text large_string |
|---|
दिल्ली,20 जून : चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. आचार्य चाणक्य सांगतात एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त बदल करण्याचा प्रयत्न केला तर तो आपला शत्रू बनण्याची शक्यता असते. (Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत) प्रत्येत व्यक्तीला आपण अगदी योग्य आहोत असा समज असतो. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीला त्याच्यामधील दुर्गुणांची जास्त प्रमाणात जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत. कारण कुणालाच स्वतःमधल्या कमतरता दिसत नाहीत. प्रत्येकालाच वाटतं की आपण परफेक्ट आहोत अस वाटतं. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती मधल्या कमतरता सांगायला लागतो तेव्हा, ते त्यांना ते आवडत नाही. (Chanakya Niti: 'या' 5 गोष्टी आहेत आर्थिक संकटाचे संकेत) त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला त्याच्यामधल्या कमतरता यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती आपल्यापासून दूर जायला लागते. त्यामुळेच आयुष्यात कधीच अशी चूक करू नये. कारण हळूहळू त्या व्यक्तीला आपल्याबद्दल घृणा वाटायला लागते. म्हणूनच इतरांच्या चुका किंवा कमतरता दाखवणारे लोक आपल्यासाठी शत्रू वाढवत असतात. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात जेव्हा आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्यासाठी शत्रू वाढवत असतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat. com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही. ) मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
Arti /////// NIPPIPINININDIApanARCCCCN मिळाली म्हणून जांवयावर सूड उगविण्यासाठी ते मोंगलांना सामील होऊन निजामशाही बुडवायला तयार कसे झाले, याचेंच मला आश्चर्य वाटते. अजूनही आपण सांगतां यावर माझा विश्वास बसत नाही. जिजाबाई शहाजीराजांच्या तोंडून शिंदखेडला आपल्या माहेरीं काय प्रकार घडला याचें वर्णन ऐकून म्हणाली. तुमचा विश्वास नाहींच बसायचा. कारण जाधवराव तमचे वडील पडले. पण मला एक सांगा, तुमचा विश्वास जन्मदात्या वडिलांवर जास्त आहे की माझ्यावर जास्त आहे ? शहाजीराजांनीं कांहींसें रागाऊन विचारलें. " हें काय विचारण ? " जिजाबाई शहाजीराजांजवळ जाऊन त्यांचा राग शांत व्हावा म्हणून त्यांना पंख्याने वारा घालीत म्हणाली. " तसें मला विचाराल तर वडील माझे कोण व मी वडिलांची कोण ? हो, त्यांनी मला जन्म दिला खरा, पण त्यांनी कन्यादान केलें. मला आपल्यांला अर्पण केली तेव्हांच ते मला अंतरले व मी त्यांना अंतरलें. कन्यादानाचें उदक जाधवरावांच्या हातून भोंसल्यांच्या हातांवर सुटलें त्याच दिवशीं जाधवांची जिजा मेली व भोसल्यांची जिजाबाई जन्माला आली. मी ते माझे बाबा म्हणून त्यांचा कड घेत्यें किंवा घेईन असे आपणांला वाटतें तरी कसें १ " एरव्हीं तुम्ही मला गळ घालघालून जाधवांच्या दारी जायला भाग पाडलेंच नसतें. तुम्हांला जर तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे जाधवांच्या कुळाहून भोसल्यांच्या कुळाचा जास्त अभिमान वाटतो, तर जाधव भोसल्याशी उघडउघड वैर मांडून बसले असतां भोसल्यांनी प्रत्यक्ष तुमच्या पतीने एखाद्या नोकरासारखे त्यांच्या दारी जावें, सलोख्यासाठी त्यांच्या पुढे तोंड वेंगाडाक व अपमान सोसून परत यावें, अशी इच्छा तुम्ही केलीच नसती ! " मीं इच्छा केली, मी तशी इच्छा केली खरी, पण ती कां केली ? आपला अपमान व्हावा म्हणून केली ? " नाहीं तर काय माझा मान राहावा म्हणून केली ? तुमच्या वडिलांचा स्वभाव तुम्हांला माहीत होता. असे असतां - " शहाजीराजांना पुरतेपर्णी बोलू न देतां जिजाबाई म्हणाली, इतके दिवस एकत्र संसार करून आपण माझी हीच किंमत केली ! तरी मी मनांत म्हणत होतें, अलीकडे दुसन्या लग्नाचे विचार आपल्या डोक्यांत घोळूं लागले आहेत ते कां ? " राणीसाहेब ! - " शहाजीराजांना कांहीं बोलायचें होतें, पण जिजाबाईनें त्यांना बोलू न दिल्यामुळे ते तेवढ्यावरच थांबले. जिजाबाई डोळे आंसवांनीं भरून आणून म्हणाली, " माझी हरकत नाहीं; आपण मोहित्यांच्या तुकाबाईशींच काय; अशा आणखी एक सोडून एकवीस बायकांशीं लगें करून मला आणखी एकवीस सवती घरांत आणल्या तरी माझी मुळींच हरकत नाहीं. पण माझें म्हणणे एवढेंच की, माझ्या माथ दोषांचें खापर फोडून आपण तें करूं नका. आपण राजे ! आपण आजच्या निजामशाहीचे वजीर ! आपण उद्यांच्या छत्रपतींचे भाग्यशाली जन्मदाते ! आपण मनांत आणाल ती गोष्ट करूं शकाल. माझे बायकोमाणसाचे तिथें काय चालणार आहे ! पण SSNAN N पण काय ? राणीसाहेब ? हा सवतीमत्सर तुमच्या तोंडाने भलभलत्या गोष्टी बोलतो आहे. " नाहीं बरें, नाहीं. मी सवतीमत्सर कधींही करणार नाही. आपल्या चरणांना साक्ष ठेवून सांगत्यें, आपण आणखी कितीही लग्ने केली तरी भी त्या सवतींचा मत्सर मरेतों कधींच करणार नाही. आणखी कितीही सवती आल्या तरी त्या माझें पद तर हिरावून घेऊं शकणार नाहीत ना ? माझा सद्धर्म असेल, पतिव्रताधर्माची पाळणूक आजवर माझ्या हातून यथान्याय झाली असेल, तर परमेश्वर माझा पाठिराखा आहे. त्याच्या कृपेनें माझ्या उदरीं उगवते छत्रपति अवतारणार आहेत. देवीचा आशीर्वाद व महापुरुषानें दिलेला हा प्रसाद कधींही अन्यथा व्हायचा नाहीं. आणखी कितीही सवती आल्या तरी राजमाता मीच होईन. आपण वेळीं मला पट्टराणीपदावरून दूर करूं शकाल; पण परमेश्वराने मला देऊं केलेला राजमातेचा मान तर आपण माझ्यापासून हिरावून घेऊं शकणार नाहीं ना ? नाहीं ना ? कीं तेंदेखील. आपल्या हातचें आहे ? हा देवगुरूंचा प्रसाद - हें श्रीफळ माझ्या ओटींत. आपण आपल्या हातांनी घातलें; ह्या प्रसादाचा व ह्या प्रसादाच्या आश्रयानें। आपणांला मिळालेल्या भावी छत्रपतींच्या पितृपदाचा मान तर आपण अव्हेरणार नाहीं ना ? भोसल्यांच्या कुळांत छत्रपति अवतरणार म्हणून भोसल्यांचा द्वेष करणारे इतके लोक आहेत, त्यांतीलच एक आपण बनून जाधवांच्या मुलीला राजमातेचा मान मिळवूं द्यायचा नाहीं अशी ईपी तर आपण धरलेली नाहीं ना ? तशी ईर्षा घरली असेल, इतर अभागी लोकांप्रमाणेंच छत्रपतींच्या अवताराला आडकाठी करण्याचे धैर्य आपल्या अंगी असेल, तर ही मी ह्या श्रीफळासह आपल्या पायां पडत्यें, मला लाथेनें दूर सारा ! " असे म्हणून जिजाबाईनें शहाजीराजांच्या पायांवर मस्तक ठेवलें. तिच्या डोळ्यांतून या वेळीं आसवें गळत होतीं व त्या आसवांनी राजांची पावलें भिजत होतीं. शहाजीराजांना जिजाबाईच्या ह्या कळवळ्याच्या बोलांची उपेक्षा करतां येणे शक्य नव्हते. कारण, मोहित्यांच्या मुलीशी लग्न करण्याविषयीं त्यांच्या मनानें घेतलें होतें व त्याबाबत जिजाबाईंची संमति मुळींच विचारली नव्हती. ही वाटाघाट त्यांनी शक्य तितक्या मोघमपणाने चालविली होती. पण ती जिजाबाईच्या कानावर आलेली ऐकतांच ते वर्मी पकडले गेले. शिवाय जिजाबाईनें आपला अव्हेर केल्यानें 'भावी छत्रपतीचा अव्हेर केल्याच्या पापाचे घनी आपण व्हाल. अशी स्पष्ट जाणीव दिली; ती तर शहाजीराजांच्या जिव्हारी झोंबली. छत्रपतींचा अवतार होणार व तो आपण आणि जिजाबाई ह्या जोडप्याच्याच उदरीं होणार असे स्पष्ट भविष्य वर्तवून आताच स्वामींनीं श्रीफळाचा प्रसाद दिला होता. त्याचप्रमाणें त्या प्रसंगाचें महत्त्व एवढे अफाट होतें को, त्यासमोर असल्या क्षुल्लक गोष्टींना नसतें महत्त्व देणे हा निव्वळ अविचार होय, इतकें जाणण्याइतकें शहाजीराजे सुज्ञ होते. ते जाधवरावांकडे गेले ते जिजाबाईच्या सांगण्यावरून गेले खरे; पण तसे सांगण्यांत आपल्या सासयाकडून अपमान व्हावा असा तिचा मानस असल्याचें. आपण रागाच्या भरांत कांहींतरी बोलून गेलों असे त्यांचें मन त्यांना आतां खाऊं लागलें होतें. हा जो आपल्या हातून आपल्या पत्नीचा अपमान झाला, त्या अपमानाची भरपाई वेळींच " केली पाहिजे असे त्यांना त्याच क्षणीं वाटू लागले. त्यांनी ताबडतोब आपला • सारा राग आवरता घेतला, व जिजाबाईला आपल्या हातांनीं धरून उठवून हृदयाशीं धरून आपल्या शेल्याच्या पदरानें तिचीं आंसवें पुशीत गोड शब्दांनी तिची समजूत करण्याला सुरुवात केली, जिजाऊ, --" नेहमीं .शहाजीराजे तिला 'राणीसाहेब ' अशा गौरवार्थी हांक मारीत, पण जेव्हां उभयतांच्या प्रेमसंबंधाच्या महासागरांत प्रणयाच्या पर्वतप्राय लाटा उसळूं लागत तेव्हां तीं दोघेही आपण राजाराणी आहोत हैं अजिबात विसरून एकमेकांशी समरूप होऊन जात व तेव्हां राजे तिला ' जिजाऊ ' ह्या एकेरी लाडक्या नांवानें संबोधीत. तशीच लाडकी हांक मारून राजे तिला म्हणाले, जिजाऊ ! सवतीमत्सर हा तुम्हां बायकांच्या पांचवीलाच पूजलेला असतो, पण तुझ्यासारख्या सूज्ञ स्त्रीनें महाराष्ट्राचा भावी छत्रपती जिच्या उदरीं जन्म घेणार त्या भाग्यशाली राणीनें असे सामान्य स्त्रीला शोभेस संशयी भाषण किंवा वर्तन करणे योग्य नाहीं. उगी रहा ! रडूं नकोस, उगी रहा ! आजचा दिवस हा आपल्या आयुष्यांतील भाग्योदयाचा दिवस आहे. अविवांच्या अमानुष अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या आपल्या महाराष्ट्राचें दास्यविमोचन करणारे रयतेचे कैवारी छत्रपति म्हणून ज्याच्या कीर्तीचा डका अलम दुनियेंत गाजायचा आहे, त्या अवतारी पुरुषाच्या अवतरणाचा संदेश आज आपणांला निश्चितपणे ऐकायला मिळाला. अशा मंगल दिवशी तूं डोळ्यांतून पाणी आणतेस ? वेडी कुठली ! उगी रहा ! रडूं नकोस ! जिजाबाई मोठी चतुर, धोरणी, दूरदर्शी व आत्मसंयमी आर्यकन्या होती. शहाजी राजे मोहित्यांच्या सुंदर तुकाबाईशीं आज ना उद्यां लग्न करणार, आपण असे करूं नका म्हटले तरी ते तें ऐकणार नाहीत, हें ती पूर्णपणें ओळखून होती. त्याविषयीं तिच्या मनाला खेद झाला नव्हता किंवा झाला नसता असेही नाहीं. खेद झाल्याशिवाय कसा राहील ? कोणत्या स्त्रीला संतोषानें आपणाला सवत असावी असे वाटेल ? पण भविष्यकाळी घडूं पाहणाऱ्या त्या नाजूक गोष्टीविषयीं आजपासून धुसफुसूं लागणारी दुबळ्या व चंचल मनाची जिजाबाई नव्हती. ती रागाच्या भरांत 'अरे तर कोरे' या न्यायानें बोलून गेली खरी. रागाच्या भरांत माणूस काय पाहिजे तें बोलतें. पण जिजाबाईला राग येण्याचें खरें कारण तें नव्हतें. आपल्या बोलण्याचा राजांनी विपर्यास केला व आपण आपल्या वडिलांचा मान राखण्यासाठी पतीचा अपमान झालेला सहन करायला तयार असल्याचा वृथा आरोप आपणावर केला, याची तिला चीड आली. तिनें राजांना जाधवरावांपाशी जाऊन सलोखा करण्याच फिरून एकवार प्रयत्न करण्याला सांगितलें, व म्हणूनच राजे शिंदखेडला गेले, एरव्हीं मुळींच गेले नसते हें खरें. तसेंच यापूर्वीही जेव्हां जेव्हां संधि मिळेल तेव्हां तेव्हां ती राजांना उपदेश करी, बाबा कसे झाले तरी वडील माणूस आहेत. त्यांनी आपला एखाद वेळीं अपमान केला असला तरी आपण त्यांचीं लेकरें, आपण त्यांचा अपमान करता कामा नये. जाधव व भोसले यांच्यांत मानापमानाच्या चुरशीमुळे कितीही बेबनाव माजला असला तरी अडल्या भिडल्याला दोघेही एकमेकाना सोयरेधायरे म्हणून उपयोगी पडले पाहिजेत. त्यासाठी दोन्ही घराण्यांमधील बेबनाव नष्ट होऊन दोघांनी एकमेकांशीं गुण्यागोविंदानें वागले पाहिजे. दोघेही हट्टी, कुणीही कुणाशीं नमते घ्यायला तयार नाही, अशानें कसा निभाव लागेल? कुणी तरी एकानें पड खाऊन उभयपक्ष गोडी राखली पाहिजे. ती पड खायला जाधव तयार नसले तर ते हटवादी आहेत हैं ओळखून आपण सुज्ञपणें पड खाली पाहिजे.' पण असाच उपदेश करण्यात आपल्या वडिलांचा श्रेष्ठपणा ठरावा व भोसल्यांच्या पदरीं अपमान पडावा अशी कोती इच्छा तिची कर्वीही नव्हती. विधिसंकेतानुसार जाधव - भोंसले ह्रीं दोन बलाढ्य मराठा सरदार घराणी रक्तसंबंधानें एकजीव झालीं. तीं जर एकाचें तोंड पूर्वेकडे व दुसऱ्याचें पश्चिमेकडे अशा दुज्या भावानें एकमेकांना पाण्यांत पाहू लागली तर त्यामुळे दोघांचीही प्रगति खुंटेल व हे दोन वीरपुरुष आपसांत झगडूं लागून निर्बल झाले म्हणजे दोघांचें भांडण आणि तिसन्याचा लाभ या न्यायानें परक्या मुसलमानांना दोघांचाही धुव्वा उडवून सारे भारतवर्ष जिकडे तिकडे मुसलमानमय करून सोडायला आयतें फावेल. तीच जाधव-भोसल्यांची एकी झाली तर दोघांनाही एकजुटीनें परशत्रूशीं झगडून आपल्या नष्ट राजवैभवाचें पुनरुज्जीवन करतां येईल. जाधव राजकुळांतील माता व भोंसले राजकुळांतील पिता असा दोन राजघराण्यांच्या एक रक्तांतून छत्रपति अवतार घेतील व दोन्हीं राजघराण्यांची कीर्ति अजरामर करून सोडतील. एवढ्या उदात्त हेतूनें आपण आपल्या पतीला जाधवांशीं मिळतें ध्यायला सांगितले. त्याचा आपल्या पतीने अर्थाचा अनर्थ केला. म्हणून जिजाबाईला अपमान वाटला व रडूं आलें. पण राजांनी तिला उठवून हृदयाशी धरतांच तिच्या अपमानाचें व दुःखाचें परिमार्जन होण्याला कितीसा उशीर ? दुसरी तिसरी सामान्य स्त्री असती तर अशा वेळीं सवतीचा प्रश्न झटाला लावून आपला पति इतका आपल्या मुठींत आला असे पाहून अधिक रुसली असती व ' मी दुसऱ्या स्त्रीशी लग्न करणार नाहीं' असें त्याच्यापासून वचन घेईपर्यंत रुसवा न सोडती. मग राजांनीं वेळीं तसे हंगामी वचन मारे अघळपघळपणानें दिलें असतें व तें पुढें मर्जीप्रमाणें अघळपघळपणानें मोडलेंही असतें. त्यामुळे मग त्यांच्या पत्नीचा पतीच्या ह्या वचनभंगामुळें अपमान झाला असता, व त्यांच्या हातूनही वचनभंगाचें नकळत पाप घडलें असतें. पण जिजाबाईनें तसें कांहीदेखील केलें नाहीं. सवतीविषयींच्या प्रश्नाचा खल करायला राजे ओशाळले एवढाच ह्या बाबीपुरता आपला विजय झाला तो सई असे मानून तिनें बाजू मोठ्या चातुर्यानें सांवरून घेतली. " महाराज ! आजच्या शुभ दिवशी आपण मला रडवलें. आपण माझ्यावर भलता आरोप केला नसता तर मला रडूं आलें नसतें. "बरें; ही आमच्या हातून चूक झाली याबद्दल आम्ही आपली क्षमा मागतों, मग तर झालें ? आतां तरी तुमची समजूत होईल की नाहीं ? कीं यापेक्षां निर ळी एखादी शरणचिठी लिहून दिली पाहिजे ? " शहाजीराजे जिजाबाईच्या - त्या आपल्या गृहलक्ष्मीच्या हनुवटीला आपल्या उजव्या हाताच्या बोटानेंच नेट देऊन तिची मान हलकेंच अंमळ वर उचलीत लडिवाळपणाने म्हणाले. शहाजीराजाचे हे बोल जिजाबाईच्या कानांना अमृतापेक्षांही गोड लागले. तिच्या चेहऱ्यावरील दुःख, शोक, अपमान चट्सारा त्याच क्षणांत नाहींसा होऊन तेथें स्मित हास्य विलसूं लागलें. ही वेला स्वारीला एक लहानसा टोमणा द्यायला खाशी आहे असे पाहून ती म्हणाली, " शरणचिठी काय करायची ? आपल्यासारख्या जमदग्नीच्या अवताराकडून आज शरणचिठी घेतली की ती उद्यां मरणचिठीच ठरायची ! " ती कशी काय ? " कशी काय म्हणजे ? चांगल्या हिताच्या गोष्टी मी सांगितल्या तरी त्यांचा आपण विपर्यास करता, कारण मी जाधवांची मुलगी ! मी म्हणत्यें, आपण आज चूक झाली म्हणाला, त्याच चुकांचा खिळा होऊन उद्यां माझ्या पायांत बोंचागचा ! आपण उद्यां रागाच्या भरांत म्हणायचे, 'माझ्या प्रति स्पर्ध्याच्या यःकश्चित पोरीसमोर मला माघार घ्यावी लागली; यांत माझ्या भोंसल्यांच्या वंशाचा अपमान झाला. ' हो ! असे आपण रागाच्या भरांत म्हणायला कमी करायचे नाहीं, माझी बालंबाल खात्री आहे. वाः ! राणीसाहेब ! अखेर तुम्ही आमचे दांत आमच्याच घशांत खासे घातलेत ! मग म्हणायचे तर, जाधवांच्या पोरीनें माझा अपमान केला. म्हणायचें एकदां, म्हणजे जाधवांचे पितर एकदांचे उद्धरून जातील ! " हे पाहा, राणीसाहेब ! आमची चूक आम्ही कबूल केली. चूक कबूल केल्यावर आतां बाकी काय राहिलें ? " बाकी आणखी काय राहणार ? जाधव आणि भोंसले यांच्यांतला बेबनाव तेवढा बाकी राहिला. ह्या वेळपर्यंत राणीसाहेबांची शोभा झाली ती व्याजांत; मूळ शिल्लक आहे तेवढी कायम आहे. ' त्याला आतां कोण काय करणार? मी जाधवांशीं सलोखा करायचे होते नव्हते तेवढे प्रयत्न केले. मामांच्या हातांपायां पडून तुम्हीं सांगितलें तसें नव्हे त्याहीपेक्षा जास्त विनवून पाहिलें. पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. बोलतां बोलतां शहाजीराजांच्या चेहऱ्यावर इतका वेळ विलसणारी प्रसन्नता हळूहळू लोपूं लागली व तिथें गंभीरता हळूहळू वाढीला लागली. इतका वेळ त्यांच्या डोळ्यांत रंगेलपणाची लकेर मारत होती ती आतां लुप्त होऊन तिथें रागीटपणाची लाल छटा उमटली. ते दोन पावलें दूर सरून छातीवर वीराला शोभणारें हातांचें विरासन मांडून म्हणाले, " तेव्हां आतां जाधवांशीं सलोखा करण्याचे सर्व सामोपचार संपले. जाधव फत्तेखानाच्या कारस्थानांत सामील होऊन मोंगालांशी लाळघोटेपणा करून भोसल्यांना वजीरपदावरून हुसकून लावायला तयार झाले, याचाच अर्थ त्यांनी भोसल्यांशी वैर जगजाहीर केले. पण आपण अखेरचा उपाय - रागवणार नाहीं तर बोलत्यें - बोलू का !" " बोला, काय तें बोला. अखेरचा उपाय कोणता ? ' वजिरी पाहिजे तर तुम्ही करा पण निजामशाहीचें रक्षण करा. मोंगलांना निजामशाहीत हात शिरकूं देऊं नका' असें मामासाहेबांना सांगायचें हाच ना तुमचा अखेरचा उपाय ? " हो ! तो एकवार मी म्हणत्यें करून पाह्यचा होता. म्हणजे वजीर जाधव असले काय किंवा भोसले असले काय एकाच्या हाती सत्ता राहती व दसरे त्या सत्तेच्या रक्षणासाठी झटले असते. अशानें परक्या शत्रूला ढवळाढवळ करायला अवसर मिळाला " तो उपायही करून पाहिला मी. " |
मिरज : मिरजेतील समतानगर आणि माणिकनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या मनोज दत्तू जोगदंड (वय ३५, रा. बन्सारोळा, जि. बीड) व विनोद शिवाजी हणमंते (३२, उदगीर) या दोघा गुन्हेगारांना पोलिसांनी बीडमध्ये अटक केली. मनोज जोगदंड याने साथीदारांच्या मदतीने मिरजेत पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. चोरट्यांनी मे महिन्यात समतानगर, माणिकनगर परिसरात पाच ठिकाणी घरफोड्या करून पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते. येथील इलाहीबक्ष मुल्ला, रब्बानी खतीब, जाफर गुरेखान, इजाज सय्यद, पीरामा जातगार या पाचजणांची बंद घरे फोडून पावणेचार लाखां चा ऐवज चोरून नेण्यात आला. चोरट्यांनी एका घरातून चोरलेल्या मोबाईलवरून पोलिसांना त्यांच्या ठावठिकाणा समजला. मनोज जोगदंड, विनोद हणमंते व त्यांच्या अल्पवयीन साथीदाराने मिरजेत येऊन घरफोड्यांचा सपाटा लावला होता. पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे व उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने जोगदंड व विनोद हणमंते या दोघांना बीड येथून अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात येणार आहे. मनोज जोगदंड याने चोरलेले दागिने लातूर येथील सराफाला विक्री केल्याची कबुली दिली आहे. रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाजवळच्या परिसरात घरफोड्या करून रेल्वेने पळून जाण्याची त्यांची पध्दत होती. या चोरट्यांनी मिरजेतील घरफोड्यांसह पुण्यातील सिंहगड रस्ता, लष्करी छावणीच्या आवारातून चंदनाची झाडे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. जोगदंड अट्टल गुन्हेगार असून, त्याने गेल्या पाच वर्षात अनेक घरफोड्या केल्या आहेत. दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. चोरलेला ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलीस पथक बीड येथे जाणार आहे. (वार्ताहर) |
हिंदू शास्त्रांप्रमाणे दर्श अमावास्येला चंद्र पूर्ण रात्र गायब असतो. सुख- समृद्धी आणि कुटुंबाच्या उद्धारासाठी प्रार्थना करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे असे म्हणतात. या दिवशी पूर्वजांची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी पितर खाली येऊन आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात म्हणून या दिवशी मनोभावे प्रार्थना करणार्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील म्हटले आहे. या अमावास्येला श्राद्ध अमावास्या देखील म्हटलं जातं. पितृ दोषापासून मुक्तीसाठी या दिवशी पितृ तरपण, स्नान-दान पुण्य फलदायी प्रदान करणारे मानले गेले आहे. तसेच जीवनातील संघर्ष, अडचणी दूर करण्यासाठी या अमावास्येला व्रत ठेवून चंद्र पूजन केल्याने यश प्राप्ती होते. चंद्र देव सर्व इच्छा पूर्ण करतात. या दिवशी चंद्र दर्शन आणि उपास केल्याने आध्यात्मिक संवेदनशीलता प्राप्त करता येते. दर्श अमावास्येला चंद्राची पूजा केल्याने भाग्य उजळत असून समृद्धी प्राप्त होते. चंद्र देवाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. चंद्रदेवाची पूजा केल्याने मनाला शीतलता आणि शांती मिळते. तसेच ज्या लोकांच्या जीवनात अधिक संघर्ष आहे त्यांनी तर नक्की चंद्र देवाची पूजा करावी. याने त्यांच्या अडचणी दूर होतात. तसेच मोक्ष प्राप्तीची इच्छा असणार्यांनी व्रत करून चंद्र देवाचे दर्शन केल्याने लाभ मिळेल. संध्याकाळी चंद्र देवाची विधिपूर्वक पूजन करावे. गायीच्या तुपाचा दिवा लावावा. कापूर जाळावे. चंद्राला पांढरे फुलं, चंदन, तांदूळ आणि अत्तर अर्पित करावे. खिरीचा नैवेद्य दाखवावा. पंचामृताने चंद्राला अर्घ्य द्यावे आणि पांढर्या चंदन माळीने 108 वेळा "ॐ ऐं क्लीं सोमाय नमः" मंत्र जपावं. पूजननंतर नैवेद्य एखाद्या महिलेला भेट करावे. तसेच अमावास्येला प्रेत आत्मा सक्रिय असतात म्हणून चतुर्दशी आणि अमावास्येला कोणतेही वाईट करणे टाळावे. हा दिवस धार्मिक पद्धतीने, पूजा पाठ, आराधना करत घालवावा. |
वडिलांच्या नावे असलेली शेतजमीन वडील आपल्या नावावर करून देत नसल्यामुळे मुलाने चक्क जिवंतपणीच दुसरा बाप दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित करून खोटे बक्षीस पत्र करत जमीन लाटल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अमरावती : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे जग विस्तारत असताना याचा कोण कसा गैरफायदा घेईल त्याचा काही नेम नाही. आई-वडिलांना देवाचा दर्जा असतो. मात्र, अमरावती जिल्ह्यातील एका महाभाग मुलाने जिवंतपणी चक्क बाप बदलविण्याची घटना घडली आहे. वडिलांच्या नावे असलेली शेतजमीन वडील आपल्या नावावर करून देत नसल्यामुळे मुलाने चक्क जिवंतपणीच दुसरा बाप दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित करून खोटे बक्षीस पत्र करत जमीन लाटल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंतर्गत येणारा वडनेर भूजंग या गावातील एका मुलाने आपल्या वडिलांची जमीन खोट्या वडिलांना उभं करून चक्क फसवणूक करून स्वतच्या नावे लाटल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. फेसबूक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या, कारण ऐकून सगळ्यांनाच बसला धक्का श्रीकृष्ण रामजी देवबाले रा. वडगाव भुजंग असे फसवणूक झालेल्या वडिलांचे नाव आहे. विनायक श्रीकृष्ण देव बाले, दिनेश भगवंत मोहोड, गजानन श्रावण पाटील आणि आणखी एक अनोळखी इसम अशी वडिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. श्रीकृष्ण रामजी उबाळे यांच्या नावे वडनेर भूजंग येथील शेतजमीन गट क्रमांक ५९ व क्षेत्र १ः६३ आर जमीन आहे. सदर जमीन ही आपल्या नावावर करावी असा मुलांचा विचार असावा. मात्र, वडील याला हरकत देत नसल्याने मुलगा विनायकने अचलपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वडिलांच्या ऐवजी खोटे वडील उपस्थित करत त्यांची खोटी स्वाक्षरी करुन वडिलांच्या संमतीशिवाय सदरची जमीन स्वतःच्या नावाने बक्षीसपत्र करून घेतले. |
मालेगाव मतदार संघात महायुती-आघाडीत चुरस; कौल कोणाला?\nडॉ. सुभाष भामरे यांना विजयी करण्यासाठी मालेगाव विधानसभा मतदार संघात राज्यमंत्री दादा भुसे हे देखील प्रचारात उतरले आहेत.महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा मतदार संघात जोरात प्रचार सुरु आहे.मात्र, दुसरीकडे याच मालेगाव विधानसभा मतदार संघात अद्वय हिरे हे कुणाल पाटील यांचा प्रचार करून डॉ. भामरे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे मालेगावमधून कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळणार याविषयी चर्चा सुरू आहे.\nधुळे लोकसभा मतदार संघासाठी येत्या 29 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. धुळे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आणि आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील हे मतदार संघात जोरात प्रचार करताना दिसत आहेत. धुळे लोकसभा मतदार संघात6विधानसभा क्षेत्र येतात. त्यापैकी मालेगाव विधानसभा क्षेत्र हे अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. मालेगावमधून सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार दादा भुसे हे मैदानात उतरले आहेत. मात्र भुसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुभाष भामरे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याने याठिकाणी भुसे यांचा प्रचंड कस लागत आहे. तर दुसरीकडे पूर्वी भाजपमध्ये असलेले आणि भामरे यांच्यावरील नाराजीमुळे काँग्रेसमध्ये गेलेले मालेगावमधील युवा नेतृत्व अद्वय हिरे हे कुणाल पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत. प्रचाराच्या या चित्रामुळे धुळे लोकसभा मतदार संघातील मालेगावमधून कोणत्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मालेगावमधून सुभाष भामरे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा दादा भुसे यांनी संकल्प केला आहे. मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी अद्वय हिरे आणि तुषार शेवाळे हे पुढे सरसावले आहेत.\nया मतदार संघात शिवसेना-भाजप हेच एकमेकांचे शत्रू असताना आता युती झाल्याने येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र फिरावे लागत आहे. याठिकाणी कुणाल पाटील यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी अद्वय हिरे आणि तुषार शेवाळे यांच्यावर आहे.\nदादा भुसे यांचा या ठिकाणी प्रचंड प्रभाव आहे. तो प्रभाव कमी करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. यामुळे या मतदार संघाचे निवडणुकीच्या निकालात किती आणि कसे योगदान राहते हे बघणे महत्वाचे असणार आहे.\nकाय आहेत मालेगावमधील जातीय समीकरणे ?\nमालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात पक्षीय पातळीवर शिवसेना तर जातीय समीकरणांचा आढावा घेतला, तर याठिकाणी मराठा पाटील समाजाचे प्राबल्य आहे. मराठा पाटील समाजाचे 40 ते 42 टक्के मतदार आहेत. तसेच 15 टक्के माळी, 10 टक्के मुस्लीम, 15 ते 16 टक्के दलित, आणि उर्वरित आदिवासी, वाणी, मारवाडी, यासह इतर समाज घटक आहेत. |
EVM चॅलेंजमधून राजकीय पक्षांनी काढला पळ? नवी दिल्ली, दि. 25 - निवडणुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या मतदान यंत्रात होणारी छेडछाड सिद्ध करा असे आव्हान निवडणुक आयोगाने दिल्यानंतर काँग्रेससह बहुतांश राजकीय पक्षांनी या इव्हीएम हॅकिंग चॅलेंजपासून दूर राहण्याचा विचार सुरू केला आहे. तर इव्हीएम हॅक करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणतीही अट वा नियम ठेवू नये अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. गेल्या वर्षभरात देशात झालेल्या बहुसंख्य निवडणुकात भाजपाला मिळालेल्या विजयानंतर अनेक राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या EVM वर संशय घेण्यात येत होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेविषयी वारंवार स्पष्टीकरण दिल्यानंतरही या पक्षांचे समाधान झाले नव्हते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्याकडील मतदान यंत्र हॅक करण्याचे आव्हान राजकीय पक्षांना दिले होते. या आव्हानांतर्गत 3 जूनपासून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडणूक आयोगाकडे असलेल्या इव्हीएम हॅक करण्यासाठी प्रयत्न करू शकतील. इव्हीएम हॅकिंगसाठी दिलेल्या आव्हानाबाबत आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ मंगळवारी निवडणूक आयोगाला भेटले. यावेळी इव्हीएम हॅकिंगसाठी दिलेल्या आव्हानासाठी कुठल्याही अटी वा नियम ठेवण्यात येऊ नये, तसेच या हॅकिंगला खुले ठेवण्यात यावे जेणेकरून मशीनमधील छेडछाडीचा डेमो दाखवता येईल. असे आम आदमी पक्षाने सांगितले. काँग्रेसने मात्र या आव्हानाबावत सावध प्रतिक्रिया दिली आहे. या आव्हानापासून दूर राहण्याचा पक्षाचा विचार आहे, असे काँग्रेसमधील एका वरिष्ठ सूत्राने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने इव्हीएम हॅक करण्यासाठी दिलेल्या आव्हानाच्या प्रक्रियेत काही अटी घातल्या आहेत. त्या अटींनुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तांत्रिक व्यवस्थेच्या चौकटीत राहून इव्हीएममध्ये छेडछाड करावी लागणार आहे. |
अहमदनगर : महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या अडून भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही आज महाविकास आघाडीला लक्ष्य करत आरोप केले. 'Government should take role to give justice to ST workers' राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यात 40 हून अधिक कामगारांचे झालेले मृत्यू भयानक आहेत. सरकारला अजून किती कामगारांचे मृत्यू हवे आहेत? असा संतप्त सवाल माजी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले, संप मोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. मागील पंधरा दिवस एसटी कामगार संपूर्ण राज्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना सरकारला मात्र त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. न्याय मिळत नसल्याने कामगार आता आत्महत्या करु लागले आहेत. दिवसागणिक ही संख्या वाढत चालली असतानाही संपाबाबत सरकार शुध्दीवर नसल्याचे दुर्दैव असल्याचे मत आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा म्हणून एसटीच्या सुविधेकडे पाहिले जाते. परंतु या कामगारांच्या प्रश्नाकडेच महाविकास आघाडी सरकारला पाहायला वेळ नसल्याची खंत व्यक्त करतानाच, एसटी कामगारांच्या श्रमातून महामंडळाचा डोलारा उभा राहिला आहे. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये. सरकारने कामगारांच्या प्रश्नाचा विषय जाणीवपूर्वक प्रतिष्ठेचा केला असल्याचा आरोप आमदार विखे यांनी केला. कामगारांना न्याय देण्याऐवजी सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. कामगारांचे निलंबन करणे हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे येवून कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय करावा. विनाकारण संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारने घेण्याची मागणी आमदार विखे पाटील यांनी केली. राज्यात वाळू तस्करी नंतर आता गुटखा माफीयांनी डोके वर काढले असल्याकडे लक्ष वेधून, राज्यात गुटखा बंदी असताना बीडमध्ये 32 लाख रुपयांचा गुटखा आलाच कुठून ? मंत्र्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. मंत्र्यांचे नातेवाईक आणि बगलबच्चे या वाळू तस्करीत आहेत. अवैध धंद्यांना सरकारचे एक प्रकार छुपे समर्थन मिळत असल्याने राजकारणातील गुन्हेगारीकरण वाढत चालले आहे. अवैध मार्गाच्या पैशातून निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे भाष्य करुन, बीड मधील गुटखा रॅकेटमध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याची शक्यता व्यक्त करुन, या प्रकरणातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आमदार विखे पाटील यांनी केली. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
जामनेर( प्रतिनिधी) आमचे गाव विकास आमचा विकास या अभियानांतर्गत शहापूर गणात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सरपंच संघटनेचे सचिव युवराज पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की आपण सरपंच जरी पाच वर्षासाठी राहत असलो ,तरी गावात आपण कायमस्वरूपी राहत असतो. म्हणून आपल्या गावाचा शास्वत विकास व गावाच्या मूलभूत गरजा या लक्षात घेऊन सर्वसमावेशक असा आराखडा तयार करण्यासाठी व वेळ प्रसंगी आपला इगो बाजूला ठेवून सरपंचांनी ग्रामसेवकांना मदत करून कृती आराखडा तयार करावा . असे आवाहन केले. यावेळी विस्ताराधिकारी डी एस लोखंडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की 14 वित्त आयोगा चे नियोजन ग्रामपंचायतींना करायचेअसून एक वर्षांचा आराखडा दीडपट आधी बनवायचा आहे. व त्यापुढील पाच वर्षांचा आराखडा हा दुप्पट रकमेचा बनवायचा आहे. साधारणतः लोकसंख्येनुसार हा 14 वा वित्त आयोगाचा निधी आता उपलब्ध होणार असून दरडोई म्हणजे माणसी 408 रुपये वार्षिक असा असेल ,आणि याचं नियोजन करताना ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या तिप्पट समिती तयार करून मग त्यात ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ, ग्राम संसाधन सदस्य ,महिला बचत गट अध्यक्ष ,सचिव, कोषाध्यक्ष सीआरपी आरोग्य सेवक , अंगणवाडीसेविका ,तलाठी कृषी सहाय्यक ,पोलीस पाटील सामाजिक अंकेक्षण समिती सदस्य ,सेवानिवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचारी, राज्य शासन व केंद्र शासनाचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश करावा. तसेच बाल सभा, महिला सभा यांच्यातून सर्वांच्या समस्या जाणून घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करता येईल . याबाबत नियोजन करावे. तसेच 18 शासकीय विभागाच्या समस्या जाणून घेऊन . त्यात त्यांना कुठे स्थान देता येईल ते पहावे . जेणेकरून गावात शाश्वत विकास होऊन गावकऱ्यांचे जीवनमान उंचावेल ,असा हा कृती आराखडा तयार करावा . व शासनाचा हा कार्यक्रम यशस्वी करावा. असे आवाहन केले . यावेळी पर्यवेक्षिका म्हणून केंद्रप्रमुख अलका वानखेडे व मधुकर बहारे आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक संघटनेचे सचिव युवराज पाटील ,जळांद्री सरपंच चांगदेव पाटील, शेळगाव सरपंच निवृत्ती पाटील ,शांताराम जाधव तसेच गणातील सर्व सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडीसेविका ,आरोग्य कर्मचारी ,मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. |
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला आहे. आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओक वर बैठक झाली आहे. सीबीआय चौकशीच्या कोर्टाच्या निर्णयामुळं अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याची बोललं जात आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही. हे ही वाचाः उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा? राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची बातमी माध्यमांना दिली. अनिल देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपवणार असून मुख्यमंत्री तो राजीनामा स्वीकारतील अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे. |
Crop Damage News पुणे : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान (Hailstorm Crop Damage) झाल्याबाबत पीकविम्याची (Crop Insurance) नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत अंदाजे सव्वादोन लाख सूचना दाखल केल्या आहेत. दरम्यान, भरपाईपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना बजावले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकात नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी १. ६० लाखाहून अधिक सूचना दाखल केल्या आहेत. तसेच, काढणीपश्चात नुकसानीच्या घटकासाठी ५६ हजारांपेक्षा जास्त सूचना आलेल्या आहेत. विमा कंपन्यांना आयुक्तालयाने एक तातडीचे पत्र पाठवले आहे. "नुकसान भरपाई प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवावी. तसेच, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची काळजी घ्यावी," असे कंपन्यांना सांगितले गेले आहे. राज्यात १ मार्च ते २२ मार्च या दरम्यान अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बहुतेक सर्व प्रकारातील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमा योजनेच्या कक्षेत सर्व पिके समाविष्ट नाहीत. त्यामुळे योजनेच्या बाहेरी पिकांना भरपाई मिळणार नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेत समावेश असलेली आणि नुकसानदेखील झालेली पिके बघता यात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आघाडीवर आहे. या पिकांना योजनेतून भरपाई मिळू शकते. मात्र, फळपिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतून भरपाई मिळणार आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी स्वतःहून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला कळविणे अत्यावश्यक आहे. नुकसानीबाबत माहिती कळविण्याच्या या प्रक्रियेला 'सूचना देणे' (इंटिमेशन) असे म्हटले जाते. वेळेत सूचना देण्यासाठी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना जागृत करणे व सूचना अर्ज (इंटिमेशन फॉर्म) वाटप करून पुन्हा ताब्यात घेणे, ही महत्त्वाची कामे कंपन्यांनी वेळेत करणे अत्यावश्यक आहे. "फळपिकांचे नुकसान झाले असले तरी सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची तरतूद या योजनेत नाही. गारपिटीचा स्वतंत्र विमा हप्ता भरलेला असेल तरच भरपाईसाठी अर्ज करता येतो. त्यासाठी विमा कंपन्यांनी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे," असे कृषी खात्याचे म्हणणे आहे. फळपिकांबाबत शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीचा लघुसंदेश पाठवूनदेखील सूचना दाखल करता येणार आहे. सूचना अर्ज या बाबींसाठी वापरले जातील : सूचना अर्ज दाखल करण्यासाठी मुदत : पिकाचे नुकसान झाल्याची घटना घडताच ७२ तासांच्या आत. फळपिक असल्यास नियम : - केवळ फळपिकाचा विमा काढला म्हणून भरपाई मिळणार नाही. गारपिटीचा अतिरिक्त विमाहप्ता भरला असेल तरच मिळणार भरपाई. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
दोहा (कतार) : यंदाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा 'ड्रॉ' शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून यजमान कतारचा 'अ' गटात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे युरोप वगळता इतर खंडातील एकही संघ एकाच गटात नाही. येत्या २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत कतारची सलामी लढत दोहाच्या उत्तरेला असलेल्या अल खोर येथील अल बयात स्टेडियममध्ये पहिल्याच दिवशी सेनेगलविरुद्ध होईल. (Draw of FIFA World CUP Decalred) स्पर्धेसाठी ३२ संघाची आठ गटात विभागणी करण्यात आली असून अद्याप तीन संघ पात्र ठरलेले नाही. त्यांच्याही 'ड्रॉ' मध्ये समावेश करण्यात आला. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. गतविजेते फ्रान्सचा 'ड' गटात समावेश असून त्यांची सलामी लढत २२ नोव्हेंबरला स्टेडियम ९७४ येथे युएई, ऑस्ट्रेलिया व पेरू यांच्यापैकी पात्र ठरणाऱ्या एका संघाविरुद्ध होईल. स्पेन व जर्मनी या दोन माजी विजेत्यांचा 'इ' गटात समावेश करण्यात आला असून स्पेनची सलामी लढत २३ नोव्हेंबरला न्यूझीलंड किंवा कोस्टा रिका यांच्यातून पात्र ठरणाऱ्या संघाविरुद्ध अल थुमामा स्टेडियम येथे व जर्मनीची सलामी २३ लाच जपानविरुद्ध होईल. गट : 'ह' - पोर्तुगाल, उरुग्वे, दक्षिण कोरिया, घाना. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
तालुक्यातील पिंपरखेड येथे शेतात खेळत असतांना वादळामुळे झाडाची फांदी तुटून अंगावर पडल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ओम ईश्वर सांळुखे असे मयत बालकाचे नाव असून हि घटना सोमवारी घडली आहे. पिंपरखेड शिवारात मृत बालकाचे वडील ईश्वर सांळुखे यांची शेती आहे. सोमवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वार्यास सुरूवात झाली. त्यामुळे साळुंखे यांच्या पत्नी, ओम व त्याची लहान बहीण हे कांदा झाकण्यासाठी धावपळ करत शेतात गेले होते. शेतात ओमची आई व बहीण कांदा झाकत होत्या. तर ओम हा तेथेच शेतातील आंब्याच्या झाडाखाली खेळत होता. वादळामुळे झाडाची फांदी तुटून अचानक ओमच्या अंगावर पडली. त्याखाली दाबला गेल्याने ओम गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर त्याच्या आईने ओमला शेतातून उचलून गावात आणले. जखमी बालकाला चाळीसगाव शहरात उपचारासाठी खासगी रूग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमोल मोरे यांनी तलाठी व अधिकार्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्यासोबत मदतीबाबत सूचना दिल्या. या घटनेचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला आहे. ओम हा घरातील एकच मुलगा होता, एकुलत्या एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. |
Malaika arora shares her diet and fitness : मलायका फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच लाईमलाइटचा भाग असते. त्याहीपेक्षा वयाच्या 47 व्या वर्षी ती आपल्या फिटनेसविषयी चर्चेत राहिली आहे. अनेकांसाठी फिटनेस ही त्यांची प्राथमिकता आहे. लोक कितीही व्यस्त असले तरीही ते स्वतः ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी थोडा वेळ घेतात. सिनेअभिनेत्री आणि फिटनेस क्वीन मलाइका अरोरा ही यापैकीच एक आहे. मलायका फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच लाईमलाइटचा भाग असते. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षीही ती आपल्या फिटनेसविषयी चर्चेत राहिली आहे. वयाच्या 45 व्या वर्षानंतर, स्त्रियांचे शरीर तरूणपणासारखे आकर्षक आणि फिट राहत नाही. पण स्वतः वर प्रेम करणार्या या अभिनेत्रीने आयुष्यात योग आणि ध्यान यांना महत्त्व दिले. त्यांच्या मते, वय काहीही असो, प्रत्येकाचे फिटनेस लक्ष्य असले पाहिजे. फक्त वजन कमी करणंच नाही तर फिटनेसकडेही तितकंच लक्ष देणं महत्वाचं आहे. या वयानंतर स्त्रियांच्या हाडांची घनता कमी होऊ लागते, यामुळे चयापचय दर कमी होतो. म्हणून फिट होण्यासाठी महिलांना दिवसभर व्यायाम किंवा वर्कआउट करण्याची आवश्यकता नाही, परंतु व्यायाम करण्यासाठी फक्त 60 मिनिटे पुरेसे आहेत. योगा सर्व वयोगटासाठी फायदेशीर आहे. हे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. मलायकाने नियमितपणे योग करून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली नाही तर फिट बनू इच्छिणाऱ्या महिलांसाठीही एक आदर्श ठेवला आहे. तिच्यामते योगामुळे आपल्याला योग्य मानसिकता आणि सामर्थ्याने रोजचे जीवन जगण्याची शक्ती मिळते. हे आपल्याला दररोज नवीन ऊर्जा देते. योगासाठी प्रत्येक वेळी नवीन आसन करण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. योगाव्यतिरिक्त, आपण इच्छित असल्यास, आपण धावणे, चालणे, पोहणे आणि बर्याच शारीरिक करू शकता. मलायका अरोराच्या वर्कआऊटचे वेगवेगळे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधून ती नेहमीच आपल्या चाहत्यांना आकर्षित करते. |
येवला : पुणे-इंदूर महामार्गाचे काम तात्काळ सुरू करा, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला- मनमाडरोड वरील अंकाई येथे विसापूर फाट्यानजीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुणे- इंदूर महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून सदर महामार्गावर रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना झाल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रात्रीच्या वेळेस रस्तालुटीचे प्रमाण वाढलेले असल्याचे तहसीलदार व संबंधितांना दिलेल्या निवेदनात स्वारिपने म्हटले आहे. संबंधित अभियंत्यास तात्काळ निलंबित करून त्यांचे वेतनातून झालेल्या खर्चाची भरपाई करून घ्यावी, झालेल्या कामाची सर्वंकष चौकशी करावी आदी मागण्याही सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनात तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, डॉ. सुधीर जाधव, बाळासाहेब आहिरे, विनोद त्रिभुवन, मयूर सोनवणे, विधाता आहिरे, बाळा सोनवणे, हमजा मन्सुरी, सुरेश सोनवणे, संतोष आहिरे, आकाश गोतीस, बाळासाहेब गायकवाड, भीमराज गायकवाड, तुषार आहिरे, शरद गायकवाड, आशा आहेर, एड. स्मिता झाल्टे, ज्योती पगारे, उषा पगारे, संगीता रणधीर, पार्बताबाई पगारे आदी सहभागी झाले होते. (०१ येवला १) |
विरुर स्टे.:- गडचिरोली जिल्ह्यातील अवैध खरेदी केलेले जनावरे विरूर व परिसरातील मार्गाने तेलंगणात गोवंशतस्करी करण्यात येते. त्यामुळे या गोवंश तस्करीच्या मार्गावर पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. दरम्यान गुरुवारी एका आयशर वाहनातून कोठारी आर्वी -अंतरगाव मार्गे तेलंगणात जनावरांची वाहतूक करीत असतांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडले. 23 बैलांसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदीमुळे विरूर व परिसरातातून महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात तस्करी करण्यात येते. गुरुवारी एमएच 34 बी.जी. 9908 या या मालवाहू वाहनाने 23 बैल तेलंगनात कत्तलीसाठी नेण्यात येत असतांना सकाळी पोलिसांनी रंगेहात पकडले. बैल व वाहन ताब्यात घेतले असून गोवंश तस्करी करणाऱ्या गाडीचालक युनुस अहमद शेख रा. गोयेगाव जि. आसिफाबाद याच्या विरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून बैल लोहारा येथील गोरक्षण केंद्र येथे रवाना करण्यात आले. याची सदस्यता घ्याः टिप्पणी पोस्ट करा ( Atom ) आधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते. वाचकांना सूचनाः- संस्थापक / मुख्य संपादकः- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित "आधार न्युज नेटवर्क" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. |
अनधिकृत बांधकामावरील शास्ती पूर्वलक्षी प्रभावाने सुधारणेचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजला होता. महापालिकेने शहरात ६६ हजार बांधकामे अनधिकृत आहेत, असे प्रतिज्ञापत्र २००८ मध्ये न्यायालयात सादर केले होते. दरम्यान १ आॅगस्ट २००८ नंतरच्या बांधकामांना दुप्पट शास्ती कर लावण्यात यावा, असा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे महापालिकेने शहरातील बांधकामांना शास्ती लावली होती. पूर्वलक्षी प्रभावाने निवासी बांधकामांची शास्ती माफ झाली असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणात अडथळा ठरणारे थकीत शास्ती कराबाबत राज्य शासनाने मंगळवारी निर्णय घेतला. सध्या शास्तीकराची सुमारे ४७६. ३६ कोटी थकबाकी आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचा फायदा एक हजार स्वेअरफुटापर्यंतच्या बांधकामांना होणार आहे. शास्ती कर हा पूर्वलक्षी प्रभावाने संपूर्ण शास्ती कर माफ करावा, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांकडून होत होती. यावरून विरोधी पक्षांनी भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. महापालिका निवडणूकीपूर्वी सहाशे स्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांना पूर्ण शास्ती माफ झाली होती. त्यानंतर महापालिकेने नवीन आदेशानुसार कार्यवाहीही सुरू केली होती. त्यानंतर राज्य शासनाने आज निर्णय घेतला आहे. |
स्वराने अॅथलीट्सला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आणि लिहिले की, 'लज्जास्पद आहे की आमच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय खेळाडूंना लैंगिक छळाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जाते, परंतु आरोपी भाजप खासदारावर काहीच कारवाई होत नाही . त्याला वाचवले जात आहे. #ISstandWithMyChampions. बडतर्फ करा आणि चौकशी करा #BrijBhushanSharanSing. ' व्हिडीओमध्ये स्वरा म्हणाली की, ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत म्हणून नाही, तर अशा कुस्तीपटूंची ही अवस्था असेल तर एका सामान्य महिला पीडितेचे काय होईल म्हणून मी त्यांना पाठिंबा देत आहे. या खेळाडूंनी देशासाठी पदक जिंकल्यावर सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्यासोबत फोटो काढायला जातात, पण आता त्यांच्यापासून अंतर का ठेवत आहेत, असा सवालही स्वरा भास्करने केला आहे. लोकांना त्यांच्या समर्थनार्थ पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
रा. रा. त्र्यंबक नारायण साठे. किर्लोस्कर मंडळीचे पहिले सेक्रेटरी, गंधर्व संगीत मंडळांचे पहिले मॅनेजर. मिरज सिटी म्युनिसिपॅलिटीचे सेक्रेटरी, रिटायर्ड मामलेदार व मॅॉजस्टेट सं० जमखंडी, रिटायर्ड कारभारी राजे घाटगे इस्टेट, जि. सातारा. पूर्वपीठिका व आख्यायिका. लेखकः- रा. त्रिंबक नारायण साठे. महाराष्ट्र संगीत नाट्यकलेचे जनक कै० अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सन १८८० इ. सालीं कविकुलगुरु कालिदास यांच्या ' अभिज्ञान शाकुंतल ' नाटकाचे " संगीत शाकुंतल " या नांवाचें भाषांतर करून नाट्यकलेला नार्के मुरडणाऱ्या संगीतलोलुप महाराष्ट्र वाचकांस उपकृत करून ठेविलें त्यास आज ४९ वर्षे झालीं. या पुस्तकाच्या जन्माचा इतिहास पूर्वी बऱ्याच लोकांस अवगत होता; परंतु त्यांपैकीं फार मोठा समुदाय कालक्रमानें कालवश झाल्यानें जे थोडे जीव घरून उरले आहेत, त्यांपैकीं हा लेखक एक आहे. 66 संगीत शाकुंतल " नाटकाच्या आतांपर्यंत अनेक आवृत्त्या छापून निघाल्या व हजारों प्रती लोकांच्या हातीं पडल्या व त्या लाखों लोकांनीं वाच ल्याही आहेत. परंतु त्यांमध्यें आरंभींच्या आख्यायिका प्रसिद्ध झालेल्या नाहीत; त्या या आवृत्तीमध्यें प्रसिद्ध व्हाव्यात या हेतूनें त्या लिहून काढाव्यात अशी आर्यभूषण छापखान्याच्या चालकवर्गापैकी माझे जुने स्नेही रा. रा. अनंत विनायक ऊर्फ वामनराव पटवर्धन यांची प्रेमाची सूचना झाली. त्यावेळी मी त्यांस कोणच्या आख्यायिका काय हेतूनें प्रसिद्ध होणें जरूर आहे त्याची त्रोटक माहिती सांगितली त्यावरून त्यांनी त्या वेळच्या संगीत नाटकाचा इतिहास काय आहे, नाटकांत भूमिका घेणारे विद्वान पदवीधर कोण होते व ते सरकारी नोकरीत काय हुग्रावर होते आणि साह्यकारी बडी मंडळी कोण होती ही माहिती सुसंगत यावी असे सुचविलें त्याप्रमाणें एक टिप्पण तयार केलें आहे व ते या प्रस्तावनेच्या रूपानें प्रसिद्ध होत आहे. ही पुरवणी प्रस्तावना स्मरणाप्रमाणे तयार केली आहे व ती त्या वेळच्या परमेश्वरक्लृपेनें हयात असलेल्या दोन चार गृहस्थांच्या नजरेखाली घातली आहे. ज्यावेळीं कालिदासांनीं 'अभिज्ञान शाकुंतल' नाटक लिहिलें त्याकाली त्याचे नाट्यप्रयोग त्या कालीन रंगभूमीवर होत असत हें प्रसिद्ध आहे. परंतु त्यावरून त्यावेळच्या प्रेक्षकांमध्यें सभापति कोण होते, भूपति कोण होते, त्याकालीं समकालीन कविवर्ग कोण होता, प्रेक्षक कोणत्या दर्जाचे होते, नाटकाचे प्रयोग राजाश्रयाखालीं प्रेक्षकांस, पंडितांस, आमंत्रण देऊन होत, किंवा त्या वेळच्या नाटक मंडळीस पारितोषके देऊन करण्यांत येत, नटवर्गीत त्यावेळी स्त्री व पुरुष पात्रांची कामें पुरुषच करीत की नटवर्ग स्त्रीपुरुष मिश्र असा होता याचा इतिहास आज कांहींच उपलब्ध नाही. फक्त ग्रंथआधारापलिकडे पुरावा नाहीं. हें न्यून लक्षांत घेऊन या प्रस्तावने॑त 'संगीत शाकुंतल' तयार झाल्यावर आरंभींच्या प्रसंगानुसार नट कोण होते, प्रेक्षक कोण होते, साह्यकारी कोण होते हा थोडासा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. सन १८८० सालीं पुणे शहरी इचलकरंजीकर नाटक मंडळीचे आनंदोद्भव नाटकगृहामध्यें गद्य प्रयोग सुरू झाले; त्यामध्यें कै० विष्णु मोरेश्वर ऊर्फ अण्णासाहेब महाजनीकृत 'तारा' नाटकाचे प्रयोग धूमधडाक्यानें चालू होते. हा नाटक प्रयोग पहाणेस विद्वानांच्या झुंडी लोटत असत. त्यावेळच्या इचलकरंजीकर नाटकाचे मॅनेजर राघोपंत यांचा व अण्णासाहेबांचा दृढ परिचय होता. त्यांचे आमंत्रणावरून एका 'तारा' नाटकास दक्षिण भाग कमिशनरचे ऑफिसांतील मंडळीपैकीं नानासाहेब सोमण, गंगाधरपंत जांभेकर बी. ए, बळवंतराव गोडबोले बी. ए., बापूसाहेब धारप बी. ए. वगैरे मंडळींसह अण्णासाहेब किर्लोस्कर हे आनंदोद्भव नाटकगृहांत गेले. हे जरा उशिरां गेल्यानें नाटकगृह प्रेक्षकांनीं चिकार भरलेले पाहून ही सर्व मंडळी अप्पा बळवंताचे बाड्यालगत पूर्णानंद नांवाच्या नाटकगृहांत पारशी नाटक मंडळीचा & इंद्रसभा ' हा गद्यपद्यात्मक प्रयोग पहाणेस जाऊन बसली. त्यावेळी अण्णासाहेबांचें मन पारशी नाटकांतील संगीत संचारानें बेघून गेले आणि अर्से संगीतात्मक नाटक मराठी भाषेमध्यें केल्यास |
गांधीजी आणि आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचा प्रवास एकाच दिशेने पण समांतर झाला. आंबेडकरवाद्यांनी गांधीजींना समजून घेतले नाही आणि गांधीवाद्यांनी आंबेडकरांना. दोघांचा वारसा सांगणाऱ्या पुढाऱ्यांनी या दोघांना एकत्र आणलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी. अन्यथा या दोन्ही विचारधारा जवळही येऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून प्रयत्न केले. असे कितीही प्रयत्न केले असले, तरी अनेक बाबतीत गांधी आणि आंबेडकर एकमेकांची गळाभेट अनेकदा झालीय. तुकाराम त्यातली एक गोष्ट. स्वतःला'यातिहीन' म्हणणारा आणि विद्रोहाची पताका उंचावणारा तुकाराम आंबेडकरांना आपलासा वाटलाच. पण तितकाच 'विष्णुदास' असणारा आणि पदोपदी संतसंग मागणारा तुकाराम गांधीजींना आवडणे तितकेच स्वाभाविक होते. आपण दोघांच्याही पूर्वपरंपरेत शोभून दिसणारा तुकाराम समजून घेऊया. एकदा ते झाले की गांधी आणि आंबेडकर दोघेही आरशासारखे समोर दिसू लागतील. नंतरच्या काळात सर्वोदयीचे आश्रमातल्या प्रार्थना, भजन हे सारे माणसं घडवण्याचेच प्रयोग होते. स्वतः मोहनदासाचा महात्मा बनण्याचा प्रवासही अशाच प्रयोगांचा होता. प्रयोग, सत्याचे प्रयोग. साधन स्वतः, साधक स्वतः आणि साध्यही स्वतःचंच. तुकारामही असेच आतआत डोकावत सत्यापर्यंत पोहोचलेले. भगवंताच्या भेटीसाठी स्वतःच धावायचं, स्वतःच पडायचं, स्वतःच स्वतःला हुरूप द्यायचा आणि स्वतःच स्वतःला घडवायचं. तुकारामांचा कोणी गुरु नाही. गांधीजींचही तसंच. त्यांनी अनेकांचा गुरु म्हणून उल्लेख केला, पण फुलटाइम गुरु त्यांनाही नव्हता. तसं पाहिलं, तर सद्विचार हेच या दोघांचे मार्गदर्शक होते. हे विचार जीवनात उतरवण्यासाठी दोघांनीही आटापिटा केला. विचार जीवनात उतरविणं हेच ज्ञान असतं. सॉक्रेटिस याविषयी ठाम सांगतो , virtue is knowledge असे विविध सद्विचार गांधीजींनी आश्रम भजनमाला मध्ये एकत्र आणले आहेत. आजचा अभंग संतपणाबद्दलचा. |
प्रियंका चोप्राचा 'द व्हाईट टायगर' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमात प्रियंका व राजकुमार राव लीड रोलमध्ये आहेत. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे आणि आता एक फोटो शेअर करत प्रियंकाही चर्चेत आली आहे. होय, प्रियंकाने नुकताच तिचा पेट डॉग डियानासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात प्रियंका व डियाना दोघेही मॅचिंग ड्रेसमध्ये दिसत आहेत. 'व्हाईट टायगर व त्याचा बच्चा,' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. एकंदर काय, तर हौस ती हौस आणि सिनेमाचे प्रमोशन ते प्रमोशनही असा प्रियंकाचा दुहेरी उद्देश सार्थ झाला आहे. सध्या पीसीचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा 'टेक्स्ट फॉर यू' हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले. याआधी ती 'वी कॅन बी हिरोज' या हॉलिवूडपटात दिसली होती. प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. प्रियंका पतीपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. शिवाय प्रॉपर्टीच्या बाबतीतही ती निकच्या कितीतरी पुढे आहे. प्रियंका सुमारे 200 कोटींच्या प्रॉपटीर्ची मालकीन आहे. तर निककडे 175 कोटींची प्रॉपर्टी आहे. प्रियंका आणि निक दोघांनाही लक्झरी लाईफ आवडते. दोघांकडेही महागड्या गाड्या आहेत, अलिशान बंगले आहेत. |
दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । फलटण । अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून 'विशेष राज्य अतिथी' हा राजशिष्टाचार दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना बेडकिहाळ यांनी सांगितले की, दि. 17 व 18 जानेवारी 2023 रोजी इंदूर येथे 'प्रांतीय मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलन' पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी म. सा. प. चे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांची निवड झाली होती. त्यावेळी मध्यप्रदेश सरकारने प्रा. जोशी यांना जाण्या-येण्याच्या प्रवासासह इंदूर येथील वास्तव्यात 'विशेष राज्य अतिथी' दर्जा दिला होता. शिवाय राजशिष्टाचार म्हणून एक्सॉर्टसह वाहन, संरक्षण, निवास आदी व्यवस्था देण्यात आल्या होत्या. मध्यप्रदेश सरकारने मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल जशी उदार भूमिका दाखवली त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या प्रचार, प्रसार व संवर्धनासाठी राज्य अतिथी दर्जाचा राजशिष्टाचार द्यावा. दि. 3 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करुन त्याचदिवसापासून संमेलन अध्यक्षांना असा विशेष दर्जा देण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सदर मागणीबाबतचा ठराव नुकत्याच पुणे येथे झालेल्या म. सा. प. कार्यकारी मंडळ सभेत आपण मांडला असून तो सर्वानुमते मंजूर झाल्याची माहितीही बेडकिहाळ यांनी दिली. |
शहरातील एका बडया व्यावसायिकाला दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकावणा-या दोन तरुणांना नुकतीच गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. मुंबई- शहरातील एका बडया व्यावसायिकाला दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकावणा-या दोन तरुणांना नुकतीच गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. संतोष खानविलकर व सुशांत बाईत अशी या दोघांची नावे आहेत. संतोषचे वडिल आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे व्यावसायिकाच्या कर्मचा-यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्याने खंडणीची योजना आखली होती. यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर २०१५ पासून त्यांना मोबाईल नंबरवरून धमकीचे संदेश येत होते. त्यात त्यांच्या कुटुंबीयांची तसेच व्यवसायाची माहिती होती. त्यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर विभागाने छापा टाकल्याची माहिती देण्यात आली होती. त्याच्या व्यवसायाची संबंधित विभागाला देण्याची धमकी देऊन खंडणीखोर त्यांच्याकडे दोन कोटी खंडणीची मागणी करत होते. त्यांच्या व्यवसायात गुंतलेल्या तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांची व्हीडिओ सीडी असल्याचे सांगून खंडणीखोरांनी ती सीडी संबंधित विभागाला देण्याचीही धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात खंडणीच्या तक्रार नोंदवली होती. याचा संमातर तपास खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करत होते. हा तपास सुरू असताना त्यांच्या कार्यालयात विक्रीकर विभागाने अलीकडेच सर्वे केला होता. मात्र त्यांनी विक्रीकर विभागाने सर्व माहिती दिली होती. ही माहिती बाहेर कशी आली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू होता. याच दरम्यान या व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देणा-या संतोष आणि सुशांत यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या चौकशीत संतोषची आई याच परिसरात खानावळ चालवते. तिथेच या व्यावसायिकाचे काही कर्मचारी जेवणासाठी येत होते. त्यांच्याकडून ही माहिती संतोषला मिळाली होती. त्यानंतर त्याने सुशांतच्या मदतीने त्यांना खंडणीसाठी धमकी देण्यास सुरुवात केली होती. खंडणीसाठी त्यांनी एक चायना मोबाईल खरेदी केला होता. या दोघांनाही एका महिलेचा सीमकार्ड मिळाला होता. याच सीमकार्डवरुन ते खंडणीसाठी धमकी आणि एसएमएस करत होते. |
शिंदे सरकार कोसळण्याबाबत जयंत पाटील यांचे भाकीत. . . भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होईल. मुंबईः भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होईल. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील सध्या मराठवाडा विभागाच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी अहमदनगर आणि औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, 'सरकारची प्रशासनावरची पकड मजबूत नाही. प्रशासनसुद्धा सरकारचे ऐकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त 40 मतदार संघापुरत्या विविध घोषणा करीत आहेत. पण, उरलेल्या मतदारसंघाचे काय? कोणत्याही घोषणेचे GR नाहीत तसेच आदेशही नाहीत. ' दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिखित भाषण वाचतात, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. महाभारतच्या बातम्या मिळविण्यासाठी व्हॉट्सऍप ग्रुपला जाईन करा अथवा 95118 27050 हा क्रमांक तुमच्या मोबाईलवर ग्रुपवर ऍड करा. |
नोटाबंदीचा काळ प्रत्येकाने पाहिला असेल, तो काळ लक्षात ठेवा जेव्हा मध्यरात्रीनंतर 500 रुपये आणि हजाराच्या नोटांचे मूल्य फक्त कागदाच्या तुकड्याएवढे झाले. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये 500 आणि 1000 च्या नोटा तात्काळ चलनातून बाद करण्यात आल्या. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे 500 ची नोट नोव्हेंबर 2016 पूर्वी चालत असेल. म्हणजेच 500 ची जुनी नोट आहे, तर समजा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले आहेत. जर तुम्ही रांगेत उभे राहून नोटा जमा केल्या असतील तर तुमच्यासाठी काहीच नाही. तरीही, एकदा तुम्ही तुमची पिगी बँक, पर्स, तिजोरी तपासा. कदाचित एखादी नोट चुकून जमा करण्यासाठी राहिली असावी. ही 500 ची नोट तुम्हाला श्रीमंत करेल. म्हणजेच 500 ची जुनी नोट तुम्हाला मिळाली तर समजा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुमच्याकडे 500 रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्हाला या नोटेमध्ये दोनदा सीरियल नंबर छापलेला नाही असे दिसेल. तसे असल्यास, तुम्हाला त्या बदल्यात 5,000 रुपये मिळू शकतात. याशिवाय, जर या नोटेचा भाग जास्त असेल तर तुम्हाला त्याच्या बदल्यात आणखी 5,000 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला या नोटेच्या बदल्यात 10,000 रुपये मिळतील. 500 ची नोट विकण्यासाठी, तुम्हाला प्रथम व्यावसायिक वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, तुम्हाला साइटवर जाऊन विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या नोटचे चित्र ऑनलाइन अपलोड सेलवर टाकू शकता. तिथून इच्छुक लोक तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्ही घरी बसून मोठी कमाई करू शकता. PM किसान योजनाः शेतकऱ्यांसाठी खुशखबर, PM किसान चा पुढचा हप्ता 'या' महिन्यात येणार ! |
नगरमधील एका टोळीने पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविल्याची घटना उघडकीस आली आहे. (ahmednagar honeytrap case) वडगाव गुप्ता (Vadgoan Gupta) परिसरात राहणार्या तरूणीने त्या बागायतदाराशी मैत्री करून त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली. या बागायतदाराने त्या ट्रॅपवाल्या टोळीला चेकने पैसे दिले व नंतर एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात फिर्याद दिल्याने नगरमधील हनीट्रॅपची नवीन टोळी उघड झाली आहे. पोलिसांनी त्या ट्रॅपवाल्या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 15 व 16 जून रोजी ही घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यामध्ये वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा पती व त्यांचा पाथर्डी तालुक्यातील एका पंटरचा समावेश आहे. ते सध्या पसार झाले असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तरूणीने त्या बागायतदाराला फोन करून त्याच्याशी मैत्री केली. या मैत्रीतून तीने त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले. 15 जून रोजी सायंकाळी बागायतदाराला घरी बोलून घेतले. ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी तरूणीचा पती आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले असे भासवून बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. दुसर्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील पंटरला मध्यस्थी घालून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी त्याची फिर्याद दाखल करून घेतली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा तपास करत आहे. दरम्यान नगर तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हनीट्रॅपची एक टोळी उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात हनीट्रॅपच्या घटना घडल्या. आणि आता पुन्हा नगरमध्ये हनीट्रॅपची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीला अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. |
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या सरकारच्या गाडीचं स्टीरींग कोणच्या हातात आहे उद्धव ठाकरे कि अजित पवार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. मात्र रावसाहेब दानवे यांनी या प्रकाराव महाविकास आघाडीओ सरकारला जोरदार टोला लगावला आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचं स्टिअरिंग हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे", असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. "गाडी एक आणि चालवणारे दोन आहेत, स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. पण राज्याच्या कारभाराचे स्टिअरिंग एकाच्या हातात असलं पाहिजे. स्टिअरिंगवरील हात निसटला तर अपघात होऊ शकतो", असं दानवे म्हणाले. त्याचबरोबर "त्यांच्याकडे लायसन्स आणि इन्शुरन्सही नाही", अशी मिश्किल टिप्पणीदेखील रावसाहेब दानवेंनी यावेळी केली. |
कराड - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून कराड नगरपालिकेने पिक्सल आर्टमधील गांधीजींचे छायाचित्र बनवून कराडकरांना अनोखी भेट दिली आहे. साधारण बारा बाय बारा फूट असलेल्या या फ्रेमचे वजन 200 किलो आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कराडात बनविण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटमध्ये या फ्रेमची भर पडली आहे. कराडमधील आर्टीस्ट नितीन भोसले यांच्या संकल्पनेतून व मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेली ही फ्रेम नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनली आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेतल्यापासून पालिकेने विविध संकल्पना राबवित कराड शहराला वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वच्छ व सुंदर कराड शहर अशी ओळख बनवित देशात प्रथम क्रमांकाचे बक्षिसही पटकावले आहे. आता 2020 च्या स्पर्धेत पुन्हा एकदा देशात कराडचा डंका वाजविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने कराडात अनेक ठिकाणी स्लेफ्टी पॉईंट, कारंजे उभारण्यात आले आहेत. या सर्व संकल्पना साकारताना कराडमधील आर्टीस्ट नितीन भोसले यांचे पालिकेस सहकार्य लाभले आहे. नितीन भोसले हे कराडचेच आर्टीस्ट आहेत. कृष्णा कला महाविद्यालयात पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांचे मन तिथे रमले नाही. त्यांच्यातला कलाकार त्यांना खुणाऊ लागला. त्यांनी त्यांच्या कल्पनेतून अनेक नावीण्यपूर्ण संकल्पना पुणे, मुंबई, अहमदनगर या सारख्या शहरांमध्ये साकारल्या आहेत. आपण इतर शहरांसाठी करतोय पण आपल्या शहराला आपल्या कलेचा काहीच उपयोग होत नाही अशी खंत त्यांना सलत होती. त्यांची कला पाहून कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कराडसाठी काही संकल्पना राबविण्याबाबत विनंती केली. भोसले यांनीही त्याला लगेच होकार दिला. यातूनच गत वर्षभरात पालिकेत राजहंस, कोल्हापूर नाक्यावरील आय लव्ह कराड, बारा डबरी परिसरातील बाग या सुंदर कल्पना साकारल्या गेल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत काही कल्पना राबविण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश आले होते. टाकाऊपासून टिकाऊ हा विषय असल्याने भोसले यांनी आईसक्रीमच्या कपपासून महात्मा गांधी यांचे पिक्सल आर्ट असलेली फ्रेम बनविण्याचा विचार केला. तो त्यांनी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व पदाधिकारी यांच्यासमोर मांडल्यानंतर सर्वांनी त्याला एकमताने मंजुरी दिली. गांधी जयंतीदिनीच ही फ्रेम उभारण्याचे ठरविण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात प्रीतिसंगम बागेवर ही फ्रेम ठेवण्यात येणार असून कराडच्या वैभवात यामुळे भरच पडली असल्याच्या अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या. महात्मा गांधीजी यांच्या पिक्सल आर्ट फ्रेमसाठी आइसक्रीमच्या कपचा उपयोग करण्यात आला आहे. सुमारे 2 हजार 116 कप या फ्रेमवर बसविण्यात आले असून रंगकामासाठी मेटॅलिक कलरचा वापर करण्यात आला आहे. गत चार महिन्यांपासून फ्रेम बनविण्याचे काम सुरू होते. तर कप चिकटविण्यासाठी 30 तासांचा कालावधी लागला. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत कराड शहरासाठी काहीतरी नावीण्यपूर्ण संकल्पना साकारण्याची मला संधी मिळाली याचे मला समाधान वाटते. शहरात राबविलेल्या संकल्पना लोकांना आवडत आहे. आणखी काही संकल्पना राबविल्या जाणार असून येत्या काही वर्षात कराडला नवी मुंबईचे स्वरूप प्राप्त होईल. |
मुंबई । दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मला दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातून एक नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात यावं अशी ती नोटीस होती. त्यात दिशा सालियानच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगायला बोलावण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. दिशाबाबत जे काही मी आणि नितेश पत्रकार परिषदेत बोललो होतो. तिचे खरे आरोपी पकडले पाहिजेत. तिने आत्महत्या केली नसून ती हत्या आहे, असं मी वारंवार बोलत होतो. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दिशाच्या आईकडे गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आईला खोटी तक्रार करायला लावली, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे. माझ्या जबाबात मी सुरुवातीपासून घडलं ती माहिती आणि आम्ही जे बोलत होतो ते सांगितलं. एवढंच नाही तर दिशा सालियानची 8 जून आणि सुशांतची 13 जूनला हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आला की, तुम्ही सुशांत आणि दिशाच्या केसबाबत बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. मी बोललो मी एक लोकप्रतिनिधी आहे, का बोलू नको? तर तु्म्हालाही मुलं आहेत, तुम्ही असं काही करु नका. मात्र, माझं हे वाक्य माझ्या जबाबातून वगळण्यात आलं आहे. याचाच अर्थ हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित आहे, असं राणेंनी म्हटलंय. कोणावर अन्याय होत असेल तर आम्ही अन्यायाविरोधात आवाज उठवणारचं. आमच्या आयुष्यातून 5 तास घेतले म्हणजे फार काही फरक पडणार नाही. दिशा सालियानची माझ्या माहितीप्रमाणे केस बंद करण्यात येतेय. ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करत आहे. पण मी शेवटपर्यंत आवाज उठवत राहणार, असा इशाराही राणेंनी दिला आहे. मला 9 तास बसवून घेतलं. मी सांगतोय मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे. आम्हाला अधिकार आहे कुणावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून द्यावा, असं नारायण राणे म्हणालेत. |
अज्ञेयवादी - कोण आहे तो? अज्ञेयवादी - मी कोण जगातील ज्ञान तत्त्व अशक्य आहे असा विश्वास एक व्यक्ती आहे. निसर्ग कायदे, तसेच जगातील आमच्या समज, वैज्ञानिक तसेच तात्विक संकल्पना स्वीकारण्यात आली, आणि, जग करून obscured जात मिळाल्यामुळे, आणि लोक स्वतंत्रपणे प्रत्येक इतर स्वतः करून अस्तित्वात करू. विज्ञान आणि अशा पध्दतीने धर्म संस्कृती एक घटक, संस्कृती एक आवश्यक गुणधर्म, म्हणून इतर तात्विक प्रवाह मध्ये मूळचा आहे की एक स्वतः ची सुधारणा तंत्रज्ञान म्हणून समजले जाते. त्यामुळे विचारतः "अज्ञेयवादी - कोण आहे" - आम्ही या लोकांना मान्य आहे मानसिकता साशंक लोकांना, जीवन, सामाजिक सवयी एक मार्ग म्हणून परिपूर्ण शंका निवडले आहे म्हणून. या दृष्टीकोन त्यांना सार्वत्रिक विश्वास आणि वैज्ञानिक सत्य बिनशर्त स्वीकृती जगात टिकून मदत करते. "अज्ञेयवादी - हा कोण आहे," प्रश्नाचे उत्तर शोधात निष्ठा चित्रपट कसा तरी आठवण "कार सावध रहा. " कार मध्ये संभाषण लक्षात ठेवाः काही आहे की देव अस्तित्वात नाही विश्वास आहे. इतर देव अस्तित्वात आहे, असा विश्वास. आणि मग, आणि अधिक सिद्ध जाऊ शकत नाही. असा विचार अज्ञेय म्हणून बद्दल आहे. अध्यात्मवाद - विचार ही ओळ विरुद्ध. हा सिद्धांत प्रसार की आमच्या जगात, मानवी क्रिया समावेश सर्वकाही, काही कायदे कमी आहे विश्वास. अपघात घडतात, आणि सर्व कार्यक्रम 100 टक्के संभाव्यता जागा घेऊ नका. दुसरी गोष्ट की आम्ही निसर्ग काही कायदे जाणीव असू शकत नाही, पण तो वेळ आणि संयम फक्त एक बाब आहे. तथापि, माझ्या मते, आणि एका Gnostics अज्ञेयवादी तत्समः वस्तू आणि घटना मर्यादित त्यांचे सिद्धांत संरेखित दूर ठेवणे जे साहित्य "सुरवात" म्हणून गणले जातात. Gnostic बिंदू, रेषा, जागा आहे. अज्ञेयवादी साठी - त्यांच्या स्वतः च्या वृत्ती, वैयक्तिक गोष्टी कल्पना. दुसऱ्या शब्दांत, सर्व तत्वज्ञानी एक गोष्ट सहमतः विश्वास काहीतरी (Aristotelian मुख्य जाऊन पोहोचला एक प्रकारचा) घेणे, आणि नंतर त्याच्या मुद्दा सिद्ध करण्यासाठी योग्य आहे. "अज्ञेयवादी - हा कोण आहे" वर शकतील काय, आम्ही असा विश्वास समस्या स्पर्श करू शकत नाही. तो संपूर्ण उच्च सार माध्यमातून धर्म स्पष्ट रचना जगात येतो तेव्हा, समस्या आधी नास्तिक गृहीत घेतले आहे की उद्भवली आहे. वैज्ञानिक सत्य किंवा निसर्गाच्या नियमांचे मोजू नका. त्यांच्या मते, तो साधने फक्त ज्ञान आहे. axioms (वरील बिंदू आणि जागा म्हणून) तयार करणे, खूप, एक सुरवात आवश्यक आहे, आणि या देखील आला पाहिजे. आणि पर्यायाने आणि शंकांना माध्यमातून. शक्यता विश्वास पुन्हा एकदा आहेत. नाही हेही त्याचे जीवन शेवटी अल्बर्ट आइनस्टाइन एक गंभीरपणे धार्मिक मनुष्य बनला. म्हणणार होता, युनिव्हर्सल आणि गोष्टी निसर्ग त्यांच्या स्वतः च्या मते नकार काय फरक आहेः व्यतिरिक्त, प्रश्न देखील एक बरगड्यांच्या खाली निसर्ग आहे? अर्थात, दृश्ये, तत्त्वज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक समुदायात विशिष्ट नकार अधीन. त्यामुळे प्रश्नाचे उत्तरः "अज्ञेयवादी - कोण आहे" - तुम्ही उत्तर विमान धोरण मध्ये, विलक्षण गोष्ट पुरेशी आहे, हे समजणे आवश्यक आहे. पहिल्याने, देव आणि विज्ञान शंका जगातील उदारमतवादी दृश्य आणि त्यांच्या स्वतः च्या, वैयक्तिक हितसंबंध आधारावर काय होत आहे ते वैयक्तिक मूल्यांकन संबंधित "तृतीय पक्ष", मोफत निवड भर कारण. दुसऱ्या शब्दांत, agnosticism, त्याच्या प्राचीन ग्रीक मूळ असूनही, एक व्यापारी संकल्पना मध्ये चालू आहे आणि स्पष्टपणे प्रोटेस्टंट मूल्ये ताल फिट. आणि दुसरे म्हणजे, अज्ञेयवादी इच्छा च्या परिपूर्ण स्वातंत्र्य, परंपरेनं त्यांचा देव म्हणून मानले जाऊ शकते जे जगात राहतात. परंतु मोफत इच्छा - कॅथोलिक आहे उशीरा मध्ययुगीन आणि व्यापारी कायदा मूलभूत संकल्पना, जे पाया नेपोलियन आणि Hegel स्थापना आहेत. व्यक्ती फक्त स्वतः साठी जबाबदार आणि त्यांच्या क्रिया करीता जबाबदार आहे - निष्कर्ष आहे. आणि इतर संबंधित त्याच्या शंका त्यामुळे मुक्त. |
लहानपणी मी दरवर्षी गणपतीसाठी आईबरोबर आजोळी मुरुडला जायचे. मुरुड म्हणजे जंजिरा-मुरुड. आमच्या गावाहून आधी एसटीने किंवा कधी बाबाही सोबत असतील तर मोटरसायकलवर, दिघीला जायचं. तिथे लॉंचच्या धक्क्यावर पोचलं, की 'आगरदांडा की राजपुरी' असा एक पर्याय असायचा. राजपुरीला जाताना लॉंच जास्त हलायची, कारण ते खुल्या समुद्राच्या जास्त जवळ आहे. अर्थात अगदी लहानपणापासून हा प्रवास अनेकदा केल्यामुळे लॉंच कितीही डुचमळली, तरी मला कधीच भीती वाटली नाही. लॉंच चालवणारी माणसं तर लीलया मोटरसायकली, स्कूटर्स लॉंचच्या टपावर वगैरे चढवायची. विषयः शब्दखुणाः |
Gitanjali Express derailed हावड- मुंबई गितांजली एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी ११. १५ वाजताचे सुमारास घडली. अकोला : बोरगाव मंजू ते काटेपूर्णा दरम्यान हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी ११. १५ वाजताचे सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान या अपघातामुळे अप व डाऊन लाईनवरची रेल्वे वाहतुक विस्कळित झाली आहे. हावडाहून मुंबईकडे जाणारी ०२२६० क्रमांकाची विशेष गाडी आपल्या नियमित वेळेवर धावत असताना सकाळी ११. १५ वाजताचे दरम्यान काटेपूर्णा ते बोरगाव मंजू रेल्वे स्थानकादरम्यान आली असता, या गाडीचा शेवटचा डबा (एसएलआर) अचानक रुळावरून घसरला. डबा घसरताच रेल्वे थांबली. मोठा आवाज झाल्याने गाडीतील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. रुळावरून घसरलेला डबा डाऊन लाइनपर्यंत गेल्याने दोन्ही बाजूची रेल्वे वाहतुक थांबविण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकारी व रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घसरलेला डबा रुळावरुन बाजूला करण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे. |
वैराग : शेतात पाईपलाईन करावयाची आहे, कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावे म्हणून गरोदर महिलेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरा, नणंद यांच्याविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. साजिद मुस्तफा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार चार वर्षांपूर्वी वैराग येथील फिर्यादी साजिद मुस्तफा यांचा पंढरपूर येथील मुस्तफा शेख याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिन्यातच शेतात पाईपलाईन करायची आहे, झालेले कर्ज फेडायचे आहे म्हणून पती व सासू, सासरे, नणंद यांनी एक लाख रुपये घेऊन ये म्हणून जाचहाट सुरू केला. काही दिवसांनी गरोदर राहिल्यावरदेखील अतिकष्टाची कामे सांगून शारीरिक, मानसिक त्रास दिला. तसेच उपाशी पोटी ठेवून रात्री अपरात्री घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वडील शादूल पठाण (रा. वैराग) यांना मुलीचा छळ सुरू असल्याचे समजताच २२ हजार व परत ४५ हजार रुपये असे दोनवेळा त्यांनी पैसे दिले. त्यानंतर त्यांना समाजावून सांगितले होते. दरम्यान, फेब्रुवारी २०२१ मध्ये आई पंढरपूर येथे आल्यावर तिला काठीने मारहाण केली. तसेच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही दे, तलाक दे म्हणून घरातून हाकलून दिले आहे. तेंव्हापासून ती माहेरी वैराग येथे आली. १४ जुलै रोजी पीडित महिला साजिदा शेख यांनी महिला सुरक्षा कक्षात तक्रार दिली. बुधवारी वैराग पोलिसात पती मुस्तफा शेख, सासरा सत्तार शेख, सासू शबाना शेख, नणंद मुस्कान शेख (सर्व, रा. पंढरपूर) यांच्या विरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
लाईव्ह न्यूज : "भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी" महाराष्ट्र : महाराष्ट्र : मुंबई : Mansukh Hiren Case: 'मनसुख हिरेन घरातून निघाले तेव्हा. . . '; धक्कादायक माहिती समोर, प्रकरण वेगळ्याच वळणार! मुंबई : महाराष्ट्र : राजकारण : महाराष्ट्र : राजकारण : महाराष्ट्र : महाराष्ट्र : |
स्मार्टफोन कंपनी 'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करत आहे. कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन 'realme x50 pro 5g' चा एक टीजर शेअर करत कंपनीने यात काही फीचर्सबाबत माहिती दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 20X हायब्रिड झूम सपोर्ट, फोटो आणि व्हिडिओ मोडमध्ये स्विचिंग सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. कॅमेराबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु यात १३ मेगापिक्सल टेलीफोटो लेन्सचा वापर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय, Snapdragon X55 5G मोडेम, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असणार आहे. कंपनीने ट्विटरवर या फोनच्या लॉन्च इव्हेंटबाबत एक टीजर पोस्ट केलं आहे. स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीही आहे. यात 65W SuperDart चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. |
जळगाव : जामनेर पोलिसात मोबाईल चोरी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप केशव गोपाळ (21, रा. आयटीआय कॉलनी, जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवार, 5 जुलै रोजी दुपारी दोन वाजता जामनेरात करण्यात आली. संशयिताकडून नऊ हजार 400 रुपयांची रोकड व मोबाईल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, रणजीत जाधव, सचिन महाजन, प्रीतम पाटील, संदीप सावळे, किरण चौधरी ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, संशयित संदीप गोपाळ विरोधात जामनेर पोलिसात मोबाईल चोरीचा गुन्हा (199/2023) दाखल असल्याने त्याचा शोध सुरू असताना तो जामनेरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास बुधवारी अटक करण्यात आली. अधिक कारवाईसाठी त्यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. |
तालुक्यातील वाडेगव्हाण येथे स्वयंपाक घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करत चोरट्यांनी 42 हजाराचा ऐवज पळवल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) मध्यरात्री घडली. याप्रकरणी मनोज विलास शेळके यांनी सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शेळके परिवार नेहमीप्रमाणे जेवण करून झोपल असता. पहाटे तीन वाजता शेळके यांना काहीतरी पडल्याचा आवाज आलाने ते जागे झाले. पत्नीसह ते रुममध्ये आले आसता त्यांना लाकडी कपाट उघडे दिसले व त्यामधील सामान खाली व इतरत्र आस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यांनी लगेच खाली येऊन आई - वडील व भावाला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाहिले असता त्यांच्या रुमला बाहेरून कड्या लावल्याल्या दिसल्या. त्यांना सोडवून पााहणी केली असता. कपाटातील 42 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. सुपा पोलिसांनी मनोज शेळके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील केलपाणी आणि चुनखडी गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील केलपाणी आणि चुनखडी गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी महसूल व वन विभागाने १३५०. ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २७. ६८ वर्ग किलोमीटरची व्यापकता असलेल्या या प्रकल्पात १५०० किलोमीटर कोअर (अतिसंरक्षित) क्षेत्र आहे. ११३ गावे बफर झोनमध्ये असून २२ गावे अतिसंरक्षित क्षेत्रात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील १४ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. अन्य १९ गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्वसन करताना तेथील लोकसंख्येसह अन्य सर्व सुविधाही बाधित होत असतात. जेथे पुनर्वसन करावयाचे आहे तेथे मूलभूत नागरी सुविधा नव्याने कराव्या लागतात. त्याबाबत प्रस्ताव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडून पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी) केंद्र पुरस्कृत योजना सर्वसाधारण घटक, अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जातीकरिता विशेष घटक याअंतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मौजा केलपाणी व चुनखेडी गावांचे पुनर्वसनाकरिता केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी २०१६ च्या आदेशान्वये २०२५. ६० लक्ष वितरित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने वितरित केलेला २०. २५ कोटींपैकी ४५० कोटी निधी चुनखेडी व केलपाणी गावांच्या पुनर्वसनाकरिता वितरित करण्यास १९ मार्च २०१६ ला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वी ११ जून २०१५ अन्वये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चुनखेडीच्या पुनर्वसनासाठी ९ कोटी देण्यात आले आहे. एकूण १३. ५० कोटींचा निधी ४० टक्के समरुप राज्य हिस्सा म्हणून दर्शविण्यात आला. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत नवीन निधी वितरण प्रणाली येण्यापूर्वी पुनर्वसनाकरिता प्राप्त होणारा निधी मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकास अंतर्गत उपलब्ध करून दिला जात होता. तथापि, नवीन वितरण प्रणालीमध्ये केंद्र व राज्याच्या प्रमाण ६०ः४० असे आहे. त्यामुळे आता मंजुरी मिळालेले ४. ५० कोटी आणि तत्पूर्वी दिलेले ९ कोटी असा एकूण १३. ५० ४० कोटी एक विशेष बाब म्हणून समरुप राज्य हिस्सा म्हणून देण्यात आला आहे. |
( १० ) सांप्रतच्या अस्वास्थ्यांतून इष्ट त्या सुधारणा घडून न येतां ते क्षयरोगाप्रमाणे हानिकारकच ठरण्याचा आज तरी सुमार दिसतो. ME SAAMAAN WA MANEN AN याप्रमाणे दशविधलक्षणात्मक नवयुगधर्म अथवा सद्यःस्थिति आहे, अशी माझी समजूत आहे. आतां यापुढें आधुनिकांनी मानलेली जी ज्ञानाचीं मुख्य गमर्के त्यांसंबंध थोडें विस्तारानें लिहितों. आधुनिकांची ज्ञानाचीं गमकें :- ऐहिक सत्तावाद आणि भौतिक विज्ञान हीं आज राज्यपदारूढ अथवा समाजसत्तारूढ आहेत. त्यामुळे : (१) इंद्रियप्रत्यक्षानुसारी दृष्टि, ( २ ) ऐहिक उत्पति किंवा विकासवाद व ( ३ ) भूतकालांसंबध ऐतिहासिक दृष्टि, हीं ज्ञानाची मुख्य गमकें आधुनिक विद्वानांनी मानली आहेत. या ज्ञानसाधनांची अथवा ज्ञानप्रक्रियांची कांहीं व्यवहारांत व कांहीं मर्यादेंत उपयुक्तता असली, तरी या ग्रंथाच्या श्री. शिवलिंगोपासना या विषयाच्या चर्चेत, ती नुसतींच निरुपयोगी नव्हत, तर अनर्थकारी आहेत, अर्से माझे म्हणणे आहे. म्हणून त्याचा थोडा स्पष्ट खुलासा करतौं. इंद्रिय प्रत्यक्षानुसारी दृष्टि : - ( १ ) देव, धर्म, आत्मा, परमात्मा, शिव, रुद्र व त्यांचा परिवार, चिच्छक्ति, माया, आधिदैवत जग, परलोक, उपासना, अंतर्मुख इद्रियातीत वृत्ति व श्रुतिप्रामाण्य या व अशा शिवलिंगोपासनेंतील मुख्य गोष्टी आहेत. परंतु इंद्रियप्रत्यक्षवादात यापैकी कशासहि मान्यता मिळणे शक्य नाहीं. मी या ग्रंथांत प्रमाणभूत मानलेल्या १ " East and West " ; and Man and his Becoming by Rene Guenon. " Bharat Shakti" by Sir John Woodxoffe; " Yoga Vasistha and Modern Thought" by Dr. Atreya ; What Indian can Teach us '; ' Search in Secret India' by Dr. Paul Brunton. 'Cultural Heritage of India'. * Some present day Superstitions' by P. N. Bose. हिंदु धर्म संस्कृति-कल्याण विशेषांक. दासबोध श्रीमच्छंक्राचार्य यांचे ब्रह्मसूनमाध्य, इत्यादि संदर्भग्रंथ समजावे. श्रीमच्छंकराचार्याच्या तत्त्वज्ञानात (श्रुतीचे स्वत. प्रामाण्य सोडलें असतां ) बाकीची इद्रियप्रत्यक्ष व त्या प्रत्यक्षावलची अन्य प्रमाणे प्रमात्याच्या अविद्यादोषामुळे अप्रमाणच मानलीं आहेतं. इतकेच नव्हे तर अनेक नामवत आधुनिक भौतिक शास्त्रज्ञान ती सर्वथैव ग्रामक ठरविली आहेत. यासाठी पुढील भवतरण वाचावी1. Politics is the freedom of the senses, while religion 1s freedom from the senses ( Swami Ramkrishananda ) 2. The closing of the external channels of sensation is usually the signal of the opening of the psychic and १ न हीदमतिगम्भीरं भावयाथात्म्य मुक्तिनिबन्धनमागममन्तरेणोत्प्रेक्षितुमपि शक्यम् + + वेदस्य तु नित्यत्वे विज्ञानोत्पत्तिहेतुत्वे च सति व्यवस्थितार्थविषयत्वोपपत्ते । तज्जनितस्य ज्ञानस्य सम्यक्त्वमतीतानागतवर्तमानः सर्वतर्ककैरपोतुमशक्यम् ।। शारीरमाण २१११११. इतर प्रत्यक्षादि प्रमाणे अविद्येचा विषय म्हणून परमार्थतः अप्रमाण आहेत. पण श्रुति म्हणजे निकालाबाधित अपरोक्षानुभूतिरूप स्वतःसिद्ध ज्ञान आहे. तें अपौरुषेय व म्हणून अप्रमादशील आहे. या विषयाचा अधिक विचार करावयास येथे अवकाश नाही, व मौतिक विज्ञानानेंहि इद्रियप्रत्यक्ष भ्रामक ठरविले असल्यामुळे, त्याची आवश्यकता पण नाहीं. २ अविद्यावद्विषयाण्येव प्रत्यक्षादि प्रमाणानि । -शारीरमाध्य १॥११. ३ मागील टीपत दिलेल्या ग्रंथांशिवाय Presonality of Man by Tyrrell. 'Survival of Man' by Sir Oliver Lodge. 'University of Spiritualism by Boddington. Mysterious Universe by Sur. J. Jeans, Nature of Physical world' by Eddington. How the senses deceive us, Five senses of man; Invisible influences by Dr. Cannon. Unseen world. KingslandRational_Mysticism, Matter, Spirit and Cosmos by Stanley Redgroove; Study of Reality by Malkamı. Yoga Vasistha and modern thought by Dr. Atreya. Wisdom of the Overself by Dr. Paul Brunton. योगवासिष्ठ, भागवतादर्श ( विश्वाध्यास प्रकरण ) इत्यादि संदर्भ ग्रंथ पहावे. from all the evidence it would seem that psychic sense is more extensive, acuter and in every way more dependable than the physical ( Second Sight, pp 12 13 ) 3 The world of sense objects is unreal For it is by its very nature, liable to being cancelled The Real must be self evident, it must not appeat The self is the only reality that does not appear Its being and the intuition of its being are not distinct It is truly self known and therefore real absolutely (A Study of Reality by Malkanı) 4 These perceptions regarded as psychological results and as sources of information are not only occasionally mendacious nine tenths of our immediate experiences of objects are visual and all our visual experiences without exception are according to science erroneous ( Foundation of belief by Arthur Balfour) 5 External world has no existence independent of mind ( Rational Mysticism, p 148 ) 6 The Universe begins to look more like a great thought than like a machine (The Mysterious Universe, P 137 ) ( २ ) उत्नातिवाद किंवा विकासवाद - हे आधुनिकाच्या ज्ञानाचें दुसरे गमक आहे जडातून चैतन्य उत्पन झाले, मूळ अज्ञानातून ज्ञानविकास होत आला, मूळ रानटी अवस्थेतून सुधारणा होत आली, असे या वादाचें स्थूल स्वरूप असून, ह्यातून आधुनिक असा सिद्धात काढतात कीं, विकासवादाच्या व्युत्क्रमप्तगतीनें प्राचीन अज्ञान सिद्ध होतें' अर्थात् शिवलिंगोपासना जर अति प्राचीन असेल, तर तिचे स्वरूप रानटी, अजाण, भाद्य १ पुढील प्रथात या मताचा निषेध केला आहे Ancient Wisdom, 1PP 213 Indian civilization and its antiquity, p 9 वनमानवांस साजेस, रौद्र, ग्राम्य व अश्लील असलेच पाहिजे. तात्पर्य, माचीन अज्ञान हैं यांतील गृहित सत्य आहे. तेवढ्याच प्राचीन अज्ञान या मुद्यासंबंधी माझ्या साधार समजुती अतिसंक्षेपांत पुढीलप्रमाणे सांगतो. प्रागतिांनी सिद्धवत् मानलेला उत्क्रांतिवाद, विकासवाद, अथवा प्रगतिवाद ही जरी अंशतः एक प्रकारची भूल असली, तरी मला त्यासंबंध येथे पूर्वोत्तरपक्ष करावयाचा नाही. प्रागतिकांच्या या विचारसरणीत जे प्राचीन अज्ञान गृहित घरलें जातें, तितक्याचपुरता मला विचार कर्तव्य आहे. माझ्या समजुतीः- ( अ ) या अखिल विश्वाचे अधिष्ठान व उपादान जें ब्रह्मात्मतत्त्व त्याची स्वरूप लक्षणे (अथवा लक्षण) सत् ( त्रिकालाबाधित सत्ता), चित् ( चेतन्य, ज्ञान, प्रकाश ), आनंद व अनत ( पूर्ण, व्यापक व नित्य असे अविकारी तत्त्व ) हीं आहेतं. या ज्ञानस्वरूप ब्रह्मात्म्याचा विकास किंवा उत्क्रांति समवत नाही. (आ) सृष्टीची उत्पत्ति-स्थिति - लयकारी असे सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् सशक्तिक शिव तत्त्व हेच जगाचे अभिन्ननिमित्तोपादानरूप कारणब्रह्म, जगत्कार्यात नित्य विद्यमान असतेच. अर्थात् सृष्टीच्या आरंभी केवळ शून्यावस्था अथवा अज्ञान असते असे नव्हे. शिवसंकल्परूप सुटीत वस्तुतः अनुक्रम नाहीं ( भा. ३/१०/३०, ३१ ). शिवसंकल्परूप सर्वज्ञ वेद ह्यांस जगताच्या उपलब्धिरूप वैदिक विज्ञानी मानीत असतात. शिवसंकल्प हा सारा एक वर्तमानकाळच जाणावा. सृष्टिकमांत अनुक्रम सांगण्यांत श्रुतिशास्त्राचे तात्पर्य नाहीं. अनुक्रम मानला तरी मानवसर्गापूर्वीच दिव्य देवसर्ग सांगितला आहे. मानवसर्गाचाच विचार पाहतां मानवाचे पहिले कृतयुग ? The most idle supposition like that of evolution for example takes the rank of " laws" and are held to be proven. (East and West by Rene Guenon, p. 59.) ३ ऋ. १०११९०१३. Indo Aryan Mythology. Vol. I, page 477. Foot-note. दें सर्वश्रेष्ठ व अभ्यत धर्मनिष्ठ असेंच वर्णिलं आहे. दशावतार हे उत्क्रांतिचादाचें गमक नव्हत मच्छ-कच्छादि अवताराच्या पूर्वी मन्वादि सर्वज्ञ ऋषि, तसेंच देवता, असुर इत्यादि ज्ञात्या व्यक्ति होत्याच. मच्छ, कच्छ, वराह, म्हणजे सामान्य मासा, कासव, डुक्कर नव्हे त्यांचे स्वरूप गूढ व दिव्य असल्याचें वर्णिलें आहे स्थूल दृष्टान्त द्यावयाचा तर रोजच्या निद्रारूप दैनदिन प्रलयानंतर जागी होणारी प्रजा निद्रेच्या पूर्वीच्या विविध अवस्थास युगपत प्रात होते, त्याप्रमाणे कल्पारर्भी जीव त्याच्या त्याच्या प्राक्कर्मानुसार अज्ञ व सर्वज्ञ अशा विविध अवस्थास युगपत प्राप्त होतात. अर्थात् भरभ सारेच लोक रानटी व असंस्कृत असले पाहिजेत हे उत्नातिवाद्याचें अनुमान अत्यत निराधार व अयुक्तिक ( इ ) या त्रिगुणात्मक सृष्टीतील गुणवैषम्य ही सृष्टीची आरभापासूनची नित्याची स्थिति असते. म्हणून अति प्राचीन काळीहि रजस्तमप्रधान अशा निकृष्ट मानव सृष्टीप्रमाण शुद्ध सत्त्वप्रधान अशा सर्वज्ञ व्यक्तिद्दि असतातच. उदाहरणार्थ, निदेव, ब्रह्मदेवाचे मानसपुन, अनेक प्रजापति, मनु, सप्तर्षि, मत्रद्रष्टे ऋषि, नित्यपितर, देवता, तसेंच व्याचा प्रलयात लय होत नाहीं, असे महलोंकादि सूक्ष्म लोकांतील सिद्ध, मुनि इत्यादि श्रेठ ज्ञाते व उपदेष्टे अति प्राचीन काळींहि विद्यमान असतातच. तेच जगाचे स्रष्टे, द्रष्टे, उपदेष्टे व नियते होत. त्या प्राचीन भारतीयाच्या अतुल ज्ञानवैभवामुळेच धर्म व तत्त्वज्ञानांत भारतवर्षाची बरोबरी अद्याप कोणासच करता आली नाही. शिवलिंग हैं उपास्यप्रतीक, त्याचे उपासक व त्याची उपासना हें सारें सशक्तिक शिवाचे म्हणजे ईश्वराचे स्वरूप होय, असे आपले प्राचीन पूर्वज जाणत होते. ( शि. पु. वि. सं १०७, यजु ३२/२. लिंपु. पू. अ. २७, ७९, उ. अ ४६, ४७). १ मनु. ११२१, ३३ ते ३६, ९४, ३/२०१. भाग ३१९१४३, ३१२४ २ Ancient Wisdom, Introduction, pp. 4-12. Reign of Religion by Sir Radhakrishnan, PP 441-451 Evolution of Life and Form by Annıe Bessant, pp. 41, 42. Theosophy explained, p. 388. A Study of Reality' by Malkani, preface. भारतधर्म मद्दामडळाचा 'भारतवर्ष का इतिहास ' |
हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उसाचा हंगाम चांगलाचाच लांबल्याने चित्र आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांचा ऊस हा गाळपाअभावी शेतातच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शिल्लक आहे त्यांना गाळपाबाबत चिंता लागून राहिली आहे. मात्र जून महिना उजाडला तरी कारखाने चालूच राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले , यंदा राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. उसाचं क्षेत्र वाढल्याने यावर्षी राज्यात विक्रमी गाळप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत. पूर्वी इतके दिवस साखर कारखाने चालू राहत नव्हते. मात्र, राज्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, त्यामुळे हंगाम लांबला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अद्याप राज्यात 33 लाख टन ऊसाचे गाळप शिल्लक राहिले आहे. त्यामुळे साधारणत 10 जूनपर्यंत काही साखर कारखाने सुरु राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. राज्यातील अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. दरम्यान, राज्यातील अतिरीक्त उसाचे गाळप पूर्ण होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत सर्वात जास्त उसाचे गाळप हे सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 293. 30 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 264 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात 253 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याती साखर हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप काही साखर कारखाने सुरु आहेत. दरम्यान ,राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार कडून दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. २०० रुपये अनुदान कोणासाठी ? -रिकव्हरी रेट जिथे १० टक्क्यांच्या खाली असेल तिथले ऊस उत्पादक यासाठी प्रयत्न असणार आहेत. -ऊस वाहतूक ५० किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रती किलोमीटर ५ रुपयांचं अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. -गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. -या निर्णयाप्रमाणे 1 मे 2022 पासुन गाळप होणाऱ्या व साखर आयुक्तालयाने अनिवार्य वितरित केलेल्या ऊसासाठी 50 किमी अंतर वगळून वाहतूक खर्च प्रति टन प्रति किमी दर 5 रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. |
BEST administration: बेस्टचे खासगीकरण ?; कंडक्टर देखील कंत्राटी पद्धतीने - bjp and congress oppose best administration's conductor hire on contract basic decision - indialegal.co\nBEST administration: बेस्टचे खासगीकरण ?; कंडक्टर देखील कंत्राटी पद्धतीने - bjp and congress oppose best administration's conductor hire on contract basic decision\nबेस्ट उपक्रमातील चालकांपाठोपाठ कंडक्टरदेखील कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. बेस्टकडून नव्याने ४०० बस भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी सुरू असून त्यासाठी नवीन धोरण स्वीकारले जात आहे. भाडेतत्त्वावरील बसपोटी कंत्राटदारास सुमारे २ हजार कोटी रुपये मोजले जाणार आहेत. मात्र, कंडक्टर कंत्राटी पद्धतीने घेणे म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस, भाजपने विरोध दर्शविला आहे.\nबेस्ट उपक्रमात दाखल होणाऱ्या बस या संपूर्णतः भाडेतत्त्वावर राहणार आहेत. परंतु, त्या पद्धतीने बस सेवा देताना बेस्टचा चालक हा कंत्राटी पद्धतीने, तर कंडक्टर हा बेस्ट उपक्रमाचा कर्मचारी असेल, असे धोरण राबविण्यात येत होते. मात्र, उपक्रमाने त्या धोरणास छेद देत कंडक्टरदेखील कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजूर झाल्यास पुढील कालावधीत बेस्टमध्ये कंत्राटी स्तरावर कंडक्टर नेमले जातील, अशी टीका केली जात आहे.\nउपक्रमाच्या प्रस्तावानुसार पुढील १० वर्षांसाठी ४०० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. त्यासाठी कंत्राटदारास १,९८० कोटी रुपये मोजले जाणार आहेत. या सर्व बस वातानुकूलित असून त्या टप्प्याटप्प्यात सेवेत आणण्याची योजना आहे. बेस्टने याअगोदर १,१०० बस भाडेत्त्ववार घेतल्या असून त्यात आणखी ४०० बसचा समावेश होणार आहे.\nखासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप\nयाप्रकारे बसमध्ये कंत्राटी पद्धतीने कंडक्टर नेमण्याचा डाव म्हणजे बेस्टचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते आणि बेस्ट समितीतील काँग्रेसचे सदस्य रवी राजा यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनीही कंत्राटी स्तरावर कंडक्टर घेण्यास विरोध दर्शविताना अशातऱ्हेने खासगीकरण योग्य नसल्याची टीका केली आहे.\n६ हजार बसगाड्यांचे उद्दिष्ट\nबेस्टने येत्या तीन वर्षांत बसगाड्यांची संख्या ६ हजारपेक्षा जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात सुमारे ३,६००पेक्षा जास्त बस असून १,१०० बस भाडेतत्त्वावरील आहेत. उपक्रमाने, ६०० बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव तयार करून निविदा मागविल्या होत्या. त्यातील दोन निविदा फेटाळल्या गेल्या आहेत. |
खंड. ] सांख्यदर्शन - प्रकरण ३ रें. अंतःसृष्टि निर्माण होते, हें आपण पूर्वी सिद्ध केलेच आहे. 'क्ष' आणि ' व ' या दोन अज्ञात आणि अज्ञेय वस्तू आहेत, हेंही आतां आपणांस माहीत आहेच. मन या शब्दाचा अर्थ तरी काय ? मन ही संज्ञा आपण ज्या वस्तूला लावत तिची शास्त्रीय व्याख्या काय ? मन ह्मणजे काल-देश-निमित्त मन ही वस्तु तयार होण्याला या तीन मूलवस्तू लागतात. कोणत्याही गोष्टीबद्दल तुझी विचार करूं लागलां, कीं त्याबरोबर कालकल्पना तुमच्या ठिकाणीं अवमश्येव उद्भवते. कालाच्या साहाय्यावांचून त्या वस्तूचा विचार सुरू होणेंच शक्य नाहीं. त्याचप्रमाणे त्या वस्तूचें स्थल आणि निमित्त हीं प्रथम मनांत आल्यावांचून, त्या वस्तूबद्दल कोणत्याही प्रकारची विचारपरंपरा सुरू होणे शक्य नाहीं. 'अमुक वस्तु' इतका विचार चित्तांत आल्याबरोबर 'ती अमुक कालीं आणि स्थलीं असलेली व अमुक निमित्तामुळे उत्पन्न झालेली इतकी विचारपरंपरा चित्तांत प्रथमच तयार होते. या विचारपरंपरेचा अभाव झाला तर त्या वस्तूबद्दलच्या कल्पेनचाही अभाव होईल. वस्तु 'क्ष' स्वरूपाची असो अगर 'ब' स्वरूपाची असो. तिजबद्दल विचारपरंपरा सुरू होण्यास, ती या देश-काल-निमित्ताच्या उपाधींत प्रथम बांधली गेली पाहिजे. या मर्यादात्रयीनें ती निगडित झाल्यानंतरच पुढील विचारपरंपरेला सुरुवात होणें शक्य आहे. या तिहींचा अभाव झाला तर त्या अभावाबरोबर मनाचाही अभाव होईल. कोणत्याही उपाधीनें युक्त नाहीं अशा वस्तूबद्दल मन कधींही चिंतन करूं शकणार नाहीं. अशा एखाद्या वस्तूबद्दल विचार करून पहा, ह्मणजे या उपाधित्रयीच्या साहाय्यावांचून चिंतनक्रिया सुरूच होत नाहीं असें तुह्मांस आढळून येईल. आतां खुद्द या उपाधित्रयीबद्दल विचार केला, तर तिलाही स्वतंत्र अस्तित्व नाहीं-तिचें अस्तित्व वस्तूवर अवलंबून आहे असे आढळून येईल. जर विश्व अदृश्य झालें, तर देश-कालनिमित्त ही उपाधित्रयी तरी कोठें राहील? अशारीतीनें वस्तुकल्पना आणि उपाधिकल्पना या संयुक्त कल्पना आहेत. त्या परस्परावलंबी कल्पना आहेत. त्यांपैकी एक नष्ट झाली तर दुसरीही आपोआप तिच्यामागें जाईल. या दोन्ही कल्पना नष्ट झाल्यावर मनही आपोआपच निष्क्रिय होणार. तें पूर्ण निष्क्रिय झालेंत्याचें मनपण नष्ट झालें- ह्मणजे शेवटीं काय उरेल ? जें कांहीं उरेल तें एकरूपच उरेल. त्या ठिकाणीं 'क्ष' आणि 'ब' हे भेदही |
Pandharpur: डोक्यावर 42 डिग्रीचे जीवघेणे ऊन, खाली तापलेली जमीन आणि अशा अवस्थेत तहानलेल्या हजारो विठ्ठल भक्तांना दर्शन रांगेत तासंतास उभं राहून होत असलेले हाल. . . याचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी एबीपी माझाच्या बातमीच्या दणक्यानंतर विठ्ठलाच्या दर्शन रांगेत मॅट टाकण्यात आले आहे, त्यामुळे आता भाविकांना दर्शन घेणं थोडं बरं पडत आहे. दुर्दैवाने ज्या भागातील अवस्था माझाने दाखवली होती, केवळ तेवढ्याच भागात हे मॅट टाकण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच दर्शन रांगेत लवकरच मॅट टाकण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. शनिवारी (10 जून) चंद्रभागा घाट, सारडा भवन या भागातील दर्शन रांगेत रबरी मॅट टाकल्याने भाविकांना पाय न भाजता विठुरायाच्या दर्शनाला जाण्याचा आनंद घेता येत होता. आज दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याचीही अतिरिक्त व्यवस्था केल्याने भर उन्हात भाविकांना पिण्याचे पाणीही मिळत असल्याचे भाविकांनी सांगितले, त्यामुळे भाविकांना थोडा दिलासा मिळाला. एबीपी माझाने दोन दिवस भाविकांच्या या मरणयातना दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी यात लक्ष घालून तातडीने मॅट टाकण्याचे आदेश दिल्यावर मंदिर प्रशासनाने हे रबरी मॅट भाविकांना चालण्यासाठी टाकले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत उन्हाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात असून यात्रा काळात मंदिर परिसरात येणाऱ्या हजारो भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी मंदिराच्या चारही बाजूला पत्र्याचे मंडप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात्रा काळात हजारोंच्या संख्येने भाविक हे मंदिर परिसरात येत असतात. यातच यंदा सूर्यदेवाचा प्रकोप इतका वाढत आहे की, अशा उन्हात भाविकांना उष्माघाताचा त्रास जाणवू नये यासाठी शासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच सध्या मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी बांधलेले कापडी मंडप काढून तेथे जास्त उंची असलेले आणि यात प्रकाश आणि हवेची व्यवस्था असणारे मंडप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विठु नगरीत सध्या असलेले कापडी मंडप अनेक ठिकाणी फाटले असून यात आग लागण्यासारखा धोका उद्भवू शकतो, याची जाणीव शासनाला असल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. या सर्व सोयींमुळे आषाढी काळात मंदिर परिसरात येणाऱ्या हजारो भाविकांना आता पाय न भाजता सावलीमध्ये मंदिर परिसरात दर्शनासाठी येता येणार आहे. महाद्वार ते नामदेव पायरी, चौफाळा ते पश्चिम द्वार आणि संपूर्ण मंदिर प्रदक्षिणा मार्गावर अशा पद्धतीचे पत्र्याचे मंडप उभारले जाणार आहेत. यासाठी सध्या असलेल्या वीजपुरवठा व्यवस्थेत देखील बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या मार्गावर असणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांना मागच्या बाजूने विजेचे कनेक्शन दिले जाणार आहेत. एकंदर, यंदा आषाढीला विक्रमी गर्दी होत असताना शासनाने या तीव्र उष्णतेबाबत खबरदारी घेतली आहे. आता आषाढी काळात मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी ही मोठी खुशखबर असून त्यांना आता सावलीत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन मिळणार आहे. हेही वाचाः |
Akola Crime News ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकाेला : पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी शहरातील दाेन जुगार अड्डयावर छापेमारी केली. या ठिकाणावरुन १५ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास व जनता भाजी बाजार येथे माेठया प्रमाणात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरुन पथकाने दाेन्ही जुगार अड्डयावर छापेमारी करून राजेश गोविंदाराव बोर्ड वय ५६ वर्ष रा. वसंत टॉकीज जवळ, प्रशांत प्रभाकर रंगारी वय ५८ वर्ष रा. जठारपेठ, रोहीदास शंकरराव सुलताने वय ३० वर्ष रा. रणपिसे नगर जठारपेठ, गोविंदा तुकारामजी पालखेडे वय ३२ वर्ष रा. बाळापूर नाका जुने शहर, अशोक बाळकृष्ण भाकरे वय ५८ वर्ष रा. शिवाजी नगर जुने शहर, वसीम अकरम खान हसन खान वय ३१ वर्ष रा. मोहम्मद अली रोड बैदपूरा, मोहम्मद नुर उल्ला मोहम्मद वलायत उल्ला वय ५६ वर्ष रा. मुल्लाणी चौक खदान, केशव हरीभाऊ गावंडे वय ६५ वर्ष रा. हरीहरपेठ पोलीस चौकी जवळ यांना ताब्यात घेतले. तर हे जुगार अड्डा चालविणारा मेहबुब खाँ बिराम खॉन उर्फ मब्बा रा. बैदपूरा हे पसार झाले. सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास येथील जुगाराव धाड टाकली असता त्या ठिकाणावरुन सुशिल शालीग्राम वाघमारे वय ३३ वर्ष रा. सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास, मनोज दगडु सुरोशे वय ३२ वर्ष रा. पंचशिल नगर वाशिम बायपास, उल्हास बालीकराम सिरसाठ वय ४० वर्ष रा. पंचशिल नगर वाशिम बायपास, रवि प्रकाश दामोदर वय ३५ वर्ष रा. कमला नेहरू नगर वाशिम बायपास, हिरा प्रकाश घूमरे ३० वर्ष रा. सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास हा पळुण गेला. दोन्ही ठिकाणी केलेल्या छापेमारीत २५ हजार ७५० रूपये राेख आणि मोबाईल जुगार साहीत्य असा एकुण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाइ जी. श्रीधर पोलीस अधीक्षक, मोनिका राऊत अपर पोलीस अधिक्षक,यांच्या मार्गदर्शनाखाली विलास रमेश पाटील पोलीस निरिक्षक विशेष पथक व त्यांच्या पथकाने केली आहे. |
राज्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी होत आहे. आता शिंदे गटात खासदार देखील शामिल होण्याच्या चर्चा सुरु आहेत. आज शिवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाची वक्तव्ये केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेल, * शिवसेनेनं आजपर्यंत साध्यासाध्या माणसांना मोठं केलं. पण ज्यांना मोठं केलं ती निघून गेली. ज्यांनी त्यांना मोठं केलं ते आज कायम शिवसेनेसोबत आहेत. * शिवसेना ही काय एखादी गोष्ट नाही. कुणीही ती पळून नेऊ शकत नाही. * एक आमदार असो, की शंभर असो. कितीही आमदार गेले तरी पक्ष संपत नसतो. विधीमंडळ पक्ष आणि रस्त्यावरचा पक्ष वेगळा असतो. * सर्वोच्च न्यायालयातील उद्याची केस ही देशात लोकशाही किती काळ टिकेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे देश चालणार आहे की नाही, हे सांगणारा उद्याचा निकाल असेल. * सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा ते मला इकडेच बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांना आजही आमच्याबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. * पण, गेली दोन-अडीच वर्षं ज्यांनी ठाकरे घराण्यावर टीका केली, विकृत भाषा वापरली, त्यांच्याविरोधात ही मंडळी काहीच बोलली नाही. ज्यांनी टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं प्रेम खरं आहे की खोटं आहे? या शिवाय त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा द्यायचा की नाही असं खासदारांशी बोलवून ठरवू असे म्हणाले. राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे हे विधान महत्वाचं मानलं जात आहे. |
ऑरलँडो : अमेरिकेतील ऑरलँडो या शहरातील बिझनेस पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी खात्मा केला असून कामासंदर्भातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाही, अशी माहिती ऑरलँडो पोलीसांनी दिली आहे. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक रहिवाशांनी घाबरु नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. गोळीबारामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. |
दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२३ । सातारा । जिल्ह्यात मध उद्योगास मोठा वाव असून मधाच्या गावांची संख्या आणखी वाढवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले. महाबळेश्वर येथील मध संचालनालय येथे जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास वाई, महाबळेश्वर, खंडाळाचे आमदार मकरंद पाटील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, वाई प्रातांधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, कृषि सह संचालक बसवराज बिराजदार, अर्थ सल्लागार विद्यासागर हिरमुखे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह राज्यातील मध व्यवसायिक उपस्थित होते. मधाचे गाव ही संकल्पना राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे सांगून श्री. साठे म्हणाले, राज्य शासनाने मध उद्योगाच्या विकासासाठी सूमारे १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार राज्यभर मध योजना राबविण्यात येणार आहे. आमदार श्री. पाटील म्हणाले, सातारा जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून मोठी जैव विविधता लाभलेली आहे. जिल्ह्यात वर्षाला 50 हजार किलो मधाचे संकलन होते. भविष्यात यामध्ये मोठी वाढ होणार आहे. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिन्हा म्हणाल्या, मधमाशा पालन योजनेत मधपाळ, 50 टक्के स्वगुंतवणूक व 50 टक्के शासन अनुदान याप्रमाणे राबविण्यात येते. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, कोयना व कांदाटी खोरे व पाटणसह संपूर्ण जंगल भागातील गावे व कृषि क्षेत्रात मध उद्योगाचे जाळे निर्माण करावे. यासाठी मंडळास शासनातर्फे सर्व ते सहकार्य करण्यात येईल. |
साखर कारखानदारीचा गळीत हंगाम सध्या सुरू झाला आहे. उसाच्या किमतीवरून वादंग सुरू आहे. आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारी व तिच्या समस्यांचाही सर्वांगीण विचार करून ही अर्थव्यवस्था टिकण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कृषीप्रधान भारतातल्या कृषिमालावर प्रक्रिया करणाऱ्या व शेतीमाल उत्पादकांचा सहभाग असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना मात्र सापत्न वागणूक मिळत आहे. नव्या खासगीकरणाचे धोरण, सहकारी साखर कारखान्यांच्या कारभाऱ्यांनी आणलेली घराणेशाही व गैरव्यवहार यामुळे अशा भ्रष्ट साखर सम्राटांवर कारवाई होण्याबाबत कोणाचीही हरकत नव्हती. परंतु कारखाने डबघाईला घालणारे मोकाटच. पण सहकारी साखर कारखानदारीच्या पोटात लाथ मारण्याची एकही संधी सरकार सोडत नाही. एकप्रकारे हे विकासाचे मॉडेल मोडीत काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा आहे. सहकारी साखर उद्योगाने सामाजिक बांधिलकीच्या नावाने अनेक समाजोपयोगीच्या योजना राबविल्या. शैक्षणिक संकुले, भागातले रस्ते, साखर कारखान्यातील उपपदार्थावर आधारीत जोडउद्योग, उपपदार्थ निर्मिती, दूध उद्योग, पाणी पुरवठा, सिंचन तसेच अनेक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली आणि ऊस उत्पादकांना उसासाठीची पिळवणूक विरहित अशी यंत्रणा उभी राहिली होती. परंतु आता चक्रे उलटी फिरत असून, खासगी साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या अडचणी वाढणार आहेत. देशातला साखर उद्योगाचा पसारा विचारात घेतला तर देशात तो सर्व बाबतीत क्रमांक दोनवर आहे. जागतिक साखर उत्पादनाच्या क्रमवारीत ब्राझीलच्या खालोखाल भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागात शेतीमालावर प्रक्रिया करण्याबरोबरच लाखो लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आहे. देशभरात सार्वजनिक क्षेत्रात ४१, सहकारी क्षेत्रात ६०० पर्यंत तर खासगी क्षेत्रात ३७० असे कारखाने एकेकाळी होते. परंतु सार्वजनिक क्षेत्राचे संकोचन चालले असून ते कारखाने खासगी भांडवलदारांना विकण्यात येत आहेत. तर सहकारी साखर कारखान्यांबाबतही त्यांचीच पुनरावृत्ती होत असून खासगी कारखानदारी फोफावत आहे. आज देशात दोन कोटीच्या आसपास ऊस उत्पादक आहेत. त्यातील ८० टक्के लहान शेतकरी आहेत. महाराष्ट्रातही २५ लाख शेतकरी ९. ५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस घेतात. त्याचे भवितव्य आता खासगी भांडवलदारांच्या हातात केंद्रीत होणार आहे. देशात ७५ हजार कोटींची या उद्योगातून उलाढाल होते. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० हजार कोटीचा आहे. देशातील कारखान्यांमध्ये १० लाख प्रत्यक्ष कामगार असून आणखी १५ लाख इतर संलग्न कष्टकरी कामगार आहेत. महाराष्ट्रातही कारखान्यात दीड लाख कामगार व इतर पाच ते सहा लाख कामगारांची संख्या आहे. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा काम देणारा व ग्रामीण भागातील स्थलांतराला पायबंद घालणारा हा उद्योग आता खासगी भांडवलदारांच्या ताब्यात जात असल्याने व त्यांनी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण, संगणकीकरणाचा अवलंब सुरू केल्याने रोजगाराचे प्रमाण घटत आहे. हा उद्योग देशाला व राज्याला सेंट्रल एक्साईज, पर्चेस टॅक्स, कंट्रीलिकर एक्साईज, फॉरेन लिकर एक्साईज, ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट फी, मळी लायसेन्स फी, सेल ट्रक्स, अल्कहोलवरील टॅक्स इत्यादी अनेक मार्गाने देशाला साडेतीन हजार कोटी तर राज्याला एक हजार ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न देत असतो. यावर्षी देशात अन्न मंत्रालयाच्या अंदाजानुसार २४. ८५ दशलक्ष टन, वेगवेगळ्या राज्यातील साखर आयुक्तालयांच्या आकडेवारीनुसार २५. ८ दशलक्ष टन तर भारतातील साखर कारखानदारांच्या संघटनांच्या म्हणण्याप्रमाणे २५. १ दशलक्ष टन साखर उत्पादन होणार. गेल्या वर्षी ते २०. २ दशलक्ष टन होते. महाराष्ट्रात यंदा ७. ३५ दशलक्ष टन उत्पादन होईल. देशांतर्गत खप लक्षात घेता व मागील वर्षाची शिल्लक साखर पाहता यावर्षी साखरेचे उत्पादन जास्त राहणार असल्याने सरकारने किमान ५० लाख टन साखरेचा बफर स्टॉक केला पाहिजे. यंदा उसाच्या जास्त आणि लाभदायी मूल्यात (एफआरपी) सरकारने ११ टक्के वाढ केली. मात्र, दुसऱ्या बाजूला पाच लाख टन कच्ची साखर आयात करून साखरेचे दर वाढणार नाहीत, याची तजवीज केली. चीनने केलेल्या आयातीमुळे २०१६ च्या उत्तरार्धात साखरेने जागतिक बाजारात उसळी घेतली होती. भारतीय कारखान्यांना यामुळे जागतिक बाजारात साखर विकणे फायदेशीर झाले होते. त्यावेळी निर्यातीवर २० टक्के शुल्क लावण्याचा चुकीचा निर्णय सरकारने घेतला. जागतिक बाजारात दर वाढल्यावर सरकारने निर्यातीवर निर्बंध घातले आणि दर कमी असताना मात्र सरकार कारखान्यांवर साखर निर्यातीची सक्ती करते. स्थानिक बाजारपेठेत दर वाढू लागले की परदेशातून आयात करते. त्यातच २०१६ च्या दिवाळीपूर्वी साखर कारखान्यांच्या साठ्यावर नियंत्रण आणण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे कारखान्यांना मिळेल त्या भावात साखरेची विक्री करावी लागली. परिणामी उत्पादनात मोठी घट अपेक्षित असताना दर पडले. देशात २०१० साली साखरेचे दर घाऊक बाजारात ४० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात ५० रुपये किलो होते. आज सात वर्षांनी साखरेचे किरकोळ बाजारातील दर ४० रुपये प्रती किलो राहावेत, हे उद्दीष्ट ठेवून सरकार काम करीत आहे. गेल्या सात वर्षांत नागरिकांच्या क्रयशक्तीत काही सुधारणा झाली नाही का, त्यांचे उत्पन्न वाढले नाही का, या कालावधीत उसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली की घट या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वयंस्पष्ट असूनही सरकारचे धोरण मात्र आडमुठेपणाचे आहे. नेमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे आता कारखान्यांचा हंगाम आणि ऊस दराच्या मागणीचे आंदोलन बरोबरच येते. या ऊसदराच्या मागणीचाही इतिहास आहे. १९२० मध्ये इंडियन टेस्टींग बोर्डापुढे ऊस उत्पादकांनी खासगी साखर कारखानदार भाव देत नाही, अशी तक्रार केली. त्यावेळी या बोर्डाने उसाच्या किमतीची ऑर्डर केली. ही पहिली सुरुवात. पुढे १९३५ मध्ये सरकारने स्टॅट्युटरी मिनीमम प्राइस ठरवण्याची पद्धत जाहीर केली. त्यावेळी मुंबई प्रांतात फक्त तीन खासगी साखर कारखाने होते. त्यांना हा कायदा लागू झाला. आता 'एसएमपी'च्या जागेवर फेअर अॅन्ड रेग्युनेटीव्ह प्राईस (एफआरपी) आली. पण गंमत अशी की, पूर्वीच्या किमतीमधील वैधानिक शब्द वगळला आहे. अर्थातच त्यात खासगी कारखान्यांच्या धोरणाचा रेटा आहे. वैधानिक शब्दामुळे कायदेशीर बंधने होती. ती आता 'योग्य किंमत' अशा भोंगळ अवस्थेत किंमत आली आहे. पुढे रंगराजन समितीने ७०ः३० हा फॉर्म्युला उसाची किंमत ठरवताना दिला. आता त्याच सूत्राभोवती उसाच्या किमतीबाबत मागणी रेंगाळताना दिसते. अर्थात, सहकारी साखर कारखाने सर्व खर्च वजा जाता उर्वरीत किंमत उस किंमत म्हणून वाटून टाकत. आता प्रक्रिया खर्च हा सारखा नाही व गैरव्यवस्थापनामुळे वाढ होते, असे मुद्दे आहेत. पण मग आता खासगी कारखान्यात मोठे घोटाळे बाहेर येत आहेत. गंगाखेड कारखान्याचे उदाहरण गाजले आहे. देशात आज सर्वत्र शेतमालाच्या किमतीबाबत खदखद आहे. स्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्च भरून पुन्हा ५० टक्के नफा अशी किमतीची हमी सरकारने द्यावी, अशी शिफारस केली आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देऊन- ते शक्य नसल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व अस्थिरता आहे. साखर धंदा वाचावा म्हणून आजवर अनेक समित्या नेमल्या गेल्या आहेत. पण कोणत्याही शिफारशीची अंमलबजावणी मात्र केली गेली नाही. माधवराव गोडबोले समिती नेमली गेली. तेव्हा त्यांनी अगोदरच, माझ्या शिफारशी लागू करणार असाल तर मी काम करतो, म्हणून सुनावले होते. त्यावेळी एक किस्सा ऐकवला होता. ते म्हणाले होते की, अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात. कोणाला पोस्टाची तिकिटे जमवायचा, कोणाला घड्याळे जमा करण्याचा तर कोणाला आणखी काही. आपल्या सरकारला समित्या नेमण्याचा व त्यांचे अहवाल बासनात गुंडाळून ठेवण्याचा छंद आहे. बरे इतर छंदकरी आपला खजिना इतरांना दाखवतात तरी, पण सरकार तेही करत नाही. तेव्हा अशा अनेक समित्यांचे अहवाल त्यातील जुजबी शिफारशी अंमलबजावणीविना धुळखात पडल्या आहेत. तुतेजा समितीचा अहवाल तर थेट लोकसभेत मांडून तो स्वीकृत करण्यात आला होता व या समित्यांच्या शिफारशी म्हणजे सांताक्लॉजने दिलेली साखर धंद्याला भेट म्हणूनही त्याची वर्णने आली होती. पण थातूरमातूर अंमलबजावणीच्या पुढे काहीही झालेले नाही. सहकारी कारखान्यांवरचे कर्ज, त्यांना मिळणाऱ्या सवलती, अनुदान यावरच जास्त चर्चा होते. पण या कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपून विकासाची काय कामे केली, यावर क्वचितच चर्चा होते. कारखान्यांनी टॅक्सच्या स्वरुपात केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत किती पैसे जमा केले याचाही फारसा गवगवा होत नाही. त्याशिवाय ज्या वित्तीय संस्थांनी कर्ज दिली, त्यांनी व्याजाच्या रुपाने केवढी कमाई केली याचा मागोवा घेतला जात नाही. फक्त थकीत कर्जाचा मोठा बोभाटा होतो. या ठिकाणी एक उदाहरण देतो- धुळे जिल्ह्यातील पांझराकान सहकारी साखर कारखान्याला एमएससी बँकेने पंचवीस वर्षात पाचशे कोटींच्या जवळपास कर्ज दिले. त्यापैकी केवळ २३ कोटी कर्ज थकले म्हणून कारखाना जप्तीची कारवाई केली. पण त्याच काळात निव्वळ व्याजाची कमाई १२५ कोटींच्या वर केली, त्याबद्दल मात्र सोयीस्कर डोळेझाक होते. कर्ज घेणारे ज्या कारणासाठी कर्ज घेतले- त्याच्यावर खर्च न करणारे, अनियमितता करणारे, कर्जाचा दुरुपयोग करणारे हे तर दोषी ठरतातच, पण त्याचबरोबर ज्यांनी अव्वाच्या सव्वा कर्ज दिले, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारखान्याच्या जिंदगी मालमत्तेपेक्षा जास्त कर्ज तारणाशिवाय कसे दिले, याचीही चौकशी झाली पाहिजे. कारखान्याने कर्जफेड केली का नाही, किती बुडवले याची आकडेवारी प्रसिद्ध करताना कर्जवाटप व कर्जाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे. |
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. पोलीस ठाणे अंमलदाराच्या कामाची वेळ संपत आली असताना एखादा नागरिक गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यास अशा वेळी दुसरा ठाणे अंमलदार येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. यात नागरिकांना नाहक ताटकळत थांबावे लागत होते. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात येताच पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी कारवाईचा बडगा उगारला. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण तत्काळ करता यावे, म्हणून पोलीस ठाण्याच्या दर्शनीय भागात सूचनाही डकविली. तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. पोलीस निरीक्षक कच्छवे यांनी कारवाईचा बडगा उगारताच पोलीस ठाणे अंमलदार कामाला लागले. गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे. तसेच किरकोळ घरगुती वाद असल्यास अशा नागरिकांचे समुपदेशन ही केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी दुपारी एक जोडपे एकमेकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. त्यांच्यातील वादही किरकोळ होता. पोलीस ठाणे अंमलदारांनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पती-पत्नीमधील वाद हा किरकोळ कारणावरून झाल्याचे लक्षात येताच ठाणे अंमलदारांनी दोघांचेही समुपदेशन केले. दोघांनाही ठाणे अंमलदाराचे म्हणणे पटल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले जोडपे आनंदाने घरी परतले. |
कागल (जि. कोल्हापूर) : कोरोनामुळे स्थलांतरित होत असलेल्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपल्याच राज्याने प्रवेश नाकारल्याने १० तरुणींनी येथील दूधगंगा नदी पुलाजवळ महामार्गाच्या मधोमध तब्बल तीन दिवस मुक्काम केला. या मुली नवी मुंबईहून उत्तर कर्नाटकातील अकोला येथे जाणार होत्या. मात्र, प्रवेश न मिळाल्याने पुन्हा मुंबईला परतावे लागले. नवी मुंबईतील नेरूळ येथून २० ते २२ वर्षांच्या तरुणी खासगी वाहनाने २३ मे रोजी कागलजवळ कर्नाटक पोलिसांच्या तपासणी नाक्यावर आल्या. त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचे रितसर पत्र होते; पण कर्नाटक राज्याचा ई पास नव्हता, म्हणून त्यांना अडविण्यात आले. त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने प्रवेश पास उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला; पण कर्नाटकने एक जूनपर्यंत ही सेवा बंद केल्याचे सांगितले. शेवटी या उच्चशिक्षित मुली तपासणी नाक्याजवळ महामार्गाच्या मधोमध असलेल्या जागेत दिवसभर झाडाझुडपांच्या सावलीत बसत आणि रात्री तेथेच अंग दुमडून झोपी जात. कर्नाटक पोलिसांकडून ह्यह्यपरत जा, परत जाह्णह्ण हे दरडावणे तर सुरूच होते. २५ मे रोजी कर्नाटकातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे आले. त्यांनी या मुलींना पाहताच यांना महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन करा, असे आदेश दिले; त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी या मुलींना कागलच्या चेक पोष्टवर आणले. महाराष्ट्र पोलिसांनीही विरोध केला. दोन्ही राज्यांच्या पोलिसांत हमरातुमरीही झाली. अखेर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशी चर्चा करून पोलिसांना त्यांना परत नवी मुंबईला पाठविले. |
नवी दिल्लीः चिनी सैन्याचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय सैन्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि त्याच्या आसपासच्या भागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फिल्ड ऑफिसरना सैन्याने विशेषाधिकार दिला आहे. आवश्यकता भासल्यास शस्त्रांचा वापर करा. गोळीबार, तोफखान यापैकी जे योग्य वाटेल त्याचा वापर करा आणि चिनी सैन्याचा बंदोबस्त करा अशा स्वरुपाचे स्वातंत्र्य भारताच्या फिल्ड ऑफिसरना देण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारने भारताच्या तिन्ही सैन्य दलांना ५०० कोटी रुपयांपर्यंतची शस्त्र खरेदी करण्यासाठी विशेषाधिकार दिला आहे. या निर्णयामुळे सैन्याला त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रे खरेदी करणे सोपे होणार आहे. भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढू नये यासाठी एक करार करण्यात आला होता. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये हा करार झाला होता. या करारानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला होता. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि तिच्या मागे दोन किलोमीटरच्या परिसरात भारत आणि चीनच्या हद्दीत आधुनिक शस्त्रांद्वारे गोळीबार करण्यास अथवा तोफखान्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली होती. या कराराचे उल्लंघन करुन चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारताने हा प्रयत्न हाणून पाडला. मागील ५ दशकांपेक्षा अधिक काळापासून जो भूभाग भारताच्या ताब्यात आहे तो आजही भारताकडेच आहे. मात्र चीनने घुसखोरीचा प्रयत्न करताना कराराचे उल्लंघन केले. चीनच्या हालचाली बघता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अद्याप कायम आहे. याच कारणामुळे भारताच्या सैन्याने फिल्ड ऑफिसरना विशेषाधिकार दिला आहे. केंद्र सरकारने भारताच्या तिन्ही सैन्य दलांना ५०० कोटी रुपयांपर्यंतची शस्त्र खरेदी करण्यासाठी विशेषाधिकार दिला आहे. या निर्णयामुळे सैन्याला त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रे खरेदी करणे सोपे होणार आहे. या संदर्भातले विशेषाधिकार सैन्याच्या तिन्ही दलांच्या उपप्रमुखांच्या हाती देण्यात आले आहेत. उपप्रमुखांकडून नोंदवण्यात आलेली मागणी थेट संरक्षणमंत्र्यांसमोर फास्ट ट्रॅक पद्धतीने मंजुरीसाठी सादर होणार आहे. याआधी अशा स्वरुपाचा निर्णय पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करण्यापूर्वी घेण्यात आला होता. कोरोना संकटाप्रकरणी जगभरातून चीनच्या चौकशीची मागणी पुढे येत आहे. या प्रकरणात कोंडी होण्याची शक्यता लक्षात येताच चीनने मुद्दाम भारताच्या सीमेवर तणाव निर्माण करुन जगाचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चीनच्या हालचालींमुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन भारताच्या सैन्याने पुरेशी खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल भदुरिया यांनी जम्मू काश्मीर तसेच लेह लडाख मधील हवाई तळांचा आढावा घेण्यासाठी तातडीचा दौरा केला. चीन जवळच्या हवाई तळांची आणि धावपटट्ट्यांची सध्याची स्थिती त्यांनी जाणून घेतली. केंद्र सरकारने सैन्याच्या तिन्ही दलांना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. दुसरीकडे चीनच्या हद्दीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अस्वस्थता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सैन्याला योग्य ती कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सैन्याला दिलेल्या स्वातंत्र्याची माहिती दिली. चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन भारताच्या हद्दीत लडाखच्या पूर्वेकडील भागात गलवान खोऱ्यामध्ये एक चौकी उभारली होती. तसेच गलवानमध्ये सैनिकांची नियुक्ती केली होती. भारताने ही चौकी पाडली. या घटनेनंतर चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यातून मोठा प्राणघातक संघर्ष सुरू झाला. चिनी सैनिकांच्या हल्ल्यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० भारतीय जवान हुतात्मा झाले. आपल्या सैनिकांच्या हौतात्म्यातून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांची चिनी सैन्याचा जोरदार प्रतिकार केला. प्राणघातक संघर्षात चीनच्या ४३ कॅज्युअल्टी झाल्याचे भारत सरकारने जाहीर केले. मात्र चीन सरकारने आपले किती सैनिक जखमी झाले अथवा मारले गेले हे जाहीर करणे टाळले. चीनमधील सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने चिनी सैन्याचीही हानी झाल्याचे वृत्त दिले मात्र आकडा जाहीर करणे टाळले. याच घटनेनंतर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. |
सिंदेवाही : शहरातील प्रभाग क्रमांक १२ व १७ दसरा वाॅर्डातील काही परिसरात नळाचे पाईपलाईन चोकअप असून मागील दहा वर्षांपासून येथील रहिवाश्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही याकडे लक्ष दिले जात नाही, परिसरातील नागरिक दुसऱ्याच्या नळावर जाऊन पिण्यासाठी पाणी भरत असतात. नळ आहे पण पाणी नाही, यावर काहीच उपाय निघत नसल्याने आता शिवसेनेने कंबर कसली आहे. येथील नागरिकांनी नगरपंचायत, तहसील, पोलीस विभाग यांना निवेदन सादर करून येणाऱ्या सात दिवसात यावर काही तोडगा काढावा, असा इशारा दिला. निवेदन देताना ब्रह्मपुरी क्षेत्राचे युवासेनेचे अध्यक्ष आशिष चिंतलवार, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र मंडलवार, शहर प्रमुख प्रीतम नागोसे, विशाल लोखंडे, रवी सगराम, श्याम गंडाईत, नवाब शेख, वैभव मडावी, प्रतीक जयस्वाल उपस्थित होते. |
जालन्यातील व्यापाऱ्याकडून पैसे स्वीकारताना पकलेले सेंट्रल एक्साईजचे अधीक्षक कृष्णराव महाडिक यांनी लाच स्वीकारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सीबीआयचे वकील विवेक सक्सेना यांनी गुरुवारी कोर्टाला दिली. सीबीआयच्या वकिलांची कोर्टात माहितीम. टा. प्रतिनिधीजालन्यातील व्यापाऱ्याकडून पैसे स्वीकारताना पकलेले सेंट्रल एक्साईजचे अधीक्षक कृष्णराव महाडिक यांनी लाच स्वीकारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सीबीआयचे वकील विवेक सक्सेना यांनी गुरुवारी कोर्टाला दिली. अबकारी कराची रक्कम कमी करण्यासाठी आकरलेल्या दंडाची दहा कोटी रुपयांची रक्कम माफ करण्यासाठी एक कोटी रूपयांची लाच महाडिक यांनी मागितली होती. सीबीआय आणि अॅन्टी करप्शन ब्युरोने केलेल्या कारवाईत महाडिक , स्टील उद्योजक सुरिंदर पित्ती, दिनेश भरूका या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर गुरूवारी विशेेेष न्यायाधीश जे. डी. कुलकणीर् यांच्या कोर्टात सुनावणी होती. सीबाआयने केलेल्या कारवाईत घटनेच्या दिवशी भरूका यांची कागदपत्रे गाडीत सापडली होती. त्यांच्याकडून दहा कोटी रूपयांचा कर वसूल करण्यात येणार होता. तो साडेतीन कोटी रूपयांपर्यंत कमी करण्यासाठी एक कोटी रूपयांची लाच मागण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले. साडेतीन कोटी रूपयांच्या कराची कागदपत्रे गाडीत सापडली. या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत असून, याप्रकरणी काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी सीबीआयचे वकील विवेक सक्सेना आणि अयूब पठाण यांनी केली. आरोपींच्या वकिलांनी प्रतिवाद करताना, या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आली असून, लाच म्हणून देण्यात येणारी रक्कम जप्त करण्यात आली आहे, असा दावा केला. तसेच, आरेापींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ते तपासासाठी सहकार्य करतील असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले. आरोपींच्या वतीने प्रताप परदेशी, हर्षद निंबाळकर, श्रीकांत सिवदे यांनी काम पाहिले. या जामीन अर्जांवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. |
म.वि.प्र. समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी, वैशाली देवरे, योगशिक्षिका मनीषा गायधनी व किर्ती ब्राम्हणकर उपस्थित होत्या. यावेळी योग शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून योगासने करून घेतली. शाळेच्या उपशिक्षिका दवंगे मंगला यांनी योग दिनाची माहिती देउन त्याचे महत्व समजावून सांगितले .मुख्याध्यापिका गायधनी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना जीवनातील योगाचे महत्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' हे नाव मानवी साखळीने तयार केले. इयत्ता 1 ली ते 4 थी च्या 1280 विद्यार्थ्यांनी व 150 सेवकांनी एकाच वेळी योग साधना केली . मुख्याध्यापिका गायधनी यांनी आलेल्या योगशिक्षकांचे पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देउन आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. |
अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथे पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे साडेदहा हजार रुपयांची देशी व गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली असून, तीन जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावखेडा (ता. अमळनेर) येथे देशी व गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानुसार पोलिस पथकाने सावखेडा येथील वैदूवाडा भागात राहणाऱ्या बाबू मारुती वैदू (वय ५४) हा घराच्या आडोश्याला दारुविक्री करताना आढळून आला. (Ten Thousand worth of local and village liquor destroyed in Savkheda Amalner police action Jalgaon News) सुमारे एक हजार रुपयांची गावठी दारू त्याच्याकडून जप्त करण्यात आली. तर त्याच भागात राहणारा रतन मल्लू वैदू (वय ४८) हा झाडाझुडुपांमध्ये विना परवानगी देशी दारूच्या बाटल्या बाळगून विक्री करताना आढळून आला असून, त्याच्याकडून ६ हजार १६० रुपयांच्या ८८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर १ हजार ४०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे. तसेच भिका मारुती वैदू (वय ६५) यांच्याकडे देखील छापा टाकून १४०० रुपयांची ३५ लिटर दारू नष्ट करण्यात आली. अमळनेर पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० हजार १६० रुपयांची देशी व गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस कर्मचारी संदेश पाटील, सुनील जाधव, महिला पोलिस कर्मचारी नजिमा पिंजारी आदींच्या पथकाने केली असून, दोन्ही जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
केंद्रीय गृहमंत्रालयात नोकरी मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारत-CEPI साठी कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टीमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिपत्रकानुसार, ही भरती नवी दिल्लीतील मुख्यालय, मुंबई, कोलकाता आणि लखनऊ येथील शाखा कार्यालयांमध्ये केली जाईल. या अंतर्गत कायदा अधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, पर्यवेक्षक/सल्लागार आणि सर्वेक्षक अशी एकूण 42 पदे भरायची आहेत. ही भरती ३ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने करायची आहे. CEPI च्या आवश्यकतेनुसार आणि उमेदवाराच्या कामगिरीनुसार नोकरीचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढविला जाऊ शकतो. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. यासाठी, गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट, mha. gov. in वर जाऊन किंवा CEPI च्या अधिकृत वेबसाइट, enemerproperty. mha. gov. in च्या रिक्रूटमेंट विभागात दिलेल्या लिंकला भेट देऊन फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो. हा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. यानंतर, फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर, तो स्कॅन करा. ईमेलला स्कॅन केलेली प्रत संलग्न करा आणि ती [email protected] या आयडीवर मेल करा. मात्र, उमेदवारांसाठी ऑफलाइन मोडचा पर्यायही देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत परिपत्रकात दिलेल्या पत्त्यावर 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म जमा करता येईल. सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्षे आहे. हे पण वाचा : |
प्रमोद पाटील प्रतिनिधी पेण : खोपोली मार्गावरुन जाणाऱ्या एका कुटुंबासाठी ती रात्र काळरात्र ठरली. गाडीचं अपघात झाला असून चालकासह चार जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे फोटो पाहून अपघात किती भयंकर झाला असेल याची कल्पना येऊ शकते. पेण खोपोली मार्गावर रात्रीच्या वेळी इर्टिगा गाडीला अपघात झाला. यात चार जण गंभीर जखमी झाले. रात्री १२ च्या सुमारास पेणहुन खोपोलीच्या दिशेने जात असतात चालकाला डुलकी लागली. कार थेट एका नदीत कोसळली. कारचेही मोठे नुकसान झालं. एका डुलकीने चार जणांचा घात केला. चालक ,प्रदीप जाधव, प्रवाशी, मारुती जाधव, सुषमा जाधव, सानिका शिंदे 16 वर्ष जखमींची नाव आहेत. |
Crime News : पोलिसांनी सांगितलं की, पप्पूच्या हत्येसाठी नवगछियाच्या गोपालपूरहून शूटर्स बोलवून हत्याकांड घडवून आणलं. या हत्येचा खुलासा आरोपींच्या मोबाइल सीडीआरमधून झाला. Crime News : बिहारच्या (Bihar) किशनगंजमधून पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने दिरासोबत मिळून सुपारी किलरकडून पतीची हत्या केली. पोलिसांनी एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या पप्पू हत्याकाडांचा खुलासा केला. पोलिसांनी दीर आणि वहिनीच्या षडयंत्राचा खुलासा करत मृतकाची पत्नी प्रीती गुप्ता आणि दीर राजू गुप्तासोबत शूटर सूरज याला अटक केली. या हत्याकाडांत सहभागी इतर शूटर्सचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, पप्पूच्या हत्येसाठी नवगछियाच्या गोपालपूरहून शूटर्स बोलवून हत्याकांड घडवून आणलं. या हत्येचा खुलासा आरोपींच्या मोबाइल सीडीआरमधून झाला. आरोपींना अटक करण्यासोबतच पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले मोबाइल फोन, पिस्तुल, चाकू आणि इतर साहित्यही ताब्यात घेतले. 26 जुलैला रात्री ड्युटीहून घरी येत असलेल्या पप्पूवर अज्ञातांनी गोळी झाडली. ज्यात तो जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली. एसआयटीने टेक्नीकचा वापर करत घटनेत सहभागी लोकांची ओळख पटवली. त्यानंतर तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की, मृतकाची पत्नीचं तिच्या दिरासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. पप्पू त्यांच्यात अडचण ठरत होता. ज्यामुळे ही हत्या करण्यात आली. मृतकाची पत्नी प्रीती कुमारी एमजीएम हॉस्पिटलमध्ये बीएससी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, दीर-वहिनीने पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर दोघांनी पप्पूचा खात्मा करण्याचा प्लान केला. यासाठी त्यांनी सुपारी किलरची मदत घेतली. एक लाख रूपयात डील झाली आणि 20 हजार रूपये अॅडव्हांस देण्यात आले. पप्पू गुप्ताची रेकी करण्यात आली. त्याच्यावर हल्ला झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. |
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ३१ गावांमध्ये वर्षाविहार पर्यटनास बंदी आदेशाचा भंग करणा-यावर कडक कारवाई करण्याचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी पोलिसांना आदेश दिले. अनेकवेळा बंदी आदेश असतानाही पर्यटक जीव धोक्यात घालुन वर्षाविहाराचा आनंद लुटतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील धरण परिसरात पर्यटनास बंदी घातली आहे. शनिवारी व रविवारी पर्यटकांनी घुसखोरी करू नये यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. तरीदेखील छुप्या मार्गाने पर्यटक येऊ लागले आहेत. गेल्या दहा दिवसात पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत. कडक कारवाईचे आदेश प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी आदेश काढले असून तहसीलदार मधुसुदन बर्गे व सर्व पोलिस निरीक्षकांना त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वडेश्वर, टाकवे बुद्रुक, फळणे, माऊ , नागाथली , वहाणगाव , कुसवली , बोरवली , डाहूली , सावळा , कुसुर , निळशी , खांउ , राजमाची , फनसराई , उधेवाडी , पवनाधरण व भुशी धरण परिसर , तुंगार्ली धरण , राजमाची व मंकी पॉईट खंडाळा , घुबड तलाव व डुक्स नोज कुरवंटे , घोरवडेश्वर ठोंगर , एकविरा देवी , कार्ला लेणी , भाजे लेणी , भाजे धबधबा , लोहगड , विसापूर, तुंग-तिकोना किल्ले , आंबेगाव धबधबा , दुधीवरे येथील प्रती पंढरपूर लोणावळा येथील टायगर , लायन्स , शिवलींग पॉईंट आदी ठिकाणी वर्षाविहार व पर्यटनास बंदी घातली आहे. |
बीड । लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले. यावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणीही कायदा हातात घेतलेल खपवून घेतलं जाणार नाही असा सूचक इशारा दिला आहे. याबबात त्यांनी फेसबुकवरून एक पोस्ट केली आहे. पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे. सकाळी 11. 00 ते दुपारी 3. 00 या ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. घालून दिलेले नियम हे जनतेच्याच हितासाठी आहेत. त्या नियमांचे पालन केल्यास अशी वेळ येणारच नाही, असं मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यासह राज्यात कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला आहे. माझं संपूर्ण जनतेला आवाहन आहे की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मुंडेंनी सांगितलं आहे. |
मुंबई - विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी अखेर 33 वर्षांपूर्वी अकादमी उभारण्यासाठी वांद्रे येथे मिळालेली जमीन म्हाडाला परत केली. आपण त्या जागी अकादमी बांधू शकत नसल्यानेच अखेर हा निर्णय घेतल्याचे गावसकर यांनी म्हाडाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. म्हाडाने 1980 साली सुनील गावसकर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला ही जमीन दिली होती. 21 हजार 348 चौरस मीटर भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव म्हाडाने गावसकर यांच्याकडे पाठवला होता. जमीन परत करत असल्याचे पत्र गावसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पाठवले असून ते मिळाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाने डिसेंबर 2019 मध्ये गावसकर यांच्या ट्रस्टसोबतचा करार रद्द करण्याची विनंती करून सरकारला संपर्क केला होता. त्यानंतर गावसकर यांनी सचिन तेंडुलकरला या उपक्रमात सहभागी करून घेत मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. |
लग्नानंतर बऱ्याचदा असे घडते की, आपली आवड सासूशी अजिबात जुळत नाही, पण तुम्ही फक्त एका सोप्या पद्धतीने तिचे आवडते बनू शकता, ते म्हणजे आवडत्या मालिकेवर चर्चा करून. वाचल्यावर तुम्हाला हसू येऊ शकते पण ज्या सासूला टीव्ही सीरियल्स बघायला आवडतात, तिच्या आवडत्या मालिकेबद्दल तिच्याशी चर्चा केल्यास तिला खूप आनंद होईल. त्यामुळे तुमच्या सासूबाई कोणती सिरिअल पाहतात या गोष्टीवर लक्ष ठेवा. कोणत्याही नात्याला वेळ द्याव लागतो. जर तुम्ही सासूबाईंसोबत जास्त वेळ घालवला तरच तुम्ही तुमच्या सासूच्या मनावर राज्य करू शकता. तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांसोबत जितका जास्त वेळ घालवाल तितके तुमच्या दोघांमध्ये प्रेम वाढेल. तसेच, अधिक वेळ घालवल्यामुळे, एकमेकांमध्ये कमी भांडणे होतील आणि आपण एकमेकांना समजून घेण्यास सक्षम असाल. सासू-सासऱ्यांपासून दूर राहिल्यास नात्यात अंतर निर्माण होईल. लग्न झाल्यावर सर्व बदलून जाईल असं होणार नाही. तुम्ही जर एखाद्या बाबतीत निर्णय घेत असाल तर सासूचे मत जरूर घ्या. तुमची सासू तुम्हाला योग्य मत आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. यामुळे तुमच्या दोघांमधील नातेही घट्ट होईल. (वाचा :- माझी कहाणी : नवरा गेला अनं होत्याचं नव्हतं झालं, बाबा कुठे आहे मुलाच्या निष्पाप प्रश्नांना कसं देऊ उत्तर? ) सासरच्या घरात तुम्ही तुमच्या सासूच्या शब्दाचा आदर करणे गरजेचा आहे. जर त्यांची मते तुम्हाला पटली नाहीत तर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचा दृष्टिकोन प्रेमाने समजावून सांगा कारण कोणत्याही नात्यात प्रेम तेव्हाच वाढते जेव्हा दोन लोक एकमेकांचा आदर करतात. (वाचा :- माझी कहाणीः माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु? ) जर तुम्हाला तुमच्या सासू-सासऱ्यांसोबतचे नाते गोड करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या रोजच्या काही सवयी बदलणे आवश्यक आहे, जसे की तुम्हाला कामात आळस वाटत असेल तर तुम्हाला काही टिप्स अवलंबणे आवश्यक आहे. यामुळे सासूबाई देखील तुमच्यावर खूश होतील. (वाचा :- माझी कहाणीः माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु? ) तुम्ही तुमच्या सासूबाईंची काळजी घ्या. कारण सून आल्यानंतर सासूला तिच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गरजांबद्दल सांगण्यास संकोच वाटू शकतो, म्हणून तुम्ही तिच्याशी शांत मनाने बोलून तिच्या गरजा विचारा आणि त्यांची काळजी घ्या. मनातल्या त्या गोष्टी. जर तुम्ही असे केलेत तर तुमच्या सासूबाई तुम्हाला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवू लागतील आणि त्यांचे म्हणणे तुमच्यासमोर प्रेमाने ठेवतील. (वाचा :- इन्स्टाग्रामचा DP बदलत IAS टीना डाबी व्यक्त केले पतीप्रती असणारे प्रेम, लव्हस्टोरीतून या गोष्टी शिकण्यासारख्या ) मुलं आपल्या आजी-आजोबांच्या खूप जवळची असतात. त्यामुळे तुमच्या सासू सासऱ्यांसोबत मुलांना वेळ घालवू द्या. यामुळे त्यांचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुमच्या बद्दल देखील तुमच्या सासूच्या मनात आदर निर्माण होईल. (वाचा :- हनिमून झाल्यावर सर्वकाही संपलं, या नात्यात मला गुदमरल्यासारखे वाटतंय मी काय करु ) |
मुरगूड : केंद्रातील सत्तेच्या बळावर ईडीसारख्या संस्थांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यक्षम नेत्यांना 'टार्गेट' करणाऱ्या भाजपच्या राजकीय कुरघोड्यांचा मुरगूडमधील नगरसेवकांनी जाहीर निषेध केला. तसेच याप्रकरणी मुश्रीफांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ नगरसेवकांनी निषेध बैठक आयोजित केली होती. यावेळी दलितमित्र डी. डी. चौगले म्हणाले, महाविकास आघाडी एकसंघपणे वाटचाल करत आहे. साम-दाम-दंड-भेद या मार्गाचा अवलंब करून भाजपला महाआघाडीचे सरकार उलथवून टाकायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून बदनाम करण्याचे कटकारस्थान भाजप सतत रचत आहे. नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी पंधरा वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तळागाळातील सर्वसामान्य माणसांसाठी राजकीय हयात खर्च करणाऱ्या मुश्रीफ यांना षड्यंत्र करून बदनाम करण्याच्या भाजपच्या राजकीय सुडबुद्धीचा निषेध करत असल्याचे सांगितले. या बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक नामदेव मेंडके, उपनगराध्यक्ष रंजना मंडलिक, नगरसेवक जयसिंगराव भोसले, दलितमित्र दत्ता चौगुले, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले, दीपक शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. महाराष्ट्रात श्रावणबाळ अशी ओळख असणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपने रचलेले हे कटकारस्थान आहे. भाजपच्या कुटनीतीला यश येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाच प्रकार यापूर्वी घडला होता. त्या सगळ्याला श्रावणबाळ असलेले मंत्री मुश्रीफ पुरून उरले होते, असे नामदेवराव मेंडके यांनी सांगितले. |
सुप्रीम कोर्टाने बँक कर्ज प्रकरणी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत कर्जदारांची बाजू ऐकून घेतली जात नाही. तोपर्यंत त्यांची खाती फसवणूक म्हणून घोषित केली जाणार नाहीत, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. कर्जदारांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यामुळे बँकांना मोठा झटका बसला आहे. कर्जदारांच्या खात्यांचे फसवणूक म्हणून त्यांना सुनावणीची संधी न देता वर्गीकरण केल्यास गंभीर परिणाम होतात. हे एक प्रकारे कर्जदारांना काळ्या यादीत टाकण्यासारखे आहे. ऑडी अल्टेम पार्टमची तत्त्वे बँक खात्यांचे फसवणूक खाती म्हणून वर्गीकरण करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत वाचली पाहिजेत. असा निर्णय तर्कसंगत आदेशाने घ्यावा. असे मानले जाऊ शकत नाही की मास्टर परिपत्रक नैसर्गिक न्यायाची तत्त्वे रद्द करते, असं कोर्टाने निरीक्षणात नोंदवले आहे. #BREAKING Supreme Court holds that a borrower must be heard before an account is classified as fraud. भारताचे मुख्य न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने डिसेंबर 2020 मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला. कर्जदाराची बाजूही ऐकून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्यांची बाजू ऐकून न घेता त्यांच्या बँक खात्यात फसवणूक झाल्याचे घोषित केले तर त्यांच्या सिबीलवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कर्जदाराच्या खात्याला फसवणूक म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय तार्किक पद्धतीने पाळला जावा, असं कोर्टाने म्हटले आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑडी अल्टरम पार्टेमचे तत्त्व म्हणजे पक्षकाराला फसवणूक करणारा कर्जदार किंवा फसवणूक करणारा खातेदार म्हणून घोषित करण्यापूर्वी पक्षकाराला सुनावणीची संधी द्यावी, याची अंमलबजावणी केली जावी, असंही कोर्टाने म्हटले आहे. |
Ved Movie: सलमान खान (Salman Khan) रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) नावाच्या आगामी मराठी चित्रपटात कॅमिओ करणार असल्याचे निश्चित झाले आहे. सलमानने रितेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कॅमिओच्या टीझर व्हिडीओसह ही घोषणा शेअर केली आहे. तो 'वेड लावलय' या गाण्यात दिसणार आहे. बरं, रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त शेअर करणे ही खरोखरच योग्य भेट आहे. (हे देखील वाचाः Ved Trailer: Riteish Deshmukh - Genelia Deshmukh जोडीचा पहिला मराठी सिनेमा 'वेड'चा ट्रेलर प्रदर्शित (Watch Video) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही. ) |
52 वर्षांनंतर प्रतापराव जाधवांनी केली हॅट्ट्रिकची नोंद!\nBy News Desk Thu, 25 Nov 2021\nविधानसभा निवडणुकीच्या विजयाची हॅट्ट्रिक करण्याची किमया करणारे प्रतापराव जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत देखील हा विक्रम केला. असा विक्रम करणारे ते जिल्ह्यातील पहिले नेते ठरले. लोकसभेत हा रेकॉर्ड काँग्रेसचे शिवराम राणे यांनी केला होता. त्यांनी 1957, 1962 व 1967 मध्ये सलग विजय मिळविले होते. मात्र तेव्हा बुलडाणा जिल्हा जळगाव मतदारसंघात समाविष्ट होता. स्वतंत्र बुलडाणा मतदारसंघ 1977 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून 2004 पर्यंत एकाही नेत्याला सलग3विजय मिळविला आला नव्हता... आज, 25 नोव्हेंबरला खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने...\nपहिल्याच लढतीत विजयी\nसन 2009 ची निवडणूक मजेदार ठरली. मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने प्रतापराव जाधव यांना नाईलाजाने दिल्लीचा रस्ता धरावा लागला. त्यांना सामाजिक अडचणीमुळे तर राजेंद्र शिंगणे यांना राजकीय कारणामुळे मैदानात उतरावे लागले. या2दिग्गजांतील लढतीत जाधव यांनी 28 हजारांच्या निसटत्या फरकाने बाजी मारत देशाची राजधानी गाठली! लोकसभेतील त्यांच्या भावी यशाची व हॅट्ट्रिकची ती पायाभरणी ठरली. बहेनजींच्या हत्तीने 81 हजार मते घेत काँग्रेस आघाडीचे मनसुबे पायदळी तुडविले.\nसर्वच रेकॉर्ड मोडीत...\nसन 2014 ची एकतर्फी निवडणूक म्हणजे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढणारी ना भूतो न भविष्यती अशी निवडणूक ठरली. नरेंद्र मोदी नामक त्सुनामी लाटेत विरोधक पार वाहून गेले. दिग्गज पराभूत झाले. तिथे बुलडाणामध्ये काय वेगळे होणार होते? त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी मिळालेले माजी आमदार कृष्णराव इंगळे यांचा पराभव होण्यात त्यांची काहीच चूक नव्हती. त्यांचा मतांचा स्कोअर साडे तीन लाखांच्या घरात (3 लाख 49 हजार) पोहोचला, पण प्रतापराव जाधव यांचा स्कोअर5लाख 11 हजारांवर पोहोचला. त्यांचा लिडच 1 लाख 62 हजारांवर गेला. झालेल्या9लक्ष 78 हजार 392 मतांपैकी 8 लाख 61 हजार 518 मते या दोघांनीच वाटून घेतल्यामुळे ती लढत एकतर्फी ठरली हे सांगायचे कामच राहिलं नाय! सलग दुसऱ्या विजयाने प्रतापराव जाधव भावी हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचले.\nनिकालापूर्वी रणसंग्राम व निकालांती एकतर्फी ठरलेल्या गत् 2019 च्या लढतीत प्रतापराव जाधव यांनी नुसताच विजय मिळवला नाही तर रेकॉर्ड ब्रेक हॅट्ट्रिक साधली. त्यांनी5लाख मतांचा आकडा पार करत5लाख 21 हजार 977 मते घेतली. तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी राजेंद्र शिंगणे (3 लाख 88 हजार 690 मते) यांचा 1 लाख 72 हजार 627 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव करत चारीमुंड्या चित केले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या सन 1952 पासूनच्या लढतीचा आढावा घेतला तर काँग्रेसचे शिवराम राणे यांच्यानंतर हॅट्ट्रिक साधणारे ते दुसरे खासदार ठरले. स्वतः घाटावरील रहिवासी असताना त्यांना घाटाखालील जळगाव जामोद (36984), खामगाव (33279) या विधानसभा मतदारसंघातून जबरदस्त लीड मिळाला. सर्वच म्हणजे6मतदारसंघातही त्यांना मताधिक्क्य मिळाले. राजेंद्र शिंगणे यांच्या सिंदखेड राजामध्ये त्यांना 5992, मेहकरात 6335, चिखलीत 23861 तर बुलडाण्यात 25793 मतांचा लीड मिळाला. |
वर्धाः अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पथक आणि पालिका पथकाला पाचारण करुन डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेले भ्रुण अवषेशांसह आढळून आले. याप्रकारणी आता रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू संगीता काळे ही सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा ३० हजारात गर्भपात केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी डॉ. रेखा कदमसह मुलाच्या आईवडिलांना अटक केली होती. कदम रुग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले असता भ्रुण अवशेष आणि काही हाडे आणि गर्भपिशवी आढळून आली. बुधवारी पुन्हा डॉ. कदम हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डॉ. रेखा कदम हिची कारागृहात रवानगी केली. रुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड्यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल. काय आहे प्रकरण? अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने सहा महिन्यापूर्वी बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीला गर्भधारणा झाली. पण मुलिचे पोट दुखत असल्याने बाब समोर आली. त्यानंतर मुलाच्या वडीलाने पीडितेच्या आई वडिलांना रस्त्यात अडवून पीडितेचा गर्भपात करण्यास आम्ही पैसे लावू, याची वाच्यता पोलिसांकडे केल्यास सर्व गावात बदनामी करु, असे धमकाविले. डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. याबाबतची तक्रार आर्वी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी रात्रीच रितसर परवानगी घेऊन कार्यवाही करण्याच्या हालचाली सुरु केली. मात्र, रात्री घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर पाळत ठेवून डॉ. रेखा कदम ह्यांना सकाळी अटक केली. सोबतच मुलाच्या आई आणि वडिलांना अटक केली. तसेच अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. |
खामगाव, दि. २६ - जागतिक स्त्री समानतादिनानिमित्त येथील किडझी संस्कार ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनी साडी परिधान करुन रॅली काढत स्त्री समानतेचा संदेश दिला. स्त्रीयांना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार २६ आॅगस्ट १९२० रोजी मिळाला. खºया अर्थाने स्त्रियांना प्रशासकीय व संसदीय कार्यक्षेत्रात सहभागाची संधी या दिवसापासून मिळाल्याने २६ आॅगस्ट हा जागतिक स्तरावर 'स्त्री समानता दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्या साधून स्त्री समानतेचा संदेश देण्यासाठी येथील किडझी संस्कार ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनी अनोखी रॅली काढली. स्त्री समानतेचा संदेश रुजावा यासाठी इयत्ता पहिलीच्या मुलांनी साडी परिधान करुन प्रत्येक वर्गात तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना विविध घोषवाक्याच्या आधारे स्त्री समानतेचे महत्व सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना ज्ञानपीठचे प्राचार्य प्रशांत धर्माधिकारी यांनी स्त्री समानता दिनाची संपूर्ण पृष्ठभूमी विद्यार्थ्यांना विषद केली. स्त्री समानतेचा कायदा येण्यासाठी अमेरिकेसारख्या देशात ९३ वर्षांची लढाई स्त्रीयांना तसेच कायदेतज्ज्ञांनी लढावी लागली. यानंतर २६ आॅगस्ट १९७८ रोजी अमेरिकन संसदेत स्त्री समानतेचा कायदा पारित झाला, अशी माहिती प्राचार्यांनी दिली. या रॅलीमध्ये सरिता गांधी, स्वप्ना चव्हाण, वंदना ढगे, आशा खोकले यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या ह्या अभिनव उपक्रमाचे शाळेचे संचालक अमित कीर्तन यांनी कौतुक केले. |
इंदूरमध्ये सेक्स रॅकेटमध्ये पकडलेल्या मुलींनी धक्कादायक खुलासा झाला आहे. यामध्ये पकडल्या गेलेल्या थायलंडमधील मुलींपैकी काही मुली आधी पुरुष होत्या. लिंग बदल झाल्यानंतर त्या भारतात आल्या. त्यांच्या पासपोर्टवरही पुरुष असे लिहिलेले होते. हे सर्वजण स्पा सेंटरमध्ये काम करण्याच्या नावाखाली देहविक्री करायचे. पोलिसांनी स्पा ऑपरेटरसह या सर्व मुलींना तुरुंगात पाठवले आहे. महिला स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी सांगितले की, सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळाल्याने छापा टाकल्यानंतर सर्व मुलींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. यापैकी परदेशी तरुणींचे पासपोर्टही दिसले. त्यावेळी चार मुलींच्या पासपोर्टवर पुरुष लिहिलेले असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते पहिले पुरुष असल्याचे समोर आले. त्यानंतर लिंग बदलून ते सेक्स वर्कर बनले. पोलिसांनी सांगितले की, मसाज पार्लरमधून अटक करण्यात आलेल्या दोन मुलींना यापूर्वीही अटक करण्यात आली आहे. स्पा सेंटरचा मॅनेजर संजय वर्मा यालाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे. मुलींनी सांगितले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा सेक्स रॅकेटमध्ये पकडले गेले तेव्हा कायदेशीर कारवाईसाठी त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले. खटला संपेपर्यंत त्या देश सोडून जाऊ शकत नाही, या अटीवर त्यांना जामीन मिळाला. अशा परिस्थितीत जामिनावर बाहेर येणे आणि जीवन जगणे हे आव्हान आहे. कारण पासपोर्टशिवाय ते त्यांच्या देशात जाऊ शकत नाहीत. म्हणूनच जीवन जगण्याशिवाय देहविक्री शिवाय पर्याय नाही. |
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट '(तएऊअ) च्या वतीने 'अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार 2015-16' जाहिर झाले आहेत. पद्मश्री राम मोहन, अॅनिमेशन क्षेत्र (मुंबई), सुभाष पवार, फाईन आर्ट क्षेत्र (पुणे), जयप्रकाश जगताप, फाईन आर्ट क्षेत्र (पुणे), धीमंत व्यास, क्ले मेशन क्षेत्र (मुंबई) या चार जणांना पी. ए. इनामदार (महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष) यांच्या हस्ते अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शिक्षकदिनी दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत हायटेक हॉल, आझम कॅम्पस येथे हा पुरस्कार गौरव कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य रिषी आचार्य यांनी दिली. दरवर्षी चार पुरस्कार कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना देण्यात येणार आहे. अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार हा भारतातील सर्व महाविद्यालयातील अॅनिमेशन, कला, ललित कला आदी क्षेत्रातील शिक्षकांना विलक्षण योगदान आणि उत्तुंग कामगिरीसाठी देण्यात येतो. |
संभाजीनगर येथील गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बसचालकाला ३ वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ! या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रार दिली होती. १७ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी अविनाशने त्यांना एका 'व्हॉट्सएप'वर व्हिडिओ पाठवला होता. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रार दिली होती. १७ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी अविनाशने त्यांना एका 'व्हॉट्सएप'वर व्हिडिओ पाठवला होता. पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी लैंगिक अत्याचारापासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल ? , योग्य- अयोग्य स्पर्श याविषयी प्रोजेक्टरद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगारांचा उद्दामपणा वाढत चालला आहे. स्वतःच्या रक्षणासाठी सतर्कता नसणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? मंदिरात येणारे भाविक आणि पर्यटक यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा मेळावा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. धरणाजवळ अवैध मशीद बांधली जात असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? जे स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्यांच्या लक्षात येत नाही, असे कसे म्हणता येईल ? याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे ! मुळात न्यायालयाला असा प्रश्न का विचारावा लागतो ? सरकारने स्वतःहून कारवाई करून महामार्ग मोकळा करणे आवश्यक आहे ! विश्व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली. |
सिंधुदुर्ग : येथील चिपी विमानतळाच्या उदघाटन प्रसंगात शिवसेना (Shivsena) आणि नारायण राणे (Narayan Rane) आमनेसामने आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत बऱ्याच वर्षांनंतर राणे हे या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले दिसले. या कार्यक्रमात राजकीय टीकाटिप्पणी होणार, याची चुणूक दोन दिवस आधीच आली होती आणि तसेच झाले. थेट `तू तू, मैं मैं` झाले नाही किंवा आक्रमक वाक्ये गेली नाहीत, हेच नशीब! या विषयावर राजकारण करायचे नाही, असे म्हणत राणे यांनी जोरदार टोलेबाजी केली. हा कार्यक्रम नक्की कोणाचा आहे, येथून त्यांनी सुरवात केली. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य, सुभाष देसाई विनायक राऊत या नेत्यांची नावे घेऊन सल्ले दिले. त्यामुळे समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याची परतफेड केली. त्यांनीही चांगल्या कार्यक्रमाला नजर लागू नये म्हणून काळा तिट लावतात, तसे काही लोक येथे बसलेले आहेत, असे सांगत आपण कोणाविषयी बोलत आहोत, हे दाखवून दिले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. राणे यांच्या भाषणाच्या वेळी शिवसैनिकांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर घोषणा नको, असे राणेंनी सुनावले. त्यानंतर त्या थांबल्या. राणे आणि ठाकरे हे एकमेकांशी फार बोलले नाहीत. मुख्यमंत्री माझ्या कानात काही कुजबुजले पण ते मला ऐकू आले नाही, अशीच आपल्या भाषणाची राणे यांनी सुरवात केली. राणे यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे : -आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमानं पाहिलं आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं. -विनायक राऊत विमानात पेढा घेऊन आले. मी त्यांना म्हणालो , "पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. तो आत्मसात करा" - या विमानतळाच्या उदघाटनासाठी जे येथे आलेले त्यांच्यासाठी मी देवांना गाऱ्हाणं घालेन. यांच्या इच्छा पूर्ण कर, इडा पीडा दूर कर पण आमच्या कोकणाचा विकास होऊ दे. -मी मुख्यमंत्री झाल्यानंतर येथे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठी पैसे मिळाले. मी कोकणाच्या विकासासाठी झटलो. बाकी कोणी जवळपास येऊच शकत नाही. -मी विमानतळाच्या कामाचे श्रेय घेत नाही. पण या विमानतळाला ज्यांनी विरोध केला ते आज व्यासपीठावर बसले आहेत. मी नावे घेतली तर राजकारण होईल. -उद्धव ठाकरेंनी माणसे तपासून घ्यावीत. प्रोटोकाॅल तरी पाळा. खोटेपणा असलेली माणसे बाळासाहेब ठाकरेंना अजिबात आवडत नव्हती. -आदित्य ठाकरे आता पर्यटनमंत्री झाले आहेत. त्यांनी या प्रोजेक्टचा अभ्यास करावा. टाटाचा 581 पानांचा रिपोर्ट वाचावा. मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटावा. -हा कार्यक्रम एमआयडीसीचा आहे की कोणाचा? विनायक राऊत यांच्या हातात माईक कसा? -अजित पवारांनी दिलेले पैसे कोणी अडवले? (अजित पवार डोक्याला हात लावून बसले) - विमानतळ झालं. पण येथे उतरल्यावर काय खड्डे पाहावे? -उद्धव ठाकरेंनी काम करून दाखवावे. मला अभिमान वाटेल. -बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोक आवडत नव्हती. खोटं बोललं तर गेट आऊट! विकासात पक्षभेद मी आणत नाही. तुमच्या (नारायण राणे यांच्या) कॉलेजबाबत मी तत्काळ परवानगी दिली. -नारायणराव आपण लघु, सुक्ष्म उद्योग खात्याचे मंत्री आहात. पण केंद्रीय मंत्री आहात. आपण विकासकाम नक्की कराल. -शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, हे तरी आपल्याला मान्य आहे. नाही तर काही जण आपणच तो किल्ला बांधला, याचे श्रेय घेत बसले असते. -तलवार चालवायची वेळ आली तर देशाच्या ,राज्याच्या शत्रूवर चालली पाहिजे. आपापसांत चालायला नको. संधी मिळाली आहे त्याचे सोनं करायला हवं. माती करायला नको. -कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं. -पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
रेल्वेकडून एका दिवसात 75 मालगाडया धावण्याचा 'विक्रम' ! पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनमुळे बंद असलेल्या रेल्वेचा विभागाला लाभ होत आहे. विशेष गाडया वगळता इतर सर्व प्रवासी गाडया बंद असल्याच्या कालावधीत रेल्वेकडून मालवाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्या अंतर्गत मालगाडयांच्या वाहतुकीवर भर देण्यात येत असून, पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातून 4 सप्टेंबरला एकाच दिवशी 75 मालगाडयांची विक्रमी वाहतूक झाली आहे. कोरोनामुळे बहुतांश प्रवासी गाडया अद्यापही बंद आहेत. त्यामुळे रेल्वेचा आर्थिक डोलाराही विस्कळीत झाला आहे. तो सावरण्याच्या दृष्टीने आणि देशभरात विविध ठिकाणी आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रेल्वेने मालगाडयांच्या वाहतुकीवर मोठा भर दिला आहे. व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने विभागवार स्वतंत्र पथकांची स्थापनाही केली आहे. परिणामी, रेल्वेच्या मालवाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदविली जात आहे. मालवाहतुकीबाबत मध्य रेल्वेने ऑगस्टमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही पाऊल टाकले आहे. त्या अंतर्गत पुण्यातून थेट बांगलादेशमध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिक येथूनही बांगलादेशात कांदा पाठविण्यात आला. त्यामुळे वाहन क्षेत्रातील उद्योग आणि शेतकर्यांनाही वाहतुकीचा नवा पर्याय मिळाला आहे. मिरज, दौंड आणि लोणावळा या पुणे रेल्वेच्या सीमा आहेत. या सीमांच्या आत असलेल्या विभागातून देशभरातून धावत असलेल्या मालगाडया आणि विभागातून सुटणार्या गाडयांची विनाअडथळा वाहतूक करण्यास विभाग यशस्वी झाला आहे. त्यातूनच एका दिवसात तब्बल 75 मालगाडयांची विभागातून वाहतूक होऊ शकली. |
महाबळेश्वर -शहरी व ग्रामीण भागाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजनांचा समावेश अर्थसंकल्पात केला आहे. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, याची खबरदारी शिवसैनिकांनी घ्यावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, माजी जिल्हाप्रमुख गोपाळ वागदरे, महाबळेश्वर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे, महिला जिल्हा संघटक शारदा जाधव, नगरसेवक कुमार शिंदे, शहरप्रमुख महेश गुजर, तालुकाप्रमुख विशाल सपकाळ, संजय शेलार, माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे, एस. एस. पार्टे, प्रदीप माने, सचिन वागदरे, लीलाताई शिंदे, प्रवीण कदम, गोपाळ लालबेग, शंकर ढेबे, नितीन भिलारे, संतोष जाधव उपस्थित होते. ना. देसाई म्हणाले, जिल्ह्याने शिवसेनेचे दोन आमदार दिले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने शिवसैनिकांची जबाबदारी वाढली आहे. कोव्हिड संक्रमित रुग्णांना आज सर्वाधिक गरज रक्ताची आहे. अनेकांना जीवदान देण्याचे काम शिवसैनिक करत असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दात प्रा. बानुगडे यांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनाचे कौतुक केले. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलानाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. माजी शहरप्रमुख विजय नायडू यांनी आभार मानले. दरम्यान, शेकडोच्या संख्येने शिवसैनिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. |
हे काम विनामूल्य आहे आणि कोणत्याही हेतूसाठी कोणीही वापरला जाऊ शकतो. आपण ही सामग्री वापरू इच्छित असल्यास, आपण या पृष्ठावर उल्लेख केलेल्या कोणत्याही परवाना अटींचे पालन करीत असताना परवानगीची विनंती करण्याची आवश्यकता नाही. या पृष्ठावर उल्लेख केलेल्या अटींनुसार कॉपीराइट धारकाने प्रकाशनास मंजुरी दिली असल्याची खात्री करुन विकिमीडियाला ई-मेल प्राप्त झाला आहे. हे पत्रव्यवहार एक OTRS सदस्याद्वारे पुनरावलोकन केले गेले आहे आणि आमच्या परवानगी संग्रहण मध्ये संग्रहित केले आहे. पत्रव्यवहार विश्वासार्ह स्वयंसेवकांना ticket #2011100910009908 म्हणून उपलब्ध आहे. |
नागपूरः नागपूर महानगरपालिका आणि ब्रिलियंट्स चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.देविदास देशमुख स्मृती बुद्धीबळ आंतरशालेय स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ नंदनवन येथील अक्षय भवन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेवक किशोर कुमेरिया, दिव्या धुरडे प्रामुख्याने उपस्थित होते. विविध वयोगटात दीपेश कोहाड, मैथिली, संस्कार, गायगोर, वृतिका गये, कृपाल वंजारी, मृणाल कोकाटे, हिमांशु जेठवानी, दिव्या शेळके, हर्ष जेठवानी, श्रावणी शिरपूरवार, रोहन सिंग विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. उपमहापौर दीपराज पार्डीकर बोलताना म्हणाले, अशाप्रकारच्या स्पर्धेमुळेच खेळाडू तयार होत असतो. यातूनच राज्यस्तरावरील, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू तयार व्हावे यासाठीच अशा प्रकारच्या सर्व स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन श्री.कुंभलकर यांनी तर आभारप्रदर्शन सौ.कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. नीरज सव्वालाखे, सोनिया चांगले, डॉ. सुशील वंजारी, आशिष देशमुख, सौ.सुवर्णाताई भुते, प्रवीण पानतावणे, नीलेश चन्नमवार, मनीष पागे, वैशाली वंजारी, आरती खंडेलवाल उपस्थित होते. |
त्यांना तिहींकडे लोटतो. ह्या परंपरेनें त्या पातेलींतल्या एकंदर आंवळ्यांची हालचाल होते. पातळ पदार्थाचे कण स्नेहाकर्षणाने बद्ध नसतात, म्हणून त्यांतल्या थोड्याशा कणांवर दाब घातला कीं, त्याबरोबर भोवतालच्या एकंदर कणांची हालचाल वर सांगितल्याप्रमाणे झाली पाहिजे. अर्थात् हा दाब प्रवाहीमधल्या कोणत्याही बिंदूवर सर्व बाजूंकडून लागू झाला पाहिजे, आणि त्याच्या पृष्ठांतल्या बिंदूवर निमे बाजूकडून लागू झाला पाहिजे. सरळ पृष्ठांतल्या बिंदूवर त्या पृष्ठाच्या एकीकडच्या एकंदर दिशांतील दाबाचें संयुक्त फळ त्या पृष्ठाशीं काटकोनांतच घडावयाचें. ह्यावरून हा दाब प्रवाहीच्या साही बाजूंच्या पृष्ठावर त्या त्या पृष्ठाशीं काटकोनाच्याच दिशांनीं लागू झाला पाहिजे. अशा विचाराने हा नियम पास्कल नामक भूमितिज्ञा ( वस्तुतः आकृति शाख्यानें ) प्रथम उदयास आणिला, म्हणून ह्याला पास्कलाचा नियम म्हणतात. हा नियम प्रयोगाच्याही आधारें स्थापित होतो. प्रयोग १४ वा.-पाण्याच्या पिचकारीचे तोटीपुढे एक पोकळ गोळा जडून त्याला चोहींकडे भोके पाडावा, उपरांत तिचा दट्या जितक्या जोराने लोटावा तितक्या जोरानें त्या भोकांतून पाणी बाहेर पडतें. हा दाब साहींकडे लागू नसता तर गोळ्याच्या सर्व भोंकांतून पाणी उडालें नसतें. तसेंच तो दाब घातलेल्या जोराचा नसता तर पाण्याच्या धारा अधिक जोरानें अधिक लांब गेल्या नसत्या. येथें पाण्याच्या धारा खालीं नमतात हें कार्य गुरुत्वाकर्षणाचें आहे. प्रवाही पदार्थाचा स्थैर्यविचार. प्रयोग १५ वा. - एक डबा बाजूस दाखविल्याप्रमाणें बनवा. त्याचा क हा दटया ने चौरस इंच तोंडीचा आणि ख, ग, घ, हे दटचे ३, २ व १ चौरस इंच तोंडीचे खोबरेलानें माखून लावा. एका दट्याच्या तोटीवाटे तो डबा पाण्याने भरा. ह्याच्या वरच्या पृष्ठाचे दट्ये क, ख, ह्यांवर त्या पाग आकृति १२ वी. ण्याचा भार लागू होणार नाहीं. परंतु डाव्या व खालच्या पृष्ठाचे दट्ये ग, घ, ह्यांवर पाण्याचा भार लागू होऊन त्यानें ते त्या त्या बाजूंस सरूं लागतील. नंतर ह्या दट्यांचें हें बाहेर सरणें बंद व्हावे आणि त्यांनी आंत सरूं लागूं नये इतक्या बेताचींच वजनें गच्या व घच्या पारड्यांत घाला ह्मणजे ह्या दव्यांवरील गुरुत्वाकर्षणाचें कार्य नाहीसे होईल. आतां ह्या गुरुत्वाकर्षणाचे कार्य न घडण्याच्या स्थि७८ तींत क दंट्यावर २।। पौंदांचें वजन ठेविलें तर त्यावर ने चौ. इंचास २॥ पौंद किंवा १ चौ. इंचास ५ पौंद ह्या दराचा दाब घातला जातो. हा दाब कोंडलेल्या प्रवाहीनें ख, ग, घ, ह्या दट्यांवर तिराच्या रोखानें लागू होतो. ह्मणून त्याने हे तिन्ही दव्ये बाहेर सरूं लागतात. येथे खवर १५ पौंदांचे आणि ग, घ, ह्यांच्या पारड्यांत अनुक्रमें १० व ५ पौंदांची अशीं वजने ठेवून ह्या दट्यांवर वरच्याच दराचे विरुद्ध दाब लागू केले, तरच हे दट्ये समतोल होतात. ह्या प्रयोगावरून पास्कलचा नियम खरा ठरतो. ५०. ब्रामाहचा दाब. - पास्कलच्या नियमाचा व्यवहाराकडे उपयोग करण्याचे यंत्र प्रथम ब्रामाह याने शोधून काढिले, त्याला ब्रामाहचा दाब ह्मणतात. आकृति १३ वी. वरील आकृतींत ब्रामाहच्या दाबाचा मधला छेद दाखप्रवाही पदार्थाचा स्थैर्यविचार. विला आहे. ह्यांत ग आणि घ ह्या दोहोकडच्या उभ्या नळांत कख प्रमाणे ददये गच्च फिरतसे अडकविलेले असतात. ह्यांतील कची तोंडी १ चौरस इंच असून खची तोंडी १००० चौरस इंच असली, आणि कवर ५ मणांचा दाब घातला, तर खवरचा पदार्थ प हा १००० खंडीच्या दाबानें वर चेपला जाईल, हे उघड आहे. ह्याप्रमाणे लहान मोठे दव्ये योजून ह्या यंत्राने पाहिजे तेवढा प्रचंड दाब लागू करितां येतो. आतां हैं यंत्र रिकामें असेल तेव्हां त्यांत पाणी भरितां यावें, आणि ख दट्याखालीं अधिकाधिक पाणी कोंढून तो दव्या शिकस्त उंचीपावेतों उचलतां यावा, ह्यासाठी ह्या यंत्राचा उजवा भाग हा संकोच क बंबाप्रमाणे तयार करून त्या खालच्या पाण्याच्या टांक्याशी जोडलेला असंतो. कदव्या वर उचलला ह्मणजे खचा दाब खालच्या कोंडलेल्या पाण्यावर पडून त्यानें ग झडप बंद होते, त्यामुळे कच्या खालीं निर्वात देश होतो. असें झाले झणजे घ खालच्या टांकीतल्या पाण्यावर जो वातावरणाचा दाब असतो त्यानें ते पाणी ध झडप उघडून त्या निर्वात देशांत भरतें. उपरांत क दट्या खाली दाबला ह्मणजे घातलेल्या दराचा दाब खालच्या कोंडलेल्या पाण्यावर पडतो. त्यानें घ झडप बंद होऊन ग झडप उघडले, ह्यामुळे तो दात्र ख दट्यावर पडून त्यानें तो दट्या वर उचलतो. ह्या रीतीने व दट्या शिकस्त उंचीस + ह्या कलमांतलें संकोचक बंबाचें कार्य हें वायु पदार्थातील उच्चालक बंब समजून घेतल्यानंतर वाचावें. ह्मणजे समजुतीस येईल. चढला ह्मणजे त्याखालचें पाणी ग च्या डावीकडचा य काक उघडून, रल तोटीच्या वाटे घ खालच्या टांक्यांत सोडून देतात, आणि पुन्हा यंत्र चालू करितात. ह्या यंत्रांतल्या पाण्यावर जो प्रचंड दाब लागू होतो, यानें तें पाणी व दट्याच्या बाजूंनींवर उडूं पहातें. ह्मणून त्याभोवतालच्या नळाच्या तोंडाशीं धातूचें कडे अडकवून, त्यावर च छ स्थळी दाखविल्याप्रमाणें चामड्याची दूण गुतविलेली असते. ह्या दुणींत ते पाणी शिरून ती दूण तेवढ्या जोराने फुगवितें, ह्यामुळे ही चामड्याची दूण तिजमधल्या दट्टयाशीं चुस्त राहते. कापूस, कापड, गवत वगैरे पदार्थ दाबून त्यांचे गठ्ठे बांधणें; तीळ, कर्डई, वगैरे धान्ये दाबून त्यांची तेलें गाळणे; तोफा, वाफेचे बॉईलर ( सतेलीं ) तारांचीं चन्हऱ्हाटे हीं केवढाले जोर सोसण्याजोगी आहेत ते जोर मोजणें ; अशा बहुत कामांत ब्रामाहच्या दाबाचा उपयोग करितां येतो. इंग्लंदांत मेवाई सामुद्रधुनीमध्यें जो ब्रितानिया नांवाचा लोखंडी नळाचा प्रचंड पूल बांधिला आहे, त्याचे मोठमोठाले भाग ब्रामाहच्याच दाबानें उचलून जागच्या जागी बसवितां आले. असा हा दाब अत्यंत उपयो गाचा आहे. ५१. दाबाचा नियम. - मोकळ्या प्रहाहीचा त्यामधल्या क्षेत्रावरील दाब हा, त्या क्षेत्राच्या मध्यम ओंडीच्या ( गुरुत्वमध्याच्या ओंडीच्या ) प्रमाणांत असतो. पुढील गोमुखाकृति ही एक मोकळ्या तोंडाचें भरलेलें भांडे दाखविते असे कल्पा ह्या भांड्यांतील पाण्याचा |
गोवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारबाबत एक मोठं विधान केलं आहे. मोदी म्हणतात की, "राज्याच्या विकासासाठी दोन्हीकडे एकाच विचारांचं सरकार असणं गरजेचं आहे. " यावेळी 'आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा' या योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलताना मोदींनी हे विधान केलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वगुणांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी 'डबल इंजिन' सरकारचा उल्लेख केला. राज्याची प्रगती, विकास होण्यासाठी राज्य आणि केंद्रात एकाच विचारांचं सरकार हवं असं मतं मोदींनी यावेळी व्यक्त केलं आहे. येत्या वर्षातील गोवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसली आहे. स्वतः तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबरला गोव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात भाजपला शह देण्यासाठी तृणमूल काँग्रेसला साथ देण्याचं आवाहनही केलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपदेखील आपली संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचं दिसून येत आहे. गोव्यात सद्यस्थितीत आहे तशाच स्थिर सरकारची गरज असल्याचंही मोदींनी यावेळी बोलून दाखवलं. त्याचसोबत, लोकांचा आशीर्वाद मिळाल्यास आम्ही गोवा स्वयंपूर्ण करू असा विश्वासही पंतप्रधांनी यावेळी व्यक्त केला आहे. कोरोना लसीकरण, पर्यटन इत्यादी विषयांवर देखील यावेळी मोदींनी भाष्य केलं आहे. गोव्यात १०० टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असून येत्या काळात पर्यटनातही वाढ होईल असं मोदी म्हणाले आहेत. |
पुणेः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) याच्या घराजवळ स्फोटके आढळणे हे घडवून आणलेले षडयंत्र असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अंबानी आणि अदानी (Adani) हे शेतकऱ्यांच्या, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्याही रोषाला पात्र ठरले आहेत. स्फोटकांचे प्रकरण घडवून आणल्याने आपल्याला सहानुभूती मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र असे काहीही रोणार नाही, असे शेट्टी म्हणाले. (it is a conspiracy to find explosives near the house of industrialist mukesh ambani says raju shetti) माजी खासदार राजू शेट्टी हे पुण्यातील एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी कायद्यावर देखील भाष्य केले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांचा फटका हा शेतकऱ्यांना तर बसणार आहेच. पण तो सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार असल्याचे शेट्टी म्हणाले. या कृषी कायद्याचे लाभधारक १५ ते १६ जण असल्याचेही ते म्हणाले. अशा लाभधारकांपैकी अदानी आणि अंबानी हे पुढे आले आहेत. मात्र दोघांपैकी एक असलेल्या अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळली. मात्र, यावरून हे घडवून आणले गेले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे शेट्टी म्हणाले. अशा प्रकारची स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा काय करत होती? , मुंबई पोलिस काय करत होते? , केंद्रीय यंत्रणा काय करत होत्या? , असे एकावर एक प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केले आहेत. आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने द्यावीत, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे. |
राममंदिर उभारण्याची मागणी ! पनवेल : शासनाने अध्यादेश काढून लवकरात लवकर राममंदिराची उभारणी करावी, यासाठी अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि रामभक्त यांनी रामाचा नामजप करीत अन् घोषणा देत २८ जानेवारी या दिवशी येथे आंदोलन केले. या आंदोलनात ५० हून अधिक रामभक्त आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. अनेक धर्मप्रेमी स्वतःहून येऊन उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी करीत होते आणि 'राममंदिर व्हायलाच हवे', असे सांगत होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर या वेळी म्हणाले की, जर काँग्रेसच्या कार्यकाळात श्री सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकतो, तर विकास आणि हिंदुत्व या सूत्रांवर निवडून येणार्या भाजपला राममंदिर उभारणे निश्चितच शक्य आहे. भाजप शासनाने अॅट्रॉसिटीच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश संसदेत कायदा करून पालटला, तसेच तीन तलाकच्या संदर्भात अध्यादेश काढून कायदा केला. इतके सगळे होऊ शकते, तर ज्यासाठी हिंदूंनी निवडून दिले, ते शासन राममंदिरासाठी आध्यादेश का काढत नाही ? १. कु. शैलजा मिसाळ, रामभक्त - आज आमचा राम तंबूत आहे, हे आम्ही कदापी सहन करणार नाही. राममंदिर बांधणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. २. श्रीमती प्रभावती उपाध्ये, रामभक्त - शासन आम्हा हिंदूंच्या भावनांची कदर करीत नाही. आमच्या शरिरात प्राण असेपर्यंत आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सातत्याने संघर्ष करू आणि राममंदिर उभारू. ३. श्री. रोहिदास शेडगे, धर्मप्रेमी - शासनाची राममंदिर बांधण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता आम्हा हिंदु बांधवांनाच संघटित होऊन राममंदिर बांधावे लागेल. १. लोक श्रीरामाच्या प्रतिमेला भावपूर्ण नमस्कार करत होते. २. रस्त्यावरून जाणारे पुरुष आणि महिलाही हात उंचावून घोषणा देत होत्या. ३. रस्त्यावरून जाणारे ३ धर्मप्रेमी या आंदोलनात सहभागी होऊन शेवटपर्यंत थांबले. |
पंख नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीने तीन दिवस बालनाट्य संस्कार व व्यक्तीमत्व उत्साहात पार पडले. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त 'पंख'तर्फे २, ३ व ४ नोव्हेंबर रोजी हे शिबिर श्रेयनगर येथील पंख अकादमीत घेण्यात आले. पंख नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीने तीन दिवस बालनाट्य संस्कार व व्यक्तीमत्व उत्साहात पार पडले. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त 'पंख'तर्फे २, ३ व ४ नोव्हेंबर रोजी हे शिबिर श्रेयनगर येथील पंख अकादमीत घेण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नाटकाची ओळख, नाट्य अभिनय, शब्दांच्या उच्चारानुसार त्यांचे बदलणारे अर्थ, भावमुद्रा, विविध रंगांचे अर्थ, त्यांचा नाटकाच्या प्रसंगांशी असलेला संबंध, नाटकातून व्यक्तीमत्व कसे घडते आदी विविध बाबींची माहिती देण्यात आली. पाचवी ते दहावीपर्यंतच्या ५० विद्यार्थ्यांनी या नाट्य संस्कार शिबिरात सहभाग घेतला. तीन दिवस चाललेले हे नाट्य शिबिर मोफत होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिराची वेळ होती. या शिबिरात प्रेषित रुद्रवार, पद्मनाभ पाठक, समशेर पठाण, कृतार्थ शेवगावकर, गिरीधर पांडे, करण जांगडे, अबोली देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रदीप मुळे, उमेश जहागिरदार यांनी परिश्रम घेतले. |
इंदिरा नेहरू गांधी... आपल्या वादळी व्यक्तिमत्त्वाने भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात छाप पाडणार्या पोलादी महिला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केले. अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच! एका महानाट्याचा, एक आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिरांजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना 'क्रांतीचे अपत्य' म्हणून संबोधले. शरीर मनाने कणखर अशा इंदिराजींनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. हे मुळी विधिलिखितच होते. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंजिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जगातील सर्वात सामर्थ्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या. परंतु येथील समाजात धर्मांधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. 'वूमन ऑफ द मिलेनियम' म्हणून गौरवण्यात आलेल्या इंदिराजींचे हे चरित्र अनेक वादळी घटनांनी भरलेले आहे. खरं पाहिलं तर इंदिरा आपल्या आईसोबत जेव्हा भोवालीला गेली तेव्हा फिरोज पहिल्यांदा तिच्या आयुष्यात आला. एव्हाना त्याने किमान दोनदा तरी तिला लग्नाची मागणी घातली होती. आनंदभवनात सर्वत्र सहजतेने वावरणारा आणि आता भोवालीला कमलेबरोबर सोबत म्हणून आलेला हा फिरोज गांधी होता तरी कोण? त्याचं महात्मा गांधींशी काहीही नातं नव्हतं. तो धर्माने पारशी होता. (जरी आडनाव गुजराथी असलं तरीही) त्याचे वडील जहांगिर फरेदून गांधी हे मरीन इंजिनीयर होते. त्याच्या आईचे नाव रत्तीमाई. जहांगीर आपल्या कुटुंबासह मुंबईत राहात होते. पण फिरोजला मात्र त्याच्या अविवाहित आत्याने वाढवले. तिचे नाव डॉ. शिरीन कमिसारियात. हिने त्याला दत्तक घेऊन त्याच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी उचलली. डॉ. कमिसारियात या एक निष्णात सर्जन होत्या. अलाहाबादमध्ये लेडी डफरीन हॉस्पिटलच्या अखत्यारित येणाऱ्या बावन्न जिल्ह्यांच्या त्या प्रमुख होत्या. अलाहाबादच्या उच्चभ्रू वर्तुळात तिची ऊठबस होती. मग तिने आपल्या या तरुण भाच्याची सर्वस्वी जबाबदारी का उचलली असावी? कदाचित असंही असेल की तो तिचा भाचा नसून मुलगाच असावा आणि खरोखरच तसं असेल तर मग त्याचे वडील अलाहाबादेतील एक नावाजलेले वकील राजबहादूर प्रसाद कक्कर असावेत, अशी शक्यता होती. याचं एक कारण असं की फिरोज गांधीच्या जन्माचा दाखला कुठेही उपलब्ध नाही. मुंबईच्या पारशी मॅटर्निटी हॉस्पिटलमधील नोंदी पडताळल्या तेव्हा रत्तीमाई हिने त्याठिकाणी १२ सप्टेंबर १९९२ रोजी मुलाला जन्म दिल्याची नोंद कुठेही आढळत नाही. त्यामुळेच डॉ. शिरीन कमिसारियात हीच फिरोजची आई असावी असा तर्क लागतो. फिरोजचे आई किंवा वडील कोणीही असले तरी १९२०च्या सुमारास जहांगीर गांधी यांच्या मृत्यूनंतर रत्तीमाई आपल्या चार मुलांसह अलाहाबादेस डॉ. शिरीन कमिसारियात यांच्या घरी राहण्यास आली. फिरोज हा आधी विद्या मंदिर हायस्कूलचा आणि नंतर एविंग खिश्चन कॉलेजचा विद्यार्थी एबिंग कॉलेजात त्या दिवशी झालेल्या निदर्शनाच्या वेळी तो नेहरूच्या वर्तुळात ओढला गेला. तोपर्यंत प्रॉव्हिन्समध्ये शेतकऱ्यांची शेतसारा न भरण्याची जी चळवळ सुरू होती त्यात फिरोजने सक्रिय सहभाग घेतला. १९३२ साली परत एकदा त्याला जेलमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर १९३३ मध्ये नेहरूंनी या चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ब्रिटिशांनी कसे हाल चालवले आहेत याची पाहणी करण्यासाठी फिरोजला खेड्यांमध्ये पाठवले. त्यानंतर त्याला परत अटक झाली. वैयक्तिरित्या फिरोज आणि जवाहरलाल यांच्यात काहीही साम्य नव्हते. फक्त दोघे उंचीने कमी होते, एवढेच काय ते साम्य! फिरोज उंचीने केवळ पाच फूट सहा इंच होता. पण तो अंगापिंडाने मात्र जाडजूड होता व त्याला डोक्यावर भरपूर दाट केस होते; तो दिसायला देखणा होता, पण नेहरूंप्रमाणे राजघराण्याला शोभेल असे रूप त्याच्याजवळ नव्हते. फिरोज हा कधीच उदास किंवा मरगळलेला नसे. तो खास बुद्धिमान नव्हता आणि इंदिरेप्रमाणेच शिक्षणात त्याला फारशी रुची नव्हती. परंतु इंदिरेप्रमाणेच शास्त्रीय संगीत आणि फुले या दोन गोष्टींची त्याला आवड होती. काही लोकांना तो जरा खळाळत्या उत्साहाचा व दांडगंट वाटे, तर काहींना तो त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे आवडे. एक खरं की तो मर्दानी भडक होता व त्याला आयुष्याबद्दल आसक्ती होती. खाणे, पिणे आणि सेक्स या सर्वांबद्दलच. फिरोज जन्मभर स्त्रीलंपटपणासाठी प्रसिद्ध होता. अत्यंत साधी व धार्मिक जीवनपद्धती असलेला कमलेचा तो इतका निस्सीम भक्त कसा बनला हेही एक कोडेच आहे. कमलेला फिरोजविषयी नक्की काय वाटत होते तेही पुरेसे स्पष्ट नाही. त्या दोघांच्या या परस्पराविरोधी व्यक्तिमत्वामधील संबंध स्पष्ट करताना कित्येकदा ते दांते व बियास्ट्रीस यांच्याप्रमाणे संबंध असल्याचे सूचित केलं होतं. अशा प्रकारच्या बदनामीकारक अफवा पसरवण्यास ब्रिटीश सरकारचे समर्थक जबाबदार नव्हते. तर खुद्द काँग्रेस पक्षाचेच काही सदस्य होते. (व हीच गोष्ट जेलमध्ये नेहरूंच्या कानावर गेल्यावर ते संतापले होते.) |
2022 ची सुरुवात अक्षयकुमारचा (Akshay Kumar) करणार आहे. 6 जानेवारी रोजी अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' रिलीज केला जाणार आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित या सिनेमात अक्षयसोबत अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि अभिमन्यु सिंह यांच्याही भूमिका आहेत. सिनेमात कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडीज नायिकांची जागा भरून काढणार आहेत. त्यानंतर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर यशराज फिल्म्स त्यांचा स्पाय यूनिर्व्हर्स सीरीजमधील सगळ्यात मोठा सिनेमा 'पठाण' रिलीज करणार आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनीत या सिनेमात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून सलमान खान (Salman Khan) यात कॅमियो करणार आहे. फेब्रुवारी 2022 च्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 'एक व्हिलन' या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वेल 'एक व्हिलन रिटर्न्स' 11 फेब्रुवारी रोजी रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत असून सोमवारपासूनच मुंबईत याचे शूटिंग सुरु करण्यात आले आहे. सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करीत असून सह निर्माता आहे विनोद भानुशाली. सिनेमाचे दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे. यशराज फिल्म्सही त्यांचा विक्की कौशल आणि मानुषी छिल्लर अभिनीत सिनेमा फेब्रुवारीमध्येच रिलीज करणार आहे. मार्चमध्ये होळीच्या मुहुर्तावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (Shradhha Kapoor) यांचा लव रंजन दिग्दर्शित सिनेमा रिलीज केला जाणार आहे. खरे तर या सिनेमात अगोदर रणबीरच्या नायिकेच्या रुपात दीपिका पदुकोणला घेण्यात आले होते. परंतु काही कारणाने दीपिकाने माघार घेतली आणि तिच्या जागी श्रद्धा कपूरची वर्णी लागली. या सिनेमाचे नाव अजून नक्की करण्यात आलेले नाही. बॉक्स ऑफिसवर खरी टक्कर एप्रिलमध्ये बघायला मिळणार आहे. 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीची सुट्टी असून 15 एप्रिलला गुड फ्रायडे आहे. त्यानंतर शनिवार, रविवार असे सलग चार दिवस सुट्टीचे मिळणार आहेत. हा मोठा विकेंड लक्षात घेऊन प्रभासने (Prabhaas) त्याचा महत्वाकांक्षी 'सालार' सिनेमा 15 एप्रिल रोजी रिलीज करण्याची घोषणा केली आहे. 'सालार'सोबत निर्माता दिनेश व्हिजन वरुण धवन (Varun Dhavan) अभिनीत 'भेडिया'ही 14 एप्रिल रोजी रिलीज केला जाणार आहे. 1 मे या महाराष्ट्र आणि कामगार दिनाची सुट्टी डोळ्यासमोर ठेऊन अजय देवगण (Ajay Dvgan) ने त्याचा 'मे डे' हा सिनेमा 29 एप्रिल रोजी रिलीज करणाार असल्याचे घोषित केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अजय देवगण स्वतःच करणार असून यात तो अमिताभ बच्चनसोबत काम करताना दिसणार आहे. सिनेमाचे पहिले शेड्यूस नुकतेच पार पडले. ऑगस्टमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभर उत्सव साजरे केले जाणार आहेत. याच उत्सवाचा एक भाग म्हणून प्रभासने त्याचा महत्वाकांक्षी 'आदिपुरुष' 11 ऑगस्टला रिलीज केला जाणार आहे. रामायणावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत (Om Raut) करीत आहे. या सिनेमात सैफ अली रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग जोरदारपणे मुंबईत सुरु करण्यात आले आहे. महात्मा गांधी जयंतीचा मुहुर्त साधत हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याचा 'फायटर' सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. 30 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार असून यात हृतिकच्या नायिकेच्या रुपात दीपिका पदुकोण दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थसाठी गांधी जयंती लाभदायी ठरली होती. त्याने हृतिक आणि टायगर श्रॉफ अभिनीत 'वॉर' 2 ऑक्टोबर 2019 ला रिलीज केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींच्या उड्या मारल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) त्याच्या महत्वाकांक्षी 'अॅनिमल' सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज केला. एवढेच नव्हे तर त्याच्या रिलीजची डेटही जाहीर केली. दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी त्याचा अॅनिमल हा बहुचर्चित सिनेमा फायटरच्या रिलीजनंतर एक आठवड्याने म्हणजे 9 ऑक्टोबरला रिलीज करणार आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीति चोप्रा दिसणार आहेत. 2022 चा दसरा, दिवाळी आणि ख्रिसमसला रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या नावाचीही आठ-दहा दिवसात घोषणा केली जाणार असल्याचे बॉलिवूडमध्ये मह्टले जात आहे. |
कुकडी साखर कारखाना वाचवण्याच्या भितीने राहूल जगताप यांनी गुन्हा नोंदवला ! अहमदनगर ब्रेकिंग : दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल ! अहमदनगर ब्रेकिंग : माजी महापौर संदिप कोतकर व सचिन कोतकर यांना जामीन मंजूर ! सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण ! सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले ! तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील ! |
मागील १६ दिवसांपासून आमदार घरी पोहोचले नाहीत, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. पण हो हे खरे आहे. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर हे १९ आॅक्टोंबर रोजी निवडून आल्यानंतर या एकच दिवशी घरी ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पोहचले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी आणि गावातील समस्या जाणून घेण्यासाठी 'आमदार जनतेच्या दारी' हा उपक्रम राबवित आहेत. एकदा निवडून गेले की, त्यानंतर कोणीही आमदार पाच वर्षे गावात येवून समस्या जाणून घेत नाही, ही मेळघाट मतदार संघातील मतदारांची निवडणूक प्रचारादरम्यान गाऱ्हाणी होती. मात्र प्रभुदास भिलावेकर हे भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी आदिवासी मतदारांच्या या गाऱ्हाणीला प्रत्यक्ष कृतीत उत्तर देण्यासाठी गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरु केल्या आहेत. विजयाच्या दिवशी एकदाच घरी गेले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी घेत असून गावोगावी जावून आदिवासी बांधवांची कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या समस्या व प्रश्न पोटतिडकीने ऐकून घेत आहे. मागील १६ दिवसांपासून आ. भिलावेकर यांचा हा शिरस्ता अव्याहतपणे सुरुच आहे. मेळघाटातील ४१५ गावांपैकी आतापर्यत ६५ गावांमध्ये जावून त्यांनी मतदारांशी संवाद साधला असून गावात करावयाच्या अतिमहत्वाच्या विकास कामांची नोंद सुद्धा ते घेत आहेत. मेळघाटात कुपोषण, वीज समस्या, पाणी, रोजगार, योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेली घुसखोरी ही बाब आर्वजून निर्दशनात आल्याचे आ. भिलावेकर यांनी धारणी येथे बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर ते 'लोकमत' शी बोलत होते. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असून मेळघाटातही भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे आदिवासींच्या जीवनात नवी उभारी यावी, याअनुशंगाने आपण विकास कामे करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्ख्ये मंत्रीमंडळ मेळघाटात आणून येथील समस्यांवर तोडगा काढण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. त्यामुळेच मेळघाट मतदार संघातील प्रत्येक गावात जात असताना तेथील समस्या, समजून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या शासनाकडे सादर करताना वस्तुनिष्ठ असाव्यात यावर त्यांचा भर आहे. यापूर्वीचा लोकप्रतिनिधी म्हणून असलेला प्रशासकीय कामकाजांचा अनुभव भिलावेकर यांच्या पाठीशी आहे. ३५० गावांमधील समस्या, प्रश्न जाणून घ्यायच्या आहेत. याकरिता किमान दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. |
'गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात आई, वडील आणि आचार्य यांच्याकडून पुत्र किंवा कन्या यांच्यावर त्यांच्याकडून सम्यक (सात्त्विक) कृती व्हावी; म्हणून वैदिक पद्धतीने जे विधी केले जातात, त्यांना 'संस्कार' असे म्हणतात. यांपैकी प्रमुख सोळा संस्कार आहेत. (सोळा संस्कारांची माहिती सनातनचा ग्रंथ 'सोळा संस्कार' यात दिली आहे. ) 'जावळ (प्रथमकेशखंडन)' ही चौलकर्माशी संबंधित एक कृती आहे. (चौलकर्म संस्काराची माहिती लेखातील सूत्र '३ अ' मध्ये दिली आहे. ) रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. त्या वेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात. ५. ३. २०२० या दिवशी सनातनचे 'दुसरे बालसंत' पू. वामन राजंदेकर यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात 'जावळ' (डोक्यावरील केस) काढण्यात आले. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढल्याने त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी 'युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू. ए. एस्. )' या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. या चाचणीत पुढील घटकांच्या 'यू. ए. एस्. ' उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. अ. पू. वामन राजंदेकर : जावळ काढण्यापूर्वी आणि जावळ काढल्यानंतर त्यांच्या 'यू. ए. एस्. ' उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. आ. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेले केस (जावळ) इ. जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू (फणी, कंगवा, वस्तरा, वस्तर्याचे पाते (ब्लेड) आणि कात्री) : जावळ काढण्यासाठी वस्तू वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर त्यांच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. २ अ १. पू. वामन राजंदेकर यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. २ अ २. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. २ अ ३. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमधील 'इन्फ्रारेड' ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे : पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमध्ये आरंभी (जावळ काढण्यासाठी वस्तू वापरण्यापूर्वी) 'इन्फ्रारेड' ही नकारात्मक ऊर्जा होती. त्यांची प्रभावळ पुढे दिली आहे. टीप - वस्तर्याच्या पात्यामध्ये 'इन्फ्रारेड' ही नकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. पात्याच्या संदर्भात 'ऑरा स्कॅनर'ने १२० अंशाचा कोन केला. ('ऑरा स्कॅनर'ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते. ) पू. वामन यांचे जावळ काढण्यासाठी वस्तू वापरल्यानंतर त्यांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाल्याचे आढळले. तेव्हा सर्व वस्तूंच्या संदर्भात 'ऑरा स्कॅनर'ने ० अंशाचा कोन केला. (वस्तूंच्या संदर्भात 'ऑरा स्कॅनर'ने ० अंशाचा दर्शवणे हे त्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा नसल्याचे निर्देशक आहे. ) २ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. २ आ १. जावळ काढल्यानंतर पू. वामन राजंदेकर यांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : पू. वामन राजंदेकर यांच्यामध्ये आरंभी पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ १६२. ४० मीटर होती. त्यांचे जावळ काढल्यानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ५६. ६५ मीटरने वाढ होऊन ती २१९. ०५ मीटर झाली. २ आ २. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असून तिची प्रभावळ ९२. २० मीटर होती. २ आ ३. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : पू. वामन यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमध्ये (वस्तर्याचे पाते सोडून अन्य वस्तूंमध्ये) आरंभी (जावळ काढण्यासाठी वस्तू वापरण्यापूर्वी) सकारात्मक ऊर्जा नव्हती. वस्तर्याच्या पात्यामध्ये अत्यल्प सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. पात्याच्या संदर्भात 'ऑरा स्कॅनर'ने ६० अंशाचा कोन केला. ('ऑरा स्कॅनर'ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते. ) पू. वामन यांचे जावळ काढण्यासाठी वस्तू वापरल्यानंतर त्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांची प्रभावळ पुढे दिली आहे. २ इ. एकूण प्रभावळीच्या (ऑरा) (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. टीप - एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा नमुना म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची एकूण प्रभावळ मोजतात. २ इ १. जावळ काढल्यानंतर पू. वामन राजंदेकर यांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे : जावळ काढण्यापूर्वी पू. वामन राजंदेकर यांची एकूण प्रभावळ २०३. ३५ मीटर होती. त्यांचे जावळ काढल्यानंतर त्यांच्या एकूण प्रभावळीत ६९. २१ मीटरने वाढ होऊन ती २७२. ५६ मीटर झाली. २ इ २. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांची एकूण प्रभावळ १२२. ६५ मीटर होती. वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण सूत्र '३' मध्ये दिले आहे. ३ अ. चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे) : 'चूडा' म्हणजे शेंडी. डोक्यावर शेंडीच्या चक्राच्या ठिकाणी सहस्रारचक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकीचे केस काढणे, याला 'चौलकर्म' किंवा 'चूडाकर्म' असे म्हणतात. उपनयन आणि प्रत्येक विधीमध्ये शेंडीला महत्त्व आहे. आयुष्य, बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी; म्हणून चौलकर्म (शेंडी ठेवणे) हा संस्कार करतात. शेंडीमुळे विश्वातील सत्त्वलहरी ब्रह्मरंध्रातून आत येण्यास साहाय्य मिळते. दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करते, तसे शेंडी कार्य करते. ३ अ १. चौलकर्म करण्याचा उद्देश : शेंडीच्या ठिकाणी मेधा शक्ती जागृत झाली की, तिने तेथेच नित्य (कायम) रहावे (आमचा विवेक नेहमी जागृत रहावा), हा चौलकर्म करण्याचा उद्देश आहे. हा संस्कार तिसर्या, चौथ्या किंवा पाचव्या वर्षी (पाठभेद पहिल्या, दुसर्या, तिसर्या किंवा पाचव्या वर्षी) शुभघटिका पाहून करण्याची वहिवाट आहे. सध्या बहुधा मुंजीच्या वेळी हा विधी करतात. ३ अ २. चौलकर्माशी संबंधित एक कृती - जावळ (जाऊळ, जायवळ, प्रथमकेशखंडन) : शास्त्रानुसार मुलगा असल्यास ६, ८, १० इत्यादी सम मासात, तर मुलगी असल्यास १, ३, ५ इत्यादी विषम मासात जावळ काढावे. रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. त्या वेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात. थोडे केस ठेवण्याचे महत्त्व सूत्र '३ अ १' यातील 'उद्देश' यावरून लक्षात येईल. एक वर्षाच्या आत जावळ काढले पाहिजे, नाहीतर तीन वर्षे काढता येत नाही, अशी अनेकांची समजूत आहे; पण त्यास शास्त्राधार नाही. तीन वर्षांपर्यंत केव्हाही सममासात (शास्त्रानुसार मुलांचे जावळ हे जन्मापासून ६, ८, १० इत्यादी सममासात केले जाते. ) योग्य दिवस पाहून जावळ काढावे. जावळ काढणे म्हणजे चौलकर्म नाही. (जावळ काढतांना शेंडी ठेवत नाहीत. )' (संदर्भ : सनातनचा ग्रंथ 'सोळा संस्कार') ३ आ. जावळ काढल्यानंतर पू. वामन राजंदेकर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ यांमध्ये पुष्कळ वाढ होणे : पू. वामन राजंदेकर हे जनलोकातून (टीप) 'हिंदु राष्ट्रा'संदर्भातील कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आले आहेत. त्यांच्यामध्ये श्रीरामतत्त्व आणि श्रीकृष्णतत्त्व आहे. पू. वामन यांच्याकडून वातावरणात चैतन्य सतत प्रक्षेपित होत असते. त्यामुळे आरंभीही (जावळ काढण्यापूर्वीही) त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा (१६२. ४० मीटर) आढळली आणि त्यांची एकूण प्रभावळही पुष्कळ अधिक (२०३. ३५ मीटर) होती. (सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. ) संतांच्या ब्रह्मरंध्रातून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होते. पू. वामन यांचे जावळ काढल्याने (त्यांच्या डोक्यावरील केस काढल्याने) त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यात पुष्कळ वाढ झाली. टीप - भू, भुवर्, स्वर्ग, महर्, जन, तपस् आणि सत्य असे सप्तलोक आहेत. यांपैकी स्वर्ग आणि त्यापुढील लोकांना 'उच्च लोक' असे म्हणतात. ३ इ. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे : संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने त्यांचा देह, त्यांचे केस आणि नखे यांतूनही चैतन्य प्रक्षेपित होते. (त्यांची कापलेली नखे आणि केस यांतूनही चैतन्य प्रक्षेपित होते. ) संतांच्या ब्रह्मरंध्रातून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होते. पू. वामन यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने त्यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा (९२. २० मीटर) आढळली आणि केसांची एकूण प्रभावळही (१२२. ६५ मीटर) पुष्कळ अधिक होती. - डॉ. अमित भोसले, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५. ४. २०२०) |
भारताची लोकशाही जगात नावाजली जाते. तिच्या लोकशाही मुल्यांचे अनुकरण करीत अनेक देशांनी आपल्या राष्ट्रीय धोरणात बदलही केले आहेत. मात्र गत काही वर्षात घडलेल्या अनेक घटनांवरुन खरेच का लोकशाही तिच्या मुल्यांचे अस्तित्व टिकवून आहे असा प्रश्न पडतो. लोकशाहीची वाटचाल ठोकशाहीच्या मार्गाने अधिकारशाहीकडेच होते आहे असेच काहीसे वातावरण देशभरात दिसून येते आहे. सध्या केंद्राला न मानण्याचा आणि केंद्राचे अधिकार झुगारुन देण्याची एक स्पर्धा राज्यांमध्ये सुरु असल्याचे दिसते. यातूनच केंद्राचे अधिकार डावलण्याचा एक नवा पायंडा पडतो आहे. मुंबईतील मेट्रो कारशेडची जागा कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय आपण एक नवा रुपयाही खर्च न करता घेतला असल्याचे सांगून मुंबईकरांची दिशाभूल करणाऱ्या ठाकरे सरकारने कांजूरमार्गमधील मिठागराची केंद्राच्या ताब्यात असणारी जागा आपली समजून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचे आरोप-प्रत्यारोप आता रंगू लागले आहेत. काहीच दिवसांपूर्वी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने थेट सीबीआयलाच राज्यात बंदी घातली. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयसह इतर कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात दखल देणार नाहीत, असा ठरावच करण्यात आला आहे. हे लोकशाही मुल्यांच्या विरोधात नव्हे काय. याआधी पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारनेही असा ठराव करून सर्वाधिकार राज्याला बहाल केले आहेत आणि केंद्राचे अधिकार अमान्य केले आहेत. महाराष्ट्रानंतर आता केरळ राज्यानेही सीबीआयला राज्यात सामान्य परवानगीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे केरळमध्ये तपास करायचा झाल्यास सीबीआयला केरळ सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. एकंदरच देशभरात विविध घटनांमधून लोकशाहीची एकप्रकारे गळचेपीच होताना दिसते आहे. प्रसार माध्यमांवर असलेली सत्ताधाऱ्यांची पकड, नागरी चळवळी व विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केले जाणारे दडपशाहीचे प्रयत्न यामुळे भारतीय लोकशाही स्वतःचा लोकशाहीचा दर्जा हरवत अधिकारशाहीकडे वाटचाल करत असल्याचा निष्कर्ष नुकताच स्वीडनमधील डेम इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या आपल्या लोकशाही अहवालात मांडला आहे. डेम इन्स्टिट्यूट २०१४ मध्ये स्थापन झाली असून ती गोथनबर्ग विद्यापीठातील एक संशोधनपर संस्था आहे. २०१७ पासून दरवर्षी या संस्थेकडून जगभरातल्या लोकशाही स्वीकारलेल्या देशांमधील राजकीय परिस्थिती मांडली जात असते. तसेच या देशांची मोठ्या प्रमाणात माहिती जमा केली जात असते. आपल्या २०२० च्या लोकशाही अहवालात अधिकारशाहीची लाट व वाढता प्रतिकार या भागात भारताची लोकशाही वेगाने धोक्यात येत असल्याची नमूद करण्यात आले आहे. २००१ नंतर जगातल्या सुमारे ९२ देशांमध्ये अधिकारशाही वाढत असून या देशांमधील लोकशाही व्यवस्था संपत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या ९२ देशांमध्ये राहणारी लोकसंख्या ही जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५२ टक्के इतकी आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, जी-२० देश व उर्वरित जगात अधिकारशाहीची तिसरी लाट उत्पन्न झाली असून त्याचा फटका या देशांच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. भारत, ब्राझील, अमेरिका, तुर्की या देशांमध्ये तसे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. भारताची गेल्या काही वर्षातील वाटचाल अधिकारशाहीच्या दिशेने होत असल्याचे स्पष्ट दिसून येते व या देशाला लोकशाही देश म्हटले जात होते व तसा दर्जा होता, तो दर्जा आता खालावत चालला आहे. जगभरातल्या ३१ देशांमधील प्रसार माध्यमांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले सुरू असून दोन वर्षांपूर्वी असे १९ देश होते ती यादी ३१ पर्यंत पोहोचली आहे. या देशांमधील वैचारिक स्वातंत्र्य गेल्या १० वर्षांत दरवर्षी १३ टक्क्याने घसरत असून शांतता मार्गाने आंदोलन करणे, निषेध करणे यावर प्रतिबंध वाढत चालले आहे. ही घसरण १४ टक्के इतकी आहे. या अहवालात उदारमतवादी लोकशाही निर्देशांक पद्धत वापरली आहे. या पद्धतीत एखाद्या देशातील किती टक्के लोकसंख्येपर्यंत लोकशाही पोहोचली आहे, याची मोजदाद केली जाते. या निर्देशांकामध्ये निवडणुकांचा दर्जा, मताधिकार, व्यक्तीस्वातंत्र्य, प्रसार माध्यमे, नागरी चळवळी, कायद्याचे राज्य यांच्या परिप्रेक्ष्यातून निर्देशांक मोजला जातो. उदारमतवादी लोकशाही निर्देशांकात भारताची घसरण दिसत असून हंगेरी, पोलंड व ब्राझील व भारतात अधिकारशाहीमुळे प्रसारमाध्यमांचे उच्चाटन व नागरी चळवळींचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. या अहवालात भारतात प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य व नागरी चळवळींवर आक्रमण केले जात असल्याचे नमूद केले गेले आहे. भारतात पत्रकारांवर राजद्रोहाचे आरोप लावणे, वृत्तांवर आक्षेप घेऊन न्यायालयात तक्रारी दाखल करणे, असे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत. हंगेरीमध्ये जसे सरकारकडून प्रसार माध्यमांवर अंकुश ठेवला जात आहे तसाच प्रकार भारतात सुरू असल्याचे या अहवालात म्हटले आहे. डेम इन्स्टिट्यूटचा हा अहवाल मार्च २०२०मध्ये प्रसिद्ध झाला आहे. कोविड-१९च्या काळात लॉकडाऊनच्या नावाखाली सामान्य माणसावर चोहोबाजूंनी कशी नियंत्रणे आणली गेली. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य लॉकडाऊनच्या काळात कसे धोक्यात आणले या घडामोडी या अहवालात समाविष्ट नाहीत. अन्यथा महाराष्ट्रातील कोरोनाच्या नेमक्या परीस्थितीवर, आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर भाष्य करणाऱ्या पत्रकारांची होणारी गळचेपी यातून उघड झाली असती. आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभारामुळे राज्यात पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे, त्या पत्रकारांना अद्यापही जाहीर केलेली सरकारी मदतही देण्यात आलेली नाही, हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जिवंत ठेवण्याच काम करणाऱ्या पत्रकारीतेचे वास्तवही या अहवालात रेखाटण्यात आले नाही, याचीच खंत अधिक वाटते. एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून पहिल्यांदाच भारताच्या लोकशाहीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आम्हाला लोकशाही हवी आहे, तिने बहाल केलेले संविधानिक अभिव्यकित स्वातंत्र्य आहे हुकूमशाही नव्हे, अशी मागणी समाजातील प्रत्येक घटकाकडून होते आहे. केवळ एखाद्या बातमीत आपले नाव गोवले म्हणून सूडबुध्दीने कारवाई करणारी लोकशाही मूल्ये ठोकशाहीचे प्रतिनिधीत्व करु लागली आहेत आणि हे भारतासारख्या देशाला निश्चितच घातक ठरते आहे. सध्या कोरोनामुळे राज्यासमोर अनेक समस्यांची मालिका आ वासून उभी आहे. बेकारी, गरीबी, कुपोषण, दारिद्र्य, महिला अत्याचार, उच्चशिक्षित गुन्हेगारांची वाढती फौज अशा अनेक समस्यांसोबत लिंगभेद, जातीवर आधारीत राजकारण अशा पारंपरिक समस्यांनी व्याप्त असणाऱ्या भारताला लोकशाहीची मुळे धरुनच विकासाच्या पायऱ्या पार कराव्या लागणार आहेत. लोकशाहीत नेमून दिलेले अधिकार, संविधानानुसार, देश एकसंघ रहावा यासाठी करण्यात आलेले नियम सत्ताधाऱ्यांनी असे सोयीने बदलत ठेवले तर ती लोकशाही नक्कीच अधिकारशाहीच ठरेल. |
। पनवेल । विशेष प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि. 1) शनिवार रोजी ऑनलाईन जिओच्या 5G सेवेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पनवेल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत उपस्थित राहून या सेवेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. या सेवेचा फायदा आपल्या सुरक्षिततेसाठी, चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी करा. त्यामध्ये मनोरंज, सिनेमा व गेम आहेतच, पण त्यातील चांगल्या बाबी घ्या, बाकी वगळा, विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या सेवेतील शिक्षणाशी निगडीत असा प्रयोग महापालिकेच्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले शाळेची निवड केल्याबद्दल प्रतंपधान मोदी, अश्विनी वैष्णव आणि त्यांच्या टीमला यावेळी धन्यवाद दिले. यावेळी प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते. 5G च्या माध्यमातून सगळ्या शाळा एकमेकांशी जोडल्या जातील, त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावला जाऊ शकतो. शिक्षकांसाठीही उपयुक्त माध्यम आहे. त्यांचे ही प्रशिक्षण या माध्यमातून करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रातदेखील यामुळे क्रांती घडेल. दृश्य माध्यमामुळे मुलांना त्याचे लवकर आकलन होऊन त्यांच्या आकलन शक्तीमध्ये प्रभावी परिवर्तन होईल. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयातदेखील याचा उत्तम वापर होऊ शकतो. यामुळे नॉर्मल क्लासेस स्मार्ट क्लासेसमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. त्यामुळे उत्तम दर्जाचे शिक्षण मिळू शकेल. ई-लर्निंग, डिजिटल क्लास रूम, शिक्षक प्रशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण कोणताही अडथळा न येता जलदगतीने मिळू शकते. शिक्षकांना ही त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर शेतीमध्ये ही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बँकिंग, वैद्यकीय सेवेत ही त्याचा आपण जसा वापर करत जाऊ तसा फायदा होणार आहे. त्यामुळेच 5G मुळे देशात डिजिटल क्रांती होणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. |
आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला शनिवारपासून सुरूवात झाली. लीगची पहिलीच मॅच चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात झाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे यावर्षी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायला परवानगी देण्यात आली आहे, यानंतर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात स्टेडियममध्ये बसलेली मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ही मिस्ट्री गर्ल रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्सला पाठिंबा देण्यासाठी आली होती. एमएस धोनीच्या अर्धशतकानंतरही या सामन्यात चेन्नईचा 6 विकेटने पराभव झाला. मिस्ट्री गर्लचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरून लगेच कॅमेरामनला ट्रोल करण्यात आलं. याआधीही आयपीएल मॅचेसवेळी अनेकवेळा अशाप्रकारे मिस्ट्री गर्ल व्हायरल झाल्या होत्या. (Photo- Devika Nair Instagram) सीएसके आणि केकेआर सामन्यावेळी व्हायरल झालेल्या मिस्ट्री गर्लचं नाव देविका नायर आहे. देविकाने स्वतःच सोशल मीडियावरून तिचा व्हायरल फोटो शेयर केला आहे. देविका प्रोफेशनल डिजिटल मार्केटर आहे. (Photo- Devika Nair Instagram) देविकाचा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. इन्स्टाग्रामवर देविकाला 22 हजारांपेक्षा जास्त जणांनी फॉलो केलं आहे. (Photo- Devika Nair Instagram) आयपीएल 2019 मध्ये आरसीबीच्या मॅचवेळी दीपिका घोष नावाच्या मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर दीपिका एका रात्रीमध्येच स्टार झाली होती. |
उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढल्याने अंगाची लाहीलाही होते. इतकेच नाही तर उन्हाचा चटका बसल्याने त्वचा टॅन होते. घामाघूम होत असल्याने पुरळ येणे, रॅशेस येणे, अंगाला घामाचा वास येणे यांसारख्या समस्याही उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी आपण दिवसातून २ वेळा आवर्जून आंघोळ करतो. तसेच अंगाला पावडर लावणे, परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर करणे यांसारखे उपाय आपण करतो. पण त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाचा वास जाण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ होण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे साबण किंवा बॉडी वॉश वापरतो. असे असले तरी त्वचेशी निगडीत समस्या कमी होतातच असं नाही (Know How To Make Cooling Ubatan For Summer Skin Care Tips). थंडीत आपण त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे उटणं वापरतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यासाठीही घरच्या घरी आपल्याला छान उटणं तयार करता येऊ शकतं. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री हे उटणं कसं तयार करायचं आणि शरीराला त्याचे काय फायदे होतात याबाबत माहिती देतात. शरीराला थंडावा देणारं हे उटणं तयार करण्यासाठी आयुर्वेदातील उपयुक्त अशा काही वनस्पतींचा यामध्ये वापर केल्यास त्याचा फायदा होतो. तसेच या उटण्यामुळे घामाचे प्रमाणही नकळत कमी होण्यास मदत होते. दिवसभर त्वचा फ्रेश राहण्यासाठी आणि त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठीही हे उटणं उपयुक्त ठरतं. उष्णतेमुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा फोड आले असतील तर फेस मास्क म्हणूनही या उटण्याचा वापर करु शकतो. पाहूया हे उटणं कसं तयार करायचं. १. वाळा पावडर, चंदन पावडर आणि आवळा पावडर सम प्रमाणात एकत्र करावी. २. ही पावडर एका बरणीत किंवा डब्यात भरुन ठेवावी. ३. रोज आपण आंघोळ करताना ज्याप्रमाणे साबण लावून अंग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे या पावडरमध्ये थोडे पाणी घालून साबणाप्रमाणे ते सगळ्या अंगाला लावावे. ४. या तिन्हीही गोष्टी थंड प्रकृतीच्या असतात त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा चांगला फायदा होतो. तसेच सेन्सिटीव्ह त्वचेसाठीही हे उटणे फायदेशीर असते. ५. या पावडरी घरात करणे शक्य नसेल तर बाजारातील आयुर्वेदीक दुकानात त्या सहज उपलब्ध असतात. |
इस्लामपूर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने डॉ. क्रांती सावंत यांनी महादेव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी सुमेध माने, महेश कांबळे, निरंज लोखंडे, जितेंद्र पवार, राजू कांबळे, अमित वेटम उपस्थित होते. इस्लामपूर : कोरोना महामारीच्या काळातही जीवनावश्यक वस्तूंची महागाई करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला. महामारीच्या काळातही जनतेच्या अडचणींचा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून महागाई कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. क्रांती सावंत यांनी केली. डॉ. दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथील प्रांताधिकारी कार्यालयात शिरस्तेदार महादेव पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात कोरोनाच्या काळातही सर्वजण महागाईची झळ सोसत आहेत. प्रत्येकाची जीवघेणी अवस्था आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा स्वस्त किमतीत होणे गरजेचे असताना त्यांचे भाव कडाडले आहेत. महामारीच्या काळात पोषक आहार घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याऐवजी कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संचारबंदीचे नियम पाळून उद्योगधंदाही करता येत नाही. या सर्व परिस्थितीला केंद्र व राज्य सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी सुमेध माने, महेश कांबळे, निरंज लोखंडे, जितेंद्र पवार, राजू कांबळे, अमित वेटम, लक्ष्मण डवरी उपस्थित होते. |
जिनिव्हा : फायझर व बायोएनटेक यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी मंजुरी दिली. गरीब देशांना ही लस सहज उपलब्ध व्हावी हा त्यामागे हेतू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयामुळे कोरोना लसीच्या आयात व वितरणासाठी तात्काळ परवानगी देण्याकरिता अनेक देशांना मार्ग मोकळा झाला आहे. जगातील सर्व देशांना कोरोना लसीचे समन्यायी वाटप व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने कोवॅक्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. फायझरप्रमाणे आणखी काही कंपन्यांच्या कोरोना लसीही विकसित होत आहेत. त्यातील काहींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. सुरक्षित व परिणामकारक लसींना जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी दिलेली मान्यता हा गरीब देशांसाठी आशेचा किरण आहे. लस विकसित करणे, वितरण या गोष्टी गरीब देशांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयांकडे दीपस्तंभाप्रमाणे पाहिले जाते. जगातील श्रीमंत देश कोरोना लस उत्पादक कंपन्यांशी लस पुरवठ्याबाबत स्वतंत्रपणे करार करत आहेत. श्रीमंत देशांपेक्षा गरीब देशांत लोकसंख्या अधिक असून, तेथील कोरोनाग्रस्तांना वेळीच लस न मिळाल्यास जगभरात साथ आटोक्यात येण्यास खूप वेळ लागेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. भारतामध्ये नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यामध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत चार लाखांनी घट झाल्याचे तसेच बळींचा आकडा पाच हजारांनी कमी झाल्याचे दिसून आले. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये देशात १२. ३३ लाख नवे कोरोना रुग्ण सापडले होते, तर १३. ४५ लाख बरे झाले, तर १५ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत डिसेंबर महिन्यात ७. ८५ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले. |
चीनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जगासाठी कुतूहल व उत्सुकतेचा विषय आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्येही असेच अद्भुत गुप्त शहर असून तेही सगळ्यांसाठी गूढ ठरले आहे. या अनोख्या शहराच्या निर्मितीचे श्रेय चीनमधील कम्युनिस्ट क्रांतिकारी माओ जेडांग यांना जाते. आजही अनेकजणया गुप्त शहराची रहस्ये शोधण्याचा प्रयत्न करतात, पण मार्गात येणारे नाना प्रकारचे अडथळे त्यांचा हा मनसुबा उधळून लावतात. या गुप्त निर्मितीस सोव्हिएत संघ व चीन यांच्यातील सिनोऐसोव्हियत सीमावाद कारण ठरला होता. 1969मध्ये हा वाद चांगलाच पेटला होता. माओ जेडांग यांनी सोव्हिएत आक्रमणापासून बीजिंगचा बचाव करण्यासाठी या गुप्त शहराची निर्मिती केली होती. कोणत्याही हल्ल्यात पूर्ण सुरक्षा देण्याच्या हेतूने त्याची रचना करण्यात आली होती. 1970मध्ये बनलेल्या या शहरात बॉम्ब वा अन्य कोणत्याही हल्ल्यातून वाचण्यासाठी तिथे खास प्रकारच्या दिव्यांना महत्त्व देण्यात आले होते. या शहरातील गुहा 10 मीटर रुंद बनविण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर तब्बल 70 हजार मजूर मेहनत घेत होते. मात्र काळाच्या ओघात या शहराला बरेच नुकसान पोहोचले आहे. त्यातून गटारीप्रमाणे पाणीही वाहू लागले आहे. सुमारे 85 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या शहरात एक हजार रचना अशा आहेत, जिथे कोणत्याही प्रकारचा आकाशीय हल्ला झाला तरी लोक सुरक्षित राहू शकतात. त्यात 90 प्रदेशद्वारे, थिएटर, दुकाने, हॉटेल, शाळा, वाचनालये, कारखाने आणि गुदामेसुद्धा आहेत. तिथे तापमान 27 अंशाच्या आसपास असायचे. |
विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव सुरू होता. नागपूरः विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव सुरू होता. गेल्या आठवडाभरापासून वाढत असलेले तापमान या अल्पवृष्टीमुळे खाली आले असून, वातावरणात गारवा वाढला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे मध्यरात्रीपासूनच जोरात पाऊस सुरू झाला होता. नागपुरातही पहाटेपासूनच हलकी वृष्टी सुरू झाली होती. त्यामुळे हवेत गारठा जाणवत होता. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, कोरपना, सिंदेवाही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बऱ्याच ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्याचे दर्शन झाले नाही. वर्धा जिल्ह्यातही सर्वत्र हलका पाऊस पहाटेपासून सुरू होता. या पावसामुळे हरभरा व गव्हाच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हरभºयाचा दाणा या पावसापायी काळा पडून गळून पडण्याची शक्यता असते. तसेच जो कापूस अजूनही काढलेला नाही त्याची प्रत घसरून नुकसान होण्याची शक्यता आहे. आंब्याच्या मोहोरावरही या पावसाचा विपरित परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे. |
पुणेःआज मंत्रालयामध्ये एका महिला पत्रकाराने मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजींना काही प्रश्न विचारले असता त्यांनी तिला 'तू टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलीन', असे अजब विधान केले आहे. या पत्रकाराला आम्ही सर्व महिलांना भारत मातेसमान मानतो आणि भारतमाता विधवा नाही असे आश्चर्यकारक उद्गार काढले आहेत. भारतमाता हे सर्वांचे श्रद्धा स्थान आहे आणि त्यात आपल्याला तिचे व्यक्ती म्हणून कोणाचेही रूप निश्चित करता येणे अशक्य आहे. असे असतानाही भारतमातेच्या प्रतिकाच्या निमित्ताने संबोधून स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यात नाहक ढवळाढवळ भिडे गुरुजी करीत आहेत. हा भिडे गुरुजी यांचा प्रयत्न झोटिंग शाही आहे की काय असे वाटत आहे. मंत्रालयात असे प्रकार घडणे अतिशय गंभीर आहे. याबद्दल काळजी वाटावी असे आहे. डॉ. गोऱ्हे यांनी भिडे गुरुजींच्या या दुजाभाव देण्याच्या वागणुकीबद्दल तीव्र शब्दांत खेद व्यक्त केला आहे आणि नापसंती दर्शवली आहे. |
मुंबई, 03 मे : भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडलं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही अशी टीका करत भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचं कुटुंब आज 'मातोश्री'वर जाणार आहे. भाजपचे पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे सर्व कुटुंबीय आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्याआधी या कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली. आमच्या भागात भाजपला फक्तं दोन मतं पडायची. त्या परिस्थितीत आमच्या वडिलांनी परीश्रम घेऊन पक्ष वाढवला. ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली पण आम्हाला मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. आता आम्ही भाजप पक्ष सोडत आहोत असं वणगा कुटुंबाने जाहीर केलं. Mumbai News : रिक्षाचालकाच्या लेकीने सातासमुद्रापार केली सुवर्णपदकाची कमाई, असं गाठलं मुंबई ते बर्लिन! Ajit Pawar : अजितदादांचा 'मास्टरस्ट्रोक', मंत्रालयात आता शिंदे आणि फडणवीस झाले शेजारी! तसंच भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडलं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. आमच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही. पालघर लोकसभा पोट निवडणुकीत आमच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
बीड : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याप्रकरणी बीडच्या (Beed) माजलगावात शहरात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले. (Live Marathi News) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त जुन्या काळातले आदर्श होते आत्ताचे नाहीत. असं बोलून शिवरायांचा अपमान करणाऱ्या आणि नेहमी शिवरायांवर वाईट बोलणाऱ्या भगत कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध नोंदविला आहे. बीडच्या माजलगाव येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
कोल्हापूर : केएसए लीग फुटबॉल सामन्यात आज, मंगळवारी पाटाकडील तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडामंडळावर ३-२ अशा गोलफरकाने मात करीत दमदार सुरुवात केली; तर अन्य एका सामन्यात दिलबहार तालीम मंडळ 'ब' विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यामध्ये झालेला सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला. छत्रपती शाहू स्टेडियमवर यंदाच्या फुटबॉल हंगमातील आज पाटाकडील तालीम मंडळ 'अ' विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये सामना होता. दोन्ही संघ तगडे असल्याने सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभास दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी करीत एकमेकांचा अंदाज घेत खेळण्यास सुरुवात केली. काही मिनिटांनी 'फुलेवाडी'ने शॉर्ट पासवर भर देत खोलवर चढाया केल्या. यामध्ये 'फुलेवाडी' संघाच्या अजित पोवारच्या पासवर राजा दासने गोल करीत सामन्यात आघाडी घेतली. या गोलनंतर पाटाकडील तालीम मंडळ 'अ'ने आक्रमण खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये हृषीकेश मेथे-पाटीलने १६ व्या मिनिटाला गोल करीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. दोन्ही संघांनी आघाडी भक्कम करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ४०व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळ 'अ'च्या हृषीकेश मेथे-पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल नोंदवीत सामन्यात एक गोलची आघाडी घेतली. ही आघाडी अल्पकाळच टिकली. 'फुलेवाडी' संघाच्या राजा दासनेही वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल करीत मध्यंतरापर्यंत सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. उत्तरार्धात 'फुलेवाडी'ने थोडी आक्रमक खेळी केली. मात्र, पाटाकडील तालीम मंडळ 'अ'ने आक्रमकच पवित्रा घेत खेळी करण्यास सुरुवात केली. ७३ व्या मिनिटाला ओमकार जाधवच्या पासवर नियाज पटेलने गोल करीत सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. ती कायम ठेवण्यास पाटाकडील तालीम मंडळ 'अ' संघाला शेवटच्या मिनिटापर्यंत यश आले. (क्रीडा प्रतिनिधी) पहिल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ 'ब' विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना खाते उघडता न आल्याने सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दिलबहार तालीम मंडळाच्या आदित्य मानेने ५३ व्या मिनिटाला गोल करीत संघाचे गोलचे खाते उघडले. ही आघाडी ६० व्या मिनिटाला उत्तरेश्वर संघाच्या ओंकार लोकरेने कमी केली. ७७ व्या मिनिटाला आदित्य माने याने गोल करीत सामन्यात २-१ ने आघाडी घेतली. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना 'उत्तरेश्वर' संघाच्या रोहन डकरेने गोल नोंदवीत सामन्यात २-२ अशा गोलफरकाने बरोबरी केली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी पाटाकडील तालीम मंडळ 'अ' विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये चुरशीच्या झालेल्या सामन्यात 'फुलेवाडी'च्या खेळाडूंनी मारलेला चेंडू गोल पोस्टच्या बाहेर ढकलताना 'पाटाकडील'चा गोलरक्षक शैलेश पाटील. |
विरोधी पक्षांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येणाऱ्या, केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी 'पंतप्रधान जनधन योजने'ने मंगळवारी ४२,००० कोटी रुपयांचा ऐतिहासिक पल्ला गाठला. या शिवाय झिरो बॅलन्स असणाऱ्या खात्यांची संख्या पंचवीस टक्क्यांच्या खाली घसरली आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येणाऱ्या, केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी 'पंतप्रधान जनधन योजने'ने मंगळवारी ४२,००० कोटी रुपयांचा ऐतिहासिक पल्ला गाठला. या शिवाय झिरो बॅलन्स असणाऱ्या खात्यांची संख्या पंचवीस टक्क्यांच्या खाली घसरली आहे. एप्रिलपासून आतापर्यंत 'जनधन' योजनेतील निधीमध्ये सहा हजार कोटी रुपयांची वाढही नोंदविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला 'जनधन' खात्यांमधील एकूण रक्कम ३६,००० कोटी रुपये होती. सात सप्टेंबरपर्यंत ही रक्कम वाढून ४२,५०४ कोटी रुपयांवर पोहोचली. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या योजनेतील समाविष्ट रक्कम दिवसेंदिवस वाढत असून, थेट हस्तांतर योजनेतील गोंधळ कमी करण्यासाठी सरकारकडून या खात्यांचा वापर करण्यात येत आहे. या खात्यातील रक्कम बँकांकडे बऱ्याच दिवसांपासून जमा आहे. काही सूत्रांच्या मते काही बँकांचे अधिकारी जाणीवपूर्वक या खात्यांमध्ये कमी रक्कम भरत आहेत. जेणेकरून त्यांचा समावेश झिरो बॅलन्स खात्यांमध्ये होऊ नये, असा यामागील उद्देश आहे. जनधन योजनेत आतापर्यंत २४. २७ कोटी खाती उघडण्यात आली असून, त्यातील झिरो बॅलन्स खात्यांची संख्या पंचवीस टक्क्यांच्या खाली घसरली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते खात्यात शून्य रक्कम असणारी खाती कमी करणे, आमचे प्रमुख उद्दिष्ट नाही. विविध प्रकारचे व्यवहार बँकेच्या माध्यमातून व्हावेत, ही यामागील भूमिका आहे. त्यामुळे खातेधारकांकडून होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ होईल, त्यांना व्यवहारांची सवय लागेल. |
मुंडे साहेब यांचा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही. वांबोरी ते देहरे रस्त्याचे 'भाग्य' उजळले! शिर्डी - नाशिक महामार्गावर भीषण अपघात. मटनात विष कालवून नवऱ्याची हत्या करणाऱ्या बायकोला अटक ! सरकारकडून पुन्हा एकदा राज्यातील शेतकर्यांवर मोठा अन्याय ! माजी आमदार अनिल राठोड यांची नगर शहरातून तडीपारी ? ...म्हणून झाला आमचा पराभव : माजीमंत्री बबनराव पाचपुते. श्रीगोंदा तालुक्यात ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार. 'या' गावाने घेतला खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय ! भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील चार तरुण ठार. सरपंचासह ग्रामसेवकाविरूद्ध अपहाराचा गुन्हा. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.