text
large_string
"सूनबाई, चहा केलाय तुझा. हे बघ ठेवते इथे. " " हो हो,घेते मी. " आज सासूबाईंनी रेखाला अर्धाच कप चहा दिला होता. रोज तर फुल भरून मिळायचा मग आज का असे? असा विचार करत रेखा चहा पीत होती. तशीही ती त्यांना काही बोलू शकत नव्हती ; कारण रेखाला खूप वर्षांनी दिवस गेले होते; अन् थोडी नाजूक परिस्थिती असल्याने तिला डॉक्टरांनी सक्त बेडरेस्ट सांगितली होती. त्यामुळे दिवस राहिले आणि दुसऱ्याच महिन्यापासून ती वेगळ्या खोलीत राहत होती. " रूम बाहेर कशी आलीस तू? तो आला की आधी येतोच ना तुझ्या रूम मध्ये! जा रूम मध्ये आधी. " थोडी घाबरलीच होती ती आज त्यांना. त्यांचे हेक्याने बोलणे आजवर तिने खूप सहन केलं होतं. तरीही त्यांच्यापुढे ब्र शब्द काढायची तिची कधीच हिंमत झाली नाही . घरातील सारे काही ती टापटीप छान करायची. पण दिवस गेल्या पासून तिला बेड रेस्ट असल्याने घरातले सारे काम सासूबाई बघत होत्या . त्यामुळे रेखाला त्यांची आडूपर होती. सासूबाई जसे म्हणतील तसे आणि तेच खायचे,तेवढेच खायचे असे तिला बंधन होते. त्यात प्रदीप देखील आईपुढे काहीच चालत नसल्याने गप्प होता . एव्हाना तिला ६ वा महिना लागला होता. ती मात्र आता पुरती कंटाळली होती. डोहाळे पुरवायचे तर दूरच पण आयते खात असल्याने सासूबाईंची चिडचिड,तेच तेच मर्यादित जेवण तिला आता सहन होत नव्हते. तिने तिच्या आईला फोन केला अन् सारे काही सांगितले. . एक दिवस अचानक स्नेहा,तिची नणंद आली. " आई मी यावेळी चांगली ३ महिने राहणार आहे. मला माझ्या लाडक्या वहिनीचे डोहाळे पुरवायचे आहेत,तसेच तिच्याशी छान गप्पा मारायच्या आहेत. . " " अन् मी काय तिला कोंडून ठेवले आहे का मग स्नेहा? " " अग तसं नाही ग आई. तुझी आडूपर नको तिला आता. मी आले आहे ना! " " अन् तुझ्या घरचं काय? " " मी सारी व्यवस्था लावून आले आहे. तू आता बिनधास्त रहा. " " वहिनी, ए वहिनी बाहेर ये ना! " रेखा व स्नेहा, नणंद भावजय म्हणून नाही तर मैत्रिणीच होत्या एकमेकींच्या. रेखा बाहेर आली. . " तुला काय खावस वाटत ते आजपासून मला सांगायचं. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या बाळंपणात तू सुद्धा माझे लाड पुरवले होतेस ना,मग ही आडूपर नसून परतफेड समज. " तेव्हापासून रेखा घरात स्वच्छंदी वावरू लागली. आपल्या मुलीने स्नेहानेच असे फर्मान सोडले होते म्हणून सासूबाई देखील पुरत्या खजील झाला होत्या; पण एकीकडे त्यांना आपल्या चुका हळूहळू लक्षात यायला लागल्या होत्या. इकडे रेखाच्या आईने स्नेहाच्या घरची जेवणाची जबाबदारी घेतली होती; कारण त्या दोघी एकाच गावातील होत्या. लेकीच्या संसारात लुडबुड नको म्हणून तिने सारी हकीगत स्नेहाला सांगितली होती,अन् स्नेहानेही त्यांचे म्हणणे ऐकून घेत आपल्या भावजयीची काळजी घेण्याचे त्यांना आश्वासन दिले होते . सारे काही सोपस्कर पार पडले,रेखाने गोंडस बाळाला जन्म दिला आणि आईला सांगू लागली, " आई स्नेहा ताईंनी माझी खूप काळजी घेतली. मला त्यांची मदत कधीच आडूपर भासू दिली नाही. मी खूप आनंदात घालवले माझे शेवटचे ३ महिने. " वाचकहो,आजही सासू आपल्या मुलीचेच का ऐकून घेते? तिचेच का लाड पुरवते? सून सुद्धा लग्नानंतर नव्या घरची जबाबदारी असतेच ना? मग तिला काही अडचण आली तर तिला मदत करणे,म्हणजे तिला आडून पाहणे हे योग्य नाही. शेवटी सासूच्या म्हातारपणात तीच तर कमी येणार आहे; दरवेळी लेक धावून येवू शकत नाही. बरोबर ना? प्रस्तुत कथेत नणंद आपल्या भावजयीला समजून घेते,म्हणून सारे आनंदी आनंद पार पडते; कारण ननंदेच्या कठीण काळात भावजईने तिला खूप मदत केलेली असते त्याची परतफेड म्हणून नणंदेला कळवळा येतो म्हणून ती भावजयीच्या मदतीसाठी जाते, नाहीतर रेखाचे काय झाले असते? रेखाची आई देखील नणंदेच्या संपूर्ण घराची जेवणाची जबाबदारी घेते. तरीही अजूनही सुनेला मदत म्हणजे इतरांची आडूपर तिला असते हे पुर्णतः चुकीचे आहे. आजकालच्या आधुनिक जगात सुद्धा अशी बुरसटलेल्या विचारांची माणसे मी पाहिलेली आहेत. तेव्हा बरोबर काय अन् चूक काय याचा उलगडा मला या कथेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविणे उचित वाटले.
बार्शी : तालुक्यातील गौडगाव येथील रहिवाशी व पुरातत्व संशोधकाने केलेल्या संशोधनामधून गौडगाव ते कात्री रस्त्यावर तब्बल 2 हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे गौडगावच्या वैभवात भर पडली आहे. त्यामुळे गौडगाव येथील गावाचा व परिसराचा इतिहास उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राचीन काळी नैसर्गिक आपत्ती जसे नदीला पूर येणे, भूकंप, परकीय आक्रमण, आग किंवा एखादा जीवघेणा रोग या मुळे मानव एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गाव, वसाहत बसत असे. अशाच प्रकारे सध्याचे गौडगाव गाव फ्लेग या महामारी मुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वसले आहे. सध्या गावात १०० ते १५० वर्षांपूर्वीचे वाडे पाहायला मिळतात. हनुमान मंदिर आणि यमाईदेवीच्या मंदिरापाशी काही प्राचीन वीरगळ आणि प्राचीन मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. हनुमान मंदिराच्या गाभार्यात उत्तर चालुक्य कालिन विष्णूमूर्ती पाहावयास मिळते. विष्णू मूर्तीच्या हाता पद्म, शंख, चक्र, गदा ही आयुध आहेत. डोक्यावरती किरीट मुकुट आहे. कानात कर्ण कुंडले आहेत. दंडात केयूर, हातात कंकण, गळ्यामध्ये ग्रिविका एकावली माळा आहे, पायात तोडे, नुपूर आहेत. अशाप्रकारे अलंकार आहेत. त्याच्या शेजारी मोठा शिवलिंग आहे. आणि एक गणेश मूर्ति आहे. शिवलींग वरून असे लक्षात येते की गावांमध्ये तत्कालीन काळामध्ये शिवमंदिर असावे. मंदिराचे काही अवशेष ही आढळून येतात. परंतु मंदिर कोठे व कसे होते हे पुराव्याअभावी सांगता येणार नाही. हे मंदिर उत्तर चालुक्य कालिन असावे असा अंदाज आहे. गौडगांव गावाच्या उत्तरेला गौडगांव कात्री रोडवर डाव्या बाजुला वाडी (गावठाण) म्हणून ठिकाण आहे. तिथे सर्वेक्षण केले असता, काही अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये मृद्-भांड महत्वपूर्ण आहेत. सातवाहन काळातील मृद्-भांडचे भग्न लाल रंगाचे तुकडे प्राप्त झाले. त्याच बरोबर आंध्राकिसक्रॉस वियर हे प्रसिद्ध मृद्-भांड प्राप्त झाले. हे या भागातील महत्वपूर्ण संशोधन ठरेल. आंध्रा किसक्रॉस वियर हे सातवाहन कालखंडाशी सलग्नीत आहे. या ठिकाणी सुपारी आकाराचे भाजलेल्या मातीचे मणी मिळाला. त्याच बरोबर निळ्या आकाराचा मणी ही प्राप्त झाला. प्राचीन काळातील बांगड्या भग्न अवस्थेत प्राप्त झाल्या, ज्या शंखा पासून बनवलेल्या होत्या. छोट्या आकाराचे ब्लेज जे कॅल्सीडोनी पासून बनवलेले प्राप्त झाले. कार्लेनियन, अॅगेट आणि हिरव्या आकाराचे मौल्यवान दगड मिळाले. एक बहामनी कालखंडातील तांब्याचे नाणे प्राप्त झाले आणि एक दोन्ही बाजूनी सपाट असलेले नाणे मिळाले. या ठिकाणी हाडे जास्त प्रमाणात मिळतात. असे दसवंत यांनी सांगितले. सध्या ह्या भागावर शेती केली जाते. वरील मिळालेल्या अवशेषावरून याचा कालखंड सातवाहन पर्यंत जातो. तर पुढील सविस्तर अभ्यासासाठी इथे उत्खननाची गरज असल्याचेही म्हटले जात आहे. महेश दसवंत - इतिहास व पुरातत्व अभ्यासक.
. � �ाह यांच्यावर टिका करताना ओम पुरी म्हणाले की, शाहने राजेश खन्नाला सुमार अभिनेता का म्हटले ? काय त्यांनी खन्ना यांचे चित्रपट बघितलेले आहेत का ? मला त्यांचा चित्रपट 'आखिरी खाट' व 'बहारों के सपन'े अजूनही लक्षात आहे. हे चित्रपट काही व्यावसायिक नव्हते. त्यानंतर खन्ना यांचा हिट चित्रपट 'अमर प्रेम' आठवणीत आहे. राजेश खन्नाला जे यश मिळाले त्याचे शाह व मी स्वप्नातही बरोबरी करु शकत नाही. मृत अभिनेत्याविषयी असे बोलणे योग्य नाही. नसिरने सलमान खान, शाहरुख खान व अमिताभ बच्चन यांच्याविषयी का टीका केली नाही. त्यांच्याकडून याचे उत्तरही मिळाले असते. खन्ना हे एक सुमार अभिनेते होते, त्यांच्यामुळे हिंदी चित्रपटाची तेव्हा प्रगती झाली नाही. अशी टीका शाहने केली होती. टिंकल खन्नाने सुद्धा यासंदर्भात शाह यांच्या टीका केलेली आहे.
Aurangabad ShivSena: औरंगाबादः 'मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ. . ' असे थेट आव्हान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारमधील मंत्री संदिपान भुमरे यांना दिलं आहे. 'मी एकनाथ शिंदेंकडून 20 लाख आणले हे सिद्ध करा अन्यथा सुळावर चढा. ' अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिली आहे. 'संदिपान भुमरेने कोणाला मोठे होऊ दिले नाही. सगळा खोटरडापणा लावला आहे. मी त्याला मोठं केलं त्याने एक झेंडा देखील लावला नाही. ' असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'हे सर्व आमदार आगामी निवडणुकीत पडतील हे मी ठामपणे सांगतो. ' असा दावाही खैरे यांनी यावेळी केला आहे. तसेच पालकमंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे यांच्या प्रत्येक निर्णयावर माझ लक्ष आहे असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आता भुमरेंविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. त्यामुळे आता याबाबत मंत्री संदिपान भुमरे नेमकी काय भूमिका घेतात आणि चंद्रकांत खैरे यांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
डिचोलीः नागझरवाडा- डिचोली (Bicholim) येथे भटक्या कुत्र्यांचा (Dogs) मोठा घोळका रात्रीच्या वेळी येथून जाणाऱ्यांची पाठ धरू लागला असून येथील रुग्णालयांत येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला करून त्यांना चावे घेण्याचे प्रकार घडल्याचे वृत्त आहे. मुक्या प्राण्यांना मारू नये, असा कायदा असल्याने प्रशासनाने हात पांघरून बसण्याचे सोयिस्कर धोरण अवंलबिल्याची संतप्त प्रतिक्रिया वासुदेव मयेकर यांनी दैनिक 'गोमन्तक'ला दिली. आपण रात्री उशिरा एका परिचिताकडे येथून जात असताना पंधरा ते वीस कुत्रे आपल्या दिशेने धावत आले. हातात छत्री असल्याने आपण थोडक्यात बचावलो, अन्यथा आपल्याला त्यांनी चावे घेऊन फाडलेंच असते, असे ते म्हणाले. या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची नाटके अपयशी ठरतात व त्यांचा वंश वाढत असून भविष्यांत ही वाढती संख्या लहान मुलांच्या जीवावर बेतू शकते, असा इशारा त्यांनी दिला. या कुत्र्यांसंदर्भांत आपण पशुपालन खात्याला कल्पना दिली असल्याची माहिती येथील डॉ. विठ्ठल म्हार्दोळकर यांनी दिली. मात्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपली विनंती मनावर घेतलेली नाही, असे ते म्हणाले. रुग्णालयात येणारे अनेक बेसावध रुग्ण कुत्रे अंगावर चालून आल्यामुळे प्रचंड धास्तावलेले असतात. या परिसरात कोणत्याही वेळी गेल्यास किमान वीस कुत्रे इतस्ततः बसलेले दिसतात. दिवसा ते जरी शांत असले तरी रात्री हिंसक होतात. त्याना लोकवस्तीपासून दूर नेऊन कोंडवाड्यात ठेवणे, हाच पर्याय असल्याचे तुकाराम शेट यांनी सांगितले. डिचोली नगरपालिका आणि स्थानिक आमदारांना याची दखल घेऊन नागरी हितास्तव संबंधित खात्याला कार्यप्रवण करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा? संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा? कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा अर्थ असा की, कोणतीही व्यक्ती विनाकारण बाहेर फिरू शकत नाही. तसेच पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे. आपापल्या हद्दीत पेट्रोलिंग, नाकाबंदीच्या माध्यमातून, अनावश्यकरित्या फिरणाऱ्या लोकांना प्रतिबंध केला जातो. असे असतानाही शहर व जिल्ह्यात दोन गट समोरासमोर येत आहेत. तुंबळ हाणामारी होऊन काहीजण जखमी होतात. या प्रकरणांमध्ये परस्पर विरोधी दंगलीचे गुन्हे दाखल होत आहेत. मंगळवारी जळगाव शहर, निंभोरा, नशिराबाद व पहुर आदी पोलीस ठाण्यांमध्ये दंगलीचे गुन्हे दाखल झाले. संचारबंदी व जमावबंदी लागू असताना या घटना घडतातच कशा? नेमकी चूक कोठे व काय? होत आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हेगारी गट शस्त्रे हातात घेऊन एकमेकांच्या समोर आले होते. संचारबंदीच्या काळात गुन्हेगारीही उफाळून येत आहे. संचारबंदी व जमावबंदी आदेशाची खरोखर अंमलबजावणी होत आहे की नाही? की फक्त मुख्य चौकातच नाकाबंदी केली जाते? संवेदनशील भाग तसेच आपापल्या बीटमध्ये पोलिसिंग होताना दिसतच नाही. त्यामुळेच अशा घटनांना वाव मिळत आहे. या घटना टाळायच्या असतील, तर खासकरून संवेदनशील भागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्या ज्या ठिकाणी दंगलीचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा गुन्ह्यांमधील बहुतांश संशयित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून अशा घटना घडत असताना, गुन्हेगारी दत्तक योजनेचा नेमका फायदा काय? ही योजना कागदावरच राहिली आहे की काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दोन गटातील वाद, त्यातही रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून होत असलेली कृती भविष्यकाळात निश्चितच धोकादायक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर वेळीच प्रतिबंध घालणे गरजेचे असून त्यांच्यावर सतत कारवाईची टांगती तलवार असणे इतकेच गरजेचे आहे.
पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर येथील विश्वराज बंधार्याच्या परिसरात आयोजिलेल्या दोन दिवसीय 'एमआयटी सांस्कृतिक संध्या' संगीत महोत्सवाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने झाला. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, प्रा. सुनीता मंगेश कराड , नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, माईर्स एमआयटीचे कुलसचिव सु.वा.उर्फ नाना कुलकर्णी व प्राचार्य गणाचार्य हे उपस्थित होते. दि. ३१ डिसेंबरला झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोपप्रसंगी मध्यरात्री १२.०० वाजता त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०१९ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले," नववर्षाच्या पूर्व संध्येला आपल्यातील अवगुणांची आहूती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. आजच्या तरूण पिढीमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आम्ही करीत आहोत." " संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटामुळे संपूर्ण जगात शांती, सहिष्णूता आणि मानवतेचा संदेश पोहोचेल. त्यामुळेच भविष्यात भारतमाता ज्ञानाचे दालन व विश्व गुरू म्हणून उदयास येईल. तसेच, भारत हा जगासमोर ज्ञान-विज्ञान असे स्वरूप मांडेल." यावेळी लक्ष्मण घुगे लिखित सुवर्ण पिंपळ हा ग्रंथांचे लोकार्पण डॉ.विश्वनाथ दा. कराड, गायिका गोदावरी मुंडे, प्रा. ज्योती कराड-ढाकणे व आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सौ. पौरवी साठे व प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे यांनी आपल्या सुरेल रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याच प्रमाणे अझरूद्दीन शेख यांनी बासरीवादन केले. सुरूवातीला कृष्ण वंदना व कथ्थक नृत्याच्या माध्यमातून प्रा. अबोली थत्ते यांनी कालिया दमन, कृष्ण भजन व अन्य नृत्ये सादर केली. तसेच, आर्यव्रत राहुल कराड यांनी तबला वादन व विरेंद्रप्रताप मंगेश कराड यांनी गिटार वादन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या संगीत महोत्सवात विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आपली गायन-वादनाची कला सादर केली. या प्रासंगी डॉ. एस.एन. पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. पायल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ज्योती कराड ढाकणे यांनी आभार प्रदर्शन केले.
मी भारताचा नागरिक आहे. माझे राष्ट्रप्रेम जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी दाखवायलाच हवे. यात विशेष काहीच नाही. फोंडाघाट- मी भारताचा नागरिक आहे. माझे राष्ट्रप्रेम जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी दाखवायलाच हवे. यात विशेष काहीच नाही. असे राष्ट्रप्रेम जागृत करतानाच जनतेपर्यंत पोहोचतानाचे मिळणारे आत्मसमाधान हे मोठे होते. हे राष्ट्रप्रेम जपले म्हणून स्वातंत्र्य सैनिक म्हणवून घेणे. स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन घेणे मला संयुक्तीक वाटत नाही. मी जे केले आहे ते या राष्ट्राचा नागरिक म्हणून. . आणि महाराष्ट्र लढयाचे म्हणाल तर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. असे जेव्हा मोरारजी देसाई यांच्या सरकारने म्हटले तेव्हा झालेला उद्रेक आणि त्यात आम्ही घेतलेला सहभाग हा स्वयंस्फुर्तीतून होता त्यासाठी कुणी आवाहन केले नव्हते. वा कुणी कुठचे आमिषही दाखविले नव्हते. मुंबई म्हणजे आमची आहे, आमच्या कोकणी माणसाची आहे. असे सातत्याने वाटते. आज पुन्हा या जागृतीची गरज वाटते आहे. आजच्या पिढीला याचे ज्ञान व्हायला हवे. आम्ही काय केले होते. यापेक्षा आजच्या पिढीला महाराष्ट्र कोणत्या संघर्षातून मिळाला आहे हे समजायला हवे. महाराष्ट्र दिना दिवशी आपण या राज्यात राहतो म्हणून सुट्टी मिळते ती मजेत घालवायची असा अर्थ होऊ लागला आहे. हे उदासिन चित्र असताना नारायणरावांसारख्या धडाडीच्या नेत्याने महाराष्ट्र दिना दिवशी प्रहार परिवाराच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राची पेटविलेली मशाल आमच्या सारख्या वयोवृद्धाला पुन्हा एकदा संघर्षासाठी उभे राहण्याचे बळ देणारी निश्चितच आहे. आमचा या कार्यक्रमात सत्कार होणे हे आमच्यासाठी आनंद देणारेच आहे. या निमित्ताने महाराष्ट्र निर्मितीच्या लढयात सहभागी झालेल्या कष्टकरी जनतेच्या अनेक संघर्ष करणा-या लढवय्यांची आठवण झाली. हुतात्म्यांना श्रद्धांजली व्यक्त करता आली हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मला स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणवून घेणे योग्य वाटत नाही. आणि आमच्या हाताने जे-जे होईल ते-ते आम्ही केले. यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. कोणते तरी पद आपल्याला पद मिळणार आहे. अशी भावना नव्हती. आपण या मातीचे देणे आहोत, आपण काही करू शकतो. हीच उर्जा आम्हाला सक्रीय करत होती. बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत होते. आमचे नेते येताहेत असे समजले की लोक झुंडीच्या झुंडीने दाखल व्हायचे. तहान-भूक विसरून विचार ऐकायचे. बसायलाही काही नसायचे, ना डोक्यावर छत असायचे. कडकडीत उन्हात घामाच्या धारा ओघळत असताना हजारोंचा जनसमुदाय विचार ऐकत बसायचा. त्यांचे विचार ऐकायला मिळायला हवेत अनेक किलोमिटरची पायपीट व्हायची. आज कार्यकर्त्यांची संकल्पनाच बदलली आहे. बैठकीच्या ठिकाणी जायचे तर सर्व सोय हवी असते. आत्मियतेपेक्षा आत्माभिमान त्यांच्यात अहंकाराच्या रूपाने भरला आहे. ही स्थिती फारच भीषण आहे. आणि महाराष्ट्रासाठी धोक्याची आहे महाराष्ट्राचे लचके तोडण्याची प्रवृत्ती यातून वाढणार आहे. आपल्या हातातून सारे सुटल्यानंतर आपल्या हातात पश्चातापाचा कटोरा पडेल. अखंड महाराष्ट्र राहावा, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाता कामा नये. यासाठीच १९५५ मध्ये आम्ही त्यावेळेच्या देवगड महालातून संघर्ष केला, निदर्षने केली. मोठा मोर्चा काढला. मुंबई येथील संघर्षात सहभागी व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना पाठविताना येथे आम्ही उपोषणाला बसलो. कोकणातील सगळीच तरुण मंडळी तेव्हा मुंबईला होती. गिरणीमध्ये ते राबत असायचे. त्यांच्या मनिऑर्डवरच कोकण जगायचे. अशी मुंबई आमच्यापासून हिरावून घेत गुजरातला जोडली जाणार आहे. ही कल्पनेतसुद्धा सहन होत नाही. त्यावेळी आतासारखी संपर्क यंत्रणा नव्हती. खरे सांगू का आम्ही करत असलेल्या उपोषणाला आणि मोर्चाना मोठी किंमत होती. संपूर्ण शासकीय यंत्रणा हलायची. आम्हीही पोटतिडकीने हे आंदोलन करायचो, प्रक्षोभ असायचा. आज आंदोलनातली दिखावटगिरी आणि प्रशासनाची ही गेंडयाची कातडी मला चिंताजनक वाटते आहे. आम्ही या चळवळीत सहभाग घेतला ते जनहितासाठी. आमच्या विचारप्रणालीशी आम्ही ठाम राहिलो. दैनिक प्रहारच्या वतीने आमच्या भूमिकेचा हा सत्कार झाला. याचे कौतुक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या नेत्याने अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेसाठी झोकून देत सयुंक्त महाराष्ट्राच्या लढयात सहभागी झालेल्यांचे प्रतिक म्हणून आमचा गौरव केला. या सा-या लढवय्यांच्या वतीने तो आम्ही स्विकारला. परंतु मी काही मोठे कार्य केले असे मला वाटत नाही कारण मी या राष्ट्राचा नागरिक आहे. माझ्या मातीचे हित मी जपायलाच हवे. ते दुस-याने करावे असे बोलून संपणार नाही. मीही काही करायला हवे आहे. आणि ते मी करतो आहे यातच माझे समाधान आहे.
पुणे आणि सांगली येथील धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांच्यासाठी 'ऑनलाईन' सत्संग सोहळा पार पडला ! पुणे आणि सांगली येथील धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांच्यासाठी 'ऑनलाईन' सत्संग सोहळा पार पडला ! विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन 'परभणी अधिवक्ता संघटने'च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना ३० नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, "१२ नोव्हेंबरला एकाच दिवशी ३ मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकांना कुणी अनुमती दिली ? याचे अन्वेषण झाले पाहिजे. त्रिपुरात मशीद पेटवल्याच्या अफवेचा सरकार शोध का घेत नाही ? श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. २९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. आता कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा 'आर्. टी. पी. सी. आर्. ' अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकर्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जुगाराचे दुष्परिणाम लक्षात आणून देऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना जिल्ह्यात चालू असलेला जुगार लक्षात येत नाही कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिवसेंदिवस कोरनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णालयात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडची संख्या कमी पडू लागली आहे. वडाळ्यातील अँटॉप हील भागात एका कोरोना बाधित रुग्णाला होम कॉरंटाईन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यातच हा प्रकार उघडकीस आल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पालिका प्रशासनानं कोरोना रुग्ण सापडल्यानंतर कित्येक तास तो वास्तव्यास असलेली इमारत किंवा रहात असलेला मजला सील केला नव्हता. अखेर बुधवारी पालिका प्रशासनाला जाग आली आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या रुग्णाला सेव्हल हिल्स रुग्णालयात दाखल केले. यानंतर तो रहात असलेली इमारत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली. तसेच इमारतीच्या दोन लिफ्टदेखील सील करण्यात आल्या. एफ- उत्तर वॉर्डमध्ये अनेक फिवर क्लिनिक्स सुरु करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे वृत्त एका इंग्रीजी वेबसाईटने दिले आहे. 19 मे रोजी वडाळ्यातील एका एसआरएच्या इमारतीत राहणारी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर त्या व्यक्तीला सोमय्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे बेड उपलब्ध नसल्याने संबंधित रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला घरी सोडण्यात आलं. रुग्णाच्या शेजाऱ्यांनी क्वारंटाईन करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या. त्यांची कोणतीही चाचणी करण्यात आली नाही. एखादी व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यास किमान ती रहात असलेला मजला सील केला जावा, तसा नियम सांगतो. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकही नियम पाळला नाही. याबाबत पालिका अधिकाऱ्याला विचारण्यात आले असता, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या कुटुंबान त्याला घरी आणल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी इमारतीचा मजला का सील केला नाही यावर बोलताना, याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या जिवाशी पालिका प्रशासन खेळत असून पालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.
पुणे : 'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'गोफ स्वरांचा' या सांगितिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. हा 47 वा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी 'सरदार महादेव बळवंत नातू सभागृह', सेनापती बापट रोड येथे झाला. 'भारतीय विद्या भवन' च्या कार्यक्रमात रागदारी आणि लोकसंगीताचे नाते उलगडले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'भारतीय विद्या भवन'चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन रंजना काळे यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. राजश्री महाजनी, माधुरी करंबेळकर, रंजना काळे यांनी गायन सादर केले. राग संगीत, नाट्यसंगीत, टप्पा, दादरा, धून अशा विविध रचना सादर केल्या. सतार आणि व्हायोलिन च्या सुरेल सुरात रसिक भारावून गेले. जया जोग (सतार), डॉ. नीलिमा राडकर (व्हायोलिन), अमृता माळी-जाधव (हार्मोनियम), भावना टिकले (तबला) या कलाकारांनी साथसंगत केली होती. डॉ. राजश्री महाजनी, माधुरी करंबेळकर, रंजना काळे यांच्या गायनाने सभागृहाचे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात राग भीमपलास ने झाली. नंतर ठुमरी, पहाडी (नादवेध) रागातील गाण्याने रसिकांची वाहव्वा मिळविली. कार्यक्रमाची सांगता भैरवीने झाली. भारतीय विद्या भवन ने गेल्या पावणे दोन वर्षात देशभरातून 11 राज्यात 422 कार्यक्रम राबविले. साडे तीन हजाराहून अधिक कलाकारांनी या कार्यक्रमाद्वारे आपली कला सादर केली, असे काकिर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
KBS/ MAP/SBT/ श्री. बोरले नंतर श्री. हर्षवर्धन पाटील विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामविकास आणि वन विभाग असे जे 5-6 विभाग आहे त्यांचेच यामध्ये महत्त्वाचे काम आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी मग काही एनजीओज् आहेत. अर्थात त्यातील काही एनजीओज् चांगले काम करीत आहेत यात शंका नाही. सभापती महोदय, या प्रश्नाच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यामध्ये सद्यःस्थिती बाबत जो मुद्दा उपस्थित केला गेला होता त्याला दिलेल्या लेखी उत्तरात जी माहिती शासनाने दिली होती त्यामध्ये असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाह
चंद्रपूर : बुधवार दुपारच्या सुमारास राजुरा वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 155 मध्ये वाघाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात राजुरा येथील इंदिरा नगर वॉर्डातील मंगेश पैकन कोडापे नावाचा इसम जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अलीकडे तालुक्यात वाघाचे सतत हल्ले होत आहे. आज ही एकाचा बळी गेला यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मागील महिन्यात मूर्ती येथील श्रीहरी साळवे यांचेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्या घटनेला काही काळ उलटतोच तो चिचबोली शिवारात आठवड्यात वाघाने हल्ला करून दोघांना जखमी केले होते. यामुळे परिस्थिती लक्षात घेता या महिन्यातील जोगापूर देवस्थान यात्रा महोत्सव बंद करण्यात आला आहे. तसेच गट तयार करून वन कर्मचारीचे रात्र दिवस गस्त घालीत आहेत. परंतु, वाघाची संख्या जास्त असल्याने अपुरे मनुष्य बळामुळे नियंत्रण करणे आव्हान ठरत आहे. त्यातच बुधवारी पुन्हा घटना घडल्यामुळे नागरिकांत संताप वाढून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Jalgaon boy from farmer family weds with american girl । जळगावात 'फॉरेनची सुनबाई'! शेतकऱ्याच्या मुलाने अमेरिकन तरुणीशी बांधली लग्नगाठ । Loksatta\nजळगावात 'फॉरेनची सुनबाई'! शेतकऱ्याच्या मुलाने अमेरिकन तरुणीशी बांधली लग्नगाठ\nसध्या जळगावमध्ये याच लग्नाची चर्चा आहे\nPublished on: February 27, 2020 4:04 pm\nप्रेमाला कसलंच बंधन नसतं असं म्हणतात. वय, देशांच्या सीमा यासारखे अडथळे ओलांडून प्रेम यशस्वी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच उदाहरणांमध्ये जळगावमधील एका तरुणाच्या प्रेमकथेची भर पडली आहे. या तरुणाचे नाव आहे योगेश माळी. शेतकरी कुटुंबातील योगेशने काही दिवसांपूर्वीच जळगावमध्ये मोठ्या थाटामाटात एका अमेरिकन तरुणीशी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. विशेष म्हणजे फेसबुकवरुन झालेली ओळखीचे रुपांतर आता पती-पत्नीच्या नात्यात झालं आहे.\nसॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या योगेशचे बालपण जळगाव आणि पुण्यातच गेले. योगेशने प्राथमिक शिक्षण विद्यानिकेतन शाळेमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यातील शासकीय महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं. कंप्युटरमध्ये एमएस पदवी योगेशने घेतली. त्यानंतर आपल्या शिक्षणाच्या जोरावर तो अमेरिकेत नोकरीला गेला. तिथेच योगेशची फेसबुकवरुन अॅना रेनवॉल या तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर ते वरचेवर एकमेकांशी बोलू लागले त्यांच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी प्रेमाची कबुली दिली. त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सोशल नेटवर्किंग मार्केटींगमध्ये कार्यरत असणाऱ्या अॅनाने योगेशबद्दल घरच्यांना कल्पना दिली. त्यानंतर दोघांनी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन याबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयानुसार अॅना तिच्या कुटुंबासहित जळगावला आली. त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. भारतीय संस्कृतीबद्दल कुतूहल असल्याने अॅनाने आणि तिच्या कुटुंबाने जळगावमध्ये येऊन भारतीय पद्धतीने लग्न करण्यास होकार दिला.\nअॅना लग्नाआधी काही दिवस जळगावला राहिली. तिने भारतीय परंपरेनुसार आपल्या राहणीमानात बदल केला. भारतीय पेहराव, घरातील कामे, नातेवाईकांच्या गाठीभेटी अशा अनेक गोष्टीं अॅनाने पहिल्यांदाच अनुभवल्या. ती माळी कुटुंबात चांगलीच रमली. त्यानंतरची अॅना आणि तिच्या आई-वडीलांनी लग्नाला होकार दिला. २३ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात माळी कुटुंबाने आपल्या फॉरेनच्या सुनबाईला कायमचे आपलेसे केले. सध्या जळगावमध्ये याच लग्नाची चर्चा आहे.
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये जाहीर सभेत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी बोलताना त्यांनी संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर देखील वक्तव्य केलं. संभाजीनगर कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वचन दिलं आहे, ते मी विसरणार नाही, आणि ते केल्याशिवाय रहाणार नाही. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'आधी जे बोंबलतायत त्यांना सांगयचाय एक दीड वर्ष झालं आहे विधानसभेत ठराव मंजूर झालेला आहे. कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. सुरुवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्राकडे दिला आहे. पण का होत नाही अजून.' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 'या शहराचं नुसतं नामांतर नाही तर संभाजीनगर जेव्हा या शहराचं नामांतर होईल तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना अभिमान वाटेल असं हे नगर करेन असं वचन मी देतो. नावाला सार्थ असं माझं शहर असेल. केंद्राकडे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव आधी मंजूर करुन घ्या. आम्ही तुमचा सत्कार करु.' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर बोलणार आहे. पाणीप्रश्न असतानासुद्धा तिथे पाठ फिरवण्याऐवजी त्याला सामोरं जातोय. कुठेही फसवेगिरी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. दहा दहा दिवसांनी पाणी येत होतं.' 'तुमच्या मनात येत असेल तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय पण आमच्या नळाला पाणी नाही. तर तुमचं ओघवतं वकृत्व आमच्या पाण्याचा हंडा भरणार आहे का. पण आता यात सुधारणा झाली आहे,' 'झारीतला शुक्राचार बसला आहे तो बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना बजावला आहे. एक जुनी योजना होती गंजून सडून गेली आहे, पण तिच्यासाठीही पैसे देत आहे. समांतर जलवाहिनी योजनेचं भूमीपूजन मी केलं होतं, त्याचा पाठपूरावा मी करेन असं मी तुम्हाला वचन दिलं होतं. ही योजना पूर्ण करण्याचं बजावलं आहे. एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही.' 'मध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता तर त्यांची सत्ता गेली म्हणून तो आक्रोश होता. आमच्या आधी पाच वर्ष तुम्हीच बसला होतात, का नाही त्यावेळेला योजना सुरु केली. पण प्रत्येकवेळा निवडणुक आली की तुमच्या तोंडावर काहीतरी फेकायचं, हे हिंदुत्व आम्हाला शिकवलं नाही.' 'रस्त्याच्या कामातही हात घालता आणि रस्त्येही सुधारत आहे. मेट्रोची गरज लागली तर त्यासाठीसुद्धा प्लान बनवण्याची तयारी सुरु आहे. पण शहराचं विद्रुपीकरण करुन मेट्रो करणार नाही. संभाजीनगराची शान वाढवण्याचं काम महाविकास आघाडी करेल हे वचन आज मी तुम्हाला देतो.'
लॅटिमेरिया : डेव्होनियन (सु. ४० ते ३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालात प्रभावी असलेल्या क्रॉसोप्टेरिजीआय या वर्गात मोडणाऱ्या माशांपैकी सध्या अस्तित्वात असलेल्या या माशाला लॅटिमेरिया असे म्हणतात. याचा समावेश सीलॅकँथिनी या गणात होतो. गेल्या तीस कोटी वर्षांच्या कालखंडात याच्या शरीरचनेत फारच थोडा फरक झाला आहे. याचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) मध्यजीव (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालात सापडले आहेत. लॅटिमेरिया कॅलम्नी हा मासा मृतावस्थेत १९३८ साली सापडला व त्याचे वर्णन जे.एल्. बी. स्मिथ यांनी केले. हे मासे सात कोटी वर्षांपूर्वी नामशेष झाले असावेत, असा समज होता. १९३८ नंतर लॅटिमेरियाचे जिवंत नमुने हिंदी महासागरात मादागास्करजवळील कॉमोरो बेटांजवळील खोल पाण्यात सापडले. हे मासे लहान माशांवर आपली उपजीविका करतात. मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलेल्या या माशांची लांबी एक ते दोन मी. असते व वजन ४० ते ८० किग्रॅ. असते. १९७२ साली याचे शवविच्छेदन करून याच्या शरीररचनेचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. याच सुमारास त्यांचा जीवरसायनशास्त्रदृष्ट्या आणि शरीरक्रियावैज्ञानिक दृष्ट्याही अभ्यास करण्यात आला. १९८७ साली यांच्या वर्तनाचा अभ्यास करून यांची छायाचित्रेही घेण्यात आली. इतर माशांपेक्षा लॅटिमेरियाचे पक्ष (हालचाल करण्यासाठी व तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या स्नायुमय घड्या पर) निराळे आहेत. याचे शेपूट रुंद आहे आणि त्याच्या कडेवर, तसेच वर आणि खाली पक्ष-अरांची रांग असते. शेपटीचे टोक एका खंडाचे असते. पुढचा पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) पंख्यासारखा असतो, दुसरा पृष्ठपक्ष व गुदपक्ष (ढुंगणावरील पर) यांच्या खंडावर खवले असतात आणि टोकावर पक्ष-अरांची रांग असते. अंसपक्ष (छातीवरील पर) व श्रोणिपक्ष (कमरेवरील पर) या युग्मित (जोडीने असलेल्या) पक्षांत पुष्कळ सारखेपणा असतो. श्रोणिपक्षाचा स्नायुयुक्त खंड जास्त लांबट असतो व तो ३६० अंशांतून वळू शकतो. त्यातील अस्थी व चतुष्पाद प्राण्यातील या अवयवाच्या अस्थी यांच्यामध्ये काही साम्य आढळत नाही. पाठीचा कणा कशेरुकांचा (मणक्यांचा) बनलेला नसून तो तंतुयुक्त नलिकेच्या पृष्ठरज्जूचा असतो. या नलिकेत द्रवपदार्थ असतो. हा कणा शेपटीच्या टोकापासून निघून डोक्यात शिरलेला असतो. असा कणा सायक्लोस्टोम व स्टर्जन यांसारख्या आदिमत्स्यांत आढळतो. असा कणा असणारा लॅटिमेरिया हा एक वैशिष्ट्यपूर्ण मासा आहे. याच्या कवटीचे अग्र व पश्च असे दोन भाग पडतात. हे दान्ही भाग पृष्ठीय बाजूस जुळलेले असतात. पृष्ठरज्जूचा अग्रभाग अग्र कवटीच्या अस्थीशी जोडलेला असतो. कवटीच्या पश्चभागात मेद व रक्त यांनी वेष्टिलेला लहान आकाराचा मेंदू असतो.⇨पोष ग्रंथीचे मुख आणि मस्तिष्क खंड लांब दांड्याने जोडलेले असतात. मुस्कट व घ्राणेंद्रियात एक इंद्रिय असते त्याचे कार्य अज्ञात आहे. डोळे काळ्या रंगाचे व अंधुक प्रकाशाच्या दृष्टीने योग्य असे असतात. आंत्रात (आतड्यात) वलयाकार सर्पिल झडप असते. वाताशय आकुंचन पावलेल्या दोऱ्यासारखा असतो. या मत्स्याच्या खवल्यांची उत्पत्ती त्वचा व अस्थीपासून झाली असावी, असे दिसते. आजपर्यंतचा जीवाश्मांच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष निघतो की, सीलॅकँथ माशापासून (ज्यात लॅटिमेरियाचा समावेश आहे) जमिनीवरील चतुष्पाद प्राण्यांची उत्पत्ती झाली असावी. हे निष्कर्ष शरीरशास्त्राच्या अभ्यासावरून काढले आहेत पण आत जिवंत लॅटिमेरिया उपलब्ध झाल्यामुळे त्याचा शरीरक्रियावैज्ञानिक व जीवरसायनशास्त्रीय दृष्टींनी अभ्यास केला गेला व यावरून असे आढळून आले की, हे मासे शार्क व रे या माशांचे पूर्वज असावेत. लॅटिमेरियाचा अग्निपिंड व पोष ग्रंथी यांचा आकार शार्कच्या या इंद्रियांसारखाच आहे. दोहोतही गुदांत्र ग्रंथी आहेत. या दोन्ही माशांच्या रुधिराभिसरणात साम्य आहे परंतु हा सारखेपणा वर्गीकरण बदलण्यास पुरेसा नाही, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. सीलॅकँथला अस्थिमय कंकाल (सांगाडा) आहे आणि खंडयुक्त पक्ष आहेत, हे त्यांच्या मते जास्त महत्त्वाचे आहे. ४० कोटी वर्षांच्या कालावधीत दोन्ही प्रकारचा क्रमविकास (उत्क्रांती) होणे शक्य आहे पण आणखी जिवंत लॅटिमेरिया मिळून त्यांचा सखोल अभ्यास होईपर्यंत हा प्रश्न अनिर्णितच राहणार आहे.
कोरोनाः नरेंद्र मोदींवर लॅन्सेटने नेमकी काय टीका केली आहे? जगप्रसिद्ध वैद्यकीय संशोधन नियतकालिक 'लॅन्सेट'ने आपल्या संपादकीयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, ट्विटरवर टीका करणाऱ्यांना रोखण्यापेक्षा कोव्हिडला रोखण्यावर त्यांनी भर द्यायला हवा होता. स्वतःवरची टीका आणि खुल्या चर्चेला रोखण्याचा प्रयत्न यामुळे ते माफीला पात्र नाहीत, असं परखड मत 'लॅन्सेट'मध्ये नोंदवण्यात आलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन संस्थेच्या मते, भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या एक लाखापर्यंत पोहोचू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर सरकारच्या टास्क फोर्सची बैठकच झालेली नाही. याचे परिणाम आपल्या समोर आहेत. कोरोनाचं संकट वाढतच चाललं आहे आणि भारताला यासंदर्भात नव्याने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. सरकार आपल्या चुका मान्य करणार का यावर नव्या धोरणांचं यश अवलंबून असेल. देशाला पारदर्शी नेतृत्व देणार का हाही मुद्दा आहे, असं 'लॅन्सेट'मध्ये म्हटलं आहे. लॅन्सेटने म्हटल्याप्रमाणे, वैज्ञानिक आधारावर सार्वजनिक आरोग्याशी निगडीत उपाययोजना करायला लागतील. जोपर्यंत लसीकरण वेगाने सुरू होत नाही तोवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी पावलं उचलायला हवीत. जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, सरकारने यासंदर्भात डेटा उपलब्ध करून द्यायला हवा. दर पंधरा दिवसांनी नेमकं काय घडतं आहे याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. कोरोनाला थोपवण्यासाठी काय उपाय अमलात आणले गेले आहेत याची माहितीही नागरिकांना द्यावी. देशव्यापी लॉकडाऊनसंदर्भात चर्चा व्हायला हवी, असं या लेखात लिहिलं आहे. कोरोना संसर्गाचं प्रारुप समजून घेण्यासाठी आणि त्याचा फैलाव कमी करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगवर भर द्यायला हवा, असंही म्हटलं आहे. या लेखात लोक कोरोना नियमांच्या पालनासंबंधी गंभीर आहेत का यासंबंधीही मत मांडण्यात आलं आहे. 'स्थानिक स्वराज्य पातळीवर संबंधित यंत्रणांनी काम सुरू केलं आहे मात्र त्याचवेळी लोक मास्क घालत आहेत का, सामाजिक अंतराचं पालन करत आहेत का, गर्दी होत नाहीये ना, क्वारंटीन आणि चाचण्या योग्य पद्धतीने होत आहेत ना याकडे लक्ष द्यावं लागेल. यात केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असेल. ' लसीकरणाला गती देणं आवश्यक आहे. आता समोर दुहेरी आव्हान आहे- लसीचा पुरवठा वाढवणं आणि त्यासाठी वितरण केंद्र उभारणं. याद्वारे शहरी तसंच ग्रामीण भागातील लोकांना लस घेता येईल. ग्रामीण भागात 65 टक्के जनता राहते. त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सोयीसुविधा पोहोचत नाहीत, असं म्हणत 'लॅन्सेट'नं सरकारला स्थानिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बरोबरीने काम करावं लागेल, असं स्पष्ट केलंय. भारत कोरोनाच्या संकटाच्या अंतिम टप्प्यात आहे असं विधान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं होतं. त्याचा संदर्भ या लेखात आहे. रुग्णालयांच्या सध्याच्या स्थितीबद्दलही नमूद करण्यात आलं आहे. काही महिने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारने आपण कोरोनाला हरवलं असं दाखवायला सुरुवात केली. दुसऱ्या लाटेचा तसंच कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका ओळखला नाही, असं या लेखात म्हटलं आहे. इशारा दिलेला असतानाही सरकारने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी दिली. यामध्ये लाखो लोक एकत्र आले. निवडणुकांच्या निमित्ताने रॅली, सभा झाल्या जिथे हजारोंची गर्दी जमली, याचाही 'लॅन्सेट'नं उल्लेख केला आहे. 'लॅन्सेट'नं सरकारच्या लसीकरण मोहिमेवरही टीका केली आहे. 'केंद्रीय पातळीवर लसीकरण अभियान अपयशी ठरलं आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात तसंच अठरा वर्षांवरील वयाच्या लोकांना लस देण्याबाबत केंद्राने राज्य सरकारांशी चर्चा केली नाही. अचानक धोरणात बदल केला आणि त्यामुळे लसीचा पुरवठा कमी पडू लागला आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. ' कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केरळ आणि ओडिशा ही राज्यं अधिक सक्षमतेनं तयार होती, असं 'लॅन्सेट'नं म्हटलं आहे. अतिरिक्त ऑक्सिजनचं उत्पादन करून ही राज्यं अन्य राज्यांना मदतही करत आहेत. 'महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या लाटेसाठी तयार नव्हती. ऑक्सिजन, रुग्णालयांची कमतरता, अन्य वैद्यकीय सोयीसुविधांची वानवा जाणवते आहे. अंत्यसंस्कारासाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे इतकी भीषण परिस्थिती आहे. ' रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या लोकांविरोधात देशाच्या सुरक्षेशी निगडीत कायद्यांचा वापर करण्यात आला, असंही 'लॅन्सेट'च्या लेखात म्हटलंय. लॅन्सेटच्या मुद्यावरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारने जोरदार टीका केली आहे. लॅन्सेटच्या संपादकीयनंतर सरकारने लाज वाटत असेल तर देशाची माफी मागावी असं काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. सरकारमधील काही लोकांनी लॅन्सेटचा आधार घेत कोरोना रोखला असा डिंडिम पिटला होता असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. हे वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )
खेड (जि. रत्नागिरी), दि. १५ : तळे - चंदनवाडी येथील बंद घरात जिलेटीनच्या कांड्या व बंदूक आढळल्याप्रकरणी फरारी असलेला संशयित आरोपी सीताराम रामचंद्र बाईत याला मुंबई येथून नाट्यमयरित्या पकडल्यानंतर त्याचा साथीदार नितीन काशिराम शिंदे (तळे - चंदनवाडी) याला पोलिसांनी अटक केली. माझ्या घरात आढळलेली ठासनीची बंदूक आपली नसून ती नितीन शिंदे यांची असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नितीन शिंदे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. या दोघांना खेड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीताराम बाईत यांच्या बंद घरात ठासनीची बंदूक, जिलेटीनच्या कांड्या व स्फोटकसदृश इतर साहित्य आढळले होते. खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ही कारवाई केली होती. यावेळी अंधाराचा फायदा घेत सीताराम बाईत नजीकच्या जंगलात पळाला होता. दोन महिन्यानंतर खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व गुन्ह्याचे तपासिक अधिकारी चंद्रकांत लाड यांनी मुंबईतील एका कंपनीच्या गेटवरच सोमवारी ११ जुलै रोजी बाईत याच्या मुसक्या आवळल्या. खेड येथील न्यायालयात हजर केले असता त्याला १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मंगळवारी पोलिसांनी पुन्हा कोठडीची मुदत मागितली होती. ती न्यायालयाने मान्य करुन एक दिवस आणखी कोठडी वाढवण्यात आली. यावेळी अटकेत असलेल्या आरोपी सिताराम बाईत याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत सिताराम याने घरात आढळलेली बंदूक नितीन शिंदे याची असून त्याने ती आपल्या घरात ठेवण्यास सांगितली होती. याबाबत नितीन शिंदे यानेही ती बंदूक आपणच ठेवल्याची कबुलीही दिली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महिपतगडावरील शंकराचे दर्शन घेऊन परतत असताना हे काम केल्याचे बाईत याने पोलिसांना सांगितले. या स्फोटक साहित्याचा वापर मासेमारीसाठी होत असल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी दिली. दुसरा संशयित आरोपी नितीन शिंदे यानेच आपल्याकडील बंदूक बाईत याच्या बंद घरामध्ये ठेवली होती. बंदूकदेखील विनापरवाना असून, ती नितीन शिंदे याच्या मालकीची नसून, ती कोठून आणली याचा तपास आता पोलीस करत आहेत. खेडचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड तपास करत आहेत.
सुपीरियर राज्य विद्यापीठ प्रवेश झिपः लेक उत्कृष्ट राज्य विद्यापीठात इच्छुक असलेल्या बहुतेक अर्जदार प्रत्येक वर्षी भरले जातात. 9 1 टक्के स्वीडिशन दराने, ज्या विद्यार्थ्यांना सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या ग्रेड आणि प्रमाणित परीक्षांचे गुण मिळतील त्या विद्यार्थ्यांना अर्ज मिळेल. अर्ज करण्यासाठी, शाळेच्या वेबसाइटवर व्हिडीओ निर्देश आणि महत्वपूर्ण मुदतीसाठी भेट द्या. प्रवेश डेटा (2016): उत्कृष्ट राज्य विद्यापीठ लेक वर्णनः लेक सुपीरियर स्टेट युनिव्हर्सिटी मिशिगनमधील 15 सार्वजनिक विद्यापीठेंपैकी एक आहे ; त्याच्या कॅम्पसची माहिती यु. एस. आर्मीच्या फोर्ट ब्रॅडीच्या साइटवर Sault Ste Marie मध्ये आहे. हे लहान बाजूवर आहे, फक्त 2,500 विद्यार्थी, एक विद्यार्थी / 15 ते 1 वयोगटातील दोष, आणि 30 पेक्षा कमी विद्यार्थ्यांची सरासरी श्रेणी आकार. एलएसएसयू आपल्या पाच महाविद्यालये आणि शाळांमधून शैक्षणिक कार्यक्रमांची एक मोठी यादी देतेः कला, पत्रे, सामाजिक विज्ञान आणि आपत्कालीन सेवा कॉलेज; व्यवसाय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय; नैसर्गिक आणि गणितीय विज्ञान महाविद्यालय; नर्सिंग कॉलेज आणि आरोग्य विज्ञान; आणि शिक्षण स्कूल. अग्निशमन विज्ञान कार्यक्रमाची ऑफर करण्यासाठी देशातील केवळ तीन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यापीठ आहे. 60 पेक्षा अधिक स्टुडंट्स क्लब आणि संघटना तसेच आंतरशाखा खेळ म्हणून कॅम्पसमध्ये भरपूर काम आहे. एलसीएसयू एनसीएए डिव्हिजन II ग्रेट लेक्स इंटरकॉलेज अॅथलेटिक कॉन्फरन्स (जीएलएसी) चे सदस्य आहे, परंतु विद्यापीठातर्फे आइस हॉकी संघ एनसीएए डिव्हिजन 1 सेंट्रल कॉलेजिएट हॉकी असोसिएशन (सीसीएचए) मध्ये स्पर्धा करते आणि पाच राष्ट्रीय विजेतेपद जिंकले आहेत. नावनोंदणी (2016): - एकूण नोंदणीः 2,0 99 (सर्व पदवीधर) खर्च (2016-17): - शिक्षण आणि फीः $ 11,019 (मध्ये-राज्य) - पुस्तकेः $ 1,100 ( का इतका? ) लेक सुपीरियर स्टेट युनिव्हर्सिटी फायनांशियल एड (2015 - 16): हस्तांतरण, पदवी आणि धारणा दरः आंतरकॉलिजिएथ अॅथलेटिक प्रोग्रॅमः माहितीचा स्रोतः जर तुम्ही सुपीरियर स्टेट युनिव्हर्सिटी लेक आवडत असेल, तर तुम्ही या शाळादेखील आवडतीलः
कागल (प्रतिनिधी) : येथील शाहू ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी बसस्थानक परिसरातील महाराजांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व वीरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जलाभिषेक करण्यात आला. नगरपालिके समोरील आणि खर्डेकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, आर्यवीर घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, श्रेयादेवी घाटगे यांच्यासह महिलांच्या गर्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुपारी १२ वाजता जन्मकाळ सोहळा झाला. महिलांनी पाळणा गायन केले. तसेच ऐतिहासिक श्रीराम मंदिर येथील सभागृहात हिदायत नायकवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवगीते गायिले. शिवशाहीर धोंडीराम मगदूम वडगावकर यांनी पोवाडा, शिवगीते गियिले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, बॉबी माने, संजय पाटील, शाहूचे संचालक यशवंत माने, राजेंद्र जाधव, विशाल पाटील, दीपक मगर, प्रवीण कदम, आप्पासाहेब भोसले, प्रा. सुनील मगदूम, प्रवीण गुरव, विवेक कुलकर्णी, उमेश सावंत, धैर्यशील इंगळे, नगरसेविका विजया निंबाळकर, आनंदी मोकाशी, सुधा कदम, नम्रता कुलकर्णी, फरीदा बुखारी, अनुप्रिता इंगळे यांच्यासह शाहूग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटा सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितले आहे. प्रिती झिंटाने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. प्रिती झिंटाने पती जीन गुडनेफसोबतचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने जुळ्या मुलांशी संबंधित गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रिती झिंटाची जुळी मुले एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. प्रीती झिंटा सरोगसीच्या माध्यमातून आई बनल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. प्रीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे पती जीन गुडइनफ याच्यासोबत फोटो शेअर केला आहे. 'आमच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. त्या दोघांची नावे जय आणि जिया अशी आहेत' त्यामुळे मी आणि माझा पती जीन खूप आनंदी आहे. अशा आशयाचे कॅप्शन लिहित फोटो शेअर केला आहे.
पुणे - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता आपला मोर्चा मंगलकार्यालयांकडे वळवला असून, तेथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात "ड्राईव्ह' हाती घेतला जाणार आहे. "स्वच्छ भारत मिशन' हा विषय महापालिकेने अतिशय गांभीर्याने घेतला असून, आता वर्षभर आधीपासूनच त्याची तयारी सुरू केली आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना देऊन, त्यांच्याकडून अधिकाधिक केसेस दाखल करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, शौच करणे, मूत्रविसर्जन करणे यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय प्लॅस्टिकचा वापर याचाही समावेश करण्यात आला आहे. "स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत महापालिकेने केवळ याच गोष्टी नव्हे तर सार्वजनिक कार्यक्रमांशी संबंधित असलेल्या आस्थापनांमध्येही जनजागृती आणि दंडात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सोमवारपासून मंगलकार्यालयांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना तेथेच कचरा जिरवण्यासंदर्भात जागृती केली जात आहे. अशा सोसायट्यांनी नियमांचे पालन न केल्यास किंवा सोसायटीत अंतर्गत छोटा कचरा प्रक्रिया प्रकल्प न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मग अशा मंगलकार्यालयांमधून रोज किंवा सिझनला निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात त्यांना समज देणे किंवा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे महापालिकेतील संबंधित विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच ही कारवाई करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने आता विविध आस्थापनांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा करणे यासह अन्य प्रकारांत महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत 19 हजार जणांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी महापालिकेने चौकांमध्ये, सिग्नलला उभे राहून "गार्बेज बॅग' विकणाऱ्यांवर कारवाई करून, त्या जप्त केल्या. तसेच भाजीविक्रेते आणि फळ विक्रेत्यांकडील प्लॅस्टिकवरही कारवाई केली. हा ड्राईव्ह कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सुपर संडेच्या दुसऱ्या लढतीत संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने कट्टर प्रतिस्पर्धी केरला ब्लास्टर्सचा 4-2 असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह बेंगळुरूने गुणतक्त्यात चौथा क्रमांक गाठला. स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ अपराजित असला तरी याआधीच्या लढतींमध्ये त्यांचा खेळ लौकीकाला साजेसा झाला नव्हता. त्यादृष्टिने ही कामगिरी चाहत्यांचा आनंद द्विगुणीत करणारी ठरली. क्लेईटन सिल्वा, एरीक पार्टालू, डिमास डेल्गाडो आणि सुनील छेत्री यांनी गोल केले. बेंगळुरूचा संघ प्रारंभी पिछाडीवर होता, पण मध्यंतरास त्यांनी बरोबरी साधली. मग दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच अनुभवी सुनील छेत्रीने पेनल्टी दवडली होती. त्यानंतरही बेंगळुरूने भक्कम मनोधैर्याच्या जोरावर विजय नोंदवला. अपराजित बेंगळुरूचा 5 सामन्यांतील हा दुसराच विजय असून तीन बरोबरींसह त्यांचे नऊ गुण झाले. एफसी गोवा (5 सामन्यांतून 8) मागे टाकत बेंगळुरूने गुणतक्त्यात एक क्रमांक प्रगती करीत पाचवरून चौथे स्थान गाठले. बेंगळुरूचे आता नऊ गोल झाले असून सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत त्यांनी मुंबई सिटी एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (प्रत्येकी 8) यांना मागे टाकले. या लढतीपूर्वी बेंगळुरूच्या खात्यात पाचच गोल होते. ब्लास्टर्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा लांबली. 5 सामन्यांत त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला. दोन बरोबरींसह त्यांचे दोन गुण व 11 संघांमध्ये शेवटून तिसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले. विजयाचे खाते अद्याप उघडू न शकलेल्या संघांमध्ये ब्लास्टर्स, ओदिशा एफसी आणि एससी ईस्ट बंगाल यांचा समावेश आहे. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मध्यंतरास दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 1-1 अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात बेंगळुरूने तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत पकड घेतली होती. त्यानंतर ब्लास्टर्सने पिछाडी कमी केली, पण सुनील छेत्रीने संघाचा चौथा गोल नोंदवला. ब्लास्टर्सने सामन्याची सुरवात सनसनाटी करीत खाते उघडण्याची शर्यत जिंकली. 17व्या मिनिटाला गॅरी हुपरने साधारण 60-70 यार्ड अंतरावरून आगेकूच केली. त्याने उजवीकडे राहुलला पास दिला. राहुलने चेंडूवर नियंत्रण मिळवत बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूला चकवले. बेंगळुरूने 29व्या मिनिटाला बरोबरी साधली. गुरप्रीतने ब्लास्टर्सच्या क्षेत्रात चेंडू टाकला. ब्लास्टर्सचा निशू कूमार आणि बेंगळुरूचा ओप्सेथ यांच्यात चेंडूवरील ताब्यासाठी चुरस झाली. निशूचे हेडिंग चुकले. त्यामुळे चेंडू ब्लास्टर्सच्याच गोलक्षेत्रात गेला. त्यावेळी बचावपटू लालरुथ्थारा याचाही अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू सिल्वा याच्या दिशेने गेला. सिल्वाने मग ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्सला चकवले. दुसरे सत्र सनसनाटी ठरले. प्रारंभीच ब्लास्टर्सचा बचावपटू बाकारी कोने याने बेंगळुरूचा स्ट्रायकर क्रिस्तीयन ओप्सेथला पाडले. त्यामुळे रेफरी क्रिस्टल जॉन यांनी बेंगळुरूला पेनल्टी बहाल केली. त्यावर सुनील छेत्रीने मारलेला चेंडू थेट गोम्स याच्या ग्लोव्हजमध्ये स्थिरावला. त्यावेळी छेत्रीला निराशा लपवता आली नाही. 49व्या मिनिटाला बसलेल्या या धक्क्यातून बेंगळुरू लगेच सावरला. 51व्या मिनिटाला युवा स्ट्रायकर आशिक कुरुनीयन याने दिलेल्या अप्रतिम क्रॉस पासवर डावीकडून क्लेईटन सिल्वाने आगेकूच केली. त्याने दिलेल्या पासवर ओप्सेथने चेंडू नेटच्या दिशेने मारला. हा चेंडू पार्टालू याच्या नडगीला लागून नेटमध्ये गेला. त्यानंतर दोन मिनिटांत बेंगळुरूने आघाडी वाढवली. गोम्सने लालरुथ्थारा याच्या दिशेने फेकलेला चेंडू क्लेईटन सिल्वाने चपळाईने आणि कौशल्याने आपल्या ताब्यात घेतला. त्याने ओप्सेथच्या दिशेने चेंडू मारला. त्यावेळी डेल्गाडो यानेही साथ देत धाव घेतली. पास मिळताच त्याने गोम्स याच्या डावीकडून चेंडू नेटमध्ये घालवला. डेल्गाडोच्या ताकदवान फटक्यामुळे गोम्सला हालचाल करण्याचीही संधी मिळाली नाही. संबंधित बातम्याः
आपणही पावसात कपडे, बूट तपासून घेतो, नीट झाडून घालतो (Snake video viral). पण कधी यामध्ये सापही असू शकतो, याचा स्वप्नात तरी तुम्ही विचार केला असेल का? असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पावसाळा म्हटलं की बरेच कीडे, कीटक आणि इतर जीव दिसू लागतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही असे जीव दिसतात. त्यामुळे बूट, कपडे यामध्ये असे छोटे-मोठे जीव असण्याची शक्यता असू शकते, याची कल्पना आपल्याला असते. त्यामुळे आपणही पावसात कपडे, बूट तपासून घेतो, नीट झाडून घालतो (Snake video viral). पण कधी यामध्ये सापही असू शकतो, याचा स्वप्नात तरी तुम्ही विचार केला असेल का? असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Snake Hiding in Shoe Video). एका बुटामध्ये कोब्रासारखा खतरनाक साप लपून बसला होता. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता एका घरात शूरॅकवर बऱ्याच चपला ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका बुटामध्ये एक महिला काठी टाकताना दिसते आहे. ती बुटामध्ये काठी टाकून हलवते आणि बऱ्याच वेळाने त्या शूझमधून एक भलामोठा साप बाहेर येतो. हा साधासुधा साप नव्हे तर विषारी खतरनाक कोब्रा साप आहे. जो बाहेर येताच आपला फणा काढून उभा राहतो (Snake Came Out Of Shoe). सापाची आकार पाहून इतक्या छोट्याशा बुटांमध्ये तो लपून राहू शकतो, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. महिला काठीने त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करते. मध्येच साप त्याच्यावर हल्ला करतानाही दिसतो. तेव्हा आपल्या अंगावरही काटा येतो. महिला या सापाला पकडताना काहीतरी सांगतानाही दिसते आहे. ती म्हणते, पावसाळ्याच्या दिवसात कुठेही विषारी कीटक, कीडे आणि असे प्राणी लपून राहतात. त्यामुळे सांभाळून राहायला हवं. सापाची आकार पाहून इतक्या छोट्याशा बुटांमध्ये तो लपून राहू शकतो, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अवघ्या 53 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण खूप भयंकर आहे. आयपीएस अधिकारी सुशांत नंदा यांनी @susantananda3 या आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पावसाळ्यात साप कोणत्याही जागी असू शकतात, त्यामुळे सावध राहा. असं कॅफ्शन त्यांनी या व्हिीओला दिलं आहे.
साताऱ्यात एक अनोखं लग्न पार पडलं. . . अनोखं कारण या लग्नाअगोदर नवरा नवरी चक्क 25 किलोमीटर धावले आणि त्यानंतर पै पाहुण्यांच्या साक्षीनं दोघं लग्नाच्या रेशीमगाठीत अडकले. पळून जाऊन लग्न करतात हे तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल पण पळत पळत लग्न केलेलं तुम्ही पाहिलं नसेल. साताऱ्यात एक जोडप्यानं पळत जाऊन लग्न केलं. साताऱ्यातल्या मेढा गावात या धावत्या लग्नाच्या गोष्टीला सुरुवात झाली. नवरदेव नवनाथ डिगे आणि नवरी पूनम चिकने या दोघांनी तब्बल 25 किलोमीटर धावत सातारा गाठत लग्न केलं. या लग्नात फक्त नवरा नवरीच धावत नव्हते तर वऱ्हाडीही धावत होते. आरोग्यासाठी धावणे गरजेचं आहे. आरोग्याबाबत जागरुक राहावं हा संदेश देण्यासाठी नवनाथ आणि पूनमनं 25 किलोमीटर धावण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यात आल्यानंतर नवरा नवरीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये दोघंही लग्नाच्या रेशीमगाठीत अडकले. लग्न तर अनेकांची होतात. पण 25 किलोमीटर धावून आरोग्याचा संदेश देत केलेलं लग्न मात्र संस्मरणीय ठरलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
नवी दिल्ली , 22 जानेवारी : भारताने कोरोना प्रतिबंधासाठी जगातील सर्वांत मोठा लसीकरण कार्यक्रम (Vaccination Programme) गेल्या आठवड्यात सुरू केला आहे. आरोग्य क्षेत्रात, तसंच युद्धपातळीवर काम करणाऱ्या आघाडीच्या लाखो कार्यकर्त्यांना आतापर्यंत लस देऊन झाली आहे; मात्र तरीही या लशी सुरक्षित आहेत की नाहीत, त्या किती प्रभावी आहेत, याबद्दल लोकांच्या मनात अजूनही अनेक शंकाकुशंका आहेत. कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींना (Vaccines) अत्यंत वेगाने संमती देण्यात आली. त्यावरून काही शंका घेतल्या जात आहेत. तसंच, या लशींबाबत काही अफवा आणि खोट्या गोष्टीही पसरवल्या जात आहेत. त्यामुळे आपण लस घेऊ नये, अशी भावना अनेक लोकांमध्ये आहे. काही जण लशींबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी गुरुवारी व्यक्त केलं. लस घेणं बंधनकारक आहे का? आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांत कोरोना योद्धे म्हणून काम करणारे कार्यकर्ते, 50 वर्षांवरील वयाच्या व्यक्ती आणि काही विकार असलेल्या 50 वर्षांखालील व्यक्ती अशा एकूण 30 कोटी नागरिकांना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तरीही कोविड-19 प्रतिबंधक लस घेणं बंधनकारक नाही. ही लस घेणं ऐच्छिक आहे. तरीही सरकारने पहिल्या टप्प्यातील लसीकरणाच्या संभाव्य लाभार्थ्यांना कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी लस घेण्याचा सल्ला दिला आहे. लस घेतल्यामुळे वंध्यत्व (Infertilty) येईल का? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींना सध्या भारतात परवानगी देण्यात आली आहे. या लशी घेतल्यानंतर पुरुष किंवा स्त्रियांमध्ये वंध्यत्व निर्माण होत असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. एखाद्याला अॅलर्जी (Allergy) असली, तर त्यांनी लस घ्यावी का? एखाद्या व्यक्तीला अॅलर्जीचा इतिहास असेल, तर त्यांनी लस घ्यावी असा सल्ला दिला जात नाही. या दोन्ही लशी विकसित करणाऱ्या कंपन्या अर्थात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी अॅलर्जीच्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) त्यांच्या फॅक्ट शीटमध्ये सांगितलं आहे, की अन्नपदार्थ, औषधं किंवा लशी आदींना अॅलर्जिक असलेल्या व्यक्तींनी लस घेण्यापूर्वी त्याबद्दलची माहिती देणं आवश्यक आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने असं म्हटलं आहे, की कोणाला अॅलर्जी असेल, त्यांनी लस न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना हे कळवलं आहे, की अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी लस घेऊ नये. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि विकार असलेल्या व्यक्तींनी लस घ्यावी का? कोविड-19 प्रतिबंधक लसनिर्मितीनंतर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये गर्भवती महिला, तसंच स्तनदा मातांना सहभागी करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आत्ता लस घेऊ नये. गंभीर आजारी असलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलेल्या रुग्णांनी बरं होऊन चार ते आठ आठवडे होईपर्यंत लस घेऊ नये, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना ताप आहे, ज्यांना रक्तस्रावाच्या व्याधी आहेत, तसंच ज्यांची आजारपणासाठी नियमित औषधं सुरू आहेत अशा व्यक्तींनी लस घेऊ नये, असं सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी म्हटलं आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मास्क (Mask) घालणं आवश्यक आहे का? हो. आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर शरीरात रोगप्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात; मात्र संरक्षण करून शकतील एवढ्या प्रमाणात अँटीबॉडीज विकसित होण्यासाठी दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवडे लागू शकतात. पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे मास्क घालणं, गर्दीच्या जागा टाळणं, सोशल डिस्टन्सिंग राखणं, हात-तोंड धुणं आदी बाबी पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही सुरूच ठेवाव्या लागणार आहेत. ज्यांना अगोदर कोरोनाची लागण होऊन गेलीय, त्यांनी लस घ्यावी का? ज्यांना अगोदर कोरोनाचा संसर्ग होऊन गेलाय, त्यांनी प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी लस घ्यावी. तसंच, ज्यांना कोरोनाचा संसर्ग आत्ता झालेला असेल, त्यांनी त्यातून बरे होऊन चार ते आठ आठवडे झाल्याशिवाय लस घेऊ नये, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. लस घेतल्यानंतर जाणवणारे दुष्परिणाम कोणते? लसीकरणानंतर काही अनपेक्षित रिअॅक्शन्स (Reactions) येऊ शकतात. त्या लसीशी किंवा लसीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित असतीलच असं नाही. वेदना, इंजेक्शनच्या जागी सूज, थोडा ताप, अंगदुखी, थकवा, रॅशेस उठणं, नॉशिया (Nausea) अशी काही सौम्य लक्षणं दिसू शकतात, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले... आईने प्रेमाने दिलेली मोतीजडित काननकुंडले अजून आपल्या जागी होती. त्याने हळूवारपणे ती काढली, दोन्ही हाताच्या ओंजळी काननकुंडले चमकत होती व त्याच्या डोळ्यासमोर भव्य राजप्रसादातील आईसोबत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी दाटून येत होत्या, राजवैभव, सुस्वरूप पत्नी, एक गोंडस मुलगी.. सर्व काही मागे सोडून नव्याने एक आत्मशोध प्रवास. क्षणभरच.. त्याने ती काननकुंडले देखील बाजूला असलेल्या रत्नांवर अर्ध्य द्यावे या प्रकारे सोडून दिले.. तो पुन्हा निर्विकार झाला होता, स्वःच्या शोधासाठी सुखाचा त्याग हा करावा लागतोच. तसा ही राजभवनात होता तेव्हा तरी तो कोठे तेथे होता? तेथे होते ते फक्त त्याचे शरीर. ध्यान, चिंतन व मनन मध्ये सदा मग्न असलेला राजकुमार. आई वडिलांची इच्छा म्हणून लग्न केले, आईला वचन दिले होते म्हणून तो किमान ३० वर्ष तरी राहिला त्या राजप्रासादात. जर वचन दिले नसते तर खूप आधीच त्याने गृहत्याग केला असता, जेव्हा त्याच्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला तेव्हाच. त्याला स्पष्टपणे तो दिवस आठवत होता. एका यज्ञशाळेत यज्ञ चालू होता. यज्ञात आहुती दिली जात होती, तूप, दही, दुध.. आणि त्याच प्रमाणे पक्षी-प्राण्यांचे ही. त्या मूक पशूचे आक्रंदन आणि आकाश व्यापणारे त्यांचे दुख. कोण प्रसन्न होत असेल अश्या उष्णरक्ताच्या अभिषेकाने? कोण प्रसन्न होऊन आशिष प्रदान करणार होते क्रूर हिंसेने बरबटलेले यज्ञ आहुती घेऊन? प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते, साचेबद्ध उत्तरे आणि तीच तीच कारणे. पण त्याचे कोमलमन या हिंसेने थरारून गेले होते. स्वतःच्या क्षणिक सुखासाठी एका जीवाचा बळी? हा प्रश्न मनात वादळ बनून घोंगावत होता. दिवसामागून दिवस गेले. बालमनाला पडलेला प्रश्न तारुण्याच्या उबरठ्यावर अजून प्रकर्षाने जाणवू लागला होता. रोजच्या ध्यानातून व चिंतनातून आत्मशोधाची आस निर्माण होत होती. हिंसेपासून सुरु झालेला चिंतनाचा प्रवास आता आत्मशोध व मोक्ष प्राप्ती मार्गावर आला होता. अतीव सुखाच्या सागरातून बाहेर येऊन कष्टप्रद साधनेच्या कांटेरी रस्तावर अत्यंत कठीण असा प्रवास, सुरु कोठून व याचा शेवट कोठे या प्रश्नांची उत्तरे त्याला देखील माहिती होती का? आज सर्वत्र एक प्रकारची खिन्नता पसरली होती पण फक्त याच्या मनात चैतन्य व शांतता होती. सर्व गोष्टींचा त्याग करून झाला होता, राहिले होते ते खांद्यावर शुभ्र देवदुष्याचा पट. सर्व पाश बाजूला करून तो चालू लागला. निर्वाकार, शांत पाउले टाकत त्यांने जंगलात प्रवेश केला, मागे त्याच्या नावाचा जयजयकार झाला, पण शरीरावरील अलंकारांप्रमाणे त्याने जणू नावाचा देखील त्याग केला होता... तो चालत राहिला, खांद्यावरी शुभ्र देवदुष्या वाऱ्याने फडफडत होती. मनात चिंतन चालू होते. या जगातील सर्व धर्मांचे मूळ काय? ईश्वर म्हणजे कोण? ही सृष्टी, हे जग याचा नियंत्रक कोण? आत्मा म्हणजे काय? आपला मुळ हेतू काय? तत्त्वज्ञानाचा शोध घ्यावा की आधी स्वत्वाचा शोध? सर्वत्र पसरलेल्या हिंसेचे मूळ काय? प्रश्न अनेक होते, वाट आता बिकट होत होती. सूर्य मावळला होता. तो एका वृक्षाजवळ जाऊन थांबला. उंच असा तो वृक्ष आकाशाला आव्हान देत वर वर चालला आहे की काय असा भास होत होता. शक्यतो असंख्य पक्ष्यांचा आसरा असेल, त्या डेरेदार वृक्षावर अनेक पक्षी आपली घरटी बांधून राहत असतील. सुमधुर असा मंजुळ स्वर नभात पसरला होता, समोर निर्मळ तलाव होता, त्याचे गूढनिळे पाणी दूरवर पसरलेले होते. त्याने येथेच ध्यानधारणा करण्याचे निश्चित केले. त्या वृक्षाच्या खाली त्याने पद्मासन धारण केले व डोळे मिटून ज्ञान शोधण्याचा प्रवास सुरु केला. दिवस, महिने वाऱ्याने पाचोळा उडावा असे निघून गेले. अखंड ध्यान मग्न राहून, असंख्य कष्टाला सामोरे जात साधना चालू होती. जंगलातील पशूंचा उपद्रव नित्य होता पण, छोट्या छोट्या गोष्टीतून, निसर्गाच्या वागण्यातून त्याला ज्ञान मिळत होते, तो सर्वाचे शांत मनाने रसग्रहण करत होता, त्याला माहिती होते ज्ञानाचा मार्ग कठीण जरी असला तरी अप्राप्य नक्कीच नाही आहे, त्याची वाटचाल चालूच होती. त्याने आपले डोळे उघडले, सूर्य अस्त होण्यास अजून कालावधी होता, सर्वत्र एक निरव व प्रसन्न अशी शांतता पसरली होती, आणि तो संथ आवाजात बोलू लागला "भय! या विश्वातील प्रत्येक जीवाला भय आहे. कारणवस्तू निश्चित वेगळी असू शकते. पण भाव एकच असतो, तो भयाचा. मृत्यूचे भय, आपल्या अस्तित्वहीन होण्याचे भय. आपल्या प्रजातीच्या अस्तित्वाचे भय. आपल्या जमवलेल्या संपतीच्या ऱ्हासाचे भय. आपल्या प्रियजन व्यक्तीशी होणारी संभाव्य ताटातूटीचे भय. आपल्या संचित पापाचे भय, आपल्या मर्यादेबाहेरील निसर्गाचे भय... भय हे सर्वत्र व्यापले आहे. सर्वांना क्षणिक मुक्ती हवी असते ती भयापासून. भयापासून मुक्ती कशी मिळेल? निर्भय होऊन. पण निर्भय होणे एवढे सोपे आहे का? क्षणभूंगूर अश्या जीवनाच्या अस्तित्वाचाच जेथे प्रश्न आहे तेथे निर्भय कसे व्हावे? निर्भय होता येते, जर अभय मिळाले तर. भयापेक्षा ही जास्त शक्ती अभय मध्ये आहे. शक्तिशाली जीवाने जर शक्तिहीन जीवाला अभय दिले तर तो भय मुक्त होऊ शकतो. पण शक्तिशाली कुठल्या कारणाने अभय देईल? जर शक्तिशाली जीव जर सर्वांना समभाव नजरेने पाहत असेल आणि त्याच्या मनात करुणाभाव असेल तर, हे सहज शक्य आहे." तो थांबला, आणि त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहू लागला. वृद्धाने आपले थरथरत असलेले दोन्ही हात पुढे केले व म्हणाला "उदाहरणार्थ?" त्याने समोर पाहिले, व वृद्धाला देखील तिकडे पाहण्यासाठी हातानेच सांगितले. समोरच्या पाणवठ्यावर एक सुंदर हरीण पाणी पीत होते, त्याच सुमारास एक वाघ तेथे पाणी पिण्यास आला. पण त्याने हरीणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून पाणी पिण्यास सुरवात केली. ज्याच्या फक्त अस्तित्वामुळे चंचल हरीण अस्वस्थ होऊन ती जागा सोडून आपले चौखूर उधळत जंगलात नाहीशी होणे अपेक्षित होते तेथे ते हरीण त्या वाघाशेजारी पाणी पीत होते. भय-अभय चे जिवंत चित्र समोर उभे होते. तो अजून ही ते पाणवठ्यावरचे दृश्य पाहत होता. तिकडे पाहत तो म्हणाला "असे अभय देणारे तत्त्वज्ञान निर्माण करणे आणि असा समाज निर्मिती हे उद्दिष्ट नजरे समोर आहे माझ्या." वृद्ध उत्तराने संतुष्ट नव्हता झाला. पण पश्चिमेच्या डोंगरांनी सूर्याला आपल्यापाठी कधीच लपवले होते. रम्य संधीप्रकाश आता लुप्त होऊ पाहत होता व समोर निशा सर्व चराचराला आपल्या कवेत घेण्यास उत्सुक झाली होती. तिकडे पाहत वृद्ध म्हणाला "भय, सार्वत्रिक आहे. तू म्हणतो आहेस ते एका अर्थाने बरोबर देखील आहे. पूर्ण अंधार्याजागी पेटलेली एक पणती देखील आपल्याला अभय देते. आपले अस्तित्व अजून काही काळ राहणार आहे याची खात्री देते." तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते. त्याचे ओठ हलकेसे स्मित करत आहेत असा भास एकाद्याला त्याच्याकडे पाहताना नक्कीच झाला असता.
तीन सफरचंदांची कथा । mr.upakram.org\nतीन सफरचंदांची कथा\nOctober 13, 2011 - 11:52 am\nआधुनिक मानवाच्या जडणघडणीत तीन सफरचंदांचा महत्वाचा वाटा आहे असे विधान जर मी केले तर बरीच मंडळी माझी गणना वेड्यात करतील अशी बरीच शक्यता आहे. मला मात्र असे ठामपणे वाटते आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे ही तिन्ही सफरचंदे पूर्णपणे काल्पनिक आहेत. बाजारात मिळणार्या व तोंडाला पाणी आणणार्या वॉशिंग्टन डिलाइट किंवा फुजी या सारख्या सफरचंदांच्या व्हरायटींशी या काल्पनिक सफरचंदांचा काडीचाही संबंध नाही. तरीही आधुनिक मानवाची विचार करण्याची पद्धत, त्याने केलेली शास्त्रीय प्रगती व आधुनिक जीवन यावर ही सफरचंदे अजूनही कमालीचा प्रभाव टाकत आहेत ही गोष्ट मोठी आश्चर्यजनकच म्हणावी लागेल.\nजगात ज्या प्रमुख धर्मांचे पालन केले जाते त्यापैकी ख्रिस्ती धर्म हा सर्वात जास्त अनुयायी असलेला धर्म आहे. जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतियांशापेक्षा जास्त किंवा 220 कोटी लोक या धर्माचे अनुयायी आहेत. अमेरिका व युरोप या दोन्ही खंडात तर या धर्माचे अनुयायी बहुसंख्येने आहेत. तर या प्रमुख धर्माचा धर्मग्रंथ असलेल्या बायबल मध्ये, जेनेसिस हे नाव असलेला एक ओवी-संग्रह आहे. या जेनेसिस ओवी-संग्रहात, एक कथा दिलेली आहे. या कथेतील वर्णनाप्रमाणे, परमेश्वराने गार्डन ऑफ ईडन या नावाची एक अतिशय नयनरम्य बाग तयार करून त्यात दुष्ट व सुष्ट विचार, सारासार विचार व विज्ञान या सर्वांचे ज्ञान देऊ शकणारा एक विशाल वृक्ष लावला होता. परमेश्वराने प्रथम ऍडम किंवा आदमबाबा या पहिल्या मानवाची निर्मिती केली होती. या पहिल्या मानवाला परमेश्वराने या ज्ञान वृक्षाची फळे कोणत्याही परिस्थितीत न खाण्याची कडक ताकीद (कां व कशासाठी ते माहीत नाही.) देऊन ठेवलेली होती. यानंतर परमेश्वराने ईव्ह या स्त्रीची निर्मिती केली. आदमबाबा व ईव्ह हे या बागेत सुखाने कालक्रमणा करत होते. (म्हणजे काय करत होते? तेही अज्ञानातच आहे.) ईव्हला या ज्ञान वृक्षाची फळे न खाण्याची आज्ञा माहितच नसल्याने, (आदमबाबाने ही ताकीद तिला का बरे सांगितली नाही?) त्या बागेत वास्तव्यास असलेल्या एका सर्पाने, ईव्हला या झाडाचे फळ खाण्यासाठी मोहात पाडले. हे फळ खाल्ल्यावर ईव्ह एकदम ज्ञानी होईल असे या सर्पाचे तर्कशास्त्र होते. ईव्हने आपल्याबरोबर आदमबाबालाही हे फळ खाण्याच्या मोहात पाडले. (आदमबाबाला परमेश्वराची ताकीद माहित होती तरीही ईव्हच्या नादाने तो फसला.) आता हे फळ खाल्ल्याबरोब्बर आदमबाबा व ईव्ह यांना पहिले ज्ञान कसले झाले तर स्वतःच्या नग्नतेचे!. परमेश्वराला आपल्या कायद्याचा या मंडळींनी भंग केला आहे हे कळल्याने तो साहजिकच अतिशय रागावला. आदमबाबा, ईव्ह व तो सर्प या सर्वांची हकालपट्टी त्याने त्या बागेतून करून टाकली व त्यामुळे या सर्वांचे अमरत्वही गेले. आणखी शिक्षा म्हणून परमेश्वराने ऍडमला शेती करून पोट भरावे लागेल, ईव्हला भयंकर प्रसृतीवेदनांना तोंड द्यावे लागेल आणि ऍडमच्या आज्ञेतच तिला जन्मभर रहावे लागेल वगैरे वगैरे शाप दिले. सर्प मात्र शापांच्यातून सुटला. या गोष्टीतला हा ज्ञान वृक्ष सफरचंदाचा असल्याने आपल्या कथेतल्या तीन सफरचंदांच्यापैकी पहिले सफरचंद या गोष्टीत सापडते.\nकाही मंडळी असे म्हणतात की ऍडम व ईव्ह यांनी हे सफरचंद खाल्ले हे चांगलेच केले. नाहीतर नग्नतेची जाणीवच नसल्याने निरनिराळे कपडे, फॅशन हे सगळे मानवाला कधी करताच आले नसते. काही मंडळींचे तर विचार आहेत की सफरचंद खाण्याआधी ऍडम व ईव्ह यांची जी लाईफस्टाईल होती ती बघता, अमरत्व मिळूनही हे दोघे कशासाठी जगत होते तेच कळत नाही. तेंव्हा त्यांनी सफरचंद खाल्ले हे आपले नशीबच. थोडक्यात म्हणजे आधुनिक मानवाची फॅशन, राहणी हे सगळे या एका सफरचंदामुळे मानवाला मिळाले आहे. आणि स्त्री-पुरुष आकर्षणच नाही? म्हणजे कथा, कादंबर्या, सिनेमे, नाटके व टीव्ही सिरियल्स संपल्याच की! 1975 साली इंदिराबाईंनी जेंव्हा देशात आणीबाणी जाहीर केली होती त्या वेळेचे दूरदर्शन वरचे कार्यक्रम सुद्धा या मानाने मनोरंजक म्हणता येतील इतके नीरस कार्यक्रम हे सफरचंद या ऍड्म-ईव्हनी खाल्ले नसते, तर आपल्याला बघत बसावे लागले असते.\nआपल्या कथेतील दुसरे सफरचंद आहे सतराव्या शतकातल्या इंग्लंडमधल्या एका झाडावरचे. ऍडम-ईव्ह यांनी खालेल्या सफरचंदासारखे विशेष काही असे हे सफरचंद नव्हते तर अगदी साधे सुधे नेहमी सफरचंदाच्या झाडाला लागतात तसलेच हे फळ होते. या सफरचंदाची विशेषता एवढीच होती की पिकल्यावर ते जे खाली गळून पडले ते झाडाखाली बसलेल्या एका मनुष्याच्या डोक्यावर. बरं हा माणूस कोणीसाधासुधा पांथस्थ नव्हता किंवा ऍडम-ईव्ह सारखा बागेत फिरणाराही नव्हता. अत्यंत विख्यात आणि सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाणारा आयझॅक न्यूटनच त्या झाडाखाली बसलेला होता. हे सफरचंद डोक्यावर पडल्यावर न्यूटनचे विचार चक्र जे सुरू झाले ते त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधून काढल्यावरच थांबले. गुरुत्वाकर्षणाबरोबरच त्याने वस्तूंच्या चलनासंबंधीचे नियम व केपलच्या नियमांचा सैद्धांतिक पुरावाही सादर केला. या नंतर इंग्लंडमध्ये जी शास्त्रीय व औद्योगिक क्रांती घडून आली त्याचे पुष्कळसे श्रेय या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आणि पर्यायाने आपल्या या दुसर्या सफरचंदाला देता येते.\nआपल्या गोष्टीतले तिसरे सफरचंद मात्र तसे नवीन आणि आधुनिक कालातले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातल्या स्टीव्हन जॉब्स या एका 21 वर्षाच्या तरूणाला, वैयक्तिक उपयोगाचा संगणक या नवीन कल्पनेने पूर्णपणे भारून टाकले होते. कॉलेज शिक्षण घेत असलेला जॉब्स या कल्पनेने इतका पछाडला होता की आपले कॉलेज शिक्षण सोडून देऊन त्याने अटारी या इलेक्ट्रॉनिक गेम्स बनवणार्या कंपनीत नोकरी सुरू केली. याच वेळेला तो हेवलिट पॅकार्ड कंपनीने आयोजित केलेल्या व्याख्यानांना आपली नियमित उपस्थिती लावत असे. या ठिकाणी त्याला स्टीफन वॉझनिआक हा त्याच्याहून3वर्षांनी लहान असलेला तरूण भेटला. जॉब्सने वैयक्तिक उपयोगाच्या संगणकाची आपली कल्पना या वॉझनिआकच्या गळ्यात उतरवली. दोघांनी स्वतःचे वाहन व एक कॅल्क्युलेटर विकून 1300 डॉलर्स जमा केले व जॉब्स कुटुंबाच्या गराज मध्ये 1976 साली आपली कंपनी चालू केली. या कंपनीला त्यांनी नाव दिले ऍपल कॉम्प्यूटर्स व आपल्या गोष्टीतले तिसरे सफरचंद आकाराला आले. याच वर्षी या दुक्कलीने आपण बनवलेले व एकाच सर्किट बोर्डावर असलेले 50 संगणक माऊंटन व्ह्यू मधील 'बाईट शॉप' या डीलरला प्रत्येकी 666 डोलर्स या किंमतीला विकले व ऍपल कंपनीची दैदिप्यमान कारकीर्द सुरू झाली.\n1977 मधल्या ऍपल2या संगणकामुळे वैयक्तिक संगणकाची शक्ती ग्राहकांच्या चांगलीच लक्षात आली. हा संगणक अतिशय प्रसिद्ध झाला व आयबीएम सारख्या कंपनीच्या उत्पादनांना अतिशय यशस्वी असा एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला. या नंतर कोणत्याही धंद्यात होतात तसे चढ उतार ऍपल कंपनीलाही बघावे लागले. परंतु गेल्या 34 वर्षात या कंपनीने उत्पादनांची जी अद्वितीय मालिका जगभरच्या ग्राहकांसमोर आणली त्याला खरोखरच तोड नाही. 1984 मधला 'मॅकिन्टॉश', 1998 मधला 'आयमॅक' हे कंपनीने ग्राहकांना सादर केलेले अजोड वैयक्तिक संगणक होते तर 2001 मधल्या 'आयपॉड' मुळे सोनीच्या वॉकमन व डिस्कमन या कधीही व कोठेही संगीत ऐकवू शकणार्या गॅजेट्सना एक अतिशय लहान आकारातला जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण झाला. 2007 मध्ये ऍपल कंपनी मोबाईल फोनच्या क्षेत्रात ' आयफोन' द्वारे उतरली व अतिशय निराळ्या डिझाईनमुळे एक नवीन क्रांतीच या क्षेत्रात आणली गेली. या पाठोपाठ मागच्या वर्षी परत एकदा संगणक क्षेत्रात 'आयपॅड' हा टॅबलेट संगणक आणून, ऍपल कंपनीने ग्राहकांच्या मनावर आपले संपूर्ण राज्य असल्याचे सिद्ध करून दिले आहे.\nऍपल कंपनीचा प्रणेता स्टीव्ह जॉब्स हा कर्करोगाने बरीच वर्षे आजारी होता. तरी सुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली ऍपल कंपनी नवीन नवीन उत्पादने बाजारात आणतच गेली. काही दिवसांपूर्वी स्टीव्ह जॉब्स या आजाराला शेवटी बळी पडला. मात्र त्याने कल्पिलेले व साकारलेले हे तिसरे सफरचंद, आपला प्रभाव जगभर पुढे सुद्धा गाजवतच राहील असे ऍपल प्रेमींना मनापासून वाटते आहे.\nया तीन काल्पनिक सफरचंदांनी, आधुनिक मानवाच्या आयुष्यावर व जडण घडणीवर एवढा मोठा परिणाम केला आहे की या तीन सफरचंदाना विसरणे कोणालाही शक्य होणार नाही.\nप्रियाली [13 Oct 2011 रोजी 12:30 वा.]\nवरल्या तीन सफरचंदाचे फॉरवर्डेड इमेल माझ्या इमेल बॉक्समध्ये आहेत. :-) चंद्रशेखरांची शैली उत्तमच परंतु त्यांच्याकडून यापेक्षा बरे काही वाचायला मिळेल या अपेक्षेत आहे.\nसन्जोप राव [14 Oct 2011 रोजी 01:03 वा.]\nचंद्रशेखर, तीन सफरचंदांची गुंफण आवडली. 'मूळ कल्पना परकीय' असे एक साधे डिस्क्लेमर टाकले असते तर 'निकलना खुल्दसे आदमका सुनते आयें हैं लेकिन, बहोत बे-आबरु होकर तेरे कूचेसे हम निकले' असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. असो, तुम्ही काय करायला हवे होते हे सांगणे म्हणजे दादागिरी होईल या भयाने इथेच थांबतो.\n'ऍन ऍपल अ डे, कीप्स अ डॉक्टर अवे'\nमूळ कल्पना परकीय\nचंद्रशेखर [14 Oct 2011 रोजी 02:27 वा.]\nपरवा गप्पा मारत असताना माझ्या एका मित्राने मला ही कल्पना सांगितली. मला ती आवडल्याने त्याला लेखस्वरूप दिले. दुर्दैवाने किंवा सुदैवाने मला असले एसएमएस कोणीच पाठवत नसल्याने असा काही एसएमएस फिरतो आहे ही कल्पनाच नव्हती. आधी माहीत असते तर तसे लेखात म्हणण्याला काहीच अडचण नव्हती. त्यामुळे संजोप राव म्हणतात तशी ' ' मूळ कल्पना परकीय' घोषणा आता लेखात करणे शक्य नसल्याने येथे प्रतिसादातच ती करतो.\nप्रियालीताईंना एवढेच सांगणे की प्रत्येक वेळेस बांगडा किंवा सुरमई करीच मिळते असे नाही काही वेळेस दुध्या भोपळ्याची भाजीही खावी लागते.\nप्रियाली [14 Oct 2011 रोजी 09:17 वा.]\n' मूळ कल्पना परकीय' घोषणा आता लेखात करणे शक्य नसल्याने येथे प्रतिसादातच ती करतो.\nबांगडा, पापलेट, बोंबिल, सुरमई करीही मिळू दे की लवकरच. पट्टीच्या शेफ कडून दुधी भोपळ्याची भाजी मिळाली तर कुरकुर होणारच. ;-)\nऋषिकेश [14 Oct 2011 रोजी 04:04 वा.]\nतीन सफरचंदे म्हटल्यावरच अंदाज आला होता.. -- तो खराही ठरला\nबाकी सध्या बर्याच महत्त्वाच्या घटना होऊनही तुमच्याकडून बर्याच दिवसांत परराष्ट्र धोरणासंबंधी वाचायला मिळाले नाहि.. खाहितरी खास वाचायला मिळायची प्रतिक्षा करतो\nसाधा सोपा लेख\nरावले सतीश [14 Oct 2011 रोजी 05:21 वा.]\nसफरचंद खाल्ल्यामुळे द्न्यान प्राप्त झाले हि ख्रिस्ती धर्मातील किती भाबडी समजूत होती अन् आहे नाही कां?\nआत्ता-आत्तापर्यंत 'ऍन ऍपल अ डे किप डॉक्टर अवेअ' अशी परकिय म्हण हि चांगलीच प्रचलित होती/ आहे.\nजॉब्स देखील नेहमी सफरचंद खायचा, बिचार्याला तरीही कॅन्सर झाला, अन् त्यामुळे तो गेला.\nकाल परवाच वर्तमान पत्रात वाचले होते कि पेरू हे स्वस्त विकले जाणारे फळ ऍन्टीऑक्सीडेन्ट म्हणून सफरचंदापेक्शा सरस आहे.\nआजूनकोणमी [14 Oct 2011 रोजी 05:30 वा.]\n>>जॉब्स देखील नेहमी सफरचंद खायचा, बिचार्याला तरीही कॅन्सर झाला, अन् त्यामुळे तो गेला.\nबहुदा सफरचंद खाल्ल्यामुळे डॉक्टर त्याच्यापासून दूर राहिला व तो कॅन्सरला बळी पडला असेल !\nअदृष्य [22 Oct 2011 रोजी 08:45 वा.]\nकॅन्सर आहे हे कळल्यानंतर भलत्यासलत्या ट्रीटमेंट्सच्या मागे लागल्याने मृत्यु थोडा लवकर आला असे म्हंटल्या जाते आहे ...\nभल्याभल्यांना माया सोडत नाही\nआजूनकोणमी [14 Oct 2011 रोजी 05:27 वा.]\nमाझ्याकडे असे कुठलेही इ-पत्र आले नाही, सबब हा लेख रंजक वाटला.\nपण देव बहुदा सापाला देखील शिक्षा करतो - तू आयुष्यभर सरपटत राहशील असा शाप देतो. (!, असो पौराणिक कथा सगळीकडेच रंजक असतात).\nआंबा का नाही?\nविसुनाना [14 Oct 2011 रोजी 07:30 वा.]\nआपल्याकडला आंबा किंवा गेलाबाजार पेरू नाही याचे (नेहमीप्रमाणेच!) वैषम्य वाटले.\n(डुकृञ्करणे,डुकृञ्करणे,डुकृञ्करणे...पहा पाश्चात्यांनी आपले मूळ धातू चोरून त्यांची भाषा बनवली आहे.) ;)\nज्ञानेश... [14 Oct 2011 रोजी 12:36 वा.]\nबाकी सगळं ठीक आहे, पण न्यूटनचे दुसरे सफरचंदही 'काल्पनिक' असल्याचे मला माहीत नव्हते. मला वाटत असे की ती सत्यकथा आहे.\nया नव्या माहितीची थोडीफार देवाणघेवाण झाल्याने (थोडासा) आनंद झाला. ;)\nचंद्रशेखर [15 Oct 2011 रोजी 02:38 वा.]\nन्यूटन झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर पडलेले सफरचंद काल्पनिक आहे. सत्य एवढेच आहे की झाडाला लागलेली सफरचंदे गळताना बघून त्याच्या मनात गुरुत्वाकर्षाच्या बलाविषयी विचार सुरू झाले.\nन्यूटनबद्दलचा हा दुवा वाचनीय आहे.
मराठमोळे कलाकार मराठी मनोरंजनसृष्टीसोबतच इतर भाषांमधील सिनेसृष्टी गाजवतात याची कित्येक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळाली आहेत. या कलाकारांनी मराठी प्रेक्षकांची मने तर जिंकलीच पण शिवाय इतर भाषेतील प्रेक्षकांनासुद्धा आपल्या अभिनयाच्या प्रेमात पडायला भाग पाडले. अगदी ७० च्या दशकांपासून आतापर्यंत असे अनेक गुणी मराठी अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या तगड्या अभिनयाने अनेक नावाजलेल्या कलाकारांना तोडीस तोड स्पर्धा दिली. काही चित्रपटांमध्ये त्यांना प्रमुख भूमिका मिळाल्या तर काहींमध्ये सहाय्यक कलाकाराच्या भूमिका होत्या. पण सहाय्यक असल्या तरी त्या मुख्य भूमिकेच्या तोडीस तोड होत्या. आज आपण अशाच काही मराठी कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीत काम करुन स्वतःची वेगळी ओळख तयार केली. प्रेक्षकांची मने जिंकली. अजय देवगणच्या तानाजी या चित्रपटात अभिनेता शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. अजय देवगणने साकारलेल्या तानाजी या भूमिकेसोबतच शरद केळकरच्या भूमिकेचे सुद्धा खूप कौतुक झाले. शरद केळकरने इतरही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकासुद्धा खूप गाजल्या. मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणून अभिनेते अशोक सराफ यांना ओळखले जाते. मराठीत ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या अशोक सराफ यांनी हिंदीत 'सिंघम', 'प्यार किया तो डरना क्या', 'गुप्त', 'कोयला', 'येस बॉस', 'जोरू का गुलाम' आणि 'करण अर्जुन' या चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. संजय नार्वेकर हा मराठी इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. वास्तव (१९९९) या लोकप्रिय हिंदी चित्रपटात "देढ फुटिया" या भूमिकेतून संजय नार्वेकरने बॉलिवूड प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, त्याच्या त्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले होते. आजही संजयला बी- टाऊनमध्ये त्या भूमिकेमुळे अधिक ओळखळं जातं. नाना पाटेकरांचे नाव मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा दिग्गज अभिनेता म्हणून घेतले जाते. दोन्ही इंडस्ट्रीतील नानांच्या कामाचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी परिंदा, वेलकम यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. त्याने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. सिद्धार्थने गोलमाल, सिम्बा आणि राधेः युअर वॉन्टेड भाई यांसारख्या विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सर्वात शेवटी तो रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये दिसला होता.
नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवाला कोरंभी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते. कोरंभी देवस्थानाला भेट देण्यासाठी भाविकांना भंडाऱ्याहून गणेशपूर मार्गे जावे लागते. भंडारा : नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवाला कोरंभी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते. कोरंभी देवस्थानाला भेट देण्यासाठी भाविकांना भंडाऱ्याहून गणेशपूर मार्गे जावे लागते. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्त्याच्या कडेला दगड लावण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. नवरात्रनिमित्त कोरंभी येथील माँ पिंगलेश्वरी येथे यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या यात्रेत जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. मात्र देवीच्या भक्तांना गणेशपूर ते कोरंभी रस्त्याचा फटका बसणार आहे. या मार्गावरील पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे यात्रेदरम्यान जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोसेखुर्द प्रकल्पबाधीत हा रस्ता असून केवळ तीन मीटर डांबरीकरण झालेले आहे. अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असून जवाहरनगरपर्यंत रस्ता सुव्यवस्थित होण्याची गरज आहे. पाच मीटर रुंदीकरण व पुलाच्या कडेला दगड लावून त्यास रंगरंगोटी करून दिल्यास अपघात टाळता येऊ शकतात. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन भाविकांची समस्या जाणून घ्यावी अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष मंगेश वंजारी, रोहित साठवणे, भाऊ कातोरे, यशवंत टिचकुले, रमेश माकडे, विनोद बोंद्रे, गणेश बडवाईक, मंगेश ठमके, सतीश नेवारे, रुपेश आतीलकर, महेश दिवटे, अजय सेलोकर, मंगेश सतदेवे, प्रमिला शहारे, हंसराज गजभिये, अंकुश वंजारी, विजय हटवार, निखील घुले, रोशन कारेमोरे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ३४१वी पुण्यतिथी चैत्र पौर्णिमा (२७ एप्रिल २०२१) यादिवशी येत आहे. प्रतिवर्षी किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजिला जातो. त्यानिमित्त. रायगडाचं महत्त्व इतर गडांपेक्षा तीन कारणांसाठी वेगळं आहे. स्वराज्याची राजधानी, महाराजांचा राज्याभिषेक आणि तिसरे म्हणजे याच रायगडावर महाराजांनी शेवटचा श्वास घेतला व ते अनंतात विलीन झाले. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५मध्ये 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा़'ची स्थापना झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे होती. पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल- दुरूस्ती व जीर्णोद्धार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे. १८१८ मध्ये मराठेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटिश काळात रायगड पूर्णतः दुर्लक्षित होता. १८८३मध्ये जेम्स डग्लस नावाच्या इंग्रज गृहस्थाने रायगडावर जाऊन तेथील दुरवस्थेचे वर्णन लिहिले. त्यामुळे भारतीय समाजात अस्वस्थता पसरली. १८८५ मध्ये रावबहादुर जोशी, लोकमान्य टिळक, न्या. तेलंग, न्या. रानडे, न्या. कुंटे इत्यादी समाजधुरिणांनी पुण्याला एका सभेचे आयोजन करून त्यात समाधी जीर्णोद्धाच्या कार्याचे सूतोवाच करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने सालाना ५ रुपये तजवीज करून ठेवली. पुढे ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा जंगी सभेचे आयोजन केले. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सेनापती दाभाडे, लो. टिळक, बापूसाहेब कुरूंदवाडकर, सरदार पोतनीस, अनेक संस्थानिक, सरदार व पुण्यातील नामवंत व्यक्ती या सभेला उपस्थित होत्या. शिवस्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी फंड उभा करण्याचं आवाहन या सभेला केलं गेलं. त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ'. लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. २४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस रायगडावर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रायगडाचा ताबा ब्रिटिश सरकारकडे असल्याने मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागण्यात आली. पण ती ब्रिटिश सरकारने नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष श्री. दाजी आबाजी खरे यांनी १९०६मध्ये ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनकडे एक अर्ज दाखल केला. पुढे तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर 'रायगड स्मारक मंडळा'च्या पदाधिकाऱ्यांना यश आले व ६ फेब्रुवारी १९२५ला ब्रिटिश सरकारने मान्यता दिली. पुढील वर्षी १९२६मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची जीर्णोद्धार झालेली वास्तू उभी राहिली. अध्यक्षतेखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले. त्यातील अनेक कामे आता सुरू झाली आहेत. पण अजूनही बरीच कामे शिल्लक आहेत. लोकसहभागातून 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा'च्या वतीने गडावर होणारा हा कार्यक्रम यंदा कोरोना महासाथीमुळे स्थगित करण्यात आला आहे. त्याऐवजी शिवपुण्यतिथीच्या दिवशी सकाळी ११ वाजता आपापल्या घरीच शिवप्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे. ( लेखक 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा'चे माजी अध्यक्ष आहेत. )
Electric Cars : भारतात बजेटपासून लक्झरी सेगमेंटपर्यंत अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्या आहेत. दर महिन्याला नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होत आहेत, त्यामुळे कंपन्यांमधील स्पर्धाही वाढली आहे. तथापि, ही स्पर्धा आणखी वाढणार आहे कारण लवकरच अशा पाच इलेक्ट्रिक कार (5 आगामी इलेक्ट्रिक कार) भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. 1. Tata Tiago EV Tata Motors ने अलीकडेच Tata Tiago EV भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या योजना उघड केल्या आहेत. कंपनीने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारबद्दल जास्त माहिती दिलेली नाही परंतु असे सांगितले जात आहे की कंपनी यामध्ये 26 kWh बॅटरी वापरणार आहे. कार फक्त 8. 5 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेईल, तर वेगवान चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी एक तास लागेल. कंपनी 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च करण्याचा विचार करत आहे. ही टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार तसेच भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. सध्या, हॅचबॅक सेगमेंटमध्ये टाटा टियागो ईव्हीशी स्पर्धा करण्यासाठी दुसरी कोणतीही इलेक्ट्रिक कार नाही. टाटा मोटर्सने लॉन्चची वेळ अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, पण बातमीनुसार, टाटा टियागो या फेस्टिव्ह सीझनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. 2. BYD ETO3 चायनीज ऑटोमेकर BYD ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत आपल्या वाहनांचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. BYD गेल्या काही काळापासून भारतीय बाजारपेठेत आहे आणि व्यावसायिक वापरासाठी आपली इलेक्ट्रिक वाहने विकत आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत E6 इलेक्ट्रिक मल्टी-पर्पज व्हेईकल (MPV) विकण्याच्या प्रक्रियेत आहे आणि आता नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे. BYD ची भारतातील पुढील इलेक्ट्रिक कार BYD Atto3 असणार आहे. या एसयूव्हीचे 10,000 युनिट्स दोन वर्षांत भारतात विकण्याची कंपनीची योजना आहे. BYD Eto3 यावर्षी सणासुदीच्या काळात सादर होण्याची शक्यता आहे. ही कार भारतात कम्प्लीली बिल्ट युनिट (CBU) म्हणून विकली जाईल. भारतातील BYD च्या श्रीपेरुम्बुदुर सुविधेमध्ये या कार असेंबल केल्या जातील. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्ण चार्ज झाल्यावर 450-500 किमीची रेंज देऊ शकते. भारतात ही कार Hyundai Kona EV शी स्पर्धा करेल. 3. Tata Altroz EV अधिकृतपणे Tata Tiago EV लाँच केल्यानंतर, Tata Motors या वर्षी Altroz हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील लॉन्च करू शकते. देशांतर्गत उत्पादक महिंद्राची स्पर्धा पाहता टाटा मोटर्स नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास उशीर करणार नाही. टाटा मोटर्सने अलीकडेच भारतीय बाजारपेठेसाठी 10 इलेक्ट्रिक कार सादर केल्याचा खुलासा केला आहे. यापैकी एक कार Altroz EV देखील असू शकते. Tata Altroz EV मध्ये कंपनी Nexon EV Max सारखीच बॅटरी आणि प्लॅटफॉर्म वापरू शकते. असे सांगितले जात आहे की कंपनी Altroz मध्ये 30. 2 KWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरेल जी कार पूर्ण चार्ज केल्यावर 312 किमीची रेंज देईल. Altroz EV ची अंदाजे किंमत 15 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. 4. Hyundai Ionic 5 Hyundai भारतात इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत फारशी मागे नाही. Hyundai आधीच भारतीय बाजारपेठेत Kona EV विकत आहे आणि आता Ionic 5 देखील समाविष्ट करण्यासाठी EV श्रेणी वाढवण्याचा विचार करत आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी आहे, जिथे ती मानक आणि लांब श्रेणीच्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. Hyundai Ionic 5 चे मानक मॉडेल 358 किमीची श्रेणी देते, तर लांब पल्ल्याच्या मॉडेलची श्रेणी 488 किमी आहे. हे मानक मॉडेलमध्ये 58 kWh लिथियम-आयन बॅटरीसह ऑफर केले जाते, तर लांब श्रेणी मॉडेलमध्ये ते 72. 6 kWh लिथियम-आयन बॅटरीसह येते. दोन्ही मॉडेल्सची पॉवर आणि टॉर्क आउटपुट देखील भिन्न आहेत. Ionic 5 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यास कंपनी उशीर करणार नाही. 5. Hyundai Kona EV फेसलिफ्ट Hyundai Kona EV MG ZS EV सोबत सादर करण्यात आली. ZS EV गेल्या वर्षी अपडेट केले गेले असताना, Hyundai ने Kona EV मध्ये अद्याप कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केलेले नाहीत. तथापि, आता अशी अपेक्षा आहे की कंपनी या वर्षाच्या शेवटी Kona EV फेसलिफ्ट लाँच करेल. याला शार्प हेडलॅम्प आणि नवीन फ्रंट ग्रिलसह नवीन फ्रंट आणि रियर बंपर डिझाइन मिळण्याची अपेक्षा आहे. आतील भागात मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळू शकेल. Hyundai Kona EV फेसलिफ्ट सध्याच्या कॉन्फिगरेशनमध्ये 39. 2 kW च्या बॅटरी पॅकसह ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे, परंतु ते वेगळ्या ट्यूनिंगसह येऊ शकते. Hyundai मोठ्या बॅटरी पॅकसह नवीन Kona EV देखील सादर करू शकते. Hyundai Kona फेसलिफ्टची किंमत सुमारे 50 लाख रुपये असू शकते.
(हा लेख केवळ मनोरंजन म्हणून वाचावा . यात कुठलीही अंधश्रध्दा पसरविण्याचा हेतु नाही. ) संध्याकाळचे 6वाजले तसे तुकाराम तात्या घरासमोरच्या वडाच्या झाडाच्या पारावर येऊन बसले. निवांतपणे बंडीच्या खिशातून विडीचं बंडल काढलं. त्यातली एक विडी बोटांमध्ये धरून वरखाली केली आणि मग तोंडात पकडून खिशातून काडेपेटी काढून शिलगावली . एक जोरदार झुरका मारून छातीत धूर भरून बाहेर सोडला. समाधानाने डोळे मिटले. आज रखमाकाकी. . तात्यांची बायको आठवड्याच्या बाजाराला गेली होती. घरच्या वस्तू. . नारळ,चिकू,वालीच्या शेंगा,मुळ्याची भाजी ,हे सर्व विकून आलेल्या पैशातून घरी हवा असलेला मीठ मसाला ,किराणा घेऊन येईपर्यंत घरी यायला तिला 8तरी वाजणार होते. म्हणूनच तात्या आज निवांत होते. बायकोची कटकट नव्हती. रखमाकाकी म्हणजे मुलुखमैदान तोफ पण त्यामुळेच त्यांच्या आवाठातल्या वस्तू कोण चोरून नेत नसे. बिचारी दोघच्या दोघं . देवाने संततिचं दान घातलं नाही पदरात,पण दोघेही आनंदी रहायची . रखमाकाकी मुलांच्या बाबतीत एकदम हळवी होती. गावातील मुलं रोज तिन्हीसांजेला तात्यांकडे गोष्टी ऐकायला जमायची. तात्यासुध्दा 10मिनिटांची गोष्ट रंगवून रंगवून 1तास सांगायचे. आज सुध्दा एकेक करून सर्व मुले आली. तात्यांची विडी ओढून झाली होती. शक्यतो मुलांपुढे ते विडी ओढत नसत. आल्या आल्या मुलांनी काकींची चौकशी केली कारण काकी रोज त्याना शेवेचा लाडू देत असत. मग गोष्टीसाठी गलका सुरू झाला. सगळ्यांना आज भुताची गोष्ट ऐकायची होती. तात्या सरसावून बसले. तेवढ्यात बाजूच्या घरातले साटम,भोळे,पाटकर हे सुध्दा येऊन बसले. तात्यांनी एक पाॅज घेतला. . वातावरण निर्मितीसाठी😂 आणि मग ते बोलू लागले. 'माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. गावात एक मोटे नावाचे सावकार होते . त्यांची चार गलबते होती. गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत विविध मालाची ने_आण यातून होत असे. मोटे हा माणूस सचोटीचा होता. त्यांच्या गलबतातून कधीच अवैध मालाची वहातूक होत नसे. प्रत्येक गलबतावर 8_10 खलाशी असत. मोटे सावकारांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत होती. खूप श्रीमंती होती. गावातले लोक कुजबुजायचे, मोटे सावकारान् देवचार पुजल्यान हा म्हणून तेका काय कमी पडना नाय. 'देवचार म्हणजे काय तात्या? 'एकाने विचारले. . . अरे ते एक प्रकारचे भूत असे. कोठे त्याला बायंगी भूत म्हणतात तर कोठे देवचार. या भूताला काही विधि करून वश करून घेतात मग ते आपल्या मालकाचे म्हणजे ज्याने त्याला वश केलेय त्याचे सर्व काम करते. फक्त दर अमावस्येला त्याला त्याचा भोग द्यायचा. म्हणजे तळलेले वडे,खीर ,मासे ,मटण असे. गावातील लोक बर्याच गोष्टी सांगायचे या भूताच्या! एकदा म्हणे घरातील सरपण(चुलीला लागणारा लाकूडफाटा)संपले होते. मोटे सावकाराची आई सहज बोलली अगोबाई, सरपण संपलं वाटतं,तर ताबडतोब सरपणाची मोळी दरवाज्यातून आत! एकदा काय झालं,संपूर्ण मोटे कुटुंब बाहेरगावी लग्नाला गेले होते,त्याना थोडे जास्त दिवस लागले परत यायला त्या गडबडीत अमावस्या टळली . दुसर्या दिवशी रात्री मोटे आजी चुलीवर काहीतरी शिजवित होती. तर बाजूच्या खिडकीतून हाक आली आजी . . . ए. . आजी. . मला खायला दे माझं खाणं परवा द्यायला विसरलीस ना? आजी पण म्हातारी . . तिचं डोकं फिरलं म्हणाली लगेच मागायला आलास ही काय वेळ आहे? आता गंमत बघ, कुठल्याच अमावस्येला देणार नाही तुला. चालता हो. ते भूत म्हणालं नको देऊ,आता मीपण काय करीन ते बघ. . . बरं हे सगळं चाललं होतं याचा सावकाराला पत्ताच नाही. दुसरी अमावस्या आली तेव्हांपण हट्टी म्हातारीने भूताला काही दिलं नाही. सावकाराची गलबतं कन्याकुमारीपर्यंत माल घेऊन गेली होती. तिथे अचानक वादळ आलं आणि चारही गलबतं बेपत्ता झाली. सावकाराला बातमी कळली . त्याच्या आईने जेव्हां हे ऐकले तेव्हां तिने मुलाला सांगितले की दोन अमावस्या देवचाराचा भोग आपण दिला नाहीय. जसे हे कळले तसे सावकाराने सर्व जेवण बनवून देवचाराचा भोग दिला व माफी मागून गलबते सुखरूप आणण्यास सांगितले. आश्चर्य म्हणजे दुसर्या दिवशी सकाळी सावकाराच्या घरामागील समुद्रात खलाशांसह गलबते सुखरूप उभी होती. 'तात्या म्हणजे देवचाराने गलबते आणली का? 'अतिचौकस रोहनचा प्रश्न. तात्या म्हणाले'रोहन या माझ्या आजीने मला लहानपणी सांगितलेल्या गोष्टी. त्यामुळे खरं खोटं काय सांगू? आता तो मोटे सावकार आणि त्याची म्हातारी सुध्दा नाही . . . चला पळा आता घरी. काकी सुध्दा येईल एवढ्यात' मुले जी गेली. काकी अजून आली नव्हती. तात्या उठले आणि घरात गेले. दिवे लावले. स्वयंपाकघरातली ट्यूब लावणार एवढ्यात त्याना खिडकीत कोणीतरी उभे आहे असे वाटले. त्यानी दरडावून विचारले' कोण आहे रे? 'हीहीहीहीही तात्या मीच रे माझ्या गोष्टी सांगतोस ना पोरांना? आता दे खायला काहीतरी मोटे सावकाराची म्हातारी गेल्यापासून उपाशी आहे मी.
मुंबई : पावसाळ्यातही खारघरमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने सेक्टर १९ मधील अंगण सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सोसायट्यांना आधार मिळाला असून प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला आहे. खारघर परिसरात हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि त्यामुळे सोसायटीत होणारे वाद टाळण्यासाठी पावसात छतावरून कोसळणारे पाणी अडवून त्यांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे सोसायटीच्या टाकीमध्ये पाणीसंचय केला जात आहे. ही संकल्पना सोसायटीतील रमेश पटेल, अरविंद पटेल, दिलीप पटेल, राजेश पटेल, कल्पेश पटेल आणि संजय पटेल या सदस्यांनी मांडली. हा प्रकल्प सुरू करून वीस दिवस झाले. वीस दिवसांत सोसायटीमधील सदस्य रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमा होणाऱ्या पाण्याचा दैनंदिन उपयोग करत आहेत. छतावर जमा होणारे पाणी पीव्हीसी पाईप आणि फिल्टरची जोडणी करून थेट सोसायटीच्या टाकीत जमा केले जाते. या पाण्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी केला जातो. याबाबतची माहिती खारघर परिसरातील अनेक सोसायटीचे सदस्य घेत आहेत. सोसायटीत २५ हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. छतावरील पाणी टाकीत सोडले जाते. जोडण्यात आलेल्या पाईपच्या मध्यभागी फिल्टर जोडणी केली आहे. जमा केलेला पाणी शुद्ध असून पाणीटंचाईवर मात केल्याने सोसायटीमधील सदस्य समाधानी आहेत.
आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधीक काळ चाललेला आणि आपल्या भारताचा विचार करता कोणत्याही सार्वजनिक उपक्रमातील सर्वात चर्चित असा दुसरा संप (पहिला क्रमांक रेल्वेच्या ऐतिहासिक संपाला) म्हणून एसटीचा संप ओळखला जातो. आपल्या एसटी कर्मचाऱ्यांंचा संपानंतर एसटीचा गाडा पुर्वपदावर येत असताना , एसटी कर्मचाऱ्यांंनी त्यांचा साडेपाच महिन्याचा संपादरम्यान व्यक्त केलेली भिती प्रत्यक्षात तर येणार नाही ना ? असी घटना घडलेली आहे. या संपादरम्यान एसटीचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे वारंवार बोलले गेले. एसटी महामंडळाच्या सांगली विभागाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या एका निविदेमुळे ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची निर्माण झाली आहे. सांगली विभागामार्फत प्रकाशित निविदेत सांगली विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध आगारांसठी कंत्राटदरांकडून साध्या गाड्यांसाठी हो साध्या गाड्यांसाठी प्रस्ताव मागितले आहेत. शिवनेरी आणि शिवशाही प्रकारच्या गाड्या खासगी कंत्राटदाराकडून चालवल्या गेल्यानंतर आता सर्व सामान्यांची लालपरी सुद्धा आता खासगी कंत्राटदारांचा हातात दिली जात आहे. महाराष्ट्र एसटीमधील हा पहिलाच प्रयोग आहे. या खासगी गाड्यांसाठी डायव्हर कंत्राटदाराचा तर कंडक्टर एसटीचा असणार आहे. यामुळे सांगली विभागातील सुमारे १५० डायव्हरांच्या नोकरीवर गंडातर येण्याबरोबरच विभागाच्या विविध आगरांमध्ये असणाऱ्या कार्यशाळेबरोबर विभागीय कार्यशाळेचे काम देखील कमी होण्यचा धोका उत्पन होईल असे सांगितले जात आहे. येत्या एका महिन्यात याबाबत प्रशासकीय बाबींची पुर्तता करण्यात येवून तांत्रिक बाबींसाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर या बसेस रस्त्यावर धावायला सुरवात करतील असा अंदाज आहे. या बसेस नेहमीच्या लालपरीपेक्षा एक मीटरने जास्त लांब असतील आपल्या लालपरी ११मीटर लांब असतात तर या खासगी लालपरी १२ मीटरच्या असतील. त्यांची वेगळी रंगसंगती असेल. या लालपरीमध्ये पुशबँक सिट तसेच मोठा लेग स्पेस असेल. यामध्ये नेहमीच्या लालपरीपेक्षा अधिक जागा वावरण्यासाठी असेल. ज्यामुळे प्रशास आरामदायी होईल असे सांगण्यात येत आहे. या बसेसमुळे एसटीचा बसेस दुरूस्तीवरचा खर्च कमी होवून एसटीचा तोटा कमी होईल असे कारण प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या आधी खासगी कंत्राटदाराकडून चालवण्यात येणाऱ्या शिवशाहीबाबत प्रवाश्यांचा असंख्य तक्रारी आहेत. या बसेसचे डायव्हर गाडी विचित्र पद्दतीने चालवतात परीणामी त्यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. एसटीच्या डायव्हरांच्या तूलनेत त्यांना बससारखे अवजड वाहन चालवण्याचा पुरेसा अनुभव नसतो. या बसेसची दुरुस्ती आणि निगा देखील राखली जात नाही. अस्या प्रवाश्यांचा तक्रारी आहेत ( एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसवर डायव्हर बाजूच्या टेल लँम्पचा बाजूला आणि बाजूला डायव्हरच्या डाव्या बाजूच्या हेडलाइटच्या बाजूला डेपोचे नाव चौकोनात आणि विभागाचे गोलात लिहले असते. ज्यावर हे नसते तसेच ज्या गाडीचे पासिंग पुणे रत्नागिरी ,औरंगाबाद आणि नागपूर सोडून इतर असते ती खासगी शिवशाही असते. ) या खासगी शिवशाहीमुळे सुरक्षीत प्रवाश्याबाबतची एसटीची प्रतिमा काहीसी काळवंडली. तोच अनुभव या साध्या बसेसबाबत प्रवाश्यांना आल्यास आपल्या एसटीच्या प्रतीमेस मोठे नुकसान होइल . अनेक एसटीप्रेम हे त्यांचा सोशल मिडीया अकाउंटवर खासगी शिवशाहीबाबत बोटे मोडत असतात जर साध्या गाड्याबाबतही ते हेच करायला लागले तर होणारे नुकसान एसटीला परवडणारे नाही. ते न होता एसटीचा हा प्रयोग यशस्वी ठरो आणि ग्रामीण महाराष्ट्राची ही जिवन वाहिनी नुकतीच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या एसटीने असीच घोडदौड सुरु ठेवावी, कारण यातच महाराष्ट्राचे हित आहे.
महाराष्ट्र अस्मानी संकट दुष्काळ परिस्थितीमुळे राज्यात शेतकर्यांच्या प्रश्न जाणून घेण्यासाठी आले आहे.विमा कंपनी जर केल्म दिला नाहीतर आम्ही मुंबईत विमा कंपनीच्या कार्यालयात चालू देणार नाही. जुनी शिवसेना दाखवु देऊ, दुष्काळावर आम्ही राजकारण करत नाही,असा स्पष्ट शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृषी कंपन्याना खणखणीत इशारा दिला आहे. शिवसेनेने सर्व केलेल्या पीकविमा मदत केद्रांची पाहणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदगाव मध्ये आले होते. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधत असतांना पीक विमा कंपन्याना हा इशारा दिला आहे. 8/10 दिवसात काही निर्णय नाही झाला तर, शेतकर्यांना घेऊन आम्ही पंतप्रधान कडे जाऊ आमच्या शक्ती साठी तुमची साथ महत्वाची आहे. शिवसेनेचे जेष्ठनेते बापूसाहेब कवडे- शेतकर्यांना सरसगत कर्जमाफी द्यावी, नांदगाव विधासभेची जागा शिवसेनेस सोडावी आम्ही ही जागा मोठ्या मतधिक्यन जिंकू अशी ग्वाही दिली. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,-कर्जमाफी मर्यादा दीड लाख पर्यंत शिवशेनामुळे झाली जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात असतो तेव्हा शिवसेना शेतकर्यांच्या सोबत आहे, संजय राऊत- नांदगाव करण्याचा योग असा की उद्धव साहेब पाऊस घेऊन आले.शिवसेनानी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. नांदगावचा पुढील आमदार शिवसेनेच्या असेल, मातीचा गधं हा शिवसेना चा गंध आहे. यावेळी व्यासपीठावर रविंद्र मिर्लेकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,भाऊसाहेब चौधरी,मिलिंद नार्वेकर खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विजय करंजकर, माजी जि. प. उपाध्यक्ष मधुकर हिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे, विलास आहेर, पंचायत समिती गटनेते सुभाष कुटे,आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाऊसाहेब हिरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, गँगाधर बिडगर संभाजी पवार, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील जाधव, सागर हिरे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, गुलाब भाबड, मनमाड नगरपालिका नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, नगराध्यक्ष, राजेश कवडे व नगरसेवक, नांदगाव व मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, संचालक नाशिक जिल्ह्यसंपर्क प्रमुख अरविंद नाईक मालेगाव शिवसेना महानगर प्रमुख रामा मिस्तरी नांदगाव पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील,तालुकाध्यक्ष किरण देवरे, विष्णू निकम, संभाजी पवार, राजाभाऊ आहिरे, जि प सदस्य रमेश बोरसे,शहराध्यक्ष सुनील जाधव,सागर हिरे, नांदगाव तालुक्यातील शेतकरी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक समजला जाणारा ३१ किलोचा मासा एका मच्छीमाराला मासेमारी करताना पाण्यात सापडला. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका मच्छीमाराने हा गोल्ड फिश शर्थीचे प्रयत्न करुन पाण्यात शोधला. जवळपास २० वर्षांपूर्वी हा गोल्ड फिश पाण्यात सोडण्यात आला होता. गोल्ड फिश समुद्रात किंवा तलावाच्या पाण्यात क्वचितच आढळतो. त्यामुळे याला जादुई गोल्ड फिश असं म्हटलं जातं. एका मच्छीमाराने नारंगी रंगाचा गोल्ड फिश पकडला. २० वर्षांपूर्वी या माशाला पाण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर हा मासा पाण्यात क्वचितच दिसायचा. एका फिशरी मॅनेजरने सांगितलं की, या गोल्ड फिशचं आरोग्य आजही ठणठणीत आहे. हा मासा जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक आहे, असा दावा केला जात आहे. या माशाला पकडण्यासाठी एंडी हैकेटने जवळपास २५ मिनिटं पाण्यात शोध घेतला. कॅरट नावाच्या या गोल्ड फिशला पकडल्यानंतर पुन्हा त्याला पाण्यात सोडण्यात आलं. हायब्रिड प्रजातीचा हा मासा खूप आकर्षक आहे. डेली मेल ने दिलेल्या माहितीनुसार, कॅरटला २० वर्षांपूर्वी जेसन काउलरने पाण्यात सोडलं होतं. फिशरी मॅनेजर जेसनने म्हटलं की, या माशाचं आरोग्य आजही उत्तम आहे. एंडीने गोल्ड फिश पकडल्यामुळं आम्ही त्याला शुभेच्छा देत आहोत. हा मासा सर्वात वेगळा आहे. हा गोल्ड फिश पाण्यात क्वचितच लोकांना दिसतो. एंडी हॅकेटनं ३१ किलोचा गोल्ड फिश पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. २०१९ मध्ये जेसन फुगेटनं अमेरिकेच्या मिनोस्टामध्ये असाच एक मासा पकडला होता. पण त्यांचं वजन १८ किलो होतं. एंडीने म्हटलं की, मला या गोल्ड फिशबाबत माहिती होती की, हा मासा फ्रांसमध्ये ब्लूवॉटर लेक्समध्ये उपलब्ध आहे. पण मी या गोल्ड फिशला पकडेल, असं मला कधी वाटलं नव्हतं. दरम्यान, एंडीने हा मासा पकडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले आणि त्यानंतर त्याने या माशाला सुरक्षितपणे पाण्यात सोडलं. टिपू सुलतानावरील एका पुस्तकाच्या वितरण आणि विक्रीला बंगळूरुतील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पुस्तकात म्हैसूरचा राजा असलेल्या टिपू सुलतानाबद्दल चुकीची माहिती छापली असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात मंगळवारी याबाबत सुनावणी झाली. 'टिपू निजा कनसुगालू' (टिपूचे खरे स्वप्न) या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक असलेल्या अयोध्या पब्लिकेशन आणि मुद्रक असलेल्या राष्ट्रोत्थान मुद्रणालय यांना हे पुस्तक विकण्यास आणि त्याचे वितरण करण्यासा ३ डिसेंबरपर्यंत तात्पुरता मनाई आदेश जारी केला आहे. कन्नड भाषेतील हे पुस्तक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे न्यायालयाच्या आदेशात म्हटल आहे. या पुस्तकाची छपाई करण्यास आणि छापलेली पुस्तके संग्रहित करण्यास मात्र कोणतही मनाई करण्यात आलेली नाही. जिल्हा वक्फ बोर्ड समितीचे माजी अध्यक्ष बी. एस. रफिउल्ला यांनी या पुस्तकाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. हे पुस्तक टिपूबद्दल चुकीची माहिती देत असून या पुस्तकाला कोणताही ऐतिहासिक आधार व पुरावा नसल्याचा दावा रफिउल्ला यांनी केला. या पुस्तकात वापरलेला 'तुरुकारू' हा शब्द मुस्लीम समाजाचा अवमान करणारा आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे अशांतता आणि जातीय तेढ निर्माण होईल, तसेच सार्वजनिक शांततेचा मोठय़ा प्रमाणात भंग होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने तिन्ही प्रतिवादींना तातडीच्या नोटीस बजावल्या आणि प्रकरणाची सुनावणी ३ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. ट्विटरमधील नोकरकपात त्यानंतर कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुरू झालेले राजीनामासत्र पाहता ट्विटरच्या भवितव्याबाबत काही युजर्संकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. एलॉन मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे ही मायक्रो ब्लॉगिंग साईट टिकणार नाही, असा कयास काही युजर्सकडून बांधला जात आहे. या टीकाकारांना एलॉन मस्क यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "ट्विटरने आत्तापर्यंत संपायला नको होतं का? " असा उलट सवाल करत अनेक उलथापालथीनंतरही कंपनी टिकून असल्याचं अप्रत्यक्षरित्या मस्क यांनी ठासून सांगितलं आहे. 'स्पेसएक्स' आणि 'टेस्ला'चे प्रमुख एलॉन मस्क यांनी हात जोडून टीकाकारांना दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी आज पुन्हा टीकाकारांना लक्ष्य केलं आहे. हात जोडलेला इमोजी वापरून हिंदीत 'नमस्ते' असं ट्वीट मस्क यांनी केलं होतं. ट्विटर खरेदी करताच मस्क यांनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. "कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा", असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी देताच कंपनीत राजीनामासत्र सुरू झाले आहे. बऱ्याच देशांमध्ये #RIPTwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी कामावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर हा सोशल मीडिया प्लॅटफार्म वापरण्यासाठी सुरक्षित आहे का? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ट्विटरचे माजी मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी लीया किस्नर, मुख्य गोपनीयता अधिकारी डेमियन किरन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आधीच कंपनी सोडून गेले आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच अर्जेटिनाच्या पराभवाचा धक्का फुटबॉल चाहत्यांना बसला. त्या धक्क्यातून सावरत नाही तो मॅंचेस्टर युनायटेडने रोनाल्डोला तातडीने मुक्त केल्याची घोषणा केली. रोनाल्डो आणि फुटबॉल चाहत्यांना हा धक्काच होता. रोनाल्डोचा व्यवस्थापक जॉर्ज मेंडेस अनेक क्लबबरोबर चर्चा करत आहे. मात्र, ३७ वर्षीय रोनाल्डो कुठल्या क्लबकडून खेळणार हे अजून स्पष्ट होत नाही. रोनाल्डो कोणाकडून खेळणार याचे उत्तर आता विश्वचषक फुटबॉल स्पर्धा संपेपर्यंत तरी मिळणार नाही. युरोपियन लीग असो वा अगदी सौदी अरेबियातील एक क्लब त्याच्यासाठी उत्सुक असले तरी विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत यावर कुणी निर्णय घेईल असे वाटत नाही. रोनाल्डो मॅंचेस्टर युनायटेड सोडणार याचे संकेत गेले काही दिवस मिळतच होते. रोनाल्डोने एका मुलाखतीत क्लबने आपला विश्वासघात केल्याचे आणि क्लबचे काही भागीदार आपल्याला संघाबाहेर ठेवू इच्छित असल्याचे सांगितले होते. मॅंचेस्टरचे नवे व्यवस्थापक एरिक टेन हैग यांच्याशी देखील रोनाल्डोचे सूर जुळत नव्हते. या सगळय़ाची परिणीती रोनाल्डोला मुक्त करण्यात झाली. मॅंचेस्टरकडून खेळण्याची रोनाल्डोची ही दुसरी वेळ होती. रोनाल्डोने मॅंचेस्टरसाठी ३४६ सामने खेळताना १४५ गोल केले आहेत. मँचेस्टर युनायटेडसोबत परस्पर सामंजस्याने मी क्लब सोडण्यास तयार झालो आहे. क्लब आणि चाहत्यांचा मी नेहमीच आभारी राहीन. त्यांच्याविषयी असलेले माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. पण नव्या आव्हानांचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वाटल्याने हा निर्णय घेतला. © Maha NMK™ । Copyright 2015 - 2023 All Rights Reserved. Made with ❤ in India.
जळगाव : विकासासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे निधी, अर्थात गल्ला असून यात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. २४) वडनगरी येथे दिले. तालुक्यातील वडनगरी येथे विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, बाजार समिती सभापती कैलास चौधरी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, की परिसरासाठी आज स्मशानभूमी पोहच रस्ता तयार झाला असून याच्या जोडीला गावातील विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने गावाजवळचा पुल, रस्त्यासह स्मशानभूमी सुशोभीकरण, व्यायाम शाळेचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रास्ताविक वडनगरीचे सरपंच उमाकांत पाटील यांनी केले. तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आभार ग्रामसेवक सतीश पाटील यांनी मानले.
हरियाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार असल्याचं म्हटलं आहे. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखून, ते पाणी हरियाणाकडे वळवणार असल्याचं सांगितलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलमबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहनही केलं. "जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला धडा शिकवा," असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. "जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला," असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आश्वासन देत, 'आपलं सरकार पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार आणि तेच पाणी हरियाणाकडे वळवणार. हे आपल्या देशाचं आणि राज्यातील शेतकऱ्याचं हक्काचं पाणी आहे," असं सांगितलं. "गेली ७० वर्ष जे हरियाणामधील शेतकरी आणि आपल्या हक्काचं जे आहे ते पाकिस्तानला मिळत आहे. पण हा मोदी हे पाणी रोखणार आणि तुमच्या घरापर्यंत आणणार. मी आधीच यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. हे पाणी आपला देश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे. यामुळेच मोदी तुमच्यासाठी लढत आहे,". महाभारतातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या जीवनावरील ही 'बेस्ट-सेलर' कादंबरी. मूळ महाभारत (भांडारकर आवृत्ती), नीळकंठी आवृत्ती आणि इतर असंख्य पुस्तकांचा सखोल अभ्यास करून लिहिलेली ही चित्तथरारक कादंबरी. महाभारतातले अनेक सुप्त पदर या कादंबरीत उलगडलेले आहेत.
'ज्ञानपीठ' पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना पुन्हा धमकी ! मुंबई (Mumbai) : पोलिसनामा ऑनलाईन - मराठी साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे (bhalchandra nemade) यांना एका अनोळखी नंबरवरुन धमकी देण्यात आल्याची माहिती मिळतेय. याबाबत मुंबईतील (Mumbai) वाकोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भालचंद्र नेमाडे यांनी 2 आठवड्यांपूर्वी एका अनोळखी नंबरवरुन धमकीचा फोन आला होता. त्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार केली होती. नेमाडे हे सध्या यवतमाळमध्ये आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतील वादग्रस्त उल्लेखामुळे भालचंद्र नेमाडे यांना धमकीचा फोन आला आहे, अशी माहिती मिळतेय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीमध्ये बंजारा समाजातील महिलाविषयी लिखाण केलंय. या लिखाणाबद्दल एका अज्ञात व्यक्तीने आक्षेप घेतलाय. भालचंद्र नेमाडे यांचं हे लिखाण बदनामीकारक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या घरात घुसून मारहाण करु, अशी धमकी दिलीय,असे समजतंय. नेमाडे यांना 2015 मध्येही धमकीचं पत्र आलं होतं. तेव्हा गृह विभागाने तातडीनं त्याची दखल घेतली होती. समाजसेवक नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर धर्मांध संघटनांनी उघडलेल्या आघाडीची गंभीर दखल राज्याच्या गृह खात्याने घेतली आहे, असे तेव्हा सांगण्यात आलं होतं. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांना धमकीपत्र मिळाल्याचं समोर आलं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
तालिबानी Taliban बंडखोरांनी जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानावर Afghanistan ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अफगाण चित्रपट निर्माती सहारा करीमी Sahraa Karimi यांनी जगभरातील चित्रपटप्रेमींसाठी एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने Anurag Kashyap शेअर केलं असून सोशल मीडियावर त्या पत्राला अधिकाधिक शेअर करण्याची विनंती नेटकऱ्यांना केली आहे. 'माझं नाव सहारा करीमी. . मी चित्रपट दिग्दर्शिका आणि अफगाण फिल्म या कंपनीची संचालक आहे. १९६८ साली स्थापित झालेली ही एकमेव सरकारी मालकीची फिल्म कंपनी आहे. अत्यंत निराश होऊन मी फक्त या एका अपेक्षेने हे पत्र लिहित आहे की तुम्ही माझ्या सुंदर देशाला तालिबानपासून वाचवू शकाल. तालिबानने गेल्या काही दिवसांत कई राज्यांवर ताबा मिळवला आहे', असं त्यांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिलं. तालिबानने कशाप्रकारे आपली दहशत पसरवली आहे, याची काही भयानक उदाहरणे त्यांनी या पत्रात सांगितली. 'तालिबानने इथे नरसंहार केला, अनेक मुलांचं अपहरण केलं, कपड्यांवरून एका महिलेला ठार मारलं, त्यांनी कॉमेडियन्सवर अत्याचार करून त्यांना मारलं, सरकारशी संबंधित व्यक्तींचा त्यांनी जीव घेतला, आमच्यापैकीच काही जणांना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली', असं त्यांनी पुढे लिहिलं. 'देशावर इतकं मोठं संकट असताना संपूर्ण जग शांत आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तालिबान सर्व कलांवर बंधनं आणेल आणि इतरही निर्माते, दिग्दर्शक त्यांच्या हिटलिस्टवर आहेत,' हे सांगताना त्यांनी मदतीची विनंती केली आहे. तालिबानमुळे मुलींच्या शिक्षणावर कशाप्रकारे परिणाम झाला आहे, याचं वास्तव त्यांनी या पत्रात मांडलं. 'गेल्या काही दिवसांत तालिबानने अनेक शाळा उद्ध्वस्त केल्या आहेत आणि २० लाखांहून अधिक मुलींना शाळेतून काढून टाकलं आहे. या परिस्थितीविषयी जगात इतकं मौन का बाळगलं जातंय हे मला माहित नाही. पण मी माझ्या देशासाठी नक्की लढणार. मी हे एकटं नाही करू शकत. मला तुमच्या मदतीची गरज आहे. आपापल्या देशातील माध्यमांमध्ये अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीची वृत्त देऊन आमचा आवाज पोहोचवा', अशी विनंती त्यांनी केली. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी शांती अहिंसा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित गेली अनेक र्वष नाटय़ व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निशा जाधव यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी शांती अहिंसा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वंदे मातरम् संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सामाजिक, साहित्य, शैक्षणिक आणि कलाक्षेत्रात मोलाचं काम करणा-या व्यक्तींचा प्रत्येक वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी शांती अहिंसा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निशा जाधव यांना प्रदान करण्यात आला. निशा जाधव ह्या गेली अनेक र्वष नाटय़ व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांना आतापर्यंत अनेक बीएमसी, महाराष्ट्र कामगार कल्याण स्पर्धातून सर्व उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात 'डार्लिग डार्लिग', 'आमच्या या घरात', 'कन्यादान', 'तुमचं घर आमचं घर', 'नटसम्राट' अशा अनेक नाटकांमधून त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले आहेत. वि. वा. शिरवाडकर लिखित 'नटसम्राट' ह्या अजरामर नाटकातून साकारलेली कावेरीची भूमिका तसेच 'या सुखासाठी'मधील लक्ष्मीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. महाराष्ट्र शासनाचे एड्स, दारूबंदी, महिला, आरोग्य, बालविकास अशा अनेक योजनांवर कार्यक्रम करून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे. रमाईच्या जीवनावर आधारित 'बोल रमाईचे' हा एकपात्री कार्यक्रम करून समाजासाठी प्रेरणादायी काम केले आहे.
. काबूल (अफगाणिस्तान) - तालिबान्यांनी सरकारी कार्यालयांवर देखील ताबा मिळविला आहे. यामध्ये राजशिष्टाचार सबंधातील अनेक कार्यालयांचाही समावेश आहे. अशाच एका अलिशान कार्यालयात तालिबान्यांनी ठाण मांडून काहीतरी खात आहे. संख्या जास्त असल्याने अनेकजण जमिनीवरच बसले. शिवाय प्रत्येकाजवळ बंदुकाही दिसत आहे. या व्हिडिओची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नसून हे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. .
Ahmednagar Gram Panchayat : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा राजकीय धुरळा थांबलाय. . मात्र तरीही निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना राजकीय विरोधातून अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर लढाया सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. . . अहमदनगर जिल्ह्यात पराभूत उमेदवारांकडून थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि सदस्यांच्या विरोधात अपात्र ठरवण्यासाठी तब्बल 244 विवाद अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेत. . . याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ.
प्रिय रोजनिशी, काही व्यक्तींच्या सान्निध्यात आलं तरी मनावर आलेलं मळभ दूर सरत जातं. अशा व्यक्ती प्रत्यक्षातच भेटायला हव्यात असं नाही. त्यांचे पुस्तकंरूपाने आपल्यापर्यंत पोचलेले विचारही मन उजळवत राहतात. आत्ता वाचायला घेतलेलं 'आनंदयात्रा', एक छोटंसं पुस्तक हे त्यापैकीच एक. घरच्या संग्रहातील हे पुस्तक आधी वाचून झालंय पण काही पुस्तकं पुन्हा वाचाविशी वाटतात. काही वेळा पुस्तक संग्रही कसं जमा झालं त्यातही रोचकता असते. आणि आपले मनगुरू इतके विलक्षण की पुस्तक हातात घेतलं की ती रोचकताही पुन्हा अनुभवता येते. मूर्ती बघता क्षणी लक्ष वेधून घेते. तिथलं शांत प्रसन्न वातावरण मनाला चैतन्यता देतं. अहं, मला व्यक्तिशः नानांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आजही नाही. मी त्यांना भेटले त्यांनीच लिहून ठेवलेल्या अक्षर अनुभवातून. त्यांचे हे अक्षर अनुभव त्यांच्याच शब्दांतून वाचावेत. म्हणजे या स्वामीभवन वास्तुजवळच नणंदेचं तिथे तात्पुरतं म्हणजे वर्ष दोन वर्षाकरता वास्तव्य होतं. त्यानिमित्ताने इथे जाणं घडलेलं. मग तिथे गेल्यावर कळलं की नाना ठाण्यात राहायचे. ते ही नौपाडा विष्णूनगरमधे. मी ठाण्यात बारा तेरा वर्ष होते रहायला. ते ही नौपाडा मधेच पण मल्हार टॉकीज जवळ. पण यांच्याबद्दल कधी ऐकल्याचं नाही आठवत. साहजिक उत्सुकता जागी झाली. मग तिथे त्यांनी लिहिलेली पुस्तकं बघितली. त्यातली दोन छोटीशी पुस्तकं घेतली. त्यातलं त्यांचं त्यांनी एकट्याने पायी केलेल्या ठाणे ते अक्कलकोट या यात्रेवरचं 'आनंदयात्रा' पुस्तक वाचलं आणि अक्षरशः भारावून गेले. या यात्रेनिमित्त त्यांना मिळालेले अनुभव आणि घेतलेल्या अनुभूती यांची खरंच आनंददायी यात्रा साक्षात ऊभी केलीये त्यांनी मनःचक्षुंसमोर. ते ही इतक्या सोप्या सोप्या शब्दात प्रसंग नजरेसमोर उभे केलेत. परत ते सांगताना कुठेही कसलंही अवडंबर, अभिमान नाही. मिळालेले अनुभव जगदीशार्पण ही भावना बस. खरं तर खूप हळहळायला झालं. कित्ती जवळ राहात होते मी. खूप मोठा स्वामी परिवार होता यांचा अजूनही आहे असं म्हणूया. खूप जणांना यांनी मार्गदर्शन केलंय. कारण समर्थ दर्शनानंतर त्यांनी त्यांची नोकरीं स्वामी आज्ञेने सोडून पूर्ण वेळ मार्गदर्शनासाठी दिलेला. पण भेटीचाही योग असावा लागतो म्हणतात. त्यावेळी शाळा कॉलेज शिक्षण करियर यातच लक्ष म्हणा. असो या पुस्तक रूपाने अक्षर माध्यमातून भेटताहेत ते याचाही आनंद आहेच. अक्षर योग हाही चांगलाच योग आहे नं भेटीचा. पुस्तकरूपाने त्यांना आलेले अनुभव त्यांनी अक्षर केलेत. शक्य असेल त्यांनी जरूर घेऊन वाचावं, संग्रही ठेवावं हे पुस्तक. कधीही पुन्हा वाचावंसं वाटू शकतं. आताच्या वातावरणात तर नक्कीच. एक आश्वासकता जागती राहाते मनात. तर ते पुस्तक वाचल्यावर जे भाव मनात आले ते कवितेत मांडण्याचा प्रयत्न.
US Signature Bank Collapses: अमेरिकेतील बँकिंग संकट आणखी खोलवर जाताना दिसत आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर आणखी एक बँक अपयशी ठरली आहे. बँकेच्या शेअरची किंमत खाली पडल्यानंतर अमेरिकन नियामकांनी बँकेला टाळं लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे बँकिंग नियामकाने सांगितले. सिग्नेचर बँक ही न्यूयॉर्कची प्रादेशिक बँक असून गेल्या शुक्रवारी या बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
आज स्मार्टफोनवर प्रत्येक कामासाठी एक वेगळे अॅप उपलब्ध आहे. मात्र, या अॅप्सचा वापर करून तुम्ही घरबसल्या कमाई करू शकता. तुम्ही जर अँड्राइड स्मार्टफोन अथवा आयफोनचा वापर करत असाल तर या अॅप्सला थेट गुगल प्ले स्टोर अथवा अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अॅप्सच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह येणारा स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तुम्ही रेफ्रल प्रोग्राम, कॅशबॅक रिवॉर्ड, रिव्ह्यू, टाय-अपच्या माध्यमातून कमाई करू शकता. या अॅप्सचा वापर करण्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहे. या अॅप्सवर काम करताना तुमचे अनेक तास जाऊ शकतात व खूप जास्त कमाई मात्र होणार नाही. तुम्ही तुमच्या नियमित कामासोबत अतिरिक्त कमाई करण्याचे मार्ग शोधत असाल तर हे अॅप्स चांगले पर्याय आहेत. या टॉप-१० अॅप्सविषयी जाणून घेऊया. Roz Dhan गेल्यावर्षी सर्वात लोकप्रिय अॅप ठरले होते. हे एक एंटरटेनमेंट अॅप असून, गुगल प्ले स्टोरवर डाउनलोडसाठी उपलबध आहे. या अॅपमध्ये यूजर्सला पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय मिळतात. यूजर्स फ्रेंड्सला इनव्हाइट करणे, स्पर्धेत भाग घेणे, न्यूज पाहणे, लेटेस्ट अपडेट, अॅप्स डाउनलोड करणे, सर्वेमध्ये भाग घेणे याद्वारे कमाई करू शकतात. Task Bucks सर्वाधिक लोकप्रिय अॅप्सपैकी एक आहे. याद्वारे वेबसाइट्सवर जाऊन अॅप्स डाउनलोड करमे, जाहिराती पाहणे, व्हिडिओ पाहणे आणि मित्रांना रेफर करणे या माध्यमातून पैसे कमवू शकता. तसेच, सर्वेक्षण आणि स्पर्धेत भाग घेतल्यास ७० रुपये मिळतात. DooCash हे देखील एक एंटरटेनमेंट आहेत. यात तुम्ही गेम्स, व्हिडिओ, जाहिराती आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून पैसे मिळवू शकता. यूजर्सला कॅश, प्रीपेड रिचार्ज आणि बिटकॉनद्वारे पेमेंट दिले जाते. तसेच, गुगल गिफ्ट कार्ड, iTunes आणि Amazon गिफ्ट वाउचर देखील मिळेल. Google Opinion Rewards देखील लोकप्रिय अॅप्सपैकी एक आहे. याद्वारे सर्वेक्षण, बिझनेस आणि लोकेशनचे रिव्ह्यू देऊ शकता. यातील पैसे गुगल पे अॅप्सवर जोडले जातात. याचा उपयोग यूजर्स अॅप्स खरेदी करण्यासाठी करू शकतात. PhonePe च्या माध्यमातून देखील तुम्ही कमाई करू शकता. याद्वारे यूजर्सला कॅश प्राइज, कूपन, डिस्काउंटसह बरंच काही मिळते. यात रेफ्रलद्वारे कमाई केलेले पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळेच हे लोकप्रिय अॅप आहे. Databuddy अॅप हे पेटीएम वॉलेटशी लिंक असते. तुम्ही कमाई केलेले पैसे येथेच जमा होतात. यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो व अन्य मीडिया फाइल शेअर करून पैसे कमवू शकतात. तसेच, कॅशबॅक आणि रिवॉर्ड देखील मिळतो. Wonk द्वारे यूजर्स ऑनलाइन टीचिंग आणि ट्यूशनद्वारे पैसे कमवू शकतात. Wonk टीम तुम्हाला एक शिक्षक म्हणून सर्टिफाइड करेल. त्यानंतर तुम्ही ट्यूटोरियलच्या माध्यमातून कमाई करू शकता. तासाला तुम्ही २५० ते १ हजार रुपयांची कमाई करू शकता. Loco अॅपचा वापर करून तुम्ही गेमिंगच्या माध्यमातून कमाई करू शकता. यात यूजर्सला गेमिंग व्हिडिओ पाहण्यासोबतच मल्टीप्लेअर गेम्समध्ये भाग घेतल्यास पैसे मिळतात. बुल बॅश, लूडो, पुल, कॅरम सारख्या गेमद्वारे पैसे मिळतात. यूजर्स सिंगल-प्लेअर गेम देखील खेळू शकतात. mCent हे देखील एक लोकप्रिय अॅप आहे. यूजर्सला पैसे कमवण्यासाठी केवळ अॅप्स आणि व्हिडिओला रेफर करायचे आहे. रिवॉर्ड्ज आणि कॅश थेट पेटीएम वॉलेटमध्ये जमा होईल. तसेच, शॉपिंग कूपन आणि कोड सारखे अन्य रिवॉर्ड्ज देखील मिळतील. गेल्या काही दिवसात Meesho अॅपची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा एक टॉप रिसेलिंग प्लॅटफॉर्म आहे, जो नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या यूजर्सच्या उपयोगी येतो.
मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याने राज्यातील सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षातील वाद वाढत चाललाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सतत भाजपवर हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी आशा व्यक्त केली. पण त्यांनी शिवसेना किंवा युतीचा उल्लेख न केल्याने राज्यातील राजकीय अस्थिरता कायम आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झालीय. पण 'शिवसेनेने ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्याला पर्यायी सरकार देऊ शकतो. तसंच आम्ही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही', शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत बसून मार्ग काढू. शिवसेनेने निर्णय घेतल्यास आम्ही पर्यायी सरकार देऊ शकतो', असं नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची सोमवारी भेट घेतली. भाजप-शिवसेनेमधील मतभेद अतिशय गंभीर आहेत. ते कधी आणि कसे संपतील, हे सांगता येत नाही. असं पवार यांनी सोनियांच्या भेटीनंतर सांगितलं. तसंच शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडणार असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थनाचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करावे, त्याला काँग्रेसने बाहेरून समर्थन द्यावे, अशाप्रकारची रणनीती उभय पक्षांनी आखल्याचं सांगण्यात येतंय.
Business Idea : आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. हा पापड बनवण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय तुम्ही घरी बसल्या बसल्या सुरुवात करू शकता. जर तुमच्या पापडाची चव अनोखी आणि खास असेल तर तुम्ही मोठे पैसे (पापड व्यवसायात नफा) देखील कमवू शकता. भारत सरकारच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामध्ये तुम्हाला 30-40% नफा मिळू शकतो. यामध्ये मुद्रा योजनेअंतर्गत 4 लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. अहवालानुसार, एकूण 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 30,000 किलो उत्पादन क्षमता तयार केली जाईल. या क्षमतेसाठी 250 चौरस मीटर जमीन लागणार आहे. किती खर्च येईल? या खर्चामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल दोन्ही समाविष्ट आहे. अहवालानुसार, स्थिर भांडवलामध्ये 2 मशीन, पॅकेजिंग मशीन उपकरणे यासारख्या खर्चाचा समावेश होतो आणि खेळत्या भांडवलामध्ये तीन महिन्यांचे कर्मचारी, कच्चा माल आणि उपयोगिता उत्पादने यांचा तीन महिन्यांचा पगार समाविष्ट असतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यात समावेश आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 250 चौरस फूट जागा आवश्यक आहे. याशिवाय 3 अकुशल कामगार, 2 कुशल कामगार आणि एका पर्यवेक्षकाची आवश्यकता असेल. ते सुरू करण्यासाठी तुम्हाला 4 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. यानंतर तुम्हाला फक्त 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. कर्ज कुठून मिळवायचे? पापड व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. कर्जाची रक्कम 5 वर्षांसाठी परत केली जाऊ शकते. कमाई किती असेल? पापड तयार केल्यानंतर तो घाऊक बाजारात विकावा लागतो. याशिवाय किरकोळ दुकाने, किराणा दुकाने, सुपर मार्केटशी संपर्क साधून त्याची विक्री वाढवता येते. एका अंदाजानुसार, जर तुम्ही एकूण 6 लाख रुपये गुंतवले, तर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये सहज कमवू शकता. यामध्ये तुमचा नफा 35000-40000 पर्यंत असू शकतो.
मुंबई, १७ जानेवारी (वार्ता. ) - गोमाता आणि गोवंश यांच्या मांसाची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करणारे प्राणीकल्याण अधिकारी आशिष बारीक आणि गोरक्षक प्रतीक नाणेकर यांच्यावर आक्रमण करणार्या ७ धर्मांधांना न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. कुर्ला येथील महानगर न्यायदंडाधिकार्यांनी १७ जानेवारी या दिवशी ही शिक्षा दिली. या प्रकरणी पोलीस चौकशी चालू आहे. १६ जानेवारीला पहाटे आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर धर्मांधांच्या टोळक्याने कुर्ला येथील कुरेशीनगर येथे आक्रमण केले. यामध्ये आशिष बारीक गंभीर घायाळ झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अडीच हजार कोटींचा आकडा, २३ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि त्यात एका जमान्यात अनेक सिनेमावेड्यांची लाडकी असलेली ममता कुलकर्णी हिचे चर्चेत आलेले नाव, यामुळे सोलापूरकर चक्रावून गेले आहेत. सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत नक्की काय घडले आणि घडते आहे याविषयी कुणालाच कुणकुण कशी लागत नाही, याचीच चर्चा चालू आहे. साधी पानटपरी सुरू करायची तर हज्जार शासकीय अडथळे पार केल्यानंतर ती सुरू होते हा सर्वसामान्य अनुभव. पण इथे हजारो कोटींचे अवैध व्यवहार सुरू असताना कुठलाच अडथळा का आला नाही, हा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता अनेक चिंताजनक मुद्दे पुढे आले. केमिकल कारखाने आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावरच या निमित्ताने प्रकाश पडतो आहे. सोलापूर शहरालगत १५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. ही कंपनी औषध निर्मितीचे काम करते आहे. जवळजवळ दीडशे लोकांना रोजगार देण्याचे काम या कंपनीने केले. निर्मिती होते पण नक्की कशाची याचा पत्ता मात्र त्या दीडशे लोकांना आजही लागलेला नाही. याच कंपनीतून इफेड्रीन हे अमली पदार्थ मानले जाणारे ड्रग पोलिसांनी हस्तगत केले आणि सर्वांचे डोळे उघडले. नायजेरियाच्या माफियाला ताब्यात घेतलेल्या ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाचे सोलापूर कनेक्शन शोधून काढले. ठाणे पोलीसच या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर इफेड्रीन आणि अमली पदार्थ माफियांचे जाळे कसे विणले गेले आहे, याची माहिती त्यांनी उजेडात आणली. ड्रग डॉन गोस्वामी आणि त्याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या सहभागापर्यंत पोलीस यंत्रणेचा तपास पोहोचला. देशात आणि विदेशात या प्रकरणाने खळबळ उडाली असताना सोलापुरात मात्र सामसूम असल्याचेच चित्र आजही दिसते. वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या अमली पदार्थासारख्या विषयाचे कनेक्शन सोलापूरशी आहे म्हटल्याबरोबर जिल्हा प्रशासन खडबडून जागे व्हायला हवे होते. तसे न घडता जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणताही उद्योग सुरू होताना कंपनी कायद्यानुसार नोंदणीपासून ते अन्न व औषधी प्रशासनापर्यंतच्या असंख्य परवान्यांची गरज असते. उद्योग सुरू झाला तरी कामगार कायद्यापासून ते औषधी प्रशासनापर्यंतच्या अनेक तपासण्यांना दर महिन्याला उद्योगांना सामोरे जावे लागते. असा अनुभव एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीच्या बाबतीत आलाच नसेल काय? जर तशा तपासण्या वेळोवेळी झाल्या असतील तर अन्न व औषधी विभागाला त्यात काहीच का सापडले नाही. असे अनेक प्रश्न उभे राहतात. एरव्ही उद्योगाशी संबंधित सर्वच स्थानिक शासकीय यंत्रणा त्रुटी राहिली की कायद्याचा बडगा उगारताना दिसतात. तोच न्याय एव्हॉन कंपनीला वेळोवेळी लावला असता तर अमली पदार्थाचे जाळे वेळीच उद्ध्वस्त करता आले असते. त्यात औषध निर्मिती आणि त्यावरील नियंत्रण पद्धती यातील तांत्रिक गौडबंगालही सामान्य माणसाच्या विचारापलीकडचे आहे. शासनमान्य औषधांच्या फॉर्म्युल्यात थोडाबहुत फरक केला तरी तो अमली पदार्थ म्हणून वापरात येऊ शकतो, असे सांगितले जाते. त्याचाच फायदा अमली पदार्थ निर्मितीत गुंतलेले तस्कर घेतात. २० महिन्यांपूर्वी कुर्डूवाडीत एका कारखान्यात अशीच अमली पदार्थ निर्मिती झाल्याचे उघडकीस आले होते. त्या प्रकरणात स्थानिक ढवळे व शहा ही मंडळी आजही तुरुंगात आहेत. त्या प्रकरणाची पाळेमुळे आणि सूत्रधार आजही शोधले गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर एव्हॉन कंपनी आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचे रॅकेट सोलापूरच्या माध्यमातून कार्यरत असेल तर ती चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उद्योगांशी असलेल्या सर्वच विभागांचे मजबूत कुंपण कार्यरत करायला हवे तसे घडल्यास कोटी कोटींची अमली ममता रोखून सोलापूरही स्वच्छ राहील.
भोपाल : एक किलो भेंडीसाठी तुम्ही किती पैसे देऊ शकता? 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये किंवा 800 रुपये. जर तुम्हाला 800 रुपयांची भेंडी खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगू की भिंडी कोठे आणि कोण 800 रुपये किलोने विकत आहे. मिश्रीलाल राजपूत हे मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील खजुरी कलाण या गावातील शेतकरी आहेत. त्याच्या शेतात लाल भेंडी वाढले आहे. ज्याची किंमत 800 रुपये किलो आहे. एएनआयच्या मिळालेल्या रिपोर्टनुसार, मिश्रीलाल राजपूत यांनी लाल भेंडी इतके महाग का आहे, आणि त्याची खासियत काय आहे. हे देखील सांगितले आहे. साधारणपणे भेंडीचा रंग हिरवा असतो, पण त्याचा रंग लाल असतो. त्यात हिरव्या भेंडीपेक्षा जास्त पौष्टिक मूल्य आहे. जे लोक हृदयरोग किंवा रक्तदाबाने ग्रस्त आहेत. त्यांच्याकरिता ही लाल भेंडी खूप फायदेशीर आहे. तसेच, ज्यांना मधुमेह किंवा उच्च कोलेस्टेरॉलची समस्या आहे. त्यांच्यासाठी ही एक महान म्हणून लाल भेंडीला ओळखले जात आहे. लेडी बोट वाढण्याच्या प्रक्रियेबद्दल मिश्रीलाल राजपूत म्हणाले, मी कृषी संशोधन संस्था, वाराणसी कडून 1 किलो बियाणे खरेदी केले होते. मी जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याची पेरणी केली होती. 40 दिवसांनी लाल भेंडीचे दरात वाढ होऊ लागली आहे. मिश्रीलाल राजपूत यांनी सांगितले आहे की, या लाल भेंडीच्या लागवडीमध्ये कोणतेही हानिकारक कीटकनाशक लागू करण्यात आले नाही. ते म्हणाले की एका एकरात कमीत- कमी 40-50 क्विंटल आणि जास्तीत जास्त 70-80 क्विंटल लाल भेंडीचे उत्पादन असू शकणार आहे. लाल भेंडीच्या किंमतीबद्दल ते म्हणाले की, सामान्य भेंडीपेक्षा लाल भेंडी मध्ये 7- 8 पट महाग आहे. काही मॉलमध्ये 500 ग्रॅम लाल भेंडीची किंमत 300- 400 रुपये आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
अमरावती : भाजपा-शिवसेना-रिपाई(आठवले) उमेदवार आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या यांच्या प्रचारात रंगत आली असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामदास तडस यांच्या प्रचार सभेत आलिंगन देऊन लोकसभा मतदार संघातील मतदारांना योग्य तो संदेश दिला होता. खासदार अडसूळ यांच्यासाठी जिल्हयातील शिवसेनेबरोबरच रिपाई महायुती व भाजपाचे पदाधीकारी कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असून पक्षाबरोबरच अडसुळ यांची स्वता 300 जणांची चमू कार्यरत आहे. त्यांचा पारंपारीक तसेच अत्याधुनिक प्रचार तंत्राने त्यांचा प्रचार सुरु आहे. प्रत्येक भागाचे काय प्रश्न आहे याची माहिती घेऊन ते नागरिकांना आश्वस्त करत आहे. दहा वर्षांचा जनसंपर्क व लोकसंग्रह त्यांच्या प्रचाराला पूरक ठरत आहे. लोकांच्या भावना जाणून त्यांनी एक वचननामा तयार केला आहे. त्यामध्ये 10 वर्षांच्या कालखंडात केलेली कामे व आगामी काळात करण्यात येणारी कामे यांची माहिती ते स्वतः जनतेपर्यंत पोहचवत आहे. डिजीटल प्रचारासोबतच त्यांनी गावोगावी जनतेशी थेट संपर्क साधला आहे. जनतेशी संपर्क साधण्यासाठी ते सर्व माध्यमांचा वापर करत आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हान यांच्या सभेने मेळघाटातील आदिवासी बांधवांना त्यांनी तापी प्रकल्पाच्या फायद्याबाबत आश्वस्त केल्यामुळे मेळघाटात अडसूळ यांच्याबाबत चांगले वातारण तयार झाले आहे. स्टारप्रचारक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या प्रचारसभामुळे वातारण अडसूळ यांच्याबाजूने आहे. आगामी सरकारमध्ये अडसुळ नक्कीच मंत्रीमंडळात असतील अशी घोषणा राजनासिंग यांनी अमरावती येथील प्रचारसभेत केल्यामुळे अमरावतीच्या विकास अधिक गतिने होणार असल्याची येथील जनतेला खात्री पटली आहे. त्यामुळे मतदार अडसूळांकडे आकृष्ट होत आहे. 6 एप्रिल रोजी दिवसभर स्वतः हजर असल्यामुळे जुन्या शिवसैनिकात आनंदाची लहर आहे. दिनेश बुब यांच्यासह माजी आमदार संजय बंड यांचे समर्थक प्रचारात उतरणे ही अडसुळांसाठी जमेची बाजू आहे.
Rinku Sing Struggle : रिंकू सिंग हे नाव सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे त्याने केलेली झंझावाती खेळी. पाच षटकार आणि एका चौकारासह २१ चेंडूंमध्ये ४८ धावा करणाऱ्या रिंकूचं आयुष्य संघर्षानी भरलेलं आहे. त्याचा इथवर येण्याचा प्रवास सोपा नाही. एक काळ असाही होता की रिंकू सिंग क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांचा मार खायचा. पण त्याचा धीर खचला नाही, तो हिंमत हरला नाही. तो क्रिकेट खेळत राहिला आणि त्याने अखेर यशाला गवसणी घातली आहे. त्याचं कौतुक दस्तुरखुद्द शाहरुख खाननेही केलं आहे. त्याचा इथवरचा संघर्षमयी प्रवास आपल्या डोळ्यात पाणी आणेल यात शंकाच नाही. कोण आहे रिंकू सिंग? १२ ऑक्टोबर १९९७ ला रिंकूचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलीगढमध्ये झाला. रिंकू लेफ्टी बॅट्समन आणि राइट हँड ऑफ ब्रेक बॉलर आहे. रिंकूचं कुटुंब अत्यंत गरीब. त्याचे वडील खानचंद्र सिंग हे घरोघरी गॅस सिलिंडर पोहचवण्याचं काम करतात. तर त्याचा भाऊ रिक्षा चालवतो. रिंकूची आई घरकाम करते. अत्यंत संघर्षात आणि गरीबीत रिंकूचं बालपण गेलं आहे. रिंकू अभ्यासात फारसा चांगला नव्हता. पण त्याचं वेड होतं क्रिकेट. तो इतकं क्रिकेट खेळायचा की वडिलांकडून त्याने अनेकदा क्रिकेट खेळण्यासाठी मारही खाल्ला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनेच ही बाब स्पष्ट केली. क्रिकेट खेळून जेव्हा रिंकूने बाईक जिंकली तेव्हा त्याला वडिलांकडून पडणारा मार बंद झाला. या बाईकवरून रिंकूचे वडील सिलिंडर पोहचवू लागले. रिंकूला पाच भावंडं आहे. तिसऱ्या क्रमांकावर रिंकू आहे. घरची परस्थिती बेताची होती. पण त्याच्या डोळ्यात क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं. यासाठी त्याने प्रसंगी झाडू मारण्याचंही काम केलं आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे रिंकूची क्रिकेटर बनण्याची स्वप्नं धुळीस मिळू लागले होती. आयपीएलमध्ये निवड झाल्याने चित्र बदललं. रिंकू KKR साठी केलेल्या खेळीमुळे हिरो झाला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. कोलकाता आणि गुजरात सामन्यात काय झालं? कोलकाता नाईट रायडर्सकडून रिंकू खेळतो आहे. गुजरात विरूद्ध कोलकाता अशी मॅच रविवारी रंगली होती. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकला आणि कोलकात्यासमोर विजयासाठी २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य कोलकाता गाठू शकणार नाही असं वाटलं होतं. पण त्याचवेळी केकेआर टीमचा संकटमोचक म्हणून रिंकू सिंग आला आणि त्याने पाच षटकार, एक चौकार यांच्यासह ४८ धावांची झंझावाती खेळी करत कोलकाताच्या हातातून निसटलेली मॅच अक्षरशः खेचून आणली. ५ मार्च २०१४ ला वयाच्या १६ व्या वर्षी रिंकूने उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. या मॅचमध्ये त्याने ८७ चेंडूंमध्ये ८३ धावा केल्या होत्या. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्याला T20 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. विदर्भाच्या विरोधात त्याने पाच चेंडूंमध्ये २४ धावा केल्या होत्या. त्यानंतर अंडर १६, अंडर १९ आणि अंडर २३ क्रिकेट स्पर्धांमध्ये तो उत्तर प्रदेशातून खेळला आहे. २०१६-१७ मध्ये रणजी ट्रॉफी उत्तर प्रदेशही तो खेळला होता.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील 20 जणांना घेऊन जाणारी बोट शरयू नदीत बुडाली आहे. दुर्घटनेत एकाचा मृतदेह हाती लागला असून तीनजण बेपत्ता आहेत. तर 10 जणांनी पोहत आपला जीव वाचवला. बोटीतून प्रवास करणारे सर्वजण शेतकरी होते. हे सर्व आपल्या कामासाठी नदी किनारी शेतात पेरणी करण्यासाठी जात होते. यावेळी ही बोट उलटून हा अपघात घडला, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली आहे. दरम्यान सध्या घटनास्थळी पोलीस व बचावपथक दाखल झाले असून शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुलात पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे निवडणूक विभागाने याबाबत संपूर्ण तयारी केली असून तातडीने निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूकीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "मला एक बातमी अशी पण कळली की, मला वाटत होतं की लोकसभेच्या निवडणूकीला एकच वर्ष राहीलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्याची. . . बापट साहेबांचं दुखःद निधन झाल्यानंतर. . . ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे. " "निवडणूक लागल्यानंतर ज्या मित्रपक्षापैकी ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं? वजन करायचं का? तर नाही. त्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची. आमदारकीच्या निवडणूकीत कोणाला किती मतं पडली याची माहिती घेतल्यानंतर अंदाज येतो" असेही अजित पवार म्हणाले आहेत. पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (ता. २९ मार्च २०२३ रोजी) झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. पुढील वर्षी म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकरांना या निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेसची आहे. तर भाजपकडून स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
मुंबई : अश्विन मोहनलाल पारिख (८७ वर्षे) आणि विमलाबेन अश्विन पारिख (८१ वर्षे) या मुंबईतील वृद्ध दाम्पत्यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (POCSO ACT) विशेष न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा तहकूब करून मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना जामीन मंजूर केला आहे. एका चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवून मुंबईतील 'पॉक्सो' न्यायालयाने या दाम्पत्यास ११ मार्च रोजी शिक्षा ठोठावली होती. लगेच १५ मार्च रोजी या दाम्पत्याने त्याविरुद्ध अपील दाखल केले. ते १८मार्च रोजी सुनवणीसाठी दाखल करून घेतले गेले होते. या प्रलंबित अपिलात पारिख दाम्पत्याने शिक्षा स्थगिती व जामिनासाठी अर्ज केला. न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी तो मंजूर केला. त्यांना सुरुवातीस १५ दिवसांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या रोख जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना नियमित जामीन द्यावा लागेल. अपिलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांची शिक्षाही तहकूब केली गेली. दोन्ही आरोपी खूप वृद्ध आहेत. खटला प्रलंबित असतानाही उच्च न्यायालयानेच त्यांना जामीन मंजूर केला होता व त्या सवलतीचा त्यांनी कधीही गैरफायदा घेतलेला नाही, हे विचारात घेऊन न्या. मोहिते-डेरे यांनी हा आदेश दिला. आरोपीने नेमके काय कृत्य केले याविषयी पीडित मुलीच्या साक्षीत विरोधाभास आहे. शिवाय तिने फक्त अश्विन पारिख यांच्यावरच आरोप केला होता. विमलाबेन यांच्यावर तिचा काहीच आरोप नव्हता. वैद्यकीय तपासणी करणाoया डॉक्टरची जबानी व पीडितेची जबानी यांच्यातही सुसंगतता नाही, या ओरोपींचे वकील अॅड. दिनेश तिवारी यांनी मांडलेल्या मुद्द्यांचीही न्यायालयाने नोंद घेतली. अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर ए. व्ही. सोनावणे व पीडित मुलीसाठी सरकारने दिलेल्या वकील अॅड. अमीता कुट्टीकृष्णन यांनी शिक्षा तहकूब करण्यास व जामीन देण्यास विरोध केला.
देवळी : तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) या गावातून माझे व्यक्तिमत्व विकसीत झाले. वडिलोपार्जित गाव म्हणून माझ्या लहान मनावर संस्कार झाले. सामाजिक व राजकीय धडे येथेच आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन, औषध व सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले. नजीकच्या सोनेगाव आबाजी येथील धर्मार्थ दवाखाना व रूग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. शिक्षण सभापती जयश्री गफाट, पं. स. सभापती विद्या भुजाडे, जि. प. सदस्य वैशाली येरावार, भाजपाचे संपर्क प्रमुख राहुल चोपडा व महामंत्री सुनील गफाट यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतकºयांच्या हितार्थ अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवून गरजु रूग्णांच्या उपचारासाठी पाच लाखापर्यंतची शासकीय मदत देवून सामाजिक दायित्वाची भावना जोपासली जात आहे, असेही यावेळी ना. येरावार यांनी सांगितले. खासदार तडस यांनी अध्यक्षीय भाषणात येरावार कुटंूबियांचा सामाजिक वारसा तसेच सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती याप्रसंगी दिली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी जयंत येरावार व कुंटुंबीयांची सामाजिक बांधिलकी तसेच शेतकऱ्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी सांगितला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते धर्मार्थ दवाखान्याचे व रूग्णवाहिणीचे लोकार्पण करण्यात आले. या दवाखान्याचा व रुग्णवाहिकेचा परिसरातील सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयंत येरावार यांचा सपत्नीक प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, जि. प. सदस्य प्रवीण सावरकर व सुनीता राऊत, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, संजय गाते, हाजी अब्दुल हमीद, नगरसेवक नंदू वैद्य, आबाजी महाराज देवस्थानचे अरूण दाणी, सतीश दाणी, सरपंच संगीता लोखंडे, विनायक भोयर, गंगाधर राऊत, आबाराव भोयर, श्याम कावळे, गजानन डफरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील जाधव संकुल भागात मायलेकींवर एकाने रस्त्यावरच धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. यात दोन्ही महिला जखमी झाल्या आहे. याप्रकरणी मणकर्णाबाई वसंत पाटील यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक जाधव (२२ रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ,जाधव संकुल) असे महिलांवर हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. पाटील या वृध्दा शुक्रवारी मुलगी छाया सरोदे व नातेसमवेत परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जात असतांना ही घटना घडली. संशयिताने मायलेकींना गाठत जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयिताने दोघी महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात दोघी महिलेंच्या हातावर वार करण्यात आल्याने त्या जखमी झाल्या असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.
स्वतिश्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदम्। बल्लाळं मुरूडं विनायक मढं चिंतामणि थेवरम्। लेण्याद्री गिरीजात्माजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्। ग्रामो रांजण संस्थितम् गणपती, कुर्यात सदा मंगलम। । या शब्दांत आपण बुद्धिदात्या, ज्ञानदात्या, संकटनिवारक आणि विघ्नहर्त्या श्री गणेशाचे मोठ्या भक्तिभावाने स्तवन करतो. हा श्लोक श्री गणेशाच्या महाराष्ट्रातील आठ गावांतील अष्टरूपांचे वर्णन करणारा आहे. या आठही गावांतील गणेशांचे तिथे जाऊन दर्शन घेणे ह्यालाच "श्री गणेश अष्टविनायक दर्शनयात्रा' असे म्हणतात. ही आठही स्थाने तशी जवळजवळच असल्याने केवळ दोन दिवसांतच अष्टविनायक दर्शनयात्रा आपण पूर्ण करू शकतो. त्यानुसारच ह्या यात्रेचे यात्रा कंपन्या आणि वैयक्तिकदृष्ट्या आयोजन केले जाते. या आठही गावी विराजमान असलेला श्री गणेश हा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. मोरगावचा गणपती हा श्री मोरेश्वर, सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक, पालीचा श्री बल्लाळेश्वर, महड गावचा गणपती हा श्री वरदविनायक, थेऊरचा श्री चिंतामणी, लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक तर ओझरचा श्री विघ्नेश्वर आणि रांजणगावचा गणपती हा श्री महागणपती ह्या नावांनी प्रसिद्ध आहे. या अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातच मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री हे पाच गणपती येतात. रायगड जिल्ह्यात महाड आणि पाली येथील दोन गणपती येतात. तर आठवा गणपती हा अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील आहे. ही आठही स्थाने मोठी रम्य आणि दर्शनीय आहेत. ही अष्टविनायकांची यात्रा कशी व कोणत्या क्रमाने करायची यासंदर्भात असे सांगितली जाते की-प्रथम मोरगावच्या श्री मोरेश्वराचे दर्शन घेऊन ह्या यात्रेस प्रारंभ करावा. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव अशी ही यात्रा करावी. या शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रेची सांगता पुन्हा मोरगावच्या गणेशाचे दर्शन घेऊन करावी. अनेक गणेशभक्त हे यात्रेच्या स्वरूपात ह्या गणेश दर्शनास न जाता आपापल्या सोयी आणि सुविधेनुसार ह्या गावी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतात. या मागील भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि गणेशभक्ती ह्याला जास्त प्राधान्य आहे.
संपूर्ण देशभरातच नाही तर महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. सरकारी यंत्रणांवरचा ताण कमी करावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात प्रत्येकाने विशेष काळजी घेणं, अत्यावश्यक ठरतंय. अवघ्या जगावर ओढवलेल्या या करोना संकटाचं निवारण करण्यासाठी चैत्र नवरात्रीनिमित्त अभिनेत्री अलका कुबल यांनी मांढरदेवच्या काळूबाईला चैत्र नवरात्रीनिमित्त साकडं घातलं आहे. हे संकट लवकर टळू दे, मी स्वतः येऊन देवी तुझी खणा-नारळाने ओटी भरेन असं त्यांनी साकडं घातलं. नवसाला पावणारी काळूबाई त्यांचं हे गा-हाणं नक्की ऐकेल, अशी चाहत्यांना श्रध्दा आहे. देवीचा आर्शिर्वाद मनुष्याच्या पाठीशी भक्कम राहावा व मनुष्यजातीचं देवीने रक्षण करावं यासाठी अलकाताईंनी हा नवस केला आहे. नवस करतानाच अलकाताईंनी जगभर विज्ञान-तंत्रज्ञानाकडून या करोनारुपी राक्षसाचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, याचा आवर्जून उल्लेख केला. पण जोडीला श्रध्दा हवीच. एकूणच सर्वांना यश मिळो व परिस्थिती लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
'मातोश्री'चे कान भरणाऱ्या संपर्कनेत्यांच्या ग्रहणात अडकली शिवसेना ग्रामीण ! शिवसैनिकांच्या मते कोण आहेत शिवसेनेतील 'ते' झारीतले शुक्राचार्य जे पक्षाला पोखरत आहेत? शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची 'संघटना' रसातळाला ....
जिल्हा परिषद विद्यालय आडगांव बुः च्या तब्बल दहा वर्षांनंतर सन २००९-२०१० च्या दहाविचा वर्ग पुन्हा भरला. सन २००९-२०१० चे माजी विद्यार्थ्यी दिपक रेळे, दिपक घाईट व शेख साबिर यांच्या संकल्पनेतून काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेतील आठवणींना उजाळा देण्याकरिता पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. यावेळी त्या वर्गातले बहुसंख्य माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. प्राचार्य आर जी जाधव यांचे प्रमुख उपस्थितीतीत वर्ग शिक्षक इंगळे, पी आर अढाऊ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे यांची उपस्थिती होती. शिक्षकवृंदानी जुन्या आठवणी व अनुभव कथन करुण विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी भविष्यात येणाऱ्या अडचणीत एकमेकांना मदत करण्याची शपथ घेतली. दहा वर्षांनी एकत्रित येत असलेल्या बरेच विद्यार्थ्यांनी आप आपल्या आठवणी कथन केल्या त्यावेळी सर्व वातावरण भाऊक झाले होते. आयोजित कार्यक्रमाचे संचालन रोशनी गाडगे व मनिषा धमके यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश तायडे यांनी केले. अशी माहिती दिपक रेळे यांनी दिली.
निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी थंड पाण्याने प्रातःस्नान सुरु करा; वाचा अधिकाधिक फायदे! उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे थंड पाण्याने स्नान सुरू करा आणि आरोग्य पण मिळवा. स्नान सूयोदयापूर्वीच करावे असे शास्त्र सांगते. `नद्यां स्नानानि पुण्यानि' असे धर्मशास्त्राचे वचन आहे. म्हणजेच नदीतील स्नान पुण्यकारक असते, असा या वचनाचा अर्थ आहे. परंतु नदीस्नान शक्य नसले, तरी घरच्या घरी सूर्योदयापूर्वी थंड पाण्याने केलेले स्नान तितकेच पुण्यकारक व लाभदायक ठरते. पूर्वी नदीस्नानाचा आग्रह का केला जात असे? तर सतत वाहते पाणी हे प्रदुषणमुक्त असते, स्वच्छ व पवित्र असते. मागील रात्री रात्रभर चंद्राच्या आणि नक्षत्रांच्या किरणांतून अमृत कणांचा वर्षाव विश्वावर आणि जलाशयातील जलावर झालेला असतो. सूर्योदयानंतर मात्र ती अमृतभारितता सूर्यकिरणांमुळे नष्ट होते. म्हणून स्नान हे सूर्योदयापूर्वी तेही वाहत्या पाण्यात करणे हिताचे मानले जात असे. स्नान डुंबत शांतपणे करावे. कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून आचमन, मार्जन, संकल्प, तर्पण करायचे असते. तेवढा वेळ पाण्यात उभे राहिल्याने वंशपरंपरागत शारीरिक विकार नष्ट होतात. यावर आताच्या काळात टब बाथ हा पर्याय वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे. परंतु ते पाणी प्रवाही नसल्याने नदी स्नानाचे मूल्य देऊ शकत नाही. आयुष्यमारोग्यमलोलुपत्वं दुःस्वप्नघातश्च तपश्च मेघा। । याचा अर्थ असा, की नित्य प्रातः स्नानात दहा गुण आहेत. रूप, तेज, बल, कांति, शुद्धता, दीर्घायुष्य, निरोगिता, आळसावर मात, दुष्ट स्वप्नांचा नाश, तप आणि मेघा. मेघा म्हणजे धारणाशक्ति. हे दहा गुण प्रातःस्नानाने प्राप्त होतात. आपल्या वेदाने सांगितले आहे, की पाण्यात सर्व वनौषधि विद्यमान आहेत. नित्य स्नानाचा मुख्य लाभ हा, की शरीराला अपेक्षित जलतत्त्वाची पूर्तता होते. शरीर पंचभूतांचे आहे. पंचभूतात जलतत्त्व आहे. शरीराला या जलतत्त्वाचाही पुरवठा हवा. स्नानामुळे साडेतीन कोटी रोमरंध्रातून जलतत्त्व शरीरात प्रविष्ट होते व पंचतत्त्वाची धारणा होते. स्नानानंतर रोमरंध्रात पाणी मुरते. हवे मंगलस्नान गरम पाण्याने केले, तरी डोक्यावर थंड पाणीच वापरावे. त्यामुळे उष्णताजन्य नेत्रविकार होणार नाहीत. त्यामुळे, यापुढे आंघोळीचा कंटाळा न करता आंघोळीची गोळी बंद आणि प्रातःस्नान सुरू करा व असाधारण लाभ मिळवा.
'ऑपरेशन मदत'च्या माध्यमातून 16 हजार ५ जणांना वाचवण्यात यश आलं. 'ऑपरेशन मदत' जरी थांबवलं असलं तरीही पूरग्रस्त लोकांना जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. विमानातून पूरग्रस्तांना अन्न आणि औषधे पुरविली जात आहेत. अशी माहिती नौदलाच्या दक्षिण विभागाने दिली. पाणी ओसरायला सुरूवात झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेलं कोची विमानतळ देखील पूर्ववत होणार आहे. २९ ऑगस्टपासून येथून उड्डाणं सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी २६ ऑगस्टपासून विमानतळ सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. केरळमध्ये पुरानंतर हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. केरळमध्ये आलेल्या पुरानंतर चहुबाजूंनी मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी केरळला ७०० कोटी रुपयांची मदत देऊ केली होती. मात्र, मदत करू इच्छिणाऱ्या या देशांचे आभार मानत भारताने त्यांची मदत नम्रपणे नाकारली आहे.
औरंगाबाद - फारोळा येथील जलशुद्धी केंद्राची वर्षानुवर्षे स्वच्छता केली नसल्याने औषधासह इतर घाणीचा दोन फुटांपर्यंत गाळ साचला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तीन एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची जागा गाळाने व्यापली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. याच टाकीत दोन फुटांपर्यंत म्हणजेच ७० सेंटिमीटरपेक्षा जास्त गाळ साचला होता. तो आज साफ करण्यात आला. यात औषधासह विविध प्रकारच्या रसायनांचे कण आणि क्षार आढळून आले. या गाळाने जागा व्यापल्याने तीन एमएलडी पाणी कमी झाले होते. महापालिकेने या कामावर केवळ दोन लाख रुपये खर्च केला आहे. खंडन काळामुळे केवळ एक दिवस पाणीपुरवठा उशिराने होणार आहे, पण सर्वांना वेळेवर पाणी मिळेल, असा दावा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी केला. क्रांती चौक, सिल्क मिल कॉलनी, नागसेननगर, एकनाथनगर, फुलेनगर, शिवाजीनगर, संघर्षनगर, चिकलठाणा, सुरेवाडी, मयूर पार्क, आंबेडकरनगर, बारी कॉलनी, कटकट गेट, एन १२, एन १, टीव्ही सेंटर परिसरासह अन्य भागांत पुरवठा करण्यात आला. या भागांत आज पाणी पुंडलिकनगर,उल्कानगरी, गारखेडा, विद्यानगर, मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी, एन ३, एन या भागात शनिवारी नियमित वेळेत पाणी देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2020) मांडला. बजेटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात (Gold-Silver Prices Today) दमदार वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) प्रति तोळा 277 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्यासोबतच चांदीचे दरही (Silver Prices) वाढलेत. प्रति किलो चांदीच्या किंमतीत 483 रुपयांची वाढ झाली आहे. मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील दुसरं बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. त्याचदरम्यान सोन्या-चांदीला झळाळी मिळाली आहे. शनिवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 41 हजार 646 रुपयांवरुन 41 हजार 923 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या 3-4 दिवसांमध्ये सोन्याच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळाला. शुक्रवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 131 रुपयांनी घटले होते. तर गुरुवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 400 रुपयांची वाढ झाली होती. (हेही वाचा : तुम्हाला किती कर द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम ) सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीतही आज मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. चांदीची किंमत प्रति किलो 47 हजार 613 रुपयांवरुन 48 हजार 096 रुपयांपर्यंत वाढली आहे. HDFC सिक्युरीटीजच्या तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर झाला आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले. >सभेत फडकला 'लोकमत' जळगाव : नेरी ता. जामनेर आणि खरजई ता. चाळीसगाव या सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि जि. प. अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, सभापती लीलाबाई सोनवणे, कांताबाई मराठे, राजेंद्र राठोड, सीईओ शीतल उगले, अतिरिक्त सीईओ सुनील गायकवाड, सभा सचिव मिनल कुटे उपस्थित होत्या. नेरी व खरजई सामूहिक पाणी योजनांचा लाभ घेत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजनांच्या विषयाला सदस्यांनी स्पष्ट विरोध न करता स्वतंत्र पाणी योजना या अयशस्वी ठरल्याची उदाहरणे दिली. प्रशासनाच्या प्रमुख म्हणून सीईओ यांनी या योजनांसंबंधी दिलेल्या अभिप्रायाबाबत सांगितले. त्या म्हणाल्या, ज्या गावांमध्ये सामूहिक पाणी योजना आहेत तेथे स्वतंत्र पाणी योजना घेऊन पैशांची उधळपट्टी करायला नको. परंतु जेथे खरोखरच गरज आहे तेथे स्वतंत्र पाणी योजना व्हाव्यात. ज्या गावांमधील स्वतंत्र पाणी योजनांना पाण्याचा स्त्रोत नाही त्या गावांसाठी सामूहिक पाणी योजनाच योग्य असल्याचा स्पष्ट अभिप्राय दिल्याचे त्या म्हणाल्या. अर्थातच नेरी व खरजई पाणी योजनांचा विषय अध्यक्ष खोडपे यांच्या संमतीने सभागृहात आला होता. विशेष म्हणजे नेरी हे खोडपे यांचे गाव आहे. सदस्यांनी नेरी सामूहिक पाणी योजनेंतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्यास मंजुरी दिली. पण खरजई योजनेंतर्गत फक्त वडाळा वडाळी या गावात स्वतंत्र योजना घेण्यास मंजुरी दिली गेली. इतर गावांमध्ये सर्वेक्षणानंतर स्वतंत्र पाणी योजना देण्याचा निर्णय झाला. नदी संवर्धन योजनेंतर्गत वाघोदा बुद्रूक ता. रावेर येथे चार कोटी १९ लाख रुपयांच्या कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जात असेल तर प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकारही जि. प. लाच द्या. या विषयासंबंधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचे नाव विषय सूचित टाकल्याची बाब चुकीची असल्याचे शिवसेनेचे प्रकाश सोमवंशी म्हणाले. त्यांचे नाव टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. या योजनेसंबंधी अटीनुसार ३0 टक्के निधी ग्रा. पं. नेच द्यावा. ग्रा. पं. ने निधी नाही दिला तर सेस फंडातून निधी देण्याची तरतूद होऊ नये. तसेच फक्त इतर गावांमध्येही अशी योजना आणावी, अशी मागणी करण्यात आली. लोकमतचा आधार घेऊन आपले मुद्दे मांडताना सदस्य प्रकाशसोमवंशी.
पातूर (सुनिल गाडगे) दि. ३/२/२०२२ रोजी कोठारी खुर्द, ताः- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा संपन्न शेतीशाळा प्रशिक्षक :- श्री जयंत सुरवाडे यांनी कामगंध सापळे व पक्षी थांबे लावणे, 12 प्रकारच्या पाल्यापासुन वनस्पतीजन्य कीटकनाशक जसे दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, कीटकनाशक फवारणी करतांना सेफ्टी किट चा वापर करणे व काळजी घेणे, मित्रकीड व शत्रूकीड ची ओळख यावर मार्गदर्शन केले. तसेच शेतीशाळा समन्वक मा. श्री. दिलीप बोबडे साहेब यांनी पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी पिकाचे सर्वेक्षण करून किडीचे व रोगाचे नियोजन करणे, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन तसेच उत्पादनखर्च व उत्पन्न यातील फरक, शून्य मशागत शेती, रासायनिक औषधी चा वापर कमी करणे, जैविक शेतीवर जास्त भर देणे याबद्दल मार्गदर्शन केले. शेतीशाळेला श्री. सरकटे साहेब(कृषीसहाय्क ), अमोल राठोड( समूह सहाय्यक) रोशनी कावळे (कृषिताई ), गेस्ट फार्मर श्री. किरण कावळे, हरीश टप्पे, रवींद्र काटेकर, अशोक कुकडकर, विजय टप्पे, भाऊराव ठाकरे, गणेश टप्पे, सुरेश कुकडकर, श्री सोयस्कर, तसेच गेस्ट फार्मर व गावातील शेतकरी उपस्थित होते.
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल ४९ मतं फुटली आहेत. भाजपानं या निवडणुकीत यशस्वी खेळी खेळली असून त्याचा फटका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना बसला आहे. भाजपाचे चंद्रशेखन बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५५९ मते होती. त्यातील ५ जणांनी मतदान केले नाही. ५५४ जणांपैकी ३६२ मतं भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, छोटू भोयर १ आणि मंगशे देशमुख यांना १८६ मते मिळाली. नाशिकमध्ये राज ठाकरेंचा शिवसेनेसह इतर पक्षांना मोठा दणका. . मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजपा व कॉंग्रेस दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात आला. मतदारांची संख्या जास्त असल्याने सुरुवातीपासूनच भाजपाकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. बावनकुळे यांना चारशेहून अधिक मतं मिळतील, असा दावा करण्यात येत होता. तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी २८० च्या जवळपास मत मिळतील, अशी भूमिका मांडली. ग्रामीण भागात भाजपाच्या ४२ मतांना फोडण्यात यश आल्याचे मंत्री सुनील केदार यांचे समर्थक सांगत होते. मात्र काँग्रेसने केलेला सर्व दावा आता फोल ठरल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत ९८. ९३ टक्के मतदान झाले होते. Read Also : - ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा 'तो' आमदार फोडला. . - मनसेच्या होर्डिंगवर 'जय श्रीराम', औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी!
Share Market Latest Updates : वर्षाच्या अखेरच्या महिन्यात भारतीय शेअर (Share Market News)बाजारात 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. शेअर बाजाराने (Share Market Live)नवीन निर्देशांक (sensex News update) गाठलेला प्रथमच पाहायाला मिळाला. त्याला कारण सुद्धा तसेच आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफपीआयचा भारतीय शेअर बाजारावर मोठा विश्वास पाहायाला मिळतो आहे. कारण गेल्या महिन्यातही विदेशी गुंतवणूकदारांनी 36,200 कोटी रुपयांची खरेदी केली होती. डॉलर इंडेक्समध्ये घसरण होत असतानाही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांवरील निर्णयापूर्वीच्या मागील 4 सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांच्या स्टॉकमधून 3,300 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 1 ते 9 दरम्यान,परदेशी गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये निव्वळ 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही त्यांनी 36,239 कोटी रुपयांची खरेदी केली होती. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये त्यांनी शेअर्समधून 8 कोटी रुपये काढले होते. सप्टेंबरमध्येही त्यांनी 7624 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. गेल्या 4 सत्रांमध्ये एफपीआयच्या विक्रीचे कारण कदाचित फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीमुळे असेल. या वर्षासाठी फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) ची शेवटची बैठक 13-14 डिसेंबर रोजी होणार आहे असं रिसर्च, मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. स्टॉक व्यतिरिक्त, एफपीआयने अहवाल कालावधीत कर्ज आणि रोखे बाजारात 2,467 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या महिन्यात फिलीपिन्स, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड आणि इंडोनेशिया यांसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही एफपीआय प्रवाह नकारात्मक राहिला आहे. नोव्हेंबरमध्येही त्यांनी 36,239 कोटी रुपयांची खरेदी केली होती. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये त्यांनी शेअर्समधून 8 कोटी रुपये काढले होते. सप्टेंबरमध्येही त्यांनी 7624 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. एकंदरीतच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफपीआयचा भारतीय शेअर बाजारावर मोठा विश्वास पाहायाला मिळतो आहे. कारण गेल्या महिन्यातही विदेशी गुंतवणूकदारांनी 36,200 कोटी रुपयांची खरेदी केली होती.
शरद ऋतूतील हंगामात काही पक्षी त्यांची घरे सोडण्यास आणि उबदार हवामान धार स्थलांतरित करण्यासाठी, कळप मध्ये गटामध्ये समाविष्ट केले जातात म्हणून पाहिले जाऊ शकते. तो स्थलांतरित पक्षी आहे - दरवर्षी wintering च्या भागात कारणास्तव प्रजनन ते स्थलांतर करतात नेहमी परत येऊ कोण प्रतिनिधी. ते जगातील सर्व पक्षी एक तृतीयांश घडवणे. रशिया मध्ये स्थलांतरित पक्षी पाणथळ जागा आणि waterfowl प्रजाती एका मोठ्या गटाला सादर केले. पक्षी या गटात सात युनिट, जास्त शंभर प्रजाती समावेशः - loons; - grebes; - Ciconiiformes; - Anseriformes; - Pastushkova; - आकाराचा क्रौंच; - Sandpipers. काही स्थलांतरित पक्षी म्हणून चिंताजनक सूचीबद्ध आणि त्यांना रशिया मध्ये बंदी घालण्यात आली आहे शिकार. या ऐवजी मोठ्या काळा आणि पिवळा-बिल आळशी यादी herons, गुसचे अ. व. रूप, आकाराचा क्रौंच काही प्रकार. काय पक्षी स्थलांतर करते? प्रत्येक वसंत ऋतु आमच्या जंगले, फील्ड आणि तलाव न्यूज विश्वभरातून पसरलेल्या एव्हीयन गलबला भरते. या रशियन स्थलांतरित पक्षी प्रजनन कारणास्तव परतले. त्यांच्या उड्डाणे समुद्र व जमिनीवरून पक्षी लांब पृथ्वीवरील मानव देखावा आधी, एक वेळ करा. स्थलांतर कालावधी वर्षे लाखो विविध भौगोलिक भागात पर्यावरणीय परिस्थिती समतोल होते अनेक प्रजाती मध्ये शारीरिक आणि जैविक प्रक्रिया योगदान. स्थलांतरित पक्षी संबंधित अनेक समस्या. ते कसे, दिवस आणि रात्र मार्गदर्शन एक हजार किलोमीटर मात? विशिष्ट प्रजनन कारणास्तव त्यांच्या जोड आम्ही कसे सांगू शकता? का पिले, अफाट अंतर मात उष्णदेशीय भागात मध्ये wintering, कडे उड्डाण करणारे हवाई आणि ते ते जन्म होते जेथे ठिकाणी खालील वसंत ऋतू परत येऊ शकता? स्थलांतरित पक्षी प्रवास कालावधी कसा परिभाषित प्रश्न नाही उत्तर. Hops - एक प्रतिसाद हवामान बदल आणि ज्या मुळे पक्षी पृष्ठवंशी प्राण्यामध्ये उर्वरित पेक्षा जास्त फिकट आहेत इतर पर्यावरणीय घटक, त्यांच्या श्रेणी पाठविणे शक्य झाले. अनेक आठवडे प्रत्येक वसंत ऋतु स्थलांतरित पक्षी अचूकपणे त्यांच्या पूर्वजांना श्रेणी हळूहळू सेटलमेंट आणि विस्तार वर्षे अनेक हजारो पराभव केला की मार्ग पुन्हा करा. पक्षी सतत सर्वात चांगल्या अधिवास शोध गुंतलेली आहेत. ते संतती निर्मिती आणि जगण्यासाठी प्रत्येक प्रजाती जैविक इच्छा चांगले अंमलबजावणी प्रत्यक्ष गतिशीलता वापरा. आर्क्टिक मध्ये समावेशन पक्षी, उदाहरणार्थ, पिल्ले दिवसरात्र धन्यवाद आक्षेपार्ह या वेळी पशुखाद्य, ध्रुवीय दिवस, त्यांना यशस्वीरित्या संतती वाढण्यास ज्यामुळे. की स्थापन करण्यासाठी जलतरण पक्षी एक विशिष्ट समावेशन साइटवर परत येत राहतात, परवानगी आता सर्व खंड वर पद्धतशीरपणे चालते पक्षी, वस्तुमान रिंग. या आकडेवारीनुसार दिलेल्या भागात समावेशन बदके लोकसंख्या सातत्याने पदवी, तसेच पुनर्वसन आणि स्थलांतर पिल्ले त्यावर आहेत. तथापि, ते पुढे मार्ग पर्यावरण राज्य परिणाम विविध घटक प्रभाव अंतर्गत, त्यांचे स्थान आणि संख्या मोठ्या मानाने बदलू शकतात. उदाहरणार्थ, योग्य खालच्या पोहोचते मध्ये पर्यावरण निकृष्ट दर्जा करण्यासाठी Ob नदी मुळे तेल विकास आणि पक्षी अधिवास नष्ट टियूमेन मध्ये, दक्षिण एक हळूहळू बदल त्यांच्या आहे. हंगामी स्थलांतर मुख्य मार्ग आफ्रिका आणि युरेशिया, कनेक्ट आग्नेय आशिया आणि युरेशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आणि उत्तर अमेरिका. बर्याचदा, पक्षी कमीत कमी अंतरावरून ओलांडून उड्डाण करणारे हवाई परिवहन, पण कधी कधी ते मार्ग वळण. उदाहरणार्थ, आकाराचा क्रौंच इतर थांबवू कमीत कमी अंतरावरून ढळणे. स्थलांतरित पक्षी उड्डाण, दिवस व रात्र असू शकते. जलद उडणाऱ्या प्रतिनिधी (swallows, आणि मार्टिन्स) कधी कधी माशी वर फीड, आणि दुपारी उड्डाण करा. Wrens, कोकिळा आणि दिवस विश्रांती आणि खाणे दरम्यान जीवन एक गुप्त मार्ग इतर पक्षी, आणि उड्डाणे रात्री करा. दिवस कोणत्याही वेळी waterfowl प्रवास. एका तासात लहान पक्षी 50 पेक्षा जास्त किमी नाही मात. hawks गती 50-60 किमी / ताशी, आणि बदके - जवळजवळ 95 किमी / ताशी. पक्षी 30 300 किलोमीटर रात्री प्रती उडता. दुपारी ते लँडस्केप आणि सूर्य, किंवा चुंबकीय क्षेत्र घटक लक्ष केंद्रित ते ढगाळ आहे तेव्हा. रात्र पक्षी आपल्या स्टार उड्डाण दिशा ठरवू शकता.
राज्यातील गरीब मुलींच्या लग्नासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजना सुरु केलेली आहे. परंतु या योजनेचा गैरफायदा घेत विवाहीत जोडप्यांनी दागिने आणि पैशांच्या हव्यासापोठी 'सरकारी लग्ना'चा पुन्हा बोजवारा उडवला आहे. मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजना ही गरीब मुलींचा विवाह व्हावा यासाठी सुरू करण्यात आली. विवाह करणाऱ्या जोडप्याला २० हजार रूपये रोख, ज्वेलरी आणि भेटवस्तू असे या योजनेचे स्वरूप आहे. मात्र, पैसे आणि दागिन्यांच्या अमिषाने विवाहीत जोडप्यांनीही सरकारी लग्न दोनदा केल्याने योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. सरकारी महाभागांच्या स्वतःःच्या लग्नात त्यांच्या पोराबाळांचाही समावेश आहे. नवभारत टाईम्सने स्टींग ऑपरेशन केल्याचा दावा करून दिलेल्या वृत्तानुसार, २४ फेब्रुवारीला ग्रेटर नोएडा येथील वायएमसीए क्लबमध्ये ६६ जोडप्यांनी सामुहिक विवाह केला. या जोडप्यांच्या सत्यतेबाबत माहिती घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सरकारी लग्न केलेल्या जोडप्यांपैकी तब्बल ११ जोडप्यांनी लग्नाचा बनाव रचत विवाह केल्याचे उघड झाले आहे. या योजने अंतर्गत सरकार २५० कोटी रूपयांचा निधी समाज कल्याण विभागाला देत असते त्यातून ही मदत केली जाते. आतापर्यंत ५५ जिल्ह्यांमध्ये ६००० पेक्षा जास्त जोडप्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समजते. यूपी सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षात १० हजार विवाहांचे लक्ष्य ठेवले आहे. राज्याच्या २० जिल्ह्यांमध्ये सरकारने येत्या काही काळात विवाहांचे आयोजन कलेले आहे. अशा बनावट लग्नामुळे सरकार सर्व माहिती घेऊनच मदत करणार असल्याचे समजते.
ओडेसा - मुख्य औद्योगिक आणि पोर्ट शहरात, ऐतिहासिक दृष्टी, समुद्र, सूर्य आणि किनारे नाही फक्त आहे. पर्यटक त्याच्या अनेक दुकाने, हॉटेल्स, ऐतिहासिक साइट, कॅफे आणि रेस्टॉरन्ट्स प्रसिद्ध Deribasovskaya स्ट्रीट बाजूने एक promenade करण्यासाठी आनंद झाला. कल्पित "पुरवठा", Starokon बाजार आणि प्रसिद्ध "7 किमी" - पण खरोखर काय, Odessa, शहर बाजारात जाणून मदत. बाजार स्थित आहे रेल्वे स्टेशन पासून 200 मीटर. एकदा गावातील विक्रीसाठी त्यांच्या वस्तू आणले जे एक क्षेत्र होते. त्यामुळे बाजार नाव होतं. 1827 मध्ये तो स्थिर निर्णय व्यापार करण्याचा निर्णय घेण्यात आला, आणि ते पोल्ट्री आणि पशुधन विक्रीसाठी परिसरात मालिका तयार करण्यासाठी सुरु. ओडेसा गेलो गेल्या चट्ठा केल्यानंतर, बाजारात बर्न होते. कॅपिटल पुनर्प्राप्ती "Privoz" 1902 मध्ये सुरुवात केली. कमानी कनेक्ट चार स्वतंत्र इमारती एक संच - सर्वात मनोरंजक इमारती एक 1913. "फळ पॅसेज" मध्ये बांधले जाऊ बाहेर वळले. क्रांती केल्यानंतर, "पुरवठा" पुनर्नामित करण्यात प्रयत्न होते, पण नवीन नाव दांडा नाही. उशीरा बाजारात अगदी शतक 60-ies मध्ये मांस आणि दुग्धजन्य माघारी आणि फरसबंदी क्षेत्र बांधले. 1990 मध्ये तो सामान्य पुनर्रचना, नवीन खरेदी आणि कार्यालय केंद्रे आणि दुकाने बांधकाम केले होते. सुपर मार्केट्स मोठ्या संख्येने, ओडेसा समृध्द आहे, जे न जुमानता, बाजारात प्राथमिक खरेदी गंतव्य म्हणून सर्व्ह करावे. ताजे मासे, मांस, लोणी, दूध, cheeses विविधः फक्त "पुरवठा" अतिशय स्वस्त आणि चवदार अन्न विकली. बाजारात हिकमती विक्रेते सन्मान कांस्यपदक स्मारके fisherwoman सोनिया क्लिनर मासे काका Zhora आणि कोस्टा खलाशी स्थापना केली. बाजार "7 किमी" खलाशी पोर्ट शहरात नेहमी लोकसंख्या आपापसांत लोकप्रिय समजते आणले. विशेषतः गेल्या शतकाच्या लोक काम बाहेर होते आणि व्यवसाय करू तेव्हा 90s मध्ये व्यापार जगू दे. त्यामुळे युरोप सर्वात मोठी घाऊक आणि किरकोळ बाजारात "7 किमी" एक स्थापना करण्यात आली. तो महामार्ग Ovidiopol 7 किलोमीटर वर स्थित आहे कारण त्याचे नाव मिळाले. नवीन बाजारपेठा क्षेत्र - 80 हेक्टर. हे किरकोळ 15 पेक्षा जास्त 000 सुविधा, गोदामांची सुविधा, 3 चिकित्सालय व आणीबाणी विभाग स्थित आहे, पोलीस स्टेशन आहे. प्रदेश 4 थीम असलेली खरेदी बाजारात विभागलेला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 कपडे, खेळणी, स्मृती, चामड्याच्या वस्तू विक्री आहे. प्लॅटफॉर्मवर संख्या 2 प्रामुख्याने तुर्की, पोलंड, घरगुती उत्पादक उत्पादने पासून कपडे आणि पादत्राणे विक्री होत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 3 रोजी आपण चीन पासून स्वस्त कपडे आणि शूज खरेदी करू शकता. ज्या विद्युत उत्पादने, घरगुती उपकरणे, टेलीव्हिजन, टेलीफोन समावेश सर्वकाही, विक्री खार्कीव्ह व्यासपीठ आहेत. बाजारात दोन हॉटेल्स आणि अनेक कॅफे आहेत. 350 हजार लोकांना दररोज बाजारात भेटी. कार आणि बस 8 सोयीस्कर पार्किंग सज्ज. ओडेसा Starokon बाजार Moldavanka केंद्र बस स्थानक जवळ आहे. तो 1832 मध्ये केली होती. Bessarabian Gypsies लिलाव घोडे येथे fetches करताना, गुरेढोरे गावातील fetches, खलाशी विदेशी पक्षी आणि प्राणी आणले. काही वर्षांनी शहर अधिकार्यांना बाजारात आणि व्यापार गुरेढोरे आणि शहराच्या बाहेर घोडे दुः ख सहन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. वेळ गेला म्हणून, शेत Moldavanka एक उपनगर मध्ये चालू, ओडेसा पुरुष होते. बाजारात सर्वत्र झरा आहेत, त्यामुळे अन्न, मांस, दूध आणि इतर उत्पादने विक्रीसाठी बांधले रिटेल जागा आणि बाजार आणि नाव मतभेद विसरून Starokon अडकले. सध्या आठवड्याच्या शेवटी विशेषतः गर्दीच्या आहे. Odessans aquariums संबद्ध प्राणी किंवा पक्षी, विशेषतः येथे अनेक मत्स्यालय मासे आणि विशेषता खरेदी येथे येतात. कोण किमान एकदा शहर भेट नाही फक्त की "Privoz" ओडेसा प्रसिद्ध माहीत आहे. बाजार आपण एक करार करू शकता, जेथे प्रत्येक क्षेत्रात आहेत. ते घरगुती आणि आयात उत्पादने, हंगामी भाज्या, तसेच वस्तू उद्योग समूह विक्री. सर्वात प्रसिद्ध आहेतः - नवीन मार्केट - शहर नाही आतापर्यंत Deribasovskaya पासून जुने भाग आहेत. "पुरवठा" समान रंग, 100 पेक्षा जास्त वर्षे आहेत. - बाजार "इषारा हिल" - हे सर्व एकाच नाव च्या शेजारच्या Cosmonauts रस्त्यावर बांधले होते. - दक्षिण बाजार - Tairov गावात शहर निवासी क्षेत्रात आहेत. तो बांधले 30 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. - उत्तर बाजार - गावात Kotovsky मध्ये सर्वात दुर्गम भागात एक नैसर्गिक बाजार साइटवर बांधले 20 वर्षांपूर्वी. काय बाजारात अजूनही ओडेसा व्यवसाय आश्चर्य करू शकतो? घाऊक बाजार आणि लहान घाऊक ऑफर इमारत साहित्य, मोठ्या कार बाजारात, इलेक्ट्रॉनिक घटक मार्केट आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात "spadix" आपण भाज्या, फळे, मांस, मासे खरेदी करू शकता, आणि अलेक्झांडर अव्हेन्यू पुस्तक सुंदर भेट. Odessans या मोठ्या पोर्ट आणि ट्रेडिंग शहरात, तुम्हाला सर्वकाही, आणि अगदी थोडे अधिक खरेदी करू शकता की अभिमान आहे.
कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा ! मोगल आक्रमक, निजाम आणि टीपू सुलतान यांचीच काँग्रेस वंशज आहे, हे लक्षात घ्या ! कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा ! मोगल आक्रमक, निजाम आणि टीपू सुलतान यांचीच काँग्रेस वंशज आहे, हे लक्षात घ्या ! ख्रिस्ती आणि इस्लाम पंथियांकडून अशी कोणती चांगली कामे केली जात आहेत, हे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले पाहिजे ! पंडित नेहरू यांनी गोव्यात सैन्य पाठवले, ते ही सहस्रोंचे बळी गेल्यावर ! हा इतिहास सार्दिन यांना ज्ञात नसला, तरी तो लपून रहात नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असतांना आता त्याने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकार्यास मारहाण करणारे कार्यकर्ते असणारा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ? गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. सनातन हिंदु धर्मा ला विसरणे, हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण ! यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेखेरीज दुसरा पर्याय नाही, हे आतातरी लक्षात घ्या ! काँग्रेसचे सर्व आमदार जर वाळूच्या अवैध व्यवसायात असतील, तर देशातील अन्य राज्यांतील किती आमदार अशा प्रकारचा अवैध व्यावसाय करत असतील, याची कल्पना करता येत नाही ! यातून भारतातील लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप लक्षात येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
पाकिस्तान आणि तिथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांबाबत राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. मुंबई - मनसेच्या आज झालेल्या महामोर्चानंतर झालेल्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच पाकिस्तान आणि तिथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांबाबतही राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा बनला आहे. तसेच, पाकिस्तानात अत्याचार होत असलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना हिंदुस्थानात नाही घ्यायचं? तर काय करायचं? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे. अमेरिकेत 9/11 ला जो दहशतवादी हल्ला झाला होता. त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. आपल्या देशात देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, शेकडो जण मारले गेले. या स्फोटामागे कोण होतं? मुंबईत 1993 साली बॉम्बस्फोट झाले. ते घडवणाऱ्या दाऊद इब्राहीमला पाकिस्तानाने थारा दिला आहे. " "पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यांना हिंदुस्थानात नाही घ्यायचं? तर काय करायचं. इतर देशात धार्मिक अत्याचार होत असतील तर भारत नागरिकत्व देईल. १९५५ सालचा हा कायदा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला. १९५५ सालची परिस्थिती वेगळी होती. आज २०२० सालची परिस्थिती वेगळी आहे. पण काही निर्णय हे आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करून घ्यावे लागतात. हिंदूना घेताय मग मुस्लिमांनाही घ्या, असे सांगितले जात आहे. पण त्यांना का घ्यायचं? माझा देश धर्मशाळा आहे का? कोणीही कुठेही यावं, राहावं, बाहेरुन येणाऱ्या घुसखोरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माणुसकीचा ठेका प्रत्येकवेळी भारताने घेतला नाही, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, सीएए आणि एनआरसीबाबतही राज ठाकरे यांनी भाष्य केले. अनेकांना सीएए आणि एनआरसीबाबत माहितीही नाही. सीएए, एनआरसीवर कायद्याची माहिती नसणारेही टीका करताहेत. व्हॉट्सअपवर मेसेज पसरवले जातात. या कायद्यांबाबत मी माहिती घेतली. जे जन्मापासून इथे राहतायेत त्यांना थोडी बाहेर काढणार आहेत? जे कायद्यात नव्हतेच तर मग कोणासाठी ही ताकद दाखवली? घुसखोरांना हाकललेच पाहिजे त्यात तडजोड होऊच शकत नाही. " असे ते म्हणाले.
गणेशोत्सवादरम्यान आता चाकरमान्यांना मुंबई, पुणे सोबतच गुजरात मधूनही कोकणात जाण्यासाठी 3 विशेष ट्रेन्स चालवण्यात येत आहेत. आता यामध्ये महाराष्ट्रात पालघर स्थानकामध्येही या ट्रेन्सला थांबा देण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधून अहमदाबाद-कुडाळ, अहमदाबाद - सावंतवाडी आणि वडोदरा - रत्नागिरी अशा तीन विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. त्यांच्या 12 फेर्या गणेशभक्तांसाठी चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेकडून पूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील या 3 ट्रेन्स वडोदरा, सूरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावरडे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकांमध्ये थांबतील आता त्यामध्ये पालघर स्थानकाची समावेश करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटामध्ये पुरेशी खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता आंतर जिल्हा एसटी सेवा देखील सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गावी कोकणात जाणार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात पश्चिम रेल्वे कडून मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकातून तर मध्य रेल्वे कडून सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस वरून 162 विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत.
कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील १८ उपकलम ५ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यामध्ये ज्या संस्थेच्या अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू आहेत, त्यांनी अनधिकृत माध्यमिक शाळा तत्काळ बंद करणे आवश्यक आहे. या अनधिकृत माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत. तसेच पालकांनी अशा शाळेत आपल्या मुलांना दाखल करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे. घेताना संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे काय, याची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील तालुकानिहाय अनधिकृत शाळा पुढीलप्रमाणे : करवीर तालुक्यातील आठवी ते दहावीचे वर्ग असलेल्या अनधिकृत माध्यमिक शाळेत ओमसाई निवासी शाळा (पिरवाडी), विठ्ठलराव शंकरराव हंचाटे माध्यमिक विद्यालय (नंदवाळ), वाघजाई ग्रीन स्कूल (कोपार्डे), चंदगड तालुक्यातील सोनारवाडी विद्यालय (मुगळी), मौ. विंझणे माध्य. विद्यालय (विंझणे), कलिवडे/किटवडे माध्य. विद्यालय, कलिवडे आठवी व नववीचे वर्ग असलेल्या सर्वोदय माध्यमिक विद्यालय (म्हाळुंगे खालसा), माडवळे हायस्कूल (माडवळे), सहावी ते सातवीचे वर्ग असलेली छत्रपती शाहू हायस्कूल (ढेकोळी खुर्द) यांचा समावेश आहे. हातकणंगलेमधील आठवी ते दहावीचे वर्ग असलेल्या चावराई माध्यमिक विद्यालय (चावरे), रांगोळी माध्यमिक विद्यालय (रांगोळी). राधानगरी तालुक्यात महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली (सूर्याजी रंगराव नाईक यांनी चालविलेली शाळा). शिरोळ तालुक्यात आठवी ते दहावीचे वर्ग असलेल्या कुटवाड हायस्कूल (कुटवाड), उर्दू हायस्कूल (कनवाड). शाहूवाडी तालुक्यात श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय (ऐनवाडी) या शाळांचा यामध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी) संस्थांनी २०१५-१६ मध्ये अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू केल्यास अशा संस्थाचालकांविरुद्ध भारतीय दंडसंहिता ४२०, ४०६, ३४ ब अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. बालकांचा मोफत व सक्तीचा हक्क कायद्यामधील तरतुदीनुसार अनधिकृत संस्थेस, शाळेस एक लाख रुपयांचा दंड करण्यात येईल. तसेच दंड करूनही पुढे शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिनी पुन्हा दहा हजार रुपयांप्रमाणे पुन्हा दंड आकारण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > राष्ट्र-धर्म लेख > समस्येमागील मूळ कारण शोधावे ! समस्येमागील मूळ कारण शोधावे ! - केवळ स्वयंपाकघर नव्हे, हे तर एक औषधालयच ! - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे ! - ताप आलेल्या रुग्णाला जेवणाचा आग्रह करू नये ! - भ्रष्टाचार संपवण्यासाठी धर्माचे शिक्षण देणे आवश्यक ! - महाविद्यालयांमध्ये देशभक्त निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ! - गोहत्या थांबवण्यासाठी विविध उच्च न्यायालयांचे आश्वासक निवाडे !
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि कसोटीतील हे त्याचे जलद अर्धशतक ठरले. सलग तिसऱ्या डावात ५०+ धावा. सोलापूर : सोलापूर बाजार समिती, चार वर्षांनंतर कांद्याची सव्वानऊ कोटी उलाढाल निर्यातमूल्य लावल्याने कांदा दराला फटका ! सोलापूर : सोलापूर : सोलापूरला मिळणार 'मातृवंदना'चा लाभ; पहिल्या बाळंतपणासाठी ५ हजारांची मदत ! सोलापूर : सोलापूर : सोलापूर : सोलापूरच्या औद्योगिक वसाहतजवळील चिंचोलीकाटी परिसरात बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू! सोलापूर : सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार, महावितरणची व्यवस्था ! सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील अवैध वाळू रोखण्यासाठी नऊ पथके, कारवाईसाठी प्रशासन झाले जागे !
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याजवळ गहुंजे येथील स्टेडियममधील खेळपट्टीची माहिती दिल्याचा आरोप साळगावकर यांच्यावर एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला आणि साळगावकर चर्चेत आले. ऐन उमेदीच्या काळात पांडुरंग साळगावकर यांना भारतीय क्रिकेट संघात प्रवेश करण्याची संधी मिळाली नाही. पण भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या कथित खेळपट्टी 'फिक्सिंग'च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हेच ६७ वर्षीय साळगावकर राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाऊन पोहोचले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याजवळ गहुंजे येथील स्टेडियममधील खेळपट्टीची माहिती दिल्याचा आरोप साळगावकर यांच्यावर एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला आणि साळगावकर चर्चेत आले. मलमपट्टीचा उपाय म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्याची आश्वासने देण्यात आली. या सगळ्या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाल्याचे म्हटले जात असताना प्रत्यक्षात क्रिकेटमधील बहुतांश लोकांची सहानुभूती ही साळगावकर यांच्या बाजूनेच होती. कारण त्यांचा स्वभाव आणि त्यांची क्रिकेटमधील एकूण प्रतिमा. शिवाय, या प्रकरणाशी संबंधित इतरही अनेक पैलू. साळगावकर यांचे नाव या प्रकरणात आले तेव्हा अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले. ते असे काही करू शकत नाहीत, असा दावाही अनेक क्रिकेटपटू व या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला. साळगावकर यांची तशी पार्श्वभूमीही असल्याचे कधी दिसले नाही. मुळात या वन डे सामन्याच्या आदल्या दिवशी कुणालाही खेळपट्टीजवळ येऊ देण्याएवढे अधिकार साळगावकर यांना होते का, खेळपट्टीजवळ कुणी जावे आणि कुणी नाही यावर संबंधित क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय यांचा किती अंकुश असतो, जर कुणीही व्यक्ती खेळपट्टीवर सहज वावरू शकत असेल तर फक्त क्युरेटरलाच यासाठी दोषी धरायचे की त्यांच्यावरील अधिकारी व संघटनाही तेवढीच जबाबदार आहे या प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे. खरेतर खेळपट्टीच्या जवळ जाण्याचे अधिकार फार थोड्या लोकांना असतात. असे असताना जर त्या अधिकारकक्षेत न येणारी व्यक्ती तिथे जात असेल तर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. आता या व्हीडिओची तथ्यातथ्यता पडताळून साळगावकर व कथित बुकीच्या रूपातील पत्रकार यांच्यात नेमका काय संवाद झाला, त्यांना तेथे प्रवेश कसा मिळाला, साळगावकर यांनी दिलेली माहिती खरोखर बेटिंग वगैरेसाठी उपयुक्त आहे का याची चौकशी व्हावी. ज्या खेळपट्टीवर सदर पत्रकारांनी बूट घासले त्या खेळपट्टीला आयसीसीने मात्र मान्यता दिली. सामनाही विनातक्रार पार पडला आणि भारत जिंकलाही. तेव्हा हा खरोखरच भ्रष्टाचाराचा प्रकार होता की केवळ सनसनाटीचा प्रयत्न?
नोकिया कंपनी दोन जबरदस्त फोन Nokia 6300 आणि Nokia 8000 ला नव्या व्हेरियंटमध्ये लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनी या दोन्ही फोनला ४ जीबी सपोर्ट आणि आजच्या लेटेस्ट फीचर्स सोबत लाँच करण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीः HMD Global नोकियाच्या क्लासिक स्मार्टफोन्सला नवीन व्हेरियंटमध्ये नेहमी लाँच करीत असते. या यादीत आता कंपनीने आधीचे दोन जबरदस्त फोन Nokia 6300 आणि Nokia 8000 ला नव्या व्हेरियंटमध्ये लाँच करण्याची तयारी करीत आहे. ही माहिती जर्मन टेक ब्लॉग Winfuture ने दिली आहे. कंपनी या दोन्ही फोनला ४ जीबी सपोर्ट आणि आजच्या लेटेस्ट फीचर्स सोबत लाँच करण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये आले होते. नोकिया ६३०० नोकिया ६३०० पहिल्यांदा २००७ साली पहिल्यांदा लाँच करण्यात आले होते. सीरीज ४० चा हा फोन स्टील फिनिशच्या कारणामुळे त्या काळी खूप प्रीमियम वाटत होता. फोनमध्ये स्क्रीन, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला होता. स्लाइडर डिझाइनचा असू शकतो नोकिया ८००० नोकिया ८००० चा हा फोन ९० च्या दशकात नोकियाचा प्रीमियम सीरीजचा फोन होता. नोकियाची जुनी सीरीज मध्ये नोकिया ८८०० सीरीजचा सुद्धा यात समावेश होता. या फोनमध्ये सफायर कोटेड ग्लास कवरिंग डिस्प्ले, की पॅड साठी स्लाइड आउट कवर आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत होता. लवकरच होणार लाँच नोकिया ८००० सीरीजमध्ये स्लायडर डिझाइन साधारण होती. त्यामळे लाँच होणाऱ्या नोकिया ८००० ४जी फोनमध्ये हे दिसू शकते. कंपनी या दोन्ही फोनला या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच करू शकते. सुरुवातीला या फोनला यूरोपमध्ये लाँच करू शकते. या दोन फोनसोबत नोकिया ६. ३ आणि नोकिया ७. ३ सोबत लाँच करण्याची शक्यता आहे.
दूध आणि तूप हे बर्याच समस्यांचे आहे निराकरण , रात्री दोघांचेही एकत्र सेवन केल्यास , आरोग्यास मिळतात अप्रतिम फायदे । Only Marathi\nदूध आणि तूप हे बर्याच समस्यांचे आहे निराकरण , रात्री दोघांचेही एकत्र सेवन केल्यास , आरोग्यास मिळतात अप्रतिम फायदे\nआजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे आपल्या आरोग्याची खास काळजी घेतात. दररोज व्यायाम करा आणि आपल्या आहारात बर्याच गोष्टींचा समावेश करा ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. जर आपण आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश केला तर अनेक रोग त्यापासून दूर राहतात आणि शरीर निरोगी आणि चपळ राहिल.\nआज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे दुधात मिसळलेले तूप पिण्याच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. बरेच लोक असे आहेत की ते तुपाचे नाव ऐकताच तोंड वाकडे करू लागतात कारण लोकांना असे वाटते की तूप खाल्ल्याने वजन वाढते , परंतु असे अजिबात नाही. आयुर्वेदात तूप मिसळून दुधाचे सेवन करणे अमृतासारखेच आहे.\nप्राचीन काळापासून दुधात तूप मिसळण्याची प्रथा आहे. जर हे दोन्ही एकत्र खाल्ले तर त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत . जर आपल्याला दूध आणि तूप पिण्याचे फायदे माहित असतील तर आपण त्याचे सेवन सुरू कराल.\nगायीचे तूपामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळते. यासह, यात अँटी-बॅक्टेरिया आणि विरोधी बुरशीजन्य गुणधर्म देखील आहेत, सांध्यातील वेदना आणि ओटीपोटात दुखत असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. तर मग जाणून घेऊया दूध आणि तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदा होईल.\nशारीरिक दुर्बलता दूर होते\nआजच्या काळात लोक त्यांच्या आरोग्याकडे काहीच लक्ष देत नाहीत, यामुळे थोड्याशा कामानंतर शरीर अशक्त होऊ लागते. अशा परिस्थितीत दूध आणि तूप खाणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही दुधामध्ये तूप मिसळले आणि त्याचे सेवन केले तर यामुळे शारीरिक थकवा कमी होतो. एवढेच नव्हे तर शरीराची स्टैमिन्याची क्षमताही वाढते. जर तुम्ही दररोज दुधामध्ये गायीचे तूप सेवन केले तर ते तुमचे शरीर मजबूत बनवते .\nदूध आणि तूप एकाच वेळी सेवन करणे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर मानले जाते. आपण नियमितपणे दूध आणि तूप एकत्र घेतल्यास त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात. एवढेच नव्हे तर त्वचेचे डाग अदृश्य होतात आणि आपली त्वचा उजळते .\nसांधेदुखी बरे करण्यास मदत करते\nसध्या असे बरेच लोक आहेत ज्यांना नेहमीच सांधेदुखीची समस्या असते, ज्यांचा उपचारांसाठी लोक इकडे तिकडे भटकत असतात आणि बरीच प्रकारची औषधे घेत असतात, परंतु सांधेदुखी बरे होण्यासाठी दूध आणि तूप एक चांगला पर्याय मानला जातो. आपण त्या दोघांना घेतल्यास सांधेदुखीचा त्रास बरा होतो. या व्यतिरिक्त, शरीरातील हाडे आणि स्नायू देखील मजबूत होतात.\nपचन निरोगी बनवते\nएखाद्या व्यक्तीला पाचक समस्या असल्यास त्याने दुधामध्ये गायीचे तूप प्यावे. यामुळे पाचन शक्ती मजबूत होते. आम्ही आपल्याला सांगतो की दूध आणि गायीचे तूप एकत्र पिल्याने पचन संबंधित सर्व एंजाइमांचे स्राव वाढते, ज्यामुळे पचन मजबूत होते. जर एखाद्यास बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर हे त्याच्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
जैनकथा रत्नकोष नाग बो. केम निर्वाह थाय? कारण के महारा देशमां त्रीश क्रोम सोनैया वर्षे वर्षे उपजे बे. तेमां सोल क्रोड अंना खरचमां वपराय बे, अनेचार कोम सोनैया घरखरचे व्यय थाय बे. एक क्रोक सोनैया हाथी माटे खरच थाय बे. बे कोड सोनैया गाय घोका प्रमुखना खरचमां वपराय बे. याच. कना दानमां चार क्रोम सोनैया वपराय बे. त्रण कोडी सोनैया जंडारमां आ. माटे तुं एकलोज जेवारे एक दिवसमां एक कोटि सोनैया खरच करी आवीश, तेवारे थोडा दिवसमां महारो जंडार खाली थर जशे. ते सांजली मकरध्वज कुमार बोल्यो - जेने पुण्य प्रबल बे तेने दान देतां पण जंकार वृद्धि पामे. जो नाग्यहीन होय तो जंमार खाली थाय. ते सांते नली राजा बोल्यो, जो तहारे पुण्यज प्रमाण ठे, तो क्रोड सोनैया जे दानमां तुंग लाव, नहि तो तारुं मस्तक बेदीने आप. एवं राजाए क्रोधे वचन कह्युं. ते सांजली मकरध्वज कुमार अभिमान आणी सभामांथी उठीने पूर्व दिशाना दरवाजे गयो, एटले जमणो खर थयो. त्यारे दक्षिण द्वारे गयो एटले जसणो घुवड थयो. पछी पश्चिम दिशाए त्यां घोर शिवारुत सांजव्युं. त्यांची उत्तर दिशाए आव्यो, एटले काबी भैरव यश. ए सर्व अपशकुन जाणीने पाठो वयो. ते वेला दरवाजाने मुखे रह्यांज शिवाशब्द ययो. ते शिवाशब्दे वंशजालमां चार रत्न वंशयष्टिमां रह्यांबे, वुं शकुनज्ञाने जाणी वंशजाली बेदी वंशने नेदीने तेमांथी चारे रत्न जीधां; अनेए सर्व पुण्यप्राव बे, एम मनमां विचारीने घर तरफ चालवा मांड्युं. एवामां दिव्य गीतध्वनि सांजली ते शब्दने अनुसारे चाल्यो आगल एक यकनुं देहरुं दी. त्यां एक मुनिराजनी दिव्य नाटक थाय बे. तेने कुमार जुए बे, एटलामां तो देवताए नाटक संङ्खु. पत्नी कुमारे मुनिने प्रणाम करीने पूठ्युं के ए देवता कोण ठे ? मुनि बोल्या, हे कुमार ! ए देवतानो पालो नव ढुं कहुं हुं ते तुं सांजल. ए पूर्वे कोइक नगरने विषे शेठ हतो. तेणे साधुना परिचये करीने मृषावाद बोलवानुं पच्चरकाण कर्यु. पठी एकदा लोने पराजव पाम्या थका तेणे पारकी थापण उलवी. ते पापे करी अपवालो यह थयो बे. जो व्रत करत तो वैमानिक देवता थात. ते माटे हे कुमार ! प्राण जते पण ए. ते सांजली मकरध्वज कुमारे बीजुं अणुव्रत अंगीकार गौतमकुलक कथासहित. कर्यु पछी संतोषे करी तुष्टात्मा यतो कुमार घर जणी चाल्यो. त्या पी य साधुने पूयुं, हे महाराज ! ए मकरध्वज कुमार पण महारी पेठे व्रत खंकशे किंवा राखशे ? साधु बोल्या, हे यद ! ए कुमार प्राणांते पण व्रत नहि खंडे. ते सांजली तेनी परीक्षा करवा माटे ते यक्ष कापडीनो वेष ल राजद्वारे पूलो लइ पोकार करवा लाग्यो के जो राजन् ! महारा चार रत्न वंशनी जालमां मूक्यांहतां ते कोइक चोर लइ गयो. माटे जे कोइ ते चोरी कबुल करे तेनो निग्रह करो पण बीजानुं नाम लेशो नही. ते सांजली राजाए ढंढेरो फेरव्यो. ते पडह सांजली कुमारे रत्नयां लोकोए घणो समजाव्यो के जुठु बोल तो पण ते प्रागांते जुतुं न बोल्यो. त्यारे देवताए प्रगट थइने कुमारनी पूजा करी नमस्कार कर्यो, सुवर्णनी वृष्टि करीने चार रत्न पा. पुण्यप्रभाव प्रकट थयो. सर्व लोक चमत्कार पाम्या देवता ठेकाणे गयो. वैरिदमन राजा पण मकरध्वजनो पुण्या तिशय देखी ने अपराध खमावतो वो अने वोल्यो के हे कुमार ! तें जे पुण्यनी बात कही हती ते साची बे. पढी मकरध्वज कुमा रने राज्ये थापी राजा पोते दीक्षा लइ तेने रुडी रीते पालीने स्वर्गे गयो. मकरध्वज राजा अनेक जीर्णोद्धार कराव्या, नवा जिनप्रासाद पण कराव्या. महाधर्मिष्टपणे न्याये राज्य पाली सद्गुरु समीपे दीक्षा लीधी. ते राजा उग्र तपस्या करी मे देवलोके देवता थया. त्यांची मनुष्यावतार पामीने दीक्षा अंगीकार करशे. अनंत अनंतदर्शन अनंत अनंतसुखमयी थशे. ते माटे सत्य वचन बोलवुं ॥ यतः ॥ नेंडर रिम निचयो न नंदनं, नो सुधापि नच हारयष्टयः ।। निर्वृत्तिं मनसि तन्वते तथा, सत्यवादिव - चनं श्रुतं यथा ॥ १ ॥ पुनः ॥ विश्वासायतनं विपत्तिदलनं दैवेः कृताराधनं, मुक्तेः पथ्यदनं जलाग्निशमनं व्याघ्रोरगस्तंजनम् ॥ श्रेयः संवननं समृ विजननं सौजन्यसंजीवनं, कीर्तेः के लिवनं प्रभावजवनं सत्यं वचः पावनम् ॥ १ ॥ इति श्रीमकरध्वजनृपकथा ॥ इति श्रीसकलसजाना मिनी जालस्थलतिलकायमान पंडित श्री उत्तम विजयगणि शिष्यपंडितपद्म विजयगणिकृतवालावबोधे श्रीगौतम कुलकप्रकरणे पंचमगाथायां पमुदाह्रणानि समाप्तानि ॥
सप्टेंबर महिन्यात शहरात पोलिसांवरील हल्ल्याच्या सुमारे सात घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पोलिसच सुरक्षित नसल्याने सामान्यांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कर्तव्यावरील पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांना धमकी देणे, धक्काबुक्की करण्यापासून मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. एवढेच नाही, तर पोलिस ठाण्यातच राडा घालून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हात उगारण्यापर्यंत काही जणांचे धाडस वाढले आहे. काही घटनांत पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सराईत गुन्हेगारांवर 'मकोका'; तसेच तडीपारीची कारवाई मोठ्या प्रमाणात केली आहे. अशा गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना संबंधित गुन्हेगारांकडून धक्काबुक्की; तसेच मारहाण झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. या वर्षात पोलिसांवरील हल्ल्याच्या ६९ घटना घडल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे सात घटनांची नोंद झाली आहे. यापूर्वी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की अशा घटना घडत होत्या. आता थेट मारहाणीचेही प्रकार घडू लागले आहेत. पोलिसांवरच गुन्हेगार हात उचलू लागल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ५ सप्टेंबर - भोसरी एमआयडीसीत तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ व धमकी. ९ सप्टेंबर - तळवडे येथे दोघांची वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, धमकी. १८ सप्टेंबर - निगडी प्राधिकरणात पोलिसांना तलवारीने मारून टाकण्याची धमकी देऊन अंगावर धावून गेल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा. २१ सप्टेंबर - देहू रोड पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. २२ सप्टेंबर - पिंपरीतील शगुन चौकात पाच जण पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या अंगावर धावून गेले. २६ सप्टेंबर - चिंचवड पोलिस ठाण्यात एकाने पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली. २६ सप्टेंबर - थेरगावात घटनास्थळी गेलेल्या फौजदाराशी हुज्जत घालून कॉलर पकडली. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीची तक्रार ऐकून घेऊन पोलिस कार्यवाही करीत असतात. कायदा हातात घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
जगातल्या प्रत्येकव्यक्तीला आपल्या उत्पन्नानुसार सरकारला टॅक्स द्यवा लागतो. जे गरजेचंही आहे आणि योग्यही. पण तेच जर तुम्हाला कुणी तुम्ही सिंगल आहात म्हणून टॅक्स द्या किंवा शरीरावर टॅटू काढायचा असेल टॅक्स द्या, तर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे काल्पनिक नाहीये. कारण अशाप्रकारच्या विचित्र गोष्टींवर काही देशांध्ये टॅक्स द्यावा लागतो. 1) बॅचलर टॅक्स : युनायटेड स्टेटच्या Missouri मध्ये 21 वर्षांच्या व्यक्तीपासून ते 50 वर्षांच्या व्यक्तीला सिंगल राहिल्यास 1 डॉलर टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स पहिल्यांदा 1820 मध्ये लागू करण्यात आला होता. यासोबतच जर्मनी, इटली आणि साऊथ आफ्रिकासहीत अनेक देशांमध्ये बॅचलर टॅक्स वसूल केला जातो. म्हणजे इथे माणूस सुखाने सिंगलही राहू शकत नाही. 2) पेट टॅक्स : 2017 मध्ये पंजाब सरकारने पाळीव प्राण्यांवर टॅक्स वसूल करण्याची घोषणा केली. हे टॅक्स दोन प्रकारचे असतात. पहिला जर एखादी व्यक्ती त्याच्या घरी कुत्रा, मांजर, हरीण किंवा बकर्या पाळतो तर त्याला टॅक्स म्हणून वर्षाला 250 रुपये द्यावे लागतात. तेच गाय, म्हैस, हत्ती, घोडा आणि ऊंट यांसाठी 500 रुपये टॅक्स द्यावा लागतो. 3) ब्लूबेरी टॅक्स : अमेरिकेतील Maine मध्ये ब्लूबेरीचं सर्वात जास्त उत्पादन होतं. तेच जर कुणी दुसरं याचं उत्पादन केलं किंवा याचं झाड विकत घेतात किंवा खरेदी करतात त्यांना प्रति पाउंड दीड पेनी टॅक्स भरावा लागतो.
सिध्दी वैद्य\nपरीक्षेला सामोरे जाताना\nबरेचदा दहावी आणि बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना सतत हे वर्ष किती महत्त्वाचं आहे याची आठवण घरातील आणि अन्यजणही करून देत असतात. या आणि असा अनेक प्रश्नांच्या भडीमारामुळे विद्यार्थी आणि पालक यांना वर्षभर तोंड द्यावं लागतं. आणि मग कुठेतरी नकळतपणे मनावर ..\nघडता-घडविता मोबाईल गेमिंगच्या जगात सध्या PUBGची चर्चा जोरदार आहे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेक जणांच्या मोबाइलमध्ये या गेमने जागा मिळवली आहे. चौकाचौकात, कॉलेज कट्टयावर, रेल्वे स्थानकावर, बस स्थानकावर, हॉटेलमध्ये मुलं समूह करून बसतात. ..\nअध्ययन अक्षमता म्हणजे एखादी गोष्ट आत्मसात करताना येणारी अडचण. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना वाचन, लेखन, गणित, शुध्दलेखन, व्याकरण ही विविध कौशल्यं शिकताना, आत्मसात करताना काही अडचणी येतात. आपण एखादी गोष्ट शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये त्याचं ..\nस्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिमेबद्दल न्यूनगंड बाळगणं आणि त्यामुळे इतरांसमोर स्वतःला प्रेझेंट करताना संकोच वाटणं हे काही मुलांमध्ये दिसून येतं आणि अर्थातच स्वतःला चांगल्या पध्दतीने प्रेझेंट न करता आल्यामुळे आत्मविश्वास आपोआप कमी होतो. आणि मग ते मूल ..\nघडता-घडवितासध्याची पिढी टेक्नोसॅव्ही असल्याचं कौतुक आपल्याला वाटतं. मात्र किशोरवयीन मुलं ज्या प्रकारे मोबाइलच्या आहारी जात आहेत, त्यामुळे पालक चिंताग्रस्त झालेले दिसतात. मोबाइलच्या अतिवापराचा मुलांच्या मनावर आणि शरीरावरही गंभीर परिणाम होताना दिसतो. ..\nएखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल असलेली भीती किंवा चिंता मुलांच्या मनातून कायमची काढून कशी टाकायची? तर मुळात आधी ही भीती, चिंता त्यांच्या मनात कशी आणि कुठून निर्माण झाली आहे, हे शोधून काढणं गरजेचं आहे. काही वेळा काही गोष्टी बघून, ..\nलैंगिकता हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याविषयी शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून माहिती मुलांपर्यंत पोहोचणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी पालक स्वतः अतिशय योग्य माहिती देणारा घटक ठरु शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे, परदेशी ..\nआहार समस्या आणि मानसिक स्वास्थ्य\nयोग्य आहार नसल्याने हवी तेवढी झोप न मिळणं, एकाग्रता कमी होणं, चिडचिड होणं, चंचलता वाढणं, hyperactivity, स्थूलता वाढणं हे आणि असे अनेक परिणाम दिसून येतात. या अशा अनियमित आहाराच्या सवयीबाबत आणि त्यामुळे वरवर दिसणाऱ्या काही परिणामांबाबत ..\nराग व्यक्त करण्याच्या प्रवृत्तीवर योग्य त्या वेळी आळा घालणं गरजेचं असतं. खरं तर ते लहान वयातच व्हायला हवं. कुमारवयीन मुलांच्या वागणुकीवर ताबा ठेवणं हे खरं तर तितकं सोपं नाही. परंतु काही गोष्टी मुलांना आपण नक्की शिकवू शकतो, जेणेकरून मुलांना त्यांच्या ..\nकुमारवयीन मुलांमध्ये जसे शारीरिक बदल होत असतात, तसेच मानसिक बदलही होत असतात. हे मानसिक बदलच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरत असतात. शिक्षण घेताना आलेला स्पर्धात्मक ताण, नव्याने कळत असलेली बाहेरील जगाची ओळख, कुटुंबाती..
तब्बल १३८ वर्षांची परंपरा असलेल्या कसोटी क्रिकेट स्पर्धेत येत्या शुक्रवारपासून (दि. २७) गुलाबी युगाची सुरूवात होत आहे. सिडनी : तब्बल १३८ वर्षांची परंपरा असलेल्या कसोटी क्रिकेट स्पर्धेत येत्या शुक्रवारपासून (दि. २७) गुलाबी युगाची सुरूवात होत आहे. अॅडिलेडमध्ये आॅस्ट्रेलिया-न्यूझिलंड सामन्याद्वारे दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाणार असून, यात प्रथमच गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. खेळातील उत्कंठा वाढावी, कसोटी क्रिकेटला अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत या साठी नवीन बदल करण्यात येत आहेत. या विषयी बोलताना क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे प्रमुख सदरलँड म्हणाले, क्रिकेटला अधिक मनोरंजक बनविणे ही काळाची गरज आहे. मला सर्वप्रकारचे क्रिकेट आवडत असले, तरी माझी पहिली पसंती ही कसोटी हीच आहे. जर आत्ताच पाऊले उचलली नाही, तर कसोटी क्रिकेट संपुष्टात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रमुख जहीर अब्बास यांनी बदलाचे स्वागत केले. मात्र काही खेळाडूंकडून या निर्णयाची खिल्ली उडविण्यात आली आहे. तर काहींनी गुलाबी रंगाचा चेंडू लवकर खराब होत असल्याचा आक्षेप घेतला आहे. (वृत्तसंस्था) डे-नाईट कसोटीचा प्रयोग यशस्वी होईल!
भारतीय इतिहासाची साक्ष देणाऱ्या या लढाईची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. हळदीघाटी हे अरवली पर्वतरांगांच्या कुषीत वसलेले लहानसे गाव. हे ही वाचा - शिवरायांच्या युद्ध तंत्राचे उत्तम उदाहरण : समरभूमी उंबरखिंड! पण मेवारमार्गे गुजरातला जाण्यासाठी स्थिर मार्ग मिळविण्याचा अकबराचा इरादा होता. त्यामुळे १५७३ मध्ये सम्राट अकबर आपली रणनिती बदलली व महाराणा प्रतापांकडे आपले शांतीदूत पाठविले आणि तहाची मागणी केली. १८ जुनला सूर्याेदयापूर्वी मुघल सेना पोहचण्याच्या प्रयत्नात होती. तोपर्यंत महाराणा प्रताप हे सैन्य, घोडदल, हस्तीदलासह युध्दासाठी सज्ज होते. प्रतापसिंह यांचे सैन्य हळदीघाटच्या गर्भात थांबून युध्दाचे आदेश मिळण्याची वाट पाहत होते. महाराणा प्रताप यांच्या सैन्याने मुघलांच्या हत्तीचा वध केला. शत्रूच्या तोफखान्याबरोबरच मान सिंगला भिडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराणा प्रताप व त्यांच्या सैन्याने शत्रूंवर प्रभुत्व मिळवले होते. अखेर महाराणा प्रताप हे चेतकवरून मानसिंगपर्यंत पोहचले व त्यांनी आपल्या तलवार आणि भाल्याव्दारे क्रोध व्यक्त केला, मान सिंगला कायमचे आडवे पाडले. हे ही वाचा - "पानिपत"च नव्हे - या भारतभूमीत एकाहून एक "महा"युद्धे घडली आहेत.. वाचा, भारतीय ऐतिहासिक महायुद्धांबद्दल..!
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहाने देशभर साजरा होत असतांना, मात्र शेवगाव तालुक्यातील कांबी येथील तलाठी कार्यालयात व पोस्ट ऑफिस कार्यालयाला स्वतंत्र अमृत महोत्सवाचा विसर पडलाय असे दिसून आले . शासनाने प्रत्येक सरकारी कर्मचारी कार्यालये यांना हर घर तिरंगा हे अभियान यशस्वी होण्यासाठी जनजागृती करण्याच्या सुचना दिल्या होत्या . ती जनजागृती तर सोडाच पण स्वतः हा कार्यलयात उपस्थित राहून स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करायला हवा होता पण तसे न करता आपली कार्यालय च बंद ठेवली स्वतंत्र अमृतमहोत्सवाचा केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या मोहिमेत गावातील नागरीक,सहकारी सेवा सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय ,जिल्हा परिषद शाळा, कांबी हायस्कूल कांबी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मात्र तलाठी कार्यालयात व पोस्ट ऑफिस कार्यालय मात्र दिवसभर बंद आढळून आले. या केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा मोहीमेला त्यांनी जनु पाठच दाखवली असे म्हणावे लागेल. नागरीकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला तर शासकीय कार्यालये उदासीन दिसुन आले असेच म्हणावे लागेल .
मालेगाव : भुयारी गटार प्रकल्पास अमृत योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. मालेगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील भुयारी गटार प्रकल्पास अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून, मालेगावसाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भुयारी गटार प्रकल्पासंदर्भात राज्यमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी मालेगाव भुयारी गटारीचा समावेश करून केंद्र शासनास पाठविण्याचे आदेश नगरविकास विभागास दिले होते. केंद्र शासनाने अमृत योजनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासाठी तीन हजार २८० कोटींच्या प्रस्तावांना मान्यता दिली असून, त्यात मालेगावसाठी १५० कोटींचा समावेश आहे. हद्दवाढीतील गावांचा भूमिगत गटार योजनेत समावेश करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून, त्यासाठी जास्तीच्या निधीची मागणी करण्यात आल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. नदीच्या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्यामुळे नागरिकांनी भुयारी गटार योजना राबविण्याची मागणी केली होती.
श्री. गणेश नाईक : सभापती महोदय, आज जग खुल्या अर्थव्यवस्थेकडे चालले आहे. पूर्वीच्या कालखंडात आपल्याकडे साखर आयातीवर बंधन होते आणि आज आपण साखर निर्यात आणि आयात करण्याची देखील भूमिका स्वीकारलेली आहे. अशा परिस्थितीत जगातील अन्य देतील एकरी ऊसाचे उत्पन्न, त्याची साखर निर्माण करण्याची पध्दती आणि त्याला पडणारी प्रॉडक्शन कॉस्ट आणि आपल्या देतील, आपल्या राज्यात एकरी ऊसाचे उत्पन्न आणि त्याला मिळणारा भाव व साखरेच्या उत्पनासाठी त्यासाठी द्यावी लागणारी किंमत या सर्व बाबी लक्षात घेण्याची गरज आहे. सन्माननीय सदस्य श्री. कन्हैयालाल गिडवाणी यांनी सांगितले त्यानुसार शेवटी कारखानदार तरी काय करणार ? ज्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल येतो त्यातून ोतकऱ्याची 10 टक्के रक्कम कापली जाते. कारण कृषी उत्पन्न बाजार समित्या आपल्या खिशातून ही रक्कम टाकत नाही तर शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाच्या किंमतीतूनच कापून घेतात. सन्माननीय सदस्य श्री. यशवंतराव गडाख यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरा आहे की जी रक्कम कापण्यात येईल ती ोतकऱ्याच्या ऊसाच्या किंमतीतूनच कापली जाणार म्हणजेच अप्रत्यक्षपणे हा बोजा शेतकऱ्यांवरच पडणार आहे. सन्माननीय सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून एक रुपया कामगारांचा, एक रुपया कारखानदारांकडून आणि एक रुपया वासनाचा आप प्रकारे शासन निश्चितपणे विचार करील. कारण शेवटी ऊस तोडणी कामगार केवळ एकाच जिल्हयात काम करीत नाही, हंगामी कालखंडात तो एका जिल्हयातून वेगवेगळया ठिकाणी जात असतो. सन्माननीय सदस्या श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी कारखान्यावर काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेची कुठलीही हमी नाही, त्यांना शौचालयाची व्यवस्था नसते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच साखर शाळा नसेल तर तशी व्यवस्था करावी. एकूणच राज्यातील साखर कारखाने डबघाईला आलेले आहेत, बोटावर मोजण्याइतके कारखाने सोडून दुसऱ्या कारखान्यांना जिल्हा सहकारी बँकांनी दिलेले कर्ज किंवा ऊस खरेदी करण्यासाठी अथवा ऊसाचे चुकारे देण्यासाठी दिलेले कर्ज सुध्दा हे कारखाने फेडू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत मनात कितीही इच्छा असली तरी देखील या अनुषंगाने जर विचार केला तर पूर्ण अर्थकारणच बदलून जाईल आणि ऊस तोड कामगारांच्या ऐवजी शासनाला शेतकऱ्यांच्याच आंदोलनाला फेस करावे लागेल. म्हणून या श्री. गणेश नाईक क्षेत्रातील अतिशय दांडगा अनुभव असलेल्या दोन व्यक्ती म्हणजेच माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री. शरदचंद्र पवार आणि आपल्या राज्यातील नेते माननीय श्री. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यांचे, शेतकऱ्यांचे तसेच कामगारांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर बोलणी चालू आहे. शासनाला देखील या दोन्ही घटकांविषयी सहानुभूती आहे आणि कामगारांच्या दृष्टीने तसेच त्यांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी म्हणून शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. म्हणून यासंबंधी उगाचच मी आश्वासन देणार नाही आणि माजी मंत्री महोदयांनी सभागृहात यासंदर्भात काय सांगितले हे मला माहिती नाही पण मी जे बोलतो ते व्यवहाराशी सांगड घालूनच बोलत आहे. म्हणून ज्या दिवशी या शेतकऱ्याची ताकद कामगारांना रोजंदारी जास्त देण्याची असेल त्या दिवशी शासन देखील अशा प्रकारचा निर्णय ठामपणे घेईल, एवढे सांगून सन्माननीय सदस्यांनी आपले विधेयक मागे घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो व माझे भाषण पूर्ण करतो. यानंतर श्री. भारवि असुधारित प्रत / प्रसि
यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले. 'आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही काल रात्री संपूर्ण अहवाल हायकमांडला पाठवला आहे. आज हायकमांड निर्देश देईल त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेऊ. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही', असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. 'सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. त्यांनी आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले की, आम्ही भाजपचा पाठिंबा घेणार आहोत. हा काँग्रेस पक्षाशी दगाफटका असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले'. 'सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्वकाही पूर्वनियोजित होते. या भागातील पदवीधर लोक अडाणी नाहीत. भाजपकडून लोकांना भय दाखवून घरे फोडण्याचे काम सुरु आहे. आज भाजपला या सगळ्याचा आनंद वाटत आहे. भाजपच्या प्रमुखांची वक्तव्ये पाहता त्यांना या सगळ्याचा आनंद वाटतोय. पण एक दिवस भाजपचे घर फुटेल तेव्हा त्यांना दुःख कळेल', असे नाना पटोले यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम? ही निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय खेळ्या सुरू होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत सगळीच अनिश्चिता होती. सर्व राजकारण सत्यजीत तांबे यांच्याभोवती फिरत होते. त्यानुसार शेवटच्या क्षणी नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. भाजप त्यांना पाठिंबा देऊन बिनविरोध निवडून आणू शकते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपली सत्यजीत तांबे यांच्यावर नजर असल्याचे सांगितले होते. तरीही काँग्रेस पक्ष गाफील राहिला. सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजीत तांबे यांच्या निर्णयामुळे पक्षीय पातळीवर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. केंद्रातही वजन असलेल्या थोरात यांना पक्षातील आणि त्यांच्याच मतदारसंघातील आणि तेही नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांना या सगळ्याची अगोदरच कुणकुण लागली होती. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याला फोन करुन सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना पक्षातही घेऊ नका, असे सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
या पदासाठी पहिली परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये होणार आहे. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. ऑफिसर्स स्केल १ (पीओ) ची मुख्य परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ ला होण्याची शक्यता आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून होती. IBPS RRB Admit Card 2021 for pre-exam training:आयबीपीएस आरआरबी प्रवेश पत्र २०२१ ची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयबीपीएस (IBPS) लवकरच पूर्व परीक्षेच्या ट्रेनिंगसाठी प्रवेश पत्र जाहीर करणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलाय ते आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट ibps. in वर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता. पुर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी आयबीपीएस प्रवेश पत्र (IBPS RRB admit card 2021)अधिकृत वेबसाईटवर ९ जुलैलाा जाहीर केले जाणार आहे. करोना स्थिती नियंत्रणात असेल आणि पूर्व परीक्षा घेणे सुरक्षित आणि शक्य असेल तेव्हा ही परीक्षा घेतली जाईल, असे आयबीपीएसने आधी म्हटले होते. आयबीपीएसने जारी केलेल्या अधिकृत नोटिसनुसार, "ग्रामीण बँके (RRB)द्वारे होणारे पूर्व परीक्षा प्रशिक्षण हे अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक, माजी सैनिक, दिव्यांगांसाठी, ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) आणि एससी, एसटी किंवा अल्पसंख्यक समुदायासाठी ऑफिस स्केल- I पदासाठी आयोजित केले जाते. आयबीपीएस आरआरबी पूर्व परीक्षा प्रशिक्षण केव्हा ? आयबीपीएस आरआरबी प्री-एक्झाम ट्रेनिंग १९ जुलै ते २५ जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, आयबीपीएस आरआरबी प्रीलिम्स एक्झाम प्रवेश पत्र (IBPS RRB prelims admit card) जाहीर केले जाणार आहे. आयबीपीएसने परीक्षेच्या तारखांची घोषणा केली नाही. कुठे असणार ट्रेनिंग सेंटर्स? दिलेल्या माहितीनुसार वारंगल, अनंतपुर, नाहरलागुन (पापुमपारे), गुवाहाटी, अजमेर, रायबरेली, गुंटूर, रायपुर, गांधीनगर, श्रीनगर, लखनऊ, मंडी, जम्मू, रांची, वाराणसी, पटना, इंफाल, जोधपुर, शिलंग, इजोल, कोहिमा , भुवनेश्वर, सेलम, हावडा, मुरादाबाद, पुडुचेरी, लुधियाना, गोरखपुर, रोहकट, राजकोट, हैदराबाद, इसतला, मुजफ्फरपुर, देहरादून आणि नागपूर याठिकाणी ट्रेनिंग सेंटर्स असणार आहेत. असे डाऊनलोड करा आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट ibps. inने होमपेजवर प्रवेश पत्राची लिंक अॅक्टीव्ह केली जाईल. यावर क्लिक करुन नोंदणी क्रमांक, जन्म तारीख आणि अनुभव प्रमाणपत्र भरा. प्रवेश पत्र स्क्रीनवर खुले होईल. हे डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून स्वतःकडे ठेवा. प्रवेश पत्रावर दिलेले निर्देश काळजीपूर्वक वाचा. ऑफिस असिस्टंट पदासाठी मुख्य परीक्षेचे आयोजन ३ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. ऑफिस स्केल २ आणि ३ साठी परीक्षा २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. कोणत्या पदांसाठी परीक्षा? आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,३) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पदांच्या पदवीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक योग्यतेची विस्तृत माहिती आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.
'अन्न हे पूर्णब्रम्ह' असं म्हणतात हे योग्यचं आहे. नवे खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. एखादा पदार्थ चांगला आहे कि वाईट याची पारख एक उत्तम खवय्याच करू शकतो. कलर्स मराठी वाहिनी अशाच चवीच्या खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम घेऊन येत आहे. 'आज काय स्पेशल' ही नवी मालिका येत्या २५ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार दुपारी दीड वाजता दाखवली जाणार आहे.
पिसाळलेले म्हणा आणि गोळी घाला ! - आजचा सुधारक\nडिसेंबर, 2009इतरसुभाष आठले\nजनुकबदल पिकांबद्दल (genetically modified crops) हेच चालू आहे. भीती पसरवण्यात आनंद मानणारा एक तथाकथित पर्यावरणवादी/समाजवादी/पुरोगामी म्हणवून घेणारा कंपू भारतात कार्यरत आहे. त्यांनी का कोण जाणे पण जनुकबदल पिकांना गोळी घालावयाचे ठरवले आहे. त्यासाठी मग जनुकबदल पिकांचे सर्व गुण नाकारून त्यांना विषारी, धोकादायक, पर्यावरणाला धोकादायक, शेतकऱ्यांना परावलंबी बनवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेले हत्यार, वगैरे विशेषणे बहाल केली आहेत. ही विशेषणे सिद्ध करण्याची, खरेच जनुकबदल पिके धोकादायक आहेत याचा पुरावा देण्याची जबाबदारी मात्र एन.डी.पाटील आणि वंदना शिवा आणि कंपनी घेत नाही. ती जबाबदारी मात्र कृषिविद्यापीठे आणि केंद्रीय शेतीखात्याची.\nपण कृषिविद्यापीठांनी कसबा-बावडा येथे प्रायोगिक प्रक्षेत्रावर चालू केलेली जनुकबदल मक्याची चाचणी मात्र एन.डी.पाटील आणि कंपनीने झुंडशाहीने आणि राजकीय दबावाने बंद पाडली; कारण चाचणी पूर्ण होऊन त्यात जर हा मका माणसाला/जनावरांना नुकसानकारक नाही असे सिद्ध झाले तर ते या कंपूला फारच अडचणीचे ठरेल. सत्य बाहेर आले तर फायदातोटा यांचा हिशेब करून ते बियाण स्वीकारता येईल किंवा नाकारता येईल. उघड गोष्टींबद्दल भीती निर्माण करता येत नाही. अज्ञाताबद्दल मात्र बागुलबुवा उभा करता येतो. या कंपूच्या दृष्टीने झाकली मूठ सव्वा लाखाची आहे.\nजनुकबदल पिके काही विवक्षित हेतू मनात ठेवून निर्माण केली जातात. उदा. १) कीड-प्रतिबंधः उदा. बीटी कापूस, बीटी मका, बीटी वांगी, वगैरे. बीटी जनुकांमुळे तयार होणारे जैवकीटकनाशक हे फक्त बोंडअळी व त्या वर्गातील अळ्यांनाच मारक आहे. ते वनस्पतीच्या अंगातच मर्यादित रहाते, जमिनीत, हवेत पाण्यात पसरत नाही. जैव असल्याने ते बायोडिग्रेडेबल आहे. या वर्गातील अळ्या सोडता इतर कीटक, प्राणी, मासे यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे इतर कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीटी कापसाच्या पिकावर जंतुनाशकाचा वापर करावाच लागतो - पण जंतुनाशक वापराचे प्रमाण खूपच कमी होते, त्यामुळे खर्च खूप कमी येतो, पर्यावरणाचे नुकसान खूप कमी होते. हे विष अत्यंत नॅरो-स्पेक्ट्रम असल्याने त्याचा माणसावर काही परिणाम होत नाही. अमेरिकेत बीटी मका गेली अनेक वर्षे माणसे व जनावरे खात आहेत, पण त्याचा वाईट परिणाम झाल्याची वार्ता नाही. भारतात गुजरात, पंजाब, हरियाणामध्ये बीटी कापूस गेली काही वर्षे पिकवला जातो. त्याच्या सरकीचे तेल माणसे खातात, सरकीची पेंड जनावरे खातात. त्यापासून वाईट परिणाम झालेला नाही. तरीही भारतात आणखी चाचण्या घेण्यास विरोध कोण करत आहे ?\nकिडीला तोंड देणाऱ्या बियाणांप्रमाणेच व्हायरसमुळे होणाऱ्या, फंगसमुळे होणाऱ्या (उदा. तांबेरा) रोगांना दाद न देणारे जनुकबदल करणे शक्य आहे. २) तणनाशकांना दाद न देणारी पिकेः ही पिके असलेल्या शेतात तणनाशक द्रव्ये वापरून तण मारता येते. त्यामुळे भांगलणीचा खर्च वाचतो व तणाचा चांगला बंदोबस्त झाल्याने पीक जास्त येते. शेतकऱ्याचा खर्च व त्रास कमी होतो. ३) अवर्षणाला तोंड देऊ शकणारी पिकेः या जनुकबदलामुळे पिके अवर्षणाला तोंड देऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्याचे होणारे मोठे नुकसान टळते. ४) अधिक पौष्टिक पिकेः उदा. बीटा कॅरोटीनचे जास्त प्रमाण असलेला तांदूळ, ज्यामुळे माणसातील अ जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघेल, अधिक प्रोटीन असलेला बटाटा किंवा तांदूळ, ज्यामुळे प्रथिनांच्या कमतरतेवर मात करता येईल. ५) क्षारयुक्त जमिनीत वाढू शकणारी पिके.\nया विविध प्रकारच्या जनुकबदल पिकांमुळे शेतकऱ्याचे आयुष्य थोडे अधिक सुरक्षित होईल, कमी कष्टाचे होईल, शेती थोडी कमी तोट्याची, कदाचित् थोडी फायद्याची होईल. सर्वसाधारण जनतेची अन्नसुरक्षा वाढेल. पण शेतकऱ्यांना गरीब आणि दुर्बल ठेवण्यातच ज्यांचा स्वार्थ आहे, त्यांना हे कसे पटवणार ? वरीलपैकी २ ते ५ प्रकारच्या पिकांमध्ये तर कोणताही विषारी पदार्थ तयार होत नाही. तरीही त्यांची योग्य चाचणी व्हायला हवी हे मान्यच.\nशेतकऱ्याला मूर्ख समजू नये. त्याचा फायदातोटा त्याला कळतो. फायदा असल्यास तो जास्त किंमत देऊन बीटी बियाणे विकत घेईल. त्याचा आर्थिक तोटा होतो हे खोटी आकडेवारी देऊन सिद्ध करण्याचा खटाटोप करू नये. शेतकऱ्यावर जनुकबदल बियाणे घेण्याची कोणी सक्ती करत नाही. नेहमीचे बियाणे त्याच्याकडे असतेच. पण त्याच्या समोर असलेला एक आशादायक आणि आश्वासक पर्याय गर्भातच खुडून टाकू नये.\nअमेरिका आणि बहुद्देशीय कंपन्या यांना दोष देण्यात अर्थ नाही. आपल्या नाकर्तेपणामुळे सर्व महत्त्वाचे संशोधन अमेरिकेत चालते व त्याचा फायदा आपण घेत असतो. औषधे घेताना, मोबाइल फोन घेताना, इंटरनेट, संगणक वापरताना, हे संशोधन आम्हाला चालते. हे सर्व संशोधन व उत्पादन बहुराष्ट्रीय कंपन्याच करतात. हे संशोधन व त्यापासून उपयोगी औषधे/वस्तू बनवणे हे महागही असते आणि धोक्याचेही असते. एखादे औषध बाजारात आणल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून आले, तर आधीचा सर्व खर्च वाया जातो, वर प्रचंड नुकसानभरपाई द्यावी लागते, शिवाय कंपनीचा लौकिक, बँडनेम खराब होते व कंपनीचे दिवाळे निघण्याची पाळी येते. धोकादायक, विषारी बियाणे बाजारात आणायला मॉन्सँटोसारख्या कंपनीस काय वेड लागले आहे ? स्वार्थासाठी का होईना, पुरेपूर काळजी घेणे हे त्या कंपनीस जीवनावश्यकच आहे. आफ्रिकेतील किंवा जगातील कोणत्याही देशास जनुकबदल बियाणे वापरण्याची सक्ती करणे आज जगातील कोणत्याही कंपनीच्या तर सोडाच, पण अमेरिकेच्याही आवाक्यातील गोष्ट नाही. जे काही युरोपीय देश जनुकबदल पिकांना सरसहा नकार देत आहेत ते व्यापारी कारणांनी नकार देत आहेत, ती पिके धोकादायक, विषारी आहेत म्हणून नाही. याच युरोपीय देशांना आफ्रिकेतील बरेच देश मका वगैरे धान्ये निर्यात करतात, आणि निर्यात धान्यात थोडीदेखील जनुकबदल धान्याची भेसळ झाल्यास ही निर्यात बंद होईल या भीतीने, जनुकबदल धान्ये/पिके अंतर्गत वापरासाठीदेखील वापरण्यास ही राष्ट्रे नाईलाजाने नकार देत आहेत. म्हणजे त्यांच्यावर जनुकबदल पिके न वापरण्याची अप्रत्यक्ष सक्ती होत आहे! खरे तर ही पिके वापरल्यास, तेथील दुष्काळ व उपासमार कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिका, बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिकीकरण यांच्याबद्दल विनातथ्य आणि आंधळी ओरड करण्याची भारतीय पुरोगामी मंडळींमध्ये फॅशनच पडली आहे.\nअसे बियाणे वापरल्यास मॉन्सँटो कंपनीची एकाधिकार मक्तेदारी तयार होईल, व अन्नसुरक्षेसाठी ते धोकादायक होईल, हेदेखील खरे नाही. आज हे तंत्रज्ञान मूळ कंपनीकडून विकत घेऊन ३०-४० भारतीय बियाणे कंपन्या बी.टी.कापूस बियाणे भारतातच बनवून भारतीय बाजारात विकत आहेत, आणि तसा करार केल्यास निर्यातदेखील करू शकतील. गेल्या वर्षी मॉन्सँटो कंपनीला भारतीय व्यवहारात ३०-४० कोटी रुपये नफा झाला, तर या वर्षात भारतीय शेतकऱ्यांनी एक अब्ज डॉलरचा, म्हणजे पन्नास अब्ज रुपयांचा कापूस निर्यात केला. म्हणजे हा सौदा भारतीय शेतकयांना आणि भारताला भरपूर फायद्याचाच आहे. ही निर्यात बी.टी. कापूस बियाणे मिळाल्यामुळेच शक्य झाली. पण हे बियाणे भारतात चोरून, मागच्या दारानेच येऊ शकले. पुरोगाम्यांच्या विरोधामुळे आणि शासकीय शास्त्रज्ञांच्या घाबरटपणामुळे, योग्य चाचण्या वेळच्या वेळी होऊन त्याला मान्यता मिळाली नाही. ते बियाणे चोरवाटेने येऊन, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होऊन त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर त्याला नाईलाजाने सरकारी यंत्रणांना मान्यता (पोस्ट-फॅक्टो) द्यावी लागली. सरकारी शास्त्रज्ञांच्या या घाबरटपणामुळेच कसबा-बावडा कोल्हापूर येथील जनुकबदल मक्याची चाचणी कृषिविद्यापीठाला अर्धवट सोडून द्यावी लागली. एक वर्षाच्या चाचणीची निरीक्षणे काय होती हेदेखील प्रसिद्ध करायला तेथील शास्त्रज्ञ घाबरत आहेत ! योग्य चाचण्या वेळापत्रकानुसार न झाल्यास हे बियाणेदेखील चोरट्या अवैध मार्गाने भारतात येईल आणि पसरेल. तसे झाल्यास ते अधिक धोकादायक ठरू शकेल. पण तशीच पुरोगाम्यांची इच्छा असावी. कोणत्याही मान्यवर शास्त्रज्ञांनी, प्रत्यक्ष प्रयोग न करता, बनवलेली मते म्हणजे केवळ संशय किंवा पूर्वग्रह होय, व त्यांची किंमत शून्य आहे.\nपुढारी मंडळीचे पुढारीपण बऱ्याच वेळा भीती पसरवण्यावर अवलंबून असते. फार पूर्वी जलविद्युत् केंद्रातील पाण्यातील वीज काढून घेतली असल्याने ते पाणी शेतीसाठी वापरू नये असा प्रचार झाला. नंतर पवनचक्क्यांमुळे पाऊस कमी पडतो असा प्रचार झाला. कोणताही बदल किंवा नवी गोष्ट नाकारण्याची मूळ भारतीय प्रवृत्तीच आहे. त्यात भीती पसरवून जगणारे लोक भर घालतात!\nवाजवी संशय आणि मुद्दाम पसरवलेली, अनाठायी व प्रमाणाबाहेर तीव्र भीती यांच्यात फरक करायला शिकले पाहिजे. गोळी घालण्यापूर्वी कुत्रे पिसाळले आहे याची खात्री करायला हवी, नाही तर उपयुक्त आणि स्वामिभक्त असे कुत्रेही मारले जाईल!\n[ हा एक दृष्टिकोण आहे. डार्विन विशेषांकातील तारक काट्यांचा लेख दुसरीही बाजू मांडतो. काटे यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगत आहोत. उरश्रश्र र वेस रव, हा प्रकार दोन्ही बाजूंनी होत असतो ! - सं.]\n२५, नागाळा पार्क, कोल्हापूर-४१६ ००३.
चेन्नई : इंग्लंडविरुद्ध चेन्नईत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने मोठी कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं कसोटी सामन्यात ३०० बळी घेण्याचा कारनामा केला आहे. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरोधात चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना इशांत शर्मानं लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पिहल्या डावात इशांत शर्मानं दोन बळी घेतले. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत ३०० बळींचा पल्ला पार केला आहे. इशांत शर्मानं ९८ व्या कसोटी सामन्यात ३०० बळी घेतेले आहेत. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा इशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव (४३४) जहीर खान (३११) अनिल कुंबले (६१९) हरभजन सिंह (४१७) रविचंद्रन अश्विन (३६५)
Tonsil Stone : तुम्हाला अनेकदा टॉन्सिल स्टोन (Tonsil Stone) म्हणजेच घशात एक प्रकारची सूज येते का? हे अन्नाच्या कमतरतेमुळे किंवा विषाणूमुळे होऊ शकते. जर तुम्हाला ते पुन्हा होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही या मौखिक आरोग्याच्या टिप्स अवलंबल्या पाहिजेत. तोंडी स्वच्छताः WHO च्या अहवालानुसार, संपूर्ण जगात सुमारे 45 टक्के म्हणजेच 350 दशलक्ष लोक तोंडाच्या समस्यांनी (Mouth Problems) ग्रस्त आहेत. तोंड स्वच्छ न ठेवल्याने असे होऊ शकते. दिवसातून दोनदा ब्रश करावे. खारट पाणीः खराब बॅक्टेरिया दूर करू शकतील अशा गोष्टींनी तोंड स्वच्छ करावे. तुम्ही माउथ फ्रेशनर वापरू शकता. याशिवाय मिठाच्या पाण्याने कुस्करणेही फायदेशीर ठरू शकते. कमी साखर उत्पादनेः दंत तज्ञ देखील शिफारस करतात की आपण कमी आणि कमी साखर खावी. जास्त साखर दातांमध्ये पोकळी निर्माण करून त्यांचे आरोग्य बिघडू शकते. कमी गोड खाण्याची सवय बॅक्टेरिया तयार होण्यापासून रोखते. वाईट सवयी : सिगारेट आणि दारूसारख्या वाईट सवयींचा परिणाम तोंडाचे आरोग्य बिघडवतो. सिगारेट किंवा तंबाखूमुळे कर्करोग होतो आणि ही सवय प्राणघातक ठरते. 'दैनिक महाराष्ट्र 'चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
कोल्हापूर : रंकाळावेश बसस्थानकाकडून धोत्री गल्लीत भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यामध्ये विजया मुधोळकर जखमी झाल्या. याप्रकरणी विजय जिरगे या संशयित मोटार चालकाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास एक भरधाव चारचाकी रंकाळा बसस्थानकाकडून धोत्री गल्लीतून जात होती. या चारचाकीने रस्त्याकडेला थांबलेल्या दुचाकींना धडक दिली, तर औषधे आणण्यासाठी निघालेल्या विजया मुधोळकर यांनाही चारचाकीची धडक बसल्याने त्या कोसळल्या. यादरम्यान पेट्रोलिंगसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता शेळके यांनी पोलीस गाडी आडवी उभी केली. तरीही तो चारचाकी चालक थांबला नाही. भरधाव वेगाने रेगे तिकटीकडे गेलेल्या या चारचाकीचा पाठलाग पोलीस अंमलदार इंद्रजित खडके, गृहरक्षक दलाचा जवान संदीप पाटील यांनी करीत चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ओळी : भरधाव वेगाने धोत्री गल्लीतून शनिवारी सायंकाळी जाणाऱ्या याच चारचाकीने पाच वाहनांना धडक दिली.
लाच मागितल्याच्या कारणावरून फौजदारी गुन्हा दाखल झालेले जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना रुजू करून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. नाशिक : लाच मागितल्याच्या कारणावरून फौजदारी गुन्हा दाखल झालेले जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना रुजू करून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. डेकाटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, गेल्या महिनाभरापासून ते अनधिकृतपणे रजेवर असल्यामुळे त्यांना रुजू करून घ्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. डॉ. डेकाटे यांनी आपल्याच अखत्यारितील तालुका वैद्यकीय अधिकाºयाची रजा मंजूर करून घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. या संदर्भात डेकाटे यांचे पैसे मागण्याबाबतचे संभाषण तक्रारदार वैद्यकीय अधिकाºयाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सुपुर्द करून तक्रार दिली होती व त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला, परंतु डेकाटे हाती लागले नाहीत, मात्र त्यांनी पैशाची मागणी केल्याचा संभाषणाचा पुरावा गृहीत धरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने डेकाटे यांच्याविरुद्ध जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भातील कुणकुण लागल्यावर तत्पूर्वीच डेकाटे हे जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच किरकोळ रजेवर निघून गेले होते. साधारणतः महिनाभरानंतर दोन दिवसांपूर्वी डॉ. डेकाटे यांनी जिल्हा परिषदेत येऊन कामकाज सुरू केले व त्यांनी रजेच्या कालावधीतील रजा मंजूर करण्याबाबत प्रशासनाकडे अर्ज सादर केला होता. मात्र डेकाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असून, ते विनापरवाना महिनाभर रजेवर असल्याची बाब गंभीर असल्याचे मानून जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना रुजू करून घेण्यास शुक्रवारी नकार दिला. तत्पूर्वी डेकाटे यांनी त्यांच्याच खात्यातील व्यक्तीकडे पैशाची मागणी केल्याने ते पुन्हा मूळ पदावर रुजू झाल्यास यासंदर्भातील गुन्ह्याचे पुरावे नष्ट करू शकतील. त्यामुळे गुन्ह्याची चौकशी होईपर्यंत डेकाटे यांना रुजू करून घेऊ नये, असे पत्र लाचलुचपत विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व खातेप्रमुखांच्या बोलविलेल्या समन्वय आढावा समितीच्या बैठकीसाठी डेकाटे आले असता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांना बैठकीतून बाहेर काढून दिले. डेकाटे यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा तसेच विनापरवाना गैरहजर राहिल्याने त्यांना रुजू करून घ्यावे किंवा नाही याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, डेकाटे यांचा पदभार अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे.