text
large_string
पूर्वीच्या भावांत किंचितही फरक होऊ न देतां, हेमांगिनी हात जोडून याला म्हणाली, " असले भलतेच शब्द मुखावाटे काढून मला पापपंकांत लोटू नये ! आपणच मला क्षमा करावयाला पाहिजे ! परंतु माझे कार्य माझ्या इच्छेमाणें तडीस गेल्याशिवाय मला घरी परत येता येणार नाहीं, ह्याबद्दल माझा इलाज आहे ! " विपिननें किंचित् कालपर्यंत पत्नीच्या त्या शांत, गंभीर, दृढनिश्चयी मुखचर्येकडे पाहिलें, व गाडीच्या आत वांकून कृष्णाचा डावा हात आपल्या हातांत घेऊन हणाला, कृष्णा, आतां तूच आपल्या ताईची समजूत घाल, व तिला परत घरी वेऊन ये ! - मी वाटल्यास येथे शपथेवर सागतों - माझ्या जिवात जीव असे तोपर्यंत तुम्हा उभयता बहिणभावामध्ये कोणीही विच्छेद घडवून आणूं शकणार ही ! चल बाबा, चल तुझ्या ताईला घेऊन परत घरी !
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) नामकरण धाराशिव (Dharashiva) करण्याच्या राज्य शासनाच्या (State Government) विनंतीला केंद्र सरकारने (Central Government) मंजूरी दिली आहे. त्याबरोबर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) हे जिल्हा मुख्यालयाच्या शहरात देशात एका बाबतीत आघाडीवर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंग्रजी वर्णाक्षरानुसार यामध्ये २४ अल्फाबेट आहेत. देशातील कोणत्याही जिल्हा मुख्यालय असलेल्या शहराच्या नावात इतके अल्फाबेट नाहीत. त्यांच्या खालोखाल साहीबजादा अजितसिंग नगर (Sahibzada Ajit Singh Nagar) यामध्ये २३ अल्फाबेट आहेत. तिरुअनंतपूरममध्ये १८ अल्फाबेट आहे. त्यामुळे नामांतरामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) हे आता देशात सर्वाधिक अल्फाबेट असलेले देशातील आघाडीचे शहर बनले आहे. उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे नामांतरण करण्यात आले आहे. ओ या इंग्रजी आद्याक्षरापासून सुरु होणारा उस्मानाबाद हे देशात एकमेव जिल्हा होता. यापूर्वी क्यु आणि झेड या आद्याक्षरापासून सुरु होणारा एकही जिल्हा देशात नव्हता, या नामांतरामुळे त्यात ओ आद्याक्षराची भर पडली आहे. देशात सर्वाधिक ९५ जिल्ह्यांची नावे ही एस या आद्याक्षरांपासून सुरु होतात.
सांगली : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यापासून १ ते १७ एप्रिलअखेर एसटीच्या ६८०० फेऱ्या रद्द झाल्यामुळे ७. ७० कोटींचे उत्पन्न बुडाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा पगार कसा भागवायचा, असा प्रश्न आहे. चालक, वाहकांची संख्या तीन हजार असून त्यापैकी १२६ जणांच्या हाताला सध्या काम मिळत आहे. जिल्ह्यात मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात तर कहरच झाला आहे. एसटीकडे प्रवाशांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारीत दिवसाला ५५ ते ६० लाखांचे उत्पन्न मिळत होते. यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ७० टक्केंनी घट झाली. १० ते १७ एप्रिल या कालावधीत उत्पन्नात ९० टक्के घट झाली आहे. जिल्ह्यातील दहा आगाराला एप्रिल महिन्यातील पंधरा दिवसांत पाच ते सहा लाखच उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली. गेल्या पंधरा दिवसांत सात कोटी ७० लाखांचा फटका बसला आहे. १० आगारातील चालक आणि वाहकांची तीन हजारांपर्यंत संख्या आहे. त्यापैकी सध्या १२६ चालक व वाहकांच्याच हाताला काम मिळत आहे. उर्वरित चालक व वाहक रोज आगारात येऊन हजेरी लावून परत जात आहेत. हाताला काम नसल्यामुळे चालक व वाहकही चिंतेत आहेत.
नांवाचें एक सुंदर काव्य भागवत प्रथम स्कंधाच्या आठव्या अध्यायाच्या आधारानें रचिलें असें त्यांतील उपसंहारात्मक श्लोकापासून दिसून येतें. यावरून हेंही काव्य ४५ वर्षीच्या आंतच झाले हे सिद्ध होतें. तसेंच हरिवंश, मंत्रभागवत (१७८०-१७८८), अष्टोत्तरशत रामायणें व केकावलि ह्रीं कार्ये त्यांनी उत्तरवयांत रचिलीं असावींत अर्से अंतःप्रमाणांवरून दिसतें. पंतांनी मैराळ भाऊस लिहिलेल्या एका पत्रावरून १०८ रामायणांची सोमवती वाहण्याची त्यांची इच्छा स्पष्ट होते. यावरून त्यांनी एकंदर १०८ रामायणें रचिली असावीत हे खचित होतें. पंतांच्या हातचीं अस्सल रामायणें प्रती करून घेण्याकरितां मैराळबावा अनवें गांवास जात असतांना त्यांस वाटेंत अंजिठ्याच्या घाटांत चोरांनी गाठले व त्यांच्याजवळील द्रव्य व रामायणांचीं दप्तरें हिसकावून घेऊन दतरें घाटाखाली फेकून दिलीं बावांनी पुढे त्या दप्तरांचा पुष्कळ शोध केला पण त्यांस तीं सांपडलीं नाहींत अशा रीतीने पंतांच्या अनुपलब्ध रामायणांची कायमची वाट लागल्याची गोष्ट सांगतात. मंत्रभागवतानंतर त्यांनीं हरिवंश रचिला. आर्या केकावलीच्या काव्यसंग्रहांत सगळ्या ६१ गीती छापल्या असून पंतांच्या पोथींत त्या १७४ लिहिल्या आहेत. हें सुरस काव्य वाचून पंतांचे व्याही बाबा पाध्ये यांनी पुढील मयूरकविवर्णनपर गीति रचिली ह्मणून सांगतातः"ऐकुनि विश्व सुखावे ज्या केकीचा अपूर्व तो टाहो । त्याला आयुष्याचा ईशकृपेनें कधीं न तोटा हो. ॥ पंत काव्यरचना फार जलद करित. ते एक्या बैठकीस १००-१५० आर्या रचित. दररोज रात्री धुळीची पाटी, संस्कृत पोथी, व सदीप समई एवढी तयारी चाकराने करून ठेवावी; नित्यकृत्य आटपल्यावर पंतांनी सर्व पाटीभर ग्रंथ लिहून मग झोप घ्यावी. मग दुसरे दिवशीं प्रातःकाळी पाटीवरील ग्रंथाची प्रत लक्ष्मणभट वांईकर याने करून ठेवावी असा त्यांचा नित्यक्रम होता. पंतांचीं काव्ये तयार होतांच ठिकठिकाणचे त्यांचे स्नेही त्यांच्या प्रती करून घेत. पंतांच्या काव्यांतून जागोजागी ठरीव यमके आढळतात. त्यांविषयीं असें सांगतात की बारामतीस पंत आपल्या खोलींत फावल्या वेळी सुचतील तीं यमकें भिंतीवर लिहून ठेवीत. अशा रीतीने सर्व भिंतींवर यमके लिहिलेली असत. त्यांपैकी काव्यरचना करितेवेळीं त्यांना जी योग्य वाटत तीं यमके त्यांतून निवडून त्यांचा ते उपयोग करित. पंतांच्या बुद्धीस वर्षाकालीं किंचित् मांद्य येत असल्यामुळे त्या वेळेस त्यांच्या हातून काव्यरचना कमी होई. पंतांनी भारतापैकी कर्णपर्व प्रथम रचून ते लोकांस आवडल्यामुळे नंतर समग्र भारतावर काव्यरचना केली. भारताच्या प्रत्येक पर्वाच्या पहिल्या गीतेचें प्रथमाक्षर घेतले असतां 'श्रीपांडवसहायो भगवानरविंदाक्षो जयति' असे संस्कृत वाक्य होते. सर्व पर्वोची माळ गुंफण्याच्या उद्देशानें प्रत्येक पर्वाच्या प्रथम गीतीची रचना क. रित करित पंत कर्णपर्वावर आले तेव्हां त्यांतील प्रथमगीतीत रचावयाचें आद्यक्षर 'भ' प्रथमच बिनचूक रचिलें गेलेले पाहून त्यांना ईश्वरी प्रसादाचें कौतुक वाटले. पंतांची ग्रंथसंपत्ति फार मोठी आहे. त्याबद्दल विशेष माहिती 'परिशिष्ट-इ' त पहावी. गीति किंवा आर्या (हीं जरी वास्तविक भिन्न वृत्ते आहेत तरी पंत गीतीलाच आर्या ह्मणत) हे पंतांचे आवडतें वृत्त होय. त्यांची बहुतेक कविता याच वृत्तांत रचिलेली आढळते. आर्या छंदाची योजना पंतांपूर्वी फारशी कोणी काव्यांत केलेली नसून पंतांनींच तिचा प्रथम प्रचार पाडिला (परिशिष्टई पहा). भस्मासुर आख्यान, भृगुचरित्र हीं आख्यानें, कांहीं रामायणें, व कृष्णविजय उत्तरार्धाचे बरेच अध्याय इतके लोकबद्ध आहेत; 'दुर्वासभिक्षा' हे प्रकरण त्यांनीं ओवीवृत्तांत रचिलें आहे. कृष्णविजय पूर्वार्ध हा सबंध आर्यागीतींत रचिला आहे. पंतांनी ध्रुवचरित्र, अंबरीषाख्यान वगैरे प्रकरणे साकी वृत्तांत रचिलीं असून 'दोहा' वृत्तांत थोडीं रामायणें व कांहीं स्फुट कविता हीं रचिलेली आढळतात. लहान मुलींकरितां रचिलेलीं रुक्मिणीस्वयंवर, सीतास्वयंवर, सावित्रीआख्यान, व श्रीरामायण एवढीं प्रकरणें त्यांनी अभंगवृत्तांत रचिलीं आहेत. क्वचित् पदें, आरत्या हींही केलीं आहेत. त्यांनी आपलीं काव्यें बहुतेक प्राकृत भाषेतच रचिलीं तरी एक सबंध रामायण, मुक्तामाला, कृष्णस्तवराज, पांडुरंगस्तोत्रें शिवार्याशतक, शंकरस्तव, रामस्तुति, हरिसंबोधनस्तोत्र इत्यादि स्फुट प्रकरण त्यांनीं संकृत भाषेंत रचिलीं आहेत. पंत काव्यरचना करित असतांना श्रीधरी, नीलकंठी इत्यादि टीकांकडे चांगले लक्ष्य देत असावे असे दिसतें. 'प्रन्हादप्रकरण' हे लहानसें (गीति २० ) काव्य त्यांनीं भागवत सप्तम स्कं०१८ 'सत्यं विधातु निजभृत्यभाषितं इ. ह्या श्लोकावरील श्रीधरीटीकेच्या आधारानेंच रचिलें आहे. उद्योगपर्वातील श्रीकृष्णोक्ति (अ. ३, गी. ५३ ६२), तसेंच हरिवंश अ. ४५ (पुष्करप्रादुर्भाव), अ. ५४ (त्रिपुरवध ) ह्या प्रकरणांस नीलकंठी टीकेचाच मुख्यत्वें आधार आहे. काव्यरचना करितांना मनासारखे वर्णन येईपर्यंत पंत कधीं कधीं दोन दोन तीनतीन प्रयत्न करित असावेत असे मानण्यास पंतांच्या काव्यांत जागा आहे (द्रोण. ४.१३-१४). पंतांनी आपल्या ग्रंथांत बहुशः वर्णनसंक्षेपच केलेला आढळतो. मूळ लक्ष ग्रंथ भारताचा सारांश त्यांनी १७१७० गीतींत आणला आहे. तथापि प्रसंगविशेषीं पंत वर्णनविस्तारही करित ('परिशिष्ट - ॠ' पहा). मंत्र साधण्याकरितांहि कांहीं ठिकाणी ते वर्णनसंक्षेप करित [परिशिष्ट-ऋ - (इ)]. पंतांनी आपली काव्ये कांहीं स्वतःच्या प्रेरणेवरून व बरीच दुसऱ्यांनी सुचविल्यावरून रचिलीं आहेत. बृहद्दशम हा त्यांनी बाबा पाध्ये यांच्या सांगण्यावरून लिहिला. तो कठिण झाला असे बाबांनी झटल्यावरून नंतर 'मंत्रभागवत' रचिला. 'हरिवंश' पांडुरंगराय नाईक यांचे सांगण्यावरून लिहिला. 'ब्रह्मोत्तरखंड,' 'कृष्णामाहात्म्य', व 'मदालसाख्यान' हीं काव्यें स्वगुरुपुत्र सदाशिव पंडितांच्या सांगण्यावरून त्यांनीं रचिलीं. गीतेवर सयमक व निर्यमक अशी दोन प्रकारची गीतिरचना पंतांनी केली आहे. निर्यमक गीतेचे पहिले सहा अध्याय मात्र पंतांचे असून बाकीचे त्यांचा पुतण्या आप्पा पराडकर ह्मणून ब्रह्मावर्तीत राहत असे त्याने केले ह्मणून सांगतात. पंतांनी वैद्यकाचा अभ्यास सुश्रुतादि ग्रंथांवरून चांगला केला असून ते कर्धी कर्धी औषधयोजनाही करित असत. तसेंच त्यांच्या वैद्यकीवर आर्या असल्याचे सांगतात. बाबा पाध्ये यांनीं भर्तृहरीच्या तीन शतकांवर आर्या रचिण्यास, तसेच दोन सहस्रांत एक अशीं संस्कृत पंचकाव्यें रघुवंशादि पंचकाव्यांच्या धोरणावर सर्गादि रचना धरून करण्यास पंतांस सुचविलें होतें. बाबा पाध्ये यासारख्या विद्वच्छ्रेष्ठाच्या मनांत जेव्हां मोरो( २० ) पंतांच्या संस्कृतभाषाज्ञानाविषयीं व काव्यसामर्थ्याविषयीं एवढा भरंवसा होता तेव्हां ते सरस्वतीदत्तवरप्रसाद कविश्रेष्ठ होते असें ह्मणण्यास काय हरकत आहे? काव्यगुणदोषविवेचन. मोरोपंतांची काव्यरचना बहुतेक स्वतंत्र अशीच आहे. भारत, रामायण, भागवतादि ग्रंथांत फत्त कथानकापुरताच काय तो मूल संस्कृत ग्रंथांतून आधार घेतला आहे. कवितेंतील अलंकार, उज्ज्वल कल्पना, अनुप्रास व यमकें हृीं खुद्द कवीचींच होत. मोरोपंतांचें काव्य 'सर्व संग्रह' व 'काव्यसंग्रह' या मासिक पुस्तकद्वारा जेव्हां प्रथम बाहेर पडले तेव्हां तो वास्तविक कवि नसून केवळ यमक्या भाषांतरकार होय, त्यांचें काव्य कृत्रिम ह्मणूनच नीरस व क्लिष्ट आहे वगैरे दूषणें बड्या मंडळीकडून त्यांस देण्यांत आली. त्यांचा विचार पृ० १५७-१६० त टीपेंत संक्षेपतः केला आहे. या आक्षेपांचें सविस्तर खंडण पाहावयाचें असल्यास तें 'निबंधमा'त व कै. मल्हार बाळकृष्ण हंस यांच्या 'मोरोपंतावरील निबंधांत' सांपडेल. पंतांच्या कवितेचा मोठा गुण तिची प्रौढता हा होय. लांब समास ( परिशिष्ट - ए पहा ), संस्कृत शब्दांचा किंवा वाक्यांचा भरणा, तसेंच शुद्ध संस्कृत पद्धतीस अनुसरून केलेली वाक्यरचना व प्रयोग (परिशिष्ट - ऐ ) इत्यादि गोष्टींमुळे पंतांच्या काव्यांत ओज किंवा प्रौढता फार आली आहे. नुसती भाषाच प्रौढ असते असें नाहीं तर आंतील अर्थही गंभीर व प्रौढ असतो. त्यांच्या काव्यांत अर्थालंकार व शब्दालंकार यांची गर्दी झालेली आढळते. प्रासयमकादि शब्दचमत्कृतीचा कित्ता पंतांनीं वामन पंडितापासून घेतलेला असून त्यांत त्यांनी आपली पराकाष्ठा केली आहे (परिशिष्टे - ॠ, हृ, टीप पृ० ६२ पहा.). लांब यमकें, चमत्कारिक अनुप्रास व साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितलेले बहुतेक सर्व अलंकार पंतांच्या काव्यांत, विशेषतः त्यांच्या भारतांत आढळतात ( पुरवणी३ पहा). मधून मधून शब्दावर कोट्या व श्लेष हीं आढळतात; पण त्यांची संख्या त्यांच्या काव्याचे प्रमाणानें फारच कमी ('परिशिष्टें - औ अं' पहा). मोरोपंतांची श्लेषावर अभिरुचि असती तर एखादें 'नलोदया' प्रमाणे श्लेषप्रचुर काव्य रचणें त्यांना कठिण नव्हते. त्यांचीं चित्रविचित्र रामायणादि काव्यें पाहिलीं ह्मणजे महाराष्ट्रभाषा त्यांच्या अगदीं अंकित होती असे वाटतें. अशा कवीला एखादें लिष्ट काव्य रचणें ह्मणजे हाताच्या मळाप्रमाणे सोपें झालें असतें. त्यांच्या काव्यांतील पुष्कळ यमकें ठरींव, ह्मणजे पुन्हा पुन्हा तीच तीच आलेली असतात, तरी तीं दूरान्वित नसून सहज ओघानेंच आली आहेत असे वाचकांस वाटतें (परिशिष्ट हु. ) शब्द व अर्थ यांच्या अलंकारांची गर्दी झाली आहे तरी त्यामुळे अर्थहानि झालेली फारशी आढळत नाहीं. कोठेंही मूळवर्णनास सोडून अलंकाराच्या ओघांत पंत वाहावले नसून त्यांची शब्दरचना व वर्णनाची हातोटी अशी खुबीदार असते की त्यामुळे सहृदय वाचकांची त्यांच्या काव्यांवर मुरकुंडीच पडावी. नवरस जसे कांहीं त्यांच्यापुढे हात जोडून उभे होते असे वाटतें. नवरसांखेरीज 'वात्सल्य' व 'भक्ति' हे रस पंतांच्या काव्यांत प्रमुखत्वाने आढळतात. कोणत्याही रसाचें वर्णन चाललं असतां कवीचें त्याच्यांत अगदर्दी तादात्म्य दिसून येतें. उत्कृष्ट रसपरिपाकाची उदाहरणें पंतांच्या काव्यांत विपुल आहेत. येथें त्यांचा उ गीच थोडासा उल्लेख मात्र करितों. ज्यास संस्कृत 'प्रथमो रसः,' 'आयरसः' असें ह्मणतात त्या शृंगाररस जनांचीं हृद्गते नाहीं. शंगार तावधूचा शृंग मर्यादशील नाजूक व प्रौ मर्यादशील व (अ० २६), विजयांतील मंत्रभागवतांत शर्मिष्ठययातिव (वन. ३.४७उदाहरणे ह किंवा वनपर्व कृष्णदारविरह ढळते, पण क त्या रसिकतत. दधींत फाजि पंतांना उत्कृ 'सूं सणणणस् भूमीच दाख तितकीं आ उद्योगपती पर्यंत सर्व प केला आहे. ३१.१४५, ३ रामलक्ष्मणांस केला तेव्हांचा पांडवांनी केले कुरुक्षेत्रावर --उदाहरणे कर्ण यांत सांपडती व अद्भुत है आढळते. या प्रद्युम्नास पाहू ३ त्या शृंगाररसाचें वर्णन पंतांच्या काव्यांत वाचलें असतां असे दिसून येईल कीं प्रणयी जनांचीं हृद्गतें जरी कवीला पूर्णपणे अवगत होतीं तरी त्यांनीं कोठेंही फाजिलपणा केलेला नाहीं. शंगारवर्णन तर अप्रतिम आहे पण अश्लीलत्व त्यांत मुळींच नाहीं. पंतांच्या कवितावधूचा शृंगार इतर कवींच्या शृंगाराप्रमाणें अश्लील नसून तो पतिव्रतेच्या शृंगाराप्रमाणे मर्यादशील आहे. पंतांचें शृंगाररसवर्णन भवभूतीच्या शृंगाररसवर्णनाप्रमाणे खुबीदार, नाजूक व प्रौढ असतें. शृंगारवर्णनाचा कळस करण्यासारख्या प्रसंगींही त्यांनी आपला मर्यादशील व प्रौढ शृंगारवर्णनाचा क्रम सोडिला नाहीं. हरिवंशांतील भामाकोपशांतवन ( अ० २६), प्रद्युम्नप्रभावती विवाह ( अ० ३५), उषानिरुद्धविवाह (अ० ४१), कृष्णविजयांतील कृष्णाची रासक्रीडा (अ० २९-३३), रतिप्रद्युम्नाची ओळख पटणें (अ० ५५), मंत्रभागवतांतील रासक्रीडा (१०-३७६-४०७), भारतांतील दुष्यंतशकुंतलाख्यान (आदि. १२), शर्मिष्ठययातिकथा ( आदि. ११), पांडुमाद्रीसमागम (आदि. १९), उर्वशीकृत अर्जुनविलोभन (वन. ३.४७-७२), कीचककृत द्रौपदीप्रमाथ ( विराट. १ ), हे प्रसंग पंतांच्या शृंगारवर्णनाच उदाहरणे होत. विप्रलंभ शृंगाराची उदाहरणें पाहिजे असल्यास मंत्ररामायणांतील किंवा वनपर्वातील रामाचा सीतेविषयीं विरह व मंत्रभागवतांतील किंवा बृहद्दशमांतील कृष्णदारविरहवर्णन हे प्रसंग पहावे. आतां क्वचित् प्रसंगी शृंगारांतर्गत बीभत्सवर्णन आ ढळतें, पण काळाकडे लक्ष्य दिले असतां ती गोष्ट क्षम्य असून त्याची अल्पता मोरोपंताच्या त्या रसिकतत्वाचें व सभ्यपणाचें मोठेच चिन्ह होय ( पृ०६६-६८). पंतांच्या एकंदर काव्यमहोदधींत फाजिल शृंगाराचीं वर्णने किंवा तत्सूचक पदें फारच अल्प आहेत. वीररसवर्णन तर पंतांना उत्कृष्टच साधलें आहे. वीररसाचें वर्णन करितांना पंतांना स्फुरण चढून 'सूं सणणणसणणणणण' अशी शब्दबाणांची दृष्टि करून ते वाचकांस प्रत्यक्ष समरभूमीच दाखवितात. वीररसाचीं उदाहरणे भारतांत व रामायणांत वाचकांस हवीं तितकीं आढळतील. वनपर्वोतील किरातार्जुनयुद्ध, विराटपर्वातील अर्जुनप्रगटन, उद्योगपर्वातील विदुलासंजय कथानक व भार्गवभीष्मयुद्ध, तसेंच भीष्मपर्वापासून गदापर्वापर्यंत सर्व पर्वे, व रामायणांतील रामरावणयुद्ध त्यांत पंतांनी वीररसाचा महानदच निर्माण केला आहे. वीररसांत शृंगाररसाचें मिश्र वर्णन पहावयाचे असल्यास कर्ण. ३५.४८-५६, ३१.१४५, ३३.३३ पहा. करुणरसाची उदाहरणें पहावयाचीं असल्यास मंत्ररामायणांतील रामलक्ष्मणांस निचेष्ट पाहून सीतेनें केलेला शोक, कुशलवाख्यानांतील रामानें सीतेचा त्याग केला तेव्हांचा सीतेचा शोक, हरिश्चंद्राख्यानांतील शोक, तसेंच द्रोणपर्वात अभिमन्युवधानंतर पांडवांनी केलेला शोक, वनपर्वोतर्गत नलदमयंतीकथा व यक्षाख्यानांतील शोक, तसाच कुरुक्षेत्रावर कौरवस्त्रियांनीं युद्धानंतर केलेला स्त्रीपर्वातील शोक, हीं प्रकरणें पहावीं. रौद्राच - उदाहरणें कर्णपर्वातील दुःशासनवध, हरिवंश अ. ४८ तील देवदैत्यसमर व सौप्तिकपर्व यांत सांपडतील. भयानकरस गदापर्वात व सौप्तिकपर्वीत भरलेला आहे. बाकीचे बीभत्स व अद्भुत हे रस वीर, भयानक, रौद्र, शृंगार यांचे अनुषंगी असून हास्यरसाची छटा तुरळक आढळते. याशिवाय वत्सलरसपरिपाक पाहावयाचा असल्यास कृष्णविजयांतील वैदर्भीची प्रद्युम्नास पाहून झालेली अवस्था व तिचें भाषण (अ. ५५, २९ - ३६), व्रजस्त्रियांची कृ ष्णाशीं पुष्कळ वर्षांनंतर झालेली भेट (अ. ८२), नंदवसुदेवाची भेट (अ. ८४), हे भाग पहावेत. सर्वात भक्तिरसाची भट्टी पंतांना फार चांगली साधली आहे. याची उदाहरणें पंतांच्या काव्यांत सर्वत्र आहेत. केकावली, भीष्मभक्तिभाग्य, कृष्णविजयांतील सुदामचरित्र (अ. ८०,८१), श्रुतदेवबहुलाश्वकथा (अ. ८७), उद्योगपर्वातील कृष्णाचें विदुरगृहीं भोजन, द्रोणपर्वातील कृष्णानें अर्जुनाच्या अश्वांची केलेली चाकरी इत्यादि अनेक प्रकरणें या गोष्टीची उत्तम साक्ष देतील. परमार्थसाधन हें पंतांच्या काव्यरचनेच्या मुळाशी असल्यामुळे त्याच्या काव्यांत भक्तिरसाचा पाक अमृततुल्य मधुर झाला आहे यांत नवल नाहीं. यासंबंधानें लिहितांना पंतांच्या काव्याची योग्यता कालिदास, भारवी, दंडी इत्यादि संस्कृत कविवर्याच्याही चरची आहे असे एका नामांकित विद्वद्वर्याचें ह्मणणे आहे. त्यांच्या मतें पंतांची कविता कालिदासाच्या कवितेप्रमाणें प्रसन्न असून भारवीच्या कवितेप्रमाणें ती भारदस्त आहे. तसेंच 'मोरोपंती भारतांतील कांहीं आख्यानें नीट समजलीं ह्मणजे सगळा कालिदास व सगळा भारवी वाचल्याचें श्रेय मिळून आणखीही अधिक लाभ होतो. तो लाभ भक्तिरसाचा व देवाविषयीं आस्तिक्यबुद्धीचा होय. भक्तिरसाचा लाभ कालिदासाच्या काव्यांत फारसा होण्याचा संभव नाहीं. भारवीनें आपल्या काव्यांत भक्तिरसाचा छटा निःसंशय उडविलेला आहे. पण कोठें मोरोपंती भक्तिसागराचा अलोट पूर व कोठें भारवीची भक्तिरसानें मंद मंद वहात जाणारी छोटी सरस्वती' सारांश ज्या ज्या स्थळीं पंतांनीं ईश्वराविषयीं किंवा ईश्वरभक्ताविषयीं उद्गार काढिले आहेत त्या त्या स्थळीं त्यांची वृत्ति लीन व तदाकार झालेली दृष्टीस पडून त्यांचें काव्य सुरस, आनंदजनक व माधुर्यप्रसादादि गुणगणमंडित झाले आहे. पंतांच्या काव्यरूपी महावस्त्रांत नीतितत्वांचा बोध करणारी सुभाषितरत्नें जागोजागीं गुंफिलीं असल्यामुळे काव्याची प्रभा द्विगुणित वाहून वाचकांची मने बोधप्रकाशमय होतात. पंतांच्या काव्यांतील सुभाषितसंग्रह एवढा मोठा आहे कीं, तो सर्व एकवटला असतां मनास बोधपर व उन्नतिपर असें शिक्षण दुसऱ्या कोणत्याही पुस्तकाचें फारसें साह्य न घेतां सहज देतां येईल. त्यांच्या सुभाषितांचीं कांहीं निवडक उदाहरणें परिशिष्ट- 'ख' मध्यें दिलीं आहेत. मोरोपंत कवि रसिक होते ही गोष्ट त्यांचे काव्य वरवर वाचून पाहाणारांच्या सुद्धां दृष्टीस येईल. त्यांनी आपल्या काव्यांत रसिकत्वाविषयीं पुष्कळ ठिकाणीं उल्लेख केले आहेत (परिशिष्ट 'उ' पहा). त्यांच्या काव्यांतून प्रसंगोचित, खुबीदार व बाणेदार भाषणें, व हृदयंगम वर्णनें यांचा सुकाळ दिसून येतो. विस्तारभयास्तव त्यांचीं उगीच थोडींशीं उदाहरणें पुढे दिली आहेत. 'वर माग' ह्मणणाऱ्या अश्विनीकुमारांस माद्रीचें पुढील भाषण किती खुबीदार, समयोचित व हृदयंगम आहे तें पहाः -- माद्री हांसोनि ह्मणे 'जाणुनि हृद्रोग, त्यासि अगदानें । दूर करा जी ! रोगी न निवे कनकाचियाहि अगदानें.' ।। (आदि. १८.९७) अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य होते तेव्हां वरील दृष्टांत फारच समर्पक आहे. पुढील उत्ती केती जोरदार व बाणेदार आहेत त्या पहा. भीष्माचें परशुरामाशीं भाषणः
पन्हाळा : पन्हाळगड खचतोय, लोकांना ये-जा करण्यास अडचण होते, मग इथली सर्व शासकीय कार्यालये वाघबीळवर नेऊ या, असा घाट काही लोकांनी घातला आहे. हे लोक पन्हाळगडाचे मूळचे रहिवासी नाहीत, गडावर येऊन त्यांनी कमवून स्वतः च्या मिळकती केल्या आहेत आणि हेच लोक स्वार्थासाठी कार्यालये हलविण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे, इथे छत्रपती ताराराणींची राजधानी होती. करवीर संस्थानचा कारभार इथून चालत होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे वास्तव्य होते. शाहू महाराजांची ये-जा होती. त्यांनीच राजवाड्यासमोर शिवमंदिर उभारले. थंड हवेचे ठिकाण म्हणून कै. यशवंतराव चव्हाण यांनी गडावर क वर्ग नगरपरिषद दिली. पूर्वी गडाला महालाचा दर्जा होता. आता तालुक्याचा दर्जा मिळाल्याने सर्व शासकीय कार्यालये चालू झाली आहेत. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्वतः ची इमारत आहे. अलीकडे जुन्या इमारतीशेजारी नवीन इमारत बांधली आहे आणि एका इमारतीसाठी ८० लाख रुपये मंजूर झाल्याचे समजते. प्रांत कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन स्वमालकीच्या इमारतीत आहेत. पोष्ट कार्यालयाने जागा घेतली असून, बांधकाम करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कसे असताना काही मूठभर लोकांनी इथून कार्यालये हलवण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे. याबाबत पन्हाळवासीयांत असंतोष पसरला असून, या लोकांचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी ते एकत्र आले आहेत. चार दरवाजातील रस्त्याचे दुरुस्तीचे कार्य युद्ध पातळीवर चालू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पडलेला भराव जेसीबीद्वारे दूर करण्याचे काम चालू केले आहे. खडकांची खोलीही ड्रिलिंग मशिनद्वारे तपासली जात आहे. पावसाने साथ दिल्यास आठवडाभरात दुचाकी आणि हलक्या चारचाकी वाहनांसाठी रस्ता सुरू होण्याची शक्यता आहे. "काहीही झाले तरी पन्हाळ्यावरील कार्यालये हलविण्यात येणार नाहीत. यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांना साकडे घालू, प्रसंगी लोक आंदोलन उभारू. खचलेल्या रस्त्याचे काम वेगाने चालू आहे. आठवडाभरात नागरिकांसह, पक्षकारांची रस्त्याची सोय होईल. " "तालुक्यातील लोकांची सोय व्हावी आणि पन्हाळ्याला यायला रस्ता नाही म्हणून तात्पुरती काही कार्यालयाचे कामकाज वाघबीळ अगर अन्य ठिकाणी चालू करावे, रस्ता चालू झाला की कार्यालये पन्हाळ्यावर कायमस्वरूपी चालू करावी एवढेच माझे म्हणणे आहे. पन्हाळ्याशिवाय कार्यालयांना शोभा नाही. " - शिवाजी मोरे, जिल्हा परिषद सदस्य.
जळगाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत आहेत. नगरसेवकाने यात रस घेतल्याने मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यामुळे रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरीत झालेल्या हॉकर्सच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत सोमवारी पुन्हा रस्त्यावर गाड्या लावल्या. ज� ��गाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत आहेत. नगरसेवकाने यात रस घेतल्याने मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यामुळे रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरीत झालेल्या हॉकर्सच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत सोमवारी पुन्हा रस्त्यावर गाड्या लावल्या. वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने मनपाच्या सतरा मजली इमारतीसमोरील तसेच गोलाणी मार्केटच्या आवारातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मनपा लगतच्या बोळीत जागा देण्यात आली. हॉकर्सने आधी विरोध दर्शविला. मात्र नंतर नाईलाजाने स्थलांतराची तयारी दर्शविली. या गल्लीचे खाऊगल्ली असे नामकरण करीत तेथे व्यवसायही सुरू केला. मात्र नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनिवारी झालेल्या महासभेत मनपाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने जनरेटर ठेवलेल्या बोळीत चार हातगाड्यांना जागा देण्याचा विषय मांडला. त्यावर सभागृहात चर्चा झाली. मात्र ठराव मंजूर झालेला नाही. मात्र एरव्ही ठराव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी न करणार्या मनपा प्रशासनाने महासभा झाली त्याच दिवसापासून या जागेवर चार हातगाड्या लावण्यास सुरूवात होऊनही कारवाई केली नाही अथवा त्यांना प्रतिबंधही केला नाही. त्यामुळे मनपाचे अधिकारी व अतिक्रमण विभागही मॅनेज झाल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू झाली आहे. तर नगरसेवक इतर हॉकर्सला हटवितात व स्वतःच्या मर्जीतील लोकांना सोयीची जागा करून देत असल्याचा आरोप हॉकर्स संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे. ----- इन्फो---हॉकर्स पुन्हा रस्त्यावरमर्जीतील हॉकर्सला रस्त्याच्या लगत जागा दिल्याने रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरीत झालेल्या काही हॉकर्सनी सोमवारी सायंकाळी पुन्हा रस्त्यावर गाड्या लावल्या.
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (varsova-andheri-ghatkopar) या मार्गावरून ७ वर्षांपूर्वी मेट्रो वन धावू लावली. आतापर्यंत या मेट्रोमधून सुमारे ७० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारी मेट्रो (Mumbai Metro) जून २०१४ ला सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी मेट्रोला सकारात्मक प्रतिसाद दिला. आजपर्यंत म्हणजे ७ वर्षे दोन महिन्यांत मेट्रोने तब्बल ७० कोटी प्रवाशांना (Seventy crore commuters) सेवा दिली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो वनने दिली. मुंबई मेट्रो वन सध्या आठवड्याच्या दिवसात सुमारे २८० फेऱ्या चालवत आहे. ज्यात पीक अवर्समध्ये ४. ५ मिनिटे आणि ऑफ-पीक अवर्समध्ये ८ ते ११ मिनिटांनी एक फेरी होते. मुंबईच्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ८ जून २०१४ ते १० जुलै २०१५ रोजी म्हणजेच ३९८ दिवसांनंतर १० लाख प्रवाशांचा पहिला टप्पा गाठला; तर २०१९ मध्ये मेट्रो वनमधून २६४ दिवसांत १० लाख प्रवाशांनी प्रवास करून नवा विक्रम केला आहे. कोविडच्या काळात २११ दिवस मेट्रो बंद असतानाही २० ऑक्टोबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १० लाख प्रवासी जोडले गेले. - १६ मे २०१७ : अंधेरी मेट्रो स्टेशनच्या प्रवासी संख्येत २० % वाढ झाली.
किंवा मोठाले खडे होतात. उकळलेले दूध प्याल्याने जुलाब होतात. गुदात आवळल्यासारखे वाटते; गोळा बसला आहे असे वाटते. तान्ह्या मुलाची हगवण विशेषतः उकळलेल्या दुधामुळे होत असलेली, मूल जलद वाळते. गुदद्वार बाहेर येते. गुदद्वारातून एकसारखे पातळ द्रव्य झिरपते. मूळव्याध बाहेर येते, त्यात टोचते. चालताना किंवा शौचास होताना मोड बाहेर येतात. गरोदरपणाची मूळव्याध. मूत्रेंद्रिये :- लघवी; दुर्गधी, दाट, खाली चिकट लाल वाळूचा थर जमतो किंवा पांढरा खरखरीत गाळ साचतो. लघवी हळुहळू होते; होण्याच्या अगोदर मूत्राशयात कापल्याप्रमाणे वेदना होतात. पहिल्या झोपेत लघवीला नकळत होते. खोकताना, शिंकताना, हसताना, एकदम जोराने दार आपटले तर, भीतीने किंवा मन दुसरीकडे गुंतविल्याने लघवीला नकळत होते त्यामुळे विशेषतः स्त्रियांना लघवी होण्याच्या क्रियेवर सारखे लक्ष ठेवावे लागते. लघवीला झाली नाही तर सर्वांगाला शहारे येतात. लघवी रक्तमिश्रित किंवा दुधासारखी. पुरुषजननेंद्रिये :- गार, दुर्गंधी घाम येतो. जुनाट परमा-खाव रात्रीच फक्त वाहतो. बोंडीवर मासांकुराची वाट. शारीरिक अशक्तपणा असला तरी संभोगाची जास्तच इच्छा होते. संभोगानंतरचे उपद्रव. नपुंसकत्व. स्त्रीजननेंद्रिये :- संभोगानंतर गळून गेल्यासारखे वाटते. संभोगाच्या कल्पनेने मळमळावयास लागते, चिडखोरपणा येतो. पाळ्या अनियमित- पाळी लवकर आली तर विटाळ जास्त जातो, उशिरा आली तर विटाळ थोडा जातो. न्हाण येण्याच्या वयात विटाळ सुरू होत नाही किंवा मूल अंगावरचे तुटल्यानंतर विटाळ सुरू होत नाही. नष्टार्तव. गर्भाशयात आग होते, टोचते, आवळल्यासारखे वाटते ( मुखात ). बाळंतपणानंतर गर्भाशय पूर्वस्थितीवर येत नाही. गर्भाशयात अशक्तपणा वाटतो. किंवा त्याला जोराने खाली ओढ लागते.- सर्व अवयव योनीतून बाहेर येत आहेत की काय असे वाटते त्यामुळे पायांची घड्ड आढी घालणे किंवा तो भाग हाताने धरून ठेवणे भाग पडते. गर्भाशयाची सूज- दाब सहन होत नाही, कमरेत दुखते व वारंवार लघवीला लागते. धुपणी, दुर्गंधी मोठमोठ्या गाठी पडतात, पिवळी, हिरवट, कंड येते. लहान मुलींची धुपणी गरोदरपणी- तांबुस हिरवट स्राव जातो, उदर हुळहुळे होते, गर्भाची हालचाल सहन होत नाही. बाळंतपणानंतर दुर्गेधी करवडणारा विटाळ जातो- त्यामुळे बराच वेळ चावल्यासारखे वाटते. योनी कोरडी, संभोग करताना दुखते पाचव्या, आठव्या महिन्यात गर्भपात होण्याची सवय. विटाळ थांबण्याच्या वयात सुरू झालेला रक्तप्रदर. विटाळ थांबण्याच्या वयात एकाएकी अंगात कढत लाटा येतात, अशक्तपणा वाटतो व घाम येतो. योनिद्वार सुजते, पू येतो; आवती भोवती पुरुळ येते. स्तनाग्राना भेगा पडून त्यातून रक्त येते, योनी व योनिद्वार पाळीनंतर कोरडे पडते त्यामुळे चालताना बरे वाटत नाही. संभोगाचा तिटकारा. श्वसनेंद्रिये :- थकवा आणणारा कोरडा खोकला. खोकला पोटातून येत आहे असे वाटते. सकाळी खोकला येऊन खूप खारट कफ पडतो. खोकला डाव्याकुशीवर निजल्याने किंवा एकदम हवेत फरक पडल्याने जास्त होतो. कफ दुर्गंधी. खोकताना कुजलेल्या अंड्याप्रमाणे घाण येते. रेंगाळणारा डांग्या खोकला. झोपेतून जागे झाल्यानंतर दम लागतो, जड़द चालण्याने कमी होतो. हृदय :- रुधिराभिसरण अनियमित; रक्त तुंबले आहे असे वाटते. हृदयाची घडपड डोळ्यानी दिसते व ती डोक्याच्या मागील भागापर्यंत होते. सर्वोगात ठुसठुसते. रात्री रक्तवाहिन्यात खळबळ झाल्यासारखी वाटते, रक्तवाहिन्या तुडुंब भरून चालल्या आहेत असे वाटते. एखादा ठोका केव्हातरी टणक लागतो. डाव्या कुशीवर निजल्याने घडघडावयास लागते. मान व पाठ :- कालर घट्ट झाल्यासारखी वाटते. तिकोनी हाडांच्या मध्ये कमरेत उणका लागतो. कंबर मोडल्यासारखी वाटते त्यामुळे ती दाबून धरावीशी वाटते. तिकोनी हाडांच्या मध्ये गार झाल्यासारखे वाटते. पाठदुखी टणक पदार्थाने दावल्याने किंवा टणक जागेवर निजल्याने, ढेकर आल्याने कमी होते, गुडघे टेकून बसल्याने किंवा वाकल्याने जास्त दुखते. पाठ ताठते, चालल्याने बरे वाटते. हातोड्याचा ठोका मारल्याप्रमाणे एकाएकी पाठ दुखावयास लागते, खाली वाकल्याने जास्त. तिकोनी हाडामधे बर्फासारखे गार वाटते. कांही झाले तरी कंबर धरते. हातपाय :- पाठ ताठतात. लुले झाल्यासारखे वाटतात, आखुड होऊन ताणल्यासारखे वाटतात. हातपाय अस्वस्थ, त्याना रात्रंदिवस धक्के बसतात आणि थरथरतात. टाचा दुखतात. पाय व पावले गार पडतात विशेषतः संध्याकाळी किंवा अंथरुणात. गुडघे किंवा टाचा गार होतात. पंजे निळे होतात. पंजे कटत असले तर पावले गार असतात किंवा पावले कढत असली तर पंजे गार होतात. तळपायाना खूप दुर्गंधी घाम येतो त्यामुळे बोटांच्या बेचक्या
नागरी सेवेतील प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीत येत्या २०११ सालापासून बदल करण्यात आला आहे. सरकारने नागरी सेवेसाठी घेतल्या जाणा-या प्राथमिक परीक्षेच्या जागी विशेष योग्यता चाचणी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्लीनागरी सेवेतील प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीत येत्या २०११ सालापासून बदल करण्यात आला आहे. सरकारने नागरी सेवेसाठी घेतल्या जाणा-या प्राथमिक परीक्षेच्या जागी विशेष योग्यता चाचणी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. विशेष योग्यता चाचणी परीक्षेमुळे उमेदवाराचा या क्षेत्रात किती कल आहे, त्याची ग्रहणशक्ती किती याचे निरीक्षण करून उमेदवाराची निवड या सेवेसाठी केली जाईल. प्राथमिक परीक्षेतच या विशेष योग्यता चाचणी परीक्षेचा समावेश करण्यात आला आहे. २०११ पासून नागरी सेवेसेठी विशेष योग्यता चाचणी परीक्षा घेतली जावी अशी आमची इच्छा आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. गेल्या महिन्यात पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी यूपीएससी परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला, अशीही माहिती सुत्रांकडून मिळाली. १ लाख ७० हजार उमेदवार दरवर्षी मे महिन्यात घेतल्या जाणा-या प्राथमिक परीक्षा देतात. ही परीक्षा पर्यायी स्वरूपाची असते. प्राथमिक परीक्षेत दोन पेपर असतात. एक सामान्य ज्ञान पेपर असतो जो सर्व उमेदवारांसाठी सारखा असतो. तर दुस-या पेपराचा विषय उमेदवारांच्या आवडीने निवडायचा असतो. यूपीएससीचे अधिकारी यावर सविस्तर चर्चा करून लवकरच योग्य निर्णय घेणार आहेत, असे यूपीएससीचे चेअरमन प्रोफेसर डी. पी. अग्रवाल यांनी सांगितले.
सामान्यतः गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. पण हिंगाच्या प्रमाणाची काळजी न घेतल्यास गॅस, जुलाब आणि पोटात जळजळ होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर खूप जास्त गॅस झाल्यास जीव घाबराघुबराही होऊ लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी हिंग असलेले अन्न खाण्यापूर्वी हलका-फुलका नाश्ता करा. अशाप्रकारे हिंगाचे औषधाप्रमाणे सेवन करणे योग्य आहे. पण हिंगामुळे ओठ सुजणे, डोकेदुखी, जुलाब, गॅस, ब्लड प्रेशर इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. (वाचा :- सावधान...! वाढलाय 'या' खतरनाक तापाचा धोका, थेट करतोय शरीरातील सर्व हाडांवर वार, या लोकांना आहे सर्वात जास्त धोका) गरोदरपणात हिंगाचे सेवन केल्यास गर्भपात होऊ शकतो. याशिवाय, जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल, तर या काळात जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यास त्याचा परिणाम दुधाद्वारे थेट बाळावरही होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगू की हिंगामुळे गर्भाशय आकुंचन उत्तेजित होऊ शकते आणि यामुळे गर्भपात होतो. आईने खाल्लेले हे मसालेदार अन्न स्तनपानातील दुधाची स्थिती बिघडवते आणि हे मसाले आईच्या दुधात मिसळतात, ज्यामुळे बाळाचे आरोग्य बिघडू शकते. लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत 5 वर्षांखालील मुलांनी हिंग असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. (वाचा :- Ayurveda Food Tips : सावधान. . ! 'हे' पदार्थ एकत्र एकाचवेळी खाल तर भोगावे लागतील भयंकर परिणाम, आयुर्वेदिक डॉक्टरांचा इशारा) हिंगाच्या अतिसेवनामुळे हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. अशा लोकांना ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी एकतर यापासून दूर राहावे किंवा मर्यादित प्रमाणात याचे सेवन करावे. तुम्हाला माहित आहे का, हिंगाला नैसर्गिक रक्त पातळ करण्यासाठी म्हणजेच नॅच्युरल ब्लड थीनर म्हणूनही ओळखले जाते. हे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून बचाव करते. याशिवाय, हिंगामध्ये कौमरिन (Coumarin) नावाचे एक संयुग आढळते, जे रक्ताच्या गाठी बनण्यापासून रोखते आणि रक्तप्रवाह सुद्धा सुधारते. (वाचा :- Inspirational weight Loss Story : सकाळी उपाशी पोटी 'या' खास पदार्थांचं पाणी पिऊन महिलेने काहीच दिवसांत घटवलं बंपर वजन, दिसू लागली सुपरहॉट! ) जर तुम्ही हिंगचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. तसेच, तुमचे कंस्ट्रेशन देखील कमी होऊ शकते. मात्र काही काळ विश्रांती घेतल्यावर हा त्रास आपोआप बरा होतो. पण काहींनी हिंग खाल्ल्यानंतर चक्कर येण्याचीही तक्रार आहे. तसं तर हिंगाचे दुष्परिणाम काही तासच राहतात आणि त्यानंतर ते आपोआप बरे होतात. पण असे होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्यावी. (वाचा :- Sleep Tips : आयुर्वेदानुसार रात्री झोपण्याआधी 'ही' 5 कामे करणारी लोक कधीच पडत नाहीत आजारी आणि फक्त याच लोकांना मिळते हेल्दी झोप! ) हिंग खाल्ल्याने त्वचेवर लाल डाग किंवा पुरळ उठू शकतात. जेव्हा त्वचेवर हिंगाचा दुष्परिणाम दिसून येतो तेव्हा तुम्हाला त्वचेवर लाल रंगाच्या खुणा आणि चट्टे दिसू लागतात आणि खाजही सुरू होते. हे सहसा काही मिनिटांत बरे होते. परंतु जर ही स्थिती दीर्घकाळ टिकून राहिली आणि सूज येऊ लागली, तर त्याला रेड अलर्ट समजा आणि वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय तुम्हाला एखादा कीटक चावला असेल तर तुम्ही हिंग आणि लसूण पेस्ट प्रभावित भागावर लावा. यातील अॅंटी इन्फ्लमेट्री आणि अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुम, चट्टे आणि पुरळ यापासून आराम देऊ शकतात. (वाचा :- Weight Loss Story : बापरे, 105 किलोवर पोहचलं होतं महिलेचं वजन, 'या' पद्धतींनी अंडी खाऊन घटवलं तब्बल 35 किलो वजन! ) हिंग हा अतिशय फायदेशीर पदार्थ आहे. पण याच्या सेवनाने काही लोकांच्या ओठांवर सूज येऊ लागते. हिंगाच्या काही काही तोट्यांपैकी हा एक आहे. पण ही सूज फक्त काही तासच किंवा काही दिवस टिकते. त्यानंतर ते स्वतःच बरे होते. पण तसे झाले नाही आणि मानेवर आणि चेहऱ्यावर सूज वाढू लागली तर वेळ न घालवता डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. याशिवाय हिंगाच्या अतिसेवनामुळे जुलाब आणि गॅसची समस्याही उद्भवू शकते. (वाचा :- Ayurvedic Tips : साखरेसारखी विरघळेल पोट व कंबरेवरची चरबी, फक्त सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुर्वेदानुसार करा 'ही' 9 कामे! ) जर तुम्हाला अर्धांगवायूचा (paralysis attack) झटका आला असेल तर तुम्ही हिंगापासून अंतर ठेवावे. हिंगाच्या माध्यमातून हा अटॅक पुन्हा येऊ शकतो. याशिवाय हिंगामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेशी (central nervous system) संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय हिंगाचे जास्त सेवन केल्यास छातीत जळजळ, डोकेदुखी, ढेकर येणे आणि जुलाब यांसारख्या समस्याही होऊ शकतात. तुम्हाला माहित आहे का एखाद्या व्यक्तीला फक्त 10 मिलीग्रॅम ते 500 मिलीग्रॅम इतकेच हिंग खाण्याचा सल्ला दिला जातो. हिंगाच्या रोज सेवनाने अनेक आजार टाळता येतात. लक्षात ठेवा की विकारांवर उपचार करण्यासाठी, तुम्ही एका दिवसात 10 मिलीग्रॅम ते 125 मिलीग्रॅम हिंग खाऊ शकता. तसंच जास्तीत जास्त तुम्ही 250 मिलीग्रॅम पर्यंत याचं प्रमाण वाढवलं तरी चालू शकतं. (वाचा :- Healthy lifestyle habits : डाएटिशियनने बनवलेलं 'हे' हेल्दी कार्ड फॉलो केल्यास मेंदू, हृदय,लिव्हर किडनी सर्व राहिल फिट, कधीच पडणार नाही आजारी! )
'कर्दळीवन सेवा संघा'ने २८ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात 'यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन' आयोजित केले होते. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा व परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यांतील अनुभवांची देवाण घेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हे संमेलन योजले होते. कैलास मानसरोवर यात्रा, कर्दळीवन परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, श्रीदत्त परिक्रमा, काशी पंचक्रोशी परिक्रमा, स्वर्गारोहिणी यात्रा, द्रोणागिरी परिक्रमा, गिरनार परिक्रमा, पिठापूर - कुरवपूर परिक्रमा, लाहिरी महाशय राणीखेत गुहा परिक्रमा, पंचकैलास - आदि कैलास, किन्नर कैलास,श्रीखंड कैलास, मणि महेश कैलास, पंचकेदार - केदारनाथ, कल्पेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ, मदमहेश्वर या परिक्रमा लोकप्रिय होत चालल्या आहेत. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत, सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि माहितीपट, चित्र प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा साहित्य संमेलनात झाले.
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. SAJAVAT KON KADHNAR ? ? वाचक वार्ताहर,इम्पॅक़्ट. फूट पाठवर् भाजी विक्रितयने हात पाय पसरले. महाराष्ट्र टाईम्स , मुंबई टाइम्स इफेक्ट. तुम्ही ऑफलाइन आहात।
मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंडात केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह दिसत आहेत. फडणवीस यांची ही केदारनाथ वारी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे. Took darshan & blessings at Kedarnath temple, this morning. विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास उरल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असे भाकीत वर्तविले आहे. झी २४ तास आणि 'पोल डायरी' यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला १२१-१२८, शिवसेना ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, एनसीपी ३५ ते ४२, वंचित १ ते ४ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १ ते ५ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे भाकीत कितपत खरे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींदेखील केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाआधी मोदी केदारनाथला गेले होते. १९ मे रोजी निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार होतं. त्याआधी म्हणजेच १८ मे रोजी मोदी केदारनाथला गेले. त्यांनी जवळपास १५ तास एका गुहेत ध्यानधारणा केली. यानंतर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ३०३ जागा मिळाल्या. - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?
होणार होणार म्हणताना अखेर 'फुलपाखरू' या सुपरहिट मालिकेतील मानस आणि वैदेही या जोडीचं लग्न लागलं. या लग्नाची त्या दोघांएवढेच त्यांचे मित्रही आतुरतेने वाट पहात होते. कॉलेजपासून सुरू झालेल्या या दोघांची मैत्री आता लग्नापर्यंत येऊन पोहोचलीय. त्यामुळे त्यांच्या नात्याला आणि पर्यायाने मालिकेला आता नवं वळण मिळणारे. कॉलेजच्या दिवसांमध्ये फुललेलं प्रेम आता चक्क लग्नापर्यंत येऊन ठेपलं. मानस वैदेहीच्या नात्यात हा दिवस अनेक कारणांसाठी खास आहे. कारण या क्षणाची ते गेले कित्येक दिवस वाट पहात होते. फुलपाखरू या मालिकेतील ही सुपरहिट जोडी नुकतीच बोहल्यावर चढली. याची सुरूवात झाली ती लग्नाच्या खरेदीपासून. मानस आणि वैदेहीच्या लग्नात ते सगळ्यात सुंदर दिसावेत यासाठी लग्नाची खास खरेदी करण्यात आली. त्यानंतर वेळ आली ती व्याही भोजनाची. दोघांच्याही घरची मंडळी यानिमित्ताने एकत्र आली आणि या दोघांप्रमाणेच त्यांचेही एकमेकांसोबतचे ऋणानुबंध कायमचे जुळले. त्यानंतर वैदेहीची मेहेंदी सेरिमनीही तेवढीच खास ठरली. यानिमित्ताने जमलेल्या तिच्या मैत्रिणींनी हे क्षण चांगलेच एन्जॉय केले, तर वैदेहीनेही तिच्या हातावर सुरेख मेहंदी काढली. मात्र या लग्नात खरी मजा आली ती संगीत सेरिमनीला. खरं तर मराठी लग्नात हा प्रकार नसतो. पण मालिका म्हंटल्यावर सगळं माफ करावं लागतं. मानस वैदेहीच्या कट्टा गँगवरील मित्र मैत्रिणींनीही या संगीत सेरिमनीत चांगलीच धमाल केली. अखेरीस दिवस आला तो या दोघांच्या लग्नाचा. आपल्या माहेरच्या माणसांना कायमचं सोडून जाताना वैदेहीला फार वाईट वाटत होतं. वडिलांचा निरोप घेताना वैदेहीच्या अश्रूंचा बांध फुटला. लग्नानंतर या मालिकेत आता कोणता नवा ट्विस्ट येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
नारायण दत्तात्रेय बेल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यात धामणी गावी झाला. त्यांनी प्राथमिक, माध्यमिक व कृषी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच घेतले. त्यांनी १९५९मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. पुणे कृषी महाविद्यालयातील पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागात कार्य केल्यानंतर ते धुळे कृषी महाविद्यालयात पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पुणे येथून एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली (१९६८) व पुढे कर्नाल, हरियाना राज्य येथील प्रसिद्ध राष्ट्रीय दुग्धशास्त्र संशोधन संस्थेतून पीएच.डी. (दुग्ध तंत्रज्ञान) पदवी प्राप्त केली (१९८६). त्यांनी प्रबंधासाठी मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक फॉर चेडार टाइप चीज फ्रॉम बफेलो मिल्क युझिंग मायक्रोबियल रेनेट या विषयावर संशोधन केले. चीज हा दुग्ध पदार्थ परदेशात मोठ्या प्रमाणात आहारात वापरला जातो, परंतु त्याच्या उत्पादन प्रक्रियेत जे रेनेट वितंचक (एन्झाईम) वापरले जाते ते गायीच्या वासरांच्या पोटातील आतड्यांवर प्रक्रिया करून तयार करत असल्यामुळे भारतातील बहुसंख्य लोक उच्च प्रथिने असूनही चीजचा वापर आहारात करत नसत. डॉ.बेल्हे यांनी वासरांची आतडी न वापरता सूक्ष्म जिवाणूंपासून तयार होत असलेले मायक्रोबियल रेनेट (बॅसिल्स सबटिलीस व अॅबसीडिया रॅनोझा या सूक्ष्म जिवाणूंपासून) वापरून चीज तयार करण्याची नवीन प्रक्रिया शोधली. आज त्याचा वापर करून अनेक दुग्धप्रक्रिया कारखाने चीज तयार करत असून त्यामुळे चीज खाण्याचे प्रमाणही भारतात वाढत आहे. दुग्धशास्त्र विषयात हा एक मोठा बदल घडवण्यात डॉ. बेल्हे यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. वासरांपासूनचे रेनेट आयात करावे लागे. हे आयातीचे प्रमाण कमी झाल्याने मौल्यवान परकीय चलनही वाचले. या संशोधनाचा पुढे मोठ्या प्रमाणात वापर करून भारतीय दुग्ध व्यावसायिकांना मदत करावी या उद्देशाने त्यांनी काही आराखडे तयार केले होते, तथापि दुर्दैवाने वयाच्या ५७व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने पुणे येथे निधन झाले.
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नर्हे परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सातजणांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन कोयते, मीरचीपूड, कटावणी अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आले. सागर बसवराज नडगिरे (वय १९, रा. वडगाव बुद्रूक), राहूल गंगाराम मरगळे (वय १९, रा. शिरकुले, हवेली), शुभम सचिन उफाळे (वय २०, रा. वडगाव), समीर मोहन चांदेकर (वय २०, रा. धायरी), सागर शरनम रणसौरे (वय २०, रा. धायरी), हर्षद गणेश जातेगावकर (वय २१, रा. धायरी), शुभम सुनिल चव्हाणे (वय २१, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई दयानंद तेलंगे पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस काल मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास नर्हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी ग्रॅडीयर सोसायटीसमोरील रस्त्यावर सात जणांचे टोळके संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानुसार पोलिसांनी सागर, राहूल, शुभम, समीर, रणसौरे, हर्षद, चव्हाणेला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन कोयते, मिरचीपूड, कटावणी, दोर, बॅटरी, स्क्रू ड्रायव्हर साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी नर्हे परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा घालणार असल्याची कबुली दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करीत आहेत.
Bhagatsingh Koshari : पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंग कोशारींचा खळबळजनक खुलासा, म्हणाले अजित पवार माझ्याकडे आले आणि.... Shivsena Symbol : . . तर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो! ! घटनातज्ञांनी सांगितले नाव आणि चिन्हाचे पुढेचे सगळे गणित. . Amit Shah : सभा अमित शाह यांची, स्थानिकांना मात्र नोटिसा, नेमकं कारण काय? Uddhav Thackeray: पक्ष आणि धनुष्यबाण गमावल्यांनतर ठाकरे यांची राजकीय खेळी, उचलले मोठे राजकीय पाऊल. .
मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात देशभर संतापाची लाट आहे. अशात मनसेने रेडिओ वाहिन्यांना पाकिस्तानी गायकांची गाणी न वाजण्याचा इशारा दिला आहे. आपल्या रेडिओ वाहिनीच्या करोडो श्रोत्यांच्या पाकिस्तानबाबतच्या संतप्त भावना लक्षात घेऊन आपण पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी रेडिओ वाहिनीवर वाजवणं तत्काळ थांबवावं. भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच, अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी 'सर्जिकल स्ट्राइक' कसा करायचा, हे आम्हाला ठाऊक आहेच, असा इशाराच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना दिला आहे. 'पुलवामा हल्ल्यामध्ये आपले ४० जवान शहीद झालेत. अशा स्फोटक वातावरणात आपल्या रेडिओ वाहिन्या मात्र पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी ऐकवतायत. या रेडिओ वाहिन्यांमध्ये जे लोक काम करतात किंवा इथल्या कार्यक्रमांचं शेड्यूल जे आखतात, त्यांना देशवासीयांची भावना काय आहे, याची काहीच जाणीव नाही का ' असा सवाल शालिनी यांनी केला आहे. 'शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध असताना आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत. अशा नाजूक स्थितीत आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे' अशी टीका शालिनी यांनी केली आहे.
मुंबई - टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटस अर्थात "टीआरपी' गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य पातळीवरील आणि केंद्रीय तपास यंत्रणांना आज मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. तपास यंत्रणांनी तपासणी करताना वस्तुनिष्ठ आणि जबाबदार असले पाहिजेत, असे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या पिठाने सुनावले. या प्रकरणाचा तपास दीर्घकाळापर्यंत चालता कामा नये. तपास यंत्रणांनी ठराविक वेळी तपास थांबवला पाहिजे, असेही न्यायालयाने सांगितले. "टीआरपी'गैरव्यवहार प्रकरणी ईडी, सीबीआय आणि राज्य पोलीसही तपास करत आहेत. या सर्व यंत्रणांनी जबाबदारीने, वस्तुनिष्ठ मूल्यांकनाच्या आधारे तपास करायला हवा. त्यांचा तपास म्हणजे आणखी एक समस्या असता कामा नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टिव्ही वृत्तवाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम युक्तिवाद ऐकताना खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. या याचिकेद्वारे तपासादरम्यान काही सवलतींची मागणी केली होती. दीर्घकाळ चाललेल्या या तपासादरम्यान गोस्वामी आणि इतरांना केवळ संशयित म्हटले जात आहे. मात्र त्यांना आरोपी म्हटले गेलेले नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले गेले. त्यावर या सर्वांना अटक करण्यामागील ठोस कारण तपास अधिकाऱ्यांकडे का नाही आणि या प्रकरणचा तपास आणखी किती दिवस चालणार, अशी विचारणा न्यायालयाने तपास यंत्रणांना केली.
टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना महाराष्ट्र भाजपसोबत सत्तेत असून देखील भाजपाला विरोधी पक्षाप्रमाणे कडाडून विरोध करीत आहे. सेनेने भाजपला महाराष्ट्र आव्हान देऊन नाकी - नऊ आणले आहेत. आता गुजरात मध्ये देखील सेना भाजपची डोकेदुखी वाढविण्यास सज्ज होत आहे. गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नाही. या भूमिकेवरुन शिवसेनेनं यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं गुजरातच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढू शकते. 40 हून अधिक जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे हिंदुत्वावादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भाजपला भोगावा लागू शकतो. यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. असं म्हटलं होतं. पण आता अचानकपणे शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. एकीकडे भाजपला गुजरातमध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांचा सामना करायला लागत असताना दुसरीकडे शिवसेनेनं थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
औरंगाबाद : विवाहितेला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी सोमवारी रात्री जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमेंविरुद्ध गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गिरमे यांच्याकडून अश्लील मेसेज येत असल्याने विवाहितेने त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. एक नंबर ब्लॉक झाल्यानंतर दुसऱ्या नंबरवरून गिरमे यांनी विवाहितेला मेसेज पाठविल्याचे चौकशीत समोर आले. जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या विवाहितेचा मोबाईल नंबर मिळवून तिच्या व्हॉटस्अॅपवर अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा नोंद होऊ नये, याकरिता चार दिवसांपासून विवाहितेच्या घरी काही लोक दबाव टाकण्याकरिता गेले होते. याविषयीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली; मात्र विवाहिता आणि तिचे कुटुंब तक्रार करण्यावर ठाम होते, यामुळे गिरमेंविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. विवाहितेच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक गिरमे यांच्याकडून तिला अश्लील मेसेज येण्यास सुरुवात झाल्यांनतर तिने त्यांना असे मेसेज पाठवू नका, असे स्पष्टपणे बजावले होते; मात्र गिरमेंकडून मेसेज येणे सुरूच राहिल्याने विवाहितेने गिरमेंना शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल क्रमांक व्हॉटस्अॅपवर ब्लॉक केला. यानंतरही गिरमे यांनी त्यांच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून विवाहितेला मेसेज पाठविणे सुरू केले. यामुळे विवाहितेने दुसरा क्रमांकही ब्लॉक केला. त्यानंतर गिरमे यांनी विवाहितेच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पाठविल्याचे समोर आले. ही माहिती विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. गिरमेंविरुद्ध सोमवारी मध्यरात्री दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिली. ते म्हणाले की, या तक्रारीची प्राथमिक चौकशी आपण स्वतः करीत आहोत. प्राथमिक चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केल्यानंतर गिरमे यांची खातेनिहाय चौकशी, निलंबन याबाबतचा निर्र्णय पोलीस आयुक्त घेतील.
भारतीय सॉफ्टबॉल महासंघ व सॉफ्टबॉल ओडीसा च्या संयुक्त विद्यमाने कटक येथे दिनांक ५ ते ९ जानेवारी २०२० दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ३२व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार्या महाराष्ट्र सॉफ्टबॉल मुलांच्या संघात आकोट च्या तेजस दिलीप मोडोकार आणि साहिल सुधिर गणगणे यांची वर्णी लागली आहे. सॉफ्टबॉल पंढरी जळगावला होत असलेल्या महाराष्ट्र सबज्युनिअर संघाच्या राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण व सराव शिबीरात सहभागी होण्यासाठी दोघेही रवाना झाले आहेत. कारंजा लाड येथे नुकत्याच झालेल्या 27 व्या सब ज्युनिअर राज्य स्पर्धेत तेजस मोडोकार सह सेकंड बेस चा उत्तम फिल्डर साहिल गणगणे व चमु ने केलेल्या उत्कृष्ट सॉफ्टबॉल खेळ प्रदर्शना मुळे अकोला जिल्हा संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले होते. तेजसने या ठिकाणी उत्कृष्ट पीचर म्हणून सन्मान मिळवला होता. दोघेही आपला सॉफ्टबॉल खेळाचा दैनिक सराव देशपांडे अकॅडमी मधे सुजय कल्पेकर व विकास वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करतात. यावर्षी 'दास आकोट' चा तिसरा खेळाडू परीमल धर्मे यानेही छत्तीसगढ येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत (१४ वर्ष मुले) महाराष्ट्र संघात स्थान मिळविले होते. अकोला जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव श्री नाजूकराव पाखले व देशपांडे अकॅडमी च्या संचालिका श्रीमती मंजिरीताई देशपांडे व सौ नूपुर देशपांडे व मानद मुख्य प्रशिक्षक मुकुल देशपांडे यांनीही खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचा निरोप घेतल्यानंतर आता अनेक आठवडे उलटले आहेत. 20 जानेवारीला जो बायडेन यांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या काही तास अगोदरच ट्रम्प फ्लोरिडामध्ये मार-ए-लागो येथील आपल्या निवास्थानी गेले होते. तेव्हापासून ट्रम्प आपल्या कुटुंबासह तिथेच राहात आहेत. ट्रम्प यांच्या माजी सल्लागाराने मेलानिया ट्रम्प यांच्या संदर्भाने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर त्यांच्या जीवनात किती बदल झाला आहे. ट्रम्प यांच्या एका माजी कॅम्पेन मॅनेजरनुसार, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना वाटते की, ट्रम्प व्हाईट हाऊसच्या दिवसांच्या तुलनेत आता जास्त आनंदी आहेत. तर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प या गोष्टीसाठी सुद्धा खुश आहेत की ते आता ट्विटरवर नाहीत. 'संडे टाइम्स'ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि कॅम्पेन मॅनेजर असलेले जेसन मिलर यांनी सांगितले की, महाभियोग ट्रायल असूनही इतक्या वर्षानंतर ट्रम्प यांच्या चेहर्यावर समाधान दिसत आहे. मिलर म्हणाले, अमेरिकन इतिहासात केवळ 45 लोक झाले आहेत ज्यांना माहित आहे की, संपूर्ण जगाचे ओझे खांद्यावर घेवून फिरणे कसे असते... जेव्हा तुम्हाला चार वर्षानंतर पहिल्यांदा हे समजते की, आता सर्वकाही तुमची जबाबदारी नाही तेव्हा हायसे वाटते. मिलर यांच्यानुसार, ट्रम्प यांनी म्हटले की, सोशल मीडियावर नसणे आणि द्वेषाने भरलेल्या इको चेम्बरचा (जे सोशल मीडिया अनेक प्रसंगी बनत असते) विषय नसणे, प्रत्यक्षात चांगले आहे. ट्रम्प यांच्या ट्विटरवर सुमारे 8 कोटी 80 लाख फॉलोअर्स होते. त्यांना काही आठवडे अगोदर मायक्रोब्लॉगिंग साईटवरून हटवण्यात आले होते. कॅपिटल हिलमध्ये 6 जानेवारीला त्यांच्या समर्थकांनी उच्छाद मांडल्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांच्याविरूद्ध कारवाई केली होती. मिलर यांच्यानुसार, नव्या वातावरणात मेलानिया ट्रम्पसुद्धा आनंदी आहेत. मेलानिया यांनी म्हटले की, ट्रम्प आता जास्त आनंदी आहेत आणि पहिल्याच्या तुलनेत जास्त एन्जॉय करत आहेत. मिलर यांनी म्हटले की ते पुर्णपणे आश्वस्थ आहेत की ट्रम्प महाभियोगात दोषी ठरणार नाहीत.
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यातून 96 लाख 25 हजार 72क् रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. ठाणो : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यातून 96 लाख 25 हजार 72क् रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. ठाणो शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 69 लाख 85 हजार 92क्, तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 26 लाख 39 हजार 8क्क् रुपयांची रोकड कारवाईदरम्यान सापडली. मात्र, ठाणो ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रत रोकड जप्तीचा नारळ फुटलेलाच नाही. सर्वाधिक 48 लाखांची रोकड कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून जप्त करण्यात आली आहे. ठाणो जिल्ह्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहितेचा भंग घेऊ नये, यासाठी आचारसंहिता भरारी पथके तैनात करण्यात आली़ आचारसंहिता लागू झाल्यावर प्रामुख्याने पैसेवाटप किंवा मतदारांवर प्रभाव पाडणाःयांवर नजर ठेवण्यात आली. आली. (प्रतिनिधी) जिल्ह्यात निवडणूक काळात आचारसंहिता भंगाचे 35 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 28 गुन्हे ठाणो शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांत नोंदविण्यात आले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी किंवा बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणो बंधनकारक आहे. परवानगी न घेता सभा, पोस्टर व ङोंडे लावणो, सरकारी कामात अडथळा आणणो या प्रकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात. हे गुन्हे जिल्ह्यात नौपाडा, मुंब्रा, कोपरीत दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील 18 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांतून या भरारी पथकाने 96 लाख 25 हजार 72क् रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामध्ये पहिली कारवाई ऐरोली मतदारसंघात करण्यात आली. तिथून 21 लाख 32 हजार 8क्क् रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर, कोपरी-पाचपाखाडीतून 48 लाख 29 हजार 92क् रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या कारवाया सप्टेंबरमध्ये केल्या गेल्या.
पश्चिम रेल्वेवर विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकांदरम्यान लोकल रुळावरून घसरून झालेल्या अपघातामध्ये लोकलचे चाक (अॅक्सेल) तुटल्याने रेल्वेच्या साधनसामग्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. मुंबई- पश्चिम रेल्वेवर विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकांदरम्यान लोकल रुळावरून घसरून झालेल्या अपघातामध्ये लोकलचे चाक (अॅक्सेल) तुटल्याने रेल्वेच्या साधनसामग्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. रुळावरुन घसरून झालेल्या अपघातानंतर तुटलेले चाक हे केवळ तीन महिन्यांपूर्वी बदलण्यात आले होते. शिवाय या चाकाची चाचणीही घेण्यात आली होती. तरीही चाक केवळ तीन महिन्यांत तुटल्याने रेल्वे प्रशासन चकित झाले आहे. अपघातग्रस्त लोकलच्या डब्याचे चाक हे २६ जून २०१५ रोजी बसवण्यात आले होते. याशिवाय या चाकाची अत्युच्च क्षमता चाचणीही याच महिन्यात २९ जून रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर हे चाक आणि डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. रेल्वेगाडीचे चाक तुटल्याने होणा-या अपघातांची संख्या फार कमी आहे. लोकलच्या गाडीचे चाक हे अत्यंत कठीण धातूपासून बनवलेले असते. त्यामुळे सहजासहजी ते तुटत नाही. त्यामुळे लोकल रुळावरून घसरून झालेला अपघात चाक तुटल्याने झाला असल्यास रेल्वेच्या साधनसमग्रीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे रेल्वेच्या अधिका-याने सांगितले.
नाशिक : समाज व्यवहारात भेटलेली माणसे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनुभव यांची सुंदर गुंफण असलेल्या विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) लिखित 'नात्यांचे सर्व्हिसिंग ' या शब्दमल्हार प्रकाशन, नाशिकने प्रकाशित केलेल्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उद्या गुरूवार, दि.१५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता घरगुती समारंभात केवळ ठराविक निमंत्रितांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ. वृंदा भार्गवे यांच्या शुभहस्ते होणार्या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून हेमंत टकले, डॉ. कैलास कमोद, प्रा. अनंत येवलेकर, प्रकाशक स्वानंद बेदरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करणार आहेत. विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना, प्रसंग यांची सांगड घालत माणूसपणाच्या खर्या, खुर्या कथांचा हा ऐवज आहे. नाती आणि प्रेम हे सूत्र असलेल्या या कथा मराठी साहित्यातला अनोखा प्रयोग आहे. सहकार क्षेत्रात काम करत असतांना भेटलेल्या माणसांचा हा एक कोलाजच आहे. पैसा हे सर्वस्व नाही, पण पैसा नगण्यही नाही. असे असतांना वर्तन कसे ठेवावे आणि माणसं कशी बांधून ठेवावी हे कथांचे आशयसूत्र आहे. ख्यातनाम लेखक मधु मंगेश कर्णिक व वसंत आबाजी डहाके यांची ह्या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाची मांडणी व सजावट केली आहे. तरी वाचक, वितरक, मित्रमंडळी यांनी या पुस्तकाच्या व एकूणच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. तसेच या समारंभासाठी मित्र व हितचिंतकांनी व्हॉट्सअॅप व फोनद्वारे शुभेच्छा पाठवाव्यात असे आवाहन लेखक विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) व विश्वास ग्रुपने केले आहे.
एपिकल व्यंजन हा एक फोन (भाषण ध्वनी) आहे जो जिभेच्या टोकासह (शिखर) वरच्या आर्टिक्युलेटरच्या संयोगाने ओठांपासून पोस्टलव्होलरपर्यंत आणि शक्यतो प्रीपॅलॅटलसह हवेच्या मार्गात अडथळा आणून तयार केला जातो. [१] [२] हे लॅमिनल व्यंजनांशी विरोधाभास करते, जे अगदी टोकाच्या मागे, जिभेच्या ब्लेडसह अडथळा निर्माण करून तयार केले जाते. काहीवेळा एपिकलचा वापर केवळ जिभेच्या टोकाचा समावेश असलेल्या अभिव्यक्तीसाठी केला जातो आणि जिभेचे टोक आणि ब्लेड दोन्हीचा समावेश असलेल्या अभिव्यक्तीसाठी एपिकोलामिनलचा वापर केला जातो. [३] तथापि, भेद नेहमी केला जात नाही आणि नंतरच्याला फक्त apical म्हटले जाऊ शकते, विशेषतः apical dental articulationचे वर्णन करताना. [१] [४] अल्व्होलर प्रदेशात काही लॅमिनल संपर्क असल्याने, एपिकोलामिनल दंत व्यंजनांना देखील डेन्टी- अल्व्होलर असे लेबल केले जाते. हा फारसा सामान्य फरक नाही आणि सामान्यतः फक्त फ्रिकेटिव्स आणि एफ्रिकेट्सवर लागू केला जातो. अशा प्रकारे, इंग्रजीच्या बऱ्याच प्रकारांमध्ये [t]/[d]च्या apical किंवा laminal जोड्या असतात. तथापि, येमेनमधील हदरामी अरबीसह काही अरबी जातींना [t] लॅमिनल परंतु [d] एपिकल समजतात. सेर्बो-क्रोएशियन प्रमाणे बास्क अल्व्होलर फ्रिकेटिव्ससाठी भेद वापरते. मंदारिन चायनीज पोस्टालव्होलर फ्रिकेटिव्स ("अल्व्हेलो-पॅलॅटल" आणि "रेट्रोफ्लेक्स" मालिका) साठी वापरतात. लिलूएट हे दुय्यम वैशिष्ट्य म्हणून वेलेराइज्ड आणि नॉन-वेलराइज्ड अॅफ्रिकेट्समध्ये विरोधाभासी म्हणून वापरते. ऍपिकल आणि लॅमिनलमधील फरक ऑस्ट्रेलियन आदिवासी भाषांमध्ये अनुनासिक, प्लोसिव्ह आणि (सामान्यतः) पार्श्व अंदाजासाठी सामान्य आहे. बंगाली-आसामी सातत्य मधील बहुतेक बोली दंत-लॅमिनल अल्व्होलर स्टॉप आणि एपिकल अल्व्होलर स्टॉप्समध्ये फरक करतात. अप्पर आसामीमध्ये, ते विलीन झाले आहेत आणि फक्त एपिकल अल्व्होलर स्टॉप सोडतात. पाश्चात्य बंगालीमध्ये एपिकल अल्व्होलर्सची जागा एपिकल पोस्ट-अल्व्होलर्सने घेतली आहे.
इंदापूर तालुक्याला राजकीय सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत कै. शंकरराव ( भाऊ ) पाटील यांचे मोठे योगदान आहे. उपेक्षित वर्गाला वेळोवेळी न्याय देण्याची भूमिका घेणारे भाऊ तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ होऊन गेले,अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कै. शंकरराव पाटील उर्फ भाऊ यांना जयंतीनिमित्त आदरांजली व्यक्त केली. राज्यमंत्री भरणे म्हणाले की, कै. शंकरराव ( भाऊ ) पाटील यांची आज जयंती आहे. इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत माजी खासदार स्व. शंकरराव ( भाऊ ) पाटील यांचे मोठे योगदान आहे. इंदापूर तालुक्याला राजकीय, सामजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक वारसा देणारे, त्याचबरोबर तालुक्यातील उपेक्षित घटकांना वेळोवेळी न्याय देण्याचे कार्य करणारे सहकार महर्षी कै. शंकरराव पाटील इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे.
अमरावती- शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर राहणार्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न गहन होऊ लागला आहे. स्वतंत्र खोल्यांपासून टीव्ही, फ्रिजची सुविधा देणार्या वसतिगृहांची संख्या शहरात उदंड आहे, पण त्यांच्या प्रकृतीकडे पाहिजे तितक्या गांभीर्याने वसतिगृह प्रशासन लक्ष देत नाही. एखाद्याची प्रकृती बिघडली, की त्याला वसतिगृहातून स्वतःच उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, खोल्या व परिसराची स्वच्छता, शिस्त, सुरक्षा आणि प्रथमोपचाराची जबाबदारी त्या-त्या शैक्षणिक संस्थांचे अधिकारी, वसतिगृह निरीक्षक, अधीक्षक यांच्यावर असते. शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व संस्थांसाठी जवळपास हे नियम सारखेच आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण, पिण्याचे पाणी, अन्न-धान्य यांची नियमित तपासणी व्हावी, आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांचे पॅनेल असावे. त्यात मुलींची तपासणी करण्यासाठी महिला डॉक्टरचा समावेश असावा. आपत्कालीन प्रसंगी जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांना नेले जाणे अपेक्षित आहे. तशा मार्गदर्शक सूचनाही आहेत. पण, जवळच्या जवळ उपचार करून घेण्याच्या नादात शासकीय रुग्णालयाकडे बहुतांश सर्वच वसतिगृहांनी पाठ फिरवली आहे. त्यामागे कारणेही नमूद केली जात आहेत. महाविद्यालय व वसतिगृहातील अधिकारी, विद्यार्थी व पालकांचा शासकीय दवाखान्यांमध्ये मिळणार्या उपचारांवर विश्वासच नाही. तेथे गेल्यानंतर तातडीने उपचार होत नाहीत. त्यामुळे आम्ही व विद्यार्थीही येथे जाणे टाळतो, असे अनेक प्राचार्य, प्राध्यापक, रेक्टर यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. शहरातील जवळपास 33 वसतिगृहांशी 'दिव्य मराठी'ने संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय सुविधा व ते करीत असलेल्या उपायांची जाणीव झाली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वच प्रकाराच्या वसतिगृहांमधून काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थितीत तत्काळ प्रतिसाद मिळत नाही. विद्यार्थी, पालकांमध्येही अशा रुग्णालयांप्रति विश्वासार्हता कमी आहे. त्यामुळे सर्वच वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात. वसतिगृह कोणतेही असो, तेथे पुरेशा सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असते. शासनाची वसतिगृहे संस्थांना दिलेली असतात. महाविद्यालयांमधील वसतिगृहांवर प्राचार्य आणि रेक्टर नियंत्रण ठेवतात. प्रत्येक महाविद्यालयाशी संलग्न किमान एक आरोग्य समिती असावी. त्यांनी विद्यार्थी, शिक्षकांना प्रथमोपचाराचे धडे द्यावेत. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, लैंगिक अशा अनेक समस्या असू शकतात. अनेक समस्या ते उघडपणे मांडू शकत नाहीत. अशा वेळी कौन्सेलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जाव्यात.
जळगाव, दि. 13 - वाहतुक नियमांचे पालन करुन वाहन चालविल्यास स्वतः बरोबरच दुसऱ्यांच्याही जिविताचे संरक्षण होईल. याकरीता सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून जिल्हा अपघात विरहित होण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी केले. येथील जी. एस. ग्राउंडवर 31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2020 चे उद्घाटन न्या. सानप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटक्के, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर आदि उपस्थित होते. न्या. सानप पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांने घराबाहेर पडतांना वाहतुक नियमांचे पालन करण्याचा ठाम निश्चिय करुनच घराबाहेर पडावे. वाहन चालवितांना आपल्याबरोबरच इतरांचीही काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. याकरीता सर्व संबंधितांनी वाहतुक नियमांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहनही केले. रस्ते सुरक्षा अभियानाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, वाहतूक नियम आपल्या भल्यासाठीच आहेत याची जाणीव नागरीकांमध्ये होणे आवश्यक आहे. हेल्मेट वापरणे ही केवळ औपचारिकता न राहता ते वापरल्याने अपघातात आपला जीव वाचू शकतो याचेही भान असणे आवश्यक आहे. प्रवास करतांना आपले संरक्षण आपल्याच हातात आहे याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाला होणे आवश्यक आहे. यामुळेअपघाताचे प्रमाणही कमी होईल. अनेक अपघात हे वेग मर्यादा न पाळल्यामुळे होत असतात. तेव्हा वाहनचालकांनी वाहन चालवितांना वेगमर्यादा पाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन म्हणजे आपल्यावर लादलेले आझे न समजता ते आपल्या सुरक्षेसाठी आहे अशी भावना ज्यावेळी जनमानसात निर्माण होईल तेव्हा वाहतुक नियम पालनाविषयी सक्ती करण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक नागरिकाने, वाहनचालकाने आपल्याबरोबरच दुसऱ्याच्याही जिवीताची काळजी घेतल्यास जिल्हा अपघात विरहित होण्यास मदत होईल. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी शहर आणि परिसरात विविध विकासाची कामे सुरू आहे. त्यामुळे नागरीकांनी वाहने चालविताना काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील अपघातांची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. हेल्मेटला भार न मानता किंवा केवळ औपचारिकता न समजता ते आपल्या संरक्षाणासाठी असल्याचे मान्य करून ते दुर्देवी अपघातात वरदान ठरत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना मागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. राजेंद्र देशमुख व सुनिता मराठे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी मानले. कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस, राज्य परिवहन विभाग, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्थ । भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत आज दुसऱ्या दिवसाखेर भारताने ६९ षटकांत ३ बाद १७२ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद ८२ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५१ धावांवर खेळत आहे. विराटचे हे २०वे अर्धशतक असून जर उद्या त्याने शतकी खेळी केली तर त्याचे हे कसोटीतील २५ वे शतक ठरेल. यावर्षी विराटने ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७२. ०८च्या सरासरीने २५९५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १० शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबर त्याने एक खास विक्रम केला आहे. एका वर्षात १९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम त्याने ४ वेळा केला आहे. यापुर्वी केवळ कुमार संगकारा आणि रिकी पाॅटिंगने ४ वेळा एका वर्षात १९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. महत्त्वाच्या बातम्याः -सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मानंतर WTC मध्ये २००० धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय ठरला. २०२३ मध्ये कसोटीत ५०० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. केमार रोचने विंडीजला दुसरे यश मिळवून देताना शुबमन गिलला १० धावांवर बाद केले. यशस्वी ७४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर बाद झाला आणि रोहितसह त्याची १३९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रोहित शर्मापाठोपाठ युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचेही अर्धशतक. . . भारताच्या बिनबाद ११८ धावा. संपादकीय : नेतृत्वाची आयात सुरूच! संपादकीय : उत्तर भारताशी थेट संपर्काचे स्वप्न लांबणार? संपादकीय : शासकीय कार्यालयांतील टॉयलेट एक 'व्यथा'! संपादकीय : संपादकीय : संपादकीय : व्यवस्था कुरतडणाऱ्या उंदरांचे काय करणार? संपादकीय : संपादकीय : संपादकीय : संपादकीय :
शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरातील टेंभापूरी मध्यम प्रकल्पात जायकवाडी धरणातून लिप्ट योजनेअतंर्गत पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षापासून कोरड्या असलेल्या या धरणामध्ये या वर्षी अल्प पर्जन्यवृष्टीसह धरणात केवळ अत्यल्प पाणीसाठा पाहता भविष्यात पिण्यासह शेतीला पाण्याची टंचाई सुरू होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्यपुर्वक लक्ष देण्याची गरज आहे. याविषयी सोमवारी (ता. 19) रोजी अभिजित म्हेत्रे अधिक्षक अभियंतासह प्रशासक प्राधिकरण औरंगाबाद यांना एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले टेंभापूरी मध्यम प्रकल्पात जायकवाडी धरणातून लिफ्ट योजनेस परवानगी देण्याची गरज आहे. टेंभापुरी मध्यम प्रकल्प नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाअंतर्गत येत असल्याने जायकवाडी धरणातून एक टी. एम. सी. पणी उचलण्याची लिफ्ट योजनेच्या बाबतीत नांदूर मधमेश्वर उपविभाग क्रमांक चार, शाखा गंगापूर यांनी तीन पर्यायाची पडताळणी करून अहवालही सादर केला आहे. या अहवालाचा विचार करून तात्काळ कार्यवाही होऊन भविष्यातील संभाव्य तीव्र पाणीटंचाईला रोखणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सचिन विधाटे, राहुल ढोले, आक्रूर निकम ,किशोर गावंडे, रामेश्वर जाधव, योगेश निकम, विकास सोनार, कुमार भवर, संदीप तुपे,कलीम शेख आदींची उपस्थित होती.
एमपीसी न्यूज - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महापुरुषांची बदनामी व चारित्र्य हनन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा. अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा सेवा संघ, पिंपरी चिंचवड अध्यक्ष एड. लक्ष्मण रानवडे यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्यातेच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या सारख्या थोर पुरुषांची बदनामी व अपमान करणाऱ्या लोकांची गय करता कामा नये. अशा लोकांना आमच्या वतीने चोख उत्तर दिले जाईल. थोर पुरुषांचे चरित्र्य हनन, बदनामी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही. ' असे या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत तुकोजी होळकरांची सुद्धा बदनामी करण्याचे षडयंत्र आहे. पुण्यातल्या लालमहालातील पुण्यभूमी नांगरतानाचं दृश्य दाखवलेल्या बालशिवाजी, जिजामाता यांच्या समूहशिल्पात घुसडलेला दादोजी कोंडदेवचा पुतळा हटल्यानंतर शिवप्रेमींचं लक्ष आता रायगडावरील 'वाघ्या' कुत्र्याच्या समाधीकडे गेलंय. म्हणजे आता वादाची जागा कोंडदेवनंतर कुत्र्याने घेतलीय. ६ जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर 'शिवराज्याभिषेक दिन' साजरा होतो. यंदाच्या या उत्सवाच्या तयारीसाठी नुकतीच(१७ मे) कोल्हापूरच्या तुळजाभवानी मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात रायगडावरील 'वाघ्या' कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा चर्चेला आला. वाध्या कुत्र्याची कथा ही दंतकथा आहे. शिवचरित्रात वा संदर्भ साहित्य-साधनांत 'वाघ्या'चा कुठेही उल्लेख नाही. कथा, कादंबऱ्या व नाटकातून रंगवलेल्या 'वाघ्या' कुत्र्याचा इतिहासाशी संबंध नाही. त्याचं शिल्प रायगडावर शिवरायांच्या पवित्र समाधीसमोर असणं, हा इतिहासाचा-शिवचरित्राचा अपमान आहे. यामुळे 'वाघ्या चं शिल्प पुरातत्त्व खात्याने रायगडावरून तातडीने हटवावं, असे मुद्दे-मागणी या बैठकीतून पुढे आलेत. या मुद्देमागणीला दुजोरा देणारी माहिती इतिहास संशोधक, अभ्यासक, लेखक इंद्रजित सावंत यांनी बैठकीत सविस्तर सादर केल्यावर 'शिवराज्याभिषेक महोत्सव समिती'चे प्रमुख युवराज संभाजीराजे यांनी 'वाघ्याचं शिल्प रायगडावरून शासनाने तातडीने हटवावं, त्यासाठी समिती नेमावी,' अशी मागणी केलीय. कोंडदेवचा पुतळा हटवण्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी वादग्रस्त होणं अपेक्षित होतं. तसंच झालंय. आधी घाण करायची आणि ती साफ करण्याचा कुणी प्रयत्न केला की, 'अकलेची मापं' काढत थयथयाट करायचा, हा सनातन्यांचा जुनाच उद्योग आहे. त्याची सुरुवात आता झालीय. पण अशा थयथयाटी सोंगा-ढोंगाने आता सनातन्यांची हरामखोरी लपून राहाणार नाही. शिवरायांचं चरित्र कायम वादग्रस्त राहाण्यासाठी शेंडीला वर्णवर्चस्वाच्या गाठी मारून व्यवहार करणाऱ्या नीच कर्माला 'वाघ्या'च्या शिल्पाने वाचा फोडलीय. त्यातून सनातन्यांचा लेखणीवाणी-कृती व्यवहार खोट्या इतिहासाची पेरणी करत इतरांच्या बुद्धीची छाटणी कशाप्रकारे करतो, ह्याची साक्षच मिळतेय. छत्रपती शिवरायांचं ३ एप्रिल १६८० रोजी निधन झालं. त्यानंतर जिथे त्यांच्या मृतदेहाचं दहन झालं, तिथे स्मृती चौथरा बांधण्यात आला; तर जिथे त्यांच्या अस्थी-राख पुरण्यात आल्या तिथे समाधी बांधण्यात आली. त्याचप्रमाणे शिवरायांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सती गेलेल्या पुतळाबाईंच्या स्मृतीची शिलाही रायगडावर आहे. याशिवाय 'वाघ्या'चं शिल्प असलेला समाधी-चौथरा रायगडावर आहे. हा समाधीचौथरा सोयराबाईंचा असण्याची काहींना शक्यता वाटते. तथापि, 'सोयराबाई शिवरायांच्या निधनानंतर संभाजी राजांच्या विरोधातील कारस्थानात सामील झाल्या होत्या; तेव्हा त्यांची समाधी संभाजीराजे कसे बांधतील,' असा काही अभ्यासकांचा प्रश्न आहे. पण तो तर्कसंगत नाही. सोयराबाई संभाजीविरोधी कारस्थानात सामील झाल्या असल्या, तरी त्या शिवरायांच्या पट्टराणी होत्या. तसंच कट-कारस्थानी बाळाजी आवजीला हत्तीच्या पायाखाली चेचून मारण्याची शिक्षा संभाजी राजांनी दिली, तरीही त्याची समाधी परळीखाली त्यांनी स्वतः बांधली आहे. असा 'सेवक-शत्रू विवेक' चोख सांभाळणारे संभाजीराजे स्वराज्य निर्माणकर्त्या छत्रपतींच्या पट्टराणीची आणि 'निर्मळ मनाची आई' असा एका दानपत्रात उल्लेख केलेल्या सोयराबाईची समाधी रायगडावर बांधणारच नाही, असं ठामपणे म्हणता येत नाही. परंतु 'वाघ्या' स्वार झालेला स्मृती-चौथरा सोयराबाईंचाच असावा, याचा इतिहासपुरावा अजून सापडलेला नाही. परंतु त्यापूर्वीच आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकर यांनी सखोल संशोधनाचा आव आणत सदर स्मृती चौथरा हीच शिवरायांची समाधी आहे आणि वाघ्याचं शिल्प असणं, हा शिवरायांचा अपमान आहे, असा त्रागा 'रायगड एक अभ्यास(भाग १): शोध शिवसमाधीचा' या पुस्तिकेतून व्यक्त केला आहे. ही पुस्तिका २०००मध्ये प्रकाशित झालीय. या पुस्तकाच्या 'प्रास्ताविक'मध्ये गोपाळ चांदोरकर यांनी १९५८मध्ये रायगडावर कसे गेलो; त्यानंतर १९८४पासून रायगडाच्या बालेकिल्ल्याची मापं घ्यायला कशी सुरुवात केली, हे काम करीत असताना तिथे निनाद बेडेकर, प्र.के.घाणेकर, भोपटकर आणि नानिवडेकर या चौकडीची ओळख कशी झाली; 'या चार 'करा'त मी एक पाचवा 'कर' चांदोरकर' जोडला गेलो. कसा; आणि या चौघांच्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झाल्यावर रायगड अभ्यासाला वेगळं वळण, दिशा कशी मिळाली, त्याचं खास ठेवणीतलं वर्णन केलं आहे. चांदोरकरांना भेटलेल्या या चौकडीतल्या निनाद बेडेकरांनीच बाबासाहेब पुरंदरेंसह लालमहालातील शिल्पसमूहात दादोजी कोंडदेवला घुसवण्याचं मार्गदर्शन पुणे महानगरपालिकेला केलं होतं. तर प्र.के.घाणेकरांचं, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड शिवरायांनी बांधलेला नाही, तो आधीपासून होता, असं म्हणणं आहे. यावरून त्यांच्या मैत्रीमुळे कोणतं वळण-दिशा चांदोरकरांना मिळाली, ते सांगायला नको. यातील साऱ्या चलाखीचा समाचार इंद्रजित सावंत यांनी 'शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध' (प्रकाशनः सह्याद्री संशोधन केंद्र, २६२/६, 'ब', गजानन महाराज नगर, रेसकोर्स, मंगळवार पेठ, कोल्हापूर; पृष्ठे ९८, मूल्य १००रु.) या पुस्तकात सविस्तर घेतला आहे. त्यात त्यांनी सांगितल्यानुसार, 'शिवरायांच्या चितेत उडी घेणाऱ्या कुत्र्या'च्या दंतकथेचा उल्लेख लिखित स्वरूपात १९०५मध्ये प्रकाशित झालेल्या चि.ग.गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात झाला आहे. तो असा-महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमीवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे, असे पाहाताच, त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घातली आणि स्वतःस जाळून घेतले. १८१८मध्ये पेशव्याच्या ताब्यात असलेला रायगड इंग्रज सैन्याने लढून ताब्यात घेतला. यावेळी रायगडाजवळील काळकाईच्या डोंगरावरून इंग्रजांच्या तोफखान्याने तुफानी हल्ला केल्याने रायगडाचं प्रचंड नुकसान झालं. यातील एक तोफगोळा रायगडावरील दारूकोठारावर पडल्याने रायगड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शेवटी पेशव्यांचा सरदार, रायगडचा शेवटचा किल्लेदार शेख अबूद यांनी रायगड १० मे १८१८ रोजी इंग्रजांच्या स्वाधीन केला. यावेळी शेख अबूदच्या बरोबर दुसऱ्या बाजीरावची बायको वाराणशीबाई होती, हे विशेष! इंग्रजांच्या ताब्यात रायगड आल्यावर त्यांनी रायगडच्या वाटा खणून बंद केल्या आणि किल्ला तेव्हाच्या वनखात्याच्या ताब्यात दिला. परिणामी, थोड्याच दिवसांत रायगडावर जंगली झाडाझुडुपांचं आणि प्राण्यांचं साम्राज्य वाढलं. रायगड आणि रायगडावरील शिवरायांची समाधी विस्मरणात गेली. या विस्मृतीला इतिहासाच्या अभ्यासामुळे आणि शिवरायांच्या पराक्रमाच्या ओढीने महात्मा जोतिराव फुलेंनी पुसून टाकलं. ते १८६९मध्ये रायगडावर गेले. २-३ दिवसांच्या अथक परिश्रमाने शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला. समाधीची जागा स्वच्छ केली. तिथे फुलं वाहून पूजा केली. ही वार्ता ग्रामभटास कळताच तो तरातरा रायगडावर आला. जोतिरावांनी समाधीवर वाहिलेली फुलं लाथेने उधळत तो म्हणाला, 'अरे कुणबटा, शिवाजीच्या थडग्याचा देव केलास! मी ग्राम जोशी असता दक्षिणा, शिधा देण्याचं राहिलं बाजूस! केवढा माझा अपमान! तुझा शिवाजी काय देव होता म्हणून त्याची पूजा केलीस? तो शूद्रांचा राजा! त्याची मुंजसुद्धा झाली नव्हती!' या प्रसंगाने जोतिराव अपमानित झाले. त्यांनी लिहिलंय, 'ज्यांच्या जीवावर पेशव्यांना राज्य मिळालं त्या शिवप्रभूची पूजासामग्री, या भटभिक्षुकांनी पायाने लाथाडावी काय? मी संतापवायूने वेडा होऊन गेलो. त्यांचं स्मारक म्हणून मी अल्प काव्य केलं आहे. ते त्यांना समर्पण करतो.' हे 'अल्प काव्य' म्हणजे 'कुळवाडी कुलभूषण' हा शिवरायांची कीर्ती सांगणारा त्यांच्या मृत्यूनंतरचा पहिला प्रदीर्घ पोवाडा. या पोवाड्याने आणि त्याआधी जोतिराव फुलेंनी रायगडला दिलेल्या भेटीने छत्रपती शिवराय व रायगडचं महत्त्व लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. यानंतर १८८१-८२मध्ये जेम्स डग्लस हा इंग्रज अधिकारी रायगडावर गेला. त्याने आपल्या 'बुक्स ऑफ बॉम्बे'मध्ये रायगडचं वर्णन लिहून ठेवलंय. त्यात त्याने नकाशासह शिवरायांच्या समाधीचा तपशील सांगितलाय. त्यानंतर १८८५मध्ये मुंबई इलाख्याचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल हेदेखील रायगड पाहाण्यासाठी आले. त्यावेळी शिवरायांच्या या उत्तुंग राजधानीच्या दर्शनाने भारावलेल्या टेम्पल यांनी रायगडावरील अनेक वास्तूंची स्केचेस काढली. त्यांच्या सोबत असलेल्या क्रॉफर्ड यांनी टेम्पल यांच्या या रायगड भेटीवर आधारित 'अवर ट्रबल इन पूना अॅण्ड डेक्कन' हे पुस्तक लिहिलं. ते १८९७मध्ये प्रसिद्ध झालं. या पुस्तकात क्रॉफर्ड यांनी शिवरायांच्या शवाचं दहनस्थळ आणि समाधी यांचं स्वतंत्र चित्र रेखाटलं आहे. जोतिराव फुलेंच्या पोवाड्याप्रमाणेच डग्लस आणि क्रॉफर्ड यांच्या पुस्तकात कुठेही 'वाघ्या कुत्र्याचा वा त्याच्या समाधीचा उल्लेख नाही. मग हा 'वाघ्या' रायगडावर स्वार झाला कसा? ही चि.ग.गोगटे यांच्या पुस्तकाची करणी? अजिबात नाही! नाटककार, विनोदकार आणि कवी अशी ओळख असलेले राम गणेश गडकरी अल्पायुषी होते. (जन्म २६ मे १८८५, मृत्यू २३ जानेवारी १९१९) अफाट कल्पनाशक्ती आणि शब्दशक्ती हा गडकरींच्या साहित्याचा विशेष आहे. कारुण्य आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती त्यांनी आपल्या लेखणीतून सारख्याच प्रभावीपणे साधली आहे. त्यात अतिशयोक्ती असली, तरी त्यांच्या लेखणीनं वाचकांचं आणि प्रेक्षकांचं मन पकडून ठेवण्याचं सामर्थ्य कमावलं होतं. ते शेवटची काही वर्ष क्षयरोगाने आजारी होते. तशाही अवस्थेत त्यांनी भावबंधन नाटकाचा अखेरचा प्रवेश लिहिला आणि थोड्याच वेळात त्यांचं निधन झालं. हे नाटक १९२०मध्ये रंगभूमीवर आलं आणि प्रकाशित झालं. तसंच त्यांचं अपूर्ण 'राजसंन्यास' हे नाटक १९२१मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झालं. या नाटकाची सुरुवातच सौंदर्याच्या मोहनबाधेने धुंद झालेल्या तुळसाला संभाजीराजे रायगडावर आणतात, या प्रसंगाने झालेली आहे. संभाजीराजांचा रंगेलपणा, त्यामुळे शिवरायांशी झालेला त्यांचा मनभेद, आणि शिवरायांच्या पश्चात या साऱ्याबद्दल संभाजीराजांना झालेली उपरती यावर बेतलेलं हे नाटक आहे. संभाजीराजांचा हा रंगेलपणा त्यांची बदनामी करण्यासाठी भटी इतिहासकारांनी रचलेला कट होता, हे इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे, कमल गोखले यांनी पुराव्यांसह सिद्ध केलं आहे. तथापि, राजसंन्यास नाटकावरून या संभाजीविरोधी कटात राम गणेश गडकरीही सामील झाले होते, ह्याची साक्ष मिळते. या नाटकात त्यांनी संभाजीराजांच्या तोंडून रामदासाच्या झोळीत शिवरायांनी मिळवलेल्या स्वराज्याच्या सनदा टाकल्या आहेत. संभाजीराजे म्हणतात, 'राजाने वैराग्याला भीक घातली. खरा शिष्य, खरा सद्गुरू! हाच राजसंन्यास!' गडकऱ्यांच्या कल्पनाशब्दशक्तीचा हा भिकारपणा इतिहास संशोधक न.र.फाटक यांनी 'शिवराय-रामदास भेट' झालीच नव्हती, हे सप्रमाण सिद्ध करून उघडा पाडला. त्यामुळे भाषांप्रभूचं शब्दवैभव अखेरीस तळीरामी झोकांड्याच ठरलं. यातली पहिली झोकांडी त्यांनी नाटकाच्या अर्पणपत्रिकेत मारली आहे. ती वादग्रस्त ठरलेल्या 'वाघ्या कुत्र्यासंबंधाने आहे. या अर्पणपत्रिकेत गडकरी लिहितात, 'इतिहास छातीला हात लावून कथा सांगतो आहे, तेव्हा विश्वासाने ती मुकाट ऐकून घ्यायलाच हवी, थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता. हे समर्था घरीचे श्वास खरोखरीच सर्वांना मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर, प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर, त्या मुक्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आज रायगडावर, त्याची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधीशेजारी मांडीला मांडी लावून बसलेली, तिन्ही लोक डोळ्यांनी पाहात आहेत. त्या समाधीवर, त्या चतुष्पाद पशूची पूजा बांधण्यासाठी, नरदेहाचा नसता अभिमान सोडून, माझ्या या राजसंन्यासाच्या पामर बोलाची-डोंगरपठारीवरच्या या रासवट रानफुलांची पांखरण करून ठेवीत आहे.' नाटक अपूर्ण असताना गडकऱ्यांनी अर्पणपत्रिका आधीच कशी लिहिली, हा प्रश्नच आहे. हा अपूर्ण राजसंन्यास गडकऱ्यांनी रेखाटलेल्या नाटकाच्या आराखड्याच्या टिपणासह पुस्तकरूपात प्रकाशित करणाऱ्याचं तर सिद्धहस्त लेखन कौशल्य नसेल ना? या नाटकात 'जिवाजी कलमदाने' हे कारकुनी पात्र आहे. हा जिवाजी पेहलवान देहूला सांगतो, 'कारकुनाच्या लेखणीप्रमाणे, शेंडा कापून जिभेचाही टाक तोडायचा, जिभेचे कलम करायचे आणि कलमाने दस्तर कुठे गंतवायचा नाही!' अर्पणपत्रिकेबाबत असं झालंही असेल! पण जिवाजीच्या तोंडची पुढची वाक्यं वाचली की, अशी काही शंका राहात नाही. जिवाजी म्हणतो, 'अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती साडेतीन फूट उंचीचा...त्याची काय मातब्बरी सांगतोस एवढी देहू!... म्हणे हिंदूपदपाच्छाई उठवली! काय रे, मोगलाई मोडलीन् मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते? शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंबे आले, का शेळीने आपली पोर वाघाच्या बेट्याला दिली, का कणसातून माणसं उपजली? अरे, केले काय शिवाजीने असे? मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठेशाहीत कवटीवर चढली, एवढाच लाभ! शिवाजी नशिबाचा म्हणून त्याचे नाव झाले इतकेच! त्यातून खरं सांगू?...शिवाजीची खरी लायकी चारचौघांना पुढे कळणार आहे! त्या माणसात काही जीव नव्हता रे!' हे जिवाजी बोलतोय; पण तो गडकरींच्या डोक्याने बोलतोय. हे डोकं ज्यांना उपयुक्त वाटलं, त्यांनीच गडकरींच्या अर्पण पत्रिकेतील वाक्यं 'वाघ्या' कुत्र्याच्या शिलाफलकावर कोरली आहेत. रायगडावरील वादग्रस्त कुत्र्याचं 'वाघ्या' हे बारसंही गडकरींनच केलं आहे. तथापि, गडकरींच्या या काल्पनिक झोकांड्या निर्माण होत असताना 'शिल्पावतारी वाघ्या' रायगडावर नव्हता. तो १९३६मध्ये तिथे आला. बाळ गंगाधर टिळकांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केल्यानंतर रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी 'श्री शिवाजी मेमोरियल ट्रस्ट' स्थापन केला. त्याचे दाजी आबाजी खरे हे अध्यक्ष होते; तर टिळक सेक्रेटरी होते. टिळकांच्या हयातीत हे समाधी जिर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं नाही. ते १९२७मध्ये झालं. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.एम.जी.देशमुख आणि सेक्रेटरी न.चिं.केळकर होते. समाधीचा जिर्णोद्धार झाल्यानंतरही 'रायगड स्मारक समिती'चं पैसे जमवण्याचं काम सुरूच होतं. त्यावेळी महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद जोरात सुरू होता. त्याचे पडसाद 'वाघ्या'च्या रूपात उमटलेले दिसतात. त्याला उजाळा मिळावा, या हेतूने गोपाळ चांदोरकरांनी 'शोध शिवसमाधीचा'चं संशोधनलेखन केलेलं दिसतं. चांदोरकर लिहितात, 'स्मारकासाठी निधी जमवायला काही मंडळी इंदूरला होळकरांकडे गेली. होळकर पडले संस्थानिका तसे पैसे द्यायची त्यांची ऐपत होती. परंतु, शिवस्मारकाला पैसे देणं कदाचित इंग्रज सरकारला आवडणार नाही, याचीही त्यांना मनोमन खात्री होती. तेव्हा ही श्रृंगापत्ती टाळावी म्हणून त्यांनी प्रथमतः समितीच्या सभासदांची गाठ घेण्यास टाळाटाळ केली. कारण सांगितलं, महाराज सुतकात आहेत. सुतक कसलं? तर महाराणीसाहेबांचे लाडके कुत्रे गेले होते, त्याचं सुतक! पण समितीची माणसं चिकाटीची आणि चाणाक्ष असावीत. आपली गरज आणि महाराजांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या स्मारकानिमित्त देणर्ग द्यावी आणि त्या देणगीचा काही अंश खर्चुन समितीने त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही, इंग्रज अवकृपेची भीती नाही! तोडगा उपयोगी पडला!' या तोडग्यानुसार जे पैसे मिळाले,ल्या पैशाने आज जिथे मेघडंबरी शिवसमाधी म्हणून आहे, त्या जवळच्या दुर्लक्षित चौथऱ्यावर कुत्र्याचं शिल्प उभारण्यात आलं. या कुत्र्याखालचा चौथरा हीच खरी 'शिवसमाधी' आहे, असं गोपाळ चांदोरकरांचं म्हणणं आहे. 'एका संस्थानिकाची लहर, एका कवीची कल्पना आणि समितीची पैसे जमवण्याची हातोटी, यातून वाध्याचा ऐतिहासिक वा तार्किक शक्यता नसलेला पुतळा उभारला गेला,' अशीही मल्लिनाथी चांदोरकर यांनी केली आहे. यातील एका संस्थानिकाची लहर' हे त्यांच म्हणणं भटीभेजाला साजेसं असलं, तरी ते तर्काला धरून नाही. कारण त्यावेळी इंदूरच्या गादीवर तुकोजी होळकर होते. ते शिवप्रेमी होते. राजर्षि शाहूंनी पुण्यात पायाभरणी केलेल्या शिवस्मारकाला तुकोजीरावांनी मोठी देणगी दिली होती. वेंगुर्त्यांचे कृष्णराव अर्जुनराव केळुसकर (जन्म १८६०, मृत्यू १९३४) यांनी पहिलं 'शिवचरित्र' लिहिलं. त्याच्या होळकरांनी शेकडो प्रती विकत घेऊन जगभरातल्या ग्रंथालयांना धाडल्या होत्या. त्याचं शिवराय प्रेम आणि आदर, राजर्षि शाहू, बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड, फलटणचे राजे निंबाळकर यांच्याप्रमाणे उघड होता. त्यांना शिवसमाधी जीर्णोद्धाराला मदत करताना इंग्रज सरकारला घाबरण्याचं कारणच नव्हतं. तसंच इंग्रज सरकारलाही शिवरायांच्या जीवन-कार्याबद्दल तिटकारा नव्हता. उलट आदरच होता. म्हणूनच इंग्रज सरकार पहिल्या महायुद्धाच्या वेळेस वर्तमानपत्रातून शिवरायांचा मोठा फोटो छापून 'शिवरायांचे तुम्ही वारस आहात, तेव्हा सैन्यात भरती व्हा, असं आवाहन करीत होतं. १८८६, १८९१, १९११ या काळात इंग्रज सरकारने पुढाकार घेऊन शिवसमाधीची डागडुजी केली. तिथे दररोजच्या दिवाबत्तीची सोय केली. हा इतिहास दर्लक्षून गोपाळ चांदोरकर तुकोजीरावांच्या दानशूरतेला 'एका संस्थानिकाची लहर' म्हणून हिणवतात, तेव्हा तो जातीय तेढ वाढवणारा हिणकस डावपेच ठरतो. होळकर हे धनगर. म्हणूनच त्यांनी कुत्र्याच्या स्मारकाला देणगी दिली; पण शिवस्मारकाला दिली नाही, असंच गोपाळ चांदोरकरांना सुचवायचं असावं. हे सुचवणं संतापजनक व्हावं यासाठी खऱ्या शिवसमाधीवर होळकरांच्या लहरीपणामुळे कुत्रा बसला, असं तर्कट ते मांडत आहेत. आणि तेच मान्य करायला भाग पाडून वर उपायांचा आगाऊपणाही करीत आहेत, तो संतापजनक आहे. 'वाघ्याच्या शिल्पाखालील चौथरा ही सोयराबाईंची समाधी असण्याची शक्यता आहे,' असं इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे. तथापि, कुत्र्याचं शिल्प हा प्रत्यक्षात आलेला काल्पनिक बनाव आहे. यावर दोघांचं एकमत आहे. इतिहासही तेच सांगतोय, तथापि, इतिहास म्हणजे कल्पनाविलास नाही, हे न कळणाऱ्या भाषाप्रभूची आणि त्या कल्पनाविलासाला ऐतिहासिकतेचा साज चढवून स्वार्थ-अहंकारांची खाज भागवणाऱ्यांना हा माज कधीतरी आपल्यावरती उलटेल, याचा अंदाज नसणाऱ्यांची कधीतरी माती होतेच. अशा मातीमोल लायकीच्यांना वसंत कानेटकरांनी 'शिवशाहीचा शोध' या आपल्या अखेरच्या ग्रंथात 'नतद्रष्ट' म्हटलंय. रायगडावरून वाघ्याच्या शिल्पाला नष्ट करताना, खोटा इतिहास सांगणाऱ्या नतद्रष्टांच्या हरामखोरीचीही माती केली पाहिजे.
तालुक्यातील एका गावातील प्रेमी युगुलाने घरच्यांकडून प्रेमाला विरोध होत असल्याने 10 दिवसांच्या कालावधीत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुलीने शेततळ्यात तर मुलीच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. पोलीसांनी तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दोघांचे गावातच प्रेमाचे सूत जुळले. मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट माहिती होताच त्यांनी तिच्याकडून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यामुळे प्रियकराचा विरह तिला सहन न झाल्याने ती घर सोडून निघून गेली. याप्रकरणी तिच्या घरच्यांनी तरुणी बेपत्ता असल्याची खबर पारनेर पोलीस ठाण्यात नोंदवली. याप्रकरणी संशय या तरुणावर असल्याने पारनेर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. परंतु नंतर लगेच सोडूनही देण्यात आले. दोन दिवसांनी गावातील एका शेततळ्यामध्ये मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पारनेर पोलिसांनी पंचनामा व उत्तरीय तपासणी करून आकस्मित मृत्यूची नोंद केली. गेल्या 10 ते 12 दिवसांत मोठ्या प्रमाणावर याप्रकरणी घडामोडी घडल्या. घटनेतील तरुणाला मोठा मानसिक त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मानसिक त्रासातून की मुलीच्या विरहामुळे त्याने आत्महत्या केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेतील तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये स्थानिक तीन नावे असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक फौजदार बी. बी. भोसले यांनी दिली. यासंबंधी कुणी फिर्याद दिली तर या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. असेही पारनेर पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे तपासी अधिकारी सहायक फौजदार भोसले यांनी चिठ्ठी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भारतीय समाज व्यवस्थेत विवाह हा नेहमीच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. तथापि लोक यासाठी काही वेळेची प्रतीक्षा करतात. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी वयाची 40 आणि 50 वर्षे ओलांडल्यानंतरही लग्न केलेलं नाही. या यादीत पहिलं नाव येतं ते सलमान खान आणि सुष्मिता सेन यांचं. हा असा प्रश्न बनला आहे की याचे उत्तर कोणाकडेच नाही. पण खुद्द अभिनेत्रीनेच एकदा हे गुपित उघड केले होते. सलमानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. आणि त्याचे चाहते नेहमी प्रार्थना करतात की त्यानं लवकरात लवकर लग्न करावं. या प्रश्नाचे उत्तर एकदा अभिनेत्री सुष्मिता सेनने दिले होते. एका फॅशन शोमध्ये शोस्टॉपर बनलेल्या सुष्मिता सेनला याबद्दल विचारण्यात आलं होतं. ज्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही हे प्रश्न त्यांनाच विचारत आहात जे अविवाहित असल्याचा आनंद साजरा करताय. तो अविवाहित नाही कारण त्याला कोणीही सापडत नाही अश्यातला भाग नाही. त्याने स्वतःच्या इच्छेनुसार अविवाहित राहणे निवडले असावे. आता सुष्मिताचा हा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आजही सलमान खानला लोकांकडून एलिजिबल बॅचलरचा टॅग मिळत आहे. त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर होते. दुसरीकडे सुष्मिता सेन सिंगल मदर आहे. तिने 2000 मध्ये रेनी आणि 2010 मध्ये अलिसा या दोन मुलींना दत्तक घेतलेलं आहे. ती मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती परंतु काही कारणास्तव नंतर दोघे विभक्त झाले. सलमान आणि सुष्मिताने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. सलमान खान आणि सुष्मिता सेन यांची मैत्री खूप जुनी आहे. दोघांनी 'बीवी नंबर 1', 'मैंने प्यार क्यूं किया' आणि 'तुमको ना भूल पायेंगे' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अलीकडच्या काळात सुष्मिता तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चित आहे. ललित मोदींसोबत असलेल्या संबंधांमुळे तिचे नाव अधिकच चर्चेत आहे.
Seema Khan: काही दिवसांपूर्वीच सोहेल व सीमा विभक्त होत असल्याची माहिती समोर आली. जवळपास २४ वर्ष एकमेकांसोबत नेटाने केलेला संसार आता ते मोडणार आहेत. बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या 'खान'दान कुटुंबात गेल्या काही काळापासून अनेक उलथापालथ सुरु आहे. एकीकडे सलमान खानने (salman khan) अद्यापही लग्न केलेलं नाही. तर दुसरीकडे त्याच्या भावांचे संसार उद्धवस्त होत आहेत. ५ वर्षांपूर्वी मलायका अरोरा (malaika arora) आणि अरबाज खान (arbaaz khan) यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यांच्यानंतर आता सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) व त्याची पत्नी सीमादेखील (Seema Khan) विभक्त होण्यास निघाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोहेल व सीमा विभक्त होत असल्याची माहिती समोर आली. जवळपास २४ वर्ष एकमेकांसोबत नेटाने केलेला संसार आता ते मोडणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या दोघांच्या घटस्फोटाचं कारण अद्यापतरी समोर आलं नसलं. तरीदेखील हे दोघंही त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता सीमाने सोशल मीडियावरील तिचं नाव बदललं आहे. सध्या सोशल मीडियावर सीमा खानच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सीमाने तिचं नाव चेंज केलं आहे. त्यामुळे सीमा खान ऐवजी आका तिने सीमा किरण सचदेव हे नाव लावलं आहे. दरम्यान, सोहेल आणि सीमा यांनी १९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. या दोघांची पहिली भेट अभिनेता चंकी पांडे यांच्या साखरपुड्यात झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली व या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. परंतु, सीमा व सोहेल यांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळे या लग्नात थोडा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, सोहेलने एका मौलवींना किडनॅप करुन सीमासोबत लग्न केलं होतं.
मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे. इंद्रपाल कटकवार । भंडारा : मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे. संचारी ही भंडारा (उमरी) येथील महर्षी विद्या मंदिर शाळेची इयत्ता नववीची विद्यार्थीनी असून तिने नुकतेच दिल्ली येथे झालेल्या 'खेलो इंडिया खेलो' या स्पर्धेअंतर्गत व्हॉली बॉल स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले आहे. व्हॉली बॉल व धावण्याच्या स्पर्धेत सातत्याने भाग घेणारी संचारी ही अभ्यासामध्येही तेवढीच हुशार आहे. विज्ञान, गणीत, हिंदी, संगणक, सामाजिक शास्त्र आदी विषय शिकत असलेल्या संचारीला खेळण्याची सवय बालपणापासूनच. आई संध्या भोवते या क्रीडा शिक्षक असल्याने क्रिडांगणातील विविध खेळांचे बाळकडू सातत्याने मिळत राहिले. इयत्ता पाचवी पासून व्हॉलीबॉल खेळत असलेल्या संचारीने खेलो इंडिया खेलो या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. तालुका, जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय व त्यानंतर राज्यस्तरावर सहभाग घेवून दिल्ली येथे होणाºया राष्टÑीय स्पर्धेसाठी दमदार एन्ट्री मारली. शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जावा असे उत्कृष्ट खेळ सादर करुन संचारीने रजत पदकाचा मान मिळविला. अव्वल स्थान प्राप्त करता आले नाही अशी खंतही तीने व्यक्त केली असली तरी भविष्यात अव्वल येण्याचा आपला मानस असल्याचेही तिने प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. तिच्या या यशामागे शाळेच्या प्राचार्य श्रृती ओहळे, क्रीडा शिक्षक तथा मार्गदर्शक एन. एस. उईके व आई-वडीलांचा मोलाचा वाटा आहे. संचारीचे वडील पोलीस विभागात कार्यरत असून तिचा मोठा भाऊ बीबीए अंत्य वर्षात शिक्षण घेत आहे. चार्टेड अकांउटंट किंवा खेळाच्या माध्यमातून भविष्यात रेल्वेत किंवा सिव्हील एव्हीएशनमध्ये कार्य करण्याची तिची ईच्छा आहे.
भोसे :- मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील कोरे वस्ती डी. पी. वरील शेतीपंपाची बिले भरून देखील ट्रान्सफॉर्मर जळल्यानंतर आता बिले भरली तरच ट्रान्सफॉर्म दिला जाईल अन्यथा नाही अशी तुघलकी भूमिका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याने या परिसरातील शेतीच्या पाण्यासह व जनावरांचे गेल्या पंधरा दिवसापासून हाल होत आहेत. भोसे शिरनांदगी रस्त्या शेजारील कोरे वस्तीवरील शेती पंपाला पाणीपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळून पंधरा दिवस झाले असून या परिसरातील शेतकऱ्यांकडे जर्सी गाईंची व जनावरांची संख्या जास्त असल्याने जनावरांची व शेतकऱ्यांचे पाण्या वाचून हाल होत आहेत ट्रान्सफॉर्म जळाल्यानंतर आठ दिवस मंगळवेढ्याचे मुख्य अभियंता चोरमुले यांना आठ दिवस वारंवार कळवून देखील आठ दिवसानंतर ट्रान्सफॉर्मर काढून नेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळ काढू पण केला असून ट्रान्सफॉर्मर नेऊन आठ दिवस उलटले तरी ट्रांसफार्मर दिला जात नाही वारंवार चौकशी केली असता बिले भरली तरच ट्रान्सफॉर्म दिला जाईल अधिकारी वारवार सांगत आहेत. कोरे डीपी वरील शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी संजीवनी योजनेत गावामध्ये सर्वप्रथम बिले भरून देखील ट्रान्सफॉर्मर् जळाल्यानंतर महावितरण कडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या पंधरा दिवसापासून कोरे वस्ती परिसरातील शेतकरी व जनावरांना केवळ विजेअभावी पाण्यासाठी वणवणं भटकंतीची वेळ आली. थकीत बिलासाठी वीज जोड तोडल्यानंतर सदर जोडणी पूर्ववत करण्याचे आदेश असताना आता डीपीच्या नावाखाली वसुलीचा तुगलगी आदेश महावितरण कोणत्या अधिकाराखाली करत आहे असा सवाल येथील शेतकऱ्यातून विचारला जात आहे. राजकीय नेते आणि शेतकऱ्याशी संबंधित संघटना देखील या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. कृषिसंजीवनी योजनेत आमचे डी पी वरील बिल वेळच्या वेळी भरून देखील महावितरणचे अधिकारी मुद्दाम डी पी जळाल्यानतर वेळ काढूपणा करत असल्याने याची चौकशी होने गरजेचे आहे पाण्याअभावी सध्या जनावराचे हाल सुरु आहेत महावितरन् कंपनीस आमचा डी पी तत्काळ देणे जमत नसेल तर आमचा डी पी परत आहे त्या अवस्थेत द्यावा. अशी भूमिका महावितरण घेतल्यावर बिलाची वसुली होऊ शकते का ? याचा देखील विचार अधिकाऱ्याने गांभीर्याने करणे गरजेचे आहे.
मुंबई, 16 ऑक्टोबर । भारतीय आयपीओ बाजाराच्या दृष्टीने 2021 हे वर्ष अधिक चांगले सिद्ध होऊ शकते. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO शेअर बाजारात आणणार आहेत. 2021 च्या पहिल्या नऊ महिन्यांत 9. 7 अब्ज डॉलर्सच्या कमाईसह भारत जगातील अव्वल आयपीओ बाजारात आपले स्थान निर्माण करू शकतो. विशेष म्हणजे ही रक्कम एकूण जागतिक आयपीओ फंडाच्या केवळ 3 टक्के (Gita Renewable Energy Ltd Share Price) आहे. सध्या शेअर बाजारात दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरशः मालामाल झाले आहेत. Gita Renewable Energy Ltd Share Price. Shares of Geeta Renewable Energy Company have yielded 4130 per cent returns to investors over the past year. The stock was valued at Rs 5. 52 on October 13, 2020 last year. The stock was traded at Rs 233. 50 on October 14, 2021. The stock had touched Rs 300 in the interim : आगामी काही महिन्यांमध्ये मुंबई बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. सध्या शेअर बाजारात गीता रिन्यूएबल एनर्जी या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात गीता रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 4130 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 13 ऑक्टोबर 2020 रोजी या समभागाची किंमत 5. 52 रुपये इतकी होती. 14 ऑक्टोबर 2021 रोजी याच समभागाची किंमत 233. 50 रुपये नोंदवण्यात आली. मध्यंतरी या समभागाची किंमत 300 रुपयांवर जाऊन पोहोचली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात या समभागाची किंमत 120 रुपयांपर्यंत घसरली होती. IPO चे पूर्ण रूप म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची संधी सामान्य जनतेला देते, तेव्हा ही प्रक्रिया IPO द्वारेच पूर्ण होते. आयपीओ लाँच आणि शेअर्सचे वाटप झाल्यानंतर कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग केली जाते. साधारणपणे कोणत्याही कंपनीच्या आयपीओची सुरुवातीची किंमत कमी असते. तथापि, शेअर बाजारात लिस्टिंग केल्यानंतर, त्याच्या शेअरच्या किमती बाजारानुसार वाढत किंवा कमी होत राहतात. कोणतीही कंपनी गुंतवणूकदारांना त्याच्या विस्तारासाठी IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करते. भारतीय आयपीओच्या दृष्टीकोनातून 2021 हे वर्ष खूप चांगले गेले आहे. यावर्षी अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले आहेत. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO लाँच करणार आहेत. जेव्हाही एखादी कंपनी आपला IPO बाजारात आणते तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी काही काळासाठी IPO खुली ठेवते. साधारणपणे हा कालावधी 3 ते 10 दिवसांचा असतो. याचा अर्थ गुंतवणूकदाराकडे कोणताही आयपीओ खरेदी करण्यासाठी 3 ते 10 दिवस असतात. या दरम्यान, गुंतवणूकदार कंपनीच्या वेबसाइटवर किंवा नोंदणीकृत दलालीद्वारे त्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतो. उघडण्याच्या समाप्तीनंतर, कंपनी वाटप करते आणि त्यानंतर शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होतात. महत्वाचंः तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील 'फॉलो (Follow) ' बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. News Title: Gita Renewable Energy Ltd Share Price touched to Rs 233 level on BSE. - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?
अकोलाः अकोट फैलमधील रहिवासी कुणाल दीपक सांगळे यास एका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शनिवारी रात्री युवकास विष पाजले. अकोलाः अकोट फैलमधील रहिवासी कुणाल दीपक सांगळे यास एका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शनिवारी रात्री युवकास विष पाजले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास सर्वोपचार रुग्णालयात शनिवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीनंतर पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेतले आहे. याच महिलेने युवकाचा खून केला की नाही, यासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. सदर महिलेच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसत नसल्याने यामध्ये गौडबंगाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बटाट्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. बटाट्याची सालं फेकून न देता त्वचेवर लावल्यानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. अशा या बहुगुणी बटाट्याचे त्वचेसाठी अनेक उपयोग असून, त्याबाबतची माहिती घेऊ या. बटाट्यात झिंक, आयर्न, प्रोटीन आणि अॅझलिक अॅसिड हे घटक असतात. ही पोषणमूल्यं त्वचेचा रंग उजळण्यास, पोत सुधारण्यास, त्वचेवरचे काळे डाग कमी करण्यास उपयुक्त ठरतात. ठरावीक कालावधीसाठी बटाट्याच्या रसाचा वापर केल्यास काळे डाग , मुरमं, त्वचेवरचे चट्टे कमी होतात. त्वचा उजळण्यासाठी, टॅन कमी करण्यासाठी अनेक जण ब्लीच करतात. स्कीनसाठी आवश्यक असणारं प्रोटीन बटाट्यात असतं. त्वचेमधल्या पेशींना हे प्रथिन मिळाल्यावर त्वचा नितळ, मऊ होते आणि रंगही एकसारखा उजळतो. त्वचेवरचे काळे डाग, चट्टे घालवण्यासाठी बटाट्याची सालं परिणामकारक ठरतात. अॅझलिक अॅसिडमुळे काळे डाग फिकट होतात व त्वचा उजळते. बटाट्यामध्ये ब्लीचिंग करणारं catecholase असतं. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा त्यामुळे उजळते. तसंच इतरही व्रण कमी होतात. बटाट्यात क जीवनसत्त्व असतं. ते नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतं. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे काळी वर्तुळं, सुरकुत्या कमी होतात व त्वचा एकसारखी दिसते. बटाट्याच्या साली कशा वापराव्यात? - बटाटा धुऊन साली काढून घ्याव्यात. ही सालं चेहऱ्यावर घासावीत. 5-10 मिनिटं तसंच ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवावा. उन्हामुळे काळवंडलेल्या भागाची जळजळ यामुळे कमी होते व त्वचा उजळते. - बटाट्याचं साल व टोमॅटोचा रस एकत्र करावा. त्यात थोडी हळद घालून तो पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावावा. 10-15 मिनिटं ठेवून धुवावं. टोमॅटोच्या रसाऐवजी काकडीचा रसही यात घेऊ शकता. - बटाट्याची सालं बारीक करून घ्यावीत. त्यात काही थेंब लिंबाचा रस घालावा. हा पॅक त्वचा उजळण्यासाठी उपयोगी ठरेल. - बटाट्याची दोन सालं फ्रीजमध्ये ठेवावीत. ही थंड सालं डोळ्यांच्या खाली ठेवावीत. यामुळे डोळ्याच्या खालच्या भागातली सूज व काळी वर्तुळं कमी होतात. बटाटा नैसर्गिकरीत्या त्वचेचा पोत सुधारतो; मात्र काही जणांना बटाट्याची अॅलर्जी असते. यामुळे सरसकट चेहऱ्यावर लावण्याआधी शरीराच्या वेगळ्या भागावर प्रयोग करून पाहावा. काही त्रास न झाल्यास चेहऱ्यावर वापर करावा. त्वचेचा रंग उजळण्यासाठी व नैसर्गिक ब्लीच करण्यासाठी बटाट्याचा उपयोग होतो. घरच्या घरी व सोप्या पद्धतीने हे उपाय करता येऊ शकतात. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनिकरणासाठी एसटी कामगारांचा सुरू झालेला संप अद्यापही कामय आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती एसटी कामगारांसोबत संपात उतरलेले भाजपा नेते गोपिचंद पडळकर यांनी दिली. गोपिचंद पडळकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही अनेक मुद्दे राज्य सरकार समोर मांडले. अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव असो किंवा विलीनीकरणाचा असो एकंदरीत चर्चा सकारात्मक झालेले आहे. विलीनीकरणाच्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत. संध्याकाळी सहा वाजता याबाबत अधिकृत निर्णय होईल तो जाहीर केला जाईल, असे गोपिचंद पडळकर यांनी सांगितले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून सुरू असला तरी आणि एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार नाही, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन राज्यभरातील बससेवा ठप्प झाली असतानाच विद्युत बस भाडेतत्त्वाने घेण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला महामंडळाने ९ नोव्हेंबरला 'वर्क ऑर्डर' दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीची 'शिवाई' विद्युत बसची बांधणी रखडलेली असतानाच खासगी विद्युत बससाठी थेट 'वर्क ऑर्डर' देण्याचा प्रकार पाहता, हे खासगीकरणच असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. खासगी शिवशाहीच्या धर्तीवर महामंडळाच्या या बस धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
शहरातील बिल्डरांनी पंतप्रधान आवास योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यांचे सहकार्य मिळत नसल्याने ही योजना राबवणे अशक्य झाले आहे, असा गौप्यस्फोट शनिवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी केला. स्थायी समितीच्या बैठकीत शेख नवीद यांनी पंतप्रधान आवास योजनेचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, या योजनेत शहरात अद्याप कोणतेच काम झाले नाही. महापालिकेचे प्रशासन यात नेमके काय करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी याबद्दल उपअभियंता शेख खमर यांना खुलासा करण्यास सांगितले. खरम यांनी या योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची माहिती दिली. बिल्डरच पुढे येत नाहीत. त्यामुळे योजना राबवताना अडचणी येतात, असे ते म्हणाले. २० बाय ३०च्या प्लॉट व बांधकामासाठी परवानगी मिळत नाही. या बांधकामांना परवानगी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यावर सभापती म्हणाले, बिल्डरांना माझ्या लेटरहेडवर पत्र द्या आणि त्यांची बैठक आयोजित करा. २० बाय ३० च्या बांधकामांची यादी नगरविकास विभागाकडून घ्या आणि ती यादी सर्वसाधारण सभेत ठेवा. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर तो प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवा. \Bपार्किंगच्या जागांबद्दल धोरण ठरविण्यासाठी आयुक्तांनी समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच पार्किंगबद्दलचे धोरण ठरवेल, अशी माहिती या समितीचे अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. स्थायी समितीच्या सदस्य शिल्पाराणी वाडकर यांनी पार्किंगच्या जागांचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत मांडला. त्या म्हणाल्या, पार्किंगबद्दलचे धोरण सहा आठवड्यात ठरवा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या आदेशाचे पालन केले जाणार आहे का ? पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याबद्दल यापूर्वीही हायकोर्टाने आदेश दिले, पण त्याचे पालन महापालिकेने केले नाही. आदेशाचे पालन न करणे हा हायकोर्टाचा अवमान आहे. आता तरी हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. गजानन बारवाल म्हणाले, पार्किंगच्या जागांबद्दलचे नियोजन कसे करणार याचा खुलासा करा. अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांनी खुलासा केला. ते म्हणाले, पार्किंगच्या जागांबद्दल आयुक्तांनी समिती स्थापन केली आहे. पार्किंगबद्दलचे धोरण लवकरच ठरवले जाईल. चार - पाच जागा पार्किंगसाठी ठरविण्यात आल्या आहेत. \Bलेखा विभागाच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या साडेअठरा कोटींच्या पेमेंटबद्दल चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने दिले आहेत. या चौकशीचे काय झाले, किती दिवसात चौकशी पूर्ण केली जाणार आहे, असा सवाल गजानन बारवाल यांनी केला. अतिरिक्त आयुक्त भालसिंग म्हणाले, चौकशीसाठी आयुक्तांनी समिती स्थापन केली आहे. मात्र, मुख्य लेखाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. त्यांनी कोणतीच माहिती समितीला दिली नाही. यावर सभापती म्हणाले, मुख्य लेखाधिकारी सहकार्य करीत नसतील, तर त्यांच्यावर अगोदर कारवाई करा आणि त्यानंतर चौकशी करून त्याचा अहवाल स्थायी समितीसमोर सादर करा. \Bशहरातील स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्याचा मुद्दा काही महिन्यांपासून गाजू लागला आहे, पण अद्याप या कर्मचाऱ्यांना मानधन सुरू करण्यात आले नाही. याबद्दल शेख नवीद यांनी प्रश्न मांडला. सभापतींनी अतिरिक्त आयुक्तांना या बद्दल खुलासा करण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांचे प्रकरण अस्थापना विभागाशी निगडित आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. यावर अतिरिक्त आयुक्त म्हणाले, स्मशानभूमी आणि कब्रस्तान आरोग्य विभागाकडे वर्ग केले आहेत. मानधनाबद्दल या विभागानेच निर्णय घ्यायचा आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, या बद्दलची फाइल कालच विभागाला प्राप्त झाली आहे. तेथील कर्मचाऱ्यांची नियुक्ती अस्थापना विभागाकडून झाली आहे. यावर सभापती म्हणाले, अतिरिक्त आयुक्तांनी महसूल विभागाच्या उपायुक्त आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्याबरोबर बसून निर्णय घ्यावा.
नवी दिल्ली : देशाची पहिली खासगी रेल्वे देशाच्या सेवेत दाखल झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तेजस एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे लोकार्पण केले. लखनऊ ते नवी दिल्ली या मार्गावर ही नवीन रेल्वे धावणार आहे. आयआरसीटीसीद्वारे संपूर्णपणे चालविण्यात येणारी ही देशातील पहिली खासगी रेल्वे आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेजस रेल्वेचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी तेजस रेल्वेमधून पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी त्यांनी तेजस रेल्वे ही देशातील पहिली कॉर्पोरेट रेल्वे आहे. देशात या रेल्वेच्या माध्यमातून अनेक शहरांना विकासासोबत जोडण्यास मदत होणार असल्याचे यावेळी आदित्यनाथ यांनी म्हटले. देशातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी सोयीची असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. विशेष गाडीचा क्रमांक 00501 आहे. ही गाडी कानपूर आणि गाझियाबाद मार्गे नवी दिल्लीकडे जाईल तर 6 ऑक्टोबरपासून ट्रेन नियमितपणे सुरू होणार आहे. रेल्वेचा पहिला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीतर्फे मोफम भोजन देण्यात येणार आहे. तसेच भेटवस्तूदेखील दिली जाणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव, आयआरसीटीसी सीएमडी खासदार माल, ईशान्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव अग्रवाल, आयआरसीटीसीचे सीआरएम अश्विनी श्रीवास्तव यांच्यासह अनेक रेल्वे अधिकारी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते.
दोहा - स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याने जवळपास एक वर्षांनी व्यावसायिक टेनिस स्पर्धेत थाटात पुनरागमन केले. त्याने येथे सुरू असलेल्या कतार ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीच्या सामन्यात डॅनियल इव्हान्सचा 7-6, 3-6 व 7-5 असा पराभव केला. हा सामना तब्बल अडीच तास चालला व त्यात फेडररने आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना आपल्या अनुभवाच्या जोरावर कोणतेही दडपण न घेता अखेरचा निर्णायक सेट टायब्रेकमध्ये जिंकला. वयाच्या 39 व्या वर्षी फेडररने थाटात केलेले पुनरागमन त्याच्या चाहत्यांनाही सुखावून गेले. करोनाचा धोका वाढल्यानंतर त्याने अमेरिकन तसेच ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली होती. तसेच त्याला स्नायूंच्या दुखापतीनेही त्रस्त केले होते. मात्र, त्याने मेहनत घेत व तंदुरुस्ती सिद्ध करत पुनरागमन केले.
ऐतिहासिक, ऐतिहासिक, इतिहासकार आणि इतिहासाच्या आधी अनिश्चित लेख , वापरा, नाही. - 25 मे, 1 9 61 रोजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ऐतिहासिक भाषण दिले "माझा विश्वास आहे की या राष्ट्राला आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला शिथिल करावे, या दशकापूर्वीच चंद्रावर एक मनुष्य उतरता येईल व त्याला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येईल". - "हडसन रिवर व्हॅली, त्याच्या समृद्ध मते आणि समृद्ध सांस्कृतिक परिदृश्यांसह, देशातील सर्वाधिक धोका असलेले ऐतिहासिक स्थल बनले आहे कारण विद्युत उपकरणे आणि अन्य उद्योगांनी अतिक्रमण करणे" (विन्नी हू, "औद्योगिक वाढ शांततेने हडसन नदी खोरे, गट चेतावणी देते. " द न्यू यॉर्क टाईम्स , जून 27, 2000) - "बाबांनी ऐतिहासिक तथ्ये लक्षात ठेवली, जसे प्रत्येक अध्यक्ष ज्या पदावर कार्यरत होते, आणि स्वतः ला शांत करण्याच्या प्रयत्नात त्या तारखा त्याने पुन्हा मागितल्या. " (एम्बर डरमोंट, "लिंडन. " नुकसान नियंत्रण , 2013) - "तुम्ही हौशी शहरी पुरातत्त्ववेत्ता आहात का? तुम्ही तुमच्या शहरातील ऐतिहासिक खजिना शोधता का, मग ते माडलकिंग किंवा मेटलचा शोध लावणार आहात? " ("शहरी पुरातत्वः आपल्या शहरातील कोणती ऐतिहासिक वस्तू आपल्याला सापडली आहेत? " गार्डियन [यूके], सप्टेंबर 14, 2016) - "चार प्रमुख [कागदपत्र], ऐतिहासिक राजा आर्थरचा सर्वात जवळचा स्त्रोत, ऐतिहासिकदृष्ट्या मुळ व सर्वात विश्वासार्ह म्हणून स्वीकारला जातो. " (फ्रॅंक डी. रेनो, ऐतिहासिक राजा आर्थर , मॅक्फारलँड, 1 99 6) - "हि एक ऐतिहासिक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे न्याय, कारण व्याख्यानेमध्ये ते काही महत्वाचे वर्णन करते परंतु परंतु ऐतिहासिकदृष्ट्या न्युट अल टर्म आहे, जो (भूतकाळातील) भूतकाळातील सर्व गोष्टींचे वर्णन करते. " (फिलिप गुइडेन, हू व्हेन्स : ए नो-नोन्सन्स गाइड टू ट्रिपल कॉन्फ्यूज्ड वर्ड . वॉकर एंड कंपनी, 2004) - " आम्ही म्हणतो की या लहानशा गावात राष्ट्रपतींनी भेट ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक घटना आहे का? हा कार्यक्रम ऐतिहासिक होता . उल्लेखनीय गोष्ट जी ऐतिहासिक , संस्मरणीय किंवा प्रसिद्ध आहे तेव्हा ऐतिहासिक (ग्रीक इतिहास , 'शिकलेला मनुष्य') वापरा. हे खरंय, ते इतिहासात सापडेल आणि खरं तर, ऐतिहासिक असू शकते परंतु इतिहासाच्या संदर्भात किंवा इतिहासाशी संबंधित असलेल्या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. दुसऱ्या शब्दांत, इतिहासाशी ऐतिहासिक गोष्टी करणे आवश्यक आहे; ऐतिहासिक सहसा घटना किंवा गोष्ट स्वतः संबंधित. आर्मस्ट्राँग चा चाँद वर चालणे एक ऐतिहासिक कार्यक्रम होता. हे इतिहास निर्माण होते अलामो एक ऐतिहासिक इमारत आहे; गॉन विद द विंड हा एक ऐतिहासिक कादंबरी आहे. " (मॉर्टन एस. फ्रीमन, द वडवेटर्स गाइड टू गुड राइटिंग अँड ग्रामर . राइटर्स डायजेस्ट बुक्स, 1 99 0) (अ) अमेरिकेतील पॉप संस्कृतीत बीटल्सचे पहिले स्वरूप एड सालिव्हान शो खरोखरच _____ क्षण होते. (बी) "सर्व _____ बदल अखेरीस दुसर्या शासक वर्ग बदलण्यासाठी खाली उकळणे. " (जॉर्ज ओरवेल, "जेम्स बर्नहॅम आणि प्रबंधकीय क्रांती," 1 9 46) (ए) अमेरिकन पॉप कल्चरमध्ये एडी सुलिवन शोवरील बीटल्सचे पहिले स्वरूप खरोखरच ऐतिहासिक क्षण होते. (बी) "सर्व ऐतिहासिक बदल अखेरीस एक शासक वर्ग बदलण्यासाठी दुसर्या खाली उकळणे. " (जॉर्ज ओरवेल, "जेम्स बर्नहॅम आणि प्रबंधकीय क्रांती," 1 9 46)
मुख्य माहिती आयुक्तांची बाजू ऐकण्याची इच्छा उच्च न्यायालयाने व्यक्त केल्याने राकेश मारियांसमोर नव्या अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या काळात पोलिस नियंत्रण कक्षाशी झालेल्या संभाषणाच्या पुरावा नोंदीविषयी विसंगत माहिती दिल्याने राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांनी निवृत्त पोलिस महासंचालक राकेश मारिया यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते. त्याला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारने केली असून त्यात मुख्य माहिती आयुक्तांची बाजू ऐकण्याची इच्छा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. सध्या निवृत्त झालेल्या मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी जुलै, २०१४मध्ये आदेश देऊन निवृत्त अथवा सेवेतील न्यायमूर्तींमार्फत या संभाषण पुराव्याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या चौकशीचा संबंध मारिया यांच्याशी असल्याने सरकारने गायकवाड यांच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली होती. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याने मारिया यांच्याविरुद्ध चौकशी केली जावी, असे मुख्य माहिती आयुक्तांनी त्यांच्या आदेशात म्हटले होते. न्या. एन. एच. पाटील व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सध्या सुनावणीला आहे. आम्हाला या प्रकरणी निकाल देण्याअगोदर मुख्य माहिती आयुक्तांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल, असे मंगळवारच्या सुनावणीत नमूद करीत न्यायालयाने १५ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली. मुंबईतील २६/११च्या हल्ला प्रकरणात विनिता कामटे यांनी हल्ल्याच्या दिवशी पोलिस नियंत्रण कक्षाशी झालेल्या संभाषणाचा तपशील मागितला होता. आपल्याला देण्यात आलेला तपशील खोटा असून २६/११ हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्याविरुद्ध चालविण्यात आलेल्या खटल्यात दिलेल्या पुराव्याशी तो जुळत नसल्याचा दावा विनिता कामटे यांनी केला होता. चौकशी आयोग कायद्याच्या अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्याचा मुख्य माहिती आयुक्तांना अधिकारच नाही, असा दावा सरकारतर्फे सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी केला. आयोग केवळ दंड ठोठावू शकते अथवा अर्जदाराला माहिती न पुरविल्याबद्दल अधिकाऱ्यांना जबाबदार धरू शकते, असेही त्यांचे म्हणणे होते. राकेश मारिया हे २६/११च्या हल्ल्याच्या काळात मुंबई पोलिसात सहआयुक्त होते व त्यांच्याकडे पोलिस नियंत्रण कक्षाची सूत्रे होती. हल्ल्यात त्यावेळी कामटे यांच्यासह दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख हेमंत करकरे व चकमकफेम पोलिस अधिकारी विजय साळसकर हे शहीद झाले होते. त्या हल्ल्याच्या काळात पोलिस नियंत्रण कक्षाकडे आलेल्या संभाषणाचा तपशील विनिता कामटे यांनी मागितला असता तो अगोदर नाकारण्यात आला व नंतर नोव्हेंबर, २००९ आणि फेब्रुवारी २०१० मध्ये देण्यात आल्यावर त्यात बऱ्याच विसंगती होत्या. त्याबद्दल मुख्य माहिती आयुक्तांनी विनिता कामटे यांनी मागितलेला तपशील जाणीवपूर्वक विलंबाने देण्यात आल्याचा ठपका त्यांच्या आदेशात ठेवला होता.
महापुरुषांच्या वक्तव्याप्रकरणी माहाविकास आघाडीने माहामोर्चाचे आयोजन केले आहे. याबाबत आज विधानभवनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. महापुरुषांच्या बाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने 17 डिसेंबरला महामोर्चाच आयोजन केलं आहे. याबाबत आज विधानभवनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. हा मोर्चा केवळ राजकीय पक्षांचा नसून महाराष्ट्र द्रोहिंन विरोधात हा विराट मोर्चा काढला जाणार आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर सातत्याने महापुरुषांच्या विरोधात मंत्री नेते सत्ताधारी पक्षाचे आमदार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. इतिहासाची तोडमोड करणारी अशी ही वक्तव्य असल्याने मराठी माणसांच्या मनामध्ये याबाबत संताप उसळला आहे. यासाठीच 17 तारखेचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून केवळ राजकीय पक्षाचा मोर्चा नसून सर्वांसाठी हा मोर्चा काढला जात असल्याचे अजित पवारांनी विधान भवनात पत्रकार परिषद घेऊन सांगितले. बैठकीत मोर्चाच्या जबाबदारी बाबत चर्चा - 17 डिसेंबरला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे. या मोर्चासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जबाबदारी कशाप्रकारे देण्यात यावी याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. 17 डिसेंबरला किती संख्यांनी लोक राज्यभरातून मुंबईत येतील त्यासाठीची कशा प्रकारची आयोजन केले गेले पाहिजे. या मोर्चासाठी कायदेशीर परवानगी या सर्व बाबत चर्चा या बैठकीत झाली. अद्याप पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मात्र, या मोर्चाच्या परवानगीसाठी महाविकास आघाडी कडून पाठपुरावा केला जात असल्याचेही सचिन अहिर यांनी यावेळी सांगितले. पुणे नाशिक नगर रेल्वे मार्गाला केंद्राकडून अनुमती नाही - पुणे नाशिक नगर रेल्वे मार्ग व्हावा यासाठी तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्व प्रयत्न केले होते. हा रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर भावा यासाठी तात्कालीन राज्य सरकारने महारेल कंपनीची स्थापना देखील करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून जमीन अधिग्रहणासाठी साडेचारशे कोटींचा वाटपही करण्यात आलं. सर्व प्रकारच्या परवानग्या या प्रकल्पासाठी घेण्यात आल्या असून केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची अनुमती न मिळाल्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्यास विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितला आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास - ज्याप्रकारे समृद्धी महामार्गामुळे विकास होणार आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे नाशिक अहमदनगर पुणे जिल्ह्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचा विकास होईल. मात्र केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही असा ठपका अजित पवारांनी केंद्र सरकारवर ठेवला आहे. या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक खासदारांनी पत्र लिहिलेले आहेत मात्र अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत आहेत. या भेटीतून या प्रकल्प बाबतही त्यांनी यावेळी चर्चा करावी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. मुंबई, दि. 12 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. या अहवालात 122 पैकी 39 आमदारांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे समोर आले. याशिवाय 23 पैकी 11 खासदारांनादेखील चांगले काम करण्यात अपयश आल्याचे अहवालातून समोर आलं आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने याबाबत वृत्त दिलं आहे. जवळपास निम्म्या खासदारांची कामगिरीदेखील फारशी समाधानकारक नसल्याची आकडेवारी भाजपाच्या सर्वेक्षणातून पुढे आली असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला आहे. कामगिरी सुधारा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचं 'टाईम्स ऑफ इंडिया'ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्येक मंत्र्याचा 'केआरए' पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतं आहे. त्याची सुरूवात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. व त्यावर उत्तरं मागविली आहेत. मंत्र्यांनी पाठविलेली उत्तरं तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात, असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो. तीन वर्षांच्या कालावधीत मंत्री म्हणून काय विशेष काम केलं? गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेलं काम श्रेष्ठ कसं ठरतं? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेलं नाही, असं मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना विचारले असल्याचं समजतं आहे.
ठाणे : 'पार्टी विथ डिफरन्स' असे बिरूद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांच्या पक्षप्रवेशाची मालिका सुरूच आहे. ठाणे आणि मुंबई परिसरांत भांडुप आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे आठ ते दहा गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार मयूर शिंदे याने मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे नेते तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या साक्षीनेच त्याला प्रवेश देण्यात आला आहे. त्याच्या प्रवेशाने अनेक कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. तो मुंबईत शिवसेनेच्या एका आमदाराचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. त्याच्या मदतीनेच तो शिवसेनेच्या तिकिटावर ठाणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. मात्र, सेनेतून त्याला उमेदवारी न मिळाल्याने त्याने थेट भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
सीरियात सत्तारुढ असद सरकार आणि बंडखोरांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. या कडव्या संघर्षातून बुधवारी सीरियात झालेल्या रासायनिक अस्त्रांच्या हल्ल्यात तान्ह्या मुलांसह तब्बल १३०० निप्षापांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. सरकारच्या आदेशावरून सीरियन लष्कराने हा हल्ला केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून आंतरराष्ट्रीय समुदायाने यात हस्तक्षेप करावा, असे आवाहन केले आहे. सिरियाची राजधानी दमिश्कच्या घाउटा भागात सरकारी फौजांनी विषारी रसायनांच्या क्षेपणास्त्रांचा मारा केला असल्याचे बंडखोर गटाचे म्हणणे आहे. रासायनिक हल्ला झाल्यानंतर श्वसनावाटे विषारी वायू पोटात गेल्याने अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. विषारी अस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करतानाचा व्हिडिओ बंडखोरांनी यू ट्यूबवर जारी केला आहे. हल्ल्यात सापडलेल्या अनेकांच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नाहीत. श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे बंडखोरांचे म्हणणे आहे. रासायनिक बॉम्बचा हल्ला झाला ते ठिकाण सध्या बंडखोरांच्या ताब्यात आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सिरियाने आंतरराष्ट्रीय निरिक्षकांच्या चमूला घटनास्थळी जाऊन चौकशी करू द्यावी असे आवाहन ब्रिटनने केले आहे. दरम्यान, लष्कराचे हल्ले सुरूच असल्याने रासायनिक बॉम्ब हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केली आहे. सिरिया सरकारने मात्र रासायनिक बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप नाकारला आहे. सिरियातील सरकारी प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याचे वृत्त निरर्थक असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधक हा आरोप करत असल्याचं म्हटलं आहे.
धूम ४ मध्ये सलमान खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाची अद्याप निश्चिती झाली नाही. पण काहींच्या मते या चित्रपटाचे शूटिंग दक्षिण अमेरिकेत होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धूम-४ चे शूटिंग उत्तर अमेरिकेत होणार आहे. सलमान खानच्या सुलतान या आगामी चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सल्लू मियाँच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. धूम ४ चित्रपटामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पंढरपूरसाठी सोडलेल्या लालपरीमधून (एसटी) ३९ हजार १६६ प्रवाशांनी सुखकारक प्रवास केला आहे. ठाणे : आषाढी एकादशी म्हटली की, वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यानिमित्ताने पंढरपूरला लाखोंच्या संख्येने वारकरी माऊलीच्या दर्शनाला जातात. पंढरपूरसाठी सोडलेल्या लालपरीमधून (एसटी) ३९ हजार १६६ प्रवाशांनी सुखकारक प्रवास केला आहे. त्यामुळे एसटीच्या ठाणे विभागाला जवळपास ३९ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. २३ जुलैच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया भाविकांकरिता ठाणे परिवहन विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून १९ ते २९ जुलै या दिवसात एकूण ७६ बसेस जादा सोडण्याचे नियोजन केले होते. १९ जुलैपासून त्या सोडण्यात आल्या. २४ जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीच्या वाहतुकीसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांना प्रवास सुखकर व्हावा, म्हणून एकूण जादा बसपैकी १० टक्के बसेस आगाऊ उपलब्ध करून दिल्या होत्या. पुणेकरांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे परिवहन विभागामार्फत जवळपास ४० बसेस पाठवल्या होत्या. अशा प्रकारे पंढरपूरसाठी एकूण ११० बसेस नियोजित होत्या. या दिवसात भारमान ७१. ४४ टक्क्यांनी वाढले होते. त्यातच, लालपरीच्या एकूण फेºयांमधून ३९ हजार १६६ प्रवासी सहभागी झाले होते. त्यातूनच ठाणे एसटी विभागाला ३९ लाखांचे उत्पन्न यंदा मिळाल्याची माहिती ठाणे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी मुंबईतील एका व्यक्तीला चोप देऊन त्याचं मुंडन केलं. रविवारी (22 डिसेंबर) हा प्रकार घडला. या व्यक्तीचं नाव राहुल तिवारी असं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीस्थित जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईची तुलना जालियनवाला बाग प्रकरणाशी केली होती. त्यानंतर या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली होती. सदरहू व्यक्तीने आपण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाशी संलग्न असल्याचं सांगितलं होतं. "मला मारहाण करण्याऐवजी पोस्टवर कायदेशीर कारवाई करता आली असती," असं या व्यक्तीने म्हटलं.
जळगाव - जिल्हा न्यायालयात खोटा व बनावट ऐपतीचा दाखला दाखवून न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या संदीप ओंकार पवार (३०, गारखेडा, ता. जामनेर) या तरूणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर पोलीस ठाण्यात २९५/२०१९ प्रमाणे दीपक भगवान माळी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल आहे. तसेच भादंवि कलम ३९२ हाणामारीच्या प्रलंबित गुन्ह्यातील दुसरा संशयित संदीप ओंकार पवार याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाय्यक मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होता. संशयित संदीप पवार याने या प्रलंबित गुन्ह्यासाठी जामनेर तहसीलदार यांच्याकडील ऐपतीचा खोटा व बनावट दाखला तयार करून जळगाव न्यायालयात सादर केला. तो न्यायालयाला खरा भासवून न्यायालयाची दिशाभूल केल्या प्रकार न्यायालयाला समजल्यानंतर संदीप पवार याच्या विरोधात विलासचंद गजानन अंबटकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.
जिल्हापरिषद गटामध्ये भाजप पक्षाला विधानसभेत घटलेले मतदान हे विचार करण्या सारखे आहे माझा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी ज्या पद्धतीने ताकद दिली त्याचे मोजमाप मतदानात कोठेही दिसून आले नाही त्यामुळे आता इथून पुढच्या कालखंडात डबल ढोलकी चालणार नाही बरेही माझ्याबरोबर निष्ठावंत पाच कार्यकर्ते राहिले तरी चालतील मात्र डबल ढोलकी वाजवणारा ना माझा आत्ताच इशारा आहे त्यांनी एक तर माझ्याबरोबर निष्ठा ठेवावी नाहीतर थेट माझ्याविरोधात राहावे अशी सनसनाटी चपराक कुडाळ जिल्हा परिषद गटातील सर्व व प्रमुख कार्यकर्त्यांना शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. कुडाळ जिल्हापरिषद गटामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमत शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटी प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती जावळीच्या सभागृहांमध्ये कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या परखड प्रतिक्रिया दिल्या. या कानपिचक्या मुळे उपस्थित काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जिव्हारी लागल्याने काही निवडक कार्यकर्त्यांचे चेहरे विरोधात काम करून गेले असल्याचे सांगून गेले. अनेकजण माझ्या निवडणुकीपूर्वी व्यक्तिगत संपर्कात होते काहीजण कारखान्याचे कामगार होते तर काहीजण बरोबरीने सहकार्य व सहकारी म्हणून काम करत होते मात्र त्यांच्या गावातच मतदान हे कमी पडल्यामुळे व त्याची आकडेवारी वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून कोण कुठं कमी पडला की काम करण्याची पद्धत चुकीची ठरली हे आता पाहणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या काळामध्ये माझ्याशी संपर्कात राहून कोणीकोणी काय माझ्या पाठीमागे दिवे लावलेत हे लपून राहिलेले नाही. कुठे ना कुठे आणि कधी ना कधी बाहेर येतच ,आणि ते लपून राहिलेलं नाही. त्यामुळे कोणीही असा गैरसमज मध्ये राहू नये सगळ्या गोष्टी मला कळाले आहेत. निष्ठावंतांची पाठीवर नक्की हात फिरवे पण गद्दारी करणाऱ्या पाठीवर धोपाटा टाकेन असा नकळत इशारा ही यावेळी शिवेंद्रराजे यांनी दिला. आपल्याला आता भाजप म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्या पद्धतीनेच भविष्यात आता आपल्याला तशी मांडणी करावी लागणार आहे. जे निष्ठा ठेवणारे आहेत त्यांना आता एक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. भले पाच असले तरी ते माझ्याबरोबर प्रामाणिक असावेत जीवाला जीव देणारे असावेत दोन्ही दगडांवर हात ठेवणारे आता हे तिथून पुढे मला चालणार नाहीत असेही ते म्हणाले. कुडाळ जिल्हा परिषद पडलेल्या कमी मतदानामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आवर्जून कुडाळ येथील उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेते उपनेते कार्यकर्त्यांना कमी पडलेल्या मतदानाचा कळत-नकळत जाब विचारला. भाजप पक्ष वाढीसाठी जे निष्ठेने माझ्याबरोबर असतील त्यांनाच मी ताकद देईन मात्र माझ्याबरोबर राहून जे गद्दारी करतील त्यांना अद्दल घडवली जाईल असा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला त्यामुळे नेहमीच डबल ढोलकी वाजवणारे काही उपस्थितांनी हा इशारा ऐकल्यानंतर हाताची घडी आणि तोंडाचा चंबूच केला.
गोव्याला 'पूर्वेचा पाचू' म्हणूनही ओळखलं जातं. भारतातलं सगळ्यांत लहान राज्य असूनही गोवा अत्यंत समृद्ध आहे. पण आंतरराज्य कोळसा वाहतुकीत गोव्याचा ट्रांझिट पॉईंट म्हणजे पारगमन बिंदू म्हणून वापर करण्याच्या प्रयत्नांबद्दल राज्यात असंतोष वाढत आहे. केंद्र सरकारच्या रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग वाहतुकीच्या विस्तार प्रकल्पांना ग्रामपंचायतींनी विरोध सुरू केला आहे. 'भारतमाला' या प्रकल्पांतर्गत महामार्ग विस्ताराचा (गोवा-हैदराबाद आर्थिक कॉरिडॉर) कार्यक्रम आखण्यात आला आहे. रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणाचं कामही होऊ घातलं आहे. राज्यातल्या सगळ्या मोठ्या नद्यांचं राष्ट्रीयीकरण झालेलं आहे. (त्याआधी नदीतली वाहतूक हा राज्य सरकारच्या अखत्यातरीतला विषय होता. ) औद्योगिक पातळीवर या नदीपात्राच्या खोलीकरणाचं काम (ड्रेजिंग) लवकरच सुरू होईल. हे सगळे प्रकल्प एकाच वेळी सुरू होणं हा केवळ योगायोग आहे असं या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटत नाही. शेजारीच असलेल्या कर्नाटकला कोळसा वाहून नेण्यासाठी हे सगळे प्रकल्प सुरू करण्यात आलेत, असं त्यांचं मत आहे. कर्नाटकात काही मोठे पोलाद प्रकल्प आहेत. नामांकित पर्यावरणवादी कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई म्हणतात, "गोवा हे कोळसा वाहतुकीतला ट्रांझिट पॉईंट झालेलं आम्हाला चालणार नाही. त्यामुळे गोव्याचं प्रचंड नुकसान होईल. " "या सगळ्या प्रकल्पांचा विरोध करण्यासाठी गोवा एकवटेल याची आम्हाला खात्री आहे. आमच्या या सुंदर राज्याच्या रक्षणासाठी आम्ही काहीही करू," असं ते म्हणतात. सरकार या मुद्द्यावर पारदर्शकपणे काहीच सांगत नसल्याने सामाजिक कार्यकते काळजीत पडले आहेत. या प्रकल्पांचे नदीकाठच्या गावांवर काय परिणाम होतील, याची जाणीव जसजशी वाढत जाते आहे, तसतशी ही भीती आणखी पसरते आहे. संपूर्ण गोव्यातल्या ग्रामसभांनी या प्रकल्पांना विरोध करायला सुरुवात केली आहे. गोव्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साष्टी तालुक्यातल्या अनेक ग्रामसभांनी या प्रकल्पांना विरोध करणारे ठराव मंजूर केले आहेत. सेराऊलीम ग्रामसभेने याआधीच कोळसा वाहतूक, रेल्वेचे ट्रॅकचे दुपदरीकरण आणि प्रमुख नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला एकमताने विरोध केला आहे. या प्रकल्पांना विरोध करणारे कार्यकर्ते रॉडनी अलमेडा म्हणतात की, "आमच्या सेराऊलीम गावातून आधीच दोन रेल्वेमार्ग जातात, सरकारला अजून दोन मार्ग बांधायचे आहेत. सरकारला गोव्याचा वापर कोळसा वाहतुकीसाठी करायचा आहे. मला कळत नाही की कर्नाटकला कोळसा नेण्यासाठी सरकारला गोव्याचा वापर का करायचा आहे? " दक्षिण गोव्यातल्या वेळीं आणि असोळणा पंचायतींनीही अशाच प्रकारचे ठराव पारित केलेत. कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या काणकोण तालुक्यातल्या लोलिएम-पोळें पंचायतींमध्येही हा मुद्दा उपस्थित केला गेला. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध कलंगुटसारख्या पर्यटनस्थळीही नाराजी व्यक्त केली जाते आहे. केंद्र सरकारच्या या कृतीविरुद्ध कलंगुट पंचायतीने ठराव पारित केला. कलंगुटचे रहिवासी शॉन ग्रासियस म्हणतात, "नद्या स्थानिक साधनसंपदा आहेत. इथला मच्छीमार समाज त्यावर अवलंबून आहे, या नद्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी आम्ही कसं राजी व्हावं? " राज्यातल्या कोळसा प्रश्नाबाबत सतत संघर्ष सुरू आहे. कोळसा हाताळण्यासाठी मोर्मुगाओ पोर्ट ट्रस्टचा (MPT) विस्तार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक सुनावणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शित करण्यात आला होता. तब्बल 8 दिवस ही सुनावणी सुरू होती. प्रत्येक प्रकल्पाबाबत स्वतंत्र सुनावणी घेण्यात आली. विस्तारामुळे MPTच्या कोळसा आयातीत चौपट वाढ होऊन ती 51 दशलक्ष टन इतकी होईल. पण MTPने एक पत्रक प्रसिद्ध केलं असून प्रदूषणाची पातळी नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. तसंच, एकंदर प्रदूषणासाठी MTPला जबाबदार धरता येणार नाही, असंही म्हटलं आहे. महामार्ग विस्तार, रेल्वे ट्रॅकचे दुपदरीकरण आणि प्रमुख नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचं काम फक्त कोळसा वाहतुकीच्या उद्देशाने करण्यात आलं आहे, हे मानायला राज्य सरकार तयार नाही. गोव्याच्या नद्यांसंदर्भात MPT ही केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणजे समन्वयक संस्था आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला गेला होता. याबाबत बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जुलै महिन्यात म्हणाले होते, "गोव्याचं हित माझ्यासाठी सगळ्यांत महत्त्वाचं आहे. मी राज्यात कोळसा प्रदूषण होऊ देणार नाही आणि वास्कोचं (जिथे MPT आहे) रूपांतर कोळसा केंद्रातही होऊ देणार नाही. " प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळश्याची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. वास्कोतली प्रदूषण पातळी प्रमाणाबाहेर गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर उपलब्ध बर्थवर कोळसा हाताळण्याची क्षमता 25 टक्क्याने कमी करण्याचे प्रयत्न करण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी तेव्हा दिलं होतं. मोदी सरकार काय करणार? आता विरोध वाढायला लागल्यानंतर मुख्यमंत्र्यानी केंद्र सरकारला खास पत्र लिहून जोपर्यंत प्रदूषण पूर्णपणे आटोक्यात येत नाही वा त्यासाठीचं तंत्रज्ञान कोळसा हाताळणीच्या ठिकाणी स्थापन केलं जात नाही, तोपर्यंत या सर्व प्रकल्पांचा विस्तार स्थगित ठेवावा, अशी मागणी केलेली आहे. मात्र महामार्ग विस्तार, रेल्वे ट्रॅकचे दुपदरीकरण आणि नद्यांचं राष्ट्रीयीकरण यांचा कोळसा प्रकल्पांशी काहीही संबंध नाही, अशी सत्ताधारी भाजपची भूमिका आहे. "हे सर्व स्वतंत्र प्रकल्प आहेत. देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं ते अत्यंत महत्त्वाचं आहेत. कोळश्याच्या विषयावर आमची भूमिका स्पष्ट आहे. लोकांना त्रास होईल असा कोणताही प्रकल्प आम्ही लादणार नाही", असं भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक सांगतात. विरोधी पक्ष काँग्रेस मात्र हे मानायला बिलकुल तयार नाही. 'सागरमाला' प्रकल्पाअंतर्गत दिलेल्या अंदाजानुसार मुरगांवला 4 कोटी टनपर्यंत कोळसा हाताळणी होणार, असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मग भाजप कुणाची दिशाभूल करायचा प्रयत्न करतेय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते यतीश नायक विचारतात. लोकही अजून साशंक आहेत. दर रविवारी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये हा विषय सातत्याने गाजत आहे. एकेक पंचायत या सर्व प्रकल्पांना विरोध करणारे ठराव पास करत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारचं म्हणणं ऐकतं की आपले निर्धारित प्रकल्प पुढे दामटतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या महिन्यात केंद्रीय बंदर आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गोव्यात आले असताना पत्रकारांनी त्यांना या प्रकल्पाना होणाऱ्या विरोधांविषयी विचारलं. स्थानिक लोकांना हे प्रकल्प नको असतील तर ते शेजारच्या राज्यात हलवण्यास आपली काहीही हरकत नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. मात्र जोपर्यंत MTP हे प्रकल्प अधिकृतरीत्या रद्दबातल ठरवत नाही, तोपर्यंत ही टांगती तलवार गोव्यावर कायम लटकत राहील असं लोकाना वाटतं. कोळसा वाहतुकीसाठी आपल्या निसर्गरम्य भूभागावर इतक्या मोठ्या प्रमाणात विकासप्रकल्प हाती घेतले जाण्याची कल्पनाच सर्वसामान्य गोवेकरांना पटत नाही. पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून MPTमधल्या कोळसा व्यवहारामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. यात चौपट वाढ करणं म्हणजे एका सुनियोजित, मानवनिर्मित आपत्तीला निमंत्रण देण्यासारखं आहे. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या येऊ घातलेल्या संकटाला विरोध करण्यासाठी तयारी सुरू आहे. (लेखक गोव्यातील 'प्रूडंट' या वृत्तवाहिनीचे संपादक आहेत. ) गोव्याच्या इतर बातम्याः (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. )
तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. चामोर्शी : तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. परंतु वादळाच्या प्रचंड वेगाने येथील सिमेंटचे वीज खांब तुटून पडले. वीज ताराही अस्ताव्यस्त झाल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. परंतु मंगळवारनंतर चार दिवसांचा कालावधी उलटूनही अद्यापही गावातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबीकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांना चार दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या जोरदार वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे छतही उडून गेले. शिवाय झोपड्या व इतर ठिकाणचे गवतही अस्ताव्यस्त झाले. परिसरातील अनेक झाडे तुटून पडली. परिणामी अनेक वीज तारांवर फांद्याही पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी सदर वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता नवीन वीज खांब लावून तारांची जुळवाजुळव करणे गरजेचे होते. परंतु या सर्व बाबीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी दमट व उष्ण वातावरणात नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये वीज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे. गावातील वीज पुरवठा खंडित होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला. सर्वत्र अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या आहेत. मात्र वीज गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी) वसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या वादळामुळे वीज खांब तुटून वीज पुरवठा खंडित झाला, याची माहिती गावातील सरपंचांनी भ्रमणध्वनीवर आष्टी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दिली. परंतु येथून कोणताही कर्मचारी गावात वीज दुरूस्तीसाठी आला नाही. गावात पिठ गिरणी, मोटारपंप, संगणकावर विविध कामे केली जातात. परंतु वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात सिमेंटच्या वीज खांबऐवजी लोखंडी वीज खांब बसवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गावातील अनेक आंबेही गळून पडले. त्यामुळे नुकसान झाले. वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे. शनिवारी तर जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल झाले होते. केवळ १५ खाटा शिल्लक होत्या. खाटा रिकाम्या करण्यासाठी कमी लक्षणे असणारे व अतिगंभीर नसलेल्यांना सुटी दिली जात आहे, तसेच काहींना कोविड केअर सेंटरला पाठविले जात आहे, तसेच नव्याने ५० खाटा तयार करण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात दररोज ७०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरोग्य संस्थांची संख्या कमी पडू लागली आहे. शासकीयसह खाजगी रुग्णालये रुग्णसंख्येने भरली आहेत. शनिवारी तर ४०० खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयात केवळ १५ खाटा रिक्त होत्या. त्यामुळे शनिवारी बाधित आढळलेल्या रुग्णांना ठेवायचे कोठे, हा प्रश्न होता. सामान्य रुग्णांना जिल्हा रुग्णालयाबाहेर प्रतीक्षाही करावी लागली होती, तर दुसऱ्या बाजूला ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही अशांना कोविड केअर सेंटरला हलविले जात होते, तसेच ज्यांना होम आयसोलेशन पाहिजे, त्यांना सुटीही दिली जात आहे. खाटा रिकाम्या करणे, हाच उद्देश सध्या आरोग्य विभागाचा आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडल्याने बाजूलाच असलेला डोळ्यांचा वॉर्ड व डायलिसिस वॉर्डमध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या तयार झालेल्या नव्हत्या. त्यामुळे सामान्य रुग्णांचे हाल झाले. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यांना सुविधा देण्यासह उपचार करण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. अगदी चाचणी करण्यापासून ते रुग्णालयातून सुटी होईपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खाटा वाढविण्यासह औषधोपचारात गतिमानता आणावी, अशी मागणी सामान्यांमधून जोर धरत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत असल्याने काही रुग्ण खाजगी कोविड सेंटरची पायरी चढत आहेत; परंतु येथेही त्यांना एडव्हान्स भरण्यासाठी अडवणूक केली जात आहे, तसेच खाटा मिळविण्यासाठी काही ठिकाणी विनंतीही करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत असल्याने बाजूचा डोळ्यांचा आणि डायलिसिसचा वॉर्ड सुरू करीत आहोत. तो सुरू झाला की नाही, याची माहिती घेत आहे.
नागपूर येथे सडक्या शेंगदाण्याला रंगवून 'पिस्ता' म्हणून विकणार्यांवर कारवाई ! राजरोजपणे अनेक मास चालू असलेली भेसळ प्रशासनाला कशी समजत नाही ? प्रशासनाने जनतेच्या आरोग्याचा विचार करून अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. राजरोजपणे अनेक मास चालू असलेली भेसळ प्रशासनाला कशी समजत नाही ? प्रशासनाने जनतेच्या आरोग्याचा विचार करून अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. परिमंडळ ५ चे साहाय्यक आयुक्त (अन्न), अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर आणि रा. भि. कुलकर्णी यांच्या पथकाने गुटका विक्रेत्याकडून १० लाख ४४ सहस्र ४०० रुपयांच्या साठ्यासह ७ लाख रुपये किमतीचे वाहनसुद्धा शासनाधीन केले आहे. जागतिक भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी आहे, हे भारताने फेटाळले आहे. 'दूरभाषद्वारे विचारलेल्या ४ प्रश्नांच्या आधारे हे ठरवू शकत नाही', असे म्हणून भारत सरकारने हा अहवाल नाकारला आहे. असे उद्दाम उत्तर देणे, ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. कर्नाटकमधील सत्ताधारी भाजप सरकारने अशांवर कारवाई करणे अपेक्षित आहे ! अन्न आणि औषध प्रशासनाचे एक प्रामाणिक अधिकारी तथा निरीक्षक राजीव कोरडे यांना ४ मासांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एका प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडल्याने त्यांचे निलंबन केल्याची चर्चा आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने'च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या 'पॅकेज' देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.
मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. धुळवड आणि त्यानंतर एक दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली. मात्र त्यानंतर लगेचच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे जनतेचा लॉकडाऊनला विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारनं इतर पर्यायांचा विचार करत आहे. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सोय उपलब्ध व्हावी याची चाचपणी राज्य सरकारनं सुरू केली आहे. लॉकडाऊन करण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरूनच काम कसं काम करता येईल या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना तसे आदेश देण्याची शक्यता आहे. नागरिक घरी राहिल्यानं रस्त्यावरची गर्दी कमी होईल. ट्रेन, बस आणि मेट्रोमध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असा सरकारचा विचार आहे. त्यासाठी वर्क फ्रॉम होमकडे सरकारनं विशेष लक्ष दिलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना सरकार वर्क फ्रॉम होमसाठी आदेश देणार असल्याची चर्चा आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन? राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं राजेश टोपे म्हणाले. लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत सरकारची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अश्विनी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अश्विनी सहकारी रुग्णालय स्वच्छतेसाठी आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येत आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र घुली यांनी दिली आहे . या स्वच्छतेचे काम पूर्ण होताच पूर्ण कार्यक्षमतेने हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेसाठी रूजू होईल असेही त्यांनी सांगितले. या गैरसोयीबद्दल दिलगीर असून रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सहकार्य करावे असा बोर्डही रुग्णालयाच्या गेटवर लावण्यात आलेला आहे. अश्विनी रुग्णालयामध्ये काही स्टाफचे कोरोना लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाले मुळे आणि काहीजणांची तपासणी आणि अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे रुग्णालयाने गेले काही दिवसापासून दक्षतेपूर्वक रुग्णाची छाननी करुन तपासणी उपचार केलेले आहेत. दोन रुग्णांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे दक्षता घेऊन सुध्दा दाखल झालेमुळे आणि त्यांच्या संपर्कामुळे कर्मचारी यांना लागण झालेमुळे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे संपूर्ण सुरक्षा आणि दक्षतेसाठी आरोग्यसेवेच्या नियमाप्रमाणे संपूर्ण हॉस्पिटल बंद ठेवून सर्व विभागांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करुन घेणे आवश्यक असल्याने ही कार्यवाही करीत आहोत. संबंधित कर्मचारी यांची व्यवस्था सिव्हील हॉस्पिटल,महानगरपालिका आरोग्य सेवा यांच्या सहकार्याने केलेली असून काही हॉस्पिटलमध्ये आणि काही विलगीकरण केंद्रात दाखल आहेत.
Planning Commission News In Marathi, Narendra Modi, Divya Marathi । नियोजन आयोगाऐवजी संस्थेसाठी मोदींनी जनतेची मते मागवली, संकेतस्थळ तयार - Divya Marathi\nPlanning Commission News In Marathi, Narendra Modi, Divya Marathi\nनियोजन आयोगाऐवजी संस्थेसाठी मोदींनी जनतेची मते मागवली, संकेतस्थळ तयार\nनवी दिल्ली - नियोजन आयोग गुंडाळून त्याऐवजी आधुनिक संस्थेची स्थापना करण्याच्या दिशेने मोदी सरकारने मंगळवारी पहिले पाऊल टाकले. ही नवी संस्था कशी असावी, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची मते मागवली असून यासाठी mygov.nic.in या वेबसाइटवर खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. उत्कृष्ट कल्पना मांडणा-यांना बक्षीसही दिले जाणार आहे.\nस्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदींनी 64 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या नियोजन आयोगाचे स्वरूप लवकरच बदलण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 21 व्या शतकातील आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी आणि भारताची संघराज्य रचना अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यांचा या प्रक्रियेत सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने अशी पावले महत्त्वाची आहेत.\nबदलता काळ, बदलती धोरणे\nसध्या देशातील अंतर्गत परिस्थिती आणि जागतिक स्थिती पण बदलली आहे. आता सरकार हे आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र राहिलेले नाही. अर्थव्यवस्था बहुआयामी बनली आहे. त्यामुळे नियोजन आयोगाचेही रुपडे बदलणार आहे.\nराज्य सरकारेही महत्त्वाची\nराज्य सरकारेही आज विकासाची केंद्र आहेत. हे एक चांगले लक्षण असल्याचे मोदींनी म्हटले होते. भारत विकासाच्या मार्गावर असेल तर राज्यांनाही या वाटेवर आणले पाहिजे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली होती.\nनवा आकार, नवे रूप : नियोजन आयोगाच्या नव्या रूपासाठी विचार करावा लागेल. या आयोगाची जागा लवकरच नवीन संस्था घेईल. तत्कालीन परिस्थितीनुसार त्या काळातील गरजा भागवण्यासाठी नियोजन आयोग स्थापन करण्यात आला होता. देशाच्या विकासात या आयोगाने काळानुरूप योगदानही दिले, असे वक्तव्यात नमूद आहे.\nनियोजन आयोग मोडीत काढण्याची किंमत चुकवावी लागेल : मुख्यमंत्री\nमुंबई ।नियोजन आयोगाऐवजी नवी संस्था स्थापन करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी टीका केली.\nनियोजन आयोग मोडीत काढून आर्थिक विषय मुक्त अर्थव्यवस्थेकडे हस्तांतरित करणे धोकादायक आहे. नियोजन आयोग मोडीत काढण्याची किंमत देशाला चुकवावी लागेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर व्यक्त केले. मोदी यांनी नियोजन आयोगाऐवजी अस्तित्वात येणारी संस्था कशी असावी, असे ट्विट मंगळवारी टाकले होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून चव्हाण यांनी हे मत व्यक्त केले.
रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर्स रुग्ण नसल्याचे कारण देऊन बंद केली आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या परिचारिकांना ठरलेला मोबदला दिला गेला नाही, अशी माहिती मिळत आहे. तसेच काही महागडी इंजेक्शन गरज नसतानाही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे, हाही विषय गंभीर असल्याचे दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष एड. दीपक पटवर्धन यांनी म्हटले आहे. त्यामुळे इंजेक्शन खरेदी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली असल्यास ती कशी झाली? याबाबतही चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण प्रसाराची शक्यता अधिक आहे. परंतु, जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये घट, आरटीपीसीआर लॅबचे कामकाज बंद हे विषय खूप गंभीर आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर लॅब पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी एड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली आहे. काही दिवस या लॅबमध्ये डाटा फिड करणारे कर्मचारी उपलब्ध नाहीत. चार कर्मचारी त्यांचा कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे काम करण्यास येत नाहीत. आरोग्य प्रशासनाकडे ती व्यवस्था हाताळू शकेल, असे अन्य कर्मचारी नसावेत. आरटीपीसीआर स्वॅबचे अहवाल अन्य जिल्ह्यातून तपासून घेतले जातात, अशी माहिती मिळत आहे. स्वाभाविकपणे या चाचण्यांचे प्रमाण खूप घटले आहे, ही गोष्ट खूप गंभीर आहे. या लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (कंत्राटी) मोबदला वेळीच देणे, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. याप्रकरणी तत्काळ लक्ष घालून आरटीपीसीआर लॅब तत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी एड. पटवर्धन यांनी केली आहे.
नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे. नागपूर : नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे. रविवारी संक्रमितांची संख्या २०,४३९ झाली. आतापर्यंत ७३० मृत्यू झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात २३ दिवसात सातत्याने कोरोनाचे आकडे वाढतच आहेत. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात एकूण १५,०४७ संक्रमित आढळले, यातील ६०४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. पण नागपुरात रिकव्हरी रेट सुधारत आहे. एकूण संक्रमितांपैकी ११,०५३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रिकव्हरी रेट ५४. ०७ टक्के झाला आहे. आठवडाभरापूर्वी हा रेट ४४ टक्क्यांवर आला होता. नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. मार्च महिन्यात १६ संक्रमित होते. ५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूची संख्या वाढतच गेली. ३१ जुलैपर्यंत नागपुरात ५,३९२ संक्रमित होते व १२६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. यात ३,४७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचे संक्रमण व मृतांची आकडेवारी वेगाने वाढली. २० ऑगस्टनंतर रविवार २३ ऑगस्ट रोजी पुन्हा ४६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील ४२, ग्रामीणचे २ व जिल्ह्याबाहेरील २ आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात ८२४ पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यात शहरातील ७१४ व ग्रामीणचे १०८ व जिल्ह्याबाहेरील २ आहेत. रविवारी ८१४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ११,०५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी ४०१ अॅन्टिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. २९१ खासगी लॅबमधून, नीरीच्या लॅबमधून ४५, मेयोतून ८६, एम्सच्या लॅबमधून १ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गेल्या २४ तासात ५,१३९ नमुने तपासण्यात आले. जिल्ह्यात ११ ऑगस्ट रोजी संक्रमिताचा आकडा १०,३६१ होता. ३७२ मृत्यू झाले होते. अवघ्या १२ दिवसात १० हजार नवीन पॉझिटिव्ह वाढले. विशेष म्हणजे पहिल्या १० हजाराचा आकडा गाठायला १५४ दिवस लागले होते.
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । सीआरपीएफ जवानाला, वाहन चालकासह दोन अज्ञातांनी चाकूच्या धाकावर मारहाण करून लुटले. तसेच रोख रकमेसह मोबाईल हिसकावून संशयित पसार झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्याजवळ घडली. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. याबाबत असे की, तेलंगणमध्ये कार्यरत सीआरपीएफ जवान श्रीकांत शांताराम माळी (रा. सावित्रीनगर, पारोळा) हे सुटीवर घरी येत होते. १८ रोजी रात्री ते रेल्वेने जळगावात आले. त्यानंतर जळगावातील आकाशवाणी चौफुलीवर ते पारोळ्याला जाण्यासाठी थांबले. तेथून तवेरा वाहनाने ते मध्यरात्री पारोळ्याला जाण्यासाठी निघाले होते. एरंडोल शहराच्या पुढे आल्यावर दादाश्री पेट्रोल पंपावर डिझेल भरून वाहन पारोळ्याकडे निघाले. त्यानंतर रात्री १ वाजून १५ मिनिटांनी भालगाव फाटा येथे संशयितांनी तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. चालकासह दोन अज्ञात संशयितांनी माळी यांना मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून साडेतीन हजार रुपये व तीन हजार रुपयांचा मोबाइल व बॅग हिसकावून घेतली. बॅगेत त्यांचा युनिफॉर्म, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे होती. लुटीनंतर संशयित पारोळ्याकडे पसार झाले. यापूर्वीदेखील या मार्गावर रात्री लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रात्री-अपरात्री महत्वाच्या कामाशिवाय एकट्याने बाहेर पडू नये. गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी. अनोळखी वाहनधारकाची मदत घेणे टाळावे. गरजेच्या वेळी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घटनेनंतर जवान माळी यांनी काही अंतर पायी चालून हाॅटेल गुरूकृपा गाठले व घटना सांगितली. हॉटेलवरूनच जवानाने भाऊ विनोद कोळी यांना घटना कळवली व बोलावून घेतले. त्यानंतर शुक्रवारी (दि. १९) त्यांनी एरंडोल पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे तपास करत आहेत.
फेसबुकच्या पृष्ठावर अभिनेताच्या मृत्यूनंतर दुःखी वृत्तांत झाल्यानंतर चाहत्यांनी सिल्व्हस्टर कुटुंबासाठी सहानुभूती व्यक्त केली. तथापि, हे फार काळ टिकू शकले नाही कारण स्टॉलोनने त्वरित प्रतिसाद दिला. सोशल नेटवर्टरच्या फोटोमध्ये त्याने आपल्या मुलीशी पडदा टाकला आणि त्यावर एक शिलालेखही तयार केलाः "माझ्या विस्मयकारक मुलीबरोबर एक भव्य डिनर. "या संदेशाने चाहत्यांना आणखी गोंधळले आणि त्यांनी अविश्वसनीय गोष्टी लिहिल्याः "आम्हाला सिल्वेस्टर स्टेलोनच्या मृत्यूबद्दल बोलण्याची इच्छा नाही. का? "," मला विश्वास आहे की तो अजूनही जिवंत आहे. " हा फोटो काहीही सिद्ध करीत नाही . . . ", इ. तथापि, या पृष्ठावरील काही तासांनी Instagram सिलवेस्टर मधील त्याच्या शॉटवर रशियन बॉक्सर सर्गेई कोव्हालेव्हचे एक चित्र रेखाटले ज्याने त्याला पुढील शिलालेख दिलेः "येथे मी एक अतिशय प्रतिभावान आणि मजबूत बॉक्सर" विनाशक "आहे - सर्गेई Kovalev. त्याने सर्व गोष्टींचा नाश केला, जो हिट झाला नाही. " ही परिस्थिती पुन्हा दर्शवते की आपण इंटरनेटवर इतका विश्वास ठेवू शकत नाही कारण सामाजिक नेटवर्कमधील कोणतेही पृष्ठ हॅक केले जाऊ शकते. तसे, स्टॉलोनकडे प्रथमच असे नाही. त्या वर्षी त्याच फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आलेला एक संदेश प्रसिद्ध करण्यात आला होता ज्यात एका दिग्गज अभिनेत्याचा अपघातात मृत्यू झाला होता. आणि 2013 मध्ये, सर्व सिल्व्हस्टर स्टेलोनला झालेल्या दुखापतीमुळे दुः ख झाले, ज्याने असे पाहिले की, एक स्नोबोर्डवरून पडताना तो आला हे स्पष्ट झाले की, ही बातमी इंटरनेटवरही पोस्ट केली गेली.
वयाची नव्वदी पार केल्यानंतर माणूस काय करेल? . . . राजकारणी असला तर मार्गदर्शन करेल, संसारी असला तर मुला-नातवंडांसोबत खेळेल आणि एखादा श्रद्धाळू असला तर भजन-किर्तनात मन रमवेल. असंच उत्तर कोणीही देईल. पण ९० वर्षांचा एखादा म्हातारा लग्नासाठी जोडीदार शोधतोय असं कुणी म्हणालं तर? चकीत झालात ना? पण हे खरं आहे.
बॉक्सबाहेर विचार करा (सेट करा) वर्षाच्या या काळातील वार्षिक कोंडीः क्लासिक रॉक पंखेसाठी काय मिळते ज्याकडे फ्रॅंक झप्पाच्या अल्बम्स किंवा "द टाइम्स वे ऐ-चँगिन '" बॉब डायलेनच्या हस्तलिखित गीतांचे सर्व 91 आधीच आहेत? जेव्हा आपल्याला बॉक्स (सेट) च्या बाहेर विचार करण्याची आवश्यकता असते आणि सुट्टी देणा-या भेटवस्तू देण्याची काही गैर-सुस्पष्ट संभाव्य शक्यता शोधण्याची आवश्यकता असते. गलिच्छ कलाकारांच्या तुलनेत कुणीही घाण चांगली ठेवू शकत नाही. पीट टाउनशेड, नील यंग, ऍन आणि नॅन्सी विल्सन आणि लेड झपेलीन आणि जिमी हेंड्रिक्सच्या तोंडी इतिहासातील आत्मचरित्रे त्या लोकांसाठी उच्च भेट क्षमता देतात ज्यांना क्लायंटचा रॉक वाचणे आवडते. आम्ही संगीतकार कलाकार म्हणतो (कारण ते आहेत) ज्याप्रमाणे आम्ही पेंट, स्केच आणि स्केलप्पट अशा लोकांना लागू करतो. काही, ग्रेस स्लीटसारखे, संगीत आणि कला या दोन्हीमध्ये शीर्षक मिळवले आहे शक्यता आहे, क्लासिक रॉक संगीत आवडत कोणालाही आपण अल्बम कव्हर आवडी, पोस्टर, चित्रे आणि तो परिभाषित मदत इतर कलात्मक प्रतिमा. आपण चित्रांबद्दल काय म्हणत आहात ते माहित आहे, त्यांच्यापैकी एक हजार शब्दांचे मूल्य कसे आहे? फोटोग्राफिक प्रतिमांचे हे अत्यंत कमालीचे संग्रह अनेकदा कोणत्याही कलाकारांच्या हृदयाबद्दल, आत्मा आणि आत्मविश्वासाबद्दल कधीही सांगतात. मी लावा दिवाचे मालक असल्याची कबुली देत नाही. 1 9 70 च्या दशकात मी आपल्या मालकीची नसलेली एक आहे, परंतु हे एक अतिशय रफर्ण चांगले प्रतिकृती आहे. हे मुख्यत्वे एका कपाटातच राहते, परंतु काहीवेळा जेव्हा इच्छाशक्ती हळूहळू सुरू होते, तेव्हा मी ते पुसून टाकतो, ते प्लग करा आणि काही प्रेमळ आठवणींवर थोडी जास्त मिळवा ही सामग्री अशीच आहे. हेन्री डेव्हिड थोरो यांनी आम्हाला "कोणत्याही कपड्यांना लागणाऱ्या कोणत्याही गोष्टीला अविश्वास" देण्याची इशारा दिला. कदाचित त्याला त्या वेळी कळलेच नाही, परंतु तो आस्थापनाच्या अविश्वासबद्दल आणि क्लासिक रॉक युगमध्ये त्या बंडखोरपणाचा भाग असलेल्या गोष्टींबद्दल बोलत होता. शेवटी, जर आपण बॉक्सच्या (आणि माझ्या मते चांगले) विचार करत असाल तर 2013 मध्ये क्लासिक रॉक आर्टिस्टकडून पाच सर्वश्रेष्ठ अल्बम आहेत. - दीप जांभळा - आता काय ? !
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली. मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली. विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात कुलगुरूंवर बडतर्फीची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विद्यापीठ आणि कुलगुरूंवर टीकेची झोड उठली होती. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून 'कुलगुरू हटाव'च्या मागणीने जोर धरला होता. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठ कायद्यातील कलम ११ (१४) (ई) प्रमाणे अधिकाराच्या दुरुपयोगाचा ठपका ठेवत कुलगुरू संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकले आहे. विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत देशमुख यांनी आणली. पण, ती यशस्वीरीत्या राबविता आली नाही. निकाल उशिरा लागले, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले या कारणांवरून देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याचे राजभवनातून सांगण्यात आले. मार्च महिन्यात परीक्षा सुरू झाल्या. एप्रिलमध्ये संजय देशमुख यांनी सर्व उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यात येतील असे जाहीर केले. त्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने दुसºयांदा तीन कंपन्यांपैकी 'मेरिट ट्रॅक' कंपनीला कंत्राट दिले. या उशिरामुळे मे महिन्याच्या मध्यात उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि तपासणीला सुरुवात झाली. प्राध्यापकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने उत्तरपत्रिका तपासणीत अनेक अडचणी येत होत्या. जून महिना संपत आल्यावरही निकाल जाहीर न झाल्याने राज्यपाल विद्यासागर राव यांनी लक्ष घातले. ४ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याची तंबी दिली. विद्यापीठाला ती मुदत पाळणे जमले नाही. त्यामुळे ३१ जुलैची दुसरी मुदत दिली. आॅगस्ट महिना उजाडल्यानंतरही निकाल जाहीर न झाल्याने ९ आॅगस्ट २०१७ रोजी कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. संजय देशमुख यांनी या कारणे दाखवा नोटीसला तब्बल तीन हजार शब्दांचे उत्तर दिले. १९ सप्टेंबरला विद्यापीठाने ४७७ निकाल जाहीर केले. अजूनही तब्बल २४ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. राज्यपालांच्या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. बडतर्फीच्या कारवाईबाबत संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण, संपर्क होऊ शकला नाही. मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६० वे वर्ष आहे. १६० वर्षांत कधीही राज्यपालांनी विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप केला नव्हता. पहिल्यांदाच निकाल उशिरा लागल्यामुळे कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली; आणि आता कुलगुरूंना काढून टाकण्यात आले आहे. नवीन कुलगुरू कोण? : सध्या विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारींच्या खांद्यावर आहे. मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यावर आता नवे कुलगुरू कोण? याविषयी उत्सुकता आहे. 'मेरिट ट्रॅक' कंपनीवर कारवाई? : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन निकालाच्या कामाचे कंत्राट 'मेरिट ट्रॅक' कंपनीकडे असल्याने या कंपनीवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दिल्ली कॅपिटल्स वि चेन्नई सुपर किंग्ज क्वालिफायर 1: आयपीएल 2021 क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, Capitalषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ प्रथम फलंदाजी करेल. दिल्ली कॅपिटल्स संघ आज केवळ पाच फलंदाजांसह उतरला आहे. दुसरीकडे, सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जचा संघ नाही. रोबीर उथप्पाला आणखी एक संधी देण्यात आली आहे. नाणेफेकानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला, "आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही एक कठीण विकेट आहे, पण नंतर ती अधिक चांगली होऊ शकते. आम्ही आमच्या उणिवांवर मोकळेपणाने बोलतो आणि त्यांचे विश्लेषण करतो आणि त्यामुळे आम्हाला मदत होते." मदत आली. आम्ही मदत केली. त्याच टीमसह उतरत आहोत. " त्याचवेळी, नाणेफेक झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार isषभ पंत म्हणाला, "आम्हाला प्रथम फलंदाजी करण्यात आनंद होत आहे, पण आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. मी थोडा चिंताग्रस्त आहे, पण हा खेळाचा भाग आहे. आम्ही एक आमच्या संघात बदल. टॉम कुरन रिपल पटेलसाठी आला आहे. जेव्हा तुम्ही गेम जिंकता, तेव्हा आत्मविश्वासाची पातळी जास्त असते, पण आम्ही सामना हलके घेणार नाही. " टी -20 फॉरमॅटमध्ये चेन्नई आणि दिल्लीचे संघ एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात एमएस धोनीच्या संघाचा वरचष्मा राहिला आहे. जिथे चेन्नई सुपर किंग्सने 15 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दिल्लीच्या संघाला केवळ 10 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज खेळत आहे इलेव्हन- Utतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (क & wk), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवूड. दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन- शिखर धवन, पृथ्वी शॉ, isषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, टॉम कुरन, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिक नॉर्टजे.
गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून जळगावसह राज्यातील विविध आगारातील चालक-वाहक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी मुंबई येथे जात आहेत. मुंबईतून आल्यानंतर या कर्मचाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करुन, अहवाल येईपर्यंत तीन दिवस कामावर न बोलावता गृहविलगीकरणात राहण्याच्या सुचना करण्यात येत आहेत. मात्र, पुणे येथे गेल्या आठवड्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी बेस्ट सेवेसाठी मुंबई, वरळी येथे गेलेल्या चालक - वाहकांना मुंबईहून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यक नसल्याच्या सुचना केल्या आहेत. त्या सुचनांच्या आधारे राजेंद्र देवरे यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवून, मुंबईतून परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी न करता, त्या कर्मचाऱ्यांवर नियोजित कामगिरी सोपविण्याच्या सुचना केल्या आहेत. इन्फो : विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना पाठविलेले पत्र सोशल मीडियावर शुक्रवारी चांगलेच व्हायरल झाले. जिल्ह्यातील विविध आगारातील चालक-वाहकांनी कामगार संघटनांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर या पत्रावर तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त करतांना दिसून आले. जर मुंबईहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होत नसेल, तर महामंडळ कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, या पत्राबाबत विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यांशी ` लोकमत` प्रतिनिधीने दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दहिगावने : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला. त्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. लग्नसोहळ्यासह इतर कार्यक्रमांची रेलचेल वाढली. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी पासेसची संख्याही वाढली. त्यामुळे दहिगावने ते शेवगाव या भागात बसेसच्या दिवसाला दोन फेऱ्या सुरू केल्या असल्याची माहिती शेवगावचे आगारप्रमुख वासुदेव देवराज यांनी दिली. ही बससेवा सुरू व्हावी, याबाबत 'लोकमत'नेही वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. संचारबंदीचे नियम शिथिल होऊन गावागावांत भरणारे आठवडे बाजार गर्दीने फुलले आहेत. छोटे-मोठे व्यापारी व जनतेची उलाढाल वाढल्याने दळणवळणात वाढ झाली आहे. मात्र, मागील दहा महिन्यांपासून ग्रामीण भागात बससेवा बंद होती. याचा दळणवळणाची सुविधा नसलेल्या नागरिकांना चांगलाच फटका बसला. त्यामुळे दहिगावने ते शेवगाव बससेवा सुरू करावी, अशी मागणी जनतेकडून वारंवार होत होती. मात्र, आर्थिक गणित जुळत नसल्याने बसच्या फेऱ्या सुरू करणे शक्य होत नव्हते. आता शाळा सुरू होऊन विद्यार्थी पासेसची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संख्या व आर्थिक गणित जुळणे गरजेचे होते. त्यात शाळा सुरू झाल्याने तालुक्यातील १ हजार ५२६ विद्यार्थ्यांना आजपर्यंत पासेस दिले आहेत. त्यामुळे राणेगाव, कांबी, दहिगावने, धनगरवाडी, नागलवाडी, वाघोली आदी भागांतील बसेसच्या काही फेऱ्या सुरू केल्या आहेत. गरजेनुसार यात वाढ केली जाईल. - वासुदेव देवराज,
सावंतवाडी ता.२२ः मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आज स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,हरिश्चंद्र पवार,संतोष सावंत,जिल्हा सोशल मीडिया सेलचे समन्वयक अमोल टेंबकर,सावंतवाडी पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर,शुभम धुरी, प्रशांत सावंत,भक्ती पावसकर,तेजल कदम,रोहित पोकळे,निखिल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी श्री.जेठे यांनी श्री.नाईक यांना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय स्तरावर काम करताना त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या आणि मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई : कोहिनूर मील गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आला आहे. त्यासाठी आज ते सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांच कुटूंबही सोबत राहणार आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे हे राज यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दक्षिण मुंबईत तसेच आदोलनाच्या संभाव्य ठिकाणी पोलिसांचा चोख बंदबोस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मनसे अधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. तर बेस्ट बसेसची तोडफोड होऊ नये यासाठी बेस्ट बसेसना जाळ्या लावण्यात आल्या आहेत. दरम्यान, लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी खास असलेली 'हज' यात्रा यंदा जुलै महिन्यात सुरू होणार आहे. सौदी अरेबिया मध्ये दरवर्षी या धार्मिक यात्रेमध्ये मुस्लिम बांधव एकत्र येतात. दरम्यान सध्या जगातील कोविड 19 चा धुमाकूळ पाहता यावर्षी सौदी अरेबियामधील किंग्डम कडून या यात्रेत सहभागी यात्रेकरूंची संख्या 60 हजार व्हॅक्सिन घेतलेले मुस्लिम बांधव इतकी करण्यात आली आहे. यामध्ये देखील 18-65 वयोवर्ष ही मर्यादा आहे. कोरोना संकट पाहता यंदा देखील परदेशी नागरिकांना हज 2021 मध्ये प्रवेश निषिद्ध असेल. आर्थिक दृष्ट्या सबळ आणि शारिरीक दृष्ट्या धडधाकट असलेली कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्यांच्या धर्मानुसार, पाच आधारांपैकी एक असलेल्या या हज यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतो. हज 2021 यंदा कधी आहे? इस्लामिक कॅलेंडर नुसार, Dhul al-Hijjah या 12 व्या आणि अंतिम महिन्यात आठव्या दिवशी हज असते. Supreme Court of Saudi Arabia नुसार, Dhul al-Hijjah यंदा ग्रेगेरियन अर्थात इंग्रजी कॅलेंडरनुसार 11 जुलै पासून सुरू होत आहे. तर 18 जुलै दिवशी हज आहे. 17 जुलै च्या सूर्यास्तानंतर इस्लामिक धर्मानुसार सारे विधी सुरू होतील. - हज च्या सुरूवातील प्रत्येक सहभागी पुरूष व्यक्तीला Ihram परिधान करावा लागतो. Ihram म्हणजे पांढरे कपडे. महिला सामान्य कपडे परिधान करू शकतात. - देवासमोर सार्या व्यक्ती समान आहेत हा संकेत देणारा पोषाख म्हणजे Ihram. एकदा ते परिधान केले तर तुम्ही एका पवित्र वातावरणात असता. त्यामुळे याकाळात तुम्ही सेक्स करू शकत नाही, नखं, दाढी, केस कापू शकत नाही. परफ्यूम वापरू शकत नाही. - हज यात्रेच्या पहिल्या दिवशी मक्काच्या Kaaba मध्ये प्रार्थना केली जाते. दुसर्या दिवशी मिना मधून Mount Arafat ला भाविक जातात. इथे अल्लाह कडे चूकांची कबुली देत माफीची याचना करतात. त्यानंतर Arafat आणि Mina दरम्यान असलेल्या Muzdalifah ला देखील भेट दिली जाते. - Muzdalifah ला पोहचल्यानंतर Maghrib आणि Isha यांच्या एकत्र प्रार्थना केल्या जातात. या दिवशी आभाळाखाली जमिनीवर झोपण्याची प्रथा आहे. - हजचा तिसरा दिवस हा Eid al-Adha सोबत येतो. या दिवशी प्राण्यांची कुर्बानी दिली जाते. त्यानंतर भाविक पुन्हा Kaaba ला येतात. - चौथ्या दिवशी मिना मध्ये आल्यानंतर तेथील 3 पिलर्सवर 7 गारगोटी दगड मारण्याची पद्धत आहे. हाच प्रकार पाचव्या दिवशी देखील केला जातो. - शेवटच्या दिवशी हज सोडण्यापूर्वी अंतिम Tawaf al-Wadaa करण्याची पद्धत आहे. टीपः सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामध्ये कोणत्याही गोष्टींची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही.
केंद सरकारने लागू केलेल्या अन्न सुरक्षा कायद्याद्वारे विक्रेत्यांना आता नव्याने मिळणारा परवाना हा चौदा अंकी सांकेतिक क्रमांकाच्या स्वरुपात असेल. त्यामुळेच, पुण्यासह राज्यभरात बनावट विक्री परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्यांचे पितळ उघडे होणार आहे. मटा प्रतिनिधीकेंद सरकारने लागू केलेल्या अन्न सुरक्षा कायद्याद्वारे विक्रेत्यांना आता नव्याने मिळणारा परवाना हा चौदा अंकी सांकेतिक क्रमांकाच्या स्वरुपात असेल. त्यामुळेच, पुण्यासह राज्यभरात बनावट विक्री परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्यांचे पितळ उघडे होणार आहे. नव्या कायद्यांतर्गत बारा लाख रुपयांपर्यंत व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायाची नोंदणी तर त्यापुढे उलाढाल असलेल्या विक्रेत्यांना परवाना घेणे सक्तीचे ठरणार आहे. परवाना किंवा नोंदणी ही दरवषीर् किंवा पाच वर्षासाठी घेता येईल. परवाना घेताना विक्रेत्यांना अन्न व औषध (एफडीए) प्रशासनाकडे व्यवसायाच्या जागेची माहिती, मिळकतकर पावती तसेच ताळेबंद पत्रकाची पूर्तता करणे आवश्यक आहे. नव्या कायद्याने राज्य आणि केंद सरकारमार्फत व्यावसायिकांना परवाना घेता येईल. मात्र परवाना किंवा नोंदणी एका स्वरुपात पूवीर् हाताने लिहून दिला जात असे. आता परवाना व नोंदणीचा क्रमांक हा सांके तिक स्वरुपात मिळणार आहे. त्यामुळे कोणी व्यावसायिक बनावट परवाना वा नोंदणीद्बारे विक्री करीत असेल तर त्याच्याविरु द्बकारवाई क रता येणे शक्य होणार आहे. तसेच कोणत्या अधिकाऱ्याच्या नावाने परवाना देण्यात आला. त्याचाही शोध घेण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाचे सहायक आयुक्त चंदशेखर साळंुखे यांनी 'मटा'ला दिली. . . . तर नोंदणी २५ हजारांपर्यंत वाढेलनव्या कायद्यानुसार परवाना नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी न करताच व्यवसाय करणारे व्यापारी, विक्रेते समोर येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे चाळीस हजार परवानाधारक विविध व्यवसायाचे विक्रेते आहेत. मात्र नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यात आणखी २५ हजार विक्रेत्यांच्या नोंदणीची वाढ होईल, असा अंदाज साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.
बाबांचा 'बैलबंडी'योग! : मिहानमधील २३० एकरातील पतंजलीच्या फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. बाबांचा 'बैलबंडी'योग! : मिहानमधील २३० एकरातील पतंजलीच्या फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. या कार्यक्रमासाठी योगगुरू बाबा रामदेव यांनी बैलबंडीवर स्वार होऊन कार्यक्रमस्थळ गाठले. रामदेव बाबांसोबत आचार्य बालकृष्ण व आ. रवी राणा होते.
जर प्रशासन आडमुठेपणा आणि चुकीच्या नियमांच्या आधारे अनुमती नाकारत असेल, तर शिवाजी पेठेसाठी अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेण्यासाठी मी सिद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची मर्यादा साडेसात लाखांपर्यंत वाढवली. पण मराठा युवकांसाठी दिली जाणारी १० लाख रुपये बिनव्याजी कर्जाची योजना ठप्प केली. आशासेविकांना ५ मास मानधन न मिळाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा ! आशासेविकांना मानधनासाठी मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन स्वतःहून का लक्ष देत नाही ? एका मुलीवर नूर इस्लाम या मौलवीने बलात्कार केला. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या आजोबांनी (फाळणीच्या वेळी) पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतात रहाण्याचा निर्णय का घेतला ? पाक तसेच अन्य इस्लामी देशांमध्ये मुली लहान वयापासून हिजाब, बुरखा आदी परिधान करतात. 'असे असतांनाही तेथे बलात्काराचे प्रमाण अधिक का ? ', विनाअनुमती आंदोलन करण्याचे धर्मांधांचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठाती देवी महालक्ष्मीचे पूजेचे विधान आहे. या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपास करून रात्री देवी लक्ष्मीचे विधिपूर्वक पूजन करतात. असे म्हणतात की एके काळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि क्षीर सागरात गेली. मां लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्री विहीन झाले. तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुनःः प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधी विधानाने त्यांच्यासाठी व्रत केले. त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले. देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली. या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली. व्रत समाप्ती पश्चात माता पुनःः उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्री हरी विष्णूंसह संपन्न झाला. देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले. ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते. म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते. लक्ष्मी पंचमी पूजन विधीः चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री सण साजरा केला जातो तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधिपूर्वक साजरी केली जाते. या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचे सेवन करण्याचे विधान आहे. या प्रकारे पूजन करू शकतात. श्री लक्ष्मीची पूजा करण्या हेतू सर्वात आधी स्नानादिने निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवीच्या पूजेसाठी लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करणे अती उत्तम ठरेल. नंतर सोनं, चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलासह विधिपूर्वक पूजा करावी. मूर्ती नसल्यास प्रतिमा किंवा फोटोची पूजा करता येते. पूजा सामुग्री या रूपात देवीला धान्य, हळद, गूळ, आलं, इतर देवीला अर्पित करावे. सामर्थ्यानुसार हवन देखील करवू शकता. व्रत करत असलेल्या भक्तांनी विधिपूर्वक उद्यापन देखील करावे. श्री पंचमीला देवीचे अनेक स्तोत्र जसे कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी सुक्त याचे पाठ करावे. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणार्या भक्तांना 21 कूल यासह देवी लक्ष्मीच्या लोकात स्थान प्राप्त होतं. स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो. आर्थिक समस्यांना सामोरा जात असलेल्यांनी हे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या आपोआप सुटतात.
समोरच्या वनांत एक मायावी सुवर्णमृग उत्पन्न केला. आणि 'हिमालयानें तुझ्यावर प्रसन्न होऊन तो येथेंच तुझ्यासाठी पाठविला आहे' अशी रामापाशी बतावणी केली. दुर्दैवानें लक्ष्मण यावेळीं तीर्थयात्रेहून परतलेल्या कुलपतींना सामोरा गेला होता. तेव्हां अखेर रामच त्या सुवर्णमृगाच्या मागें धांवला. आतां तेथें एकटी सीताच राहिली. लगेच रावणानें आपलें खरें रूप प्रकट करून सीतेला धरून तो आपल्याबरोबर घेऊन गेला. जातां जातां त्यानें जनस्थानांतील तपस्व्यांना उद्देशन गर्वाने जाहीर केलें कीं, "हा पळवून मी दशमुख रावण रामाची पत्नी बळजबरीनें नेत आहे. जर रामाला आपल्या पराक्रमाचा अभिमान असेल तर त्यानें तो आतां प्रकट करावा. यावेळीं रावणाला अडविण्यासाठीं जटायू नांवाचा एक प्रचंड गिधाड पक्षी पुढे आला, परंतु रावणाने त्याचें पंख तोडून त्याला पंगू करून टाकलें. रावण सीतेला पळवून नेत असतांना दोन तपस्व्यांनीं तें पाहिलें. नागिणीप्रमाणे आपल्या सुटकेसाठीं सळसळ करणारी आणि एखादी फुलवेल तोडून काढावी त्याप्रमाणें सुकून गेलेली सीता रावण जबरदस्तीने पळवून नेत असतांना पाहून त्यांना वाटले की तपोवनांतील मुनिजनांच्या तपश्चर्येची सिद्धीच हा रावण पळवून नेत आहे. त्यांनीं सीतेच्या मदतीसाठीं हांकाहांक केली, परंतु त्यावेळी
अकोला : जिल्ह्यातून तडीपार केलेले दोन आरोपी हरिहरपेठ येथे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने छापा टाकून दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध जने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिहरपेठ येथील रहिवासी शेख जुनेद शेख निजाम आणि शेख कासम ऊर्फ गुड्डू शेख अनिस या दोन आरोपींना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र तरी हे दोघेही हरिहरपेठ येथे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी सापळा रचून बुधवारी दुपारी या दोघांनाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण - अफू !\nपारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण - अफू !\nOctober 15, 2018 October 11, 2019 इनमराठी टीम835 Views 1 Comment Parsi Community, Reason Of Richness\nपारशी समाज हा भारतातील सर्वात अल्पसंख्याक धार्मिक समूह आहे. भारताच्या अगदी काही थोड्या भागात पारसी लोकांचं आज अस्तित्व आहे.\nतरी एवढी कमी संख्या असून देखील पारशी समाजाचा देशाच्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे.\nपारशी समाजाकडे मोठ्या प्रमाणावर धन साठा आणि संपत्ती आहे. पारशी लोकांचं जीवनमान हे खूप उच्चस्तरीय आहे.\nपारसी लोक मूळचे इराकचे रेफ्युजी म्हणून भारतात आले आणि अगदी काहीच वर्षात इतके श्रीमंत झाले की त्यांनी भारताच्या औद्योगिक विश्वावर आधिपत्य गाजवले.\nपण एका भटक्या व आश्रित समूहाला एका परकीय भूमीवर एवढी प्रगती करणं कसं शक्य झालं? त्यांचाकडे एवढा पैसा आला तरी कुठून?\nतर मित्रांनो याचं उत्तर आहे, "अफूचा व्यापार"...!\n"अफू"च्या व्यापाराने पारशी लोकांना इतकं श्रीमंत बनवलं की त्यांची संपत्ती ते स्टील, रिअल इस्टेट आणि व्यापारात विस्तारित करू शकले.\nअन्यथा एक समूह ज्याच्याकडे स्वतःची जमीन नाही. सोनं - नाणं नाही तो भारताच्या औद्योगिक विश्वावर अधिराज्य तरी कसा गाजवू शकतो?\nअफूचा व्यापार तेव्हा सुरू करण्यात आला जेव्हा ब्रिटिशांना चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या चहा, चिनीमाती आणि रेशीम या वस्तूंची देयके देतांना अडचण येऊ लागली होतो.\nअनेक भारतीय घराण्यांनी अफूचा व्यापार सुरू केला परंतु पारशी समाज त्यात आघाडीवर होता.\nपारसी लोकांकडे अनेक गुण होते. जसे आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होणे, ब्रिटीशांशी चांगले संबंध असणे आणि समुद्रातून प्रवास करण्याची भीती नसणे. (पूर्वी तसं करणं भारतात पाप आणि चुकीचं समजलं जाई, त्याला सिंधूबंदी असे म्हणत!)\nअफूच्या व्यापाराच्या सफलतेमागे सर्वात महत्वाचा वाटा त्यांच्या कर्मभूमीचा आहे. पारशी लोकांची कर्मभूमी तीच होती जी आज अनेकांची कर्मभूमी आहे.\nती म्हणजे मुंबई. त्यातल्या त्यात दक्षिण मुंबई.\nया भागात ब्रिटिशांचं प्रस्थ होतं त्यामुळे पारसी लोकांना हवी ती मदत मिळाली. त्यांनी पारसी लोकांची जास्त अडवणूक केली नाही.\nकोलकाताच्या एका प्रमुख व्यापाऱ्याने पण अशी गुंतवणूक अफूचा व्यापारात केली होती परंतु त्याला यात अपयश आले.\nचीनने अफूचा व्यापारावर बंदी आणली होती. त्या बंदीमुळे भारतात होणारा अफूचा व्यापार स्थगित झाला होता.\nपरंतु आर्थिक दृष्ट्या नुकसान होऊ देण्याची इंग्रजांची कुठलीच मानसिकता नव्हती त्यांनी लगेचच चीन सोबत दोन अफूचे युद्ध केले.\nया युद्धात चीनचा पराभव झाला. चीनने शरणागती पत्करली व ब्रिटिशांनी अफूचा व्यापार कायदेशीर करून घेतला.\n१८३० च्या उत्तरार्धात, ४२ पैकी २० विदेशी व्यापारी संस्था ज्या चीन मध्ये अफूचा व्यापार करत त्या पारसी समाजाच्या मालकीच्या होत्या.\n१९०७ साली भारताचा अफू व्यापार आजच्या तुलनेत १० पट जास्त होता. तेव्हा अफूच्या उत्पादनाचं जागतिक प्रमाण हे ४१,६२४ टन होतं. परंतु या अफूचा व्यापारामुळे चीनला सामाजिक स्तरावर खूप मोठं नुकसान झेलावं लागलं होतं.\nचीनमधील चार पैकी एक तरुण हा अफूचा व्यसनाने ग्रस्त झाला होता. हा आकडा आज जितके अफूचे व्यसनी लोक आहेत, त्यांचा तीनपट होता.\nभारतातील गंगा किनाऱ्यावरील जमिनीवर आणि मालवा प्रदेशात अफूच उत्पादन शेतकऱ्यांना घ्यायला लावलं जात होतं. यामुळे त्या भागात आवश्यक खाद्यान्न पिकं जसे गहू आणि भात याचं उत्पादनच होत नसे. यामुळे ओढवलेल्या उपासमारीने लाखो लोकांचा जीव गेला होता.\nयाबरोबरच आफ्रिकेतून अमेरिकेतल्या कापूस आणि उसांच्या शेतात जो गुलाम आयात निर्यात करण्याचा कारभार चालायचा त्यासाठी अफूचा व्यापार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.\nअफूच्या व्यापाराचा इतिहास जरी अत्यंत अंधकाराने व पिडेने भरलेला असला तरी पारसी लोक फक्त त्याचा व्यापार करण्यासाठी उपयोग करत.\nतो व्यापार त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं. ते तो व्यापार कायदेशीररित्या करत असत. जे काही परिणाम झालेत अथवा जे काही नुकसान झाले ते दोन्ही बाजूंचे झाले होते.\nहे सर्व होऊन सुद्धा पारसी समाजाने समाजाला खूप काही परत केलं.\nपारशी समाजाने भारतात औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, जेव्हा जे आरडी टाटांनी स्टीलचा पहिला कारखाना सुरू केला.\nहे सर्व अफूच्या पैश्यांवरच शक्य झालं.\nअनेक शैक्षणिक संस्था जसे सर जे जे स्कुल ऑफ आर्ट्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बंगलोर, सर जे जे स्कुल ऑफ आर्किटेक्चर, बी जे मेडिकल कॉलेज, जे जे मेडिकल कॉलेज, जे एन पेटिट लायब्ररी आणि सेठ आर जे जे हायस्कूल यांची स्थापना पारशी लोकांकडून करण्यात आली. या संस्थांतून दर्जेदार शिक्षण देशात उभं राहिलं.\nभारताच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्र विकासात आपण टाटा, वाडिया, मेस्त्री, गोदरेज या पारशी समूहांचे योगदान नाकारुच शकत नाही.\nभारताला स्वयंपूर्ण बनवण्यात पारसी लोकांचा सिंहाचा वाटा आहे. पारसी लोकांनी स्वतःच्या प्रगतीबरोबर देशाच्या प्रगतीला देखील तितकेच महत्व दिले आहे. त्यामुळे देश त्यांचा काळ्या भूतकाळाची आठवण काढत नाही.\nत्यांच्या प्रति समाजात नेहमी आदराचे स्थान आहे व ते पुढे कायम राहिल.\n← लोक घरात "फिश टँक" फक्त हौस म्हणून ठेवतात असं वाटतं? वाचा त्याचे 'आश्चर्यकारक फायदे'\nया गावात नवस फेडण्यासाठी पुरुषांचं जे केलं जातं ते पाहून हसावं की रडावं कळणार नाही! →\nइस्लाम की स्व-धर्मः पारशी समुदायाच्या इराण ते भारत प्रवासाचा रंजक इतिहास\nदुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास!\nApril 27, 2017 इनमराठी टीम 0\nOne thought on "पारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण - अफू !"\nOne GRAVE MISTAKE !\nParsis DID NOT come From IRAQ- PARSI MEANS PERSIANS / IRANIANS !\nThey were Refugees from Persia / IRAN !
ज्या ठिकाणी हिंसाचार झाला तेथून ४० किमी अंतरावर ६० बॉम्ब सापडले आहेत. शनिवारी मारग्राम परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये ४ बादल्यांमध्ये ठेवलेले २०० बॉम्ब जप्त करण्यात आले. मारग्राम ते हिंसाचारग्रस्त बागतुई गावाचे अंतर सुमारे ४० किमी आहे. जिल्ह्य़ाचे एसपी नागेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, क्रूड बॉम्बच्या जप्तीसाठी सातत्याने छापे टाकले जात आहेत. नवी दिल्ली - बीरभूम हिंसाचारानंतर पोलिसांच्या छाप्यांमध्ये गेल्या २४ तासांत बंगालमधील विविध ठिकाणांहून ३५० हून अधिक क्रूड बॉम्ब सापडले आहेत. त्यापैकी बहुतेक २०० बॉम्ब बीरभूमच्या मारग्राम परिसरात सापडले आहेत. पोलिसांनी या छाप्यात क्रूड बॉम्बसह ११ जणांना पकडले आहे. शनिवारी मारग्राम परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये ४ बादल्यांमध्ये ठेवलेले २०० बॉम्ब जप्त करण्यात आले. मारग्राम ते हिंसाचारग्रस्त बागतुई गावाचे अंतर सुमारे ४० किमी आहे. जिल्ह्य़ाचे एसपी नागेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, क्रूड बॉम्बच्या जप्तीसाठी सातत्याने छापे टाकले जात आहेत. चला जाणून घेऊया, गेल्या २४ तासांत बंगालच्या कोणत्या जिल्ह्यातून बॉम्ब सापडले आहेत. बीरभूम हिंसाचारानंतर, ममता बॅनर्जी यांनी प्रभारी डीजीपी मनोज मालवीय यांना राज्यातील सर्व अवैध बॉम्ब आणि शस्त्रे जप्त करण्याचे निर्देश दिले होते. ममता यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बॅरकपूर-बिजपूर विभागात टीम अधिक सक्रिय करण्यात आली आहे. ही मोहीम १० दिवस चालणार आहे.
वाशिम (ज़का खान) : खुन्नस दिल्याच्या राग मनात धरुन बारावीत शिकणाऱ्या मुलाने अकरावीत शिकणाऱ्या तिघांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये घडली आहे. हल्ला झालेल्या तिन्ही युवकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात संशयित आरोपी निखिल मेहरे (१९) आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांवर कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात रेहान खान रहीम खान (१७) याने दिलेल्या तक्रारीतून मिळालेली अधिक माहिती अशी की, बिलाल याकूब कालूत (१७), गुलाब दस्तगीर खान (१८) असे दोन मित्र आहेत. हे तिघे जण रोज कॉलेजला सोबत जातात आणि सोबत परत येतात. या तिघांना बारावीतील निखील मेहरे (रा. कारंजा लाड) हा काही कारण नसतांना नेहमी येता जाता शिवीगाळ करत असतो. ऑगस्ट २०२२ मध्ये विदयाभारती कॉलेजमध्ये अॅडमिशन सुरु असताना फिर्यादी रेहान खान आणि बिलाल कालूत रांगेत उभे होते. तिथं निखील मेहरेही उभा होता. त्यावेळी तिघांमध्ये काही कारणाने वाद झाला. तेव्हा निखीलने रेहना आणि बिलालला दादागिरी करून धमकाविले. अशात काल (शुक्रवारी) संध्याकाळी महेश भवनमध्ये ब्लुचिप कॉन्वेन्ट शाळेचा डान्स कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला रेहान आणि बिलाल गेले होते. तिथंही निखील मेहरे याने बिलालला हॉलच्या बाहेर नेले, रेहानही त्यांच्यासोबत गेला. तेव्हा निखील मेहरे यानी "तुम्ही कॉलेजमध्ये कसे येता, तुम्हाला पाहतो मी" अशी धमकी दिली. त्यानंतर आज (शनिवारी) सकाळी रेहान, गुलाम आणि बिलाल हे तिघं जण कॉलेजमध्ये गेले. तेव्हा निखील आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांनी बिलाल आणि याकुबला शिवीगाळ केली. बिलालने त्यांना शिवीगाळ का करतो असे विचारले. त्यावर निखील मेहरे यांने त्याच्या खिश्यातुन एक बटन चाकु काढुन बिलाल याकुबच्या गळ्यावर मारला. त्यांना सोडविण्यासाठी रेहानही पुढे सरसावला. पण निखील मेहरेने गुलामच्या मानेवर आणि आणि रेहनाच्या डावे डोळ्यावर चाकुने मारहाण केली. तसंच त्याच्यासोबत असणाऱ्यांही लाथा बुक्याने मारहाण केली आणि शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. दरम्यान, रेहनने दिलेल्या या फिर्यादीवरुन कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रकरणातील संशयित आरोपी निखील मेहरे याला पोलिसांनी अवघ्या २५ मिनिटांत शोधून ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास कारंजा शहराचे पोलीस निरीक्षक ए. एस. सोनोने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बि. सी. रेघीवाले आणि डिबी पथक हे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक जयंत नाइकनवरे आणि वाशिमचे अधिक्षक बच्चनसिंह कारंजा शहरात तळ ठोकून होते.
उपकार केले आहेत असेच मला वाटते. निर्णायक मात करतो ही गोष्ट खरेच विचार करण्यासारखी आहे. कुणी मनमोकळेपणाने अभिनंदनही करत नाही ! कडून शिकावे! इतका आंतरराष्ट्र्रीय दबाव असतांनाही त्यांनी ज्याप्रकारे श्रीलंकन सेनेत आणि नागरिकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम चेतविले त्याला तोड नाही !! श्रीलंका सरकारचे अभिनंदन !!
अमरावती : मेळघाटातील नागरिकांच्या विविध समस्यांची दखल घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटचा गोपनीय दौरा केला. या अभ्यासदौऱ्यात त्यांनी दुर्गम गावांना भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण तत्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. मांगिया, जेतादेही, मोथा, हरिसाल अशा विविध गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. जेतादेही परिसरात रोजगाराची अडचण पाहता मनरेगातून अधिकाधिक कामे राबवावीत. तेथील पेयजलाचा प्रश्नही प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळेत प्रस्ताव व कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मोथा येथील आरोग्य उपकेंद्र व सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित तपासण्या व उपचार व्हावेत. साधनसामग्रीबाबत कुठलीही अडचण असेल तर तत्काळ जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा. अनेक नागरिकांत हिमोग्लोबीनची कमतरता जाणवत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे याबाबत शंभर टक्के नागरिकांच्या तपासण्या करून उपचारासंबंधी उपाययोजना करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मांगिया गावातील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. रोजगार निर्मितीसाठी अधिकाधिक कामे राबवा. वन्यजीव विभागातील एमएससीआयटी प्रशिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. बोरी येथील वन विभागाच्या रोपवाटिकेसह वनौषधी व दुर्मीळ वनस्पती संकलन केंद्राची पाहणीही त्यांनी केली. लवादा बांबू केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स [Inter University Center for Astronomy and Astrophysics] पुणे येथे वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ जानेवारी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : शैक्षणिक पात्रता : एमएससी पदवी (भौतिकशास्त्रामध्ये) किंवा वैज्ञानिक संगणकीय किंवा B. E. /B. Tech पदवी (संगणक शास्त्र) फक्त नवोदित उमेदवारासाठी. वर्तमान भरती (येथे क्लिक करा) NMK (येथे क्लिक करा) © Maha NMK™ । Copyright 2015 - 2023 All Rights Reserved. Made with ❤ in India.
'लॉकडाऊन'दरम्यान 'फिटनेस फ्रिक' मिलिंद सोमननं पत्नी अंकिता कुंवरला पाठीवर बसवून मारले 'पुश-अप्स' ! (व्हिडीओ) पोलीसनामा ऑनलाईन : कोरोनाच्या दहशतीमुळं पू्र्ण देशात 24 मार्च 2020 पासून 21 दिवसांसाठीचा लॉकडॉकऊन आहे. सामान्यांसोबतच सारेच बॉलिवूड कलाकार सध्या आपापल्या घरात कैद आहेत. अनेकजण आता आपापलं रूटीन बनवताना दिसत आहेत. फिटनेस फ्रिक आणि पुरुष सुपरमॉडेल अशी ओळख असणारा अभिनेता मिलिंद सोमन सध्या आपल्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आला आहे. त्यानं पत्नी अंकिता कुंवरला पाठीवर बसवलं आहे आणि तो पुशअप्स मारत आहे असं व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना मिलिंदनं लिहिलं की, "8 वा दिवस. तुमच्याकडे जे काही आहे त्याच्या मदतीनं कसरत करा. त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्याकडे कसरत करण्यासाठी काहीच सामान नाही. आता तुम्ही कोणतंही कारण देऊ शकत नाहीत. कोणतीही लस चांगल्या प्रतिकारशक्तीपेक्षा जास्त प्रभावी काम करत नाही. ही प्रणाली चांगली काम करावी यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. संपर्ण शरीर क्रिया चांगल्या बनवण्यासाठी सूर्य नमस्कार सारखा सोपा व्यायाम करावा. आपल्या कसरतीच्या पहिल्याच प्रयत्नात पत्नीला उचलण्याचा प्रयत्न करू नका. 5 ने सुरुवात झाली होती. आता ही संख्या 12 झाली आहे. धन्यवाद अंकिता. " या पोस्टमध्ये मिलिंदनं पत्नीलाही टॅग केलं आहे. सध्या मिलिंद सोमनचा हा वर्कआऊट व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मिलिंद सोमन एक फिट बॉलिवूड कलाकार आहे. त्यानं अनेक सिनेमात काम केलं आहे. बाजीराव मस्तानीमधीलही त्याची भूमिकाही साऱ्यांना आवडली होती. मिलिंद एक अॅथलिटही आहे. अनेक किमीची मोठी रनिंग तो करू शकतो.
गोपाल नीलकंठ तथा गो. नी. दांडेकर यांना गोनीदा असेही म्हणतात. गोनीदा एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गोनीदा हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. त्यांचा जन्म गो. नी. दांडेकर यांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाही तर त्यानंतर ते गाडगे महाराजांचा संदेश पोहचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांच्या 'पडघवली' आणि 'शितू' या कादंबर्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते. गो. नी. दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक 'गोनीदांची दुर्गचित्रे' या नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती करताना 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. अशा या थोर लेखकाचे १ जून १९९८ रोजी निधन झाले.
उन्हाळ्यात थकवा जाणवणे : उन्हाळ्यात नेहमी थकवा जाणवतो. या थकव्याचे कारण पाण्याची कमतरता हेच असते. शरीरातील पाणी कमी झाल्याने एनर्जी लेव्हल कमी होते. यासाठी भरपूर पाणी प्या. हार्ट समस्या वाढू शकते : कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात डिहायड्रेट वाढते. युरीन आणि घाम कमी येतो. रक्त घट्ट होते, यामुळे हृदयापर्यंत रक्ताचा संचार व्यवस्थित होत नाही. हृदयरोग असल्यास योग्यप्रमाणात पाणी प्या. काकडी, कलिंगड, टरबूज खा. पचनशक्ती बिघडते, वजन वाढते : योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक मल-मूत्राद्वारे बाहेर पडतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. वजन नियंत्रणात राहील. पचनशक्ती चांगली राहील. सांधेदुखी वाढू शकते : कमी पाणी प्यायल्याने सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात. सांध्यातील गुळगुळीतपणा कमी होतो. यामुळे वेदना होऊ शकतात. ड्रायनेस आणि मुरूम वाढू शकतात : कमी पाण्याने चेहर्यावरील तजेला निघून जातो. त्वचेवर सुरकुत्या पडतात, मुरमे, डाग आणि कोरडेपणा येतो. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, हिरव्या भाज्या आणि फळे खा.
यादव साम्राज्यानंतर काळानंतर मुघल, आदिलशाही आणि निजामशाहीत पिळवणूक सहन करून नुकतेच स्वराज्याचे स्वप्न रयत बघु लागली होती, परंतु वतनदारी मिळालेले काही सरदार रयतेला वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार होत होते. पाटलांच्या,वतनदारांच्या मनात खोलवर चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच घेत नव्हती. उगवत्या सूर्याकडे आशेने पाहताना रयत राजरोज हुंदक्या मागून हुंदके देत होती. कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा कुणाला आणि आपलं दुःख सांगायचे कुणाला. अशी रयतेची स्थिती होती. पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत गैरवर्तन केल्याचे महाराजांच्या कानी आले. याआधी सुद्धा पाटलाने असेच शेण खाल्ले तरीही कोणी निवाडा केला नसल्याने लोकं निमूटपणे अन्याय सहन करत होते. पण यावेळी लाल महालात खुद्द माँसाहेब जिजाऊ न्यायनिवाडा करण्यास बसल्या होत्या. त्यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला, ज्या रयतेने एवढे वर्ष अन्याय सहन केला त्या रयतेवर आपल्या अधिपत्याखाली असा अन्याय होतोय यावरून त्या चवताळल्या. रांझे हे गाव जिजाऊंच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी ह्या गावची मालकी आऊसाहेबांकडे आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई रयत नासवना-यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण करण्याची वेळ आली होती. शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर ला सदरेस बोलावून घेतले. न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वांसमोर महाराजांनी बाबाजीची चौकशी केली, चौकशीअंती गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्याला आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता. बाबाजीला साधी शिक्षा केल्यास रयतेत उठसुठ कोणीही हे दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती. शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचे फर्मान दिले, त्वरित त्याची पाटीलकी जप्त केली गेली. इतकेच नव्हे तर त्याला या दुष्कर्माबद्दल त्याचे हात पाय कलम केले गेले. सर्वांसमक्ष बाबाजीला चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दिली गेली. पण हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होउन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जान सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही चौरंग शिक्षा अशी कठोर शिक्षा दिली. चौरंग शिक्षा केल्यानंतर शिक्षा पूर्ण करून त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था मृदू मनाच्या महाराजांनी केली. बाबाजी निपुत्रिक असल्याने त्याच्या अपंगावस्थेत त्याचा सांभाळ करायची तयारी गुजर कुळीच्याच सोनजी बिन बनाजी गुजर याने दर्शविली. महाराजांनी याबदल्यात मेहेरबान होऊन रांझेची पाटीलकी सोनजीच्या नावे करत बाबाजीस पालनपोषणार्थ त्याच्या स्वाधीन केले.
श्रीमद्भगवद्गीता - सार खाण्यापिण्याची व्यवस्था करू इच्छित होते, परंतु त्यांनी ते स्वीकार केले नाही. ते श्रीजगन्नाथांच्या स्वयंपाकघरातून फेकण्यात आलेला सडलेला भात जो गाईदेखील खात नसत, तो उचलून घेऊन आणत. त्या भाताला पाण्याने धूत असत आणि त्यात थोडे मीठ मिसळून खात असत. त्यावरच ते आपला उदरनिर्वाह करीत त्यांची एकमात्र संपत्ती एक मातीचे जलपात्र (पाणी पिण्यासाठी मातीचा एक गडवा किंवा गाडगे) होते; त्यांच्याकडे कुठली थाळी किंवा घोंगडीदेखील नव्हती. जगन्नाथपुरी समुद्राच्या तटस्थ आहे, म्हणून तेथे जास्त गरमी किंवा थंडी पडत नाही, म्हणून कसेतरी ते आपल्या झोपण्याची व्यवस्था करून घेत असत. लोकांनी टाकून दिलेल्या वस्त्रांपासून दोन कौपीन (लज्जारक्षणासाठी बांधलेले कमरेचे वस्त्र किंवा लंगोटी) बनवून त्या धारण करून भजन करीत असत. परंतु आम्ही स्वतःकडे पाहावे की आम्ही कसे रहातो आहे आणि काय घालतो ते? आपल्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी महाप्रभूंनी हे जग सोडून आपली लीला संगोपन (पूर्णतः अदृश्य) केली. त्यांच्या विरहात श्रील रघुनाथ दासांनी खाणेपिणे सोडले. ते रात्रंदिवस रडत असत. यालाच 'साधन' म्हणतात. आणि जे असे जीवन व्यतीत करतात, ते 'साधक' आहेत. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंच्या विरहात श्रीस्वरूप दामोदरांनीसुद्धा आपला देह सोडून गोलोक व्रजधामात प्रवेश केला. त्यानंतर तर श्रील रघुनाथ दासांनी पाणी पिणे देखील त्यागले आणि ते रात्रंदिवस केवळ रुदन (विलाप, क्रंदन) करीत बसत. ते नंतर जगन्नाथपुरीत राहू शकले नाहीत कारण त्यांची दशा अशी झाली होती, जशी श्रीकृष्ण मथुरेला गेल्यानंतर नंदबाबांची झाली होती. आपल्या घरातील प्रत्येक वस्तू (श्रीकृष्णांचे पीतांबर, श्रीकृष्णांची बासरी, श्रीकृष्णांचे मोरपीस) श्रीनंदबाबांना श्रीकृष्णांचीच आठवण करून देत असे. असा तीव्र विरह अनुभविल्यावर ते घरातून बाहेर निघून जात असत. यमुनेच्या काठी गेल्यानंतर तेथे श्रीकृष्णांचे पदचिन्ह (पाउलखूण, पावलांचा ठसा) पाहून पुन्हा ते विरहाने व्याकूळ होऊन जात. ते त्या वृक्षाला पाहात ज्यावर चढून श्रीकृष्ण कालिय नागाचे दमन करण्यासाठी पाण्यात झेपावले होते. यामुळे श्रीनंदबाबांना आणखीच तीव्रतेने श्रीकृष्णांची आठवण होत असे; मग ते आपले नेत्र बंद करून घेत असत. मग ते श्रीगोवर्धन पर्वताकडे जात. तेथे त्यांना वाटे जणू सगळे वृक्ष विरहात एकमेकांवर झुकून रडत आहेत, (जणू विचारीत आहेत),
ITR Refund: प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपली आहे आणि आता करदात्यांना रिफंडची प्रतीक्षा आहे. जर तुम्ही वेळेवर आयकर रिटर्न भरला आणि निर्धारित कालावधीनंतरही परतावा मिळाला नाही तर त्यामागील कारण काय असू शकते. हायलाइट्सः प्राप्तिकर विभाग साधारणपणे २५ ते ६० दिवसांत तुमचा परतावा परत देतो. आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतरच विभाग तुमच्या परताव्याची प्रक्रिया करतो. तुम्ही योग्य बँक खाते किंवा अचूक खात्याची माहिती भरली नाही तर परतावा अडकून जाईल. मुंबई : मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे, आता करदात्यांना त्यांचा परतावा मिळण्याची प्रतीक्षा आहे. आयकर विभाग तुमचे स्वतःचे पैसे परतावा म्हणून परत करत असले तरी लोकांसाठी ते बोनसपेक्षा कमी नाही आणि ते त्याची आतुरतेने वाट पाहतात. मात्र, बर्याच वेळा आयकर रिटर्न वेळेवर भरूनही तुमचा रिफंड विभागाकडून येत नाही आणि करदात्याला आपले पैसे अडकले की काय अशी भीती वाटते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही हीच भीती वाटत असेल किंवा वेळ उलटून गेल्यानंतरही परतावा मिळाला नसेल तर याची मुख्यतः पाच कारणे असू शकतात. या चुकांमुळे विभाग तुमचा परतावा रोखू शकतो. विभाग साधारणपणे २५ ते ६० दिवसांत तुमचा परतावा देतो. अतिरिक्त कागदपत्रे न देणे रिफंड अडकण्यामागे हे बहुतेकदा सर्वात मोठे कारण असते. आयकर विभागाला करदात्यांच्या अतिरिक्त माहितीची गरज असते, त्यामुळे आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतरच विभाग तुमच्या परताव्याची प्रक्रिया करतो. जर तुम्हाला देखील कळले की कोणतेही कागदपत्र गहाळ (कमी) आहे, तर तुमच्या मूल्यांकन अधिकाऱ्याशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि पावती देखील मिळवा. परताव्याचा चुकीचा दावा अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, करदात्याने परताव्याच्या दाव्यात नमूद केलेली रक्कम विभागाच्या मूल्यांकनाशी जुळत नाही. असे झाले तरी तुमचा परतावा अडकू शकतो. पण अशा प्रकरणांमध्ये प्राप्तिकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवून कळवेल की तुमच्याकडून परतावा मागितलेली रक्कम चुकीची आहे, तर ती रक्कम परत केली जात आहे. विभागाच्या समाधानासाठी तुम्ही या नोटीसला उत्तर दिल्यास तुम्हाला प्रत्यक्ष परतावा मिळेल. आयकरमध्ये चुकीचे तपशील अनेक वेळा करदात्याने त्याच्या आयकर रिटर्नमध्ये न जुळणारे किंवा चुकीचे तपशील भरले असल्यामुळे त्याचा परतावा अडकू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही दिलेली माहिती आणि विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती यात तफावत असण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात सामान्य चूक बँक खात्याबाबत आहे. तुम्ही योग्य बँक खाते किंवा खाते तपशील योग्य न भरल्यास तुमचा परतावा नक्कीच अडकेल. कराची देय रक्कम न भरल्यास तुम्ही तुमच्या कर दायित्वाचे योग्य मूल्यांकन केले नाही आणि विभागाने मागितलेल्या करापेक्षा कमी रक्कम जमा केली तरीही तुमचा परतावा अडकतो. अशा परिस्थितीत देखील विभाग तुम्हाला नोटीस पाठवून थकबाकी कराची मागणी करतो आणि तो भरल्यानंतर तुम्हाला परतावा दिला जातो. पडताळणी न केलेले बँक खाते किंवा आयटीआरच्या बाबतीत जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची पूर्व पडताळणी केली नसेल, ज्यामध्ये परतावा येणार आहे, तर यामुळे पैसेही अडकू शकतात. आयकर रिटर्नमध्ये त्याच्या बँक खात्याचा तपशील भरण्यापूर्वी करदात्याने खाते पूर्व-प्रमाणित केले पाहिजे. याशिवाय काही करदाते त्यांचे रिटर्न वेळेवर भरतात, परंतु निर्धारित वेळेत आयटीआर पडताळत नाहीत. यामुळेही तुमचा रिफंड अडकू शकतो. परतावा न मिळाल्यास काय करावे? सर्वकाही बरोबर झाल्यानंतरही तुम्हाला परतावा मिळाला नसेल, तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या बँकेशी संपर्क साधला पाहिजे. बर्याच वेळा आयकर विभागाने परतावा परत केला असूनही बँक ते तुमच्या खात्यात जमा करण्यास विलंब करते. जर ही बाब इथेही घडत असेल तर तुम्ही विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार पाठवू शकता किंवा टोल फ्री नंबरद्वारे तुमच्या रिफंडबाबत विभागाकडून माहिती मिळवू शकता.
आम्ही तुमच्यासाठी आज 5 किलोच्या पिठाचा पॅक घेऊन आलो आहोत. हे सर्व पॅक ग्लूटेन फ्री पिठाचे आहेत. हे तयार करण्यासाठी गहू आणि इतर साहित्य वापरण्यात आलेल आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये तुम्हाला डायबेटीस फ्रेंडली पीठही मिळत आहे. चपाती हे भारतीय संस्कृतीचा मुख्य खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे ती बनवताना चांगल्या क्वालिटीचे पीठ नक्कीच वापरायला हवे. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पिठाचे 5 किलोचे पॅक घेऊन आलो आहोत. यामध्ये गव्हाचे पीठ आणि मल्टीग्रेन पिठाचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील काही पीठ सेंद्रिय गव्हाचे आहे तर काही शरबती गव्हापासून बनवलेले आहेत. त्यांच्यापासून बनवलेल्या चपात्या या स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. तसेच हे पचनसंस्थेला बरे करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते आणि इतर समस्यांपासून देखील आराम देऊ शकते.
चर्चगेट स्टेशनात शिरलेली भरधाव वेगातील लोकल बफर एण्डवर आदळून प्लॅटफॉर्मवर चढल्याच्या घटनेची पुनरावृत्ती आज सीएसटी स्थानकात लोकल शंटिंगदरम्यान घडली. पहाटे दोनच्या सुमारास सीएसटीच्या प्लॅटफॉर्म नंबर पाचवर एक लोकल थेट बफरला जाऊन धडकल्यानं दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवानं, या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही, पण सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १५ मिनिटं उशिरानं होतेय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण अजून अपघाताचं कारण समजू शकलेलं नाही. पहाटे लवकर सुटणाऱ्या काही लोकल मध्यरात्रीनंतर सीएसटी स्टेशनात मुक्कामी असतात. तशीच, एक रिकामी लोकल दोनच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर पाचमध्ये शिरली. पण थांब्याची पिवळी पट्टी ओलांडून ती पुढे गेली आणि बफर एण्डवर आदळली. डेड एण्डचं आणि गाडीच्या डब्याचं झालेलं नुकसान पाहता, ही धडक जोरदार असल्याचं दिसतंय. या अपघातात ट्रेनचे दोन डबेही रुळावरून घसरले. पहाटेच्या वेळी स्टेशनात अगदीच किरकोळ वर्दळ असते. त्यामुळे मोठी हानी टळली. परंतु, रेल्वे प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेतली असून अपघाताचं कारण शोधण्याचं काम सुरू केलंय. सकाळी गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यादृष्टीने प्रशासनानं अपघातग्रस्त डबे तातडीनं हटवले. त्यानंतर, बफर एण्डची आवश्यक दुरुस्तीही करण्यात आली असून प्लॅटफॉर्म नंबर पाच खुला करण्यात आलाय. सकाळी काही काळ हा ट्रॅक बंद असल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक रखडली होती. पण ती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, गेल्या जून महिन्यात चर्चगेट स्टेशनात लोकल बफरला धडकून झालेल्या अपघातात मोटरमनसह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर मोटरमनवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर, या अपघाताची चौकशी करणाऱ्या समितीनं आपल्या अहवालात, मोटरमन आणि गार्ड यांना सेवेतून मुक्त करण्याची शिफारस केली होती.
भारताच्या इशान्येकडील अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात भाषातज्ज्ञांच्या पथकाला आजवर ज्ञात नसलेल्या 'कोरो' या भाषेचा शोध लागला आहे. मात्र, जेमतेम ८०० जण बोलत असलेली ही भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भारताच्या इशान्येकडील अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात भाषातज्ज्ञांच्या पथकाला आजवर ज्ञात नसलेल्या 'कोरो' या भाषेचा शोध लागला आहे. मात्र, जेमतेम ८०० जण बोलत असलेली ही भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातही २० वर्षांखालील कोरो भाषकांची संख्या कमी आहे. तिबेटो-बर्मन भाषा-विभागातील ही भाषा आहे. या विभागातील ४०० पैकी तब्बल १५० भाषा भारतात बोलल्या जातात. मात्र त्यापैकी कोणत्याही भाषेचे कोरोशी सार्धम्य आढळलेले नाही. नॅशनल जिओग्राफिकच्या 'एण्डयुरिंग व्हॉइसेस प्रोजेक्ट'अंतर्गत ग्रेगरी अॅण्डरसन आणि के. डेव्हिड हॅरिसन तसेच रांची युनिव्हर्सिटीचे गणेश मुर्मू या तीन भाषातज्ज्ञांचे पथक आका आणि मिजी या अत्यंत कमी बोलल्या जाणा-या भाषांच्या शोधात फिरत असताना अचानक त्यांना 'कोरो'चा शोध लागला. अरुणाचलच्या पहाडी भागातील, भात-बार्ली पिकवणा-या गावांत घरोघरी जाऊन भाषा ऐकत, रेकॉर्ड करत असताना ही तिसरी, वेगळी भाषा त्यांना आढळली. या पथकाने मोहिमेपूवीर्च भाषांचे प्रचंड वैविध्य असलेले अरुणाचल प्रदेश भाषांच्या जागतिक नकाशावरील महत्त्वाचे केंद म्हणून निश्चित केले गेले होते. यातील बहुसंख्य भाषा लिहिल्या जात नाहीत, त्यांना अभ्यासही फारसा झालेला नाही.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. Published on : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत आले आहे. काल मंत्री सत्तार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. त्यावरुनच अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. मंत्रीमंडळात असणार्या अशा जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातील संसदेत काम करणाऱ्या एका महिला खासदाराबाबत अशाप्रकारे बोलणे कितपत योग्य आहे. सत्तार यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले, अब्दुल सत्तार यांची ही भाषा पहिलीच नाही, यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दारु पिता का? असा प्रश्न विचारला होता. आता एखाद्या महिलेबाबत बोलणे, त्या संसदेत अतिशय पोटतिडकीने बोलतात. त्यांच्याबाबत बोलणे ही तर हद्दच झाली आहे. मंत्र्यांनी काही मर्यादा सांभाळायच्या असतात परंतु या मर्यादांचा वारंवार हे मंत्री उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. असेही जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यपाल हे सर्वोच्च आहेत. सरकार ऐकत नसेल तर त्यांना आम्ही कैफियत मांडू शकतो. हा विषय माफी मागून संपणार नाही. हवे ते विधान करता मग माफी मागता हे महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारमधील लोकांनी विचार करावा, त्यांना आपले सहकारी कसे हवेत. अब्दुल सत्तार यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही. मंत्री आहेत म्हणून पोलीस घाबरत असतील तर पोलिसांनी आपल्या कर्तव्यापासून चुकू नये, सरकारे येतात आणि सरकारे जात असतात असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळेस केले आहे. या सरकारमधील मंत्र्यांची महिलांविषयी काय भूमिका आहे, महिलांचा द्वेष कशापद्धतीने करतात, यांचा महिलाविषयी काय विचार आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारमधील मंत्री कसे असावेत याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा आणि मंत्र्याने जे वक्तव्य केले आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? असा सवाल करतानाच मंत्र्यांची ही भूमिका भाजपला मान्य असेल तर बडतर्फ करणार नाही आणि मान्य नसेल तर धाडसाने सरकार येत जात असतात त्यामुळे कुणाकुणाला पदरात घ्यायचे व कुणाची ओझी उचलायची हे एकदा भाजपने ठरवले पाहिजे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.