text large_string |
|---|
पुणेः आरोग्यनामा ऑनलाईन : यकृत हे आपल्या शरीरात अतिशय महत्वाचे कार्य करते. जसे कि,साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.हे काम यकृत करत असते. आपल्या शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते. यकृतामध्ये ६ महिने पुरेल एवढा 'अ' जीवनसत्वचा साठा असतो आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.हे यकृतच करत असते.\nतसेच निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिनची निर्मीती करणे. तसेच पित्त रस तयार करून त्याव्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. या बरोबरच आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.शरीरातील एवढ महत्वाचं कार्य यकृत करत असत. त्यामुळे आपण आपलं यकृत निरोगी ठेवलं पाहिजे.\nत्यामुळे यकृत निरोगी राहण्यासाठी जास्त फॅट, जास्त साखर, मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच तळलेले पदार्थ, फास्टफूड न खाल्लेलेच बरे.यकृताच कार्य चांगलं राहण्यासाठी डिहायड्रेशन होणं गरजेचं आहे. आणि डिहायड्रेशन होण्यासाठी खूप पाणी पिणे गरजेचे आहे.यकृत निरोगी राहण्यसाठी फळे, भाजीपाला खाणे योग्य ठरेल. तसेच मांस, कडधान्य, दूध या सर्व पदार्थांचा आपल्या आहारात उपयोग करा. यकृताला फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा जर आपल्या आहारात समावेश केला. यकृताला निरोगी ठेवणं सोपं जाईल. |
लाल डोळे फारच लहान मुली आणि शाळेत येऊ शकतात. या आजाराची कारणे यांत्रिक समस्या आणि रोग असू शकतात. जर मुलांनी डोळे डोळ्यात भरवले असेल, तर त्याचे कारण समजणे, तो दूर करणे आणि आवश्यक असल्यास आवश्यक उपचार करणे महत्वाचे आहे. डोळे का लाल पडतात? मुलाच्या डोळ्यांच्या लालसरपणाचे मुख्य कारण खालील प्रमाणे आहेतः - नेत्रगोल न होणे हा रोग लहानपणापासून अतिशय सामान्य आहे. नेत्रश्लेजाचा दाह अतिशय संसर्गजन्य आहे आणि व्हायरल किंवा बॅक्टेरीयल इटिओलॉजी असू शकते. जर मुलांनी डोळे डोळ्यात भरवले असेल, तर तो उत्सव आणि पाणी टाकत आहे, आणि फिफ्फोबिया आणि थोडा सूज देखील आहे, हे नेत्रसुरुवादाचा दाह ठरला आहे. जेव्हा आपण शक्य तितक्या लवकर उपचार सुरू करण्याची आवश्यकता असेल तेव्हा हा रोग होतो. नेत्रश्लेजातील सूक्ष्मजंतूंच्या संसर्गाचा दाह च्या एटियलजि वर अवलंबून, तयारी kruhe फक्त एक डॉक्टर नियुक्ती करतो. - डोळा दुखणे बाळाच्या डोळे सुजलेल्या आणि पांढऱ्या रंगाचे लाल रंगाचे क्रम म्हणून, त्याने फिस्टिकफिक्समध्ये भाग घेतला पाहिजे असे आवश्यक नाही. गेम दरम्यान कॉर्नियाला स्क्रॅचिंग केल्याने फारच दुःखदायक परिणाम होऊ शकतात. आपण ते विशेष साधनांशिवाय ते पाहण्यास सक्षम असणार नाही, त्यामुळे जर आपल्या मुलाला ग्लॅझिकमध्ये एक खेळण्यासारखे असेल तर ताबडतोब ऑक्सिलिस्टकडे जा. - संगणकावर लांब रहा किंवा टीव्ही पहा. कॉम्प्यूटर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे आणि दुर्दैवाने आधुनिक मुले त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवतात. जर मुलाने डोळ्याचा कोप, आणि कदाचित संपूर्णपणे सर्व प्रथिने लाल केले असतील तर ते तंत्राला किती वेळ देतो हे पहा. कदाचित त्यासाठी कितीतरी तास खर्च केले असतील तर आपण आश्चर्यचकित होऊ. का डोळ्याभोवती त्वचा लाल आहे? मुलाच्या डोळ्याखाली लाल झालेला लालूचा एक कारण बार्ली आहे. या पुर्ण रोगाने शारीरिक आणि नैतिक रूपाने प्रचंड अस्वस्थता निर्माण केली आहे. हे दोन्ही गरम करून (परिपक्वताच्या अवस्थेत) आणि डोळ्यातील थेंबांद्वारे उपचार केले जाऊ शकतेः अल्ब्युसिड, लेव्होमाईसेटिन, इ. याव्यतिरिक्त, तो बार्ली हिरव्या भाज्या, तसेच chamomile ओतणे च्या compresses दाबणे मदत करते. |
आणि साखरे या गावांचा समावेश आहे. वनजमीन ताब्यात येण्याआधीच या प्रकल्पाच्या १८६ कोटी रुपयांच्या कामास २००६ सालीच मान्यता दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी ५३१. १८६ हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता. शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरांची भविष्यात तृष्णा भागवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित लिंक प्रोजेक्टचा देहरजी मध्यम प्रकल्प हा एक भाग आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसाचे वाया जाणारे पाणी वैतरणामार्गे या प्रकल्पात आणण्याचे प्रस्तावित आहे. तो पूर्ण झाल्यास पाणीटंचाईने होरपळणाऱ्या एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरांना दिलासा देण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, या प्रकल्पास स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांचा प्रचंड विरोध आहे. कारण, या धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी न देता ठाणे, मुंबईला देण्याचा राज्य शासनाचा घाट असल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे वनजमीन ताब्यात मिळण्याआधीच देहरजीसह विदर्भातील जीगाव प्रकल्पाचे काम मे. पीव्हीआर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही प्रकल्पांचा खर्च ३८६ कोटी होता. त्यात देहरजीचे काम १०४ कोटींचे होते. मात्र, आता काम लांबल्याने या प्रकल्पांचा खर्च कितीतरी पटीने वाढणार आहे. देहरजीच्या कामात मुख्य धरणासह कॅनाल आणि तत्सम कामांचा समावेश आहे. देहरजी मध्यम प्रकल्प हा केंद्र सरकारचा लिंक प्रोजेक्टमधील महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यास आमचा विरोध नाही. मात्र, स्थानिकांचे शेतजमिनीसह योग्य मोबदला देऊन पुनर्वसन व्हायला हवे. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावे. देहरजी धरणाचा १९८५ साली आराखडा बनवला, तेव्हा ते सिंचनासाठीच राहील, असे सांगण्यात आले होते. तसेच आदिवासी उपयोजनेच्या निधीतून ते बांधण्यात येणार आहे. मात्र, नव्या आराखड्यात लिंक प्रोजेक्टच्या नावाखाली त्यातून शेतकऱ्यांच्या सिंचन क्षेत्राला वगळले आहे. आमच्या अनमोल जमिनी काय मुंबई आणि ठाण्याची तहान भागवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या धरणांसाठीच आहेत का. जमीन आमची, आदिवासी उपयोजनेचा निधीही आमचा, पाणी मात्र आदिवासी शेतकऱ्यांना न देता ते मुंबई-ठाण्याला द्यायचे, हा कोणता न्याय आहे. या धरणाचे संपूर्ण पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठीच मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. पावसाळ्यात ३०० एमएमपर्यंत पाऊस होत असतानाही आम्हाला वर्षभर पिके घेता येत नाहीत. मग, आम्ही काय करायचे. - प्रफुल्ल पाटील, |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंत्रालयात धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे. या बाचाबाचीदरम्यान केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर देखील फेकण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यानच्या गोंधळात केजरीवाल यांच्या चष्म्याची देखील मोडतोड झाली आहे. सुदैवानं केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. मात्र या घटनेमुळे सचिवालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्या व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर हल्ला केला त्याचे नाव अनिल शर्मा असे सांगण्यात येत आहे. केजरीवाल यांच्यावर हल्ला झाल्याक्षणी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या शर्मा नामक व्यक्तीला चौकशी करीत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपच्या नेत्यावर हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही तर यापूर्वी देखील आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्यावर कडक सुरक्षा कवच तोडून हल्ला करण्यात आले आहेत. याआधी देखील ऑक्टोबर २०१६ मध्ये देखील आखिल भारतीय विद्यर्थी सेनेकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर राजस्थानातील बिकानेर येथे शाई फेकण्यात आली होती. |
अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या शिकवणूकीची प्रेरणा आत्मसात व्हावी. यासाठी दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. तसेच त्यांच्या कार्याची महती सर्वांना ठाऊक व्हावी यासाठी चौंडी येथे म्युझियम उभारण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल (मंगळवारी) चौंडी येथे केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील चौंडी या त्यांच्या जन्मगावी आज आयोजित कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवरांनी चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, अण्णा डांगे, भूषणसिंह राजे होळकर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अहिल्याबाईंनी अठ्ठावीस वर्षे राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालविला. त्यांचा राज्यकारभार आदर्श होता. त्याला जगात तोड नाही. ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी सर्व धनगरवाडीपर्यंत ग्रामविकास विभागातर्फे रस्ते बांधण्यात येतील. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शासनातर्फे धनगर समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रास्ताविकात आमदार रोहित पवार यांनी आज चौंडी येथील नियोजित विकास कामे करण्यासह परिसरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांच्या बरोबर राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे स्मरण देशात नेहमीच केले जाते. कर्जत - जामखेड हा भाग दुष्काळी आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी तेव्हाही पाण्यासाठी बारव बांधण्याचे काम केले. ते काम आता आ. रोहित पवार करत आहेत. कर्जत-जामखेड परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्यासह या भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची सूचना यावेळी पवार यांनी केली. |
जेजुरीः महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या सोन्याच्या जेजुरीतील खंडोबा मंदिरालाचा कळस आणि शिखर नव्या वर्षात सोन्याचा होणार आहे. या साठी आठ किलो सोने वापरले जाणार आहे. या सोबतच शहरात आरोग्यविषयक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यात एमआरआय, सोनोग्राफी, सिटीस्कन, एक्सरे, प्रसूतिगृह, या सुविधा बरोबरच डायलिसीस फ्री महाराष्ट्र हा संकल्प राबविला जाणार आहे, अशी माहिती श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने कोरोना काळात केलेली कामे आणि नव्या वर्षातील नियोजित कामाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख विश्वस्त सॉलीसीटर प्रसाद शिंदे, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, संदीप जगताप, अॅड अशोकराव संकपाळ, तुषार सहाणे, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते. गेल्या दहा महिन्याच्या कोरोना संकटाच्या काळात औद्योगिक वसाहतीतील कामगार, गरीब अनाथ नागरिकांना दोन वेळेची अन्न्सेवा, गरीब कुटुंबियांना किरणा कीट, रुग्णालयाना पीपीई कीट, सॅनिटायझर, औषधे फवारणी, ससून रुग्णालयाला आयसोलेशन वार्ड साठी ५१ लक्ष रुपये असे एकूण पाऊने दोन कोटी रुपयांची सुविधा देवस्थानाने दिली. जेजुरी व परिसरात आरोग्याच्या आधुनिक सुविधा नसल्याने गोर गरीबाच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याने ती टाळण्यासाठी आरोग्यविषयक एमआरआय, सोनोग्राफी, सिटीस्कन, एक्सरे, प्रसूतिगृह आदी आधुनिक सुविधा येत्या आठ ते दहा महिन्यात नाममात्र दरात भाविक आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सोबत डायलिसीस फ्री महाराष्ट्र ही संकल्पना नाममात्र दरात राबविणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. देवा तुझी सोन्याची जेजुरी या उक्ती प्रमाणे जेजुरीगडावरील खंडोबा मंदिराचे शिखर व घुमट सोन्याचे करण्यात येणार आहे. यासाठी आठ किलो सोने वापरण्यात येणार आहे. हे सोने महाराष्ट्रातील भाविकांकडून देणगीच्या स्वरुपात स्वीकारले जाणार आहे. जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई मंदिराचे काम सुरु असून देवसंस्थानच्या वतीने ५७ लाख रुपये या कामासाठी देण्यात आले आहे. लवकरच मंदिराचे काम पूर्ण होणार आहे. जेजुरी शहरातील मुख्य मारुती मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु करण्यात आले आहे. जेजुरीगडावर सुमार ४० लक्ष रुपये खर्च करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. या परीसराचे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. जेजुरी गडावरील नरवीर उमाजी नाईक यांच्या पुतळा परिसरातील सुशोभिकरण, जुन्या घोड्याच्या पागेच्या जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह व जेष्ठ भाविकांसाठी विश्रांती गृह, समूह शिल्पा मागील मोकळ्या जागेत संरक्षक भिंत, तसेच कुलधर्म कुलाचार करण्यासाठी सुविधा, भव्य प्रसादालय आदी कामे सुरु करण्यात आली आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित घेतला जाणार आहे. राज्यातील अनेक भाविकांनी देवाच्या नावाने व देवसंस्थानच्या नावाने पूर्वीच्या काळात जमिनी दान केल्या आहेत. देवसंस्थानच्या दप्तरी केवळ ४० एकर जागेची नोंद होती. विश्वस्त मंडळाने अनेक ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेवून आणखी ४९ एकर जागेचा शोध घेतला आहे. चाकण येथे ११ एकर, सातारा गिरवी येथे, २२ एकर, लिंब सातारा साडेसात एकर, भुईंज येथे साडे सतरा एकर, तसेच सांगवी फलटण, तरंगवाडी, सणसर ,पिसर्वे येथे देवसंस्थानच्या नावे जागा असून अनेक ठिकाणी या जमिनी शेतकरी कसीत आहेत. या शेतकऱ्याकडून देवसंस्थानला उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असेही विश्वस्त मंडळाने सांगितले. फोटो मेल केला आहे. |
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. >पुणो : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे विधानसभेसाठी अनेक इच्छुकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. अटीतटीची निवडणूक असल्याने अपक्ष उमेदवारांचे माघारीसाठी 'भाव' वधारले आहेत. पक्षाच्या मोठय़ा नेत्यांचा फोन आला पाहिजे, निवडणुकीच्या तयारीचा खर्च निघाला पाहिजे; अन्यथा ठोस आश्वासनाशिवाय माघारी न घेण्याची अपेक्षा उमेदवारांना आहे. बंडखोरी मिटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होतील. (प्रतिनिधी) च्राज्यात पंचरंगी लढतीमुळे कोणाची सत्ता येणार, हे अनिश्चित असल्यामुळे प्रत्येक इच्छुकाला आमदार होण्याची आशा आहे. परंतु, पक्षातून एकाच इच्छुकाला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाःयांना विधान परिषदेच्या आश्वासनांचे वेध लागले आहेत. |
कोल्हापूर, ता. २८ : 'इन्शाअल्लाह' कादंबरीचे वाचन सुरू झाले अन् मुस्लिम धर्मीयांचे समाज जीवन पुढे सरकू लागले. बागवानी भाषेतील झकास विनोदाचे सादरीकरण असो, की जुल्फीची मुस्लिम धर्म जाणून घेण्याची इच्छा. आजच्या समाजाचे चित्रण व विविध विचारसरणींचे दर्शन त्यातून घडत गेले. सुमारे दीड तास प्रेक्षक खुर्चीला खिळून राहिले. निमित्त होते प्रसिद्ध दिग्दर्शक अभिराम भडकमकर लिखित 'इन्शाअल्लाह' कादंबरीच्या अभिवाचनाचे व त्यावरील चर्चेचे. प्रोसेनियन आर्ट असोसिएशनतर्फे त्याचे आयोजन केले होते. संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. भडकमकर यांचा प्रायव्हेट एज्युकेश सोसायटीचे संचालक प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते नागरी सत्कार झाला. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉलमध्ये कार्यक्रम झाला. श्री. भडकमकर मूळचे कोल्हापूरचे. त्यांच्या लेखणीतून साकारलेली 'इन्शाअल्लाह' कादंबरी. तिच्या अभिवाचनाचा कार्यक्रम असल्याने प्रेक्षकांनी हॉलमध्ये तुडूंब गर्दी केली. भडकमकर यांनी टाकाळ्यावर राहत असताना बागवानी भाषेच्या आठवणी कादंबरीतून जाग्या केल्या. कादंबरीतील निवडक भागाचे वाचन सुरू झाले. सलीम मुल्ला, सचिन सुरेश, प्रसाद माळी, अभिनेत्री स्वाती चित्रणीस यांनी ओघवत्या शैलीत वाचन केले. अभिवाचनानंतर कादंबरीच्या अनुषंगाने चर्चा झाली. कादंबरी कशी साकारली गेली, कोल्हापुरातील वातावरणाचा लिखाणास कसा उपयोग झाला, कादंबरी लिहिल्यानंतर कसे अनुभव आले, यावर भडकमकर यांनी संवाद साधला. कादंबरीवर टीका झाली का, या प्रश्नावर त्यांनी कादंबरीत वास्तव चित्रण झाल्याने सर्वधर्मीयांतून तिचे स्वागत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी श्रेयश मोहिते, प्रतिक टाकवडेकर, सुनील सुतार, पृथ्वीराज साळोखे, अमित मठपती यांचा सत्कार झाला. सत्यजित साळोखे यांनी सूत्रसंचालन केले. अवधूत जोशी यांनी प्रास्ताविक केले. सलीम मुल्ला यांनी आभार मानले. |
चीनी मूळच्या लोकप्रिय ब्रँडने आपल्या सुप्रसिद्ध कमी किमतीच्या क्वांटिफाइंग ब्रेसलेटचे नूतनीकरण केले. आम्ही बद्दल बोलतो झिओमी माझे बॅण्ड 2, एक डिव्हाइस जो आपल्या आयफोनचा परिपूर्ण सहयोगी म्हणून प्रकट झाला आहे जो आमच्या शारीरिक क्रियाकलापाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे प्रमाणित करण्यासाठी, आपली झोप मोजण्यासाठी आणि आमच्या स्पंदनाची नोंद ठेवण्यासाठी आहे. आज lप्लिझाडोस मध्ये आम्ही एक अपवाद करतो आणि आम्ही त्याबद्दल बोलतो झिओमी माझे बॅण्ड 2 कारण, मागील आवृत्ती दीड वर्षासाठी वापरल्यानंतर आणि जवळजवळ एक वर्ष Appleपल वॉच वापरकर्ता राहिल्यानंतरही मी याची पुष्टी करू शकतो की आपण एकत्र वापरण्यासाठी खरेदी करू शकणार्या सर्वोत्कृष्ट उपकरणेपैकी एक आहे. आमच्या आयफोनवर. La झिओमी माझे बॅण्ड 2 या घालण्यायोग्यच्या पहिल्या पिढीतील एक उल्लेखनीय गुणात्मक झेप प्रतिनिधित्व करते. आता समाविष्ट ए OLED प्रदर्शन उच्च प्रतिकार आणि कमी वापर आम्हाला फक्त आपल्यास स्पर्श करून सर्व नोंदणीकृत डेटा पाहण्याची परवानगी देते एकल स्पर्श बटण. अशा प्रकारे, आता वापराचा एक मुख्य फायदा म्हणजे आम्हाला यापुढे अॅप उघडण्याची आवश्यकता नाही मी फिट आपल्या मनगटावर सर्वकाही असल्याने आपण चालत असलेले अंतर, पावले उचलली आहेत, हृदय गती किंवा आपण जळलेल्या कॅलरीज तपासत आहोत. याव्यतिरिक्त, द झिओमी माझे बॅण्ड 2 ने आपली सिस्टम अल्गोरिदम सुधारित केला आहे आणि आता आहे अधिक अचूक मोजणीची पावले, डाउनटाइम मोजणे इत्यादींबद्दल जेव्हा. आणि पक्षातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो महान प्रतिकार. कंगन उचलताच तुम्हाला समजेल की हे "स्वस्त प्लास्टिक" नाही; हे आहे आरामदायक, प्रतिरोधक, काहीही वजन नाही आणि त्याचे आंतरराष्ट्रीय आयपी 67 रेटिंग आहे धूळ, पाणी आणि घाम प्रतिरोधक आहे. ची काही मुख्य वैशिष्ट्ये झिओमी माझे बॅण्ड 2 ते आहेतः आपण झिओमी स्मार्टफोन मॉडेलपैकी कोणतेही वापरल्यास स्वयंचलित अनलॉकः सुसंगत. झिओमी मी बँड 2 सह मी काय करावे? La एमआय बॅण्ड 2 हे एक अंगावर घालण्यास योग्य डिव्हाइस आहे जे विशेषतः व्यावसायिक .थलीट, शौकीन किंवा ज्याला त्यांच्या शारीरिक हालचालींवर थोडासा ताबा मिळवायचा आहे आणि त्या सुधारित करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सूचित केले आहे. त्यासह आपण हे करू शकताः आणि हे सर्व, न घेताच, कारण आपण त्यासह धावू शकता, झोपू शकता, शॉवर करू शकता आणि अगदी समुद्रकाठ देखील जाऊ शकता. आपल्याला अत्यंत सावधगिरीने आणि मोहक डिझाइनसह, उच्च प्रतिकारशक्तीसह आणि जवळजवळ सौदा किंमतीवर सतत अधिसूचनांद्वारे ताणतणावा नसणारे एक ब्रेसलेट हवे असेल तर आम्ही शिफारस करतो झिओमी मी बॅन्ड 2 खरेदी करा, नक्कीच आपण दिलगीर होणार नाही. तसेच, आपण स्क्रीनशिवाय मागील कोणत्याही मॉडेल्सला प्राधान्य दिल्यास, आपण आता पूर्वीच्यापेक्षा अधिक चांगल्या किंमतीवर एमआय बॅन्ड 1 किंवा एमआय बँड 1 एसची निवड करू शकता. नमस्कार मिगुएल. मला नाही वाटत. शाओमी मी बँडची सर्व कार्ये मी फिट अॅप स्वतःच (अर्थातच) आणि आयफोनच्या हेल्थ अॅपशी सुसंगत आहेत, तेथील ब्रेसलेटने मोजलेले सर्व पॅरामीटर्स पाहण्यास सक्षम आहेत. पण मला वाटते की हे रँटास्टिक सारख्या दुसर्या अॅपशी सुसंगत नाही. नमस्कार, मी योगायोगाने प्रवेश केला आहे आणि मी तुमची टिप्पणी पाहिली आहे. आपल्याला सांगा की शक्य असल्यास आपणास अॅपस्टोअर वरून माझा एचआर नावाचा अनुप्रयोग डाउनलोड करावा लागेल. हे स्थापित करुन आपण खालील चरणांचे अनुसरण कराः -. रूंटॅस्टिकमध्ये आपल्याला हृदय गती यंत्र शोधणे आवश्यक आहे आणि ते दिसून आले पाहिजे. हॅलो, आपल्याकडे स्टॉपवॉच आहे? हॅलो, मला हे जाणून घ्यायचे होते की मी Android वर प्रमाणेच इतर अनुप्रयोगांकडून सूचना प्राप्त करण्याबाबत जेव्हा आयफोनवर 2 आयफोनशी सुसंगत आहे की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे कारण आयफोनवर मी असे सांगितले आहे की मी बॅन्ड केवळ कॉल आणि व्हॉट्सअॅपवर सूचित करण्यास सक्षम आहे (काटेकोरपणे) अनुप्रयोग बोलत) धन्यवाद! माझा बँड वापरण्यास सक्षम होण्यासाठी माझ्या आयफोनवर मला कोणता अॅप्लिकेशन डाउनलोड करावा लागेल हे जाणून घेऊ इच्छित आहे. 2 मी माझा फिट डाउनलोड केला आहे आणि तो स्पॅनिशमध्ये येत नाही. नमस्कार, माहितीसाठी धन्यवाद. मला हे जाणून घेऊ इच्छित आहे की आपण ब्रेसलेटच्या स्क्रीनवरून कॅलरी पाहू शकता किंवा आपल्याला अॅपवर जावे लागेल? धन्यवाद मी उत्तर कृपया आशा आहे. |
पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड या आदिवासी बहुल, भागातील रोहयोअंतर्गत कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर डहाणू तालुक्यातील वाघाडी, वनई इ. गावामध्ये पंचायत समिती अंतर्गत राबविलेल्या योजनेतही अशाच प्रकारच्या भ्रष्टाचार झाल्याचे वास्तव माहितीच्या अधिकारामध्ये समोर आले आहे. डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील कमळाकर गोपाळ कामडी यांच्या विहीरीचे काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असून मजुरीपोटी ३३ हजार १२ रू. व लाभार्थ्यांने सिमेंट, रेती, दगड इ. साठी खर्च केलेले ३६ हजार ६८५ असे एकुण ७१ हजार ६९७ इ. रू. चे येणे बाकी आहे. या संदर्भात कष्टकरी संघटनेने माहितीच्या अधिकारात मागीतले त्या माहितीमध्ये दोन वेगवेगळी उत्तरे देत एका माहितीत ९८ हजार ६४२ रू. तर दुसऱ्या माहितीत ८७ हजार ३९५ रू. खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तर या कामामध्ये पंचायत समितीकडून ४६ हजार ३७० रू. चे बांधकाम मटेरीयल टाकण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर नवशा रामा पवार यांनी आपल्या शेतात खोदाई केलेल्या व बांधकाम केलेल्या विहिरीसाठी मजुरीचे २४ हजार ४३८ रू. व दगड, सिमेंट, रेती यांचा खर्च ४२ हजार दाखविण्यात आला आहे. मात्र त्यांनी मागीतलेल्या माहितीमध्ये या कामापोटी १ लाख ३४ हजार २४८ रू. ची रक्कम देण्यात आली आहे. अंत्या हिरा भोईर यांच्या शेतात तीस फूट विहिर खोदण्यात आली असून ही आजही अपूर्णावस्थेत पडून आहे. त्यांच्या मस्टरवर त्यांनी खर्च केलेले २१ हजार २१२ तर बांधकाम साहित्याचे २६ हजार तर पंचायत समितीने ११ हजार ८७५ रू. चा खर्च दाखविण्यात आला असला तरी त्या शेतकऱ्यांच्या हातात एक छदामही पडलेला नाही. मजूर आणि गवंड्यांच्या फेऱ्या मात्र त्यांच्या दारात आजही सुरूच आहेत. अशाच सखाराम पिलेना, बाबु झिपर, जन्या धागडा व माणीक सातवी इ. शेतकऱ्यांच्या व्यथा या सर्वांपेक्षा वेगळ्या नसल्याचे दिसून आले. वनई येथील केशव लक्ष्मण तांबडा, बाबु लक्षा शिंगडा, कृष्णा वरठा, मेहादू तांडेल, जानु भवार, आंबोळी येथील लहान्या कोडे, चांदवड येथील दिव्या घाटाळ, धामणगाव येथील हनुमान वाघाड इ. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरी महत्प्रयासाने खोदून बांधकामही केले आहे. मात्र डहाणू पंचायत समिती कार्यालयाचे खेटे घालून हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. डहाणू पंचायत समितीच्या या योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांना आपला खर्च काही प्रमाणात मिळाला असला तरी अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहीले आहेत. त्यांनी विहिरीच्या बांधकामासाठी आॅर्डर दिलेल्या रेती, सिमेंट, दगड इ. च्या पैशासाठी मालकाने तगादा लावला आहे. रोहयो योजनेंतर्गत प्रथम १ लाख ४० हजाराची विहिरीची किंमत मंजूर असताना वाढीव बांधकाम करावे लागणार असे भासवून सदर विहिरीची किंमत १ लाख ९० हजारापर्यंत नेण्यात आल्याची उदाहरणे ही माहिती अधिकारात समोर आल्याचे कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी सांगितले. (वार्ताहर) |
मुंबई, 12 ऑक्टोबर । पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. मंदाकिनी खडसेंनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने (Non Bailable Warrant Against Eknath Khadse & Mandakini Khadse) फेटाळला आहे. दरम्यान, या प्रकरणी एकनाथ खडसे हे आजही सत्र न्यायलयात हजर होऊ शकले नाही. Non Bailable Warrant Against Eknath Khadse & Mandakini Khadse. Mumbai Sessions Court has issued a non-bailable warrant against Eknath Khadse's wife Mandakini Khadse in the Pune land scam case. The court also rejected the bail application filed by Mandakini Khadse : आज मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. एकनाथ खडसेंची सर्जरी झाली असून ते सध्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. अजून काही दिवस ते रुग्णालयातच राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच हजर राहण्यासाठी कोर्टाकडे आणखी वेळ मागितला आहे. न्यायालयाने खडसेंना उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी आता 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महत्वाचंः तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील 'फॉलो (Follow) ' बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. News Title: Non Bailable Warrant Against Eknath Khadse and Mandakini Khadse in Mumbai Sessions Court. - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
मुंबई, 16 मे : लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर महाराष्ट्रात आता राजकीय पक्षांनी विधासभेची तयारी सुरू केली आहे. अशातच गेल्या चार वर्षांपासून नेमल्या न गेलेल्या उपमुख्यमंत्रिपदावरून आता चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. याच निकालानंतर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. भाजपने शिवसेनेच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापण केली असली तरी कोणालाही उपमुख्यमंत्री करणं टाळलं आहे. पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदावर नेमणूक होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत जर शिवसेनेला चांगलं यश मिळालं तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास शिवसेनेकडून कुणाला संधी देण्यात येणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. याबाबत लोकसत्ता या दैनिकाने वृत्त दिलं आहे. दुसरीकडे, दिल्लीत मात्र पंतप्रधानपदासाठी हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वतः सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते. या बैठकीसाठी वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना बोलवण्यात आले आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
नाक, तोंड रिकामे; मास्क गळ्यात! कऱ्हाड : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विविध नियमांद्वारे संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. मास्क वापरणे बंधनकारक असले तरी नाक, तोंड रिकामे ठेवून मास्क गळ्यात लटकवण्याची सध्या 'फॅशन'च झाल्याचे चित्र आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेकजण मास्क वापरल्याचा दिखावा करीत आहेत. कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाच प्रशासनाने विविध उपाययोजनांद्वारे संसर्ग थोपविण्याचा प्रयत्न सुरू केला. लॉकडाऊन, जमावबंदी, सॅनिटायझर वापर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर आदी उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या. मध्यंतरीच्या कालावधीत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे एकमेकांशी संपर्क येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने कडक धोरण अवलंबून सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या अमाप असल्याचे दिसते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला अनेकांनी तिलांजली दिल्याचे दिसते. दुकानामध्ये गर्दी करून मालाची खरेदी-विक्री बेधडक सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापराचाही सध्या फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. कोरोना संक्रमण रोखण्यात मास्क प्रभावी असल्याचे सांगून प्रशासन वारंवार नागरिकांना मास्क वापरण्याबाबत सूचना देत आहे. मात्र, अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून मास्क वापराचा केवळ दिखावा करीत आहेत. नाक, तोंड रिकामे ठेवून मास्क केवळ दिखाव्यासाठी गळ्यात अडकविण्याचे प्रकार सुरू आहेत. जनजागृती करूनही मास्क वापराबाबत नागरिकांमध्ये म्हणावे तेवढे गांभीर्य येत नसल्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींसह स्थानिक प्रशासनाला या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अशी कारवाई करून वसूल केलेला दंड संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जमा करायचा आहे. १) मास्कचा वापर न करणाऱ्यास : ५०० रु. २) सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन : १००० रु. ३) सार्वजनिक, खासगी जागेत थुंकणे : १००० रु. ४) प्रवासी वाहतुकीचा नियमभंग : १००० रु. |
पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य पं. श्रीनिवास जोशी आणि गानसम्राज्ञी किशोरी अमोणकर यांच्या शिष्या मंजिरी असणारे - केळकर यांचे गायन आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या सुमधुर बासरी वादनात रसिक दंग झाले. स्वर - सुरांनी रंगलेली एक अनोखी संध्याकाळ रसिकांनी शनिवारी अनुभवली. कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित तीन दिवसीय कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या गायन - वादनाच्या दमदार प्रस्तुतीने कला रसिकांची मने जिंकली. महोत्सवाची सुरूवात माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरवी राव यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, प्रसिद्ध सनईवादक कल्याण आपार, मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तबलावादन सादर झाले, तर कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राग तिलक कमोद'मध्ये ' कोयलिया बोले अंबुवा के ...' ही बंदिश आणि 'गगन सदन...' हे गीत सादर केले. अविनाश दिघे ( हार्मोनियम ), किशोर कोरडे ( तबला), मंदार भारती व स्वप्नील राठोड ( तानपुरा), गंभीर महाराज ( पखवाज) आणि विद्याधर विरोकर ( टाळ ) यांनी साथ केली. उत्तरार्धातील पहिल्या सत्रात पं. रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग रागेश्रीने आपल्या वादनाची सुरूवात केली. त्यानंतर आलाप, जोड, झपताल आणि तीन तालात त्यांनी दमदार प्रस्तुती केली. खमाज रागात त्यांनी सादर केलेल्या ' वैष्णव जन तो ...' या भजन सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना पं. रामदास पळसुले ( तबला) यांनी साथ केली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता मंजिरी असणारे - केळकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग नंद'ने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये 'ढूँडू बारे सैया...' ही विंलंबित तीनतालामधील बंदिश, छोटा ख्याल'मध्ये द्रुत तीन तालातील बंदिश 'अजहू न आये शाम...' , बसंतबहार रागात 'जोगी वही...' ही मध्यलय तीन तालातील बंदिश सादर केली. ' गुरुजी मैं तो...' या निर्गुणी भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संजय देशपांडे (तबला) आणि डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम ) यांनी साथ केली. |
जळगावः कोरोनाचे (Corona) दैनंदिन नवे रुग्ण कमी होत असताना आणि सध्या पॉझिटिव्हिटी दोन टक्क्यांच्याही आत असताना निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव (Proposal to the Government) पाठविण्यात आला आहे. त्यासंबंधी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली (District Administration) सुरू झाल्या असून, बाजारपेठेची (Market) वेळ वाढवून मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (jalgaon district corona restrictions relaxed proposal to the government) फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण वाढू लागले आणि दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. मार्च, एप्रिलमध्ये ही लाट तीव्र झाली. यादरम्यान राज्यात नव्याने लॉकडाउन जारी करण्यात आले. ते मेपर्यंत सुरू राहिले. लाट ओसरू लागल्याची चिन्हे दिसताच लॉकडाउनमध्ये लावलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. जूनमध्ये जळगाव जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघता बहुतांश निर्बंध शिथिल करून बाजारपेठ खुली करण्यात आली. मात्र जूनमध्येच पारोळा तालुक्यातील एका गावातील सात रुग्णांमध्ये कोरोनाचा 'डेल्टा' हा नवा व्हेरिएंट संसर्गित आढळून आल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा काही प्रमाणात निर्बंध कठोर करण्यात आले. त्यात सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरू ठेवणे, शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाउनमध्ये सर्वच दुकाने बंद असे निर्बंध सुरू होते. महिनाभरापासून हे निर्बंध लागू असताना कोरोनाचा संसर्गही नियंत्रणात येत असल्याची चिन्हे आहेत. रोज दोन-तीन हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त होत असून, रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आतच आहे. पॉझिटिव्हीव्हिटीही घटली असून, त्यामुळे दुकानांची वेळ वाढवून द्यावी, शनिवार व रविवार दुकाने सुरू करण्यासंबंधी परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी राज्यभरात अजूनही निर्बंध लागू आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र निर्णय होणे कठीण आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने महिनाभरापासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी सादर करत निर्बंध शिथिल करण्यासंबंधी मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर राज्य सरकार काय निर्णय घेते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. |
यासंदर्भात आतार यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे. : Corona test mandatory for trade license renewal' एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ट्रेड लायसन्स नूतनीकरासाठी वैद्यकीय तपासणीसह कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्रफ आतार यांनी केली आहे. यासंदर्भात आतार यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने ट्रेड लायसन्स नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील छोटे व्यावसायिक व व्यापारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीत आहेत. सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेड लायसन्स नूतनीकरणासाठी चाचणी करणे बंधनकारक करावे. कोरोना चाचणी अहवाल सादर केल्यानंतरच संबंधीतांच्या ट्रेड लायसन्स नूतनीकरण करावे, असे आतार यांनी निवेदनात म्हटले आहे. |
राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अजित पवार हे दोनवेळा व्यासपीठ सोडून निघून गेले होते. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का ? |
Maruti Suzuki Alto LXI CNG Loan EMI Down Payment : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक सीएनजी वाहनं खरेदी करू लागले आहेत. तुम्ही देखील एखादी सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती अल्टो सीएनजी हा एक चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे. नवी दिल्ली : Maruti Suzuki Alto LXI CNG : भारतीय बाजारातील सर्वात किफायतशीर आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये मारुती अल्टो ८०० या कारचा समावेश आहे. या कारचं सीएनजी व्हर्जन देखील मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटसह सीएनजी मॉडेलला देखील बाजारात मोठी डिमांड आहे. या कारला मोठी मागणी असण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे या कारची किंमत आणि या कारचे फीचर्स. तसेच या कारचं सीएनजी मॉडेल उत्तम मायलेज देतं. त्यामुळे या कारला लोकांकडून मोठी पसंती मिळते. तुम्ही देखील स्वतःसाठी एखादी उत्तम सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अल्टो हा एक उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहे. अल्टो सीएनजी या कारची एक्स शोरूम किंमत ५. ०३ लाख रुपये इतकी आहे. या मॉडेलची ऑन रोड प्राईस ५. ४८ लाख रुपये इतकी आहे. तुमचं बजेट इतकं नसलं तरी काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला या कारवरील सोप्या फायनान्स स्कीमची माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही ही कार अवघ्या १ लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह खरेदी करू शकता आणि नंतर सुलभ हप्त्यांमध्ये हे कर्ज फेडू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला डाऊन पेमेंट, कर्ज, व्याजदर आणि मासिक हप्त्याची माहिती देणार आहोत. मारुती अल्टो LXI ऑप्शनल एस-सीएनजी कारची ऑन रोड प्राईस ५. ४८ लाख रुपये इतकी आहे. तुम्ही १ लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह (ज्यामध्ये ऑन रोड प्राईस, प्रोसेसिंग फीस आणि पहिल्या महिन्याचा हप्ता यांचा समावेश असतो. ) खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून ४,४८,६४६ रुपयांचं कर्ज मिळेल. या कर्जावर ९ टक्के व्याज आकारलं जाईल. जर तुम्ही हे कर्ज ५ वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला दर महिन्याला ९,३१३ रुपयांचा हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागेल. पाच वर्षात तुम्हाला एकूण ५,५८,७८० रुपये भरावे लागतील. म्हणजेच बँक तुमच्याकडून १,१०,१३४ रुपयांचं व्याज वसूल करेल. दरम्यान, व्याजदर हा तुमच्या क्रेडिट स्कोरवर अवलंबून असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. अल्टो सीएनजी कारमध्ये कंपनी सीएनजी पर्याय देखील देते. या मॉडेलचं नाव अल्टो ८०० एलएक्सआय असं आहे. यामध्ये तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॉवर विंडो, व्हील कव्हर्स, पॅसेंजर एअरबॅग, ड्रायव्हर एअरबॅग, पॉवर स्टीयरिंग आणि एअर कंडिशनरसारखे फीचर्स मिळतील. ही कार एकूण ६ रंगांमध्ये येते. ज्यामध्ये सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे, मोहितो ग्रीन, सेरुलियन ब्लू, सॉलिड व्हाइट आणि अपटाउन रेड यांचा समावेश आहे. |
नवी दिल्लीः कोरोना संकटाची तीव्रता पाहता गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्न धान्य मिळणार असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना तीन महिने मोफत धान्य मिळणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं होतं. हीच योजना नोव्हेंबरपर्यंत सुरूच राहणार असल्याची घोषणा मोदींनी गेल्या आठवड्यात केली. मात्र आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणाऱ्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ होईल. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सरकार गरिबांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचा मोफत पुरवठा करणार आहे. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक न केलेल्यांसाठी सरकारनं ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सरकारकडून गरिब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू/तांदूळ आणि एक किलो चणे दिले जात आहेत. हे धान्य महिनाभरासाठी पुरवण्यात येत आहे. तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आता नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. त्यासाठी सरकारनं आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली मुदतही वाढवली आहे. जास्तीत जास्त लोकांना पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेता या दृष्टीनं आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. रेशन कार्ड आधारला लिंक कसं कराल? १. रेशन कार्डला आधारसोबत लिंक करण्यासाठी UIDAI चं अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा. २. स्टार्ट नाऊचा पर्याय निवडा. ३. तुमचा पूर्ण पत्ता भरा. (जिल्हा आणि राज्याच्या माहितीसह) ४. उपलब्ध पर्यायांमधून रेशन कार्डचा पर्याय निवडा. ५. यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, ई-मेल आणि मोबाईल नंबर भरा. ६. यानंतर तुमच्या मोबाईलवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर नोटिफिकेशन येईल. |
Swiggy will use drones for home delivery : खाण्यापिण्याचे पदार्थ घरपोच आणून देणारा ऑनलाइन फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी लवकरच ड्रोनच्या मदतीने होम डीलिव्हरी करणार आहे. स्विगी इन्स्टंट ग्रोसरी डीलिव्हरी सर्व्हिस मार्ट ही सेवा ड्रोनच्या मदतीने चालविणार आहे. यासाठी स्विगीने चार ड्रोन स्टार्टअप कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्यांच्या ड्रोनच्या मदतीने ग्रोसरीची होम डीलिव्हरी केली जाईल. गरुड एअरोस्पेस, स्कायएअर मोबिलिटी, एएनआरए+टेकईगल कंसोर्टिया आणि मारुत ड्रोनटेक या ड्रोन स्टार्टअप कंपन्या स्विगीसोबत काम करणार आहेत. ड्रोन एका गोदामातून मालाची पिशवी घेईल आणि थेट ग्राहकाच्या घरी जाऊन होम डीलिव्हरी करेल. या व्यवस्थेत पेमेंट ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे ग्राहकाची मागणी लवकर पूर्ण होईल. मानवी श्रम, वेळ आणि पैशांची बचत होईल. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर बंगळुरू तसेच दिल्ली-एनसीआर येथे ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी केली जाईल. यासाठी स्विगी गरुड एअरोस्पेस कंपनीची बंगळुरूत आणि स्कायएअर मोबिलिटी कंपनीची दिल्ली एनसीआरमध्ये मदत घेणार आहे. पहिला प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यावर कंपनी दुसरा प्रयोग सुरू करणार आहे. यात एएनआरए+टेकईगल कंसोर्टिया आणि मारुत ड्रोनटेक या कंपन्या सहभागी होतील. दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यास स्विगी ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी सुरू करणार आहे. ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी सुरू करण्यासाठी संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी स्विगी ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी सुरू करणार आहे. |
मंचर (पुणे) - दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात शेतीपिके आणि घरांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. याबरोबरच या भागात केरोसिनचा पुरवठाही त्वरीत करावा, अशी मागणी करणारे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकरराव मोहंडुळे यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळात आदिवासी भागात घरांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन अद्याप नुकसान भरपाई दिली गेली नाही. पश्चिम आदिवासी भाग हा अतिवृष्टीचा प्रदेश आहे. शेतीकामे (घोगंडी वाळवणे), चुल पेटवणे, तसेच लाईट सतत बंद पडल्याने दिवाबत्तीसाठी केरोसिन (रॉकेल) प्रति कुंटुबास 3 ते 4 लिटर मिळणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील तळेघर, अडिवरे, डिंभे या मध्यवर्ती ठिकाणी तलाठी व मंडल अधिकारी सजेच्या ठिकाणी येणे आवश्यक आहे. संबधित अधिकारी महिन्यातून फक्त दोन किंवा तीन दिवस येत असल्याने आदिवासी बांधवांना वारस नोंदी, 7/12, 8-अ आदी कामांसाठी 50 ते 60 किलोमीटर अंतरावरील तालुक्यातील घोडेगावला यावे लागत असल्याने वेळ, पैसे व मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. आदिवासी बांधवांना येणाऱ्या विविध समस्यांबाबत त्वरीत कार्यवाही करण्यासाठी लेखी निवेदनाच्या प्रती मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतरांना दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकरराव मोहंडुळे यांनी दिली. |
राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ आगारांमध्ये २६६ बस आहेत. यातील बहुतांश बस या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास पूर्ण करावा लागतो. विशेष म्हणजे चार आगारांतील बसच्या दुरुस्तीसाठी वर्षाला ६ कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यातच आता मागील वर्षभरापासून वारंवार लॉकडाऊन जाहीर करण्यात येत असल्याने या चारही आगारांतील बस एका जागेवरच उभ्या राहत आहेत. त्यामुळे नादुरुस्त बसमध्ये आणखीनच भर पडली आहे. काही बसच्या काचा निखळल्या असून, काही बसचे शीट फाटले आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी महामंडळ प्रशासनाला बसची दुरुस्ती करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी बसच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शनिवारी परभणी येथील आगारात बसची पाहणी करताना दिसून आले. परभणी जिल्ह्यातील चार आगारांतील २६६ बसच्या नियमित दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी वर्षभरापासून काही बस एका जागेवरच उभे होत्या. तसेच दुसऱ्या लाटेत तीन महिने बस आगाराच्या बाहेर काढता आल्या नाहीत. सध्या दोन महिन्यांपासून या बस रस्त्यावरून धावत आहेत. मात्र, या बस दुरुस्तीसाठी खर्च वाढला आहे. परिणामी वर्षाकाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च बस दुरुस्तीसाठी होण्याची शक्यता आहे. बसची नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात येते. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार बसच्या दुरुस्तीसह इतर कामकाज कर्मचाऱ्यांकडून नियमित केले जातात. |
अकोला : अन्यायाविरोधात ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेच्यावतीने ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. अकोला : स्थानिक भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयात पेन्शनसाठी जाणाऱ्या ईपीएस ९५ वर्गवारीतील पेन्शनधारकांना सदर कार्यालयातील गलथान कारभारामुळे मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेच्यावतीने ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. अकोल्यातील भविष्य निर्वाह निधी उपप्रादेशिक कार्यालयात वृद्ध पेन्शनधारकांना मागील दोन महिन्यांपासून सन २०१६-२०१७ चे हयातीचे ई-जीवन प्रमाणपत्र सादर करूनही पेन्शन देण्यात येत नाही. त्यांना बाहेरगावावरून बोलावून रांगेत चार ते पाच तास थांबावे लागते. त्यानंतर घरी परत आल्यानंतर जीवन प्रमाणपत्र यशस्वीरीत्या लिंक झाले नसल्याचा मेसेज येतो. याबाबत विचारले असता योग्य उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे पेन्शनधारक संतप्त झाले असून, त्यांच्या मागण्यांसाठी ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात ११ जुलै रोजी अशोक वाटिकेजवळून सकाळी ११ वाजता भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. तरी सर्व ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कमांडर राऊत यांनी केले आहे. |
गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 11 आमदार बेपत्ता असल्याची चर्चा होती. पण, त्यातील सात परतले आणि चार बेंगळुरूला गेल्याचे सांगितले जात होते. मध्य प्रदेशात पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे 17 आमदार पळाले? भोपाळ Bhopal : मध्य प्रदेशात सत्तेत असलेल्या काँग्रेसची Congress डोकेदुखी थांबण्याची काही चिन्हे नाहीत. काठावरचं बहुमत असलेल्या काँग्रेसचे आणखी काही आमदार बेंगळुरूला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळं कमलनाथ Kamalnath सरकार पुन्हा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज, सकाळीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्लीला भेट देऊन पक्ष श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेपासूनच अस्वस्थता आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. काँग्रेसमध्ये कमलनाथ यांचा एक गट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक गट असा सामना आहे. दुसरीकडे राज्यात दिग्विजय सिंह यांचाही एक गट सक्रीय आहे. या सगळ्यांत सत्ताधारी पक्षा अडचणीत आला आहे. कमलनाथ यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. पण, सध्याच्या स्थितीत काँग्रेसमध्ये ऑल इज वेल आहे, असं वाटत नसल्याचं बोललं जातंय. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 11 आमदार बेपत्ता असल्याची चर्चा होती. पण, त्यातील सात परतले आणि चार बेंगळुरूला गेल्याचे सांगितले जात होते. त्या चार पैकी दोन भोपाळला आले. पण, दोघांशी पक्षातील नेत्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्या दौघांना आता आणखी 15 ते 17 आमदार मिळाल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे गटाचं बंड? मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यापैकी 114 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. तर भाजपच्या 107 जागा आहेत. बसपच्या दोन, समाजवादी पक्षाची एक आणि चार अपक्ष आमदार आहेत. या सभागृहात 34 मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते. सध्या मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री मंत्रिमंडळात कार्यरत आहेत. त्यामुळं आणखी पाच मंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणारा गट मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्ष श्रेष्ठींवर दबाव टाकत असल्याचं बोललं जात आहे. बेंगळुरूला गेलेल्या 15 ते 17 आमदारांपैकी सर्वाधिक आमदार हे ज्योतिरादित्य शिंदे गटाचे आहेत. येत्या 26 मार्च रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, 13 मार्चपर्यंत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या तीन जागांवर निवडणूक होत आहे. सभागृहातील काँग्रेसचे संख्याबळ पाहता. तीन पैकी दोन जागा काँग्रेसला मिळतील, अशी शक्यता आहे. पण, त्यासाठी बेंगळुरूला गेलेले आमदार पुन्हा काँग्रेसच्या शामीयान्यात परतावे लागणार आहेत. दिल्लीत पक्ष श्रेष्टींशी राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात चर्चा झाली. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पक्ष नेतृत्वाशी बोलणं झालेलं आहे. |
जून १९८४. ठिकाणः अमृतसर, पंजाब. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे एक अचाट आणि अफाट व्यक्तिमत्त्व आहे. केरळ केडरचे IPS अधिकारी असलेले डोभाल हे प्रथमदर्शनी सामान्य सरकारी अधिकार्यासारखेच दिसतात, पण त्यांच्या डोळ्यातली अद्भुत जरब आणि ऒठांवरचं गूढ हसू पाहताच समजतं की हे काहीतरी वेगळं पाणी आहे. भारताचे सर्वश्रेष्ठ गुप्तहेर असा लौकिक असलेल्या या नावाभोवती गेल्या ४५ वर्षात गूढतेचं एक अद्भुत वलय तयार झालंय ज्यामध्ये असंख्य कथा गुंफल्या आहेत... काही वास्तविक, काही अकल्पित तर काही कल्पनातीत! ! डोभाल सर्वप्रथम १९६४ साली प्रकाशात आले ते त्यांच्या मिझोराममधील यशस्वी कामगिरीमुळे. लालडेंगा याच्या नेतृत्वाखालील मिझो नेशनल फ्रंटने ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या आणि सरकारच्या चर्चेचे प्रस्ताव ते सतत फेटाळून लावत होते. डोभाल तिकडे गेले आणि लालडेंगाच्या सहा महत्त्वाच्या साथीदारांना आपल्या बाजूस वळवले. लालडेंगा नाक मुठीत धरून शरण आला, एवढंच नव्हे तर सरकारच्या सर्व अटी मान्य करून मुख्य प्रवाहात सामील झाला. एकेकाळी अशक्य वाटणारी ही गोष्ट डोभालांनी लीलया साध्य करून दाखवली. सिक्कीमचे भारतातील विलीनीकरणाचे अत्यंत अवघड कामही त्यांनी अगदी अलवार करून दाखवले. १९७४ साली अणूस्फोट घडवून भारत एक अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र बनले. पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यानेही अण्वस्त्रे बनवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न सुरू केले. या काळात डोभाल एकदमच गायब झाले. तब्बल ७ वर्षं त्यांचा ठावठिकाणा काही मोजक्या लोकांनाच ठाऊक होता. नंतर समजलं की डोभाल चक्क पाकिस्तानातील लाहोर शहरात रहात होते. या ७ वर्षात त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात प्रचंड अडथळे आणले आणि सर्व गुपिते भारतीय गुप्तहेरयंत्रणांना पुरवली. या ७ वर्षात एखादी छोटीशी चूकही त्यांच्या जीवावर बेतली असती, पण हा महान देशभक्त आपल्या प्राणांची पर्वा न करता हे अतिधोकादायक काम सतत ७ वर्षे करत राहिला. या काळात त्यांनी पाकिस्तानात RAW चे मजबूत जाळे विणले आणि कसलाही पुरावा मागे न ठेवता भारतात परत आले. ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोचली नाही, पण ती सर्व देशांच्या हेरगिरी संघटनांना समजली आणि पाकिस्तानच्या ISI संघटनेची सर्व जगात चांगलीच छी-थू झाली. तेव्हापासून डोभाल हे ISI चे क्रमांक १चे शत्रू बनले. १९९०च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सुरूवात झाली होती. हा दहशतवादी आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे हे लक्षात येताच केंद्र सरकारला पुन्हा एकदा डोभाल यांची आठवण झाली. काश्मीरमधील हा धर्माधिष्ठीत दहशतवादी केवळ शस्त्रबळाने चिरडल्यास तात्पुरते यश मिळेल पण त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट असतील हे डोभाल यांनी ओळखले आणि एक वेगळीच चाल खेळली. काश्मिरीमधील गावागावातून दहशतवादी संघटनांमधे सहभागी झालेल्या तरुणांवर त्यांनी बारीक नजर ठेवली आणि या तरूणांचा brainwash करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी सर्व मार्ग वापरले. अशा brainwash केलेल्या तरुणांची एक दहशतवादविरोधी संघटना उभी करून त्यांनी पाकप्रणीत दहशतवादास तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी बनलेले हजारो तरूण पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाले. पुढे पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि सर्व जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. भारतीय सैन्य, BSF, काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षादले यांच्यामध्ये काटेकोर समन्वय साधून डोभाल यांनी एक अत्यंत कार्यक्षमता यंत्रणा उभी केली. या यंत्रणेचा success rate ९९% आहे, म्हणजे १०० पैकी ९९ दहशतवादी कारवाया या होण्याआधीच थांबवल्या जातात. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे डोभाल याना 'कीर्तीचक्र' हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार फक्त लष्करी अधिकारी अथवा सैनिकांना मिळतो. गेल्या ७० वर्षात हा पुरस्कार मिळालेले डोभाल हे एकमेव पोलिस अधिकारी आहेत. २००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला आणि डोभालांनी निव्रुत्ती घेतली. पण या काळातही RAW, IB, NIA या संघटनांचे प्रमुख त्यांचे मार्गदर्शक घेतच राहिले. 2014 साली मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी पहिला महत्त्वाचा निर्णय घेतला जो त्यांनी आधीच मनाशी ठरवला होता- अजित डोभाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात घेतलेल्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयावर डोभाल यांची छाप दिसते. भारताचे पाकसंबधाचे सर्व निर्णय डोभालच घेतात असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी सप्टेंबरमधे पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यावेळी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी मोदींनी डोभालांवर सोपवली. डोभालांनी अत्यंत निर्दयपणे कारवाई करून पाक सीमेचा इंचन् ईंच अक्षरशः भाजून काढला. इकडे भारत सर्व जगाला ओरडून सांगत होता की पाकिस्तान आमचं भयंकर नुकसान करतोय, पण वास्तवात मात्र भारताने पाकिस्तानचे चौपट नुकसान केले होते. पाकिस्तानसाठी हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता, कारण भारतानं आम्हाला झोडपलं असं जर त्यांनी जाहीर केलं असतं तर पाकिस्तानात त्यांच्या लष्कराची नाचक्की झाली असती. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या १८ जवानांना मारणाऱ्या मिझो दहशतवाद्यांना म्यानमारच्या सीमेत घुसून मारण्याची जी कारवाई लष्कराने केली त्याचे सूत्रसंचालनही डोभाल यांनीच केले होते. पाकिस्तानविरुद् त्यांनी offensive defense हे धोरण राबवले आहे. आपले संरक्षण मजबूत ठेवायचे आणि शत्रूवर गुप्तपणे सतत वार करत रहायचे अशा या धोरणास मोदींचा पूर्ण पाठिंबा आहे. दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात. भारतातील सामान्य जनतेस डोभाल यांच्याविषयी फारशी माहिती नाही, पण पाकिस्तानी लष्कर, ISI, सर्व राजकीय पक्ष, इतकंच नव्हे तर जनताही डोभाल यांचा प्रचंड तिरस्कार करते. पाकिस्तानच्या प्रत्येक वृत्तपत्रात डोभाल यांच्या विरोधातील लेख नियमितपणे छापले जातात, इलेक्ट्रॉनिक मेडीयामधे त्यांच्याविरोधात गरळ ऒकली जाते, इतकंच नव्हे तर ट्विटरवर अशी शेकडो पेजेस आहेत ज्यावर केवळ डोभालविरोधातील लिखाणच केले जाते. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि वजिरीस्तान या भागातील पाकविरोधी दहशतवादी संघटनांचे संचालन डोभाल करतात अशी पाक सरकारची पक्की खात्री आहे. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचे डोभाल हेच बाप आहेत असं पाकिस्तानातील सामान्य जनतेसही वाटतं. हा माणूस पाकिस्तानात कुठेही काहीही करु शकतो अशी भिती पाकिस्तानला वाटते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना डोभाल यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की जर पाकिस्तानने पुन्हा २६/११ सारखा हल्ला केला तर त्यांना कदाचित बलुचिस्तान गमवावा लागेल. या एका वाक्याने संपूर्ण पाकिस्तानात अक्षरशः वादळ निर्माण केले होते. पाकविरोधी सर्व संघटनांचे डोभाल हेच संचालक आहेत हा समज अधिकच ठाम झाला. पण आजवर पाकिस्तानला डोभाल यांच्याविरूद्धचा एकही पुरावा मिळालेला नाही. भारत आणि पाकिस्तानमधे NSA स्तरावरील बोलणी व्हावीत असा निर्णय मोदी-शरीफ भेटीत काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. शरीफ यांना हा अगदी साधा आणि निरूपद्रवी निर्णय वाटला आणि त्यांनी मोदींसमवेत तो जाहीरही करून टाकला. पण पाकिस्तानात परत जाताच लष्कराबरोबरच त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. डोभालांशी चर्चा करायची आहे हे ऐकून पाकिस्तानचे NSA सरताझ अझीझही पुरते गडबडून गेले. पाक मिडियामधेही या निर्णयाची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली. अजित डोभालसमोर सरताज अझीझ टिकूच शकत नाहीत हे सत्य पाक मिडियाने आधीच मान्य केले होते. या चर्चेदरम्यान डोभाल यांना देण्यासाठी तीन डोसीयर पाकने तयार केली होती ज्यामध्ये भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांना कसे प्रोत्साहन देतो याचे पुरावे देण्यात आले होते. गंमत म्हणजे या तीनपैकी एक डोसीयर केवळ डोभालांविषयी होते! ! देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्यभर झटणारा हा महान देशभक्त वयाच्या सत्तरीतही संपूर्ण जोमाने कष्ट करतोय, दहशतवाद रोखण्याचे नवनवीन उपाय शोधून काढतोय, भारतीय हेरसंघटनांना अधिकाधिक मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी जीवाचं रान करतोय. कसलाही गाजावाजा न करता गेली ५० वर्षे अविरतपणे देशसेवा करणाऱ्या आणि देशाच्या शत्रूंना नामोहरम करणाऱ्या अजितकुमार डोभाल यांना मानाचा मुजरा. ( श्री. जयंत दामले यांच्या सौजन्याने) |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या 'सी-प्लेन'चे (पाण्यावर उतरू शकणारे आणि तेथून उड्डाण करू शकणारे विमान) लोकार्पण ३१ ऑक्टोबर अर्थात राष्ट्रीय एकता दिनी होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशातील पहिली 'सी-प्लेन' सेवा सुरू करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. साबरमती नदीच्या काठावरून उड्डाण घेऊन नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया कॉलनी येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'पर्यंतचा प्रवास हे 'सी-प्लेन' करील. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, साबरमती (अहमदाबाद) ते 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (केवाडिया) या मार्गासाठी 'सी-प्लेन'ची पहिली फेरी सुरू करण्यात येणार आहे. 'स्पाइसजेट' या खासगी प्रवासी विमान कंपनीद्वारे ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ३१ ऑक्टोबरपासून १९ प्रवाशांची क्षमता असलेल्या 'सी-प्लेन'च्या रोज चार फेऱ्या एका बाजूने होणार असून, प्रतिव्यक्ती ४,८०० रुपये तिकीट आहे. साधारण २०५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 'सी-प्लेन'ला केवळ एक तास लागणार आहे. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद ते धारोई प्रवास 'सी-प्लेन'द्वारे २०१७मध्ये केला होता. ते तेव्हा गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर होते. |
गेल्या सहा वर्षांच्या करिअरनंतर आता कुठे तापसीला सिनेमा निवडण्याचा चॉईस मिळायला लागला, असे तिला स्वतःला वाटायला लागले आहे. 'बदला' या थ्रिलर सस्पेन्स फिल्मनंतर एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीच्या रुपात तिच्याकडे बघितले जाऊ लागले आहे. तोपर्यंत केवळ सपोर्टिंग रोल आणि लीड अॅक्ट्रेसच्या छबीमध्येच तिच्याकडे बघितले जाऊ लागले होते. थोडक्यात पूर्वीच्या अॅक्ट्रेसना एकाच श्रेणीमध्ये काम करायला लावण्याची निर्मात्यांची सवय होती. "कमर्शियल' आणि "ऑफ बीट' या दोनच श्रेण्यांमध्ये प्रामुख्याने अॅक्ट्रेसची वर्गवारी केली जात असे. त्याशिवाय वेगळा पर्याय क्वचितच निवडला जायचा. आताच्या कोणत्याच अॅक्ट्रेसला असे एकाच श्रेणीमध्ये काम करायला लावणे शक्य नाही, कोणत्याही अॅक्ट्रेसला असे टॅग लावताना सतरावेळा विचार करायला लागतो आहे. हे तापसीने दाखवून दिले आहे. त्यामुळेच तिच्याकडून अॅक्शन, रोमान्स, सस्पेन्स, थ्रिलर अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांची अपेक्षा सहज केली जाऊ शकते आहे. तापसीने आता सिनेमे निवडण्याच्याबाबतच्या स्वतःचे निकष पक्के केले आहेत. तिचा पहिला आणि एकमेव निकष म्हणजे एक प्रेक्षक म्हणून जो सिनेमा बघायला आवडेल, त्या सिनेमातच काम करायचे हा आहे. हेच एकमेव कारण आहे की ज्यासाठी तिने मध्यममार्ग निवडला आहे. पूर्ण कमर्शियल किंवा "ऑफबीट' सिनेमामध्ये स्वतःला झोकून देण्याचा धोका तिने टाळला आहे. आता बॉलिवूडमधील गाजलेल्या दिग्दर्शकांच्या एकापेक्षा अधिक सिनेमांमध्ये तापसीची वर्णी लागली आहे. डेव्हिड धवन, शुजित सरकार, नीरज पांडे यांच्याबरोबर तापसीने यापूर्वीच काम केले आहे. आता अनुराग कश्यपच्या सिनेमामध्ये वर्णी लागायची ती वाट बघते आहे. "सांड की आंख'मध्ये प्रथमच तिला भूमी पेडणेकरबरोबर म्हातारीचा रोल करायचा आहे. या सिनेमाचे नाव पूर्वी "वुमनियां' असे ठरले होते. मात्र नंतर ते बदलले गेले. त्याशिवाय "हाऊसफुल्ल 4′ सारखा धमाल कॉमेडी सिनेमाही तिच्याकडे आहे. त्यातून तापसीच्या अभिनयाचे आणखी वेगळे पैलू समोर येतील. |
दाभोळकर यांच्या आंदोलन व चळवळीला ज्यांचा विरोध होता, त्यांच्याकडून बोलताना वा लिहिताना काही अवास्तव बोललेही गेले असेल. पण त्या शब्दांना तपासात किती किंमत द्यायची; हा मुद्दा महत्वाचा होता. हत्या व हल्ल्याचा प्रकार बघितला, तर लगेच हे सुपारी किलींग म्हणजे भाडोत्री खुन्यांकडून करून घेतलेले काम आहे, हे लक्षात येऊ शकत होते. त्यातली सफ़ाई व निसटण्याची चतुराई व्यावसायिक चतुराई दाखवत होती. त्यामुळेच खुनाचे सुत्रधार शोधण्यापेक्षा खरे हल्लेखोर ताब्यात घेणे वा त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. असे हल्लेखोर मिळाले, मग खर्या सुत्रधार वा सुपारी देणार्यापर्यंत जाऊन पोहोचणे अवघड रहात नाही. पण त्या हल्लेखोरांच्या मागावर जाण्याची सवड व मोकळीक गदारोळ करणार्यांनी पोलिसांना दिलीच नाही. सनातन वा हिंदुत्ववादी किंवा वारकरी संप्रदाय यांच्याविषयी पहिल्या दिवसापासून इतका गहजब करण्यात आला, की मोडस ऑपरेंडीनुसार हा सुपारी गुन्हा असल्याचेही स्पष्टपणे बोलून दाखवायची पोलिसांना हिंमत राहिली नाही. परिणामी असे मारेकरी, शार्पशुटर शोधण्यापेक्षा बोंबलणार्यांच्या समाधानासाठी सनातनच्या कोणा साधक व्यक्तीला पकडण्यासाठीच पोलिसांना आपली शक्ती पणाला लावणे भाग पडले. शेवटी गोव्यात कुणा साधकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हाच हा गहजब थांबला. अर्थात त्याचा तपासात काहीही उपयोग झाला नाही. त्याला गोव्यातून पुण्यात आणून पोलिसांनी जबानी घेऊन सोडून दिले. पण त्यामुळे सनातन विरोधी चाललेला गदारोळ थांबला आणि पोलिसांना खर्या गुन्ह्याच्या तपासाचा मार्ग खुला झाला. त्यांनी गुन्ह्याची पद्धती व घटनाक्रमाच्या आधारे गुन्हेगार जगताकडे डोळे वटारून योग्य शोध सुरू केला आहे. वाचाळ दाभोळकर समर्थकांनी गहजब केला नसता व पोलिसांना अकारण सनातनच्या दिशेने भरकटवले नसते; तर असे डझनभर सुपारीबाज पकडून त्यापैकी एकाकडून तरी दाभोळकरांचा गेम करणार्यापर्यंत नक्कीच मजल मारली असती. त्याला प्राधान्य अशासाठी आहे, की असे मारेकरी सामान्य बुद्धीचे असतात आणि विनाविलंब सुपारी देणार्यांची म्हणजे खर्या सुत्रधाराची नावे मिळू शकतात. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील मारेकरी सापडल्यावर पोलिसांना खासदार असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला नव्हता. पण तोच तपास आधीच पाटलांचे धागेदोरे शोधण्यात गुरफ़टला असता, तर खरे मारेकरी बेपत्ता व्हायला सवड मिळाली असती. आणि मग सहजासहजी पाटलांपर्यंत पोहोचता आलेच नसते. इथे नेमकी तीच चुक झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनीही पहिल्याच दिवशी कारस्थान असल्याची भाषा बोलून सुरुवात केली आणि आठवडाभर पोलिसांना मारेकर्याचा शोध घेण्य़ापेक्षा नुसत्याच संशय व्यक्त करणार्या शंकासुरांच्या समाधानाला प्राधान्य द्यावे लागले आहे. थोडक्यात दाभोळकरांविषयी आत्मियता दाखवताना ज्या लोकांनी सनातनविषयी आपला सुड उगवण्याचे उपदव्याप केले; त्यांनीच या तपासाची दिशा भरकटून टाकण्याचे मोठे पाप केले. त्यातून पोलिस तपासात जो व्यत्यय आणला आहे, त्याचा लाभ म्हणून हल्लेखोर व त्यांचे सुत्रधार असतील, त्यांना धागेदोरे लपवायला सवड मिळाली त्याचे काय? जेव्हा पोलिसतपास व आपुलकी यांच्यात गल्लत केली जाते; तेव्हा मग असाच कामाचा विचका होतो. महत्वाच्या वेळेचाही कालापव्यय होऊन जातो. थोडक्यात ज्यांनी आपल्या आपुलकीचे नको तिथे प्रदर्शन मांडण्याची हौस भागवून घेतली, ते उतावळेच या तपासकामातले खरे अडसर झाले म्हणावे लागते. |
'रंगसंगती'ला जेव्हा खुणावतात रुग्णालयाचे दरवाजे. . . ! मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नाट्यक्षेत्रावर पडदा पडला असल्याने, नाट्यगृहे, पर्यायाने रंगमंच ओस पडले आहेत. नाट्यगृहांचे दरवाजे बंद असले, तरी कलाक्षेत्रातील संवेदनशील मंडळी स्वस्थ राहू शकत नाहीत. अशा वेळी कलाक्षेत्रातील काही जणांना रंगमंचाच्या ऐवजी रुग्णालयाचे दरवाजे खुणावू लागले आणि त्यांनी थेट रक्तदानाच्या माध्यमातून, सामाजिक बांधिलकीचा 'प्रवेश' सादर करत अनोखे उदाहरण कायम केले. कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या रंगसंगती कलामंच या संस्थेचा यंदा ११वा वर्धापन दिन होता. गेली दहा वर्षे या मंडळींनी संस्थेचा वर्धापन दिन रंगमंचांवर विविध कलागुणांच्या माध्यमातून साजरा केला. मात्र, यंदा कोरोनाच्या काळात रंगमंचाचे दरवाजे बंद असताना, २४ तास उघडे असणारे रुग्णालयाचे दरवाजे या संस्थेला समाजकार्यासाठी खुणावत होते. त्या पार्श्वभूमीवर या संस्थेने १६ मे रोजी टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून वेगळा पायंडा पाडला. महत्त्वाचे म्हणजे, या रक्तदान शिबिरात रंगसंगतीच्या सर्व सभासदांनीही रक्तदान केले. त्याशिवाय, केवळ मुंबईतूनच नव्हे, तर पनवेल, टिटवाळा, विरार आदी ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी या शिबिरात रक्तदान केले. विशेष म्हणजे, याच दिवशी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नुपूर राणे या युवतीने रक्तदान करून तिचा वाढदिवस साजरा केला, तसेच गेली अनेक वर्षे नियमित रक्तदान करत आलेल्या ६२ वर्षीय विद्याधर सावंत यांनीही येथे रक्तदान केले. युवा अभिनेता अनुराग वरळीकर यानेही यावेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रंगसंगतीचे हे शिबिर शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत पार पडले. सध्याचा काळ पाहता, एकूण ६२ जणांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. त्यातील ५४ जण रक्तदान करण्यास पात्र ठरले. सध्याच्या कठीण परिस्थितीत मिळालेला हा प्रतिसाद पाहून आणि संस्थेने घेतलेला पुढाकार लक्षात घेऊन टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनीही रंगसंगती कलामंचचे कौतुक केले. कलेसोबतच समाजकार्याचीही ओढ सध्याच्या युवापिढीला असल्याची प्रचिती या शिबिरातून आली. आमच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्वांच्या सहभागाने हे शिबिर यशस्वी झाले, याचे समाधान आहे. |
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo Credit :sai tamhankar instagram) नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit :sai tamhankar instagram) गोल्डन कलरचा शॉर्ट ड्रेस आणि पायात सिल्व्हर रंगाचे हिल्स अशा बोल्ड लूकमधील सईच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. (Photo Credit :sai tamhankar instagram) सईने हे फोटो शेअर करून त्याला 'शाइनिंग ब्राइट' असे कॅप्शन दिले आहे. (Photo Credit :sai tamhankar instagram) सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Photo Credit :sai tamhankar instagram) मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे. (Photo Credit :sai tamhankar instagram) सईच्या बॉलिवूडमधील मिमी या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Photo Credit :sai tamhankar instagram) लवकरच सईचे 'मिडियम स्पायसी' आणि 'इंडिया लॉकडाउन' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (Photo Credit :sai tamhankar instagram) |
भारत-पाकिस्तानमधले तणावपूर्ण संबंध हा चर्चेचा विषय असला तरी बॉलिवूडला मात्र पाकिस्तानचं बिलकूल वावडं नाही. गेल्या काही वर्षांतली अनेक हिट हिंदी गाणी पाकिस्तानी गायकांनी गायली आहेत. काही पाकिस्तानी बँडससुद्धा बॉलिवूडमध्ये आपली कमाल दाखवतायत. भारत-पाकिस्तानमधले तणावपूर्ण संबंध हा चर्चेचा विषय असला तरी बॉलिवूडला मात्र पाकिस्तानचं बिलकूल वावडं नाही. गेल्या काही वर्षांतली अनेक हिट हिंदी गाणी पाकिस्तानी गायकांनी गायली आहेत. काही पाकिस्तानी बँडससुद्धा बॉलिवूडमध्ये आपली कमाल दाखवतायत. मोहित चौहान, अरिजित सिंग, अंकित तिवारी यांसारख्या भारतीय गायकांच्या बरोबरीनेच बॉलिवूडमध्ये सध्या पाकिस्तानी गायकांची चलती आहे. अनेक पाकिस्तानी गायकांनी भारतीय संगीत क्षेत्राचा सूर बरोब्बर पकडला आहे. यामध्ये बहुतांश पुरुष गायकच असून त्यांची गायनशैली भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. २००४साली 'पाप'मधून राहत फतेह अली खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आणि त्यानंतर एकामागोमाग एक गायकांची रांगच लागली. आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली झफर, आरिफ लोहार, शफकत अमानत अली, मुस्तफा झाहिद, अदनान सामी, जावेद बशीर, अली अझमत, कॉल बँड, अॅनी खलिद, आदिल चौधरी, खुर्राम इक्बाल, शेहजाद रॉय असे अनेक पाकिस्तानी गायक हिंदी सिनेसृष्टीत दाखल झाले. भट्ट कँपनं अलिकडेच आतिफ अस्लमला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. 'जेहेर', 'अजब प्रेम की गजब कहानी' , 'रेस २', 'फटा पोस्टर निकला हिरो' चित्रपटांतील गाण्यांमुळे आतिफ युथमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. अभिनेता-गायक अली जफरने तर गाण्याबरोबरच अभिनेता म्हणूनही स्वतःची छाप पाडली. 'तेरे बिन लादेन', 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'लंडन पॅरिस न्यूयॉर्क', 'चष्मेबद्दूर', 'टोटल सियापा' या सिनेमांत तो चमकला. त्यात त्याने गाणीही गायली आहेत. 'लिफ्ट करा दे'फेम अदनान सामी हासुद्धा मूळचा पाकिस्तानी गायक. 'माय नेम इज खान', 'रश', 'थ्रीजी', 'किडनॅप', 'चान्स पे डान्स' या सिनेमांत त्याने गायलेली गाणी यूथमध्ये पॉप्युलर झाली. 'कॉकटेल'मधलं गाजलेलं 'जुगणी' आणि 'भाग मिख भाग'मधलं 'बस तू भाग' या गाण्यांना आरिफ लोहार या पाकिस्तानी गायकाचाच आवाज आहे. 'जिस्म २'मधील अली अझमत यांचंही गाणं तुफान गाजलं. आगामी 'एक व्हिलन' सिनेमामध्येही 'जरुरत' या गाण्याला पाकिस्तानी गायक मुस्तफा झाहिदचा आवाज असेल. लाहोरच्या प्रसिध्द रॉक्सन बँडचा गायक असलेला मुस्तफा 'आशिकी २', 'रागिणी एमएमएस २', 'आवारापन' अशा चित्रपटांमध्ये गायला आहे. 'एक व्हिलन' याच चित्रपटातील 'आवरी' हे गाणंसुद्धा 'सोच' या पाकिस्तानी म्युझिक बँडनं संगीतबद्ध केलंय. या रोमँटिक रॉक गाण्यात अदनान धूल, रब्बी अहमद आणि मोमिना मुस्तेहान अशा पाकिस्तानी कलाकारांचा समावेश आहे. सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांमध्ये पाकिस्तानी कलाकारांचा समावेश आहे. अनेक पाकिस्तानी गायक आणि बँडसोबत काम केलेला संगीतकार गौरव डगावकर सांगतो, 'पाकिस्तानी गायकांची मुळं सुफी आणि कव्वालीची असल्यानं त्यांची गाण्याची शैलीच वेगळी असते. जसं राहत फतेह अली खान यांनी सुफी तसं आतिफ अस्लमनं हिंदी रॉकमध्ये वैविध्य आणलं. भारतीय गायकांपेक्षा त्यांच्या आवाजातील भाव आणि उच्चारांमध्ये फरक असतो. पाकिस्तानी गायकांच्या आवाजात एक बेफिकीरपणा असतो जो भारतीयांना भावतो. ' गौरवनं अलिकडेच 'फ्युजून' पाकिस्तानी बँडसोबत 'हार्टलेस' चित्रपटाला संगीत दिलं होतं. आतिफ अस्लम - रंग शरबतों का (फटा पोस्टर निकला हिरो) राहत फतेह अली खान - दगाबाज रे (दबंग २) मुस्तफा झाहिद - भुला देना (आशिकी २) अली जफर - पलट मेरी जान (तोतल सियापा) शफकत अमानत अली - मनचला (हसी तो फसी) जावेद बशीर - ये तुने क्या किया (वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा) |
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यात अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना ऊर्जा दिली. मावळ तालुक्यातील सर्व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, कॅन्टोमेंटसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढवून विजयी व्हा. शासनाच्या अनेक योजनांमधून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आदिवासी आश्रम शाळेला 11 कोटी रुपयांचा निधी जाहीर करत भंडारा डोंगर दशमी समितीला यावेळी निधी देण्यात आला तसेच काही विशेष सत्कार देखील करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा नूतन वास्तूचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी (दि. 3) पार पडला. यावेळी तालुक्यातील 187 कोटी 72 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजीमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे,आमदार सुनील शेळके,आमदार रोहित पवार, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तालुका महिला अध्यक्षा दिपाली गराडे, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर,सहकार महर्षी माऊली दाभाडे,माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,शहर अध्यक्ष गणेश काकडे, सरसेनापती दाभाडे घराण्यातील अंजलीराजे दाभाडे, सत्येन्द्रराजे दाभाडे, सत्यशिलराजे दाभाडे, वृशालीराजे दाभाडे, याज्ञीसेनीराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे,सचिन घोटकुले, विठ्ठल शिंदे, दीपक हुलावळे,रामनाथ वारिंगे,किशोर भेगडे, संजय बाविस्कर, संतोष भेगडे,अरुण माने,वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, स्मिता चव्हाण, प्रशांत भागवत, राजेंद्र खांडभोर, राजू दौंडकर, चंद्रकांत दाभाडे, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, सभापती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यात झालेल्या विकासकामाचा आढावा घेत त्यासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अजित पवार यांचे आभार व्यक्त केले तसेच पवना प्रकल्प ग्रस्त प्रकरण लवकर सोडविणे, आंद्रा धरणातून तळेगावसाठी पाणी योजना, क्रीडा संकुल आदी मागण्या यावेळी केल्या. सभेचे अध्यक्ष झिरवाळ यांनी आदिवासी बांधवांना केलेल्या मदती बद्दल समाधान व्यक्त केले, आमदार रोहित पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्या कामाचे कौतुक केले. स्वागत गणेश काकडे यांनी केले. प्रास्ताविक गणेश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश खांडभोर यांनी केले. आभार संतोष भेगडे यांनी केले. दरम्यान, कार्यक्रमात आदिवासी आश्रमशाळेस 11 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. चंद्रकांत निवृत्ती दाभाडे यांच्याकडून भंडारा डोंगर दशमी समितीस 11 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कार्याबद्दल संपर्क बालग्रामाचे अमित बॅनर्जी यांचा सन्मान झाला. सरसेनापती दाभाडे घराण्यातील सदस्यासह तालुक्यातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश झाला. यावेळी बोलताना पर्यटनाला चालना मिळण्यासाठी शासन निधी देणार असल्याचेही सांगण्यात आले. |
'महाराष्ट्र भूषण' पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी उत्साहात नुकतेच साजरे केले. एखाद्या साहित्यिकाला समस्त मराठी भाषिकांचे इतके प्रेम 'पुलं'शिवाय अन्य कुणाला लाभले नसेल म्हणूनच, तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराचे प्रथम मानकरी 'पुलं' ठरले होते. एखाद्याच्या अंगात नाना कला असणे म्हणजे काय हे 'पुलं'कडे पाहिल्यावर लक्षात येते. 'पुलं'मध्ये काय नव्हते? ते लेखक होते, कवी होते. नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, पटकथाकार, संवादलेखक, संगीतकार, नकलाकार, एकपात्री कलाकार, वक्ते, अभिवाचक, पेटीवादक आणि प्राध्यापकही होते. अशा कित्येक क्षेत्रांत त्यांनी एकाचवेळी प्रभावी संचार केला. 'गुळाचा गणपती' हा चित्रपट म्हणजे सबकुछ 'पुलं' असे मानतात. 'जोहार मायबाप' या चित्रपटातील त्यांनी साकारलेला चोखामेळा पाहिल्यावर त्यांच्यातील असीम अदाकारीची आपल्याला प्रचिती येते. एक माणूस एकाचवेळी इतकी सगळी कामे तीही प्रभावीपणे कशी करू शकतो हेच कळत नाही. बरे हे सगळे करत असताना ते समाजसेवेतही मागे नव्हते. दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्या 'आनंदवन'साठी तसेच डॉ. अनिल अवचट यांच्या 'मुक्तांगण'साठी त्यांनी भरभरून मदत केली. शिवाय शाळा, वाचनालये, रुग्णालये अशा समाजोपयोगी कितीतरी संस्थांना त्यांनी नेहमीच मदत केली. अनेक कर्तृत्वान माणसे आपापल्या क्षेत्रात थोर असतात, पण इतर क्षेत्रात ती माणसे तितकी प्रवीण नसतात. एकाचवेळी अनेक क्षेत्रात प्रावीण्य असलेली आचार्य अत्रे यांच्यानंतरची व्यक्ती म्हणजे 'पुलं' होय. त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात ते अग्रगण्य ठरले. त्यांचे कोणतेही पुस्तक घ्या. एकदा वाचावयास सुरुवात केली की, ते वाचून पूर्ण केल्याशिवाय वाचक स्वस्थ बसत नाही. त्यांची अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा आणि वंगचित्रे वाचताना 'पुलं' वाचकांना त्यांच्यासोबत त्या-त्या ठिकाणी फिरवून आणतात. 'पुलं'नी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचताना त्या-त्या व्यक्ती 'पुलं' वाचकांसमोर मूर्तिमंत उभ्या करतात आणि त्याच व्यक्ती 'पुलं'कडून ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. त्यांचे साहित्य जाणून घ्यायचे, तर एक जन्मही पुरा पडणार नाही. त्यांचे पत्रसंग्रह आणि भाषणेही प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोद हे निखळ होते, त्यात अश्लीलता शोधूनही सापडणार नाही. घरातील सर्व वयाच्या आणि नात्याच्या सदस्यांनी एकत्र बसून ऐकावे, ऐकतच राहावे अशी त्यांची भाषा निर्मळ आणि स्वच्छ आहे. लोकांना हसवण्यासाठी त्यांना अश्लील भाषा वा आक्षेपार्ह अंगविक्षेप करावे लागले नाहीत. विनोद सांगण्याचे त्यांचे टायमिंग, ठरावीक वाक्य बोलून झाल्यावर क्षणभर घेत असलेला पॉज, प्रसंगानुरूप आवाजातील बदल, आवाजाच्या नकला हे सगळेच अप्रतिम आहे. मागील काही पिढय़ा त्यांची व्यक्तिचित्रे वाचत, ऐकत मोठय़ा झाल्याच, पण आजच्या झटपट, नवनवीन ट्रेंड बदलणा-या युगातील तरुण पिढीही त्यांची व्यक्तिचित्रे, त्यांचे कथाकथन तितक्याच तन्मयतेने ऐकतात. असे यश किती लेखकांना, कलाकारांना लाभले वा लाभते? प्रासंगिक विनोद, शब्दांवरील कोटय़ा करण्यात 'पुलं'चा हातखंडा होता, तसेच ते हजरजबाबी होते हे 'पुलं' वाचताना, ऐकताना नेहमीच लक्षात येते. उगीच का त्यांना 'कोटय़धीश 'पुलं' म्हणतात! 'पुलं'नी वाचक-रसिकांच्या मनात ध्रुवाप्रमाणे अढळ स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली'ची कित्येकांनी पारायणे केलीत. त्या व्यक्ती आपल्या ओळखीच्या वाटू लागतात. नारायण, हरितात्या, अंतू बर्वा, नामू परीट, नाथा कामत, नंदा प्रधान, १०० टक्के पेस्तन काका, सखाराम गटणे, चितळे मास्तर, पानवाला वगैरे व्यक्ती आपल्याला कुठे ना कुठे भेटल्यात, आपण पाहिल्यात असे वाटू लागते. 'पुलं'चे निरीक्षण आणि त्यानंतर त्याची मांडणी इतकी उत्कट असते की त्या-त्या व्यक्तीरेखेत वाचक गुंतून जातो. बरे त्या व्यक्ती परत परत वाचताना वा ऐकताना कंटाळा तर सोडाच उलट तितकाच आनंद प्रत्येकवेळी होतो. किंबहुना कॅसेट ऐकताना पुढचे सगळे प्रसंग, वाक्ये माहितीची असताना, पाठ असतानाही ती ऐकताच तितकेच हसू येते ही ताकद आहे 'पुलं'च्या लेखणीची आणि सादरीकरणाची. या सा-या व्यक्तिरेखा मला खूपच आवडतात, भावतात. त्यात डावे-उजवे, कमी-अधिक करणे कठीणच, तरी एक व्यक्तिरेखा ऐकताना मात्र मला हसू येते तितकेच कारुण्य वाटते (तसे कारुण्य हरितात्या, नारायण, वगैरेतही आहे. ) आणि ती व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली पाहिजे होती, त्या व्यक्तीचा सहवास काही काळ तरी मिळायला हवा होता असे वाटते. ती अजरामर, साधी-सरळ, किंचित रागीट-खूप प्रेमळ, दणकट तितकीच सहृदयी, स्पष्टवक्ती व्यक्ती म्हणजे 'रावसाहेब' होय. 'पुलं'नी प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी 'म्हैस'ही अजरामर केली आहे, पण रावसाहेब लाजवाबच! रावसाहेब बेळगावचे तरी मराठी अभिमानी, नाटक-संगीताची आवड असलेले. आपल्याला एकही वाद्य वाजवता येत नसल्याची खंत बाळगणारे, गर्भ श्रीमंतीत जन्म होऊनही श्रीमंतीचा माज नसलेले, मैत्रीसाठी काहीही करण्यास तयार असलेले, ज्या मित्राविरुद्ध कोर्टात केस त्यालाच आपल्या घरी पाहुणचार करणारे, चोरी करणा-या नोकराची परिस्थिती कळल्यावर त्याला शिक्षेऐवजी मदत करणारे, खाँ साहेबांच्या गायनाने तृप्त होऊन त्यांचे पाय चेपणारे, स्वतः थिएटरचे मालक असूनही हौशी कलाकारांच्या नाटकात कुणाच्या पायाला खिळा चुकून टोचू नये म्हणून स्वतः रंगमंचावर झाडू मारणारे रावसाहेबच! श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं की ब-याच लोकांच्या मनाला लकवा भरतो. माणसे अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात पण रावसाहेब त्याला अपवाद होते. 'दूधभात' चित्रपटाची कथा कै. राम गबाळे आणि 'पुलं' रावसाहेबांच्या बंगल्यात लिहीत होते तेव्हाची रावसाहेबांची घालमेल, भाबडेपणा, निष्पाप वृत्ती आणि निरागसता हे सगळे 'पुलं'च्या शब्दात पुन्हा पुन्हा ऐकावे इतके सुंदर आहे. काही वर्षाच्या सहवासानंतर 'पुलं' बेळगाव सोडणार हे समजल्यावर अतिशय दुःखी होऊनही ते दुःख दाबून ठेवून 'पुलं' निघाल्यावर त्यांना 'कशाला आला होता र बेळगावात? ' असे आपल्या बेळगावी सुरात विचारून ऐकणा-याचे काळीज चिरणारे रावसाहेबच! रावसाहेब ऐकताना त्यांच्यातील एक-एक पैलू 'पुलं'नी असा काही उलगडत नेला आहे की, आपण त्यात गुंतून जातो. रावसाहेबांच्या मैफलीत येणा-या एकूण एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या होतातच पण त्या मैफलीत आपण कधी हजेरी लावतो तेच कळत नाही. मैफलीतील प्रत्येकाची रावसाहेबांनी आपल्या कानडी 'टच'मधून मराठीत उडवलेली टोपी ऐकताना हसू आवरता येत नाही. त्यांच्या संवादात मराठीला सणसणीत कानडीचा आघात आणि कानडीला इरसाल मराठीचा साज असे. दर तीन शब्दामागे एक कचकचीत शिवी ठरलेलीच. मग ते नाक्यावरच्या मोचीसोबत बोलत असो वा जिल्ह्याच्या कलेक्टरशी. इतकेच नव्हे तर रावसाहेबांची जिमी नावाचा कुत्रा होता त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या समजत असत. नाटय़प्रयोगाला गेल्यावर त्यातील सुमार नट पूर्वीच्या गाजलेल्या नटांच्या भूमिका करताना असह्य झालेले आणि पुढे एका नाटय़गीताची चाल बदलताच संतप्त झालेले रावसाहेब त्या नटाला खडसावून विचारणारे रावसाहेब तसेच तबलजी त्यांच्या मनासारखे वाजवत नसल्याने त्याला 'तबला वाजिवतो की मांडी खाजवतो रे? ' असे खडसावून विचारणारे रावसाहेब! प्रत्येक प्रसंगानुरूप 'पुलं'नी रावसाहेबांमधील ही सच्चाई, खरेपणा असा काही रंगवला आहे की रावसाहेब संपूच नये, ऐकतच राहावे असे वाटते आणि म्हणून एकदा-दहा वेळा-शंभर वेळा ऐकूनही रावसाहेब पुन्हा-पुन्हा ऐकतो आपण. आवेग आवरणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते, ते रावसाहेबांना जमत नसे तरीही रावसाहेब सभ्य होते, शुद्ध होते. (मोबाईल - ९८६९१८०९५८) |
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निळवंडे कालव्याच्या कामासाठी भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्यापासून पोलीस बंदोबस्ताशिवाय कालव्याचे काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत जाहीर केले. निळवंडे येथील कालव्याच्या कामावरून वाद निर्माण झाला होता. कालव्यांचे कामही प्रकल्पग्रस्त व कालवेग्रस्तांनी बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, आ. वैभव पिचड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी देता येणार नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात तच कालव्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. उद्यापासून पोलिस बंदोबस्तात कालव्याचे काम सुरू केले जाईल. अकोले येथील स्थानिक नागरिकांनी निळवंडे कालव्याचे काम बंद पाडले होते. त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झाला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर जोरदार टीका केली होती. कालव्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, असा इशारा त्यांनी दिला होता. |
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा, यांचे 'बिकमिंग' हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी आपल्या लहानपणापासून ते ओबामा यांची अध्यक्षीय कारकीर्द संपेपर्यंतच्या आठवणी उत्कंठावर्धक पद्धतीने दिल्या आहेत. त्यातून त्यांची मते, ओबामा पतीपत्नीमधले नाते आणि एका सामान्य घरात जन्मलेल्या मुलीचा असामान्य प्रवास, याची वाचकांना ओळख होते. पतीच्या छायेबाहेरचे स्वतःचे व्यक्तिमत्व लोकांपुढे उभे करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. लेखिकेच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय पालकांनी घर विकत घेण्यापेक्षा आपली सर्व पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली. ती अभ्यासात हुशार होती. हुशार मुलांचा वेगळा वर्ग करण्याची वादग्रस्त कल्पना त्यावेळी लोकप्रिय होत होती आणि त्याचा तिला फायदा झाला. तिच्या पालकांनी व्याकरणशुद्ध भाषा आणि योग्य शब्दप्रयोग वापरण्याचे महत्त्व मुलांना समजावले होते. त्यामुळे तिचे बोलणे काही मैत्रिणींना गौरवर्णीय मुलीसारखे वाटायचे. मात्र त्यातून विश्वासघात, उच्चभ्रूपणा आणि आपली संस्कृती नाकारणे, असाही अर्थ सुचवला जायचा. पुढे बराक ओबामा यांनाही राजकारणामधे याच प्रश्नाचा सामना करावा लागला. प्रिन्स्टन या जगविख्यात विद्यापीठात प्रवेश मिळवण्याइतकी गुणवत्ता तिच्यात नाही, असे कोण्या समुपदेशकाने सांगितल्यामुळे, लेखिकेने जिद्दीने प्रयत्न करून प्रिन्स्टन विद्यापीठात नाव नोंदवले. सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टाने बनवलेल्या अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कार्यक्रमामुळे बहुसंख्य गौरवर्णीय विद्यार्थ्यांच्या मनात कटुता निर्माण होताना दिसते. ती अनुभवताना आपण केवळ एका सामाजिक प्रयोगाचा भाग आहोत का, असा प्रश्न लेखिकेला छळत असे. आपला पती बराक याने निवडणुकीत उभे रहाण्याला तिचा पहिल्यापासून विरोध होता. तिचे राजकारण्यांबद्दलचे मत वाईट होते आणि आपल्या पतीने तसे व्हावे, ही कल्पना तिला रुचण्यासारखी नव्हती. शिवाय बाकीचे राजकारणी बराकला कच्चा खातील ही भीती होतीच. पतीने राजकारणात स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्यावर, घर आणि मुलींच्याकडे लक्ष देता यावे म्हणून लेखिकेसाठी स्वतःच्या महत्त्वाकांक्षांवर मर्यादा आणणे अपरिहार्य होते. संसारातल्या समस्या निवारण्यासाठी बराक आणि मिशेल यांनी वैवाहिक समुपदेशकाची मदत घेतल्याचा उल्लेख लेखिकेने केला आहे. व्हाईट हाउस या अध्यक्षीय निवासस्थानाची वास्तू अंगावर येते, असे तिने नमूद केले आहे. तिथे रहात असताना आपल्या मुलींनी स्वतःचे अंथरूण पांघरूण स्वतः आवरून ठेवले पाहिजे, अशी शिस्त तिने मुलींना लावली. पण त्या लहान मुलींना ते आपले घर वाटावे, यासाठी घराच्या पॅसेजमधे चेंडू खेळणे, स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी खायला घेणे, अशा गोष्टी करायची परवानगी दिली. घराबाहेर गवतावर जाऊन खेळण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही, हेही त्यांना सांगितले. आपल्या मुलींनी रात्री वेळेवर घरी आले पाहिजे, असा तिचा आग्रह असायचा. पण राष्ट्राध्यक्षांची ही पत्नीसुद्धा इतर आयांप्रमाणे एकमेकींशी फोनवर बोलून, आपली मुलगी आता कुठे असेल, याची चौकशी करायची. व्हाईट हाउस मधे राहणे महागात पडू शकते याचा अनुभव लेखिकेला लवकरच आला. घरभाडे, वीज-फोन वगैरे बिले आणि नोकरांचे पगार, यांचा खर्च नसला, तरी बाकीचा खर्च ओबामा कुटुंबियांनी स्वतःच्या खिशातून केला. किराणा, अन्नधान्य आणि मित्र-नातलग अशा पाहुण्यांच्या जेवणाचा खर्च त्यांनाच करावा लागत होता. अध्यक्ष आणि त्यांची पत्नी यांच्या प्रत्येक कृती आणि उक्ती यांच्यावर जगभरातले लोक आणि प्रसारमाध्यमे यांचे बारीक लक्ष असते. तिला काय म्हणायचे होते त्यापेक्षा तिचे पोशाख लोकांसाठी जास्त महत्त्वाचे असायचे. 'मी काहीही केले तरी त्यातून काही लोकांची निराशा होणार, हे मला माहीत होते. ' अशा शब्दात तिने तिची व्यथा मांडलेली आहे. लेखिकेला मिळालेले पालकांचे प्रेम, तिच्याकडून तिच्या शिक्षकांच्या अपेक्षा, आणि चांगले शिक्षण यामुळे तिला चांगले यश मिळाले असे तिला वाटते. ओबामांनी एकदा आपल्या समर्थकांना विचारले होते, "हे जग आहे तसेच आपण मान्य करायचे, की ते जसे असायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करायचे? " ओबामा दांपत्याने हे तत्त्व आपल्या जीवनात अंगिकारले आहे. बिकमिंग, लेः मिशेल ओबामा, प्रकाशकः व्हाईकिंग, पानेः ४४८, किंमतः ९९९रु. , किंडलः ४६४रु. |
"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" मित्र/मैत्रिणींनो, आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Everytime"-"प्रत्येकवेळी" "प्रत्येकवेळी" "Everytime" "प्रत्येकवेळी" मी सारं काही केलं असतं केवळ तुझ्यासाठी. आपल्या प्रेमात त्या तेव्हा घडत होत्या. जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय. तू बरोबर असल्याशिवाय मला हे नाहीच जमत. आपल्या प्रेमात त्या तेव्हा घडत होत्या. जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय. मी ते सर्व काळ तुझ्यासाठी जपीन. जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय. जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय. (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस. कॉम) -----श्री. अतुल एस. परब(अतुल कवीराजे) -----दिनांक-12. 03. 2023-रविवार. |
'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. २१) 'मटा कॉन्क्लेव'चे आयोजन केले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. २१) 'मटा कॉन्क्लेव'चे आयोजन केले आहे. 'मेक इन कोल्हापूर' संकल्पनेंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. हॉटेल सयाजी येथे सायंकाळी साडेचार वाजता राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मटा कॉन्क्लेव' होणार आहे. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर सर्वंकष चर्चा होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रात 'आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक'यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार आणि पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते कॉन्क्लेवचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शहर आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण, आयटी, वैद्यकीय क्षेत्रातील निवडक प्रतिनिधी, विद्यमान खासदार, आमदार, महापौर तसेच राज्य सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होणार आहेत. उद्यमशीलतेसाठी अत्यंत पूरक वातावरण असलेल्या कोल्हापूरची भौगोलिक रचना महत्त्वाची आहे. येथे शेतीबरोबरच उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. भरपूर महसूल देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाची कोंडी कशी फोडता येईल, प्रश्न कसे गतीने सोडविता येतील, याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. निधीअभावी जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत आणि विकासाचा अजेंडा निश्चित व्हावा, याबाबत 'मटा कॉन्क्लेव'मध्ये मान्यवरांची चर्चा होणार आहे. कोल्हापूरचे उद्योग आणि आयटी हा कॉन्क्लेवचा मुख्य अजेंडा आहे. उद्योगवाढ आणि त्यासोबत रोजगारनिर्मिती हा यामागील हेतू आहे. यामुळे दुसऱ्या सत्रात 'आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक' या महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. यात मनोरमा इन्फो सोल्युशन्सच्या सीईओ अश्विनी दानिगोंड, वेलसर्व्ह आयटीचे सीईओ अभिजित खोत तसेच आयसायबरसेकचे सीईओ पंकज घोडे मार्गदर्शन करणार आहेत. उद्योगांचे काही क्लस्टर प्रकल्प प्रलंबित आहेत. नवीन औद्योगिक क्षेत्रे, उद्योग, इचलकरंजीचा कापड उद्योग, गूळ क्लस्टर, कृषिपूरक उद्योग यांसह पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोल्हापुरी चप्पल, सराफ पेठ, भाजीपाला उत्पादन या पारंपरिक उद्योगांनाही झळाळी मिळाल्यास रोजगारनिर्मितीसह आर्थिक क्षमताही वाढू शकते. परिणामी जिल्ह्याच्या अर्थकारणावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कोल्हापूरच्या औद्योगिक परंपरेचा विचार करता मुंबई, पुणे, बेंगळुरू कॉरिडॉरमध्ये जिल्ह्याचा समावेश असायलाच हवा. कोल्हापूर-कोकण रेल्वेला जोडण्याचा विषय याच पातळीवर अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणून प्राधान्याने विचारात घेतला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच रेल्वे मार्गाच्या सर्व्हेचे उद्घाटनही केले. रेल्वे मार्गाद्वारे कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. गेली काही वर्षे 'मटा'ने हा प्रश्न सातत्याने मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले होते. अखेर कोल्हापूर-कोकण मार्ग प्रत्यक्षात साकारण्याचे निश्चित झाले आहे. कोल्हापूरच्या विकासाला बळकटी देणाऱ्या मुद्द्यांवर 'मटा कॉन्क्लेव'मध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. मटा कॉन्क्लेवसाठी मनोरमा इन्फो सोल्युशन प्रा. लि. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आहेत. जाधव इंडस्ट्रीज स्पॉन्सर-पार्टनर आहेत, तर हॉटेल सयाजी हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत. चाटे एज्युकेशन ग्रुप एज्युकेशन पार्टनर आहेत, तर नंदादीप आय हॉस्पिटल आणि वार्डविझ इंडिया सोल्युशन प्रा. लि. हे स्पॉन्सर-पार्टनर आहेत. |
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील चलनांच्या खरेदीनुसार भारतातील एलपीजीची प्रति लिटर किंमत जगात सर्वाधिक आहे. देशातील किंमत 3. 5 आंतरराष्ट्रीय डॉलर प्रति लिटर आहे. भारतानंतर तुर्की, फिजी, मोल्दोव्हा आणि युक्रेनमध्ये एलपीजीची सर्वाधिक किंमत आहे. दुसरीकडे, स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅनडा आणि यूकेमध्ये एलपीजीची किंमत आंतरराष्ट्रीय डॉलरपेक्षा कमी आहे. पेट्रोलची किंमत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय डॉलरच्या दृष्टीने पेट्रोलच्या किमतीवर नजर टाकली, तर भारतात ती प्रति लिटर 5. 2 आंतरराष्ट्रीय डॉलरवर बसते. ही किंमत अमेरिकेत 1. 2 आंतरराष्ट्रीय डॉलर, जपानमध्ये 1. 5, जर्मनीमध्ये 2. 5 आणि स्पेनमध्ये 2. 7 आंतरराष्ट्रीय डॉलर इतकी आहे. |
आयएमएससाठी अजनीचा पर्याय तांत्रिकदृष्ट्या चुकीचा () नागपूर : महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे काॅलनीच्या जागेचा पर्याय तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. एकतर आयएमएसचे विमानतळाशी कनेक्शन नाही व दुसरीकडे आंतरिक किंवा बाह्य रिंग राेडशीही हे टर्मिनल जुळलेले नाही. अशावेळी माेठ्या प्रमाणात बाहेरील व आतील वाहनांचे आवागमन शहरातून हाेईल. त्यामुळे शहराच्या मधाेमध वाहतुकीचा गाेंधळ उडण्याची आणि प्रदूषणाचा स्तर वाढण्याची शक्यता आहे. आर्किटेक्ट व पर्यावरण वारसा अभ्यासक संदीप पथे यांनी सांगितले, आधीच अजनी ते मेडिकल चाैक ते गणेशपेठ बसस्थानकापर्यंत वाहतुकीचा प्रचंड खाेळंबा निर्माण हाेत असताे. एनएचएआयच्या प्रस्तावित आयएमएसनुसार मेट्राे, ब्राॅडगेज रेल्वेसह १६३ बस फलाट, खासगी बसेस व १२०० कार्स राहतील असे स्टॅंड तयार करण्यात येणार आहे. विमानतळ जवळ नसल्याने त्यासाठी वेगळा पर्याय तयार करावा लागेल. दुसरीकडे आऊटर रिंग राेड येथून फार लांब असल्याने बाहेर राज्यातील प्रवासी वाहतूक बाहेरूनच वळविणे अशक्य हाेईल. शहराच्या मधाेमध एवढ्या माेठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे काय परिस्थिती निर्माण हाेईल, याचा विचार हाेणे गरजेचे आहे. पत्रपरिषदेत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ शरद पालिवाल, अनसूया काळे-छाबरानी, जयदीप दास, कुणाल माैर्य आदी उपस्थित हाेते. आयएमएसच्या पहिल्या टप्प्यात ४४ एकरांतील ७००० झाडे ताेडली जाणार आहेत. इतर तीन टप्प्यात ४९० एकरांमध्ये हा प्रकल्प साकारला जाणार असून त्यात ४० हजारांवर झाडांची कत्तल होईल. हे मूल्य भरून काढणे शक्य नसल्याचे जयदीप दास म्हणाले. - नागपूर रेल्वेस्थानकावरून दरराेज २२४ गाड्यांची ये-जा हाेते. त्यापैकी २०० गाड्या अजनीहून आणि पर्यायाने खापरीहूनही चालतात. - येथे मेट्राे स्टेशन आहे. ब्राॅडगेज मेट्राेही सुरू हाेऊ शकते. आंतरराष्ट्रीय विमानतळही जवळ आहे. - आऊटर रिंग राेड अगदी जवळ आहे. आऊटर रिंग राेडशी राष्ट्रीय महामार्ग ४४, ४७, ५३ तसेच राज्य महामार्ग क्रमांक ३, २४८, २५५ व २६४ जुळलेले आहेत. यातून इतर महामार्ग जाेडून बाहेरील वाहतूक शहराबाहेरूनच वळविता येते. अमेरिका, इंग्लंड, नेदरलॅन्ड या देशातील शहरात माॅडेल स्टेशन बनलेले आहेत. ते १२ ते ३० एकरात तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे ते सर्व शहराच्या बाहेर आहेत. याशिवाय चेन्नईचे आशियातील सर्वात माेठे बस टर्मिनल ३७ एकरात, दिल्लीचे सर्वाधिक व्यस्त बस टर्मिनल २५ एकरात व हैदराबादचे ३० एकरात आहे. अशावेळी नागपूरसारख्या ठिकाणी शहराच्या आतमध्ये ४९० एकरात आयएमएस साकार करण्याचा पर्याय व्यावहारिक नसल्याचे अनसूया काळे म्हणाल्या. दुर्दैवाने खापरीबाबत सर्वेक्षण व एनालिसिस केले नसल्याची टीका त्यांनी केली. अजनी पर्यावरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अजनी आर्ट स्थळ म्हणून विकसित केले जाऊ शकते. चेनई, लाेधी आर्ट दिल्ली, कालाघाेडा मुंबई व काेच्छी येथील आर्ट डिस्ट्रिक्टप्रमाणे रचनात्मक केले जाऊ शकते. शहराच्या मध्यभागी वसलेले एक मनोरंजन केंद्र निर्माण हाेऊ शकते. या उत्क्रांतीत स्ट्रीट आर्ट, वॉल पेंटिंग, भित्तिचित्र कला प्रतिष्ठापने आणि समुदाय समावेशी क्रियाकलाप समाविष्ट आहेत. बंगले तात्पुरते किंवा कायमस्वरूपी विविध ब्रँड आणि आर्ट गॅलरीवर भाड्याने देता येतात. याचे प्रात्यक्षिक संदीप पथे यांनी सांदर केले. |
डॉक्टर म्हटलं की, आपल्यासाठी देवच. . . रूग्णांचे आजार दूर करणारा आणि प्राण वाचविणारा माणूस म्हणजे, डॉक्टर. आज आम्ही अशाच एका हटके आणि क्लासी डॉक्टरबाबत तुम्हाला सांगणार आहोत. डॉक्टर म्हटलं की, आपल्यासाठी देवच. . . रूग्णांचे आजार दूर करणारा आणि प्राण वाचविणारा माणूस म्हणजे, डॉक्टर. आज आम्ही अशाच एका हटके आणि क्लासी डॉक्टरबाबत तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर ही 31वर्षांची डॉक्टर Sarah Gray ऑस्ट्रेलियामध्ये राहते. सध्या ती एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. Sarah एक अशी डॉक्टर आहे, जिने सर्वात जास्त टॅटू गोंदवून घेतले आहेत. Sarah ने वयाच्या 16व्या वर्षा आपला पहिला टॅटू गोंदवून घेतला होता. आतापर्यंत तिने अनेक टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत. Sarah याबाबत सांगते की, तिचं दोन गोष्टिंवर सर्वाधिक प्रेम आहे. एक म्हणजे, आर्ट वर्क आणि दुसरी म्हणजे, तिचा डॉक्टरी पेशा. Sarah ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते त्याचं नाव Royal Adelaide Hospital असं आहे. येथे तिला 'The Most Colourful Doctor' म्हणून ओळखलं जातं. सारा आणि तिचे पती एक टॅटू पार्लर चालवतात. तिच्या नवऱ्याचं नाव मॅट असून तो फुल टाइम टॅटू आर्टिस्ट आहे. Dailymail ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये साराने सांगितले की, 'अनेकदा टॅटूमुळे मला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला. एकदा तर टॅटूमुळे मला एका रेस्टरंटमधून बाहेर काढण्यात आलं होतं. ' Sarahच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळे टॅटू काढण्यात आले आहेत. फक्त तिचा चेहरा उरला आहे. तसेच सारा सांगते की, खासकरून तरूणाईचे निचार बदलत आहेत. हा एक प्रकारचा बॅरियर ब्रेक डाउन आहे. लोक बदल स्विकारून पुढे जात आहेत. ' इन्स्टाग्रामवर Sarah चे 60 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. डॉक्टर असलेली सारा मॉडलिंगही करते. |
मेष - कमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. कोणाला जामीन राहू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. तब्बेतही सांभाळा. पैशाच्या देवाण- घेवाणीत लक्ष द्या. दुर्घटनेपासून जपा. दुपारनंतर मात्र खूप खुशीत राहाल.\nवृषभ - घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील असे श्रीगणेश सांगतात. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. नवीन मित्र पण मिळतील. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपारनंतर सांभाळून राहण्याची सूचना श्रीगणेश देतात.\nमिथुन - आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात.व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील आणि वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल.\nकर्क - वरिष्ठ अधिकार्यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा, असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.\nसिंह - आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील. घरातील व्यक्तींशी भांडणे होतील. ईष्टदेवता स्मरण आणि आध्यात्मिकतेचे आचरण हाच त्यावर तोडगा आहे.\nकन्या - सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. तब्बेतीचा त्रास होईल.\nतूळ - आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. गृहस्थी जीवनात सुख- शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर ताबा ठेवा.\nवृश्चिक - मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल राखण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती यांत नावीन्य मिळेल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील.\nधनु - कुटुंबातील शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद- विवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल.\nमकर - महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपारनंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ राहील. शारीरिक दृष्ट्या स्फूर्ती वाटणार नाही.\nकुंभ - आज राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थिरता येईल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस न्याल.\nमीन - आजचा आपला दिवस शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवासाचे योग आहेत. दुपारनंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. |
पुणे, ता. २ : आचार्य श्री विजय वल्लभ शाळा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'टीसीएस सीएसआर गो आयटी' व्यासपीठावर झालेल्या सत्रात तयार केलेल्या एपचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून दोन सर्वोत्कृष्ट संघांची निवड केली. या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी टीसीएसला भेट दिली. यात नववीमधील पलक बांगड, निशा कवाड, शिखा त्रिवेदी, मोनिता सोलंकी, कशिश सगरा यांनी शिक्षिका प्रीती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'झिरो स्ट्रेस' हे एप तयार केले. मुख्याध्यापिका दीपाली तारे, दीपज्योती अत्रे, महेश राऊत यांनीही टीसीएसला भेट दिली. यावेळी टीसीएसच्या प्रांगणात असणारी विविध संशोधन केंद्रे, तज्ज्ञ, क्लायंट मीटिंग हे प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. टीसीएसमधील मान्यवरांसमोर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एपचे सादरीकरण केले. |
5 dead in road accident in Karnataka nraj । कर्नाटकमधील भीषण अपघातात पाच ठार, मतदानाला चाललेल्या प्रवाशांवर काळाचा घाला । Navarashtra (नवराष्ट्र) कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील बीजी हल्ली या भागात हा भीषण अपघात झाला. आज (रविवारी) पहाटे ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर सहा जण गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना नजीकच्या इस्पितळात उपचारांसाठी हलवण्यात आलंय. त्यापैकी काहीजणांची प्रकृती ही गंभीर असल्याचं समजतंय. कर्नाटकमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात हा भीषण अपघात झालाय. चित्रदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रुसर जीप आणि बस यांच्यात टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला. रविवारी पहाटेच्या सुमाराला हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातात ठार झालेले सर्व प्रवासी हे रायचूर जिल्ह्यातील लिंगतूर तालुक्यातील रहिवासी होते. जखमींना बल्लारीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्वजण ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या गावी जात असल्याची माहिती मिळतेय. तर ही बस बंगळुरूहून लिंगसूरकडे जात होती. |
नवी दिल्ली , 22 एप्रिल : अलीकडच्या काळात अनेक ब्रँडच्या जाहिरातींबाबत सोशल मीडियावर (Social Media) लोकांची नाराजी पहायला मिळत आहे. ह्युंदाई (Hyundai) आणि किया मोटर्स (Kia Motors) यांसारख्या ऑटो कंपन्यांना अलीकडेच सोशल मीडियावर या बहिष्काराचा फटका बसला होता. टाटा समूहाची ज्वेलरी कंपनी तनिष्कही (Tanishq) एका जाहिरातीवरून वादात सापडली होती. आता मलाबार गोल्डच्या (Malabar Gold) एका जाहिरातीमुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. लोकांनी या ज्वेलरी ब्रँडवर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर No Bindi No Business चा ट्रेण्ड चालवला आहे. सध्या मलाबार गोल्डने नुकतीच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) सणासंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आहे. अक्षय्य तृतीयेशी संबंधित या जाहिरातीत करीनानं कपाळावर टिकली लावलेली नसल्याचं दिसत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी ही गोष्ट आवडली नसल्याचं म्हटलंय. लोकांचं म्हणणं आहे की, अक्षय्य तृतीया हा हिंदूंचा पवित्र सण आहे आणि या निमित्ताने लोक दागिन्यांची खरेदी करतात. करीना कपूरने हिंदूंच्या सणाच्या जाहिरातीमध्ये टिकली का लावलेली नाही, असा प्रश्न युजर्स उपस्थित करत आहेत? अनेक युजर्स #Boycott_MalabarGold आणि #No_Bindi_No_Business या हॅशटॅगसह ट्विटरवर पोस्ट टाकत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'मलाबार गोल्डची नवी जाहिरात हिंदू सणांची खिल्ली उडवण्याचा नवा प्रकार आहे. भारतीय महिलांच्या पारंपरिक पेहरावात टिकली किंवा कुंकवाला महत्त्व आहे. हिंदू परंपरांची खिल्ली उडवल्यानंतरही हिंदूंनी तुमच्याकडून खरेदीसाठी पैसा खर्च करणं हे यापुढे होणार नाही. ' 'बॉयकॉट मलबार गोल्ड' आणि 'नो बिंदी, नो बिझनेस' हे हॅशटॅग वापरून एका युजरने लिहिलंय की, 'तथाकथित जबाबदार ज्वेलर्स अक्षय तृतीयेसाठी जाहिरात प्रसिद्ध करत आहे आणि करीना कपूर टिकलीशिवाय दिसत आहे. ते हिंदू संस्कृतीचा आदर करतात का? ' एका यूजरने लिहिलं की, 'टिकली किंवा कुंकू हे हिंदूंसाठी केवळ एका लाल ठिपक्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. मलाबार गोल्ड सारख्या ब्रँडने हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. तेव्हा आता हिंदूंनी अशा ब्रँडला बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. काही युजर्स हे प्रकरण करीना कपूरच्या लग्नाशी आणि मलाबार गोल्डच्या मालकाच्या धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. करीना कपूरने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मलाबार गोल्डची स्थापना 1993 मध्ये एमपी अहमद (MP Ahammed) यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांच्या टीमने केली होती. कंपनीचं मुख्यालय केरळमधील कोझिकोड शहरात आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
इंदिरानगर (नाशिक) : पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेसइनजवळ राहणाऱ्या शिखा सागर पाठक (३२, रा. साई सिद्धी अपार्टमेंट) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्याच खोलीत त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा रिधान देखील मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा चौथ्या मजल्यावर राहतात. बैठकीच्या खोलीत त्यांचे आई-वडील बसलेले होते. त्या दरम्यान त्या स्वतःच्या बेडरूममध्ये गेल्या आणि गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्या ठिकाणी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपयुक्त विजय खरात, सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख आणि वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी तातडीने तेथे जात संपूर्ण घराची कसून तपासणी केली. त्याच खोलीत त्यांचा मुलगाही मृतावस्थेत आढळून आल्याने मुलाचा खून करून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रथमदर्शनी त्यांनी आपल्या मुलाचा तोंडावर उशी दाबून खून केला असावा व मग स्वतः आत्महत्या केली असावी असे दिसून येत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृत्यूच्या वेळी त्यांचे आई-वडील घरातच उपस्थित होते. त्यांनी अद्याप काहीही तक्रार दिलेली नाही. |
- देशातील प्रख्यात लैंगिक समुपदेशक तथा 'सेक्स गुरू' डॉ. महिंद्र वत्स यांचे आज वृद्धापकाळानं निधन झालं. - वत्स यांच्या मुलांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. - लैंगिक विषयावर समुपदेशन करणारा आणि सल्ला देणारा 'मुंबई मिरर'मधील त्यांचा स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. मुंबईः देशातील प्रख्यात लैंगिक समुपदेशक तथा 'सेक्स गुरू' डॉ. महिंद्र वत्स यांचे आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. टाइम्स समूहाच्या 'मुंबई मिरर' या दैनिकातील 'आस्क द सेक्सपर्ट' या स्तंभामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती. लैंगिक आरोग्यविषयक लेखन आणि समुपदेशनामुळं वत्स हे अनेकांचे फ्रेंड, फिलॉसॉपर आणि गाइड बनले होते. (Dr. Mahinder Watsa Passes Away) वत्स यांच्या मुलांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. 'आमचे बाबा स्वतःच्या अटींवर एक समृद्ध आयुष्य जगले. त्यांच्या स्वभावाला अनेक पैलू होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. त्यांची आठवण सतत येत राहील,' असं त्यांच्या मुलांनी निवेदनात म्हटलं आहे. लैंगिक विषयावर समुपदेशन करणारा आणि सल्ला देणारा 'मुंबई मिरर'मधील त्यांचा स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या स्तंभातून ते लोकांना लैंगिक आरोग्याविषयी उत्तम मार्गदर्शन करायचेच, पण खुसखुशीत उत्तरांनी वाचकांचं मनोरंजनही करायचे. वत्स यांनी १९६० मध्ये स्तंभलेखन सुरू केले. फेमिना, फ्लेअर आणि ट्रेंड या महिलाविषयक मासिकांसाठी त्यांना वैद्यकीय सल्ला देणारे लेखन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९७० पर्यंत त्यांनी अनेक मासिकांमध्ये लेखन केले. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतानाच भारतात लैंगिक समस्यांबाबत अज्ञान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. १९७४ मध्ये 'फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया' सोबत सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांनी देशात लैंगिक शिक्षण कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांचा प्रस्ताव स्वीकारला गेला आणि त्यानंतर अनेक स्तरांतून विरोध झाल्यानंतरही देशात पहिले सेक्स एज्युकेशन, समुपदेशन व उपचार केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर १९८० मध्ये वैद्यकीय व्यवसाय थांबवून त्यांनी पूर्णवेळ समुपदेशन आणि लैंगिक शिक्षणाचे काम सुरू केले. 'मेड इन चायना' या चित्रपटात अभिनेते बोमन इराणी यांनी साकारलेले डॉ. वर्धी हे पात्र डॉ. वत्स यांच्यावरच बेतले होते. चित्रपटात हे पात्र अधिकाधिक उत्तमरित्या उभे करता यावे म्हणून दिग्दर्शक मिखिल मुसळे यांनी वत्स यांची अनेक वेळा भेट घेतली होती. वत्स यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे मुसळे खूपच प्रभावित झाले होते. वत्स हे मला भेटलेल्या अत्यंत अनुभवी आणि प्रामाणिक व्यक्तींपैकी एक होते, अशी भावना मुसळे यांनी नंतर व्यक्त केली होती. |
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेम्स टुल याने गेल्या काही दिवसांपूर्वी वन डे क्लब क्रिकेटमध्ये ३४१ रन बनवून प्रसिद्धी झोतात आला होता. आता राजस्थानच्या आदित्य गढवाल याने एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक लगावून इतिहास रचला आहे. आदित्य गढवाल राजस्थानचा खेळाडू असून त्याने मध्यक्षेत्र विनू मंकड अंडर-१९ क्रिकेट टुर्नामेंटमध्ये रेल्वे विरुद्ध खेळताना २६३ रन्सची शानदार खेळी केली. आदित्यने या खेळीत २२ चौकार आमि १८ षटकार लगावले. आदित्यच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने ४१३ रन्सचा डोंगर रचला. याला प्रत्युत्तर देताना रेल्वेचा संघ ४२. २ षटकात १४२ धावांवर गारद झाला. राजस्थानने २७१ रन्सने विजय मिळविला. |
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबीची जवळची मैत्रीण फराह खान देश सोडून परदेशात पळून गेली आहे. पाकिस्तानात नवे सरकार स्थापन झाल्यास तिला अटक होऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. फराह खान पाकिस्तानातून जवळपास ९० हजार डॉलर घेऊन पळून गेली आहे. त्यांचा विमानात बसलेला एक फोटोही व्हायरल झाला आहे. फराह खान रविवारी दुबईला रवाना झाली आणि तिचा पती एहसान जमील गुजर आधीच अमेरिकेला गेला आहे. अधिकार्यांच्या बदल्या आणि त्यांना इच्छित पद मिळवून देण्यासाठी फराहने मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी दावा केला की फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार केला आहे. मरियमच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांची "चोरी" पकडली जाईल, अशी भीती वाटते. पंजाबचे नुकतेच बडतर्फ केलेले राज्यपाल चौधरी सरवर आणि इम्रान खान यांचे जुने मित्र आणि पक्षाचे फायनान्सर अलीम खान यांनीही फराहने पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यामार्फत बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला आहे. |
नागपूर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी भाष्य केलं आहे. "राज ठाकरे जेव्हा जेव्हा भाजप नेते वा शिंदे गटाच्या नेत्यांशी भेट घेतात, तेव्हा ती प्रत्येक भेट राजकीय असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्र, मुंबईचा विकास कसा करायचा, या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांना अनेकजण भेटत असतात. राज ठाकरेंची भेटही तशीच समजली पाहिजे," असे बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "राज ठाकरे हे सर्वांचे मित्र आहेत. महाराष्ट्राच्या, मुंबईच्या विकासासाठी ते सर्वांच्या भेटीगाठी घेत असतात. विकासाबाबत चर्चा करण्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली असेल," आजच्या 'सामना'मधून शिंदे गटावर शिवसेनेनं निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची कॉन्ट्रॅक्ट किलरप्रमाणे सुपारी घेतली, अशी घणाघाती टीका आज शिवसेनेने केली. याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, "एकेकाळी संताजी-धनाजी या मावळ्यांची दहशत मोगलांनी घेतली होती. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिंदे व फडणवीस यांची दहशत घेतली आहे. त्यामुळे ठाकरे जेव्हा जेवायला बसतात तेव्हाही त्यांनी शिंदे-फडणवीस यांची आठवण येते," Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : सध्या अनेकांचा कल हा आयुर्वेदिक उपचार (ayurvedic treatment) पद्धतीकडे वाढतो आहे. कारण याचे फारसे दुष्परिणाम होत नाही. कित्येक लोक आयुर्वेदिक उपचारच घेतात. असेच आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्यांसाठी आता आयुर्वेदिक शस्त्रक्रियेचा (ayurvedic surgery) मार्गही मोकळा झाला आहे. आयुर्वेदिक उपचाराप्रमाणे आता आयुर्वेदिक ऑपरेशनही करता येणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना आयुर्वेदिक शस्त्रक्रिया (ayurvedic operation) करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. आतापर्यंत आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबद्दल शिकवलं जात होतं. पण शस्त्रक्रिया कशी करावी याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन नव्हतं. आता आयुर्वेदात पदवी घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयुर्वेद डॉक्टर डोळे, नाक, कान, घसा (ENT) यासोबत जनरल सर्जरही करू शकतील, त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल, असं सरकारनं सांगितलं. सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आयुर्वेदातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबद्दल सखोल माहिती दिली जाईल. देशातील सर्जन्सची कमतरता दूर व्हावी या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आयुर्वेदात शस्त्रक्रिया कशी केली जाते ते इथे जाणून घ्या. महर्षी चरकाने 'काय-चिकीत्सा' (म्हणजे औषध) यावर लक्ष केंद्रीत केलेला ग्रंथ म्हणून चरक-संहिता लिहिली, तर महर्षी सुश्रुत यांनी 'शल्य-चिकित्सा' (म्हणजेच शस्त्रक्रिया) यावर सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला. सुश्रुत यांनी शस्त्रक्रियेच्या तीन भागांचे वर्णन केलं - पूर्व कर्म (प्री-ऑपरेटिव्ह), प्रधान कर्म (ऑपरेटिव्ह) आणि पश्चात कर्म (पोस्ट-ऑपरेटिव) या तीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी, अष्टविधी शास्त्र कर्म (म्हणजे आठ पद्धती) करणं देखील नमूद केलं आहे, ज्या खालीलप्रमाणे आहेत : छेदन (एक्सीजन) भेदन (इंसीजन) लेखन (स्क्रॅपिंग) वेधन (पंक्चरिंग) एषण (प्रोबिंग) आहरण (एक्स्ट्रक्सन) विस्रावण (ड्रेनेज) सीवन (सुचरिंग) सुश्रुत यांनी अनेक छोट्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. सुश्रुत संहितामध्ये शस्त्रक्रियेच्या अगदी बारीकसारीक गोष्टींचा उल्लेख आहे, म्हणजे जखमेचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा जखम शिवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या वापराव्यात, शिवण्यासाठी कोणता धागा असावा इत्यादी. शस्त्रक्रियेतील साधनांविषयी सुश्रुताने सुमारे 101 प्रकारची साधनं (ब्लन्ट इंस्ट्रुमेंट्स) विस्तारितपणे स्पष्ट केली आहेत. ही साधनं आजही तशीच आहेत. जुन्या काळात जसे आयुर्वेद सर्जन यांचं वापर करत होते त्याचप्रमाणे अॅलोपॅथ सर्जन ही साधने गरजेनुसार वापरत आहेत. सुश्रुतांनी शस्त्रक्रियेचं कारण, कार्यपद्धती आणि नियमांचं सविस्तर चर्चा करताना वर्णन केलं आहे. याचसोबत प्राचीन काळात आयुर्वेदात सुश्रुतांनी प्लॅस्टिक सर्जरी केल्याचा उल्लेख आहे. तलवारीनं युद्ध होत असल्याने अनेकदा योद्ध्यांचं नाक किंवा कान कापलं जायचं. हे अवयव पुन्हा शरीरावर बसवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेची माहितीसुद्धा सुश्रुत संहितेमध्ये आहे. महर्षी सुश्रुत ज्यांनी संधान कर्माबद्दल (म्हणजेच प्लॅस्टिक सर्जरी) अगदी बारकाईने लिहिलं. त्यामुळे त्यांना फादर ऑफ सर्जरीदेखील म्हटलं गेलं. अॅलोपॅथी शस्त्रक्रियेपेक्षा आयुर्वेदिक शस्त्रक्रिया कशी वेगळी आहे? दोन शस्त्रक्रियांदरम्यान कोणतीही स्पर्धा किंवा संघर्ष नाही. आयुर्वेदची प्लॅस्टिक सर्जरी आणि क्षार सूत्र अॅलोपॅथीनं अवलंबलं आहे आणि आधुनिक अॅलोपॅथी सर्जन त्यांच्यावर या पद्धतींचा उपचार करत आहेत. दुसरीकडे आयुर्वेदिक शस्त्रक्रियेत अॅनेस्थेसियासारख्या पद्धती वापरतात, जे अॅलोपॅथी सर्जरीचं वैशिष्ट्य आहे. खरं तर, दोन्ही पद्धतींमध्ये शस्त्रक्रिया जवळजवळ सारख्याच आहेत. जर काही फरक असेल तर हाच की शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला दिलेली औषधं आहेत. काही शस्त्रक्रिया या अपवाद आहेत. जसं की क्षार सूत्र उपचार, अग्नि कर्म, जलयुक्का आणि रक्त मोक्ष ही केवळ आयुर्वेद, ऑर्गन ट्रांप्लान्ट, बायपास शस्त्रक्रिया, लेसर आणि की होल रोबोटिक शस्त्रक्रिया इत्यादी अॅलोपॅथीची वैशिष्ट्यं आहेत. आयुर्वेदिक शस्त्रक्रिया पदवी कशी मिळवायची? शस्त्रक्रिया एक विशेष वैद्यकीय विज्ञान आहे, ज्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि सराव आवश्यक आहे. आयुर्वेदात तीन वर्षांची शस्त्रक्रिया (एमएस आयुर्वेद) पदवीदेखील आहे. जी पदवीनंतर (बीएएमएस) प्राप्त करू शकता. एमएस आयुर्वेद केल्यावर पीएचडीदेखील करता येते. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, गुजरात आयुर्वेद विद्यापीठ, जामनगर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, नवी दिल्ली आणि आर. ए. पोद्दार हॉस्पिटल, वरळी, मुंबई या आयुर्वेदात एमएस करण्यासाठी उत्कृष्ट संस्था मानल्या जातात. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
पुणे : कोरोना पॉझिटिव्ह महिलेला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे गुरुवारी दुपारी घडली. आशा पुरुषोत्तम पाटील (वय 45 रा. चौधरी नगर मुंजाबा वस्ती धानोरी) असे मृत्यू झालेेल्या महिलेेेचे नाव आहे. महापालीकेेने शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे कोरोना पॉझिटिव्ह सामान्य रुग्णांवर उपचार केले जातात. येरवड्यातील सेंटरमध्ये आवश्यक योग्य उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे या महिलेचा 24 तासात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी येरवडा नागरिक कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील व पुरुषोत्तम पाटील यांची बुधवारी कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शांतीनगर येथील संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे सायंकाळी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी करून आवश्यक औषधे दिल्यानंतर आशा यांना तिसऱ्या मजल्यावर तर पती पुरुषोत्तम यांना दुसऱ्या मजल्यावर खोली मिळाली होती. बुधवारी रात्रीपासून आशा यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ लागल्यामुळे याची माहिती डॉक्टरांना दिल्यावर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती जास्त खालावल्यामुळे दुपारी त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आशा यांना ऑक्सिजन व इतर आवश्यक साधने देखील वेळेवर मिळाली नसल्याचे त्यांचे पती पुरुषोत्तम पाटील यांनी सांगितले. तसेच पत्नीला जर वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुरुषोत्तम पाटील हे पत्नी आशा यांच्यासह भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. . |
'सकाळ' माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मला शंभर टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यासाठी 2024ची वाट का पाहायची? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली महत्त्वकांक्षा जाहीर केली. राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अजितदादा काहीही करू शकतात. कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतात अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे? पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनायला 145 आकडा लागतो. हा आकडा अजित पवार यांच्याकडे असेल तर त्यांनी अगदी सहज मुख्यमंत्री बनावं. मी बनतो, मी बनतो असं म्हणण्याचं काहीच कारण नाही असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. तर अजित पवार यांनी मुलाखतीवेळी एका प्रश्नाचं उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलाजाने काम केलं असं म्हणाले यावर बोलताना पटोले म्हणाले की, नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथ नव्हती घ्यायची. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त केली त्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती. या व्यक्तव्याची अपेक्षा आम्हाला नव्हती. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला. त्यामुळे असं वक्तव्य करणं चुकीच आहे. तुम्हाला तेव्हा काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवं होतं असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत. काय म्हणाले होते अजित पवार? पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. २०१९ला महाविकास आघाडी झाली. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही एकत्रिपणे चांगलं काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्षे काम केलं. कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने काम केलं परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. |
हो मंडळी, ते पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत आणि त्यांनी पुन्हा सिद्ध केले की प्रेमाला वयाचे कोणतेही बंधन नसते. केपी सिंह यांच्या या नवीन लाईफ पार्टनरचे नाव आहे शीना आणि तिच्यासोबत आयुष्यातील उरली सुरली वर्षे काढण्याचा केपी सिंह यांचा मानस आहे. ज्या वयात अनेक लोक हार मानून व दुखणी-खुपनी घेऊन रडत बसतात त्या वयात केपी सिंह यांनी केलेली नव्या आयुष्याची सुरूवात खरंच खचलेल्या मनांना प्रेरणा देणारी आहे. दुःखावर पाय ठेवल्याशिवाय सुखाचा पर्वत पाहता येत नाही हे त्यांच्या या निर्णयावरून दिसून येते. जाणून घेऊया त्यांची रोमहर्षक प्रेम व जीवनकहाणी. . ! (फोटो सौजन्य :- Twitter - Deepak Sharma #SaveSoil, Financial Express, Thiruvasagam, emailtheboss, Bloomberg Wealth, Business Today) डीएलएफ ग्रुप रिअल इस्टेटमध्ये सक्रीय असून केपी सिंह हे रिअल इस्टेटमधील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये केपी सिंग 299 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $7. 63 अब्ज (सुमारे 63200 कोटी रुपये) आहे. माहिती अशी आहे की, त्यांनी 1961 मध्ये सैन्यातील पोस्टिंग सोडले आणि त्यांचे सासरे राघवेंद्र सिंग यांनी सुरू केलेल्या दिल्ली लँड अँड फायनान्स (DLF) कंपनीमध्ये ते सामील झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ कंपनीचे अध्यक्ष राहिले आणि जून 2020 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता ते डीएलएफचे एमेरिटसचे चेअरमन आहेत. (वाचा :- प्रियकर व प्रेयसीलाच मानून बसलाय नवरा-बायको? हे 5 संकेत सांगतात तुमचा बाबू-शोना करणार नाही तुमच्याशी कधीच लग्न) केपी सिंह हे रिअल इस्टेटमधील अव्वल श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत. केपी सिंह यांच्या पत्नी इंदिरा यांचे 2018 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. एका मुलाखतीत केपी सिंह यांनी सांगितले की, "माझ्या पत्नीने तिच्या मृत्यूच्या ६ महिने आधी माझ्याकडून वचन घेतले होते की मी हार मानू नये. माझ्यापुढे अजून आयुष्य आहे आणि तिचे हेच शब्द मला जगण्याची प्रेरणा देत आहेत. " ते पुढे म्हणाले की, माझे वैवाहिक जीवन खूप छान होते. माझी पत्नी केवळ माझी जोडीदारच नव्हती तर माझी मैत्रीणही होती. तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. 65 वर्षे एकत्र राहून जेव्हा तुम्ही तुमचा जोडीदार गमावता, तेव्हा होणारी वेदना शब्दात मांडता येत नाही. तुमचे संपूर्ण आयुष्य बदलते. " पत्नीच्या मृत्यूनंतर केपी सिंह नैराश्यात होते. (वाचा :- नव-याने या एका गोष्टीवर 3 वर्षात तब्बल एक करोड रूपये उधळले,त्यामागील किळसवाणं सत्य मी सासू-सास-यांपासून लपवलंय) (वाचा :- कपिल शर्मासारखा प्रसिद्ध कॉमेडियन का वळलाय या मार्गाला,जगाला हसवणारा व्यक्तीच का आणतोय बायकोच्या डोळ्यांत पाणी) मृत्यू हा अटळ आहे. जाणारा व्यक्ती हा जातो पण सगळ्यात जास्त त्रास हा त्याच्या मागे राहिलेल्या जोडीदाराला होतो. जोडीदार कायमचे सोडून जाण्याचे दुःख खूप मोठे असते व ते केवळ त्या व्यक्तीलाच ती पोकळी समजू शकते. खास करून जेव्हा विवाहित जोडप्यांना अनेक वर्षे संसारात रमल्यानंतर अशा दुःखाला सामोरे जावे लागते तेव्हा त्यांचासाठी आयुष्य तितके सोप्पे राहत नाही. केपी सिंह यांच्याबाबतीत देखील होच गोष्ट झाली. कितीही मनाची तयारी असली तरीही 65 वर्षांच्या संसारानंतर एकट्याने आयुष्य जगायचं आहे ही कल्पना करणंही जीवघेणं ्असतं. (वाचा :- 4 वर्ष प्रेमात आहे, सेटल आहे पण 35 पर्यंत लग्न करायचं नाही पण प्रेयसीची विचित्र अट ऐकून पायाखालची जमीन सरकलीये) अनेकांनी ही बातमी बाहेर येताच केपी सिंह यांची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले गेले. पण ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण त्यांनी ज्या भावनेतून आपले रिलेशनशिप जाहीर केले आहे ती भावना समजून घ्यायला हवी. हे असे वय आहे ज्या वयात खऱ्या अर्थाने व्यक्तीला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. पण आता पत्नी सोडून गेल्याने ते एकटे पडले आहेत. अशावेळी जर त्यांना पत्नीसारखी काळजी घेणारी एखादी जोडीदार मिळाली असेल तर त्यात वावगे काही नाही. कोणत्याही सुजाण व्यक्तीला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम करण्याचा अधिकार नक्कीच आहे. प्रेम हे वय, रंग-रूप पाहून केले जात नाही, ज्या व्यक्तीच्या हातात हात दिल्यानंतर आपल्याला निश्चिंत वाटतं तेच आपलं खरं प्रेम. . ! हे सिद्ध करण्यासाठी जगाची पर्वा न करणा-या धाडसी केपी सिंह यांचं करावं तेवढं कौतुक कमीच. (वाचा :- 'मी दिया मिर्झा शपथ घेते' ओठांवर ओठ टेकून प्रेम व्यक्त करत मराठमोळ्या शब्दांत पतीचा स्वीकार,चाहत्यांकडून कौतुक) |
Kanpur Encounter : 'या' भयानक 'कट' प्रकरणात खरोखर सामील होती का नवविवाहिता ? 3 दिवसांच्या आत होईल 'खुलासा' नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिकरू एन्काऊंटर मध्ये कट रचल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठविलेली नवविवाहिता खुशी (अमर दुबे यांची पत्नी) च्या भूमिकेचा पुन्हा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणी आयजी रेंज मोहित अग्रवाल यांनी एसएसपीला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चौकशीनंतर तिची तुरूंगातून सुटका होण्याची अपेक्षा आहे. एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमर दुबेची पत्नी खुशीला कट रचल्याबद्दल पोलिसांनी तुरूंगात पाठवलं आहे. 29 जून रोजी तिचे लग्न झाले होते आणि 30 जून रोजी ती बिकारू येथे पोहोचली होती. याच्या दोन दिवसांनंतरच 2 जुलै रोजी बिकरू येथे घटना घडली. ती दोन दिवसच बिकरूमध्ये राहिली तरीही पोलिसांनी कट रचल्याच्या आरोपावरून तिला तुरूंगात पाठविले. आता आयजीचे म्हणणे आहे की खुशीच्या भूमिकेचा आढावा घेतला जात आहे. पुरावा न मिळाल्यास 169 ची कारवाई करून तिला तुरूंगातून सोडण्यात येईल. तीन दिवसांत तपास पूर्ण होईल. तपास एसपी वेस्टकडे देण्यात आला आहे. बिकरू येथे शहीद झालेल्या पोलिसांचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली. एकापाठोपाठ पाच चकमकी झाल्या. त्याचवेळी चकमकीत मारल्या गेलेल्या अमर दुबेच्या नवविवाहितेविरूद्ध पोलिसांच्या कारवाईवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. नातेवाईकांनी आरोप केला आहे की अमर बरोबर त्यांच्या मुलीचे लग्न त्यांची दिशाभूल करुन लावण्यात आले होते. लग्नानंतर दोन दिवसांनंतर मुलीला सासरच्यांबद्दल नीट समजले देखील नव्हते की पोलिसांनी तिला या एन्काऊंटर कट रचल्याप्रकरणी अटक केली. निर्दोष मुलीविरूद्ध केलेल्या कारवाईमुळे कुटुंबातील लोक अतिशय दुःखी स्थितीत होते. पनकी रतनपूर कॉलनीत राहणारे खुशी दुबेचे वडील श्याम यांनी सांगितले की, ते पेंटिंगचे काम करून कसेतरी पाच मुलांच्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. |
बेडशीटच्या स्वच्छतेबरोबरच उशा स्वच्छ करणे देखील तितकेच आवश्यक असते. घरात उशी कशी स्वच्छ करावी ते आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहोत. पलंगाशी संबंधित बर्याच गोष्टी असतात ज्यांच्या स्वच्छतेची आपण विशेष काळजी घेतो. परंतु तुम्हाला आठवत नाही की आपण उशी शेवटची कधी धुतली होती. जर आपण गेल्या 6 महिन्यांपासून अस्वच्छ उशी वापरत असाल तर आपण रोगास आमंत्रण देत आहात. बेडशीट आणि उशाचे कव्हर धुण्यासोबतच उशा धुणे देखील आवश्यक आहे. बरेच लोक 6 महिन्यांसाठी उशा वापरतात आणि ते गलिच्छ झाल्यावर ते फेकून देतात. त्याच वेळी, काही लोकांना असे वाटते की उशावर कव्हर ठेवल्यास ते घाणीपासून वाचवू शकते, परंतु तसे नाही. कालांतराने उशाचे कव्हरच नव्हे तर उशी देखील धुणे आवश्यक आहे. जर आपण असा विचार करत असाल की उशा कसा धुवाव्या, तर आम्ही येथे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे आपण घरातील उशी साफ करू शकता. उशी स्वच्छ ठेवून आपण बर्याच काळासाठी त्यांचा वापर करू शकता. इतकेच नाही तर आपण मशीनमध्ये उशी सहजतेने साफ देखील करू शकता, चला कसे ते जाणून घेऊया? पहिली पद्धत : सर्वप्रथम उशाचे कव्हर नीट बघून घ्या की त्यावर काही डाग धब्बे तर नाहीत ना. जर ते असेल तर ते धुण्यापूर्वी त्यावर डिटर्जंट सप्रे करा आणि 15 मिनिटे तसेच सोडून द्या. आता वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये उशी घाला. आपल्या माहितीसाठी सांगतो की वॉशिंग मशीनमध्ये उशी धुणे पूर्णपणे सुरक्षित आहे. एकावेळी फक्त दोन उशा घाला, जेणेकरून त्या एकमेकांवर घसणार नाही आणि चांगल्या प्रकारे स्वच्छ होतील. दुसरी पद्धत : आता उशी धुण्यासाठी ना जास्त ना कमी योग्य प्रमाणात डिटर्जंट डिस्पेंसरमध्ये ते टाकून द्या. जर आपण असा विचार करत असाल की अधिक डिटर्जंट लावल्यास उशी चांगली धुवावी तर आपण चुकीचे आहात. यामुळे अधिक फेस तयार होईल, जो नंतर उशामधून काढणे कठीण होईल. तिसरी पद्धत : आता कोमट पाण्याने उशी स्वच्छ करा आणि वॉशिंग मशीनमध्ये घाला आणि रिंस सायकलवर दोनदा फिरवून घ्या. अतिरिक्त डिटर्जंट योग्य प्रकारे उशामधून बाहेर येत असल्याचे सुनिश्चित करा. वॉशिंग मशीनमध्ये दोन वेळा रिन्स सायकल चालविल्यानंतर, ड्रायरमध्ये उशा घाला. ड्रायरमध्ये ठेवल्यानंतर सेटिंग्ज समायोजित करा. हे लक्षात ठेवा की जर आपल्या उशा पंखांचा पिसांच्या असतील आपले ड्रायर एअर-फ्लफ-नो हीट मोडमध्ये ठेवा. सिंथेटिक उशा असल्यास ड्रायरला कमी हिटवर ठेवा. चौथी पद्धत : उशा चांगल्या सुकविण्यासाठी आता आपण टेनिस बॉल वापरू शकता. त्यासाठी दोन टेनिस बॉल घ्या आणि ते स्वच्छ मोज्यात घाला. यानंतर ते आपल्या ड्रायरमध्ये उशासोबत ठेवा, असे केल्याने आपण ते लवकर सुकवू शकता. आता आपला ड्रायर सुरू करा, यामुळे उशा मागच्या बाजूस फूलेल दिसेल आणि चांगल्या प्रकारे कोरडे देखील होतील. पाचवी पद्धत : फायबरफिलसाठी कमी-मध्यम हिटवर सुमारे एक तास वाळवा किंवा डाउन-फिलसाठी एक्सट्रा लो किंवा नो हिट मोडवर ठेवा. ड्रायरचे काम पूर्ण झाल्यावर कुठला भाग ओला राहिला यासाठी एकदा उशी तपासून घ्या. तपासून घेतल्यावर 30 तास वाळण्यासाठी सोडून द्या. उशी नवीन ठेवण्यासाठी नेहमी कव्हर वापरा. तसेच त्या सुकविण्यासाठी बाहेर अशा जागी ठेवू नका, ज्यामुळे त्यावर घाण आणि धूळ चिटकेल. महत्वाची गोष्ट : उशी वर्षातून नेहमीच 3 ते 4 वेळा धुवावी, कारण केसांना लावलेले तेल, कोंडा, घाम अनेकदा उशावर चिकटून राहतो. दोन ते तीन महिन्यांत उशाला वास येऊ लागतो. त्यामुळे उशा वेळोवेळी धुण्याचा प्रयत्न करा. तसेच, जर आपल्याला असे वाटत असेल की उशा धुण्याच्या स्थितीत नाही तर त्या बदला. |
पुणे : जातीयता, भेदाभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना समाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. सन २०२०-२०२१ या अर्थिक वर्षात पुणे विभागातल्या ५ जिल्ह्यांतील ६५४ विवाहित जोडप्यांचा संसाराला ३ कोटी २८ लाख रुपयांचे आर्थिक बळ देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येते. सन २०२०-२०२१ या अर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यासाठी ९४ लाख (१८८ जोडपी), साताऱ्यासाठी ७० लाख (१४० जोडपी), सांगलीसाठी ६० लाख (१२० जोडपी), सोलापूरसाठी ५० लाख (१०० जोडपी) तर, कोल्हापूरसाठी ५४ लाख (१०८ जोडपी) रुपये वितरित करण्यात आले. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या संयुक्त नावाने धनादेश देण्यात आला. आंतरजातीय विवाह प्रोत्सानपर आर्थिक साहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नी हे महाराष्ट्रातील रहिवासी असणे तसेच जातीचा दाखला व आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आंतरप्रवर्गातील विवाहित जोडप्यांच्या विवाहास ही आंतरजातीय विवाह म्हणून शासन मान्यता आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यास रुपये ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. या अनुदान रकमेत केंद्र आणि राज्य शासनाचे प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे. |
मुंबई : शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. मात्र, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? असा कणखर प्रश्न करत शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला चांगलेच खडसावले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी महाराष्ट्र संवाद कार्क्रमादरम्यान शिवसेनेवर टीका केली होती. सावंत म्हणाले, तुम्ही परवा बिहारचा बिगुल वाजवला आणि 70 हजार एलईडी लावून प्रचार सुरु केला. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नये. ही राजकारणाची वेळ नसल्याचं सांगत पीएम केअर फंडाचं काय झालं? आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप आहे का? शिवसेना आणि सत्ता असं काही नाही. सत्ता हे आमचं साधन आहे साध्य नाही. वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तशीच आहे. त्याच विचारांनी काम करत असल्याचे सावंत म्हणाले. शरद पवार हे देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दौरा केला तर तुमच्या पोटात ढवळण्याची काही गरज नाही. त्याचं स्वागत केलं पाहिजे, असे सावंत यांनी भाजपाला ठणकावून सांगितले. राजकारण करायची ही वेळ नाही. देश आणि विश्व एका विषाणूने त्रस्त झाला असून त्याच्यावर मात करायची गरज आहे. तुम्ही मात्र परवा बिहारचा बिगुल वाजवला. 70 हजार एलईडी लावून तुम्ही प्रचार सुरु केला. |
पुणे - आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला परिसरातील धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी आज विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी धायरी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जामशिंग गिरासे, तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के उपस्थित होते. श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महिलांना समान दर्जा देण्यासाठी व समाजातील कुप्रथा बंद करण्याचे काम सुरू आहे. खडकवासला मतदार संघातून शंभर टक्के विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव होणे कौतुकास्पद आणि मार्गदर्शक आहे. राज्यातील गावागावात असे ठराव होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजात महिलांना समान दर्जा देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री. गुप्ता म्हणाले, समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी आपला सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे. समाजातील कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी सर्व मिळून एकत्रित करावे, असेही ते म्हणाले. महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, खडकवासला विभागातील अनेक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथे विरुद्ध ठराव केला. २९ ग्रामपंचायतींचा कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. एकाच वेळी ठराव करणारा राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. विधवा महिलांना समान अधिकार आहेत. गावातील सरपंच, महिला यांनी यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे. राज्यातील गावागावात असे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.देशमुख म्हणाले, स्री पुरुष समानतेचा इतिहास लिहला जाईल, त्यावेळी या ऐतिहासिक कार्यक्रमाची त्यात निश्चितपणे नोंद असणार आहे. कायद्यासोबतच अनुरूप असे सामाजिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आजच्या या ठरावाच्या कार्यक्रमातून लोकचळवळ उभी राहील, महिलांना सन्मान देणारी चांगली सुरुवात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.महिला आयोगाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.महिला आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली. राज्य महिला आयोगाने विधवा प्रथासारख्या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला राज्यभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व काही प्रभागातील नागरिकांनी आज हा ठराव मंजूर केला आहे. खडकवासला हा महाराष्ट्रातील १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा पहिला मतदारसंघ असणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. कानडे, तहसीलदार श्रीमती कोलते,सरपंच मोनिका पडेर, राहुल पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक,महिला आदी उपस्थित होते. |
ऐन आर्थिक मंदी काळात टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे. TCS Jobs 2020: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीच्या काळातही तब्बल ४० हजार फ्रेशर उमेदवारांना नोकऱ्या देणार आहे. देशभरातली सर्व कॅम्पस मिळून या ४० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची टीसीएसची योजना आहे. गेल्या वर्षी देखील या मोठ्या IT कंपनीने इतक्याच नोकऱ्या उपलब्ध केल्या होत्या. मात्र यंदा परिस्थिती अनुकूल नसतानाही, बाजारात आर्थिक मंदी असतानाही टीसीएसने हे पाऊल उचलले आहे. यूएस कॅम्पसमधील प्लेसमेंटची संख्याही या वर्षी दुप्पट करून २ हजार इतकी करण्याचा TCS चा प्रस्ताव आहे. टीसीएसचे सीईओ राजोश गोपीनाथन यांनी गेल्या आठवड्यात या नोकऱ्यांसंबधी भाष्य केले. ते म्हणाले, 'या तिमाहीत कोविड - १९ मुळे मागील तिमाहीपेक्षा कठीण परिस्थिती असेल याचा अंदाज होता. करोनामुळे गेल्या तिमाहीत आम्ही असं जाहीर केलं होतं की फ्रेशर्सची भरती थांबवण्यात येत आहे. मात्र ज्यांना ऑफर लेटर देण्यात आले होते त्यांची भरती होणार आहे. ' मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरूवात करत आहे, असंही गोपीनाथन यांनी सांगितले. टीसीएसचे ग्लोबल एचआर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात नव्याने देण्यात येणाऱ्या नोकऱ्यांची संख्या ३५ हजार किंवा ४५ हजारही असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत व्यवसाय पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. टीसीएसतर्फे अमेरिकेत इंजिनीअरांव्यतिरिक्त टॉप १० बिझनेस स्कूलच्या पदवीधरांनाही सेवेत सामावून घेत आहे. व्यवसायात वाढ करण्यासाठी आणि अमेरिकेत विस्तार करण्यासाठी कंपनीतर्फे नवोदितांबरोबरच अनुभव कर्मचाऱ्यांचीही भरती करणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत कर्मचाऱ्यांची भरती करणे ही बाब आमच्यासाठी नवी राहिलेली नाही. कंपनीने २०१४पासून वीस हजारहून अधिक अमेरिकी व्यक्तींना नोकरी देऊ केली आहे. टीसीएसने गेल्या वर्षी भारतात कॅम्पसच्या माध्यमातून ४० हजार नोकरभरती केली होती. त्यामध्ये भरती केलेले नवोदित १५ जुलैपासून कंपनीत रूजू होण्यास सुरुवात होईल. कंपनीतर्फे भरती करण्यात आलेल्या ८ हजार ते ११ हजार प्रशिक्षणार्थींचा प्रत्येक आठवड्यात ऑनलाइन मागोवा घेतला जातो. ८ हजारहून अधिक नवोदितांनी रूजू होण्यापूर्वीच दोन डिजिटल सर्टिफिकेशनही पूर्ण केले आहे. या शिवाय कंपनी विविध पदांवर शंभरहून अधिक अनुभवी आणि हुशार कर्मचाऱ्यांची भरती करीत आहे. |
भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे. मात्र भारतात अनेक भागात कापूस वेचणीचे काम महिला मजूरांकडून करून घेतले जाते. त्यामुळे महिला मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वर्धा - भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे. मात्र भारतात अनेक भागात कापूस वेचणीचे काम महिला मजूरांकडून करून घेतले जाते. त्यामुळे महिला मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने ऑक्टोबर २००४ मध्ये या संदर्भात अभ्यास करून शासनाकडे निष्कर्ष अहवाल सादर केला होता. यावर कार्यवाही करून कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरण, महिलाचा त्रास कमी होणाऱ्या बाबी अमलात आणाव्या अशा सूचना केल्या होत्या. मात्र या अहवालावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे कापूस मजूरांच्या व्यथा कायमच आहे. जगात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इस्राईल, अमेरिका या देशामध्ये ९० टक्के कापसाचे उत्पादन होते. येथे कापूस वेचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतात मात्र महिला मजूरांकडून कापूस वेचून घेतला जातो. पाच बोटांमध्ये कापूस पकडून तो बोंडाबाहेर काढण्याचे काम करण्यात येते. कापूस वेचणीची ही पद्धत अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मणक्याचे आजार, कमरेचे आजार होतात, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधारण परिषदेने कापूस पिकावर जागतिक संशोधन केले. या संशोधनात कापूस वेचणीबाबत काही निष्कर्ष मांडलेत. त्यात भारत आणि पाकिस्तान आणि चीन या देशात कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्याची टक्केवारी शून्य असल्याचे नमूद केले आहे. कापूस वेचणीसाठी मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाने कापडाचा खिसा असलेला कोट वापरण्याची सूचना केला होती. समोरच्या भागात साडेपाच किलो कापूस मावेल असा पद्धतीचा कोट तयार करण्यात आला होता. मात्र कापूस वेचणाऱ्या महिला स्वखर्चाने हा कोट खरेदी करीत नाही. असे आढळून आले. नॅशनल हार्टिकल्चर मिशनचे संचालक चंद्रशेखर पडगिलवार यांनी म्हटले आहे की, भारतात कापूस वेचणीचे यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र बोंडाजवळ नेल्यावर ५० ते ६० किलो कापूस एका तासात वेचते. एका तासात १०० किलो कापूस वेचणे शक्यता आहे परंतू आपल्याकडे राज्य सरकारचा कृषी विभाग कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरणाचा वापर करून घेण्याबाबत प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आजही महिलांना कापूस वेचणीचे काम करावे लागत आहे. पूर्वी विदर्भाच्या विविध भागात एक महिला दिवसभर जितका कापूस वेचत होती. त्यानुसार किलोच्या आधारे रोजी दिली जात होती. यंदा मात्र २०० रूपये रोजीच्या महिला कापूस वेचणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना ठेवाव्या लागत आहे. एक महिला साधारणपणे २० ते २५ किलो कापूस दिवसभरात वेचते. पूर्वी १३० रूपयात हे काम व्हायचे आता २०० रूपये द्यावे लागत आहे. म्हणजे ७० रूपये अधिकचे शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. त्यामुळे आता कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. विदर्भात कापूस हे सर्वात महत्वाचे पिक आहे. व ते नगदी असल्याने शेतकरी यावरच उभा आहे. |
पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे घरात लोक असताना चोरट्याने हा डाव साधला आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये सुद्धा चोरट्याने प्रवेश केला होता. कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल झाले असले तरी अजूनही काही लोक घराबाहेर निघणे टाळत आहेत. लोक आपल्या घरातच असल्याने या काळात चोरीचे प्रमाणात सुद्धा घट झाली आहे. मात्र पवईतील पवई तलावाच्या समोर असणाऱ्या लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने प्रवेश करत लोक घरात असतानाच तब्बल ३ फ्लॅटमध्ये प्रवेश करून त्यातील एका फ्लॅटमध्ये चोरी करत मोठा डल्ला मारला आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता कोणताही दरवाजा उचकटल्याशिवाय घरात प्रवेश करत चोरी केली असल्याचे समोर येत आहे. रात्री २.३० नंतर सकाळी ७ वाजण्यापूर्वी चोरट्याने आपला डाव साधलेला आहे. यावेळी घरातील सर्व व्यक्ती बेडरूममध्ये झोपलेले होते, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले. "चोरट्याने पाईपच्या माध्यमातून खिडकीतून किचनमार्गे घरात प्रवेश केला आहे. संपूर्ण फ्लॅटमधील लोकांचा अंदाज घेत ज्या रूममध्ये कोणीच नाही तिथे चोरट्याने मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे." असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. "घरातील व्यक्तीचे जवाब नोंदवण्याचे काम सुरु असून, प्रथमदर्शनी ९.२५ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरट्याने चोरल्याची माहिती समोर येत आहे", असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले. "५व्या मजल्यावरील ५०२ फ्लॅटमधील एका बेडरूममध्ये कपाटाच्या आत असणारे लॉकर चोरट्याने उचकटत त्यातील सोन्याचे, हिऱ्याचे दागिने चोरी केले आहेत. विशेष म्हणजे त्याने घरातील इतर कोणत्याच गोष्टीला हात लावलेला नाही. केवळ दागिने आणि २५,०००ची रोकड चोरी केली आहे.' असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले. "इमारतीच्या २रया आणि ४थ्या मजल्यावर त्याच रांगेत असणाऱ्या फ्लॅटमध्ये सुद्धा चोरट्याने प्रवेश केला होता. मात्र तिथे काहीच चोरी केली नसल्याचे फ्लॅटमालकांनी सांगितले," असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांनी सांगितले. फोरेन्सिक पथकाने तपासणी केली असता ५ व्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये ३ ठसे तर ४ थ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये २ ठिकाणी १ आणि ३ असे ४ ठसे मिळून आले आहेत. श्वान पथकही चोरीच्या ठिकाणी दाखल झाले होते. इमारतीची सुरक्षा भिंत चढून चोरट्याने इमारत भागात प्रवेश केला आहे. त्यानंतर पाईपच्या सहाय्याने त्याने २, ४ आणि ५ माळ्यावरील एकाच रांगेतील फ्लॅटमध्ये खिडकीतून प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे एका फ्लॅटमध्ये तर चक्क त्याच घरातील व्यक्तीचा ऍपल कंपनीचा मोबाईल फोनच्या टोर्चचा उपयोग त्याने केला आहे. जाताना मोबाईल परत जागेवर सोडून गेला आहे," असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले. चोर हा इमारतीत प्रवेश करताना कोणतेही सामान घेवून आलेला दिसत नाही. मात्र जाताना त्याने चोरीच्या ठिकाणावरील एका लॅपटॉप बॅगमधून लॅपटॉप काढून ठेवून त्यात चोरी केलेले दागिने भरून घेवून गेला आहे. आम्हाला चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळून आले आहे. सध्या त्याची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, खबऱ्याचे जाळे पसरवण्यात आले असून, चोरटा लवकरच पोलिसांच्या ताब्यात असणार आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले. |
सातारा : जेवण करून रात्री साडेदहा वाजता शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रीतम अनिल चव्हाण (वय १७, रा. सरस्वती बंगला, सदर बझार, सातारा) या युवकाला दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश हेमंत धोत्रे, अक्षय हेमंत धोत्रे (रा. देशमुख काॅलनी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रीतम चव्हाण हा बुधवार, दि. २९ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणानंतर शतपावली करण्यास घराबाहेर पडला. सदर बझार परिसरातून तो जात असताना धोत्रे बंधूंनी त्याला अडवले. आम्ही सकाळी तुझ्या गाडीला डॅश मारला, तेव्हा तू आमच्याकडे रागाने का बघितलेस, असे म्हणून त्याला मारहाण केली. तर ऋषिकेश धोत्रे याने प्रीतमच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला फरशी मारली तर पाठीवर दगड मारून जखमी केले. या प्रकारानंतर प्रीतम याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी धोत्रे बंधूंवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. |
मसाले, सुगंधी वनौषधी लागवडीवर भर! कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे. अकोला : राज्यातील मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सुगंधी औषधी वनस्पती पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठीचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. विदर्भात सुगंधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत असून, या कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे. यानुषंगाने शेतकऱ्यांना या पिकांच्या 'शाश्वत शेतीसाठी अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान' या विषयावर अकोल्यात दोन दिवस मंथन होणारआहे. या प्रकल्पाचा आदर्श घेत विदर्भातील मोजक्या शेतकºयांनी सध्या तिखाडी तेल गवताची व्यावसायिक शेती सुरू केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकºयांनी तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीचा शेती प्रयोग केला. भंडारा, वर्धा जिल्ह्यात वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे. या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकºयांनी सुगंधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाºया या चर्चासत्रामध्ये मसाला व सुगंधी वनस्पती पिकांबाबत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे मूल्यसंवर्धन तथा प्रक्रिया, विपणन व स्वयंरोजगाराच्या संधी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तिखाडी हे तेल गुणकारी असून, गुडघे, सांधेदुखीवर या तेलाचा उपयोग करण्यात येतो. नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल निर्मिती प्रकल्प असून, माफक दरात तिखाडी तेलाचा पुरवठा गरजवंतांना उपलब्ध करण्यात येत आहे. वनस्पती औषधी शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकºयांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात कोरफड, शतावारी, क रंज, बिहाडा, गुग्गुळ, अडुळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यांचा समावेश आहे. |
येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याने किरकोळ कारणावरून दुसर्या कैद्याला शौचास बसलेला असताना शिवीगाळ करून गालावर खिळा मारून जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडला. या प्रकरणी कैद्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय काशीनाथ जामदारे (कुदळवाडी, चिखली, सध्या येरवडा कारागृह) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे, तर गणेश ऊर्फ हनुमंत ननवरे असे जखमी कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी मध्यवर्ती कारागृहातील पोलिस शिपाई जीवनदास काळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय जामदारे एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे, तर गणेश ननवरे हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे. दोघेही एकाच सर्कलमधील एकाच बराकीमध्ये राहण्यास आहेत. त्यांच्या दोघांमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाले होते; तसेच काही किरकोळ वाद झाले होते. त्यामुळे ननवरे हा मध्यवर्ती कारागृहातील बराक क्रमांक 2 मधील शौचालयात प्रातर्विधीला बसला असताना अक्षय जामदारे तेथे आला. त्याने ननवरे याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या गालावर खिळा मारून त्याला जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत. मलकापूर नगरपंचायतीला 'क' वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर सत्ताधारी काँग्रेस समर्थकांनी एकच जल्लोष केला. शहरातून मोटारसायकल रॅली काढून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी नागरिकांनीही मोठ्या उत्साहात रॅलीत सहभागी होत या निर्णयाचे स्वागत केले. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. या रॅलीत नगरसेवकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मलकापूर नगरपंचायतीचे 'क' वर्ग नगरपरिषदेत रुपांतर व्हावे, म्हणून सत्ताधारी गटाकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरु होते. राज्य शासनाकडून नगरपरिषदेचा निर्णय अपेक्षित असतानाही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याची भावना सत्ताधारी मनोहर शिंदे, त्यांचे सहकारी तसेच नागरिकांची झाली होती. त्यातच सत्ताधार्यांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोगाने नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रियाही सुरु केली होती. नगरपरिषदेसाठी पुरेशी लोकसंख्या असतानाही मलकापूरपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दोन शहरांना राज्य शासनाने नगरपरिषदेचा दर्जा दिला. मात्र, मलकापूरबाबत दुजाभाव होत असल्यानेच सत्ताधार्यांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरही राज्य शासनाने वेळकाढूपणा करण्याचे धोरण अवलंबल्यानंतर न्यायालयाने कडक शब्दात समज देत चार आठवड्यात मलकापूरबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने मंत्तिमंडळाची उपसमिती नेमून निर्णय घेण्यास सांगितले. या उपसमितीने बैठकीत निर्णय घेऊन 27 जुलैला त्याबाबतची अधिसूचना काढली. ती अधिसूचना न्यायालयात सादर केल्यानंतर मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाने न्याय मिळाल्याचे सांगत सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते नगरपंचायत कार्यालयासमोर जमले. बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, नारायण रैनाक, लक्ष्मण येडगे, गजेंद्र बुधावले, धनराज शिंदे, राहूल पाटील, प्रशांत चांदे, सुरेश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करण्यास सुरवात केली. तसेच यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याचवेळी नगरपंचायतीसमोरून मोटारसायलक रॅलीस प्रारंभ झाला. तेथून रॅली लक्ष्मीनगर येथे आली. त्यानंतर माजी आ. भास्करराव शिंदे यांच्या घरासमोरून रॅली मलकापूर फाटा, खंडोबानगर, कोयनावसाहत, ढेबेवाडी फाटा, आगाशिवनगर मार्गे रॅलीचा कोल्हापूर नाक्यावर समारोप झाला. या रॅलीवेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. तसेच नगरपरिषदेची मान्यता मिळाल्याने जल्लोषही केला. |
नवरात्रौत्सवाला उद्यापासून सुरूवात होते आहे. या काळात नऊ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आदिशक्तीचा जागर असतो. नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा गेल्या दशकभरापासून सुरू आहे. पण मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील महिला पिंक महिना साजरा करीत आहेत. संपूर्ण जगभरामध्ये ऑक्टोबर महिना हा महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोग जनजागृतीसाठी साजरा केला जातो. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार केले तर त्या महिलेचा जीव वाचू शकतो. आपल्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अनेक महिलाना स्टेज 3 अथवा स्टेज 4 मध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कळून येतात व तेंव्हा फार उशीर झालेला असतो याच जाणिवेतून मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल हा महिना पिंक महिन्याचे आयोजन करण्यात आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टर , नर्सेस , सुरक्षा रक्षक तसेच साफसफाईचे काम करणार्या महिला जास्तीत जास्त पिंक (गुलाबी ) रंगाचे कपडे परिधान करणार आहेत तसेच यासोबत हॉस्पिटलमध्ये येणार्या महिला पेशंट व त्यांच्या महिला नातेवाईकांना या पिंक महिन्याचे महत्व समजावून देणार आहेत. हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी म्हणाले, जागतिक पातळीवर या महिन्यात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती आणण्यासाठी पिंक म्हणजेच गुलाबी रंगाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देऊन बर्या झालेल्या महिलांना पिंक पँथर्स म्हणतात. स्तनाच्या कर्करोगासंबंधी जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गुलाबी रंग प्रतिकात्मक म्हणून वापरला जातो. आमच्या हॉस्पिटलमध्ये 70 टक्के या महिला असून त्यांनीच हा महिना साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला असून या निमित्ताने आम्ही एका महिलेचे जरी आयुष्य वाचवू शकलो तरी आमचा उद्देश सफल होईल. |
अब्दुल कलाम यांचे शेवटचे शब्द होते 'या जगाला जगण्यासारखे कसे बनवावे'. मरण्यापूर्वी राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या सैनिकांना सांगितले होते की, 'माझा मृतदेह इंग्रजांना देऊ नका. ' प्रिस्टने चार्ली चॅप्लिनला सांगितले होते की, देव तुमच्या आत्म्यावर दया कर, तेव्हा चार्ली म्हणाला की 'का नाही, हे सर्व त्याचेच आहे. ' अल्बर्ट आइनस्टाइन म्हणाले होते की 'मला जेवढे जगायचे होते तितके मी जगलो आणि या पृथ्वीला जेवढे योगदान द्यायचे होते तेवढे मी दिले. ' महात्मा गांधींनी शेवटच्या काळात तीन वेळा 'हे राम' म्हटले होते. टेनेसी व्हिस्कीचे संस्थापक जॅक डॅनियल म्हणाले, 'चला एक शेवटचे पेय होऊ द्या. ' कार्ल मार्क्स म्हणाले की 'शेवटचे शब्द त्या मूर्ख लोकांचे आहेत जे त्यांच्या आयुष्यात फार काही बोलू शकले नाहीत. ' |
बीड - दोन वेळा मतदान करा ;पण बोटावरची शाई पुसण्याची दक्षता घ्या असे विधान करणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवडणूक आयोगाची माफी मागावी लागली पण राजकीय आखाड्यात काकांविरोधात शड्डू ठोकणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मात्र त्यांच्या बोगस मतदान केल्याच्या विधानावरून निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडले आहेत. आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी आपण बोगस मतदान केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानुसार पुढील चोवीस तासांत त्यांना या नोटीसला उत्तर द्यायचे आहे. धनंजय मुंडे यांनी मतदानाबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या वक्तव्यावरुन धनंजय मुंडेंवर चौफेर टीका झाली. त्यांचे काका आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी देखील हे वृत्त फेटाळले आहे. |
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. शिवाय मुंबई ही मनोरंजनाची राजधानीही (बॉलिवूड) आहे, म्हणूनच तिला चंदेरी दुनिया म्हटले गेले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबई एक आहे. देशातील एकूण कारखानदारी नोकरदारांपैकी वीस टक्क्यांहून अधिक लोक येथे राहतात. नोकरी-व्यवसायातील संधी आणि बॉलिवूडचे आकर्षण अशी स्वप्ने सत्यात उतरविणार्या मुंबईच्या या मायानगरीकडे भारतातून अनेक स्थलांतरित येत असतात. वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक येथे एकत्र नांदतात. हे सगळे समुदाय आपल्या संस्कृतीबरोबरच मुंबईच्या संस्कृतीत मिसळून जातात. या सर्व धर्मीयांना आपलीशी वाटणारी देवता म्हणजे गणपती. चौदा विद्यांचा, चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या, बुद्धीचा अधिष्ठाता असलेल्या गणेशाची उपासना सर्वच जण भक्तिभावाने करतात. महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणे मुंबईतही गणपतीची जागृत देवस्थाने आहेत. मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या - ज्याची ख्याती केवळ देशातच नाही, तर जगात असलेल्या 'सिद्धिविनायक मंदिरा'बरोबरच गणपतीची अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध मंदिरे मुंबईत आहेत. त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या. 'शिवाजी पार्क, दादर' - राजकीय, सामाजिक, क्रीडा असे विविध आयाम असलेले आणि चोवीस तास माणसांची वर्दळ असलेले हे पार्क (उद्यान) मुंबईकरांसाठी आध्यात्मिक शांततेचेही ठिकाण ठरलेले आहे, ते येथे असलेल्या उद्यान गणेशमंदिरामुळे. या मंदिरातील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे 1966 साली एका व्यक्तीला वडाच्या झाडाखाली गणेशाची छोटी मूर्ती सापडली. ज्या वडाच्या झाडाखाली गणेशाची मूर्ती प्रकट झाली, त्याच ठिकाणी 1970 साली गणेशमंदिर बांधण्यात आले. ही गणेशाची मूर्ती उद्यानात सापडली असल्यामुळे या मंदिराला 'उद्यान गणेशमंदिर' असे नाव देण्यात आले. मंदिरात प्रवेश केल्यावर मनमोहक अशा बालगणेशमूर्तीचे दर्शन होते. उजवीकडे सोंड असलेली (सिद्धिविनायक), शंख, लाडू, हस्तिदंत, गदा धारण केलेली चतुर्हस्त अशी चांदीची बाल गणेशमूर्ती दिसते. मूर्तीच्या दोन्ही बाजूस ऋद्धी-सिद्धी आणि लक्ष-लाभ उभे आहेत. मंदिराच्या बांधकामात राजस्थान व गुजरात येथील संगमरवराचा वापर करण्यात आला असून मंदिरातील सिंहासन आणि घुमट सोन्याने मढवलेले आहे. मुंबईतील दादर हे शहर आत्यंतिक गजबजलेले असूनदेखील 'उद्यान गणेशमंदिर' येथील परसिरातील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न करणारे आहे. मनोभावे देवाच्या दारी गेल्यावर जी मनःशांती प्राप्त होते, त्याचा अनुभव उद्यान गणेशाचे दर्शन घेतल्यावर निश्चितच होतो. बोरिवली पश्चिमेकडील वझिरा नाका येथील गणेशमंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी कोळी बांधव, भंडारी समाज आणि स्थानिक ग्रामस्थच मंदिरात दर्शनासाठी येत असत. गेल्या काही काळात या मंदिराची ख्याती वाढल्याने मुंबईतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले आहेत. या ठिकाणी पाच मंदिरे आहेत. येथील गणेशाची मूर्ती उत्तर दिशेला असून बाजूला शितलादेवीची मूर्ती आहे. त्याशिवाय मारुती आणि स्थानिक ग्रामदेवता आलजी देव यांचीही मंदिरे आहे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या पाठारे प्रभूंचे हे दैवत. या मंदिरातील गणेशमूर्ती संगमरवरी असून सोन्याचा मुकुटाने आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली आहे. 1927मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. 'इच्छापूर्ती करणारा गणेश' म्हणून वांच्छा (वांच्छा या शब्दाचा अर्थ इच्छा असा आहे) सिद्धिविनायक असे संबोधले जाते. या मंदिरात गणेशासह शिवशंकर, दत्तगुरू, मारुती आणि महालक्ष्मी यांचीही छोटी व सुबक मंदिरे आहेत. विलेपार्ले स्थानकानजीक पार्लेकरांचे श्रद्धास्थान असलेले पार्लेश्वर मंदिर आहे. मूळ मंदिर भगवान शंकराचे असले, तरी मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे. गणेशभक्त श्रद्धेने येथील गणपतीची पूजा करतात. या मंदिरातील गणेशमूर्ती पंचधातूची असून मूर्तीवर चांदीचे छत्र आहे. मूळच्या अलिबाग येथील असलेल्या यशोदा गोविंद फडके यांनी 1890 साली फडकेवाडीत या गणेशमंदिराची स्थापना केली. पतीच्या अकाली निधनामुळे निपुत्रिक असलेल्या यशोदाबाईंनी गणपतीलाच आपले पुत्र मानले आणि मंदिराची उभारणी केली. गणेशाला आपला पुत्र समजून या मंदिरातच त्या आपला वेळ सत्कारणी लावत. त्यांच्या पश्चात त्यांच्या स्नेही आणि नातेवाइकांनी मंदिराची देखभाल केली. गाभार्यातील गणेशमूर्तीचे मखर आणि गाभार्याचा दरवाजा चांदीचा आहे. मायानगरी मुंबईच्या मध्य भागात वसलेल्या या झोपडपट्टीत सुमारे 15 लाखाहून अधिक लोक राहतात. पश्चिम माहिम आणि पूर्व शीव (सायन)दरम्यान 557 एकरात धारावीची झोपडपट्टी पसरली आहे. धारावीतील झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत येणारे परप्रांतीयांचा लोंढा काही प्रमाणात धारावीत स्थिरावतो. अशाच स्थलांतरित लोकांनी येथे गणेेशमंदिराची उभारणी केली आहे. दक्षिण भारतातील अदी द्रविड या समाजाने 1913 साली धारावीतील या गणेशमंदिराची उभारणी केली. तामिळनाडूतील हा समाज मुंबईत आला आणि धारावीमध्ये राहून चामड्याचा व्यवसाय करू लागला. या समाजातील काही लोकांनी येथे मंदिराची स्थापना केली. शंभर वर्षांपूर्वी पूर्ण झालेले हे मंदिर पूर्वी पिंपळवृक्षाच्या खाली बांधण्यात आले. 1939 साली त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ गावापासून दूर राहणार्या या स्थलांतरित लोकांनी मुंबईच्या मायानगरीत तारणहार वाटणार्या विघ्नविनाशक, संकटमोचक गणेशाची स्थापना केली. भारतात ठिकठिकाणी आपल्याला लेणी पाहायला मिळतात. लेण्यांमधून वास्तुशिल्पांचे, चित्रांचे अनेक नमुने आपली संस्कृती अधोरेखित करताना दिसतात. मुंबईत मागाठाणे, कान्हेरी, मंडपेश्वर, जोगेश्वरी इत्यादी ठिकाणीदेखील लेण्या आहेत. येथील जोगेश्वरी लेणीत गणेशाचे रेखीव मंदिर आहे. गुहेत असलेल्या या मंदिराचे शिल्पसौंदर्य अप्रतिम आहे. गणेशमूर्ती दगडात कोरलेली असून मूर्तीला शेंदुराचे लेपन केलेले आहे. तसे पाहिले, तर जोगेश्वरी लेणी ही शैव लेणी म्हणून ओळखली जातात, परंतु या लेण्यांच्या प्रथमदर्शनीच गणेशाचे मंदिर पाहायला मिळतेे. येथील गणेशाची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. गुहेसमोरच कोरीव काम केलेले दोन खांब आपल्याला बघायला मिळतात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अनोखा संगम जोगेश्वरी लेणीतील गणेशमंदिरात अनुभवायला मिळतो. 17 जुलै 1961 रोजी गणेशाची छोटी मूर्ती बसवून मंदिराची स्थापना करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र भट्ट यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. 1980 साली गणपती मंदिराचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी 1984मध्ये माघी गणेश चतुर्थीनंतर येणार्या संकष्टीला मंदिरात काळ्या रंगाची गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला 'मुंबईतील काळा गणपती' म्हणून ओळखले जाते. मुंबईतील घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालणार्या धकाधकीच्या दिनचर्येमुळे अष्टविनायक दर्शन शक्य होत नसले, तरी मुंबईतील या अष्टविनायकांचे दर्शन आपण जरूर घेऊ शकतो. |
औरंगाबाद रोलर रिले स्केटिंग संघटनेतर्फे पहिल्या जिल्हास्तरी स्केटिंग स्पर्धेचे आयोजन रविवारी (सात जुलै) करण्यात आले आहे. ही स्पर्धा शहरातील दोन भागांमध्ये होणार आहे. रोड वन ही स्पर्धा सकाळी साडेसात वाजता एपीआय कॉर्नर येथे होईल. रिंक रेस स्पर्धा संग्रामनगर उड्डाणपुला शेजारी असलेल्या आर. जे. इंटरनॅशनल स्कूल परिसरात होणार आहे. या स्पर्धेत चार ते चौदा वर्षांखालील मुले-मुली तसेच खुल्या गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. प्रत्येक गटातील अनुक्रमे पहिल्या तीन खेळाडूंना पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच पहिल्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबाद संघात निवड केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सचिव राधिका अंबे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक भिकन अंबे यांनी केले आहे. |
मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात 'बीड जिल्ह्याचा विकास' या विषयावर ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरुवार दि. १ आणि शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे. |
बीड । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा किरोनाची लागण झाली. याबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांची मेसेजद्वारे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे धनंजय मुंडेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. कोरोना अद्याप गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहावे, असे आवाहन त्यांनी बीज जिल्ह्यातील जनतेला केले आहे. यावेळी नागरिकांना मास्क आणि सिनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे, असे आवाहन धनंजय मुंडेंनी केले आहे. माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये सुद्धा पंकज मुंडेंना कोरोनाची लागण झाली होती. आता पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच राज्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. राज्यात १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली, तर सरकार कठोर निर्बंध लावू शकते, असे स्पष्ट संकेत पवारांनी काल (१ जानेवारी) कोरोगाव-भीमा जयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. |
बिहारच्या पाटण्यात एका व्यक्तीच्या मेंदूत ब्लॅक फंगसची लागण झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत क्रिकेट चेंडूएवढा ब्लॅक फंगस काढला. बिहारमधील पाटण्यात एका व्यक्तीच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूतून क्रिकेट बॉलएवढी ब्लॅक फंगस काढण्यात आला. (प्रातिनिधीक फोटो, सौजन्य PTI) देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र हे संकट ओसरत असलं तरी ब्लॅक फंगसचं संकट कायम आहे. करोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना ब्लॅक फंगसची लागण होत आहे. ब्लॅक फंगसच्या महागड्या उपचारांचा खर्च ऐकून सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळू सरकते. त्यामुळे अनेकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे. या ब्लॅक फंगसमुळे अनेकांना जीवाला मुकावं लागलं आहे. असं असताना बिहारच्या पाटण्यात एका व्यक्तीच्या मेंदूत ब्लॅक फंगसची लागण झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. त्याच्या मेंदूतून क्रिकेट चेंडूइतका मोठा ब्लॅक फंगस काढण्यात आला. इतका मोठा ब्लॅक फंगस बघितल्यानंतर डॉक्टरानाही धक्का बसला. मात्र शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बिहारच्या पाटण्यातील एका ६० वर्षीय व्यक्तीला ब्लॅक फंगस हा आजार झाला होता. त्याच्या मेंदूत ब्लॅक फंगस झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी तात्काळ पाटण्यातील गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर ब्रजेश कुमार यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांनी तीन तास शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत त्याच्या मेंदूतून क्रिकेट चेंडूएवढा ब्लॅक फंगस काढण्यात आला. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. पाटण्यातील व्यक्तीला करोनातून बरे झाल्यानंतर थकवा जाणवत होता. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांची त्याची तपासणी केली असता त्याला ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं. ब्लॅक फंगस त्याच्या नाकातून मेंदूपर्यंत पोहोचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुदैवाने त्याच्या डोळ्यांना काही इजा झाली नाही. "शस्त्रक्रिया खूपच गुंतागुंतीची होती. नाकावाटे ब्लॅक फंगस मेंदूपर्यंत पोहोचला होता. थोड्या प्रमाणात डोळ्यांना स्पर्श झाल्याचं दिसून आलं. तो मेंदूत वेगाने मोठा होत असल्याचं दिसून आल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर तीस तास शस्त्रक्रिया केल्यानंतर तो ब्लॅक फंगस काढण्यात यश आलं", असं डॉक्टरांनी सांगितलं. |
दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटतेसुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे. |
बीड : सध्याची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण हा संवेदनशील मुद्दा असल्याने, त्याबाबत कोर्टात चालू असलेली सुनावणी ही फास्ट ट्रॅक कोर्टात करावी, अशी मागणी भाजपचे विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी केली. परळीत अजूनही मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोहोचून सुरेश धस यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. "महाराष्ट्रात मराठा समाज ३२ टक्के आहे. सध्या या समाजामध्ये चीड आहे. तरुण आक्रमक झाले आहेत. समाजमन हललं आहे. या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी मी समाजासोबत आहे. सरकारने न्यायालयात अडीच हजार पानी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, ते पण ऑनलाईन उपलब्ध करावं, जेणेकरुन सरकारची भूमिका सर्वांसमोर येईल", असं सुरेश धस म्हणाले. |
शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामधील यड्राव येथे असणाऱ्या पार्वती औद्योगिक वसाहतीमधील प्रोसेसला क्लोजरची नोटीस देऊनही उद्योग सुरू ठेवल्याने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार महावितरणने पाच प्रोसेसचा वीजपुरवठा खंडित केला. यामध्ये मनपसंद, जुबली, बाहुबली, बिर्ला, आयको टॅक्स या पाच प्रोसेसचा समावेश आहे. त्यामुळे प्रोसेसधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणात कारणीभूत ठरल्याप्रकरणी जबाबदार उद्योजकांवर गेल्या महिनाभरापूर्वी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला होता. यातील काही प्रोसेसधारकांना कारणे दाखवा नोटीस तर काही प्रोसेस धारकांना क्लोजरची नोटीस बजावली होती. यड्राव मधील मनपसंद, बाहुबली, जुबिली, बिर्ला व आयको टॅक्स या प्रोसेसना क्लोजर नोटीस देण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार उपकार्यकारी अभियंता सुनील अकीवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिजीत बिरनाळे यांच्या पथकाने पाचही प्रोसेसचा वीज पुरवठा खंडित केला त्यामुळे या पाच प्रोसेसवर अवलंबून असणाऱ्या ६०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. |
पाकिस्तानी हेरास राजस्थानमधून अटक ! अशा देशद्रोह्यांना जोपर्यंत भरचौकात फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत असे कृत्य करणार्यांवर जरब बसणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ? अशा देशद्रोह्यांना जोपर्यंत भरचौकात फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत असे कृत्य करणार्यांवर जरब बसणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ? अमली पदार्थांनी पोखरलेला गोवा ! काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्यांचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांनी १५ सष्टेंबर या दिवशी अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध चालू आहे. पोलीस उपअधीक्षकांना १५ दिवसांत बदली करण्याची धमकी देणारा, तसेच पोलीस निरीक्षकांवर अरेरावी करणारा तोतया पोलीस संदीप लगड याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतात शांतता नांदायची असेल, तर पाकला नष्ट करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाक भारतविरोधी कारवाया करण्यात गुंतला असतांना भारत सरकार त्याच्या विरोधात कठोर पावले का उचलत नाही ? १ सप्टेंबर या दिवशी धर्मांध शेख हा येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता. तो कारागृहात असतांना त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला होता. शेख हा विलेपार्लेमधील बामनवाडा येथील रहिवासी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे 'धर्मांतर हेच राष्ट्रांतर' आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय स्तरावर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळी बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मल्ल्याळम् दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेत्री निमिषा बीजो आणि त्यांची मैत्रिण उन्नी यांना अटक केली आहे. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. बलात्कार करणार्यांना कठोर शिक्षा देऊन तिची कार्यवाही त्वरित केल्यासच गुन्हेगारांवर वचक बसेल. |
वाशी पासून ते वाशी खाडी पुलावर पोहचेपर्यन्त पन्नास मिनिटे लागली. वाहतूक कोंडी असूनही टोल नाक्यावर टोल वसूली सुरूच होती. त्यामुळे वाःतुकीचा वेग अधिक मंदावला होता. अशा वेळी काही काळ टोलवर सूट देणे गरजेचे होते. पाली : वाशी खाडी पुलावरील रस्त्याच्या कडेची लोखंडी जाळी तुटली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. 14) सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे. टोल नाक्याच्या अलीकडे दोन किमी पासून वाहणांच्या रांगा लागल्या आहेत. पुलावर रस्ता जोडण्यासाठी मधोमध आडव्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यातील एक पुलाच्या मध्यावरील कडेची जाळी तुटली असून खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहने बाजूने जात आहे. सध्या तिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाशी पासून वाशी टोल नाक्या पासून वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वाहणांच्या लांब रांगा लागल्या आहे. टोल नाक्यावर पुलावर जाळी तुटल्याच्या त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याच्या सुचना स्पीकरवर दिल्या जात होत्या. |
Tata Group Stock । टाटा उद्योग समूहातील बऱ्याच कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाल निशाणीवर ट्रेड करत होते. त्यापैकीच एक स्टॉक आहे,"व्होल्टास". टाटा उद्योग समूहातील Voltas कंपनीचा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. व्होल्टास कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून निम्म्या किंमतीवर आले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Voltas कंपनीचा शेअर 851. 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. Voltas कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 803. 60 रुपये आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1347. 65 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE - NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price । Voltas Stock Price । BSE 500575 । NSE VOLTAS) जर आपण व्होल्टास कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, आपल्याला समजेल की, Voltas कंपनीचे शेअर्स एका वर्षात 30 टक्क्यांहून जास्त पडले आहेत. तर मागील सहा महिन्यांत Voltas कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 14. 57 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या स्टॉकमध्ये 3. 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 1 जानेवारी 1999 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 13. 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 6272 टक्के परतावा कमावून दिला आहे. व्होल्टास शेअरवर तज्ञांचा सल्ला : व्होल्टास कंपनीच्या स्टॉकबद्दल तज्ञांच्या भावना संमिश्र आहे. 37 तज्ञापैकी फक्त 4 विश्लेषकांनी Voltas कंपनीचे शेअर्स त्वरित खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 11 तज्ञांनी स्टॉक पडल्यावर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 14 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर 6 जणांनी ताबडतोब स्टॉक विकून प्रॉफिट बुक करण्याचा म्हणजेच स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. दोन विश्लेषकांनी स्टॉक मध्ये थोडीफार वाढ झाल्यास विकण्याचा सल्ला दिला आहे. तिमाही निकाल परिणाम : 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत व्होल्टास कंपनीला 6 कोटी रुपयेचा तोटा सहन करावा लागला आहे. त्याचवेळी मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत Voltas कंपनीने 104 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर नुकताच संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत व्होल्टास कंपनीचे उत्पन्न 5. 5 टक्क्यांनी वाढले असून कंपनीने 1833 कोटी रुपयेची जबरदस्त कमाई झाली आहे. महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही. News Title। Tata Group Stock of Voltas company share price has fallen and stock price is at lowest level on 08 December 2022. Mankind Pharma Share Price । कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा शेअरने 5 दिवसात 11. 80% परतावा दिला, पुढे शेअर मोठा फायदा देणार? - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
विविध शुभप्रसंगी श्रीसत्शक्ति (सौ. ) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर दिसलेली शुभचिन्हे ! साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीमध्ये होणार्या दैवी पालटांमुळेही तिच्या देहावर शुभचिन्हे उमटतात. विविध यज्ञ-याग, धार्मिक विधी आणि सोहळे यांच्या प्रसंगी सनातनच्या श्रीसत्शक्ति(सौ. ) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर अनेक दैवी शुभचिन्हे दिसून आली. |
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडुन त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर दिले होते यावर प्रश्न विचारताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहे की मादी डास धोकादायक आहे. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का. . ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का . ? असे गमतीशीर प्रश्न विचारले... (बघा हा व्हिडिओ) |
औरंगाबाद : राज्यात १७ जिल्ह्यात लंम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, तसेच राज्यात लसीकरणावर (Vaccination) भर देण्यात येणार असून, परंतु लसीकरण अधिक गतिमान करा अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात लंम्पी स्कीन आजाराबाबत उपाययोजना संदर्भातील बैठक मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ८) पार पडली. या बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. बैठकीस कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, प्रादेशिक पशु संवर्धन सह आयुक्त संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड आदी उपस्थित होते. विभागातील जिल्हाधिकारी, राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. कृषिमंत्री सत्तार म्हणाले, की पशुधन दगावल्या जाणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. जनावरांसाठी आवश्यक तपासणी प्रयोगशाळा जिल्हास्तरावर अद्यावत कराव्यात. यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. आमदार बागडे यांनी जनावरांना योग्य वेळेत उपचार मिळावा, अशी सूचना मांडली. विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास प्राधान्य द्यावे. प्रयोगशाळा अद्यावत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. "राज्यात लंम्पी स्कीन आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी. लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींची उपलब्धता मुबलक प्रमाणात असावी. पशुधन मृत पावल्यास संबंधित पशुधन मालकास तातडीने जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून दहा हजारांची मदत द्यावी,अशा सूचनाही त्यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी यांना केल्या. लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांच्या वाहतुकीवरही बंदी आहे. त्याचबरोबर प्रशासनाने प्रभावीपणे उपाययोजना करून जनावरांचा मृत्यूदर कमी करावा," असेही विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
मीरा रोडमध्ये इमारतीला तडे : गृहसंकुलाला धोका । पुढारी\tTop\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मीरा रोडमध्ये इमारतीला तडे : गृहसंकुलाला धोका\nमीरा रोडमध्ये इमारतीला तडे : गृहसंकुलाला धोका\nPublished On: Aug 30 2018 2:20AM । Last Updated: Aug 30 2018 1:46AM\nमीरा रोड येथील हाटकेश भागातील चार इमारतींच्या ग्रीनवुड गृहसंकुलातील स्टर्लिंग कोर्ट इमारतीला मंगळवारी मधोमध तडे गेले. इमारत कोसळण्याची भीती लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत चारही इमारती रिक्त करून 82 कुटुंबीयांचे स्थलांतर केले आहे. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून बेघर झालेल्या कुटुंबीयांना एमएमआरडीच्या सदनिकांमध्ये स्थलांतरीत करण्याचे आदेश मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी दिले आहेत.\nमीरा रोडच्या हाटकेश भागात 2002 मध्ये सात इमारतींचे ग्रीनवूड गृहसंकुल उभारण्यात आले. त्यात एक सात मजली व अन्य चार मजली इमारती आहेत. या इमारती एकमेकांना लागून आहेत. त्यातील स्टर्लिंग कोर्ट इमारतीमधील माती पडत असल्याचा आवाज मंगळवारी संध्याकाळी रहिवाशांना आला आणि त्यांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी कळविले. अग्निशमन दल आणि पालिका अधिकार्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या मधोमध गेलेला तडा पाहून प्रशासनाने तातडीने या गृहसंकुलातील चारही इमारती रिक्त करण्याचा निर्णय घेतला.\nया इमारतींमधील 82 कुटुंबियांना सामान घरातच सोडून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संकुलाला लागूनच लोढा ग्रुपमार्फत होणार्या बांधकामाच्या पायलिंगचे काम सुरू असल्याने ग्रीन वूड संकुलाला हादरे बसत आहेत आणि त्यातून इमारतीला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार सोसायटीने तीन महिन्यांपूर्वी आयुक्त मीरा भाईंदर महापालिका, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीमीरा पोलीस ठाणे यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीकडे कुणीच लक्ष दिले नाही.\nपुन्हा सोसायटीच्या पदाधिकार्यांनी महापौर डिंपल मेहता तसेच आमदार नरेंद्र मेहता, आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र अपेक्षित दखल घेण्यात न आल्याने आमच्यावर ही वेळ आली, असा आरोप बेघर झालेल्या रहिवाशांकडून केला जात आहे. दरम्यान महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रहिवाशांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पोलिसांनी घटनास्थळी दंगल विरोधी पथक तैनात केले आहे. अग्निशमन दलाचे जवान सुद्धा मंगळवारी रात्रीपासूनच लक्ष ठेवून आहेत. |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते. यावेळी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार उतरवला आहे. शिंदे गटाचा त्यांना पाठिंबा आहे. अंधेरी मतदारसंघात मराठी मतेही भरपूर आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे भाजप - शिंदे गटाला पाठिंबा देणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांची भाजप आणि शिंदे गटासोबत जवळीक वाढली आहे. यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यांनतर राज ठाकरे वर्षावर गेले होते. त्यातच मुंबई महापालिका निवडणूकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीला शह देण्यासाठी शिंदे गट - भाजप आणि मनसे तिघेही एकत्र येणार का अशा चर्चाना उधाण आलं आहे. |
त्रयकाराच्या महायान बौद्ध शिकवणानुसार , "तीन शरीर", एक बुद्ध परिपूर्ण आहे परंतु सर्व प्राण्यांच्या मुक्तिसाठी कार्य करण्यासाठी त्यास स्वरूप आणि सामनेच्या जगामध्ये प्रकट होते. हे साध्य करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे बुद्धांच्या तीन शरीरे आहेत, जसे धर्माकाय, सांभोगाकाय आणि निर्मन्या . धर्मेक्य संपूर्ण आहे; विश्वाचा सार; सर्व गोष्टी आणि प्राणी एकता, unmanifested. धर्माकाय अस्तित्वात किंवा अस्तित्वात नसल्यामुळे आणि संकल्पनांच्या पलीकडे आहे. उशीरा चोग्यम त्रुंगाने धर्माकाय म्हटले "मूळ जन्मजात". इतर शरीराशी संबंधीत धर्माकाय समजणे सोपे होऊ शकते. धर्माक्षय ही वास्तविकतेचा मूळ आधार आहे, ज्यापासून सर्व गोष्टी घडतात. नर्मनक्य म्हणजे देह आणि रक्त भौतिक शरीर. सांघोगाकाय मध्यस्थ आहे; तो परोपकारी किंवा पुर्ण शरीर आहे जो ज्ञानाच्या संपूर्णतेचा अनुभव करतो. दुसरा मार्ग ठेवा, धर्माकायची कधीकधी एकेक किंवा वातावरणाशी तुलना केली जाते; सांघोगाकाची तुलना बादलांशी केली जाते, आणि निरीक्षणे पाऊस असते. वाडोर्स ऑफ द नॅचरल माईंडः द सार ऑफ द नॅचरल दिंडः द सार इन द नेटिव बॉन परंपरा ऑफ तिब्बत (स्नो लिओन, 2000), तेनज़िन वांग्याल रिनपोछे ने लिखा, "धर्माकाय ही वास्तविकता की प्राकृतिक अवस्था का शून्यता है, संयोगशास्त्र स्पष्टता है नैसर्गिक अवस्था; निरमनाकाय म्हणजे शून्यता आणि स्पष्टतेच्या अविभाज्यतेतून उर्जा उत्पन्न होणारी आहे. " हे समजणे महत्त्वाचे आहे की धर्मेयका स्वर्गाप्रमाणे नाही, किंवा जेव्हा आपण मरतो तेव्हा किंवा आपण "ज्ञानीपणा" प्राप्त करतो. हे आपल्यासहित सर्व अस्तित्वाचे आधार आहे. हे सर्व बौद्धांचे आध्यात्मिक शरीर किंवा "सत्य शरीर" देखील आहे. धर्माकाय नेहमीच उपस्थित असतो आणि सर्वत्र पसरतो हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तो स्वतःच प्रकट होऊ शकत नाही, परंतु त्यातून सर्व प्राणिमात्र प्रकट होतात. हे बुद्ध निसर्ग आणि सूनाटा , किंवा शून्यता सह समानार्थी अनेक प्रकारे आहे. धम्मकाय शब्द किंवा धर्म-शरीर, लवकर शास्त्रवचनांमध्ये आढळू शकतात, ज्यात पली सुत्ता-पिटाक आणि चिनी केनॉनचा अगम्यांचा समावेश आहे. तथापि, मूळ शब्दाचा अर्थ "बुद्धांच्या शिकवणुकीचा" असा होता. ( धर्माचे अनेक अर्थांचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी, " बौद्ध धर्मातील धर्म काय आहे ? " पहा) धम्मकाया शब्दांचा कधीकधी वापर केला जातो की बौद्धांचे शरीर हे धर्मांचे मूर्त रूप आहे. महायान बौद्ध धर्मातील धर्मप्रसाराचा सर्वात आधीचा वापर प्रज्ञापारम्य सूत्रांपैकी एक आहे, अ Astasahasrika प्रज्ञापारमितासूत्रा, ज्याला 8000 लाईन्समध्ये 'द प्राप्ति ऑफ विज्डम' म्हणतात. अ Astasahasrika एक आंशिक हस्तलिखित रेडिओरोशिन 75 सीई करण्यासाठी दिनांक होते. चौथ्या शतकात, योगकाकाराच्या तत्त्वज्ञांनी त्रिकैया शिकवण विकसित केले, तसेच धर्माक्षय आणि निर्मन्याबरोबर एकत्र बांधण्यासाठी सांघोगाकायची कल्पना मांडली. |
पणजी : सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. कुणी हिमाचल प्रदेशला जातंय, कुणी कोकणात जातंय, कुणी केरळ तर कुणी गोव्याला जात आहे. तुम्हीही गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिथे गेल्यावर कोणत्याही पर्यटकाबरोबर तुम्हाला विनापरवानगी सेल्फी किंवा फोटो घेता येणार नाही. त्या पर्यटकाच्या प्रायव्हसीची काळजी घेऊन परवानगी घेणं आवश्यक आहे. याबाबत आता नवी गाईडलाईन्स सरकारकडून जारी करण्यात आली आहे. ही नवी गाईडलाईन्स गोवा पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भाग आहे. याचा उद्देश पर्यटकांच्या गोपनीयतेचं रक्षण करणं, त्यांची सुरक्षितता जपणं आणि अनैतिक घटना टाळणं, तसंच त्यांची फसवणूक होऊ नये हा आहे. कोणत्याही पर्यटकासोबत सेल्फी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी आधी त्याची परवानगी घ्या, विशेषतः तुम्ही ज्या व्यक्तिसोबत सेल्फी किंवा फोटो घेणार असाल ती व्यक्ती जर समुद्रात पोहत असेल किंवा सनबाथ घेत असेल तर त्याच्या प्रायव्हसीचा आदर करा असं जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एवढच नव्हे तर अपघात टाळण्यासाठी खडकाळ भाग आणि समुद्रातल्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यासही पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. गोव्याला भेट देणाऱ्या प्रवाशांनी भिंतीवर काहीही लिहून वारसास्थळांची नासधूस किंवा नुकसान न करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. स्मारकं विद्रूप करण्याचा प्रयत्न करू नये, असंही म्हटलं आहे. "बेकायदा खासगी टॅक्सी भाड्याने घेऊ नका. जास्त भाडं आकारणं टाळण्यासाठी मीटरच्या भाड्यानेच प्रवास करा," असंही त्या अॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सरकारने सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. एवढंच नाही तर पर्यटकांनी नोंदणीकृत असलेली हॉटेलच राहण्यासाठी बुक करावीत तसेच उघड्यावर किंवा समुद्र किनारी मद्यपान करून नये. मद्यपान करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नव्या गाईडलाईन्समध्ये म्हटल आहे. गोव्यात दर वर्षी लाखो पर्यटक देशभरातून आणि विदेशातून पर्यटनासाठी येतात. त्यांनी परिवहन विभागाकडे नोंदणीकृत नसलेली आणि ज्यांच्याकडे वैध परवानगी नाही अशी खासगी वाहनं भाड्यानं घेणं, कॅब, दुचाकी भाड्याने घेणं टाळावं, असं सांगण्यात आलं आहे. पर्यटकांना समुद्रपर्यटन बुकिंगसाठी बेकायदा टाउट किंवा एजंट्सकडून बुकिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनी अशा सेवांचं बुकिंग करताना पर्यटन विभागाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा आग्रह धरला पाहिजे आणि अशा सेवा फक्त नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट किंवा नोंदणीकृत ऑनलाइन पोर्टलवरून बुक कराव्यात, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
भाजपात 'दादा'गिरी - Dr.Yuvraj M Pardeshi\nHome Political भाजपात 'दादा'गिरी\nभाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्याच्या राजकारणात 'दादा' म्हणून ओळखले जाणारे चंद्रकात पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभेची निवडणूक भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार हे निश्चित झाले आहे. राज्यात क्रमांक दोनवरील नेते म्हणून ओळखले जाणार्या दादांनी मराठा आरक्षणाचा विषय कुशलतेने हाताळला, नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला यश मिळवून देण्यासाठी कंबर कसली होती. तसेच बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवरा उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या बालेकिल्ल्यातच कोंडी केली होती. पाटील यांच्या रणनीतीमुळे भाजपाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळाले. याची पुनरावृत्ती राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी भाजपाने चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळण्याची चतुर खेळी खेळली आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होवून ऑक्टोबर मध्यापर्यंत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदावर दानवेंना कायम ठेवले जाईल असे वाटत होते. मात्र दानवेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाकडून तातडीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात प्रदेशाध्यक्षपदी दादांची वर्णी लागली आहे.\nअवघ्या काही वर्षात दादा राजकारणाच्या रंगात रंगले\nवयाच्या १८ व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करणारे दादा २००४ साली भाजपात सामील झाले, २०१३ साली ते पक्षाचे उपाध्यक्ष झाले व जून २०१४ साली महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. जुलै २०१६ पासून ते महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या नंतर चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले क्रमांक दोनचे मंत्री झाले. मितभाषी, कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे. आयुष्याचा मोठा काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि विद्यार्थी परिषदेत गेलेला. त्यामुळे राजकारण्यांची गेंड्याची कातडी दादांना कधी आली नव्हती. दादा प्रकाशझोतात आले तेव्हा ते राजकारणात कसे फिट बसतील? असा प्रश्न विचारला जावू लागला. नैतिकता वगैरे गोष्टी इतर संघटनेत ठिक असतात. राजकारणात त्याचे काही चालत नाही हे दादांना त्यावेळी ऐकवले जावू लागले. आपल्या वक्तव्यांमुळे वाद झाला तर त्याचा विपर्यास केला गेला, आपण असे बोललोच नाही, विरोधकांचा कट होता ही खास राजकारण्यांची स्टाईल दादांना तोपर्यंत माहित नव्हती. पण अवघ्या काही वर्षात दादा राजकारणाच्या रंगात पूर्णपणे रंगले. आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी मंत्रिपदाच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात दाखवून दिले.\nभावी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाव\nयाकाळात मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार्या भूमिका व विधानांमुळे ते बर्याचदा चर्चेत देखील राहिले. भावी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव घेतले गेले. विशेषतः राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटला असतांना देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची चर्चा सुरु झाली होती. यावेळी दादांचे नाव आघाडीवर होते, मात्र त्यांनी त्यावर कधीच भाष्य केले नाही. मराठा आरक्षणासाठी एकूण ५७ मोर्चे निघाल्यानंतर जनभावनेचा विचार करुन राज्य सरकारने सुरुवातीला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन, तसा अध्यादेश काढला. यानंतर सुरु झालेल्या न्यायालयीन लढाईत डॅमेज कंट्रोलची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकातदादांकडे सोपवली. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारे, संवैधानिक पातळीवर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेऊन मागासवर्ग आयोगाकडे हे प्रकरण सोपवल्यानंतर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत त्यातील सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मराठा समाजातील तळमळीचे नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नियुक्त केली. दादांनी दुसर्या दिवसापासून मराठा आरक्षणापूर्वी मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक, नोकर्यांमध्ये भेडसावणार्या अडचणी दूर करण्यासाठी काम हातात घेतले. मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक सोईसुविधा मिळाव्यात यासाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवली. यासह तातडीने अनेक धाडसी निर्णय घेत मराठा तरुणांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची नवी दारे खुली करुन दिली. याशिवाय, अनेक गरीब कुटुबांतील मुलांना एमबीबीएस, बीडीएस सारख्या अभ्यासक्रमांमधून शिक्षण घेण्याची इच्छा मराठा आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येत होती. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांसाठी दादांनी अनेक सकारात्मक निर्णय घेत मराठा समाजातील तरुणांना दिलासा दिला. हा किचकट विषय कुशलतेने हाताळल्यानंतर दादांचे राजकीय वजन वाढले.\nअशातच दादांनी मुख्यमंत्री अडचणीत येतील अशी काही विधाने केल्याने दादा विरुध्द मुख्यमंत्री असे चित्र निर्माण झाले होते. या विषयात अनेक नाट्यमय वळणे आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भूखंड घोटाळ्याचे आरोप केल्याने दादांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा जुळवून घेतल्यानंतर हा वाद शमला. मराठा आरक्षणाचा विषय असो की खड्ड्यांचा, भाजपामध्ये प्रवेश करणार्या आयारामांचा की दूधाच्या आंदोलनाचा... दादांच्या वक्तव्यांनी अनेकदा वाद निर्माण केले. पण दादांचा दबदबा मोठा असल्याने परिस्थिती हाताबाहेर कधी गेली नाही आणि दादांनीही मनाचा मोठेपणा दाखवत दिलगीरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता भाजपात 'दादा'पर्वाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळवण्याचा करिष्मा करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून पक्षाला आहे. आधीच पक्षात मोठे वजन असणार्या मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधत कधी कधी अंगावर धावून येणार्या शिवसेनेलाही सांभाळण्याची कसरत दादांना करावी लागणार आहे. भाजपाने मराठा कार्ड खेळले असले तरी आता भाजपासह राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष हे पश्चिम महाराष्ट्रातीलच असून, तिघेही मराठा समाजाचे आहेत. |
पुणे शहराचा 'स्मार्ट सिटी' आराखडा प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेत मांडला, मात्र त्याला महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेससह मनसेने तीव्र विरोध केल्याने सभा तहकूब करण्यात आली. पुणे - पुणे शहराचा 'स्मार्ट सिटी' आराखडा प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेत मांडला, मात्र त्याला महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेससह मनसेने तीव्र विरोध केल्याने सभा तहकूब करण्यात आली. स्मार्ट सिटी आराखडा १५ डिसेंबपर्यंत केंद्राकडे पाठवणे आवश्यक होते, परंतु सभा तहकूब झाल्याने आराखडा केंद्राकडे पाठवण्यास अडथळा येणार आहे. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळल्यात जमा आहे. पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश झाल्यापासून प्रशासनाच्या वतीने शहराचा स्मार्ट सिटी आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या योजनेत निवड झालेल्या शहरांतून अंतिम १० शहरांच्या स्पध्रेत उतरण्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यास १५ डिसेंबरची अंतिम मुदत आहे. असे असताना महापालिकेत या विषयावरून बोलावण्यात आलेली सर्वसाधारण सभा ४ जानेवारीपर्यंत तहकूब करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मांडण्यात आला. मनसेनेही या तहकुबीला पाठिंबा दिला. स्मार्ट सिटी योजनेवरून मनसे आक्रमक झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही याला विरोध दर्शवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने एकत्र येत सभा तहकुबीच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सभा तहकूब करावी लागली. आता पुढील सभा ४ जानेवारी रोजी आहे. परिणामी स्मार्ट सिटीचा अहवाल केंद्राकडे न जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेत देशातील १०० शहरे सहभागी होणार असली, तरी त्यात स्पध्रेतील सर्वोत्कृष्ट १० शहरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याचसाठी महापालिकांकडून अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारने मागितले आहेत. हे प्रस्ताव १५ डिसेंबपर्यंत केंद्राकडे पोहोचणे अपेक्षित आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेला महापालिकेत राजकीय विरोध सुरू झालेला असल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी थेट कृष्णकुंज गाठले होते. महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस सत्तेत आहेत. या दोन्ही पक्षांनी या योजनेच्या आर्थिक तरतुदीवरून यापूर्वीच नाराजी नोंदवलेली आहे. मोठा गाजावाजा केलेल्या या योजनेसाठी केवळ शंभर कोटी रुपये दिले जाणार असल्याचे या पक्षांचे म्हणणे आहे. या योजनेमुळे महापालिकेची स्वायतत्ता टिकणार नाही, अशी शिवसेनेचीही नाराजी आहे. |
१. रंध्रता (Porosity) - या संज्ञेचा उल्लेख मागील लेखात आलाच आहे. याचा अर्थ आहे खडकांमध्ये असलेली अशी छिद्रे, ज्यांच्यातून द्रवपदार्थ वाहू शकतील. रंध्रता जेवढी जास्त, तेवढी खडकांमधील छिद्रे जास्त आणि तेवढाच द्रवपदार्थांचा प्रवाहही जास्त. गाळाच्या खडकांची रंध्रता सर्वात जास्त असते, तर अग्निजन्य खडकांमध्ये ती सर्वात कमी असते. २. पारगम्यता (Permeability)- खडकांची अशी स्थिती, ज्यात खडक आपल्या छिद्रांमधून किंवा रंध्रांमधून द्रवपदार्थ प्रवाहित होऊ देते. आता आपण खडकांच्या पाण्याचा प्रवाह झेलण्याच्या क्षमतेचा अभ्यास करू. या क्षमतेवरूनही काही संज्ञा तयार करण्यात आल्या आहेत. त्या आपण आता पाहू. १. जलवाहक (Aquifer) - याचा अर्थ खडकांचा असा संच, जो भूजलाने संतृप्त झालेला आहे आणि यात विहीर खणल्यास आपल्याला वापरासाठी पाणी मिळू शकते. २. विजलवाहक (Aquiclude) - याचा अर्थ खडकांचा असा स्तर, ज्याची रंध्रता चांगली आहे आणि त्याच्यात पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. मात्र, याच्या इतर वैशिष्ट्यांमुळे यात पाण्याचा प्रवाह सोपा आणि वेगवान नाही. ३. अजलवाहक (Aquifuge) - खडकांचा असा संच, जो पूर्णपणे अपारगम्य आहे आणि ज्यात कोणत्याही प्रकारे पाण्याचा भूजलाचा साठा होऊ शकत नाही. ४. गळणारा जलवाहक - (Leaking aquifer OR Aquitard) - याचा अर्थ असा जलवाहक किंवा विजलवाहक, जो निर्माण झालेल्या भेगांमुळे गळायला लागला आहे. जगात जेवढे भूजलाचे ज्ञात स्रोत आहेत, ते या चार संज्ञांपैकी एकामध्ये बसतातच. भूजलाचे हे जे साठे असतात, म्हणजेच जलवाहक, ते एखाद्या टाकीसारखेच असतात, पण नैसर्गिक. साधारणपणे हे जलवाहक रंध्रित खडकांमध्ये सापडतात. आता आपण या जलवाहकाचे प्रकार बघू. १. बंदिस्त जलवाहक (Piezometric Surface) - जे जलवाहक सर्व बाजूंनी अपारगम्य खडकांमध्ये अडकलेले असतात, त्या जलवाहकांना 'बंदिस्त जलवाहक' म्हणतात. या जलवाहकांमध्ये पाण्याचा दाब फार जास्त असतो आणि यात विहीर खणल्यास चांगल्या दाबाने पाणी मिळते. या जलवाहकाच्या वरच्या पृष्ठभागाला 'पिझोमेट्रिक पृष्ठभाग' (Unconfined Aquifer), असे म्हणतात. २. अप्रतिबंधित जलवाहक (Atmospheric Pressure) - या जलवाहकाला 'जल-सपाटी जलवाहक' असेही म्हणतात. हा प्रकार जगात सर्वत्र आढळतो. या जलवाहकामध्ये पाणी हे वातावरणीय दाबामध्ये (Free Groundwater) असते. या जलवाहकामधील भूजल हे कोणत्याही अतिरिक्त दाबाखाली नसल्यामुळे या जलसाठ्यामध्ये असलेल्या भूजलाला 'मुक्त भूजल' असे म्हटले जाते. वापरली जाते, जी त्या क्षेत्राच्या सरासरी जलसपाटीपेक्षा वेगळी पडली (Water Table) आहे. अशी परिस्थिती मोठ्या पारगम्य जलवाहकामध्ये थोडासा भाग अपारगम्य असल्यास त्यात पाणी अडकून राहिल्यामुळे निर्माण होते. या स्थितीमध्ये या क्षेत्राची सरासरी जलसपाटी ही अधिश्रित जलवाहकाच्या जलसपाटीपेक्षा बरीच खाली असू शकते. ४. आर्टेशियन जलवाहक (Artesian Aquifer) - हा असा जलवाहक आहे, ज्याचा पिझोमेट्रेक पृष्ठभाग हा कायम जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर असतो. अशा जलवाहकांमध्ये विहीर खणली असता त्यातून पिझोमेट्रिक पृष्ठभागाच्या उंचीच्या बरोबरचा पाण्याचा फवारा उडू शकतो. अशा विहिरींना 'आर्टेशियनविहिरी' (Artesian Well) असे म्हणतात. तर, आपण जलवाहकांचे म्हणजेच जलसाठ्यांचे प्रकार बघितले. आता आपण या भूजलाचा शोध कसा लावावा हे बघू. भूजलाचा शोध घेण्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. या पद्धतींना भूशास्त्रीय पद्धती आणि भूभौतिकीय पद्धती अशा दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. यांची एक एक करून माहिती घेऊ. अ. नकाशे (Maps) - नकाशांचा वापर करून भूजलाचे शक्य असलेले सगळे साठे शोधता येतात. नकाशाचा वापर करून एकदा शक्य असलेले साठे निर्धारित केले की, मग इतर पद्धतींचा वापर करून पाण्याचा साठा आहे की नाही हे नक्की करता येते. या नकाशांमध्ये पाण्याची खोली, पृष्ठभागाचा आणि पृष्ठभागाखालील जमिनीचा उतार, अशा गोष्टी असतात. आ. हवेतून काढलेली छायाचित्रे (Aerial Photographs) या छायाचित्रांमार्फत एखाद्या क्षेत्रामध्ये भूजलाचे अस्तित्व आहे की नाही, हे ठरवता येते. खडकांच्या प्रकारावरून त्यात पाणी आहे की नाही हे शोधता येते, तसेच पृष्ठभागाच्या रंगावरूनही पाण्याचा शोध लावता येतो. उदाहरणार्थ, जर जमिनीखाली भूजल असेल, तर ही शक्यता आहे की, पृष्ठभागावर थोडासा ओलावा असेल. या कामासाठी कृत्रिम उपग्रहांचाही (Artificial Satellites) वापर केला जातो. इ. ड्रिल परीक्षण (Drill Testing) - एकदा नकाशे आणि छायाचित्रांवरून भूजलाचे अस्तित्व सिद्ध झाले की, त्या भागामध्ये परीक्षण ड्रिलिंग केले जाते. ड्रिलिंगमधून काढलेल्या खडकांच्या नमुन्याचे परीक्षण करून खडकांची वैशिष्ट्ये, त्यांची पाणी वहन करण्याची क्षमता, तसेच भूजलाची गुणवत्ता यांचा शोध घेतला जातो. अ. विद्युत पद्धती (Electrical Methods) - सारांशरूपामध्ये सांगायचे झाले, तर या पद्धतीमध्ये 'पाण्याचा विद्युतरोध शून्य असतो' या सिद्धांताचा वापर करून जमिनीमध्ये ठराविक विभवांतराचा (Voltage) विद्युतप्रवाह सोडला जातो. पृष्ठभागावर प्रत्येक थोड्या अंतरावर विद्युत विभवांतर मोजणारी यंत्रे (Voltage Measuring Devices) लावली जातात. खडकांमध्ये असलेल्या विविध खनिजांवरून त्यांचा विद्युतरोध बदलतो. यामुळे खडकांमधून जाणार्या विद्युतप्रवाहाचे विभवांतर बदलते. या गोष्टींची नोंद विभवांतर मोजणार्या यंत्रांमध्ये केली जाते आणि त्यांचा आलेख तयार करून भूजलाच्या खोलीचे मापन केले जाते. आ. भौकंपिक पद्धती (Seismic Methods) - जेव्हा भूकंप होतो, तेव्हा त्यातून विविध प्रकारच्या भूकंप लहरी निर्माण होतात, हे आपण पाहिलेच आहे. आता प्रत्येक वेळेला भूकंप होण्याची वाट बघणं अतार्किक ठरेल. म्हणून भूकंपलहरी कृत्रिमरीत्या जमिनीत सोडल्या जातात. या लहरी खडकांच्या प्रत्येक स्तरावर आपटून थोड्या परत येतात आणि थोड्या खालच्या स्तरात जातात. या लहरी मोजण्यासाठीही भूकंपलहरी मोजणारी यंत्रे (Geophones) दर थोड्या अंतरावर जमिनीत लावली जातात. भूकंपलहरी या ध्वनिलहरींसारख्या असल्यामुळे किती अंतर पार करायला त्यांना किती वेळ लागला, हे सोप्या गणिताने शोधून काढता येते. यावरून खडकांच्या विविध स्तरांची खोली काढता येते. जेव्हा या लहरी पाण्यावर आदळतात, तेव्हा त्यांची वागणूक थोडी बदलते. ही वागणूक आलेखावर दिसते, आणि भूजलाचा शोध लावता येतो. इ. गुरुत्वमापन पद्धत (Gravimetric Method) - गुरुत्वाकर्षण हे विश्वातले सगळ्यात क्षीण बल आहे. न्यूटनच्या गुरुत्वीय नियमाप्रमाणे (Newton's law of gravity) जेवढी एखाद्या गोष्टीची घनता जास्त, तेवढे तिचे वजन जास्त आणि तेवढीच तिची गुरुत्त्वताही (Gravity) जास्त. याच नियमाचा वापर करून खडकांची गुरुत्वता शोधून काढता येते. जर जमिनीखाली एकाच प्रकारचा खडक असेल, तर त्याची गुरुत्वता सर्व ठिकाणी सारखीच असली पाहिजे. पण जर तिथे जलवाहक असेल, तर मात्र त्या क्षेत्राची गुरुत्वता बाकी क्षेत्राच्या सरासरी गुरुत्वतेपेक्षा कमी असेल. यावरूनच भूजलाचा शोध घेतला जातो. ई. विद्युतचुंबकीय पद्धत (Electromagnetic Method) - या पद्धतीमध्ये अतिउच्च वारंवारतेच्या लहरी (High Frequency Waves - १००MHz) जमिनीत सोडल्या जातात. या लहरीही स्तरांच्या सीमांवर उलटतात आणि यांची नोंद या लहरी मोजणार्या यंत्रांमध्ये होते. या पद्धतीनेही भूजलाचा शोध घेतला जातो. तर, अशा पद्धतींमार्फत आपण भूजलाचा शोध घेतो. आता इथे आपण थांबू आणि पुढील भूजलाबद्दलच्या आणि भूशास्त्राच्या शेवटच्या लेखात आपण विहिरी, झरे तसेच दर दिवशी कमी होणारे भूजलाचे साठे परत कसे भरता येतील यांची माहिती घेऊ. (लेखक हे नागरी अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठातून भूभौतिकीय अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही घेत आहेत. तसेच अमेरिकेतील त्यांच्या सहकार्यांबरोबरच तेथेच त्यांचे शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.) |
अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, प्रा. अशोक डोंगरे, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, शहराध्यक्ष संतोष जाधव, गणेश बागल, महेश साठे, अमोल वाघचौरे, ऋषीकेश शेलार, ओंकार चौधरी आदि उपस्थित होते. जिल्हा महासचिव राजू शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची माहिती दिली. |
४६ सहस्र पुस्तकांचे केले प्रकाशन ! भिवानी (हरियाणा) - हरियाणा शैक्षणिक बोर्ड राज्यातील सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना वैदिक गणित शिकवणार आहे. त्यासाठी १८ लाख रुपये खर्च करून ४६ सहस्र पुस्तके प्रकाशित केली आहेत. हरियाणा विद्यालय शैक्षणिक बोर्डाचे अध्यक्ष जगबीर सिंह यांनी यासंदर्भात सांगितले की, शैक्षणिक बोर्डाच्या वैदिक गणिताच्या अभ्यासक्रमाला हरियाणा विद्यालय शिक्षा निदेशालयाकडून अजूनपर्यंत स्वीकृती मिळाली नसली, तरी बोर्डाच्या संचालक मंडळाने यास अनुमती दिली आहे. सिंह म्हणाले की, वैदिक गणितामुळे विद्यार्थ्यांना पुष्कळ लाभ होणार आहे. वैदिक गणित शिकवण्यासाठी राज्यातील ११९ खंडांतील प्रत्येक खंडात तीन शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत नववी ते बारावी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवण्यात येईल. त्यामुळे त्यांना गुणाकार, भागाकार, तसेच अंकमोजणी करण्यासाठी कागद-लेखणीची आवश्यकता रहाणार नाही, तर ते बोटांवरच सर्व गणना करू शकतील, असेही सिंह म्हणाले. हरियाणा शैक्षणिक बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! आता अन्य भाजपशासित प्रदेशांनीही अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वैदिक म्हणजेच प्राचीन गणिताचे धडे देऊन स्पर्धात्मक युगामध्ये यश संपादन करण्यासाठी साहाय्य करावे, असेच हिंदूंना वाटते ! |
दिघी येथील संस्थेच्या रोपवाटिकेत पार पडलेल्या सोहळ्यात अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण संशोधक डॉ. सचिन पुणेकर, केंद्रीय भूजल विभागातील संशोधक आणि सहज जलबोधकार उपेंद्रदादा धोंडे,विजय वाळके, डॉ. अभय कुलकर्णी, उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, माझ्या एकट्याच्या कामाने काय फरक पडतो हा विचार सोडून देवून काम सुरू ठेवले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. बेडेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले.पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्रातील पर्यावरण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि आपला राज्य वृक्ष आंबा या वृक्षाचे पूजन करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष किरण घोटकुले यांनी गेल्या वर्षभरात संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, त्यातील अंकुर आणि वृक्ष परिचय या उपक्रमाना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला होता.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मारुती साळुंखे यांनी केले होते तर आभार राहुल घोलप यांनी मानले. |
या अनेकविध विषयांना हात घालणारा हा निबंधसंग्रह डॉ. राजा दीक्षित यांनी हाताळलेल्या विषयवैविध्याच्या व्यापतेला अनुरूप असा आहे. पुस्तकात काही ठिकाणी इंग्रजी वाक्यरचनांमधील विस्कळीतता किंवा अनवधानाने राहून गेलेल्या काही त्रुटी क्वचित दिसून येतात. मात्र बंगाली बुद्धिजीवित्वाच्या तुलनेत मराठी सामाजिक अभ्यासविश्व काहीसे संकुचित भासत असले, तरी अशा प्रकारचे संग्रह आणि लेखन यांच्यात सातत्य राखल्यास, त्याला शासकीय स्तरावरून यथायोग्य साहाय्य झाल्यास मराठी अभ्यासकवर्गाला, समाजशास्त्रे शिकणाऱ्या ताज्या दमाच्या विद्यार्थिवर्गाला हुरूप येईल याविषयी शंका नाही. |
अशा 'वेबसिरीज'वर बंदी घाला ! - सनातन प्रभात\nसनातन प्रभात > Post Type > फलक प्रसिद्धी > अशा 'वेबसिरीज'वर बंदी घाला !\nअशा 'वेबसिरीज'वर बंदी घाला !\n'पाताल लोक' या 'वेबसिरीज'मध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. यामध्ये 'एक हिंदु महाराज एका हिंदु राजकारण्याला मांसाहार देत असून तो गायीवर बसलेल्या देवीच्या चित्रासमोर बसून मांसाहार खात आहे', असे दृश्य दाखवण्यात आले आहे. |
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कंगनाने गतवर्षी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृतिक रोशनवर हल्लाबोल करताना त्याच्यावर थेट फसवणुकीचा आरोप लावला होता. तसेच कंगनाने हृतिक आणि आपल्यामध्ये काही ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे देखील सांगितले. त्यावेळी थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर कंगनाने हृतिकवर आरोप लावल्याने बॉलिवूडमध्ये मोठे वादंग देखील उठले होते. दरम्यान, आता याच प्रकरणावरून अभिनेता हृतिक रोशनला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स पाठवले आहेत. मुंबई पोलिसांनी हृतिकला उद्या (२७ फेब्रुवारी) जबाब नोंदवण्यासाठी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकासमोर (सीआययू) हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात ही चौकशी केली जाणार आहे. हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात क्रिश सिनेमाच्या दरम्यान प्रेमसंबंध जुळले होते. मात्र पुढे या दोघांचं अफेयर आणि ब्रेक अप दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या. या दोघांनी एकमेकांवर बरीच चिखलफेकही केली होती. दरम्यान, कंगना गेल्या महिन्या भरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोलिंगची शिकार होत असल्याचे दिसून येत आहे. |
फ्रान्स देशासंबंधानें ह्मणावयाचें ह्मणजे, ज्याच्या राज्यविशारदतेमुळेंच चवदाव्या लुईला नाशकारक लढायांचें सत्र सारखें चालू ठेवितां आलें, त्या बुद्धिवान, मुत्सद्दी व राजकार्यनिपुण, अशा प्रधानाच्या - ह्मणजे कालबर्टच्या - कारकीर्दीत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा जन्म झाला. कालबर्ट याची कारकीर्द ( जन्म इ. सन १६१९ मृत्यु १६८३ ) फ्रान्सच्या इतिहासाच्या दृष्टीचें अत्यंत महत्त्वाची गणली गेलेली असून त्याच्याच अमदानीत शेती, कठाकौशल्य व व्यापार, यांना उत्तेजन मिळालेले आहे. परंतु त्याच्या मतांना एकदम व जोरानें वळण दिले गेल्यामुळे हिंदुस्थानांतील फ्रेंच कंपनीच्या वर्मी घाव बसला; आणि जरी तिला - पन्नः स वर्षांचा व्यापारी कुमक्ता, पहिल्या दहा वर्षांत सरकारदेण्याची माफी, त्या मुदतीत नुकसान झाल्यास भरपाई होण्याची हमी, कंपनीच्या साठ लक्षांच्या भांडवलाचा पांचचा हिस्सा दिल्याचें अभिवचन, - हीं मिळालेलीं होतीं, तरी त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपयोग न होतां उलट तीच मदत या जग्या " कंपनीच्या नाशास कारणीभूत होऊन बसली. तथापि हिंदुस्थानांत एके काळी फ्रान्सनें मद्रास इलाख्यांत व निझामच्या आणि शिंद्याच्या दरबारांत आपलें राजकीय वर्चस्व परमावधीस नेलें होतें. परंतु दळणवळणाच्या साधनांचा अभाव, सैन्यसामग्रीचा तुटवडा, आपसांतील दुफळी, अव्यवस्थित व अनियंत्रित राज्यकारभार, सांपत्तिक ओढाताण, व राष्ट्रीय हितसंबंधाची अनास्था, वगैरे कारणांमुळे फ्रान्सचें हिंदुस्थानांतील वर्चस्त्र नाहींसें होऊन हल्ली त्यांच्या ताब्यांत चंद्रनगर, माहे, यानान, कारीकल, आणि पांदेचरी, एवढींच काय ती फक्त पांच ठिकाणें राहिलेली आहेत. ब्रिटिश राष्ट्राच्या इतिहासांत इलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीचा काळ (इ. सन १९९८ - १६०३ ) हा पुष्कळ दृष्टीनें अत्यंत महत्वाचा असून त्या काळांतच त्रिटिश राष्ट्रीय व्यापाराची, आरमाराची व वाङ्मयाची संस्मरणीय अशी वाढ झालेली आहे; व्यापार, वसाहती व विदेशगमन, यांसंबंधीं धाडशी कृत्ये करण्याच्या इच्छेबरोबरच कष्टमय जलपर्यटणे करून लांब लांबच्या देशांत जाऊन आपलें नशीब काढण्याच्या प्रयत्नांनाही याच वेळीं जोराची अशी चेतना मिळालेली आहे; याच राणीच्या कारकीर्दीत एका इंग्लिश मनुष्यानें - ह्मणजे सर फ्रान्सिस ड्रेक यानें - अगदी पहिल्यानें सर्व जगासभोवती जलपर्यटण केलें आहे; - हिंदुस्थानाकडे जाण्याच्या जवळच्या मार्गाचा शोध लावण्याकरितां इंग्लिश लोकांनींही पोर्तुगीज लोकांप्रमाणे प्रयत्न केला आहे; इ. सन १४९६ मध्यें सातव्या हेनरीनें जान कॉबेट यास हिंदुस्थानाकडे जाण्याच्या मार्गाचा शोध लावण्याकरितां दोन जहाजांनिशीं जलपर्यटण करण्याचा राजकीय परवाना दिला, आणि त्याप्रमाणें त्यानें जलपर्यटणही केले. परंतु हिंदुस्थानाकडे जाण्याच्या नव्या मार्गाचा शोध लागण्या ऐवज त्यास न्यू फाउंडलंड या बेटाचा शोध लागलेला आहे. -- स्पेनच्या आरमाराचा धुव्वा उड विण्यांत आला ( १९८८), आणि " ईस्ट इंडीजकडे व्यापार करणा लंडनमधील व्यापाऱ्यांची कंपनी आणि तिचा गव्हर्नर " या नांवाची मंडळी स्थापन होऊन तिनें राणीपासून परवाना मिळविला, व पूर्वेकडील देशांबरोचर व्यापार सुरू केला. सदरहू इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीविषयीं परंभींचा थोडक्यांत इतिहास असा आहे कीं, इ. सन १९७१ मध्यें आशियाकडील माल तुर्कस्थानच्या किनाऱ्यावरून खुष्कीच्या मार्गानें भूमध्य समुद्रांतून इंग्लंडमध्ये आणण्याकरितां " लीव्हंट कंपनी" स्थापन झाली, आणि तिनें इ. सन १९९९ च्या एप्रिलमध्यें मिल्डन हॉल या नांवाच्या एका मनुष्यास हिंदुस्थानांत पाठविलें. इकडे आल्यावर तो आग्रा येथें जाऊन अकबर बादशहास भेटला, आणि त्यानें आपल्या कंपनीकरितां कांहीं विशिष्ट सवलती मिळविल्या. मध्यंतरीं ता. २२ व ता २४ सप्टेंबर १९९९ रोजीं लंडन येथें फाऊंडर्स हॉलमध्यें लार्ड मेयर, सर स्टीफन सोम, याच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरली. तींत लंडनमधील अजमारों शंभर प्रमुख व्यापारी हजर असून हिंदुस्थानांत व्यापार करण्या२३ करितां एक व्यापारी कंपनी स्थापन करण्याचे ठरलें, व जागच्या जागी ३०,००० पौंड रक्कम गोळा झाली, वराणी आणि प्रिव्ही कौंसिल यांचेकडे व्यापाराची सनद मिळविण्याबद्दल खटपट करण्याचें काम सुरू झालें. त्यांनीं पाठविलेल्या विनंतिपत्रांत खालील मजकूर आहे :* डच लोकांनीं ईस्ट इंडीजमध्ये केलेल्या सफरींत त्यांना मिळालेल्या यशानें आपणही तिकडे सफरी कराव्या, असें आह्मांस उत्तेजन मिळाले आहे. डच लोक हे हल्लींही पुन्हां ईस्ट इंडीज बेटांमध्यें सफर करण्याच्या तयारींत असून ते हल्ली इंग्लंडमध्ये आलेले आहेत. आम्ही सर्व एकत्र झालेल्या व्यापारी मंडळानेही तसेंच धाडशी जलपर्यटण करण्याचा निश्चय केला असून राणीनें कृपावंत होऊन आह्मांस सनद देण्याची मेहेरबानी करावी. " शिवाय ता. १० एप्रिल १९९९ रोजीं, ह्मणजे फिच्च परत आला त्या सुमारास, लंडन येथील टर्की कंपनीमधील साहसी व्यापायांनी क्याप्टन रेमंड याच्या हाताखालीं तीन गलबतें हिंदुस्थानांत येण्यासाठीं प्लेमौथहून हांकारलीं होतीं ता. ३१ दिजंबर इ. सन १६०० रोजीं इलिझाबेथ राणीनें सनदेवर सही केली; कंपनीनें पांच जहाजें विकत घेतलीं; २४ डायरेक्टर्स व एक गव्हर्नर नेमण्यांत आले; आणि ता. १६ फेब्रुवारी १६०१ रोजीं मनुष्यें, ( जहाजावरील मुख्य अधिकारी ) सर जेम्स ल्याकेस्टर, ४०० व ३२ कारकून, यांसह लंडनहून जहाजें हांकारण्यांत आलीं. या कंपनीला कांहीं सवलती व हक्क देण्यांत आलेले होते. मागलेनची सामुद्रधुनी आणि केप ऑफ गुड होप यांचे दरम्यान आशिया खंडांतील सर्व भागांत व आफ्रिकें त कोणत्याही बंदरांत व्यापार करण्याची परवानगी देण्यांत आली होती, आणि आपल्या कामाकाजाच्या बाबतींत वव्यवस्थेत नियमन करण्याचाही पूर्ण अधिकार दिलेला होता. शिवाय खुद्द राणीनें इकडील राज्यकर्त्यांना देण्यासाठी पहिल्या सफरीच्या मुख्यापाशीं एक पत्र दिलें होतें; तें विशेष महत्त्वाचें असल्यानें याखाली दिलेले आहे. फेब्रुवारी १६००. " परमेश्वरकृपेंकरून इंग्लंड, फ्रान्स व ऐलंडची राणी, इलिझाबेथ, हिजकडून. ...... चे थोर व पराक्रमी राज्यकर्ते........ यांस. सर्वशक्तिमान प्रभूनें आपल्या अपरिमित व अगाध शहाणपणानें व कृपादृष्टीने ह्या जगांत मनुष्याच्या उपभोगाकरितां अनेक उत्तम वस्तु उत्पन्न करून त्यांची सर्वत्र सुव्यवस्था करून ठेविली आहे. ते जिन्नस कोठेंही व कसेही मूळ पैदा झालेले असले, व कांहीं ह्या देशांत व कांहीं त्या देशांत तयार झालेले असले, तरी ते ह्या प्रभूच्या दुकमानें पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांस पोंचले जावे, व त्याचें अपरिमित औदार्य सर्व जनांस सारखें प्राप्त व्हावें, असा त्या प्रभूचा उद्देश दिसतो. ज्या प्रदेशांत तो जिन्नस पिकेल, तेथच्या लोकांनी मात्र तो वापरावा, इतर देशांतील लोकांस तो मिळू नये, असा त्याचा हेतु दिसत नाहीं. एका देशानें दुसऱ्या देशाच्या उपयोगीं पडावें, व एका देशांत जो जिन्नस विपुल पिकतो, त्यानें दुसन्या देशाची गरज भागावी, असा ईश्वरी उद्देश असल्यामुळेच दूरदूरच्या अनक देशांमध्यें व्यापाराची घडामोड चालते, व मालाची देववेव चालल्यानें त्यांजमध्यें स्नेहभाव व प्रेम वाढत जाते. महाराज, ह्या वर सांगितलेल्या हेतूशिवाय आणखी आह्मांस असें समजले आहे कीं, कोणीही परराष्ट्राचे लोक व्यापाराचा उद्देश मनांत धरून स्नेहभावानें व सौम्य वृत्तीनें आपल्या देशांत गेले असतां आपण त्यांचा उत्तम प्रकारें आदर करितां; यावरून आमच्या कित्येक व्यापाज्यांस आपल्या देशांत जाण्याची परवानगी देण्यास आह्मांस उमेद आली आहे. आपल्या देशांत व्यापारी मालाचा सौदा फार उत्तम होतो, असें इकडे खात्रीलायक कळल्यावरून जलमार्गाची अनेक दुर्धर संकटें सहन करूनही हे व्यापारी तिकडे जात आहेत. तेथे आपल्या लोकांशी व्यापारी धोरणानें सौदा करावा, ह्मणजे इकडचे जिन्नस त्यांस विकून तिकडचे इकडे विकत आणावे, असा त्यांचा उद्देश आहे. एवढी संकटें सोसून आपल्या देशांत प्रवेश करण्याची ज्या अर्थी त्यास स्फूर्ति झाली आहे, त्या अर्थी आपणही त्यांचा योग्य परामर्ष घेतला असतां बोलण्याचालण्यांत व व्यवहारांत ते चोख व सभ्य आहेत, असे आपणांस दिसून येईल, व ते आपल्या देशांत आल्याबद्दल आपणास वाईट वाटण्याचें कारण राहणार नाही. तसेच त्यांनी आपल्या गलबतांतून नेलेला इकडचा माल आपणास देण्यांत व आपणाकडचा माल इकडे आणण्यांत एकमेकांचा निकट सहवास व व्यवहार घडल्यावर त्यांनीं पुनरपि असाच माल घेऊन आपल्या देशांत यावें, असें आपणास वाटेल. आजपर्यंत फक्त स्पॅनिश व पोर्तुगीज व्यापारीच काय ते इकडचा माल आपल्या देशांत नेत आहेत; पण ते लोक व्यापाराच्या कामांत आमच्या व्यापायांस व इतर लोकांस नाहक जाच करितात, वास्तविक पाहिले तर ते आपल्या देशांत व्यापाराच्या उद्देशानें गेले आहेत, असें नाहीं; तिकडच्या सर्व देशाचे मालक व बादशहा आपणच आहों, असे ते लोक समजतात; व तिकडचे सर्व लोक आपल्या केवळ प्रजा आहेत, असे ते इकडे लोकांस सांगत सुटले आहेत, व लिहिण्यांतही ते तसा व्यवहार उघडपणें करीत आहेत. " " आमचे जे लोक केवळ व्यापाराच्या सौम्य उद्देशानें आपल्याकडे आज जात आहेत, त्यांस आपण मेहेरबानी करून आपल्या देशांत येऊं द्याल, व आजच्या ह्या पहिल्या प्रसंगाची ओळख पुढें चालू ठेवून आपल्या व आमच्या प्रजेमध्यें हें व्यापाराचें व स्नेहाचें दळणवळण वृद्धिंगत कराल, अशी आह्मांस आशा आहे, आपली आज्ञा असेल, तर आमचे कांहीं व्यापारी इकडे परत येऊन पुन्हां इकडचा माल भरून तिकडे नेत तोपर्यंत बाकीची मंडळी आपल्या कृपाछत्राखालीं तेथेंच राहून तेथची भाषा वगैरे शिकतील, कीं जेणेकरून एकमेकांचे विचार व रीतरिवाज एकमेकांस कळल्यानें स्नेह वृद्धिंगत होऊन उभयतांचा उद्देश पार पडेल. " आपला आमचा स्नेह वृद्धिंगत होऊन दळणवळण वाढावें, यासाठी उभयतांमध्ये कांहीं करार किंवा ठराव होण्याची जरूरी आहे त्यासाठी हें पत्र आपणाकडे घेऊन जाणारे इसपास आमच्या तर्फे बोलण्यास व ठराव करण्यास आह्मी संपूर्ण अधिकार दिला आहे. ते गृहस्थ आपल्याशीं जे ठराव करतील, ते आह्मी इमानानें पाळूं, व आपण आमच्या ह्या लोकांवर जी मेहेरबानी किंवा उपकार कराल, त्यांची फेड आह्मी मोठ्या आनंदानें करूं. अखेरीस एवढेच मागणे आहे कीं, आमचा हा उद्देश आपणास पसंत पडल्याचे निदर्शक ह्मणून आपला या पत्राचा जबाब गेलेल्या मंडळीजवळ द्यावा. आपण जबाब पाठविल्याने आमच्यावर मोठी मेहेरबानी होईल, व आम्हांस अतिशय संतोष वाटेल. " त्यानंतर इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीनें हिंदुस्थानांत ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला, आणि साम्राज्याची हल्लीं असणारी टोलेजंग इमारत क्रमाक्रमानें उभारली गेली; युरोपियन पद्धतीनें शिकविलेल्या कवायती सैन्याच्या मदतीनें डुप्ले यानें कर्नाटकच्या नबाबाच्या बिनशिकलेल्या व बिनशिस्तीच्या सैन्याचा हिंमतीने एका आणि पहिल्याच खटक्यासरशीं धुव्वा उडविल्यानंतर आणि पुढें फ्रेंचांनी प.ठबळ दिलेले मुजफरजंग व चंदासाहेब यांचे विरुद्ध नासिरजंग व महमद अल्ली यांना अनुक्रमें हैद्राबादच्या निझामाची व कर्नाटकच्या नबाबाची गादी मिळवून देण्यांत मदत करण्याचें इंग्लिशांनी आपल्या अंगावर घेतल्यानंतर - फ्रान्स आणि इंग्लंड दो युरोपियन राष्ट्रांमधील हिंदुस्थानांतील उग्र व चिवट राजकीय प्रतिस्पर्धेला खरा रंग आला; व उभयतां कंपन्यांची वाढती शक्ति, हिंदुस्थानांतील राज्यांचा कमकुवतपणा, परस्परांमधील परमावधीस पोंचलेली स्पर्धा, आणि उभयतां राष्ट्रांची युरोपांतील चालू असलेली कडाक्याची चुस, यांमुळे व्यापारी प्रतिस्पर्धेचें - राजकीय वर्चस्व मिळविण्याकरितां कराव्या लागणाऱ्या सशस्त्र लढायांमध्यें - रूपांतर झालें. अशा रीतीनें चाललेली ही प्रतिस्पर्धा हिंदुस्थानच्या भूमीवर राहून राहून सुमारें वीस वर्षेपर्यंत सारखी चालू होती. इ. सन १७८९ मध्यें फ्रेंच लोक शेवटचे हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर आले, त्या वेळीं इंग्लिशांना समुद्रांत पुष्कळ गोष्टी प्रतिकूळ होत्या. युरोपमधील इतर समुद्रतीरस्थ राष्ट्रांबरोबर फ्रान्स, स्पेन, व हालंड शिवाय खुद्द इंग्लंडच्या ताव्यांतील अमेरिकेंतील वसाहतींबरोबर, इंग्लंड एकटेंच झगडत होतें. शिवाय, इकडे हिंदुस्थानामध्येही म्हैसूरचा हैदरअल्ली व दक्षिणेचे मराठे यांचेबरोबरील युद्धप्रसंगांत ते ओढले गेले होते. अशा स्थितींत अत्यंत पराकाष्ठा करूनही फ्रान्सला हिंदुस्थानांत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करतां आलें नाहीं, आणि फ्रान्सविरुद्ध प्रत्येक ठिकाणीं सरशी करून इंग्लंडनें आपलें ब्रिटिश साम्राज्य हिंदुस्थानांत स्थापन केले आहे. वरील एकंदर विवेचनावरून युरोपियन राष्ट्रांच्या तत्कालीन परिस्थितीची आणि अंतःस्थ व बाह्य राजकारणाची वाचकांस बरीच माहिती होईल, असें ह्मणणें अतिशयोक्तीचें होणार नाहीं. आशिया खंडांतील पूर्वकालीन राजकीय स्थितीसंबंधी प्रस्तुतच्य पुस्तकांत बरीच हकीकत आलेली असल्याने त्या हकीकतीस उपांग ह्मणून त्या खंडांतील त्या काळच्या परिस्थितीसंबंधी थोडीशी हकीकत देणें अवश्यक आहे. आशिया खंडांतील पूर्वकालीन परिस्थितीकडे पाहिले, तर त्या वेळचीं राज्य ही निव्वळ राजकीय प्रवृत्ति असून "बळी तो कान पिळी" अशी स्थिति होती. " ज्यांचा राजगादीवर उत्तम हक्क ह्मणजे तीं लुबाडून घेण्याची आणि ताब्यांत ठेवण्याची अंगांत असलेली धमक हाच होता, ज्यांचें जीवित्व आणि त्यांच्या राज्याचें अस्तित्व हीं निव्वळ एखाद्या लढाईच्या परिणामावरच नेहमी अवलंबून असत, कांहींही हक्क नसतांना मनगटाच्या जोरावर दुसन्याचे राज्य स्वतःच्या वशाखालीं उतरखूं पहाणारे कर्तबगार लोक, कायदेशीर हक्कदार असूनही अंगांत करामत नसलेले वारसदार, थोडासा मुलूख अंगाखाली दावून बसलेले लष्करी पुढारी, कांहीं हजार वोडेस्वारांचे मराठे शिल्लेदार, अगर अफगाण जातीचे धाडशी सेनानायक, आणि आपलीं राज्ये वंशपरंपरेनें प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करीत असलेले प्रांतानिहाय सुभेदार, " अशा लोकांचा हिंदुस्थानभर बुजबुजाट झाला होता. त्यामुळे कोणत्याही राज्यकर्त्याच्या ताव्यांतील प्रजा एकाच जातीची, वर्णाची अथवा भाषेची असणे केव्हाही फारसें शक्य अथवा संभवनीय नव्हते. राज्यकर्ते बंधरहित असून त्यांची सत्तां अमर्याद असे. त्यामुळे सुराज्यघटनेचा अभाव असून स्वतःकरिता मिळविलेले राज्य टिकविण्याची, आणि तसा प्रयत्न करूनही तें टिकेक कीं नाहीं याबद्दलची, अशाश्वती असल्यानें प्रजापालन व प्रजासुखसमृद्धिं ह्या महत्त्वाच्या अंतर्गत बाबतींकडे पाहण्याची राज्यकर्त्यांना बहुधा प्रवृत्तिच होत नसे. आणि कदाचित् एखाद्यास झाल्यास त्यास त्या बाबतीत मन घालण्याला अवसरही सांपडत नसे. राज्यकर्त्यांचा राज्याशीं, ह्मणजे त्यांच्या प्रजेशीं, फक्त सरकारसायापुरताच संबंध असल्यामुळे तो वसूल होतो कीं नाहीं, एवढ्याबद्दलच काय ती त्यांना काळजी वाटत असे. उलट पक्षीं " ठराविक सरकारदेणे दिलें ह्मणजे झाले, " अशी प्रजेची भावना असल्याने राज्यक्रांतीच्या अदलाबदलीबद्दल प्रजेस महत्त्व वाटत नसे; इतकेंच नाहीं, पण राज्यकर्यांत बदल झाला, ही जाणीव - नव्या राज्यकर्त्याला धर्मवेड अथवा जुलूम यासारख्या त्याच्या प्रवृत्तीमुळे ठराविक सरकारदेण्यापेक्षां अधिक रक्कम द्यावी लागली, तरच - - होत असे. युरोप खंडांतील सरदारी अगर संस्थानिक राज्यपद्धतीप्रमाणेच या काळी हिंदुस्थानांत वतनदारीपद्धति व अशोक, चंद्रगुप्त वगैरे राज्यकर्त्यांच्या वेळेपासून सुरू असलेली ग्रामपंचायतपद्धति ह्या जोरांत आल्या; आणि स्थानिक वसुलीचीं गांवकामगारांची कामें इनामदार वर्गाकडून, आणि स्थानिक कारभाराची कामें गांवपंचायतीकडून होत असल्यामुळे, जबाबदारीबरोबर उभयतां संस्थांचे महत्त्वही पुष्कळच वाढलें. परंतु ही व्यवस्था प्रत्येक गांवापुरती निरनिराळी असल्याने राजकीय ऐक्य अथवा राष्ट्रीय भावना याची नुसती कल्पना होणें सुद्धां संभवनीय नव्हतें. राज्यकर्त्यांना प्रजेच्या मताची अथवा शब्दाची किंमत न वाटण्या इतपत त्यांची सत्ता निर्बंधरहित होती; आणि प्रजेसंबंधी आपले कर्तव्य काय आहे, याचीही त्यांना फारशी ओळख नव्हती. उलट पक्ष प्रजेलाही राष्ट्रीयत्याची जाणीव नसून त्यामुळे जनतेच्या उन्नतावस्थेला अत्यवश्यक असलेल्या उच्च भावनांचा अभाव होता. मानवजातीच्या उन्नतीला निरनिराळ्या समाजांत पृथक् पृथक् उत्क्रांति होत जावी लागते, आणि समाजाच्या उत्क्रांतीची फळे ह्मणजेच समाजाची योग्य संस्कृति होणें होय; --ह्मणजे व्यक्ति, समाज किंवा राष्ट्र उन्नतावस्थेस पोचण्याच्या पूर्वी तशी मानसिक तयारी होण्यास अत्यवश्यक असलेली परिस्थिति प्रजेंत उत्पन्न होण्याला राष्ट्रीयत्वाची जाणीव हीच विशेषतः प्रधान गोष्ट आहे. राज्यकर्त्याला प्रजेसंबंधीं आपढ़ें कर्तव्य कळूं लागण्य'ला शाश्वती आणि संस्कृति, या गोष्टींची अवश्यकता असते परंतु ह्या गोष्टी साध्य होण्याला शांततेचीही तितकीच अवश्यकता असते. आणि शांततेच्या काळाच्या अभावीं इच्छा असूनही राज्यकर्त्याला प्रजेच्या सुखसमृद्धीकडे फारसे लक्ष देतां येणें शक्य • नसतें. हिंदुस्थानांत मराठे अथवा मोंगल राज्यकर्त्यांच्या मानानें ब्रिटिश अमलाखाली मानवजातिसमूहाची प्रत्येक बाजूनें जी सुधारणा झाली आहे, त्याला त्या सरकारची आपल्या प्रजेसंबंधीची खरी कळकळ, स्वयंस्फूर्तिजन्य औदार्य, आणि स्वकर्तव्यनिष्ठा, हीं जरी कारणें असलीं, तरी मुख्यतः " शांततेच्या काळाचा लाभ " हेच प्रधान कारण आहे, आणि तशी शांतता प्रस्थापित करण्याकरितां त्यांनी सतत आणि मनापासून अत्यंत नेटानें प्रयत्न केले असल्यामुळेच तो लाभ झालेला आहे, असे ह्मणण्यास कांहीही हरकत नाहीं. एकाच जातीचे अथवा एकाच समाजाचे लोक भिन्न भिन्न राजकीय परिस्थितीत व निरनिराळ्या शासनपद्धतींखाली असल्यास त्यांच्या आचारविचारांत, व्यवहार वागणुकीत आणि मतमतांतरांत एक विशिष्टत्व राहणें शक्य नसल्यामुळे संस्कृतीच्या उत्क्रांतीत राष्ट्रघटनेच्या बाबतीमध्येही त्या त्या समाजांत कमी अधिक प्रमाणानें भिन्नत्व असणे स्वाभाविक रीत्याच अपरिहार्य आहे. कोणत्याही जातीचें, समाजाचें अथवा राष्ट्राचे अस्तित्व कायम राहण्यास त्यांची संघटित शक्ति नेहमी जिवंत रहावी लागते, आणि ती तशी जिवंत राहण्यास सुव्यवस्थित राज्यघटना अत्यवश्यक असते. सुसंबद्ध राष्ट्रघटना आणि सनदशीर राज्यव्यवस्था ह्यांमुळे ग्रेट ब्रिटनच्या राष्ट्रीय तेजाची वाढ होत गेली, आणि तें "दिग्विजयी राष्ट्र" बनून त्याचे ताब्यांतील प्रदेशाचा विस्तारही झपाट्याने होत गेला. तथापि प्रदेशाचा विस्तार आणि त्यांत ब्रिटिश लोकांनी केलेल्या वसाहती, यांमुळे त्यांचें मातृभूमीबरोबरील दळणवळण बंद झाले नाहीं; इतकेंच नव्हे, तर इंग्लंडमधील केंद्रस्थानी असलेल्या सत्तेच्या सूत्रचालकत्वाखालींच तेथील राष्ट्रघटना व राज्यव्यवस्थाही अद्यापपर्यंत चालू आहे. मराठा साम्राज्यांत केंद्रस्थानची सत्ता पहिल्यानें सातारा व नंतर पुणे येथें आली; मध्यंतरीं शिंदे, होळकर, गायकवाड, भोंसले, वगैरे मराठी सरदारांनीं जरी आपापले "सवते सुभे" निर्माण केले, तरी जोपर्यंत मुख्य केंद्रस्थानी असलेल्या सत्तेच्या अनुरोधनानें, ह्मणजे एक मतानें, राष्ट्रीय कार्यसिद्धीचे प्रयत्न होत होते, तोपर्यंत मराठी साम्राज्याची संघशक्ति जिवंत प्रतिकार करण्याइतकी सतेज होती. परंतु साम्राज्याचा प्रत्येक आधार अवयव वेगळा होऊन "जुटी चें बळ" फुटल्याने एकराष्ट्रीयत्वाची भावना नाहींशी होऊन मराठा साम्राज्य नामशेष झालें. ग्रेट ब्रिटनचें साम्राज्य आणि त्याच्या ताब्यांतील वसाहती यांचा संबंध " आई आणि मुलें " असा निकटचा असून त्या योगानें एकराष्ट्रीयत्वाची भावना नेहमीं जिवंत असल्यामुळे -- आणि वसाहतीं- तलि स्वातंत्र्य उपभोगीत असतांनाही मातृभूमीसंबंधाचें कर्तव्य, प्रेम आणि ओढा, यांची ओळख नेहमीं ताजी रहात असल्यामुळे - परस्पर एकमेकांच्या सुखदुःखांचे नेहमीं तत्परतेनें वांटेकरी असतात; परस्परांच्या हिताहिताची उभयतांना जाणीव असते; आणि इष्टसाध्यतेप्रीत्यर्थ होणारे प्रयत्न एक जुटीनें होत असल्यामुळे " जुटीच्या बळाचे फायदे" ग्रेट ब्रिटनच्या राष्ट्रास नेहमीं मिळत राहतात. तथापि एकराष्ट्रीयत्वाची भावना ही एक जात, एक देश, अथवा एक वर्ण असला, तरच फक्त उत्पन्न होते, असें मात्र बिलकूल ह्मणतां यावयाचें नाहीं; इतकेंच नाहीं, पण समजातीय, समवर्णाच्या, एकधर्मीय अथवा एकाच राष्ट्रांतील लोकांमध्ये कित्येक वेळां राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभाव असल्याचें आढळून येतें. आणि त्याचप्रमाणें उलट पक्षी भिन्न जात, भिन्न वर्ण, भिन्न धर्म, अथवा भिन्न राष्ट्र असूनही एकराष्ट्रीयत्वाची भावना जागृत राहिल्याचें आढळून येतें. परंतु अशी भावना उत्पन्न होण्यास अथवा नष्ट पावण्यास राजकीय परिस्थिति कारणीभूत होते; आणि हिंदुस्थानच्या उदाहरणावरून आपणास असेंही ह्मणतां येईल कीं, राज्यकर्ते जरी भिन्न देशाचे, धर्माचे व वर्णाचे आहेत, तरी स्वकर्तव्यनिष्ठेची चाड व ताब्यांतील प्रदेशांतील प्रजेच्या सुखसमृद्धिविषयींची काळजी, यांमुळे उदार अंतःकरणानें प्रजेला दिलेल्या विद्यादानानें मानसिक संस्कृति होऊन त्या योगानें एक राष्ट्रीयत्वाची भावना उत्पन्न होऊन वाढीस लागलेली आहे. हिंदुस्थानांत ब्रिटिश साम्राज्य स्थापन झाल्यानंतर ब्रिटिश लोकांची न्यायी व उदार राज्यपद्धति, त्यांची सनदशीर राज्यघटना व सरळ व्यवहार, वगैरे अनेक सद्गुणांमुळे जसजसा सहवास वाढत गेला, तसतसे " ब्रिटिश सरकार हे आपलेच सरकार आहे, " अशी भावना वाढत गेली; - आणि अगदी थोडक्यांत ह्मणावयाचें ह्मणजे, ज्या सांप्रतच्या महायुद्धांत ग्रेट ब्रिटननें न्यायाने भाग घेतला आहे, त्यांत आपल्या साम्राज्य सरकाराला विजयश्री नें माळ घालावी, • ह्मणून सर्व हिंदुस्थान देश राजनिष्ठा व राजप्रेम यांनी प्रेरित होऊन शरी३२ रानें, मनानें, व धनानें मदत करीत आहे --- केली आहे -- आणि पुढेही तो नेहमीं अशीच आनंदानें व तत्परतेनें मदत करीत राहील, अशी आह्मां सर्वांची व साम्राज्यसरकारर्चाही खात्री आहे. तथापि भिन्न भिन्न जातीचे अथवा समाजाचे लोक एकाच राजकीय परिस्थितीत असल्यास त्यांच्या हितसंबंधांत कित्येक वेळीं परस्पर विरोध उत्पन्न होतो, आणि अशा वेळीं सरकारला कोणत्याही विवक्षितजातीचें अथवा समाजाचें मन मुद्दाम न दुखविण्याची अथवा कोणत्याही एखाद्या विवक्षित जातीला किंवा समाजाला मुद्दाम विशिष्ट हक्क न देण्याची अंतःकरणापासून इच्छा असल्यानें सार्वत्रिक कायदा करणेही पुष्कळ वेळां अडचणीचें होतें, ह्या गोष्टीचा हिंदुस्थानांत नेहमीं अनुभव येतो. परंतु राज्यकत्यांची न्यायी वागणूक आणि सनदशीर व नियंत्रित राज्यकारभार, यांबद्दल जनतेचा विश्वास बसून त्या योगानें उत्पन्न, व क्रमाक्रमानें दृढ, झालेली राजभक्ति, यामुळे अशा अडचणीच्या प्रसंगांतून ब्रिटिश सरकार नेहमीं यशस्वी रीतीनें निभावून बाहेर आलेले आहे. हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्याचा हा काळ ह्मणजे युरोपप्रमाणेच हिंदुस्थानांतील नव्या किंवा "सुवर्णयुगाचा " काळ होय; ह्या काळांत आशिया खंडाचें, व विशेषतः हिंदुस्थानचें, युरोप खंडाबरोबर जारीनें दळणवळण सुरू झालें; पाश्चात्य संस्कृति, आधिभौतिक ज्ञान व सुधारणा, ह्यांमुळे जनसमाजाच्या आचारविचारांत, व्यवहार - वागणुकीत, न्यायान्यायाच्या राज्यकर्त्यांचे कर्तव्य व प्रजेचे हक्क, या बाबतींच्या व्यापारी व सांपत्तिक घडामोडीच्या, आणि देशांतील अंतःस्थ राज्यकारभार, व परदेशांतील राजकारण व बाह्य राजधोरण, यांसंबंधींच्या कल्पनेंत व विचारांत अननुभूत अशी जोराची क्रांति झाली; आणि एका प्रख्यात इंग्लिश लेखकाच्या शब्दांत ह्मणावयाचें ह्मणजे, "शिवाय एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी अशा कित्येक गोष्टी घडल्या कीं, तेणेंकरून युरोपच्या वर्चस्त्राबद्दलच्या आशियांतील लोकांच्या कल्पनांत मोठा फरक पडला. निदान तीनशे वर्षांत आशिया खंडांत राहणाऱ्या लोकांनीं युरोपियन लष्करावर उघड्या मैदानांत मिळविलेला पहिला विजय इ. सन १८९६ साली इतालीच्या लोकांस जिंकून अबिसीनियन लोकांनीं संपादन केला. " - अबिसिनियांत इतालीच्या सैन्याचा जो मोड झाला, त्यानें हिंदी लोकांच्या मनावर घडलेल्या परिणामांचा बाबू शरत्कुमार घोष यांनी " नशिबाचा राजा" या कादंबरीत उल्लेख केलेला असल्याचें दुसन्या एका प्रख्यात ग्रंथकाराने आपल्या ग्रंथांत नमूद केलेलें आहे. - " जमिनीवरीलच नव्हे, तर समुद्रावरच्या लढायांत सुद्धां जपाननें रशियावर जे जय मिळविले, त्यांवरून आशियांत जाऊन सहज जय मिळविण्याचे दिवस गेले, असे स्पष्ट दिसून आलें; कारण, पूर्वी कधींही आशियाच्या आरमारानें युरोपच्या आरमाराशीं युद्ध करून जय मिळविल्याचें इतिहासांत नमूद नाहीं." वर दर्शविलेल्या व अशा किंवा दुसन्या प्रकारच्या अनेक कारणांनीं 'हिंदी लोकांच्या मागण्या व्यापक स्वरूपाच्या होणे स्वाभाविक असून आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेत आपलाही वाढता भाग असावा, असे त्यांना वाटू लागले आहे, आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे दिवसेंदिवस राज्यकारभार चालविण्याचे कार्यही ओघाओघानेंच अवघड होत चाललेले आहे. " - तथापि राजनीतीचें प्रत्येक उदार तत्त्व ब्रिटिश राज्यकर्ते अमलांत आणण्यास नेहमीं तयार असल्यानें हें कोडेंही लवकरच उलगडले जाईल, अशी आशा बाळगण्यास जागा आहे. ग्रेट ब्रिटनचा आपल्या आरमागप्रीत्यर्थ होणारा खर्च किती मोठा आहे, आणि इतर राष्ट्रांच्या मानानें इंग्लंडच्या आगबोटी, जहाजे वगैरे सर्व जगांतील समुद्रभर किती अधिक प्रमाणानें संचार करीत आहेत, याची खालील त्रोटक हकीकतीवरून कांहींशी कल्पना होईल. |
कणकवली : गौणखनिज उत्खनन बंदी असताना तालुक्यात होत असलेल्या गौणखनिज व्यवसायावर महसूल विभागाने कारवाई तीव्र केली असून, दंडात्मक वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. महसूलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दंडाची रक्कम तीन ते चार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. गौणखनिज उत्खननाविरोधात महसूलची कारवाई गेले काही दिवस सुरू आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर कसवण परिसरातील क्रशर सुरू असल्याचे पुढे आले. त्यामुळे महसूल विभागाने त्यादृष्टीने चौकशी केली आणि अनेक व्यावसायिकांना उत्खननासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. वाळू व्यावसायिक, चिरेखाण मालक आणि क्वॉरी व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. किती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे याची विचारणा करण्यासोबत अतिरिक्त उत्खनन केलेल्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण दंडात्मक कारवाईची रक्कम काही कोटींच्या घरात जाऊ शकते. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जनशताब्दी अपघातानंतर कसवण परिसरात क्रशर सुरू असल्याचे उघड झाले. गौणखनिज बंदी असताना क्रशर कसे काय सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महसूल विभागाकडून क्रशर मालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानंतर कारवाईच्या भीतीने क्रशरवर असणारे खडीचे साठे तातडीने हलविण्यात आले. (प्रतिनिधी) |
कलिंग (ओडिया) लिपि - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nकलिंग (ओडिया) लिपि\nकलिंग (ओडिया) लिपि : ओरिसातील (प्राचीन नाव कलिंग देश) कलिंगनगरच्या गंगराजाचे ताम्रपट कलिंग लिपीमध्ये लिहिलेले आढळून येतात. सातव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत या लिपीमध्ये लिहिलेली दानपत्रेही आढळून येतात. गांगेय संवत ३९ च्या जिरजिंगी येथे सापडलेल्या ताम्रपटात ही लिपी प्रथम आढळून येते. हे दानपत्र गंगराजा पहिला इंद्रवर्मन् याचे आहे. गांगेय संवताचा आरंभकाळ आता चैत्र शुक्ल प्रतिपदा शके ४२० (इ. स. पू. १४ मार्च ४९८) असा निश्चित झाला आहे. कलिंग लिपीवर निरनिराळ्या लिपींचा प्रभाव पडलेला आहे. जिरजिंगी ताम्रपटातील अक्षरे भरीव पेटिकाशीर्षक पद्धतीची आहेत. या लेखातील काही अक्षरांचे मध्य हिंदुस्थानातील अक्षरवाटिकेशी साम्य आहे. गांगेय संवत १४८ च्या चिकॅकोल येथील आज्ञापत्रात वरील सर्व वैशिष्ट्ये प्रगट झाली असून, 'आ', 'ग', 'श' इ. अक्षरे प्राचीन ⇨ ग्रंथ लिपीप्रमाणे आहेत. गांगेय संवत १८३ मधील चिकॅकोल येथील आणखी एका दानपत्रातील अक्षरांचेही मध्य हिंदुस्थानातील अक्षरवाटिकेशी साम्य असून त्यातील 'न' हे अक्षर नागरीप्रमाणे आहे.\nकलिंग लिपीमध्ये झालेल्या अक्षरवाटिकांचे मिश्रण हा विद्वानांचा चर्चेचा विषय आहे. कीलहोर्न यांनी त्याची कारणमीमांसा केली आहे : पहिले कारण म्हणजे ओरिसाची भौगोलिक रचना. या भौगोलिक रचनेमुळे ओरिसा प्रांतावर निरनिराळ्या भूभागांतील राजांनी वेळोवेळी स्वार्या केल्या. या स्वार्या केवळ राजकीय घटनाच ठरल्या नाहीत, तर त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली. ओरिसाचा भूप्रदेश दक्षिणेस तेलुगू व कन्नडभाषिक प्रदेशाला लागून आहे, तर उत्तरेला पेटिकाशीर्षक व नागरी लिपीचे वर्चस्व असलेला प्रदेश आहे. पूर्वेला बंगालची भूमी आहे. त्यामुळे कलिंग लिपीवर आजूबाजूच्या निरनिराळ्या लिपींचा प्रभाव पडणे क्रमप्राप्तच होते. दुसरे कारण म्हणजे राजदरबारामध्ये असणारे कोरके आपले लेखनकौशल्य दाखविण्यासाठी आपल्याला येत असलेल्या सर्व अक्षरवाटिकांचे मिश्रण आपल्या लेखनात करीत असत.\nप्रचलित ओडिया (उडिया) लिपीवर बंगाली लिपीची विशेष छाप आढळून येते. बाराव्या शतकानंतर जे लेख ओरिसात सापडले, त्यांमधील लिपीला ब्यूलर यांनी 'प्राक्बंगाली लिपी' असे नाव दिले आहे. या लिपीमध्ये बंगाली अक्षरांप्रमाणे अक्षरांवर शिरोरेषा आहेत. प्रचलित ओडिया लिपीमध्ये ह्या शिरोरेषांना गोलाई प्राप्त झाली आहे. ह्या लिपीतील 'अ', 'आ', 'ह', 'ष', 'क्ष' या अक्षरांचे नागरी अक्षरांशी साम्य आहे तसेच 'ए', 'ऐ', 'ओ' आणि 'औ' ही अक्षरे बंगाली लिपीतील अक्षरांप्रमाणे आहेत. एकंदर अक्षरांचे वळण गोल असून अक्षरांचा झोक उजवीकडे वळलेला आहे. या लिपीचे दोन प्रकार आढळून येतात. एक छापण्याची आणि दुसरी हस्तलिखितांची. हस्तलिखितांसाठी वापरलेल्या ओडिया लिपीला 'करणी' हे नाव आहे.\nपहा : ओडिया भाषा.\nसंदर्भ : 1. Buhler, G. Indian Paleography, Calcutta, 1962.\n२. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपीमाला, दिल्ली, १९५९. |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. vaccination : 'पुरेशा प्रमाणात लस नाही, तरीही त्रासदायक कॉलर ट्यून ऐकवता' Kerala: ऑनलाईन मित्रासाठी अल्पवयीन मुलीनं घरातून गायब केलं ७५ तोळे सोनं! Kerala: ऑनलाईन मित्रासाठी अल्पवयीन मुलीनं घरातून गायब केलं ७५ तोळे सोनं! तुम्ही ऑफलाइन आहात। |
मुंबई खंडणी विरोधी पथकाची कामगिरी : एमपीसीन्यूज : लोणावळा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल उमेश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सादिक बंगाली याला मुंबई खंडणी विरोधी पथकाने सापळा रचत नुकतीच अटक केली. त्याच्याकडून 2 पिस्तूल व 15 काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत. बंगाली याला मुंबईतील कॉटन ग्रीन येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह लोणावळ्यात सादिक बंगाली याच्यावर 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली. सादिक बंगाली हा लोणावळा गावठाण येथील राहणारा असून लोणावळा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी खून प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो फरार होता. एक जण शस्त्राची विक्री करण्यासाठी कॉटन ग्रीन एअर फोर्स रोड या ठिकाणी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहिती वरून खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून मोटारसायकलवरून आलेल्या एकाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही सादिक बंगाली असल्याचे समोर आले. सादिक बंगाली हा रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीचा शार्प शूटर असून त्याच्याविरुद्ध मुंबई, पुण्यात हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. लोणावळा शहर पोलीस त्याला लवकरच तपासणीसाठी त्याला ताब्यात घेणार आहेत. |
संदर्भ - हल्लीहल्लीची, पाश्चिमात्य देशातील एका टी. व्ही. चॅनलवरील बातमी. - आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतात आत्महत्या हा एक गुन्हा मानला जातो. कांहीं काळापूर्वी सरकारनें Euthanasia म्हणजेच दयामरण या विषयावर मतें मागवली होती. ( याविषयी मी सरकारला पाठवलेला माझा, 'Dayamaran and Ichchhamaran' हा इंग्रजी लेख, जिज्ञासूंनी माझी वेबसाईट www. subhashsnaik. com येथें वाचावा ). - थोडक्यात मुद्दा असा आहे की, दयामरण हे त्या पेशंट्स् साठी असतें जे terminal disease ने पीडित असतात, व / किंवा brain-dead असतात. पण मुख्य गोष्ट अशी की, माणूस हा एक thinking animal आहे, आणि म्हणून स्वतःच्या जीवितावर व मरणावर त्याचा अधिकार असायला हवा. म्हणजें, दयामरण तर हवेंच,पण इच्छामरण मान्य असणारा कायदाही अस्तित्वात यायला हवा. - जे लोक acutely depressed असतात व आत्महत्येचा प्रयत्न करतात, त्यांची गोष्ट वेगळी ; ती चर्चा इथें अभिप्रेत नाहीं. त्यांना psychiatrist च्या मदतीची आवश्यकता आहे. ( म्हणून, सरकारनें आता पूर्वीचा, आत्महत्या हा गुन्हा असण्याचा , कायदा बदलला, हें स्तुत्यच आहे) . - पण आपण मुख्यत्वें बोलत आहोत अशा लोकांबद्दल जे वृद्ध आहेत , आणि ज्यांना dignified death ची इच्छा आहे. असें इच्छामरण त्यांच्या स्वतःच्या हातात असायला हवें. ती आत्महत्या नाहीं, व गुन्हा तर नाहींच नाहीं. कायदा त्याला 'बेकायदेशीर' भले ही म्हणो, पण तें कृत्य अनैतिक (immoral) खासच नाहीं. - महाभारतातील भीष्मांना इच्छामरणाचा वरच मिळालेला होता. भीष्मांनी, पालनासाठी महाकठीण अशी प्रतिज्ञा केली होती, फार मोठा त्याग केला होता ; म्हणून त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला. यावरून, अगदी पुरातन काळापासून इच्छामरणाला भारतीय संस्कृतीत असलेला उच्चकोटीचा सन्मान व महत्व आपल्या ध्यानात येतें. - तसेंच, भारतीय संस्कृतीत इच्छामरणासाठी प्रायोपवेशन, संथारा असे पर्याय गेली अनेक शतकें उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे यांनी प्रायोपवेशन केलें होतें, व त्यांच्या या कृत्याबद्दल अतिशय आदरानें बोललें जातें. कांहीं जैन मुनी संथारा करतात, व तेंही अतिश्रेष्ठ मरण मानलें जातें. हल्लीच एक मुनी असा संथार करत होते. (म्हणूनच, संथारा म्हणजे आत्महत्या नाहीं व त्याला परवानगी दिली जावी, यासाठी कांहीं जैन संघटनांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केलेली आहे). पत्नीचे ज्येष्ठ चुलतभाऊ. ( मी या लोकांना 'तथाकथित सामान्य' असें म्हणालो, कारण स्वहस्तें विचारपूर्वक मरण स्वीकारणारी व्यक्ती 'साधारण' असूंच शकत नाहीं ). Kudos to them ! - मला या ठिकाणी, माझी स्वतःची दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता हिचेंही उदाहरण द्यावेसें वाटतें. २०१४ मध्ये तिला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हां रोगाचें मेटास्टॅसिस झालेलें होतें, व रोग 'स्टेज ४' मध्ये गेलेला होता. स्नेहलतानें मानसशास्त्रात पीएच्. डी. केलेलें असल्यामुळे म्हणा, किंवा मन खंबीर असल्यामुळे म्हणा, अथवा दृष्टिकोन अतिशय प्रॅक्टिकल असल्यामुळे म्हणा, किंवा गेली अनेक वर्षें एकूणच तिचें मत इच्छामरणाच्या बाजूनें होतें, म्हणून म्हणा, पण स्वतःला हा रोग झाल्याची बातमी आणि रोगाची सीरियस लेव्हल कळल्यापासूनच तिनें आपल्या भावी मृत्यूचा अगदी सहजपणें स्वीकार केला होता. Hats off ! त्यामुळे, कांहीं महिन्यांनंतर जेव्हां तिचा रोग अधिक बळावला, शक्ती कमी कमी होऊं लागली, थोडेंफार परावलंबित्व येऊं लागलें , तेव्हां तिनें शांतपणें डॉक्टरांकडे पृच्छा केली की, सहजपणें क्षणार्धात पेशंटला वेदनारहित मरण येईल असा कांहीं उपाय डॉक्टरांकडे असतो कां ? आणि, हें संभाषण तिनें अतिशय संतुलितपणें आणि विचारपूर्वक केलें. तिचा प्रश्न ऐकून डॉक्टर किंकर्तव्यमूढ झाले, काय बोलावें तें क्षणभर त्यांना सुचेना. मला जरी भावनिक पातळीवर तिच्या प्रश्नानें बेचैन केलें , तरी बौद्धिक पातळीवर मला आश्चर्य वाटलें नाहीं, कारण तिचें गेल्या अनेक वर्षांपासूनचें याबद्दलचें मत मला माहीत होतें. ( आणि, इच्छामरणाच्या बाबतीत माझेंही मत स्नेहलतासारखेंच आहे, त्यामुळे, तिचे विचार मी समजून घेऊं शकलो). अर्थातच, डॉक्टर या विषयात कांहींही करूं शकत नव्हते, ते केवळ रोग contain करण्याचा (विफल ) प्रयत्न करूं शकत होते, आणि तो प्रयत्न त्यांनी अखेरपर्यंत केलाही. स्नेहलताचें भाग्य थोर की तिला खितपत न पडतां, त्रास न होतां, अल्पावधीत मरण आलें. ती bed-ridden झाली नाहीं, धरून-कां-होईना पण चालूं शकत होती, शेवटपर्यंत बोलत होती, आणि अखेरच्या दिवशीही तिची विनोदबुद्धी शाबूत होती. स्नेहलताला नैसर्गिकरीत्या 'इच्छामरण' प्राप्त झाले कां, मला माहीत नाहीं. पण, ज्या रात्रीं ती गेली, त्या दिवशी सकाळीच तिनें मला, 'मी चालले आहे' असें सांगितलें होतें . ( त्या वेळी , तिच्या विधानाची सीरियसनेस मला कळली नाहीं, याबद्दल मला आतां कायमच खंत वाटते ; कारण , नाहीतर मी नक्कीच तिच्या अखेरच्या दिवशी अधिक वेळ तिच्या सोबत घालवला असता ! ) मात्र, स्नेहलतामुळे मला वारंवार, इच्छामरणाच्या विषयाची आठवण येत असते, हें खरें. - भारतात अजून इच्छामरणाचा कायदा झालेला नाहीं. मात्र, हॉलंडमध्ये तसा कायदा केला गेला ही फार चांगली गोष्ट आहे. ( अर्थात्, त्या सरकारनें त्या कृत्यासाठी कांहीं सेफगार्डस् निर्माण केले असतीलच. तें ठीकच आहे ). हॉलंडबद्दलची बातमी वाचून मला, या प्रगतीबद्दल आनंद तर वाटलाच ; पण टर्मिनल-डिझीझ नसतांनाही मरणेच्छा करणार्यांना आतां इच्छामरणासाठी नुसती संमतीच नाहीं, तर, मदतही प्राप्त होऊं शकेल, असा कायदा करणार्या सरकारबद्दल ( म्हणजेच, जनतेनें निवडून दिलेल्या रिप्रेझेंटेटिव्हज् बद्दल ) मला अतीव आदर वाटतो आहे. त्या सरकारच्या या कृतीवरून आपल्याला डच जनतेची सांस्कृतिक maturity, विचारांचा पुढारलेपणा आणि बुद्धिवादी वृत्ती दिसून येते. - अखेरीस असें आहे की, वृद्धत्वामुळे म्हणा, किंवा दुर्धर व्याधीमुळे म्हणा, किंवा कांहीं अन्य कारणामुळें म्हणा, जर एखाद्या व्यक्तीला सन्मानपूर्वक-मरण हवें असेल, तर निश्चितच तो त्या व्यक्तीचा अधिकार आहे , व त्या व्यक्तीला डिग्निफाइड मृत्यू स्वीकारूं देणें यासारखें दुसरें सत्कृत्य नाहीं. सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai. Website : www. subhashsnaik. com, www. snehalatanaik. com. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.