text large_string |
|---|
वैरागड : मागील आठ दिवसांत आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड, गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वन परिक्षेत्रातील मोहटोला, लोहारा, नरचुलीच्या जंगलात आग लागली असून या आगीत कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होत आहे. मात्र वन विभागाची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्याला सुरूवात होताच जंगलांना आगी लागण्यास सुरूवात होते. याचा अनुभव वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. यावर्षी वन विभागाने जंगलातील आगी थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आरमोरी, कुरखेडा, पोर्ला वन परिक्षेत्रातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड येथे कृत्रित रोपवाटिका आहेत. या रोपवाटीकेत वनवा लागला आहे. कुरखेडा, कोरची तालुक्यातील जंगल आगीत नष्ट झाले आहे. पोर्ला वन परिक्षेत्रातील मोहटोला, लोहारा, नरचुलीपर्यंतच्या जंगलाला आग लागली आहे. आग विझविण्यासाठी कोणती उपाययोजना वन विभाग करताना दिसत नाही. ज्या ठिकाणी खोटे मजूर दाखवून आर्थिक चिरीमिरी मिळते. त्या ठिकाणी फायरलाईन जाळण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ज्या वन क्षेत्रात वनवे लागतील. त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला जबाबदार धरून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. शासन कोट्यवधी रूपये मंजूर करते व ते खर्चही होतात. मात्र जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण तसूभरही कमी झाले नाही. आग लागण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने शासनाचा पैसा वन विभागाचे अधिकारी केवळ लाटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. वन विभागाने प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यावर विशिष्ट भूभागाची जबाबदारी निश्चित करावी व त्या भूभागावर आग लागल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करावी, असे झाल्यास वन विभागाचे कर्मचारी अधिक दक्ष राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर) |
पोलीसनामा ऑनलाइन -Samman Dindi By Pune Congress । 350 वर्षाच्या इतिहासात काळीमा फासणारी घटना काल घडली. वारकऱ्यांवर झालेल्या अमानुष पद्धतीने केलेला लाठी चार्ज कोणाच्या इशारानी केला होता ? भागवत संप्रदायाच्या 350 वर्षाच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली नव्हती. कित्येक वारकरी जखमी झाले असून झाला असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात येत आहे हा वारकऱ्यांच्या श्रद्धा आस्था आणि परंपरा काळीमा फासणारी घटना आहे. (Samman Dindi By Pune Congress) वारकऱ्यांच्या सन्मानासाठी (For Honor Of Warkari) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Former Congress MLA Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी गृहमंत्री आमदार रमेश बागवे (Ramesh Bagwe), संजय बालगुडे (Sanjay Balgude), वीरेंद्र किराड (Virendra Kirad) यांच्या नेतृत्वात सन्मान दिंडी काढण्यात आली. (Samman Dindi By Pune Congress) फलक घेऊन कार्यकर्ते वारकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते. यावेळी किशोर मारणे, प्रवीण करपे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, संकेत गलांडे, पुष्कर अबनावे, दत्ता मांजरेकर, आयुब पठाण, उमेश काची, राजेश जाधव, गणेश साळुंखे, विशाल गुंड, प्रवीण करपे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे, बंडू शेडगे, गोरख पळसकर, रुपेश पवार, रवी पठारे, नंदू जाधव, गणेश तामकर, संजय चव्हाण, रुपेश पवार, संतोष भुतकर, मयुरेश दळवी, साहिल राऊत, कान्होजी जेधे, भावेश पंखेवाले, |
खुशखबर! 'या' कंपनीचे 2 नवीन रिचार्ज प्लॅन्स लॉंच, वाचा ढीगभर फायदे. . ब्रेकींगः शेतकऱ्यांना सरकारचं दिवाळी गिफ्ट, 'या' तारखेला 12व्या हप्त्याचे पैसे येणार? दहावीचा निकाल आज जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? Sangli News घरात घुसून ४२ हजारांचे दागिने लंपास! संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज! संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? सेवा जमतच नाही त्यावेळेस करा हे काम स्वामींची कृपा होईल! |
police: रखडलेल्या पोलीस भरतीला आता 'मुहूर्त' मिळाला असला तरी शिवसेनेने त्याबाबत निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे. कॉन्स्टेबल पदासाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेऊन त्यातील पात्र उमेदवारांना मैदानी चाचणी देता येणार आहे. मुंबई : रखडलेल्या पोलीस भरतीला आता 'मुहूर्त' मिळाला असला तरी शिवसेनेने त्याबाबत निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे. कॉन्स्टेबल पदासाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेऊन त्यातील पात्र उमेदवारांना मैदानी चाचणी देता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जाहीरनाम्यात ही पद्धत रद्द करून मैदानी चाचणी प्रथम व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचे नमूद केले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही २०१९च्या पोलीस भरतीत लेखी परीक्षा पहिल्यांदा घेण्याचे निश्चित केले आहे. २०१९ मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेल्या ५,२९७ पदासाठीची भरती पहिल्यांदा घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ११ लाख ९७ हजार अर्ज आले आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने पूर्वीची पद्धत रद्द करून पहिल्यांदा लेखी व त्यानंतर मैदानी घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामीण भागातील तरुणांकडून विरोध होता. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने २०१९विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात हा मुद्दा नमूद केला होता. महाविकास आघाडी सरकारने भरतीप्रक्रियेसाठी राबविले जाणारी महापोर्टल रद्द केले. त्यामुळे कॉन्स्टेबलच्या भरती पद्धतीमध्ये बदल केला जाईल, अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र २०१९मध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्याचे नमूद असून, रद्द करावयाचे झाल्यास नव्याने जाहिरात देऊन पुन्हा सर्व प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे विलंब होणार असल्याने तो टाळण्यासाठी ही भरती जाहिरातीप्रमाणे घेण्यात येईल. त्यानंतर पुढील भरतीसाठी नियमावलीत बदल करून पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. - दिलीप वळसे-पाटील (गृहमंत्री) |
रात्रपाळीची सिलिंग मर्यादेचा आदेश रद्द करावा, रेल्वेचे खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, जुनी पेन्शन याेजना लागू करावी, काेराेना काळात आघाडीवर राहून रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांनी अन्नत्याग आंदोलन केले. पुणे स्टेशनजवळील रेल मंडल कार्यालय (डीआरएम ऑफीस) येथे हे आंदोलन करून स्टेशन मास्तरांनी त्यांचा निषेध नाेंदवला. देशातील स्टेशन मास्तरांच्या ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या (एआयएसएमए) वतीने देशभर हे आंदोलन झाले. आंदोलनाचा हा सहावा टप्पा होता. याआधी रेल्वे बाेर्ड अधिकाऱ्यांना ७ ऑक्टोबर राेजी प्रथम ईमेल पाठवून विराेध दर्शवला. त्यानंतर १५ ऑक्टोबर राेजी रात्रपाळी दरम्यान देशातील स्टेशन मास्तर यांनी कामाचे ठिकाणी मेणबत्ती पेटवून विराेध दर्शवला. तिसऱ्या टप्प्यात २० ते २६ ऑक्टोबर दरम्यान गणवेशावर काळी पट्टी लावून गाडी संचालन करत मागण्या मान्य करावेत, अशी विनंती केली. चाैथ्या टप्प्यात ३१ ऑक्टोबर राेजी देशातील स्टेशन मास्तर यांनी एकदिवसाचे उपाेषण करत विराेध दर्शवला. तर, पाचव्या टप्प्यात स्टेशन मास्तर यांनी धरणे आंदोलन केले. त्यांनतर आजचे अन्नत्याग आंदोलन केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंदरात्रे, मंडल अध्यक्ष अमित वर्मा, मंडल सचिव शक़ील इनामदार, दिनेश कांबळे, एस के मिश्रा, अजय सिन्हा, अर्जुन कुमार, प्रह्लाद कुमार, मैथ्यू जार्ज, जे आर तांडले, सुनील गुप्ता, मनाली कुलकर्णी हे पदाधिकारी उपस्थित होते. धनंजय चंद्रात्रे म्हणाले, वारंवार आंदोलन करूनही रेल्वे प्रशासन स्टेशन मास्तरांच्या मागण्यांची दखल घेत नाही. विनंत्या, उपोषण, निषेध करूनही आमच्या हाती काहीच लागणार नसेल, तर यापुढील आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील. रेल्वे प्रशासनाने सप्टेंबरमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार देशातील रात्रपाळी करणाऱ्या स्टेशन मास्तर अधिकारी व कर्मचारी यांचे भत्त्यात कपात करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी रात्रपाळीकरिता स्टेशनचे दर्जानुसार ८ ते २४ टक्के भत्ता दिला जात हाेता. परंतु आता ४३ हजार ६०० रुपये बेसिक सिलिंग मर्यादा ठेवल्याने त्यापेक्षा अधिक पगार असलेल्यांचा भत्ता कमी हाेणार आहे. त्याचप्रमाणे मार्च २०१८ मध्ये रेल्वे प्रशासनाने आदेश काढून काेणतेही औचित्य नसताना एक जुलै २०१७ पासून ज्यांना संबंधित मर्यादापेक्षा अधिक भत्ता दिला गेला आहे, ते पैसे वळते करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून, तो लवकरात लवकर परत घ्यावा, अशी आमची मागणी आहे. |
संजय राऊत यांच्या वाचाळपणामुळे विधान परिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत ? मुंबई - विधान परिषदेच्या ( Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड (Praveen Darekar, Ram Shinde, Srikant Bharatiya, Uma Khapre and Prasad Lad) , शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी(Sachin Ahir and Amsha Padvi) , राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे(Ramraje Naik Nimbalkar and Eknath Khadse) तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे (Bhai Jagtap and Chandrakant Handore) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. काँग्रेसने अनेकवेळा मुख्यमंत्री भेटत नाहीत अशी उघडपणे तक्रार केलीये. तर, शिवसेना आमदारही खासगीत उद्धव ठाकरे भेटत नसल्याचं बोलून दाखवतात. राज्यसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्षांवर दगाबाजीचा आरोप केला होता. त्यांनी काही आमदारांची नावे उघडपणे घेतली होती. त्यामुळे अपक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. आघाडीला मदत करूनही आरोप होत असतील तर विधान परिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करायला हरकत नाही, असं काही अपक्ष आमदार खासगीत बोलत आहेत. यामुळेच विधान परिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत आहे असं सांगितले जात आहे. |
मुंबई - शीला दीक्षित यांची निधनाची बातमी ऐकून मला प्रचंड दुःख झाले आहे. शीला दीक्षित काँग्रेस पक्षाची मुलगी होती. त्यांच्याबरोबर मी भावनात्मक दृष्टया जोडलेलो होतो. या दुःखद प्रसंगात माझ्या संवेदना शीला दीक्षित यांचे कुटुंबिय आणि दिल्लीच्या जनतेसोबत आहेत. १५ वर्ष शीला दीक्षित यांनी निस्वार्थ भावनेने दिल्लीची सेवा केली अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. I'm devastated to hear about the passing away of Sheila Dikshit Ji, a beloved daughter of the Congress Party, with whom I shared a close personal bond. My condolences to her family & the citizens of Delhi, whom she served selflessly as a 3 term CM, in this time of great grief. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. आयुष्यभर काँग्रेससोसबत राहिलेल्या शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात काँग्रेसपक्ष सहभागी असून या कठिण काळात त्यांनी बळ मिळो असे काँग्रेसने त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. शीला दीक्षित मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रचंड दुःख झाले आहे. दिल्लीच्या विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. |
एकीकडे राणांनी बसवलेल्या अनधिकृत पुतळ्यावरून राजकारण सुरु आहे तर दुसरीकडे दर्यापूरमध्ये सेनेने रातोरात बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा. पुतळा बसवलेल्या ठिकाणी पोलीस दाखल. Rebel MLA Special Report राऊतांची ऑफर सेना आमदारांनी धुडकावली, NCPतही या चिमण्यांनो, . . . परत फिरा रे? |
सीआयएस देशांमध्ये, मोटार रोड नेहमीच कव्हरेजच्या खराब गुणवत्तेमुळे दर्शविले गेले आहे, त्यामुळे अनेक कार मालक त्यांच्या कारची मंजुरी वाढविण्याबद्दल विचार करीत आहेत. खरंच, आधुनिक कारची मंजुरी वारंवार 14-15 सेंटिमीटर पेक्षा जास्त नसते आणि हे आमच्या रस्त्यांसाठी फारच कमी आहे त्यामुळे आशुपाल आणि गाडीच्या खालच्या दरम्यान मंजुरी वाढवण्याची गरज आहे. प्रश्नः "कसे? " आजसाठी, सवारी उंची वाढविण्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे spacers ची स्थापना. मंजुरी वाढविण्यासाठी, हा सर्वात योग्य पर्याय आहे. आणि आज आम्ही या भागांबद्दल काय विशेष आहे याचा विचार करणार आहोत, आणि ते कोणत्या सामग्रीपासून बनवले जातात. या spacers वापरण्याचा मुख्य फायदा म्हणजे वाढती जमीन मंजुरी आहे, ज्यामुळे सामान सामानाने पूर्ण लोड करण्याच्या बाबतीत गाडीच्या चक्रावर चाक घासणार नाही आणि असंबळच्या असमान तुकड्यांशी तिचे संरक्षण करेल. अशा भागांची स्थापना करून, आपण मशीनच्या खालच्या पातळीवर होणाऱ्या नुकसानाचे लक्षणीयरीत्या कमी करु शकता आणि त्यानुसार, तिचे जीवन लांबणीवर टाकू शकता. पण त्यांच्या त्रुटी देखील आहेत. विशेषतः, या मशीनच्या गुरुत्वाकर्षणाच्या केंद्रावर चिंतेत आहे, जे अशा भाग स्थापित करताना थोडीशी विस्थापित होतील. आपण क्वालिशन वाढवण्यासाठी spacers स्थापित केल्यानंतर Lacetti (आणि कोणत्याही इतर कार) प्रती तास 130 किलोमीटर प्रति तास चालविण्यास गती मिळू शकत नाही. मग त्यावर तीक्ष्ण चालायला फार धोकादायक असेल. याव्यतिरिक्त, चेसिसची संरचना कडकपणा कमी झाली आहे, व्हील संरेखन आणि व्हीलबेसची रूंदी बदलत आहे. स्टीयरिंग यंत्रणेवर बरेचदा भाग बाहेर पडतील आणि शॉक अॅब्सॉब्सर्सचा स्रोत कमी केला जाऊ शकतो. आपण मंजूरी वाढवण्यासाठी spacers खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर, टोयोटा आणि इतर विदेशी बनविलेले कार लक्षणीय त्यांचे हाताळणी वैशिष्ट्ये बदलू शकता त्यांना यापेक्षा वेगाने बदलण्यासाठी नाही, हे स्पकारर्स कोणते बनवायचे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बर्याचदा ते अॅल्युमिनियम, पॉलीयुरेथेन आणि प्लॅस्टिकच्या बनलेले असतात. आमच्या रस्त्यांसाठी शेवटचा पर्याय सर्वात योग्य आहे पॉलीयुरेथेन स्पेकार्सच्या उणिवांपैकी, त्यांची वेगवान वेशभूषा लक्षात घेणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती अशी आहे की या घटकांचे शरीर हे पॉलीयुरेथेनचे बनलेले आहे आणि बुश स्टीलचे बनलेले आहे. आणि जर तुम्ही त्याऐवजी बदलल्याचा अंदाज लावला नाही, तर स्पेसर कारच्या शरीरावर बराच नुकसान करेल आणि ते खराब होऊ शकेल. धातूचा अधिक विश्वासार्ह आहेत, परंतु ते गंजण्याची शक्यता असते. प्लॅस्टिकची गंजणे घाबरत नाही आणि ती पोलिओरेथेननेसारखी नाही. म्हणूनच, "फोर्ड" ची विल्हेवाट वाढवण्यासाठी spacers प्लॅस्टिककडून विकत घेणे चांगले. आपले स्वतःचे हात कसे स्थापित करायचे? मग, काय केले पाहिजे? प्रथम आम्ही डिस्क्सवरील बोल्ट फाडतो, आम्ही गाडी जॅक आणि चाक काढू पुढे आम्ही एक ब्रेक होझ आणि स्टॅबिलायझर रॅक डिस्कनेक्ट केला . आम्ही समोरच्या स्तंभावर 2 नट आणि अप्पर बॉल संयुक्त वर 3 स्क्रूचे सेक्रेटर काढा . पुढे आम्ही एक रॅक बाहेर काढतो पहिली गोष्ट ज्याकडे आपण लक्ष दिले ते जुन्या बोल्ट्स आहेत, जे फिटिंग spacers साठी फार कमी असतील. म्हणूनच आम्ही त्यांना दूर करतो आणि वाढवलेला विस्तार स्थापित करतो. आता नवीन बोल्ट वर भाग निराकरण करा आणि उलट क्रमाने प्रत्येक गोष्ट स्थापित करा. काहीवेळा स्प्रिंग जागेत सर्व भाग ठेवणे आवश्यक आहे. या प्रकरणात तो आणखी एक जॅक वापरण्यासाठी चांगले आहे. प्रत्येक गोष्ट, या स्टेजवर spacers ची स्थापना यशस्वीपणे पूर्ण केली गेली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे आपल्याला 30 ते 45 मिनिटे वेळ लागेल. मंजुरीसाठी स्पेसर किती वाढवतो? सरासरी, समान उत्पादनांची किंमत प्रति सेट 300-1000 रूबल (म्हणजे 2 तुकडे) असते. हे समोर आणि मागील निलंबन साठी वेगळ्या spacers स्वतंत्रपणे आहेत की लक्षात करणे आवश्यक आहे. ते कारची वैशिष्ट्ये आणि डिझाइनच्या आधारावर स्प्रिंग्स आणि रॅक्सच्या खाली दोन्ही स्थापित केले आहेत. पण मशीनवर फक्त 4 spacers स्थापित करणे आवश्यक नाही - फक्त त्याचे एक (मागील) भाग वाढवा. |
मुंबई, 10 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI) 2 विकेट्सनं पराभव केला. आरसीबीनं ही मॅच शेवटच्या बॉलवर जिंकली. पाच विकेट्स घेणारा हर्षल (Harshal Patel) आणि एबी डीव्हिलियर्स (AB De Villiers) आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले. डीव्हिलियर्सनं फक्त 27 बॉलमध्ये 48 रन काढले. त्याचा स्ट्राईक रेट 177 पेक्षा जास्त होता. मोक्याच्या क्षणी डिव्हिलियर्सनं ही खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आणि संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) या खेळीमुळे प्रभावित झाले आहेत. सेहवागनं डीव्हिलियर्सच्या खेळीवर मजेदार ट्विट केलं असून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालं आहे. "विल पॉवर (इच्छाशक्ती) म्हणजेच डीव्हिलियर्स पॉवर. सर्वांना आश्चर्यचकीत करणारी पॉवर. आयपीएलचा लोगो देखील डीव्हिलियर्सचा खेळ पाहून हळूच डिझाईन केला आहे. " सेहवागनं हर्षल पटेलची देखील प्रशंसा केली आहे. "पटेल भाईच्या राज्यात आरसीबीची बॉलिंग पाहून मजा आली. जबरदस्त स्पेल 5/27" संजय मांजेरकर यांनीही डीव्हिलियर्सच्या खेळेची प्रशंसा केली आहे. "जीनियसपेक्षा ही खास,' या शब्दासाठी विशेषण काय आहे. एबी खरंच असा आहे. त्याची बॅटींग कमाल आहे," असं ट्विट मांजरेकर यांनी केलं आहे. आरसीबीनं 160 रनचं टार्गेट अगदी शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. आरसीबी मॅच अगदी सहज जिंकणार असं ाटत होतं. पण विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघं आऊट झाल्यानंतर त्यांची टीम अडचणीत आली होती. (On This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन! ) या अडचणीच्या वेळी डीव्हिलियर्सनं जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांचा सहज सामना करत 48 रन काढले. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये तो रन आऊट झाला. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
लहान खट्याळ मुलांना खाऊ घालणं हे कोणत्याही एका मोठ्या टास्कपेक्षा काही कमी नाही. तुमच्या मुलाचं जेवण त्याच्या मूडवर अवलंबून आहे का? असेल तर हा ट्रिक्स एकदा नक्की वापरून पाहा. लहान खट्याळ मुलांना खाऊ घालणं हे कोणत्याही एका मोठ्या टास्कपेक्षा काही कमी नाही. तुमच्या मुलाचं जेवण त्याच्या मूडवर अवलंबून आहे का? अनेकदा लहान मुलं खाण्या-पिण्यासाठी कंटाळा करता किंवा मग वेगळी वेगळी कारणं देत असतात. त्यांचे नखरे पाहून मग पालक सुद्धा वैतागतात आणि मग त्यांना खाऊ घालण्यासाठी मागे मागे करणं सोडून देतात. पण प्रत्येक वेळी लहान मुलांनी असं वागणं हे त्यांच्या विकासासाठी योग्य नाही. काहीही करून लहान मुलांना खाऊ घालणं गरजेचं आहे. हे सारं करून तुम्ही वैतागले असाल तर तुमच्यासाठी काही खास ट्रिक्स घेऊन आलो आहोत. या ट्रिक्स एकदा नक्की वापरून पाहा. मुलांना खाऊ घालण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यासोबत फूड गेम खेळणं. उदाहरणार्थ, कोण आधी रोटी किंवा पराठा खातो, फूड स्टोअर सेलर सारखे गेम्स खेळून ही लहान मुलं खेळता खेळता कधी तुमच्या ताटातलं अन्न संपवतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. क्रिएटीव्ह व्हा! तुम्ही जितके जास्त क्रिएटिव्ह असाल, तितका फायदा मुलांना खायला देण्यात होतो. त्यांना आकर्षित करणारे आकार, रंग आणि चवी वापरून नवीन-नवीन डिश तुम्ही बनवू शकता. एखादा पदार्थ खायला मुलं अजिबातच तयार होत नाहीत, तेव्हा त्यामागचं नक्की कारण शोधायचा प्रयत्न करा. पदार्थ पुढे करताच सरळ नकार येत असेल, तर तो वेगळ्या पद्धतीनं बनवणं, तो सजवणं, त्याच्याऐवजी दुसरा पदार्थ देणं असे उपाय योजून बघा.जर तुम्हाला बाळाला पनीर सँडविच खायला द्यायचे असेल तर तुम्ही ते केचअपने सजवू शकता. आपण भाज्यांपासून क्रिएटिव्ह बनवून मुलांना अगदी सहज खाऊ घालवू शकता. कार्टून किंवा मुलाच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरने सजवलेले वेगवेगळे कप, प्लेट्स, लंच बॉक्स वापरून त्यात त्यांना पदार्थ देऊन खाऊ घालू शकता. या रंगीबेरंगी गोष्टींमध्ये मुलांना खाण्याचा आनंदही मिळेल. नेहमी ही ट्रिक्स वापरू नका. पण कधीकधी जेव्हा मूल जास्त अस्वस्थ होत असेल, तेव्हा जेवण केल्यानंतर मुलांना फिरायला घेऊन जाण्याचा किंवा आइस्क्रीम देण्याचा मोह देऊन खाऊ घालू शकता. मुलांना जेवण करण्याच्या फायद्यांबद्दल कथा सांगत जा किंवा मुलांना सुपरहिरोच्या आवडीच्या पदार्थांसारखी कथा सांगत चला. विशेषतः जेवण देताना मुलांना गोष्ट सांगा, यामुळे मुलाचे संपूर्ण लक्ष कथेवर राहील आणि मुल अधिक अन्न खाऊन घेईल. |
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची 15 हजार 511 पदांची भरती अखेर जाहीर झाली आहे. राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विविध खात्यांतील रिक्त पदांची माहिती तत्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या भरतीची घोषणा त्यांनी विधिमंडळ अधिवेशनातच केली होती. त्यानुसार गट अ, गट ब व गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली आणि 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला सादर झालेले नाहीत. त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. |
कोळशाची वाहतूक करणार्यांकडून सेस गोवा ग्रामीण विकास आणि कल्याण सेस या नावाने वसूल केला जातो. कोळशाची वाहतूक करणार्यांकडून सेस गोवा ग्रामीण विकास आणि कल्याण सेस या नावाने वसूल केला जातो. पाकिस्तान आता काश्मीर खोर्यातील अमली पदार्थांच्या नशेमध्ये अडकलेल्या मुसलमान तरुणांना अमली पदार्थ देऊन त्यांचा ग्रेनेड फेकणे, शस्त्र हिसकावणे, निवडणूक लढणार्यांंना बंदुकीच्या धाकावर धमकावणे आदींसाठी वापर करवून घेत आहे. ८ सहस्र ६०० रुपयांचा गांजा, ५ लाख ६० सहस्र रुपयांचा चरस आणि १४ लाख रुपये किमतीची कॅनाबिस लागवड कह्यात घेण्यात आली. गोव्यात गेल्या २४ घंट्यांत १६७ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. कोरोनाच्या काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजदेयके तातडीने रहित करा, अशी मागणी करत 'ग्राहकांचे वीजमीटर खंडित करण्यासाठी आलात, तर खबरदार', अशी चेतावणी आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत. गेल्या ७ वर्षांपासून येथील कारागृहात कथित लैंगिक शोषणाच्या दोषावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली आहे. अशा विवाहाला 'प्रेम' म्हणणारे निधर्मीवादी आता गप्प का ? ते चर्चचा विरोध का करत नाहीत कि 'चर्चचा विरोध योग्य आहे; मात्र हिंदूंनी 'लव्ह जिहाद' म्हणत त्याला विरोध केला, तर तो चुकीचा आहे', असे त्यांना वाटते ? बिहारमध्ये पहिल्यांदाच एम्. आय. एम्. चे ५ आमदार निवडून आले आहेत आणि ते आता त्यांचे खरे स्वरूप विधानसभेत पहिल्याच दिवसापासून दाखवू लागले आहेत. पुढील ५ वर्षांत ते काय करणार, याची ही झलक आहे. |
नाशिक : इलेक्ट्रीक वस्तू बनविणा-या कारखान्यातील चांदीवर कामगाराने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात घडली असून याप्रकरणी पोलीसांनी संशयीत कामगारास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल संजय सुर्यवंशी (२८) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. सुर्यवंशी औद्योगीक वसाहतीतील निवेक क्लब समोरील एक्सेल इंजिनिअरींग या कारखान्यातील कामगार आहे. या कारखान्यात इलेक्ट्रीक वस्तूंचे स्पेअर पार्ट बनविले जातात. बहुतांश वस्तूमध्ये चांदीचा अॅनोड आणि कॅथोड याप्रमाणे वापर केला जातो. संशयीताने शुक्रवारी (दि. ११) रात्री सेवा बजावत असतांना आपल्या ताब्यातील चांदीमधून सुमारे ७३ हजार रूपये किमतीची व ९९४ ग्रॅम वजनाची अॅनोड हातोहात लांबविली. ही बाब लक्षात येताच कारखाना प्रशानाने पोलीसात धाव घेतली असून अविनाश खैरनार यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार संजय शिंदे करीत आहेत. .... |
Rinku Singh, Team India: इंडियन प्रीमियर लीगच्या नुकत्याच झालेल्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या आणि अनेक सामने एकहाती जिंकणाऱ्या रिंकू सिंगची संघात निवड करण्यात आली नाही. भारतीय क्रिकेट संघाला सध्या नवीन चीफ सिलेक्टर मिळाला. माजी मुंबईकर क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यावर संघनिवडीची जबाबदारी होती. त्याने निवडलेल्या संघात 'मुंबई इंडियन्स'चा प्रतिभावान डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याची निवड झाली. पण IPL मध्ये तिलक वर्मापेक्षा जास्त धावा करणारा रिंकू सिंग मात्र टीम इंडियाला नकोसा झाला आहे का, असा सवाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विचारला. रिंकूचा पत्ता कोणी कापला? वेस्ट इंडिजचा दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत रिंकूला संघात जागा मिळाली नाही. कोलकाता नाईट रायडर्सचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला संघात स्थान मिळू शकत नाही याचे कारण सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन देखील मधल्या फळीत आहेत. अशा परिस्थितीत या ठिकाणी कोणालाही ठेवणे शक्य असे बोलले जात आहे. त्यामुळे जस्टिस फॉर रिंकू सिंग हा टॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागल्याचे दिसले. 2017 मध्ये IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या रिंकूने 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 59. 25 च्या सरासरीने 474 धावा केल्या. त्यात त्याने सहा वेळा नाबाद राहताना चार अर्धशतके झळकावली. एका षटकात सलग पाच षटकार मारून गुजरात टायटन्सच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतानाची त्याची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. रिंकू सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनसाठी खेळत आहे. खेळपट्टीवर स्थिरावण्याची त्याची कला आणि वेगाने धावा करत सामना जिंकवून देण्याची त्याची कसब त्याला नक्कीच टीम इंडियात संधी मिळवून देईल असे बोलले जात आहे. पण यावेळी त्याची संधी हुकल्याने नेटकरी नाराज झाल्याचे दिसून आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठ फलंदाजांना पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावरून हे स्पष्ट होते की त्यांना टी२० सामन्यांमधून हळूहळू बाहेर काढले जात आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई हे दोन खेळाडू संघात कमबॅक करत आहेत. भारताचा टी२० संघ- इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव , रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra. |
मोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा? कसे करावे? ई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे? कसे करावे? जीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा? कसे करावे? अनेकदा घाईघाईत आपल्याकडून एखादा मेल चुकीचा अथवा चुकीच्या व्यक्तीला पाठवला जातो. यासाठी जीमेलमध्ये पाठवलेला मेल रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे. |
क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजासाठी जेवढे शतक महत्त्वाचे असते, तेवढीच गोलंदाजासाठी हॅट्रिक. सिडनी, 13 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजासाठी जेवढे शतक महत्त्वाचे असते, तेवढीच गोलंदाजासाठी हॅट्रिक. गोलंदाजाच्या करिअरमध्ये हॅट्रिक किंवा पाच विकेट घेणे याचे महत्त हे अनन्य साधारण असते. हा अनुभव फक्त गोलंदाजाला चांगल्या संधी मिळवून देतो, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी हा रोमांचक अनुभव असतो. असाच प्रसंग क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 4 दिवसाच घडला आहे. गेल्या 4 दिवसांत चाहत्यांना एक, दोन नाही तर तब्बल 4 हॅट्रिकचा अनुभव घेता आला. क्रिकेटमध्ये इतिहासात कदाचित पहिल्यांदा असा प्रकार घडला असावा. जेव्हा 4 दिवसात 3 गोलंदाजांना हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. यात एका अभिमानाची गोष्ट म्हणजे यातला एक गोलंदाज भारतीय आहे. भारताचा युवा गोलंदाज दीपक चाहरनं गेल्या 72 तासांच्या आत दोन वेळा हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. सगळ्यात आधी भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली. नागपूरमधील सामन्यात हॅट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅट्रिक पूर्ण केली. त्याने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर 2 गडी बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. त्याच्यानंतर लगेचच सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये राजस्थानकडून खेळताना दीपक चाहरनं ही अशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या शेफील्ड शील्ड स्पर्धेत मिचेल स्वेपसन (Mitchell Swepson) या गोलंदाजानं विक्टोरिया संघाविरोधात हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली. क्विन्सलॅंड संघाच्या या फिरकी गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना फलंदाजी करूच दिली नाही. या गोलंदाजानं 110व्या ओव्हरमध्ये ही कमगिरी केली. स्वेपसननं हॅट्रिक कामगिरी करत एकूण 4 विकेट घेतल्या. तसेच, प्रतिस्पर्धील संघाला केवळ 300 धावांवर रोखले. स्वेपसन हा चार दिवसांत हॅट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज आहे. बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात दीपक चाहरनं राजस्थानकडून खेळताना हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तराखंडचा गोलंदाज मयंक मिश्रा यानं हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. |
मुंबई, 5 जानेवारी : सकाळी सकाळी चहा आणि बिस्किट किंवा टोस्ट खाणं अनेकांना आवडतं. काही जण तर न्याहारी न करता चहासोबत 3-4 टोस्टच खाणं पसंत करतात. यामुळे काही काळासाठी पोट तर भरतं; पण भविष्यात काही आजार मागे लागू शकतात. 'हेल्थ पँट्री'च्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ खुशबू जैन टिबरेवाला यांनी आहारातल्या टोस्टचं पोषणमूल्य किती आहे, त्याविषयी सांगितलं आहे. अनेक वेगवेगळ्या आकारांचे व स्वादाचे टोस्ट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. जाहिराती पाहून ते विकत घेण्याचा मोह झाला नाही तरच नवल; पण खरंच त्यातून शरीराला काय मिळतं, याचा विचार केला, तर एका मोठ्या चक्रातून आपली सुटका होईल. चवीला मस्त आणि तोंडात विरघळणारे हे टोस्ट मैद्यापासून तयार केलेले असतात. साखर, स्वस्तातलं तेल, जास्तीचं ग्लुटेन आणि काही इतर घटक मैद्यात मिसळून टोस्ट तयार होतात. या सगळ्या जिन्नसांमुळे रक्तातली साखरेची पातळी वाढते, तसंच दाह निर्माण होतो, असं 'हेल्थ पँट्री'च्या संस्थापक, आहारतज्ज्ञ आणि डायबेटीसबाबच्या मार्गदर्शक खुशबू जैन टिबरेवाला यांचं मत आहे. दररोज टोस्ट खाल्ल्यामुळे रक्तातली ग्लुकोजची पातळी सतत वरखाली होते. यामुळेच अखेर इन्सुलीन रेझिस्टन्स तयार होतो. त्याशिवाय शरीरात जळजळ होते. त्यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. आतड्यात वाईट जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती, पचनक्रिया यांच्यावर परिणाम होतो. पोषणमूल्यं शरीरात शोषली जात नाहीत व अकारण भूक वाढते. "टोस्टमुळे लठ्ठपणा वाढतो, ताण वाढतो, आळस वाढतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, हॉर्मोन्सवरही परिणाम होतो," असं टिबरेवाला यांचं म्हणणं आहे. टोस्टमध्ये काय घटक पदार्थ असतात व त्यांचं पोषणमूल्य काय असतं, याबाबत हॉर्मोनल एक्स्पर्ट, आहारतज्ज्ञ आणि हेल्थ कोच शिखा गुप्ता यांनी माहिती दिली आहे. मैदा - टोस्टमधला प्रमुख घटक मैदा असून, तो गव्हाचं वरचं साल बाजूला काढून बनवलेला असतो. त्यामुळे त्यात कोणतीही जीवनसत्त्वं नसतात. फायबर्सही नसतात. साखर - शरीरातल्या कॅलरीज वाढवण्याचं काम साखर करते. दिवसभरात कशातूनही साखर न खाता केवळ दोन टोस्ट खाल्ले तरी त्यापेक्षा जास्त साखर पोटात जाते. रिफाइन्ड व्हेजिटेबल तेल - खूप जास्त तापमानावर गरम करून ते तयार केलेलं असल्यानं त्यात काहीच पोषणमूल्यं नसतात. केवळ शरीरातला दाह वाढवण्याचं काम ते करतं. रवा - गव्हापासूनच बनवलेला असला, तरी त्यातही जीवनसत्त्वं व फायबर्स नसतात. प्रीझर्व्हेटिव्ह, इमल्सिफायर्स, कृत्रिम स्वादासाठीचे पदार्थ - उत्पादन जास्त काळ टिकण्यासाठी असे घटक वापरले जातात; मात्र त्यांचा शरीराला काहीही फायदा नसतो. कृत्रिम रंग - टोस्टमध्ये कॅरॅमल किंवा तपकिरी रंग वापरला जातो. "हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मैद्याचा टोस्ट गव्हाचा वाटावा, तसंच बेक केलेला दिसावा यासाठी हा रंग घातला जातो," असं होलिस्टिक हेल्थ कोच दिग्विजय सिंग यांनी सांगितलं. टोस्टच्या ऐवजी भाजलेले शेंगदाणे, चणे किंवा भाजलेले मखाणे खाता येऊ शकतात, असं टिबरेवाला सांगतात; मात्र तरीही टोस्ट खाण्याचा मोह टाळता येत नसेल, तर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 100 टक्के गव्हापासून किंवा रव्यापासून तयार केलेले टोस्ट विकत घ्यावेत. विकत घेताना त्यावरचं लेबल वाचून वापरलेले पदार्थ पाहून मगच घ्यावेत. तसंच प्रत्येक वेळी थोडेच टोस्ट खावेत, असं सिंग सांगतात. सगळ्या प्रकारच्या टोस्टच्या पाकिटांवरची मागची बाजू वाचा. यामुळे टोस्टमधल्या घटकांची व त्यांच्या प्रमाणाची कल्पना तुम्हाला येईल, असं टिबरेवाला यांचं म्हणणं आहे. गव्हाचे, रव्याचे किंवा थेट मैद्याचे असले तरी कोणत्याही प्रकारचे टोस्ट शरीराला फारसे चांगले नसतातच. त्याचा शरीरावर लगेचच परिणाम दिसत नाही; मात्र सातत्यानं व भरपूर सेवन केल्यास आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
नागपूर : जमिनीपासून ७० मीटर उंचीवरील नव्या व जुन्या अशा सर्व इमारतींना आता 'अग्निशमन अधिकारी' किंवा पर्यवेक्षक (सुपरवायझर) नेमणे बंधनकारक आहे. राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये बदल करण्यात आला आहे. या अग्निशमन अधिकारी किंवा पर्यवेक्षकाच्या माध्यमातून एक वर्षाच्या आत इमारतीचा 'फायर ऑडिट रिपोर्ट' तयार करून महापालिकेच्या मुख्य अग्निशामन अधिकाऱ्यांना सादर करायचा आहे. ७० मीटर इमारत म्हणजे २२ ते २३ माळ्याची इमारत असते. सद्या शहरात ऐवढ्या उंच इमारती नसल्या तरी, ७० मीटरपेक्षा उंच इमारतीच्या निर्मिती होत आहे. नव्याने बदल करण्यात आलेल्या अग्निशमन कायद्यात महापालिकांकडून आकारण्यात येणारे फायर प्रीमिअम चार्जेस आणि फायर इन्फ्रास्क्ट्रचर चार्जेस काढून टाकत, 'अग्निशामन व आपत्कालीन सेवा' शुल्क लागू केले आहे. त्याच बरोबरच अनेक नवीन तरतुदींचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. राज्य सरकारने अग्नीशमन कायद्यात बदल करताना बांधकामाची परवानगी घेताना आकारण्यात येणार्या अग्निशामक व आपत्कालीन सेवा शुल्क रेडीरेकनरशी लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असली तरी बांधकाम व्यवसायिकांचा खर्च मात्र वाढणार आहे. अखेरीस सदर खर्च ग्राहकांच्या खिशातूनच वसूल होणार असल्याचे दिसून येते. राज्य शासनाने सरसकट एकच अग्निशामक व आपत्कालीन सेवा शुल्क लागू केले आहे. हे शुल्क रेडीरेकनरमध्ये दर्शविलेल्या बांधकाम खर्चाची लिंक करण्यात आले असून, त्याचे दोन टप्पे करण्यात आले. त्यात ४५ मीटर उंचीपर्यंतच्या निवासी बांधकामासाठी येणार्या एकूण खर्चाच्या ०. २५ टक्के, तर ४५ मीटर उंचीच्या वरील बांधकामासाठी एकूण खर्चाच्या ०. ५० टक्के शुल्क आकारण्यास महापालिकांना परवानगी देण्यात आली आहे. |
राळेगणसिद्धी तसेच साकळाई योजनांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला असून दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सोमवारी (दि. 27) पुणे येथे जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत देण्यात आले. जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांसदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत अधिकार्यांची पुणे येथे बैठक अयोजित केली होती. या बैठकीत पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धीसह नऊ गावे तसेच नगर तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी आमदार लंके यांनी केली. त्यावर या योजनांसाठी लागणार्या पाण्याची उपलब्धताही कोकणामध्ये वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे वळविल्यानंतर उपलब्ध होणार्या पाण्यापासून होणार असल्याचे अधिकार्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मंत्री पाटील यांनी पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी या दोन्ही योजनांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना या बैठकीत अधिकार्यांना दिल्या. या सर्वेक्षणानंतर उपलब्ध होणार्या पाण्यातून साकळाई उपसा योजना तसेच राळेगणसिद्धीसह नऊ गावांच्या योजनांना प्राधान्याने देण्याबाबत पाटील यांनी सहमती दर्शविली. याच बैठकीत आमदार लंके यांनी पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या 58 ते 70 किलोमीटरपर्यंत अस्तरीकरण करण्याची मागणी केली. त्यावर अस्तरीकरणाचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याच्या सूचना ना. पाटील यांनी दिल्या. पिंपळगाव जोगा कालव्यावरील पारनेर तालुक्यातील वितरिकांची उर्वरीत कामे तातडीने हाती घेण्याच्या आ. लंके यांच्या मागणीवर तसा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या शेवटी असलेल्या वडझिरे तलावापासून शिवडोह तलावापर्यंतच्या बंदिस्त नलिका लाईनचे काम पूर्ण करून पिंपळगाव जोगा धरणातील पाणी शिवडोह तलावापर्यंत पोहोचविण्याचे काम तातडीने हाती घेण्यासंदर्भात या बैठकीत पाटील यांनी सूचना दिल्या. कुकडी डावा कालव्यावरील कि. मी. 31 एस्केप बांधून जांबूतसह इतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश या बैठकीत दिले. दरम्यान या बैठकीसंदर्भात बोलताना आमदार लंके यांनी सांगितले की, आपण विधानसभेचे सदस्य झाल्यापासून या दोन्ही योजनांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होतो. दोन्ही योजनांमुळे शेतकरी वर्गाचा मोठा लाभ होणार असल्याची बाब आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पवार यांनीही या दोन्ही योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत, यावर सहमती दर्शविली होती. पवार यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण दोन्ही योजनांसाठी पाठपुरवा केला व मंत्री जयंत पाटील यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही योजनांचे सर्वेक्षण, शिवडोह बंदिस्त नलिकेचे काम, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेणे, कालव्यांचे अस्तरीकरण याबाबत अधिकार्यांना थेट आदेश दिल्याचे ते म्हणाले. |
युरा, बरीस आणि झोया एकमेकाना खेटून बसले होते. ते घाबरून एकटक माझ्याकडे पाहू लागले. • फार उशीर झालाय, माझ्या दाटलेल्या घशातून कसेतरी शब्द बाहेर पडले; मूर्खासारखा हसत सुटलो होतो त्यानं शरीर अजूनही हादरत होतं. "बाबा, वेळ निघून गेलीय आता." " तोंड बंद कर ! आता घोडा जोडू की दोन तासात झात्स्क तिथून जायचं मोझेइस्कला, तिथं गेलो की मॉस्कोच्या दारातच पोहोचलो आपण. तिथून जायचं मोर्दोवियाला, पावेलकाकांकडे त्यांचा पत्ता आहे माझ्या जवळ." झात्स्कमध्ये जर्मन शिरले आहेत. सगळीकडे पसरले आहेत ते; " मी सर्वाना काचेव्स्कीशी झालेली भेट व बोलणी सांगितली. त्याच्याबरोबरचे सैनिक कसे बलदंड होते, प्रत्येकाजवळ कशी रायफल होती वगैरे सारं काही सांगितलं. त्यांच्या जवळ तर सामानसुमान काहीच नव्हतं. तरीही त्याना मॉस्कोला जाता आलं नव्हतं. उलट, आमच्याबरोबर लहान लहान मुलं होती, उरलं सुरलं सारं सामान होतं. तेवढ्यात एकापाठोपाठ एक सहा फैरी झडल्याचे आवाज आले. मोठमोठ्या बंदुका क्लुशिनोवर आग ओकीत होत्या. खिडक्या दारं हादरली. कदाचित शत्रूचा ताफखाना आपल्या पल्ल्याची चाचणी करीत असावा किंवा आमच्याच सैन्याची काहीतरी गफलत झाली असावी. सध्या तर कोणाला कांहीच सांगता आलं नसतं. काय चाललंय ते बाहेर जाऊन पाहून गायला मी कचरलो, काही गोळया थेट बागत घुसल्या होत्या. पण घरात बसून राहणंही तितकंच धोक्याचं होतं. जर घरावरच एखादा गोळा येऊन पडला असता तर सान्याचाच शेवट झाला असता. घर म्हणजे कुटुंबाच कबरस्तान ठरलं असतं. बाबानी अंगातलं जाकीट कांढलं आणि खाली बसून ते बुटाचे बंद सोडू ल, गले. मग ते आईला म्हणले, " मातोश्री, सोडा ती गाठोडी आता, चला रे बिछाने घ्या घालून रात्री चांगली झोप झाली पाहिजे. म्हणजे सकाळी सारीजण छान ताजीतवानी होतील." सकाळ उजाडला. झोया आणि युरा नेहमीप्रमाणे शाळेत गेली. तासांदीडतासान बातमी आली. गावच्या सोविएतात जर्मन आले आहेत. त्यांच्या जवळ मोटर सायकली आहेत. त्याच दिवशी शत्रूच्या एका मोठ्या तुकडीनं आमच्या गावचा कबजा घेतला. मी अजून पावेलकाकांच्या घरीच राहात होतो. एक नाझी जनरल व त्याचा मोठा ताफा यानी त्याच घरात तळ ठोकळा होता. मला घर सोडून जायला मनाई होती. बाहेर आऊटहौसमध्ये जायला सुद्धा परवानगी मागावी लागे. ८४ ॥ माझा भाऊ, यूरी ॥ जनरलच्या घराचा कारभार एक लठ्ठंभारती सार्जंट मेजर पहात असे. त्याच्याकडून परवानगी घ्यावी लागे. मी मोठ्या अपमानकारक परिस्थितीत सापडलो होतो. त्यात भर म्हणजे मला माझ्या आई-वडिलांची भावाची, बहिणीची काहीच बातमी नव्हती. कसे होते ते ? अजून जिवंत होते ना ? जनरलच्या घराकडे फिरकण्याची एकाही गाववाल्याची हिंमत झाली नाही. ते स्वाभाविकच होतं. त्यामुळं घरी कोणाच्या हाती निरोप पाठवायचा म्हटलं असतं तरी ते शक्य झालं नसतं. एके दिवशी पहाटेच मी पडवीतल्या खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो बाहेर काय चाललंय् ते पाहू लागलो. रस्त्यावर शुकशुकाट होता. एक बाई पाणी भरायला चालली होती; एक मुलगा शेजारच्या घरात जात होता. बस्. बाकी कोणी नाही. घरोघरच्या धुराड्यातून निळसर धूर वळणं घेत घेत वर चढत होता, बाकी बघायला असं काही नव्हतं. अचानक युरा माझ्या दृष्टीस पडला. ते इतकं अनपेक्षित होतं की, पहिल्यान मला वाटलं, आपले डोळे फसवताहेत आपल्याला. तसं काही नव्हतं. युराच होता तो. अगदी जवळ होता तो. फाटकापासून जेमतेम वीस पावलांवर. फाटकापाशी एक उंच संत्री पहारा देत होता; सबमशीन गन घेऊन. एका लहानशा खड्ड्यापाशी हिरवळीचा तुकडा होता. त्यावर युरा बसला होता. खड्डयात पाय सोडून हलवीत होता; वारंवार चोरून पावेलकाकांच्या घरावर नजर टाकीत होता. " माझं कसं काय आहे ते पहायला आला असणार, मला खात्रीच होती तशी. " अगोदर कितीदा याच्या इथं फेन्या झाल्या असतील कोणास ठाऊक ! त्याला इथून कशी खूण करता येईल ? रस्त्यावर जाणं तर अशक्यच होत मला. जनरलचा मुक्काम बाहेरच्या खोलीत असल्यानं त्या बाजूच्या रस्त्यावरच्या खिडक्य। 'प्रवेश नाही ' क्षेत्रात मोडत होत्या. मी प्रयत्न करायचं ठरवलं. बागेत जावं आणि फाटक उघडावं. तो संत्री नक्कीच अंगावर धावून येईल. पण तो मला गोळीही घालणार नाही. युरा निदान मला पाहून घेईल आणि घरी जाऊन सांगेल की, वाल्या ठीक आहे म्हणून. कदाचित तो ओरडून माझ्याशी दोन चार शब्द बोलेलही. मी दरवाजाकडे निघालो, तेवढ्यात लठ्ठभारतीनं स्वयंपाकघरातून ठणाणा केला. "इवान ? इकडे ये ! इवान !" त्याच्या दृष्टीनं मी आणि कोणताही रशियन म्हणजे 'इवान'च होतो. कोणतंही व्यक्तिमत्व, कोणताच तोंडवळा नसलेला इवान ! आपल्या पट्टयात बोटं खोचून सार्जंट मेजर स्वयंपाकघरात मधोमध उभा ८५ ।। आक्रमण । |
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांची आज (शनिवार) दिल्लीत बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे या बैठकीदरम्यान पाच मंत्रीपदं मागणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी राज्यसभा खासदार अनिल देसाई, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, रत्नागिरी सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत आणि दक्षिण मध्य मुंबईतील खासदार राहुल शेवाळें यांची नावं चर्चेत आहे. भाजपकडून शिवसेनेला तीन मंत्रीपदाची ऑफर असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा सामावेश आहे. |
आवश्यकतेपेक्षा जास्त संख्येत उघडली गेली. यामुळे पदवीधरांची संख्या भरमसाट वाढली. शिक्षणाचा व व्यावसायिक क्षेत्राचा योजनापूर्वक विस्तार न झाल्यामुळे बेकारांची संख्या वाढत गेली. शिक्षण क्षेत्रातील राजकारणाप्रमाणे शिक्षणपद्वती सदोष राहिली व त्यात योग्य ते परिवर्तन करण्याची आवश्यकता शासनाला वाटत नाही, हे विशेष होय. आजच्या शिक्षणपद्वतीने व्यवसायनुकूल दृष्टिकोन स्वीकारलेला नाही. काळाच्या गरजेनुसार होणा-या परिवर्तनाची दखल घेण्याचे सामर्थ्य या शिक्षणपद्वतीत नसल्यामुळे असंख्य तरुण जीवनातील महत्वाच्या कार्यासाठी, व्यापार व्यवसायासाठी, नोकरीसाठी अपात्र ठरत आहेत. वाणिज्य विद्याशाखेतील विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतमर स्वयंरोजगारासाठी अपात्र ठरतात, हा शिक्षण पद्वतीचा दोष नव्हे काय? अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचाराचे प्रमाण इतके प्रचंड वाढले आहे की, प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात योग्यता डावलण्यात येऊन भ्रष्टाचाराच्या जोरावर नोकरीत शिक्कामोर्तब करण्यात येते. परिणामी उचित पात्रता असलेले पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण नोकरी व व्यवसायापासून वंचित राहतात. भ्रष्टाचाराची सर्वत्र ओरड होऊनही शासन दरबारी व समाजातही त्याकडे मोठया प्रमाणावर दुर्लक्ष होत असलेले दिसून येते. विद्यमान शिक्षण प्रणालीने नैतिक मूल्यांचे पतन घडविले व त्या अभावाची जाणीवही होणार नाही, अशी संवेदनाशून्य परिस्थिती निर्माण केली. परिणामी आळशी, खोटया प्रतिष्ठेची जपणूक करणारी, श्रमाच्या प्रतिष्ठेकडे दुर्लक्ष करणारी, परावलंबी अशी शिक्षित पिढी तयार व्हायला लागली व रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे बेकारीचा आलेख उंचावत गेला. भारतीय अर्थव्यवस्था अजून विकसनशील अवस्थेत आहे. आपला विकासाचा दर ५.५ आहे. यामुळे उद्योग, वाहतूक, नोकरी, सेवा इत्यादी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली तरी शिक्षितांना, नोकरीमध्येच सामावून घेण्यास ही क्षेत्रे असमर्थ ठरली. नियोजनातील अपयश याला कारणीभूत आहे. शिक्षणाचा विस्तार व व्यापार-उद्योगांचा विस्तार व त्याद्वारे रोजगार संधीचा पुरवठा यांचे जे सुयोग्य संतुलन अमेरिका, इंग्लंड, या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आढळून येते, नेमके तेच आमच्या योजनाकारांना ३३ वर्षे झाल्यानंतरही साधता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वाढत जाणारी बेकारी हे नियोजनातील मोठे प्रश्नचिन्ह ठरले. उद्योजकतेचा अभाव सुशिक्षित बेकारीला वरील कारणाप्रमाणेच सुशिक्षित युवकही त्यांच्या अवास्तव अपेक्षा व शारीरिक कष्ट करण्याची वृत्ती नसल्यामुळे जबाबदार ठरतात. केवळ नोकरी करण्यात इतिकर्तव्यता मानणारा, व्यवसाय किंवा उद्योगाची उभारणी करण्यास तयार नसणारा मोठा शिक्षित वर्ग आज अस्तित्वात आहे. उद्योजकतेचा अभाव असल्यामुळेच बेकारीचा चटका जाणवतो. व्यवसाय किंवा स्वतंत्र उद्योग प्रारंभ करावयाचा म्हणजे दोन मूलभूत प्रश्न निर्माण होतात. एक भांडवल उपलब्धीचा असतो. त्याकरिता कर्ज देण्याच्या सोयी मोठया प्रमाणावर उपलब्ध आहेत. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी बँका, सिकॉम, औद्योगिक अर्थधारा \ ९९ |
या गरोदर महिलेचे प्राण कसे वाचले पहा. . . तुम्ही भविष्यात अशी मदत करू शकता. . अविनाश कोळी । सांगली : रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात त्यांनी केलेल्या रक्तपुरवठ्यामुळे रुग्णालय प्रशासन व रुग्णाच्या नातेवाईकांनी संघटनेच्या कार्याला सलाम केला. मुंबई अंधेरीच्या फडके हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या हर्षदा सपकाळ या गरोदर महिलेची प्रकृती अचानक बिघडली. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ४ पेक्षा कमी झाले होते. रक्तगटाची तपासणी केल्यानंतर येथील डॉक्टरांना तिचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असल्याचे लक्षात आले. त्यांनी मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये चौकशी केली, मात्र त्यांना हा रक्तगट कुठेच मिळाला नाही. दुसरीकडे महिलेची प्रकृती तर चिंताजनक होत होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक मेसेज व्हायरल केला. तो मेसेज फिरत तासगाव येथील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचे संस्थापक विक्रम यादव यांच्यापर्यंत गुरुवारी पोहोचला. त्यांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधला व रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. तातडीने रक्त मिळाले नाही, तर महिलेच्या जिवाला धोका होऊ शकतो, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. यादव यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी कार्वे (ता. कºहाड) येथील सुधीर निवृत्ती कणसे या रक्तदात्याशी संपर्क साधला आणि रुग्णाविषयी कल्पना दिली. मुंबईत वाहतूक कोंडी झाल्याने रक्त तातडीने पोहोचविणे हेच आव्हान होते. कणसेंंनी कºहाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये रक्तदान केले. ते रक्त गुरुवारी रात्री कºहाडमधून वातानुकूलित कार करून मुंबईत नेण्यात आले. त्या गरोदर महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. बॉम्बे ब्लड ग्रुपने दाखविलेल्या या तत्परतेने रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले. त्यांनी सहभागी संघटनेचे आभार मानले. |
मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला म्हणजेच उद्या गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. यावेळी नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, आता पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. "पंतप्रधान मोदी उद्या शिवसेनेने केलेल्या कामांवरच शिक्कामोर्तब करण्यासाठी येणार' असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, "उद्या देशाचे पंतप्रधान ज्या कामांचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत, त्यातील बरीचशी कामे शिवसेनेने सुरू केली होती. शिवसेनेने केलेल्या कामाच्या पायभरणीचं लोकापर्ण होणार आहे. याचा अर्थ आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत येत आहेत," असा चिमटा संजय राऊत यांनी भाजपला काढला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. |
अधिकाऱ्यांना डांबून जाब विचारण्याच्या मनसे स्टाइलविरोधात पालिका अधिका-यांनी दंड थोपटले आहेत. मुंबई : अधिकाऱ्यांना डांबून जाब विचारण्याच्या मनसे स्टाइलविरोधात पालिका अधिका-यांनी दंड थोपटले आहेत. जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यासह परवाना विभागाच्या अधिकाºयाला झालेली धक्काबुक्की तसेच शिवीगाळ प्रकरणी कर्मचाºयांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. मनसेच्या संबंधित पदाधिकाºयांना दोन दिवसांत अटक न झाल्यास संपूर्ण २४ विभाग कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. लोअर परळ आणि वरळी या भागांमध्ये फेरीवाल्यांवर काय कारवाई केली? याचा जाब विचारण्यास गेलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग प्रमुख संतोष धुरी यांनी परवाना अधिकारी आणि सहायक आयुक्त जैन यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाºयांविरोधात पालिकेने एफआयआर दाखल केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ 'जी दक्षिण' विभागात सोमवारी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला २४ विभागांतील सहायक आयुक्त व सहायक अभियंत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सहायक आयुक्त जैन यांच्या दालनात म्युनिसिपल मजदूर युनियनच्या पदाधिकाºयांसह एक बैठक झाली. या बैठकीत मनसेच्या पदाधिकाºयांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाºयांचे हल्ले खपवून घेणार नाही, असा इशारा अधिकाºयांनी दिला. दोन दिवसांत मनसे पदाधिकाºयांना अटक न झाल्यास २४ विभागांमध्ये काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा अन्य विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी दिला. एकीकडे 'जी दक्षिण' विभागात काम बंद आंदोलन सुरू असताना मनसेच्या वतीने फेसबुक लाइव्ह करून जैन चोर असल्याच्या घोषणा देण्यात आल्या. 'जी दक्षिण विभागाचे चोर व भ्रष्ट सहायक आयुक्तांचा निषेध' अशा मजकुराचे फलक लोअर परळ भागामध्ये लावून निषेध नोंदविण्यात आला. यापुढे 'सहायक आयुक्त जैन चोर' अशा प्रकारचा 'हॅश टॅग' चालवूनच मोहीम चालवली जाणार असल्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. |
मैदानी मुलांची खेळाची उपकरणे आणि पर्यावरणामधील संवाद । GFUN\nभेटवस्तूसारखी मुले, खेळणी नसलेली असावीत, मनोरंजक डिझाइन मुलाला अखंड आनंद आणू शकते. मुलांच्या खेळाची उपकरणे काही सौंदर्याचा साथीदार आणि मजेदार मुलांची खेळण्याची उपकरणे मुलांसाठी संभाव्य धोका दर्शवू शकतात. दरवर्षी, मुलांच्या खेळाच्या उपकरणामुळे 100,000 हून अधिक मुले मोठ्या अपघातात सामील होतात आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची आवश्यकता असते.\nम्हणूनच, मुलांच्या खेळाची उपकरणे निवडताना केवळ खेळाची उपकरणेच नव्हे तर पॅकेजिंगच्या सूचना देखील तपासणे आवश्यक आहे. मुलांची खेळाची उपकरणे पर्यावरणाशी संवाद साधण्यात मुलांची आवड वाढवू शकतात. मैदानी खेळाची उपकरणे बाह्य वातावरणानुसार तयार केली गेली आहेत.\nहे मुलांच्या सक्रिय अन्वेषण, सक्रिय शिक्षण आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी पायाभरणी करणारे विविध प्रकारे पर्यावरण प्रभावीपणे सक्रिय करते. मुलाच्या वाढीस राहणीमान वातावरणाशी बरेच काही करायचे आहे. जर मुल भेकड असेल तर आपण नेहमीच मोठ्याने बोलू शकत नाही. आपण त्याची काळजी घ्यावी आणि हेतूनुसार त्याच्या धैर्याचा सराव केला पाहिजे. यावेळी, आपण मुलांच्या खेळाच्या उपकरणासह त्याला घेऊन जाऊ शकता. कारण हा खेळ एक सर्वसमावेशक खेळ आहे, केवळ मुलांच्या सामंजस्यात आणि स्वतः ची क्षमता विकसित करण्यासाठीच नव्हे तर मुलाला शूरवीर देखील बनण्यासाठी, त्याने या समस्येचा एकट्याने सामना करण्याची हिंमत करू नये. मुलांनी खेळण्यासाठी मी स्टेनलेस स्टीलच्या स्लाइड्स काळजीपूर्वक शिफारस करतो. तो मुलांची काळजी घेण्यात आपल्याला मदत करू शकतो.\nमुलांच्या खेळांसाठी हे फक्त शारीरिक सामर्थ्य प्रशिक्षित करण्यासाठीच नव्हे तर माझ्या अंतःकरणातही मजबूत आहे याची जाणीव करून दिली. काही मुले धैर्याने जन्माला येतात, आपण त्याच्या प्रतिभा दाबू नये, आपण त्यांना योग्यरित्या नियंत्रित करावे आणि आपण आपला हात योग्यरित्या उचलला पाहिजे. जेव्हा अशी मुले खेळतात, तेव्हा त्यांना अक्कल नसलेली पत्ते खेळायला आवडतात. उदाहरणार्थ, त्यांना मागे जाणे आवडते. त्याच्या जिज्ञासासाठी अधिक आव्हानात्मक आणि समाधानकारक म्हणून चढणे. या प्रकरणात, सुरक्षित असल्याची हमी दिलेली असल्यास, ते मुलांच्या काही खेळाच्या उपकरणासह खेळण्यास मोकळे आहेत, जे त्यांची सर्जनशीलता दर्शवू शकतात. |
बुधवारी(21 एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. हा सामना चेन्नईने 18 धावांनी जिंकला. चेन्नईच्या विजयात युवा ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले. सामन्यानंतर त्याच्याबद्दल चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीने प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर या हंगामात कोलकाताविरुद्धच्या सामन्याआधी खेळलेल्या तीन्ही सामन्यात ऋतुराज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला होता. पहिल्या तीन सामन्यात मिळून त्याला केवळ 20 धावा करता आल्या होत्या. मात्र, तरीही चेन्नई संघाने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठीही संघात कायम केले होते. त्यानेही हा विश्वास सार्थ ठरवत 42 चेंडूत 64 धावा फटकावल्या आणि फाफ डू प्लेसिसबरोबर पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. तसेच या सामन्यात ऋतुराजशिवाय फाफ डु प्लेसिसनेही जबरदस्त खेळी खेळली. त्याने 60 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 95 धावांची नाबाद खेळी केली. या चमकदार खेळीत त्याला ऋतुराजने सुरेख साथ दिली. त्यामुळे डु प्लेसिसने ऋतुराजचे कौतुक केले. |
Arjun Kapoor 38th Birthday:अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांचे एकमेकांवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. आज म्हणजेच 26 जून 2023 रोजी अर्जुन कपूरचा 38 वा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत मलायका तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस खास कसा बनवणार नाही? मलायकाने तिच्या प्रियकराच्या वाढदिवसाला तिच्या डान्सने सर्वांना आश्चर्यचकित केले. वास्तविक, अर्जुन कपूरने काल रात्री त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्रांपासून ते बहीण अंशुला कपूर आणि तिचा प्रियकरही उपस्थित होता. अर्जुनच्या पार्टीचा एक आतला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मलायका डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका शाह रुख खानच्या 'दिल से' चित्रपटातील 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 49 वर्षीय मलायकाने ज्या प्रकारची पार्टी पेटवली, त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. अर्जुन कपूरच्या वाढदिवशी मलायका अरोराने आपल्या डान्स मूव्ह्सनेच नव्हे तर तिच्या सुंदर अवतारानेही सर्वांना वेड लावले. तिने पांढऱ्या रंगाचा साइड कट लाँग ड्रेस घातला होता ज्यावर हार्ट शेप होता. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी मलायकाने अर्जुनसोबतचे नाते अधिकृत केले. तेव्हापासून दोन्ही जोडपे गोल करण्यात कधीच चुकले नाहीत. वयात 13३ वर्षांचे अंतर असूनही त्यांची केमिस्ट्री इतकी मजबूत आहे की ते इतर जोडप्यांनाही प्रेरणा देतात. बर्थडे बॉयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अर्जुन कपूर शेवटचा 'कुत्ते' चित्रपटात दिसला होता. या सिनेमात तो तब्बू आणि राधिका मदानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. यापूर्वी या अभिनेत्याने 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये काम केले होते. तो लवकरच 'मेरी पत्नी का रिमेक'मध्ये दिसणार आहे. |
मुंबई, 14 जून : पुशअप्स (Push ups) म्हटलं की हात आणि पायांचा वापर आलाच. मात्र अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina kaif) जमिनीवर हात न टेकवता पुशअप्स मारले आहेत. कतरिनाच्या पुशअप्सचा व्हिडीओ सोशल मीडियावरही (social media) चांगलाच व्हायरल (viral) होतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ कतरिना कैफ फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना डेडिकेशनने वर्कआऊट करताना दिसते आहे. या व्हिडीओत ती प्रकारे पुशअप्स करताना दिसते. सुरुवातीला कतरिना आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवून पुशअप्स मारते. त्यानंतर ती एका हातानेच पुशप्स करताना दिसते आणि शेवटी तर ती दोन्ही हात जमिनीवर न टेकवता पुशअप्स करताना दिसते. हे कसं काय शक्य आहे? कतरिनाने हे नेमकं केलं तरी कसं? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडला असेल ना? व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. खरंतर व्हिडीओचा शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला हसूही आवरणार नाही. कतरिना एका लांब प्लायवूडवर आहे, ज्याला मध्येच आधार देण्यात आलेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला एक व्यक्ती उभी आहे. ज्यामुळे सी-सॉप्रमाणे या प्लायवूडची हालचाल होते आहे आणि कतरिता हात न टेकवता पुशअप्स मारू शकते. तसा कतरिनाचा हा व्हिडीओ मार्चमधील आहे. मात्र तो पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये कतरिना सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह झाली आहे. आपल्या सोशल मीडियावर ती असे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
आयुक्तांनी घेतली अध्यक्षांचीच विकेट! नागपूर : महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पुढील वर्षात निवडणुका असल्याने आश्वासन पूर्तीसोबतच आवश्यक विकास कामांसाठी सात ते आठ महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. याचा विचार करून मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करून विकासासाठी २०-२० चा सामना खेळण्याचा संकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी व्यक्त केला होता. परंतु आयुक्तांनी अद्याप या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली नसल्याने या सामन्यात त्यांनी अध्यक्षांचीच विकेट घेतली आहे. निवडणुकीपूर्वी विकास कामे करता यावीत, या हेतूने राऊ त यांनी २७ मार्चला महापालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा २०४८. १३ कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला होता. त्याच तत्परतेने आयुक्तांकडून या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेचा कारभार सध्या आयुक्तांच्या सुधारित अर्थसंकल्पानुसार सुरू आहे. कोणत्याही स्वरूपाचे नवीन मोठे प्रकल्प प्रस्तावित न करता नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, मागील चार वर्षांत अर्थसंकल्पाच्या निमित्ताने प्रस्तावित परंतु अद्याप अपूर्ण असलेल्या योजना पूर्ण करण्याचा मानस राऊ त यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या महिनाभरात स्थायी समितीच्या माध्यमातून विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा त्यांनी लावला. परंतु समितीच्या गेल्या सहा ते सात बैठकीत मंजुरी देण्यात आलेल्या विकास कामांचे प्रशासनाने अद्याप कार्यादेश काढलेले नाही. त्यात सोमवारच्या बैठकीत पुन्हा १३४ कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. प्रशासनाकडून स्थायी समितीच्या निर्णयांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने निवडणुकीपूर्वी आश्वासनपूर्ती कशी होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थायी समितीचे अध्यक्षांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर १५ दिवसांनी सभेचे इतिवृत्त तयार करण्यात आले. त्यानंतर अर्थसंकल्प वित्त विभागाकडे मंजुरीसाठी आला आहे. यात काही बदल सुचविण्यात आले आहेत. विभागाने पडताळणी केल्यानंतर अर्थसंकल्प आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. समितीच्या अर्थसंकल्पाला अद्याप आयुक्तांची मंजुरी मिळालेली नसल्याने आयुक्तांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पानुसार महापालिकेचे कामकाज सुरू आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याची प्रशासकीय प्रक्रि या असते. छाननीनंतर अर्थसंकल्प आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून तातडीने मंजुरी मिळेल. सर्व पक्षाच्या सदस्यांना विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर सर्व विकास कामांचे कार्यादेश काढण्यात येतील. |
सावर्डे (ता. चिपळूण) येथे रविवार आठवडा बाजार असल्याने मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी होत असते. रविवारी महामार्गावरून प्रवास करीत असताना एका चारचाकी वाहनाने रविवार सुट्टीच्या दिवशी सावर्डे येथे महामार्गावर उभ्या असलेल्या आॅटो रिक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, ही कारवाई सुरु असताना काही ग्रामस्थ तेथे जमले. त्यानंतर या वाहनाने पळ काढला. सावर्डे : सावर्डे (ता. चिपळूण) येथे रविवार आठवडा बाजार असल्याने मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी होत असते. रविवारी महामार्गावरून प्रवास करीत असताना एका चारचाकी वाहनाने रविवार सुट्टीच्या दिवशी सावर्डे येथे महामार्गावर उभ्या असलेल्या आॅटो रिक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, ही कारवाई सुरु असताना काही ग्रामस्थ तेथे जमले. त्यानंतर या वाहनाने पळ काढला. त्यामुळे त्या गाडीचा ग्रामस्थांकडून पाठलाग करण्यात आला. बऱ्याच वेळानंतर ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असल्याचे कळल्यानंतर ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. सुमो गाडीतून आलेले अधिकारी हे कार्यालयीन पेहरावात नसल्याने त्यांना कुणीच ओळखले नाही. त्यांनी काही आॅटो रिक्षांवर कारवाई केली. काही वेळाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीसह परगावातील लोकांची गर्दी जमा झाली. त्यानंतर सविस्तर माहिती विचारण्यासाठी स्थानिक पत्रकार प्रतिनिधी गेले असता त्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि गाडीच्या काचा बंद करून ते पुढे गेले असता स्थानिक ग्रामस्थ एकटवले. अधिकारी न थांबता पुढे गेले त्यांनी स्वतःचे नाव आणि हुद्दाही सांगितला नसल्याने उपस्थितांच्या मनात तर्कवितर्क येऊ लागले. नक्की परिवहन अधिकारीच आहेत की, अन्य कुणी? अशा शंका तेथे उपस्थितांनी निर्माण केल्याने गाडी तिथून निघताच तिथे असणाºया उपस्थितांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीच्या काचा बंद करुन अधिकाऱ्यांनी पलायन केले. गाडी चिपळूणच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर दहा मिनिटांतच ती फिरून सावर्डे बसस्थानकाकडून परत आली. मात्र, महामार्गावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांना पाहून गाडी सावर्डे पोलीस स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर सर्व शांत झाल्यावर पुन्हा तीच गाडी दोन होमगार्डसह बसस्थानकावर थांबली. ही गाडी परिवहन अधिकाऱ्यांची असल्याचे समजले अन् त्यानंतर हा सारा प्रकार मिटला. आजपर्यंत परिवहन अधिकारी वाहनांच्या मागे लागतात पण सावर्डेत तर चित्र उलटे पहायला मिळाले. परिवहन अधिकाऱ्यांच्या गाडीचा पाठलाग उपस्थित ग्रामस्थांकडून पहायला मिळाला. हे अधिकारी कोण? यासंदर्भात अधिकाऱ्यांशी विचारपूस केली असता त्यांन ताकास तूर लागू न दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. |
श्रीनगर, 30 मेः सोशल मीडिया (Social Media) हे लोकांशी कनेक्ट होण्याचं आणि आपल्या समस्या मांडण्याचं एक चांगलं व्यासपीठ आहे. अनेक जण सोशल मीडियावरून आपापल्या भागांतील समस्या मांडतात, अनेकदा तर संबंधित विभाग किंवा नेते मंडळी त्याची दखल घेतात आणि या समस्येचं निराकरण होतं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे मदत मिळाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. दरम्यान, आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक छोटी मुलगी आपल्या भागातील रस्त्यांची दुर्दशा दाखवण्यासाठी रिपोर्टर बनली आहे. तिच्या ग्राउंड रिपोर्टिंगचा व्हिडिओ (Reporting Video) सध्या चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडिओ काश्मीरमधला (Kashmir) आहे. काश्मीरमध्ये सध्या पाऊस आणि बर्फवृष्टी (Snowfall) सुरू आहे. बर्फ वितळल्यामुळे आणि पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्यामुळे रस्ते चिखलमय झाले असून तिथून नीट चालताही येत नाही. हेच रस्ते दाखवण्यासाठी काश्मीरची एक चिमुकली मुलगी रिपोर्टर झाली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत परिसरातील चिखल आणि खड्ड्यांमुळे खराब झालेल्या रस्त्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा हा व्हिडिओ एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सीनिअर रिपोर्टर उमाशंकर सिंह यांनी ट्वीट केलाय. "काश्मीरमधील खराब रस्त्यांचा अतिशय गोंडस ग्राउंड रिपोर्ट आणि ग्राउंड रिपोर्टर... कॅमेऱ्याच्या मागे तिची आई आहे. हे प्रकरण बर्फवृष्टीनंतरचं आहे, असं कळतंय. प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, जेणेकरून घरी पाहुणे येऊ शकतील, अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे," असं कॅप्शन देत सिंह यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. गुलाबी रंगाचं जॅकेट घातलेली ही मुलगी परिसरातील खराब रस्ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती मुलगी तक्रार करत आहे, की रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे पाहुणे तिला भेटायला घरी येऊ शकत नाहीत. रिपोर्टिंग करताकरता ही चिमुकली तिच्या कॅमेरा सांभाळणाऱ्या आईला रस्त्यावरील खड्डे दाखवायला सांगते. चिखल आणि पावसामुळे परिस्थिती कशी बिकट झाली आहे, हेही मुलगी सांगते. मोबाईल फोनवर शूट केलेल्या या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये खड्डे दाखवत ती रस्त्यावरून पुढे जाते. लोक रस्त्यावर कचरा फेकतात आणि त्यामुळे सगळं कसं घाण झालंय, याबद्दलही ती सांगते. तसंच ही छोटी रिपोर्टर प्रेक्षकांना तिचा व्हिडिओ 'लाइक, शेअर आणि सबस्क्राईब' करण्यास सांगतीये आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू असं सांगते. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 62 हजार जणांनी पाहिला असून, साडेनऊ हजार युजर्सनी लाईक केलाय. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. स्वतः उमाशंकर सिंह म्हणतात, "मला पत्रकार म्हणून वार्तांकन करताना बिहारमधील करहराचा पूल दोन वर्षांत बांधता आला नाही, मात्र काश्मीरच्या या चिमुकलीच्या रिपोर्टिंगनंतर तिथे रस्ता बांधला जाईल, असा विश्वास आहे. " अनेकांनी काश्मिरच्या या चिमुकलीच्या रिपोर्टिंगचं कौतुक केलंय. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. Tags: Jammu kashmir, Viral video. |
Canada Work-Permit Stream for H-1B Visa : H-1 B व्हिसा (H-1B Visa Holders) असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेचा शेजारी देश कॅनडा युएस H-1B व्हिसाधारकांसाठी मार्ग खुला करणार आहे. H-1B व्हिसा धारकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील फायदा होणार असल्याचं कॅनडाच्या इमिग्रेशन, निर्वासित आणि नागरिकत्व मंत्रालयाने जाहीर केलं आहे. कॅनडा आता H-1B धारकांसाठी 'ओपन वर्क परमिट स्ट्रीम' आणणार आहे. यामध्ये H-1B व्हिसा धारकाच्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षण आणि वर्क परमिट मिळणं सोपं होणार आहे. अलिकडे भारतीय तरुणांचा अमेरिका-कॅनडासारख्या मोठ्या देशात जाण्याचा कल वाढला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान, यूएस सरकारने (US Govt) H-1B व्हिसा नियम सुलभ करण्याचं जाहीर केलं होतं. आता H-1B व्हिसाचं नूतनीकरण (H-1B Visa Renewal) अमेरिकेतच (USA) केलं जाईल, यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आता कॅनडा सरकारनेही H-1B व्हिसाधारकांसाठी एक मोठं पाऊल उचलले आहे, याचा फायदा व्हिसाधारकांच्या कुटुंबांनाही होणार आहे. कॅनडाचे इमिग्रेशन (Canada Minister of Immigration) मंत्री सीन फ्रेझर (Sean Fraser) यांनी घोषणा केली की, सरकार 10,000 यूएस H-1B व्हिसा धारकांना कॅनडामध्ये येऊन काम करण्याची परवानगी देण्यासाठी ओपन वर्क-परमिट स्ट्रीम तयार करणार आहे. कॅनडाच्या इमिग्रेशन आणि नागरिकत्व मंत्रालयानं म्हटलं आहे की, नव्या नियमामुळे H-1B व्हिसा धारकांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी शिक्षण आणि वर्क परमिट मिळेल. कॅनडाच्या मंत्रालयानं म्हटलं आहे की, कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या कंपन्यांद्वारे भारतासारख्या देशातील हजारो कामगार उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात आणि यूएसमध्ये काम करणारे लोक अनेकदा H-1B व्हिसावर असतात. कॅनडा सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता आमच्या अर्जदारांना तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ओपन वर्क परमिट मिळेल. 16 जुलै, 2023 पर्यंत, यूएसमधील विशेष व्यवसाय व्हिसा धारक आणि त्यांच्या सोबतचे कुटुंबीय कॅनडामध्ये स्थलांतरित होण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. H-1B व्हिसाधारक कॅनडामध्ये कोणत्याही क्षेत्रात आणि कुठेही काम करु शकतील. व्हिसाधारकाचे पती/पत्नी आणि नातेवाईक देखील आवश्यकतेनुसार काम किंवा शिक्षण परवाना असलेल्या तात्पुरत्या निवासी व्हिसासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. कॅनडाचे मंत्री सीन फ्रेझर यांनी सांगितलं की, या वर्षाच्या अखेरीस कॅनडा सरकार जगातील काही प्रतिभावान लोकांना कॅनडामध्ये टेक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येण्यासाठी इमिग्रेशन स्ट्रीम विकसित करेल. मात्र, अशा योजनेसाठी कोण पात्र असेल किंवा किती जणांना प्रवेश दिला जाईल, हे मंत्र्यांनी स्पष्ट केले नाही. |
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकानं विजयी झाले. भाजपची मत एकत्र ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो. महाविकास आघाडीची मत मिळवण्यात बावनकुळे यशस्वी झाले. अस चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तर, अकोल्याचा विजय अद्वितीय आहे. वसंत खंडेलवाल यांनी तीन वेळचे आमदार गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवलेल्या श्रद्धा आणि सबुरीचं फळ आहे. नागपूरमध्ये काँग्रेसनं पोरखेळ केला. चिन्हावरचा उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत पडलं आहे. त्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा दिलेला उमदेवार पराभूत झाला. राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेली जागा बिनविरोध केली पण काँग्रेसनं धुळे मुंबईवर आमची बोळवण केली. असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. |
करोनासंसर्गात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सोयीसुविधेसाठी हिंजवडीतील विप्रो कंपनीच्या इमारतीत उभारलेले रुग्णालय आता कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनासंसर्गात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सोयीसुविधेसाठी हिंजवडीतील विप्रो कंपनीच्या इमारतीत उभारलेले रुग्णालय आता कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयातील विविध ७१ प्रकारची उपकरणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने जाहीर केला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा परिषदेने हिंजवडीत विप्रो कंपनीच्या इमारतीमध्ये भागीदारीत (पीपीपी) रुग्णालय उभारले. त्यामुळे विप्रो रुग्णालयात दुसऱ्या लाटेत दाखल झालेल्या रुग्णांना मदत होऊ शकली. परिणामी, करोनाच्या तिसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अधिक असली, तरी गंभीर रुग्णसंख्या अत्यल्प ठरली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात हिंजवडी येथील रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेने १५ कोटी ३३ लाख रुपये, तर 'विप्रो'ने २४ कोटी आठ लाख रुपये खर्च केले होते. आता हिंजवडीच्या विप्रो रुग्णालयाची इमारत ही विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (एसईझेड) समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे विप्रोच्या या इमारतीचा उपयोग करता येणार नाही. या संदर्भात विप्रोच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक झाली. त्या बैठकीत ही इमारत आयटी कंपनीच्या विस्तारासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयात बसविण्यात आलेली ७१ प्रकारची उपकरणे जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपकेंद्रांना आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहे. रुग्णालयातील पोर्टेबल व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर (लहान-मोठे), ईसीजी मशिन, फ्रीज, मोबाइल एक्स रे मशिन; याशिवाय अन्य प्रकारच्या वस्तू सरकारी रुग्णालयांना मिळणार आहेत. करोनाकाळात विप्रो कंपनीच्या मदतीने जिल्हा परिषदेने हिंजवडीत कोव्हिड रुग्णालय सुरू केले होते. ३१ डिसेंबरपर्यंत या रुग्णालयात रुग्णांना उपचार देण्यात आले. आता रुग्णालय बंद करण्यात आले असून, रुग्णालयातील ७१ प्रकारच्या वस्तू जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना गरजेनुसार देण्यात येणार आहेत. या रुग्णालयामुळे संसर्गात रुग्णांना खूप मोलाची मदत झाली. |
काबुल, २० ऑगस्ट । जगातील सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक म्हणून अफगाणिस्तानला कमी लेखले जात असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहेत. या देशात एक ट्रिलियन डॉलर अर्थात तब्बल 74. 37 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त साधन संपत्ती आहे. 2010 मध्ये अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एका सर्व्हेमध्ये याचा खुलासा केला होता. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक ट्रिलियन डॉलरची नैसर्गिक साधन संपत्ती (Afghanistan has minerals worth 74 lakh crore resources lithium copper gold oil natural gas) : अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक ट्रिलियन डॉलरची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. याचा योग्य वापर झाल्यास अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट होईल. आता तालिबानने देश काबिज केल्यानंतर तज्ज्ञांच्या चिंता वाढल्या आहेत. लोह, तांबे, कोबाल्ट आणि सोन्याचे भांडारः तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानात लोह, तांबे, कोबाल्ट, सोने आणि लीथियमचे भांडार आहेत. अफगाणिस्तानात असलेल्या या मिनरल्सचा साठा इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक दुर्मिळ आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात या साधनसामुग्रीची खूप मागणी आहे. याच्याच मदतीने मोबाइल फोन, टीव्ही, हायब्रिड इंजन कार, काँप्युटर, लेझर आणि बॅटरी तयार केल्या जाऊ शकतात. जियोलॉजिकल सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानात जेवढे लीथियमचे भांडार जगात कुठेच नाहीत. लीथियमने रिचार्जेबल बॅटरी प्रामुख्याने बनवल्या जातात. हवामान बदल रोखण्यासाठी हे एक महत्वाचे तंत्रज्ञान आहे. (Afghanistan has minerals worth 74 lakh crore resources lithium copper gold oil natural gas) तालिबान आल्याने परिस्थिती सुधारणार नाहीः इकोलॉजिकल फ्यूचर्स ग्रुपचे संस्थापक संशोधक आणि संरक्षण तज्ज्ञ रॉड शूनोवर यांनी सांगितले, सुरक्षेची आव्हाने, पायाभूत सुविधांचा आभाव आणि दुष्काळाने ही साधन संपत्ती अद्याप काढण्यात आलेली नाही. आता अफगाणिस्तानात आता तालिबानी राजवट आल्याने परिस्थिती सुधारणार नाही. लोह आणि तांब्याच्या बाबतीत हा जगातील सर्वात मोठा निर्यातक देश होऊ शकतो. तालिबानचे समर्थन करणाऱ्या चीनसारख्या देशांची यावरच नजर आहे. सर्वात धनाढ्य देश होऊ शकतो अफगाणिस्तानः अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेचे मिर्झाद यांनी 2010 मध्ये एका मासिकाला याबाबत माहिती दिली होती. काही वर्षे जरी अफगाणिस्तानात शांतता नांदली, तर साधन सामुग्रीच्या बळावर हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक बनू शकतो. सध्या 3 देश पुरवतात 75% लीथियम-कोबाल्टः संपूर्ण जगाचा विचार केल्यास लीथियम, कोबाल्टसारखे अतिशय दुर्मिळ घटकांचे 75% उत्पादन केवळ 3 राष्ट्र करतात. त्यामध्ये चीन, रिपब्लिक ऑफ कांगो आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. चीनचा संपत्तीवर डोळाः चीनने अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे त्यांचे देशाच्या पुनर्बांधणीत योगदान देण्यासाठी आपले स्वागत आहे असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी चीनच्या माध्यमांना सांगितले आहे. चीन एक मोठी अर्थव्यवस्था आणि क्षमता असलेला मोठा देश आहे. मला वाटते की ते अफगाणिस्तानच्या पुनर्वसन, पुनर्बांधणीमध्ये खूप मोठी भूमिका बजावू शकतात,"असे शाहीनने गुरुवारी रात्री उशिरा सीजीटीएन टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गेल्या महिन्यात तियानजिनमध्ये तालिबानच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली होती आणि त्यांना आशा आहे की अफगाणिस्तान इस्लामी धोरण स्वीकारू शकेल असे म्हटले होते. महत्वाचंः तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता 'फॉलो (Follow) ' करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या. News Title: Afghanistan has minerals worth 74 lakh crore resources lithium copper gold oil natural gas news updates. - VIDEO । अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा । पहा. . - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार? |
उरण : जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दस्तान येथे असलेल्या शिवस्मारकातील नोकर भरतीत पक्ष विरहित नोकर भरती करुन स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना सामावून घेण्याची मागणी जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी जेएनपीए बंदर प्रशासनाकडे केली आहे. तसे न झाल्यास जेएनपीए विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दस्तान येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवस्मारकांची उभारणी केली आहे. या शिवस्मारकांचे उध्दघाटन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभे हस्ते करण्यात आले आहे. जेएनपीए प्रशासना कडून नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून या शिव स्मारकांच्या देखरेखीसाठी, कामकाजासाठी नोकर भरती केली जात आहे. यामध्ये ठराविक पक्षातील तरुणांनाच नोकर प्रक्रियेत सामावून घेतले जात आहे. त्यामुळे इतर पक्षांतील तरुणांवर, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांनी या परिसरातील प्रकल्पांमधील नोकर भरती प्रक्रियेत केव्हाच राजकारण केले नाही. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिव स्मारकातील नोकर भरती प्रक्रियेत सर्वच पक्षांच्या तरुणांना, प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात जेएनपीए बंदराचे चेअरमन संजय शेठी,व्हा. चेअरमन उमेश वाघ तसेच प्रशासकीय अधिकारी जयवंत ढवळे यांनी संबंधित ठेकेदाराला दिले असताना त्या सुचनेची अंमलबजावणी मुजोर ठेकेदार करत नसल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. या अन्यायाविरुद्ध विरोधात जेएनपीए बंदर प्रशासनावर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. |
Certican 0.75mg Tablet in Marathi उपयोग, दुष्परिणाम, संमिश्रण, विकल्प, सतर्कता आणि सल्ला - Novartis India Ltd । strip of 10 tablets । 1mg\nहोम>Certican>certican 0.75mg tablet\nCertican Tablet चे वापर (Uses of Certican Tablet in Marathi)\nCertican Tablet चे दुष्परिणाम (Side effects of Certican Tablet in Marathi)\nCertican Tablet कसे वापरावे (How to use Certican Tablet in Marathi)\nहे औषध आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या मात्रेत आणि कालावधीत घ्यावे. संपूर्णपणे गिळावे. हे चघळू नये, तुकडे करु नये किंवा तोडू नये. Certican 0.75mg Tablet ला अन्नासोबत किंवा शिवाय घेतले जाऊ शकते परंतु ते एका विशिष्ठ वेळी घ्यावे.\nCertican Tablet कसे काम करते (How Certican Tablet works in Marathi)\nCertican 0.75mg Tablet कॅन्सर पेशींना रक्त पुरवठा कमी करुन त्यांच्या विकासाला आणि प्रसाराला कमी करते. हे त्या पेशींचे कार्य देखील थांबवते, ज्या अभिक्रिया उत्पन्न करतात, ज्यामुळे शरीर अवयव प्रत्यारोपणाचा अस्वीकार करते.\nCertican 0.75mg Tablet गर्भारपणात असुरक्षित आहे.\nCertican 0.75mg Tablet बहुधा स्तनपानाच्या दरम्यान वापरण्यास असुरक्षित आहे. मर्यादित मानवीय आकडेवारी सूचित करते की या औषधाने बाळाला एक लक्षणीय जोखीम होऊ शकते.\nमूत्रपिंडाचा रोग दरम्यान Certican 0.75mg Tablet सुरक्षित आहे. Certican 0.75mg Tablet च्या मात्रेचे समायोजन करण्यास सांगितलेले नाही.\nयकृताचा रोग सावधानतेने $ med_name $ चा वापर करावा. तुम्हाला यकृताचा रोग असल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला. Certican 0.75mg Tablet ची मात्रा समायोजित करावी लागू शकते.\nआपल्याकडे Certican 0.75mg Tablet संबंधित काही प्रश्न आहेत का?\nCertican 0.75mg Tablet घेत असलेल्या रुग्णांना\nआपण Certican Tablet साठी काय वापरत आहात?\nCertican 0.75mg Tablet वापरताना दुष्परिणाम काय होते?\nआपण Certican Tablet कसे घेता?\nदराने Certican 0.75mg Tablet दर द्या? |
Cristiano Ronaldo Saudi Arabian club Al Nassr: फिफा वर्ल्डकपनंतर फुटबॉल विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डोने अल नासर क्लबसोबत करार केला आहे. लंडनः पोर्तुगालचा सुपर स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळवता आले नाही. पण आता तो एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सौदी अरबमधील फुटबॉल क्लब अल नासरने रोनाल्डोला करारबद्ध केले आहे. मध्य पूर्व क्षेत्रातील फुटबॉलसाठी ही मोठी घटना मानली जात आहे. पण यामुळे युरोपकडील संघाकडून खेळणाऱ्या या खेळाडूचे नाव आता आघाडीच्या क्लबमध्ये असणार नाही. अल नासरने पाच वेळा बॅलन डिओर विजेत्या रोनाल्डोचा फोटो सोशळ मीडियावर शेअर केला आहे, ज्यात तो क्लबच्या जर्सीसह दिसतोय. या करारामुळे क्लबला फक्त चांगले यश मिळणार नाही तर आमच्या लीगला देखील चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. आमचा देश आणि भविष्यातील खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मदत होईल, असे क्लबने म्हटले आहे. असे म्हटले जात आहे की, ३७ वर्षीय रोनाल्डोच्या करिअरचा हा अखेरचा करार असू शकतो. यामुळेच यासाठी त्याला मोठी रक्कम मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पोर्तुगालच्या या स्टार खेळाडूला या करारातून वर्षाला २०० मिलियन जवळपास १७ अब्ज रुपये मिळणार आहेत. यामुळे फुटबॉलच्या इतिहासात तो सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू होईल. एका वेगळ्या देशात नवी फुटबॉल लीग खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. मी नशीबवान आहे की युरोपीयन फुटबॉलमध्ये सर्व काही मिळवले आणि जे करायचे होते ते केले. आता मला आशियातील अनुभव करण्याची योग्य वेळ असल्याचे वाटते, असे रोनाल्डो म्हणाला. कतारमध्ये नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये रोनाल्डो आणि त्याच्या संघाची कामगिरी निराशजनक झाली. नॉकआउट फेरीतील लढतीत त्याला पहिल्या हाफमध्ये मैदानात उतरवण्यात आले नव्हते. या सामन्यात मोरक्कोकडून त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर रोनाल्डो रडत मैदाना बाहेर केल्याचे सर्वांनी पाहिले होते. रोनाल्डो याआधी मॅनचेस्टर युनायटेड आणि रियाल माद्रिद सारख्या अव्वल क्लबकडून खेळला आहे. या क्लबसोबत त्याने चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले आहे. |
मंदिराच्या भिंतीवर 'जिझस एकमेव देव आहे' असे लिहिले ! - अमेरिकेत हिंदूंच्या मंदिरात घुसून तोडफोड होते; मात्र भारतातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना याचा निषेध करत नाही ! जगभरात एखाद्या मशिदीवर असे अन्य धर्मियांनी आक्रमण केले असते, तर सर्वत्र हिंसाचार झाला असता ! - मंदिरातील मूर्तींचे विद्रुपीकरण करून तेथील भिंतींवर जिझसचा उदोउदो करणारे कोणत्या पंथाचे आहेत, हे हिंदू जाणून आहेत ! वॉशिंग्टन : अमेरिकेतील केन्टुकी प्रांतातील लुइसविले शहरात असणार्या स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांनी घुसून तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील देवांच्या मूर्तींवर काळा रंग फासला. तसेच मुख्य दालनात असलेल्या खुर्च्या तोडल्या. मंदिराच्या भिंतीवर विचित्र चित्र काढून आक्षेपार्ह लिखाणसुद्धा लिहिले. (ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. - संपादक, दैनिक सनातन प्रभात) यात 'जिझस एकमेव देव आहे', असेही लिहिले आहे. या घटनेची माहिती २ दिवसांनंतर मिळाल्यावर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. |
सरकारकडून नागरी स्वातंत्र्याचे हननच! नुकताच देशभर संविधान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांची स्वाभाविक आठवण होते. आणीबाणीच्या काळात १९७६ साली सर्वोच्च न्यायालयात जी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती, त्यात त्यांनी स्वतःचे भिन्न मत नोंदवले होते. सॉलिसिटर जनरल) नुकताच देशभर संविधान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांची स्वाभाविक आठवण होते. आणीबाणीच्या काळात १९७६ साली सर्वोच्च न्यायालयात जी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती, त्यात त्यांनी स्वतःचे भिन्न मत नोंदवले होते. त्याद्वारे त्यांनी नागरी स्वातंत्र्याच्या बाजूने आपण भक्कमपणे उभे आहोत हे दाखवून दिले होते. लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले होते. त्या वेळी हेबियस कॉर्पसच्या संदर्भात झालेला निर्णय बाजूला सारण्यात ४० वर्षांचा कालावधी निघून गेला. २०१७ च्या व्यक्तिगत गोपनीयतेच्या प्रकरणात हा निर्णय बाजूला सारण्यात आला. हेबियस कॉर्पसच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बहुमताच्या निर्णयाची दखल घेतली नाही. उलट क्रिमिनल लॉच्या संदर्भात संदिग्धता दाखविण्यात आली. न्यायालयाने काम करण्याच्या पद्धतीतील सुरक्षात्मक उपाय सौम्य केले तसेच कायद्यात नवे गुन्हे सामील करण्यास मान्यता दिली. पण शिक्षा देण्याचे कायदे मात्र खूप विचारांती करण्यात आले नाहीत. उलट ते लोकक्षोभाच्या दबावाखाली करण्यात आले व न्यायालयांना त्यांची दखल घ्यावी लागली. न्यायालयांनी सौम्य सुरक्षाविषयक तरतुदी आणि कठोर शिक्षा मान्य केल्यामुळे अधिक कठोरतम शिक्षा देण्याचे कायदे करण्यासाठी सरकारचे धाडस वाढले. हे कायदे करताना निरपराधीपणा सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्यात आली. ही गोष्ट घटनात्मक तरतुदींच्या विपरीत म्हणावी लागेल. जामीन मिळण्याचा हक्क हा मानवी स्वातंत्र्याशी निगडित आहे व न्यायालयीन पद्धतीेचे तो अविभाज्य अंग आहे. १९८० साली गुरुबक्षसिंग सिब्बिया प्रकरणात न्यायालयाने म्हटले होते, समाज टिकून राहण्यासाठी व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहण्याची गरज आहे. पण दोनच दशकांनी १९९७ च्या अनिल शर्मा यांच्या खटल्यात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची पोलीस कस्टडीतील उलटतपासणी कलम ४३८ अन्वये मिळालेल्या सुरक्षित ठिकाणापेक्षा अधिक योग्य समजण्यात आली होती. १९८० च्या दहशतवादविरोधी कायद्याने जामीन देण्यावर बंधने आणण्यात आली. तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक पुराव्याबाबतच्या सुरक्षाविषयक तरतुदी सौम्य करण्यात आल्यामुळे आरोपींना बचावाची संधी नाकारली गेली आहे. अशा स्थितीत क्रिमिनल लॉच्या आजवरच्या प्रवासावर निरनिराळ्या राज्यांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने त्या कायद्याचे दर पाच किंवा दहा वर्षांनी आॅडिट केले पाहिजे. मनमानी पद्धतीने नवीन कायदे करून शिक्षेत वाढ करून तसेच सुरक्षात्मक उपाय सौम्य करून कायद्याच्या राज्याचा विपर्यास केला जात आहे. १९७७ साली आणीबाणी संपुष्टात आली तेव्हा मी ११ वर्षांचा होतो. आणीबाणीच्या काळात माझ्या स्वर्गवासी पित्याने तुरुंगात असलेल्या अनेकांच्या बाजूने बचाव केला. पण वॉरंटशिवाय अटक करण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. अशा वेळी न्या. एच. आर. खन्ना यांनी १९७६ साली जे विरोधी मत नोंदवण्याचे धैर्य दाखवून नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे काम केले त्याचे स्मरण ठेवण्याची व त्याप्रमाणे वर्तन करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांनी नोंदवलेले विरोधी मत हे विरोधी मत म्हणूनच राहील. |
अमेरिकन कंपनी वॉलमार्टकडून इंडियन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट विकत घेण्यात येणार आहे. यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांच्या विक्री आणि व्यवसायावर परिणाम होणार आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने संपूर्ण भारतभर या गोष्टीला विरोध केला जात आहे. देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये पंतप्रधानांच्या नावाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले जात आहे. त्यामुळे पुण्यात देखील अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सूर्यकांत पाठक, शैलेश राणीम, उदय जोशी, तुषार गायकवाड, किरण गुंजाळ, थकसेन पोरे आदी उपस्थित होते. सूर्यकांत पाठक म्हणाले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्यावतीने संपूर्ण भारतात अमेरिकन कंपनी वॉलमार्टकडून इंडियन ई - कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट विकत घेण्याला विरोध केला जात आहे. वॉलमार्ट ही चिनी वस्तूंची अमेरिकन विक्रेता कंपनी आहे. या कंपनीमधून मिळणारा नफा अमेरिकेत जाणार आणि चिनी लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या स्वप्नाला बाधा पोहोचणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत संपूर्ण भारतात पंतप्रधानांच्या नावाने जिल्हाधिका-यांना निवेदने देत असून अशाप्रकारच्या बेकायदा खरेदीला त्वरित थांबवावे, अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे. या व्यवहारामुळे देशातील लोकांचा रोजगार हिरावले जातील. स्वस्त दरात माल खरेदी केल्याने शेतक-यांचे देखील नुकसान होणार असून महाग दरात माल विकल्यावर ग्राहकाचे नुकसान होईल. तसेच देशातील लघु उद्योग करणा-या व्यावसायिकांना व्यवसाय बंद पडेल. त्यामुळे याला आमचा विरोध आहे. |
अगदी दुसऱ्या पेपरपासून कोरोनाच्या बातम्या कानावर पडत होत्या. शेवटचे दोन पेपर मास्क घालूनच लिहिले. शेवटचा पेपर कडेकोट बंदोबस्तात, पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग पाळून एकदाचा पार पडला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केलं. सर्व पेपर संपल्याचा आनंद व्यक्त करायचा, की लॉकडाऊनमुळं आखलेल्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं याचं दुःख व्यक्त करायचं, काहीच कळेनासं झालं. काही दिवस चिडचिड झाली, आपल्या वेळेसच असं का झालं याचं वाईटही वाटलं. वेळ जाता जाईना, सगळं सगळं कॅन्सल झालं. मग हळूहळू मी निरीक्षण करू लागले, की आई-बाबा कसा वेळेचा उपयोग करताहेत. मग मी स्वतःहून आईकडून बेकिंग आणि विविध पदार्थ करण्याचे धडे घेऊ लागले. घरकामात मदत करू लागले. लिहायची आवड आधीपासून आहेच, त्यामुळे विविध विषयांवर निबंध लिहू लागले. डू इट युअरसेल्फचे व्हिडिओज बघून, आहे त्या गोष्टींमध्ये स्वतःची रूम छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून सजवायला लागले. माझ्या बाबांचा भगवद्गीतेचा खूप चांगला अभ्यास आहे. रोज दोन तास त्यांच्याबरोबर बसून मी त्या संदर्भात नवनवीन गोष्टी शिकू लागले. जसजसं ते मला समजावत गेले, तसतसा माझा इंटरेस्ट वाटू लागला. नंतर मला ऑप्शन मिळाला, की जे क्लासेस लावले होते ते ऑनलाइन करायचे. मग मी विचार केला की हे शिक्षण मला नंतर कधीही आणि कुठंही घेता येईल. पण हे जे मौल्यवान क्षण आहेत ते मला कदाचित कधीच परत मिळणार नाहीत. शिवाय मी यातून एक पॉझिटिव्ह विचार हाही केला, की जर मला पुढच्या शिक्षणासाठी परगावी अथवा परदेशी जायची वेळ आली, तर मला माझी स्वतःची कामं कोणावरही अवलंबून न राहता नीटपणे करता आली पाहिजेत, अगदी सफाईपासून पौष्टिक कुकिंगपर्यंत. ही सगळी त्याची मॉक ड्रिलच नाही का? त्यामुळं आता लॉकडाऊन कितीही वाढला, तरी तो आपल्या भल्यासाठीच असा विचार करून आणखीन काय नवं शिकायला मिळतं आहे, याकडं लक्ष केंद्रित करू लागले. बाकी काही हो न हो, हा लॉकडाऊन बरंच काही शिकवून जाणार आहे. आपल्याकडं जे आहे त्याची किंमत ठेवायला, आहे त्यात भागवायला, पाहिजे तेवढंच घ्यायला, वेळेची कदर करायला, एकमेकांच्या कामाबद्दल आदर बाळगायला, कानाकोपऱ्यात स्वछता ठेवायला आणि बरंच काही. जे कोणालाही जमलं नाही, ते सगळं शिकवून जातोय एक न दिसणारा विषाणू. आहे की नाही यात गंमत! बारावीची परीक्षा सुरू असताना थोडं टेंशन होतं, पण तेवढंच छान वाटत होतं. परीक्षा संपल्यावर आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं होतं, की गड किल्ले फिरायला जायचं. शेवटचा पेपर झाल्यानंतर फिरायला जाणार, पण जायच्या आदल्या दिवशी बातमी आली, की पुण्यात कोराेनाचं प्रामाण वाढलं आहे. आम्हाला सगळ्यांना थोडं वाईट वाटलं, पण आम्ही ठरवलं नंतर जाऊ. काही दिवसांनी सरकारनं लॉकडाऊन घोषित केलं. तेव्हा आता लॉकडाऊनमध्ये घरी काय करणार हा प्रश्न पडायला लागला. मग दिवसभर फोनवर किती व्हॉट्सएप वापरणार म्हणून यूट्युबवर वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीज बघून त्या घरी तयार करून जे येत नाही ते शिकले. बारावीनंतर काय करायचं हे डोक्यात होतं. बारावीनंतर पार्लरच्या कोर्ससाठी एडमिशन घ्यायची होती. पण लॉकडाऊनमुळं पार्लर बंद असल्यानं एडमिशनही घेता येईना. म्हणून इन्स्टाग्रामवर स्वतःचं पेज सुरू केलं आणि त्यावर स्किनकेअर व होम रेमेडी टिप्स पोस्ट करू लागले. लॉकडाऊनमध्ये मी स्किनकेअर, कुकिंग अशा बऱ्याच गोष्टी यूट्युबवरून शिकले. लॉकडाऊनमध्ये मी माझ्या भविष्यात उपयोगी येतील अशा सर्व गोष्टी शिकले. मी दहावीची परीक्षा दिली आहे, मात्र कोरोनामुळं सगळीकडं लॉकडाऊन सुरू आहे. असाच लॉकडाऊनचा काळ वाढत राहिला, तर पुढं निकाल लागण्यासाठी उशीर होणार, नंतर अकरावीच्या एडमिशनला उशीर होणार. त्यामुळं थोडं टेंशन आलं आहे. दहावीचे पेपर संपल्यानंतर काय काय करायचं याचं मी प्लॅनिंग केलं होतं. पण आता बाहेर पडता येत नसल्यामुळं कोणत्या क्लासलाही जाऊ शकत नाही. परीक्षा सुरू असतानाच लाॅकडाऊन सुरू झालं. नऊ मार्चला पेपरचा दिवस असताना सकाळी पुण्यात दोन रुग्ण सापडले. त्यानंतर लाॅकडाऊन दाट होत गेलं. परीक्षा संपल्यानंतर अनेक गोष्टींचं प्लॅनिंग केलं होतं. एमएससीआयटीचा क्लास लावायचा होता, स्विमिंगला जायचं होतं, गावाला फिरायला जायचं होतं, क्रिकेट खेळायचं होतं, गाडी चालवायला शिकायचं होतं, किल्ल्याला भेट द्यायची होती, उद्यानाला भेट द्यायची होती, मुंबईचं शिवाजी महाराज टर्मिनस पाहायचं होतं, वॉटर पार्कला जायचं होतं. पण आता लॉकडाऊनमुळं घरात बसून टीव्ही पाहत बसतो. यूट्युब बघतो. पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, व्हिडिओ गेमही खेळतो. सध्या मी पानिपत कादंबरी वाचतो आहे. तसंच स्वामी समर्थांचं पारायण करतो आहे. त्याशिवाय रात्री चित्रपट पाहतो, हिंदी व मराठी ऐकतो. घरात टाइमपास व्हावा यासाठी प्रश्न तयार करून इतरांना प्रश्न विचारतो. सकाळी सहा वाजता उठतो, घरातच व्यायाम करतो. नंतर आईला कामात मदत करतो. दुपारी जेवण झालं की खेळ खेळत असतो. माझा इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंग्रजीची पाच वाक्यं रोज लिहितो. यूट्युबवर इंग्रजी गोष्टी लावतो. इंग्रजी गोष्टी वाचतो. मराठी गोष्टीही वाचतो. तसंच अपडेट राहण्यासाठी गणिताचे घनमूळ काढणं, वर्गमूळ काढणं, पाढे वाचत राहणं, इतिहास वाचत राहणं या गोष्टीही करतो. माझा शेवटचा पेपर १८ मार्चला होता. हा पेपर पुढं ढकलला जाईल अशी मला भीती वाटत होती. पण सुदैवानं हा पेपर झाला आणि मी सुटलो. पण माझे काही मित्र इतके नशीबवान नव्हते. पहिला लॉकडाऊन जाहीर झाला आणि माझ्या सगळ्या प्लॅन्सवर पाणी फेरलं गेलं. माझा प्लॅन अगदी साधा सरळ होता. मी दोन आठवडे आराम करणार होतो, टीव्ही बघणार होतो आणि गेम खेळणार होतो. त्यानंतर बॅडमिंटन खेळायला जाणार होतो आणि स्विमिंगही करणार होतो. आम्ही काही छोट्या आणि काही मोठ्या ट्रिप्सही प्लॅन केल्या होत्या. मी हॉलिडे मूडमध्ये होतो आणि आता घराबाहेरही पडता येणार नाही हे कळल्यावर मला खूप वाईट वाटलं. घरात बसून मला आणि माझ्या घरच्यांनाही खूप बोर होतं. पहिले दोन आठवडे मी एंजॉय केले, उशीरा झोपलो, उरा उठलो, गेम्स खेळलो आणि दिवसभर टीव्ही पाहिला. पण आता मात्र स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी मला नवीन नवीन गोष्टी शोधाव्या लागतात. मी सध्या यूडेमी किंवा यूट्युबवरून नवीन भाषा शिकण्याच्या विचारात आहे. तसंच मी कुकिंग करण्याचाही प्रयत्न करतो आहे कारण मला खायला आवडतं. मी मित्रांशीही खूपदा गप्पा मारतो. माझा शेवटचा संस्कृतचा पेपर राहिला होता, जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं. घाबरत घाबरत पेपर लिहायला गेले होते, मास्क आणि सॅनिटायझर घेऊन. परीक्षा संपल्यानंतर स्पर्धा परीक्षांसाठी जोरात अभ्यास सुरू करायचा होता. सिनेमे बघायचे होते, ट्रेकला जायचं होतं; ते सगळं राहून गेलं. त्यामुळं वाईट वाटतंय. मैत्रिणींबरोबर फिरायला जाता येत नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी अजिबात घराबाहेर पडले नाहीये. लॉकडाऊन खूप काळ राहील हे समजल्यावर मनाची तयारी केली आणि नवीन रुटीन सुरू केलं. अभ्यासामुळं व्यायामाकडं दुर्लक्ष झालं होतं, म्हणून मी रोज ऑनलाइन बघून व्यायाम करते. टीव्ही, मोबाइल यात जास्त वेळ न घालवता वाचन, चित्रकला, नृत्य हे माझे छंद जोपासते. सगळ्या स्पर्धा परीक्षा पुढं ढकलल्या आहेत, त्यामुळं अभ्यासक करायचा कंटाळा येतो. ऑनलाइन क्लासेस सुरू असले, तरी अभ्यास करायचं मोटिव्हेशन कमी होतंय. घरच्या कामातही मी हातभार लावते आहे. आधी क्वचितच केलेली कामं आता रोज करते. तसंच ऑनलाइन नृत्यही शिकते आहे. या लॉकडाऊनमुळं कामाची सवय लागली, पुस्तकं वाचायला वेळ मिळाला. पण तरीही घरात कोंडल्यासारखं वाटतं आणि दिवस उदासवाणा वाटतो. औरंगाबाद : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आज (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांत गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
भारतात गेल्या काही वर्षांपासून दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला लेड अॅसिड बॅटरी असणारी स्कूटर लॉन्च केली होती. त्यांची रेंज कमी होती. मात्र आता लिथियम आयन बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या जात आहेत. ज्या सिंगल चार्जमध्ये जबरदस्त रेंज देण्यास सक्षम आहेत. अशातच EeVe India लवकरच भारतात आपली Soul इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करु शकते. (Automatic Hybrid Tractor: भारतामध्ये Proxecto ने सादर केला देशातील पहिला ऑटोमॅटिक हायब्रिड ट्रॅक्टर; ना गियर ना क्लच, जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत ) दाव्यानुसार, EeVe Soul एक हायस्पी इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. ज्यामध्ये एक दमदार बॅटरीचा वापर केला जाऊ शकतो. खासियत अशी की, मार्केटमध्ये असलेला ट्रेंड पाहून या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये डिटॅचेबल बॅटरी दिली जाऊ शकते. त्याच्या मदतीने तुम्ही याची रेंज अधिक वाढवू शकता. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी चालकाला मोकळीक सुद्धा मिळते. प्राप्त झालेल्या माहितीनुसा, कंपनी ही अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटर भारतात जून महिन्यापर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्कूटरच्या लॉन्चिंगच्या तारखेवर परिणाम होऊ शकतो. कारण काही महत्वाच्या कम्पोनेंट्सचे सप्लाय कोरोनामुळे प्रभावित होऊ शकतो. अशातच ग्राहकांना स्कूटरसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. (नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु; खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे) असे बोलले जात आहे की, EeVe Soul इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 130 किमी पर्यंत धावण्यास सक्षम आहे. जी स्कूटरची उत्तम रेंज आहे. कंपनीची ही स्कूटर एक हायस्पीड असल्याने याची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास असू शकते. जर परिस्थिती पूर्णपणे मार्गावर येत असल्यास भारतात ती लॉन्च केली जाऊ शकते. त्यानंतर कंपनीकडून त्याची डिलिव्हरी सुद्धा सुरु केली जाऊ शकते. |
गोल्फ भाषेतील "फ्रन्ट नऊ" (किंवा "फ्रंट 9") आणि "बॅक नऊ" (किंवा 9) हे सर्वात सामान्य आणि मूलभूत शब्द आहेत आणि त्यांचा अर्थ समजून घेणे खूप सोपे आहेः - फ्रंट नऊ म्हणजे 18-भोक गोल्फ कोर्सवरील पहिले नऊ छिद्र, किंवा गोलभोवती खेळलेले पहिले नऊ छिद्र; - परत नऊ म्हणजे 18-छिद्र संचाचे दुसरे नऊ छिद्र किंवा गोल्फच्या फेरीत खेळणारे अंतिम नऊ छिद्र. आपण बघता त्याप्रमाणे, वापर अटींनुसार गोल्फ कोर्स आणि गोल्फच्या फेरीत लागू होऊ शकतात, अगदी थोड्या वेगळ्या अर्थाने. च्या दोन्ही वापरासाठी वर जाऊ या. एक मानक गोल्फ कोर्स 18 छिदांचा आहे, 1 ते 18 याप्रमाणे. पहिल्या नऊ छेद "फ्रंट नऊ" आणि शेवटच्या नऊ छिद्रांमध्ये - 10 पासून 18 पर्यंत राहील - "परत नऊ" म्हटले जाते. Golfers एक नियमन विचार कल, nines दोन संच म्हणून 18-भोक गोल्फ कोर्स. आम्ही पुढच्या नऊ आणि मागील नऊ धावांचा गुण मिळवतो, नंतर अंतिम, 18-भोक स्कोअरसाठी एकत्र जोडू. जवळजवळ सर्व गोल्फ स्कोरकार्डस अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे की, एकूण नऊ एकूण आणि मागील नऊ एकूण रिक्त स्थानासह. अनेक गोल्फ कोर्स हे "गोळ्यांचे दोन संच" स्वीकारतात, नवव्या हिरव्या आणि 10 व्या उपकरणात, किंवा त्यांच्या अभ्यासक्रमाच्या सहाय्याने नाक शॅक्स आणि / किंवा रेस्टोररूम टाकून, नवव्या छिद्राने क्लबहाऊसमध्ये परत गोल्फर गाठले आहे. (द-द-नन्स थांबासाठी, आवश्यक असल्यास). 18-छिद्र अभ्यासक्रमातील नऊ भागांना "फ्रंट बाजूला", "पहिल्या नऊ" किंवा "बाह्य 9" असे म्हटले जाते. 18-भोक गोल्फ मैदानाच्या मागे नऊला "बॅक साइड," "दुसरा नऊ" किंवा "इनवर्ड नऊ" असे म्हटले जाते. गोल्फच्या नियमन गोलांची लांबी 18 र राहील. गोल्फरच्या समोर नऊमध्ये तिने खेळलेले पहिले नऊ छिद्रे असतात, आणि तिच्या मागे नऊ तिच्या नाटकातील शेवटच्या नऊ छिद्र असतात. परंतु कधीकधी एक फेरीचे नऊ आणि गोल्फ कोर्सचे नऊ भाग वेगळे असतात. समोर नऊ समान. हे कसे शक्य आहे? गोल्फचे प्रत्येक फेरीत नंबर 1 चे प्रारंभ होत नाही; उदाहरणार्थ, काही स्पर्धांमध्ये, गोल्फर्सना क्रमांक 10 च्या वर काही फेरी घेण्याची आवश्यकता असू शकते. आपण जर 10 ते 18 वेळा छेद खेळत असाल तर त्या गॉल्फच्या त्या विशिष्ट फेरीच्या नऊ आहेत, जरी 10 ते 18 गोल्फर गोल्फ मैदानाचे नऊ आहेत ते मिळवायचे? त्याचप्रमाणे, 18-भोक फेरीत गोल्फर नं. 10 टी वर सुरु होइल, 1 9-9 राहील शेवटचे नऊ छिद्रे असतील, आणि म्हणून, त्या फेरीत मागे 9- भेद 1- 9 जरी स्पष्टपणे असले तरी , गोल्फ कोर्स समोर नऊ. थोडक्यात, तथापि, जेव्हा गोल्फर्स "फ्रंट नऊ" बद्दल बोलत असतात तेव्हा आम्ही 1 9 वर्षे राहील म्हणतो; आणि "परत नऊ," राहील 10-18. उदाहरणार्थ, एक टीव्ही ऍवॉर्डर जो म्हणतो, " अगस्टा नॅशनलमध्ये बॅक 9 हा मास्टर्समध्ये थरारक उरतो. " नेहमी 10 ते 18 या छेदबद्दल बोलत असतो. |
अंगावर टॅटू काढणे सध्या अनेकांची स्टाईल झाली असून तरुणांमध्ये याची कमालीची क्रेझ वाढली आहे. मात्र, हा टॅटू एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. टॅटूमुळे दहा वर्षाच्या मैत्रित फूट पडून त्यात मित्राची हत्या करण्यात आली आहे. नेमके काय घडले? पिंपरी चिंचवडमध्ये महिन्याभरापूर्वी मयुर मडके या तरुणाने 'एमएम' (M. M) असा टॅटू काढला होता. त्यानंतर त्याचा जिवलग मित्र मंगेश मोरेनेही त्याच आद्याक्षराचा पण, थोड्या वेगळ्या डिझाईन असलेला टॅटू काढला आणि वादाला सुरुवात झाली. मयुर मडके आणि मंगेश मोरे हे दहा वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांचेही नाव आणि आडनाव 'एम' अक्षरावरुन येत असल्याने दोघांनी तसे टॅटू काढले. पण, सारखे टॅटू काढण्यावरुन दहा वर्षांच्या मैत्रीत फूट पडली. गेल्या जवळपास महिनाभर दोघांमध्ये धुसफूस सुरु होती. दरम्यान, मंगेश मोरेने मयुर मडकेची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील भोसरी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन आरोपी मंगशे मोरेसह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश मोरेसह सातही आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नसून आता मयुर मडकेच्य़ा साथीदारांनी सोशल मीडियावर 'वेट अॅण्ड वॉच ओन्ली, रिप्लाय फिक्स', असे धमकीचे मेसेज व्हायरल केले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आणखी एक घातपात होण्याआधीचे हे प्रकरण तडीस नेण्याचे आव्हान आहे. |
अशा या घटना किंवा फतवे काढल्यानं वाद निर्माण होण्याचे प्रसंग आज एकविसाव्या शतकात थांबवता येणार नाहीत काय? निश्वितच येतील. मात्र त्यासाठी गरज आहे, ती मुस्लिम समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी एकत्र येऊन मूलभूत विचार करण्याची आणि तसा विचार करण्यासाठी बहुसंख्याक समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी त्यांना पाठबळ देण्याची. भारतीय मुस्लिमांपुढील खरा पेच आहे, तो पश्विम आशियातील मुस्लिम समाजाची भारतीय शाखा म्हणून राहायचं की, भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगायचं, हाच. भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगण्याचा निर्णय येथील मुस्लिम समाजानं घेतला, तर त्यासाठी त्याला मूलभूत विचार करण्याची गरज भासणार आहे...आणि त्याची सुरुवात कुराणापासूनच होते. कुराणाचे दोन सरळ भाग पडतात. एक मक्केतील व दुसरा मदिनेतील. मक्केतील बहुतांश आयती प्रेषितांच्या 'रसूल' या भूमिकेतून आल्या आहेत. धर्माची उदात्त तत्त्वं या आयतीत सांगितली आहेत. उलट मदिनेतील आयती या प्रेषितांच्या 'राष्ट्रपती' या भूमिकेतून आल्या आहेत. प्रेषितांच्या आयुष्यातील मदिनेचा काळ हा संघर्षाचा होता. त्यांना मक्का सोडून मदिनेला जावं लागलं होतं. त्यामुळं कुराणातील या काळातील आयतींना त्या संघर्षाचा काळाचा तत्कालीन संदर्भ आहे. मक्केतील आयतीप्रमाणं त्या कालातीत अशा स्वरूपाच्या नाहीत. विशेष म्हणजे काळाच्या संदर्भात कुराणाचा अर्थ लावायला हवा, असं प्रेषितांचंही म्हणणं होतं. म्हणूनच त्यांनी 'इज्तिहाद'ची संकल्पना मांडली. पैगंबरांनी येमेन या प्रांताचा सुभेदार म्हणून मुआद याची नेमणूक केली. त्यावेळी कारभार करताना न्यायदानाची तुझी पद्धत कशी असेल, असा प्रश्न पैगंबरांनी त्याला विचारला. कुराणातील तत्त्वांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं उत्तर मुआदनं दिलं. त्यावर 'कुराणात प्रत्येक परिस्थितीत न्याय देण्याच्या दृष्टीनं तत्त्व न मिळाल्यास काय करशील?' असा दुसरा प्रश्न पेषितांनी मुआदला विचारला. तेव्हा पैगंबरांच्या आदर्श जीवनातील घटनांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं मुआदचं उत्तर होतं. त्यानंही पैगंबरांचं समाधान झालं नाही. माझ्या जीवनातील घटनांमुळंही न्यायदान करणं जर अशक्य झालं तर काय करशील, असा प्रतिप्रश्न त्यांनी मुआदला केला. तेव्हा समाजातील विचारवंंतांची मदत मी घेईन, असा जबाब मुआदनं दिला. विचारवंंत काही सर्वज्ञानी नसतात, त्यांनाही काही गोष्टी कळत नसतात, मग काय करशील, असा सवाल प्रेषितांनी केला. शेवटी मुआद म्हणाला की, मी माझी सदसद्विवेक बुद्धी वापरीन आणि न्याय करीन. हे उत्तर प्रेषितांनी मान्य केलं. मुआदचं हे चौथं उत्तर म्हणजेच इज्तिहाद. ही संकल्पना आपली सदसद्विवेकबुद्धी वापरण्याचा हक्क प्रत्येक श्रद्धावानाला देते.. जेथे मुस्लिम बहुसंख्य नाहीत, तेथे इतर धमीर्यांच्या राज्यात कसं राहायचं, कसं वागायचं, आपलं धर्माचरण कसं करायचं, हा इस्लामधमीर्यांच्या दृष्टीनं कळीचा प्रश्न असतो. पण या संदर्भात पैगंबरांनीच आपल्या कृतीनं काही दाखले देऊन ठेवले आहेत. मदिनेत असताना तेथील बहुधमीर्य समाजात वेळ पडल्यास इतर धमीर्यांशी सहकार्य करण्यास हरकत नाही, असा दाखला पैगंबरांनी आपल्या कृतीनं घालून दिला आहे. पैगंबरांच्या याच दाखल्याचा वापर मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिमांनी कसं सहभागी होणं आवश्यक आहे, हे पटवण्यासाठी केला होता. अरबस्तानातील सतत संघर्ष करणाऱ्या युद्धखोर टोळ्यांना एकत्र आणून त्यांना एका समान श्रद्धेच्या धाग्यानं बांधून ठेवण्यासाठी 'ईश्वराचे आपण लाडके आहोत, पूवीर्च्या सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टी इस्लाममध्ये सामावलेल्या आहेत, तोच एकमेव धर्म उरला पाहिजे व त्याच्या प्रचाराची जबाबदारी आपल्यावर ईश्वरानंच टाकली आहे, अशी शिकवण पैगंबरांनी दिली. सहाव्या शतकातील अरबस्तानात एक नवा समाज निर्माण करण्यासाठी हे सांगणं पैगंबरांना आवश्यक होतं. त्यांना विविध स्थानिक पंथ व ख्रिश्वन आणि ज्यूंच्या प्रभावाला तोंड देत आपला धर्म प्रस्थापित करायचा होता. आज शेकडो वर्षांनंतर तोच दृष्टिकोन बाळगला जाणं हे कालबाह्यतेचं लक्षण आहे. |
। पुणे । वडगाव शेरी येथील प.पू. प्रीतिसुधाजी, प.पू. मधुस्मिताजी यांच्या प्रेरणेने, तसेच श्री महावीरजी नहार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील ३६ जैन संघांच्या उपस्थितीत १९ सप्टेंबर या दिवशी सुसंस्कार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व संघप्रमुखांच्या स्वाक्षरीसहित 'प्री वेडिंग शूटिंग'ची (विवाहापूर्वी जोडप्यांचे केले जाणारे छायाचित्रण) हानीकारक प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या कुटुंबांमध्ये अशा पद्धतीने विवाह होत असेल, त्या विवाहाचा समाजातील मुख्य पंच निषेध करतील आणि विवाहामध्ये सहभागी होणार नाहीत, असा ठराव संमत करण्यात आला. या वेळी जैन संघाचे प्रमुख श्री. विजयकांतजी कोठारी, श्री. पोपटलालजी ओस्तवाल, प्रा. अशोकजी पगारिया, श्री. चंद्रकांतजी पगारिया उपस्थित होते. 'प्री वेडिंग शूटिंग' म्हणजे विवाहापूर्वी जोडप्यांचे केलेले छायाचित्रीकरण ! हे छायाचित्रीकरण सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसारित केले जाते. यातून मुलींचे प्रदर्शनच मांडले जाते. ही प्रथा अयोग्य असून तिचा अपलाभही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे ही हानीकारक प्रथा बंद करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. |
गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर मोकळ्या वातावरणामध्ये आणि पूर्वीप्रमाणे जल्लोषात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मंडळांची लगबग सुरू झाली आहे. पुण्यामध्ये अफझल खान वधाचा जिवंत देखावा साकारण्यासाठी मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे पुण्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. कोथरूड (Kothrud) परिसरातील संगम तरुण मंडळाने (Sangam tarun Mandal) देखाव्यासाठी परवानगी मागितली होती पण पोलिसांनी ती नाकारली आहे. पुणे पोलिसांनी कायदा व सुवस्थेचं कारण सांगत यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर मग काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का? हेच का हिंदूत्ववादी सरकार? असा सवाल किशोर शिंदे यांनी विचारला आहे. आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत. मात्र त्यापूर्वी हिंदुत्वाच्या नावावर सरकार बनवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की, ते आम्हाला परवानगी देतील, असं किशोर शिंदे यांनी म्हटलं आहे. संगम तरुण मंडळ मागील 56 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करत आहे. ऐतिहासिक देखावे साकारण्यासाठी संगम तरुण मंडळ प्रसिद्ध आहे. मुंबईमध्येही काल नागपाडा भागात गणपती मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. संबंधीत व्यक्तीला अटक करुन आरोपीवर कलम 295A आणि 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणीही पोलिस तपास सुरू आहे. |
पुणे / सातारा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यास अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही. छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital Pune) उपचार सुरु आहेत. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं बोललं जातंय. मागील चार दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. सातारा भाजप खासदार (Satara BJP MP) उदयनराजे भोसले यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले (Kalpanaraje Bhosle) या कोरोना बाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे उदयनराजे भोसले अधिवेशन सोडून परतले होते. त्याची प्रकृती आता बरी आहे. दरम्यानच्या काळात उदयनराजे भोसले यांना कोरोना झाला असं सांगितलं जातंय. ते सध्या उपाचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून एक ते दोन दिवसात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. Devendra Fadnavis । 'दारू दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का? (व्हिडीओ) |
तामिळनाडूत अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी येत असतात. दरम्यान रामनाथपुरम जिल्ह्यातील मुदुकुलाथूर येथील सरकारी अनुदानित शाळेतील आणखी एक घटना समोर आले आहे. एका विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या आधारे एका शिक्षकास अटक करण्यात आली आहे. शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाने कोचिंग देण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर त्याने चुकीच्या पद्धतीने कॉल करणे व बोलणे सुरू केले, असे तक्ररादाराने सांगितले आहे. तसेच शिक्षकाने विद्यार्थिनीला खास क्लासेससाठी त्याच्या घरी येण्यास सांगितले. यावेळी शिक्षकाने तिला घरी येण्यास नकार दिल्यास नापास करण्याची धमकी दिली होती. शिक्षकाने विद्यार्थिनीला कॉल केल्यानंतरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऑडिओमध्ये यापुर्वी सुद्धा बऱ्याच विद्यार्थिनींनी हे केले असल्याचे शिक्षक बोलत आहे. तसेच शिक्षकाने इतर अनेक विद्यार्थिनींची नावे घेऊन चुकीच्या टिप्पण्या केल्या. यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यात संताप पसरला आहे. दरम्यान, मुधुकुलाथूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस (POCSO) या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत. दरम्यान, तामिळनाडू सरकारने लैंगिक हिंसाचारापासून विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शाळांसाठी सल्लागार पॅनेल, ड्रेस कोड आणि सेफ्टी ऑडिट यासारख्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. |
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आता शिगेला पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली, त्यानंतर आता उर्फीने महिला आयोगाकडे तक्रार केली असून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. आता यावरुन चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी जावेदने आज चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. तसंच आज तिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेटही घेतली आहे. यावरुनच चित्रा वाघ यांनी हे प्रकरण आता उर्फी नीट कपडे घालेल तेव्हाच मिटेल, असं उत्तर दिलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, "तिला कुठे जायचं तिथे जाऊदे. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. पण विषय समाजस्वास्थ्याचा आहे. माझी भूमिका मी मांडलेली आहे. माझी लढाई सुरुच राहणार आहे. आम्हाला जे करता येईल ते आम्ही करूच. हे प्रकरण आता तेव्हाच संपेल जेव्हा ती कपडे घालेल. तिने व्यवस्थित कपडे घालावेत. ती अशी फिरेल तर हे प्रकरण चालूच राहील. " उर्फी जावेदच्या वतीने तक्रार दाखल केलेले वकील नितीन सातपुते यांनीही आपली भूमिका मांडली आहे. सातपुते म्हणाले, "मॉडेल उर्फी जावेदला चित्रा वाघ धमकी देत आहेत. उर्फीच्या जीवाला धोका आहे. सार्वजनिक ठिकाणी चित्रा वाघ धमकी देत आहेत. हा गुन्हा आहे. आम्ही महिला आयोगाला तक्रार केली आहे. उर्फी विशिष्ट समाजाची असल्याने वाघ तिला टार्गेट करत आहेत. आम्ही आमच्या परिने तक्रार केली आहे. उर्फी स्वतः येऊन तिची भूमिका मांडेल. " |
देशद्रोह आणि दहशतवादी कृत्यातील सहभागाबद्दल स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) माजी प्रमुख सफदर नागोरी, त्याचा भाऊ कमरुद्दीन आणि अन्य नऊ जणांना विशेष सीबीआय न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. इंदौर- देशद्रोह आणि दहशतवादी कृत्यातील सहभागाबद्दल स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) माजी प्रमुख सफदर नागोरी, त्याचा भाऊ कमरुद्दीन आणि अन्य नऊ जणांना विशेष सीबीआय न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीश बी. के. पलोदा यांनी ही निकाल दिला. सफदर, अहमद बेग आणि महंमद यासीन या तीन जणांनी २३ फेब्रुवारीला दाखल केलेल्या अर्जावरून व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे हा निकाल देण्यात आला. दरम्यान, हा निकाल जाहीर झाला तेव्हा न्यायालयात वडिलांसोबत हजर असणारा मुनरोज हा मला यात गुंतवलंय असं म्हणत न्यायालयातच रडायला लागला. मुनरोज हा कर्नाटकातील असून तो वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सीमीचा तो सक्रिय सदस्य आहे. मुनरोजशिवाय सफदर नागोरी, कमरुद्दिन नागोरी, अमीप परवेझ, हाफिज हुसेन, पिडीकल शिवली, पीडिकल शादुली, अन्सार, कमरन, अहमद बेग, महंमद बेग यांना शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायदा, श्पटके बाळगणे, भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली बेकायदा शस्त्रसाठा, स्फोटकांचा साठा, दहशतवादी कृत्यांचा कट रचणे यांसह देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला. नागोरी आणि अन्य दहा जणांना येथील संयोगितागंज भागातून २६ मार्च २००८ रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी चोराल येथील एका फार्म हाऊसमधूनही शस्त्र, दारूगोळा, धार्मिक विद्वेष वाढवणारे साहित्य जप्त केले होते. तेथे सीमीच्या सदस्यांना दहशतवादी कृत्यांचे प्रशिक्षण दिले जात असे. या फार्महाऊसशी संबंधित अन्य दोन जणांना अटक करण्यात आली होती. |
समुद्रपूर : जिल्हा परिषदेचे माजी सभापती छत्रपती थुटे यांचा शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान रविवारी नागपूर येथे मृत्यू झाला. त्यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची चर्चा होती. सोमवारी दुपारी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी थुटे यांचा मृतदेह असलेली व्हॅन पोलीस ठाण्यासमोर उभी केली. त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी थुटे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले. छत्रपती थुटे यांच्या हत्येत सहभागी असलेल्यांचा पोलिसांना सुगावा लागला असून त्यांच्या मागावर ते असल्याचे सांगण्यात आले आहे. हत्येचा संशय गावातील काही इसमांवर असून त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होवू नये म्हणून पोलिसांकडून त्यांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती आहे. तत्पूर्वी शिवसैनिकांनी या प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीकरिता पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून, गिरड, वर्धा, वडनेर व स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शिवसेनेच्यावतीने मागणीचे एक निवेदन उपविभागीस पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांना देण्यात आले. घटनेमुळे समुद्रपूर व सावरखेड्यात तणावाचे वातावरण आहे. रविवारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती छत्रपती थुटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे नेले असता रविवारी मृत्यू झाला. सोमवारी सावरखेडा येथे अंत्यसंस्काराकरिता त्यांचा मृतदेह आणताना जिल्ह्यातील शिवसैनिक समुद्रपूर येथे मोठ्या संख्येत गोळा झाले होते. त्यांनी थुटे यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवला. यावेळी माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह शिवसौनिकांनी तिथेच रास्ता रोको केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच वर्धेवरून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले. थुटे यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची शक्यता असल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले. यावेळी शिंदे यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांना शांत केले. यावेळी तालुका प्रमुख रवींद्र लढी, प्रमोद भटे, सचिन गावंडे, प्रा. विलास बैलमारे, नारायण बादले, महादेव बैलमारे, विलास वैद्व, सनी निवटे यांच्यासह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) ४तालुक्यातील सावरखेडा येथे छत्रपती थुटे यांचा मृतदेह आणण्यात आला. गावात तणावाचे वातावरण होते. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंत्यसंस्काराच्यावेळी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. यावेळी अशोक शिंदे, माजी आमदार राजू तिमांडे, अॅड. सुधीर कोठारी, हिम्मत चतुर, रमेश भोयर, अभय कोठारी, खुशाल लोहकरे, नितीन सरोदे यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते व हजारो शिवसैनिक उपस्थित होते. |
गोवाः राज्यात गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या युतीबाबत संपूर्ण राज्यात चर्चा चालू होती मात्र, सर्वोतोपरी प्रयत्न करूनही गोव्यात ही युती होऊ शकली नाही. "अनेक प्रयत्न करून देखील त्याचा फारसा फायदा झाला नाही मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात कोणताही करार नाही पण 'आम्ही मित्र आहोत आणि मित्रच राहू' असे विधान करत युतीच्या चर्चेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पूर्णविराम दिला आहे. (Clarification from P Chidambaram regarding alliance between Congress Shiv Sena and NCP in goa) गोव्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा भाग नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही वाटाघाटीसाठी काँग्रेस नेत्यांशी बोलणार नसल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. आज, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नेत्यांनी गोव्यात दोन्ही पक्षांमधील निवडणूकपूर्व युती बाबत बैठक घेतली होती. हे दोन्ही पक्ष काँग्रेससोबत युतीसाठी इच्छुक होते आणि त्यांनी वेळोवेळी हात पुढे केले. मात्र, युती न करण्याच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
आज इंडिया लिजेंड्स (India Legends) रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) त्यांचा चौथा सामना खेळणार आहे. हा संघ डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडच्या दिग्गजांच्या (England legends) आव्हानाला सामोरे जाईल. दुसरीकडे, इंग्लंड संघाचे कर्णधारपद इयान बेलच्या हाती असेल. मॅट प्रायर, टिम ब्रेसनन आणि निक कॉम्प्टन हे माजी खेळाडू या संघात खेळताना दिसणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा हा 14 वा सामना आज (22 सप्टेंबर) संध्याकाळी 7. 30 वाजता डेहराडून येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सिनेप्लेक्स आणि स्पोर्ट्स-18 वाहिनीवर केले जाईल. यासोबतच या मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट अॅपवर पाहता येणार आहे. इंडिया लिजेंड्सः सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, सुब्रमण्यम बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, राजेश पनवर यांचा समावेश आहे. आणि राहुल शर्मा. इंग्लंड लिजेंड्सः इयान बेल (कर्णधार), मल लॉये, डॅरेन मॅडी, दिमित्री मास्करेहन्स, ख्रिस स्कोफिल्ड, ख्रिस ट्रेमलेट, मॅट प्रायर, फिल मस्टर्ड, टिम अॅम्ब्रोस, टिम ब्रेसनन, रिकी क्लार्क, निक कॉम्प्टन, जेड डर्नबॅच, इयन बेल (कर्णधार), मॅल लॉये, स्टीफन पॅरी, जेम्स टिंडल. |
चिंबळी - सर्व विद्यार्थ्यांचे शिकणे गतीने होण्यासाठी शिक्षकांनी बदलत्या नवीन शैक्षणिक संकल्पनांचा, माहिती-तंत्रज्ञानांचा अवलंब अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, पुणे येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा खेड तालुक्याचे संपर्क अधिकारी डॉ. राजेश बनकर यांनी निष्ठा प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी केले. केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांच्या समग्र व्यावसायिक विकासासाठी विकसित केलेल्या निष्ठा कार्यक्रमांतर्गत खेड तालुक्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी चाकण (ता. खेड) येथील नवसह्याद्री अध्यापक विद्यालयात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, पाच दिवसांच्या दहा टप्प्यांमध्ये तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एन. डी. पिंगळे, गटसाधन केंद्रातील साधनव्यक्ती संदीप दोडके, संतोष शिंदे, प्रतिभा भांगे,विशेष शिक्षक पुरुषोत्तम झाडे आणि सर्व तजज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय दहिफळे यांनी केले, तर सर्व उपस्थित शिक्षकांचे स्वागत आणि आभार मरकळ शाळेचे शिक्षक विनोद चव्हाण यांनी मानले. निष्ठा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील 13 हजार शिक्षकांसाठी तालुकास्तरावर 19 ठिकाणी सर्व शिक्षकांसाठी पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. शाळा बंद न ठेवता प्रशिक्षणाला प्रत्येक टप्पानिहाय 150 शिक्षकांना पाठवण्याचे नियोजन पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावयाचे आहे. यावेळी राज्यस्तरावर प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ विजय दहिफळे, विलास जाधव, दयानंद शिंदे, जितेंद्र डेरे, नयना अहिरे तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यस्तरावरून प्रत्येक तालुक्यातील प्रशिक्षणाचे नियंत्रणही या माध्यमातून केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व निकोप शालेय वातावरण निर्मिती, शाळा आधारित मूल्यांकन, शाळेमधील घटकांचे आरोग्य आणि स्वास्थ्य तसेच भाषा, गणित, परिसर अभ्यास, विज्ञान व सामाजिक शास्त्र इत्यादी विषयांचे अध्यापन शास्त्र, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांचा समावेश या प्रशिक्षणामध्ये आहे. |
मुंबई :- राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आली. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे फोटो वापरला आहे. त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाचे जाहिराती दिसत होत्या. मात्र आता देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेने ज्या जाहिराती केल्या आहेत, त्या योग्य नाहीत. या जाहिरातींमध्ये एकनाथ शिंदे यांना सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दाखवले आहे. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राला योग्य दिशा दिली आहे. त्यामुळे एकमेकांना कमी जास्त दाखवण्यासाठी कुणी खतपाणी घालत असेल तर त्याला बळी पडू नये. त्यामुळे वातावरण प्रदुषित होईल, हे मात्र नक्कीच असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हणाले होते. दरेकरांच्या या नाराजीनंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. सर्वेक्षणावरून शिवसेना भाजपा युतीत वाद नाही. एखाद्या जाहिरातीमुळे कदाचीत गैरसमज पसरले असतील तर आम्ही एकत्र बसून ते दूर करू. ज्यांना आमच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे ते त्यांना करू द्या. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हातात हात घालून काम करत आहेत. आताही आम्ही दोन-अडीच तास एकत्र होतो, असा टोलाही त्यांनी विरोधकांला लगावला. शिंदे गटातील (Shinde Group) पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून तसे आदेश दिल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, पाच मंत्र्याना डच्चू मिळणार ही बातमी चुकीचे आहे. कोणताही दबाब आलेला नाही. आमच्या सरकारमधील सर्वच मंत्र्यांचे काम चांगले आहे. |
प्रस्तुत पुस्तक प्रकाशनास झालेल्या विलंबाबद्दल 'क्षमस्व' म्हणून ग्राहकांची क्षमायाचना करण्यापलीकडे अन्य उपाय नाहीं ! ग्राहकांचा गैरसमज होऊं नये म्हणून इतकें मात्र येथे नमूद करावेसे वाटतें कीं, प्रस्तुत विलंबास अनेक कारणे असली तरी सर्वात प्रमुख व प्रभावी कारण म्हटलें म्हणजे मालेची आर्थिक असहाय परिस्थिती हेच होय. मालेचीं पुष्पें नियमितपणे काढण्याचा आम्हीं नेहमीच प्रयत्न करीत असतो पण वरील कारणामुळेच आमचा दरवेळी नाइलाज होतो. " माला आपल्या पाया. वर सर्वस्वी उभी राहीपर्यंत हा नियमितपणा राखण बरेच कठिण आहे; करितां अशाही परिस्थितीत मालेकडून वेळोवेळी होणारी सेवा - विलंबामुळे तिजवर रुष्ट न होतां - ग्राहकांनी आपल्या गुणग्राही वृत्तीनुसार गोड करून घ्यावी अशी त्यांस विनंति आहे. दुःखांत समाधानाची गोष्ट ही कीं, इतक्या उशीरां कां होईना पण जे पुस्तक आतां ग्राहकांस देण्यांत येत आहे तें अजवरच्या सर्व पुस्तकांहून आकाराने मोठे असून त्यांची बांधणीहि सर्व पुस्तकांहून सरस करण्यांत आलेली आहे. कागद टिटांघरचा अटिक वापरण्यास घेतला होता पण सुमारें पुस्तक छापून झाल्यावर नागपूरला सदर कागद उपलब्ध न झाल्यामुळे व परगांवहून तो आणविणे शक्य न झाल्यामुळे बाकी पुस्तकाकरितां सामान्य ग्लेज कागदच उपयोगांत आणला आहे. या बाह्य सजावटीपेक्षां पुस्तकाचें अंतरंग वाचकांना विशेषच चित्तवेधक होईल अशी आम्हांस उमेद आहे. लेखकाला पुस्तकलेखनार्थ किती ग्रंथांचं आलोडन करावे लागले हें निरनिराळ्या ग्रंथांतील जे उतारे पुस्तकांत जागोजागी दिले आहेत त्यावरून स्पष्ट होणार आहे. पुस्तकाचा विषय निवडून काढण्यांतहि लेखकाची स्वतंत्र कल्पकबुद्धी दिसून येते. पुस्तकांतील साधार, सोपपत्तिक, निर्भीड तशीच सविवेचक मांडणी यावरून लेखकाच्या प्रस्तुत विषयाचा व्यासंग, |
राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. मुंबई : राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची घोषणा करताच युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याबाबतचे ट्विट केले हेाते. मात्र, काही वेळातच ते ट्विट डिलिट केले. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड आदित्य यांना लक्ष्य केले आहे. ट्विट डिलिट करणार्या आमच्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका, असा टोकाल लाड यांनी लगावला आहे. या संदर्भात प्रसाद लाड यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की "परवडतं त्यांच्याकडून पैसे घेऊः राजेश टोपे, लसीकरण फुकट करूः नबाव मलिक श्रेय लाटू नका : बाळासाहेब थोरात एकच विनंती आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनो भांडा. पण, ट्विट डिलिट करणार्या आमच्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका," अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला आहे. दरम्यान, राज्यात लसीचा तुटवडा असताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील सर्व नागरिकांना १ मे पासून मोफत लस देण्यात येणार आहे, त्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने ट्विट करत राज्यातील नागरिकांना आम्ही आमचे कर्तव्य म्हणून मोफत लस देणार आहोत, असे म्हटले होते. मात्र, काही वेळानंतरच त्यांनी आपले ट्विट डिलिट केले होते. त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर भापजच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. राज्यामध्ये मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करण्याआधीच त्याचे श्रेय घेणे योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना कोरोना लस मोफत द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसी मागणी केली असून ती मान्य होईल, अशी आशा आहे, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केली होती. |
राज्य पोलीस दलातील अकार्यक्षम पोलिसांना काढण्यासाठी आसाम पोलिसांनी एक नवीन योजना आखली आहे. Assam Police: प्रत्येक राज्यातील पोलिस विभागात काही लठ्ठ किंवा अनफिट पोलीस कर्मचारी असतात. अनफिट असल्यामुळे त्यांना कर्तव्य बजावण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कर्मचाऱ्यांना फिट किंवा पदमुक्त करण्यासाठी आसामपोलिसांनी एक नवीन योजना आखली आहे. राज्यातील IPS अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी-अधिकार्यांचे बॉडी मास इंडेक्स (BMI) रेकॉर्ड केले जाणार आहेत. यातून अनफिट पोलिसांना सेवामुक्त केले जाणार आहे. पोलिसांना त्यांच्या फिटनेसवर काम करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल, त्यानंतर बीएमआय रेकॉर्ड केला जाईल. आसामचे पोलिस महासंचालक (DGP) जी. पी. सिंह यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटले की, "आम्ही आयपीएस अधिकाऱ्यांसह सर्व आसाम पोलिस कर्मचार्यांना 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ देणार आहोत, त्यानंतर 15 दिवसांत त्यांचे बीएमआय रेकॉर्ड केले जाईल. जे कर्मचारी लठ्ठ श्रेणी (BMI 30+) मध्ये येतात, त्यांना वजन कमी करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ दिला जाईल. " "या तीन महिन्यात त्यांनी आपले वजन आटोक्यात आणले नाही, तर त्यांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) ऑफर देण्यात येईल. ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हायपोथायरॉईडीझमसारख्या वैद्यकीय समस्या आहेत, त्यांना यातून सूट दिली जाईल. 16 ऑगस्ट रोजी बीएमआय रेकॉर्ड करणारा मी स्वतः पहिला व्यक्ती असेल," अशी माहिती त्यांनी दिली. जी. पी. सिंग यांनी 8 मे रोजी सांगितले, त्यांनी 650 हून अधिक कर्मचार्यांची यादी तयार केली आहे, ज्यांना कथितपणे दारुचे व्यसन आहे किंवा ते अति लठ्ठ आहेत आणि कर्तव्यासाठी अयोग्य आहेत. त्यांना या योजनेनंतर स्वेच्छानिवृत्तीची ऑफर दिली जाईल. ठोस कारणाशिवाय यादीत नाव जोडले जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन केल्या आहेत. डेप्युटी कमांडंट किंवा अतिरिक्त एसपीचा दर्जा असलेले अधिकारी या समित्यांचे प्रमुख असतील. ज्यांची नावे यादीत असतील, परंतु ते व्हीआरएस निवडण्यास तयार नसतील तर त्यांना फील्ड ड्युटी दिली जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकत्याच उच्च पोलीस अधिकार्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत पोलीस दलातून अकार्यक्षम लोकांना काढून टाकण्यावर भर दिला होता. या लोकांमध्ये मद्यपान करणारे, आजारी किंवा लठ्ठ कर्मचारी, तसेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कर्मचारी व्हीआरएस घेतील, त्यांना त्यांची पूर्ण देय्य रक्कम मिळेल. तसेच, रिक्त पदे भरण्यासाठी लवकर नवीन भरती केली जाईल. |
पुणे - चहूबाजूने वाढत असलेल्या पुण्याच्या पश्चिम-दक्षिण क्षितीजावर आकाराला येत असलेला "कुटुंब' हा महत्त्वाकांक्षी आणि सर्व सोयींनी परिपूर्ण असा गृहप्रकल्प आंबेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रांगण बिल्डकॉन आणि लक्ष्मी डेव्हलपर्सच्या या प्रकल्पात 250 हून अधिक कुटुंबांचं स्वतःचं घर साकारण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे, तेही अगदी माफक किंमतीत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात "कुटुंब' हा गृहप्रकल्प असूनही येथे वाहनांच्या आवाजाचा त्रास अथवा प्रदुषणाची समस्या अजिबात नाही. आंबेगाव परिसरातून हडपसर ते हिंजवडीपर्यंत सहजपणाने जाता येते. कुटुंबातील प्रत्येकाच्या दृष्टीने सोयीस्कर असलेले हे लोकेशन कूल आणि कम्फर्टेबलही आहे. आर्यन, पोद्दार, सिंहगड स्कूलसह कॉलेजेस आणि झील कॉलेज, भारती विद्यापीठ अशा शिक्षण संस्था जवळच असल्याने मुला-मुलींच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय हाकेच्या अंतरावर आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी सिंहगड रस्ता, सातारारस्ता, कोथरुड, वारजे, धायरी, नऱ्हे औद्योगिक वसाहती, कार्यालये आणि कंपन्या जवळच उपलब्ध आहेत. नांदेड सिटीमधील विकसीत होत असलेले आयटी पार्क असो की अन्य विकास प्रकल्प येथून जवळच आहेत. शिवाय भारती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आरोग्य सेवा पुरवण्यात तत्पर आहेतच. एवढे सगळे असूनही "कुटुंब'मधले फ्लॅट्स अगदी खिशाला परवडतील, असे आहेत. 1 बीएचके फ्लॅट 32 लाखापासून, तर 2 बीएचके फ्लॅट्स 42 लाखापासून उपलब्ध आहेत; तेही सर्व खर्च, कर समाविष्ट करुन आणि कुठलेही छुपे खर्च करावे न लागता. त्यामुळे चंद्रांगण बिल्डकॉन आणि लक्ष्मी डेव्हलपर्सच्या "कुटुंब' गृहप्रकल्पात घर घेणे, हा आजचा शहाणपणाचा निर्णय ठरणार आहे. (अधिक माहितीसाठी संपर्क : लक्ष्मी डेव्हलपर्स 8888576878) |
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे. चला हवा येऊ द्या साजरा करणार आहे नागराज मंजुळे स्पेशल आठवडा. येत्या भागात थुकरटवाडीत नाळ या झी स्टुडिओजच्या आगामी चित्रपाटाची टीम येणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे स्वतः अभिनय करणार आहेत. ते स्वतः या संपूर्ण टीम सोबत थुकरटवाडीला भेट देणार आहेत. तसेच नागराज मंजुळे यांची सैराट या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे ज्या कलाकारांशी नाळ जोडली गेली ते कलाकार देखील चला हवा येऊ द्या च्या मंचावर नागराज मंजुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी सज्ज झाले. सैराट मधील परश्या, लंगड्या आणि फॅन्ड्री मधल्या जब्या हे सर्व कलाकार थुकरटवाडीत उपस्थित होते. चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी या ऐन मोक्यावर इंडस्ट्रीतील कलाकार नागराज मंजुळे यांना शुभेच्छा द्यायला आले तर ते कशाप्रकारे शुभेच्छा देतील यावर एक धमाल विनोदी स्किट सादर केलं. त्यात कुशल आणि सागर अजय अतुल, तर भाऊ कदम आर्ची, अंकुश वाढवे सिनिअर सोनाली कुलकर्णी, भारत गणेशपुरे महेश कोठारे बनले. हे सर्व विनोदवीर त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि कॉमेडी टायमिंगने सर्व रसिक प्रेक्षकांना हसून लोटपोट करण्यासाठी संपूर्ण आठवडा सज्ज होणार आहेत. |
नाशिक । Nashik (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ८ हजार ८९९ अंगणवाडी कर्मचाऱ्यापैकी अठराशे कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे करोना काळात फ्रंट वर्कर म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी लसीकरण करून घेण्याचा सूचना महिला व बालकल्याण सभापती आर्कि. अश्विनी आहेर यांनी दिल्या आहेत. महिला व बालकल्याण समितीची सभा दुरदृष्य प्रणालीद्वारे पार पडली. यावेळी समिती सदस्य कविता धाकराव, रेखा पवार, सुनीता सानप, गीतांजली पवार, कमल आहेर, गणेश अहिरे, शोभा बरके प्रभारी सचिव जी. एम. शेवाळे, बाल विकास अधिकारी दीपक चाटे आदी उपस्थित होते. सभेमध्ये कुपोषणाबाबतचा आढावा घेण्यात आला. मार्च महिन्यात ० ते ६ या वयोगटातील तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची शोध आणि आरोग्य तपासणी मोहीम करण्यात आली. यामध्ये ३७३ तीव्र कुपोषित बालके आढळून आले तर २४४१ मध्यम कुपोषित बालके आढळून आले आहे. करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव बघता आरोग्य विभागाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील बालकांची आरोग तपासणी करून शंभर टक्के उद्दीष्ट साध्य करावे, अशा सूचना सभापती आहेर यांनी दिल्या. जिल्ह्यातील रिक्तपदे आणि भरती प्रक्रिया यांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. यामध्ये ११४६ पदे रिक्त असून याबाबत सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद कडे पाठवावा, असे देखील सभापती आहेर यांनी निर्देश दिले आहे. |
सोलापूर, दि. 02 - आषाढीनंतरची दुसरी मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणा-या पंढरीच्या कार्तिकी यात्रेसाठी सोलापूर विभागाने एसटीच्या १६६ जादा गाड्यांची सोय केली असून, ७ ते १४ नोव्हेंबरपर्यंत या गाड्या धावणार असल्याचे यात्रा प्रमुख तथा विभागीय वाहतूक अधीक्षक मुकुंद दळवी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. पंढरपुरातील चंद्रभागा बस स्थानकावर निवारा शेडही उभारण्यात आला आहे. शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा आहे. संपूर्ण राज्यभरातून आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक या सोहळ्यास आवर्जुन हजेरी लावत असतात. कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बीदर या जिल्ह्यातील भाविकांची संख्या पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने जादा एस. टी. गाड्यांची आखणी केली आहे. सोलापूर बस स्थानकातून २०, बार्शी आगारातून ३६, करमाळ्यातून १७, सांगोल्यातून २०, मंगळवेढ्यातून १२, पंढरपूर बसस्थानकातून २१, अक्कलकोट डेपोतून १३, अकलूज आगारातून १५ तर कुर्डूवाडी बस स्थानकातून १२ अशा १६६ एस. टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७ कंट्रोल पार्इंटवरुनही जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. मोहोळ येथून ३, शेटफळ-मोडनिंबमधून२, टेंभुर्णीतून २, नातेपुतेतून २, साळमुख येथून १ तर महूद येथून १ अशा ११ बसगाड्या धावणार असल्याचे दळवी यांनी सांगितले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी भागातून येणा-या भक्तगणांना सुमारे २०० हून अधिक गाड्या धावणार आहेत. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिक यात्रेसाठी पंढरीत भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांबरोबर वाहक आणि चालकांना कुठल्या समस्या उद्भवू नयेत यासाठी सोलापूर आगाराने ५० कर्मचा-यांची तुकडी तैनात केली आहे. चालक आणि वाहकांच्या राहण्याची सोय पंढरपूर मार्केट कमिटीच्या रेस्ट हाऊस आणि अन्य ठिकाणी करण्यात आली आहे. |
पनवेल : भूमिपुत्रांची अस्मिता असलेल्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा इशारा सोमवारी (दि. 9) जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. 15 ऑगस्ट ही डेडलाइन आहे. या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबा साहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर 16 ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यात करण्याचा निर्धार या वेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विशाल मशाल मोर्चा काढण्यात आला होता. नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली. या मशाल मोर्चात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, दिबां चे पुत्र अतुल पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, जे. डी. तांडेल, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, 27 गाव समितीचे नंदराज मुंगाजी, दशरथ भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, सरपंच संतोष घरत, अर्जुनबुवा चौधरी, माजी जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल मनपाचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, अजय बहिरा, हरेश केणी, बबन मुकादम, विजय चिपळेकर, विकास घरत, शत्रुघ्न काकडे, अमर पाटील, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, ब्रिजेश पटेल, दिनेश खानावकर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, वहाळच्या साई संस्थानचे संस्थापक रवी पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, राजेश गायकर, सीमा घरत, रूपेश धुमाळ, दीपक म्हात्रे यांच्यासह कृती समितीच्या विविध शाखांचे पदाधिकारी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सहभागी झाले होते. या वेळी दिवंगत गणपतराव देशमुख, मधुकर ठाकूर, माणिक जगताप, लक्ष्मणशेठ पाटील, मेघनाथ म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. |
सत्याचा आग्रह हाच जगण्याचे मूलतत्त्व आणि अहिंसेच्या मार्गाने ते मिळवण्याचे आणि टिकवून धरण्यासाठी गांधीजींनी आयुष्यभर धडपड केली. त्यांच्या या विचारांचे राजकीय, सामाजिक अंगाने सविस्तर विवेचन झालेले आहे. सत्याचा आग्रह हाच जगण्याचे मूलतत्त्व आणि अहिंसेच्या मार्गाने ते मिळवण्याचे आणि टिकवून धरण्यासाठी गांधीजींनी आयुष्यभर धडपड केली. त्यांच्या या विचारांचे राजकीय, सामाजिक अंगाने सविस्तर विवेचन झालेले आहे. ब्रिटनमधील इस्टर्न मेडिटेरियन युनिव्हसिटीतील प्राध्यापक बी. एन. घोष यांनी गांधींच्या विचारांची उकल आर्थिक अंगाने केलेली आहे. 'गांधींचे राजकीय-अर्थकारण' असे न म्हणता 'गांधीवादी राजकीय अर्थकारण' अशी मांडणी घोष यांनी संशोधनात्मक पुस्तकात केलेली आहे. गांधीजींनी स्वतःहून कोणतीही राजकीय-आर्थिक मांडणी केलेली नाही. वेळोवेळी त्यांच्या जगण्याचा भाग म्हणून जे विचार मांडले आणि त्याचा आग्रह धरला, तेच गांधींची विचारसरणी. तोच गांधीवाद. गांधींनी सर्वोदयाचा विचार मांडलेला होता. सोप्या भाषेत सांगायचे तर सर्वोदय म्हणजे जनकल्याण. गांधीजींना अभिप्रेत असलेले मनुष्याचे सर्वांगीण कल्याण एकात्मिक होते. त्यामुळे अर्थकारणाचाही स्वतंत्र, एकटा विचार करता येत नाही. त्यामुळे 'राजकीय-अर्थकारण' असा एकत्रित विचार करावा लागतो, असे घोष मानतात. भारतीय परंपरा, संस्कृती, जीवनपद्धती या सगळ्याचा गांधीजींवर मोठा प्रभाव होता. त्यांनी ब्रिटनमध्ये राहात असताना विविध धर्मांचा आणि जीवनपद्धतींची तुलनात्मक अभ्यासही केला होता. त्यामुळेच गांधीवादी राजकीय-अर्थकारण म्हणजे भारतीय आणि पाश्चिमात्य जीवनपद्धती यांच्यातील संघर्षच आहे, असे घोष यांना वाटते. ब्रिटिशांच्या भांडवलवादी जीवनपद्धतीतून भारतीय समाजाचे कल्याण होणार नाही. त्यापेक्षा लोकांना कमीतकमी विस्थापित करणारे, संघर्ष टाळणारे म्हणजेच परस्पर सहकार्याचे 'विकास मॉडेल' योग्य ठरेल, असे गांधींचे म्हणणे होते. त्याचा आधार सत्य, अहिंसा, त्याग आणि सर्वोदय हाच होता. त्यातून 'स्वयंपूर्ण खेड्या'ची संकल्पना गांधीजींनी विकसित केली. या संकल्पनेत परस्पर सहकार्य आहे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापराला आळा बसतो, अधिकाधिक लोकांच्या हाताला काम आहे. या मॉडेलमधूनच न्याय्य वाटपाचे धोरण अवलंबले जाऊ शकते. आधुनिक जगात असमानता पूर्णतः नष्ट होणार नाही. नैसर्गिक स्वरूपाची असमानता नेहमीच अस्तित्वात असेल, याची जाणीव गांधीजींनाही होती म्हणूनच समानतेपेक्षा न्याय्य वाटपाला अधिक महत्त्व येते. अशा वाटपासाठी हव राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य. गांधीजींना अभिप्रेत असलेले 'पूर्ण स्वराज्य'! गांधीजींना सर्वांगीण विकास अपेक्षित होते. यात प्रमुख दोन भाग होते. स्वातंत्र्य आणि जनकल्याण. स्वातंत्र्य कसले? आर्थिक आणि राजकीय. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? तर, स्वयंनिर्भरता आणि गरिबी व बेरोजगारीचे निर्मूलन. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय? तर, हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राहणे. जनकल्याण म्हणजे काय? मनुष्यबळ विकास आणि सामाजिक-आर्थिक विकास. मनुष्यबळ विकास म्हणजे काय? तर, कार्यकुशलेताच विकास आणि शरीर, मन आणि आत्माचा विकास. सामाजिक-आर्थिक विकास साधणे म्हणजे काय? तर, समानता व संधी आणि न्याय व शोषणविरहित व्यवस्था. स्वातंत्र्य आणि विकास म्हणजेच राजकारण आणि अर्थकारण हे सर्वागीण विकासाचे दोन प्रमुख ठरतात. म्हणूनच घोष यांनी 'गांधीवादी राजकीय-अर्थकारण' असे म्हटले आहे. घोष यांचे हे संशोधनात्मक पुस्तक असल्याने त्यासंबंधीचे सर्व नियम पाळून ते लिहिलेले आहे. त्यात, भांडवलवादी अर्थव्यवस्थेतून असमानता वाढत जाते, असा हायपोथिसिस मांडण्यात आला आहे. त्यामुळेच गांधीवादी राजकीय-अर्थकारणात भांडवलवादाला कसा आणि का विरोध केला आहे, याची मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. हा प्रबंध असल्याने तो वाचताना किचकट वाटतो. त्यामुळे या पुस्तकाचा आणि पर्यायाने गांधीवादी राजकीय अर्थकारण म्हणजे काय, हे एका पानात समजून घ्यायचे असेल तर पान २२८ वर दिलेली आकृती नीट वाचली तरी पुरे होते. गांधीयन पॉलिटिकल इकॉनॉमीः प्रिन्सिपल, प्रॅक्टिस अँड पॉलिसी, लेः बी. एन. घोष, प्रकाशकः अॅने बुक्स प्रा. लिमिटेड, पानेः २६४, किंमतः २९५ रु. |
बंदीपुरा,11ऑक्टोबरः जम्मू आणि काश्मीरच्या बंदीपुरामध्ये चकमक सुरू भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय, पण दुर्दैवानं आपले २ जवान यात शहीद झाले आहेत. त्यात एक महाराष्ट्रातील मिलिंद किशोर आहेत. काल संध्याकाळपासून बंदीपुराच्या हाजीन गावात लष्कराचा पहारा होता. ३ ते ४ दहशतवादी गावात लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली होती. रात्री शोधकार्य आणखी तीव्र करण्यात आलं. मध्यरात्रीच्या आसपास दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. १३ राष्ट्रीय राफल्स, ९ पॅरा आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप मिळून ही कारवाई करत आहेत. शहीद झालेले जवान हे वायुदलाच्या गरुड पथकाचे सदस्य होते, अशी माहिती मिळतेय. ते प्रशिक्षणासाठी लष्कराच्या कारवाईत सहभागी झाले होते, असंही वृत्त आहे. अजूनही दोन तीन दहशतवादी गावात लपून बसले असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
राजस्थानातील मंगल कार्यालय दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भरतपूर येथे खुल्या मंगल कार्यालयाची भिंत कोसळून बुधवारी २४ ठार, ३० जण जखमी झाले होते. जयपूर : राजस्थानातील मंगल कार्यालय दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भरतपूर येथे खुल्या मंगल कार्यालयाची भिंत कोसळून बुधवारी २४ ठार, ३० जण जखमी झाले होते. राजस्थान सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कार्यालय मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तो फरार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. भरतपूर येथील सेवार रोडवर बुधवारी ही दुर्घटना घडली. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे १२ फूट उंचीची भिंत कोसळली आणि विवाह सोहळ््याला आलेले अनेक पाहुणे ढिगाऱ्याखाली दबले. हे मंगल कार्यालय महापालिकेच्या परवानगीविना चालविले जात होते. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. |
संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) पुणे येथे ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैन्यसेवा कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्व सशस्त्र दलाचे जवान, ज्यात भालाफेक खेळातील सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा याचा समावेश आहे, हे सर्वजण या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्री राजनाथ सिंह आपल्या या भेटीदरम्यान एएसआय आणि सैन्यातील होतकरु खेळाडू आणि त्यांच्या संघांशी संवाद साधतील. ते यावेळी दक्षिण कमांडच्या मुख्यालयाला देखील भेट देतील. संरक्षणमंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन हेसुद्धा असतील. भारतीय सैन्य हा नेहमीच भारतीय खेळांचा कणा राहिला आहे - मेजर ध्यानचंद ते सुभेदार नीरज चोप्रा पर्यंत अनेकांनी भारतीय खेळांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपली नावे कोरलेली आहेत. ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याच्या उद्देशाने आणि खेळांचे मानदंड उंचावण्यासाठी भारतीय लष्करामार्फत 'मिशन ऑलिम्पिक' हा कार्यक्रम 2001 मध्ये हाती घेण्यात आला होता. एएसआय, पुणे ही भारतीय सैन्याची एक वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक दर्जाची क्रीडा संस्था आहे आणि तीने 34 ऑलिंपिक विजेते खेळाडू, 22 राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेते, 21 आशियाई क्रीडा पदक विजेते, सहा युवा क्रीडा पदक विजेते आणि 13 अर्जुन पुरस्कार विजेते निर्माण केले आहेत. या खेळाडूंच्या समर्पणाव्यतिरिक्त, त्यांच्या यशाचे श्रेय एएसआयमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांचे परीश्रम यालाही आहे. एएसआय, पुणे ही एक प्रमुख क्रीडा प्रशिक्षण संस्था म्हणून विकसित झाली आहे, ज्यायोगे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी, प्रतिभा ओळखणे, पद्धतशीर प्रशिक्षण प्रदान करणे, जागतिक दर्जाचे शिक्षण, क्रीडा वैद्यकीयज्ञान सहाय्य, यासारख्या अनेक चांगल्या पायाभूत सुविधा सशस्त्र दलांच्या समन्वयाने उपलब्ध करून राष्ट्रीय खेळ फेडरेशन आणि इतर क्रीडा संस्था यांच्या स्पर्धांकरीता, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासह सैन्य सेवादलातील खेळाडू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जात असते. |
महापालिकेचे आयुक्त मिटिंगसाठी मुबंर्इला तर दोन्ही उपायुक्त सुटीवर असल्याने सोमवारी सतरा मजली इमारतीमध्ये सुटीसारखेच वातावरण होते. दुपारनंतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना शुक्रवारी पतेतीची सुटी होती. अनेकांनी शनिवारी सुटी टाकली. त्यात रविवार आल्याने सलग तीन दिवसाची सुटी मिळाल्यामुळे अनेकांनी पर्यटनाची संधी साधली. आज, सोमवारी आठवड्याच्या पहिलाच दिवस होता. मात्र, आयुक्त चंद्राकांत डांगे मिटिंगसाठी मुबंर्इत गेले होते. तसेच उपायुक्त लक्ष्मीकांत कहार हे आठ दिवसांच्या रजेवर आहेत. उपायुक्त चंद्रकांत खोसे देखील रजेवर असल्याने सोमवारी सतरा मजलीत कुणीही वरीष्ठ अधिकारी नव्हते. अधिकारी नसल्याने सतरा मजलीतील अनेक विभागप्रमुख देखील सकाळी येवून नंतर निघून गेले. त्यामुळे दिवसभर हॉलिडे फिव्हर होता. वाढता आस्थापना खर्च, घटत चालले उत्पन्न आणि कर्जफेडीच्या हप्तांमुळे महापालिका प्रशासनाची गाडी अद्याप रुळावर आली नसतानाच अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेत अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांनीही कामे नसल्याने त्यांनी ऑन ड्युटी सुटीचा आनंद घेतला. आधीच महिनाभर निवडणूक त्यातच गेल्या आठवड्यातील तीन दिवस सुट्यांमुळे मूलभूत सुविधा, अतिक्रमण, नगररचना विभाग, घरपट्टी संदर्भातील कामांसाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांची कामे खोळंबली आहेत. 'साहेब नाहीत, उद्या या' अशी उत्तरे ऐकून नागरिकांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले. |
तासगाव : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत उतरुन खासदार संजयकाका पाटील यांना जाहीर आव्हान दिल्याने संजयकाका पाटील व गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत सोशल मिडीयात तुफान घमासान रंगले आहे. गोपीचंद पडळकर यांनी विटा येथे पत्रकार परिषद घेऊन सांगली लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. संजयकाका पाटील यांनी 'लायकी असेल तर उभे रहा' असे दिलेले आव्हान डोळ्यापुढे ठेऊनच मैदानात उतरत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच भाजपने संजयकाकांनाच तिकीट द्यावे, कोणाची लायकी आहे ते जनता ठरवेल, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे. खासदार समर्थकांकडुन भाजपने खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्याचे व निवडणुक प्रचाराचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेस की स्वाभिमानी लढणार याची चर्चा सुरु असताना गोपीचंद पडऴकर यांच्या उमेदवारीने रंगत आली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या लोकसभा निवडणुक लढवण्याच्या घोषणेने सोशल मीडियात खासदार समर्थक व पडळकर समर्थकांत घमासान रंगले आहे. कार्यकर्ते अगदी हमरीतुमरीवर आल्याचे दिसते. पुर्वी एकाच भाजप पक्षात असलेले, एकमेकांना मदत केलेले कार्यकर्ते आता एकमेकांच्या नेत्यांची उणी दुणी काढत आहेत. |
इंदूर- पुणे राज्य महामार्गावरील मनमाडजवळ अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीने झाडाला धडक दिल्याने शहरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शहरातील एकाच वेळी चार युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने मनमाडकर हळहळले. बुधवारी (दि. ११) दुपारी या युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिक : इंदूर- पुणे राज्य महामार्गावरील मनमाडजवळ अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीने झाडाला धडक दिल्याने शहरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शहरातील एकाच वेळी चार युवकांचा अपघातीमृत्यू झाल्याने मनमाडकर हळहळले. बुधवारी (दि. ११) दुपारी या युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास येवल्याकडून मनमाडकडे कार (क्रमाक एमएच ४१ व्ही ७३१७) येत असताना अनकवाडे शिवारातील शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजसमोर भरधाव वेगात झाडावर आदळल्याने अपघात होऊन मनमाड शहरातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एका युवकाच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये तौफिक गफार शेख (२५), प्रवीण राजू सकट (२३), दिनेश राजेंद्र भालेराव (३२), हे तिघे रा. एच. के. हायस्कूलच्या पाठीमागे, पाटील नगर, मनमाड आणि गोकुळ वाल्मीक हिरे (३८), रा. गौतमनगर, मनमाड यांचा दुर्दैवी अंत झाला, तर अजय संतोष वानखेडे (२३), रा. सिद्धार्थ कॉलनी, मनमाड हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला आहे. अपघाताची खबर गावात वाऱ्यासारखी पसरताच हितचिंतकांसह मित्र परिवाराने येथील उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. बुधवारी दुपारी या युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमाड- येवला रोडवरील फौजी ढाब्यावर रात्रीच्या सुमारास जेवण करून येत असताना हा अपघात घडल्याची शहरात चर्चा आहे. शहरातील चार होतकरू युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली. दरम्यान, दिनेश भालेराव हा मंडप व केटरिंगमध्ये काम करत होता, तर प्रवीण सकट हा मोबाइल रिपेअरिंग सेंटरमध्ये काम करत होता. तौफिक शेख हा सरबत दुकान लावत होता, तर गोकुळ हिरे हा वाहन चालक होता. जखमी अजय वानखेडे केटरिंगचे काम करतो. यामध्ये दिनेश भालेराव, प्रवीण सकट व गोकुळ हिरे हे तिघे विवाहित आहेत. |
Battle Of Balds । (Picture Credit: Instagram) बॉलीवूडमध्ये वाद काही नवीन नाहीत. दोन नायकांमधला किंवा नायिकांमधला वाद हा जुना आहे. परंतु या वेळी वाद झाला आहे 2 टकल्यांमध्ये. चकित झालात ना? खरं तर हा वाद आहे 2 चित्रपटांमधला. उझडा चमन (Ujda Chaman)आणि बाला (Bala) हे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 27 मे ला अमर कौशिक (Amar Kaushik) दिग्दर्शित बाला या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आणि आयुष्मान खुराणाच्या (Ayushman Khurana) 'टकल्या' लूकमुळे उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण गेल्या आठवड्यात उझडा चमनचा ट्रेलर आला आणि बालाच्या निर्मात्यांना धक्का बसला. कारण या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दिसणाऱ्या कथानकात आणि बाला च्या कथानकात बऱ्यापैकी साम्य आहे. ऐन तारुण्यात डोक्यावरचं 'छप्पर' उडाल्या कारणाने येणाऱ्या अडचणी आणि लग्न जुळवताना होणार त्रास, हा उझडा चमनचा विषय आहे. (हेही वाचा. सैफ अली खान पुन्हा एकदा वेब सिरीजमध्ये, अली अब्बास झफरसोबत करणार 'तांडव') अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट 8 नोव्हेंबर ला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये 'टकल्याची पहिली आणि खरी फिल्म' अशी ओळ लिहून त्यांनी नकळत बाला वर निशाणा साधला. मग बाला च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अलीकडे करत 7 नोव्हेंबर हि ठेवली आणि 'बाला आता लवकर येत आहे' असं कॅप्शनही दिलं. त्यामुळे आता हे दोन्ही चित्रपट एकाच आठवड्यात, एका दिवसाच्या फरकाने प्रदर्शित होत आहेत. दोन्ही चित्रपटांच्या पोस्टरमध्येही बरंच साम्य आहे. आता या दोन टकल्या हिरोंपैकी कोणता हिरो बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. उझडा चमन मध्ये सनी सिंग, मानवी गगरु हे मुख्य भूमिकेत आहेत, तर बाला मध्ये आयुष्मान खुराणा सोबतच भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि यामी गौतम (Yami Gautam) यांच्या मुख्य भूमिका आहेत. |
रामनवमीच्या दिवशी 'दोन प्रहरी, सूर्य शिरी थांबल्यावर' झालेल्या रामजन्माच्या उत्सवात भाग घेणे कांही या वर्षी मला जमले नाही, पण कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे यांनी लिहिलेल्या 'उर्मिला' या कादंबरीच्या प्रकाशनाचा, म्हणजेच जन्माचा, सोहळा संध्याकाळी पहायला मिळाला. 'वसंत व-हाडपांडे' हे नांव मराठी साहित्याच्या विश्वात सुपरिचित आहे. एक उत्कृष्ट कवि म्हणून तर ते ख्यातनाम आहेतच; त्याशिवाय कथा, कादंबरी, चरित्रकथा, प्रबंध, समीक्षण, बालवाङ्मय अशा विविध प्रकारचे त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. पुरातन तसेच समकालीन साहित्यिकांच्या निवडक वाङ्मयाच्या संपादनाचे कामसुध्दा त्यांनी केले आहे. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. अकस्मात झालेल्या अपघाती निधनामुळे त्यांची साहित्यक्षेत्रातील यशस्वी घोडदौड अचानकपणे थांबून गेली. त्यांचे जितके साहित्य तोपर्यंत प्रकाशित झाले आहे त्यापेक्षाही जास्त साहित्यकृती अद्याप अप्रकाशित राहिलेल्या आहेत. डॉ.सौ. अंजली कुलकर्णी आणि डॉ.सौ.अनुराधा हरकरे या त्यांच्या कन्यका अथक प्रयत्न करून त्यांचे दर्जेदार साहित्य हर त-हेने जगापुढे आणण्याचे कार्य करीत आहेत. सुरेल चाली लावून लोकप्रिय गायक गायिकांच्या आवाजात गाऊन घेतलेला त्यांच्या निवडक कवितांचा पहिला आल्बम 'मस्त शारदीय रात' या नांवाने त्यांनी काढला. ती गाणी आता सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होत आहेत, इतकेच नव्हे तर कॉलर ट्यूनच्या रूपात मोबाईलवर उपलब्ध आहेत. अशा रीतीने ती घरोघरी पोचत आहेत. तो उपक्रम यशस्वी झाल्यानंतर उर्मिला या कादंबरीच्या प्रकाशनाचा सोहळाही त्यांनी परवा घडवून आणला. अणुशक्तीनगरातल्या समाजकेन्द्राच्या सभागृहात हा कार्यक्रम ठेवला होता. प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक श्री.के.ज.पुरोहित - 'शांताराम', सुप्रसिध्द लेखिका डॉक्टर विजया वाड, महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक श्री.मुकेश माचकर, ग्रंथालीचे प्रमुख श्री.दिनकर गांगल, अभिनेता श्री. अविनाश नारकर आणि अभिनेत्री सौ. ऐश्वर्या नारकर हे दापत्य आणि नवतारका नृत्यांगना वेदांती भागवत ही मंडळी मंचावर होती. डॉक्टर रत्नाकर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून समारंभाची सूत्रे सौ.अनुराधा हरकरे यांच्या स्वाधीन केली. डॉ.सौ. अनुराधा आणि डॉ.सौ.अंजली या भगिनींनी हृदयाला भिडणा-या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. १९९२ साली झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचे वडील कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे, आई सौ.वसुमती आणि दोघेही डॉक्टर बंधु डॉ.राजीव व डॉ.संजय या सर्वांना एका फटक्यात काळाने ओढून नेले. काळजाला गोठवून टाकणा-या या घटनेने सर्वांनाच सुन्न करून टाकले होते. या दुःखातून पूर्णपणे बाहेर येणे केवळ अशक्य आहे. त्या आघातातून जरा सांवरल्यानंतर आपल्या बाबांच्या दर्जेदार साहित्यकृती रसिकांसमोर आणण्याचा ध्यास घेऊन अशा प्रकारे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्याची सुरुवात केली. यासाठी त्यांनी 'स्मृतिगंध प्रकाशन' ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी आधी वसंतरावांच्या गीतांचा आल्बम काढला आणि परवाच्या समारंभात त्यांच्या एका अप्रकाशित कादंबरीचे प्रकाशन केले. कार्यक्रमाची ही पूर्वपीठिका ऐकतांना प्रेक्षकांचे डोळेही पाणावल्याशिवाय राहिले नाहीत. श्री. के.ज.पुरोहित यांनी आपल्या जुन्या काळातल्या मित्राच्या या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. आपल्याला जे कांही सांगायचे होते ते या प्रस्तावनेत दिले आहे त्यामुळे या समारंभात आपण कांही बोलणार नाही असे त्यांनी आधी सांगितले होते, पण आयत्या वेळी चार शब्द बोलण्याची इच्छा व्यक्त करून त्यांनी कै.वसंत व-हाडपांडे यांच्या कांही आठवणी सांगितल्या. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीसाठी नागपूर केंद्राचे कार्य सांभाळण्यासाठी त्यांना एका तळमळीने काम करणा-या माणसाची गरज होती. सभेमध्ये उत्कृष्ट बोलणारे वक्ते खूप सापडतात पण प्रामाणिकपणे मान मोडून प्रत्यक्ष काम करणारी माणसे दुर्मिळ असतात. वसंतरावांची एकंदर वाटचाल पाहता हे काम ते उत्तम रीतीने सांभाळतील असा विश्वास त्यांना वाटला म्हणून हे काम त्यांना दिले गेले आणि त्याचे त्यांनी सोने केले. या कामात एकदा मोठा विलक्षण पेचप्रसंग निर्माण झाला होता. संकलित केलेल्या भागाचे मान्यवरांच्या पुढे सादरीकरण करायचे ठरले असतांना ते कागद ठेवलेल्या गोदामावर एका भुरट्या चोराने डाका घातला आणि तिथले सारे कागद चोरून रद्दीच्या भावात त्याची विल्हेवाट लावली. अशा वेळी चिडून किंवा खचून न जाता व-हाडपांड्यांनी अगदी कमी अवधीत ते सारे दस्तऐवज पुन्हा निर्माण करून दिले आणि वाङ्मयकोशाच्या कार्याला गति दिली. 'उर्मिला' ही कादंबरी उत्तम निर्मात्याच्या हातात पडली तर जुन्या 'मानिनी'सारख्या अप्रतिम चित्रपटाची निर्मिती होऊ शकेल असे एका लेखात ख्यातनाम समीक्षक डॉ.हेमंत इनामदार यांनी लिहिलेले आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्याचा संयोजकांचा मानस आहे असे सांगून श्री. मुकेश माचकर यांना असलेल्या चित्रपटसमीक्षणाच्या दीर्घ अनुभवाचा लाभ मिळावा अशी प्रस्तावना त्यांच्या भाषणापूर्वी केली गेली. "साहित्य हा आपला प्रांत नाही आणि एरवी आपण अशी जुन्या शैलीतली कादंबरी कदाचित वाचलीसुध्दा नसती." असे सांगत माचकरांनी भाषणाची सुरुवात केली. " 'आजचे वृत्तपत्र आणि उद्याची रद्दी' अशा प्रकारचे केवळ तात्कालिक महत्वाच्या विषयांशी संबंधित असलेले साहित्य रोज पहायची आपल्याला संवय आहे. त्यामुळे आपण या समारंभापासून दूर राहणार होतो, पण या दोघी भगिनींकडे विलक्षण परस्वेशन पॉवर आहे, त्यांच्या आग्रहपूर्वक विनंतीला आपल्याला नकार देताच आला नाही, मात्र ही कादंबरी हांतात धरल्यानंतर ती वाचून पूर्ण करेपर्यंत सोडावीशी वाटली नाही." असे त्यांनी सांगितले. "यातल्या कथेवर आधारलेला चित्रपट तयार करतांना मात्र तो कसा तयार होत आहे यावर बारीक लक्ष ठेवा. शब्दांपलीकडलं सारं शब्दांवाचून सांगण्याची किमया ज्याच्याकडे आहे असा संवेदनशील दिग्दर्शकच या कथेला योग्य तो न्याय देऊ शकेल. चटकदार संवाद घालण्याच्या मोहापोटी तिचा विचका होणार नाही एवढे पहा." असा सल्लाही त्यांनी दिला. ग्रंथालीचे श्री. दिनकर गांगल यांनी थोडक्यात आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ.विजया वाड यांनी या कादंबरीच्या कथेबद्दल वाचकांच्या मनातली उत्सुकता वाढेल अशा पध्दतीने तिच्याबद्दल थोडे विस्ताराने सांगितले. उर्मिला आणि विश्वास ही यातली दोन प्रमुख पात्रे आहेत. आईवडिलांच्या इच्छेखातर विश्वास उर्मिलेबरोबर विवाह करतो, पण त्याचे मन आधीच दुसरीकडे गुंतलेले असते. उर्मिला मात्र विश्वासच्या सोबतीने सुखी संसाराची रंगीत स्वप्ने घेऊन आलेली असते. असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. अपेक्षाभंगाने दुखावली गेलेली उर्मिला आक्रस्ताळेपणाने आकांडतांडव करत नाही किंवा आपलं नशीबच फुटकं असं म्हणून ढसाढसा किंवा मुळूमुळू रडतही बसत नाही. अत्यंत धीरगंभीर वृत्तीने ती शांतपणे आपल्या अस्तित्वाचा लढा देत राहते. आपल्या मार्गावर खंबीरपणे चालत राहण्याचा आत्मविश्वास तिच्याकडे असतो आणि तिला जे हवे असते ते अखेर तिला प्राप्त होते. अशी या कादंबरीची सुखांत गोष्ट आहे. यातली उर्मिलेची व्यक्तीरेखा आक्रमक नाही, पण दुबळीही नाही. आजच्या मालिकांच्या कथानकात संसारांची सारखी तोडफोड होतांना जशा प्रकारे दाखवली जात असते त्या पार्श्वभूमीवर उर्मिलेची भूमिका जास्तच सहनशील वाटेल, पण हेच तिचे वैशिष्ट्य़ आणि बलस्थानही आहे. त्रिकालाबाधित शाश्वत अशी मूल्ये कधीच जुनी होत नाहीत. त्यामुळे वीस पंचवीस वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ही कादंबरी आजच्या आणि उद्याच्या वाचकांनाही आवडेल असा विश्वास त्यांनी प्रगट केला. डॉक्टर विजयाताईंनी आपले काही मजेदार अनुभवही सांगितले. जेंव्हा त्यांना पहिल्यांदा दिवस राहिले तेंव्हा त्या ज्या कार्यालयात काम करीत होत्या तिथले सहकारी त्यांना नेहमी "आता तो लाडू, तो पेढा असे पदार्थ खा, ती जिलबी, ती चकली वगैरे खाऊ नका, म्हणजे मुलगाच होईल." असा सल्ला देत होते आणि त्यांनी तो पाळला सुध्दा. पण " तुम्हाला मुलगी झाली" असं जेंव्हा नर्सने सांगितलं तेंव्हा क्षणभरच " ते कसं शक्य आहे?" अशी त्यांची प्रतिक्रिया झाली, पण दुस-याच क्षणी त्या गोंडस बाळाला पाहताच त्यांच्यातल्या मातृत्वाची अनुपम भावना जागी झाली पूर्वीचे सगळे विचार अदृष्य होऊन गेले. त्यांच्या संसारात बहार आणणा-या या पहिल्या कलिकेचे नांव त्यांना प्राजक्ता असे ठेवले. तिच्या पाठीवर आलेली निशिगंधा झाली. तीच सुप्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड! "या दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला तर त्याचं नांव झेंडू ठेवा म्हणजे तुमची फुलबाग पूर्ण होईल." असे कोणी तरी खट्याळपणाने सुचवले . त्यावर त्यांच्या पतीने उत्तग दिले, "आमची फुलबाग आता पूर्ण झाली आहे. तेंव्हा वाटल्यास मलाच तिने झेंडू, गुलाब, मोगरा असे कांही म्हणावे." सौ.अंजली आणि सौ.अनुराधा या दोघी भगिनी आपला वैद्यकीय व्यवसाय, घरगृहस्थी, मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण वगैरे सगळे उत्तम प्रकारे सांभाळून आपल्या वडिलांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी इतक्या धडपडत आहेत, त्यांच्या साहित्यकृती वेगवेगळ्या माध्यमांमधून जगापुढे येत रहाव्यात यासाठी त्यांचे इतके आटोकाट प्रयत्न चालले आहेत याची त्यांनी भरपूर प्रशंसा केली. त्यात त्यांना सहकार्य देणा-या त्यांच्या पतिराजांचेही कौतुक केले. "या मुलींना जेंव्हाही माहेरपणाची ओढ वाटेल तेंव्हा त्यांनी आपल्या घरी निःसंकोचपणे यावे." असे त्या म्हणाल्या. मुलींच्या प्रेमळ स्वभावाबद्दल बोलतांना "Sons are for a while, but daughters are for life! " असे एका प्रसिध्द इंग्रजी साहित्यिकाने लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या दिवशी रामनवमी असल्यामुळे मी सकाळपासूनच थोडे रामनामगुणगान ऐकत होतो. त्यामुळे या साहित्यिकाला श्रावणबाळाची किंवा प्रभू रामचंद्रांची कथा माहीत असती तर कदाचित तो म्हणाला नसता असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला. वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर ते सभागृहात येऊन बसले आणि पुढला कार्यक्रम सुरू झाला. वेदांती भागवत आणि श्री. तिवारी या युगुलाने डॉ.व-हाडपांडे यांच्या एका गीतावर सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांनी कादंबरीतील अनुक्रमे उर्मिला आणि विश्वास यांचे स्वभाव, संस्कार आणि त्यांच्या मनात उठलेले तरंग दाखवणारे महत्वाचे भाग साभिनय वाचून दाखवले. कथेमध्ये थोडासा खलनायक वाटावा असा दिसणा-या विश्वासची कांहीशी लंगडी वाटणारी कां होईना पण एक जी कांही बाजू आहे, ती अविनाशने समर्थपणाने मांडली. उर्मिलेच्या पात्रातले गुंतागुतीचे भावाविष्कार ऐश्वर्याने छान रंगवले. 'या सुखांनो या' या मालिकेतली सरितावहिनींची जी सोज्ज्वळ प्रतिमा तिने प्रेक्षकांच्या काळजात कोरून ठेवली आहे तिच्याशी उर्मिलेची व्यक्तीरेखा सुसंगत अशीच आहे. ऐश्वर्याचे जे अभिनयकौशल्य आपण नाटकांतून आणि मालिकांमधून पाहतो त्यामुळे हे वाचन ती याहून अधिक प्रभावीपणे आणि सफाईने करू शकली असती असे मनात आले. माणसाची नेहमी स्वतःशीच स्पर्धा चाललेली असते किंवा तुलना होत असते असे म्हणतात ना? मस्त शारदीय रात या आल्बममधल्या दुस-या एका गोड गीतावर वेदांती भागवतने केलेल्या नृत्याविष्काराने हा सोज्ज्वळ, सात्विक असा कार्यक्रम संपला. तत्पूर्वी श्री. प्रशांत हरकरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमानंतर चहापानाने त्याची सांगता झाली. एक हृद्य तसेच नेटका सुनियोजित असा कार्यक्रम पाहण्याची आणि त्या निमित्य़ाने कांही प्रसिध्द व्यक्तींचे विचार त्यांच्या खास शैलीमध्ये ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यबद्दल व-हाडपांडे कुटुंबियांचे आभार मानायलाच हवेत. आनंद......खूप छान लिहिलं आहेस रे प्रकाशन सोहळ्याचं वर्णन. अगदी समोर बघतोय कार्यक्रम असं वाटलं. ह्या सोहळ्याचं फ़ार अगत्याचं आमंत्रण होतं पण सध्या कुवेतला असल्यामुळे जाता आलं नाही. पण तुझ्या ह्या दोन सुरेख लेखांमुळे जाता न आल्याचा सल कमी झाला. अनुराधा हरकरे माझी बालमैत्रिण. काकांच्या ह्या नव्या कलाकृतीला भरपूर शुभेच्छा :) तुझे मनापासून आभार :) जयश्रीताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमात अभिजित राणेची भेट झाली. माझ्याबरोबर त्याची जुनी ओळख आहे. त्याच्याकडून तुमच्या कवितांच्या आल्बमच्या प्रकाशनाबद्दल समजले. (जग किती छोटे आहे ना?) माझ्याकडून (थोडेसे उशीराने) हार्दिक अभिनंदन. |
Local bodies Election Maharashtra । एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय तेच का बदलत आहेत हे मला कळत नाही. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे ते स्पष्ट करा. आपण एका विचारावर ठाम राहा, तुम्हाला संधी मिळालीय. काही महिन्यांपूर्वी योग्य वाटलेली गोष्ट तुम्हाला आता अयोग्य वाटते. सगळ्यांना थेट अधिकार द्यायचे असतील तर नगरसेवकांनी नेमकं काय करायचं, असा सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. |
Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत, लताजींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी एका मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात झाला. लता पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत्या, त्यांचे वडील थिएटर कलाकार आणि गायक होते. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या चित्रपटसृष्टीतील अशा एक गीतकार आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ गायन आणि कुटुंबासाठी वाहून घेतले. (वाचा - Lata Mangeshkar Passes Away: लता दीदींच्या निधनाने देशात 2 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा; जाणून घ्या राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय असतं? ) वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासून गायनाच्या दुनियेत प्रवेश करणाऱ्या लता दीदींनी सिनेमाला विविध भाषांमध्ये अनेक सुपरहिट आणि संस्मरणीय गाणी दिली. जी कायम स्मरणात राहतील. लता दिदिंनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घेऊयात. . . (वाचा - Lata Mangeshkar Passes Away: जयोस्तुते श्रीमहन्मंगले ते मोगरा फुलला लता मंगेशकर यांची 'ही' मराठी गाणी आजही करतात मंत्रमुग्ध! ) लताजींना पहिल्यांदा स्टेजवर गाण्यासाठी 25 रुपये मिळाले, ज्याला त्या त्यांची पहिली कमाई मानतात. लताजींनी 1942 मध्ये 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणं गायलं होतं. लतादीदींचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहिणी उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले या तिघांनीही संगीताची निवड केली. (वाचा - Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी 6. 30 वाजता शिवाजी पार्क येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार) लता दिदिंनी लग्न का केलं नाही? लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही? याचे उत्तर त्यांनी स्वतः दिले आहे. लतादीदींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, घरातील सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. अशा परिस्थितीत लग्नाची कल्पना अनेकवेळा आली तरी, ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मी अगदी लहान वयात काम करायला सुरुवात केली, माझ्याकडे खूप काम असायचे. 1942 मध्ये, वयाच्या अगदी तेराव्या वर्षी, लताजींच्या डोक्यावरून वडिलांची सावली गेली. त्यामुळे कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. लता मंगेशकर यांचे वडील शास्त्रीय संगीताचे मोठे चाहते होते, त्यामुळेच कदाचित ते लताजींच्या चित्रपटात गाण्याच्या विरोधात होते. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आणि लता मंगेशकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. |
गोंदिया : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागातर्फे गोंदिया शहराच्या चौकाचौकात सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सन २०१२-१३ या वर्षात दी कोटी रूपये शासनाने दिले. परंतु पैसे दिल्यानंतर कॅमेरे लावण्यासाठी टेंडर काढण्याच्या प्रक्रियेत वेळ निघाल्याने ते कॅमेरे लावण्यात आले नाही. तेव्हापासून आजपर्यंत गोंदिया शहरात कॅमेरे लावण्याच्या हालचाली पोलिस विभागाकडून झाल्या नाहीत. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशिल आहे. येथे गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहून पोलीस विभागातर्फे गोंदिया शहराच्या मुख्य चौकात सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याचा माणस पोलीस विभागाने करून तत्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके यांनी गृहखात्याला प्रस्ताव पाठवून दिड कोटी रूपये या कॅमेऱ्यांसाठी मागणी केली. ती रक्कम शासनाने सन २०१२-१३ या वर्षात दिली. परंतु शासनाने पाठविलेली रक्कम उशीरा पाठविल्यामुळे कॅमेरे लावण्याच्या प्रक्रियेला वेळच मिळाला नाही. परिणामी दुसऱ्या टेंडरनंतर मार्च महिना लोटून गेल्यामुळे सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. निधी मिळताच पहिला टेंडर पोलिस विभागातर्फे करण्यात आला. परंतु पहिल्या टेंडरमध्ये एकाच व्यक्तीने टेंडर टाकले होते. कमीत कमी तीन लोकांचे टेंडर येणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. दुसऱ्यांदा पोलीस विभागाने टेंडर केले. परंतु तेव्हापर्यंत वेळच निघून गेल्याने पोलिसांना त्यावर्षी सिसिटीव्ही कॅमेरे लावता आले नाही. दुसऱ्या वर्षी ही प्रक्रिया करायला हवी होती. परंतु पोलीस विभागाच्या लिपीकांनी या संदर्भात वेळोवेळी अधिक्षकांना याबाबत माहिती न पुरविल्यामुळे मागील तीन वर्ष लोटले तरी गोंदिया शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. सुरक्षेच्या दृष्ट्रीने गोंदिया शहरात कॅमेरे लावणे गरजेचे होते. परंतु गोंदिया शहरात कॅमेरे लावण्यात आले नाही. आता आलेला निधी तसाच पडून आहे. नाविन्यपुर्ण योजनेतून सदर निधी देण्यात आला होता. हे कॅमेरे लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. नियोजन विभागाने वित्त मंत्रालयाकडे पुन्हा प्रस्ताव पाठविला आहे. मंजूरी आल्यानंतर गोंदिया शहरात कॅमेरे लावले जाणार आहेत. शहरात कॅमेरे लावले सनल्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. (तालुका प्रतिनिधी) आमगावला जमले ते गोंदियाला का नाही? सुरक्षेच्या दृष्ट्रीने आमगाव पोलीस ठाणे आघाडीवर आहे. शहराची सुरक्षितता कायम रहावी यासाठी तत्कालीन ठाणेदार डी. बी. मडावी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. लोकवर्गणीतून हे कॅमेरे बसवून सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र हे काम गोंदियात पोलिसांनी जमले नाही. या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी हा प्रशासनाचा भाग असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. अंदाजे दीट कोटी रूपये आले, त्याची कार्यवाही सुरू आहे, असे ते म्हणाले. परंतु या संदर्भात सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. |
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत आहेत. पहिल्या हातून सत्ता गेली, तर आता पक्ष वाचवण्याची धडपड सुरू आहे. ज्यामध्ये रोज नवा ट्विस्ट येतो. आता एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे गटाने जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाला तूर्तास हात लावलेला नाही. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या उपनेतेपदी यशवंत यादव गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंखे, तानाजी सावंत, विनय नाहाटा, शिवाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बैठकीत शिवसेनेचे १३-१४ खासदार ऑनलाइन हजर झाल्याचेही सूत्रांच्या हवाल्याने वृत्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच शिवसेनेचे ५५ आमदार दोन गटात विभागले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिबिराला 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर 15 आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्याचवेळी आता शिंदे गटाने 12-14 खासदारांसह येण्याचा दावा केला आहे. लसणाचे भाव कोसळे शेतकऱ्यांना मिळतोय ५ ते ७ रुपये किलोचा दर, असे उत्पन्न दुप्पट होणार का? आठवडाभरापूर्वी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक झाली. शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याचे बोलले होते. या बैठकीला शिवसेनेचे 18 पैकी 13 लोकसभा सदस्य उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानी झालेल्या बैठकीला 18 पैकी 15 लोकसभा सदस्य उपस्थित असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, खासदारांच्या सूचनेनंतर उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मूला पाठिंबा जाहीर केला. कारण आधीच बंडखोर आमदारांमुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून सत्ता गेली आहे. त्यामुळेच त्यांना आता पक्ष वाचवण्यासाठी खासदारांचा पाठिंबा हवा आहे. महाराष्ट्रातील 18 लोकसभा खासदारांव्यतिरिक्त कलाबेन डेलकर या दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून शिवसेनेच्या खासदार आहेत. त्याचवेळी राज्यसभेत शिवसेनेचेही तीन खासदार आहेत. |
श्रीगोंदा : बेलवंडी हिंगणी व देवदैठण शिवारात झालेल्या दोन निरनिराळ्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हिंगणी गावातून कुकडी साखर कारखान्यावर उसाने भरलेला ट्रक बेलवंडी रोडवर आला असता ट्रक चालक राजेंद्र आनंदराव वाघचौरे (वय ४५) रिडीटरमध्ये पाणी भरत असताना समोरून आलेल्या पीकअपने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते जागीच ठार झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला. दुसरा अपघात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास देवदैठण शिवारात झाला. एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलस्वार बाळू भरत रावडे (वय ४५, रा. कडूस, ता पारनेर) हा जागीच ठार झाला. बेलवंडी पोलीस ठाण्यात याबाबत दोन्ही वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. |
सासष्टीः राज्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवरील साधन सुविधांचा तसेच तीर्थक्षेत्रे (मंदिरे) व वारसा स्थळांचा विकासही केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे केला जाईल ,अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी तीन योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांद्वारे गोव्यालाही केंद्राकडून आर्थिक सहाय्य मिळेल,असे नाईक यानी सांगितले. गोव्यात खाणी बंद असल्याने पर्यटन हाच गोव्यासाठी सध्या महसूल प्राप्तीचा प्रमुख स्त्रोत बनला आहे. त्यासाठी गोव्यात जास्तीत जास्त पर्यटक कसे आकर्षित होतील, याकडे सरकार लक्ष देणार आहे, असेही त्यानी सांगितले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यानी नवी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेऊन पर्यटन विकास आराखडा सादर केला. मंत्री रेड्डी यांनीही सर्वतोपरी सहकार्याचे आश्र्वासन दिल्याचे नाईक यांनी सांगितले. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
दीपिका महागली! द� ��पिका पादुकोण सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर तर आहेतच शिवाय 'ट्रिपल एक्स- द रिटर्न आॅफ झेंडर केज' या चित्रपटाच्याद्वारे ती विन डिझेलसोबत हॉलिवूडमध्येही डेब्यू करतेय. या 'डिमांड'ला 'कॅश' कसे करायचे हेही तिला चांगले कळतेय म्हणूनच तिने संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती'साठी आपले मानधन वाढवून मागितले आहे. भन्साळींसोबत ती सलग तिसरा चित्रपट करीत आहे. रामलीला आणि बाजीराव-मस्तानी असे दोन चित्रपट तिने याआधी केले आहेत. पण, म्हणून काही भन्साळींना दीपिकाने मानधनाच्या बाबतीत सूट दिली नाही. याच चित्रपटासाठी दीपिकाची प्रतिस्पर्धी प्रियंका चोप्राही प्रयत्नरत होती. पण, अखेर बाजी दीपिकानेच मारली. आता पुन्हा कबीर खानचा नेक्स्ट प्रोजेक्ट असलेल्या 'ट्युबलाईट'मध्येही ती सलमानसोबत झळकणार असल्याची बातमी आहे. म्हणजे. . . दीपिकाचे सध्या 'दसो उंगलीया घी मे. . . . 'आहेत असे म्हणायला हरकत नाही तर? |
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! पोहचलो बघा साहेब !" मण्या जागीच थांबला - समोर वीस मीटर अंतरावर एक भलमोठ्ठ वडाच झाड होत. आकाशात पडलेल्या जऊळाने , वडाची हिरवी पाने जराशी तपकिरी पिकल्यासारखी वाटत होती. वडाच्या पुढे आणि मागे , चारही बाजुंनी सुकलेल्या पानांचा खच पडलेला दिसत होता. मसणातून जळणा-या प्रेताच मांस खाणा-या अघोरीच्या जटांसारख्या खाली लोंबणा-या पातळसर शहारा त्या वडाच्या झाडाच रुप अभद्र बनवत होत्या. कोठूनतरी पांढरट रंगाच धुर येऊन खोडाजवळून वाहत पुढे जात होत. " हेच का ते वडाच झाड?" मंजूलालने जरास बिचकत विचारल . तसंही समोरचा देखावा मनात धडकी भरवणारा होता - काळिज ते पाहून धडधड करत घंटेसारख वाजत होत. मंजूलालने ह्या अगोदर सुद्धा वाईट कामांचे पैसे अश्या अद्यात स्थळी घेतले होते. पन त्या जागेंमध्ये आणि ह्या अभद्र जागेमध्ये किती जमिनी आसमानाचा फरक होता ! एका अद्यात -अनोळखी क्षेत्रात प्रवेश केल्यासारखी , जिथे त्या वावरणा-या अद्यात - अनोळखी , शक्तिच फक्त वास जाणवत आहे - त्याच आस्तित्व जाणवत आहे , पन ते दिसू शकत नाही. " स..स..साहेब!" मण्याचा काफरा आवाज आला तसे मंजूलालची तंद्री भंग पावली. " काय.!" तो नरमीत म्हंणाला. की भीतिने त्याचा आवाज बसला होता ? देवच जाणो! " जाताय ना ?" " अरे पन तिथ कोण दिसत का नाहिये ?" " मला वाटत झाडाच्या मांग असतील, तुम्ही जाऊन तर बघा की!" मण्याच्या वाक्यावर मंजूलालने फ्क्त होकारार्थी मान हळवली. सुकलेल्या घशात आवंढा गिळून त्याने खाकी चौकलेटी रंगाच्या बुटांचा पाय पुढे टाकला. चरचर आवाज होत होता. अवतीभवती हलकीशी रातकिड्यांची किरकिर मृत्युच्या भजनासारखी एका सुरात वाजत होती. मध्येच वडाच्या झाडांची हवेने होणारी पानांची सळसल छातित कळ उठवत होती.. श्रापीत वातावरणात जशी आकाशात चंदेरी रंगाची विज चकाकायची तसा तो वडाचा झाड, खालून वर पर्य्ंत चंदेरी प्रकाशाने दोन सेकंदांसाठी चमकून उठायचा , तेवढ्यावेळेत डोळ्यांना जर काही तसल दिसल तर? हा विचार करून मनाला कशी भीति वाटत होती.. जागेवरच उभ राहून मंजूलालने एक कटाक्ष मागे मण्यावर टाकला. वेळेची माया अजुन काय! मंजूलालने आवंढ़ा गिळत पुढे वळून पाहिल- वडाच्या झाडाला पाहत तो पुढे पुढे जाऊ लागला. तर मधोमध एक नाचणीच्या पिठाची एक फुट उंचीची बाहुली उभी करून ठेवलेली दिसत होती- बाहुलीच गोलसर टक्कल पडलेल डोक- डोळ्यांन जागी दोन हातांनी खड्डे पाडलेले दिसत होते - हात - पाय जाडजुड होते - पोट ढेरी वाढल्यासारख मोठ होत - कपाळावर लाल रंगाने मळवट भरला होता. बाहुलीच्या जाडजुड पोटावर बेंबीमधोमध एका अज्ञात अनोळखी माणसाच फोटो चिटकवल होत. कोणावर तरी भानामती करणी केली गेली होती. तसही त्याला काय घेण देण होत त्या बाहुलीशी किंवा त्या जादू टोण्याशी? त्याला फक्त पैसा घेऊन इथून आल्या पावले निघुन जायच होत!. मंजूलाल चालत वडाच्या झाडामागे आला.. आजुबाजुला पाहू लागला. त्या मातीतून कुठे कुठे एक फुट उंचीच बिनकामाच रानटी गवत उगवल होत. त्याच गवतावर कोणितरी पाठमोर उभ होत. अंगात काळ्या रंगाची मळकटसर बाह्यांची बाराबंदी होती , खाली भडक लाल रंगाच धोतर होत -- डोक्यावर काहीच केस नव्हते - फक्त मागच्या बाजूला शेंडी दिसत होती. त्या दोन चिंचोळ्या घा-या डोळ्यांत जणू प्राणच शिल्लक नव्हते अस दिसत होते , ती शुन्यातली नजर - समोरून कोणी पाहिली तर अगदी छातीत कळ भरून येईल अशी होती. चेह-यावर असलेली त्वचा गडद पिठासारखी पांढरट होती- मगाशी पाहिलेल्या त्या बाहुलीसारखी. मंजूलाल त्या आकृतीच्या मागे उभा होता - नाहीतर त्याला हे असल रूप पाहायला लागल असत ! समोर उभ्या असलेल्या मांणसाला आपण ईथे आलो आहोत ह्याची कल्पना अद्याप मिळाली नसावी - म्हंणूनच ते पुढे पाहत आहेत , म्हंणूनच मंजूलालने आवाज दिला- तरी सुद्धा तो माणूस? की आणखी काही - पाठमोरा तो पाठमोराच राहिला. " स.स..साहेब , तू..तूमचा काम झाला आहे ! आता मला माझ्या कामाचे तेवढे पैसे द्या बस्स !" मंजूलाल जरा घाबरतगूबरत म्हंणाला. त्याच्या वाक्यावर त्या मांणसाच्या हाताची हालचाल झाली . हालचाल होतांना एक हलकेच हाड वाजल्यासारखा 'कट ' आवाज झाला होता. |
आता कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात हाक दिली आहे. देशभरात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न होत असतानाच, आता कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात हाक दिली आहे. चेंबूरच्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लघुपट तयार केले असून ते लघुपट सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागृती सप्ताहात हे लघुपट दाखविण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात असतानच, विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती होणे हे महत्त्वाचे मानले जात होते. ही बाब हेरूनच विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या (वेसीट) विद्यार्थ्यांनी एकूण सात लघुपट तयार केले आहेत. हे सर्व लघुपट विद्यार्थ्यांनीच दिग्दर्शित केले असून अभिनयही विद्यार्थ्यांनीच केला आहे. यातून या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचारमुक्त समाजाचा आदर्श समोर ठेवला आहे. 'भ्रष्टाचारमुक्त भारत - माझा दृष्टिकोन' या संकल्पनेवर आधारित या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे लघुपट दक्षता जागृती सप्ताहादरम्यान दाखविण्यात येणार आहेत. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर हा सप्ताह सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघुपट या व्यापक अभियानाचा भाग आहे. |
क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीजच्या माधव मिश्रा यांच्यावर एक नवीन केस समोर आली आहे. माधव मिश्रा उर्फ पंकज त्रिपाठी लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर एक नवीन आणि खळबळजनक केस सोडवताना दिसणार आहे. वास्तविक, हॉटस्टारने आपल्या सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूबवर क्रिमिनल जस्टिसच्या तिसऱ्या सीझनची झलक शेअर केली आहे. होय, हॉटस्टारने 'क्रिमिनल जस्टिस 3' चा टीझर रिलीज केला आहे. ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही. ) |
बरं झालं असतं "ओएसओ" जर बघितला नसता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळणार. दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळणार. जग सुनं सुनं होणार पिक्चर सरता सरता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते. क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते ! क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. या जन्मी जर नाही जमलं पुढच्या जन्मी बघू. आपण सुद्धा तेव्हा ओम कपूरसारखं जगू. "दि एन्ड" नाही, पिक्चर अजून बाकी आहे दोस्ता, डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..! |
शनिवार, ७ ऑगस्ट रोजी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भारतीय पोस्ट खात्याच्या एका नव्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केले आहे. भारतीय पोस्ट खात्यातर्फे 'आजादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमांतर्गत भारतातील विविध क्षेत्रांमधील अज्ञान नायकांचा गौरव करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. एक थोर समाज सुधारक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या चमनलाल यांचे हे टपाल तिकीट आहे. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चमनलाल यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. चमनलाल यांचा जन्म १९२० साली सध्याच्या सियालकोट येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. युवा अवस्थेपासूनच समाज कल्याणासाठी काम करण्याचा उत्साह त्यांच्यात होता. शैक्षणिक जीवनात ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. आपल्या शैक्षणिक वर्षांमध्ये ते सुवर्णपदक विजेते होते. अनेक मोठमोठ्या नोकऱ्यांची संधी त्यांना समोरुन येत होती. पण तरीही त्यांनी फाळणीग्रस्तांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काम करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. हे ही वाचाः नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे! चमनलाल हे खऱ्या अर्थाने भारतीय संत होते. आपल्याकडचे दुसऱ्याला देणे आणि त्यांची काळजी वाहणे यावर त्यांचा विश्वास होता. याच तत्वज्ञानाचा त्यांनी अंगिकार केला असे श्री नायडू म्हणाले. संघाचे जागतिक पातळीवर जाळे तयार करण्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. परदेशात जाणाऱ्या भारतीयांना सोयीसुविधा मिळण्यासाठी त्यांनी काम केले. आतंरराष्ट्रीय संस्कृती अभ्यास केन्द्राचे सरचिटणीस श्री अमरजीवा लोचन यांनी टपाल तिकीट प्रस्तावित केले तर श्री संखा समंता यांनी याचे आरेखन केले आहे. या स्मरणार्थ टपाल तिकीट सर्व टपाल तिकीट विक्रीत्यांकडे उपलब्ध आहे. ऑनलाईन हवे असल्यास (Visit : https://www. epostoffice. gov. in/ ). इथे संपर्क करा. |
माझा आणि जपानी भाषेचा कुठे ना कुठे संबंध येतोच. टीव्हीवर आणि मोबाईलवर बातम्या वाचत असलो की, त्यात जपानची बातमी येतेच. त्यात माझा लहान भाऊ 'शिनचॅन' कार्टून पाहतो. त्यातही जपानी भाषा आहे. माझा आणि जपानी भाषेचा संबंध १९ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालाय. वाचनाची थोडीफार आवड असल्यामुळे सोशल मीडिया आणि बऱ्याच व्यक्तींकडून जपानी पुस्तक 'तोत्तोचान' विषयी खूपच ऐकले होते. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद झाला होता. लगेच मी ते पुस्तक विकत घेतले. पण वाचण्याचा योग काही लवकर आलाच नाही. त्यानंतर काही दिवसांनी १९ ऑगस्टला वृत्तपत्रात छापून आलेल्या 'तोत्तोचान' पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले. दुसऱ्याच दिवशी त्या पुस्तकाच्या अनुवादिका चेतना सरदेशमुख-गोसावी यांची मुलाखत स प महाविद्यालयात सकाळी ११ वाजता होती. पण मी ते पुस्तकच वाचल नव्हतं. मग मी ते पुस्तक वाचण्याच ठरवलं. पुस्तकाचे ४१ पान वाचले, पण खूपच झोप आल्यामुळे मी झोपी गेलो. मध्यरात्री एकच्या दरम्यान अचानक जाग आली. मग पाणी प्यायलो आणि मग उरलेले पुस्तक मी वाचले. दुसऱ्या दिवशी कॉलेजचा तास बुडवून मुलाखतीला गेलो. मुलाखत खूपच चांगली झाली. त्यानंतर मी त्यांना भेटून पुस्तकाविषयीचा आनंद व्यक्त केला. तिथे त्यांचे अजून एक नवीन पुस्तक विक्रीस होते. मी ते लगेचच खरेदी केले. काही दिवस उलटल्यानंतर मी आणि माझा अभियांत्रिकीचा मित्र रविराज, आम्ही एखादी परदेशी भाषा शिकावी, असं ठरवलं. त्यानंतर एके दिवशी रविराजचा फोन आला. तो म्हणाला, "मी आणि व्यंकटेश डेक्कनला आलोय. आपण सिम्बॉयसिसला परदेशी भाषेविषयी चौकशी करायला जाऊ." मी त्याला बोललो,"ठीक आहे, मी कॉलेजचे तास संपल्यावर येतो." मग दुपारी साडेतीनच्या सुमारास मी सिम्बॉयसिसजवळ पोहोचलो. रविराज आणि व्यंकटेश हे आधीच चौकशी करून आले होते. मग त्यांनी मला एक पत्रक दिलं आणि माहिती सांगितली. तेव्हा मी म्हणलं पाहू आपण कसं शिकायला जमतंय ते. त्यानंतर आम्ही तिघे तिथे जवळच नाष्टा करायला गेलो. खाता खाता मस्त गप्पा मारत होतो.. खरंतर मी तेव्हा कोणती परदेशी भाषा शिकावं, हे ठरवलंच नव्हतं. त्यानंतर कॉलेजच्या गडबडीत मी हा विषयच विसरून गेलो. पुन्हा बरेचसे दिवस उलटले. आता आपल्याकडे टाळेबंदी होण्याच्या बरोबर एक दिवस आधी आम्ही सर्व गावाला म्हणजेच जुन्नरला गेलो. गावाला निवांत असल्यामुळे माझ्या मनात पुन्हा परदेशी भाषेचा विषय घोळू लागला. एक दिवस सकाळ पेपर वाचत असताना त्यात 'जपान आणि संधी' हे सदर वाचलं. जपानी आणि मराठी भाषेत खूपच साम्य आहे, असंही माझ्या वाचनात आले, हे वाचून खूपच आनंद झाला. त्यानंतर एका सदरात स्वामी विवेकानंदांनी जपानविषयी लिहिलेले एक वाक्य वाचल. त्यांनी असं लिहिलं होतं की, "प्रत्येक भारतीय युवकाने एकदा तरी जपानला जरूर भेट द्यावी. जपानची शिस्तप्रियता, स्वच्छता आणि जपानी माणसांचे देशप्रेम या गोष्टी मला खूपच भावल्या आहे." हे वाचून तर मला अजूनच प्रेरणा मिळाली. मी जपानी भाषा शिकण्याचे ठरवले. पण सुरवात कशी करावी, हे काही समजेना. मग मी इंटरनेटवर माहिती पाहू लागलो. त्यात अस आढळलं की, जपानी ही जगातील सर्वात कठीण भाषांपैकी एक आहे. ती भाषा पाहिली. सर्व चित्रलिपीच होती. त्यात त्या अक्षरांचा काहीच ताळमेळ लागेना. पण तरीही मी ती भाषा शिकायची ठरवली. पण शिकायची कशी हा प्रश्न पडला. मग पाटी पेन्सिलवर त्याचा सराव करण्याचे ठरवले. पण पाटी पेन्सिल नव्हती. मग आई बोलली,"कदाचित आयुषकडे (मामाचा मुलगा) पाटी असेल." आईने फोन करून विचारले तर मामा बोलला की, पाटी आहे. मग बाबांनी जाऊन पाटी आणि पेन्सिल आणली. पण ती पाटी खूपच जुनी असल्याने त्यावर पेन्सिलने नीट अक्षरच उठत नव्हते. मग बाबांनी मला नवी कोरी पाटी आणि पेन्सिल आणून दिली. मोबाईलमध्ये काही अॅप घेतले, त्यातून मी रोज पाच अक्षरं घेऊन पाटीवर सराव करायचो. त्यानंतर मला आठवले की, माझ्याकडे 'तोत्तोचान' पुस्तकाच्या अनुवादिका चेतना सरदेशमुख-गोसावी यांचा मोबाईल नंबर आहे. लगेच त्यांना फोन केला आणि मी जपानी भाषा कसं शिकतोय याबाबत त्यांना माहिती दिली. चेतना ताई बोलल्या की, "चांगलं आहे. तू लिहायचा आणि बोलायचा सराव करत राहा." मग दीड महिना रोज सराव केला आणि दोन्ही लिपी बऱ्यापैकी यायला लागल्या. त्यानंतर २४ मे रोजी पुण्याला आलो. जपानीचा सराव चालूच होता. त्यातच एक दिवस इंटरनेटवरून 'हिकारी सेंटर फॉर जापनीज लँग्वेज' विषयी माहिती मिळाली. चैत्रालीताई पानसे या जपानी भाषा मराठीतून शिकवत होत्या. हे पाहून मला आनंदाचा धक्काच बसला. कारण मी कधी विचारही केला नव्हता की, कुणी मराठीतूनही जपानी भाषा शिकवत असेल. चैत्रालीताई पानसे यांची यु ट्यूब वाहिनी आहे, त्यात ते मराठीतून जपानी भाषा शिकवतात. हाच माझा जपानी भाषा शिकण्याचा मैलाचा दगड ठरला. त्यांच्या यु ट्यूब वाहिनीमुळे मला जपानी शिकायला खूपच मोठी मदत होत आहे. त्यानंतर एकदा मी आणि वर्गमित्र आदित्य आम्ही व्हाॅट्सअॅपवर बोलत होतो. त्याला मी जपानी भाषा शिकतोय, याबद्दल सांगितलं. त्यावर तो बोलला की,"आता आईला जपानी सून आण." हे वाचून मी खूपच हसत होतो. त्यानंतर आता दोन आठवड्यांपूर्वी इचलकरंजीचे मित्र आकाश यांनी त्याचा व्हाॅट्सअॅपचा डीपी जपानी भाषेत ठेवला होता. मग मी त्यांना त्याबद्दल विचारले तर ते बोलले की, माझे दोन मित्र जपानी आहे. त्यांनी मला प्रवीण यांडे या मित्राविषयी माहिती दिली. ते मूळचे पुण्याचेच आहे, पण ते जपानला स्थलांतरित झाले आहे. त्यांना मी फेसबुकवर संपर्क साधला. त्यांनी एक खूपच छान उत्तर दिले. ते म्हणाले,"मी आतापर्यंत जपानी भाषा स्वयंसाधनेतून शिकत आलो आहे." खरतर प्रवीणने दिलेलं हे उत्तर नवीन काही शिकू पाहणाऱ्या प्रत्येकालाच लागू पडत. माझा आणि जपानी भाषेचा कुठे ना कुठे संबंध येतोच. टीव्हीवर आणि मोबाईलवर बातम्या वाचत असलो की, त्यात जपानची बातमी येतेच. त्यात माझा लहान भाऊ 'शिनचॅन' कार्टून पाहतो. त्यातही जपानी भाषा आहे. मी ते वाचण्याचा प्रयत्न करतो, पण ते लगेच जातं. आज सकाळी एक घटना घडली. रोज सकाळी पावणे सहा वाजता मी आणि आई चालायला जातो. तिथे स्पाईन सर्कलला आम्ही दोघे बसलो होतो. अचानक तिथे मला एक जपानी मुलगी जॉगिंग करताना दिसली. मग मी जपानी भाषेचा प्रवास आठवू लागलो. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की, मी याचा लेख लिहायला पाहिजे. त्यामुळे हा भलामोठा लेखप्रपंच तुमच्यासमोर मांडला. याबद्दल मी त्या अनोळखी जपानी मुलीचे मनापासून धन्यवाद मानतो. |
कचरा विलगीकरणासाठी रोज दहा प्रभाग 'लक्ष्य' शहरातील कचरा विलगीकरणासाठी दहा प्रभाग 'लक्ष्य' करण्यात आले आहे. रोज दहा प्रभागात कनक व मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कचरा विलगीकरण करण्यास नागरिकांना सांगतील. तसेच याबाबत आवश्यक ती माहितीही देतील. त्यामुळे पुढील काही दिवसात शहरात कचरा विलगीकरण होण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे. सोमवारपासून ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची मनपाची मोहीम पहिल्याच दिवशी फसल्यानंतर अद्यापही नागरिक या मोहिमेपासून अनभिज्ञच असल्याचे पुढे आले आहे. वस्त्यांमधील नागरिकांना कचरा वेगळा करून रोज द्यायचा आहे, याची माहिती नाही. मनपाची यंत्रणा यात कमी पडल्याचे चित्र असून, यासाठी मोठया प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. दरम्यान, सोमवार, १८ डिसेंबरच्या 'मटा'च्या अंकात 'विलगीकरणाचाच कचरा' यासंदर्भातील वृत्त आल्यावर मनपा यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. तर, आरोग्य विभागाने १० झोनमधील प्रत्येकी एक प्रभागात ६० टक्के कचरा विलगीकरण झाल्याचा दावा केला आहे. सोमवारी, निवडक प्रभाग वगळता इतर भागात अनेक घरांमधून कचरा एकत्रितपणे टाकला जात होता. सोसायटी व अपार्टमेंटमधूनही कचरा विलगीकरण झाल्याचे जाणवत नव्हते. यामुळे हा प्रयत्नही फसणार का,अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रत्येक झोनमधील एका प्रभागाची निवड करून तेथे कचरा विलगीकरणास प्राधान्य दिले. त्यानुसार या प्रत्येक प्रभागात ६० टक्के ओला व सुका असे कचऱ्याचे विलगीकरण झाल्याचा दावा आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे यांनी केला. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असून, नागरिकांना ती सवय लागावी असे प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी विलगीकरणाचाच कचरा झाल्याने, यंदाही नागपूर मनपा स्वच्छ सर्वेक्षणात माघारणार का, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. सोमवारला आसीनगर झोन, लकडगंज, मंगळवारी आदी झोनमध्ये कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांनी माहिती नसल्याचे सांगितले. कनकचे कर्मचारीही याबाबत गंभीर नसल्याचे दिसत होते. कचरा संकलित करण्यात येणाऱ्या वाहनांमध्येही ओला व सुका वेगवेगळा साठविण्याचे कंपार्टमेंट नव्हते. वस्त्यांमधील घरांमधून कचरा गोळा करणाराही कचरा वेगवेगळा करण्यासाठी आग्रह धरत नव्हता. कमी वेळेत जास्त घरांतून कचरा संकलित करावयाचे असल्याने घंटागाडीचे कर्मचारी लगबग करताना दिसले. त्यामुळे या मोहिमेसाठी मनपाला मोठया प्रमाणात जनजागृती करावी लागेल असे दिसले. यासाठी प्रशासनाला आरोग्य विभागासह नगरसेवकांचीही मदत घ्यावी लागेल. प्रभागनिहाय हस्तपत्रकेही वाटावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर काही भागातील उद्यानांमध्ये वा परिसरात जनजागृतीसाठी शिबिरही घेण्याची गरज असल्याचे दिसत आहे. |
प्रेग्नंट सोहाला वहिनी करिना देतेय टिप्स! बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करते आहे. सोहाला तिच्या प्रेग्नंसीसंबंधीच्या टिप्स दुसरे-तिसरे कोणी देत नसून तिची वहिनी करिना कपूर देतेय. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करते आहे. सोहाला तिच्या प्रेग्नंसीसंबंधीच्या टिप्स दुसरे-तिसरे कोणी देत नसून तिची वहिनी करिना कपूर देतेय. सोहा सांगतेय. 'करिना मला न्युट्रिशनबाबत टिप्स देतेय. करिनाने मला सांगितले आहे, 'प्रेग्नंसीदरम्यान कोणतेही डाएट करू नकोस. जे हवं असेल ते सगळं मनापासून खात जा. ' सोहाने ट्विट केले आहे, 'येणाऱ्या नव्या पाहुण्याबाबत कुणाल आणि मी खूपच उत्सुक आहोत. आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. आता आयुष्याचे एक नवे पर्व सुरू होत आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्ही आणखी खूष झालो आहोत. ' सोहा पुढे लिहिते, 'मी तशी नजर लागते या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. मी या बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ इच्छित नाही. तशीही मी आणि कुणाल आमचे पसर्नल लाइफ पर्सनल ठेवतो. ' सोहा आणि कुणालची ओळख 'ढूँढते रह जाओगे' या चित्रपटाच्या सेटवर झाली. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर विवाहबंधनात अडकले. |
लाईव्ह न्यूज : मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा काढणार! नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन! बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : 'हाऊसफुल 4': कॉमेडीचा फुसका 'बार ! बॉलीवुड : अमिताभ बच्चनही पडले या चिमुकलीच्या प्रेमात, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है! ! बॉलीवुड : Commando 3 Trailer : कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का? बॉलीवुड : दिवाळी पार्टीत दिसली ही अभिनेत्री, देणार का 'गुड न्यूज'? |
राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचारी निलंबित! एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित केले आहे. मात्र, या निलंबनाची अधिकृत घोषणा झालेली नाही. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांना वेठीस धरू नये असेही त्यांनी म्हटले होते. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर आज मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. एसटी महामंडळ उद्या सकाळी 10 वाजता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. महामंडळाने देखील आता कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमीका घेतली असून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे एका दिवसाचे काम नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आडमुठी भूमिका सोडावी. नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहनही परब यांनी कर्मचाऱ्यांना केले होते. |
पटियाला, 23 जानेवारीः स्वातंत्र्यपूर्व काळात देशात अनेक श्रीमंत राजघराणी होती. त्यात पटियाला राजघराणं सर्वात मोठं होतं. महाराजा भूपिंदर सिंह देशातील महिले असे राजा होते ज्यांच्याजवळ आपलं स्वतःचं विमान होतं. त्यांची लाइफस्टाइल अशी होती की इंग्रजही त्यांच्या स्टाइलकडे पाहून जळत होते. भूपिंदर सिंह जेव्हा परदेशात जात होते. तेव्हा ते संपूर्ण हॉटेलच भाड्यानं घेत होते. त्यांच्याजवळ तब्बल 44 रोल्स रॉइस गाड्या होत्या. तर जेव्हा राजाचा काफिला निघत होता तेव्हा त्यांच्यासोबत तब्बल 22 रोल्स रॉयल गाड्या जात होत्या. महाराजा भूपिंदर पटियाला घरण्याचे राजा होते. त्यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती असल्याची माहिती आहे. येवढच नाही तर त्यांच्याविषयी अनेक किस्से सांगितले जातात. ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. जेव्हा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची स्थापना झाली तेव्हा महाराजांनी खुप पैसे दिले असल्याचं सांगितलं जातं. येवढचं नाही तर जेव्हा भारतीय क्रिकेट संघ परदेशात खेळण्यासाठी जात होता तेव्हा त्यांचा संपूर्ण खर्च महाराजा भूपिंदरसिंह करत होते. 1940 पर्यंत भारतीय संघाचा संपूर्ण खर्च महाराजा उचलत होते. त्या बदल्यात त्यांना भारतीय संघाचा कर्णधार बनवलं जातं होतं. महाराजा भूपिंदरसिंह ही देशातील पहिली व्यक्ती होती ज्यांच्याजवळ स्वतःचं विमान होतं. महाराजांनी विमान 1910 साली ब्रिटनकडून विकत घेतल्याची माहिती मिळते. विमानाची देखभाल करण्यासाठी महाराजांकडे पूर्ण स्टाफ होता. विमान उतरवण्यासाठी पटियालातच धावपट्टी तयार करण्यात आली होती. विमानातून अनेकदा परदेश दौराही महाराज करत असल्याची माहिती आहे. महाराजा भूपिंदरसिंह यांच्या जीवनावर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहे. दीवान जर्मनी दास यांनी त्यांच्या जीवनावर 'महाराजा' नावाचं पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकातून महाराजा किती अलिशान जीवन जगत होते यांची माहिती त्यांनी लिहिली आहे. तर लेपियर कोलिंग यांच्या 'फ्रीडम ऍट मिडनाईट' मध्ये महाराजांची ऐशआरामी जीवनशैली सांगण्यात आली आहे. महाराजा भूपिंदरसिंह यांनी दहा वेळा लग्न केलं असल्याची माहिती आहे. या शिवाय त्यांच्या हरममध्ये 300 पेक्षाअधिक राण्या असल्याची माहिती आहे. परदेशी महिलाही त्यांच्या राण्या होत्या. महाराजांना त्यांच्यापासून 88 मुलं होती. महाराजा भूपिंदरसिंह यांचा देशात नाही तर परदेशातही मोठा थाट होता. परदेश दौऱ्यावर जाताना मोठा लवाजमा त्यांच्यासोबत जात होता. लंडन आणि पॅरिसमधील महागड्या हॉटेलमधील संपूर्ण मजलाच ते भाड्यानं घेत होते. त्यांचं अलिशान राहाण पाहून परदेशातील लोकंही आवाक होत होते. भूपिंदरसिंह यांच्या गाड्यांच्या ताफ्यात 44 रोल्स रॉइस होत्या. त्यांची गाड्यांची आवड पाहून हिटलरनंही त्यांना एक कार बक्षिस म्हणून दिली होती. 1935 साली बर्लिन दौऱ्यावर असताना त्यांची भेट हिटरशी झाली. महाराजांना भेटून हिटलर येवढे प्रभावित झाले की त्यांनी आपली कार महाराजाला बक्षीस म्हणून दिली. हिटलरसोबत महाराजांची मैत्री फार वेळ टिकली. महाराजा भूपिंदरसिंह यांनी 1929 साली मौल्यवान नग, हिरे आणि आभूषणं असलेली एक पेटी पॅरीसमधील ज्वेलर्सला पाठवली होती. त्यानंतर तर महाराजाच्या श्रीमंतीची चर्चा संपूर्ण पॅरिसमध्ये पसरली होती. मौल्यवान दागिन्यांपासून हार तयार करण्यासाठी कारागिरांना तब्बल 3 वर्षं लागली. त्या वेळी त्या हाराची किंमत तब्बल 250 लक्ष डॉलर होती. हा हार देशातील सर्वात महागडा हार होता. महाराजा भूपिंदरसिंह यांनी भारतीय क्रिकेटच्या उभारणीत मोठा आर्थिक हातभार लावला होता. त्यानंतरही बोर्डाला महाराज मदत करत होते. मुंबईतील ब्रेबोर्स स्टेडियमचा एक हिस्सा त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून तयार झाला होता. भारतीय क्रिकेट संघ आणि मेलबर्न क्रिकेट संघाकडूनही ते खेळले आहे. त्यांनी सर्वप्रथम ब्रिटिश क्रिकेट कोचला भारतात बोलावलं. त्यांनी स्वतःची क्रिकेट टीम तयार केली होती. त्यांच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते. लाला अमरनाथही त्यांच्या क्रिकेट टीममध्ये होते. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
मुदत संपूनही १. ७८ लाख नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस ! गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर पुढे होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करावे असा सल्ला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम जोमात राबविली जात आहे. याचे फलित असे की, १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे असताना मात्र हे नागरिक आपल्याच मस्तीत वागत असताना दिसत आहेत. २) जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ) - कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शरीरात कोरोनाविरोधात प्रतिपिंड तयार करण्यासाठी या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. - त्यानुसार, दोन्ही लसींमध्ये ठरावीक कालावधी ठरवून दुसरा डोस दिला जात आहे; कारण यातून त्या लसींची कार्यक्षमता अधिक वाढते व प्रतिपिंड तयार होऊन अधिक कालावधीपर्यंत आपल्या सुरक्षित ठेवते. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असून आजघडीला जिल्ह्यात फक्त दोन बाधित आहेत. यामुळे आत कोरोना गेल्याने लस घेण्याची गरज काय, असा संभ्रम नागरिकांत आहे. शिवाय, सध्या शेतीची कामे सुरू असून डोस घेतल्यास ताप येणार व अशात कामे खोळंबणार हा विचार करूनही नागरिक दुसरा डोस टाळत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनापासून सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता जिल्ह्यातून कोरोना गेला असा संभ्रम न बाळगता प्रत्येकाने आपले डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे लवकरात लवकर डोस घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करा. |
पुणे-विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा घेऊन आलेल्या कर्णबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जमध्ये काही कर्णबधीर विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या कर्णबधीर आंदोलकांनी आक्रमक धोरण स्वीकारले असून सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आता आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहेत. अजूनही आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आहे. पोलिसांनी लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात प्रयत्न केला. पण ते काय सांगत आहेत, ते आम्हाला कळत नव्हते आणि आम्ही काय सांगतोय ते त्यांना समजत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे. . १)शेख शकील शेख साबीर, (वय-३१,रा. दर्गा मोहल्ला, वसमत) २) प्रशांत धुमाळे (वय २४, रा. देगलूर, नांदेड) ३) सिद्धनाथ लष्करे (वय २३, रा. लातूर) ४) कोंडिबा खरात (वय ३४, मानखुर्द, मुंबई) ५) किरण राजपूत (वय ४२, रा. नवापूर, नंदूरबार) ६) दिलीप गट (वय ३०, रा. पारनेर, अहमदनगर) ७) प्रमोद सुर्वे (वय ४०, रा. शिरगाव, सांगली) ८) हनिफ खारियत (वय ३२, दोंडाईचा, धुळे) ९) अमित कुमार सिंह (वय २९, देहूरोड, पुणे) १०) बाबू शेख (वय ५२, रा. देहूरोड, गांधीनगर) ११) नागेश भंडारे (वय ३४, रा. मालेगाव) १२) कृष्णा शिवाजी कदम (वय १९) |
केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी घेत असलेल्या केंद्रीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये गेल्या काही वर्षांत मराठी टक्का सातत्याने वाढतो आहे. पूर्वी केंद्रीय सेवांमध्ये मराठी टक्का कमी का, असा प्रश्न विचारला जाई. महाराष्ट्रात येणाऱ्या परभाषी वा परप्रांती सनदी अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या विकासाची तितकी आच नसते, अशीही तक्रार होते. महाराष्ट्रातील रिक्त जागांइतके मराठी विद्यार्थी यशस्वी होत नसतील तर इतर प्रांतांमधले अधिकारी येणारच. याशिवाय, उत्तर भारतीय यशस्वी विद्यार्थी महाराष्ट्रात यायला उत्सुक असतात. महाराष्ट्रात येणाऱ्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी होत असले तरी पूर्वी तेही महाराष्ट्रालाच अग्रक्रम देत. गेल्या दोन दशकांत मात्र सनदी सेवांमधला महाराष्ट्राचा हिस्सा वाढतो आहे. ही आनंदाची बाब आहे. यात राज्य सरकारचे, ठाणे महापालिकेसारख्या विशेष वर्ग चालविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, ज्ञान प्रबोधिनीसारख्या संस्थांचे, चाणक्य मंडलसारख्या विशेष अभ्यास केंद्रांचे तसेच अनेक माजी सनदी अधिकाऱ्यांचे श्रेय आहे. सनदी सेवेसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक दशके दिल्लीतील मार्गदर्शक वर्गांचे नाव घेतले जाते. इतके की, एरवी आपल्या राज्यात क्लास लावणारे विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात मात्र दिल्लीकडे धावत. मात्र, आता पुण्याने अशा मार्गदर्शनात विशेष स्थान निर्माण केले आहे. केवळ केंद्रीय नाही तर राज्य सेवा परीक्षांसाठीही पुण्यातल्या विविध संस्था किंवा वर्गांत मुले जातात. या पार्श्वभूमीवर ताज्या निकालावर नजर टाकली तर ७५९ विद्यार्थी निवडले गेले आहेत. हा भरतीचा एकूण आकडाच यंदा कमी आहे. यात ५७७ मुले तर १८२ मुली आहेत. याचा अर्थ, मुलींचा आकडा मुलांच्या जवळपास एक तृतियांशापर्यंत पोहोचतो आहे. तो पुढील काळात आणखी वाढत राहील, अशी चिन्हे आहेत. या यशस्वी मुलांमध्ये ८० ते ९० मुले मराठी अथवा महाराष्ट्राची असावीत, असा अंदाज आहे. असा केवळ अंदाज बांधता येतो. याचे कारण, देशात मुलींमध्ये पहिली आलेली सृष्टी जयंत देशमुख ही मुलगी मराठी आहे. मात्र, तिचे शिक्षण महाराष्ट्राबाहेर झाले. सध्या ती इंदूरला असते. पूजा ज्ञानेश्वर मुळे या कोल्हापूरच्या कन्येने यशस्वी उमेदवारांच्या यादीत अकरावे स्थान पटकावले असले तरी तिचे प्राथमिक शिक्षण दिल्लीत आणि नंतर उच्च शिक्षण कोलंबिया विद्यापीठात झाले. पूजा ही तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ आयएफएस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या. तिलाही आयएसएफ व्हायचे होते. क्रमवारीतील तिचे स्थान पाहता हे सहज शक्य होईल. पूजाचे यश कौतुकास्पद असले तरी अगदी सर्वसामान्य घरातल्या, नोकरदारांच्या मराठी मुलांनी या परीक्षेत मिळवलेले यश विलक्षण आहे. तृप्ती दोडमिसे ही राज्यसेवा परीक्षा पास करून सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून काम करत होती. पण यूपीएससीचे स्वप्न तिला पडतच राहिले. चारवेळा यूपीएससी दार ठोठावून तिने यंदा यश मिळवलेच. या काळात तिला व्यक्तिगत आयुष्यातही अनेक तडजोडी कराव्या लागल्या. मात्र, तिने जिद्द सोडली नाही. देशात १६७वा आलेला नचिकेत शेळके हा तर पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातला. आई-वडील शिक्षक. त्यानेही बीई झाल्यानंतर न थकता चारवेळा धडक देऊन यंदा बाजी मारलीच. या सगळ्या मराठी मुलांचे अभिनंदन करताना त्यांनी आता पुढची स्वप्ने पाहावीत, असे सुचवायला हवे. कोणतेही सरकार आले तरी नोकरशाही हाच साऱ्या प्रशासन यंत्रणेचा कणा असतो. उत्तरेकडून दक्षिणेत जावे, तसतशी नोकरशाही ही अधिक समाजसन्मुख, क्रियावान, वेगवान असलेली दिसते. महाराष्ट्र मध्यावर आहे. इथल्या नोकरशाहीनेही अधिक वेगवान, पारदर्शक आणि प्रामाणिक होण्याची गरज आहे. या नव्या अधिकाऱ्यांनी सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर प्रलोभनांना बळी न पडता लोकसेवेचे ब्रीद पाळायला हवे. सुदैवाने, उत्तीर्णांमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधून, आर्थिक परिस्थितीमधून आलेली मुले आहेत. रेल्वेपासून पोस्टापर्यंत आणि मुलकीपासून पोलिसपर्यंत कोणतीही सेवा मिळाली तरी त्यांनी ती जनहितासाठी राबवायला हवी. प्रसंगी नोकरशाहीची पोलादी चौकट हुशारीने वाकवायला हवी. स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी साधे साधे प्रश्न सुटलेले नाहीत. हे अपयश नोकरशाहीचेही आहे. ते या मराठी तरुणांनी आतातरी धुवून काढायला हवे. प्रशासकीय सेवेत मराठी मुले कमी का, असे सारे पूर्वी खंतावत असत. आता या मुलांची संख्या वाढत असताना 'रूप पालटू देशाचे. . ' हे स्वप्न पुरे व्हायला काय हरकत आहे? |
पावसाळा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला वेग आला आहे. मिठी नदीमुळे पावसाळ्यात मुंबईत मोठ्याप्रमाणावर पाणी तुंबते. त्यामुळे सध्या महानगरपालिकेकडून वांद्रे पश्चिम परिसरात नालेसफाईचे काम जोरात सुरु आहे. नाल्यामधील गाळ उपसून काढण्यासाठी सफाई कामगारांना नाल्यात उतरवण्यात आले आहे. या सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी पालिकेने सुरक्षा उपकरणे विकत घेतली आहेत. मात्र, तरीही हे सफाई कामगार कोणत्याही सुरक्षेविनाच नाल्यात उतरताना दिसत आहेत. पालिकेची सुरक्षा उपकरणे (protective gear) परिधान करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही सुरक्षेशिवायच नाल्यात उतरत असल्याचे या सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुंबईत दरवर्षी मॅनहोल साफ करताना किंवा पुरेशा सुरक्षेअभावी अनेक सफाई कामगारांना जीव गमवावा लागतो. आजपर्यंत यावर अनेकदा आवाज उठवण्यात आला, काही प्रकरणे न्यायालयात जाऊन सफाई कामगारांना नुकसान भरपाईही मिळाली. मात्र, त्यानंतरही मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांच्या अवस्थेत तसूभरही फरक पडलेला नाही. |
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! शिरपूरःप्रतिनिधीःडाॕ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त प्रबोधन स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्याल पळासनेर येथे कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रतिमापूजन विद्यार्थ्याच्या हातुन करण्यात आले. सदर कार्यक्रमात पांडुरंग कोळी व भटू पवार समतादूत शिरपुर यांनी स्वामी विवेकानंद यांचे युवकांविषयी चे मत मांडले. व माँ साहेब जिजाऊ यांचे विचार व त्यांच्या कार्येविषयी माहीती देण्यात आली. शिक्षकांनी देखील अतिशय सुंदर मत मांडले. सदर कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादकः श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) याची सदस्यत्व घ्याः टिप्पणी पोस्ट करा (Atom) |
नागपूर : शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता प्रथम सत्राच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. मात्र, अद्यापही सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातील वसतिगृहामध्ये प्रवेश सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अर्धे सत्र संपूनही प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची अद्यापही गुणवत्तेनुसार प्रवेश यादीच जाहीर न झाल्याने प्रवेश नेमके कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने राज्यातील जवळपास ४५० वसतिगृहे सुरू आहेत. येथे ५० हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे आठवीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत प्रवेश दिला जातो. यासाठी राज्यातील हजारो विद्यार्थी जिल्हा समाज कल्याण विभाग व उपायुक्त कार्यालयात अर्ज करतात. येथे अनुसूचित जातीसह इतर वर्गानाही प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील प्रवेशासाठी जून महिन्यापासून अर्ज केले आहेत. मात्र, आता नोव्हेंबर संपायला आला असतानाही अद्याप वसतिगृह प्रवेशाची यादी जाहीर झालेली नाही. प्रवेश यादीअभावी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश करता येत नाही. यंदा शैक्षणिक वर्ष हे जुलै ते ऑगस्टपासून सुरू झाले. पदवी व पदव्युत्तरच्या अनेक अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा या डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्षांतील पहिले सत्र संपत आले असतानाही वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समाज कल्याण विभागाला यासंदर्भात विचारणा केली असता डिसेंबर महिन्यात प्रवेशाची यादी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, प्रवेशासाठी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक भरुदड . . वसतिगृहामध्ये निवास, भोजन, मासिक विद्यावेतन आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च अशा सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळे दारिद्रय़रेषेखालील आर्थिक दुर्बल विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशाला प्राधान्य देतात. वसतिगृहात प्रवेश मिळेल या आशेवरच विद्यार्थी शहराच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू होऊन सहा महिने झाले तरीही वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.