text large_string |
|---|
सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. नारायण कोल्हे आणि सकूबाई कोल्हे अशी वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. कौटुंबिक वाद आणि पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हे दाम्पत्यासोबत त्यांचा भाचा रामदास भोये हा राहायला होता. यावेळी तो बाहेर असताना त्यांचा नातू वरखेडा येथून आजी-आजोबांना भेटण्यासाठी येऊन गेला होता. पोलिसांनी काळू कोल्हे याला ताब्यात घेऊन बोलते केले. पैशांची मागणी आणि कौटुंबिक वाद यातून त्याने ही हत्या केल्याचे कबूल केले. याबाबत अधिक तपास अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत. |
लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई, 28 जून : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी राज्यात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर ते बोलत आहेत. राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभं राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. - ३० तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. ३० जूननंतर काय होणार आहे. लॉकडाउन हा शब्द आता बाजूला ठेवायचा आहे. - ३० जूननंतर लॉकडाउन उठणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर नाही. - हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहे. पण धोका अजून टळलेला नाही. आपण अनलॉकची सुरूवात केली आहे पण धोका अजूनही कायम आहे. - दुकानं उघडली म्हणून गाफील राहू नका, कोरोना आ वासून उभा आहे. तुम्ही जर घराबाहेर पडला तर कोरोनाचा धोका हा कायम आहे. - काही ठिकाणी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती, ती सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठा, उद्योग धंदे सुरू करण्यात आले आहे. - आपला शेतकरी अहोरात्र अफाट मेहनत करत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी आल्या आहे. यांची गंभीर दखल घेतली आहे. जे बियाणे पेरले ते उगवलेच नाही. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पण पैसे येणार कुठून? - कर्जमुक्ती थांबली होती. त्यानंतर लॉकडाउन लागू झाला त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी पुढे लांबली होती. आता परत कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुन्हा पुरवला जाणार आहे. - ज्या कंपन्यांनी बोगस बियाणे वाटले, त्या कंपन्या दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. - आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे, मी पंढरपूरसाठी चाललो आहे. - आपल्या विठू रायाला साकडं घालणार आहे, राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे. मुख्यमंत्री म्हणून मान वेगळा आहे पण मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर तुमचा प्रतिनिधी म्हणून जात आहे. - दहीहंडी मंडळांनी स्वतःहुन थर न लावण्याचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. याला सामाजिक जाणीव म्हटले जाते. - गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली, त्यांनी एकसुरात सांगितलं की, सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. त्यामुळे यंदा सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा होणार आहे. - अनेक ठिकाणी गणेशची मूर्तीही मोठी असते. त्यामुळे चार फुटांची मूर्ती असावी असा सल्ला मी दिला आहे. त्यामुळे जास्त लोकांची गर्दी जमणार नाही. लोकमान्य टिळकांनी जी चळवळ सुरू केली होती, त्याचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. - प्लाझ्मा थेअरी आपण मार्च एप्रिलपासून सुरुवात केली आहे. सुरुवातीला एकदोन ठिकाणी त्याचा वापर करत होतो. त्यातून सहा ते सात लोकं रुग्ण झाली आहे. - एस क्यू, हायड्रो, रेन्डीझ सह कोरोनावरील आपण सगळीच औषध वापरत आहोत. केंद्राकडे औषध वापरण्यासाठी पाठपुरावा केला होता. फॅविकिल औषधाचा पुरवठा राज्यात वाढवणार आहोत, किंमतीची चिंता करू नका, राज्य सरकार त्यासाठी आहे. - मी आपल्याला आपुलकीने सांगतो. आता सगळी दुकानं सुरू झाली म्हणून सगळं काही सुरू झालं असं समजू नका. आपणहुन कोरोनाला बळी पडू नका, एकमेकांपासून अंतर ठेवा. मॉर्निग वॉकसाठी परवानगी दिली आहे. - लॉकडाउनबद्दल काही शहरं विचारणा करत आहे. पण लॉकडाउन करण्याचा निर्णय हा तुमच्यावर सोपवणार आहे. त्यामुळे काही भागात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागणार आहे. - ३० जूनला पंतप्रधान अन्नधान्य योजना संपत आहे. भगवे रेशन कार्ड आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांना धान्य वाटप केले जात आहे. ही मुदत 3 महिने वाढवण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. |
तुम्ही हिला ओळखलंत का ? 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू होती टाईमपास सिनेमातील प्राजूची मैत्रीण By ऑनलाइन लोकमत । Published: February 18, 2021 11:41 AM2021-02-18T11:41:58+5:302021-02-18T13:46:09+5:30 सध्या झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील नायिका स्वीटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Instagram) स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे अन्विता फलटणकर. (Photo Instagram) अन्विता साकारत असलेली स्वीटूची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. (Photo Instagram) ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावली आहे. (Photo Instagram) अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram) रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. (Photo Instagram) यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. (Photo Instagram) Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. (Photo Instagram) अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. (Photo Instagram) 'चतुर चौकडी' आणि 'रुंजी' या मालिकेतही तिने काम केलं. (Photo Instagram) टॅग्स :झी मराठीZee Marathiशेअर : |
मिशिगन, 07 ऑगस्टः एका व्यक्तीने लिव्ह-इनमध्ये सोबत राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन, तिचा मृतदेह तब्बल सात महिने घरात लपवून ठेवल्याची (Man hid girlfriends body for 7 months) घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील मिशिगनमध्ये घडला आहे. पकडला गेल्यानंतर या व्यक्तीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल (Michigan man kills girlfriend) केला. मॅथ्यू लेविंस्की असं आरोपीचं नाव आहे. 37 वर्षीय मॅथ्यू हा आपली गर्लफ्रेंड जेरी विंटर्स हिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये (Man kills live-in partner) राहत होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेरीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. मॅथ्यूला तिचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. याबाबत त्याने आपल्या मित्राजवळ नाराजी व्यक्त केली होती. ती परत आल्यास आपण तिला घरातच घेणार नसल्याचं मॅथ्यू या मित्राला म्हणाला होता. पुढच्याच महिन्यात, म्हणजे डिसेंबर 2020 मध्ये जेरी मॅथ्यूच्या घरी परत आली होती. यावेळी त्यांच्यात बरेच वाद आणि भांडणे झाली. या भांडणांदरम्यानच मॅथ्यूने जेरीची हत्या (Michigan man killed girlfriend) केली. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे. यानंतर त्याने तिचा मृतदेह तळघरात लपवून (Man hides girlfriends body in basement) ठेवला. एवढंच नाही, तर त्याने या मृतदेहाच्या पाठीच्या त्वचेचा मोठा भाग काढून टाकला होता. या घटनेच्या तब्बल सात महिन्यांनी मॅथ्यूच्या बहिणीला घरातील हा मृतदेह (Man hid GFs body in house) दिसला, ज्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी मॅथ्यूला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये मॅथ्यूने आपणच हत्या केल्याचे कबूल केले. याबाबत शेजाऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की आजूबाजूला गेल्या काही महिन्यांपासून कुबट वास येत होता. मात्र एखादे जनावर मेले असावे असा विचार करुन शेजारी या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करत होते. दरम्यान मीडिया अहवालानुसार, जेरीच्या एका मैत्रिणीने सांगितले, की गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जेरी आणि मॅथ्यूचा साखरपुडा झाला होता. यावेळचे काही फोटोही जेरीने आपल्या फेसबुकवरुन शेअर केले होते, ज्यामध्ये हे दोघेही अगदी आनंदी दिसत होते. मॅकम्ब काऊंटी जेलमधील माहितीनुसार, मॅथ्यूवर हत्येसोबतच बॉडी म्युटेशनचाही (Body Mutation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच मृतदेहाची हेळसांड केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
Raj Thackeray :मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना खास आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, दरवर्षी 14 जून रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कार्यकर्ते मला भेटायला येतात आणि शुभेच्छा देतात. त्यावेळी तुमचे येणे, तुमचा अभिवादन ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे पण तरीही महाराष्ट्राचे जवान पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात पण या वर्षापासून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कृपया पुष्पगुच्छ, मिठाई किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. राज ठाकरे म्हणाले, "तुम्हाला काही आणायचे असेल तर रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणा, मग ती पुस्तके किंवा कोणतेही छोटे शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही जी रोपे द्याल ती आम्ही विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य आणू. भेट म्हणून आम्ही ते तुमच्या पक्षातील गरजू विद्यार्थ्यांना भेट देऊ. तुम्ही माझ्या विनंतीचा आदर कराल याची मला खात्री आहे. मी सकाळी 8:30 ते दुपारी 12:00 या वेळेत उपस्थित राहीन. 14 जूनला भेटूया विनम्र राज ठाकरे. राज ठाकरे 14 जून रोजी 55 वर्षांचे होतील. दरम्यान, आता राज ठाकरेंनी केलेल्या या आवाहनाला मनसे कार्यकर्ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नाले आणि नद्यांच्या दुर्दशेसाठी स्थलांतरित मजुरांना जबाबदार धरले होते. दादर येथे त्यांच्या पक्षाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेच्या पाचव्या पायाभरणी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, स्थलांतरित मुंबईत येतात आणि या नाल्या आणि नद्यांच्या आजूबाजूला 'बेकायदेशीरपणे' झोपड्या बांधतात, त्यामुळे धोका निर्माण होतो आणि सुविधांवर भार पडतो. |
नूह-मेवात, 5 एप्रिल : देशात दिवसेंदिवस महिला विरोधी अत्याचारांच्या (Crime against women) घटना वाढतच चालल्या आहेत. अगदी कौटुंबिक हिंसाचारापासून बलात्कारापर्यंतच्या (Rape) अनेक घटना देशात दररोज नोंदवल्या जात आहे. कडक शासन करूनही गुन्हेगारांना काहीही फरक पडत नाही. अशातचं एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला (Rape on minor girl) आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे पीडितेच्या घरच्यांनी याला विरोध केला असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना हरियाणातील नूह-मेवात येथील आहे. पुन्हाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 13 वर्षीय मुलीवर एका युवकाने पाशवी बलात्कार केला आहे. त्याने पीडित मुलीला बंदुकीचा धाक दाखवत भुसाच्या खोलीत नेवून तिच्यावर बलात्कार केला. संबंधित आरोपी पीडितेच्या गावातीलच रहिवासी आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीची 13 वर्षीय मुलगी शनिवारी सायंकाळी शौचासाठी जंगलाच्या दिशेनं गेली होती. यावेळी गावातील वकिल नावाच्या युवकानं तिला जबरदस्ती पकडलं आणि बंदुकीचा धाक दाखवत जवळच्याच एका भुसाच्या खोलीत नेलं. त्याठिकाणी आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीचा ओरडल्याचा आवाज ऐकून पीडितेचा काका घटनास्थळी दाखल झाला. त्याने आरोपीला रंगेहाथ पकडलं. (वाचा - प्रियकराने न्यूड फोटोची केलेली मागणी जीवावर बेतली; अल्पवयीन मुलीची आत्महत्या) परंतु आरोपीनं फारूखवरच हल्ला केला. तो एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने आणखी अर्धा डझन लोकांना फोन करून बोलावून घेतलं. आणि त्याने आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने फारूखला दांडक्यांनी मारहाण केली. याची माहिती मिळताच कुटुंबातील अन्य सदस्यही घटनास्थळी पोहचले. आरोपींनी त्यांच्याशीही वाद घालत त्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
अभिनेत्री अदिती राव हैदरीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये शाही भूमिका साकारल्या आहेत. आतापर्यंतच्या या सर्व भूमिकांमध्ये 'पद्मावत'मधील मेहरुनिसा आणि नुकतीच आलेली 'ताज डिव्हाइडेड बाय ब्लड' या वेबसीरिजमधील तिची अनारकली भूमिका चांगलीच गाजली. महत्त्वाची बाब म्हणजे अदिती खऱ्या आयुष्यात एका शाही कुटुंबातील आहे. अदितीचं कुटुंब हैदराबादमध्ये आहे. अदितीचे पणजोबा अकबर हैदरी १८६९ ते १९४१ पर्यंत तत्कालीन स्थापित झालेल्या हैदराबाद राज्याचे पंतप्रधान होते. तर अदितीचे काका आसामचे माजी राज्यपाल होते. अदितीची आई विद्या राव या ठुमरीच्या शास्त्रीय गायिका आहेत. अदितीच्या आईच्या वडिलांचं अर्थात तिच्या आजोबांचं घर एक शाही घराणं आहे. तिचे आजोबा जे. रामेश्वर राव हे वानापथीचे राजे आणि हैदराबाद येथील निजामाच्या राजदरबारातील कुलीन होते. अदितीचं आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसोबत एक खास नातं आहे. अदितीच्या आईचे वडील किरण रावचे आजोबा होते. अदिती आणि किरण राव या दोघी नात्याने बहीण लागतात. दोघीही अनेकदा एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात. अदितीने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं आहे. तिने वयाच्या सहाव्या वर्षी भरतनाट्यम शिकण्यास सुरु केलं होतं. त्यानंतर ती भरतनाट्यममध्ये उस्ताद लीला सॅमसन यांची शिष्या बनली. |
सोलापूर : सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (Central Reserve Police Force, CRPF) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. सीआरपीएफने वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर) (Medical Officer) पदे भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सीआरपीएफच्या विविध युनिटमध्ये एकूण 16 पदे नियुक्त केली जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट crpf. gov. in वर अधिसूचना वाचू शकतात, त्यानंतर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. (CRPF recruitment for the post of Medical Officer will be interviewed) केंद्रीय राखीव पोलिस दलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. ही मुलाखत सोमवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता घेतली जाईल. मुलाखतीच्या फेरीसाठी उमेदवारांना जीसी, सीआरपीएफ, श्रीनगर (जम्मू व काश्मीर) येथे पोचावे लागेल. यासह उमेदवारांनी ठरलेल्या वेळेत पोचण्याची विशेष काळजी घ्यावी. वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित असताना उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांची मूळ आणि फोटोकॉपी (डिग्री सर्टिफिकेट, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्रे आदी) आणली पाहिजे. यासह साध्या कागदावर अर्ज करताना त्यात अर्ज करणाऱ्या पदाचे नाव आणि पाच पासपोर्ट आकाराचे फोटो देखील लावावे. या व्यतिरिक्त अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार सीआरपीएफची अधिकृत साइट तपासू शकतात. मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे; तसेच त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. त्याचबरोबर या पदावरील उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 75,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे. |
पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. हा असा सामना होता ज्यात शेवटच्या दिवशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कसोटी सामना अनिर्णित घोषित झाला, त्यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने दुसऱ्या डावात 9 गडी गमावून 304 धावा केल्या होत्या. यजमानांना सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज होती. अजून तीन षटके टाकायची होती. अशा स्थितीत पंच अलीम दार यांनी पुरेशा प्रकाशाअभावी सामना सुरू ठेवणे योग्य मानले नाही. त्याने लाईट मीटरने लाईट तपासली. यानंतर, द्वितीय क्षेत्रीय पंच अॅलेक्स वार्फ यांच्याशी सल्लामसलत करून, पाचव्या दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित करण्यात आले. ज्यासाठी अलीम दार यांना सोशल मीडियावरही ओढले गेले. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा दोन्ही संघांमधील सामन्याचा निकाल प्रत्येक चेंडूवर बदलत होता, तेव्हा स्टेडियमचे स्टँड प्रेक्षकांविना रिकामे होते. कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, पाचही दिवस प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य होता. साहजिकच पाकिस्तानच्या भूमीवर खेळलेली ही वर्षातील शेवटची कसोटी होती. असे असतानाही प्रेक्षकांनी सामना पाहण्यात रस दाखवला नाही. सामन्यादरम्यान मैदानावर मोजकेच प्रेक्षक दिसले. ज्या वेळी सामन्याचा निकाल चेंडूवर चेंडू बदलत होता, त्यावेळी कराचीचे नॅशनल स्टेडियम प्रेक्षकांविना रिकामे होते. हा असा सामना होता ज्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. एक उत्कृष्ट आणि संस्मरणीय चाचणी ज्याकडे कराचीच्या प्रेक्षकांनी लक्ष दिले नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका अनिर्णित राहिली. या मालिकेतील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान कराचीत खेळला गेला. ज्यामध्ये पाकिस्तानने पहिल्या डावात 438 धावा आणि दुसऱ्या डावात 8 विकेट्सवर 311 धावा करून डाव घोषित केला. तर न्यूझीलंडने पहिला डाव 9 विकेट्सवर 612 धावा करून घोषित केला. त्याचवेळी दुसऱ्या डावात एका विकेटवर 61 धावा झाल्या. अशा प्रकारे पहिली कसोटी अनिर्णित राहिली. दुसरीकडे, दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने पहिल्या डावात 449 धावा आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स 277 धावा करून डाव घोषित केला. तर पाकिस्तानने पहिल्या डावात 408 धावा आणि दुसऱ्या डावात 9 गडी बाद 304 धावा केल्या. |
ठाणे : ओडिशा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओडिशा आणि महाराष्ट्रातील गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचाच गैरफायदा बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांकडूनही घेण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी अशा बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनीही गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाईचे आदेश बजावले आहेत. दरम्यान, ठाण्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना २ सप्टेंबर रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे घोडके यांच्यासह निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने घोडबंदर रोडवरील कासारवडवली भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या प्रशांत आणि अरमान या दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत. ठाणे पोलिसांनी एका आठवड्यात ही तिसरी कारवाई केली असून यापूर्वीही ठाणेनगर पोलिसांनी ओडिशातून गांजा आणणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे. |
याप्रमाणे केंद्रशासन कृती करेल का ? चिंचवड (पुणे) : चीन हा भारताशी नेहमीच आक्रमक राहिला आहे. १९६२ च्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या अहिंसेच्या भूमिकेमुळे चीनकडून भारताला पराभूत व्हावे लागले. आताही चीन त्यांच्या वस्तू भारतीय बाजारपेठेत आणून भारताच्या लघु उद्योगांना कमकुवत करत आहे, तसेच ब्रह्मपुत्रा नदीवर धरणे बांधून पाणी अडवत आहे. भारताला अंतर्गत आणि बाहेरून कमकुवत करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. हा धोका ओळखून शासनाने सैन्याला आधुनिक शस्त्रांनी युद्धसज्ज करावे, असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी केले. येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे 'भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला धोका' या विषयावर ते बोलत होते. अंतर्गत सुरक्षेविषयी ते म्हणाले की, केवळ राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा करू नये. स्वतःचे वैयक्तिक दायित्व समजून प्रत्येकाने राष्ट्राप्रती सजग असणे आवश्यक आहे. चिनी वस्तू बहिष्कृत करणे आवश्यक आहे. पाकिस्तानकडून शांततेची अपेक्षा करणे म्हणजे, शून्याला भागण्यासारखे आहे. नेहरूंपासून मोदींपर्यंत प्रत्येक नेत्याने त्यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले; पण त्याचा परिणाम हा शून्यच आहे. (हे केंद्रशासनाला का कळत नाही ? - संपादक, दैनिक सनातन प्रभात) |
भोपाळ :- मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आता केवळ भूमिपुत्रांनाच सरकारी नोकरी मिळेल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज (१८ ऑगस्ट) ला ही घोषणा केली. यासाठी कायदेशीर पावलं उचलली जातील असं शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) म्हणाले. शिवराज सिंह चौहान यांनी एक व्हिडीओ व्हायरल (video viral) करून ही माहिती दिली. ते म्हणाले की, यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील. मध्य प्रदेशातील साधनसामुग्री केवळ राज्यातील मुलांसाठीच असेल. आतापर्यंत मध्य प्रदेशासाठी सरकारी नोकरभरतीसाठी देशपातळीवर अर्ज मागवले जात होते. नुकतेच एका नोकरभरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागवले होते. मध्य प्रदेशातील तरुणांनी याचा तीव्र विरोध केला होता. याआधी कमलनाथ सरकारने उद्योगांमध्ये स्थानिकांना ७० टक्के रोजगार देने अनिवार्य केले होते. कमलनाथ सरकारच्या नियमानुसार, मध्य प्रदेशातील ७० टक्के स्थानिकांना रोजगार दिला तरच सरकारी योजनांमध्ये उद्योजकांना करामध्ये सूट मिळणार आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यावर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. मात्र इतर राज्यांमधून जे लोक मध्य प्रदेशात राहून काम करत आहेत, त्यांच्यासाठी कोणते नियम असतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. नवीन नियम कधी लागू होणार याची घोषणा अजून झालेली नाही. यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. आतापर्यंत एमपीपीएससी आणि इतर नोकऱ्यांमध्ये देशभरातून अर्ज येत होते. सगळ्यांसाठी नियम समान होता. परंतु या नव्या नियमामुळे आता केवळ मध्य प्रदेशातील नागरिकांनाच सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. |
रबकवी-बनहट्टी (कर्नाटक) - हिजाब प्रकणामध्ये धर्मांधांनी हळिंगळीच्या अल्लमप्रभु प्राथमिक शाळेतील शिक्षक मंजुनाथ नायक यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यामुळे ते गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर बागलकोटच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे हिजाबच्या प्रकरणावरून निदर्शने करतांना दगडफेक करण्यात आल्यानंतर लोखंडी सळीद्वारे हे आक्रमण करण्यात आले. 'आक्रमण करणार्यांना व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या साहाय्याने ओळख पटवून पकडण्यात येईल', असे पोलीसांनी सांगितले. |
Kerala । High Court । : केरळमधील ख्रिश्चन समाजाच्या परंपरेवर तेथील कोट्टायम न्यायालयाने बंदी घातली आहे. भाऊ-बहिणीचे लग्न करण्याची परंपरा आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, ही धार्मिक बाब नाही, त्यामुळे ही परंपरा बंद करा. ही बाब चुलत भाऊ, चुलत भाऊ, चुलत भाऊ अथवा दूरच्या नातेवाईकांशी संबंधित नाही, तर ती खऱ्या भाऊ-बहिणीशी लग्न करण्याच्या परंपरेशी संबंधित आहे. मर्यादित क्षेत्रात मर्यादित लोकसंख्या असलेला हा समाज या परंपरेमागे वेगळे कारणही देतो. भाऊ-बहिणीचे लग्न लावण्याच्या परंपरेमागील त्यांचे तर्क सर्वांनाच चकित करू शकतात. वास्तविक, केरळमध्ये राहणारा हा असा ख्रिश्चन समुदाय आहे जो स्वतःला जातीपासून अत्यंत शुद्ध समजतो. या समाजात आपली पवित्रता टिकवून ठेवण्यासाठी खरे भाऊ-बहीणही एकमेकांशी लग्न करतात. कनानईट कॅथोलिक समुदायाचा उगम ७२ ज्यू-ख्रिश्चन कुटुंबांकडे आहे जे मेसोपोटेमिया येथून 345 एडी मध्ये कनानच्या व्यापारी थॉमससोबत येथे आले होते. किनाई नंतर कन्या बनल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. केरळमधील कोट्टायम आणि त्याच्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये या समुदायाचे सुमारे 1. 67 लाख लोक आहेत. यापैकी 218 पुजारी आणि नन्स आहेत. या समाजातील लोक आपली जातीय शुद्धता राखण्यासाठी सहसा समाजाबाहेर लग्न करत नाहीत. जर कोणी समाजाबाहेर लग्न केले तर त्याला समाजातून बहिष्कृत केले जाते. एवढेच नाही तर त्याला चर्च आणि स्मशानभूमीत जाण्यासही बंदी आहे. समाजाबाहेर लग्न करणारी व्यक्ती या समाजातील इतर विवाह आणि कार्यक्रमांना, अगदी नातेवाईकांच्या लग्नालाही जाऊ शकत नाही. समाजातून हकालपट्टी करून पुन्हा समाजात येण्याचीही अपवादात्मक परिस्थिती आहे. जर या समाजातील मुलाने बाहेरच्या मुलीशी लग्न केले आणि त्या बाहेरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला समाजात परत घेण्याचीही तरतूद आहे पण त्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. अट अशी आहे की, मुलाला पुन्हा आपल्या समाजातील मुलीशी लग्न करावे लागेल. दुसरी अट अशी आहे की जर पहिल्या पत्नीला (बाहेरील मुलगी) मूल असेल तर तिला समाजात आणता येणार नाही. 'दैनिक महाराष्ट्र 'चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा! |
रत्नागिरी(प्रतिनिधी): कोकणात येऊ पाहणाऱ्या कारखान्यांना आणि प्रकल्पांना विरोध करण्याची अनेक आंदोलने झाली परंतु एखाद्या प्रकल्पाची उभारणी करा अशी मागणी करण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी लढा देण्याचा निर्धार केला आहे. आपले समर्थन जिल्हा प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी एकत्र एकवटत २० जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सेनेच्या राजकारणामुळे जिल्ह्यातून हद्दपार झालेला नाणारचा प्रस्तावित तेलशुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) परत आणण्यासाठी प्रकल्प समर्थकांनी कंबर कसली आहे. प्रचंड रोजगार निर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प याच जिल्ह्यात उभारला जावा यासाठी रत्नागिरी शहरातील व्यापारी, हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक संघटित झाले असून प्रकल्पाच्या समर्थनासाठी संपूर्ण जिल्ह्यात लोकमत संघटित करण्याची पावले पडू लागली आहेत. रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी शुक्रवारी एक बैठक घेऊन प्रकल्प परत आणण्याच्या चळवळीचा कृती आराखडा आखला. त्यानुसार जुलैच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे २० तारखेला प्रकल्प समर्थकांचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे. त्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता माळनाक्यापासून या मोर्चाचा प्रारंभ होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो नेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्प समर्थकांतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्च्याच्या आयोजनाबरोबरच प्रस्तावित प्रकल्प परिसरातील जनतेला प्रकल्पाची शास्त्रोक्त माहिती देऊन त्यासंबंधीचे गैरसमज नाहीसे करणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील व्यावसायिक आणि आम जनतेचे समर्थन मिळविणे तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हावासियांच्या भावना शासनासमोर मांडणे ही उद्दिष्ट्ये डोळ्यांपुढे ठेवून हा कृती आराखडा आखण्यात आला आहे. 'कोकण जनकल्याण प्रतिष्ठान'चे सचिव अविनाश महाजन, निमंत्रक कौस्तुभ सावंत, आनंद जोशी यांसह सर्वश्री महेंद्रशेठ जैन, दिनेश जैन, केशव भट, राजेश शेट्ये, राजेंद्रशेठ जैन, निलेश मलुष्टे, संतोष तावडे, प्रमोद खेडेकर, मनोज पाटणकर, दीपक साळवी, राजीव लिमये, सुहास ठाकूरदेसाई, राजेंद्रप्रसाद मसुरकर, अमोल लेले इत्यादी मान्यवर रत्नागिरीकर या सभेला उपस्थित होते. 'नाणार जाणार' या विचाराला दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली देण्याची कल्पना नंदू पटवर्धन यांनी मांडली. या प्रकल्पातून युरो-६ निकषांची पूर्तता करणारे इंधन तयार होणार असल्याने प्रदूषणमुक्त असेल ही वास्तव बाब नागरिकांना समजावून देण्याच्या उद्दिष्टावर भर देण्यात आला. त्यानंतर 'रत्नागिरी ग्रीन रिफायनरी' याच नावाने या प्रकल्पाची सकारात्मक ओळख जनतेला करून देण्याचे ठरले. |
जवळपास शहरातील बहुतांश नागरिक घरफाळा व पाणीपट्टी भरतात. त्यासाठी त्यांना नागरी सुविधा केंद्रांमध्ये वा पाणी बिल भरणा केंद्रात जावे लागते. त्यांचा वेळ वाचवण्यासाठी महापालिकेने ही दोन्ही बिले ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जवळपास शहरातील बहुतांश नागरिक घरफाळा व पाणीपट्टी भरतात. त्यासाठी त्यांना नागरी सुविधा केंद्रांमध्ये वा पाणी बिल भरणा केंद्रात जावे लागते. त्यांचा वेळ वाचवण्यासाठी महापालिकेने ही दोन्ही बिले ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर इस्टेट विभागाकडे भरले जाणारे भाडे व हॉस्पिटल नोंदणी व त्यासाठी आवश्यक असणारे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राची सुविधा ऑनलाइनद्वारे दिली आहे. याशिवाय प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी केएमटीने संगणकीकृत पास वितरीत केले आहेत. महापालिकेचे उत्पन्नाच्या महत्वाच्या स्त्रोतांमध्ये घरफाळा व पाणीपट्टी यांचा समावेश आहे. बहुतांश सर्व नागरिकांना घरफाळा भरावा लागतो व पाणीपट्टीही भरावी लागते. घरफाळा वर्षातून एकदा भरायचा असला तरी जास्तीत जास्त नागरिकांकडून मार्चमध्येच तो भरला जातो. त्यामुळे विविध नागरी सुविधा केंद्रांवर भली मोठी रांग लागलेली पहायला मिळते. त्यासाठी वेळ जातो. पाणी बिल भरण्यासाठीही दर महिन्याला भरणा केंद्र गाठावे लागते. त्यासाठीही रांगेत उभे रहावे लागते. हे टाळण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे केंव्हाही घरफाळा व पाणीबिल घरातून, मोबाइलवरुनही भरता येऊ शकेल. या बहुतांश नागरिकांच्या सेवेबरोबरच हॉस्पिटल नोंदणीची प्रक्रियाही ऑनलाइन केली आहे. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टखालील नोंदणी करण्यासाठी अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. हा अर्ज ऑनलाइन भरता येतो. तसेच त्यासाठी लागणाऱ्या अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रासाठीही ऑनलाइन अर्ज करता येतो. त्यामुळे या दोन्ही प्रक्रियेसाठी महापालिकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. महापालिकेने शहरात विविध मार्केटमध्ये भाड्याने गाळे दिले आहेत. त्यांनाही महापालिकेत न येता ऑनलाइनद्वारे भाडे भरण्याची सुविधा दिली आहे. केएमटीच्यावतीनेही संगणकीकृत पास उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच ई तिकिटींग सेवाही सुरु केली आहे. ऑनलाइन सुविधेचा कसा वापर करायचा? महापालिकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन सेवा या नावाच्या बॉक्समधून या सुविधांचा लाभ घेता येतो. ऑनलाइन सेवा या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी आपले नाव, पत्ता, शहर, मोबाइल नंबर व इ मेल आयडी व पासवर्ड टाकावा लागतो. त्यानंतर या प्रकारे इ मेल आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करता येते. तिथून आपला घरफाळ्याचा मिळकत नंबर, पाणी जोडणी नंबर, इस्टेटचा मिळकत नंबर टाकून आपले बिल पाहू शकतो. त्यानंतर ते तिथूनच भरता येते. |
श्रीलंकेतील (Sri Lanka Economic Crisis) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. भीषण आर्थिक संकटामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. वाढती महागाई आणि उपयुक्त वस्तूंचा तुटवडा यामुळे राजधानी कोलंबोमध्ये (Colombo) लोकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. देशात सतत इंधनाचा तुटवडा असून वीज संकटाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप लोक करतात. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे भावही गगनाला भिडले आहेत. सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासोबतच आंदोलकांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे आरोपही केले. सध्याच्या श्रीलंका दौऱ्यात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने लोकांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. कोलंबोतील रस्त्यांवर वाहनांचा लांबलचक ताफा दिसत होता. त्यानंतर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. कोलंबो श्रीलंकेचा मार्क्सवादी पक्ष, जनता विमुक्ती पेरामुना (JVP), पुढच्या आठवड्यात राजपक्षे सरकारच्या हकालपट्टीसाठी एक मोठा मोर्चा काढणार आहे. जेव्हीपीचे सरचिटणीस टिल्विन सिल्वा म्हणतात की देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा असेल, जो 17 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित केला जाईल. मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. हे भ्रष्ट सरकार मनुष्यबळाच्या माध्यमातून उलथवून टाकणार असल्याचे ते म्हणाले. (हे देखील वाचाः Sri Lanka: श्रीलंकेत सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना, एप्रिलपर्यंत संपणार पेट्रोल-डिझेल! ) दुसरीकडे, विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावावर आणि सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. विशेष म्हणजे, श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. डिझेल आणि पेट्रोलचाही तोच तीव्र तुटवडा आहे. नागरिकांना अनेक तास वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, निषेधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. |
नॉटिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर फलंदाज मुरली विजयच्या जागी त्याला संधी देण्यात आली. भारतीय संघातील दुसरा बदल म्हणजे हैदराबादचा युवा फलंदाज हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघातील हा दुसरा मोठा बदल आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त तीन सामन्यांसाठीच भारतीय संघ निवडण्यात आला होता. इंग्लंडविरुद्धचे उर्वरित दोन कसोटी सामने 30 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर रोजी अनुक्रमे साऊथेम्पटन आणि लंडनमध्ये खेळवण्यात येणार आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत भारताने आजच इंग्लंडवर विजय मिळवला. त्यानतंर नॉटिंगहॅममध्येच निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. विश्वविजेत्या अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ सध्या दमदार फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या प्रथम श्रेणी सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56. 72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. रणजी आणि दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉच्या नावावर आतापर्यंत सात शतकं आणि पाच अर्धशतकं आहेत. कोण आहे हनुमा विहारी? हैदराबादच्या 24 वर्षीय हनुमा विहारीने दमदार कामगिरी केली आहे, ज्याच्या बळावर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 59. 79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 15 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. |
ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या वेळी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध न करता, २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काय केले, याचा ऊहापोह करणारा 'पंचनामा' जनतेसमोर सादर केला. या वेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. आव्हाड पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या राज्यात ठाण्याला राज्य सरकार आणि केंद्राचा कोट्यवधींचा निधी मिळाला. मग, शिवसेनेने ठाण्याला काय दिले, काय केले अन् काय आणले, हा आमचा शिवसेनेला सवाल आहे. केेंद्र आणि राज्याकडून आलेल्या २० हजार कोटींच्या निधीत शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून आता ठाणेकर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीलाच ठाण्याची सत्ता देतील आणि ठाण्यात आघाडीचा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर आनंद परांजपे यांनी एवढ्या निधीचा खर्च कोठे केला, याचा हिशेब जनतेला देणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिवसेनेनी ठाण्याची कचराकुंडी केली. कळवा येथील मेडिकल कॉलेजचा बट्ट्याबोळ केला. या पांढऱ्या हत्तीला पोसून येथे शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला. ठाणे महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले. साधा कोपरीचा पूल यांना बांधता येईना आणि रिंगरूटची भाषा बोलून दाखवतात, असे आव्हाड म्हणाले. या पालकमंत्र्यांचे करायचे काय? ठाण्याचे डम्पिंग होत असताना हे पालकमंत्री काहीच करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. रिपाइं नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते जर मतदानानंतर शिवसेना आणि भाजपाला पुन्हा एकत्र आणणार असतील, तर ते आता आधुनिक चाणक्य झाले, असेच म्हणावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. (प्रतिनिधी) ठाणे महानगरपालिकेचा २०१६-१७ वर्षाचा २५४९. ८२ कोटी एवढा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये पाण्यासाठी २५०. ९८ कोटी, घनकचऱ्यासाठी २१८. ३३ कोटी, मलनिःसारणासाठी ५९. ७५ कोटी, परिवहनसाठी ४५. ३६ कोटी आणि परिवहनच्या वित्तीय तुटीसाठी २४ कोटी, आरोग्यासाठी केवळ कळवा हॉस्पिटलसाठी १७. ८७ कोटी व आरोग्य केंद्रांसाठी ५९. १९ कोटी, रस्तेबांधणी दुरु स्ती आदी कामांसाठी ८४२. १६ कोटी ठाणेकरांच्या एवढ्या निधीचा चुराडा एक वर्षात केला आहे. जर एवढा निधी खर्च झाला असेल, तर तो कोणत्या कामांमधून दिसतो आहे. कोणासाठी खर्च केला गेला, याची उत्तरे शिवसेनेने देणे गरजेचे असल्याचे मत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. |
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्चाचे ४ लाख ३५ हजार मास्कसह सात प्रकाराच्या साहित्यांची मागणी झेडपीचे शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे संकेत दिलेले आहेत. याप्रमाणे सन २०२०-२१ मधील शैक्षणिक वर्ष सुरू करायचे झाल्यास शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. जिल्हयात झेडपीच्या २८०० शाळा आहेत. या शाळांमधून २ लाख ७ हजार विद्यार्थी विद्यार्जन व ९ हजार ६४२ इतके शिक्षक त्यांच्यासाठी ज्ञानर्जनाचे काम करतात. त्याप्रमाणे या सर्वांच्या रक्षणासाठी जिल्हा नियोजनमधून खालील साहित्य खरेदी करून मिळावे. थ्री लेअर कापडी मास्कः ४ लाख ३५ हजार, फेस शील्ड कव्हरः २ लाख १७ हजार, डिजीटल थर्मल स्कॅनरः २८00, पल्स अॅक्सीमीटरः २८00, हॅन्ड सॅनीटायझर, पाच लिटरचे एक कॅनः २८00, फुट आॅपरेटेड हॅन्ड सॅनीटायझरः ५ हजार ६00. लिक्वीड हॅडवॉशसह डिस्प्रेशनर बॉटलः ५६00. झेडपीच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब आहेत. त्यामुळे कोरोणापासून बचाव करणारे साहित्य घेण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे कोरोना विषाणू संसगार्पासुन त्यांचा बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ५0 लाखाचा निधी द्यावा असा प्रस्ताव दिल्याचे शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांनी सांगितले. |
पुणे - कोल्हापूर येथील "ब्रेनडेड' 18 वर्षीय तरुणाने हृदय आणि मूत्रपिंड दान करत तिघांना जीवनदान दिले. "ग्रीन कॉरिडॉर'च्या सहाय्याने अवघ्या 2 तास 20 मिनिटांत कोल्हापूर पुण्यात हृदय आणून डॉक्टरांनी भिगवण येथील 30 वर्षीय शेतकरी तरुणावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. तर, एक मूत्रपिंड कोल्हापूरमधील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तर दुसरे मूत्रपिंड पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. मंगळवारी (दि. 11) पहाटे हे प्रत्यारोपण करण्यात आले. हदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे दोन दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तेथील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तरुणाला सोमवारी (दि. 10) रात्री त्याला "ब्रेनडेड' घोषित करण्यात आले. त्याबाबत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांना माहिती मिळताच, डॉक्टरांची एक टीम कोल्हापूरला रवाना झाली. त्यानंतर 18 वर्षीय दात्याचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटे 5 वाजता ग्रीन कॉरिडॉरद्वारे हृदय पुण्याच्या दिशेने निघाले. अवघ्या 2 तास 20 मिनिटांत हृदय पुण्याला पोहोचले. त्यानंतर 30 वर्षीय शेतकऱ्यावर पहाटे 5 वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली. ती तब्बल 6 तास चालली. आता तो रूग्ण स्थिर आहे. दरम्यान, सह्याद्री रूग्णालयातील हे दुसरे प्रत्यारोपण आहे, अशी माहिती युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे यांनी दिली. ही शस्त्रक्रिया हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांच्या मार्गदर्शनानुसार, भूलतज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, हदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश कौशिष, डॉ. तडस, हृदय भूलतज्ज्ञ डॉ. सुहास सोनवणे, डॉ. सौरभ बोकील व परफ्युशनिस्ट प्रशांत धुमाळ आणि टीम यांचा समावेश होता. आरती गोखले यांच्या नेतृत्वाखाली झेडटीसीसीचे समन्वयनक डॉ. स्वाती निकम, वाहतूक पोलीस यांचे सहकार्य मिळाले. कोल्हापुरातील ग्रामीण भागात राहणारा 18 वर्षीय तरुण नुकताच दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. घरची परिस्थिती गरीब, वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या कष्टाला हातभार लावायचा. त्यांना सुखात ठेवण्याचे स्वप्न तरुणाचे होते. मात्र, काळाने घाला घातला आणि तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली होती. |
बाळापूर (डॉ. चांद शेख)- महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापुर तालुक्याची सभा रविवारी पारस येथील संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्या सभागृहात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे, प्रदेश सरचिटणीस अॅड सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. यावेळी देवानंद साबळे यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्र्यंबक वानखडे यांनी बाळापुर तालुकाध्यक्षपदासाठी संतोष काळे तर सचिवपदासाठी संजय वानखडे यांचे नाव सुचविले. त्याला ज्ञानेश्वर शेंडे व देवानंद साबळे यांनी अनुमोदन दिल्याने महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापुर तालुकाध्यक्षपदी संतोष काळे तर सचिवपदी संजय वानखडे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे, प्रदेश सरचिटणीस अॅड सुधाकर खुमकर यांनी संघटनेच्या बांधणी बद्दल विस्तृत माहिती दिली. तर जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे यांनी जिल्ह्यातील संघटनेबद्दल आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना मिळणाऱ्या घरकुला बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापुर तालुक्याची पुढील कार्यकारणी वाडेगाव येथे होणाऱ्या सभेत गठित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संतोष दांदळे, कालिंग लांडे, देवानंद साबळे, राजू लांडे, त्र्यंबक वानखडे, विजय मेहरे, ज्ञानेश्वर शेंडे, रवींद्र भटकर, कडूराम तेलगोटे, जनार्दन साबळे, संतोष लांडे, उमेश म्हैसने, डॉ. शेख चाॅद, सुभाष अग्रवाल, आनंद पुंडे, पंकज सोनवणे, श्रीकांत आबुस्कर, तेजराव टेकाडे, शिवानंद लांडे, बळीराम लांडे, रवींद्र दांडगे, दिनकरराव भरणे, महादेव सावंत, अरुण लांडे, गणेश ताथोड, शुभम वानखेडे, श्रीकृष्ण वैराळे, बळीराम लांडे, सहदेव पुंडे, श्रीनाथ लांडे, संतोष लांडे (पारस), प्रवीण सातव, दिलीप काकड, साहेबराव भरणे, पुरुषोत्तम जुजगर आदीची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण माळी तर राजू लांडे यांनी आभार प्रदर्शन केले. |
झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे मस्त झोप येते, हा चुकीचा समज आहे. चहा व कॉफीत आढळणाऱ्या कॅफिन या उत्तेजक घटकामुळे झोप उडते. तसेच कॅफिनमुळे रात्री वारंवार लघवी येते. त्यामुळे झोपमोड होते. रात्री झोपण्यापूर्वी अतिपाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवीसाठी उठावे लागते. रात्री हलका आहार घ्या. अतिमसालेदार देखील टाळा. पित्त व अपचनाचा विकार होऊन तुमची झोप बिघडू शकते. काही जण सकाळी व्यायामाऐवजी सायंकाळी उशीरा करतात. यामुळे तीव्र निद्रानाश होण्याची शक्यता असते. रात्री झोप येत नाही म्हणून काही लोक चक्क झोपेच्या गोळ्या घेतात. तसं करणं आरोग्यासाठी घातक आहे. झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करत बसू नका. चिंता करू नका. मेंदूला शांत होण्यासाठी थोडा वेळ देणे महत्त्वाचे आहे. काही लोक पोटावर किंवा पाय पोटात घेऊन झोपतात. त्यामुळे तुमच्या अस्थिबंधनावर ताण येऊन झोपमोड होऊ शकते. मेंदू थकल्यानंतर व झोप आल्यावरच बिछान्यावर झोपायला जा. Thanks For Reading! |
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सत्तेबाबत आणि पक्षातील वादाबाबत बोलत होते. याबाबत वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के सामाजिकरण आणि २० टक्के राजकारण, या घटकाला व जनहिताची कामे करण्यासाठी आमच्याकडे बाहेर पडल्याशिवाय पर्याय नव्हता. असे राठोड यांनी सांगितले. यवतमाळ : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) हेच आमचे नेते राहतील, त्यांच्या बाबत नेहमीच आदर राहील, आणि उद्धवजींना जेव्हा आमची भूमिका पटेल व मातोश्रीचे दरवाजे जेव्हा उघडे होतील त्यावेळी उध्दवजीसोबत जाऊ ही भूमिका ठेऊनच उठाव केला असल्याचे शिवसेना बंडखोर आमदार (Shiv Sena rebel MLA) संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे गटात (Shinde group) दाखल झालेले दिग्रस-दारव्हा-नेरचे (Digras-Darvha-Ner) आमदार संजय राठोड काल पहिल्यांदाच यवतमाळमध्ये दाखल झाले. दरम्यान राठोड हे त्यांच्या यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात (public relations office) पोहोचले. तेव्हा जनसंपर्क कार्यालयात स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रसार माध्यमांशी चर्चा करताना ते म्हणाले की, आजही आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, परंतु, महाविकास आघाडी व शिवसेनेत राहून सातत्याने अन्याय होत होता, शिंदे गटात गेलेले अनेक मंत्री, आमदारही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सत्तेबाबत आणि पक्षातील वादाबाबत बोलत होते. याबाबत वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के सामाजिक कारण आणि २० टक्के राजकारण, या घटकाला व जनहिताची कामे करण्यासाठी आमच्याकडे बाहेर पडल्याशिवाय पर्याय नव्हता. असे राठोड यांनी सांगितले. शिवसैनिकांशी आपले भांडण नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, आम्ही अचानक उठाव केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आपल्या विरोधात भूमिका घेतली मात्र आता गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, माझ्या कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे असलेले फोटो कधीही काढणार नसल्याचे देखील संजय राठोड यांनी स्पष्ट केले. या कालावधीत ज्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले त्यांना देखील योग्य वेळी उत्तर देऊ असे राठोड यांनी सांगितले. माननीय उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, त्यांच्याबाबत मनामध्ये आदर होता आणि यापुढेही राहील, आम्ही शिवसैनिक म्हणून घडलो आहे, बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही घडलो आहे, त्यांच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत. त्यामुळे शिवसैनिक ही भूमिका आमच्यातून कधीच जाणार नाही. त्यामुळे आजही आम्ही शिवसैनिकच आहोत. |
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर ही सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसून येते. यापूर्वी देखील तिला वेगवेगळ्या वादांचा सामना करावा लागला आहे. आता करिना चर्चेत आली आहे ते तिच्या पराक्रमामुळे. त्याचे झाले असे की, ती आणि तिची मैत्रीण अभिनेत्री अमृता अमृता अरोरा या एका पार्टीला गेल्या होत्या. तिथे सगळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. जेव्हा त्या दोघींची कोरोनाची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पालिकेनं सुरक्षेच्या कारणास्तव करिनाचे घर सील केलं आहे. कोरोना आणि अमृता अरोरा या दोघींची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पालिकेनं दिलेल्या सुचनेनुसार तिचे घर सील करण्यात आले आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अद्याप अधिकाऱ्यांना करिनाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती मिळालेली नाही. ती त्यांना दिली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्याबाबत सातत्यानं माहिती घेण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. अशा वेळी बॉलीवूडमधील एका प्रख्य़ात अभिनेत्रीकडून गंभीर चूक होणं यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. करिना आणि अमृता या दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आता तपासणी करण्यात येत आहे. त्यांचे ट्रेसिंग केले जात आहे. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सुपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. |
भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. खेड्यातील लोकात एकोपा असतो असा आतापर्यंत अनुभव असला तरी हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर होणारे राजकारणाचे पडसाद खेडेगावात उमटले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात काल एकूण 120 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होऊन निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत आपलेच पॅनल निवडून आले पाहिजे म्हणून प्रचाराची रणधुमाळी खेडेगावात दिसून आली. ग्रामपंचायत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करतात कारण त्यावरून सत्तेची समीकरणे पक्ष मांडत असतो. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ही एक मोठी ग्रामपंचायत आहे. सदर ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात मुक्ताईनगरच्या आमदारांबरोबर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रचार सभा घेतल्या. केवळ एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असल्याने कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतचा कारभार त्यांच्या हातून हिसकावून आपल्या ताब्यात घेण्यासाठी आमदारांनी दंड थोपटले होते. परंतु काल निकाल त्यांच्या विरोधात गेला. एकूण 17 सदस्य कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतमध्ये सरपंचांसह 13 सदस्य एकनाथ खडसे यांचे समर्थक निवडून आले. शिंदे भाजप गटाला एकनाथ खडसे यांचा हा धक्का म्हटला पाहिजे. नुकत्याच पार पाडलेल्या दूध संघाच्या निवडणुकीत विद्यमान नवे चेअरमन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या धर्मपत्नी मावळत्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्याच अविर्भावात आमदार मंगेश चव्हाण यांनी कुऱ्हा काकोडा गावात जाऊन खडसेंच्या ताब्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून किसकाहून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला. संघ निवडणुकीत केवळ 447 मतदार असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय क्षेत्राचा सत्तेचा त्याचबरोबर इतर बाबींचा दबाव टाकून मतदान खेचून आणले. ते सत्ताधाऱ्यांना सहज सोपे आहे. मात्र गाव पातळीवरील स्थिती काही वेगळीच असते, हेच कुऱ्हा काकोडा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. आमदारांच्या पदरी पराभव पडला एवढे मात्र निश्चित. . खेडेगावात अजूनही सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात. तर शेतीत कामे करून रात्री पारावर एकत्र बसून सुखदुःखाच्या गोष्टी केल्या जातात. आजही पारावर गावकऱ्यांच्या गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यावरून गावातला एकोपा दिसून येतो. तथापि हिडीस राजकारणाचे लोन पोचलेले आहे. परिणामी गटबाजीमुळे त्यांच्यात असलेल्या एकोप्याला तळा जातो. त्यामुळे गावातील राजकारणाच्या स्पर्धेमुळे जणू एकमेकात वैर असल्याचा भाव दिसून येतो. राजकीय पक्षांच्या सर्व वरिष्ठांनी याबाबत एक मत नसून गाव पातळीवरील वातावरण सौदार्हाचे करण्यासाठी तसेच निकोप राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा खेडेगावातील वातावरण दूषित होऊन समाजावर विपरीत परिणाम होईल. जे तालुका जिल्हा व राज्यस्तरावर चालले आहे त्याची पुनरावृत्ती खेडेगावात होत असल्याने ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जामनेर तालुक्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचे वर्चस्व असलेल्या तालुक्यातील एकूण बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदार होऊन मतमोजणी झाली. एकूण बारा ग्रामपंचायती भाजपतर्फे नव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला, असा दावा केला जातो आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे की, पाच जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. या वादाला काही अर्थ नाही. परंतु भाजपच्या अंतर्गतही दोन गट निर्माण होऊन भाजपचे पॅनल निवडून निवडणुकीत आमने सामने निवडणूक लढवत होते. जामनेर तालुक्यातील टाकळी गावात भाजपच्या पॅनलचा विजय झाल्यावर ते उमेदवार मिरवणुकीने मंदिरात दर्शनाला जात असताना पराभूत पॅनलच्या लोकांकडून त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत सरपंच पदी विजयी झालेले जितेंद्र यांचे बंधू धनराज माळी यांच्या डोक्याला दगड लागून मृत्यू झाल्याची अफवा पसरवली गेली. मात्र प्रशासनाने याचा खुलासा केला असून सदर व्यक्तीचा मृत्यू हा चक्कर येऊन पडल्याने झाला असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले आहे. मात्र भाजपचे एकमेकांमध्ये आपापसात असलेली वैरभावना यातून दिसून आली. पक्ष म्हणून पक्षनेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यायला हवी होती. परंतु ते तसे घडले नाही. दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात कायम दुश्मनी वैर राहील. त्यामुळे गावचे वातावरण गढूळ होऊन गावात गटबाजीमुळे पुन्हा पुन्हा अशा हाणामारीच्या दगडफेकीच्या घटना होतील. म्हणून गाव खेड्यातील वातावरण राजकारणाने बिघडत आहे एवढे मात्र निश्चित...! |
कोरोना योध्यांना विद्यार्थ्यांनी बांधली राखी! स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायसोनीत रक्तदान शिबीर! एरंडोलला बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलतर्फे 'हर घर तिरंगा' रॅली! शिवसेनेत फूट : शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार पाटील यांचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा! यावलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक! गुलाबराव पाटलांनी बदलला पक्ष : भाजपात प्रवेश? |
पुणे - राज्य सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर, डॉ.अभय बंग यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, "अभय बंग हे महान जगव्यापी सामाजिक नेते, चळवळीतील कार्यकर्ते आहेत, ते महान आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. एकही माणूस गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू खात नाही, सिगारेट पीत नाही, दारू पीत नाही एवढं महान कार्य त्याचं आहे. त्यामुळे त्यांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे." असे धक्कादायक वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात राज्यातील अनेक घडामोडीवर भाष्य केले. पेट्रोल -डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काल मुंबईत भाई जगताप हे आंदोलनादरम्यान पोलिसांच्या अंगावर गेले होते, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही त्यांना मंत्री म्हणून समज देणार का? या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की, "कसली समज, स्मृती इराणी यांना आठवण करून द्यायची समज त्यांना देऊ, ७० रुपये लिटर पेट्रोल असताना रस्त्यावर बसणार्या बाई, आता गायब झाल्या आहेत१०५ रुपये पेट्रोल होऊन देखील. भाजपाची आता मंडळी कुठे आहे? असा सवाल उपस्थित करीत भाजपाच्या नेत्यावर त्यांनी निशाणा साधला. तसेच भाई जगताप अंगावर धावून गेले नाहीत, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या." असं सांगत त्यांनी भाई जगताप यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. |
वैभववाडी : कुंभवडे चव्हाणवाडी येथील सर्पदंश झालेले रामदास शिवराम चव्हाण (६३) या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला. कणकवली एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री ही घटना घडली. रामदास चव्हाण हे गुरुवारी सकाळी शेतात गवत आणायला गेले होते त्यावेळी त्यांना सर्पदंश झाला. त्रास जाणवू लागल्याने त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चव्हाण यांचा गावातील सामाजिक कार्यात पुढाकार होता. त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल कुंभवडे व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. |
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : एका रुग्णालयातील नर्सच्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या नर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. नर्सच्या या कृत्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात रुग्णालयातील कर्मचाऱ्याची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय केविन रीड यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 5 सप्टेंबर रोजी रुग्णालयाच्या नर्सनी केविनला मृत घोषित करून बॉडी बॅगेत पॅक केली. हैराण करणारी बाब म्हणजे रुग्णाला डॉक्टरांनी नव्हे तर नर्सने मृत घोषित केलं. नर्सनी स्वतःच त्याला मृत घोषित केलं अन् शवगृहात ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांची टीम मृतदेहाचा तपास करण्यासाठी पोहोचली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. केविनने मृत्यूपूर्वी अवयव दान केले होते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्याचा मृतदेह तपासण्यासाठी शवगृहात पोहोचले. डॉक्टरांनी पाहिलं तर त्याचे डोळे उघडे होते. तोंडातून रक्त येत होतं. हे रक्त ताजं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यामुळे डॉक्टरांनी संशय आला. त्यांनी नर्सकडे डेथ सर्टिफिकेटची मागणी केली, मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. कारण डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केलंच नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे सर्टिफिकेटही नव्हतं. ही घटना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील एका रुग्णालयातील असल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारे नर्सच्या निष्काळजीपणाचा खुलासा झाला. तपास टीमच्या एका सदस्याने सांगितलं की, रुग्ण जिवंत असल्याची शक्यता होती. आणि रुग्ण बॅगेच्या बाहेर येण्यासाठी तडफडत असावा. मात्र श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
अमरावती : अंतर्गत राजकारण, न्यायालयीन भानगडींमध्ये वर्षभरापासून अडकलेल्या बडनेरा मतदारसंघातील १२. ५० कोटी रुपयांच्या विकासकामांवर अखेर महापालिकेच्या गोंधळात पार पडलेल्या आमसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. विकासकामांच्या यादीला सभेत मंजुरी देताना सदस्यांमध्ये रंगलेल्या कलीगतुऱ्यानंतर या विकासकामांवर निर्णय घेण्यात आला. सदस्यांची कामे गटनेत्यांनी महापौरांकडे प्रथम सादर करावी, असे ठरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर वंदना कंगाले यांच्या पीठासीनाखाली बुधवारी सर्वसाधारण सभा पार पडली. बडनेरा मतदारसंघात १२. ५० कोटी रुपयांतून करावयाच्या विकास कामांच्या यादीत समाविष्ट कामांची नावे बघून काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप हिवसेसुध्दा संतापले. त्यांनी उद्वेगाने हातात असलेली विकास कामांची यादी सभागृहात फाडून भिरकावली. अखेर जावेद मेमन यांनी त्यांची समजूत काढली. १२. ५० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या अनुदान वाटपावर शिक्कामोर्तब करताना सभा स्थगित करण्याच्या विषयावरुन संजय खोडके गटाचे सदस्य जावेद मेमन आणि राकाँचे सुनील काळे यांच्यात वाद झाला. मुस्लिम वस्त्यांमध्ये अनुदान वाटपात राजकारण होत असल्याचा आरोप जावेद मेमन यांनी केला. सुनील काळे सभा स्थगित करण्याच्या बाजूने असल्याने मेमन संतापले. सदस्यांनी मध्यस्थी के ली. |
सीजीएल २०१७ परीक्षेद्वारे आयकर विभागात २६१ इन्स्पेक्टर्स आणि १७२१ टॅक्स असिस्टंट्स पदांवर उमेदवारांची निवड झाली होती. या उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्राची प्रतीक्षा आहे. संतप्त उमेदवारांनी शनिवारी ट्विटरवर एक मोहीम चालवली होती. #INCOMETAX_CGL17_JOINING_DO या हॅशटॅगसह २० हजारहून अधिक ट्विट केले गेले. एका उमेदवाराने टि्वट केलंय की आयुष्यातली ३ वर्षं यासाठी दिली आणि हाती केवळ प्रतीक्षा लागली. अन्य एक उमेदवाराने ट्विट करून लिहिलं की दोन हजारांहून अधिक उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय नैराश्येत आहेत. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. एका उमेदवाराने लिहिलंय की 'इनकम टॅक्सने असिस्टंट आणि इन्स्पेक्टर पदासाठी सीजीएल २०१७ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. साडेतीन वर्षं जुन्या रिक्त जागा आहेत आणि निकाल लागूनही सात महिने उलटून गेले आहेत. कृपयचा न्याय द्यावा. ' |
हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. पिंपरी : हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले होते. अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा, योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (दोघे रा. सांगवी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी अमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. शाहबाज सिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि आरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय २६, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पायसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. २४) रात्री पोलिसांनी स्पायसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील त्यांच्याकडून जप्त केली. लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी अमिन फिरोज खान याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील शाहबाज आणि आरबाज हे दोघेजण अद्याप फरार आहेत. हितेश मुलचंदानी याच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी कॅम्पात बुधवारी (दि. २४) सायंकाळनंतर शगुन चौक ते बाबा छत्तुरामलाल मंदिर दरम्यान कँडलमार्च काढण्यात आला. यात व्यापारी, व्यावसायिक, महिला व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पिंपरी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, पथारीवाले, हॉटेल, आईस्क्रिम पार्लर यासह अन्य दुकानेही रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. ही सर्व दुकाने वेळेत बंद करण्यात यावीत, अशी मागणी सिंधी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. |
अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून चांगलेच राजकारण तापले असून रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे. रवी राणा यांच्या महिला कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारला. दरम्यान त्यांच्या अंगावर शाई फेकली. घडलेल्या या प्रकारामुळे आयुक्त गोंधळून गेले. मात्र पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवून या महिला कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. येथे दोन महिला आल्या. एका महिलेने पिशवीतून एक शाईची बाटली काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आयुक्त सतर्कहून पळाले. मात्र आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बिसलेरीची बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. सुरक्षा रक्षकाने तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. नंतर या महिला पळून जात असताना जय भवानी, जय शिवाजीचे नारे हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या महिला आमदार रवी राणा यांच्या समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी महापालिकेत केली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्याने तो पालिकेने काढला. त्यावरून राजकारण तापलं होतं. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे. |
राज्यामध्ये सोमवार (दि. ७) पासून अनलॉक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये फक्त दोन जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एक ही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरामध्ये मुंबईचा समावेश होतोय. त्यामुळे मुंबईसह इतर पाच जिल्ह्यात खालील नियम लागू राहतीलमुंबईसह या पाच जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लोकल सेवा बंद राहील. 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील. मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील. सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील. कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील. ई सेवा पूर्ण सुरू राहील. जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील. मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील. खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील. इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील. सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल. सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार). लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील. कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील. दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल. पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील. सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील. हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार). अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील. शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती. स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही . लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक. राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील. ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील. कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील. ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही. बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही. संचारबंदीचे नियम लागू राहतील. |
भारताचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिक-विद्यार्थी आणि त्यांच्या भारतातील चिंताग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. ज्योतिरादित्य शिंदे खुद्द या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी तसंच भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची व्यवस्था पाहण्यासाठी बुधवारी बुखारेस्टमध्ये दाखल झालेले आहेत. गुरुवारी युक्रेनसह सीमावर्ती चौकी असलेल्या सिरेत भागाला ज्योतिरादित्य शिंदे भेट देणार आहेत. पुढचे ४८ तास विद्यार्थ्यांना भारतात रवाना करण्यासाठी ते इथेच थांबणार आहेत. 'शेवटचा विद्यार्थी सिरेतहून बाहेर पडेपर्यंत मी इथेच थांबणार आहे', असं शिंदे यांनी म्हटलंय. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुखारेस्ट आणि सुकिव्हिया मार्गे बुधवार ते शुक्रवार दरम्यान जवळपास ४८०० भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर काढलं जाईल. यासाठी तब्बल २४ उड्डाणं रोमानियामधून नियोजित करण्यात आली आहेत, असं शिंदे यांनी म्हटलंय. 'बुखारेस्टमध्ये जवळपास ३००० आणि सिरेतमध्ये जळपास हजार भारतीय विद्यार्थी दाखल झालेले आहेत', अशी माहिती शिंदे यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत दिली. सिरेत चेकपोस्टवर आणखी सुमारे हजार विद्यार्थी दाखल होण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसांत त्यांना भारतात परत पाठवण्याची सरकारला आशा आहे, असंही शिंदे यांनी म्हटलंय. बुधवारी बुखारेस्ट इथून सुमारे १३०० विद्यार्थ्यांना घेऊन सहा विमानांनी भारताकडे उड्डाण घेतलं. गुरुवारी १३०० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी सहा विमानं बुखारेस्टहून निघणार आहेत. मंगळवारी रात्री विमानतळावर २०० - ३०० विद्यार्थ्यांची भेट घेतल्याचंही केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलंय. |
पोलीसनामा ऑनलाइन टीम - खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात, परंतु कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात कोणते बदल होतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे (High Cholesterol) शरीराच्या कोणत्या 3 भागात बदल होतात. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत (There Are Two Types Of Cholesterol) वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या मुख्य लक्षणांमध्ये त्वचेतील बदलांचा समावेश होतो. कोलेस्ट्रॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करतात. हे दोन प्रकारचे असतात, लो डेन्सिटी लिपोप्रोटीनला (Low Density Lipoprotein) बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनला (High Density Lipoprotein) गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) म्हणतात. बॅड कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढतो. या कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते (These Causes Cholesterol To Rise) उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे (Symptoms Of High Cholesterol) 1. कोलेस्ट्रॉल वाढल्याने डोळ्यांमध्येही बदल होऊ लागतात. असे मानले जाते की जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा रुग्णांना डोळ्याच्या कॉर्नियाच्या बाहेरील भागाच्या वर किंवा खाली निळ्या किंवा पांढर्या घुमटासारखे काहीतरी दिसते. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या कोलेस्ट्रॉलची चाचणी नक्की करून घ्या (High Cholesterol). 2. जर तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागला असेल तर थोडे सावध व्हा कारण हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण आहे. 3. जर हात दुखत असतील तर तुम्ही लक्ष द्यावे. असे मानले जाते की वारंवार हात दुखणे हे योग्य लक्षण नाही. (Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ) |
कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी मार्गावर जामखेड पारसपाडा येथे वाहनचालकाचा ताबा सुटून अपघात झाला. पुलावर धडकल्यामुळे चालक गंभीर झाला आहे. शिवाय वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. |
पारोळा प्रतिनिधी येथील पारोळा तालुका सरपंच संघटनेतर्फे ग. स. सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुनिल पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष नंदलाल पाटील,कन्हेरेचे सरपंच विभीषण पाटील,मेहुचे सरपंच विकास बोरसे,हिरापूर येथील सरपंच सोनू पाटील,वसंतवाडीचे सरपंच किसन पवार,युवा सेनेचे उपतालुका प्रमुख समाधान मगर आदी उपस्थित होते. |
या ६ जादुई उपायांनी अपर लिप्स आणि शरीरावर इतरत्र असलेले केस काढा - ZenParent\nया ६ जादुई उपायांनी अपर लिप्स आणि शरीरावर इतरत्र असलेले केस काढा\nZenParent Wednesday at 10:16 AM\nकाही मुली आपल्या चेहऱ्यावरील किंवा शरीराच्या अन्य भागांवरील नकोशा केसांच्या समस्येने बऱ्याच त्रस्त असतात. काही स्त्रियांमधे ह्या नकोशा केसांची वाढ हॉर्मोनल किंवा आनुवंशिक कारणांमुळे होते. हे केस काढणं हे फार कठीण काम असतं, आणि ते काढले गेले नाहीत तर चेहरा विद्रूप व खराब दिसतो. पण आता तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, कारण काही असे घरगुती उपाय आहेत ज्याच्या आधारे तुम्ही ह्या समस्येतून सुटका करून घेऊ शकता. हे उपाय खालीलप्रमाणे आहेत-\nतांदळाचं पीठ आणि दूध\nहे मिश्रण चेहऱ्यावरील आणि ओठांच्या वरच्या भागावरील केस काढण्यासाठी वापरतात. यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठात थोडं कच्चं दूध मिसळून वरच्या ओठाच्या वरच्या भागावर लावा. पण लक्षात ठेवा की ही पेस्ट थोडी घट्टसर असली पाहिजे जेणेकरून ती चांगल्या प्रकारे लावता येईल. त्यानंतर ही पेस्ट सुकू द्या व मग रगडून धुवून टाका. या उपायाने तुम्हाला लगेच फरक दिसून येईल.\nसाखर, कॉर्न फ्लोर आणि मध\nया मिश्रणाच्या वापरामुळे बराच काळपर्यंत केस पुन्हा उगवत नाहीत. हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्ही साखर, कॉर्न फ्लोर आणि मध हे तिन्ही पदार्थ चांगले मिसळून घेऊन जिथे केस असतील त्या भागावर लावा आणि ते सुकू द्या. याचा एक थर बनेल. मग आपल्या तर्जनीने हळूहळू हा पॅक काढा. असं केल्याने त्या भागावरचे नको असलेले केस निघून जातील.\nहळद आणि बेसन\nहे मिश्रण देखील नकोसे केस काढण्यासाठी वापरलं जातं. यासाठी तुम्ही बेसनात हळद मिसळून पेस्ट बनवून घ्या आणि चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवल्यावर हलक्या हाताने रगडून थंड पाण्याने धुवून टाका.\nचेहरा किंवा इतर भागांवरील केस काढण्यासाठी तुम्ही अंड्याच्या पांढऱ्या भागाचा वापर करू शकता. ही पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही एका अंड्याच्या पांढऱ्या भागात एक चमचा कणीक आणि साखर मिसळून घ्या. मग ही पेस्ट चेहऱ्यावर आणि केस असलेल्या इतर भागांवर लावा आणि २० मिनिटे तशीच राहू द्या. एका महिन्याच्या आत तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये घट झाल्याचं दिसून येईल.\nतुम्ही पिकलेल्या किंवा कच्च्या अशा कुठल्याही पपईचा वापर करू शकता, पण कच्चा पपई जास्त प्रभावी असतो. कारण यामध्ये पॅपेन नावाचं सक्रिय एन्झाईम असतं जे केसांची वाढ कमी करण्यात मदत करतं. यासाठी तुम्ही दोन मोठे चमचे पपईची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद पावडर घेऊन पेस्ट बनवून घ्या. या पेस्टने १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्याला मसाज करा आणि मग पाण्याने धुवून टाका.\nब्राऊन शुगरचा वापर स्क्रब म्हणूनही केला जातो कारण ब्राऊन शुगरमुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते व नको असलेले केस निघून जाण्यात मदत होते. यासाठी तुम्ही ब्राऊन शुगरमध्ये थोडा मध मिसळून हलक्या हाताने चेहऱ्यावर रगडून लावा. यामुळे हळूहळू नको असलेले केस कमी होऊ लागतील.\nया उपायांचा वापर चांगल्या प्रकारे करा कारण याचे परिणाम तुम्हाला महिन्याभरात दिसून येतील.\nतजेलदार आणि उजळ त्वचेसाठी रात्री झोपण्याआधी ह्या गोष्टी जरूर करा\nडोळ्यांखाली सुरकुत्या पडत असतील तर लगेचच हे ५ उपाय करा\nथंडीत सुद्धा तुमच्या त्वचेवरील चमक कायम राहील, फक्त आठवड्यातून तीनदा हे काम करा\nबाळंतपणानंतर स्त्रियांनी जरूर करावीत ही ६ कामं, त्यामुळे त्या खूप लवकर बऱ्या होतील\nथंडीच्या मोसमात आंघोळीच्या आधी त्वचेवर हे ४ पदार्थ लावा आणि मग बघा कमाल\nगरोदरपणात जरूर करा ही ५ कामं, हे फायदे होतील\nसेक्स केल्यावर गुप्तांगातून दुर्गंधी येत असेल, तर ही समस्या असू शकते\nव्हिटॅमिन ई कॅप्सूल कुठे व कशी वापरावी?\nहिवाळ्यात, तेलात हे ५ पदार्थ मिसळून केसांना जरूर लावा, केस गळायचे थांबतील\nपतीने ह्या ५ गोष्टींच्या बाबतीत पत्नीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे\nप्रत्येक बॉडी टाईप साठी परफेक्ट साडी कशी नेसावी!\nकॅन्सरची ही ६ लक्षणं ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात\nवयानुसार सेक्सची किती फ्रिक्वेंसी चांगली मानली जाते?\nतुम्ही तुमच्या बाळाच्या गुप्तांगाला पावडर लावता का? मग हे "आत्ताच" वाचा! |
पवन कुमारने केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सकाळी फेटाळताच सत्र न्यायालयाने फाशीच्या स्थगितीसाठीचा आधी केलेला अर्जही फेटाळला. नवी दिल्ली : निर्भया प्रकरणात शिक्षा झालेल्या चौघांपैकी पवन कुमारने केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सकाळी फेटाळताच सत्र न्यायालयाने फाशीच्या स्थगितीसाठीचा आधी केलेला अर्जही फेटाळला. मात्र पवन कुमारने लगेच राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला व त्याआधारे स्थगितीसाठी नवा अर्ज केला गेला. एकदा डेथ वॉरंट काढल्यानंतर पुन्हा पुन्हा फाशी पुढे ढकलली जाणे, हे व्यवस्थेचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली. पब्लिक प्रॉसिक्युटर इरफान अहमद व 'निर्भया'च्या पालकांच्या वतीने अॅड. इंदर कुमार झा यांनी फाशी स्थगित करण्यास विरोध केला. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला असला तरी या टप्प्याला न्यायालयाने फाशी स्थगित करण्याची गरज नाही. तसा अधिकार न्यायालयास नाही. राष्ट्रपतींचा निर्णय होईपर्यंत फाशी स्थगित राहील. पण तो निर्णय सरकारच्या पातळीवरचा असेल, असे त्यांचे म्हणणे होते. दिल्ली उच्च न्यायालयाने या चारही खुन्यांना सर्व कायदेशीर मार्ग एक आठवड्यात अनुसरण्याचा आदेश ५ फेब्रुवारी रोजी दिला होता. परंतु पवनने मुदत टळून गेल्यानंतर अर्ज केल्यानंतर त्याची दखल घेण्याची गरज नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. हा युक्तिवाद अमान्य करताना सत्र न्यायाधीश राणा यांनी तुरुंग नियमावलीचा दाखला दिला. दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरही फाशी १४ दिवसांनंतर देण्याचे बंधन नियमांत आहे. दयेचा अर्ज हा राज्यघटनेने फाशीच्या कैद्याला दिलेला अधिकार आहे. अर्ज उशिराने केला म्हणून, तो हक्क हिरावला जाऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. न्या. राणा यांनी ऐनवेळी दयेचा अर्ज करण्यावरून पवन कुमारचे वकील अॅड. सिंग यांना धारेवर धरले. 'तुम्ही आगीशी खेळत आहात. कोणाहीकडून जरी चूक झाली तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करा. नियमांचे उल्लंघन करून फाशी दिलेल्या माणसाचे प्राण पुन्हा आणता येत नाहीत', असे ते म्हणाले. पीडितेच्या कुटुंबियांनी जोरदार विरोध केला असला, तरी कायद्याने उपलब्ध असलेले सर्व मार्ग अनुसरण्याची संधी न्यायसंस्थेने नाकारली, अशी खंत उराशी बाळगून प्राण सोडण्याची वेळ फाशीच्या कैद्यावरही येऊ नये, असे मला ठामपणे वाटते. - धर्मेंद्र राणा, |
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच काहीनाकाही कारणांमुळे चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स (Dressing sense) हाच बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो. इतरांसाठी ज्या ठिकाणी फॅशन (Fashion) संपते तिथून उर्फीच्या फॅशनला सुरुवात होते. काही वेळा, तिचे फॅशनचे प्रयोग पूर्णपणे फसतात, तर काहीवेळा ती लोकांना आपली स्तुती करण्यास भाग पाडते. कायम अतिशय बोल्ड कपड्यांमुळे (Bold Clothes) उर्फी सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. आपली कपड्यांची निवड, तिची फॅशन अतिशय आत्मविश्वासाने ती कॅरीही करताना दिसते. विशेष म्हणजे ती फक्त शूटसाठीच बोल्ड कपडे घालते असं नाही तर अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवरही त्याच अंदाजात फिरताना दिसते. आता पुन्हा एकदा उर्फी आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वतःची स्तुती करताना दिसते आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम हँडलवर उर्फीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अलीकडेच उर्फीने पुन्हा एकदा तिच्या ड्रेससोबत एक एक्सपिरिमेंट केलं होतं. यावेळी ती कॉम्प्लिकेटेड डिझाईन असलेल्या एका ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये (Urfi Transparent Dress) दिसली. या ड्रेसचं फॅब्रिक (Fabric) पातळ आणि पारदर्शक असल्यामुळे लोकांनी त्याची तुलना मच्छरदाणीशी केली. या ड्रेसमुळे उर्फी ट्रोलदेखील (Troll) झाली आहे. मात्र, उर्फीनं ट्रोलर्सला (Trollers) प्रत्त्युत्तर दिलं आहे. 'हा कॉम्प्लिकेटेड ड्रेस आणि लुक तयार करण्यासाठी खूप वेळ आणि कष्ट लागले आहेत. मी कितीही चांगले कपडे घातले तरी काही लोकांना ते वाईटच दिसतात. पण, मी प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदरच दिसते, याची मला खात्री आहे. त्यामुळे लोकांच्या टीकेनी मला फरक पडत नाही,' असं उर्फी म्हणाली आहे. उर्फी जेव्हा-जेव्हा नवीन अवतारात आपले फोटो पोस्ट करते तेव्हा इंटरनेटवर वेगवेगळ्या कमेंट्सचा पूर येतो. काहींना तिचा आत्मविश्वास आणि फॅशन सेन्सचं कौतुक वाटत तर, काहीजण तिच्यावर टीका करतात. यावेळी देखील उर्फीनं घातलेल्या या बोल्ड ट्रान्सपरन्ट ड्रेसवर अनेकांनी मिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, या ड्रेसमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास (Confidence) दिसत असून आपण घातलेला ड्रेस आणि त्या ड्रेसमध्ये आपण अतिशय सुंदर दिसत असल्याचं तिचं ठाम मत तिने व्यक्तही केलं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
औद्योगिक विकास ण्याच्या गिरण्याहि महाराष्ट्रांत आढळून येतात. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईपर्येत विटा भाजण्याचे काम बहुतेककरून घरगुती उद्योगधंद्यांनीं होत असे. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून सैन्यासाठी व इतर खाजगी कामासाठी देखील बांधण्यांत येणाऱ्या इमारतींसाठीं विटांना खूप मागणी येऊं लागली व मोठ्या भा भट्टया बांधून एकदम खूप विटा तयार करण्यांत येऊं लागल्या. शहरांमध्ये रस्ते तयार करण्यासाठी खडीची मोठ्या प्रमाणावर गरज भासूं लागली. तेव्हां मोठ्या शहरांमध्यें यांत्रिक साधनांनीं खडी फोडण्याच्या कारखान्यांना सुरुवात झाली. लहान गांवांतून अजून हातांनींच खडी फोडण्यांत येते. कातडीं कमाविण्याचे व त्यापासून वस्तु तयार करण्याचे कारखाने देखील महाराष्ट्रांत आहेत; परंतु या उद्योगधंद्यांत अजून लहान प्रमाणावर काम करणारे कारखानेच पुष्कळ आहेत. जनावरांच्या हाडांपासून खत तयार करण्याचा उद्योगधंदा महाराष्ट्रांत लहान प्रमाणावर चालतो. रबर व प्लॅस्टिक यांचे कारखाने महाराष्ट्रांत दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत भरभराटीस आले. प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे ह्या उद्योगधंद्याला महाराष्ट्रांत वाव आहे यांत शंका नाहीं. ह्याशिवाय सरकारनें सैन्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य व दारूगोळा यांचे उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्रांत अनेक ठिकाणीं कारखाने उघडले आहेत. महाराष्ट्रांतील चित्रपटव्यवसाय हाहि एक उल्लेखनीय उद्योगधंदा आहे. मुंबई हॅ ह्या व्यवसायाचें केंद्र असून भारतांत तयार होणाऱ्या चित्रपटांपैकीं जवळजवळ निम्मे चित्रपट मुंबई शहरांत तयार झालेले असतात. मुंबईशिवाय पुणे व कोल्हापूर हीं दोन्हीहि महाराष्ट्रांतील चित्रपट व्यवसायाची केंद्रे आहेत. सध्यां भारतीय सरकार पुण्याला 'फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' नांवाची चित्रपटव्यवसायाचे शिक्षण देणारी एक संस्था काढीत आहे. ह्यासाठी सरकारनें पुण्याचा प्रभात स्टुडिओ आपल्या ताब्यांत घेतला आहे. ही अर्थात् पुण्याच्या दृष्टीनें अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ह्याचा दुसरा परिणाम असा झाला आहे कीं, पुण्यांतील खाजगी चित्रपट व्यवसाय बऱ्याच प्रमाणावर कोल्हापूर या ठिकाणीं गेला आहे. महाराष्ट्रांत चित्रपट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो व जवळजवळ ५-६ हजार कामगारांना तरी काम पुरवितो. लघु उद्योगधंदे व कुटीरोद्योग आतांपर्यंत आपण महाराष्ट्रांतील प्रमुख उद्योगधंद्यांची माहिती बघितली. त्याचबरोबर आपल्याला हैहि लक्षांत ठेवावयास पाहिजे की महाराष्ट्रांत अनेक लघु उद्योगधंदे व कुटीरोद्योग चालू आहेत व ह्या उद्योगधंद्यांमार्फत जीवनोपयोगी सर्व वस्तूंचे उत्पादन होतें. सूत काढणे, हातमागांवर कापड विणर्णे, रेशर्मी काम, कातडीं कमाविण्याचे उद्योगधंदे, तेल काढणे, गूळ तयार करणे, हातकागद तयार करणे वगैरे कार्मे या लघु उद्योगधंद्यांत व कुटीरोद्योगांत होतात. यांपैकी बऱ्याच उद्योगधंद्यांची व्यवस्था अलीकडे सहकारी संस्थांमार्फत पाहिली जाते. या उद्योगधंद्यांमुळे बऱ्याच लोकांना काम मिळते म्हणून अलीकडे सरकारहि ह्या उद्योगधंद्यांना उत्तेजन देत आहे. सध्या राज्यांत २,००० वर औद्योगिक सहकारी संस्था असून त्यांच्या सभासदांची संख्या १॥ लक्ष आहे. यांचे खेळते भांडवल ५ कोटि रुपयांच्या आसपास आहे. लघु उद्योगधंदे व कुटीरोद्योग यांचे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासांत एक विशिष्ट स्थान आहे. राज्य सरकार तर्सेच केंद्र सरकार ह्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्यं लघु उद्योगधंदे व कुटीरोद्योग ह्यांचें कोणते स्थान असावें हें निश्चितपणे जाणलॅ आहे व त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. तेव्हां लघु उद्योगधंदे व कुटीरोद्योग ह्यांचा थोडा तपशीलवार विचार केला तर फारसें अप्रस्तुत होणार नाहीं अर्से वाटते. अर्थातच हा विचार आपण भारताच्या दृष्टीनें करीत असला तरी महाराष्ट्र हा भारताचा अविभाज्य घटक असल्यामुळे खालील सर्व विवरण महाराष्ट्रालाहि लागू आहे. |
योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्. . . ' उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची घोडदौड नमूद करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्याचा जीडीपी हा गेल्या चार वर्षात दुप्पट झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. प्रयागराज :उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची घोडदौड नमूद करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्याचा जीडीपी हा गेल्या चार वर्षात दुप्पट झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. (cm yogi adityanath claims we will come to power again) सन २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा विजय संपादन करून सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षात अनेक महत्त्वाचे बदल राज्यात करण्यात आले आहेत. थोडा धीर धरा. संयम बाळगा. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ आणि देशात उत्तर प्रदेशला आर्थिक आघाडीवर प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले. आम्ही सत्तेत आलो, तेव्हाचेच प्रशासन आहे, तीच माणसे आहेत, महसुलाचा स्रोतही तोच आहे, सर्व गोष्टी यापूर्वी होत्या तशाच आहेत, आम्ही केवळ कार्यपद्धती बदलली, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ आणि उत्तर प्रदेशमधील स्थलांतर थांबवू, असा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतरावरूनही विरोधकांवर जोरदार टीका केली. अशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का? शास्त्री भवनाची दुर्दशा का झाली? , अशी विचारणा करत मुख्यमंत्री कार्यालयात चौकशी केली तेव्हा समजले की, माजी मुख्यमंत्री केवळ वर्षातून एक ते दोन वेळाच तेथे जात असत. काही मंत्री तर मंत्रिमंडळ बैठकीला केवळ १० मिनिटे उपस्थिती लावत होते. अशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का, असा खरमरीत सवाल योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना विचारला. योगी आदित्यनाथ यांच्या टीकेवर पलटवार करताना विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी म्हणाले की, तुम्ही योगी असाल किंवा नसाल, अखिलेश यादव कर्मयोगी आहेत. २०२२ मधील लढाई योगी विरुद्ध कर्मयोगी अशी होईल, असे प्रत्युत्तर राम कोविंद चौधरी यांनी दिले. |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. बाप इंजिनीयर तर मुलगी पण इंजिनियर बाप शिक्षक तर मुलगी पण शिक्षक. मात्र, बाप चोर तर मुलगी पण चोर अस म्हणायला आपल्यातली लोक कमी करत नाही. अशीच एक कहानी आहे कल्पना दाभाडे यांची. कल्पना या लहान वयात असताना कल्पना यांच्या वडिलांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांची परिस्थिती खडतर होती दोन वेळेचं अन्न मिळणं ही त्यांच्या साठी मोठी गोष्ट होती. मात्र, अशा परिस्थितीच्या सुरुवातीपासून ते सीए होण्याचा प्रवास कल्पना दाभाडे यांनी आपल्या समोर मांडलाये. असं म्हणतात बापाचं छत आणि आईची माया मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट असते. समाजात आपल्या वडिलांची जशी छबी असते त्या दृष्टीने त्यांच्या मुलांकडे पाहिलं जात. असं नेहमी बोलतात बाप डॉक्टर तर मुलगी पण डॉक्टर, बाप इंजिनीयर तर मुलगी पण इंजिनियर बाप शिक्षक तर मुलगी पण शिक्षक. मात्र, बाप चोर तर मुलगी पण चोर अस म्हणायला आपल्यातली लोक कमी करत नाही. अशीच एक कहानी आहे कल्पना दाभाडे यांची. कल्पना या लहान वयात असताना कल्पना यांच्या वडिलांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांची परिस्थिती खडतर होती दोन वेळेचं अन्न मिळणं ही त्यांच्या साठी मोठी गोष्ट होती. मात्र, अशा परिस्थितीच्या सुरुवातीपासून ते सीए होण्याचा प्रवास कल्पना दाभाडे यांनी आपल्या समोर मांडलाये. कल्पना यांचे आई वडील अशिक्षित होते म्हणून त्यांची परिस्थिती जेम तेमच होती. आई धुणे भांडी म्हणजे घर काम करत असे आणि वडील एका कंपनी वॉचमनचे काम करायचे. त्या प्राथमिक शाळेत असताना त्यांना एक किलोमीटर चालत जावे लागत असे आणि आईवर चार ते पाच घरचे कामाची जबाबदारी होती. म्हणून सकाळचा डबा तिच्या मैत्रिणीकडे पाठवून देत असे. वडिलांना दारु पिण्याचं व्यसन होते. म्हणून कल्पना यांच्या पहिल्या प्राथमिक शिक्षणाकडे ना आईला वेळ द्यायला जमायचे ना वडिलांना. अशी या कुटुंबाची रोजची जीवनाची गाडी धावत होती. मात्र, एके दिवशी असा प्रसंग घडला जिथून कल्पना आणि त्यांच्या आईची झोप उडाली. कल्पना यांचे वडील ज्या कंपनीमध्ये काम करायचे त्या ठिकाणी टीव्हीची चोरी झाली. त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशीसाठी आले वडिलांना दारु पिण्याचं व्यसन होतं म्हणून त्या चोरीबद्दल कोणतंही स्पष्टीकरण वडील देऊ शकले नाही. म्हणून पोलिसांनी सगळा आरोप कल्पनांच्या वडिलांवर लावला आणि त्यांना तुरुंगात टाकलं. (आदित्य भवार) माझ्या प्रवासाबद्दल एवढचं सांगायचंय की कोणत्याही व्यक्तीला एका चष्म्यातून बघू नका प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील वेगवेगळे कंगोरे असतात काही दिसतात काही दिसत नाहीत. कष्टाला पर्याय नाही आपले कष्टच आपल्याला कुठेही तारुन नेऊ शकतात. प्रामाणिकपणे काम करणे आणि येईल त्या प्रसंगाला सामोरे जाणे याचं एक पर्याय सी.ए कल्पना दाभाड यांनी वापरला आहे. शिक्षणाच्या या खडतर प्रवासानंतर कल्पना दाभाडे या चांगल्या ठिकाणी काम करत आहे. त्यांचा प्रवास पाहून लोकांचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्या हा प्रवासाला "महाराष्ट्र टाइम्स"चा सलाम आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. (आदित्य भवार) मात्र, काही महिन्यानंतर क्षितिज या संस्थेच्या ऑफिसला येणारे फंडिंग बंद झालं आणि तेही ऑफिस मला सोडावे लागले. त्यावेळी राहण्याचा प्रश्न पुन्हा पुढे आला. मात्र, संस्थेच्या एका मैत्रिणीने मला रुम घेऊन राहण्याचा सल्ला दिला. मी एक रुम घेऊन राहिली पण योगा योगाने मला विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये जॉब मिळाला. मात्र, तिथेही सुरवातीला बॉंड लिहून देणे, काम प्रामाणिकपणे करणे, कॅशचे व्यवहार सांभाळणे अशा प्रकारची काम करायची होती. मात्र, त्यांच्याकडे मी पुढील शिक्षणाची विनंती केली तर ते म्हणाले हरकत नाही इतकी मूल शिकत आहे तू देखील शिक. त्यासाठी त्यांनी मला थोडा वेळ अॅडजेक्ट करुन दिला म्हणून अशा प्रकारे तीन वर्ष आर्टिकलशिप आणि दोन वर्ष परिक्षा असं करत पाच वर्ष मी सी.एच शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या ठिकाणी आर्टिकलशिप करत होती म्हणजे गोखले संस्थेमध्ये त्याच ठिकाणी त्यांनी मला पार्टनरशिपची ऑफर दिली आणि आता पण मी तिथे काम करत आहे. (आदित्य भवार) संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर खऱ्या जीवनाचा अनुभव आला. राहायला छप्पर होतं, पण आता कुठे राहणार आणि काय करणार, काम मागायला गेल्यावर पहिले लोक विचार करायचे की ही निरीक्षक गृहमधून आली आहे. यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केला असेल का? हिला रिमांड रुममध्ये ठेवण्यात आलं होतं का?, असे अनेक प्रश्न लोकांच्या समोर उभे राहायचे. त्यावेळी लातूरमध्ये एक भूकंप झाला होता. तिथे एक व्यक्ती कामासाठी हवी होती म्हणून मी पुढच्या शिक्षणाऐवजी त्याला प्राधान्य दिले करण राहणं आणि पोटाची खळगी भरणं त्यावेळी माझ्यासाठी जास्त गरजेचं होते. त्यानंतर मी पुण्यात परत आली आणि आई त्यावेळी खूप आजारी होती. मात्र, काही दिवसानंतर आईचंही निधन झालं. त्यानंतर मला पुण्यात एका क्षितिज संस्थेत काम मिळाले. त्यांच्या ऑफिसमध्ये दिवसभर काम करत होती आणि रात्री त्याच ऑफिसमध्ये राहण्याची सोय केली होती. जवळपास तीन वर्षे मी तिथे राहिली आणि काम करता करता माझं एम.बी.एच शिक्षण पूर्ण केलं. (आदित्य भवार) मी लहान असताना मला बोर्डिंग (निरीक्षक गृह) मध्ये ठेवण्याचा निर्णय माझ्या आईने घेतला. कामाची कधी सवय नव्हती तरी बरीच काम तिथे मी लहान असल्या कारणाने मोठ्या मुली करायच्या पण स्वतःची काम ही स्वतःला करायला लागायची. निरीक्षक गृहमध्ये एकतर शिका नाही तर सांगितलेली काम करा, बोर्डिंग मधल्या लोकांचा मार नको बसायला म्हणून मी शिकत गेले कसं तरी मी चौथीपर्यंत पास झाले. मात्र, त्या नंतर माझी दुसऱ्या संस्थेत बदली झाली तेव्हा त्यांनी विचार केला की यांना पुन्हा चौथीत बसवायचं की पाचवीत काही कारणास्तव माझं चौथीत बसणं टाळलं आणि मी पाचवीत गेले. माझा चौथी पर्यंतचा प्रवास अजिबात चांगला नव्हता. मात्र, पाचवी नंतर मी शिक्षणात गुंतत गेले तिथे शिका अस म्हणणारे कोणी नव्हते आणि शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जर कोणी विद्यार्थी फेल झाला तर त्यांना विविध प्रकारचे काम सांगण्यात यायचे म्हणून मी शिकत गेले. येथे आम्हाला आमच्या मनाने कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेता नाही आला. मला नर्स बनून लोकांची सेवा करायची होती पण संस्थेच्या दृष्टीने मला लवकर सेटल होण्यासाठी त्यांनी मला डी.एडला अॅडमिशन घ्यायला लावले. पण काही कारणास्तव माझे अॅडमिशन डी.एडला होऊ शकलं नाही आणि मला कॉमर्सला अॅडमिशन घ्यावे लागले. माझी कधीच इच्छा नव्हती की मी कॉमर्सला अॅडमिशन घ्यावे पण दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मी माझं शिक्षण कॉमर्समधून पूर्ण केलं आणि संस्थेमधून बाहेर निघाली. (आदित्य भवार) वडिलांना तुरुंगात टाकल्याने याचा परिणाम कल्पना यांच्या आईच्या कामावर झाला ज्या ठिकाणी घर काम करत होती तिथून त्यांचं काम थांबण्यात आलं. वडिलांच्या एका चुकीमुळे मुलीला आणि आईला त्रास भोगावा लागत होता. दोन वेळाची पोटाची खळगी भरणे देखील अवघड झालं. मात्र, काही दिवसानंतर काम मिळालं तिथे आई कामाला जाताना त्यांना सांगण्यात यायचं की मुलीला कामावर घेऊन येऊ नको मुलगी कुठे कुठल्यातरी वस्तूला हात लावेल काही तरी नुकसान करेल. म्हणून आई ज्या ठिकाणी कामाला जायची मला त्या घराबाहेरच तीन-चार तास बसावं लागत असे. अशा अनुभव अनेक ठिकाणी जिथे आई काम करत होती तिथे आला. एका ठिकाणी आई जिथे काम करत होती तिथे आईची वाट पाहून बंगल्यात गेले तिथल्या मालकांनी मला घाबरवण्यासाठी कुत्रा माझ्या अंगावर सोडला त्याचे नखं माझ्या नाकावर लागले ती आठवण अजूनही माझ्या मनात आणि नाकावर आहे. वयाने लहान असल्या कारणाने आई सतत सोबत असावी असं वाटायचं पण अशेच वेगळे आणि वाईट अनुभव अनेक आईच्या कामावर आले. म्हणून मला आईने बोर्डिंगला ठेवण्याच्या निर्णय घेतला. (आदित्य भवार) Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा. देश सिंहांशी लढू शकते ही म्हैस, महिन्यात देते 'इतके' हजार लिटर दूध! सिनेन्यूज 'द कश्मीर फाइल्स' ला वल्गर प्रपोगंडा म्हणणारा नदव लॅपिड नक्की आहे तरी कोण? आजचं भविष्य आजचे राशीभविष्य २९ नोव्हेंबर : ग्रहांच्या संक्रमणानुसार, आजचा दिवस या राशींसाठी शुभ असेल. सिनेन्यूज बॉलिवूड चित्रपटांमध्ये वाढतोय या गोष्टीचा भरणा, निर्मात्यांचा निर्णय ठरणार का गेम चेंजर? नियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..? |
औरंगाबाद- गेल्या चार दशकांपासून मराठी मनावर मोहिनी घालणार्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या 'तुझे गीत गाण्यासाठी' या गप्पा आणि अवीट कवितांच्या मैफलीने औरंगाबादकर रसिकांना शब्दांच्या झोपाळ्यावर झुलवले. 'स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे' असा अनुभव सर्वांना आला. देवेन समूहाच्या वतीने गुरुवारी (7 मार्च) मंगेश पाडगावकर यांचा डॉ. यु. म. पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्याधर रिसबुड यांनी पाडगावकरांची प्रकट मुलाखत घेतली. पाडगावकरांची अजरामर गाणी आणि गप्पा असा हा कार्यक्रम रंगला. पाडगावकरांनी कवितेचा प्रवास आणि गाजलेल्या कवितांबद्दल माहीत नसलेले अनेक प्रसंग सांगितले तसेच आपल्या प्रसिद्ध कवितांचे वाचनही केले. पाडगावकर म्हणाले, वयाच्या 14 व्या वर्षी माझ्याच वयाच्या एका मुलीला पाहून मी पहिली कविता केली. 'तुज पाहिले, तुज वाहिले, नव पुष्प हे, हृदयातले' ही ती कविता होती. खुसखुशीत किश्शांना दाद देणार्या औरंगाबादकर रसिकांचे कौतुक करताना पाडगावकर म्हणाले की, 'वा. रा. कांत आकाशवाणीत नोकरीला असताना मी कविसंमेलनासाठी औरंगाबादला आलो होतो. त्यानंतर अनेकदा आलो. चांगल्या कलेचे, कवितेचे कौतुक करणे ही औरंगाबादकरांची खासियत आहे.' मुलाखतीदरम्यान विश्वनाथ दाशरथे, सुस्मिरता डवाळकर, निनाद आजगावकर यांनी 'तुझे गीत गाण्यासाठी', 'श्रावणात घन निळा', 'लाजून हासणे', 'निज माझ्या नंदलाला रे','शुक्र तारा मंद वारा' ही अजरामर गाणी सादर केली. |
ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी गेले मात्र, त्यांनी भांडण करीत पप्पा आणि मम्मीचे पाय ओढत डोक्यावर लोखंडी पाईपने मारले. माझ्या मागे धावले मी घाबरून घरात घुसले, ते मम्मी-पप्पांना मारतच होते. परतवाडा (अमरावती) : ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी गेले मात्र, त्यांनी भांडण करीत पप्पा आणि मम्मीचे पाय ओढत डोक्यावर लोखंडी पाईपने मारले. माझ्या मागे धावले मी घाबरून घरात घुसले, ते मम्मी-पप्पांना मारतच होते. मला माझे मम्मी-पप्पा पाहिजे, असा टाहो चिमुकल्या स्वातीने फोडला अन् उपस्थित शेकडोंचे डोळे पानावले. गोविंदपूर येथे बुधवारी रात्री हल्ल्यात मृत पावलेल्या लिल्लारे दाम्पत्यावर हजारोंच्या उपस्थितीत गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर जवळपास दीड हजार लोकवस्तीचे खेडे. शिरजगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाoया गोविंदपुरात बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान कैलास उत्तमराव लिल्लारे (४५), पत्नी गीता (४०) यांची काका रतन (४०), मदन (३८) व जगन प्रेमलाल लिल्लारे (३६, सर्व रा. गोविंदपूर) यांनी अतिशय क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीच्या डोक्यावर लोखंडी पाईपने प्रहार करून हत्या केली. शिरजगाव पोलिसांनी फिर्यादी अंकुश सोपान रणगिरे (२४, रा. अकोली जहागीर, ता. अकोट) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या ३०२, ३४ अन्वये आरोपींना तत्काळ अटक केली. हातभर बांबू तुटण्याचे निमित्त- आरोपी हे मृत लिल्लारे दाम्पत्यांचे चुलत काका आहेत. दोघांची घरे आजुबाजूला. दोघांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी मुरुम आणणा-या ट्रॅक्टरचा धक्का लागून कुंपणाचा वेळू तुटला. त्यावरून पुढे दाम्पत्याचे मुडदे पाडले गेले. क्रौर्याचा कळस लिल्लारे पती-पत्नी खाली कोसळेपर्यंत क्रूरकर्म्यांनी पाईपने सतत वार केले. रक्तबंबाळ दाम्पत्य बचावासाठी याचना करीत होते. परिसरातील नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही. जन्मदात्यांवर हल्ला होताना चिमुकली स्वातीही मदतीसाठी किंचाळत होती, मात्र व्यर्थ ! अन् स्वाती बचावली दोघांची हत्या केल्यावर तिन्ही आरोपींनी मोर्चा स्वातीकडे वळविला. ती घरातच अंधारात लपून बसली. घरात घुसून त्यांनी मिळेल त्या दिशेने लोखंडी पाईप फिरविले. मात्र आपण हुंदके गिळत गप्प पडून राहिल्याने ते घराबाहेर गेल्याचे स्वातीने 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ट्रॅक्टर चालक गोपाल पारीसे आणि लिल्लारेंच्या घरी पाहुणा म्हणून आलेला अंकुश रणगिरे मिळेल त्या वाटेने पळत सुटल्याने बचावले. हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार गोविंदपूर नजिकच्या हिंदू स्मशान भूमित निःशब्द वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत लिल्लारे दाम्पत्यावर गुरूवारी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास लिल्लारे यांना दोन मुली आहेत. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. मोठी मुलगी व मुलगा तारूबांदा येथे आजोबांकडे राहतो. 'स्वाती' एकटीच आई-वडिलांसोबत राहत होती. आरोपींना पोलीस कोठडी चांदूरबाजार न्यायालयाने तिन्ही आरोपींना गुरुवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींनी हत्येसाठी वापरलेले लोखंडी पाईप, रक्ताने माखलेले कपडे, इतर साहित्य पोलिसांनी जप्त करवयाचे आहे. ट्रॅक्टर जप्त केले आहे, अशी माहिती ठाणेदार मुकूंद कवाडे यांनी दिली. |
पारोळा : माहेरहून व्यावसायासाठी तीन लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेच्या छळ करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रेणुका योगेश पाटील (वय २५; थाळनेर ता. शिरपूर जि. धुळे, हल्ली मुक्काम पारोळा) यांचे नंदुरबार येथील सासर असलेल्या विवाहितेचे पती योगेश सुदाम पाटील (रा. दत्त कॉलनी, कोरीट नाका नंदुरबार) यांच्यासोबत विवाह झाला होता. (Bring Three Lakh for Business Harassment of married woman by in laws Jalgaon Crime News) हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का? लग्नानंतर महिनाभरानंतर योगेश सुदाम पाटील (पती), सुदाम भिका पाटील (सासरे), प्रमिला पाटील (सासू), रविना राकेश न्हावी (नणंद), विजय पाटील (दिर, सर्व रा. नंदुरबार) यांनी विवाहितेला माहेरून तुझ्या वडिलांकडून आम्हाला नंदुरबार येथे व्यवसायासाठी तीन लाख रुपये आणावे म्हणून सांगितले. विवाहितेने नकार दिला असता सर्व मंडळींनी शिवीगाळ व मारहाण केली, तसेच मानसिक त्रास देऊन छळ केला. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
शासकीय दुधसंकलन केंद्रात वाढ झाली आहे. वाशिम : मागील वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात स्थानिक शासकीय दुधसंकलन केंद्रात जिल्हयातील दुध उत्पादक सहकारी संस्थांकडून पुरवठा करण्यात आलेल्या दुधाच्या तुलनेत यावर्षी याच चार महिन्याच्या कालावधीत दुध उत्पादक सहकारी संघाकडून करण्यात येत असलेल्या दुधपुरवठयात वाढ झाली आहे. विशेषत एप्रिल महिन्यात सामान्यात : दुध संकलनात दरवर्षी घट असल्याचा सार्वत्रिक अनुभव असताना वाशिमच्या शासकीय दुधसंकलन केंद्रात गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिनी सरार्स एक हजार लीटरएवढी वाढ झाली आहे. जिल्हयात वाशिम व कारंजा येथे १0 हजार लीटर सावठवण क्षमतेची प्रत्येकी एक या प्रमाणे शासकीय दुधशितीकरण केंद्रे आहेत. या केंद्रामध्ये सन २00३ पर्यंत प्रतिदिनी प्रत्येकी पाच हजार लीटर एवढे दुधसंकलन होत होते. पंरतु, नंतरच्या काळात वारंवार दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे दुग्धोत्पादनात घट झाली तसेच विविध कारणामुळे अनेक दुध उत्पादक सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती ढासळली. त्यामुळे त्याचाही शासकीय दुधसंकलन केंद्राला केल्या जाणार्या दुधपुरवठयावर परिणाम झाला. वाशिम व कारंजा येथील शासकीय दुधशितीकरण केंद्राला होणार्या दुधपुरवठयात झपाटयाने घट होत गेली वाशिमचे शासकीय दुधशितीकरण केंद्र कसेबसे सुरु राहीले परंतु, कारंजा येथील शासकीय दुधशितीकरण केंद्र कालांतराने बंद पडले ते आजही बंद आहे. वाशिमच्या शासकीय दुधसंकलन केंद्रातील दुधशितीकरण केंद्रातील दुधसंकलन २00५ -0६ मध्ये अवघ्या एक हजार लीटर एवढे कमी झाले होते. त्यानंतर पंतप्रधान पॅकेजमधून जिल्हाप्रशासनाकडून व पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेतून जिल्हयात गायी, म्हशीचे मोठया प्रमाणात वाटप करण्यात आल. महानंदच्या योजनेतूनही गायी म्हशीचे वाटप करण्यात आले तसेच २00९ पासून अजूनही जि. प. पशुसंवर्धन विभाग व उपायुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजनांमधून शेतकर्यांना अनुदानावर गायी व म्हशीचे वाटप करण्यात येत आहे. परिणामी जिल्हयात दुग्धोत्पादनात वाढ झाली आहे. मागीलवर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या काळात वाशिमच्या शासकीय दुधशितीकरण केंद्रात दुधउत्पादक सहकारी संस्थाकडून सरासरी २७00 लीटर प्रतिलिटरने दुधाचे संकलन झाले होते. चालुवर्षी याच चार महिन्याच्या काळात प्रतिदिन सरासरी ३२५0 लीटर एवढे संकलन झाल्याची नोंद आहे. सध्या शासकीय दुधखरेदीत घेतल्या जाणार्या गायीच्या ४. 0 फॅट असलेल्या दुधाला २१ रुपये ५0 पैेस लीटर तर म्हशीच्या ६. ५ फॅट असणार्या दुधाला ३0 रुपये ५0 पैसे प्रती लिटरचा भाव मिळत आहे. गायीच्या ४. 0 फॅटपेक्षा जास्त प्रत्येक पाईटला व म्हशीच्या ६. ५ फॅटपेक्षा जास्त प्रत्येक पाईटला ३0 पैसे प्रमाणे जास्त दर दिला जात आहे. |
तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. . . ! लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे. संजय देशमुख। यंंदा कधी नव्हे तो जून मध्येच चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या पेरणीसाठीच्या तयारीत गुंतला आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे. भाजप आणि शिवसेना युती बाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर कुठलाच निर्णय झालेला नाही. आणि उमेदवार कोण असतील हा प्रश्न तर अद्याप पक्षाच्या पटलावरही नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांतील दानवे आणि खोतकर यांच्यातील शाब्दिक युध्द टोकाला पोहोचले आहे. यामुळे ज्या प्रमाणे मुंबई महानगर पालिका तसेच पालघर निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून निवडणुका लढवल्या. त्यामुळे तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विषयही जनतेसमोर आला नाही. त्याच धर्तीवर जालना लोकसभा मतदार संघात दानवे व खोतकरांकडून रणनीती आखली जात आहे की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. २००९ मध्ये अर्जुन खोतकरांना शिवसेनेने घनसावंगी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती, त्यावेळी देखील खोतकरांनी तेथे आक्रमक प्रचार करून राजेश टोपे यांना मोठी टक्कर दिली होती. त्यानुसारच आता खोतकर हे आक्रमकपणे दानवेंवर तुटून पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून कोणाचा किती फायदा होणार हे येणारा काळच ठरवेल. युतीचा निर्णय न होताच दानवे आणि खोतकरांमध्येच निवडणूक होणार हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचे काम आतापासून माध्यमांच्या माध्यमातून होत आहे. या दोघांनी जे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत, त्यात त्यांनी यापूर्वी कधीही कुठल्या जबाबदार शासकीय यंत्रणेकडे एकमेकांच्या विरोधात कधी पुरावे दिल्याचे समोर येत नाही. त्यामुळे मूळ यंत्रणेला बाजूला ठेवून, केवळ माध्यमातून आम्ही दोघे किती एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो आहेत, हे चित्र पध्दतशीरपणे रंगवले जात आहे. त्यामुळे जनतेतून काँग्रेसकडून कोण उभे राहणार, कोणाला उमेदवारी मिळणार या बाबत विचार करण्यास वेळच दिला जाऊ नये हा ही हेतू या आरोप-प्रत्यारोपातून साध्य केला जात असल्याचे वास्तव आहे. एकूणच जालना बाजार समितीची निवडणूक आणि त्यानंतर झालेली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून दानवे व खोतकर यांच्यातील वादाला जास्त धार आली. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या जागावाटपावरूनही बराच खल या दोन नेत्यांमध्ये झाला होता. त्यात तडजोड होऊन युती करून ही निवडणूक लढवली आणि सभापती ऐवजी उपसभापती पदावर रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे यांना देऊन येथे समेट झाली. नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळावणी करून अध्यक्षपदी अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांना संधी मिळाल्याने तर भाजपचा तीळपापड झाला होता. या मुद्यांसह रस्ते विकासाचा शुभारंभ असो की नगराध्यक्षाची निवडणूक; यातून दानवे आणि खोतकरांमधील मतभेद वाढतच गेले. आणि आता तर, त्या दोघांनी एकमेकांच्या 'अर्थपूर्ण' उन्नतीचे स्त्रोत सांगून मोठा राजकीय धुरळा उडवून दिला आहे. |
योक्त्याचा प्रबंध आहे. नागरी वा नैसर्गिक करार राजा व त्याची प्रजा यांना अजूनही बंधनकारक होत असेल, तर परस्परांविषयीची कर्तव्यबुद्धी ही तिथे असणारच; अर्थातच, निरपेक्ष निकाल जाहीर करणारा निरपेक्ष न्यायाधीश म्हणून जनताजनादनाची इच्छाशक्ती स्वतःच उभी राहू शकणार नाही. म्हणूनच, प्रजा व राजा यांच्यामध्ये कोणत्याही कराराचे बंधन असत नाही, हे सिद्ध करणे आवश्यक आहे. जनता ही शाश्वत सत्याचे मूर्तस्वरूप आहे. हे सिद्ध करण्यासाठी, राजेशाही ही शाश्वत गुन्हेगारीचे मूर्तस्वरूप आहे हे सिद्ध करणे आवश्यक आहे. प्रत्येक राजा हा बंडखोर वा हक्क बळकावणारा आहे असे सेंट जस्ट म्हणून गृहीत धरतो. राजा हा जनतेचे निरपेक्ष सार्वभौमत्व बळकावणारा जनताविरोधी बंडखोर आहे. राजेशाही म्हणजे एखादा व्यक्तिगत राजा नव्हे; तर "ती मूर्तिमंत गुन्हेगारी आहे", एखादा दुसरा गुन्हा नव्हे तर साक्षात गुन्हेगारीच आहे, असे सेंट जस्ट म्हणतो. वेगळ्या शब्दात राजेशाही म्हणजे संपूर्णपणे अमंगल अशी गोष्ट. गर्भितार्थ फारच ताणला गेलेल्या * सेंट-जस्टच्या पुढील उद्गाराचा अचूक त्याबरोबरच अंतिम अर्थ हाच आहे : "निरपराध राहून कोणीही राज्य करू शकणार नाही." प्रत्येक राजा अपराधी आहे. कारण, राजा बनण्याची इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती आपोआप न कळत मृत्यूच्या पक्षामध्ये उभी असते. जनतेचे सार्वभौमत्व ही 'पवित्र वस्तू आहे असे सिद्ध करण्यास सेंट जस्ट जेव्हा निघतो, तेव्हा तो अगदी बरोबर हेच म्हणतो. जनता अभंग व पवित्र असते आणि तिच्यातील सामायिक इच्छाशक्तीचे व्यक्त स्वरूप असलेला कायदाच केवळ तिच्यावर निर्बंध घालू शकतो. या विशिष्ट पावित्र्याचा व कायद्याच्या महतीचा लुईला स्वतःला फायदा उठविता येणार नाही, कारण त्याचे स्थान करारनाम्याच्या कक्षेबाहेर आहे. तो सर्वसामान्यांच्या इच्छाशक्तीचा अंश नव्हे; उलटपक्षी, केवळ आपल्या अस्तित्वामुळेच तो सर्वशक्तीमान इच्छा शक्तोचा निंदक ठरतो. या नूतन दैवी पसायदानांत सहभागी होण्याची पात्रता ठरविणारी "जनता" ( पौरजन) ही त्याची किताबत नव्हे. "परेंच पौरजन या नात्याने तुलना करता राजा ही काय चीज, किस झाडकी पत्ती ?" या दृष्टिकोनातूनच म्हणून त्याला न्यायासनासमोरच उभा केला पाहिजे. यापेक्षा काही अधिकावर हक्क सांगण्याची त्याची पात्रता नाही. * किंवा किमान त्या उद्गाराची अर्थपूर्णता पूर्वापेक्षितच होती. जेव्हा त्याने हे उद्गार काढले तेव्हा आपण स्वतःपुरतेच बोलत आहोत याची सेंट-जस्टला जाणीव नव्हती. बंडखोरीचे तत्त्वज्ञान |
एमपीसी न्यूज - किवळे येथील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून (Kiwale) अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. लोखंडी होर्डिंग कोसळल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी जागामालकासह चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. त्याबाबतचा अहवाल आठ दिवसात पाठविण्यात यावा, असे आदेश शासनाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी दिले आहेत. या दुर्घनेत मृत्यू झालेल्या पाच जणांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार मदतीचे 15 लाख रुपये पुणे जिल्हाधिकारी, पुणे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये वर्ग करण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही रक्कम पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार यांच्याकडे धनादेशाद्वारे वितरित केली आहे. हे धनादेश मृतांच्या नातेवाइकांची ओळख पटवून तत्काळ देण्यात येणार (Kiwale) आहेत. |
अहमदनगर - महाराष्ट्रातील अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सिताराम दगडु जाधव (वय 83, बख्तपुर ता. शेवगाव), भिवाजी सदाशिव पवार (80, किन्ही ता. पारनेर), रामकिसन विठ्ठल हरपुडे (70, माका, ता. नेवासा), कोंडाबाई मधुकर कदम (70, केडगाव, ता. नगर), छबाबी अहमद सय्यद (65, शेंडी, रा. नगर), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (65, तेलकुडगाव, ता. नेवासा), कडुबाळ गंगाधर खाटीक (65, पाथरवाला, ता. नेवासा), आसराबाई गोविंद नागरे (58, शेवगाव, ता. शेवगाव), दिपक विश्वनाथ (37, आश्वी, ता. संगमनेर) आणि एक 58 वर्षीय अनोळखी व्यक्ती यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दरम्यान, अहमदनगर येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेबाबत देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 17 कोरोना रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आगीमुळे येथील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. या कारणामुळे अनेक कोरोना बाधितांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आले. आगीमुळे किती रुग्ण दगावले आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किती रुग्ण दगावले याची अचूक आकडेवारी तपासानंतरच समोर येईल. दरम्यान, अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची चौकशी होईल, अशी माहिती अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान कोल्हापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरकडे रवाना झाले आहेत. दरम्यान यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेत वरून ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. |
नामदेव मोरे, नवी मुंबई- शासनाने फळे व भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने साखर, डाळी व सुका मेवा बाजार समितीमधून यापूर्वीच वगळला असून आता भाजीपाला व फळे वगळल्यास येथील तीन मार्केटमधील जवळपास दहा हजार कामगारांसह वाहतूकदार व इतर घटकांवर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची थेट विक्री करता यावी यासाठी शासनाने भाजीपाला व फळे बाजार समितीमधून वगळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई बाजार समितीला बसणार आहे. अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसू लागणार आहेत. शासनाने यापूर्वी साखर, डाळी, सुका मेवा, रवा, मैदा या वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. व्यापारी बहुतांश मालाची परस्पर विक्री करत असल्याने माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. सद्यस्थितीमध्ये कांदा - बटाटा, भाजीपाला व फळे या तीनच मार्केटमधील कृषी मालाचे नियमन सुरू आहे. आता या वस्तूही नियमनातून मुक्त करण्यात येणार असल्याने बाजार समितीच्या अस्तित्वाला काही अर्थच राहणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. जवळपास दहा हजार माथाडी कामगार व तेवढेच रोजंदारी कामगार मालाची चढउतार करण्याचे काम करत आहेत. भाजीपाला थेट मुंबईत गेल्यास कामगारांचा रोजगार कमी होणार असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. साखर, डाळी व सुका मेवा यापूर्वीच बाजार समितीमधून वगळला आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आता भाजी व फळे वगळल्याने त्याचा थेट परिणाम माथाडी कामगारांच्या रोजगारावर होण्याची शक्यता आहे. एपीएमसीमधील व्यापारावर किमान ३० ते ४० टक्के परिणाम होण्याची शक्यता असून याविषयी सर्व घटकांना विश्वासात घेवून पुढील निर्णय घेतला जाईल. |
भूमिका- पंचकाभ्यासात् स्वात्मारामतया - भृशम् । आभ्यंतराणां बाह्यानां पदार्थानामभावनात् ।। ९ ।। पर प्रयुक्तेन चिरप्रयत्नेनावबोधनम् । पदार्थाभावना नाम षष्ठी भवति भूमिका ॥१०॥ (पूर्वी सांगितलेल्या) पाच भूमिकांच्या सूमहाचा भरपूर (भृशं ) अभ्यास झाल्यामुळे म्हणजे त्यांच्या स्थिरतेमुळे, स्वतःच्या आत्म्याच्या / मनाच्या ठिकाणी आरामाची प्राप्ती होत असल्यामुळे (स्वात्मारामतया), आंतरिक आणि बाहेरील अशा (द्विविध) पदार्थांचा विचार / भावना (मनात) न आल्यामुळे (अभावनात्), दुसऱ्या कोणीतरी (पर) केलेल्या चिरकालीन प्रयत्नामुळे, जे ज्ञान होते / अवबोधन), ते ज्ञान ज्या भूमिकेत असते ती पदार्थाभावनापदार्थ अभावना- नावाची सहावी भूमिका आहे (९-१०) पहिल्या पाच भूमिका मनात स्थिर झाल्या. आता मुमुक्षु माणूस अंतर्मुख झाला असल्यामुळे, ज्यात विषयां- पासूनचा आनंद अशी एक आनंदाची विशिष्ट स्थिती मुमुक्षूच्या मनात उद्भूत होते, आणि त्याला आत्मानंदाची झुळूक प्राप्त होते. साहजिकच त्याला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे बाह्यपदार्थ / विषय आणि काम, क्रोध, लोभ इत्यादि आंतर पदार्थ म्हणजे विकार यांची जाणीव त्याला होत नाही. ही विशिष्ट अवस्था प्राप्त झाल्यावर त्या मुमुक्षूला दुसऱ्या कोणीतरी प्रयत्नपूर्वक त्या त्या पदार्थाची जाणीव करून द्यावी लागते, मगच त्याला तो पदार्थ कळतो. याचा अर्थ इतकाच की तो आता स्वेच्छेने त्या त्या पदार्थाकडे वळत नाही. अशी जी भूमिका / अवस्था तिला पदार्थाभावना ( पदार्थ - अभावना ) असे म्हणतात. संक्षेपाने पदार्थाभावना म्हणजे मुमुक्षूला स्वतःहून पदार्थांची जाणीव न होणे. (येथे हे लक्षात असावे की सर्वच मुमुक्षूंच्या बाबतीत ही पदार्थाभावना असेलच असे नाही. कारण काही मुमुक्षू हे देहधर्मानुसार स्वेच्छेने व्यवहाराकडे वळताना दिसून येतात.) षड्-भूमिका-चिराभ्यासाद् भेदस्यानु प्रलंभनात् । यत् स्व-भावैक-निष्ठत्वं सा ज्ञेया तुर्यगा गतिः ।।११।। (पहिल्या) सहा भूमिकांच्या चिरकालीन अभ्यासामुळे - स्थिरतेमुळे - (मुमुक्षूला) भेदाचे ज्ञान होईनासे होते, त्यामुळे (भेदस्य अनुप्रलंभनात्) त्याला स्वतःच्या भावाशी जी एकनिष्ठा प्राप्त होते, ती म्हणजे तुर्यगा (ही सातवी) भूमिका (गति) आहे (११). या श्लोकात 'गतिः'चे स्थानी 'स्थिती' असा पाठभेद आहे. पहिल्या सहा भूमिकांचा अभ्यास - स्थिरता - झाल्यामुळे, त्या भूमिका/ अवस्था आता मुमुक्षूच्या स्थिरपणाने दृढ झाल्या आहेत. परिणामतः त्याचे भेदाचे ज्ञान संपते. याचा अर्थ असा की आत्म्याखेरीज अन्य काही आहे असे त्याला वाटत नाही. त्याला सर्वत्र आत्मदर्शन होऊ लागते. 'एतदात्म्यमिदं सर्वम्' = ( हे सर्व आत्माच आहे) किंवा 'सर्वंखल्विदं ब्रह्म' = (हे सर्व विश्वब्रह्म आहे) अशी प्रचीती त्याला येऊ लागते. श्लोकातील 'स्व-भाव' मध्ये स्व म्हणजे आत्मा आणि भाव म्हणजे अस्तित्व. स्वतःचा भाव म्हणजे आत्म्याचे अस्तित्व. आत्माच आहे आणि अन्य काही (त्याच्यापेक्षा वेगळे) नाही अशी त्या मुमुक्षूची ठाम भूमिका होते ( एक निष्ठत्व ) म्हणजे आत्मा आहे, तोच सर्व काही आहे, आत्म्याखेरीज अन्य काही नाही अशी जी त्याची ठाम अवस्था ती म्हणजे तुर्यगा भूमिका होय. तुर्यगा / तुर्या म्हणजे शब्दशः चौथी (अवस्था). या स्थितीला चौथी अवस्था म्हणण्याचे कारण असे, माणसाच्या नेहमीच्या व्यवहारात आणि जीवनात जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्था स्वाभाविकपणेच आलटून पालटून येत असतात. परमार्थात/ अध्यात्मात मुमुक्षूला या तीन अवस्थांच्या पलीकडील अवस्था प्राप्त होते. ती चौथी म्हणजे तुर्या अवस्था आहे. ही तुर्या अवस्था कशी असते ते शंकराचार्य पुढील श्लोकात कथन करतात. (१२) परब्रह्मवदाभाति निर्विकारैकरूपिणी । सर्वावस्थासु धारैका तुर्याख्या परिकीर्तिता ।। १२ ।। सर्व अवस्थांमध्ये परब्रह्माच्या स्वरूपाप्रमाणे असणारी अशी जी एकच (ज्ञानाची) धारा, ती तुर्या या नावाने ओळखली जाते (१२). तुर्या या अवस्थेत केवळ परब्रह्म म्हणजे शुद्ध चैतन्य असते. वेदांतसार ग्रंथात म्हटल्याप्रमाणे, 'यदनुपहितं चैतन्यं तत् तुरीयं इति उच्यते' (उपाधिरहित शुद्ध चैतन्य हे तुरीय तुर्या, चौथे) म्हटले जाते. "शिवं अद्वैतं चतुर्थं मन्यते स आत्मा' असे मांडुक्य उपनिषदही (७) सांगते. या तुर्यावस्थेत मुमुक्षूचा तथाकथित जीव हा परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. परिणामतः त्याला सर्व अवस्थांमध्ये परब्रह्माचीच जाणीव रहाते. यानंतर समारोप करताना शंकराचार्य सांगतात, इत्यवस्था - समुल्लासं विमृशन् मुच्यते सुखी ॥१३॥ अशाप्रकारे या भूमिकांचा अवस्थांचा जो प्रकार / विस्तार (समुल्लास) आहे, त्याचा जो मुमुक्षु विचार करतो (विमृशन्) म्हणजे अनुभव घेतो, तो सुखी होतो आणि तो (सहजपणे ) प्रपंचाच्याभगवत् पूज्यपाद जगद्गुरु आद्य शंकराचार्य विशेषांक |
पुणेः विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांचा निधी आणि त्यांच्या प्रश्नांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरलं. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडवावा, अशी मागणी पवारांनी केली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं होतं. या बैठकीला अजित पवार यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तीन-चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना निधीची कमतरता भासत आहे, शिवाय बिलं रोखली जात आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न तडीस जात नसल्याचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. काय म्हणाले अजित पावर? पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे आमदारांच्या निधीबाबत मागणी केली आहे. राज्यातील १ लाख ५ हजार कोटी रुपयांची बिलं थकलेली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बिलांचाही समावेश आहे. वरती विचारल्याशिवाय बिलं काढू नका, असे आदेश ट्रेझरीला आल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी यावेळी केला. पुढे बोलतांना पवार म्हणाले की, ३१ मार्चच्या आधी केलेल्या कामांची बिलं पेंडिंग आहे. त्यामुळे आम्ही चंद्रकांतदादांना मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासंदर्भात मागणी केली आहे. यासह पिण्याचं पाणी, कचरा, जलपर्णी, खड्डे, वीजेचे प्रश्न यासंबंधीच्या कामांसाठी निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केल्याचंही अजित पवार म्हणाले. |
'गंधर्व नाटक मंडळी'त प्रवेश करण्यापूर्वी, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्याजवळ माझे वास्तव्य होते. कोल्हापुरातील कोणी गाणारा मुलगा असल्यास त्यांना त्या वेळी हवा असल्याने, महाराजांच्या सांगण्यावरून श्री. रामराव नागेशकर या वाड्यावर नोकरीस असलेल्या आणि आमच्या घरच्या परिचयाच्या गृहस्थांनी मला मुद्दाम नेऊन श्रीमंत महाराजांची भेट करवली आणि तेथे नोकरी दिली. माझे वडील व मातोश्री माझ्या लहानपणापासून कोल्हापुरास स्थायिक झालेले असले तरी आमचे मूळ सुप्रसिद्ध भिक्षुक घराणे गोव्यातील सावईवेरे येथील होय. त्यामुळे नागेशकर वगैरे गोव्यातील मंडळींचा व आमचा परिचय होता. त्या घेळी माझे इंग्रजी शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेले होते. पण तिकडे फारसे लक्ष नव्हते. नंतर कोल्हापूरचे त्या वेळचे दरबार गवई पै. म. बुरजीखांसाहेब यांच्याकडे माझी गाण्याची तालीम सुरू झाली. नव्या 'किर्लोस्कर मंडळी'ची कोल्हापुरात फाटाफूट त्या वेळी ' किर्लोस्कर नाटक मंडळी' (नवीन ) कोल्हापुरास येऊन बंद झाली होती. त्यातील प्रमुख नट श्री. चाफेकर व श्री. माधवराव जोशी हे त्या वेळी दरबारात राहिले होते. मला वाटते, श्री. आक्कासाहेब महाराजांच्या मनातून त्या वेळी एखादी नाटक कंपनी सुरू करण्याचे असावे. नाटक कंपनीला लागणारे सर्व साहित्य, बंद झालेल्या कंपनीचे तयार होतेच, त्यास अनुसरून 'संशयकल्लोळ', 'मानापमान' वगैरे प्रयोग जवळचाच नटसंच जमवून कारणपरत्वे रंगभूमीवर केले गेले. पुढे बराच काळ विशेष हालचालीशिवाय तसाच जात चालला व श्रीमंत स्वारीबरोबर राहणे, शिकारीनिमित्त पन्हाळा, रायबाग वगैरे ठिकाणी सरकारी कँप जाईल तेथे बरोबर असणे, रेसच्या निमित्ताने पुणे, मुंबई वगैरे ठिकाणी बरोबर जाणे वगैरे गोष्टी माझ्या कलासक्त अंतःकरणाला मानवणान्या नव्हत्या. गाण्याचे शिक्षण व तालमीही त्यामुळे व्यवस्थित चालत नसत, तशातून मागे उल्लेखिल्याप्रमाणे येथील श्रीमंत सावकार बाबूराव रुईकर यांना मी वाड्यावर सरकार दरबारात राहावे हे पहिल्यापासून पटत नसल्याने, मला गंधर्व नाटक मंडळीत ठेवण्याबद्दल त्यांनी माझ्या वडील-मातोश्रींना बरेच वेळा व हरएक प्रकारे समजावून सांगून पाहिले, व शेवटी त्यांच्याच इच्छेप्रमाणे मी मिरज मुक्कामी गंधर्व मंडळीत प्रविष्ट झालो. वडील-मातोश्रींना मी एकुलता एकच असल्याने मला आपल्यापासून दूर जाऊ देण्यास त्यांचा विरोध होताच. कोल्हापूर सोडून नाटक कंपनीत गुपचुप प्रवेश माझे कोल्हापुरातून बहिर्गमन आणि नाटक कंपनीत राहणे या गोष्टी सरकारस्वारी आणि श्रीमंत आक्कासाहेब महाराज यांना न कळवता आल्याने त्यांचा रोष होईल की काय या धास्तीने मी कित्येक दिवस कोल्हापुरास येण्याचे टाळीत असे. एकदा कंपनीचा मुक्काम मुंबईस असताना रॉयल ऑपेरा हाउसमध्ये नाट्यप्रयोग चालू होते. कोल्हापूरचा सरकारी कँप रेसच्या निमित्ताने मुंबईस असता एका नाट्यप्रयोगास श्रीमंत आक्कासाहेब महाराज व सरकारस्वारी इतर काही दरबारी मंडळीसह उपस्थित होती. त्या वेळी त्यांनी मला मुद्दाम बोलावून घेऊन विचारले व चौकशी केली की न कळवता कंपनीत जाण्याचे काय कारण होते ? आपल्याला सांगितले असते तर आम्हीही तुझ्या मनाप्रमाणे नाटक कंपनीत प्रवेश मिळवून दिला असता. असो. त्याच वेळी नानांची आणि श्रीमंत स्वारींची भेट होऊन त्यांनी नानांना विचारले की, आपण कोल्हापुरास का येत नाही ? यापुढे मनात काहीही न आणता जरूर कोल्हापुरास यावे वगैरे गोष्टी सांगून, कोल्हापुरास येण्याचे जवळ जवळ आमंत्रणच दिले; आणि त्यानंतर कंपनी कोल्हापुरास मुक्काम करू लागली. मध्यंतरी कित्येक वर्षे कंपनी कोल्हापुरास येण्याचे काही कारणाने टाळत असे, पण त्यानंतर (१९३४) गंधर्व कंपनी जेव्हा कोल्हापुरास आली तेव्हा श्रीमंत सरकारांकडून कंपनीचा यथोचित गौरव झाला आणि लोकाश्रयही चांगला मिळाला. मन माझे मोहुनि गेले ' गंधर्व नाटक मंडळी 'तील माझा प्रवेश म्हणजे एका संस्थानातील राजदरबारातून दुसऱ्या संस्थानातील रंगभूमीच्या दरबारातील प्रवेश होय. या दरबारात मात्र माझे मन सुखावले, आणि जे मागितले ते मिळाले असा वरच मिळाल्याचा ब्रह्मानंद मला झाला. रंगभूमीची ती सजावट आणि पुराणकालीन स्वर्गीय देखावे पहात असता, देवलोकीच्या कौरव-पांडवकालीन वर्णनाप्रमाणे रंगभूमीवर दृश्य दिसत असे, आणि मन त्याच काळात वावरत राही. बालगंधर्वांनी स्वतःच्या जीवनाचा, आयुष्याचा आणि स्वार्थाचा विचारही न करता रंगभूमी हेच आपल्या पराक्रमाचे क्षेत्र अशा दृढ भक्तीने आणि तनमनधनाने आपली रंगभूमी सजवली, पोसली, आणि त्यातच आपल्या आयुष्याचे सुखसमाधान मानले. कर्जाचे डोंगर उभे केले, पण रंगभूमीला ऐश्वर्य प्राप्त करून देण्याच्या कारणाकरताच ! त्यांच्या दृष्टीला एक सृष्टी म्हणजे आपली रंगभूमीच दिसत असे. " तपश्चर्येचे फळ सर्वेश्वर दिल्यावाचून राहात नाही या उक्तीप्रमाणे गंधर्व रंगभूमीवर कोणत्याही प्रकारची कमतरता अगर उणीव दिसून येत नसे. स्वर्गीय संगीत, अव्वल दर्जाचे साथीदार, कुशल नटवर्ग, यथायोग्य वेषभूषा, आणि रंगभूमीचा तो अपूर्व थाट- हा सर्व गुणसमुच्चय गंधर्व कंपनीशिवाय इतरत्र कोठेही पहावयास मिळत नसे. मोहिले कंठ मधु बले बालगंधर्वाच्या अलौकिक आणि दैवी नाट्यगुणांबद्दल मी काय लिहावे ! त्या स्वर्गीय, सुमधुर आणि सुश्राव्य गायनाबद्दल रुक्ष गद्यात |
मागील दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आज सरकारने घरगुती गॅसच्या दरात वाढ केली आहे. आज घरगुती वापराचा सिलिंडर २५ रुपयांनी महागला आहे. तर वाणिज्य वापराचा सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. हायलाइट्सः आज १ जुलै २०२१ पासून देशभरत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. घरगुती आणि वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. १४. २ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत आजपासून २५. ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई : घरगुती वापराच्या १४. २ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत आजपासून २५. ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. यामुळे मुंबईत आता घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी ८३४. ५० रुपये मोजावे लागणार आहेत. 'अमूल' दूध दोन रुपयांनी महागले; जाणून घ्या नवा दर आज कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८४ रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा भाव आता १५०७ रुपये झाला आहे. जून मध्ये तो १४७०. ५० रुपये होता तर मे महिन्यात तो १५९५. ५० रुपये होता. कंपन्यांनी मे आणि जून महिन्यात या सिलिंडरचा भाव कमी केला होता. सामान्यांना बसतेय दरवाढीची झळ गेल्या काही महिन्यांत सहा वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ जाहीर करण्यात आली होती. १ जानेवारी २०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर होती. १ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव ८१० रुपये झाला होता. तर जून महिन्यात कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नाही. |
नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभाराचे वाभाडे निघाले. अनेकांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. तर अनेक ठिकाणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील समोर आला. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशामुळे अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री मनसुख मांडविया सफदरगंज रुग्णालयात सामान्य नागरिक म्हणून तपासणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयातील एका गार्डने काठीने मारहाण केली. सफदरगंज रुग्णालयातील आरोग्यविषयक उपक्रमांच्या उद्घाटन समारंभात मांडविया यांनी हा खुलासा केला आहे. डॉ. मांडाविया म्हणाले की, रुग्णालयात एक सामान्य रुग्ण म्हणून तपासणी करण्यासाठी गेला त्यावेळी बाकावर बसत असताना गार्डने बाकावर बसू नको असे म्हणत, शिव्या दिल्या आणि काठीने मारहाण केली. त्याचवेळी रुग्णालयात एक वयस्कर महिला आपल्या मुलासाठी स्ट्रेचर मिळवण्यासाठी एका गार्डकडे विनवणी करत होती, पण महिलेला स्ट्रेचर दिले नाही. दरम्यान याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. त्यावर मोदींना देखील धक्का बसल्याचं मांडविया यांनी सांगितलं. तसेच मोदींनी गार्डला निलंबित केलं, का असं विचारलं. त्यावर आपण एका गार्डला निलंबित न करता संपूर्ण सिस्टममध्ये सुधारणा करायची असल्याचं मांडविया यांनी सांगितलं. |
बीड : परळीच्या बड्या नेत्याला दिलासा ! बीडचा एक पॉझिटीव्ह\nJune 7, 2020 June 7, 2020 Balaji Margude308\nपॉझिटीव्ह रुग्णाचा हैद्राबाद प्रवासाचा इतिहास\nबीड : आज पाठविण्यात आलेल्या 76 नमुन्यांपैकी 75 निगेटीव्ह आले असून एकजण पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा बीडमधील आहे. तो झमझम कॉलनी बीड येथे राहणारा असून 61 वर्षीय हा रुग्ण हैद्राबादहून आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी दिली.\nपरळीच्या बड्या नेत्याला दिलासा\nजिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये परळीची औरंगाबादेत पॉझिटीव्ह आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कातील कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश होता. हे सर्व स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. या महिलेच्या कुटुंबाच्या संपर्कात परळीचे बडे नेते होते. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्ह्यातील नेत्यांचंही टेन्शन वाढलं होतं. तीन दिवसांपासून आरोग्य विभागातील काही अधिकारी परळीत ठाण मांडून होते. संबंधीत नेतेही स्वतःहून होम क्वारंटाईन झालेले होते. आज परळीचे सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र परळीतील त्या महिलेला लागण नेमकी कुठून झाली याचा शोध आरोग्य विभाग अजुनही घेत आहे.\nधारूर 20 पैकी 20 निगेटीव्ह\nधारूर तालुक्यातील अंबेवडगावच्या तीन पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर 20 जणांचे स्वॅब आज तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्वच स्वॅब निगेटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांनी कार्यारंभशी बोलताना दिली. त्यामुळे अंबेवडगावचा धोका तुर्तास टळला असल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. त्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या दोन सुना कालच पॉझिटीव्ह असल्याचे समोर आलेले होते. आता फक्त अंबेवडगावच्या रुग्णाच्या संपर्कातील माजलगावच्या हॉस्पिटलमधील स्वॅब घेणे बाकी आहे. शिवाय उद्या देखील अंबेवडगाव येथील दोघांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.\nमहत्वाची सुचना : संबंधीत बातमीची लिंक व्हॉटसअॅप, फेसबूक व इतर सोशल प्लॅटफॉर्मवर फॉरवर्ड/शेअर केल्यास आम्हाला आनंदच आहे. परंतु ही बातमी आमच्या परवानगीशिवाय जशीच्या-तशी कॉपी करून ती टेक्स्ट स्वरूपात व्हॉटसअॅप ग्रुपवर, फेसबूकला पोस्ट करणे किंवा इतर वेबसाईटवर प्रकाशीत करणे, यातून कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ शकतो. कार्यारंभकडून बातमी वेळोवेळी अपडेट केली जाते. परंतु त्या आधीच बातमीचा स्क्रीन शॉट काढून तो व्हायरल करून त्यातून चुकीचा मेसेज बाहेर गेल्यास त्याची जबाबदारी कार्यारंभ घेत नाही.\n'फोटो लेते रहो'...अमृता फडणवीस ट्रोल\nसैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी रोखलं आणि म्हणाले.. |
चंद्रपूरः एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी बल्लारपूर शहरात या सिनेस्टाईल घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. पीडित युवती पेपर सोडविण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. त्यावेळी एका युवकाने चारचाकी वाहनातून आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने युवतीचे अपहरण केले व तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेला बेदम मारहाणदेखील करण्यात आली. या घटनेने विद्यार्थींनीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपुरातील राजेंद्रप्रसाद वॉर्डातील रहिवासी श्याम भगत याची त्याच परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीवर वाईट नजर होती. ती बल्लारपुरातील गुरूनानक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. श्याम भगत हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या मागावर होता. अनेकदा त्याने तिच्यापुढे प्रेमसंबंधाचा प्रस्तावदेखील ठेवला. मात्र सदर युवतीने त्याला धुडकावून लावले. बुधवारी दुपारी सदर महाविद्यालयीन युवतीचा परीक्षेचा पेपर होता. तो देण्यासाठी दुपारी १ वाजताच्या सुमारास ती महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात गेली. दरम्यान, काही वेळानंतर श्याम भगत त्याच्या काही मित्रांसमवेत स्कार्पिओ वाहनाने महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात पोहोचला. तुझी आई बाहेर उभी आहे. तिला तुझ्याशी बोलायचे आहे, अशी थाप त्याने पीडित युवतीला मारली. आईचे नाव घेतल्याने युवतीदेखील तातडीने महाविद्यालयाबाहेर आली. मात्र तिला तिची आई कुठेच दिसली नाही. आपली फसगत केल्याचे तिच्या लक्षात येताच, ती परत महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असता, श्याम व त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने वाहनात बसविले व वाहन बाजूच्या एका निर्जन गल्लीत नेऊन तेथे तिला मारहाण सुरू केली. श्याम एवढ्यावरच थांबला नाही तर, माझे प्रेम स्वीकार, नाही तर तुझा खून करतो, अशी धमकी देत तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा आवळला. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून आजुबाजूचे लोक तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी तिच्या श्याम व त्याच्या मित्रांच्या तावडीतून सोडविले. लगेच युवतीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी श्याम भगत व त्याच्या साथिदाराविरुद्ध भादंवि ३०७, ३५४, ३५५ (३४) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी) |
अकोला- सध्या खेळण्यांचे प्रकार काळानुसार बदलत चालले आहे. आधीचे खेळ पडद्याआड जाऊन नवनवीन शैक्षणिक खेळणे घेण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच मुलांना काहीतरी शिकता येण्यासाठी ही खेळणी उपयुक्त ठरत आहेत. मुलांच्या बौद्धिक विकासाबाबत पालक अधिक जागरूक झाले आहेत. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत आपल्या मुलांनी टिकावे यासाठी त्यांना खेळातून ज्ञान प्राप्त व्हावे, ही प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे. मुलांच्या वयानुसार विविध प्रकारची खेळणी उपलब्ध असली तरी, अनेक वेळा पालक अगदी लहानपणीच त्यांच्यासाठी बौद्धिक खेळण्यांची मागणी करतात. लहान मुलांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी शारीरिक कसरत घडवणारे निरनिराळे खेळही बाजारात उपलब्ध आहेत. काही महिन्यांच्या रांगत्या बाळाला गतिशील करण्यासाठी आगळावेगळा चेंडू आला असून, हसतखेळत बाळाच्या शारीरिक विकासाला चालना मिळते. त्यांना प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेऊन खेळांची निर्मिती केली आहे. नवजात मुलांच्या खेळण्यांचे बाजारात 200-250 प्रकार आहेत. यावरून आपण विचार करू शकतो की, वयोगटानुसार खेळण्यांचे किती विविध प्रकार असतील. लहान मुलांच्या जुन्या प्रकारच्याच खेळण्यांना नवीन आकार आणि थोडा बदल करून त्यात आकर्षकता निर्माण केली आहे. डोरेमॉन, छोटा भिमला लहान मुलांची जास्त मागणी आहे. मुलींसाठी नेहमीचेच खेळ असले तरी बाहुल्यांची जागा बार्बी डॉलने घेतली. याशिवाय त्यांच्यासाठी ज्वेलरी गेम यांसारखे क्रियाशीलतेला वाव देणारे खेळही आले आहेत. तीनचाकी सायकलला आकर्षक रूप देण्यात येऊन ट्विस्टर या सायकलला जास्त मागणी आहे. व्यावसायिक पेशाशी निगडित इंजिनिअर्स सेट, डॉक्टर्स सेट असे खेळ लहानपणीच मुलांना देऊन त्यांच्यात याविषयी आवड निर्माण केली जाते. मैदानी खेळाची जागा आता बैठय़ाखेळांनी घेतली आहे. मुलांना एखाद्या गोष्टीचे पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नसते. कुठलीही गोष्ट स्वतः करून बघितल्यास, प्रयोग केल्यास नेहमीसाठी स्मरणात राहते. विज्ञानातील प्रयोग जोपर्यंत ते स्वतः करून पाहणार नाही तोपर्यंत त्यातील बारकावे समजत नाही. मुलांना खरे ज्ञान प्रयोगातूनच मिळते. मुलांच्या वयानुसार खेळांची निर्मिती झालेली असते. त्यांना वयानुसारच खेळणी दिल्या गेली पाहिजे. मुलांना खेळणी दिल्यानंतर पालकांनी त्याचा वापर कोणत्या दृष्टीने व्हावा हे मुलांना समजून सांगितले पाहिजे. कोणत्याही खेळाची मागणी करताना मुलांच्या वयाचा विचार अवश्य करावा. |
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम करण्याची संधी आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. पण, या पावसाएवजी रोहितच्या बॅटीतून पडणारा धावांचा पाऊस पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. या सामन्यात एक षटकार खेचल्यास रोहित एका अनोख्या विक्रमांच्या शिखरावर जाऊन बसेल. या सामन्यात रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा विक्रम सर करण्याची संधी आहे. सध्या रोहितच्या नावावर 399 षटकार आहेत आणि एक षटकार त्याला विक्रमाच्या शिखरावर बसवू शकतो. अशी कामगिरी करणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. जगात केवळ पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ( 476) आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( 534) या दोन फलंदाजांनी 400 पेक्षा अधिक षटकार खेचले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहलीला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं. रोहितनं 101 सामन्यांत 2539 धावा केल्या आहेत. कोहली 72 सामन्यांत 2450 धावा केल्या आहेत. - भारतीय संघ ट्वेंटी-20 - विराट कोहली, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर. - वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स, Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
सध्या वास्तुशास्त्राला महत्त्व आले आहे. परंतु, याबाबतच्या किचकट नियमांमुळे अनेकांना हे शास्त्र कसे पाळावे ते कळत नाही. संभ्रमावस्थेतच तो वास्तुत निवास करतो. 1. किचन दक्षिण-पूर्व दिशेला असावे. मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला तर मुलांचे बेडरूम उत्तर-पश्चिम दिशेला असावे. शौचालय दक्षिण दिशेतच असावे. 2. पाण्याची व्यवस्था उत्तर दिशेत असावी. ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला खुली जागा ठेवावी. दक्षिण-पश्चिम दिशेला अवजड वस्तू ठेवता येतील. 3. मुख्य दरवाजा अन्य दरवाज्यांपेक्षा मोठा व जड असावा. 4. खिडक्या व दरवाजे सम संख्येत असावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेत असावे. 5. तीन दरवाजे सलग एका रेषेत असू नये. 6. पूजेसाठी ईशान्य कोन असावा. देवांचे तोंड ईशान्य दिशेलाच असावे. 7. उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे. 8. पूर्वजांचे फोटो पूजाघरात ठेवू नयेत. दक्षिणेतील भिंतीवर ते फोटो लावावेत. 9. संध्याकाळी घरात पूजा करावी. 10. इष्टदेवतेचे ध्यान आणि पूजन नियमित करावे. 11. आपल्या उत्पन्नाच्या हिस्सा इष्टदेवाच्या नावाने नियमित वेगळा ठेवावा. त्यामुळे घरात समृध्दी राहते. घरातील मुख्य दरवाजा दक्षिण वा पश्चिम दिशेला असल्या तो शुभ मानले जात नाही. परंतु, हे निश्चित करण्यासाठी जन्मपत्रिका पाहाणे आवश्यक आहे. काही राशींच्या व्यक्तींसाठी हे खूपच शुभ ठरु शकते. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत शनी आणि मंगळ शुभ असेल त्यांच्यासाठी दक्षिण व पश्चिम दिशेला दरवाजा शुभ ठरतो. शेवटी सर्वच गोष्टींचा विचार करुन वास्तुबाबत निर्णय घ्यावा. त्यामुळे घरात सुख, शांती नांदेल. |
मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) झालेला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी (Royal Callengers Banglore) अत्यंत महत्त्वाचा ठरला. आरसीबीने या सामन्यात सहज बाजी मारलीच, पण त्यांच्यासाठी त्याहून अधिक महत्त्वाचे ठरले ते कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे फॉर्ममध्ये येणे. या सामन्यानंतर कोहलीने राजस्थानच्या युवा खेळाडूला स्पेशल गिफ्ट देत त्याच्या खेळीचे कौतुक केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) या क्षणाचा फोटो ट्वीटरवर पोस्ट करुन 'खेळच खेळाला ओळखतो' अशी कमेंट केली आहे. राजस्थानने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने ५३ चेंडूंत ७२ धावांचा तडाखा देत आरसीबीला ८ विकेट्सने सहज विजय मिळवून दिला होता. याआधीच्या सामन्यांत कोहली अपयशी ठरला होता. सामना संपल्यानंतर कोहलीने राजस्थानच्या युवा खेळाडूची भेट घेतली आणि त्याने केलेल्या धमाकेदार खेळीसाठी त्याला आपले ऑटोग्राफ केलेले टी-शर्ट भेट दिले. हा खेळाडू होता राहुल तेवटिया. (Rahul Tewatia) किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने एकाच षटकार ५ षटकारांचा पाऊस पाडताना राजस्थान रॉयल्सच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. राहुलच्या या खेळीने सर्वाचेच लक्ष वेधले होते. त्यामुळेच राजस्थानविरुद्धचा सामना संपल्यानंतर कोहलीने राहुलची भेट घेतली आणि त्याला स्वतःची ऑटोग्राफ केलेली आरसीबीची जर्सी भेट दिली. दोघांचाही टी-शर्टसोबतचा फोटो पोस्ट केला तो आयसीसीने. आयसीसीने या फोटोला कॅप्शन दिले की, 'विराट कोहलीने राहुल तेवटियाला एक स्पेशल ऑटोग्राफ जर्सी भेट म्हणून दिली आहे. खेळच खेळाला ओळखतो. ' आयसीसीच्या या पोस्टवर क्रिकेटचाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
यावर रामराजे यांनी सांगितले की, विधान परिषदेवर ७८ आमदार असतात. विधान सभेवर २८८ आमदार असतात. तेथे माझे जावईच सध्या अध्यक्ष आहेत. मी ज्या पद्धतीने विधान परिषद चालवली. मी निवडून कसा आलो? कै. शिवाजीराव देशमुख हे त्यावेळी काँग्रेस आयचे सभापती होते. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव होता. अविश्वासाचा ठराव राष्ट्रवादी आणि भाजपानं आणला. मला सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी मिळून निवडून दिलेले आहे. मला त्यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांनी सहकार्य केलेले आहे. चांगल्या प्रकाराने मी विधान परिषद चालवली. मी १५ वर्षे विधान परिषदेत काम केलेले आहे. तेथे कटुता असते, मात्र कामही होते, काम होत नाही, असे होत नाही. आरडाओरडा चालू राहतो, परंतु कामकाज होते. बिलावर चर्चा होत नाही, हे चुकीचे आहे. माझ्या काळात अर्ध्या अर्ध्या तासात मी बिले काढली आहेत विना चर्चेची. हे चुकीचे आहे. सर्व पार्टींनी एकत्र बसून याच्यावर मार्ग काढला तर ते होईल. विलासराव देशमुख कोईलिशन मिनिस्ट्री चालविण्यात फार एक्स्पर्ट होते. त्यांचे जे व्यक्तिमत्त्व होते, त्यांचा जरी पश्चिम महाराष्ट्राला विरोध होता तरी माझ्या फाईलवर त्यांनी सह्या केल्या आहेत. याला म्हणतात मुख्यमंत्री. थोडसं चालायचं राष्ट्रवादी - काँग्रेस, पण विलासरावांचं काम लक्षात ठेवण्यासारखं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं अकॅडमीक जास्त होतं. त्यांची लेवल वेगळी होती. यांना कोईलिशन मिनिस्ट्री चालवता येत नव्हती. ते दिल्लीतच योग्य होते. विरोधी पक्षनेते राणे साहेब आणि विधान परिषदेवर विरोधी पक्षनेते गडकरी साहेब यांनी जे काम केलेले आहे, हे विसरता येणार नाही. ज्या पद्धतीने ते प्रश्न विचरायचे, मंत्री म्हणून उत्तरे देताना धडकी भरायची, असे हे दोघे होते. राणे साहेबांचा आत्ताचा अवतार आणि त्याकाळचा अवतार, हे अभ्यासू नेते होते. गडकरी साहेबांवर तर न बोललेलेच बरे! कारण त्यांना हातात कागद लागायचा नाही. शरद पवार साहेबांबद्दल सांगायचे झाले तर शरद पवारांचे आम्ही कामकाज पार्लमेंटमध्येही बघितलेले आहे. ते जेव्हा ७८ साली राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सर्व खात्यांची उत्तरे पवार साहेब देत होते. त्यांचे जे मंत्री होते, त्यांना विषयच माहीत नव्हते, हेच उत्तरे देत होते. हेही बघितलेलं आहे. आत्ताच्या तरुण आमदारांचा पॉझिटीव्ह विचार नाही. तेथे आडवाअडवी चालते. सती परंपरा, अंधश्रद्धेचा कायदा, कोविड अशा विषयांवर कोण बोलत नाही. नुसता आरडाओरडा करून चालत नाही. थोडक्यात सत्ता ही निगेटीव्ह कामासाठी की पॉझिटीव्ह कामासाठी जास्त वापरली जात आहे, याचा ऊहापोह झाला पाहिजे. आत्ता खासदारांचे काय चालले आहे की, वैयक्तिक बोलले जात आहे. मी जे ३० वर्षे काम केलेले आहे, तेच खोडून काढायचे चालले आहे. हा राजकीय त्रास नाही. हा वैयक्तिक त्रास आहे. शरद पवार साहेबांना तर ६७ सालापासून मी बघितलेले आहे. एसटीने प्रवास केलेला बघितला आहे. हॉटेल रूपालीसमोर पिशवी अडकवून सायकलवर फिरताना बघितलेले आहे. मोदी साहेबांचे जर सांगायचे झाले तर मोदी साहेबांचे आणि माझे वाद झालेले होते. ते झाले होते नर्मदा पाण्यावरून. नर्मदा अॅथॉरिटी ही अपेक्स अॅथॉरिटी आहे. चार राज्यांशी संबंधित आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. त्याची अपेक्स कमिटी असते. त्याचे पंतप्रधान चेअरमन असतात, पण ते येत नाहीत. चरण सिंह त्या कमिटीचे चेअरमन होते. त्याची डिसेंबरमध्ये बैठक व्हायची. त्या बैठकीत असे ठरले होते की, चारही राज्यांचे पुनर्वसन डिसेंबरपर्यंत झाले असेल तर हो म्हणायचे, नाही म्हटले कोणी, तर पुढचे काम होत नाही. मेधा पाटकर यांचा नर्मदा अॅथॉरिटीला विरोध होता. मी त्यावेळी महाराष्ट्राचा प्रतिनिधी राज्यमंत्री होतो, माझा विरोध आहे म्हणून सांगितले. त्यावेळी बैठकच उठली. मोदीसाहेब म्हणाले, रामराजे साहेब आपने ए क्या किया? उमा भारतींशीही माझे त्यावेळी वाद झाले. त्यानंतर दुसर्या दिवशी मला उपपंतप्रधान आडवाणी साहेबांचा फोन आला, त्यांनी विचारले की, कशासाठी तुम्ही अडविले. मी सांगितले की, तुम्ही पवार साहेबांना विचारा की का आडवलं ते. त्यावेळी दुसर्या दिवशीही मिनिस्ट्रीचा फोन आला, मी सांगितले की, आम्हाला तुम्ही पैसेच देत नसाल तर काय करायचे? हाच विषय होता की, ५० आणि ७५ टक्क्यांचा. ते म्हणाले की, एक धरण सांगा. मी म्हटले की, द्या धोम-बलकवडीला. असल्या सगळ्या भानगडी ऑफ द रेकॉर्ड खूप केल्या आहेत मी. दुसर्या आडवाणींशी बोलायला राज्यमंत्री म्हणून मीच होतो. मी बर्याच गोष्टी केल्या, ज्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला झाला आहे. मी महत्त्वकांक्षी नव्हतो, आजही नाही; परंतु जे गैर चालले आहे, ते मनात भिडतेय. ते आपल्याला दूर करावे लागणार आहे. आम्ही ते बदलणार म्हणजे बदलणार. मी यावेळेस ते बदलणार आहे. मी एकटाच विरोध करणार आहे. मी उभा राहून करीन किंवा माझ्या पद्धतीने करीन. मला इतकं भोळही समजू नका, अपक्षातनं राजकारण मी केलेलं आहे. राजकारणातला रामराजे हा वेगळा असतो, तुमच्यासमोर बसलेला हा राजकीय रामराजे नाही. राजकीय रामराजे बघायचे असतील तर फलटणला इलेक्शनच्या अगोदर सहा महिने या! |
गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली. रेपो दरात तब्बल २. ५ टक्क्यांची वाढ होऊन ते ६. ५० टक्क्यांवर गेले. यानंतर अनेक बँकांनी आपल्या होम लोनचे व्याजदर वाढवले. तर दुसरीकडे बँकांनी जमा रकमेवर व्याजदर वाढवले आहेत. हेच कारण आहे ज्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये बचत खाती आणि एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. अशातच युनियन बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. तर अन्य बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक दरात होम लोनही दिलं जात आहे. युनियन बँक ऑफ इंडियानं २५ नोव्हेंबर २०२२ रोजी एफडीवरील व्याजदरात अखेरची वाढ केली होती. युनियन बँक ऑफ इंडिया ८०० दिवस आणि ३ वर्षांच्या एफडीवर ७. ३० टक्के व्याज दर देत आहे. या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ७. ८० टक्के व्याज दिलं जात आहे. त्याच वेळी, सुपर सीनिअर सिटिझन्स या कालावधीसाठी ८. ०५ टक्के व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. बचत खात्यावर किती व्याज? युनियन बँक ऑफ इंडिया ५० लाख रुपयांच्या बचतीवर २. ७५ टक्के आणि ५० लाख आणि १०० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर २. ९० टक्के व्याज देत आहे. १०० कोटींहून अधिक रकमेवर ३. १० टक्के व्याज दिलं जात आहे. ५०० कोटींहून अधिक रकमेवर ३. ४० टक्के वार्षिक व्याज दिलं जातंय. , तर १ हजार कोटींच्या रकमेवर सर्वाधिक ३. ५५ टक्के व्याज दिलं जात आहे. होम लोनचे व्याजदर किती? गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली आहे. त्यानंतर युनिअन बँकेच्या कर्जाच्या व्याजदरातही वाढ झाली आहे. असं असलं तरी बँक स्पर्धात्मक व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. युनिअन बँक ८. ६० टक्के व्याजदरानं होम लोन देत आहे. परंतु हे व्याजदर तुमच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असतील. जर तुमचा सिबिल ८०० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला ८. ६० टक्के व्याजदरानं कर्ज मिळेल. जर तुमचा सिबिल ७५० ते ७९९ दरम्यान असेल तर तुम्हाला ८. ७० टक्के व्याजदरानं कर्ज मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधू शकता किंवा बँकेच्या संकेतस्थळावरून माहिती घेऊ शकता. |
चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात दोन वाघिणींसह एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ताडोबा प्रशासनाने शवविच्छेदन करून नमुने घेतले. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. मात्र, बछड्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात तर दोन वाघिणींचा मृत्यू नैसर्गिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी येथील कक्ष क्र. १८९ मध्ये सहा- सात महिन्यांच्या वाघाचा बछडा (मादी) गुरुवारी मृतावस्थेत आढळला. हा बछडा टी ६० या वाघिणीचे असल्याचे कळताच सहायक वनसंरक्षक बापू येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, डॉ. संजय बावणे, बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर यांनी तातडीने घटनास्थळी गाठून पाहणी केली. वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे आणले. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून तपासणीसाठी नमुने घेतले. बछड्याचा मृत्यू नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याच्या शरीरावरील खुणा व घटनास्थळावरील परिस्थितीवरून आल्याची माहिती ताडोबा प्रशासनाने दिली. दुसरी घटना शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा नियत क्षेत्रालगत बुधवारी उघडकीस आली. मृत वाघीण टी ७५ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत वाघिणीचे अंदाजे १४-१५ वर्षे होते. या वाघिणीचा मृत्यू वृद्धावस्थेमुळे झाला. वाघिणीचे अवयव व कातडी कुजलेल्या स्थितीत आढळले. दात व नखे सुस्थितीत आढळून आली, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. रामगावकर यांनी दिली. बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्र वासेरा परिसरातील महसूल विभाग गट नंबर १८५ येथे बुधवारी शिवनी वनपरिक्षेत्राचे वनरक्षक गस्त घालत असताना एक वाघीण मृतावस्थेत आढळली. ही वाघीण 'कोंड पाटील वाघीण' अशा नावाने ओळखली जात होती. या वाघिणीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला असून अंदाजे १५ दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, अशी माहिती वनविभागाने दिली. वाघिणीचे अर्धे मांस हे नष्ट झाले असून काही प्रमाणात सांगाडा दिसत आहे. |
सुन्ना येथील विष्णु ईस्तारी आगीलवार यानं चितळ हरणाची शिकार केल्याप्रकरणी पांढरकवडा वनविभाग आणि वन्यजीव विभागाने त्यांच्याविरोधात संयुक्त कारवाई केली आहे. पांढरकवडा (यवतमाळ) - सुन्ना येथील विष्णु ईस्तारी आगीलवार यानं चितळ हरणाची शिकार केल्याप्रकरणी पांढरकवडा वनविभाग आणि वन्यजीव विभागाने त्यांच्याविरोधात संयुक्त कारवाई केली आहे. आरोपीच्या घरातून दहा किलो मांस जप्त करण्यात आले आहे. वन्यजीव व पांढरकवडा वनपरिक्षेत्र पांढरकवडा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी विष्णु ईस्तारी आगीलवार (वय 48 वर्षे) सुन्ना यांनी 10 जानेवारीच्या रात्री चितळ हरणाची शिकार केली. शिवाय, काही मांसाची घरुन विक्री करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच सापळा रचून प्रादेशिक विभाग आणि वन्यजीव विभागाने आरोपीच्या घरुन 10 किलो कच्चे मांस आणि काही शिजलेले मास मांस ताब्यात घेतले. सुन्ना येथून टिपेश्वर अभयारण्य जवळच लागून असल्याने या भागात तृणभक्षी वन्य प्राण्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळेच या भागात वाघाचे अस्तित्व टिकून आहे. परंतु मानवाने वन्यप्राण्यांच्या क्षेत्रात पूर्वीपासूनच हस्तक्षेप चालवलेला आहे. याचाच परिणाम स्वरूप आज वन्यप्राणी गाव वस्त्यांकडे चाल करत आहे. आरोपी विष्णु ईस्तारी आगीलवार यानं पहिल्यांदाच शिकार केली की तो सराईत शिकरी आहे? , याची चैकशी वनविभाग करत आहे. ही कार्यवाही उपवनसंरक्षक के. अभर्णा आणि विभागीय वन अधिकारी वन्यजीव टी. बी. पंचभाई यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली आहे. |
हैदराबाद : शिवसेना वरपंगी कितीही आव आणत असली तरी आतून पंतप्रधान मोदींना घाबरते. त्यामुळेच शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याऐवजी सामनात अग्रलेख लिहिण्याचा नवा प्रयोग सुरू केल्याची टीका ऑल इंडिया इत्तेहादूल मुसलमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी केली. तसेच माझे पूर्वजही भारतीयच होते, हे मी सिद्ध करू शकतो,असं देखील ओवेसी यांनी म्हटलं आहे. दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी खा. ओवेसी यांच्यावर चांगलीच आगपाखड केली होती . ओवेसी यांनी स्वतःला हैदराबादपुरतेच मर्यादित ठेवावे. राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे, हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही! ओवेसी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या नावाखाली मुस्लिम समुदायाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. भविष्यात त्यांना याचा फटका बसेल', असे विधान राऊत यांनी केले होते. दसरा मेळाव्यातील खा. संजय राऊत यांच्या या शाब्दिक हल्ल्याने संतापलेल्या ओवैसी यांनी शनिवारी यासंदर्भात ट्वीट करून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. |
काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली 'लेट नाईट पार्टी' चांगलीच वादात सापडली होती. मागील काही दिवसांपूर्वी करण जोहरने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडचे बरेच तारेतारकांनी हजेरी लावली होती. यात रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, दीपिका पादुकोण व वरूण धवन उपस्थित होते. या पार्टीतील एक व्हिडिओ करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर या पार्टीतील कलाकारांवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर यावर काही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली. आता पुन्हा एकदा विकी कौशलने त्या पार्टीतील रात्रीतील सत्य सांगत संताप व्यक्त केला. विकी कौशलने एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला अरूणाचल प्रदेश जायचे होते. मी इंडियन आर्मीसोबत तिथल्या डोंगरावर होतो. तिथे अजिबात नेटवर्क नव्हते. मला अजिबात माहित नव्हते की मी संपूर्ण देशाचा चरसी बनलो आहे. विकीने पुढे सांगितलं की, मी जेव्हा मुंबईत परतलो तेव्हा मी माझं ट्विटर अकाउंट चेक केलं. एफआयआर, ओपन लेटर? मला वाटलं की माझ्या आई वडिलांवर याचा खूप परिणाम होईल. ते न्यूज फॉलो करत होते. मी माझ्या आई वडिलांजवळ गेलो तर ते हसत होते. तो पुढे म्हणाला की, मला वाटलं की सर्व काही ठीक आहे. कारण माझ्या आई वडिलांना सर्व माहित आहे. मात्र काही टीव्ही चॅनेलवर माझ्याबद्दल काहीही बोलत होते. या गोष्टी मला खूप प्रभावित करत होत्या. पत्रकार राजीव मसंद यांच्या शोमध्ये करण ही पार्टी आणि त्याच्या व्हिडीओवर बोलला. 'त्या दिवशी पार्टीत अनेक स्टार्स हजर होते. या सर्वांनी प्रचंड कष्टाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आठवडाभर काम केल्यानंतर हे सगळेजण एन्जॉय करत होते. पार्टीत ड्रग्ज असती तर मी हा व्हिडीओ शेअर केला असता का? मी इतका मूर्ख नक्कीच नाही,'असे करण म्हणाला. विकी कौशल नाक स्वच्छ करताना दिसला म्हणजे त्याचा अर्थ तो ड्रग्ज घेत होता, असा होतो का? एखादी व्यक्ती आपला फोन खिशात टाकत असेल तर तो ड्रग्ज लपवत असेल असा अर्थ निघतो का? असे सवालही करणने यावेळी केले. 'लाईटच्या रिफ्लेक्शन पडले आणि लोकांनी त्याला ड्रग्ज ठरवले. विकी कौशल त्यावेळी डेंग्यूच्या आजारातून बरा होत होता. तो गरम पाणी आणि लिंबू घेत होता. व्हिडीओ बनवण्याच्या 5 मिनिटांआधीपर्यंत माझी आई त्यादिवशी तिथे हजर होती. माझ्या कुटुंबात फक्त आणि फक्त आनंद वाटला जातो. मित्रांसोबत बसून गप्पा केल्या जातात, चांगले संगीत ऐकले जाते. आम्ही त्यादिवशी वेगवेगळ्या पक्वानांचा आस्वाद घेतला, मस्ती केली, इतकेच, असेही करण म्हणाला. या आरोपांवर तू शांत का बसलात? असे विचारले असता, अशा व्यर्थ गोष्टींवर खुलासे देणे मी सोडले आहे. पण यापुढे असे आरोप झालेच तर मी कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही आमची प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकत नाही, असे त्याने सांगितले. |
पिंपरी - शहरात बुधवारी ७६२ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४३ हजार ९४७ झाली आहे. आज एक हजार ९८० जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख २६ हजार ३९९ झाली आहे. (New Patients in Pimpri Chinchwad less than number of patients discharged today) सध्या १३ हजार ७७३ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील १० रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील तीन हजार ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत चार हजार ७५८ रुग्ण उपचार घेत आहेत. नऊ हजार १५ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत चार लाख ७० हजार ९४२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २३२ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार ८४० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार २४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. आठ हजार ८१० जणांचे विलगीकरण करण्यात आले. |
मुंबई : आई होणे ही जगातील सर्वात आनंदाची भावना आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतः ही भावना अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला या आनंदाची जाणीव होत नाही. त्याच वेळी, पहिल्यांदा आई होणे हे अधिक वेगळे आहे कारण यावेळी बहुतेक महिलांना आई होण्याबद्दल किंवा मातृत्वाबद्दल अनेक गोष्टी माहीत नसतात. (parenting) बाळ बोलू शकत नाही. बाळाला रडताना पाहून अनेकदा माता अस्वस्थ होतात. काय करावे किंवा आपल्या बाळाला कसे शांत करावे हे त्यांना कळत नाही. बाळाला सतत रडताना पाहून काही माता घाबरतात. जर तुम्ही नवीन किंवा पहिल्यांदा आई झाला असाल तर तुम्हाला जास्त घाबरण्याची गरज नाही. तुमच्यासोबत तुमची आई किंवा सासू असेल, ज्यांना बाळ का रडत आहे याची कल्पना असेल. त्यांची मदत घेऊन तुम्ही तुमच्या बाळाला शांत करू शकता. आई झाल्यानंतर बाळाला दूध पाजणे कधीकधी कंटाळवाणे होऊन जाते आणि अनेकदा मातांनाही त्याचा ताण येतो. या नवीन अनुभवामुळे महिलांना काळजी वाटू लागते. तुम्ही तुमच्या बाळाला ब्रेस्ट फीडिंग पंपाने देखील दूध पाजू शकता. तुम्ही तुमचे दूध एका बाटलीत ठेवून झोपू शकता. या काळात दुसरे कोणीतरी बाळाला दूध देऊ शकते. बाळाचे तोंड, जीभ, कान आणि नखे स्वच्छ करणे २. ५ महिन्यांनंतर किंवा बालरोगतज्ज्ञांशी बोलूनच सुरू केले पाहिजे. तथापि, काही माता कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करतात आणि बाळ २. ५ वर्षांचे होण्यापूर्वीच तोंडाची स्वच्छता सुरू करतात. यामुळे मुलावर अनावश्यक ताण येतो. बाळाच्या जन्मानंतर झोपेचे चक्र पूर्ण न झाल्यामुळे मातांना पुरेशी झोप न मिळणे ही मोठी समस्या आहे. शक्य तितक्या लवकर आपल्या बाळाला झोपेचे प्रशिक्षण देणे सुरू करा. हे पालकांबरोबरच मुलासाठी देखील चांगले आहे. आई झाल्यानंतर महिला त्यांच्या गरजा विसरतात. स्पा, सलूनमध्ये जाणे, पुस्तक वाचणे, कॉफी, योग आणि ध्यान करणे किंवा मित्रांशी बोलणे त्यांच्या आयुष्यातून नाहीसे होते. नवीन आईंनीही स्वतःसाठी वेळ घ्यावा. यामुळे त्यांना ताजेतवाने वाटू शकते. |
म्हसाळा-खसाळा परिसरातील राखेचा तलाव फुटल्याच्या थरारक घटनेला नऊ दिवस उलटले. त्यानंतर कोराडी व पांजरा औष्णिक वीजकेंद्राने काही उपाययोजना केल्यात का? तर अजिबात नाही. आजही या तलाव परिसरात गेले तर दुर्घटनेची टांगती तलवार अजूनही दिसते. नाही म्हणायला महाजेनकोने तलावाची दुरुस्ती केली; मात्र ती तात्पुरती. बांधाला अजूनही भेगा दिसतात. अतिवृष्टी झाली तर हा बांध पुन्हा फुटू शकतो, हेही जाणवत राहते. पोत्यांमध्ये राख भरून फुटलेल्या बांधाच्या ठिकाणी ठेवत तात्पुरती डागडुजी तेवढी करण्यात आली. नाल्यातील आणि कॅनलमधील राखेचा थर काढून टाकावा. फुटलेल्या बांधाची दुरुस्ती करून बांधाचे मजबुतीकरण करावे. तांत्रिक उपायोजना करून यापुढे अशी दुर्घटना होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने देऊनही मजबुतीकरणाचे काम झालेच नाही. 'मटा'ने या परिसराला भेट दिली असता अक्षम्य दुर्लक्षाचे अनेक नमुने पुढे आले. १६ जुलै रोजी खसाळा राख बंधारा फुटल्याने खसाळा, म्हसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत पाणी शिरले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. खसाळा राख बंधारा ३४१ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला असून सुमारे ७ किलोमीटर जागेत राख साठवण करण्यात येते. नुकसानीचे पंचनामे करून उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी आर. विमला यांना नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला. यात गावातील घरांचे, रस्त्यांचे आणि शेतीचे नुकसान झाले असल्याचे पुढे आले. म्हसाळा, कवठा, खसाळा, खैरी येथील ७४ कुटुंबांचे नुकसान झाले. ६९. ९१ हेक्टर क्षेत्रावर त्यांनी पेरणी केली होती. यापैकी ४७ हेक्टरचे नुकसान झाले. धान, कापूस, सोयाबीन यासह फळांची शेती त्यांनी केली होती. वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले. मात्र, अद्यापही तलावाच्या मजबुतीकरणाकडे फारसे लक्षच दिले जात नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तलाव फुटू नये, यासाठी त्यावर दगडांची भिंत उभारावी लागते. याच प्रकाराला पिचिंग असे म्हणतात. टाकलेला भराव वाहून जाऊ नये यासाठी सॅण्ड फिल्टर लावले जाते. काळी माती, मुरूम यासारखे घटक टाकून त्याला मजबुती दिली जाते. मजबुतीकरणाचा आराखडा तयार करून हे काम केले जाते, असे पाटबंधारे विभागातील आजी माजी अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. राखेमुळे परिसरातील शेतजमिनीची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे शेती करता येत नाही. परिणामी, शेतजमीन वीटभट्ट्यांना देण्यात आली. चरितार्थासाठी शेतजमीनमालकांना त्याच भट्ट्यांवर राबावे लागते. प्रकल्प होण्याआधी, ४० वर्षांपूर्वी सुखसमृद्धी होती. आता पिकेच येत नाहीत, असे सूर्यभान माकडे यांनी सांगितले. वीजप्रकल्पातील राख शेतजमिनीत शिरणे अतिशय धोकादायक आहे. रेडिअॅटिव्ह केमिकल्स यात जातात. कधीच शेती करू शकणार नाही, अशी स्थिती जमिनीची होते. या जमिनीचा शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज आहे. डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जीने चमू पाठवून याचे परीक्षण करायला हवे. जमिनीसह पाण्यातही ही राख गेली असल्याने अधिक धोके असल्याचे कृषी क्षेत्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार यांनी सांगितले. अधिकारी म्हणतात, पावसाळा आहे! महाजेनकोचे अभियंता राजेश कराडे यांच्याशी 'मटा'ने संपर्क साधला असता, सध्या पावसाळा असल्याने पिचिंग करता येत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. पावसाळा संपल्यानंतर या कामाला सुरुवात होईल. तलावाची उंची साडेतीन मीटरने वाढविण्यात येईल. मुरुम टाकून 'एनकेसिंग' केले जाईल, असे त्यांनी सांगितले. 'अधिकारी पावसाळा संपायची वाट बघत आहेत. मात्र, तलाव काही पहिल्यांदा फुटला नाही. यापूर्वीही अशी घटना घडली होती. त्यावेळीही धोके वर्तविले होते. मग वेळीच तलाव मजबूत का केला नाही', असा रोष गावकऱ्यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला. |
केडगाव - मागील चार महिन्यांपासून उन्हाळा असह्य झाल्यामुळे उष्णता आणि पाणी समस्या कमी होण्यासाठी आता केवळ पावसाची आशा निर्माण झाली आहे. पाऊस केव्हा येणार, यासाठी सर्वसामान्य नागरिक आभाळाकडे टक लावून बसला आहे. मागील दोन वर्षांपासून पाऊस झालाच नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीसमस्या निर्माण झाली. चालू वर्षी वातावरणात 42 अंश सेल्सियसपर्यंत तापमान आणि पाण्याची गंभीर समस्या अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागला. अगदी भीमा व मुळा-मुठा नदीपट्टयातदेखील दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. नदी परिसरातील राहु, देलवडी, पिंपळगाव, पारगाव, नानगाव, हातवळण, कानगाव या गावांनाही पाणी समस्या कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. केडगाव आणि परिसरातील दापोडी, खोपोडी, बोरीपार्धी इत्यादी गावांतील शेतकऱ्यांनी आपली शेती आता रामभरोसे सोडून दिली असून केवळ पिण्याच्या पाण्याची गरज कशी भागेल, असा विचार सुरू केला आहे. काही शेतकऱ्यांनी कोवळा ऊस कडबा कुट्टीसाठी मिळेल, त्या भावात देणे पसंद केले आहे, तर काहीजण जनावरांना चारा म्हणून त्याचा उपयोग करीत आहेत. आता जून महिना सुरू झाला असून रोहिणी नक्षत्रात पाऊस सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे; परंतु यामधील तीन दिवस कोरडेच गेले आहेत. त्यातच हवामान खात्याने मान्सून 12 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत दिले असून, अजून किमान सात-आठ दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. खडकवासला धरण क्षेत्रात कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने कालव्याच्या पाण्यावर भिस्त ठेवणे मृगजळ ठरणार आहे, त्यामुळे वाढती उष्णता आणि शेती टिकवण्यासाठी आता केवळ पावसाचाच आधार उरला असल्याने पाऊसाच्या येण्याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. |
सिग्मंड फ्रॉइड व इंग्रजी वाङ्मय चळावतात अशी त्याची तक्रार आहे, ' Psycho analysis and the unconscious ' या पुस्तकांत लॉरेन्सनें जाणत्या मनाबद्दल महत्त्वाचीं विधानें केलीं आहेत. जाणतें मन व प्रबल इच्छाशक्ति यांच्यांत राक्षसी यंत्रांचे सामर्थ्य आहे व या शक्ती आपल्या स्टीमरोलरखालीं माणसाचें नैसर्गिक, नेणतें जीवन चिरडून चिपाटून असें तो म्हणतो. (The mind is the dead end of life. But it has all the mechanical force of the non-vital universe. It is a great dynamo of super-mechanical force. Given the will as accomplice, it can even arrogate its machine-motions and automatizations over the whole of life, till every tree becomes a clipped tea-pot and every man a useful mechanism. So we see the brain, like a great dynamo and accumulator, accumulating mechanical force and presuming to apply this to the living unconscious, subjecting every thing spontaneous to certain machine principles called ideals or ideas. And the human will assists in the humiliating and sterilying process. ") फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय प्रमेयांत लैंगिक वासनांचें सर्वगामित्व प्रतिपादिले आहे. लॉरेन्सच्या लेखांत व कादंबऱ्यांतहि लैंगिक वासनांना नैसर्गिक वाव देण्याचें महत्त्व विशद केलेलें आहे. फ्रॉइडनें ज्याप्रमाणें अस्मिता व लैंगिकवासना ( Ego and Libido ) यांच्या द्वंद्वाचें महत्व वर्णिले आहे त्याप्रमाणें लॉरेन्सनें लैंगिकवासना व व्यक्तिमत्त्व या द्वंद्वाचे महत्त्व जाणले आहे. प्रेमाबद्दलच्या 'प्लेटॉनिक ' कल्पनांचा फोलपणा व प्रेमाचें वास्तव रूप, लैंगिक प्रेमाचा व्यक्तीच्या स्वत्वावर होणारा आघात व व्यक्तीचा आपले स्वत्व शाबूत राखण्याचा प्रयत्न, योग्य समाजरचनेला आवश्यक असणारें नैसर्गिक लैंगिकप्रेमाचे अधिष्ठान व त्याचें निकोप स्वरूप इत्यादि सूत्रांची गुंफण लॉरेन्सर्ने ' Women in Love ' या व इतर कादंब-यांत मोठ्या कुशलतेनें केली आहे. तो लैंगिकप्रेमाचें महत्त्व व प्राबल्य मानतो पण त्याबरोबरच व्यक्तीच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्याचे व एकलेपणाचें महत्त्वहि जाणतो. वर निर्देशिलेल्या कादंबरींत बर्किन या पात्राची विचारसरणी पहाण्यासारखी आहे. लैंगिकप्रेमाचा प्रभाव त्याला माहीत आहे व त्या महापुरांत व्यक्तित्वाचे बांध ढांसळून जातात याची हि त्याला जाणीव आहे आणि म्हणूनच या महापुरापासून व्यक्तीच्या वेगळेपणाची जपणून करावयास हवी असें तो म्हणतो. स्त्री आपल्या लैंगिक आकर्षणानें पुरुषाला आपल्या भोंवतीं नाचावयास लावून गुलाम बनविते, माता म्हणून तिनें पुरुषाला जन्म दिला स्त्री म्हणून ती त्याच्यावर पुन्हा प्रभुत्व गाजवूं पहाते. पुरुषाला आपल्या व्यक्तित्वाचा, स्वत्वाचा विकास करावयाचा असेल तर स्त्रीच्या लैंगिक प्रेमाची हीं बंधनें शिथिल केली पाहिजेत, अशा प्रकारचे चर्किनचे विचार आहेत. त्याला आपल्या प्रेमपाशांत गुंतवू पाहाणारी हर्मिओनी हिच्याबद्दल विचार करतांना त्याच्या मनांत आलेंः " Did he not know it in Hermione. Hermione, the humble, the subservient, what was she all the while but the Dolorosa, in her subservience, claiming with horrible, insidious arrogance & female tyranny her own again, claiming back the man she had borne in suffering. By her very कुएए ऐसीऑ ओऊंअः कखगघुङ चषजत्र ठडटण तयद्धन पफबभ्रम यरलवशु पसह कक्षज्ञ suffering and humility she bound her son with chains, she held him her everlasting prisoner. जेम्स जॉईस लैंगिक प्रेम व वासना यांचें वैयक्तिक व सामाजिक जीवनांतले महत्त्व ओळखून, प्रचलित नीति कल्पनांच्या चाकोरींतून बाहेर येऊन त्या प्रवल नैसर्गिक शक्तींचें स्वरूप व कार्य मोकळेपणानें विशद करून मग त्यांना जीवनांत योग्य तें स्थान द्यावें अशा प्रकारची जी विचारसरणी लॉरेन्सच्या लेखनांत आढळते ती फ्रॉइडच्या मानसशास्त्रांत प्रतिपादिलेल्या लैंगिक वासनेच्या (Libido किंवा Eros ) सिद्धांताशी बरीचशी जुळती आहे. या नव्या कल्पनांचा प्रसार झाल्यामुळे लॉरेन्स प्रमाणे इतरहि लेखकांच्या वाङ्मयांत त्यांचा वापर झालेला आढळतो. फ्राइडनें प्रचलित मानसशास्त्रीय कल्पनांना जो धक्का दिला त्यामुळे वाङ्मयहि जुन्या चाको रीतून बाहेर येऊन नवे प्रयोग व नव्या व्यक्तिरेखा करूं व रेखाटूं लागलें. विशेषतः व्यक्तीच्या मनोव्यापाराचें वास्तव दिग्दर्शन करण्याचें साधन म्हणून व्यक्तीच्या संज्ञाप्रवाहाचें ( stream of consciousness ) दिग्दर्शन करण्याची पद्धत नव्यानेंच वापरण्यांत येऊं लागली. माणूस दुस-यांशी बोलतांना पुष्कळशा कृत्रिमपणानें, आपले खरें हेतु बाहेर न यावेत अशी काळजी घेऊन, लोकांवर एक. विशिष्ट छाप पाडण्याचा दृष्टीनें बोलतो. त्याच्या संभाषणांत व भाषणांत त्याचें खरें स्वरूप व मनोव्यापार उघड होत नाहींत. म्हणून लेखक माणसाच्या संज्ञाप्रवाहाचें जसेच्या चित्रण करतो, अंतर्मनांतील स्वगतभाषण ( internal monologue ) लिहून वाचकांना व्यक्तीचें वास्तवदर्शन घडवितो. जेम्स जॉइस या कादंबरीकाराच्या 'युलीसिस' या कादंबरींत या पद्धतीचा पद्धतशीरपणें वापर केला आहे, डब्लिनमधील तीन व्यक्तींच्या आयुष्यांतील एका दिवसाचें यथातथ्य वर्णन कादंबरींत आहे व प्रत्येक व्यक्तीच्या संज्ञाप्रवाहाचें क्ष-किरणांनी काढावें असें चित्र दाखविलें आहे. बाहेरील जग व परिस्थिति, जाणत्या मनाचे व्यापार व संज्ञाप्रवाह या सर्वोचा मिलाफ होऊन एक वास्तव आणि विदारक असें सत्यकथन कांदबरींत केले जातें. पुष्कळदां संज्ञाप्रवाहांतील स्पष्टास्पष्ट विचार-विकार- कल्पना, शब्दांचें परस्परावलं. बित्व व संदर्भासहित विश्लेषण यांचें आकलन होणें कठीण होते व परिच्छेद दुर्बोध वाटतात, पण या पद्धतीमुळे शब्दचित्राच्या वास्तवपणाला धार येते व सामान्यतः अदृश्य व अतर्क्य असलेल्या मानवी मनाच्या कप्प्यांत वाचकाला डोकावून पाहतां येतें. कादंबरीकार हा फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या तंत्राचा वापर करून व्यक्तीच्या मनांतल्या खोल खोल रूजलेल्या जागृत, अर्धसुप्त व सुप्ता विचार-विकारकल्पनांचा आविष्कार करूं शकतो व वाङ्मयांत एक नवीन वास्तवता निर्माण करतो. • फ्राइडच्या मनोविश्लेषणशास्त्राचे व मानसशास्त्रांचें क्षेत्र फारच विस्तीर्ण आहे. येथें केवळ दिग्दर्शन करण्याच्या हेतूनें त्याच्या अभिनव प्रमेयांपैकीं एकदोहोंचा दाखला घेऊन आधुनिक इंग्रजी वाङ्मयावर त्याचा किती परिणाम झाला आहे व त्यामुळे वाङ्मयाला एक नवेंच वळण कसें लागले आहे याचा थोडासा परामर्श फ्राइडच्या जन्मशताब्दीच्या निमित्तार्ने घेतला आहे. मुंबई येथें नुकत्याच भरलेल्या आशियाई समाजवादी परिषदेच्या निमित्तानें आशियांतील समाजवादी आंदोलनाकडे जगांतील नामवंत समाजवाद्यांचें लक्ष वेधले गेलें होतें. " आशियाई समाजवादा"च्या कल्पनेमुळें समाजवादी वर्तुळामध्यें निर निराळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहेत. समाजवादासारख्या विश्वव्यापी तत्त्वज्ञानाला प्रादेशिक स्वरूप देऊन त्याला संकुचिततेच्या खाईत लोटण्यामध्यें तर आशियाई समाजवादाची परिणति होणार नाहीं ना अशी प्रामाणिक शंका देखील कांहीं युरोपीय समाजवाद्यांच्या मनामध्यें आल्याशिवाय राहिली नाहीं. ' सोशलिस्ट इंटरनॅशनल ' ही आंतरराष्ट्रीय समाजवाद्यांची संघटना असतांना ' एशियन सोशलिस्ट कॉन्फरन्स' ची आवश्यकता काय हा प्रश्नहि कांहीं समाजवाद्यांच्या डोक्यामध्यें घोळत आहे. या पार्श्वभूमीवरून आशियांतील समाजवादी चळवळीची, विचारसरणीची व आशियांतील समाजवाद्यांपुढे निर्माण झालेल्या कांहीं वैचारिक समस्यांची चर्चा होणें आवश्यक आहे. प्रादेशिक वैशिष्ट्य म्हणजे संकुचितता नव्हे ! प्रा. मधु दंडवते आशियाई समाजवाद " समाजवादी दृष्टि ही मूलतः विश्वव्यापी दृष्टि आहे. अखिल मानवजातीचा विकास साधू इच्छि णारी ती एक जीवनपद्धति आहे आणि म्हणूनच राष्ट्राच्या भौगोलिक मर्यादांनीं समाजवादाला जखटाकणें अयोग्य आहे, "आशियाई समाजवादा " - डून चा पुरस्कार करतांना आशियाई समाजवाद्यांची दृष्टि देखील हीच आहे. तथापि विश्वव्यापी दृष्टि म्हणजे विचारांचा आणि आंदोलनाचा ठोकळेबाज एकजिनसीपणा नव्हे. आशियाई समाजवाद्यांची दृष्टि न. भा. ही विविधतेंतील एकतेची दृष्टि आहे. आशियांतील आर्थिक विकास, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी, लोकशाही पद्धति जनतेमध्ये रुजविण्याचें कार्य ह्या सर्वोचा इतिहासक्रम युरोपमधील देशांपेक्षां तौलनिक दृष्टया वेगळा राहिला आहे. आशियांतील देशांच्या समस्यांमध्ये एकप्रकारचें साधर्म्य आढळून येत आहे. व केवळ याच महत्वाच्या कारणास्तव विश्वव्यापी समाजवादी दृष्टीचा स्वीकार करून हि आशियांतील समाजवाद्यांना आशियाच्या पातळीवरून अनेक समस्यांचा विचार करावा लागतो. युरोप आणि आशिया पश्चिम युरोपमधील आर्थिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांतील समाजवादी चळवळीचें स्वरूपाहून आशि यांतील मागासलेल्या राष्ट्रांमधील समाजवादी चळवळीचें स्वरूप भिन्न आहे. पश्चिम युरोपमधील समाजवादी आंदोलनाचा मागोवा घेतल्यास दिसून येतें कीं युरोपमधील समाजवादी चळवळीचा विकास हा आशियांतील राष्ट्रांप्रमाणें राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या अवस्थेमधून झाला नाहीं, तर भांडवलशाहीच्या प्रत्यक्ष विरोधामधूनच झाला, युरोपमधील राष्ट्रांचा आशियांतील वसाहतवादाचा आणि साम्राज्यवादाचा वारसा सर्वच युरोपीय समाजवाद्यांनीं संपूर्णपणे व खंबीरपणें अनेक वर्षे झिडकारिला नाहीं. यामुळेच युरोपीय समाजवादी व आशियाई समाजवादी यांच्यामध्यें भावनात्मक एकता ( emotional integration ) निर्माण होऊं शकली नाहीं. युरोपमधील सत्तारूढ समाजवाद्यांनीं देखील वसाहतविषयक अनेक प्रश्नांवर केवळ सकुं चित व्यवहारवादी ( Pragmatic ) भूमिका घेतली |
बॉलीवूडमधील सर्वोत्तम गायिका म्हणून आज नेहा कक्करचे नाव सगळ्यात पुढे आहे. आपल्या आवाजाने आणि दमदार गायिकेने नेहाने सगळ्यांचा अक्षरशः वेड लावलं आहे. आपल्या मेहनत आणि सुंदर आवाजासोबत उत्तम अशा गाण्याच्या खास शैलीमुळे नेहा देशातील एक सर्वात नावाजलेली सेलेब्रिटी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर सध्या नेहा बसलेली आहे. दोन वर्षांपूर्वी अचानकच नेहाच्या लग्नाची बातमी समोर आली आणि अनेकांना धक्का बसला. तिने अचानकच रोहनप्रीत सोबत विवाह केला, त्यामुळे तिच्या फॅन्सला एक सुखद धक्का बसला होता. रोहनप्रीत आणि नेहाचे एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. ते अनेकवेळा आपल्या सोशल मिडियावरून, काही खाजगी फोटोज शेअर करतच असतात. नेहा आणि रोहनप्रीतच्या जोडीला त्यांचे फॅन्स रब ने बना दि जोडी असच म्हणतात. नेहा कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळं चर्चेत असते. सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या व्हिडियो आणि फोटोजमुळे तर ती खास चर्चेत येते. आता पुन्हा एकदा नेहा चर्चेत आली आहे. तिने एका गाण्यावर व्हिडियो बनवून आपल्या सर्व सोशल मीडियाच्या अकाऊंट वर शेअर केला. मात्र या व्हिडियोमुळे तिला ट्रोल व्हावं लागत आहे. सध्या अनेकांवर, पुष्पा सिनेमाची भुरळ पडली आहे. त्यामध्ये, समंथाच आयटम सॉंग ऊ अंटत्वमामा हे गाणं तर खूपच जास्त प्रसिद्ध झाले आहे. अनेकांना या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरत नाहीये. आणि असंच काही नेहा क्करच्या बाबतीत देखील झालं. मात्र नेहाच्या व्हिडियोमुळं तिला सगळेच जण ट्रोल करत आहेत. नेहाने या गाण्यावर डान्स करत व्हिडियो बनवला आहे. गाण्यामध्ये समंथा आणि अल्लू अर्जुनचे अनेक वेगवेगळ्या डान्स स्टेप्स आहेत. त्यामध्ये जमिनीवर बसून एक स्टेप आहे. तीच स्टेप करण्याच्या प्रयत्नात नेहाला टी'केचा सामना करावा लागला आहे. यावेळी समुद्रकिनारी नेहाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून कमरेला एक गडद निळ्या रंगाची ओढणी कमरेला बांधली आहे. ती स्टेप तिला व्यवस्थित जमली नाहीये. त्यामुळे नेटिझन्स तिला खूप जास्त ट्रोल करत आहेत. त्यातच माघील अनेक दिवसांपासून ती प्रे'ग्नेंट असल्याची चर्चा देखील सुरु होती. मात्र तिचा हा डान्स बघून ती गरोदर नसल्याच समोर आलं आहे. अल्लू अर्जुन आणि समंथाची हुक स्टेप करताना नेहाने चांगलीच मेहनत घेतली. मात्र नेहाला त्यावरून नेटकरी मात्र तिला खूप जास्त ट्रोल करत आहेत. |
शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : जेव्हा एखाद्या पक्षासोबत अन्य पक्ष येतात (दल के साथ 'दल-दल'), तेव्हा अधिक 'दलदली'मुळे कमळ चांगले खुलते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे विरोधकांचा समाचार घेतला. येथे 'किसान रॅली'त बोलताना मोदी म्हणाले की, केंद्रात ऐतिहासिक जनादेश देऊन जनतेने जे सरकार स्थापन केले आहे, त्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही. संसदेत आम्ही सातत्याने विचारत होतो की, अविश्वास प्रस्तावाचे कारण काय आहे? जेव्हा कारण सांगू शकले नाहीत, तेव्हा गळ्यात पडले. आम्ही त्यांना हेच सांगत होतो की, लोकशाहीत जनादेश सर्वात श्रेष्ठ आहे. जनतेच्या मनाविरुद्ध असा खेळ खेळणे योग्य नाही. विरोधी पक्षांना असे वाटत होते की, आपण मोदींना धडा शिकवायला हवा, त्यांना पदावरून दूर करायला हवे, पण देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या ताकदीमुळे, त्यांच्या विश्वासामुळेच आपण पंतप्रधानपदी आहोत, हे विरोधक विसरून गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ही ताकद आहे. साखर कारखान्यांना १ डिसेंबरपासून उसापासून केवळ साखरच नव्हे, इथेनॉल, रस आणि मोलॅसिसची निर्मिती करण्याची परवानगी देण्याचे आमच्या सरकारने ठरविले आहे, असेही मोदी यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. दलालांना दूर करून शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य किंमत दिली जात आहे. खरेदीत पारर्शकता आणली आहे. आज शेतकºयांच्या नावाने जे अश्रू ढाळत आहेत, त्यांनाही कधी काळी शेतकºयांसाठी काही करण्याची संधी होती, तेव्हा काहीच केले नाही, हे शेतकºयांना माहीत आहे. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, पूर्वी काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, दिल्लीहून एक रुपया निघतो तेव्हा गावात जाईपर्यंत १५ पैसे उरतात. तेव्हा पंचायतींपासून ते संसदेपर्यंत त्यांचीच सत्ता होती. मात्र, आम्ही यावर तोडगा काढला आणि आज ९० हजार कोटी रुपये योग्य व्यक्तीच्या खात्यात जात आहेत. पूर्वी ते दुसरीकडेच जात होते. |
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. मोहिमेअंतर्गत बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने शहरातील तीन ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात ३७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील ससून रुग्णालय, टिळक रोड येथील सचिन ढवळे अकॅडमी आणि निकमार विद्यापीठ बाणेर येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान मोहिमेचे उद्घाटन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केले. यावेळी उपअधिष्ठाता मुरलीधर तांबे, डॉ. अजय तावरे, डॉ. भारत दासवानी, डॉ. निला नकाते, डॉ. सोमनाथ खेडकर, डॉ. मानसिंग साबळे, डॉ. संजय तांबे आदी उपस्थित होते. |
गुंतवणुकीचं नियोजन सतत करत राहावं लागतंच, पण मार्चचा शेवटचा आठवडा हा आर्थिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असतो. वर्षअखेर असल्याने या काळात गुंतवणुकीचं पूर्वावलोकन करता येतंच पण राहिलेल्या गुंतवणुकी पूर्ण करून करबचत करता येते. यानिमित्ताने पुढील आर्थिक वर्षाचं नियोजन करून या वर्षीच्या चुका टाळण्याचा प्रयत्नही करता येतो. या आनुषंगाने काय करता येईल आणि नेहमीच मार्चमध्ये काय करावं याविषयी. . मार्च महिना हा आर्थिक दृष्टीनं महत्त्वाचा ठरणारा महिना असतो. यावेळी विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करून बँका, म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणुकांचा आढावा घेतला जातो आणि करबचतीसाठी आवश्यक असेल तर इतर गुंतवणुकाही केल्या जातात. कर परताव्यासाठी तयारी केली जाते. यावेळी सहसा काही निर्णयांचा पश्चात्ताप होत असतो आणि त्या संदर्भात पुढील आर्थिक वर्षात अधिक चांगली कामगिरी करण्याचा विचार केला जातो. मात्र तज्ज्ञांच्या मते मार्चमध्ये आढावा घेऊन आर्थिक व्यवहारांसंदर्भात काही गोष्टी नेहमीच कराव्या लागतात. यासंदर्भातली पहिली बाब म्हणजे तुमचा पैसा तसाच पडून राहू देऊ नका. योग्य वेळेची आणि गुंतवणूक संधीची वाट पाहत राहिल्यामुळे त्यात हवी तितकी वाढ होत नाही आणि गुंतवणुकीच्या पातळीवर तो निरुपयोगी ठरतो. यासाठी एक 'डिफॉल्ट' गुंतवणूक योजना तयार करा. ती कदाचित तुम्हाला आवडत असलेल्या गुंतवणुकीसंदर्भातली असेल किंवा तुम्ही मागोवा घेत राहिलेल्या फंडांविषयीची असेल किंवा तुमच्या आवडत्या स्टॉक्सच्या संचांविषयीची असेल; परंतु तुमचा पैसा कोणत्या ना कोणत्या गुंतवणुकीत असलाच पाहिजे. दुसरी बाब म्हणजे सतत सक्रिय राहण्याची आवश्यकता असलेल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करू नका. कारण यासाठी सातत्यानं देखरेख करत राहावं लागतं किंवा सतत खरेदी-विक्रीत अडकून पडावं लागतं. तरच तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार बनता. त्याऐवजी तुमची गुंतवणुकीची व्यूहरचना साधी, सोपी असली पाहिजे आणि तिची अंमलबजावणी करणंही सहज जमलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओचा वार्षकि आढावा घेत राहा. हे कंटाळवाणं वाटलं तरी अत्यावश्यक असतं. कोणत्या गुंतवणुकी योग्य दिशेनं चालल्या आहेत आणि कोणत्या गुंतवणुकी काम करत नाहीत ते पाहा. तुमच्या सगळ्या मालमत्तेचं मूल्य काढा. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आपला पैसा कुठे ठेवणं अधिक चांगलं आहे ते ठरवा. चुकांची जबाबदारी घेऊन त्यामध्ये दुरुस्ती करणं ही या प्रक्रियेतला चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादी गुंतवणूक चांगली कामगिरी करत असेल, तर आपल्याला तातडीनं नफा मिळवण्याचा आणि त्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा मोह होतो. त्याचप्रमाणे एखादा पर्याय चांगली कामगिरी करत नसला, तर आपण त्यामधली गुंतवणूक तशीच पडून राहू देतो. पण असे झटपट निर्णय घेण्याऐवजी आपल्या निर्णयाचा आपल्या संपूर्ण पैशावर काय परिणाम होत आहे आणि होईल याचा विचार करा. इथे संपूर्ण पोर्टफोलिओवर नजर टाकून सर्वागीण विचार करा. वार्षिक तरलता योजनेचा विचार करणं ही पाचवी महत्त्वाची बाब असते. भरपूर खर्चाच्या बाबी असतील तर आपण इक्विटीतली गुंतवणूक विकून त्या भागवू शकू, असा विचार करणं धोकादायक असतं. त्याऐवजी गरजेच्या वेळी मिळावा म्हणून कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये पैसा गुंतवा. इक्विटीची बाजारपेठ खात्रीची नाही. तुमच्या गरजेच्या वेळीच पैसा दामदुपटीनं मिळेल असं समजणं चुकीचं ठरतं. त्यावेळी बाजार घसरलेला असेल तर गुंतवणुकीतून अल्प पैसा मिळून तुमची गरज न भागण्याची शक्यता असते. अशा वेळी बँकांच्या मुदत ठेवींमध्ये किंवा अल्पकालीन डेब्ट आणि लिक्विड फंडांमध्ये हा पैसा ठेवणं शहाणपणाचं ठरतं. मोठय़ा गरजांसाठी अशा प्रकारची तरतूद खूप आधीपासून करावी लागते. सहावा मुद्दा म्हणजे क्रेडिट कार्डच्या खर्चाचा आढावा घ्या. अत्यावश्यक गरजांखेरीज करत असलेला इतर अनावश्यक खर्च आपल्याला क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटच्या आढाव्यातून स्पष्टपणे दिसतो. कोणत्या सवयी किंवा चैनी आपल्याला परवडण्याजोग्या आहेत हे त्यातून समजतं. अकारण खर्चात टाकणा-या सवयी वेळीच दूर ठेवणं हीसुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच आहे, या दृष्टीनं हे मोह टाळण्याकडे पाहा. पैशांच्या नियोजनाच्या प्रक्रियेतली पुढली बाब अधिक महत्त्वाची आहे. तुम्हाला पश्चात्ताप वाटत असलेल्या आर्थिक निर्णयांकडे बारकाईनं पाहा. आपल्या मानवी दोषांसकट आपण कोणताही निर्णय घेत असतो आणि काही वेळा चुकीच्या निर्णयांचीही एक विशिष्ट संरचना असल्याचं आपल्या लक्षात येतं. वर्षातून एकदा तरी या मुद्याचा आढावा घेऊन चुका कुठे आणि कशा होतात ते पाहा आणि त्या होऊ नयेत यासाठी कोणती खबरदारी घेता येईल याचा विचार करून पावलं उचला. आपल्या गुंतवणुकांमध्ये खंड पडणार नाही याची काळजी घ्या. ही आठवी महत्त्वाची बाब आहे. गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या बाबी पूर्ण झाल्या आहेत का, याची खात्री करून घ्या. तुमचा नामनिर्देशन अर्ज भरलेला आहे हे पाहा. त्यात ई मेल अॅड्रेससह इतर बाबी अचूक भरलेल्या आहेत ना, हे तपासा. या छोटय़ा बाबी आपण लांबणीवर टाकतो. त्यानंतर संकट समोर ठाकतं त्यावेळी छोटे तपशील पूर्ण करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याचं आपल्या लक्षात येतं. वर्षभरातून जेमतेम एखादा तास काढला तरी या बाबी सहजगत्या पूर्ण होतात. याखेरिज प्राप्तिकर परतावे वेळेत फाईल करावेत. त्यासाठी गरज असल्यास व्यावसायिक मदत घ्यावी. आपले उत्पन्नाचे स्त्रोत जाहीर करून आणि प्रामाणिकपणे कर भरून आपण आपल्या संपत्तीचा आनंदाने उपभोग घेऊ शकतो. आता दर वर्षीच्या आर्थिक वर्षाची सांगता योग्य प्रकारे व्हावी म्हणून मार्चच्या शेवटच्या एक-दोन आठवडय़ांमध्ये केल्याच पाहिजेत, अशा कोणत्या बाबी असतात ते पाहू या. यंदाच्या आर्थिक वर्षाचा अखेरचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे या बाबी तुम्ही अजूनही या वर्षासाठी करू शकता. शेअर बाजारात नोंद झालेले समभाग आणि समभागावर आधारित म्युच्युअल फंड योजनेच्या युनिट विक्रीमुळे झालेला दीर्घकालीन भांडवली नफा आतापर्यंत करमुक्त होता. परंतु १ एप्रिल २०१८ पासून अशा प्रकारच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यापैकी पहिल्या एक लाख रुपयांवर कर बसला नाही तरी पुढच्या नफ्यावर तो बसणार आहे आणि तो १० टक्के दरानं भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला नसेल किंवा झालेल्या नफ्याची रक्कम एक लाखांपेक्षा कमी असेल, तर ३१ मार्चपूर्वी तुम्ही एक लाखांचा नफा कमवू शकता. त्यामुळे त्याच्यावरच्या १० टक्के कराची बचत होईल. करबचतीच्या रकमेचा विचार न करता तुमचं एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असेल, तर तुम्हाला उत्पन्नाचं विवरणपत्र भरावं लागेल. गुंतवणुकीच्या इतर पर्यायांची निवड आपण करू शकतो; परंतु करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्न मिळवण्यासाठी पीपीएफचं खातं अवश्य उघडलं पाहिजे. यात शक्यतो जास्तीत जास्त रक्कम ठेवा. अर्थातच दर वर्षी दीड लाखांहून अधिक रक्कम या खात्यात ठेवणं शक्य नसतं. किमान पाचशे ते कमाल दीड लाख अशी या खात्यात ठेवावयाच्या रकमेची मर्यादा आहे. ही सरकारी योजना आहे आणि ती १५ वर्षाची आहे. त्यामुळे तिच्यातले पैसे सुरक्षित राहतात. काही बँका आणि टपाल खात्यात हे खातं स्वतःच्या किंवा अज्ञान मुलांच्या नावावर उघडता येतं. पीपीएफमधील गुंतवणूक ही प्राप्तिकर कायद्याच्या ८० कलमांतर्गत वजावटीला पात्र असते. या गुंतवणुकीवरचं व्याज करमुक्त आहे. |
कोल्ड नाईट कडधान्ये सहसा लोखंडासह मजबूत असतात. लोहा कसा दिसतो? हे सोपे प्रयोग वापरा. यास फक्त सुमारे 15 मिनिटे लागतात! - ब्लेंडर (पर्यायी) - वाडगा किंवा ब्लेंडर मध्ये अन्नधान्य घाला. - पूर्णपणे धान्याचे झाकण लावण्यासाठी पुरेसे पाणी घाला (हे अचूक मोजमाप नाही - लोखंडी पाण्यात विरघळत नाही असे तुम्हाला जितक्या जास्त आवडते तितके जास्त जोडू शकता) - एका चमच्याने कडधान्यास मिसळा किंवा ब्लेंडर वापरुन पाण्याने एकत्र करा. अन्नधान्य अधिक बारीकपणे ग्राउंड आहे, लोह मिळविण्यासाठी सोपे होईल. - सुक्या अन्नधान्यामधून चुंबक हलवा. लोह जड आहे आणि डूबळ होईल, म्हणून वाडगाच्या खालच्या बाजूकडे लक्ष द्या. जर आपण ब्लेंडर वापरला असेल तर, आपण किलकिलेच्या तळाशी असलेल्या कणांकडे जाऊ शकता याची खात्री करा. - चुंबकावरील काळ्या 'फझ' किंवा लोखंडाची पहा. आपण पांढरे नैपकिन किंवा पेपर टॉवेलवर लोखंडास पुसल्यास लोह पाहण्यासाठी सर्वात सोपा आहे. Mmmm Mmm चांगले! |
नागपूर : 'सीबीएसई'च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या निकालात उपराजधानीमध्ये विद्यार्थिनींचाच वरचष्मा कायम असल्याचे दिसून आले. प्रथम क्रमांक जरी सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलच्या मोझम्मील खलील याने पटकाविला असला तरी, 'टॉपर्स'मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत. नागपुरात 'सीबीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे सहा हजार विद्यार्थी बसले होते. मोझम्मीलच्या पाठोपाठ त्याच्याच शाळेतील कोमल कुशवाह या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक पटकाविला. तर तृतीय क्रमांकावर सौंदर्या जनार्दन (९८. २ टक्के) ही राहिली. नारायणम् विद्यालयाच्या जिज्ञासा बडवाईक या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण मिळवीत चौथे स्थान पटकाविले. भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स येथील शिप्रा मुदलियार, सबोरनी कार, ऐश्वर्या डहाके व सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलची जान्हवी वालदे यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. त्यांना ९७. ८ टक्के गुण मिळाले. भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स येथील विद्यार्थिनी रिशिका दत्ता व प्राची श्रीवास्तव तर निनाद खांडेकर मॉडर्न स्कूल यांनी ९७. ६ टक्के गुण मिळवीत संयुक्तपणे सहावा क्रमांक मिळविला आहे. ९७. २ टक्के गुणांसह भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्सच्याच अंजली घोडवैद्य, सुरभी शहलोत व श्रीकृष्णनगर शाखेचा पीयूष अग्रवाल यांनी सातवा क्रमांक मिळविला. उपराजधानीतील ४८ पैकी अनेक शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला असून, सगळीकडेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. गुणवंतांची पसंती वैद्यकीय-अभियांत्रिकी शाखेला उपराजधानीतून पहिल्या तीन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जणांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेलाच पसंती दिली आहे. गेल्या वर्षी गुणवंतानी अभियांत्रिकीला जास्त प्राधान्य दिले होते. (प्रतिनिधी) 'टॉपर्स टॉक' 'आयआयटी'त जाण्यासाठी प्रयत्न : मोझम्मील खलील विद्यार्थ्याला बारावीनंतर देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्था असलेल्या 'आयआयटी' येथील अभियांत्रिकीची पदवी घ्यायची आहे. यासाठी मी आतापासूनच प्रयत्नाला लागलो आहे, असे मत ९९ टक्के गुण मिळविणार्या मोझम्मील खलील या विद्यार्थ्याने व्यक्त केले. वर्षभर नियमितपणे अभ्यास करीत होतो. वायफळ वेळ वाया जाऊ नये म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच सोशल नेटवर्किंगपासूनदेखील दूर झालो, असे त्याने सांगितले. त्याचे वडील रेल्वेत असून आई गृहिणी आहे. मोझम्मीलला वाचनाची प्रचंड आवड असून, चेतन भगत हा आवडता लेखक आहे. मोझम्मीलला इंग्रजी व संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत, हे विशेष. प्रशासकीय सेवेत जायचे आहे - कोमल कुशवाह साधारणतः विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेचे वेध लागले असतात. परंतु मला मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे. यासाठी सातत्याने अवांतर वाचनाच्या माध्यमातून सामान्य ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न असतो. दहावीच्या परीक्षेत नियमित अभ्यास व सरावावर भर दिला, असे मत कोमल कुशवाह या विद्यार्थिनीने व्यक्त केले. उपराजधानीतून दुसरे स्थान पटकाविणार्या कोमल कुशवाह हिचे वडील विजय कुशवाह हे व्यावसायिक असून, आई गृहिणी आहे. |
पुणे - केंद्र सरकारने अप्रत्यक्ष कराचे जुने वाद मिटविण्यासाठी "सबका विश्वास' योजना सुरू केली होती. याला 15 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, याकडे मोठ्या करदात्यांनी दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, एकूण प्राप्त पात्र करदात्यांपैकी 87. 5 करदात्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळेच उत्साहित होऊन सरकारने या योजनेला 15 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अगोदर या योजनेची मुदत 31 डिसेंबर रोजी संपणार होती. छोट्या करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, एकूण संख्येपैकी 12. 5 टक्के करदाते मोठे आहेत आणि त्यांच्याकडे 1. 7 लाख कोटी रुपयांची रक्कम अडकली आहे. या करदात्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत पुढाकार घेतलेला नाही. केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करूनही आतापर्यंत हे मोठे करदाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. देशातील जुन्या कर विवादामध्ये 1. 84 लाख कोटी करदाते आहेत. त्यातील 1. 61 लाख करदात्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्याकडे 79 हजार कोटी रुपयांची विवादित रक्कम आहे. त्यांना काही कर माफ केल्यानंतर हे करदाते 35 हजार कोटी रुपयांची रक्कम सरकारला देणार आहेत. मात्र, 23 हजार करदाते जेकी एकूण संख्येच्या 12. 5 टक्के आहेत. त्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला नाही. या करदत्यांची माहिती कर विभागाकडे आहे. त्यामुळे कर विभागातील अधिकाऱ्यांनी याकरिता त्यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेची माहिती द्यावी, असे अर्थमंत्रालयाने सांगितले आहे. अतिशय सोपी सुटसुटीत आणि करदात्यांना बरीच सूट देणारी ही योजना असूनही मोठे करदाते पुढे यायला तयार नाहीत. याबाबतची कारणमिमांसा करताना काही विश्लेषकांनी सांगितले की, या मोठ्या करदात्यांनी यासंबंधात ठेवलेले सल्लागार आणि वकील यामध्ये अडथळे आणत असल्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने ही मुदत संपल्यानंतर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात यातील काही करदाते समोर येऊ शकतात. |
दक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही - यशोमती ठाकूर - Majha Paper\nदक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही - यशोमती ठाकूर\nमुख्य, कोरोना, महाराष्ट्र / By माझा पेपर / कोरोना तिसरी लाट, पालकमंत्री, महाराष्ट्र सरकार, महिला व बालविकास मंत्री, यशोमती ठाकूर / September 9, 2021 September 9, 2021\nअमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. केरळमध्ये रोज हजारो नवे रुग्ण आढळत असून, हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे दक्षता पाळली गेली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी दिला. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.\nपालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, अमेरिका, चीन आदी देशांत तिसरी लाट उदभवली असून, केरळमध्येही रोज नवे हजारो रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर आपल्याला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे; पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये.\nपालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, आरोग्याची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तरच पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. आपण सर्वांनी मिळून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करायला हवे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन व्हावे. गर्दी व सार्वजनिक कार्यक्रम टाळावे.\nदुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. आता तो रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी दक्षता नियम पालनाची व स्वयंशिस्तिची गरज आहे. त्यामुळे सर्वानी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. |
नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने ताप आणि घसादुखी (fever And Sore Throat) असणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचाणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोविड टेस्ट (Corona Rapid Antigen Test) जलद करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. केंद्राने राज्यांना (Center Government Letter To All States ) पत्र लिहून कोरोनाचा वाढता संसर्गाचा दर पाहता रॅपिड अँटीजेन टेस्टचा (RAT) वापर वाढवण्यास सांगितले आहे. वाढत्या संसर्गाबाबत सरकारने राज्यांना इशारा दिला असून, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग दर वेगाने वाढत असल्याचे केंद्राने म्हटले आहे. (State To Conduct Covid Test In Fever & Sore Throat Cases) कोरोनाच्या (Coroana Cases raised In India) सध्याच्या वाढीच्या काळात खोकला, डोकेदुखी, घसादुखी, श्वासोच्छवास, अंगदुखी, चव किंवा वास, थकवा आणि अतिसार अशा कोणत्याही व्यक्तीला संशयास्पद मानावे असे सांगण्यात आले आहे. तसेच अशा सर्व व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात यावी. तसेच त्यांना ताबडतोब आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी 18 टक्के प्रकरणे ओमिक्रॉनचे आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगच्या एकूण प्रकरणांपैकी 18% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन आढळून आला आहे. (Corona Latest News In Marathi ) |
पोहरा बंदी : जंगलाचे संरक्षण आणि गुरे व मेंढ्या जंगलातून कायम हद्दपार करण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी दोन दिवसांपासून 'सर्जिकल स्ट्राइक' राबवून जंगल गस्त करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादरम्यान चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील सावंगा बीट वनखंड क्रमांक ३०७ मधील राखीव जंगलात मेंढ्या व बकऱ्यांचा कळप चराई करताना आढळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने धडक कारवाई केली. वनकर्मचाऱ्यांचे पथक पाहून मेंढपाळ मेंढ्या जंगलातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरले. तरीसुद्धा चिरोडी वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन मेंढ्या ताब्यात घेतल्या व त्या वाहनाने चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून बंदिस्त केल्या. शनिवारी ही कारवाई चिरोडी प्रभारी वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक अतुल धसकट, वनमजूर शेख रफीक, शालिक पवार, संरक्षण मजूर प्रमोद राठोड यांनी गस्तीदरम्यान केली. वनरक्षक अतुल धसकट यांनी दोन मेंढ्यांसह उर्वरित पळवून नेलेल्या मेंढ्याप्रकरणी पशुपालकांवर वनगुन्हा जारी केला. |
एमपीसी न्यूज - मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस'सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा' या संकल्पनेवर आधारित साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा संस्कृतीची जोपासना व नागरिकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे व्यापक स्वरुपात आयोजन करण्याबाबत शाळा, संस्थांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संस्था, शाळांमध्ये प्रभात फेरी, रॅली काढणे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा विषयक प्रचार व प्रसारासाठी सहाय्यभूत ठरतील अशा उपक्रमाचे आयोजन, राज्याचे क्रीडा धोरण, क्रीडा विषयक परिसंवाद, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, आहारशास्त्र यांचे महत्व समजावून सांगणे, व्यवसायिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम घेणे, चर्चासत्र, व्याख्यान, क्रीडा प्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वांतत्र्यदिनाचा अमृत महोत्सव निमित्त 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत'फिट इंडिया फ्रीडम रन' ही चळवळ, उपक्रम राबविण्यात यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे दुरध्वनी 020 - 26610194 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. |
पाहा सलमानच्या 'भारत'चा फर्स्ट लूक । Saamana (सामना) अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'भारत' चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा निर्माता अतुल अग्निहोत्री याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे. 'भारत'च्या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना वाघा-अटारी बॉर्डरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे दिसत आहेत. या चित्रपटातील कतरिनाचा लूक हा आतापर्यंतचा वेगळा लूक असल्याचे दिसून येत आहे. यात तिने साडी नेसली असून केस देखील कुरळे केलेले आहेत. सलमान आणि कतरिनाचा चित्रपटातील हा फर्स्ट लूक बघूनच त्यांच्या चाहत्यांची उत्सुकतता शिगेला पोहोचली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत या चित्रपटात सलमान कतरिना व दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटात कतरिनाच्या जागी प्रियंका चोप्राची वर्णी लागली होती. मात्र प्रियंकाने शूटींग सुरू व्हायच्या काही दिवस आधीच चित्रपटातून माघार घेतली होती. |
काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली. लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली. रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठी माणसाला रस्सा भुरकण्याचा प्राचीन काळापासून नाद ! रस्सा म्हटलं की पयलेछूट आठवतो तांबडा-पांढरा ! तांबडा रस्सा म्हणजे रश्श्यांचा राजा आणि पांढरा त्याचे धाकटे भावंड ! तांबडा तुम्हाला कुटंबी भेटंल खरं पण तांबडा पांढऱ्याची जोडी पाहिजे असंल तर कोल्लापूरला यावं लागंल. तांबड्याची तर्री आणि पांढऱ्याचा साजूक तोरा मिरवावा तर कोल्हापुरी थाळीनंच. ताटाच्या वरल्या अंगाला दोन मोठाल्या वाट्या एकीत लालभडक कटवाला तांबडा आणि त्याला खेटून दुसरीत नाजूक मिजाजवाला मिरे-वेलची-तमालपत्रीचा स्वाद मिरवणारा पांढरा. मधे सुक्क्या मटनाची प्लेट, डावीकडं वाफा निघतेली जोंधळ्याची भाकरी, तिला लागून दहीकांदा आणि लिंबाची फोड आणि त्याच्याजवळ खेम्याची बारकी प्लेट ! यवडं झालं की लागली कोल्लापुरी थाळी ! बसा आनी हाणा !! ...आनी रस्सा मागून घ्याला लाजू नका बरं का पावनं ! तांबडा म्हणु नका, पांढरा म्हणू नका, लागंल तेवढा वरपा ! खरा रस्साप्रेमी कधी रश्श्यात तुकडे शोधत बसणार नाही आणि चमच्याने नाजूकपणे रश्श्याचे चहासारखे घुटकेही घेणार नाही. रस्सा खायचा तो भुरकून आणि ओरपून, वाटी तोंडाला लावूनच. महाराष्ट्राच्या प्रांतागणिक तांबड्याचा नूर बदलत जातो. खानदेशी, मालवणी, वऱ्हाडी, नागपुरी. त्यांची आणि वेगवेगळी तऱ्हा. पण रंग तांबडाच. तांबडा आणि पांढरा झाला की नंबर लागतो खेकड्याचा रस्सा ! ह्याला लैच निगुतीनं करायला लागतंय आणि खाणारापण दर्दी लागतोय. उगं माशाचा वास येतोय म्हणून नाकं मुरडणारा चालत न्हाय. खेकडे आणून त्यांच्या नांग्या काढून, आबदार ठेचून शिजवून दबदबीत रस्सा करायचा. बारक्या नांग्या असल्या तर मिक्सरात फिरवून रस गाळून घ्याचा आणि रश्श्यात घालायचा. सगळं घर दरवळायला लागतंय बघा ! तेचाच एक भाऊ कोळंबीचा रस्सा. हे जरा करायला सोपं आणि कमी त्रासात ! कोळंबी मार्केटातूनच साफ करून आणली की फार कटकट नाही. धुतली की टाकली फोडणी. कोळंबीला मसाला बिसाल्याची नाटकं नाहीत. आलंलसूण ठेचून घातलं आणि धणे-जिरे पूड टाकली की झालं काम. पण चव काय नामी ! स्लर्प !! जातीचे मटनखाऊ आणखी एका रश्श्याचे पंखे असतात. मुंडी रस्सा ! याचा वास आणि उग्रपणा सहन करायला मर्दाचं काळीज आणि पोट बाळगावं लागतं. आमची आजी अंड्याचा रस्सा करायची. म्हणजे अंडा करी नव्हे. मसालारहित, नुसतं तिखट मीठ घालून. अंडं फोडून फेसायचं आणि कांदा भाजून त्यात तिखट-मीठ, लसूण आणि पाणी घालून पातळ पिठलं करतो तसं त्यात फेसलेलं अंडं घालून रस्सा करायचा. त्या लालभडक तर्रीदार रश्श्याच्या तोडीची अंडा करी आजवर भेटली नाही. माझी एक दूरची बहिण अंडे फोडून डायरेक्ट उकळत्या रश्श्यात घालून शिजवून रस्सा करते. त्याचं नाव डुबुकरस्सा ! त्याची एक वेगळीच टेस्ट. नॉनव्हेजमध्ये आहेत त्यापेक्षा जास्त व्हरायटी व्हेज रश्श्याची. बटाट्याचाच एक रस्सा घेतला तरी त्यात शंभर नमुने. बटाटा रस्सा हा एक ऑल टाईम फेवरीट रिझर्व्ह आयटम आहे. पाहुणे आले, फ्रिजमधली भाजी संपलीय, बाजारात जायला वेळ नाही, आले बटाटाभाऊ मदतीला. शिवाय याच्या जोडीला कुणीही खपून जाते. कांदे-बटाटे रस्सा , टोमॅटो-बटाटा रस्सा, गोड बटाटा रस्सा, बटाट्याचा काळा रस्सा, फ्लॉवरवाटाणे-बटाटा रस्सा (याला काही जण कुर्मा म्हणतात.), वांगी-बटाटा रस्सा, ढब्बू मिरची आणि बटाटा रस्सा मासळीप्रेमी त्यात सोडे-बांगडे इ. मिसळून घालतात. बटाटा हा सर्वसमावेशक असल्याने या सर्वांच्या रंगात आपला रस-रंग मिसळून रश्श्याला वेगळीच गोडी आणतो. मटकीचा रस्सा मिसळीसाठी जास्त फेमस आहे. तरीपण नुसता ओरपायला पण भारीच. थोडा मटणाचा मसाला लावला तर तांबड्याच्या तोंडात मारेल. मात्र याच्या पाकृला ओले खोबरे मस्ट. आणि वरती तरंगायला कोथिंबीर. नॉनव्हेज रश्श्याच्या तोडीस तोड म्हणजे पावटा किंवा वालाच्या मोडाचा रस्सा. आमच्या कोल्हापूरकडे त्याला वरणे म्हणतात. वाल किंवा वरणे रात्रभर भिजत घालावे , दुसरे दिवशी कपड्यात बांधून झाकून ठेवावे. बारा तासांनी मोड आले की कांदा, आले-लसूण तिखट-मीठ इतके मोजकेच घटक घालून असली चाबरट चव येते की ज्याचं नाव ते ! पावट्याचा रस्सा म्हटलं की आमच्या घरी इतर काही कालवण करावं लागत नाही. रस्सा एके रस्सा. चपाती-भाकरीबरोबर आणि भाताबरोबरपण ! (फोटो आंजावरून साभार ) |
'कोरोना'च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात बसून साजरी करीत आहोत. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात ही पहिली वेळ असावी की, अनुयायांना जल्लोष करून, मिरवणुका काढून जयंती साजरी करता येत नाही. यात काही गैर आहे असेही नाही. कोरोनाचे संकट संपलेले नाही. घरात बसून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना भीमजयंती कशी साजरी करावी, याचे आत्मचिंतन करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. तिचा भीमानुयायांनी चांगला उपयोग करून घेतला पाहिजे असे वाटते. बाबासाहेबांनी हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या नरकात पिचत पडलेल्या दलित समाजाची अस्पृश्यतेच्या जखडबंद तुरुंगातून मुक्तता केल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी वाजत-गाजत त्यांची जयंती साजरी करणे स्वाभाविक आहे; पण प्रश्न असा आहे की, बाबासाहेबांचे आम्ही भक्त आहोत की अनुयायी? भक्त म्हटले की, बाबासाहेबांचे दैवतीकरण करून जयघोष केला की जबाबदारी संपते; पण अनुयायी म्हटले की, त्यांचे विचार कृतीत आणणे अपरिहार्य होऊन बसते. तेव्हा मुद्दा हा की, बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करताना आपण त्यांच्या समग्र सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न खरोखरच साकार केले आहे काय? निदान त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत काय? त्यांनी आयुष्यभर मूल्याधिष्ठित राजकारण केले; पण व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही, तर काळाची गरज ओळखून स्वतःचे स्वतंत्र पक्ष काढले आणि आम्ही? व्यक्तिगत स्वार्थाखातर त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची मोडतोड करून तत्त्वशून्य युती-आघाड्या करीत आलो. आता तरकाय? धर्मांध पक्षाशी युती करून सत्तेच्या खुर्च्या जशा उबवत आहोत, तसेच धर्मांध पक्षांना मदत करणाऱ्या राजकीय रणनीतीही आखत आहोत. बाबासाहेबांनी दलित समाजाला 'शासनकर्ती जमात व्हा' असा संदेश दिला. याचा अर्थ वाटेल त्याच्याशी तडजोड करून सत्तेच्या खुर्च्या मिळवा, असा होतो काय? नाही, तर मूल्याधिष्ठित राजकारण करा व प्रसंगी संविधान वाचविण्यासाठी समविचारी पक्षांशी सहकार्य करा, हेच त्यांना अभिप्रेत होते. राजकारणासोबत आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सत्ता मिळवा, जीवनाच्या सर्वांगात प्रवेश करा, असाही त्यांच्या संदेशाचा खरा अर्थ आहे; पण या संदेशाचा सोयवादी अर्थ काढून आपण दलित-शोषित समाजाची फसवणूक करणारे राजकारण करीत आलो. जातिअंत हे बाबासाहेबांचे जीवनध्येय होते. जाती मोडणे ही बहुसंख्याकांची खरी जबाबदारी आहे; पण आपण तरी खरेच जातिमुक्तझालो आहोत काय? राजकारण व धम्म ही माझ्या रथाची दोन चाकं आहेत, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यांच्या राजकीय संकल्पनेची आपण मोडतोड केलीच आहे; पण त्यांनी दुःखमुक्त,शोषणमुक्त समाजाच्या पुनर्रचनेसाठी जो बौद्ध धम्म दिला त्याचे तरी मनोभावे पालन आपण करतो काय? बाबासाहेबांनी प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडले पाहिजे, असे सांगून ठेवले. आपण किती सामाजिक ऋण फेडतो, हे कोण तपासणार? प्रश्न अनंत आहेत. याचे चिंतन भीमजयंतीच्या निमित्ताने तरी करणार आहोत का नाही, हा खरा प्रश्न आहे. दलितेतर पुरोगामी विचारवंतांनीही आत्मशोध घेण्याची गरज आहे. दलितांचे प्रश्न ही राष्ट्रीय समस्या आहे. दलितेतर पुरोगामी विचारवंतांची जबाबदारीही म्हणूनच मोठी आहे. प्रश्न आहे तो, बाबासाहेबांच्या जयंतीस सामाजिक अभिसरणाचे स्वरूप यावे म्हणून ते काय करतात हा! बहुसंख्याक समाजाचे मानसिक परिवर्तन करावयाचे, तर बाबासाहेबांची जयंती त्यांनी त्यांच्या पेठा-वस्त्यांतून साजरी करायला नको काय? दलितविरोधी मानसिकतेची तीव्रता ग्रामीण भागातून मोठी आहे. तिथे जयंती हाच अनेकांच्या पोटदुखीचा विषय असतो. मोठ्या प्रमाणात दलित अत्याचार तिथेच होतात. तेव्हा पुरोगामी विचारवंतांनी किमान जयंती काळात तरी (खरे तर सतत) ग्रामीण भागात जाऊन स्वकीयांचे प्रबोधन करायला नको काय? पण असे होत नाही. बाबा आढावांनी उभारलेल्या 'एक गाव-एक पाणवठा'च्या धर्तीवर सामाजिक अभिसरणास चालना देणारे उपक्रम राबविले जात नाहीत. तात्पर्य, दलितेतर पुरोगामी विचारवंतांनी ग्रामीण भागात जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. (लेखक राजकीय, सामाजिक विश्लेषक आहेत) |
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. पुरंदर : भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु शिक्षण,व्यापार,नोकरी आदी कारणाने अनेक भारतीय परदेशात जातात. पुरंदर तालुक्यातील विद्यार्थिनीं रशियात उच्चशिक्षणासाठी गेल्या असताना त्यांनी भारतीय परंपरेनुसार त्याठिकाणी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करत गणेशोत्सव साजरा करतात. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु, या प्रत्येकाची मराठमोळ्या संस्कृती, सणांशी जोडली गेलेली नाळ सोबत जपण्याचा प्रयत्न केला जातो. आज अनेक भारतीय कुटुंबे परदेशात राहत आहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पद्धतीने पूजा करून परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले. पुरंदर तालुक्यातील काजल चौंडकर (नायगाव), काजल भिंताडे(भिवडी),ऋतुजा कुंभारकर(वनपुरी),सायल जगताप(जेजुरी),आर्या पाटील (धनकवडी) ह्या मुली उच्च वैद्यकीय शिक्षण रशिया येथे घेत आहेत. परदेशात शिकत विद्यार्थिनींना असलेल्या या गणेश चतुर्थीला सुट्टी मिळत नसल्यामुळे या उत्सवासाठी भारतात परत येता आले नाही. मात्र, गणपती विषयी असणारी ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. यामुळेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या तेथील राहत्या घरी गणेश मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करत आपण कोठेही असोत मनात भक्तिभाव असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. आम्हाला देशाची व येथील सण उत्सवांची खूपदा आठवण येत असते. त्यामुळे यापुढे आम्ही सगळे येथे एकत्र येऊन शक्य तेवढे सण साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभावे हीच आमची इच्छा आहे. भारताची संस्कृती परदेशात देखील जपण्याचे प्रयत्न करत असल्याचे काजल चौंडकर हिने सांगितले . |
समृद्ध, संपन्न अशा नाट्यचळवळीचं आम्ही स्वप्न पाहिलं होतं. त्यात आम्हांला तेंडुलकरांची साथ लाभली यातच काय ते आलं. >> सत्य आहे. चिन्मय, तू आत्तापर्यंत जे काही वाचायला आणि ऐकायला दिलसं त्यामधे हे लिखाण सर्वात उत्तम! वाचता वाचता जीव विरघळून गेला माझा! सुप्रिया, तुझ्या स्वाक्षरीतील त्या ओळी कुणाच्या आहेत? मला फार आवडल्यात. जमत असेल तर पुर्ण कविता दे वाचायला. चिन्मय, पैंची ती कविता पुर्ण नसेल तर इथे पुर्ण करून दे ना.. खूपचं सुरेख आहे. मला वाटलं होतं बालकवींची आहे ती.. 'शांतता कोर्ट चालु आहे' अगदी खिळवून ठेवणारं नाटक आहे, सुलभा देशपांडेंच नाटक पाहिल होत आणि नुकतच रेणुका शहाणे च व्हर्जन पण पाहिलं. त्यांनी केलेल्या सगळ्याच भूमिका अविस्मरणीय.. चौकट राजा मधली आई पण फार सुरेख उभी केली होती त्यांनी .. हॅट्स ऑफ !! |
घटना पुडुचेरीच्या वेल्लुपुरम सीमेवर घडली, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. पुद्दुचेरीः दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडतात. या वर्षीही अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे अपघा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच एका अपघातात पिता-पुत्राला आपला जीव गमवावा लागला आहे. पुद्दुचेरीच्या वेल्लुपुरम सीमेवर स्कूटरवर फटाके घेऊन जाताना फटाक्यांच्या अचानक स्फोट होऊन पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याने जात असलेल्या एका स्कूटरचा अचानक स्फोट होऊन धूर पसरल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्या तारखेनुसार 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा वेदनादायक अपघात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, स्कूटरवरुन पिता-पुत्र जात होते, तेवढ्यात स्कूटरमध्ये ठेवलेल्या फटाक्यांचा अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात स्कूटरचे तुकडे झाले, तर वडील आणि सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत अन्य तीन जण जखमी झाले, तर अन्य तीन वाहनांचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, धडकेमुळेच फटाके फुटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असे सांगण्यात येत आहे की वडील आणि मुलगा त्यांच्या घराच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. |
Banana MSP : शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. केळीला १८. ९० रुपयांचा हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याच्या मागण्यांसह केळीला हमीभाव मिळावा, प्रतिबंधित असणारी औषधे कृषी सेवा केंद्रावर सापडल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या. केळी उत्पादकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याबाबतचा विषय घेण्याच्या सूचना मुख्य सचिवांना केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात केळीचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, केळी पिकाला कोणत्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांकडून वारंवार केळीला हमीभाव देण्याची मागणी केली जात आहे. एप्रिलमध्ये सावदा येथे राज्यस्तरीय केळी परिषद पार पडली होती. या परिषदेत केळी उत्पादकांच्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी या परिषदेत काही ठरावही करण्यात आले होते. केळीचा शालेय पोषणात समावेश करणे, केळीला. १८. ९० रुपये हमीभाव द्यावा. विमा कंपन्यांच्या मनमानी थांबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. तसेच प्रतिबंधित असणारी औषधे, खते कृषी केंद्रावर विक्री केल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांना जबाबदर धरावे. दरम्यान, गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. केळीला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडला आहे. Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, एग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
इंटेल डेस्कटॉप मदरबोर्ड उत्पादन थांबविणार - Majha Paper\nइंटेल डेस्कटॉप मदरबोर्ड उत्पादन थांबविणार\nतंत्र - विज्ञान / By Majha Paper / February 8, 2013 May 16, 2014\nजगातील बलाढ्य चीपमेकर जायंट इंटेल कंपनीने त्यांचे डेस्कटॉप मदरबोर्डचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असून कंपनी आता सर्व लक्ष सीपीयू व्यवसायावरच केंद्रीत करणार असल्याचेही म्हटले आहे. येत्या तीन वर्षात मदरबोर्डचे उत्पादन टप्प्याटप्प्यात बंद करण्यात येणार आहे.\nकंपनीचा शेवटचा मदरबोर्ड असेंब्ली लाईनवर त्यांच्या हस्वेल चीपसेटसाठी बनविला जाणार आहे. त्यानंतर हे उत्पादन बंद होईल. या व्यवसायात फार फायदा नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वरीष्ठ अधिकार्यां चे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनी आता सीपीयू उत्पादनावरच सर्व लक्ष केंद्रीत करणार आहे. मात्र चांगली बातमी अशीही आहे की कंपनी त्यांचा एकही कामगार कमी करणार नाही तर या विभागातील सर्व कर्मचार्यांयना अन्य विभागात समावून घेणार आहे.\nतीन वर्षांनंतर मदरबोर्डचे काय होणार याची काळजी लागली असेल तर त्यापासून दिलासा देणारी बाब अशी की इंटेल रेफरन्स डिझाईन्स विकसित करत राहणार आहे. ही डिझाईन्स त्यांच्या अंतर्गत चाचण्यासाठी विकसित केली जाणार असली तरी ती नंतर अन्य मदरबोर्ड उत्पादक कंपन्यांना हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. |
FTP स्थळ फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे एक मानक प्रोटोकॉल आहे, जे TCP आधारित नेटवर्कवरील एका होस्टवरून दुसर्या होस्टवर स्थानांतरित फाइलमध्ये वापरले जाते. FTP मध्ये क्लायंट-सर्व्हर आर्किटेक्चर आहे आणि हे अॅप्लिकेशन स्तराच्या OSI मॉडेलवर कार्य करते. नेटवर्कवर डेटा स्थानांतरीत करताना चार डेटा प्रतिनिधित्व मोड आहेत, 2 बायनरी मोड (प्रतिमा मोड) जेव्हा एका होस्टला (होस्ट यचे म्हणता येईल) दुसर्या फाईलमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे (होस्ट बी म्हणायचे असल्यास), या होस्ट A आणि होस्ट B दरम्यान एक कनेक्शन असणे आवश्यक आहे. या कनेक्शनचे दोन मार्ग आहेत दोन होस्ट दरम्यान त्यांना म्हटले जाते, (वास्तविक, हे वेगळ्या प्रकारच्या FTP नाहीत, परंतु FTP पोर्ट उघडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.) सक्रिय मोडमध्ये, FTP क्लायंट यादृच्छिक अनुप्रमाणित पोर्टमधून FTP सर्व्हरच्या पोर्ट 21 शी जोडतो, जे सामान्यतः 1024 (पोर्ट नंबर) पेक्षा मोठे आहे. एफ़टीपी FTP, FTP क्लायंट आणि FTP सर्व्हर दरम्यान संप्रेषण करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे आहे, • ग्राहकांच्या आदेश पोर्ट सर्व्हरचे आदेश पोर्टशी संपर्क साधतो आणि त्याचा डेटा पोर्ट देतो. • सर्व्हरने डेटा पोर्ट आणि क्लायंट डेटा पोर्ट दरम्यान कनेक्शन स्थापित करते. • शेवटी, ग्राहक सर्व्हरवर पोचपावती पाठवतो. जेव्हा FTP सर्व्हर जोडणी करण्याचा प्रयत्न करत आहे, निष्क्रिय FTP कनेक्शनचे समर्थन करत नाही किंवा FTP सर्व्हर फायरवॉल / राउटर / NAT डिव्हाइसच्या मागे असेल तेव्हा सक्रिय FTP वापरावे. सक्रिय मोडचे कनेक्शन समस्यांचे निराकरण करण्यासाठी निष्क्रिय FTP मोड विकसित केले आहे. FTP क्लायंट सर्व्हर सांगण्यासाठी PASV आदेश वापरू शकतो, कनेक्शन निष्क्रिय आहे. हे FTP क्लायंट आणि निष्क्रिय मोडमध्ये सर्व्हर यांच्यात संप्रेषण आहे. • ग्राहकांना सर्व्हर कमांड पोर्टशी संपर्क साधा आणि PASV कमांडला सांगा म्हणजे हे निष्क्रिय कनेक्शन आहे. • मग क्लायंट सर्व्हर दरम्यान डेटा पोर्ट आणि दिलेल्या पोर्टचा वापर करुन करतो. (पोर्ट सर्व्हरद्वारे दिलेले आहे) • शेवटी, सर्व्हर ग्राहकांकडे पोचपावती पाठवते. सक्रिय आणि निष्क्रीय FTP यात काय फरक आहे? 1 एक्टिव मोड FTP सर्व्हरला अधिक सुरक्षितता प्रदान करतो. पण निष्क्रिय मोड मध्ये नाही. (फायरवॉलद्वारे FTP कनेक्शन ब्लॉक केल्यानंतर निष्क्रिय मोडचा उपयोग केला जातो.) 2 एक्टिव्ह FTP फायरवॉलमुळे समस्या येऊ शकतात परंतु निष्क्रीय FTP ला फायरवॉलपासून कनेक्शन समस्या येत नाही) |
ओबीसी संघर्ष समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी ओबीसी जातनिहाय जनगणना, संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व, ओबीसींना संविधानिक हक्क अधिकार व ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. अनेक वर्षे ओबीसी समाजाला उपेक्षित ठेवण्याचे काम आजपर्यंतच्या व्यवस्थेने केले आहे. या बाबत अनेक ओबीसी संघटना वेगवेगळ्या माध्यमातून चळवळ उभी करून आपले हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. मात्र आता आपले सर्वांचे उद्दिष्टे एक आहेत. तर सर्व संघटनांनी आपापसातील मतभेद दूर करून एकत्र लढ्यात सामील होऊन बहुसंख्य म्हणून आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. रत्नागिरी जिह्यातील अनेक तालुक्यांतून मोर्चा बांधणी सुरू झाली आहे. मोर्चात मोठ्या संख्येने जनआंदोलन करण्यासाठी जिल्हा समन्वय समितीने कंबर कसली असून रत्नागिरी तालुक्यात विविध ठिकाणी ओबीसी सभा घेऊन जनजागृती करण्याचे व मोर्चाचे नियोजन काम सुरू आहे. रत्नागिरीत मोर्चा असल्याने रत्नागिरी तालुक्याने त्या नियोजनाची मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यासाठी या संपूर्ण मोर्चाचे नियंत्रण करण्यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका रत्नागिरी यांची नुकतीच येथील शामरावजी पेजे सभागृह, कुणबी भवन, जे. के. फाईलजवळ रत्नागिरी येथे आज गुरूवार 18 नोव्हेंबरला सभा होणार आहे. सभेला ओबीसी संघर्ष समन्वय समिती कार्यकारिणी पदाधिकारी, ओबीसी गटनिहाय पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सभापती, सदस्य, सरपंच, उपसरपंच, रत्नागिरी परिसरातील ओबीसी नेते, गावप्रमुख उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हाभरातून सभेला येणाऱ्या बंधूभगिनीच्या गाड्या पार्किंग व्यवस्था, पाणी व्यवस्था, मोर्चाचा मार्ग निश्चित करणे, संबंधित यंत्रणेची व्यवस्था, स्पिकर व्यवस्था, स्वयंसेवक, वाहतूक व्यवस्था, शासकीय परवानगी, विचार मंच, स्लोगन, वक्ते व सर्वात महत्वाचे तालुक्यातून विभागवार ओबीसी बंधूभगिनी यांची येणारी संख्या या सर्व गोष्टींची जबाबदारी व विभागणी करून विराट मोर्चाचे सुसूत्र नियोजन केले जाणार आहे. मोर्चाच्या नियोजन सभेला सर्वांनी हजर रहावे, असे आवाहन ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका रत्नागिरी यांच्यावतीने अध्यक्ष नंदकुमार मोहिते, उपाध्यक्ष राजीव कीर, महेश (बाबू) म्हाप, दीपक राऊत, सुधीर वासावे यांनी केले आहे. |
बंगळुरु, 3 ऑगस्ट : सुरक्षेसाठी प्रत्येक वाहन चालकानं वाहतुकीच्या नियमांचे (Traffic Rules) पालन करणं बंधनकारक असतं. अनेकदा हे नियम मोडल्यानं वाहतूक पोलीस (Traffic police) संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करताना दिसतात. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशिष्ट नियम दर्शवणारी चिन्ह (Traffic Signs) रस्त्यावर लावलेली असतात. नियमांशी संबंधित चिन्हाविषयी वाहनचालकांना (Drivers) पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. पण काही वेळा या चिन्हांचा नेमका अर्थ न समजल्याने वाहनचालकाकडून नकळतपणे नियमांचं उल्लंघन होतं. याच अनुषंगानं सध्या बंगळुरू वाहतूक पोलिसांची (Bengaluru Traffic Police) एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) विशेष चर्चेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी वाहतूक नियमांशी निगडीत चिन्हांचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या या प्रयत्नाला नेटिझन्स आणि नागरिकांनी विशेष दाद दिली आहे. या संदर्भातलं वृत्त `लाइव्ह मिंट`ने दिलं आहे. वाहतुकीच्या नियमांशी निगडीत सर्व चिन्हांचा अर्थ प्रत्येकाला माहिती असतोच असं नाही. वाहनचालकांना तसंच नागरिकांना या चिन्हाविषयी माहिती व्हावी, त्यांच्या मनातल्या शंका, संभ्रम दूर व्हावा, या उद्देशानं बंगळुरु वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. एका ट्विटर युजरच्या निर्देशनास वाहतुकीच्या नियमाविषयीचं एक चिन्हं आलं. त्याने त्या चिन्हाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. या चिन्हासंबंधी शंका दूर करावी, अशी विनंती करत या युजरनं पोलीस ट्विटर हॅंडलला (Twitter Handle) टॅग केलं. या युजरच्या ट्वीटला बंगळुरू वाहतूक पोलिसांना तातडीनं प्रतिसाद दिला. या ट्वीटवर अनेक युजर्सनं कमेंट (Comment) करत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनं कमेंट केल्या आहेत. ``वाहतुकीच्या नियमांशी निगडीत सर्व चिन्हांचा अर्थ वाहनचालकांना माहिती असतो, असं नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेलं मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त आहे,`` असा सूर नेटिझन्समधून व्यक्त झाला आहे. पोलिसांच्या या पोस्टवर युजर्सनं कमेंट्स करत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ``तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद, मला या चिन्हाचा अर्थ माहिती नव्हता,`` असं एका युजरनं कमेंट करत म्हटलं आहे. `` @blrcitytrafficने ट्विटरवर रोज वाहतुकीच्या नियमांवर आणि त्याच्याशी संबंधित चिन्हांवर थोडा प्रकाश टाकणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. यामुळे आम्हाला याबाबत सखोल माहिती मिळेल,`` असं दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे. ``मला या विषयी माहिती नव्हती. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,`` असं एका युजरनं कमेंट करताना म्हटलं आहे. ``वाहतुकीशी संबंधित काही चिन्हांचा अर्थ आम्हाला माहिती नव्हता. पोलिसांनी त्याविषयी सविस्तर माहिती दिल्याने, आम्हाला चिन्हाचा अर्थ समजला,`` असं युजर म्हणतात. पोलिसांच्या या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केलं असून, वाहतुकीच्या नियमांविषयी आम्हाला पोलिसांनी सातत्यानं मार्गदर्शन करावं, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
तज्ञ पाणबुडयांनी प्रत्यक्ष ऑपरेशन सुरु करण्याआधी बऱ्याचवेळा रंगीत तालीम केली त्यानंतर रविवारपासून मिशन सुरु झाले होते. २३ जूनपासून ही मुले गुहेमध्ये अडकून पडली होती. थायलंडच्या वाईल्ड बोअर्स फुटबॉल संघातील १२ मुले आणि त्यांचा प्रशिक्षक चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहा पाहण्यासाठी गेले होते. ही मुले आतमध्ये असताना अचानक बाहेर पावसाचा जोर वाढला आणि गुहेबाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेर १८ दिवसांनी या मुलांची सुटका झाली. सगळया जगाचे लक्ष लागलेल्या थायलंडमधील शोधकार्यात किलरेस्कर समूहाच्या दोन अभियंत्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे पुढे आले आहे. थायलंडमधील या गुहेत अडकलेल्या फूटबॉल खेळाडूंची सुटका करताना वापरल्या गेलेल्या उपसा पंप तंत्रज्ञानातील निष्णात अभियंते म्हणून किर्लोस्कर कंपनीत कार्यरत असलेल्या सांगलीतील प्रसाद कुलकर्णी आणि त्यांच्या सोबत पुण्यातील अन्य एक अभियंते यांना येथे पाचारण केले होते. मदतकार्य करणाऱ्या बचाव पथकात ते सहभागी झाले होते. या मदतकार्यात गुहेत खोलवर साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पाण्यात राहून कार्यरत राहणाऱ्या शक्तिशाली उपसा पंपाची गरज होती. तसेच हे पंप विनाअडथळा सातत्याने सुरू ठेवणे हे देखील या मदतकार्यातील एक आव्हान होते. भारतातील किलरेस्कर उद्योग समूहाच्या सांगलीतील (किलरेस्करवाडी) 'किलरेस्कर ब्रदर्स' या कंपनीकडे या विषयातील तज्ज्ञता आणि अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी याबाबत मदतीचा हात देऊ केला. या मदतीला थायलंड सरकारनेही लगेच प्रतिसाद दिल्यावर किलरेस्कर कंपनीच्या वतीने शुक्रवारीच कुलकर्णी यांच्यासह दोन अभियंत्यांना थायलंडला पाठवण्यात आले. विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले सध्याचे दोन तरुण कर्णधार मानले जातात. सध्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टिव्ह स्मिथ एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगतो आहे. त्याच्या अनुपस्थितीत टिम पेनकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व आहे. मात्र विराट कोहली सर्वोत्तम की स्टिव्ह स्मिथ?? ही चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये अनेकदा ऐकायला मिळते. मात्र या दोन्ही खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कोण याचं उत्तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने दिलेलं आहे. गेल्या ३-४ वर्षांमध्ये स्मिथने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी केलेलं काम हे नक्कीच वाखणण्याजोगं आहे. मागच्या हंगामात अॅशेस मालिकेत त्याने केलेली फलंदाजी ही निव्वळ अप्रतिम होती. विराट कोहली मर्यादीत षटकांच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करतो. कसोटी क्रिकेटमध्ये सपाट खेळपट्टीवर त्याची फलंदाजी बहरते. मात्र खेळपट्टीत जराशी उसळी असली की कोहलीला फलंदाजी करताना अडचणी येतात. स्मिथने मात्र सर्व प्रकारच्या वातावरणात आपली फलंदाजी सुधारुन दाखवली आहे. पाँटींगने आपलं मत व्यक्त केलं. २०१८ वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणातील शिक्षेमुळे या दौऱ्यात स्मिथच्या सहभागाबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा कोणता खेळाडू कोहलीला आव्हान देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. |
भाजपचा "जय' होणार? विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी अजूनही काही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून, काहीजण भाजपचा "जय' म्हणणार असल्याची चर्चा आहे. परिणामी, भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताकारणात उलथापालथ होणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे मात्र भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केला. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाच आपल्या पक्षात खेचून घेतल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतही आपले "राज्य' आणले आहे. सातारा, जावळी पंचायत समितीच्या सत्तेवर राष्ट्रवादीचे चिन्ह असले, तरी सत्ता मात्र आता भाजपची राहणार आहे. विधानसभेपूर्वी अजूनही जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याने स्थानिक स्वराज्यमधील वर्चस्वासाठी राष्ट्रवादीला झुंजावे लागेल. सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. आता मात्र खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात भाजपची त्सुनामी पसरली असून, त्या लाटेबरोबर शिवेंद्रसिंहराजे भोसले आज स्वार झाले. त्यामुळे भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्यानंतर भाजपला जिल्ह्यात विधानसभा सदस्य मिळाला नव्हता. आता मात्र जिल्ह्यातून विधानसभेसाठी भाजपचे कमळ फुलण्याची आशा उंचावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिकांच्या निवडणुकांत कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर येथे अध्यक्षपद मिळवून भाजपने वर्चस्व गाजविले, तसेच काही नगरसेवकही विजयी झाले. जिल्हा परिषदेमध्ये सात सदस्य निवडून आले. शिवाय, पंचायत समित्यांमध्येही शिरकाव केला आहे. आता मात्र गत अडीच वर्षांत भाजपची ताकद विलक्षणीय वाढली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदन भोसले, अतुल भोसले या भोसलेत्रयींसह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, डॉ. दिलीप येळगावकर, विनायक पावस्कर, लक्ष्मी कऱ्हाडकर, अनिल देसाई, महेश शिंदे, दीपक पवार, मनोज घोरपडे आदींचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींपर्यंतचे वर्चस्व असून, त्याचा एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील बल वाढण्यास मदत होणार आहे. मेढा नगरपंचायत, सातारा व जावळी पंचायत समितींमध्ये शिवेंद्रसिंहराजेंची सत्ता आहे. सध्याचे नगरसेवक, समिती सदस्य हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर असले तरी शिवेंद्रसिंहराजेंच्या गटातील असल्याने तेथे आता वर्चस्व भाजपचे राहणार आहे. शिवाय, सातारा नगरपालिकेत भाजपच्या सहा नगरसेवकांनाही आता नगरविकास आघाडीच्या 12 नगरसेवकांची साथ लाभणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.