text
large_string
एलोवेरा त्वचेसाठी फारच चांगले आहे आणि एक्जिमामुळे येणार्या कोरडेपणाला नियंत्रित करण्याचे काम करतो. विटामिन ई च्या तेलासोबत एलोवेरा लावल्याने खाज कमी होण्यास मदत मिळते. हे त्वचेला पोषण आणि एकाच वेळेस सूज कमी करण्यास मदत करतो. यासाठी तुम्ही एलोवेराच्या पानांपासून जेल काढून घ्या आणि विटामिन ईच्या कॅप्सूलमधील तेल काढून योग्य प्रकारे मिसळून घ्या. आणि प्रभावित जागेवर त्याला लावा. संक्रमणाच्या विरुद्ध सुरक्षा प्रदान करतो. यासाठी तुम्हाला 10 ते 12 थेंब कडुलिंबाच्या तेलात 4 थेंब जैतूनचे तेल घेऊन प्रभावीत जागेवर लावायला पाहिजे. यासाठी तुम्हाला 2 चमचे मध आणि 2 चमचे कलमीचे पावडर घेऊन योग्य प्रकारे याची पेस्ट तयार करावे आणि प्रभावित जागेवर ही पेस्ट लावावी. वाळल्यानंतर याला पाण्याने धुऊन घ्यावे. मध एक व्यापक स्पेक्ट्रम एंटीमायक्रोबायल एजेंट आहे. हे त्वचेला शांत करतो, सूज कमी करतो. कलमी (दालचिनी) देखील एक एंटीमायक्रोबायल एजेंट आहे. हे एंटीऑक्सीडेंटमध्ये समृद्ध आहे आणि यात एंटी इंफ्लेमेटरी गुण देखील आहे. प्रभावित जागेला स्वच्छ धुऊन घ्यावे आणि त्या जागेवर ही पेस्ट लावावी. वाळल्यानंतर पाण्याने धुऊन घ्यावे.
मुंबई : पश्चिम उपनगरातील रिक्षांची चोरी करून त्या भाड्याने लावण्याचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा सांताक्रूझ पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून पाच चोरीच्या रिक्षा हस्तगत केल्या. वांद्रे पूर्व ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान चालणाऱ्या शेअरिंग रिक्षा चोरीच्या असल्याची माहिती सांताक्रूझ पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, हवालदार संतोष पाटील, आशिष भांड, शेंदरकर, शिरसाठ, परब, दळवी यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीच्या रिक्षाचा शोध घेतला. यावरून खेरवाडी येथील महाराष्ट्र नगर येथुन मन्सूर अहमद मकसूद अहमद कसार (२५) याला अटक करण्यात आली. मन्सूरनेे पाच रिक्षा चोरून त्या भाड्याने दिल्या होत्या. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
मुंबई । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. 25 मार्चपासून सुरु झालेला 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र असं असतानाच केरळातील कोझीकोडे येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एक प्रेमी युगुल लॉकडाउनच्या काळातच लग्न करण्यासाठी घरातून पळून गेलं. मात्र त्यानंतर त्यांच्यावर पळून जाण्याऐवजी लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 21 वर्षीय मुलगी आणि 23 वर्षाचा मुलगा लॉकडाउनच्या कालावधीत घरातून पळून गेले. मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलीच्या घरुन लग्नाला विरोध होता. मुलगी घरातून पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु करण्याआधीच हे दोघे पोलीस स्थानकात हजर झाले. पोलिसांनी या दोघांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. यावेळी मुलीने मी 21 वर्षांची असून माझ्या इच्छेनेच मुलाबरोबर पळून गेल्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायलयाने या दोघांना पळून जाण्याच्या गुन्ह्यामधून मुक्त केलं.
ष्णतेचाच घेतला पाहिजे. याकरितां ६२ अंश उ ब्णतेचें अर्कनिष्कासनाच्या योगानें काढलेले शुद्ध उदक प्रमाणरूपाने धरून त्याबराबर इतर पदार्थाचे विशिष्टगुरुत्व ताडून पाहतात. तो प्रकार असाज्या पदार्थाचे विशिष्टगुरुत्व काढायाचे असतें तो १० दार्थव शुद्ध उदक ही आकारपरिमाणानें सारखीं घेऊन त्यांचे वजन करितात, आणि उदकाचें विशिष्टगुरुत्व १, कल्पून त्याच्या जितकेपट त्या पदार्थाचें वजन भरते तितकें त्या पदार्थाचें विशिष्टगुरुत्व धरतात; तो पदार्थ, जर उदकाच्या दुप्पट भरला तर त्याचे विशिष्टगुरुत्व २, तिप्पट भरल्यास ३, चौपट भरल्यास ४ आहे असें झणतात. अशा रीतीने पाहू लागले असता २२ पर्यंत विशिष्टगुरुत्वाचे पदार्थ आढळतात. लाटिनम् या नावा. ची धातु सर्व पदार्थामध्ये फार जड आहे; तिचें विशिष्टगुरुत्व २२ पेक्षा थोडे अधिक भरतें ह्रीं वरची कसर, विशिष्टगुरुत्व सूक्ष्मतेने समजण्याकरितां, द शांशरूपानें मांडितात्त. वायुरूप पदार्थोचें विशिष्टगुरुत्व ताडून पाहण्याकरितां कधी कधी हवा प्रमाणरूपानें घरतात; परंतु अप्रवाही आणि प्रवाही यांचे
राज ठाकरे पुण्यात पत्रकार परिषदेत सीएएबद्दल बोलत असताना म्हणाले की "बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकमधून येणाऱ्यांना हाकला, सध्या देशात तरुण-तरुणी बेरोजगार आहेत मग त्यात बाहेरून लोकांना आणण्याची गरजच काय? " असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. Cabinet Expansion Special Report : मंत्रिमंडळ विस्तारात माशी कुठे शिंकतेय? , नवे मंत्री का ठरेनात? Congress Delhi : महाराष्ट्र काँग्रेसचे 25 नेते दिल्लीत जाणार, महाराष्ट्रातील संघटन बदलावर चर्चा?
पर्जन्य वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यासाठी ३० दिवस लागतील. त्यानंतरच हिंदमाता, परळला पावसात दिलासा मिळेल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधवारी हिंदमाता परिसरात पाणी तुंबले. हा परिसर पूरमुक्त करण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाकी तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. पर्जन्य वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यासाठी ३० दिवस लागतील. त्यानंतरच हिंदमाता, परळला पावसात दिलासा मिळेल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. हिंदमाता, परळमध्ये साचणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी टोकिया शहराच्या धर्तीवर भूमिगत टाक्या तयार करण्यात येतील. पहिला प्रयोग हिंदमाता येथे करण्यात येईल. त्यानुसार परळ येथील सेंट झेविअर्स मैदान आणि दादर पूर्व येथील स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानात टाक्या बांधत आहाेत. पहिल्या टप्प्याचे काम पुढील तीन दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, पावसाचा फटका बसला. हिंदमाता परिसरातील पाणी प्रमोद महाजन मैदानापर्यंत वाहून नेण्यासाठी भूमिगत पर्जन्य वाहिन्या बांधण्यात येत आहेत. रेल्वे मार्गाखालून ही वाहिनी जाईल. ती टाटा मिलमधून बांधण्याच्या कामाला मेच्या अखेरीस परवानगी मिळाली आहे. पुढील ३० दिवसांत ही वाहिनी बांधण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर या भागाला दिलासा मिळेल, असा विश्वास हिंदमाता परिसराच्या पाहणीदरम्यान त्यांनी व्यक्त केला. वाहतूक थांबली नाही : हिंदमाता, परळ उड्डाणपुलादरम्यानच्या रस्त्याची उंची चार फुटाने वाढविण्यात आली आहे. दोन्ही पुलांमध्ये कनेक्टर तयार करण्यात आला आहे. 'रस्त्याची उंची वाढविल्यामुळे यंदा वाहतूक थांबली नाही', असा दावा पालिका आयुक्तांनी यावेळी केला.
Home / व्यक्तिमत्व विकास (Personality Development) / Most inspirational Video ever! Most inspirational Video ever! आज रविवारी मी हा लेख लिहितोय. उद्या सोमवार आहे आणि एका दीवसाच्या सुट्टीनंतर उद्या ऑफीसला जाण्याचा खुपच कंटाळा आला आहे. उद्या पुन्हा रडत्-खडत उठायचं आणि पाय ओढत ऑफीसला जायचं . नेहमीचंच झालय हे. खरचं आपण कितीतरी कामे अशी पाय ओढत आणि रडत्-खडतच करत असतो. पण याउलट जर आपण रोज नव्या जोशाने आणि प्ररणेने आपली कामे करु लागलो तर? आपल्या आवडीचे काम मिळाले नसेल कदाचित पण मिळालेले काम आवडीने करत गेलो तर यश मिळणार हे नक्की! परंतु मनाजोगतं काहीच घडत नसताना आणि सगळीकडुन संकटांचा मारा होत असताना नवा जोश आणि प्रेरणा आणायची कोठुन? माझ्या मते, यशस्वी आणि महान समजल्या गेलेल्या जाणार्या सर्व व्यक्तींमध्ये एक गुण समान होता तो म्हणजे त्यांची स्वयंप्रेरणेने (Self motivation) काम करण्याची इच्छाशक्ती. अर्थात हा गुण प्रत्येकात असतोच असे नाही.मग आपल्यासारख्या पामरांनी काय करावे बरे? मित्रहो, मी आज तुम्हाला याबाबतचा माझा एक उपाय सांगणार आहे. दोन वर्षांपुर्वी मी एका सेल्स ट्रेनींगमध्ये एक स्फुर्तीदायी व्हीडीओ (Motivational Video) पाहीला होता. मी आतापर्यंत पाहीलेल्या सर्वोत्तम व्हीडीओ क्लिप्स पैकी एक असा हा व्हीडीओ खरचं खुप प्रेरणात्मक आणि स्फुर्तीदायी आहे. जेव्हा जेव्हा मी निराशेने ग्रासलेला असतो तेव्हा हा व्हीडीओ आवर्जुन पाहतो. माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेला हा व्हीडीओ तुम्हासही नक्कीच भावेल ही अपेक्षा. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी कॅन्सरचे निदान झालेला आणि तरीसुद्धा जिद्दीने त्यावर मात करत, टुर्-दे-फ्रान्स (Tour-de-france) या जगातील सर्वात कठीण सायकल शर्यतीत सलग सात वेळा जागतीक विजेतेपद पटकावणारा सायकलपटु लान्स आर्मस्ट्राँग (Lance Armstrong) , ऑलींपीक मधील""परफेक्ट टेन" (पुर्ण १० गुण) चा मान जगात सर्वप्रथम मिळवणारी रोमानीयाची नादीया कॉमानेकी (Nadia Comaneci), लहानपणी धावण्यात सर्वात कमजोर असलेला पण अथक परीश्रमाने ऑलींपीकमध्ये तब्बल १० पदकांची कमाई करणारा धावपटु कार्ल लुईस (Carl Lewis), भारतासाठी विश्वचषक जिंकणारा आणि ३५ जागतीक विक्रम नावावर असणारा क्रीकेटपटु कपील देव, जगातील सर्वात धोकादायक समजल्या जाणार्या फॉर्म्युला वन या शर्यतीत सलग सात वेला विजेतेपद पटकावणारा मायकेल शुमाकर (Michael Schumacher) आणि १२८५ गोल्स करणारा, फुटबॉलचा अनभीषीक्त सम्राट पेले (Pele) यांच्यावर चित्रीत करणात आलेला हा व्हीडीओ मी नेहमी आवर्जुन पाहतो. नेटभेटच्या वाचकांसाठी हा खास व्हीडीओ मी येथे देत आहे. सुमारे पाच मिनिंटांच्या या व्हीडीओचे पार्श्वसंगीतही तीतकेच परीणामकारक आहे.म्हणुनच हा व्हीडीओ पाहताना स्पीकर्स चालु ठेवण्यास विसरु नका. प्रत्येकाच्या संग्रही असावाच असा हा व्हीडीओ डाउनलोड करायचा असेल तर खाली कमेंटस मध्ये तुमचा इमेल पत्ता (Email Address) द्या. डाउनलोड लिंक मी तुम्हाला इमेलद्वारे पाठवेन. असाच स्फुर्तीदायी आणखी एक व्हीडीओबद्दल मी सांगणार आहे. पण पुढच्या रवीवारी, पुन्हा ऑफीसला जायचा कंटाळा येइल तेव्हा :-)
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. दादा कोंडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. 1969 मध्ये रिलीज झालेल्या तांबडी माती या चित्रपटामधून दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. 1971 मध्ये दादा कोंडके यांचा सोंडाड्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. 1989 मध्ये प्रदर्शित झालेला माला घेउन चला या दादा कोंडके यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत मधु कांबीकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. पळवा पळवी या दादा कोंडके यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या पळवा पळवी या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री उषा चव्हाण यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं. तेरे मेरे बीच में यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून दादा कोंडके हे प्रेक्षकांच्या भेटीस आले.
सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची पुढची राजकीय दिशा भाजपने ठरवलेली आहे. उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपने केली आहे, असं कळतंय. येत्या एप्रिल महिन्यांत महाराष्ट्रातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपतीये. त्यात भाजपच्या कोट्यातून उदयनराजेंची वर्णी लागू शकते, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजतीये. उदयनराजेंना राज्यसभा खासदार करून केंद्रिय मंत्रिपद देण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यांना मंत्रिपद देण्याने शरद पवार यांना तगडा शह मिळू शकतो, असा अंदाज भाजपच्या वतीने काही नेते बांधत आहेत. भाजपचे खासदार अमर साबळे यांचा एप्रिल महिन्यात राज्यसभेचा कार्यकाळ संपतो आहे. त्यांच्याच जागी उदयनराजेंची वर्णी लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व धुळेवरून आलेल्या 150 राज्य राखीव पोलीस दलातील जवानांपैकी 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. ही दीडशे जवानांची तुकडी मागील आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती. यातील 29 पॉझिटिव्ह तर इतर सर्व जवानांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाचे 72, राज्य राखीव दलाचे 29, सीमा सुरक्षा दलाचे 2 असे मिळून 103 जवान कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आयुष्याचे ४५-५० वर्षे सार्वजनिक जीवनात अहोरात्र खर्च करणाऱ्या एका ज्येष्ठ वयाच्या नेत्यावर एक मनोविकृत माणूस हल्ला करतो आणि त्याच्या ह्या कृतीने आपलेच काही देशबांधव / मराठी बांधव एका आसुरी आनंदाने हुरळून जातांना बघून खरच आच्छर्य वाटले, देश, भ्रष्टाचार या सारख्या मुद्द्यावर बोलणारे साध्या सरळ भारतीय संस्कारांना कसे विसरले. शरद पवार आणि त्यांचा भ्रष्टाचार हे मुद्दे वेगळे आणि त्या रोगी माणसाने "पाठीमागून" एका ज्येष्ठ वयाच्या व्यक्तीवर केलेला वार हि घटना निराळी, दोन्हींची सांगड घालून आपण आपल्यातल्या विकृतीला खतपाणीच घालत आहोत असे मला वाटते. दोन्ही गोष्टींचा तितक्याच प्रखरतेने विरोध करावा पण निदान आपल्या सांस्कृतिक दिवाळखोरीचे प्रदर्शन थांबवावे असे मला वाटते. रस्त्यावर एखाद्या मोठ्या वयाच्या माणसाला / स्त्रीला कोणी मारहाण केली तर पेटून उठणारे आज नक्कीच एवढे हि मनाने पांगळे बनले नाहीयेत. विकृत मानसिकतेने ग्रासलेल्या देशात काही हि घडू शकते, एरवी मातीमध्ये राब राब राबणाऱ्या त्या शेतकऱ्याची कोणाला आठवण येत नाही , तो कसे जीवन जगतो, त्याचे कुटुंब कुठल्या परिस्थतीत आहे ह्याची दुरूनही जाणीव नसणारेही आज शेतकर्यांबद्दल कळवळून बोलत आहेत, प्रत्येक आठवड्याचे दोन दिवस सिनेमे आणि मॉल मध्ये घालवणारे आणि उरलेले पाच दिवस बैलासारखे काम करणारे अगदी थोडीशी सवड मिळाली कि सबंध देशाच्या समस्यांवर फारच पोट तिडकीने बोलतांना दिसतात आणि एका ब्रेक मध्ये चुटकीसरशी सारे प्रश्न सुटले पाहिजेत ह्याची अपेक्षा करून आणि देश पुन्हा त्याच पुढाऱ्यांच्या हातात देऊन पुन्हा आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मग्न होतात. संविधान कर्त्याने मतदानासारखे शक्तिशाली हत्यार हाती दिलेले असतांना आता देश हरविंदर सिंग सारख्या मनोविकृत माणसावर जास्त विश्वास करते याचे फार वाईट वाटते आणि देशाच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण होते. मला माहित आहे शहाण्यांना शहाणपण शिकवावे लागत नाही पण वेळ निघून जाण्यापूर्वीच आपल्या विचारांना आवर घाला कारण आपले विचारच आपल्या देशाचे भवितव्य घडवणार आहेत, आणि ते नक्कीच उज्वल आणि सुसंकृत असावे यामध्ये नक्कीच कोणाचे दुमत नसावे. तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे, आपण मागच्या ५० वर्ष पासून मतदान करतच आहोत ना?मग हे भ्रष्ट कॉंग्रेस सत्ते वरून उतरली का? नाही. भ्रष्टाचार कमी झाला का नाही. अहो युंही पैसा खा. पण लोकांचे काम तर करा. आणि पैसा तरी कटी खावा माणसांनी ह्यला काही सीमा आहे कि नाही. शरद पवार किती भ्रष्ट आहे हे मी काही तुम्हाला सांगायला नको. पूर्ण भारताला ते माहित आहे. मग त्यांना पकडले का नाही अजून ? तर पुरावे कुठे आहेत? पैसा हेच खाणार आणि कारवाई पण हेच करणार. चोरालाच जर इन्स्पेक्टर बनवले तर चोर पकडले कसे जाणार ? जे झाले ते फारच छान झाले. ह्यला तुम्ही विकृत म्हणा कि काही. पण भ्रष्टाचार करून भारताचे नाक कापणारे तुम्हाला चालतात. त्यांना पाठींबा ठेणारे विकृत नाही का ? मी तर म्हणतो कि खूनच करायला हवा होता. महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली असती. शेतकरी सुखी झाले असते. तुम्ही अगदी माझ्या विचाराचे आहात.. मीही या गोष्टीचा निषेध करतो.. महागाई नाही स्वतः कडे तितके पैसे नसतात.. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळालाच पाहिजे. हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आणि दाउदचा हस्तक असलेल्या माणसाला कुठल्याही वयात आणि सावध/बेसावध कुठल्याही अवस्थेत मारणं यात काहीही वावगं नाही !!! तुम्ही केलेले आरोपांमध्ये तथ्य असेल तर मग फाशीच द्यायला हवी त्यांना, त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी तरी निदान आपण या देशात येऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर लढाई द्यावी हि अपेक्षा... का न्यायालयांवर पण विश्वास राहिला नाही आत्ता ?
पावसात भिजलेले हे भात खाण्यासाठी उपयुक्त नसल्याचे त्यांनी सांगितले हे पीक कापले नाहीतर भात झडून पुढच्या पिकाला मार देणार, त्यापेक्षा ते कापायचे आणि वाळवून जनावरांना सुग्रास म्हणून वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंदगड - अवघ्या शिवारभर पावसाच्या माऱ्याने कोलमडून पडलेले भात, गुडघाभर चिखल तर काही ठिकाणी भात पिकावरुन वाहणारे पाणी. चिखलात झडून पडलेल्या भाताला कोंब फुटलेले. आता हे भात माणसाने खायच्या दर्जाचे राहिले नाही. याचा उपयोग जनावरांना सुग्रास म्हणूनच. अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या चेहर्यावरील भाव काळीज चिरणारे. हंबेरे ( ता. चंदगड) परिसरातील शेतकऱ्यांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया. संपूर्ण तालुक्यात असेच चित्र पाहायला मिळते. नाना पाटील यांचे गावाला लागूनच शिवारात दीड एकरामध्ये सोनम जातीचे भात आहे. पुरातून वाचलेले भात चांगले तरारले होते. परंतु अवकाळी च्या दणक्याने ते पूर्णतः कोलमडले आहे. त्यांच्या मालकीचा पट्टा जमिनीलगत आडवा झाला आहे. दररोजच्या पावसाने झडलेले भात चिखलात उगवले आहे. पावसात भिजलेले हे भात खाण्यासाठी उपयुक्त नसल्याचे त्यांनी सांगितले हे पीक कापले नाहीतर भात झडून पुढच्या पिकाला मार देणार, त्यापेक्षा ते कापायचे आणि वाळवून जनावरांना सुग्रास म्हणून वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 15 हजार रुपयांचा खर्च वाया गेलाच परंतु यावर्षी खायचे काय असा प्रश्नही त्यांनी केला. बळीराम पाटील यांनीही दीड एकरामध्ये सेंद्रिय पद्धतीने 'चिंटू' जातीचे पीक घेतले होते. 60 पोती उत्पादन होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु अवकाळीने त्यावर पाणी फिरवले आहे. कृष्णा पाटील, तुकाराम गडकरी यांचीही अशीच अवस्था आहे. पाऊस दररोज कोसळत आहे. सद्यस्थितीत थांबला तरी शेतातील पाणी आटण्यास किमान पंधरा दिवसाचा कालावधी लागेल. एवढ्या वेळात हा हंगामध्ये हातचा निघून जाणार असल्याची भीती सुभाष पाटील यांनी व्यक्त केली. कृषी विभागाचे अधिकारी बांधावर उभा राहून पंचनामे करतात. त्यांनी शेतात उतरून पिकाला हात लावून पाहणी केली तर अवस्था कळेल असा रागही आळवला. दरम्यान शिवारात भात व ऊस पिकाचे प्रमाण मोठे असून संपूर्ण शिवार पाण्याने तुडुंब भरला आहे. शेतात पाण्याच्या उगळी फुटल्या आहेत. सतत पाण्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. "महापुरामुळे नदीकाठची भातशेती वाया गेली. आता अवकाळीने उरलेल्या पिकांची नासाडी केली आहे. जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या विभागातील शेतकरी पिक विमा घेत नाहीत त्यामुळे शासनाने भरघोस मदतीचा हातभार लावण्याची गरज आहे." - बाळकृष्ण पाटील, शेतकरी, हंबेरे. बघावे ते नवलच ! कडीसाठी हातकडीचा उपयोग!
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समोरासमोर आले. भाजपने राज्य सरकारवर जिल्ह्याच्या निधीत कपात केल्याचा आरोप करीत निदर्शने केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकार राज्याचा निधी देत नसल्याचा आरोप करीत निदर्शने केली. भाजपच्या आमदारांनी बैठकीवर बहिष्कार घालत निदर्शने केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या निधीत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळात ७०० कोटी रुपये मिळणाऱ्या नागपूर जिल्ह्याला आता २५० कोटी दिले जात आहे. भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनही सादर केले. यासंदर्भात पवरा यांनी आमदारांच्या मागणीवर मुंबईत विशेष बैठक आयोजित केली जाईल. कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे सांगितले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. गिरीश व्यास, आ. समीर मेघे, आ. परिणय फुके, आ. विकास कुंभारे आणि चंदन गोस्वामी उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. केंद्र सरकारने जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले नाही, याचा निषेध केला. यावेळी नगरसेवक दुनेश्वर पेठे, महेंद्र भांगे, विजय गजभिये, हाजी आसीफ भाई, गोपी आंभोरे, बादल शेंद्रे, अमित मुडेवार आदी उपस्थित होते.
बीड : 28 टक्के महागाई भत्ता आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनिकरण करण्यात यावे. यासाठी बीडमध्ये कालपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आज सकाळपासूनच शंभर टक्के कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत एकप्रकारे बस बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच आगारातून बस बंदची हाक दिल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ज्या गाड्या परजिल्ह्यातून आलेल्या आहेत. त्याचे गाड्या या ठिकाणाहून रवाना होताना पाहायला मिळत आहेत. मात्र, स्थानिक आगारातील एकाही बसची फेरी अद्याप झालेली नाही. दरम्यान जोपर्यंत कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळत नाही. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत उपोषण आणि आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर जिओग्राफीकल इंडिकेशन टॅगची (जीआय मानांकनची) मोहर उठून, हापूस आंब्याचे मूळ कोकणच असल्याचे आणि कोकणात पिकणारा हापूस आंबा हाच खरा हापूस आंबा असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याने कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि समस्त हापूस आंबाप्रेमी, खवय्ये, खरेदीदार या सर्वानाच दिलासा मिळाला आहे. यामुळे गेली काही वर्षे हापूसच्या नावाखाली परराज्यातील आंबा विक्री आणि निर्यात करून सुरू असलेली फसवणूक आणि चोरटा व्यापार थांबेल. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणा-या कोकणच्या हापूस आंब्याची गुणवत्ता, त्याचा विशिष्ट दर्जा यामुळे त्याची जगभरात स्वतंत्र ओळख आहे. जागतिक दर्जा लाभलेल्या हापूस आंब्याला त्याचे स्वतंत्र भौगोलिक स्थान मिळून जीआय मानांकन मिळावे यासाठी गेली दहा वर्षे कोकणातील हापूस उत्पादक अथक प्रयत्न करत होते. अखेर कोकणच्या हापूस आंब्याला न्याय मिळाला आहे. जीआय मानांकन त्या परिसरात उत्पादित होणा-या विशिष्ट फळ अगर उत्पादनाला त्याची बौद्धिक संपदा, उत्तम गुणवत्ता आणि दर्जा पाहून केंद्रीय, वाणिज्य मंत्रालयाकडून दिले जाते. कोकणच्या हापूस आंब्याला जीओग्राफीकल इंडिकेशन रजिस्ट्रारकडून जीआय मानांकन मिळाल्याने आता कोकणच्या हापूस आंब्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भागातील आंबा, 'हापूस आंबा' या नावाचे लेबल लावून अगर परराज्यातील आंब्याला 'हापूस आंबा' असे संबोधून त्याची विक्री करता येणार नाही, अगर परदेशात निर्यातही करता येणार नाही. कोकणातील हापूस आंब्याची स्वतंत्र ओळख आहे. त्याची विशिष्ट चव, त्याचा रंग, त्याचा गंध, त्याचा वैशिष्टय़पूर्ण आकार, त्याचे दिसणे हे सर्व अन्य आंब्यांपेक्षा वेगळे आहे. कोकणचा हा हापूस आंबा त्याच्या या विशिष्ट गुणधर्म, वैशिष्टय़े, चव आणि दर्जा यांमुळेच जगप्रसिद्ध आहे. अमेरिका, इंग्लंड तसेच युरोपियन आणि दक्षिण-पूर्व आशिया खंडातील देशात मोठय़ा प्रमाणात हापूस आंबा निर्यात होतो. या देशामध्ये हापूस आंब्याला फार मोठी मागणी आहे. त्यातून कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना चांगला आर्थिक लाभ होतो. तसेच देशालाही मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळते. कोकणचा जगप्रसिद्ध आंबा जगभरातील खवय्यांची खास आवड बनलेला आहे. त्यासाठी ज्यादा किंमतही ते मोजायला तयार असतात. याचाच गैरफायदा घेऊन कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात आदी राज्यातील आंबा, या व्यवसायातील व्यापारी दलाल हापूस आंबा म्हणून देशात विक्री करतात. तसेच त्याची परदेशातही मोठय़ा प्रमाणात निर्यात करतात. एवढेच नव्हे तर गेली चार-पाच वर्षे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परराज्यातील हा आंबा हापूस म्हणून विकून कोकणातील हापूस आंबा उत्पादकांची तसेच खरेदीदार ग्राहकांचीही सर्रास फसवणूक केली जात होती. विशेषतः गेली काही वर्षे कर्नाटक, आंध्र, केरळमधील आंबा विक्रीचे स्टॉल कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी उघडपणे लावून हापूस आब्यांच्या नावाखाली परप्रांतीय आंब्यांची विक्री होत असे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत होते. तसेच ग्राहकांचे आणि हापूसच्या खवय्यांचीही राजरोसपणे फसवणूक केली जात होती. हापूसच्या नावाखाली परराज्यातील आंब्याचा चोरटा व्यापार व निर्यात होत असल्याने, देश व परदेशातील हापूस आंबाप्रेमी खवय्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन हापूस आंब्याच्या दर्जा व गुणवत्तेबद्दल शंका निर्माण झाली होती. कोकणच्या हापूसला बौद्धिक संपदा कायद्यानुसार भौगोलिकदृष्टय़ा मूळ स्थान दर्शविणारे आतापर्यंत स्वतंत्र जीआय मानांकन नसल्याने कोकणच्या हापूसवरील हे परराज्यातील आंब्यांचे अतिक्रमण आणि चोरटा व्यापार कायद्याने रोखता येत नव्हता. या फसवणुकीबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता येत नव्हती. ती आता करता येईल. हापूस आंब्याला स्वतंत्र जीआय मानांकन मिळाल्याने हापूस आंब्याची गेली काही वर्षे चाललेली फसवणूक आता थांबेल. हापूस आंबा उत्पादकांना त्याचा फायदा होईलच. तसेच परदेशात निर्यात केला जाणारा हापूस आंबा आता कोकणचाच हापूस आंबा असेल. त्यामुळे जगभरातील खवय्यांमध्येही हापूस आंब्याचे स्थान कायम राहील. देवगड हापूस आंबा उत्पादक सहकारी संघाचे अॅड. अजित गोगटे यांनी देवगड हापूसला आणि के ळशी हापूस आंबा उत्पादक संघाचे प्रा. गणेश हिंगमिरे यांनी रत्नागिरी हापूसला त्या-त्या भागातील हापूस आंब्याच्या वैशिष्टय़ामुळे स्वतंत्र जीआय मानांकन मिळावे यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या प्रयत्नानुसार त्यांना देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस असे स्वतंत्र मानांकन लवकरच मिळणार आहे आणि ते तसे मिळावे त्याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही; परंतु देवगड काय, रत्नागिरी काय अगर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य भागातील हापूस आंबा काय, शेवटी हा कोकणचाच हापूस आंबा आहे. परराज्यातील हापूस आंब्याचे अतिक्रमण डावलून कोकणच्या आंब्याला स्वतंत्र जीआय मानांकन मिळाले. हे समस्त कोकणातील आंबा उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परराज्यातील हापूस आंब्यावरील अतिक्रमण फसवणूक आणि चोरटा व्यापार आता थांबेल. कोकणातील हापूसला स्वतंत्र भौगोलिक दर्जा मिळाल्याने न्याय मिळाला हे महत्त्वाचे!
मुंबईतील वेगवान वाहतुकीसाठी महापालिका बांधत असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाला आहे. मुंबई : मुंबईतील वेगवान वाहतुकीसाठी महापालिका बांधत असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाला आहे. कोस्टल रोडला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी पालिकेचे सभागृह नेते यशंवत जाधव यांना दिले होते. त्यानुसार जाधव यांनी गटनेत्यांपुढे प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला सोमवारी मंजुरी मिळाली. कोस्टल रोडला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर व सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली होती. या दोघांचीही मागणी डावलून शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय म्हणजे सेनेला बाळासाहेबांचे विस्मरण झाल्याची टीका पालिकेतील विरोधी पक्षांनी केली आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana Agitation : प्रलंबित असलेल्या अनुदानासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 22 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. बारावीच्या परीक्षा असल्याने दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार असून राष्ट्रीय महामार्ग बंद केला जाणार नाही. ऊस तोडणी मुकादमांकडून होत असलेली ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकित अनुदान, यासह विविध प्रश्ंनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात (Kolhapur News) पत्रकार परिषद घेत आंदोलन करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीज बिल दुरुस्त करुन देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित 37 टक्के वीज वाढ रद्द करावी, आदी मागण्याही करण्यात येणार आहेत. राजू शेट्टी म्हणाले की, चक्काजाम आंदोलन राष्ट्रीय महामार्गावर होणार नसून तालुक्याच्या पातळीवरील राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्ग रोखून धरले जातील. ते पुढे म्हणाले की, "ऊस तोडणी वाहतूकदरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे, पण तोडणी मजुरांची संख्या कमी होत चालली आहे. याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 22 जिल्ह्यामध्ये 446 कोटी रुपयांची मुकादमांनी फसवणूक केली आहे. " राज्य पातळीवरील स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या संघटनेमार्फत ऊस तोडणी कल्याण महामंडळाकडून आता मजुरांची नोंदणी करुन कारखान्यांना मजूर पुरवावेत, वाहतूकदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करताना स्थानिक पोलिसांनी सखोल चौकशी करावी, टोळ्या पळालेल्या वाहतूकदारांच्या मागचा बँकेचा ससेमिरा कमी करावा, हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळण्याची ऑफर दिली होती. मात्र, राजू शेट्टी यांनी नम्रपणे ही ऑफर नाकारली आहे. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. तसेच करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नसून, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.
प्रो कबड्डी लीगच्या आठवी हंगामातील ८४ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजय मिळवला. सामन्याचा पहिल्या मिनिटापासून सामना रंगतदार बनला. मागील सामन्यात दारूण पराभव झालेल्या गुजरातने या सामन्यात लय पकडली. संघासाठी अजय व प्रदीप या दोन्ही रेडर्सने चमकदार कामगिरी करून दाखवली. डिफेन्समध्ये गिरीश एर्नाक उत्कृष्ट कामगिरी करत होता. पहिल्या हाफच्या अखेरीस गुजरात १९-१२ असा आघाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्येही गुजरातने आपल्या खेळात सातत्य राखले. अजय व प्रदीप यांनी वैयक्तिक सुपर टेन पूर्ण केले. हरियाणासाठी कर्णधार विकास कंडोला व मीतू यांनी गुण घेत आघाडी मोठी होऊ दिली नाही. मात्र गुजरात संघाने संयम दाखवला. त्यांनी अखेरच्या तीन मिनिटात खेळ कमालीचा संथ केला. त्यामुळे हरियाणा संघाला ३२-२६ असे पराभूत केले.
हिंदुस्थानचें संक्षिप्त गॅझेटीयर रूपरेषा - हिंदुस्थानदेश ह्मणजे आशियाखण्डापासून दक्षिणेस समुद्रांत पसरलेला एक आवाढव्य व विषम असा त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा विस्तार उत्तर अक्षांशाच्या आठव्या अंशापासून पस्तिसाव्या अंशापयर्यंत आहे. म्हणजे विषुववृत्ताच्या अत्यन्त उष्ण प्रदेक्षापासून समशीतोष्ण कटिबन्धाच्या अगदर्दी आंतल्याप्रदेशापर्यंत या देशाची व्याप्ती आहे. कलकत्ता हैं ठिकाण ८८ रेखांशावर आहे. ह्मणजे कलकत्यास सहा वाजतां सूर्य मावळतो, तेव्हां इंग्लण्डांत नुकतेच कोटं बारा उलटतात. हिंदुस्थानची उत्तर दक्षिण लांबी व पूर्व पश्चिम रुंदी ही दोन्ही सारखींच सुमारे १९०० शें मैल आहेत. क्षेत्रफळ १७, ७३, १६८ चौरसमैल आहे; म्हणजे एक रशिया वगळला तर सर्व यूरोपखंडाच्या क्षेत्रफळाहुन अधिक आहे. लोकसंख्या (देशी संस्थाने धरून) एकतीस कोटी, पन्नास लक्ष आहे. या विस्तीर्ण प्रदेशास देशापेक्षां खंड हाटल्यास तें अधिक शोभेल. भौतिकस्वरूप - उत्तरेस हिमालय पर्वत, ईशान्येस व पूर्वेस ग्रहह्मपुत्रनद, आग्नेयेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस हिंदी महासागर, पश्चिमेस सिंधूनद व अरबी समुद्र हीं आहेत. या मर्यादेतील या देशाचा प्रदेश जगांत अतिशय उंच अशा प्रदेशापासून दोन नद्यांमधला सुपीक व समुद्रसपाटी जवळ जवळ असलेला सखल प्रवेश निसर्ग हवा व पाणी यांत असलेली विविधता वगैरेंनी संपन्न आहे. हिंदुस्थान देशाकडे स्थूलदृष्टीने पाहाणारासहि या देशावर निसर्गाची पूर्ण कृपा आहे, असे तात्काळ दिसन येतें. हिंदुस्थान हा सगळ्या पृथ्वीचा एक लहानसा नमुना आहे. " असे एकानें म्हटले आहे. तें सर्वथैव खरें आहे. जगांतील निरनिराळ्या भागांत सृष्टीची जी भिन्नभिन्न स्वरूप आढळून येतात ती सर्व एकत्र नांदतांना दिसतात. प्रेक्षकांचे मन भारून टाकणारे सृष्टिसौंदर्य, सुपीक जमीन, घनदाट अरण्यें, अत्युच्च पर्वत, प्रचंड नद्या, कडक थंडी अतिशय कडक उष्णता, त्याचप्रमाणे वृक्षशून्य व खडकाळ मैदान, जलशून्य वालुकामय प्रदेश, अशा प्रकारची विविध स्वरूपें दृग्गोचर होतात. तीन- प्रदेश-प्रथमविभाग हिमालय - विमानांत बसून हिंदुस्थानच्या भूभागाचें निरीक्षण करूं लागलों तर आपणांस असे दिसून येईल की, विशिष्ट मर्यादांकित अशा तीन निरनिराळ्या प्रदेशांचा हिंदुस्थानांत समावेश होतो. पहिला म्हणजे हिमालय पर्वत व त्याच्या उतरणीवरील प्रदेश. दुसरा हिमाल्यापासून निघालेल्या सिंधू, गंगा, यमुना, वगैरे नद्या ज्या मैदानांनरून आपली नूपुर गर्जना करीत पतिराजाच्या (समुद्राच्या ) भेटीस जातात तो व तिसरा म्हणजे विंध्याद्रीच्या दक्षिणेस पूर्व-पश्चिम घांटामधील दक्षिणची डोंगरपठार, हिमालयाच्या उंचीचा कळस होतो ती ठिकाणे कांचनगंगा व गौरीशंकर ही दोन जगांत अति उंच शिखरं असून त्यांची उंची २९०२ फूट आहे. हिमालयाघ्या दोन रांगांच्या दरम्यानच्या दरीतून पश्चिमेकडे सिंधू, सतलज ह्या वाहतात व पूर्वेकडील अज्ञेय अशा भागांतून ब्रम्हपुत्रा नद निघतो. तिबेट व हिंदुस्थान योजमधील हिमालयाच्या उंच भागावर अखंड बर्फ असतो. या डोंगरापैकी एकाची तर लांची साठ मैल असून त्यावरील बर्फ उष्णतेनें खालीं येतो. हिमालयाच्या स्वाभाविक तटबंदीमुळे जलसंचयास चांगली मदत होते. उन्हाळ्यांत हिंदी महासागराच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन जे वायूप्रवाह बनतात ते जसजसे उत्तरेकडे वळतात तसतसे त्यामध्यें ढंग उत्पन्न होऊं लागतात व हिमालयाच्या पायथ्याशीं आल्यावर ते वर चढू लागतात, तेव्हां त्वामध्यें जलातिरेक होऊन हिमालयावर फार मोठीं त्रुष्टि होते; अगर हे वारे हिमालयाची उंच शिखरें ओलांडतांना गोठून जाऊन त्यांचं बर्फ बनते. हिमालयांतलें जगांत अतिवृष्टीचं ठिकाण म्हणजे चेरापुंजी हे आसामांत आहे. एक वर्षों तर ६७ फूट म्हणजे तिमजली इमारत महज जलमय होईल एवढा मुसळधार पाऊस पडला. द्वितीय विभाग नद्यांचा प्रदेश उत्तर हिंदुस्थानच्या प्रशस्त मैदानावरून जाणान्या हिमजन्य सिंधु, सतलज, गंगा, यमुना व ब्रम्हपुत्रा या सर्वच नद्या गलबतें जाण्याजोग्या प्रशस्त व प्रचंड जलौघानें सतत व स्वच्छंशनें विहरणाऱ्या असल्यामुळे कृषिसृष्टीस, व्यापारास अगर राजकीयदृष्ट्या भूभागाची विशिष्ट राजमर्यादा ठरविणाच्या कामी त्यांचा अत्यंत उपयोग झाला आहे. भूगोलशास्त्रवेत्यांनी निर्णीत केल्याप्रमाणें सिंधु व म्हपुवा या दोन नदांची लांची गंगेहून अधिक असली तरी त्यांचे प्रवाह बऱ्याच अंतरापर्यंत हिमालयांत अज्ञेय प्रदेशांत आहेत. गंगा हिमालयांतून बाहेर पडल्यावर लौकरच तिचा कालव्यामुळे कृषीस उपयोग होतो व प्रवाहहि गलबतें जाण्याजोगा प्रशस्त होतो. पुरानें जी जमीन भिजते व कांठच्या प्रदेशांत जो गाळ जमतो त्यानें एक पीक बुडाले तरी दुसरें दुप्पट जोरांत येईल अशा आशेने शेतकरी आनंदांत असतो. लोकोपकाराच्या दृष्टीनें पाहतां हिंदुस्थानांतील दुसरी कोणताहि नदी गंगेची बरोबरी करू शकत नाहीं. नदीमार्गे व्यापार व मालाची ने आण गंगेप्रमाणे जगांत कोणत्याच नदीनें होत नाहीं. धार्मिक पवित्रतेपेक्षा शेतकी व व्यापार या कामी तिची उपयुक्तता व महत्व अधिक, यामुळेच ती अधिक वंदनीय झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. कारण गंगा अगर तत्तल्य म्हपुत्रा व सिंधु, सतलज वगैरे नद व नद्या यांचा प्रथम जमीन तयार करणे व ती सुपीक करणें नंतर पैदास चहूंकडे फैलावणे असा तीन प्रकारांनी उपयोग होतो. बहुतेक मोठ्या नद्या या देशाचे राजमार्ग आहेत. शेतकीच्या पैदासेची आयात, निगत व अंतर्गत प्रदेशांतील मालाची ने आण नदीमार्गे फार थोड्या खर्चांत होते. सचेतन शररािला जशा धमन्या अगर रक्तचाहिन्या तशा बंगालला गंगा ब्रम्हपुत्रा व त्यांच्या असंख्यात शाखा या आहेत. या त्यांच्या विपुलतेमुळे आपत्तीहि तशाच येतात. महापुरानें नुकसान झाले नाही असे एखादे वर्ष क्वचितच जाते. शिवाय या दोन मोठ्या प्रवाहांत स्थलांतर तर नेहमच होत असते. एकाकाली गंगा किनारी असलेले विशाल व सुंदर असे राजधानचिं शहर कनोज हैं हल्ली नदीतीरापासून चार मैलांवर उजाड भागांत आहे. ईस्टर्न बंगाल रेल्वेचं पाहिले अत्य ठिकाण कुरसी याची पुरानें नासधूस झाल्यावर गोलांडा हें नवीन स्टेशन नदीकांठी मजबूत व मक्कम भरण घालून वसविण्यांत आले. परंतु १८७५ च्या आगस्ट महिन्यांत ते भक्कम धरण व रेल्वे स्टेशन वगैरे सर्व वाहून जाऊन त्याठिकाण जलमय होऊन गेले, तेव्हां रेल्वेला आपले ठाणे नदीपासून दोन मैल लांच न्यावे लागले. तृतीय विभाग दक्षिण - या भूभागाचे जे तीन प्रदेश प्रथम कल्पिले त्यांपैकी दोन्हीचे वर्णन वर आलेंच आहे. राहिला तिसरा प्रदेश म्हणजे दक्षिण अगर दक्षिणची डोंगर पठार. वस्तुतः दक्षिण म्हणजे नर्मदा व कृष्णा या दोन नद्यांमधला प्रदेश, तथापि विंध्याद्रीच्या दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत द्वपिकल्पाच्या सर्वच भागास दक्षिण असें मानण्यांची साधारण प्रवृत्ती आहे. दक्षिण देशाच्या उत्तरेस विंध्य, पूर्वेस पश्चिमेस त्याच नांवाचे घांट म्हणजे तीन्ही बाजूस गिरिंपर्वतसमूहाचें आवरण आहे. नर्मदेच्या दक्षिणेस विध्याद्रीशी समांतर असा सातपुडा पर्वत असून या दोन लंबायमान गिरिराजांचे वंदनीय चरण मध्यप्रांताच्या पहाडी प्रदेशांत एकमेकांस मिळतात. विंध्याद्रीच्या पश्चिमटोंकाला अबू पहाड हें समृद्रातून जसें एकादें बेट वर निघते तसें राजपुतान्याच्या मैदानावर अरवली डोंग रांमधून निघालेलें सुळक्यासारखे शिखर; व पूर्वटोंकास पारसनाथ ही दोन्ही पांच हजार फूट उंच शिखरें जैनधर्माची पवित्र स्थानें असल्याबद्दल प्रसिद्धच आहेत. कोकणपट्टींतून पश्चिमघाटानें आंत शिरण्यास अनेक प्रसिद्ध खिंडी अगर मार्ग आहेत. उदाहरणार्थ मुंबईहून चाळीस मैलांवरील बोरघाटाची घळण १७९८ फूट उंच आहे. समुद्रकिनान्याच्या बाजूनें देशावर प्रवेश करूं पाहणाऱ्या केवढ्याहि मोठ्या सेनेस एकादर्दी लहान टोळी थोपवून भरीत असे; म्हणून बोर घाट म्हणजे प्राचीनकाळी दक्षिणची गुरुकिल्ली मानण्यांत येत असे. आतां डोंगराच्या खांद्यासभोंवतीं लपेटलेल्या खिंडीवरून मध्ये आड आलेल्या सुळक्याला बोगदे पाडून उभ्या डगरीच्या तोंडाशी असलेल्या अरुंद खडकाच्या कंगोऱ्याला बिलगून रेल्वे म्हणजे लोहमार्गे नेण्यांत आला आहे. एका ठिकाण नागमोड तर इतकी अणीदार आहे की, तिला वळसा अगर वळण घेतां येणें अगर्दी अशक्य आहे. याकारणानें आगगाडीला थांबावें लागून दिशा बदलून सपाट भागावरून उलट दिशेने जावे लागते. याठिकाणी जी. आय. पी. रेलवेनें स्टेशन केलेले असून त्यास '" रिव्हरसिंग '" असे नांव आहे. त्याचप्रप्रमाणे थळघांटांतूनहि साधा व आगगाडीचा रस्ता नेण्यांत आला आहे. विंध्य व सातपुडा यापासून निघालेल्या नर्मदा व तापी बहुतेक समांतर वाहात येऊन खंबायतचे आखातास मिळतात,
'आणि...काशिनाथ घाणेकर'चा 'कडक' टीझर आलाय भाऊ....प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे !!\nरंगभूमीचा पहिला सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. सुबोध भावेचं हे तिसरं बायोपिक. पण नेहमीच (वाईट चित्रपट असला तरी) त्याचं काम असलं 'कडक' असतंय की नाव ठेवायला जागाच उरत नाही राव. अशाच अफलातून कामाची झलक या टीझर मधून मिळते.\nटीझर मध्ये चित्रपटातील सर्वच प्रमुख भूमिका एकामागेमाग एक दाखवल्या आहेत. प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी. एकेकाळची रंगभूमी गाजवणारी फळी आणि त्यांच्या भूमिका साकारणारी आजच्या कलाकारांची फळी बघून उत्सुकता वाढली आहे.\nटीझर मधून सर्वच बडे कलाकार काशिनाथ घाणेकर यांच्या विरोधात होते असं दिसतंय. यात किती तथ्य आहे ? हे तर आपल्याला चित्रपटातच पाहायला मिळेल. या टीझरचं मुख्य आकर्षण शेवटच्या २३ सेकंदात अवतरतं. त्यासाठी हा टीझर बघून घ्या....\nचला तर सुबोधचा हा नवा बायोपिक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा !!
दादर पूर्व येथे असलेले आंबेडकरी चळवळीचे केंद्र मध्यरात्री अंधारात पाडून ते उद्ध्वस्त केले. मुंबई- दादर पूर्व येथे असलेले आंबेडकरी चळवळीचे केंद्र मध्यरात्री अंधारात पाडून ते उद्ध्वस्त केले. यात कोणाचे किती हितसंबंध आहेत, अथवा कोण या सर्व घातक कामाच्या मागे आहे, हे चित्र स्पष्ट झाले असले तरी अशा प्रकारच्या कृत्याचे कोणताही समाज समर्थन करत नाही, यासाठी आता काही तरी मध्यम मार्ग यातून निघाला पाहिजे, यासाठी चला समाजमान्य आंबेडकर भवन उभारू या, मैत्री संवाद आणि मध्यम मार्गासाठी आम्ही सारे युवा असे फलक घेतलेले तरुण चैत्यभूमीवर मौन संवादाचे आंदोलन दादर चैत्यभूमी येथे सुरू केले आहे. यात मुंबईत विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत असलेले व बुद्ध तत्त्वज्ञानाला मानणा-या कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. या आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी बसले असून हे आंदोनल येत्या १८ जुलैपर्यंत चालणार असल्याची माहिती आंदोलनकत्या वर्षा विद्या विलास यांनी दिली. आंबेडकर भवन पाडले ही खूपच मोठी चूक ठरली आहे, त्यासाठी दोषींच्या येणा-या पिढया देखील याचा परिणाम भोगतील. मात्र हे भवन आता पुन्हा त्याच स्तरावर चळवळीचे केंद्र व्हावे, ती बाबासाहेबांचे विचार तिथून संपूर्ण देशात जातील यासाठी फार कोणी बोलत नाही. यामुळेच इंदू मिल बाजूला राहिले असून आंबेडकरी समाजातील काही लोक या भवनामुळे एकमेकांवर आरोप करत सुटले आहेत, या साठी आता नवीन संघर्ष करायचा की, यातून मध्यम मार्ग काढायचा असा संदेश या देत, चला समाजमान्य आंबेडकर भवन उभारा. मैत्री संवाद आणि मध्यम मार्गासाठी आम्ही सारे युवा असे फलक घेतलेले तरुण चैत्यभूमीवर मौन संवादाचे आंदोलन करत असून यात राज्यातील इतर अनेक संघटना सहभागी होणार असल्याची माहितीही वर्षा विद्या विलास यांनी दिली.
अजॅक्सचा गोलकीपर आंद्रे ओन्ना याची ड्रग्स चाचणी पॉझिटीव्ह आढळल्याने यूइएफएने (UEFA) त्याच्यावर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. ३० ऑक्टोबर २०२० रोजी त्याच्या शरीरात फ्युरोसेमाइड, डायुरेटिक असे प्रतिबंधक पदार्थ सापडले होते. त्यामुळे यूइएफएने आजपासून (५ फेब्रुवारी) पुढील १२ महिन्यांसाठी क्लब आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांतून त्याला निलंबित केले आहे. कोण आहे ओन्ना ? ओन्ना हा २०१६-१७ या हंगामापासून अजॅक्सचा पहिल्या पसंतीचा गोलकीपर आहे. २०१५ साली बार्सिलोना अकादमीतून तो अजॅक्स क्लबमध्ये सहभागी झाला होता. याचबरोबर तो कॅमेरून राष्ट्रीय फुटबॉल संघाचा नियमित सदस्य असून त्याने १८ कॅप्स जिंकल्या आहेत. याचबरोबरच त्याला फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट युवा गोलकीपरमध्ये गणले जाते. त्याने चेल्सी आणि बोरुसिया डॉर्टमंड अशा युरोपियन क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु आता त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आल्यामुळे तो आफ्रिकन कप ऑफ नेशन्स २०२१ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. नक्की कशामुळे घातली बंदी ? अजॅक्स क्लबने दिलेल्या माहितीनुसार, ओन्नाने तब्येत खराब असल्यामुळे चुकीने त्याच्या पत्नीने लिहून दिलेली काही औषधे घेतले. त्यानंतर तो ड्रग्स चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता. फुटबॉल संघटनेची शिस्तबद्ध तुकडीने ओन्नाने मुद्दाम असे केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु युरोपियन फुटबॉल संघटनेच्या अँटी-डोपिंग नियमानुसार, कोणत्याही फुटबॉलपटूचे कर्तव्य असते की त्याने प्रतिबंधक पदार्थांचे चुकूनही सेवन करू नये. याच कारणामुळे ओन्नावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत.
साम, दाम, दंड व भेदासह निवडणूक फडातील डाव खेळला. काहींनी जिंकला तर काही हरले. निवडणुका संपल्या तरीदेखील जिल्ह्यातील हजारावर ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठी निवडणूक खर्चाचा ससेमिरा कायम आहे. खर्चाचा हिशेब सादर न झाल्याने सदस्यत्त्व रद्द होण्याच्या कारवाईलादेखील सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
पुणे : दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाळप हंगामाला प्रारंभ करणार आहे. यंदा कारखाना प्रशासनाने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळप आणि १.२५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तब्बल चार वर्षांपासून बंद असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना निराणी ग्रुपने गेल्या गळीत हंगामात चालवायला घेतला. सर्व प्रक्रिया पार पाडत कारखान्याने तीन महिन्यांच्या कालावधीत ३ लाख १२ हजार २१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत २ लाख ८२ हजार २०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी ११.६५ साखर उतारा मिळाला होता. ऊस वाहतूक ट्रॅक्टर, सभासद, कामगार, शेतकरी तसेच कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची बिले वेळेत खात्यावर जमा करून भीमा पाटस कारखान्याने अल्पावधीत सर्व घटकांचा विश्वास संपादन केला आहे. यंदाही पुणे जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे. निराणी ग्रुपचे यंदा गळीत हंगामाचे दुसरे वर्ष आहे. निराणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मृगेश निराणी, संगमेश निराणी, भीमा पाटस साखर कारखाना प्रशासन व कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांचा शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देण्याचा मानस आहे. यंदा कारखाना प्रतिदिनी १० हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे. डिस्टिलरी व कोजनरेशन प्रकल्पमध्येदेखील मोठी उभारी घेणार असून, या वर्षी दिवसाला ७० हजार लिटर इथेनॉल निर्मिती करणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली.
गेली १३ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असलेल्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपच्या २०१७ च्या सत्राला सुरुवात होत आहे. तब्बल १० एकरची व्याप्ती असणाऱ्या ह्या कँपकरिता मनुष्य़बळही तेवढ्याच मोठ्या संख्येने लागणार. ह्या भक्तिमय निष्काम सेवेकरिता ठिकठिकाणाहून यंदा सेवेकरिता संधी मिळालेले कार्यकर्ते शिबिरासाठी निघाले. मुंबईहून २२ बसेस, तसेच इतर कार्समधून मिळून ७४८ कार्यकर्ते, पुण्याहून ३ बसेसमधून ११३ कार्यकर्ते, तर रायगडमधून १ बसमधून २५ कार्यकर्ते शिबिराकरिता रवाना झाले. ह्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे नंदाईंची व सुचितदादांची उपस्थिती. कँपच्या अचूक नियोजनाचा जणू कणाच असलेले हे दोघे म्हणजे कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे उगमस्थान. आताही कँपकरिता येणाऱ्या सर्च कार्यकर्त्यांच्या आधी पोहोचून कँपशी संबंधित विविध समित्यांबरोबर नंदाई व सुचितदादा मीटिंग्स घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. संस्थेच्या सर्व सेवाकार्यांचा पाया 'भक्ति' असल्यामुळे प्रत्येक सेवाकार्याची सुरुवात प्रार्थनेने होते. हे भगवान, ह्या सेवाकार्यात सेवाकरायची संधी आम्हाला देऊन तू आम्हाला उपकृत केले आहेस, असा भाव सर्व कार्यकर्त्यांचा ही प्रार्थना करताना असतो. त्याचबरोबर संस्थेच्या सर्व उपक्रमांमध्ये लक्षणीय असते, ती शिस्त. त्या अनुषंगानेच कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या सेवाक्षेत्रानुसार बॅजेस् दिले जातात, जेणेकरून काही गोंधळ होणार नाही. ह्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपला झटणार्या कार्यकर्त्यांची नीट काळजी घेतली जाते व त्यांच्या जेवणाखाण्याची कधीच आबाळ होत नाही. आताही कँपच्या आदल्या दिवशी पोहोचलेले कार्यकर्ते त्यांच्याकरिता आयोजित केलेल्या जेवणासाठी जमत आहेत.
२९ संतोष ०२ : मिरजेत निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रात स्किझोफ्रेनिया दिनी डॉ. चंद्रशेखर हळींगळे यांनी मार्गदर्शन केले. मिरज : येथील निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रात स्किझोफ्रेनिया दिन साजरा झाला. यावेळी डॉ. चंद्रशेखर हळिंगळे म्हणाले, मेंदूतील रासायनिक घटकांचा समतोल बिघडल्याने हा विकार उद्भवतो. अनुवांशिकता, बालपणी झालेले आघात, पालकांची अतिकडक शिस्त, त्यांची भांडणे, एका पालकाचा मृत्यू किंवा घटस्फोट, लैंगिक शोषण, मानसिक छळ, ताणतणाव आदी कारणांनीही विकार उद्भवतो. कानात अनाकलनीय आवाज, संशय, असंबद्ध बडबड व वागणे, एक कृती वारंवार करणे अशी लक्षणे दिसतात. ते म्हणाले की, योग्य औषधोपचार, विद्युत लहरींचा वापर, मानसोपचार व समुपदेशन, पुनर्वसन या मार्गांनी रुग्ण हमखास बरा होतो. नातेवाइकांनी त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. 'मेंटल' म्हणून हिणवू नये. यावेळी डॉ. दीपक मुकादम, डॉ. प्रकाशकुमार मोरे, डॉ. दीपक माने, डॉ. श्रद्धा गायकवाड, सेजल बनसोडे, सत्यव्वा मगदूम आदी उपस्थित होते.
यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. अमरावती- यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुंब बाधित झाले आहे. या तीन महिन्याच्या कालावधित सर्वात जास्त २,७४३ शेतजमिनींचे नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात एक जून ते १६ जून या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे ४४ व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक २३ व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. अमरावती 6, अकोला 2, बुलडाणा १४ तर वाशिम जिल्हा निरंक आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सहाही व्यक्ती वीज पडून मृत झाल्या आहेत. अकोला येथे एक पुरात वाहून तर एक वीज पडून मृत झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या १६ व्यक्ती वीज पडून तर एक नाल्याच्या पुरात वाहून गेला आहेत. अकोला जिल्ह्यात एक अंगावर भिंत पडून, तर एक जण पुरात वाहून गेला आहे. वाशिम जिल्ह्यातील एक व्यक्ती पुरात वाहून गेली. तर बुलडाणा जिल्ह्यातील ११ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या तीन महिन्याच्या आपत्तीमध्ये वाशिम जिल्ह्यात १. ६० हेक्टर तर यवतमाळ जिल्ह्यात २,७४३. ४८ हेक्टर मधील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे २० तालुक्यातील ८३४ कुटूंबे बाधित झाली आहेत. यामध्ये अमरावती १७०, अकोला नऊ व यवतमाळ जिल्ह्यात ६५५ कुटूंबाचा समावेश आहे. यंदाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या ३५ पैकी २७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली आहेत. तर सात प्रलंबित आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात तीन प्रकरणात १२ लाख, अकोला जिल्ह्यात दोन प्रकरणात आठ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १५ प्रकरणात ६० लाख, बुलडाणा जिल्ह्यात आठ प्रकरणात ३२ लाख रूपयांची शासकीय मदत देण्यात आलेली आहे. या कालावधित विभागात १५३ लहाल-मोठी जनावरे मृत झाली आहेत. यामध्ये ४५ मोठ्या दुधाळ जनावरांसाठी मालकास ८. ९६ लाख, ६९ लहान दुधाळ जनावरांसाठी २. १२ लाख, ओढकाम करणाºया ३३ जनावरांसाठी ६. ५० लाख तर ओढकाम करणाºया लहान जनावरांसाठी ७६ हजारांची मदत करण्यात आलेली आहे. या कालावधितील जिवित व वित्तहानीमध्ये सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे.
PHOTOS: अशी सुरू झाली होती सुशांत-रियाची प्रेमकहाणी । know about Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty Love Story breakup with ankita lokhande see photos sdn 96 । Loksatta\nPublished on June 14, 2021 2:09 pm\nबॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी १४ तारखेला सुशांतने अचानक या जगाचा निरोप घेतला.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालंय मात्र, त्याच्या आत्महत्येमागील कारणांची चर्चा सुरूच आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी थेट सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवरच आरोप केले. रियावर पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या वादात सुशांत-रियाची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. पण, सुशांत आणि रियाची लव्हस्टोरी सुरू कशी झाली माहिती आहे का?\nबॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअरबद्दल नेहमीच चर्चा सुरू असतात. रिया आणि सुशांतबद्दलही अशाच चर्चा होत असत. त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर नेहमी एकमेकांचे फोटो दिसून येत, त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं सांगितलं जायचं. दोघांनी त्यांच्यातील नातं जाहीर केलेलं नव्हतं. सुशांतच्या मृत्यूनंतरच रियानं याबद्दल खुलासा केला होता.\nसुशांत आणि रिया २०१३ मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी सुशांत शुद्ध देसी रोमान्सच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. तर रियाही मेरे डॅड की मारूती या सिनेमाचं शुटिंग करत होती.\nया दोन्ही सिनेमांचे सेट आजूबाजूलाच होता. त्याचवेळी रिया आणि सुशांत यांची भेट झाली. त्यानंतर सुशांत व रिया अनेक पार्ट्यामध्ये एकमेकांना भेटले.\nनेहमीच्या भेटीतून दोघांमध्ये मैत्री झाली. त्यावेळी सुशांत अभिनेत्री अंकित लोखंडेच्या रिलेशनमध्ये होता. ज्यावेळी रिया सुशांतच्या आयुष्यात आली, त्यावेळी अंकिता आणि सुशांतमधील संबंध तणाव होता, असं वृत्त त्यावेळी माध्यमांमधून समोर आलं होतं.\nअंकितासोबतचे संबंध बिघडत जात असतानाच सुशांत व रिया जवळ आले. दोघांच्या भेटी वाढल्या. त्यानंतर सुशांत व अंकिताचं ब्रेकअप झालं. दोघे ६ वर्षे रिलेशनमध्ये होते. त्यावेळी अशी चर्चा होती की, ते दोघे लग्नही करणार होते.\nअंकिता आणि सुशांतच्या ब्रेकअपनंतर रिया आणि सुशांत सोबत फिरताना दिसायला लागले. त्यांचे फोटोही एकमेकांच्या सोशल मीडियातून दिसायला लागले होते.\nरिया सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं घराच्यांशी बोलणं कमी झालं होतं, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या लोकांनी केलं होतं. सुशांत कुटुंबीयांशी व मित्रांशी कमी बोलायचा. तसेच तो वारंवार फोन नंबरही बदलायचा, असंही त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं होतं.\n(सर्व फोटो सौजन्य : सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती / इन्स्टाग्राम)
बीड : मासिक पाळीतील स्वच्छतेअभावी होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. माधुरी रायमाने यांनी केले. येथील माऊली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालयात गृहविज्ञान विभाग, समाजशास्त्र विभाग, महिला विकास कक्ष आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त राज्यस्तरीय वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सविता शेटे या होत्या. सुरुवातीला प्राचार्य डॉ. शेटे यांनी युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार ७० टक्के मुली मासिक पाळी सुरू असताना शाळेत जात नाहीत, तर ८४ टक्के मुलींच्या शाळेत मासिक पाळीत आवश्यक साधनांची सुविधा नसल्याची माहिती दिली. मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी देखील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर कशी गुंतवणूक झाली पाहिजे यावर मत मांडले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. माधुरी रायमाने यांनी 'मासिक पाळी-स्वच्छता आणि आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन केले. मासिक पाळीत स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी सविस्तर आणि सोदाहरण पटवून दिले. आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सजग राहण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या मनातील शंकाचे निरसन करून घेतले. सूत्रसंचालन करून पाहुण्यांचा परिचय गृहविज्ञान विभागाच्या डॉ. संध्या आयस्कर यांनी करून दिला. महिला विकास कक्षाच्या डॉ. अर्चना वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक, विद्यार्थी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांमधील व्यक्ती, गृहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मेयर, अर्न्स्ट वॉल्टर : (५ जुलै १९०४ - ३ फेब्रुवारी २००५). अर्न्स्ट वॉल्टर मेयर यांचा जन्म जर्मनीतील केम्प्टेन शहरात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. वडलांना निसर्ग विज्ञान आणि पक्षिशास्त्राची आवड होती. सुटीच्या दिवशी ते आपल्या दोन्ही मुलाना निसर्गसहलींना नेत असत. त्यातून वुर्झ्बर्गमधील सर्व स्थानिक पक्ष्यांची ओळख त्यांचे मोठे भाऊ ऑटो यांनी करून दिली. ड्रेस्डेन येथे त्यांचे हायस्कूल शिक्षण झाले. पक्षिविज्ञानातील त्यांचे पहिले गुरू रुडॉल्फ झिमरमान यांनी त्यांना पक्षिविज्ञानाची गोडी लावली. त्यांच्या पक्षिनिरीक्षणातील व पक्ष्यांच्या अभ्यासावर खूष होऊन त्यांना पक्षी संग्रहालयात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ग्रीफ्सवाल्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण एकाच वर्षात त्यांनी आपली शाखा जीवविज्ञानाकडे बदलून घेतली. पक्षिविज्ञानाचा अभ्यास करताना पक्षी निरीक्षकाबरोबर जाण्याची संधी त्यांना वारंवार मिळत गेली. बर्लिन म्यूझीयममध्ये केवळ सोळा महिन्यात त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली तर त्यांना कामाची संधी मिळेल असे सांगितल्यावर डॉक्टर कार्ल झिमर (Carl Zimmer) यांच्याकडे खरेच त्यांनी सोळा महिन्यात डॉक्टरेट पूर्ण केली. केवळ वयाच्या एकविसाव्या वर्षी ते बर्लिन म्यूझीयममध्ये रुजू झाले. ऑस्ट्रेलिया आणि मलेशियामध्ये वसलेल्या न्यू गिनी व सॉलोमन बेटांच्या समूहावर जाण्याच्या पक्षी निरीक्षण मोहिमेत ते सहभागी झाले. विविध प्राणिजाती भौगोलिक दृष्ट्या कशा विखुरलेल्या असू शकतात याचा अनुभव त्यांना तेथे आला. मुख्यतः पक्ष्यांचे, हजारो जीवावशेष त्यांनी जमवून बरोबर आणले. या सामुग्रीचा अभ्यास करून अनेक नव्या पक्षिजातींचे तसेच जमवलेल्या ऑर्किड वनस्पतींपैकी अडोतीस जातींचे नामकरण त्यांनी केले. पक्षिवर्गीकरणावर त्यांचे शंभर शोधनिबंध दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित केले. या अभ्यासाचे संकलन करून Birds of the Southwest Pacific हा ग्रंथ प्रकाशित झाला. जगातील आतापर्यंतच्या शंभर सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते. ते प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापकपदी रुजू झाले आणि तेथूनच सेवानिवृत्त झाले. निवृत्त झाले तेव्हा त्यांना 'अलेक्झांडर अग्गासिझ तुलनात्मक प्राणिशास्त्राचे' मानद प्राध्यापक हार्वर्ड विद्यापीठ, अशी उपाधी देण्यात आली. आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित The Growth of Biological Thought हा ग्रंथ त्यानी सेवानिवृत्त झाल्यानंतर सात वर्षांनी, संगणकाची मदत न घेता स्वतःच्या हाताने लिहून काढला. या पुस्तकात त्यांनी जीवशास्त्राचा इतिहास, त्यातील समस्या आणि संकल्पना यांचा परामर्श घेतला आहे. त्यांनी दोन कीटकशास्त्रज्ञ सहलेखकांबरोबर Methods and Principles of Systemic Zoology हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी प्राणी वर्गीकरणशास्त्र आणि प्राण्यांच्या प्रजाती, जाती, उपजाती, प्राणिजातींचे नामकरण, उद्भव यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. Animal Species and Evolution या त्यांच्या पुस्तकात, त्यांनी जीवशास्त्राच्या दृष्टीने प्राणिजाती म्हणजे काय आणि उत्क्रांतीत 'प्राणिजातीं'ची भूमिका कोणती याचे विवेचन केले आहे. मेयर यांनी लिखाण करताना त्यांचे त्या काळातील जीवरसायन, शरीरक्रियाशास्त्र , आनुवंशिकताशास्त्र इ. अन्य संबंधित शास्त्रांचे अद्ययावत ज्ञान वापरले. संदिग्धता वा वाद असणार्या मुद्यांवर त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे. जीवशास्त्रीय जाती संकल्पना, जातींचे भौगोलिक वा अन्य कारणांनी विलगीकरण, नाव जातींचा उद्भव, उपजाती, त्यांतील फरक, फरक होण्याची कारणे, जातीसंकर अशा नाना बाबींना स्पर्श केला. What Evolution Is या त्यांच्या पुस्तकात, तीन प्रकारच्या वाचकांचा परामर्श त्यांनी घेतला आहे. डार्विन-समर्थक परंतु अधिक पुरावे शोधणारा एक वाचकगट होता. उत्क्रांती झाली पण डार्विन यांचे प्रतिपादन पूर्णतः योग्य नाही असे मानणारा दुसरा गट होता. दैवी निर्मितीवर श्रद्धा ठेवणारे पण शत्रूपक्षाचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी असणारे वाचक तिसऱ्या गटात होते. विज्ञानप्रसारासाठी पुस्तके लिहिण्याखेरीज त्यांनी प्रामुख्याने पक्षिशास्त्र, वर्गीकरणशास्त्र, भौगोलिक प्राणिविज्ञान, उत्क्रांतिशास्त्र या ज्ञानशाखांमध्येही संशोधन केले. सजीवांच्या 'जाती' या मूलभूत संकल्पनेबद्दल जगभरच्या जीवशास्त्रज्ञांमध्ये सुस्पष्टता आणि एकवाक्यता यावी यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली. त्यांना 'जाती संकल्पनेबद्दल एकवाक्यता यावी म्हणून किती प्रयत्न करावे लागले असतील हे समजायला एक उदाहरण उपयोगी पडेल. ते म्हणजे - 'जातीच्या थोडेफार फरक असणाऱ्या निदान २६ संकल्पना आहेत. यात भर म्हणजे लैंगिक पुनरुत्पादन होणाऱ्या पक्ष्यांसारख्या सजीवांतील जाती संकल्पना जीवाणूंसारख्या अलैंगिक पुनरुत्पादन करणाऱ्या जीवांना लागू पडत नाहीत. जीवशास्त्रातील सर्वात प्रतिष्ठित मानले जाणारे तीनही पुरस्कार अर्न्स्टना मिळाले आहेत. त्यापैकी पहिला आहे - मानव्य क्षेत्रात, नैसर्गिक विज्ञानात, सांस्कृतिक क्षेत्रात अद्वितीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा इंटरनॅशनल बाल्झन पुरस्कार. दुसरा पुरस्कार इंटरनॅशनल प्राईझ फॉर बायॉलॉजी, जो जीवशास्त्रात उत्कृष्ट मूलभूत संशोधनासाठी प्रदान करण्यात येतो. त्यांना गौरवणारा तिसरा पुरस्कार म्हणजे रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने बहाल केलेला क्राफूर्ड पुरस्कार. मेयर यांच्यामुळे घडलेली सर्वात महत्वाची घटना म्हणजे मेंडेल आणि डार्विन यांचे काम एकत्रित विचारात घेतले गेले. या दोन जीवशास्त्रज्ञांचे विचार एकमेकांना किती पूरक आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्या दोन विचारधारांचा समन्वय करून उत्क्रांतीची एक एकात्मिक उपपत्ती त्यांनी मांडली. ही एकात्मिक उपपत्ती मूर्त रूपात आणण्यासाठी थिओडोसियस डॉबझान्स्की (Theodosius Dobzhansky), रोनाल्ड फिशर (Ronald A. Fisher), जेबीएस हाल्डेन (J.B.S.Haldane) अशा अनेक जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ, रसायनशास्त्रज्ञांचा त्यात समावेश होता. अल्पशा आजारानंतर वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे निधन झाले .
भारत सरकारने क्षमा मागण्याविषयीचे अधिकृत पत्र कतार सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू ! अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ? अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ? मंदिरासाठी अर्पण देतांनाही फसवणूक करणारे जन्महिंदू जनतेला किती फसवत असतील ? झारखंड राज्यात हिंदुद्वेषी आणि ख्रिस्तीप्रेमी झारखंड मुक्ती मोर्च्याचे राज्य आहे. त्यामुळे तेथे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केले असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही. राज्यातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक ! जनहिताचे नियम करणे एकांगी असून त्यांची कठोर कार्यवाही आणि कायद्याचे प्रामाणिकपणे पालन करणारी जनता निर्माण होणे आवश्यक आहे. असे आतापर्यंत होऊ न शकणे, हे लोकशाहीचे अपयश नव्हे का ? 'फबिंग' म्हणजे तुमच्यासमवेत लोक असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या भ्रमणभाषमध्येच मग्न रहाण्याची मनोविकृती ! अमेरिका आणि नेदरलँड या देशांतील धर्मप्रेमी हिंदूंनी 'I support Hindu Rashtra Adhiveshan', अशा प्रकारचे फलक हातात घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन दिले आहे. आपल्याला मूलतः आंतरिक प्रवास करून, म्हणजेच साधना करून धर्मकार्यासाठी सिद्ध व्हायला हवे. स्वतः हिंदु धर्माचे आचरण केल्यासच हिंदूंना जागृत करणे शक्य आहे, असे प्रतिपादन हाँगकाँग येथील व्यवसायिक श्री. दयाल हरजानी यांनी केले. येथील शांतिपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिव आणि नंदी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केले. ५०० वर्षांनंतर मंदिरावर फडकला ध्वज !
सायबर पोलीस सेल म्हणजे काय? २००० साली माहिती-तंत्रज्ञान आयटी कायद्याची निर्मिती झाली.त्याच वर्षी देशभरातल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण्यात आले. त्यानुसार १८ डिसेंबर २००० रोजी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यान्वित झाला हा सेल गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करतोय. मुंबई पोलीस आयक्तालयात या सायबर सेलच सुसज्ज कार्यालय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा प्रत्येक गुन्हा या सेलकाढून तपासला जातो. त्यासाठी या सेल मध्ये तज्ञ,तज्ज्ञ मंडळी प्रशिक्षित अधिकारीवर्ग आहे. २००९ सालि मुबई पोलिसांनी वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस ठाण्याची स्थापना केली.सायबर पोलिस आधी तक्रारीतली तथ्यता पडताळतात.त्यानंतर आरोपीने वापरले ले ईमेल अकाउन्टचा पाथ,आयपी,आयएसपी शोधून प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहचतात.त्याने ज्या कॉम्प्युटरमधून गुन्हा केला आहे तो ताब्यात घेऊन त्यातून पुरावे गोळा करतात.हा संपूर्ण तपास अत्यंत गोपनीयपणे केला जातो. इंटरनेट किंवा मोबइलच्या माध्यमातून आर्थिक फसवूणूक,बदनामी,अश्लील मजकूर-फोटो क्लीप, धमक्या यापैकी कोणत्याही तक्रारीसाठी थेट सायबर सेल कडे तक्रार करता येऊ शकते. "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी"अर्थात योग्य विचाराने पैसा कमवावा आणि निरपेक्ष वृत्तीने तो खर्च करावा.संत तुकाराम महाराजांनी पाचशे वर्षापूर्वी आर्थिक नियोजनाचा गुरमंत्र अवघ्या आठ शब्दात सांगून गेले आहेत.काय ती दुरदृष्टी?कारण तेव्हापासून पाचशे वर्षानंतर या भूमिवर गुदगुल्या करून हसवून मारणारे 'क्रेडिट कार्ड' नावाचे एक 'अस्वल' धुमाकूळ घालणार आहे आणि घालत आहे.हे तेव्हाच त्यांना दिसत असले पाहिजे! नको असलेली खरेदीसुध्दा करून घरी परतलो असतो, कारण क्रेडिट कार्ड आज फक्त खरेदी करायची आणि एक रूपया पण व्याज न देता चाळीस दिवसात कधीही पैसे भरू शकता आणि इथेच अनावश्यक खरेदीला प्रारंभ होतो.
अभय अभ्यंकर हे चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. त्यांनी सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून १९८२ साली बी. कॉम. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केला. ऑडिट, टॅक्सेशन व बॅंकिंग या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात. कॉलेजमध्ये असताना ते विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळत होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) निवडणूक चिन्हावरील धनुष्यबाण आयोगाने गोठविल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही पाठवलेल्या कागदपत्रांची नीट तपासणी न करून निवडणूक आयोगाने पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी व्हावी, असा अर्जही उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला होता, मात्र आज ना उद्या या प्रकरणावर सुनावणी होऊ शकते. याआधी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र नंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. पक्षाने शनिवारी आयोगाला पत्र पाठवले होते, मात्र त्यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि घाईघाईने आम्हाला वेळही दिला गेला नाही, असा आरोप शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केला. देसाई म्हणाले की, आम्ही दिल्ली उच्च न्यायालयासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत. पक्षाची घटना आणि पदाधिकाऱ्यांचाही उल्लेख केला आहे. न्यायालय याचा सखोल विचार करेल, अशी आशा आहे. देसाई म्हणाले की, आयोगाच्या अंतरिम निर्णयावरून नैसर्गिक न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, असे दिसते. त्यामुळेच आम्ही ही याचिका दाखल केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. आयोगाने दोघांना सोमवारपर्यंत आपापल्या पक्षांसाठी तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जवळ आल्याने शिंदे गटाच्या विनंतीवरून आयोगाने अंतरिम आदेश जारी केला आहे. जेव्हा जेव्हा पक्ष फुटतो तेव्हा त्याच्या निवडणूक चिन्हावर दावा सुरू होतो. दोन्ही गटांना निवडणूक चिन्ह आपल्याकडेच ठेवायचे आहे. अशा स्थितीत निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करावा लागतो आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले जाते. शिवसेनेच्या बाबतीतही तेच झाले. यापूर्वी लोक जनशक्ती पक्षात (लोजप) अशीच फूट पडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने लोजपचे निवडणूक चिन्ह असलेला बंगला गोठवला होता. निवडणूक आयोग काय म्हणाला? निवडणूक आयोगाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, पोटनिवडणुकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही गोंधळापासून मुक्त आहे याची खात्री करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्यामुळे निवडणुकीत भाग घेणाऱ्या कोणत्याही गटाचा अवाजवी फायदा किंवा तोटा होणार नाही याची खात्री करण्यासाठी पुढील पायरी आवश्यक आहे. निवडणूक चिन्हे गोठवण्याचा नियम काय आहे? निवडणूक आयोग निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ चे पालन करतो. यामध्ये पक्ष तुटल्यास पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाला द्यायचे, असे सांगण्यात आले आहे. याबाबत काही अटी आहेत, ज्यांचे समाधान झाल्यानंतरच आयोग निर्णय घेते. पुरेशी सुनावणी, कागदपत्रे आणि पुरावे याशिवाय निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेत नाही. उद्धव आणि शिंदे गट आता काय करणार? निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला विद्यमान चिन्हांमधून स्वतःची निवड करण्यास सांगितले आहे. पक्षाच्या नावाबाबत आयोगाने म्हटले आहे की, दोन्ही गट नवीन नावे वापरू शकतात. दोन्ही गटांना नवीन चिन्ह आणि नाव घेऊनच निवडणुकीत उतरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Disclaimer : सदरील माहिती पुस्तकं, वर्तमानपत्रं, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे. यात आम्ही सत्यतेचा दावा करत नाही.
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउनसारखी स्थिती आहे. करोनामुळे जगाचे अर्थकारण डगमगले आहे. मात्र, चीनमध्ये करोनामुळे अनेकांचे संसारही धोक्यात आले आहेत. बीजिंगः चीनमध्ये करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर आता अनेक जोडप्यांचे संसारही विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहेत. करोनामुळे चीनमधील काही प्रांतात निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे अनेक जोडपी घरात होती. घरात कैद असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद वाढले असून अनेकांनी संसार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या दाझौ प्रातांतील अधिकारी लू शिजून यांनी सांगितले की, २४ फेब्रुवारीपासून जवळपास ३०० जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केले आहेत. करोनाच्या संसर्गानंतर अनेक जोडपी घरातच आहेत. त्यातून पती-पत्नीत टोकाचे वाद होण्याचे प्रकार वाढले असतील अशी शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. करोनाच्या संसर्गामुळे घटस्फोटाच्या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यातील काही अर्ज समुपदेशनानंतरही मागे घेण्यात येतील असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, इटलीतही नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. घरातच अनेकजण अडकले आहेत. वेळ घालवण्यासाठी अनेकजणांनी इंटरनेटचा आधार घेतला असून ऑनलाइन गेमिंगचा वापर वाढला असल्याचीही माहिती समोर आणली आहे. तर, इटलीत एका पॉर्न वेबसाइटने प्रीमियम मेंबरशिपही मोफत केली आहे. चीनमध्ये करोनाची स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. चीनमध्ये करोनाचे नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. चीनमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात येत असले तरी इटली व इराणमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
एमपीसी न्यूज - कर्ज देण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून महिलेची आर्थिक फसवणूक केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. हा प्रकार 19 डिसेंबर 2020 रोजी घडला. गोविंद किसनराव सावंत (रा. घरकुल, चिखली), गौतम शिरसाठ आणि गोविंद याची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 4 मार्च रोजी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंद याने फिर्यादी महिलेला कर्ज देण्यासंदर्भात वेळोवेळी व्हाट्सअपवर अश्लील मेसेज केले. महिलेचा पाठलाग करून तिला पाच लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला. सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेला पाच लाख रुपये कर्ज देण्याच्या बहाण्याने कर्जाच्या प्रोसेसिंग फीसाठी साडेपाच हजार रुपये घेतले. पैसे घेऊन महिलेला कर्ज दिले नाही. तसेच प्रोसेसिंग फीसाठी घेतलेल्या पैशांपैकी एक हजार रुपये महिलेला परत करून उर्वरित साडेचार हजारांची महिलेची फसवणूक केली. आरोपी गोविंद आणि गौतम यांनी महिलेला कर्ज मिळाल्यानंतर त्यांना 30 हजार रुपये कमिशन म्हणून देण्याची देखील मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
नागपूर - महाजनको या वीजनिर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने कोळसा पुरवठा व वॉशिंगसाठी काढलेल्या निविदेसंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा ऊर्जा खात्याशी काहीही संबंध नसल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून निर्माण झालेल्या वादाबाबत प्रदेश काँग्रेसने गुरुवारी सायंकाळी हा खुलासा केला. खनिकर्म महामंडळाने गेल्या मे महिन्यात महाजनको कंपनीसाठी नागपूरच्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला कोळसा पुरवठा व वॉशिंगसाठी देकार पत्र दिले आहे. ही कंपनी संजय हरदवाणी चालवितात; परंतु, या कंपनीला अशा कामाचा कोणताही अनुभव नाही, कंपनीचे नेटवर्क नाही, आर्थिक उलाढाल नाही व सुरक्षेबाबतही खात्री नाही. त्यामुळे हे देकारपत्र गैरमार्गाने दिले असल्याचा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याच पक्षाच्या ऊर्जामंत्र्यांच्या खात्याविरुद्ध ही तक्रार केल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतर श्री. पटोले यांनी त्या संदर्भात खुलाशाचे निवेदन व्हिडिओद्वारे जारी केले. आपण खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करून तिला स्थगिती देण्याची मागणी केली असून, तिचा ऊर्जाखात्याशी संबंध जोडणे म्हणजे आपल्या काँग्रेस पक्षाचे मंत्री नितीन राऊत व आपल्यात भांडणे लावण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वर्तमान कायदा अंतर्गत, कर्ज करार व्याज न असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. मग कर्जदार बँक व्याज भरावे लागते नाही. तथापि, या चरणावर निर्णय घेतला होता, तो खात्यात पैलू भरपूर घेणे आवश्यक आहे. हा लेख आहे काय पाहू एक बिनव्याजी कर्ज आहे, आणि काय एक अस्वल परिणाम म्हणून संस्थापक पासून. अनेक, कर्ज आणि कर्ज फरक अस्तित्वात नाही. तथापि, या संकल्पना समानार्थी नाहीत. कर्ज - क्रेडिट तुलनेत अधिक सर्वसाधारण करार. त्यामुळे गेल्या - हे फक्त कर्ज प्रकार एक आहे. हे अपरिहार्यपणे व्याज समावेश आहे फक्त बँक किंवा अन्य संस्था योग्य परवाना आहे ठेवेल खरं द्वारे दर्शविले जाते. कर्ज वैशिष्ट्ये काय विचार करा. - तो पैसा आणि गोष्टी स्वरूपात दिले जाऊ शकते. - एक अनुदान तत्त्वावर एक करार शक्यता आहे. - करार करताना हस्तांतरित संपत्ती किंवा पैसा शक्ती प्रवेश होणार नाही. - कर्ज विपरीत, कर्ज कोणत्याही कायदेशीर किंवा अगदी एक वैयक्तिक जारी करू शकता. तो प्रामुख्याने रोख प्रसारित केला जातो. तथापि, अन्य स्वरूपात प्रदान शक्यता आहे. या प्रकरणात, गोष्टी करू शकता वैयक्तिक वैशिष्ट्ये आहेत नाही, पण ते काही वैशिष्ट्ये एकत्र येतात. - जाडेभरडे लोकरीचे कापड कर्ज सहसा आत्महत्या व्याज पत्करणे आहेत. तथापि, पैसे, त्याउलट, व्यवहार बहुतांश व्याज लक्षात आहेत. आणि तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नाही तर, टक्केवारी मुलभूत (दर देण्यासंदर्भात) करून मोजले जाते. आणि कर्ज करार कर्ज वेळी समारोप मानली जाते करताना, केवळ पैसा किंवा गोष्टी हस्तांतरण यावर अंमलात येतील की आणखी एक महत्त्वाचा फरक आहे तेव्हा करार पैसे साइन इन जारी अंतर्गत कर्तव्ये निर्दिष्ट करते. या कर्ज की कर्जदार करार व्याज भरावे लागते नाही सुचवते जे एक विशिष्ट फॉर्म आहे. त्यामुळे, तो फक्त रक्कम हात होता की द्यावी लागते. तथापि, सराव, तो आवश्यक विविध परिस्थितीत विचार आहे. त्यामुळे, संस्थापक एक बिनव्याजी कर्ज कर्जदाराच्या भाग आणि कर्ज देणारा बाजूला कर भरणा यांचा समावेश आहे. त्यामुळे या बाबी करणे आवश्यक आहे, की खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न कर मोठ्या वाढ होईल आणि फायदेशीर होणार नाही असे त्यांना वाटत होते नाही. मुख्य उद्दिष्टे, कर्ज हा प्रकार जारी आहेतः - मदत संस्थापक; - कंपन्या दरम्यान म्युच्युअल; - कर्मचारी किंवा व्यवसाय मालक आर्थिक आधार; - व्यवसाय प्रकल्प आर्थिक,; - मित्र आणि कुटुंब मदत करा. रक्कम अपरिहार्यपणे 1000 रूबल्स एक करार असणे आवश्यक आहे अधिक असेल तर. आपण असे न केल्यास, नंतर तो अशक्य loaned पैसे देत असल्याचे दर्शवणारी. स्वतंत्र दरम्यान घडणे व्यवहार व्यक्ती आणि कायदेशीर अस्तित्व (आणि कर्मचा दरम्यान, उदाहरणार्थ), नियामक एक विशेष नियंत्रणासाठी प्रदान राज्य. सर्व केल्यानंतर, अशा एक मार्ग बेकायदेशीर अर्थ उत्पन्न गैरव्यवहार मार्ग एक आहे. त्यामुळे, आपण जेव्हा लेखा विभागात एक करार अतिशय काळजीपूर्वक, विशेषतः कर समस्या गणना असणे आवश्यक आहे. मुख्य धोका अर्थ मंत्रालय, बाजार व्याज दर तर कंपनी फायदा होऊ शकतो की नफा कर आकारणी खात्यात घेणे आहे पाहिले. तथापि, नियामक ते मोठ्या प्रमाणात चालते आणि मोठ्या प्रमाणात रक्कम समावेश तरच कर्ज लक्ष. करार कर खालीलप्रमाणे मोजले जातातः - आयकर (काही बाबतीत, समस्या वादग्रस्त आहे जरी) प्रदान केली जाणार नाही; - निधी वापर व्याज न करता, ते कर्जदार लाभ वैयक्तिक आयकर (एक नैसर्गिक व्यक्ती एक करार करत बाबतीत) खरं केले जाते की; - पैसे सरळ नाही म्हणून योगदान sots. fondy सूचीबद्ध नाही. संस्थापक एक बिनव्याजी कर्ज विशेष नियंत्रण अधीन नसेल, तर नोंदणी अडचणी, एक नियम म्हणून, उद्भवत नाही. केवळ अनुगामी समान आणि फार 600 000 प्रमाणात नियमितपणे केले जाईल की कार्यक्रम, अतिरिक्त समस्या उद्भवू शकतात. कर्ज लांब उपक्रम अंमलबजावणी, तसेच व्यक्ती दरम्यान दोन्ही सामान्य केले आहे. विशेष म्हणजे, कर मत आणि खर्च किमान त्यांच्या जोखीम कमी करण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे की न्यायतत्त्वशास्त्र. संस्थापक, संस्था, व्यक्ती दरम्यान मुक्त कर्ज, तसेच कायदेशीर व्यक्ती शारीरिक आणि कायदेशीर व्यक्ती करार असू शकते. व्यक्ती तसेच व्याज इतर प्रत्येक कर्ज, आणि बिनव्याजी तत्वावर मानू शकतो. तथापि, ते ओलांडू शकत नाही 50 वेळा किमान वेतन. पण कोणत्याही रक्कम देणे मान्य गोष्टी आहे. कर सर्वात सोपा येथे गणना. या प्रकरणात, रस नाही व्यवसाय संबंधित नाहीत फक्त प्रकरणांमध्ये परवानगी जाईल. काहीवेळा तो पक्ष नाही व्यवहार व्यावसायिक लाभ करण्याची गरज नाही हे सिद्ध करणे आवश्यक आहे. अनुकूल कंपन्या एकमेकांना मदत करू शकता. मग, कर्जदाराला कर परिणाम येऊ नाही. पण प्रश्न कर्जदाराला वादाकरता पुढे आणणे किंवा मांडणे आहे. त्यामुळे, लेख 41 टॅक्स कोड च्या आधारावर कर अधिकारी कर्जदार उत्पन्न कर्ज एक परिणाम म्हणून अ की, तो त्यावर व्याज वाचवतो म्हणून विश्वास आहे. त्यामुळे व्यवहार अहेतुक सेवा मानली जाते. तथापि, कर अधिकारी लवाद न्यायाधिकरण सहमत नाही. सहसा तो एक सेवा विचार करू नका नाही उत्पन्न आहे, आणि म्हणून नफा कर चार्ज करण्यासाठी काहीही नाही म्हणून. त्यामुळे वाद पहाणी करणे, सुरक्षितपणे न्यायालयाने उजवीकडे अर्ज करू शकतात तर. कंपनी यशस्वी असेल, तर तो एक कठीण परिस्थितीत होता, जोरदार आपले महत्त्वाचे कर्मचारी मदत करण्यासाठी एक स्थान आहे. मग तो संस्थापक पासून बिनव्याजी कर्ज जारी केले जाऊ शकते. कर्ज मळा यावर एक स्वतंत्र देणे आवश्यक आहे वैयक्तिक आयकर, रक्कम तीन मात्रेत मिळण्याची दर आहे. कर्जदार एक कर्मचारी असल्यास, कर भरणा पगार एक निश्चित रक्कम ठेवण्यासाठी योग्य असू शकते. दुसर्या प्रकरणात, लेखा कर दस्तऐवज सादर केला. मग कर्जदार स्वतंत्रपणे कर देते. हा नियम अपवाद असू शकते. त्यामुळे, पुढे गृहनिर्माण खरेदी करण्यासाठी वापरले जातात तर, कर क्रेडिट मिळू शकते. मग वैयक्तिक इन्कम टॅक्स भरणे आवश्यक होणार नाही. हे संस्थापक केवळ करार मुक्त कर्ज नाही जारी केले जाऊ शकतात - एक कायदेशीर अस्तित्व. कधी कधी संस्था स्वतः व्यक्तीच्या खाजगी ते मिळविण्यासाठी ते करत आहात. मग आपण बँक व्याज भरावे लागते नाही. कोणीतरी संस्थापक आणि संस्था दरम्यान या बिनव्याजी कर्ज करार फक्त पैसे सरकत आहे की विचार होईल. तथापि, तो नाही आहे. कर्जदार वाहून नाही कर ओझे. पण संस्थापक गैरफायदा प्राप्त करू शकता. बाजारातील परिस्थिती व्याज न कर्ज प्रदान करण्यासाठी - एक विशिष्ट वर्गात न बसणारा परिस्थिती. तथापि, कर बँक वैयक्तिक आयकर देऊन आवश्यक असू शकते. मग, व्याज दर म्हणून मिळण्याची दर गणना केली जाईल. कर्ज लहान आणि दीर्घकालीन मध्ये जारी केले जाऊ शकतात. त्याच्या डिझाइन विविध बारकावे खात्यात घेणे आवश्यक आहे. न करार अडथळे नाही व्याज भरावे. तथापि, करार विहित नाही तर, डीफॉल्ट ते भरपाई साठी विचारात घेतले जाईल, स्वारस्य वर शुल्क आकारले जाईल. कसे सामग्री असल्याचे, तसेच एक निश्चित फॉर्म म्हणून, करार नाही. पण अपरिहार्यपणे खालील डेटा रेकॉर्ड करणे आवश्यक आहेः - जारी रक्कम, - अचूक परिपक्वता तारीख; - आवड नाही शुल्क आकारले जाणार नाही की संकेत; - संस्थापक परत प्रचालन प्रक्रिया; - एक आणि इतर तपशील; - पैसे रोख किंवा अन्यथा हस्तांतरित आहे किंवा नाही; - उशीरा पैसे दंड; - वाद निकाली यंत्रणा; - इतर विविध परिस्थिती. संस्थापक पासून बिनव्याजी कर्ज, जे खाली पाहिले जाऊ शकते एक नमुना एक तुकडा सह प्रत्येक पक्षाला दोन प्रती केली आहे. आपण कर्जदार पैसे पाठवा, तेव्हा रक्कम सूचित करणे आवश्यक आहे, जे समस्या आणि करार पक्षांनी तपशील तारीख रक्कम प्राप्त की एक पावती, लिहितात. सर्व अटी आणि दस्तऐवजात स्पेलिंग अटी, विद्यमान कायदे नाकबूल करू शकत नाही. नोंदणी करार व दस्तऐवजावर दाखले देणारा अधिकारी करण्याची आवश्यकता नाही आहे. पण पक्ष किंवा दोन्ही इच्छा एक तर, आपण हे सुद्धा करू शकता. तथापि, पक्ष नियम स्वाक्षर्या त्यानुसार पुरेसे आहे. सामान्य करार परिशिष्ट परतफेड वेळापत्रक आहे. हे देखील सूचित आणि इतर महत्वाचे मुद्दे शकते. पक्ष एक असल्याने - एक कायदेशीर अस्तित्व, नेहमीच्या पद्धतीने कर्मचारी संस्थापक व्याज मुक्त कर्ज प्राप्त नाही देणे. परिणाम अशा कराराच्या मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि कर्ज देणारा आणि कर्जदार प्रतिनिधी होते की आहेत. कायदे अंतर्गत परवानगी नाही. म्हणून, कंपनी संस्थापक स्वतंत्र निर्णय, परिस्थिती बाहेर मिळविण्यासाठी. नंतर हा करार संस्थेचे नाव या महत्त्वाच्या संस्थेच्या स्थापनेत एक साइन इन केले आहे. कर्ज मंजूर निर्णय स्वतंत्रपणे रेकॉर्ड केले. करण्यासाठी करार मानू एक परिचर एक पासपोर्ट किंवा दस्तऐवज आपली ओळख certifying प्रदान करण्यासाठी पुरेसे आहे. करार दस्तऐवज डेटा निर्दिष्ट करते. उत्पन्न विशेष कागद पुरावा नियोक्ता म्हणून, ही माहिती आधीच उपलब्ध आवश्यक आहे आहे. त्याच वेळी, बँक आवश्यक आहे आणि व्यवहार इतर दस्तऐवज शकते. कोणतेही दस्तऐवज आवश्यक आहे प्रदान करण्यासाठी नियोक्ता. बहुतांश घटनांमध्ये, तो मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्हे किंवा इतर अधिकारी या कायदेशीर अस्तित्व वतीने कृती करण्यास अधिकृत. स्वाभाविकच, करार लेखा एक ऑपरेशन सारखे, त्याच्या निष्कर्ष अशक्य होईल सिद्ध आणि आवश्यक असल्यास कर देणे लेखन आणि योग्य स्वरूपात असू, किंवा इतर आवश्यक आहे. रोख मशीन कर्ज परतफेड अंतर्गत, देणे वापरले नाही. या तिकीट कार्यालय जोरदार पुरेशी आहे. त्या दस्तऐवजात संस्थापक एक बिनव्याजी कर्ज दाखल्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. नमुना करार दिसले पाहिजे महत्वाचे आयटम समाविष्ट आहेत. हे कर्ज व्याज न देता येऊ शकतील. हे संस्थापक कर्ज क्षमा शकता जोडून वाचतो. मग कर्ज क्षमा स्वतंत्र निर्मिती केली. आपण संस्थापक, कर परिणाम आणि सार्वजनिक अधिकारी एक विशिष्ट नियंत्रण संभाव्यता एक बिनव्याजी कर्ज काढणे करण्यापूर्वी विचार करावा. दस्तऐवज सर्वकाही दावा जे आदेश, म्युच्युअल मदत नेहमी चांगला आणि मदत प्राप्त बाजूला, आणि त्या मध्ये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कुठे बैलगाडीला फुगे बांधले होते, लेझीमवर मुला-मुलींनी ठेका धरला होता, सर्वच ठिकाणी गोडधोड खायला केले होते. नवी कोरी पुस्तकं दिली होती. अशा उत्साही वातावरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी' शाळा प्रवेशोत्सव' केला. अनेक गावांमध्ये मान्यवर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावत मुला-मुलींचे स्वागत केल्याने वेगळेच वातावरण गावोगावी निर्माण झाल्याचे दिसत होते. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटांतील सर्व बालकांची नियमित शाळेत १०० टक्के पटनोंदणी होण्यासाठी तसेच एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या प्रथमदिनी 'शाळा प्रवेशोत्सव'कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या शाळाभेटींचे नियोजन केले होते. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रथम दिनानिमित्त शाळेत हजेरी लावून इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत केले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी संजीवन वि. मं. चंदूर (ता. हातकणंगले) , आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी वि. मं. मिणचे (ता. हातकणंगले), आमदार उल्हास पाटील यांनी कन्या वि. मं. दत्तनगर (ता. शिरोळ), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कुमार व कन्या वि. मं. (गडमुडशिंगी, ता. करवीर), उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी कुमार वि. मं. (कळे, ता. पन्हाळा), शिक्षण सभापती अंबरिष घाटगे यांनी वि. मं. गलगले (ता. कागल), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी कन्या वि. मं. वाकरे (ता. करवीर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी वि. मं. कोथळी (ता. करवीर), शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी कुमार व कन्या वि. मं. कुंभोज (ता. हातकणंगले) यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत, मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ दिले.
मुंबई, 06 जूनः बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप कुमार यांना आज सकाळी खार येथील हिंदुजा (PD Hinduja Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांना सध्या ICU मध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांचे फॅमिली डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचलं आहे. त्यामुळं एवढ्या लवकर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळणं अवघड आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिलीप कुमार यांच्या चाहत्यांनी काळजी करु नये लवकरच ते घरी परततील असं आश्वासनही डॉक्टरांनी दिलं आहे. आज सकाळी 8. 30 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं कमतरता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या जागतिक विक्रमातून बाबर आझमने हाशिम अमलाचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विक्रम मोडणारे शतक ठोकले. आझमने १३९ चेंडूत १५८ धावा केल्या आणि अनेक जुने विक्रम मोडले. तसेच अनेक नवीन विक्रम देखील नोंदवले. या डावाच्या जोरावर बाबर आझमने चार मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात शतक पूर्ण करत बाबर आझमने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात आणि कर्णधार म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रमही त्याने केला. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही सामन्यात कर्णधाराकडून इतक्या धावा केल्या नव्हत्या त्यामुळे हा विक्रमही त्याच्या नावावर झाला. तसेच सर्वात कमी डावात १४ एकदिवसीय शतके पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम बाबर आझमच्या नावावर झाला आहे. बाबर आजमने ८१ सामन्यांमध्ये १४ एकदिवसीय शतके पूर्ण केली. वेगवान १४ एकदिवसीय शतकांच्या यादीत २६ वर्षीय हशिम अमला (८४ सामने), डेव्हिड वॉर्नर (९८ सामने), विराट कोहली (१०३ सामने) आणि क्विंटन डी कॉक (१०४ सामने) यांचा समावेश आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने १३९ चेंडूत १५८ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. पाकिस्तानने इंग्लंडसमोर ३३२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु त्यांना ३ गडी राखून पराभव पत्करावा लागला.
कार्ल एरिक माहित होतं की तो मूर्ख नव्हता. तो पण रॉल्फला धडा शिकवणार. तो पहिल्यापासून गणिताच्या अंकात वेगवान होता. आता तो इंग्रजी शिकण्यासाठी खूप मेहनत करत होता. मिस लिंडने त्याला एक पुस्तक उधार घेवू दिले. त्याने घरच्या लांबवरच्या रस्त्यावर एना स्टिनाचे पुस्तक वाचले. आपलं काम करतांना सुद्धा तो वाचत एक दिवस कार्ल एरिकने आपल्या आईला वाचून दाखवलं. ती केवळ काहीच शब्द समजू शकली. पण ती हसली आणि ती म्हणाली की तो एना स्टिनासारखा हुशार आहे. "तू शिकारीच्या जाळ्याच्या बाबत इतका चतुर नाही," जोनास म्हणाला. "तू यांची इतकी चिंता करू नको." कार्ल एरिक पण जोनास शिकारीच्या जाळ्याबाबत योग्य होता. जेव्हा कार्ल एरिकने जाळ्याचे स्थान बदलले आणि त्यात वेगवेगळा चारा अडकवला. पण तरीही तो कोणतीच शिकार पकडू शकला नाही. त्याने घराची जबाबदारी कशी उचलली. त्याचे वडील आणि काका काय म्हणतील. ४. आगंतुक दहा आठवड्यांचे सत्र आता जवळजवळ संपत आले होते. कार्ल एरिक आता राल्फ इतक्या वेगाने इंग्रजी वाचत होता. मिस लिंड खूप खुश होती. त्यांनी कार्लला हेनरिकच्या जवळ बसवले. आता दिवस थंडीचे आणि अंधारे झाले होते. जमिनीवर खूप बर्फ पडले होते. घरातील पुरुष जाऊन आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला होता. एका सकाळी कार्ल एरिक सोडून सगळेजण शहरात गेले. तो विस्तव आणि जनावरांची काळजी घेण्यासाठी घरीच राहिला होता.
मुंबई : स्टार क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या फॅन्सचे अनेक विचित्र अनुभवावे लागतात. हे फॅन्स आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक किस्सा टीम इंडियाचा कर्णधार आणि सध्या रॉयल चॅलेंजर्सचं नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने सांगितलाय. एका फॅनने रक्ताने लिहिलेलं लेटर पाहून तो कसा आश्चर्यचकीत झाला होता, याचा त्याने पहिल्यांदाच खुलासा केलाय. जगभरात कोहलीचे फॅन्स आहेत. खासकरुन महिला त्याच्या खेळाच्या आणि त्याच्या लूक्सवर जीव ओवाळतात. पण कोहलीसोबत रक्ताने लिहिलेल्या लेटरची घटना दिल्लीत घडली होती. विराट कोहलीने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला एक रक्तीने लिहिलेलं पत्र मिळालं होतं. ही गोष्ट फार विचित्र होती. ही घटना दिल्लीत घडली होती. मी माझ्या कारने जात होतो. दरम्यान काही फॅन्सना ऑटोग्राफ देण्यासाठी मी कारच्या खिडकीची काच खाली केली. अशातच माझ्यासमोर हे पत्र आलं. मी हे बघू शकलो नाही की, ते कुणी दिलं. त्यावर माझं नाव लिहिलं होतं. ते मी माझ्या सुरक्षा रक्षकांकडे दिलं. मी ते घेऊच शकत नव्हतो. ते खूप घाबरवणारं होतं'. आयपीएलसाठी खेळाडूंना वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागतं. अशात अनेकदा फॅन्सना खेळाडूंसोबत फोटो काढण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळते. असाच आणखी एक मजेदार किस्सा विराटने शेअर केला. कोहलीने सांगितले की, 'मी एकदा फ्लाईटमध्ये होतो. मी हेडफोन लावून सीटवर झोपलो होतो. अचानक मला जाग आली आणि मी पाहिले तर माझ्या मांडीवर एक लहान मुल होतं. कुणी माझ्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी घेत होते. मी चष्मा घातला होता. त्यामुळे त्यांना वाटले असेल की, मी त्यांना बघतोय. पण मी झोपेत होतो'. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
मनसे कार्यकर्ते याग्निक शिंदे यांची आत्महत्यानाशिकः मनसेचे कार्यकर्ते याग्निक शिंदे यांनी गंगापूर रोड येथील फ्लॅट मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. कै. नंदू आबा शिंदे यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी सटाणा येथे स्वतः च्या कारमध्ये गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांचे वर्षश्राध्द मागील आठवड्यात झाले. त्यांनतर काही दिवसातच याग्निक शिंदे यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेनंतर जिल्हा रूग्णालयात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. गंगापूर रोड येथील सम्राट ट्रॅपिकोना या बिल्डिंग मधील सी विंगच्या दहाव्या मजल्यावर बुधवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान शिंदे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, याग्निक शिंदे यांच्या जवळ तसेच संबंधित फ्लॅट मध्ये अद्याप कुठलीही चिठ्ठी आढळून आलेली नसल्याचे गंगापूर पोलिसांनी सांगितले. शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याच इमारतीच्या बी विंग मध्येही आठ दिवसांपूर्वी अभ्यासाच्या ताण तणावातून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. मागील वर्षी याग्निक शिंदे यांचे वडील नंदू आबा शिंदे यांनीही आत्महत्या केली होती. त्यांचा काही दिवसांपूर्वीच प्रथम पुण्यस्मरण पार पडले. वडिलांच्या अकाली निधनानंतर याग्निक यांनी कुंटुंब तसेच त्यांचे सामाजिक कार्य अत्यंत खंबीरपणे पुढे घेऊन पुढे जात होते. नवीन नाशिक सह शहरभरात हितचिंतक असलेल्या कुटुंबात अश्या प्रकारची दुसरी घटना घडल्याने सर्वदूर हळहळ व्यक्त केली जात आहे.
उमरगा - महिलांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा आदर्श घेऊन आपले जिवन आदर्शमय केले पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले. तालुक्यातील पेठ सांगवी येथे प्रशिका फाउंडेशनच्या वतिने माता रमाई जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींंना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अॅड. दिलीप निकाळजे, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, अॅड. शितल चव्हाण, न्या. कुणाल वाघमारे, सरपंच सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी अवंती किरण सगर, साखराबाई सुरवसे, सिंधुबाई बब्रुवान सुरवसे, मिनाबाई सुखसेन सुरवसे, भारतबाई किसन सुरवसे यांच्यासह अन्य महिलांना रमाई पुरस्कारानेे गौरविण्यात आहे. याचबरोबर प्रशासनातील जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, कुणाल वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशासक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. आशा कार्यकर्तींना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित केले. कार्यक्रमास मिनाक्षी निळकंठ राठोड, हरिदास भोसले, माजी सरपंच गणेश पाटील, प्रकाश सुभेदार, लक्ष्मण कांबळे, महादेव लोहार, बुद्धिवंत कांबळे, दुशासन सुरवसे, राजेंद्र सुरवसे, दिनेश पाटील, सुनिल माने, केरनाथ कांबळे, विजयानंद सुरवसे आदींची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन व आभार उमेश सुरवसे यांनी केले.
बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा । Deshdoot\nGokul Pawar November 21, 2019 7:13 pm\nनाशिक । जिल्ह्यात रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता बियाणांची मागणी केली आहे. जिल्ह्याकरिता 1 लाख6हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून महाबीज, राबिनी व खासगी कंपन्यांकडून आतापर्यंत 22 हजार 200 क्विंटल बियाणांचा जिल्ह्यात पुरवठा झाला आहे.\nजिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल व भुईमूग या रब्बी हंगामातील पिकांकरिता 1 लाख6हजार 292 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत महाबीज कंपनीचे5हजार 332 क्विंटल, राबिनीचे 920 क्विंटल तर खासगी कंपन्यांचे 15 हजार 948 क्विंटल असे एकूण 22 हजार 202 क्विंटलचा पुरवठा जिल्ह्यात झालेला आहे. यामध्ये ज्वारी 119 क्विंटल, गहू 18 हजार 138 क्विंटल, मका 318 क्विंटल, हरभरा 3625 क्विंटल याप्रमाणे बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.\nअतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेल्या क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्याच्या आशेवर असलेल्या शेतकर्यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. जमिनीला पेरणी योग्य वाफसा नसल्याने जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला काहीसा उशीर होत आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.\nतर अतिवृष्टीमुळे महापुराच्या तडाख्यातून सुटलेला पिकांना फटका बसला. खरीप हंगाम हातचा गेलेला असताना उरली-सुरली काढणी योग्य झालेल्या पिकांना परतीच्या पावसाने तडाखा दिला. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची कापणी लांबत गेली. महापूर आणि अतिवृष्टीने खरीप हंगामातील भरपाई रब्बी हंगामात करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे.\nरब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्यासाठी 70 हजार 764 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. हरभरा, उडीद, मूग अशा कडधान्यांचे 41,184 हेक्टर क्षेत्र निश्चित केले.
Railway Administration on Resuming Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेन १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं असलं तरी रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेमुळं संभ्रम वाढला आहे. हायलाइट्सः मुंबईः येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा मर्यादित वेळेत सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसं पत्र मध्य व पश्चिम रेल्वेला देण्यात आलं आहे. त्यामुळं एकीकडं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असतानाच रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या भूमिकेमुळं संभ्रम वाढलं आहे. (Railway Administration on Resuming Mumbai Local Train) राज्य सरकारनं दिलेलं पत्र आम्हाला मिळालं आहे. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या सरकारच्या मागणीबाबत रेल्वे बोर्डाला कळवण्यात येईल. बोर्डानं मान्यता दिल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. त्यामुळं लोकल ट्रेनमधून १ फेब्रुवारीपासूनच प्रवास करता येणार की आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. ठराविक वेळेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करताना गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार, कोणत्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देता येईल, याचा सविस्तर तपशील सरकारनं रेल्वेला दिला आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं आता बोर्डाकडं बोट दाखवलं आहे.
लोहा : तालुक्यातील कौडगाव येथील चार तराफे पकडून ते जाळून टाकण्यात आले. तसेच अवैध उपसा केलेली ४५ ब्रास वाळूचा लिलाव महसूल प्रशासनाने केला. या कारवाईत नायब तहसीलदार राम बोरगावकर, तलाठी मनोज जाधव, संदीप कल्याणकर, सतीश शिंदे, सरोदे, कावळे, मांडवगडे, कोतवाल, विठ्ठल ढेपे, जोंधळे आदींचा समावेश होता. हदगाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने या कामाचा दर्जा व्यवस्थित झाला नसल्याची तक्रार लोकांनी केली आहे. कामाचा दर्जा खालावलेला असताना याकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. तडे गेलेल्या ठिकाणी केवळ मल्लमपट्टी करण्याचा प्रयत्न संबंधितांकडून केला जात आहे. फुलवळ : मराठी पत्रकार संघाची फुलवळ कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष परमेश्वर डांगे, सचिव दिगंबर डांगे, सल्लागार डॉ. प्रदीपसिंह राजपूत, सदस्य धोंडिबा बोरगावे, मधुकर डांगे, विश्वंभर बसवंते, सचिन मंगनाळे, एड. उमर शेख. बहाद्दरपुरा : येथील रहिवासी ज्योती राजेश वंजे यांना पुणे येथील आयोजित बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट स्पर्धेत बेस्ट मेकअप आर्टिस्ट पारितोषिक देण्यात आले. पुणे येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. भोकर : तालुक्यातील आंबुलगा येथील २२ वर्षीय विवाहितेचा माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. देगलूर : शहरातील शिवनेरी नगर येथील संतोष नाईकवाडे यांचा मोबाईल ५ मार्च रोजी चोरीला गेला. त्यांनी हा मोबाईल खुर्चीवर ठेवला होता. नजर चुकवून तो लंपास करण्यात आला. मोबाईलची किंमत २७ हजार रुपये होती. देगलूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. किनवट : घोडीफाटा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर किनवट पोलिसांनी ५ मार्च रोजी धाड टाकली. यात २ हजार ६० रुपये जप्त करून एकास ताब्यात घेण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. किनवट : येथील गजानन महाराज संस्थानमध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनामुळे यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. फक्त महाप्रसादाचे पाकीट वाटप करण्यात आले. मंदिरातही सुरक्षित अंतर ठेवून भाविकांना दर्शन देण्यात आले. नायगाव : तालुक्यातील देगाव येथील अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड करणाऱ्या आरोपी शिक्षकाची आता पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. सपोनि के. एस. पठाण यांनी ही माहिती दिली. १ मार्च रोजी ही घटना घडली. बीट जमादार बारी यांनी गुन्हा नोंदवला होता. सुरुवातीला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. उमरी : मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी हे मुलबाळ होत नसल्याने रुग्णालयात उपचार करण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ करीत होते. नांदेड : येथील नल्लागुट्टा चाळमधील दत्त मंदिरात महाआरती व भंडारा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अनिरुद्ध शिरसाळकर, पोलीस कर्मचारी राठोड, नितीन जैन, पांडे, डॉ. तम्मेवार आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर व्यवस्थापनाकडून सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजित पाटील, संजय टीके, गणेश अण्णा, दिलीप गोटींगलल्ला, अशोक विना आदी उपस्थित होते.
मराठा चेंबर ऑफ कॅामर्स, इंडस्ट्रीज एन्ड एग्रिकल्चर उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रांच्या विकासाकरता १९३४ पासून कार्यरत आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषीवर अवलंबून असल्याने बहुतांश नागरिक सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
गुरुवारी ५१५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यातील ६०३, मोहाडी ८८, तुमसर ८९, पवनी १३१, लाखनी १६२, साकोली १०७ आणि लाखांदूर तालुक्यात ८२ असे १२६२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ७२ हजार ४९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ३३ हजार ७२२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर २१ हजार १२६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४९४ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. जिलह्यात सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यातील झाली आहे. जिल्ह्यात ४९४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, त्यातून २४१ व्यक्ती एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी तालुक्यात ४४, तुमसर ७३, पवनी ५४, लाखनी २८, साकोली ३२, लाखांदूर तालुक्यात २२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १. ४६ टक्के असून, मृत्युदर १. ४६ टक्के आहे.
पाचोरा :- दिवसा गणीत ग्रामसेवक संवर्गावरील कामाचा वाढता ताण-तणाव यातून वाढणारे अपघाताचे प्रमाण आणि मृत्यू पश्चात कुटुंबाची होणारी वाताहात लक्षात घेता अशा कुटुंबाचा आधार बना असे भावूक उद्गार राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांनी पारोळा ग्रामसेवक पत संस्थेच्या वतीने कुटुंबास १० लाख रुपये अपघाती विमा रक्कमेचा धनादेश वितरण प्रसंगी केले. पाचोरा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आयोजित धनादेश वितरण आणि नव निर्वाचित जिल्हा संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार कार्यक्रमा पार पडला. गत वर्षी पाचोरा तालुक्यातील ग्रामसेवक जे. बी. सोनवणे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांचे मृत्यू समयी याच दरम्यान चे काळात इतरही बांधवांचे झालेले अपघाती निधन यामुळे घरातील कर्ता कमविता माणुस अचानक निघून जाण्याने कुटुंबाची होणारी परवड लक्षात घेता अशा कुटुंबाचा आधार बनले पाहीजे. यासाठी संजीव निकम यांनी जिल्हा ग्रामसेवक युनियन व पारोळा पत संस्थेच्या संचालकांशी संवाद साधत भविष्यात या प्रकारे कोणत्याही कुटुंबाची परवड होवू नये. यासाठी तत्कालीन चेअरमन विलास महाले आणि संचालक मंडळाशी चर्चा करत संस्थेच्या प्रत्येक सभासदांचा १० लाखाचा रुपयाचा अपघाती विमा संरक्षणाची तरतूद पारोळा ग्रामसेवक पत संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. या उपक्रमाची प्रत्यक्षात अंमलबजावणी मृतांचे कुटुंबाला धनादेश वितरण करुन आज पाचोरा येथे संस्थेचे चेअरमन सुनिल दगा पाटील व सर्व संचालक मंडळाचे हस्ते व सुनिल पाटील (ग. स. संचालक), नंदकुमार गोराडे (जिल्हाअध्यक्ष), संजय भारंबे (सरचिटणीस), जिल्हा ग्रामसेवक युनियन व प्रशांत तायडे (जिल्हा सरचिटणीस), जि. प. कर्मचारी महासंघ जि. प. जळगांव व जिल्हा ग्रामसेवक संघटना पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितत करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना संजीव निकम म्हणाले की, भविष्यातील कामकाजातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी, ग्रामसेवकांना अडचणीत आणून कारवाई करतात. त्यामुळे आपसातील हेवे दावे बाजूला ठेवून सर्वांनी काम केले पाहीजे. ग्रामसेवक पत संस्था अधिक सक्षम करत आपल्या सर्वांच्या अर्थिक हीताचे दृष्टीने पारोळा पतसंस्था अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याची भुमिका त्यांनी यावेळी मांडली. यातून आगामी ४ ते ५ वर्षात अत्याल्प दराने कर्ज पुरवठा आणि तोही १२ ते १५ लक्ष रुपयांपर्यंत करण्याचे लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यू पश्चात्ताप वारसांना भरीव मदत करणारी पत संस्था म्हणून राज्य भरातील संवर्गा पुढे नवा आदर्श पारोळा पतसंस्थेंने निर्माण केला आहे. असे ही निकम यांनी सांगितले. ग्रामसेवकांची पतसंस्था भविष्यात अधिक आर्थिक सक्षम होणे साठी संस्थेत राजकारण कुणी करु नये असे ही उपस्थितांना सल्ला निकम यावेळी यांनी दिला. या ऐवढ्या मदतीवरच न थांबता राज्य शासनाचे वतीने काढण्यात आलेल्या विमा सुरक्षा कवच योजने अंतर्गत ही लवकरच पुन्हा १० लक्ष रुपये मिळवून देण्या साठी कुटुंबा प्रति कटीबध्द असल्याचे ही ते म्हणाले. राज्यभर ग्रामसेवक संघटनेच्या सर्व टीमने आता पर्यत संवर्ग हीता साठी केलेल्या कामकाजाचा लेखाजोका मांडत ग्रामसेवकांना त्यांनी ज्ञात केले. यावेळी ग. स. संचालक सुनिल पाटील, जळगांव जिल्हा ग्रा. से. संघटना (जिल्हाअध्यक्ष) नंदकुमार गोराडे, संजय भारंबे (जिल्हा सरचिटणीस), प्रशांत आर. तायडे (जिल्हा सरचिटणीस जि. प. कर्मचारी महासंघ जि. प. जळगांव) यांनी ही शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. यावेळी जळगांव जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे (जिल्हा उपाअध्यक्ष) आशोक खैरणार, कृष्णा पाटील (कोषाध्यक्ष),रुपाली साळुंके (महीला उपाअध्यक्षा), कल्याणी पाटील (महीला संघटक),पारोळा पत संस्था संचालीका योगिता हिवराळे, संचालक डी. सी. इंगळे, जी. एम. पवार (मानद अध्यक्ष), गौतम वाडे (मानद सचिव), सुरेश पाटील लेखा परिक्षक, पारोळा पत संस्था चेअरमन सुनिल दगा पाटील, माजी चेअरमन तथा चाळीसगांव तालुका अध्यक्ष विलास महाले, आर. पी वाघ, सचिव येवले, भडगांव अध्यक्ष जीभू पाटील, नवल पाटील, (एरंडोल), अध्यक्ष पटाईत आप्पा, माजी कार्यअध्यक्ष हिलाल पाटील, बागुल आण्णा वि. अ. (चाळीसगांव), माजी अध्यक्ष अतुल पाटील, पी. व्ही. तळेले सचिव यावल तालुका, बन्सी चव्हाण सचिव जामनेर तालुका आणि संपूर्ण जिल्हा भरातील सर्वांचे लाडके सतत निस्वार्थ भावनेतून काम करणारे राकेश कोतकर (चाळीसगांव) यांचे सह तालुका अध्यक्ष, सचिव, जिल्हा भरातून आलेले विविध पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील बांधवांचे मदतीसाठी पाचोरा तालुका अध्यक्ष पी. आर. पाटील, सचिव सतीष सत्रे,पी. ए. चव्हाण,विकास पाटील,अविनाश पाटील,आर. डी. पाटील, बैसाणे, शिंदे मडम, शरद पाटील आणि संपूर्ण पाचोरा तालुका टीमने कैतुकास्पद नियोजन करुन कार्यक्रम यशस्वीतते साठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पी. आर. पाटील, तर आभार सचिव सतिष सत्रे यांनी मांडले. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, जिल्हासरचिटणीस संजय भारंबे, मानद अध्यक्ष जी. एम. पवार, मानद सचिव गौतम वाडे, जिल्हाकोषाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हाउपध्यक्ष अशोक खैरणार, जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हासरचिटणीस प्रशांत तायडे व संस्थेचे सर्व संचालक पाचोरा तालुका अध्यक्ष पी. आर. पाटील, सचिव सतिष सत्रे, भडगांव तालुका अध्यक्ष /सचिव दोन्ही तालुका ग्रामसेवक ग्रा. वि. अ मोठ्या संखेने उपस्थित होते.
तूळ स्त्री - प्रत्यक्ष स्त्री, मोहक शिष्टाचार आणि मोहक अभिजात पूर्ण. तसेच ठोस वाद करू शकता नर तर्कशास्त्र आणि कोणत्याही वाद हरवले. तथापि, पुरुष बाजूला kakyh ओळख नंतर आपण समोर जाऊ शकता. वादविवाद तिला आकर्षित, आणि ती पूर्ण न्याय परिस्थिती दोन्ही बाजूंना असते. तूळ स्त्री फक्त एक वितर्क सुरू करू शकता आणि आपल्या योगदान, फक्त काही यादृच्छिक टिप्पण्या आहे एका पूर्ण. ती आपण म्हणणं आहे, तर ती वेळोवेळी स्मित करू शकता. तुम्हाला माहिती आहे करण्यापूर्वी, आपण हास्य तिच्या चेहऱ्यावर आणि मोहिनी करून मंत्रमुग्ध वाटत असेल. या वेळी, ती आपल्या अंतः करणात तसेच विवाद जिंकलो असतो. अर्थात, आपण या विचार करणार नाही अशा काळजीपूर्वक संतुलित आणि तार्किक मुद्दे सह याची खात्री पटते कारण. एक स्त्री तूळ प्रोफाइल ठराविक वैशिष्ट्ये सुंदर आणि संतुलित करण्यासाठी सतत गरज समावेश आहे. बहुतेक - तो आपण येथे सर्व विश्वास गमावला वाटत नाही अशा एक व्यवहारचतुर प्रकारे त्याच्या बाबतीत प्रस्तुत आहे. त्याच वेळी, तो आपले मत बदलणार हट्टी आणि सहज, तो आपल्या वितर्क अधिक तार्किक आणि खात्री नाही तर आहे. हे दृष्टिकोनातून दांडा नाही आणि आपले मत तिच्या स्वतः च्या म्हणून तिच्या साठी एक फरक पडेल, फक्त कारण आहे. लक्झरी पर्यावरण सारखे तूळ महिला आणि ढगळ, गलिच्छ वातावरण त्यांना उदासीन वाटते. एक स्त्री अशा परिचित तूळ खूप लांब होता कामा आहे, तर ते शारीरिक विकसित करू शकता. त्यापैकी सर्वाधिक लग्न नंतर काम. पैसे व्यतिरिक्त, या मुख्य कारण - खरं तर त्यांना, लग्न देखील भागीदारी योग्य आहे आणि दोन्ही भागीदारांना एकत्र कर्तव्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. तूळ स्त्री नाही संबंध वर्चस्व मागत आहे, आणि माझा नवरा नेहमी आदर तो पात्र नाही. त्याच वेळी, तो चुका बनवण्यासाठी किंवा चुकीचे निर्णय घेत त्याला प्रतिबंधित करते. तो पुढाकार घेते, आणि तो त्याच्या निर्णय परिणाम बाहेर गुळगुळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तो निर्णय विरोधात जाणार नाही, पण ते चुकीचे आहे तर, तो योग्य मार्गावर हळू हळू चालणे होईल. ती भावनिक आहे, पण एक मत लागत किंवा न्याय जात नाही. व्हा संशयास्पद व्यक्तिमत्त्व एक अद्वितीय वैशिष्ट्य महिला तूळ नाही. ती आपण पूर्णपणे विश्वास आहे, आणि आपल्या वैयक्तिक ई-मेल उघडणे तिच्या नजरेत चुकीचे आहे. ती सहज आणि उदार हस्ते तिच्या भावना व्यक्त करते. आपण या पैलू बद्दल तक्रार नाही. आकर्षक दृश्ये, सभ्य स्ट्रोक, सभ्य मिठी आणि प्रेमळ चुंबने नाही कमतरता असेल. लग्न केल्यानंतर, आपण एक घाणेरडा परत घरी जाऊ कधीच भेटणार नाही. सर्व काही आपल्या पत्नीला आपल्या लिव्हिंग रूममध्ये पासून, स्मार्ट असेल. मॅन तूळ स्त्री आणि तूळ एकमेकांना प्रेम. तूळ स्त्री बोलणे आवडतात, पण ती शांतपणे आपल्या समुद्रातून जात ऐकेल. हे सर्व महिला, प्रेम आणि प्रणय संबंधित आहेत. तथापि, काही विशिष्ट गंभीर स्थिती अनपेक्षितपणे अ, तेव्हा तो कोणत्याही माणूस म्हणून फक्त म्हणून मजबूत होईल.
आॅनलाइनमुळे ग्रामपंचायतीच्या विकासाला बसतोय खो? बिरवाडी : विकासकामे करताना विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी याकरिता शासनाने आॅनलाइन निविदा प्रक्रिया सुरू केली असली तरी या निविदा प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांनाच खो बसत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ३८ लाख ८ हजार रुपयांची विकासकामे आॅनलाइन निविदा प्रक्रियेमुळे प्रलंबित असल्याची माहिती बिरवाडीचे सरपंच लक्ष्मण पवार यांनी दिली. महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून सुमारे ३८ लाख ८ हजार रुपये एवढा निधी खर्च करून रस्ते विकास त्याचप्रमाणे सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे, मात्र आॅनलाइन प्रक्रियेमुळे या विकासकामांना चालना मिळण्यास विलंब होत आहे. आदर्शनगर ते वेरखोले या अंतर्गत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून यामुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता न झाल्यास या परिसरातील वाहतूक ठप्प होऊ शकते. आॅनलाइनमुळे तब्बल ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यातच जातो. १३ लाख १८ हजार एवढा निधी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर केला आहे, बिरवाडी जुनी बाजारपेठ रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता १४ लाख ९० हजार रुपये, तर कुंभारपाडा, बिरवाडी येथील समाज मंदिराकरिता १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र आॅनलाइन प्रक्रिया सक्तीची असल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांना लगाम बसत आहे. (वार्ताहर)
वॉशिंग्टन (अमेरिका) - भारत ही एक जिवंत लोकशाही असून नवी देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत 'स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स'चे समन्वयक जॉन किर्बी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जॉन किर्बी यांनी हे विधान केल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी भेटीविषयी जॉन किर्बी म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, दोन्ही देशांमधील मैत्री आणि व्यापारी भागीदारी आणखी भक्कम होईल. दोन्ही देशांमधील आर्थिक व्यापार फार मोठा आहे. अनेक पातळ्यांवर भारताला निश्चितच महत्त्व आहे. यासाठी विविध कारणेही आहेत. या सर्व सूत्रांवर बोलण्यासाठी आणि मैत्री वाढवण्याकरता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यास इच्छुक आहोत.
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या मुभा देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांत आंनद आणि उत्साहाचे वातावरण आहे. वणी : गेल्या दोन दिवसांत वणी आगाराला प्रवासी वाहतुकीतून एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून तब्बल ११३ दिवस बंद असलेली बाह्यजिल्हा बससेवा गुरूवारपासून पूर्ववत सुरू झाली. त्याला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या मुभा देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांत आंनद आणि उत्साहाचे वातावरण आहे. गुरूवारी पहिल्या दिवशी वणी एस. टी. आगाराने ४० फेऱ्यांचे नियोजन केले. प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी सर्व बसेस स्वच्छ धुवून सॅनीटाईज करण्यात आल्या. सकाळी ९ वाजता पहिली बस चंद्रपुरसाठी सोडण्यात आली. सोबतच नागपूर, यवतमाळ, वर्धासाठीही बसेस सोडण्यात आल्या. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी नागपूर, चंद्रपूर, वरोरा, यवतमाळ या मार्गावर ४३६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून जवळपास ५० हजार रूपये उत्पन्न आगाराला मिळाले. शासनाने खासगी वाहनाने बाह्य जिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक केली आहे. ई-पास मिळविण्यासाठी बºयाच प्रक्रियेतून जावे लागते. मात्र एस. टी. साठी ही अट शिथिल करण्यात आल्याने प्रवाशांना बसमधून ई-पासशिवाय कुठेही जाता येणार आहे. ही बाब जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची झाल्याने आता प्रवासी एस. टी. कडे वळणार आहेत. त्यातून एस. टी. उत्पन्न वाढणार असल्याने एस. टी. ला सुगीचे दिवस येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आगाराकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे एस. टी. आगार प्रमुख सुमेध टिपले यांनी 'लोकमत'ला सांगितले.
कडेपठार - Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी\nखंडोबाचे अवतार स्थान कडेपठार मंदिर, मंदिराचे मार्गावरील देवता, मंदिर यांचे माहिती सह सचित्र दर्शन\nजेजुरी गावातून जाणारा रस्ता जेजुरीगडा वरून जाणारा रस्ता कडेपठार दर्शन कडेपठार मंदिर कडेपठार परिसर\nजेजुरी नगरी व गडाचे नेरुत्य दिशेस कडेपठार हे खंडोबाचे मुळ स्थान आहे. ते 18°15'12′′N 74°8'59′′E वर वसलेले असून समुद्र सपाटी पासून ९९२ मीटर उंची वर व जेजुरी गावा पासून २५९ मीटर उंच आहे. जेजुरी जवळ आले की ही डोंगर रांग दिसते, कडेपठारी जाण्यासाठी जेजुरीगडा वरून व पायथ्या पासून असे दोन मार्ग आहेंत.\nजेजुरी मधील चिंचचें बागे पासून गाडी रस्त्याने कडेपठारचें पायथ्याला पोहचता येते, तेथून पुढे पायरी मार्गाने चढावे लागते\nजेजुरी गावातून सुमारे १.५ किमी. गाडी रस्त्याने विझाळा पर्यंत पोहचता येते.कडेपठार हे खंडोबाचे अवताराचे मुळस्थान. जेजुरीगडाचे पूर्वी पासून हे स्थान आहे. कडेपठार जेजुरी गावापासून सुमारे ४०० फुट उंचीवर आहे. या परिसरात जुन्या काळी वीज पडून झरा उत्पन झाला होता. म्हणून या परिसरास विझाळा म्हणतात. येथे पायथ्याला एक शंकराची मूर्ती असून शेजारील कमानी मधून पायरी मार्गास सुरवात होते\nया रस्त्यावर सुमारे ७५० पायरी आहे. जुन्याकाळी हा पायरी मार्ग नव्हता, डोंगरातील पायवाटेने चढावे लागत असे, अलीकडे कडेपठार ट्रस्टने भाविकांचे देणग्या मधून हा पायरी मार्ग उभारला. काही टप्पे पार करून गेले वर रस्त्याचे पश्चिम बाजूस एक घोडेउड्डाणाचे स्थान आहे. पुढील चढण पारकरून थाप्यावर पोहचता येते.\nरस्त्याचे पूर्व बाजूस एका पश्चिमाभिमुख डोंगरकपारीत बानुबाईचे स्थान आहे बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे. येथून पुढे थोडे चढले कि हा रस्ता जेजुरीगडा वरून कडेपठारी आलेल्या रस्त्याला मिळतो.\nजेजुरी गडाच्या मागील बाजूचे रस्त्याने हि येथे पोहचता येते.\nगडकोटाचे नेर्रूय्तेस दिसतो तो डोंगर माथ्यावरून जाणारा कडेपठारचा रस्ता.या रस्त्याने डोंगर चढणीचे सुमारे २.७ किमी. चालून येथे पोहोचता येते.\nगडाचे मागील विहिरी पासून पुढे गेले कि उत्तर दिशेस एक टेकडीवर जाणारा रस्ता दिसतो, टेकडीवर एक चोथरा असून दसऱ्याला शिलांगनास निघालेली पालखी येथे विसाव्यास थांबते. टेकडीच्या पूर्वेकडून जाणारे रस्त्याने पुढे दोन टेकडी मधील लवणात पोहोचतो\nयेथे हि एक चोथरा आहे. हा सुद्धा पालखीचा विसावा. येथून पूर्वेकडून जाणारा रस्ता रमण्यात जातो. पश्चिमे कडील चढणीचा रस्ता कडेपठारी जातो.\nचढण संपली कि सपाटीचा रस्ता लागतो येथे रस्त्याचे दोन्ही बाजूस दगडी वास्तूचे भग्न अवशेष आहेत. काही देवड्या मध्ये पादुका आहेंत.\nसमोर थोडे चढणीवर वेस आहे. या मार्गावर जुन्याकाळी ७ वेस असल्याचा उल्लेख आढळतो. आता फक्त तीनच वेस आहेंत.\nपुढे लाल मातीच्या टेकडीचा परिसर लागतो येथून मागे वळून पहिले कि जेजुरीचा संपूर्ण परिसर दिसतो\nपूर्वेस रमणादरी कडे खाली एका टोकावर एका लहान दगडावर एक मोठी शिळा दिसते, या विषयी अनेंक दंतकथा प्रचलित आहेत काही जण या सासू सुना असून सुनेचे पाठीवर सासू बसली आहे असे म्हणतात. काहीचे मते या भांडणे करणाऱ्या सवती आहेत, काही यांना म्हाळसा बानुचे भांडणे म्हणतात. एका नेसर्गिक रचणे बदलच्या या कथा मनोरंजकच\nपुढे चढण लागते तिचे मध्यावर इक पडकी ओवारी आहे. तीच्ये शेजारून पुढे जाता येते.\nसमोर एक वेस असून तिला सलग्न पूर्वेला एक उत्तराभिमुख ओवरी आहे भक्तांच्या विसाव्याची केलेली हि व्यवस्था.\nवेसी मधून थोडे पुढे जाऊन मागे वळून पहिले कि जेजुरी गड व मल्हारसागराचे विहंगम दृष दिसते\nकाही अंतर पुढे गेले कि पायरी मार्ग सुरु होतो\nपुढे चोथारा दिसतो तो दसऱ्याचे दिवशी शिलांगना वरून येणारे कडेपठार पालखीचा विसावा पूर्वेकडील रस्त्याने येवून येथे पालखी विसावते. पश्चिमे कडील पायरी मार्ग कडेपठारकडे जातो.\nया पायरी मार्गावर पश्चिम बाजूस एक पाण्याचे टाके आहे. समोरच डोंगराचे कपारीस पश्चिमाभिमुख देवडी आहे ती बाणाईची. बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे.\nपुढे एक चोथरा लागतो तो कडेपठार पालखीचा दसरा शिलांगनासाठी जातानाचा विसावा. येथील पूर्व बाजूचा रस्ता शिलांगनाचे जागे कडे जातो. पश्चिमेकडील रस्त्याने वेसी मधून कडेपठार कडे जाता येते.\nपुढे सपाटीचा रस्ता लागतो या रस्त्याचे दोन्ही बाजूना काही देवड्या लागतात. दक्षिणे कडील डोंगरावर कडेपठारचे मंदिर दिसते .व मध्ये जानाईदरा परिसर दिसतो.पुढे एक सुळका दिसतो हि सुसरटेंगी.सुळक्यावर एक चोथरा दिसतो तो कडेपठार पालखीचा दसरा शिलांगनासाठी जातानाचा विसावा या सुळक्याचे दक्षिणे कडून पुढे जाता येते.\nसुसरटेंगी च्या पुढे आले कि येथे उत्तरे कडून विझाळा परिसरातून येणारा पायरी मार्ग हि येथे येवून मिळतो.\nजेजुरीगडा वरून व विझाळ्या मधून आलेले दोनही रस्ते जिथे मिळतात. तिथेच समोर कडेपठार कडे जाणारे दोन रस्ते फुटतात. पश्चिमेकडील चढणीचे रस्त्याने काही मंदिरे लागतात.\nचढून वर गेले कि समोर पूर्वाभिमुख देवूळ दिसते ते हेगडी प्रधानाचे. हेगडीप्रधान हा गंगा जमनी शब्द असून कन्नड मध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असाच होतो. मार्तंड मल्लासुर युद्धात विष्णूनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले होते. त्यामुळे हेगडीप्रधान हा विष्णूचा अवतार मानला जातो. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडीप्रधानाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. जनश्रुती नुसार हेगडीप्रधान हा बाणाईचा भाऊ होता व बाणाई विवाहा नंतर तो खंडोबाचा प्रधान बनल्याचे सांगतात. या मंदिरात हेगडी च्या दोन मूर्ती आहेंत.\nया मंदिराचे पुढे पूर्वाभिमुख दुसरे देवूळ दिसते तो भगवानगिरीचा मठ. या मठात दोन समाधी असून मागील समाधी भगवानगिरी यांची असून पुढील समाधी त्यांची शिष्या ज्वालागिरी हिची आहे. भगवानगिरी हे सिद्धपुरुष होते. त्यांचे चमत्काराचे अनेक दंतकथा सांगितल्या जातात.\nपुढे खालून आलेला रस्ता इथे मिळतो. येथे पूर्वभिमुख मंदिर आहे ते साक्ष विनायकाचे.\nपार्वतीने आपली दासी जया हिस शंकराचे पुढील अवतारात, शंकराच्या पत्नीत्वाचा भाग देण्याचे वचन शंकर व गंगेच्या उपस्थितीत दिले होते. त्यास गणपती साक्ष होता पुढे खंडोबा अवतारात बाणाईचे रुपात शंकराने जयेस वरले. पण म्हाळसा अवतारातील पार्वतीने क्रोध प्रगट केला. तेव्हा गणपती साक्ष देण्यास आला, पण म्हाळसाने हि साक्ष नाकारली. पुढे विवाद मिटलेवर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्ताची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले, तो हा साक्षविनायक. खंडोबाचे दर्शन घेतल्यावर साक्ष विनायकाचे दर्शना शिवाय खंडोबाचे दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते\nपुढे मंदिराकडे निघाले वर रस्त्यापासून पश्चिमेस थोड्या अंतरावर डोंगराचे कडेस एक शेंदूरचर्चित शिळा दिसते ती विरभद्राची. विरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणी मधील देव, तो शंकरांचा अवतार मानला जातो. खंडोबाचे मनिमल्लासुरा बरोबरील युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व देत्यशेल् यांनी केलेली चक्राव्युह रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवणारे विरभद्राची यथे स्थापना केलेली आहे.\nरस्त्याचे पुर्वबाजूस कमानी जवळ नाग प्रतिमा आहे.\nपश्चिमेस पूर्वाभिमुख राममंदिर आहे. तीन कमानी सदर व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे मंदिर इस. १७९० मध्ये उभारण्यात आले. गर्भगृहात राम, लक्ष्मन सीता यांचे प्रतिमा व एक द्वीलिंग आहे. मंदिरा समोर एका मेघदंबरीत हनुमान प्रतिमा आहे.\nपुढे मंदिरा कडे जाताना एका पश्चिमाभिमुख देवडीत वाघजाईची मूर्ती आहे.तिचे देवडी शेजारी दक्षिणेस एका छोट्या कोनाड्यात खोकलाईचा तांदळा आहे.\nया रस्त्याने आपण कडेपठार मंदिराचे मागील बाजूस पोहोचतो. जुन्याकाळी या मंदिरा भोवती आतून ओवऱ्या असणारा दगडी कोट होता. असे तेथील अवशेषा वरून दिसते. मंदिराचे उत्तर बाजूने पुढे गेले कि एका दगडी पश्चिमाभिमुख मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहेंत. यांचे मागे पूर्वदरवाजा आहे.\nसमोर खंडोबाचे मुख्य मंदिर दिसते. मंदिर व नंदी मेघदंबरी मध्ये सुमारे २० फुट व्यासाचे दगडी कासव आहे. मंदिराची रचना तीन कमानी सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे. मंडपाचे प्रवेशद्वारावर जय विजय प्रतिमा आहेंत. मंडपात एक दगडी कासव व धातूची श्वान प्रतिमा आहे\nमंडपातील दरवाजातून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात एका आयताकृती योनीत खंडोबा व म्हाळसा यांची द्वीलिंग आहेंत. यांच्या पाठीमागे धातूचे नाग, कुत्रा इत्यादी प्रतिमा आहेंत. या प्रतिमाचे मागे खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेंत. या मूर्तीचे उत्तरेस संगमरवरी गणेश प्रतिमा आहे. तर दक्षिण बाजूस नव्याने बसवलेली मार्तंड प्रतिमा आहे. पाठीमागे देवळीत बसलेली सुमारे ३ फुट उंच व २ फुट रुंद असलेली मार्तंड भैरवाची चतुर्भुज दगडी प्रतिमा आहे. तिचे आसनावर मणि व मल्ल यांची नरमुंड कोरलेली आहेंत. मार्तंडाचे दोन्ही बाजूस त्याचे पत्नीचे उभ्या प्रतिमा आहेत. हे खंडोबाचे अवताराचे मुळ ठिकाण यथेच शंकरानी मार्तंड अवतार धारण केला. अशी मान्यता आहे. हे मंदिर खूप प्राचीन मानले जाते.\nमंदिराचे समोरील नंदी मंडपाचे दक्षिण बाजूस दत्त मंदिर आहे. या मंदिरात अनेक मूर्ती आहेंत. या मूर्ती समोर गोविंदबाबांची समाधी आहे. गोविंदबाबा हे योगी होते. इस १८२० मध्ये गोविंदबाबांनी येथे दत्त मूर्तीची स्थापना केली. व इस १८६२ मध्ये या मठाचे काम पूर्ण झाले. गोविंदबाबा इस १८६२ मध्ये समाधिस्त झाले. याच परिसरात खंडोबा विषयक 'मार्तंड विजय' हा ग्रंथ गंगाधर कमलाकर यांनी आपल्या सिद्धहस्ताने पूर्ण केला.\nपुर्वद्वाराने बाहेर पडले कि काही अंतरावर एक विहीर आणि तलाव आहे. या तलावाचे परिसरात लक्ष्मिआई व वेताळ यांची स्थाने असलेचे सांगतात\nतलावाकडून परतताना अनेंक वास्तु चे भग्न अवशेष दिसतात.\nया अवशेषाचे उत्तर दिशेस एका उत्तराभिमुख देवडीत एक समाधी आहे ती लक्ष्मनबाबांची ते हुमनाबादचे माणिकप्रभू चे शिष्य होते. त्याच्या चमत्काराच्या अनेक दंतकथा लोक सांगतात या समाधी परिसरात त्यांचे शिष्याचे काही समाधी आहेंत.\nपूर्व दरवाजाचे समोरच एका दगडी चोथरा असून त्याचे मधोमध उभा केलेला सुमारे ३० फुट उंचीचा लाकडी खांब दिसतो तो बागडाचा. या बगाडावर भक्तगण गळ टोचून घेत असत, इंग्रजी U आकाराचा हा गळ पाठीच्या कण्याच्या दोन्ही मांसल बाजू मध्ये अडकवला जात व त्याचे आधारे बगाडावरील आडव्या लाकडाला टांगून गोल फिरवले जात असे, नवसपूर्तीसाठी अशी कृती केली जात होती तर कधी आपल्या मधील इश्वरी सामर्थ दाखवण्यासाठी. गळ टोचलेली माणसे देवाचे योग्यतेची मानली जात व लोक त्यांचे कडे भक्तिभावाने पहात. देवासाठी आपण जेवढे जास्त यातना भोगतो तेवढे आपण देवा जवळ जातो अशीही लोकभावना होती. इस १८५६ मध्ये इंग्रजानी बगाडावर बंदी घातली आणि हि प्रथा बंद झाली.\nपूर्व दरवाजाचे उत्तरबाजूस दरवाजा जवळच यशवंतरावची स्थापना केलेली आहे. या दरवाजा वर नगारखाना आहे.\nपूर्व दरवाजा मधून आत आले कि उत्तरेस दिसतो तो उत्तरदरवाजा हा दरवाजा भग्न अवस्थेत आपल्या पुर्व वैभवाची साक्ष म्हणून उभा आहे.\nमंदिराच्या दक्षिण बाजूस दक्षिणदरवाजा आहे. येथे बाहेर काही मंदिरे आहेंत. कडेपठार चे पठार सुमारे ११.५ एकर आहे\nदक्षिणेस पुर्व बाजूस डोंगराचे कडेवर घोडेउड्डाण आहे. मार्तंडानी येथूनच युद्ध साठी दक्षिणेस प्रस्थान केले असे मानले जाते.\nघोडेउड्डाणचे पश्चिमेस एक पुर्वभिमुख देवडी आहे ती सटवाई देवी ची.\nपश्चिमेस काही अंतरावर एक छोटा मंडप असलेली पुर्वभिमुख देवडी आहे. या देवडीत काळभेरव व भवानीची मूर्ती आहे. या देवडीस तुकाईची देवडी म्हणतात. पश्चिमेस काही अंतरावर पुर्वभिमुख देवडी आहे. येथे भुलेश्वराची स्थापना केलेली आहे.\nकोटाचे पश्चिम बाजूच्या पुर्वभिमुख ओवरीत भांडारगृह आहे. येथे नवरात्र व षडरात्र उत्सवात मूर्तीची स्थापना केली जाते.येथील शेजारचे ओवरीत अश्वरूढ खंडोबाची मूर्ती आहे.\nया ओवरीच्या मागे पश्चिमेस उत्तर बाजूस पुर्वभिमुख पंचलिंग मंदिर आहे. या मंदिराची रचना तीन कमानी सदर व गर्भगृह अशी असून गर्भगृहात पंचलिंग व गणपती ची मूर्ती आहे. मूलतः शंकर हि देवता पंचमुख असल्याचे मानले जाते, त्याचीच हि स्थापना. या पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार,व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते.\nपंचलिंग मंदिराच्य मागील खोल दरीत दूरवर दिसते ते वाघेश्वरी चे मंदिर येथे कडेपठारचे मागील बाजूने उतरून किवा विझाळा चे पश्चिमे कडील कवडदरी मधून चढून खेसोबाचे स्थानापासून कवडखिंडी मधून उत्तरून जाता येते.\nकडेपठारचे दरीत जानाईचे पुर्वभिमुख मंदिर आहे. कडेपठारचे उत्तरे कडील गंगाधर कड्यावरून उतरून दरीत जातायेते. या रस्त्याने उतरताना काही अंतराने पूर्वे कडे रस्ता फुटतो या रस्त्याला एक गुहा आहे. पेशवे तलावा जवळून रमणा परिसरातील डोंगर चढून या दरीत उतरून जाता येते. दरीत एक गोमुख हि आहे. मंदिराचे जवळ विहीर असून तिला जननी तीर्थ म्हणतात.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला गेला. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईला बेंगलोरने ७ विकेट्सने पराभूत केले. आरसीबीचा आयपीएल २०२२ मधील हा तिसरा विजय आहे, तर मुंबईला आत्तापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात अपयश आले आहे. दरम्यान, या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात ३६ चेंडूत ४८ धावा केल्या, ज्यामध्ये ५ चौकारांचा देखील समावेश आहे. त्याने दूसऱ्या विकेटसाठी अनुज रावतसोबत ८० धावांची भागीदारी केली. विराटने या सोबतच आयपीएलमधील आपले ५५० चौकार पूर्ण केले आहेत. तो या लीगमध्ये ५५० हून अधिक चौकार आणि २०० हून अधिक षटकार लगावणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. विराटने २११ आयपीएल सामन्यांमध्ये ५५४ चौकार, तर २१२ षटकार ठोकले आहेत. तसेच त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतके देखील ठोकली आहेत. विराटने आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ४ सामन्यात त्याने एकदाही अर्धशतकीय खेळी खेळली नाही. त्याने पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध ४१ धावा केल्या. नंतर केकेआरविरुद्ध १२, तर राजस्थानविरुद्ध ५ धावा केल्या. तसेच मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने ४८ धावा केल्या. विराट हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू ठरला आहे. त्याने या लीगमध्ये ३७ च्या सरासरीने ६३८९ धावा केल्या आहेत. इतर फलंदाजांनी अजून ६ हजारचा आकडा देखील गाठलेला नाही. तो ३२ वेळा नाबाद देखील राहिला आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमसुद्धा विराटच्याच नावावर आहे. त्याने २०१६ च्या हंगामात ८१ च्या सरासरीने ९७३ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ११ सामन्यांत ५० हून अधिक धावा केल्या होत्या, परंतु या दरम्यान आरसीबी संघ अंतिम सामन्यात येऊन पराभूत झाला होता. आरसीबीने आयपीएल इतिहासात एकदाही विजेतेपद पटकावले नाही.
दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा विधी प्राधिकरण, सातारा यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदयांसाठी दिवाणी न्यायाधीश एस. एस. दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी न्यायाधीश तथा शिबिराचे अध्यक्ष एस. एस. दहातोंडे यांनी बंदीना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे यांनी देखील कारागृहातील बंदीना हक्क व अधिकार याच्यापूर्वी कर्तव्य हे श्रेष्ठ असते. त्या कर्तव्यातूनच कारागृहातील वर्तन स्वच्छ ठेवल्यास बंदींना कारागृहबाहेर जाण्याचे मार्ग लवकरात लवकर मोकळे होतील, याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा विधी सेवाच्या पॅनलवरील एड. शरद जांभळे हे उपस्थित होते. त्यांनी कारागृहातील बंदींना कायद्याने काय काय अधिकार दिले आहेत, याची माहिती दिली. तसेच त्यांचे हक्क व कायदेशीर तडजोडीनुसार असलेल्या गुन्हयातून लवकरात लवकर केस संपवून कारागृहाबाहेर येण्याचे मार्ग कसे आहेत, याबाबत मार्गदर्शन करून जमिनीच्या तरतुदींची देखील माहिती कारागृहातील सर्व बंदिना दिली. या कार्यक्रमास एड. जांभळे, लघुलेखक दिलीप भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे तसेच इतर बंदी व कर्मचारी उपस्थित होते.
रत्नागिरी : खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी कालावधीत रविवारी १ ऑगस्टसपासून संपत असल्याने पर्ससिननेट नौका वगळता अन्य मासेमारी नाैकांद्वारे मासेमारीला प्रारंभ होणार आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून वादळी हवामानामुळे मासेमारी सुरू करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही काही नौका खोल समुद्रातील मासेमारीला जाण्यास सज्ज झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वातावरणातील सततचे बदल यामुळे मागील दोन हंगामात मच्छीमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. गतवर्षी पावसाळा लांबल्यामुळे समुद्रही खवळलेला होता. डिसेंबर महिन्यात बऱ्यापैकी वातावरण निवळले होते. मात्र, मे महिन्याच्या शेवटी तौक्ते वादळाने सर्वांनाच दणका दिला होता. चालू वर्षात मार्च ते मे महिना या कालावधीत कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे घालण्यात आलेल्या बंदीचा फटका मासेमारीला बसला होता. शासनाने १ जून ते २१ जुलै हा कालावधी मासेमारी बंदीसाठी निश्चित केला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. यामध्ये ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट व इतर लहान नौकांद्वारे मासेमारी करण्यास शासनाची परवनगी आहे. पर्ससिननेटला १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हे तीनच महिने मासेमारीसाठी देण्यात आले आहेत. मागील आठवड्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे अजूनही समुद्र खवळलेला आहे. वातावरणामध्ये स्थिरता येऊ लागली असली तरी अजूनही समुद्रात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे खोल समुद्रात नौका नेणे धोकादायक ठरू शकते. तरीही अनेक नौका मालकांनी समुद्रात नौका नेण्याची तयारी करून ठेवली आहे. मात्र, वादळी वातावरणामुळे मासेमारीवर अनिश्चिततेचे सावट आहे. मासेमारी व्यवसायासाठी स्थानिक खलाशांची कमतरता असल्याने परराज्यातून तसेच नेपाळमधून खलाशी मागविण्यात येतात. यंदा परराज्य तसेच नेपाळी खलाशी अजून आलेले नाहीत. तसेच व्यवसायातील आर्थिक चणचण, डिझेल परतावा रखडल्यामुळे मागील हंगामात मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातच अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे अजूनही मासेमारी व्यवसाय समस्यांच्या गर्तेत आहे.
मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील कलगीतुरा थांबेना. फडणवीस हे धडधडीत खोटे बोलत आहेत. विधानसभेत त्यांनी सीडीआरबाबत खोटी माहिती दिली. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कूट रचत आहेत. वेळ आल्यावर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी फडणवीस यांच्यावर चौकशी करण्याची मागणी केली. महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भाजपाचे नेते सैरभैर झाले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत, अशी टीका पटोलेंनी केली. दरम्यान, "रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, रश्मी शुक्लांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत." असे पटोले म्हणाले. "सरकार येतात जातात पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र 'खुनी' राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार? सध्याच्या प्रकरणात जे दोषी आढतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, चुकीला माफी नाही." असेही पटोले यांनी स्पष्ट केले. परमबीर सिंग, रश्मी शुक्लाप्रकरणी सरकारच्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही. काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवतात. राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
शुक्रवारी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत कृषीविषयक कायदे मागे घेतले आहेत. त्याचवेळी, आता संसदेने हे कायदे औपचारिकपणे रद्द करावेत, अशा संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुख नेत्यांच्या 9 सदस्यीय समितीची आज सिंधु सीमेवर भविष्याची पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही. )
एमपीसी न्यूज - सुंदर अक्षर हाच खरा दागिना...एकी हेच बळ... माझे माझ्या अक्षरावर प्रेम आहे... असे सुविचार कागदावर सुलेखनाद्वारे लिहित एकाच वेळी 200 विद्यार्थ्यांनी अक्षरावरील प्रेम व्यक्त केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठीत सुंदर हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असतानाच साहित्यिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठीचे महत्त्व उपस्थितांसमोर उलगडले. अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. पुण्यातील 25 शाळांमधून इयत्ता 3री ते 8वी पर्यंतचे तब्बल 15 हजारहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत प्रातिनिधीक स्वरुपात सुमारे 200 विद्यार्थी एकाच वेळी सुलेखन केले. यावेळी अक्षर रसिक सुलेखन वर्गाचे शैलेश जोशी, व्हिनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदांनी, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ आदी उपस्थित होते. नवीन मराठी शाळेत साहित्यिक आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, वि. स. खांडेकर, विं. दा. करंदीकर, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शांता शेळके, इंदिरा संत, दुर्गा भागवत, मंगेश पाडगावकर, विश्वास पाटील, रणजित देसाई, अरुणा ढेरे आदींच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले. स्पर्धेत 16 मराठी माध्यमाच्या शाळा तर 9 इंग्लिश माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या. गेली 47 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात नाव मिळवलेले व्हीनस ट्रेडर्स आणि 25 वर्षांपासून सुलेखन क्षेत्रात अलौकिकपणे नाव मिळवलेले अक्षर रसिक सुलेखन वर्ग हे मराठी लेखन वृद्धीच्या दृष्टीने स्पर्धेद्वारे प्रयत्न करीत आहेत.
औरंगाबाद : शहरात शनिवारी (ता. दोन) पहाटे पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला. शहरातून (Aurangabad) वाहणाऱ्या खाम (Kham River), सुखना नदीला (Sukhana River) मोठा पूर आला असून, नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलठाणा, चौधरी कॉलनी, नूर कॉलनी या भागाला पूराचा मोठा फटका बसला. सुमारे तीनशे ते चारशे घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली. शहराला गुलाब चक्रीवादळाने (Gulab Cyclone) २८ सप्टेंबरला जोरदार तडाखा दिला होता. त्यानंतर आलेल्या शाहीन चक्रीवादळामुळे शनिवारी पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पहाटे ३. २५ वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. यानंतर ३. ३८ वाजे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पहाटे ३. ३८ ते ४. ०३ या पंचवीस मिनिटांत विजांचा कडकडाट, ढगांच्या (Rain In Aurangabad) गडगडाटासह सरासरी ११८ मिलिमिटर मिटर प्रतितास या ढगफुटीच्या वेगाने पाऊस पडला. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या खाम, सुखना नद्यांना पूर आला. नागरिक पहाटेच्या साखर झोपत असताना त्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अग्निशमन विभागाला मदतीसाठी फोन करण्यात आले. पण तोपर्यंत अनेकांच्या घरात कंबरेपर्यंत पाणी साचले होते. नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलाठाणा, चौधरी कॉलनी, नूर कॉलनी या भागातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. त्यामुळे जीवित हाणी झाली नाही. दरम्यान सकाळी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे नऊ वाजेच्या सुमारास दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली. दरम्यान शहरातील अनेक व्यापाऱ्यांना पावसाचा फटका बसला. तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पहाटे पंचवीस मिनिटाच्या पावसाची ५१. २ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. तसेच पहाटेपर्यंतच्या एकूण पावसाची ७८. २ मिलिमिटर एवढी पावसाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत रात्री ११. ३० ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंच्या पावसाची नोंद ४४. ०५ मिलिमिटर एवढी झाली आहे. यंदा प्रथमच औरंगाबाद शहरावर गेल्या एका महिन्यात तीन वेळेस ढगफुटीच्या वेगाने पावसाने हजेरी लावली आहे, असे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी कळविले आहे. चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाठीमागे एकाने सुखनानदीपात्रात उडी मारल्याचा प्रकार घडला. त्याला वाचविण्यात नागरिकांना यश आले.
अर्जुनी-मोरगाव : बालपणापासूनच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. विशिष्ट वयात योग्य संस्कार केले तर बालकांचे भविष्य घडते. लोकमत 'संस्काराचे मोती' या स्पर्धात्मक उपक्रमाद्वारे बालकांना संस्कारमय करण्याचे कार्य 'लोकमत' करीत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी केले. सरस्वती विद्यालयात आयोजीत 'लोकमत संस्काराचे मोती' मधील लकी ड्रॉ विजेत्यांना पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पर्यवेक्षिका विना नानोटी उपस्थित होत्या. स्पर्धेतील विजेती प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी स्नेहा प्रशांत पालिवाल हिला टॅब देण्यात आला. आदीत्य कारूसेना सांगोळे याला क्रीकेट कीट, नयना दिलीप कापगते हिला फुटबॉल, प्रणय मधूर कुरसूंगे याला स्केट्स, भावेश नरेश परशुरामकर प्रणय देवदास मस्के व वृषाली सुखदेव शहारे यांना वॉटर बॉटल देण्यात आली. संचालन शशिकांत लोणारे यांनी केले.
कराड, गेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने सभासदांना प्रतिशेअर दरवर्षी ६० किलो साखर देण्याचे आश्वासन दिले होते. हे मोफत साखरेचे अभिवचन आमच्या संचालक मंडळाने पूर्ण केले असून, सभासदांना अशा प्रकारे मोफत साखर देणारा कृष्णा कारखाना देशात एकमेव असेल, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराड तालुक्यातील अंबवडे, कोळे व आणे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, उमेदवार सयाजी यादव, बबनराव शिंदे, माजी संचालक श्रीरंग देसाई, अजित खबाले, हेमंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या सहा वर्षांत आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सरासरी हा दर ३००० रुपये इतका आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबद्ध असा कारभार केला. कृष्णा कारखाना एक कुटुंब आहे, या विचाराने काम आम्ही केले. येत्या काळातही कृष्णा कारखाना शेतकरी सभासद हिताचे अनेक उपक्रम राबविणार आहे. तसेच कारखान्याची गाळपक्षमता ९००० मेट्रिक टनावरून १२,००० मेट्रिक टन वाढविण्याचा आमचा मानस आहे. जयवंत आदर्श योजना अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीरंग देसाई म्हणाले, कृष्णा कारखान्याची निवडणूक ही आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित आहे. या संस्थेचे आपल्याला दैनंदिन जीवनात मोठे सहकार्य लाभते. या भागाचा सर्वांगीण विकास कृष्णा कारखान्यामुळे व भोसले कुटुंबामुळे झाला आहे. त्यामुळे या भागातील सर्व सभासद सहकार पॅनेलच्या पाठीशी राहतील. या वेळी दादासो कदम, जालिंदर कदम, नंदकुमार पाटील, जयवंत शेवाळे, विनोद पाटील, अंकुश कदम, संपत कदम, नारायण शेवाळे, महेंद्र साळुंखे, अशोक कांबळे, रमेश शेवाळे, राजाभाऊ कांबळे, सुरेश चव्हाण, भीमराव चव्हाण, अशोक कांबळे, अस्लम देसाई, पांडुरंग सावंत, महादेव कराळे, नाथा कराळे, राजेंद्र देसाई, शशिकांत तिरंगे, राहुल चव्हाण, युवराज कदम, सागर पाटील, किसन देसाई, शंकर पाटील, सदाशिव चव्हाण, सर्जेराव पाटील, सुभाष पाटील, सुरेश देसाई, संजय देसाई, चंद्रकांत देसाई, विकास देसाई, अधिक देसाई, आनंदराव देसाई, संभाजी देसाई, शंकर देसाई आदी उपस्थित होते. फोटो ओळी : आणे ता. कराड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार बैठकीत बोलताना डॉ. सुरेश भोसले.
खडकवासला - पानशेत रोडवरील आंबी फाट्याच्या आत रानवडी ता. वेल्हे हद्दीत किरकोळ वादातून पुण्याच्या युवकाचा लोखंडी सळईने निघृण खून करून पुरण्यात आला आसल्याची घटना बुधवारी (ता. १८) रोजी उघडकीस आली. आरोपींनी फिल्मी स्टाईलने घरासाठी घेतलेल्या खोल खड्ड्यात मृतदेह पुरला होता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता परिसरातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती. विजय प्रफुल्ल काळोखे (वय ३८ राहणार कन्या शाळेजवळ विजय लाॅज बिल्डिंग, आप्पा बळवंत चौक पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीसांनी आरोपी नितीन रामभाऊ निवंगुणे व विजय दत्तात्रय निवंगुणे दोघे रा. आंबी (ता. हवेली) यांना अटक केली आहे. या प्रकरणी पानशेत पोलीस चौकीचे पोलीस नाईक अजय कुमार शिंदे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फीर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहीती मिळताच हवेली विभागाचे विभागीय पोलीस आधिकारी भाऊसाहेब ढोले, वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी वेल्हे तालुका निवासी तहसीलदार सूर्यकांत कापडे व पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलीसांनी सांगितले की पोलीस नाईक अजयकुमार शिंदे यांना रानवडी येथे आरोपी नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांनी एका व्यक्तीचा खुन करून मृतदेह नितीन निवंगुणे यांच्या शेतात टाकला आहे. आशी माहीती खब-याकडून मिळताच वेल्हे पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक महेश कदम रानवडी (पानशेत ) येथे तातडीने दाखल झाले . नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले . पंरतु दोघांनी उडवा उडविची उत्तरे दिली, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दोघांना विश्वासात घेतले. विचारपुस केली असता नितीन निवंगुणे यांने गुन्हा केल्याची कबुली दिली. नितीन निवंगुणे याने शेतात घर बांधण्यासाठी खोल पाया घेतला होता, त्या खोल खड्यात विजय काळोखे यांचा मृतदेह पुरून ठेवला होता.
पुणे महानगर पालीकेच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर प्रभाग ११ मधील नगरसेवीका असलेल्या सौ. वौशालीताई राजेंद्र मराठे यांची स्थायी समिती सदस्य पदी नुकतीच नियुक्ती झाली . त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार साईनाथ मित्र मंडळ व कोकण रहिवासी संघ आणि कोकणवासीय महासंघ कोथरूड विभागाच्या वतीने मा नगरसेविका सौ. अश्विनीताई जाधव यांनी केला. हनुमान नगर येथील साईबाबांच्या मंदिरात त्यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते . या सत्कार सोहळ्यासंबंधी त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी बांधील असल्याचे सांगीतले. या सत्कार सोहळ्यासाठी मा. नगरसेवीका सौ. अश्विनीताई तुकाराम जाधव, कोकणवासीय महासंघ पुणे शहराचे अध्यक्ष तुकाराम जाधव उपस्थित होते. अध्यक्ष शंकर जाधव, रहिवासी संघाचे अध्यक्ष अशोक यादव, महासंघाचे कोथरुड विभागाचे अध्यक्ष संतोष अनिवसे आणि मंडळाचे व रहिवासी संघाचे सर्व पदाधिकारी आणि हनुमाननगर मधिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. खराब रस्त्यांमुळे आणखीन किती लोकांचा जीव जाणार? असा सवाल हायकोर्टानं केलाय. महामार्गांवरील खड्ड्यांबाबत राज्य सरकारनं गांभीर्यानं काम करायला हवं, असं म्हणत कोर्टाने खडसावलं आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिकेचा समाचार घेतला आहे.
दोन बायकांचा दादला! अकलुज पोलिसांसमोर 'वचन' दिले अन् मुंबईत पोहोचला; संसारही सुरु केला? अकलूजमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला. अकलूज : माळेवाडी- अकलूज येथे एकाच वेळी दोन वधुंशी लग्न केल्याने अकलूज पोलिस ठाण्यात तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी वरासह दोन्ही वधू व त्यांची आई स्वतः हजर होऊन पोलिसांकडून नोटीस स्वीकारून पोलीस तपासात सहकार्य करण्याचे मान्य केले. माळेवाडी येथे शुक्रवार, दि. २ डिसेंबर रोजी दुपारी १२ः३० वाजता रिंकी व पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी अतुल आवताडे या युवकाने विवाह केला. त्यानंतर माळेवाडीतीलच राहुल फुले यांच्या तक्रारीवर अतुल आवताडे याच्यावर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात रविवारी दुपारी अतुलबरोबर रिंकी व पिंकी आणि त्यांची आई धनश्री मिलिंद पाडगावकर हे ठाणे अंमलदार बकल यांच्यासमोर स्वतःहून हजर झाले. बकल यांनी अतुल यास गुन्ह्याची नोटीस देऊन अकलूज पोलिसांनी वेळोवेळी तपासासाठी बोलविल्यानंतर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे बजावले आहे. उपस्थित सर्वांनीच सहमती दर्शवली. त्यानंतर चौघेही मुंबईला रवाना झाले. त्यानंतर अतुलने दोन बायकांसह संसारही सुरु केल्याचे सांगितले जात आहे. अकलूजमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातून चर्चा होत मिम्सचा अक्षरशः धुमाकूळ घातला. काहींनी आम्हाला एक वधू मिळत नाही, म्हणून खंत व्यक्त केली, तर काहींनी एकीलाच सांभाळणं कठीण होत असल्याचे सांगितले. काहींनी तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असेही मत मांडले. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
नातवांच्या संवादाने आजी-आजोबा भारावले - My Marathi\nHome Local Pune नातवांच्या संवादाने आजी-आजोबा भारावले\n-सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची पानशेत येथे 'जनसेवा'च्या वृद्धाश्रमाला भेट\nपुणे : उतारवयात नातवांच्या संवादाला, त्यांचे लाड करण्याला, आपुलकीने विचारपूस होण्याला आणि कौटुंबिक सुखापासून वंचित राहिलेल्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेच; पण डोळ्यात आनंदाश्रूही तरळले. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल अँड ऍडवान्सड स्टडीजच्या (सिवास) विद्यार्थ्यांनी पानशेतजवळील आंबी येथील जनसेवा फाउंडेशन संचालित वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांशी प्रेमाचा संवाद केला.\nम्हातारपणात जवळच्या प्रियजनांच्या प्रेमाची आणि आस्थेने होणाऱ्या चौकशीची आवश्यकता असते. हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना करुणा आणि कौटुंबिक मूल्ये समजावीत, यासाठी 'सूर्यदत्ता'च्या विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धित शिक्षण उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमाला भेट दिली. मुलांनी दिलेल्या या भेटीने ज्येष्ठ नागरिक सुखावले. आपल्या नातवंडाना भेटल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. वृद्धाश्रमाचे नियोजन पाहणारे सचिन आणि सोनाली शहा यांनी विद्यार्थ्यांना जनसेवा फाउंडेशन आणि आंबी येथील वृद्धाश्रमाविषयी माहिती दिली. समाजातून मिळणाऱ्या देणग्यांवर चालत असलेल्या या संस्थेने आजवर जवळपास ८० गावे दत्तक घेतले असून, तेथे सामाजिक कार्य सुरु आहे.\nसुमारे १५ वर्षांपासून मोदी आजोबा या आश्रमात राहत असून, ते योगा शिकवतात. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही करतात. सकाळी आणि संध्याकाळी एक तास भजन होते. यावेळी आजी-आजोबांसाठी विद्यार्थ्यांनी एक करमणूक कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, खेळ आदींमधून आजी-आजोबाना आनंद दिला. तेथील आजी-आजोबाही मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी त्यांना काही भेटवस्तू भेट म्हणून दिल्या. तंत्रज्ञानाच्या युगात नातेसंबंधांची मूल्ये कमी होत आहेत. या आजी-आजोबांना भेटल्यानंतर त्यांना आधार आणि संवादाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले.\n"आजी-आजोबांना भेटून खूप आनंद झाला. मुलांनी आपल्या आई-वडिलांना उतारवयात वृद्धाश्रमात न ठेवता आपल्यासोबत ठेवणे किती महत्वाचे आहे, हे यांना भेटल्यावर प्रकर्षाने जाणवले. कुटुंबाचा आधार बनून आपल्याला मायेने वाढवणाऱ्या आजी-आजोबांना आपण प्रेमाने आणि आपुलकीने जपायला हवे, हीच शिकवण आम्ही घरी परतलो," असे अक्षय राठोडने सांगितले. तर मानसी सावंत म्हणाली की, जनसेवा फाउंडेशनने हे एक कुटुंब उभारले आहे. या कुटुंबातील प्रेमाने आम्ही सगळेच भारावलो. अनेक आजी-आजोबांच्या जीवनकथा डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत. यातून नातेसंबंध टिकवून ठेवणे आणि आपुलकीची भावना जोपासणे महत्वाचे असल्याची शिकवण मिळाली.
सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली. सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली. पोलिसांच्या चौकशीत महंमद दिलखुश याने सांगितले की, त्यांच्याकडे चारचाकी चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) नव्हती. ते गाडीतून रोहना येथे जात असतांना त्यांनी मनोज कुमार याला धडक दिली. मॅनहोल (भूमीगत गटारात जाण्याचा मार्ग) मध्ये उतरून ड्रेनेजची यंत्रणा स्वच्छ करणार्या कर्मचार्याच्या अंगावरून गाडी गेली. जगवीर यादव (वय ३७ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो वर येत असतांनाच गाडी अंगावरून गेल्याने तो मॅनहोलमध्येच अडकला. आसूद जोशीआळी येथे ट्रक आणि खासगी मॅक्स्झिको वडाप गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचाही समावेश आहे. स्वतःच्या व्यवसायाचा वापर हिंदूंच्या धर्मांतरासाठी करणारे धर्मांध डॉक्टर. अशा डॉक्टरांचा परवाना रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! अशी चेतावणी का द्यावी लागते ? सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांना खासगी 'प्रॅक्टिस' न करण्यासाठी मूळ वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता देण्यात येतो. एन्. पी. ए. आणि सर्व भत्ते मिळून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेऊनही काही सरकारी आधुनिक वैद्य खासगी प्रॅक्टिस करत. . कमला मिल येथील ट्रेड वर्ल्ड या १६ मजली इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरून उद़्वाहन यंत्र (लिफ्ट) खाली कोसळले. यामध्ये ९ जण घायाळ झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. घायाळ झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे. वारकर्यांना तात्काळ आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकोला : २०१९ या सरत्या वर्षाने राजकारणात मोठी उलथापालथ घडविली. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस असे तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार सोमवारी झाला. यामध्ये अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकोल्यातील पाचपैकी चार जागा भाजपने जिंकलेल्या असून, शिवसेनेने बाळापूर ही एकमेव जागा जिंकली आहे. शिवसेनेचे आ. गोपीकिशन बाजोरिया हे सर्वात ज्येष्ठ आमदार असून, त्यांचे पुत्र विल्पव हे सुद्धा हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. बाजोरिया हे मंत्रिपदासाठी शिवसेनेत सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असल्याने पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात तसेच त्यांची मातोश्रीसोबत असलेली जवळीक लक्षात घेता त्यांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात नव्या नेतृत्वालाही संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्या अनुषंगाने पहिल्यांदाच विजयी झालेले आमदार नितीन देशमुख यांनाही संधी मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांना होती; मात्र सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अकोल्याची पाटी कोरीच राहिली आहे. विशेष म्हणजे आ. बाजोरिया यांनी शपथविधी सोहळ्याला दांडी मारून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड यांच्या समवेत शपथविधीचा सोहळा दूरचित्रवाणीवर बघितला. त्यावरून पश्चिम वºहाडातील आमदारांची नाराजी स्पष्ट झाली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले आमदार बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता राजकीय वर्तृळात व्यक्त केली जात आहे. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्याचे असून, तेथील आमदार यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. साहजिकच त्या अमरावतीच्या पालकमंत्री पदावर राहतील त्यामुळे ना. कडू यांना नजीकच्या अकोल्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ना. कडू यांची प्रहार संघटना अकोल्यातही प्रभावी असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेली आहे. त्यामुळे ना. कडू यांनाही अकोला रजाकीय दृष्टीने सोयीचे ठरण्याची शक्यता आहे.
Marathi Composition on my school... - Brainly.in\nMarathi Composition on my school\nby tanmayarte1 03.04.2016\nकुटुंब नंतर आम्हाला महान प्रभाव exerts कोणत्याही संस्था आहे तर आज तो शाळेत आहे . आम्ही शाळेत खर्च की वर्षे फक्त देखील , आमच्या वर्ण मोल्डिंग विविध दृष्टिकोण घेणार्या आणि जीवन मूलभूत तत्त्वे imbibing वेळी शिकत आणि ज्ञान आपले मन भरून , पण खर्च वेळ नाहीत . आमच्या व्यक्तीची मूलभूत अद्वितीय वैशिष्ट्य आमच्या शाळेत दिवसांत फॉरमॅट केले आहेत. मी डॉन Bosco माध्यमिक शाळा , Tura एक विद्यार्थी असल्याचे मला अभिमान आहे. मी गतगोष्टी शाळा वर्षे परत दृष्टीक्षेपात म्हणून , माझे हृदय कृतज्ञता आणि धन्यवाद मी शाळेत खर्च बारा विस्मयकारक वर्षे देऊन अप swells . माझे शाळा नितांत आकार आणि मला माझ्या आयुष्यात कोणत्याही इतर घटक जास्त शि आहे .
नवी दिल्लीः Axis Bank FD Rates: बँकेत एफडी काढणं हे सुरक्षित समजलं जातं. अनेक ग्राहकांची गुंतवणुकीसाठी पहिली पसंती ही एफडी असते. एफडीतील पैसेदेखील वेगानं दुप्पट होतात. तसेच वेगवेगळ्या बँकांचे एफडीवर वेगवेगळे व्याजदर असतात. तुमचे खाते खासगी क्षेत्रातील Axis बँकेत असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींचे व्याजदरही वाढवलेत. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी हे बदल करण्यात आलेत. FD वर Axis बँकेचे वाढलेले दर 20 जानेवारी 2022 पासून लागू आहेत. बँकेने ठराविक कालावधीसाठीच व्याजदर वाढवलेत. अलीकडे एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनेही एफडी व्याजदर वाढवलेत. अॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या विविध मुदतींमध्ये मुदत ठेवी ऑफर करते. अॅक्सिस बँकेच्या वेबसाईटनुसार, बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2. 50 टक्के व्याजदर देत आहे. 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी 3 टक्के व्याजदर देत आहे, तर 3 महिने आणि 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 3. 5 टक्के व्याजदर आहे. ऍक्सिस बँकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदरात बदल जाहीर केलेत. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 2. 5 ते 6. 50 टक्के व्याजदर मिळेल. खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर बँक दर वाढवण्याची घोषणा केलीय. बँकेचे नवीन दर गुरुवारपासून (20 जानेवारी 2022) लागू झालेत. बँकेच्या वेबसाईटनुसार, बँक आता 7 ते 29 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 2. 50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के व्याजदर देत आहे. हे 91 दिवस ते 184 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 3. 5 टक्के आणि 185 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 4. 40 टक्के व्याजदर देत आहे. बँक एक वर्ष ते 389 दिवसांच्या एफडीवर 5 टक्के दर देत आहे.
देशातील सर्वात निवडक महाविद्यालये आणि विद्यापीठे 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान मुदतीची असतात. आपल्याला असे आढळेल की कमी निवडक शाळांना अनेकदा नंतरच्या मुदतीनंतर - फेब्रुवारीमध्ये अनेक प्रकरणांमध्ये, जरी काही शाळा अनुप्रयोग प्रक्रियेस कधीही बंद करत नाहीत तोपर्यंत आणखी जागा उपलब्ध नाहीत. खालील सारण्यांमध्ये, आपण शीर्ष महाविद्यालये आणि विद्यापीठे यासाठी अनुप्रयोगाची अंतिम मुदत माहिती आणि अधिसूचना दर पहाल. आपण 31 डिसेंबर आणि जानेवारी 15 दरम्यान (सर्वात अद्ययावत माहितीसाठी प्रत्येक शाळेच्या प्रवेश वेबसाइट तपासण्याचे निश्चित केले आहे, अर्ज करण्याची मुदत आणि अधिसूचना तारीख वर्ष ते वर्ष बदला). खालील सर्व माहिती 2017-2018 प्रवेश चक्र साठी वैयक्तिक शाळा संकेतस्थळ आहे. यापैकी प्रतिष्ठित विद्यापीठे आणि महाविद्यालय प्रत्येक एप्रिल 1 च्या आसपास निर्णय घेतील परंतु काही अर्जदार त्या वेळेपूर्वी निर्णय घेतील. जे विद्यार्थी लवकर कृती किंवा लवकर निर्णय घेणा-या अर्ज करतात ते बहुधा डिसेंबरमध्ये उत्तर मिळतील. या महाविद्यालयांवरील अधिक प्रवेश माहितीसाठी, खालील सारणीतील शाळेच्या नावावर क्लिक कराः लक्षात ठेवा की या अनुप्रयोगाची मुदत संपण्याआधी आपण योग्य पद्धतीने अर्ज कराल. प्रवेश कार्यालये जानेवारीच्या सुरवातीस दमबाजी करतात. आपण आपला अर्ज एक महिना किंवा अंतिम मुदतीपूर्वी सबमिट केल्यास, आपल्या सामग्रीचा आढावा घेताना प्रवेश अधिकार्यांना कमी त्रास देण्यात येईल. तसेच, लक्षात ठेवा की आपला अनुप्रयोग गेल्या शक्य मिनिटापूर्वी प्राप्त केल्यास कमी-प्रभावी संस्थात्मक कौशल्यांचे प्रदर्शन कराल. अंतिम मुदतीपूर्वी चांगली अंमलबजावणी केल्याने आपण मुदतीपूर्वी कार्य करतो हे दर्शविते, आणि ते आपली उत्सुकता दर्शविण्यास देखील मदत करू शकते, जी एखादी गोष्ट जी हितसंबंधित आहे . तसेच, आपण अनुप्रयोग सामग्री गहाळ झाल्यास, आपण अशा समस्या काळजी घेण्यासाठी भरपूर वेळ लागेल. अखेरीस लक्षात घ्या की वरील मुदती नियमित प्रवेशासाठी आहे. आरंभीच्या कारवाई आणि लवकर निर्णय देण्याची मुदत नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत असते. जर तुमच्याकडे स्पष्ट पसंतीचा कॉलेज असेल तर, अर्ली अॅक्शन किंवा अर्ली डीझीशनच्या सहाय्याने अर्ज केल्याने प्रवेश मिळाल्याच्या आपल्या शक्यता वाढू शकतो. या लेखात अधिक जाणून घ्याः आपण लवकर कॉलेजमध्ये अर्ज करावा?
पिंपरी -"करोना'चे अधिक रुग्ण आढळलेलले काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. याच भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने निश्चित करुन दिलेल्या वेळेत उघडण्यात येतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागांमध्ये किराणा दुकानांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. परंतु शहरात काही प्रमुख भागांमध्ये ठराविक वेळेतच दुकाने उघडी ठेवण्यास सांगून अन्य वेळेत सरसकट दुकाने बंद करायला लावली जात आहेत. अशा प्रकारे दुकानदार आणि नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. शहरात सील केलेल्या भागामध्ये सकाळी 8 ते 11 या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. सील केलेल्या भागांशिवाय अन्यत्र किराणा दुकाने किंवा दुध विक्री बंद ठेवण्याबाबत त्यांच्या कोणत्याही सूचना नाही. तरीही, शहरातील काही प्रमुख भागांमध्ये किराणा दुकाने, दूध डेअरी ही ठराविक वेळेतच सुरू ठेवण्यात येत आहे. शहरातील भाजी आणि फळ विक्री तीन दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. एकीकडे फळ आणि भाजी विक्री बंद असताना किराणा साहित्य आणि दुधासाठी देखील नागरिकांवर आज काही भागांमध्ये वणवण भटकण्याची वेळ आली. करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भाग "सील' केले आहेत. त्यामध्ये दापोडी आणि कासारवाडीचा काही भाग, भोसरीतील काही भाग, खराळवाडी, दिघी, चिखलीतील स्वस्त घरकुल प्रकल्पाचा भाग, थेरगाव-पडवळनगर आदी भाग सद्यःस्थितीत "सील' केलेले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी स्वतःच लाकडी बांबू टाकून रस्ते अडवून ठेवले आहेत. सील केलेल्या भागांमध्ये प्रवेश बंदी आहे. तथापि, संबंधित भाग वगळता अन्य भागातही नागरिकांनी अन्य भागातील लोकांनी आपल्या भागात येऊ नये. तसेच, आपल्या भागातील नागरिकांनीही बाहेर पडू नये, यासाठी रस्ते अडविले आहेत. त्याचा फटका अत्यावश्यक सेवेलाही बसू लागला आहे. शहरातील सील केलेल्या भागांमध्ये सकाळी 8 ते 11 या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याबाबत सांगितलेले आहे. अन्य भागांमध्ये मात्र दूध विक्री किंवा किराणा दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना केलेल्या नाहीत. - श्रावण हर्डीकर, आयुक्त.
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अनेकदा गैरप्रकार घडत असतात. काही वर्षापूर्वी राजस्थानमध्ये शूटिंग कालावधीत अभिनेता सलमान खान याच्यावर हरणाची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. अशाच प्रकारचे अनेक अभिनेत्यांकडून देखील काही वेळा कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे, असाच गैरप्रकार कानपूरमध्ये नुकताच घडला. चित्रपट अभिनेता वरुण धवनने कानपूरमध्ये शूटिंग सुरू असताना 65 मिनिटांत दोनदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवण्याच्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत वाहतूक पोलिसांनी एमव्ही कायद्यांतर्गत दोन वेगवेगळी चालान जारी केली आहेत. इतकेच नव्हे तर त्याने गोळी झाडलेल्या त्याने बुलेटवर दुसऱ्याच दुचाकीचा नंबर लावला होता. त्याबद्दल त्याला आता नोटीस पाठवण्याची तयारी आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढू शकतात. कानपूरमधील झेड स्क्वेअर ते पटकापूर दरम्यान वरूणने सकाळी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवली. त्यानंतर दुपारी हॅरिसगंजच्या कॅन्टोन्मेंट परिसरात त्याने हेल्मेटशिवाय दुचाकी चालवली. या दोन ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे चालान करण्यात आले. याबाबत वाहतूक विभागाचे डीसीपी संकल्प शर्मा म्हणाले की, वाहतुकीचे नियम सर्वांसाठी समान आहेत. शूटिंगदरम्यानचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ तपासले असता ही घटना खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर चित्रपट अभिनेत्याच्या दुचाकीला चालान करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आयोजकांना नोटीस पाठवून उत्तर देऊ. याशिवाय वाहतूक पोलिस वरुण धवनचा डीएलही पाहणार आहेत. जर चित्रपटाचे शूटिंग आयोजक डीएल दाखवू शकत नसेल, तर दुसरे चलन केले जाईल. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास एक हजार रुपयांचे चलन आकारले जाते. अभिनेत्याच्या बाईकचे दोन वेळा चालान करण्यात आले आहे. त्यामुळे चलनाचे दोन हजार रुपये ऑनलाइन, वाहतूक पोलिस कार्यालयात किंवा न्यायालयात जमा करावे लागणार आहेत. कानपूरमध्ये शूटिंगदरम्यान ज्या बाईकचा सिनेस्टार वरुण धवनला चालना देण्यात आली, ती बाईक मूळची उन्नावची असून त्याच मालक सध्या तो मुंबईत आहे. त्यावर वरुण धवनच्या बाईकचा नंबर वापरला होता की त्याची बाईक वापरली होती, याची त्याला कल्पना नाही. त्याची बाईक चित्रपटाच्या टीमने किंवा वरुण धवनने विचारली नाही, असे तो सांगतो. त्याला या घटनेची माहिती नाही. उन्नावमधील तवरिया मजग्वा गावात राहणारा बाईकचा मालक प्रमोद सांगतो की, आठ महिन्यांपूर्वी त्याने आपली बाईक गावातील एका दुकानदाराला विकली होती. ते जवळपास सहा महिने मुंबईत राहून लालबाग परिसरात काम करतात. मुंबईत येण्यापूर्वी दुचाकी खरेदी करणाऱ्याला नोंदणी प्रमाणपत्रात नाव ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले होते.
CaO = 0·7SO3+ 2·8SiO2 + 1·65Al2O3 + 0·35Fe2O3. यात आपण C3S व C2S पैकी फक्त त्रि-कॅल्शम सिलिकेटची उपस्थिती धरली आहे. Caso, हे जिप्समद्वारा येते. म्हणून CaSO, मधला CaO बाजूला काढला तर खंगरातल्या जास्तीतजास्त संयोगीकरण होऊ शकणाऱ्या CaO चे पुढील सूत्र मिळतेः परंतु कच्च्या मालात CaO चे जर एवढे प्रमाण असेल तर भट्टीतल्या तपमानाला जो स्थितिसमतोल असतो त्यात CaO चे पुरे संयोगीकरण होणार नाही. व CaO चा काही भाग स्वतंत्र अवस्थेतच राहील. ह्या वरच्या तपमानाला स्थिती समतोलाचा अभ्यास केल्यावर असा निष्कर्ष निघाला की जास्तीत जास्त संयोगीकरण होऊ शकणाऱ्या CaO चे प्रमाण साधारणतः पुढील सूत्राप्रमाणे आहेः ह्या सूत्राप्रमाणे सगळ्या CaO चे संयोगीकरणाकरिता चुनातृप्ती गुणपदाचे जास्तीत जास्त मूल्य १·०० असणार. परंतु खंगर जेव्हा १४५०० सें. पासून थंड होऊ लागतो तेव्हा स्वतंत्र अवस्थेत राहिलेल्या थोड्याफार जादा CaO चे संयोगीकरण होऊ शकेल. दुसरे म्हणजे थोडाफार CaO (सुमारे २-२ १/२% पर्यंत) जर स्वतंत्र अवस्थेत राहिला तर सिमेंटचे गुणधर्म बिघडत नाहीत. म्हणूनच चुना तृप्ती गुणपदाचे कमाल मूल्य १·०२ इतके ठेवले आहे. या गुणपदाचे किमान मूल्य ०.६६ इतके दिलेले आहे. जितके मूल्य कमी तितके सिमेंटमध्ये C3S चे प्रमाण कमी व C2S चे जास्त असेल. म्हणजेच चुना तृप्ती गुणपदाचे मूल्य कमी असलेल्या सिमेंटचे दमनबल वाढण्याचा वेग कमी असणार. अल्पोष्मदायी सिमेंटमध्ये CaO - 0-7SO च्या कमाल व किमान मर्यादा पुढीलप्रमाणे दिलेल्या - CaO - 0-7SO चे मूल्य कमाल मर्यादेजवळ असले तर कॅल्शम सिलिकेट्स (C3S+ C2S) मध्ये C3S चे प्रमाण २/३ पर्यंत असेल व किमान मर्यादेजवळ सिमेंटमध्ये फक्त C½S च असेल. ( CaO - 0.7SO 3 चे मूल्य किमान मर्यादेपेक्षाही खाली गेल्यास खंगरात जलसंयोग न पावणारी, निरुपयोगी व कमी अल्कधर्मी कॅल्शम सिलिकेट्स असतील.) म्हणजेच अल्पोष्मदायी सिमेंटमध्ये जलसंयोगी उष्णता जास्त असणाऱ्या C3S वर कमाल मर्यादा घातलेली आहे. अमेरिकेत "अत्यंत अल्पोष्मदायी" असा पोर्टलंड सिमेंटचा प्रकार प्रचारात असून त्यामध्ये C3S व C3A या दोन्हींवर कमाल मर्यादा घातलेल्या आहेत. (ब) AlkO३/FeOगुणोत्तर : किमान मूल्य ०.६६ या गुणोत्तराचे मूल्य ०·६६ हून खाली घसरले तर खंगरात असलेल्या सर्व अॅल्यूमिना Al2O3 चा वापर कॅल्शम अॅल्यूमिनो- फेराइटमध्ये होऊन त्यात C3A नसणार. असे सिमेंट पहिल्या २४ तासांत दृढ होऊन बलशाली होणे कठीणच. (क) अविद्राव्य अवशेष :कमाल २% वजनी सिमेंटची परीक्षा करताना हायड्रोक्लोरिक अम्लाशी (HCI) विक्रिया केल्यावर जो अविद्राव्य अवशेष मिळतो तो अनेक कारणांमुळे जादा होऊ शकतो. उदा. खंगर पुरा भाजला गेलेला नसणे, जिप्समच्या दगडामध्ये विशुद्धींचे प्रमाण जास्त असणे, सिमेंट तयार झाल्यावर त्यामध्ये चुकून (किंवा भेसळ करण्यासाठी) मृत्तिकेसमान पदार्थ मिसळले जाणे. या किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हजर असलेल्या अविद्राव्य अवशेषाची जलसंयुक्त सिमेंटला बल देण्यासाठी काहीच मदत होत नाही. उलट त्यामुळे सिमेंटमधला कार्यप्रवण भाग विरल होतो. म्हणून अविद्राव्य अवशेषावर वरील कमाल मर्यादेद्वारा आवर घातला आहे. (ड) मॅग्नेशिआ, MgO : कमाल ६% वजनी कच्च्या मालातल्या मॅग्नेशिआची इतर ऑक्साइड घटकांशी मिश्र संयुगे होत नाहीत व मॅग्नेशिआ इतर मिश्र संयुगांत फारसा ( २ - ३% पेक्षा जास्त) विद्रवतही नाही. ह्या स्वतंत्र अवस्थेतल्या Mgo चे बारीकबारीक स्फटिक खंगरात व सिमेंटमध्ये राहतात. असे स्फटिक फार प्रमाणात राहिले तर त्यामुळे सिमेंटच्या शिळेवर पाणी कालव्यापासून वर्षभरानंतर वाईट परिणाम दिसून येतात. (या परिणामांबद्दल पुढच्या प्रकरणात चर्चा येईलच.) म्हणून सिमेंटमधल्या MgO वर ही कमाल मर्यादा घातलेली आहे. (इ) एकूण सल्फर, गणितागत SO प्रमाणे कमाल २.७५% वजनी खंगर दळताना जर जिप्समचे प्रमाणजास्त झाले तर सिमेंट व पाणी एकत्र कालवल्यावर ४-६ तासानंतरसुद्धा जिप्समचा साठा शिल्लक राहील व तो संपेपर्यत C 3A च्या जलसंयोगद्वारा एट्रिगाइट (3CaO.Al2O3.3CaSO4.31H2O) हे द्रव्य तयार होत राहील. ज्या घटकांपासून एट्रिंगाइट तयार होते त्यांचेपेक्षा एट्रिंगाइटचे विशिष्ट आकारमान जास्त असून सिमेंटच्या आत्तापर्यंत दृढ व बलवान झालेल्या शिळेमध्ये फार मोठे प्रसरणी दबाव उत्पन्न होऊन त्यामुळे सिमेंटच्या शिळेला धोका संभवतो. म्हणून SO3 वर कमाल मर्यादा असणे इष्ट आहे. (जिप्समप्रमाणेच काही थोड्या प्रमाणात कच्च्या मालातून किंवा कोळसादी इंधनातून SO3 खंगरामध्ये येऊ शकतो व त्यामुळेही SO3 चे प्रमाण वाढू शकते.) (फ) ज्वलनान्ती घट : कमाल ४% वजनी
ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा! मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर जोडीदार शोधताना काही दिवसांपूर्वी एक महिला अभियंता अशाच घटनेची शिकार झाली. जोडीदार शोधताना तिची ओळख अशाच फसव्या व्यक्तीबरोबर झाली व त्या महिलेचे १० लाखांचे नुकसान झाले. मॅट्रोमिनी स्कॅम्सचे प्रकार वाढले असून, पुरुषांबरोबर महिला देखील या जाळ्यात अडकत आहेत. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने आपल्या सायबर-सेफ्टी आणि सायबर सायकर सिक्युरिटीचे ट्विटर हँडल सायबर दोस्तवरून युजर्सला काही सूचना दिल्या आहेत. यात युजर्सला मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर जोडीदाराचा शोध घेताना काय करावे आणि काय करू नये. - मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर रजिस्टर करण्यासाठी नवीन ईमेल आयडीचा वापर करावा. -मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर फोटो, फोन नंबर आणि पत्ता यासारख्या खासगी गोष्टी शेअर करू नयेत, -कोणत्याही मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर रजिस्ट्रेशन करण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. -वेबसाईटचे रिव्ह्यूज वाचावे, कोणत्याही वेबसाईटवर विश्वास ठेवण्याआधी मित्र, कुटुंबाचा सल्ला घ्या. - मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सद्वारे फ्रॉड करणारे कोणतीही इर्मजन्सी असल्याचे सांगून पैसे खात्यात टाकण्यास सांगतात. मागील काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत. - तसेच मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सद्वारे फ्रॉड करणारे तुम्हाला गिफ्ट पाठवले असून, त्यासाठी टॅक्स मनी ट्रान्सफर करण्यास सांगून फसवणूक करतात. त्यामुळे अशा भानगडीत पडू नये. कोटः ऑनलाइन पद्धतीने जाेडीदार शोधणे अनेकदा घातक ठरू शकते. मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सद्वारे फसवणुकीचे प्रकार देशात वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यात एवढ्यात तरी अशी कोणती घटना घडली नाही. कोणाची फसवणूक झाली असल्यास आम्हाला कळवावे. यात मुलीच नव्हे, तर मुलांचीही फसवणूक होऊ शकते. -रहिम शेख, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल.
आपले वाहन प्रारंभ करण्यासाठी आणि रस्त्यावर परत येण्यासाठी येथे उत्तम साधने आहेत. कंग्टन हा एक समर्पित आणि उत्कट संघ असून 2004 पासून शांघाय येथे आहे. आमच्याकडे कंग्टन संघात ज्ञान आणि नावीन्य, अनुभव आणि वचनबद्धता, व्यावहारिक आणि 'टेकी' यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. हे सर्व एकत्रितपणे आम्ही आमच्या वाढत्या प्रिय ग्राहकांना शक्यतो प्रदान करू शकणार्या उच्च स्तरीय सेवा ऑफर करण्यासाठी एकत्र येतो. तुम्हाला तुमच्या अंगणात गर्व आहे, पण त्याचा सामना करूया, कोणालाही मैदानी कामे करणे आवडत नाही. परंतु योग्य साधनांसह, आपण यार्डमध्ये काम करण्यास कमी वेळ घालवू शकता आणि आपल्या आवडत्या गोष्टी करण्यात अधिक वेळ घालवू शकता - जसे की आपल्या बागेत आनंद घ्या. येथे 6 बागांची सर्वोत्तम साधने आहेत जी आपल्याला बाहेरची कामे रेकॉर्ड वेगाने पूर्ण करण्यात मदत करतील.
सैफ अली खान : बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता सैफ अली खान लवकरच 'आदिपुरुष' चित्रपटात 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे पडद्यावर सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारणारा सैफ खऱ्या आयुष्यात खूपच हटके आयुष्य जगतो. 1993 मध्ये 'परंपरा' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या सैफ अली खानने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, या अभिनेत्याने OTT वर देखील आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांना वेड लावले आहे. तुम्हाला सैफ अली खानच्या लग्झरी लाइफची ओळख करून देणार आहोत. सैफ अली खान एका वर्षात करोडोंची कमाई करतो. CaKnowledge. com 2022 च्या अहवालानुसार, सैफ अली खानकडे सुमारे 1180 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेत्याची दरवर्षी 30 कोटी आणि दरमहा 3 कोटींहून अधिक कमाई होते. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, हा कलाकार एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपये फी घेतो. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 ते 5 कोटी रुपये फी आकारतो. सैफच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात मर्सिडीज बेंझ S350, ऑडी R8 स्पायडर, रेंज रोव्हर स्पोर्ट्स, फोर्ड मस्टँग जीटी 500, BMW 730LD सारख्या लक्झरी वाहनांचा समावेश आहे. ज्याची किंमत करोडो रुपये आहे. सैफ अली खानने त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेली बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले आहे. हे स्टार कपल त्यांच्या दोन मुलांसह मुंबईतील वांद्रे येथे एका अतिशय आलिशान घरात राहतात. ज्यामध्ये जिमपासून स्विमिंग पूलपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय सैफ अली खानचा हरियाणातील पतौडी गावात एक आलिशान घर आहे. जे एखाद्या महालापेक्षा कमी नाही. Financialexpress. com नुसार सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसची किंमत 800 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये 150 खोल्या आहेत. ज्याला सुंदर रंग आणि महागड्या फर्निचरने सजवण्यात आले आहे.
बार्शी : येथील श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक समितीच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात गरजेनुसार मोफत पाण्याचे टँकर उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जैन मुनी गुरूदेव ओंकारेश्वर म. सा. आदी ठाणा यांच्या अम्रतहस्ते मंत्रोच्चार करून, तहसिलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते या टँकरचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कमलेश मेहता, प्रदिप बागमार, बाळासाहेब तातेड, अजित कुंकूलोळ, भरतभाई वखारिया, नगरसेवक प्रशांत कथले, अॅड. दिनेश श्रीश्रीमाळ, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, गोविंद बाफणा, किशोरभाई शहा, धन्यकुमार शहा, पवन श्रीश्रीमाळ, सुभाष लोढा, संदिप सुराणा, सतिश जाजू, समीर सुराणा, अमित कटारिया, सचिन बागमार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
फ्रीजमध्ये अन्न किती काळ ठेवावं? फ्रीजमध्ये अन्न किती काळ ठेवावं? फ्रीजमध्ये किती काळ अन्न ठेवावं हा सगळ्यांना सतावणारा प्रश्न आहे. याबद्दल अनेक प्रवाद आहेत. मात्र नक्की किती काळ अन्न ठेवावं या प्रश्नाचं उत्तर आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर देत आहेत. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. 'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा. )
पुणे : पीएमपी प्रशासनाने नियमित सुरू असलेल्या बसच्या काही मार्गांवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या सुमारास बस रिकाम्या धावत असल्याने मार्गांच्या वेळेमध्ये बदल केले आहेत. याची अंमलबजावणी पीएमपीच्या शहरासह ग्रामीण भागाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने उत्पन्न आणि प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील १५ डेपोअंतर्गत असलेल्या मार्गांची पाहणी करून हा निर्णय घेतला. शहरासह ग्रामीण भागातील काही मार्गांवर पहाटेच्या सुमारास अजिबात प्रवासी उपलब्ध होत नव्हते. तशीच स्थिती रात्री उशिराच्या वेळीदेखील होती. प्रशासनाने केलेल्या पाहणीदरम्यान असे काही मार्ग निदर्शनास आले. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागासह शहरातील पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस आणि रात्री उशिराच्या वेळेस प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार आहे.
सोमवार, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) उपस्थित होते. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी भाजपवर (BJP) केला. दरम्यान, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. (Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेविरोधात महाराष्ट्र सरकारची 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक) पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या बंदात महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली. या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात येणार आहे. तसंच या बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे, असंही ते म्हणाले. तसंच हा बंद 100 टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नवाब मलिक म्हणाले की, लखीमपूरमध्ये इतका मोठा गुन्हा घडूनही पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत. शेतकऱ्याची हत्या करणारा मंत्र्याचा मुलगा फरार आहे. शेतकरी आंदोलनाला वर्ष लोटले तरी केंद्र सरकार त्यांच्याशी संवाद साधत नसून त्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हटले जात आहे. भाजप शेतकऱ्यांचे हित पाहणारा पक्ष नसून तो शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. आता तर भाजप शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीकाही नवाब मलिक यांनी केली. "शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडणे ही मानवतेला कलंक लावणारी घटना आहे आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीला कलंकीत करणारे आहे," असे सचिन सावंत म्हणाले. ज्या पद्धतीने प्रियांका गांधी, राहुल गांधींना अडवण्यात आले ते पाहता देशात हुकुमशाही आली आहे, असे म्हणावे लागेल. त्याचबरोबर यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दमनशाही केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काही दिवसांपूर्वी मी कॉन्टूरिंगGE 1.1 नावाच्या एका अनुप्रयोगाद्वारे Google Earth मधील कॉन्टूर्स पाहण्यासाठी एक मित्र विचारले होते जे कोणत्याही आवृत्ती 4x, Windows XP किंवा Vista सह कार्यरत आहे. सुरू करण्यासाठी, आपल्याला करावे लागेल एक फाइल डाउनलोड करा एका "द्वेषपूर्ण" पृष्ठावरून संकुचित केले आहे जेथे निर्मात्याकडे जर्मन भाषेतील जाहिरातीसह पॉपअप विंडो आहे जी संपूर्ण पृष्ठ व्यापते, म्हणून ती "डबल चिन" काढून टाकण्यासाठी तुम्ही फक्त SchlieBen निवडा म्हणजे बंद करा आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. सावध रहा, आपण केवळ या पृष्ठात प्रवेश करू शकता (http://www.sww.wg.am/) महिन्याच्या पहिल्या दिवसांमध्ये, कारण त्यात मर्यादित बँडविड्थ आहे आणि त्यानंतर बँडविड्थ संपली आणि उपलब्ध नाही. एकदा फाइल डाउनलोड झाली की, ते विसर्जित केले गेले आहे आणि पाच फायली दिसतातः मग ocx ची नोंदणी करण्यासाठी तुम्ही कमांड मेनू प्रविष्ट करा, जो "start/run/cmd" सह DOS सारखा दिसतो आणि तेथे तुम्ही मजकूर लिहाः आणि प्रविष्ट करा, असा संदेश असावा की नियंत्रण योग्यरित्या स्थापित केले गेले होते, ते इतर बरोबर केले जातेः जर आपल्याला काउंटरलेट शोधण्यात समस्या येत असेल तर ते सहसा 1 नंबरच्या डावीकडील बटणावर आणि Alt जीआर की वापरुन होते. ते Alt + 92 वर देखील असते. सरतेशेवटी आपण आपले डोके तोडू इच्छित नसल्यास, वरील ओळींवर कॉपी करा आणि नंतर काळ्या स्क्रीनवर आपण एक उजवे बटण आणि पेस्ट करा. मी GGEFramework.dll फाइल "C:Archivos de programaGoogle Google Earth" मध्ये ठेवली आहे, तेथे एक्झिक्युटेबल त्रिकोण आणि kml फाइल देखील आहे. मग मी स्वतः ला कंटाळलो नाही, मी डेस्कवर असलेल्या लहान त्रिकोणाच्या शॉर्टकट तयार केले. आता Google Earth चालू आहे. आणि एकदा तैनात केल्यावर त्रिकोण काढला जातो. त्यानंतर Google Earth मध्ये GGE नामक वरच्या बारमध्ये एक नवीन कमांड दिसून येतो, ज्यामध्ये कॉन्टूर तयार करण्यासाठी आणि त्यांचे स्वरूप किंवा लेबलिंग कॉन्फिगर करण्यासाठी पर्याय असतात. प्लगिनचा वापर करून ते करण्याचा दुसरा मार्ग ऑटोकॅड कडून आहे. चरण 1. आम्हाला Google अर्थ डिजिटल मॉडेल प्राप्त करायचे आहे त्या क्षेत्राचे प्रदर्शन करा. चरण 2. डिजिटल मॉडेल आयात करा. ऑटोकॅड वापरुन, प्लेक्स.इर्थ अॅड-इन्स स्थापित केले. तत्वतः, आपल्याला सत्र सुरू करावे लागेल. मग आम्ही टेरिन टॅबमधील "बाय जीई व्यू" पर्याय निवडतो. ते 1,304 गुण आयात होईल याची पुष्टी करण्यास सांगेल; तर आमच्याकडे समोच्च रेषेत तयार व्हायचे असल्यास ते पुष्टी करण्यास सांगेल. आणि तयार; ऑटोकॅड मधील Google अर्थ समोच्च रेषा. ऑब्जेक्ट निवडल्यानंतर, आम्ही केएमएल निर्यात पर्याय निवडतो, त्यानंतर आम्ही दर्शवितो की मॉडेल हे भूप्रदेशात समायोजित केले आहे आणि शेवटी ते Google Earth मध्ये उघडते. आणि तिथेच आमचा परिणाम आहे. De येथे आपण kmz फाइल डाउनलोड करू शकता आम्ही या उदाहरणामध्ये वापरला आहे. अॅरी जूनियर म्हणतातः कार्यक्रमाची कल्पना चांगली आहे, परंतु ती कार्य करत नाही !!! खरच खेदाची गोष्ट !! त्यांच्याकडे सर्वकाही झाल्यानंतर, ते चरणांचे अनुसरण करतात, परंतु सीएमडी ocx वाचण्यासाठी प्रशासक म्हणून कार्यान्वित केले जातात, फक्त या चरणावर regsvr32 %Systemroot%~\System32\comdlg32.ocx ते ~ काढून टाकतात आणि जेव्हा ते मार्गावर कॉपी केले जाते. google Earth चे इतर दोन फोल्डर दिसतात आणि ते क्लायंट फोल्डरमध्ये कॉपी करतात बाकीचे फॉलो करतात आणि ते त्यांच्यासाठी कार्य करावे. माईड म्हणतातः धन्यवाद! देव तुला आशीर्वाद देवो! कृपया कोणीतरी मला फाइल कॉन्टूर.केएमएल पाठवू शकता ?? नॅन्सी म्हणतातः आर्थर तावारे म्हणतातः गिलर्मो स्कुलझ म्हणतातः जुआन रिक्लेम म्हणतातः जर एखाद्याचे समाधान असेल तर आपल्यापैकी बरेच जण याची प्रशंसा करतील. फ्रँको योगदान दिल्याबद्दल धन्यवाद. हाय.... मी पाहत आहे की बरेच लोक कॉन्टूर.केएमएल फाईल गमावत आहेत, कदाचित म्हणूनच यात एरर 5 आहे. मलाही ते घडले.... कोणाकडे ती फाईल आहे... .. तसेच इतर दोन फायली ज्या त्या प्रदान केलेल्या दुव्यांमध्ये नाहीत, त्या इतर टिप्पण्यांमध्ये ठेवल्या आहेत.... रॉजर म्हणतातः विंडोज 7 मध्ये मी ते कसे प्रतिष्ठापीत करू? येथून आपण डाउनलोड कराः केवळ आपल्याला महिन्याच्या पहिल्या दिवसात तसे करावे लागेल कारण त्या साइटची बँडविड्थ मर्यादित आहे आणि नंतर ती उपलब्ध नाही. बाहुली म्हणतातः रॉगेरीओ चगास म्हणतातः आपल्यापैकी कोणास कॉन्टूरिंगGE च्या 1.1 आवृत्तीची आवृत्ती आहे कृपया आपण खालील मेलवर पाठवू शकता? कारण मी 1.2 आवृत्ती डाउनलोड केली आहे आणि ते मागील वर्णनापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. Contour.kml फाइल म्हणजे काय? ते पान नाही http://www.sww.wg.am खाली आहे. काय होते की त्याची बँडविड्थ कमी आहे, म्हणून ती फक्त महिन्याच्या पहिल्या दिवसातच उपलब्ध असते, जेव्हा रुंदी संपते तेव्हा उर्वरित महिन्यासाठी ती प्रवेशयोग्य नसते. ठीक आहे, ती काहीतरी आहे जरी ती टेरिआना मार्गे असेल. ओडीआय म्हणतातः जुलियट म्हणतातः नमस्कार, बर्याच जणांप्रमाणे मला प्रोग्राम चालविण्यासाठी समस्या येत आहेत. एक पृष्ठ http://www.sww.wg.am/downloads.html हे कार्य करत नाही ... आणखी एक पृष्ठ असेल ज्यातून संकुचित फाईल डाउनलोड करावी? धन्यवाद!! नमस्कार, 5 त्रुटी कशी येत आहे, संगणनाबद्दल आणि मला असलेल्या Google पृथ्वीबद्दल मला काहीच समजत नाही, ते काय आहे ते मला माहित नाही, मी कुठे दिसते? आणि काहीतरी बदलू? जर कोणी मला योग्य गृहिणी आणि गुगल पृथ्वी पाठवण्यास पाठवू शकेल तर मी त्याचे कौतुक करतो कारण मला हे काही आवश्यक कामांसाठी आवश्यक आहे. यासीर म्हणतातः जॉर्जे_SLP म्हणतातः मी Google Earth आवृत्ती 4.2.0205.5730 मध्ये लेव्हल वक्र तयार करू शकतो, परंतु हे कॉन्टूर लाइनचे मूल्य दर्शविणार नाही कारण हे वक्रशी संबंधित असलेले मूल्य आहे आणि त्याचे गुणधर्म सारणीसह, SHP स्वरूपनात निर्यात केले जाऊ शकते. कोणीतरी आधीच हे प्राप्त केले आहे, कृपया मला रेसिपी पास करा, कारण मी जवळजवळ अर्धा वर्ष होतो, त्रुटी 5 शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, आणि दुसरे काहीही नाही. जियोव्हानी म्हणतातः Alguem मला किंवा contour.kml pois estou tendo किंवा erro 5 também पाठवू शकते! रॉय म्हणतातः आणि मी या सूचनांनुसार ते डाउनलोड करण्याचा निर्णय घेतला आणि मला त्रुटी 5 ची समस्या किंवा तत्सम काहीतरी आहे......ते सुरू झाले आहे. कृपया मदत करा.... Takay म्हणतातः एक सोल्यूको amigos !!!! प्रथम Parabéns pelo साइट !!! पास्ता विन्डोजसिस्टम xNUMX साठी डेपोइस कॉम्पी आणि ट्यूटोरियल प्रक्रियांचे अनुसरण करा. ठीक आहे ?? !! अॅलेक्स म्हणतातः डेनिस म्हणतातः गुस्तावो म्हणतातः कोयूओ म्हणतातः प्रिय, मी या संदर्भात विविध प्रश्नांमध्ये सामील आहे. मी जीई प्लस 5.1.3533.1731 मध्ये जीई कंटूरिंग स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल सूचित केले जाणारे सर्व चरणांचे अनुसरण करून मला जीई टूलबारमध्ये सीजीई बटण देखील मिळत नाही. कदाचित काही उदार आत्मा मला हा हात देईल, हे काम करण्यासाठी मला सापडणारा प्रचंड समाधान दर्शविणे आवश्यक नाही. रिकार्डो, मी आपल्या मेलवर आपल्याला कॉन्टूर.केएमएल फाइल पाठवितो, तथापि, कोणत्याही भागीदाराने आधीच सोडविल्यास, मी अद्याप अर्ध्या ओळीच्या लेबलांचा भाग सोडविण्यास सक्षम नाही. या फोरममध्ये डेटा पास करा किंवा प्रकाशित करा. पुन्हा मी या स्पेसची प्रशंसा करतो, जिथे तंत्रज्ञान निरंतर बदलते आणि त्यास स्वारस्य असलेल्या लोकांपर्यंत पोहोचते. आपणास कंटरिंग जीई पृष्ठाचा मालक म्हणायचे आहे काय? आयएनजी मार्सेलो म्हणतातः नमस्कार गुड मॉर्निंग, माफ करा मी पृष्ठाचा मालक कोण आहे हे जाणून घेऊ इच्छितो, आज खेद वाटला की, आपले फोटो दिसतात आणि मला वाटते की मी तुम्हाला ओळखतो... ;-) एजर्डो म्हणतातः कोणीतरी समस्या सोडवली !!!! कृपया मला माझ्या मेलवर समस्येचे निराकरण पाठवा tatoozaa@yahoo.es खूप आभारी आहोत म्हणून मी खूप आभारी आहे !!!! आयएनजी रॉड्रिग्ज म्हणतातः अशा महत्वाच्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी आपल्याला धन्यवाद. COUNTRYING GE PROGRAM ची स्थापना करण्यात अक्षम नसलेल्या प्रत्येकासाठी, मी आपल्या स्थापनेची समस्या कोणती आहे हे आपण शोधून काढले आहे याची मला माहिती आहे. या आवृत्तीवर, डाव्या बाजूस, मार्क रिलीफसाठी एक जागा ठेवून वर्णित आहे. विश्वासाची जागा ब्रँड करा, कारण ते दृश्यमान आहे, अन्यथा तयार केले जाऊ शकत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे एक आवृत्ती आहे जिथे तुम्ही निवडू शकताः "रिलीव्ह", आणि या फोरममध्ये आधीच दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. (ईएल साल्वाडोर) Google पृथ्वीचा वापर करा ज्यामध्ये विश्वासार्हतेचा पर्याय आहे आणि निवडा, जेणेकरून आपण पातळीवरील कारणे तयार करू शकता. मी आणखी एक आहे ज्यांना चुकांची चिरस्थायी समस्या आहे. I. मी गियरची आवृत्ती 5 डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जीई प्रारंभ विंडोमध्ये ते मला सांगते की मी प्रोग्रामला आवृत्ती .4.3.२ वर अद्यतनित करणे आवश्यक आहे, म्हणजेच, ज्याद्वारे काउंटर नाही चालवा.... जॉर्ज_एसएलपीः जर आपण मला आपल्या GEarth च्या आवृत्तीचे इन्स्टॉलर आणि कॉन्टूर माझ्या ईमेलवर पाठवू शकता richi225@hotmail.com आणि मी प्रत्येकास प्रत्येकासाठी एक निश्चित निराकरण देण्यासाठी सर्वकाही अपलोड करण्याचे आणि येथे एक दुवा सोडण्याचे वचन देतो. जर अधिक लोकांना प्रोग्राम कार्यरत असेल तर मला वाटते की परिमाणांच्या समस्येचे निराकरण करणे आपल्यासाठी सोपे होईल. फेलो मंच, मी हे नवीन आहे आणि Google Earth वर रुपरेषा ओळी व्युत्पन्न, आणि अनुप्रयोग आवृत्ती प्राप्त साध्य करण्यासाठी 1.2 अर्ज संबंधित आहे, मी सर्व पुनरावलोकने वाचा आणि मी सर्वात कार्य करत नाही कारण आम्हाला वाटते की हा अनुप्रयोग फक्त Google Earth आवृत्ती 4.3 कार्य करते, आणि त्याला Google द्वारे दाखल झिप फोल्डर, कार्यक्रम शोधून काढणे contour.kml असण्याचा आणि सर्व पावले केले आणि तो फक्त मला काम, मला प्रत्येक कॉन्टूर लाइनमध्ये उंचीचे मूल्य जोडण्याची आवश्यकता आहे, जर कोणी मला माहित असेल तर कृपया मला एक टिप्पणी पाठवा किंवा या फोरममध्ये पोस्ट करा, मी त्याची प्रशंसा करीन. मजेदार मंच, मदत. झोन म्हणतातः मित्रांनो, मी हे वक्र किंवा गूगल अर्थ वरून पॉईंट्स ऑटोकॅड किंवा सिव्हिल d डी सारख्या प्रोग्राममध्ये कसे निर्यात करू शकतो, कृपया मित्रांनो, मला याची गरज आहे, तुमच्या उत्तरांबद्दल धन्यवाद! Saludos AMIGOS देखावा मी समान समस्या Lacho contour.kml देखावा आणि दिसत जेथे मी आहे तेथे ही फाईल शोधू किंवा मी आवश्यक 5 फाइल खर्च नाही कुणाला नाही तर porfa शोधू शकत नाही. लाचो म्हणतातः दान म्हणतातः ऑर्लॅंडो म्हणतातः अधिकृत वेबसाइटनुसार, 1.5 आवृत्ती आहे परंतु आपण ते डाउनलोड करु शकत नाही आणि आपल्यासारख्या, मला समस्या आहेत ,,, कोणीतरी ज्याने 100% वर कार्य केले आहे? ऑस्कर म्हणतातः फूल म्हणतातः नमस्कार कुणीतरी माझी मदत करू शकेल. मी ̈google पृथ्वी संरक्षण यंत्रणा संदेशासह एक विंडो मिळवू शकतो. मी स्वीकारतो की आपण Google स्वीकारत आहात, मी स्वीकारतो आणि नंतर मला प्रसिद्ध त्रुटी 5 मिळते. जोसः OpenX मध्ये ActiveX प्रमाणे ते कार्य करते. गांधीहोसः तुम्ही ocx नोंदणी केली आहे का? गंंधिओस म्हणतातः कल्पना आहे का? जोसेदकेराकस म्हणतातः Rigoleto म्हणतातः युरीनोआ म्हणतातः Amigosssss. खूप त्रास होऊ नका. मला हे जाणून घेणे आवश्यक आहे की ते पूर्ण होईल की नाही हे त्यांना सोडवायचे नाही. मी हे पृष्ठ वरुन डाउनलोड केले आहे जे शीर्षस्थानी आहे आणि ते कार्य करते, मोठी समस्या अशी आहे की लेबल परिमाणे ठेवण्यासाठी सक्रिय केले जात नाही. फक्त तेच दोष आहे. म्हणून आम्ही येथे माहिती आणि मदत करण्यासाठी येथे आहोत. स्तरीय घटके आल्या आहेत ठीक आहे ते आर्गिस किंवा ऑटोकाडमध्ये निर्यात केले जाऊ शकतात आणि अशा प्रकारे ते चांगले डिजिटल सादरीकरण बनवू शकतात. ते माझ्या मेलवर पाठविल्यास ते पूर्ण इंस्टॉलर असणे आवश्यक आहे geovilc_yuri@hotmail.com आणि मी तुम्हाला हे प्रोग्राम कसे हाताळायचे ते पाठविणार नाही. Fred83 म्हणतातः मॅन्युएल पेरिया अल्मनझा म्हणतातः युरीनो म्हणतातः countourinGE प्रतिष्ठापीत करण्यासाठी. प्रथम आपण गूगल गुगल धरून स्थापित केलेच पाहिजे, ठीक आहे हेही आपल्याला ठाऊक आहे की सी ड्राइव्हमध्ये फोल्डर स्थापित करताना. आता आपण countouringGE वरून डाउनलोड केलेली सर्व फाईल्स त्या एका युनिट सी मध्ये असलेल्या google एथ फोल्डरवर कॉपी करा. मग त्या त्रिकोणाच्या प्रकारचे चिन्ह क्लिक करा जे त्या कोंटरिंगजी फायलींपैकी एक असून आनंद घ्या. तुमच्याकडे ते ocx असणे आवश्यक नाही, तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये आधीच आहात, तुमच्या PC च्या c drive मध्ये टाका आणि systen 32 फोल्डरमध्ये हे आवश्यक नाही. दुसऱ्यासाठी, जर तुम्हाला रन टाईममध्ये एरर 5 आली, तर ते फक्त तुमच्या Google Earth स्क्रीनवर तुमची इमेज खूप मोठी असल्यामुळे तुम्हाला थोडे अधिक झूम करावे लागेल आणि समस्या संपली आहे. जर कोणाकडे काउंटरिंगजीई 1.1 किंवा 1.2 असेल, तर मी तुम्हाला माझ्या ईमेलवर पाठवण्याची विनंती करतो, मी अनंत कृतज्ञ राहीन, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समोच्च रेषांवर तुमची परिमाणे ठेवणे, माझा ईमेल आहे geovilc_yuri@hotmail.com. मी हा विषय चांगला हाताळतो आणि आपण माझा पाठिंबा देत असल्यास मी इतर गोष्टी देखील करतो. मी आपले सर्व ट्यूटोर व्हिडीओ हाताळल्याप्रमाणे आणि इतर विस्तार देखील पाठवू. युली म्हणतातः हॅलो पोर्फा मला कोणीतरी प्रोग्राम countouringGE पास करू शकतो माझ्याकडे एक आहे पण लेबले वक्र वर ठेवू नका. इवन म्हणतातः मला वाटते की प्रोग्राममध्ये काही कॉन्फिगरेशन पर्याय आहेत, आपण वारंवार वक्र व लेबल इच्छिता. हॅरोल्ड म्हणतातः योगदान खूप चांगले आहे. मला एक समस्या आहे परंतु एक शंका आहेः मी कॉन्टूरिंगGE डाउनलोड केली आहे आणि सर्वकाही ठीक कार्यरत आहे वगळता मला त्या समोरील रेषांवर संख्या मिळत नाही. असे का घडते? तुझ्याकडे संख्या बाहेर येतात का? धन्यवाद, सीओओ. जॉर्ज फ्लॉरेस एस म्हणतातः उत्कृष्ट... हे उत्तम प्रकारे कार्य केले.... डोळा जो काम करतो.... कदाचित इंस्टॉलेशन फार चांगले समजावले नाही. माझ्याकडे सामान्य पृथ्वी Google आहे, पीआरओ काम करत नाही. पी. संहुझा म्हणतातः सत्य हे आहे की जेव्हा आपल्याकडे समोच्च कव्हरेज नसते तेव्हा हे साधन खूप उपयुक्त आहे; तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की वक्रांचे घनता केवळ त्यांच्या इंटरपोलेशनशी संबंधित आहे; मी काही आराम मॉडेल की छाप करा. मी व्यायाम केला आणि 50 मीटर अंतरावर देखील समान अंतर कमी-अधिक चांगले कार्य करते, त्यानंतर आम्ही काहीही "जिंकत" नाही. आह!!!!!!, आवृत्ती अद्यतनित केली गेली आणि अनेक चरणांची आवश्यकता नाही. उत्कृष्ट ब्लॉग, बर्याच एंट्रेन्टिनेडो जियोफुडास. मला कॉन्टूरिंगGE 1.2 सह समस्या नाही. असे दिसते की ते घसरण होत नाही, परंतु बँडविड्थ देणारी रक्कम आधीपासून जास्त रहदारीने पार केली गेली आहे. जोपर्यंत वेब मालक अधिक बँडविड्थ मिळवण्यासाठी अधिक पैसे देतील तोपर्यंत आपल्याला महिना समाप्त होण्याची प्रतीक्षा करावी लागेल कारण हे प्रति महिना दिले जाते. एप्रिलचा पहिला दिवस हे पृष्ठ पुन्हा उपलब्ध असले पाहिजेत ... आणि ते आपण महिन्यात भरत असलेल्या वाहतुकीची मर्यादा ओलांड करेपर्यंत महिन्यात असेल. आपण ब्लॉगवर कधी उल्लेख केला आहे हे मला आठवत नाही परंतु व्हॅलेरी होरोसुनोव्ह (Google अर्थ समुदायामधील व्हॅलेरी 35) यांचे एक उपयुक्त अनुप्रयोग आहे, ज्यासह - बर्याच गोष्टींमध्ये रुपरेषा तयार केली जाऊ शकतात. जोपर्यंत त्यांचा संबंध आहे, अनुप्रयोगात प्रतिनिधित्व करण्यासाठी पातळीची संख्या, त्यांचे रंग, त्यांचे ग्रेडियंट आणि गुळगुळीत ठेवण्याची क्षमता आहे. या अनुप्रयोगाला KML2KML म्हटले जाते, त्याचे URL हे आहेः सर्वात किफायती आवृत्तीसाठी $ 50- डॉलर्स खर्च होतात. मला 3 आवृत्त्यांची वैशिष्ट्ये उपलब्ध असल्याची खात्री नाही.
अमरावतीः देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दुसऱ्या लाटेत देशात सर्वाधिक मृत्यू झालेत. अनेकांचे रोजगार गेलेत. व्यवसाय बंद पडलेत. अनेकांनी कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावली. एकूणच मोदी सरकार देशवासींना भिक्षेला लावण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. जिल्हा दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी शनिवारी (ता. १२) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाची दुसरी लाट येणार याची शास्त्रज्ञांनी कल्पना दिल्यानंतरही मोदी सरकार गाफील राहिले. देशात मृत्यूने कहर केला. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतासुद्धा देशात ऑक्सिजन, लशींबाबत केलेले नियोजन फसले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेतसुद्धा मोदी सरकारकडून फारशा अपेक्षा नाहीत, असेही ते म्हणाले. महामारीमुक्त देश हीच काँग्रेसची संकल्पना असून त्यादृष्टीने प्रत्यक्षात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करीत असल्याचे ते म्हणाले. पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अटी केंद्र शासनानेच बदलल्या आहेत. अनेक अटी आज गैरलागू आहेत. असे असतानाही महाविकास आघाडीच्या नावाने खडे फोडण्याचा उद्योग भाजप नेते करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नंदुरबार जिल्हा परिषदेत (Nandurbar zp) रिक्तपदे आहेत. यात सक्षम अधिकारी असतांना त्याठिकाणी पात्रता नसलेल्या (unqualified officers) अधिकार्यांना नियुक्त्या (Appointment) देण्यामागील गौडबंगाल काय आहे. असा सवाल करत शिक्षण विभागाचा कारभारावर जि. प. सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत ताशेरे ओढले. त्यामुळे बैठकीत वातावरण तापले होते. नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात स्थायी समितीची सभा जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जि. पं. मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि. प. उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगिता गावीत, शिक्षण व अर्थसमिती सभापती गणेश पराडके, बांधकाम सभापती शंकर पाडवी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रमोदकुमार पवार आदी उपस्थित होते. यावेळी सुरूवातीला शासन निर्णय परीपत्रके वाचन करण्यात आली. दरम्यान जि. प. सदस्य राया मावची यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्माशानभुमी नसलेल्या ठिकाणी स्मशानभुमी तयार करण्याची मागणी केली. तसेच पदवीधर, आमदारांच्या धर्तीवर सरपंच, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांच्याही आमदार निवडण्यात यावा. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे सुचना केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, वर्ग दोनचे सक्षम अधिकारी असतांना त्यांना डावलून गट शिक्षणाधिकारीपदी कोणालाही पदभार देण्यात येतो. त्याबाबत त्यांच्यासह जि. प. सदस्या एश्वर्या रावल यांनी आक्षेप घेतला. शिक्षण विभागासोबतच महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेसाठी प्रभावी अधिकारी म्हणून श्री. सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर अनेक तक्रारी असतांना पद्भार कुठल्या अनुषंगाने दिला जातो. असा सवाल जि. प. सदस्य भरत गावीत यांनी उपस्थित करत सक्षम अधिकारी असतील त्यांच्याकडे पद्भार देण्यात यावा. याची मागणी केली. त्यासोबत कुठल्या विभागात पदभार देतांना कुठले नियम लावले आहेत. याची लेखी मागणी केली. जिल्हा परिषदेत अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे पादत्रता नसलेल्या लोकांना नियुक्त्या दिल्या जात असल्याबाबत जि. प. सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जि. प. सदस्या एश्वर्या रावल यांनी 7 ते 8 वर्षापासून सारंगखेडा आरोग्य केंद्रात डॉक्टरांची मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापर्यंत त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. 30 गावांचा संपर्क या आरोग्य केंद्राशी येतो. त्यामुळे येथे एम. बी. एस. डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेतंर्गत 2021-22 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे अद्यापही रजिस्टेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शासनाने 31 मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असतांना त्यांचे कामे कसे पूर्ण होतील. असा सवाल जि. प. सदस्यांनी व्यक्त केला. दरम्यान 2024 पर्यंत मनरेगासाठी जिल्ह्यात 1 हजार कोटी मनुष्यबळाचा लक्षांक ठेवण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. शासनाला विनंती आहे की, नंदुरबार जिल्हा परिषदेतील रिक्तपदे भरण्यात यावी. ज्यामुळे जिल्ह्यात विकासाला चालना मिळेल तसेच ग्रामीण भागातून आलेल्या नागरीकांचे तक्रारी सोडविण्यास मदत होईल. आज जिल्हा परिषदेत पात्रता नसतांनाही विविध विभागात कर्मचार्यांना अधिकारीपदाचा दर्जा दिला जात आहे. त्यातच शिक्षण विभागात मनमानी कारभार सुरू असून अनेक कर्मचारी 10 ते 12 वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून आहे. अशा कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी.
मागील अधिक्याइतकीच जयदत्त क्षीरसागरांना मते । Loksatta\nमागील अधिक्याइतकीच जयदत्त क्षीरसागरांना मते\nराष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला असला, तरी ६५ टक्के मतदारांनी त्यांना नाकारले, मागील वेळी ७६ हजारांचे मताधिक्य होते. या वेळी तेवढीच मते त्यांना मिळाली.\nthombre । October 26, 2014 01:50 am\nराष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला असला, तरी ६५ टक्के मतदारांनी त्यांना नाकारले, तर पक्षाच्या पराभूत उमेदवारांत सर्वाधिक मते आष्टीत सुरेश धस यांनी घेतली. बीड मतदारसंघात मागील वेळी क्षीरसागरांना ७६ हजारांचे मताधिक्य होते. या वेळी तेवढीच मते त्यांना मिळाली.\nसहापकी बीड मतदारसंघात क्षीरसागर यांचा ६ हजारांच्या मताधिक्क्याने निसटता विजय झाला. क्षीरसागर घराण्याचा जिल्हय़ाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. केशरबाई क्षीरसागर यांनी सरपंच ते खासदारकीपर्यंत यश मिळवताना वर्चस्व निर्माण केले. त्यांचा वारसा जयदत्त पुढे चालवत आहेत. पाच वर्षांपूर्वी चौसाळा मतदारसंघ कमी झाल्यानंतर त्यांनी बीडमधून तब्बल ७६ हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळवला. नगरपालिकेसह सर्वच स्थानिक संस्थांवर क्षीरसागरांचे वर्चस्व आहे. खासगी शिक्षण संस्थांचे मतदारसंघात जाळे आहे. त्यामुळे हक्काचा मतदार असतानाही त्यांच्याविरुद्ध मतपेटीतून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त झाली.\nयुती तुटल्याने ऐनवेळी आलेल्या भाजपच्या विनायक मेटे यांनी शेवटपर्यंत त्यांना कडवी झुंज दिली. हक्क बजावलेल्या दोन लाख मतांपकी क्षीरसागरांना ७७ हजार मते मिळाली. सव्वा लाख मते त्यांच्या विरोधात गेली. इतक्या मोठय़ा प्रमाणात जनमत विरोधात का गेले? याचे आत्मचिंतन त्यांना करावे लागणार आहे. आष्टीतून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी जिल्हय़ातील पराभूतांपेक्षा सर्वात जास्त, १ लाख १५ हजार, तर केजच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी सर्वात कमी ६३ हजार मते घेतली. परळीत धनंजय मुंडे यांनी ७१ हजार, तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांनी ७४ हजार मते घेतली.\nFirst Published on October 26, 2014 1:50 am\nWeb Title: jaydatta kshirsagar previous votes\n1 हैदराबाद पोलिसांसह एटीएसकडून चौकशी\n2 मंगलमय वातावरणात काळभरवाची भेंडोळी\n3 देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री!
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. पण, आज विरोधकांकडून नाही तर सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी 'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं. यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. वर एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे. तर आदित्य हे हिंदुत्वाकडे पाठकरुन बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवताना दिसत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकामंधील संघर्ष पाहायला मिळत आहे. काल विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये बाचाबाची झाली, हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. त्यानंतर आज शिंदेगटाकडून थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीवरही हल्लाबोल करण्यात आला आहे. 'लवासाचे खोके, बारामती ओके', 'दाऊदचे खोके, महाविकास आघाडी ओके', अशा घोषणा यावेळी शिंदे गटाकडून देण्यात आल्या. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे प्रकाश सुर्वेही या आंदोलनात सामील झाले होते. आदित्य ठाकरे यांनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते तर मुळात यांनी गद्दारी केली नसती आणि आता असे बिचाऱ्यांसारखे उभे राहिले नसते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आदित्य यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचे शिंदे गटाचे चॅलेंजही स्वीकारले. मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. शिंदे गटाच्या ४० आमदारांनीही त्यांचा राजीनामा द्यावा. विधानसभा विसर्जित करून संपूर्ण राज्यातच निवडणूक घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. या बंडखोर आमदारांना आम्ही काय कमी दिले होते. कोणताही मुख्यमंत्री सोडणार नाही, अशी खाती त्यांना दिली होत. पण, आज हे सर्वजण आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमच्यासमोर उभे आहेत. आम्हाला एकटं पाडण्यासाठी, आमच्यावर टीका करण्यासाठी या बंडखोर आमदारांना गळ्यात काय-काय घालून उभं केले जात आहे. आम्हाला एकटं पाडा, टीका करा, तर मंत्रिपदं मिळतील, असे या बंडखोर आमदारांना सांगितले जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
निश्चितपणे प्रत्येक घरात फिक्स्चर्स असतात. दिवे ही सर्व यंत्रे आहेत जी त्यांच्या डिझाइनमध्ये दीप-स्क्रूिंग चक, दिवा, विद्युत वायरिंग घटक आणि या डिव्हाइसचे निराकरण करण्याची शक्यता आहे. एका विशिष्ट खोलीसाठी कशा प्रकारचा दिवा निवडतो, ते सर्वसाधारणपणे कसे वर्गीकृत केले जाऊ शकतात आणि एकाच खोलीत कित्येक प्रकारचे दिवे एकत्र कसे करावे? आपण आमच्या सर्व लेखांबद्दल याबद्दल चर्चा करू. त्याच्या उद्देशानुसार, luminaires खालील प्रकारच्या विभागली आहेतः - सामान्य प्रकाश साठी दिवे यात निलंबित , छत, भिंत , टेबल आणि फ्लोचा प्रकारचे सामने यांचा समावेश आहे. ते खोलीच्या सामान्य दिव्यांसाठी स्थापित केले आहेत. - स्थानीय (स्थानिक) प्रकाशयोजनासाठी फिक्स्चर्स ते डेस्कटॉप, अंगभूत, मजला, निलंबित, भिंत माऊंट किंवा संलग्नयोग्य असू शकतात. ते कामाच्या पृष्ठभागावर किंवा रुंदीच्या दुसर्या भागाला प्रकाशित करण्यासाठी वापरतात. - एकत्रित प्रकाशाची फिक्स्चर्स. यामध्ये भिंत, निलंबित, मजला आणि टेबल दिवे अंतर्भूत आहेत, जे साधारण आणि स्थानिक दोन्ही प्रकाशाच्या कार्याचे समान कार्य करू शकतात. - दिवे सजावटी प्रकार - डेस्कटॉप आणि भिंत. खोलीच्या इतर सजावटांसोबत ते आतील सजावटीचे काम करतात. - एक्सपोजर दिवे. ते विशिष्ट ऑब्जेक्ट्स प्रकाशित करण्यासाठी डिझाइन केले आहेत आणि डेस्कटॉप, भिंत, निलंबित, कमाल मर्यादा, बिल्ट-इन, संलग्न केलेले, फ्लोअर असू शकतात. म्हणून, स्वयंपाकघरच्या सामान्य प्रकाशासाठी, छत किंवा भिंतीवरील दिवे, जसे चंडेरे आणि स्नाहीसारख्या दिव्यांची उष्णता असलेल्या दिवे सर्वात उपयुक्त आहेत. दुसरा पर्याय - ऊर्जेच्या बचत दिव्यांच्या दिवा, ज्या समान प्रकाशाच्या सावलीत देतात आणि एक आरामदायक वातावरण तयार करतात. स्वयंपाकघरमध्ये मजला दिवे, टेबल लैंप आणि स्पॉट लाइट्स वापरणे अवांछनीय आहे. स्वयंपाकघर क्षेत्रातील स्थानिक प्रकाशासाठी, इनकॅन्डेसेंट दिवे काम करणार नाहीत, कारण ते त्वरेने गरम होतात. फ्लोरोसेंट दिवे वापरणे चांगले. लिव्हिंग रूमसाठी लिमिनेयरची निवड हे अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे खोलीचे आकार आणि आकार, मर्यादेची उंची, आतील विशिष्ट शैली, वैयक्तिक झोन हायलाइट करण्याची आवश्यकता, विशिष्ट प्रकाश परिणाम तयार करण्याची इच्छा. हे असे होऊ शकते की, लिव्हिंग रूममध्ये अशा प्रकारचे फिक्स्चर वापरणे बिंदू, मुख्य दिवे, रात्र दिवे असे प्रथा आहे. आणि त्यांच्या स्थानाच्या ठिकाणी - फाशी, कमाल मर्यादा, भिंत, डेस्कटॉप. बेडरूम सामान्य आणि स्थानिक प्रकाश साठी दिवे वापरतात, तसेच सजावटीचे नमुने मुख्य प्रकाश मर्यादीत झाडाझड्यांमधून येतो, आणि स्थानिक प्रकाश म्हणून, अधिकतर बिछान्यावरील मेजावर असलेल्या बेड किंवा टेबल लॅम्पच्या डोक्यावर भिंत कुपी वापरतात. झूमर आणि विशिष्ट झोन स्पॉटलाइटिंगचा हा मिलाफ आपण वेगवेगळ्या परिस्थितीत आरामदायी अनुभवतो. आपली साइट प्रकाशित करण्यासाठी प्रोजेक्ट विकसित करताना, आपल्याला प्रकाशयोजनाच्या प्रकार आणि शैलीवर निर्णय घेणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दिवे, गरमागरम, गॅस-स्त्राव, पारा, धातू-हॅलोजन, सोडियम, क्सीनन, फ्लूरोसेन्ट, इन्डेकरण दिवे आणि सौर-शक्तीच्या दिवे यांसारख्या दिवे योग्य आहेत. विविध प्रकारचे एलईडी दिवे देखील सामान्य आहेत. शैलीच्या अनुसार, स्ट्रीट लाईट फ्लॉन्ज प्रकाराचे असू शकतात, जसे की पोल, भिंत, निलंबित, बिल्ट-इन, ग्राउंड आणि फ्लोटिंग वर रस्त्यावर दिवे.
Manthan- Vishwash Londhe, Anant Velankar - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books) गेली सुमारे 3 वर्षे quora.com सारखी समाजमाध्यमे किंवा वृत्तपत्रीय लेख आणि दूरदर्शनवर घडणाऱ्या चर्चा किंवा मूलभूत प्रश्नांचा नैमित्तिक आढावा यातून आम्ही काही दखलपात्र प्रश्नांवर आधी चर्चा आणि मग त्या चर्चेच्या निष्कर्षांवर स्वतंत्र विस्तृत विवेचन अशा पध्दतीने वेळोवेळी काही लेख लिहून काढले त्यांचं हे संकलन वाचकांसमोर ठेवण्यास आम्हाला आनंद वाटतो. या लेखांमधे कोणताही ठराविक असा विषय नाही किंवा स्पष्टच सांगायचं तर सुसूत्र अशी विषय संगतीही नाही. ज्या प्रश्नासंदर्भात ही चर्चा होते किंवा मुद्दाम घडवून आणली जाते ते बऱ्याच अंशी quora.com सारख्या समाजमाध्यमातूनच विचारलेले असतात आणि याच माध्यमातून त्यांना कमीअधिक सुसंगत उत्तरेही मिळालेली असतात. या उत्तरांचाही संदर्भ आणि उपयोग या चर्चांमध्ये आणि पर्यायाने लेखनात होता. श्रवण, वाचन, चिंतन, मनन, चर्चा याच्या पुढची पायरी ही लेखन असावी असा पूर्वसंकेत आहे. आणि त्या अर्थाने लेखन ही सर्वात कष्टप्रद, आणि सर्वात जास्त धोकादायक किंवा विध्वसंक कृती मानली पाहिजे. कारण एका व्यक्तीने कितीही तर्कशुध्द विचार करायचा ठरवला तरी मतभिन्नता निर्माण होतेच आणि लेखन हा तर्काच्या स्थितीशून्यतेचा पुरावाच असतो. वाचनाची पर्यायाने संदर्भांची किंवा संदर्भ ग्रंथाच्या परिशीलनाची विपुलता प्रत्येक लेखनाची प्राथमिकता आहे पण या बाबतीत इथे त्याची कमतरता मान्य करताना हे लेखन कुठल्याही तऱ्हेने किंवा कोणत्याही अंगाने पूर्वप्रसिध्द मतांना छेद देण्यासाठी नसून चर्चेत सहभागी असणाऱ्यांच्या मतांचा किंवा निष्कर्षांचा फक्त लेखी स्मरणठेवा आहे. स्वतंत्ररित्या यापैकी प्रत्येक लेख हा निबंध प्रकारातच मोडेल कारण हा लेखकांचा दृष्टिकोन असून त्याला अनेक पैलू असू शकतात किंवा निरनिराळ्या कोनातून किंवा अगदी भिन्न अशा अर्थाने ही त्या बद्दल लिहिता आणि बोलता येईल आणि हाच असे लेख किंवा निबंध लिहिण्याचा हेतू आहे. ढोबळ अर्थापासूनसुरूवात करुन जास्तीत जास्त आक्षेपांचे जास्तीत जास्त निराकारण व्हावे असा यात आशावाद आहे. हा वाद किंवा खंडन नसून ज्या निष्कर्षाकडे आपण जाणार आहोत त्याचे अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्षित असे स्वरुप स्पष्ट व्हावे आणि त्यातून चर्चाविषयालाच नव्हे तर आणखी काही विषयांवर चर्चेला किंवा लेखनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. बव्हंशी निरीक्षणातून असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा मुळात विषयाचं किंवा प्रश्नांचच नीट आकलन न झाल्यामुळे अगदी स्वपातळीवर सुध्दा समाधानकारक अशा स्पष्टिकरणाचा उत्तरांमधे अभाव दिसून येतो. आमचा प्रयत्न हाच आहे की मुळात प्रश्न समजून घेण्यात आपण किती यशस्वी होतो याचं मोजमाप करावं याच विचारातून प्रत्येक प्रश्नावर आणखी उपप्रश्न आणि त्यावर आणखी आक्षेप आणि त्याची जास्तीतजास्त समाधानकारक (म्हणजे आमच्या मर्यादे पर्यंत) सोडवणूक हे चर्चेचे सूत्रच फक्त लेखांमधून पुढे नेले आहे. लेखन, वाचन ह्या चिकाटीच्या आणि व्यासंगाच्याच गोष्टी आहेत पण अशा प्रकारे चर्चा, लेखन यातून आपण ही थोडाफार तर्कसंगत आणि तर्कशुध्द विचार करु शकलो तर त्यातून अधिक तपशील मिळवण्याची इच्छा होईल त्यातून अधिक सुसंबध्द असं आचरण घडू शकेल का? खुद्द आपल्या आचारविचारातील विसंगती कमी होईल का? इतरांच्या वर्तनातील विसंगतीची कारणमीमांसा लक्षात घेता आली तर तिच्याकडे क्षमाशील वृत्तीने नाही तरी किमान दुर्लक्षित नजरेने तरी पाहता येईल का? पूर्वग्रहदूषितपणा हा किती खोल पोचला आहे याचं भान आपल्याला येईल का? प्रत्येक प्रश्नात प्रत्यक्ष सोडवण्याचा भाग किती आणि समज नीट न झालेला असंबद्ध भाग किती? आत्मपरिक्षणातून आलेल्या निष्कर्षांची टोचणी सहन करण्याची क्षमता किती? पूर्व कल्पना आणि संस्कृतीची तर्कविसंगत, काळी किंवा गैरसोयीची बाजू मान्य करण्याची तयारी किती? हे आणि असे अनेक बेचैन करणारे प्रश्न स्वतःला पडावेत हा ह्या चर्चेचा आणि लेखांचा हेतू होता तो किती सफल झाला याचा आढावा घेऊन पुढच्या लेखांचा प्रपंच करावा इतपत ही प्रस्तावना म्हणजे खरतर साधं सरळ मनोगत आहे. म्हणूनच ही लेखमाला म्हणजे कुणाचीही बाजू घेण्याचा किंवा कुणाच्याही मताचा उच्छेद करण्याचा आटापिटा नसून जो विचार आपण करु शकतो तो तसाच मांडू शकतो का? याची चाचपणी आहे.
ठाणे : सध्या सर्वत्र विनामूल्य वायफायचे पेव फुटले आहेत. ठाणे महापालिकेनेही त्यात पुढाकार घेतला आहे. केवळ १०० रुपयांत नावनोंदणी करून पालिका १० वर्षे ठाणेकरांना विनामूल्य वायफाय सेवा देणार आहे. शहरात टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेकडे १00 रुपये शुल्क भरून नावनोंदणी करणाऱ्या ठाणेकरांना पुढील दहा वर्षांसाठी ८00 केबीपीएस वेगाने डेटाविनामूल्य वापरण्यास मिळणार आहे. यापेक्षा जास्त वेग हवा असल्यास वेगळे शुल्क भरावे लागणार आहे. तसेच महापालिकेच्या सर्व कार्यालयांना २0 एमबीपीएस वेगाने डेटा या सेवेअंतर्गत विनामूल्य पुरविला जाणार आहे. या योजनेतून महापालिकेस वर्षाकाठी ६१ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.
मालदीव बेटे ही सध्या तेथील राजकीय परिस्थितीमुळे चर्चेत असली, तरी तेथील पर्यावरणाला असलेला धोकाही तेवढाच मोठा चर्चेचा विषय आहे. पर्यटनासाठी मालदीव बेटांचे असलेले आकर्षण नवीन नाही; पण निसर्गाचे वरदान लाभलेले हे बेट सध्या मात्र निसर्गाच्या कोपाला धास्तावले आहे. आठ वर्षांपूर्वी बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्याचे ओरखडे या बेटावर आणि तेथील जनतेवर अजूनही ताजे आहेत. त्यातच 'क्लायमेट चेंज' म्हणजे वातावरण बदल रोखण्याबाबत वेळीच पावले उचलली नाहीत, तर त्याचा सर्वाधिक धोका या बेटाला बसेल, असे पर्यावरणतज्ज्ञांचा अभ्यास सांगत असल्याने मालदीवमधील जनतेच्या मनात एक अनामिक भीती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, तेथील जनतेला आकडेवारीच्या जंजाळाने केवळ घाबरवून सोडण्यापेक्षा पर्यावरण रक्षणाबाबत वैयक्तिक पातळीवरही काही गोष्टी करू शकता येतील, असा विश्वास जागवण्याचे काम करत आहेत, मालदीवमधील भारताचे यापूर्वीचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे. त्यांच्याच प्रयत्नांतून पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटर'तर्फे गेली दोन वर्षे मालदीवमध्ये पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजिल्या जाणाऱ्या या महोत्सवाला तेथील जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, हे तेथील जनतेच्या मनात पर्यावरणाबाबत असलेली धास्ती आणि ते वाचविण्याची कळकळ अधोरेखित करणारे आहे. एका भारतीय मराठी माणसाच्या पुढाकारातून हे सर्व होत आहे, हे विशेष. यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन मालेमध्ये झाले. मालदीवच्या पर्यावरण मंत्री डॉ. मरियम शकिला उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित होत्या. उद्घाटनासाठी फिल्म निवडली होती, संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेली 'मेल्टिंग ऑफ हिमालया'. हिमालयातील बर्फ वितळण्याची प्रक्रिया, त्याचा धोका, त्याचे व्यवस्थापन आदी बाबींना स्पर्श करणाऱ्या या फिल्मची उपस्थितांनी विशेष दखल घेतली नसती, तरच नवल. याशिवाय मालदीववरचीच 'सीगल्स फ्लाइट' ही फिल्मही अंतर्मुख करणारी होती. 'तेर पॉलिसी सेंटर'ने तयार केलेली पश्चिम घाटावरची खास फिल्मही महोत्सवाचे आकर्षण ठरली. इतरही काही फिल्म्स महोत्सवात दाखविण्यात आल्या. पर्यावरणातील बदलांना सामोरे जायला सज्ज होण्यासाठी या महोत्सवासारखे उपक्रम आवश्यक असल्याचे मत मुळे यांनी मांडले, तर डॉ. शकिला यांनी, हा महोत्सव दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांचा पुरावा असून, तो या पुढे दरवर्षी सुरू राहील, अशी घोषणाही केली. हा महोत्सव केवळ मालेपुरता मर्यादित न ठेवता २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत इतर पाच ठिकाणीही या सर्व फिल्म्स नेण्यात आल्या. त्यात शाळांमध्ये मिळालेला प्रतिसाद अचंबित करणारा होता. या विद्यार्थ्यांसाठी फिल्म्सबरोबरच 'तेर पॉलिसी सेंटर'ने पर्यावरणाशी संबंधित काही उपक्रमही आयोजिले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, ओझोनबाबतची माहिती आदी उपक्रमांचा समावेश होता. त्याचप्रमाणे सौर ऊर्जेवरील उपकरणांच्या वापराचे प्रात्यक्षिक, त्याचे प्रशिक्षण असे काही उपक्रम एनजीओंसाठी आयोजिण्यात आले. या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने आणखी एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे पर्यावरण रक्षण हा कोणत्याही एका देशाचा प्रश्न नाही, तर ती जगाला भेडसावणारी समस्या आहे आणि देशा-देशांमधील परस्पर सहकार्यानेच या समस्येवर मात करणे शक्य आहे. ही भावना आता रुजणे गरजेचे आहे आणि असे महोत्सव हे त्यासाठीचे एक निमित्त आहे. - विनिता आपटे (लेखिका 'तेर पॉलिसी सेंटर'च्या अध्यक्ष आहेत. )
अमरावती : रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव महापालिकेसमोर सध्या तरी नाही. आल्यास तो सभागृहासमोर ठेवला जाईल, असे आयुक्तांनी आमसभेदरम्यान मंगळवारी स्पष्ट केले. नवसारी ते अमरावती शहरात येणारा कॅम्प शॉर्ट रोड राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याची मनपा प्रशासनाची योजना आहे काय, असा प्रश्न मंगळवारच्या आमसभेत प्रशांत डवरे यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने महापालिकेकडे रस्ता हस्तांतरित केल्यास त्याची देखरेख ठेवण्याइतपत मनपाची आर्थिक स्थिती बळकट आहे काय, जर नसेल तर मनपा प्रशासनातर्फे राज्य मार्ग हस्तांतरण रोखण्याबाबत काय प्रयत्न झालेत, अशी विचारणा डवरे यांनी केली. त्यावर महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केवळ 'नाही'असे उत्तर दिले. त्याचवेळी डवरे आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाली. आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे मिळाले असले तरी अन्य दोन उपप्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, अशी विचारणा करीत डवरे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. बांधकाम विभागाचे रस्ते हस्तांतरित करून त्यांची देखभाल-दुरूस्ती करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे काय, याचे उत्तर मात्र डवरेंना मिळाले नाही. तथापि असा प्रस्ताव आल्यास तो सभागृहासमोर ठेवण्यात येईल,असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यात बसपचे गटनेते चेतन पवार यांनी असा एक प्रस्ताव यापूर्वीही सभागृहासमोर आला होता. अमरावती : तो फेटाळण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली. रस्ते हस्तांतरणाबाबत 'लोकमत'ने चालविलेल्या वृत्तमालिकेचा संदर्भ देऊन बसपचे गटनेते चेतन पवार यांनी याबाबत प्रशासनाला विचारणा केली. रस्ते हस्तांतरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे की नाही, हा प्रश्न गौण ठरत असल्याचे आयुक्त म्हणाले. मद्यविक्रीपासून मिळणारा कोट्यवधींचा महसूल वाचविण्याकरिता रस्त्यांची मालकी बदलविण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय मंगळवारच्या आमसभेत ठेवला होता. मात्र, प्रशासनाने हा विषय स्थगित ठेवण्याचा मुद्दा मांडला. स्वीकृत सदस्य निवडायचेच नव्हते, तर विषय पत्रिकेत विषय का ठेवला, असा प्रश्न विलास इंगोले यांनी उपस्थित केला. स्थायीचे सभापती तुषार भारतीय यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली. शाब्दिक वादावादीनंतर हा विषय पुढच्या आमसभेत ठेवण्याचे निर्देश पिठासीन सभापतींनी दिले. स्वीकृत सदस्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित असल्याने आमसभेत स्वीकृत सदस्यांची निवड केलेली नाही. महानगर पालिकेच्या मंगळवारच्या आमसभेत चारही विषय समिती सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महिला तथा बाल कल्याण समितिमध्ये जयश्री कुऱ्हेकर, नीलिमा काले, वंदना कंगाले, साहेब बी कय्युम शाह, कुसुम साहू, रेखा भुतड़ा, संगीता बुरंगे, नीता राऊत, जयश्री डहाके यांचा समावेश आहे. विधी समितीत सुनंदा खरड, सुमति ढोके, प्रणित सोनी, संजय वानरे, वंदना हरणे, मोहम्मद साबिर, आस्मां फिरोज, हफीजाबी नूर खां तथा मंजुषा जाधव यांचे वर्णी लागली आहे. तर पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिति चेतन गावंडे, गीता पडोले, पद्मजा कौंडण्य, स्वाती कुलकर्णी, विजय वानखड़े, अफजल हुसैन, सलीम बेग, अब्दुल वसीम मजीद तथा डॉ. राजेन्द्र तायडे यांना समावेश आहे. . शहर सुधार समितीत शिरीष रासने, राजेश साहू, गोपाल धर्माले, अजय सारसकर, नूतन भुजाड़े, रूबीना तबस्सुम हारून अली, सुनीता भेले, प्रशांत डवरे तथा भारत चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. आमसभेदरम्यान वृक्ष प्राधिकरणावर ९ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे श्रीचंद तेजवाणी, अजय गोंडाणे, धीरज हिवसे, प्रमिला जाधव आणि वंदना मडघे यांच्यासह एमआयएमचे अब्दुल नाजिम, काँग्रेसचे प्रशांत डवरे आणि प्रदीप हिवसे आणि शिवसेनेचे प्रशांत वानखडे यांचा समावेश आहे.
कोल्हापूर, ९ ऑगस्ट (वार्ता. ) - श्री गजानन महाराज, शिर्डी येथील श्री साईबाबा आणि सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका एकाच वेळी एकाच दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात एकत्र आल्या होत्या. या प्रसंगी सातारा येथील समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांसह अन्य उपस्थित होते.
दिंडोरी, दि. 28 - नाशिक दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे शुक्रवारी एका द्राक्ष निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेजमध्ये बिबट्या घुसला. पाण्याचे शोधात बिबट्या शौचालयात घुसल्यावर तेथील कामगाराने शौचालयाचा दरवाजा बंद केल्याने बिबट्या तेथेच अडकून पडला. सदर घटना वनविभागास कळविण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी त्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खेडगाव येथे किरण शेटे यांचे द्राक्ष भाजीपाला निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेज असून तेथे सकाळी सातच्या सुमारास एका बिबट्याने प्रवेश केला यामुळे तेथील कामगारांची घाबरगुंडी उडाली ते लपून बसले मात्र बिबट्या पाण्याच्या शोधात शौचालयात गेला असता एका कामगाराने प्रसंगावधान राखत दरवाजा बंद करत बिबट्याला कोंडून ठेवत वनाधिकाऱ्यांना कळविले. वनविभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रवाना झाले आहे.
टीम ई-लोकमान्य । मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली. काल सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, प्रविण दटके, गोपिचंद पडळकर,अमोल मिटकरी,राजेश राठोड यांचा समावेश होता. याच शपथविधी वरून आता शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टिका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे. "पवारांनी मुख्यमंत्री केल्यानंतर राज्यपालांकडे भीक मागून स्वतःलाच उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध झाली नाही. तर मी राजीनामा देतो सांगणारा,कधी ग्रामपंचायत सुधा न लढवलेला पण महाराष्ट्राला देशात कोरोना मध्ये एक नंबर वर नेणारा माणूस आमदार झाला",अशा खोचक शब्दांत निलेश राणे यांनी ट्विट करत उध्दव ठाकरेंवर टिका केली आहे.
जगभरातील प्रवासी आणि भटके नित्यनवीन सुंदर पर्यटन स्थळांच्या शोधात असतात. अश्या ठिकाणी फोटो काढणे आणि ते शेअर करणे हाही आजकाल अनेकांचा छंद झाला आहे. जगभरातील पर्यटनस्थळांच्या यादीत थायलंड मधील फुकेत बेट बऱ्याच वरच्या स्थानावर आहे आणि वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र या बेटावर काही नियम थोडे विचित्र वाटतील असे आहेत. त्यातील एक म्हणजे या बेटावर सेल्फी किंवा फोटो काढायला बंदी केली गेली असून फोटो काढणे हा गुन्हा मानला गेला आहे. इतकेच नव्हे तर हा गुन्हा करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. नुसता फोटो किंवा सेल्फी काढली म्हणून मृत्युदंड हे ऐकायला जरा विचित्र वाटेल पण त्या मागचे कारण तसेच महत्वाचे आहे. हा नियम पर्यटक, प्रवासी यांची सुरक्षा लक्षात घेऊन बनविला गेला आहे. या बेटाच्या जवळ विमानतळ आहे आणि रोज शेकडो विमाने येथून ये जा करतात. या ठिकाणी विमाने अगदी खालून उडतात. त्यामुळे वैमानिकाला समुद्र किनाऱ्यावरची सगळी दृश्ये अगदी स्पष्ट दिसतात. आता पर्यटक जर विविध प्रकारे सेल्फी, फोटो घेत असतील तर पायलटला ते दिसणार आणि एखादेवेळी जरी त्याचे लक्ष या फोटोमुळे विचलित झाले, तर त्याचे विमानावरचे नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. यामुळे केवळ विमानातीलच नाही तर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे येथे समुद्रकिनाऱ्यावर जाताना मोबाईल किंवा कॅमेरा बाजूला ठेऊन जावे लागते. ही हरकत कुणी करू नये म्हणून जागोजाग सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत.
नवी दिल्ली - भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कस्तुपटूंनी लैंगिक अत्याचारासह अनेक आरोप केले होते. याच्या चौकशीसाठी व सिंह यांच्या राजीनाम्यासाठी अव्वल ऑलिंम्पिक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले. तीन दिवस हे आंदोलन सुरु होते. त्यानंतर अखेर ब्रिजभूषण सिंह पदावरून हटविण्यात आले आहे. यानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेतले. सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यात चौकशी अहवाल देणार आहे. तोपर्यंत हीच समिती कुस्ती संघटनेचे काम बघणार आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण सिंह यांना महासंघाच्या कामांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जोपर्यंत त्यांच्या वरील आरोपांची चौकशी पूर्ण होत तो पर्यंत ते कुस्ती संघटनेच्या कामांपासून दूर राहणार आहेत. दरम्यान, कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाची आज (रविवारी) होणारी AGM बैठक रद्द करण्यात आली आहे. अयोध्येतील हेरिटेज हॉटेलमध्ये सकाळी दहा वाजता ही बैठक होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.