text large_string |
|---|
Ajit Pawar : शेतामध्ये माझे आयुष्य गेले. अजित पवार यांना स्वच्छतेची लहानपणापासून खूप आवड होती. वेळेत कामे करण्याची व चांगल्या कामासाठी न थांबण्याची त्याची प्रवृत्ती आहे. पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मूळचे बारामती तालुक्यातील काटेवाडीचे. त्यामुळे, त्यांचे बालपण हे गावातच आणि शेती-मातीच्या संस्कृतीचं गेले. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण करत असताना ते राजकारणात आले. पवार कुटुंबातच राजकारणाचा मोठा वारसा असल्याने, काका शरद पवार यांच्या तालमीतच त्यांनी राजकारणाचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. त्यातूनच, त्यांची कारकीर्द बहरली अन् आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांच्या मातोश्रींनी अजित पवार यांच्या राजकीय जडणघडणीचे श्रेय शरद पवार यांचे असल्याचे म्हटलयं. "माझ्या मुलांना चांगले वळण लावत मी धाकासोबतच प्रेमाने वाढविले. आमचे सासर आणि माहेरचे कुटुंब मोठे असल्याने भरलेल्या गोकुळात माझे आयुष्य गेले. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र येतो. शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे", असा उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास सांगताना त्यांच्या मातोश्रींचा कंठ दाटला होता. "शेतामध्ये माझे आयुष्य गेले. अजित पवार यांना स्वच्छतेची लहानपणापासून खूप आवड होती. वेळेत कामे करण्याची व चांगल्या कामासाठी न थांबण्याची त्याची प्रवृत्ती आहे. आपणही आपल्या मुलांना प्रेम, आपुलकीने वाढविले पाहिजे. तसेच मुलांच्या कलाप्रमाणे त्यांना वाढवावे. अजितदादा स्वभावाने प्रेमळ आहे आणि आज हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो", असे आशा पवार यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर म्हटले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्, पुण्याच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने तिसरा आदर्श माता पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या होत्या. या कार्यक्रमात बोलताना आशाताईंच्या डोळ्यात पाणी होते, तर मुखात पुत्र अजित पवार यांच्या जडणघडणीचा इतिहास होता. |
तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत. आर्णी : तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत. साथरोग मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा प्राथमिक आरोग्य केन्द्र म्हसोला येथिल संबधीत अधीकारी कर्मचारी मात्र गावात फीरकलेच नाही. आरोग्य यंत्रणा लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी तालुका आरोग्य अधीकारी कार्यालयात केली. या तक्रारीतून गावात ताडीने आरोग्य कॅम्प लावण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. आर्णी तालुका मुख्यालयापासून अगदी आठ किमलोमीटर अतंराव आमणी हे गाव आहे. या गावात दीडशे कुटूंब असून बहुतांश शेतकरी,शेतमजुर आहेत. गट ग्रामपंचायत असल्याने या गावाकडे प्रशासनाचे लक्ष नाही असाही आरोप गावकºयांचाआहे. गावातील सत्तर ते अंशी टक्के लोक या साथ रोगाने आजारी पडले आहेत. गावात संबधीत विभागाने स्वच्छता अभियान हाथी घेण्याची गरज आहे. तथा आरोग्य कर्मचाºयांनी ताबडतोब घरोघरी जावून तपासनी करुन औषधोऊपचार करण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या अधीकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच ह्या गावात साथरोग वाढल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. निवेदनावर आमनी गावातील पोलीस पाटील संदीप पवार ,ग्रामपंचायत सदस्य सिमा गितेश चव्हाण,सुभाष चव्हाण,सुभाष रुणवाल,जगलाल चव्हाण,विठ्ठल राठोड,सदाशिव चव्हाण,गितेष चव्हाण यांच्या स्वक्षºया आहेत. |
एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, लॉकडाउन होणार ही अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. तसेच, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा संसर्ग वाढू नये, तो आटोक्यात राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, शाळा-महाविद्यालये, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश दिला आहे. ज्या भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येईल. तो परिसर पूर्वीप्रमाणेच म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. ठराविक कालावधीनंतर भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या नियमित कोरोना चाचण्या करण्यात याव्यात, असे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांमध्ये म्हटलेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आज व्हायरला झालेला व्हिडिओ जुना आहे. त्यात जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याचे म्हटलेले आहे. पण, तो जुना व्हिडीओ असून लॉकडाऊन होणार ही अफवा आहे. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे. |
दुष्काळग्रस्त भागातील ४६९१ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार! अकोला : फेब्रुवारी व मार्च २0१८ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील ४ हजार ६९१ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होण्याची शक्यता आहे. १२५ शाळांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. ही माहिती शिक्षण विभागावतीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. शासनाने सतत दोन वर्ष जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते; परंतु अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहितीच सादर केली नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदा तसे होऊ नये आणि शासनाने यंदाही दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले, तर या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हे शुल्क तातडीने जमा व्हावे, या दृष्टिकोनातून शाळेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या ४ हजार ६९१ विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती, बँक खाते क्रमांकांची माहिती घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केली आहे. विद्यार्थ्यांची विद्याशाखा, बैठक क्रमांक, नाव, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे गाव, मोबाइल क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, शाखा आणि आयएफसी कोड आदी माहिती पाठविण्यात आली असून, ही माहिती शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील या विद्यार्थ्यांना शासनाने परीक्षा शुल्क माफ केले, तर त्यांच्या बँक खात्यात परीक्षा शुल्काची प्रत्येकी ३00 रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यंदा अकोला जिल्ह्यात काही ठिकाणीच दुष्काळसदृश परिस्थिती होती. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार की नाही, याविषयी साशंकता आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने माफ केले. विद्यार्थी परीक्षेचे शुल्क भरतात. नंतर शासन हे शुल्क विद्यार्थ्यांना देते. ३00 रुपये शुल्क मिळत असल्यामुळे ७0 टक्के विद्यार्थी शुल्काची रक्कम स्वीकारतच नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नसते आणि झीरो बॅलन्सवर बँका खाते उघडण्यास नकार देतात. |
ध्या भारताच्या क्रिकेट रसिकांचे डोळे हे भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे आणि आशिया कप दौऱ्याकडे लागले आहेत. आता भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. केएल राहुल आता तंदुरुस्त झाल्यामुळे भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी ट्वीट करत भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात केएल राहुल हा संघाचा कर्णधार असणार आहे याची माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे, ३० जुलै रोजी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. त्यामध्ये केएल राहुलचे नावच नव्हते. तीन एकदिवसीय सामन्यासाठी संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र, १० दिवसांत शिखर धवनच्या जागी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिखर धवनचे चाहते नाराज झाल्याची चर्चा रंगत आहे. कर्णधार पदावरून धवन चा पाण उतारा करून झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्विट करत राहुल फिट असून झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यात संघाचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमध्ये राहुलला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर. |
तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याच्या सोशल मीडीयावरील व्हायरल संदेशानां अफवांचे स्वरुप देणाऱ्या वन विभागास अखेर मानुर परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे अढळून आले आहेत. मानुरसह परिसरातील जाटवड, बडेवाडी, बाजगजवाडी, शेरी शिवारात बिबट्या अढळूण आल्याचे नागरीकांनी सोशल मीडीयावर संदेश व्हायर केले होते. त्यानुसार मानुर परिसरात शोध मोहिमेद्वारे परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊल खुना (ठसे) अढळून आल्याने नागरीकांना खबरदारीच्या सुचना वन वनिभागने दिल्या आहेत. शिरुर कासार/पाथर्डी (जि. अहमदनगर) : तालुक्या नंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी बिबट्याचा धुमाकूळ घातला आहे. आष्टी तालुक्यात तीघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागाची राज्यभरातील पथक तैनातीत असताना तालुक्यातील मानूर (नागनाथ) परिसरात वन विभागास बिबट्याचे ठसे अढळून आल्याने नागरीकात भीतीचे वातावणरण निर्माण झाले आहे. मानूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सोशल मीडीयावरील व्हायरल संदेशाना वन विभागाने अफवांचे स्वरूप दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ठसे अढळूण आल्याने जाटवड शिवारात वन विभागाने पिंजरा लाऊन नागरीकांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. तालुक्यातील मानूरसह भगवानगडाच्या पायाथ्याशी पारगाव घोगस, माळेगव चकला , भारजवाडी (ता. पाथर्डी) परिसरात बिबट्याचा वावर असल्याची असल्याची कुजबुज सुरू होती. सोशल मीडीयावरही अनेकांनी बिबट्यास प्रत्यक्षदर्शी दिसून आल्याचे संदेश सोशल मीडीयाच्या व्हाट्स अप, फेसबुकवर व्हायरल केले. मात्र, अधिकृत माहिती अथवा प्रत्यक्ष खात्री अभावी वन विभागाकने त्यास अफवांचे स्वरुप देत नागरीकांनी भयभित न होता खबरदारीच्या सुचना दिल्या होत्या. पंधरवाड्यापूर्वी मानूर परिसरातील जाटवड शिवारात बिबट्या दिसून आल्याची माहिती येथील नागरीकांनी दिली. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य पती रामदास बडे यांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून शिवारात शोध मोहिम राबवली. मात्र, बिबट्याचा वावर असल्या बाबतचे ठोस पुरावे पायांचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे वन विभागाने अफवांवर विश्वास न ठेवता शेतात काम करताना खबरदारी च्या सुचना दिल्या. सोमवारी (दि.30) मानूर परिसरातील जाटवड येथे बिबट्या प्रत्यक्षदर्शी आढळून आल्याच्या माहिती नागरीकांनी दिली. त्यानुसार वन विभगाने परिसरात शोध मोहिमे अंतर्गत जाटवड शिवारात बिबट्या च्या पाउल खुना (पग मार्ग, ठसे) मिळाल्याचे जाहिरकरत जाटवड परिसरात पिंजरा लावला आहे. दरम्यान, मानुर परिसरात बिबट्याचे ठसे मिळाल्याने परिसरातील गावखेड्यांसह वाडी-वस्त्यांवरील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वावरणाऱ्या बिबट्यास पकण्यासाठी तात्काळ ठोस उपाय योजनाची मागणी करण्यात येत आहे. तालुक्यात खरिपासह रब्बी पिकांच्या मशागतींना जोमात असतानाच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सामान्य नागरीकांपासून शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. वाघ (बिबटे) नेमके किती? :आष्टी तालुक्यासह पाथर्डी, भगवानगड, माजलगाव, गेवराई, पाटोदा तालुक्यात सर्वत्र बिबट्याची चर्चेमुळे नेमके वाघ (बिबट्या) किती ? हा प्रश्न उद्भवत असला तरी अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच वन विभागाने सक्षम यंत्रणे मार्फत मानूर परिसरातील बिबट्यास पकडण्याची मागणी धास्तावलेल्या नागरीकातून होत आहे. पाडळीत आढळला होता बिबट्या : तालुक्यातील पाडडळी येथील उथळा प्रकल्याप परिसरात पंधरा वर्षापूर्वी बिबट्या अढळून आला होता. वन विभागास खात्री पटल्या नंतर पिंजरा लावून त्या बिबट्यास पकडले बिबट्यास पकडले. मात्र, त्या बिबट्याने कुठल्याही पाळीव अथव माणसावर हल्ला केला नव्हता अशी माहिती प्राणी मित्र सिद्धार्थ सोनावणे यांनी दिली. |
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत. तर राज्य सरकारने लॉकडाउनचे (Lockdown) आदेश दिले असून नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्याचसोबत नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण घराबाहेर पडत आहे. दुसऱ्या बाजूला लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात अंमलबाजवणीसाठी पोलिसांची फौज कमी पडत असल्याने आता अधिक मनुष्यबळाची मदत घेणार आहेत. यासाठी एसीबी (ACB) आणि सीआयडीच्या (CID) दलातील पोलीस सुद्धा मदतीसाठी पुढे येणार आहेत. राज्यात लॉकडाउनच्या काळात नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची अधिक गरज आहे. तर कोरोना व्हायरस दिवसेंदिवस राज्यात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपयायोजना करणे अत्यावश्यक आहे. सध्या पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांसमवेत अन्य पोलीस कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळेच आता अधिक पोलिसांचे मनुष्यबळाची मदत घेतली जाणार आहे. जवळजवळ 2. 20 लाख कर्मचारी महाराष्ट्रात पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यापैकी 10 टक्के कर्मचारी हे सीआयडी, एसीबी आणि पीसीआर येथे आपले कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण पोलीस दलातील कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी पुढे आले आहेत. (COVID19: कोरोनाशी लढण्यासाठी 1. 25 लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती) दरम्यान, कोरोनाबाधितांवर उपचार डॉक्टर्स, नर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तसेच रस्त्यांवर पोलीस गस्त घालून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. तरीही कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असून महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 26 रुग्ण आढळून आल्याने आकडा 661 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. |
आवाळपूर : कोरपना तालुक्यात १७ ग्रामपंचायतमध्ये मतदार आपले मत नोंदवत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून व्हीलचेअर खरेदी केल्या आणि त्या ग्रामपंचायतीला पुरविण्यात आल्या. मात्र व्हीलचेअर गेल्या तरी कुठे, असा प्रश्न पडला असून वृध्दांना शुक्रवारी काठीचा आधार घ्यावा लागला. मोजक्या काही ग्रामपंचायत सोडल्या तर बाकी इतर ग्रामपंचायतमध्ये तीच परिस्थिती दिसून येत होती. नागरिकांनी एकत्र येऊ नये व कोणतीही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त ठेवून दुचाकी सुध्दा जाणार नाही अशी व्यवस्था केली होती. मात्र व्हीलचेअर नसल्याने वृध्दांची ऑटोरिक्षाने ने-आण सुरू होती. यामुळे बूथ केंद्रावर गर्दी दिसून येत होती. मास्क व सॅनिटायझरचा वापर होताना दिसला. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार आपले हक्क बजावत होते. दुसरीकडे गावात आशा वर्कर नागरिकांना मास्क लावा, सॅनिटायझर लावा, असे सांगताना दिसत होते. एवढेच नाही तर बूथ केंद्राच्या पुढे बसून मतदारांच्या हातावर सॅनिटायझर देताना निदर्शनास आल्या. |
नालेसफाई पाहणीचे आमंत्रण न मिळाल्याने नगरसेवक महापौरांवर रुसले! - Loksatta\nनालेसफाई पाहणीचे आमंत्रण न मिळाल्याने नगरसेवक महापौरांवर रुसले!\nमुंबईत नालेसफाईची ६० टक्के कामे झाल्याची टिमकी प्रशासनाने वाजविताच महापौर पत्रकारांचा लवाजमा घेऊन नदी-नाल्यांवर धडकले आणि त्यांनी प्रशासनाच्या कामाची तोंडभरून स्तुती केली.\nMay 17, 2014 1:05:10 am\nमुंबईत नालेसफाईची ६० टक्के कामे झाल्याची टिमकी प्रशासनाने वाजविताच महापौर पत्रकारांचा लवाजमा घेऊन नदी-नाल्यांवर धडकले आणि त्यांनी प्रशासनाच्या कामाची तोंडभरून स्तुती केली. मात्र या नालेपाहणीची माहिती नसलेले सर्वपक्षीय नगरसेवक महापौरांवर रुसले. आपल्या प्रभागातील नाला पाहण्यासाठी 'महापौर आले पण आम्हाला नाही बोलावले' हा त्यांचा राग आहे. पालिका सभागृहाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.\nमुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमध्ये युद्धपातळीवर नाले आणि नदी सफाईची कामे करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.\nत्यामुळे महापौर सुनील प्रभू यांनी बुधवारी नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. वरळीच्या लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनपासून सुरू झालेला दौरा पूर्व-पश्चिम उपनगरांतील नाल्याच्या पाहणीनंतर दहिसर, पोईसर नदी किनाऱ्यावर आटोपता घेण्यात आला. प्रत्येक नाल्यावर कंत्राटदाराचे कामगार पाण्यात उतरून सफाई करीत असल्याचे दृष्य पाहून महापौरही सुखावले. यामुळे यंदा मुंबई जलमय न होता मुंबईकरांना पावसाचा आनंद लुटता येईल, असे सांगत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.\nज्या भागातील नाला आणि नदीची महापौरांनी पाहणी केली, तेथील स्थानिक नगरसेवकांना मात्र या दौऱ्याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक नगरसेवक हिरमुसले. त्यामध्ये काँग्रेसच्या रिद्धी खुलसुंगे, शीतल म्हात्रे, मनसेच्या शिल्पा चौगले, चेतन कदम, भाजपच्या मनीषा चौधरी आदींचा समावेश आहे.\n'नाले आणि नद्यांतील सफाई योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार आसपासचे नागरिक स्थानिक नगरसेवकांकडे करीत आहेत. असे असताना या दौऱ्याबाबत इतकी गुप्तता का राखण्यात आली', असा सवाल मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी केला आहे.\nकाँग्रेस आणि मनसेचे नगरसेवक या गोपनीय दौऱ्यामुळे संतप्त झाले असून या मुद्दय़ावरून सभागृहात रणशिंग फुंकण्याचा विचार उभय पक्ष करीत आहेत. त्यामुळे पालिका सभागृहाच्या बैठकीत रण पेटण्याची चिन्हे आहेत.\nWeb Title: Mayor unhappy on councilors for not invite him to see gutter cleaning\nलाचखोरांविरुद्ध आतापर्यंत ३८८ सापळे यशस्वी! |
नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक परिणामकारक होत चाललं आहे. युक्रेनमधील विविध स्तरातील नागरिक आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यासाठी युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. रशिया हा जगातील सामर्थ्यशाली देश म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वाधिक सैन्य असणाऱ्या देशांमध्ये रशिया पहिल्या पाच क्रमांकात येतो. रशियन सैन्यासमोर युक्रेनकडं कमी प्रमाणात सैन्यबळ आहे. रशियन सैनिकांच्या तुकड्या सध्या युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. रशिया युक्रेनवर आतपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहे. तब्बल 64 किलोमीटरपर्यंत रशियन सैनिकांची रांग लागली आहे. रशियन सैनिक युक्रेनवर हल्ला करण्यासाठी सोबत रणगाडे आणि इतर साहित्य घेवून आले आहेत. यापैकी रस्त्यातच काही रणगाडे बंद पडल्यानं त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. रणगाड्यांमध्ये बिघाड झाल्यानं आणि इंधन संपल्यानं रणगाडे रस्त्यावर उभे आहेत. याचाच फायदा युक्रेनच्या एका शेतकऱ्यानं घेतला आहे. आपली शक्कल लढवत शेतकऱ्यानं चक्क रशियन सैनिकांना फसवलं आहे. सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावर उभा असणारा रणगाडा शेतकरी आपल्या ट्रॅक्टरला जोडतो आणि तो पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहे. परिणामी रशियन सैनिक त्याच्या मागं पळत आहेत. तर काहीजण हसत व्हिडीओ बनवत आहेत. महाभयंकर युद्ध चालू असताना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा व्हिडीओ युक्रेनचे ऑस्ट्रेलियातील राजदूत ओलेजेंट स्चेर्बा यांनी शेअर केला आहे. माझ्या मते एका शेतकऱ्यानं पळवलेला हा जगातील पहिला रणगाडा असेल, असा मजकूर त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलाय. दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धादरम्यान रशियन सैनिकांना युक्रेनमध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे. युक्रेनचे नागरिक देशासाठी रस्त्यावर उतरून युद्ध करत आहेत. If true, it's probably the first tank ever stolen by a farmer... )) |
नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (३७) यांच्या झालेल्या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लागला आहे. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला आहे. नाशिकमधील गजबजलेल्या एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अध्यक्ष अमोल इघे यांची त्यांच्या माजी सहकाऱ्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर विनोद बर्वे याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित कामगार संघटना, औद्योगिक युनिट स्थापन करायची होती. पण या ठिकाणी अमोल इघे यांची भाजप समर्थित युनियन होती. बर्वे हे भाजप समर्थित युनियनचा भाग होते, ज्याचे व्यवस्थापन इघे करत होते. या प्रकरणातून इघे यांची हत्या झाली, असे पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितले. बर्वे हे ठाण्यातील रहिवासी होते. दुपारी ३. ३० च्या सुमारास मुंबई च्या दिशेने पळ काढत असताना नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली. या हत्येनंतर नाशिक भाजप युनिटने तीन शहरांचे आमदार , महापौर आणि पक्षाच्या नगरसेवकांसह २०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नेत्यांसह सातपूर पोलीस ठाण्यासमोर तीन तासाहून अधिक काळ धरणे आंदोलन केले. हे ही वाचाः जॅकलिनचा 'तो' रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा? इघे हे सकाळी त्यांच्या कारमधून कामानिमित्त जात होते. त्याचवेळी बर्वे हे त्यांना भेटले. आणि बोलता बोलता अचानक इघे यांच्या मानेवर धारदार चाकूने वार केला. इघे यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना दीड इंच खोल जखम झाली होती, असे खरात म्हणाले. गेल्या पाच दिवसांत शहरात तीन खून झाले आहेत, यात इघे यांचाही समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती या घटनांवरुन लक्षात येते, असे भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना पदावरून काढण्यासाठी भाजपने जिल्हा प्रशासनाला निवेदन केले आहे. |
एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांनी सोमवारी (दि. १०) खेड तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. यावेळी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, पुणे जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते निलेश कड-पाटील यांनी भाजप शासनाच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, कॉंग्रेसचे जमीर काझी, बाळासाहेब गायकवाड, मनसेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. माजी आमदार मोहिते म्हणाले कि, वाढत्या महागाईसाठी भाजप सरकार जबाबदार आहे. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ करून हे सरकार सामन्यांच्या खिशावर डल्ला मारत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. विजय डोळस यावेळी म्हणाले कि, भाजप शासनाने सामन्य नागरिकांना देशोधडीला लावले आहे. भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. निलेश कड-पाटील म्हणाले कि, 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी आश्वासन दिले होते की, देशात दोन कोटी नोकर्या दरवर्षी तरुणांना मिळतील, पण उलटेच झाले. प्रतिवर्षी 20 लाख नोकर्या कमी झाल्या आहेत. तरुणांना काम नाही, गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस नाही. इंधनाचे दर रोजच वाढत आहेत. विकास दर वाढत असल्याची जाहिरात करता तशी इंधन दर रोजच वाढत असल्याचे सरकारी फलकही लावा अशी खरमरीत टीका निलेश कड-पाटील यांनी यावेळी केली. |
- २००१ः काश्मीर आतंकी हल्ला - राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान ३८ लोकांचे निधन. - १९९२ः कार्टून नेटवर्क चॅनल - सुरु झाले. - १९८२ः सोनी - कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले. - १९७८ः तुवालू - देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले. - १९७१ः सीटी स्कॅनर - रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सीटी स्कॅनर वापरले गेले. - १९७१ः वॉल्ट डिस्ने वर्ल्ड, फ्लोरिडा, अमेरिका - सुरु झाले. - १९६९ः कॉनकॉर्ड विमान - प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले. - १९६४ः जपानी शिंकनसेन (बुलेट ट्रेन) - टोकियो ते ओसाका पर्यंत हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू. - १९६१ः डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA), अमेरिका - देशातील पहिल्या लष्करी गुप्तचर संस्थेची स्थापना झाली, - १९६०ः नायजेरिया - देशालाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले. - १९५९ः भुवनेशप्रसाद सिन्हा - यांनी भारताचे ६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. - १९५८ः भारत - देशात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली. - १९५३ः आंध्र राज्य - तयार झाले. - १९४९ः पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना - स्थापना झाली. - १९४६ः मेन्सा इंटरनॅशनल, युनायटेक किंगडम - स्थापना झाली. - १९४०ः पेनसिल्व्हेनिया टर्नपाइक, अमेरिका - देशातील पहिला सुपरहायवे मानला जाणारा रास्ता रहदारीसाठी खुला झाला. - १९३९ः दुसरे महायुद्ध - एका महिन्याच्या वेढा नंतर, जर्मन सैन्याने वॉर्सा शहर ताब्यात घेतले. - १९३१ः जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज, अमेरिका - न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कला जोडणारा पूल नागरिकांसाठी खुला झाला. - १९२८ः नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क - सुरु झाले. - १९१८ः पहिले महायुद्ध - इजिप्शियन सैन्याने दमास्कस काबीज केले. - १९०८ः फोर्ड मॉडेल टी - गाडीची US$825 च्या किमतीत विक्री सुरु झाली. - १८९८ः व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस एडमिनिस्ट्रेशन - स्थापना झाली. - १८९१ः स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका - सुरु झाले. - १८८७ः बलुचिस्तान - देश ब्रिटिश साम्राज्याने जिंकला. १८३७ः भारतातील पहिले टपाल कार्यालय - सुरु झाले. - १७९१ः फ्रांस - फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. - १९९७ : गुल मोहम्मद - जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२. १ ") - १९५९ : इरिको डी निकोला - इटली प्रजास्ताकचे पहिले अध्यक्ष (जन्मः ९ नोव्हेंबर १८७७) - १९३१ : दिवाकर - नाट्यछटाकार (जन्मः १८ जानेवारी १८८९) - १८६८ः राम (चौथा) - थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ (जन्मः १८ ऑक्टोबर १८०४) |
मुंबई - मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कोश्यारींच्या या विधानावर चौफेर टीका सुरू आहे. यापूर्वी देखील राज्यपाल यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील झाली होती. दीपक केसरकर यांनी म्हटले की, राज्यपालांचे वक्तव्य आज चर्चेचा विषय बनलेय. या पदावरील व्यक्तीबद्दल बोलू नये तसा शिरस्ता आहे. मुळात यांची भाषण अधिकारी लिहितात. राज्यपालांची भाषण लिहून देणाऱ्या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिले जाते ते तेच वाचतात. मुंबईत पारसी, पंजाबी यांचेही तितकच योगदान आहे. मुंबईवर महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे, काही लोकं फक्त लोटा घेऊन आले ते सोबत पैसा घेऊन आले नव्हते. पैसा त्यांनी इथे आल्यावर कमवला असे केसरकर म्हणाले. माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही - राज्यपालांची भाषण लिहून देणाऱ्या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिलं जातं ते तेच वाचतात. राज्यपालांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असायला हवे मुख्यमंत्री सध्या दौऱ्यावर आहेत. ते आल्यावर त्यांची भेट घेतील. राज्यपालांच्या वाक्याशी मी काय कोणीही सहमत होणार नाही. आम्ही आमच्या पक्षातर्फे पत्र पाठवून याबद्दल भूमिका जाहीर करूच असे दीपक केसरकर म्हणाले. माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. कुठल्याही वाक्याचे राजकारण करायचे नाही, असेही केसरकर यावेळी म्हणाले. |
कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या मतदान पेट्यांचे ( ईव्हीएम) सिलिंग गुरुवारी करण्यात आले. कर्जत आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाचे निरीक्षक बिपीन चंद्र झा यांनी या सिलिंग प्रक्रि येची पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले. कर्जत मतदार संघासाठी आणण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ कॉलेज येथे ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार यांच्या नावाची तयार करण्यात आलेली मतपत्रिका ईव्हीएम मशीनमध्ये टाकण्याचे काम आज उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुरुवातीला कर्जत मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी सर्व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करून प्रक्रिया बिनचूक होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बाविस्कर आणि दीपक आकडे हे देखील उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम मशिनचे निवडणूक आयोगाने नेमलेले अभियंता डी. बी. पाटील यांनी सर्व कर्मचारीवर्गाला सिलिंगबाबत माहिती दिली. कर्जत मतदारसंघात एकूण ३१० मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी ३१० ईव्हीएम मशिन यांचे सिलिंग करण्यात आले, तर मशिनमध्ये कोणती अडचण निर्माण झाल्यास तातडीची गरज म्हणून ३९ अधिकच्या ईव्हीएम मशिन यांचे सिलिंग करण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाने नेमलेले निरीक्षक बिपीन चंद्र झा यांनी सिलिंग प्रक्रि येची व खोलीची पाहणी केली . |
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशाची दुसरी फेरी शनिवारी (ता. १५) सुरू करण्यात आली होती. औरंगाबाद - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशाची दुसरी फेरी शनिवारी (ता. १५) सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या फेरीत १ हजार ८९० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली असून, त्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (ता. २७) मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांसाठीची प्रवेश अर्जप्रक्रिया सध्या सुरू आहे. आरटीई प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यात ५९६ शाळांमधून पाच हजार ६२७ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीने १४ हजार ४३४; तर एपच्या माध्यमातून ८३ असे १५ हजार ५२७ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले. आरटीईची पहिली फेरी आठ एप्रिलला सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये तीन हजार ८३९ बालकांची निवड झाली होती. कागदपत्रांची पूर्तता बाकी असणे, मनासारखी शाळा न मिळणे व तांत्रिक अडचणी अशा कारणांमुळे तब्बल दोन महिने चाललेल्या पहिल्या फेरीत फक्त अडीच हजार प्रवेश निश्चित झाले; तर एक हजार ३३७ प्रवेश अपूर्णच राहिले; तसेच या प्रक्रियेसाठी चारवेळा मुदतवाढही देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया रेंगाळत गेली; मात्र आता शाळा सुरू होण्याअगोदर एक दिवस पुन्हा ही प्रक्रिया सुरू झाली असून, दुसऱ्या फेरीसाठी पालकांना फक्त बारा दिवस वेळ देण्यात आला आहे. दुसऱ्या फेरीत १ हजार ८९० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली. या विद्यार्थ्यांचे प्रवेश गुरुवारपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे. आजपर्यंत दुसऱ्या फेरीतील सातशे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या होतात. नेहमीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला आहे. साधारणतः शाळा सुरू होण्यापूर्वी आरटीई प्रक्रिया संपायला हवी होती; मात्र ढिसाळ नियोजनामुळे शाळा सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी प्रक्रिया सुरूच आहे. दोन्ही फेऱ्यांत ज्या पाल्यांचा प्रवेशासाठी नंबर लागला नाही, अशा पाल्यांच्या पालकांमध्ये तिसऱ्या फेरीबाबत शंका आहे. त्यामुळे पालकांनी आरटीईवर अवलंबून न राहता पाल्याचे प्रवेश निश्चित केले आहेत. |
मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला. संगमनेर (अहमदनगर), दि. 25 - मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला. या हल्ल्यात गबाजी रुपवते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खांडगाव येथील रहिवासी गबाजी बुधवारी सायंकाळी मुलीला भेटायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. दरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खांडगाव शिवारातील एका शेतामध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. एका ग्रामस्थाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती गावात दिली. यानंतर गबाजी यांच्या मुलगा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात दिली. आपल्या वडिलांचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याचे त्यांनी म्हटले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय वनअधिकारी मच्छिंद्र गायकर, वनपाल निलेश आखाडे, शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व वन कर्मचा-यांनी भेट देवून पंचनामा केला. अवयव कुजल्याने मृतदेह हलवणे शक्य नव्हते. म्हणून जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रूपवते यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाला नसल्याचा दावा वन विभागाच्या अधिका-यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेचा उलगडा होवू शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. |
सर्व प्रथम, हे प्रतिबंधात्मक उपाय पुनरावृत्ती टाळण्यासाठी की नोंद करावी ischemic स्ट्रोक प्राथमिक अट घटना नंतर शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक आहे. pathologies प्रतिबंध सर्वात महत्वाचे उपाय हेही धुम्रपान, दारू, आहार सुधारणा, औषधांचा वापर मध्यम शारीरिक नियुक्ती सोडणे. मुळे वृद्ध प्रतिबंधात्मक उपाय रुग्णांना मध्ये गुंतागुंत धोका अंत काळजी चालते पाहिजे. स्ट्रोक पुनरावृत्ती रोखण्यासाठी नॉन-औषध पद्धती स्मोकिंग पहिल्या समाप्ती समावेश आहे. निरिक्षण माजी धूम्रपान राज्ये विकसित निकोटीन धोका पासून मदिरावर्जन पाच वर्षांनी एक व्यक्ती त्याच्या संभाव्यता पासून किरकोळ फरक आहे की, एक नाही धूम्रपान नाही दाखवा. या प्रकरणात, सिगारेट smoked किंवा धूम्रपान समाप्ती स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका एक प्रतिबंध म्हणून वापरले जाते अगदी स्मोकिंग एक मोठा पुरेशी अनुभव वृद्ध लोकांना मध्ये रक्कम मर्यादित. दारू वापर कमी होतो हळूहळू माजी मद्यपी राज्ये धोका कमी होतो. काही तज्ञ प्लेटलेट फायब्रिनमध्ये आणि कोलेस्टेरॉलची पातळी घट, तसेच समूह (चिकटून) मध्ये एक कमी हा गुणधर्म. मात्र, दारु पिणारे, दारू कमी डोस प्राप्त करून स्ट्रोक प्रतिबंध सिद्ध केले नाही. हे एक भौतिक निसर्ग कमी क्रियाकलाप राज्य धोका वाढतो. नियमित व्यायाम करत वारंवार स्ट्रोक प्रभावी प्रतिबंध. राज्य वर एक फायदेशीर परिणाम मध्यम व्यायाम, नियमित चालणे घराबाहेर आहे. रुग्णाला फिरण्यास अक्षम असल्यास, प्रकाश व्यायाम संच मुख्यपृष्ठावर दिसत आहे करते. वारंवार स्ट्रोक घेतल्यानंतर मागे अपरिहार्यपणे शक्ती सुधारणा रुग्ण समाविष्ट करणे आवश्यक आहे. हे पुरेशा प्रमाणात, तेल मध्ये फळे आणि भाज्या आहार मध्ये समाविष्ट करण्यासाठी सल्ला दिला आहे. कोलेस्ट्रॉल एक उच्च सामग्रीसह एकाच वेळी उत्पादने वगळले जाऊ नये. अन्न पासून मीठ सेवन कमी करण्यासाठी दर्शविली. मधुमेह उपस्थितीत ग्लुकोजच्या पातळी, आहार, वापर मधुमेहावरील रामबाण उपाय किंवा sulfonylureas नियमित नियंत्रण असणे आवश्यक आहे. वजनाच्या कारणाचा कपात चांगल्या कामगिरी साध्य करण्यासाठी. वारंवार स्ट्रोक चे पीक antiplatelet थेरपी यांचा समावेश आहे. हे लक्षात घेतले पाहिजे प्लेटलेट एग्रीगेशन कमी औषधांचा वापर की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली संबंधित पॅथॉलॉजीकल अटी प्रतिबंध अग्रगण्य घटना आहे. वारंवार स्ट्रोक चे पीक सहसा वापर करून चालते वेदनाशामक ऍसिड, ticlopidine आणि इतर antiplatelet एजंट. निरिक्षण नुसार, दीर्घकालीन सेवन (किमान तीन वर्षे) या औषधांचा मोठ्या मानाने दुय्यम रोग राज्ये, मृत्यू, वीस टक्के सरासरी समावेश धोका कमी होतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदवी उपस्थितीत उच्च रक्तदाब (मध्यम किंवा तीव्र) एक प्रभावी प्राप्त होऊ शकते antihypertensive औषधे. त्यांच्या नियोजित भेट कोण एक स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका आहे रुग्णाच्या खाते वैयक्तिक वाचन लागतात. याव्यतिरिक्त, सौम्य (प्रथम) उच्च रक्तदाब औषधे पदवी असलेल्या रुग्णांना प्रभावी antihypertensives गट केवळ वेगळे आहेत. या लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ indapamide करण्यासाठी, विशेषतः, यांचा समावेश आहे. |
Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) चक्र सुरूच आहे. दिवसांपासून संततधार पावसामुळे काही नद्यांना पूर (Rivers flood) आला आहे. तर काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे शेकडो नागरिकांचे जीव गेले आहेत. तसेच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जरी पावसाने उघडीप दिली असली तरी दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) अजूनही सक्रिय आहे. अशा स्थितीत शुक्रवारीही राज्यात पावसाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. शुक्रवारी राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान केंद्र मुंबईने (Mumbai Weather Station) वर्तवला आहे. पावसाच्या अंदाजानुसार हवामान खात्याने अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याशिवाय इतर ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. यानंतर शनिवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त हिंगोली आणि नांदेडमध्येही हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात मान्सून सुरू झाल्यानंतर पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत 125 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते मध्यम' श्रेणीत नोंदवला जात आहे. जाणून घेऊया शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल? शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 43 वर नोंदवला गेला आहे. पुण्यात कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 52 नोंदवला गेला आहे. महत्वाच्या बातम्याः |
(२) ३० मे १८९२ ते १८९५ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक दिल्लीत तीन मूर्ती या जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी स्मृती ग्रंथालय आहे तेथे उपलब्ध आहेत. १८९२ पूर्वीचे सुधारकाचे अंक ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. तेही संपूर्ण उपलब्ध नाहीत. (३) १८९९ ते १९०३ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक पुण्यात फग्र्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात काही वर्षापूर्वी मी पाहिलेले होते. (४) १४ ऑक्टोबर, १८९५ चा "सुधारकाचा अंक दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात मिळण्याची शक्यता आहे. मी तो पाहिलेला नसल्यामुळे नक्की सांगू शकत नाही. दिल्लीत याबाबत चौकशी करावी. एप्रिल ९४ च्या अंकातील पान ३ वरील संपादकीयाच्या शेवटल्या परिच्छेदात वाचकांना आजचा सुधारक च्या स्वरूपाबद्दल प्रामाणिक प्रतिक्रिया कळविण्याबद्दल ववाचनीयतेत सुधारणा हव्या असतील तर त्याबद्दल सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रतिक्रिया व सूचना देत आहे. (१) फेब्रुवारी ९४ च्या अंकातील पत्रव्यवहार या सदरात श्री. र. वि. खांडेकर यांनी केलेल्या बहुतांश सूचनांशी सहमत आहे. (२) मासिकाचे ९० टक्के वर्गणीदार विद्वान या सदरात मोडणारे नसल्याने भाषाशैली त्यांना कळेल अशी सहज सुलभ असावी. मासिकाचा उपयोग विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी कोणी करीत असल्यास त्यास पायबंद घालावा. (३) निव्वळ स्वतःचा शहाणपणा व इतर सर्वांचे दोष किंवा मूर्खपणा दाखविण्याचा आव आणणार्याअ लेखांना भिडस्तपणापायी प्रसिद्धी देऊ नये. कारण असल्या लेखांत सुधारणेचे पाऊल पुढे पडण्याच्या दृष्टीने किंवा प्रबोधनपर काहीच नसते. लेखकाच्या अहंकाराचे प्रदर्शन मात्र असते! (४) औचित्य भंग होऊ न देता संपादकीय धोरणाविरुद्ध, सभ्य भाषेत, वैचारिक लिखाण आल्यास त्याचे स्वागत व्हावे व त्यावर उलट सुलट चर्चाही घडवून आणावी. उदाहरणार्थ- फेब्रु. ९४ च्या अंकातील संपादकांचे आवाहनानुसार 'स्त्री-मुक्ती चळवळ व भारतीय स्त्री या विषयावर एक लहानसे टिपण पाठविले होते. त्यात (१) पुरुपांपेक्षा स्त्रियांचे प्रबोधन करणे कठीण असते व (२) पुरुष हे स्त्रियांपेक्षा विवेकी असतात हे सोदाहरण प्रदिपादिले होते. ते टिपण प्रसिद्ध करून त्यावर चर्चा घडववून आणण्यास हरकत नसावी. (५) मासिक हे नुसते चर्चेसाठी नसावे. प्रबोधनपर प्रचारासाठी प्रामुख्याने असावे. प्रबोधनपर प्रचाराची आज नितांत आवश्यकता आहे. (६) लेखकांकडून लिखाण आल्यास त्याची पोहोच ताबडतोब द्यावी व निर्णय यथावकाश कळवावा. त्यासाठी लेखकांनी लिखाणासोबत पुरेशी टपाल तिकीटे पाठवावी अशी सूचना योग्य वाटल्यास पुढच्या अंकात द्यावी. (७) प्रसिद्ध होणारे बरेचसे लिखाण वाचतांना वाचकांची दमछाक होते. असे होऊ नये. (८) लेख वाचताना आपण देवळात बसलो आहोत व पुराणिकाचे पुराण ऐकतो आहोत असा आभास निर्माण करणारे लेख मासिकाची तुटपुंजी पृष्ठसंख्या विचारात घेऊन कटाक्षाने टाळावे. (९) विशेषांकांचा उपक्रम स्वागतार्ह आहे. नीरक्षीर न्यायाने योग्य सूचना स्वीकाराल व अयोग्य सूचना अव्हेराल याची खात्रीआहे. |
Dussehra 2019 : जाणून घ्या काय आहे विजयादशमीचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त! आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. यावर्षी दसरा ८ तारखेला साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. पौराणिक कथांनुसार, भगवान रामाने दहा तोंडाच्या रावणाचा याच दिवशी वध केला होता. म्हणून हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी रावणाचं दहनही केलं जातं. जेणेकरून आपल्यातील क्रोध, भ्रम, ईर्षा, स्वार्थ, अन्याय आणि अहंकाराचा नाश करू शकू. काय आहे दसऱ्याचा अर्थ? दसऱ्याचा अर्थ होतो दशमी म्हणजे दहावी तिथी. ज्योतिषांनुसार, वर्षभरात ३ सर्वात मोठ्या शुभ तिथी असतात. पहिली चैत्र शुक्ल प्रतिपदा, दुसरी कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि तिसरी दसरा. असे मानले जाते की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केल्यास लाभ होतो. त्यामुळे या दिवशी अनेकजण नव्या कामांना सुरुवात करतात. विजयादशमी तिथी - ७ ऑक्टोबरला १२. ३९ पासून दशमी सुरू होईल ते ८ ऑक्टोबर दिवशी दुपारी १४ः५० पर्यंत असेल. १) दसऱ्याच्या दिवशी भगवान निलकंठांचे दर्शन करणे शुभ मानले जाते. २) या दिवशी वाहन, इलेक्ट्रिनिक्स वस्तू, सोनं, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ मानलं जातं. ३) दसऱ्याच्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करणं शुभ मानलं जातं. ४) असे मानले जाते की, या दिवशी कोणत्याही कामाला सुरुवात केल्यास त्यात यश मिळतं. ५) रावण दहनानंतर थोडी राख घरात ठेवणेही शुभ मानले जाते. |
दैनिक ठांठी : UAE मधील पहिले तमिळ वर्तमानपत्र प्रकाशित - डिसेंबर २०१४ ....... दिना ठांठी हा भारतातील प्रसिद्ध तमिळ वृत्तपत्र समूह आहे. या समूहाने युनाईटेड अरब अमिराती (UAE) मधील तमिळ नागरिकांसाठी पहिले तमिळ वर्तमानपत्र सुरु केले आहे. - दैनिक ठांठी! याचे उद्घाटन तमिळ अभिनेता प्रसन्ना आणि स्नेहा प्रसन्ना यांनी केले. दैनिक ठांठीचे संपादक - बाला आदित्य नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल. |
exclusive-interview-of-president-pratibha-devi-singh-patil । EXCLUSIVE: निवृत्तीनंतर या गोष्टींना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील देणार प्राधान्य - Divya Marathi\nExclusive interview of president pratibha devi singh patil\nEXCLUSIVE: निवृत्तीनंतर या गोष्टींना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील देणार प्राधान्य\nनवी दिल्ली- देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान मिळवलेल्या प्रतिभा देवीसिंह पाटील यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या 25 जुलैला संपणार आहे. या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रपती पदाला साजेशे काम केले. सामान्य लोकांसाठी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे त्यांनी कायम उघडे ठेवले. दैनिक भास्कर (दिल्ली)चे संपादक राजेश उपाध्याय यांनी या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली.\nप्रश्न- पाच वर्ष रायसीना हिल्सच्या अनुभवाकडे आपण कसे पाहता?\nउत्तर- या कालावधीत खूप काही शिकण्याची संधी मिळाली. माझा आधीपासूनच लोकांशी थेट संवाद आणि संपर्क साधण्यावर विश्वास राहिला आहे. त्यामुळे इथेही हाच क्रम सुरू राहिला. या पाच वर्षांत राष्ट्रपती भवनमध्ये दीड लाख लोकांना भेटले. मी ज्या राज्यांत किंवा केंद्रशासीत प्रदेशात गेले. तेथे समाजातील सामान्य लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. दुर्घटनाग्रस्त मुलांना भेटले. विशेष करून सीमावर्ती भागात मी गेले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या लोकांना दिल्लीला बोलावले. यामध्ये 90 टक्के लोकांनी तर आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच रेल्वे पाहिली होती.\nप्रश्न-तुम्ही महिलांना सशक्त करण्यासाठी राष्ट्रपती भवनाचा कसा उपयोग केला?\nउत्तर- महिला सशक्त झाल्या तरच देश सशक्त होईल. महिलांच्या सबलीकरणासाठी मी कायम काम करत आले आहे. मी अर्थशास्त्रात एम.ए केलेले आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणेवर माझा भर असतो. माझ्या सांगण्यावरूनच 2008मध्ये राज्यपालांच्या बैठकीत त्यांच्या तीव्र सामाजिक-आर्थिक विकास आणि सशक्तीकरणासाठी राज्यपालांची समिती बनवली आहे. या समितीच्या शिफारशी सरकारने गंभीरतेने घेतल्या आणि त्याच्यावर अंमलबजावणीही केली. पंतप्रधानांनी त्याला राष्ट्रीय मिशन बनवले. त्याच्या आधारावरच राष्ट्रीय महिला सशक्तीकरण मिशनची स्थापना करण्यात आली. महिलांच्या स्थितीचा व्यापकरित्या अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी न्या. रूमा पाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली.\nप्रश्न- तुमच्या विदेश दौ-यांबद्दल खूप काही लिहिण्यात आले. विदेशात भारताची छबी सुधारण्यासाठी या दौ-यांचा काही उपयोग झाला काय?\nउत्तर- पहिल्यांदा हे माहित करून घेतले पाहिजे की, विदेश नीती सरकार बनवते. त्यानुसारच सगळे निर्णय घेतले जातात. या निर्णयांमध्ये विदेश दौरेदेखील येतात. राष्ट्रपतींचा विदेश दौरादेखील या निर्णयाअंतर्गतच येतो. ज्याप्रमाणे मी राष्ट्रपती या नात्याने दुस-या देशांमध्ये गेले. त्याप्रमाणेच माझ्या कार्यकाळात 100 पेक्षा अधिक देशातील राष्ट्राध्यक्ष आणि इतर उच्च पदस्थ अधिका-यांनी आपल्या देशाला भेटी दिल्या आहेत. मी तर अशा देशामंध्ये गेली आहे. जिथे गेल्या 50 वर्षांत आपल्या येथून कोणीही गेले नव्हते. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जस्टिस दलवीर भंडारी यांची झालेली नियुक्ती अशा विदेश दौ-यांचेच फलित आहे.\nप्रश्न- लष्काराच्या सुप्रीम कमांडर पदाचा तुमचा अनुभव कसा होता? नुकत्याच घडलेल्या घटनाक्रमाबाबत काय म्हणाल?\nउत्तर- मी सीमारेषेवर जाऊन जवानांना भेटले. जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागातील चौक्यांबरोबरच अरूणाचल प्रदेशातील सीमारेषेवरील चौक्यांवरदेखील मी जाऊन आले. तिथे जाऊन मी जवानांचे मनोबल वाढवले. मी आधीपासूनच लष्करासाठी काम करत आले आहे. आमदार असताना 1962 साली चीन युद्धाच्यावेळी आम्ही महिला होमगार्डसची स्थापना केली. मी त्याची कमांडर होती. त्यासाठी खूप अवघड ट्रेनिंग आम्ही घेतले होते. त्याचा आज फायदा होत आहे. वायु दलाच्या प्रमुखांनी मला सुखोईमध्ये उड्डाण कराल का असे विचारले. जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी मला असे करण्यासाठी सुचवले होते. त्यामुळे मी लगेच तयार झाले, आणि तयारी करू लागले. सुखोईमध्ये उड्डाण करणारी जगातील मी पहिलीच महिला राष्ट्रपती ठरले. लहान-मोठया गोष्टीतर सगळीकडे घडत असतात. परंतु, माझा विश्वास आहे की, भारतीय लष्कर हे जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि समर्पित असे आहे.\nप्रश्न- सर्वसामान्य जनता या पदाकडून आपल्या तक्रारींच्या निवारण्याची अपेक्षा ठेवते. काय म्हणाल याबद्दल?\nउत्तर- प्रत्येक दिवशी चार-साडेचार हजार अर्ज आमच्याकडे येतात. पूर्वी याचे निवारण करण्यासाठी खूप वेळ लागायचा. यामध्ये सुधारणा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले. त्यामुळे लोकांना सहजपणे आपली तक्रार नोंदवता येऊ लागली. लोकांकडून आलेली तक्रार त्याचदिवशी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येते. त्यामुळे लोकांची चांगली सोय झाली आहे.\nप्रश्न- निवृत्तीनंतर आपल्या काय योजना आहेत?\nउत्तर- राष्ट्रपती भवनात मी एकटीच राहिलेली आहे. यादरम्यान कुटुंबातले लोक येत-जात असत. आता पूर्णपणे कुटुंबियांबरोबर राहणार आहे. समाज आणि देशाच्या कल्याणासाठी काम करण्याची लक्ष्य ठेवले आहे. |
औरंगाबाद,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- दगड मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास योजना राबविण्यात येतात. गरीब कुटुंबियांसाठी स्वतःचे हक्काचे सुरक्षित घर असणे ही त्यांच्यासाठी आयुष्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. अधिकाऱ्यांनी विविध घरकुल योजना राबविताना केवळ प्रशासकीयदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्या विचार करुन काम करावे जेणेकरुन योजनेच्या कामाचं ओझ वाटणार नाही असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, सहायक उपायुक्त (विकास) विना सुपेकर, विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, सरपंच, ग्रामसेवक, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रत्येक स्त्री करिता घर ही हक्काची जागा असते. त्या घरात ती जीव ओतून काम करत असते आणि म्हणूनच अशा गरजू कुटुंबियांकरिता घरकुल योजनेअंतर्गत काम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी वाळू उपलब्ध करुन देणे, घराचे बांधकाम दर्जात्मक करणे आदी कामे जाणिवपूर्वक जबाबदारीने केल्यास एक अधिकारी म्हणून विश्वास पात्र व्हाल असे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, कामगाराची घरकुल या योजनेकरिता देखील तहसिलदारांनी तात्काळ प्रस्ताव पाठवून जलदगतीने घरकुलांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच 'थोडसं माय बापासाठी' या योजनेत उस्फुर्तपणे सहभागी होण्याचे जिल्हा परिषद, ग्रामपंचातींना आवाहन केले. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे म्हणाल्या की, महाआवासमध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट येण्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड आताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे योगदान असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, घरकुल योजनेत महिलांचा मोठा सहभाग राहिला आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या योजनेचे भरीव काम सुरू आहे असे सांगून पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत जमिन उपलब्धतेचा निधी वाढवून मिळावा याकरिता विभागीय आयुक्तांकडे त्यांनी मागणी केली. श्रीमती कांबळे यांच्या मनोगता नंतर श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वाटप करण्यात आले. पुरस्कारामध्ये जागा उपलब्धता व वाळू उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुक्यांमध्ये राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम पुरस्कार नायगांव, जि.नांदेड तर द्वितीय पुरस्कार वैजापूर, जि.औरंगाबाद या तालुक्यांना प्रदान करण्यात आला. तर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी प्रथम पुरस्कार पैठण तर द्वितीय पुरस्कार सिल्लोड तालुक्याला देण्यात आला. वित्तीय संस्था निकषामध्ये राज्य पुरस्कृत योजना व प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या दोन्ही निकषासाठी प्रथम क्रमांक महिंद्रा होम फायनान्स लि. सेलू जिल्हा परभणी यांना देण्यात आला. उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत चुडावा, ता.पूर्ण, जि.परभणी, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत धानुरी, ता.लोहारा, जि.उस्मानाबाद तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत इरळद, ता.मानवत, जि.परभणी यांचा समावेश आहे. तर प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) साठी प्रथम क्रमांक ग्रामपंचायत पारगावं, ता.वाशी, जि.उस्मानाबाद, द्वितीय पुरस्कारासाठी ग्रामपंचायत सावळदबरा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद, तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत जळकीघाट, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद यांना देण्यात आला. उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम क्रमांक मानवत, जि.परभणी, द्वितीय क्रमांक लोहारा, जि.उस्मानाबाद, तृतीय पुरस्कार पालम, जि.परभणी यांना देण्यात आला. तर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम पुरस्कार खुलताबाद, जि.औरंगाबाद, द्वितीय पुरस्कार पालम, जि.परभणी, तर तृतीय पुरस्कार वाशी, जि.उस्मानाबाद यांना देण्यात आला. उत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रथम पुरस्कार उस्मानाबाद, द्वितीय पुरस्कार औरंगाबाद तर तृतीय पुरस्कार परभणी यांना देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी प्रथम पुरस्कार औरंगाबाद, द्वितीय पुरस्कार उस्मानाबाद तर तृतीय पुरस्कार हिंगोली जिल्हा परिषदेला देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक उपायुक्त (विकास) वीणा सुपेकर यांनी केले. |
भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन दिवसांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक म्हणजे १५ ऑगस्ट १९४७, या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९. या दिवशी राज्यघटना समिती स्वीकृत केली गेली आणि तिसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५० अर्थात प्रजासत्ताक दिन. या दिवसापासून राज्यघटनेतील सर्व कलमांची अंमलबजावणी सुरू झाली. ज्याप्रमाणे आपण धार्मिक सणवार मोठ्या उत्साहाने साजरे करतो त्याच उत्साहाने प्रत्येक भारतीय काही राष्ट्रीय सणही साजरे करत असतो. त्यापैकीच प्रजासत्ताक दिन हा एक दिवस. आपण या वर्षी भारतीय प्रजासत्ताकाचा ६९ वा उत्सव साजरा करत आहोत. ६८ वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी भारतीय प्रजासत्ताक टिकून आहे, हीच फार मोठी घटना म्हणावी लागेल. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून तो लिखित संविधानाप्रमाणे चालतो. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या संविधानात संसदीय लोकशाही अभिप्रेत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये या संविधानाचा आधार घेतला जात असला तरी आता त्यात स्थानिक स्तराचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत केंद्रात आणि राज्यात सरकार स्थापनेसाठी नियमित निवडणुका पार पडल्या आहेत. शिवाय बहुमताने निवडून आलेली सरकारे राज्य चालवत आहेत. इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीचा एक वर्षाचा कालावधी सोडला तर यात कोणताही खंड पडलेला नाही. येथील सत्ताबदल राज्यघटनेप्रमाणेच होत राहिला आहे. या पार्श्वभूमीवर बिगर लोकशाही मार्गाने सरकार स्थापन करण्याचा एकही प्रयत्न झाला नाही, हे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. आणखी एक अपूर्व बाब म्हणजे भारतात साम्यवाद्यांची सरकारेसुद्धा संसदीय पद्धतीनेच निवडून आली आहेत. जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या या देशात अनेक भाषा, धर्म, पंथ, संस्कृती शतकानुशतके नांदत असल्या तरी त्यात भिन्नता नाही. संस्कृतीचा अपूर्व संगम प्राचीन काळापासूनच झालेला आहे. या देशातल्या विविध धर्माच्या उपासना पद्धती, चालीरीती, परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी सर्वच धर्माच्या मानवतेच्या शिकवणुकीची जोपासना सर्वच धर्मियांनी केल्यामुळेच राष्ट्रीय एकता आणि अखंडता कायम राहिली. वास्तविक एकात्मता हाच देशाच्या सुरक्षिततेचा पाया आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत याच एकात्मतेला हादरे बसू लागले आहेत. जातीभेदाच्या प्रश्नांवरून निर्माण झालेले संघर्ष हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. राजकीय स्वार्थ आणि आपल्या नेतृत्वाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अधूनमधून काही अपप्रवृत्ती डोके वर काढतात. चिथावणीखोर कृत्ये करतात. सामाजिक वातावरण बिघडते. भिन्न जातीत असहिष्णुतेचे वातावरण निर्माण होते. पण, फारच थोडा काळ ते टिकते. काही महिन्यांनी परस्परातले गैरसमज निवळतात आणि पुन्हा एकोपा होतो. काही घटनांना राजकीय रंग फासला जातो. त्याचे राजकीय भांडवल करून आपला स्वार्थ साधणारे राजकारणी गणंग हेच राष्ट्रीय एकतेचे खरे वैरी आहेत. जातीय दंगलीत सर्वसामान्य आणि गोरगरिबांचेच प्राण जातात. अशा दंगलीमुळे सामाजिक ऐक्याला तडा जातो. आणखी एक प्रश्न आपल्याकडे कायम उकरून काढला जातो, तो म्हणजे भारत धर्मनिरपेक्ष आहे का हिंदू राष्ट्र आहे? हा सर्वसमावेशक देश आहे, असे विधान हिंदुत्ववाद्यांकडून नेहमी केले जाते. त्यामुळे त्या अर्थाने भारत हा हिंदू देश आहे असे म्हटले जाते. परंतु ही जनतेची दिशाभूल आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू या शब्दाप्रमाणेच हिंदू हा शब्दही सामान्य भाषेत धर्म या अर्थाने वापरला जातो. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे असे राज्यघटनेतील प्रस्तावनेतील पहिल्या ओळीत म्हटले आहे. परंतु हा शब्द ४१ व्या घटना दुरुस्तीने घातला असा आक्षेप घेतला जातो. इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की भारताची राज्यघटना पहिल्या दिवसापासूनच धर्मनिरपेक्ष आहे. राज्यघटनेने धर्मस्वातंत्र्याचे, अल्पसंख्याकांना सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार दिले आहेत. त्याचप्रमाणे अनेक मूलभूत अधिकारांप्रमाणे भारतीय नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याप्रमाणेच संघटना स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. हे सर्व अधिकार धर्म, वंश तसेच पंथांच्या लोकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. सर्वधर्मियांनी राज्यघटना हाच आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानल्यास आणि राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आचरण केल्यास देशातले हे धार्मिक आणि स्वार्थी वाद संपतील. देशासमोरच्या गरिबी, प्रदूषण, अंधश्रद्धा-रूढी परंपरा यासह अनेक समस्यांवर देशवासीयांना एकजुटीने मात करता येईल. आतापर्यंत जेव्हा जेव्हा देशावर संकट आले, तेव्हा भेदभाव आणि मतभेद विसरून सर्व भारतीयांनी एकजुटीने राष्ट्रीयतेच्या धर्माचे जागरण करीत शत्रूची कटकारस्थाने उधळून लावलेली आहेत. या सा-या बाबी अभिमानास्पद असल्या तरीही सामाजिक एकता आणि समानता मात्र अद्यापही प्रस्थापित झालेली नाही. आपल्यातल्या मतभेदांचा लाभ घेत शेजारच्या राष्ट्रातल्या दहशतवाद्यांनी देशात घुसून धार्मिक चिथावणी तर दिलीच पण परस्परात फूट पाडण्याचे करंटे उद्योग केलेले आहेत. आता या पुढच्या काळात राष्ट्रद्रोह्यांचे हे सारे मनसुबे उधळून लावण्यासाठी सामाजिक एकजूट कायम ठेवायला हवी. भारतात बुद्धिमानांची कमतरता नाही. त्यांच्याकडे ज्ञान आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रात लीलया झेप घेणारी व्यक्तिमत्त्वे आपल्या देशाने पाहिली आहेत आणि भविष्यातही अशा लोकांची कमी पडणार नाही. विकसित राष्ट्रातही आपल्या देशातील बुद्धिमानांना नेहमी मागणी असते आणि ती यापुढेही कायम राहणार आहे. भारताकडे अशी उंच भरारी घेण्याची क्षमता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण असेच काही उच्च ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आता प्रत्येक भारतीयाने 'येस वुई कॅन डू इट' असा नारा द्यायला हवा. ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याची सुरुवात करायला हरकत नाही. तसे झाले तर या प्रजासत्ताक देशाला नवा अर्थ प्राप्त होईल. |
1.लढाईत जिकलेला बहुजन तहात हरला. खोट्या प्रतिष्टे साठी कुठल्याही थराला जाण्याची राजकारण्यांची मानसिकता या बद्दल सर्व सामान्य माणसात प्रचंड चीड आहे. त्यात प्रचंड मेहनत करून दोन वेळच्या रोजी रोटीची पूर्तता करण्यात शेतकरी अपयशी होत आहे , सर्वसामान्य माणूस पूर्ण हवालदिल होत आहे. मनुवादी लोकांनी बहुजनांना भुरळ घालात, शिवरायांचे नाव घेऊन हि लोक सत्येत आली ,सत्येत आल्या नंतर खरे नेते नाथाभाऊ खडसे यांना बाजूला करत जातीचा निकस लावत मुख्यमंत्री निवड केली. देवेंन्द्रजी व खडसे सोडले तर भाजप मध्ये मुखमंत्री पदाला लायक कोणीही नाही ही जरी परिस्थिती खरी असली तरी खडसे "मनुवादी"नाहीत म्हणून ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे वास्तव आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची प्रतिमा रावणाची करून हे रामराज्य असल्याचा आभास निर्माण केला ,यासाठी तमाम हिंदूंना एकवटून राज्य मिळवलं आणि सुरु होत गेलं हिंदू राज्यच वर्चस्व आणि ते मनुवाद्यांनी मिळवलं , आणि लढाईत जिकलेला बहुजन तहात हरला. 2. राजकारण हुकूमशाहिकडे. मोदी लाटेत प्रचंड लोकप्रियता मिळवून हे सरकार सत्येत आले आणि राष्ट्रवादी व काँग्रेस ची मस्ती लोकांनी उतरवली असे हे लोक सांगू लागले. प्रचंड आश्वासनांचा पाऊस पडला पण ती पूर्ण करताना नाके नऊ येऊ लागल्यानी ह्या सरकारची तारांबळ उडाली . लोकांना दिलेले शब्द पूर्ण होत नाहीत हे दिसल्यावर लोकांचा या सरकार वर रोष वाढू लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी च्या चुकीच्या धोरणामुळे हे सरकार अडचणीत असल्याची अफवा मनुवादी फौजा सोडू लागल्या सर्व सामान्य माणसाची दिशाभूल केली. 3.मनुवाद्यांचा धनंजय मुंडे हेच कर्दनकाळ. बीड च्या राजकारणात स्वतः चा वेगळा ठसा उमटून प्रचंड प्रामाणिक , निरपेक्ष काम करणारे बहुजन समाजाचे नेते धनंजय मुंडे पुढे येऊ लागले, मराठा व ओबीसी समाजातील बीड जिल्यातील जातीवादाचा त्यांनी अंत केला , बहुजन युवकांची मोट बांधली ,आन मोहीम वळाली राज्याकडे .पवार साहेबानी राज्याचे नेतृत्व दिले प्रचंड निराशेतील बहुजन जनतेला धनंजयजी मुंडे यांनी आशा दिली , राज्यभर सरकार विरोधात रान उठवले ,या सरकार मधील मनुवादी घाबरले आणि बहुजनांच्या या पोराने जर मनुवाद्यांच्या राज्याला सुरुंग लावला तर, आणि या लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा डाव केला , त्यासाठी मदत घेतली IBN भोकमतच्या राजकारणासाठी हापापलेल्या मनुवादी दलाल पत्रकाराची , की ज्यांनी यापूर्वी भगवान गडावर ही शिवराळ भाषा वापरली होती , त्या बदल्यात भाजपा माझा या वाहिनेने त्याची हकाल पट्टी केली होती. शहानिशा न केलेली क्लिप घाईघाईने दाखवून मोकळा झाला , आणि पेशवाईतल्या कुणाची शाबसकी मिळवली कुणास ठाऊक ,धनंजय मुंडे यांच्याच जातीचा हा पत्रकार हाताखाली धरून याला त्यांच्या विरोधात परळी मतदार संघातून भाजप कडून विधानसभेला उभा करून वंजारी समाजाचे नेतृत्व त्याच्या कडे देण्याचा मनुवाद्यांचा डाव आहे , अशा इलसी व्यक्तीची आम्ही निवडणुकीसाठी परळी स्वागत करत आहोत. आदरणीय पवार साहेब वरती अनेकांनी आरोप केले , त्याच कारण होत की पवार साहेब प्रचंड लोकप्रिय होते मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण चर्चेत येऊ हा समज रूढ होत गेला. तोच धागा पकडत मुंडे वर आरोप करण्यात आले ते स्वतःच्या राजकीय म्हत्वाकांक्षे पोटी . मुंडे याना हल्लाबोल मधील लाखो युवकांची मिळणारी प्रचंड साथ हि होती; असल्या आरोपाणी तर नेतृत्व उजळून निघते या निमिताने नेतृत्वाला चकाकी मिळाली. 5.बहुजनांना नेतृत्व मिळाले. स्व.बाळासाहेब ठाकरे व शरद पवार साहेबा नंतर राज्यात आजतागायात सर्वात लोकप्रिय नेतृत्व, सर्वात संघर्षशील नेतृत्व म्हणून मुंडे पुढे आले . या निमित्याने संभाजी राजे , संत तुकाराम महाराज, स्व.गोपीनाथ मुंडे याचा खून करून त्यांना देव बनवून तो खून पचवलेल्या मनुवाद्यांचा हा धनंजय मुंडे नावाचा वाघ कर्दनकाळ ठरेल यांच्या खुनाचा बदला बहुजनांच्या जागृतीतून मिळेल ही मला अपेक्षा आहे .कारण स्वतःच्या आरोपाची नार्को टेस्ट करा , माझे सर्वाधिक वाईट चिंतवणाऱ्या व्यक्तीकडून माझी चौकशी करा म्हणणारा भारताच्या राजकारणातील पहिला संघर्ष योद्धा म्हूनून इतिहास ना.धनंजय मुंडे यांची नोंद घेईल. जातीपातीचे राजकारण सोडून बहुजन समाज धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारू लागला असून अशा या लोकनेत्यास 2019 ला सर्व बहुजन एकवटून शिरपेचात मुख्यमंत्री पदाचा मनाचा तुरा रोवून आजवरच्या बहुजन अन्यायाचा कर्दनकाळ म्हणून नेतृत्व स्वीकार करूया. ना.धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे मनुवाद्यांच कपट , या कटात पायऱ्यापासून शिखरा पर्यंत आप्तस्त असल्याने वेदना , प्रभू श्रीरामावर हि हीच घाणेरडी चाल स्वकीयांनी केली पण शेवटी श्रीराम इतिहासात अजरामर झाले , आता तर राम वनवासात जाणार नाहीत तर भगवान बाबांच्या आशीर्वादाने बहुजनांचे राज्य उभा करतील आणि लोकनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 2019 साली धर्मनिरपेक्ष विचारसरणीची स्वकीयांच्या या कटाला होळीच्या पवित्र अग्नित जाळून "शिवशाही" ऊभा राहील यात माझ्या व जनतेच्या मनात शंका नाही. व्यक्ती विशेष : Magazine Download करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा. माऊली भैया बडे, संस्थापक : महाराष्ट्र संघर्षयोद्ध युवामंच , नामदार.धनंजय मुंडे युवामंच. Share this: Click to share on Twitter (Opens in new window) Click to share on Facebook (Opens in new window) शर्मा कम्पनी म्हणजे हनी ट्रॅप रचून खंडणी उकळणारी टोळी? Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. ...ज्याला डर नाही !! तरुणांनी समाज माध्यमांचा उपयोग बदलत्या परिस्थिती नुसार उद्योग,व्यापारासाठी करावा. महासत्ता हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' महासत्ता आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'महासत्ता'चा प्रयत्न आहे. |
Akçaray च्या Sekapark बीच रोड ट्राम लाइन ऑपरेशनसाठी निविदाकडे जाते; कोकाली मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी, सेकापार्क आणि प्लाज्योलू दरम्यान चालणारी अकारे ट्राम लाइन, ऑपरेशनसाठी निविदा केली जाईल. सेकापार्क आणि प्लाज्योलू दरम्यान धावणाऱ्या अकारे ट्रामसाठी "ऑपरेशन आणि मेंटेनन्स रिपेअर सर्व्हिस" साठी निविदा काढली जाईल. कोकाली मेट्रोपॉलिटन नगरपालिका कायद्यानुसार 2017 मध्ये ऑपरेशन सुरू केलेल्या ट्राम लाइन चालविण्याचा अधिकार हस्तांतरित करेल. होणार्या निविदांसह, ट्राम लाईनचे संचालन अधिकार 6 महिन्यांसाठी हस्तांतरित केले जातील. ट्रान्सपोर्टेशन पार्क A.Ş., मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटीची उपकंपनी. द्वारे संचालित ट्राम लाइन कायद्यानुसार पुन्हा निविदा काढली जाईल. ट्रान्सपोर्टेशन पार्कची निविदा काढणे अपेक्षित आहे. ही निविदा 3 जानेवारी 2020 रोजी महानगर पालिका इमारतीत घेण्यात येईल. |
उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उल्हासनगर (Ulhasnagar Crime News) जवळ माणेरे गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातल्या काही तरुणावर कोंबड्यांच्या डीलरशिपवरून जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून सागर पाटील (Sagar Patil) गटातील अजीज शेख (Aziz Shaikh) आणि महेंद्र म्हात्रे (Mahendra Mhatre) असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनंतर काही तरुणांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुना अंबरनाथ गावात राहणारे महेंद्र म्हात्रे आणि सागर पाटील हे कोंबड्यांच्या डीलरशिपचा व्यवसाय करतात. तर माणेरे गावात राहणारा आकाश भोईर (Akash Bhoir) देखील कोंबड्यांच्या डीलरशिपचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वीच माणेरे गावात कोंबड्याच्या डीलरशिपवरून आकाश भोईर आणि महेंद्र म्हात्रे, सागर पाटील यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यांना सागर भोईरचा फोन आला आणि त्याने तातडीने आम्हाला बोलावून घेतले. यानंतर मी आणि मित्र अजिज दस्तगीर शेख एका मोटार सायकलवर तर सागर पाटील व कुंदन मडवी (Kundan Madvi) हे एका मोटार सायकलवर असे आम्ही सागर भोईरला भेटण्यासाठी गेलो. यादरम्यान सकाळी 7. 30 वाजेच्या सुमारास मोणेरेगाव उल्हासनगर नं. 4, काजल किराणा स्टोअर्स समोर रोडवरून जात असताना सागर पाटील व कुंदन मडवी हे आमच्या पुढे निघून गेले. यादरम्यान तिथे हातात तलवारी, लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेवून उभे राहीलेले आरोपी आकाश भोईर, आशिश उर्फ बंटी भोईर, सुशिल भोईर, बादल वर्मा, कल्पेश आणि इतर 3 ते 4 जणांनी आमच्यावर हल्ला केला. दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. |
इस्लामपूर (प्रतिनिधी) जर्मनीहून मुंबईमार्गे वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे मामाच्या गावी आलेल्या तरुणांची माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. तो आठ दिवसांपूर्वी 'जर्मनी'तून मुबंई येथे आला आहे. शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नेर्ले गावात आला. आजोळी आलेल्या परदेशी पाहुण्याची चाहूल लागताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जर्मनीहून आलेल्या तरुणाची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. नेमका प्रकार काय आहे. यासाठी सतर्क झालेल्या प्रशासनाने थेट नेर्ले येथे धाव घेतली. अन् उलट सुलट चर्चा ही रंगली. ग्रामपंचायत प्रशासनासह सदस्य व पोलीस यांनी नातेवाईकांनी त्या युवकास मार्गदर्शन केले. त्यामुळे तो युवक आपल्या घरी सुरक्षित मार्गस्थ झाला. तो २७ वर्षीय युवक जर्मनीत नोकरी करतो. मुंबईत त्याचे वृद्ध आई वडील आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी तो जर्मनीहून विमानाने मुंबईत आला. मुंबईत राहून तो नेर्ले येथे आज पहाटे आला होता. त्याला त्याच्या घरी जाण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय तपासणीनंतर तो मुबंईला रवाना झाला. |
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. याचे पडसाद सोशल माध्यमांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानी गायक आतिफ असलमने सुद्धा या मुद्यावर ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमुळे त्यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. दरम्यान, हज यात्रेसाठी निघालेल्या आतिफ असलमने ट्विट केले आहे की,'मी तुम्हाला काही सांगू इच्छितो मी माझा जीवनातील लवकरच महत्त्वाची यात्रा पूर्ण करणार आहे. मात्र यात्रेला जाण्यापूर्वी मी माझ्या फॅन्स, कुटूंबाची क्षमा मागतो कारण माझ्यामुळे तुमचे मन दुखाऊ शकते, मी काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसा आणि अत्याचार मी तीव्र निषेध करतो, अल्लाह जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या निरागस लोकांवर आपल्या आशीर्वाद दे. ' असेही ट्विटच्या माध्यमांतून आतिफ असलमने जम्मू काश्मीरबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. या ट्विटमुळे भारतीय फॅन्सने नाराजी व्यक्त केली आहे. |
इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मधील प्रयेक टीमकडे तडाखेबाज फलंदाजी करणारे ओपनर फलंदाज आहेत. ओपनिंग फलंदाजीच टीमचे टार्गेट देणे किंवा चेस करण्याचा पाया आहे. यामुळे कोणता ओपनर या सीझनमध्ये टीमला चांगली सुरुवात करून देईल? यासाठी भास्करने सोशल मीडियावर एक सर्व्हे केला. यामध्ये सर्वात जास्त 38.8% वोट मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मिळाले आहेत. दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल आहे. त्याला 30.8% वोट मिळाले आहेत. 18.9% वोट मिळवून रॉयल चॅलेंजेसर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आहे. चौथ्या स्थानावर 11.4% वोट मिळवून हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. IPL इतिहासात सर्वात जास्त धावा बनवण्याच्या बाबतीत कोहली टॉपवर आहे. कोहलीने 193 सामन्यात 5911 धावा काढल्या आहेत. त्यानंतर सुरेश रैना (5422), रोहित शर्मा (5292), शिखर धवन (5282) आणि डेव्हिड वॉर्नर (5257) चा नंबर लागतो. मागील सीझनमध्ये पंजाबची टीम प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही परंतु राहुलचे प्रदर्शन चांगले राहिले होते. राहुलने सीझनमध्ये सर्वात जास्त 670 धावा काढल्या. राहुल व्यतिरिक्त वॉर्नरने 500 धावा काढल्या होत्या. कोहलीनेही मागील सीझनमध्ये 450 धावा काढल्या होत्या. |
बंगळुरु : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसर्या लाटेशी झुंज देत आहे. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर मदत करत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माही मदतीसाठी पुढे आले. या जोडीने कोरोना पीडितांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपयांचा निधी जमा केला. आता विराट नेतृत्व करत असेलेल्या आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मालक कंपनीने आतापर्यंतची आयपीएल संघानी केलेल्या मदतीपैकी सर्वात मोठी मदत केली असून तब्बल ४५ कोटी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा निधी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. आरसीबीची मालक कंपनी डिएगोने प्रत्येक राज्यातील एका जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ४५कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी २१ शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आरसीबीच्या मालकाने आणखी १५ शहरांमध्ये १६ खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कृपालू म्हणाले, की या संकटादरम्यान कंपनीला देशातील लोकांसमवेत उभे राहायचे आहे. कंपनीचे मुख्य लक्ष्य सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हॉस्पिटलचे बेड आणि ऑक्सिजन केंद्रे प्रदान करणे हे आहे. |
स्मार्ट सिटीच्या मार्गावर असलेल्या नागपूर शहरासमोर बऱ्याच समस्या, प्रश्न व आव्हाने आहेत. नागपूर : स्मार्ट सिटीच्या मार्गावर असलेल्या नागपूर शहरासमोर बऱ्याच समस्या, प्रश्न व आव्हाने आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव व शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे या तर प्रमुख समस्या आहेत. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी बऱ्याच योजनांवर काम झाले. मात्र, शहर झोपडपट्टीमुक्त झाले नाही. झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पार्किंगवर बोलायचे झाले तर शहरातील अर्ध्या लोकसंख्येएवढी वाहने रस्त्यावर धावत आहेत. ही वाहने पार्क करण्यासाठी उपलब्ध असलेली जागा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पार्किंगच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलीस विविध प्रारूपांचा अभ्यास करीत आहे. नागपूरकरांचे हित विचारात घेता लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या 'लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूर चा विकासः समस्या, अपेक्षा व नियोजन)' या एक दिवसीय परिषदेमध्ये या दोन्ही आव्हानांवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन होणार आहे. रविवारी, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९. ३० वाजता कामठी रोडवरील ईडन ग्रीन्ज येथे आयोजित या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यानंतरच्या दोन सत्रात संबंधित समस्येवर चर्चा होईल. झोपडीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे केव्हा मिळणार ? शहरातील एक मोठा जनसमुदाय झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. संबंधित झोपडीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची तयारी राज्य सरकारने चालविली आहे. मात्र, यात आणखी बऱ्याच अडचणी आहेत. पट्टे वाटपासाठी झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण व्हायचे आहे. तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांची वस्तुस्थिती माहीत करून त्यांना फोटो ओळखपत्र द्यायचे आहेत. त्याच आधारावर पट्टे वाटप होईल. सर्वेक्षण व फोटो ओळखपत्रासाठी सन २०१६-१७ च्या महापालिका अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात यावर काम सुरू झालेले नाही. असे असले तरी राज्य सरकार पट्टे वाटपाबाबत सकारात्मक आहे. काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शहराच्या हद्दीत ८ लाख ९ हजार ३२७ नागरिक झोपडपट्टीत राहतात. झोपडपट्ट्यांची संख्या ४२४ आहे. यापैकी २९३ झोपडपट्ट्या राजपत्रात घोषित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असण्याची शक्यता आहे. २४ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारतर्फे नासुप्रच्या जमिनीवर वसलेल्या ५२ झोपडपट्ट्यांचे पट्टे वितरण करण्याचे अधिकार नासुप्रला प्रदान करण्यात आले. खुल्या प्रवर्गातील झोपडीधारकाकडून ५०० वर्ग फूटापर्यंतच्या झोपडीसाठी कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही. झोपडपट्टीवासीयांची पात्रता निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने ११ जुलै २००१ रोजी फोटो ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत सन २००३ ते २००६ दरम्यान फोटो ओळखपत्र देण्याची योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेला झोपडपट्टीवासीयांचा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर संबंधित प्रस्तावावर बराच काळ चर्चाही झाली नाही. सन २००४ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)ची स्थापना झाली. नागपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी पात्र नागरिकांना पक्के घर बांधून देण्याची योजना साकारण्यात आली. स्वस्त घर कधी मिळणार? - जेएनएनयूआरएम योजनेतील बीएसयूपी योजनेंतर्गत पक्की घरे बांधून दिली जाणार होती. यासाठी एकूण १० प्रकल्पांना मंजुरी देऊन कार्यान्वित केले जात आहे. या अंतर्गत ४ हजार २०१ फ्लॅट बांधून देण्याची योजना आहे. यापैकी ३ हजार ३२५ फ्लॅट बांधून तयार आहेत. उर्वरित फ्लॅटचे काम सुरू आहे. महापालिकेने सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात यासाठी ३५ कोटींची तरतूद केली आहे. आता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत स्वस्त घरे बांधून देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही स्वस्त घरे प्रत्यक्षात कधी मिळणार हा एकच प्रश्न झोपडपट्टीवासीयांना सतावत आहे. शहरातील रस्ते बऱ्यापैकी रुंद करण्यात आले असले तरी पार्किंगसाठी मात्र शोधूनही जागा सापडत नाही, असे चित्र आहे. बाजारामध्ये वाहन घेऊन गेले असता वाहनचालकाला घाम फुटतो. शहरातील फक्त ४० टक्के जागांवरच मोठी कसरत केल्यानंतर पार्किंगसाठी जागा उपलब्ध होते. सद्यस्थितीत पार्किंग ही एक मोठी समस्या झाली आहे. जुन्या वस्त्यांमध्ये तर ही समस्या आणखीनच गंभीर आहे. इतवारी, मोमीनपुरा, सीताबर्डी, महाल, सदर या भागात तर लोक पार्किंगच्या समस्येने बेजार झाले आहेत. नागरिकांची ओरड सुरू झाल्यानंतर आता पार्किंगवर मार्ग काढण्यासाठी बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे. सीताबर्डीत कार पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण व्हायची. शेवटी नासुप्रने व्हेरायटी चौकाजवळ मल्टी स्टोरेज पार्किंगची व्यवस्था विकसित केली. आता जगनाडे चौकातही पार्किंग प्लाझा उभारला जात आहे. शहरात काही ठिकाणी पार्किंगच्या नावावर अवैध वसुली होत आहे. महापालिकेने पार्किंग व्यवस्थेच्या नावावर सीताबर्डी उड्डाण पुलाच्या खाली जागा निश्चित केली आहे. उर्वरित जागेवर सिंगल लाईन आखून वाहनांचे पार्किंग केले जात आहे. मात्र, ही जागा अपुरी आहे. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. वाहनांची संख्या अर्ध्या लोकसंख्येच्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे येत्या काळात पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी) महापालिकेच्या परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश गुप्ता यांनी सांगितले की, शहरात पार्किंग व्यवस्थेसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. पार्किंग व्यवस्थेबाबत सर्व संबंधित एजन्सीसोबत समन्वय साधण्यासाठी १० जून २०१६ रोजी बैठक घेण्यात आली होती. यात महापालिकेसह नासुप्र, मेट्रो रेल, वाहतूक पोलीस व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. |
गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मल्हारपेठ येथील विकास पंडित हे आपला मुलगा विश्वजित याच्यासह निसरे येथे कोयना नदीवर पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने विश्वजित नदीतून वाहून गेला. मित्रांनी आरडाओरडा केल्यामुळे नदीकाठावर गेलेल्या विकास पंडित यांनी धावत येऊन नदीमध्ये उडी मारली. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाताला लागला नाही. पाण्याचा वेग आणि दोघांमध्ये अंतर जास्त राहिल्याने तो पाण्यामध्ये बुडाला. पोहताना विकास यांना दम लागल्याने त्यांचे प्रयत्नही थांबले. त्यानंतर तेथे असलेल्या अन्य ग्रामस्थांनीही शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. गुरुवार व शुक्रवारी शोध घेतल्यानंतर शनिवारीही शोधकार्य सुरूच होते. शनिवारी दुपारी बोटीच्या साह्याने शोध घेण्यात आला. मृतदेह शोधण्यासाठी निसरे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी मोठी मदत केली. युवकांनी तीन दिवस नदीपात्रात उतरून विश्वजितचा शोध घेतला. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास विश्वजितचा मृतदेह आढळून आला. |
भारतीय जवान फिटनेसमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. सध्या काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. या वातावरणातही जवानांच्या उत्साहाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता एक बीएसएफचा जवान बर्फवृष्टीतही ४० सेकंदात ४७ पुशअप्स मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने अनेक नेटिझन्सची मन जिंकली आहेत. नेटीझम्सनी या बीएसएफ जवानाला सलाम करत आहेत. व्हिडिओमध्ये बीएसएफचा जवान हिमवृष्टीतही जमिनीवर पुश अप करताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये बीएसएफ जवान हिमवृष्टीत काश्मीरमध्ये ४० सेकंदात ४७ पुशअप्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) च्या अधिकृत ट्विटर हँडलवर "४० सेकंद" या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे. |
RCB in IPL 2022 : आयपीएल 2022 (Ipl 2022) मध्ये रॉयल चँलेजर्स बंगळुरुने (RCB) कमाल कामगिरी करत क्वॉलिफायर 2 मध्ये धडक घेतली आहे, त्यामुळे केवळ एक विजय आणि अंतिम सामन्यात पोहोचतील. त्यांनी बुधवारी एलिमेनेटर सामन्यात लखनौ सुपरजायंट्स (RCB vs LSG) संघाला 14 धावांनी मात दिली. पण याच वेळी त्यांनी एक नकोसा रेकॉर्डही नावे केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार आरसीबी संघाविरुद्ध पडले आहेत. याआधी 2018 मध्ये हा रेकॉर्ड कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) नावावर होता. त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी संघानी 135 षटकार लगावले होते. पण यंदा आरसीबीविरुद्ध प्रतिस्पर्धी संघानी आतापर्यंत 137 षटकार ठोकले आहेत. आरसीबीचा हा लाजिरवाणा रेकॉर्ड लखनौ संघाची फलंदाजी सुरु असताना 17 व्या षटकात झाला. आरसीबीचा स्पिनर वानिंदु हसरंगा 17 वी ओव्हर फेकत होता. त्याचवेळी ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लखनौचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) IPL 2022 मधील RCB विरुद्धचा 136 वा षटकार उडवला. त्यामुळे केकेआरच्या 135 षटकारांचा रेकॉर्ड यावेळी तुटला. त्यानंतर हर्षल पटेलच्या षटकातही एक षटकार आल्याने या सामन्याअखेर आरसीबीविरुद्ध एकूण 137 षटकार प्रतिस्पर्धी संघाचे पूर्ण झाले. नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार राहुलने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर बंगळुरुची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला. रजतने दमदार असं शतक लगावल्याने आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच हा धावांचा डोंगर उभा केला. 208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. संघाकडून केवळ राहुल आणि दीपक हुड्डा यांनी चांगली फलंदाजी केली. 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी दोघांनी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर राहुलही 79 धावांवर बाद धाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि आरसीबीचा 14 धावांनी विजय झाला. |
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला सलामीचा सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात नसला तरीही भारतीय संघाकडून अनेकांना अपेक्षा आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या स्पर्धेत कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी कोहली या स्पर्धेत खोऱ्याने धावा काढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. जेव्हा एखाद्या स्पर्धेत मोठा सामना असतो तेव्हा एक मोठा खेळाडू नेहमी हात वर करुन म्हणतो की मी या सामन्यासाठी तयार असून जबाबदारी घ्यायला तयार आहे. आशिया चषकापासून विराट कोहलीचं शॉट सिलेक्शन नक्कीच सुधारलं आहे, गावसकर यांनी स्पष्ट केलं. आशिया चषकाआधी विराट कोहलीचं शॉट सिलेक्शन जरासं चिंतेत पाडणारं होतं. कारण त्याच्याकडून सातत्याने धावा निघत नव्हत्या. ऑफ स्टम्पबाहेरचे बॉल खेळून तो आऊट होत होता. काही सामन्यांमध्ये तर नशीबदेखील त्याच्याविरुद्ध होतं. काही सामन्यांमध्ये चांगल्या बॉलवर बॅटची कड लागून तो बाद झाला. परंतु आशिया चषकानंतर त्याच्या शॉट सिलेक्शनमध्ये कमालीचा बदल झाला असून त्याला कोणता फटका कधी खेळायचा याचा अंदाज आला आहे, असं गावसकर म्हणाले. आशिया चषकात विराट कोहलीने ज्या सातत्याने धावा काढल्या आहेत ते पाहता या विश्वचषक स्पर्धेत तो खोऱ्याने धावा काढेल असा मला विश्वास असल्याचं गावसकरांनी स्पष्ट केलं. काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला होता. परंतू आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात शतक झळकावल्यानंतर विराटने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. |
Yoga Asanas for Spine Problems : स्कोलियोसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पाठीचा कणा एका बाजूला वाकतो. साधारणपणे याचा मणक्याच्या वरच्या भागावर परिणाम होतो आणि पाठीच्या खालच्या भागाला वक्रता येते. जेव्हा स्कोलियोसिसची समस्या असते तेव्हा वेदना वाढते आणि शस्त्रक्रियेची स्थिती येते. मात्र, मणक्याची समस्या नैसर्गिक पद्धतीने कमी करता येते. मणक्याच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी योग हा एक प्रभावी मार्ग आहे. आठवड्यातून किमान तीन दिवस 90 सेकंद फक्त एक योगाभ्यास करून स्कोलियोसिसच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. वशिष्ठासनाचा सराव जेव्हा स्कोलियोसिसचा त्रास असेल तेव्हा करावा. मणक्याच्या कमकुवत बाजूला साइड प्लैंकचा सराव करा. या योगाच्या अभ्यासासाठी प्रथम दंडासन आसनात जमिनीवर बसावे. नंतर डावा हात जमिनीवर ठेवून त्यावर शरीराचे वजन ठेवावे. आता डावा पाय उजव्या पायावर ठेवा आणि उजवा हात वर करून मांड्यांवर ठेवा. श्वास घेत असताना, काही क्षण या स्थितीत रहा. श्वास सोडल्यानंतर, सामान्य स्थितीत परत या. पाठ किंवा मणक्यात दुखत असेल तर मार्जरी आसन करावे. त्याच्या सरावासाठी, गुडघ्यावर आणि हातावर येताना पाठीचा कणा वर ठेवा. श्वास घेताना, डोके छताच्या दिशेने वर करा आणि शरीराच्या नाभीचा भाग खाली वाकवा. श्वास सोडताना हनुवटी छातीला लावा आणि पाठीचा कणा उचला. या आसनाचा सराव चार ते पाच वेळा करा. |
फल ज्योतिष्य/ होमिओपॅथी ह्यांच्या उपयुक्तते विषयी ही चर्चा नाही, उपक्रमींचा कल ह्या दोन गोष्टींमधे कुठे आहे जाणून घ्यायचे कुतुहल ह्या हेतूने विरंगुळा म्हणून हा धागा सुरू करत आहे. मुतालिकला काळे फासले हे योग्यच झाले का? वेद् आपौरुषेय आहेत का ? वेदांबद्दल 'संस्कृत' समुदायात बरीच रोचक आणि ज्ञान वाढवणारी चर्चा चाललेली आहे. राष्ट्रध्वजावरचे हिंदू मंदिराचे प्रतिक! राष्ट्रध्वजावरचे हिंदू मंदिराचे प्रतिक! हिंदू मंदिरावरच्या कळसावर आपण ध्वज आपण नेहमीच पाहात असतो. तो जर नसेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल. धारयती इति धर्मः अशी धर्माची व्याख्या आहेच. पण प्रचलित व्याख्या मात्र 'रिलिजन' ह्या अर्थाने वापरली जाते. नक्की धर्माची व्याख्या कशी करावी? ह्या मनूचा हा लोच्या कुणी समजावून सांगेल काय? मनूने स्त्रियांना गुलाम करा असे म्हटले आहे, हा मनुस्मृती कधीही न वाचताच ऐकीव हिंदुविरोधी कम्युनिस्ट१ प्रचाराला बळी पडलेल्यांचा समज आहे. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' असे मनुस्मृतीत म्हटले आहे. असे बरेच वाक्प्रयोग आहेत जे आपण सर्रास वापरतो पण त्याचा अर्थ नेहमी माहित असतोच असे नाहि. जसे मागे 'तुंबड्या लावणे' म्हणजे काय मला माहित नव्हते त्याची इथे (उपक्रमावर)चर्चा करून अंदाज आला. वैदिक ऋचांचे रसग्रहण (नासदीय सूक्त १०.१२९) ऋग्वेदात जगाच्या उत्पत्तीबद्दल विप्रश्न करणारी काही सूक्ते आहेत. त्यात दोन "भारत एक खोज" या दूरदर्शन मालिकेच्या सुरुवातीला ऐकून आपल्या परिचयाची झालेली आहेत. आपल्याकडे न्यायदेवता म्हणून हातात तराजू घेतलेल्या व डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या स्त्रीची मूर्ति असते. |
मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआय वृत्त संस्थेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पार्थिवावर आज दुपारी बांद्रा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या. |
चेन्नई (तमिळनाडू) - मद्रास उच्च न्यायालयाने आर्. डी. संथन कृष्णन् या अधिवक्त्याच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अधिवक्ता संथन हे 'व्हिडिओ कॉन्फरसिंग'द्वारे चालू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी एका महिलेसमवेत अश्लील चाळे करत असल्याच्या स्थितीत दिसून आले. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यामुळे न्यायालयाने हा गुन्हा नोंदवला आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी बार काउंसिलकडून या अधिवक्त्याला निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयाने म्हटले की, जेव्हा न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी अशा प्रकारचा निलाजरेपणा सार्वजनिक स्तरावर प्रसारित होत असेल, तेव्हा न्यायालय मूकदर्शक होऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने याची नोंद घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीच्या वेळी यापूर्वीही अधिवक्त्यांकडून काही अयोग्य कृती घडल्या आहेत. यात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका ऑनलाईन सुनावणीच्या वेळी श्रीधर भट्ट नावाचे अधिवक्ते अर्धनग्न अवस्थेत उपस्थित होते. त्यांना याची जाणीव करून दिल्यानंतरही ते २० मिनिटे त्याच स्थितीत होते. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका सुनावणीच्या वेळी अधिवक्ता राजीव धवन हे हुक्का (तंबाखू सेवन करण्याचा एक प्रकार) ओढत असतांना दिसून आले होते. जून २०२१ मध्ये अधिवक्ता आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी पँट न घालता सुनावणीला ऑनलाईन उपस्थित होते. |
पिंपरी - शहरातील नागरिकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर शहरातील तीन आमदारांमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. या श्रेयवादामध्ये आता पक्षनेते एकनाथ पवार यांनी उडी घेतली असून हे प्रश्न आमदारांनी नव्हे तर भाजपाने सोडविल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपातील श्रेयवादाचा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमण, स्पाईन रोड बाधित घरे आणि प्राधिकरणातील साडे बारा टक्के परताव्याचे प्रलंबित प्रश्न माझ्यामुळेच सुटल्याचा दावा शहरातील आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्याबरोबरच प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी देखील केला आहे. याबाबत या चारही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पत्रके काढत, याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. तसेच या सर्वांचेच वेगवेगळ्या ठिकाणी सध्या सत्कार सोहळेदेखील सुरु आहेत. सध्या भाजपा आमदार आणि खाडे यांच्यात सुरू असलेल्या श्रेयवादाबाबत सभागृहनेते एकनाथ पवार यांना विचारले असता ते म्हणाले, या चारही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ही वस्तुस्थिती आहे. मात्र प्रश्न केवळ भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमुळे सुटला आहे. आमदारांचा आणि खाडे यांचा दावा यावेळी पवार यांनी खोडून काढत प्रश्न सुटल्याचे श्रेय त्यांनी पक्षाला दिले. पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे श्रेयवाद आणि पक्षांतर्गत वाद पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. |
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरबाबत मोठा निर्णय घेतला असून ते स्वतः ट्विटर बोर्डात सामील होणार नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तसेच याबाबत ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करत यासंबंधीत माहिती दिली आहे. बोर्डात सामील होण्याबाबत त्यांची आणि कंपनीच्या बोर्डाची एलॉन मस्कसोबत चर्चा झाली आहे. आम्ही सहयोग करण्यासह व्यवसायातील रिस्क फॅक्टरबद्दल उत्सुक आहोत. एलॉन मस्क हे स्वतः इतर सर्व बोर्ड सदस्यांप्रमाणेच कंपनीचे सदस्य होतील असा आमचा विश्वास होता. तसेच त्यांनी कंपनीच्या आणि आमच्या सर्व भागधारकांच्या हितासाठी काम केलं पाहीजे अशी अपेक्षा होती, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. एलॉन मस्क यांच्याकडे सदस्यत्व जाण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. परंतु यामध्ये कंपनीचा सर्वात मोठा भागधारक असल्याने एलॉन मस्क यांच्या इनपुट्सचा विचार केला जाईल, असंही अग्रवाल यांनी म्हटलंय. कंपनीची पार्श्वभूमी तपासणी आणि अनौपचारीक स्वीकृतीनंतर एलॉन मस्कची बोर्डाच्या सदस्यांमध्ये नियुक्ती केली जाईल, असं आम्ही मंगळवारी जाहीर केले होतं. तसेच त्यांची ९ एप्रिलपासून अधिकृतपणे बोर्डावर नियुक्ती होणार होती. परंतु एलॉन मस्कने ट्विटर बोर्डात सामील न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेअर केली, असं अग्रवाल म्हणाले. एलॉन मस्कने मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरवर ९. २ निष्क्रीय स्टेक खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर ते कंपनीचा सर्वात मोठे स्टेक होल्डर बनले. एवढंच नाही तर कंपनीच्या बोर्डातही त्यांनी एन्ट्री घेतली होती. मस्क ट्विटरच्या बोर्ड मेंबर्समध्ये सामील होणार होते. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीही ही माहिती दिली होती. एलॉन मस्क यांचा ट्विटर बोर्डात समावेश करण्यात आला आहे. यावेळी मस्कने ट्विटरच्या इतर बोर्ड मेंबर्समध्ये आणि पराग अग्रवाल यांच्यासोबत काम करण्याबाबतही त्यांनी म्हटले होते. मात्र, आज अचानक एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबत काम करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. |
दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएलच्या दोन नव्या टीमची (IPL New Teams) घोषणा झाली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊच्या (Lucknow) टीम पुढच्या मोसमापासून मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 झाली आहे. आरपीएसजी ग्रुपने लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली, तर सीव्हीसी कॅपिटलला (CVC Capital) अहमदाबादची टीम 5,166 कोटी रुपयांना मिळाली. आयपीएल लिलावाच्या आधीपासूनच अदानी ग्रुप (Adani Group) अहमदाबादची टीम विकत घेण्यात यशस्वी होईल, असं सांगण्यात येत होतं, पण सीव्हीसी ग्रुपने हा लिलाव जिंकत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. कोण आहे सीव्हीसी कॅपिटल? सीव्हीसी कॅपिटल युकेमधली इनव्हेस्टमेंट फर्म आहे. या कंपनीने नुकतेच ला लिगामध्ये 10 टक्के मीडिया राईट्स विकत घेतले आहेत. याशिवाय फॉर्म्युला वन आणि रग्बी टीमही सीव्हीसी कॅपिटलच्या नावावर आहे. अहमदाबादच्या टीमसाठी अदानी ग्रुपने 5 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, पण सीव्हीसी कॅपिटलने जवळपास 200 कोटी रुपयांपेक्षा जास्तचं टेंडर दिल्यामुळे त्यांच्या नावावर अहमदाबादची टीम झाली आहे. आरपीएसजी ग्रुपने लखनऊच्या टीमवर यशस्वी बोली लावली. या टीमसाठी कंपनीने तब्बल 7090 कोटी रुपये मोजले, याचसोबत लखनऊची टीम आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम झाली आहे. अहमदाबाद, लखनऊ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी आणि इंदूर या सहा शहरांमध्ये आयपीएलच्या नव्या टीमसाठीची स्पर्धा होती. प्रसिद्ध फूटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे मालक, अडानी ग्रुप (Adani Group), कोटक ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा या कंपन्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. एमएस धोनीचा (MS Dhoni) मॅनेजर असलेल्या अरुण पांडे यांच्या रिठी स्पोर्ट्स या कंपनीने उद्योगपती आनंद पोदार यांच्या कंपनीसाठी कटकची टीम विकत घेण्यात रस दाखवला, पण बिडिंग करण्यासाठी रिठी स्पोर्ट्सला उशीर झाला, त्यामुळे त्यांचं टेंडर स्वीकारण्यात आलं नाही, असं वृत्त आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
बहुजननामा ऑनलाइन - राजस्थानमधील राजसमंद येथील भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले (bjp leader and mla kiran maheshwari passes away she had tested positive for covid19) आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. राजसमंद (राजस्थान) से विधायक बहन @kiransnm जी का निधन बेहद दुखद है। उन्होंने अपना पूरा जीवन समाज की सेवा और हितों को संरक्षित करने के लिए समर्पित किया। मेरे लिए उनका निधन व्यक्तिगत क्षति है। ईश्वर दिवंगत आत्मा को श्रीचरणों में स्थान दें। परिजनों के प्रति संवेदनाएं व्यक्त करता हूँ। किरण जी के साथ राजनीतिक-सामाजिक जीवन में लम्बे अरसे तक काम किया। सामाजिक विषयों विशेषतः महिलाओं व वंचित वर्गों के अधिकारों की वे सशक्त आवाज थीं। दीन-दुखियों की सहायता के लिए हमेशा तत्पर रहने वाली किरण जी को उनकी निर्भीकता व स्पष्टवादिता के लिए सदैव याद किया जाएगा। गेल्या काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी सहाडा येथील आमदार कैलास त्रिवेदी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. किरण माहेश्वरी यांचे निधन अतिशय दुःखद आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सेवेसाठी समर्पित केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. " असे बिर्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आमदार माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्या होत्या. त्यांना कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. राजस्थानमधील करोनाचा वाढता संसर्ग पाहता, राज्यातील बहुतांश भागांमध्ये 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सायंकाळी 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच, बाजारपेठा व अन्य व्यावसायिक ठिकाणे सायंकाळी 7 वाजेनंतर बंद ठेवण्यात आलेली आहेत. |
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. यावेळी पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात रंगणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आयपीएल 2022मध्ये भाग घेणाऱ्या गुजरात संघाने पहिले-वहिले विजेतेपद पटकावले होते. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात गुजरातने किताब जिंकून सर्वांना चकित केले होते. आता जगातील सर्वात मोठ्या मैदानावर आयपीएलची सुरुवात होणार आहे. तसेच, तब्बल एक लाखांहून अधिक प्रेक्षक या सामन्याचे साक्षीदार होऊ शकतात. या स्टेडिअमवर साखळी फेरीतील एकूण 7 सामने खेळले जाणार आहेत. म्हणजेच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ त्यांचे सर्व सामने याच मैदानावर खेळेल. 31 मार्चनंतर गुजरातचा दुसरा सामना 9 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पार पडेल. यानंतर 16 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध, 25 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध, 2 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, 7 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आणि 15 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये एकूण 70 साखळी सामने असतील. यासाठी 10 संघांची विभागणी 5-5 अशा दोन गटांमध्ये केली आहे. यातील संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळतील. तसेच, इतर गटाच्या 4 संघाविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळतील आणि एका संघासोबत दोन सामने खेळतील. गुजरात टायटन्स संघाबाबत बोलायचं झालं, तर गुजरात टायटन्स संघ ब गटात आहे. या गटात त्यांच्यासोबत चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या संघांचा समावेश आहे. (narendra modi stadium in ahmedabad ipl 2023 matches know schedule) |
मागील चार महिन्यांपासून भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी बंद असणारी रो रो सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोव्हिडं-19चा वाढता प्रादुर्भाव पाहता ही सेवा चार महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. परंतु आजपासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. आज भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी जवळपास 150 नागरिकांनी प्रवास केला. याबाबत बोलताना शिपच्या संचालक देविका सेहगल म्हणाल्या की 15 मार्चला या सेवेचं उदघाटन झालं आणि काहीच दिवसांत कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव पाहता ही सेवा बंद करण्यात आली. परंतू आता मात्र ही सेवा पूर्णपणे सुरू राहणार असून याला नागरिक देखील उत्तम प्रतिसाद देतं आहेत. उद्या भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी जाण्यासाठीचे बुकिंग पूर्ण झालं आहे. या सेवेमुळे मुंबईला कामाला येणारे, रुग्णालयात येणारे यांची मोठी सोय होणार आहे. |
आज राष्ट्रीय सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रीय दिन हा चिनी लोकांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा सण आहे.उत्सवाच्या शेवटी, आमच्या सहकाऱ्यांनी एक पार्टी आयोजित केली.पार्टीत, आम्ही अनौपचारिकपणे गप्पा मारल्या, स्वादिष्ट अन्न खाल्ले आणि ही छान सुट्टी एकत्र साजरी केली. हा सुंदर उत्सव आमच्या नवीन कारखान्याचा एक महिना वर्धापन दिन आहे. नवीन कारखान्याचे क्षेत्रफळ 12000 चौरस मीटर आहे, उत्पादन क्षमता आणि साठवण जागा मोठ्या प्रमाणात सुधारली आहे, दरमहा 120-150 कंटेनर तयार केले जाऊ शकतात! उत्पादन क्षमता आणि क्षेत्रफळ पूर्वीच्या चौपट आहे आणि आमचे कारखाना व्यवस्थापन आणि गुणवत्ता नियंत्रण अधिकाधिक प्रमाणित केले जाईल.आता आम्ही तुम्हाला चांगले आणि जलद समर्थन देऊ शकतो ) अधिक व्यावसायिक निर्माता म्हणून, आम्ही आमच्या ग्राहकांना मदत आणि समर्थन देण्यासाठी नेहमीच कठोर परिश्रम करत असतो. आता आमच्या कारखान्याचा आणखी विस्तार करण्यात आला आहे, त्याच वेळी, आम्ही तुम्हाला आमच्या कारखान्याला भेट देण्यास आमंत्रित करतो किंवा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू करतो.आमची नवीन फॅक्टरी आणि उत्पादन लाइन तुम्हाला दाखवण्यात आम्हाला आनंद होत आहे. आता आमच्या कारखान्याचा आणखी विस्तार करण्यात आला आहे, त्याच वेळी, आम्ही तुम्हाला आमच्या कारखान्याला भेट देण्यास आमंत्रित करतो किंवा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू करतो.आमची नवीन फॅक्टरी आणि उत्पादन लाइन तुम्हाला दाखवण्यात आम्हाला आनंद होत आहे. |
अरुणाचल प्रदेशमधील नव्याने स्थापन झालेल्या अंजाव जिल्ह्यात केवळ दोन मतदारांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. इटानगरः अरुणाचल प्रदेशमधील नव्याने स्थापन झालेल्या अंजाव जिल्ह्यात केवळ दोन मतदारांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त ईशान्येकडील या सर्वात मोठ्या राज्यात १० पेक्षा कमी मतदार असलेली ८, २० पेक्षा कमी मतदारांची २० आणि ५० पेक्षा कमी मतदारांची १०५ मतदानकेंद्र आहेत. ९ एप्रिल रोजी येथे मतदान होत आहे. |
सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यान, टांझानिया एक्सप्लोर करा - World Tourism Portal\nटांझानिया मधील सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यान एक्सप्लोर करा\nकाय पहावे. टांझानिया मधील सेरेनगेटी नॅशनल पार्क मधील सर्वोत्तम आकर्षणे\nटांझानियाच्या सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यानात काय करावे.\nसेरेनगेटीची अधिकृत पर्यटन वेबसाइट\nसेरेनगेटी बद्दल एक व्हिडिओ पहा\nटांझानियाच्या उत्तरेस स्थित सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यान, एक मोठा संवर्धन क्षेत्र अन्वेषित करा. उद्यान शेजारच्या भागात पसरले आहे केनिया जिथे ते मसाई मारा म्हणून ओळखले जाते.\nहे पार्क पूर्व आफ्रिकेच्या सेरेनगेटी प्रदेशातील अनेक संवर्धनांपैकी एक आहे, जरी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वन्यजीव, वनस्पती आणि प्रतिकृतींचे संवर्धन करण्याबरोबरच सेरेनगेटी नॅशनल पार्क हे एक प्रमुख प्रवासी आणि पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे आणि बर्याच जणांनी सफारीमध्ये भाग घेण्यासाठी प्रवास केला आहे. सेरेनगेटी हे नाव मासाई भाषेतून आलेले आहे, याचा अर्थ 'अंतहीन मैदानी प्रदेश' आहे.\nWorld०,००० कि.मी. क्षेत्रामध्ये दोन जागतिक वारसा साइट आणि दोन बायोफिअर रिझर्व्ह स्थापित केले आहेत. सेरेनगेटी इकोसिस्टम ही पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आहे. गेल्या दशलक्ष वर्षात हवामान, वनस्पती आणि जीवजंतूची आवश्यक वैशिष्ट्ये केवळ बदलली आहेत. सुरुवातीच्या माणसाने स्वतः सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी ओल्डुवाई गॉर्जमध्ये हजेरी लावली होती. जीवन, मृत्यू, रुपांतर आणि स्थलांतरणाचे काही नमुने स्वतः टेकड्यांइतके जुने आहेत.\nहे स्थलांतर आहे ज्यासाठी सेरेनगेटी बहुधा प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाऊस पडण्यासाठी उत्तरेकडच्या टेकड्यांपासून दक्षिणेकडील मैदानावर दशलक्षांहून अधिक वाइल्डबीस्ट आणि सुमारे 200,000 झेब्रा दक्षिणेकडे वाहतात आणि एप्रिल, मे आणि जूनमध्ये झालेल्या लांब पाऊसानंतर पश्चिम आणि उत्तर दिशेने फिरतात. पुरातन प्रवृत्ती इतकी भयंकर आहे की, दुष्काळ, घाट किंवा मगरमच्छग्रस्त नदी त्यांना रोखू शकत नाही.\nदरवर्षी या उद्यानात जवळपास ,90,000 ०,००० पर्यटक भेट देतात.\nसेरेनगेटी इकोसिस्टममध्ये त्याच्या महान स्थलांतरणासह वन्यजीव पाहणे प्रचंड आहे! पृथ्वीवर कोठेही पदयात्रावर 1.5 दशलक्ष खूर असलेल्या प्राण्यांच्या तमाशास प्रतिस्पर्धा करणारे कोणतेही स्थान नाही. टांझानियामधील सेरेनगेटी नॅशनल पार्कच्या मैदानापासून मासै माराच्या गवताळ प्रदेशात मोठ्या प्रवासानंतर दरवर्षी पांढर्या दाढी वाले विल्बेड, झेब्रा आणि गझले स्थलांतर करतात. केनिया ताज्या गवत शोधात. या ग्रहावर सेरेनगेटीमध्ये सर्वात मोठ्या सस्तन प्राण्यांचे प्रमाण जास्त आहे आणि ते २,2,500०० सिंहांसाठी प्रसिद्ध आहे, सर्वात जास्त एकाग्रता कोठेही आढळली! मध्ये आवडत नाही केनिया (आणि नॅगोरोन्गोरो क्रेटरचा अपवाद वगळता), सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यानात गेम ड्राईव्हवर इतर पर्यटक किंवा वाहने तुम्हाला क्वचितच दिसतील.\nवन्य प्राणी धोकादायक असू शकतात आणि आपण स्वतःच भटकू नये, विशेषतः रात्री, सफारीवर असताना (स्वाहिली भाषेत फक्त "प्रवास" असा होतो). तथापि बहुतेक प्राणी मानवांनी घाबरतात आणि कोपरा किंवा भडकल्याशिवाय आक्रमण करण्याऐवजी पळून जातील. समजूतदार अंतर ठेवा आणि त्यांना आदराने वागवा.\nसेरेनगेटीत ओळखल्या गेलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींच्या 518 पेक्षा जास्त प्रजातींचे निरीक्षण करण्यासाठी पहाटे लवकर आणि उशिरापर्यंतचा काळ हा सहसा सर्वोत्तम काळ असतो. त्यातील काही यूरेशियन स्थलांतरित आहेत जे ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत युरोपियन हिवाळ्यातील महिन्यांमध्ये उपस्थित असतात.\nसेरेनगेटी पूर्व आफ्रिकेच्या क्लासिक बायमोडल पर्जन्यमानाच्या पॅटर्नमध्ये येते. मार्च - मे मध्ये लांब आणि मुसळधार पाऊस, नोव्हेंबर / डिसेंबरमध्ये कमी पाऊस पडतो. सरासरी मासिक जास्तीत जास्त तापमान सेरोनेरा येथे सुमारे 27 ते 28 अंश सेंटीग्रेड पर्यंत स्थिर राहते. एनगोरोन्गोरो क्रेटर येथे रात्री उंचीमुळे खूप थंडगार असू शकते.\nसेरेनगेटीला सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे किलीमंजारो विमानतळ जवळ रशा.\nटांझानियामध्ये पार्क फी खूपच महाग असू शकते. जर आपण ट्रॅव्हल एजंटद्वारे आपली सहल बुक केली तर ते सहसा एकूण ट्रिप खर्चात समाविष्ट केले जातात. सेरेनगेटी नॅशनल पार्क आणि नॅगोरोन्गोरो कन्झर्वेशन क्षेत्रात पार्क फी रोज प्रति व्यक्ती US० अमेरिकन डॉलर्स आहे, दर दिवशी डेरेसाठी US० अमेरिकन डॉलर्स आणि दर दिवशी प्रति वाहन यूएस $ $० आहे. सेरेनगेटीत पुष्कळसे निश्चित "डॉनट्स" नाहीत. यामध्ये खूप जवळचे आणि त्रासदायक जनावरे गाठणे, न स्वीकारलेले आवाज काढणे, फुले उचलणे किंवा वनस्पती नष्ट करणे, कचरा टाकणे, 50 किमी / तासाच्या वेगाच्या मर्यादा ओलांडणे, पार्कमध्ये पाळीव प्राणी किंवा बंदुक आणणे आणि सेरोनेराच्या 30 कि.मी.च्या आतून रस्ता जाणे समाविष्ट आहे.\nडिसेंबर ते मे पर्यंत पावसाच्या आधारे मोठे कळप ओल्डुवाई, गोल, नाबी आणि लगरजा दरम्यानच्या सखल गवताळ प्रदेशात केंद्रित असतात. मग मासाक लेक किंवा लागरजा लेक वर एक तळ आदर्श आहे कारण तेथून सर्व दिशेने प्रवास करता येतो. दिवसा सहल अशा क्षेत्रांमध्ये कमीतकमी ज्ञात नसतात जेणेकरून आपण शांततेत पशू नंदनवनाचा आनंद घेऊ शकताः उदाहरणार्थ लपलेली व्हॅली, सोइटो नगम कोप्जेस किंवा केकेसिओ प्लेन्स. सर्वोत्तम ठिकाणे शोधण्यात सक्षम होण्यासाठी आपण क्रॉस कंट्री प्रवास करण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्याल आणि अशा प्रकारे मध-बॅजर, वन्य मांजरी, पोर्कोपिन सारख्या दुर्मिळ प्राण्यांना पाहण्याची संधी मिळेल. योग्य हंगामात, दक्षिणी सेरेनगेटी मागे टाकली जाऊ शकत नाही.\nमोरू कोपजेस आणि सेरोनेरा, सेंट्रल सेरेंगेती. येथे सवाना जनावरांमध्ये अशा प्रजाती सामील आहेत ज्या खडकाळ चट्टानांमध्ये राहण्यास अनुकूल आहेत. येथून किंवा संक्रमणात असताना, आपण उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या दुर्मिळ बिबट्या आणि चित्ता शोधत असलेल्या सेरोनेराला भेट देता. आपण गॅलरीची जंगले, कोप्जेस आणि पाण्याच्या छिद्रांसह बदलत्या लँडस्केपचा आनंद घेऊ शकता.\nलोबो, उत्तर सेरेनगेटी. उत्तर सेरेनगेती दक्षिणेतील गवताळ प्रदेशांपेक्षा खूप वेगळी आहे. नेहमीच पाणी असते म्हणून कोरड्या हंगामात मोठे कळप तेथे माघार घेतात. याव्यतिरिक्त बर्याच प्रजाती आहेत ज्या येथे कायमस्वरूपी राहतात आणि आपण हत्ती नियमितपणे पहाल. स्वतः साठी एक सीमेवरील बोलोन्झा स्प्रिंग्ज आहे केनिया. 'कॉरिडोर', वेस्ट सेरेनगेटी\nहे एक विशेष क्षेत्र आहे जे सफारी टूर वर क्वचितच दिले जाते. लांब पल्ले, खराब दळणवळण (काही वाहने रेडिओने सुसज्ज आहेत) आणि वारंवार कठीण रस्त्यांची परिस्थिती अद्याप सेरेनगेटीच्या या भागापासून व्हिक्टोरिया लेकपर्यंत पसरलेल्या बहुतेक अभ्यागतांना दूर ठेवते. म्हणून सेरेनगेटीचा एक महत्वाचा पैलू त्यांच्यासाठी हरवला आहे. हे क्षेत्र उद्यानाच्या इतर मुख्य विभागांपेक्षा खूप वेगळे आहे. कोरड्या हंगामात पश्चिमेकडे असलेल्या वाटेच्या मोठ्या दिशेने प्राण्यांचा व्यावहारिकदृष्ट्या रिकामापणा असू शकतो. मार्ग शेवटचा चतुर्थांश संपूर्ण वर्षभर हजारो प्राण्यांचे घर होण्यासाठी योग्य आहे. येथे राहणारे ज्ञान व झेब्रा उत्तरेकडे जाणा every्या दरवर्षी जाणा their्या त्यांच्या स्थलांतरित नात्यात सामील होत नाहीत. जिराफ, म्हशी, इलँड, टोपीस, कोन्गोनिस, इम्पालास, वॉटरबक आणि थॉम्पसनच्या गजेल्सचे मोठे समूह येथे एकत्र राहतात. सर्व मोठ्या मांजरी आणि हायनाही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ऑगस्ट ते ऑगस्ट पर्यंत पश्चिम सेरेनगेटी मधील झेब्रा आणि विल्डेबीस्टचे वार्षिक स्थलांतर पाहण्याची वेळ येते. वाईल्डबीस्टसाठीही हा हंगाम आहे आणि पुरुष वाईल्डबीस्ट त्यांच्या तात्पुरत्या प्रदेशाचा बचाव करीत आहेत. ग्रुमेती नदीची मगरमच्छ लोकसंख्या ही खास आकर्षण बनली आहे. हे विशेषतः किरावीरा येथे मोठे आहे, जिथे नदी कोरडे होत नाही. या जीवन देण्याच्या पाण्याच्या स्त्रोतावर घालवलेला वेळ सर्वात अंतर देणारा असू शकतो. येथे केवळ मगर आणि हिप्पो पाहण्यासारखेच नाही तर पक्ष्यांच्या मोठ्या संख्येने वाण देखील आहेत. बराच वेळ असलेले (किंवा नशीब) असणारे पर्यटक झाडांच्या किरीटात काळा आणि पांढरा कोलोबस माकड शोधू शकतील. एनडाबाकाच्या मैदानावरील जंगली सवाना येथे नेहमीच काहीतरी पाहायला मिळते. शांत तलाव आणि अनाकलनीय "कोरोन्गोस" येथे आपणास नेहमीच शांती मिळेल. सेरेनगेटीच्या या कमीतकमी भेट दिलेल्या भागात तुम्ही फेरफटका मारताना, किरवीरा जवळील सर्वात विलासी आणि अनन्य शिबिरात राहू शकता, "किरावीरा सेरेना कॅम्प", कॉर्झर्व्हेशन कॉर्पोरेशनच्या "ग्रुमेटी रिवर कॅम्प" येथे (अगदी अनन्य!) किंवा स्वस्त येथे परंतु लेक व्हिक्टोरिया किना on्यावर (पार्कच्या बाहेर4किमी अंतरावर, किरावीरापासून तासाभराच्या अंतरावर) चांगला आणि मोहक नवीन स्पिक बे लॉज. Mbalageti Serengeti Mbalageti Serengeti देखील पश्चिम कॉरिडॉरमध्ये आहे आणि तारांच्या स्थानामुळे विशाल मैदानावर एक अतुलनीय दृश्य प्रदान करते.\nछायाचित्रे घ्या! एक चांगला झूम आणि मोठे मेमरी कार्ड परिणाम इतके चांगले करतात की आपण महिने आणि महिने नंतर फोटो पहात आहात. (त्यांना उच्च प्रतीच्या प्रतिमेवर जतन करा आणि आपण घरी गेल्यावर आपण आपल्या फोटो प्रोग्रामसह आश्चर्यकारक गोष्टी करू शकता!)\nएक बलून सफारी घ्या जे आपल्याला उत्कृष्ट दृश्ये देईल.\nमानवी वस्ती नसतानाही सेरेन्गेटीमध्ये नैसर्गिकरित्या खरेदी करणे अत्यंत मर्यादित आहे. मध्ये रशातथापि, आणि अन्य प्रमुख शहरांमध्ये आपणास करीओ मार्केट्स आढळतील जिथे आपण सर्व प्रकारच्या कोरीव वस्तू, मुखवटे, मासाईचे भाले, कापड, ड्रम, टिंगा-टिंगा पेंटिंग्ज, बाटीक वर्क, रेशीम शाल, स्थानिक रत्ने, दागिने, कॉफी इत्यादी खरेदी करू शकता. रशा हेरिटेज सेंटर मोठ्या संख्येने स्मृतिचिन्हे आणि हस्तकला ऑफर करतो. तसेच, सयारी शिबिरात स्थानिकांशी थोड्याशा "भेटवस्तूचे दुकान" पुरवण्याची व्यवस्था होती आणि ते पैसे स्थानिक कार्यक्रमांमध्ये परत जातात.\nताजे भाजलेले काजू खा, टरबूजचा रस प्या, लहान गोड केळी वापरून पहा.\nसफारीवर उपलब्ध अन्नाची गुणवत्ता आणि विविधता पाहून बहुतेक अभ्यागत आश्चर्यचकित होतात. आपण लॉज, टेन्टेड कॅम्प किंवा मोबाईल सफारी शिबिरात राहत असाल तरी आंतरराष्ट्रीय स्वाद आणि मानकांनुसार तुम्हाला नव्याने तयार केलेले जेवण दिले जाईल. बाटलीबंद पाणी सर्व लॉज आणि शिबिरांवर खरेदी केले जाऊ शकते आणि सर्व सफारी ऑपरेटरद्वारे प्रदान केले गेले आहे. नॉनोलाकॉलिक मद्यपान बहुधा सर्व समावेशक दरांमध्ये समाविष्ट केले जाते. बाटलीबंद पेयांनी चिकटून रहाणे शहाणपणाचे आहे.\nकॉफी, बंगोचा रस, टस्कर लेजर, अमरुला!\nसफारी लॉजची संज्ञा आणि संकल्पना तंझानियन मूळची आहे. येथे आपल्याला रोमांचक डिझाइनच्या इमारती आढळतील, विशेषतः उद्यानांच्या वन्य लँडस्केपमध्ये फिट होण्यासाठी, तरीही स्विमिंग पूल आणि ललित फूड सारख्या लक्झरी हॉटेलच्या सर्व सुविधांसह. जसे की आपण खाणे, पिणे, तलावाद्वारे आळशी किंवा आपल्या खाजगी व्हरांड्यावर बसता, आपण गेम पाहण्यास सक्षम असाल, बर्याचदा काही अंतरांच्या अंतरावर.\nलक्झरी टेन्टेड कॅम्प\nसेरेनगेटी येथे काही लक्झरी टेन्टेड कॅम्प आहेत ज्यांचा एक अनोखा सफारी अनुभव आहे. तंबू सहसा पूर्णपणे सुसज्ज एन-स्वीट बाथरूम, खाजगी व्हरांड्या आणि मोहक फर्निचर देतात. रात्री आपण सेरेनगेटीचे उबदार आणि आरामदायक पलंगावर जडलेले वाइल्ड आवाज ऐकू शकता!\nसेरेनगेटीच्या नऊ कॅम्पसाईटपैकी एकावर रहाणे हा एक स्वस्त पर्याय आहे. जर तुम्हाला त्यांच्याकडे रहायचे असेल तर आपणास टानापा किंवा जवळच्या पार्क वॉर्डनची परवानगी घ्यावी लागेल.\nप्रदेशात आरोग्य सेवा मर्यादित आहे, परंतु समस्या असल्यास आपल्या लॉजसाठी मदत घ्या. अधिक गंभीर आपत्कालीन परिस्थितीत, आपण यामध्ये सामील होऊ शकता नैरोबी, किंवा आपल्या मायदेशी रिकामे केले जात आहे. |
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ८ हजार ४०० कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत २६०० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, निवडणूक कर्मचाऱ्यांची रविवारी (दि. १२) दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येऊन प्रत्येकाला जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान, तर २३ फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकी पाच कर्मचारी असलेल्या १६०० पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या निवडणूक शाखेकडे आतापर्यंत २६०० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले आहेत. मतदानाच्या पाच दिवस अगोदर कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करावे लागणार आहेत. त्यानंतर प्राप्त अर्जांनुसार त्या-त्या प्रभागातील मतपत्रिकांची छपाई करून संबंधित मतदार कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्त असलेल्या ठिकाणीच मतदान करत मतपत्रिका बंदिस्त पाकिटात जमा करायची आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी दुसरी कार्यशाळा सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम, कालिदास कलामंदिर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत त्या-त्या विभागातील निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले, तसेच कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांचेही वाटप करण्यात आले. ईव्हीएममार्फत होणाऱ्या मतदान प्रक्रियेचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. (प्रतिनिधी) |
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली. कऱ्हाड : सध्या सत्तेवर असलेलं सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर भांडवलदारांचं सरकार आहे. सध्या देशात मोठी मंदी निर्माण झाली आहे. याला यापूर्वीची सरकारेही जबाबदार आहेत. स्वातंत्र्यापासून विकासाच्या दिशाच चुकलेल्या आहेत. त्यापासून आतापर्यंत सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचे आहेत, असे सांगत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली. श्रमिक मुक्ती दलाचा वार्षिक महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बुधवारी डॉ. भारत पाटणकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, सिद्धेश्वर पाटील, चंद्र्रकांत पाटील, शिवाजी शिंदे, जयसिंग गावडे, संभाजी पाटील यांची उपस्थिती होती. डॉ. पाटणकर म्हणाले, ह्यया मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसह पाटण तालुक्यातील समन्यायी पाणीवाटपाचा संघर्ष, कऱ्हाड विमानतळ आणि तारळी धरणग्रस्तांची सध्या सुरू असलेली चळवळ, नवे कृषी औद्योगिक धोरण, बडवे हटवल्यानंतर चालू झालेल्या पुरुष सुक्त हटाव चळवळीचा कार्यक्रम, वारकरी संतांची संस्कृती हीच महाराष्ट्राची संस्कृती, या भूमिकेच्या आधारे केले जाणारे विचार मंथनाची प्रक्रिया, अशा विषयांबाबतचे विविध ठरावही यावेळी घेण्यात येणार आहे,ह्ण अशी माहितीही त्यांनी दिली. वीस वर्षांच्या संघर्षानंतर दुष्काळग्रस्त आटपाडी, सांगोला, तासगाव तालुक्यांतील प्रत्येक कुटुंबाला पाच एकराचे बागायत मिळेल, एवढे प्रकल्प मिळाले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील वगळलेली सर्व गावेही यात सहभागी होतील. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी उचलून संबंधित दुष्काळी भागात पोहोचवल्यास येथील महापुराचा फटका सौम्य होईल. आटपाडी पॅटर्न राबवल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, त्यामुळे सरकारने राज्यभरात समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावा, असे मत पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले. |
अकोला : पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वीजखांबावर व रोहीत्रावर चढणाऱ्या वेलीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा ठरणाºया व प्रसंगी अपघातालाही निमंत्रण देणाºया वेली व झाडे-झुडूपे काढण्याची मोहिम हाती घेत जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी ६५८ विद्युत खांब व २३५ रोहित्रांवरील वेली काढण्यात आल्या. महावितरणची यंत्रणा उघड्यावरच आणि रानावनात पसरली असल्याने अनेक ठिकाणीरोहीत्रे आणि विद्युत खांब वेली तसेच झुडूपे यांच्या विळख्यात वारंवार अडकतात. यामुळे वीज यंत्रणा असुरक्षित होते. परिणामी थोडी हवा आली तरी खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागते. शिवाय वेली व झुडूपे ही ओली असल्यामुळे यात व खांबाला लावलेल्या तानात वीज प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते. हे अपघाताचे कारण बनू नये म्हणून जिल्हयात सुरक्षित वीज यंत्रणेतून वीज पुरवठा करण्यासाठी शनिवार, २६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी मोहीम घेऊन जिल्ह्यातील रोहीत्रे व विद्युत खांबावरील वेली व झाडे-झुडूपे काढण्यात आली. अधिक्षक अभियंत पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला शहर ,अकोला ग्रामिण आणि अकोट विभागाचे कार्यकारी अभियंते यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या मोहिमेत २३० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. वेलीमुक्त करण्यात आलेली वीजखांबे व रोहीत्रामध्ये अकोला शहर १८८ वीज खांबे व ९७ रोहीत्राचा समावेश आहे. यावेळी अकोला ग्रामीण विभागातील २६५ वीज खांबे व १०० रोहीत्रे वेलीमुक्त करण्यात आली. तर, हीच संख्या अकोट विभागासाठी अनुक्रमे २०५ व ३८ आहे. |
देसाईगंज : २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य व उत्स्फूर्त मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळावे व त्यात विद्यार्थी यशस्वी व्हावे. या हेतूने शिक्षण विभाग पं. स. देसाईगंज अंतर्गत शिक्षकांना उद्बोधन वर्गातून मार्गदर्शन करण्यात आले. या उद्बोधन वर्गात चंद्रपूर येथील 'झटपट गणित' पुस्तकाचे लेखक तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बालाजी बावणे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटसमन्वयक विजय बन्सोड, आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुलभा प्रधान, केंद्रप्रमुख ब्रह्मानंद ऊईके उपस्थित होते. नवोदय किंवा शिष्यवृत्तीसारख्या परीक्षा या जीवनातील स्पर्धात्मक परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असल्याने या उद्बोधनवर्गात प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना पुरेपूर लाभ द्यावा, असे आवाहन विजय बन्सोड यांनी प्रास्ताविकेतून केले. उद्बोधन वर्गाचे संचालन विषय साधन व्यक्ती होमा शहारे तर आभार रानू ठाकूर यांनी मानले. यशस्वितेसाठी आर. जी. म्हस्के यांच्यासह गटसाधन केंद्राच्या अल्का सोनेकर, वैशाली खोब्रागडे व रणजित चौधरी यांनी सहकार्य केले. उद्बोधन वर्गाला जि. प. , न. प. व खासगी शाळांचे ५९ शिक्षक उपस्थित होते. |
मुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने चौफेर टीका होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी बसले होते तेथे खाली आणखी जागा होती. चुकीचे वाटत असेल तर माफी मागते. जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका. मी जिथे बसले तेथे काहीच धोकादायक नव्हते. मी त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नव्हे तर शुद्ध हवा घेण्यासाठी बसले होते. |
भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यापासून ते तत्पर वैद्यकीय उपचार पुरवण्यापर्यंत विविध मंत्रालयं आणि राज्यं एकत्र काम करत आहेत घाबरण्याचं काहीही कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे काल मोदी यांनी कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासंदर्भात संबंधित विभागानं केलेल्या तयारीचा व्यापक आढावा घेतला ते पुढे म्हणाले की सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे तसंच स्वतःच्या संरक्षणासाठी लहान पण महत्वाची काळजी घेतली पाहिजे असंही मोदी म्हणाले कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना मदत म्हणून जागतिक बँकेनं बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे काल जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी बातमीदारांना ही माहिती दिली ज्या देशाला या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या देशाला जास्त निधी देण्यात येईल सर्व देशांबरोबर बँकेनं याबाबतीत संपर्क साधला आहे असंही त्यांनी सांगितलं शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचाकोणताही निर्णय अद्याप झालेला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी स्पष्ट केलं आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते यासंदर्भातला कोणताही प्रस्ताव आपल्यासमोर आला नसल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआर संदर्भात एकसमिती स्थापन करून निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले नागरिकत्व सुधारणाकायदा सीएए संदर्भात आपल्या भूमिकेचापुनरुच्चार केला राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलंजाईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कालविधानपरिषदेत दिली यात राज्यातल्या जनतेला शंभरयुनिटपर्यंत मोफत वीज देणं तसंच शेतकऱ्यांना दिवसा देखील चारतास वीजदेण्याचं प्रस्तावित असून अहवाल आल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले भारत दोन हजार अठ्ठावीस च्या ऑलम्पिक स्पर्धेत पहिल्या दहा राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवणार असा आशावाद केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केला काल हरियाणा इथं भारततिबेट पोलीस दलाच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय पोलीस अथलेटिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक संसेक्समध्ये आज सकाळच्या सत्रात शंभर पाच अंकांची वाढ झाली आणि तो अडतीस हजार सात शे एक्क्याण्णव अंकांवर पोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही चार अंकांची वाढ झाली आणि तो अकरा हजार तीन शे अंकांवर पोचला चलन बाजारात रुपयाचं मूल्य तेहेतीस पैशांनी वधारलं आज सकाळी विनिमय दर प्रति डॉलर बाहत्तर रुपये त्रेचाळीस पैसे होता |
Sachin Tendulkar on Carlos Alcaraz winner of Wimbledon 2023: विम्बल्डन या मानाच्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी अनुभवी नोव्हाक जोकोविचला नवख्या कार्लोस अलकराझकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचचा १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा पाच सेटमध्ये आणि सुमारे पाच तास चाललेल्या सामन्यात पराभव केला. पहिल्या तीन पैकी दोन सेट गमावल्यानंतर, जोकोविचने कमबॅक करत सामना पाचव्या सेटपर्यंत खेचला. पण अखेर शेवटच्या सेटमध्ये ६-४ अशा गुणसंख्येने अलकराझने पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. विम्बल्डन जिंकणारा तो तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला. राफेल नदालने २००८ व २०१० मध्ये तर मॅन्यूएल सँटानाने १९६६ मध्ये विम्बल्डन जिंकली होती. त्याच्या विजयानंतर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याने त्याचे अभिनंदन केले आणि कौतुक केले. ४ तास आणि ४३ मिनिटं रंगलेल्या सामन्यात अनुभवी जोकोविचला अलकराझने पराभूत केले. त्यानंतर अलकराझवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यातही, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने त्याचे ट्विट करत कौतुक केले आणि खूप मोठी शाबासकीही दिली. "दोन्ही खेळाडूंनी अतिशय तुफानी खेळ केला. अंतिम सामना पाहायला खरंच खूप मजा आली. आपण आजच्या सामन्यात टेनिसमधील एका नव्या ताऱ्याचा उदय पाहिलाय. ज्याप्रमाणे मी रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील प्रत्येक सामना न चुकता पाहिलाय, तसंच आत मी पुढली १०-१२ वर्षे अलकराझच्या कारकिर्दीतील सामने नक्की बघेन. कार्लोस अलकराझ, तुला खूप खूप शुभेच्छा! ", असे सचिनने ट्विट केले. सर्बियाच्या जोकोविचने पहिला सेट ६-१ असा सहज जिंकला. त्यानंतर अलकराझने पुढला सेट टायब्रेकरमध्ये तर तिसरा सेट ६-१ असा एकतर्फी जिंकला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन केले आणि ३-६ असा सेट जिंकला. त्यामुळे पाचवा सेट निर्णायक ठरला. पाचव्या सेटमध्ये सुरूवातीला जोकोविच ४-२ असा पिछाडीवर होता. तरीही त्याने सामना ५-४ असा रंगतदार स्थितीत आणला. पण अखेरच्या गेममध्ये अलकराझने विजय नोंदवत शेवटचा सेट ६-४ ने जिंकला व विजेतेपदावर नाव कोरले. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
लखनौ, दि. ११ (पीसीबी) : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करूनही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह राज्यातील 10 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य सिरथू यांना समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली आहे. पल्लवी पटेल या अपना दल (कम्युनिस्ट) च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत, त्यांचा डॉ. पल्लवी पटेल यांनी ७,३३७ मतांनी पराभव केला आहे. मौर्य यांच्याशिवाय राज्य सरकारचे ऊस मंत्री सुरेश राणा यांचा शामली जिल्ह्यातील थानाभवन जागा सपाच्या अशरफ अली खान यांच्याकडून 10 हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाल्या, तर बरेली जिल्ह्यातील बहेडी विधानसभा मतदारसंघातून राज्यमंत्री छत्रपाल यांनी राष्ट्रीय लोकदलाला पाठिंबा दिला. सिंग गंगवार यांचा समाजवादी पक्षाच्या अताउर रहमान यांनी ३,३५५ मतांनी पराभव केला. योगी सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ मोती सिंह यांचा प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या राम सिंह यांच्याकडून 22,051 मतांनी पराभव झाला, तर राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय यांनी चित्रकूट मतदारसंघातून सपाचे अनिल कुमार यांचा 20,876 मतांनी पराभव केला. गेले, राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांचा सपाच्या जयप्रकाश यांनी पराभव केला. तसेच राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांचा बलिया जिल्ह्यातील बैरिया जागेवर समाजवादी पक्षाच्या जयप्रकाश सर्कलकडून 12,951 मतांनी पराभव झाला, आनंद स्वरूप गेल्या वेळी बलिया मतदारसंघातून विजयी झाले होते, परंतु विद्यमान आमदार सुरेंद्र सिंह यांचे तिकीट कापून त्यांना बैरिया यांना पाठवण्यात आले. त्यांच्या जागी पक्षाने दयाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली. तिकीट मिळाल्यानंतर सुरेंद्र सिंह यांनी भाजपविरोधात बंडखोरी केली आणि विकासशील इंसान पक्षाकडून निवडणूक लढवली आणि भाजपला बैरियाची जागा गमवावी लागली. फतेहपूर जिल्ह्यातील हुसेनगंज जागेवर समाजवादी पक्षाच्या उषा मौर्या यांनी भाजप उमेदवार आणि राज्यमंत्री रणवेंद्र सिंह धुन्नी यांचा २५,१८१ मतांनी, औरैया जिल्ह्यातील दिबियापूर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे राज्यमंत्री प्रदीपकुमार यादव यांचा लखन सिंह राजपूत यांचा अवघ्या ४७३ मतांनी पराभव केला. मतांच्या फरकाने, विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार माता प्रसाद पांडे यांनी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील इटावा जागेवर मूलभूत शिक्षण मंत्री सतीश चंद्र द्विवेदी यांचा 1,662 मतांनी पराभव केला. |
उस्मानाबाद प्रतिनिधी । माणसाचे जीवन अमूल्य असते त्याची किंमत कशानेच मोजता येऊ शकत नाही असे बोलले जात असले तरी देखील नेमक्या त्या जीवनाची किंमत समजलेलीच नसते. अगदी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेतला जात असेल तर आपण खर्च माणसे आहोत की जनावरे आहोत असा प्रश्न उपस्थित होतो. जनावरांना देखील दया-माया असते ते देखील किती भावनिक असू शकतात यांची अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. परंतु माणूस नावाचा प्राणी मात्र किती हिंसक आणि संवेदना हीन असू शकतो याचा परिचय देणारी घटना उस्मानाबाद शहरात घडली आहे. उस्मानाबाद शहरातील एंनजॉय नेट कॅफे येथे उस्मानाबाद तालुक्यातील घाटगरी गावचा ३६ वर्षीय दशरथ गेमा पवार हा काही इंटरनेटच्या कामासाठी आला होता. तिथे त्याने नेटचा वापर केला. त्याने वापरलेल्या नेटच बिल ४० रुपये झालं. परंतु दशरथने हे ४० रुपयांचं बिल दिल नाही. त्याचाच राग कॅफेचा मालक असणारा विनोद लंगळे याला आला. त्याचा इतका राग अनावर झळा की त्याने थेट दशरथ वर हल्लाच चढवला. हा हल्ला इतका गंभीर होता की दशरथ याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून याबाबत उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु दशरथच्या घरच्यांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनच्या दारात एकाच आक्रोश केला. |
चिंचवड, दि. ३० (पीसीबी) - व्हायोलिन अकादमी , MIT World Peace University Faculty of Liberal arts यांच्या संयुक्त विद्यमानाने व पं.अनिंदो चॅटर्जी म्युझिक फाउंडेशन तालपरिक्रमा यांच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शुक्रवार, शनिवार दिनांक 27 व 28 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता संगीत महोत्सव पार पडला. या विशेष महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी शास्त्रीय गायक आनंद गंधर्व - आनंद भाटे यांनी राग पुरिया धनाश्री रागामध्ये विलंबित व छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर त्यांनी ठुमरी व तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर केला. त्यांना तबल्यावर श्री. भरत कामत व संवादिनी वर श्री. सुयोग कुंडलकर यांनी समर्पक साथ केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पंडित अतुलकुमार उपाध्ये व श्री तेजस उपाध्ये यांनी राग किरवानी मध्ये झपताल व तीनताल मध्ये निबद्ध बंदिश सादर केली. त्यांना तबल्यावर दमदार साथ पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी केली. सदर व्हायोलिन वादनाने प्रेक्षकांस मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात श्री. चिराग कट्टी यांच्या सतार वादनाने झाली. त्यांनी राग पुरीया धनाश्री मध्ये आलाप, जोड व मध्य लय झपताल व चार ताल की सवारी या तालांमध्ये निबद्ध गत सादर केली. त्यांना तबल्यावर उत्तम अशी साथ श्री. अनुव्रत चॅटर्जी यांनी केली. या महोत्सवाचा समारोप तालऋषी पंडित अनिंदो चॅटर्जी यांच्या सोलो तबला वादनाने झाला. त्यांनी ताल तीनताल मध्ये फरुखाबाद, लखनौ व पंजाब घराण्याचे कायदे, बंदिशी व चक्रदार सादर केले. त्यांना श्री. समीर सूर्यवंशी यांनी तबल्यावर व श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर साथ संगत केली. पंडितजींच्या सोलो तबला वादनास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाला पु. ना गाडगीळ आणि सन्स व ताल परिक्रमा यांचे विशेष सहकार्य लाभले . लोकमान्य मल्टिपर्पज बँक, विलो पंप्स, ऑर्लीकोण बालझर्स, हॉटेल रत्नलोक आणि चितळे एक्सप्रेस हे सहप्रायोजक होते. कार्यक्रमामध्ये सर्वांतर्फे थोर संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या महोत्सवाचे सूत्रसंचालन श्रीमती माधवी तोडकर यांनी केले. या कार्यक्रमास पं विजय घाटे, पं रामदास पळसुले व अनेक मान्यवर उपस्थित होते. |
राज्यात नोंदणी व मुद्रांक विभागाचे किती प्रादेशिक विभाग आहेत, त्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत ? ।नाशिक,अहमदनगर,जळगाव,व धुळे (नंदुरबारसह) ।नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली,भंडारा (गोदीयासह) ।अमरावती,यवतमाळ,बुलढाणा व अकोला (वाशिमसह) ।लातूर,नांदेड, उस्मानाबाद व परभणी (हिंगोलीसह) प्रादेशिक स्तरावरील नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांची नावे, पत्ते, दूरध्वनी, ई मेल आयडी याची माहिती को�� े उपलब्ध होईल ? प्रादेशिक स्तरावरील नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांची नावे, पत्ते, दूरध्वनी व ई मेल आयडी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisationया सदराखाली Officesया �� िकाणी उपलब्ध आहेत. नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांमध्ये कोणत्या स्वरुपाचे कामकाज चालते? - नोंदणी उपमहानिरीक्षक हे त्या प्रादेशिक विभागाकरीता विभाग प्रमुख म्हणून काम करतात. - प्रादेशिक विभागातील सह जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण नोंदणी उपमहानिरीक्षकांकडुन � ेवले जाते. सह जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाच्या तपासण्या नोंदणी उपमहानिरीक्षकांकडुन केल्या जातात. - मुंबई वगळता, उर्वरीत प्रादेशिक विभागांचे नोंदणी उपमहानिरीक्षक हे त्या त्या प्रादेशिक विभागाकरीता मुद्रांक उपनियंत्रक म्हणून देखील काम करतात व त्या अधिकारात खालील कामे पार पाडतात. - मुद्रांक परताव्याबाबत रुपये 1 लाखावरील व 10 लाखापर्यंतचे परतावा मागणी प्रकरणांना मंजुरी देणे. - मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी मुद्रांक शुल्क आकारणी करतांना, निश्चित केलेले बाजारमूल्य पक्षकारांना मान्य नसल्यास,त्याविरुध्दचे अपील चालविणे. - मुंबई विभागामध्ये,मुद्रांक उपनियंत्रक पदाचे कामकाज अपर मुद्रांक नियंत्रक यांचेकडुन पार पाडले जाते. |
नवी दिल्लीः राम जेठमलानी यांनी आज खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच अप्रामाणिकपणाचा जाहीर ठपका ठेवल्याने राज्यसभेत एकच गदारोळ माजला. जेठमलानींच्या ताशेऱ्यामुळे खवळलेल्या भाजप सदस्यांनी त्यांना बोलूच न देण्याचा पवित्रा घेतला. या वेळी अनेक मंत्रीच गोंधळ घालताना पाहून राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी त्यांना पदाचा मान राखण्याबाबत वारंवार इशारा दिला. त्यानंतर त्यांनी जेठमलानींचे ते शब्दही कामकाजातून वगळले. जमीन किंवा सोन्याची खरेदी करून काळ्या पैशाला पळवाटा देण्याचे प्रकार बंद होण्यासठी सरकारने केलल्या काही कडक आर्थिक उपायांमुळे व रोखीने व्यवहार करण्यावर घातलेल्या विविध बंधनांमुळे हे प्रमाणही कमी झाल्याचे निरीक्षण जेटली यांनी नोंदविले. मॉरिशस, सिंगापूर व सायप्रसबरोबर करार करून केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या या मुख्य पळवाटाही बंद केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र 15-15 लाख रुपये बॅंक खात्यांवर जमा करण्याच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यापासून नरेंद्र मोदींच्या दाव्याचे काय झाले, या प्रश्नावर ते आजही निरुत्तर झाले. प्रश्नावलीतील 198 क्रमांकाच्या दुसऱ्याच प्रश्नावेळी ही जेटली-जेठमलानी चकमक झडली. मूळ प्रश्न राजीव गौडा यांचा होता. त्याला जेटली यांनी दिलेले उत्तर ऐकून जेठमलानी यांनी पूरक प्रश्नाच्या सुरवातीलाच शेरा मारला. त्यानंतर भाजपच्या खासदार व मंत्र्यांनी एकच गोंधळ सुरू केला. आनंद शर्मा यांच्यासह कॉंग्रेस सदस्यांनी या भाजप मंत्र्यांचे एकूणच वर्तन व त्यांची भाषा याबाबत तीव्र आक्षेप नोंदविले. त्यावर जेठमलानी यांचे असंसदीय शब्द अन्सारी यांनी तत्काळ कामकाजातून काढून टाकले व जेठमलानींना फक्त प्रश्न विचारण्यास सांगितले. मात्र नंतरही जेठमलानी यांनी टिप्पणी सुरू केल्यावर अन्सारी यांनी त्यांना परवानगी नाकारून पुढचा प्रश्न पुकारला. याच्या निषेधार्थ जेठमलानी सभात्याग करू लागताच जेटली यांनी स्वतःच उभे राहून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. जेठमलानी यांचा मूळ प्रश्न होता की स्विस बॅंकेत काळा पैसा दडविलेल्या 14 हजार भारतीयांची नावे जर्मन सरकारला माहिती झाली आहेत व त्यांनी ती भारताला देण्याचीही तयारी दाखविली आहे. यावर केंद्राने काय पाऊल उचलले? काय प्रतिसाद दिला? मात्र त्यांच्या "जेटली केंद्रित' शेरेबाजीने किमान पंधरा मिनिटे यावरून गदारोळ झाला. जेटली म्हणाले, की "एचएसबीसी' बॅंकेतील खात्यांपुरताच हा प्रश्न मर्यादित आहे. त्याचे जे तपशील सरकारला मिळाले त्या आधारे परदेशांत काळा पैसा दडविणाऱ्या 628 खातेधारकांची चौकशी केली. यातील काही खात्यांत पैसे ठेवलेले नव्हते. यातील 409 प्रकरणांचा तपास पूर्ण होऊन 837 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. लष्कर भरतीची प्रश्नपत्रिका पुणे केंद्रावर फुटल्या प्रकरणी 18 संशयितांना अटक केल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले. महंमद अली खान, दिग्विजयसिंह, संजय राऊत यांनी यावर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, की यंदा 26 फेब्रुवारीला ही कॉमन एन्ट्रन्स टेस्ट होणार होती. मात्र ठाणे पोलिसांनी घातलेल्या छाप्यांत हा पेपर फुटल्याचे उघड झाले. प्रश्नपत्रिका छापायला जातात तेथूनच या प्रश्नपत्रिकेला पाय फुटल्याचा संशय आहे. या प्रकाराची चौकशी मेजर जनरल पदावरील लष्करी अधिकाऱ्यामार्फत, तसेच सीबीआयमार्फतही केली जाणार आहे. मात्र यात लष्कराची गुप्तचर यंत्रणा साफ अपयशी ठरली नाही का, या राऊत यांच्या प्रश्नाला भामरे यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. ही प्रश्नपत्रिका पुण्याबरोबरच तत्कालीन संरक्षणमंत्र्यांचे गोवा व गृह खाते हाताळणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गाव नागपूर या तीन ठिकाणांहून फुटल्याचे राऊत यांनी सांगितले. |
क्रिकेटच्या मैदानावर धावांचे डोंगर उभे करणारा आणि आपल्या सर्वांच्याच हृदयामध्ये स्वतःसाठी एक प्रेमाचे आसन रोखून असलेला सचिन तेंडुलकर दोनशेवा कसोटी सामना खेळून अलीकडेच निवृत्त झाला. त्याचा एकेरी उल्लेख करावासा वाटतो, त्याला आदरार्थी बहुवचनाने संबोधणे कृत्रिम वाटते हे त्याच्याविषयी वाटणार्या जवळिकीमुळेच. आपल्या देशातील क्रिकेटची आत्यंतिक लोकप्रियता विचारात घेता त्याला भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान दिला गेला हे स्वाभाविकच होते. गेले काही आठवडे देशातील सर्वच वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या त्याचा भरभरून गौरव करत आहेत. त्याच्याविषयी इतके काही लिहिले बोलले गेले आहे, की त्याच्याविषयी आता वेगळे काय लिहायचे हा मोठा प्रश्नच आहे. या गौरवयात्रेतील मला स्वतःला भावलेली एक बाब म्हणजे काश्मिरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत संपूर्ण देश या सचिनसोहळ्यात सहभागी झाला होता. यात इंग्रजी माध्यमांचा पुढाकार मुद्दाम अधोरेखित करावा असा होता. 'टाइम्स ऑफ इंडिया' हे या देशातील अग्रगण्य वृत्तपत्र. गेले कित्येक दिवस त्याची पाने सचिनगौरवाने दुथडी भरून वाहत होती. आपली शेवटची खेळी खेळण्यासाठी सचिन जेव्हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उतरला, त्या दिवशी टाइम्सच्या पहिल्या पानावरचा ठळक मथळा होता - भारत बंद! आज सकाळी साडेनऊ वाजता सचिन जेव्हा मैदानावर पाय ठेवेल, तेव्हा आपले सर्व व्यवहार ठप्प करून देशातील जनता त्याच्या खेळीची प्रतिक्षा करत असेल, असे त्या मथळ्याचे स्पष्टीकरणही खालच्या ओळीत होते. इंग्रजी माध्यमे मराठीद्वेष्टी किंवा महाराष्ट्रद्वेष्टी आहेत असे माझ्या काही मित्रांना नेहमीच वाटत आले आहे. त्यांचा तो समज किती चुकीचा आहे हेदेखील उपरोक्त सचिनगौरवातून अप्रत्यक्षरीत्या सिद्ध होते. पण या सचिनगौरवातील मला भावलेले आगळेपण हे होते, की हा मुंबईत जन्मलेल्या सचिनचा मुंबईकरांनी केलेला किंवा मातृभाषा मराठी असलेल्या सचिनचा महाराष्ट्राने केलेला गौरव नव्हता, तर संपूर्ण देशाला ज्याने 24 वर्षे अपार आनंद दिला त्या 'भारतीय' सचिनचा संपूर्ण भारताने केलेला गौरव होता. आपले भारतीयत्व अधोरेखित करणार्या या आगळेपणाला आज मोठा व्यापक सामाजिक संदर्भ आहे. कारण देशाचे एकत्व किंवा अखंडत्व भविष्यातही सुरक्षित राहील की नाही, याविषयी शंका वाटावी, अशीच परिस्थिती हळूहळू निर्माण होत आहे - किंबहुना आपणच निर्माण करत आहोत. जॉन स्ट्रॅची नावाच्या एका वरिष्ठ इंग्रज अधिकार्याने भारतात अनेक वर्षे काढल्यानंतर सुमारे 100 वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते :'There was no such thing called India or Indians. There were Hindus or Muslims, Bengalis or Punjabis, Brahmins or Untouchables; but no Indians." त्याचे शब्द आपल्याला कितीही असत्य व अप्रिय वाटले तरी भारतासंबंधी अनेक पाश्चात्त्य विचारवंतांची हीच धारणा होती. ती खोटी ठरवण्याच्या जिद्दीनेच जणू स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक भारतीय नेत्यांनी राष्ट्रीय ऐक्य जोपासण्याचा, एकात्मता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हिंदीसारखी एखादी भाषा राष्ट्रभाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधींनी घेतलेले अविरत परिश्रम हा त्याच ऐक्यनिर्मितीचा एक भाग होता व स्वातंत्र्यपूर्व काळात त्या प्रयत्नांना थोडेफार यशही मिळू लागले होते. इंग्रजांसारखा परकीय शत्रू समोर असल्याने ऐक्यनिर्मितीला एक प्रकारे बळही लाभत होते; परका शत्रू समोर असताना आपापसातील भेद बाजूला ठेवून त्याच्याशी झगडणे काही काळापुरते तरी सुलभ बनते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इंग्रज गेले व त्याचबरोबर ऐक्यनिर्मितीची ती आचही दुर्दैवाने आटली. स्वातंत्र्यलढ्याच्या तालमीत तयार झालेले नेते सत्तेत होते तोवर देशाची एकात्मता आपण जवळजवळ गृहीत धरू शकत होतो; पण हळूहळू फुटीर प्रवृत्ती बळावू लागल्या, देशांतर्गत भेद पुन्हा डोके वर काढू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू मूळ अलाहाबादचे असले तरी कुठल्याही अर्थाने ते केवळ उत्तर प्रदेशाचे नेते नव्हते - त्यांच्या मते जे व्यापक देशहिताचे होते, त्यालाच त्यांनी प्राधान्य दिले. लालबहादूर शास्त्री किंवा इंदिरा गांधी यांच्याही बाबतीत तसे म्हणता येईल; फक्त आपल्या प्रांतापुरता असा त्यांनी कधीच विचार केला नाही. अर्थात तसा व्यापक विचार करणारे त्या काळात इतरही अनेक नेते होते. आज मात्र आपल्या अवतीभवती प्रामाणिकपणे बघितले तर काय चित्र दिसते? निवडणूक आयोगाची व्याख्या काहीही असो, थोड्याफार प्रमाणात राष्ट्रीय पक्ष म्हणता येईल असे फक्त काँग्रेस व भाजपा हे दोनच पक्ष दिसतात. त्यांनाही देशातील अनेक प्रांतांमध्ये केवळ नसतात अस्तित्व आहे. उदाहरणार्थ, तमिळनाडू किंवा बंगाल येथे त्यांना काहीही जनाधार नाही. एकेकाळी आंतरराष्ट्रीय अधिष्ठान असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला बंगाल व केरळव्यतिरिक्त कुठेही स्थान नाही. तीच गत समाजवादी पक्षंची. सर्वत्र स्थानिक अस्मिता कुरवाळणार्या स्थानिक पक्षांचाच वरचष्मा दिसतो. इंग्लंड वा अमेरिकेत जसे दोनच पक्ष आहेत व ते देशव्यापी आहेत, संपूर्ण देशाचा एकत्रित विचार करणारे आहेत, तसे चित्र आपल्याकडे नाही. हे झाले पक्षांच्या पातळीवर; नेत्यांच्या बाबतीत स्थानिकीकरण अधिकच तीव्र आहे. आपले नेहमीचे मतदारसंघ सोडून इंदिरा गांधी चिकमंगलूरमधून, जॉर्ज फर्नांडिस मुझफ्फरपूरमधून, कृष्ण मेनन मुंबईमधून वा अटलबिहारी वाजपेय लखनौमधून प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ शकत होते. तशी क्षमता असणारे, देशव्यापी प्रतिमा असणारे नेते आज फारसे कोणी नाहीतच. देशव्यापी सोडा, राज्यव्यापी नेतृत्वही आज दुर्मीळ झाले आहे. हे स्थानिकीकरण जीवनाच्या इतरही अनेक क्षेत्रांमध्ये दिसते. वृत्तपत्रांच्या आवृत्त्या वेगवेगळ्या शहरांमधून निघतात; कधीकधी वेगवेगळ्या उपनगरांपुरत्याही निघतात. त्यामुळे बहुतेकदा कोल्हापूरातील कार्यक्रमाची बातमी नाशिकच्या पेपरात नसते आणि नागपूरच्या कार्यक्रमाची बातमी नाशिकच्या पेपरात नसते आणि नागपूरच्या कार्यक्रमाची बातमी मुंबईच्या पेपरात नसते - मग तो कार्यक्रम कितीही उत्तम होवो अन् त्या प्रसंगी मांडले गेलेले विचार कितीही मोलाचे असोत. एखादा कार्यक्रम तुम्ही एखाद्या वृत्तपत्राच्या साहाय्याने केलात, तर त्याची बातमी शहरातील त्या वृत्तपत्रात एकवेळ येऊ शकेल, पण त्याच शहरातील अन्य वृत्तपत्रे मग त्या कार्यक्रमाची सहसा दखल घेणार नाहीत. कुठल्याच कार्यक्रमाचा राज्यव्यापी प्रभाव पाडणे आज खूप अवघड झाले आहे - राजव्यापी जनजागरण किंवा राज्यव्यापी कृती ही तर खूप पुढची बाब झाली. भावना भडकवणार्या व त्यामुळे तात्कालिक फायद्याच्या ठरणार्या भाषिक व प्रांतिक अस्मितांमुळे व्यापक एकात्मतेच्या भावनेला तडे गेले तर देशाचे विघटन होणेही अशक्य कोटीतले नाही. इतिहासाकडे नजर टाकली तर अशी अनेक उदाहरणे आपल्याला आढळतात. ऑस्ट्रिया व हंगेरी हे आज युरोपातील खूप छोटे देश आहेत, पण एकेकाळी त्यांचे मोठे साम्राज्य होते. अत्यंत सामर्थ्यशाली अशा सोव्हिएट युनियनचे विघटन होईल असे कोणाला वाटले होते? पण 1991मध्ये ते झाले व त्यातून 15 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. हे जगभर घडत आले आहे. विकीपिडियामधील नोंदीनुसार 1947 साली, म्हणजे आपण स्वतंत्र झालो त्यावेळी, जगात फक्त 76 देश होते; पण आज 2014 साली युनायटेड नेशन्समध्ये 193 स्वतंत्र देश आहेत. याचाच अर्थ, गेल्या 67 वर्षांत 117 नवे देश अस्तित्वात आले. हेच दुसर्या शब्दांत सांगायचे तर, जगातील आजचे 60 टक्के देश हे नवप्रस्थापित आहेत; भूतपूर्व देशांच्या विघटनातून ते निर्माण झाले आहेत. राष्ट्राचे अस्तित्व 'यावच्चंद्रदिवाकरौ' राहील असे नसते. 1948 साली संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. पण तत्पूर्वी भारतात सुमारे 550 वेगवेगळी संस्थाने होतीच. त्यांचे राजे वेगवेगळे होते, परंपरा वेगवेगळ्या होत्या, इतिहास वेगवेगळे होते. ब्रिटिशांचा एकछत्री अंमल स्थापन होण्यापूर्वी त्यांच्या आपापसात असंख्य लढाया होत असत आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हे राजे परकीयांची मदतही सर्रास घेत असत. इतिहासाचा कोणीही अभ्यासक सांगेल, की परकीय सत्ता भारतात पाय रोवू शकल्या, याचे एक मोठे कारण येथील राजवटींच्या आपापसातील लढाया हे होते. असे पुन्हा होऊ नये म्हणून आपण ऐक्यभावना जोपासली पाहिजे. काही विचारवंत असे होणार नाही याची ग्वाही देत भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा उल्लेख करतात. पण आजचे आपले देशांतर्गत जातिभेद, धर्मभेद, पंथभेद, भाषाभेद, प्रांतभेद बघितले तर या सांस्कृतिक ऐक्याविषयीही शंका वाटते. काही विचारवंत आय.ए.एस., आय.पी.एस. यांसारख्या मध्यवर्ती सेवांचा व एकूणच शासनयंत्रणेचा उल्लेख करतात. पण आपल्यापेक्षा अनेक पटींनी सामर्थ्यवान अशी नोकरशाहीची पोलादी चौकट सोव्हिएट युनियनमध्ये होती, एकपक्षीय राजवटीचे भक्कम पाठबळही त्या चौकटीला होते, पण तरीही सोव्हिएट युनियनचे विघटन टळले नाही. ही सगळी व्यापक ऐतिहासिक पार्श्वभूमी कधीकधी अस्वस्थ करते आणि म्हणूनच सचिन फक्त मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा न राहता सगळ्या देशाचा लाडक बनला याचे मोल खूप मोठे वाटते. अशा देशव्यापी मानबिंदूंची आज नितांत गरज आहे - मग हे मानबिंदू एखाद्या व्यक्ती असोत, संकल्पना असोत वा प्रकल्प असोत. विशिष्ट भागापुरत्या सीमित न राहता सर्व देशाला कवेत घेणार्या 'सचिन-सचिन'च्या वानखेडे क्रीडांगणावरील गर्जना म्हणूनच इतक्या रोमांचक वाटल्या. म्हणूनच सर्व देशाचा सहभाग हे सचिनगौरवतील आगळेपण इतके कौतुकास्पद वाटले. |
लातूर- स्थानिक स्वराज्य संस्थांचे होत असलेले बळकटीकरण व ग्रामविकासावर सरकार करत असलेली मोठी आर्थिक गुंतवणूक योग्य कारणी होते का, हे पाहणे गरजेचे झाले असून त्यासाठी आयसीएआयने नवीन सी. ए. झालेल्यांना वैद्यकीय सेवेच्या धर्तीवर ग्रामीण भागात एक वर्ष सेवा देणे अनिवार्य करावे, असे प्रतिपादन तेलंगण विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा उस्मानिया विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे विद्यमान अधिष्ठाता डाॅ. अकबर अली खान यांनी येथे केले. राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'सी.ए. व्यवसायातील आव्हाने व संधी' या िवषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डाॅ. गोपाळराव पाटील होते. आय.सी.ए.आय. वेस्टर्न रिजन मुंबईचे अध्यक्ष सी.ए. अनिल भंडारी, कॅनरा बँकेचे संचालक सी.ए. सुनील कोटेचा, प्राचार्य एस. बी. जाधव, डाॅ. ए. जे राजू, डाॅ. पी. एन. सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. खान म्हणाले, पंतप्रधान मोदींमुळे मोठी परकीय गुंतवणूक भारतात येत आहे. आर्थिक िवकास गतीने साधण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. अशा अवस्थेत प्रशासन व उद्योग-व्यवसायातील पारदर्शकता राहणे आवश्यक असून सेवेतील भ्रष्ट कार्यपद्धतीला बांध घालणे गरजेचे आहे. त्यासाठी सी.ए. महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थविश्वात जागतिकीकरणाने होत असलेला कायापालट व येत असलेल्या जबाबदाऱ्या, वेगवेगळे घोटाळे अशा भोवतालात सी.ए. चे महत्त्व अन् जबाबदाऱ्यांत वाढ झाली आहे. गुणवत्ता व लिखाण कौशल्यामुळे जगभरातून भारतीय सी.ए. ना मागणी आहे. २०३० पर्यंत प्रतिवर्षी साडेसात ते दहा हजार सी.एं. ची आवश्यकता देशाला भासणार अाहे. तथापि, देशात एकूण मागणीच्या दहा टक्केही चार्टर्ड अकाउंटंट आपण िनर्माण करू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सी. ए. अनिल भंडारी यांनी विचारातील सुस्पष्टता, कष्ट, प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीचा अंगीकार करून यशोशिखर गाठता येते हे उदाहरणासह पटवून दिले. डाॅ. पाटील, डाॅ. सगर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. |
CoronaVaccine News & Latest Updates : राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये शनिवारी एका गार्डला कोवॅक्सिन लस दिल्यानंतर त्याला एलर्जीप्रमाणे लक्षणं तीव्रेतेनं दिसून आली. त्यानंतर या गार्डला रुग्णालयात दाखल करावं लागलं. बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला काल देशभरात सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण अभियानाचा प्रारंभ केला. मात्र, लसीकरण मोहिमेनंतर कोरोना आटोक्यात येईल, असे नाही. त्यामुळे कोरोना लस घेतल्यानंतरही काही साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत. राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये शनिवारी एका गार्डला कोवॅक्सिन लस दिल्यानंतर त्याला एलर्जीप्रमाणे लक्षणं तीव्रेतेनं दिसून आली. त्यानंतर या गार्डला रुग्णालयात दाखल करावं लागलं. एम्स रुग्णालयातील प्रमुख तज्ज डॉ. रणदिप गुलेरिया यांनी सांगितले की, संध्याकाळी चार वाजता या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लस देण्यात आली होती. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी या गार्डच्या हृदयाचे ठोके वाढले होते याशिवाय शरीरावर लाल चट्टे उठले होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोविशील्डची निर्मिती ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटन-स्वीडनमधील फार्मास्युटिकल कंपनी ऍस्ट्राझेनेकानं मिळून केली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशील्ड लसीचं उत्पादन केलं आहे. कोविशील्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम अतिशय चांगले आहेत. या लसीचे दोन डोज अतिशय परिणामकारक असल्याचं सांगितलं गेलं. ब्रिटनमध्ये लसीच्या चाचण्या ९०-९५ टक्के प्रभावी ठरल्या. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या शरीरात अँटीबॉडी आणि व्हाईट ब्लड सेल्स (टी-सेल्स) विकसित झाल्या. कोविशील्ड लस मॉर्डना आणि फायझरच्या लसीपेक्षा बरीच वेगळी आहे. |
Assuming brother Profession CA alone, earning millions from animal husbandry business Read this Avaliya's abandoned success story । मानलं भावा! पेशाने CA मात्र, पशुपालन व्यवसायातून कमवतोय लाखों; वाचा या अवलियाची भन्नाट यशोगाथा । Farmer succes story\nHome कृषी मानलं भावा! पेशाने CA मात्र, पशुपालन व्यवसायातून कमवतोय लाखों; वाचा या अवलियाची...\nमानलं भावा! पेशाने CA मात्र, पशुपालन व्यवसायातून कमवतोय लाखों; वाचा या अवलियाची भन्नाट यशोगाथा\nFarmer succes story : शेती (Farming) आणि शेतीशी संबंधित शेती पुरक व्यवसायात (Agri Business) असंख्य शक्यता असून यामध्ये मोठी कमाई करण्याचे अनेकानेक चान्सेस आहेत.\nया शक्यतांचा शोध घेण्यासाठी आणि आपले उत्पन्न वाढावे यासाठी, विविध व्यवसायातील लोक आता शेती व शेतीपूरक व्यवसायात (Animal Husbandry) आपले नशीब आजमावत आहेत. फक्त नशीब आजमावत आहेत असे नाही तर अनेक लोक कठोर परिश्रम आणि समर्पणाने यश देखील मिळवत आहेत.\nविशेष म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाने आजच्या काळात तरुणाईही शेतीशी संबंधित व्यवसायाकडे आशेने बघत असून याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. आता शेती मधला तरुणाई वर्ग पारंपारिक पद्धतींपेक्षा काहीतरी जरा हटके करत आहे आणि इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनत आहे.\nअशीच एक व्यक्ती आहे नरेंद्र कुमार. मित्रांनो खरं पाहता नरेंद्र व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत मात्र ते पशुपालन व्यवसाय करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. नरेंद्र हे मूळचे बिहार (Bihar) येथील रहिवासी आहेत, परंतु गेल्या काही वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास असून दुग्धव्यवसाय करत आहेत.\nविशेष म्हणजे जनावरांसाठी ते चारा विकत घेत नाहीत तर स्वतः चाऱ्याचे उत्पादन घेतात. चाऱ्याचे उत्पादन देखील ते हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने घेत आहेत. एवढेच नाही नरेंद्र देशी गायींच्या संवर्धनावरही काम करत आहेत.\nसीए नरेंद्र कुमार हे मूळचे बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रुनी-सैदपूर तहसीलचे रहिवाशी आहेत आणि सध्या नोएडामध्ये वास्तव्यास असून त्यांची कंपनी चालवत आहेत. मित्रानो नरेंद्र CA चे यशस्वी व्यावसायिक जीवन जगत होते.\nमात्र कोरोनाच्या काळात नरेंद्र कुमार यांना शुद्ध देसी तूप आणि दूध मिळतं नव्हते. यामुळे त्याच्या मनात विचार आला की आपण स्वतःच काही तरी करावे म्हणजे देशी तूप आणि दुधासाठी भटकंती करावी लागणार नाही.\nया विचाराने त्यांनी स्वतःसाठी देशी गाय संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने त्यांनी पशुपालन सुरु केले आणि लवकरच त्यांच्या फार्ममध्ये गायींची संख्या वाढत गेली. आज नरेंद्रकडे गीर आणि साहिवाल जातीच्या अनेक गायी आहेत.\nदेशी गायींच्या संवर्धनासाठी पण काम सुरु\nउत्पादन वाढल्यावर ते दूध, तूप, दही विकू लागले. देशी गायींच्या उत्पादनांना शहरापासून ते तळागाळात असलेल्या खेड्यापाड्यांवर मोठी मागणी आहे आणि लोक त्यासाठी चांगली किंमतही देतात. नरेंद्र आज नोएडा-एनसीआरच्या अनेक भागात दूध, दही आणि तूप विकत आहेत.\nअलीकडे देशी गायींची संख्या कमी झाली आहे. अधिक दूध मिळावे या इच्छेने पशुपालक आता जर्सी आणि इतर गायींचे पालनपोषण करत आहेत. पण गुरेढोरे मालकांनी देशी गायींकडे वळावे अशी नरेंद्रची इच्छा आहे, म्हणूनच नरेंद्र देखील देशी गाईंचे संगोपन करणार आहेत.\nनरेंद्र म्हणतात की, देशी गाय कमी दूध देते, पण दुध हे गुणवत्तापूर्ण असते. गुणवत्तेला धक्का न लावता देशी गायींची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ते प्रोत्साहन कार्यही करत आहेत. यासोबतच देशी जातीचे चांगले नंदीही तयार केले जात आहेत.\nशुद्ध आणि देशी गाईचे दूध आणि त्याची उत्पादने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे नरेंद्र सांगतात. निश्चितच नरेंद्र यांनी शेतीपूरक व्यवसायात साधलेली प्रगती उल्लेखनीय असून इतरांसाठी मार्गदर्शक आहे. |
मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो. पणजी : मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो. तसेच आजच्या विद्यार्थ्यांनीही यापासून दूर रहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी येथे केले. सायबर एज योजनेखाली बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याच्या कार्यक्रमावेळी येथील संस्कृती भवनमधील सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते. सायबर एज योजनेखाली सरकार मुलांना जे संगणक किंवा लॅपटॉप देते, त्याचा गैरवापर ब्ल्यू फिल्म पाहण्यासाठी मुले करतात अशा प्रकारच्या बातम्या प्रारंभी यायच्या. ज्या विद्यार्थ्यांना ब्ल्यू फिल्मसारख्या गोष्टी पहायच्या असतात, त्यांना लॅपटॉपच हवे आहेत असे काहीच असत नाही. आम्ही शिकताना देखील काही टार्गेट मुले असायची. त्यावेळी लॅपटॉप वगैरे आलेच नव्हते. त्या काळातही ब्ल्यू फिल्मसह सगळ्या गोष्टी काही टार्गट मुलांमध्ये चालायच्या. मी आयआयटीत असतानाही तेच चालत होते. त्यासाठी संगणकाची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. सायबर एज योजनेखाली बारावीच्या आणि बारावी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. बुधवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पणजी परिसरातील पाच उच्च माध्यमिक विद्यालयांच्या पन्नास विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. सोशल मिडियाचा गैरवापर होत आहे. काही बुद्धीवादी कोणत्याही प्रकारची व चुकीची माहिती सोशल मिडियामधून पाठवत असतात. सोशल मिडियाला फिल्टर नसतो. विद्यार्थ्यांनी समोर येणारी माहिती फिल्टर करून मगच त्या माहितीचे ग्रहण करण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायबर एज योजनेखाली तुम्ही आम्हाला संगणक दिले होते, त्याचा चांगला वापर करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे मला काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी भेटून सांगितले आहे. ही योजना आणल्याचे सार्थक झाले असे मला त्यावेळी वाटले असेही मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांनी सायबर एज योजनेखाली लॅपटॉप मिळाल्यानंतर त्या लॅपटॉपची खुल्या बाजारात विक्री करू नये. आम्ही त्याविरुद्ध कारवाई करू, असा इशारा यावेळी शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिला. अशा प्रकारे लॅपटॉप खरेदी करणारेही अडचणीत येतील. आम्ही लॅपटॉप जप्त करू, असे भट म्हणाले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हेही व्यासपीठावर होते. त्यांचेही भाषण झाले. आधुनिक काळात प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक तांत्रिक ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन मंत्री खंवटे यांनी केले. गुगल सर्चमधून सगळे काही आरामात मिळत असले तरी, विद्याथ्र्यानी त्यांची वाचनाची सवय बंद करू नये, असेही खंवटे म्हणाले. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, माहिती व तंत्रज्ञान सचिव श्री. अभ्यंकर, संचालक श्री. झा हेही यावेळी व्यासपीठावर होते. |
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा सापांसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Snake Video) पाहून अनेकजण भडकलेही आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे, की असं करणं म्हणजे वेडेपणा आहे. सोशल मीडियाच्या जगात अनेकदा नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत राहतात. यातील अनेक व्हिडिओ असे असतात, जे पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही हैराण होईल. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा सापांसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Snake Video) पाहून अनेकजण भडकलेही आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे, की असं करणं म्हणजे वेडेपणा आहे. हा व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा आई-वडिलांनी आपल्या मुलांना अधिक जबाबदारीने सांभाळायला हवं, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काही सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून लोक थक्कही झाले आणि भडकलेही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा घरामध्ये उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये एक हिरव्या रंगाचा साप आहे (Kid Playing with Snake). तुम्ही पाहू शकता की हा साप त्याच्या पाठीवर तसंच डोक्यावर जात आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या मुलाच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाही. उलट हा मुलगा सापाला हातात घेऊन त्याच्यासोबत खेळत आहे. साप म्हणजे एखादं खेळणं असल्याप्रमाणे तो त्याच्यासोबत खेळत राहातो. हे पाहून कोणाच्याही काळजाचे ठोके चुकतील. हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे. लहान मुलगा आणि सापाचा हा हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर snake. _. world नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 14 जानेवारीला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा आकडा वाढतच आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून यूजर्स भडकले आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की साप एखादं खेळणं नाही, जे तुम्ही मुलांच्या हातात द्याल. आई-वडिलांनी मुलांच्या बाबतीत अधिक जबाबदार व्हायला हवं. एका यूजरचं असं म्हणणं आहे, की मला वाटतंय हा ग्रीन ट्री बोआ साप आहे. हे साप चावणारे असतात आणि एका मुलाला अशाप्रकारे सापासोबत खेळायला लावणं चुकीचं आहे. तसंही साप खेळायची वस्तू नाही. दुसऱ्या एका यूजरनं या मुलाबाबत काळजी व्यक्त करत लिहिलं, आई-वडिलांनी इतकं बेजबाबदार असू नये. हा साप विषारी नसला तरी मुलाला चावू शकतो. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. |
सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी अविरतपणे धडपडणारे कणखर नेतृत्व. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून छगन भुजबळ यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे. उपेक्षित, पददलित व मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही त्यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाचीच किमया आहे की. त्यांनी ३ वेळा महाराह्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहेत. मुंबईचे महापौर, महसूल, गृहनिर्माण, गृह, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षणीय राहिली आहे. |
Home / Maharashtra / एक चौथरा,तीन भिंती २२ लाख खर्च ;ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाला चुना लावण्याचा प्रताप....! एक चौथरा,तीन भिंती २२ लाख खर्च ;ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाला चुना लावण्याचा प्रताप....! वनविभागाच्या एकलक्ष वृक्ष लागवड सामाजिक वनिकरणाची चौकशी ससेमिरा सुरू असून यात अतंर्गत बंडाळीत तालुक्यातीस वनविभाग पोखरल्याचा फटका थेट जिल्हावनअधिकारी कोलेकर यांची चौकशी सुरु असतानाच प्रसिद्ध वनहुतात्मा स्मारकाच्या नांवे तीन भिंती एक चौथरा बनविण्यात येत त्यावर २२ लाखाची उधळण मुरबाड पुर्व वनविभागाने चालवली असल्याने केवल ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाला चुना लावण्याचा प्रताप सुरू आहे.ज्या वनकर्मचा-यांचा कामावर असतांना बळी गेला आहे त्याच्या नांवे ११सप्टेबरला महाराष्ट वनहुतात्मा दिन साजरा केला जातो जिल्हाभरात वनकर्मचारी बळी गेलेल्यात टोकावडे वनविभागातुन बळी गेलेल्या दोन घटना घडल्या होत्या त्यांचे ठाणेवन वृत्ताचे वनहुतात्मा स्मारक ठाणे येथे बांधण्यात येणार होते परंतु ते स्मारक मुरबाड मुरबाड पुर्व वनविभागाने ऑगस्ट महिण्यात बांधकाम सुरू केले आहे हे काम शिवशक्ती इटंरप्राईजेस बनवित आहे या वनहुतात्मा स्मारकांसाठी २२लाख रूपये निधी उपलब्ध असून केवळ या रक्कमेतुन एका तीन×सहा सिमेंटच्या चौथ-यां वर सहाफुट उंचीच्या तीन भिंती बांधकामावर २२ लाखाचा खर्च पाहता हे काम करताना याच काम आणी खर्च पाहता केवळ ठेकेदारी पोसण्यासाठी हा खटाटोप होत असल्याचा आरोप होतो आहे या बाबत या कामाची जबाबदारी असलेले मुरबाडपुर्व चे वनक्षेत्रपाल विकास भामरे यांनी सांगितले की हे काम अद्याप अपुर्ण असुन ह्यात ब-याच त्रृटी असल्याने ठेकेदारास रक्कम अदा केली जाणार नाही. |
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबरः अलीकडच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करताना (Investment in Gold) फिजिकल गोल्डमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी डिजिटल गोल्डचा विचार केला जातो. तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकार (Modi Government Scheme) सोन्यामध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देत आहे. सोमवारपासून पुन्हा एकदा तुम्हाला सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये पैसे गुंतवता येतील. सरकारी सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 (Sovereign Gold Bond Scheme 2021-22) चा आठवा हप्ता 29 नोव्हेंबरपासून ओपन होत आहे. काय आहे गोल्ड बाँडची किंमत? या हप्त्यासाठी सॉव्हरेन गोल्ड बाँडची किंमत 4,791 प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा (Buy Gold Online) वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. सरकारने रिझर्व्ह बँकेसह विचार विनीमय करून ऑनलाइन अप्लाय करणाऱ्यांसाठी आणि डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे पेमेंट्स केल्यास 4,741 रुपये प्रति ग्रॅमने रक्कम मोजावी लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ही माहिती दिली. ही योजना 29 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 3 डिसेंबर रोजी बंद होईल. बाँडसाठी अर्ज 29 नोव्हेंबरपासून पाच दिवसांसाठी देता येईल. सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. त्यामुळे यात सॉव्हरेन गॅरंटी असते. हे बाँड खरेदी करताना ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्याप्रमाणे मार्केटमध्ये सोने खरेदी करताना प्रक्रिया करावी लागते. 2015 मध्ये सरकारने सॉव्हरेन गोल्ड बाँड ही योजना सुरू केली होती. हे वाचा-पेट्रोलच्या किमती स्थिर मात्र अद्यापही शंभरीपार! प्रति लीटर किती किंमत? तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता. सॉव्हरेन गोल्ड बाँडची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीशी संबंधित असते आणि एक्सचेंजेसवर ट्रेडेबल असते. भौतिक सोने (Physical Gold) लॉकर इत्यादी सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे अशाप्रकारच्या सोन्याच्या चोरीची भीती देखील असते. परंतु SGB मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही ते लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च आणि चोरीचा धोका टाळू शकता. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
काय पहाल? वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत. मुख्य चार यात्रा(वार्या) चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात. आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ " आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात. "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपुर येथे सार्या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्यांना गोपालकाला वाटला जातो. कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो. माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात. |
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाईल असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावं लागेल, असे शाह म्हणाले. नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाईल असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावं लागेल, असे शाह म्हणाले. एम. जे. अकबर यांच्याविषयी पक्षाकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आहे. मी टू मोहिमेंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. यानंतर परदेशात असणाऱ्या अकबर यांना सरकारने ताबडतोब भारतात बोलावून घेतले. आज शनिवारी ते भारतात परतणार आहेत. आतापर्यंत पक्षाकडून अकबर यांच्यावरील कारवाईविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. शाह यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. अकबर मीडिया संस्थांमध्ये संपादक म्हणून काम करत असताना अनेक महिला पत्रकारांसोबत त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप काही महिला पत्रकारांनी केला आहे. अकबर यांचं नाव लैंगिक शोषणाच्या आरोपात पुढे आल्यानंतर भाजपवर पक्षांतर्गत तसेच विरोधकांकडूनही दबाव येत आहे. परिणामी या घटनेची गंभीर दखल भाजपला घ्यावी लागणार आहे. |
प्रथम श्री.अजित शिगम श्री. केशवराव मानकर (विधान सभेने निवडलेले) : सभापती महोदय, वि. स.वि. क्रमांक 13 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 यात आणखी सुधारणा करण्यासाठी जे विधेयक या ठिकाणी मांडण्यात आले आहे. त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. असुधारित प्रेत/ प्रसिद्धीसाठी ने सभापती महोदय, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना बंधपत्र सादर करण्याची मुदत 15 दिवसा ऐवजी 45 दिवसांची करण्यात येत असून ही चांगली गोष्ट आहे. कमी बंधनपत्र सादर करणे शक्य नसते म्हणून ही मुदत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे या विधेयकाचे मी स्वागत करतो. या विधेयकाच्या परिशिष्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सभेमध्ये आपले मत व्यक्त केलेले आहे ते प्रोसिडींगवर येणारच आहे. परंतु जे मत व्यक्त केलेले आहे ते मत उपनिबंधकाला सात दिवसाच्या आत राहत असेल तर त्याला सात दिवसाच्या आत उप निबंधकाकडे लेखी मत देता येणार नाही. हा कालावधी अत्यंत कमी आहे. त्याला मला विरोध करावयाचा आहे.. श्री.प्रकाश सोळंके : ज्याला विरोध करावयाचा असतो त्याने संस्थेच्या बैठकीमध्ये विरोध करावयाचा असून त्याची अधिक काळजी घेण्यासाठी लेखी स्वरुपात उप निबंधकाकडे देखील कळवावयाचे असते. श्री.केशवराव मानकर : सात दिवसाचे बंधन का घातले आहे ? प्रोसिडीगमध्ये तर मत नोंदवलेले आहे. कळविले नाही तरी त्यामुळे फरक पडत नाही. मिटींगमध्ये विरोध करुन प्रोसिडींग बुकमध्ये त्याचा विरोध नोंदविणे मात्र आवश्यक आहे. नंतर श्री. सरफरे |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'खईके पान बनारस वाला' हे गाणे ऐकले ही बिग बी अमिताभ बच्चन यांची आठवण येते. आता त्यांच्या याच गाण्यावर एका चिमुकल्याने डान्स केला आहे आणि डान्स पाहून बिग बीदेखील त्याच्या प्रेमात पडले आहे. त्यांनी चिमुकल्या डॉनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओतएक क्युट असा छोटा मुलगा आहे. जो आईच्या मांडीवर बसून अमिताभ बच्चन यांचे गाणे खईके पान बनारसवाला वर डान्स करताना दिसत आहे. मुलाचे एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत. व्हिडीओ पाहून अमिताभ यांनादेखील हसू आले. त्यांना 'हाहाहा... बेचारा. . पण खूप क्युट'. अशी प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिली आहे. अमिताभ यांचे चाहतेदेखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहर्यावर हसू फुलेल. याआधी अमिताभ यांनी आर्या नावाच्या गायिकेचे गाणे ट्वीट केले होते. अमिताभ यांनी केलेल्या ट्वीटमुळे आर्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. |
माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे. सेवाग्राम : माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे. माकडांमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात. काही वर्षांत माकडांनी शेताकडे व आसपासच्या गावांकडे धाव घेतली आहे. प्यायला पाणी, खायला अन्न आणि फळझाडे असतील अश्या ठिकाणी माकडे धुडगूस घालत आहेत. घरच्या अंगणात, गच्चावर तसेच परसबागेत अन्नधान्य वाळत घातले असल्यास विचारायलाच नको अशी परिस्थिती होऊन जाते. गावाकडेच नाही तर शेतातही माकडांची उच्छाद मांदला आहे. यात पिकांचे बरच नुकसान होत असते. शेतकरी सातत्याने माकडांना हुसकावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तराही माकडे जुमानताना दिसत नाही. त्यांनाही माणसांचे हाकलणे नित्याचे झाले असल्याने त्यांचा मुजोरपणा वाढला. आहे. महिलांवर तर अनेकदा ही माकडे हल्ला करीत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. यात लहान मुलांनाही धोका असतो. पूर्वी शेताच्या धुऱ्यावर शेतकरी अनेक प्रकारची झाडे लावत असे. यात आंबा, पेरू, जांभूळ आदी झाडांचा समावेश असायचा. परंतु याच झाडांवर माकडे उच्छाद मांडत असल्याने कंटाळून शेतकरी आता धुऱ्यावरील झाडे तोडत आहेत. यामुळे इंधनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न पडला आहे. (वार्ताहर) माकडांचा मोठा कळपच गावात किंवा शेतात शिरत असतो. संख्येने जास्त असलेली माकडे कुणालाही जुमानत नाही. त्यामुळे तसेच हाकलण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकरी व महिलांवर माकडांनी हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांना माकडांच्या मर्कटलीला पाहून आनंद होत असला तरी ही माकडे केव्हा हल्ला करतील याचा नेम नसतो. |
लेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी । Saamana (सामना) आधुनिक तंत्रज्ञान जगभरातील वेगवेगळी क्षेत्रं काबीज करत असतानाच संगीताचे क्षेत्रं तरी कसे मागे राहील? तसे पूर्वीपासूनच संगीतात यंत्रांचा वापर होत आला आहेच. वेगवेगळ्या चाली बनवण्यासाठी संगीतकारांना मदत म्हणून यंत्रे होतीच. वेगवेगळे आवाज एकत्र करणे, वेगवेगळ्या ट्रकवर रेकॉर्डिंग करणे अशी कामे यंत्रांच्या मदतीने होत आहेतच. मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर या क्षेत्रात वेगाने वाढत चालला आहे. गाण्यांच्या चाली बनवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वाढता वापर होत असून लवकरच हे तंत्रज्ञान स्वतःच गाणी लिहून त्यांना चालीदेखील लावायला सुरुवात करण्याची चिन्हे आहेत. तसे बघायला गेलो तर 1957 साली संगणकाच्या मदतीने पहिली चाल चाल रचण्यात आली होती. 'इलियाक स्वीट' असे नाव असलेल्या या संगीताच्या चालीला अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी 'इलियाक वन' संगणकाच्या मदतीने रचले होते. आयबीएमचे वॉटसन हे आर्टिफिशल इंटेलिजन्स मशीनदेखील या कामात तरबेज मानले जाते. संगीतकार एलेक्स डा किड्सचे गाणे 'नॉट ईझी' वॉटसनच्याच मदतीने तयार करण्यात आले आहे. या गाण्याला 2016 सालच्या टॉप गाण्यांमध्ये 40 वे स्थान मिळाले होते. वॉटसन एआय हे संगीताच्या जोडीलाच वर्तमानपत्रे आणि मासिकातले लेख वाचण्यासाठीदेखील सक्षम आहे, तसेच सोशल मीडियाच्या युजर्सच्या टाइमलाइन वाचून तो युजर्सचा मूड कसा आहे हेदेखील सांगू शकतो. याच तंत्राच्या मदतीने तो लोकांच्या आवडीच्या चाली तयार करण्यासाठी विविध बदल सुचवू शकतो. यूटय़ूबवरदेखील सध्या अनेक गायक आणि संगीतकार आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने स्वतःची गाणी तयार करून अपलोड करत आहेत आणि त्याला लोकांची चांगली पसंतीदेखील मिळते आहे. स्वीडनच्या केटीएच रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि लंडनच्या किंग्सटन युनिव्हर्सिटीने मिळून एक लोकगीत मशीन तयार केली आहे. या मशीनच्या मदतीने केवळ 14 तासांत एक लाख लोकगीतांच्या रचना तयार करण्यात यश आले. |
विकास मिरगणे। ठाणे : राज्यामध्ये शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा शंभुराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. परंतु, शंभुराज देसाई हे कधीतरी ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. शंभुराज देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासोबत सातारा जिल्ह्याचीही पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. परंतु, शंभूराज देसाई ठाण्याचे पालकमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये येताना दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, सध्या ठाण्याचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे करताना दिसून येत आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असताना त्यांना पालकमंत्री देण्यात आलं नाही याबाबत भाजपने सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या काही नेत्यांनी हे पालकमंत्री येत नाहीत, अशी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची यांच्याकडे देण्यात यावा, असा आग्रह भाजपचा असल्याचे समजते. |
मुंबई - लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीवर 75 टेक्क् परिणाम झाला. एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादकांनी केवळ 43 हजार 748 वाहनांची निर्यात केली. गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये 1 लाख 73 हजार इतकी वाहने निर्यात केली होती. या तीन महिन्यांमध्ये कंपन्यांच्या उत्पादनावर, त्याचबरोबर देशांतर्गत वाहतुकीवर परिणाम झाला होता. अर्थात, या काळात आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरही परिणाम झाला असल्यामुळे मिळालेल्या ऑर्डरही पूर्ण करता आल्या नाहीत. |
KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नातील 'मॅरीयाना ट्रेंच'आहे तरी काय? नाझिया नसीम, कौन बनेगा करोडपती सिझन १२ च्या १ कोटी जिंकणाऱ्या पहिल्या विजेत्या ठरल्या आहेत. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांनी पहिल्यांदा लाईफ लाईनचा वापर केला. १ कोटीचा प्रश्न हा त्यांच्यासाठी अतिटतीचा होता. या अवघड प्रश्नावर त्यांना उत्तर सुचेनासं झाल्यावर त्यांनी प्रश्न बदलायचा पर्याय निवडला. १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला नेमका प्रश्न कोणता होता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 'कॅथरीन सुलीवन'. कोण होत्या कॅथरीन सुलीवन? कॅथरीन सुलीवन ह्या अमेरिकेच्या माजी अंतराळवीर आहेत. सध्या त्या भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून काम करतात. ११ ऑक्टोंबर १९८४ साली 'स्पेस शटल' ह्या अवकाशयानातून अवकाशात जाणाऱ्या त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. याखेरीज त्यांच्या नावावर असणारा दुसरा विक्रम म्हणजे मॅरीयाना ट्रेंच भागात जाणे. मॅरीयाना ट्रेंच भाग 'चॅलेंजर डीप' म्हणूनही ओळखला जातो. ७ जून २०२० रोजी समुद्रातील ह्या सर्वात खोल भागात जाणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. आता प्रश्न कसा आहे की हा मॅरीयाना ट्रेंच काय आहे? तर, ट्रेंच म्हणजे खंदक! प्रशांत महासागरात मॅरीयाना बेट आहे. ह्या बेटापासून जवळपास २०० किलोमीटर दूर पश्चिमेकडे एक खंदक आहे. त्यालाच मॅरीयाना ट्रेंच म्हटलं जातं. शाळेत इतिहासात किल्ल्यांभोवती खंदकांमध्ये पाणी सोडून शत्रूला किल्ला ताब्यात मिळणं कसं अवघड करायचे हे वाचलं असेलच. हे किल्ल्या भोवतालचे खंदक मानवनिर्मित असतात. पण मॅरीयानासारख्या खंदकांचा विचार केला तर ते समुद्राच्या तळाशी नैसर्गिकरित्या तयार होतात. त्यांची निर्मितीप्रक्रिया समजून घेणं फार सोपं आहे. पृथ्वी ही Tectonic Plates म्हणजे सोप्या भाषेत भूखंडांपासून तयार झाली आहे, हे तर तुम्हाला माहित असेलच. हे भूखंड जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा एक भूखंड दुसऱ्या भूखंडाखाली जाऊन खंदक तयार होतात. मॅरीयाना ट्रेंचची निर्मिती ही अशाच प्रक्रियेतून झाली आहे. त्याचा आकार चंद्रकोरीसारखा आहे आणि तो चांगला २५५० किलोमीटर लांब, तर रुंदी ६९ किलोमीटर इतकी आहे. या मॅरीयाना ट्रेंचचा शोध सर्वात प्रथम १९५१ साली लागला होता. जेम्स कॅमेरॉन नावाचे एक साहसी आणि धाडसी चित्रपट निर्माते आहेत. मार्च २०१२ मध्ये त्यांनी Deep Sea Challenge स्वीकारले होते. मॅरीयाना ट्रेंचचा एकट्याने ११ किलोमीटर खोल प्रवास करून येणारे ते जगातली पहिली व्यक्ती ठरले आहेत. मॅरीयाना ट्रेंचमध्ये बुडी मारल्यावर जसजसे समुद्राच्या आत खोल जाऊ तसतसे तापमानात जलद गतीने घट होत जाते. तर पाण्याच्या दबावात प्रचंड वाढ होत जाते. हा दबाव ८ टन प्रती चौरस इंच इतका असतो. समुद्रसपाटीवर असणाऱ्या वातावरणीय दाबाच्या आठपट जास्त हा दबाव असतो. तर हा मॅरीयाना ट्रेंच साधारणतः किती खोल असेल असे वाटते? मॅरीयाना ट्रेंच साधारणतः किती खोल असेल याची आयडिया यावी म्हणून ही उदाहरणं बघा, जवळपास ९०० फूट इतक्या खोल समुद्रात समुद्रीजीवन निर्माण होते. उदाहरणार्थ मासे, प्रवाळ सारख्या गोष्टी. आण्विक पाणबुडी ८०० फूट खोलीपर्यंत जाऊ शकते. स्कूबा चालकांनी आजवर १०४४ फूट खोल जाण्याचा विक्रम केलेला आहे. समुद्राच्या आत ३३०० फूट खोलीपर्यंतच सूर्यकिरणे पोहचू शकतात. त्यानंतर फक्त अंधारच अंधार असतो. १९१२ मध्ये बुडालेले टायटॅनिक जहाज १२४६७ फूट खोल समुद्राच्या तळाशी आहे. समुद्राच्या २५२६२ फूट खोल भागात स्नेल मासा राहतो. जर माउंट एव्हरेस्ट समुद्रात उलटा केला तर तो २९०३२ फूट खोल बुडेल. मारियाना ट्रेंच, हा ३६०७० फूट खोल आहे! ! ! तर, हे आकडे आणि त्यांची तुलना पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मॅरीयाना ट्रेंचपर्यंत जाऊन परत जिवंत येणे ही काही साधी सरळ गोष्ट अजिबात नाहीये. कॅथरीन सुलीवन आणि जेम्स कॅमेरॉन ह्या साहसवीरांनी आपल्या जीवाची बाजी लाऊन हे धाडस करून दाखवले आहे. ही बाब कौतुकास्पद नक्कीच आहे. आपले विश्व हे आपल्याला माहित असलेल्या गोष्टींपेक्षाही बरेच मोठे, गूढ, विस्तारीत आहे. इथे प्रत्येक कणात निर्मिती आहे आणि ही निर्मिती डोळे दिपवणारी नक्कीच असेल या गोष्टीची तुम्हाला आता तरी खात्री पटली का? आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक कराः InMarathi. com । आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम । शेअरचॅट । Copyright © InMarathi. com । All rights reserved. |
नागपूर : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात नंबर वन होईल, अशी विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांसोबत बोलत होते. फडणवीस यांना दूरदृष्टी आहे. त्यांच्या नेतृत्वात मागासलेला विदर्भ, कोकण व मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. नागपुरातील मिहान प्रकल्पाला गती मिळेल. राज्याची आर्थिक प्रगती होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. देवेंद्रला राजकारणात मी आणले. त्याने स्वकर्तृत्वाने राज्याचे नेतेपद मिळविले. फडणवीस राज्याला स्थिर सरकार देतील. त्यांची कारकीर्द यशस्वी होवो, अशा आमच्या शुभेच्छा असल्याचे गडकरी म्हणाले. एकनाथ खडसे नाराज नाहीत. आज दुपारी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांनीच नेतेपदासाठी फडणवीस यांचे नाव सुचविले. गेल्या १५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल. विदर्भासाठी ही मानाची बाब ठरणार असल्याचे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी) |
CSK vs RCB Highlight: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनराईज हैदराबाद या दोन संघात अतिशय रंगतदार सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात मुंबईने हैदराबादचा १४ धावांनी पराभव केला. मुंबईचा यंदाचा हंगामातील हा सलग तिसरा विजय असून विजयासह मुंबईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनराईज हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने हैदराबादसमोर विजयासाठी निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्या १९३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. (Latest sports updates) मुंबईकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने १६ चेंडूत ३७ धावा चोपत स्ट्राईक रेट वाढवून दिला. हैदराबादकडून मार्को यान्सनने ४३ धावा देत २ गड्यांना बाद केलं. तर भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या. दरम्यान, १९३ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरूवातीलाच पडझड झाली. मागच्या सामन्यातील शतकवीर हॅरी ब्रूकला जेसन बेहरेनडॉर्फने ७ धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठी फार काही मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्याने ५ चेंडूत ७ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या एडम मार्करमने मयांक अग्रवालची चांगली साथ दिली. मात्र, दोघांमध्ये भागीदारी होत असताना कॅमरुन ग्रीनने ही जोडी फोडली. मार्करम २२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या क्लासेनने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. क्लासेनने मयांक अग्रवालची चांगली साथ दिली. मयंक अग्रवाल आणि हेन्रिक क्लासेन खेळत असताना हैदराबाद हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र दोघेही बाद झाल्याने सामना पुन्हा मुंबईच्या ताब्यात आला. अग्रवालने ४१ चेंडूत ४८ धावा केल्या. तर क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने चांगली गोलंदाजी करत आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. मुंबईने हा सामना १४ धावांनी जिंकला आहे. मुंबईकडून बेहरेनडॉर्फ, चावला आणि मेरिडिथने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर अर्जुन तेंडुलकर कॅमरून ग्रीनने प्रत्येकी १ गड्यांना बाद केलं. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
मुंबई : यंदा शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात (Dussehra rally) भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जे नेते सत्तेसाठी शिवसेना सोडून भाजपात गेले होते ते दसरा मेळाव्यात घरवापसी करण्याची शक्यता आहे. तसे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले. एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपमध्ये गळतीला सुरुवात झाली का? असा प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले की, खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तो त्यांचा दृष्टिकोन आहे. हा भाजप आणि राष्ट्रवादीतील मुद्दा आहे. त्याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. त्यांना राष्ट्रवादी जवळ का वाटली हा आमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. खडसे यांच्यानंतर काही नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलतील याकडे आपण लक्ष द्यावे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जे नेते सत्तेसाठी शिवसेना सोडून भाजपात गेले होते ते आता परत येणार का हे त्याच दिवशी स्पष्ट होईल. शिवसेनेची दारे सदैव खुली आहेत. असे म्हणत त्यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले. यावेळी ते म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे. मात्र आपल्यावर अन्याय झाल्याचं एकनाथ खडसे म्हणत आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच पुनर्वसन कस करायचं हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. याबाबत शरद पवार निर्णय घेतील. मंत्रिपदाची अदलाबदल करून त्यांना कृषिमंत्रिपद देण्यात येणार असा कुठलाही आमच्यापर्यंत आलेला नाही. कृषिमंत्रिपद सध्या शिवसेनकडे आहे. सध्याची परिस्थिती बघता कृषिमंत्री दादा भुसे उत्तम काम करत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सध्यातरी यावर चर्चा नाही असे म्हणत त्यांनी एकप्रकारे कृषिमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार हे विरोधकांना पटले आहे. हे सरकार १ महिनाही चालणार नाही, असा दावा विरोधक करत होते. मात्र काही दिवसातच या सरकारचे १ वर्ष पूर्ण होणार आहे, असेही ते म्हणाले. भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत भाजपला खडे बोल सुनावले. आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकात 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा' अशी घोषणा वाचली होती. त्याप्रमाणाचे आता भाजप 'तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें' असा नारा देत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. यापूर्वी जातीधर्माच्या मुद्द्यावरून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न झाला. आता भाजपला लसीच्या मुद्द्यावरून देशाचे विभाजन करण्याची तयारी सुरु आहे का? भाजपला मत न देणाऱ्यांना कोरोनाची लस देणार नाही, अशाप्रकारचे राजकारण क्रुरता आहे. मध्य प्रदेशातही भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि जे.पी. नड्डा यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत मिळणार किंवा नाही, हे स्पष्ट करावे, असेही राऊत यांनी म्हटले. |
संपूर्ण जगात आतापर्यंत ४७ कोटी ९० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ६० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवी दिल्ली - गेल्या २ वर्षापासून जगात कोरोना महामारीमुळे अनेक देशांत चिंतेचे वातावरण पसरलं होतं. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी जारी केली आहे. २१ मार्च ते २७ मार्च काळात कोरोना रुग्णांचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी झाले आहे. परंतु मृतांचा आकडा ४३ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र त्यामागचं कारण वेगळं आहे. भारतात झालेल्या मृतांचा आकडा आता अपडेट केल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढले आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत नोंदलेल्या १६ जुन्या मृत्यूंची भर पडली आहे, त्यामुळे मृत्यूंचा आलेख वाढला असून भारतात गेल्या २४ तासांत म्हणजेच २९ मार्च रोजी ३१ मृत्यूची नोंद झाली आहे, मात्र २४ तासांत १५ नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. त्याच वेळी, अमेरिका आणि चिलीमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृतांची संख्या आता वेगळ्या पद्धतीने मोजली जात आहे, ज्यामुळे तिथून मृत्यूची संख्या वाढत आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ४७ कोटी ९० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ६० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्यात कोरियामध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली, कोरियामध्ये २४ लाख ४२ हजारांहून अधिक नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली, तर जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे सुमारे १६ लाख रुग्ण नोंदवण्यात आली. गेल्या आठवड्यात चिलीमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अहवालानुसार, चिलीमध्ये ११ हजार ८५८ मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच अमेरिकेत ५ हजार ३६७ मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक मृत्यूंची नोंद असलेल्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता, तेथे ४ हजार ५२५ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे, कोरोना विषाणू वेगाने पसरत असल्यानं ही आकडेवारी समोर आल्याचा इशारा WHO ने दिला आहे. कारण प्रत्येक देशात चाचणी कमी होत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, हे आकडे चुकीचे सिद्ध होऊ शकतात. कारण कमी चाचण्यांमुळे कोरोनाच्या प्रार्दुभावाचे योग्य चित्र समोर येत नाही. |
दिमित्री पायेतच्या गोलच्या जोरावर यजमान फ्रान्सने युरोपियन चषक स्पर्धेत रोमानियावर २-१ने मात करून विजयी सलामी दिली. पॅरिस : दिमित्री पायेतच्या गोलच्या जोरावर यजमान फ्रान्सने युरोपियन चषक स्पर्धेत रोमानियावर २-१ने मात करून विजयी सलामी दिली. फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी हजेरी लावली. या स्टेडियमवर गेल्या १४ नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पूर्वार्धात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. उत्तरार्धात फ्रान्सने जोरदार आक्रमण केले. पायेत याने दिलेल्या पासवर आॅलिवियर गिरोड याने ५७व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर रोमानियाच्या बोगडान स्टांकू याने ६५व्या मिनिटाला संघाला बरोबरी साधून दिली. सामना बरोबरीत सुटेल असे वाटत असताना ८९व्या मिनिटाला पायेत याने २५ मीटर अंतरावरून निर्णायक गोल केला. |
नवी दिल्ली, 2 मेः मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या शेवटपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये मुंबईचा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) अखेर सर्वांवर भारी पडला. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं मुंबईसमोर 219 रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 10 ओव्हरमध्ये पोलार्ड बॅटींगला आला. त्यावेळी मुंबईची अवस्था 3 आऊट 81 होती. पोलार्डनं मैदानात उतरताच मॅचची सर्व सूत्र हाती घेतली. त्यानं फक्त 17 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं. या आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा विक्रमक त्यानं मोडला. पृथ्वीनं कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते. अर्धशतकानंतरही पोलार्ड थांबला नाही. त्यानं 34 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली, यामध्ये त्याने 6 फोर आणि 8 सिक्स मारले. तब्बल 255. 88 च्या स्ट्राईक रेटने पोलार्डने बॅटिंग केली. तो अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देऊनच ड्रेसिंग रुममध्ये परतला. पोलार्डचं या विजयानंतर ड्रेसिंगरुममध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. पोलार्डही यामुळे चांगलाच खूश झाला होता. त्यानं सहकाऱ्यांची गळाभेट घेत विजयाचा आनंद साजरा केला. या सर्व प्रसांगाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सनं त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. चेन्नई विरुद्धच्या ऐतिहासिक खेळीनंतर पोलार्डनं सर्व आयपीएल टीमना एक गंभीर इशारा दिलाय. "आम्हाला कमी समजू नका. आम्ही हे पूर्वी केलं आहे आणि यापुढेही करु कुणी काहीही म्हंटल तरी. . . " या शब्दात पोलार्डनं सर्व टीमना इशारा दिला आहे. IPL 2021: 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नरवर 'ही' नामुश्की का आली? कायरन पोलार्ड हा 2010 पासून मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. त्यानं 171 आयपीएल मॅचमध्ये 150. 87 च्या स्ट्राईक रेटनं 3191 रन काढले आहेत. यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश असून नाबाद 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचबरोबर पोलार्डनं 8. 83 च्या इकॉनॉमी रेटनं 63 विकेट्स घेतल्या आहेत. नियमित कॅप्टन रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीमच्या नेतृत्त्वाची धुरा देखील पोलार्डनं सांभाळली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप, शिवसेना, रासप आणि रिपाई (ए) या महायुतीसोबत रहाणार आहे. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्या देवींचे आशीर्वाद घेऊनच राज्यकारभार सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही जातीपातीला थारा न देता महायुतीला मतदान करावे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताकदीची भाजपला जाणीव आहे. रासपचा योग्य जागा देऊन सन्मान केला जाईल. इतर मागासवर्ग, दलित, आदिवासी आदी समाजावर अन्याय अत्याचार केले. धनगर समाजाच्या आरक्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे नामदार महादेव जानकर यांनी उपस्थित समाज बांधवाना सांगितले. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष 27 राज्यात पसरला असून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या चार राज्यात रासपला पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या ताकदीचा विचार करून आम्हाला जागा द्या, अशी मागणी नामदार जानकर साहेबांनी पंकजाताई मुंडे याच्याकडे केली. तसेच आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे घोषीत केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी महामंडळाचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब दोडतले म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्यातील पाच नंबरचा पक्ष आहे. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप, शिवसेना नंतरचा तिसरा पक्ष म्हणून उदयास येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत जीवाचे रान करून पक्षाच्या उमेदवाराचे काम करावे, असे राज्यमंत्री दोडतले यांनी सांगितले. नामदार महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाचा 80 टक्के प्रश्न सुटला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळाला मागताक्षणीच 1000 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार पंकजाताई मुंडे, नामदार महादेव जानकर यानी केली असल्याचे राज्यमंत्री दोडतले यांनी सांगितले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनाला अभिनेता संजय दत्त यांनी व्हिडिओ वरून शुभेच्छा दिल्या. तसेच रासपच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यात ताकद वाढली आहे. पक्षाचे 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनेक नगर पालिका बाजार समित्या रासपच्या ताब्यात आहेत. पक्षाच्या ताकदीचा विचार करूनच भाजपकडे 57 जागांची मागणी केली असल्याचे नामदार महादेव जानकर यांनी उपस्थित जनसमुदायास सांगितले. |
Capricorn Horoscope Today 10th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. घरोघरी हवन, पूजा, पाठ आदींचे आयोजन केले जाईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील काही अडचणींसाठी त्यांच्या मित्रांची मदत घेतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. तुम्ही लवकरच तुमचे घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्याची तयारी सुरु करु शकता. तुम्हाला जर नवीन वास्तू घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा शुभ दिवस आहे. तुम्ही तयारी सुरु करु शकता. आज तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीचा पुरेपूर फायदा मिळेल. काही काळ धार्मिक कार्यक्रमामध्ये राहिल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल. सासरच्या मंडळींकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जोडीदाराबरोबर हा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. भावंडांच्या बाबतीत तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील. संध्याकाळी तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी एकांतात शांत संगीत ऐका. यामुळे तुम्हाला काही काळ प्रसन्न वाटेल. श्वासोच्छवासावर आधारित योगाभ्यास करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ) महत्त्वाच्या बातम्या : |
इस्लामपूर : कोरोनाचे उपचार सुरू असताना, मृत्यू झालेल्या भावाच्या उपचाराची फाईल मागण्यासाठी गेलेला मृताचा भाऊ आणि त्याच्या मित्राला डॉ. सचिन सांगळूरकर, त्यांची पत्नी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना दुपारी दीडच्यासुमारास घडली. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याबाबत मृताचा भाऊ गणेश वसंत पाटील (३८, रा. कापूसखेड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांचे भाऊ धोंडीराम पाटील (वय ४२) यांच्यावर डॉ. सांगळूरकर यांच्या रुग्णालयात १५ एप्रिलपासून उपचार सुरू होते. मात्र २ रोजी त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाटील कुटुंबाने या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दुपारी गणेश पाटील हे रामदास कचरे या मित्रासोबत भावावर झालेल्या उपचाराची फाईल मागण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी तेथे असणाऱ्या डॉ. सचिन सांगळूरकर, त्यांची पत्नी आणि कर्मचाऱ्यांनी 'कसली फाईल आम्हाला माहीत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा' अशी उद्धट भाषा वापरत शिवीगाळ आणि दमदाटी केली. दरम्यान, डॉ. सांगळूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गणेश पाटील, शाकीर तांबोळी, सनी खराडे, चंद्रकांत पाटील, रामदास कचरे, रूपाली पाटील आणि इतर ५०-६० जणांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय सेवेत अडथळा निर्माण केला. तसेच कोविड नियमावलीसह जमावबंदी, संचारबंदीचा भंग केला. |
वनरोपवाटिका व्यवस्थापन - (भाग - ७) वनरोपवाटिका म्हणजे काय ? वनरोपवाटिका म्हणजे असे क्षेत्र कि, जेथे उत्तम प्रतीचे व निरोगी वनझाडांची रोपे तयार करून, ती लागवाडी योग्य होण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी व व्यवस्थापन केले जाते. वनरोपवाटिकेमध्ये प्रत्यक्ष बी रोपण, छाटापासून आणि वनस्पतीच्या विविध भागापासून तयार रोपांचे स्थानांतर करून रोपे निर्मित केली जाते. उत्तम प्रतीच्या रोपवाटीकेसाठी तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले वाफे, खते, पाणी देण्यासाठी आधुनिक पद्धती, मशिनरी, अवजारे, भांडार, कर्मचारी वसाहत, कुंपण रस्ता इ. गोष्टी आवश्यक असतात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रोपवाटीकेचे दोन प्रकार पडतात. शुष्क रोपवाटीका व पाण्याची उपलब्धता असलेली रोपवाटिका : शुष्क वनरोपवाटीकेमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी केला जातो. शक्यतो पावसाचे आगमन होण्यापूर्वी बियाणे वाफ्यावरती पेरले जाते. या वाफ्यांना इतर कोणतेही संरक्षण, पाणी व्यवस्थापन केले जात नाही. पाण्याची उपलब्धता असलेली रोपवाटिका : या रोपवाटिकेत कृत्रिमरित्या पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन करून रोपे तयार केली जातात. या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाची रोपे होतात. पाण्याच्या नियोजनामुळे खत, तण व्यवस्थापन करणेही सोपे होते. या रोपवाटीकांच्या उपयोगानुसार त्यांचे दोन प्रकार पडतात. तात्पुरत्या स्वरुपाची रोपवाटिका : या रोपवाटीकेमध्ये साधारणतः एक ते दोन वर्षांपर्यंत रोपांची वाढ केली जाते. त्यामुळे कोणत्याही कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज नसते. त्यामुळे ही रोपवाटिका शक्यातो जास्त लागवड करणाऱ्या क्षेत्रापाशी केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खर्च वाचण्यास मदत होते. कायम स्वरुपाची रोपवाटिका : सर्व सोयींयुक्त मध्यवर्ती ठिकाणी ही रोपवाटिका असते या रोपवाटीकेसाठी योग्य ती आणखी, रस्ते, देखदेख, वाफे, पाणी व्यवस्थापन, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, खत निर्मिती, बियाण्यांसाठी भांडार, हत्यारे, इ. गोष्टी कराव्या लागतात. या रोपवाटिका मुख्य रस्त्यालगत असतात व त्यासाठी कायमस्वरूपी कुंपण केलेले असते. वनरोपवाटिकेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. बियाणे साठविण्यासाठी कंटेनर, पेरण्यासाठी वेगवेगळे कंटेनर, बियाणे सुप्तावस्था मोडण्यासाठी संप्रेरके, रसायानांचा वापर, पाण्यासाठी मायक्रोस्प्रीन्कलर, फॉगर, खते, सेंद्रियखते , इ. प्रभावी व्यवस्थापन करून आपण रोपवाटिकेचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो. रोपवाटीकेसाठी संग्रहित केलेले बियाणे कसे साठवावे ? आवश्यक असलेल्या प्रजातीचे बियाणे जमा केल्यानंतर ते चांगले वाळवून त्यास बुरशीनाशकांद्वारे संस्करण करून साठ्विल्यास बुरशी रोगापासून बचाव होऊ शकतो. चांगल्या प्रजातींचे बियाणे जमा केल्यानंतर ते चांगले वळवून त्यास कपटन, बाविस्टीन, डायथेन एम-४५ इ. बुरशीनाशकांद्वारे संस्करण करून साठ्विल्यास बुरशी रोगापासून बचाव होऊ शकतो. रोपवाटीका तयार करतांना बियाणांस संस्करण करणे आवश्यक असते का ? बऱ्याच वनस्पतींची बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी बियाणे संस्करण करण्याची गरज पडते. बियाणे संस्करण करण्यासाठी वनरोपवाटीकेत कमीखर्चाच्या पध्दती वापरल्या जातात. यात गरम पाणी, कोमट पाणी, चोळणे, घासणे, आपटणे, शेणात ठेवणे इ. पद्धती मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. याशिवाय काही ठराविक वृक्षांसाठी आम्लधर्मी रसायने, जीएसारखे संप्रेरके, काही यंत्र इ. गोष्टी वापरल्या जातात. रोपवाटिकेत सावलीची आवशकता : बियाणे उगवल्यानंतर रोपांचे ऊन, पाऊस, वारा, थंडी, इ. गोष्टीपासून बचाव होण्यासाठी निवारा किंवा सावली करणे आवश्यक असते. सावलीसाठी गावात, बांबूच्या पट्ट्या नारळाच्या झावळ्या, झाडांचा पाला, प्लास्टिक, शेडनेट इ. गोष्टी वापरतात. ५०-१०० % प्रकाश देणाऱ्या जाळ्या प्रजातीनुसार वापरता येतात. खतांची आवशक्ता :- शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, तसेच शुद्ध रोपापोटी झाडे चांगली वाढती, दर्जेदार रोपांसाठी मातीची सुपिकता वाढविणे रोपवाटिकेत आवश्यक असते. त्यासाठी मातीत कुजलेले शेणखत, जंगलामधील जमिनीच्या वरच्या थरातील कुजलेला पालापाचोळा, हिरवळीचे खत, गांडूळ खत, इ. गोष्टींचे अंतर्भाव करणे आवश्यक असते. त्यासाठी रोपवाटिकेबरोबरच नैसर्गिक खतनिर्मिती प्रकल्प उभारणी केल्यास रोपवाटिकेमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. शेवरी सारख्या हिरवळीची खते देणाऱ्या पिकांची लागवड नर्सरीच्या बांधावर कडेने केल्यास तण नियंत्रणाला मदत होईल व खतही मिळेल. कीडा व रोग व्यवस्थापन - चांगली दर्जेदार रोपे निर्मितीचा उद्देश ठेवून लागवड क्षेत्रासाठी रोपे बनविली जातात. तथापि रोग, किडी इ. गोष्टींमुळे रोपे दर्जेदार होऊ शकत नाही. वाळवी, पाने कुरतडणाऱ्या अळया, अन्नद्रव्य शोषणाऱ्या किडी, मुंग्या इ. मुळे रोपवाटीकेत मोठे नुकसान होते. यासाठी रोपवाटिका स्वच्छ असणे आवश्यक असते. सागाची रोपवाटिका : सागाची नर्सरी करण्यापुर्वी चांगले गुण असलेले म्हणजे खोड सरळ, मोठी पाने, टिकाऊ लाकुड, रोग कमी असलेली झाडाची निवड करूनच अश्या झाडांची बियाणे गोळा करावे. अशा निवडलेल्या झाडांना 'प्लस ट्री' असे म्हंटले जाते. सागाचे बियाणे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत परिपक्व होते. बियाणे गोळा करून पक्क्या जागेवरती पसरवून वाळवावे. वाळवत असताना बियाणे हलवून देणे आवश्यक असते. सागाच्या बियाचे कवच टणक असल्याने त्यासाठी बियाणे संस्करण करणे आवश्यक असते. त्यासाठी बियाणे शेणामध्ये टाकून उन्हात वाळवावे. कवच मऊ करण्यासही बियाणे काही ठिकाणी काठीच्या सहाय्याने झोडपले जाते. प्रक्रिया केलेले बी रोपवाटिकेत गादीवाफ्यावर मे महिन्यात पेरावे. दोन ओळीतील व रोपांतील अंतर साधारणतः १० ते १५ सेमी. खोलीवर पेरावे. बियाणे जास्त गर्दीने पेरू नये, त्यामुळे प्लास्टिक पिशवीत सुद्धा पेरता येते. बियाणे पेरण्यापुर्वी मातीमध्ये २ः१ः१ अशा प्रमाणात माती, वाळू व कुजलेले शेणखत चांगले मिसळून त्यात कीड प्रतिबंधक करंज पेंड किंवा निंबोळी पेंड मिसळावी. गादीवाफे जास्त पावसाच्या प्रदेशात केले जातात. गादीवाफ्यावर ठेवलेली रोपे व्यवस्थित पुढील पावसापर्यंत तशीच ठेवली जातात. त्यानंतर धारदार कात्रीने सोटमुळे व केसासारखी बारीक उपमुळे छाटून टाकतात. खोडाचा १ ते २ सेमी पर्यंतचा भाग काढून टाकतात. अंतराच्या तुकडयालाच 'साग्जाडी' असे म्हणतात. सागजाड्या करते वेळी मुळाची जाडी हाताच्या अंगठ्याच्या आकाराची असणे आवश्यक असते. अशा तयार केलेल्या 'सागजाड्या' प्रत्यक्ष रोपवन क्षेत्रामध्ये लागवडीच्या ठिकाणी नेवून लागवड केली जाते. सागाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. यात पिशवीत केलेल्या रोपापासून व सागजाड्यापासून आपण लागवड करू शकतो. |
संजय दत्त म्हणतो, प्रतिमा बदलण्यासाठी कुणीच २५-३० कोटी खर्च करणार नाही! 'संजू' हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. या आरोपावर संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे? 'संजू' हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी ठरला होता. पण या भूतकाळावर पडदा टाकून फक्त त्याच्या मेकओव्हरची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आलीय, असा जाहीर ठपकाही ठेवला गेला आहे. या आरोपावर खुद्द संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे? एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजयने या प्रश्नाचे उत्तर दिले. राजकुमार हिराणींनी जनमानसातील तुझी प्रतिमा बदलण्यासाठी 'संजू' काढला, या आरोपावर तू काय म्हणशील, असा प्रश्न संजयला यावेळी करण्यात आला. यावर संजयने थेट बोलणे टाळले. कुणीच जनमानसातील प्रतिमा बदलण्यासाठी २५ ते ३० कोटी रूपये खर्च करणार नाही, केवळ एवढेच तो म्हणाला. संजय दत्त एक चांगला माणूस आहे. त्याच्याकडून काही चूका झाल्यात. पण म्हणून तो वाईट नाही, असेही संजय दत्त या मुलाखतीत म्हणाला. एक काळ असा होता, ज्यावेळी मी आत्महत्येचा विचार केला होता. पण मी त्यातून बाहेर पडलो. तुरुंगातील त्या दिवसांनी माझ्यात प्रचंड बदल घडवलेत. आता मी कमालीचा धार्मिक झालो आहे. ऋग्वेद, शिवपुराण, सामवेद आदी धार्मिक ग्रंथ मी वाचलेत, असे संजयने सांगितले. 'संजू' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर 'संजू'चे चाहते आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी उडत आहेत. दुसरीकडे या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर सगळ्या सिनेमांना मागे टाकत जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. |
शिर्डी विधानसभा आढावाः विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज? शिर्डी विधानसभा आढावाः विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज? अहमदनगर - विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. गेल्या ५ वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडल्याने शिर्डी विधानसभा मतदारसंघात राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा आणि विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन राधाकृष्ण विखे पाटील भाजपत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा पराजय करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. शिर्डी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांसमोर कडवं आव्हान देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेची निवड करण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत विखे पाटील मोदी लाटेतही ७० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा त्यांनी पराभव केला. विखे पाटील आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने सत्यजित तांबे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. तांबे यांनी शिर्डी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मुलाखतही दिली. शिर्डी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांसमोर कडवं आव्हान देण्यासाठी तांबेची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णतः खिळखिळी झाल्याने विखेंचं पारड जड असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले. यावेळी भाजप-शिवसेना युती झाली, तर ही जागा शिवसेनेकडे असल्याने विखे पाटील तिकीट मिळवण्यासाठी यातून कसा मार्ग काढतात ते पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे. युती झाली नाही, तर मात्र विखेंसमोर शिवसेनेचे मोठे आव्हान असणार आहे. - साईबाबा संस्थानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याची मागणी. - शिर्डीतील वाढलेली गुन्हेगारी. - कोणतेही मोठे उद्योग नसल्याने बेरोजगारीची वाढती समस्या. - निळवंडे लाभधारकांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी अपूर्ण कालव्यांची कामे मार्गी लावणे. - शिर्डीतील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन प्रकल्प आणणे. - शिर्डी विमानतळ येथे सुविधा उपलब्ध करुन देणे. |
Sharmila Tagore summoned saif on taimur security । नातू तैमूरच्या सुरक्षेविषयी आजीला वाटतेय चिंता, सैफ अली खानला घरी बोलावून दिल्या सुचना - Divya Marathi\nSharmila Tagore Summoned Saif On Taimur Security\nनातू तैमूरच्या सुरक्षेविषयी आजीला वाटतेय चिंता, सैफ अली खानला घरी बोलावून दिल्या सुचना\nएन्टटेन्मेंट डेस्क. शर्मिला टागोर आपला नातू तैमूरच्या सिक्योरिटीसाठी टेंशनमध्ये आहे. पटौदी कुटूंबाशी संबंधीत असलेल्या सूत्रांनुसार, शर्मिला यांनी तैमूरच्या सुरक्षेविषयी बोलण्यासाठी सैफ अली खानला घरी बोलावले होते. शर्मिला टागोर या सैफ किंवा सोहाच्या वयक्तिक आयुष्यात कधीच दखल देत नाहीत. पण तैमूरविषयी त्यांना जास्त काळजी वाटते. तैमूर ज्या वेगाने लाइमलाइटमध्ये आला आहे, ते पाहून तैमूरची सुरक्षा वाढवण्यात यावी असे वाटते. कारण असे केल्याने तो नॉर्मल आयुष्य जगू शकतो.\nतैमूरच्या प्रसिध्दी अशी की, त्याच्यासारखी डॉल बाजारात\nनुकतीच तैमूर डॉल बाजारात आली आहे. ही डॉल घेऊन सारा एका टीव्ही शोमध्ये पोहोचली होती. साराचा 'केदारनाथ' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. ती डॉल घेऊन या चित्रपटाचे प्रमोशन करतेय. साराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे डोळे वडिलांसारखे आहेत. हे पाहून तिला चांगले वाटते. तैमूरची प्रसिध्दी पाहता सर्व कुटूंबच त्याच्या सुरक्षेविषयी चिंतेत असल्याचे सारानेही मान्य केले.\nमीडियाचा फेव्हरेट आहे तैमूर\nसैफ आणि करीनाचा लाडका तैमूर मीडियाचा आवडता आहे. तो जिथे जातो, तिथे मीडिया हजर असते. तैमूरही फोटोग्राफर्सला पोज देतो. नुकताच एक क्यूट व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये तैमूर कॅमेरा पाहून हाय म्हणताना दिसतोय. यापुर्वी एक अनोळखी व्यक्ती तैमूरजवळ आला होता आणि सेल्फी घेत होता. त्याला दूर करणे नैनी सावित्रीला कठीण झाले यानंतर सैफ करीनाने तैमूरचे फोटो न काढण्याची अपील केली होती.\nवडील सैफ म्हणाले होते की, तैमूरला बोर्डिंगमध्ये पाठवणार\nआपल्या दोन वर्षांच्या मुलाला मिळत असलेल्या अटेंशनमुळे करीना आणि सैफ चिंतेत राहतात. सैफ तर एकदा म्हणाला होता की, मी तैमूरचा बचाव करण्यासाठी त्याला बोर्डिंगमध्ये पाठवेल. याविषयी करीनाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, मला असे वाटत नाही. तिला वाटते की, तैमूरने स्वतंत्र्य आकाशात उडावे, त्याने कैद असू नये. |
नाशिक : महापालिका हद्दीमध्ये मोबाईलचे जाळे विस्तारत असताना ज्या मोबाईल टॉवरवरून नेटवर्कची देवाणघेवाण होते. त्यातील अवघी सहा मोबाईल टॉवरला महापालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी दिल्याचे बाब समोर आली आहे. जवळपास ७९४ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची बाब समोर आल्याने या सर्व टॉवरला नोटिसा बजावल्या जाणार आहेत. (Only 6 mobile towers allowed 794 unauthorized Nashik NMC News) महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवरची संख्या झाली आहे. नगररचना विभागाच्या माध्यमातून मोबाईल टॉवरला परवानगी दिली जाते. शहरात जवळपास ८०० मोबाईल टॉवर आहे. त्यातील अवघ्या सहा मोबाईल टॉवरला परवानगी दिली असून, त्यावर कर आकारणी झाली आहे. यापूर्वी ७९४ मोबाईल टॉवर अनधिकृत ठरवून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयात दावा दाखल असल्याचे कारण देत मोबाईल टॉवर धारकांनी महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. परंतु, आता महसूल वाढीसाठी उपाययोजना केल्या जात असताना त्यात मोबाईल टॉवरवरदेखील दंडात्मक आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ७९४ मोबाईल टॉवरला नोटीस बजावली जाणार आहे. या माध्यमातून २० ते २२ कोटींचा महसूल अपेक्षित आहे. महापालिकेला टॉवर सील करण्याचे अधिकार आहे, परंतु अत्यावश्यक भाग म्हणून न्यायालयाने टॉवर सील करण्यास बंदी घातली आहे. |
कोल्हापूर, 12 मे : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातलं सरकार वाचलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरातूनही अनेक जण यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिंदेच्या ऐवजी कोल्हापुरात भाजपला मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विनय कोरे हे याचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत काहीशी अस्वस्थता आहे. शिंदे फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी देव पाण्यात घातले आहेत. कोल्हापुरातून शिंदेच्या बंडात सामील झालेले प्रकाश अबीटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या निमित्ताने अपेक्षा पुन्हा जागृत झाल्या आहेत. यड्रावकर हे राज्यमंत्री असतानाच शिंदे गटात सामील झाले होते, त्यामुळे त्यांच्याकडून मंत्री पदावर दावा केला जात आहे. Political News : मोठी बातमी! मुश्रीफांना मंत्रिपद, समरजित घाटगे नाराज; भाजपमधून बाहेर पडणार? NCP : राष्ट्रवादीतल्या भूकंपाचे कोल्हापुरात हादरे, भाजपचा बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत? Kolhapur Monsoon Tourism: पावसाळ्यात कोल्हापूरचा पाऊस नादखुळा. ही 10 ठिकाणे त्याहून भारी, पाहिली का? तर शिवसेनेचे जिल्ह्यात एकमेव आमदार असलेले प्रकाश अबीटकर यांनी सेना वाढीसाठी आपल्यालाच मंत्रिपद मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तर भाजपच्या गोटातून माजी मंत्री विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांनी फिल्डिंग लावली आहे. विनय कोरे यांची फडणवीस यांच्याशी वाढती जवळीक असल्याने आणि सहकारात कोरेंचा असलेला दबदबा पाहता ते मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, तर आवडेंनीही तितकीच ताकद लावायला सुरूवात केली आहे. कोल्हापुरात शिंदे गटाचा राजेश क्षीरसागर सोडले तर तसा ताकदवान नेता कोणी नाही. त्यामुळे शिंदे इथे मंत्रिपद देऊन शिवसेना वाढीचे काम करणार की, मित्रपक्ष म्हणून भाजपला मंत्रिपद सोडणार हे आता पाहावे लागेल. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीच्या (Friendship) नात्याला विशेष स्थान असतं. आपल्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यावेळी मदतीसाठी खरा मित्रच (Friend) धावून येतो. खरं तर जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. सध्या अशाच एका मैत्रीची कहाणी सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरली आहे. एका महिलेनं वडिलांच्या मित्राविषयीची एक पोस्ट लिंक्डइनवर (LinkedIn form) शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये वडिलांच्या मित्रानं त्यांना नोकरीसाठी अर्ज लिहिण्याकरिता कशी मदत केली हे या महिलेनं नमूद केलं आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एअर इंडियाच्या कमर्शियल लीड रवीना मोरे (Ravina More) यांनी एका मैत्रीची कहाणी सांगणारी पोस्ट लिंक्डइनवर शेअर केली आहे. माझ्या वडिलांना त्यांच्या एका जवळच्या मित्राने 80 च्या दशकात नोकरी (Job) मिळण्यासाठी कशी मदत केली, याची कहाणी रवीना यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 1985 मधला हस्तलिखित अर्जही (Handwritten Application) शेअर केला आहे. या अर्जातलं हस्ताक्षर सुंदर आहे. पोस्टवर टिप्पणी करणाऱ्या अनेकांनी त्यावर सहमती दर्शवली. रवीना यांची ही पोस्ट 27 हजारपेक्षा अधिक व्यक्तींना आवडली आहे. यापैकी बहुतांश जण ही पोस्ट वाचून भावनिक झाल्याचं दिसलं. पुढील आठवड्यात निवृत्त होत असलेल्या वडिलांना त्यांच्या सर्वांत जवळच्या आणि विश्वासू मित्राबद्दलची आठवण रवीना यांनी करून दिली आहे. हा नोकरीचा अर्ज त्यांनी थरमॅक्स कंपनीला लिहिला होता. त्या वेळी रवीना यांच्या वडिलांनी 'ट्रेनी इंजिनीअर-मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्शन' या पदासाठी हा अर्ज केला होता. रवीना मोरे यांनी सांगितलं, की `मी जो नोकरीसाठीचा अर्ज शेअर केला आहे, तो प्रकाश काकांनी 1985 मध्ये माझ्या वडिलांसाठी लिहिला होता. हस्तलिखित अर्ज आता भूतकाळात जमा झाले आहेत. मित्रांना करिअरमध्ये संधी मिळावी यासाठी आपल्या मित्राच्या रेझ्युमेचं पुनरावलोकन करणारे. मित्रांसोबत संदर्भ, कंपनी आणि उद्योगांविषयीची माहिती शेअर करणारे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्या कठीण काळात एकमेकांसोबत राहणारे मित्र कायम एकमेकांसोबत राहतात. एका कंपनीचा अर्ज दुसऱ्या कंपनीकडे पाठवणं, यासारख्या चुकाही त्या वेळी माझे वडील करत होते; पण एक मित्र म्हणून प्रकाश काका माझ्या वडिलांना सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असत. प्रकाश काकांनी त्यांना नोकरी मिळावी, यासाठी नेहमीच मदत केली,` असं रवीना आवर्जून नमूद करतात. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज (गुरुवारी) अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. ओडिसा केडरचे २००५ च्या बॅचचे आयएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली होती. ते प्रतिनियुक्तीने पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात आले आहे. आता त्यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे बदली झाली आहे. तर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे. यापूर्वी ते गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. शेखर सिंह हे २०१६ च्या बॅचचे अधिकारी असून देश पातळीवर त्यांनी ३०६ वा क्रमांक पटकावला होता. सिंह हे आज सायंकाळी पाच वाजता पिंपरी महापालिकेत आले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, या बदल्यांबाबतचा आदेश मंगळवारी (दि. १६) काढला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंह यांनी कार्यभार न स्वीकारल्याने बदली आदेश रद्द करण्यात आला असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर आज शेखर सिंह यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. |
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी, जिल्हा सहकारी बँकेने एकरी १६ हजार ५०० रूपये याप्रमाणे धान कर्ज देण्यात येणार असून ३१ मार्चपर्यंत एक लाख रूपयांपर्यंतचे कर्जाची परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कृषी तज्ज्ञ समितीच्या सभेत घेण्यात आला. या बैठकीत सन २०१६-१७ च्या खरीप व रबी आणि बागायती पिक कर्ज वाटपाचे दर धोरण ठरविण्यात आले. भंडारा जिल्ह्यात उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने येत्या हंगामात ऊस लागवडीसाठी एकरी ३३ हजार, केळी लागवडीसाठी एकरी ४२ हजार, कांदा लागवडीसाठी हेक्टरी ५५ हजार रूपये, हळद लागवडीसाठी हेक्टरी ८० हजार मिरची व बटाटे लागवडीसाठी हेक्टरी ५७ हजार ५०० रूपये देण्यात येत आहे. या व्यतीरिक्त शेवंती, झेंडू व मोगरा या फुल शेती लागवडीसाठी हेक्टरी ३० हजार रूपये, गुलाब फुल शेतीसाठी हेक्टरी ४० हजार याप्रमाणे कर्जपुरवठा करण्यात येणार असून याचा शेतकरी सभासदांनी लाभ घ्यवा, असे आवाहन फुंडे यांनी केले आहे. ही कर्जमर्यादा बिनव्याजी वापरण्यासाठी ३१ मार्चपूर्वी त्यांचे कडील थकीत, चालू कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सभासदांनी त्यांचेकडील थकीत, चालू कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी सभासदांनी बँकेच्या शाखेत जावून कर्ज वसुली जमा करावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या खातेदारांनी के. वाय. सी. ची पुर्तता केली नसेल त्यांनी बँकेच्या संबंधित शाखेत जावून के. वाय. सी. ची पुर्तता करावी. १ एप्रिलपासून भंडारा जिल्हा सहकारी बँक, रुपे किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून कोअर बँकींग प्रणालीद्वारे दर्जेदार व तातडीने सेवा उपलब्ध करून देत आहे. याचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे. या सभेला प्रगतीशील शेतकरी यादवराव कापगते, रेवाराम निखाडे, जिल्हा बँकेचे संचालक रामलाल चौधरी, सत्यवान हुकरे, विलास वाघाये, अशोक मोहरकर, रामदयाल पारधी, होमराज कापगते, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक अरविंद खापर्डे, जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था, संजय क्षीरसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोयर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, जिल्हा मध्य. सह. बँकेचे सरव्यवस्थापक किशोर बोबडे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) |
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी दूध उद्योगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणुकीतील सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. निवडणूक अपेक्षेप्रमाणे दुरंगी झाली असून २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात राहिल्याने आता खऱ्या अर्थाने खडाखडी सुरू झाली. सत्तारूढ आघाडीने १२ विद्यमान संचालकांना व नऊ नवीन उमेदवारांना संधी दिली. विरोधी आघाडीमध्ये दोन विद्यमान व एका माजी संचालकांसह १८ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. संघाची निवडणूक येत्या २ मे व निकाल ४ मे रोजी आहे. संघाचे ३,५५० सभासद निवडणुकीचा हक्क बजावतील. संघामध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गेली सुमारे ३० वर्षे सत्ता आहे. त्या सत्तेला काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि विधानसभेत भाजपला पाठिंबा दिलेले जन स्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी आव्हान दिले आहे. सहकारी संस्थेची निवडणूक असली तरी तिथे काँग्रेस-भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी ढोबळ मानाने लढत होत आहे. सत्तारूढ आघाडीचे नाव राजर्षी शाहू आघाडी तर विरोधी आघाडीचे नाव राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी असे आहे. सत्तारूढ आघाडीतून संघाचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचा मुलगा दीपक, माजी आमदार संजय घाटगे यांचा मुलगा अंबरिश, काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा धैर्यशील, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची पत्नी अनुराधा पाटील या उमेदवारांचा समावेश आहे. विरोधी आघाडीतून मंत्री मुश्रीफ यांचा मुलगा नविद, खासदार मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र, राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांची पत्नी सुश्मिता पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांचा मुलगा रणजित, माजी आमदार दिवंगत संजय गायकवाड यांचा मुलगा कर्णसिंह, माजी आमदार दिवंगत यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा भाऊ अजित नरके यांचा समावेश आहे. सुमारे साडेतीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आणि देशभरात नावलौकिक मिळवलेला ब्रॅण्ड अशी गोकूळची ओळख आहे. या संघाची सत्ता काबीज करण्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांपासून इतरही मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पॅनल घोषणेनंतर उरलेल्या २०५ पैकी १६० जणांनी माघार घेतल्याने एकास एक लढतीचा मार्ग मोकळा झाला. सर्वसाधारण गटातून १६ जागांसाठी ३३, महिला गटातून २ जागांसाठी ५, एससी एसटीच्या एका जागेसाठी ३, ओबीसी व एनटीच्या प्रत्येकी एक जागेसाठी २ उमेदवार रिंगणात उरले आहेत. महिला गटातून वडणगेचे बाजीराव पाटील यांची पत्नी वैशाली यांची उमेदवारी राहिली आहे. अनुसूचित गटातून सत्तारूढकडून दिनकर कांबळे यांनी उमेदवारी मागितली होती, पण मिळाली नाही. त्यांनी माघार घेतली नाही. सर्वसाधारणमधून श्यामराव बेनके यांनीही माघार घेतली नाही. |
क्रिकेट हा कौशल्यावर आधारित असा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू आपल्या कौशल्याच्या आधारे चांगले प्रदर्शन करत असतो. मात्र काही वेळेस या खेळात वर्णद्वेषासारखे किस्से घडत असतात. जे क्रिकेटसारख्या खेळामध्ये निंदनीय आहे. अशाच एका घटनेबाबत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सोमवारी (२३ ऑगस्ट) वक्तव्य केले. त्याचा यॉर्कशायर संघाचा माजी संघ सहकारी अजीम रफीकसोबत क्रिकेट क्लबकडून वर्णद्वेष झाल्याचे आरोप केल्यानंतर त्याने दुःख व्यक्त केले. रूटने अशा घटनांपासून जागरुकता निर्माण करण्यासाठी याच्याशी संबंधित लोकांना आग्रह केला आहे. यानंतर यॉर्कशायर क्लबकडून रफिकसोबत झालेल्या वर्णद्वेष आणि भेदभावाबाबत माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांनी रफिकची माफी देखील मागितली होती. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.