्यभरातून लाखो भाविक गडावर श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यासाठी येणार आहेत. भाविकांना पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यासाठी पुणे जिह्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी सौरभ राव आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहसुवेझ हक यांच्या तसेच विविध खात्याच्याअधिकाऱयांसह एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे आणि इतर विश्वस्त उपस्थित होते. बैठकीला एच. डी. ओ राजेंद्र मुके, प्रांत अधिकारी सुभाष भगारे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिवतारे तसेच विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी आणि एकवीरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, सहखजिनदार विलास कुटे, सचिव संजय गोविलकर, विश्वस्त सल्लागार, काळुराम देशमुख, विश्वस्त विजय देशमुख या भाविकांच्या वतीने विद्या म्हात्रे उपस्थित होत्या.
बुधवारी आठवडेबाजार असल्याने मनपाचे अतिक्रमण पथक सकाळी गंगाघाटावर दाखल झाले, त्यावेळी शुकशुकाट होता तर दुपारी विक्रेत्यांनी दुकाने थाटून आठवडेबाजार बसविला. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आठवडेबाजाराला बंदी घातली असताना बाजार बसल्याचे निदर्शनास येताच मनपा पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे व पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक भूषण देशमुख, राजेंद्र सोनवणे, दीपक मिंधे, संजय बोरसे आदींनी कारवाई केली. यावेळी विक्रेत्यांचे रिकामे पोते, कॅरेट, भाजीपाला जप्त करत वाहनात ध्वनिक्षेपकाहून नागरिकांना सूचना दिल्या. औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेत दर बुधवारी व रविवारी आठवडेबाजार भरतो. कोरोना पार्श्वभूमीवर बाजार भरवू नये, याबाबत सूचना दिल्यानंतर सकाळी काही विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मनपा अतिक्रमण पथकाने निलगिरी बागेत जात भाजीबाजार उठविला. बाजार बसविण्यास परवानगी नसल्याने भाजी विक्रेत्यांनी पंचवटी विभागीय कार्यालयात जाऊन प्रभाग सभापती शीतल माळोदे यांची भेट घेत यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली असता माळोदे यांनी प्रशासनाशी ठोस चर्चा करत मार्ग काढणार असल्याचे सांगितले. कोरोना नियम पायदळी तुडवत जात असल्याने पंचवटी मनपा पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, नियम पायदळी तुडविणारे काही व्यावसायिक थेट लोकप्रतिनिधींना फोन करून कारवाईसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन देत राजकीय दबाव आणत असल्याने कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला खाली हात परतावे लागते. (फोटो १७ बाजार)
गोंडपिपरी : तालुक्यांतील करंजी गावाला तंटामुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झाला. मात्र, दारूबंदीनंतरच्या काळात गावात सद्यःस्थितीत अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. यासह करंजी-चेकपेल्लूर रस्त्यावर चंद्रपूर येथील एका बड्या दारूविक्रेत्याने आपले दुकान थाटले आहे. बिनदिक्कतपणे दारूविक्री सुरू केली आहे. ही दारूविक्री समूळ बंद करावी, अशी मागणी गावातील काही नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे. दारूबंदी काळापासूनच जिल्हा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात तस्करीतून दारू आयात केली जाते. अशातच तालुक्यातील करंजी गावात, तसेच करंजी-चेक पेलूर या मार्गावर एका अवैध दारू विक्रेत्याने ठाण मांडले असून, खुलेआम दारू विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. असे असताना या दारूविक्रीवर कुणाचेच अंकुश नसल्याचे चित्र आहे. सोबतच करंजीच्या परिसरात गावात कोंबडबाजार, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी करंजी गावातील महिलांनी एकत्र येत दारूविक्री सुरू असतांना गावातील वैध दारूचे दुकान बंद पाडले. यामुळे महिला शक्तीचा विजय झाला अन् करंजी गावात शांतता आणि सुव्यवस्था नांदू लागली. याउलट आता मात्र दारूबंदीच्या काळात करंजी गावासह परिसरातील गावात दारूविक्रीला सुगीचे दिवस आले आहेत. ही दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी करंजी गावासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने अनेक जण घरात आहेत. त्यामुळे विरंगुळा म्हणून ऑनलाईन फिल्म्स, वेबसीरिज पहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे ऑनलाईन फिल्म्स, बेवसीरीज पहात असाल तर सावध रहा. अशा वेबसीरिज आणि फिल्म्स पाहणं तुम्हाला महागात पडू शकतं. कोरोना लॉकडाऊनच्या या काळात हॅकर्स आपला चांगलाच फायदा करून घेत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागाने अलर्ट जारी केला आहे. काही ऑनलाइन फिल्म्स आणि वेबसीरिज पाहणं चांगलंच महागात पडू शकतं, असं सरकारने सांगितलं आहे. ऑनलाईन फिल्म्स पाहण्याच्या नादात तुमचा प्रायव्हेट डेटा चोरीला जाऊ शकतो हॅकर्स यावर टपून बसले आहेत, अशी सूचना जारी करण्यात आली आहे. असे दहा चित्रपट आणि दहा वेबसीरिजची यादी सरकारने जारी केली आहे. यामध्ये दिल्ली क्राईम, ब्रुकलीन नाइन-नाइन अशा वेबसीरिज तर मर्दानी, छपाक, जवानी जानेमन, बाहुबली अशा चित्रपटांचा समावेश आहे. सरकारने जारी केलेल्या वेबसीरिज आणि फिल्म्सच्या यादीमधील वेबसीरिज तुम्ही पहात असाल, चित्रपट ऑनलाइन पहात असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर सावध रहा. ऑनलाइन मुव्ही पाहताना कोणतीही परवानगी देऊ नका. नाहीतर हँकर्स तुमचा पर्सनल डाटा चोरी करू शकतात, असं सायबर विभागाने सांगितलं आहे.
कतार : विश्वचषक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने आपली विजयी सुरुवात केली आहे. अहमद बिन अली स्टेडियमवर बुधवारी (२३ नोव्हेंबर) रात्री उशिरा रंगलेल्या सामन्यात बेल्जियमने कॅनडावर मात केली. कालच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने कॅनडाचा १-० असा पराभव केला. बेल्जियमच्या विजयाचे सर्व श्रेय मिची बत्सुई आणि गोलकीपर थिबॉट कोर्टोइस या दोन दिग्गज फुटबॉलर्सना जाते. गोलकीपर थिबॉट कोर्टोइसने कॅनडाचा पेनल्टी किकवर गोल करण्याचा प्रयत्न अयशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. तर, बत्सुईने एक गोल डागत संघाला विजय मिळवून दिला. फर्स्ट हाफमध्ये दोन्ही संघ आक्रमक दिसून आले. ३६ वर्षांनंतर विश्वचषक खेळण्यासाठी आलेला कॅनडाचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत होता. फर्स्ट हाफमध्ये एकूण १४ शॉर्टस् घेतले, पण गोल डागण्यात यशस्वी झाले नाहीत. याचदरम्यान, सामन्याच्या दहाव्या मिनिटाला कॅनडाकडे गोल डागण्याची सुवर्णसंधी आली. सामन्याच्या सेकंड हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल डागता आला नाही. या हाफमध्ये कॅनडाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. पण बेल्जियमचा गोलकीपर कोर्टोइसच्या बचावापुढे कॅनडाचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर बेल्जियमने १-० अशा फरकाने सामना जिंकत तीन गुण मिळवले.
म. टा. खास- मोबाइलवर कादंबरी... ही नवी कल्पना आता प्रत्यक्षात उतरलीय. पिंकी विराणी यांच्या नव्या कादंबरीचा विषय मोबाइल कादंबरीसाठी योग्य ठरलाय. केईएममधल्या अरुणा शानभाग नावाच्या नर्सवर झालेल्या बलात्काराची कैफियत पुस्तकरूपाने मांडणाऱ्या पिंकी विराणी यांची 'डेफ हेवन' ही नवी कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे ती भारतातील पहिलीच मोबाइल कादंबरी असणार आहे. म्हणजे ही कादंबरी वाचकांना चक्क मोबाइलवर वाचनासाठी उपलब्ध होणार आहे. कशी... वाचकांना पाठवल्या जाणाऱ्या ९० टेक्स्ट एसएमएसच्या माध्यमातून! पुस्तकरूपाने ही कादंबरी छापली जाणार आहेच. शिवाय ऑॅडियो मोबाइल बुक आणि मोबाइल कादंबरी अशा तिहेरी स्वरूपात 'डेफ हेवन' वाचकांच्या भेटीला अवतरणार आहे. मोबाइलवर ९० एसएमएसच्या माध्यमातून या कादंबरीचे टेक्स्ट पाठवले जातील. हे टेक्स्ट एकत्रित करून कम्प्युटरवर कादंबरी कॉपी केली जाऊ शकते. तर ऑॅडियो मोबाइल बुकमध्ये प्रत्येकी २० मिनिटांचे दोन भाग असणार आहेत. रेडिओवरील नाटकासारखे या ऑॅडियो कादंबरीचं स्वरूप असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या आवाजांमध्ये या कादंबरीतील पात्रं त्यातील कथानक वाचकांना ऐकवणार आहेत. या स्वरूपाचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असणार आहे. पिंकी विराणी यांनी यापूवीर् 'अरुणाज स्टोरी', 'वन्स वॉज बॉम्बे' आणि 'बिटर चॉकलेट' अशा तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 'डेफ हेवन' ही त्यांची चौथी कादंबरी होय. पिंकी विराणी यांनी ही कादंबरी लिहायला घेतली तेव्हा ती भारतातील पहिली मोबाइल कादंबरी असेल, असं वाटलं होतं का, अशी विचारणा केली असता विराणी सांगतात की, नाही. मी माझ्या कादंबरीचा पहिला ड्राफ्ट वाचत असताना ही कल्पना सुचली. मी पुस्तकाच्या संपादकांना म्हणाले, हल्ली कुणीही पत्र लिहिण्यासाठी पोस्टकार्डची वाट पाहत बसत नाही. कादंबरीतील नफिसा आणि झारंधरी या पात्रांकडे बघा. ती पात्रं एकमेकांना भेटत नाहीत, परंतु एसएमएस पाठतात. जेव्हा कादंबरीचा तिसरा ड्राफ्ट तयार होत आला तेव्हा, आपण मोबाइल कादंबरी लिहावी, अशी कल्पना सुचली.
रिअल इस्टेटची विक्री ही एक जबाबदार व्यवसायाची आहे ज्यासाठी रिटर्न आवश्यक आहे. आज अशा अनेक स्कॅमर आहेत जे अशा सौदात लोकांना फसवतात. याव्यतिरिक्त, प्रचंड स्पर्धा आणि जोखीम केवळ आर्थिक संकुचित होऊ शकत नाही, तर इतर समस्यांमुळे उद्भवते, उदाहरणार्थ, मनाची शांती, आरोग्य इत्यादी. अशा परिस्थितीत, अपार्टमेंटच्या विक्रीसाठी निकोलाय चुडूोत्र्वेट्सची मदत मिळू शकेल. एक संत व्यक्तीला आत्मविश्वास वाढवण्यास , अनैतिक खरेदीदारांची सुटका करण्यास आणि कोणत्याही समस्यांशिवाय एक करार करण्यास मदत करेल. बऱ्याच लोकांना निकोलस द वंडरवर्कर हा देवाचा उजवा हात मानतो, त्यामुळे या संतला प्रामाणिक आवाहन ऐकता आणि समजले जाते. पाळकांनी असा युक्तिवाद केला की आशीर्वाद, धन्यवाद आणि प्रार्थनेसह कोणत्याही गंभीर बाबने सुरुवात करावी. उच्च ताकदींच्या मदतीमुळे एखाद्या व्यक्तीला चांगले खरेदीदार मिळू शकते आणि गुंतागुंत न होता फायदेशीर व्यवहार करता येतो. विविध संतांकडून मदत शोधा, परंतु बहुतेक लोक निकोलस द वंडर-वर्कर्स प्रार्थना करतात. सुरुवातीला तुम्हाला चर्चमध्ये जाण्याची आवश्यकता आहे, पवित्र मेणबत्तीच्या प्रतिमेपुढे ठेवून व अचल संपत्तीच्या विक्रीबद्दल अशी प्रार्थना करणे आवश्यक आहे की निकोलाई वंडरवर्करलाः एक अपार्टमेंट विक्री आणि उदार च्या खरेदीदार खाली पाठविले, प्रामाणिक आणि गरीब नाही तुझी इच्छा पूर्ण होईल. आमेन. " त्यानंतर, घरी जा आणि निकोलसच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावा आणि नंतर, निकोलाई वंडरवर्करला अपार्टमेंट विकण्यासाठी मदतीसाठी प्रार्थना वाचा. "द वंडरवर्कर निकोलस, मी तुम्हाला विनवणी करतो. मला दुः ख सोबत संबंधित आहे, प्रामाणिक आणि खुशाल खरेदीदार. व्यवस्थापित करेल तुझी इच्छा पूर्ण होईल. आमेन. " ग्राहकांच्या आगमनापूर्वी प्रार्थना वाचल्यानंतर विधीची पुनरावृत्ती करा. लेनदेन यशस्वीरित्या आयोजित होईपर्यंत रोज निकोलस द मिरॅकल वर्करला पत्ता. संत आणखी कशासाठी मदत करतो? निकोलसला चमत्काराचे कार्यकर्ते न केवळ एका अपार्टमेंटच्या यशस्वी विक्रीसाठीच नव्हे तर अन्य समस्या सोडवण्यासाठीही प्रार्थना करू शकतातः - हे संतांना शारीरिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही आजारापासून बरे करण्यास मदत करते. - जर एखादी व्यक्ती अडचणीत आहे आणि अज्ञात कृती कशी चालू ठेवावी तर आपण निकोलास द वंडर-वर्कर्सकडे वळू शकतो आणि तो योग्य मार्गाचे मार्गदर्शन करेल. - पालक आपल्या मुलांना विविध त्रासांपासून वाचवण्यासाठी संतला प्रार्थना करतात. प्राचीन काळापासून, आपल्या मुलाला रस्त्यावर पाठवताना, आईनी त्यांची देखभाल करण्यासाठी वेन्डरवर्करकडे वळले. जर तो अचानक एखाद्या वाईट कंपनीशी संपर्क साधला तर त्याला योग्य रस्त्याकडे घेऊन जाण्यास मदत करेल. - एका चांगल्या सोबत्याची मदत घेण्यास आणि यशस्वीरीत्या विवाह करणारी एकाकी महिला संतला विचारा. विवाहातील स्त्रिया कुटुंबांतील शांती व प्रेमासाठी प्रार्थना करतात. लक्षात ठेवा निकोलसला कोणतीही प्रामाणिक अपील चमत्कारी कामगार ऐकण्यात येईल आणि आपण मदत मिळविण्यास सक्षम असाल.
कांचेची किमया सहा वर्षांचा देखील नव्हतों मी तेव्हां. नुकताच कोठें शाळेंत जाऊं लागलों होतों. गणूदादा इंग्रजी दुसरींत होता. एकादा नवीन शब्द माहित झाला म्हणजे त्याचा पुनःपुन्हां उच्चार करण्यांत, आणि त्याचा अर्थ ताईला अन् मला सांगण्यांत त्याला मोठी मौज वाटे. नुकताच तो आपल्या पुस्तकांतला "रामू आणि न्यायाधीश' हा धडा शिकला होता. शाळेतून घरी येतांच गणूदादानें मला सांगितलें, आपल्यापेक्षां मोठ्या असलेल्या माणसाला नमस्कार करावयाचा असल्यास इंग्रजीत त्याला " गुड मॉर्निंगू " म्हणतात. झालें ! आई, ताई, गणूदादा या सर्वांना मी सकाळ-संध्याकाळ 'गुड मॉर्निंग' करायचा ! बाबाच काय ते एक सुटले होते. जूलिया बरीच उंच होती, खूब गोरी होती आणि ती सुरेख पण होती. सायकलवरून इकडून तिकडे मारे मिरवत असे नेहमीं. थोरा७८
No Shave November 2020 Meaning & Rules: नोव्हेंबर महिना हा सोशल मीडियाच्या जगात 'नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणून ओळखला जातो. या महिन्यात 'नो शेव्ह नोव्हेंबर' (No Shave November) शिवाय 'मूव्हंबर' (Movember) नावानेदेखील एक खास मोहीम चालवली जाते. जगभरात गेल्या अनेक वर्षांपासून नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही मोहीमा सुरू आहेत. या दोन्ही मोहीमागील उद्देश कॅन्सरबद्दल जनजागृती करणं हा आहे. साधारणतः कर्करोग झालेल्या रुग्णाचे केस गळतात. त्यामुळे आपण केस वाढवून, दाढी न करता पैसे वाचवून ते कॅन्सरग्रस्तांसाठी आणि पुरुषांना होणाऱ्या आजारांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थाना दान करायचे, असाही या मोहीमागील महत्त्वाचा उद्देश आहे. नोव्हेंबर महिना लागला की, सोशल मीडियावर 'नो शेव्ह नोव्हेंबर' हा ट्रेंड होता. जगभरातील अनेक तरुण या ट्रेंडला चांगला प्रतिसाद देतात. आज आपण या लेखातून 'नो-शेव्ह नोव्हेंबर' आणि 'मूव्हंबर' म्हणजे काय? आणि याचा कर्करोगाशी कसा संबंध आहे हे जाणून घेऊयात. 'नो-शेव्ह नोव्हेंबर' ही महिनाभर चालणारी मोहीम असून या मोहीमेअंतर्गत कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी जागरूकता आणि निधी जमा केला जातो. याद्वारे कर्करोगाच्या संशोधन, शिक्षण आणि त्यावरील उपचार / प्रतिबंधासाठी मोहिमा आयोजित केल्या जातात आणि निधी जमा केला जातो. सोशल मिडियावर तसेच ऑफलाइन देखील ही मोहिम राबवली जाते. ज्याचा हेतू केमोथेरपीमुळे केस गमावावे लावलेल्या कर्करोग झालेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढविणे हा आहे. ( हेही वाचा - World Vegan Day 2020: Vegetarianism आणि Veganism मध्ये नेमका फरक काय? ) ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात 1999 मध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहीम सुरू केली होती. दरवर्षी जगभरात 'वर्ल्ड बिअर्ड अँड मुस्टॅश कॉम्पिटिशन' ही स्पर्धा घेतली जाते. त्यातून 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही संकल्पना पुढे आली. त्यानंतर या मोहिमेचं आवाहन स्विकारणाऱ्या तरुणांनी ही संकल्पना सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर 'नो शेव्ह नोव्हेंबर' हा ट्रेंड आला. महिनाभरात दाढी करण्यासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढे पैसे कर्करोग झालेल्या रुग्णासाठी दान करण्याची प्रथा पुढे आली. ही चळवळ जगभरात प्रसिद्ध झाली. तेव्हापासून नोव्हेंबर महिन्यात तरुण पैसे जमा करून ते कर्करोग झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी स्वयंसेवी संस्थाना दान करतात. 'नो-शेव्ह नोव्हेंबर'चे नियम अत्यंत सोपे आहेत. आपल्याला नो-शेव्ह नोंव्हेंबर नावातचं या मोहिमेच्या नियमांची कल्पना समजते. नो-शेव्ह नोंव्हेंबर मोहिमेमध्ये महिनाभर म्हणजेचं 30 दिवस पुरुष दाढी करत नाहीत. आपण आपल्या दाढीची देखभाल करण्यासाठी जे काही पैसे खर्च कराल, ते तुम्ही या मोहिमेसाठी देणगी म्हणून देऊ शकता. या मोहिमेचे नियम अगदी सोपे आहेत. याशिवाय या मोहिमेअंतर्गत तुम्ही #NoShaveNovember फोटो पोस्ट करू शकता आणि इतरांनादेखील यात भाग घेण्यास प्रोत्साहित करू शकता. नो-शेव्ह नोव्हेंबर आणि मूव्हम्बर या दोन्ही मोहिमा थोड्याफार प्रमाणात सारख्या आहेत. 2003 मध्ये मूव्हंम्बर फाऊंडेशनने ऑस्ट्रेलियामध्ये मूव्हंबर मोहिमेची सुरुवात केली होती. नो-शेव्ह नोव्हेंबर प्रमाणेचं मूव्हंबर हीदेखील एक जागतिक चळवळ आहे. ज्यामध्ये 21 देशांचा समावेश आहे. मात्र, या मोहिमेचे लक्ष केवळ मिशावर आहे. या दोन्ही मोहिमा पुरुषांच्या वैद्यकीय समस्यांकडे लक्ष वेधून घेतात.
Washim News : ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार. वाशिम : जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जल जीवन मिशनचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. बी. साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. पी. राऊत, उपअभियंता सर्वश्री एस. पी. बोरकर, एस. एन. राठोड, डी. जी. होळकर, आर. टी. नारकर, सहायक अभियंता व्ही. एल. गिरी, जे. पी. तायडे यांची उपस्थिती होती. या सभेत ११ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या ५१ कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जल जीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणारी पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्ह्यातील ५१ गावातील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता साळुंखे यांनी दिली.
पंजाब मधील गहू आणि भातपिकाचे अवशेष जाळल्यामुळे (Stubble Burning) होणारे प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. थेट सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणी आदेश द्यावे लागले होते. पंजाबमध्ये भातकापणीच्या काळात साधारणपणे १२० दशलक्ष टन अवशेष जाळले जातात. त्यामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, पंजाब आणि हरियाणाला प्रदूषणाच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रकार थांबवण्यासाठी पंजाब सरकार पुरेशा उपाययोजना करत नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कानउघडणी केली होती. शेतकऱ्यांचे केवळ प्रबोधन करण्यावर धन्यता मानण्यापेक्षा त्यातील मूळ समस्येला हात घालण्याची गरज अनेक जाणकारांनीही व्यक्त केलेली आहे. अखेर बरीच भवति न भवति झाल्यानंतर पंजाब सरकारने पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याचे जाहीर केले. त्यासाठी राज्याच्या कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पीक काढणीनंतरच्या अवशेषाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तरीही राज्यातील पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने किसान ड्रोनचा (Kisan Drones) वापर करण्याचे ठरवले आहे. पंजाबमध्ये साधारणतः २९ ते ३१ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. गव्हाप्रमाणे भातपिकाचे (Paddy) अवशेष जनावरांच्या चाऱ्यासाठी (Animal Feed) उपयुक्त ठरत नाहीत, त्यामुळे पुढचं पीक घेण्याआधी शेतकरी ते जाळून टाकतात. राज्याच्या कृषी विभागाच्या सततच्या आवाहनानंतरही भातपिकाच्या हंगामातील अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट हे प्रमाण वाढल्याचे दिसते. २०२१ च्या भातपिकाच्या हंगामात राज्यभरात ७१,२४६ ठिकाणी अवशेष जाळण्यात आले. २०२० मध्ये ७६,५९० ठिकाणी अवशेष जाळले होते. २०१९ साली हे प्रमाण ५२,९९१ होते. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या कृषी विभागाने किसान ड्रोनचा वापर करून ही समस्या सोडवण्याची तयारी केली आहे. कृषी रसायनांच्या फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचा वापर अवशेष जाळणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाणार आहे. तसा प्रस्ताव राज्याच्या कृषी विभागाकडून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. केंद्र सरकारकडे त्यासाठी ५३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण (Farm Mechanization) योजनेतून हा निधी मिळावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्याच्या कृषी विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, हा निधी राज्याकडून बहूउद्देशीय किसान ड्रोन खरेदीसाठी वापरला जाणार आहे. असे ७० किसान ड्रोन (Kisan Drone) खरेदी केले जाणार आहेत. कृषी रसायनांच्या फवारण्यांसोबतच या ड्रोनच्या माध्यमातून अवशेष जाळण्याचे प्रकार नियंत्रणात ठेवण्यात येणार आहेत. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
सोलापूर - माहेरी असलेल्या पत्नीकडे आलेल्या पतीने तिला नांदवणार नाही, घटस्फोट दे म्हणत तिला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच सासू व सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी बॅटने पायावर व कपाळावर मारून जखमी केले. या प्रकरणी शशिकांत राम हिरवडे (रा. कामगार वसाहत, सुनील नगर) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. २६) फिर्यादी गोविंद एकनाथ गायकवाड हे त्यांच्या घरी मुलगी सोनालीसोबत बोलत बसले होते. त्यावेळी त्यांचा जावई शशिकांत त्याठिकाणी आला. गप्पा मारताना सासरे जावयला म्हणाले, 'सोनालीला सासरी कधी घेऊन जाणार. त्यावेळी चिडलेल्या जावयाने सासऱ्याला शिवीगाळ सुरु केली. तुमच्या मुलीला मी घेऊन जाणार नाही, तिला इथेच ठेवणार असून नांदवणार नाही, मला घटस्फोट द्या' असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर सासरा गोविंद गायकवाड यांना व त्यांच्या पत्नीला शशिकांतने लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण केली. बॅटने देखील मारले, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार नवले तपास करीत आहेत.
किनगाव येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासह इतर ठिकाणी नागरिक मास्क न वापरताच वावरताना दिसून आले. परिणामी, कोरोनाचा फैलाव होण्याची भीती जाणकारांतून व्यक्त हाेत आहे. बुधवारी किनगाव येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरताे. या बाजारामध्ये सर्रासपणे नागरिकांनी मास्क न वापरताच बाजारहाट करत असल्याचे चित्र दिसून आले. किनगावमध्ये सध्या तीन कोरोना एक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज पंचवीस ते तीस रुग्णांची आरटीपीसीआर व रॅपिड टेस्ट केली जात आहे. बाजाराशिवाय गावातही नागरिक विनामास्क फिरत आहेत. फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचे चित्र किनगाव येथील बाजारात दिसून आले. ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे सर्रासपणे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज पंचवीस आरटीपीसीआर आणि चार ते पाच रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर नियमितपणे करावा, फिजिकल डिस्टन्स पाळावे. योग्य आहार घ्यावा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच वातावरण बदलामुळे सर्दी,खोकला रोगाचे प्रमाण वाढले आहे. घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन तपासणी करून घ्यावी.
दुनियादारी या नवीन मराठी सिनेमाची प्रदर्शनापूर्वी बरीच प्रसिद्धी धाली होती. त्यातील गाण्यांनाही बरीच पूर्वप्रसिद्धी मिळाली. त्यामुळे सिनेमाविषयी उत्सुकता, कुतुहलही निर्माण झालं. - मृण्मयी जोशीदुनियादारी या नवीन मराठी सिनेमाची प्रदर्शनापूर्वी बरीच प्रसिद्धी धाली होती. त्यातील गाण्यांनाही बरीच पूर्वप्रसिद्धी मिळाली. त्यामुळे सिनेमाविषयी उत्सुकता, कुतुहलही निर्माण झालं. त्यातून सिनेमाची कथा होती सुहास शिरवळकरांच्या (नव्हे, सुशिंच्या) कादंबरीवर. ही कादंबरी म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या तरुणाईचा जीव की प्राण. सध्याची फास्ट जनरेशन तिचा कितपत स्वीकार करेल, ही शंका मनात घेऊन पहिल्याच दिवशी सहकुटुंब सहपरिवार 'दुनियादारी'ला हजेरी लावली. या सिनेमानं आमच्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्ण केल्या. सिनेमाचा पूर्वार्ध झकासच! 'कट्टा गँग'च्या मेंबर्सची एंट्री, त्यांचे संवाद मस्त. त्या काळातल्या कॉलेजच्या मुलींचे, मुलांचे पोषाख, फॅशन, हेअरस्टाइल, हावभाव, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत लाजवाब! श्रेयस आणि दिग्यातली मैत्री, कट्टा गँगची धमाल, श्रेयसचं शिरिनवरचं हळुवार प्रेम हे छान घेतलंय. 'जिंदगी जिंदगी' हे गाणं प्रेक्षकांची पकड घेतलं. हळूवार, रोमँटिक असं 'टिक टिक वाजते डोक्यात' हे गाणंही सुंदर. संगीत ऐंशीच्या दशकाला साजेसं आहे. दिग्याचे संवादही खुमासदार आणि टाळ्या घेणारे. दिग्याचं 'यारा यारा' हे गाणं थिरकायला लावतं. मध्यंतराच्या सुमाराला कथानक एकदम अनपेक्षित वळण घेतं. कादंबरी निष्ठेनं वाचणाऱ्या रसिकांना धक्काच बसतो. कदाचित सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून असेल; पण पुढे कथा अनपेक्षित धक्के देत जाते. शेवट मात्र हृदयाला भिडणारा घेतला आहे. त्या अनुषंगानं 'देवा तुझ्या गाभाऱ्याला' हे गाणं दुःखी मूडचं, फिलॉसॉफिकल आहे. कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा लक्षात राहातात. श्रेयस म्हणून स्वप्निल जोशी, दिग्या ः अंकुश चौधरी, साईनाथ ः जितेंद्र जोशी हे लक्षात राहातील असे. मिनू ः उर्मिला कानेटकर, शिरिन ः सई ताम्हणकर, प्रीतम ः सुशांत शेलार हे कमी प्रसंगांत दिसूनही लक्षात राहातात. एकंदरीत काय, दिग्दर्शक संजय जाधव यांची 'दुनियादारी' तुम्हाला नॉस्टॅल्जिक करते. तुमच्या कॉलेज जीवनातल्या आठवणींना उजाळा देते. त्यासाठी हा सिनेमा एकदा तरी नक्कीच पाहायला हवा. त्यातला तो जुना काळ आणि गाणी दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहातील.
बाष्प प्रेशर ची रसायनशास्त्र व्याख्यावाफ दाब व्याख्याः समान पदार्थाचे घन किंवा द्रव टप्प्यासह संतुलित वातावरणातील वाष्पाने दबाव टाकला. तसेच, घन किंवा वायुमंडलाच्या वरच्या वातावरणातील पदार्थाचे आंशिक दाब . - by अॅन मेरी हेलमेनस्टीन, पीएच. डी. डायमंड कंडक्टर आहे का? जेव्हा रंगीत रंगाचा शोध लावला होता? अंडरग्रॅज्युएट इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ए. टी. टायटॅनिक कधी सापडले? कच्चे (अनप्रिनल) कॅनव्हासवर ऍक्रिलिक्स सह रंग देणे ठीक आहे का? मी रॉक क्लाइव खूप मोर्य आहे?
मार्गालगतच्या वीटभट्ट्या केव्हा हटणार? बड़नेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वर व जुना बायपास मार्गालगत असणाऱ्या वीटभट्ट्या अपघात, प्रदूषणासह आरोग्याचा धोका वाढविणाऱ्या आहेत. प्रशासनाचा याकडे असणारा कानाडोळा कोरोनाच्या संसर्गात गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. कोंडेश्वर, जुना बायपास मार्गालगत प्रशासनाचे नियम डावलून मोठ्या संख्येत वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. कोंडेश्वर देवस्थान निसर्गाच्या कुशीत आहे. येथे भाविक भक्तांची रेलचेल असते. या व जुना बायपास मार्गालगत असणाऱ्या वीटभट्ट्यांच्या धोकादायक धुरातून शेकड़ो लोकांना ये-जा करावी लागते. त्या ठिकाणी असणाऱ्या राखेची धूळ अंगावर झेलत, डोळे चुरचुरत रस्ता पार करणे हे दिव्य ठरते. यामुळे अपघाताचा धोक संभवतो. अगदी रस्त्यालगत असणाऱ्या वीटभट्ट्या प्रशासन का हटवित नाही, असा प्रश्न भाविक भक्तांसह वाहनचालक करीत आहेत. या धुरामुळे श्वसनासह त्वचेचे आजार वाढत असून, त्याला प्रशासन जबाबदार राहील, अश संतप्त प्रतिक्रिया कोंडेश्वर देवस्थानला जाणाऱ्या भाविक भक्तांमधून उमटत आहेत. वीटभट्ट्या गरम असताना आगडोंबातून जात असल्याची स्थिती येथे असते. प्रशासनाने याची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी आणि रस्त्यालगतच्या वीटभट्ट्यांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी भाविक तसेच या परिसरातील रहिवाशांकडून होत आहे. वीटभट्ट्यांवर जाणारी माती व राख रस्त्यांवर सांडत असल्याने रस्ता खराब झाला आहे. बायपास मार्गावर नुकताच डांबरी रस्ता करण्यात आला. रस्त्यालगतच वीटभट्ट्यांमुळे हा रस्ता खराब झाला. तीच अवस्था कोंडेश्वर मार्गाचीदेखील झाली आहे. मोजक्याच चिमण्याशेकडोंच्या संख्येत असणाऱ्या वीटभट्ट्यांपैकी मोजक्या भट्ट्यांमध्ये धूर नियंत्रणासाठी चिमणीचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. प्रदूषणामुळे लगतच्या वस्त्यांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना, नियमांचा भंग करणाऱ्या वीटभट्ट्यांवर नियमांची सक्ती केव्हा होणार, हा प्रश्न लगतच्या नागरी वस्त्यांमधून विचारला जात आहे.
रासायनिक खते खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. सांगलीतून हे प्रकरण समोर आले होते. यावरुन सभागृहात विरोधीपक्षनेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाले होते. खते खरेदी करताना जात का विचारली जातेय, असा संतप्त सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला. त्यानंतर आता यावरुन कृषि विभागाचे उत्तर आले आहे. ही जात नाही तर वर्गवारी असल्याचं कृषि विभागाने म्हटलं आहे. तसेच, केंद्र सरकारने पॉस मशीनचे नवीन 3. 2 सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. त्यात वर्गवारी हा घटक आहे. कुणाचीही जात विचारली जात नाही. जात पाहून खत दिले जात असल्याची बातमी खरी नाही. उलट प्रत्येक वर्गवारीला लाभ मिळतो की नाही, हे पाहण्यासाठी केवळ वर्गवारी दिली आहे. जनरल, SC, ST, OBC अशा केवळ वर्गवारी त्यात आहेत. केवळ असा सर्वांना लाभ मिळावा, हा हेतू आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने एक पत्र केंद्र सरकारला पाठवून याबाबत समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती केली असल्याचं कृषि विभागाने म्हटलं आहे. नव्या सरकारच्या काळात ई-पॉस मशिनमध्ये जातीचा रकाना नव्याने टाकला आहे. जातीचा रकाना भरल्याशिवाय खत खरेदी पुढे जात नाही. खत खरेदी करताना नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि आता जात विचारली जात आहे. सरकारने जातीचं लेबल लावू नये. आमच्या भावना तीव्र आहेत. यामध्ये अधिकारी बळीचे बकरे बनू नयेत. मात्र, जो मुद्दामहून अशी गडबड करतोय, याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. खत खरेदी करताना शेतकऱ्याला जात सांगावी लागणार नाही, असा सरकारने आदेश काढावा, अशी माणगीही अजित पवार यांनी केली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ई-पॉस मशिनमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे, तो फक्त सांगलीपुरता मर्यादीत नाही. हा आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पण आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, ई पॉस मशिनमध्ये केंद्र सरकारच्या आदेशानुसार बदल करण्यात आलेला आहे. हे खरं असेल तर हा बदल कोणी केला आहे, तो आदेश देण्याचे कारण काय. आपण महाराष्ट्रात जातपात समजवण्याचा प्रयत्न करत असताना हे सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे का, असा सवालाही चव्हाण यांनी सरकारला केला. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
स्ट्रक्चरल स्टील, मिश्र धातु स्टील, स्टेनलेस स्टील आणि इतर सामान्य सामग्रीच्या प्रक्रियेसाठी वापरा;अचूक केंद्रीकरण क्षमता जी स्थिर परिमाण अचूकता आणि उत्कृष्ट पृष्ठभागाची गुणवत्ता प्राप्त करण्यास सक्षम करते, उत्कृष्ट कडकपणासह प्रक्रिया प्रणालीसाठी योग्य. चांगली कडकपणा, उच्च शक्ती, उच्च ड्रिलिंग अचूकता प्राप्त करणे सोपे आहे.हे अधिक जटिल सामग्रीच्या ड्रिलिंगसाठी योग्य आहे आणि उच्च कटिंग गती निवडली जाऊ शकते. प्रभावीपणे चिपिंग कमी करा आणि चांगला पोशाख प्रतिकार करा. चिप काढण्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि कमी कटिंग प्रतिकार राखण्यासाठी मल्टी-लेयर भौमितिक कटिंग एज. सामान्यतः वापरल्या जाणार्या उजव्या कोनातील शँक्स व्यतिरिक्त, विविध प्रकारचे शँक उपलब्ध आहेत, जे विविध ड्रिलिंग रिग आणि ड्रिलिंग मशीनसाठी योग्य आहेत. तुमचा संदेश आम्हाला पाठवाः
जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा पालिकेच्या विविध विकास कामांसाठी नगर विकास खात्या तर्फे राज्य सरकारने एक परिपत्रका द्वारे वैशिष्ट्यपूर्ण काम अंतर्गत विशेष निधी म्हणून 6 कोटी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे सदर निधी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आ. चंद्रकांत पाटील यांचे विशेष प्रयत्नानी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामात सावदा शहरारील विविध भागातील विकासकामे प्रास्तावीत करण्यात आले असून यात सावदा नगरपरिषद हद्दीतील रजा नगर भागात रस्त्याचे दुतर्फा गटारी बांधणे 15 लाख, काँक्रीटकरण करणे, रस्ते बांधणे 15 लाख, ईदगाह येथे काँक्रीटकरण 20 लाख, साईपार्क भागात काँक्रीटकरणे 20 लाख, स्वामी हॉस्पिटल ते हायवे पर्यत काँक्रीटकरण करणे 20 लाख, स्टेशन रोड भागात रस्ता मजबुती करणं व डांबरीकरण करणे 50 लाख, गट न 1569 ते 1546 पर्यंत रस्ता मजबुती करणं व डांबरीकरण करणे 45 लाख, रिंग रोड, रेस्ट हाऊस भागात रस्ता मजबुती करण व डांबरीकरण करणे 45 लाख, रजा नगर, पनापीर बाबा रस्ता व गटारी बांधणे 20 लाख, गट न 1525, जाम मळा भागात 300 मीटर आर, सी,सी गटार बांधणे 50 लाख, गौसियानगर भागात खडीकरण व डांबरीकरण करणे 50 लाख, गट न 97 मध्ये सांस्कृतिक सभागृह बांधणे 65 लाख, खुल्या हद्दीतील जागा विकसीत करणे 35 लाख, गौसिया नगर भागातील ओपन स्पेस विकसित करणे 30 लाख, शहीद अब्दुल हमीद चौक विकसीत करणे 15 लाख, खंडोबा मंदिरा जवळ संरक्षण भिंत बांधणे 25 लाख, नाना साहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळेस संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे 20 लाख अश्या कामांचा समावेश असून निधी प्राप्त होताच सदर कामाच्या निविदा नगर पालिके मार्फत काढून काम करण्यात येणार आहे. या भरीव निधी मुळे कोरोना काळा नंतर मोठ्या प्रमाणात विकास कामांना निधी मिळाल्या नंतर सदर कामे मार्गी लागणार आहेत.
पुणे : राज्यात 10 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. मोसमी वार्यांची सध्याची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल असून, त्यामुळे पुढील दहा दिवस राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा कितीतरी कमी पाऊस बरसलेल्या मराठवाडा, विदर्भातदेखील समाधानकारक पाऊस अपेक्षित असून, यामुळे येथील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघण्यास मदत मिळेल. मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी 5 ते 10 ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून दुष्काळी परिस्थिती असणार्या या भागांमधील पाऊसमान सुधारेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या राज्याच्या जवळ पोहोचले आहे. हे क्षेत्र मंगळवारी पूर्व मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यावर स्थिर होते. त्याचबरोबर मागील आठवड्यात उत्तर भारतात असणारा मान्सूनचा ट्रफ गेल्या दोन दिवसांपासून मध्य भारतात असून त्यामुळे राज्याच्या अंतर्गत भागातील पावसाचा जोर वाढल्याचे हवामान खात्याने सांगितले. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहील, असा अंदाज आहे. परिणामी राज्यभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसणार आहे, असे सांगण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा, विदर्भात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली.
आतापर्यंत तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यात भक्त आगीच्या निखाऱ्यांवर चालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. भक्तीच्या सागरात बुडलेला व्यक्ती आपल्या आराध्यदेवतेसाठी काही करायला तयार असतो. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी मागे हटण्याची तयारी नसते. फक्त आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करणं हेच भक्ताच्या मनात असतं. आतापर्यंत तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यात भक्त आगीच्या निखाऱ्यांवर चालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
अंतराळात 7 तास स्पेसवॉक करून अंतराळवीरांनी सोलर पॅनेल कसे बसवले? अंतराळात 7 तास स्पेसवॉक करून अंतराळवीरांनी सोलर पॅनेल कसे बसवले? नासाच्या अंतराळवीरांना अवकशात स्पेसवॉक केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर त्यांनी दोन सोलर पॅनेल बसवले. त्यासाठी त्यांनी सात तास काम करावं लागलं. पाहा हा व्हीडिओ.
T20 WC, Semi Final: टी -20 विश्वचषक अखेरच्या टप्यात पोहचला आहे. कोणत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अ गटामधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं आहे. अ गटात उपांत्य फेरीचं गणित खडतर होतं. दक्षिण आफ्रिका संघाला 8 गुण मिळाल्यानंतरही उपांत्य पेरीत पोहचता आलं नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघानं उत्तम नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली आहे. ब गटात पाकिस्तान संघ 8 गुणांसह उपांत्य फेरीत पोहचला आहे. मात्र, दुसऱ्या संघासाठी तीन संघ स्पर्धेत आहेत. भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा आहेत. न्यूझीलंडचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारत आणि अफगाणिस्तान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. आज, दुपारी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर ब गटातील उपांत्य फेरीतील गणित स्पष्ट होईल. भारतीय संघाचं उपांत्य फेरीच्या आशा न्यूझीलं आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर आहेत. न्यूझीलंड संघानं जर अफगाणिस्तान संघाचा पराभव केला तर भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार आहे. असं झाल्यास ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पात्र ठरणार आहेत. पण जर ब अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला तर मात्र, नेट रनरेटच्या आधारावर उपांत्या फेरीतील संघ ठरवला जाणार आहे. अशा परिस्थिती भारताला अखेरचा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागेल. भारताचा अखेरचा सामना सोमवारी नामेबियाविरोधात आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर 130 कोटी भारतीयांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आज अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडला रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुंबई : डास सगळीकडे आढळतात, घरात, घराबाहेर, अगदी सगळीकडे आणि डास नुसते असतात असे नाही तर अनेक वेगवेगळे आजार देखील पसरवतात. डेंग्यू, मलेरिया, अरबोव्हायरस, इंसेफॅलिटिस, चिकनगुनिया, झिका ताप ही डासांमुळे पसरणाऱ्या आजारांची यादी बरीच लांबलचक आहे. डासांच्या तब्बल 3500 पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यांच्यापैकी काही तर जीवघेण्या ठरू शकतील इतक्या भयंकर आहेत. काही प्रकारचे डास पक्षी, उभयचर प्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रक्तावर जगतात तर काही डास माणसांना चावतात. अनोफेलेस डासाच्या एका चाव्यामुळे मलेरिया होऊ शकतो तर एडिस डास डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका विषाणू पसरण्यासाठी कारणीभूत ठरतो. लक्षणीय बाब अशी की डासाची फक्त मादीच माणसांना चावते कारण अंडी निर्माण करण्यासाठी त्यांना आपल्या रक्तातील प्रथिनांची आवश्यकता असते. डॉ. मुकेश संकलेचा, कन्सल्टन्ट पेडियाट्रिशियन, बॉम्बे हॉस्पिटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक डेटा डॅशबोर्ड हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमच्या अहवालानुसार भारतात एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत मलेरियाचे 3. 37 लाखांपेक्षा जास्त तर डेंग्यूचे 1. 30 लाख रुग्ण नोंदवले गेले. या सर्व डासजन्य आजारांमुळे होणारे वैद्यकीय खर्च, उत्पादनाचे, कमाईचे होणारे नुकसान यामुळे उद्भवणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्च लक्षात घेता हे आजार म्हणजे देशावरचे खूप मोठे आर्थिक ओझे असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार मलेरिया आणि डेंग्यूमुळे उद्भवलेले वार्षिक आर्थिक खर्च अनुक्रमे 11640 कोटी रुपये आणि 6000 कोटी रुपये होते. आपण या मुद्द्यांची दखल घेतली आहे आणि चांगली बाब अशी की, एक देश या नात्याने आपण उद्धिष्ट ठरवले आहे की वर्ष 2030 पर्यंत आपण मलेरिया-मुक्त देश बनायचे आहे. सरकार आपल्या स्तरावर प्रयत्नशील आहेच, पण त्याचवेळी प्रत्येक कुटुंबाने देखील आपल्या सर्व सदस्यांना डासांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. पावसाळा असल्यामुळे अनेक जागी पाणी साठून राहते व संसर्गाचा धोका वाढतो. आपले घर आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ व सुरक्षित राहील, डासांची पैदास होऊ शकेल अशी एकही जागा आपल्या जवळपास असणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. मलेरियाचे डास घाणेरड्या साठलेल्या पाण्यात वाढतात तर डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घरातील पाईप्स, पाण्याच्या टाक्या व पाणी साठून राहते अशा सर्व जागांची नियमितपणे तपासणी करा, त्या सर्व जागा कायम स्वच्छ ठेवा. अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे वापरण्यासारख्या काही अगदी साध्या उपायांचे पालन करून देखील आपण संसर्गाचा धोका कमी करण्यात मदत करू शकतो. एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवा की डास हे फक्त संध्याकाळीच नव्हे तर संपूर्ण दिवसभर सक्रिय असतात. मलेरिया पसरवणारे डास तिन्हीसांजा झाल्यापासून पहाटेपर्यंत सक्रिय असतात तर डेंग्यूचा डास दिवसभरात चावतो. घरात असताना डासांपासून सतत संरक्षण मिळत राहावे यासाठी मॉस्किटो रिपेलंट्सचा वापर करता येऊ शकतो. भारतातील सर्वात शक्तिशाली लिक्विड व्हेपोरायझर आधुनिक पर्याय देखील उपलब्ध आहेत. घराबाहेर पडताना व्यक्तिगत रिपेलंट्स सहज वापरता येतात कारण त्यांचे देखील विविध पर्याय उपलब्ध आहेत, जसे, रिपेलंट स्क्रीन क्रीम्स, रोल-ऑन्स इत्यादी आणि या पर्यायांचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत टिकून राहतो. लहान मुलांची त्वचा नाजूक व संवेदनशील असते त्यामुळे त्यांच्यासाठी बालरोगतज्ञांनी प्रमाणित केलेलीच उत्पादने वापरावी. सुगंधांचेही भरपूर पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, त्यातून आपण आपली आवड निवडू शकतो. डासाच्या एका चाव्याने देखील डेंग्यू किंवा मलेरिया होऊ शकतो. स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांना त्वरित मारून टाकणे हा आहे. हिट स्प्रेसारखे विश्वसनीय पर्याय आपल्याकडे आहेत ज्यांच्या मदतीने डासांना तातडीने नष्ट केले जाऊ शकते. डास डोळ्यांना सहजासहजी दिसून येतातच असे नाही पण ते असतात, त्यामुळे बेड, सोफा यांच्या खाली, पडद्यांच्या, कपाटांच्या मागे स्प्रे नक्की मारावा कारण याच डासांच्या लपून राहण्याच्या हमखास जागा असतात. शहरांच्या बाहेर जिथे विजेची समस्या असते, अशा ठिकाणी स्प्रे, मॉस्किटो नेट्स आणि पटकन जळणारी कार्ड्स यांचा वापर करून आपण स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. खिडक्या, दरवाजे आणि पलंगांना जाळ्या लावल्या जाऊ शकतात. सध्याच्या कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण जगभरातील आरोग्य व्यवस्थांवर प्रचंड मोठे अतिरिक्त ओझे निर्माण केले आहे. आरोग्य यंत्रणा पुरेशी मजबूत नसलेल्या भारतासारख्या देशांना सार्वजनिक आरोग्याला आधीपासून भेडसावत असलेले धोके आणि कोविड-१९ सारखे नवे धोके असे दुहेरी आव्हान झेलावे लागत आहे. आरोग्याचा विचार करता, कोविड-19 ची लक्षणे आणि डासजन्य आजारांची लक्षणे काही प्रमाणात समान असल्याने दोन्हींमध्ये नेमका फरक काय ते नीट समजून घेणे आवश्यक बनले आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसत असल्यास लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधावा व तपासणी करून घ्यावी. काही डास जीवघेणे देखील ठरू शकतात त्यामुळे हलगर्जीपणा करणे अजिबात योग्य नाही. Calculate Your Body Mass Index ( BMI )
मुंबई :- भाजप (BJP) पक्षाला राम राम ठोकून शिवबंधन बांधणाऱ्या अद्वय हिरे (Advaya Hire) यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात विनायक राऊत यांनी उपनेतेपदी हिरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्करराव जाधव, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, सुरेश पवार, पवन ठाकरे आदी उपस्थित होते. मालेगाव येथे रविवारी (ता.२६ मार्च) म.स.गा. महाविद्यालयाच्या प्रांगणावर विराट महासभा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवगर्जनेने होणार आहे, या सभेस सेनानेते प्रमुख नेत्यांसह ठाकरे गटाचे महाराष्ट्रातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेत खासदार संजय राऊत, महिला नेत्या सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री देसाई, विरोधी पक्षनेते दानवे, आमदार जाधव आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुरबाड - मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे भानामतीसाठी या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सुरज भोईर असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालक वर्गात सर्वत्र खळबळ माजली आहे. सुरज भोईर लघवीसाटी बाहेर गेला होता, मात्र तो शाळेत परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता शाळेशेजारील ओसाड घरात सुरज रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आढळला. शाळेतील विद्यार्थ्यांने ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले असता शिक्षकांनी सुरजला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बेशुद्ध अवस्थेत असल्यानं शिक्षकांनी पालकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस निरिक्षक अजय वसावे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून मारेकऱ्यांचा शोधदेखील सुरू करण्यात आला आहे. शासनाने शिक्षण क्षेत्रात आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शाळा डिजिटल करण्याची मोहीम हाती घेतली आसली तरी त्या शाळामधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता यावर मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना आखली नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. ही घटना भयावह असून यामागे गावातीलच एका व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्याची हत्या भानामतीसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत मारेक-याला अटक करत नाही तोपर्यंत सुरजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
युरोपियन युनियनने अॅमेझॉनवर (Amazon) आतापर्यंत सर्वात मोठा दंड (Penalty) लावला आहे. हा दंड डेटा (Data) गोपनियतेच्या नियमांचे (Rules) उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे. जरी अॅमेझॉनने (Amazon) नियमांचे उल्लंघन करून हे केले आहे. परंतु संपूर्ण प्रकरण काय आहे आणि अॅमेझॉनची योजना (scheme) काय आहे हे जाणून घेऊया. लक्झेबर्ग डेटा संरक्षण प्राधिकरणाने अॅमेझॉनला (Amazon) 746 मिलियन किंवा 888 मिलियन डॉलर दंड (Penalty) ठोठावला आहे. युरोपियन जनरल डेटा (Data) प्रोटेक्शन रेग्युलेशनचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकरण्यात आला आहे. एका फ्रेंच हक्क गटाच्या तक्रारीनंतर 2018 मध्ये तपास सुरू करण्यात आला. त्यांनी अॅमेझॉनवर (Amazon) लादलेल्या दंड निर्णयाचे स्वागत केले आहे. अॅमेझॉनने (Amazon) आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, कोणत्याही नियमांचे (Rules) उल्लंघन झाले नाही. कोणत्याही ग्राहकांचा डेटा (Data) कोणत्याही तृतीय व्यक्तीला देत नाही. त्यांनी म्हटले की, ताज्या निर्णयाला कोणताही आधार नाही. आम्ही CNDP च्या निर्णयाशी सहमत नाही. अॅमेझॉनवर (Amazon) लावलेला हा निर्णय 16 जुलै रोजी आला. मिळालेल्या अहवालानुसार अॅमेझॉन येणाऱ्या काळात या निर्णयाला आव्हान देईल. युरोपियन युनियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशननुसार कोणतीही कंपनी (company) परवानगीशिवाय लोकांचा वैयक्तिक डेटा (Personal data) वापरू शकत नाही. जर कंपन्यांनी परवानगीशिवाय डेटा वापरला तर त्या कंपन्यांना मोठा दंड आकरण्यात येईल. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
कोल्हापूर, 16 एप्रिल : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी विजय मिळवला असून भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (MVA vs BJP) अशी झाली असली तरी या निवडणुकीत एका नावाची जोरदार चर्चा सुद्धा झाली आणि ते म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुणा धनंजय मुंडे यांची. करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhanajay Munde) यांनी ही निवडणूक लढली होती आणि त्यांना किती मते मिळाली माहिती आहे का? निवडणुकीचे निकाल आता समोर आले असून काँग्रेसच्या जयश्री जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांना 96176 मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम हे आहेत. सत्यजीत कदम यांना 77426 मते मिळाली आहेत. जयश्री जाधव आणि सत्यजीत कदम यांच्यातच ही मुख्य लढत झाल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांकडूनही निवडणुकीत जोरदार प्रचार करण्यात आला. तसेच दोघांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. NCP : राष्ट्रवादीतल्या भूकंपाचे कोल्हापुरात हादरे, भाजपचा बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत? Kolhapur : कोल्हापुरात आता काय ठरलं? दोस्तांची दोस्ती की राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती? Kolhapur News: कोल्हापूरकरांनी जपला 2000 वर्षांपूर्वीचा ठेवा, आता चाललाय अमेरिकेला, काय आहे कारण? Maharashtra Politics : राष्ट्रवादीतल्या भूकंपानंतर कोल्हापुरात काँग्रेस आशावादी, 'स्पेस'मुळे संघर्ष वाढणार? वाचा : मुख्यमंत्र्यांच्या एका भाषणामुळे झाला भाजपचा गेम, वाचा नेमंक काय घडलं? करुणा धनंजय मुंडे- शर्मा यांना किती मते मिळाली? या निवडणुकीच्या रिंगणात करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनीही उडी घेतली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा शर्मा यांनी आपला अर्ज दाखल केला. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. त्यांनी आपला अर्ज करुणा धनंजय मुंडे या नावाने दाखल केला होता. मतमोजणीची जी आकडेवारी आली आहे त्यानुसार करुणा धनंजय मुंडे यांना निवडणुकीत 133 मते मिळाली आहेत. करुणा शर्मांची संपत्ती किती? करुणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपला अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीची माहितीही जाहीर केली. करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची नेमकी किती संपत्ती आहे याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, करुणा शर्मा यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं दिसून येत आहे. करुणा शर्मा यांनी आपला अर्ज दाखल करताना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असा उल्लेख केला आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे रोख 400000 रुपये असल्याचं म्हटलं आहे. तर विविध बँक अकाऊंट आणि इतर गुंतवणुकीची एकूण रक्कम पाहता कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. तर मध्यप्रदेशात इंदूर येथे बिगरशेती जमीन असून त्याचे एकूण आकारमान 2400 चौरस फूट इतके असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या जागेवर झालेल्या बांधकामानंतर त्या जागेची बाजारभावानुसार किंमत ही 2,00,00,000 रुपये इतकी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच मुंबईत असलेल्या फ्लॅटचाही उल्लेख केला आहे ज्याची किंमतही कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पुणे : ज्या उद्योगसमुहाला केंद्र सरकार अभय देत आहे म्हणून काँग्रेस देशभरात रान उठवत आहे, त्याच उद्योग समुहाचे शरद पवार यांनी समर्थन केल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या पुण्यातील प्रस्तावित सभेच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीला काही काँग्रेसजन गैरहजर होते. शहराध्यक्ष व अन्य काही पदाधिकारी मात्र बैठकीला उपस्थित होते. पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात यासाठीच्या नियोजनाची बैठक झाली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र माळवदकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गटनेते आबा बागूल, सुनील शिंदे, संगीता तिवारी, नीता परदेशी, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच संजय बालगुडे, विरेंद्र किराड तसेच अन्य बरेच पदाधिकारी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी अदानी उद्योग समुहावरून भारतीय जनता पक्षाला संसदेसह सगळीकडे धारेवर धरले आहे. असे असताना शरद पवार यांनी त्याच उद्योगसमूहाचे समर्थन करावे, त्यांचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे असे म्हणावे याचा अर्थ काय समजायचा असे शहरातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राहूल गांधी यांनी देशभर निर्माण केलेला टेंपो पवार यांच्या या वक्तव्याने कमी झाली अशी या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे मुख्य उद्दीष्ट भाजपला जेरीस आणायचे हे असताना त्यालाच खीळ बसेल असे वक्तव्य कशासाठी असा त्यांचा प्रश्न आहे. शहराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले की ही बैठक त्या सभेच्या नियोजनाची होती. क्वार्टर गेट येथील मैदानात ही सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात सगळीकडे अशा सभा होणार आहेत. त्याचे नियोजन एकत्रितपणे करावे असा पक्षाचा आदेश आहे. त्याप्रमाणे ही बैठक होती. बैठकीत फक्त त्यावरच चर्चा झाली. जबाबदाऱ्या ठरल्या. अन्य विषयांबाबत प्रदेशकडून जी काही भूमिका येईल त्याचे पालन केले जाईल.
पुण्यात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अखेर हिवाळा सुरू झाला याचा आनंद पुणेकरांना झाला. पुणे - गेल्या काही दिवसांपासून सतत पडण्याऱ्या पावसामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांची गुरुवारची (7 नोव्हेंबर) सकाळ आल्हाददायक झाली. सकाळी शहरात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अखेर हिवाळा सुरू झाला याचा आनंद पुणेकरांना झाला. मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने पाऊस पडत आहे. सकाळी तसेच दुपारी कडक ऊन अन संध्याकाळी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणेकर मेटाकुटीला आले होते. स्वेटर, टोपी आणि रेनकोट अशा सर्वच गोष्टी सोबत बाळगायला लागत होत्या. त्यातच वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे अनेक साथीचे आजार सुद्धा शहरात पसरण्यास सुरुवात झाली होती. अखेर आज सकाळी शहरात धुके पसरल्याने हिवाळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ऑक्टोबर महिना संपला तरी पाऊस सुरूच त्या थंडीची चाहूल ही नाही असे चित्र मागील काही दिवसांपासून होते. मात्र असे असताना आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना एक वेगळेच दृश्य दिसले. शहरातील अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. पुणे शहराच्या आसपास अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पर्वती, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, तळजाई यासारख्या टेकड्यांवर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना आज हे धुके पाहायला मिळाले. हे धुके इतके दाट होते की काही अंतरावरचे ही दिसत नव्हते. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांनी आज धुक्याचा मनमुराद आनंद लुटला.