text large_string |
|---|
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांचे सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. आर. आर. पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी स्मिता आणि मुलगा रोहित असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादी भवन येथे सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या अंजनी या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे एका दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या पाटील यांची प्रकृती सोमवारी सकाळी पुन्हा खालावली. लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अशी माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर संजय उगेमोघे यांनी दिली. त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालय, बॉम्बे हॉस्पिटल्समध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांनी चालण्याचा सरावही केला. मात्र, आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. दरम्यान, प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सोमवारी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता, अशी आर. आर. पाटील यांची जनमानसात ओळख होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील उर्फ आबा यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात अंजनी येथे झाला. शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत ते लहानपणी श्रमदान करून शिक्षण घेतले. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालामध्ये कला शाखेची पदवी घेतली. आणि नंतर वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले. राजकीय जीवनामध्ये प्रथम १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य होते. नंतर १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ साली ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. पाटील यांच्या निधनामुळे राज्यभरामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही पाटील यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात जावून पाटील यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले. शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक हे ही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दुख व्यक्त करताना एक दिवसाचा शासकीय दुखवटा ही जाहीर केला. पाटील यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येते. दरम्यान सोमवारी संध्याकाळी सहा वाजता पाटील यांचे पार्थिव राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आपल्यानेत्याचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या पार्थिव त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मुळ गावी नेण्यात आले. सोमवारी सकाळपासूनच आर. आर. पाटील यांच्या निधनाच्या बातम्या येत होत्या. अशावेळी लिलावती रूग्णालय प्रशासनाने ही पाटील यांची स्थिती गंभिर असली तरी स्थिर असल्याचे सकाळी स्पष्ट केले. मात्र संध्याकाळी पाटील यांच्या निधनाची बातमी रूग्णालय प्रशासनाने जाहीर केली. त्यानंतर लिलावती रूग्णालयात सर्व पक्षीय नेत्यां बरोबर च कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर राष्ट्रवादी भवनमध्ये सन्नाटा होता. जणू तेथे दुखांचा डोंगर कोसळल्याची जाणीव होत होती. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि सर्वांचे लाडके आबा म्हणजेच आर. आर. पाटील यांची तोंडाच्या कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेरीस अपशयी ठरली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात १५ दिवसांपूर्वी आबांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना सोमवारी कृत्रिम श्वासोच्छवास पुरविण्यात येत होता. परंतु बरेच वर्ष ते कर्करोगाशी संघर्ष करत असल्याने त्यांच्या शरीरातील सर्व अवयव निकामी झाले होते. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. इतकंच नव्हेतर मागील काही दिवसांपूर्वी आबांच्या छातीत जळजळ होऊ लागल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्या गालावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर नानावटी रुग्णालयात केमो आणि रेडिएशनबाबत त्यांच्यावर उपचार सुरु होते. जवळपास चार-पाच वेळा आबांवर केमोचे उपचार करण्यात आले होते. इतकंच नव्हेतर मागे तब्येत अस्वस्थामुळे त्यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारानंतर त्यांना घरी देखील सोडण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळपासून आर. आर. पाटील यांच्या निधनाची बातमी पसरल्यानंतर दुपारी आबांचे फॅमिली डॉ. संजय उगेघुगे यांनी सांगितले की, आर. आर. पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही प्रयत्न करतो की, पाटील यांची तब्येत लवकरच ठिक होईल. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आबांच्या तब्येत लवकरच सुधारावी, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र, ४ ते ४. ३० च्या दरम्यान लीलावती रुग्णालयाने आबांच्या निधनाबाबत स्पष्ट केले. |
हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. आमदार बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का दिला आहे. संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संतोष बांगरही चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष बांगर सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारो शिवसैनिकांसह ते मुंबईच्या दिशेने आले असून त्यांचा ठिकठिकाणी सत्कार केला आहे. यावेळी संतोष बांगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजी केली आहे. यावेळी बांगर यांचं मुंबईत येताना जालना येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. या स्वागत समारंभानंतर संतोष बांगर यांनी जेवणाचाही आस्वाद घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांना आज सायंकाळी ४ वाजता भेटीची वेळ दिल्याची माहिती आहे. |
अज्ञात समाजकंटकाने संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग जाळल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर त्याचे पडसाद आता राज्याच्या काही भागांमध्ये उमटायला लागले आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दसरा मेळाव्याच्या दिवशी भगवान बाबा यांचं जन्मगाव असेलल्या सावरगावात भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मूर्तीचा समोरील भाग तयार होता. पण मागच्या भागाच्या फिनिशिंगंच काम नगरमध्ये जगप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कारखान्यात सुरु होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. या संदर्भात प्रमोद कांबळे यांनी तक्रार दिली असून पारनेर पोलीस स्टेशन येथे स्वप्निल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कलम ३७९ चोरी करणे, ४२७ तोडफोड करणे, ४३५ कच्चा माल जाळपोळ करणे आदी कलम लावण्यात आले आहेत. दरम्यान प्रमोद कांबळे ज्या ठिकाणी हा शिल्पाचा कारखाना चालवत आहेत. त्या ठिकाणी वीज बिल न भरल्यामुळे हा विकृतपणा केल्याचं बोललं जातं असून यामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. |
काम सोपे नाही (अग्रलेख) चार वर्षांपूर्वी मोदी यांची "अच्छे दिन आयेंगे' ही घोषणा टाळ्या घेणारी ठरत होती. तीच घोषणा आता चेष्टेचा विषय झाली आहे. चार वर्षापूर्वी मोदी यांना टक्कर देऊ शकेल, असा नेता नाही, अशी भावना होती. आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रूपाने मोदी यांना दमदार विरोधक मिळाला आहे. गेल्या निवडणुकीवेळी अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपशी मैत्री केली होती. आज भाजपचे अनेक मित्र त्यांना सोडून गेले आहेत. नवी दिल्ली येथे झालेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारच्या बैठकीत सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी "अजेय भाजप' ही नवीन घोषणा केली गेली आणि आगामी काळातील सर्व निवडणुका अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यासाठी त्यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदतही वाढविण्यात आली. देशात इंधन दरवाढ आणि इतर अनेक विषयांवरून सरकारच्या विरोधात नाराजीची तीव्र भावना निर्माण झाली असल्याने "अजेय भाजप' ही घोषणा प्रत्यक्षात आणणे सोपे नाही, याची कल्पना शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनीही असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेत, सन 2014 पेक्षा अधिक बहुमताने सरकार स्थापन करण्याचा संकल्पही भाजपने केला आहे. या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह काही राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचाही संकल्प करण्यात आला. अर्थात, संकल्प आणि वास्तव यात खूप फरक असतो हे शहा आणि मोदी यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. इंधनाच्या दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी आज 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपची "अजेय भाजप' ही घोषणा सध्यातरी मृगजळच वाटत आहे. सन 2014 मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या होत्या आणि त्यात पक्षाला घवघवीत यश मिळाले. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे गेल्या चार वर्षात सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी हे निर्णय महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव देऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केलेली आहे. हे निर्णय घेऊन भाजप मतदारांसमोर जाणार असेल, तर पक्षाला तोंडघशीच पडावे लागेल. कारण या सर्व निर्णयांमधील फोलपणा आता समोर आला आहे. नोटाबंदी फसल्याची माहितीही उघड झाली आहे आणि जीएसटीचा फटकाही अनेकांना बसला आहे. शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयांचा संपूर्ण फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही, हे वास्तवही समोर आले आहे. अशा परिस्थितीत "अजेय भाजप'ची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा कालावधी असला, तरी या वर्षाच्या अखेरीस होणारी चार राज्यांची विधानसभा निवडणूक शहा यांच्यासाठी "लिटमस टेस्ट' ठरणार आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे आणि मिझोरमध्ये कॉंग्रेस सत्तेत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा फटका बसल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो, याची कल्पना भाजपला असणार आहे. राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताबदलाची परंपरा असल्याने, भाजपला यावेळी मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. इथल्याही पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा फटका बसला आहे. छत्तीसगडमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेसच्या मतांमध्ये फार काही अंतर नसते. त्यामुळे इथेही भाजपला झगडावे लागणार आहे. मिझोरमची सत्ता हस्तगत करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. पण तो प्रयत्नही कितपत यशस्वी होईल, याची शंका आहे. चार वर्षांपूर्वी मोदी यांची "अच्छे दिन आयेंगे' ही घोषणा टाळ्या घेणारी ठरत होती. तीच घोषणा आता चेष्टेचा विषय झाली आहे. चार वर्षापूर्वी मोदी यांना टक्कर देऊ शकेल, असा नेता नाही, अशी भावना होती. आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रुपाने मोदी यांना दमदार विरोधक मिळाला आहे. गेल्या निवडणुकीवेळी अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपशी मैत्री केली होती. आज भाजपचे अनेक मित्र त्यांना सोडून गेले आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना हे महत्त्वाचे मित्र आता विरोधकांचे काम करून लागले आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांनीही स्वबळाची भाषा केल्याने त्यांची मैत्रीही भाजपला मिळणार नाही. नवीन मित्र निर्माण होण्याची शक्यताही नाही. साहजिकच वेगळ्या अर्थाने भाजपला "शतप्रतिशत भाजप' ही मोहीम राबवावी लागणार आहे. दुसरीकडे, महाआघाडीच्या निमित्ताने विरोधकांची एकी पुन्हा एकदा दिसू लागली आहे. "भाजपचा पराभव' या एकमेव हेतूने विरोधक एकत्र येत असल्याने त्याला तोंड कसे द्यायचे, याचा विचारही भाजपला करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, "अजेय भाजप' घोषणेबाबत शंका येणे साहजिकच आहे. काही वर्षापूर्वी भाजपने सत्तेवर असतानाच, पुन्हा सत्तेवर येण्याच्या हेतूने, "शायनिंग इंडिया'ची घोषणा केली होती. पण त्या घोषणेनंतर भाजपला सत्ता गमवावी लागली होती आणि त्यानंतर 15 वर्षे सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. आता "अजेय भाजप' घोषणेलाही पराजयाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, कोणताही राजकीय पक्ष आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाकांक्षी संकल्प करीत असतो आणि आम्हीच सत्तेवर येणार असा दावा करीत असतो. कार्यकर्त्यांना बळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात. पण ते करताना थोडेफार वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे असते, इतकेच. |
उल्हासनगरः गावठी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा काळा गुळ (Black Jaggery) उल्हासनगरच्या (Ulhasnagar) हिललाईन पोलिसांनी जप्त (Confiscated) केला आहे. या काळ्या गुळाची ८ लाख ७० हजार एवढी असून या कारवाईत एकाला अटकही करण्यात आली आहे. (Confiscated black jaggery used for village liquor; Hill Line police action) उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या (Hill Line Police Station in Ulhasnagar No 5) हद्दीतील प्रेम नगर परिसरात तरुण चांदवानी नावाच्या व्यक्तीने एका दुकानात काळा गुळ साठवून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक पोपट करडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हिललाईन पोलिसांनी रात्रीच्या सुमारास या दुकानावर धाड टाकली. या दुकानातून तब्बल ४८० गोण्या काळ्या गुळाने भरलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी तरुण चांदवानी याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. कुरखेडा/आलापल्ली : कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी सुधीर कटारे यांच्या चमूने १४ मे रोजी येथे धाड घालून हा मोहफूल सडवा जप्त केला. धाडीदरम्यान घटनास्थळावर कुणीही इसम आढळून आला नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. तर अहेरी तालुक्याच्या आलापल्ली येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष दारूबंदी पथकाने शुक्रवारी धाड घालून १ लाख ९६ हजार ८२० रूपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दारूविक्रेते आरोपी संतोष श्रीधर अग्रवाल (२७) रा. आलापल्ली, नितेश सुधाकर येमुलवार (३०) रा. गणेशनगर मुलचेरा या दोघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील गणेश सीताराम मडावी, रेखा गणेश मडावी दोघेही रा. आलापल्ली व कृष्णा मुजुमदार रा. कसनसूर हे तीन आरोपी फरार झाले आहेत. यांच्याकडून पोलिसांनी इन्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या १८० एमएल मापाच्या १८६ निपा जप्त केल्या. याची किंमत १ लाख २१ हजार ५०० रूपये आहे. ४६ हजार २०० रूपये किंमतीच्या गोवा कंपनीच्या १८० एमएल मापाच्या ४६२ व १४ हजार ४०० रूपये किंमतीच्या बीआर हायवार्ड कंपनीच्या ७२ निपा जप्त केल्या. याशिवाय पोलिसांनी दारूविक्रेत्याच्या घरून दारूविक्रीतून जमा झालेली १४ हजार ७२० रूपयांची रोकड जप्त केली. या आरोपींविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आलापल्लीजवळच्या दामापूर येथेही पथकाने कारवाई करून ४० हजारांची दारू पकडली. (प्रतिनिधी) |
गुन्हेगारांवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांच्यावरील त्यांना योग्य ती शिक्षा सुनावली जाते. काही गुन्हेगारांच्या शिक्षा अल्प काळासाठी असतात तर काहींच्या दीर्घकाळासाठी. गुन्हेगारांवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांच्यावरील त्यांना योग्य ती शिक्षा सुनावली जाते. काही गुन्हेगारांच्या शिक्षा अल्प काळासाठी असतात तर काहींच्या दीर्घकाळासाठी. पण शिक्षा भोगून झाल्यानंतर या गुन्हेगारांचे नेमके काय होते, त्यांना समाजाकडून काय सोसावे लागते, त्यांच्या कुटुंबाचे काय होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण त्यावर थोडा फार विचार करून सोडून देण्याखेरीज विशेष असे काही केले जात नाही. पण आता असाच एक विषय दिग्दर्शक आर. विजय आपल्यासमोर मांडणार आहेत 'बाबांची शाळा' या चित्रपटातून. लेखिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत बाबांची शाळा हा चित्रपट आधारित आहे. जन्मठेप झालेल्या पुरुषाची तुरुंगातली शिक्षा भोगून झाल्यानंतर आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेचे चित्र या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. चित्रपटाची निर्मिती विलास माने, उमेश नथानी यांनी केली आहे. हंसराज पटेल आणि नविन पटेल सहनिर्मित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे, ऐश्वर्या नारकर, शशांक शेंडे, कमलेश सावंत, थाया कदम, आरती मोरे, उमेश बोलके, मिलींद अधिकारी आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. |
नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असून १ नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत सध्या पेट्रोल ५. ६ रुपयांनी, तर डिझेल ६. २९ पैशांनी वाढले असून स्वयंपाकाच्या गॅसचा सिंलिंडर तब्बल १२५ रुपयांनी महागला आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कृषी अधिभार लावल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखीनच वाढण्याच्या शक्यता व्यक्त होत असून गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेली महागाई आणखी किती रडवणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कमच जमा झाली नसल्याचे अथवा नाममात्र तीन किंवा सार रुपये सबसीडी जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरही तब्बल १२५ रुपयांनी महागला आहे. विशेष म्हणजे सरकारकडून अनुदानित सिलिंडरच्या किमतीतही जवळपास शंभर रुपये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना तीन ते चार रुपये अथवा कोणतेही अनुदान मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यात भारत गॅस, इंडियन ऑइल तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे मिळून १३ लाख गॅस ग्राहक आहेत. यातील अनुदानित सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात महिन्याला साधारण दहा लाख रुपयांचे अनुदान जमा होते. गॅस सिलिंडरच्या कमी-जास्त होणाऱ्या किमतीनुसार ही रक्कम ठरते. मात्र, एप्रिल २०२०पासून गॅस अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करताना आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचे फायदे थेट ग्राहकांना मिळतील असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. उलट सामान्य ग्राहक सतत वाढणाऱ्या महागाईत होरपळून निघतो आहे. डिझेलच्या दरवाढीचा परिणाम थेट अन्य वस्तूंवरही होत असून त्यामुळे महागाई वाढत आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असून ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात आवश्यक आहे. एकीकडे किराणा मालाच्या किमती वाढत असताना दुसरीकडे स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. सरकारकडून स्वच्छ इंधनाचा आग्रह धरला जात असताना स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सबसीडीही मिळणे बंद झाले आहे. |
कोल्हापूर : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले. यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेली प्रतिबंधित बंद क्षेत्र व सूट, वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात येत आहेत. तसेच वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी-क्षेत्र पूर्ववत सुरू राहतील. याअंतर्गत दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या घटकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे. कोल्हापूर : माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वसुंधरेप्रती आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी १ ते १५ जानेवारी या कालावधित हरितशपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळे, हास्यक्लब, तरुण मंडळे, शासकीय, राजकीय, सामाजिक तसेच निमशासकीय, कार्यालये तसेच संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी, व्यक्ती यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरितशपथ घ्यावी. त्याची नोंद www. majhivasundhara. in या वेब पोर्टलवर करावी. राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती daokolhapur@gmail. com या ई-मेल वर पाठवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत खासगी जमीन खरेदी करून १०० टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली. अनुसूचित जातीच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटुबांचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढावे व त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी ही योजना राबवली जाते. ही जमीन जिल्हा समाज कल्याण कार्यालय खरेदी करणार असून, जे जमीन मालक रेडिरेकनरनुसार जमीन विक्रीस तयार आहेत, त्यांनी कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. |
ड्रग्ज मागवण्यासाठी खास गृप, दीपिका ऍडमिन; मॅनेजरने केला धक्कादायक खुलासा - Mulukh Maidan\nसुशांत सिंह राजपुतच्या मृत्यू ते आता ड्रग्स कनेक्शन. या सगळ्यामध्ये अख्खे बॉलीवूड ढवळून निघाले आहे. रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता ड्रग्स प्रकरणात रकुल प्रीत, दीपिका पादुकोन, सारा अली खान यांचे नाव आले आहे. ड्रग्स चॅट सापडल्यानंतर २५ सप्टेंबरला NCB ने रकुल आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला चौकशीसाठी बोलावले होते.\nचौकशीत करिश्मा प्रकाश हिने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने NCB ला सांगितले आहे की, ज्या ग्रुपवर ड्रग्सच्या देवाण घेवाणबद्दल चॅटिंग होत होती त्या ग्रुपची ऍडमिन स्वतः दीपिका पादुकोन होती. यामुळे दीपिका पादुकोन अधिक अडचणीत सापडू शकते.\nक्वान टॅलेंट आणि कंपनी यांच्यात कामाविषयी माहिती किंवा अपडेट देण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला होता. परंतु काही काळानंतर या ग्रुपवर ड्रग्सच्या देवाण घेवाणबद्दल चॅट सुरू झाली. या ग्रुपमध्ये दीपिका पादुकोन, जया प्रकाश आणि करिश्मा प्रकाश यांचा समावेश होता.\nया ग्रुपची ऍडमिन स्वतः दीपिका पादुकोन होती. या ग्रुपवर ती ड्रग्सच्या चौकशीबाबत आणि मागणीबाबत चॅट करायची. असा खुलासा करिश्मा केला आहे. तसेच जया शहाने चौकशीत करिश्माचे नाव घेतले आहे. एनसीबीने आधी जया सहाची चौकशी केली होती.\nजया सहा हिने अनेक सेलिब्रिटींची नावे फोडली आहेत. एनसीबीने या सर्व सेलिब्रिटींना समन्स बजावला आहे. दीपिका पादुकोन काल रात्री मुंबईत दाखल झाली आहे. ती तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्यामध्ये होती पण एनसीबीने समन्स बजावल्यानंतर ती काल मुंबईत दाखल झाली आहे.\nTags: करिश्मा प्रकाशजया सहाताज्या बातम्यादीपिका पादुकोनमराठी बातम्यामुलूखमैदानसुशांत सिंह राजपूत\n'राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी नाही' |
नवी दिल्ली, २४ एप्रिलः देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111. 20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला. सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात करोनाची वाढती प्रकरणे आणि ऑक्सिजनची तीव्र कमतरतात लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक घेतली. त्याच वेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वागणुकीवर चिडले, कारण त्यांनी बैठकीत झालेल्या खासगी चर्चेचे थेट प्रक्षेपण केलं होतं. आजतकने थेट राघव चढ्ढा यांनी जाहीर माफी मागितल्याचे सांगत सगळ्या गोष्टी ट्विटच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले. हे ट्विट पाहून स्वरा भास्करचा मात्र चांगलाच पारा चढला आणि थेट रिट्वीट करत तिनेही निशाणा साधला. वाहवा आजतक राघव चढ्ढा यांनी आणखीही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्या गोष्टीही हेडलाईनमध्ये टाकणे जरा जास्त रिलेव्हंट झाले असते. अंजना कश्यपला या गोष्टीची जरा जास्त मिर्ची झोंबलेली दिसतेय. अरविंद केजरीवाल हे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देशाचे भलेही स्मशानभूमीत रुपांतर होवो, पण आपल्या आकाची प्रतिमा मात्र मलिन होऊ नये. खरंच लाजिरवाणे आहे हे सगळं. आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या स्वराचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे. News English Summary: Anjana Kashyap seems to be a little too chilly about this. Arvind Kejriwal is seen as the responsible Chief Minister. Even if the country is transformed into a cemetery, the image of our sky should not be tarnished. It's all really embarrassing. This tweet of a voice known for its tough nature is currently in good discussion. News English Title: Bollywood actress Swara Bhaskar slams news anchor Anjana Om Kashyap on debate issue news updates. गुजरात सरकारला हायकोर्टाने फटकारलं । ऑक्सिजन, बेड उपलब्ध आहेत, मग लोकं रांगेत का उभी? - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
सोलापूर - सोलापूर विभागातील होटगी ते तिलाटीदरम्यानचे रेल्वे दुहेरीकरणाचे काम गतीने होत आहे. हे काम करणाऱ्या आरव्हीएनएल (रेल्वे विकास निगम लि.,) रेल्वे रुळ जोडणीसाठी फरिदाबाद येथून अाधुनिक फ्लॅश बेल्ट वेल्डिंग मशीन मागविली आहे. या मशीनद्वारे अवघ्या तीन मिनिटांत रुळाची जोडणी केली जाते. या मशीनमुळे दुहेरीकरणाचे काम गतीने होत असून अाधुनिक तंत्रज्ञानामुळे रेल्वे ट्रॅकची सुरक्षाही मजबूत होत आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. अद्ययावत यंत्राचा वापर कामासाठी होत आहे. ट्रॅक टाकण्याचे कामही वेगाने होत आहे. पूर्वी रेल्वे रुळ एकमेकांना जोडण्यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा अवधी लागायचा. परंतु नव्या मशीनच्या माध्यमातून अवघ्या तीन मिनिटांत रुळ जोडले जातात. होटगी ते तिलाटीदरम्यान सुरू असलेल्या कामात रोज रुळाचे ६० तुकडे जोडले जात आहे. ही मशीन रेल्वे रुळावर तसेच रस्त्यावरही धावते. या मशीनच्या माध्यमातून सोलापुरात पहिल्यांदाच रेल्वे रुळ जोडण्याचे काम केले जात अाहे. मशीनची किंमत १० कोटी रुपये आहे. रेल्वे रुळएकमेकांना जोडण्यासाठी फ्लॅश बेल्ट वेल्डिंग मशीनचा वापर केला जात आहे. यामुळे दुहेरीकरणाच्या काम गतीने होत आहे. राजू भडके, वरिष्ठ बांधकाम अभियंता, सोलापूर . रेल्वेरुळाचा तुकडा हा १३ मीटरचा आहे. असे तुकडे एकमेकांना जोडून रेल्वे ट्रॅक तयार केला जातो. रेल्वे रुळ जोडण्याचे काम जिकिरीचे असते. जोडण्याचे काम ठीक झाले नाही तर तुकड्यामध्ये गॅप पडून रेल्वे अपघात होण्याची शक्यता असते. पूर्वी हे काम करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागायची. तसेच, हा वेळखाऊ प्रकार होता. एक रुळ जोडण्यासाठी सुमारे ४५ मिनिटांचा अवधी लागायचा. ही मशीन अत्यंत वेगवान पद्धतीने काम करते. हॉलंड येथे या मशीनची निर्मिती केली जाते. रुळ एकमेकांना जोडण्यासाठी मोठा दबाव लागतो. फॅल्श बेल्ट वेल्डिंग मशीन रुळामध्ये १८०० हायड्रोलिक प्रेशर निर्माण करते. तसेच, ४५० व्हाेल्टेजचा विद्युतप्रवाह रुळामध्ये सोडला जातो, असे अजितसिंग या कर्मचाऱ्याने सांगितले. |
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू झाला असला तरी राज्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात पडलेल्या पावसाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसलाय. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी या संदर्भात कृषी विभागानं महत्त्वाचा सल्ला दिलाय. गेल्या काही दिवसांपासून ऋतूचक्र बदलल्याचं पाहायला मिळतंय. हवामानातील बदलाचा मोठा परिणाम पिंकावर झालाय. मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडलाय. त्यामुळे काढणीला आलेले गहू, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यासोबत उन्हाळ्यात ज्याची सर्वाधिक प्रतीक्षा असते त्या आंब्याच्या मोहरावरही याचा दुष्परिणाम दिसत आहे. या सर्व नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये काळजी वाढली आहे. सर्व शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची मळणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास पीक ढीग मारुन ताडपत्रीनं झाकून ठेवावं. काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीसाठी तयार असलेल्या भाजीपाला आणि फळ पिंकाची काढणी करुन घ्यावी. त्याचबरोबर परिपक्व झालेल्या टरबूज फळांची काढणी करुन अपरिपक्व फळं गवतानं झाकावीत. त्याचबरोबर पाऊस सुरू असताना पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधावे, असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. गहू : पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस आलेल्या व तयार झालेल्या पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी काढणे केलेल्या शेतात पिकाचे अवशेष जाळू नयेत तर ते मूळ ठिकाणी कुजवावेत यासाठी एकरी 50 किलो युरिया व 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात शेतात पसरवावे व नंतर पलटी नांगरणी करून घ्यावी यामुळे येणाऱ्या हंगामापर्यंत अवशेष कुजून उत्कृष्ट खत तयार होईल. रब्बी पिकांची काढणी आणि मळणी केल्यानंतर तयार झालेले धान्यात किड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धान्यातील ओलावा दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवावा. धान्य साठवणुकीच्या पूर्वी उन्हात योग्यरीत्या वाळवून घ्यावे. त्यामध्ये एक ते दोन टक्के कडुलिंबाचा पाला मिसळवावा. आंबाः आंबा फळाची गळ कमी करण्यासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट 100 ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फळे वाटाणा घोटीव सुपारीच्या आकाराची असताना स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. |
नागपूर : अवैध सावकारीवर राज्य सरकारने कायद्याने बंधने आणली असली तरी आता राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनाही वेगवेगळ्या शुल्काच्या नावावर वसुली सुरू केली असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. कोविडच्या काळात किमान अनावश्यक शुल्काची वसूल करण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरत असून रिझर्व्ह बँकेनेच यावर आता निर्बंध आणावे अशी मागणी केली जात आहे. विविध नियमांसह राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका आणि को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे वर्षभरामध्ये अनेक प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून आकारले जातात. यामध्ये, मंथली अॅव्हरेज बॅलेंस (एमएबी), एसएमएस शुल्क, डेबिट कार्ड शुल्क, इंस्पेक्शन शुल्क आदींचा समावेश आहे. कर्जावरचे व्याज आणि इतर शुल्क वेगळे असतात. आरबीआयने मागील लॉकडाउनच्या काळात कर्जाच्या हप्त्याचा भरणा करण्यासाठी सूट दिली होती. यंदा मात्र सामान्य नागरिक प्रतीक्षेत आहेत. याबाबत, बॅकेंच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता नोकरी अडचणीत येऊ नये म्हणून त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती केली. केंद्र सरकारने अनेक योजनेचे लाभ थेट लोकांच्या जनतेच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी बँकेत खाती सुरू केली. सरकारी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर बँकेत खाते गरजेचे असते. सर्वसाधारणपणे बँकेत पैसे जमा केल्यावर व्याज दिले जाते. पण खात्यावरील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी काही शुल्क आकारले जातात. काही बँका एका विशिष्ट रक्कमेपेक्षा अधिक पैसे जमा करण्यावर शुल्क आकारते. ही रक्कम ५० रुपये ते १५० रुपयांपर्यंत आहे. आयसीआयसीआय बँक- सुरुवातीच्या चार व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारासाठी १४० रुपये शुक्ल घेते. ही बँक एटीएम मधून विशिष्ट रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेचा व्यवहार केल्यास २० रुपये आणि त्यावर जीएसटी आकारते. बँक ऑफ महाराष्ट्र- पहिले तीन व्यवहार मोफत असतात. त्यानंतर जर तुम्ही पैसे जमा करणार असाल किंवा काढणार असाल तर १०० रुपये शुल्क घेतले जाते. अॅक्सिस बँक- जर १० रुपये, २० रुपये किंवा ५० रुपयांच्या नोटांचे बंडल जमा करायचे असेल तर प्रत्येक बंडलसाठी १०० रुपये द्यावे लागतात. इतकेच नाही तर या बँकेत आधी ईसीएस व्यवहार मोफत होते. त्यावर आता २५ रुपये इतके शुल्क आकारले जाते. कोटक महिंद्र बँक- ४ व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. त्यानंतर प्रत्येक १ हजार रुपयांवर ३. ५ रुपये शुल्क आकारले जाते. |
आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. गुवाहाटी : आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा तडाखा बसला असून ६ लाख ८० हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. ६२ शिबिरांत ४८५२ लोकांना ठेवण्यात आले आहे. आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. अर्थात, लखीमपूर, शिवसागर, बोंगईगाव, होजई, उदलगुरी, माजुली आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यात्ां पुराच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम लोकांना मदत करीत आहेत. ग्रामीण भागातील लोकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठाही केला जात आहे. आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सांगितले की, आसामच्या गुवाहाटीमध्येच कोरोनाचे अधिक रुग्ण दिसून येत आहेत. राज्य सचिवालयातील कार्यालय एक आठवड्यासाठी बंद ठेवले आहेत. व्दारका : गुजरातच्या व्दारकामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मोठा पूर आला असून यात निवासी भागातील काही कार बुडाल्याचे दिसत आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका कॉलनीमधील काही वाहने पाण्यात अर्धी बुडालेली दिसत आहेत. पुराचे पाणी इंजिनमध्येही गेले आहे. गुजरातच्या गीर, सोमनाथ, जुनागड आणि अमरेलुसह अन्य काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. |
कोणतंही कर्ज घेतलं तर त्याचं ओझं डोक्यावर असतं, कधी एकदा हे कर्ज फेडतो असंच प्रत्येकाला वाटतं. काही सोप्या मार्गांनी तुम्ही या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होऊ शकता. कोणतंही कर्ज घेतलं तर त्याचं ओझं डोक्यावर असतं, कधी एकदा हे कर्ज फेडतो असंच प्रत्येकाला वाटतं. काही सोप्या मार्गांनी तुम्ही या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होऊ शकता. मला माझ्या कारवर लोन मिळेल का, त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? घशात चॉकलेट अडकल्यानं मुलाचा मृत्यू; तुमच्याबाबतीत असं घडलं तर काय कराल? मुंबई, 08 डिसेंबर : सध्याच्या काळात स्वतःचं घर घेणं खूप अवघड आहे. स्वतःचं घर घेणं आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे. घरासाठी कर्ज घेणं हा खूप मोठा निर्णय आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. घरासाठी कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे. अगदी सहज कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना कर्ज (home loan) उपलब्ध करून देते. पण त्यानंतर कमीतकमी 20 वर्ष त्यासाठी हफ्ते भरणं खूपच मोठी गोष्ट आहे. काही वेळा आयुष्यात आर्थिक संकटं येतात तर काही वेळा जागतिक संकटामुळे व्यक्तीवरील आर्थिक भार वाढतो. अशा परिस्थितीत हे कर्ज फेडणं अवघड होऊन बसतं. पण काही वेळा तुम्ही हे कर्ज लवकर फेडून व्याजाची मोठी बचत करू शकता. त्याचबरोबर भविष्यात मोठी बचत करण्याच्या दिशेने देखील वाटचाल करू शकता. लवकरात लवकर कर्जातून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरासाठी घेतलेल्या कर्जातून लवकर मुक्त होऊ शकता. सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत कमी करणं. या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त होऊ शकता. त्याचबरोबर कर्जाच्या हफ्त्यांबरोबर आणखी काही रक्कम खात्यात जमा करत जा. यामुळे तुम्ही जितकी जास्त रक्कम खात्यात जमा कराल तितकंच व्याज तुम्हाला कमी पडेल. तुम्ही जितक्या लवकर बँक खात्यात रक्कम तितक्याच वेगानं तुमच्या कर्जाच्या व्याजामध्ये देखील कपात होईल. त्यामुळे शक्य तितकी जास्त प्रमाणात रक्कम जमा केल्यास तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता. बर्याच वेळा कमी कालावधीसाठी कर्ज परत करणं आकर्षक वाटेल. पण महिन्याला मोठी रक्कम हफ्त्याच्या रूपात परत करणं अवघड होऊन बसेल. जर तुम्ही आधीच गृहकर्ज घेतलं असेल तर तुम्हाला व्याजामध्ये सूट मिळणं शक्य नाही. तसंही कोणतीही बँक आपले व्याजदर कमी करण्यास तयार नसते. त्यामुळे कमी रकमेचे कर्ज काढणंच हितावह ठरणार आहे. अशावेळी विविध बँकांतील व्याजदराची (EMI) तुलना करून ज्या बँकेत कमी व्याजदर आहे तिथं तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे तुमचं कर्ज दुसऱ्या बँकेत देखील हस्तांतरित होऊ शकतं. मुख्य म्हणजे या दोन्ही प्रक्रियांमध्ये तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. ज्या बँकेतून तुम्ही कर्ज हलवणार आहेत त्यांची दंडाची रक्कम आणि ज्या बँकेत कर्ज हस्तांतरित करायचे आहे तेथील प्रक्रिया शुल्क देखील तुम्हाला भरावे लागेल. त्यामुळे सर्व गणिते तयार करून तुमची बचत कुठे होते हे पाहून पुढील प्रक्रिया करू शकता. अशावेळी तुम्हाला बँक व्याजदर(interest rate) कमी करून देण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे कमी कालावधीत हे कर्ज फेडण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. कमी व्याजदरामुळे तुमच्या बचतीमध्ये देखील मोठी वाढ होईल. उदाहरण म्हणजे, समजा तुम्ही 20 वर्षांसाठी 8.5 टक्के व्याजदरासह 70 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतलं तर तुम्हाला मासिक हफ्ता हा 60,748 रुपये असेल. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कालावधीत मुख्य रकमेसह एकूण 14,579,520 रुपये फेडावे लागणार आहेत. समजा, 4 वर्षांनंतर बँकेने तुमचा व्याजदर 7.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला, तर तुम्हाला 56,392 रुपये हफ्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच दरमहा सुमारे 4,356 रुपयांची बचत होईल. यामुळे या संपूर्ण कर्जाच्या रकमेत तुमची 10 लाख रुपयांची बचत होणार आहे. याच पद्धतीत तुम्ही महिन्याला 68,932 रुपयांचा हफ्ता फेडू शकलात तर तुम्हाला 12 वर्षच कर्ज फेडावं लागणार आहे. यामुळे दीर्घकालीन विचार करता कर्जाच्या रकमेत तुमची 22 लाख रुपयांची बचत होणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कर्जाच्या रकमेत फरतफेडीची मुदत मोठी आहे. यामध्ये या कालावधीत तुमचा कमाईचा आकडा देखील वाढणार आहे. त्यामुळे कर्जाच्या रकमेत वाढ होऊ न देण्यासाठी कर्जाच्या हफ्त्याच्या थोडी जास्त रक्क्म फेडत राहिल्यास तुम्हाला फायदा आणि बचत दोन्ही होणार आहे. यामुळे तुमच्या कर्जाच्या कालावधीत देखील कपात होऊन तुम्ही भविष्यकाळात दीर्घ बचत करू शकता. हप्त्यापेक्षा थोडी अधिक रक्कम भरण्यासाठी कदाचित तुम्हाला कमाईचा एखादा जादाचा मार्ग शोधावा लागू शकतो. अनेकदा कर्जाची रक्कम ही मोठी असल्याने तुम्ही मुद्दलापेक्षा अधिक व्याज भरता. वरील उदाहरणामध्ये आपण बघितल्याप्रमाणे 70 लाखांच्या कर्जासाठी आपण 14,579,520 रुपयांची परतफेड करणार आहोत. त्यामुळे 76 लाख रुपये आपण केवळ व्याजाच्या रूपात फेडणार आहोत. कर्जाची रक्कम लवकर फेडण्यासाठी तुम्ही 70 लाख रुपयांची एसआयपी(SIP) सुरु करू शकता. यामध्ये 0.10 टक्क्याने तुम्हाला 7 हजार रुपये मिळतील. 20 वर्षांमध्ये तुम्हाला 16.80 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानुसार तुम्हाला 1 कोटी 4 लाखांचा परतावा मिळणार आहे. त्यामुळे या हिशोबाने तुम्हाला 88 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्ही या रकमेतून बँकेचे व्याज वजा केलं तरीदेखील 12 लाख रुपये फायद्यामध्ये आहेत आणि बँकेचे व्याजदर कमी होण्यासाठी तुम्ही जास्त डाउनपेमेंट करून कमी कर्ज घेऊ शकता. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
तीन ते चार दिवस महक आयसीयूमध्ये होती. तिला ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. महक २ जानेवारी रोजी अचानक बेशुद्ध झाली होती. तिला छातीत दुखू लागलं होतं. श्वासही घेता येत नव्हता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हेही वाचा - Urfi Javed : हा कपडे न घातल्यासारखाच प्रकार. . . उर्फी- चित्रा वाघ यांच्या वादात काय म्हणाल्या दिपाली सय्यद? महक चहलने याबाबत बोलताना सांगितलं, की रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचं सिटी स्कॅन करण्यात आलं. यात तिच्या दोन्ही फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचं समजलं. ती अद्यापही रुग्णालयात असून तिला आयसीयूतून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल होऊन तिला ८ दिवस झाले असून आता तिच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होत आहे. मात्र तिला ऑक्सिजन वरखाली होत असल्याची समस्या अद्यापही आहे. आतापर्यंत अशाप्रकारे कधीही आजारी न पडल्याने अतिशय घाबरल्याचं तिने सांगितलं. बेशुद्ध अवस्था, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना अशा परिस्थितीत तिला नेमकं काय झालंय हे समजत नसल्याचंही तिने म्हटलं. अभिनेत्रीची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर आता तिच्या चाहत्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. |
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतफेर् शहर आणि परिसरात निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतफेर् शहर आणि परिसरात निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या संपर्कप्रमुख आणि प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेेत त्याबाबत माहिती दिली. त्याअंतर्गत पक्षाच्या कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, हडपसर, पर्वती, कँ टोन्मेंट, कसबा, खडकवासला विभागांतील कार्यर्कत्यांतफेर् त्या-त्या परिसरातील मंदिरांमध्ये येत्या २३ जानेवारीला स्वच्छता मोहीम, दीपोत्सव आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. पक्षाच्या कोथरूड विभागातफेर् प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष असून गुरुवारी, २० जानेवारीला या व्याख्यानमालेचे उद््घाटन होणार आहे. 'राष्ट्रजागर : पानिपतचा रणसंग्राम. . . राष्ट्रगीताची शताब्दी' हा या व्याख्यानमालेचा विषय असून, त्याअंतर्गत २० जानेवारीला ज्ञानेश पुरंदरे यांचे 'पानिपतचा रणासंग्राम' आणि २१ जानेवारीला मिलिंद सबनीस यांचे 'राष्ट्रगीताची शताब्दी' विषयावर व्याख्यान होणार आहे. कोथरूडमधील शिक्षकनगर सोसायटीच्या मैदानावर सायंकाळी ७. १५ वाजता ही व्याख्याने होणार आहेत. पक्षाच्या पिंपरी-चिंचवड आणि शिवाजीनगर विभागातफेर्ही निरनिराळ्या स्पर्धा आणि शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या वेळी गोऱ्हे यांनी दिली. पक्षाचे शहरप्रमुख नाना वाडेकर, महापालिका गटनेते श्याम देशपांडे या वेळी उपस्थित होते. |
जलवाहिनी दुरुस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागून मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. राजावाडी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईः मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. हे कर्मचारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करत होते. कुर्ला पूर्वेकडील सुमन नगर परिसरात महापालिकेच्या जलवाहिनीचे आज दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सात कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते. या कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागला. यातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. गणेश दत्तू उगळे (वय ४५) आणि अमोल काळे (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर नाना पुकाले (वय ४१), महेश जाधव (वय ४०), नरेश अंधगले (वय ४०), राकेश जाधव (वय ३९) आणि अनिल चव्हाण (वय ४३) अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टर दीपाली यांनी दिली. |
ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचं यश पचणी पडत नाही. तुमच्या बॉसने तुमचं कौतुक केलं तर काहींच्या पोटात जोरात दुखायला लागतं. अशात तुमच्या जर हे लक्षात आलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरतं. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता. बॉसने एखाद्याचं कौतुक केल्यास काहींना याचा त्रास होतो आणि त्यामुळे ते लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. काहींच्या अशा वागण्यामुळे ऑफिसमधील वातावरण बिघडतं. यामुळे होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही स्वतः एक टीम म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करा. कामासंबंधी बोलणं करा. त्यांना तुमचा सकारात्मकपणा दाखवा. काही दिवसांनी परिस्थिती बदलेल. जर आधीपासूनच काही लोक तुमच्यावर 'जळतात', तुमच्यावर राग धरून असतात तर अशावेळी परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला संयमाने काम करावं लागेल. आपल्या शब्दांवर कंट्रोल ठेवायला हवा. तुमचा एक चुकीचा शब्द तुमच्या विरोधात त्यांच्यासाठी शस्त्र ठरू शकतो. याने ऑफीसमध्ये तुमची इमेज बिघडण्यास कुणीच रोखू शकणार नाही. जर तुमच्या काही लोक 'जळत' असतील आणि यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर अशांसोबत तुम्ही केवळ कामापुरतं बोला. पण जर तुमचा सिनिअरच तुमच्यावर 'जळत' असेल तर इथे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अशावेळी काही गैरसमज असतील तर संवाद साधून ते दूर करावेत. तुमचं जर बॉसने भरभरून कौतुक केलं किंवा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक बोनस दिला किंवा प्रमोशन दिलं तर ही गोष्ट ओरडत कुणाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला जरी याने आनंद झाला असला तरी तुमच्या या वागण्याला काही लोक गर्व समजू शकतात. यामुळे काही लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात. ऑफीसमध्ये जर तुमच्या सहकाऱ्याची काम करण्याची पद्धत किंवा त्यांची एखादी कल्पना आवडली नाही तर तुमच्या डोक्यातील कल्पना त्यांच्यासमोर ठेवा. त्यांना काही सजेशन्स द्या. पण त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका. |
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील पाण्यावरून राजकारण तापले असून सोमवारी मनसे व भाजपने एकत्र येत कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाणीप्रश्न सुटत नसेल तर एक दिवस महापालिकेला टाळे ठोकणार, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला, तर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनीही सत्तेचा माज नसता तर पाणीप्रश्न पाच वर्षांपूर्वीच सुटला असता, अशी प्रशासनावर प्रखर टीका केली. २७ गावांसह महापालिका हद्दीतील पाणी प्रश्नावर सोमवारी मनसेच्या वतीने तहान मोर्चा काढण्यात आला. ज्याला भाजपनेही आपला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला. कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय मॉलपासून सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये मनसे आणि भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण पाहता, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेच्या युतीची नांदी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे. केडीएमसी मुख्यालयावर धडक दिल्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळ प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मुख्यालयात आले; परंतु या बैठकीला केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि एमआयडीसीचे मुख्य अधिकारी उपस्थित नव्हते. परिणामी मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी हजारो नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसी अधिकारी अजिबात गंभीर नसल्याचा घणाघात केला. |
लाल ताज्याकडे१५३ नाहीं ! स्टालिन मात्र प्रत्येक महत्वाच्या प्रसग लेनिनच्या पाठीशीं उभा असे. रशियात क्रातीचा स्फोट झाल्याबरोबर सील केलेल्या जर्मन आगगाडींतून लेनिन रशियात परत आला, हा महत्वाचा प्रसग दाखविणारे एक भव्य तैलचित्र या सग्रहालयात आहे. त्या चित्रातसुद्धा लेनिन डब्यातून स्टेशनात उतरतो आहे आणि त्याच्या मागोमाग स्टॅलिन उतरतो आहे असेच दाखविले आहे. ऑखलॉ कॉव्हच्या 'रिआलिस्टिक' थिएटरात सध्याकाळी आठ वाजता नुकताच दोनचार दिवसापूर्वी उत्तर ध्रुवावर ज्यानी लाल बावटा फडकवला, त्या सोव्हिएट वैमानिकापैकीं व्हॉडॉप्यानॉव्ह या वैमानिकाने लिहिलेल्या ' The Dream' या नाटकाचा प्रयोग पाहायला मला जायचे आहे. याच थिएटरात काल 'अयेल्लो' पहायला मी गेलो होतो बस चुकल्यामुळे थिएटरमध्ये पोचावयाला मला उशीर झाला. नाटक आठ वाजता सुरू झाले होते मी आठ वाजून दहा मिनिटानीं पोचलों. माझ्या खुर्चीचा नबर माझ्याकडे होता आणि माझी जागाहि 'रिझर्व्हड्' होती. पण रशियन थिएटरात उशीरा येणाऱ्या बाजीराव प्रेक्षकाचे लाड चालत नाहींत. उशीरा येणाराला पाय न वाजवता जपून वरच्या गॅलरींत जावे लागतें आणि अक सपून उजेड होईपर्यत तिथे उभे राहून नाटक पाहावे लागतें अक सपला की मधल्या वेळाखडात आपण आपल्या जागेवर जाऊन बसायचे. आजच्या प्रयोगाला तरुण रशियन स्त्री-पुरुषाची गर्दी तुफान आहे. त्याचा उत्साहहि अवर्णनीय आहे. आजच्या व्हॉडॉप्यानॉव्हच्या ' The Dream' च्या प्रयोगाला खरोखरच सर्व जगाच्या रगभूमीच्या इतिहासात एक प्रकारचे अद्वितीय महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्हॉडॉग्यानॉव्ह हा वैमानिक असून नाटककारहि आहे. नाटक इथे चालू आहे, या क्षणाला तो आपल्या इतर वैमानिक सोबत्यासह उत्तर ध्रुवावर छावणी टाकून बसला आहे. इतकेच नव्हे, तर हे स्वतःचे नाटक उत्तर ध्रुवावर बसून तो रोडओवर ऐकतो आहे ! सोव्हिएट सरकारच्या खास हुकुमाने आजचा प्रयोग उत्तर ध्रुवावर मुद्दाम या थिएटरातून 'ब्रॉडकास्ट' करण्यात येतो आहे. सोव्हिएटच्या वैमानिक वीरानीं उत्तर ध्छ्वावर लाल बावटा रोवण्याचा सर्व जगाला थक्क करून टाकणारा जो अपूर्व विजय मिळविला आहे, त्याच्या इथभूत आणि रसभरित वर्णनाशिवाय गेल्या दोनचार दिवसाच्या रशियन वृत्तपत्रात दुसरे काहीं नाहीं । साऱ्या राष्ट्राला अभिमान वाटावा असेच हे अचाट कृत्य आहे याबद्दल मुळींच शका नाहीं. हें अचाट कृत्य करणाऱ्या एका वीराने लिहिलेले नाटक आज आम्ही पाहात आहोत. या नाटकातले प्रत्येक दृश्य पाहून रशियन प्रेक्षकाचे अतःकरण का थरारून येऊ नये ? खरोखर सर्वच काहीं' स्वप्न ' आहे ' या नाटकाचा नायक एक वैमानिकच आहे. त्याच्या जीवनाचे स्वप्न उत्तर ध्छ्वावर लाल बावटा लावावा असे आहे. व्हॉडॉग्यानॉव्हने प्रत्यक्ष उत्तर ध्रुवावर जाण्यापूर्वी कितीतरी दिवस आधीं हे नाटक लिहिले आहे. आणि कमालीचा योगायोग असा, कीं त्या नायकाच्या स्वप्नसृष्टीची या क्षणाला खरोखरच सत्यसृष्टि झाली आहे. शेवटच्या अकात नाटकाचा नायक उत्तर ध्रुवावर बर्फाच्या राशीत लाल बावटा रोवतो, आणि खरोखरच कालपरवापासून उत्तर ध्रुवावरल्या शुभ्र हिमराशीवर सोव्हिएट रशियाचा लाल बावटा फडकतो आहे ! नाटक आणि जीवन याच्यातले प्रसग जगाच्या इतिहासात इतक्या समातर रेषेत क्वचितच घडले असतील. कोण म्हणेल व्हॉडॉग्यानॉव्हच्या 'The Dream' चा हो प्रयोग अद्वितीय नाहीं म्हणून ! काल इथेच अथेल्लोचा प्रयोग झाला, तेव्हा स्टेजवर जिकडेतिकडे काळे पडदे दिसत होते आज जिकडेतिकडे आकाशी रगाचे निळे पडदे दिसत आहेत. बरोबरच आहे, कारण आकाशात सचार करणाऱ्या वैमानिकाच्या जीवनासबधींच आजचे नाटक आहे. नाटकाच्या एकदर वातावरणाला उठाव देण्याकरिताच की काय, रगभूमीची जी दर्शनी चौकट असते, तिच्या वरच्या बाजूला बरोबर मध्यभाग एका विमानाचा पुढचा भाग, त्यातून हळुहळु फिरणारा पखा, आणि विमानाचे दोन बाजूचे दोन पख कायमचे बसवून टाकले आहेत. नटाच्या भाषणाना अडथळा न होईल इतक्या बेताने विमानाच्या एजिनाचा 'घर्रर्रर्र' आवाज नाटक चालू असता थिएटरात सारखा ऐकू येत होता. नाट्यविषयाशीं प्रेक्षकाचें तादात्म्य करण्याकरिता ऑख्लॉपकॉव्ह ज्या एक एक युक्त्या योजतो, त्या खरोखरच और आहेत । लाल ताज्याकडे१५५ जोराची हिमवृष्टि होत आहे आणि गुडघ्याइतके खोल बर्फ तुडवीत नायक आणि त्याचे सोबती हातात लाल बावटा घेऊन मोठ्या कष्टानें एकएक पाऊल पुढे टाकीत आहेत, असा देखावा शेवटच्या अकात आहे. या वेळीं रगभूमीवर जोराची हिमवृष्टि होत होतीच, पण थिएटरमधल्या अधारात बसलेल्या आम्हा प्रेक्षकावरहि अविरत हिम पडत होतें ! आजूबाजूच्या प्रेक्षकाच्या अंगावर सफेत काहींतरी पडते आहे म्हणून मीं माझ्या कोटाकडे पाहिले, तो माझ्याहि कोटावर पाढरेपाढरे काहींतरी सारखे पडत होते ! मात्र ते झाडून टाकण्याची काहींच आवश्यकता नव्हती. तें मायावी हिम होते ! अदृश्य सिनेमायत्राच्या सहाय्याने सान्या थिएटरभर हे निरुपद्रवी हिम पाडण्यात येत होते । नाटक साडेदहा वाजता सपले. वाटेत हॉटेल मेट्रोपोलमध्ये जेवण घेऊन मी माझ्या हॉटेलात परत आलों. ता. ९ जून - कामगारांनो, हा कारखाना तुमचा आहे ! - आइस्क्रीम पॉवडर ! - Intervention' नाटक सकाळी साडेदहा वाजता ' Fresser' नावाचा कारखाना पाहावयाला निघालो. फ्रेस्सर म्हणजे अत्यत कठीण धातु कापण्याकरिता जीं हत्यारे लागतात ती तयार करण्याचा कारखाना हा कारखाना शहरापासून बराच दूर आहे. आम्ही ११-१५ च्या सुमारास कारखान्यापाशी पोचलो. हा कारखाना १९३२ साली बाधण्यात आला. कारखान्यात एकदर पाच हजार कामगार असून त्यापैकी निम्म्याहून अधिक स्त्रिया आहेत. स्त्रियाचा पगार पुरुषाइतकाच आहे. कारखाना पाहावयाला आत शिरण्यापूर्वी आम्ही एका प्रशस्त बागेतून जात होतों. पलीकडे लाल विटाची सुदर टुमदार घरे दिसत होतीं. ही या कारखान्यातल्या कामगाराचीं राहण्याची घरे होत. ही घरे पाहाताना आमच्या मुबईच्या कामगाराकरिता बाधलेल्या सिमिटाच्या चाळींची धुक्यांतून लाल तान्याकडे ! मला आठवण झाली । कामगाराच्या मुलाकरिता ' किडर गार्टन' शाळा वगैरे सर्व काही व्यवस्था चोख आहे. कामगाराना दोनशेपासून पधराशे रूबल्सपर्यत पगार आहेत. अर्थात् पधराशे रूबल्सइतका लठ्ठ पगार फक्त 'स्टाखानोव्हाइट' कामगाराना मिळतो. 'स्टाखानोव्हाइट' म्हणजे जो उत्पादन वाढवण्याची एखादी नवीन पद्धत शोधून काढतो किवा उत्पादनाचे प्रमाण तेवढ्याच वेळात कितीतरी पटीने वाढवून दाखवतो तो कामगार. 'स्टाखानॉव्ह' नावाच्या एका कामगाराने ही चळवळ सुरू केली, म्हणून अशा कामगाराना ' स्टाखानोव्हाइट' म्हणतात. लेनिनग्राडमधल्या छापखान्यात सर्वसाधारण कामगार सहा तासात ६०,००० अक्षरे लिनोटाईप मशिनवर कपोज करू शकतो, पण त्याच मशीनवर 'स्टाखानोव्हाइट' कामगार सहा तासात १३०,००० अक्षरे कपोज करतात. रशियात प्रत्येक कामगार 'स्टाखानोव्हाइट' होण्याकरिता धडपडत असती 'फ्रेस्सर' मधल्या कामगाराना सहा दिवसातून एक दिवस भरपगारी रजा मिळते त्याचप्रमाणे वर्षातून एक महिना अशीच रजा मिळते. त्या रजेत कामगार व्होल्गा नदीवर किंवा काळ्या समुद्राच्या काठी कामगारासाठी सोव्हिएट सरकारने खास बाधलेल्या 'सॅनेटोरियम 'मध्ये विश्रातीकरिता जातात. कारखान्यात एक ' प्रपोजल कमिशन' आहे एखाद्या कामगाराला उत्पादन वाढवण्याची काहीं नवी युक्ति सुचली तर त्याने ती या कमिशनपुढे माडावयाची. आम्ही पहिल्यादा भट्टीखान्यात शिरलो. तिथे एका रागेने कितीतरी अजस्र भट्टया धगधगत होत्या आणि त्यातून लालपिवळ्या अग्निज्वाला भडकत होत्या. या खात्यातसुद्धा कितीतरी बायका काम करीत होत्या. आत उष्णता इतकी होती, की मला दोन मिनिटेसुद्धा उभे राहावेना । या खात्यात काम करणाऱ्या कामगाराना दिवसातून फक्त सहाच तास काम असते. कारखान्यातल्या भितीवर काहीं ठिकाणीं हातीं लिहिलेलीं वर्तमानपत्रे लावलेली होती. याना 'वॉल न्यूजपेपर्स' म्हणतात. ' कामगारानो । हा कारखाना तुमचा आहे. सोशालिस्ट उद्योगधंद्याची काळजी घेणे आणि त्याचे सरक्षण करणे हे तुमच्या हातीं आहे-' इत्यादि ध्येयवाक्यें लिहिलेले लाल फडके जिकडे तिकडे टागलेले दिसत होतें. लाल ताऱ्याकडे - दुपारी दीड वाजता कारखाना पाहून आम्ही परत आलो. जेवल्यानंतर सहज आजचा 'मॉस्को डेली न्यूज' मी चाळीत बसलों होतो. * सोशालिस्ट राष्ट्रातली वृत्तपत्रे इतर राष्ट्रातल्या वृत्तपत्रापेक्षा किती वेगळी असतात ! जाहिरात एकहि दिसत नाही. आमच्या वर्तमानपत्रात कुणी कुणाचा खून केला आणि कुणी कुणाची बायको पळवली या मह त्वाच्या बातम्या । तेच आजच्या ' मॉस्को डेली न्यूज'कडे पहा. आजचा नुसता 'मॉस्को डेली न्यूज' पाहिला तरी रशियन राष्ट्राच्या नसानसातून नवचैतन्य कसे उसळते आहे याचे प्रत्यतर येते. कालआजच्या रशियन पत्रातली मुख्य बातमी म्हणजे रशियन वैमानिकानीं उत्तर ध्रुवावर मिळविलेला अपूर्व विजय आणि त्यानी तिथे केलेले पराक्रम इतर बातम्याहि मासलेवाईक आहेत. एका सोव्हिएट गणितज्ञाला रशियन सरकारने दहा हजार रूबल्स बक्षीस दिले. गेली कित्येक शतके जगातल्या प्रख्यात गणितशास्त्रज्ञाना भडावून सोडणारा एक प्रश्न त्याने सोडवला म्हणे. एका रशियन शास्त्रज्ञाने आइस्क्रीमची पॉवडर तयार केली आहे. खिशातून पॉवडर घ्यावी आणि आइस्क्रीम खावेसे वाटले की अर्धा कप पाण्यात थोडी पॉवडर टाकावी की झाले आइस्क्रीम तयार । ओडेसा येथील डॉ. फिलॉटॉव्ह यानी नुक्त्याच मेलेल्या माणसाच्या डोळ्याचे नस ( tissues ) आधळ्या माणसाच्या डोळ्यात बसवून त्याला दृष्टि आणण्याचे ऑपरेशन यशस्वी केले । या आणि अशा आजच्या 'मॉस्को न्यूज' मधल्या कितीतरी बातम्या राष्ट्राच्या सर्वागीण प्रगतीवर प्रकाश पाडतात. 'प्रवदा ' च्या आजच्या अकात कामगाराना इषारा देण्यात आला आहे, की 'कामगारानो, स्वतःच्या राष्ट्राची बढाई सागण्याकरिता म्हणून शस्त्रास्त्राच्या किवा इतर कारखान्यातली महत्वाची रहस्ये तुम्ही वाटेल त्याच्याजवळ बोलून जाता, पण परराष्ट्रातील हेराचे जाळे सोव्हिएट रशियात पसरले आहे हे लक्षात ठेवा. मोठ्या सद्धेतूने आत्मप्रौढी मिरवायला जाल, पण आपल्या राष्ट्राचा घात कराल ।' सध्याकाळी सात वाजता वाख्तागॉव्ह थिएटरमध्ये सुप्रसिद्ध 'रोजस्यूर' सिमॉनॉव्ह याने बसवलेले स्लाव्हिनचे ' Intervention ' हे नाटक पाहा१५८ वयाला गेलों. क्रान्तीनंतर रशियात यादवी चालू असता स्वतःला 'राष्ट्रीय' समजणाया रशियातल्या बोल्शेव्हिकविरोधी भाडवलदार वर्गाने परराष्ट्राना आपल्या राष्ट्राचे लचके तोडावयाला कसे बोलावले ते या नाटकात दाखविले आहे. साम्राज्यवादी फ्रेच किवा इग्रज लोकाचे दास्यत्व पत्करले, पण रशियन बोल्शेव्हिकाचे राज्य नको असे या 'राष्ट्रियाचे' मत होते । पहिल्याच देखाव्यात ओडेसा बदर फ्रेच सैन्याने घेतले आहे आणि बदरात जिकडेतिकडे लाल, पाटया, निळ्या रगाचे फ्रेच झेंडे फडकत आहेत, असे दाखविले होते. बदराचा देखावा कमालीचा हुबेहूब होता. दूर काळोखात लाल, हिरवे- बोटींच्या डोलकाठ्यावरचे दिवे लुकलुकत आहेत. बदरात नागर टाकून उभ्या असलेल्या दोन आगबोटीचे भाग दिसत आहेत. धक्क्यावर पेट्या, दोरखड वगैरे सामान पडले आहे. फ्रेच सोजिराशी रशियन अमीर- उमरावाच्या पोरी प्रणयचेष्टा करताहेत. फार काय, सर्वसन्यास घेतलेल्या रशियन भिक्षुणी ( Nuns ) सुद्धा धर्मलड बोल्शेव्हिकाच्या तावडीतून सोडवण्याकरिता हे फ्रेच उद्धारकर्ते आले, म्हणून फ्रेच सोजिराच्या गळ्यात गळा घालताहेत । फ्रेच सैनिकात अली नावाचा एक काळा सेनेगालीज सोजीर दाखवला होता. तो शेवटी बोल्शेव्हिकाना मिळतो, पण नाटकातले बोल्शेव्हिक शिपाई त्याला ' Choro1' 'Chorni' ( म्हणजे रशियन भाषेत 'काळा अदमी ) म्हणून चिडवीत होते ते मला आवडले नाही. त्याचप्रमाणे एके ठिकाणी ' To them even Negro soldiers are preferable to Bolsheviks ' हे एका बोल्शेव्हिकाच्या तोडचे वाक्यहि मला कसेसेच वाटले. कदाचित् मी 'काळा आदमी' आहे म्हणून मला तसे वाटले असेल. पण बोल्शेव्हिक नाटककाराने अप्रत्यक्ष रीतीने का होईना, पण काळ्या लोकाविषयी अशी अनुदार वृत्ति प्रदर्शित करू नये असे मला वाटते. नाटक सपल्यावर रात्रीं अकरा वाजता मी हॉटेलात परत आलो. |
केंद्र सरकारमधील ग्रामीण विकास मंत्री आणि मध्य प्रदेशातील मंडला येथील खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मक्याच्या कणसाची किंमत 15 रुपये आहे हे ऐकून ते आश्चर्यचकित होतात आणि त्या विक्रेत्याकडे फ्रीमध्ये दे अशी मागणी करतात. त्यांचा हा व्हिडीओ काँग्रेस नेत्यांनीही शेअर करत महागाई आणि जीएसटीवरुन निशाणा साधला आहे. (inflation gst faggan singh kulaste 15 rupees corn video viral) मंत्री कुलस्ते यांनी गुरुवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी, "आज सिवनीहून मंडला जात आहे. मक्याच्या कणसाचा आस्वाद घ्या. आपण सर्वांनी आपल्या स्थानिक शेतकरी आणि लहान दुकानदारांकडून खाद्यपदार्थ खरेदी केले पाहिजेत. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळेल आणि भेसळविरहित वस्तू मिळतील. " असे म्हटले आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मंत्री रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीच्या दुकानासमोर थांबतात आणि मक्याचे कणीस देण्यास सांगतात. विक्रेता ताबडतोब कणीस भाजतो आणि लिंबू मसाला लावतो. दरम्यान, पर्स काढताना मंत्र्याने किंमत विचारली असता आश्चर्य व्यक्त केले जाते. 15 रुपयांची कणीस! आश्चर्यकारकपणे किमतीची पुनरावृत्ती करत मंत्री फग्गन सिंग इथे हे फुकट मिळेल असे म्हणतात. मग त्याला प्रतिकिलो भाव विचारतो, तर दुकानदार सांगतो की डझनाने मिळतो. मंत्र्याला आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी विक्रेता गाडी पाहून जास्त किंमत मागितली नसल्याचे म्हणतो. दोघांच्या संवादाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना नेटकऱ्यांनी मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना ट्रोल केले आहे. तर काहींनी जीएसटीवरुन टोलेबाजी केली आहे. एका युजरने "मंत्री महोदय, तुम्हाला 15 रुपयांचा कणीस महाग दिसत आहे. त्यावर जीएसटी आल्यावर विचार करा, मग चक्कर येईल. ' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने,"मंत्र्यांना मैदा आणि मिठाची किंमतच माहीत नव्हती. आज महागाईचा सामना करताच पायाखालची जमीन सरकली. गरीब फेरीवाले, हातगाडीवाले यांच्याकडून हे सौदे नेहमीच केले जातात. " असे कमेंट्स बॉक्समध्ये म्हटले आहे. |
मुंबई-कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी अकरा वाजता भेट घेतली. यावेळी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई करुन जनतेला विश्वास द्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आरोपींच्या अटकेशिवाय शांतता शक्य नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यात सरकारने सुरु केलेली दलित तरुणांची धरपकड थांबवावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आणि हि विनंती त्वरित मुख्यमंत्री यांनी मान्य केली आहे . आंबेडकर म्हणाले, बंद पुकारुन आम्ही दलित समाजाचा राग कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करुन सरकारने समाजाला विश्वास द्यावा. बंददरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांची क्लिप जर पोलिसांकडे असेल तर त्यांनी ती आम्हाला सादर करावी या यादीतील लोकांना आम्ही हजर करु मात्र, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन थांबावावे, त्याशिवाय आंदोलन नियंत्रणात राहणार नाही, असे ते म्हणाले. या बैठकीत आमच्या मागण्या मान्य झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात येईल तसेच आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. भिडे आणि एकबोटे यांना अटक होते की नाही हे आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. |
कोरोनाने बाबा गेले, मेरे पास सिर्फ माँ है. . कोल्हापूर : वडील खासगी नोकरीत होते, आई गृहिणी. वडिलांनी आम्हाला खूप लाडात वाढवलं. आईला कधी काम करू दिलं नाही, म्हणायचे तू घर मुलांचं सगळं सांभाळ आता वडिलांचं कोरोनाने निधन झालं. संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला. . . आता त्यांना आईचाच आधार, दुसरीकडे त्या माऊलीला मुलांचा सांभाळ कसा करायचा. आर्थिक आणि मानसिक आधार बनून हा गाडा कसा हाकायचा याची चिंता लागली आहे. वडिलांचे प्रेम, धाक आणि मायेला ही मुलं आता पारखी झाली आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वयोवृद्धांना मोठा होता आता दुसऱ्या लाटेने मात्र मध्यमवयीन लोकांना वेढले आहे. अगदी ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांचे या काळात मृत्यू होत आहेत. यामुळे अनेकांचे संसार अर्ध्यावरच मोडले आहेत. या वयातील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने पत्नी, लहान मुलं, आई-वडील असं कुटुंबच रस्त्यावर आले आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय, शेती कामातून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या वडिलांचे निधन झाल्याने अगदी दोन-चार महिन्यांच्या बालकांपर्यंत १५ ते १६ वर्षांपर्यंतची मुलं वडिलांच्या मायेला पारखी झाली आहेत. अचानक झालेल्या या आघाताने आई खचली आहे. तर आपल्याला आयुष्यभर वडिलांशिवाय जगावं लागणार या विचाराने मुलं सैरभैर झाली आहेत, त्यांच्या मनात विचारांचे काहूर दाटले आहे, दुसरीकडे आईला पतीच्या निधनाचे दुःख उराशी घेवून आता घर कसं चालवायचं, पुढे काय करायचं याची विवंचना आहे. वडील खासगी नोकरीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि त्यांच्यापाठोपाठ आजोबादेखील कोरोनाने गेले. आता घरात मी आणि आई आहोत. वडिलांनी घरासाठी थोडं कर्ज घेतलं होतं, घराचं काम पण पूर्ण झालं नाही. या काळात शेजारी, नातेवाईकांनी साथ दिली पण आता घर चालवण्यासाठी आई नोकरी शोधत आहे, मी पण कुठेतरी लहान मोठा कामधंदा शोधावा म्हणतोय, पण शिक्षण पूर्ण व्हायचं आहे आणि माझं वयही कमी आहे. बाबा आणि आजी एकाचवेळी दवाखान्यात एडमिट झाले. वडील डॉक्टर होते तरी त्यांना कोरोनाने हिरावून नेले. दुसऱ्याच दिवशी या धसक्याने आजी गेली. मी आणि भाऊ जुळे आहोत. ११ वर्षांचे. आई अंगणवाडीसेविका म्हणून काम करते. घरातल्या दोन जवळच्या माणसांचे निधन झाले पण कोण मदतीला आले नाही. आमचं भरलेलं घर आता रिकामं झालंय. घर खायला उठतंय, आईसारखी रडत असते. तिला कसा धीर कसा द्यायचा हे कळत नाही. पती एमआयडीसीत कामाला होते. सर्दी खोकल्याचं निमित्त झालं. त्यांना एडमिट केलं पाठोपाठ सासऱ्यांनाही त्रास सुरू झाला. शेती नाही, घर तेवढं स्वतःचे आहे. पदरात तीन वर्षांची मुलगी आणि ६ महिन्यांचा मुलगा आहे. ते जाऊन आज अकरा दिवस झाले पण अजून ते या जगात नाहीत हे पटेना, आता काय करायचं सगळा अंधारच दिसतोय. त्यांच्याशिवाय मी आणि मुलांनी कसं जगायचं. बाप म्हणजे काय हे कळायच्या आधीच माझी मुलं निराधार झाली. कोरोनाने एका पालकाचे निधन झाले अशी १७५ बालके आहेत, मलकापूर येथील एका कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांचेही निधन झाल्याने लहान मुलगा आणि मुलगी आई-वडिलांच्या प्रेमाला मुकले आहेत. या भावंडांची जबाबदारी त्यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. |
मालिकेत सध्या दाखवण्यात येत असलेल्या कथेनुसार, राज आणि वैदेहीच्या लग्नाच्या दिवशी कावेरीला खरं माहीत पडल्याने ती त्यांचं लग्न थांबवते. त्यानंतर कावेरी स्वतःच्या प्रेमाची कबुली देते. राज आणि रत्नमाला कावेरीला मागणी घालण्यासाठी गुहागरला जातात. मात्र तिचे तात्या राज आणि कावेरीच्या लग्नाला नकार देतात. यापुढे तात्या लग्नासाठी राजसमोर एक अट ठेवतात ती म्हणजे त्याने आईची सर्व संपत्ती सोडून गावाला राहायला यावं आणि स्वकमाईवर जगून दाखवावं. राजही ही अट मान्य करतो आणि गावातच राहायचं ठरवतो. आता राज तिथेच राहून आपल्या प्रेमाची परीक्षा देणार आहे. ही संपूर्ण कथा सलमानच्या 'मैंने प्यार किया' चित्रपटातील आहे. त्यामुळे प्रेक्षक लेखकाला काहीतरी नवीन लिहिण्याचा सल्ला देतायत. एका युझरने लिहिलं, 'अरे काहीतरी नवीन लिहा रे' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'काय हे याशिवाय दुसरं काही सुचत नाही का' आणखी एका युझरने लिहिलं, 'अरे रमय्या वास्तमैया' ची कथा चोरली आहे लेखकाने. प्रेक्षकांना काय समजता. काही दुसरं नवीन लिहा. ' या सहज असलेल्या कथानकामुळे मालिका आता ट्रोल होतेय. |
मुंबई । आला...रे. . गोविंदा. . आला गोपाळकाला म्हटले की संपुर्ण देशाचे लक्ष लागते ते मुंबईच्या दहीहंहीकडे आज गोपाळकाला हा सण मुंबईकरांसाठी खास मानला जातो. गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात. यंदा शासनाने प्रो-दहीहंडीला मान्यता दिली आहे. सालाबादप्रमाणे यंदा दादर येथील आयडियल, दादर स्टेशनजवळील आणि नक्षत्र मोलसमोरील दहीहंडी ही खास असते. या दहीदंडी फोडण्यासाठी येथे गोविंदा पथक देखील दाखल झाले आहेत. (छायाचित्र - गौरी टिळेकर ) यंदा आयडियलची इकोफ्रेंडली दहीदंडी असून श्री साई दत्त मित्र मंडळ आणि आयडियल यांच्या संयुक्तविद्यामाने, दादर स्टेशनजवळील दहीहंडी ही भाजपचे माहिम-वडाळा विधानसभा वॉर्ड - १९२ वॉर्डचे अध्यक्ष मनोड शाहा आणि माहिम विधानसभाचे अध्यक्ष विलास आंबेकर यांनी आयजित केली. तर नक्षत्र मोलसमोरील दहीहंडी ही शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश बबन पाटनकर यांनी आयोजित केली आहे. दादर येथील दहीदंही फोडण्यासाठी मुंबईतील ठिकठिकानाहून गोविंदा पथक येथे येता. हळूहळू दहीहंडीचा उत्साह संपुर्ण मुंबईत पाहायला मिळणार आहे. |
अमेरीकेत डेमोक्रॅटिक पक्षाची सर्वंकष सत्ता. कोरोनाच्या केसेसमध्ये भारतात निरंतर घट - प्रो. शमिका रवी. मारिकोचा भाव शेअर बाजारात ५२ आठवड्यात सर्वात जास्त. ब्युटी स्टार्टअप नायका २०२१ मध्ये आयपीओ काढणार. पाकिस्तानमध्ये कोर्टाचा पुरोगामी निर्णय. तेलगी प्रकरणात भुजबळांचा नेमका राग काय? |
अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. |
अखेर २००० नंतरच्या झोपड्यांचा पाणीपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला असून यापुढे जुन्यांसह नवीन झोपड्यांमधील मागेल त्याला पाणी पुरवठा होणार आहे. मुंबई- मागील दोन वर्षापासून २००० नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव फेटाळत गरिबांच्या तोंडचे पाणी पळवणा-या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने मागील जूनमध्ये अखेर या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र, शिवसेना-भाजपाने तब्बल पाच महिने हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकून ठेवत आता महापालिका निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना सोमवारी याला मंजुरी दिली. त्यामुळे अखेर २०००नंतरच्या झोपड्यांचा पाणीपुरवठय़ाचा मार्ग सुकर झाला असून यापुढे जुन्यांसह नवीन झोपड्यांमधील मागेल त्याला पाणी पुरवठा होणार आहे. मात्र, रस्ते, पदपथ,खासगी जमिनी, गावठाणातील झोपड्यांना मात्र याचा लाभ मिळणार नसून ती कुटुंबे मात्र तहानलेलीच राहणार आहेत. मुंबईत १ जानेवारी २०००नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी पाणी हक्क समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर न्या. ए. एस. ओक आणि ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने डिसेंबर २०१४ मध्ये अंतरिम आदेश देत अनधिकृत झोपड्या हटविण्याबरोबरच त्या अस्तित्वात असेपर्यंत त्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे म्हटले होते. महापालिका प्रशासनाने २०००नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी धोरण बनवून हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणला. तेव्हा दोन वेळा सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने तो फेटाळला. हा प्रस्ताव जून २०१२मध्ये स्थायी समितीत मंजूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी सभागृहापुढे ठेवला होता. परंतु तेव्हापासून हा प्रस्ताव शिवसेना-भाजपाने बासनात गुंडाळून ठेवला. त्यामुळे या नोव्हेंबर महिन्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर हा विषय घेण्यात आला होता. या विषय सोमवारी महापालिका सभागृहात कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आला. प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावात उपसूचनेद्वारे बदल करण्याची मागणी स्थायी समितीत काँग्रेस आणि सपाने केली होती. परंतु त्या उपसूचना वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे महापालिका सभागृहातही या उपसूचनांचा विचार न करता मूळ प्रस्तावच मंजूर केल्यामुळे या झोपड्यांना हजार लिटरसाठी ४. ६६ रुपये दराने पाण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे रस्ते, पदपथ, खासगी जागा, कोळीवाड्याचा परिसर आणि गावठाण आदी भागातील २०००नंतरच्या झोपड्यांमधील कुटुंबांना पाणी मिळणार नाही. २०००नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी २०१५मध्ये आला होता. तो शिवसेना, भाजपा आणि मनसेने बहुमतावर फेटाळला. त्यानंतर सप्टेंबर २०१५मध्येही हा प्रस्ताव आल्यानंतर याचीच पुनरावृत्ती झाली. त्यानंतर मे २०१६ मध्ये हा प्रस्ताव आल्यानंतर जूनमध्ये मंजूर करण्यात आला होता. पण फेब्रुवारी २०१५मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर याचा लाभ गरिबांना आतापर्यंत झाला असता. दोन वेळा हा प्रस्ताव फेटाळून सुमारे दोन वर्षापासून हक्काच्या पाण्यापासून जनतेला तंगवले गेले. |
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याच्या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याच गुन्ह्यात चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मविप्र संस्थेतील वादाच्या प्रकरणात अॅड. विजय पाटील यांचे अपहरण करुन त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे येथील कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिसांच्या पथकाने निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी संशयितांनी भोईटे यांच्या घरात अनिधिकृतपणे प्रवेश करीत दस्तऐवज दाखल करायचे आणि पोलीसांच्या छाप्यात हस्तगत झाले असे दाखवायचे. तसेच त्यांच्या घरात सूरा ठेवून असा कट रचून वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती दिली होती. तसेच निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी दि. ७ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती. भोईटे यांच्या या तक्रारीवरुन अॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली आहे. अर्थात, या प्रकरणात अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रविवारी चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या असलेल्या गुन्ह्यात प्रवीण चव्हाण हे चाळीसगाव येथे आले असता शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव येथून चव्हाण यांना जळगाव शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे. चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, भूषण पाटील, निलेश पाटील, विनोद खैरनार, ज्ञानेश्वर गीते, रविंद्र बच्छे यांच्या पथकाने प्रवीण चव्हाण यांना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. चव्हाण यांची बंदद्वार चौकशी करण्यात येत आहे. |
मुंबई : टीआरपी घोटाळा उघडकीला आल्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे वाद निर्माण झाला आहे. एआरजी आऊटलायरने सिंग यांनी आपल्याला या प्रकरणात अडकविण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना सिंह यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. संवेदनशील प्रकरणात पत्रकार परिषद घेणे ही प्रक्रिया व प्रथा आहे, असे सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. वृत्तवाहिनी व त्यांच्या कार्यकरिणीला टीआरपी घोटाळ्यात गोवण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आल्याचा 'एआरजी'चा आरोप सिंह यांनी फेटाळला. संवेदनशील प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना कोणतीही गोपनीय माहिती न देता त्यांना योग्य माहिती देणे योग्य ठरते, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सिंह यांनी उच्च न्यायालयाने अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येसंदर्भातील वृत्त प्रसिद्ध न करण्याचे निर्देश प्रसारमाध्यमांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर दिलेल्या निकालाचा हवालाही प्रतिज्ञापत्रात दिला. उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, मुंबई पोलीस किंवा अन्य तपास यंत्रणांनी संवेदनशील प्रकरणांत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार करावा. या घोटाळ्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर तपास केला. प्राथमिक चौकशीअंती आणि 'बार्क'ने सादर केलेल्या विश्लेषक अहवालानंतर तीन वृत्त वाहिन्यांविरोधात पुरावे सापडले. त्यात रिपब्लिक टीव्हीचाही समावेश आहे, असेही सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत एआरजी आऊटलायर कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन न्यायालयाला दिले. दरम्यान, न्यायालयाने 'एआरजी'ला ९ फेब्रुवारीपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले. |
बेलापूर येथे गुरुवारी सकाळी ग्रामस्थांची बैठक पार पडली. शनिवारच्या बंदबरोबरच हिरण यांच्याबाबत ठोस माहिती देणा-यास १ लाख रुपयांचे बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, जि. प. सदस्य शरद नवले, पं. स. सदस्य अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भरत साळुंके, सुनील मुथ्था, रवींद्र खटोड, अशोक गवते, अजय डाकले, अशोक पवार, प्रफुल्ल डावरे, प्रशांत लढ्ढा, शांतीलाल हिरण, रमेश अमोलिक, रत्नेश गुलदगड, गणेश फुलभाटी, भास्करराव खंडागळे, देवीदास देसाई, रणजित श्रीगोड आदी उपस्थित होते. या अपहरणाबाबत पोलिसांना चुकीची माहिती देऊ नये. त्यामुळे तपास भरकटतो तसेच वेळ खर्ची होतो. तपासाची दिशा त्यामुळे भरकटण्याची भीती असते. अचूक व ठोस माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रविवारनंतर आंदोलनाचे वेगळी रूपरेषा ठरविली जाणार आहे. दरम्यान, श्रीरामपूर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मारुती बिंगले यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. हिरण यांच्या अपहरण प्रकरणी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. असा अनुचित प्रकार यापुढे होऊ नये यासाठी पोलिसांनी कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात. अन्यथा भाजपच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा कार्यकारिणी सदस्या अनिता शर्मा, मिलिंदकुमार साळवे, अरुण धर्माधिकारी, अजित बाबेल, बंडूकुमार शिंदे, आनंद बुधेकर, रूपेश हरकल, अमित मुथ्था, श्रेयस झिरंगे, डॉ. ललित सावज, रवी पंडित, उज्ज्वल कुमार डाकले, इंजि. चंद्रकांत परदेशी आदींच्या सह्या आहेत. |
अत्यंत संकुचित विचारसरणीचे काही पंथ, तर अतिशय उदार विचारसरणीचा हिंदु धर्म ! 'काही पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथाच्या धर्मग्रंथावर कोणतेही भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ('एखाद्या धर्मग्रंथावर भाष्य करणे वा लिहिणे', म्हणजे त्या धर्मग्रंथाचा आपल्या परीने अन्वयार्थ काढून त्या धर्मग्रंथातील ज्ञानाचे विश्लेषण करणे होय. या विश्लेषणामध्ये मूळ धर्मग्रंथात सांगितलेल्या ज्ञानापेक्षा वेगळा विचारही मांडलेला असू शकतो. ) त्या पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथियांनी केवळ त्या धर्मग्रंथात दिलेल्या ज्ञानालाच प्रमाण मानून त्यानुसार आचरण करावे. जर कोणी धर्मग्रंथावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पंथबाह्य केले जाते. याउलट सहस्रो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या हिंदूंच्या धर्मग्रंथांवर आज कोणीही भाष्य करू शकतो, उदा. 'भगवद्गीता' या धर्मग्रंथावर लोकमान्य टिळकांनी लिहिलेले 'गीतारहस्य' हे भाष्य. अनेक जण एखाद्या ग्रंथावर अशी वेगवेगळी भाष्ये लिहू शकतात. थोडक्यात हिंदु धर्मात प्रत्येकाला अगदी धर्मग्रंथांवरही स्वतःची मते, भाष्य आदी प्रतिपादन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. 'ब्रह्मांडामध्ये अनंत ज्ञान आहे. काळानुसार आणि आवश्यकतेनुसार ते ज्ञान विविध माध्यमांतून मानवाकरता पृथ्वीतलावर अवतरित होते', असे हिंदु धर्म मानतो. ज्ञान अनंत असल्यामुळेच अनंत काळ ते ग्रहण करण्याची प्रक्रियाही चालू रहाते. सध्या सनातनच्या काही साधकांना ब्रह्मांडात असलेले नाविन्यपूर्ण अध्यात्मशास्त्रीय ज्ञान विविध विषयांवर मिळत आहे आणि पुढेही मिळत राहील. धर्मज्ञानाच्या संदर्भातील इतकी उदार विचारसरणी हिंदु धर्म सोडून अन्य कोणत्या पंथात आहे का ? यासाठीच 'सर्वधर्मसमभाव' ही किती पोकळ वल्गना आहे', यावर राजकीय नेते अंतर्मुख होऊन विचार करतील का ? ' - (पू. ) श्री. संदीप आळशी (१६. ११. २०१८) |
चेस्टर-ले-स्ट्रीट, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेला साजेशी सुरूवात करता आली नाही. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कागिसो रबाडाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्याने सलामीवीर व कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( 0) याला फॅफ ड्यू प्लेसिसकरवी झेलबाद केले. करुणारत्ने शून्यावर बाद होऊनही एक पराक्रम करून गेला. रबाडाने टाकलेल्या चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलेल्या करुणारत्नेने पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. शिवाय गोल्डन डक नावावर करणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी आशियातील एकाही कर्णधारावर अशी नामुष्की ओढावलेली नाही. सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे तीन सामने शिल्लक आहेत आणि ते 11 गुणांसह दुसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. श्रीलंकेविरुद्ध रबाडानेही एक विक्रम नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी शॉन पोलॉकने तीनवेळा ही विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने दोनवेळा अॅडम गिलख्रिस्टला, तर एकवेळा फिलो बॅलेसला बाद केले आहे. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
Ketaki Chitale : मुंबई : सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक अशी वादग्रस्त पोस्ट केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट केली आहे. त्यामुळे राज्यात एकच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते केतकीच्या विरोधात आक्रमक झाले असून त्यांनी केतकीवर टीका केली आहे. तसेच ठाण्यात केतकीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. केतकी चितळे हिने आपल्या फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. त्यात पवारांची नरकात जायची वेळ आली असून त्यांच्या कर्करोगावरही अश्लाघ्य शब्दात टिप्पणी केली आहे. ऍडव्होकेट नितीन भावे नावाच्या माणसाची ही मूळ पोस्ट त्यांच्या नावाने केतकीने ही पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, केतकीच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिडले आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर केतकी चितळेचा निषेध नोंदवला जात आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनीही केतकी चितळेवर टीका केली आहे. केतकी छपरी असून तिला चपलेने मारले पाहिजे, ही विकृती असून केतकी मनोरुग्ण असल्याचेही ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रवक्त्या सक्षणा सलगार यांनीही केतकीवर टीका केली आहे. केतकीला कोणी कुत्रंही ओळखत नाही आणि प्रसिद्धिसाठी केतकी हे सगळे करत असल्याचे सक्षणा यांनी म्हटले आहे. केतकीच्या या वादग्रस्त पोस्टविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्याती सासवड पोलीस स्थानकात केतकी चितळेविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी केतकीविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. |
अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत. वॉशिंग्टन : किमान एका कोरोना प्रतिबंधक लसीला अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या आधी मान्यता द्यावी, असा दबाव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबंधित यंत्रणांवर आणण्याची शक्यता आहे. तशी चर्चा सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचे प्रयोगांतून सिद्ध होण्याच्या आधीच राजकीय दबावापोटी तिला मान्यता देणे ही अत्यंत आक्षेपार्ह कृती असेल, असे तेथील संशोधकांचे मत आहे. आहेत. तिसºया टप्प्यात स्वयंसेवकांना फायझर कंपनी २१ दिवसांत तर मॉडेर्ना २८ दिवसांत लसीचे दोन डोस देणार आहे. या दोन्ही कंपन्या लस विकसित करण्यासाठी एकाच प्रकारचे तंत्रज्ञान वापरत आहेत. या लसी टोचलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले. तरीही एवढ्या एकाच गोष्टीवरून त्या लसी कोरोनावर रामबाण उपाय आहेत, हे सिद्ध होत नाही. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या पहिल्या कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षात कोरोनामुळे हानी झाली. ट्रम्प सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही स्थिती ओढवली, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे. त्यामुळे निवडणुकीआधी कोरोनाच्या लसीला मान्यता मिळाल्यास त्याचा राजकीय लाभ उठविता येईल, अशी रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेली असू शकते. |
ख्यातनाम साहित्यिक डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२४ रोजी झाला. टेकडीवरचे पीस, देवचाफा, माळ, फॅन्टॅसिया हे कथासंग्रह, चार्वाक, माता द्रौपदी, कुणीकडून कुणीकडे ही नाटके तसेच आवडलेली माणसे (व्यक्तिचित्रे) आणि शाश्वताचे रंग (समिक्षात्मक) ही त्यांची साहित्यसंपदा. १९८९ मध्ये त्यांचे निधन झाले. |
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत भात, तूर, मूग, उडीद बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकासह स्वतःच्या आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल ज्या वापरकत्यार्कडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन आपली आधार नोंदणी करावी. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय अनुदान वितरित होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सामूहिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मंडलिक यांनी केले आहे. |
Photos : खूल्या आकाशाखाली Mouni Roy चं झक्कास फोटोशूट, तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स! मौनी रॉय सिनेमातील भूमिकांप्रमाणेच हॉट फोटोंमुळेही नेहमी चर्चेत असते. ती इन्स्टाग्रामवर बरीच अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे १४ मिलियन फॉलोअर्स आहेत. |
पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - कोरोना काळात (Corona Period) प्रचंड मेहनत घेणार्या पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) सहाय्यक आरोग्य प्रमुखांना 'डॉक्टर्स डे'निमित्त पुण्याच्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी (pune municipal corporation commissioner vikram kumar) मोठी भेट दिली. सहाय्यक आरोग्य प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतरही पुर्वीच्याच वेतन श्रेणीवर काम करत असलेल्या तीन सहाय्यक आरोग्य प्रमुखांना शासनाप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने वेतन श्रेणी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. मनीषा नाईक (Dr. Manisha Naik), डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjeev Wavre) आणि डॉ. कल्पना बळीवंत (Dr. Kalpana Baliwant) अशी या सहाय्यक आरोग्य प्रमुखांची नावे आहेत. या तिघानांही मार्च २०१८ मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या आकृतीबंध राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने त्यांना पदोन्नती देताना वेतन श्रेणी मात्र जुनीच ठेवण्यात आली होती. डॉक्टर्स डे च्या मुहुर्तावर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pune municipal corporation commissioner vikram kumar) यांनी या तीनही सहाय्यक आरोग्य प्रमुखांना शासनाप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीप्रमाणे मार्च २०१८ पासून नवीन वेतन श्रेणी देण्याचे आदेश दिले आहेत. सुधारीत वेतन श्रेणीनुसार त्यांच्या वेतनातील ग्रेड वेतनावर भरीव वाढ मिळणार आहे. कोरोना काळात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाप्रमाणेच (Health Department) सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पुणे शहर (City Pune) पहिल्या लाटेपासून देशातील हॉटस्पॉट ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचार्यांनी अपवाद वगळता सुट्टी घेत अहोरात्र कोरोनाशी लढा दिला आहे. विशेषतः प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना सहाय्यक आरोग्य प्रमुखांनी यंत्रणा उभारताना आणि समोर येणार्या प्रत्येकाला मदतीचीच भुमिका बजावली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी (municipal corporation commissioner) 'डॉक्टर्स डे'चे (Doctor's Day) अवचित्य साधून ही भेट दिल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू होती. |
तब्बल १४ दिवसाननंतर वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांसमोर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली होती. माझी आणि समाजाची बदनामी थांबवा, तपासात सत्य समोर येईलच असे म्हणत त्यांनी या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे स्पष्टीकरण तोकडे असून, तेच पूजा चव्हाणचे हत्यारे असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे या मागणीचा त्यांनी पुर्नउच्चार केला आहे. त्याबाबतचे एक ट्विटही त्यांनी शेअर केले असून, त्यामध्ये पूजा चव्हाण आणि मंत्री संजय राठोड यांचा एक फोटो शेअर केला आहे. जो बोया है.... . वही पायेगा, तेरा किया आगे आयेगा महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटसोबत त्यांनी संजय राठाेड आणि पूजा चव्हाणचा एकत्रित असलेला एक फोटोही शेअर केला आहे. |
'काश्मीरसाठी कोणीही बंदूक घेऊन आला, तरी तो परत जिवंत जाणार नाही', हे भारताने आधीच स्पष्ट केलेले आहे, हे इम्रान खान यांनी लक्षात ठेवावे ! न्यूयॉर्क - काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद केलेे असते, तर मीही बंदूक हाती घेतली असती, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केले. 'इस्लामोफोबिया'मुळे जग विभागले जात आहे. हिजाब एक शस्त्र ठरत आहे. ९/११ पासून हे प्रारंभ झाले. 'स्वर्गात यांना अप्सरा मिळतात; म्हणून हा समाज आत्मघाती आक्रमणे करतो', असे लोकांना सांगण्यात आले. हिंदु धर्मावर मात्र आरोप होत नाही. (हिंदूंमध्ये असे काहीच सांगण्यात येत नाही आणि हिंदू सहिष्णु आहेत, हे जगजाहीर आहे ! - संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुसलमान नेतृत्वामुळेच मुसलमानांचे हे अधःपतन झाले आहे, असे इम्रान खान म्हणाले. (असे आहे, तर इम्रान खान अशा मुसलमान नेत्यांवर कारवाई का करत नाहीत ? - संपादक, दैनिक सनातन प्रभात) अणुयुद्ध टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्राने दायित्व बजावावे ! तुम्ही काश्मीरमधील लोकांवर बंधने घालून त्यांना कट्टर बनवत आहात. मी पुन्हा सांगू इच्छितो की, वेळ कठीण आहे. संयुक्त राष्ट्राचेही दायित्व आहे की, अणुयुद्ध टाळण्यासाठी त्यांनी काहीतरी केले पाहिजे. आम्ही प्रत्येक स्थितीसाठी सिद्ध आहोत. जर २ देशांमध्ये युद्ध झाले, तर काहीही होऊ शकते, अशी धमकीही इम्रान खान यांनी दिली. |
श्री.के.एल.खाडे साहेब अभिष्टचिंतन-संजय सोणवणी. - नवे-पर्व\nया वयातही ताठ कण्याने समाजसुधारणेसाठी धावपळ करणा-या, सतत कार्यमग्न राहणा-या श्री. के. एल. खाडेकाकांनी अज ९१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशीच कार्यमग्नता त्यांना पुढेही लाभो आणि त्यांना अशच उत्तम आरोग्यासहित उदंड आयुष्य मिळो या शुभकामना.\n"माझी बखर" हे त्यांचे मोकळे ढाकळे आत्पकथन प्रसिद्ध तर आहेच पण रेल्वेच्या विश्वावर प्रकाश टाकत त्याचे अंतरंग उलगडणारे "मी स्टेशनमास्तर" हेही पुस्तक प्रसिद्ध आहे. "माझी बखर" ला मी लिहिलेल्या प्रस्तावनेतील हा अंश त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकते.\n"के. एल. खाडॆ यांचे आत्मचरित्र हे त्यांचे, त्यांच्या परिवाराचे व त्यांच्या स्मरणात असलेल्या पुर्वजांचे तर आहेच पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यपूर्व ते जागतिकीकरणापर्यंतचा वर्तमानातील काळ याचा ग्रामीण भागातील गावगाड्याचा, निरंतर बदलत राहिलेल्या समाजाच्या जीवनबदलाचा व नातेसंबंधाचा एक विलक्षण दस्तावेज आहे. निपाणी-वडगांव या आता स्मृतीशेष झालेल्या, उध्वस्त अवशेषांनी भरलेल्या गांवचा त्यांच जन्म. हा परिसरच तसा पुरातन वस्त्यांच्या अवशेषांनी भरलेला. निपाणी-वडगांवचाच इतिहास हृद्यपणे सांगत या वेगळ्या चरित्राची सुरुवात होते. गांवची (आजही फारशी बदललेली नसलेली) जातीनिहाय गल्ल्यांची रचना, गढी, गांवबारव यांचा इतिहास, मोठ्या बांधकामांत त्याकाळी कसे नरबळी दिले जायचे याच्या कथा जागवत आपण अल्लादपणे खाडे घराण्याच्या इतिहासात घुसतो. आपल्याकडे आजोबा-पणजोबांच्या पलीकडे पुर्वजांची नांवेही कोणाला माहित नसतात...त्यांचे जीवनचरित्र माहित असणे ही तर दुरची बाब. आम्ही इतिहासाबद्दल मोठ्या जोशात बोलत असतो, पण स्वतःच्या इतिहासाचे काय हा प्रश्न विचारला तर सर्वत्र नन्नाचा पाढा ऐकू येईल अशी स्थिती.\nपण खाडॆकाकांनी ज्ञात पुर्वजांबद्दल जेवढे माहित आहे ते लिहून ठेवल्याने भविष्यातील पिढ्यांची मोठीच सोय करुन ठेवली आहे. वयाच्या पाच-सहा वयापसुनचा स्वतःचा, स्वतःच्या परिवाराचा आणि सोबतच समाजाचाही इतिहास ते मांडत जातात आणि माहित असुनही माहित नसलेले, ज्ञात तरीही अपरिचित जगात आपण प्रवेशू लागतो. सामान्य माणसाचा इतिहास असामान्य बनतो तो त्या माणसाच्या जीवनावरील अथांग प्रेमामुळे, जीवनावरील अपार निष्ठेमुळे आणि सहनशील आणि क्षमाशील वृत्तीमुळे. कोणत्याही घरामद्धे थोरला म्हनून जन्माला येणे हेच एक दिव्य कसे बनून जाते हे खाडेकाकांच्या जीवनावरुन लक्षात येते.\nखाडॆकाकांचे शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांचे शिक्षक म्हणून शिक्षणक्षेत्रातील मुशाफिरी आणि शेवटी रेल्वे हेच आपले भागधेय मानत, सामाजिक संवेदना जपत, परिवाराला मोठ्या कष्टाने कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढत जरा बरे दिवस येताहेत असे वाटु लागताच आजवर जपलेले एक्त्र कुटुंबाला लागलेला विभाजनाचा शाप आणि कसलीही वाटणी न मिळता सहन करावा लागलेला कौटुंबिक कलह....पुन्हा एकला चालो रे....पण समाजासोबत. सामाजिक कार्यात त्यांनी झोकून दिले ते आजतागायत. मंडल आयोग संघर्ष समिती स्थापन करणारे महाराष्ट्रातील ते पहिलेच. पेंशनरांच्या संघटनेतील त्यांचे काम असो कि प्रवासी संघटनेतील, धनगर समाजाच्या ऐक्यासाठीचे काम असो कि अन्य कोणतेही सामाजिक कार्य...ते उत्साहाने त्यात वावरत राहिले. काही प्रयत्न अयशस्वी झाले तर काही यशस्वी. हे करित असतांना त्यांनी आपला परिवार, त्याचे सौख्य याचीही काळजी घेतली. कसेही वागले असोत, ते बंधू आणि अन्य नातेवाईकांबाबत आगपाखड न करता अत्यंत सहृदयतेने वर्णन करणे हे अत्यंत अवघड. पण खाडेकाकांनी ते अत्यंत सहजतेने केले आहे म्हणून जास्त मनोज्ञ आहे.\nसहधर्मचारिणीबाबत लिहितांना ते भावूक न होताही तिच्या जीवनातील योगदानाचे, निस्पृहतेचे आणि कष्टांचे जे वर्णन येते ते अगदी कोरड्या भाषेत आले तरी खाडेकाकांच्या अंतःकरणात हेलकावणारा भावनोद्रेक त्या कोरडेपणातुन अधिक टोकदार होतो. खाडेकाकुंचे निधन दिडेक वर्षांपुर्वी झाले. अंधश्रद्धा, कर्मकांडांबद्दल अनास्था असणा-या खाडेकाकांनी त्यांचा पहिला स्मृतीदिन व्याख्यान ठेवून साजरा केला. कोणतेही धार्मिक कर्मकांड केले नाही. हा अस्सल पुरोगामीपणा अंगी असणा-या खाडॆकाकांना जेंव्हा काशी-बनारसची तीर्थयात्रा सहपरिवार करावी लागली ते प्रसंग वर्णन करतांना कसलाही ढोंगी पुरोगामीपणा डोकावत नाही. इतरांच्या भावनांची, श्रद्धांची कदर न करता हेकेखोरपणा करणारे पुरोगामी कसे असू शकतील हा प्रश्न त्यातून निर्माण होतो.\nअस्पृष्यतेचा अभिशाप भारतियांना कधी लागला ते माहित नाही. पण खाडेकाकांनी प्रत्यक्ष अस्पृष्यता निर्मुलन करण्याचा प्रयत्न स्वतःपासून, प्रसंगी त्रास सोसत केला. ते स्वतःला आपण त्यावेळी समाजसुधारक होतो असे मानत नाहीत. गावगाड्यातील जातीयवादाची धग या कथनातून अंगावर येईल एवढी जाणवते. अस्पृषता त्यांना स्वतःलाच मान्य नव्हती आणि ते प्रसंगी ती तोडतही असत. या संदर्भातील वर्णने मुळातुनच वाचण्यासारखी आहेत. तत्कालीन समाजस्थितीची तुलना सहजपणे आजच्या पुरोगाम्यांशी केली तर आजचे पुरोगामी केवढे दांभिक आहेत हे सहज दिसून येईल. खरे असे आहे कि क्रांती व्यक्ती घडवते. स्वतःत बदल घडवून घडवते. तिचे ढोल बडवून क्रांती होत नसते. असे हजारो-लाखो-कोटी व्यक्ती जेंव्हा स्वतः त्याचे स्वेच्छेने स्वप्रेरणांचे पाईक बनतात तेंव्हाच क्रांती वैश्विक होते...चिरायु होते. क्रांती घोषणांत नसते...आंदोलनांत नसते....क्रांती जगण्यात असते...आणि खाडॆकाकांनी त्यांचे क्रांती केली. इतिहासाने त्याची दखल घ्यायचे काहीएक कारण नाही. कोट्यावधी अशाच शहिदांच्या प्रेतांवर उभा राहून जो ओरडतो...तोच क्रांतीकारक म्हणून जग दखल घेते हा जागतिक इतिहासाचा नियम आहे. पण खाडॆकाकांनी, गांवगाड्यातील सर्व सामाजिक कायदेकानुनांना त्यांच्या परीने वागण्यातुन ही क्रांती घडवली जी अगदी त्यांच्या रेल्वे जीवनातील अठरापगड सहका-यांशी वागतांना, सनातन्यांना लाजवत सुरु राहिली...आणि हीच क्रांती असते.\nया पुस्तकाचे नामकरण "माझी बखर" आहे. बखर वाड्मय शैली महाराष्ट्रात आता कोणी वापरत नाही. याही पुस्तकात ती शैली नाही. तरेही ही बखर आहे कारण बखरीप्रमाणेच "जसे घडले, जसे दिसले, जसे भोगले तसे" हा बाणा या लेखनात आहे. त्यामुळे हे नांव सार्थही आहे, कारण ही के. एल. खाडे या माणसाची जीवनकहानी नाही तर प्रत्येक सामान्य माणसाची कहानी आहे. आणि म्हणुनच ती असामान्य आहे.\nया आत्मचरित्रात अजून काय आहे, कोणत्या घटना आहेत, हे येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. तुम्ही ते पुढे वाचणारच आहात. मला भावलेले महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीतून आज जवळपास हद्दपार झालेल्या असंख्य ग्रामीण शब्दांची यात लेखनाच्या ओघात येणारी बरसात. ग्राम्य म्हणजे शिव्याच असा काही तरी समज सारस्वताचा आहे. पण शेती, दैनंदिन जीवन यासंबंधात मराठीत अनेक लोभसवाने शब्द आहेत आणि ते मराठी भाषेची शान आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. गुर्हाळातील चुल्हानाला 'चुलंगण" हाही एक प्रतिशब्द आहे हे या आत्मचरित्रातून कळते. असे अनेक शब्द लिलया येवून जातात आणि मराठीचे वैभव कळते. नगर जिल्ह्याची ही शब्दसंपन्नता आगळीवेगळी आहे.\nहे आत्मकथन एक सामाजिक दस्तावेज आहे असे मी म्हटले. आजकाल लग्ने, अगदी सामान्य शेतक-यांच्या मुला-मुलींची कशी लागतात हे पाहिले कि त्यांचेच नजिकचे पुर्वज किती सामान्यपनात लग्नसोहोळ्याचा असामान्य आनंद घेत असत हे त्याना समजत नाही याची त्यांना शरमच वाटेल. पुर्वीचे विवाहसोहोळे नात्यांचा उत्सव असे, श्रीमंतीचे ओंगळवाने प्रदर्शन करणारे नसत हे या चरित्रातील २-३ लग्नांचे अत्यंत सविस्तर वर्णन वाचून समजते. हा कालप्रवास आपल्याला समज देणाराही आहे.\nप्रारंभिक शैक्षणिक व शिक्षकाच्या हलाखीचा, परवडीचा काळ सोडला तर खाडॆकाकांचे निवृत्तीपर्यंतचे आयुष्य रेल्वेला वाहिलेले आहे. हाही प्रवास खडतर आहे. रेल्वेच्या युनियनचेही काम पाहत त्यांनी असंख्य रेल्वे कर्मचा-यांना न्याय मिळवून दिला. त्यांचे "मी स्टेशनमास्तर" हे एक प्रकाशित झालेले पुस्तक तर रेल्वेच्या जगावर अद्भूत प्रकाश टाकते व रेल्वे समजावून घ्यायला मदत करते. त्या पुस्तकात आलेले तपशील खाडेकाकांनी या पुस्तकात टाळले आहेत. वाचकांनी मात्र ते पुस्तक अवश्य मिळवून वाचावे कारण भारतीय रेल्वेचा व रेल्वेच्या एकंदरीत जगाचा तो एक चित्तथरारक दस्तावेज आहे. वेळोवेळी सर्व घटनांच्या नोंदी करुन ठेवण्याची शिस्त, जी बहुजनांत अपवादानेच पहायला मिळते, असल्याने कोठेही, अगदी तारखांपासुनही, घोळ-संभ्रम होत नाही."\nखाडेकाका हे बहुजनांच्या शिकलेल्यांच्या पहिल्या पिढीचे बिनीचे शिलेदार. बहुजनांचे जीवन अलीकडे-अलीकडेपर्यंत आपल्याकडे सहसा साहित्य अथवा चरित्रांचा विषय होत नसे. इतिहासही त्याची नोंद घेत नाही. त्यामुळे काळाच्या ओघात बहुजनांचा, सामान्यांच्या जगण्याचा केवढा मोठा मोलाचा इतिहास नष्ट झाला असेल याची जाणीव "माझी बखर" वाचतांना होते. हे पुस्तक एका व्यक्तीचे, परिवाराचे, त्या परिवारातील अंतर्गत प्रेम-माया-संघर्ष-असुयेचे एकांगी बनत नाही तर ते निपाणी-वडगांव-नगर-श्रीरामपुरचे चरित्र बनते आणि हेच या कथनाचे वैशिष्ट्य आहे. भाषेतील अलिप्तता, आलंकारिकतेचा सोस नसलेली साधी सरळ पण भिडणारी भाषा, स्वतःच्या व इतरांच्याही चुका आणि सद्गुण निर्लेपपणे दाखवायची वृत्ती यामुळे हे चरित्र वाचकांना जास्त आपले वाटेल व भावेल याची खात्री वाटते."\nअभिष्टचिंतन श्री.के.एल.खाडे साहेब, सेवानिवृत्त स्टेशन मास्तर, श्रीरामपूर.\nचाळीस वर्षापूर्वी जेव्हा टेलिफोन सुद्धा दुर्मिळ होते,गावात एस.टी.बस नव्हत्या व संपर्काचे साधन म्हणजे पोस्टकार्ड होते तेव्हा खाडे साहेब महाराष्ट्रभर फिरत, चांदा टू बादा समाज ऐकत्र यावा,रोटी बेटी व्यवहार व्हावेत व महाराष्ट्रातील बहुजन मंडळीने सामाजिक, शैक्षणिक प्रगती साधावी हा त्यांचा त्या काळातील दुरदृष्टीकोन. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला धनगर समाजाला नात्याच्या धाग्यात जोडणारा पहिला सोयरीक संबध बहुतेक खाडे साहेबांच्याच हातचा.साहेबांनी त्या काळात समाजातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले जे महाराष्ट्रात गाजले.\nनिवृत्ती नंतरही खाडे साहेब जेष्ठ नागरिक, प्रवासी संघटना, पेन्शनर अन कोणकोणत्या संघटनाचे काम करतात,त्यांचे जिवन एखाद्या तपस्व्यासारखे वाटते.अशी माणसं आजच्या काळात दुर्मिळच आहेत.\nश्री.खाडे साहेबांचे चिरंजीव श्री.अविनाश, श्री.प्रकाश यांनी सुद्धा खाडे साहेबांच्या पावलावर पाउल ठेवून समाजकार्याला सुरुवात केली आहे.\nआज श्री.के.एल.खाडे साहेबांचा वाढदिवस आहे,त्यांना शतायुष,सुआरोग्य लाभो अशा शुभेच्छा.\nश्री.सदाशिव काळदाते, शालिग्रामजी काळदाते, डॉ. सुभाष काळदाते, विनायक काळदाते, ईजी.अनिल जाधव,बबनराव साळवे,हिमांशू शिदे,भागवतराव जाधव,रावसाहेब सोनवने,अकोला,नाशिक, अहमदनगर, वर्धा, नागपूर येथील सर्व आप्तेष्ट व मित्र परिवार.\nशेतातील धुरा- नारायण सरोदे. |
क्रिस्टल मसाज उत्तम उपचार ; मसाज हा संधिवातावर उत्तम उपचार आहे. संधिवात झालेल्या व्यक्तींना जरा जरी हात लावला तरी दुखते, मुंग्या येतात, चावल्यासारख्या वेदना होतात. पण अशावेळी घाबरून जाऊ नये. मसाज हा संधिवातावर उत्तम उपचार आहे. हा उपचार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्येच सध्या लोकप्रिय असलेला मसाज म्हणजे संधिवातावरील क्रिस्टल मसाज होय. क्रिस्टल द्वारा म्हणजेच विविध रंगाच्या स्फटिकांद्वारा मसाज केला जातो. हा मसाज तज्ज्ञांकडून घ्यावा. ( arthritis crystal massage treatment ) मसाज शक्यतो दुसऱ्याला द्यावा किंवा आपण दुसऱ्याकडून करून घ्यावा. प्रथम पोटावर छोटा क्रिस्टल ठेवावा. नंतर तळपायाला स्फटिक किंचित दाबून हळूहळू मसाज करावा. ह्याप्रमाणे दोन्ही पायांना मसाज झाल्यावर मग पाठीच्या कण्यावर हळूवारपणे क्रिस्टल ठेवून मसाज करावा. मग अनुक्रमे मसाज करून खांदे, मान, डोके, हात ह्याप्रमाणे क्रमवार मसाज करीत यावे. नंतर उताणे झोपवून पायापासून गुडघ्यांपर्यंत मसाज करत यावे. नंतर पोटावर स्फटिक ठेवून घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोलाकार हळूवार मसाज करावा. त्याहीपेक्षा हळूवार मसाज हृदयाला करावा. नंतर गाल, कपाळ, केस यांनाही मसाज करावा. ह्या मसाजाने त्वरित आराम मिळतो. उत्साह वाटतो व शरीर, मन अत्यंत तरतरीत ताजेतवाने होते. विशिष्टप्रकारे स्फटीक ठेवले जातात. सर्वसाधारणपणे षट्चक्रांच्या रंगांचे स्फटिक मसाज वापरले जातात. यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. त्याचप्रमाणे ऑरा बॅलन्ससाठी त्या त्या चक्रावर ते ते स्फटिक ठेवून तळहातांवरही स्फटिके ठेवून डोळे मिटून शांतपणे 20 ते 30 मिनिटे पडून राहावे. दीर्घश्वसन करावे व मग रिलॅक्स व्हावे. |
भविष्य कृदन्ते ऊन > ऊन् > ऊं : हसून > हसून् > हसूं हें रूप ज्ञानेश्वरीत नाहीं. महानुभाव ग्रंथांत, विशेषतः गद्यांत हें नित्य येतें. एकाच काळांतील भाषेचे थर सूक्ष्म भेद कसे व्यक्तवूं शकतात त्याचा हा उत्तम दाखला आहे. हीं रूपें ज्ञानेश्वरींत नसल्यानें साहजिकच राजवाडे किंवा डॉडेरेट त्यांचा उल्लेख करीत नाहींत. तीं रूपें येणेंप्रमाणेंमहदाइसें घरांतु रीगों बैसली । स्मृ॰ २३ (=रिगौनि) स्मृ० ५३ (= जाऊन ) " प्रकरणींची लक्षणें केलीं भटोबासां पुसपुसों।" - स्मृ० १० ( = पुसून ) तेहिं शब्द घडउं घडउं पदें बांधिलीं । " - स्मृ० १७४ ( = घडवून ) भिक्षू तयातें बोलावूं बोलावूं विजना नेति । " - स्मृ० ११० " ते नांवें घेंवों घेंवों बोलवीति । " - लीला० १ ३४ " एरें श्रीकरें भुइचे अनु वेचवेचुं तेथ घालीति । " - लीला० १-५३ पद्यांत हीं रूपें जवळ जवळ नाहीतच. म्हणजे वास्तविक ऊन मधील नासिक्य वर्णाचा उच्चार व्यंजनान्त करण्याकडे कल होता व त्याचेंच रूपांतर अनुनासिकात झालें. गद्यांत भाषेचें खरें स्वरूप दिसतें तें असें. ६ ४९ भविष्य कृदन्तें ( १ ) तुमन्त : हैं अव्ययी कृदन्त असून त्याची परंपरा अशीसं० तुम् > प्रा० उम > अप० उं, हुं, इवि > म० ऊं अपभ्रंशांतील 'उं हुं ' प्रत्ययांच्या द्वारा मराठींतील ऊं सिद्ध झाला. क्वचित् पूर्वस्वराशीं संधि पावून त्याचा ओं, औं होतो. दाउं- उम अपभ्रंशांत 'उं-हुं' प्रत्ययाबरोबर 'इवि' हा निष्ठाप्रत्यय लागूनहि तुमन्त सिद्ध होई. जसें, कहिवि ( कथयितुं ) - सावयधम्म० २०१ कढिवि (कर्षितुं ) - णायकुमार० ७-६-२ करिवि, धरेवि |
भाग दुसरा. त्याला बराच अवकाश लागेल. निवडलेल्या मेबरांचों नांवें सरकारी ग्याशिटांत प्रसिद्ध होत असतात. विवक्षित कारणांसाठी अशा मेंबराची नेमणूक रद्द करण्याचा अधिकार सरकारानें हाती ठेवला आहे. तरी त्याच्यासंबंधे उठाचणी व कागाळी म्युन्सिपालिटीकडून झाली पाहिजे अशी एक अट आहे. ती चांगली आहे. सरकाराकडून नेमले जाणान्या मेंबरांमध्ये बहुधां असिष्टंट कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, सिटी मजिस्ट्रेट, सिव्हिल सर्जन, एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर, असे अधिकारी, शिवाय गांवांतील सभ्य व प्रतिष्ठित सावकार, पेन्शनर, जमीनदार वगैरे पैकी आणि मागसलेल्या वर्गाच्या हक्कांचे रक्षण होईल अशा तऱ्हेचे एक दोन, इतके मेंबर असतात. नव्या व्यवस्थेमध्ये एकंदर मैचरांची संख्या वाढविल्याशिवाय इतक्यांचा समावेश होणे शक्य दिसत नाहीं. सरकारी अंमलदार मेंबर बहुतकरून सभेला कमीच-त्यांतही युरोपियन अफिसर त्याहून कमी हजर राहतात. तसा कांहीं महत्वाचा प्रश्न विचाराकरितां आला असेल तेव्हां यांपैकीं पुष्कळांना अगाऊ सूचना देऊन तयार करून आणावें लागतें. सरकारांतून नेमलेल्या मेंबरां पैकी निम्याहून अधिकांचा मंडपशोभेपलीकडे फारसा उपयोग होत नाहीं. गैरहजिरीमुळे जागा जाण्याचा नियम सरकारी अधिकारी मैत्ररांना लागू नसतो. निवडलेल्या भेचरांपैकी बहुतेक बरेच लोक अलीकडे म्युन्सिपल कामाकाजाकडे लक्ष देतात, नाहीं असें नाहीं. पण त्यांतही पोक्त विचार करून पूर्वापर विषय समजून घेऊन, सार्वजनिक हिताकडे लक्ष देऊन, व्यक्तिविषयक अभिमान किंवा वाद बाजूस ठेवून, भारदस्तपणानें, समजुतीनें व मन लावून काम करणारे असे मेंबर थोडे असतात. अशा लोकांची संख्या जितकी अधिक होईल तितकें काम सुरळीत चालतें, हें निराळें सांगणे नकोच. कांहीं कारणांमुळे एखादी निवडलेल्या सेंबराची जागा रिकामी झाली आणि कायद्यानें ठरविलेल्या मुदर्तीत दुसऱ्या भेंबराची निवडणुक न केली गेली, तर त्या जागी मेंबर नेमण्याचा सरकाराला अधिकार आहे. लोकांनी निवडणूक करावयाची तो कोणच्या रीतीनें, कधीं, केव्हां, को, व्हावयाची या विषयचे नियम सरकारने केलेले आहेत. त्यांच्यांत कमीजास्ती फेरफार करण्यासंबंधानें सूचना व ठराव करून ते सरकारांत मंजूरीसाठी पाठविण्याचा म्युन्सिपालिट्यांना अधिकार आहे. या नियमान्वयें झालेल्या निवड |
पंढरपूर : महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या यंदाचा आषाढी पालखी सोहळा येत्या २९ जूनला साजरा होणार आहे. (Ashadhi Wari) आषाढी यात्रे दरम्यान भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल घेवून जाता येणार आहे. तथापी (Pandharpur) मोबाईल वापरास मात्र बंदी कायम ठेवली आहे. (Latest Marathi News) आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी यात्रा काळात भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना मोबाईल घेवून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून भाविकांना विठ्ठल रूक्मिणी मंदिरात (Vitthal Rukhmini Temple) मोबाईल घेवून जाण्यास बंदी होता. यात्रा काळात मोठी गर्दी असते. अशावेळी संपर्काचे प्रमुख साधन असलेला मोबाईल ठेवण्यासास भाविकांना अडचण येते. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन मंदिर समितीने आषाढी यात्रा काळापुरती मोबाईलवरील बंदी मागे घेतली आहे. मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
उमरगा : तालुक्यातील कडदोरा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बुधवारी कृषी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदाताई रणखांब तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती सचिन पाटील, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, उपसरपंच खंडू बालकुंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील आदी उपस्थित होते. सभापती पाटील यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी उमेदच्या पोषण परसबाग विकसन मोहिम, झिरो बजेट शेती, सेंद्रिय प शेती, गांडूळ खत, निंबोळी अर्क , दशपर्णी अर्क, जैविक कीड नियंत्रण ,उत्पादक गट, बांधावर व सलग वृक्ष लागवड आदी बाबत सविस्तर माहिती दिली. उपसरपंच खंडू बालकुंदे यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन संगणक परिचालक प्रशांत चव्हाण यांनी केले तर आभार माजी सैनिक रमेश मुगळे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी बालाजी धनराज रणखांब, बालाजी शहाजी रणखांब , सी. आर. पी. वैशाली चव्हाण, कृषी सखी कांचन हिंगमिरे व शिवकन्या महिला ग्राम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. |
भारतीय संघात 'कॅप्टन कूल' एमएस धोनीच्या नेतृत्वात अनेक दिग्गज खेळताना पाहिले आहे. ते खेळाडू धोनीपेक्षाही अधिक अनुभवी होते. त्यांपैकी काही खेळाडू असेही होते, ज्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्या सर्वांसमोर धोनी अगदी नवखा होता. वेळेनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा अनुभवही वाढत गेला आणि त्यानंतर त्याचेही एक मोठे नाव बनले. भारतीय संघात अनेक खेळाडूंच्या निवडीपासून अंतिम ११ खेळाडूंपर्यंत धोनीची भूमिका नेहमीच खास राहिली आहे. युवराज सिंग, गौतम गंभीर यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू धोनीच्या नेतृत्वात संघात येत-जात राहिले आहेत. दुसरीकडे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये धोनीबरोबर खेळणारे अनेक खेळाडू भारतीय संघात खेळले आहेत. मोहित शर्मा आणि मनप्रीत गोनी ही नावे यांतील मुख्य नावे आहेत. धोनी कर्णधार असताना असेही पहायाला मिळाले की, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शेवटचा सामना न खेळताच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. असे वनडे क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंबरोबर घडताना पाहिले आहे, त्यापैकी ३ खेळाडूंचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत. भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव मानले जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) वनडे क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला नव्हता. त्याने आपला शेवटचा वनडे सामना १८ मार्च २०१२ रोजी ढाका येथे आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यावेळी संघाचे नेतृत्व धोनी करत होता. यानंतर सचिन वनडेत खेळताना दिसला नाही. सचिनची निवडकर्त्यांबरोबर काय चर्चा झाली होती, हेदेखील समोर आले नाही. सचिनने डिसेंबर २०१२ ला निवृत्तीची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यामुळे वनडेत धोनीच्या नेतृत्त्वाखाली फेअरवेल सामना मात्र सचिन खेळला नाही. सचिन तेंडुलकरबरोबर खेळणारा विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवागबरोबरही (Virender Sehwag) असेच काहीसे झाले होते. कसोटी क्रिकेटमध्ये २ त्रिशतक आणि वनडेत द्विशतक जडणारा सेहवाग भारतीय संघाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. जानेवारी २०१३मध्ये कोलकाता येथे पाकिस्तानविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या सेहवागने काही वर्षे वाट पाहिली. परंतु त्याला संघात सामील केले नाही. त्यानंतर त्याने २० ऑक्टोबर २०१५ रोजी निवृत्ती घोषणा केली. त्यालाही कर्णधार धोनीच्या नेतृत्त्वाखील फेअरवेल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानची (Zaheer Khan) २००३ आणि २०११ विश्वचषकातील कामगिरी कोणीही विसरू शकणार नाही. त्याने पल्लेकल्ले येथे श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामाना खेळला होता. यानंतर काही वर्षे वाट पाहिली आणि १५ ऑक्टोबर २०१५ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीर एक महान खेळाडू होता यात काडीमात्र शंका नाही. धोनीच्या नेतृत्वात निवृत्ती घेणारा झहीर तिसरा गोलंदाज होता. त्यालाही विशेष सामन्याचे आयोजन करुन फेअरवेल मिळाले नाही. विशेष म्हणजे हे सचिन, सेहवाग आणि झहीर हे तिन्ही खेळाडू सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वातही खेळले आहेत. |
कलाकारांसाठीची इन्सिट्यूट! बहुआयामी चित्रकर्मी म्हणजे सुमित्रा भावे. साहित्य, आशय, शब्द, चित्र, कला, मूल्यं आणि माणूसपण या सर्व गोष्टींचा एकसंध विचार करून त्याला चित्रपटाचं रूप देण्याचं काम सुमित्रा भावे यांनी केलं. एकीकडे समाजशास्त्राचा अभ्यास, समाजातल्या सर्व घटकांविषयी कळकळ, चांगुलपणावर विश्वास आणि समूहभावनेने काम करण्याची सवय यांमुळे त्यांचे चित्रपट आणि कामाचे स्वरूपही वेगळे ठरले. कलाविश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सुमित्रा भावे यांचं पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झालं आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी त्यांच्या प्रतीचं प्रेम, आदर व्यक्त करत काही जुन्या आठणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे,डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांसारख्या अनेकांनी सुमित्रा भावे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. "सुमित्रा भावे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही चित्रपट निर्मात्याने एचआयव्ही, स्किझोफ्रेनिया, कोड, स्मृतिभ्रंश, औदासिन्य या पाच आजारांचे संवेदनशील विषय हाताळले नाहीत. 'जिंदगी झिंदाबाद', 'देवराई', 'नितळ', 'अस्तु' आणि 'कासव' या पाच चित्रपटांतून त्यांनी ते हाताळले. त्या समाजशास्त्रज्ञ आणि संशोधक होत्या व त्यांना सिनेमा हे योग्य व शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे, याची जाणीव झालेली होती. ही माहिती मनोरंजनातून लोकांपर्यंत पोचवत त्या आजाराबद्दलचे गैरसमज व खोटी माहिती दूर करण्यासाठी त्या प्रयत्न करीत. त्या अत्यंत सोप्या भाषेत या आजाराबद्दल सांगत तो दूर करण्यात मानवी दृष्टिकोनाची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे समजावून सांगत. त्यांच्या चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी हानी आहे. त्यांच्या शेवटच्या दोन चित्रपटांची निर्मिती मी केली होती", असं ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे म्हणाले. "मराठी चित्रपटाला एका अर्थपूर्ण वाटेवर नेणाऱ्या प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन हे अनेकार्थांनी दुःखद आहे. भावे या संवेदनशील दिग्दर्शक तर होत्याच, परंतु आपल्या प्रत्येक चित्रपटांमधून मानवतेची, प्रागतिक जीवनमूल्यांची कास धरून त्यांनी मराठी सांस्कृतिक विश्वाला एक वेगळे, प्रगल्भ परिमाण देऊ केले. स्त्रीचळवळीशी, ग्रामीण समस्यांशी जोडल्या गेलेल्या सुमित्रा भावेंनी अतिशय सकारात्मकतेने आपल्या भवतालाकडे बघत प्रेक्षकांच्या मनात कायम एक आशेचा अंकुर जागा ठेवला. स्त्रीप्रश्नाची आणि इतर सामाजिक प्रश्नांची त्यांची हाताळणी कला क्षेत्रासाठी पथदर्शक ठरली आहे. 'मिळून साऱ्याजणी' आणि अर्थातच विद्याताईंशी त्यांचा विशेष स्नेहबंध होता. त्यांच्या निधनाने 'मिळून साऱ्याजणी' परिवारातील एक जिवलग काळाच्या पडद्याआड गेला आहे. " - गीताली वि. मं. |
जळगाव : ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री एस एन पाठक म्हणाले की 28 जुलै रोजी सर्व संरक्षण महासंघ आणि सीडीआरए अधिकार्यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये सेक्रेटरी डिफेन्स प्रोडक्शनसह सेक्रेटरी डिफेक्शन प्रोडक्शनने कर्मचारी नेत्यांना सरकारला कळवण्याचे आश्वासन दिले होते. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये, फेडरेशनच्या सर्व सीडीआरए अधिकारी या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील रणनीतीबद्दल 29 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुन्हा चर्चा केली. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष श्री एस एन एन पाठक यांच्या अध्यक्षतेखाली या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महासंघांच्या अधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की सेक्रेटरीने संरक्षण उत्पादनातील फेडरेशनची कल्पना सरकारला जाणीव करून देण्याचे वचन दिले होते. संरक्षण मंत्रालय किंवा संरक्षणमंत्र्यांनी 31 जुलैपर्यंत कोणताही संवाद स्थापित केला नसेल तर ते अशा परिस्थितीत कॉर्पोरेटेशनसाठी सल्लागार निवडीसाठी निविदा उघडण्याची तारीख August ऑगस्ट रोजी सरकारला देण्यात येणार असून, भारत वाचविण्याच्या केंद्रीय व्यापार संघटनांच्या आवाहनावरून ऑगस्ट रोजी भारत सुटण्यासह १२ ऑक्टोबरपासून अनिश्चित संप सुरू होईल. सर्व संस्थांमध्ये संरक्षण संप करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासह, संरक्षण कर्मचारी 18 ऑगस्ट रोजी कोळशाच्या कर्मचार्यांच्या प्रस्तावित संपाच्या समर्थनार्थ एकजुटीचे प्रदर्शन करून आपापल्या भागात व्यापक प्रात्यक्षिक आंदोलन करतील. * सी. कुमार, अशोक सिंह, आर. श्रीनिवासन, साधू सिंह यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पाठक जीl , मुकेश सिंग, बीबी मोहंती, अजय या चर्चेत सहभागी होते. वरणगाव फॅक्टरी मधे कामगार युनियन, इंटक युनियन व बीएमएस युनियन ने पण बेमुदत संपावर जाण्याची तैयारी सुरु केली आहे. |
सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा या दोन चौपदरी महामार्गांच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली आहे. २०१९ मध्ये भूमिपूजनानंतर थंडबस्त्यात असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर भेटीत समस्या मांडली व याची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेत प्रकल्प सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले. त्यामुळे अंदाजे एक हजार ९०० कोटी प्रस्तावित किंमत असलेल्या या चौपदरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले आहे. याबाबत गॅझेट नोटिफिकेशन ३१ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झाले. यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवित झालेली आहे. या प्रकल्पाबाबत जमीन भुअर्जन करण्यासाठी व इतर समस्या मार्गी काढण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्ताकडे ३ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता. चंद्रपूर-बल्लारशा-राजुरा-लक्कडकोट ते तेलंगणा राज्य सीमेपर्यंत असलेला चारपदरी महामार्ग क्र. ९३०-डी या महामार्गाचे बामणी - लक्कडकोट ते राज्य सीमेपर्यंत अंदाजे ३३ किलोमीटर लांबीचा रस्ता व बामणी ते कोरपना आदिलाबाद सीमेपर्यंत जुळणाऱ्या ५६ किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी अंदाजे एक हजार ९०० कोटी खर्च येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन महामार्गाचे भूमिपूजनही बामणी येथे करण्यात आले होते. त्यानंतर बामनी ते आष्टी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली व ते काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, बामणी ते लक्कडकोट व बामणी ते कोरपना आदिलाबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला होता. या महामार्गाच्या कामाचा प्राधान्यक्रमही बदलण्यात आलेला होता. हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्त्वाचे व आंतरराज्य वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. मात्र, आता या मार्गाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. हा महामार्ग पूर्णत्वास आल्यास राजुरा, कोरपना व गडचांदूर शहरासोबत महामार्गालगतच्या गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो. |
माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. एखाद्या माणसाला खाण्यातून जिंकलं तर मनाने जिंकणं फारसं कठीण नसतं. खाण्याच्या पद्धतीतून खाणा-याचे नि खिलवणा-याचे संस्कार डोकावतात. म्हणूनच म्हणतात, खाणे हा केवळ उदरभरणाचा उपचार नसून तो एक दक्ष संस्कार आहे. दर बारा कोसावर भाषा बदलते तशी दर कोसावर खाद्यसंस्कृतीही बदलते. महाराष्ट्राची ही वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती केवळ देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती जगभरात आपला ठसा उमटवते ती त्याच्या साधेपणामुळे आणि वैविध्यपूर्ण लज्जतीमुळे. महाराष्ट्रात खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा असूनही आज एकूण धकाधकीच्या जीवनात रोजच्या आहारात जागा घेतलीय ती फास्टफूड किंवा डाएटफूडने. रोजच्या धावपळीत विविध व्यवधानं सांभाळताना अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागतेय. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतोय आणि त्यामुळे अनेक व्याधींपासून मुक्तता मिळवण्यासाठी आहारसुद्धा संतुलित आणि योग्य पद्धतीचा घेण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र संतुलित आणि योग्य आहार म्हणजे नेमकं काय हे माहित नसल्यानं आहार संतुलनापेक्षा चुकीचा आहार घेतला जातो आणि आरोग्याची समस्या अधिक बिकट होते. म्हणूनच झी मराठीवर अन्न आणि आरोग्य यांचा सुरेख मिलाफ घालत आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमात येत्या काही भागांमध्ये विशेष तज्ञमंडळींना पाचारण करण्यात येत आहे. आरोग्याबाबत काही खास सूचना देताना किंवा विविध विषयावर मार्गदर्शन करताना काही विशेष पाककृतींची ओळखही ही तज्ञमंडळी करून देणार आहेत. ६ जुलैला कान-नाक-घसा तज्ञ डॉ. ज्योत्सना जगताप तर ७ जुलैला ज्येष्ठ सौंदर्यतज्ञ माया परांजपे नोकरदार स्रियांनी कमीत कमी वेळेत पोषक आणि संतुलित तसेच सौंदर्य टिकवण्यसाठी काय आहार घ्यावा यासाठी मार्गदर्शन करतील. तसेच ८ जुलैला स्त्रीरोगतज्ञ डॉ. ललिता मायदेव आणि ९ जुलैला मार्गदर्शक सुचित्रा सुर्वे दहावी - बारावी झालेल्या मुलांना व पालकांना मार्गदर्शन करतील. सोमवार ते शनिवार दररोज दुपारी १. ३० वाजता झी मराठीवर 'आम्ही सारे खवय्ये'मध्ये हे विशेषतज्ञ खवय्यांना भेटतील त्यांच्या खास पाककृतींसह. |
नागपूरः निवडणुकीदरम्यान आदर्श आचार संहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची नागरिकांना तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने 'सी-व्हिजिल एप'च्या माध्यमातून सुविधा प्रथमच उपलब्ध करुन दिली आहे. या माध्यमातून नागरिकही स्वतंत्र व निःपक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रियपणे जबाबदार भूमिका बजावू शकतात. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील 26 नागरिकांना 'सी-व्हिजिल एप'चा वापर करुन आचार संहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारी प्रथमच दाखल केल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी 'सी-व्हिजिल एप' जनतेसाठी उपलब्ध करुन दिले असून नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर व फ्लेक्स असल्याबाबत सी-व्हिजिल एप वरुन तक्रारी केल्या आहेत. यापैकी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर झालेल्या सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेतली. यापैकी 13 ठिकाणी असलेले बॅनर तात्काळ हटविले आहे. तसेच 10 तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी केली असता त्याजागेवर आचार संहितेचा भंग होत नसल्याचे आढळून आले. दोन तक्रारी चौकशी स्तरावर आहेत. तर एक तक्रार निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. रामटेक लोकसभा मतदार संघात सी-व्हिजिल एप या मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन कामठी येथील व रामटेक येथील पाच तक्रारींचा समावेश आहे. नागपूर मतदार संघातील नागपूर-दक्षिणमध्ये दोन, नागपूर दक्षिण-पश्चिममधील 11, नागपूर- पूर्वमधील तीन तर नागपूर उत्तरमधील एका तक्रारीचा समावेश आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीसंदर्भात सरासरी 2 ते 29 मिनिटांच्याआत दखल घेवून कारवाई करण्यात आली आहे. 'सी-व्हिजिल या एप'मार्फत नागरिकांना आदर्श आचार संहिता भंग होत आहे असे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा आणि भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह एपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे आचार संहितेसंदर्भातील घटना नोंदवू शकतात. नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होते. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ही तक्रार पाठविण्यात येते. त्यानंतर जीव्हीआयजी, आयएल अन्वेषक या जीआयएस आधारित मोबाईल एप्लिकेशनच्या साहाय्याने संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनिटांच्याआत पोहचणे अपेक्षित आहे. संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारींच्या तथ्यांची तपासणी करुन या संबंधीचा अहवाल या एपद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्या जातो. हा अहवाल 30 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत पोहचणे आवश्यक आहे. या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येते आणि तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्याआत तक्रारींची स्थिती तक्रारदार नागरिकांना पाठविण्यात येईल. तक्रार करणाऱ्या नागरिकांना मोबाईलवर सुद्धा संदेशाद्वारे कळविण्यात येईल. नागरिकांनी आचार संहिता भंग होत असलेल्या तक्रारीसंदर्भात 'सी-व्हिजिल एप'चा वापर करावा तसेच तक्रार नोंदवायची असल्यास राज्य संपर्क क्रमांक 1950 यावर सुद्धा कॉल करता येईल. 'सी-व्हिजिल मार्फत मतदारांना पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचे वाटप मतदारांना मारहाण अथवा दमबाजीचा प्रकार, जमावाला चिथावणीखोर भाषण तसेच मतदारांना आमिष आदीबाबत तक्रार करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आवाहन केले आहे. |
माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले. हडपसर : माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले. मात्र, माजी नगरसेविका पूजा कोद्रे आणि उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांनी हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे सांगत कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. सकाळी १० ते २ या काळात आंदोलन झाले होते. माजी नगरसेविका पूजा कोद्रे या कार्यालयाकडील आस्थापना विभागात आल्या होत्या. उप अधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्या टेबलजवळ येऊन त्यांनी कार्यालयाच्या तळमजल्यावरील बारनिशी विभागाचे प्रवेशद्वारावरील माझ्या नावाचा बोर्ड का काढला? असा जाब विचारला. सदर बोर्ड निखळला होता व धूळ, जाळ्याजळमटे साठल्यामुळे तो बोर्ड बारनिशी विभागामध्ये उभा करून ठेवला होता, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यानुसार तो बोर्ड त्वरित स्वच्छ करून त्याचवेळी पूर्वी आहे तसा पूर्ववत लावण्यात आला. याबाबतचा फोटो त्यांच्या व्हॉटस अपवर पाठविला होता. यापुढे असे होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल असे कळविले होते, असेही भुजबळ यांनी सांगितले. मात्र, तरीही कोद्रे यांनी वाद घातला अशी तक्रार भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांकडे तसेच हडपसर पोलीसांत केली होती. मात्र, हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. कोद्रे याबाबत म्हणाल्या की, क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष असताना दिव्यांगांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागू नये, तळमजल्यावर व्यवस्था व्हावी या सोईसाठी आपण खोली साफ करून घेऊन तेथे बारनिशी विभाग सुरू केला होता. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने बोर्ड लावला होता. आता आचारसंहिता नसतानाही बोर्ड काढण्याचे कारण नाही, असे सांगितले. भुजबळ यांनीही ते मान्य केले आहे. |
गया (बिहार), 12 सप्टेंबर : बिहारमधील गया इथं एक मोठं हत्याकांड समोर आलं आहे. पत्नीचं दिरावर प्रेम झाल्याचा आरोप करत नवऱ्याने दोघांची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे गयामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचे आपल्या भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. या संशयातूनच आरोपीने पत्नीसह स्वतःच्या भावाचीही निर्घूण हत्या केली. तसंच त्यांना संपवल्यानंतर दोघांचे मृतदेह झाडाला बांधले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती टुली मांझी आणि सासऱ्याला अटक केली आहे. टुली मांझी याच्या घरापासून जवळच असणाऱ्या शेतात गुरुवारी सकाळी एका झाडाला एक युवक आणि एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एकाच वेळी दोघांचे मृतदेह सापडल्याने आसपासच्या गावांतही खळबळ उडाली. बघता बघता तिथं शेकडो लोक जमा झाले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 'मृत महिलेचं नाव लालती देवी तर पुरुषाचं नाव कुंदन उर्फ टेनी मांझी आहे. लालती देवी ही कुंदनसोबत एका आठवड्यापूर्वी फरार झाली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपी टुली मांझी याने पत्नी आणि युवकाची हत्या केली,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
सुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस जमिनीतील कंद वाढू लागतो. वर्षातील आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. सुरणाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्रीएवढे मोठे असू शकते. सुरणाचा कंद काहीसा ओबडधोबड, अर्धगोलाकृती, एकंदरीत काहीसा चपटा गर्द तपकिरी रंगाचा असतो आणि आतून किंचित लालसर किंवा किंचित बदामी असतो. सुरण चिरताना हाताला खाज येते किंवा चिंच न घालता त्याची भाजी केली तर घसा खवखवतो. कारण त्याचा दांडा हिरवा असतो आणि त्यावर फिकट पांढरे ठिपके असतात. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे. सुरणाचे वन्यसुरण आणि ग्राम्यसुरण असे दोन प्रकार आहेत. ग्राम्य म्हणजे गावठी. या सुरणाची लागवड करावी लागते. वन्य म्हणजे जंगली. हा सुरण जंगलात आपोआप वाढतो. जंगली सुरण औषधासाठी आणि गावठी सुरण खाण्यासाठी वापरतात. सुरणाचा खाजरेपणा घालवण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात. परंतु जंगली सुरण उकळावा लागतो. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. सुरणाच्या कंदाची बटाट्यासारखी उकडून भाजी करतात. तुपात हिरव्या मिरच्या जिरे फोडणीला घालून उपवासाची भाजी करतात; तसेच गरम किंवा गोडा मसाला घालून रसभाजी करतात. सुरण रूक्ष, तुरट, तिखट गुणधर्माचे आहे. भूक व चव वाढविते. दमा, श्वासनलिकेचा दाह, वांती, पोटदुखी, मूळव्याध, रक्तविकार, हत्तीरोग यावर सुरण उपयुक्त आहे. सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक, कफोत्सारक आहे. सुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीसाठी गुणकारी आहे. भाजीमुळे यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. |
पणजी : ई-व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट आणि तिच्या संस्थापकांना परकीय चलन विनिमय कायद्याचे कथित उल्लंघन केल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस जारी करताना १०,६०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. किराणा क्षेत्रातील बलाढय़ अमेरिकी कंपनी वॉलमार्टच्या मालकीच्या या कंपनीसंबंधाने चौकशी व तपास पूर्ण केल्या गेल्यानंतर ही आरोपवजा नोटीस दिली गेली असल्याचे सूत्रांनी सांगितले. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांच्यासह १० जणांना परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) विविध कलमांखाली गेल्या महिन्यातच नोटीस बजावली गेली आहे. त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांमध्ये थेट परकीय गुंतवणूक नियमांचे आणि मल्टि-ब्रँड रिटेलसंबंधी नियमनांचा उल्लंघनाचा समावेश आहे. |
इस्लामाबाद, 26 फेब्रुवारी : परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी एअर स्ट्राईकनंतर पत्रकार परिषद घेत भारतानं केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर आता पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली असून आम्हालाही स्वसंरक्षण, प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. भारताच्या हल्ल्याला आम्ही देखील प्रत्युत्तर देणार अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमुद कुरेशी यांनी दिली. यावेळी पाकिस्तानच्या संसदेमध्ये 'इम्रान खान शेम शेम' अशा घोषणा देखील देण्यात आल्या. पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा तळ उध्वस्त केला अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे मोठं नुकसान झाले आहे. जैश कडून दहशतवादी कारावाया सुरूच आहे. भारताच्या संसदेवर हल्ला झाला. नंतरही अनेक हल्ले झाले. जैश ए मोहम्मदचे हजारो जिहादी हल्ल्याच्या तयारीत होते. पाकिस्तानच्या मदतीशीवाय अतिरेकी असे कार्य होऊच शकत नाही. अशी माहिती विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं जम्मूतील कानाचक्क येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतानं देखील चोख प्रत्यत्तर दिलं असून यामध्ये पाकचा एक सैनिक ठार तर, एक सैनिक जखमी झाला. यानंतर आता सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मसूद अझरचा मेव्हणा ठार? पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता. या हल्ल्यामध्ये 200 दहशतवादी ठार झाले असले तरी मौलाना युसूफ अझर ठार झाला की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली. दरम्यान, यापूर्वी पाकचे पंतप्रधान इम्नान खान यांनी भारतानं एक संधी द्यावी. पुरावे दिल्यास दहशतवाद्यांविरोधात कारवाई करून असं म्हटलं होतं. पुलवामा हल्ल्यामध्ये 14 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' अर्थातच अभिनेत्री 'सोनाली कुलकर्णी'ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. सोनालीचे नुकतेच 'पांडू' आणि 'झिम्मा' नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकतंच सोनाली कुलकरर्णीनं एक ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत. |
नवी दिल्लीः भारताचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९४. २८ टक्के तर कोरोना रुग्णांचा मृत्यू दर १. ४५ टक्के आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांचा दर ४. २६ टक्के आहे. आतापर्यंत देशात ९६ लाख ८ हजार २११ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ९० लाख ५८ हजार ८२२ जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात कोरोनामुळे १ लाख ३९ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला. सध्या भारतात ४ लाख ९ हजार ६८९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्व कोरोना रुग्ण क्वारंटाइन आहेत. या रुग्णांवर वैद्यकीय पथकांची देखरेख आहे. आवश्यकतेनुसार उपचार सुरू आहेत. (Covid-19: 36,652 new cases take India's virus tally to 96,08,211) मागील २४ तासांमध्ये ४२ हजार ५३३ कोरोना रुग्ण बरे झाले. देशात मागील २४ तासांमध्ये कोरोनामुळे ५१२ जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांमध्ये कोरोना अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांच्या संख्येत ६ हजार ३९३ने घट झाली. देशात मागील २४ तासांमध्ये ३६ हजार ६५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांनी ही याचिका केली आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. कोरोनाचे विषाणू नाकावाटे अथवा तोंडावाटे शरीरात जाण्याचा सर्वाधिक धोरा आहे. या आजारावर अद्याप औषध किंवा लस बाजारात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गर्दी केल्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मागील काही दिवसांत कोरोना नियंत्रणात येत आहे, असे चित्र होते. पण सणांच्या दिवसांत बाजारांमध्ये गर्दी झाली. नागरिकांची एकमेकांकडे होणारी ये-जा वाढली आणि दिल्लीतले कोरोनाचे रुग्ण वाढले. आता शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमावर्ती भागात प्रचंड गर्दी आहे. पोलिसांना त्यांची इतर कामं सोडून सीमावर्ती भागात बंदोबस्तासाठी रात्रंदिवस उभे राहावे लागत आहे. दिल्लीच्या सीमेवरील प्रचंड गर्दीमुळे दिल्ली तसेच शेजारी राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढून संकटाची तीव्रता वाढण्याचा धोका आहे, अशी चिंता याचिकाकर्ते अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांनी व्यक्त केली आहे. |
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर ऊस संशोधन केंद्राचे संशोधक, ऊस विभाग आणि साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या पथकांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. शेतामध्ये ऊसावर पसरलेल्या टॉप बोरर व अन्य किड रोगांपासून पिकाला कसे वाचवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. देहात विभागात ऊसावर या किडीसह इतर रोगांचा फैलाव झाला आहे. त्यामुळे ऊस संशोधन केंद्राचे संयुक्त संचालक डॉ. वीरेश सिंह, किटक तज्ज्ञ डॉ. निलम, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, खांडसरी अधिकारी चंद्रशेखर सिंह, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक संजय कुमार, बृजेश कुमार राय, बुढाना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राज सिंह चौधरी, महाव्यवस्थापक देवेंद्र सिंह आदी उपस्थित होते. दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या पथकाने शहापूर गावातील शेतकरी कुलदिप सिंह आणि धनकुमार, मदीनपूरचे शेतकरी रामकुमार व महिपाल, अलिपूर अटेरनाचे शेतकरी सतवीर सैनी व अजित यांच्या उसाची पाहणी केली. उसात किती प्रमाणात टॉप बोरर किड पसरली आहे, याचा आढावा घेतला. डॉ. वीरेश सिंह यांनी शेतकऱ्यांना अशी किडग्रस्त रोपे काढून टाकावीत, त्यांची पाने तथा किडलेला भाग नष्ट करावा असे सांगितले. पिकांना कलोरेन्ट्रेनीलीप्रोल कीटनाशक तसेच कोराजन अथवा फरटेरा हे किटकनाशक ४०० लिटर पाण्यात १५० मिलीलीटर इतके मिसळून फवारावे असे सांगितले. शेतकऱ्यांना इतर उपायांचीही माहिती देण्यात आली. |
आमच्याकडे आता आमचा महसूल गट, डिझाइन कर्मचारी, तांत्रिक क्रू, क्यूसी टीम आणि पॅकेज ग्रुप आहे.आमच्याकडे आता प्रत्येक प्रक्रियेसाठी कठोर उत्कृष्ट नियमन प्रक्रिया आहेत.तसेच, आमचे सर्व कामगार USB सह इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंपसाठी प्रिंटिंग विषयात अनुभवी आहेत,रिचार्ज करण्यायोग्य ब्रेस्ट पंप , यूएसबी हँड्स-फ्री ब्रेस्ट पंप , Mooimom ब्रेस्ट पंप मॅन्युअल ,साइड्स रिचार्जेबल ब्रेस्ट पंप.'ग्राहक प्रथम, पुढे फोर्ज अहेड' या व्यवसाय तत्त्वज्ञानाचे पालन करून, आम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही देश-विदेशातील ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.हे उत्पादन युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अँगुइला, सर्बिया, मेक्सिको, पॅरिस यांसारख्या जगभर पुरवले जाईल. आमच्या सोल्यूशन्समध्ये अनुभवी, प्रीमियम दर्जाच्या वस्तूंसाठी राष्ट्रीय मान्यता मानके आहेत, परवडणारे मूल्य आहे, जगभरातील लोकांनी स्वागत केले.आमची उत्पादने क्रमाने वाढतच जातील आणि तुमच्या सहकार्यासाठी उत्सुक असतील, खरोखरच लोकांच्या कोणत्याही वस्तू तुमच्यासाठी स्वारस्यपूर्ण असणे आवश्यक आहे, याची खात्री करा.एखाद्याचे सखोल तपशील मिळाल्यावर तुम्हाला कोटेशन देण्यास आम्हाला आनंद होईल. |
कसे आपला चेहरा वर pores स्वच्छ? मनुष्य चेहरा - असे त्याचे कॉलिंग कार्ड. तो देखावा मध्ये आहे, कपडे योग्य ओळखले जाते. एक व्यक्ती, व्यवस्थित असेल तर चांगले दिसते, नंतर तो इतर लोकांना, त्याला उलट छान कारण ड्रॅग करा. पण कधी कधी लीड्स देखावा, त्यामुळे सहकारी socializing काम साधन समस्या, असू शकते. या प्रोफाइलमध्ये काय आहे नाही, आपण सतत स्वतः ला जपणे आवश्यक आहे. चेहरा पुरळ, comedones, किंवा मुक्तता pores आहे, तर या उणीवा लवकर निराकरण करणे आवश्यक आहे. आणि कसे स्वच्छ चर्चा करू आपला चेहरा वर pores घरी. जे कोरडे आहे जेथे त्वचा अधिक तेलकट आहे, जेथे काळे ठिपके आहेत - प्रथम आपण soberly त्यांच्या परिस्थिती मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तेव्हा आणि कार्यपद्धती करण्यासाठी तिचा चेहरा आणण्यासाठी करण्यासाठी चालते कसे करावे - मग तुमच्या तोंडावर pores कसे साफ करण्यासाठी क्रिया स्पष्ट योजना करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थः - वॉशिंग - दररोज. - मुखवटा - 1 किंवा 2 वेळा आठवड्यातून. - खुजा - नाही 1 पेक्षा जास्त दर आठवड्यात वेळ. - कमी करणे - दररोज. - वाळवणे - दररोज 1 वेळा. च्या सुरूवाती पासून प्रारंभ करू. आपण प्रत्येक दिवस, सकाळी व संध्याकाळी गरज धुवा. हे बालवाडी पासून प्रत्येक व्यक्ती ज्ञात आहे. हे लोशन, foams आणि साबण विविध वापर न करता थंड पाण्याने धुवा सर्वोत्तम आहे. वॉशिंग केल्यानंतर, एक टॉवेल सह चेहरा स्वच्छ करण्याची गरज नाही, तो केवळ किंचित ओले त्वचा आहे. मग आम्ही साधन विविध (उदा, मलई) अर्ज लव्हाळा नये, त्वचा थोडे श्वास द्या. pores खूप बंद आहेत, तर तो इतर pores clogs म्हणून पाया वापरणे शिफारसित नाही आहे, आणि अशा प्रकारे, त्वचा सर्व श्वास नाही. या बाबतीत ते पावडर वापर करणे चांगले आहे. मास्क अपरिहार्यपणे चिकणमाती आधारित करणे आवश्यक आहे. त्या मातीच्या चेहरा pores मध्ये खोल कुणालाच आणि घाण बाहेर ढकलणे करू शकता. दररोज, कारण त्वचा खूप खराब झालेले आहे आणि त्याच्या मखमलीसारखे मऊ व गुळगुळीत हरले, एक मास्क नाही करू शकता. आठवड्यातून एकदा पुरेसे होईल. Scrubs लोक comedones आहेत त्यांना चांगला वापर. त्यांना सामोरे नाही फक्त गरज, पण अगदी आवश्यक. धूत तेव्हा आपण जर्दाळू कर्नल आधारावर एक प्रकाश खुजा वापर केला पाहिजे. तसेच, आठवड्यातून एकदा कॉफी सोयाबीनचे केले (ते बारीक milled आणि मुद्रित केली आहे) एक वेगळी मजा वापर करून, सु साफसफाई, उदाहरणार्थ. खुजा कोरडी त्वचा लागू नाही, आणि हलके पाणी सह moistened. अपरिहार्यपणे केल्यानंतर, त्वचा मऊ करणे वाईट रीतीने नुकसान सुरवातीला थर पापुद्रा काढणे नंतर आवश्यक आहे. सर्वोत्तम औषध येथे ऑलिव तेल करेल. तो pores लोढणे नाही, त्वचा उत्तम प्रकारे breathable आहे आणि जीवनसत्त्वे saturates. तेल एक मलई, एक पातळ थर म्हणून लागू केले जावे. काही मिनिटे द्या, नंतर एक कापूस पॅड जादा बंद पुसणे. तरीही उत्तम पर्याय - रात्रभर चेहरा जैतुनाचे तेल सोडून. मग त्वचा घाण ठरतो खूप तेलकट किंवा चेहऱ्यावर भागात वंगण आहे - नाक पंख, कपाळ, इ, तो असे हे टाळण्यासाठी झोन डेटा सुकणे आवश्यक आहे . . . चांगल्या अवस्थेत परंपरागत बाळ साबण आहे. हे फक्त चरबी सामग्री करून झोपणे आहेत, आणि नंतर भरपूर पाणी स्वच्छ धुवा त्या ठिकाणी लागू करणे आवश्यक आहे. कसे व्यावसायिक उपकरणे किंवा सौंदर्य प्रसाधने सुपूर्त न करता pores स्वच्छ? आपण उकळत्या पाण्यात, एक टॉवेल आणि विवाहाची अंगठी एक वाडगा आवश्यक आहे. या प्रकारे, आपण नेहमी फक्त चेहरा वर लहान अपुरेपणा लावतात करू शकता. त्यामुळे, आपण योग्यरित्या करणे आवश्यक आहे चेहरा स्टीम. मद्य प्यालेला सर्व pores योग्य उघडले जाते, जेणेकरून, किमान अर्धा तास आयोजित करावी. मग ओळ ठेवण्यासाठी कपाळ पासून 45 अंश कोनात प्रतिबद्धता अंगठी घ्या आणि त्याद्वारे pores स्वच्छ. दररोज प्रक्रियांसाठी वेळ, नंतर कसे नाही, तर pores स्वच्छ? हे करण्यासाठी, आपण सौंदर्य सलून ऑफर प्रक्रीया करण्यासाठी रिसॉर्ट करू शकता. उदाहरणार्थ, चेहर्याचा साफ करणारे, सोलणे, ध्वनिलहरी साफ करणारे. सर्वोत्तम, आवश्यक असल्यास आपण प्रक्रिया सौंदर्यप्रसाधनांचा उत्पादक किंवा विक्रेता निवडेल शकते. |
नवी मुंबई : वाशीतील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यावरील माती काढण्यासाठी मशीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे उडणारी धूळ नागरिकांच्या घरांमध्ये जात असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्वच विभागात कामे सुरू आहेत. वाशी सेक्टर १५ मधील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. डांबरीकरण करण्यासाठी रस्त्यावर असलेली माती काढण्यासाठी मशीनचा वापर करण्यात आला. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. काम सुरू असलेल्या शेजारील इमारतींमधील घरांमध्येही मोठ्या प्रमाणावर धूळ गेली. ठेकेदारांच्या बेजबाबदारीमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असून, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. |
वाराणसी (उत्तरप्रदेश) : देशात अशी ८ राज्ये आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. या राज्यांत हिंदूंना अल्पसंख्य ठरवून त्यांना अल्पसंख्यांकांना मिळणारे अधिकार मिळणार आहेत का ? , असा प्रश्न वाराणसी येथील अखिल भारतीय संत समितीमधील साधू आणि संत यांनी विचारला आहे. अल्पसंख्यांकांच्या नावाखाली ५ कोटी मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करतांना त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. तसेच केंद्र सरकारला पत्र पाठवून अल्पसंख्यांकांची व्याख्या स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या ईदच्या वेळी केंद्र सरकारने ५ कोटी मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर समितीने पंतप्रधान, अल्पसंख्य कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि अल्पसंख्यांक आयोग यांना हे पत्र लिहिले आहे. त्यात ९ सूत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती याविषयी म्हणाले की, १. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 'एक जन एक राष्ट्र' असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यघटनेत अल्पसंख्यांक शब्दाची व्याख्या कुठेही नाही. डिसेंबर १९९२ मध्ये पहिल्यांदा काँग्रेस सरकारने अल्पसंख्यांक आयोगाच्या स्थापनेचा प्रस्ताव आणला होता. तो मूळ राज्यघटनेच्या धोरणाच्या विरोधात होता. त्यामुळे भारतात अल्पसंख्यांक कोण आहे, हा प्रश्न आहे. २. भारतातील ८ राज्यांमध्ये (जम्मू-काश्मीर, मेघालय, मिझोराम, पंजाब, लक्षद्वीप, नागालॅण्ड, अरुणाचल प्रदेश आणि मणीपूर) हिंदू अल्पसंख्यांक आहेत. अडीच ते ३८ टक्क्यांपर्यंत तेथे हिंदू आहेत. या अल्पसंख्य हिंदूंनाही सरकारकडून दिल्या जाणार्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ३. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या काळात अल्पसंख्यांक आयोगाकडे मागणी केली होती की, राज्यवार अल्पसंख्यांकांची व्याख्या बनवून दाखवा. आम्हीही सरकारकडे हीच मागणी करत आहोत. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा आम्हाला आनंद आहे; मात्र या ८ राज्यांतील हिंदूंनाही ती मिळाली पाहिजे. |
Maharashtra Election 2019: 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार' सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना आघाडीकडून उभे करण्यात येणार होते. कराड - विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे. कराडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी आले होते. अमित शहा म्हणजे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडात येणार होते पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठविला असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी अमित शहांना लगावला आहे. कराड दक्षिण या मतदारसंघातून भाजपाकडून अतुल भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवित आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना आघाडीकडून उभे करण्यात येणार होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. कोण आहेत श्रीनिवास पाटील? श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे महाविद्यालयीन काळातील जिवलग मित्र आहेत. या दोघांचे शिक्षण पुण्यात झाले. श्रीनिवास पाटील पुढे सनदी अधिकारी झाले. पवारांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या पाटील यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कराड मतदारसंघातून पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. तसेच २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही पाटील सलग दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या काळात श्रीनिवास पाटील यांना सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता वयाच्या ७९ व्या वर्षी ते लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा भेदण्यासाठी भाजपाने दोन राजेंना आपल्या गोटात सामील करुन घेतलं आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा पोटनिवडणुकीत बाजी कोण मारणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. |
राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. चिमूर : राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. नागभीड तालुक्यातील पारडी ठाणा येथील अल्पवयीन मुलीवर असाच अत्याचार झाला होता. या प्रकरणातील पीडित मुलीला अद्याप न्याय मिळाला नाही. सरकारने केवळ आश्वासने देऊन बोळवण केली, असा आरोप मूलनिवासी आदिवासी गोंडीयन समाज व आदिवासी संघटनांनी यावेळी केला. शहरातील गोंड मोहल्ला नेताजी वॉर्डातून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चेकऱ्यांनी संस्था चालकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील येथील मुख्य मार्गाने हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. त्यांनतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. समाजातील ज्येष्ठ मंडळींनी राजुऱ्यातील घटनेचा कठोर शब्दात निषेध केला. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ झाले आहे. परंतु, शासनाने अशी प्रकरणे घडू नये, याकरिता कडक उपाययोजना करण्याची मागणी मान्यवरांनी केली. शिष्ठमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. राजुरा येथील शाळा व संस्था कायमची बंद करावी, संस्था चालकांना त्वरीत अटक करावी, दोषी कर्मचाºयांना निलंबीत करून निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सर्व सवलती कायमच्या बंद कराव्यात, संस्था चालकाकडून पीडित मुलींना उपचाराकरिता १० लाख द्यावे, या प्रकरणात हयगय करणारे डॉक्टर व ठाणेदारावर अॅट्रासिटी कायद्यातंर्गत गून्हा नोंदवून तत्काळ निलंबित करावे, आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, निधी अखर्चित ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी, आदी १४ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदार संजय नागटिळक व उपविभागीय पोलीस अधिकारी इंगवले यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी मनोज मडावी, नानाजी उईके , माधुरी वरखेडे, सरस्वती उईके, इंदरशहा मडावी, दागो वरखेडे, प्रमोद कोयचाडे, दिलीप मडावी, मंगला मडावी, पुष्पा नैताम आदी उपस्थित होते. दुपारी १२. ०० वाजता सुर्य आग ओकत असतानाही हजारो आदिवासी बांधव, विद्यार्थिनी व महिला सहभागी झाले होते. |
रनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील रामा कोहोकडे यांच्या कुटुंबात गंगाधर यांचा जन्म झाला़ रामा कोहोकडे यांना सोळा एकर शेती होती़ त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता़ आई, वडील, एक भाऊ असं गंगाधर कोहोकडे यांचं कुटुंब़ पाचवीपर्यंत शिकल्यानंतर त्यांनी सैन्यात भरती व्हायचा ध्यास घेतला. त्याप्रमाणे सैन्यात भरतीही झाले़ भरती झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्यांचा विवाह निंबवी येथील शशीकला बाळकृष्ण शिर्के यांच्याशी १९६८ मध्ये झाला. १९६७ मध्ये भारत-पाक युद्ध झाल्यानंतर देशभरात सगळीकडे सैन्यदलात बदल करण्यात आले होते़ शिवाय सैनिकांना वर्षातून दोनदा मिळणाऱ्या सुट्ट्या रद्द करून थेट वर्ष-दोन वर्षांनंतर सुट्ट्या देण्यात येत होत्या़ या फेरबदलात नारायणगव्हाण येथील जवान गंगाधर कोहोकडे यांना जम्मू-काश्मीर सीमेवर बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते़ त्यांनी तिथं अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. आपलं सर्वस्वच देशसेवेसाठी अर्पण केल्याचं ते नेहमी घरी सांगत असायचे. ते १९७१ चे साल होते़ गंगाधर बैलपोळ्यासाठी सुट्टीवर आले होते़ साधारणतः वर्षभरानंतर ते घरी आले होते़ बैल पोळ्याचा सण झाला आणि त्यांना तार आली की तत्काळ ड्यूटीवर हजर व्हावे़ गंगाधर यांनी घर सोडलं आणि ड्यूटीवर हजर झाले़ नोव्हेंबर १९७१ मध्ये पाकिस्तानच्या पूर्व भागात गंगाधर यांच्यासह सुमारे तीन हजार जवानांची तुकडी पाठवण्यात आली होती़ त्याआधी गंगाधर यांचा पगार झाल्यानंतर त्यांनी तातडीने आपली पत्नी शशीकला यांना पगाराची मनिआॅर्डर पाठवली. शशीकला यांना ३ डिसेंबरला ती मनिआॅर्डर मिळाली़ त्याच दिवशी पूर्व पाकिस्तानजवळ भारत व पाकिस्तानी सैन्यामध्ये युद्ध सुरु झाले़ दिवसभर धुमश्चक्री होऊन पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश आलं होतं. त्यामुळे सायंकाळी भारतीय लष्कराने पुढील कारवाई थांबवली होती़ दुसरा दिवसही पुन्हा युद्धानेच सुरु झाला़ सायंकाळपर्यंत पाकिस्तान बराच बॅकफूटवर गेला होता़ ४ डिसेंबर १९७१ रोजी गंगाधर व त्यांचे सहकारी रात्री जेवण करून पुन्हा गस्त घालण्यात व्यस्त होते़ ५ डिसेंबरच्या पहाटे चार वाजेपर्यंत सर्वत्र शांतता होती़ मात्र, चार वाजण्याच्या सुमारास अचानक भारतीय लष्कराच्या तळावरच पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला़ अंधाºया रात्रीत कुठून गोळीबार होतोय? हेच समजेनासे झाले. त्यामुळे भारतीय जवानांनी गोळीबाराच्या आवाजांच्या दिशेने फायरिंग सुरु केली़ गंगाधर कोहोकडे हे गनर असल्यामुळे फायरिंग करण्यात ते सर्वांच्या पुढे होते़ त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने थेट भारतीय सैनिकांच्या तळावरच बाँब फेकण्यास सुरूवात केली. अन् या बाँबहल्ल्यात नारायणगव्हाणचे गंगाधर कोहोकडे यांच्यासह अनेक भारतीय जवान शहीद झाले. श्रावणातल्या पोळ्याला ते सुट्टी घेऊन आले होते़ तार मिळताच ते सैन्यात हजर झाले़ पुन्हा आलेच नाहीत़ ते शहीद झाले़ पण त्यांच्या अंत्यविधीसाठी घरच्या मंडळींना पार्थिवसुद्धा पहायला मिळालं नाही, असे सांगताना वयाची सत्तरी गाठलेल्या वीरपत्नी शशीकला यांचे डोळे पाणावले़ आमच्या हाताला काहीच लागलं नाही, असं त्या डोळे पुसतच सांगत होत्या. घरी शेती असल्याने त्या घरी शेती करीत होत्या़ घरातील वाटणीत आठ एकर शेती होती़ त्यात कुकडी कालव्यासाठी पाच एकर गेल्याने अवघी तीन एकर शेती कोहोकडे यांना राहिली होती़ पती शहीद झाल्यावेळेस शशीकला या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या़ तर सुनीता ही मुलगी अवघ्या दोन वर्षांची होती़ पतीच्या निधनाने आघात झालेल्या शशीकला यांना साथ देण्यासाठी त्यांची आई त्यांच्यासोबत बरीच वर्षे थांबल्या़ दुसरी मुलगी झाली़ तिचं नाव अनिता ठेवलं. शशीकला यांना अवघी दरमहा एकशे तीस रूपये पेन्शन तसेच केंद्र सरकारचे पाच हजार व राज्य सरकारचे पाच हजार असे दहा हजार रूपये मिळाले़ एकशे तीस रूपयांची दरमहा पेन्शन व शेती करीत शशीकला यांनी दोन मुलींना मोठं केलं़ सैन्यदलाकडून शशीकला यांना बोलावणं आलं होतं. शिवणकाम शिकवून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याचे आश्वासन सैन्यदलाने त्यांना दिले होते़ परंतु वीरपत्नी शशीकला यांनी गावात, नारायणगव्हाणमध्येच राहणं पसंत केलं. या वीरपत्नीने वयाची सत्तरी ओलांडून ७१ व्या वर्षात पदार्पण केलंय. पण आजही त्या स्वतः शेतात काम करीत आहेत. मोठी मुलगी सुनीता निवृत्ती बढे या मुंबईत तर अनिता संतोष सात्रस या न्हावरा (पुणे) इथं असतात. अधूनमधून मुलींकडे जाऊन आल्यानंतर आपलं एकांगी जीवन त्या जगत आहेत. १९७२ च्या सुमारास गावात शहीद जवान गंगाधर कोहोकडे यांचं स्मारक बांधण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थांनी केला होता. पण जागेबाबत एकमत झालं नव्हतं. त्यामुळे स्मारक तसंच राहून गेलं. अलिकडच्या काळात सरपंच सुरेश बोºहुडे यांनी शहीद जवान गंगाधर कोहोकडे मार्ग असं नाव गावातील रस्त्याला दिलं आहे. गावातील शाळांमध्ये कोहोकडे यांच्या वीरगती दिनी विविध स्पर्धा घेतल्या जातात़ यानिमित्ताने सुरेश बोºहुडे मित्र मंडळाच्या वतीने शशीकला कोहोकडे यांचा गौरवही करण्यात आला. |
मुंबई । शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. शिंदेंनी 35 समर्थक आमदारांना सोबत घेत बंड केल्यानंतर आता शिवसेना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर सेना विरूद्ध एकनाथ शिंदे वाद आणखी चिघळल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बातचीत केली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांची तक्रार केल्याचं समजतं. संजय राऊत फोनवर चांगलं बोलतात मात्र प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या या तक्रारीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी खोचक शब्दात एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. अडीच वर्ष सत्तेचा मलिदा ज्यांनी चाखला तेच लोक आता बोलत आहेत, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असून यामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना संजय राऊत अग्रस्थानी होते. तर शिवसेनेनं भाजपसोबत युती करावी असा एकनाथ शिंदेंचा आग्रह होता. दरम्यान, संजय राऊतांनी खोचक शब्दात टीका केली असून एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे पुढे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठेवल्या 'या' अटी! |
तुम्ही जर बाहेर जेवायला जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक केळी आणि दही खा. दिवाळीच्या निमित्ताने चॉकलेट, कुकीज किंवा झटपट मिठाई खाण्यापेक्षा डेजर्ट खाणे चांगले. (photo: indian express) दिवाळीच्या सणामध्ये खाण्यापिण्याबाबत लोकांमध्ये अनेकदा द्विधा मनस्थिती असते. लोकांना वाटते की त्यांनी मिठाई आणि पदार्थ खाल्ल्यास त्यांची पचनक्रिया बिघडते. त्यामुळे लोकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे, ते खासकरून दिवाळीच्या दिवशी काहीही खाणे टाळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिव्यांच्या या सणाला रात्री उशिरा जेवणाचा प्लॅन करत असाल तर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी काही फूड टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्ही अवलंबू शकता. तुम्ही जर बाहेर जेवायला जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक केळी आणि दही खा. कारण हे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिकचे उत्तम मिश्रण आहे. लोकं सहसा रात्रीच्या जेवणानंतर पेय घेतात, त्यामुळे दही आणि केळी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. पोषणतज्ञ रुजुता दिवेकर सांगतात की, दिवाळीच्या निमित्ताने चॉकलेट, कुकीज किंवा झटपट मिठाई खाण्यापेक्षा डेजर्ट खाणे चांगले. कारण डेजर्ट रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. भाऊबीजनिमित्त 'या' विविध प्रकारच्या मेहंदी डिझाईनने तुमचे हात बनवा सुंदर! रुजुता दिवेकर यांनी यावेळी सांगतात की, तुम्ही जर रात्री उशिरा जेवत असाल तर फक्त एक किंवा दोन स्टार्टर्स निवडा. कारण रात्री जास्त गोष्टी खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम तर होतोच पण आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. याच बरोबर करीना कपूरचे न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करून घरी परतत असाल तर येताच तुमच्या पायाला तुपाने मसाज करा. कारण तुपाने मसाज केल्याने गॅस आणि पोटफुगीचा त्रास होत नाही आणि रात्री चांगली झोप लागते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्री एक ग्लास कोमट पाणी देखील पिऊ शकता. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोकं त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर रुजुता या इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतात आणि त्या त्यांच्या पोस्टद्वारे लोकांना खाण्याबद्दल अलर्ट करत असतात. |
मुद्रण ही एक जगभरामध्ये सध्या जोरात विकसित होणारी इंडस्ट्री आहे. यामध्ये असंख्य नोकरीच्या संधी देश आणि विदेशामध्ये उपलब्ध आहेत. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे इतरांप्रमाणेच विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. परीक्षा होऊन नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागलेले आहेत. सर्व पालक व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पुढील शिक्षणाची आणि करिअरच्या दृष्टीने क्षेत्र निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच पालकांची इच्छा असते की, माझ्या पाल्याने चांगल्यात चांगले शिक्षण घेऊन उच्च पदाची नोकरी अथवा मोठा व्यवसाय सुरू करावा. परंतु कोरोना महामारीमुळे काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कमी झाले अथवा इतरही काही आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना सध्याच्या महागाईच्या काळात विद्यार्थ्याची शैक्षणिक फी आणि इतर खर्च परवडेल असाच कोर्स अथवा अभ्यासक्रम काहीजण निवडताना दिसतात. मुद्रण ही एक जगभरामध्ये सध्या जोरात विकसित होणारी इंडस्ट्री आहे. यामध्ये असंख्य नोकरीच्या संधी देश आणि विदेशामध्ये उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनामध्ये सर्वच ठिकाणी प्रिंटींगचा वापर आपल्याला दिसून येतो. जगभरामध्ये आणि आपल्या शेजारी काय चालले आहे, हे जरी माहीत करून घ्यायचे असल्यास प्रत्येकाला वर्तमानपत्राचाच आधार घ्यावा लागतो. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात मोबाईलचा वापरही वाढलेला असला, तरी मोबाईलवर देखील प्रिंटिंग हे आलेच की, अगदी दुकानातून आणलेले वाण सामानापासून विमानातील प्रवाशांना व वैमानिकांनाही आवश्यक असणाऱ्या सूचना यापर्यंत सर्वच ठिकाणी प्रिंटिंगचा वापर हा करावाच लागतो. काही ठिकाणी अक्षरमुद्रा नसेल त्याठिकाणी सिंबॉलिक पद्धतीनेही असेल परंतु तेथेही प्रिंटिंग करावेच लागते. मग ते कागदावर असेल, प्लॅस्टिकवर असेल अथवा मोठ्या खोक्यांपासून मिठाईच्या बॉक्सवरचेही असेल. विविध वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी पॅकेजिंग क्षेत्रातसुद्धा प्लॅस्टिकवर मात करत पर्यावरण पूरक वस्तू तयार करणे, कागद, पुठ्ठा तयार करणे आणि त्यावरही प्रिंटिंग करणे हाही भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असल्याने पेपर इंडस्ट्रीमध्ये आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्यामुळे प्रिंटिंग बरोबरच याही क्षेत्रात करिअर घडविता येते. पारंपरिक पद्धतीने स्क्रीन प्रिंटिंगपासून अद्ययावत अशा तंत्रज्ञानामुळे डिजिटल प्रिंटिंग आणि थ्री डी प्रिंटिंगलाही जगभरातून मोठी मागणी असून, हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. जागतिक स्तरावर पुढील पाच वर्षांमध्ये या क्षेत्राची उलाढाल मोठ्या प्रमाणात होणार असून २. २७ टक्के इतक्या जास्त प्रमाणात व्यवसाय वाढण्याचे संकेत आजपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहेत. या संधीचा फायदा आपल्याला नक्कीच घेता येऊ शकतो आणि आपण प्री-प्रेस, प्रेस आणि पोस्ट प्रेस यामधील आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवू शकतो. जाहिरात क्षेत्रामध्येही होर्डिंगपासून मीडियामध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हात काळे करावे लागणे, हाही गैरसमज निघून गेला आहे. मुद्रण म्हणजेच प्रिंटिंग हा एक करिअरच्या दृष्टीने फारसा माहीत नसलेला अभ्यासक्रम आपण विचारात घेतल्यास या क्षेत्रामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी शासनाचा तीन वर्षांचा फूल टाइम कोर्स उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये कमी गुण पडले असतील अथवा दहावी नापास विद्यार्थ्यांना शासनमान्य एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्सही उपलब्ध आहे. एक वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्स केल्याने अद्ययावत अशा मुद्रणातील तांत्रिक शिक्षणामुळे नोकरी अथवा छोटा व्यवसायदेखील सुरू करता येऊ शकतो व स्वतःचे पायावर उभे राहता येऊ शकेल. दहावीनंतर पदविकेला शासनाच्या (डीटीई) नियमानुसार शासनाच्या वतीने महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि बीड येथे असलेल्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी आकारण्यात येणारी फी सुद्धा सर्वसामान्यांना परवडणारी असते. बारावीनंतर मुद्रण पदवीसाठी ते विद्यार्थी पात्र ठरू शकतात. त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांसंबंधी प्रवेशाचे नियम लागू होतात. ते सर्व नियम आणि प्रवेशाचे सर्व वेळापत्रक शासनाच्या वेबसाइटवर पहायला मिळतील सर्व प्रवेशासंबंधीचे नोटिफिकेशन स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केले जाते. बीई प्रिंटिंगच्या चार वर्षांच्या कोर्सनंतरही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या दृष्टीने एमई अभ्यासक्रमासही प्रवेश घेता येतो अथवा परदेशामध्येही उच्च शिक्षणासाठी जाता येते. (लेखक पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष आहेत) |
फुलकोबीच्या हळव्या किंवा लवकर येणाऱ्या जातीस उष्ण हवामान (गड्डा धरताना २५ ते २७ अंश सेल्सिअस) आणि दीर्घ काळ सुर्यप्रकाश (मोठे दिवस) पोषक ठरतो. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान (बटनिंग) आणि कमी प्रतीचा तयार होतो. गरव्या किंवा उशिरा तयार होणाऱ्या स्नोबॉलसारख्या जातींसाठी सुरूवातीपासूनच थंड हवामान (१० ते १६ डी सेल्सिअस) आणि छोटे दिवस मानवतात. पीकवाढीच्या काळात तापमानात अचानक चढउतार झाल्यास गड्ड्याची वाढ चांगली होत नाही. गड्डा घट्ट न होता विरळ राहतो. गड्ड्याचा पृष्ठभाग खडबडीत होणे, मधूनच लहान पाने दिसणे, गड्डा पांढराशुभ्र न राहता त्यावर पिवळसर किंवा जांभळट रंगाची छटा दिसणे, यासारखे दोष निर्माण होतात आणि त्यामुळे गड्ड्याची प्रत कमी होते. कोरड्या आणि उष्ण हवामानात गड्डा लहान आणि कठीण बनतो. * जमीन : फुलकोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी सुपीक जमीन निवडावी. फुलकोबीच्या हळव्या जातींसाठी मध्यम प्रतीची, रेताड, पोयट्याची जमीन योग्य आहे. गरव्या जातींसाठी नदीकाठची गाळवट किंवा भारी सुपीक जमीन निवडावी. फुलकोबी च्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ इतका असावा. * सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये तयार होणाऱ्या हळव्या जाती : या गटातील जातींच्या बियांची पेरणी एप्रिल - मे या महिन्यांमध्ये करून रोपे ४ ते ५ आठवड्यांची झाल्यावर शेतात लागवड करतात. या जातींचे गड्डे सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये काढणीला तयार होतात. १) पुसा कार्तिकी : भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथे ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीची रोपे मध्यम वाढीची असतात. या जातीच्या रोपांची पाने निळसर हिरव्या रंगाची असून गड्डे पिवळसर पांढरे आणि मध्यम आकाराचे असतात. |
न्यूयॉर्क : कोरोनामुळे जगातील अनेक देशांत लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वायदे बाजारात कच्च्या तेलाच्या (पेट्रोलियम) किंमती नीचांकी घसरल्या होत्या. मात्र आता ही स्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. न्यूयॉर्क येथील बाजारात बुधवारी अखेरच्या सत्रात कच्च्या तेलाच्या किमती 4 टक्क्यांनी वाढून त्या 36. 03 डॉलर्स प्रति बॅरल नोंदवल्या गेल्या. काही युरोपीय देशांनी आणि भारताने लॉकडाऊन काही अंशी शिथिल केले आहे. त्यामुळे तेलाला पुन्हा मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून या किंमती वाढल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी तेलाच्या किमती 70 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात घसरून -0. 37 डॉलर पर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. आता हा बाजार सावरत असल्याचे चित्र नव्या माहितीवरून दिसत आहे. |
संजयनगर : निरोगी राहा आणि सशक्त बना तसेच समतोल आहार ही उत्तम यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा दाते यांनी व्यक्त केले. सांगलीतील श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयामध्ये मैत्रेयी ग्रुप सांगली व महाविद्यालय माजी विद्यार्थिनी समिती तसेच महिला आरोग्य विकास समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. दाते म्हणाल्या की, आज महिलांचे शारीरिक व मानसिक सबलीकरण करणे गरजेचे आहे. इंटरनेटवरील अर्धवट माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. पी. आर. पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एस. के. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. शोभा पवार यांनी आभार मानले. |
भारतीय नियमक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक म्हणून वर्षाला सात कोटींहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक म्हणून वर्षाला सात कोटींहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले जाणार असल्याचे समजते. बीसीसीआयने शास्त्रींना तशी ऑफर दिली आहे. ही रक्कम साडेसात कोटींपेक्षा जास्त नसेल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. शास्त्रींसोबत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रसिक्षकांचे वार्षिक मानधन दोन कोटींपर्यंतच असल्याचे सांगितले जाते. अनिल कुंबळे याने प्रशिक्षकपदासाठी साधारण इतक्याच रकमेची मागणी केली होती. बीसीसीआयने काही प्रमाणात त्या मागणीची दखल घेत शास्त्रींना सात कोटींचे पॅकेज देण्याचे ठरवले असावे, अशी माहिकी मिळते. या संदर्भातील करारांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. |
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२. १० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही. नागपूर : अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२. १० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही. खगोलशास्त्राच्या भाषेत याला 'शून्य सावली दिवस' (झिरो शॅडो डे) असे संबोधले जाते. खगोलशास्त्र तज्ज्ञानुसार येत्या २६ मे रोजी भर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी हा शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. जिल्ह्यात २४ ते २८ मे या काळात शून्य सावलीचा अनुभव येईल. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली, असे वाटते. ही खगोलीय घटना रोमांचकारी अनुभवच आहे. तज्ज्ञांच्यानुसार पृथ्वीचा धु्रव २३. ५ अंश उत्तरेकडे कलल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. त्यामुळे सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे २३. ५ अंश आणि उत्तरेकडे २३. ५ अंश भ्रमण करताना दिसतो. एखाद्या अंशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येते. त्यावेळी कोणत्याही वस्तूची सावली दुपारी पडत नाही. सूर्याचा आंशिक कोन मोठा असल्याने एकाच वर्षी दोनदा शून्य सावली अनुभवता येते. वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. मे महिन्यात ३ ते ३० मेदरम्यान १५ ते २२ उत्तर अक्षांशावर महाराष्ट्रात शून्य सावली दिवस घडतो. राज्यात २० ते ३० मेदरम्यान आणि १६ जुलै व ५ ऑगस्टदरम्यान शून्य सावली दिवसाचा अनुभव येईल. मात्र या काळात पावसाळा राहत असल्याने ढगाळ वातावरणामुळे ते पाहता येत नाही. मात्र मे महिन्यात हा अनुभव घेता येतो. पृथ्वीवर मकरवृत्त दक्षिणेकडच्या भागात आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्यावर येत नाही. पण दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर आल्याचा अनुभव येतो व शून्य सावलीचा अनुभव मिळतो. पूर्वी आपली पृथ्वी सपाट आहे, अशी मान्यता होती. मात्र शून्य सावलीच्या प्रयोगामुळे पृथ्वी सपाट नसून गोल आहे व ती आपल्या अक्साभोवती फिरते, हे गृहितक सिद्ध करण्यात यश आले. हे यामागचे वैज्ञानिक महत्त्व आहे. मुलांना झिरो शॅडो डेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा व त्यामागचे विज्ञान समजावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंद्वारे ही घटना प्रत्यक्ष दाखविण्यात येणार आहे. ११. ३० वाजतापासून १२. १० पूर्वी, त्यावेळी आणि त्यानंतर काय फरक दिसतो, हे प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. शून्य सावलीचा अनुभव केवळ नागपुरात घेता येणार आहे. त्यामुळे एक मीटर रॉडच्या मदतीने नागपूर, भोपाळ आणि दिल्ली येथे एकाचवेळी काय परिस्थिती असेल आणि पडणाऱ्या सावलीची लांबी किती असेल, याचा प्रयोग दाखविण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे तांत्रिक अधिकारी महेंद्र वाघ यांनी दिली. |
गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे. गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे. ओबीसींमध्ये एकतेची भावना नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात मागे पडत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले. ओबीसी युवा महोत्सवाचे उद्घाटन गोकुलनगर येथील शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी करण्यात झाले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना योगीता भांडेकर म्हणाल्या, देशात ५२ टक्के ओबीसी असताना ओबीसीमध्ये एकतेची भावना नाही. त्यामुळे संघटन कमी पडत आहे. एकाच शाळेत एकाच बेंचवर बसणाऱ्या एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश दिल्या जाते. मात्र ओबीसी विद्यार्थ्यांना या साहित्यापासून वंचित केले जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथूनच जातीभेदाची सुरूवात होते. जि. प. अध्यक्ष या नात्याने आपण जिल्ह्यातील ओबीसींच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश शासनाकडून मिळण्याकरिता आपण प्रयत्न करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या प्रश्नांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना राज्यात झाल्यामुळे ओबीसींच्या विविध समस्या मार्गी लागणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या गावांमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे. मात्र चुकीच्या सर्वेक्षणाने संबंधित गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील ओबीसींवर अन्याय झाला आहे. या संदर्भात आमसभा व ग्रामसभांचे प्रस्ताव आमच्याकडे पोहोचले आहेत. सदर प्रस्तावाला घेऊन शासन दरबारी अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रयत्न करणार असे डॉ. होळी यांनी सांगितले. प्रा. शेषराव येलेकर म्हणाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या रेट्यामुळेच राज्यात ओबीसी मंत्रालय स्थापन झाले. मात्र या मंत्रालयाला लोकसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त निधी उपलब्ध न झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा मोठे आंदोलन करावे लागेल, असेही प्रा. येलेकर यांनी सांगितले. याप्रसंगी अरूण मुनघाटे, दादाजी चापले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक बांदूरकर, संचालन अक्षय ठाकरे यांनी केले तर आभार नयन कुनघाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला नगरसेवक रमेश भुरसे, श्याम वाढई, प्राचार्य सुरेश डोंगे, पांडुरंग घोटेकर, दादाजी चुधरी, पी. पी. म्हस्के, त्र्यंबक करोडकर, राजेंद्र उरकुडे, पी. टी. देशमुख, प्राचार्य मने, देव्हारे, हरीभाऊ बुरडकर, मत्ते, तुषार वैरागडे, राहूल भांडेकर, अतुल वाढई, शुभम बांगरे, चेतन शेंडे, शिवानी मोहुर्ले आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळच्या सुमारास कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. २४ एप्रिल रोजी सोमवारला या ठिकाणी बुध्दीबळ स्पर्धा घेतली जाणार असून सायंकाळी समुह नृत्य स्पर्धा होईल. |
ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर ३१ मे आधी भरण्यासाठी सर्वसामान्यांची वेबसाइटवर झुंबड उडत आहे. मात्र वेबसाइटवर करभरणा करताना होमपेजच्या पुढील विंडो येण्यासाठी वेळ लागत असल्याने करदाते हतबल झाले आहेत. तरीही सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक महापालिका भवन अथवा जवळील प्रभाग समिती कार्यालयात धाव घेत आहे. विशेष म्हणजे, मालमत्ता कर भरल्यास दहा टक्के सवलतीचे आमिष ठळकपणे दिले जात असले तरीही प्रत्यक्षात पाच टक्केच सवलत मिळत असल्याने करदाते गोंधळून गेले आहेत. |
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ४० हजार कोटींचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले होते. सत्ताबदल झाल्यावर भाजप सरकारने ८० हजार कोटींचे नवे धोरण जाहीर केले. हजारो कोटींची धोरण जाहीर करूनही प्रत्यक्ष काहीच होताना दिसत नाही. अन्य राज्ये आकर्षक पॅकेज जाहीर करून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असताना महाराष्ट्राची वस्त्रोद्योगात पीछेहाट होत आहे. वस्त्रोद्योग हा देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी १४ टक्के, सकल उत्पादनापैकी ४ टक्के तर एकूण निर्यातीपैकी १७ टक्के इतका वाटा वस्त्रोद्योग क्षेत्राचा आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. राज्यातही सरासरी सुमारे ८० लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. राज्यात उत्पादित कापसावर मूल्यवर्धनाच्या प्रक्रिया केल्यास राज्यामध्ये जवळपास ११ लाख नवीन रोजगारनिर्मिती होणार आहे. देशाची वस्त्रांची गरज भागवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून देशातीलच नव्हे तर विदेशातील बाजारपेठेत दबदबा निर्माण करण्याच्या दिशेने राज्य शासन गेल्या १५ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या सदस्यीय समितीने सादर केलेल्या २३ कलमी शिफारशी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जशाच्या तशा स्वीकारल्या. त्यानंतर राज्याचा वस्त्रोद्योग प्रगतीपथावर आला. 'कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती' अशी साखळी राज्यात निर्माण झाल्यास दर्जेदार कापडाबरोबरच मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. यासाठी पूरक ठरते ते राज्याचे वस्त्रोद्योग धोरण. पण याच मुद्दय़ावर राज्याच्या वस्त्रोद्योग विकासाचे घोडे अडले आहे . राज्याच्या २०१७ पर्यंतच्या वस्त्रोद्योग धोरणाची मुदत संपली आहे. नव्या धोरणाला आकार देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. राज्यातील वस्त्रोद्योग धोरणाची फेररचना करून अस्तित्वातील उद्योग घटकांना सोयीसवलती देण्याबरोबरच राज्यात कापूस ते गारमेंट अशी उत्पादन साखळी निर्माण करण्यासाठी इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. वस्त्रोद्योगातील समस्यांची सोडवणूक होण्यासाठी या समितीने इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, नागपूर, सोलापूर आदी ठिकाणी असलेल्या यंत्रमाग व पूरक वस्त्रोद्योग विकेंद्रित घटकांना भेटी दिल्या. त्याचा अहवाल जानेवारी २०१५ मध्ये हाळवणकर यांनी राज्य सरकारला सादर केला. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यावर राज्यात पाच वर्षांत ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल आणि ११ लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा समितीचे प्रमुख हाळवणकर यांनी व्यक्त केला होता. या आधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकाने आणलेले वस्त्रोद्योग धोरण निव्वळ धूळफेक करणारे होते. त्या धोरणामुळे हजारो प्रकल्प येतील व लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक येईल असे सांगण्यात आले पण त्यांना ते अजिबात साध्य करता आले नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती. हाळवणकर यांनी सादर केलेला अहवाल आणि आघाडी सरकारवर केलेला निष्क्रियतेचा आरोप पाहून वस्त्र उद्योजकांना राज्याचे नवे वस्त्रोद्योग धोरण कधी एकदा अमलात येते याचे कुतूहल निर्माण झाले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती अहवाल जाऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या शासनाकडून त्यांच्या अंमलबजावणीच्या केवळ तारखाच जाहीर होत आहेत. प्रकल्प उभा करूनही कोणत्याच योजनेचा ठोस लाभ मिळत नसल्याने नव्याने गुंतवणूक करणारा वस्त्र उद्योजक गोंधळून गेला आहे, तर काहींनी शेजारच्या कर्नाटकची वाट धरणे पसंत केले आहे. 'कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती' अशी साखळी राज्यात निर्माण करायची असेल तर वस्त्रोद्योगाचा समग्र विचार होणे अनिवार्य आहे. त्यामध्ये राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्व कापसावर राज्यातच प्रक्रिया होईल यासाठी कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारणे, नवीन टेक्स्टाइल हब, प्रोसेसिंग पार्क, टेक्स्टाइल मेगासिटी, यंत्रमागांचे आधुनिकीकरणासाठी उपाय, अस्तित्वातील सहकारी यंत्रमाग संस्थांची बळकटीकरण करणे, यंत्रमाग कामगारांचे कल्याण मंडळ, यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक, कामगार कायद्यात सुधारणा, निर्यात वाढ यांना ताकद आणि बळकटी दिली पाहिजे. २०१७ ते २०२२ या काळासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे गतवर्षी मे महिन्यात सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले होते. यापूर्वी सन २०११ ते सन २०१७ या कालावधीसाठी राज्याचे वस्त्रोद्योग धोरण ठरले होते त्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक आणि ११ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात १७ लाख ३०४ कोटींची गुंतवणूक झाली असून २ लाख ६२ हजार रोजगारनिर्मिती झाली. या धोरणाची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपल्याने ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नव्या धोरणाची आखणी सुरू असल्याचे देशमुख सांगतात. तथापि, उद्योजक मात्र धोरण कधी जाहीर होणार याकडे डोळे लावून बसला आहे. वस्त्रोद्योगाचा विस्तार आपल्या राज्यात व्हावा यासाठी अनेक राज्यांनी वस्त्र उद्योजकांसाठी लाल गालिचा अंथरला आहे. आपल्या राज्याचे वस्त्रोद्योग धोरण अधिक आकर्षक कसे राहील याची काळजी घेतली जात आहे. गुजरात, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसारख्या राज्यांनी यामध्ये आघाडी घेतली आहे. जमीन उपलब्ध करून देण्यापासून त्याच्या उत्पादनापर्यंत पूर्णतः लक्ष घातले जाते. व्याज अनुदान, विजेची सवलत, अन्य लाभ देण्यात त्यांचा पुढाकार असल्याने उद्योजक तिकडे जाताना दिसत आहे. राज्य शासनाने या राज्याच्या स्पर्धेला सामोरे जात अधिक आकर्षक धोरण जाहीर करून त्याची यथाशिग्रह अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत पॉवरलूम डेव्हलपमेंट अॅण्ड एक्स्पोर्ट प्रमोशनल काऊन्सिलचे माजी अध्यक्ष, संचालक विश्वनाथ अग्रवाल यांनी 'लोकसत्ता'कडे मांडले. सिंगापूर ही अतिशय शिस्तबद्ध आणि सुयोग्य शहर आहे. ते सुपरसेफ आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा करडा धाक आहे. आपल्याकडे मुलींबाबत घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा विचार करताना मुलींचा पेहराव हा अनेकदा चर्चेतला एक मुद्दा असतो. इथं पेहराव करताना मुलींना फारसा विचार करायला लागत नाही. कारण कोणीही त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत नाही. त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा तिथूनच सुरू होतो. दुसरं म्हणजे इथले लोक आपल्याला फसवत नाहीत. टॅक्सीवाले किंवा दुकानदार वगैरे मंडळी व्यवहारात कोणतीही फसवणूक करीत नाहीत. एखाद्या फूड कोर्टमध्ये आपण टेबलवर पर्स ठेवून ऑर्डर द्यायला गेलो तर परतल्यावर आपली पर्स किंवा अन्य वस्तू त्या टेबलावर तशीच असते. प्रसंगी आपण ती विसरलो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन विचारणा केली तर सुरक्षारक्षक ती परत करतात. ट्रेनमधून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशाला काहीही संशयास्पद वाटल्यास प्रत्येक डब्यात मदतीसाठी बटण दाबल्यावर तात्काळ मदत मिळते. काही वेळा सुरक्षाव्यवस्थेचा अतिबाऊ केला जात नाही. उदाहरणार्थ - मॉलमध्ये बॅग आत नेऊ देतात, कारण चोरी करताना कुणी पकडलं गेल्यास त्वरित त्याच्यावर कडक कारवाई होते. इथली मुलं २०-२२ व्या वर्षांनंतर स्वतःच्या पायावर उभी असतात. बहुतेक जण पालकांसोबत राहात नाहीत, म्हणून ती पालकांचा मान राखत नाहीत, असे विचार कोणाच्याही डोक्यात येत नाहीत. हे खरंच घडतं, कारण ते स्वतंत्र आहेत. इथे एकूणच स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वास या तीन घटकांचं अस्तित्व प्रकर्षांने जाणवतं. एका ठरावीक वयानंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही सर्वसाधारण गोष्ट आहे. चिनी संस्कृती आणि भारतीय संस्कृती यामध्ये चटकन साम्य वाटत असलं तरी चिनी संस्कृती खूप लवकर पुढारलेली दिसते. इथले ऐंशी ते नव्वद टक्के लोक बाहेरच खातात. घरी जेवण रांधण्यासाठी आपल्याकडच्या गृहिणी असोत किंवा नोकरदार स्त्रियांची बहुतांशी वेळा धावपळ चालते. पण ही संकल्पना इथे जवळपास नाहीच. कारण इथली फूडकोर्ट्स खूप लोकप्रिय आहेत. प्रत्येक उपनगरात 'गव्हर्मेन्ट हाऊसिंग' ही संकल्पना आहे. त्याच्या आजूबाजूला फूडकोर्ट आहेत. फूडकोर्टमधले पदार्थ खाणं खूप स्वस्त पडतं. या रेस्तराँ आणि फूडकोर्टमध्ये आरोग्यदृष्टय़ा आवश्यक असणारे स्वच्छतेचे सगळे नियम आणि अटी कटाक्षाने पाळल्या जातात. स्ट्रीट फूड फारसं मिळतच नाही. 'ए' ग्रेडिंग सगळ्यात वरची श्रेणी मानली जाते. सिंगापूर खूप कॉस्मोपॉलिटिन आहे. त्यामुळे इथे सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. लोकल फूड हे चायनीज फूड असून ते आपल्या भारतीय चायनीजपेक्षा वेगळ्या चवीचं असतं. शिवाय जपानी आणि कोरियन फूडलाही पसंती दिली जाते. इथे तमिळ लोकांची संख्या अधिक असल्याने इडली, डोसा आदी पदार्थ पटकन उपलब्ध होतात. इथल्या अनेकांना भारतीय पदार्थ आवडतात. चिकन राइस, चिली क्रॅ ब्ज या इथल्या खूप आवडत्या डिश आहेत. फास्टफूड आवडत असलं तरी त्यात शाकाहारी पर्याय कमी असतात आणि मांसाहारच अधिक मिळतो. डम्पलिंग्ज खूप प्रसिद्ध असून आवडीने खाल्ले जातात. एकूणच इथलं चायनीज फूड हेल्दी असतं. सिंगापूरमध्ये पार्टी कल्चर मोठय़ा प्रमाणात रुजलेलं आहे. शुक्रवार-शनिवारी रात्री हमखास पार्टी केली जाते. क्लार्क के, बोट के , क्लब स्ट्रीट आदी ठिकाणी पार्टी केली जाते. इथे क्लब्ज, रेस्तराँ, बार खूप आहेत. हाऊस पार्टीजही खूप होतात. तरुणाई खूप पार्टी करीत असली तरी पार्टी कल्चरमुळे अनेकदा ओढवू शकणारे मारामारीचे प्रसंग इथे घडत नसल्याने सुरक्षित वातावरण असतं. तरुणांची सर्जनशीलता ग्राफिटी वॉल्स, नृत्यकला, संगीतातून दिसते. इथे एकूणच कलेला खूप प्रोत्साहन दिलं जातं. शालेय जीवनापासूनच क्रीडा आणि कलाविषयांना मुख्य अभ्यासक्रमाइतकंच महत्त्व देत त्यांची जोपासना केली जाते. त्यामुळे मुलांमध्ये आपोआपच कलादृष्टी विकसित होते. बॅले, झुम्बा, साल्सा वगैरे नृत्यप्रकारांचे खूप क्लासेस चालतात. काही ठिकाणी फ्री डान्स क्लासेसही चालतात. ओपन कॉन्सर्ट्स चालतात. इथली ग्राफिटी केलेली भिंत कोणीही खराब करत नाही. प्रत्येक स्टेशनवर एक मॉल आहे आणि त्यापैकी जवळपास प्रत्येकात थिएटर असल्याने चित्रपटसंस्कृती चांगलीच रुजलेली आहे. रात्री उशिरापर्यंत चित्रपटांचे खेळ सुरू असतात. भारतीय चित्रपट पाहायला भारतीय प्रेक्षकांची संख्या अधिक असते. शिवाय हॉलीवूड, चिनी, जपानी, कोरियन आदी चित्रपटही लागतात. इथले लोक खूप चांगले आहेत. त्यांचं वागणं सौहार्दपूर्ण आहे. थोडासा भाषेचा प्रश्न कधी कधी उभा राहतो. तरुणाईचं इंग्लिश व्यवस्थित असल्याने फारसा प्रश्न येत नाही. पण आपल्याला इंग्लिश नीट येत नसेल तर थोडंसं कठीण जातं, कारण आपली भाषा त्यांना माहिती असेल असं नाही. सिंगापूरमध्ये तमिळ लोकांची संख्या खूप आहे. त्यामुळे आपल्याला तमिळ भाषा येत असेल तर निभाव लागू शकतो. शाळेत तमिळ हा भाषेसाठी तिसरा पर्याय आहे. मराठी लोक आणि भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी हिंदी किंवा मराठी तितकं बोललं जात नाही. एकूणच सिंगापोरियन लोक फार चांगले आहेत. खूप सौजन्यशील, संवादी, मदतीस तत्पर असणारे आहेत. आपण तिथे नवखे असलो तरी परकेपणा जाणवू दिला जात नाही. एकजुटीने राहण्याची संकल्पना प्रत्यक्षात जगली जाते. सरकारतर्फे शालेय जीवनापासूनच स्वयंसेवेला खूप प्रोत्साहन दिलं जातं. सिंगापूरच्या नागरिक आणि कायमस्वरूपी नागरिकांच्या मुलांना वयाची अठरा र्वष पूर्ण झाल्यानंतर नॅशनल सव्र्हिस हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागतो. त्यानंतर चाळिशीपर्यंत त्यांना दोन आठवडे नॅशनल सव्र्हिससाठी द्यावे लागतात. मला एक घटना आठवतेय, सिंगापूरचे परिवर्तन प्रत्यक्षात साकारणारे ली कुआन यू यांचं निधन झालं तेव्हाची.. त्यांच्या निधनाच्या वेळी सिंगापूरकरांना त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम, आदर आणि आत्मीयता प्रकर्षांने जाणवली. त्यांची एकजूट, शिस्तबद्धपणा दिसत होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठाल्या रांगा लागल्या होत्या. केवळ सिंगापूरकरच नव्हे तर जगभरातल्या लोकांनी त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त केला होता. सिंगापूरमधली वयोवृद्ध माणसं आपल्याकडच्या वयस्कारांपेक्षा खूपच फिट आणि अॅक्टिव्ह आहेत. सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच करतात. फारसे कोणावर अवलंबून राहात नाहीत. होता होईल तोवर लोक कष्ट आणि काम करतात. इथे फिटनेसला खूप प्राधान्य दिलं जातं. शैक्षणिक संस्था असोत किंवा कार्यालयं असोत आरोग्याला खूप महत्त्व दिलं जातं. सगळे जिम, जॉगिंग, तायची वगैरे व्यायाम प्रकार करतातच. क्रीडा प्रकारांना शालेय वयापासूनच प्रोत्साहन दिलं जातं. ऑलिम्पिकमध्ये सिंगापूरला पदकं मिळतात. गेल्या ऑलिम्पिकमध्ये सिंगापूरला स्विमिंगचं सुवर्णपदक मिळाल्याने स्विमिंग सध्या अधिक लोकप्रिय आहे. शिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॅण्डबॉल हे खेळ आवडीने खेळले जातात. क्रिकेटचं वेड इथे अजिबात नाही. फक्त भारतीयांच्या काही ग्रुपमध्ये मर्यादित प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. तरुणाई प्रवास खूप करते. वीकएण्डला सिंगापूरमधल्याच रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये एक-दोन दिवस राहणं खूप कॉमन आहे. सिंगापूरजवळ इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाइन्स, हाँगकाँग, श्रीलंका वगैरे देश एक ते तीन तासांच्या हवाई अंतरावर असल्याने सिंगापूरचा मध्यवर्ती ठिकाण म्हणून विचार केला जातो आणि ते उत्तम पर्यटनस्थळ आहे. सिंगापूर हे नियोजनबद्ध पद्धतीने वसलेलं असून त्याचा विस्तार फार झपाटय़ाने होतो आहे. केवळ परिसराचा चेहरामोहरा बदलतो आहे, असं नव्हे तर त्यासाठी भविष्याचा विचार करून त्या दृष्टीने नियोजन करून त्याचा अवलंबही केला जातो आहे. प्रत्येक गोष्टीत आणि एकूणच सोयीसुविधा पुरवताना वृद्ध-बालक-अपंगांसह सगळ्यांचाच विचार केला जातो. |
विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन। Kolaj\nतुम्हाला यंदाचा नोबेल पुरस्कार घोषित झाला, कुणीतरी फोन केला. यावेळी ते पुन्हा चिडले. नेहमीच येणाऱ्या मित्रांच्या अशा फोनमुळे त्यांना वैताग यायचा. मात्र यावेळी आलेला हा कॉल खरा होता. त्यांना १९३० या वर्षाचा नोबेल पुरस्कार खरोखरच घोषित झाला होता. केवळ भारतच नव्हे तर विज्ञानाच्या क्षेत्रात आशिया खंडातला हा पहिला पुरस्कार एका भारतीयाला जात होता.\nभारतात आधुनिक विज्ञानाची नुकतीच रुजवात झाली होती. भारतच नाही तर जगभरातून या नावाची चर्चा व्हायला लागली होती. हे नाव होतं, चंद्रशेखर व्यंकट रमण. सीवी रमण. जगातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार हा त्यापूर्वी फक्त एका भारतीयाला घोषित झाला होता. यापूर्वी १९१३ या वर्षी साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना.\nआईच्या घरगुती प्रयोगांचा वारसा\nसर सीवी रमण जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थिरुवनैक्कवल इथे झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर हे विज्ञानाचे शिक्षक होते. आई पार्वती अय्यर ह्या गृहिणी होत्या. मात्र त्या अत्यंत कल्पक आणि प्रयोगशील होत्या. त्या अनेक छोटी मोठी उपकरणं घरीच तयार करत. त्यात काही बिघाड झाला तर त्यांची दुरूस्तदेखील करत. लहानगा चंद्रशेखर हे सगळं पाहत असे. वडलांचा वाचनाचा वारसा त्यांना आपसूकच मिळाला.\nत्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने सर्व चकित व्हायचे. आता पुढे काय शिकवावं असाही प्रश्न त्यांच्या शिक्षकांपुढे पडायचा. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षीच ते मॅट्रिकची परीक्षा पास झालेत. १९०१मधे त्यांनी इंटरमीडिएटची परीक्षा पास केली. १९०२ मधे मद्रासच्या प्रेसिडेंसी कॉलेजला त्यांना बीएसाठी प्रवेश मिळवला. १९०५ मधे प्रथम श्रेणीत ही पदवी मिळवणारे ते एकमेव विद्यार्थी होते. एमएची डिग्री घेत असताना ते प्रोफेसर आरएल जोन्स यांचे लाडके विद्यार्थी होते. त्यांच्या फेवरी पिरट इंटरफेरोमीटर या यंत्राचा उपयोग रमण प्रयोगांसाठी करायचे. या यंत्रामधून ते प्रकाशकिरणांचं मोजमाप करायचा प्रयत्न करायचे.\nप्रेमाचं म्युझिकल विज्ञान\n१९०७ मधे एमएच्या पदवीसह रमण गोल्ड मेडलदेखील मिळाले. पुढचं शिक्षणही त्यांनी भारतात राहूनच घेतलं. ते वायोलिन आणि अन्य वाद्यांच्या ध्वनिकंपनांवर संशोधन करत होते. स्वतः उत्तम वादक होते. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांच्या आयुष्यात हळूहळू प्रेमाचंही म्युझिकल विज्ञान फुलायला लागलं. वीणावादन करणाऱ्या लोकसुंदरी यांच्याशी त्यांच्या मनाच्या ताराही जुळल्या. ६ मे १९०७ला त्यांचं लग्न झालं.\nमोठ्या भावासारखंच सरकारी नोकरीत रुजू व्हावं, असं रमण यांना वाटलं. त्यांनी आयएएएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची भारत सरकारच्या अर्थविभागात सहायक अकाउंटंट जनरल म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांचे वय फक्त १९ वर्ष होते. पुढे ते अकाउंटंट जनरलही झाले. विज्ञानात रमणाऱ्या रमण यांचं मन काही या नोकरीत लागत नव्हतं. एक दिवस फिरता फिरता त्यांना 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स' ही संस्था दिसली. तिथे त्यांचं एक उज्ज्वल भविष्य दिसायला लागलं.\nकोलकाता इथे डॉ. महेंद्रलाल सरकार यांच्या पुढाकाराने २९ जुलै १८७६ला विज्ञान विषयाला समर्पित एक संस्था स्थापन झाली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, ऊर्जा अशा अनेक विषयांवर संशोधन करणारी ही भारतातली सर्वात जुनी इन्स्टिट्यूट आहे. १९३३पर्यंत रमण इथेच संशोधन करत होते. जगप्रसिद्ध रमण इफेक्टचा शोधही इथेच लागला.\nहेही वाचा : इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं\nसमुद्राच्या प्रेरणेतून रमण इफेक्ट\n१९१७ला रमण यांनी शासकीय नोकरी सोडली. कलकत्ता विद्यापीठात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नव्या पिढीत आणि लहान मुलांत ते रमायचे. त्यांच्या शंकांचं निराकरण करायचे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तरुणांना प्रोत्साहित करत. १९१८ ला लंडन इथे ब्रिटीश राष्ट्रकुलातल्या विद्यापीठांचं संमेलन होतं. या संमेलनात रमण यांनी कलकत्ता विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं. ती त्यांची पहिली विदेशवारी होती.\n१९२१मधेही इंग्लंडमधल्या अशाच परिषदेवरून जहाजाने परतीचा प्रवास सुरू असताना रमण समुद्राची आणि आकाशाची निळाई पाहत होते. अनुभवत होते. समुद्राची आणि आकाशाची निळाई त्यांना जणू प्रश्न विचारत होती. समुद्र निळा का दिसत असावा? आकाश निळं का दिसत असावं? निळ्या आकाशामुळे तर समुद्र निळा दिसत नसेल ना? की सूर्यकिरणामुळे समुद्राचं पाणी निळं दिसत असेल का?\nलॉर्ड रॅले या वैज्ञानिकाने सूर्यकिरणांवर विविध प्रयोग केले होते. त्यांच्यानुसार वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंसोबत सूर्यकिरण भिडले तर प्रकाश सर्व दिशांना पसरतो. या क्रियेमुळे आकाश निळं दिसतं. या प्रक्रियेला रॅलेच्या नावावरूनच 'रॅले प्रकीर्णन' असं नाव पडलं. सागराची निळाई ही आकाशामुळे असते असं लॉर्ड रिले यांनी जाहीर केलं होतं. मात्र रमण यांचं मन ते मानायला तयार नव्हतं. 'स्पेक्ट्रोमीटर' हे उपकरण त्यांच्या सोबतच होतं. जहाजावरूनच त्यांनी त्यांचे प्रयोग सुरू केले. अनेक प्रयोगांती त्यांच्या लक्षात आलं, की सागराच्या निळाईमागे आकाश हे कारण नाही. सागराचा निळा रंग हा सागरातील पाणी आणि प्रकाशाच्या संयोगाने भासतो.\nरमण यांचा परतीचा प्रवास सुरूच होता. या प्रवासात सोबतीला हा रंगाचाच विचार होता. कलकत्त्याला आल्याबरोबर त्यांनी त्यावर अत्यंत सखोल संशोधन सुरू केलं. त्यांचं संशोधन 'नेचर' या अत्यंत प्रतिष्ठित मॅग्झिनमधे प्रकाशित झांलं. याच संशोधनाने पुढे वैज्ञानिक क्षेत्रात महान क्रांती झाली. त्यांच्या संशोधनाची संपूर्ण विश्वात चर्चा व्हायला लागली. कौतुक व्हायला लागलं. 'ऑप्टिकस' नामक वैज्ञानिक क्षेत्रातील रमण यांच्या योगदानाची दखल घेतली गेली. त्याबद्दल १९२४ साठी रमण यांना 'रॉयल सोसायटी'चं सदस्यत्त्व मिळालं.\nभारतीयांमधे विज्ञान रुजावं, त्यात आवड निर्माण व्हावी म्हणून रमण हे सदैव प्रयत्नरत असायचे. याच प्रेरणेतून १९२६ मधे त्यांनी 'इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स' हे मासिक सुरू केलं. ते याचे पहिले संपादक होते. दुसऱ्या अंकात त्यांना 'न्यू रेडिएशन' हा लेख प्रसिद्ध झाला. या अंकांमुळे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, वैज्ञानिकांपासून सर्वसामान्यांपर्यंत सहजरीत्या विज्ञान पोहचायला लागलं.\n२८ फेब्रुवारीचा चमत्कार\nसमुद्राच्या निळ्या रंगाच्या चमत्कारात रमण खोल खोल बुडाले होते. वारंवार प्रयोग सुरू होते. काहीतरी नवीनच डोळ्यांसमोर येत होतं. अस्वस्थ येराझारा, सतत टिपणं काढणं सुरूच होतं. 'युरेका... युरोका...' सापडलं सापडलं, असं त्यांच्या मनाने ठाम केलं. भौतकशास्त्राच्या विश्वातील एक रहस्य पहिल्यांदाच त्यांना गवसलं होत. तो दिवस होता २८ फेब्रुवारी १९२८ चा.\nलेजर किरणांपासून अनेक आधुनिक संशोधनांचा पाया या शोधाने रचला. रमण यांनी केलेल्या इफेक्टिव संशोधनाला त्यांच्याच नावावरून 'रमण इफेक्ट' हे नाव देण्यात आलं. याच संशोधनासाठी त्यांना १९३०मधे अत्यंत प्रतिष्ठेचं नोबल पारितोषिक मिळालं. २८ फेब्रुवारीच्या या चमत्काराने भारताची प्रभा अधिक लख्ख झाली.\nभारतीय विज्ञानाच्या क्षेत्रातलं हे एक प्रचंड मोठं यश होतं. रमण यांना बेंगलोर येथील 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेज'चे संचालक म्हणून जबाबदारी त्यांना देण्यात आली. तिथे त्यांनी १९४८पर्यंत काम केलं. त्यानंतर त्यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय 'रमण रिसर्च इंस्टिट्यूट'चा डोलारा उभा केला. रमण यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इथे आपले प्रयोग सुरूच ठेवलेत.\nशेवटचा श्वास समाधानाचा\nया इंस्टिट्यूटसाठी त्यांनी आपली जमापुंजी खर्ची घातली. लोकांनीही त्यांना मदत केली. त्यांनी 'द फिजिओलॉजी ऑफ विजन' सारखे अनेक ग्रंथ लिहिले. आपल्या कामात ते सातत्याने व्यस्त असायचे. भारत स्वतंत्र झाल्यावर 1952 मधे उपराष्ट्रपतीपद स्वीकारण्याचं त्यांना निमंत्रण मिळालं. मात्र अत्यंत विनयपूर्वक त्यांनी ते नाकारलं.\nपुढे १९५४ मधे त्यांना भारतरत्न हा सन्मान मिळाला. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं. १९९८मधे अमेरिकन केमिकल सोसायटीने रमण इफेक्टचा 'आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक रासायनिक घटना' म्हणून गौरव केला. नागपूरला त्यांच्या नावाने 'रमण विज्ञान केंद्र सुरू झालं.' १९६८ला त्यांनी अज्ञात कारणांमुळे रॉयल सोसायटीचं सदस्यत्त्व परत केलं. तसं करणारे ते एकमेव मान्यवर आहेत.\n१९६८च्या ऑक्टोबरमधे ते त्यांच्याच इन्स्टिट्यूटमधे काम करता करता कोसळले. त्यांना हॉस्पिटलमधे हवलण्यात आलं. पण त्या चार भिंतीतलं मरण त्यांना नको होतं. त्यामुळे इंन्स्टिट्यूटच्या आवारात त्यांना ठेवण्यात आलं. मृत्यूच्या आदल्या दिवशी त्यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी भवितव्याविषयी चर्चा केली. २१ नोव्हेंबर १९७०च्या सकाळी त्यांनी समाधानाने आपला देह ठेवला.\nराष्ट्रीय विज्ञान दिनाची सुरवात\nभारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने विज्ञान दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्यासाठी कोणती तारीख निवडावी याचा विचार सुरू झाला. तेव्हा या खात्याचे सचिव शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर होते. सर्वानुमतीने ही तारीख २८ फेब्रुवारी नक्की झाली. जगाच्या पाठीवर विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने रमण इफेक्टच्या रूपात दिलेली अनमोल देणगी ही याच दिवशी मिळाली होती. या दिवशी भारतात राष्ट्रीय विज्ञानदिन साजरा करण्यास सुरवात झाली. |
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल स्वतःच्या हातावर चापकाचे फटके मारून घेत असताना पहायला मिळत आहेत. व्हायरल होणारा व्हिडीओ छत्तीसगडमधील (Chattisgadh) दुर्ग जिल्ह्यातील असून आदिवासी बहुल अशा छत्तीसगडमधली ही एक प्रथा आहे. येथील गौरी-गौर पूजेच्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले होते. यातील एका प्रथेनुसार, प्रत्येकजण आपल्या हातावर चापकाचे फटकारे मारून घेतात आणि ते सहन करतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत, मुख्यमंत्री भूपेश बघेल गर्दीत उभे आहेत. त्यांनी हात पुढे केलाय. एक व्यक्ती त्यांच्या मनगटावर सपासप् चाबकाचे फटके मारतोय. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हात अगदी ताठच ठेवलाय. समोरील व्यक्ती बघेल यांच्या हातावर पाच फटके मारतो. तर मुख्यमंत्री बघेल त्या व्यक्ती समोर हात जोडताना पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री बघेल दरवर्षीच या पूजेला आवर्जून उपस्थित राहतात. दुर्ग जिल्ह्यातील गौरा गौरी पूजेत सहभागी झाले असून या पूजेदरम्यान अशा प्रकारे चाबकाचे फटकारे मारून घेतल्याने अनिष्ट गोष्टी टळतात; आणि राज्यात आनंदी आनंद राहतो, अशी मान्यता आहे. ही प्रथा पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, परमेश्वर तुमच्या आयुष्यात दरवर्षी आनंद घेऊन येवो. तुमचे आयुष्य असेच उजळून निघत राहो. |
ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा झालेला पराभव हा अजुनही चर्चेचा विषय बनला आहे. भविष्याचा विचार करत भारताच्या टी-२० संघात बदल करण्याची मागणी होते आहे. १८ नोव्हेंबरपासून टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. माजी क्रिकेटपटू वासिम जाफरच्या मते टी-२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने सलामीला येणं गरजेचं आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंतसाठी सर्वोत्तम जागा ही सलामीची आहे. ज्यावेळी पॉवरप्लेमध्ये फिल्डर हे पुढे असतात आणि पंतने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करायला सुरुवात केली तर तो खरंच स्फोटक फलंदाज ठरेल. अगदी त्याच पद्धतीने ज्या पद्धतीत तो टेस्ट आणि वन-डे मध्ये बॅटींग करतो. एकदा त्याने २०-३० धावांचा टप्पा ओलांडला तर त्याला थांबवणं खरंच कठीण आहे. सर्कल बाहेरच्या फिल्डरचा पंतवर फारकाही परिणाम होत नाही, असं वासिम जाफर ESPNCricinfo वर बोलत होता. ज्यावेळी तो फलंदाजीला पाचव्या क्रमांकावर येतो त्यावेळी दडपण हे त्याच्यावर येतं. अशावेळी पंत सिक्स मारु शकत नाही. पंत अशा प्रकारचा खेळाडू आहे की जो आपल्या संघाला धडाकेबाज सुरुवात करुन देतो, असं जाफरने स्पष्ट केलं. यावेळी बोलत असताना वासिम जाफरने टी-२० मालिकेत भुवनेश्वरऐवजी सिराज, अर्शदीप आणि हर्षल पटेल यांना संधी द्यावी असं स्पष्ट केलं. |
मुंबई : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी US फेडर बँकेनं व्याजदर वाढवला. ०. ७५ टक्क्यांनी हा रेट वाढवल्याने त्याचे मोठे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पाहायला मिळाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या दोन महिन्यात पुन्हा व्याजदर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. US शेअर बाजार खाली घसरला आणि त्याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊया. भारतातही शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या अंकांनी कोसळली आहे. यामागे ५ कारण असल्याचं सांगितलं जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य निचांकावर पोहोचलं आहे. एका डॉलरसाठी ८१. ५४ रुपये मोजावे लागणार आहे. डॉलर इंडेक्ट उच्चस्तरावर पोहोतचल्याने सोनं आणि जगभरातील करन्सीवर दबाव निर्माण झाला आहे. RBI ची शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. यावेळी RBI महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ०. ५० टक्के रेपो रेटमध्ये वाढवणार आहे. त्यामुळे EMI वाढण्याची शक्यता आहे. बँकांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम चीनमधील शेअर बाजारावर झाला आहे. कमोडिटी किंमतीवर वेगानं परिणाम होताना दिसत आहे. तर मेटल शेअर्सच्या किंमतीही आपटल्या आहेत. ५ सत्रामध्ये खूप जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळे गुंवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
मुंबई, 25 जानेवारीः खाद्यपदार्थ विक्री आणि घरपोच डिलिव्हरी या क्षेत्रात कोरोना महामारीच्या काळात मोठी वाढ झाली. त्याचमुळे खाद्यपदार्थ विक्रीचे अनेक छोटे व्यवसाय उभे राहिले, तसंच झोमॅटो, स्विगी यांसारख्या घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याही वेगानं विस्तारल्या. आयटीसारख्या क्षेत्रामध्ये नोकरकपातीचं वारं वाहत असताना झोमॅटोनं मात्र मोठी नोकरभरती घोषित केलीय. इंजिनीअर, प्रॉडक्ट मॅनेजर, जनरलिस्ट यांसारख्या 5 पदांसाठी तब्बल 800 उमेदवार त्यांना हवे आहेत. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी लिंक्ड इन पोस्टच्या माध्यमातून हे जाहीर केलंय. 'इंडिया डॉट कॉम'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. ग्रोथ मॅनेजर पदासाठी काम करताना उमेदवाराकडून खाद्यपदार्थांच्या घरपोच विक्रीचं जाळं मजबूत करण्याची अपेक्षा असल्याचं जाहिरातीत म्हटलंय. तसंच कामाच्या जबाबदारीबाबतही माहिती दिली आहे. उमेदवारानं ग्राहक, डिलिव्हरी पार्टनर्स, रेस्टॉरंट पार्टनर्स, कर्मचारी यांना योग्य सेवा देणं गरजेचं आहे. ग्राहक व व्यवसायातल्या इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, एखादं रेस्टॉरंट चालवणं म्हणजे काय असतं, याची कल्पना असणं, समस्या जाणून घेऊन त्यावर वेळीच उपाय शोधणं असा गोष्टींची अपेक्षा उमेदवाराकडून असेल. हा व्यवसाय म्हणजे सेवा व्यवसाय असल्यानं ग्राहकांच्या मागणीवरच सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे मोठे सण, उत्सव, सुट्ट्या या कालावधीसाठी स्वतःला तयार ठेवणं गरजेचं असल्याचं यात म्हटलं आहे. उमेदवारांना झोमॅटोमध्ये चीफ ऑफ स्टाफ ते सीईओ पदापर्यंत नोकरीची संधी मिळू शकते. ब्लिंकिट, हायपरप्युअर आणि झोमॅटोमध्ये ही महत्त्वाची पदं मिळू शकतात. एकंदरीतच झोमॅटोमध्ये येऊन उमेदवार त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळवू शकतात, असं कंपनीनं म्हटलंय. दरम्यान, झोमॅटोची स्पर्धक कंपनी स्विगी सध्या नोकरकपातीच्या तयारीत असल्याचं समजतंय. जागतिक मंदीच्या भीतीनं स्विगी 10 टक्के नोकरकपात करू शकते. यामुळे कंपनीचंच्या उत्पादन, इंजिनीअरिंग आणि ऑपरेशन या विभागांवर परिणाम होण्याची शक्यता असून स्विगीच्या इन्स्टामार्ट सिस्टीमला त्याची झळ बसू शकते. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप 4 महिन्यांचा का कालावधी बाकी आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार आहेत. 8 संघ आधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ पात्रता फेरी खेळून प्रवेश मिळवतील. क्वालिफायर फेरीत झिम्बाब्वे संघ शानदार प्रदर्शन करत आहे. संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. झिम्बाब्वे संघ अ गटात गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. संघाच्या या विजयामागे सीन विलियम्स याचा मोलाची भूमिका आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावाही केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहली याच्या विक्रमाच्या खास यादीत स्थान मिळवले आहे. झिम्बाब्वे संघाचा 36 वर्षीय फलंदाज सीन विलियम्स (Sean Williams) याने सलग 5 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) अव्वलस्थानी आहे. विलियम्सने सलग 5 सामन्यात 532 धावा केल्या आहेत. तर विराटने 108. 56च्या स्ट्राईक रेटने 596 धावा केल्या आहेत. विलियम्सने यासोबतच 60 चौकार आणि 12 षटकारांचा पाऊस पाडला आहे. या बाबतीत पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझम दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 537 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडन आहे. त्याने सलग 5 सामन्यात 529 धावा केल्या आहेत. यादीत पाचव्या स्थानी पाकिस्तानी खेळाडू फखर जमान आहे. त्याने 515 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, सीन विलियम्स हा स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याने क्वालिफायर फेरीत 3 शतके झळकावली आहेत. झिम्बाब्वे संघाविषयी बोलायचं झालं, तर संघाने शानदार प्रदर्शन करत चारही सामन्यात विजय नोंदवला आहे. झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात नेपाळला 8 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. तसेच, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला 35 धावांनी पराभूत केले होते. चौथ्या सामन्यात युनायटेड स्टे्सविरुद्ध 304 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर सुपर 6 फेरीत ओमान संघालाही झिम्बाब्वेने 14 धावांनी पराभूत केले होते. आता झिम्बाब्वे संघ श्रीलंका आणि स्कॉटलँडविरुद्ध सामना खेळेल. दुसरीकडे, श्रीलंका संघ ब गटातील गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. (world cup 2023 qualifier zimbabwe sean williams most runs in 5 consecutive odi innings) |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पहिले नांगरट साहित्य संमेलन रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी विद्यापीठातील वि स खांडेकर भाषा भवन सभागृहात होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ ,उद्घाटक वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे असून सदर संमेलनामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर आ. ह. साळुंखे,दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव,ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांना स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय शेतकरी प्रश्नांचे कला साहित्य माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयावर परिसंवाद ही होणार आहे सदर परिसंवादाचे अध्यक्ष दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले हे आहेत . या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे ज्येष्ठ साहित्यिक विजय चोरमारे ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील ज्येष्ठ लेखक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर जालिंदर पाटील हे सहभागी होणार आहेत. याचबरोबर निमंत्रितांचं कवी संमेलन ही होणार असून या संमेलनाचे सुरेश शिंदे हे अध्यक्ष असणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे . यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. |
मुंबईः लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकून हल्लेखोरांनी काही प्रवाशांना लुटलं आणि एका महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इगतपुरी-कसारा स्थानकादरम्यानची काल रात्री 8 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं आणि 20 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. |
ह्या सोबतच मराठा समाजाचे शेती संबंधित काही दोष गुण चालत आलेले दिसून येतात. महाराष्ट्रातील इतर समाजात ते फार कमी दिसतात. 'वावर आहे तर पावर आहे' हा शब्द आधुनिक काळात मराठ्यांच्या तोंडी मोठ्या प्रमाणत एकायला येतो, कारण जमीन हा मराठ्यांचा वेगळा मानबिंदू बनलेला आहे. फुटभर बांधावरून मारामाऱ्या करणे, प्रसंगी खून देखील पडणे हे गावोगाव अनेक ठिकाणी घडते. बांध कोरून कोणी फार मोठी जहागिरी कमावली असे ऐकण्यात कधी आले नही, मात्र कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झालेली अनेक उदाहरणे आहे. ही सामाजिक कारणे शेती संदर्भात असली तरी मुख्य कारणे ही आधी सांगितली तीच आहे, असे म्हणावे लागेल एकूणच मराठा शेतकऱ्यांचे शेतीवरील उपजीविका झटकायचा प्रयत्न शेतीच्या वातहातीमुळे दिसतो. ते आपल्या मुलांना शेतीक्षेत्रात येऊ देण्यास धजावत नाही. मराठा आई-वडील किंवा तरुणांचे 'जाऊदे काही नाही झालं तर शेती करू' हे पूर्वीच वाक्य बदलून 'शेतीचं काही खरं नाही, त्यापेक्षा कंपनीत गेलेलं बरं' हे वाक्य रुजलेले दिसते. |
झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नवे 'ट्विस्ट' पाहायला मिळणार आहे. चाहत्यांचा आवडता 'राणा' आता पोलिसांच्या भूमिकेत दिसेल. राणाने नोकरी किंवा व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे ठरवले आहे आणि अंजली देखील त्याच्या या निर्णयात त्याला साथ देणार आहे. राणा पुढील वाटचालीसाठी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतो आणि नोकरीच्या शोधात असलेल्या राणाला स्पोर्ट्स कोटय़ातून पोलीस भरती असल्याची माहिती कळते. तो तिथे भरती होऊन ट्रेनिंग घेणार आहे. नव्या भूमिकेबद्दल राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "या मालिकेतील प्रत्येक पात्र मी आव्हान म्हणून स्वीकारले आहे. माझी प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. त्यामुळे नवे 'ट्विस्ट' आणि नवे पात्र सर्वाना आवडेल, अशी अपेक्षा आहे. |
पोंभुर्णा (चंद्रपूर) : ४३ अंश तापमानाने चंद्रपूर जिल्हा होरपळून निघत असतानाच पेसा कायदा, इको सेन्सेटिव्ह झोन, सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक या प्रमुख व ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदिवासी बांधवही मंगळवारी पेटून उठले. पोंभुर्ण्यातील जुन्या बसस्थानक चौकात जन आक्रोश, रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करीत रखरखत्या उन्हात वाहतूक रोखून धरली. लहान चिमुकल्यांनीही 'जल, जंगल, जमीन हमारी है' हा नारा देत आंदोलनाला बळ दिले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, असा पवित्राही आंदोलकांनी घेतला असल्याने हे आंदोलन आणखी किती चिघळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात चिमुकली मुले व महिलांचीही मोठी उपस्थिती होती. आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगरकार यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना गणतंत्र पार्टी व बहुजन समाजाच्या सहकार्याने आदिवासी समाज बांधवांनी हे आंदोलन सुरू केले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आदिवासीबहुल गावांना ५ वी व ६ वी अनुसूची अंतर्गत तात्काळ पेसा कायदा लागू करावा, पोंभुर्णा तालुक्यातील वन जमिनी व महसूल जमिनीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वहिवाट करीत असलेल्या बहुजनांना तात्काळ पट्टे देण्यात यावे, सुरजागड लोह प्रकल्पाची भरधाव वाहतूक पोंभुर्णा शहरातून बंद करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह आणखी महत्त्वाच्या नऊ मागण्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनापुढे ठेवल्या आहेत. आदिवासी नेते जगन्नाथ येलके व देवाडा खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच विलास मोगरकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. अंदाजे तीन हजारांहून अधिक समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनाला काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन भटारकर यांची उपस्थिती होती. तेलंगाणा राज्यातील १०० जणांचे पारंपरिक ढेमसा व घुसाडी नृत्य आंदोलनस्थळी दिवसभर सुरू होते. याशिवाय आंदोलकांनी जेवण, नाश्ता, चहा व पिण्याच्या पाण्याची सोय आंदोलनस्थळीच केली होती. आंदोलकांना जेवणाची व्यवस्था म्हणून ६० क्विंटल तांदूळ जमा केले होते व आंदोलनस्थळीच स्वयंपाक करण्याची व्यवस्था केली होती. जोपर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. मागण्या रास्त आहे म्हणून आंदोलनाला सर्वांची साथ मिळत आहे. - विलास मोगरकार, सरपंच, देवाडा खुर्द. |
दोन महिन्यानंतर शुक्रवारी सकाळी शहराच्या दक्षिण भागात पुन्हा एकदा गूढ आवाज झाला. गेल्या तीन वर्षांपासून नेहमीच कमी जास्त प्रमाणात ऐकू येत असलेल्या या गूढ आवाजामुळे शहरवासियांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून येत असलेल्या या गूढ आवाजाची प्रशासनाकडे कुठलीही नोंद नाही. दोन महिन्यांपूर्वी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सलग दोन दिवस शहरातील दक्षिण भागातून गूढ आवाज आले होते. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधी नंतर शुक्रवारी पुन्हा एकदा शहरातील दक्षिण भागातूनच गूढ आवाज आला. विशेष म्हणजे, शहराच्या उत्तर भागातील वसाहतीतील नागरिकांना शुक्रवारी आलेला गूढ आवाज ऐकू आला. 'मी सकाळी चहा पित असताना, नऊ वाजून २७ मिनिटाला मला दक्षिण भागातून मोठा आवाज ऐकू आला. आवाज येताच मी घराबाहेर पळालो. त्यावेळी आमच्या गल्लीतील बहुतांश नागरिक घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर आले होते,' अशी माहिती रामनगर येथील रहिवासी विष्णू मुंदडा यांनी दिली. अनेक वर्षापासून शहर व तालुक्यात गूढ आवाज एकू येत आहे. या आवाजाविषयी पोलिस व तहसील प्रशासनाकडे विचारणा केली असता या दोन्ही विभागाकडे गूढ आवाजाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. |
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी (14 डिसेंबर) सुरू झाला. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवानंतर भारत कसोटी मालिकेत यजमानांना पराभूत करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, पहिल्या दिवशी संघ कसोटी सामन्याची सुरुवात मनाप्रमाणे करू शकला नाही, असेच दिसते. विराट कोहली मागच्या काही सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे, पण या कसोटी सामच्या पहिल्या डावात त्याने स्वतःत विकेट गमावली. विराट कोहली बांगलादेशविरुद्दच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात शतकीय खेळी करू शकला. त्याने इशान किशन याच्यासोबत 190 चेंडूत 290 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 400पार घेऊन गेला. या सामन्याप्रमाणेच विराटकडून चाहत्यांना कसोटी सामन्यात देखील अशाच प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अवघी एक धाव करून विकेट गमावली आणि चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. विरानटे पाच चेंडू खेळले आणि तैजुल इस्लाम (Taijul Islam) याच्या चेंडूवर पायचीत पकडला गेला. तैजूल इस्लामने या सामन्यात कसलेली गोलंदाजी केली आणि बांगालदेशसाठी वरच्या फळीतील दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला पहिला झटका बसला, तो शुबमन गिल (Shubman Gill) याच्या रूपात. गिलने 14 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावली. या षटकात तैजुल इस्लाम गोलंदाजी करत होता आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने यासीर अलीच्या हातात झेल दिला. गिलने 40 चेंडीत 20 धावा केल्या आणि विकेट गमावली. दुसरी विकेट कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने गमावली. खालीद अहमदने राहुलला अवघ्या 22 धावांवर तंबूत पाठवले. विराट कोहली याच्या रूपात संघाला तिसरा झटका बसला. तैजुनने टाकेलल्या चेंडूवर विराट कोहली पायचीत झाला. हा चेंडू सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वतः विराट देखील बाद झाल्यानंतर आश्चर्यचकीत झाल्यासारखाच दिसत होता. चेंडू खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर स्पीन होत थेड विराटच्या पॅडला जाऊन लागला. चेंडून असा अचानकपणे पायात वळेल, याचा विराटला देखील अंदाजा नव्हता. चेंडू पायाला लागल्यानंतर पंचांनी विराटला बाद घोषित केले. मात्र, विराटला पंचांच्या निर्णयावर शंका असल्यामुळे त्याने चेतेश्वर पुजारासोबत चर्चा केली आणि रिव्यू घेतला. रिव्यूमध्ये चेंडू स्टंपच्या बाहेर जात असेल, असे विराटला वाटत असले, तरी तसे काही होताना दिसले नाही. चेंडू स्टंप्समध्येच जाणार होता आणि रिव्यूमध्येही पंचांचा निर्णय अचूक असल्याचे पाहायला मिळाले. परिणामी भारतीय संघाची धावसंख्या 48 असताना संघाला तिसरी विकेट गमवावी लागली. पुढे संघाने चौथी विकेट रिषभ पंतच्या रूपात 112 धावांवर गमावली. (In the first Test against Bangladesh, Virat scored just one run and lost his wicket) शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता? |
एमआयडीसीतील ज्येष्ठ महिलेच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला. मात्र, अद्यापही नऊ ज्येष्ठांच्या मारेकऱ्यांना हुडकून काढण्यात हायटेक पोलिसांना यश आलेले नाही. एमआयडीसीतील ज्येष्ठ महिलेच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला. मात्र, अद्यापही नऊ ज्येष्ठांच्या मारेकऱ्यांना हुडकून काढण्यात हायटेक पोलिसांना यश आलेले नाही. नऊ वर्षांनंतर मनीष श्रीवास हत्याकांडाचा पर्दाफाश करून स्वतःची पाठ थोपटवून घेणारे स्मार्ट पोलिस हे गुन्हे का उघडकीस आणत नाहीत, असा सवाल नागपूरकर करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी मानकापूरमध्ये सुरक्षारक्षक बैस यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणात चार पोलिसांना निलंबितही करण्यात आले. मात्र, अद्यापही बैस यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. १३ जुलै २०१४ मध्ये नरेंद्रनगरमधील दिन प्रजाहित सोसायटी येथील रोशनी पेटकर (वय ६२) यांची घरात घुसून हत्या करण्यात आली. २०१५मध्ये नीरीचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. आनंद बाळ यांच्या पत्नी वसुंधरा ऊर्फ जयश्री बाळ (६९) यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्याकांडांनी त्यावेळी उपराजधानीत मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी हायटेक तपासही केला. तरीही पोलिसांना मारेकऱ्यांचे धागेदोरे गवसलेले नाहीत. वाडीतील आयुध निर्माणी परिसरातील कालीमाता मंदिरात त्रिशूलने वार करून पुजारी जगन कोडापे यांची हत्या करण्यात आली. मंदिरातच पुजाऱ्याची हत्या झाल्याने उपराजधानीत मोठी खळबळ उडाली होती. पुजाऱ्याचे मारेकरीही अद्याप मोकाट आहेत. १७ नोव्हेंबर २०१६ला कोराडी भागात ६२वर्षीय प्रमिला मारोतराव कानफाडे यांची घरात पावशीने वार करून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे रहस्यही अद्याप गुलदस्त्यात आहे. २०१७मध्ये हुडकेश्वरमधील न्यू म्हाळगीनगर परिसरातील सुमंताबाई हरिभाऊ देवळे (७५) यांचा गळा आवळून खून करण्यात आला. याशिवाय, सदरधमधील अजित मेश्राम व जरीपटक्यातील शाहरुख शेख यांच्या खुनातील मारेकऱ्यांपर्यंत स्मार्ट पोलिसांचे हात पोहोचू शकले नाहीत. वाडीतील भगवती चंदा (वय ७०) व सरोजबाई यांच्या हत्येवरूनही अद्याप पडदा उठलेला नसल्याचे कळते. |
पंचवटी (जि. नाशिक) : औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नलवर शनिवारी (ता. ८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ निष्पाप बळी गेले, तर ४१ जण जखमी झाले. अपघाताला कारणीभूत असलेले चौकाच्या आजूबाजूचे अतिक्रमण, अरुंद रस्ता, टर्निंग पॉइंट, सिग्नल यंत्रणा, चौकातील रस्त्याचे रुंदीकरण याबाबत आता महापालिका एक्शन मोडवर आली आहे. (Nashik Bus Fire Accident NMC on action mode after accident Nashik Latest Marathi News) वारंवार अपघात घडणाऱ्या जागांवर उपाययोजना करा, अशी मुख्यमंत्र्यांनी दिलेली ताकीद दिल्यानंतर तसेच पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांनंतर महापालिकेतील संबंधित विभाग जोरदार कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत पंचवटी अतिक्रमण विभागाकडून औरंगाबाद नाका ते नांदूर नाका व अमृतधाम ते जय शंकर गार्डनपर्यंतचे रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेण्यात आले व पक्के अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नगरनियोजन विभाग, पंचवटी यांच्याकडून चौकाच्या विस्तारीकरणाबाबत तसेच टर्निंग पॉइंट विस्तृत करण्याबाबत सर्व्हे करण्यात आला असून, काही ठिकाणी रेखांकन करण्यात आले आहे. उर्वरित रेखांकनाचे काम येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. चौकालगत असणाऱ्या व रस्ता विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या सर्व पक्क्या अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आलेले आहे. मुदतीत अतिक्रमण काढल्यास मनपा सदरचे अतिक्रमण तोडून काढणार असून, त्याचा खर्च अतिक्रमण धारकाकडून वसूल करण्यात येणार आहे. अशा सूचनादेखील देण्यात आलेल्या आहे. मात्र मनपाकडून देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदतीनंतर मनपाचे अधिकारी कर्मचारी राजकीय दबावापोटी तग धरतील का की, फक्त कागदोपत्री औपचारिकता पूर्ण होते हे येत्या काळात दिसून येईल. मिरची चौकाच्या आजूबाजूला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने सदर अतिक्रमण मनपाकडून काढण्यात येते की, फक्त नोटीस देण्याची औपचारिकता साधली जाते याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्यातील टर्निंग पॉइंटच्या मधोमध येणाऱ्या विद्युत वितरण विभागाच्या इलेक्ट्रिक पोलबाबत मनपाकडून कुठलाही पत्रव्यवहार अथवा कारवाई करण्यात आलेली नाही. त्याबाबत महावितरण विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, त्याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. औरंगाबाद रोड भागातील रस्त्यालगत छोटा व्यवसाय करणारे, फेरीवाले, टपरीवाले यांचे अतिक्रमण मनपाकडून त्वरित काढण्यात आले. मात्र याच रस्त्यावर राजकीय पुढाऱ्यांचे असलेले पक्के अतिक्रमण काढण्यास त्यांना वेळ देण्यात आल्याने अशा सापत्न वागणुकीची औरंगाबाद रोडवरील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. |
राष्ट्रवादीच्या २० ते २५ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचा दावा भाजपानं केलाय. पण असं असलं तरी भाजपा समोर पक्षांतरबंदी कायद्याचा पेच कायम आहे. राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्ठापन केले. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या २० ते २५ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचा दावा भाजपानं केलाय. पण असं असलं तरी भाजपा समोर पक्षांतरबंदी कायद्याचा पेच कायम आहे. काय आहे पक्षांतरबंदी कायदा? या कायद्यानुसार, जर एखाद्या सदस्यानं पक्षानं काढलेल्या व्हिपविरुद्ध मतदान केलं, राजीनामा दिला, निवडणुकीनंतर पक्षांतर केलं किंवा निवडून आलेला सदस्य दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. २००३ मध्ये या कायद्यात आणखी सुधारणा करण्यात आली. यानुसार, एक व्यक्तीच नाही तर एखादा गट दुसऱ्या पक्षात गेला तरी तो घटनाबाह्य ठरतो. त्यानंतर आणखी काही सुधारणा झाल्या आणि पक्षांतर करायचे असेल तर दोन तृतियांश सदस्यांची आवश्यकता असते. या कायद्याची गरज काय? भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या कलमानुसार हा पक्षांतरबंदी कायदा आहे. 1985 मध्ये घटनेत दुरुस्ती करून हा कायदा आणण्यात आला. राजकीय स्वार्थासाठी जेव्हा राजकीय नेते पक्षांतर करू लागले तेव्हा या कायद्याची आवश्यकता निर्माण झाली. पक्षांतरामुळे संधिसाधूपणा आणि राजकीय अस्थिर्य वाढीला लागले. त्यातच जनमताचाही अनादर होऊ लागला. म्हणून पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला. पक्षांतराची कारवाई काय? एखाद्या लोकप्रतिनिधीनं जर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात पक्षांतर केलं तर त्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. तसंच त्यांना सदनमधे आणि सदनाच्या बाहेर मतदान करण्यापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं. अपात्रतेची कारवाई तर होईलच परंतु लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व सुद्धा रद्द होईल. त्याला सहा वर्षांसाठी निवडणुकीपासून वंचित रहावं लागेल. जर त्यानं न्यायालयामध्ये दाद मागितली तर ६ महिन्याच्या आत तो खटला निकालात काढला गेला पाहिजे अश्या सुद्धा सुधारणा महाराष्ट्र सरकार करत आहे. |
PM Scholarship 2023: केंद्र सरकार आज एकापेक्षा एक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा अनेकांना होताना दिसत आहे. अशीच एक योजना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षाला 25000 प्राप्त होत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेअंतर्गत सरकारकडून मुलांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. ज्याचे नाव पीएम स्कॉलरशिप योजना आहे. या योजनेची रक्कम शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली जाते. ही योजना केंद्रीय सैनिक मंडळातर्फे चालवली जात असून ती पीएम शिष्यवृत्ती योजना म्हणूनही ओळखली जाते. त्याला UGC, MCI, AICTE ची मान्यता आहे. विद्यार्थी यासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात, यासाठी त्यांना त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या शिष्यवृत्तीच्या मदतीने सरकार पोलिस कर्मचारी, RPSF, रायफल्स RPF, ज्यांचे सैनिक सेवेदरम्यान मरण पावतात त्यांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. सरकार त्यांच्या मुलांना 200 ते 3000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देते. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मुलाला 60 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने शासनाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे. दहावी ते बारावी आणि पदवीपर्यंतची मुले या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी प्रथम https://www. aicte-india. org या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करा. यानंतर फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती भरा आणि अर्जाचे फोटो अपलोड करा. यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि सर्व तपशील तपासल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. आता तुम्ही शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र असाल. |
मुंबई । अँटेलिया कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे. भिवंडी येथील एस. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझेवर एंजोप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी केली जाण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्ट रोजी एस एस हॉस्पिटलचे असिस्टंट आर एम ओ फुरकान यास आरोपी सचिन वाजे यांचे नातेवाईक येऊन भेटले यावेळी त्यांनी त्याच्या उपचाराची फाईल दाखविली. त्यानंतर संबंधित डॉक्टरांशी बोलून फुरकान यांनी वाझेच्या उपचारासाठी संमती पत्र उपलब्ध करून दिले. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्याबाबत ऑर्डर करून सचिन वाझेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे 31 ऑगस्ट रोजी सचिन वाझेला दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास उपचारासाठी एस. एस. हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. डॉक्टर विनीत रणवीर यांनी त्याची तपासणी केली. ज्यामध्ये वाझेच्या रक्तातील साखर वाढल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, 29 ऑगस्टला जे. जे. हॉस्पिटल येथे वाझेचे ब्रेन एमआरआय देखील करण्यात आले होते. ज्याचे रिपोर्ट हे नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले आहे. दरम्यान, आरोपी सचिन वाझेवर 2डी इको आणि अँजोग्राफी करुन त्याच्यावर अँजोप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी करायची याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आरोपी सचिन वाजे याच्यासाठी रुग्णालयात एक विशेष खोली तयार करण्यात आली आहे. जी मुळात आयसीयू रूम आहे. सदर रूमच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच रूममध्ये आणि बाहेर जेल, स्थानिक पोलीस स्टेशन, गुन्हे अन्वेषण विभाग यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आरोपी असलेल्या रूममध्ये कोणालाही मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलचे डॉक्टर ,नर्स ,स्टाफ बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, या शस्त्रक्रियेच्या निमित्ताने आता पुढील काही दिवस तरी वाझे हा जेल बाहेरच असणार आहे. काय आहे प्रकरण? 25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. ज्यामध्ये जिलेटीन कांड्या आणि अंबानींच्या नावे धमकीचं पत्र मिळालं होतं. जेव्हा पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओ कार पार्क केल्यानंतर त्या कारमधील संशयित व्यक्ती ही मागेच असणाऱ्या एका दुसऱ्या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. या सगळ्या दरम्यान, स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी मुंब्र्यातील खाडीत आढळून आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या दोन्ही प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आलेली आहे. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future. |
मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी बुधवारी कुरार पोलिसांनी पाच जणांना अटक केली. मालाड, कुरार परिसरात दबदबा निर्माण करण्यासाठी उदय पाठक टोळीच्या गुंडांनी हा गोळीबार केला. हवेत गोळीबार करून, व्यापाऱ्यांच्या दुकानात धमकीची चिठ्ठी टाकून हे गुंड फरार होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कुरारमधील शिवाजी नगर मार्गावरील आनंद मेडिकल समोर १ फेब्रुवारी रोजी एक तरुण आला आणि हवेत गोळीबार करून दुकानामध्ये चिठ्ठी फेकून पसार झाला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने आणखी एका दुकानासमोर गोळीबार करीत चिठ्ठी फेकली. या घटनेमुळे या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांनी तांत्रिक पुराव्यांवरून गोळीबार करणाऱ्या निखिल रोकडे, विकास पांडे, जितू गरासिया, सूरज सागरे आणि प्रवीण बाविस्कर या पाच आरोपींना अटक केली. या भागामध्ये उदय पाठक टोळीची दहशत असून व्यापाऱ्याकडून सहज पैसे उकळता यावेत यासाठी पाठक याच्या सांगण्यावरूनच या पाच जणांनी गोळीबार केल्याचे तपासातून समोर आले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.