text
large_string
महा विकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केली आहे. छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. छगन भुजबळ समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये किमतीच्या बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे. याआधीही छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली होती काही काळासाठी छगन भुजबळ हे तुरुंगात देखील गेले होते. इन्कम टॅक्स विभागाने प्रसिद्ध पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी ही बेनामी संपत्ती कंपनीद्वारे खरेदी केली होती, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई सेशन्स कोर्टात यासंदर्भातले सुनावणी सुरू आहे तसेच या प्रकरणात भुजबळ दोषी आढळले तर त्यांना सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. © 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
दिवाळीच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड (bollywood Stars) कलाकार पार्टी आयोजित करत आहेत. त्यात अनेक सिने तारकांचे विविध अवतार पाहायला मिळत आहेत. पण बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar Bold look) बोल्ड लूकने कहर केला आहे. भूमीचा हा अवतार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे नेटकरी अचंबित झाले आहेत. भूमीचा ग्लॅमरस अवतार पाहून लोकांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) दिवाळी निमित्ताने पार्टी आयोजित केली होती. यात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. भूमी पेडणेकर देखील बोल्ड ड्रेस परिधान करून या पार्टीला उपस्थित राहिली होती. व्हाईट कलरच्या आउटफिटमध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये भूमी पेडणेकरने कहर केला आहे. लेहेंगा स्टाइल ड्रेसमध्ये भूमीने ब्लाउज ऐवजी स्ट्रॅपलेट ब्रॅलेट घातला आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये भूमी जबरदस्त पोज देताना दिसत आहे. भूमीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर भूमीच्या या लूकची जोरदार चर्चा होत असल्याने नेटकरी चांगलेच रंगात आले आहेत. अनेकांनी भूमीच्या या लूक वरती मजेशीर कमेंट केल्या आहेत. अनेकांना भूमीचा हा लूक अजिबात आवडलेला नाही. काही यूजर्सनीं भूमीची तुलना उर्फी जावेदशी (Urfi Javed) केली आहे. 'उर्फी तो बेवजह बदनाम हैं' अशी कमेंट एका यूजरने दिली आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
प्रतिनिधी / कणकवलीः महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या गती घेत आहे. या कामात नांदगाव तिठा येथे काही विद्युत खांब अडथळा ठरत असल्याने त्यांना मागे सरकवण्? यात आले. मात्र, हायवेलगतच्या जमीनमालकांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध करत यापूर्वी काम बंद पाडले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. प्रभारी पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्? त दिवसभर तैनात होता. यावेळी जमीनमालक सुरेश ऊर्फ बाळा मोरये म्हणाले, 'संबंधित खोदाई काम थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी पोलिसांना पाचारण करून दडपशाहीच्या माध्यमातून काम करत असल्याचा आरोप केला. येथील नकाशाच बदलण्? यात आला असून भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित नाहीत. कोणतेही भूसंपादन नसताना विनाकारण लोकांना त्रास देत आहेत. याविरोधात आपण दाद मागणार असून प्रसंगी काम बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, उपअभियंता अमोल ओटवणेकर यांनी शासनाकडून निर्धारित करण्यात आलेल्या नकाशाप्रमाणे येथे काम होत असून जर अशी कामे विनाकारण अडविण्यात येत असतील, तर ही कामे कशी पूर्ण होतील? असा सवाल केला. उपअभियंता ओटवणेकर, पांडे, पवार, प्र. पोलीस निरीक्षक भोसले तसेच पोलीस पाटील संतोष तांबे, केसीसी कंपनीचे अधिकारी आदी दिवसभर तळ ठोकून होते.
फोंडाः फोंड्यातील नागरिकांना नेहमीच चांगले ते देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. आताही गेला बराच काळ रखडत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असून मलनिस्सारण प्रकल्पामुळे रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला आता चालना मिळाली आहे. त्यामुळे पुढील काळात फोंड्यातील रस्ते हे चकाचक झालेले असतील, अशी ग्वाही फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिली. वरचा बाजार - दुर्गाभाट भागातील रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ आज (गुरुवारी) मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, स्थानिक नगरसेवक शांताराम कोलवेकर, नगरसेवक आनंद नाईक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते अरविंद फडते व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही रस्ता डांबरीकरण शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
ठाणे । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी । तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का? मी भटक्या समाजाचा मागासवर्गीय माणूस आहे. मग कसला जातीवाद? असे सवाल उपस्थित करत राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का? मी भटक्या समाजाचा मागासवर्गीय माणूस आहे. मग कसला जातीवाद? असे सवाल उपस्थित करत राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. जातीवादी राजकारण राष्ट्रवादीच्या जन्मापासून झाले आहे. तसेच, शरद पवारांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, अशा शब्दांत पवारांवर राज ठाकरेंनी टीका केली. त्यांच्या या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. "राष्ट्रवादीचा जन्म १९९९ ला झाला. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 'हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे जेम्स लेनने लिहिलेले पहिले घाणेरडे पुस्तक आले. त्या पुस्तकामध्ये माँसाहेब यांच्या चारित्र्याबद्दल आणि शहाजीराजांच्या पितृत्वाबद्दल शंका घेण्यात आली होती. या पुस्तकाच्या प्रस्ताविकामध्ये अनेकांची नावे होती. हे या पुस्तकात कसे आले? या पुस्तकाबद्दल सगळ्यात पहिले आक्षेप घेणारा मी आणि सीपीआयचा कार्यकर्ता किशोर ढमाले हेच होतो. नंतर तो मुद्दा सगळ्या मोठ्या नेत्यांनी उचलला. परंतु महाराष्ट्राचे माता पिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातेबद्दल त्यांच्या पित्याबद्दल शंका घेणाऱ्या जेम्स लेनला आम्ही माफ करणार का? त्याला माहिती पुरवणाऱ्यांना माफ करावं अशी इच्छा आहे का? ते आमच्याकडून नाही होणार, तुम्ही काहीही म्हणा" अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. जे ६ डिसेंबरला आपल्या घरातच थांबत नाही, त्यांनी आम्हाला जातीपाती शिकवू नयेत. तुम्ही ६ डिसेंबरच्या आधी आणि ६ डिसेंबरच्या नंतर कुठे असतात ते एकदा जाहीररीत्या सांगा ना. . तेव्हा उगाच राष्ट्रवादीवर आणि शरद पवारांवर नको ते आरोप करू नका. आम्ही पूर्ण पुराव्यानिशी उत्तर देतो, असे देखील आव्हाड यांनी म्हटले. 'हर हर महादेव' चित्रपटात इतिहास खोटा दाखवला. महाराजांच्या इतिहासाचं तेव्हा विकृतीकरण कोण करतं? वर्ण वर्चस्ववाद कोण करतं? जातीय द्वेष कोण पसरवतं? असे सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाडांनी ठाकरेंनप टीका केली. "मी पाहिजे त्या विषयावर बोलू शकतो. ही सगळी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचीच विचारसरणी आहे आणि ती महाराष्ट्राला ती कळली पाहिजे. अजूनही लोकांना वाटतं की बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे शिवाजी महाराज लोकांच्या घरोघरी कसे पोहोचले. पण महाराष्ट्र वेडा नाहीये. या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला जन्मताच शिवाजी महाराज समजतो", असं आव्हाड म्हणाले.
नवी दिल्ली : भारतातील सराफांना यापुढे फक्त १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिने विकता येणार आहेत आणि या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Gold Hallmarking) असणे बंधनकारक असणार आहे. १६ जूनपासून हॉलमार्किंगचे नवे नियम (New Rule for Gold Hallmarking) लागू झाले आहेत. सुरूवातीला देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या (Gold Jewellery) खरेदी आणि विक्रीमध्ये पारदर्शकता येणार आहे. जानेवारी २०२१पासूनच हॉलमार्किंगचा नियम लागू केला जाणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. गोल्ड हॉलमार्किंगच्या नव्या नियमाचा सराफांवर आणि तुमच्यावर काय परिणाम होणार? (What is Gold Hallmarking? How it will impact you? ) हॉलमार्किंग सोन्याच्या शुद्धतेचे परिणाम आहे आणि खात्री आहे. १६ जूनपासून सोन्याचे हॉलमार्किंग बंधनकारक झाले आहे. भारतात खूप मोठ्या प्रमाणावर सोने आयात होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारत दरवर्षी साधारण 700-800 टन सोन्याची आयात करतो. दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्यासाठी सराफांना त्यांच्याकडचे दागिने बीआयएसच्या ए अँड एच केंद्रावर म्हणजे हॉलमार्किंग केंद्राकडे द्यायचे असतात. तिथे त्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते. या तपासणीनुसार बीआयएस त्या दागिन्यांवर मार्किंग करते. सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी (Gold Jewellery) हॉलमार्किंग बंधनकारक केले आहे. १६ जून २०२१ पासून हॉलमार्क नसलेले सोने (gold) विकता येणार नाही. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (Bureau of Indian Standard) म्हणजेच बीआयएसने (BIS)यासंदर्भातील अधिसूचना (notification) जारी करत सर्व सराफांना (jewelers) याची माहिती दिली आहे. सोन्याची शुद्धता आता तीन दर्जांमध्ये (Gold standards) असेल. पहिले 22 कॅरेट, दुसरे 18 कॅरेट आणि तिसरे 14 कॅरेट. यामुळे ग्राहक अधिक पारदर्शकरित्या सोन्याचे दागिने विकत घेऊ शकतील. दर्जाबद्दल या ग्राहक आणि सराफ दोघांच्याही मनात शंका राहणार नाही. १४ कॅरेट सोन्यात एकूण वजनाच्या ५८. ५० टक्के सोने असते. १८ कॅरेट सोन्यात एकूण वजनाच्या ७५ टक्के सोने असते. २२ कॅरेट सोन्यात एकूण वजनाच्या ९१. ६० टक्के सोने असते. २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने समजले जाते. मात्र २४ कॅरेट सोन्यापासून दागिने बनू शकत नाहीत. कारण ते फारच मुलायम असते. सोन्याचे दागिने हे २२ कॅरेट सोन्याचा वापर करून बनवलेली असतात. बीआयएस आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सोन्याची शुद्धता तपासते. हॉलमार्किंगमध्ये सहा अंकांचा कोड असेल आणि त्यासोबत बीआयएसचे चिन्ह असेल आणि सोबत शुद्धता आणि डिलिव्हरीचे व्हाउचर सराफाला दिले जाईल. मात्र सर्वच सराफांसाठी हॉलमार्किंग सक्तीचे नसेल. ४० लाख रुपयांपर्यत उलाढाल असणाऱ्या सराफांसाठी हे बंधनकारक नसेल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आणि सरकारद्वारे मान्यताप्राप्त प्रदर्शनांसाठी हॉलमार्किंगची सक्ती नसेल. त्याचबरोबर सोन्याची घड्याळे, फाउंटन पेन आणि कुंदन, पोलकी, जडाऊ यासारख्या विशेष दागिन्यांना यातून वगळण्यात आले आहे. याव्यतिरिक्त जुने दागिने ज्यावर हॉलमार्क नसेल अशी दागिने सराफ हॉलमार्कशिवाय ग्राहकांकडून विकत घेऊ शकतील. देशभरात सध्या फक्त ३० टक्के दागिनेच हॉलमार्क आहेत. देशातील हॉलमार्क सेंटरशी संख्या मागील पाच वर्षात ४५४ वरून वाढून ९४५ वर पोचली आहे. सध्या यातील ९४० केंद्र कार्यान्वित आहेत. एका दिवसात हॉलमार्किंग केंद्रावर १५०० दागिन्यांचे हॉलमार्किंग होऊ शकते. सध्या भारतात एका वर्षात १४ कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्याची क्षमता आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार भारतात ४ लाख सराफ आहेत ज्यातील फक्त ३५,८७९ सराफ बीआयएसचे सर्टिफिकेट असलेले आहेत.
- डॉ. परिणय फुके, आमदार. गरीब, सर्वसामान्य, युवा आणि शेतकरी अशा कोणत्याही वर्गाच्या कल्याणाचा संकल्प नसलेला महाराष्ट्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे पाण्यावर रेघोट्या ओढण्याचा प्रकार आहे. अर्थसंकल्प राज्याचा की केवळ मुंबईपुरता हेच कळायला मार्ग नव्हता. शेतकऱ्यांच्या मदतीचा कुठेही उल्लेख नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विषयावर एक शब्दही नाही. - सुनील मेंढे, खासदार, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केेलेला अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारा आहे. अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, सिंचन, रस्ते विकास यावर भर देण्यात आला आहे; तर घरकामगार महिलांसाठी विशेष तरतूद केली आहे. अर्थसंकल्प तयार करताना सर्वच क्षेत्रांचा समतोल साधण्यात आला आहे. - डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस. महाविकास आघाडी सरकारने सलग दुसरा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनासारख्या संकट काळातही सर्वच क्षेत्राच्या विकासाला गती कशी मिळेल, याचा विचार करण्यात आला आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प खऱ्याअर्थाने विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. - मुकेश शिवहरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना. कोराेनासारख्या महामारीतसुध्दा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे हित साधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कृषी पंपांचे थकीत बिलात ३३ टक्क्यांची सूट, गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. - गंगाधर परशुरामकर, माजी जि. प. सदस्य. अर्थसंकल्पात पुण्या-मुंबईतील प्रकल्पांना झुकते माप देण्यात आले आहे. विदर्भावर अन्याय करण्यात आला. या अर्थसंकल्पात कुठल्याही वर्गाला दिलासा मिळेल, अशा एकाही बाबीचा समावेश नसलेला अर्थसंकल्प अर्थहीन आहे. - अशोक लंजे, माजी जि. प. सभापती.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा - बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूककोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीने बिगरगाळाधारक भाजी व्यापाऱ्यांसाठी विस्तारित मार्केटची उभारणी केली आहे. मूळ मार्केटमधून विस्तारित मार्केटमध्ये जाण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करून डांबरी रोड तयार केला आहे. काही महिन्यांपासून या रोडवर कांदा व बटाट्याची विक्री करणाºया व्यापाºयांनी अतिक्रमण केले आहे. रोडच्या दोन्ही बाजूला शेकडो गोणी उतरवून अनधिकृतपणे व्यापार केला जात आहे. त्यांच्या बाजूला इतर फेरीवाल्यांनीही जागा अडविली असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे. बाजार समितीने कांदा व्यापारासाठी स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. परंतु भाजी मार्केटच्या बाहेर सुरू असलेल्या व्यापारामुळे तेथील व्यापारावर परिणाम होऊ लागला आहे. रोडवर सुरू असलेला हा व्यापार थांबविण्यात यावा व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांनी व बाजार समितीमधील अधिकृत व्यापाºयांनी केली होती. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघानेही एपीएमसी पोलीस स्टेशन, बाजार समिती प्रशासनासह महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग अधिकाºयांना याविषयी वारंवार पत्र दिले आहे. पण अद्याप संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. बाजार समिती परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्याही वाढू लागली आहे. पदपथ व रोडवर जिथे जागा मिळेल तेथे अतिक्रमण करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे. विस्तारित मार्केटच्या परिसरामध्ये फेरीवाले येऊ नयेत यासाठी गेट बांधावे, अशी मागणीही केली आहे. भाजी मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये रोडवर कांदा-बटाट्याचा व्यापार सुरू आहे. त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी. येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी रोडवर गेट तयार करावे व बाजार समितीने तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. - शंकर पिंगळे,
हा लिलावप्रकार अधिकृतरीत्या अस्तित्वात येण्यापूर्वी प्रसिद्ध जर्मन कवी जोहान गटे यांनी 1797 मध्ये अयशस्वीरीत्या वापरला होता. ही कथा मुळातूनच रंजक आहे. गटेंनी लिहिलेली कविता त्यांनी प्रकाशकाकडे आपल्या हस्तकाकरवी पाठवली आणि संबंधित कवितेची रॉयल्टी काय असावी, यासंबंधी बंदिस्त लिफाफाही त्याला दिला. त्यांनी आपल्या हस्तक वकिलाला असे सांगितले की, या लिफाफ्यात मी माझी प्रस्तावित रॉयल्टी रक्कम लिहिली आहे. प्रकाशकाने जर या किमतीपेक्षा अधिकची रक्कम देऊ केल्यास हा लिफाफा त्याला काढून दाखवा आणि या लिफाफ्यातील दिलेली रक्कमच मी घेईन, असे सांगावे. जर प्रकाशकाने यापेक्षा कमी रक्कम देऊ केल्यास लिफाफा आणि कविता परत घेऊन यावे, त्याच्याशी वाटाघाटी करू नये, भविष्यकाळात आपल्या कवितांना काय रक्कम मिळू शकते याचा त्यांना अंदाज घ्यावयाचा होता. लिलाव सिद्धांतातील सुधारणा व लिलावाचे नवे स्वरूप विकसित केल्याबद्दल पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना या वर्षीचा अर्थशास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. तत्पूर्वी, विल्यम विक्रे या कॅनेडियन अर्थतज्ज्ञांनाही 1996 मध्ये लिलाव अभ्यासाबद्दल नोबेल मिळाले होते. ज्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांकरता आयता (Readymade) बाजार उपलब्ध होत नाही, कोणत्या किमतीला अशा वस्तूंच्या नेमक्या किती नगसंख्येची मागणी येऊ शकते याविषयी अनिश्चितता असते; अशा वस्तू व सेवांच्या किमती पारदर्शक, कार्यक्षम व जलदरीत्या निर्धारित करणे हा लिलावप्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे लिलावप्रक्रियेचा लिखित इतिहास हा इसवी सन पूर्व 500 वर्षांपूर्वीचा आहे. बॅबिलोनमध्ये विवाहयोग्य मुलींचा विवाहाकरता लिलाव होत असल्याचे हिरोडोटसने आपल्या ग्रंथात नमूद केले आहे, तर भारतीय पुराणकथेत राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांचा गुलाम म्हणून लिलाव झाल्याचे नमूद आहे. इसवी सन 193 मध्ये तर चक्क रोमन साम्राज्याचाच लिलाव झाल्याची नोंद आहे. आजकाल अनेक सिनेकथांमधील लिलावदृश्ये त्या सिनेमाची रंजकता वाढवतात. अगदी निवडणुकासुद्धा एक प्रकारचा लिलाव आहे, याची जाणीव अनेकांना नसते. एकंदर, बाजारातील संबंधित वस्तूंची किंमतनिश्चितीची गरज लिलावप्रक्रियेतून भागवली जात असल्याने ही पद्धत आजही लोकप्रिय असून ती वर्धिष्णू होत आहे. मात्र लिलावप्रक्रियेतील दोषांमुळे शेतमालाला रास्त भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी अनेकदा आंदोलन करतात. तसेच विशिष्ट सार्वजनिक संपत्तीचे योग्य प्रकारे लिलाव न केल्याने सरकारचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे देशाचे महालेखापरीक्षक सांगतात. त्यामुळे साधी-सोपी वाटणारी लिलावप्रक्रिया गुंतागुंतीची बनते आणि ती गुंतागुंत सोडविण्याकरता त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास अत्यावश्यक बनतो. जेव्हा 1970 च्या दशकात OPEC या खनिज तेल विक्री करणाऱ्या देशांच्या संघटनेने संगनमत करून पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढवल्या; तेव्हा खनिज तेलाबाबत आत्मनिर्भर होण्याकरता अमेरिकेने आपल्या देशातील सागरकिनारवर्ती भागातील संभाव्य तेलसाठ्याचे पट्टे लिलाव करून खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला. या तेलपट्ट्याचा लिलाव कशाप्रकारे करावा याविषयी अर्थतज्ज्ञांचे मार्गदर्शन अमेरिकन सरकारने मागवले. तेव्हापासून अर्थतज्ज्ञही लिलावप्रक्रियेकडे गांभीर्याने पाहू लागले, त्याचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास करू लागले. या संशोधनाचे फलित म्हणजे 'लिलाव सिद्धांत आणि त्याचे उपयोजन' ही अर्थशास्त्राची उपयोजित शाखा विकसित झाली. कोणत्याही लिलावाची तीन प्रमुख वैशिष्ट्ये असतात. पहिले वैशिष्ट्य म्हणजे- लिलावाचे नियम काय आहेत, लिलाव खुला आहे की लखोटाबंद, किती वेळा लिलावात बोली लावता येते- लिलावातील विजेत्याला कोणती किंमत द्यावी लागते, या बाबी यात येतात. दुसरे म्हणजे लिलावात विक्रीकरता असलेल्या वस्तू अथवा सेवेचे मूल्य कशा प्रकारे ठरते, सर्व बोली बोलणाऱ्यांच्या दृष्टीने त्याचे समान मूल्य आहे की नाही आणि शेवटी बोली लावणाऱ्या संभाव्य खरेदीदारांना संबंधित वस्तूंबद्दल, त्याच्या खऱ्या मूल्याबद्दल कितपत माहिती आहे व त्या माहितीची निश्चितता किती आहे- या तीन प्रमुख मुद्यांभोवती लिलाव सिद्धांत फिरतात. याविषयीच्या सैद्धांतिक अभ्यासाचा परिणाम म्हणून 1994 मध्ये अमेरिकन फेडरल कम्युनिकेशन कमिशनने ज्या प्रकारे रेडिओलहरींचा लिलाव केला, त्याचे वर्णन 'न्यूयॉर्क टाइम्स'ने आजपर्यंतचा जगातील सर्वोत्कृष्ट लिलाव असा केला आहे. आज टेलिकॉम स्पेक्ट्रम असो की आयपीएलमधील खेळाडूंची विक्री असो- असंख्य वस्तू व सेवांच्या कार्यक्षम किंमतनिश्चितीत लिलाव हा अविभाज्य घटक बनला आहे. विक्रेते आणि संभाव्य खरेदीदार यांचा कार्यक्षम किमतीला मिलाफ घडवून आणण्याचे कार्य लिलावातून साध्य होत असते. विक्रेत्याला महत्तम नफा मिळवण्याकरता लिलावाचे नियम (Auction Rule) आणि लिलावाचे नेपथ्य (Auction Environment) या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. लिलावात सहभागी असलेल्या संभाव्य खरेदीदारांनी काय करावे ते काय करू नये, ते कशा प्रकारे बोली देऊ शकतात? बोलीतील विजेतानिवडीची पद्धत काय आहे? विजेत्याने अंतिमतः कोणती किंमत द्यायची? लिलाव-प्रक्रियेदरम्यान विक्रेत्याने त्या वस्तूसंबंधीची कितपत माहिती सार्वजनिक करावी? यात लिलाव डावपेचविषयक अनेक बाबी येतात. याचा लिलावसंबंधित वस्तूंच्या मूल्यावर परिणाम होत असतो. लिलावाच्या प्रकारानुसार यात इंग्रजी लिलाव आणि डच लिलाव असे दोन प्रकार असतात. इंग्रजी प्रकारच्या लिलावात अशा लिलावाची सुरुवात एखाद्या किमान आधार किमतीपासून सुरू होते आणि सर्वाधिक बोली लावणारा विजेता असतो. यात बोली बोलणाऱ्यांना लिलावकाळात आपल्या बोली रकमेत वारंवार वाढ करण्याची मुभा असेल, तर ती खुली बोली होते. यात इतर बोली लावणाऱ्या स्पर्धकांच्या वर्तणुकीवरून संभाव्य खरेदीदार आपले डावपेच आखत असतात. त्यामुळे काही वेळा यात अनेक लिलावफेऱ्याही होतात. आयपीएल सामन्यांकरता खेळाडूंचा लिलाव होत असताना अशा फेऱ्या झालेल्या अनेकांनी पाहिलेच असेल. आता जर अशी बोली बंदिस्त लखोट्यात एकदाच द्यावयाची असेल, तर संभाव्य खरेदीदारांना आपल्या स्पर्धकांच्या वर्तणुकीबद्दल अंदाज व्यक्त करणे अवघड होते. त्यामुळे त्यांना लिलावासंबंधित वस्तूच्या त्यांच्या खऱ्या मूल्य आकलनानुसार बोलीची रक्कम लिहावी लागते. या प्रक्रियेत ज्याची निविदा जास्त रकमेची असेल तो विजेता घोषित केला जातो आणि त्याला ही संबंधित रक्कम मोजावी लागते. आता येथेसुद्धा जर नियमात थोडासा बदल केला, तर लिलाव रकमेत फार मोठा बदल झालेला दिसून येऊ शकतो. याला दुसऱ्या क्रमांकाच्या किमतीचा लिलाव असेही म्हणतात. यात बंदिस्त लखोट्यात ज्याने सर्वाधिक बोली लावली आहे, तो विजेता घोषित होतो आणि किंमत मात्र स्पर्धक बोलीदाराने लावलेली दुसऱ्या क्रमांकाची देतो. आपण लावत असलेली बोलीची रक्कम आपल्याला द्यावयाची नसल्याने स्पर्धक थोड्याशा उदारपणे बोली लावतात. लिलावात वर्चस्व राखायचे असेल, तर बोली जास्त रकमेचीच लावावी लागेल. याला लिलावाची अर्थतज्ज्ञ विक्रीपद्धत असेही म्हटले जाते. हा लिलावप्रकार अधिकृतरीत्या अस्तित्वात येण्यापूर्वी प्रसिद्ध जर्मन कवी जोहान गटे यांनी 1797 मध्ये अयशस्वीरीत्या वापरला होता. ही कथा मुळातूनच रंजक आहे. गटेंनी लिहिलेली कविता त्यांनी प्रकाशकाकडे आपल्या हस्तकाकरवी पाठवली आणि संबंधित कवितेची रॉयल्टी काय असावी, यासंबंधी बंदिस्त लिफाफाही त्याला दिला. त्यांनी आपल्या हस्तक वकिलाला असे सांगितले की, या लिफाफ्यात मी माझी प्रस्तावित रॉयल्टी रक्कम लिहिली आहे. प्रकाशकाने जर या किमतीपेक्षा अधिकची रक्कम देऊ केल्यास हा लिफाफा त्याला काढून दाखवा आणि या लिफाफ्यातील दिलेली रक्कमच मी घेईन, असे सांगावे. जर प्रकाशकाने यापेक्षा कमी रक्कम देऊ केल्यास लिफाफा आणि कविता परत घेऊन यावे, त्याच्याशी वाटाघाटी करू नये, भविष्यकाळात आपल्या कवितांना काय रक्कम मिळू शकते याचा त्यांना अंदाज घ्यावयाचा होता. एक प्रकारे दुसऱ्या क्रमांकाच्या किमतीचा लिलाव करण्याचा गटेंचा तो प्रयोग होता. मात्र इंटरनेटच्या उदयानंतर ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या अनेक कंपन्या या प्रकारच्या लिलावपद्धतीचा वापर यशस्वीरीत्या करत आहेत. लिलावाचा दुसरा प्रकार आहे, ज्याला डच लिलावपद्धत असे म्हटले जाते. नेदरलँडमधील ट्युलिपची फुले आणि इतर नाशवंत शेतमाल यांच्या लिलावाकरता ही पद्धत वापरली जाते. या प्रकारात लिलावाची सुरुवात ही अवास्तव अशा जास्त किमतीने होते आणि हळूहळू किमती तोपर्यंत कमी होत जातात की, जोपर्यंत त्या किमतीला एखादा खरेदीदार मिळत नाही. अर्थात कितपत किंमत कमी करावी, याचा निर्णय विक्रेत्याला घ्यायचा असतो. हा जलद लिलावप्रकार असतो, म्हणून काही ठिकाणी घड्याळाच्या काट्यांकडे पाहत हा लिलाव होतो. विक्रेता सांगत असलेल्या किमतीला जर कोणी 'ही वस्तू माझी' असं म्हणत असेल तर तिथेच तो लिलाव संपतो. लिलावात सांगत असलेल्या किमतीला आपला स्पर्धक 'हो' म्हणू शकतो, याची भीती बोलीतील प्रत्येक संभाव्य खरेदीदाराला असते, त्यामुळे त्याला योग्य किंमत आहे असे वाटल्यास तो लागलीच 'हो' म्हणतो. एकंदर इंग्रजी असो की डच असो; दोन्ही लिलाव प्रकारांत साधारणतः सारखीच किंमत मिळते; असे विक्रेत्यांचे मत होते, जे बिनचूक नाही. लिलावाच्या नियमाबरोबरच लिलावाचे पर्यावरण किंवा नेपथ्य (Auction Environment) लिलावाच्या परिणामांवर प्रभाव टाकत असते. लिलावात बोली लावणारे हे स्वहित आणि महत्तम लाभ मिळण्याच्या प्रेरणेने लिलावात सहभागी होत असतात. त्यामुळे लिलावातील बोली लावणे हा एक प्रकारचा खेळ आहे असे मानले, तर या खेळाचे डावपेच, व्यूहरचना कशी करता येईल की- ज्यायोगे संबंधित वस्तू आपल्यालाच मिळेल, याविषयी बोली लावणारे संभाव्य खरेदीदार जागरूक असतात. असे बोली लावणारे कशा प्रकारे संबंधित वस्तू व सेवेचे मूल्य निर्धारित करतात, यावर लिलावाचे नेपथ्य अवलंबून असते. वस्तू जर खासगी स्वरूपाची असेल आणि भविष्यात त्याची पुनर्विक्री करणे हा हेतू नसेल, तर प्रत्येक बोली लावणारा त्याच्या सापेक्ष मूल्यआकलनानुसार बोली लावतो, तो इतर स्पर्धकांच्या बोलीचा विचार करत नाही. दुर्मिळ वस्तू, पेंटिंग अथवा ज्या वस्तूंशी भावनिक नाते जोडलेले असते, हे अशा वस्तूंच्या बाबतीत खरेदीदाराच्या दृष्टीने त्या वस्तूचे खासगी मूल्य व्यक्तिसापेक्ष असते. उदाहरणार्थ- 2009 मध्ये न्यूयॉर्क येथे महात्मा गांधीजींच्या वापरातील काही वस्तूंचा लिलाव झाला होता. या लिलावात विजय माल्या यांनी 1.8 दशलक्ष ही सर्वाधिक बोली लावून त्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. 'ही बोली मी देशाकरता लावली', असे त्यांनी त्या वेळी सांगितले होते! याउलट, पुनर्विक्री करण्याकरता संभाव्य खरेदीदार त्या वस्तू लिलावात खरेदी करत असेल, तर त्याला निरपेक्षपणे लिलावाचे मूल्य निर्धारित करावे लागते. अशा परिस्थितीत लिलावाचे नेपथ्यच बदलते. याला समान मूल्य लिलाव असे म्हणतात. खनिज तेलाचे साठे असलेले पट्टे लिलावाने घेत असताना खनिज तेलाची बाजारातील किंमत सर्व बोली लावणाऱ्या सहभागी बोलीदारांना माहीत असते; मात्र संबंधित तेलपट्ट्यात नेमके किती खनिजतेल मिळू शकते, याबद्दलचे अंदाज वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक बोलीदार आपल्या अंदाजाप्रमाणे बोली लावत असतो. अशा वेळी अंदाजातील चूक ही आर्थिक दृष्ट्या खूप महाग पडू शकते. याला विजेत्यांचा शाप असेही म्हटले जाते. दिल्लीच्या संघाने 2015 च्या आयपीएल मोसमाकरता संभाव्य उपयुक्तता लक्षात घेऊन युवराजसिंगला रुपये सोळा कोटी इतकी बोली लावून संघात घेतले होते. मात्र त्या मोसमात युवराजसिंगला फॉर्म गवसला नाही. त्या मोसमात युवराजसिंगने एकंदर 248 धावा केल्या. म्हणजे त्याची एक धाव दिल्लीच्या संघाला साधारणपणे साडेसहा लाख रुपयांना पडली! आपले स्पेक्ट्रम लिलाव ही एक प्रकारे विजेत्याचा शाप ठरला असून अनेक टेलिकॉम कंपन्या त्यामुळे बंद पडल्या आणि आहे त्या कंपन्या प्रचंड कर्जबाजारी झालेल्या आहेत, ते या विजेत्याच्या शापामुळेच! म्हणून विशेषतः सामान्य मूल्य असलेल्या वस्तूंच्या बाबतीत बोली लावत असताना फार काळजी घ्यावी लागते. लिलावप्रक्रियेत संभाव्य खरेदीदारांचे संगनमत तसेच विक्रेता अथवा त्याच्या हस्तकाचे खरेदीदाराशी होणारे संगनमत लिलावप्रक्रियेचा फज्जा उडवू शकते. वरील एका उदाहरणात गटे यांच्या कवितेचा संदर्भ दिला आहे. गटेंच्या वकिलाने प्रकाशकाशी हातमिळवणी करून त्या पाकिटातील नेमकी रक्कम प्रकाशकाला सांगितली असल्याने प्रकाशकाने त्याचा गैरफायदा घेत त्यांची खरी किंमत सांगितली नाही आणि त्यापासून अडीचपट नफा कमावला. ज्या कारणासाठी गटेंनी विश्वासाने हा प्रयोग केला होता, त्या विश्वासाला तडा गेला. गटेंना त्यात काही तरी काळेबेरे झालेले लक्षात आले आणि त्यांनी पुढच्या कविता खुल्या बोलीच्या लिलावपद्धतीने विकल्या! येथे किंमत निर्धारणातील लाभ-नुकसान हे त्या दोन पक्षांपुरतेच मर्यादित आहेत. मात्र जर लिलावातील संबंधित वस्तू अथवा सेवा जनतेचा विश्वस्त या नात्याने सरकार विकत असेल अथवा भाडेपट्ट्याने देत असेल, तर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधित लिलावातून सरकारला रास्त व योग्य मोबदला तर मिळालाच पाहिजे तसेच जनहितही साध्य झाले पाहिजे. म्हणून सरकारच्या सार्वजनिक धोरणाची यशस्विता मोजमापनाचा एक महत्त्वाचा निकष हा लिलाव असतो. अशा वेळी सार्वजनिक संपत्ती लिलाव-संबंधित यंत्रणेचा आराखडा (Auction Mechanism Design ) कसा आहे, लिलावाचे नियम आणि लिलावाचे नेपथ्य कसे आहे, यावर सर्वसामान्य जनतेनेसुद्धा लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. वर्तमानात ज्या देशातील संस्था कमकुवत आहेत, सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे आणि देशात काही विशिष्ट उद्योगपतींचेच प्रस्थ आहे, अशा देशांमध्ये लिलावप्रक्रिया ही बहुतांशरीत्या एक फार्स असते. भारताचे उदाहरण द्यायचे झाले तर, 1991 नंतर भारतात खासगीकरणाची सुरुवात झाली आणि अनेक सार्वजनिक कंपन्या कवडीमोल भावाने विकल्या गेल्या. 2G स्पेक्ट्रम आणि कोळशाच्या खाणी खासगी कंपन्यांना देताना सरकार जनतेचा विश्वस्त या नात्याने काम करण्यात अपयशी ठरले, म्हणून तत्कालीन सरकारला निवडणुकीत पदच्युत व्हावे लागले. विद्यमान सरकारने तर विमानतळ, बंदरे, रेल्वे यांसारख्या मक्तेदारीयुक्त सार्वजनिक सुविधा विक्रीस काढलेल्या आहेत. विशेष म्हणजे, काही विशिष्ट उद्योगसमूहांनाच या क्षेत्रात शिरकाव करून दिला जात आहे. लिलाव-प्रक्रियेबद्दल जनतेने अधिक जागरूक राहिले पाहिजे ते यामुळेच!
गाझियाबादमध्ये पत्रकार विक्रम जोशी (Journalist Vikram Joshi) यांच्यावर सोमवार (20 जुलै) दिवशी गोळीबार झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. भाचीची छेडछाड करणार्या तरूणांना विरोध केल्याने त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. दरम्यान त्यानंतर 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र विक्रम यांच्या पुतण्याने कमल-उद- दिन यांच्या मुलाने हल्ला केल्याचा दावा करत त्याला अटक होत नाही तो पर्यंत विक्रम यांचे पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. तसेच बुलेट्सचे घाव देखील गंभीर होते. विक्रम यांच्या भाचीने 16 जुलै दिवशी काही तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसात तक्रार दाखल केल्याच्या रागातून त्या अज्ञात तरुणांनी बदल्याच्या भावनेतून पत्रकार विक्रम जोशी यांना बेदम मारहाण करून गोळीबार केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. त्याचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर देखील जोशी कुटुंबाकडून 3 जणांविरोधात पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकी इंचार्जला निलंबित करण्यात आलं आहे.
पुणे : घरगुती अथवा सार्वजनिक कार्यक्रमात वापरण्यास सोयीचे आणि अत्यंत स्वस्त म्हणून डिस्पोझिबल प्लेट व इतर साहित्यांचा वापर वाढला आहे . केवळ पंचवीस रुपयांच्या या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने गुंडाच्या टोळक्याने दुकानातील दोघांवर जीवघेणा हल्ला केला. धर्माराम गोकुळराम बंजारा (वय २२, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, सुखसागरनगर, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी निखील नितीन गावडे (वय २२, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) याला अटक केली असून त्याच्या इतर तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी येथील अंबिका डिस्पोझबल अँड बर्थ डे हाऊसमध्ये २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्माराम बंजारा व त्यांचा साथीदार मंलगराम बंजारा हे दोघे अंबिका डिस्पोझिबल या दुकानात काम करीत होते. त्यावेळी निखील गावडे व त्याचे साथीदार आले. त्याने त्यांच्याकडे सुट्या ५ डिस्पोझिबल प्लेट मागितल्या. फिर्यादीने त्यांना ५ प्लेट देऊन त्याचे पैसे मागितले. या कारणावरुन त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन त्यांच्यातील एकाने हातातील कोयत्याने फिर्यादीचे हातावर, कपाळावर मारुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा सहकारी मंलगराम याच्या हाताचे बोटावर वार करुन त्याला जखमी केले. लाठ्या काठ्याने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक एस एम आदलिंग तपास करीत आहेत.
लाच स्वीकारताना रंगेहाथ गजाआड होणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची काही खैर नाही. त्यांना शिक्षा अटळ आहे. लाच स्वीकारताना रंगेहाथ गजाआड होणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची काही खैर नाही. त्यांना शिक्षा अटळ आहे. कारण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अशा आरोपींसाठी रचलेल्या सापळ्याचे व्हिडीओ चित्रीकरण सुरू केले आहे. एसीबीकडून हेच चित्रीकरण ठोस पुरावा म्हणून सादर होऊ लागल्याने अशा लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांना न्यायालय संशयाचा फायदा देणे निव्वळ अशक्य बनले आहे. याच युक्तीच्या जोरावर गेल्या चार महिन्यांमध्ये एसीबीने आपला दोषसिद्धी दर वाढवला आहे. गेल्या वर्षी एसीबीचा दोषसिद्धी दर २१ टक्के इतका होता. मात्र या वर्षी पहिल्या ४ महिन्यांमध्ये तो २९ टक्क्यांवर झेपावला आहे. भविष्यात हा दर आणखी वाढेल, असा विश्वास एसीबी अधिकाऱ्यांना आहे. दोषसिद्धी दर वाढल्याने चिरीमिरीसाठी सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्या बेगुमान अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेसण घालण्यात यश येऊ शकेल, असा विश्वासही एसीबीकडून व्यक्त होतो. लाचखोरीची तक्रार आल्यानंतर एसीबी आधी तक्रारीतील तत्थ्यता पडताळते. तत्थ्य आढळल्यास गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचते. या सापळ्यात फिर्यादी आणि त्याच्यासोबत पंच असतात. या पंचांसमक्षच लाच स्वीकारली जाते आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी गजाआड होतात. पैसे स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे हात रंगतात. तोही एक पुरावा असतो. मात्र असे असूनही आरोपी अधिकाऱ्याची अपुऱ्या पुराव्यांमुळे, संशयाचा फायदा मिळवत न्यायालयातून निर्दोष मुक्तता होते. यात पंच, साक्षीदार फोडण्याचे, फिर्यादीवर दबाव आणण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर आरोपी अधिकाऱ्यांना पळवाट मिळू नये म्हणून एसीबीने सापळ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण सुरू केले. या चित्रीकरणातून आरोपी अधिकारी पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसतो आणि न्यायालयात त्याच्याकडे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.
गृहिणी सचीवः । म्हणून आज दाखवायचा निश्चय आहे का ? ' मग उशीर का ? त्या अवताराच्या दर्शनाने आम्ही किती कपटी, धूर्त, अविश्वासू आहोत हे आमच्या प्रचीतीला येणार आहे ना ? होऊं दे तर एकदां तुझ्या मनासारखं - " हें पाहिलंत - पुन्हां रागवायचं झालं- ' ' खरंच नाहीं रागावलों-खरंच नाहीं रागावत. तुझ्यावर मला रागावतांच येत नाहीं ! तूंच सांग, तुझ्यावर मी कधीं आजवर रागावलों आहें का- ' ' असं आहे म्हणूनच तर ' आज माझ्यांतलं वैगुण्य माझ्या पदरीं सप्रमाण बांधायचं ठरविलं आहेस ? होय ना ? हांस - खुशाल हांस ! तूं कुत्सितपणानें कितीहि हंसलीस तरी मला कांहीं राग यायचा नाहीं; समजलीस ? कां, आतां कां बोलत नाहींस ? कांहीं सुचत नाहीं ? कशी सुरवात करावी हे कळत नाहीं? पण थांब; जिन्यांत कुणाचीं तरी पावले वाजताहेत-बाहेरचे कुणी तरी - ' ' नमस्कार - !' नमस्कार दिवाणजी- या, बसा असे ! फार दिवसांनीं इकडे वाट चुकलांत ! सहज इकडे कुठे गेला होतात. ते जातां जातां-' ' छेः छेः ! सहज कशाला येतोय ? - सहज आम्हांला इकडे तिकडे कोण फिरूं देणार ? मुद्दाम आलों आहे आपल्याकडेच ! मालकांन मुद्दाम पाठविले आहे मला ! म्हणाले कीं, सगळीं कामें बाजूला ठेव. एकछि काम नाहीं झालं तरी चालेल. पण त्यांच्याकडे जा आणि त्यांना घेऊ नच ये म्हणून आलो आहे. दुसरं काय ?-' ' असं - असं ! - मी येणारच होतों-येणार आहेच पण जरा-हें दिवाणजींना एक पेलाभर चहा तरी देऊं या '
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Galaxy Fold, Huawei Mate X, Moto Razr आणि आता Galaxy Z Flip फोल्डेबल स्मार्टफोनचा ट्रेंड एक प्रकारे सुरू झाला आहे. परंतु चीनी कंपनी TCL ने एक स्मार्टफोन बनवित आहे ज्याचा स्क्रीन एक्स्पैंड होईल. टीसीएलने मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस 2019 दरम्यान फोल्डेबल स्क्रीन शोकेस केली. सीएनईटीच्या अहवालानुसार, ज्या स्मार्टफोनवर टीसीएल काम करत आहे त्याची स्क्रीन लवचिक असेल. टीसीएल स्लाइड आउट डिझाइनसह स्मार्टफोनचा एक प्रोटोटाइप बनवित आहे. त्याचा फायदा असा असेल की फोनला वाकविण्याची गरज भासणार नाही, तसेच स्क्रीनला बाजूला ढकलून कमी केली जाऊ शकते. अहवालात म्हटले की, ते एका स्टॅंडर्ड स्मार्टफोनसारखे दिसते. परंतु स्क्रीन खेचल्यानंतर तो टॅब्लेटचा आकार बनतो. अहवालानुसार, टीसीएल यावर्षी मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये या स्मार्टफोनचा प्रोटोटाइप दर्शविणार होता, परंतु आता एमडब्ल्यूसी 2020 रद्द करण्यात आले आहे. टीसीएलच्या या प्रोटोटाइपमध्ये स्लाइड आउट डिस्प्ले आहे आणि कर्व्ड ऐज देण्यात आला आहेत. या प्रोटोटाइपच्या मागील पॅनेलमध्ये डिवाइडर आहे जिथून स्क्रीन जिथे आत येते तिथून बाहेर पडते. फोनच्या फ्रण्टमध्ये ड्युअल कॅमेरा दिसू शकतो, जो पंचहोलमध्ये आहे. स्लाइड आउट डिस्प्ले कसे कार्य करेल, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही, मात्र हा स्मार्टफोन इतर फोल्डेबल स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो. ज्यामुळे वारंवार फोन फिरवण्याची गरज पडणार नाही. दरम्यान, टीसीएलने आत्ता या स्मार्टफोनच्या प्रोटोटाइपविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
टेंभुर्णी : आपल्या मुलाला बसमध्ये बसवून देण्यासाठी सावंगी फाट्यावर आलेल्या एका इसमाला भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील सावंगी- गोंधनखेडा फाट्यावर बुधवारी रात्री घडली. यात सुभाष कचरूबा अढावे (५५) हे जागीच ठार झाले. सावंगी वरगणे येथील सुभाष कचरुबा अढावे हे आपल्या मुंबईला जाणा-या मुलाला बसमध्ये बसवून देण्यासाठी परिवारासोबत सावंगी फाट्यावर आले होते. फाट्यावरून रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणा-या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात अढावे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सावंगी येथील ग्रामस्थांनी त्यांना तातडीने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मयत अढावे यांच्या मृतदेहाचे गुरुवारी टेंभुर्णी येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी सावंगी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचा मुलगा विलास आढावे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सनी लिओनने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. श्रीजीत विजयनच्या "शेरो' या तमिळ थ्रिलर सिनेमात ती दिसणार आहे. याशिवाय विक्रम भट्ट यांच्या "अनामिका' या वेब सीरिजमध्येही ती दिसणार आहे. या वेब सीरिजचे शूटिंग नुकतेच संपले आहे. आता त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात होणार आहे. ही वेब सीरिज 10 भागांची असणार आहे. या दोन प्रोजेक्टमुळे आपले हे वर्ष मस्त जाणार आहे, असे ती म्हणाली. या वर्षात आपण सर्वजण घरामध्येच अडकून पडलो होतो. या काळात या प्रोजेक्टची तयारी चांगल्या प्रकारे करता आली. त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी खरोखर "वर्किंग इअर' होते, असे सनी म्हणाली. "शेरो'चा डायरेक्टर विजयन यांनीच या सिनेमाची कथा लिहिली आहे. त्यांनी यापूर्वी तमिळमधील आणखीन 2-3 सिनेमांचे डायरेक्शन केलेले आहे. "शेरो'जरी तमिळमध्ये रिलीज होणार असला तरी हिंदी प्रेक्षकांना नाराज होण्याचे काहीही कारण नाही. कारण हा सिनेमा एकाचवेळी तमिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे "अनामिका'मध्ये ती चक्क मारेकरी म्हणून दिसणार आहे. तिला या वेब सीरिजमध्ये विरुद्ध बाजूच्या गॅंगला संपवण्याचे काम करायचे आहे.
विजय कोंडके म्हणजे विख्यात विनोदी नट दादा कोंडके यांच्या मोठ्या भावाचा मुलगा. शेवंताबाई व धोंडीराम या दांपत्याच्या पोटी विजय यांचा जन्म मुंबई येथे झाला. मात्र त्यांचे शालेय शिक्षण हिंगवली, उरळीकांचन आणि भोर या ठिकाणी पार पडले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयामधून १९७१ मध्ये ते बी.कॉम. झाले. त्याच काळात दादांनी 'सोंगाड्या' हा पहिला चित्रपट निर्माण केला. पण सोंगाड्याला वितरक मिळेना. तेव्हा स्वतःच सोंगाड्याचे वितरण करायचे दादांनी ठरवले. पण वितरणाची काहीच कल्पना नसल्याने वितरणातील एका अनुभवी माणसाला नेमून त्यांच्या हाताखाली विजय कोंडके यांना वितरण शिकण्यासाठी नेमले. दादांचे वितरण कार्यालय तेव्हा पुण्यात होते. थोड्याच दिवसात विजय कोंडके यांनी वितरणाची बरीचशी माहिती जमवली. चित्रगृहवाल्यांच्या ओळखी करून घेतल्या आणि 'एकटा जीव सदाशिव' या दादांच्या दुसऱ्या चित्रपटाचा कोल्हापुरात मुहूर्त केला, तेव्हा त्यांनी विजय कोंडके यांना आपल्या वितरणाचे प्रमुख नेमले. विजय कोंडके यांनी साऱ्या महाराष्ट्रात फिरून चित्रगृहवाल्यांशी ओळख करून घेतली आणि वितरण क्षेत्रात आपला जम बसविला. नंतर ते निर्मितीकडे वळले. विजय कोंडके यांनी 'मला घेऊन चला' (१९८८), 'पळवापळवी' (१९८९) हे दोन चित्रपट निर्माण केले. दोघांचेही दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका दादा कोंडके यांची होती. यानंतर विजय कोंडके यांनी दिग्दर्शनात उतरायचे ठरवले आणि १९९१ मध्ये 'माहेरची साडी' हा कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केला. कामगाराच्या कुटुंबाची ही कथा. त्यामुळे समाजात ज्याला तळागाळाचा वर्ग म्हणतात, त्या वर्गाने 'माहेरची साडी'ला गर्दी केली. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले.
आरोपींनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. पिंपरी : हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाचे अपहरण केले. त्यानंतर तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून केला. ही घटना सोमवारी पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली. हितेश मुलचंदानी (वय २३, रा. डी. ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी चार इसमांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशच्या मित्राचे कासारवाडी येथील हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. किरकोळ वादाचे रुपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याचा मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये धाव घेतली. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने गाडीत बसवले. चौघांनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी होऊन हितेशचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
म्हापसा : शेजारच्या भाडेकरू महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी संशयित माय-लेकीला अटक केली. नंतर या दोघींची जामिनावर सुटका झाली. हा प्रकार मायणा पाटो, कामुर्ली येथे घडला. दरम्यान, म्हापसा न्यायालयाने या संशयित माय-लेकीची सशर्त जामिनावर सुटका केली. प्रत्येकी 10 हजार रूपये हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार आणि गोवा सोडून न जाणे तसेच तक्रारीत हस्तक्षेप न करणे, अशा अटी घातल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सदर घटना बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. बोरीकडे मायणा पाटो कामुर्ली येथे एका घरात निसाद व कांबळी सुवारीस ही दोन कुंटूंबे भाडेकरू म्हणून शेजारी राहतात. त्यांना खोलीत जाण्यासाठी एकच वाट असून त्यावरून वारंवार खटके उडत. बुधवारी संशयित माया व जोस्लीन सुवारीस यांनी तक्रारदार मदनची पत्नी रूपाली निसाद (41) हिच्यावर सळीने वार केला. यात त्या जखमी झाल्या. हवालदार सुनिल मांद्रेकर तपास करीत आहेत. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
नसा ब्लॉक होण्याची किंवा त्यात अडथळ्याची कारणे काय आहेत? इतर अनेक रोग आणि बाह्य घटकांमुळे एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकते. परंतु रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम आपण खाल्लेल्या अनहेल्दी गोष्टींचा होतो. तळलेले अन्नपदार्थ, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, केक, स्नॅक्स, तेल, लोणी यांसारख्या गोष्टी नसांमध्ये चरबी जमा करतात, ज्यामुळे ते फॅट नसांत अडकण्याची शक्यता असते. बंद झालेल्या नसा उघडण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे ते जाणून घेऊया. एनसीबीआय NCBI वर प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लसूण हे एक सुपरफूड आहे जे विविध आरोग्यविषय फायदे आणि पोषक तत्वे शरीराला प्रदान करते. हे ऑर्गेनोसल्फर संयुगांचा खजिना आहे जे सूज, कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात. याशिवाय आपल्या आहारात लिंबूवर्गीय फळे, बेरीज, फॅटी फिश, शेंगा, अव्हाकॅडो इत्यादींचे सेवन करावे. (वाचा :- COVID 4th wave : चौथ्या लाटेत करोनाची रूग्णसंख्या कमी पण मृत्यूचे प्रमाण मात्र भयंकर, 'ही' 8 विचित्र लक्षणे दीर्घकाळ घालत आहेत धुमाकूळ) पालक, ब्रोकोली, कोबी इत्यादी पालेभाज्या रक्तवाहिन्यांच्या भिंती(ज्या एथेरोस्क्लेरोसिसमुळे जाड झालेल्या असतात) त्या विस्तारण्यास किंवा बारीक करण्यास मदत करतात. ते रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल देखील कमी करतात. (वाचा :- Cancer symptoms : पाठदुखी व 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, या जीवघेण्या कॅन्सरचे आहेत संकेत. . ! ) टोमॅटोमध्ये लाइकोपीन भरपूर प्रमाणात असते, जे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. अनेक अभ्यास दर्शवतात की, जे लोक नियमितपणे टोमॅटोचे सेवन करतात त्यांना विविध हृदयरोग होण्याचा धोका कमी असतो. (वाचा :- Weight loss mistakes : सावधान, वेटलॉससाठी वापरल्या जाणा-या जगातील 'या' खास टिप्सच करतात शरीराला झपाट्याने म्हातारं. . ! ) अक्रोड आणि बदाम सारखे नट्स हे अनेक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे हृदय निरोगी राहते. नियमितपणे अक्रोडाचे सेवन केल्याने बंद झालेल्या धमन्या आणि नसा उघडण्यास आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते. (वाचा :- Weight Loss Story : 68 किलोवर पोहचलं होतं वजन, 'ही' साधीसोपी ट्रिक वापरून फक्त 4 महिन्यांत घटवलं तब्बल 18 किलो वजन, पाणी पिऊन केली कमाल. . ! ) फ्लेक्स सीड्स आणि सब्जा सीड्स यांसारख्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि इन्सुलिनची पातळी सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. इन्सुलिनमध्ये गडबड होण्याचे हे एक प्रमुख कारण असू शकते. (वाचा :- Gut Health : करीना कपूरची डाएटिशियन ऋजुताने सांगितले गॅस, अपचन, पोट फुगणे, पोटदुखी व पोट साफ न होणा-यांसाठी 5 खास उपाय. . ! ) टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Mumbai Coastal Road : मुंबई महापलिकेतर्फे सागरी किनारा मार्गावर नवा प्रयोग राबविण्यात येणार आहे. सागरी जीवांची वाढ व्हावी यासाठी मँग्रो फाऊंडेशनचच्या सोबतीने हा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याचा अभ्यास केला जाणार आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पात जैवविविधता टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेने 'कृत्रिम खडका'चा (आर्टिफिशियल रीफ) प्रयोग सुरू केला आहे. यामुळे सागरी जीवांना समुद्र किनाऱ्यावर निवासस्थान उपलब्ध होणार असून, त्यांची वाढ किंवा पैदास होण्यास मदत मिळणार आहे. सागरी किनारा मार्गावर एक वर्ष हा प्रयोग केला जाणार आहे. त्याचा अभ्यास करून सागरी जिवांसाठी ते उपयोगी ठरल्यास कृत्रिम खडकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. किनारा रस्ता प्रकल्प हा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असा १०. ५८ किमी लांबीचा आहे. सध्या या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यापैकी वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्ह असा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. पहिला टप्पा येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ८ लाख ८० हजार क्युबिक मीटर म्हणजेच १ लाख ४० हजार ट्रक भरतील एवढा भराव किनारा रस्ता प्रकल्पासाठी टाकण्यात आला आहे. Mumbai Local: लोकल फलाटाला धडकली; मुंब्रा स्थानकातील 'त्या' घटनेचं धक्कादायक कारण पुढे. . . यामध्ये ४० हेक्टर जागेत टाकलेला भराव हा सागरी किनारातील रस्ते कामांसाठी, तर उर्वरित भराव हा हरितक्षेत्र निर्माण करण्यासाठी टाकण्यात आला आहे. या प्रकल्पाला सीआरझेडने (किनारपट्टी नियमन क्षेत्र)मंजुरी देताना, जैवविविधता म्हणजे सागरी जीव टिकवण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी प्रयत्न करा, त्यांची पैदास किंवा वाढ होण्यासाठी कृत्रिम खडक (आर्टिफिशियर रीफ) तयार करा, असे नमूद केले होते. हाजी अली ते महालक्ष्मी दरम्यान तीन ठिकाणी, वरळीजवळ दोन ठिकाणी आणि प्रियदर्शनी पार्कजवळ एका ठिकाणी हे खडक बसविले जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी सहा ते दहा कृत्रिम खडकांचा समावेश आहे. मासे, खेकडे, कासव आणि अन्य प्रवाळांना याचा फायदा होणार आहे. हे कृत्रिम खडक चौकोनी, त्रिकोणी, गोलाकार अशा वेगवेगळ्या आकारांचे आहेत. या जैवविविधतेच्या कामासाठी मुंबई महापालिकेने निधीही उपलब्ध केला आहे.
उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट बसला, असे म्हटले जाते. याचे कारण असे, की आधीच उंटावर नको तितके ओझे लादलेले असते आणि तेच उचलण्याची शक्ती त्याच्यात राहिलेली नसते. म्हणूनच एका काडीचे वजन जास्त झाल्याने उंट बसलेला नसतो. तर त्याच्या कुवतीपेक्षा त्याच्यावर बोजा लादण्याचा अतिरेक झालेला असतो. म्हणून मग एक काडीही उंटाला जड होत असते. कुठलाही अतिरेक असेच परिणाम देत असतो. मग चर्चा काडीची करायची नसते, तर अतिरेकाची करायला हवी. आताही तेच झाले आहे. असंहिष्णूतेचे नाटक छान रंगले होते. पण त्याचाही अतिरेक होऊ लागला होता आणि लोकांना त्याचा कंटाळा नव्हेतर संताप येऊ लागला होता. नाटक आणि वास्तव याचे भान नाटककार व नाटकातल्या कलावंतांनीही ठेवायला हवे. अन्यथा त्यांची वेशभूषा व रंगभूशा सामान्य माणासाला खरडून काढायची वेळ येते. एकूणच संहिष्णूतेच्या नाटकाचा तोच अतिरेक होत गेला होता. मुख्यप्रवाहातील माध्यमांपासून राजकीय, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रात त्याचा नको इतका अतिरेक झाल्यावर लोक कंटाळले होते आणि हळुहळू लोकांना संताप येऊ लागला होता. अशावेळी त्यात आमिरखानने उडी घेतली आणि तीच मग उंटाच्या पाठीवरची काडी झाली. त्याचा पहिला फ़टका आमिर खानला नव्हेतर त्याला आपल्या जाहिरातीचा ब्रॅड लिडर बनवणार्या कंपनीला बसला आहे. स्नॅपडील नावाची इंटरनेट व्यापार कंपनी आहे. आमिर तिच्या जाहिराती करतो. आमिरच्या ताज्या वक्तव्यांनी माध्यमातले पुरोगामी सुखावले असले, तरी त्याचा गाजावाजा करताना पुरोगामी पत्रकार व कलावंत यांनी आपल्याच पायावर आता धोंडा पाडून घेतला आहे. त्याचा पहिला फ़टका स्नॅपडील कंपनीला बसला आहे. आमिरच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीशी काडीमोड घेतला आहे. एका माहितीनुसार दोन दिवसात कंपनीने ३८ कोटीचा धंदा गमावला आहे. अविष्कार स्वातंत्र्य, संहिष्णूता ही दिवसेदिवस देशात पाखंड व थोतांड बनत चालली आहेत. मग त्यात काळापैसा ओतून लोकांच्या माथी खोट्या गोष्टी व भ्रामक वार्ता मारण्याचा उद्योग चालू राहिला. त्याचा दुष्परिणाम मागल्या लोकसभा निवडणूकीत दिसून आला असतानाही, एक वर्षात पुन्हा त्याच नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. आमिरने त्यातच उडी घेतली आणि त्याच्याच पोटावर आता पाय आला आहे. कारण जाहिरपणे काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीच्या मोबाईल खरेदीसुविधेचे साधन आपल्या फ़ोनवरून हटवले आहे. आमिर जाहिरातीत असल्याच्या निषेधार्थ आपण स्नॅपडीलला रामराम ठोकत असल्याच्या हजारो प्रतिक्रिया लोकांनी सोशल माध्यमातून दिल्याच. पण ज्यांनी शांतपणे रामराम ठोकला त्याचे आकडे कंपनीला कळू शकतात. हे आकडे सहा लाखाहून अधिक असल्याने ही कंपनी हादरून गेली आहे. आमिर खानला जाहिरातीतून बाजूला करण्यापर्यंत आपण या कंपनीशी व्यवहार करणार नाही, असा इशाराही काही लोकांनी सोशल माध्यमातून कंपनीला दिला आहे. त्याची सहसा कधी दाद घेतली जात नाही. असे काही माथेफ़िरू असतात. पण जेव्हा आपल्या ऑनलाईन ग्राहकांच्या नोंदबुकातली संख्या झपाट्याने घसरू लागली, तेव्हा कंपनीला खडबडून जाग आली आहे. अर्थात ही सुरूवात आहे. कारण आता माध्यमांपेक्षा सोशल माध्यमे प्रभावी झाली असून, व्यापारावरही त्यांची हुकूमत चालते याचा साक्षात्कार यातून घडणार आहे. खरेच स्नॅपडील कंपनीला याचा आर्थिक फ़टका बसला, तर त्यांना आमिरला हटवावे लागेल. किंवा मग अशाच पैशावर नावारुपास आलेल्या आमिरला तरी आपले शब्द मागे घेऊन विरोधाला शरण जाणे भाग पडेल. आणि हे नवे अजिबात नाही, अविष्कार स्वातंत्र्य असो किंवा संहिष्णूतेचे नाटक असो, पैशासमोर सगळे पाखंडी शरण जातात हा जगाचा इतिहास आहे. आठ वर्षापुर्वी अमेरिकेतली एक घटना त्याचा दाखला आहे. डोनाल्ड आयमस नावाचा अत्यंत लोकप्रिय रेडीओ कलाकार अशाच चक्रव्युहात सापडला होता. अमेरिकाभर त्याच्या रसभरीत खोचक भाषेतील शेरेबाजीसाठी तो प्रसिद्ध होता. शेकडो रेडिओ स्टेशनवरून त्याचा कार्यक्रम प्रसारीत केला जात होता. विविध नेटवर्क तो प्रसारीत करीत होती. रग्गर नामक विद्यापिठाच्या महिला बास्केटबॉल संघाने २००७ साली राष्ट्रीय अजिंक्यपद संपादन केले आणि त्याही अंतिम सामन्यावर आयमसने शेरेबाजी केली होती. त्या संघात बहुतांश कृष्णवर्णिय मुली होत्या आणि त्यांच्याबद्दल केलेल्या शेरेबाजीने वादळ निर्माण झाले. त्याची शेरेबाजी वर्णद्वेषी असल्याचा गदारोळ उठला आणि अनेक संघटनांनी त्याच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अभिजन वर्ग, प्रतिष्ठीत मान्यवर (म्हणजे आपल्याकडे जसे असंहिष्णूतेचे नाटक करणारे आहेत तसे) लोक आयमसच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि बहुतेक नेटवर्क कंपन्यांनी आयमसला हाकलण्यास नकार दिला. ते अविष्कार स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यावर बंदीची मागणी म्हणजे मुस्कटदाबी व असंहिष्णुता असल्याचा तमाशा चालू झाला. दोन दिवस हा तमाशा जोरात चालला आणि अखेरीस रग्गरचा तो महिला संघ पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आला. त्यांनी एकच भूमिका जाहिर केली. 'आयमसचा कार्यक्रम प्रसारीत करणार्या रेडीओ स्टेशन, नेटवर्क यांच्यावर जाहिरात करणार्या कुठल्याही कंपन्या वा जाहिरातदाराला आमचा संघ प्रायोजक म्हणून घेणार नाही'. ही घोषणा झाली आणि एका तासात पाच मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी आयमसचे प्रसारण करणार्या नेटवर्कच्या आपण जाहिराती थांबवत असल्याचा इशारा दिला. पुढल्या दोन तासात त्या नेटवर्कने आयमसचे पुढील सर्व कार्यक्रम रद्दबातल केल्याची घोषणा केली होती. याला म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते. दोनतीन दिवस अविष्कार स्वातंत्र्याचा तमाशा चालला. पण उत्पादक व जाहिरातदार कंपन्यांनी आपल्यावर येऊ घातलेले संकट ओळखून आयमसला वार्यावर सोडून देण्याचा दिलेला इशारा जादूची मात्रा ठरली. तमाम माध्यमे शेपूट घालून शिस्तीत वागू लागली. स्नॅपडील कंपनीवर सोशल माध्यमातून आमिर विरोधात सुरू झालेला बहिष्कार हे अतिरेकी अविष्कार स्वातंत्र्याचे फ़लित आहे. ही नुसती सुरूवात आहे. असा इशारा गोदरेज कंपनीला दिल्यावर त्यांनी आमिर आपला मॉडेल नसल्याचा खुलासा केला आहे आणि स्नॅपडील समोर दुसरा पर्याय नाही. पण आज हे चक्र सुरू झाले आहे, ते कुठवर जाऊ शकते? जे कोणी अशाप्रकारे संहिष्णूतेचे नाटक करत आहेत आणि अतिरेक करीत आहेत, त्यांची मदार जाहिराती व उत्पादक कंपन्यांच्या पैशावर आहे. उद्या आपल्याला नावडत्या भूमिका प्रेक्षक वाचकाच्या गळी मारण्याचा उद्योग असाच चालू राहिला, तर हेच प्रक्षुब्ध सामान्य लोक त्या माध्यमाला जाहिरात देणार्या कंपन्या वा तिच्या उत्पादनावर बहिष्कार घालू लागतील, तेव्हा संपादक पत्रकार काय करणार आहेत? उदाहरणार्थ राजदीप वा बरखा दत्त यांच्या खोटारडेपणाला सामान्य माणुस रोखू शकणार नाही. पण त्यांच्या कार्यक्रमाला प्रायोजक असेल त्या कंपनीच्या उत्पादनावर असा सार्वत्रिक बहिष्कार सुरू झाला मग? म्हणजे टाटा चाय प्रायोजक जाहिरातदार असेल आणि अशा बहिष्काराची घोषणा झाली, त्यातून मुंबई वा दिल्लीसारख्या शहरात साप्ताहिक चहाच्या खपात टाटा चहाची विक्री घटली तर काय होईल? मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक राजा झाला आहे आणि तोच सुत्रधारही होऊ लागला, तर माध्यमांचे अविष्कार स्वातंत्र्याचे काय होईल? कुठलाही अतिरेक विनाशाला आमंत्रण देत असतो. मग तो मोदीभक्तांचा असो किंवा पुरोगामी विचारवंतांचा असो! संहिष्णूतेचा गळा घोटणारी संहिष्णुता लोकांना आता असह्य झालीय, इतकाच त्याचा अरर्थ आहे.
६. मौजेचे पोहणे भिलवडी हे गाव कृष्णाकाठी आहे. कृष्णेच्या दोन्ही डगरींवर असलेल्या शेवरीच्या व इतर झाडांनी तो भाग हिरवागार दिसतो. भिलवडीहून एका मैलावर नदीच्या वरच्या बाजूला औदुंबर आहे. दत्ताचे हे एक प्रसिद्ध स्थान आहे. तेथे नदीला मोठा डोह असल्यामुळे उन्हाळ्यातही भरपूर पाण्याचे मोठे थोरले पात्र पाहण्यासारखे आणि पोहण्यासारखे असते. मला पोहायला येत होते. विहिरीत मी उंचावरून उड्या मारूनही पोहत असे. आमच्या गावच्या सीमेवरील वारणा नदीतही मी अनेक वेळा पोहलो आहे. पण कुठे लहानशी वारणा नदी आणि कुठे मोठी थोरली कृष्णा नदी! भिलवडी गावी कृष्णेला एक सुंदर घाट आहे. हा घाट पाहण्यासारखा आहे. काशीला मी गंगेच्या काठचे पुष्कळ घाट पाहिले आहेत; पण हा भिलवडीचा घाट त्या मानाने कितीतरी सरस आहे. हा घाट पेशव्यांचे सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन तासगावकर यांनी बांधवलेला आहे, असे म्हणतात. घाटाला सुमारे पंचेचाळीस पायऱ्या आहेत; पण या पायऱ्यांची गंमत अशी, की सगळ्या एकाला एक लागून नाहीत. कुठे तीन, कुठे चार, कुठे एक तर कुठे दोन पायऱ्या बांधल्यावर थोडीफार सपाट जागा सोडलेली आहे. नदीच्या पात्राकडच्या शेवटच्या पायरीच्या कडेला डोळा लावून वर पाहिले, तर सपाट जागा दिसतच नाही. एकाला एक लागून साऱ्या पायऱ्याच दिसतात. उलट वरच्या बाजूच्या पहिल्या पायरीवरून खाली पाहिले, तर पायऱ्या असतील असे वाटतच नाही. एकसारखा सपाट उतारच उतार दिसतो. वरच्या पायरीवर ठेवलेला तांब्या खालच्या पायरीला डोळा लावून पाहिल्यास दिसतो आणि तसाच खालच्या पायरीवरील तांब्या वरच्या पायरीच्या टोकाला डोळा लावल्यास दिसतो. हा घाट हे भिलवडीचे एक भूषण आहे. इतकेच नव्हे, तर तो या गावचा एक संरक्षक तट आहे. भिलवडीला पावसाळ्यात कृष्णेच्या पुराने मोठाच धोका उत्पन्न होतो. पण घाटाने या गावाचा बचाव झाला आहे. पावसाळ्यात कृष्णेला पाणी येते आणि बराच घाट बुडून जातो. घाटावर एक देऊळ आहे, ते पाण्यात बुडून जाऊन त्याच्याखाली भोवरा पडतो. तेथे गंमत दिसते. हे देऊळ दोन-दोन, तीन-तीन आठवडे बुडून जाते. तेव्हा कृष्णेला महापूर आला आहे, असे समजण्यात येते. नदीकाठालाच असलेल्या शाळेच्या सगळ्या पायऱ्या जवळजवळ बुडतात. गावाच्या पूर्वेला असलेल्या मारुतीच्या देवळात पाणी शिरते. तिथून एका मैलावर असलेल्या माळवाडीच्या व गावाच्या मध्ये ओताचे पाणीच पाणी पसरलेले असते. नाव चालवावी लागते. ओताचे पाणी या मार्गाने साऱ्या रानातून जाऊन पुढे दोन-तीन मैलांवर कृष्णेलाच पुन्हा मिळते. पश्चिमेच्या ओताचेही पाणी असेच पसरते व गावाला बेटाचे रूप येते. असे झाले म्हणजे ग्रामस्थ कृष्णा नदीची पूजा करतात. काही लोक महापूर पोहायला बाहेर पडतात. कृष्णेचे पाणी सर्वत्र पसरलेल्या अफाट सागरासारखे दिसायला लागते. पाण्याला ओढही खूप असते आणि पाण्यामध्ये लाटाही बऱ्याच उसळत असतात. नदीकाठची घरे वाहून जाण्याचा, एकंदरीने गावाचेच नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी महापुरात पोहण्याची एकप्रकारे गंमत असते. मोठ्या घाटाच्या बाजूला एक लहानसा घाट आहे. तो बुडून त्यावरचे पाणी गावात शिरलेले असते. तेव्हा भिलवडीची माणसे तिथून पोहायला निघतात. पोहायला लागण्यापूर्वी ही माणसे कधीकधी मातीची दोन-तीन मडकी निशाणे लावून तेथून पाण्यात सोडतात. ही मडकी नेमकी पलीकडच्या बाजूला अंकलखोपच्या हद्दीत म्हसोबा बनाजवळ लागतात. त्यावरून अंकलखोपचे लोक समजतात, की भिलवडीची माणसे आता पोहून येणार आहेत. मग ती मराठी बाल ५वी-२ तेथे स्वागताची तयारी ठेवतात, म्हणजे पळकाट्याचे भारे शेकण्यासाठी तयार ठेवतात व हावळा खाण्यासाठी ठेवून देतात. भिलवडीच्या या पोहायला गेलेल्या लोकांना परत येताना, औदुंबरला जाऊन तेथून पोहायला पडावे लागते. या वेळी तेथील दत्ताचे देऊळ बुडून गेलेले असते. त्यावर दोन-तीन पुरुषांहून अधिक पाणी असते. या ठिकाणाहून पोहायला पडलेली माणसे खाली मैलावर भिलवडीच्या घाटावर लागतात. मीही एकदा या लोकांच्या बरोबर महापूर पोहायला गेलो होतो. त्या वेळी पोटाखाली तांब्याची घागर घेतली होती. अशी पालथी घागर पोटाखाली घेऊन, दोन्ही हात मोकळे सोडून पोहण्याची सवय, भिलवडीतील इतर अनेक लोकांबरोबर मीही केलेली होती. काही लोकांनी पाठीवर भोपळे बांधलेले होते, तर काही लोक सांगडीवर होते. एक नाव घेऊन नावाडीही बरोबर होते. आम्ही सुमारे चाळीस-पन्नास लोक होतो. महापूर पोहणे म्हणजे एक प्रकारचे धाडसच होते, यात शंका नाही. बरेच अंतर पोहून जावे लागत असल्याने हात पाय भरून येतात. मला आठवते, आम्ही पलीकडे अंकलखोपच्या रानात पाय टेकले तेव्हा तेथे थोडा गाळ होता. त्यातून पाय उचलून चालणेही जिकिरीचे वाटत होते. पाणी फार गार असायचे. आमच्यापैकी एक-दोघे तर इतके काकडले होते, की पलीकडे गेल्यावर त्यांना फार शेकावे लागले. येताना ते नावेतूनच परत आले. लाटाही एवढ्या उसळत, की बरोबरच्या माणसांपैकी एकजण तीन-चार हात वर गेलेला असायचा; तर केव्हा आपणही झरदिशी वरून खाली येत आहोत असे वाटायचे. माझ्या दोन्ही बाजूंना थोड्याच अंतरावर माझे मित्र व काही ग्रामस्थ होते. मी काही घाबरलो नव्हतो. पाण्याच्या प्रवाहाबरोबर बराच वेळ जायचे असते. मध्ये धार असते तेथे मात्र हात मारून ती धार तोडून पुढे सरकावे लागते. ते जर चुकले तर ठराविक ठिकाणी न लागता खाली लांब जावे लागते. पोहायला पडताना सगळे एका ठिकाणाहून एकापाठोपाठ एक पडताना दिसतात. तरी आत गेल्यावर बरेच लांब पसरतात, मागे-पुढे होतात. काठावर शेकडो लोक पाहायला उभे असतात. त्यांना मोठी मौज दिसते. आम्ही पोहायला पडल्यावर अंकलखोपला गेलो. तेथे काही मंडळींनी शेकाटा घेतला. मग आम्ही औदुंबरला जाऊन तेथून पुन्हा पाण्यात पडून, भिलवडीच्या घाटावर लागलो. भिलवडी गावच्या रहिवाशांना नदीत पोहण्याचे फारसे काही वाटत नाही, पण मी परका होतो. शिक्षक म्हणून माझ्या रक्षणासाठी आजूबाजूला पोहणारे काही लोक होते. एकंदरीने महापूर पोहण्यात एक प्रकारची मौज असते, यात शंका नाही.
आज दिनांक 04 जून 2022, शुक्रवार. आज ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी. चंद्र आज कर्क राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य. चतुर्थ स्थानात चंद्र अत्यंत शुभ असून आईवडील भेट, घरात काही विशेष घटना असा हा दिवस आहे. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम. आज तृतीय चंद्र मानसिक आणि आर्थिक मजबुती देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम. राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहिल. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ. आज राशी स्थानातून होणारे चंद्र भ्रमण गृहसौख्य देणारे आहे. अष्टम शनी कुरबुरी सुरू ठेवेल. रवी, बुध मात्र मार्ग दाखवतील. दिवस उत्तम आहे. राशीच्या व्यय स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक व्यय दाखवत आहे. त्रासदायक दिवस. प्रत्येक विषयात काही तरी अडचण निर्माण होईल. शांत रहा. दिवस मध्यम. आज लाभस्थानातील चंद्रभ्रमण उत्तम असून घरासाठी काही विशेष खरेदी होईल. जास्तीचे काम पडेल. वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत. दिवस मध्यम आहे. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये काही विषयात मतभेद असतील. दिवस बरा आहे. भाग्यस्थानातील चंद्र मध्यम अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभदेखील उत्तम राहिल. दिवस चांगला आहे. आज चंद्र भ्रमण आणि तृतीय शनी सांभाळून राहण्याचे संकेत देत आहेत. वाहनापासून जपा. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. दिवस मध्यम. आजचा दिवस कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस मध्यम. आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. षष्ठ चंद्र, मंगळ धनस्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. दिवस मध्यम जाईल. आज कौटुंबिक आयुष्य आणि संतती याला महत्त्व असेल. प्रवास योग येतील. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी. शुभम भवतू! ! मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
पुरस्कार आणि तिरस्कार ! 'अॅमेझॉन प्राइम'वरील वेब सिरीज 'तांडव'मधून भगवान शिवाचा अवमान ! मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !
तत्पुर्वी शिवसेनेला मिळालेलं 'मशाल' चिन्ह त्यांच्यासाठी अजिबातच नवं नाहीये. मशाल आणि शिवसेनेचं नातं फार जुनं आहे. शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेना पुरस्कृत पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता. आज शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर सेनेचे तत्कालिन नेते छगन भुजबळ यांचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये डाव्या बाजूला भुजबळांचा फोटो आहे तर उजव्या बाजूला मशाल चिन्ह आहे. मुंबई महापालिका गाजवल्यानंतर विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या भुजबळांनी माझगावच्या मतदारांना आवाहन करताना मशालीसोबतचं पत्रक छापून लोकांना भावनिक साद घातली होती. शिवसेना प्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांनी १९७२ साली माझगांव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मला उभे केले. जनतेने मला निवडूनही दिले. १९७८ साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली. पहिल्या पांच वर्षाच्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून मतदार बंधु-भगिनींनी माझ्या मतांच्या पेटया भरभरुन टाकल्या आणि अनेक रथी-महारथी विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. एवढे प्रेम व जिकाळा माझगांवच्या जनतेने मला दिला आहे. या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला. या कालखंडामध्ये आपल्या भागातील नागरिकांना विविध सुविधा देण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. माझ्या चाहत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत याची चित्रमय झलक आपण पहालच. महानगरपालिका सभागृहात विविध समस्यांवर भी आवाज उठविला. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेळोवेळी उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचा उहापोह केला. मग तो रॉकेल टंचाई अमी की बेळगांव कारवार प्रश्न असो, किया गिरणी कामगारांचा प्रश्न असो, किंवा "बॉम्बे" ऐवजी "मुंबई" हे नांव प्रचारात आणण्याचा प्रश्न असो. अशा विविध प्रश्नांना मी महापालिकेच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक व्यासपिठावरून वाचा फोडली आहे. माशी ही भरीव कामगिरी पाहून मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापालिका शिवसेना गटाचा नेता नेमले. मुंबई महानगरपालिकेनेही माझ्या कार्याचा गौरव म्हणून अनेक महत्वांच्या संस्थांवर माझी नियुक्ती केली, इतकेच नव्हे तर तीन मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून मला परदेशी अभ्यासदौयावर पाठविले. बेळगांव-कारवार सीमा प्रश्न, बस भाडे वाढ, दूधभाव बाद अशा अनेक जन आंदोलनात अग्रभागी राहून मी प्रसंगी कारावासाची शिक्षा भोगली. अशा प्रकारे केवळ नागरी सुख-सोयी बाबतच नव्हे तर समाजातील अन्य विनय कार्यामध्ये मी सक्रीय भाग घेतला. म्हणूनच शिवसेनेने माझगांव विभागातून विधान सभेकरिता माझी उमेदवारी जाहीर केली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही़ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. रावेत : महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परवानगी देण्या अगोदर प्रशासनाने येथील पाण्यासह इतर मूलभूत सुविधा, भविष्याचा वाढता विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेऊन सर्व सुविधा निर्माण कराव्यात, अन्यथा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या त्वरित रद्द कराव्यात व परिसरात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावीत अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे, असे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. भोंडवे म्हणाले, "रावेत प्रभागात असणा-या पाणी, वीज, रस्ते व इतर असुविधांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर याना भेटून समस्या मांडल्या आहेत़ परंतु प्रशासन वेळकाढूपणा करीत वेळ मारून नेत आह़े.
चित्रपट दिग्दर्शकांसाठी, प्रमुख स्टुडिओसाठी काम करणे सुरू ठेवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे चित्रपट तयार करणे जे पैसे कमवतात. वेगाने, कामातून स्वतः ला शोधण्याचा सर्वात जलद मार्ग हा आहे की चित्रपट बनवू नका जे पैसा कमावत नाहीत किंवा कलाकारांना आपल्यासोबत काम करण्यास नकार देणारे इतके निराकरण असलेल्या समस्या निर्माण करतात. "मूव्ही जेल" या शब्दाचा उपयोग एका चित्रपट निर्मात्याचे वर्णन करण्यासाठी केला जातो जो मूलतः हॉलीवूड स्टुडिओच्या प्रमुख चित्रपटांद्वारे चित्रपट दिग्दर्शित करण्यापासून निर्वासित झाला आहे. कथित ऑरसन वेल्सची चित्रपट जेलमध्ये संपली, कारण स्टुडिओशी त्याच्या मागे असंख्य दृश्यांच्या लढामुळे त्यांची फिल्म-फायनान्स्सची आर्थिक मदत झाली. आणखी एक उदाहरण म्हणजे चित्रपट निर्माते मायकेल सिमिनो, 1 9 78 च्या ' द डियर हंटर ' साठी सर्वोत्कृष्ट चित्र आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार. त्याच्या पुढील चित्रपटात 1 9 80 च्या ' हेल्व्हन गेट' हा अशा महत्त्वचा एक गंभीर आणि व्यावसायिक बॉम्ब होता की जो युनायटेड कॅरिबर्टला जवळजवळ दिवाळखोर बनला. आयुष्यभर सिमोनोला चित्रपट निर्मात्या म्हणून काम मिळवण्यास त्रास झाला. तथापि, काही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तुरुंगाच्या बंदुकीतून बचावण्यासाठी भाग्यवान केले आहे. या पाच चित्रपट निर्मात्यांनी प्रत्येक बॉक्स ऑफिस बॉम्ब, वाईट प्रतिष्ठा, किंवा दोघांचा मिलाफ करून पुनरागमन केले आहे. नाटककार केनेथ लोणारगण एक यशस्वी पटकथालेखक ( यानी , न्यूयॉर्कच्या गँग्सचे विश्लेषण ) बनले आणि 2 99 0 च्या दशकासह आपण चित्रपटाचे दिग्दर्शक बनले. 2005 मध्ये, लोर्नरगंजने 20 व्या शतकात फॉक्स नावाचा एक नाटका मारला होता मार्गारेट नावाच्या एका विवादास्पद न्यूयॉर्कच्या किशोरवयीन मुलाविषयी (अण्णा पाक्विन), ज्याला बस दुर्घटनेची जबाबदारी आहे. शूट पूर्ण झाल्यानंतर, लोर्नरगण आणि 20 व्या शतकात फॉक्स चित्रपटच्या लांबीवर सहमत होऊ शकला नाही आणि त्यांच्या असहमतीमुळे अनेक खटले झाले. फॉक्सने शेवटी 2011 मध्ये 150 मिनिटची आवृत्ती रिलीझ केली आणि नंतर पुढील वर्षी लोर्नरगणच्या 186 ने तोडले. दरम्यान, परिस्थितीमुळे लोर्नरगण काम करणे कठीण असल्याचे समजले जात होते. तो त्याच्या मित्र मॅट डेमॉन आणि इतर उत्पादकांना लिनरगनला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बनविण्याची संधी मिळावी म्हणून 2016 सालाद्वारे समुद्रात मॅन्चेस्टर लिहून दिग्दर्शित करण्यासाठी नियुक्त केले. यामुळे सागराने मँचेस्टरला मोठा धक्का बसला आणि अकॅडमी अवार्ड्ससाठी नामांकन केले गेले. डेव्हिड ओ रसेल यांनी अनेक प्रशंसनीय चित्रपट दिग्दर्शित केले जसे की फ्लर्टिंग विथ आपत्ती , थ्री किंग्स आणि आय हर्टबॅकज , पण अभिनेत्रींसोबत वादविषयावर अनेक वादविवाद केल्यानंतर त्याने काम करणे कठीण असल्याबद्दल प्रतिष्ठा विकसित केली. मी हर्ट हक्काबीजच्या सेटवर अभिनेत्यांकडून किंचाळलेले फुटेज फेटाळल्यामुळे त्यांचे वाईट प्रतिष्ठा सार्वजनिक झाली. चित्रपटातील अत्यंत कठीण उत्पादन प्रक्रियेनंतर, रसेल हे चित्रपटातील व्यक्तिमत्त्व नसलेल्यासारखे दिसत होते (आतापर्यंत कुणीही अपघाताच्या कारणास्तव 2015 पर्यंत रिलीज केलेले नव्हते). रसेलने 2010 च्या ' द फाइटर' सह पुनरागमन केले जे बॉक्स ऑफीस आणि गंभीर यश दोन्ही होते. रसेलने सिल्व्हर अॉलिन्स प्लेबुक (2012), अमेरिकन हलवा (2013), आणि जॉय (2015) सह लढले . विनम्र 2002 क्रीडाक्षेत्राचे निर्देशन केल्यानंतर जॉन ली हेनकॉकच्या "सिनेमा गुन्हा" द रूकी हिच्यावर होता की, टेक्सास क्रांतीदरम्यान अलामोच्या प्रसिद्ध लढाईबद्दल त्यांनी 2004 साली अल्लामो सह-लेखन आणि दिग्दर्शित केलेला होता. समीक्षकांकडून भयानक पुनरावलोकने प्राप्त झाल्यानंतर, अलामोने केवळ $ 25. 8 दशलक्ष कमावला असला तरीही ती चार पटीने रक्कम मोजली. हा बॉक्स ऑफिस बॉम्बचा प्रकार आहे ज्यामुळे अनेक चित्रपट दिग्दर्शकांच्या करिअर संपुष्टात येतील. आश्चर्याची बाब म्हणजे मूव्ही जेलमध्ये हॅनाकॉंचे निधन संक्षिप्त होते. अलामोने पाच वर्षांनंतर त्यांनी ' द ब्लाईंड साइड' नावाचा एक प्रमुख बॉक्स ऑफिस दिला. सँड्रा बुलॉकने आपल्या चित्रपटासाठी ऑस्कर देखील जिंकला. तेव्हापासून त्यांनी सुप्रसिद्ध बचत बँकांचे (2013) आणि संस्थापक (2016) चे दिग्दर्शन केले आहे. काही दिग्दर्शकांच्या करिअरने एम. नाईट श्यामलनच्या कारणास्तव उंचावरील आणि निचांकावर पोहोचले आहेत. आपल्या पहिल्या दोन चित्रपटांना केवळ एक प्रकाशन मिळाले, 1 99 0 च्या दशकात त्यांच्या 1 999 च्या द फिल्म ' द सिक्स सेन्स' 1 9 60 च्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक बनली, जगभरात 673 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. श्यामलनने अनब्रेबलेबल (2000), चिन्हे (2002) आणि द व्हिलेज (2004) चे दिग्दर्शन केले होते, जे सर्व बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. तथापि, त्याची प्रतिष्ठा 2006 च्या लेडी इन द वॉटर आणि 2008 च्या 'होपिंगिंग ' या मालिकेत झाली , जी दोन्ही आर्थिकदृष्ट्या यशस्वी नव्हती. 2010 च्या ' द लास्ट एअरबेन्डर' आणि '2013 च्या एव्हरी अर्थ' हे जगभरातील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले असताना, ते अमेरिकेमध्ये कमी यशस्वी ठरले आणि समीक्षकांनी त्यांना परावृत्त केले. बर्याच प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटांना आश्चर्याची वळण देण्याची प्रवृत्तीची टीका केली आणि अनेकदा श्यामलन यांनी संपूर्ण चित्रपटावर संपूर्ण चित्रपटाचा निर्णय घेतला. श्यामलनने आपल्या चित्रपटांची संख्या कमी करुन जवळजवळ आपला नारा दिला. त्यांनी कम-बजेट थ्रिलर्स द व्हिच (2015) आणि स्प्लिट (2016) या दोघांना आर्थिक मदत पुरविली आणि या दोघांनाही बरीच कणखर कामगिरी व प्रेक्षकांची प्रशंसा मिळाली आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. एक अभिनेता म्हणून एक अविश्वसनीयपणे यशस्वी कारकीर्द नंतर, मेल गिब्सन त्याच्या प्रतिभांचा दिग्दर्शित वळले. 1 99 5 च्या ब्रेहेहार्टने केवळ गिब्सनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी ऑस्कर मिळविला नाही, तर सर्वोत्कृष्ट चित्रपटासही जिंकले. 2004 मध्ये, त्याने द पॅशन ऑफ द क्राइस्ट, येशूची क्रूसीफिक्सियन बद्दलच्या चित्रपटास निर्देशित केला. क्रूफिक्सियन दरम्यान ज्यू नेतेंचे वर्णन करण्यासाठी या चित्रपटाची टीका करण्यात आली असली तरी, अमेरिकेच्या बॉक्स ऑफिस इतिहासातील आर-रेटेड चित्रपट बनला. त्यानंतर गिब्सनने महत्त्वाकांक्षी 2006 चित्रपट एपोकॅलिट्टो दिग्दर्शित केला, जो आणखी एक बॉक्स ऑफिस व गंभीर यश होता.
बारामती - सराईत गुंडाने मंगळवारी जांब (ता. इंदापूर) येथे दिवसाढवळ्या एका दलित युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्याकांडामुळे गावात दलित संघटना आक्रमक झाल्या असून, आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताचे कुटुंबीय व संघटनांनी घेतला होता. दरम्यान, केंद्रीय अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी बुधवारी गावात भेट देऊन आरोपींवर ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर 30 तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केल्याच्या रागातून कुख्यात आरोपी सतपाल व त्याच्या पाच साथीदारांनी मंगळवारी चंद्रकांत जयवंत गायकवाड याचा गोळ्या घालून खून केला होता. या हत्याकांडामुळे संतापलेल्या बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांतील दलित संघटनांनी बुधवारी जांब येथे धाव घेतली होती. आरोपींना तातडीने अटक करावी, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यासाठी रुईच्या रुग्णालयासमोर धरणे देत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. घटनेच्या निषेधार्थ बारामती, इंदापूर, वालचंदनगरमध्ये बंदही पाळण्यात आला. मृतदेह ताब्यात घेतला. आरोपींवर कडक कारवाई करू, चंद्रकांतच्या मुलांची शिक्षणाची सोय करणार, पत्नीला नोकरीची हमी, पक्के घर देणार, 5 एकर शेतजमीन देण्यासाठी प्रयत्न, सतपालने धमकी दिलेले वैभव गिते, दादा जाधव यांना व पीडित कुटुंबीयांना तीन महिन्यांसाठी सशस्त्र पोलिस संरक्षण देऊ, असे आश्वासन थूल यांनी दिले आहे.
आयओएस 13 आणि आयपॅडओएस 13 लॉन्च केल्याने Appleपलने काही वर्षापूर्वी सक्रिय आणि निष्क्रीयतेने पुष्टीकरण करण्याचा आग्रह धरला असता त्या टेबलाचा धक्का बसला आहे. लॅपटॉपसाठी आयपॅड ही आदर्श जागा होती. आयपॅडओएस 13 सह आता हे मानले जाऊ शकते की पारंपारिक लॅपटॉपसाठी आयपॅड हा व्यवहार्य पर्यायांपेक्षा अधिक आहे. आयपॅडवरील बहु-विंडो वैशिष्ट्य काही वर्षांपूर्वी आली होती, परंतु त्यानंतर अनेक मर्यादा आल्या हे आम्हाला समान अनुप्रयोगाच्या दोन विंडो उघडण्यास परवानगी देत नाही. आम्ही हे फक्त सफारीसह करू शकू, म्हणून हे वैशिष्ट्य खूप मर्यादित होते. या वैशिष्ट्यास समर्थन देण्यासाठी आयफोन आणि आयपॅडसाठी सर्वोत्कृष्ट फाइल व्यवस्थापकांपैकी एक आहे, अमेरिकेला नुकतेच अद्ययावत केले गेले आहे. अॅमेरीगो जेव्हा अॅप स्टोअरवर येतो तेव्हा नेहमीच उपलब्ध असणारी सर्वोत्कृष्ट अनुप्रयोग ठरली आहे YouTube व्हिडिओ डाउनलोड कराजरी स्पष्ट कारणांसाठी असले तरी त्याची जाहिरात केली जात नाही. परंतु जसजशी वर्षे गेलीत तसतसे managerप्लिकेशन फाइल मॅनेजर, फाईल मॅनेजर सारख्या नवीन फंक्शन्सची भर घालत आहे जो आपल्याला फाईली अॅप्लिकेशन्सप्रमाणेच समान फंक्शन ऑफर करतो. अॅमरिगो आम्हाला आमची खाती जोडण्याची परवानगी देतो ड्रॉपबॉक्स, गूगल ड्राईव्ह, वनड्राईव्ह, यानडेक्स, ओपनड्राईव्ह, हाय ड्राईव्ह, पीक्लाऊड, वेबडॉव्ही रेवपॉवर. आमच्या डिव्हाइसवरून आम्ही क्लाऊडवर अपलोड करू किंवा मल्टी-चॅनेल फंक्शनसह सुसंगतता जोडणारी नवीनतम अद्यतनाबद्दल आम्ही आमच्या आयपॅड वरून संग्रहित केलेल्या फायली त्या दरम्यान हलवू शकतो. आणखी एक नवीन गोष्ट, आम्हाला ती प्लेसहोल्डरमध्ये आढळते जी आम्ही मेघवरून, एन.ए.एस. किंवा इतर कोणत्याही स्रोतावरून सामग्री डाउनलोड करत असताना दर्शविली जाते, जेणेकरून आम्हाला नेहमीच माहित असेल डाउनलोड किंवा कॉपी प्रगती. लघुप्रतिमा मध्ये नवीनतम नवीनता आढळली जी आम्हाला PDF स्वरूपात फायली दर्शविते. अॅमिरिगोची किंमत 9,99.प स्टोअरवर XNUMX युरो आहे. आमच्याकडे आमच्या विल्हेवाट लाइट आवृत्ती देखील आहे, ही आवृत्ती ज्यात केवळ जाहिरातींचा समावेश नाही परंतु देय आवृत्तीमध्ये काही फंक्शन्स देखील उपलब्ध नाहीत, ज्यात या लेखात नमूद केल्याप्रमाणे आहे. लेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे. डेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन. डेटा संप्रेषणः कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही. अधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.
देशभरात करोनाचा कहर! गेल्या २४ तासात देशभरात सापडले 'एवढे' रुग्ण\nदोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते.\nमात्र पुन्हा एकदा भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. तर, ओमायक्रॉन (omicron) प्रकाराचे रुग्णही मोठ्या संख्येनं आढळत आहेत.\nदेशात गेल्या २४ तासांत करोनाच्या आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या आता २ लाखाच्या जवळ आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ९४ हजार ७२० इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत १५.८ टक्क्यांनी अधिक आहे. करोना मृत्युंची संख्याही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ४४२ जणांना करोनाने मृत्यू झाला आहे.\nभारतात आतापर्यंत ३ कोटी ४६ लाख ३० हजार ५३६ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पुन्हा एकदा करोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढत आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ९.८२ टक्के इतका आहे. देशात सध्या ९ लाख ५५ हजार ३१९ सक्रीय रुग्ण आहेत. सध्याचा करोना रुग्ण वाढीचा दर ११.०५ टक्के इतका आहे.\nCompared to yesterday, the total number of fresh COVID cases is up by 26,657 (15.8%) today.\nIndia had reported 1,68,063 cases yesterday.\nआतापर्यंत देशात ६९.५२ कोटी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर लसीकरणाची मोहिम वेगाने सुरु आहे. यात आजपर्यंत १५३ कोटी ८० लाख ८ हजार २०० डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ८५ लाख २६ हजार २४० जणांना डोस देण्यात आला.\nशिवाय, देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) चा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ४ हजार ८६८ वर पोहोचली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि राजस्थानमधील आहेत.
Home > Books > कायदेविषयक > भारतीय इनकमटॅक्स अॅक्ट(असेसमेंट वर्ष २०१८-२०१९) मराठी आवृत्ती ( CD सहित ) इनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या द्रुष्टीने भारतीय इनकमटॅक्सचि माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. पांडे आणि रविंद्र के. पाटील यांनी लिहिले आहे. या पुस्तकात असेसमेंट वर्ष २०१८ - १९ पासून अंमलात येणाऱ्या सुधारणांची माहिती मिळते. या कराच्या परिचायाबरोबर भत्ते, वेतनापासून मिळणारे उत्त्पन्न, व्यापार - भांडवली नफा - इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न, घर संपत्तीपासून मिळणारे उत्पन्न आणि उत्पन्नावाराचा कर यांची माहिती मिळते. एवढेच नव्हे, तर भेट आणि बक्षीस, इनकमटॅक्स आणि अनिवासी भारतीय , अंदाजित उत्पन्न, संपत्तीकर असे विषयही हाताळले आहेत. सर्वसामान्य करदात्याला माहिती असावी असे पॅन नंबर, टीडीएस, टीसीएस, डिजिटल, सिग्नेचर सर्टिफिकेट यांची माहितीही समजते. पुस्तकांबरोबर 'सीडी' ही देण्यात आली आहे.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. राहुरीच्या वांबोरी घाटात असलेल्या धबधब्यावर ही घटना घडली आहे. यातील एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. काल रविवारी संध्याकाळी अहमदनगरमधील पाच मित्र राहुरीजवळच्या वांबोरी घाटातील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यातील एका मित्राचा पाय घसरला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वच मित्र पाण्यात बुडाले. तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेत गणेश वायाळ, श्रीराम रेड्डी, युवराज साळुंखे आणि शुभम मोरे या तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर प्रतीक गायकवाड असं वाचवण्यात आलेल्या मित्राचं नाव आहे. बुडालेले चारही जण अहमदनगर शहर आणि उपनगरातील रहिवासी आहेत.
नीरा (पुणे) : बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आघाडीने सर्वच्या सर्व जागांवर म्हणजे १८ जागांवर विजय संपादन करत बाजार समितीवर आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यावतीने सोमेश्वर सहकार पॅनलच्या वतीने १८ उमेदवार उभे केले होते. यामधील व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर शिवसेना भाजप यांच्या वतीने १३ उमेदवार उभे करण्यात आले होते. काल शुक्रवारी ९४. ६७ टक्के मतदान झाले होते. आज शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावर सर्वात कमी मतदार असलेल्या हमाल मापाडी मतदार संघाचा निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे उमेदवार विक्रम दगडे यांना १२० पैकी ८२ मते पडली, विरोधी उमेदवार नितीन दगडे यांना ३५ मते मिळाली तर ३ मते बाद झाली होती. या झालेल्या मतमोजणीमध्ये सोसायटी मतदारसंघांमध्ये आघाडीने एकतर्फी विजय संपादित केला, तर ग्रामपंचायत मतदार संघामध्ये युतीने आघाडीला सुरुवातीला जोरदार टक्कर दिली मात्र बारामती तालुक्यातील मतदान मिळवण्यात युतीला यश आले नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उमेदवार निहाय्य मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण जागी कामठे देविदास संभाजी १,३५५, कामठे वामन आश्रु १,३४३, जगदाळे बाळासो गुलाब १,३४१, जगताप शरद नारायणराव १,३२८, निगडे अशोक आबासो १,३२४, निलाखे पंकज रामचंद्र १,२९३, फडतरे संदिप सुधाकर १,२८६, सोसायटी महिला प्रतिनिधि मतदार संघ वाबळे शरयु देवेंद्र १,४०९, शेख शहाजान रफीक १,३६५, सोसायटी मागास प्रवर्ग टिळेकर महादेव लक्ष्मण १,५०९, गुलदगड भाऊसाहेब विठ्ठल १,४२४, ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी होले गणेश दत्तात्रय ५७३, शिंदे बाळु सोमा ५५५, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी कांबळे सुशांत राजेंद्र ५५८, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ नाझीरकर मनिषा देवीदास ५३५, हमाल व तोलारी मतदार संघ दगडे विक्रम पांडुरंग ८२ मते मिळवून विजयी झाले आहेत.
कांड ] ऐशा विगत श्री त्या विकळस्वांता द्विषन्निहतकांता कांता दशाननाच्या करिती तेव्हां अनेक आकांता. ७२९ त्या पंक्तिकंध रा ला संस्कार बिभीषणें स्वयें केला, समजाउनि पाठविले, ते सारे बंधुंदार लंकेला. ७३० म राघव अंबरमैणिवंशपुंडरीकरवी लंकाख्य पारितोषिक दे पौलस्त्याशि लक्ष्मणाकरवी. ७३१ ज गतीवर मनुजेंद्राज्ञप्त वायुपुत्रधन उठवी रोमांचांकुर जयवागमृतें हरूनि ताप घनं. ७३२ य वार्ता ऐकुनि सीता म्हणे, 'मरुत्पोता ! दावीं आतां राजा मजला, चिंतामहासरित्पोता!' ७३३ हा काम समी रा त्मज सांगे, तेव्हां दयाळु दाशरथी 'जा, आण जानकीला' ऐसें स्वमुखें बिभीषणाशि कथी. मग त्याणें नाता धृतभूषणा जगन्महिता, बैसउनीं नरयानीं अतिहर्षे आणिली, धरादुहिता. ७३५ ज म्हणे, 'सीते! दशकंठ पावला निधन, जो तस्कर लंकेला आला माझें बळें हरूनि धन. य जो जन, व्याला लोकांत भेटती न `शिवें; वसलीसि परगृहीं तूं म्हणउनि तुज सर्वथैव मीं न शिवें. जला मीं वरितां दोघांस ही नसे शर्म; मर्मच्छेदक जनवाग्बाण निवारावया नसे वर्म. ' य वदतां आलें दुःखाब्धिनीर नेत्रास; गात्रास कंप सुटला, सीता बहु पावली मनें त्रास. ७३९ अवशंका वा रा या प्रत्यय उपजावया, विशुद्ध सती, शपथपुरःसर दीप्तज्वलनज्वालांत जाहली धसेती. ७४० निंदेसह तु यापरि अप्रि १. शत्रूनीं मारिला पति ज्यांचा अशा. २. भावजयी. ३. सूर्यवंशकमलविकासक सूर्य. ४. रामानें आज्ञापिलेला. ५. जयवाणीरूप अमृतें. ६. मोठा. ७. चिंतानदीतील नौका च अशामारुते ! ८. पालखींत. ९. कल्याणें. १०. कवच. ११. निर्भय प्रवेश करणारी.
हे खरे व्हॅलेन्टाईन.... ! कोणत्याही प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती डोळे असूनही आंधळ्याप्रमाणे वागू लागते. मग ती नशा सत्तेची असो, संपत्तीची असो, धर्माची असो वा कामाची असो! म्हणूनच 'सत्तांध', 'धर्माध', कामांध, असे शब्द भाषेत रूढ झाले. 'प्रेम आंधळे असते' असे वचन सर्रास प्रचलीत झाले. पण प्रेमीजनांना ते कधीही मान्य होणार नाही. त्यांचे म्हणणे असे की, उत्कट प्रेमात गुरफटलेली व्यक्ती सरळधोपट मार्गाने जाण्याचा रुक्ष व्यवहाराकडे पाठ फिरविते. म्हणूनच व्यवहार पंडितांना ती आंधळी वाटत असावी; पण वस्तुस्थिती अशी आहे की, प्रेमात पडलेली माणसं सामान्यजनांच्या दृष्टीने अंध बनत असली, तरी त्यांना असामान्य दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते. त्यामुळेच प्रेमाची उंच-सखल आणि काटेरी वाटही ते हसतमुखाने आक्रमू शकतात! जगाची नजर चुकवून मिलनाची नशा कशी लुटावी, अनेक अडथळे लीलया ओलांडून इष्काची मंजिल कशी गाठावी,या बाबाबत साऱ्या चोरवाटा प्रणयीजीवांना सहज दिसतात. लग जा गलेसे, ताब अब। अय नाजनीं नहीं। है है खुदा के वासतें। मत कर नही हैं। । अशा बेफाम इश्कबाज कविता लिहीणाऱ्या जुअरतला आंधळ्यांचे सोंग घेण्याची युक्ती सुचविणारे प्रेम आंधळे असते, असं कोण म्हणेल? आणि आता तर प्रेमाला अंधत्वाची बाधा होऊच शकत नाही हे सिद्ध करणारा आंधळ्यांचा प्रेमविवाह नुकताच संपन्न झाला. त्या ह्या दिव्यदृष्टीमुळेच! सागराच्या प्रेमाने धुंद झालेली नि प्रणयाच्या महापुराने ओसंडून वाहणारी नदी आंधळी असावी, असे आपणास वाटते; पण नाही. मार्गात उभ्या ठाकलेल्या धिप्पाड पहाडांना कधी युक्तीने फोडून तर कधी शिताफीने वळसा घालून, अनेक वळणे घेऊन ती अखेर सागरालाच मिळते. हा प्रेमाच्या दिव्य दृष्टीचाच प्रभाव! अहो, फार काय सांगावे, आंधळ्यांचे सोंग घेऊन इश्कची सुरत लुटायला लावणारी बिलंदर दृष्टी ही प्रीतीच्या कैफातच प्राप्त होते. या बाबत 'भावबंधन' मधील महेश्वराचे, कामण्णाचे उदाहरण आपल्या परिचयाचेच आहे. या कामण्णांचा गुरू शोभावा असा एक शायर उर्दूत होऊन गेला. त्याचे नाव शेख कलंदर बख्श जुअरत. (१७३० ते १८१०). हा मूळचा दिल्लीचा. पण त्याच्या उत्तान शृंगारिक आणि चावट गझलांची कीर्ती लवकरच लखनौ रसिक नि विलासी अमीर-उमरावीत पसरली. तरुण वयातच हा रंगीला शायर लखनौत आला आणि तो संगीतनिपुण असल्याने त्यांच्या रंगेल गझल गायनाचा सर्वत्र बोलबाला झाला. अशा या काळात नवाबांच्या जनानखान्यातून अनिर्बंध संचार करायला मिळावा आणि विलासी लावण्यवतींचे सौंदर्य निःसंकोच पहावयास आणि हाताळावयासही मिळावं, या लोभापायी जुरअत 'आपले डोळे गेले' अशी खोटीच हुल उठवून दिली. मग काय, गरीब नि गुणी आंधळा म्हणून तो जनानखान्यात ठाण मांडून बसू लागला. पुढे त्याचे हे बिंग फुटले, हा भाग निराळा. पण परमेश्वराची करणी पहा कशी, तो काही दिवसाने खरोखरच आंधळा झाला! रामकृष्ण आणि सुशीला हे अंध युवक युवती यांचा हा विवाह केवळ प्रेमविवाहच नव्हे, तर आंतरजातीय विवाह होय! रामकृष्णाने अंधशाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि लॉटरीची तिकिटे विकण्यास प्रारंभ केला. तोच त्याच्या प्रारब्धाची लॉटरी खुलली. तो या अंध युवतीचा प्रेमात पडला. ब्रेल लिपीतून तिला प्रणयपत्रे लिहू लागला. 'माझी होशील का? ' असा त्याने सवाल विचारला आणि मग सुशिलेने त्याला होकारार्थी जवाब दिला. जातीपातीचे बंधने ओलांडणाऱ्या या अंध युगुलांचे प्रेम आंधळे आहे, असं कोण म्हणेल? जातीयतेचा विरोधात घोषणा करणाऱ्या हजारो डोळसांना जे साधले नाही ते या अंधांनी साधले. हे आंधळे प्रेमीजन जातीधर्मापलीकडे असलेली मानवता पाहू शकले! मग डोळे नसूनही ते अधिक डोळस होते असंच म्हणणं योग्य नाही काय? 'प्रेम आंधळं असतं' ह्या भ्रमाचा भोपळा ह्या अंध युगुलाने सहज फोडला! आंधळ्यांचे प्रेम अधिक उच्च दर्जाचे असणे क्रमप्राप्त आहे. कारण 'लव्ह ऐट फर्स्ट साईट' असं ते असूच शकत नाही. ते बहिरंगावर अवलंबून नसते. आपली प्रिया चंद्रमुखी आहे की रुद्रमुखी आहे? ती मीनाक्षी आहे की हरिणाक्षी? तिचा केशविलाप काळाभोर आहे की पिंगट? तिला नथ खुलून दिसते की चमकी? तिचा बांधा नऊवारीत अधिक खुलतो की पाचवारीत? लुंगी कुडत्यात, सलवार कमीजमध्ये की बेलबोटम जीन्समध्ये? हे अंध प्रियकराला कसे कळणार? आणि अंध प्रेयसीला प्रियकराचे रंगरूप आकलन होणं शक्यच नसतं. तो काळा सावळा असला काय अन गोरागोमटा असला काय, तिला त्या बाह्यरंगाचे ज्ञान अशक्यच! म्हणूनच अंध युगुलांचे प्रेम बाह्यरंगावर नव्हे, तर अंतरंगावर अधिक आधारलेले असणार! केवळ स्पर्शानं जी काही शरीरसौंदर्याची कल्पना करता येणं शक्य आहे. तेवढंच अंधजनांच्या हाती असतं. कारण चर्मचक्षूंना ते पारखे झालेले असतात. आंधळेपणाचे, चर्मचक्षूंच्या अभावाने अनेक तोटे असले तरी हा एक फायदाच म्हणावा लागेल की, 'उप्परकी टामटूम' नव्हे तर 'अंदरका राम' च अंधजनांना अधिक लक्षात घ्यावा लागतो. देहापेक्षा हृदयाचे सौंदर्याच अनुभवाच्या चक्षूंनी आकलन करावं लागतं! साहजिकच त्यांची दृष्टी बाह्य जगताकडून आंतरिक मनोव्यापाराकडे अधिक वळते. ते अधिक अंतर्मुख होतात आणि मग अशा अंधजनांना ह्या जगातील अंधारात खरेखुरे प्रेमच मार्गदर्शन करू शकते. 'प्रेमभावे जीव जगी या नटला' हे सनातन सत्य कोणत्याही ऐक्यापेक्षा अधिक उत्कटतेने परत असावं. हमदर्दीने ओथंबलेल्या, दुसऱ्याच्या दुःखाने कळवळणाऱ्या सहानभूतीने काठोकाठ भरलेल्या शुद्ध प्रेमाची अंधांना अतीव आवश्यकता असते आणि म्हणून त्यांनाच अशा प्रेमाची महती अधिक कळते. 'प्रेम' ना वसे बहिरंगी हे सांगण्याची त्यांना आवश्यकता उरत नाही.
बंगळुरु : देशातील महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे महिलांच्या, अगदी अल्पवयीन मुलींच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच विषयावर कर्नाटक विधानसभेत चर्चा सुरु असताना महिला आमदारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत संतप्त प्रतिक्रिया दिली. बलात्काऱ्याला कायद्याने सामान्य शिक्षा न देता त्याचे गुप्तांग छाटावे, त्याचे सार्वजनिकरित्या खच्चीकरण करावं, इतकंच नव्हे तर बलात्काऱ्याचे तेलंगणाच्या धर्तीवर एन्काऊंटर करावे अशी मागणी त्यांनी केली. म्हैसुरमध्ये नुकतेच एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. गेल्या 15 दिवसातील ही दुसरी बलात्काराची घटना आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. याच विषयावर शुक्रवारी कर्नाटक विधासभेमध्ये चर्चा सुरु झाली. महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका मांडणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर या मराठी भाषिक मतदारसंघाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी या प्रश्नी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आमदार विनिशा नेरो म्हणाल्या की, "बलात्काऱ्याचे पोस्टर्स सर्वत्र छळकायला हवेत, अशा लोकांची पोलिसांनी सार्वजनिक वरात काढली पाहिजे. त्यामुळे बलात्काऱ्याला थोडी तरी शमर वाटेल. " मैसुरुचे आमदार एसआर महेश यांनी तेलंगणामध्ये घडलेल्या 2019 च्या बलात्काऱ्याच्या एन्काऊंटरचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, याच धर्तीवर कर्नाटकातील बलात्काऱ्यांचे एन्काऊंट करायला हवं.
यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही. चित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळी नसते याची जाणीव 'चिन्ह'ला आहे. चित्रकलेबद्दल बोलायचे तर आधी चित्रकारांची ओळख व्हायला हवी, त्यांचं जगणं, त्यांचं वावरणं, त्यांचं असणं यातून विकसित होत गेलेल्या त्यांच्या कलाविषयक जाणिवांचाही शोध घ्यायला हवा ही जाणीव 'चिन्ह'ला अगदी पहिल्या अंकापासून होती. बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते. स्त्रियांना विनोद कळत नाही, आणि त्यांना विनोद करता येत नाही, असा एक समज मराठी वाचकांमध्ये पूर्वापार आहे. रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ अशा लेखकांनी त्यांच्या लेखनांतून, मुलाखतींमधून या समजाला चांगलंच खतपाणी घातलं. शकुंतला फडणीस, पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, मंगला गोडबोले यांनी मात्र सातत्यानं दर्जेदार विनोदी लेखन करत या समजाला छेद देण्याचं काम उत्तमरीत्या केलं. रेल्वे स्टेशनावर, किंवा रस्त्यांवर गर्दीत बरेचदा फाटक्या, मळक्या कपड्यातला एखादा बारका हात आपल्या समोर येतो. आपण सवयीनं तिकडं दुर्लक्ष करतो. फारच मागे लागला, तर पोलिसांकडे द्यायची धमकी देतो. मग तो हात दुसर्या कोणासमोर पसरला जातो. हा पसरलेला हात कोणाचा याचा विचार क्षणभरसुद्धा आपण करत नाही, इतकं हे आपल्याला सवयीचं झालेलं असतं. भारतीय क्रिकेटचा चेहरा आणि आवाज म्हणून जगन्मान्य असलेल्या हर्षा भोगलेनं पहिल्यांदा क्रिकेट सामन्यांचं धावतं समालोचन केलं, त्याला आता एकवीस वर्षं होतील. उणीपुरी पाच वर्षं हर्षानं रेडिओवर समालोचन केलं. मग भारतात उपग्रह वाहिन्यांनी पाय पसरायला सुरुवात केली, आणि 'भारतीय क्रिकेटचा चेहरा' अशी नवी ओळख हर्षाला मिळाली. टीव्हीवरची त्याची समालोचनं गाजलीच, शिवाय 'हर्षा की खोज' हा त्याचा कार्यक्रम, त्याचे प्रश्नमंजूषेचे कार्यक्रमही प्रेक्षकांनी उचलून धरले. क्रिकइन्फोनं २००८ साली त्याला 'सर्वोत्तम समालोचक' हा किताब बहाल केला. त्यामुळे खेळाडू नसलेला हा क्रिकेटमधला तसं पाहिलं तर पहिला सेलिब्रिटी. भीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे. जागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वसंत चिंचाळकर यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रं 'सगे सोयरे' या पुस्तकात संकलित केली आहेत. यांपैकी काही शब्दचित्रं चरित्रात्मक आहेत. या व्यक्तींमध्ये वसंत सोमण, आलमेलकर, पद्मजा फेणाणी, उ. झाकीर हुसेन यांसारखे कलाकार आहेत, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. व्ही. गिरी यांसारखे राजकारणी आहेत, बाबा आमटे, डॉ. विकास महात्मे, गाडगेबाबा, शाहू महाराज आहेत. बापूंची कुटी आहे आणि पाऊस, उन्हाळाही आहे. 'सगे सोयरे' या नचिकेत प्रकाशनाच्या पुस्तकातील 'तुळसा काकी' हे शब्दचित्र. . एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत रूढींच्या पाशात अडकलेल्या आणि कमालीचं जडत्व आलेल्या महाराष्ट्रीय समाजाला नव्या विचारांचं वारं लागावं, म्हणून अनेक समाजधुरिण प्राणपणानं लढले. बुरसटलेले विचार आणि परकीय सत्तेचा पाश अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत या मंडळींनी एका पुराणप्रिय समाजाला डोळे उघडे ठेवून बघायला, स्वतःच्या डोक्याचा वापर करून विचार करायला शिकवलं. ज्यांचा मुक्तपणे जगण्याचा हक्कच नाकारला गेला होता, अशा विधवांना आणि दलितांना मोकळा श्वास महाराष्ट्रातल्या काही सुधारणावाद्यांमुळेच घेता आला. या सुधारणावाद्यांनी सामाजिक परिस्थितीविरुद्ध विद्रोह केला, पण विवेकाच्या आधारानं. मराठी साहित्यात अनुवादांचं स्थान मोठं आहे. वामन मल्हार जोश्यांपासून भारती पांडे, अपर्णा वेलणकरांपर्यंत अनेकांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणलं. मात्र हे अनुवाद बहुतांशी नाटकं, कादंबर्या आणि क्वचित कविता व प्रवासवर्णनांपर्यंतच मर्यादित राहिले. उत्तमोत्तम कथा मराठीत फारशा आल्या नाहीत. फार वर्षांपूर्वी जयवंत दळवी 'यूसिस'मध्ये कार्यरत होते, तेव्हा त्यांनी प्रभाकर पाध्ये आणि शांताबाई शेळक्यांकडून इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद करून घेतले होते. हे अनुवाद बरेच गाजले. शांताबाईंनी केलेल्या या अनुवादांचं दुर्गाबाई भागवतांनी स्वतंत्र लेख लिहून कौतुक केलं होतं. नंतर मात्र असे प्रयत्न झाले नाहीत.
जळगाव : पोलिसांच्या कायदेशीर कब्जात असलेल्या बंदीने त्यांच्या हाताला हिसका देत पलायन करण्यास यश मिळवले आहे. राजेश एकनाथ निकुंभ रा. सुभाष चौक अमळनेर असे पलायन केलेल्या बंदी आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 जूनच्या सायंकाळी अमळनेर न्यायालयातील कामकाज आटोपून राजेश निकुंभ या बंदीस जळगावला बसने आणले जात होते. अमळनेर बस स्थानक परिसरात मुख्यालयातील पोलिस कर्मचा-यांच्या ताब्यातील राजेश निकुंभ याने शिताफीने हिसका देत तेथून पलायन केले. या घटनेप्रकरणी सहायक फौजदार रमेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विलास पाटील करत आहेत.
९ मार्च रोजी २०१४ रोजी रात्री १२. ३० च्या सुमारास एजाज रहिम खान यांनी घराजवळ दुचाकी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात अमीर तुफेल खान (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली. त्याच्याकडून गाडी जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अमीर याला दोषी ठरवले. त्यावेळी तो विवाहित असून, घरातील कर्ता आहे. त्यामुळे त्याला चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडून देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र सरकारी वकील वामन कोळी यांनी त्याला विरोध केला. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आणखी गुन्हे प्रलंबित आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी न्यायालयाने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला परिविक्षा अधिनियमाचा लाभ देणे योग्य ठरणार नाही. त्याने केलेले कृत्य क्षमेस पात्र नसून, शिक्षेचा समाजात सकारात्मक प्रभाव समाजामध्ये पसरवणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने एक वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसाचा कारावास भोगावा लागेल असे आदेशही दिले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नसला, तरी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊन च्या चर्चांना रोख लागलेला नाहीये. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी, विद्यार्थ्यांसाठी आज ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून एक मोठी घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिसस्थिती लक्षात घेऊन मी, इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मुल्यमापना संदर्भात बोलणार आहे. करोनाच्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. ५ वी ते ८ वी च्या शाळादेखील सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. परंतु मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. तसेच, यावर्षीची करोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, १ ली ते ८ वी चे जे विद्यार्थी आहेत, त्यांना आरटीईच्या अधिकाराच्या कायद्यांतर्गत, सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे. राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊनच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक (८ वी पर्यंत) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा पप्रश्न मार्गी लागला असून, आता उर्वरित विद्यार्थ्यांचे हित आणि होणाऱ्या नुकसानाचा अंदाज घेऊन सरकार त्यांच्या बाबतीत देखील काय निर्णय घेणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Devendra Fadnavis: अजित पवार नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीस कुठे होते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. Devendra Fadnavis: राज्याचे राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. यातच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण काढत पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. अलीकडेच अजित पवार काही तासांसाठी नॉट रिचेबल झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस कुठे होते, याबाबत खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. नॉट रिचेबल असण्यावरून अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरण आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधे घेतली आणि झोपलो. त्यानंतर बरे वाटू लागल्यानंतर कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमे कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होते, असे अजित पवारांनी सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांसोबत असलेल्या नात्याविषयी विचारण्यात आले. अजित पवार नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीस नेमके कुठे होते? अजित पवार आणि तुमचे चांगले संबंध आहेत. विरोधी पक्षनेता असूनही ते तुमच्याबाबत सॉफ्ट असतात. पहाटेच्या शपथविधीनंतर तुम्ही कधी भेटलात असे देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या घटनेनंतर अजित पवार खूप डिफेन्सिव्ह झाले. कोरोना काळात केवळ दोन बैठकांसाठी आम्ही भेटलो. मात्र, त्यापूर्वी कधीही भेटलो नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच परवा अजितदादा कुठल्या तरी पुण्याच्या कार्यक्रमातून निघून गेले. त्या दिवशी मुंबईतल्या घरी फाइल्स क्लिअर करण्याचे काम करत होतो. त्यावेळी परत सुरू झाले, अशा चर्चा सुरू झाल्या. पण त्या दिवशी माझ्या घरी काही पत्रकारांना गप्पा मारायला बोलावले होते. त्यामुळे पत्रकार माझ्याच घरी होते. पण तिकडे चर्चा अशा सुरू होत्या की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूरला भेटले. मी मुंबईत आणि अजित पवार कुठे आहेत हे मला माहिती नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते मुंबई तकशी बोलत होते. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आमदार नेहमीच संपर्कात असतात. सत्ताधारी पक्ष म्हणू काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. या संबंधामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेक लोक बरोबर येतात. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, त्यातील किती लोक भाजपात येतील हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तृतीयपंथी व्यक्तींनाही आपल्या ट्रान्सजेंडर आधार कार्डद्वारे कर विवरणपत्र भरता येणार आहे. यापूर्वी वेबसाईट अनेक तृतीयपंथ्यांचे आधार कार्ड स्विकारत नव्हती त्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१७-१८चे कर विवरणपत्र भरण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या आपले कर विवरण भरण्यासाठी अनेक जण रांगेत असल्याने वेबसाईटला अनेक अडचणींचा समावेश करावा लागत आहे. आजवर काही तृतियपंथीयांचे कर विवरणपत्र भरताना तृतीयपंथ्यांना अनेक अडचणी येत होत्या.
ब्रिस्टॉल हे लोकसंख्येच्या बाबतीत इंग्लंडमधील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. या शहरात फ्रोम आणि अॅव्हॉन या नद्यांलगतच्या भागात डोंगरावर किल्ले तसेच रोमन पद्धतीच्या गढ्या बांधण्यात आल्या. १९५५ च्या सुमारास ब्रिस्टॉल शहराला राजेशाहीचा स्पर्श झाला. समुद्राच्या सान्निध्यामुळे हे शहर भरभराटीस आले.
कृषी सुधारणा कायदे करण्याची मागणी कोणत्या शेतकऱ्यांनी केली होती, असा सवालही आंदोलकांनी दिल्लीश्वरांना विचारला आहे. त्यांचा प्रश्न अत्यंत रास्त असून त्याच्या उत्तराची उकल करण्यासाठी थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. कृषीप्रधान भारत देशाचा आर्थिक कणा शेतकरी असूनही सत्ताधारी वर्गाकडून नेहमीच त्याची उपेक्षा होत आली आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा धरून हमीभाव दिला जाईल असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन आता त्यांच्या अंगलट येत आहे. सुरुवातीला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे नवे गाजर दाखवले. यासाठी नीम कोटेड युरियाचा प्रचार केला, प्रधानमंत्री कृषी विमा योजनेचा प्रचार केला. पण शेतकऱ्यांनी मात्र स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी कायम ठेवली. त्यासाठी मोठी आंदोलने उभी राहिली. मध्य प्रदेशातील मंचरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात पाच शेतकरी शहीद झाले. त्यावेळी मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यांच्यावर डोळा ठेवून तत्कालीन अर्थमंत्री स्व. अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून अशी घोषणा केली की, सरकार रब्बीसाठी 50 टक्के नफा धरून हमीभाव देतच आहे; आता खरीपासाठीही तो दिला जाईल. परंतु ही घोषणा करताना एक चलाखी करण्यात आली. ती म्हणजे "ए2-एफएल'वर आधारित हमीभाव जाहीर केले; परंतु स्वामिनाथन आयोगाने शेतकऱ्याने जमिनीसाठी गुंतवलेले भांडवल, त्यावरील व्याज आदींचा समावेश असलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट म्हणजेच "सीटू' अधिक 50 टक्के नफा गृहित धरून हमीभाव देण्यात यावेत अशी शिफारस केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या पाच वर्षांत मोदी सरकारने जी हमी किंमत जाहीर केली होती ती प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्याला कधीच मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांची हमीभावासाठी सातत्याने आंदोलने होत होती आणि केंद्र सरकारला जास्त प्रमाणात या शेतमालाची खरेदी करावी लागत होती. अलीकडेच वाराणसीच्या भाषणात पंतप्रधानांनी असे म्हटले की, 3 लाख कोटींचा गहू खरेदी केला, 5 लाख कोटींचा धान खरेदी केला, 50 हजार कोटींच्या डाळी विकत घेतल्या. 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर किमान आधारभूत किमतीत 3-4 टक्केच वाढ करण्यात आली; पण त्यानंतरही असे लक्षात आले की जगभरात कृषीमालाबाबत मंदीचे वातावरण आहे. कोविडमुळे ही मंदी आणखी वाढली आहे. गतवर्षी केंद्र सरकारला 30 टक्के कापूस खरेदी करावा लागला. एकंदरीत, सरकारला हमी किमतीमध्ये खरेदी करणे जड जाऊ लागले. तशातच सरकारवर जागतिक व्यापार संघटनेचाही दबाव आहे. अर्थात, तो डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळापासून आहे. गहू आणि धानाच्या हमीकिमतीबाबत हा दबाव आहे. गहू आणि धानाची हमीकिमतीत खरेदी करून बफर स्टॉक करण्यावर "डब्ल्यूटीओ'चा आक्षेप आहे. "ऍग्रीमेंट ऑन ऍग्रीकल्चर'मध्ये एकंदर "ऍग्रीकल्चर मेजर ऑफ सपोर्ट' देण्याची जी सूट आहे त्याची मर्यादा भारतात पार केली जात आहे असे जागतिक व्यापार संघटनेचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, गव्हाचे एकूण उत्पादन 1 लाख रुपयांत होत असेल तर 10 टक्के म्हणजेच 10 हजार रुपयेच सबसिडी केंद्र सरकारला देता येईल, त्याहून अधिक देता येणार नाही असे "डब्ल्यूटीओ'चे म्हणणे आहे. भारतात ती दिली जात असल्याने "डब्ल्यूटीओ'ने आपल्याला "पीस क्लॉज'वर ठेवले होते. याखेरीज साखर निर्यातीला अनुदान देण्यावरून आणि साखर आयातीवर लावल्या जाणाऱ्या आयात करावरून ब्राझीलनेही आक्षेप नोंदवत दबाव आणायला सुरुवात केली आहे. दुधाची पावडर आयात करू दिली जात नसल्याबद्दल न्यूझीलंडही दबाव आणत आहे. डाळींच्या हमीभावात वाढ केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, देशातील अनेक अर्थतज्ज्ञांनीही असे म्हटले आहे की, ज्या 24 पिकांचे हमीभाव सरकार जाहीर करते त्यांचा बाजारात भाव तितका नाहीये; त्यामुळे हा सर्व शेतमाल खरेदी करावा लागला तर सरकारचे अर्थकारण कोलमडेल. या सर्व कोंडीतून बाहेर पडण्यासाठी करोनाच्या काळात मोदी सरकारने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा), शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) या तीन कृषीसुधारणा कायद्यांचा डाव खेळला. या तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांची गेल्या 70 वर्षांपासून जी लूट होत होती ती बंद होणार असून या कायद्यांमुळे शेतकऱ्याच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील असा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. या कायद्यांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होणार आहे. कृषीउत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदीची परवानगी दिल्याने अनेक व्यापारी येतील, गुंतवणूक येईल आणि शेतकऱ्यांना पर्याय मिळाल्याने जास्त भावात आपला माल विकण्याची संधी मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केल्याने मोठमोठे उद्योजक येऊन मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी करतील आणि धान्यगोदामे, शीतगृहे तयार करतील आणि या स्पर्धेमुळेही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल असा सरकारचा दावा आहे. तसेच करार शेतीमुळेही शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाची हमी मिळेल असा सरकारचा कयास आहे. या सर्व प्रचारातून सरकार शेतकऱ्यांना मुक्त करत नसून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार हमीभाव लागू करण्याच्या वचनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब पंजाबच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. हमीकिमतीच्या संरक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले आहे. हे संरक्षण राहिले नाही तर त्यांच्या धानाला 1500-1600 रुपये क्विंटलही भाव मिळणार नाही हे त्यांना उमगले आहे. आज महाराष्ट्रातही यापेक्षा अधिक दराने गहू खपत नाहीये असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कापूसही 5300 ते 5500 यादरम्यानच खपतो आहे. मग चांगला भाव देणारा व्यापारी आहे कुठे? आज जरी केंद्र सरकार हमीभाव राहीलच असे म्हणत असले तरी उद्या त्यांनी हात वर केले तर शेतकऱ्यांनी करायचे काय? बडे उद्योगपती जरी शेतीत आले तरी तेही अन्यत्र भाव कोसळलेले असताना अधिक भाव देतील याची खात्री काय? या शेतकऱ्यांना दुसरी भीती आहे ती म्हणजे, जागतिक दबाव वाढत गेल्यास जगभरातील शेतमाल भारतात मोठ्या प्रमाणावर येऊ लागेल. तसे झाल्यास आपल्या देशातल्या शेतमालाला अक्षरशः कवडीमोल भाव मिळेल. यामुळेच या शेतकऱ्यांनी या कायद्यांविरोधात दंड थोपटले आहे.
तो मोठा कुलीन आणि सज्जन मनुष्य आहे. त्याची आई आणि बायकोहि तशींच सज्जन आहेत! 'तुझ्या मोहनाताईच्या नादानें तुझी बायको बिघडेल' ह्मणून तो मला कित्ती दिवस बजावतो आहे; तेव्हां आतां त्याच्या इथेंच जाऊन बि-हाड ठोकावें ! नाहींतर हिला द्यावी चार दिवस तिच्या बापाकडे पाठवून, आणि पुन्हा आली कीं निराळें बिहाड ! [ आंत जातो. ( पडदा वर होतो. ) मोहना - ( यमूताईची ओटी भरून तिला कुंकूं लावते, निळूस सुपारी देते व दोघांचे हातावर दहीं घालते. ) जपून जा. अन् अण्णा, तूं गेल्याबरोबर सगळीं खुशाल असल्याचं पत्र घाल. विसरूं नकोस हो ! निळू - ठीक आहे. [ जातात. मोहना - ( पोंचवून परत येऊन ) गेलीं एकदाचीं. ( स्वगत ) आजचा प्रकार सगळाच कांहीं चमत्कारिक ! आह्मीं नाटक काय केलं ! अन् मधींच येणं काय झालं ! अन् यांचं एकदम जाणं काय झालं ! सगळंच अकस्मित ! पण, ज्या वेळेस हांका ऐकू आल्या त्यावेळी माझी काय स्थिति झाली पण ! [ पद - पति राखीं श्रीहरी ] किति झालें घाबरी ! पति येतां । ध्रु० । नटवेषातें टाकुन देउन, आभरणांतें काढुन टाकुन दिधलें परि मीं भिउनि अंतरीं ॥ १ ॥ किति० ॥ युवति जमवुनी नाटक अभिनव, केलें ऐसें जानें कळले तर, काय वदति हैं येइ मदंतरीं ॥ २ ॥ किति० ॥ ऊरहि माझा धडधडला किति, कंपित झालें वाटुनि भीती, चोरीची अति भयद स्थिति खरी ॥ ३ ॥ किति० ॥ [ जाते. [ पडदा पडतो. ] अंक ५ वा प्रवेश १ ला. अंक ५ वा. प्रवेश १ ला. स्थल - श्रीपतरावाचें घर. गोविंदराव, निळकंठराव, आणि श्रीपतराव बोलत बसले आहेत असा प्रवेश. ] गोविंदराव - काय ? तर मग ती माधवरावाची बहीण रमाबाई नव्हती ह्मणतां ? खुद्द माधवराव गेला होता ? श्रीपतराव - हो हो, खुद्द मांधवराव आपला निळकंठराव जो आमच्या इथें राह्यला आला तोतरी एवढ्याचकरितां ! मी ह्मणतों, याचा जर तुझांला पडताळाच पाह्यचा असेल, तर तुझी माधवरावांच्या इथें जा आणि त्याला जरा खुलवून विचारा ह्मणजे सगळे सांगेल तो तुझांला. मात्र नीट त्याच्या पोटांत शिरून काढलें पाहिजे सगळें. अलीकडे तुमचा अन् त्यांचा परिचयहि बराच झाला आहे. गोविंदराव - अस्सें ! ठीक आहे तरमग ! श्रीपतराव - पहिल्यापासूनच ह्मणत नव्हतों मी गोविंदराव, कीं, हें चांगलें नव्हे. हा स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे ! तुझी स्वतः होऊन जर बायकांनां नाटकें शिकवूं लागलां, तर काय ह्मणावें तुझांला ! You must educate women, but this is not the way to do it! निळकंठराव-नाहीं, त्यांनां पदें शिकवा, त्यांनां नाटकांतले अभिनय करायला शिकवा, आणि त्यांनां नाटकांत नेऊन नाचवा, ह्मणजे तुमच्या सुधारणादेवीचा चांगला जयजयकार होईल! नुसतीं पोरें बिघडलीं आहेत तेवढे बस्स नाहीं तुझांला ! सुधारणाशकटाचीं दोन्हीं चक्रे सारखीं चालली पाहिजेत ! कां, असेंच कीं नाहीं ? श्रीपतराव - आठआठ दहादहा वर्षांच्या पोरांचे विक्रमशशिकलेंतल्या झगड्यांचे पाठ कसे चालले असतात, टारगीं पोरें रस्त्यांतून जाणाऱ्यायेणाऱ्या स्त्रियांनां उद्देशून केव्हां केव्हां 'लोपविली बहुत शोभा, ' नाहींतर 'वस्त्राने देह सारा सुंदरिने झांकिला,' नाहींतर 'नगनग पळून जाऊं तूं नारी,' ह्रीं पदें कशीं निर्लज्जपणानें ह्मणत असतात हेंहि तुमच्या नजरेला मीं पांचदहा वेळ आणून दिले आहे. इतक्या थरावर गोष्टी आल्या असूनहि हें पसंत आहेका तुह्मांला ? गोविंदराव - अशा बीभत्स नाटकांचे हे अनिष्ट परिणाम आहेत खरे ! पण ज्यांची बुद्धि प्रगल्भ झाली आहे त्यांनां नाटकें दाखवायला काय हरकत आहे
सुदर्शन पटनायक याने सॅन्टा क्लॉजचं वाळूशिल्प काढलं आहे. या वाळूशिल्पातून जागतिक शांततेचा संदेश त्याने दिला आहे. 25 डिसेंबरः आज ख्रिसमस म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस.आज जगभर ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे. मुंबई जवळच्या वसईतही ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत. गाव सजली आहेत ख्रिसमस इव्हला तर वसई रोषणाईने उजळून निघाली होती. आज अनेक ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात. येशूचा जन्मोत्सव साजरा केला जातो. देशभर आज या सणाचा उत्साह आहे. सुदर्शन पटनायक याने सॅन्टा क्लॉजचं वाळूशिल्प काढलं आहे. या वाळूशिल्पातून जागतिक शांततेचा संदेश त्याने दिला आहे. आज जगभर युद्ध आहेत,अस्थैर्य आहे. अस्वस्थता आहे. यासगळ्या अशांततेमध्ये येशू ख्रिस्ताचा क्षमाशिलतेचा आणि शांततेचा संदेश हा नक्कीच प्रेरणा देणारा ठरतो.धर्म जात पलीकडे जाऊन भारतात सर्वत्र या सणाचा उत्साह आहे.
दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला. मुंबईने लेग स्पिनर राहुल चहरच्याऐवजी जयंत यादवला टीममध्ये घेतलं. रोहित शर्माने टॉसवेळी सांगितलेला हा बदल ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण टॉसवेळीच रोहित शर्मा (Rohit Sharma) ने जयंत यादवला टीममध्ये घ्यायचं कारण सांगितलं. दिल्लीच्या टीममध्ये डावखुऱ्या बॅट्समनची संख्या जास्त असल्यामुळे चहरऐवजी जयंत यादवला संधी दिल्याचं रोहितने सांगितलं. दिल्लीच्या टीममध्ये शिखर धवन, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर आणि अक्सर पटेल हे सुरुवातीच्या 7 बॅट्समनपैकी 4 बॅट्समन डावखुरे आहेत. जयंत यादव (Jayant Yadav) हा ऑफ स्पिनर आहे. डावखुऱ्या बॅट्समनला ऑफ स्पिनरसमोर खेळताना अडचणी येतात, तर लेग स्पिनरना खेळणं त्यांच्यासाठी सोपं असतं, असं सांगितलं जातं, त्यामुळे मुंबईने लेग स्पिनर असलेल्या चहरऐवजी जयंत यादवला खेळवण्याचा धोका पत्करला. जयंत यादव यानेही त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनला यादवने माघारी धाडलं. 13 बॉलमध्ये 15 रन करणाऱ्या धवनला जयंत यादवने बोल्ड केलं. दुसरीकडे राहुल चहर (Rahul Chahar) ने मात्र या मोसमात चांगली कामगिरी केली होती. राहुल चहरने या मोसमात खेळलेल्या 15 मॅचमध्ये 8. 16 चा इकोनॉमी रेट आणि 28. 86 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या होत्या. राहुल चहरला फायनल मॅचसाठी बाहेर बसवताना वाईट वाटत आहे, त्याने मोसमात उत्तम कामगिरी केली, पण रणनीती म्हणून आम्ही जयंत यादवला खेळवत असल्याची प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली. जयंत यादवला यंदाच्या मोसमात या मॅचआधी आणखी एक मॅच खेळण्याची संधी मिळाल होती. तर मागच्यावर्षी चेन्नईविरुद्ध झालेल्या प्ले-ऑफमध्येही जयंत यादवने चांगली कामगिरी केली होती. जयंत यादव 2015 सालापासून आतापर्यंत एकूण 14 मॅच खेळला आहे, यात त्याला 6 विकेट मिळाल्या आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
लीगमधील सालेम स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तंवर याच्या नावावर असा एक विक्रम झालाय जो तो कधीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याने मॅचमधील अखेरच्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर १८ धावा दिल्या. क्रिकेटच्या इतिहासात एका चेंडूवर इतक्या धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये ३६ धावा झालेल्या पाहिल्या आहेत. ओव्हरच्या सर्व चेंडूवर षटकार पाहिलेल्या क्रिकेट चाहत्यांना तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये असे काही तरी पहायला मिळाले जे कधीच घटले नाही. टीएनपीएल २०२३च्या दुसऱ्या मॅचमध्ये हा विक्रम झाला, जो अनेक वर्ष लक्षात ठेवला जाईल. सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलिल यांच्यात झालेल्या सामन्यात स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तंवरने २०व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर १८ धावा दिल्या. होय तुम्ही अगदी बरोबर वाचले, एका चेंडूवर चक्क १८ धावा. क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग चेंडू ठरला आहे. तर टी-२० क्रिकेटमधील अखेरच्या ओव्हरच्या सर्वात महाग अखेरचा चेंडू ठरला आहे. क्रिकेटमधील सर्वात महाग चेंडूचा विक्रम ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये झाला आहे. या लीगमध्ये एका चेंडूवर २० धावांचा विक्रम आहे. २०१३-१४ मध्ये क्लिंट मॅके या गोलंदाजाने १ चेंडूवर २० धावा दिल्या होत्या. अभिषेकने २०व्या ओव्हरची सुरुवात बरी केली होती. पण अखेरच्या ओव्हरने सर्व काही वाया गेले. सुरुवातीच्या ५ चेंडूवर ८ धावा दिल्या होत्या. पण सहाव्या चेंडूवर त्याने संजय यादवला चेंडू टाकला जो एक शानदार यॉर्कर होता. या चेंडूवर संजय क्लीन बोल्ड झाला खरा पण त्यानंतर सर्व गोंधळ सुरू झाला. ज्या चेंडूवर अभिषेकने संजयला क्लीन बोल्ड केले तो नो बॉल होता. या चेंडूनंतर फलंदाजाने त्याच्याकडून बदलाच घेतला. नो बॉलनंतर अभिषेकने फ्री हिटसाठी चेंडू टाकला पण तो देखील नो बॉल झाला आणि यावेळी संजयने कोणतेही चूक केली नाही. फ्री हिटवर षटकार मारला. त्यानंतर अभिषेकने टाकलेला पुढचा चेंडू देखील नो बॉल ठरला ज्यावर संजयने २ धावा काढल्या. आता आणखी एक फ्री हिटचा चेंडू होता जो अभिषेकने वाइड टाकला. अखेर कसे बसे अभिषेकने सहावा चेंडू योग्य पद्धतीने टाकला ज्यावर संजयने षटकार मारला. अशा पद्धतीने संजयने एका चेंडूवर १८ धावा केल्या.
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात काल 29 कोरोनाबाधितांचा रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात मृतांचा आकडा समोर आलं. तर ऑक्सिजनअभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहे. तर आज मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार देखील या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकरी कार्यालयात आढावा घेणार आहे. तर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात 7500 जणांना कोरोनाची लागण झाली असून याच दोन आठवड्यात 121 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
के. श्रीकांत डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत\nBy Pranali Kodre\t On October 22, 2017 3:04 pm\nभारताचा बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांत डेन्मार्क ओपन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्य फेरीत हॉंगकॉंगच्या वाँग विंग कि विन्सन्टचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.\nया सामन्यात श्रीकांत आणि वाँग मध्ये कडवी झुंज बघायला मिळाली. ३९ मिनटे चाललेल्या या सामन्यात श्रीकांतने सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्या सेटमध्ये ११-६ अशी आघाडी घेतली होती. परंतु वाँगने पुनरागमन करत आघाडी कमी करत १४-१० अशी केली. दोघेही एकमेकांना कोणतीही संधी न देता आपला खेळ करत होते. अखेर श्रीकांतने २१-१८ असा सेट जिंकला.\nदुसऱ्या सेटमध्येही या दोघांनी आपापले अनुभव पणाला लावले होते. या सेटमध्ये त्यांची १५- १५ अशी बरोबरी झाल्यानंतर मात्र श्रीकांतने उत्तम खेळ करत वाँगला आघाडी घेऊन दिली नाही. आणि अखेर हा सेट २१-१७ असा जिंकत सामनाही जिंकला.\nया विजयाबद्दल श्रीकांत म्हणाला कि " मला छान वाटतंय. मला चांगलाच खेळ करायचा होता. आमचा खेळ सारखा होत होता पण मी जास्त संयम दाखवला. मी सामन्यात काही चुका केल्या पण मी त्या लवकर सुधारल्या. या नंतर माझा सामना लीशी होणार आहे. मी या आधी कधी त्याच्याशी खेळलो नाही. त्यामुळे माझ्या मते त्याच्या बरोबर खेळणे अवघड असेल."\nश्रीकांतचा अंतिम सामना दक्षिण कोरियाच्या ली ह्युनशी आज होणार आहे. श्रीकांतने यावर्षी इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत आणि सिंगापुर ओपनच्या अंतिम फेरीत उपविजयी झाला आहे. त्यामुळे जर तो डेन्मार्क ओपेनही जिंकला तर तो वर्षातली तिसरी सुपर सिरीज जिंकेल.
मुलांना अति लाडावू नका, त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या ! - Tinystep\nमुलांना अति लाडावू नका, त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या !\nबहुतांशी पालकांकडून नकळतपणे अतिपालकत्वाची चूक घडते. जर कुणी हे लक्षात आणून दिले नाही, तर त्यांना कळतही नाही की ते अतिपालकत्वाचे अपराधी आहेत. परंतु हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत उशीरही झाला असेल; कारण अवास्तव लक्ष देणारे पालक बनणे हा मूल वाढवण्याचा योग्य मार्ग असू शकत नाही. तुम्ही अतिकाळजी करणारे पालक आहात की नाही, हे ओळखण्याची ५ चिन्हे खाली दिलेली आहेतः\n१) त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या\nबहुधा तुम्हाला तुमच्या अपत्याच्या भवितव्याची इतकी चिंता वाटत असते की, तुम्हाला तुमचे मूल नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत कार्यरत असावे असे वाटते. मग तुम्ही त्यांना आवड नसेल अशाही क्लासेसमध्ये त्यांना भरती करता; कारण तुम्हाला वाटते की त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल. खरेतर हे करताना तुम्ही आपल्या बाळाला त्याच्या गतीने विकसित व्हायचा वेळ देत नाही. वेगवेगळ्या वयोमानात मुले वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देतात; म्हणून त्यांच्यावर जास्त गोष्टी लादू नका.\n२) त्यांना जबाबदाऱ्या न देणे\nत्यांची दैनंदिन कामे तुम्हीच करता; कारण तुम्हाला वाटते की ते करायला ती समर्थ नाहीयेत किंवा ते करताना ती चुकली, तर त्या सुधारण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीय!\nत्यांना थोडया जबाबदाऱ्या द्या. म्हणजे जसजशी ती मोठी होत जातील; तसे त्यांना कळून येईल की प्रत्येक कृतीला परिणाम असतात.\n३) हेलिकॉप्टर पालक\nहेलिकॉप्टर पॅरेंट ही संज्ञा अशा पालकांसाठी वापरतात, जे नेहमी आपल्या पाल्यांभोवती भिरभिरतात. जर तुमच्या पाल्याला परिक्षेत कमी गुण पडले म्हणून तुम्ही शिक्षकांना फोन करून त्यांच्याशी हुज्जत घालत असाल; तर तुम्ही हेलिकॉप्टर पॅरेंट आहात! दुसरे प्रौढ तुमच्या पाल्याला कशी वागणूक देतात, यावरुन त्यांच्याशी वाद घालणे हे योग्य लक्षण नाही. कोणाबरोबर आपला वेळ खर्च करणे योग्य आहे आणि कोणाबरोबर नाही; हे त्यांनी शिकणे गरजेचे आहे.\n४) अपयश पचवता न येणे\nआपले मूल अपयशी होताना पाहणे हे कोणत्याही पालकाला आवडत नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना अपयश येऊच नये यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावेत! पालक म्हणून तुम्ही नेमके करावयाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अपयशाच्या वेळी आणि जेव्हाही त्यांना आधाराची गरज लागेल, तेव्हा त्यांच्या सोबत राहा. नेहमी त्यांचा अपयशापासून बचाव करणे हे त्यांची सज्ञान बनण्याची आणि त्यांच्या चुकांपासून शिकण्याची संधी हिरावून घेते.\n५) त्यांच्या पसंतीविरुद्ध वाद घालणे\nतुम्हाला जरी वाटत असेल की एखादी गोष्ट तुमच्या पाल्यासाठी सर्वोत्तम आहे; पण तुमच्या पाल्याचे मत वेगळे असू शकते. कदाचित तुम्ही बरोबर असू शकता की, तुमचे मूल त्यांना पाहिजे त्या कपड्यांमध्ये अथवा हेअरकट मध्ये किती हास्यास्पद दिसेल! पण तुमची मते त्यांच्या गळी उतरवणे हे त्यांना तुमचा आदर करण्याऐवजी तुमच्यावर चीड आणण्यास प्रवृत्त करु शकते.
परिभाषाः सम्राट चीन शिह हंग-ती ही पहिली चिन (वंश) राजघराणे सम्राट होती आणि त्यामुळेच त्याला "प्रथम सम्राट" म्हटले जाते. इ. स. तिसर्या शतकातील इ. स. पूर्व सम्राटांचे मूल्यांकन हे वेगवेगळे आहे. काहींच्या मते त्याच्या सरकारला अप्रामाणिक आणि हिंसक, अंधश्रद्ध शासक ज्याने बिबिलोकॉस्टचा आदेश दिला. त्यांनी कन्फ्यूशीवाद आणि विचारांच्या इतर शाळांची निंदा केली, कायदेशीरपणा जतन केला, ज्याने त्याच्या शाही अवस्थेला समर्थ केले. ते म्हणतात की त्याच्या अंत्यविधीच्या संकुलात काम करणार्या कन्फ्यूशियन्स विद्वान आणि कारागीरांना जिवंत ठेवले. इतर लोक शांतता आणणारे राजकीय आणि कायदेशीर एकनिर्माते म्हणून त्याचे कौतुक करतात, ज्याने कॅरेट चाकांमधील मानक अंतराळ हाताळण्यासाठी रस्ते बांधले आणि ग्रेट वॉल सुरू केले; एक सुधारक, जो प्रमाणित नाणे, वजने आणि उपाय, आणि लिखित भाषा. सुरुवातीच्या इजिप्तच्या फारोंप्रमाणे, प्रथम चीनी सम्राटाने भूगराभोवती असलेला राजवाडा आणि जीवनाचा आकार, यथार्थवादी, पेंटिंग योद्धे, रथ आणि घोडे यासह एक प्रचंड टेरा कोट्टा सेना यासह, नंतरचे जगण्याची अफाट संपत्ती खर्च केली. शटरच्या झाडाच्या झाडावर ट्राँडेकिंग देखील वेगाने वैयक्तिकरीत्या होते. मिनायापोलिस इंस्टीट्युट ऑफ़ आर्ट (चीनच्या टेराकोटा वॉरियर्स - द फर्स्ट सम्राटर्स लेगेसी) या 2012 च्या प्रदर्शनात एक डोसने म्हटले आहे की, योद्धा सुमारे सहा फूट उंच आहेत, जे कदाचित आधुनिक चीन पुरुषांसाठी सरासरी उंच आहे, परंतु ते जीवन समजले जाते स्टेप denizens या वंशजांसाठी आकार. सम्राट म्हणून त्याचे शासन होते 49 वर्षे वयाच्या निधन तेव्हा ते 12 वर्षे. तो मृत्यू झाला तेव्हा, त्याचे शरीर मासे द्वारे झाकून आणि त्याच्या शरीरात घरी परत होईपर्यंत बातम्या विलंब करण्यासाठी झाकून समाविष्ट होते - आख्यायिका त्यानुसार बंड नंतर लवकरच अनुसरण. दुर्बल उत्तराधिकाराचे अनुसरण केले, त्यामुळे त्यांचे राजवंश फक्त आणखी तीन वर्षे टिकले. वारिंग स्टेट्स कालावधी (Ch'in Qi Chu Yan, हान, झाओ, आणि वी) दरम्यान चीन सात राज्ये होते. यापैकी दोन राज्ये, चिन आणि च्यू (ज्यायोगे, कन्फ्यूशियसचे 'लू'चे 24 9 वे वर्ष एकत्रित झाले होते) वर्चस्व गाजवले आणि 223 मध्ये चिनने Chu ने पराभूत केले पहिले युनिफाइड चीनी राज्य दोन वर्षांनंतर, किंग चेंगच्या कारकीर्दीच्या 26 व्या वर्षी. (सर्व चीनच्या पहिल्या सम्राटाप्रमाणे, किंग चेंग यांना सम्राट चिन असे नाव पडले. ) इ. स. पू. 213 मध्ये सम्राट चाइनाचा मृत्यू होण्याआधी तीन वर्षांपूर्वी चिनने एक पुस्तक बर्निंग (बिबिलोकॉस्ट) देण्याचे आदेश दिले होते जे पूर्वीच्या कालखंडातील बर्याच ऐतिहासिक नोंदी नष्ट करायचे होते. पहिले सम्राटच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, 208 मध्ये हसियांग यू यांनी एका राजपूत कॉम्पल-बर्निंगमध्ये छिन्नीची कागदपत्रे नष्ट केली होती. 1 9 70 च्या दशकात जेव्हा शेतकर्यांनी मातीची अनपेक्षित प्रमाणात खोदली तेव्हा 7000 पेक्षा अधिक पुरूषांच्या प्रसिद्ध टेरा कोट्टा सेना आणि कायदेशीर कागदपत्रांचा समावेश असलेल्या पहिल्या सम्राटाच्या कबरची पुरातन वास्तू सापडली. सम्राट चाइन बद्दल माहितीचा आणखी एक स्रोत सुमारे शंभर इ. स. मधील हान राजवंश इतिहासकार एसयू-मा चिएन यांनी शिह ची (ऐतिहासिक नोंदी) लिहिला आहे. याचच इतिहासकार आणि कथाकथ्याला सिमा क्वान म्हणतात, ऋषीची चरित्रकथा लिहिली आहे. कन्फ्यूशियस (कोन्जझी) उदाहरणेः 1 9 74 मध्ये जेव्हा शेतकर्यांनी सम्राट चिनीची कृत्रिमता उघडकीस आणली तेव्हा चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे प्रसिद्ध नेते अध्यक्ष माओ अध्यक्ष, खालील शब्दांवर किंवा भावनांचे श्रेय दिले जातेः " सम्राट किन शी हुआंग काय करू शकतात? त्याने 460 कन्फ्यूशियन विद्वान मारले, परंतु आम्ही 46,000 बुद्धीवादी मारले. आम्ही क्रांतिकारकांच्या दडपशाहीमुळे काही क्रांतिकारक बौद्धिकांना मारून टाकलो नाही काय? लोकशाही लोक ज्यांना सम्राट किन शी हुआंगसारखे वागण्यास आम्ही आक्षेप घेतला. मी म्हणालो की ते चुकीचे आहेत आणि आम्ही त्याला शंभर वेळा ओलांडले. " संदर्भः - फ्रेडरिक पॉल ब्रॅंडुअर, जुन्जी हुआंग यांनी पारंपारिक चीनमध्ये शाही शासकिय आणि सांस्कृतिक बदल ; (1 99 4). - चीनी इतिहास (ओहियो राज्य विद्यापीठात मार्क बेडर)
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत उत्तर दिल्यानंतर या वादात आता प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेने आपले हिंदुत्व सोडलेले नसून, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे,अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यात बार सुरू झाले मात्र मंदिर बंद असल्याच्या मुद्द्यावर भाजपने राज्यात आंदोलन सुरू केले आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाबाबत उल्लेख केला आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर भाजपने शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर या वादात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरे सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरे सुरू न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत असल्याने राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहारावरही आपले मत व्यक्त केले. राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका योग्यच असून,केंद्र सरकारच्या निर्णयाचे पालन होते की नाही,हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार त्यांना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिले आहे. त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असे सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम असून राज्यात शिवसेना आणि भाजपात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत खळबळ उडवून देणारे विधान काल केले होते. महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल',असे भाकीत करून प्रकाश आंबेडकर वर्तविले होते. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय कोणत्या आधारावर होणार आहे, याचा तर्कही प्रकाश आंबेडकर यांनी लावला आहे. केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागेल, असे आंबेडकर यांनी सांगितले होते.
उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. आता किती दिवस माणसं घरात बसून राहतील. प्रॅक्टीकली काही विचार केला पाहिजे. जो पर्यंत 'करोना' थेट हद्दपार होत नाही तो पर्यंत सामान्य तापासारखे उपचार घेऊन येणे-जाणे सुरुच राहील असं सध्या तरी याचं स्वरुप होत आहे. लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. लॉक डाऊन हे गॅस चेंबर मध्ये गॅस मास्क घालण्यासारखे आहे. मुळात गॅसची गळती बंद होईपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलेला तात्पुरता उपाय आहे. जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.
जागतिक स्तरावरील 'फेस ऑफ युरोप अॅण्ड द वर्ल्ड' या स्पर्धेत भारतीय चेहरा म्हणून अक्षता टाले या तरुणीची निवड झाली आहे. तिच्या निवडीमुळे शहरात सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. पुण्याच्या सिएरा या स्पर्धात्मक परीक्षा केंद्राद्वारे या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावेळी देशातील शेकडो मुलींमधून उल्हासनगरच्या अक्षता टालेची निवड करण्यात आली. १८ वर्षीय अक्षता ही नुकतीच सीएचएम विद्यालयातून उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत ९२ टक्के घेऊन उत्तीर्ण झाली आहे. महाविद्यालयीन दशेतच ती उत्कृष्ट निवेदिका व कथ्थक नर्तिका म्हणूनही लोकप्रिय आहे. सुंदर आणि प्रभावी व्यक्तिमत्व, शैक्षणिक व व्यावसायिक महत्त्वाकांक्षा, सामान्यज्ञान, वैशिष्ट्यगुण, भारतातील संस्कृती, लोककला यांचा अभ्यास या निकषांवर आधारित अक्षताची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. या वर्षी १ ते ७ नोव्हेंबर मध्ये इंग्लंड, पॅरीस, फ्रान्स या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे. अक्षता ही सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हाअध्यक्ष तथा उल्हासनगर महानगरपालिका नगरसेवक प्रमोद टाले यांची कन्या आहे. या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अक्षता उल्हासनगरची भूषण ठरली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
युक्रेनमध्ये कीव्ह, इरपिन, खारकीव्ह या भागात रशियन सैन्याने सगळ्यात आधी हल्ला केला. तेव्हापासून दहा लाखच्या वर लोकांनी सुरक्षिततेसाठी युक्रेन सोडलंय. पण, काही नागरिक तरीही मागे राहिले. यातलेच काही जण तर स्वयंसेवक म्हणूनही हट्टाने मागे राहिलेत. यातलेही काही आता देश सोडण्याच्या तयारीत आहेत. बीबीसी प्रतिनिधी जेरेमी बोवेन यांनी अशा मागे राहिलेल्या लोकांकडून त्यांचं दुःख आणि भीती जाणून घेतली. हेही वाचलंत का? (बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनने शहरात खळबळ उडाली आहे. कॉलरने दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन 100 कोटी रुपयांची खंडणीही मागितली. गडकरींना दिलेल्या धमकीच्या फोनने शहर पोलिसांची चांगलीच कोंडी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. यासोबतच गडकरींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. काही तासांतच सायबर टीमच्या मदतीने कॉल करणाऱ्याचा शोध घेण्यात आला. हा फोन कर्नाटकातील बेळगाव शहरातून केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी तातडीने गुन्हे शाखेचे पथक विमानाने कर्नाटकला रवाना झाले. बेळगाव कारागृहात असलेल्या एका गुंडाने धमकीचा फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचीही चौकशी केली जात आहे मात्र संवेदनशील प्रकरणामुळे कोणीही बोलायला तयार नाही. फोन करणारा गुंड जयेश पुजारी असल्याचे सांगण्यात आले. खुनाच्या गुन्ह्यात जयेश जेलची हवा खात आहे. त्याने हे सिमकार्ड दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने विकत घेतले होते. तो जेलमधूनच फोन चालवत होता. कारागृहातील कैद्याला त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट घ्यावे लागते. तपासासाठी गेलेले पथक सोमवारी न्यायालयाकडून त्याची कोठडी मागू शकते. डीसीपी झोन 2 राहुल मदने गडकरी यांच्या कार्यालयात पोहोचले आणि फोन उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून संभाषणाची संपूर्ण माहिती घेतली. ताबडतोब बीएसएनएलकडून कॉल करणाऱ्याचे तपशील मागवण्यात आले. याशिवाय सायबर क्राइम टीमही कॉलरचा शोध घेण्यासाठी तपासात गुंतली आहे. या घटनेबाबत पोलीस गुप्तता पाळत आहेत. डीसीपी मदने यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे. 3 वेळा कॉल आला आणि धमक्याही देण्यात आल्या. गडकरींच्या घर आणि कार्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही कार्यक्रमांना गडकरी स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांचे कार्यक्रम असलेल्या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. फोन कोणी केला, हे सध्या स्पष्ट होऊ शकले नाही.
शिरूर कासार : काळानुरूप जश्या चाली- रीती बदलू लागल्या त्याप्रमाणे वापराच्या साधनांमध्ये ही बदल होऊ लागला. आकर्षकपणा मुळे आधुनिक साधनांनी भुरळ घातल्याने सर्वच ठिकाणी त्यांनी आपला जम बसविला. बैठक खोली असो की बेड रूम मध्ये बाज ऐवजी दिवाण, लोखंडी पलंग, सोफा यांनी आपली आपली जागा कायम केलीय. त्यामुळे आता शहरापाठोपाठ गावखेड्यात ही बाज नामशेष होत चालली असून बाज विणकाम करणाऱ्या कारागिरांनी आपली ही कला गुंडाळून ठेवल्याचं मत कारागीर बबन थोरात..... यांनी व्यक्त केली. थकवा दूर करण्यासाठी आरामदायी म्हणून हवी- हवी असलेल्या बाजेला खेड्या- पाड्यात खूप महत्व असायचं. यामुळे पूर्वी बाजेला जास्त मागणी असल्याने विणकाम करणाऱ्या कारागिरांना यातून उत्पन्न मिळत असे. परंतू, काळ जसा जसा बदलत जाऊ लागला. तशी बाजेची जागा दिवाण, लोखंडी पलंग, सोफा यांनी घेतली. शहरापाठोपाठ या आकर्षक वस्तूंनी गाव खेड्यातील लोकांना ही भुरळ घातली आहे. त्यामुळे गाव खेड्यात बाजेची मागणी घटली असून बाज नामशेष होत चालली आहे. बाज विणकाम करणाची कला ही दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. परिणामी विणकाम करणाऱ्या कारागीरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शारीक दृष्ट्या बाजेवर झोपल्याने पाठ दुखीचा कोणताही त्रास जाणवत नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने बाज उत्तम आहे. परंतु हल्ली बाजेला मागणी घटली असून जुने लोकच बाजेला पसंती देतात.त्यामुळं बाजेबरोबर बाज विणण्याची कला ही आता लोप पावत चालली आहे. एक बाज विणन्यासाठी साधारणपणे पाचशे ते आठशे रुपये आकारले जातात. असे विणकाम करणारे कारागीर बबन नानाभाऊ थोरात म्हणाले.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ११८ धावांचे आव्हान ठेवले होते. असे असताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धडाकेबाज फलंदाजी करत हे लक्ष अवघ्या ११ षटकांमध्ये पार केले. यावेळी मार्शने 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर त्याला ट्रॅव्हिसनेही अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता दुसरा सामना १० विकेट्सने जिंकला. याचसोबत आता १ - १ अशी मालिकेत बरोबरी केली आहे. आज ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना हा विशाखापट्टणम येथे झाला. यावेळी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. संपूर्ण संघ हा अवघ्या ११७ धावांमध्ये सर्वबाद झाला. यावेळी एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर अक्षर पटेलने त्यांनंतर २९ धाव केल्या. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने ५ विकेट्स घेत अर्धा संघ तंबूत पाठवला.
रोजगार हमीवरील धामणशेत भागातील १५० मजूरांना तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर मजुरी मिळणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांची दिली आहे. मोखाडा : रोजगार हमीवरील धामणशेत भागातील १५० मजूरांना तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर मजुरी मिळणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांची दिली आहे. त्यांना अर्ज विनंत्या करुनही दाद मिळत नसल्याने लोकमतने त्यांची बाजू २५ एप्रिल रोजी वृत्ताद्वारे मांडली होती. मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत या मजुरांना मजुरी मिळावी म्हणनू उसनवारी करुन तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. धामणशेत येथील १५० धामणशेत कोशिमशेत ग्रुप ग्रामपंचायत मधील धमानशेत येथील १५० मजुरांनी फेब्रुवारी महिन्यात १२ दिवस कृषी विभााग यंत्रनेच्या मजगी चे काम केले परंतु कृषी विभागातील उद्धट अधिकारी त्यांना उडवा उडवी ची उत्तरे देत होती. परंतु याबाबत लोकमत मध्ये २५ एिप्रलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करताच मोखाडा कृषी विभागाचे धाबे दणाणले होते.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील दुसरा सामना सेडन पार्कवर संपन्न झाला. यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानला ९ गड्यांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला सोबतच, पाकिस्तानचा सर्वात अनुभवी फलंदाज मोहम्मद हफिज हा काहीसा दुर्दैवी राहिला. त्याच्यावर अत्यंत दुर्दैवीरित्या ९९ धावांवर नाबाद राहण्याची नामुष्की आली. अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ९९ धावांवर बाद किंवा नाबाद राहणारा तो चौथा फलंदाज ठरला. हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. असद शाफिक व हैदर अली झटपट बाद झाल्यानंतर, मोहम्मद रिजवान व मोहम्मद हफिज यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मात्र, रिजवान हा देखील फार काळ हफिजची साथ देऊ शकला नाही. दुसऱ्या बाजूने नियमित गडी बाद होत असताना, हफिजने आपला अनुभव पणाला लावत एक बाजू लावून धरत पाकिस्तानला सामन्यात जिवंत ठेवले. अखेरच्या षटकात हफिजला आपले शतक पूर्ण करण्यासाठी १८ धावांची आवश्यकता होती. कायले जेमीसन टाकत असलेल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हफिज केवळ एक धाव काढू शकला. दुसऱ्या चेंडूवर इमाद वसीमने एक धाव काढत पुन्हा हफिजला संधी दिली. तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर मात्र हफिजने षटकार, चौकार आणि षटकार वसूल करत १६ धावा काढल्या. परंतु, दुर्दैवाने त्यांची वैयक्तिक धावसंख्या ९९ पर्यंत पोहोचू शकली. पाकिस्तानने निर्धारित २० षटकात १६३ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडकडून सलामीवीर टिम सिफर्ट व कर्णधार केन विलियम्सन यांनी अनुक्रमे ८४ व ५७ धावा काढत न्यूझीलंडला ९ गड्यांनी विजय मिळवून दिला. या नाबाद ९९ धावांच्या खेळीनंतर हफिज त्या चार कमनशिबी खेळाडूंमध्ये सामील झाला जे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९९ धावांवर बाद किंवा नाबाद राहिले आहेत. इंग्लंडचा एलेक्स हेल्स हा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वप्रथम ९९ धावांवर बाद झाला होता. २०१२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्यावर ही नामुष्की आली होती. इंग्लंडचाच ल्युक राईट हा २०१२ टी२० विश्वचषकावेळी अफगाणिस्तान विरुद्ध ९९ धावांवर नाबाद राहिला होता. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० सामन्यात इंग्लंडचा डेविड मलान हा ९९ धावांवर नाबाद राहीलेला. त्यानंतर, आज हफिज या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. विशेष म्हणजे या यादीतील पहिले तीनही खेळाडू इंग्लंडचेच आहेत. महत्वाच्या बातम्याः
31 Jan 2020 1 mins read\nरायगड जिल्हयातील महाड हे महत्वाचे तालुक्याचे गाव आहे. महाडपासून रायगड 24 कि.मी. अंतरावर आहे. रायगडावर स्वतंत्र सिंहासन स्थापून विधीवत समारंभाने छात्रपतीपद धारण करून षिवरायांनी मराठयांच्या राज्याची श्रेश्ठता जगजाहीर केली. या राज्याभिशेकामूळे स्वराज्याची स्..\nकिल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड\nसहयाद्रीतील किल्ल्यांचे महत्व जाणणाÚया षिवरायांनी तोरण्याच्या किल्लेदाराला वष करून तोरणा ताब्यात घेतला. त्यावेळी षिवरायांचे वय होते केवळ 17 वर्शे. तोरण्याची दुरूस्ती करत असताना एका ठिकाणी खणताना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 22 हंडे सापडले. या धनातून ..\nकिल्ले सिंहगड उर्फ कोंडाणा\nशिवरायांचे पराक्रमी वडील शहाजीराजे यांच्या पुणे जहागिरीत येणारा कोंडाणा काही काळ जिजाऊ आणि षिवबा यांच्या वास्तव्याचे ठिकाण होते. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळातच राजगड, तोरणा, पुरंदर यांच्याबरेाबर कोंडाणा षिवरायांनी स्वतःकडे घेतला. या उद्योगाने ..\nआरमाराच्या सहाय्याने समुद्रावर सत्ता गाजवीत कोकणपट्टीत धुमाकूळ घालणाÚया परदेषी सत्तांना उत्तर देण्यासाठी आरमार स्थापण्याची कल्पना महाराजांच्या मनात होतीच आणि मालवणच्या समोरील समुद्रातील 'कुरटे' नावाचे बेट त्याच्या भौगोलिक रचनेने महाराजांन..\nस्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा बाळगून आणि सर्व साथीदारांना आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाने आणि उच्च ध्येयाने भारून टाकून स्वराज्याचा श्रीगणेषा करण्यासाठी राजांची नजर पडली ती प्रथमतः तोरणा आणि मुरंबदेव किल्ल्यांच्या जोडीवर. तोरण्याचा ताबा घेऊन दुरूस्ती करत..\nजिजाऊंच्या पोटी महाराष्ट्रचा भाग्यसूर्य या गडावर 19 फेबु्रवारी 1630 रोजी जन्माला आला. गडावरील षिवाई देवीच्या आषीर्वादाने झालेल्या या बाळाचे नाव देवीच्या नावावरून 'षिवाजी' ठेवण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या सूर्यवंषातील षहाजीराजे आणि श्रीकृ..
आगरा (उत्तर प्रदेश), 15 नोव्हेंबर : एका व्यक्तीने 50 लाखांच्या खंडीणीसाठी आधी मित्राचे अपहरण केले. पण खंडणी मागण्यापूर्वीच पीडितेचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने मित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांला प्रेशर कुकरमध्ये जाळलं. या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरा येथील किरावली येथे राहणारे धर्मेंद्र तिवारी हा संगणक ऑपरेटर होते. ते 18 ऑक्टोबरला अचानक बेपत्ता झाले होते. बरीच शोधा-शोध केल्यानंतरही त्यांचा न लागल्याने धर्मेंद्रच्या वडिलांनी अचनेरा पोलिस ठाण्यात हरवल्याचा अहवाल नोंदविला. पोलिस तपासात धर्मेंद्र अखेर ललित नावाच्या युवकाबरोबर दिसला होता. हे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होतं. त्यानंतर ललितची ओळख पटली. यानंतर पोलिस बिचपुरी मार्गावरील मंगोलिया कॉलनीतील ललित बोडला यांच्या घरी पोहोचले. ललित त्याची आई शालिनी आणि भाऊ रोहितसोबत राहतो. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांची काटेकोरपणे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. कर्ज फेडण्यासाठी ललितने 50 लाखांची खंडणी वसूल करण्यासाठी धर्मेंद्रचे अपहरण केले. ललितने धर्मेंद्रला काही निमित्त देऊन घरी बोलावले. त्याला कॉफी दिली आणि नंतर त्याला इंजेक्शन दिले. यानंतर धर्मेंद्र बेशुद्ध झाला. ललितने धर्मेंद्रचे हातपाय आणि तोंड टेपने बांधले आणि खोलीत बंद केले. तोंड बाधलं असल्यामुळे धर्मेंद्रचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. जेव्हा ललितला हे कळले तेव्हा तो घाबरला. त्यानंतर ललितने धर्मेंद्रच्या शरीराचे लहान तुकडे केले आणि घरात ठेवले. नंतर आरोपींनी हे तुकडे कुकरमध्ये शिजवले. शरीराचे मोठे भाग त्याने नाल्यात फेकले. पोलिसांनी ललितची कसून चौकशी केली असता या सगळ्या प्रकाराचा खुलासा झाला. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Agriculture: शेतीचे धार्मिकीकरण म्हणजे भिकेचे डोहाळे! Agriculture: भरड धान्याला 'श्री धान्य' म्हटले म्हणून उत्पादन वाढत नाही. शेतीला धर्माचा गंध लावण्याचा प्रयत्न केल्यास नुकसानच अधिक होईल. (संपादक, लोकमत, कोल्हापूर) भारतीय संस्कृती, परंपरा, धार्मिक उत्सव आणि सण यांचा कृषी क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. किंबहुना भारतीय संस्कृती ही मुळात कृषी संस्कृती आहे. तिला कोणत्या धर्माचा गंध लावण्याचे कारण नाही; कारण भारतातील हवामान तीन ऋतूंमध्ये विभागले आहे. त्यानुसार शेतीच्या उत्पादकतेचे निसर्गचक्रही निश्चित झाले आहे. त्या निसर्गचक्रात बदल करण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत. खरीप आणि रब्बी हंगामात येणाऱ्या पिकांची थेट वर्गवारी आहे. तसे तापमान असणारे प्रदेशसुद्धा सांगता येतात आणि त्याप्रमाणेच पीकपद्धतीदेखील विकसित झाली आहे. म्हणूनच देशातील एकूण भात उत्पादनापैकी २९ टक्के उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. गव्हाचे उत्पादन पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंदाजपत्रक सादर करताना भारतीय कृषी क्षेत्रातील कुंठित अवस्थेला पुन्हा एकदा हात लावलेला नाही. भारत हा आता लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील एक नंबरचा देश झाला आहे. तरुणांचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजे अन्नधान्याची मागणी अधिक. लोकसंख्या, कृषी क्षेत्रधारणा, कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण, या क्षेत्रात होणारी गुंतवणूक, कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी वाढवाव्या लागणाऱ्या पायाभूत सुविधा आदींचा गांभीर्याने विचार केला आहे, असे अजिबात दिसत नाही. कृषी क्षेत्राला गत वर्षी अठरा लाख कोटी रुपये पतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात दोन लाख कोटी रुपयांची वाढ केली आहे. कृषी मालाच्या व्यापारपेठांतील सुधारणांविषयी एकही उपाय नाही. आयात-निर्यातीच्या धोरणांचा विचार नाही. जो विचार परंपरागत आलेला आहे, तोच राबविण्याचा विचार आहे. कृषी मालाचे दर वाढले किंवा त्याचे उत्पादन घटले की निर्यातबंदी आणि आयातीसाठी व्यापाऱ्यांना सवलती! उत्पादन वाढले की, निर्यातीला प्रोत्साहन नाहीच. उलट महागाई कमी झाली याबद्दल सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते. हे आजवरचे कृषी धोरण आहे. वास्तविक कृषी क्षेत्रावर आजही ६५ ते ७५ कोटी जनता थेट अवलंबून आहे. भारताच्या दहाव्या कृषी गणनेनुसार एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण ८६. २० टक्के आहे. शेतकऱ्यांची ही संख्या ११ कोटी ७२ लाख भरते. मध्यम शेतकऱ्यांची (१ ते ४ हेक्टर क्षेत्र) संख्या १ कोटी ९७ लाख आहे आणि त्यांचे प्रमाण १३. २० टक्के आहे. केवळ ९ लाख ८० हजार शेतकरी पाच किंवा त्याहून अधिक हेक्टर शेतीक्षेत्र असणारे आहेत. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांची संख्या मागील कृषी गणनेच्या आकडेवारीनुसार वाढली आहे. म्हणजे तुकडेकरणाची प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की, कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वेगाने कमी होणे अपेक्षित आहे ते होत नाही. ग्रामीण भागात रोजगाराची संधी कृषी क्षेत्रातच आहे; पण त्या कृषी क्षेत्रातील लोकांचे; पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत. जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारल्यानंतरही आयात-निर्यात धोरणांचा वापर करून शेतमालाचे दर पाडले जातात. सरकार त्याला महागाई नियंत्रणाच्या उपायाचे नाव देते. वास्तविक भारतीय कृषी क्षेत्रात इतकी विविधता आहे की, एखादे पीक पुरेसे आले नाही, त्याचे उत्पादन कमी झाले तरी त्याला पर्याय असतो. भरड धान्याचे असंख्य प्रकार आहेत. या धान्यांच्या उत्पादनवाढीसाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. त्यांच्या चांगल्या बियाणासाठी पुरेसे संशोधन नाही. भरड धान्याला 'श्री धान्य' म्हटल्याने उत्पादन वाढत नसते. ते धान्य भरडून खायचे असते म्हणून त्याला भरड धान्य म्हणतात. श्री या शब्दाचा अर्थ काय? श्रीधान्य असे नाव दिल्याने त्या धान्याच्या नैसर्गिक गुणधर्मालाच छेद दिला जातो. शेतीलाही धार्मिक आयाम देण्याचे प्रयत्न होत आहेत. भारतीय कृषी क्षेत्र नैसर्गिकच आहे. त्याला आधुनिक साज देण्यात आला. १९७२ च्या मोठ्या दुष्काळापर्यंत आपण अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण नव्हतो. मात्र, २०१४ पूर्वीच बहुतांश कृषी उत्पादनात भारत स्वयंपूर्ण झाला होता. तांदूळ, गहू, साखर, आदी कृषी उत्पादने अतिरिक्त होऊन निर्यातही होत होती. नैसर्गिक शेतीला नवे वळण देण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग करण्यात आला. परिणामी नवी संकरित बियाणे आली, रासायनिक खतांचा वापर सुरू झाला, ओलिताखालील क्षेत्र वाढविण्याचा तसेच पडीक जमीन सुधारणांचे मोठे कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामुळे आपण सर्वच उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे जाऊ लागलो. मात्र, हे सर्व करणाऱ्या आणि त्यासाठी कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. याउलट खते, बियाणे, औषधे यांचे भाव प्रचंड वाढू देण्यात आले. अनुदान कपातीचाही परिणाम झाला. अनुदाने न दिल्याने शेतीचा खर्च वाढला. खर्चाच्या प्रमाणात उत्पन्न वाढत नसल्याने नैसर्गिक शेतीची टूम काढण्यात आली. ते करीत असताना नवे संकरित बियाणे, पीक पद्धती, कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा वाढविणे आदी उपाय करावे लागणार आहेत, अन्यथा नैसर्गिक शेती म्हणजे भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि त्यामागून धार्मिक उन्माद, आदी मार्गाने जाणे म्हणजे श्रीलंकेसारखे भिकेचे डोहाळे लागणे होय! हेच धोरण अंदाजपत्रकात दिसते. .
आहात. (आतल्या दरवाज्याकडे बोट दाखवून ) मी काही पहिल्यांदाच येत नाही या मार्गाने. पेट्टरसेनः होय, तुम्ही जाऊ शकता. ( दरवाजा उघडतो) पण हे पाहा, जायचे ते नेहमीच्याच वाटेने. परके लोक आलेत इथे. एकदालः मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे- हं! धन्यवाद, पेट्टरसेन, माझ्या जुन्या मित्रा! धन्यवाद! (हळूवारपणे पुटपुटतो) गाढव! (तो ऑफिसात जातो, तो गेल्यावर पेट्टरसेन दरवाजा बंद करतो.) येनसेनः ऐका तो सुद्धा ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांपैकी आहे का? पेट्टरसेनः नाही, तो फक्त थोड्याशा नकलांचं काम करतो घरी जेव्हा त्या गरजेच्या असतात. नाही पण एक काळ असा होता, हा खूप मोठा माणूस होता, हा म्हातारा एकदाल. येनसेनः होय, दिसतोय खरा, थकलेला, बऱ्या वाईट प्रसंगांतून गेलेला. पेट्टरसेनः होय मग, तो लेफ्टनंट होता, ठाऊक आहे तुम्हाला? येनसेनः राहू दे- तो आणि लेफ्टनंट होता? पेट्टरसेनः होय, ह्यात काहीच चूक नाही. पण नंतर तो लाकडाच्या किंवा कसल्याशा व्यापारात शिरला होता. ते म्हणतात एकदा त्याने वर्ल साहेबांची ओंगळ फसवणूक केली होती. त्या वेळी ते दोघे होयदालच्या कारखान्यात भागीदार होते. मी ह्या म्हाताऱ्या एकदालला चांगलाच ओळखतो. किती तरी वेळा आम्ही मॅडम एरिकसेनबरोबर कडवट दारू आणि बिअरच्या बाटल्या रिचवल्या होत्या. येनसेनः एवढा उधळेपणा करण्याजोगा हा वाटत नाही. पेट्टरसेनः अरे देवा, उधळेपणा करीत होतो तो मी. एके काळी ज्या माणसांनी चांगले दिवस पाहिले होते अशा उच्च कुळातील लोकांशी अदबीने वागायला हवं.
परभणी जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. लोक परिसरात हिरवगार वातावरणामुळे हरणांचं वास्तव्य वाढलं आहे. हरणांची झुंड शेतात नेहमीचं दिसून येते. शेतात चरण्यासाठी आलेल्या अशाच एका हरणावर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केलं. मात्र नागरिकांनी सतर्कता दाखवत हरणाची सुटका केली आणि दुचाकीवरून थेट उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानं या हरणाला जीवनदान मिळालं.
जळगाव । सदैव दक्ष असणार्या व इमाने इतबारे मालकाचे रक्षण करणार्या कुत्र्याचा प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतो. त्याच्या याच प्रामाणिकपणाचा फायदा पोलिस खात्यालाही होत असून, पोलिस खात्यातील श्वानांमुळे अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली आहे. जळगाव पोलिसांकडे असलेल्या हॅप्पी, जंजीर, जॅक व चाम्प या श्वानांनी पोलिसांचे काम बरेच सुकर केले आहे.यातील जॅक हा श्वान अंमली पदार्थाची तस्करी रोखण्याचे काम बजावतो. जॅक हा श्वान जर्मन शेफर्ड, तर हॅप्पी, जंजीर व चाम्प हे डाबरमॅन जातीचे आहेत. पोलिस दलातील हे श्वान म्हणजे जणू काही पर्मनंट कर्मचारीच. त्यांनाही सर्व शासकीय सेवा लागू आहेत. एवढेच नाही तर या श्वानांच्या देखभालीसाठी खास लोकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पोलिस दलातील प्रत्येक कर्मचार्याप्रमाणे 24 तास ऑन ड्युटी राहणार्या या श्वानांमुळे जिल्ह्यातील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस दलाच्या सेवेत कार्यरत असलेल्या श्वानांची दर महिन्याला वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याच बरोबर पशुवैद्यकाने सुचविल्याप्रमाणे त्यावर औषधोपचार देखील केले जातात. त्यांना खाण्यासाठी कंपनीकडून पुरविण्यात येणार्या गोळ्या दिल्या जातात. त्याच बरोबर या श्वानांचा आहार देखील ठरलेला असतो. या श्वानांच्या निगराणीसाठी असलेल्या डॉगमनला देखील पुण्याला 9 महिन्यांचे ट्रेनींग दिले जाते. संपूर्ण महाराष्ट्राचे ट्रेनिंगंसेंटर फक्त पुण्यात शिवाजीनगर भागात आहे. तर संपूर्ण देशभरातील पोलिस, मिलीटरी व इतर सुरक्षा यंत्रणांच्या श्वानांसाठीचे ट्रेनिंग सेंटर ग्वाल्हेर येथील डेक्कनपूर येथे आहे. या ट्रेनिंगमध्ये त्यांना डॉगची हाताळणी कशी करायची, त्याच्याबरोबर कसे रहायचे, त्याची काळजी आणि निगराणी कशी घ्याची याचे प्रशिक्षण देण्यात येते. पोलिस दलात बॉम्ब शोध व गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी श्वानांचा वापर करण्यात येतो. पोलिस दलात दोन प्रकारचे श्वान असतात. त्यात एक आयपीसी व दुसरा बॉम्ब शोधक पथकातील श्वान. या श्वानांची खरेदी पुण्यातील कॅनॉल क्लब येथून केली जाते. त्यानंतर त्यांना 9 महिने पुणे पोलिसांच्या श्वान अकादमीत ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आणले जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी आणल्यानंतर या श्वानांचा गुन्ह्यांच्या तपासात प्रत्यक्ष वापर करून घेतला जातो. पोलिस दलाच्या श्वान पथक विभागात पोलिस उपनिरीक्षक शामराव सोनुले यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचार्यांनी वर्षभराचे प्रशिक्षण झाले असून त्यानुषंगाने ते श्वानांची देखरेख ठेवून घटनेच्या वेळी त्यांच्या हालचाली टिपत असतात. व त्यानुषंगाने गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होते. ा जळगाव शहरामधील समतानगर परिसरातील नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा हत्या करण्यात आल्याची घटना मागील आठ महिन्यांपूर्वी घडली होती. या गंभीर गुन्ह्यात पोलिस दलाच्या हॅप्पी श्वानाने चपळाई दाखवित घटनास्थळापासून शिरसोली रस्त्यापर्यंतचा मार्ग पोलिसांना दाखविला. त्यामुळे संशयिताचा शोध घेण्यास मदत होवून पोलिसांना संशयितापर्यंत पोहचणे शक्य झाले. हॅप्पी या श्वानाच्या या कामगिरीमुळे मुंबई पोलिस महासंचालनालय कार्यालयाने या श्वानाची दखल घेतली असून त्यावर स्वतंत्र स्टोरी तयार करण्यात येणार असल्याचे श्वान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शामराव सोनुले यांनी सांगितले. चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेतील चोरट्यांपर्यंत पोहचण्यास चाम्प या श्वानाची पोलिसांना चांगलीच मदत झाली. चाम्पने दाखविलेल्या मार्गाने पोलिसांनी तपासाला सुरुवात करून संशयित चोरट्यांना गजाआड केले होते.
या प्रकरणात आत्मविचारासंबंधीचे काही गैरसमज तसेच त्यांचे निराकरण यांचा समावेश आहे. 'अद्वैत वेदांत' या भारतीय दर्शनशास्त्रातील सैद्धांतिक प्रणालीचा आजमितीला अंदाजे एका सहस्त्रकापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी सातत्याने उत्कर्षच होत आलेला आहे. रमण महर्षींनी वेळोवेळी ज्या तात्विक सिद्धांतांचे प्रतिपादन केले, त्यांचे अद्वैत वेदांताच्या अनुयायांनी अंगीकारलेल्या भूमिकेशी कमालीचे साधर्म्य असल्याचे दिसते. रमण महर्षी आणि अद्वैत वेदांताचे उपासक यांच्या वैचारिक भूमिकेत बहुतांशी सर्वच बाबतीत एकवाक्यता असल्याचे दिसत असले, तरी तदनुषंगिक बाबी आचरणात आणण्याविषयीच्या त्यांच्या भूमिका मात्र पूर्णपणे वेगळ्या असल्याचे दिसून येते. अद्वैत मताचे गुरूजन बहुधा 'स्वरूप' ही एकमेव वस्तुस्थिती आहे असे मनावर वारंवार ठसवण्यावर आधारित असलेल्या ध्यानपद्धतींचा पुरस्कार करत असले, तरी रमण महर्षींनी मात्र आत्मविचाराचेच ठामपणे प्रतिपादन केलेले दिसते. 'मी ब्रह्म आहे' किंवा 'तो (ईश्वर) मीच आहे' अशी ठाम खात्री देत असलेल्या विधानांचा मंत्रासारखा वापर करणे किंवा क्वचितप्रसंगी अशा महावाक्यांविषयी चिंतन मनन करणे आणि त्यातला गर्भितार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करणे या पेक्षा आत्मविचार ही वेगळी साधनाप्रणाली आहे. आत्मविचाराची सुरूवात 'मी कोण आहे?' या प्रश्नाने होत असल्याने अद्वैतमताचे पारंपारिक अनुयायी असे गृहीत धरताना दिसतात की 'अहं ब्रह्मास्मि' हे या प्रश्नाचे उत्तर आहे. काही अद्वैत मताचे साधक आपल्या मनाला या वैचारिक उत्तराची सतत घोकंपट्टी करण्यात गुंतवून टाकत असल्याचेही दिसते. महर्षी मात्र या खटाटोपाबद्दल स्पष्टपणे असहमती दाखवताना असे स्पष्टीकरण देत असत की 'मी कोण आहे' या प्रश्नाचे तार्किक उत्तर शोधण्यात किंवा एखाद्या तर्कनिष्पत्तीच्या स्वरूपात गवसलेल्या उत्तराची यांत्रिक घोकंपट्टी करण्यात सतत गुंतलेले मन त्याच्या उगमस्थानी बुडून जाण्याची आणि त्याचा लय होण्याची अशा खटाटोपात शक्यताच उरत नाही. याच कारणामुळे 'मी कोण आहे?" या प्रश्नाचा मंत्रवत उपयोग करण्याबद्दलही ते ठामपणे असहमती दाखवत असत. त्यांचे असे ठाम मत होते की या दोन्ही चुकीच्या दृष्टीकोनांमुळे आत्मविचारामागचा मूळ हेतूच साधकाच्या हातून निसटून जातो. महर्षी असे सांगत असत की 'मी कोण आहे' हा प्रश्न मनाचे विश्लेषण करून त्याच्या स्वरूपाविषयी बौद्धिक निष्कर्ष काढण्यासाठी दिलेले आमंत्रण नाही, तसेच तो एखादा सूत्रस्वरूपात गोवलेला मंत्रही नाही. साधकाच्या हाती असलेले ते एक सहज सुलभ साधन आहे, जे बाह्य वस्तुंविषयीचे विचार, वासना आणि आकलन यात गुंतलेल्या चित्ताच्या अवधानाला तेथून परावृत्त करून विचारक किंवा अनुभोक्त्याकडे परत वळवण्यात मोलाची मदत करते. 'मी कोण आहे' या प्रश्नाचे खरे उत्तर मनाच्या अंतरंगात किंवा मनाद्वारे शोधता येत नाही, कारण त्याचे एकमेव खरे उत्तर हे उन्मनी स्थितीची अनुभूतीच आहे असे रमण महर्षींचे ठाम मत होते. आत्मविचाराविषयीचा आणखी एक सर्वदूर पसरलेला गैरसमज हिंदूंच्या एका धारणेवर आधारलेला आहे, तो असा की आपल्याला अनुभवता येत असलेल्या सगळ्या विचारांचा आणि अनुभवांचा जाणीवपूर्वक बुद्धीने अव्हेर करत गेल्यास त्याची परिणती आत्मसाक्षात्कारात होते. वेदांत परंपरेत या साधनेला 'नेति नेति' असे म्हणतात. नेति नेति करणारा साधक 'मी मन नाही', 'मी देह नाही' अशा प्रकारे एक एक गोष्टीचा बौद्धिक पातळीवर अव्हेर करत जातो, या ओघातच आत्मस्वरूप आपोआप आपल्याला प्रकट करेल अशी त्याची/ तिची अपेक्षा असते. काही हिंदू ग्रंथांमधे नेति नेतिलाच 'आत्मविचार' असे नाव दिलेले आहे, त्यामुळे रमण महर्षींनी प्रतिपादन केलेला आत्मविचार आणि नेति नेति यात कित्येकांची गल्लत होताना दिसते. रमण महर्षींचे नेति नेति सारख्या काही पारंपारिक पद्धतींबद्दलचे मत पूर्णपणे प्रतिकूल होते. ते त्यांच्या अनुयायांना अशा पद्धतींचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. महर्षी वेळोवेळी हे बजावून सांगत असत की साधकाने हव्या तितक्या बौद्धिक कसरती केल्या तरी मनापलीकडचा प्रांत अवगत करून घेण्यासाठी त्यांचा तिळमात्रही उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही. प्रश्नः ध्यान आत्मविचारापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणावे का? रमण महर्षीः ध्यानात मनोनिर्मित प्रतिमांचा अंतर्भाव असतो, तर आत्मविचार हा (सगळ्या आभासांमागे दडलेल्या) वास्तविकतेचा शोध असतो. ध्यान ही वस्तुनिष्ठ तर आत्मविचार ही व्यक्तिनिष्ठ बाब आहे. प्रश्नः या (ध्यान, अध्यात्म वगैरे) विषयाच्या बाबतीत आपला वैज्ञानिक दृष्टीकोण असायला हवा. रमण महर्षीः वास्तविक नसलेल्या (मिथ्या, अशाश्वत) गोष्टींचा त्याग करणे आणि वास्तविकतेचा (सत्य, शाश्वत) शोध घेणे पूर्णपणे वैज्ञानिकच आहे. प्रश्नः मला असे सुचवायचे होते की सर्वप्रथम मन, मग बुद्धी, त्यानंतर अहंकार असे क्रमशःच नष्ट होत जात असतील. रमण महर्षीः निजस्वरूप ही एकच गोष्ट वास्तविक सत्य आहे. त्या व्यतिरिक्त सारे आभासी आहे. तुमचे मन किंवा बुद्धी तुमच्यापेक्षा पृथकत्वाने नांदू शकत नाहीत. बायबल सांगते, "निश्चळ व्हा, आणि मी देव आहे अशी प्रचिती अनुभवा". ("बी स्टिल अँड नो दॅट आय अॅम गॉड"). आत्मा हाच परमात्मा आहे हे अनुभवण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे - निश्चळ असणे. प्रश्नः मला 'मी' विषयीचे भान (आत्मभान) असते. असे असूनही माझ्या मागची पीडा काही संपत नाही. रमण महर्षीः तुमचे 'मी' विषयीचे भान शुद्ध आत्मभान नाही. शरीर आणि ज्ञानेद्रियांशी स्वरूपाचे तादात्म्य आहे या भूमिकेतून घेतलेल्या अनुभवांची त्यात भेसळ आहे. आपण अनुभवत असलेली सारी पीडा कुणाला आहे याचा शोध घ्या. 'मी आहे' या जाणीवेभोवती सारा खेळ चाललेला आहे. या जाणीवेतच चित्त स्थिर करा. तसे केल्याने इतर विचारांचा फापटपसारा क्षीण होत जाईल. प्रश्नः (जग मिथ्या आहे असे ठामपणे मानून आत्मविचाराने अंतर्यामी शोध घेत असताना) या गोष्टीची खात्री काय की आजवर अज्ञात असलेली कुठलीशी अनिर्वचनिय गोष्ट अंतर्यामी माझ्या स्वागतासाठी तयार असेल? रमण महर्षीः एखादा साधक पुरेशा पक्व अवस्थेला पोचला की त्याची तशी आपोआपच खात्री होते. प्रश्नः असा अध्यात्मिक विकास मला कसा साध्य होईल?. रमण महर्षीः शास्त्रात याची अनेकविध उत्तरे दिलेली आहेत. मी इतकेच म्हणेन की अन्य कुठल्याही मार्गाने आधी जर काही प्रगती झालेली असेल, तर आत्मविचाराने अधिक वेगाने परिपक्वता प्राप्त होत जाते. प्रश्नः हा विचारांचा एक वर्तुळाकार भोवरा झाला. मी जर पक्व असेन तर मी आत्मविचारासाठी पात्र असेन आणि अशी पात्रता प्राप्त करण्यासाठी मला आत्मविचारच करावा लागेल. रमण महर्षीः मनाचा स्वभावच असा आहे की त्याच्यापुढे सतत अशा अनेक शंका आणि अडचणी उभ्या ठाकतील. मनाला स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या सैद्धांतिक प्रणालीची नेहेमीच गरज असते. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की ज्याला गांभिर्याने आणि तळमळीने ईश्वराचा शोध घ्यायचा आहे किंवा आपल्या निजस्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे अशा साधकाची आंतरिक तळमळच त्या दृष्टीने पुरेशी असते. अशा पक्व साधकाला कुठल्याही सैंद्धांतिक मीमांसेची अजिबात आवश्यकता नसते.
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.
टिन्निटस रिंगिंग, गुप्पींग, क्रॅंकिंग किंवा स्पीडिंग आवाज आहे जो ऐकू येतो एक किंवा दोन्ही कानांनी. टिन्निटसचे वेदना अनेक प्रकारचे आवाज अनुभवू शकतात, ज्याची तीव्रता किरकोळ द्वेषापासून ते कमजोर करणारी वेदना असते. सर्दी आणि फ्लू, गोंगाटयुक्त वातावरणात आणि ऍलर्जी फ्लेअर-अपमुळे टिन्निटस आवाज तीव्रता वाढू शकतो. इतर टिनाटस त्रासांमधे उच्च मीठ आहारात, साखर, कृत्रिम गोड करणारे, दारू, विविध औषधे, तंबाखू आणि कॅफीन यांचा समावेश आहे. अमेरिकन टिन्निटस असोसिएशनने अंदाज वर्तवला आहे की अमेरिकेत 50 मिलियन लोक टिस्नटस अनुभवले आहेत. येथे सामान्य कारणे आणि लक्षणे आहेतः - TMJ (Temporomandibular संयुक्त विकार) - टीएमएस (ट्रान्स्क्रानियल चुंबकीय उत्तेजित होणे) टिनाटसचे प्रत्येक रुग्णाने या परिस्थितीसह वैयक्तिक अनुभव घेतला आहे. काय एक व्यक्ती इतर साठी काम करू शकत नाही साठी आराम लावते. विविध प्रकारचे नैसर्गिक उपचार उपलब्ध आहेत, परंतु टिनिटासच्या पीडित रुग्णांनी उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांची काळजी घेणे आवश्यक आहे. अॅक्यूपंक्चर, क्रोनीओसेकरल थेरपी, चुंबक थेरपी , हायपरबरिक ऑक्सीजन आणि संमोहन हा पर्यायी उपचारांमधील एक आहे ज्यात समग्र चिकित्सकांनी टिन्निटसशी संबंधित असुविधा व वेदना व्यवस्थापित करण्यासाठी काम केले आहे. काही टिनाथिटस रुग्णांना ही उपचारोपचारास उपयुक्त ठरले असले तरी या उपचारांच्या प्रभावीतेवर संशोधन अनिर्णीत झाले आहे. रक्ताभिसरण करणा-या समस्या टायंटसच्या लक्षणे आहेत, द इलस्ट्रेटेड एनसायक्लोपीडिया ऑफ नैचुरल रेमेडीज चार आवश्यक तेले शिफारस करतातः रोजच्या सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुप, सप्रेश, लिंबू आणि गुलाब तेल हेड मसाज, वाफॉर्मर किंवा अरोमाथेरेपी डिफिझर वापरता येऊ शकते. टिंचन बरोबर जंगल असलेला असणे एक भावनिक कर आकारणी अनुभव असू शकते. एखाद्या सल्लागाराशी किंवा एका समर्थन गटात सामील होण्यामुळे भावनिक आधार मिळू शकतो. - जिन्कगो बिलोबा मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील खाद्य विज्ञान विभागाने केलेल्या अभ्यासानुसार, जिन्कगो पानांचे अर्क टिन्निटसच्या उपचारासाठी प्रभावी ठरू शकते. जिन्कगो अर्क व्यापक स्वरूपातील healers द्वारे मोठ्या प्रमाणावर विहित आहे कारण स्मृती आणि एकाग्रता समस्या, गोंधळ, उदासीनता, चिंता, चक्कर येणे, टिंनिटस आणि डोकेदुखी यासारख्या आरोग्यविषयक समस्यांसाठी श्रेणीसाठी उपचार केले जातात. - काळे कोहोष. औषधी वनस्पतींचे ज्ञानकोश टिनेटसला मज्जातंतू स्थिती म्हणून वर्गीकृत करते जे काळ्याशी संगोपन पासून लाभ घेऊ शकते. याव्यतिरिक्त, द इलस्ट्रेटेड एनसायक्लोपीडिया ऑफ नॅचरल रेमेडीजने ब्लॅक कॉहोशला रक्तवाहिन्यासाठी हर्बल उपाय म्हणून किंवा डोक्यात दबाव दर्शविला आहे. - हॉथोर्न हे असे सुचवले जाते की हेथॉर्नचा वापर टिनिटससाठी एक उपाय म्हणून केला जातो कारण तो रक्ताभिसरण प्रणालीसाठी टॉनिक होता. - मेलाटोनिन टिन्निटसच्या व्यवस्थापनात Chieti-Pescara विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका अभ्यासानुसार टेंनिटस संबंधित झोप विकारांविषयी संबोधित करण्यासाठी, सल्लोडक्साइड एकत्रित मेलाटोनिन हे सेंट्रल किंवा सेन्सरिनियल टिनिटसपासून ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक व्यवहार्य उपचार पर्याय आहे. - सिंकोना ऑफिचिनलिस (चीन) ताणतणावा आणि विश्रांती उपचारांना टिनाटसच्या अस्वस्थता आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये हे समाविष्ट होऊ शकतेः - मसाज थेरपी डोके, मान आणि छातीवर लावलेली मालिश सुचविली आहे. - ध्वनी चिकित्सा टिनिटसशी संबंधित त्रासदायक आवाजापासून मास्क किंवा विचलित करण्याचा एक मार्ग म्हणून ध्वनी थेरपी वापरली जाते. यामध्ये पांढर्या आवाज मशीन आणि ध्वनी टेप समाविष्ट होऊ शकतात जे ध्वनी खेळू शकतात जे नक्षत्र पावसाळा, महासागर, वेदना, चिंतन, वारा ध्वनी असतात. टिन्निटस रिटननिंग थेरपी (टीआरटी) टिन्निटस रीट्रेनिंग थेरपी टिनिटसच्या ग्रस्त मुलांना शिकवण्याकरिता वापरण्यात येणारी एक तंत्रज्ञानाची पद्धत आहे ज्यामध्ये टिन्निटसच्या वाईट प्रभावापासून दूर कसे जायचे आहे. वयस्कर विभागाच्या विभागाने पाहणी केलेल्या क्लिनिकल अभ्यासाचे निष्कर्ष दर्शवितात की पारंपारिक सल्ला किंवा गैर-उपचारांच्या तुलनेत टीआरटी अधिक प्रभावी आहे. टिन्निटस टीएमएस (टेंशन माय्योटीसि सिंड्रोम) द्वारे प्रकट होणारी अनेक स्थितींमधील आहे, एक मनोदैहिक विकार. द ग्रेट पेड डिसेप्टचे लेखक स्टिव्हन रे ओझिच म्हणतात की, त्यांच्या कानांचे रिंग टिम्स उपचार घेतल्यामुळे शांत होते. - मॅग्नेशियम आणि पोटॅशियम. द इलस्ट्रेटेड एनसायक्लोपीडिया ऑफ नैचुरल रेमेडीज यांच्या मते, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियमची कमतरता टिन्निटस बरोबर जोडली गेली आहे. व्हिटॅमिन्स ए आणि सी, आणि बायोफॅव्होलायओड्स निरोगी परिभ्रमणास प्रोत्साहित करतात. - झिंक झिंक कमतरता टायनीटसचा अनुभव असलेल्या काही लोकांशी देखील निगडीत आहे, विशेषतः वृद्ध पाच लहान अभ्यासांपैकी चारपैकी असे दिसून आले की जस्ताचे व्यवस्थापन टिनिटसच्या मुक्ततेवर फायदेशीर होते. तथापि, संशोधकांनी निष्कर्ष काढला की पुष्टीकरणासाठी मोठ्या नमुन्यांसह अनुवर्ती अभ्यास आवश्यक होते. - व्हिटॅमिन ए, बी आणि सी . व्हिटॅमिन बी ई . मध्ये समृद्ध, आणि फॉलिक असिड, तिळ, कंदात रिंगाशी संबंधित असलेल्या व्हिटॅमिनच्या कमतरतेसह लोकांसाठी पोषण पूरक म्हणून herbalists द्वारे विहित केलेले आहे. टीपः आपण औषधे घेत असल्यास, औषधी पुरवणी घेण्यापूर्वी आपल्या फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांकडे किंवा इतर आरोग्य सेवा प्रदात्यांकडून तपासा. - > द नैसर्गिक उपचारांचे इलस्ट्रेटेड एनसायक्लोपीडिया सी. नॉर्मन शेली, एमडी, पीएच. डी.
Women's World Cup 2022: टीम इंडिया बांगलादेश विरूद्ध उतरवणार हुकुमाची राणी! महिला वर्ल्ड कपमधील (Women's World Cup 2022) प्रत्येक मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. महिला वर्ल्ड कपमधील (Women's World Cup 2022) प्रत्येक मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. आयपीएल स्पर्धेचे यापूर्वीचे सर्व सिझन खेळलेले 3 भारतीय बॉलर्स यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत खेळणार नाहीत. टीम इंडियाची सेमी फायनलमधील वाटचाल (India Women Semi Final Equation) आणखी खडतर झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वीच भारत-पाकिस्तान मॅचचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमला वचपा काढण्याची संधी आहे. गौतम गंभीरनं तब्बल 9 वर्षांनी विराट कोहलीसोबत IPL 2013 मध्ये झालेल्या भांडणाचं कारण सांगितलं आहे. 11 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आणि तेंव्हा 32 वर्षांच्या असलेल्या त्या स्पिनरकडून फार कुणालाही अपेक्षा नव्हत्या. महेंद्रसिंग धोनीनं (MS Dhoni) तो 7 नंबरची जर्सी का घालतो याचे कारण सांगितले आहे. वूल्मर यांच्या त्या वाक्याला काही तासांनी वेगळाच संदर्भ प्राप्त झाला. त्या रात्रीनंतर ते कधी उठलेच नाहीत. पंजाब किंग्जच्या 5 खेळाडूंमध्ये टीमचं भवितव्य घडवण्याची क्षमता आहे. या खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे खेळ केला तर पंजाबला विजेतेपद दूर नाही. सर्वच क्रिकेट फॅन्ससाठी दोन्ही निकाल अनपेक्षितच होते. पण माझ्यासाठी पाकिस्तानचा पराभव जास्त धक्कादायक होता. त्याची कारणंही अनेक आहेत. .
बॉलीवूडची मस्तानी म्हणून जिला ओळखले जाते त्या दीपिकावर सध्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्याला कारण किंग खानसोबतचा तिचा पठाण चित्रपट. टीझर लॉन्च इव्हेंटमध्ये, संजय लीला भन्साळी यांनी या प्रोजेक्टसह मोठ्या स्क्रीनवरून ओटीटीमध्ये झालेल्या त्यांच्या संक्रमणाबद्दल सांगितले. सलमान खान आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार होता. पण मध्येच 'इंशाअल्लाह' हा चित्रपट अपूर्ण राहिला. बॉलीवूडमध्ये आपल्या सदाबहार गायकीनं श्रेया घोषालनं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. केवळ हिंदीच नाहीतर वेगवेगळ्या भाषांतून तिनं आपल्या अनवट सुरावटीचा आनंद श्रोत्यांना दिला आहे. आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवला जाणार आहे. आज गायक 'केके'चा वाढदिवस आहे. तेव्हा मी भन्साळींना रडताना पाहिले. ते काही म्हणाले नव्हते. फक्त पाठीवर हात ठेवला आणि निघून गेले. संजय लीला भन्साळींनी मला सिनेविश्वात आणले! भन्साळींच्या 'हीरामंडी'त मनीषा कोईराला अन् मुमताज? 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या रिलीजच्या आधीच या चित्रपटाच्या पहिल्याच गाण्याने संपूर्ण देशभरात धूमाकुळ घातला होता. बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला (Bollywood News) पोहचवली होती त्या संजय लीला भन्साळीच्या गंगुबाईला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Mumbai (मुंबई): जर तुम्ही एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू इच्छित असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कारण जेव्हा तुम्ही मॅच्युरिटी पूर्ण होण्यापूर्वी FD स्कीममधून पैसे काढता तेव्हा तुम्हाला काही दंडही भरावा लागतो. मे 2022 मध्ये RBI ने रेपो दरात वाढ केल्यापासून, अनेक बँकांनी त्यांचे AFD व्याजदर अनेक वेळा वाढवले आहेत. गुंतवणूकदारांसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि खात्रीशीर परतावा मिळविण्यासाठी ही चांगली वेळ आहे. या ठेवींमध्ये तुमचे पैसे ठेवण्यापूर्वी, आपत्कालीन परिस्थितीत बँक एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. देशातील अनेक बँका मुदतीपूर्वी एफडी काढण्याचा पर्याय देतात. तुम्हाला रक्कम काढायची असल्यास, तुम्हाला सावकारांना दंड भरावा लागेल, सामान्यतः 0. 5% ते 3%, जो बँकेनुसार भिन्न असू शकतो. एसबीआय 5 लाख रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतपूर्व पैसे काढल्यास 0. 50% दंड आकारते. जर गुंतवणूक रु. 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर बँक तुम्हाला 1% दंड आकारू शकते. FD खाते वेळेपूर्वी बंद झाल्यास HDFC बँक 1% दंड आकारते. तर PNB मुदतीपूर्वी रद्द केल्यावर किंवा सर्व कालावधीसाठी FD अंशतः काढण्याच्या वेळी 1% व्याज दंड आकारते. परंतु साध्या एफडी योजनेच्या बाबतीत, बँक मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणताही दंड आकारत नाही. हेही वाचा :₹75 Coin Launch: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त केंद्र सरकार ₹ 75 चे नाणे लॉन्च करणार आहे. ग्राहकाला रु. 1 च्या पटीत परिपक्वतेपूर्वी कोणतीही रक्कम काढण्याची लवचिकता आहे, एका वेळी किमान रु. 1000 काढणे बंधनकारक आहे. समजा तुम्ही FD स्कीममध्ये 5 लाख रुपये गुंतवले असतील, तर तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी 0. 50 टक्के दराने 2500 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त FD मध्ये 8 लाख रुपये गुंतवले असतील, तर तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यासाठी 1 टक्के दराने 8000 रुपये दंड भरावा लागेल. 'दैनिक महाराष्ट्र 'चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बहुतांश धर्मामध्ये उपवासाला खुप महत्त्व आहे. उपवासाला अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि सायंकाळी उपवास सोडतात. काही उपवास जास्त दिवसांचे सुद्धा असतात. काहीजण उपवासाला फराळ करतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी यानिमित्ताने उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. ३ रोग दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते. ७ जिवनमान उंचावते आणि वाढते. शरीर तरुण राहते. १० कॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबू शकते. १३ केस मजबूत होतात. १४ शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.
विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदी यांच्या व्हिडिओ सोबत करण्यात येणार दावा खोटा आहे. पश्चिम बंगाल मध्ये पीएम मोदी यांच्या निवडणुकांचा व्हिडिओ आता एडिट करून त्यात गर्दी ला ब्लर करून व्हायरल करण्यात येत आहे. विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर पीएम मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये असे दाखवण्यात येत आहे कि पीएम मोदी समोर हाथ वर करून सगळ्यांना अभिवादन करत आहेत पण समोर गर्दीच नाही. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. पश्चिम बंगाल मध्ये पीएम मोदी यांचा एक निवडणुकीचा व्हिडिओ एडिट करून खोट्या दाव्यांसह व्हायरल केला जात आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. पश्चिम बंगाल मधल्या निवडणुकीच्या रॅली चा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला गेला आहे. काय होत आहे व्हायरल? सोशल मीडिया च्या वेग-वेगळ्या प्लॅटफॉर्म वर लोकं पीएम मोदी चा १७ सेकंड चा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. असेच एक Samiran Das नावाच्या ट्विटर हॅन्डल ने २ एप्रिल २०२१ रोजी हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहले, ज्यांना गर्दी नाही दिसत आहे त्यांनी आपले डोळे तपासावे. या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. हाच व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगाल युथ काँग्रेस च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल ने देखील शेअर केला आहे. या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ ला निरखून बघितले. या व्हिडिओ मध्ये आम्हाला कुठल्याच प्रकार चा साउंड मिळाला नाही. या शिवाय व्हिडिओ ची क्वालिटी पण नीट नव्हती. मोदी यांचे शेअर केलेले व्हिडिओ हे चांगल्या क्वालिटी चे असतात. विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ वजा तपास सगळ्यात आधी कीवर्डस च्या मदतीने केला आणि आताच्या निवडणुकांच्या रॅली बद्दल जाणून घयायचा प्रयत्न केला. आम्हाला १ एप्रिल २०२१ रोजी टाइम्स ऑफ इंडिया च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ पश्चिम बंगाल च्या जयनगर मध्ये पीएम मोदी यांच्या झालेल्या एका निवडणुकीच्या रॅली चा आहे. व्हिडिओ च्या शीर्षक मध्ये सांगितले गेले आहे कि रॅली निघणाऱ्या रूट वर लोकांची लोकांची गर्दी दिसली आणि लोकांनी मोदी यांचे स्वागत केले. या व्हिडिओ मध्ये सुरुवातीचे फक्त १७ सेकण्ड दाखवण्यात आले आहे. फक्त फरक इतका आहे कि एक व्हिडिओ क्लिअर आहे आणि त्यात लोकांची नारेबाजी ऐकू येते तर दुसरा व्हिडिओ ब्लर आहे आणि त्यात आवाज ऐकू येत नाही. हा व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता. विश्वास न्यूज ने कीवर्ड सर्च केल्यावर हाच व्हिडिओ आम्हाला बीजेपी च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल च्या पोस्ट वर देखील मिळाला. बीजेपी ने एक एप्रिल २०२१ रोजी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात देखील लोकांची गर्दी स्पष्ट दिसते. विश्वास न्यूज ने या व्हिडिओ संदर्भात भाजप चे वरिष्ठ प्रवक्ता हरीशचंद्र श्रीवास्तव यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी व्हिडिओ सोबत केल्या जाणाऱ्या दाव्यांना खोटे असल्याचे सांगितले. तसेच ते बोलले कि रॅली मध्ये दिसत असणारी गर्दी तर जगजाहीर आहे. त्यांनी सांगितले कि हा एडिटेड व्हिडिओ आहे आणि पार्टी च्या हॅन्डल वर खरा व्हिडिओ पहिला जाऊ शकतो. हा राजनेतिक विरोधकांचा प्रोपोगांडा आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ शेअर करणारे ट्विटर यूजर Samiran Das च्या प्रोफाइल चे स्कँनिंग केले. प्रोफाइल वर दिलेल्या माहिती प्रमाणे यूजर शिलॉन्ग चे रहिवासी आहे. फॅक्ट चेक होत पर्यंत प्रोफाइल ला ४८० फॉलोवर्स होते. निष्कर्षः विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदी यांच्या व्हिडिओ सोबत करण्यात येणार दावा खोटा आहे. पश्चिम बंगाल मध्ये पीएम मोदी यांच्या निवडणुकांचा व्हिडिओ आता एडिट करून त्यात गर्दी ला ब्लर करून व्हायरल करण्यात येत आहे. Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
हा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात. नवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल. तुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील. तुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल. या काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे. आत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विकार संभवतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या भेडसावतील. तुमची मनःशांती ढळलेली राहील.
दिड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटला! अकोलाः वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३. ४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तर आजच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३. ४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, ३ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४८. ९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २. ६५ टक्के आहे. तोरणा ११. ६६, तर उतावळी धरणातील पातळी ३७. ७० टक्के असून, नळगंगा या मोठ्या धरणात १४. ६७ टक्के, पेनटाकळी धरणात १०. ६२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १७. ९५ टक्के, पलढगमध्ये २७. ८३ टक्के, मन धरणात २२. २७ टक्के, तर मसमध्ये शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७६. ४९ टक्के, एकबुर्जी ७२. १० तर सोनल धरणात ९३. ७९ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ ३६. २३ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९१. ९२, अरुणावती ६५. ३९ तर बेंबळा धरणात ३९. ९२ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ७३. ९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९३. ३१ टक्के जलसाठा असून, उमा ९०. ७५, मोर्णा धरणात ४८. ८२ टक्के, तर वान धरणात ८८. ६५ टक्के जलसाठा आहे. काही धरणात अल्प जलसाठा असल्याने प्रत्येकाने पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. ज्या धरणांत भरपूर जलसाठा आहे, तेथे काही प्रमाणात सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. यात अकोला जिल्ह्यातील तीन धरणांचा समावेश आहे. अंकुर देसाई, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.
मुंबई : आज भाजपमध्ये माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित प्रवेश करणार असून नंदूरबारमधून माणिकराव गावित यांना पराभूत करुन हिना गावित खासदार झाल्यानंतर नंदूरबार मतदारसंघात आघाडीचा जोर कमी होत भाजपने वर्चस्व मिळवळे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेसाठी गावितांचा भाजपमध्ये प्रवेश महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान खासदार हिना गावित यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे विजयकुमार गावितांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर गावितांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयकुमार गावित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गावित यांच्यासह नाराज काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची फौज भाजपमध्ये दाखल होत आहे.
व्यक्ति आणि कला संथपणामुळे मैफलीचा भास होत असे. आपल्या गायकीबद्दल त्यांना इतका आत्मविश्वास होता कीं, वेळप्रसंगीं, गातां गातां एखादा अपेक्षित स्वर लागला नाहीं तर तो तिथेंच तोडून ते इतक्या मजेनें परतत असत, कीं त्या परतण्यांतसुद्धां आकर्षकपणा निर्माण होत असे. बालगंधवानी संगीताचा विस्तार वाढविला हैं मराठी रंगभूमीच्या रसनिष्ठ स्वरूपाला विघातक झाले असा एक आक्षेप घेण्यांत आला आहे. बालगंधर्वोचें गाणे रंगभूमीवरून नाहींसें होऊन त्याची धुंदी उतरल्या नंतर कांहीं टीकाकारांनी घेतलेल्या या आक्षेपाचा विचार करतांना, किर्लोस्कर - देवलांच्या नाटकांतले संगीत आणि मानापमानापासूनच्या नाटकांतलें संगीत यांतील भेद लक्षांत घेतला पाहिजे. किर्लोस्कर - देवलांनीं संगीतात्मक संभाषणाच्या दृष्टीनें पदांची योजना केली आणि त्याच दृष्टीनें पदांसाठीं चाली निवडल्या. त्या चाली एकसारख्या वीस वर्षे राबविल्या गेल्यामुळे नव्या चालींची गरज निर्माण झाली आणि आणखी दहा वर्षांनंतर म्हणजे मानापमान नाटकापासून ख्याल गायकीच्या चाली आमच्या संगीत रंगभूमीवर आल्या. मानापमान नाटकासाठीं ख्याल गायकीपेक्षां निराळ्या तऱ्हेच्या चाली निवडतां आल्या असत्या असें अद्याप कोणी सुचविलेलें नाहीं. ख्याली पद्धतीच्या चालीवर केलेल्या पदांना किर्लोस्कर - देवलांच्या पदांप्रमाणे संभाषणांत बेमालूम मिसळतां आलें असतें किंवा त्या चालीवरचीं पदें विस्ताराशिवाय रंजक आणि परिणामकारक करतां आलीं असत असेंही कोणी सिद्ध केलेलें नाहीं. संगीतात्मक सभाषणासाठीं योजलेल्या बहुतेक पदांत गायकीपेक्षां अर्थसौष्ठवाला अधिक महत्त्व असले, तरी 'पुष्पपराग सुगंधित' सारखीं केवळ वर्णनात्मक पदें गायकीच्या दृष्टीनें विस्तारानुकूलही होतीं. उलटपक्षी, ख्याल गायकीच्या रंगतीला विस्तार अवश्य असल्यामुळे ख्याली चालीवर केलेल्या पदांच्या गायनांत साहजिकच विस्ताराला महत्त्व प्राप्त झाले आणि श्रोत्यांच्या अतृप्त वृत्तीमुळे तें दिवसेंदिवस वाढत गेलें. पण ख्याली चालीवरील पदें विस्तारानें गाण्याची पद्धत केवळ बालगंधर्वानींच रूढ केली असे नव्हे, तर गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव, केशवराव भोसले, सवाई गंधर्व, मास्तर दीनानाथ यांनीं सुद्धां विस्तृत गायकीचा अवलंब केला. ख्याल गायकीचा रंगभूमीवर शिरकाव होण्यापूर्वीसुद्धां, किंबहुना १९०८ सालापूर्वी सुद्धां विस्तृत गायनाची प्रथा सुरू झाली होती. नाट्यसंगीताचे तज्ज्ञ श्री. बाबुराव जोशी आपल्या ' संगीतानें गाजलेली रंगभूमि' या पुस्तकांत (पृ. ५२ ) म्हणतात, " पदें घोळून घोळून म्हणण्याच्या प्रघातास या वेळींच सुरुवात झाली. आणि याचें पहिलें महत्त्वाचें उदाहरण म्हणजे केशवराव भोसले यांनी म्हटलेलीं शारदेचीं पदें. "- श्री. भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे माझा नाटकी संसार ' या पुस्तकाच्या तिस-या खंडांत म्हणतात (पृ. २३), " सवाई गंधर्व हे नाट्यकलाप्रवर्तक मंडळींत आले तेव्हांपासून गायनाचा विस्तार वाढू लागला. स्पर्धेला बळी पडून बालगंधर्व देखील गायनाचा विस्तार करूं लागले, अर्थात् केशवराव भोसल्यांनाही तीच प्रथा अस्तित्वांत आणणे भाग पडलें ! गायनाच्या योगेंकरून एखादी चमत्कृति दाखविण्यापेक्षां रसपरिपोषक असें सुस्वरांचें पटल निर्माण करणें ज्यांना योग्य वाटलें आणि ज्यांना अधिक 'वन्समोअर' मिळत होते त्यांचीं पदें इतरांपेक्षां अधिक लांबतात असा अनुभव येणें संभवनीय आहे. पण कोणतें पद लांबवायचें आणि कोणतें नाहीं या संबंधांत बालगंधर्वाचे कांहीं निश्चित संकेत होते. किर्लोस्कर - देवलांच्या नाटकांत जिथें संभाषणाच्या ओघाला महत्त्व आहे अशा प्रसंगीचीं पदें त्यांनीं कधीं लांबविली नाहीत. त्यानंतरच्या ख्याली गायकीच्या पदांत सुद्धां, स्वगतांतलीं पदें किंवा जिथें शेजारी सखी किंवा प्रियकरासारखें पात्र असून संगीताच्या विस्ताराला योग्य असा प्रसंग आहे अर्शी पदें ते विस्तारानें गात असत. शेजारी अधिक पात्रे असून त्यांनीं एखादें पद लांबविलें असेल तर त्याला सुद्धां कारणे असत. ते जी भूमिका करीत असत त्या भूमिकेखेरीज बाकीचीं पात्र प्रेक्षकांच्या खिजगणतींतही राहणार नाहींत असा प्रसंग असावा, त्या प्रसंगासाठी वापरलेली चाल विस्ताराला योग्य असावी आणि त्या प्रसंगीच्या भावनेला गायनाच्या विस्तारामुळे परिणामकारक स्थिरता प्राप्त व्हावी असा योग जमून आला तरच, शेजारी अधिक पात्रे असून सुद्धां, बालगंधर्व कांहीं पदें विस्तारानें गात असत. एकच प्याला नाटकाचें उदाहरण घेतलें
कसे एक मजेदार उन्हाळ्यात कोशिंबीर शिजविणे? हे सोपे आहे! उदाहरणार्थ, lineup मध्ये एक मल्टि रंगीत घंटा peppers वापरून, आपण नेहमी अक्षरश तेजस्वी आणि निरोगी डिश करा. हा लेख एक मजेदार सादर उन्हाळ्यात salads फोटो. प्रस्तावित पाककृती जेवण शिजविणे प्रयत्न करा, आणि कदाचित त्यांना किमान आपण मिळतील. चवदार उन्हाळ्यात कोशिंबीर "विविधता" (फोटो 1) कोशिंबीर मूलभूत रचनाः - दोन peppers (पिवळा आणि लाल); - दोन योग्य टोमॅटो; - दोन ताजे cucumbers; - लाल कांदा अर्धा; - ताज्या तुळस एक घड; - तीन टेबल. ऑलिव तेल; - टिस्पून. मीठ चमचा. भरून साहित्यः - लसूण दोन पाकळ्या; - अर्धा टिस्पून. मोहरी चमचे; - तीन टेबल. spoons 9% व्हिनेगर; - दोन टेबल. ऑलिव तेल; - अर्धा टिस्पून. मीठ; - जोमाने ग्राउंड मिरपूड एक चिमूटभर. तयार करणेः - चौकोनी तुकडे 1,5h1,5 पाहू मध्ये वडी कट आणि मीठ मिसळा. एक खोल तळण्याचे पॅन मध्ये, तेल भाग गरम करावे. browned croutons पर्यंत फ्राय लहान भाग आर्थिक अडचणीत आलेल्या व्यवसायातील. गरज म्हणून काही तेल बंद फुंकणे. - Peppers, टोमॅटो आणि cucumbers लहान चौकोनी तुकडे. - कांदा आणि बारीक लांब उभे काप मध्ये तुळस चिरून घ्यावी. - लसूण बारीक, एक चाकू सह चिरून घ्यावी उर्वरित साहित्य जोडा आणि वस्तुमान झटकून टाकणे भरून झटकून टाकणे. - toasted croutons आणि ostyvshimi एक मोठा वाडगा मध्ये सर्व diced भाज्या मिक्स. flavored सॅलड ड्रेसिंग जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे घालावे आणि ते 5-10 मिनिटे पेय द्या. मधुर उन्हाळ्यात "उधळलेले रंगीत" कोशिंबीर (फोटो 2) कोशिंबीर मूलभूत रचनाः - चार peppers (विविध रंग); - कांदा; - लाल सोयाबीनचे भाग-वेळ कप. भरून साहित्यः - एक लिंबू च्या रस; - तीन टेबल. tablespoons तेल; - टिस्पून. चमचे जिरे; - अर्धा टिस्पून. मीठ; - अर्धा टिस्पून. मध; - एक चिमूटभर लाल मिरची ; - कोथिंबीर काही पाने (पर्यायी). तयार करणेः - सोयाबीनचे पूर्व शिजू द्यावे. त्यातून पळवाट, सुमारे एक तास धुवावे, आखात पाणी (1. 5 एल), उकळण्याची. आपण धान्य सुजलेल्या नाही याची खात्री करा करणे आवश्यक आहे. मग, अतिरिक्त द्रव आणि थंड काढून टाकावे एक चाळणी मध्ये सोयाबीनचे काढून टाकावे. - मिरची आणि कांदा कट चौकोनी तुकडे, कडधान्य आणि सॉस मिसळा. आवश्यक असल्यास, मीठ आणि चवीनुसार मसाले घालावे. चवदार उन्हाळ्यात कोशिंबीर "टरबूज आणि भाजीपाला इंद्रधनुष्य" (फोटो 3) कोशिंबीर मूलभूत रचनाः - दोन पिवळा घंटा peppers; - तीन ताजे टोमॅटो; - जाड sliced टरबूज देह एक पेला; - एक काकडी; - एक मध्यम आकाराचे radishes - 5-6 तुकडे; भरून साहित्यः - दोन टेबल. अंडयातील बलक च्या tablespoons; - तीन टेबल. ऑलिव तेल; - ताज्या मिंट घड; - oregano एक चिमूटभर; - मीठ एक चिमूटभर. तयार करणेः - लहान प्लेट - मिरपूड, टोमॅटो, चौकोनी तुकडे, radishes मध्ये काकडी आणि चीज बारीक तुकडे करणे. - मिंट चाकू बारीक तुकडे करणे आणि मीठ, अंडयातील बलक, तेल आणि oregano मिसळा. - भाजीपाला, टरबूज काप आणि चीज सॉस घाला. हलक्या, साहित्य तळाशी लिफ्ट कोशिंबीर मिक्स आणि लगेच सर्व्ह करावे. सर्जनशील व्हा! तो चवदार उन्हाळ्यात salads अद्भुत पाककृती नाही का? उन्हाळ्यात तेजस्वी इंद्रधनुष्य आवडले! इतरांना एक घटक बदली, आपण सहजपणे बाहेर आला आणि मिरपूड असलेली मधुर dishes विविध शिजविणे करू शकता. जीवनसत्त्वे वर शेअर!
शालीवान शके - 1944, 7 जून 2022, वार - मंगळवार, ज्येष्ठ शु. 7, रास - सिंह, तिथी - शु. सप्तमी, नक्षत्र - पूर्वा, मुलांक - 7, भाग्यांक - 1, राहुकाळ - दुपारी 3 ते 4. 30, या काळात शक्य असल्यास महत्वाची कामे करू नये. विवाहादि मंगलकार्य वर्ज्य नाही. ज्यांचा जन्म 1, 7, 10, 16, 25 या दिवशी झाला आहे त्यांना देवदर्शनाचा योग आहे. आशीर्वाद मिळतील. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना विविध क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल. मात्र स्वार्थी लोकांपासून सावध रहावे. घरी काही कारणाने वादविवादाचे प्रसंग येतील. विनाकारण गैरसमज करू घेऊ नये. मन चंचल असेल. सर्दी-खोकला त्रास देतील. उपाय - मसूरडाळ, गुळ दान द्या. व्यापारी वर्गासाठी लाभदायक दिवस. वारसाहक्काच्या प्रॉपर्टीचा निर्णय होईल. अचानक प्रवास कराल. वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च टाळावा. विद्यार्थी वर्गाचा अभ्यास होईल. जागेचे व्यवहार करण्यास हरकत नाही. उपाय - तुपाचा दिवा देवाजवळ लावून अर्गला स्तोत्र बोलावे. लाभातील हर्षल अचानक सुसंधी देईल. मुलाखतीमध्ये यश मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल, किंवा अचानक देवदर्शन होईल. सरकारी नोकरदारांनी अनितीने वागू नये. प्रेमसंबंधात यश मिळेल. नातेवाईक, शेजारी यांच्याशी संबंध चांगले असतील. उष्णतेचे त्रास होतील. उपाय - आपल्या उंची इतका हिरवा धागा जवळ ठेवून दुसर्या दिवशी झाडाखाली ठेवावा. वडिलोपार्जीत जागेविषयी त्रास होतील. भागीदारीत जपून व्यवहार करावे. नवीन गुंतवणूक करताना दुसर्यांच्या सल्ल्याने जावू नये. प्रेमीजनांना गैरसमजामुळे संबंध बिघडण्याची शक्यता. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. कंबरेचे, मणक्याचे विकार असणार्यांनी काळजी घ्यावी. उपाय - गणपतीला लाल फूल, दुर्वा वाहणे. गुळाचा नैवेद्य दाखवावा. भागीदारीत विनाकारण घाईत निर्णय घेऊ नये. प्रेमसंबंधात बिघाड होण्याची शक्यता. अविवाहितांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे लग्नात बाधा येऊ शकते. दत्तगुरूंना प्रार्थना करावी. चांगल्या लोकांचे सहकार्य मिळेल. मन अस्वस्थ राहील. उपाय - लाल रंगाचा आपल्या उंची इतका धागा जवळ ठेवून संध्याकाळी त्याची वात करून दिवा लावावा. नवमातील रवि, बुध नोकरदारांना बदली, बढतीचे योग देण्याची शक्यता. मान-सन्मान मिळण्याचे योग. परदेशात जाणार्यांसाठी उत्तम दिवस. नोकरीत पैसे देवून-घेवून कामे करू नयेत. कोर्ट-कचेरीत अपयश मिळेल. अॅलर्जीचा त्रास होईल. उपाय - गणपतीला लाल फूले अर्पण करून अथर्वशीर्ष बोलावे. व्यापारी वर्गाला अचानक आर्थिक लाभ होतील. आयटी, इंजिनियर लोकांना नवीन प्रोजेक्टची संधी मिळेल. वेळेचे नियोजन करावे. कौटुंबिक सुख मिळेल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. मित्र-परिवारापैकी महिला वर्गाने वादात मध्यस्थी करू नये. उपाय - गणपतीला 21 लाल अक्षता वाहणे. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. आनंदी उत्साही रहाल. परदेशात जाणार्यांसाठी चांगला दिवस. परदेशात व्यवसाय असणार्यांना आर्थिक लाभ. उधार देवू नये. अचानक नोकरीत चांगले बदल होतील. व्यापारी वर्गाने नवीन गुंतवणूक करू नये. उपाय - देवीकवच, अर्गला स्तोत्र वाचावे. प्रियजनांना एकमेकांचे प्रेम मिळेल. प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस. नातेवाईक, शेजारी, यांच्याशी सलोख्याने वागावे. एखाद्या लहान कारणाने बालंट येण्याची शक्यता. अभ्यासात वेळेचे नियोजन करावे. राजकारणात प्रतिस्पर्ध्याशी वाद होण्याची शक्यता. मौजमजेकडे कल राहील. उपाय - गणपतीला 1 दालचिनीचा तुकडा, 1 मूठ गहू देवळात अर्पण करावे. अचानक प्रतिस्पर्ध्याबरोबर वादाचे प्रसंग उद्भवतील. मनावर, वाणीवर ताबा ठेवावा. वृद्धांना आज प्रेमाची गरज आहे. विशेष काळजी घ्यावी. परदेशात, नवीन प्रांतात जाण्याचे आयोजन कराल. वैवाहिक सौख्य मध्यम राहील. इस्टेट एजंटना आर्थिक लाभ. उपाय - 11 पिवळी फूले गणपतीला वाहणे. स्वताच्या हिंमतीवर प्रोजेक्ट पूर्ण कराल. वैवाहिक सौख्यात जवळच्या व्यक्तींनी गैरसमज करण्याचा योग. प्रेमसंबंधात आज कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. लेखन, कला क्षेत्रातील लोकांना आर्थिक लाभ. मायग्रेनचा त्रास जाणवेल. उपाय - मारूतीला 11 लवंगा अर्पण कराव्यात. महत्वाच्या कामाला अचानक गती मिळेल. जोडीदाराबरोबर प्रवास कराल. ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कला, जाहीरात, हॉटेल व्यवसायात लोकांना आर्थिक लाभ होतील. अभ्यासात दिरंगाई करू नये. उपाय - पिंपळाला दूध, पाणी, तीळ, साखर अर्पण करावे.
नागपूर : नागपुरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळं गळा कापल्या गेल्यामुळं आज एक 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आदित्य भारद्वाज असं जखमी मुलाचं नाव आहे. आदित्य आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून बाईकनं त्याच्या कॉम्प्युटर क्लासला जात होता. तेव्हा त्याच्या बाइकसमोर अचानक हवेतून नॉयलॉन मांजा आडवा आला. त्यामुळं आदित्यचा गळा नॉयलॉन मांजामुळं कापला गेला. रक्त बंबाळ अवस्थेत आदित्य दुचाकीवरून खाली कोसळला आणि बरेच लांब फरफटत गेला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचाराकरीता जवळील स्पर्श हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याची स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दोन महिन्यांपूर्वीच आदित्यच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन झाले आहे. त्यात आदित्यचा नॉयलॉन मांजामुळं झालेल्या अपघातामुळं त्याची आई आणि लहान भावासमोर मोठं संकट निर्माण झाले आहे. या घटनेमुळं बंदी असलेला नॉयलॉन मांजाचा वापर अजूनही काही पतंगबाज करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. यापूर्वी नागपुरात नॉयलॉन मांजानं अनेकांचा जीव घेतला आहे. काही दिवसनपूर्वी एकापोलीस कर्मचाऱ्यालाही नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी व्हावे लागलं होते. कमी पैशांत न तुटणाऱ्या मांजाची सध्या क्रेझ आहे. पतंग उडवणाऱ्यांना हा मांजा आनंद देत असला तरी तो वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कमी जाडीचा मांजा डोळ्याला दिसत नाही. परिणामी मुख्य रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना मांजा कापल्याने जीवघेण्या दुखापती झाली आहेत. त्यामुळे तुमचा शौक दुसऱ्याच्या जीवावर उठत असेल तर सावधान!
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. देशात सध्या करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. दररोजची मोठ्याप्रमाणावर वाढत असलेली रूग्णसंख्या ही चिंताजनक बाब ठरत आहे. करोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी देशाच्या माजी पंतप्रधानांपर्यंत सर्वच अडकत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील करोनाची लागण झालेली आहे. करोनामुळे देशातील दिवसेंदिवस बिकट होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राहुल गांधींकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. आता देखील त्यांनी गृह विलगीकरणात असूनही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ करोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या." असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी नियमांचं पालन करण्याचे देखील आवाहन केले होते. याशिवाय, राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा देखील केली होती. तसेच, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस धोरणावर देखील टीका केलेली आहे. केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. याशिवाय, "केंद्र सरकारची कोविड रणनीती - स्टेज १ - तुघलकी लॉकडाउन लावा, स्टेज २ - थाळी वाजवा, स्टेज ३ - प्रभूगान." अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवरच्या रणनीतीवर टीका देखील केलेली आहे. "ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?" असं देखील या अगोदर राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.
Shakun Shastra : घरात मुंग्या असणे याच्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुंग्या खाण्याच्या पदार्थात पडू नये एवढीत आपण काळजी घेतो. परंतु, शकून शास्त्रात घरात मुंग्या दिसणे शुभ की अशुभ याबाबत सांगितलं आहे. घरातून मुंग्या बाहेर पडणे हे शुभ आणि अशुभ संकेतांशी संबंधित आहे. सहसा काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या अनेक घरांमध्ये दिसतात. जर तुमच्या घरातही अशा मुंग्या दिसत असतील तर त्याला अनावश्यक समजू नका. शकुन शास्त्रामध्ये या दोन रंगांच्या मुंग्यांबद्दल सांगितले आहे. ज्यांच्याशी शुभ आणि अशुभ संकेत जोडलेले आहेत. शकुन शास्त्रात घरात मुंग्या दिसल्यानंतर मिळणाऱ्या संकेतांबद्दल माहिदी देण्यात आलीय. शकुन शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात. जर काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरातून बाहेर पडत असतील तर हे लक्षण मानले जाते की घरात सुख-समृद्धी येणार आहे. यासोबतच तुमचे शारीरिक सुख वाढणार आहे हे देखील एक शुभ लक्षण आहे. कोणत्याही धान्यात काळी मुंगी दिसली तर ती अधिक शुभ मानली जाते. घरी काळ्या मुंग्या दिसल्यास त्यांना साखर किंवा मैदा वगैरे खायला द्यावे. कुन शास्त्रामध्ये घरामध्ये लाल मुंग्या बाहेर येणे अशुभ मानले जाते. हे घरात येणाऱ्या संकटांचे लक्षण मानले जाते. जर घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या येत असतील तर हे सूचित करते की भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल तसेच आर्थिक खर्चही वाढू शकतो. जर काळ्या मुंग्या उत्तर दिशेकडून आल्या तर ते खूप शुभ मानले जाते. दुसरीकडे लाल मुंग्या पूर्वेकडून आल्या तर ते अशुभ मानले जाते. पश्चिमेकडून लाल मुंग्या येणे शुभ असते. हे एक संकेत आहे की तुम्ही प्रवासासाठी जाऊ शकता. मुंग्या वरून खाली येणे देखील शुभ मानले जाते. दुसरीकडे, जर मुंग्या खालून वर जात असतील तर जीवनात प्रगतीचे लक्षण मानले जाते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
Old Note and Coin : आजकाल चलनातून बंद झालेली जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. जर तुमच्याही घरात अशी नाणी किंवा नोट असतील ते विकून तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमची नाणी किंवा नोटा ऑनलाईन वेबसाईटवर विकावी लागतील. अनेकांना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा छंद असतो. पण त्यांचा हा छंद त्यांना आता लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. कारण बाजारात अशी चलनातून बंद झालेली नोटा आणि नाण्यांना प्रचंड मागणी आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी जुनी नाणी आणि नोटा इतकी महाग कशी विकली जात आहेत? पण अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ झाली असल्याने तसेच त्यावर काही विशेष अंक किंवा चित्र असते त्यामुळे अशी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात ठेवली जातात. तुमच्याकडेही चित्रात दाखवलेली नाणी किंवा नोटा असतील तर तुम्ही काही ऑनलाईन वेबसाइटवर ती विकून पैसे कमवू शकता. त्यावरील विशेष चिन्ह किंवा चित्र अशा नाणी आणि नोटांना लाखो रुपये मिळवून देतात. जर तुमच्याकडे माता वैष्णो देवीची प्रतिमा असलेले नाणे असेल तर तुम्हाला हे नाणे रातोरात लखपती बनवू शकते. हे नाणे १ लाख रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी केले जात आहे. असे नाणे आता मिळत नसल्याने ते वाढीव दराने खरेदी केले जात आहे. एक खूप जुने नाणे 10 कोटी रुपयांना विकले गेले होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे नाणे ब्रिटिश भारतातील असल्याचे सांगण्यात आले. ब्रिटीश राजवटीत 175 SSC मध्ये जारी केलेले, आता फार कमी लोकांकडे हे नाणे आहे. अशी दुर्मिळ नाणी आणि नोटा तुम्हाला विकायची असतील तर तुम्ही इबे, क्विकर किंवा कॉइनबाजार ऑनलाईन वेबसाइटवर विकू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल. तसेच त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडील नाणी आणि नोटांचा फोटो अपलोड करावा लागेल. यानंतर खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधेल.
शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा ते १ वाजण्याच्या सुमारास ठोकळ कुटुंबीय झोपेत असताना दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला़ ठोकळ दाम्पत्याला जाग आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून गज, काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ठोकळ यांच्या पत्नीच्या अंगावरील तसेच मुलीच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने असा मिळून २७९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ठोकळ यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला असून, सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले हे पुढील तपास करीत आहेत़ घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, श्रीराम शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले़ मात्र, दरोडेखोरांचा माग काढण्यात श्वानपथकाला अपयश आले़ दरम्यान, त्याच रात्री काशीनाथ आव्हाड व ताजमहंमद शेख (रा. कासारवाडी) यांच्या घरीही चोरी झाली़ ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
लाईव्ह न्यूज : "भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी" बॉलीवुड : ए. आर. रहमानच्या 'उर्वशी-उर्वशी'चे 'रिइमॅजिन्ड व्हर्जन' तुम्ही ऐकले का? बॉलीवुड : सुशांतसिंह राजपूत व जॅकलिन फर्नांडिस का आलेत एकत्र? बॉलीवुड : बॉलीवुड : कधी सुरु होणार 'नायक2'चे शूटींग? बॉलीवुड : श्रद्धा कपूर-आदित्य कपूर एकमेकांना का म्हणतात,'एनीटाईम फ्रेंड्स'? बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फॅशन सेन्सनी केली निराशा! बॉलीवुड : 'दंगल गर्ल्स' सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेखच्या मैत्रीमध्ये शाहरुख खानमुळे का पडली फूट? बॉलीवुड :
आपली जलसंपत्ती ठरते, त्या आधारे आपल्याला काही सिद्धांत, सापेक्ष प्रमाणात तपासता येतील. हिवाळ्यात,हिमालयावरील 500,000, कि.मी. (2500 कि.मी. लांबी X200 कि.मी. रूंदी) एवढी जागा हिमाच्छादित असते. कायम हिमनगांनी व्याप्त भाग बराच कमी म्हणजे सुमारे 50,000 चौ.कि.मी.(2500 कि.मी. X20 कि.मी.) एवढा असतो. ह्या हिमनद्यांमधील बर्फाच्या रुपाने बंदिस्त असलेले पाण्याचे एकूण परिमाण किती आहे याची आपल्याला नक्की माहिती नाही. परंतु साधारण तर्क करता येईल. ते अंदाजे 400 (mhm) म्हणजे सबंध देशभर वर्षाभरात पडणाऱ्या एकूण पावसाएवढे आहे. कृत्रिमरीत्या मोठ्या प्रमाणात काढले तर तो जास्त काळ टिकणार नाही. सुदैवाने ते कसे काढायचे हे अद्याप कोणाला माहीत नाही. परंतु ते काढून घ्यायची एखादी पद्धत शक्य झाली तर हा राखीव साठा आपल्याला आणिबाणीच्या परिस्थितीत वापरता येईत. पावसाळ्यात येणारे पुराचे पाणी रोखून धरण्यासाठी उपाय शोधून काढणे हे जास्त महत्वाचे आहे. हिमालयाच्या मधल्या व खालच्या भागात पडणाऱ्या पावसाचे हिमामध्ये रुपांतर करणे हा एक उपाय आहे. (इष्ट असेलच असे नाही) त्यामुळे नदीचा प्रवाह वेळेवर सर्वत्र सारखा करता येईल. परंतु अद्याप हे कोणाला शक्य झालेले नाही. त्यामुळे आपल्याला नेहमीच्या पद्धतींचा म्हणजे पुराचे पाणी साठवणे, मोठी धरणे, जलाशय बांधणे, यांचा आधार घ्यावा लागेल. त्यांचा उपयोग होत असल्याचे सर्वश्रुत आहे. आपल्याकडे मोठी नैसर्गिक सरोवरे फारशी नाहीत. काश्मीरमध्ये मध्यम आकाराची (दाल, वुलर,सोमरोरी पँगकाँग इत्यादी), लहान आकाराची कुमाऊँ टेकड्यांवर (नैनीताल, भीमताल सिक्कीम मध्ये (यॅमड्रॉक सो, चॅमटोडॉग) आहेत. भारताच्या दक्षिण मध्य भागात काही लहान सरोवरे आहेत. राजस्थानमध्ये उथळ खोलगट जागा आहेत. सांभर सॉल्ट लेक हे सर्वात मोठे आहे. ते आकाराने 250 चौ. कि.मी. असून पावसाळ्यात एक मीटर खोल पाण्याने भरते पण लौकरच सुकून त्या जागी खारट जमिनीचा थर रहातो. ही सर्व सरोवरे स्थानिक लोकांना महत्वाची असून पर्यटकांचे आकर्षण बिंदू आहेत. लोणार सरोवर खड्डयासारखे असून सुमारे 100 मीटर खोल व 2 कि.मी. व्यास आहे. ते डेक्कन बसॉल्ट खडकाळ जातीचे असून त्याला सभोवती कडे आहे. ते अलीकडेच, उल्कापातामुळे निर्माण झाल्याचा शोध लागल्यामुळे त्याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. हे खरे असेल तर काळ्या लाव्हाच्या दगडात उल्कापातामुळे झालेल्या खड्डयाचे ते एकमेव उदाहरण ठरेल. पाणी साठवणे व पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे, ह्या दृष्टीने आपली कृत्रिम सरोवरे जास्त महत्वाची व संख्येने जास्त आहेत. लहान, मोठी धरणे बांधून नदीचे पाणी अडवल्यामुळे ती तयार झाली आहेत.
नेमकी हीच गोष्ट नुपूरला आवडली नाही. त्याने इरा फोनमध्ये बघतानाचा फोटो क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, 'या डिस्ट्रॅक्शन्सला काय बोलू! फोकस कर इरा. 'या फोटोत इराच्या एका हातात फोन दिसत आहे तर दुसऱ्या हातात कैची पकडली आहे. यावर इराने लिहिलं की, 'तू पण बसून खेळतच होतास. ' व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी इराने नुपूरसोबतचे संबंध अधिकृतपणे चाहत्यांना सांगितले होते. कोण आहे नुपूर शिखरे? यापूर्वी इरा न्यूयॉर्कचा संगीतकार मिशल कृपलानी याला डेट करत होती. नुपूरबद्दल बोलायचं झालं तर तो Fitnessism चा संस्थापक आहे. याशिवाय तो फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार आहे. आमिर खानचा तो फिटनेस ट्रेनरही आहे. याशिवाय, गेल्या १० वर्षांपासून तो सुष्मिता सेनचा फिटनेस ट्रेनर राहिला आहे.
बारा ज्योतिर्लिंगः घृष्णेश्वर मंदिराचा नेमका इतिहास काय आहे ? Shravan 2022: घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या मंदिराचे उल्लेख दिसून येतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा 16 व्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला होता. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ. स. 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये (red stone) करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. घृष्णेश्वर मंदिराची वास्तुकला. . घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. या मंदिराचे बांधकाम, 4400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगमंदिर परिसरामध्ये पाच-स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत, जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत. मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवितात. गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीस्वरची मूर्तीही दिसते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा काय आहे ? घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती-पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते, परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही. म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा हिची धाकटी बहीण घुश्मासोबत लग्न केले. वेळ गेला आणि घुश्माच्या गर्विष्ठतेपासून, एक सुंदर मुलाचा जन्म झाला. पण हळू हळू तिच्या हातातून तिचा पती, प्रेम, घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीजं फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले ज्यात घुश्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती. सुधर्माची दुसरी पत्नी घुश्मा, जी भगवान शिवची भक्त होती, ती दररोज सकाळी उठून 101 शिवलिंगे बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे. मुलाची बातमी ऐकून चहूबाजूंनी आक्रोश झाला, पण दररोज प्रमाणेच, घुश्माही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जनकरायला गेली, तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला आला. त्याच वेळी भगवान शिव सुद्धा घुश्माला दिसले, भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घुश्माला वरदान देऊ इच्छित होते. पण घुश्माने सुधेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली. घुश्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. घृष्णेश्वर मंदिराजवळ एक तलाव आहे. ज्याचं नाव शिवालय तलाव असे आहे. भाविक लोक घृष्णेश्वर मंदिरासोबत या तलावाला देखील मोठ्या भक्ती भावाने भेट देतात.
। अलिबाग । वार्ताहर । लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेंतर्गत आनंदो प्रकल्पामार्फत अलिबाग विभागामध्ये बोर्ली, वळके, रामराज, बेलोशी या चार केंद्रामध्ये 8 वी, 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या-पुस्तके, दप्तर, कंपासपेटी, चित्रकला, वही आणि आलेख वही या साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वर्षासाठी संस्थेने बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी अशा चार विभागातून 290 मुलांची निवड केली असून त्या सर्वांना शैक्षणिक साहित्य वाटप केले गेले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मिळून 532 हून अधिक लाभार्थ्यांसमवेत कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पार पडला. या कार्यक्रमाला चंद्रकांत मोहिते उपसभापती पंचायत समिती मुरुड, नितीन पाटील मुख्याध्यापक को. ए. सो. ना. क. गायकर हायस्कूल वळके, बालाजी लाटे शिक्षक, प्रियांका राऊत, सिस्टर जुली चांदी मुख्याध्यापक माउंट कार्मेल हायस्कूल, रोशन मार्तीस, चेतन जावशेन सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली, मयुरेश गावंड, सिद्धार्थ मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत सुरू असलेल्या डीवाय पाटील टी-२० कप स्पर्धेत हार्दिकने शतकी खेळी केली. त्याने ३९ चेंडूत १०५ धावा केल्या. इतक नव्हे तर फलंदाजीनंतर गोलंदाजीत कमाल करत ५ विकेट देखील घेतल्या. वाचा- विराट, तुझे वय झालयं; अधिक सराव कर! अष्ठपैलू हार्दिकने रिलायन्स वन संघाकडून खेळताना ८ चौकार आणि १० षटकार मारत ३७ चेंडूत १०० धावा केल्या. हार्दिकच्या या खेळीमुळे रिलायन्सने सीएजी विरुद्ध २० षटकात ५ बाद २२५ धावा केल्या. त्यानंतर रिलायन्सने सीएजीचा १५१ धावांवर ऑल आउट करत १०१ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद देखील उपस्थित होते. हार्दिक गेल्या ६ महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. आता त्याने धमाकेदार खेळी करत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. याआधी ही दुखापतीनंतर कमबॅक करताना हार्दिकने २५ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या.
यावरून असें झालें कीं, शक्तीस चाकाच्या त्रिज्यनें गुणिलें असतां जो गुणाकार येईल तो अर्ध वजनास कण्याचा जाडा व बारीक भाग यांच्या भिज्यांच्या अंतराने गुणून जो गुणाकार येईल त्या बरोबर असतो. कड् कड़ आणि कग म्हणजे के आणि के यांमधील अंतर अ लहान करून विवक्षितशक्तीनें हवे तेवढें वजन उचलितां येईल. (१२६ ) अनेक चाकें व कणे यांची सांगड-जेमित शक्तीने यंत्राच्या आंगीं फार सामर्थ्य आणावयाचें अ सते तेव्हा अनेक उच्चालकांच्या सांगडीममाणे अनेक चाकें व कणेषांची सांगड करितात. पहिल्या चाकावर शक्ति लावितात. या चाकाच्या फिरण्यानें याचा कणा फिरतो. या कण्याच्या फिरण्यानें दुसऱ्या चाकास फिरवितात, व तेणेंकरून त्याचा कणा फिरतो. या दुसऱ्या कण्या च्या फिरण्यानें तिसरे चाक फिरयितान, व त्याजबराबर त्याचा कणा फि आणि रतो. या प्रमाणें हृवी तितकी चाकें व कणे एकत्र जोडिनात, शेवटल्या कण्यास वजन लावितात. एका चाकाच्या फिरण्यानें दुसन्यास फिरविण्यासाठी म्हणजे एकाच्या गतीने दुसऱ्यास गति देण्याकरितां अनेक रीतींची योजना करितात. परंतु सर्वांत साधारण रीति म्हटली म्हणजे पहिल्या चाकाच्या कण्याच्या परिघावर खांच पाडून त्यावरून दुसऱ्या चाकाच्या परिघावरील खांचेंत एक बळकट दोरी किंवा चामड्याचाचपठा पट्टानेतात. दोरीची किंवा पट्ट्याची शेवटें एकत्र गांठवून किंवा शिवून त्या दोरीस किंवा पट्ट्यास सलग किंवा सतत वर्ति करितात. दोरी किंवा पट्टा यांचे पृष्ठभाग खरबरीत असतात आणि पहिल्याचा कणा व दुसऱ्याचें चाक यांच्या परिघाचे पृष्ठभाग खरबरीत असतात, यामुळे घर्षण घडून कण्याची गति चाकास मिळते. यारीतीने फिरत असणाऱ्या दोन चाकांची सांगड खालील आकृतीत दाखविली
गिलगिट - बाल्टिस्तानशी या पाकव्याप्त काश्मीर परिसरात पाकिस्तानने एक कार्यकारी आदेश (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) काढला आहे. या आदेशाद्वारे या प्रदेशाचे स्वायत्त क्षेत्राचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आता हे अधिकार पाकिस्तानच्या संसदेला देण्यात आले आहेत. त्याशिवाय भविष्यात गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशाविषयी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देण्यात आले आहेत. या सर्वांचा संबंध भारताशी आहे. गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तान संबंधांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. या घटनेचा थेट परिणाम भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेवर पडणार आहे. असे असतानाही माध्यमांमधून त्याविषयी फारशी चर्चा झाली नाही. ही घटना गिलगिट-बाल्टिस्तानशी संबंधित आहे. या पाकव्याप्त परिसरात पाकिस्तानने एक कार्यकारी आदेश (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) काढला आहे. या आदेशाद्वारे या प्रदेशाचे स्वायत्त क्षेत्राचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आता हे अधिकार पाकिस्तानच्या संसदेला देण्यात आले आहेत. त्याशिवाय भविष्यात गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशाविषयी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देण्यात आले आहेत. या सर्वांचा संबंध भारताशी आहे. गिलगिट-बाल्टिस्तान कुठे आहे? गिलगिट- बाल्टिस्तान हे जम्मू-काश्मिरमधीलच एक क्षेत्र आहे. त्याचे क्षेत्रफळ 72 हजार वर्ग किलोमीटर इतके आहे. या प्रदेशाची लोकसंख्या सुमारे 10 लाख आहे. यामध्ये सात जिल्हे आहेत. काराकोरम ही जगातील सर्वांत उंच पर्वतरांग गिलगिट-बाल्टीस्तानमध्येच आहे. त्याचप्रमाणे कांचनगंगा हे प्रसिद्ध शिखरही याच क्षेत्रात आहे. सामरिक दृष्ट्या हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे कारण या प्रदेशाच्या सीमा रेषा चीन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला भिडलेल्या आहेत. सन 1947 मध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी केली आणि जम्मू काश्मीरच्या काही भागावर बेकायदेशीरपणे कब्जा केला. त्यालाच आज आपण "पाकव्याप्त काश्मीर' असे म्हणतो. गिलगिट-बाल्टिस्तान हा या पाकव्याप्त काश्मिरचाच एक अविभाज्य भाग आहे. साहजिकच, भारताचा त्यावर मालकी हक्क आहे. तरीही पाकिस्तानने सन 1963 मध्ये गिलगिट-बाल्टिस्तानचा एक हिस्सा बेकायदेशीरपणे चीनला दिला. सन 1970 च्या दशकामध्ये पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमधील स्थानिक सरकारला काही विशेषाधिकार देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानच्या संसदेत सन 2009 मध्ये स्वतंत्र कायदा करण्यात आला. यामध्ये गिलगिट-बाल्टिस्तानच्या स्थानिक प्रशासनाला स्वायत्त दर्जा देण्यात आला. असा दर्जा देऊन या भागासाठी स्वतंत्र लहानसे विधीमंडळही नेमण्यात आले. तेथे मुख्यमंत्री निवडण्यात आले. आता मात्र पाकिस्तानने या स्वायत्त क्षेत्राचे अधिकार काढून घेतले आहेत. पाकिस्तानचा यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गिलगिट-बाल्टिस्तानला पाचवा प्रांत (प्रोव्हिन्स) बनवायचे आहे. सुरुवातीपासूनच काश्मीरच्या ज्या भागावर बेकायदेशीर कब्जा केला आहे, त्याची पाकिस्तानने दोन गटात विभागणी केली आहे. एक "पाकव्याप्त काश्मीर' आणि दुसरे "गिलगिट बाल्टिस्तान'. अशा प्रकारे ही दोन्ही क्षेत्रे वेगळे करणे हेही बेकायदेशीर आहे. कारण तो जम्मू-काश्मीरचाच भाग आहे. मात्र तो स्वतंत्र करून गिलगिट-बाल्टिस्तानला आपला पाचवा प्रांत बनवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासी यांनी यासाठी दिखावा करताना गिलगिट-बाल्टिस्तानमधील 10 लाख लोकांना सिंधप्रमाणे अधिकार देण्यासाठी, त्यांचा विकास घडवून आणायचा आहे, असे कारण पुढे केले आणि आम्ही जाणीवपूर्वक हा निर्णय घेत असल्याचे सांगितले. तथापि, यामागचे मुख्य कारण स्थानिकांचा आवाज पूर्णपणे दाबून इतर या प्रांतावर कब्जा करण्याचा हेतू आहे. आदेश आत्ताच का? तीन वर्षांपूर्वी चीनने "चीन पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्र' योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. गिलगिट-बाल्टिस्तानमधूनच त्याची सुरुवात होते आहे. याच प्रदेशाची सीमारेषा चीनबरोबर आहे. दोन देशांना जोडणारा भाग असल्याने या प्रकल्पांतर्गत चीनने इथे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीनला या प्रदेशाचा इतिहास माहिती आहे की, हा परिसर मुळात काश्मीरचा भाग आहे आणि त्यावर पाकिस्तानने बेकायदेशीर कब्जा केलेला आहे. त्यामुळे चीनला आर्थिक गुंतवणुकीविषयी चिंता वाटू लागली आहे. हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्याविषयी चीन साशंक बनला आहे. चीन ही गुंतवणूक भारताच्या क्षेत्रात करतो आहे, याची कल्पना संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, युरोप यांसह संपूर्ण जगाला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश पाकव्याप्त काश्मीरपासून वेगळा करून पाकिस्तानचा स्वतंत्र हिस्सा बनवावा, यासाठी चीनने पाकिस्तानवर दबाव आणला आहे. असे केल्याने चीनला या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणे सोपे जाणार आहे. हा आदेश लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चीनी सैन्य गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये येऊ शकणार आहे. या प्रदेशात जे विकास प्रकल्प राबवले जाणार आहे ते सर्व चीनकडूनच राबवले जाणार आहेत. यासाठी चीनी लष्कर तिथे तैनात होणार असल्याने भारताच्या सुरक्षेला जबरदस्त धोका निर्माण होणार आहे. नजिकच्या भविष्यात चीन-पाकिस्तान एकत्रितपणे भारतावर हल्लाही करू शकतात. त्यासाठी ह्या प्रदेशाचाच वापर केला जाऊ शकतो. चीनने हे आर्थिक परिक्षेत्र वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या प्रकल्पालाही जोडले आहे. भारताचा ओबीओआरला विरोध आहे. पण मूळ भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तानलाही चीन ओबीओआरचा भाग बनवत आहे. यातून चीन भारताला आव्हान देत आहे. तिथल्या गुंतवणुकी या कायदेशीर करायच्या असल्याने त्यांनी गिलगिट-बाल्टिस्तानचा स्वतंत्र दर्जा काढून पाकिस्तानचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या घटनेची चर्चा भारतात झाली पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय वजनाचा वापर करत ही गोष्ट जागतिक पातळीवरही जोरकसपणाने मांडण्याची गरज आहे. पाकिस्तान काश्मीरचा प्रश्न विविध आंतरराष्ट्रीय मंचावरून मांडत आला आहे. काश्मीरमध्ये भारत मानवाधिकाराचे उल्लंघन करत असल्याचा कांगावा पाककडून नेहमीच केला गेला आहे. आता भारतानेही गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानवर दबाव येईल. विशेषतः भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेत आता गिलगिट-बाल्टिस्तान हा विषय आला पाहिजे. एकंदरीतच, भारताला यासंदर्भात काही ठोस निर्णय घेणे, संवदेशनशील राहणे आणि देशपातळीवर याची चर्चा होणे आवश्यक आहे. या प्रदेशात पूर्वी शीख शासनकर्ते होते. यानंतर तेथे डेगरा शासनकर्ते होते. तसेच इथला बहुसंख्य समाज हा शियापंथीय आहे. त्यामुळे या सर्वाला त्यांचा विरोध आहे. मात्र त्यांना समर्थन मिळणे गरजेचे आहे. यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे. आज पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला स्वातंत्र्य चळवळ असे म्हणत सर्व ते सहकार्य करत असतो, प्रोत्साहन देत असतो. या माध्यमातून भारतात कारवायाही केल्या जातात. आता तशाच पद्धतीने भारताने गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्थानिकांच्या पाकिस्तानविरोधाला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला पाहिजे.
पुदुचेरी -पुदुचेरीचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. जानकीरामन यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. वयाशी निगडीत आजारांमुळे जानकीरामन यांना काही दिवसांपूर्वी पुदुचेरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जानकीरामन यांची पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील राजकीय कारकिर्द प्रदीर्घ ठरली. ते पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी 1996 ते 2000 या कालावधीत मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी पुदुचेरीत द्रमुक-तामीळ मनिला कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते. उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालक म्हणून सुरूवातीच्या काळात काम करणाऱ्या जानकीरामन यांनी राजकारणात उडी घेतल्यावर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी पुदुचेरी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही सांभाळली. त्यांच्या निधनाबद्दल पुदुचेरी सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी जानकीरामन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. विद्यमान मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जानकीरामन यांचे अंत्यदर्शन घेतले.
सर्वांनाच लेखन-वाचनातून-पुस्तकातून विकासाची वाट सापडेल असे नाही. प्रत्येक मूल वेगळं मानलं तर नक्कीच मुलांना शाळेत आपलेपणा वाटेल. सर्वांनाच लेखन-वाचनातून-पुस्तकातून विकासाची वाट सापडेल असे नाही. प्रत्येक मूल वेगळं मानलं तर नक्कीच मुलांना शाळेत आपलेपणा वाटेल. ते जे काही शिकतायत, करतायत त्यात त्यांना रस वाटू शकेल. शाळेत येणं ही जबरदस्ती न वाटता तो एक आनंदादायी प्रवास ठरू शकेल. ज्ञानीला कोण नाही ओळखत गावात? आणि ज्ञानी कुणाला ओळखत नाही? ज्ञानेश्वरीला गावातल्या सगळ्या खबऱ्या ठाऊक. कोणाकडच्या शेळीला काल पहाटे वासरू झालं इथपासून कोण यंदा ग्रा. पं. सरपंच झालं सगळं तिला बरोब्बर माहीत. गावात कुणी नवीन आलं की ज्ञानीच त्यांना गाव दाखवते. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला तयारीत हमखास पुढे असते. गावात कुठल्याही कार्यक्रमात, लग्नात कामासाठी पुढे सरसावते. तिला तिचा गाव फार आवडतो. तिची ही हुशारी पाहून कित्येकदा संस्थेवाले तिला विचारतात- तुला शहरात नेतो, चांगली शिकशील, मोठी होशील, पण "मला मुळी गावाबाहेर जायचंच नाही. . . " ती तोंडावर सांगते. आम्ही शाळेत का येऊ? निखिल आणि अंकुश नेहमीप्रमाणे शाळेवर उशिराच आले. सरांचा ओरडा खाल्ला- फटके खाल्ले. बाकीच्यांनी त्यांची टिंगलटवाळी केली. ते निमुटपणे पाठच्या बाकावर जाऊन बसले. त्यांना काहीही विचारलं तरी ते कधीच काही बोलत नहीत. जेमतेम तीनचार शब्द. बऱ्याचदा मधल्या सुट्टीत सगळीजण डबा खायला जातात, तेव्हा ही दोघं मात्र खिशात हात घालून इथं तिथं भरकटत बसतात. घुटमळतात शिक्षकांच्या खोलीपाशी. त्यांच्या डोळ्यात सतत एक लख्ख चमक असते आणि चेहऱ्यावर कोरडा करकरीत भाव. एकदा हेमांगी सहज बोलता बोलता म्हणाली, त्यांचे आई-बाबा दोघंही दारू पितात रोज आणि झोडतात त्यांना. त्यांच्या त्याच कोरडेपणात सगळ्याची उत्तरं लपली असावीत. मनीष खूप दांड्या मारतो. केव्हाकेव्हाच शाळेवर येतो. त्याचा आजोबा सुतारकाम करतो. शाळेवरची पोरं सांगत होती. त्या दिवशीच्या सत्रात 'मुडा' कसा बनवतात याची चर्चा चालली होती. 'मुडा' म्हणजे मासे बनवण्याचं साधन. बांबूचं बनवतात. त्याच्या बारीक पट्ट्या तासून एक एक विणावं लागतं. वर्गात पोरं सांगत होती. तेवढ्यात मनीष सांगायला लागला, "अरे आधीच कसा विणायचा? आधी बुटी लावायची, नीट मापून घ्यायचं, मग ना विणत जायचं. " तो खिडकीबाहेरूनच ओरडून सांगत होता. एरवी शाळेत यायला कंटाळणारा हाच मनीष. तो आता खिडकीतून आत वर्गात 'मुडा' घेऊनच आला. सगळ्यांना कसा बनवायचा ते सांगायला. हर्षला कायम पाठच्या बाकावर बसते. इतरांना सोप्पी वाटणारी गणितं तिला सोडवता येत नाहीत. मग सरांचा-मॅडमचा ओरडा खाते. सातवीत असली तरी तिला अजून खणखणीत वाचता येत नाही, याचं तिच्या घरच्यांना वाईट वाटतं. मग ते तिला मारून मुटकून गावच्याच सरांकडे ज्यादा वर्गासाठी पाठवतात. त्यातही ती कसाबसा पळ काढते. वर्गात तिचा पाय ठरत नाही. तिला शाळेत-गावात एक 'उडाणटप्पू' मुलगी म्हणूनच ओळखतात. हिचं काही अभ्यासात लक्ष नाही, दहावी तरी जेमतेम होईल का? . . . पण तीच हर्षला जेव्हा वर्गाबाहेर मैदानात येते; तेव्हा एखाद्या सुसाट रॉकेटसारखी पळते. डोंगर झपझप् चढते. खो-खो खेळताना भल्या भल्यांना हरवते. कपारीतून डोहात उड्या मारते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या छतावर सराईतपणे चढून कौलं नीट करते. तिने शाळेला एकदा जिल्हास्तरीय बक्षीसही मिळवून दिलंय. कुणाच्या घरी सकाळी जेवण शिजतच नाही. कुणाचे घरवाले कामाच्या शोधात शहरगावी भटकतात. कुणी खेळात तरबेज, तर कुणाचे बोलणे सतत ऐकावेसे वाटणारे. कुणी आत्मविश्वासाविना इतकं हरवून गेलेलं. 'शाळा'- 'शिकणं' याभोवती किती तरी पदर आहेत. याची जाणीव ही असंख्य मुलं आपल्याला करून देतात. ज्ञानी, मनीष, हर्षला, अंकुशसारखी किती तरी मुलं-मुली आपल्या आसपास असतीलही. सगळ्यांच्या व्यक्त व्हायच्या जागा वेगळ्या. गरजा वेगळ्या. हे सर्वजण शिक्षणाकडे आशेनं पाहत आहेत. . पाठ्यपुस्तकं तीच असतील, पण या सर्वांपर्यंत ती पोचवताना वेगवेगळ्या संधी निर्माण करू शकू का? (लेखिका 'वयम्'च्या कार्यकर्त्या आहेत. )
भिवंडीमध्ये एक भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. येथे एका अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन जण थोडक्यात बचावले. ते किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. ही हृदयद्रावक घटना 3 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. समोर आलेला व्हिडिओ रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये काही लोक रस्त्याच्या कडेला अरुंद रस्त्यावर उभे असलेले दिसतात. यामध्ये भरधाव ट्रक येतो आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना तुडवत पुढे जातो. भिवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसबीबी परिसरातील फ्रँक हॉस्पिटलबाहेर हा अपघात झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाले असून वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे चालकाचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी चालकाने हा ट्रक आणला होता त्या ठिकाणी मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकाला आम्ही अटक केली आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये चालकाची चूक दिसून येत आहे. त्याच्या वक्तव्याची चौकशी सुरू आहे. त्याचे मेडिकलही झाले आहे.
रहाटणी, दि. ३० (पीसीबी) - दुचाकीवरून जाणा-या तरुणाला दोघांनी आवाज दिला. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण थांबला आणि त्याने चेह-याचा मास्क काढला. यावरून दोघांनी मिळून दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याला चावा घेतला. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री रहाटणी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. बालाजी तुकाराम शिंदे (वय 23, रा. रहाटणी. मूळ रा. एकुरका, पो. कल्लुळ, ता. उदगीर, जि. लातूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज नामदेव सुतार, आशिष उर्फ बारक्या शिंदे (रा. रहाटणी फाट्याजवळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी शिंदे रहाटणी येथील सार्वजनिक शौचालयाजवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आवाज दिला. त्यामुळे फिर्यादी थांबले आणि त्यांनी चेह-याचा मास्क काढला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांना चावा घेऊन जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत 'ऋतूनां कुसुमाकरः' असे संबोधले आहे. कवीवर्य जगदेव तर वसंताचे वर्णन करताना थकत नाहीत. निसर्गाचे आकर्षण एरवी असतेच. पण वसंत ऋतूत त्याचे सौंदर्य जास्त खुलते. आपल्या या सौंदर्य विशेषाने तो आकर्षित करून घेतो. फक्त त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. नेहमीच्या धावपळीच्या जगतातून फुरसतीचे क्षण काढून निसर्गाकडे वळायला हवे. निसर्गाच्या माध्यमातून सतत चलित स्थितीत असणार्या देहाला आराम दिला पाहिजे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवर त्याचा असा काही असर होतो, की सगळी दुःखे, वेदना पार विसरायला होतात. निसर्गाचे हेच सानिध्य कायम मिळत राहिले तर मग काय मानवी जीवनात बहारच येईल. सहाजिकच त्याचा परिणामही दीर्घकाळ राहिल. निसर्गात अहंकाराचा लवलेश नाही. म्हणूनच तो ईश्वराच्या जवळ आहे आणि त्याचमुळे आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो. निसर्ग सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. वसंत असो वा वर्षा वेगवेगळ्या मार्गाने ईश्वरच पृथ्वीवरून हात फिरवत असतो. आणि त्याच्या या चैतन्यदायी स्पर्शाने सृष्टी फुलून निघते. जीवनात प्रभू स्पर्श झाला, त्याचा हात फिरला तर आपले जीवनही संपूर्णपणे बदलून जाईल. जीवनात वसंत येईल. दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणात दूर होतील. ईश्वराच्या स्पर्श झाल्यानंतर आयुष्यात फक्त एकच ऋतू येतो, तो म्हणजे वसंत. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह आणि बुद्धीत चमक व ह्रदयात चेतना निर्माण होते. सर्व सृष्टी चेतनामय वाटू लागते. सृष्टीचे सौंदर्य चाखण्यासाठी दोन डोळेही कमी पडतात, असे वाटते. कदाचित म्हणूनच की काय या काळात विवाह समारंभ होतात आणि विवाह करून आणखी दोन डोळ्यांच्या सहाय्याने आपण या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत असू. सृष्टीचे सौंदर्य आणि युवावस्था एकत्र येथे तिथून निराशा, निष्क्रियता, नीरसता हद्दपार होते. निसर्गाच्या सौंदर्यात व मानवी रसिकतेत ईश्वराचा स्वर न मिसळल्यास मानवी रसिकता विलासी जीवनाचा मार्ग पकडते आणि विनाशाच्या गर्तेत घेऊन जाते. म्हणूनच वसंताच्या संगीतात गीतेचा स्वर मिळायला हवा. वसंतोत्सव अमर आशावादाचेही प्रतीक आहे. वसंताची पूजा करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. शिशिरातल्या पानगळीप्रमाणे निराशाही त्याच्या आयुष्यातून गळून जाते. निराशेने ग्रासलेल्या आयुष्यासाठी वसंत हा आशेचा किरण असतो. पाऊस नसतानाही सृष्टीला नवपालवी फुटविण्याची ईश्वरी किमया वसंतातच साकार होते. म्हणूनच हा वसंत ज्याच्या अंगी भिनला आहे, त्याचे आयुष्य कधीही निराशेने ग्रासले जात नाही. त्याच्या जीवनात कायम वसंत नांदत असतो. भक्ती व शक्तीच्या सुंदर सहयोगातून त्याची जीवनदृष्टीही बदलून जाते. जगणे हेच एखाद्या गाण्यासारखे त्यालावाटू लागते. जीवनातील दुःखांकडे पाहण्याची त्याची दृष्टी विधायक बनते. महापुरूषांच्या आयुष्यात आशेलाच सिद्दीत परिवर्तित करणार्या साधनेचे मोठे महत्त्व आहे. असे लोक कल्पनांच्या राज्यात भरार्या मारणेच नसतात, त्याचप्रमाणे रोजच्या धावपळीच्या जीवनात रसिकतेला स्थान नाही, असे म्हणणारे अरसिकही नसतात. जीवन व वसंताला ज्याने एकरूप केले आहे, अशा व्यक्तीलाच आपली संस्कृती संत म्हणते. जो जीवनात वसंत आणतो, तोच संत असतो. यौवन आणि संयम, संकल्प आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन आणि विसर्जन या सगळ्यांचे समन्वय साधणारा आणि जीवनात सौंदर्य, संगीत व स्नेह निर्माण करणारा वसंत आपल्या जीवनात आला, त्याचवेळी आपण वसंताला पाहिले, अनुभवले आणि आपल्यात रिचवले असे म्हणता येईल.