text large_string |
|---|
येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले. बल्लारपूरः येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लिमी. कंपनीला प्रदूषण करण्याच्या कारणावरुन संबंधित मंत्र्यांनी बंद करण्याचे आदेश दिले. मात्र शहरातील कामगारांवर यामुळे संकट ओढावणार आहे. याचा विपरित परिणाम व्यापारी वर्गावरही होणार आहे. कोणत्याही परिस्थिती उद्योग बंद होऊ नये, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत ज्येष्ठ भाजपा नेते चंदनसिंह चंदेल यांनी दिली. राज्यात भाजपासह महायुतीचे सरकार आहे. सरकारने प्रदूषण करणाऱ्या उद्योगावर बंदीचे हत्यार उपसले आहे. यात पेपर मिल उद्योगाचा समावेश आहे. या प्रकारामुळे कामगारात भितीचे वातावरण पसरले आहे. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन व्यथा मांडली. कामगारांना आश्वासन देताना, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर मिल बंद होऊ देणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. शहराची आर्थिक व्यवस्था बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रा. लि. वर अवलंबून आहे. उद्योग बंद झाल्यास कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. प्रदूषण होत असल्याच्या कारणावरुन उद्योगाला टाळे लावले ही बाब योग्य नाही. दंडात्मक कारवाई त्यावर उपाय आहे. मात्र सरसकट उद्योग बंदीचा निर्णय कामगारांच्या जीवावर उठणार आहे. येथील कामगारावर अन्याय होऊ देणार नाही, असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्यासह अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, सतविंदर सिंहदारी, काशिनाथ सिंह, राजू गुंडेटी, विजयसिं ठाकूर यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी) |
वियोग दोन्ही भागीदारांसाठी एक वेदनादायक प्रक्रिया आहे, विशेषतः जर भावनांनी अद्याप थंड केले नाही. स्वतःला समजून घेणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे चूक न करणे आणि कृतीबद्दल खेद वाटला नाही. एक मानसशास्त्रज्ञ सल्ला, एक माणूस सह भाग कसे, म्हणून शक्य तितकी झटका मऊ मदत होईल. लांब बॉक्समध्ये निर्णय पुढे ढकलण्यासाठी, शंकांद्वारे तणाव आणि साथीदारास आणखी पश्चाताप करणे आवश्यक नाही, कारण यामुळे केवळ परिस्थितीला गती येईल. निवडलेल्या एखाद्याच्या स्वतःच्या भावनिक अवस्था आणि मनाची भावना लक्षात घेऊन, योग्य क्षणी निवडणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून संभाषण घोटाळ्यामध्ये वळत नाही. कसे एक मनुष्य योग्यरित्या भाग म्हणून? प्रत्येक टप्प्यावर विचार न करता या समस्येकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण बरेच तपशील आहेत जे खात्यात घेतले पाहिजे जेणेकरुन भागीदारांना वेदनादायी न करणे आणि शक्य तितक्या परिस्थितीची सुस्पष्ट करणे नाही. कसे जायचे आणि मनोवैज्ञानिक केवळ अशा परिस्थितीसाठी उपयुक्त सल्ला देतात याबद्दल कोणतीही विशिष्ट सूचना नाही. एखाद्या माणसाबरोबर राहण्यास किती छान वाटतेः - अंतराळातील कारण स्पष्टपणे ओळखणे महत्त्वाचे आहे. जोडीदारास सांगा की तुमच्या नातेसंबंधात नेमके काय संबंध नाही, आणि तुम्हास विवाद वगळता इतर परिणाम कशा दिसणार नाहीत? कारणास्तव दुहेरी अर्थ असावा. भूतकाळातील उदाहरणे न वापरण्याचा प्रयत्न करा. - आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर कसे सहभागी करायचे याबद्दल बोलणे, हे एक महत्त्वाचे सल्ला देणे महत्त्वाचे आहे - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जरी प्रेमी निर्दयी आणि असभ्यपणा दर्शवत असला तरीही एखाद्याला उत्तेजन नकोसे वाटू नये. - एकही आरोप आणि अपमान असू नये, कारण सर्व प्रथम हे महिला तिच्या दुर्बलतेचे लक्षण आहे. आपणास भागीदार जबाबदार करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही आणि स्वतः ला सर्वकाही घेण्यास सर्वोत्तम आहे. फक्त भयानक शब्द वापरू नका "ते आपल्याबद्दल नाही", कारण ते बर्याच वेळा दुर्लक्षाने समानार्थी आहेत. - आपल्याला वापरत असलेल्या किंवा आवडलेल्या एखाद्या मनुष्याबरोबर कसे सहभागी करायचे हे आणखी एक महत्त्वाची सल्ला, निरर्थक आशा बाळगू नका. मित्रत्वाची ऑफर करणे आणि कोणत्याही विसंगती टाळणे आवश्यक नाही. ठाम रहा आणि एक बिंदू ठेवा. जर सर्वकाही चांगले होते, तर भविष्यात संबंध सुधारेल. - शेवटी, एकत्र कॉफी पिण्यासाठी किंवा एकत्र चालायला देऊ नका कारण ती निरर्थक आशा आहे. सर्वोत्तम उपाय म्हणजे फक्त उठणे आणि सोडून देणे त्याचप्रमाणे, त्या व्यक्तीने आक्रमकतेचे दोष दाखविण्यास सुरुवात केली तर दोष देणे, किंवा, त्याउलट, राहण्यास सांगा. स्पष्टपणे सांगा की हा निर्णय अंतिम आहे. हे सर्व संपर्क तोडणे महत्वाचे आहे, म्हणजे, ते सोशल नेटवर्क्सवरून काढून टाका, फोन ब्लॉक करा, सर्वसाधारणपणे, आपल्या जीवनातून हटवा. यामुळे दोन्ही भागीदारांना वेगळे राहणे आणि घोटाळे आणि मारामारी टाळणे शक्य होणार आहे. मानसशास्त्रज्ञांचीही सल्ला आहे ज्याचा वापर आपण एखाद्या मनुष्याबद्दल अजूनही भावना अनुभवत असल्यास, परंतु आपण आपल्या नातेसंबंधाचे नूतनीकरण करू इच्छित नाही. नवीन जीवन सुरू करण्यासाठी, सर्व भावना सोडवण्याची शिफारस केली जाते, हे एखाद्या मैत्रिणीबरोबर घरी किंवा मिररच्या समोर किंवा इतर कोणत्याही प्रकारे करता येते. आत्मा वर जमा झालेल्या सर्व गोष्टी व्यक्त करा उदाहरणार्थ, अभ्यासाची भाषा, प्रवास, एक छंद शोधणे, सामान्यतः सर्वकाही करा जे सकारात्मक भावना आणतील आणि माजी प्रियकरांच्या विचारांपासून विचलित होईल. आपण बदलू शकता आणि बाहेरून, उदाहरणार्थ, वजन कमी करू शकता, नवीन केशर तयार करू शकता किंवा आपली अलमारी अद्ययावत करू शकता. मित्रांच्या मंडळात भरपूर वेळ घालविण्याचा प्रयत्न करा आणि नवीन परिचितांना घाबरू नका. हे सर्व टिप्स आपल्याला सुरवातीपासून जीवन सुरू करण्यास आणि शेवटी अयशस्वी झालेल्या संबंधांबद्दल विसरू देण्यास अनुमती देईल. |
Kolhapur News : दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात नारळाचे केसर काढण्यास, खोबऱ्यांची वाटी उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी केसर काढून नारळ, खोबऱ्यांचे तुकडे करून विक्री करावी असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. (Breaking Marathi News) चैत्र यात्रेत जोतिबा मंदिरात (Jotiba Chaitra Yatra) भाविकांची माेठी गर्दी असते. केसर काढून नारळ फोडताना केसराचा ढीग पडतो. हा ढिग लवकर बाजूला होत नाही. त्यामुळे भाविकांची अडचण होते. तसेच यात्रेत गुलाल- खोबरे मोठ्या प्रमाणात उधळण्यात येते. यामध्ये अखंड खोबऱ्यांची वाटी सुद्धा पालखी, सासनकाठीवर उधळली जाते. अखंड खोबऱ्यांची वाटीमुळे भाविक जखमी होतात. उंचीवरून व लांबून आलेल्या खोबऱ्यांच्या वाटीचा मार भाविकांना जोरात बसतो. यावर उपाय म्हणून प्रशासनाने जोतिबा मंदिरात नारळाचे केसर काढणे आणि दुकानात खोबऱ्यांची वाटी विक्रीस मनाई केली आहे. व्यापाऱ्यांनी केसर काढून आणि खोबऱ्यांचे तुकडे करून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. साम टीव्हीशी बाेलताना तहसीलदार रमेश शेंडगे (tashildar ramesh shendge) म्हणाले नारळाचा कचरा पडतो. नारळपाणी सांडून भाविक घसरून पडतात. हे टाळण्यासाठी नारळ केसर काढून देण्याबाबत आदेश दिला आहे. व्यापारी, दुकानदार आणि भाविकांनी सहकार्य करून यात्रा सुरळीत पार पाडावी. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
MPSC: संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) पहिल्या महायुध्दानंतर अस्तित्वात असलेली 'लीग ऑफ नेशन्स' ही संघटना बरखास्त करून त्याच संघटनेचे व्यापक रूप म्हणून 'संयुक्त राष्ट्रसंघ' (युनो ूण्ै) या नव्या संघाची स्थापना दुसर्या महायुध्दानंतर पन्नास प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन दि. २६ जून १९४५ रोजी युनोच्या सनदेला सॅन फ्रन्सिस्को येथे मान्यता दिली. व दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोेजी 'युनो' अस्तित्वात आले. युनोचे सदस्यत्व जगातील कोणत्याही राष्ट्राला घेता येते. मात्र त्या राष्ट्राचा जागतिक शांतता सद्भावना यावर विश्वास असला पाहिजे, त्या राष्ट्राला युनोची सनद मान्य असली पाहिजे, त्या राष्ट्राला युनोचे सभासदत्व घेतल्यानंतरच्या जबाबदारीची जाणीव असून ती जबाबदारी घेण्याची त्याची तयारी असली पाहिजे. ३.व्यक्ती व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची जोपासना व संवर्धन करणे. ४.मानवी दृष्टीकोनातून तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या प्रसंगातून मार्ग काढणे व समस्या दुर करणे. ५.जगातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नती विकासासाठी आंतरराष्ट्रीय श्रमशक्ती आणि यंत्रशक्तीचा उपयोग करणे. **युनोचे मुख्यालय : ****युनोच्या मुख्य भाषा : युनो ही आंतरराष्ट्रीय संघटना असल्याने तिचे कामकाज एकुण ६ प्रमुख भाषामध्ये चालते. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज आणि अरेबिक. **युनोचे ध्वज : फिकट निळया रंगाच्या कापडावर पांढर्या रंगाने युनोचे बोधचिन्ह असलेला ध्वज. **युनोचे बोधचिन्ह : पृथ्वीच्या भोवती ऑलिव्ह झाडाच्या दोन फांद्या. युनोचे स्वतःचे स्वतंत्र पोष्ट ऑफिस आणि टपाल तिकिटे आहेत. युनो संघटनेमध्ये सुमारे ५२,००० व्यक्ती काम करीत आहेत. **युनोच्या कार्याकारी संघटना : १. महासभा (जनरल असेंब्ली) : २. सुरक्षा समिती : ३. आर्थिक आणि सामाजिक समिती(श्र्छैश्ैछ) : ४. विश्वस्त समिती (ट्रस्टीशिप कौन्सिल) : ५. आंतरराष्ट्रीय न्यायालय : ६. सचिवालय : *****महासभा (जनरल असेंब्ली) : युनोचे सदस्य असलेल्या प्रत्येक राष्ट्राचा कमीत-कमी एक प्रतिनीधी महासभेचा सदस्य असतो. काही राष्ट्रे पाचपर्यंत प्रतिनिधी पाठवू शकतात. परंतु एक प्रत्येक राष्ट्राला एकाच मतांचा अधिकार असतो. महासभेतील सदस्य राष्ट्रांचे वर्षाला एक तरी अधिवेशन होतेच. सुरक्षा समितीच्या विनंतीवरून युनोचे सरचिटणीस विशेष अधिवेशन बोलावू शकतात. दरवर्षी महासभा आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडते, सुरक्षा समिती, आर्थिक व सामाजिक समिती, विश्वस्त समिती यांचे सदस्य निवडते, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या न्यायमूर्तीची निवड करणे, युनोच्या वार्षिक अंदाजपत्रकाला मान्यता देणे व आर्थिक वा राजकीय महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी ठराव करणे इ. महासभेची प्रमुख कामे होत. अति महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असल्यास २/३ बहुमताची गरज असते. *****सुरक्षा समिती : आंतरराष्ट्रीय शांतता टिकविणे हे या समितीचे प्रमुख काम. या समितीत पाच कायम स्वरूपी व दहा तात्पुरते (दोन वर्षासाठी) असे १५ सभासद असतात. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन हे कायम सभासद असून त्यांना नकाराधिकार (व्हेटो) वापरण्याच्या अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून बहुमतातील ठरावही फेटाळता येतो. समितीच्या अध्यक्ष दर महिन्याला बदलतो व सदस्यराष्ट्रांच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार त्यांचा क्रम ठरतो. महासभेच्या सहाकार्याने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायमूर्तींची निवड करणे, सरचिटणीसाची निवड करणे, नव्या राष्ट्राला युनोचे सदस्य करणे किंवा जुन्याचे सदस्यत्व रद्द करणे इत्यादी गोष्टी सुरक्षा समितीच्या अधिकारात येतात. सुरक्षा समितीचे दहा तात्पुरते सदस्य पुढील प्रमाणे :- बांगलादेश, माली, टयुनिशिया, जमैका, युक्रेन, मॉरिशस, कोलंबिया, आयर्लंड, नॉर्वे, सिंगापुर (३१ डिसेंबर २००२) आंतरराष्ट्रीय आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक करणे तसेच मानवी मूल्य आणि मुलभूत हक्क अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून ही समिती काम करते. महासभेने २/३ बहुमताने निवडून दिलेल्या ५४ सभासदांचा या समितीत समावेश असतो. युरोप, आफि्रका, लॅटिन अमेरिका, प.आशिया, आग्नेय आशिया व प्रशांत महासागर या भागातील आर्थिक समस्या सोडविण्यासाठी या समितीअंतर्गत पाच प्रादेशिक आयोगांची निर्मिती करण्यात आली आहे. ****विश्वस्त समिती (ट्रस्टीशिप कौन्सिल) : ज्या प्रदेशाला अजून पूर्ण स्वराज्य वा स्वायतत्ता मिळाली नाही अशा प्रदेशातील लोकांचे आर्थिक, राजकीय, सामाजिक हितसंबध जपण्याचे लक्ष्य असते. आतापर्यंत अशा प्रकारच्या ११ विश्वस्त प्रदेशांपैकी दहा विस्वस्त प्रदेश स्वतंत्र झाले. आहेत. विश्वस्त समितीने १४ सदस्य असतात. यातील ५ सुरक्ष समितीचे कायम सभासद असतात व उरलेले सभासद विश्वस्त प्रदेशाचा कारभार पाहणारी राष्ट्र असतात. ****आंतरराष्ट्रीय न्यायालय : आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचे काम हे न्यायालय करते. न्यायालयात १५ न्यायाधीश असून प्रत्येक न्यायाधीशची मुदत ९ वर्षांची असते. मुदत संपल्यावर त्यांची पुनर्निवड होऊ शकते. एकाच देशाचे दोन न्यायाधीश असत नाहीत. न्यायालयाचे काम हेग येथून चालते. पण विशेष परिस्थितीत न्यायालयाचे सत्र इतरत्रही भरते. ****सचिवालय : युनोचे सचिवालय न्यूर्यॉक येथे असून संघटनेचे कामकाज तेथून चालते. न्यायालयाचा प्रमुख सरचिटणीस असतो. तोच संघटनेचा मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी सुध्दा असतो. त्याच्या हाताखाली अवर-सचिव आणि सहायक सचिव असतात. सरचिटणीसाची नेमणूक महासभा करते. सरचिटणीसाची मुदत पाच वर्षांची असते पण मुदतीनंतर त्यांची पुनर्निवड होऊ शकते. |
नांदेड : शहर व जिल्ह्यामध्ये खाकीचा धाक कमी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा(law and order) प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या शहर व जिल्ह्यात जबरी चोऱ्या, मारहाण, खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार यांसारख्या (nanded crime news )घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असून, सर्वजण दहशतीखाली वावरत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यामध्ये भरदिवसा पैशांची बॅग लिफ्टिंग, खून, जबरी चोरी, अल्पवयीन मुलींना पळवणे, विवाहितांचा छळ, शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मारहाण, घरफोडी आदी घटना पोलिसांचा धाक कमी झाल्याने सर्रासपणे घडत आहेत. चोरट्यांनी डोके वर काढल्याने सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांमध्येही धास्ती भरली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारखे नांदेड जिल्हा क्राईममध्ये नावारुपाला येते की काय? अशी शंका दृढ होत चालली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून मारहाण करून खून करण्याचे(murder) प्रकार घडत असताना, पोलिस मात्र तपासकामी कमी पडत असल्याचे दिसत आहे. नांदेड शहरामध्ये पंधरा दिवसात दोन खून झाले आहेत. मुरमुरा गल्ली आणि शारदानगर येथे क्षुल्लक कारणावरून तरुणांना जीव गमवावा लागला आहे. विशेष आरोपी हे २० ते २५ वयोगटातीलच आहेत. शहरामध्ये भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबतच जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचाही धाक पडला आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक, खरेदीसाठी जातांना जीव मुठीत धरूनच सर्वसामान्यांना बाहेर पडावे लागत आहे. |
कोणत्याही आगीशी मुकाबला करण्यासाठी अग्निशमन दलातल्या प्रत्येकाला प्रशिक्षण देण्यासह सुसज्ज अशी सामग्रीही देण्यात येते. शनिवारी वरळी येथील साधना इमारतीमध्ये लागलेल्या आगीत धुराची तीव्रता इतकी होती की हा धूर नेमका कसला आहे, हे लक्षात येण्यापूर्वीच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची घुसमट सुरू झाली. दम लागला, श्वास घेणेही मुश्कील झाले. आग लागल्यानंतर धुराचा सामना करावा लागतो, पण भडकलेली ही आग ज्या केमिकल्समुळे लागली होती त्यावर पाण्याचा शिडकावा केल्यानंतर धुराचे लोट उठत होते. त्यामुळे पुढचे काही दिसत नव्हते. श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ नये यासाठी देण्यात आलेल्या ब्रिदिंग ऑपरेटर्स सेटची मदतही अपुरी पडल्यामुळे घुसमट झाल्याची शक्यता आहे. |
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २०१९च्या निवडणुकीत अपक्ष असूनही भाजप उमेदवाराला हरवून सातव्यांंदा विजय मिळवला. याच रागात त्यांची राजकीय कारकीर्द संपवून त्यांनी पुढील निवडणूक लढवू नये म्हणून त्यांचा छळ सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांचा मुलगा अभिनव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. वडिलांनी गेल्या ३२ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम केले. त्यांचे काम व मेहनतीमुळेच ते सात वेळा निवडून आले. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाल्यास ते पुढील निवडणूक लढणार नाहीत आणि जरी लढले तरी जिंकून येणार नाहीत, असा विचार करून त्यांच्या छळाचा कट आखण्यात आला. त्यांच्यावर आराेप करत चुकीचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले, असे अभिनव यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले. अभिनव यांच्या तक्रारीवरून दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल, जिल्हाधिकारी संदीप सिंग, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, उपजिल्हाधिकार अपूर्वा शर्मा, उपविभागीय अधिकारी मनस्वी जैन, पोलीस निरीक्षक मनोज पटेल, रोहित यादव, फत्तेसिंग चौहान, तलाठी दिलीप पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नऊ जणांनी त्यांचा कशा पद्धतीने संगनमत करून छळ केला याबाबतचे पुरावे, तसेच यासंदर्भात वेळोवेळी करण्यात आलेले तक्रार अर्ज अभिनवने पोलिसांकडे सादर केले. तेथील प्रशासन मदत करणार नाही म्हणून त्यांनी मुंबईत आत्महत्या केली. मुंबई पोलीस याची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देतील या विश्वासाने त्यांनी येथे आत्महत्या केली. आता पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अभिनव यांनी केली. |
दोन वैमानिकांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी । मिसळपाव\nदोन वैमानिकांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी\nअमेरिकन हवाईदलातून निवृत्त होऊन लेफ्टनंट कर्नल चार्ल्स उर्फ चार्ली ब्राउन परिपूर्ण असे आयुष्य जगत होता. १९७२ साली अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातून निवृत्त झाल्यावर मायामी येथे स्थायिक झाला. १९८६ सालच्या एका कॉम्बॅट पायलट रीयुनियन सोहळ्यात त्याला वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्याला एकाने विचारले की "दुसर्या महायुद्धातील तुमचा सहभाग असलेल्या एखाद्या कामगिरीची आठवण सांगता का?" त्यावर त्याने 'ती' घटना सांगितली. ती घटना सांगितल्यावर चार्ल्स ब्राउनला वाटले की त्या घटनेतील एका व्यक्तीचा शोध घ्यायला हवा. म्हणून मग त्याने एक शोधमोहीम सुरू केली. मात्र त्यात समस्या अशी होती की दुसर्या महायुद्धातील ती घटना घडून बराच काळ लोटला होता. बरे, शोध तरी कसा घेणार? कारण त्या व्यक्तीचे नावही त्याला ठाऊक नव्हते. त्याला फक्त एवढेच माहीत होते की ती व्यक्ती एक वैमानिक होती. सुमारे चार वर्षे झाली, तरी ही शोधमोहीम कोणत्याच निष्कर्षापर्यंत येत नव्हती. अखेरचा उपाय म्हणून मग त्याने कॉम्बॅट पायलट असोसिएशनच्या नियतकालिकाला एक पत्र पाठवले. त्याव्यतिरिक्त आता करण्यासारखे फारसे काही उरले नव्हते.\nलेफ्टनंट कर्नल चार्ल्स ब्राउन यांचे हे छायाचित्र जालावरून साभार.\nकाही महिन्यांचा काळ लोटला आणि त्याला एक पत्र आले. ते आले होते कॅनडास्थित फ्रान्झ स्टिगलर याचे. त्याने पत्रात लिहिले होते की तुम्ही ज्या व्यक्तीच्या शोधात आहात, ती मीच आहे.\nफ्रान्झ स्टिगलर यांचे हे छायाचित्र जालावरून साभार.\nफोनवर त्या दोघांचे बोलणे झाले अन चार्ल्सची खातरी पटली की त्याचे शोधकार्य यशस्वी झाले आहे. आता मात्र चार्ल्स भूतकाळातल्या आठवणींमध्ये दंग झाला. १९४१ साली अमेरिकेने दुसर्या महायुद्धात उडी घेतली, त्या वेळी सेकंड लेफ्टनंट चार्ल्स ब्राउन अमेरिकन हवाईदलातला एक उमदा तरुण वैमानिक होता. इंग्लंडमधल्या एका तळावर त्याची नेमणूक करण्यात आली होती. तो B-17F या बॉम्बर प्रकारच्या विमानाचा वैमानिक होता. तो ३७९व्या बंबार्डमेंट ग्रूपचा एक सदस्य होता. यात Ye Olde Pub या नावाच्या टीमचे चार्ल्स धरून १० सदस्य होते.\nचार्ल्स ब्राऊन आणि त्याचे Ye Olde Pubचे इतर सहकारी. हा फोटो जालावरून साभार.\n२० डिसेंबर १९४३ रोजी या ग्रूपला एक कामगिरीवर पाठवले गेले होते. यात त्यांना जर्मनीतल्या ब्रेमेन येथील एका विमानाच्या उत्पादन स्थळाला उद्ध्वस्त करायचे होते. मात्र ब्रेमेन येथे मोठ्या संख्येने जर्मन लढाऊ वैमानिक तैनात होते. या मोहिमेत त्यांना 'पर्पल हार्ट कॉर्नर' या व्यूहरचनेत उडायचे होते. यात धोका असा होता की या व्यूहरचनेतील कडेच्या विमानांना असलेल्या जोखमीची तीव्रता मधल्या विमानांपेक्षा अधिक होती. कारण त्यांना जर्मन वैमानिकांकडून जास्त धोका होता. जर्मन सैनिकांना थेट आतल्या विमानांवर हल्ला करायच्याऐवजी कडेच्या विमानांवर हल्ला करणे अधिक सोपे जायचे. मोक्याचा क्षणी त्यांच्यापैकी एका वैमानिकाला माघार घ्यावी लागल्याने चार्ल्सला व्यूहरचनेत कडेची जागा घ्यावी लागली. हा हल्ला अमेरिकन वैमानिकांसाठी यशस्वी झाला, तरी परतीचा मार्ग चार्ल्ससाठी एवढा सुकर नव्हता. ज्या वेळी चार्ल्स आपल्या विमानातून बॉम्ब डागणार होता, त्या क्षणी विमानविरोधी तोफांकडून त्याच्या विमानाच्या नाकाचे नुकसान झाले. तसेच त्याचे क्रमांक दोनचे इंजीन कामातून बाद झाले आणि चौथ्या क्रमांकाचे इंजीनही बाद झाले, जे आधीच जरा कमकुवत झाले होते.\nयामुळे चार्ल्सच्या विमानाचा वेग चांगलाच मंदावला आणि ते ग्रूपच्या इतर विमानांबरोबर राहू शकले नाही. चार्ल्सचे विमान आकाशात हेलकावे खाऊ लागले होते. आता त्याच्यावर जर्मन लढाऊ विमानांच्या हल्याचा धोका आणखीनच वाढला. अन झालेही अगदी तसेच. अचानक जवळजवळ १५ जर्मन लढाऊ विमानांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चार्ल्सच्या विमानाचे तिसरे इंजीनही बाद झाले. विमानातील प्राणवायूची प्रणाली काम करेनाशी झाली. तसेच आतील विद्युत प्रणालीही बिघडल्या होत्या. त्यामुळे विमानच्या आतून हल्ला करायच्या बहुतेक सर्व प्रणाल्या जाम झाल्या. फक्त समोरील काही बंदुका काम करत होत्या. याखेरीज त्याच्या विमानात बसलेले अनेक सहकारी जखमी झाले होते. Eckenrode हा विमानविरोधी तोफांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. Yelesanko यालाही पायाला दुखापत झाली होती. ब्लॅकफोर्ड्चे पाय गोठले होते, Pechoutच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच चार्ल्सच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. प्रथमोपचारासाठी ठेवलेले मॉर्फिनही गोठले गेले. त्यामुळे जखमींवर त्वरित उपचार करण्यात अनेक अडचणी येत होत्या. विमानातील रेडियोही उद्ध्वस्त झाला होता. विमानाच्या अंतर्गत प्रणाली बहुतकरून निकामी झाल्या होत्या. तसेच विमानाचे बाहेरून खूप नुकसान झाले होते.\nB-17 जातीचे एक विमान. चार्ल्स बॉऊन उडवत असलेले B-17 बॉम्बर विमानही असेच होते. हा फोटो जालावरून साभार.\nजमिनीवरून हे हेलकावे खात असलेले बॉम्बर विमान जर्मन वैमानिकांना दिसत होते. या वैमानिकांपैकी एक म्हणजे फ्रान्झ स्टिगलर. त्या वेळी तो त्याच्या विमानात इंधन भरत होता. लवकरच त्याने उड्डाण केले आणि चार्ल्सच्या विमानाजवळ पोहोचून त्याच्या समांतर रेषेत स्वतःचे विमान उडवू लागला. आता मात्र चार्ल्स अधिकच चिंताग्रस्त झाला, कारण त्याला एक जर्मन लढाऊ विमान त्याच्या विमानाच्या अगदी जवळ आल्याचे दिसत होते. फ्रान्झला मोडकळीला आलेल्या विमानात जखमी झालेले आणि अडकलेले अमेरिकन हवाईदलातील सैनिक दिसत होते. एकमेकांना मदत करायची त्यांची केविलवाणी धडपड दिसत होती. एका जर्मन विमानाला आपल्या इतके जवळ पाहून मग चार्ल्सने त्याच्या एका सहकार्याला त्याच्यावर बंदूक रोखून तयार राहायला सांगितले. मात्र हल्ला करण्यास मनाई केली. आश्चर्याची बाब म्हणजे अशा हालचाली पाहूनही फ्रान्झने त्यांच्यावर हल्ला चढवला नाही. तो काही काळ त्यांच्या बाजूने उडत राहिला. तो अशा प्रकारे त्यांच्या बाजूने उडत राहिला की जेणेकरून जर्मन विमानविरोधी तोफा B-17ला लक्ष्य करू शकणार नाही.\nफ्रान्झ खुणावून चार्ल्सला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. मात्र चार्ल्सला काहीच कळत नव्हते. त्याने मग त्यांना उत्तरेकडील समुद्रापर्यंत साथ दिली. फ्रान्झला असेही भय वाटत होते की जर कुणा जर्मन अधिकाऱ्याने त्याला हे करताना पहिले, तर काय होईल? त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध होईल. वेळ हातातून निसटत चालला होता. आता निर्णय घेणे आवश्यक होते. फ्रान्झने चार्ल्स व त्याच्या विमानातल्या सैनिकांना एक सलाम ठोकला आणि आपल्या मार्गाने निघून गेला.\nया प्रसंगाचे नाट्यमय रूपांतर दर्शवणारा फोटो. हा फोटो जालावरून साभार.\nत्यानंतर चार्ल्सने त्याचे B-17 जवळजवळ २५० मैल समुद्रावरून (नॉर्थ सी) उडवत नेले अन आपल्या एका बेसवर यशस्वीरित्या उतरवले. मात्र यादरम्यान Eckenrode याचा मृत्यू झाला आणि बाकी सारे जिवंत राहिले. पुढे चार्ल्सने त्याच्या कमांडिंग ऑफिसरला ही गोष्ट सांगितली. मात्र त्या अधिकाऱ्याने हा किस्सा इतर कोणास सांगायला मनाई केली. कारण त्याला जर्मन सैनिकांच्या चांगुलपणाबद्दल गोष्टी प्रसिद्ध होऊ द्यायच्या नव्हत्या. जर्मनीला या युद्धात नेस्तनाबूत करणे आवश्यक होते. फ्रान्झनेही हा किस्सा कोणाला सांगितला नाही, अन्यथा त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला असता.\nफ्रान्झने दाखवलेल्या माणुसकीच्या सन्मानार्थ हे चित्र काढले गेले. त्याचा हा फोटो जालावरून साभार.\nपुढे चार्ल्सने युद्धात अनेक कामगिर्या पार पाडल्या. फ्रान्झनेही युद्ध संपेपर्यंत आपली कामगिरी बजावली. १९८६नंतर चार्ल्सने फ्रान्झचा शोध घेतला. फ्रान्झ युद्ध संपल्यानंतर व्हॅकुंवर, कॅनडा येथे स्थायिक झाला. पुढे झालेल्या प्रत्यक्ष भेटीत चार्ल्स म्हणाला की त्याला असे वाटत होते की ४० वर्षांनी त्याला त्याचा हरवलेला भाऊ परत भेटला. फ्रान्झ म्हणाला की तो चार्ल्सला हाताने खुणावून एखाद्या जर्मन बेसवर उतरून शरण यावे अथवा स्वीडनच्या दिशेने उडत जावे असे सांगत होता. मात्र फ्रान्झ काय सांगत आहे ते चार्ल्सला त्या वेळी कळले नव्हते. त्या वेळी फ्रान्झने शत्रुपक्षाच्या सैनिकांना जिवंत जाऊ दिल्याचे कारण सांगितले. तो म्हणाला की त्याच्या वरिष्ठ अधिकार्याने त्याला एकदा सांगितले होते की त्याने जर पॅराशूटमधून उडणार्या एखाद्या सैनिकाला मारले, तर तो स्वतः (वरिष्ठ अधिकारी) त्याला (फ्रान्झला) जिवंत सोडणार नाही. फ्रान्झच्या मते त्या वेळी चार्ल्स आणि त्याचे सहकारी त्याला पॅराशूटमधील माणसांसारखे वाटले आणि त्याच्यातील माणुसकीचा विजय झाला. मात्र जसे त्याला जर्मन युद्ध तळ दिसले, तसे त्याने चार्ल्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना सलाम ठोकला आणि निघून गेला.\nचार्ल्स आणि फ्रान्झ यांच्या सन्मानार्थ फ्लोरिडा राज्याचे तत्कालीन गव्हर्नर जेब बुश यांनी त्याची २००१ साली भेट घेतली. हा फोटो जालावरून साभार.\nचार्ल्स व फ्रान्झ फिशिंगचा आनंद घेताना...\nडावीकडून चार्ल्स व त्याची पत्नी जॅकी, फ्रान्झची पत्नी हिया व फ्रान्झ. वरील दोन्ही फोटो जालावरून साभार.\nचार्ल्स आणि फ्रान्झ हे एका अनोख्या मैत्रीच्या नात्यात गुंफले गेले ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत. योगायोग असा की दोघेही २००८ साली काही महिन्यांच्या अंतराने मृत्यू पावले. फ्रान्झ स्टिगलरने युद्धासारख्या क्रूर वेळीदेखील आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवली. फ्रान्झने चार्ल्सला भेट दिलेल्या एका पुस्तकात लिहिलेला संदेश त्याच्याच शब्दांत...\nफारच जगावेगळी कहाणी आहे ही.\n19 Oct 2017 - 2:55 am । सही रे सई\nफारच जगावेगळी कहाणी आहे ही. ती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल श्रीरंग यांचे विषेश कौतुक.\nअनोखी कहाणी आहे ही .\n19 Oct 2017 - 8:38 am । अभिजीत अवलिया\n19 Oct 2017 - 9:26 am । लाल टोपी\nब-याच दिवसांनंतर तुमचे लिखाण वाचायला मिळाले आणि नेहमीप्रमाणे आवडले.\n19 Oct 2017 - 10:20 am । कविता१९७८\n19 Oct 2017 - 10:45 am । अमरेंद्र बाहुबली\n19 Oct 2017 - 11:19 am । बाजीप्रभू\nखूप छान माहिती... सुंदर लिहिलंय.\nयुद्धामधील मानवता. छान गोष्ट.\n19 Oct 2017 - 12:23 pm । पाषाणभेद\nआगळी आणि अनाकलनीय\n19 Oct 2017 - 5:51 pm । सुनील\n"माणूस" फ्रान्झची कृती आगळीवेगळी असली तरी "सैनिक" फ्रान्झची कृती मात्र अनाकलनीय वाटली.\n19 Oct 2017 - 6:50 pm । गामा पैलवान\nनाझी विचारांशी ओळख असलेल्यांना हे अनाकलनीय आजिबात वाटणार नाही.\nनाझी विचारांशी ओळख\n19 Oct 2017 - 7:50 pm । अमित खोजे\nहे कुठे वाचायला मिळेल का? लेख सुंदर झालाय! अभिनंदन श्रीरंग.\nसुरेख लिहिलंय रे श्रीरंगा\n19 Oct 2017 - 8:07 pm । अभ्या..\n19 Oct 2017 - 8:58 pm । निशाचर\n19 Oct 2017 - 10:49 pm । मित्रहो\nदोन वेगळ्या व्यक्तींची ओळख झाली. आणि ती दोघे नंतर एकमेकाला भेटली हे सुद्धा छान.\n"खरे जीवन बर्याचदा कथेपेक्षा\n19 Oct 2017 - 11:21 pm । डॉ सुहास म्हात्रे\n"खरे जीवन बर्याचदा काल्पनिक कथेपेक्षा जास्त चमत्कृतीपूर्ण असते" हे अधोरेखीत करणारा सुंदर लेख !\nअतिशय रोचक आणि आगळीवेगळी\n20 Oct 2017 - 12:13 am । एस\nअतिशय रोचक आणि आगळीवेगळी कहाणी.\nउत्तम. आगळी वेगळी युद्धकथा.\n20 Oct 2017 - 2:30 am । पद्मावति\nयुध्द कथा रम्य असतात ते\n20 Oct 2017 - 7:38 pm । प्रमोद देर्देकर\nयुध्द कथा रम्य असतात ते पुन्हा या कहाणी वरुण सिद्ध झाले.\n23 Oct 2017 - 9:43 pm । पैसा\n24 Oct 2017 - 11:27 am । स्वाती दिनेश\nआगळीवेगळी कहाणी आवडली.\nयुध्दस्य कथा रम्याः!\nछान लेखन! खरंच अनोखी कहाणी.\n26 Oct 2017 - 12:35 am । रुपी\nरंगाप्पा लेखं आवडला.\n26 Oct 2017 - 7:48 pm । कॅप्टन जॅक स्पॅरो\nलेख जमलाय हो रंगांण्णा..!!!\n26 Oct 2017 - 8:18 pm । मोदक\n26 Oct 2017 - 8:26 pm । Nitin Palkar\nछान कथा! सुन्दर लेखन!!\n27 Oct 2017 - 10:15 am । श्रीरंग_जोशी\nसर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे धन्यवाद.\nपाच वर्षांपूर्वी जालावर चार्ल्स ब्राऊन व फ्रान्झ स्टिगलर यांच्याबाबत वाचले. तेव्हाच त्यावर लेख लिहायचे मनात आले होते. ते विलंबाने का होईना करू शकलो याचे समाधान आहे. साहित्य संपादकांनी या लेखाची निवड दिवाळी अंकासाठी केली यासाठी त्यांना धन्यवाद.\nफ्रांझची ही कृती प्रत्येकाला पटेलच असे आवश्यक नाही.\nया घटनेपूर्वी दुसऱ्या महायुद्धातील विविध कामगिऱ्यांमध्ये फ्रान्झने बरेच शौर्य गाजवले होते. चार्ल्सचे बॉम्बर विमान पाडले असते तर त्याला नाइटस क्रॉस मिळाला असता. परंतु आक्रमणच काय तर स्वतःचा बचावही करण्याच्या परिस्थितीत नसणाऱ्या शत्रूच्या तुकडीवर हल्ला करणे त्याला योग्य वाटले नाही. कदाचित चार्ल्सबरोबर रेडिओद्वारे संपर्क झाला असता तर त्याला शरण येण्याचा इशारा फ्रांझने दिला असता. परंतु तो पर्याय उपलब्ध नव्हता असे दिसते.\nअवांतर - सध्या याच घटनेवरचे अ हायर कॉल हे पुस्तक वाचत आहे. सुरुवातीलाच कळलेली बाब म्हणजे फ्रान्झ नाझी पक्षाचा सदस्य नव्हता.\nशत्रूसैन्यातली माणसे असूनही\n28 Oct 2017 - 12:40 am । रेवती\nशत्रूसैन्यातली माणसे असूनही त्यांना दिलेली वागणूक पाहून बरे वाटले. |
रावेर - तालुक्यातील निरूळ येथील आशापुरी माता मंदिराच्या मागील भागात नाल्यामध्ये सुरू असलेला जुगार अड्डा रावेर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी पाच जुगारींना अटक करत त्यांच्याकडून ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, जुगार अड्डा चालवणारा पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार होण्यात यशस्वी झाला. रावेर शहरातील सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. निरुळ गावात मंदिरामागील नाल्यात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रामदास वानखेडे, उपनिरीक्षक मनोहर जाधव, हवालदार जितू पाटील, हरी पाटील, भरत सोपे, जाकीर पिंजारी, नीलेश चौधरी, ओमप्रकाश सोनी, सुरेश मेढे यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत समाधान फकीरचंद खैरे, महेंद्र किसन पाटील, जगन्नाथ धनसिंग चौधरी, दगडू आत्माराम पाटील, वसंत बाबुराव पाटील (सर्व रा.निरुळ) यांना अटक करण्यात आली. तर जुगार अड्डा चालक दिलीप शंकर पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. किनगाव (ता.यावल) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेण्यात आले, तर तीन जण पसार झाले. सोमवारी सायंकाळी फैजपूर डीवायएसपींच्या पथकाने ही कारवाई करत ४६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.किनगावातील लेंडी नाल्याच्या काठावर तडवी वाड्याजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांना मिळाली. त्यानुसार यावलचे सहायक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, सहायक फौजदार अजीज शेख, हवालदार राजेंद्र पाटील, संजीव चौधरी, अविनाश चौधरी, शेख असलम, गणेश मनुरे, विकास सोनवणे, सुशील घुगे, दिलीप तायडे यांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकला. त्यांना ६ जण जुगार खेळतांना आढळले. त्यातील खलील सिराज तडवी, साहेबराव आधार महाजन व अजय साहेबराव कोळी यांना पकडण्यात आले. तर गणेश दिलीप साळुंके, सुरेश हरचंद भोई व जयवंत उर्फ बाळासाहेब रामचंद्र पाटील (रा.डोणगाव) हे तिघे पसार झाले. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला. |
कझान अरेना -दक्षिण कोरियाने अखेरच्या एफ गटसाखळी लढतीत गतविजेत्या जर्मनीचा 2-0 असा पराभव करताना फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद केली. या पराभवामुळे गतविजेत्या जर्मनीचे आव्हान गटसाखळीतच संपुष्टात आले आहे. निर्धारित 90 मिनिटांअखेर गोलशून्य बरोबरीनंतर यंग ग्वोन किमने 92व्या मिनिटाला, तर हेयुंग मिन सोनने 96व्या मिनिटाला गोल नोंदविताना कोरियाला विजय मिळवून दिला. एफ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात स्वीडनने मेक्सिकोचा प्रतिकार 3-0 असा मोडून काढताना पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत धडक मारली. तसेच मेक्सिकोनेही 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकाने बाद फेरी गाठली. मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीनंतर लुडविग ऑगस्टिन्सने व्हिक्टर क्लासेनच्या पासवर 50व्या मिनिटाला स्वीडनचे खाते उघडले. त्यानंतर 65व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर अँड्रियास ग्रॅनक्विस्टने स्वीडनला 2-0 असे आघाडीवर नेले. मेक्सिकोच्या एडसन अल्वारेझने 74व्या मिनिटाला नोंदविलेल्या सेल्फ गोलमुळे स्वीडनच्या 3-0 अशा विजयाची निश्चिती झाली. |
नाशिक : जुन्या बिटको (NMC) रुग्णालयातील समस्या कायमच्या सोडवून गरीब रुग्णांना दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी नगरसेवक जगदीश पवार (Jagdish Pawar) यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांना दिले. जगदीश पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन जुन्या व नवीन बिटकोतील समस्या त्यांच्या निर्देशनास आणून आणल्या. त्यांनी तातडीने आयुक्त रमेश पवार यांना उपाययोजनांचे निर्देश दिले. आरती मांजलकर ही आठ महिन्यांची गरोदर महिला सोनोग्राफीसाठी बिटकोत आली असता, सोनोग्राफी मशिन बंद असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. भगवान आहिरे यांच्या नातीचे पोट दुखत होते. तिलाही सोनोग्राफीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले गेले, अशाच व्यथा रोज अनेक रुग्णांच्या वाट्याला येत आहेत. बिटकोत लहान बाळांसाठी ऑक्सिजन नाही आणि ते देण्याची मशिनरी नाही. बिटकोत सोमवारी व गुरुवारी ओपीडी वरच्या मजल्यावर भरते. त्यामुळे गरोदर महिलांना त्रास होतो. फिजिशयन नसल्याने टीबी, बीपी, शुगर, गरोदर महिलांची तपासणी आदी साधे डॉक्टर करतात. तेच औषध देतात. गरोदर महिला व रुग्णांना सिव्हिलला पाठविले जाते. गरीब रुग्णांच्या जीवाशी रोज खेळ सुरू आहे. बिटकोतील ऑपरेशन थिएटरची दुरवस्था झाली आहे. त्यातील यंत्रणाही जुनी झाली आहे. आर्थोपेडीक, डेन्टिस्टचे साहित्य नसल्याने रुग्णांचे हाल होतात. बिटकोत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची (सीएमओ) संख्या कमी आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. बिटकोमध्ये महिनाभरापासून मोतीबिंदूसह डोळ्यांचे ऑपरेशन्स बंद आहेत. डोळ्यांचे ऑपरेशन होणार नाहीत, तुम्ही झाकीर हुसेन रुग्णालयात जा, असे रुग्णांना सांगितले जाते. येथे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर नाही. सोनोग्राफी मशिन आहे, तसेच ते चालविणारा रेडिओलॉजिस्ट नाही. या सर्व गोष्टींमुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे आर्थिक फटका बसतो. बिटकोतील रक्तपेढीत रक्त नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. अनेकदा बाहेरून रक्त मागवावे लागते. बिटकोतील सरकारी महालॅबचे रिपोर्ट वेळत येत नाहीत. बिटकोच्या स्वतःच्या लॅबमध्ये टेस्टिंग होत नाही. तिसरी कृष्णा लॅब सुरू आहे. तिन्ही लॅबच्या तीन तऱ्हांमुळे गरीब रुग्ण गोंधळून जात आहेत. नवीन एमआरआय मशिन ऑपरेटर नसल्याने तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून रिपोर्टस आणावे लागतात. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri) हद्दीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून आजमितीला 181 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसून शासनाकडे लसीची मागणी करण्यात आलेली आहे. रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण 5 आहेत. तर, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 176 आहे. 1 जानेवारी 2023 पासून कोरोनामुळे एकाचा मृत्यु झाला. मंगळवारी खासगी रुग्णालयात 89 वर्षीय वयोवृद्ध पुरुष रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. हा रुग्ण श्वसन आजारकरिता 31 मार्चपासून खासगी रुग्णालयात दाखल होता. खाजगी रुग्णालयाद्वारे रुग्णाच्या मृत्युबाबत माहिती बुधवारी रात्री उशिराने प्राप्त झालेली आहे. कोरोना आजारास घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोनाची तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा मास्क चा वापर करावा. (Pimpri) महानगपालिकेच्या आठही रुग्णालयांत कोरोना रुग्णांकरिता तपासणी उपकरणे मोफत उपलब्ध आहेत. तसेच ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी, येथे कोरोना रुग्णांकरिता उपचाराकामी लागणारे सर्व औषधोपचार व पुरेशा खाटा मोफत उपलब्ध आहेत, गरज भासल्यास नविन थेरगांव रुग्णालय, नविन भोसरी रुग्णालय, नविन जिजामाता रुग्णालय व वायसीएम रुग्णालय येथे कोरोना रुग्ण दाखल करणेकामी खाटांची उपलब्धता त्वरित करण्यात येईल. (Pimpri) सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसून याकामी शासनाकडे लसीची मागणी करण्यात आलेली आहे. लवकरच लस उपलब्ध होईल, असे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. |
पणजीः कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र अवस्थेत मृत सापडलेल्या सिद्धी नाईक आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आता 'जस्टीस फॉर सिद्धी नाईक' ही मोहीम राबविली जात असून, समाजमाध्यमांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सुरवातीपासूनच पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने पोलिस आणि डॉक्टर आता टार्गेट होत आहेत. पोलिसांसोबतच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक विभागानेही या प्रकरणी कमालीचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याचा स्पष्ट झाल्याने यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. घटना घडून बारा दिवस होत आले तरी सिद्धीचे कपडे आणि इतर साहित्य अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास यंत्रणेवर नेटकरी आक्रमकपणे बोलत आहेत. पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा सिद्धीचा मोबाईल, मित्र आणि नातेवाईकांकडे वळवला आहे. डॉक्टरांनी सिद्धीचा तपासासाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचे व्हिसेरा आणि इतर स्वॅब काढलेले नाहीत. त्यामुळे एका अर्थाने न्यायवैद्यक विभागाच्या अहवालाच्या आधारे केल्या जाणाऱ्या तपासासाठीची दारे सध्यातरी बंद झाली आहेत. त्यामुळे डॉक्टरांचा हा प्रचंड हलगर्जीपणा स्पष्ट होत आहे. यावरही सोशल मीडियावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. समाजमाध्यमांवरील काही चॅनल्स, युट्युब, ट्विटर यांनीही हा विषय सध्या तरी न्यायाच्या प्रतीक्षेत ठेवलेला दिसतो. स्नेहा लोटलीकर यांनी प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या करताना काळजी घ्यावी असे म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या विणा नाईक यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारचा तपास चालू असताना प्रसारमाध्यमांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी. या प्रकरणामध्ये पोलिस दोषी असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे गोवा अध्यक्ष जितेश नाईक यांनी राज्यात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या नेत्या बिना नाईक त्यांनीही हे प्रकरण योग्यप्रकारे पोलिस हाताळत नसल्याचं आणि पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'चायपाणी' या सामाजिक माध्यमातील चॅनलच्या श्रुती चतुर्वेदी यांनी गोव्यातल्या महिलांवर अत्याचार वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, महिलांवरील अत्याचार रोखणे मध्ये पोलीस यंत्रणा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे मध्ये सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाला पूर्णपणे सरकारच दोषी आहे. राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध आहे. पोलिस निष्काळजी राहिल्यानेच त्यांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळलेच नाही. महिलांवर मोठ्या प्रमाणात सातत्याने अन्याय होत आहे. यापूर्वीही तरूणींवर बलात्कार करून खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांसाठी राजकीय व्यक्ती, पोलिस दोषी आहेत. - आवडा व्हिएगस, सामाजिक कार्यकर्त्या. पोलिसांनी हे प्रकरण सुरुवातीपासून योग्य प्रकारे हाताळले नाही. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांत पोलिस तपास 'जैसे थे' आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडली आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
भारतामध्ये पुन्हा एकदा फिक्सिंग प्रकरणाच्या चर्चेला उधाण आलंय. झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेन्डन टेलरने खळबळजनक आरोप केला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये एका भारतीय उद्योगपतीने स्पॉन्सरशिपसाठी आणि चर्चेसाठी मुंबईमध्ये बोलावलं होतं. तसेच जेवणानंतर उद्योगपतीनं मला कोकेन दिलं आणि माझ्या अपरोक्ष माझा व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल केलं, असा आरोप ब्रेन्डल टेलरनं केला आहे. ही घटना घडल्यानंतर ब्रेन्डन टेलरने ही बाब आयसीसीला सांगितली आहे आणि त्यानंतर आयसीसीने चौकशी करून ब्रेन्डन टेलरवर बंदी घातली आहे. स्पॉट फिक्सिंगसाठी १५ हजार डिपॉझिट म्हणून डॉलर्स मिळाले. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर २० हजार डॉलर्स मिळणार होते, अशी कबुली देखील ब्रेन्डन टेलरने दिली आहे. स्पॉट फिक्सिंग केलं नाही तर व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. ६ जणांनी मला घेरल्यामुळे मला भिती वाटत होती. त्यामुळे त्यांनी दिलेले १५ हजार डॉलर्स मी स्वीकारले आणि भारत सोडला. काम झाल्यावर ते मला २० हजार डॉलर्स देणार होते. परंतु माझ्यावर ताण होता. त्यामुळे कुटुंब सुरक्षित करून मी ६ महिन्यांनी आयसीसीकडे तक्रार केली. आयसीसीची कारवाई मी स्वीकारतो आहे, अशी पोस्ट ब्रेन्डन टेलरने केली आहे. जागरूकता पसरवा...बऱ्याचदा पत्त्याच्या एका खेळात टेबलवर आपल्याला अनेक पर्याय दिले जातात. तेव्हा एक तर डाव खेळा किंवा सोडून जा. अशावेळी खेळ सोडून जाणंच योग्य असतं. ब्रेन्डन आणि त्याच्या कुटुंबाला बळ मिळो, असं भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विनने ट्विट करत म्हटलं आहे. |
Ajit Pawar Sensational Statement on NCP President : भाकरी फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आता आली आहे. आता विलंब करून चालणार नाही,असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून काही दिवसांपुर्वीच पक्षात नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. या विधानानंतर आज शरद पवार यांनी त्यांच्या 'लोक माझ्या सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भावुक होतं,शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. वाय. बी. सेंटरमध्ये तब्बल दीड तास शरद पवारांची मनधरणी सुरु होती. मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. एकीकडे शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे शरद पवारांनतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण संभाळणार अशीही चर्चा सुरू होती. यामध्ये आपसुकच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अजित पवार ही दोन नावे आघाडीवर होती. राष्ट्रवादीतील ही दोन नावे खरंच नेतृत्व सांभाळण्यासाठी उत्सुक आहेत का याबाबतची भूमिका समोर आली नव्हती. मात्र आता अजित पवार यांची भूमिका समोर आली आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष होणार का? यावर ते पत्रकारांना काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात. (ajit pawar's sensational statement regarding ncp presidentship sharad pawar political retirement) अजित पवार काय म्हणाले? शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता अजित पवार यांची भूमिका समोर आली आहे. शरद पवार यांनी जर राष्ट्रावादीचा अध्यक्ष बनवलं तर तुम्ही बनणार का असा असा अजित पवार यांना पत्रकाराने विचारला होता. यावर अजित पवार म्हणाले, नाही, मी नाही बनणार, मी त्याच्यात काम करू शकत नाही, असे ते म्हणाले. पुढे अजित पवार म्हणतात, प्रश्नच येत नाही, विचार करण्याचाही प्रश्न येत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या विधानानंतर त्याचा अध्यक्ष पदात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. झी 24 तासला याबाबतची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. हे ही वाचा : राजीनाम्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, अजितदादांनी सांगितला नेमका निरोप! दरम्यान, आजच्या दिवसातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष होऊ शकतात. जर शरद पवार यांनी विचार बदलला नाही तर अशा पद्धतीचा विचार हा होऊ शकतो. असं सूत्रांकडून समजतं आहे. |
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona)संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिवसाला एक लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसदेत सविस्तर निवेदन केले . आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले. "हा राजकीय लढा नाहीये, लोकांचा जीव वाचवण्यासाठी लढाई आहे," अशी टीकाही राऊत यांनी केली. संसदेत बोलताना संजय राऊत म्हणाले,"माझी आई आणि भावालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं ((BMC) केलेल्या कामाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय," असे संजय राऊत म्हणाले. "मला सदस्यांना विचारायचं की असंख्य लोक कोरोनातून बरे कसे झाले? क्या लोग भाभीजी के पापड का करके ठीक हो गये? ही राजकीय लढाई नाहीये, तर लोकांचे जीव वाचवण्याची लढाई आहे," अशा शब्दात राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिले. |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा। नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. भगवंताच्या नामस्मरणाने हृदयावर कसे सकारात्मक परिणाम होतात याबाबत काही संशोधन लेखसुद्धा आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. मनापासून विठ्ठल शब्द उच्चारल्याने अनाहृत चक्रावर म्हणजेच हृदयावर याचा परिणाम होतो व हृदयाच्या ऊर्जेत वाढ होते असे चाचण्यात सिद्ध झाले आहे. भगवंताच्या नामस्मरणाच्या स्पंदनात शक्ती आहे व त्याच्या नामस्मरणाने विघ्न दूर होतात ही मान्यता अध्यात्मामध्ये बºयाच संत महात्म्यांनी मांडली आहे. म्हणूनंच संत कान्होपात्राने असाच अनुभव विशद केला आहे. ते म्हणतात, नामे दोष जळती । नामे प्राण उद्धरती । । हे ते आले अनुभवा । सत्य जीवा प्रत्यया । । म्हणजेच नामस्मरणाने मानवी जीवनातील दोष नाहीसे होतात व जीवनाचा उध्दार होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। भगवंताच्या नामस्मरणाने मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढीस लागतात, मन सशक्त होते व दुःखावर मात करण्याची शक्ती नामस्मरणानीच येत असते. नामस्मरण हे मनापासून करणे आवश्यक आहे. त्यामागे श्रद्धा, निष्ठा, लीनता, अनन्यता, अखंडता आवश्यक असते. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा । । म्हणजेच प्रभातसमयी रामाचे चिंतन करावे. केवळ शांत मनाने रामाचे नाव घेतल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. श्री गोंदवलेकर महाराजांनी तर भक्ती मार्गासाठी फक्त नामस्मरणाचा उपाय सांगितला आहे. आज वैद्यकीय शास्त्राने सुद्धा नामस्मरणाचे महत्त्व मान्य केले आहे. संत तुकाराम महाराजसुद्धा नामस्मरणाचे श्रेठत्व सांगतात की, मुखाने सतत नामस्मरण केल्याने मोक्ष हा मिळतोच. सर्व युगात भगवंताचे नामस्मरण करण्यात आले आहे. भक्त प्रल्हादाने विष्णूचे, हनुमंताने रामाचे केलेले नामस्मरण हे आदर्श उदाहरण आहे तेव्हा कलियुगात आपण सर्वजण मनःपूर्वक भगवंताचे नियमित नामस्मरण करू या ! |
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील दसरा मेळाव्याचा वाद अखेर संपला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा (Dasara Medava) घेणार आहेत. तर शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. शिवसेना कुणाची या वादावर सत्तासंघर्ष सुरु असला तरी दोन्ही गटाच्या माध्यमातून दसरा मेळाव्याला जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पहिल्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी औरंगाबाद शहर, जिल्ह्यातून दहा हजार वाहनांचे नियोजन केले आहे. २५ हजार शिवसैनिक त्यात असतील. प्रवासाच्या नियोजनासाठी ३० सप्टेंबर रोजी संत एकनाथ नाट्यगृहात दुपारी बारा वाजता महत्त्वपूर्ण बैठक होत आहे, अशी माहिती महानगराध्यक्ष तथा आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बैठकीत माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, जिल्हाध्यक्ष रमेश पवार, राजू आहिरे, गणेश पवार, संदीप जाधव, रमेश सूर्यवंशी, धीरज पवार उपस्थित होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करीत आहे. त्यांनीही पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. ठाकरेंनी यंदाच्या दसरा मेळाव्याला दीड ते २ लाख कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्याचे आदेश दिले असून शिवाजी पार्कासाठी २० हजार अनामत रक्कमही मनपात जमा केली आहे. दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते कोसो दुरून आपल्यासाठी येत आहेत त्यांची गैरसोय होता काम नये, अशा सुचना ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच उद्धव ठाकरेंनी पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. आजपर्यंत झाला नाही असा भव्यदिव्य दसरा मेळावा भरविण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे कळते. औरंगाबाद जिल्ह्यातूनउद्धव सेनेच्या गटाने ३ हजार वाहनांतून १५ हजार कार्यकर्त्यांना मुंबईत नेण्याची तयारी केली आहे. दाेन्ही गटांकडून शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजारहून अधिक शिवसैनिक येणार आहेत. याकरिता ३५० बसेसचे नियोजन झाले असून मतदारसंघातून ५०० बसेसची मागणी होत असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. |
मुंबई :- राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने (MVA Govt) दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ठाकरे सरकार (Thackeray Govt) स्थापन झाल्यापासून भाजप (BJP) नेत्याकडून सरकार पडेल अशी टीका सातत्याने करण्यात येत आहे. यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांवर हल्लाबोल केला. गेल्या दोन वर्षांत सरकार पाडू न शकणारा विरोधी पक्ष सरकार पाडण्याच्या नव्या तारखा देतो हा विनोद म्हणावा लागेल. ठाकरी बाण्यानं राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहिले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकार आता लवकरच पडेल, असे म्हटले. भाजप तारखा देण्याच्या फंदातून आणि छंदातून बाहेर पडलेला नाही. चंद्रकांत पाटील नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे, असा सवाल राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीत सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षानं बाहेर पडावं, असं म्हणणारे पुन्हा ठाकरे सरकार पडेल असं सांगतात. त्यांनी आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी, असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षांत सगळ्यांना पुरून उरले. विरोधी भाजपनं ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले. राजकारणातील कमरेखालचे वार करूनही सरकार कायम आहे, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे, ते लोकांमध्ये प्रिय आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांचा चेहरा आश्वासक होता. हाच माणूस संकटातून रक्षण करेल, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला होता, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळं राज्यावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले असल्याचे संजय राऊत म्हणाले. |
Republic day 2022:यामध्येच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही देशवासीयांना आणि चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Republic Day 2022 : संपूर्ण देशात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. तर, अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच बॉलिवूडसेलिब्रिटींनीही देशवासीयांना आणि चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात अमिताभ बच्चनपासून तापसी पन्नूपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारे बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी असून या गर्दीतील एका व्यक्तीच्या हातात भारताचा झेंडा आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी 'सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा', असं म्हटलं आहे. असाच आणखी एक फोटो त्यांनी ट्विटरवरही शेअर केला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येणाऱ्या कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'आपले पहिले राष्ट्रगीत... सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 'असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री सारा अली खानने देखील सुंदर ड्रेस परिधान करुन हातात झेंडा घेऊन एक फोटो पोस्ट केला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी यानेदेखील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद! ' असं म्हटलं आहे. |
सार्थ योगरत्नाकर. (हारितांत म्हटले आहे :-) मदनाचा नाश करण्याच्या हेतूनें. शिवार्ने रागानें त्रिशूळ फेकला. तो आपल्या अंगावर पडत आहे. असे पाहून मदनानें अयभीत होऊन विष्णूच्या शरीरांत प्रवेश केला. त्या वेळी विष्णूच्या हुंकाराने मोहित झालेला तो त्रिशूळ पृथ्वीवर पडला. त्याला शूळ अर्से म्हणतात. तो ह्या पंचभूतात्मक देहाला पीडा देतो. अशी ह्याची उत्पत्ति आहे. ज्याच्या योगानें शरीरामध्ये शूल टोंचल्याप्रमाणें पीडा होते, अशा ह्या त्रिशूलापासून उत्पन्न झालेल्या रोगाला पूर्वीचे वैद्य शूळ अर्से म्हणतात. शूल पीडिताला ज्या अर्थी त्यापासून शंखाने फोडल्याप्रमाणे तीव्र वेदना होतात त्या अर्थी त्याला शूळ अर्से म्हटले आहे. शूळाची संख्या. पृथग्दोषैः समस्तामद्वंद्वैः शूलोऽष्टधा भवेत् । सर्वेष्वेतेषु शूलेषु प्रायेण पवनः प्रभुः ॥ १ ॥ वातादि पृथक् दोषांनीं तीन प्रकार, दोषांनीं तीन प्रकार, सन्निपातापासून एक, दोषानें एक, आणि दोन दोन दोषांच्या संसर्गानें तीन मिळून शूळाचे आठ प्रकार आहेत. ह्या सर्व शुक्रांमध्ये प्रायः वात प्रधान असतो. वातिक शूळाचें कारण व लक्षण. लक्षण. व्यायामयानादतिमैथुनाच्च प्रजागराच्छीतजलातिपानात् । कलायमुगाढ कि कोरदूषादत्यर्थरूक्षाध्यशनाभिघातात् । कषायतिक्तातिविरूढजान्नविरुद्ध वल्लूरकशुष्कशाकात् ॥ १ ॥ विशुक्रमूत्रानिलवेगरोधाच्छोकोपवासादतिहास्यभाष्यात् । वायुः प्रवृद्धो जनयेद्धि शूलं हृत्पार्श्वपृष्ठत्रिकबस्तिदेशे ॥ १ ॥ जीर्णे प्रदोषे च घनागमे च शीते च कोपं समुपैति गाढम् । • मुहुर्मुहुश्चोपशमप्रकोपौ विश्वातसंस्तम्भनतोदभेदैः ॥ १ ॥ संस्वेदनाभ्यञ्जनमर्दनाद्यैः स्निग्धोषणभोज्यैश्च शमं प्रयाति ॥१॥ व्यायाम, मार्गक्रमण, अतिमैथुन, जागरण, थंड पाणी अतिशय सेवन करणें, वाटाणे, मूग, तुरी व हरीक हीं धान्यें व रूक्ष पदार्थ अतिशय खाणें, जेवणावर पुनः जेवण करणे, पोटावर भावात होणे. तुरट, कडू व मोड आलेले पदार्थ खाणे, विरुद्ध अन्न खाणे, वाळ - पित्तजन्य शूळाचें कारण व लक्षण. लेले मांस खार्णे, वाळलेल्या भाज्या खाणे, मल, मूत्र, शुक्र चबात ह्यांचा अवरोध करणें, शोक, उपास, अतिशय हसणे किंवा अतिशय बोलणे इत्यादि कारणांनी वाढलेला वायु हृदय, पाठ, कुशी, माकडहाड व बस्ति ह्यांमध्ये शुळ उत्पन्न करितो. हा शूळ अन्न जिरले असतां, प्रदोषकाळी, पावसाळ्यांत व थंडीच्या दिवसांत अत्यंत वाढतो. हा वरचेवर थांबतो व पुनः उत्पन्न होतो. ह्याच्या योगार्न मल व अधोवायु ह्यांचा अवरोध होतो. टोचल्याप्रमाणे किंवा फोडल्याप्रमाणे वेदना होतात. वाफारा दिल्यानें, तेल लावल्पानें, मर्दन केल्यानें, आणि स्निग्ध व उष्ण भोजन केल्याने हा शूळ शांत होतो. पित्तजन्य शूळाचें कारण व लक्षण. क्षारातिर्ताक्ष्णोष्णविदाहितैलनिष्पावपिण्याककुलत्थ्यूषैः । कट्टुम्लसौवीरसुराविकारैः क्रोधानलायास रविप्रतापैः ॥ १ ॥ ग्राम्यातियोगादशनैर्विदग्धैः पित्तं प्रकुण्याऽऽशु करोति शूलम् । तृण्मोहदाहार्तिकरं हि नाभ्यां संस्वेदमूर्छाभ्रमशोषयुक्तम् ॥ १ ॥ मध्यंदिने कुप्यति चार्धरात्रे निदाघकाले जलदात्यये च ॥ शीते च शीतैः समुपैति शान्ति सुस्वादुशीतैरपि भोजनैश्च ॥१॥ क्षार, अतिशय तीक्ष्ण द्रव्ये, विदाहकारक व तेलकट पदार्थ, पावटे, तिळकूट, हुलग्याचें कढण, तिखट व आंबट पदार्थ, मद्य किंवा त्याचे प्रकार ह्यांच्या सेवनानें व राग, विस्तवाचा शेक किंवा न अतिशय घेणे, अति मैथुन करणे, विदाही अन्न खाणं ह्या कारणांनीं पित्त प्रकुपित होऊन नाभीचे ठिकाण शूळ उत्पन्न कारतें. त्यामुळे तहान, मोह, दाइ, पीडा, घाम, मूर्च्छा, भोवळ व शोष हीं लक्षणे होतात. हा शळ दोनप्रहरी, मध्यरात्रीस, ग्रीष्मऋतूमध्ये व शरदऋतूंत वाढतो आणि थंडीच्या दिवसांत, थंड पदार्थाच्या सेवनानें आणि थंड व गोड अशा भोजनानें शांत होतो. कफजन्य शूलाचें कारण व लक्षण. आनूपवारिजकिलाटपयोविकारैमोसेक्षुपिटकुशरातिलशकुलीभिः । |
Job Opportunity । टीम महाराष्ट्र देशाः नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. आयुध निर्मिती कारखाना, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) प्रशिक्षणार्थी पदाच्या तब्बल 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पदवीधर अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर तपशील याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply) या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) |
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने दहा उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, पक्षामध्ये अतिशय वाईट स्थिती असतानाही काँग्रेसने राज्यसभा उमेदवारी जाहीर करताना प्रादेशिक नेत्यांच्या मतांना महत्त्व दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर नुकतेच पार पडले. त्या शिबिरामध्ये सालाबादप्रमाणे पक्षांतर्गत सुधारणांविषयी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पक्षासाठी पूर्णवेळ अध्यक्ष असावा, याविषयीदेखील ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध समित्या पक्षाने तयार केल्या आहेत. मात्र, या समित्या म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचे पक्षातील नेत्यांनाही पुरते माहीत आहे. सततच्या पराभवांमुळे पक्षसंघटनेस कमालीचे नैराश्य आले आहे, तरीदेखील ते नैराश्य दूर करण्यासाठी पक्षामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची काँग्रेसची इच्छा असल्याचे चिंतन शिबिरामध्ये दिसली नाही. चिंतन शिबिरानंतर पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी शांततेत पक्षाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि आपल्या राज्यसभेचा मार्ग मोकळा करून घेतला. अर्थात, सिब्बल यांची ही खेळी म्हणजे काँग्रेस आणि सपाचे 'म्युच्युअल अंडरस्टॅण्डिंग' असल्याची दिल्लीत चर्चा आहे. असो. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने दहा उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, पक्षामध्ये अतिशय वाईट स्थिती असतानाही काँग्रेसने राज्यसभा उमेदवारी जाहीर करताना प्रादेशिक नेत्यांच्या मतांना महत्त्व दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याउलट अतिशय काळजीपूर्वक रणनीती आखल्याने काँग्रेसला धक्का देण्याची पूर्ण तयारी भाजपने केली आहे. राज्यसभा निवडणुकीतमध्ये महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणाकडे देशाचे लक्ष लागले आहे. या तीन राज्यांतील १२ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानमध्ये सुभाष चंद्रा, हरियाणात कार्तिकेय शर्मा आणि महाराष्ट्रात धनंजय महाडिक हे मैदानात उतरल्याने ही लढत रंजक बनली आहे. राजस्थानमध्ये नामांकनाच्या शेवटच्या दिवशी खासदार सुभाष चंद्रा यांनी अपक्ष, तर हरियाणामध्ये कार्तिकेय शर्मा यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. सुभाषचंद्रा आणि शर्मा यांना भाजपने आपला पाठिंबा देऊ केला आहे. दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातून तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. महाडिक यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला नाही म्हटले तरी धक्का बसला आहे. राजस्थान आणि हरियाणामध्ये काँग्रेसला घेरण्याचे काम भाजपने केले आहे. काँग्रेसला धक्का देण्यात भाजपला यश आल्यास या राज्यांमधील काँग्रेस पक्षसंघटनेमध्येही फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजस्थानमध्ये चार जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसने रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत घनश्याम तिवारी यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने नामांकनाच्या शेवटच्या दिवशी तिसर्या जागेसाठी सुभाषचंद्रा यांना पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे. राजस्थाममध्ये एक जागा जिंकल्यानंतर भाजपकडे ३० अतिरिक्त मते असतील, तर दोन जागा जिंकल्यानंतर काँग्रेसकडे २७ अतिरिक्त मते असतील. अशा स्थितीत दुसरी जागा जिंकण्यासाठी भाजपला ११ अतिरिक्त मतांची गरज आहे, तर काँग्रेसला तिसर्या जागेसाठी १४ अतिरिक्त मतांची गरज आहे. राज्यात १३ अपक्ष आहेत, प्रत्येकी तीन जागा 'आरएलपी', 'बीटीपी', दोन 'सीपीएम' आणि एक 'आरएलडी'कडे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नजरा या अतिरिक्त आमदारांवर आहेत. येथे सुभाषचंद्रा रिंगणात उतरल्याने काँग्रेसपुढे अडचणी उभ्या राहण्याची दाट शक्यता आहे. सुभाषचंद्रा राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार बनल्याने हरियाणातील शाई बदल प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. २०१६ सालच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने हरियाणामध्ये सुभाषचंद्रा यांना अपक्ष उमेदवार म्हणून बाहेरून पाठिंबा दिल्याची चर्चा होती. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाचे वकील आर. के. आनंद हे काँग्रेस आणि 'आयएनएलडी'चे उमेदवार होते. निवडणुकीत संख्याबळ सुभाषचंद्रांच्या बाजूने अजिबात नव्हते. मात्र, चुकीच्या शाईचा पेन वापरल्याने काँग्रेसच्या १४ आमदारांची मते रद्द करण्यात आली होती आणि त्यामुळे सुभाषचंद्रा यांचा विजय सुकर झाला होता. त्यावेळी पराभवातही विजय कसा वळवायचा, हे मला चांगलेच ठाऊक असल्याचे सुभाषचंद्रा यांनी म्हटले होते. या घटनेची दखल सोनिया गांधी यांनी घेऊन पक्षातील नेत्यांनी कठोर शब्दात समजही दिली होती. त्यामुळे सुभाषचंद्रा यावेळी कोणता करिष्मा करतात, याचीही चिंता काँग्रेसला आहे. हरियाणामध्ये भाजपने कृष्णलाल पवार आणि काँग्रेसने अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, माकन यांच्यापुढे अपक्ष उमेदवार कार्तिकेश शर्मा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हरियाणात राज्यसभेच्या उमेदवाराला विजयासाठी ३० मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे ३१ आमदार असताना त्यांना विजयाची पूर्ण खात्री असायला हवी आहे. मात्र, 'क्रॉसव्होटिंग'च्या भीतीने काँग्रेसला सतावण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे भाजपकडे आपल्या अधिकृत उमेवारास निवडून आणल्यानंतर दहा मते शिल्लक राहणार आहेत, अशा परिस्थितीत कार्तिकेय शर्मा यांचा दावा मजबूत मानला जात आहे. विशेष म्हणजे, कार्तिकेय यांचे वडील विनोद शर्मा हे काँग्रेसचे एकेकाळचे महत्त्वाचे नेते होते. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. दुसरीकडे कार्तिकेय यांचे सासरे कुलदीप शर्मा हेदेखील काँग्रेसमध्ये असले तरीही ते नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये फूट पाडण्यास कुलदीप शर्मा पुढाकार घेणार नाही, याची खात्री काँग्रेसला नाही. दुसरीकडे भूपिंदरसिंग हुड्डा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद दिल्याने नाराज असलेले कुलदीप बिश्नोईही बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजय माकन यांचा राज्यसभेचा मार्ग कठीण झाला आहे. कर्नाटकातही चौथ्या जागेसाठीची लढत रंजक बनली आहे. कारण, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अतिरिक्त उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे जनता दलास (सेक्युलर) एकही जागा जिंकणे कठीण झाले आहे. भाजपच्या १२२ आमदारांसह पहिले दोन उमेदवार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेता जगेश याचा विजय निश्चित मानला जात आहे, तर तिसरे उमेदवार लहर सिंह सिरोया यांना उर्वरित ३२ मते मिळतील. मात्र, त्यांना विजयासाठी आणखी १३ मतांची आवश्यकता आहे. त्याचवेळी काँग्रेसकडे ७० जागा आहेत आणि त्यांचे पहिले उमेदवार जयराम रमेश सहज जिंकतील. मात्र, दुसरे उमेदवार मन्सुर अली खान यांना विजयासाठी काँग्रेसला २० अतिरिक्त मतांची आवश्यकता असणार आहे. एकूणच राज्यसभा निवडणुकीचा विचार केल्यास सध्या तरी भाजपने काँग्रेसचे पुरेपूर कोंडी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच काँग्रेस हायकमांडने घेतलेल्या निर्णयांविरोधात प्रादेशिक नेत्यांनी विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रातून आशिष देशमुख यांनी राज्य सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनीही काँग्रेसच्या उमेदवार निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना नेहमीप्रमाणे गांधी घराण्याशी निष्ठा असणार्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसने याद्वारे पक्षांतर्गत सुधारणांची मागणी करणार्या ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र, पक्षांतर्गत समीकरणे सोडविताना मुख्य समीकरणाकडे, म्हणजे निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे का, असा प्रश्न निर्माण होते. कारण, या निवडणुकीमध्ये 'क्रॉसव्होटिंग'रोखण्यात काँग्रेसला यश न आल्यास त्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागू शकते. याचा थेट परिणाम सध्याही यथातथाच असलेल्या पक्षाच्या संसदेतील कामगिरीवर होणार आहे, त्यासोबतच प्रादेशिक नेत्यांची नाराजी उफाळून आल्यास त्याचाही मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे. |
औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड घेतल्यानंतर स्वबळाची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत तीन उमेदवारांचा समावेश होता. एमआयएम विधानसभेच्या किमान ६० जागा लढविणार आहे. मागील आठ दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरासाठीही मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतींचा कार्यक्रम ७० टक्के पूर्ण झाला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. जिथे एमआयएम पक्षाचे संघटन आहे, नागरिकांचा प्रतिसाद आहे, त्या ठिकाणी उमेदवार टाकण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. एमआयएमची पहिली यादी १० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पुण्याच्या वडगाव शेरी येथून डॅनियल रमेश लांडगे, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मुफ्ती मोहंमद इस्माईल, नांदेड (उत्तर) मधून मोहंमद फेरोज खान (लाला) यांची नावे जाहीर झाली होती. दुसऱ्या यादीत चार जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मोहंमद शाहबदी, सोलापूर दक्षिणमधून महिला उमेदवार देण्यात आल्या आहेत. सोफिया तौफिक शेख या उमेदवार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट येथून हिना शफिक मोमीन यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये एमआयएमने दोन याद्या जाहीर करून आघाडी घेतली आहे. इतर पक्षांनी अद्याप यादीच जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांची बरीच दमछाक होत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघात एमआयएम पक्षाने विजय मिळविला होता. या मतदारसंघात सर्वाधिक ३० जण इच्छुक आहेत. येथील उमेदवारीचा निर्णय हैदराबाद येथे पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी घेणार आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुकांचे डोळे सध्या हैदराबादकडे लागून आहेत. यादीत नाव असावे यासाठी जोतो जोरदार प्रयत्न करतो आहे. |
कैद्यांना भेटण्यासाठी वकिलांना येणाऱ्या अडचणी, जेलमध्ये कैद्यांना मिळणाऱ्या असुविधा याकडे लक्ष वेधण्यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर हायकोर्टाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडून नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. जेलमधील कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी आता वकिलांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार वकील सकाळी नऊ ते साडेदहा यावेळेतच कैद्यांना भेटू शकतात. यापूर्वी जेलमध्ये कैद्यांना भेटण्यासाठी दिवसातून दोनदा वेळ देण्यात आली होती. मात्र आता ही वेळ सकाळची केल्यामुळे ती अडचणीची ठरू लागली आहे. |
'पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका'\nHomeमहाराष्ट्र'पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका'\nSmart Ichalkaranji October 12, 2020\nPolitics मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्दयांना अनुसरुन जनतेला संबोधित केलं. मेट्रो कारशेड, सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा इथपासून ते राज्यातील शेतकरी आणि कोरोना परिस्थितीबाबतही त्यांनी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.\nकोरोनाशी दोन हात करत असताना सर्वांनी काळजी घ्यायचीच आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 'कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही. जगात काही देशांत, तर याची दुसरी लाट आली आहे त्यामुळं आपल्याला सावधपणे पुढं जावं लागत आहे', असं म्हणत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\nशासनाची जनतेप्रती असणारी जबाबदारी अधोरेखित करत जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोनाचा संसर्ग असतानाही टप्प्याटप्प्यानं अनलॉक करत अनेक सुविधा आणि सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली. पण, अनेक ठिकाणी असं होत असतानाच कोरोनाचा मात्र विसर पडल्याचं भीषण चित्र पाहायला मिळालं. परिणामी काही अंशी नियंत्रणात असणारी परिस्थिती पुन्हा चिंतेत टाकणाऱ्या वळणावर आली.\nराज्यातील अशाच परिस्थितीवर भर देत आणि संकट टळलेलं नाही, हेच पुन्हा सांगत सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असं आवाहनही केलं. |
३४ : परक्याचें धन प्रकरणाचा कदाचित् शेवट होईल. ( एकदम ) आपल्याला किती पैसे हवेत ? शामराव : (दचकून) आपल्या या विधानाचा अर्थ काय होतो हे आपल्याला ठाऊक आहे ? परशुरामपंत : मला हा पत्रलेखक काय किंवा आपण काय, दोन्ही सारखेच ! शामराव : आपलं हे विधान फारच भयंकर आहे ! केवळ आपला दर्जा आणि पंडितचा संबंध लक्षांत घेऊन मी आपलं सगळं बोलणं शांतपणं ऐकून घेतलं आहे. परंतु, आपल्याला जर याच तालासुरांत यापुढं बोलायचं असेल, तर बोलणं बंद करून आपण यावं, अशी मला नाईलाजानं विनंती करावी लागेल ! परशुरामपंत : असं कां ? ( किंचित् थांबून ) पण आपण कांहीं पैशाच्या संकटांत आहांत हें खरं ना ? शामाराव : मी आपल्याकडे पैसे मागायला तर कधीं आलों नाहीं ना ? मग माझ्या संकटाची चिंता आपण कां करतां ? परशुरामपंत : आपण माझ्याकडे आलां नाहीं तेंच संयुक्तिक आहे. कारण तसे माझ्याकडून पैसे मिळण्याची शक्यता नव्हतीच. या मार्गाने मात्र ती शक्यता उतन्न होते. एक तर या पत्रांचा परिणाम आमच्या मुलीच्या मनावर अपेक्षेबाहरे झाला. ती प्रकृतीनं जरा दुबळी आहे आणि, मुली सामान्यतः असतातच तशी, हळवी, भावनाशील आहे. या पत्रांनीं तिनं असा कांहीं मानसिक धक्का घेतला आहे कीं, तिच्या सुरक्षितपणाविषयीं आम्हां सर्वांना मोठीच चिंता उत्पन्न झाली आहे. शामराव : तें खरंहि असेल.. . कदाचित् स्वाभाविक असेल. मला हे सांगण्याची जरूर ? परशुरामपंतः आपण स्वाभाविक' शब्द वापरलात ना ? मी तेंच म्हणतों. या परिणामाची जाणीव पत्रलेखकाला निश्चित होती. या मुलीसाठी, आणि एकंदर ही सगळी भानगड मिटविण्यासाठीं, आम्ही या फाशांत साह' जिकच सांपडूं याचीहि कल्पना या पत्रलेखकाला आहे. पैसे काढण्यासाठीं टाकलेला हा डाव हुकमी आहे. |
कन्नुर - नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत संघर्ष पेटवून देश तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पक्षाच्या संसदीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. देशातील वाढती बेरोजगारी हे मोदी सरकारच्याच बेजबाबदार अर्थकारणाचे फलित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ग्वाही देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे असेही ते म्हणाले. दर 24 तासात देशातील 27 हजार युवकांच्या नोकऱ्या जात आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. ते म्हणाले की आज देशातील कृषी क्षेत्रापुढे प्रचंड आव्हान निर्माण झाले असून देशाचे आर्थिक मागासलेपणही वाढले आहे. पण त्या प्रश्नावर लक्ष देणे सोडाच पण त्यावर बोलणे सुद्धा मोदी टाळत आहेत. ते पत्रकारांशीही बोलायला टाळतात असे ते म्हणाले. केरळातील दोन दिवसांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येथे आले आहेत. केरळात येत्या 23 एप्रिल रोजी सर्व 20 लोकसभा मतदार संघात निवडणुका होत आहेत. स्वता राहुल गांधी हे वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. या राज्यात सत्तारूढ डावी आघाडी आणि कॉंग्रेस प्रणित युडीएफ यांच्यात प्रमुख लढत होत आहे. |
सेतुपार्वती : १३९ तेंहि कळत नाहीं ! मी कां रडतेंय् तेंहि कळत नाहीं !..." असं म्हणत मागींनं अशा असाहाय आणि अतृत नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं, कीं त्यांनी तिचा एक हात आपल्या हातांत नि आपला दुसरा हात तिच्या पाठीवर अशा स्थितींत तिला खुर्चीवरून उठवून कॉटवर नेऊन बसवलं. पुढें कांहीं बोलायची गरजच पडली नाहीं. गार्गी स्फुंदतस्फुंदत त्यांच्या मांडीवर आडवी झाली. जगदीशबाबूंना तिची कींव आली. त्यांना ती आजवर कोणत्याहि अवस्थेत रमणीयच दिसलेली होती. आजहि रडूनरडून डोळे, गाल, मान लाल झालेली गार्गी कुणालाहि करुणमनोहरच दिसली असती. जगदीशबाबूंना मात्र आज तिची फक्त कींव येत होती. तिच्याच टीचभर हातरुमालानं तिचे गाल पुसण्यापलीकडे त्यांचे हात आज कांहींच करीत नव्हते. उलट आज जगदीशच्या मांडीवर डोकं असून आणि जगदीशचा हात तोंडावरून फिरत असूनहि, गार्गीलाच जगदीश पुरेसा जवळ नाहीं असं वाटत होतं. तिच्या अंगोपांगांची हालचाल तिच्या गूढ अतृप्ततेचा आणि अस्वस्थतेचा परिस्फोट करीत होती. स्त्रियांच्या स्वाभाविक संकोचामुळे आणि अशरीरी प्रेमाच्या अस्वाभाविक संकल्पामुळे तिच हात बांधले असले, तरी ओठांचं आणि वक्षःस्थलाचं स्पंदन तिच्या संकोचाला आणि संकल्पाला कसं जुमानणार ? अखेर अंशतः जगदीशबाबूंच्या सान्निध्यानं आणि अंशतः त्यांच्या निश्चलतेनं, गार्गीचं रडं आटोक्यांत आलं. त्यानंतर मात्र त्या निर्विकार प्रियकराच्या मांडीवर पडून रहाणं तिला व्यर्थ आणि खोटं वाटू लागलं. मांडीवरून उठून कॉटवरच पण थोड्या अंतरावर बसून, तोंड पुसून आणि केंस सांवरून गार्गी म्हणाली, " माझं चुकत असेल कदाचित् - पण तुम्ही त्यामुळं मला दुरावणार नाहींत ना, जगदीशबाबू ? मला माझ्या कल्पनेप्रमाणं प्रेम करूं द्या तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणं करा..." कुणीहि आपल्या कल्पनेप्रमाणंच वागणार गार्गी ! पण तुझं वागणं तुझ्याहि कल्पनेप्रमाणं नाहीं, एवढीच माझी तक्रार होती. आपलं स्वतःचं मन समजणंसुद्धां सोपं नाहीं, गार्गी ! " गार्गी थोडा वेळ शून्य दृष्टीनं बसून अखेर एक अक्षरहि न बोलतां पायांत सँडल्स् अडकवून निघून गेली. १४० : सेतुपार्वती गार्गी निघून जातांच जगदीशबाबूंनीं टेबलाच्या खणांत चोळामोळा होऊन पडलेलं तिचं पत्र काढलं, त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते टेबलाखालच्या टोपलींत फेंकून दिले. पत्र काढतांना आणि फाडतांना त्यांच्या डोक्यांत गार्गीच्या निर्याणापेक्षां सेतुपार्वतीच्या प्रयाणाचे विचारच अधिक होते ... जगदीशबाबूंकडून गेल्यापासून रात्र पडेपर्यंत सेतुपार्वती मैत्रिणींच्या घोळक्यांतच हिंडत होती, बसत होती, बांधाबांध करीत होती. लीला कर्णिक तिला बांधाबांधींत मदत करीत होती; रशीदा शेग्व तिच्या वेण्या हातांत घेऊन त्या वियोगाच्या वेळीं गोड 'गुफ्तगू' करण्यांत गर्क होती. बेबी निंबाळकर मात्र सेतुपार्वतीच्या आणि रशीदाच्या भावपूर्ण चेहेऱ्यांकडे आलटून-पालटून पाहत, एखाद्या लाडावलेल्या पाळींव प्राण्याप्रमाणं कॉटवर बसून होती. जगदीशबाबू स्टेशनवर येतील कीं नाहीं, याबद्दल त्या सर्वजणीच उलटसुलट तर्क करीत होत्या. रात्री दहाच्या बंगलोर मेलमध्यें मावशीच्या यजमानांनी सेकंड क्लासच्या दोन जागा रिझर्व्ह केलेल्या होत्या. साडेनऊपासून एम्. एस्. एम्. मेलच्या एका कंपार्टमेंटचं लेडीज् होस्टेलच्या खोलीत रूपांतर झालेलं होतं ! पोक्त वयाची, डोक्यावर पदर असलेली, सतेज डोळ्यांची, ताप्त्यासारख्या अंगाची, सेतुपार्वतीची मावशीच काय ती त्या हंसऱ्या कॉलेजकन्यांत वेगळी दिसत होती. सेतुपार्वतीलाहि प्रवासांत - वडील माणसं बरोबर असल्यास ! - डोक्यावरून पदर घेण्याची सक्ती असल्यामुळे, ती आज थोडी निराळी पण अधिक आकर्षक दिसत होती. पदराच्या रेशमी मेहेरपींतून तिच्या काळ्याभोर रेशमासारख्या केंसांचं आणि त्यांच्या दुभंगलेल्या दाटींतून मोत्यांच्या ओळीप्रमाणं सरळ वाट काढणाऱ्या तिच्या भांगाचं वैभव, ती सकाळीं न्हालेली असल्यानं आज विशेषच शोभून दिसत होतं ! तूं हमेशा डोक्यावरून ऐसाहि पदर काय म्हणून नहीं घेत, सेतुपार्वती १ बहोत खूबसूरत दिसते तूं आज ! " असं म्हणत डोक्यावरून नेहमींच पदर घेणाऱ्या रशीदानं तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले. एवढ्यांत सेतुपार्वती : १४१ जगदीशबाबू ! ' 'बाबूजी आले !' अशी तोंडांची कुजबुज आणि त्याच अर्थाचे डोळ्यांचे इषारे झाले. सेतुपार्वती चमकून उठून डब्यांतून खालीं आली. तिची मावशीहि 'प्रोफेसराइवरा ऽऽ?' प्रोफेसर इद्दारा ऽऽ ? ' -असं कांहींतरी कानडींतून कुजबुजत डब्याबाहेर आली. आपण कशाला रात्रीचे आलांत ? " सेतुपार्वतीनं सद्गदित स्वरांत " एवढंहि करूं नये का तुझ्याकरतां, सेतुपार्वती ? " जगदीशबाबू खिन्नपणें म्हणाले. आत्तांपर्यंतच्यां बालिश हास्यविनोदाच्या आणि उल्हासाच्या वातावरणाला एकदम कारुण्याचं वळण लागतं की काय, अशी सर्वांनाच चिंता पडली. पण आज उल्हासाचा भंग होऊं द्यायचा नाहीं, असा जणूं सेतुपार्वतीनं निश्चयच केला होता. ती उत्कट पण प्रसन्न स्वरांत म्हणाली, - "" एवढंहि' म्हणजे काय, जगदीशबाबू ? सगळंच केलं आहेत तुम्हीं माझ्याकरतां ! " आतां तीं दोघं मुलींच्या घोळक्यांतच उभी असली, तरी जगदीशबाबू फारसं स्पष्ट बोलू शकत नव्हते. ते थोड्या सूचक स्वरांत म्हणाले, - " प्रसंगाला तोंड तर तूं एकटीच देत आहेस. मी इथं आलों काय आणि घरीं बसलों काय ! " तुम्ही घरीं बसून देखील मला बळ देऊं शकाल जगदीशबाबू ! मला ज्या प्रसंगाला तोंड द्यायचं आहे, त्याला तुमच्या बंदुकीची गरज नाहीं; तुमच्या पैशाची गरज नाहीं. -- तुमच्या विचारांची, तुमच्या श्रद्धेची, तुमच्या • प्रेमाची गरज आहे. मला घरांतून बाहेर पडायचं बळ नको आहे, जगदीशबाबू ! घरांत रहायलाच बळ हवं आहे ! परवां तुमच्याकडून आल्यापासून कां कोण जाणे, मला जगांत नुसतं दुःख, नुसता दुष्टपणा नसून चांगुलपणाहि आहे, असं वाटू लागलं आहे. आणि जगांतल्या त्या चांगुलपणाच्या आधारावर आणि माझ्या स्वतःच्या चांगुलपणाच्या बळावरच मला प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. प्रेमाच्या माणसांचा रोष, आईवडिलाचा विरोध कांहीं गोळीबारानं मोडायचा नसतो. मी स्वतः तिथं जाणं, प्रेमासह आणि प्रेमाच्या श्रद्धेसह जाणं, हेंच माझं बळ आहे.. तें बळ मला पुण्यांत, या मराठी मुलखांत तुमच्या रूपानं भेटलं, जगदीशबाबू ! तुम्हीं आणखी काय करायचं होतं ? - आणि तुम्हीं केलंत तें |
मुंबई 10 जुलै : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांचा काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच आठवडाभरावपूर्वीच घटस्फोट झाला आहे. एकमेकांच्या सहमतीने त्यांनी हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण असं असलं तरीही ते पूर्वीप्रमाणेच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. व त्यांच्या नात्यात कोणतीही कटुता नसल्याचं दिसत आहे. दरम्यान हा फोटो अभिनेता आमिर खानच्या आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्डा'च्या (Lal Singh Chadda) सेटवरचा आहे. जिथे किरण आणि आमिर एकत्र वेळ घालवत आहेत. साउथ अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने हा फोटो शेअर केला आहे. सध्या लाल सिगं चड्डाचं शुटींग हे लडाखमध्ये सुरू आहे. तर चित्रपटाची स्टारकास्ट लडाखमध्ये आहे. त्यावेळी आमिर आणि किरणही एत्र वेळ घालवताना दिसले. फोटो शेअर करत चैतन्यने लिहिलं की, 'कृतज्ञ आहे' दरम्यान चैत्यन्यला चित्रपटात विजय सेतुपतीच्या जागेवर घेण्यात आलं आहे. जो चित्रपटात आमिर खानच्या जवळच्या मित्राची भूमिका साकरणार आहे. 'लाल सिंग चड्डा' हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंपचा' हिंदी रिमेक आहे. चैतन्य चित्रपटात बेंजामिन बुफोर्ड ब्लू उर्फ बुब्बा हे पात्र साकारणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार लाल सिंग चड्डाची टिम सध्या लडाखमध्ये महत्तपूर्ण फायटींग सीन शुट करत आहे. हे संपूर्ण 45 दिवसांचं शेड्युल्ड शुटींग आहे. काहीच दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेणारे आमिर खान आणि किऱण रावला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. दोघेही घटस्फोट झाल्यानंतर काहीच तासांत लाइव्ह देखील आले होते. व आपण विभक्त झालो असलो तरीही मैत्री संपणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयातील लसीकरण विभागात १२ जुलै रोजी एका दिवसात ९९१ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत दहिरे यांनी दिली. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य शासनाकडून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी सर्वत्र काटेकोरपणे करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचीच अंमलबजावणी स्वाराती अंबाजोगाईचा लसीकरण विभागही करीत आहे. १२ जुलै रोजी एका दिवसात ९९१ नागरिकांचे लसीकरण करून आत्तापर्यंतचा एक दिवसीय उच्चांक या विभागाने गाठला आहे. कोविड -१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात कोविड -१९ लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. स्वाराती ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील कोविड लसीकरण विभागाने आतापर्यंत ३० हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर , त्याचबरोबर ४५ ते ६० वर्ष आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस वापरण्यात आली असून जवळपास दहा हजार नागरिकांनी दुसरा डोस घेऊन स्वतः चे लसीकरण पूर्ण करून घेतले आहे. १२ जुलै रोजी एकदिवसीय लसीकरण मोहिमेचा उच्चांक गाठल्याबद्दल लसीकरण विभागातील विभाग प्रमुख डॉ. प्रशांत दहिरे , डॉ. गणेश ताटे , डॉ. योगेश माने , डॉ. सचिन शेवडे , अजय कसबे , अमरदीप वाघमारे , उदय पाळेकर , पूरण वाड, शेख राजिया , ज्योती जाधव , सुनीता खरात , सुनीता शिराढोणकर , विश्रांती पवार , संध्या साखरे , कोलफुके व सर्व कर्मचाऱ्यांचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे , मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार , वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. विश्वजीत पवार , पीएसएम विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र अंकुशे यांनी कौतुक केले. १८ ते ४४ तसेच ४५ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व पुरुष , महिला , गरोदर माता , स्तनदा माता , तसेच दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण स्वारातीच्या लसीकरण विभागात चालू आहे. सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन स्वतः ला कोविड-१९ महामारीपासून सुरक्षित ठेवावे. - डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती, अंबाजोगाई. |
प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना अटक करावी या मागणीसाठी गावकºयांनी विना परवानगी मोर्चा काढला, त्याला प्रतिबंध करायला गेलेल्या पोलिसांवर गावकºयांनी हल्ला केल्याची घटना कानळदा, ता. जळगाव येथे घडली. ठळक मुद्दे तरुणाच्या मृत्यूप्रकरणात न्यायासाठी काढला विनापरवानगी मोर्चावृध्द झोपले पोलीस वाहनासमोरगावातच अडविला मोर्चाआ� ��नलाईन लोकमतजळगाव दि, ९ : तालुक्यातील कानळदा येथील प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना अटक करावी या मागणीसाठी गावकºयांनी विना परवानगी मोर्चा काढला, त्याला प्रतिबंध करायला गेलेल्या पोलिसांवर गावकºयांनी हल्ला केल्याची घटना कानळदा, ता. जळगाव येथे घडली. दरम्यान, पोलिसांनीच मयत तरुणाचे आजोबा रामचंद्र देवचंद सपकाळे यांच्या डोक्यात काठी टाकली असा आरोपही गावकºयांनी केला आहे. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती असून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. प्रशांत सपकाळे या तरुणाचा मृतदेह २ आॅगस्ट रोजी पहाटे गावाबाहेर एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला होता. त्यामुळे प्रशांत याला कोणी तरी मारुन झाडावर लटकवून दिल्याचा आरोप त्याचे आजोबा रामचंद्र सपकाळे यांनी केला होता. या प्रकरणात तीन महिने उलटले तरी दोषींना अटक झाली नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गावातच अडविला मोर्चासकाळी दहा वाजता गावातील ५० महिला व पुरुष बॅनर घेऊन मुख्य चौकात जमले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याच्या तयारीत असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी कुवारखेडा येथे जाणाºया पोलिसांना रस्त्यात गर्दी जमलेली दिसली. त्यांनी मोर्चेकरांना विरोध केला असता पोलीस व मोर्चेकरांमध्ये वाद झाला. परवानगी नसल्याने मोर्चा जागेवरच अडविण्यात आला. वृध्द झोपले पोलीस वाहनासमोरपोलीस व मोर्चेकºयात वाद होत असताना मयत प्रशांत याचे आजोबा रामचंद्र सपकाळे हे पोलीस वाहनासमोर झोपले. हवालदार राजेंद्र बोरसे यांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडाने स्वतःचे डोके फोडून घेतले. यात प्रचंड रक्तस्त्राव व्हायला लागल्याने सहायक निरीक्षक सचिन बागुल व उपनिरीक्षक बी. डी. पाटील यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही अंगावर जमाव धावून आला. त्यांच्याशी धक्काबुक्ती झाली. यावेळी सपकाळे यांनी रक्ताचे हात पोलिसांच्या कपड्यावर मारले. |
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात सोन्याला मागणी दिसून आली. मात्र सलग तीन सत्रात तेजीत असलेल्या सोने दरात बुधवारी शेवटच्या सत्रात नफावसुली दिसून आली. बाजार बंद होताना सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. हायलाइट्सः आज गुरुवारी सोन्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याचा भाव ३७० रुपयांनी कमी झाला. कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत १३९ रुपयांची घसरण झाली. मुंबई : सराफा बाजारात आज गुरुवारी सोन्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याचा भाव ३७० रुपयांनी कमी झाला. तर कमॉडिटी एक्सचेंजमध्ये काल सोन्याच्या किमतीत १३९ रुपयांची घसरण झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर बुधवारी सोन्याचा भाव ४७३५५ रुपयांवर गेला होता. दिवसभरात सोन्याचा भाव ४७४३७ रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र बाजार बंद होताना नफावसुली झाली आणि सोन्याचा भाव १३९ रुपयांनी घसरला. बाजार बंद होताना सोने ४७१४१ रुपयांवर स्थिरावले. खाद्य तेलात स्वयंपूर्ण बनणार; केंद्र सरकारने दिली राष्ट्रीय खाद्य तेल अभियानाला मंजुरी Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६१३० रुपये इतका खाली आला आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत ३७० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेटचा भाव ४७१३० रुपये इतका झाला आहे. दिल्लीत आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२५० रुपये इतका झाला आहे. त्यात कालच्या तुलनेत २१० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०४५० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४४९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५४० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३०० रुपये आहे. गुंतवणूक टिप्स; हे शेअर देतील तुम्हाला नजीकच्या काळात चांगला परतावा अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने आर्थिक पॅकेजमध्ये कपातीचे संकेत दिल्यानंतर आज जागतिक कमाॅडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव ०. ७ टक्क्यांनी घसरला आणि तो १७७४. ४१ डाॅलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव १. ६ टक्क्यांनी कमी झाला आणि तो २३. १० डाॅलर प्रती औंस झाला. |
भारतीय जनता पक्ष आणि पीडीपी यांचं गेल्या तीन वर्षांपासून असलेलं जम्मू-काश्मीरमधलं सरकार नुकतंच संपुष्टात आलं. भारतीय जनता पक्षानं पाठिंबा काढून घेत सगळ्यांनाच एक धक्का दिला. खरंतर या धक्क्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते. वस्तुतः हे दोन्ही पक्ष समविचारी नाहीत. केवळ सत्तेसाठी ते एकत्र आले होते. निवडणुकांपूर्वी जम्मू विरुद्ध काश्मीर असं एक राजकीय युद्धच झालं होतं. हे दोन्ही पक्ष म्हणजे एक दक्षिण ध्रुव तर उत्तर ध्रुव, अशी त्यांची संभावना करण्यात येत होती आणि ही युती अनैसर्गिक असल्याचं युतीतील दोन्ही पक्ष प्रारंभी खाजगीत मान्य करत होते. निवडणुका झाल्यावर निकाल लागण्यापर्यंतचा जो काळ होता, त्या दरम्यानच्या काळात मुफ्ती महंमद सईद यांची भेट झाली होती. त्यावेळी ते म्हणाले होते- 'मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. ते म्हणाले आहेत की आजवर काश्मीरप्रश्नी देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. मी तुम्हाला शब्द देतो की काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मी गरज पडल्यास अटलबिहारी वाजपेयी यांच्याही एक पाऊल पुढं जाईन. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण काश्मीर प्रश्नावर तोडगा काढू या. ' या वक्तव्याला अटलजींनी मुफ्ती महंमद सईद यांना पीडीपी पक्ष स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याची पार्श्वभूमी होती. प्रत्यक्षात भविष्यात काय झाले हे आपण सर्वांनी पाहिले. अत्यंत निराशा आणि फसविले गेल्याची भावना केवळ जम्मू आणि काश्मिरी जनतेचीच नाही तर मुफ्ती महंमद सईद यांचीही झाली होती, म्हणूनच त्यांच्या निधनानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास खूप वेळ लावला. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करणं ही ऐतिहासिक गोष्ट होती. कारण जम्मू-काश्मीरच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच पीडीपीच्या सहकार्यांनं सत्तेचा वाटेकरी होता आलं. भाजपला काश्मीरमध्ये आपली पाळंमुळं रोवण्याची संधी मिळाली. या युतीमुळं आणि केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळं काश्मीर प्रश्नी काही ठोस तोडगा निघेल, अशी आशा बाळगणारेही काही लोक होते. प्रत्यक्षात, दुर्दैवानं केंद्र आणि राज्यातील भाजप आणि त्याचवेळी पीडीपी या दोन्ही पक्षांची कामगिरी जम्मू काश्मीरच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारी तर झाली नाहीच, उलट दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर अकार्यक्षमतेबरोबरच भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. जनतेचा संताप अधिकच वाढला, म्हणूनच या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर काश्मीरमधील अनेक भागात फटाकेही वाजले. भाजपशी युती झाल्यामुळं पीडीपी आतल्या आत विस्कळीत झाली होतीच. त्यांच्या पक्षात दोन उभे गट पडले होते. याच काळात दहशतवादाकडे वळण्याचं काश्मिरी तरूणांचं प्रमाणही वाढलं. पक्ष म्हणून पीडीपीच्या काश्मीर खोऱ्यातील पाठीराख्यांमध्येही नाराजी पसरली. मुफ्ती महंमद सईद आणि त्यांच्या मृत्युनंतर मेहबुबा मुफ्ती यांची खाजगीतील प्रतिक्रिया 'हम कहीके नही रहे. . . बरबाद हो गये' अशीच होती. भाजपा आणि संघ परिवाराची प्रतिक्रियाही वेगळी नव्हती, मात्र संघाबद्दल सहानुभूती असणाऱ्या किंवा संघाच्या अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना या सत्तेच्या माध्यमातून आजवर जेथे त्यांना अस्पृश्य समजलं जात होतं, त्या काश्मीर खोऱ्यात आपला पाया भक्कम करता आला. त्यामुळे त्यांना या युतीचा दीर्घकालीन विचार करता फायदाच झाला आहे. आज उघडपणे भाजपचा झेंडा खांद्यावर घेणारे हजारो तरुण काश्मीर खोऱ्यात तयार झाले आहेत. ही युती दोन्ही बाजूनं टिकली असती, तर ते देशाच्या फायद्याचं ठरलं असतं. मात्र भाजपला उर्वरित भारतात राजकीय नुकसान सोसावं लागलं असतं. पंजाबमध्येसुद्धा अकाली दलाच्या विरुद्ध भाजपनं टोकाचे वैचारिक हल्ले केले आणि त्याच अकाली दलाबरोबर दहा वर्षं राज्य केलं. महाराष्ट्रातही शिवसेनेशी असलेल्या संबंधांची परिस्थिती वेगळी नाही. अर्थात काश्मीरची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. या राज्यात घडणाऱ्या घटनांचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात हे नाकारून चालणार नाही. मेहबुबा मुफ्तींचा पाठिंबा काढून घेतल्यावर आता राज्यपाल राजवटीच्या माध्यमातून आम्हीच राज्य करणार आहोत, अशी भूमिका जाहीरपणे मांडली जाऊ लागली आहे. अर्थात एन. एन. व्होरा यांची कारकीर्द अतिशय अनुभवी आणि लोकाभिमुख अशी आहे. या काळात अनेक चांगले निर्णय होतील असे मानणाराही एक मोठा वर्ग काश्मिरात आहे. पत्रकार शुजात बुखारीची हत्या असो की, पाकिस्तानमधील निवडणुका, त्याच वेळी आता सुरू झालेली अमरनाथची यात्रा अशा काळात केंद्रसरकारने राज्यपाल बदलले नाही, हा निर्णय चांगलाच झाला. दगडफेकीचं प्रमाण आता कमी होईल, मात्र चकमकी वाढतील. अमरनाथ यात्रा सामान्यपणे अतिरेक्यांच्या टारगेटवर नसते. मात्र आता दहशतवादाकडे वळणाऱ्या तरुणांच्या कारवायांबद्दल नेमकेपणाने अंदाज व्यक्त करता येणार नाही. खरंतर पंजाबमध्ये ऑपरेशन 'ब्लॅक थंडर' झालं, त्याप्रमाणे दहशतवादविरोधी कारवाया होणं गरजेचं आहे. शिवाय काश्मीर खोऱ्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, मग त्या मेहबूबा मुफ्ती असतील किंवा फारुख अब्दुल्ला, त्यांनी सैफुद्दीन सोझ हे देशद्रोही आहे आहेत आणि आम्हीच तेवढे जनतेचे तारणहार आहोत, असा प्रचार टाळणंही इष्ट ठरेल. पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यावर केंद्रसरकारने जम्मू काश्मीर विधानसभा मात्र बरखास्त केलेली नाही, याचा अर्थ काश्मीर खोऱ्यातील हसीब द्राबू, इमरान अंसारी, अल्ताफ बुखारी, सज्जाद लोन यांच्यासारख्या पीडीपी अथवा स्वतंत्र नेत्यांना- ज्यांच्याशी भाजपने या काळात उत्तम संबंध प्रस्थापित केले आहे - हाताशी धरून भाजपच्या पाठिंब्याचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत, असं काश्मीरमध्ये अनेकांना वाटत आहे. मात्र काश्मीर खोऱ्यात भाजपच्या पाठिंब्याने कोणाचंही सरकार पुन्हा स्थापन झालं, तरी त्याचे परिणाम नकारात्मक होण्याची शक्यताच जास्त आहे. पक्ष कोणताही असो, त्या पक्षाची आंतरिक भावना या देशाच्या जनतेप्रती नाही, तर राजकारणाप्रती आहे, हे यातून स्पष्ट होतं. युती तोडल्यानंतर तर हे अजूनच ठळकपणे झालं आहे. युती तोडायची या निर्णयापर्यंत दोन्ही पक्ष येऊन ठेपले होते. शस्त्रबंदीचा मुद्दा घेऊन मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा द्यावा असा पक्षात त्यांच्यावरही दबाव होता, मात्र असं केलं तर आपल्याला देशद्रोही आणि काश्मीरद्रोही ठरविलं जाईल, अशी त्यांना भीती वाटत होती. आता २०१९ डोळ्यांसमोर ठेवूनच तयारी सुरू आहे. लष्कर, निमलष्करी दले आणि पोलिस ही जम्मू-काश्मीरमध्ये सरकारची प्रतीकं मानली जातात. ही प्रतीकं आधीही कार्यरत होती आणि आताही आहेत. मात्र लष्कर, पोलिस आणि प्रशासन दहशतवाद्यांना आता टिपून मारत आहे, असं भासविण्यासाठी अनेक माध्यमं अहोरात्र अथकपणे प्रचार करीत आहेत. काही प्रमाणात हे खरं असलं, तरी ज्या पाकिस्तानला जगाच्या राजकारणात दहशतवादाचा जनक देश म्हणून आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सातत्याने वेगळे पाडण्याचे प्रयत्न करत होतो, तोच देश भारतातील जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग नाही तर वादग्रस्त भाग आहे आणि तेथे लष्कर विरुद्ध काश्मिरी जनता असा संघर्ष सुरु असून मानवी हक्कांचं सर्रास उल्लंघन होत आहे, अशाप्रकारचा समज रूढ करण्यात हळूहळू यशस्वी होऊ लागला आहे. युनोचा अहवाल अथवा सीआयएचा अहवाल आपण नाकारला असला, तरी भारतविरोधी प्रचाराला त्यामुळे बळ मिळू शकतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. काश्मीरची भौगोलिक स्थिती भारतातल्या इतर राज्यांसारखी नाही. जम्मू आणि लडाखला काश्मीरच्या विरुद्ध उभं करणं हा भाजपाध्यक्ष अमित शहांचा प्रयत्न पाकिस्तानच्याच पथ्यावर पडणार आहे. दुसरीकडे चीनने पाकव्याप्त काश्मीर जवळपास स्वतःच्या नियंत्रणात आणलं आहे. पाकिस्तानच्या काश्मीरविषयक प्रत्येक भूमिकेला चीनचा पाठिंबा नसला तरी विरोधही नाही, किंबहुना चीन हा पाकिस्तानचा सर्वकाळचा मित्र आहे आणि भारताचा मात्र आता कोणीच सर्वकाळचा मित्र नाही. ही स्थिती काश्मीरसारख्या संवेदनशील विषयांना आपण नीट हाताळावे, असा संदेश देणारी आहे. मात्र केंद्रसरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी नैसर्गिकपणे काश्मीर प्रश्नांचा अथवा त्यांना उपयोगी अशा विषयांचा वापर करेल आणि त्यात काश्मीर हा तर सदैव भारतीय राजकारणातील निवडणुकांचाच विषय झालेला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांची अवस्था काही वेगळी नाही. स्वतःवर राष्ट्रद्रोही असा शिक्का बसू नये, यासाठी त्यांच्यातही चढाओढ सुरू आहे. एकूण काय तर पुढील दोन वर्षं काश्मीरमधील जनतेसाठी अधिकाधिक कठीण असण्याची शक्यता आहे. इतिहासातील चुकांपासून आपण काहीच शिकत नाही. काश्मिरी जनतेची बाजू घेणाऱ्या प्रत्येकाला पाकिस्तानचा हस्तक आणि लष्कराचा विरोधक ठरविणं म्हणजे जगाला काश्मीरमधील जनता केवळ लष्करामुळेच भारतात आहे, असा चुकीचा संदेश देणारं आहे. आजही बहुसंख्य काश्मिरी जनतेला भारतातच आपले हित आहे, पाकिस्तान सोबत जाण्यात नाही; याची जाणीव आहे. २०१९ चं उद्दिष्ट समोर ठेवताना युतीचा पाठिंबा काढून घेऊन केंद्राने काश्मीरवर आघात केला आहे, असं शरद पवार म्हणाले हे काही प्रमाणात खरंच आहे! |
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडे पडले असून, पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे ओझे, करंजवण, लखमापूर, म्हैळूस्के या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी करंजवण धरणातून कादवा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी कादवा नदी परिसरातील गावांमधून होत आहे. दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडे पडले असून, पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे ओझे, करंजवण, लखमापूर, म्हैळूस्के या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी करंजवण धरणातून कादवा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी कादवा नदी परिसरातील गावांमधून होत आहे. एक महिन्यापूर्वी कादवा नदीत सोडलेले पाणी बंद करण्यात आले व नंतर आठ दिवसातच कादवा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच काही ठिकाणी कादवा नदी पात्रालगत गावाला पाणीपुरवठा करणारी पाणी योजना आहे. त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी कमी पडले आहे. त्याचप्रमाणे सध्या कादवा नदी परिसरामधील गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार वारंवार हात -पाय धुण्यासाठी जास्त पाण्याचा वापर होत आहे. म्हणूनच कादवा नदीपात्रात मागणी सोडण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यापासून करंजवण, ओझे, म्हैळूस्के, लखमापूर परिसरामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अंत्यसंस्कारासह दशक्रियाला पिंडदानासाठीही पाणी शिल्लक नाही. उशाला धरण, पायथ्याला नदी. . . तरीही गावे पाण्यावाचून उपाशी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. येथील आमदार व विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कोरड्या पडलेल्या कादवा नदीपात्रात पाणी सोडून तालुक्यातील गावांना न्याय द्यावा, अशी मागणी कादवा परिसरातून होत आहे. |
महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ एकानं भरधाव कार पादचाऱ्यांना उडवलं आहे. मुंबई- महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ एकानं भरधाव कार पादचाऱ्यांना उडवलं आहे. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून, इतर एक वाहनचालक जखमी आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव मर्सिडीजने एका पादचाऱ्याला उडविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या भीषण अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाला आहे. काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. अंधेरीत राहणारा राजेंद्र प्रसाद राम (४३) याचा या घटनेत मृत्यू झाला. तो ताडदेव येथे नोकरी करत होता. रात्री नेहमीप्रमाणे काम संपवून तो घरी जात होता. त्यावेळी मर्सिडीजने त्याला जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. |
नेवासा ते टाकळीभान रस्ता काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्यामुळे संबंधित सुरू असलेले काम अंदाज पत्रकाप्रमाणे होऊन सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नेवासाफाटा येथील आंबेडकर चौकात आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष राजू आघाव व अॅड. सादिक शिलेदार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजू आघाव म्हणाले की, शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून बांधकाम खात्याचे या रस्ता कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संबंधित ठेकेदार निकृष्ट काम करत असून एका कि.मी. अंतराला अडीच कोटी रुपये खर्च होऊनही या कामाची गुणवत्ता नसल्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे होत नसल्यामुळे बांधकाम खात्यावर आघाव यांनी कडाडून टीका केली. अॅड.शिलेदार यांनी कामाचे अंदाजपत्रक आणि सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा अधिकार्यांसमोर मांडला.काम अंदाज पत्रकाप्रमाणे न झाल्यास प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. तालुका उपाध्यक्ष देवराम सरोदे यावेळी म्हणाले, सध्या या रस्ता कामाकडे अर्थिक मिली-भगतमुळे दुर्लक्ष झाल्याने रस्ता कामाची वाट लागलेली आहे. या रास्ता रोकोचे निवेदन बांधकाम खात्याचे अभियंता श्री. दुबाळे यांनी स्विकारून या कामाची गुणवत्ता तपासणीसाठी पाठपुरावा करू व सुरू असलेले काम दर्जेदार होण्यासाठी बांधकाम विभाग लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले. रास्ता रोकोप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, हवालदार बाळकृष्ण ठोंबरे, कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार किरण गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी घटनापती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि भालेराव, आम आदमीचे सचिव प्रविण तिरोडकर, भाऊसाहेब बेल्हेकर, अप्पासाहेब लोंढे, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख सलीम सय्यद, शहराध्यक्ष संदीप आलवणे, बापूसाहेब आढागळे, नानासाहेब बर्डे, डॅनियल जावळे, संतोष कापसे, पांडुरंग खंडागळे, नितीन गुंजाळ, युवक आघाडी प्रमुख दीपक गायकवाड, सोहेल शेख आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. |
मॉस्को : अनुभवाच्या जोरावर फ्रान्सने दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सने दमदार खेळ करत क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळवला आणि यंदाच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात क्रोएशियाच्या संघाने जास्त वेळ चेंडू आपल्याकडेच ठेवला होता. पण फ्रान्सचा संघ हतबल झाला नाही. त्यांनी आपला बचाव मजबूत केला आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी गोल करत विजय साकारला. The first time since 1958 we've had six goals in regular time of a #WorldCupFinal! The first time since 1958 we've had six goals in regular time of a #WorldCupFinal! मॉस्को : फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील फुटबॉल विश्वचषकातील अंतिम फेरीला काही मिनिटांमध्येच सुरुवात होणार आहे. फुटबॉल विश्वातले हे महायुद्ध पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. एकिकडे क्रोएशियाच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फ्रान्सचा संघ दुसऱ्या विश्वचषक पटकावण्यासाठी आतूर झाला आहे. क्रोएशियाने आतापर्यंच विश्वचषकात एकही सामना गमवलेला नाही. प्रत्येक सामन्यात त्यांनी वरचढ कामगिरी केली आहे. दुसरीकडे फ्रान्सनेही पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे अंतिम फेरीत दोन्ही संघांचे पारडे समसमान असेल. |
उदगीर : तालुक्यातील वाढवणा बु. येथील यशवंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य शंकरराव बुड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पर्यवेक्षक प्रा. वीरभद्र बिरादार, प्रा. मनोजकुमार माने, किशनराव ढोकाडे, मुख्याध्यापक फड, सरपंच नागेश थोटे, उपसरपंच सोनू माळी, जलिलखाँ गोलंदाज, संगम अष्टुरे, एड. प्रमोद बिरादार, प्रा. रमेश केंद्रे, प्रा. संगम बिरादार, प्रा. उमाकांत कांबळे, प्रा. शफिउल्ला खान, प्रा. अतुल जाधव, प्रा. अभिजित डांगे, प्रा. डॉ. संध्या भोयर, प्रा. पल्लवी इंद्राळे, प्रा. रविकिरण कांबळे, प्रा. संदीप तोडकर, प्रा. बब्रुवान वलसे, प्रा. सुभाष पासमे, प्रा. जयराज बुर्से, मंगेश सरदार, जहागीरदार एन. , नवनाथ मोरे, सुरेश देशमुख, प्रवीण भिंगोले, संतोष सोमासे, रामचंद्र डावळे, शेख शौकत, ज्ञानेश्वर बाऱ्हाळे, अरुण चंदाले, संदीप उडत्तेवार, पिंटुराम नामवाड, अंकुश बुंदराळे, किशोर तोलसरवाड आदी उपस्थित होते. उदगीर : येथील शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्था पदाधिकारी अरविंद पाटील एकंबेकर, प्रेमगीर गिरी, रमेश पाटील चिमेगावकर, विशाल पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप, डॉ. आर. एम. मांजरे, प्रा. व्ही. आर. भोसले, प्रबंधक बी. के. पाटील, प्रा. नेहाल खान, प्रा. पी. डी. माने आदी उपस्थित होते. |
पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्ग - विकिपीडिया\n(पुणे-मिरज-लोंडा रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)\nलोंढा, बेळगाव जिल्हा\nमध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे\n४६८ किमी (२९१ मैल)\nअधिक माहितीः मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग\n11 सासवड रोड\n280 /0मिरज\n443 खानापूर रेल्वे स्थानकखानापूर\nपुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग पुणे येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग कर्नाटकातील लोंढा ह्या लहान गावामध्ये हुबळी-गोवा रेल्वेमार्गाला जुळतो. महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव इत्यादी महत्त्वाची शहरे ह्याच मार्गावर आहेत. कोकण रेल्वे चालू होण्याअगोदर गोव्याला रेल्वेमार्गाने जोडणारा हा एकमेव दुवा होता.\nमे २०१६ मध्ये भारत सरकारने पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना जाहीर केली.\n"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=पुणे-मिरज-लोंढा_रेल्वेमार्ग&oldid=1401778" पासून हुडकले\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१६ रोजी १८ः४६ वाजता केला गेला. |
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. चामोर्शी हे शहर तालुक्याचे ठिकाण असून, येथे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. चामोर्शी येथील मुख्य ठिकाणी परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा थांबा असल्याने शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याकरिता विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी होते. दोन्ही बाजूंनी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. रस्त्याच्या एका बाजूचे खोलीकरण करण्यात आले आहे परंतु याठिकाणी पाणी साचले असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, यासाठी हे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी युवा संकल्प संस्थेने आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी शाखाप्रमुख सुरज नैताम, उपप्रमुख प्रशांत चुदरी, सदस्य अजय भाडेंकर, सुरज चौके, विजय भाडेकर, प्रशिक नदेश्चवर, ध्रुप चिचघरे, डॉ. विशाल सहारे, अजय बुराडे, सुरज सोयाम, कार्तिक चौके, दिलीप शेट्ये, भूषण बारसागडे, ज्ञानेश्वर लटारे, शंतनू पिपरे, राहुल चिचघरे, सचिन कुनघाडकर, अनुराग बन्सोड, स्वप्नील चिचघरे आदी उपस्थित होते. |
'प्रतिभा-वेदनेतूनच अस्सल साहित्यनिर्मिती ' वसई - "काटेमुक्त जीवनातून चांगले साहित्य निर्माण होऊ शकत नाही; त्यासाठी काटा काळजात घुसावा लागतो. प्रतिभा आणि वेदनेच्या संगमातूनच अस्सल साहित्यनिर्मिती होत असते', असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी रविवारी (ता. 25) भुईगाव येथे केले. "सहयोग' संस्थेने भरवलेल्या सहाव्या "वसई साहित्य-कला महोत्सवा'त दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात उत्तम कांबळे बोलत होते. वनाधिपती विनायकदादा पाटील, फादर ऍण्ड्य्रू रॉड्रिग्ज, तलासरीच्या कुष्ठरोग पुनर्वसन केंद्राच्या सिस्टर मोनिका मस्करनीस, पत्रकार रवींद्र आंबेकर व्यासपीठावर उपस्थित होते. शेतकऱ्यांपासून लेखकांपर्यंत आत्महत्यांचे पेव फुटले असून मरणाच्या घटना वाढून जगण्याचे मार्ग क्षीण होताना दिसत आहेत. जगातील असुरक्षितता वाढत जाऊन माणूस तुटत चालला आहे. या वातावरणात अशी संमेलनेच सर्जनशीलता जपत असून माणसाला जगण्याची नवी ऊर्मी देण्याचे प्रयत्न करत आहेत, असे गौरवोद्गार कांबळे यांनी काढले. या वेळी तलासरी-वडोली येथील दयानंद हॉस्पिटलला "सामाजिक कृतज्ञता' पुरस्काराने गौरवण्यात आले. रुग्णालयाच्या सिस्टर मोनिका मस्करनीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विनायकदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रुग्णालयाच्या विकासासाठी वर्षभरात 51 लाखांचा निधी संकलित करण्याची घोषणा "सहयोग'चे सायमन मार्टिन यांनी केली; तसेच स्वतः एक लाखाचे योगदान देत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात स्टीफन परेरा (मृत्युंजय), सचिन मेन (पक्षिजगत), ऍन्थनी परेरा (परी आली माझ्या घरी, पैशांचे झाड), धोंडू पेडणेकर (सूर आले जुळूनी) आणि सुनील जाधव (मला समजून घ्या) या लेखकांना "सहयोग ग्रंथ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव दत्ता नर, कामगार संघटनेचे भरत पेंढारी, कोमसापचे कार्याध्यक्ष शेखर धुरी, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर म्हात्रे आदी या वेळी उपस्थित होते. शनिवारी (ता. 24) सायंकाळी एसटी कामगार संघटनेने काढलेल्या वृक्षांच्या आणि ग्रंथांच्या दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. चित्रकार आबिद सुरती, प्रा. दिगंबर गवळी, ज्यो डिसोजा, दत्तात्रय ठोंबरे आणि चार्ली कोरिया यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन या वेळी करण्यात आले. त्याचे संयोजन शशिकांत बने आणि फिलिप डिमेलो यांनी केले. अखेरच्या सत्रातील साहित्य चर्चेत अनेक मान्यवरांनी भाग घेतला. या वेळी कवितांचे चित्रांकन सुभाष गोंधळे यांनी; तर सूत्रसंचालन मनोज आचार्य यांनी केले. निसर्ग माणसाला डोळे देतो; पण दृष्टी देण्याचे काम लेखक साहित्यातून करत असतो. जोखीम घेतल्याशिवाय प्रभावी लेखन होत नाही, असे उत्तम कांबळे म्हणाले. नवा विचार आणि बदलासाठी नेमके उद्दिष्ट घेऊन लिहिणे गरजेचे आहे. केवळ अनुभवांचे प्रतिबिंब म्हणजे साहित्य नव्हे; तर त्या अनुभवांतील संवेदनांचे कंगोरे शोधून वाचकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरे साहित्य, असे विवेचन त्यांनी केले. |
13 मार्चः 1 जानेवारी भीमा कोरेगावात झालेला हिंसाचार आणि त्याच्या दोन दिवसांनंतर झालेल्या बंदामधील गुन्हे रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गंभीर गुन्ह्यांवर मात्र खटले सुरूच राहणार आहे. ही माहिती त्यांनी विधानपरिषदेत दिली . गंभीर गुन्ह्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान वढू -तुळापुरातली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी सरकार ताब्यात घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधीमंडळात दिली आहे. याशिवाय मिलिंद एकबोटेंच्या कस्टोडीअल चौकशीची मागणी सरकारकडून करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कोरेगाव-भीमावर आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं आहे. याप्रकरणात सरकार 9 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भीमा कोरेगाव झालेल्या हिंसाचारावरुन एकूण १५८ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी २२ जण अजूनही अटकेत आहेत. तर ३०० ते ३५० जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय राज्यात अॅट्रॉसिटीचे १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मिलिंद एकबोटेंना अटक करण्यासाठी तात्काळ गुन्हा दाखल केला. ते फरार झाल्यानंतर कोंबिग ऑपरेशन केलं. सर्च ऑपरेशन केलं. पण त्यांना सुप्रिम कोर्टानं जामीन दिला, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सांगितले, की सद्यःस्थितीत भारतीय गोलंदाजी सर्वोत्कृष्ट आहे. पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवशी अलीने १७० चेंडूंत ५० धावा केल्या. शिवाय अॅलिस्टर कूकसोबत त्याने ७३ धावांची भागीदारीही रचली. यामुळे इंग्लंडने दिवसअखेर ७ गडी गमावून १९८ धावांपर्यंत मजल मारली होती. अली म्हणाला, विकेट स्लो असल्यामुळे चेंडू दिशा बदलत होता. त्यामुळे मी संयमी खेळावर जोर दिला. भारतीय गोलंदाजी खरोखरच उत्कृष्ट होत होती. त्यांनी मला फटके मारण्याजोगा एकही चेंडू फेकला नाही. त्यामुळे मी संयम कायम ठेवला. मी अशा प्रकारचा खेळ कधी करीत नाही. करत होते. मी याआधी अशा प्रकारच्या गोलंदाजीचा सामना कधी केला नाही. जागतिक स्तरावर हा सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा संघ आहे, असे अली म्हणाला. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
बीड : अखेरच्या काळात माझी एकच इच्छा आहे, माझ्या विजयसिंहला (विजयसिंह पंडीत, Vijaysinh Pandit) एकदा निवडून द्या, असे भावनिक आवाहन माजी मंत्री आणि बीड (Beed) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडीत (Shivajirao Pandit) यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना केले. (Elect Vijaysinh Pandit in elections : Shivajirao Pandit) माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. त्या सत्काराला उत्तर देताना पंडीत यांनी आपली इच्छा व्यक्त केली. शिवाजीराव पंडित म्हणाले की, मी राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सत्कार घेण्याचे बंद केले होते. पण, माझे नेते शरद पवार साहेब येणार आहेत, म्हटल्यावर मला हा सत्कार घ्यावा लागला. मी १९६२ पासून गेवराई तालुक्यासाठी सालगड्यासारखे काम केले आहे. आज मी थकलो असलो, तरी तुमची राखण करतो आहे. त्यासाठी माझी तीनही मुले इमानदारीने काम करत आहेत. हा अभिष्टचिंतन सोहळा पाहून माझे जीवन सार्थक झाल्याचा आनंद होतो आहे. लोकांच्या आशीर्वादामुळेच मी हे करु शकलो. मतदारसंघात शाळा उभ्या केल्या. नवोदय विद्यालय आणले, त्यातून शेकडो मुले देशाच्या विविध भागात काम करत आहेत. ही सारी मुलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आहेत, याचा मला अभिमान आहे, असेही पंडीत यांनी नमूद केले. माजी मंत्री पंडीत म्हणाले की, राजकारणाचा गुरुमंत्र मला बाबूराव पाटील अनगरकर यांनी दिला, त्यांचे आशीर्वाद मी कधीच विसरु शकत नाही. ते माझे ट्रेनिंग सेंटर होते. आज आपल्या व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. या निमित्ताने जळगाव ते सोलापूर या रेल्वे मार्गाची मागणी आज त्यांना करतो आहे. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
मुंबई : 'तू ही मेरी शब है', 'सच कह रहा है दीवाना', 'लबों को', 'तड़प तड़प के' अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांचे गायक कृष्ण कुमार कुन्नथ म्हणजेच केके (KK) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे (Death ) त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. देशसहित जगभरातील त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. केके यांच्याकडून नव्या पिढीच्या गायकांना (Singer ) खूप प्रेरणा मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? केके सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishor Kumar ) यांच्यापासून प्रेरित झाले होते. ते कधीच शास्त्रीय संगीत (Music ) शिकले नव्हते. ते किशोर कुमार यांच्या गायनामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी गायनाला सुरुवात केली. खुद्द केके यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. (kk singer latest news In Marathi ) केके यांनी एका वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, किशोर कुमार हे त्यांच्या प्रेरणास्थानी होते. केके यांनी कधीही शास्त्रीय संगीत शिकले नव्हते. काही दिवसांसाठी एका संगीत शाळेत गेले होते , परंतु तेथे त्यांना संगीताचे धडे घेण्याची आवश्यकता वाटली नव्हती, असेही केके यांनी या मुलाखतीत सांगितले होते. 'सुरुवातीपासूनच गाणे ऐकूनच मला गाणे गाता येत होते, हे माझ्यासाठी वरदान आहे. मला नंतर कळले की किशोरदाही कधीच संगीत शिकले नव्हते, त्यामुळे माझ्याकडे संगीत शिक्षण न घेण्याचे हे देखील एक कारण होते', असंही केके यांनी मुलाखतीत सांगितले. त्यांच्या वडिलांनीही त्यांच्यावर संगीतासाठी कोणताही प्रकारचा दबाव कधी टाकला नसल्याचेही त्यांनी सांगितले. केकेंसाठी किशोर कुमार यांच्या सोबतच अनेक दिग्गज गायक आणि संगीतककार प्रेरणास्थानी होते. गायक हरिहरन यांनी त्यांना मुंबईत येऊन संगीत क्षेत्रात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता. केके जेव्हा दिल्लीत गाणे म्हणत होते, तेव्हा हरिहरन यांनी त्यांचे गाणे ऐकले होते. त्यानंतर हरिहरन यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांना मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
चैत्र नवरात्रीपर्यंत दुकाने बंद ठेवणार ! गुरुग्राम (हरियाणा) : येथे २०० शिवसैनिकांनी मांसविक्रीची ५०० हून अधिक दुकाने बंद पाडली आहेत. यात 'केएफ्सी' या आस्थापनाचाही समावेश आहे. चैत्र नवरात्रीपर्यंत ही सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक मंगळवारी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, अशी चेतावणी शिवसैनिकांनी दुकानदारांना दिली आहे. शिवसैनिकांनी केएफ्सीमध्ये जाऊन तेथील ग्राहकांनाही बाहेर काढले आणि दुकान बंद केले. 'स्थानिकांनीच मांसविक्रीची दुकाने नवरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी केली होती. त्यामुळेच दुकाने बंद करण्यासाठी कारवाई करावी लागली', असेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे. (हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद घेऊन कृती करणारी शिवसेना ! - संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कारवाईसाठी शिवसेनेने आधीच पोलीस आणि प्रशासन यांची अनुमती घेतली होती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 'या कारवाईसंदर्भात आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. वैध दुकाने बंद करण्यात आली असतील, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल', असे गुडगाव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (पोलिसांना असे म्हणायचे आहे की, येथे अवैध दुकानेही आहेत. जर तसे असेल, तर पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? - संपादक, दैनिक सनातन प्रभात) अशी कारवाई आधी का करण्यात आली नाही ? नवी देहली : भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या ४ राज्यांत अवैध पशूवधगृहे आणि मांसविक्रीची दुकाने यांवर कारवाई करण्यात येत आहे. (उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अवैध पशूवधगृहांवर कारवाई चालू केल्यानंतर भाजपची सत्ता असलेल्या या राज्यांनी ही कारवाई चालू केली आहे. मुळात आतापर्यंत या सरकारांनी अवैध पशूवधगृहांवर कारवाई का केली नाही, याचेच उत्तर द्यायला हवे ! योगी आदित्यनाथ यांनी कारवाई चालू केली नसती, तर या राज्यांनीही तसा विचार केला नसता ! - संपादक, दैनिक सनातन प्रभात) आतापर्यंत हरिद्वारमध्ये ३, रायपूरमध्ये ११ आणि इंदूरमध्ये १ मटणाचे दुकान बंद करण्यात आले आहे. जयपूर महापालिकेने एप्रिलपर्यंत ४ सहस्र अवैध मांसविक्रीची दुकाने बंद करणार असल्याचे घोषित केले आहे. (राजस्थानमध्ये साडेचार वर्षे सत्तेत असतांना असा निर्णय आधी का देण्यात आला नाही, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे ! गोहत्या हा हिंदूंच्या धार्मिक भावनांशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा गोमांसविरोधाच्या नावावर मते मिळवण्यासाठीच हा प्रयत्न तर नाही ना ? - संपादक, दैनिक सनातन प्रभात) या ४ सहस्र दुकानांपैकी ९५० मटनांची दुकाने वैध असून या दुकानांच्या परवान्याचे पालिकेने नूतनीकरण केले नसल्याचा दावा मांस विक्रेत्यांनी केला आहे. काही लोकप्रतिनिधी आणि स्थानिक यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली जात असल्याचा दावा पालिका अधिकारी करत आहेत. छत्तीसगडच्या रायपूर महापालिकेचे आयुक्त आर्. के. डोंगरे यांनी मांसविक्री करणार्या अनधिकृत दुकानांना ३ दिवसांत ती बंद करण्याचा आदेश दिला आहे. ३ दिवसांत मांसविक्रेत्यांनी दुकाने बंद केली नाहीत, तर ही दुकाने सील करण्याचा आदेशही आयुक्तांनी दिला आहे. |
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. यासोबतच काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवरून मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "भारत सरकार काश्मिरी पंडितांची दुर्दशेकडे दुर्लक्ष करू इच्छित आहे, कारण त्यांच्या कठोर धोरणांमुळे त्यांच्या दुर्दैवी हत्या झाल्या आहेत. सरकार आम्हाला शत्रू म्हणून पाहत आहे, त्यामुळे मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आणखी एका ट्विटमध्ये मेहबुबा यांनी लिहिले की, "चोटीगाममध्ये आज सुनील कुमारच्या कुटुंबीयांना भेटण्याचा माझा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला. जेव्हा तेच प्रशासन प्रत्येक कानाकोपऱ्यात जात असताना आम्हाला कुलूप लावणे हे चुकीचे असल्याचा दावा करत आहे. यापूर्वी मेहबूब मुफ्ती यांनी काँग्रेसच्या 'आप' विरोधी आंदोलनांवर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रीय एजन्सींच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांना एकत्र करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. यावर काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांची गॅंग भ्रष्ट कृत्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायला हवा. |
'ब्राह्मण त्यास पंगतीस घेऊन भोजन केले सर्वांनी मखेपात्रे दिल्ही उभयता भट नेहमीच भोजन पंगतीस करीत होते गुजराथ्याचे नाव चिमण भट प्रस्तुत आपणाजवल ठेविला आहे कलावे मागाऊन पाठऊन देतो हे विज्ञापना ( पहिले पान दुसन्या मजकुराचे पाठीमागचे पान ताजा कलमप्रमाणे हे विज्ञापना नंतर लिहिलेली हकिकत ) बापुजीपंताचा तोतया आमचे हाती देत नवते त्याचे प्रस्थान मोठेच वाढवले. होते गजनीच्या तपा, हालपा किमखापी तकीये गालिचे जोडवी आगठ्या दहा माणसाचा सिधा दररोज या प्राो साहित्याचा तर्तुद याचा तपसील पत्री लिहिता येत नाहीं समक्षच विनंती करीन या प्रो मोरोबाचे ढंग हरिपंताचा पुतण्या यांजकरितां क्षमा केली नाहींतर पारपत्यच केले असते त्यात बरवे उभयता येऊन पदर पसरून अन्याय मागोन घेतले नाहीतर येथील येखत्यारच न सांगतो स्वामीनी उपेक्षा करू नये लवकर बंदोबस्त करावा माझे नांव बाहेर जाहीराण्यात शफतपूर्वक आणु नये हे विज्ञापना...... 3 " १२ उदेपूरच्या व्यास घराण्याकडील कांहीं पत्रा ( श्री. अक्षयकीर्ति व्यास, एम्. ए. व श्री. ग. ह. खरे ) [इ. १९५१ च्या डिसेंबरांत मी ऐतिहासिक परिषदांच्या निमित्तानें जयपुरास गेलों असतां तेथें माझे मित्र श्री. अक्षयकीर्ति व्यास सुपरिंटेंडंट, आर्किऑलॉजी अँड म्यूझियम्स, उदयपूर सर्कल, उदयपूर यांनी मला कित्येक मराठी, राजस्थानी हिंदी व संस्कृत पर्ने दाखविली आणि आवश्यक ती नकलून घेण्यास परवानगी दिली. मी व माझे मित्र डॉ. मो. गं. दीक्षित, श्री. वि. सी. चितळे व श्री. शं. ना. जोशी अशा चौघांनी ती नकललीं. तींच येथें प्रसिद्ध करीत आहे. या पत्रांचे पूर्ववृत्त श्री. व्यास यांनी लिहून धाडले तसेंच पुढे दिले आहे. त्यांचे म्हणणे असे की, त्यांचे पूर्वज उदेपूरच्या दरबारांत पंडित असून संस्कृत पत्र लिहिण्याचे काम करीत. तर्से असेल तर च्यापारसनीस घराण्यांत पेशव्यांकडे आलेली फार्सी पत्र राहिलीं तद्वत् हीहि पत्र व्यासांच्या घराण्यांत राहिली असतील. पण मग मराठी-हिंदी पत्रे त्यांजकडे कां यावीं ? मला वाटतें या घराण्याकडे सर्वच मराठ्यांकडून आलेला पत्रव्यवहार पहाण्याचे काम असेल. यामुळे पेशवे, छत्रपति व त्यांचे सरदार यांचों संस्कृत, मराठी व राजस्थानी+ २ सुवर्णदुर्गचे मामलेदार. मेणवली दप्तर; रुमाल नं. ४८, फाईल नं. २, पत्रक्रमांक १३६. हिंदी भाषांतील पत्रें या घराण्याकडे आली असावीं या अकरा पत्रापैकी क्र. ३, ५, ११ ह्रीं राजस्तानी - हिंदी, ऋ. १० हें मराठी व बाकीचीं ७ संस्कृत आहेत. हीं पत्र घाईतच नकलाव लागल्यानें मराठी पत्रांप्रमाणे अक्षरांच्या विविधतेविषयीं पाहिजे तितका विचार करून तशा नोंदी करणे शक्य झालें नाहीं. जेथें सहज डोळ्यांत भरणारा निराळेपणा माढळला तेथें तो नमूद केला आहे. संस्कृत पत्रव्यवहार आजवर फार थोडा उपलब्ध झाला असल्यानें त्यांच्या लेखनपद्धतीचीं वैशिष्ट्ये सध्या नीट अवगत नाहींत. म्हणून येथे त्याविषयीं कहीं न लिहितां यांत निर्देशिलेल्या व्यक्ति व घटना इतरत्र कोठें, कशा आल्या आहेत हें दाखवितों. त्यावरून पत्रांच्या अंसलनकलबनावटपणांविषयीं ज्याच्या त्यानें कल्पना बांधाव्या. येथें पत्रपाठ शुद्ध करण्याचा यत्न केलेला नाहीं. ] महाराष्ट्रवीर छत्रपति शिवाजीने अपने वंशका निकास उदयपूर के सीसोदिया राजवंशसे मानकर मेवाडके साथ छूटा हुआ संबंध पुनः स्थापित कर लिया था । उन्होंने भारत में हिन्दू साम्राज्यकी स्थापनाका दृढ संकल्प कर शक्तिशाली मुगल सम्राट् औरंगजेबसे लोहा लिया जिसमें उन्होंने मेवाडके महाराणा श्रीप्रतापसिंहकाही मार्ग अपनाकर युद्धनीति भी वही रखी । शिवाजीका सत्यसंकल्प सिद्ध नही हुआ, किन्तु कालान्तरमें उनके पेशवा - मंत्रियोंने भारतवर्ष में मुगल सत्ताकी जड खोखली कर दी । दुर्भाग्य से महाराज शिवाजी और मेवाडके महाराणा राजसिंहके बीच होनेवाले पत्र-व्यवहारका पता नहीं लगता, किन्तु शिवाजीके वंशधरों एवं पेशवाओंके पत्रादि सैंकडोंकी संख्या में मिलते हैं जिनसे मेवाड और मरहट्टा संबंधपर पूरा प्रकाश पड़ता है । यह स्पष्ट है कि महाराणा द्वितीय अमरसिंह (वि. सं. १७५५ - ६७ = ई. सं. १६९८ - १७१ ० ) और द्वितीय संग्रामसिंह के समय ( वि. स. १७६७-९० = ई. स. १७१०-३४ ) मुगल दरबार में महाराष्ट्र वीरोंसे संधिकी बातचीत उदयपुर के महाराणा· द्वारा भी चलाई गईं थी । पेशवा वरि उदयपुरके महाराणाओंके कुलगौरव को स्मरण कर उच्च भावनाएं रखते रहे । दक्षिण भारत और उत्तर भारतकी भाषासंबंधी विभिन्नता के कारण पत्रोंका आदान-प्रदान दोनो तरफसे संस्कृत भाषा में होता था । अठारहवी शताब्दी में उदयपुर के दरबार में संस्कृत भाषाभाषी कई विद्वान् थे; किन्तु व्यक्तिगत पत्र - व्यवहार - में तो केवल कुशल और विश्वसनीय व्यक्तिही प्रयुक्त किया जा सकता है । अतएव महाराणा संग्रामसिंह द्वितीयने यह कार्य अपने परंपरागत विश्वसनीय विद्वान् और प्रतिष्ठित व्यक्ति एवं मेवाडके आदिनिवासी भट्ट मेवाडा ( भट्ट मेदपाठीय ) ब्राह्मण • गोवर्द्धन के पुत्र रूपजितको सौंपा । रूपजित्का छोटा पुत्र सोमेश्वर और पौत्र पुरुषोत्तम हुआ, जिसको महाराणा भीमसिंहने वि. सं. १८३९ ज्येष्ठ कृष्ण ७ के परवानेद्वारा 'संस्कृतिपण्डित " की उपाधि प्रदान की। रूपजितके देहावसान के पश्चात् उसका ज्येष्ठ पुत्र रामकृष्ण उपरोक्त कार्य विक्रम संवत्की उन्नीसवी शताब्दी के प्रारंभतक करता रहा । तत्पश्चात् उसका वंशधर भाई सोमेश्वरभी करने लगा । इस वंशमें पुरुषोत्तमके पश्चात् क्रमशः व्यास रमाराम, व्यास शिवराम और व्यास जगन्नाथ हुए । जगन्नाथका ज्येष्ठ पुत्र व्यास विष्णुरामशास्त्री हुआ और उसका ज्येष्ठ पुत्र व्यास अक्षयकीर्ति एम. ए. इस -समय विद्यमान है, जो उदयपूरपुरातत्त्व विभाग और म्यूजियमका अध्यक्ष है। अपने विषय में सुरुचि होनेके कारणं उसीके सौजन्यसे मेवाड और मरहट्टा संबंधपर प्रकाश डालनेका यह साधन उपलब्ध हुआ है । कालान्तरमें इस परिवारको उदयपुर दरबार से 'राजकीय कथाव्यास' का पद प्रदान किया जाकर उच्च सम्मान दिया गया, जिससे इनका उपनाम व्यास हुआ । महाराणाओं द्वारा होनेवाले संस्कृत पत्र व्यवहारका कार्य अब भी यही करते हैं। इस समस्त प्राचीन बहुमूल्य पत्रव्यवहार को अबतक सुरक्षित रखनेका श्रेय व्यास विष्णुरामशास्त्रीको है जिसने जीवनपर्यन्त अपने विद्यानुराग और कठोर अध्यवसायके द्वारा इन प्राचीन पत्रोंका अध्ययन करते रहकर इनको प्राणों की तरह मूल्यवान समझा और रक्षा की । इनकी रचनाएं :१ श्री वैद्यनाथ शिवालय, सीसारमा गांव, उदयपुर की प्रशस्ति, जिसका अंतिम भाग इस प्रकार है : - पंचद्वीप मुनींदुसमितशरच्छुकासिताऽवींद्र जादास्त्रे सूर्यसुतान्विते द्विजवरो गोवर्द्वनस्यात्मजः । प्रत्यर्थिक्षितिभृत्पराजयकरः श्रीमंडित - श्वरस्य वचनात् श्रीरूप भट्टोलिखत् ॥ संवत् १७७५ वर्षे ज्येष्ठवदि 3 शनौ लिपिकृतं भट्टगोवर्द्धनसुतेन रूषाजता ( वरिविनोद, भाग 3, पृष्ठ ११७२ ) २ उदयपुर के हरवेनजीके खुरेपर शिवालयकी प्रशस्ति, वि. सं. १७९० वैशाख शुद्ध १३ व्योमकमुनिभूसंख्ये वर्षे मासि च माधवे । दले सिते त्रयोदश्यां तिथौ च भृगुवासरे ॥ २६ श्रीरूप भट्टजनुषा कविराड्वंदितांघ्रिणा । रामकृष्णेन रचिता प्रशस्तिरियमुत्तमा ॥ २९ (वीरविनोद भाग ३, पृ.१५१९) ३. मानजी धायभाईका कुण्ड ( गोवर्द्धनविलास ) की वि. सं. १७९९ की प्रशस्ति ) श्रीरूभट्टद्विजराजजेन श्रीरामकृष्णेन बुधेन बुद्ध्या । इलाविलासाहितचेतसेयं मानप्रशस्ति र्निरमायि रम्या ॥ २६ सुरूपरूपद्विजराजजन्मा बुधो भवत्येव न तत्र चित्रं । इलाविलासोद्धुरचित्तवृत्तिर्नक्षत्रभूः क्षत्रकुलप्रथोपि ॥ २७ ऐतिहासिक संकीर्ण निबंध - खंड ५ संवत् १७९९ वर्षे चैत्रमासे शुकृपक्षे १ दिने गुरुवातरे महाराजाधिराजमहाराणाश्रीजगत्सिंहजीविजयराज्ये मेदगटज्ञातीय भट रूपजी तत्पुत्र भट रामकृष्ण या प्रशस्ति बणाई छे ( वीरविनोद, भाग ३, पृ. १५२१ ) ४. राजसिंहराज्याभिषेककाव्य ( अप्रकाशित ) । इसकी रचना रूपाजत के छोटे पुत्र सोमेश्वरने की थी । ( ओझा, राजपुतानेका इतिहास, भाग २, पृ. ९५४, टिप्पणी २ ) ५. देबारीके दरवाजेके सामनेवाले राजराजेश्वर के मन्दिरकी वि. सं. १८१९ वैशाख शुक्ला ८ के अप्रकाशित शिलालेखका रचयिताभी सोमेश्वर था ( ओझा, राजपुतानेका इतिहास भाग २, पृ. ९७३ ) माघ असित १३ } ॥ श्री सांबो जयति ॥ श. १६५७ माघ वद्य १३ इ. १७३६ जानेवारी २९ श्रीमगिरिजारमणचरणारांधनावाप्त सकलगुणगणेषु मित्रजनहृत्कमल मित्रेषु दीवानजीकानामेधमानरूपांकितेषु श्रीबिहारिदासजित्सु [ मो. जा. * ] स्नेहाकिंत - बाजीराव बल्लालपंडितप्रधानवर्यकृताशीराशयः शमत्रत्यं माघासित १३ पर्यंत वरवर्ति तत्रत्यमपि कुशलमभिलषामहे विशेषस्तु युष्मतप्रेषितपत्रमागतं महानानंदः समजनि अत्रत्यसकलमपि वृत्तं पितृव्यसकतावतजयसिंहसूरतसिंहयोर्वचनरचनाभिः स्फुटं भविता सदाशिवपंडितस्तत्र वर्तते पट्टाकार्यविषये वैलव्यं मास्तु लक्ष्मीरामेणेदानी परिश्रमेण सेवा कृता भवति श्रीदवानजीकान्प्रत्येतदविषये विज्ञापयित्वा यथा श्री दीवानजीकानामेतदउपरि वर्धिष्णु कृपा स्यात्तथा कर्तव्यं भवद्भिः सर्वदा स्वकुशलपत्रांमृतेन स्नेहव्रततिर्वद्वनीया अभिशेषु कि बहुलेखनेनेत्यलं ॥ बाजीराव बल्लाळ प्रधान → बिहारीदास दिवाणजी माघ वद्य १३ पर्यंत खुशाल आहों. येथील सर्वं वृत्तांत पितृव्य सकनावत जयसिंह व सूरतसिंह यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होईल. सदाशिव पंडित तेथें आहे. पट्ट्याबाबत विलंब होऊं नये. लक्ष्मीरामाने सध्या कष्टपूर्वक चाकरी केली. तरी त्यावर आपली वाढती कृपा होईल असे करावें. [ हे पत्र पंचोली बिहारीदासाला उद्देशून आहे. बिहारीदास इ. १७३६ मध्ये मेल्याचे समजतात असें कै. ओझा लिहितात ( राजपुतानेका इतिहास, २ रा खंड, पृ. १३०८ ). पण मला त्याविषयों संशय आहे. पेद ९॥ १२ या पत्राची १८१५११७३५ ही तारीख निश्चित आहे. या पत्रांत ' बिहारीदास यांस नूतन सेवा प्राप्त जाली यामुळे स्वामसि किफायत करून दाखविताती' अर्से विधान आहे. तो १७३६ मध्ये मेल्याचें १२ उदेपूरच्या व्यास घराण्याकडील कांही पत्रे गृहीत धरल्यास तो थोडेच दिवस दिवाण होता अर्से मानावें लागेल. पण कै. ओझा यांनी आपल्या उपर्युक्त पुस्तकांत बहुधा वीरविनोदाच्या आधारानें तो, मुघल सम्राट फर्रुखसियर इ. १७१३ मध्यें गादीवर आला तेव्हां मेवाडचा वकील म्हणून बादशाही दरबारांत गेला आणि तेथें मेवाडतर्फे उत्तम सेवा केल्यामुळे इ. १७१७ पूर्वी मेवाडचा दिवाण बनला, अर्से नमूद केलें आहे (पृ. १३०७ ). तेव्हां येथें नूतन सेवा या शब्दांचा अर्थ पुनरपि दिवाणगिरी असा मर्यादित करावा लागेल. पेद ९॥१२ मध्यें पट्टाप्रकरण निर्दिष्ट आहे. यांत सक्तावत जयसिंह व सूरतसिंह अशा दोन व्यक्ति उल्लेखिल्या असून त्यांस पितृव्य म्हणून संबोधिलें आहे. तेव्हां हे महाराणा जगत्सिंहाशीं चुलत्याचें नातें धारण करणारे असावेत, यांपैकीं सूरतसिंहाचा निर्देश वीरविनोद खंड २, पृ. १२२७ वर आला आहे. जयसिंह हा त्याचा जवळचा भाऊबंद असण्याचा संभव आहे. येथील लक्ष्मीराम आणि चिमाजीच्या पत्रांत (क्र. २ ) आलेला मिश्र लछीराम बहुधा एक असावेत. ] (श. १६५८ ज्येष्ठ शुद्ध 3 सोम, (इ. १७३६ मे ३१ नंतर ॥ स्वस्तिश्रीमत्समस्तसामंतसेवक निर्वाहेषु कोशकृषीवल ।। गृहपारिबहर्षहेतु नीतिसेतुरक्षणनिपुणेषु. परोपकार ॥ सत्कार करणपरायणेषु. वेदां[*]ण्विवपरानंदप्रकाशेषु. अस्मत् विश्वासपात्रीभूतेषु. श्री। 3 । विहारीदासामात्येषु ॥ स्नेहांकि ॥ तचिमणाजीबल्लाळपंडितरुनाशिषो विलसंतु शमत्र ॥ ॥ भवदीयमीहे विशेषस्तु इश्वरकृपया श्रीकाशीयात्रां संपाय ॥ ॥ श्रीमातृभिः सुखेन पुण्यग्रामे समागतं श्रीमहाराजकृपा भवतां ॥ ममता यद्यत्साहित्यं यात्राप्रसंगे कृतं तत्सर्वे सक्तावतजयसिंह ॥ लछीराममिश्राभ्यां अवगतं तेन परमानंद अगान्मन्मनश्चको ।। रः अस्मिन्विषये श्रीमतां विश्वासः स्छितः चपरं अग्रेपि नेहा ॥ भिवृद्धि प्रतिपरिपालनादिकुशलाः भवंत एव श्रीमातुसेवार्थे ॥ सक्तावतजयसिंह लछीराममिश्रो दत्तो आभ्यां संम्यक् सेवा ॥ कृता तथा मातुरंतःकरणे संतोषो जातः आभ्यां मातृभिः ॥ सह यात्राविषये अतीव श्रमः कृतः श्रीमहाराजाधिराजानां त ॥ था श्री छत्रपतीना स्नेहैक्यं वरिवर्त्ति तथैव तैः सेवां कृत्वा प्रक ।। टीकृतं तस्मात् एतेषु यथा महाराजप्रभूणां अनुकंपा भवि ॥ ष्यति तथा श्रीमद्भिः कृत्वा देयं अत्यः सर्वोप अर्थः आभ्यां ।। व्याक्तीभविष्यति सदैव पत्रादिना स्नेहाभिवृद्धिपूर्वकत्वे । अस्मदंतःकरणं संतोषणीयं किमधिक सुज्ञेषु ॥ श्री श्री श्री ॥ चिमणाजी बल्लाळ → अमात्य हिदास मातुश्री काशीयात्रा संपादून सुखरूप पुण्यास आल्या. महाराजांच्या कृपेनें व आपल्या ममतेनें यात्रेच्या प्रसंगी जे जे साह्य झालें ते सर्व सक्नावत जयसिंह आणि लीराम मिश्र यांजकडून अवगत झालें परम आनंद झाला. मातुश्रींच्या सेवेसाठी उपर्युक्त लोक दिले व त्यांनीं उत्तम सेवा केली याबद्दल मातुश्रींनाही संतोष झाला.. यायोगे महाराजाधिराज व छत्रपति यांच्या स्नेहांत अभिवृद्धि होईल. यांवर महाराजांची कृपा व्हावी येथील सर्व वृत्त ते सांगतील. [ बाजीचिमाजींची आई राधाबाई इ. १७३६ मे ३१ रोजीं काशीयात्रेहून पुण्यास परतली ( पेद २२१३३० ). तेव्हां त्यानंतर हें पत्र लिहिले गेलें. या पत्रांत सक्तावत जयसिंह आणि लछीराम मिश्र या दोघांना उदेपूरच्या महाराण्यानें काशीयात्रेत राधाबाईंच्या सोबतीस दिल्याचे सांगितले आहे. आणि त्यांनी त्या प्रसंगांत उत्तम सेवा केली म्हणून त्यांवर उदेपूर दरबाराकडून कांहीं कृपा व्हावी म्हणून विनविलें आहे.] वि. सं. १७९२ (श्रावणादि ) आषाढ शुद्धि ७ श्रीरामजी { श. १६५८ आषाढ शुद्ध ७ इ. १७३६ जुलै ३ सीधश्री सर्व उपमाजोग्य श्रीपचोली वीहारिदासजी जोग्य लसकरथी राजश्री रामचंद्रजीकेन आसीबचन ब [*]णा आठरा समाचार श्रीजीरी कीरपासु भला हे थाहारा सदा भला चाहिजेजी अपरं च तुमारा कागद आया समाचार सब मालम होवा. श्रीमंत राजश्री रावसाहेब प्रधानजी हुकम् { कम कर दीया फौज हजार बारा मालवामे चौ मासामे रखी ईंनका बरचकी फुरमास जो श्रीदीवा[न *] जी म्हाका रुपीया भेज देसी सो परच कीजे सो तो अ बार तां पहुची नही .श्रीजीस अरज करि परचकी पबर लीजो ओर वीशेष काईं लीपा श्रीदीवाण तथा श्रीरावसाहेबकी जाणे हे कोई बात की तफावत नहीं आय वडा छो कागदसमाचार हमेसा लीषता रहजोजी माती आशाढ. शुदि ७ समत १७९२ वर्श रामचंद्र [ बावा शेणवी ] → बिहारदास पंचोली [ बाजी ]रावसाहेच प्रधान यांनी हुकूम दिल्यावरून बारा हजार फौज पावसाळ्याच्या चार महिन्यासाठीं माळव्यांत राहिली आहे. आपणाकडून फौजेच्या खर्चाची फर्मास अजून पावली नाहीं. श्रीजीस अर्ज करून खबर घ्यावी. आपण व श्रीराव यति काही अंतर नाही. आपण थोर आहा. [ या पत्राची तारीख हिंगणे दप्तर खंड १ ले. ६ वरून ठरविली आहे. ही अचूक असेल तर येथील संवत् निदान श्रावणादि तरी धरावा लागेल. चैत्रादि धरल्यास इ. १७३५ हें साल येईल. पंचोली बिहारीदास हा त्या वेळचा उदेपूरच्या महाराण्याचा दिवाण. श्रीजी म्हणजे महाराणा जगत्सिंह. याचा राज्यकाल इ. १७३४ ते १७५१. रावसाहेब प्रधान म्हणजे बाजीराव महाराण्यानें कोणत्या कारणानें मराठ्यांस पैसे देण्याचें १२ उद्देपूरच्या व्यास घराण्याकडील कांहीं पत्र कबूल केलें होतें हैं या पत्रावरून नीट समजत नाहीं. तथापि याच सालीं पण या पत्रापूर्वी बाजीराव व महाराणा यांची भेट झाली तेव्हां महाराण्यानें त्यास अर्थात् मराठ्यांस कांहीं देण्याचें कबूल केले असावें. त्याबद्दल यांत मागणी आहे. अशा देण्याघेण्याबाबत याच प्रकरणांतील क. ५ चे पत्र आणि वीरविनोद खं. २, पृ. १२१९, १२२२, १२२८ यांत आलेल्या हकीकती व दिलेले कागद उपयोगी पडण्यासारखे आहेत. ] ॥ श्री ॥ ॥ स्वस्तिश्रीमद्रमारमणचरणनलिनमकरंदचिं दुसंसक्तान्तःकरणेषु ॥ निजप्रचंड दोर्दंडखंडितारातिमंडलादेडमण्डलमाण्ड तडिँडिरपिंडपांडुरीतयशस्सु ॥ क्षत्रियकुलावतंसेषु स्वधमानुष्ठाननिष्ठांतः ॥ करणेषु श्रीमहाराजाधिराजश्रीराणाजगत्सिंहनृपवर्येषु श्रीम ॥ न्महाराजाधिराज छत्रपतीनां स्नेहपूर्वकं स्मरणं अन्य ।। च्च श्रीमत्स्नेहेन श्रीमत तत्प्रतिदिनंमाशास्महे ॥ श्रीमद्भिः संतो ॥ पपत्रं प्रेषितं तत्प्राप्तं तेनान्त्यताल्हादः समजनि ॥ तस्मिन् प्रचुरस्नेहवादार्थान् व्यलिखन् अतः आवयो स्नेहः पूर्वपरंपराप्राप्तः अग्रे ॥ प्येवमवतंतनीयः तदंतरायस्तनवो बोभवति ॥ राजश्रीबाजीरा ॥ य अमात्यानां दर्शनं जातं श्रीमतां विस्तृतं वृत्तं निवेदितं यादृक् पर । स्परं प्रेम रक्षणीयं तथैव तत् अनवरतपत्र लेखनेन स्नेहसंतति ॥ रवधंतां ॥ अथ च राजश्री उदेसिंहसख्तावत एतस्य ग्रामद्वयं श्री ॥ मद्भि दत्तं तत्पूर्ववत्प्रकारेण देयं इति पूर्वपत्रे लिखितमस्ति ।। सो सदैव दीयतां सभ्यः किंबहुपल्लवितेन छत्रपति → राणा जगत्सिंह आपलें पत्र पाऊन आनंद झाला. स्नेहाच्या गोष्टी लिहिल्या. त्यास स्नेह परंपराप्राप्तच आहे. बाजीराव अमात्य यांची भेट होऊन श्रीमंतांचें वृत्त श्रवण केले. परस्पर पत्रलेखनानें स्नेहवृद्धि होवो. सक्तावत उदेसिंह यास दोन गाव आपण दिले ते पूर्वी प्रमाणे द्यावे. [ यांत छत्रपतींनी बाजीरावांची भेट होऊन महाराण्याचे वृत्त कळल्याचें लिहिलें आहे. बाजीराव इ. १७३६ मध्ये महाराण्याच्या भेटसि गेला होता. तेथून परत येऊन याच वर्षांच्या पावसाळ्यांत शाहूस भेटण्यासाठी सातान्यास गेला असता हें पत्र लिहिलें गेलें असावें. मी वरिविनोद व राजपुतानेका इतिहास हे दोन ग्रंथ वर वर चाळले. पण यांत सतावत उदेसिंह याचा निर्देश आढळला नाहीं. कदाचित् सूक्ष्म वाचनानें आढळेल. ] |
मुंबई : शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. देशमुख यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु. शार्जीलवर पुण्यातील स्वारगेटमध्ये गुन्हा शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणाऱ्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. एल्गार परिषदेत शार्जीलचं आक्षेपार्ह विधान पुण्यात शनिवारी (30 जानेवारी) झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शार्जील उस्मान म्हणाला होता की, "आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे. " "उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लिम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करुन हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीन हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत," असंही शार्जील म्हणाला. |
देसाईगंज पोलिसांनी डाक बंगल्यालगतच्या किशोर ट्रॉन्सपोर्टच्या गॅरेजच्या गाडीतून माल खाली करताना धाड घालून दोन लाख ८८ हजार २४० रूपयांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला. देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी डाक बंगल्यालगतच्या किशोर ट्रॉन्सपोर्टच्या गॅरेजच्या गाडीतून माल खाली करताना धाड घालून दोन लाख ८८ हजार २४० रूपयांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला. याप्रकरणी गाडीचालक व मालकास अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लखन किशोर पंजवानी (२२) रा. सिंधी कॉलनी गोंदिया व प्रकाश व्यंकटराव डोहरे (४५) रा. झिंगारटोली जि. गोंदिया यांचा समावेश आहे. सदर दोघांनीही मेटॅडोर गाडी क्र. एमएच-४९-०१४१ या गाडीतून देसाईगंज येथील डाग बंगल्याजवळ १५ पेटी उतरत असताना झडती घेतली. त्यावेळी त्यांना १४४० पॅकेट सुगंधित तंबाखू आढळून आला. याप्रकरणी ट्रॉन्सपोर्ट मालकाचा मुलगा व वाहनचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देसाईगंज बाजारपेठ गोंदिया बाजारपेठेशी जुळली असल्याने गोंदियावरून सर्व प्रकारच्या साहित्याची किशोर ट्रॉन्सपोर्ट गॅरेजच्या माध्यमातून आठवड्यातून सहा दिवस वाहतूक केली जाते. देसाईगंज येथील बाजारपेठेत माल पाठविताना गोंदिया येथील ट्रॉन्सपोर्ट गॅरेजमध्ये माल पाठविणारा बिल्टिची एक प्रत देतो व दुसरी प्रत त्याच्याकडे असते. देसाईगंज येथे सदर तंबाखूजन्य माल कोणत्या व्यापाऱ्यांकडे वितरित केला जाणार होता, याची माहिती देसाईगंज पोलीस घेत आहे. सहा लाखांच्या वाहनासह एकूण ९ लाख ८ हजार २४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी) |
बृहन्मुंबई महानगरपालिका व नगरसेवक दिलीप लांडे यांच्या सहकार्याने आयोजित अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या कौतुक ढापळेने बदाम मगदुमला पराभूत करीत महापौर केसरीचा मान मिळविला. मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका व नगरसेवक दिलीप लांडे यांच्या सहकार्याने आयोजित अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या कौतुक ढापळेने बदाम मगदुमला पराभूत करीत महापौर केसरीचा मान मिळविला. त्याला ७५ हजारांचे इनाम व चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. आमदार मंगेश सांगळे, शिवाजीराव नलावडे यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव झाला. कुमार केसरीचा मान मिळविला उत्कर्ष काळेने. त्याला २१ हजारांचे इनाम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. जवळपास ४० महिलांनीही स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून माधुरी घराळने शोभा भोसलेला पराभूत करीत २१ हजारांचे इनाम जिंकले. राजेंद्र राजमाने, नितीन सकपाळ, आबा अटकळे, प्रणाली ढेकळे, अमोल पाटील यांनीही स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. |
मोठ्या बैलांचा पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. या पोळ्यालाही पारंपरिक महत्त्व आहे. लाकडी बैल बाजारात. . . मोठ्या बैलांचा पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. या पोळ्यालाही पारंपरिक महत्त्व आहे. या पोळ्याकरिता मोठ्या प्रमाणात लाकडी बैल बाजारात विक्रीकरिता आले आहेत. बाजारात ५०० पासून तर ५१ हजार रुपयांपर्यत किंमत असलेले बैल बाजारात येणाऱ्यांचे लक्ष वेधत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. |
२५ वर्षे मविआ सरकार चालणार असल्याची भविष्यवाणी केली होती ती खोटी ठरली हे पण विसरलात, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. मुंबईःशिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार फटकेबाजी, टोलेबाजी करून सभागृह दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मात्र हे सरकार किती दिवस टिकणार याविषयी तर्क-वितर्क केले जाताना पाहायला मिळत आहेत. यावरून भाजपने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागतील, असा दावा करताच संजय राऊत यांनीही तशाच प्रकारची विधाने केली. नवे सरकार तात्पुरते असून, गुजरातसह महाराष्ट्रात निवडणुका घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच सामना अग्रलेखातूनही शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल करत हे सरकार केवळ ६ महिने टिकेल, असा दावा केला आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आमदार गेले, मंत्री गेले, सरकार गेल तरी अद्याप संजय राऊत हे शरद पवार यांची री ओढायच काही थांबत नाहीत. पवारसाहेब म्हणाले तेच पुढे आज अग्रलेखात. २५ वर्षे मविआ सरकार चालणार असल्याची भविष्यवाणी याच अग्रलेखातून केली होती ती खोटी ठरली हे पण विसरलात, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. दरम्यान, सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले. बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही. शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल, पण शिवसेना कधीच संपणार नाही. शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे, अशी घणाघाती टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. |
ओव्हर हेड वायर दुरूस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरल्यानं कसारा-आसनगाव दरम्यान वाहतूक ठप्प आहे. कसारा स्टेशनजवळ ही घटना घडलीय. दरम्यान, लोकोमोटिव्ह दुरुस्ती इंजिनच रुळावरून घसरल्याने नाशिकची पंचवटी आणि मनमाड - मुंबई राज्यराणी एक्सप्रेस तसंच मनमाड - एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात. यामुळे लांब पल्ल्याच्या या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई - नांदेड एक्सप्रेस दौंडमार्गे तर सुपर काशी, पुष्पक एक्सप्रेस सूरतमार्गे वळवण्यात आल्यात. मध्य रेल्वेमार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रस्त्यात थांबवाव्या लागल्यात. हे इंजिन रुळावरून लवकरात लवकर हटविण्याच काम सकाळपासून सुरू आहे. लोकल वाहतूक ठप्प असल्यानं सकाळीच वासिंदमध्ये रेल-रोको आंदोलनही करण्यात आलंय. वाहतूक ठप्प असल्यानं कसाऱ्याकडून येणाऱ्या प्रवशांचे हाल होत आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनानं लोकल वाहतूक टिटवाळ्यापर्यंतच सुरू असल्याचं म्हटलंय. |
२0१९ मध्ये कोणती क्रांती? वैभववाडी : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी २५ वर्षात जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे. दर पाच वर्षांनी निवडणुकीपूर्वी नवीन क्रांती उदयास येते. २००९ मध्ये दूधक्रांती, २०१४ मध्ये हरितक्रांती झाली. २०१९ मध्ये कोणती क्रांती येतेय कोणास ठाऊक? अशा शब्दात जठारांची डेअरी व सावंतांच्या कारखान्याची टर उडवत नीतेश राणे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. वैभववाडी येथे आयोजित प्रचारसभेत नीतेश राणे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, प्रमोद जठारांचे प्रगतीपुस्तक हीच आमच्या प्रचाराची खरी ताकद आहे. पुस्तकात छापलेली सगळी कामे त्यांनी केली असतील तर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट घालविण्याएवढा आत्मविश्वास जठारांमध्ये असायला हवा होता. मग ३४ हजारच का? त्यांच्या मागच्या जाहीरनाम्यातील कुठे दिसतोय बस डेपो, कुठे आहे हॉस्पिटल, शौचालय तरी बाजारपेठेत दिसतेय का? असा सवाल करीत पाच वर्षात तुम्हाला आमदार कितीवेळा गावात दिसला? याचे आत्मपरीक्षण करून तुम्हीच निर्णय घ्या, असे आवाहन केले. रक्ताचे पाणी करून वाढवलेली वृत्तपत्रे विकली गेली आहेत. पत्रकारितेचा धंदा केला आहे. पॅकेज संपले की बातमी बंद ही संघाची पत्रकारिता आहे. ही पॅकेज पत्रकारिता लोकशाहीला घातक आहे, असे मत मधुकर भावे यांनी यावेळी येथे बोलताना व्यक्त केले. केली. (प्रतिनिधी) धर्माचा आणि रामाचा संबंधच काय? असा सवाल करीत मधुकर भावे यांनी भाजपवर तोफ डागली. भाजपाएवढे खोटारडे लोक कुठेही सापडणार नाहीत. देश स्वयंपूर्ण करण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र रामाच्या नावाने राजकारण करणारे भाजपवाले सत्तेवर येताच रामाला विसरले. राम पुन्हा जन्मला तर पहिला बाण मोदीला आणि दुसरा गडकरीलाच मारेल. १२ वर्षे मुख्यमंत्री असताना साबरमती स्वच्छ न करू शकलेले मोदी गंगा काय स्वच्छ करणार? असा सवालही त्यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे लबाड कंपनीचे एम. डी. आहेत, अशी टीका भावे यांनी केली. |
आज राहुल आणि रोहितने ८५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. पण त्यामागे देखील एक कहाणी आहे\nभारतीय क्रिकेट टीम सध्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधला दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. दरम्यान, या दौऱ्यावर भारतीय संघानं आपला कित्येक वर्ष जुना रेकॉर्ड ब्रेक केलाय.\nभारतीय संघाच्या रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी जबरदस्त खेळी करत कसोटीच्या पहिल्या डावात २१४ धावांची भागीदारी केली. केएल राहुलने सामन्याच्या पहिल्या डावात १२९ आणि दुसऱ्या डावात ५ धावा केल्या. तर रोहित शर्माने पहिल्या डावात ८३ धावा आणि दुसऱ्या डावात २१ धावा केल्या. अशा प्रकारे, राहुलने १३४ आणि रोहितने १०४ धाव करून भारताला चांगली सुरुवात करून दिली.\n१९३६ नंतर पहिल्यांदाच भारताच्या ओपनिंग जोडीच्या दोन्ही फलंदाजांनी टेस्ट मॅचमध्ये स्वतंत्रपणे १०० धावा केल्यात.\n१९३६ साली विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांच्या जोडीनं हा कारनामा केला होता.\nBoth Indian openers scoring 100+ runs inamen's Test match in England:-\nVijay Merchant & Syed Mushtaq Ali in 1936\nKL Rahul & Rohit Sharma in 2021#ENGvIND\nतर १९३६ साली भारतीय संघ इंग्लडच्या दौऱ्यावर होता. इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर ही टेस्ट सिरीज सुरु होती. त्यावेळी मुश्ताक अली आणि विजय मर्चंड या दोघांनी समनीला सुरुवात केली. या कसोटी सामन्यात मुश्ताक अलीने ११२ रन्सची इनिंग साकारत अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. विदेशी भूमीवर शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.\nदरम्यान या सामन्यात आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला होता. तो म्हणजे मुश्ताक अली आणि विजय मर्चंड या दोन्ही खेळाडूंनी मिळून २०३ रन्सची भागीदारी केली होती. ही भारतीय संघाकडून करण्यात आलेली पहिलीच द्विशतकी भागीदारी ठरली होती.\nदरम्यान, हा रेकॉर्ड करण्यामागचा हेतू सुद्धा तेव्हाच्या भारतीय संघांच्या कॅप्टनचा चुकीचा हेतू यशस्वी न करण्याचा होता.\nतर १९३६ मध्ये भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन विजयनगरमचे महाराज कुमार म्हणजे विज्जी होते. ते चांगले क्रिकेटपटू होते, पण नेहमीच स्वतः ला महान खेळाडू म्ह्णून घ्यायचे. आपल्या सत्ता आणि पैशाच्या जोरावर त्यानं हे कॅप्टनपद मिळवलं होत.\nया इंग्लंड दौऱ्यावर सय्यद मुश्ताक अली, लाला अमरनाथ, विजय मर्चंट, मोहम्मद निसार आणि सी. नायडू असे दिग्गज खेळाडू होते. पण मुळात विज्जीचं आपलंच वेगळं म्हणणं असायचं. आपल्यापेक्षा कोणताच महान खेळाडू नाही, हे त्यांना सिद्ध करायचं होत. त्यांनी संघात - खेळाडूंमध्ये अनेक कुरघोड्या केल्या.\nअशाच एक सामन्यात स्वतःच अपयश लपवण्यासाठी विज्जीने टीम स्पिरिट नष्ट करण्याच्या प्लॅन आखला. यासाठी त्यांनी भारताचे सलामीवीर विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांना टार्गेट केलं.\nटेस्ट मॅचचा दुसरा डाव सुरू होण्याआधी त्याने मर्चंड आणि मुश्ताक या दोघांचे कान भरवायला सुरुवात केली. त्याने आधी मर्चंडला आत बोलवून सांगितले कि, 'तू मुश्ताकवर विश्वास ठेवू नको. तो तुला रन आउट करण्याचा प्लॅन आखतोय.'\nविज्जीचं हे बोलणं ऐकून मर्चंड थोड्या वेळ बुचकळ्यात पडला, त्याने विचारले, 'तो असं का करेल? यावर विज्जी म्हणाले, कारण तो मुसलमान आहे."\nविज्जीनी हाच प्लॅन मुश्ताकवर सुद्धा लागू केला. त्यांनी मुश्ताकला संगितलं कि, "तू त्या गुज्जू बनियावर विश्वास ठेवू नका! तो बनिया तुला रन आउट करेल. "\nविज्जीच्या या बोण्यावर मुश्ताक गोंधळून गेला.\nविज्जीचं हे वागणं प्रत्येक खेळाडूला माहित होत. त्यामुळं मुश्ताक आणि मर्चंड यांनी एकमेकांशी बोलणं योग्य मानलं. आणि अश्याप्रकारे त्यांना विज्जीचा प्लॅन कळाला. या दोघांनीही ठरवलं कि, काहीही झालं तरी एकमेकांना रन आउट करायचं नाही.\nआणि मग काय विजय मर्चंड आणि मुश्ताक अली या दोन्ही खेळाडूंनी २०३ धावांची जबरदस्त भागीदारी करत रेकॉर्ड केला आणि कॅप्टनचा डाव हाणून पडला. तेव्हा त्यांनी जिद्दीने केलेला रेकॉर्ड गेली ८५ वर्षे टिकला आणि आज तो रोहित शर्मा व के.एल राहुलने मोडला. |
Amazon's Success story : वाचा कशी झाली एमेझॉनची सुरूवात? - Arthasakshar\nAmazon's Success story : वाचा कशी झाली एमेझॉनची सुरूवात?\nआज एमेझॉनवर आपल्याला पुस्तकांपासून ते म्युझिक सीडीपर्यंत त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, स्पोर्टिंग फॅशनपर्यंत एमेझॉनवर सगळ्या गोष्टी मिळतात. गेल्या 26 वर्षात Amazon ने सर्व क्षेत्रात आपले पाय घट्टपणे रोवले आहेत. अर्थसाक्षरच्या सक्सेस सिरीजमध्ये आपण नायका, बायजू , सॅमसंग, टायटन, फ्लिपकार्ट, लेन्सकार्ट या ब्रँडची सुरूवात कशी झाली याबद्दल जाणून घेत आहोत. आजच्या भागात आपण एमेझॉनची सुरूवात कशी झाली याबद्दल माहिती घेणार आहोत. इ-कॉमर्समध्ये आघाडीच्या कंपन्यांपैकी एमेझॉनची सुरूवात जेफ बेझॉस यांनी १९९४मध्ये केली होती. अॅमेझॉनचे सुरूवातीचे स्वरुप केवळ ऑनलाइन पुस्तकांची विक्री करणे इतकच मर्यादित होत. तेव्हा या कंपनीचा कारभार बेझॉस यांच्या वॉशिंग्टन येथील घरातील गॅरेजमधून सुरू झाला होता.\nहेही वाचा - Success Story of Flipkart : जाणून घ्या भारतातील सर्वात यशस्वी स्टार्टअप 'फ्लिपकार्ट'ची संघर्षकथा....\nपहिले विकली पुस्तके\nजेफ बेझोस वॉल स्ट्रीटमध्ये एक अधिकारी म्हणून काम करत असे. आणि भविष्यात ऑनलाईन वस्तू विकण्यात मोठी संधी असल्याचे हेरले. स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी त्याने वॉलस्ट्रीट मधील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीस राम राम ठोकला. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम सि्अॅटल येथे हलवला. आणि कॅडाब्रा या नावाने नवीन ई कॉमर्स कंपनी सुरू केली. बेझोस जेव्हा कंपनीची कायदेशीररित्या नोंदणी करण्यास गेला. तेव्हा त्यांच्या वकीलाने कॅडावर असे चुकीचे ऐकले. आणि त्याच नावाने रजिस्टर केले. पुस्तकांशिवाय इतर काहीही विकण्याची योजना नसल्यामुळे, नंतर Amazon ला, लोकांना अशाच पद्धतीने म्युझिक सीडी किंवा मूव्ही डीव्हीडी विकत घ्यायच्या आहेत असे सुचवणारे ईमेल येऊ लागले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी पाहता त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला. आजा एमेझॉन पुस्तके, म्युझिक सीडी, फॅशन, हार्डवेअर आणि टूल्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि अॅक्सेसरीज यासारख्या 30 हून अधिक उत्पादनांची विक्री करते.\n20 वस्तूंची केली यादी\nबेझॉस यांनी जुलै १९९५मध्ये पहिल्या पुस्तकाची विक्री केली होती. त्यानंतर दोनच वर्षात १९९७मध्ये एमेझॉनचा IPO बाजारात आला. अॅमेझॉनचे आजचे उत्पन्न ५९६ मिलियन डॉलर इतके आहे. आणि आजच्या घडीला त्यात २ लाख ६८ हजार ९०० कर्मचारी काम करत आहेत. बेझोस यांनी आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी पुढील गोष्टी केल्या. त्यांनी वेबसाईटवर नसलेल्या 20 वस्तूंची यादी केली. आणि बेझोसने त्या वस्तूंचे पर्याय आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले. यामध्ये कंप्यूटर हार्ड डिस्क, हार्डवेयर, सॉफ्टवेयर, व्हीडीयो, तसेच पुस्तके यांचा समावेश होता. दोन महिन्यात एमेझॉन लाँच झाल्यावर त्यांनी 45 देशांमध्ये पुस्तके विकली.\nहेही वाचा - BYJU'S Success Story: 'बायजू रविंद्रन' यांची प्रेरणादायी यशोगाथा !\nएमेझॉन आणि वाद\nएमेझॉन आणि वाद हे काही नवीन नाही. मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) त्याच्या अॅपचा लोगो मध्ये बदल केला आहे. या अॅमेझॉन अॅपच्या लोगोची तुलना ही हिटलरच्या चेहऱ्याशी झाली. याबद्दल एमेझॉनला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. अॅमेझॉन अॅपच्या नव्या लोगोवर सर्व जगभरातील युजर्सकडून जबरदस्त टीका होऊ लागली. त्यांच्या नव्या लोगोमध्ये ब्राऊन रंगाचा एक बॉक्स होता. पॅकिंग बॉक्स मध्ये असलेल्या या चौकोनाच्या वरच्या बाजूला निळ्या रंगाची खूण होती. ही निळी खूण म्हणजे सेलोटेपचं चिन्हं होतं. तर मध्यभागी अॅमेझॉनचा सिग्नेचर अॅरो होता. त्यात ब्ल्यू स्ट्रीप म्हणजे जर्मनीतील हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलरच्या 'आयकॉनिक' मिशीसारखी वाटत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत निळ्या पट्टीलं भाग बदलून नव्या स्वरुपात लोगो सादर करण्यात आला आहे.\nTags: Amazon, Amazon Prime Video, Jeff Bezos, अॅमेझॉन, जेफ बेझोस\nGudipadwa 2022 : गुढीपाडव्याच्या दिवशी 'असे' करा आर्थिक नियोजन\nTerm Insurance : टर्म इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे? |
माकडाचं पिल्लू फळं खातं एक दिवस माकडाचं पिल्लू एका कलिंगडाच्या शेतात गेलं. त्यानं पहिल्यांदाच कलिंगड पाहिलं होतं. एक कलिंगड तोडून ते त्याचं जाड साल खाऊ लागलं. खूप प्रयत्न करून जेमतेम दोन घास खाल्यावर त्यानं ते फेकून दिलं आणि म्हणाला, "शी! कलिंगडाची चव काहीतरीच आहे." जवळच एक वासरू उभं होतं, ते म्हणालं, "कलिंगडाचा गर खातात, साल नाही काही.' |
कोणी कितीही हेल्थ फ्रीक असले तरी रस्त्यावर गरमागरम पाणीपूरी, पावभाजी , चायनीज असे सगळे पदार्थ पाहिले की लगेच जाऊन खाण्याचा मोह आवरणं शक्य होत नाही. मात्र अशा वेळी जर का विक्रेत्यांनी भेसळयुक्त किंवा अस्वच्छ पदार्थ आपल्याला खाऊ घातले तर मात्र नंतर आरोग्याच्या नाना प्रकारच्या समस्या समोर येऊन उभ्या ठाकतात, अन्नातून विषबाधा, पोटाचे विकार यांसारखे गंभीर आजार उद्भवतात. मात्र याबाबात आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून नामी उपाय शोधण्यात आला आहे, यापुढे राज्यातील सर्व हातगाड्यांवर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नेमून दिलेला ड्रेसकोड लागू घालणे अनिवार्य असणार आहे. या ड्रेसकोडचे वैशिष्ट्य असे की यातून विक्रेता उघड्या हाताने किंवा थेट पदार्थाला स्पर्श करू शकणार नाही परिणामी अन्नाचा दर्जा टिकवून ठेवण्यात मदत होईल. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या पुढाकारातून ही मोहीम लागू करण्यात आली आहे. याची सुरुवात सध्या बुलडाण्यातून (Buldhana) करण्यात आली आहे. यासोबतच, यापुढे हातगाडीवर पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने आणि स्वच्छता नेटाने तपासली जाणार आहे. हाताची, नखांची स्वच्छता तसेच या विक्रेत्यांना कुठला त्वचा रोग आहे का, त्याचीही आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या नियमाचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर एक रुपयांपासून ते एक लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. |
पुण्यात जहीर खानची 'नवी इनिंग' रविवारपासून .! भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान एक यशस्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तर आहेच, त्याबरोबरच तो यशस्वी उद्योजकही आहे. पुण्यात बस्तान बसवताना त्याने लुल्लानगर परिसरात 'झेड के' नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते. पुण्याच्या वाघोली रोडवरील फिनिक्स मॉलमध्ये 'झेड के'ची आणखी एक शाखा निघाली. येत्या रविवारी पुण्यातील रेस्टॉरंटमधील 'स्पोर्ट्स बार'ची कल्पना 'टॉस' या नावाने प्रत्यक्षात साकारते आहे. सबकुछ स्पोर्ट्स या कल्पनेने साकारलेल्या या बारला लंडनच्या लॉर्ड्स मैदानाचा 'लूक' आहे. जागतिक क्रीडाविश्वातील दिग्गज खेळाडूंचे पोस्टर्स आहेत. त्यात युसेन बोल्ट आहे, बोरिस बेकर आहे, राफेल नदाल आहे, रॉजर फेडरर आहे, फुटबॉलपटू वायने रुनी, बेकहॅम आहेत, मारिया शारापोवा आहे आणि भारताचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कपिलदेव, युवराजसिंग आदींचे फोटो आहेत. 'झेड के'मधील बॅन्वेट हॉलला फॉयर नाव देण्यात आले आहे, तर रेस्टॉरंटला फाइन डाइन असे संबोधण्यात आले आहे. रविवारी सकाळी आपला एकेकाळचा सहकारी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याच्या उपस्थितीत नव्या कल्पनांचे जहीर अनावरण करणार आहे. जहीर खानने दरम्यानच्या काळात स्वतःच्या फिटनेसवर अधिक मेहनत घेतली आहे. तो म्हणाला, 'फ्रान्समध्ये मी प्रशिक्षणात फिटनेससाठी पहिला टप्पा पूर्ण केला. तेथील सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणादरम्यान मी बरेच काही साध्य केले. फिटनेस पूर्णपणे मिळवली. तब्बल सात किलो वजन घटवले'. जहीर खान 2003 च्या सुमारास हॉटेल उद्योगात आला. त्याने पुण्यात लुल्लानगर येथे 'जहीर खान्स' (झेड के) हे रेस्टॉरंट सुरू केले. त्याचा भाऊ अनिस आणि वडील बाख्तियार खान त्याला मदत करतात. भाऊ अनिस याने हॉटेल व्यवस्थापनाचा ब्रिटनमध्ये जाऊन अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो पूर्णपणे या उद्योगात आला आहे. जहीर खानने आपल्या क्रिकेटमधील लोकप्रियतेचा लाभ घेत रेस्टॉरंटच्या फ्रँचायझी देण्याची यापुढील योजना आहे. पुण्यात जहीर खानच्या या योजनेला सध्यातरी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. |
हुबळी :- कर्नाटक राज्यातील हुबळीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ 'सरल वास्तू' फेम चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली आहे. चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांची हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलच्या (President Hotel) रिसेप्शनमध्येच चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. शिष्याच्या वेशात आलेल्या राक्षसी प्रवृत्तीच्या दोघांनी त्यांची हत्या केली. हॉटेलमध्ये आलेल्या हल्लेखोरांना भेटण्यासाठी ते हॉटेलच्या लॉबीमध्ये आले होते. याच वेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत आपला डाव साधला. चंद्रशेखर गुरुजी मूळचे बागलकोटचे होते आणि काही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने हुबळी येथे आले होते. सरल वास्तू नावाने म्हणून प्रसिद्ध असलेले ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या फुटेजमध्ये गुन्हेगार हत्या केल्यानंतर सरळ पळताना दिसत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांनी आधी ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर चाकूसारख्या धारदार शस्त्राने एकामागून एक तब्बल ७० वार केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या खळबळजनक घटनेतील हल्लेखोर कोण होते आणि हत्येमागील कारण काय होते याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. हॉटेल आणि परिसरातील चौकशीसह पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. |
पुणे : गेल्या दोन वर्षात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील उसाचे क्षेत्र वाढले. त्यातून अतिरिक्त उसाचा प्रश्न तयार झाला. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदा पावसाची अनुकूलता अधिक आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. या वर्षीपेक्षा पावसाची चांगली स्थिती पुढील वर्षात असेल. त्यामुळे उसाचे क्षेत्र अधिक वाढण्याची शक्यता दिसते. त्या अनुषंगाने आगामी गळीत हंगामात ऊस तोडणीचे नियोजन कारखाने सुरू करण्यापूर्वीच करावे लागेल, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ च्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. साखर निर्यात, इथेनॉल उत्पादन, सहवीज निर्मिती या बाबी लक्षात घेऊन दूरगामी दृष्टिकोनातून साखर उद्योगाचे नियोजन करावे लागेल, असे पवार म्हणाले. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राज्यस्तरीय साखर परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जालन्याजवळ १६० एकर जमीन खरेदी करून व्हीएसआयने केंद्र स्थापन केले आहे. विदर्भातही व्हीएसआयचे केंद्र हवे अशी अपेक्षा मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली आहे. तसे केंद्रही स्थापन केले जाईल, अशी घोषणा पवार यांनी यावेळी केली. शरद पवार म्हणाले की, साखर उद्योगासमोरील समस्यांची चर्चा करताना अनुकूल, शाश्वत, पर्यावरणपूरक उपाययोजनांचा आढावा घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. यासाठी सर्वव्यापी, सूक्ष्म नियोजन हवे. दूरगामी दृष्टी हवी. अत्याधुनिक उपाययोजनांतून साखर उद्योगाला योग्य दिशा देण्याचे काम होईल. यंदा मराठवाडा, जालना, बीड, लातूर, परभणी, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा अशा जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र अधिक होते. त्यामुळे काही नवीन प्रश्न निर्माण झाले, असे सांगून शरद पवार म्हणाले, यंदा तोडणी-वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. कारखान्यांनी ऊस तोडणी घटकांना वेतन वाढवून दिले. तरीही तोडणी करणाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. त्याचा बोजा शेतकऱ्यांच्या खिशावर पडला. त्यामुळे आता साखर कारखाने सुरू करण्यापूर्वी नियोजन करायला हवे. साखर आयुक्तालय आणि कारखान्यांना याची अंमलजबावणी करावी लागेल. यंदा केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी प्रोत्साहनाची भूमिका घेतली. नंतर त्यात बदल झाला ही बाब वेगळी. मात्र ही गोष्ट मान्य केली पाहिजे की साखरेची निर्यात चांगली झाली. त्यातून एक प्रकारचा अतिरिक्त उसाचा ताण कमी झाला, असे पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले की, यावर्षी विक्रमी साखर निर्यात होण्याची स्थिती दिसते. सध्याच्या अंदाजानुसार भारतातून ९० लाख टनांपेक्षा अधिक साखर निर्यात होऊ शकेल. साखर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. साखर निर्यात आणि इथेनॉलकडे जाणारे उसाचे प्रमाण या दोन्ही बाबी कारखान्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून साखर निर्यातीला प्राधान्य दिले गेले आहे. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राचा विचार करता चालू हंगामात १,३२२ लाख टन ऊसाचे गाळप आणि १३८ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, हा अंदाज आहे. इथेनॉलसाठी १५ लाख टन उसाचा वापर झाला आहे. यावर्षी महाराष्ट्रात मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र वाढले. ऊस तोडणी कामगार, हार्वेस्टरचा अभाव यामुळे तोडणी हंगाम लांबला. शेतामध्ये उभ्या राहिलेल्या ऊसामुळे शेतकरी आणि कारखानदार हे दोन्ही घटक अडचणीत आले. सद्यस्थितीत महाराष्ट्रातून या हंगामात ६४ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. आणि प्रत्यक्षात ४० लाख मेट्रिक टनाची निर्यात झाली आहे. जागतिक स्तरावर साखरेचे उत्पादन आणि वापर यात १७ लाख टनाची तूट दिसते. ब्राझील या जगातील सर्वात जास्त साखर उत्पादन करणाऱ्या देशात यंदाही पिक समाधानकारक नाही. त्यामुळे उत्पादन कमी होईल. इथेनॉलची किंमत चांगली मिळत असल्याने ब्राझीलने इथेनॉलला प्राधान्य दिले आहे. अशा स्थितीत भारताने साखर निर्यातीला चालना दिली आहे. आतापर्यंत ९२ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले. तर ८२ लाख टन साखर बंदरात पोहोचली आहे. स्थानिक बाजारात साखरेचा दर टिकून आहे. या बाबी दिलासादायक आहेत. अफगाणिस्तान हा आपला मोठा ग्राहक होता. मात्र तेथील निर्यात अंदाजे १३ लाख टनापासून ३ लाख टनापर्यंत खालावली. तरीही बांगलादेश, इंडोनेशियाने भारताची बहुसंख्य साखर खरेदी केली. एकूण निर्यातीपैकी ४४ टक्के साखर या दोन देशांनी खरेदी केली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने १२१ देशांत साखर निर्यात केल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही हिंदूस्थानातून साखर निर्यात झाली नव्हती. ती आता झाली, ही अभिमानाची बाब आहे. पवार म्हणाले की, साखर उद्योगाने सहवीज प्रकल्पांकडे लक्ष द्यायला हवे. विजेची देशातील गरज प्रामुख्याने औष्णिक ऊर्जा, हायड्रो आणि सौर ऊर्जा अशा प्रकल्पांनी भागते. राज्याचा विचार करता कोळसा टंचाईमुळे उत्पादन घसरले. महावितरणकडे सध्या ६,००० मेगावॅटचा तुटवडा आहे. विजेच्या अपुऱ्या पुरवठ्याने भारनियमन करावे लागते. याचा परिणाम उद्योग व शेतीवर होतो. विजेचा घरगुती वापर, तापमानात वाढ, कृषी पंपांचा वापर वाढला आहे. विजेची विक्रमी मागणी आहे. महावितरणला एकूण २५,५०० मेगावॅट विज लागते. महावितरणकडे ७५ टक्के वीज औष्णिक ऊर्जा प्रकल्पांतून मिळते. सध्या कोळसा टंचाईमुळे ६००० मेगावॅट विजेची कमतरता आहे. खुल्या बाजारातून महागडी विज खरेदी करावी लागत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १ हजार लाख टन ऊस गाळला जातो. उसाचा बगॅस साधारणतः २८ टक्के असतो. बगॅसपासून ३,६०० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते. सध्या २,४७० मेगावॅटचे सहविज प्रकल्प आहेत. त्यापैकी ६५ ते ७० टक्के वीज महाराष्ट्र सरकारला दिली जाते. १,६६० मेगावॅट वीज सरकारला मिळते. राज्य सरकारने २०२१-२२ मध्ये ५०० मेगावॅट, २०२२-२३ मध्ये ५०० मेगावॅट आणि २०२३-२४ मध्ये ३५० मेगावॅटचे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार यासाठी अनुदान देणार आहे, असे पवार यांनी सांगितले. मात्र आता सौर ऊर्जेकडे पाहिले पाहिजे. विहिरींवर सोलर पंप बसविण्याची गरज आहे. विज उपलब्ध आहे, पण भारनियमन होते, तेथेही सोलर पंप योजना केंद्र सरकारने राबवायला हवी. तरच शेतीत उत्पादन वाढेल. याशिवाय साखर कारखान्यांनी आपल्याकडील उपलब्ध जागेवर सोलर प्रकल्प उभारावेत. त्यासाठी सरकारने मदत करायला हवी. ४-५ वर्षांचे पाठबळ असेल तर हे प्रकल्प यशस्वी होतील. यासाठी निधी आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसवायला हवा. सौर प्रकल्पांसाठी काही कंपन्यांनी संपर्क साधला आहे. कारखान्यांचे छत, गोडावून व इतर कन्स्ट्रक्शनची ठिकाणे, मोकळ्या जागांवर त्या कंपन्या स्वतःच्या खर्चाने प्रकल्प बसवून देऊ शकतात. त्यापासूनच्या उत्पन्नाचा काही वाटा कारखाना व काही गुंतवणूक कंपन्या असा विभागला जाईल. या योजनेची आम्ही अधिक माहिती घेत आहोत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने याची माहिती कारखान्यांना दिली जाईल. साखर उद्योगात संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. ऊर्जा बचत, कारखान्यांच्या समस्या सोडवणे व दर्जेदार उत्पादन यासाठी व्हीएसआयने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगशी नुकताच करार केला आहे, असे पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले की, इथेनॉल उत्पादनाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सकारात्मक भूमिका आहे. देशाची पेट्रोलियम आयात २०२०-२१ मध्ये ५५ अब्ज डॉलरची होती. कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ७७ टक्के कच्चे तेल आयात केले जाते. भाजप सरकारने २०२२ पर्यंत ही आयात १० टक्के कमी करण्याचे ध्येय ठेवले आहे. इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅमअंतर्गत २०२२ मध्ये १० टक्के आणि २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण केले जाणार आहे. या प्रोग्रॅममधून सध्या ३३२ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा केला जातो. त्यासाठी १८ लाख मेट्रिक टन साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये केले जाते. मात्र, इथेनॉलची उत्पादन क्षमता ७०० कोटी लिटरची हवी. २०२५ पर्यंत १२०० कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकारची दिशा योग्य व सकारात्मक आहे. मात्र, अंमलबजावणीत अडचणी आहेत. तेल उत्पादन कंपन्या व बँकांचा दृष्टिकोन यांची सांगड घालायला हवी. बँकांनी कर्ज पुरवठा करून मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारणीस प्रोत्साहन द्यायला हवे. साठवणुकीकडेही लक्ष द्यायला हवे. पवार म्हणाले की, सध्या हमीभावामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांकडे दुसरे नगदी पिक नाही. पाणी असेल तर ऊस हे समिकरण कायम आहे. उसाची प्रती हेक्टरी अपेक्षित उत्पादन क्षमता ८० ते ८५ टन हेक्टर इतकी आहे. काही शेतकऱ्यांनी हेक्टरी ३७० टन उत्पादन घेतले. परंतु असे कारखाने फक्त १० टक्के आहेत. उर्वरीत ९० टक्के शेतकऱ्यांची उत्पादकता ५० ते ७५ टन इतकीच आहे. कारखान्यांचे याकडे लक्ष नाही. कारखाने सुरू होतात, तेव्हा फक्त तोडणी-वाहतुकीला महत्त्व दिले जाते. ऊस विकास योजना सातत्याने राबवल्या जात नाहीत. ऊस पिकाची उत्पादकता वाढली तर शेतकरी, कारखाना आणि देशाचा फायदा होईल. यासाठी कारखान्याने कार्यक्षेत्रात हेक्टरी ऊस आणि उतारा वाढवायला हवा. ऊस विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. ऊस यांत्रिकीकरणावर साखर कारखान्यांनी भर देण्याची गरज आहे. |
नवी मुंबईः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करीत राष्ट्रगीत व तद्नंतर १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी - कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कामगार दिनी नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणा-या कामगारांना सन्मानीत करण्यात येते. त्यानुसार आयकॉनिक महानगरपालिका मुख्यालय इमारतीची अतिशय उत्तम स्वच्छता राखणा-या १० स्वच्छताकर्मींना प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्तांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस ३० एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यालय इमारतीसमोर हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ती पाहण्यासाठी व विद्युत रोषणाई आणि प्रतिकृतीसमवेत सेल्फी काढण्यासाठी नागरिक या परिसराला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. |
कोरोणा संकटाच्या पाश्वभूमिवर प्रशासनाच्या वतिने खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान बनावट पास तय्यार करून गडचिरोली जिल्हात प्रवेश करन्याच प्रयत्न करन्यार्रया तिन प्रवाशाविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये नितिन चिलमवार (३४),अमर पातारकर(२९) दोघेही रा.गडचिरोली व भाग्यवान मोहूर्ले रा.आष्टा ता.आरमोरी यांचा समावेश आहे.कोरोना संकट वाढू नये.आंतरजिल्हा वाहतूकीवर नियंत्रण रहावे यासाठी जिल्हा,तालुका प्रशासनासह पोलिस विभाग दक्ष आहे दरम्यान ये जा करनार्या प्रवाशी व वहानाची कसून चौकशी करनयाचे निर्देश जिल्हा अधिकारी यंत्रणेला दिल आहे.असे असताना सुद्धा काही नागरीक बनावट पास तय्यार करून जिल्हात प्रवेश करत असल्याची माहिती होताच प्रशासनाने कार्यवाही केली.१२ ऑगस्ट रोजी चारचाकी वहानाने दुसर्याच्या नावाच ई- पास च वापर करून आरमोरी ब्रह्मपूरी मार्गावर वैनगंगा नदी वरिल चेकपोस्ट वाहनाची तपासणी करन्यात आली.दरम्यान प्रवाशी व ई-पास मध्ये नमूद असलेल्या नावामधे तफावत आढळल्याने दोघांवर कारवाही करण्याबाबत अहवाल तयार करन्यात आला. |
श्रीराज घरत (१५१) व करण शहा (१३८) यांच्या नाबाद शतकांच्या बळावर तेंडुलकर इलेव्हनने व्हेरॉक कप १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत वेंगसरकर इलेव्हनविरुद्ध १ बाद ३११ अशी मोठी मजल मारली. मुंबई : श्रीराज घरत (१५१) व करण शहा (१३८) यांच्या नाबाद शतकांच्या बळावर तेंडुलकर इलेव्हनने व्हेरॉक कप १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत वेंगसरकर इलेव्हनविरुद्ध १ बाद ३११ अशी मोठी मजल मारली. दुसऱ्या सामन्यात जहांगिर अन्सारीचे ५ बळी व वरुण जोईजोडेच्या ४ बळींमुळे गावस्कर संघाने शास्त्री इलेव्हनला ९७ धावांत गुंडाळले. गावस्कर संघाने नंतर त्याला १ बाद ५९ असे उत्तर दिले होते. स्कोअरबोर्ड : शास्त्री इलेव्हन ९७ (केसरसिंग ४८, जहांगीर अन्सारी ४१-५, वरुण जोईजोडे २१-४) वि. गावस्कर इलेव्हन १ बाद ५९ (दिव्यांश सक्सेना २९, अमन शर्मा २३). तेंडुलकर इलेव्हन १ बाद ३१९ (श्रीराज घरत ना. १५१, करण शहा ना. १३८) वि. वेंगसरकर इलेव्हन. |
बार्शी (जि. सोलापूर) : आपल्या देशामध्ये महामारी आली की, आरोग्य सुविधांची कमतरता जाणवते. पण सुविधांयुक्त देश करायचा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. प्रत्येक नागरिकाला सेवा, सुश्रूषा मिळालीच पाहिजे, असे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Devendra Fadnavis visits MLA Rajendra Raut's residence) आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही पुत्रांच्या विवाहास उपस्थित राहू शकलो नाही. पण, दांपत्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. आमदार राजेंद राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयसिंह देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, आसपासच्या दोन जिल्ह्यांतील कोरोनाचे रुग्ण बार्शी शहरात उपचारासाठी दाखल होत होते. त्यानंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागला. आमदार राजेंद्र राऊत यांना माझा एक दिवसाआड फोन सुरु होता. सातत्याने समाजाचे काम धडपड करुन केले आहे, त्यामुळे यापुढे माजी कधीच व्हायचे नसून आजीच राहायचे आहे, अशा शब्दांत राऊत यांच्या कामाचे कौतुक फडणवीस यांनी केले. निर्बंध दूर होताच भगवंत मैदान, सॉलव्हन्ट प्लॅन्ट, हॉस्पिटलच्या शुभारंभ, उदघाटनास मी येणारच असून विकासासाठी पंतप्रधान केअर फंडातून निधी देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. कोरोना अजून संपलेला नसून सर्वांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही फडणवीस यांनी या वेळी बोलताना दिला. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, सत्ता असो वा नसो आयुष्यभर तुमच्यासाठी काम करणार आहे. तुमच्यामुळेच मी माजीचा आजी झालो आहे; अन्यथा कधीच आजी झालो नसतो. तालुक्यास विकासरुपी आशीर्वाद कायम राहावा, अशी विनंती राऊत यांनी फडणवीस यांना केली. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
राजापूर : लॉकडाऊनमुळे एस. टी. वाहतूकही बंद झाली. त्याचा परिणाम एस. टी. आगारातील भाडेतत्वावर असलेल्या व्यावसायिकांनाही बसला आहे. अशा परिस्थितीत एस. टी. महामंडळाने दुकानगाळे भाडे माफ करावे, अशी मागणी राजापूर आगारातील छोट्या व्यावसायिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विभाग नियंत्रक यांच्याकडे देण्यात आले आहे. एप्रिल ते जून हा एस. टी. प्रवाशांचा गर्दीचा हंगाम असतो. याचकाळात लॉकडाऊन लागल्याने आमच्या व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. एस. टी. आगारातील गर्दी रोडावल्याने आमचे व्यवसायही जेमतेम सुरू होते. अशा परिस्थितीत नोकरांचे पगार, वीजबिल, विविध कर भरणे कठीण बनले आहे. प्रसंगी कर्ज काढून हा खर्च भागवावा लागणार आहे. या साऱ्या परिस्थितीतून आमच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत एस. टी. महामंडळाकडून आकारण्यात येणारे व आम्ही दरमहा अदा करत असलेले भाडे भरणे मुश्कील बनले आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून लॉकडाऊन असेपर्यंत व एस. टी. वाहतूक पूर्ववत सुरळीत होईपर्यंत दुकानगाळे भाड्यातून सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर निशांत भोगटे, अनंत हर्याण, विलास गावकर, सदानंद धालवलकर, प्रभात पाध्ये, शशिकांत अमरे, किसन मयेकर यांच्या सह्या आहेत. |
Wonder Women : 'वंडर विमेन' सिनेमा १८ नोव्हेंबरला भेटीला येणार आहे. काही नाती असतात, तर काही खास नाती असतात. आपण मानवांना एकाच मताची माणसे शोधण्यास अवघड जाते किंवा आपण आपल्या सभोवतालच्या विश्वामध्ये वावरण्यास सुरूवात केल्यानंतर 'आपला समाज' म्हणण्यास सुरूवात करतो. ही नाती विश्वसनीय, वैवाहिक, रोमँटिक व आदरणीय अशा विविध प्रकारची असू शकतात. पण या सर्वांमध्ये एक नाते गोड, प्रेमळ व उत्साही असते, ते म्हणजे महिलांचे; महिला एकमेकांना परिचित अनुभव, भिती व आशा यामध्ये नेव्हिगेट करण्यास मदत करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांचा असा समाज निर्माण होतो, जो संकटात त्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्यांना अधिक प्रबळ करतो. हा प्रवास व त्यांच्या धैर्याला प्रशंसित करत सोनी लिव्ह जीवनाचा सार दाखवणारा चित्रपट 'वंडर विमेन' ( Wonder Women) सादर करत आहे. अंजली मेनन यांचे लेखन व दिग्दर्शन असलेला हा चित्रपट व्यासपीठावर १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आरएसव्हीपी फ्लाईंग युनिकॉर्न एंटरटेन्मेंटसह लिटल फिल्म्स प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटामध्ये नित्या मेनेन, पार्वती थिरूवोथू, अमृता सुभाष, नदिया मोयडू, पद्मप्रिया जनकिरमन, सायानोरा फिलिप, अर्चना पद्मिनी प्रमुख भूमिकेत आहेत. या महिलांच्या कथेचे इंग्रजीमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, मल्याळम व कन्नड या भाषा देखील आहेत. |
गेल्या दोन आठवड्यापासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाने पालकांची माफी मागितली आहे. 'सर्व मुले सुखरुप आहेत, मी त्यांची काळजी घेईनच. पण सर्व पालकांची मी माफी मागतो', असे पत्र प्रशिक्षकाने लिहीले आहे. थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर जवळपास नऊ दिवसांनी शोध लागला. थाय फुटबॉल संघातील ११ ते १६ वयोगटातील एकूण १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले आहेत. या मुलांच्या सुटकेसाठी जगभरातून प्रार्थना होत असून स्थानिक आपातकालीन यंत्रणा आणि नौदलाचे प्रयत्न सुरु आहेत. या मुलांच्या मदतीसाठी गेलेल्या सिल कमांडोचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. शनिवारी खराब हवामानामुळे बचाव मोहीम थांबवण्यात आली आहे. गुहेत अडकलेल्या प्रशिक्षकाने पालकांसाठी एक पत्र लिहीले आहे. या पत्रात प्रशिक्षकांनी पालकांची माफी मागितली आहे. 'सर्व पालकांना सांगतो की अजून तरी त्यांची मुलं सुखरुप आहेत. मी त्यांची नीट काळजी घेईनच असे आश्वासन मी त्यांना देतो. तुम्ही दिलेल्या मानसिक पाठिंब्यासाठी मी सर्वांचाच आभारी आहे. पण या घटनेसाठी मी पालकांची माफी मागतो, असे भावनिक पत्र त्यांनी लिहीले आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांसोबत गुहेत अडकलेल्या प्रशिक्षकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संघाचा शोध घेईपर्यंत नऊ दिवस प्रशिक्षकाने मुलांची देखभाल केली. त्यांना स्वतःकडे असलेले खाद्यपदार्थही दिले. ही मुलं सुरक्षित राहतील, यावरही प्रशिक्षकाने भर दिला. दरम्यान, या मुलांच्या सुटकेसाठी थाय नौदल आणि थाय हवाई दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. चारहून अधिक देश आणि या देशांतील १ हजारांहून अधिक कमांडो, तज्ज्ञ या बचाव मोहीमेत सहभागी झाले आहेत. गुहेत अडकलेल्या एकाही मुलाला पोहता येत नसल्यानं पाणबुड्यांना त्यांना आधी प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. पावसामुळे गुहेतील पाण्याची पातळी वाढत गेली तर मात्र मुलांना पोहण्यात अडथळे येऊ शकतात. ही गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढलं जाऊ शकते. मात्र, या दोन्ही पर्यायांचा विचार केला तरी या मुलांना आणखी काही महिने गुहेतच राहावे लागणार आहे. |
ग्राहकांना स्वच्छ आणि ताजी ताडी-माडी मिळावी म्हणून नामी शक्कल काढली आहे. ताडी-माडीमध्ये होत असलेल्या भेसळीमुळे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांना स्वच्छ आणि ताजी ताडी-माडी मिळावी म्हणून नामी शक्कल काढली आहे. एका दुकानामागे तब्बल एक हजार ताड, माड आणि खजुराची झाडे असावीत, असे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईसह राज्यातील सुमारे दोन हजार ताडी-माडी विक्रेत्यांनी एक नोव्हेंबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे. मुंबईत २५० तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर या भागात सुमारे दीड हजार असे राज्यात एकूण दोन हजार ताडी-माडी विक्रेते आहेत. भंडारी समाजाकडून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या या व्यवसायाला १९६८मध्ये राज्य सरकारने कायदेशीर मान्यता दिली. काही दुकानदारांकडून ताडी-माडीत भेसळ केली जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने एका दुकानामागे एक हजार ताड, माड आणि खजुराच्या झाडांची सक्ती केली आहे. झाडांबाबत यापूर्वी अशी कोणतीही सक्ती नव्हती. एका दुकानामागे १०० ते १५० झाडे वर्षाला पुरेशी असतात. त्यांना व्यवस्थित ताडी-माडी मिळते, असे महाराष्ट्र ताडी, माडी उत्पादक व परवानाधारक सेवा संस्थेचे म्हणणे आहे. नारळाच्या माडीसाठी वार्षिक एका झाडामागे १८०० रुपये, ताडी व खजुरीसाठी तीन महिन्याला १२० ते १५० रुपये भाडे द्यावे लागते. ताडी-माडीचे दर विलायती दारूच्या तुलनेत खूपच किरकोळ असतात. त्यामुळे एक हजार झाडे ठेवायची झाल्यास वार्षिक भाड्याने दुकानदारांचे कंबरडे मोडून जाईल, असा दावा संस्थेचे कोषाध्यक्ष भरत शेटे यांनी केला आहे. या व्यवसायावर आधीच परप्रांतीयांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून टिकाव धरून असलेल्या मराठी व्यावसायिकांना सरकारने वाचवले पाहिजे, असे शेटे म्हणाले. ताडी-माडीत हायड्रोक्लोराईडची भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने मुंबईतील काही दुकानांवर छापे टाकले. त्यात २७ भेसळखोरांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. राज्यात दोन हजार विक्रेत्यांच्या तुलनेत २७ दुकानांतील भेसळ ही खूप लहान बाब आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे अडचणीत सापडले आहेत. या व्यवसायावर उत्पादक, विक्रेते व त्यांचे कुटुंबीय अशा सुमारे एक लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. झाडांसोबतच लायसन फीमध्ये देखील भरमसाठ वाढ झाली आहे. वसई, विरार या भागात ताडी-माडी पाठवायची नाही अशा जाचक अटी टाकण्यात आल्याचे ताडी-माडी उत्पादक व परवानाधारक सेवा संस्थेतर्फे सांगण्यात आले. |
कल्याण : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी कल्याणध्ये तीन ठिकाणी भाजपतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. दुर्गाडी चौकात भाजपने केलेल्या 'रास्ता रोको'मध्ये भाजप खासदार कपिल पाटील, माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार, ओबीसी मोर्चाचे सचिव अनिल पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, श्याम मिरकुटे, विशाल शेलार, निखिल चव्हाण, प्रिया शर्मा आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. पूर्वेतील सूचकनाका येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या 'रास्ता रोको'मध्ये भाजप कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाटा नाका येथील 'रास्ता रोको'मध्ये भाजप आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने कल्याण-शीळ रस्त्यावरील दुर्गाडी, सूचकनाका आणि टाटा नाका या तिन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली. |
थोर आंतरराष्ट्रीय मानवतावादी डाॅ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास मंगळवारी चीनचे राजदूत सन विडांग भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते क्रांतिकारक नेते माओ त्से तुंग यांच्या अक्षरातील शोकसंदेशाचे पत्र सुरक्षित पेटीत ठेवण्यात येणार आहे.डाॅ. कोटणीस स्मारक येथे दुपारी तीन वाजता राजदूतांसह १० जणांचे पथक येणार आहे. त्यापूर्वी चिनी राजदूताचे प्रतिनिधी मंडळाने डाॅ. कोटणीस स्मारकास सोमवारी भेट दिली. स्मारकात स्वच्छता, बंद पडलेले दिवे, स्वच्छता करण्यात आले. चीनचे राजदूत पुण्याहून मंगळवारी सोलापुरात येतील. दुपारी तीन वाजता डाॅ. कोटणीस स्मारकाची पाहणी करतील. डाॅ. कोटणीसांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील. माओ त्से तुंग यांच्या हस्ताक्षरातील शोकसंदेश पत्राचे आगळे महत्त्व चीनला वाटते. ते खूप जीर्ण झाल्याने २०१७ मध्ये दोन चिनी तज्ज्ञांनी सोलापुरात राहून त्या पत्राचा जीर्णोद्धार केला. तसेच ते पत्र कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी चीन सरकारने खास काचेची पेटी महापालिकेला तयार करून दिली होती. मात्र महापालिकेकडून तिची चावी हरवली. ती नव्याने करून घेण्यात आली आहे. त्यात शोकसंदेशाचे पत्र ठेवण्यात येणार आहे. याची तयारी झाली असल्याचे स्मारकाचे व्यवस्थापक प्रदीप जोशी यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. चीन-जापान युद्धात भारतातून वैद्यकीय मदत पथक गेले होते. त्यात डाॅ. कोटणीस यांचा समावेश आहे. चिनी सैनिकांचा इलाज करत असताना त्यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी चीनमध्ये निधन झाले. त्यांच्या सोलापुरातील कुटुंबीयांना त्यावेळी क्रांती नेते माओ त्से तुंग यांनी चिनी भाषेत शोकसंदेश पाठवला होता. भाताच्या गवतापासून बनवलेल्या तीन फुटी कागदावर त्यांनी तो स्वहस्ताक्षरात लिहिला. ते पत्र २९ डिसेंबर १९४२चे आहे. |
येथील गायत्री बालिकाश्रमातील चार मुलींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितून १० वीच्या परीक्षेत भरारी घेतली आहे. आई-वडीलांचे छत नसलेल्या परंतु, गुणांनी हुशार असलेल्या ४ बालिका काजल बनसोड, आरती धुर्वे, मुस्कान खान, निताली गवई या उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाल्या आहेत. या चारही मुली खडतर जीवन जगत असताना बालिकाश्रमात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांना त्यांचे नावही लिहीता येत नव्हते, शाळा काय आहे? हे माहित नव्हते. अशा मुलींनी आज स्वतःची जिद्द,आश्रमात मिळालेल्या संस्काराच्या आधारावर दहावीची परीक्षा पास केली आहे. कोरोनात बंद पडले होते शिक्षण, पण जिद्द, चिकाटी ठरली महत्त्वाची आरती सुरेश धुर्वे (७६ टक्के)हिचे आई- वडील हयात नाहीत. लहानपणापासून आरती आजी, आजोबा, मामाकडे लहानाची मोठी झाली. आरतीला अभ्यासाची आवड असल्याने ती अकोट येथील आश्रम शाळेत शिकत होती. कोरोना काळात ही आश्रम शाळा बंद होती. ती घरी आजी, आजोबा, मामांकडे गेली. त्यावेळी आई वडील नसलेल्या आरतीला काही विपरीत कारणास्तव आश्रम शाळेच्या शिक्षकांनी चाइल्ड लाइनद्वारे बाल कल्याण समितीच्या आदेशाने दीड वर्षापूर्वी गायत्री बालिकाश्रमात दाखल केले. त्यावेळी बालिकाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी आरतीची शिक्षणाची आवड व जिद्द बघता तिला अभ्यासाची व्यवस्था करुन दिली. तिला पेपरला अकोटला जावे लागत होते. त्यासाठी बाल कल्याण समितीची परवानगी मिळवून दिली. आरतीला शिकवणी नसताना स्वभ्यासाने तिने चांगले गुण घेतले. आरतीला विज्ञान शाखेत प्रवेश घेवून बी.एस्सी करायचे आहे. प्रतिकुल परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत भरारी घेणाऱ्या विद्यार्थिनी. |
BBC News, व्हीडिओ, चीनमध्ये तस्करी होणाऱ्या खवले मांजराला वाचवणाऱ्या कोकणातल्या गावाबद्दल माहितीये? व्हीडिओ, या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी 120 गाढवं पाळायचं का ठरवलं? व्हीडिओ, व्हीडिओ, व्हीडिओ, व्हीडिओ, गुजरात : 'आम्हाला भीती वाटते की मगरी आमच्या मुलांना खेचून नेतील. . . ' ओसामा बिन लादेन ने त्याच्या कुत्र्यांवर रासायनिक प्रयोग का केले होते? व्हीडिओ, उंदराच्या 'निर्घृण हत्ये'नंतर पोलिसांकडून पोस्टमॉर्टम, काय आहे प्रकरण? झोपेशिवाय आयुष्य नीट जगता येऊ शकतं का? व्हीडिओ, युरोपमध्ये 'मनोरंजना'साठी माणसांना जेव्हा 'प्राणीसंग्रहालया'त ठेवलं गेलं. . COP27 ही हवामान बदलाची परिषद काय आहे? जगाचं याकडे का लक्ष आहे? अजगर अख्खा माणूस कसा गिळू शकतो? |
आणखी पाच पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त ! जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. गत दोन दिवसांपासून रुग्णसंख्या पाच, पाच अशी येत आहे. शनिवारीदेखील पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. वाशिम शहरात १, टनका १, कारंजा शहरातील प्रगती नगर व धनज येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. उर्वरित चार तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७२३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले. शनिवारच्या अहवालानुसार नवीन पाच रुग्ण आढळून आले तर एकाने कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १७ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. गत दोन दिवसांत दहा रुग्ण आढळून आल्याने गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्याही वाढल्याचे दिसून येते. शनिवारच्या अहवालानुसार कारंजा व वाशिम तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले. उर्वरित मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. |
महाविद्यालयात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गाडगेनगर परिसरात रुम भाड्याने घेऊन वास्तव्यास आहेत. अमरावती : महाविद्यालयात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गाडगेनगर परिसरात रुम भाड्याने घेऊन वास्तव्यास आहेत. नेमकी ही बाब हेरुन विद्यार्थ्यांच्या घरात घुसून पॉकीट, पैसे, मोबाईल व अन्य साहित्य चोरणारी टोेळी सक्रीय झाली असून या टोळीने अनेक विद्यार्थ्यांना गंडविल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांना गंडविल्याच्या घटना घडल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अथवा बयाण देणे याबाबीपासून दूर राहणे ते पसंत करतात. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसात तक्रार झाली नसलीे तरी काही विद्यार्थ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर 'लोकमत'कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गाडगेनगरात एका रुम मध्ये दोन ते तीन विद्यार्थी राहतात. येथील अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी रुम बांधून प्रति विद्यार्थी याप्रमाणे भाड्याने देण्याचा व्यवसाय थाटला आहे. भाड्याच्या रकमेपोटी घरमालकांनी आठ ते दहा खोल्या बांधल्या आहेत. एका घरमालकाकडे २० ते २५ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. हीच संधी साधून काही अज्ञात तरुण चोरटे खोल्यांमध्ये प्रवेश करतात. नवीन विद्यार्थी असल्यामुळे आपसात अनेकांची ओळख नसते. त्यामुळे हा चोरटा नेमका कुणाकडे आला आहे. कुणाचा मित्र आहे. हे कळण्याचा आतच तो डल्ला मारुन आपला हात साफ करतो. महिन्याभरात तीन ते चार विद्यार्थ्यांसबोत हा प्रकार घडला आहे. मंगळवारी सायंकाळी एका विद्यार्थ्यांचे पॉकीट चोरीला गेले. त्यामध्ये हजार रुपये, वाहन परवाना, पॅन कार्ड व आधार कार्डसह महत्वाचे कागदपत्रं होती. चोरीच्या घटनेमुळे दर्यापूर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्याची परीक्षा सुरु असल्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार देणे नाकारले. असाच प्रकार काही दिवसापूर्वी असाच प्रकार यापूर्वीही या परिसरात विद्यार्थ्यांसोबत घडला आहे. पोलिसात तक्रार दिली जात नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. घराचे बांधकाम करायचे व नुसते विद्यार्थ्यांसाठी रुम काढायचे व त्यांना प्रती विद्यार्थी या प्रमाणे खोल्या भाडयाने द्यायच्या हा गाडगेनगरात अनेकांचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण खोली भाडयाने देतो त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही घरमालकाचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे अनोखळी युवकांना खोली भाड्याने देऊ नये त्यांच्यावर सुक्ष्म लक्ष ठेवणे गरजेचे आहे. खातरजमा केल्यानंतरच त्याला खोली भाड्याने द्यावी. |
Home Maharashtra यूपीः अपघातामुळे भीषण आग; ५० अडकले? यूपीः अपघातामुळे भीषण आग; ५० अडकले? कन्नौजः उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ५० प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आणि स्लीपर बसमध्ये हा अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. यामध्ये ५० प्रवासी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते, अशी माहिती आहे. काही प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात यश आले असून, काही प्रवासी बसमध्ये अडकल्याचे समजते. या अपघातातील मृतांचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. ही बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मुख्यमंत्री यांनी या अपघाताची दखल घेतली असून, कन्नौजच्या जिल्हाधिकारी आणि पोलिसांना घटनास्थळी तातडीने जाऊन प्रवाशांना सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात रात्री ८ वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. हा अपघात झाला, तेव्हा बसमधील प्रवासी झोपले होते. त्यामुळे प्रवाशांना पटकन बाहेर पडता आले नाही, अशी माहिती मिळाली आहे. अद्याप मृतांचा आकडा समजला नसून, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार यात अनेकजण अडकले असण्याची शक्यता आहे, अशी माहिती कानपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जीटी रोड महामार्गावर ग्राम घिलोई भागात ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, असेही अग्रवाल यांनी सांगितले. |
अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- एमआयडीसी'तील काही कारखान्यांची गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली फाटकं उघडली गेली आहेत. प्रत्यक्ष उत्पादन नसले, तरी मेंटेनन्स व पेंडिंग कामे केली जात आहेत. कामकाज सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये इंडियन सिमलेस, लार्सन अॅड टुब्रो, कमिन्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे बंधन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्राबाहेरील कंपन्या सुरू करण्यास काही अंशी परवानगी 'एमआयडीसी'तील कंपन्यांना दिली होती. छोट्या कंपन्यांनी तर 'एमआयडीसी'च्या जवळ राहणारे व पायी कारखान्यात येऊ शकतील, अशा पाच-दहा कामगारांवरच काम सुरू केले आहे. यामध्ये प्राधान्याने मेंटेनन्स, मार्केटिंग विभागाचे कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यास आणखी बर्याच अडचणी आहेत. बहुतांश माल बाहेरून येणारा असल्याने तो पुरेशाप्रमाणात सुरू झाल्याशिवाय आणि त्या प्रमाणात नवीन ऑर्डर मिळाल्याशिवाय काम पूर्ण क्षमतेने सुरू होणे सध्या तरी शक्य नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले. कंपनी सुरू केल्यानंतर विविध कारणांसाठी वेगवेगळ्या वस्तुंची गरज पडत असते. ती सध्या मिळणे अशक्य आहे. तसेच पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणांहून माल येत असतो. तो येण्यातही अनेक अडचणी आहेत. हे सर्व सुरळीत झाले तरच कंपनीची कामे पूर्ववत होतील. 3 मे नंतर हे सुरळीत न झाल्यास सध्या सुरू केलेल्या कंपन्या पुढे चालू ठेवणे अशक्य होणार असल्याने त्या बंद कराव्या लागतील, अशी भीती काही उद्योजकांनी व्यक्त केली आहे. |
Chanakya Niti for Successful Life: आचार्य चाणक्य हे जगातील महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये व्यावहारिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना आजही महत्त्व आहे. या गोष्टींचा अवलंब केल्यास अनेक समस्या आणि संकटे टळू शकतात. आज आपण चाणक्य नीतीमध्ये उल्लेख केलेल्या अशा लोकांबद्दल जाणून घेत आहोत, ज्यांच्यापासून दूर राहणेच आपल्यासाठी चांगले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की या लोकांसोबत कधीही राहू नका कारण ते तुम्हाला कधीही फसवू शकतात. आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला आनंदी-यशस्वी जीवन जगायचे असेल आणि स्वतःला संकटांपासून वाचवायचे असेल तर काही लोकांपासून दूर राहणे चांगले आहे. चला जाणून घेऊया चाणक्य नितीमध्ये कोणत्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे लोक जे नेहमी जास्त गोड बोलतात, विनाकारण तुमची स्तुती करतात, अशा लोकांपासून सावध रहा. असे लोक आपला हेतु साधण्यासाठी तुमच्याशी चांगले बोलून कधीही फसवू शकतात. जराही विचार न करता ही लोक कधीही विश्वासघात करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर रहा. ( हे ही वाचाः शनिदेवाने मकर राशीत गोचर करत बनवला केंद्र त्रिकोण राजयोग! 'या'३ राशींना प्रगतीसोबत होईल प्रचंड धनलाभ) जे लोक नेहमी मोठी आश्वासने देतात परंतु कोणतीही आश्वासने पूर्ण करत नाहीत त्यांच्यापासून दूर रहा. अशी माणसे तुमचा कधीच उपयोगात येणार नाहीत, उलट संकटाच्या वेळी तुमची साथ सोडतील. हे लोक ओळखणे थोडे कठीण आहे कारण ते तुमच्या समोर तुमच्या शुभचिंतकासारखे वागतात पण तुमचे नुकसान करण्यात, तुमच्या मागे तुमची प्रतिमा खराब करण्यात व्यस्त असतात. अशा लोकांना ओळखा आणि लगेच त्यांच्यापासून दूर राहा. |
पुणे : जगात लस उत्पादनात आघाडीवर असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (Dr Suresh Jadhav) यांचे बुधवारी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. 'सिरम'ची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांतच ते रूजू झाले होते. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्या जन्माआधीपासून ते 'सिरम'मध्ये कार्यरत होते. लस निर्मितीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना या क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जात होते. डॉ. जाधव हे 1979 मध्ये 'सिरम'मध्ये दाखल झाले होते. तर 1992 पासून त्यांच्याकडे संस्थेच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी होती. त्यांचा या पदाचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत होता. पण त्यांनी काही दिवसांपुर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. जवळपास 42 वर्ष यांनी सिरममध्ये अव्याहतपणे काम केले. यामध्ये विविध लशींच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जगभरातही त्यांची या क्षेत्रात मोठं नाव होतं. कोरोनावरील कोविशिल्ड (Covishield) या लशीचे उत्पादन सिरमकडून केले जात आहे. या प्रक्रियेतही जाधव यांनी खूप मेहनत घेतली. ते मुळचे बुलढाणा येथील आहे. नागपूर विद्यापीठातून त्यांनी औषधनिर्मितीशास्त्रामध्ये 'पीएच. डी. ' मिळवली. त्यानंतर 1970 पासून पन्नास वर्षे अखंडपणे या क्षेत्रात राहिले. जाधव हे सुरूवातीला नागपूर विद्यापीठ व 'एसएनडीटी' विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम करत होते. त्यानंतर ते हापकिनमध्ये संशोधक म्हणून रुजू झाले. तिथून त्यांचे लस निर्मिती क्षेत्रातील काम सुरू झाले. पुढे 1979 मध्ये0 सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाल्यानंतर ते अखेरपर्यंत तिथेच थांबले. त्यांनी अनेक महत्वाच्या समित्यांमध्ये तज्ज्ञ म्हणून काम केले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांच्यासह या क्षेत्रातील अनेकांनी जाधव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 'खूपच दुःखद बातमी आहे. लस निमिर्तीमध्ये त्यांनी आयुष्यभर मोठं योगदान दिलं आहे. ' असं स्वामीनाथन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
गेल्या 18 वर्षांपासून एमटीव्हीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो (Reality show) रोडीजचा (Roadies) भाग असलेला रणविजय सिंघ (Ranvijay Singh) आता शोला अलविदा म्हणणार आहे. त्याच्या जागी बॉलिवूडच्या (Bollywood) एका लोकप्रिय चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. शोमधील रणविजयची जागा कोण घेणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत निर्माते लवकरच एक निवेदन जारी करणार आहेत. रणविजयची जागा घेणारे काही बॉलिवूड कलाकार आहेत. आता तो अभिनेता कोण, निर्मात्यांना त्याची माहिती गुप्त ठेवायची आहे. लोकांचा मसिहा बनलेला सोनू सूद रणविजयची जागा घेणार असल्याचा दावा केला जात आहे. रणविजयचा एमटीव्ही रोडीजशी दीर्घकाळ संबंध राहीला आहे. एकेकाळी या शोचा स्पर्धक असलेला रणविजय नंतर होस्ट आणि गँग लीडर बनला. 2003 मध्ये, रणविजय या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तेव्हापासून रणविजय एमटीव्ही रोडीजचा मोठा चेहरा बनला आहे. शोच्या पहिल्या सीझनमध्ये रणविजय दिसला होता. यानंतर, त्याने रोडीज 2. 0 ते रोडीज रिव्होल्यूशनपर्यंतचे सर्व सीझन होस्ट केले आहेत. रोडीज व्यतिरिक्त रणविजयने MTV चे इतर शो देखील होस्ट केले आहेत. रणविजयने या शोला अलविदा केल्यामुळे चाहत्यांना तो मोठा धक्का बसला आहे. वर्क फ्रंटवर, टीव्ही होस्ट रणविजय सिंघा सध्या वाइल्डलाइफ (Wildlife) शो सफारी इंडियामध्ये व्यस्त आहे. हा शो देशभरातील राष्ट्रीय उद्यानांचे अन्वेषण करतो. रणविजय या शोशी जोडला गेल्याने खूप खूश आहे. अभिनेत्याने याला त्याचा थरारक अनुभव म्हटले आहे. रोडीजमध्ये सोनू सूदला मेंटॉरच्या भूमिकेत पाहणे खरोखरच मजेशीर असणार आहे. चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
कुणाल कामरा आणि रुचिता तनेजा विरोधात न्यायालयीन अवमान खटला सुरु. . सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्याविरूद्ध केलेल्या ट्विटमुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रुचिता तनेजा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दोघांविरोधात न्यायालयीन अवमान प्रक्रिया सुरू करण्यास सहमती दर्शविल्यानंतर आज सुप्रिम कोर्टानं नोटीस जारी करुन ट्विटसाठी अवमान कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 'रिपब्लिक टीव्ही'चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना जामीन दिल्याप्रकरणी तनेजा यांनी दोन ट्वीट केले होते. हे ट्वीट न्यायालयाचा अवमान करणारी असल्याची तक्रार विधी शाखेचा विद्यार्थी आदित्य कश्यप यांनी केली होती. रचिता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोन कार्टुन रेखाटले होते. त्यांनी हे कार्टुन सोशल मीडियावर 'सॅनिटरी पॅनल्स' नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केले होते. हा न्यायालयावर हल्ला आणि न्यायालयीन संस्थेचा अवमान असल्याचं सांगत अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी कारवाई करण्यात हिरवा कंदील दिला होता. आज सुप्रिम कोर्टानं तनेजा यांना नोटीस जारी करुन कार्यवाही सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामीसह अन्य आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (11 नोव्हेंबर) दिले होते. या आदेशानंतर अर्णव गोस्वामी यांना तुरुंगातून सोडण्यात आले. अर्णव गोस्वामीच्या सुटके नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने देखील खोचक ट्विट केले होते. यानंतर वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाच्या अॅटर्नी जनरल यांनी पत्र लिहीत अवमानना खटला दाखल करण्याची मागणी केली होती. कॉमेडियन कुणाल कामरा ट्विटरवर अर्नब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला दिलेल्या अंतरिम जामिनावरील आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. अगोदरचं अवमान कारवाई सुरु असूनही कुणाल कामारा माघार घेतली नव्हती. 18 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याबद्दलच्या आणखी एका ट्विटनंतर अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी कुणालच्या विरोधात कोर्टाची कार्यवाही सुरू करण्याचे मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोघांनाही सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. |
पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या भारत दौऱ्याबाबत ट्रम्प भरभरून बोलत असून ट्विटही करत आहेत. म्हणून डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर! या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. अमेरिकेत जवळपास २८ ते ३० लाख भारतीय वास्तव्यास आहेत. या निवडणुकीत भारतीय नागरिकांच्या मतांना महत्त्व आहे. या दौऱ्यातून ट्रम्प भारत-अमेरिका मैत्रीतून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. आशिया खंडात अमेरिकेचे प्राबल्य कायम ठेवण्यासाठी एका मजबूत देशाची आवश्यकता आहे. भारताचा आशिया खंडात प्रभाव आहे. त्यामुळे भारतासोबतची मैत्री आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न अमेरिका करणार आहे. सध्या भारतीय बाजारपेठ सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेतील कंपन्यांसाठी मोठा ग्राहक येथून मिळू शकतो. अमेरिकन कंपन्यांना भारतात काही सवलती मिळाव्यात यासाठी ट्रम्प प्रयत्न करतील. त्याशिवाय व्यापार शुल्कावर ही या दौऱ्यात चर्चा होणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी अमेरिकेतील जाहीर सभेत दिले आहेत. मोदींसोबतच्या मैत्रीचा अमेरिकेला फायदा? पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेतील 'हाउडी मोदी' या कार्यक्रमात ट्रम्प दोन तासांहून अधिक वेळ उपस्थित होते. भारतात सध्या पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे ट्रम्प या परिस्थितीचा फायदा घेऊन दोन्ही देशातील संबंध आणखी बळकट करण्यासह अमेरिकेचा अधिकाधिक फायदा कसा होईल याकडे लक्ष देतील. |
पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. बीड, दि. 16 - लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुधाकर इंगेवाड हा मूळचा नांदेडचा असून 2008 मध्ये पोलीस दलात भरती झाला. सध्या तो मुख्यालयावर कर्तव्यास आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची नेमणूक चौसाळा (ता. बीड) येथे चौकीत होती. चौसाळा येथीलच 26 वर्षीय महिलेसोबत त्याची ओळख झाली. पुढे ओळखीेचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर इंगेवाडची बीडमध्ये पोलीस मुख्यालयात बदली झाली. लग्नाचे आमिष दाखवून इंगेवाड याने वारंवार बलात्कार केला, अशी फिर्याद महिलेने शनिवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांत दिली. त्यानंतर त्याच्यावर उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. तो फरार असून तपास सहायक निरीक्षक सलीम पठाण करत आहेत. रक्षणकर्त्यानेच महिलेची अब्रू लुटल्याच्या या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पीडित महिला घटस्फोटीत असून, तिला एक मुलगा आहे. चौसाळा हे तिचे माहेर आहे. तेथे सुधाकर इंगेवाडसोबत प्रेमसंबंध आल्यानंतर त्याची बदली झाली. त्यानंतर दोन वर्षांपासून ते दोघे बीडमध्ये शिवाजीनगर भागात भाड्याचे घर घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपप्रमाणे लग्नाविनाच एकत्रित राहत होते. त्यांना सहा महिन्यांची मुलगी देखील आहे. सुधाकर इंगेवाड याने लग्न करण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यांना मुलगी झाल्यानंतर पीडितेने लग्नाचा हट्ट धरला. मात्र सुधाकरने गावी जाऊन दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. याची माहिती पीडितेला कळाल्यावर त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. अखेर महिलेने ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. |
राज्यात पुणे ठरले सर्वात थंड शहर ; 'ही' आहे त्यामागची राज की बात. . राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १०. ३ अंश सेल्सिअस बुधवारी नोंदविले गेले. पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जाेर वाढल्याने राज्यातील बहुतांश शहरातील तापमानाचा पारा घसरला आहे. देशातील हवामानातील बदलाचा परिणाम नेहमी पुण्यात अगोदर दिसून येतो, याचा प्रत्यय सध्या पुणेकर घेत आहे. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १०. ३ अंश सेल्सिअस बुधवारी नोंदविले गेले. पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, तर मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानाच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. पुणे शहराच्या आजूबाजूच्या भागात किमान तापमान जास्त असताना पुण्यातच रात्रीचे तापमान कमी होण्यामागचे नेमके कारण काय, असे विचारता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, पुण्याचे किमान तापमान कमी राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुण्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. पुणे शहराची रचना ही बशीसारखी आहे. शहराच्या चारही बाजूला टेकड्या आहेत. दिवसा जमीन तापलेली असते. सायंकाळनंतर ही हवा वर जाण्यास सुरुवात होते. त्याचवेळी टेकड्यांवरील थंड हवा जड होऊन खाली येते. आजू बाजूला झाडे व पाणीसाठा मोठा असेल तर हवा तापण्याचे प्रमाण कमी होते. त्यात टेकडीवरुन आलेली थंड हवा याचा एकत्रित परिणाम होऊन रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा कमी होते. त्यामुळे पुणे शहरातील किमान तापमान कमी असले तरी लोहगावचे किमान तापमान शिवाजीनगरपेक्षा अधिक जाणवते. तसेच पर्वतीवरही उबदारपणा जाणवतो. कधी कधी महाबळेश्वरपेक्षा पुण्यात किमान तापमान कमी असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती आपल्याला नाशिक व निफाड या जवळच्या दोन शहरांमध्ये दिसते. नाशिकपेक्षा निफाडचा पारा अधिक खाली घसरलेला दिसून येतो. आता सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्याने उष्णता वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल. |
कोल्हापूर, 16 एप्रिल : उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत (North Kolhapur Assembly By election) महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत जयश्री जाधव यांना 96176 मते मिळाली तर सत्यजीत कदम यांना 77426 मते मिळाली. काँग्रेसचा विजय आणि भाजप उमेदवाराचा पराभव म्हणजे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. तर तिकडे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयाचा गुलाल उधळला जात असून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील हिमालया की गोद मे असे पोस्टर्स बनवत शिवसैनिकांनी डिवचलं आहे. Kolhapur News: कोल्हापूरकरांनी जपला 2000 वर्षांपूर्वीचा ठेवा, आता चाललाय अमेरिकेला, काय आहे कारण? Kolhapur : कोल्हापुरात आता काय ठरलं? दोस्तांची दोस्ती की राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती? Maharashtra Politics : राष्ट्रवादीतल्या भूकंपानंतर कोल्हापुरात काँग्रेस आशावादी, 'स्पेस'मुळे संघर्ष वाढणार? NCP : राष्ट्रवादीतल्या भूकंपाचे कोल्हापुरात हादरे, भाजपचा बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत? काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं, "आज चॅलेंज लावतो. . . ज्याला असं वाटतं ना त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची. निवडून नाही आलो ना. . . तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल. " वाचा : मुख्यमंत्र्यांच्या एका भाषणामुळे झाला भाजपचा गेम, वाचा नेमंक काय घडलं? आज काय म्हणाले चंद्रकांत पाटील? या विधानानंतर आज भाजप उमेदवाराच पराभव झाला आणि त्यानंतर या विषयावरुन शिवसैनिकांनी त्यांना डिवचलं. आहे. या निवडणूक निकालानंतर चंद्रकांत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी हिमालयाच्या मुद्द्यावर विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत काय केलं आणि पुढे काय करणार या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढली. हिमालयात जाण्याच्या विधानावर त्यांनी म्हटलं, मी काय करायचं हे मी आणि माझे श्रेष्ठी ठरवतील. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, कोल्हापूर विधानसभेची पोटनिवडणूक ही तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत झाली. आम्ही ही निवडणूक विकासावर लढलो. भविष्यात आम्ही काय करणार आहोत हा मुद्दा आम्ही प्रामुख्याने मांडला. दुसरा मुद्दा हिंदुत्वाचा. . . हिंदूत्व आमचा अजेंडा नाही हिंदूत्व आमचा श्वास आहे. राजकीय आवश्यकता म्हणून कुठल्या दुसऱ्या पक्षासारखं अचानक हिंदूत्वाचा मुद्दा मांडला नाही. आमचे नाना कदम लढले आणि तुमच्या तोंडाला फेस आला मग मी लढलो असतो तर तुमचं काय होईल? मी असं म्हटलं होतं की, मी लढलो आणि मी जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईल असं म्हटलं होतं. मी अजून लढायचो आहे ना. . असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
RIL Jio Happy New Year Offer । Jio नं नववर्षानिमित्त आणली भन्नाट ऑफर, जाणून घ्या काय मिळणार 'या' पॅकमध्ये? नवी दिल्ली : वृत्तसंस्था - RIL Jio Happy New Year Offer । रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या मुकेश अंबानी यांच्या जिओ (Jio) ने ख्रिसमसनिमित्त शनिवारी (25 डिसेंबर 2021) यूजर्सला भेट दिली. जिओने 2,545 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानची एक नवीन, मर्यादित कालावधीची हॅप्पी न्यू ईयर ऑफर (RIL Jio Happy New Year Offer) आणली आहे. जिओने आपल्या काही लोकप्रीय प्लानची वैधता कमी करून ग्राहकांना जास्त किंमतीचे प्लान खरेदी करण्यास भाग पाडले असतानाच हा न्यू इयर प्लान आणल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळू शकतो. जिओ वार्षिक प्रीपेड प्लान, जो सामान्यपणे 336 दिवसांच्या वैधतेसह येतो, आता 29 दिवसांच्या अतिरिक्त वैधता देत आहे. म्हणजे जियोचा 2,545 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान संपूर्ण 365 दिवस चालेल. ही नवीन वर्षाची एक लिमिटेड ऑफर आहे. सोबतच सध्याचे आणि नवीन रिलायन्स यूजर्स याचा लाभ घेऊ शकतात. हा प्लान प्रतिदिन 1. 5GB हाय-स्पीड डेटासह येतो. रिलायन्स जिओच्या 2,545 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दैनिक 100 एसएमएस, रोज 1. 5GB हय-स्पीड डेटा आणि 336 दिवसांची वैधता मिळेल. ही ऑफर जिओच्या अधिकृत वेबसाइटसह माय जिओ अॅप (MyJio App) वर सुद्धा उपलब्ध आहे. (RIL Jio Happy New Year Offer) वरील लाभांसह कंपनीचा 2,545 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान यूजर्सला जिओ टीव्ही (JioTV), जिओ सिनेमा (JioCinema), जिओ सिक्युरिटी (JioSecurity) आणि जिओ क्लाऊड (JioCloud) चे सदस्यत्व देतो. जिओचा 2,545 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान केवळ एक मर्यादित कालावधीसाठी आहे. कारण ही ऑफर दोन जानेवारी 2022 रोजी संपणार आहे. अतिरिक्त वैधता पाहिले असलेल्या ग्राहकांसाठी हा चांगला प्लान आहे. जिओ हॅप्पी न्यू ईयर प्लान : - कॉल : अमर्यात (मोफत) |
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आता एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. राज्यातील अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी वर्गाला निर्देशही दिले आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची तात्पुरती हौस भागली आहे. मात्र, यामागे भाजप असून, शिवसेना संपवण्याचा डाव यशस्वी होणार नसल्याचा स्पष्ट इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. हा भाजपचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे काही कायम स्वरूपी नाही. फक्त एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले इतर ३९ आमदार गेल्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे जरी नुकसान झाले असले, तरी शिवसेनेचा मूळ ढाचा कुठेही ढासळलेला नाही, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच जे लोक मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेले होते, त्यांचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाटक सुरू झाले. ५-६ महिन्यांपूर्वीपासून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत होते. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे असेल, तर मी खाली उतरतो असे त्यांना सांगितले होते. एकनाथ शिंदेंशी वारंवार सविस्तर चर्चा झाली होती. पक्षात फूट पाडण्याचे काम करू नका असे त्यांना सांगितलं होते. |
भारताने नेदरलँड्सचा 56 धावांनी केला पराभव केला. या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांनी मोलाची कामगिरी बजावली. रोहित शर्माने 53 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 44 चेंडूत 62 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. या विजयानंतर विराटने खास पोस्ट करत खेळाडूंचे कौतुक केले. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा आहे ती म्हणजे सुर्यकुमार यादवच्या कमेंटची अन् विराटच्या मराठी रिप्लायची. सामन्यानंतर विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामन्यातील काही फोटो पोस्ट करत, "आणखीन एक दमदार निकाल" अशा कॅप्शनसहीत पोस्ट केली. या पोस्टमध्ये चार फोटोंचा समावेश असून कॅप्शननंतर भारतीय झेंड्याचा आणि ताकद दर्शवणाऱ्या दंडांचे इमोजी वापरण्यात आले आहेत. या चार फोटोपैकी एका फोटोमध्ये विरोट आणि सुर्यकुमार दोघे क्रिजवर दिसत आहेत. दोघांचा फोटो पाहून सुर्यकुमार भलताच खुश झाला त्याने दोघांच्या जोडीला 'सूरवीर' असे भन्नाट नाव सुचवत कमेंट केली. तर त्याची ही प्रतिक्रिया पाहून, विराटने थेट मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्या. सूर्यकुमारने दोघांच्या जोडीसाठी दिलेलं नाव पाहून विराटने कमेंटमध्ये आधी हसू आल्याचं दर्शवलं आहे नंतर 'मानलं भाऊ' असं म्हणत फायर इमोजी वापरला आहे. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे. |
महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्ण संख्या 748 झाली आहे. आज नवीन 113 रुग्णांची नोंद झाली. आज 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबादचे आहेत. महाराष्ट्र सायबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल पर्यंत, कोविड -19 बद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरूद्ध, महाराष्ट्रात 85 खटले दाखल करण्यात आले आहेत. यात बनावट ऑडिओ क्लिप्स, फोटो आणि टिक- टॉक व्हिडिओंचा समावेश आहे. रविवारी महाराष्ट्रातील सोलापूर शहरातील विमानतळावर भीषण आग लागली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अहवालानुसार विमानतळाभोवती कोरडे गवत आहे आणि त्यामुळे ही आग वाढत गेली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील स्थानिक अडचणी व उपयुक्त सूचनांच्या अनुषंगाने, सोमवार दि. 6 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शरद पवार त्यांच्या https://bit. ly/2UzvZtc या फेसबुक पेजवरून लाइव्हद्वारे संवाद साधणार आहेत. हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) चे मालक महेश अग्रवाल यांचे सिंगापूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. ते यकृताच्या गंभीर आजारामुळे त्रस्त होते व गेल्या तीन महिन्यांपासून तिथल्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार चालू होते. दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 9 वाजता त्यांच्या निवासस्थानावरील सर्व दिवे बंद करुन, दीप प्रज्वलित केले. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी त्यांनी जनतेला दिवे पेटवण्याचे आवाहन केले होते. शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याचा आवाहनावर मुंबईचे काही खास क्षण टिपले आहेत. मुंबई दिव्यांच्या आरासाने झगमटून उठली असून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याचा आवाहनावर घराबाहेर लावले दिवे लावले आहेत. तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याचा आवाहनावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. तर आता देशातील संपूर्ण नागरिकांकडून कोरोनाचा अंधःकार दूर करण्यासाठी घरातील लाईट्स बंद करुन दिवे लावले जाणार आहेत. हरियाणा येथे 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल म्हणजेच आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन केलं आहे. रात्री 9 वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागरिकांनी एकाच वेळी घरातील वीज बंद केल्यास तांत्रिक समस्या निर्माण होऊन यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता आहे, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी देशातील कोरोना बाधितांची संख्या 3113 इतकी होती. यात 2825 सक्रिय केसेस असून 212 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज या आकडेवारीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या 635 वर जाऊन पोहोचली आहे. आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. जगभरात कोरोना विषाणुमुळे हाहाकार माजला आहे. जगभरात आतापर्यंत 11 लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 63 हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय इटलीमध्ये आतापर्यंत 15 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही 3 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. |
Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन लाँच होण्याआधीच लीक झाले आहेत. यात 7000mAh बॅटरीसह भन्नाट फीचर्स मिळणार आहेत. Tecno नं काही दिवसांपूर्वी भारतात Tecno Pova 2 स्मार्टफोन सादर केला होता. यातील 7000mAh ची बॅटरी लक्षवेधी फिचर होतं. हा भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेल्या स्मार्टफोन्स पैकी एक होता. आता पुन्हा एकदा कंपनी एवढीच मोठी बॅटरी असलेला हँडसेट सादर करणार आहे. Tecno Pova 3 ची जोरदार तयारी सुरु आहे. टिपस्टर Paras Guglani नं आगामी टेक्नो फोन Bureau of India Standards (BIS) च्या डेटाबेसमध्ये LF7 मॉडेल नंबरसह स्पॉट केला होता. त्यानुसार, हा डिवाइस Tecno Pova 3 च्या नावाने बाजारात येईल. ज्यात 1080×2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6. 9 इंचाचा Full HD+ डिस्प्ले मिळेल. 20. 5:9 आस्पेक्ट रेशियोसह यात 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. Helio G88 चिपसेटच्या प्रोसेसिंग पावरसह 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफीसाठी Tecno Pova 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 50MP चा मेन सेन्सर असेल. फ्रंटला ड्युअल LED फ्लॅशसह 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हँडसेटमध्ये 7000mAh ची बॅटरी देऊ शकते. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन Ecological Black, Silver Sea आणि Blue Sea अशा तीन कलर व्हेरिएंटसह बाजारात येऊ शकतो. Tecno Pova 2 मध्ये 6. 9-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा टेक्नो स्मार्टफोन Android 11 वर आधारित HiOS 7. 6 वर चालतो. Tecno Pova 2 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा AI फोटोग्राफी सेन्सर देण्यात आला आहे. हा फ्रंटला 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. टेक्नो पोवा 2 मध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी 18W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी(customer) एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना(customer) स्वस्तात पाच लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन काढता येणार आहे. देशात पसरलेल्या कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने ही खास ऑफर आणली आहे. बँकेने या कर्जसेवेला 'कोव्हिड पर्सनल लोन' (Covid Personal Loan) असं नाव दिलं आहे. या कर्जाची विशेष बाब म्हणजे याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिक्योरिटी देण्याची गरज नाही. कोरोनाच्या संकट काळात अनेकांना पैशांची चणचण भासते, पैशांची कोणालाही चणचण भासू नये यासाठी बँकेने हे पाऊल उचललं आहे. इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते पगारदार, पगार नसणारे आणि निवृत्तीवेतनधारकांना कोविड-19 च्या उपचारांसाठी अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकेल. बँक ग्राहकांना हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी देते. या कर्जावर ग्राहकाला 8. 5 टक्के दराने व्याज आकराणी केली जाईल. याशिवाय अनसिक्योर्ड वैयक्तिक कर्जाचे दर 10 ते 16 टक्क्यांपर्यंत आहेत. तुम्ही हॉस्पिटल बिल बँकेमध्ये दाखवून हे कर्ज घेता येईल. तुमच्या पेमेंटची स्थिती आणि क्षमता घेऊन बँक तुम्हाला कर्ज देईल. या व्यतिरिक्त तुम्ही कोरोना रुग्णाच्या उपचार खर्चाची अंदाजे रक्कम देऊनही या सुविधेचा लाभ घेऊ शकता, जी बाँकेत घेऊन जावी लागेल आणि कर्जासाठी अर्ज करावा लागेल. यात बँका 25 हजार ते 5 लाख रुपयापर्यंतची कर्ज देऊ शकतात. कर्जासाठी मान्यता आणि ते नाकारण्याचा अधिकार बँकेकडे असेल. एसबीआय प्रमुख दिनेश खारा आणि इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन राज किरण राय यांची रविवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये या कोव्हिड पर्सनल लोन संदर्भात महात्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोव्हिड पर्सनल लोनला पब्लिक सेक्टर बँकांच्या बोर्डाकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. हे कर्ज पगारदार आणि पगार नसणाऱ्या अशा दोन्ही गटातील व्यक्तींना मिळणार आहे. |
India vs Australia Delhi Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्सने विजय मिळवताना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली. ऑस्ट्रेलियाचा दुसारा डाव ११३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीच्या या कृतीने पुन्हा एकदा साऱ्यांची मनं जिंकली गेली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने २० चेंडूंत ३१ धावा केल्या. विराटने २० धावा केल्या. श्रेयस अय्यर १२ धावांवर बाद झाला. पुजारा ३१ आणि भरत २३ धावांवर नाबाद राहिले आणि भारताने ६ विकेट्सने हा सामना जिंकला. या कसोटी दरम्यान दिल्लीकर प्रेक्षक विराटच्या समर्थनात RCB, RCB असा जयघोष करत होते, परंतु विराटने त्याच्या जर्सीवरील अशोकचक्राकडे हात दाखवून भारताच्या नावाने जयघोष करा असे त्यांना सांगताना दिसला. आयपीएलमध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो, म्हणून RCB, RCB असा जयघोष सुरू होता. पण विराटच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. २०१७नंतर विराट प्रथमच दिल्लीत कसोटी खेळला. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ( Innings) २५ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजाचा विक्रम केला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकचा विक्रम मोडला. विराटने ५४९ डावांत हा टप्पा ओलांडला. सचिनला ५७७ डाव खेळावे लागले होते. शिवाय वयाच्या ३४ पर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने रिकी पाँटिंगचा २४१९३ धावांचा विक्रम मोडला. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
अनुभवामृत रहस्य. अर्थ :- मी एक व जगत् एक असें जें द्वैतरूपी अंगण आहे त्यास आपण म्हणजे आत्माच प्रकाशित करीत असल्यामुळें तें अधिकाधिक अभेदपणास पुष्टि देत आहे. कैवल्याहि चढावा। करीत विषयसेवा ॥ झाला भृत्यूभज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ।।३०।। शब्दार्थः- - कैवल्य ( केवल मोक्ष ) चढावा ( वरचढ ) विषयसेवा (विषयमेवन) भृत्यु ( चाकर, उपासक ) भज्य ( उपास्य, देव ) भृत्युभज्य ( देवभक्त ) कालोवा ( कालवाकालव . ) अर्थः- ज्ञात्या पुरुषांचें विषयसेवनच असें असतें कीं जो जो विषय त्यास दिसेल तो तो आत्मरूपच आहे असे समजून ग्रहण करितो. हा विषय व मी विषयी हा भाव त्याच्या ठायीं नसतो. नानाप्रकारें माझा मीच आहे असा सद्भाव त्याच्या ठिकाणीं वसत असल्यामुळे तो विषयांस पहात असतांहि त्यास तोच असल्याचा अनुभव येतो. यामुळे असे होतें कीं त्याची केवल अद्वैतता मात्र वाढते व तो अधिकच कैवल्यपदारूढ होऊं लागतो. त्याच्या ठिकाणीं सेव्यसेवकभाव किंवा देवभक्तपणा रहात नाहीं. देवभक्त एकच होऊन जातात; म्हणजे त्याचा देवहि तोच व भक्तहि तोच होतो. घरामाजीं पाय। चालतां मार्ग तोचि होय ॥ बैसे तरी आहे । पावणें कीं ॥ ३१ ॥ अर्थः - ज्याप्रमाणे घरामध्ये पायानें चालू लागले असतां घरच त्याचा चालण्याचा मार्ग होऊन रहातें, किंवा न चालतां वसलें तरी घरास तो सोडीत नाहींच. तद्वत् तोच सर्व जगद्रूप विषयांस आपल्या पोटांत प्रकाशरूपें पहात असल्यामुळे त्याची प्राप्ति त्यास सहज आहे. तो कोणत्याहि वस्तूहून विभक्त होईल अशी त्याची स्थितीच नाहीं. मग देवभक्तपणा त्यास दिसावा तरी कसा ? दिसणारच नाहीं. त्याच्या ठिकाणीं जो जो व्यवहार म्फुरेल तो तो व्यवहारच त्याची भक्ति आहे; त्यास निराळी भक्ति करावी लागत नाहीं. |
ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांच्या मानाने ऑक्टोबरमध्ये शहरातील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असली, तरी हिवाळ्यात करोनाची दुसरी लाट येऊ शकते, असे संकेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहेत. करोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असले, तरी नाशिककरांनी सावधगिरी बाळगावी, तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण मोहीम अधिक व्यापक, तसेच तीव्रतेने राबविणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त जाधव यांनी गुरुवारी झूम मीटिंगच्या माध्यमातून सर्व माध्यमांच्या संपादकांशी संवाद साधला. त्यावेळी जाधव यांनी शहरातील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे सांगत दुसऱ्या लाटेचेही संकेत दिले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत करोनाचे रुग्ण उच्चांकी वाढले आहेत. परंतु, ऑक्टोबरमध्ये करोनाची स्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. नाशिक महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगत गोरगरिबांसाठी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या बिटको रुग्णालयाचे खासगीकरण अजिबात होऊ देणार नाही याचा पुनरुच्चारही आयुक्तांनी केला. जुने बिटको रुग्णालय कायमस्वरुपी संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी राखीव ठेवण्याचे आयुक्त जाधव यांनी जाहीर केले. बिटको रुग्णालयात वैद्यकीय कोर्स सुरू केला जाणार असून, मबाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. |
वडझिरे : दोन वर्षांपूर्वी अंगणवाडीची इमारत बांधून पूर्ण झाली खरी; मात्र निकृष्ट कामे असल्याने ग्रामस्थांनी तिच्या लोकार्पणास आक्षेप घेतला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून सदर इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नव्याने आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने दुरुस्ती करून घेत अंगणवाडीचे लोकार्पण केले. लालफितीत अडकून पडलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यात चिमुकल्यांचा किलकिलाट ऐकू येऊ लागला आहे. पोषण आहार योजनेअंतर्गत सन २०१३-१४ साली सुमारे ६ लाख रुपयांच्या निधीतून अंगणवाडीची इमारत बांधण्यात आली होती. मात्र फरशी, खिडक्या व स्वयंपाकगृह यांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप तात्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे जुन्या ग्रामपंचायत इमारतीत अंगणवाडी भरवली जात होती. तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अंगणवाडी इमारतीचे अपूर्ण व निकृष्ट काम पुन्हा नव्याने करून घेण्याची विनंती केली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून फरशी, खिडकी व स्वयंपाकगृहाची दुरुस्ती करून घेऊन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. सरपंच संजय नागरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव दराडे यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी भीमराव दराडे, संजय नागरे, अर्जुन बोडके, छाया नागरे, मंदा ठोंबरे, रामदास बोडके, कांतीलाल सानप, रामचंद्र कापसे, फकीरा दराडे, तुळशीराम ठोंबरे, बाळू बोडके, गोरख ठोंबरे, संजय बोडके आदिंसह ग्रामस्थ. |
तुमचे आवडते चित्रपट पहायचे राहून गेले असतील तर काळजी नसावी. प्रवाह पिक्चर (Pravah Picture) आता हा आनंद थेट तुमच्या घरी घेऊन येणार आहे. नव्याकोऱ्या सिनेमांचा (Movie Channel) खास नजराणा सादर करत कुटुंबाला एकत्र आणण्याचे हे खास क्षण आपल्या आयुष्यात घेऊन येणार आहे डिस्ने स्टारची नवी चित्रपट वाहिनी 'प्रवाह पिक्चर' (Pravah Picture) . प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी नुकतीच सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतले (Marathi) सर्व दिग्गज कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर ही वाहिनी करणार आहे. 'प्रवाह पिक्चर' या नव्या वाहिनीच्या माध्यमातून प्रवाह ब्रॅण्डचा विस्तार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून मराठी सिनेमा साजरा करण्याची आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मिळत आहे. या नव्योकोऱ्या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सिनेमांचा आनंद लुटता येईल. दर्जेदार मनोरंजनाच्या शोधात असलेल्या मराठी कुटुंबासाठी प्रवाह पिक्चर ही वाहिनी हक्कांचं दालन असेल याची आम्हाला खात्री आहे अशी भावना नेटवर्क एंटरटेनमेंट चॅनल्स आणि डिस्ने स्टारचे प्रमुख केविन वाझ यांनी व्यक्त केली. प्रवाह पिक्चरवर प्रीमियर्सचा हा खजिना 'पावनखिंड' या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमापासून सुरु होणार आहे. १९ जूनला हा धमाकेदार सिनेमा पहाता येईल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित मल्टीस्टारर 'झिम्मा' हा आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'कधी आंबट कधी गोड' आणि 'प्रवास' या दोन सिनेमांची देखील प्रवाह पिक्चरवर खास पर्वणी असेल. सुपरस्टार स्वप्नील जोशीचा 'बळी', महेश मांजरेकर यांचा 'ध्यानीमनी', मल्टीस्टारर आणि समीक्षकांनी प्रशंसित 'कारखानीसांची वारी' येत्या काही आठवड्यांत प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतील. तुमचे आवडते चित्रपट पहायचे राहून गेले असतील तर काळजी नसावी. प्रवाह पिक्चर आता हा आनंद थेट तुमच्या घरी घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे हे चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर म्हणून फक्त प्रवाह पिक्चरवर प्रक्षेपित केले जातील आणि हेच या वाहिनीचं वेगळेपण आहे. |
पालकावर माझा विशेष लोभ आहे.पण आतापर्यंत तो पाण्यात उकळून प्युरी करत धपाटे,पुरी,पालक पनीर,पालक इडली -डोसा,पालक चिला असेच बनवले आहे.नुसता न उकळता चिरून पीठ पेरून भाजी घाईच्या वेळेत होते.डायट पाळणं सात दिवस झालं जमलंच नाही. मका होता पालक होता.न उकळता फक्त पालक चिरून तेव्हा झटपट रेसिपी केली. साहित्य -दोन वाटी उकडलेले मक्याचे दाणे,अर्धी जुडी चिरलेला पालक, अर्धा चिरलेला कांदा, लसूण, एक चमचा मैदा,तीन चमचे दूध ,२५ ग्रम चीझ, एक चमचा हर्ब्स,तिखट , मीठ चवीनुसार,एक चमचा लिंबाचा रस. एक चमचा पनीर कढईत टाकून गरम झाल्यावर बारीक लसूण फोडणीला दिला.कांदा परतून घेतला.मक्याचे दाणे परतले.हर्ब्स,तिखट मीठ टाकले.चिरलेला पालक फोडणीत टाकला.मक्याचा पिवळसर रंग आणि पालकाचा हिरवा रंग सुंदर दिसू लागला.यत एक चमचा मैदा आणि नंतर दूध घातले.एका वाफेनंतर किसलेले चीझ टाकले.हळूहळू चीझी स्टेक्चर आले.किंचित लिंबू पिळले. याच पुढे ब्रेड टोस्ट करायचे होते पण ब्रेड विसरले.मग पोळीच तुपात गरम कळून हे चीझी मिश्रण त्यावर पसरून पोळीची घडी घालून कडक खरपूस भाजली. लेकीला याचा मक्याचा गोड आणि मेल्टेड चीझचा यम्मी स्वाद आवडला.आणि तिच्या पोटात पालक गेला याच आई म्हणून समाधान मिळालं. या मका पालक चीझी मिश्रणाचे स्प्रिंग रोलही बनवता येतात.झटपट भरपेट पदार्थ आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.